मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिशा, वाट अन् `वाट'

आपला अभिजित ·

प्राजु Sun, 02/10/2008 - 01:44
चांगलं आहे विडंबन. मुळ कविताच मला इतकी नाही भावली. पण तुमचं विडंबन चांगलं आहे... - प्राजु.

प्राजु Sun, 02/10/2008 - 01:44
चांगलं आहे विडंबन. मुळ कविताच मला इतकी नाही भावली. पण तुमचं विडंबन चांगलं आहे... - प्राजु.
लेखनविषय:
बिनचेहर्‍याच्या अफाट शहरात होता मला एक जीवलग मित्र जणू हरवलेल्या माणसांमधलं माझं रंगभरलं हिरवं चित्र तो मला आवडायचा अन मीही, त्याला आवडायचो फार चर्चा, मस्करी, थट्टेला पूर यायचा अपार... पण हळूहळू दिवस सरले... पाहता पाहता वर्षही सरलं... माझ्या मित्राचं मी तोंडही नाही पाहिलं हे तेव्हा कुठे मला आठवलं! आम्ही आता नव्हतो नवथर पोरं कालची कसल्याशा ओझ्यांनी होती पाठ आमची वाकली नाव, पैसा आणि प्रतिष्ठा यांचा होता खेळ खेळता खेळता नुरला मित्रासाठी वेळ...

"जनरल मोटर्स" विरूध्द " मायक्रोसॉफ्ट "

छोटा डॉन ·

चतुरंग Sat, 02/09/2008 - 22:04
हसून हसून खल्लास! एक विनोद - न्यूयॉर्कमधे एकदा एक हेलिकॉप्टर दाट धुक्यात सापडते. त्यांना उतरण्यासाठी हेलीपॅड दिसत नसते. बर्‍याच वेळ ते एका मोठ्या बिल्डिंगच्या भोवती घिरट्या घालत असतात. त्या बिल्डिंगमधले लोक खिडकीतून बघायला लागतात. शेवटी हेलिकॉप्टरमधला एक जण मोठ्या पेपरवर एक मेसेज लिहितो आणि त्या लोकांना दाखवतो - "WHERE ARE WE?" थोड्याच वेळात खिडकीत मेसेज झळकतो - "YOU ARE IN A HELICOPTER!" चालक ताबडतोब हेलिकॉप्टर योग्य जागी नेऊन उतरवतो. दुसरा माणूस त्याला विचारतो अरे अचानक तुला कसे समजले की हेलीपॅड कुठे आहे ते. चालक म्हणतो सोप्पं आहे - "YOU ARE IN A HELICOPTER!" असा तांत्रिक दृष्ट्या अचून पण अत्यंत निरुपयोगी 'मठ्ठ' मेसेज फक्त मायक्रोसॉफ्टचा इंजीनियरच देऊ शकतो! त्यामुळे मला लगेच आपलं लोकेशन लक्षात आलं आणि मी उतरलो! चतुरंग

प्राजु Sun, 02/10/2008 - 01:19
खूप च हसले... 6. The oil, water temperature, and alternator warning lights would all be replaced by a single "This Car Has Performed an Illegal Operation"warning light. 7. The airbag system would ask "Are you sure?" before deploying. एकदम मज्जा आली.. - प्राजु

"चालक म्हणतो सोप्पं आहे - "YOU ARE IN A HELICOPTER!" असा तांत्रिक दृष्ट्या अचून पण अत्यंत निरुपयोगी 'मठ्ठ' मेसेज फक्त मायक्रोसॉफ्टचा इंजीनियरच देऊ शकतो!" सहीच. पुण्याचे पेशवे

वरदा Wed, 02/13/2008 - 01:22
The airbag system would ask "Are you sure?" before deploying. झकास आहे एकदम. ह. ह. पु. वा.

चतुरंग Sat, 02/09/2008 - 22:04
हसून हसून खल्लास! एक विनोद - न्यूयॉर्कमधे एकदा एक हेलिकॉप्टर दाट धुक्यात सापडते. त्यांना उतरण्यासाठी हेलीपॅड दिसत नसते. बर्‍याच वेळ ते एका मोठ्या बिल्डिंगच्या भोवती घिरट्या घालत असतात. त्या बिल्डिंगमधले लोक खिडकीतून बघायला लागतात. शेवटी हेलिकॉप्टरमधला एक जण मोठ्या पेपरवर एक मेसेज लिहितो आणि त्या लोकांना दाखवतो - "WHERE ARE WE?" थोड्याच वेळात खिडकीत मेसेज झळकतो - "YOU ARE IN A HELICOPTER!" चालक ताबडतोब हेलिकॉप्टर योग्य जागी नेऊन उतरवतो. दुसरा माणूस त्याला विचारतो अरे अचानक तुला कसे समजले की हेलीपॅड कुठे आहे ते. चालक म्हणतो सोप्पं आहे - "YOU ARE IN A HELICOPTER!" असा तांत्रिक दृष्ट्या अचून पण अत्यंत निरुपयोगी 'मठ्ठ' मेसेज फक्त मायक्रोसॉफ्टचा इंजीनियरच देऊ शकतो! त्यामुळे मला लगेच आपलं लोकेशन लक्षात आलं आणि मी उतरलो! चतुरंग

प्राजु Sun, 02/10/2008 - 01:19
खूप च हसले... 6. The oil, water temperature, and alternator warning lights would all be replaced by a single "This Car Has Performed an Illegal Operation"warning light. 7. The airbag system would ask "Are you sure?" before deploying. एकदम मज्जा आली.. - प्राजु

"चालक म्हणतो सोप्पं आहे - "YOU ARE IN A HELICOPTER!" असा तांत्रिक दृष्ट्या अचून पण अत्यंत निरुपयोगी 'मठ्ठ' मेसेज फक्त मायक्रोसॉफ्टचा इंजीनियरच देऊ शकतो!" सहीच. पुण्याचे पेशवे

वरदा Wed, 02/13/2008 - 01:22
The airbag system would ask "Are you sure?" before deploying. झकास आहे एकदम. ह. ह. पु. वा.
पुढे ढकललेल्या "विरोपातून " आलेला एक मस्त 'मेल' देत आहे. मुळात तो "इंग्लिश" मध्ये आहे पण त्यातील "तांत्रिक बाबींना पर्यायी मराठी शब्द" मला माहीत नसल्याने मुळ ऊतारा आहे तसा इंग्रजी मधून देत आहे.... At a recent computer expo (COMDEX), Bill Gates reportedly compared the computer industry with the auto industry and stated, "If GM had kept up with technology like the computer industry has, we would all be driving $25.00 cars that got 1,000 miles to the gallon." In response to Bill's comments, General Motors issued a press release Stat

परीचे पशुधन

धनंजय ·

ऋषिकेश Sat, 02/09/2008 - 10:10
हि दोन्ही पद्ये खूप खूप आवडली... :)) एकदम मस्त!!! शब्द इतके सहज, नादमय, सोपे आहेत की लगेच तोंडात बसतात :) पुलेशु -ऋषि़केश

विसोबा खेचर Sat, 02/09/2008 - 11:01
शिंगे मऊमऊ म्हणून काय धोक्याचे तिच्या पोटातले पाय हा हा हा! मस्तच... :) तात्या.

प्राजु Sun, 02/10/2008 - 00:43
परीच्या पागांत बंदुकीचा घोडा बाबड्याला लागतो खुराक थोडा लगाम न लागे, कधी न ओढा उधळे तेव्हा, कधी न झोडा खूपच छान... एकदम छानच. - प्राजु

ऋषिकेश Sat, 02/09/2008 - 10:10
हि दोन्ही पद्ये खूप खूप आवडली... :)) एकदम मस्त!!! शब्द इतके सहज, नादमय, सोपे आहेत की लगेच तोंडात बसतात :) पुलेशु -ऋषि़केश

विसोबा खेचर Sat, 02/09/2008 - 11:01
शिंगे मऊमऊ म्हणून काय धोक्याचे तिच्या पोटातले पाय हा हा हा! मस्तच... :) तात्या.

प्राजु Sun, 02/10/2008 - 00:43
परीच्या पागांत बंदुकीचा घोडा बाबड्याला लागतो खुराक थोडा लगाम न लागे, कधी न ओढा उधळे तेव्हा, कधी न झोडा खूपच छान... एकदम छानच. - प्राजु
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
परीचे पशुधन ***************** परीच्या गोठ्यात गोगलगाय तिच्या दुधाची चंदेरी साय शिंगे मऊमऊ म्हणून काय धोक्याचे तिच्या पोटातले पाय *** परीच्या छतातलं चिमणीचं घरटं लखलख काचेचं चकचक करतं चिमणीच्या चालतो आराम मस्त गरजेच्या वेळी तेलच नसतं *** परीच्या पागांत बंदुकीचा घोडा बाबड्याला लागतो खुराक थोडा लगाम न लागे, कधी न ओढा उधळे तेव्हा, कधी न झोडा *** परीच्या झाडावर पराचा कावळा नका रे समजू कावळ्याला बावळा कोकलतो कोहळा असल्यास आवळा मागून माजतो गोंधळ सावळा *****************

महामानवाला प्रणाम!

विसोबा खेचर ·

प्राजु Sat, 02/09/2008 - 09:25
आनंदवनच्या रुपाने बाबा आमटे ही संस्था कायमस्वरुपीच आपल्यापाशी राहील! निघून गेली आहे ती फक्त व्यक्ती! अगदी मनातलं बोललात तात्या.. कोटी कोटी प्रणाम बाबांना..! - प्राजु

भडकमकर मास्तर Sat, 02/09/2008 - 10:04
आमचीही आदरांजली... अवांतर : आत्ता जालावर आल्यावर कळले...आज सकाळच्या वर्तमानपत्रांत दिसली नाही बातमी... ते आज पहाटे गेले का?

झकासराव Sat, 02/09/2008 - 12:11
असताना एकदा आनंवनात जावुन त्यांच्यासोबत ताडोबा फिरण्याची एक वेडी इच्छा आणि आशा होती मनात. ती राहुनच गेली की. :( बाबा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. अमर आणि चिरंजिव झालात तुम्ही तुमच्या अफाट कार्यातुन.

पिवळा डांबिस Sat, 02/09/2008 - 16:35
कालच एका निराळ्या संदर्भात त्यांच्या काव्यपंक्ति 'क्वोट' केल्या आणि आज ही अशुभ बातमी समजली. :( बाबांच्या स्म्रूतींना सहस्र प्रणाम! दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती. (शोकाकुल) पिवळा डांबिस

चतुरंग Sat, 02/09/2008 - 21:37
त्यांना साश्रु नयनांनी श्रद्धांजली. कुष्ठे झडता अंगहि सगळे वाळित पडता 'माणुस' तो, त्याला उचलुन घेउन सदनी महामानव हा येइ जो, अविचल निष्ठा, अथक श्रमांनी करे 'साधना', मुनीच तो, 'वनीआनंदी' स्मृति ह्या ठेवुनी वैकुंठाला जातो तो. चतुरंग

डॉ.प्रसाद दाढे Sat, 02/09/2008 - 22:53
महामानव बाबा आमटे या॑चे आज पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. बाबा॑ची मृत्युशी शेवटची झु॑ज स॑पली. आत्ता पर्य॑त बाबा॑नी यमदूता॑ना किती तरी वेळा हसत हसत परतवून लावले होते..लग्नाच्या वेळी, वरोर्‍याच्या ज॑गलात, ऑपरेशन टेबलवर (हे तर कित्येकदा..). कितीही स॑कटे उभी राहिली तरी निर्धाराने इप्सित साध्य करणार्‍या बाबा॑ना साक्षात मृत्युनेही कुर्निसात केला असेल..

