मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खयाली पुलाव

सन्जोप राव ·

सर्वप्रथम सन्जोप रावांचे अभिनंदन! चांगला लेख लिहिल्याबद्द्ल तर आहेच पण चर्चेला एक नवा विषय दिल्याबद्द्ल!! नाहीतर हल्ली जे काही विषय चालले होते, उदा. शिवाजीची जात, शाळेतले धार्मिक शिक्षण, सहा महिन्यात कर्जमुक्त वगैरे! आता मेंबरं एकमेकांच्या नरड्यावर बसणार असं वाटायला लागलं होतं.:) नाहीतर अगदी दुसरं टोक म्हणजे पुण्यातल्या पाट्या, गॅलरीत वाळत घातलेल्या चड्डीची चित्रे वगैरे!! आज अखंड भारत पाहिजे म्हणून तुम्ही घेणार का पाकिस्तान आणि बांगला देशाला आपल्यात सामावून? का नाही? यू.पी. आणि बिहार नाही सामावून घेतला? देशासाठी त्याग करायला नको? बोला, भारतमाता की जय!! आणि इंडस बासमती राईस खायला मिळेल तो वेगळाच!! दमादम मस्त कलंदर!!:)) डबल बॅरल दिलीप संतापाने जांभळा झाला होता. आम्ही सहज म्हणून लिहिलेले बिरूद असे चिकटलेले पाहुन आम्ही धन्य झालो आहोत!!:)) तरी नशीब चतुरंगांनी दिलेले नांव (कोणतं ते आम्ही नाही सांगणार जा! मिपा ची शंभर पाने वाचुन काढा जर माहिती करून घ्यायचे असेल तर!) चिकटले नाही (अजून!) 'सकाळी तोंडसुद्धा न धुता क्वार्टर लावण्याने आलेली प्रचिती' या माझ्या लेखाबाबत. बाबारे, मोठ्याने म्हणूसुद्धा नकोस! आम्ही "नशा" या विषयावर (पूर्ण शुद्धीत राहून) एकच चिंतन काय लिहिलं तर दहा वड्यांनी (वडा = जो स्वतःला बेवडा समजत नाही तो) आम्हांला झापलं. पण शिंच्यांची गंमत बघ, स्वतः न प्यालेल्या दारूबद्दल धडाधडा बोलले पण त्याच लेखात मी लिहिलेल्या चहा/कॉफीच्या सवयीबद्दल मात्र अळिमिळी गुपचिळी!! हे आमचं नशीब! नाहीतर बघ काही माणसं कसल्या-कसल्या बायकांच्या पाठीला साबण लावूनसुद्धा नामानिराळी राहतात! नाहीतर आम्ही भरलेला ग्लास तोंडाला लागण्याआधीच "शौकिन' (बेवडे असं वाचायचं!) म्हणून डिक्लेअर!!!:)) "धमु नका रे म्हणू मला.." धमाल मुलगा कळवळला. अरे, लहान आहे रे तो अजून! कशाला छळता त्याला? आधीच लग्न करू का नको, करू का नको अशा विचाराने धास्तावलाय बिचारा! लग्नानंतरच्या हनिमूनचं टेन्शन ते वेगळंच!!:))) आता याला आपण पिडा म्हणतो, त्याला काही वाटतं का त्याचं?" त्याला काय वाटणार! तो बारा गावचं पाणी पिऊन टणक झालाय!! आणि नाहीतरी तो कधी कधी दुसर्‍याना पिडा देतोच!!! सारखं राष्ट्रवादी काँग्रेसच्या फलकांसारखं कुठं या अण्णाला शुभेच्छा, या दादाचं अभिनंदन असं करत राहण्यात काही हशील नाही, काय? हे मात्र अगदी खरं! तिच्यायला अगदी असंच व्हायला लागंलंय अलिकडे! आणि कहर म्हणजे नुसतं अभिनंदन केलं तरी त्याच्यावर टीकात्मक प्रतिक्रिया येतात!! आता 'अ' ने 'ब' चं केलेलं अभिनंदन 'क' ला का टोचतं कळत नाही!!:)) इकडे इनोबा, धमाल मुलगा आणि पिवळा डांबिस 'दिसामाजी काहीतरी वैचारिक वाचनाचे फायदे' या विषयावर गंभीरपणे बोलत होते. ते आम्ही नाही, धमु तर मुळिच नाही, ते फक्त इनोबा! ते बोलतात आणि आम्ही ऐकतो. आम्हाला त्यांच्याबद्दल अतीव आदर आहे हो! खरंतर आम्हाला विनायक नांवाच्या माणसांबद्द्ल एकूणच अतीव आदर आहे! मराठी संस्कृतीचे खरे पाईक! पेशवाईत साडेतीन शहाणे होते म्हणतात तसे मिपावर साडेतीन विनायक अती आदरणीय आहेत: एक मंगलमूर्ती (महादेव-पार्वती पुत्र), दुसरे सावरकर, तिसरे सेनापती बापट आणि अर्धे आमचे इनोबा अनिवसे!! काय पटतं की नाही?:))) वरील लेखनातील पात्रे प्रत्यक्षातील असली तरी प्रसंग पूर्ण काल्पनिक आहेत, हे कळायला काही आईन्स्टाईनची बुद्धीमत्ता नको. हे खास सर्किटरावांसाठी लिहिलंय वाटतं. त्यांना अलिकडे निर्बुध्द माणसाच्या मेंदूतील पेशी होण्याचे डोहाळे लागले आहेत!!:) बाकी लेख झकास! पस्तीस वर्षांपूर्वी लागून गेलेल्या 'पिंजर्‍या'च्या २००८ मधल्या पंचनाम्यापेक्षा हे आवडलं! काय समजलांत!!!:)))) आपला कृपाभिलाषी, पिवळा डांबिस (पिडा)

In reply to by पिवळा डांबिस

कोलबेर 01/04/2008 - 10:06
बाकी लेख झकास! पस्तीस वर्षांपूर्वी लागून गेलेल्या 'पिंजर्‍या'च्या २००८ मधल्या पंचनाम्यापेक्षा हे आवडलं! काय समजलांत!!!:))))
अगदी हेच!! झक्कास लेख आणि जबरा प्रतिसाद (गॅलरीत वाळत घातलेल्या चड्डीची चित्रे काढणारा) कोलबेर
"अच्छा अच्छा.. म्हणजे ती नुसती पांघरायची असते होय? मला वाटलं की ती खरोखर तशी करायची असते. सॉरी हां..." सन्जोप विनयानं म्हणाला.
आमच्या कळफलकावर देखिल उसाचा रस सांडता सांडता राहिला..:)))

विसोबा खेचर 01/04/2008 - 07:07
बरं मग किमान त्या रां.. आपलं, काही विशिष्ट सेवा पुरवणार्‍या बायकांच्या पाठीला साबण तरी चोळतोस की नाहीस? नाही? अरे, मग कसं होणार तुझं इथं या मिसळपाववर?" :) आन हितं येऊन बगतो तर काय, ह्यो केशवसुमार तात्याच्या कुल्ल्याला कुल्ला लावून बसलेल्या. गणिम सूर्याजी पिसाळ..." हा हा हा! मांडीला मांडी लावून बसणे हे ऐकले होते, कुल्ल्याला कुल्ला हे बाकी क्लासच! :) "व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार आणि दडपशाही व कंपूबाजीमुक्त वावर हेच धोरण आपण आजवर सांभाळलेले आहे. मी बघ कसा जनरल डायरला रिटायर करून नवीन संपादक मंडळाच्या हातात संपादन सोपवून मोकळा झालो आहे. " हम्म! आता पुन्हा तोच विचार सुरू आहे. नवीन संपादक मंडळाकरता आम्ही काही सभासद पुन्हा हेरले आहेत. आणि लवकरच आणिबाणी मागे घेऊन लोकशाहीची दुसरी फेज थोड्या वेगळ्या स्वरुपात मिपावर जाहीर करू म्हणतो! लोकशाहीत वृत्तपत्र स्वातंत्र्याला मुभा असते. त्यामुळे 'साप्ताहिक मिसळपाव' असं एखादं साप्ताहिक इथे मिपावरच सुरू करीन म्हणतो! काय रावसाहेब, आठवड्यातून एकदा "संपादकीय अग्रलेख" लिहायची जिम्मेदारी घेता काय? तुम्ही एकदम फस्क्लास लिहू शकाल म्हणून विचारतो! :) तात्याचे लेख बघ 'बाबुजींच्या गाण्यातल्या हुकलेल्या जागा' आणि 'भाईकाका कुठे घसरले?' -तर 'तात्यासेठ, डोळ्यात पाणी आणलंत हो, जिंकला, जिंकला तुम्ही'या आशयाच्या पंचेचाळीस प्रतिक्रिया. तात्पर्य काय, तर असं मनाला लावून घ्यायचं नसतं... " अहो तेवढ्या प्रतिक्रिया मिळवण्यासाठी तेवढा आंतरजालीय अभ्यास असावा लागतो! आमचं ट्रेनिंग तर थेट तुमच्या मनोगतातच झालं आहे. तिथे पण साला आपण मिळवायचो साला ४०/४५ प्रतिक्रिया! काय रावशेठ, खरं की नाय?! :) "बरोबर आहे हां" आतापर्यंत गप्प बसलेला संजिव म्हणाला. मलाही हाच अनुभव आहे. 'सकाळी तोंडसुद्धा न धुता क्वार्टर लावण्याने आलेली प्रचिती' या माझ्या लेखाबाबत. त्यावेळी तर माझी ओळखही नव्हती कुणाशी." :)))) जाऊ द्या रावशेठ, साला येताजाता तात्याला हाणता तेवढं पुरे आहे की! त्या संजिवच्या पंच्याला क उगाच हात घालताय? अहो, देवभक्त भला माणूस आहे तो! :) असो, तुमचा हातखंडा असलेल्या विषयावर बर्‍याच दिवसांनी वाचले, खूप आनंद वाटला! खयाली पुलावचे पुढचेही भाग अंतराअंतराने येऊ द्यात ही विनंती... जाता जाता - हा लेख 'आपापसात' मध्ये न जाता मुख्यप्रवाहातच राहील एवढं तरी मिपाचं वैशिष्ठ्य तुम्हाला मानायला हरकत नाही रावसाहेब! :) आपला, (साप्ताहिक मिसळपाव सुरू करून संपादकीय अग्रलेखाची जबाबदारी संजोपवर सोपवायची एक नवीनच कल्पना सुचलेला!) तात्या.

