मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिवाजी राजे मराठा कि राजपुत ...?

पान्डू हवालदार · · काथ्याकूट
राजे शिवाजी ... मुळचे सिसोडिया ...रजपुत ... मराठा नव्हेत ..... आपल्याला काय वाट्त ... चर्च्या फक्त लेखा वर लेखकावर नको ...म्हन्जे चच्र्चे ला मजा येइल ...

वाचने 29917 वाचनखूण प्रतिक्रिया 28

झकासराव Sat, 03/29/2008 - 23:27
पांडुजी ते मुळ सिसोदिया हे बरोब्बर आहे पण तुम्ही अजुन इतिहास द्याल का??? जसे की त्यांची कितवी पिढी महाराष्ट्रात आली? कारण त्यांच्या आजोबा पणजोबांपासुन सगळे महाराष्ट्रातच होते हे इतिहासातच होते. असा इतिहास दिला तर मग पुढे बोलायला बरं पडेल हो.

सृष्टीलावण्या Sat, 03/29/2008 - 23:54
जरा आज कुठे मिपा शांत आहे ते काय तुला अगदीच बघवत नाही का रे? कळलाव्या नारद कुठला... > > शेवाळलेले शब्द आणिक यमकछंद करतील काय, डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनु बांधील काय?

मानस Sat, 03/29/2008 - 23:56
रजपुत, त्यांची एक शाखा थेट नेपाळ पर्यंत जाते. स्थानिक मराठ्यांशी लग्न केल्यामुळे, "मराठा" असे संबोधले जाऊ लागले.

पिवळा डांबिस Sun, 03/30/2008 - 00:01
शिवाजी महाराज हे मराठी (महाराष्ट्रीय) होते हे आम्हाला नक्की माहीती आहे. आणि ते आमच्यासाठी पुरेसं आहे, अभिमानास्पद आहे. बाकी मराठा/सिसोदिया वाद जाऊ द्या खड्ड्यात!

In reply to by पिवळा डांबिस

इनोबा म्हणे Sun, 03/30/2008 - 00:19
शिवाजी महाराज हे मराठी (महाराष्ट्रीय) होते हे आम्हाला नक्की माहीती आहे. आणि ते आमच्यासाठी पुरेसं आहे, अभिमानास्पद आहे. अगदी बरोबर! बाकी काही म्हणा डांबीस काका,हा पांडूखान आल्यापासून मराठ्यांच्याच मागे लागलाय. बाकी कोणाच्या इतिहासावर बोलायला तयार नाही. मला तरी हा उ.प्र. किंवा बिहारचाच असल्याचा दाट संशय येतोय. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by पिवळा डांबिस

धम्मकलाडू Mon, 03/31/2008 - 12:58
शिवाजी महाराज हे मराठी (महाराष्ट्रीय) होते हे आम्हाला नक्की माहीती आहे. आणि ते आमच्यासाठी पुरेसं आहे, अभिमानास्पद आहे. बाकी मराठा/सिसोदिया वाद जाऊ द्या खड्ड्यात!
पिवळा डांबिस, अचूक बोललात. अशा आगलाव्या चर्चांना मिसळपाववर स्थान नको. धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

देवदत्त Sun, 03/30/2008 - 01:52
चर्च्या फक्त लेखा वर लेखकावर नको ...म्हन्जे चच्र्चे ला मजा येइल ह्या लेखावर चर्चा होणे कठिण वाटते. ह्याप्रकारे सुरू केलेल्या चर्चेचा मार्ग कसा जातो हे इथे पहावे.

डॉ.प्रसाद दाढे Sun, 03/30/2008 - 17:54
माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराजा॑सारखे लोकोत्तर पुरूष जाती-धर्मापलिकडचे आहेत. त्या॑चे कार्य जाणून घेऊन आज कि॑वा भविष्यात त्या॑ची शिकवण आपल्या आचरणात कशी आणता येईल हे महत्वाचे आहे. त्या दृष्टीने शिवचरित्रात कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या आहेत्..महाराजा॑चे प्रशासन, महसूल व्यवस्था, राष्ट्रभक्ती, मातृभक्ती, दूरदृष्टी, राजकारण, धर्मकारण, युद्धशास्त्र इ.इ.

चतुरंग Sun, 03/30/2008 - 19:42
शिवाजी महाराजांसारख्या लोकोत्तर पुरुषांनी त्यांच्या स्वतःच्या जीवनातून जे मार्गदर्शन केलेले आहे त्यातली एकेक बाब अमलात आणायची म्हणली तरी आयुष्य पुरणार नाही अशी अवस्था आहे. सबब असले काही संदर्भहीन वादविवाद उपस्थित करणे अजिबात आवश्यक नाही. (अवांतर - पांडोबा, काही कारणाने आपल्याला मि.पा. वर असे वादविवाद उपस्थित करुन त्याची प्रतिमा डागाळणे ह्यातच रस असेल तर शिवाजी महाराजांना वेठीला धरण्याचे कारण नाही. आपल्या सारखे सभासद इथे असणे हाच मि.पा.वरचा डाग आहे असे मी मानतो. तरीही नजर लागू नये म्हणून आपण तीट लावतो ना तसे काही काळे ठिपके मि.पा. आपल्या अंगावर वागवते, काय करणार अजून वर्षही झाले नाहीये हो जन्माला!) चतुरंग