सर्किट Mon, 02/11/2008 - 12:53
शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही... - सर्किट

मानस Mon, 02/11/2008 - 23:56
महामानव श्री. बाबा आमटे ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली कुसूमाग्रजांची "संत" ही कविता येथे देत आहे. “साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा” आज आहे महोत्सव माझ्या शब्दांचा उसासले आहेत माझ्या निरर्थक नभावर सहस्त्रावधी वारकरी नेत्र तुला पाहण्यासाठी माझ्या घराच्या एकलकोंड्या कौलारावर बसले आहेत निळ्या पाखरांचे थवे तुझ्या वाटेवरची धूळ आपल्या पंखांवर वाहण्यासाठी. आकाशाचं मन कळत नाही वारा होऊन मुक्त झाल्याशिवाय प्रकाशाच्या देवळात शिरता येत नाही दिवा होऊन भक्त झाल्याशिवाय म्हणून थोडं वारेपण - थोडं दिवेपण - उचललं आहे माझ्या जिराईत अक्षरांनी तुझ्याच मेघशील जीवनातून तुझ्याच स्वागताच्या कमानीवर तोरण लावण्यासाठी. लोहाराच्या भट्टीतील एखादी कलंदर ठिणगी झेप घेते आकाशात हरवलेपणानं काळाच्या परमाणूत का होईना पण बारीकसा सूर्य होण्यासाठी क्षणभर दिमाखानं जळण्यासाठी नंतर अनंत काल संकोचाशिवाय विझण्यासाठी. तसंच आहे माझ्या शब्दांचं क्षणाला माखलेलं हे मोठेपण. तसं पाहिलं तर कोण तू आणि कोण मी? कोसांच्या नव्हे तर जगांच्या अंतराने विभागलेले दोन अनोळखी प्रवासी. आणि तरीही - माझ्या सभोवारच्या चिरेबंद काळोखाला जातात केव्हा तरी तडे आणि त्यातून पाहतो मी स्तंभित होऊन स्वप्नात वितळलेल्या माणसाप्रमाणे तुझ्या प्रकाशमय विश्वातील काही अग्नि-रेषा. अशाच शंभर आभासात पहाट रात्रीच्या नि:शब्दातून मी पाहिले आहे तुझे शिल्पचित्र तीनशे मैलांवरूनही. सोमनाथच्या सूर्यद्रोही जंगलात पृथ्वीच्या गर्भात पाय खोचणार्या विराट वृक्षावर अपराजित कुर्हारड मारणारा तू सर्जन डॉक्टरांच्या सभागृहात डोंगराच्या सुळक्यासारखा उभा राहून माझ्या देहात महारोगाची लस घाला म्हणून आव्हान फेकणारा तू - श्वापदांच्या समूहात सिंहाचा स्वर होणारा सर्पांच्या प्रदेशात गरुडाचं घर होणारा वणव्याच्या समोर घनघोर पाऊस होणारा दु:खाच्या समोर फक्त निभेर्ळ माणूस होणारा दुबळ्या दयेच्या चिखलातून माणुसकीला बाहेर काढणारा तू - पृथ्वीवरच्या व्यवहारात ईश्वराचा हात माणसांपर्यंत पोचवणारा तू - अरे आम्ही आहोत असे करंटे की आमच्या पेठेत लागतात पताका फक्त मंत्री आले तर - सोनेरी अंबारीचे ऐरावत जेव्हा रस्त्याने झुलू लागतात तेव्हा आमचे लाचार हिशेबी हात जुळून येतात छातीवर - आमच्या गळ्यातले कोमल गांधार जातात निषादाच्या तीव्र पट्टीवर त्याचा जयजयकार करण्याकरता. आणि तुझ्यासारखे संत ऐहिकाच्या प्रपंचातील ईश्वरी अंशाचे रखवालदार निघून जातात गस्त घालीत अंधारात, उद्ध्वस्त मनाच्या मोहल्ल्यातून आसवांच्या दलदलीतून दु:खानं उसवलेल्या दुनियेवर अमृताचं सिंचन करीत. आणि दोन शतकं गेल्यानंतर शोधू लागतो आम्ही वाळवंटावर तुमच्या पायखुणा, आम्ही होतो मशालजी आणि टाळकरी तुमच्या मखमली पालख्यांचे तुमच्या मेलेल्या मतांचे, आम्ही होतो मतवाले शूर शिपाई संरक्षण करण्यासाठी मातीत मिसळलेल्या तुमच्या प्रेतांचे. हे महामानवा, आम्ही देणार आहोत तुला फक्त फावल्या वेळातला नमस्कार - एखादा गुच्छ एखादा हार - तीस पायांवर सरपटणार्याा कॅलेंडरातील एखादा शनिवार, रिकामा रविवार. पण तरीही - त्यातल्याच एका साक्षात्कारी क्षणाला आम्हाला कळतं - आज सारा संसार उभा आहे क्रांतीच्या दाराशी जुने पडते आहे नवे घडते आहे काळाच्या स्मशानातून उठलेली भुतावळ जमिनीवरती जटा आपटीत रडते आहे रक्तबंबाळ होऊन. मातीतून उठत आहेत गर्जना करीत लक्षावधी प्रचंड आकार पोलादाच्या कारखान्यातील जळत्या राक्षसी तुळयांसारखे तांबडेलाल, काही तोडण्यासाठी काही जोडण्यासाठी. या ऐतिहासिक हलकल्लोळात सनातन आणि अजिंक्य आहे ते फक्त तुझ्यासारख्याचं हात उभारून काळाच्या किनार्या वरून धावणारं संग्रामशील माणूसपण. '' तुम्ही जाता तुमच्या गावा अमुचा रामराम घ्यावा.'' हे यात्रिका, विस्कटलेल्या शरीरांचा चुरगळलेल्या आत्म्यांचा जथा घेऊन तू तुझ्या मार्गानं जा मागे वळून पाहू नकोस जो हिशेब कधी केला नव्हतास तो यापुढेही कधी करू नकोस. तुला साथसोबत आम्ही करणार नाही आमच्या दिवाणखानी दिव्यांचा प्रकाश तुझ्या रात्रीवर पडणार नाही तुझ्या अलौकिक वेदनेसाठी आम्ही रडणार नाही आमच्या जयघोषांच्या जमावातही तू राहणार आहेस एकटा दक्षिण ध्रुवावरील बर्फासारखा अगदी एकटा. पण असेच एकाकीपण लाभले होते ख्रिस्ताला ज्याच्या हाताचा ठसा मला दिसतो आहे तुझ्या हातावर असेच एकाकीपण लाभले होते बुद्धाला ज्याच्या प्रज्ञेचे किरण मला दिसताहेत तुझ्या पथावर हीच तुझी सोबत आणि हेच तुझे संरक्षण... '' जेथे जाशी तेथे - तो तुझा सांगाती चालवील हाती - धरोनिया.''

प्राजु Sat, 02/09/2008 - 09:25
आनंदवनच्या रुपाने बाबा आमटे ही संस्था कायमस्वरुपीच आपल्यापाशी राहील! निघून गेली आहे ती फक्त व्यक्ती! अगदी मनातलं बोललात तात्या.. कोटी कोटी प्रणाम बाबांना..! - प्राजु

भडकमकर मास्तर Sat, 02/09/2008 - 10:04
आमचीही आदरांजली... अवांतर : आत्ता जालावर आल्यावर कळले...आज सकाळच्या वर्तमानपत्रांत दिसली नाही बातमी... ते आज पहाटे गेले का?

झकासराव Sat, 02/09/2008 - 12:11
असताना एकदा आनंवनात जावुन त्यांच्यासोबत ताडोबा फिरण्याची एक वेडी इच्छा आणि आशा होती मनात. ती राहुनच गेली की. :( बाबा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. अमर आणि चिरंजिव झालात तुम्ही तुमच्या अफाट कार्यातुन.

पिवळा डांबिस Sat, 02/09/2008 - 16:35
कालच एका निराळ्या संदर्भात त्यांच्या काव्यपंक्ति 'क्वोट' केल्या आणि आज ही अशुभ बातमी समजली. :( बाबांच्या स्म्रूतींना सहस्र प्रणाम! दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती. (शोकाकुल) पिवळा डांबिस

चतुरंग Sat, 02/09/2008 - 21:37
त्यांना साश्रु नयनांनी श्रद्धांजली. कुष्ठे झडता अंगहि सगळे वाळित पडता 'माणुस' तो, त्याला उचलुन घेउन सदनी महामानव हा येइ जो, अविचल निष्ठा, अथक श्रमांनी करे 'साधना', मुनीच तो, 'वनीआनंदी' स्मृति ह्या ठेवुनी वैकुंठाला जातो तो. चतुरंग

डॉ.प्रसाद दाढे Sat, 02/09/2008 - 22:53
महामानव बाबा आमटे या॑चे आज पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. बाबा॑ची मृत्युशी शेवटची झु॑ज स॑पली. आत्ता पर्य॑त बाबा॑नी यमदूता॑ना किती तरी वेळा हसत हसत परतवून लावले होते..लग्नाच्या वेळी, वरोर्‍याच्या ज॑गलात, ऑपरेशन टेबलवर (हे तर कित्येकदा..). कितीही स॑कटे उभी राहिली तरी निर्धाराने इप्सित साध्य करणार्‍या बाबा॑ना साक्षात मृत्युनेही कुर्निसात केला असेल..