प्राजु 01/04/2008 - 07:28
सर्वप्रथम सन्जोप रावांचे अभिनंदन! चांगला लेख लिहिल्याबद्द्ल तर आहेच पण चर्चेला एक नवा विषय दिल्याबद्द्ल!! नाहीतर हल्ली जे काही विषय चालले होते, उदा. शिवाजीची जात, शाळेतले धार्मिक शिक्षण, सहा महिन्यात कर्जमुक्त वगैरे! आता मेंबरं एकमेकांच्या नरड्यावर बसणार असं वाटायला लागलं होतं.:) नाहीतर अगदी दुसरं टोक म्हणजे पुण्यातल्या पाट्या, गॅलरीत वाळत घातलेल्या चड्डीची चित्रे वगैरे!! डांबिसकाका, हे मात्र झकासच..! संजोपराव, आपला हा खयाली पुलाव अतिशय चांगला जमला आहे. हा हैद्राबादी पुलाव होता.. आता पुढचा पुलावचा प्रकार कोणता आणि कधी शिजवताय?? :))) - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

मुक्तसुनीत 01/04/2008 - 08:34
प्रसिद्ध विनोदी अमेरिकन टीव्ही सिरिज "साईन्फेल्ड" मधे "बिझारो वर्ल्ड" नावाचा एक सुप्रसिद्ध एपिसोड आहे. त्याची आठवण झाली. या एपिसोडचा सारांश असा की जेरी, जॉर्ज आणि क्रेमर , या अत्यंत आळशी, विचित्र, विक्षिप्त अशा तीन मित्रांमधे वावरणार्‍या इलेनला अचानक तीन नवे असे लोक भेटतात जे या तीन मित्रांसारखेच जवळजवळ दिसतात, पण त्यांच्या बरोब्बर उलट्या स्वभाव-विभावांचे (म्हणजे नम्र , अभ्यासू, सभ्य - आणि म्हणूनच अत्यंत वैशिष्ट्यहीन, कंटाळवाणे !) असतात. संजोपरावानी एक असेच "बिझारो" जग रेखाटले आहे, ज्यात जो जो जसा जसा "नॉर्मल" जगात आहे तो तो त्याच्या बरोब्बर उलटा या "बिझारो" जगात आहे :-) " साईन्फेल्ड"च्या त्या एपिसोडमधे मूळचे "नॉर्मल" मित्र आणि त्यांच्या "बिझारो" जगातल्या प्रतिकृतींची शेवटी गमतीशीर भेट होते. संजोपरावांच्या दुनियेत असे झाले तर ??

सर्किट 02/04/2008 - 01:41
काय वो तुमचे ते लेखन संजोपराव ! " हे बघ दिलीप.." प्रमोद त्याच्या दंडाला धरुन म्हणाला. "मलाही कधी कधी त्वेषानं वार करावासा वाटतो. मीही कधीतरी एकदा 'सहमत नाही' असं लिहून बघणार आहे. पण काय करणार सांग." आम्ही आम्ची सगळी कॉफी ठ्ठ्या करून आमच्या ल्यापटापवर सांडवली बघा.. एकदा तरी प्रमोदकाका नॉन-पॉलिटिकल झालेत, तर तुमच्या घरीच सत्यनारायण घालू... - सर्किट

आजानुकर्ण 01/04/2008 - 08:47
मानामान किती | तुझ्या क्षुल्लका संपत्ती || जा रे चाळवी बापुडी | कोणी धरिती ती गोडी || पाहतोसी काय | आता पुढे करी पाय || वरि ठेवू दे मस्तक | ठेलो जोडुनी हस्तक || रिद्धीसिद्धी देसी | आम्ही चुंभळे नव्हो तैसी || तुका म्हणे ठका | ऐसे नागविले लोका || वा वा. (आस्वादक) आजानुकर्ण

छोटा डॉन 01/04/2008 - 08:53
संजोपराव , तोडलतं तुम्ही ... जवाब नही ... ""हेच ते, प्राण्यांची शरीरं वगैरे... पण पीतही नाहीस म्हटल्यावर.. बरं मग किमान त्या रां.. आपलं, काही विशिष्ट सेवा पुरवणार्‍या बायकांच्या पाठीला साबण तरी चोळतोस की नाहीस? नाही? अरे, मग कसं होणार तुझं इथं या मिसळपाववर?"" हा हा हा, खरे आहे. सुमारशेठ, विचार करा ..... "सर्किट म्हणाला. "त्याचबरोबर सदस्यांचा अनामिक रहाण्याचा मूलभूत अधिकार जपण्याच्या कामात माझा खारीचा वाटा आहे, याचा मला सार्थ आनंद आहे."" जबरा ... "इकडे इनोबा, धमाल मुलगा आणि पिवळा डांबिस 'दिसामाजी काहीतरी वैचारिक वाचनाचे फायदे' या विषयावर गंभीरपणे बोलत होते." आता मात्र खरचं पोट दुखुस्तोवर हसू आलं. मस्त ... अवांतर : असे लेख लिहण्याची कल्पना चांगली आहे, बघु आम्ही पण ट्राय करतो ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विजुभाऊ 01/04/2008 - 10:23
सन्जोप राव तुमी खरेच जब्बर लिवताय्.....मला तर प्रत्यक्ष आपण बसलोय असे वाटायला लागले. बाकी खरेच आपण एकदा सगळे मिळुन कॉफी प्यायला बसूच( ए धमु हसलास का रे? ऑ.....तुला काय कॉफी चे नुसते नाव काढले तरी लत्ता ( अर्थ: कीक) बसु लागली की काय. मजा आला ....जरा क्लायंट शी तह आणि वाटाघाटी चालल्यात. मोकळा झालो की येतोच घाटात. बाकी सध्या इथले लोक कसले कसले घाट घालताहेत. घाटाच्या पायथ्याशी वैचारीक कट्टा करण्याचा घाट घालुन तो पार ही करतात. हां, तर इथं लिहिताना आपण काहीतरी गंभीर आणि वैचारिक लिहिलं पाहिजे. सारखं राष्ट्रवादी काँग्रेसच्या फलकांसारखं कुठं या अण्णाला शुभेच्छा, या दादाचं अभिनंदन असं करत राहण्यात काही हशील नाही, काय? हे मस्तच.... इतके डायरेक्ट लिहु नका नायतर ही मंडळी " कायम चूर्ण चांगले की ईसबगूल "यावर जब्बरी वैचारीक परी संवाद घडवायचे. सन्जोप काकांचा पुतण्या विजुभाऊ

केशवसुमार 01/04/2008 - 10:41
संजोपराव, ज ह ब ह रा हा.. "हेच ते, प्राण्यांची शरीरं वगैरे... पण पीतही नाहीस म्हटल्यावर.. बरं मग किमान त्या रां.. आपलं, काही विशिष्ट सेवा पुरवणार्‍या बायकांच्या पाठीला साबण तरी चोळतोस की नाहीस? नाही? अरे, मग कसं होणार तुझं इथं या मिसळपाववर?" खो खो खो खि खि खि... लवकरच तुमच दर्शन घ्यायला हवे.. ते प्राण्यांची शरीर नाही हो.. प्रेतं.. प्रेत.. ते तेव्हढ लगेच बदला बघू.. केशवसुमार अवांतर :तुम्ही कविता /गझल कधी लिहताय..??

विसोबा खेचर 01/04/2008 - 10:42
" हरामखोर आहे साला. आरे, आजवर आपन सर्वांणी त्याच्या पालख्या उचलल्या. भोई झालो त्याचे, भोई. त्याच्या धोतराला धरुन भेंचोत त्यो जाईल त्या जागेवर गेलो. त्यानं म्हनलं की इथं शेनाचा वास येतोय, की आपन लगेच त्याला हागणदारी म्हनून मोकळे झालो. त्यो म्हनाला, माझ्या पत्राला उत्तर देत न्हाईस काय, आपुन लाथ मारतो तुझ्यावर, की आपुनबी पायतानं काखोटीला मारुन त्याच्यामागं च्यूत्यासारखे पळत आलो. च्यायला! आमचे बिरुटेशेठ एवढ्या शिव्या कधीपासून द्यायला लागले? :)) की, एक प्राध्यापक दुसर्‍या प्राध्यापकाच्या तोंडी शिव्या घालून शिव्या द्यायची हौस भागवू पाहतोय!? :) चालू द्या, चालू द्या, तुमच्या शिव्या-ओव्या सगळं काही यथास्थित चालू द्या! आमचं काहीच म्हणणं नाही. पण काय रे संजोप, अरे अजून किती अभिव्यक्ति स्वातंत्र्य पाहिजे तुम्हा लोकांना? आणिबाणीच्या परिस्थितीतही लेको तुम्हाला एवढं अभिव्यक्ति स्वातंत्र्य मिळतं आहे, तरीही अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाने माझ्या नावाने शिमगा करून माझ्या डोक्यावर मिरे वाटता? :) अरे थोडासा तरी न्याय करा की रे! की तात्या म्हणजे भिकारचोटच माणूस आहे असा ठरावच पास करून घेतलाय तुम्ही लोकांनी? :) छ्या..! मिपावर तात्पुरते/प्रासंगिक यथास्थित भांडू पण शेवटपर्यंत सगळे एकत्र आनंदाने नांदू एवढीच माझी मनापासूनची इच्छा आहे असं मी तुला जुना मित्र म्हणून आणि चंचीला स्मरून शेवटचंच सांगतो आहे संजोप! लेका पुण्यात मिपाचा कट्टा झाला, मन मोठं करून तू काही नाही गेलास त्या कट्ट्याला सांग बरं! साला, मला मनोमन खूप आनंद झाला असता! लेका पुण्यात राहतोस आणि कट्ट्यकडे पाठ फिरवतोस? शोभलं नाही तुला! :) तात्या.

तात्याच्या भाषेत ...और ये लगा सिक्सर! "संजोप स्पेशल" टच, खूप दिवसांनी तुमच्या खास टच चे लिखाण केलेत. मजा आली वाचताना! स्वाती

धमाल मुलगा 01/04/2008 - 11:35
च्यामारी, सध्या वेळ नाहीय्ये निवा॑त प्रतिसाद टाकायला... उद्या तब्ब्येतीत लिहितो उत्तर :-) बाकी चिमटे एकदम फस्कल्लास -(कळवळणारा) धमु

विसोबा खेचर 01/04/2008 - 11:38
लिखाणाच्या सोयीसाठी काही ज्येष्ठांचे उल्लेख एकेरी करावे लागले आहेत, त्याबद्दल क्षमस्व. ठीक आहे, ठीक आहे. ज्जा! तुला केली क्षमा!! :) आपला, (क्षमाशील ज्येष्ठ!) तात्या.

सहज 01/04/2008 - 15:35
स्टार वॉर्स सागा कन्टिन्युज एन्ड ओबी-वन [का पालपटाइन] इज बॅक!! एक दिवस ल्युक स्कायवॉकर्णाला, डार्थ खेचर म्हणणार आय एम युअर फादर!! मग द जेडाय कॉन्सील एन्ड द सीथ लिव्हड हॅपीली एव्हर अफ्टर!! वारकरी जी. एं. लुकास!! [गुरू, 03/27/2008 - 11:25 माफ करा. कार्यबाहुल्य. जी.एं. वर लिहायचे तर अभ्यास करावा लागतो. उगीच जाताजाता अमुकला ग्रेट म्हणावे की नाही किंवा 'आमचा गो इतिहास...' असे गळे काढण्याचे ते काम नव्हे. तेवढा वेळ सध्या नाही. सवड मिळाली की लिहितो.] हे बदडायच काम सवडीच का सोयीचं? अभ्यासपुर्वक की जाताजाता खरडलेल? :-) तुम्ही "ओबी वन राव" का "संजोप पालपटाईन" एकदाचे काय ते ठरवा. डार्थ खेचरला इतके घट्ट धरुन ठेवताय. चेल्याने गिर्यारोहण / यात्रा संपले असल्यास गुरुजींना अर्थ समजवावा!!