ऋषिकेश Sun, 03/30/2008 - 19:50
अश्या प्रश्नांच्या उत्तराने वादाशिवाय पदरात काहिच पडत नाहि. आणि ते रजपुत होते की मराठा हे खरच महत्वाचं आहे का? .. त्यांचं कार्य ह्या असल्या बिनबुडाच्या गोष्टींच्या फार फार वरचं आहे. सबब असल्या वादाची भेसळ मिसळीत केली नहित तरच उत्तम -('मिसळ'लेला) ऋषिकेश

ऋषिकेश Sun, 03/30/2008 - 19:55
या निमित्ताने जनरल डायर यांच्या कडे एक विनंती प्रस्ताव ठेवत आहे: तसेच काथ्याकुट सदरात कोणत्याही जिवंत/मृत व्यक्तींवरील "वाद" काहि काळ बंद ठेवावेत ही विनंती -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

देवदत्त Sun, 03/30/2008 - 20:06
काथ्याकुट सदरात कोणत्याही जिवंत/मृत व्यक्तींवरील "वाद" काहि काळ बंद ठेवावेत ही विनंती कमीत कमी मृत व्यक्तिंवरील वाद काही काळ बंद ठेवावेत ह्याला पाठिंबा.

कै इनोबा राव आह्मी राम राम करतो आणी तुम्हि आमचे नाव पण ठिक ल्हिहि नहित .... पि पा वर बरेच लोक सन्कुचित विचरचे दिसतात ... काही आवद्ले नहि तेर सरळ लेखकवर टीका ... तात्या ह्या कडॅ लक्श देतिल का.... आणी इनोबा जी शिवाजी महाराजाचे वन्शज देखिल उ.प्र. आले होते ... नन्तर मराठ्यां बरोबेर स्वराज्याची स्थपना केलि ...

In reply to by पान्डू हवालदार

इनोबा म्हणे Sun, 03/30/2008 - 21:10
कै इनोबा राव अरे वा!धन्यवाद,पांडूखान. नशीब पैगंबरवासी नाही म्हणालात.(तुमच्यात तेच म्हणतात ना?) आह्मी राम राम करतो आणी तुम्हि आमचे नाव पण ठिक ल्हिहि नहित .... असं कसं पांडूखान लिहीलं आहे की. पि पा वर बरेच लोक सन्कुचित विचरचे दिसतात ... काही आवद्ले नहि तेर सरळ लेखकवर टीका ... तू महाराजांची जात काढली तरी ती चर्चा,आणि आम्ही तुला मुसलमान मानले तर ती टीका होय रे पांड्या! आता संकूचित कोण ते स्वतःला विचार. आणी इनोबा जी शिवाजी महाराजाचे वन्शज देखिल उ.प्र. आले होते ... नन्तर मराठ्यां बरोबेर स्वराज्याची स्थपना केलि ... आम्हाला तूमचा इतिहास काय म्हणतो त्याच्याशी काही देणेघेणे नाही.आम्ही महाराजांना आपले मानतो आणि मानत राहू. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

इनोबा राव तुमच्या चिडचीड तच माझे उत्तर मिळाळे :) असे रागावात जाउ नका श्रिमन्त ... तब्येतीला श्रम झेपणार नहित ..... आणी "क"" टायपो होता "काय" चा .. सत्य कटू असत ... पण सत्य असत ...

In reply to by पान्डू हवालदार

इनोबा म्हणे Sun, 03/30/2008 - 22:32
तुमच्या चिडचीड तच माझे उत्तर मिळाळे :) असे रागावात जाउ नका श्रिमन्त ... तब्येतीला श्रम झेपणार नहित ..... मी किड्यामुंग्यांवर चिडत नसतो पांडूखान... :)(वरच्या प्रतिसादात स्माईली दिसली नाही ? की डोळे झाकून घ्यायची सवयच लागली आहे.स्माईली कळते ना!) सत्य कटू असत ... पण सत्य असत ... हे तुम्हाला समजले तरी फार झाले... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

इनोबा, या पांडूखान ला उ.प्र. मधून आयात केले आहे का थेट अफगाणिस्तानातून?? :) पुण्याचे पेशवे

विजुभाऊ Mon, 03/31/2008 - 12:45
हे असले वाद मुद्दाम का उकरून काढतात? मिपा सदस्यानो क्रुपया काही दिवस हे असले वाद टाळुया........ईनोबा तु थोडा शहाणा आहेस्..तू प्रत्युत्तर देय नकोस. वाद अपसुक शमतील मला एक म्हण ठाउक आहे....काही लोकांसोबत वाद घालणे म्हणजे डुकरासोबत गटारात कुस्ती लढण्यासारखे असते...यात आपण तर घाण होतोच पण वाईट म्हणजे डुकराला त्याची मजा येत असते. पेशवे भाउ तुम्हाला ही हीच विनन्ती.सुज्ञास सांगणे न लगे.... बाकी जनरल डायर काय करायचे ते करतीलच