सर्किट Mon, 02/11/2008 - 12:53
शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही... - सर्किट

मानस Mon, 02/11/2008 - 23:56
महामानव श्री. बाबा आमटे ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली कुसूमाग्रजांची "संत" ही कविता येथे देत आहे. “साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा” आज आहे महोत्सव माझ्या शब्दांचा उसासले आहेत माझ्या निरर्थक नभावर सहस्त्रावधी वारकरी नेत्र तुला पाहण्यासाठी माझ्या घराच्या एकलकोंड्या कौलारावर बसले आहेत निळ्या पाखरांचे थवे तुझ्या वाटेवरची धूळ आपल्या पंखांवर वाहण्यासाठी. आकाशाचं मन कळत नाही वारा होऊन मुक्त झाल्याशिवाय प्रकाशाच्या देवळात शिरता येत नाही दिवा होऊन भक्त झाल्याशिवाय म्हणून थोडं वारेपण - थोडं दिवेपण - उचललं आहे माझ्या जिराईत अक्षरांनी तुझ्याच मेघशील जीवनातून तुझ्याच स्वागताच्या कमानीवर तोरण लावण्यासाठी. लोहाराच्या भट्टीतील एखादी कलंदर ठिणगी झेप घेते आकाशात हरवलेपणानं काळाच्या परमाणूत का होईना पण बारीकसा सूर्य होण्यासाठी क्षणभर दिमाखानं जळण्यासाठी नंतर अनंत काल संकोचाशिवाय विझण्यासाठी. तसंच आहे माझ्या शब्दांचं क्षणाला माखलेलं हे मोठेपण. तसं पाहिलं तर कोण तू आणि कोण मी? कोसांच्या नव्हे तर जगांच्या अंतराने विभागलेले दोन अनोळखी प्रवासी. आणि तरीही - माझ्या सभोवारच्या चिरेबंद काळोखाला जातात केव्हा तरी तडे आणि त्यातून पाहतो मी स्तंभित होऊन स्वप्नात वितळलेल्या माणसाप्रमाणे तुझ्या प्रकाशमय विश्वातील काही अग्नि-रेषा. अशाच शंभर आभासात पहाट रात्रीच्या नि:शब्दातून मी पाहिले आहे तुझे शिल्पचित्र तीनशे मैलांवरूनही. सोमनाथच्या सूर्यद्रोही जंगलात पृथ्वीच्या गर्भात पाय खोचणार्या विराट वृक्षावर अपराजित कुर्हारड मारणारा तू सर्जन डॉक्टरांच्या सभागृहात डोंगराच्या सुळक्यासारखा उभा राहून माझ्या देहात महारोगाची लस घाला म्हणून आव्हान फेकणारा तू - श्वापदांच्या समूहात सिंहाचा स्वर होणारा सर्पांच्या प्रदेशात गरुडाचं घर होणारा वणव्याच्या समोर घनघोर पाऊस होणारा दु:खाच्या समोर फक्त निभेर्ळ माणूस होणारा दुबळ्या दयेच्या चिखलातून माणुसकीला बाहेर काढणारा तू - पृथ्वीवरच्या व्यवहारात ईश्वराचा हात माणसांपर्यंत पोचवणारा तू - अरे आम्ही आहोत असे करंटे की आमच्या पेठेत लागतात पताका फक्त मंत्री आले तर - सोनेरी अंबारीचे ऐरावत जेव्हा रस्त्याने झुलू लागतात तेव्हा आमचे लाचार हिशेबी हात जुळून येतात छातीवर - आमच्या गळ्यातले कोमल गांधार जातात निषादाच्या तीव्र पट्टीवर त्याचा जयजयकार करण्याकरता. आणि तुझ्यासारखे संत ऐहिकाच्या प्रपंचातील ईश्वरी अंशाचे रखवालदार निघून जातात गस्त घालीत अंधारात, उद्ध्वस्त मनाच्या मोहल्ल्यातून आसवांच्या दलदलीतून दु:खानं उसवलेल्या दुनियेवर अमृताचं सिंचन करीत. आणि दोन शतकं गेल्यानंतर शोधू लागतो आम्ही वाळवंटावर तुमच्या पायखुणा, आम्ही होतो मशालजी आणि टाळकरी तुमच्या मखमली पालख्यांचे तुमच्या मेलेल्या मतांचे, आम्ही होतो मतवाले शूर शिपाई संरक्षण करण्यासाठी मातीत मिसळलेल्या तुमच्या प्रेतांचे. हे महामानवा, आम्ही देणार आहोत तुला फक्त फावल्या वेळातला नमस्कार - एखादा गुच्छ एखादा हार - तीस पायांवर सरपटणार्याा कॅलेंडरातील एखादा शनिवार, रिकामा रविवार. पण तरीही - त्यातल्याच एका साक्षात्कारी क्षणाला आम्हाला कळतं - आज सारा संसार उभा आहे क्रांतीच्या दाराशी जुने पडते आहे नवे घडते आहे काळाच्या स्मशानातून उठलेली भुतावळ जमिनीवरती जटा आपटीत रडते आहे रक्तबंबाळ होऊन. मातीतून उठत आहेत गर्जना करीत लक्षावधी प्रचंड आकार पोलादाच्या कारखान्यातील जळत्या राक्षसी तुळयांसारखे तांबडेलाल, काही तोडण्यासाठी काही जोडण्यासाठी. या ऐतिहासिक हलकल्लोळात सनातन आणि अजिंक्य आहे ते फक्त तुझ्यासारख्याचं हात उभारून काळाच्या किनार्या वरून धावणारं संग्रामशील माणूसपण. '' तुम्ही जाता तुमच्या गावा अमुचा रामराम घ्यावा.'' हे यात्रिका, विस्कटलेल्या शरीरांचा चुरगळलेल्या आत्म्यांचा जथा घेऊन तू तुझ्या मार्गानं जा मागे वळून पाहू नकोस जो हिशेब कधी केला नव्हतास तो यापुढेही कधी करू नकोस. तुला साथसोबत आम्ही करणार नाही आमच्या दिवाणखानी दिव्यांचा प्रकाश तुझ्या रात्रीवर पडणार नाही तुझ्या अलौकिक वेदनेसाठी आम्ही रडणार नाही आमच्या जयघोषांच्या जमावातही तू राहणार आहेस एकटा दक्षिण ध्रुवावरील बर्फासारखा अगदी एकटा. पण असेच एकाकीपण लाभले होते ख्रिस्ताला ज्याच्या हाताचा ठसा मला दिसतो आहे तुझ्या हातावर असेच एकाकीपण लाभले होते बुद्धाला ज्याच्या प्रज्ञेचे किरण मला दिसताहेत तुझ्या पथावर हीच तुझी सोबत आणि हेच तुझे संरक्षण... '' जेथे जाशी तेथे - तो तुझा सांगाती चालवील हाती - धरोनिया.''
लेखनविषय:
लेखनप्रकार
समस्त मिसळपाव परिवारातर्फे बाबा आमटे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र आदरांजली! या महामानवाला आमचे कोटी कोटी प्रणाम! बाबा आमटे ही व्यक्ति नसून एक संस्था होती. व्यक्ति येतात, जातात, परंतु संस्था ही नेहमी कायमस्वरुपी असते/असावी! आनंदवनच्या रुपाने बाबा आमटे ही संस्था कायमस्वरुपीच आपल्यापाशी राहील! निघून गेली आहे ती फक्त व्यक्ती! (नतमस्तक) तात्या.

शेजारचे जातियवाद व राजकारण

सतीश वळीव ·

ऋषिकेश Sat, 02/09/2008 - 02:46
सर्वप्रथम या मिपाच्या कट्ट्यावर आपले स्वागत!..
मला खुप काही संगायचे आहे पन शब्दांत सागुं शकत नाही.
या स्थळावर येत रहा . इथे खूप दिलदार मंडळी आहेत. या दिलखुलास स्थळाने मनात कोणाविषयी दुराग्रह/तेढ बाळगून होणारे वर्तन/लेखन होऊ दिलेले नाहि तेव्हा इथे आपले विचार खुशाल प्रकट करावेत. इथे इतरांच्याही लिखाणाचा आस्वाद घ्या आणि तुमचेही विचार बोलून दाखवा ... बोले तो बिंदास!! ;) -ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

विसोबा खेचर Sat, 02/09/2008 - 11:38
म्हणतो..! सतीशरावांचे मिपावर मनापासून स्वागत! आजपासून सतीशराव मिपाचे आहेत, मिपा सतीशरावांचं आहे... बरं का सतीशराव, जातीपातींचे जात, पोटजात, उपजात आणि कुठली कुठली जात असे अनेक प्रकार आहेत, त्याचप्रमाणे धर्मही अनेक आहेत. परंतु आपल्या मिसळपाव या संस्थळापुरतं बोलायचं झालं तर इथे येणार्‍यांची फक्त आणि फक्त "मिसळपाव" ही एकच जात आणि "मिसळपाव" हा एकच धर्म आहे/ असावा असाच मिसळपावचा आग्रह आहे! सतीशराव, आपण मागासवर्गीय आहात, की उच्चवर्गीय आहात की आणखी कुठले वर्गीय आहात याच्याशी मिसळपावला काहीही देणेघेणे नाही! हां, परंतु जर का आपल्याला मिसळपाव हा पदार्थ आवडत नसेल आणि जर आपलं या पदार्थावर प्रेम नसेल तर मात्र आपल्या येथील सभासदत्वाबद्दल मिसळपावला फेरविचार करावा लागेल! :)) (ह घ्या!) आपला, (जातीने मिसळपावप्रेमी आणि धर्माने मिसळपावधर्मी !) संत तात्याबा महाराज, संस्थापक - मिसळपावधर्म! -- मिसळपाव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा! :) तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे | तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे ! :)

आपल्या वेदना वाचून दःख झाले. आपण शहरी भागात राहता का ग्रामीण भागात? शहरी भागात सध्यातरी जातीयता कमी आहे असे मी मानतो. तरी आपण धीर सोडला नाहीत हे वाचून आनंद वाटला. देव तुम्हाला या ही परीस्थितीतून नक्की बाहेर काढेल. -आशावादी. पुण्याचे पेशवे

पिवळा डांबिस Sat, 02/09/2008 - 03:31
प्रिय सतीशराव, सर्वात आधी तुम्ही मनमोकळे लिहील्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन!! जातीयवादाची समस्या उग्र आहे हे तर सत्यच आहे. त्यापायी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना होणारया त्रासाबद्दल अत्यंत खेद होतो. अश्या वेळी मला ह्या सर्व गोष्टी मुळे प्रामाणिकपना व सरळ साधेपना व दुसर्‍यास उपयोगी पडने हे सर्व थांबउका असे वाटते. पन आजुन सहनशक्ती मजबुत आहे. देव हे सर्व पाहत आहे. मला एकमात्र माहीत आहे की जो कोनी चांगले वागतो त्याचे त्याला चांगलेच फळ मीळनार. तुम्ही म्हणता ते पूर्णपणे खरे आहे. पण तुम्ही जर तुमचा चांगुलपणा सोडून दिलात तर तो तुम्हाला कमी लेखणारयांचा विजय नाही का? तुम्ही तुमचे प्रयत्न चालूच ठेवावे अशी तुम्हाला विनंती आहे. सतत प्रयत्न करणारयाची प्रगती कोणीच रोखू शकत नाही. "जाको राखे साईंया, मार सके ना कोय!" आणखी एक, तुम्ही मागासवर्गीय असल्याबद्द्ल मुळीच न्यूनगंड मनात बाळगू नये. माणसाची लायकी त्याच्या जन्मावर अवलंबून नसते. तुकोबांनी म्हटलंच आहे, "बरे झाले कुणबी केलो, नाहितर दंभेची असतो मेलो" तुकोबांना तथाकथित उच्चवर्णियांनी काय कमी त्रास दिला? पण आज तीनशे वर्षे झाली, तुकोबा माहित नसलेला मराठी माणूस सापडणार नाही, आणि त्यांना त्रास देणारयांची नांवेही राहिली नाहीत. बाबा आमट्यांनी म्हटल्याप्रमाणे, "सत्ता असते महंतांची, नांवे राहतात ती संतांची, पण महंत फक्त गादी चालवू शकतात, मन्वंतरे घडवून आणू शकत नाहीत" तुमचे विचार निर्भीडपणे मांडत रहा. आपला स्नेहाभिलाषी, पिवळा डांबिस