In reply to by सहज

चेल्याने गिर्यारोहण / यात्रा संपले असल्यास गुरुजींना अर्थ समजवावा!! कोण चेला आणि कोण गुरु ? :) अहो, सहजराव !!! जी. ए. च्या कथांवरुन निघणार्‍या अर्थावरुन त्यांचे सध्या जमत नाही. (नुकतेच दोघांनी मिळुन जी.एंची पुस्तके पाचगणीच्या धबधब्यात सोडली - एक बातमी ) त्यामुळे सध्या एक तुकारामाची गाथा वाचतो, तर एक इंग्रजी पुस्तकाचे स्वैर अनुवाद करतोय म्हणे :)

भोचक 01/04/2008 - 16:55
हेच ते, प्राण्यांची शरीरं वगैरे... पण पीतही नाहीस म्हटल्यावर.. बरं मग किमान त्या रां.. आपलं, काही विशिष्ट सेवा पुरवणार्‍या बायकांच्या पाठीला साबण तरी चोळतोस की नाहीस? नाही? अरे, मग कसं होणार तुझं इथं या मिसळपाववर?"
संजोपजी, मजा आला. शैलीसुद्धा धमाल. प्रत्येकाची वैशिष्ट्ये छान टिपली आहेत. (स्वतःच्याही पाठीपर्यंत साबण न पोहोचल्याने हळहळणारा) भोचक

मनापासुन 01/04/2008 - 17:03
सर्वसाक्षी आणि विजुभाऊचे वेगळेच चालले होते. "जुने जाऊद्या मरणालागुनि" की अशीच काहीशी ऒळ आहे ना रे ती? या इतिहासाच्या कचाट्यातून आपण कधी बाहेर पडणार कुणास ठाऊक." हा विजुभाऊ चा स्वभाव एकदम फक्कड पकडला आहे. हो ! तो "जुने जाऊद्या मरणालागुनि" म्हणताना ऐतिहासिक भाषा पण टेचात वापरतो...काय वल्ली आहे हे नीट कळतच नाही. ऐतिहासीक म्हणावा तर परवा संजीव च्या स्तोत्रावर जाम घसरला आणि उखडला. तुम्हाला काय कर्ण पिशाच्च वश झालेय की काय अशी शन्का येत्येय. स्वभावाचे यक्झॅक्ट वर्णन ....धमु चे सुद्धा. कट्ट्यावर न जाता सुद्धा येवढं? लेख आवडला.........अगदी मनापासुन

विजुभाऊ 01/04/2008 - 19:51
विजुभाऊ चा स्वभाव एकदम फक्कड पकडला आहे. हो बरे झाले मला ते तरी समजले. आपले इतिहासावर प्रेम आहे. पण आपण त्यामुळे केवळ इतिहासातच रहात नाही. ईतिहासावर प्रेम करताकरता उगच स्वतःच ऐतिहासिक पुराण वस्तु व्हायला आवडत नाय आपल्याला आपल्या इतिहासातल्या योग्य त्याच गोष्टींचा अभिमान आहे. कोणी उगाच स्तोत्रे म्हणुन कर्ज फिटेल म्हणाले की आपल्या डोक्यातली सगळे बाजीप्रभु जागे होतात गनीम टीपायला.स्तोत्रे म्हणुन फारतर म्हणण्याची हौस फिटेल स्तोत्रांचा उपयोग मला फार झाला वर्गात गाण्यांच्या भेंड्या खेळताना. र वरुन तर रामरक्षेमुळे कधीच प्रॉब्लेम आला नाय.

इनोबा म्हणे 01/04/2008 - 20:05
जबरा हो संजोपराव.... पुलाव अगदी झक्कास जमलाय. वि.सू.:ज्यांना झेपत नसेल त्यांनी हा पुलाव जास्त खाऊ नये,नाहीतर पूलाखाली बसायची वेळ येईल. :) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

'तात्यासेठ, डोळ्यात पाणी आणलंत हो, जिंकला, जिंकला तुम्ही' हे एकदम जब्रा..... असे काथ्याकूट सुरुच राहिले! अशाच काथ्याकुटांच्या प्रतिक्षेत :) - छोटी टिंगी ;)

झंप्या 02/04/2008 - 07:21
"पन तात्या, तुज्या संपादक मंडळात आमची वर्दी न्हायी लावलीस तू. मी न्हाई, प्रकाश घाटपांडे न्हाई, प्राजू न्हाई, गारंबीचा बापू न्हाई, नाना चेंगट न्हाई... यवडंच काय पन धोंडोपंतबी न्हाई. तू निवडलंस ते पोष्टमन, किमयागार आन आपासाहेब चौघुले या तिगास्नी. ह्ये काय तुजं कळंना राव..." खल्लास रावसाहेब! जींकलात!!.. पण काय हो तो किमयागार तर ठार झाला बाळासाहेब (आपासाहेब नव्हे) रुसुन गेलाय वाटतं, पोष्टमन तर घरोघरी पोथ्या पोहिचवतोय..मग ते गारंबीचा बापू, शलाका पेंडसे, राजीव अनंत भिडे हे लोक कुठे गेले ओ? आजकाल कुठे गेले.. तिच्यामायला तात्याच्या लिखाणाला पण ते प्रतिसाद घालत नाहीत बघून काळजी वाटते. अगदी अलीकडचा 'उथळ आणि बटबटीत प्रतिसादांपासून सुटका' हा छोट्या डॉनचा लेख बघ.. हे तर कै च्या कैच! १ नंबर!! 'तात्यासेठ, डोळ्यात पाणी आणलंत हो, जिंकला, जिंकला तुम्ही' असले प्रतिसाद देणार्‍यांना लाल भडक तर्रीची धुरी देऊन नुसत्या डोळ्यातुनच नव्हे तर आणखी कुठून कुठून पाणी काढावेसे वाटते बघा!उगाच मिसळपाव मिसळपाव करुन नाचतात आणि गुळमट प्रतिसाद टाकतात लेकाचे.

अभिज्ञ 02/04/2008 - 22:35
मागे बिरुटे साहेबांचा "तात्या मनोगतावर परतला" असाच काहितरी एक लेख होता. त्यात सुध्दा ब-याच लोकांचि स्टाईल (ने?) मारलि होती! तसाच हा एक झकास "लेख". मोकळा वेळ मिळत नसल्याने आम्हि काहि इथे जास्त लिहित नाहि,पण मि.पा.वर वाचन मात्र चालू असते. त्यामुळे बरीच पात्रे ,त्यांची शैली माहित आहे.त्यामुळे लेखाचा जास्त आनंद घेता आला. असो. (फक्त मिसळपाववरतिच वावरणारा) अबब

संकेतस्थळावरील व्यक्तिचित्रांची चांगलीच खेचली आहे. लेखन बहारदार झाले  आहे आणि ते आवडले.
बाकी आमच्या तोंडी खालील लेखनात ओव्या जरा लैच झाल्या, जाऊ द्या !!!!  या निमित्ताने आपण आपली हौस तर भागवून घेतली. :)

" हरामखोर आहे साला. आरे, आजवर आपन सर्वांणी त्याच्या पालख्या उचलल्या. भोई झालो त्याचे, भोई. त्याच्या धोतराला धरुन भेंचोत त्यो जाईल त्या जागेवर गेलो. त्यानं म्हनलं की इथं शेनाचा वास येतोय, की आपन लगेच त्याला हागणदारी म्हनून मोकळे झालो. त्यो म्हनाला, माझ्या पत्राला उत्तर देत न्हाईस काय, आपुन लाथ मारतो तुझ्यावर, की आपुनबी पायतानं काखोटीला मारुन त्याच्यामागं च्यूत्यासारखे पळत आलो.

सहमत !!!! ;) हाहाहाहाहा:))))))))) 

'एक जबरदस्त फसलेला आंतरजालीय दिवाळी अंक'  या विषयावर आपण कधीतरी आमचे खिसे चाचपणार हेही आम्हाला माहित होतं :)

खयाली पुलावात  'दिलीप' च्या मसाल्याचा लै  वापर झाल्यासारखा  वाटला !!!! :)
'ज्योतिषविषयक लेख वाचण्यापासून कसा बचाव कराल?' हा प्रकाश घाटपांडेचा लेख घे,
:)))))) ह. ह. पु. वा. च्यायला आमच्या घाटपांडे साहेबांनी काय लिहावे आता !!!

आणि जी.ए.कुलकर्णी हा कालबाह्य झालेला लेखक आहे, असं माझं मत आहे" कर्ण जोरात म्हणाला. हे शक्य तरी आहे का ? जी. ए.चे जगभरात दोनच वाचकच शिल्लक राहिले आहेत, एक आपण आणि आमचा मित्र कर्ण ;)

अवांतर :) लेखनाच्या या आकृतीबंधाचा  वापर आपल्यापासुनच आम्ही शिकलो. त्यावर आम्ही दोन प्रयोग केले. आणि आपलेही दोन झाले. आता नवीन काही तरी शोधा बॉ !!! :)


आपला

दिलीप
(डबल बॅरलवाला)

तुमचे मुक्तचिंतन वाचले, मनात आलं इतक्या सुंदर कल्पनाविलासाला थातुरमातुर प्रतिसाद देण्यात हशील नाही. पण काय लिहावे सुचेना. २ दिवस खालच्या पापणीला वरची पापणी लागली नाही. खरोखरच मागल्या शुक्रवारी वातावरण पार कोंदटले होते, (मिपाचे ग्रहयोगच तसे असतील म्हणा पण) तात्यांच्या इडलीवड्याच्या आत्मचरित्राने त्या धुमसत्या निखार्‍यांवर पाणी टाकले आणि आपल्या ह्या हलक्या फुलक्या लेखाने तर कित्येकांच्या मनातली साचलेपणाची जळमटं निघाली. खडाजंगी, वादविवादाने जे साहित्यिक अग्निमांद्य आले होते ते ह्या दिलपाक लिखाणाने समूळ नष्ट झाले. अगदी अलिकडच्या अक्करमाशी लिखाणांचा धांडोळा घेतला तर तुमचा लेख सर्वांगसुंदर आहेच पण त्यात दांभिकपणाचा लवलेश नाही. विनोदाच्या क्षितिजावर जणू कस्तुरीचे हास्यतुषार दरवळले. मी अधून मधून तल्लफ आली कि हा लेख वाचते, तेव्हढेच काही काळ ह्या धकाधकीच्या जीवनात दाठरलेले मन प्रफुल्लित होते. बाकी काही म्हणा, तुमचा हा लेख उमजला तर एखादा नसनखवडा पण पोट धरधरून हसेल. ह्या ठाव घेणार्‍या लेखात तुम्ही अनेकांच्या नाकावर लिंबू घासलेत. खरी मजा तर आता सुपात असणार्‍यांची आहे. आपला काय पंचनामा होणार ह्या भीतीने त्यांना घोसळले आहे . पुढचा लेख झटकन् येऊ दे. हा असला प्रौढ मराठीत प्रतिसाद देण्यासाठी मराठी शब्दकोशात ठेवणीतले मराठी शब्द धुंडाळणारी, सृला > > बा आनंदी पक्ष्या देई, प्रसाद अपुला मजला काही, जेणे मन हे गुंगून जाई प्रेमाच्या डोई...