In reply to by विजुभाऊ

अघळ पघळ Mon, 03/31/2008 - 20:52
ईनोबा तु थोडा शहाणा आहेस्.. इजुभाऊ, इनोबांच्या लिखाणाचा तुमचा चांगलाच अभ्यास दिसतोय! इनोबांनी सुरू केलेला एक चारोळ्यांचा धागा मध्यंतरी त्यांनी स्वतःच उडवला होता (म्हणून तर ज.डायर ने तो अधिकार लेखकांकडून आता काढून घेतला आहे म्हणे) तो तुम्ही वाचायला हवा होतात :))) -(तुमचा) अघळ पघळ्या

In reply to by अघळ पघळ

इनोबा म्हणे Tue, 04/01/2008 - 00:22
इजुभाऊ, इनोबांच्या लिखाणाचा तुमचा चांगलाच अभ्यास दिसतोय! काही लोकांसोबत वाद घालणे म्हणजे डुकरासोबत गटारात कुस्ती लढण्यासारखे असते...यात आपण तर घाण होतोच पण वाईट म्हणजे डुकराला त्याची मजा येत असते. इजूभाऊंना तुझ्या लिखाणाचाही चांगलाच अभ्यास दिसतोय. :) इनोबांनी सुरू केलेला एक चारोळ्यांचा धागा मध्यंतरी त्यांनी स्वतःच उडवला होता (म्हणून तर ज.डायर ने तो अधिकार लेखकांकडून आता काढून घेतला आहे म्हणे) कोण ज. डायर? आणि कसल्या अधिकाराबद्दल बोलता आहात. माझ्या माहितीप्रमाणे मिपावर अशी कोणतीही बंधने नाहीत.म्हणून तर मी इथे आहे. (तुझ्यासारख्या डूकरांना मात्र कोणतीही बंधने नाहीत,पाहीजे तेव्हा चिखलात लोळ आणि हवा तेवढा .... खा) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

विसोबा खेचर Tue, 04/01/2008 - 08:26
सदर चर्चेत भाग घेतलेल्या बहुतांशी सभासदांच्या म्हणण्यानुसार आणि त्यांचा आदर म्हणून या चर्चेवर आता इथेच पडदा टाकण्यात आला आहे! शिवछत्रपतींसारख्या थोर राष्ट्रपुरुषाची जात कुठली, धर्म कुठला, ते मराठा होते, रजपूत होते की आणखी कुणी गुजराथी होते, यासारख्या फालतू विषयावर ज्यांना चर्चा करायची आहे त्यांनी ती कृपया एकमेकांना खरडी, पोष्टकार्ड पाठवून करावी! ती चर्चा वाचण्यात मिपाकरांना काहीही स्वारस्य नाही असाच एकूण होरा दिसला म्हणूनच या चर्चेवर आता पडदा टाकण्यात आलेला आहे याची नोंद घ्यावी आणि अजून इथे काही प्रतिसादात्मक लिहिण्याचे कष्ट घेऊ नयेत असे वाटते! तात्या. -- "महाराज, आम्हाला क्षमा करा हो! अहो आम्ही जात्यातच करंटे आहोत. सूर्यासारख्या तेजस्वी असलेल्या आपल्या व्यक्तिमत्वातील १०० % गुण तर सोडाच परंतु त्यातले ०.०००००००००..........१% एवढेही गुण आम्ही न घेता, तसा प्रयत्न न करता, 'आपण रजपूत होता, की मराठा, की मारवाडी होता' याच चर्चा करण्यात धन्यता मानतो! महाराज, खरंच लाज वाटते आम्हाला!

सिसोदिया कुळाचा मूळपुरुष हा महाराष्ट्रातील पैठण येथील होता राज्य विस्तारासाठी सिसोदे राजस्थान मेवाड ला गेले आणि इस्लामी आक्रमणे व्हायला लागल्यावर बाराव्या शतकात पुन्हा महाराष्ट्रात वेरूळ येथे आले आणि याचा पुरावा म्हणजे राजपूत लोकांचा ग्रंथ राजकुलाख्यान हा आहे त्यानंतर कर्नल लिखित राजस्थान का इतिहास हे पुस्तक आहे आणि मराठी पुस्तके म्हणाल तर क्षत्रीय व त्यांचे अस्तित्व मराठा व त्यांची 96 कुळे ही आहेत राजपूत हे मराठ्यांचे वंशज आहेत त्यामुळे शिवाजी महाराज मराठाच आहेत

तुम्ही एक दिवसांत नाही सदस्य झाला नाही तो थेट 2008 चा धागा वर काढलात. काय गरज होती ? आधीचे प्रतिसाद तरी वाचायला हवे होते दुलक्ष करा सांगीतलेल्या लोकांचे. सं मं हा धागा उडवा