चतुरंग Sat, 02/09/2008 - 04:15
आपले अनुभव वाचून दु:ख झाले पण आपली आणि आपल्या कुटुंबियांची वेदना खरी आहे. आपल्या समाजाचा हा रोग आपल्या सर्वांच्या प्रयत्नानेच एक दिवस जाईल. "मिसळपाव"च्या ह्या कट्टयावर जगातल्या अनेक देशातून लोक मनमोकळ्या गप्पा मारायला इथे येतात. सगळ्यांची इथली भाषा "मराठी" आणि जात एकच "मिसळपाववाले भारतीय!" "चांगले वागणे सोडू का? मदत करणे थांबवू का?" असे तुम्ही विचारता आहात - तसे करु नका कारण तीच तुमच्या मनाची शक्ती आहे - पण फसवणार्‍या माणसांशी, तुमची मदत घेऊन तुम्हालाच खेचणार्‍याशी सावधपणेच वागा, नाहीतर तुमचा गैरफायदा घेतला जाईल, असे सांगावेसे वाटते. तेव्हा असेच या, लिहीत रहा, वाचत रहा. पुन्हा एकदा आपले स्वागत! चतुरंग

सतीशराव, आपले इथे स्वागत आहे, आपले लेखन या संस्थळावर वाचायला आम्हाला आवडेल. बाकी आपला अनुभव वाचला, वाईटच वाटले.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु Sun, 02/10/2008 - 01:13
बघा बरं.. इथे किती लोक आहेत तुम्हाला आपलं मानणारे..! तुम्ही हे जातियवाद... सगळं डोक्यातून काढोन टाका. इथे या गप्पाटप्पा करा.. तुमचे विचार मांडा, इतरांचे ऐका. मिसळीवर ताव मारा.. बाकी सगळं विसरून जा. - प्राजु

सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 20:24
इथे येणार्‍यांची फक्त आणि फक्त "मिसळपाव" ही एकच जात आणि "मिसळपाव" हा एकच धर्म आहे/ असावा असाच मिसळपावचा आग्रह आहे! सतीशराव, आपण मागासवर्गीय आहात, की उच्चवर्गीय आहात की आणखी कुठले वर्गीय आहात याच्याशी मिसळपावला काहीही देणेघेणे नाही! असे म्हणणे आहे. एक काम करा. जगातील सगळे धर्म, जाती, उपजाती, पोटजाती एकत्र करा आणि यंदा होळीत जाळा. तेवढा धीर नसेल तर मस्त थंडी पडली आहे. शेकोटी पेटवा व त्यात जाळा. मी ते लहानणीच जाळले.

ऋषिकेश Sat, 02/09/2008 - 02:46
सर्वप्रथम या मिपाच्या कट्ट्यावर आपले स्वागत!..
मला खुप काही संगायचे आहे पन शब्दांत सागुं शकत नाही.
या स्थळावर येत रहा . इथे खूप दिलदार मंडळी आहेत. या दिलखुलास स्थळाने मनात कोणाविषयी दुराग्रह/तेढ बाळगून होणारे वर्तन/लेखन होऊ दिलेले नाहि तेव्हा इथे आपले विचार खुशाल प्रकट करावेत. इथे इतरांच्याही लिखाणाचा आस्वाद घ्या आणि तुमचेही विचार बोलून दाखवा ... बोले तो बिंदास!! ;) -ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

विसोबा खेचर Sat, 02/09/2008 - 11:38
म्हणतो..! सतीशरावांचे मिपावर मनापासून स्वागत! आजपासून सतीशराव मिपाचे आहेत, मिपा सतीशरावांचं आहे... बरं का सतीशराव, जातीपातींचे जात, पोटजात, उपजात आणि कुठली कुठली जात असे अनेक प्रकार आहेत, त्याचप्रमाणे धर्मही अनेक आहेत. परंतु आपल्या मिसळपाव या संस्थळापुरतं बोलायचं झालं तर इथे येणार्‍यांची फक्त आणि फक्त "मिसळपाव" ही एकच जात आणि "मिसळपाव" हा एकच धर्म आहे/ असावा असाच मिसळपावचा आग्रह आहे! सतीशराव, आपण मागासवर्गीय आहात, की उच्चवर्गीय आहात की आणखी कुठले वर्गीय आहात याच्याशी मिसळपावला काहीही देणेघेणे नाही! हां, परंतु जर का आपल्याला मिसळपाव हा पदार्थ आवडत नसेल आणि जर आपलं या पदार्थावर प्रेम नसेल तर मात्र आपल्या येथील सभासदत्वाबद्दल मिसळपावला फेरविचार करावा लागेल! :)) (ह घ्या!) आपला, (जातीने मिसळपावप्रेमी आणि धर्माने मिसळपावधर्मी !) संत तात्याबा महाराज, संस्थापक - मिसळपावधर्म! -- मिसळपाव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा! :) तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे | तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे ! :)

आपल्या वेदना वाचून दःख झाले. आपण शहरी भागात राहता का ग्रामीण भागात? शहरी भागात सध्यातरी जातीयता कमी आहे असे मी मानतो. तरी आपण धीर सोडला नाहीत हे वाचून आनंद वाटला. देव तुम्हाला या ही परीस्थितीतून नक्की बाहेर काढेल. -आशावादी. पुण्याचे पेशवे

पिवळा डांबिस Sat, 02/09/2008 - 03:31
प्रिय सतीशराव, सर्वात आधी तुम्ही मनमोकळे लिहील्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन!! जातीयवादाची समस्या उग्र आहे हे तर सत्यच आहे. त्यापायी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना होणारया त्रासाबद्दल अत्यंत खेद होतो. अश्या वेळी मला ह्या सर्व गोष्टी मुळे प्रामाणिकपना व सरळ साधेपना व दुसर्‍यास उपयोगी पडने हे सर्व थांबउका असे वाटते. पन आजुन सहनशक्ती मजबुत आहे. देव हे सर्व पाहत आहे. मला एकमात्र माहीत आहे की जो कोनी चांगले वागतो त्याचे त्याला चांगलेच फळ मीळनार. तुम्ही म्हणता ते पूर्णपणे खरे आहे. पण तुम्ही जर तुमचा चांगुलपणा सोडून दिलात तर तो तुम्हाला कमी लेखणारयांचा विजय नाही का? तुम्ही तुमचे प्रयत्न चालूच ठेवावे अशी तुम्हाला विनंती आहे. सतत प्रयत्न करणारयाची प्रगती कोणीच रोखू शकत नाही. "जाको राखे साईंया, मार सके ना कोय!" आणखी एक, तुम्ही मागासवर्गीय असल्याबद्द्ल मुळीच न्यूनगंड मनात बाळगू नये. माणसाची लायकी त्याच्या जन्मावर अवलंबून नसते. तुकोबांनी म्हटलंच आहे, "बरे झाले कुणबी केलो, नाहितर दंभेची असतो मेलो" तुकोबांना तथाकथित उच्चवर्णियांनी काय कमी त्रास दिला? पण आज तीनशे वर्षे झाली, तुकोबा माहित नसलेला मराठी माणूस सापडणार नाही, आणि त्यांना त्रास देणारयांची नांवेही राहिली नाहीत. बाबा आमट्यांनी म्हटल्याप्रमाणे, "सत्ता असते महंतांची, नांवे राहतात ती संतांची, पण महंत फक्त गादी चालवू शकतात, मन्वंतरे घडवून आणू शकत नाहीत" तुमचे विचार निर्भीडपणे मांडत रहा. आपला स्नेहाभिलाषी, पिवळा डांबिस

चतुरंग Sat, 02/09/2008 - 04:15
आपले अनुभव वाचून दु:ख झाले पण आपली आणि आपल्या कुटुंबियांची वेदना खरी आहे. आपल्या समाजाचा हा रोग आपल्या सर्वांच्या प्रयत्नानेच एक दिवस जाईल. "मिसळपाव"च्या ह्या कट्टयावर जगातल्या अनेक देशातून लोक मनमोकळ्या गप्पा मारायला इथे येतात. सगळ्यांची इथली भाषा "मराठी" आणि जात एकच "मिसळपाववाले भारतीय!" "चांगले वागणे सोडू का? मदत करणे थांबवू का?" असे तुम्ही विचारता आहात - तसे करु नका कारण तीच तुमच्या मनाची शक्ती आहे - पण फसवणार्‍या माणसांशी, तुमची मदत घेऊन तुम्हालाच खेचणार्‍याशी सावधपणेच वागा, नाहीतर तुमचा गैरफायदा घेतला जाईल, असे सांगावेसे वाटते. तेव्हा असेच या, लिहीत रहा, वाचत रहा. पुन्हा एकदा आपले स्वागत! चतुरंग

सतीशराव, आपले इथे स्वागत आहे, आपले लेखन या संस्थळावर वाचायला आम्हाला आवडेल. बाकी आपला अनुभव वाचला, वाईटच वाटले.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु Sun, 02/10/2008 - 01:13
बघा बरं.. इथे किती लोक आहेत तुम्हाला आपलं मानणारे..! तुम्ही हे जातियवाद... सगळं डोक्यातून काढोन टाका. इथे या गप्पाटप्पा करा.. तुमचे विचार मांडा, इतरांचे ऐका. मिसळीवर ताव मारा.. बाकी सगळं विसरून जा. - प्राजु

सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 20:24
इथे येणार्‍यांची फक्त आणि फक्त "मिसळपाव" ही एकच जात आणि "मिसळपाव" हा एकच धर्म आहे/ असावा असाच मिसळपावचा आग्रह आहे! सतीशराव, आपण मागासवर्गीय आहात, की उच्चवर्गीय आहात की आणखी कुठले वर्गीय आहात याच्याशी मिसळपावला काहीही देणेघेणे नाही! असे म्हणणे आहे. एक काम करा. जगातील सगळे धर्म, जाती, उपजाती, पोटजाती एकत्र करा आणि यंदा होळीत जाळा. तेवढा धीर नसेल तर मस्त थंडी पडली आहे. शेकोटी पेटवा व त्यात जाळा. मी ते लहानणीच जाळले.
लेखनविषय:
सध्याच्या युगात जातियवाद व राजकारण आजुनही ज्वलंत समस्या आहे. मी ऐक मध्यम वर्गीय नोकरधार असुन प्रामाणिक व सरळ साधा व दुसर्‍यास उपयोगी पडनारी व्यक्ती आहे. मी मागासवर्गीय असुन शेजारच्या स्त्रीया आमच्या स्त्रीयांच्या बरोबर अंतकरनापासुन व्यवस्तीत वागत नाहीत. हे जहाले स्त्रीयांचे. पुरषांचे कही कमी नाही. इतर कोनत्याही गोष्टीत आडकाठी घालुन आम्हाला खाली खेचतात. अश्या वेळी मला ह्या सर्व गोष्टी मुळे प्रामाणिकपना व सरळ साधेपना व दुसर्‍यास उपयोगी पडने हे सर्व थांबउका असे वाटते. पन आजुन सहनशक्ती मजबुत आहे. देव हे सर्व पाहत आहे. मला एकमात्र माहीत आहे की जो कोनी चांगले वागतो त्याचे त्याला चांगलेच फळ मीळनार.