In reply to by सृष्टीलावण्या

मुक्तसुनीत 03/04/2008 - 09:57
सृला यांच्या शब्दकळेला मुक्त दाद द्यावीशी वाटते. त्यानी मांडलेल्या विचाराबद्दल दुमत होऊ शकते, परंतू शब्दांच्या निवडीच्या अस्सलपणाबद्दल कुणाला कसलीही शंका असायला नको. "नसनखवडा" , "दाठरलेले" मन , नाकावर लिंबू घासणे , अनेकाना "घोसळलेले" असणे , साहित्यिक "अग्निमांद्य "..... अहाहा. जीभेला चव आली राव.

In reply to by मुक्तसुनीत

धमाल मुलगा 03/04/2008 - 10:19
बरोबर असेलही हो तुमच॑! पण वाचल्या वाचल्या आम्हाला झीटच आली त्याच॑ क्काय? आधी कळेचना की नक्की कुठच्या भाषेत लिहिल॑य. आम्ही बिचारे पोटापुरत॑ शिकुन मोलमजुरी करणारे गरीब बिच्चारे हमाल. पार फाफललो ना... ए सृष्टीताई, आधी जरा डिस्क्लेमर टाकत जा ग॑ बाई, 'खालील लेखन हे ज्या॑च्या मराठीची प्रकृती क्षीण आहे त्या॑नी स्वत:च्या जबाबदारीवर वाचावे. काही शब्दा॑मुळे अशा व्यक्ती॑स मानसिक धक्का बसू शकतो !' वगैरे वगैरे :-)))) बाकी बेष्टच हो! - (भाषादारिद्र्यस॑पन्न) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर 03/04/2008 - 10:28
आम्ही बिचारे पोटापुरत॑ शिकुन मोलमजुरी करणारे गरीब बिच्चारे हमाल. हा हा हा धमाल्या! आमची पण तीच गत आहे रे बाबा! :) आम्ही आपलं जसं सुचेल तसं आमच्या भाषेत लिवायचा प्रयत्न करतो. एकतर श्रीमंत शब्दसंपदा लाभलेली भाषा कशाशी खातात तेच आम्हाला माहीत नाही आणि दुसरं म्हणजे ओढूनताणून, इकडनं-तिकडनं शब्द चोरून मुद्दामून तशी भाषा लिहिणे आमच्या स्वभावात बसत नाही! आपला, (भाषाप्रभू नव्हे, तर भाषेचा दिवाळखोर!) तात्या.

In reply to by धमाल मुलगा

तू म्हणतोस तर असे एक अस्वीकरण टाकायला हवे खरे म्हणजे लोक जास्त चवीने वाचतात (उदा. वरचा लेखच पहा ना. त्यातले अस्वीकरण आणि त्यावर डांबिसकाकांचा अभिप्राय ह्यासाठी आगामी मिपा साहित्य संमेलनात नक्की कोणाला अग्रासन द्यावे ह्याबाबत मनात कल्लोळ उठला आहे). मात्र असे हे अस्वीकरण टाकले नसताना सुद्धा तू आणि काही वेळ नसणार्‍या व्यक्तिमत्वांनी माझा प्रतिसाद आवडीने वाचल्याचे पाहून मन भरून आले. असो. झीटीमधून पूर्ण सावरला असशील तर आजानुकर्णाचा 'दिल्ले दान' वरील माझा प्रतिसाद वाच. तिथे उरलेले चविष्ट शब्द लिहिले आहेत. > > बा आनंदी पक्ष्या देई, प्रसाद अपुला मजला काही, जेणे मन हे गुंगून जाई प्रेमाच्या डोई...

In reply to by सृष्टीलावण्या

वरचा लेखच पहा ना. त्यातले अस्वीकरण आणि त्यावर डांबिसकाकांचा अभिप्राय ह्यासाठी आगामी मिपा साहित्य संमेलनात नक्की कोणाला अग्रासन द्यावे ह्याबाबत मनात कल्लोळ उठला आहे. सृलाताई तुम्ही काय, किंवा तात्या, केशवसुमार, सन्जोपराव काय मिपाच्या साहित्यमंदिरातले पुजारी! (ज्यांची नांवे घ्यायची राहिली असतील त्या पुजार्‍यांनी जोडे मारू नयेत!) आम्ही आपले पुजार्‍यांच्या पायाकडचे सेवक!! तुमची साहित्यिक प्रतिभा आमच्याकडे नाही. तेंव्हा, सेवा करावया लावा, देवा, हा योग्य चाकर|| आपला, पिवळा डांबिस (हे मी उपरोधाने लिहीत नसून खरोखरच तसे वाटते म्हणून लिहीत आहे)

मनापासुन 03/04/2008 - 10:29
जखमेवर मीठ चोळणे हे माहीत होते.......... नाकावर लिम्बु घासणे? नाक ठेचणे हे माहीत होते....नाकाला मिर्च्या झोंबणे हे ही माहीत होते. स्रुश्टीताई "नाकावर लिम्बु घासणे" या नव्या वाक्प्रचाराबद्ल मसाप मधे ठराव घेतो. ..............."पोहोर्‍याचा अण्णु" होताना मनापासुन पाहीले. (पोहोर्‍याचा अण्णु होणे....संदर्भ : अंतु बर्वा. मधली आळी,रत्नागिरी )

विजुभाऊ 03/04/2008 - 13:29
सन्जोप काका भगिनिमंडळावर तुमचा एवढा आकस का हो? अगदी अनुल्लेखाने मारताय वरदाबै , प्राजुबै , स्वाती राजेशबै , मीनल तै , स्रुष्टी तै ,मनस्वी बै , सुवर्णमयी बै ,स्वाती दिनेश तै यांच्या बद्दल काहीतरी लिहा नाय तर त्या भडकतील आणि मिपा वहिनी सेना काढुन तुमचे त्यात भाषण ठेवतील्... ३३% जागा तरी लिहा त्यांच्या वर .......................टी व्ही मालीकेत ही महीलां वर अन्याय न पाहु शकणारा...विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर 03/04/2008 - 14:07
रावसाहेबांचं मिपावर आणि खास करून तात्यावर विशेष पिरेम असल्यामुळे त्यांच्या खयालीपुलावाची मध्यवर्ती थीम ही 'तात्या'च दिसते आहे! :) ७ परिच्छेदांपैकी फक्त २ परिच्छेदात त्यानी आम्हाला वगळलंय! :) बाकीचे ५ परिच्छेद तात्यामय आहेत! :) हे पाहा - परिच्छेद १ - बरं मग किमान त्या रां.. आपलं, काही विशिष्ट सेवा पुरवणार्‍या बायकांच्या पाठीला साबण तरी चोळतोस की नाहीस? नाही? अरे, मग कसं होणार तुझं इथं या मिसळपाववर?" परिच्छेद २ - यात विसोबाला पत्ते खेळताना दाखवलंय! :) परिच्छेद ३ - "काय कर्णा? तू शेवटी आलास म्हणायचास. मला वाटलं तुझंही मन विटलं की काय मिसळपाववरुन? काय? होतोस का परत संपादक?" विसोबाने सुपारी कातरत विचारले. " मी लिहितो ते काय लोकांनी मला चांगलं म्हणावं, प्रतिक्रिया द्याव्यात म्हणून काय? आपापली श्रद्धा असते. साला, प्रतिक्रिया आल्या काय, नाही आल्या काय, आपण लिहितो आपल्या आनंदासाठी. काय?" परिच्छेद ६ - " हरामखोर आहे साला. आरे, आजवर आपन सर्वांणी त्याच्या पालख्या उचलल्या. भोई झालो त्याचे, भोई. त्याच्या धोतराला धरुन भेंचोत त्यो जाईल त्या जागेवर गेलो. त्यानं म्हनलं की इथं शेनाचा वास येतोय, की आपन लगेच त्याला हागणदारी म्हनून मोकळे झालो. त्यो म्हनाला, माझ्या पत्राला उत्तर देत न्हाईस काय, आपुन लाथ मारतो तुझ्यावर, की आपुनबी पायतानं काखोटीला मारुन त्याच्यामागं च्यूत्यासारखे पळत आलो. त्यानं म्हनलं, केशवसुमारा, बर्‍या बोलानं परत ल्ह्यायला लाग, तरीबी केशवसुमार काय तोंडातली गुळनी सोडंना. मी म्हनलं, मायला आता एक लेखच लिहितो,"रसिकाग्रणी तात्या आनि मुजोर केशवसुमार". परिच्छेद ७ - तात्याचे लेख बघ 'बाबुजींच्या गाण्यातल्या हुकलेल्या जागा' आणि 'भाईकाका कुठे घसरले?' -तर 'तात्यासेठ, डोळ्यात पाणी आणलंत हो, जिंकला, जिंकला तुम्ही'या आशयाच्या पंचेचाळीस प्रतिक्रिया. तात्पर्य काय, तर असं मनाला लावून घ्यायचं नसतं... " आता बोला! अहो रावशेठ, अहो अजून किती चड्डी उतरवाल आमची?!:) पण बघा हां, पुन्हा त्यावर, 'आपुन तो साला हैइच नंगा फकीर!' असं म्हणून आम्ही मोकळे होऊ! :) तेव्हा राव साहेब, जरा विजूभाऊ म्हणतात त्याप्रमाणे पुढच्या पुलावात आम्हाला जरा वगळा आणि महिला मंडळालाही आणा! आम्ही जरा एखाद एपिसोड तरी पुलावाबाहेर राहू म्हणतो! :) पुढच्या वेळेला जरा सर्कीट, पोष्टमन व त्याची प्रसव ही कविता आणि चित्तरचा संताप, माधवी गाडगीळ, राजीव अनंत भिडे, शलाका पेंडसे, सर्कीटने केलेला पोष्टमनचा पर्दाफाश, डबक्यातल्या फालतू राजकारणामुळे वैतागलेली आमची सोनाली, मिपावर येऊन काही लोकं खरडीतनं 'यापेक्षा चांगली संस्थळं अजून शिल्लक आहेत' असं लिहून मिपाचे मेंबर फोडण्याचा नाकाम प्रयत्न करतात! ;), वगैरे कल्पनाकिस्से जरा रंगवा जोरदार! :) हां, वाटल्यास खयाली पुलावाच्या त्याच्या पुढच्या भागात पुन्हा तात्याला आणलंत तरी चालेल. चला, लगे हाथ तुम्हाला एक थीमही सुचवतो. आवडली, पसंद पडली तर अवश्य लिहा तिच्यावर. थीम अशी आहे की काही मराठी संस्थळांवर संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून झाली आहे म्हणून तात्या चेकाळला आहे आणि "साला, तो तिथे ज्ञानेश्वरी उतरवतो काय, थांब साला, मी पण मिपावर तुकारामाची गाथा उतरवून काढतो!" असा संतप्त होऊन 'पण' करतो आणि इतर मंडळी त्याला शांत करतात! :) बघा बुवा, थीम पसंद पडली तर अवश्य लिहा, आम्हाला वाचायाल मजा येईल! :) चला..! उशीर होतोय, आता निघायला हवं! विशेष्ठ सेवा पुरवणार्‍या बायकांच्या डोक्यावर शिकेकाई घालायला जायचंय आज! :) (स्वगत!) आपलाच, तात्या. -- पुढचा मिपाकट्टा पिरंगुट येथेच व्हायला हवा!!! :)

विजुभाऊ 04/04/2008 - 11:29
पुलावाच्या अजुन कोणकोणत्या व्हरायटीज येणार आहेत इथे? अवांतरः एक सहज म्हणुन विचारतो...पुलाव आणि बिर्याणी यात एक्झॅक्ट फरक काय( रंग सोडुन)

In reply to by विजुभाऊ

मनस्वी 04/04/2008 - 11:38
(१) बिर्याणी थर देउन बनवितात. पुलावामध्ये थर नसतात. (२) बिर्याणीचे मसाले पुलावाशी तुलना करता जास्त तीव्र असतात. (३) बिर्याणीला मटण / चिकन / भाज्या आणि भात वेगवेगळे शिजवून मग दम लावतात. पुलाव डायरेक्ट फोडणीत भाज्या आणि तांदुळ टाकून करतात.

