वैदर्भी बोली खरेतर संस्कृतशी अधिक जवळीक असणारी. मात्र तिची खुमारी पाहायची असेल तर बुवा उपाध्यांची भगवत् गीता वाचावी. भगवत् गीतेशी एव्हढा लडिवाळपणा करण्याची हिंमत दुसर्या कोणत्या भाषेची वा बोलीची झाली असेल असे वाटत नाही.
बुवा लिहितात -
पार्थ म्हणे गा हृषीकेशी,
या युद्धाची ऐशीतैशी,
बेहत्तर आहे मेलो उपाशी,
पण लढणार नाही.
धोंड्यात जावो हि लढाई,
आपल्या बाच्याने होणार नाही,
समोर सारेच बेटे, जावाई,
बाप, दादे, काके.
अरे लढाई असते का सोपी ..
मारे चालते कापाकापी,
कित्येक लेकाचे संतापी
मुंडकी ही छाटती.
माझं मत..
ऑल यु निड इज द फायटिंग स्पिरीट
अज्ञान...