नांदी बिगरमराठी मुख्यमंत्र्याची ? (मटामधील बातमी)

इनोबा म्हणे ·

धमाल मुलगा Fri, 02/08/2008 - 17:02
वाचून अतिशय आन॑द जाहला... आता आपापली गाठोडी काठीच्या टोकाला बा॑धून मराठी माणसाने "ॐ भवति .." करत फिरायची तयारी सुरू करावी. की छानपैकी काशीयात्रेला निघून तिकडेच ग॑गामाईच्या तिरी टाचा घासून प्राण सोडावेत? ह॑...कदाचित लवकरच यातला योग्य तो उपाय आपले दूरदृष्टीशून्य राजकीय नेते स्वतःच्या बुडाखालची खुर्ची वाचवताना एखादी दळभद्री युती करून आपल्या समोर सादर करतीलच, यात श॑का नसावी. राज ठाकरे॑च्या नावाने गळे काढणार्‍याना योग्य त्या वेळी कळेलच, काय योग्य अन् काय अयोग्य ते. चला म्हणजे आता "मुक्त"राज्याचा टे॑भा फक्त बिहारनेच मिरवायला नको, महाराष्ट्राचाही लवकरच न॑बर लागेल हो !!!. आपला - (भैय्याप्रेमी(?), पराकोटीचा पुरोगामी (यडxx)विचारव॑त) ध मा ल.

ऋषिकेश Fri, 02/08/2008 - 21:31
हा लेख एकांगी आणि एक खास दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन लिहिल्यासारखा वाटतो आहे. पण त्यात मतदारसंघ पुनर्रचना अंमलात येत असल्याचं वाचून आनंद झाला. (असे झाले तरीही महाराष्ट्रात बिगरमराठी मुख्यमंत्री होणे कठीण वाटते. हे आपलं माझं मत) असो. या पुनर्रचनेचा मुख्य फायदा असा की आता पुन्हा प्रत्येक मतदार संघात साधारण सारखेच मतदार झाले आहेत. उपनगरात अशा छोट्या मतदारसंघांची गरजच होती. जितका मतदार संघ छोटा तितके प्रशासन नेटके होऊ शकते. आणि चांगले प्रशासन हे व्यक्तीचा प्रांत, धर्म, जातस आदि बघून दिले जात नाहि (उदा. गुजरातेत प्रत्येक गावात वीज आली ती, हा गुजराती आहे, हा हिंदु आहे त्यांनाच वीज असा प्रकार नव्हता.) अश्या पुर्रचनेने (जर झाला तर) विकास हा सगळ्यांचाच होणार आहे. मराठी मंडळींचा आणि बिगरमराठी लोकांचाहि! -ऋषिकेश

विजुभाऊ गुरुवार, 02/21/2008 - 18:34
बिगर मराठी ग्रुह मन्त्री क्रुपा शन्कर सिंह होतच ना........ त्याना मराठी भाशा समजत नाही...... आपल्या द्ळ्भद्री ( खास् थोरल्या ठाकर्यान्चा अवडता शब्द) सहिश्णु व्रुत्तिमुळे हे सगळे होतेय.

धमाल मुलगा Fri, 02/08/2008 - 17:02
वाचून अतिशय आन॑द जाहला... आता आपापली गाठोडी काठीच्या टोकाला बा॑धून मराठी माणसाने "ॐ भवति .." करत फिरायची तयारी सुरू करावी. की छानपैकी काशीयात्रेला निघून तिकडेच ग॑गामाईच्या तिरी टाचा घासून प्राण सोडावेत? ह॑...कदाचित लवकरच यातला योग्य तो उपाय आपले दूरदृष्टीशून्य राजकीय नेते स्वतःच्या बुडाखालची खुर्ची वाचवताना एखादी दळभद्री युती करून आपल्या समोर सादर करतीलच, यात श॑का नसावी. राज ठाकरे॑च्या नावाने गळे काढणार्‍याना योग्य त्या वेळी कळेलच, काय योग्य अन् काय अयोग्य ते. चला म्हणजे आता "मुक्त"राज्याचा टे॑भा फक्त बिहारनेच मिरवायला नको, महाराष्ट्राचाही लवकरच न॑बर लागेल हो !!!. आपला - (भैय्याप्रेमी(?), पराकोटीचा पुरोगामी (यडxx)विचारव॑त) ध मा ल.

ऋषिकेश Fri, 02/08/2008 - 21:31
हा लेख एकांगी आणि एक खास दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन लिहिल्यासारखा वाटतो आहे. पण त्यात मतदारसंघ पुनर्रचना अंमलात येत असल्याचं वाचून आनंद झाला. (असे झाले तरीही महाराष्ट्रात बिगरमराठी मुख्यमंत्री होणे कठीण वाटते. हे आपलं माझं मत) असो. या पुनर्रचनेचा मुख्य फायदा असा की आता पुन्हा प्रत्येक मतदार संघात साधारण सारखेच मतदार झाले आहेत. उपनगरात अशा छोट्या मतदारसंघांची गरजच होती. जितका मतदार संघ छोटा तितके प्रशासन नेटके होऊ शकते. आणि चांगले प्रशासन हे व्यक्तीचा प्रांत, धर्म, जातस आदि बघून दिले जात नाहि (उदा. गुजरातेत प्रत्येक गावात वीज आली ती, हा गुजराती आहे, हा हिंदु आहे त्यांनाच वीज असा प्रकार नव्हता.) अश्या पुर्रचनेने (जर झाला तर) विकास हा सगळ्यांचाच होणार आहे. मराठी मंडळींचा आणि बिगरमराठी लोकांचाहि! -ऋषिकेश

विजुभाऊ गुरुवार, 02/21/2008 - 18:34
बिगर मराठी ग्रुह मन्त्री क्रुपा शन्कर सिंह होतच ना........ त्याना मराठी भाशा समजत नाही...... आपल्या द्ळ्भद्री ( खास् थोरल्या ठाकर्यान्चा अवडता शब्द) सहिश्णु व्रुत्तिमुळे हे सगळे होतेय.
महाराष्ट्र टाईम्स मधील 'नांदी बिगरमराठी मुख्यमंत्र्याची ?' ही बातमी वाचा. अटकेपार झेंडे रोवणार्‍या मराठ्यांवर आता परप्रांतीय राज्य करणार काय?

सोड असले नाद सगळे

केशवसुमार ·

इनोबा म्हणे Fri, 02/08/2008 - 16:53
केशवा सह्ह्ह्ह्हीच रे! सोड असले नाद सगळे "केशवा" होईल 'माँ' ती (फाजील) -इनोबा

धमाल मुलगा Fri, 02/08/2008 - 17:26
लय भारी हो, केशवखुमार !!! बाकी तुमच्या विड॑बना॑चा खुमार चढत्या भाजणीतला आहे हा॑ !!! इनोबा, हे तर च्यायला कडीवर वरकडी :)) -ध मा ल.

विसोबा खेचर Fri, 02/08/2008 - 17:31
सोड असले नाद सगळे "केशवा" होईल माती हा हा हा! मस्त रे केशवा.. तात्या.

वरदा Fri, 02/08/2008 - 17:45
काही शब्दच नाहीत्..किती चपखल असतं तुमच विडंबन्...

प्राजु Fri, 02/08/2008 - 18:43
आदितीचि कविता न वाचताही खूप मजा आली केशवा तुझी कविता वाचताना... सह्हि रे... वेळ नुसता खर्च झाला गवसले काही न हाती लईच भारी.. - प्राजु

ऋषिकेश Fri, 02/08/2008 - 19:34
सपूर्ण विडंबन आवडलं.. एकापेक्षा एक सरस द्वीपदी :) अजून येउद्या :) -ऋषिकेश

केशवसुमार Sun, 02/10/2008 - 14:00
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार केशवसुमार

इनोबा म्हणे Fri, 02/08/2008 - 16:53
केशवा सह्ह्ह्ह्हीच रे! सोड असले नाद सगळे "केशवा" होईल 'माँ' ती (फाजील) -इनोबा

धमाल मुलगा Fri, 02/08/2008 - 17:26
लय भारी हो, केशवखुमार !!! बाकी तुमच्या विड॑बना॑चा खुमार चढत्या भाजणीतला आहे हा॑ !!! इनोबा, हे तर च्यायला कडीवर वरकडी :)) -ध मा ल.

विसोबा खेचर Fri, 02/08/2008 - 17:31
सोड असले नाद सगळे "केशवा" होईल माती हा हा हा! मस्त रे केशवा.. तात्या.

वरदा Fri, 02/08/2008 - 17:45
काही शब्दच नाहीत्..किती चपखल असतं तुमच विडंबन्...

प्राजु Fri, 02/08/2008 - 18:43
आदितीचि कविता न वाचताही खूप मजा आली केशवा तुझी कविता वाचताना... सह्हि रे... वेळ नुसता खर्च झाला गवसले काही न हाती लईच भारी.. - प्राजु

ऋषिकेश Fri, 02/08/2008 - 19:34
सपूर्ण विडंबन आवडलं.. एकापेक्षा एक सरस द्वीपदी :) अजून येउद्या :) -ऋषिकेश

केशवसुमार Sun, 02/10/2008 - 14:00
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार केशवसुमार
लेखनविषय:
आमची प्रेरणा अदितीताईंची कविता काल सांगावा मिळाला.... घालते डोळा मला ती दाबते ओठास दाती काय रे येतोस का तू सोबतीला सांग राती पाहुनी घायाळ झालो पण पुढे झाली न छाती वेळ नुसता खर्च झाला गवसले काही न हाती सोड असले नाद सगळे "केशवा" होईल माती --केशवसुमार (माघ शु.१ शके १९२९, ८ फेब्रु. २००८)

माझी मायभू

वडापाव ·

विसोबा खेचर Sun, 02/10/2008 - 11:15
या काळात भारतातून एवढी संपत्ती लुटली गेली, की जिचे मूल्य आत्ताच्या बाजारपेठांमध्ये जवळजवळ चारशे निखर्व अमेरिकन डॉलर्स एवढे होईल. अरे बापरे! विचारवंतांच्या हिशेबाप्रमाणे भारत इसवी सन 2050 पर्यंत जगातील सर्वात मोठी महासत्ता होणार आहे. माहिती, तंत्रज्ञान, संगणक क्षेत्र, अवकाश संशोधन, उपग्रहाद्वारे माहिती संकलन, अणुऊर्जा, इत्यादी क्षेत्रात भारताची प्रमुख राष्टांत गणना केली जाते. ते सगळं ठीक आहे हो, परंतु आज तरी भारताची आर्थिक राजधानी मुंबईच्या जवळ असलेल्या आमच्या ठाणे शहरात रोजची ३ तास वीज नसते! स्वातंत्र्य मिळून ६० वर्ष झाली तरी वीज, पाणी यांसरख्या किमान आवश्यक नागरी सेवासुविधांच्या बाबतीत अजूनही माझी मायभू पारतंत्र्यातच आहे याचे वाईट वाटते! रोज तीन तास, मला माझे सगळे कामकाज थांबवावे लागते, माझी प्रॉडक्टिव्हिटी बंद पडते. का? तर वीज नाही!! अहो फार लांब नाही तर डोंबिवली, कल्याण सारख्या शहरांतून जेथे तुम्हाआम्हासारखा अतिशय मोठ्या प्रमाणावर कष्टकरी, सुशिक्षित मध्यमवर्गीय चाकरमानी वर्ग राहतो त्यांना वेळच्या वेळी विजेची बिले भरूनसुद्धा, सर्व सरकारी कर प्रामाणिकपणे भरूनदेखील जर दिवसाचे सहा सहा, सात सात तास साधी वीजही मिळणार नसेल तर मग माझी मायभू अद्यापही पारतंत्र्याच आहे असेच म्हणावे लागेल! वीज नाही म्हणजे संगणकावरील कामापासून ते अगदी चक्क्यागिरण्यांपर्यंतचे सर्व महत्वाचे व्यवहार तर ठप्प होतातच, परंतु करमणूक म्हणून घटकाभर दूरदर्शनवील एखादा कार्यक्रमही बघता न येऊन सहा तास सक्तीने गप्प बसावे लागते, याला माझी मायभू अद्यापही पारतंत्र्याच आहे असे नाही म्हणणार तर दुसरे काय म्हणणार? भारतात कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम प्रसंगी सक्तीने राबवण्यास माझी मायभू पूर्णत: अयशस्वी ठरली आहे याचेही मला मनापासून वाईट वाटते! स्वातंत्र्योत्तर काळात भारतात हरितक्रांती व धवलक्रांती घडून आली. त्यामुळे बहुतांशी ग्रामीण जीवन सुधारले. ?? आज अनेक दुर्गम ग्रामिण भागात दिवसाचे ९ ते १२ तास वीज नसते, कळशीभर पिण्याच्या पाण्याकरता बायकांना दोन मैल रपेट करावी लागते याला आपण, "स्वातंत्र्योत्तर काळात भारतात हरितक्रांती व धवलक्रांती घडून आली. त्यामुळे बहुतांशी ग्रामीण जीवन सुधारले"" असे जर आपण म्हणत असाल तर मग प्रश्नच मिटला! त्यामुळे आज भारतात मी एक अभिमानी दृष्टिकोन बाळगून राहतो. माझ्या भारताला एखाद्या स्वप्ननगरीसारखे पहाण्याची गरजच नाही; कारण भारत हीच अशी एक सुंदर स्वप्ननगरी आहे, स्वप्ननगरी तर आहेच, परंतु वीज नसल्यामुळे अंधेरनगरीही आहे असे खेदाने म्हणावे लागेल! असो, तरीही आपल्याप्रमाणेच माझेही माझ्या मायभूवर प्रेम आहे, अगदी निरतिशय प्रेम आहे! परंतु ते प्रेम डोळस नसून आंधळं असतं तर किती बरं झालं असतं! तात्या.