In reply to by विजुभाऊ

मला जाणवलेला फरकः- बिर्याणीत तूप जास्त असते. बिर्याणी, भात आणि मटणाचे थर लावून केली जाते. मटण आणि भात वेगवेगळे शिजवून जशी बिर्याणी करतात तशीच कच्चे मटण आणि तांदूळ एकत्र थर लावूनही बिर्याणी करतात. बिर्याणीत जास्त कॅलरीज असतात. बिर्याणी पचायला जरा जड असते. बिर्याणी त्यातील मसाल्यांमुळे तसेच, पुदीना, कोथींबीर, केशर, तूप ह्या पदार्थांमुळे पुलावा पेक्षा एकदम वेगळी लागते. पुलाव मटण शिजवलेल्या पाण्यात करतात. त्याला मराठीत आखणीचा आणि उर्दूत या़खनीचा पुलाव असे म्हणतात. शिजवलेल्या मटणाची बारीक तुकडे (हाडे नाही) ह्या पुलावात घालतात. पुलावात गरम मसाले, तूप कमी प्रमाणात वापरतात. पुलाव, बिर्याणीपेक्षा पचायला हलका असतो. मटणाची याखनीमुळे पौष्टीक असतो. त्यामुळे दीर्घ आजारातून उठलेल्या माणसास शक्तीवर्धक आहार म्हणून देतात. बिर्याणी किंवा पुलाव हा फक्त मटणाचाच करतात. चिकन आणि व्हेज बिर्याणी आणि पुलाव हे सोयीनुसार शोधून काढलेले पदार्थ आहेत.

सर्वप्रथम सन्जोप रावांचे अभिनंदन! चांगला लेख लिहिल्याबद्द्ल तर आहेच पण चर्चेला एक नवा विषय दिल्याबद्द्ल!! नाहीतर हल्ली जे काही विषय चालले होते, उदा. शिवाजीची जात, शाळेतले धार्मिक शिक्षण, सहा महिन्यात कर्जमुक्त वगैरे! आता मेंबरं एकमेकांच्या नरड्यावर बसणार असं वाटायला लागलं होतं.:) नाहीतर अगदी दुसरं टोक म्हणजे पुण्यातल्या पाट्या, गॅलरीत वाळत घातलेल्या चड्डीची चित्रे वगैरे!! आज अखंड भारत पाहिजे म्हणून तुम्ही घेणार का पाकिस्तान आणि बांगला देशाला आपल्यात सामावून? का नाही? यू.पी. आणि बिहार नाही सामावून घेतला? देशासाठी त्याग करायला नको? बोला, भारतमाता की जय!! आणि इंडस बासमती राईस खायला मिळेल तो वेगळाच!! दमादम मस्त कलंदर!!:)) डबल बॅरल दिलीप संतापाने जांभळा झाला होता. आम्ही सहज म्हणून लिहिलेले बिरूद असे चिकटलेले पाहुन आम्ही धन्य झालो आहोत!!:)) तरी नशीब चतुरंगांनी दिलेले नांव (कोणतं ते आम्ही नाही सांगणार जा! मिपा ची शंभर पाने वाचुन काढा जर माहिती करून घ्यायचे असेल तर!) चिकटले नाही (अजून!) 'सकाळी तोंडसुद्धा न धुता क्वार्टर लावण्याने आलेली प्रचिती' या माझ्या लेखाबाबत. बाबारे, मोठ्याने म्हणूसुद्धा नकोस! आम्ही "नशा" या विषयावर (पूर्ण शुद्धीत राहून) एकच चिंतन काय लिहिलं तर दहा वड्यांनी (वडा = जो स्वतःला बेवडा समजत नाही तो) आम्हांला झापलं. पण शिंच्यांची गंमत बघ, स्वतः न प्यालेल्या दारूबद्दल धडाधडा बोलले पण त्याच लेखात मी लिहिलेल्या चहा/कॉफीच्या सवयीबद्दल मात्र अळिमिळी गुपचिळी!! हे आमचं नशीब! नाहीतर बघ काही माणसं कसल्या-कसल्या बायकांच्या पाठीला साबण लावूनसुद्धा नामानिराळी राहतात! नाहीतर आम्ही भरलेला ग्लास तोंडाला लागण्याआधीच "शौकिन' (बेवडे असं वाचायचं!) म्हणून डिक्लेअर!!!:)) "धमु नका रे म्हणू मला.." धमाल मुलगा कळवळला. अरे, लहान आहे रे तो अजून! कशाला छळता त्याला? आधीच लग्न करू का नको, करू का नको अशा विचाराने धास्तावलाय बिचारा! लग्नानंतरच्या हनिमूनचं टेन्शन ते वेगळंच!!:))) आता याला आपण पिडा म्हणतो, त्याला काही वाटतं का त्याचं?" त्याला काय वाटणार! तो बारा गावचं पाणी पिऊन टणक झालाय!! आणि नाहीतरी तो कधी कधी दुसर्‍याना पिडा देतोच!!! सारखं राष्ट्रवादी काँग्रेसच्या फलकांसारखं कुठं या अण्णाला शुभेच्छा, या दादाचं अभिनंदन असं करत राहण्यात काही हशील नाही, काय? हे मात्र अगदी खरं! तिच्यायला अगदी असंच व्हायला लागंलंय अलिकडे! आणि कहर म्हणजे नुसतं अभिनंदन केलं तरी त्याच्यावर टीकात्मक प्रतिक्रिया येतात!! आता 'अ' ने 'ब' चं केलेलं अभिनंदन 'क' ला का टोचतं कळत नाही!!:)) इकडे इनोबा, धमाल मुलगा आणि पिवळा डांबिस 'दिसामाजी काहीतरी वैचारिक वाचनाचे फायदे' या विषयावर गंभीरपणे बोलत होते. ते आम्ही नाही, धमु तर मुळिच नाही, ते फक्त इनोबा! ते बोलतात आणि आम्ही ऐकतो. आम्हाला त्यांच्याबद्दल अतीव आदर आहे हो! खरंतर आम्हाला विनायक नांवाच्या माणसांबद्द्ल एकूणच अतीव आदर आहे! मराठी संस्कृतीचे खरे पाईक! पेशवाईत साडेतीन शहाणे होते म्हणतात तसे मिपावर साडेतीन विनायक अती आदरणीय आहेत: एक मंगलमूर्ती (महादेव-पार्वती पुत्र), दुसरे सावरकर, तिसरे सेनापती बापट आणि अर्धे आमचे इनोबा अनिवसे!! काय पटतं की नाही?:))) वरील लेखनातील पात्रे प्रत्यक्षातील असली तरी प्रसंग पूर्ण काल्पनिक आहेत, हे कळायला काही आईन्स्टाईनची बुद्धीमत्ता नको. हे खास सर्किटरावांसाठी लिहिलंय वाटतं. त्यांना अलिकडे निर्बुध्द माणसाच्या मेंदूतील पेशी होण्याचे डोहाळे लागले आहेत!!:) बाकी लेख झकास! पस्तीस वर्षांपूर्वी लागून गेलेल्या 'पिंजर्‍या'च्या २००८ मधल्या पंचनाम्यापेक्षा हे आवडलं! काय समजलांत!!!:)))) आपला कृपाभिलाषी, पिवळा डांबिस (पिडा)

In reply to by पिवळा डांबिस

कोलबेर 01/04/2008 - 10:06
बाकी लेख झकास! पस्तीस वर्षांपूर्वी लागून गेलेल्या 'पिंजर्‍या'च्या २००८ मधल्या पंचनाम्यापेक्षा हे आवडलं! काय समजलांत!!!:))))
अगदी हेच!! झक्कास लेख आणि जबरा प्रतिसाद (गॅलरीत वाळत घातलेल्या चड्डीची चित्रे काढणारा) कोलबेर
"अच्छा अच्छा.. म्हणजे ती नुसती पांघरायची असते होय? मला वाटलं की ती खरोखर तशी करायची असते. सॉरी हां..." सन्जोप विनयानं म्हणाला.
आमच्या कळफलकावर देखिल उसाचा रस सांडता सांडता राहिला..:)))