संजय अभ्यंकर Sun, 02/10/2008 - 15:35
तात्यांशी सहमत... ठाणे शहरात रोजची ३ तास वीज नसते! भारताच्या वीजेच्या समस्येच्या मुळाशी आपल्यादेशाचे (वीज निर्मिती व वितरणाचे) कल्पनाशुन्य नियोजन कारणीभूत आहे. (शेतकर्‍यांना फुकट वीज देण्याचा मुर्खपणा यातच सामिल आहे). जेथे रिलायंस वा टाटा वीज वितरित करते, तेथे आणी जेथे सरकार वितरित करते तेथे फरक का दिसुन येतो? "स्वातंत्र्योत्तर काळात भारतात हरितक्रांती व धवलक्रांती घडून आली. त्यामुळे बहुतांशी ग्रामीण जीवन सुधारले" पाण्याचे नियोजनही वीजेप्रमाणे कल्पनाशुन्य आहे. भारताच्या तुलनेते इस्रायलचे पर्जन्यमान कमी असुनही शेती उत्पन्न (दर हेक्टरी) आपल्यापेक्षा जास्त आहे. म्हणुन काही ठिकाणी पाण्याचा सुकाळ, तर काही ठिकाणी दुर्भिक्ष. रस्त्यांचे काय? भारतातले रस्ते आणि वाहतूक व्यवस्था हा एक पोरखेळ आहे. मुंबईत उड्डाणपुल कुर्म गतीने बांधले जातात. हा पोरखेळाचाच एक प्रकार आहे. बांधकाम कंत्राटदारांवर वेळेचे कसले बंधन नाही काय? पाणीपुरीजी , भारताला महासत्ता बनण्यासाठी अजुन बरेच पापड बेलायचेत असे मला वाटते. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

राजे Sun, 02/10/2008 - 16:06
जेथे देशाच्या राजकीय नाड्या आवळल्या व सोडल्या जातात त्या राजधानी दिल्ली ची हाल / वृतांत खालील प्रमाणे - १. वीज (खाजगी कंपनी द्वारे) - घोषीत कपात २ तास रोज. ( अघोषीत -५, ६,४ ,१० तास येईल तेव्हा येईल नाहितर नाही जा तीकडे) २. पाणी - स्वत:चा पाण्याचा पंप नाही आहे असे घर दिल्लीत शोधून सापडले नाही मलातरी अजून. ३. रस्ते - क्या कहने ! परवाच झालेल्या एका सर्वेकक्षणात असे सांगीतले गेले की दिल्ली तील रस्ते सर्वात सेफ आहेत..... मोठे आहेत वाहन चालवण्या करता. ( त्यामुळेच दररोज एक असे बस अपघाताचे प्रमाण आहे, मरणारी व्यक्ती संख्या -रोज ३ अशी आहे दिल्ली मध्ये.) दिल्ली गुडगांव रोड २७ कीमी. - कोठे ही थांबा नाही, १५ मिनीटाचा रस्ता पण टोल मुळे तो २ तास तर कधी कधी ४ तास देखील घेत आहे ( जगातील एकमेव २७ कीमी चा रस्ता ज्यावर तीन टोल-प्लाझा आहेत) ४. सार्वजनीक वाहतूक - १५ वर्षाच्या माझ्या दिल्ली राहण्याच्या कालावधी मध्ये मला एक ही रिक्क्षेवाला भेटला नाही जो मीटर प्रमाणे भाडे घेतो. ५. दिल्ली -NCR - माझ्या नजरे समोर शेकडो- हजारो एकड जमीन, उपजाऊ जमीन कंपन्यांना दिली गेली, कारखाने तयार करण्यासाठी. साध्या भाजी व धान्यासाठी देखील शेजारील राज्यातून मदत घ्यावी लागत आहे व भाज्यांचे भाव आकाशाला पोहचले आहेत. ६. उड्डाण फुल - जेथे गरज आहे तेथे नाहीत, जेथे गरज नाही तेथे दोन दोन आहेत. ७. पोलिस व कायदा - कोणी ही कधी ही तुम्हाला लुटू शकतो फक्त डोके हवे, पोलिस प्रथम एफ्-आई-आर पण लिहून घेत नाहीत, माझ्या गाडीचे कागज हरवले, ८०० रुपये मागीतले गेले, मी दिले नाही, दोन आठवडे लागले एफ्-आई-आर साठी. मागील वर्षामध्ये चालत्या गाडीमध्ये ३ बलात्कार झाले, शेकडो खुन, तपास प्रतीशत १०% देखील नाही, चोरी व लुटमारचे आकडे माझ्या कडे नाही आहेत. ८. विमानतळ - साधं पिण्याचे पाणी नाही उपलब्ध. (काही दुकान दारांचे साटे-लोटे आहे असे म्हणतात लोकं) बाहेर नियमाबाहेर गाडी उभी करु पर्यंत तुम्हाला कोठी थांबवत नाही पण एकदा का तुम्ही गाडी उभी केली व बाहेर आलात तर मात्र चलान घेऊन एकदा पोलीसवाला तुम्हाला देऊन जाईल. ९. भ्रष्टाचार - प्रचंड हा एकच शब्द. -छोट्या व्यक्ती पासून मोठ्या नेत्या, अधिकारया पर्यंत भ्रष्टाचार. पैसे आहेत खिश्यामध्ये तर तुमचे कोणीच काही बिघडू शकत नाही, पण पैसे नाहीत तर तुम्ही नियमानूसार असला तरी तुम्ही गुन्हेगार होऊ शकता, धीस इज दिल्ली माय डियर फ्रेडं ! धीस इज दिल्ली !!!!!! जय हो भारत माता की, माफी बरं का जय हो इंडीया की!!!!!!!!!! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

वडापाव Sun, 02/10/2008 - 16:17
श्री. राजे तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांपैकी सहावा मुद्दा मी स्वत: अनुभवला आहे. पुन्हा कधी दिल्लीत जायचं झालं, तर तुम्ही दिल्लीबद्दल दिलेल्या या आगाऊ माहितीच्या आधारे मी दिल्लीत दिवस काढीन. पहिल्या दर्शनातच व दिल्लीला जाऊन आलेल्या माझ्या ओळखीतील व्यक्तींच्या मतांवर नजर फिरवल्यास तुम्ही मांडलेल्या इतर आठ मुद्यांमधून पूर्णसत्य दिसून येते याची मला खात्री आहे. आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. जय हो भारत माता की !!!!!!!

सहज Sun, 02/10/2008 - 16:45
पाणी पुरी आपण हा लेख लिहायला जे श्रम घेतले त्याचे कौतुक वाटते. धन्यवाद. हा लेख वाचुन तोंडात सुंदर चॉकलेटचा तुकड ठेवल्यासारखे वाटले. काश!! फक्त चॉकलेट खाउन आयुष्य काढता आले असते तर. :-)

सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 19:12
लूट केली. ते करणारच. त्यासाठीच ते इथे आले होते. स्वकीयांचे काय. चोर, गुन्हेगार, पोलिस, राजकारणी, सरकारी अदिकारी, सगळे सर्व स्वकीयच आहेत. माझ्या मते स्वकीयांनीच आपल्याला जास्त लुटले. ही रक्कम १५०० वर्षातील परकीयांनी लुटलेल्या रकमेपेक्षा जास्त असेल. ही आपण देत असलेली लोकशाहीची किंमत आहे. याहूनहि वाईट असे राज्य हुकूमशाहीत येऊ शकते. ते येऊ नये म्हणून आपण ही किंमत मोजतो. प्रतिभा गुंडींनी स्टलिनचे चरित्र लिहिले आहे. त्याने राजकीय कारणावरून ५ टक्के जनतेला नाहीसे केले. परंतु राष्ट्राला आर्थिक दृष्ट्या १०० वर्षे पुढे नेले. कारण कोणतेहि उत्पादक काम न करणारे असे व आर्थिक दृष्ट्या जनतेवर बोजा असणारे राजकीय नेते व कार्यकर्ते त्याने नाहीसे केले.

संजय अभ्यंकर Sun, 02/10/2008 - 20:33
सार्वजनीक वाहतूक - १५ वर्षाच्या माझ्या दिल्ली राहण्याच्या कालावधी मध्ये मला एक ही रिक्क्षेवाला भेटला नाही जो मीटर प्रमाणे भाडे घेतो.
राज साहेबांनी दिल्लीचे यथार्थ वर्णन केले आहे. माझी कं. जेव्हा जेव्हा मला दिल्लीला पाठवते, तेव्हा मला अस्वस्थ वाटु लागते (पण जावेच लागते). दिल्लीतली "जी हुजुर" पद्धती, लोकांचे खोटे हास्य, मुंबईच्या मानाने महागाई इ. प्रकार फार यातना देतात. दिल्लीसारख्या महाप्रचंड शहरात स्वतःचे वाहन असल्याशिवाय कोणाचा निभाव लागु शकत नाही. एखाद्या संध्याकाळी, कॅनॉट प्लेस मधिल, निरुलाचे -पॉट पौरि किंवा काकेदा कडे जेवायला जायचे असेल तर आपले वाहन घेउन जावे लागते. अन्यथा आपले हॉटेलात परत पोहोचणे त्या हरामखोर रिक्षावाल्यांच्या मर्जीवर अवलंबून असते. ते किती पैसे मागतील हे केवळ तेच जाणतात.
स्टालिनने...परंतु राष्ट्राला आर्थिक दृष्ट्या १०० वर्षे पुढे नेले.
सुधीर साहेबांनी सांगितल्याची प्रचीती, जेव्हा मला रशियन्स भेटले तेव्हा आली. एकेकाळी हा देश कम्युनिस्ट असला तरी त्या काळातही त्यांनी प्रचंड तांत्रीक प्रगती केली. हिंदुस्तान एरॉनॉटिक्स मध्ये सुखोई-३० या रशियन बनावटीच्या विमान प्रकल्पात आम्ही अनेक यंत्रे उभी केली. तेव्हा त्यांचे तंत्रज्ञान, त्यांनी केलेले डोळे दिपवणारे कार्य पहावयास मिळाले. विमानाचा प्रत्येक भाग कसा बनवावा, ह्या प्रक्रियेचे जगड्व्याळ लेखन, केवळ स्तिमीत करणारे आहे. हे लिहिण्या मागचा उद्देश हा, कि कम्युनिस्ट(समाजवादि) असल्यामुळे रशियाच्या तांत्रिक प्रगतीत अडथळा आला नाही, गेल्या ५० वर्षांत रशियाने अनेक लढाऊ विमाने विकसित केली. आम्ही अजुनही लढाऊ विमानाला लागणारे एकमेव कावेरी ईंजिन गेली १६ वर्षे बनवू शकलो नाही. संरक्षणा साठी लागणारे बहुसंख्य तंत्रज्ञान आम्ही अजुनही आयात करतो. आम्ही खरोखर महासत्ता बनू शकतो? संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

विसोबा खेचर Sun, 02/10/2008 - 11:15
या काळात भारतातून एवढी संपत्ती लुटली गेली, की जिचे मूल्य आत्ताच्या बाजारपेठांमध्ये जवळजवळ चारशे निखर्व अमेरिकन डॉलर्स एवढे होईल. अरे बापरे! विचारवंतांच्या हिशेबाप्रमाणे भारत इसवी सन 2050 पर्यंत जगातील सर्वात मोठी महासत्ता होणार आहे. माहिती, तंत्रज्ञान, संगणक क्षेत्र, अवकाश संशोधन, उपग्रहाद्वारे माहिती संकलन, अणुऊर्जा, इत्यादी क्षेत्रात भारताची प्रमुख राष्टांत गणना केली जाते. ते सगळं ठीक आहे हो, परंतु आज तरी भारताची आर्थिक राजधानी मुंबईच्या जवळ असलेल्या आमच्या ठाणे शहरात रोजची ३ तास वीज नसते! स्वातंत्र्य मिळून ६० वर्ष झाली तरी वीज, पाणी यांसरख्या किमान आवश्यक नागरी सेवासुविधांच्या बाबतीत अजूनही माझी मायभू पारतंत्र्यातच आहे याचे वाईट वाटते! रोज तीन तास, मला माझे सगळे कामकाज थांबवावे लागते, माझी प्रॉडक्टिव्हिटी बंद पडते. का? तर वीज नाही!! अहो फार लांब नाही तर डोंबिवली, कल्याण सारख्या शहरांतून जेथे तुम्हाआम्हासारखा अतिशय मोठ्या प्रमाणावर कष्टकरी, सुशिक्षित मध्यमवर्गीय चाकरमानी वर्ग राहतो त्यांना वेळच्या वेळी विजेची बिले भरूनसुद्धा, सर्व सरकारी कर प्रामाणिकपणे भरूनदेखील जर दिवसाचे सहा सहा, सात सात तास साधी वीजही मिळणार नसेल तर मग माझी मायभू अद्यापही पारतंत्र्याच आहे असेच म्हणावे लागेल! वीज नाही म्हणजे संगणकावरील कामापासून ते अगदी चक्क्यागिरण्यांपर्यंतचे सर्व महत्वाचे व्यवहार तर ठप्प होतातच, परंतु करमणूक म्हणून घटकाभर दूरदर्शनवील एखादा कार्यक्रमही बघता न येऊन सहा तास सक्तीने गप्प बसावे लागते, याला माझी मायभू अद्यापही पारतंत्र्याच आहे असे नाही म्हणणार तर दुसरे काय म्हणणार? भारतात कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम प्रसंगी सक्तीने राबवण्यास माझी मायभू पूर्णत: अयशस्वी ठरली आहे याचेही मला मनापासून वाईट वाटते! स्वातंत्र्योत्तर काळात भारतात हरितक्रांती व धवलक्रांती घडून आली. त्यामुळे बहुतांशी ग्रामीण जीवन सुधारले. ?? आज अनेक दुर्गम ग्रामिण भागात दिवसाचे ९ ते १२ तास वीज नसते, कळशीभर पिण्याच्या पाण्याकरता बायकांना दोन मैल रपेट करावी लागते याला आपण, "स्वातंत्र्योत्तर काळात भारतात हरितक्रांती व धवलक्रांती घडून आली. त्यामुळे बहुतांशी ग्रामीण जीवन सुधारले"" असे जर आपण म्हणत असाल तर मग प्रश्नच मिटला! त्यामुळे आज भारतात मी एक अभिमानी दृष्टिकोन बाळगून राहतो. माझ्या भारताला एखाद्या स्वप्ननगरीसारखे पहाण्याची गरजच नाही; कारण भारत हीच अशी एक सुंदर स्वप्ननगरी आहे, स्वप्ननगरी तर आहेच, परंतु वीज नसल्यामुळे अंधेरनगरीही आहे असे खेदाने म्हणावे लागेल! असो, तरीही आपल्याप्रमाणेच माझेही माझ्या मायभूवर प्रेम आहे, अगदी निरतिशय प्रेम आहे! परंतु ते प्रेम डोळस नसून आंधळं असतं तर किती बरं झालं असतं! तात्या.

संजय अभ्यंकर Sun, 02/10/2008 - 15:35
तात्यांशी सहमत... ठाणे शहरात रोजची ३ तास वीज नसते! भारताच्या वीजेच्या समस्येच्या मुळाशी आपल्यादेशाचे (वीज निर्मिती व वितरणाचे) कल्पनाशुन्य नियोजन कारणीभूत आहे. (शेतकर्‍यांना फुकट वीज देण्याचा मुर्खपणा यातच सामिल आहे). जेथे रिलायंस वा टाटा वीज वितरित करते, तेथे आणी जेथे सरकार वितरित करते तेथे फरक का दिसुन येतो? "स्वातंत्र्योत्तर काळात भारतात हरितक्रांती व धवलक्रांती घडून आली. त्यामुळे बहुतांशी ग्रामीण जीवन सुधारले" पाण्याचे नियोजनही वीजेप्रमाणे कल्पनाशुन्य आहे. भारताच्या तुलनेते इस्रायलचे पर्जन्यमान कमी असुनही शेती उत्पन्न (दर हेक्टरी) आपल्यापेक्षा जास्त आहे. म्हणुन काही ठिकाणी पाण्याचा सुकाळ, तर काही ठिकाणी दुर्भिक्ष. रस्त्यांचे काय? भारतातले रस्ते आणि वाहतूक व्यवस्था हा एक पोरखेळ आहे. मुंबईत उड्डाणपुल कुर्म गतीने बांधले जातात. हा पोरखेळाचाच एक प्रकार आहे. बांधकाम कंत्राटदारांवर वेळेचे कसले बंधन नाही काय? पाणीपुरीजी , भारताला महासत्ता बनण्यासाठी अजुन बरेच पापड बेलायचेत असे मला वाटते. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

राजे Sun, 02/10/2008 - 16:06
जेथे देशाच्या राजकीय नाड्या आवळल्या व सोडल्या जातात त्या राजधानी दिल्ली ची हाल / वृतांत खालील प्रमाणे - १. वीज (खाजगी कंपनी द्वारे) - घोषीत कपात २ तास रोज. ( अघोषीत -५, ६,४ ,१० तास येईल तेव्हा येईल नाहितर नाही जा तीकडे) २. पाणी - स्वत:चा पाण्याचा पंप नाही आहे असे घर दिल्लीत शोधून सापडले नाही मलातरी अजून. ३. रस्ते - क्या कहने ! परवाच झालेल्या एका सर्वेकक्षणात असे सांगीतले गेले की दिल्ली तील रस्ते सर्वात सेफ आहेत..... मोठे आहेत वाहन चालवण्या करता. ( त्यामुळेच दररोज एक असे बस अपघाताचे प्रमाण आहे, मरणारी व्यक्ती संख्या -रोज ३ अशी आहे दिल्ली मध्ये.) दिल्ली गुडगांव रोड २७ कीमी. - कोठे ही थांबा नाही, १५ मिनीटाचा रस्ता पण टोल मुळे तो २ तास तर कधी कधी ४ तास देखील घेत आहे ( जगातील एकमेव २७ कीमी चा रस्ता ज्यावर तीन टोल-प्लाझा आहेत) ४. सार्वजनीक वाहतूक - १५ वर्षाच्या माझ्या दिल्ली राहण्याच्या कालावधी मध्ये मला एक ही रिक्क्षेवाला भेटला नाही जो मीटर प्रमाणे भाडे घेतो. ५. दिल्ली -NCR - माझ्या नजरे समोर शेकडो- हजारो एकड जमीन, उपजाऊ जमीन कंपन्यांना दिली गेली, कारखाने तयार करण्यासाठी. साध्या भाजी व धान्यासाठी देखील शेजारील राज्यातून मदत घ्यावी लागत आहे व भाज्यांचे भाव आकाशाला पोहचले आहेत. ६. उड्डाण फुल - जेथे गरज आहे तेथे नाहीत, जेथे गरज नाही तेथे दोन दोन आहेत. ७. पोलिस व कायदा - कोणी ही कधी ही तुम्हाला लुटू शकतो फक्त डोके हवे, पोलिस प्रथम एफ्-आई-आर पण लिहून घेत नाहीत, माझ्या गाडीचे कागज हरवले, ८०० रुपये मागीतले गेले, मी दिले नाही, दोन आठवडे लागले एफ्-आई-आर साठी. मागील वर्षामध्ये चालत्या गाडीमध्ये ३ बलात्कार झाले, शेकडो खुन, तपास प्रतीशत १०% देखील नाही, चोरी व लुटमारचे आकडे माझ्या कडे नाही आहेत. ८. विमानतळ - साधं पिण्याचे पाणी नाही उपलब्ध. (काही दुकान दारांचे साटे-लोटे आहे असे म्हणतात लोकं) बाहेर नियमाबाहेर गाडी उभी करु पर्यंत तुम्हाला कोठी थांबवत नाही पण एकदा का तुम्ही गाडी उभी केली व बाहेर आलात तर मात्र चलान घेऊन एकदा पोलीसवाला तुम्हाला देऊन जाईल. ९. भ्रष्टाचार - प्रचंड हा एकच शब्द. -छोट्या व्यक्ती पासून मोठ्या नेत्या, अधिकारया पर्यंत भ्रष्टाचार. पैसे आहेत खिश्यामध्ये तर तुमचे कोणीच काही बिघडू शकत नाही, पण पैसे नाहीत तर तुम्ही नियमानूसार असला तरी तुम्ही गुन्हेगार होऊ शकता, धीस इज दिल्ली माय डियर फ्रेडं ! धीस इज दिल्ली !!!!!! जय हो भारत माता की, माफी बरं का जय हो इंडीया की!!!!!!!!!! राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

वडापाव Sun, 02/10/2008 - 16:17
श्री. राजे तुम्ही मांडलेल्या मुद्द्यांपैकी सहावा मुद्दा मी स्वत: अनुभवला आहे. पुन्हा कधी दिल्लीत जायचं झालं, तर तुम्ही दिल्लीबद्दल दिलेल्या या आगाऊ माहितीच्या आधारे मी दिल्लीत दिवस काढीन. पहिल्या दर्शनातच व दिल्लीला जाऊन आलेल्या माझ्या ओळखीतील व्यक्तींच्या मतांवर नजर फिरवल्यास तुम्ही मांडलेल्या इतर आठ मुद्यांमधून पूर्णसत्य दिसून येते याची मला खात्री आहे. आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. जय हो भारत माता की !!!!!!!