विसोबा खेचर 01/04/2008 - 07:07
बरं मग किमान त्या रां.. आपलं, काही विशिष्ट सेवा पुरवणार्‍या बायकांच्या पाठीला साबण तरी चोळतोस की नाहीस? नाही? अरे, मग कसं होणार तुझं इथं या मिसळपाववर?" :) आन हितं येऊन बगतो तर काय, ह्यो केशवसुमार तात्याच्या कुल्ल्याला कुल्ला लावून बसलेल्या. गणिम सूर्याजी पिसाळ..." हा हा हा! मांडीला मांडी लावून बसणे हे ऐकले होते, कुल्ल्याला कुल्ला हे बाकी क्लासच! :) "व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार आणि दडपशाही व कंपूबाजीमुक्त वावर हेच धोरण आपण आजवर सांभाळलेले आहे. मी बघ कसा जनरल डायरला रिटायर करून नवीन संपादक मंडळाच्या हातात संपादन सोपवून मोकळा झालो आहे. " हम्म! आता पुन्हा तोच विचार सुरू आहे. नवीन संपादक मंडळाकरता आम्ही काही सभासद पुन्हा हेरले आहेत. आणि लवकरच आणिबाणी मागे घेऊन लोकशाहीची दुसरी फेज थोड्या वेगळ्या स्वरुपात मिपावर जाहीर करू म्हणतो! लोकशाहीत वृत्तपत्र स्वातंत्र्याला मुभा असते. त्यामुळे 'साप्ताहिक मिसळपाव' असं एखादं साप्ताहिक इथे मिपावरच सुरू करीन म्हणतो! काय रावसाहेब, आठवड्यातून एकदा "संपादकीय अग्रलेख" लिहायची जिम्मेदारी घेता काय? तुम्ही एकदम फस्क्लास लिहू शकाल म्हणून विचारतो! :) तात्याचे लेख बघ 'बाबुजींच्या गाण्यातल्या हुकलेल्या जागा' आणि 'भाईकाका कुठे घसरले?' -तर 'तात्यासेठ, डोळ्यात पाणी आणलंत हो, जिंकला, जिंकला तुम्ही'या आशयाच्या पंचेचाळीस प्रतिक्रिया. तात्पर्य काय, तर असं मनाला लावून घ्यायचं नसतं... " अहो तेवढ्या प्रतिक्रिया मिळवण्यासाठी तेवढा आंतरजालीय अभ्यास असावा लागतो! आमचं ट्रेनिंग तर थेट तुमच्या मनोगतातच झालं आहे. तिथे पण साला आपण मिळवायचो साला ४०/४५ प्रतिक्रिया! काय रावशेठ, खरं की नाय?! :) "बरोबर आहे हां" आतापर्यंत गप्प बसलेला संजिव म्हणाला. मलाही हाच अनुभव आहे. 'सकाळी तोंडसुद्धा न धुता क्वार्टर लावण्याने आलेली प्रचिती' या माझ्या लेखाबाबत. त्यावेळी तर माझी ओळखही नव्हती कुणाशी." :)))) जाऊ द्या रावशेठ, साला येताजाता तात्याला हाणता तेवढं पुरे आहे की! त्या संजिवच्या पंच्याला क उगाच हात घालताय? अहो, देवभक्त भला माणूस आहे तो! :) असो, तुमचा हातखंडा असलेल्या विषयावर बर्‍याच दिवसांनी वाचले, खूप आनंद वाटला! खयाली पुलावचे पुढचेही भाग अंतराअंतराने येऊ द्यात ही विनंती... जाता जाता - हा लेख 'आपापसात' मध्ये न जाता मुख्यप्रवाहातच राहील एवढं तरी मिपाचं वैशिष्ठ्य तुम्हाला मानायला हरकत नाही रावसाहेब! :) आपला, (साप्ताहिक मिसळपाव सुरू करून संपादकीय अग्रलेखाची जबाबदारी संजोपवर सोपवायची एक नवीनच कल्पना सुचलेला!) तात्या.

प्राजु 01/04/2008 - 07:28
सर्वप्रथम सन्जोप रावांचे अभिनंदन! चांगला लेख लिहिल्याबद्द्ल तर आहेच पण चर्चेला एक नवा विषय दिल्याबद्द्ल!! नाहीतर हल्ली जे काही विषय चालले होते, उदा. शिवाजीची जात, शाळेतले धार्मिक शिक्षण, सहा महिन्यात कर्जमुक्त वगैरे! आता मेंबरं एकमेकांच्या नरड्यावर बसणार असं वाटायला लागलं होतं.:) नाहीतर अगदी दुसरं टोक म्हणजे पुण्यातल्या पाट्या, गॅलरीत वाळत घातलेल्या चड्डीची चित्रे वगैरे!! डांबिसकाका, हे मात्र झकासच..! संजोपराव, आपला हा खयाली पुलाव अतिशय चांगला जमला आहे. हा हैद्राबादी पुलाव होता.. आता पुढचा पुलावचा प्रकार कोणता आणि कधी शिजवताय?? :))) - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

मुक्तसुनीत 01/04/2008 - 08:34
प्रसिद्ध विनोदी अमेरिकन टीव्ही सिरिज "साईन्फेल्ड" मधे "बिझारो वर्ल्ड" नावाचा एक सुप्रसिद्ध एपिसोड आहे. त्याची आठवण झाली. या एपिसोडचा सारांश असा की जेरी, जॉर्ज आणि क्रेमर , या अत्यंत आळशी, विचित्र, विक्षिप्त अशा तीन मित्रांमधे वावरणार्‍या इलेनला अचानक तीन नवे असे लोक भेटतात जे या तीन मित्रांसारखेच जवळजवळ दिसतात, पण त्यांच्या बरोब्बर उलट्या स्वभाव-विभावांचे (म्हणजे नम्र , अभ्यासू, सभ्य - आणि म्हणूनच अत्यंत वैशिष्ट्यहीन, कंटाळवाणे !) असतात. संजोपरावानी एक असेच "बिझारो" जग रेखाटले आहे, ज्यात जो जो जसा जसा "नॉर्मल" जगात आहे तो तो त्याच्या बरोब्बर उलटा या "बिझारो" जगात आहे :-) " साईन्फेल्ड"च्या त्या एपिसोडमधे मूळचे "नॉर्मल" मित्र आणि त्यांच्या "बिझारो" जगातल्या प्रतिकृतींची शेवटी गमतीशीर भेट होते. संजोपरावांच्या दुनियेत असे झाले तर ??

सर्किट 02/04/2008 - 01:41
काय वो तुमचे ते लेखन संजोपराव ! " हे बघ दिलीप.." प्रमोद त्याच्या दंडाला धरुन म्हणाला. "मलाही कधी कधी त्वेषानं वार करावासा वाटतो. मीही कधीतरी एकदा 'सहमत नाही' असं लिहून बघणार आहे. पण काय करणार सांग." आम्ही आम्ची सगळी कॉफी ठ्ठ्या करून आमच्या ल्यापटापवर सांडवली बघा.. एकदा तरी प्रमोदकाका नॉन-पॉलिटिकल झालेत, तर तुमच्या घरीच सत्यनारायण घालू... - सर्किट

आजानुकर्ण 01/04/2008 - 08:47
मानामान किती | तुझ्या क्षुल्लका संपत्ती || जा रे चाळवी बापुडी | कोणी धरिती ती गोडी || पाहतोसी काय | आता पुढे करी पाय || वरि ठेवू दे मस्तक | ठेलो जोडुनी हस्तक || रिद्धीसिद्धी देसी | आम्ही चुंभळे नव्हो तैसी || तुका म्हणे ठका | ऐसे नागविले लोका || वा वा. (आस्वादक) आजानुकर्ण

छोटा डॉन 01/04/2008 - 08:53
संजोपराव , तोडलतं तुम्ही ... जवाब नही ... ""हेच ते, प्राण्यांची शरीरं वगैरे... पण पीतही नाहीस म्हटल्यावर.. बरं मग किमान त्या रां.. आपलं, काही विशिष्ट सेवा पुरवणार्‍या बायकांच्या पाठीला साबण तरी चोळतोस की नाहीस? नाही? अरे, मग कसं होणार तुझं इथं या मिसळपाववर?"" हा हा हा, खरे आहे. सुमारशेठ, विचार करा ..... "सर्किट म्हणाला. "त्याचबरोबर सदस्यांचा अनामिक रहाण्याचा मूलभूत अधिकार जपण्याच्या कामात माझा खारीचा वाटा आहे, याचा मला सार्थ आनंद आहे."" जबरा ... "इकडे इनोबा, धमाल मुलगा आणि पिवळा डांबिस 'दिसामाजी काहीतरी वैचारिक वाचनाचे फायदे' या विषयावर गंभीरपणे बोलत होते." आता मात्र खरचं पोट दुखुस्तोवर हसू आलं. मस्त ... अवांतर : असे लेख लिहण्याची कल्पना चांगली आहे, बघु आम्ही पण ट्राय करतो ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विजुभाऊ 01/04/2008 - 10:23
सन्जोप राव तुमी खरेच जब्बर लिवताय्.....मला तर प्रत्यक्ष आपण बसलोय असे वाटायला लागले. बाकी खरेच आपण एकदा सगळे मिळुन कॉफी प्यायला बसूच( ए धमु हसलास का रे? ऑ.....तुला काय कॉफी चे नुसते नाव काढले तरी लत्ता ( अर्थ: कीक) बसु लागली की काय. मजा आला ....जरा क्लायंट शी तह आणि वाटाघाटी चालल्यात. मोकळा झालो की येतोच घाटात. बाकी सध्या इथले लोक कसले कसले घाट घालताहेत. घाटाच्या पायथ्याशी वैचारीक कट्टा करण्याचा घाट घालुन तो पार ही करतात. हां, तर इथं लिहिताना आपण काहीतरी गंभीर आणि वैचारिक लिहिलं पाहिजे. सारखं राष्ट्रवादी काँग्रेसच्या फलकांसारखं कुठं या अण्णाला शुभेच्छा, या दादाचं अभिनंदन असं करत राहण्यात काही हशील नाही, काय? हे मस्तच.... इतके डायरेक्ट लिहु नका नायतर ही मंडळी " कायम चूर्ण चांगले की ईसबगूल "यावर जब्बरी वैचारीक परी संवाद घडवायचे. सन्जोप काकांचा पुतण्या विजुभाऊ

केशवसुमार 01/04/2008 - 10:41
संजोपराव, ज ह ब ह रा हा.. "हेच ते, प्राण्यांची शरीरं वगैरे... पण पीतही नाहीस म्हटल्यावर.. बरं मग किमान त्या रां.. आपलं, काही विशिष्ट सेवा पुरवणार्‍या बायकांच्या पाठीला साबण तरी चोळतोस की नाहीस? नाही? अरे, मग कसं होणार तुझं इथं या मिसळपाववर?" खो खो खो खि खि खि... लवकरच तुमच दर्शन घ्यायला हवे.. ते प्राण्यांची शरीर नाही हो.. प्रेतं.. प्रेत.. ते तेव्हढ लगेच बदला बघू.. केशवसुमार अवांतर :तुम्ही कविता /गझल कधी लिहताय..??

विसोबा खेचर 01/04/2008 - 10:42
" हरामखोर आहे साला. आरे, आजवर आपन सर्वांणी त्याच्या पालख्या उचलल्या. भोई झालो त्याचे, भोई. त्याच्या धोतराला धरुन भेंचोत त्यो जाईल त्या जागेवर गेलो. त्यानं म्हनलं की इथं शेनाचा वास येतोय, की आपन लगेच त्याला हागणदारी म्हनून मोकळे झालो. त्यो म्हनाला, माझ्या पत्राला उत्तर देत न्हाईस काय, आपुन लाथ मारतो तुझ्यावर, की आपुनबी पायतानं काखोटीला मारुन त्याच्यामागं च्यूत्यासारखे पळत आलो. च्यायला! आमचे बिरुटेशेठ एवढ्या शिव्या कधीपासून द्यायला लागले? :)) की, एक प्राध्यापक दुसर्‍या प्राध्यापकाच्या तोंडी शिव्या घालून शिव्या द्यायची हौस भागवू पाहतोय!? :) चालू द्या, चालू द्या, तुमच्या शिव्या-ओव्या सगळं काही यथास्थित चालू द्या! आमचं काहीच म्हणणं नाही. पण काय रे संजोप, अरे अजून किती अभिव्यक्ति स्वातंत्र्य पाहिजे तुम्हा लोकांना? आणिबाणीच्या परिस्थितीतही लेको तुम्हाला एवढं अभिव्यक्ति स्वातंत्र्य मिळतं आहे, तरीही अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाने माझ्या नावाने शिमगा करून माझ्या डोक्यावर मिरे वाटता? :) अरे थोडासा तरी न्याय करा की रे! की तात्या म्हणजे भिकारचोटच माणूस आहे असा ठरावच पास करून घेतलाय तुम्ही लोकांनी? :) छ्या..! मिपावर तात्पुरते/प्रासंगिक यथास्थित भांडू पण शेवटपर्यंत सगळे एकत्र आनंदाने नांदू एवढीच माझी मनापासूनची इच्छा आहे असं मी तुला जुना मित्र म्हणून आणि चंचीला स्मरून शेवटचंच सांगतो आहे संजोप! लेका पुण्यात मिपाचा कट्टा झाला, मन मोठं करून तू काही नाही गेलास त्या कट्ट्याला सांग बरं! साला, मला मनोमन खूप आनंद झाला असता! लेका पुण्यात राहतोस आणि कट्ट्यकडे पाठ फिरवतोस? शोभलं नाही तुला! :) तात्या.