सहज Sun, 02/10/2008 - 16:45
पाणी पुरी आपण हा लेख लिहायला जे श्रम घेतले त्याचे कौतुक वाटते. धन्यवाद. हा लेख वाचुन तोंडात सुंदर चॉकलेटचा तुकड ठेवल्यासारखे वाटले. काश!! फक्त चॉकलेट खाउन आयुष्य काढता आले असते तर. :-)

सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 19:12
लूट केली. ते करणारच. त्यासाठीच ते इथे आले होते. स्वकीयांचे काय. चोर, गुन्हेगार, पोलिस, राजकारणी, सरकारी अदिकारी, सगळे सर्व स्वकीयच आहेत. माझ्या मते स्वकीयांनीच आपल्याला जास्त लुटले. ही रक्कम १५०० वर्षातील परकीयांनी लुटलेल्या रकमेपेक्षा जास्त असेल. ही आपण देत असलेली लोकशाहीची किंमत आहे. याहूनहि वाईट असे राज्य हुकूमशाहीत येऊ शकते. ते येऊ नये म्हणून आपण ही किंमत मोजतो. प्रतिभा गुंडींनी स्टलिनचे चरित्र लिहिले आहे. त्याने राजकीय कारणावरून ५ टक्के जनतेला नाहीसे केले. परंतु राष्ट्राला आर्थिक दृष्ट्या १०० वर्षे पुढे नेले. कारण कोणतेहि उत्पादक काम न करणारे असे व आर्थिक दृष्ट्या जनतेवर बोजा असणारे राजकीय नेते व कार्यकर्ते त्याने नाहीसे केले.

संजय अभ्यंकर Sun, 02/10/2008 - 20:33
सार्वजनीक वाहतूक - १५ वर्षाच्या माझ्या दिल्ली राहण्याच्या कालावधी मध्ये मला एक ही रिक्क्षेवाला भेटला नाही जो मीटर प्रमाणे भाडे घेतो.
राज साहेबांनी दिल्लीचे यथार्थ वर्णन केले आहे. माझी कं. जेव्हा जेव्हा मला दिल्लीला पाठवते, तेव्हा मला अस्वस्थ वाटु लागते (पण जावेच लागते). दिल्लीतली "जी हुजुर" पद्धती, लोकांचे खोटे हास्य, मुंबईच्या मानाने महागाई इ. प्रकार फार यातना देतात. दिल्लीसारख्या महाप्रचंड शहरात स्वतःचे वाहन असल्याशिवाय कोणाचा निभाव लागु शकत नाही. एखाद्या संध्याकाळी, कॅनॉट प्लेस मधिल, निरुलाचे -पॉट पौरि किंवा काकेदा कडे जेवायला जायचे असेल तर आपले वाहन घेउन जावे लागते. अन्यथा आपले हॉटेलात परत पोहोचणे त्या हरामखोर रिक्षावाल्यांच्या मर्जीवर अवलंबून असते. ते किती पैसे मागतील हे केवळ तेच जाणतात.
स्टालिनने...परंतु राष्ट्राला आर्थिक दृष्ट्या १०० वर्षे पुढे नेले.
सुधीर साहेबांनी सांगितल्याची प्रचीती, जेव्हा मला रशियन्स भेटले तेव्हा आली. एकेकाळी हा देश कम्युनिस्ट असला तरी त्या काळातही त्यांनी प्रचंड तांत्रीक प्रगती केली. हिंदुस्तान एरॉनॉटिक्स मध्ये सुखोई-३० या रशियन बनावटीच्या विमान प्रकल्पात आम्ही अनेक यंत्रे उभी केली. तेव्हा त्यांचे तंत्रज्ञान, त्यांनी केलेले डोळे दिपवणारे कार्य पहावयास मिळाले. विमानाचा प्रत्येक भाग कसा बनवावा, ह्या प्रक्रियेचे जगड्व्याळ लेखन, केवळ स्तिमीत करणारे आहे. हे लिहिण्या मागचा उद्देश हा, कि कम्युनिस्ट(समाजवादि) असल्यामुळे रशियाच्या तांत्रिक प्रगतीत अडथळा आला नाही, गेल्या ५० वर्षांत रशियाने अनेक लढाऊ विमाने विकसित केली. आम्ही अजुनही लढाऊ विमानाला लागणारे एकमेव कावेरी ईंजिन गेली १६ वर्षे बनवू शकलो नाही. संरक्षणा साठी लागणारे बहुसंख्य तंत्रज्ञान आम्ही अजुनही आयात करतो. आम्ही खरोखर महासत्ता बनू शकतो? संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्राचीन काळापासूनची आपली संस्कृती बहुतांशी टिकवून ठेवणारा, विविध परकियांचे आकर्षणस्थान झाल्याने व त्यांच्या आक्रमणांमुळे या संस्कृतीत किंवा संस्कृतीतून जरी काही घटक समाविष्ट अथवा नाहीसे झालेे असले, तरी न ढळता अभिमानाने जगात मान उंचावणारा, जीवसृष्टी व लोकसृष्टीत अमाप प्रमाणात विविधता असलेला, विकासाच्या दिशेने रोज पाऊले पुढे टाकत जगावर छाप पाडणारा, असा हा भारत देश. ह्या देशावर सर्वप्रथम आर्य, त्यानंतर शक, मग मौर्य, मग ग्रीक, इत्यादी प्रबळ राजवटींनी देशाचा कायापालट करून त्याचे जणू सुवर्ण संास्कृतिक भूमीत रूपांतर केले. भारताने 1 ते 9 हे अंक अस्तित्वात आणले. शून्याचा शोध भारतीयांनी लावला.

एक नवीन ऑल-इन-वन सॉफ्टवेअर

माझी दुनिया ·

वरदा Fri, 02/08/2008 - 21:42
www.meebo.com वर जाते फक्त चॅट करायला...याहू, जीटॉक, एम एस एन मेसेंजर डाऊनलोड करावे लागत नाहीत....

In reply to by वरदा

छोटा डॉन Sat, 02/09/2008 - 16:50
"www.meebo.com वर जाते फक्त चॅट करायला...याहू, जीटॉक, एम एस एन मेसेंजर डाऊनलोड करावे लागत नाहीत..." हेच म्हणतो ......... गप्पिष्ट [ छोटा डॉन ]

देवदत्त Fri, 02/08/2008 - 22:29
कल्पना आणि सॉफ्टवेअर चांगले वाटते. फक्त एक भीती किंवा शंका आहे. ह्यात आपल्याला आपण वापरत असलेले सर्व सभासद नावे व परवलीचे शब्द त्यात द्यावे लागतील. त्याचा गैरफायदा न घेतला जावो. अर्थात ही प्रणाली बहुधा AOL कडून आहे असे वाटते, त्यावर विश्वास ठेवू शकतो.

माझी दुनिया Mon, 02/11/2008 - 11:59
इतर चर्चासत्रांवरूनही या प्रणालीच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला गेला. मी ही प्रणाली तयार केलेली नाही, फक्त मिळालेला दुवा तुमच्यापर्यंत पोचवायचे काम केले. पण ज्यांना अशी भिती वाटते त्यांनी ही प्रणाली संगणकावर उतरवून घेतल्यावर तुम्ही वापरत असलेल्या कीटाणूनाशकाकडून तपासून घेणे उत्तम. :-) माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

आनन्दा गुरुवार, 10/25/2012 - 20:05
तुम्हाला किती मिळाले हो?

What do I get paid for?
You get paid for every new user that installs Digsby.
How much do I get paid?
You get paid up to $1.00 for every new user that installs Digsby. The amount varies depending on the geographic location of the person installing Digsby.

वरदा Fri, 02/08/2008 - 21:42
www.meebo.com वर जाते फक्त चॅट करायला...याहू, जीटॉक, एम एस एन मेसेंजर डाऊनलोड करावे लागत नाहीत....

In reply to by वरदा

छोटा डॉन Sat, 02/09/2008 - 16:50
"www.meebo.com वर जाते फक्त चॅट करायला...याहू, जीटॉक, एम एस एन मेसेंजर डाऊनलोड करावे लागत नाहीत..." हेच म्हणतो ......... गप्पिष्ट [ छोटा डॉन ]

देवदत्त Fri, 02/08/2008 - 22:29
कल्पना आणि सॉफ्टवेअर चांगले वाटते. फक्त एक भीती किंवा शंका आहे. ह्यात आपल्याला आपण वापरत असलेले सर्व सभासद नावे व परवलीचे शब्द त्यात द्यावे लागतील. त्याचा गैरफायदा न घेतला जावो. अर्थात ही प्रणाली बहुधा AOL कडून आहे असे वाटते, त्यावर विश्वास ठेवू शकतो.

माझी दुनिया Mon, 02/11/2008 - 11:59
इतर चर्चासत्रांवरूनही या प्रणालीच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला गेला. मी ही प्रणाली तयार केलेली नाही, फक्त मिळालेला दुवा तुमच्यापर्यंत पोचवायचे काम केले. पण ज्यांना अशी भिती वाटते त्यांनी ही प्रणाली संगणकावर उतरवून घेतल्यावर तुम्ही वापरत असलेल्या कीटाणूनाशकाकडून तपासून घेणे उत्तम. :-) माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

आनन्दा गुरुवार, 10/25/2012 - 20:05
तुम्हाला किती मिळाले हो?

What do I get paid for?
You get paid for every new user that installs Digsby.
How much do I get paid?
You get paid up to $1.00 for every new user that installs Digsby. The amount varies depending on the geographic location of the person installing Digsby.

आजकाल ऑल-इन-वन वस्तू जास्त वापरात येतात. सगळ्या गोष्टी त्यात एकत्रितपणे मिळण्याची सोय असल्याने ते सुटसुटीत पडते. अशीच एक सुटसुटीत प्रणाली माझ्या पहाण्यात आली. हॉटमेल , याहू आणि जीमेल अशी तिन्ही खाती असणारे, त्याद्वारे विरोप पाठवणारे, वाचणारे, गप्पा मारणारे काही कमी नाहीत. पण त्याकरता आपण किती प्रणाल्या संगणकावर उतरवून घेतो ? याहू आणि हॉटमेल च्या गप्पांकरता ’याहू मेसेंजर’ आणि जीमेल करता ’जीटॉक’. विरोप महाजालावरच वाचत असलात तर ठीक नाहीतर आऊटलूक किंवा थंडरबर्ड किंवा तत्सम. महाजालावरच वाचत असलात तर किती संकेतस्थळांना भेटी द्याव्या लागतील ? अर्थातच तीन हॉटमेल , याहू आणि जीमेल.