तात्याच्या भाषेत ...और ये लगा सिक्सर! "संजोप स्पेशल" टच, खूप दिवसांनी तुमच्या खास टच चे लिखाण केलेत. मजा आली वाचताना! स्वाती

धमाल मुलगा 01/04/2008 - 11:35
च्यामारी, सध्या वेळ नाहीय्ये निवा॑त प्रतिसाद टाकायला... उद्या तब्ब्येतीत लिहितो उत्तर :-) बाकी चिमटे एकदम फस्कल्लास -(कळवळणारा) धमु

विसोबा खेचर 01/04/2008 - 11:38
लिखाणाच्या सोयीसाठी काही ज्येष्ठांचे उल्लेख एकेरी करावे लागले आहेत, त्याबद्दल क्षमस्व. ठीक आहे, ठीक आहे. ज्जा! तुला केली क्षमा!! :) आपला, (क्षमाशील ज्येष्ठ!) तात्या.

सहज 01/04/2008 - 15:35
स्टार वॉर्स सागा कन्टिन्युज एन्ड ओबी-वन [का पालपटाइन] इज बॅक!! एक दिवस ल्युक स्कायवॉकर्णाला, डार्थ खेचर म्हणणार आय एम युअर फादर!! मग द जेडाय कॉन्सील एन्ड द सीथ लिव्हड हॅपीली एव्हर अफ्टर!! वारकरी जी. एं. लुकास!! [गुरू, 03/27/2008 - 11:25 माफ करा. कार्यबाहुल्य. जी.एं. वर लिहायचे तर अभ्यास करावा लागतो. उगीच जाताजाता अमुकला ग्रेट म्हणावे की नाही किंवा 'आमचा गो इतिहास...' असे गळे काढण्याचे ते काम नव्हे. तेवढा वेळ सध्या नाही. सवड मिळाली की लिहितो.] हे बदडायच काम सवडीच का सोयीचं? अभ्यासपुर्वक की जाताजाता खरडलेल? :-) तुम्ही "ओबी वन राव" का "संजोप पालपटाईन" एकदाचे काय ते ठरवा. डार्थ खेचरला इतके घट्ट धरुन ठेवताय. चेल्याने गिर्यारोहण / यात्रा संपले असल्यास गुरुजींना अर्थ समजवावा!!

In reply to by सहज

चेल्याने गिर्यारोहण / यात्रा संपले असल्यास गुरुजींना अर्थ समजवावा!! कोण चेला आणि कोण गुरु ? :) अहो, सहजराव !!! जी. ए. च्या कथांवरुन निघणार्‍या अर्थावरुन त्यांचे सध्या जमत नाही. (नुकतेच दोघांनी मिळुन जी.एंची पुस्तके पाचगणीच्या धबधब्यात सोडली - एक बातमी ) त्यामुळे सध्या एक तुकारामाची गाथा वाचतो, तर एक इंग्रजी पुस्तकाचे स्वैर अनुवाद करतोय म्हणे :)

भोचक 01/04/2008 - 16:55
हेच ते, प्राण्यांची शरीरं वगैरे... पण पीतही नाहीस म्हटल्यावर.. बरं मग किमान त्या रां.. आपलं, काही विशिष्ट सेवा पुरवणार्‍या बायकांच्या पाठीला साबण तरी चोळतोस की नाहीस? नाही? अरे, मग कसं होणार तुझं इथं या मिसळपाववर?"
संजोपजी, मजा आला. शैलीसुद्धा धमाल. प्रत्येकाची वैशिष्ट्ये छान टिपली आहेत. (स्वतःच्याही पाठीपर्यंत साबण न पोहोचल्याने हळहळणारा) भोचक

मनापासुन 01/04/2008 - 17:03
सर्वसाक्षी आणि विजुभाऊचे वेगळेच चालले होते. "जुने जाऊद्या मरणालागुनि" की अशीच काहीशी ऒळ आहे ना रे ती? या इतिहासाच्या कचाट्यातून आपण कधी बाहेर पडणार कुणास ठाऊक." हा विजुभाऊ चा स्वभाव एकदम फक्कड पकडला आहे. हो ! तो "जुने जाऊद्या मरणालागुनि" म्हणताना ऐतिहासिक भाषा पण टेचात वापरतो...काय वल्ली आहे हे नीट कळतच नाही. ऐतिहासीक म्हणावा तर परवा संजीव च्या स्तोत्रावर जाम घसरला आणि उखडला. तुम्हाला काय कर्ण पिशाच्च वश झालेय की काय अशी शन्का येत्येय. स्वभावाचे यक्झॅक्ट वर्णन ....धमु चे सुद्धा. कट्ट्यावर न जाता सुद्धा येवढं? लेख आवडला.........अगदी मनापासुन

विजुभाऊ 01/04/2008 - 19:51
विजुभाऊ चा स्वभाव एकदम फक्कड पकडला आहे. हो बरे झाले मला ते तरी समजले. आपले इतिहासावर प्रेम आहे. पण आपण त्यामुळे केवळ इतिहासातच रहात नाही. ईतिहासावर प्रेम करताकरता उगच स्वतःच ऐतिहासिक पुराण वस्तु व्हायला आवडत नाय आपल्याला आपल्या इतिहासातल्या योग्य त्याच गोष्टींचा अभिमान आहे. कोणी उगाच स्तोत्रे म्हणुन कर्ज फिटेल म्हणाले की आपल्या डोक्यातली सगळे बाजीप्रभु जागे होतात गनीम टीपायला.स्तोत्रे म्हणुन फारतर म्हणण्याची हौस फिटेल स्तोत्रांचा उपयोग मला फार झाला वर्गात गाण्यांच्या भेंड्या खेळताना. र वरुन तर रामरक्षेमुळे कधीच प्रॉब्लेम आला नाय.

इनोबा म्हणे 01/04/2008 - 20:05
जबरा हो संजोपराव.... पुलाव अगदी झक्कास जमलाय. वि.सू.:ज्यांना झेपत नसेल त्यांनी हा पुलाव जास्त खाऊ नये,नाहीतर पूलाखाली बसायची वेळ येईल. :) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

'तात्यासेठ, डोळ्यात पाणी आणलंत हो, जिंकला, जिंकला तुम्ही' हे एकदम जब्रा..... असे काथ्याकूट सुरुच राहिले! अशाच काथ्याकुटांच्या प्रतिक्षेत :) - छोटी टिंगी ;)

झंप्या 02/04/2008 - 07:21
"पन तात्या, तुज्या संपादक मंडळात आमची वर्दी न्हायी लावलीस तू. मी न्हाई, प्रकाश घाटपांडे न्हाई, प्राजू न्हाई, गारंबीचा बापू न्हाई, नाना चेंगट न्हाई... यवडंच काय पन धोंडोपंतबी न्हाई. तू निवडलंस ते पोष्टमन, किमयागार आन आपासाहेब चौघुले या तिगास्नी. ह्ये काय तुजं कळंना राव..." खल्लास रावसाहेब! जींकलात!!.. पण काय हो तो किमयागार तर ठार झाला बाळासाहेब (आपासाहेब नव्हे) रुसुन गेलाय वाटतं, पोष्टमन तर घरोघरी पोथ्या पोहिचवतोय..मग ते गारंबीचा बापू, शलाका पेंडसे, राजीव अनंत भिडे हे लोक कुठे गेले ओ? आजकाल कुठे गेले.. तिच्यामायला तात्याच्या लिखाणाला पण ते प्रतिसाद घालत नाहीत बघून काळजी वाटते. अगदी अलीकडचा 'उथळ आणि बटबटीत प्रतिसादांपासून सुटका' हा छोट्या डॉनचा लेख बघ.. हे तर कै च्या कैच! १ नंबर!! 'तात्यासेठ, डोळ्यात पाणी आणलंत हो, जिंकला, जिंकला तुम्ही' असले प्रतिसाद देणार्‍यांना लाल भडक तर्रीची धुरी देऊन नुसत्या डोळ्यातुनच नव्हे तर आणखी कुठून कुठून पाणी काढावेसे वाटते बघा!उगाच मिसळपाव मिसळपाव करुन नाचतात आणि गुळमट प्रतिसाद टाकतात लेकाचे.

अभिज्ञ 02/04/2008 - 22:35
मागे बिरुटे साहेबांचा "तात्या मनोगतावर परतला" असाच काहितरी एक लेख होता. त्यात सुध्दा ब-याच लोकांचि स्टाईल (ने?) मारलि होती! तसाच हा एक झकास "लेख". मोकळा वेळ मिळत नसल्याने आम्हि काहि इथे जास्त लिहित नाहि,पण मि.पा.वर वाचन मात्र चालू असते. त्यामुळे बरीच पात्रे ,त्यांची शैली माहित आहे.त्यामुळे लेखाचा जास्त आनंद घेता आला. असो. (फक्त मिसळपाववरतिच वावरणारा) अबब

संकेतस्थळावरील व्यक्तिचित्रांची चांगलीच खेचली आहे. लेखन बहारदार झाले  आहे आणि ते आवडले.
बाकी आमच्या तोंडी खालील लेखनात ओव्या जरा लैच झाल्या, जाऊ द्या !!!!  या निमित्ताने आपण आपली हौस तर भागवून घेतली. :)

" हरामखोर आहे साला. आरे, आजवर आपन सर्वांणी त्याच्या पालख्या उचलल्या. भोई झालो त्याचे, भोई. त्याच्या धोतराला धरुन भेंचोत त्यो जाईल त्या जागेवर गेलो. त्यानं म्हनलं की इथं शेनाचा वास येतोय, की आपन लगेच त्याला हागणदारी म्हनून मोकळे झालो. त्यो म्हनाला, माझ्या पत्राला उत्तर देत न्हाईस काय, आपुन लाथ मारतो तुझ्यावर, की आपुनबी पायतानं काखोटीला मारुन त्याच्यामागं च्यूत्यासारखे पळत आलो.

सहमत !!!! ;) हाहाहाहाहा:))))))))) 

'एक जबरदस्त फसलेला आंतरजालीय दिवाळी अंक'  या विषयावर आपण कधीतरी आमचे खिसे चाचपणार हेही आम्हाला माहित होतं :)

खयाली पुलावात  'दिलीप' च्या मसाल्याचा लै  वापर झाल्यासारखा  वाटला !!!! :)
'ज्योतिषविषयक लेख वाचण्यापासून कसा बचाव कराल?' हा प्रकाश घाटपांडेचा लेख घे,
:)))))) ह. ह. पु. वा. च्यायला आमच्या घाटपांडे साहेबांनी काय लिहावे आता !!!

आणि जी.ए.कुलकर्णी हा कालबाह्य झालेला लेखक आहे, असं माझं मत आहे" कर्ण जोरात म्हणाला. हे शक्य तरी आहे का ? जी. ए.चे जगभरात दोनच वाचकच शिल्लक राहिले आहेत, एक आपण आणि आमचा मित्र कर्ण ;)

अवांतर :) लेखनाच्या या आकृतीबंधाचा  वापर आपल्यापासुनच आम्ही शिकलो. त्यावर आम्ही दोन प्रयोग केले. आणि आपलेही दोन झाले. आता नवीन काही तरी शोधा बॉ !!! :)


आपला

दिलीप
(डबल बॅरलवाला)

तुमचे मुक्तचिंतन वाचले, मनात आलं इतक्या सुंदर कल्पनाविलासाला थातुरमातुर प्रतिसाद देण्यात हशील नाही. पण काय लिहावे सुचेना. २ दिवस खालच्या पापणीला वरची पापणी लागली नाही. खरोखरच मागल्या शुक्रवारी वातावरण पार कोंदटले होते, (मिपाचे ग्रहयोगच तसे असतील म्हणा पण) तात्यांच्या इडलीवड्याच्या आत्मचरित्राने त्या धुमसत्या निखार्‍यांवर पाणी टाकले आणि आपल्या ह्या हलक्या फुलक्या लेखाने तर कित्येकांच्या मनातली साचलेपणाची जळमटं निघाली. खडाजंगी, वादविवादाने जे साहित्यिक अग्निमांद्य आले होते ते ह्या दिलपाक लिखाणाने समूळ नष्ट झाले. अगदी अलिकडच्या अक्करमाशी लिखाणांचा धांडोळा घेतला तर तुमचा लेख सर्वांगसुंदर आहेच पण त्यात दांभिकपणाचा लवलेश नाही. विनोदाच्या क्षितिजावर जणू कस्तुरीचे हास्यतुषार दरवळले. मी अधून मधून तल्लफ आली कि हा लेख वाचते, तेव्हढेच काही काळ ह्या धकाधकीच्या जीवनात दाठरलेले मन प्रफुल्लित होते. बाकी काही म्हणा, तुमचा हा लेख उमजला तर एखादा नसनखवडा पण पोट धरधरून हसेल. ह्या ठाव घेणार्‍या लेखात तुम्ही अनेकांच्या नाकावर लिंबू घासलेत. खरी मजा तर आता सुपात असणार्‍यांची आहे. आपला काय पंचनामा होणार ह्या भीतीने त्यांना घोसळले आहे . पुढचा लेख झटकन् येऊ दे. हा असला प्रौढ मराठीत प्रतिसाद देण्यासाठी मराठी शब्दकोशात ठेवणीतले मराठी शब्द धुंडाळणारी, सृला > > बा आनंदी पक्ष्या देई, प्रसाद अपुला मजला काही, जेणे मन हे गुंगून जाई प्रेमाच्या डोई...

In reply to by सृष्टीलावण्या

मुक्तसुनीत 03/04/2008 - 09:57
सृला यांच्या शब्दकळेला मुक्त दाद द्यावीशी वाटते. त्यानी मांडलेल्या विचाराबद्दल दुमत होऊ शकते, परंतू शब्दांच्या निवडीच्या अस्सलपणाबद्दल कुणाला कसलीही शंका असायला नको. "नसनखवडा" , "दाठरलेले" मन , नाकावर लिंबू घासणे , अनेकाना "घोसळलेले" असणे , साहित्यिक "अग्निमांद्य "..... अहाहा. जीभेला चव आली राव.

In reply to by मुक्तसुनीत

धमाल मुलगा 03/04/2008 - 10:19
बरोबर असेलही हो तुमच॑! पण वाचल्या वाचल्या आम्हाला झीटच आली त्याच॑ क्काय? आधी कळेचना की नक्की कुठच्या भाषेत लिहिल॑य. आम्ही बिचारे पोटापुरत॑ शिकुन मोलमजुरी करणारे गरीब बिच्चारे हमाल. पार फाफललो ना... ए सृष्टीताई, आधी जरा डिस्क्लेमर टाकत जा ग॑ बाई, 'खालील लेखन हे ज्या॑च्या मराठीची प्रकृती क्षीण आहे त्या॑नी स्वत:च्या जबाबदारीवर वाचावे. काही शब्दा॑मुळे अशा व्यक्ती॑स मानसिक धक्का बसू शकतो !' वगैरे वगैरे :-)))) बाकी बेष्टच हो! - (भाषादारिद्र्यस॑पन्न) ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

विसोबा खेचर 03/04/2008 - 10:28
आम्ही बिचारे पोटापुरत॑ शिकुन मोलमजुरी करणारे गरीब बिच्चारे हमाल. हा हा हा धमाल्या! आमची पण तीच गत आहे रे बाबा! :) आम्ही आपलं जसं सुचेल तसं आमच्या भाषेत लिवायचा प्रयत्न करतो. एकतर श्रीमंत शब्दसंपदा लाभलेली भाषा कशाशी खातात तेच आम्हाला माहीत नाही आणि दुसरं म्हणजे ओढूनताणून, इकडनं-तिकडनं शब्द चोरून मुद्दामून तशी भाषा लिहिणे आमच्या स्वभावात बसत नाही! आपला, (भाषाप्रभू नव्हे, तर भाषेचा दिवाळखोर!) तात्या.

In reply to by धमाल मुलगा

तू म्हणतोस तर असे एक अस्वीकरण टाकायला हवे खरे म्हणजे लोक जास्त चवीने वाचतात (उदा. वरचा लेखच पहा ना. त्यातले अस्वीकरण आणि त्यावर डांबिसकाकांचा अभिप्राय ह्यासाठी आगामी मिपा साहित्य संमेलनात नक्की कोणाला अग्रासन द्यावे ह्याबाबत मनात कल्लोळ उठला आहे). मात्र असे हे अस्वीकरण टाकले नसताना सुद्धा तू आणि काही वेळ नसणार्‍या व्यक्तिमत्वांनी माझा प्रतिसाद आवडीने वाचल्याचे पाहून मन भरून आले. असो. झीटीमधून पूर्ण सावरला असशील तर आजानुकर्णाचा 'दिल्ले दान' वरील माझा प्रतिसाद वाच. तिथे उरलेले चविष्ट शब्द लिहिले आहेत. > > बा आनंदी पक्ष्या देई, प्रसाद अपुला मजला काही, जेणे मन हे गुंगून जाई प्रेमाच्या डोई...

In reply to by सृष्टीलावण्या

वरचा लेखच पहा ना. त्यातले अस्वीकरण आणि त्यावर डांबिसकाकांचा अभिप्राय ह्यासाठी आगामी मिपा साहित्य संमेलनात नक्की कोणाला अग्रासन द्यावे ह्याबाबत मनात कल्लोळ उठला आहे. सृलाताई तुम्ही काय, किंवा तात्या, केशवसुमार, सन्जोपराव काय मिपाच्या साहित्यमंदिरातले पुजारी! (ज्यांची नांवे घ्यायची राहिली असतील त्या पुजार्‍यांनी जोडे मारू नयेत!) आम्ही आपले पुजार्‍यांच्या पायाकडचे सेवक!! तुमची साहित्यिक प्रतिभा आमच्याकडे नाही. तेंव्हा, सेवा करावया लावा, देवा, हा योग्य चाकर|| आपला, पिवळा डांबिस (हे मी उपरोधाने लिहीत नसून खरोखरच तसे वाटते म्हणून लिहीत आहे)

मनापासुन 03/04/2008 - 10:29
जखमेवर मीठ चोळणे हे माहीत होते.......... नाकावर लिम्बु घासणे? नाक ठेचणे हे माहीत होते....नाकाला मिर्च्या झोंबणे हे ही माहीत होते. स्रुश्टीताई "नाकावर लिम्बु घासणे" या नव्या वाक्प्रचाराबद्ल मसाप मधे ठराव घेतो. ..............."पोहोर्‍याचा अण्णु" होताना मनापासुन पाहीले. (पोहोर्‍याचा अण्णु होणे....संदर्भ : अंतु बर्वा. मधली आळी,रत्नागिरी )

विजुभाऊ 03/04/2008 - 13:29
सन्जोप काका भगिनिमंडळावर तुमचा एवढा आकस का हो? अगदी अनुल्लेखाने मारताय वरदाबै , प्राजुबै , स्वाती राजेशबै , मीनल तै , स्रुष्टी तै ,मनस्वी बै , सुवर्णमयी बै ,स्वाती दिनेश तै यांच्या बद्दल काहीतरी लिहा नाय तर त्या भडकतील आणि मिपा वहिनी सेना काढुन तुमचे त्यात भाषण ठेवतील्... ३३% जागा तरी लिहा त्यांच्या वर .......................टी व्ही मालीकेत ही महीलां वर अन्याय न पाहु शकणारा...विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर 03/04/2008 - 14:07
रावसाहेबांचं मिपावर आणि खास करून तात्यावर विशेष पिरेम असल्यामुळे त्यांच्या खयालीपुलावाची मध्यवर्ती थीम ही 'तात्या'च दिसते आहे! :) ७ परिच्छेदांपैकी फक्त २ परिच्छेदात त्यानी आम्हाला वगळलंय! :) बाकीचे ५ परिच्छेद तात्यामय आहेत! :) हे पाहा - परिच्छेद १ - बरं मग किमान त्या रां.. आपलं, काही विशिष्ट सेवा पुरवणार्‍या बायकांच्या पाठीला साबण तरी चोळतोस की नाहीस? नाही? अरे, मग कसं होणार तुझं इथं या मिसळपाववर?" परिच्छेद २ - यात विसोबाला पत्ते खेळताना दाखवलंय! :) परिच्छेद ३ - "काय कर्णा? तू शेवटी आलास म्हणायचास. मला वाटलं तुझंही मन विटलं की काय मिसळपाववरुन? काय? होतोस का परत संपादक?" विसोबाने सुपारी कातरत विचारले. " मी लिहितो ते काय लोकांनी मला चांगलं म्हणावं, प्रतिक्रिया द्याव्यात म्हणून काय? आपापली श्रद्धा असते. साला, प्रतिक्रिया आल्या काय, नाही आल्या काय, आपण लिहितो आपल्या आनंदासाठी. काय?" परिच्छेद ६ - " हरामखोर आहे साला. आरे, आजवर आपन सर्वांणी त्याच्या पालख्या उचलल्या. भोई झालो त्याचे, भोई. त्याच्या धोतराला धरुन भेंचोत त्यो जाईल त्या जागेवर गेलो. त्यानं म्हनलं की इथं शेनाचा वास येतोय, की आपन लगेच त्याला हागणदारी म्हनून मोकळे झालो. त्यो म्हनाला, माझ्या पत्राला उत्तर देत न्हाईस काय, आपुन लाथ मारतो तुझ्यावर, की आपुनबी पायतानं काखोटीला मारुन त्याच्यामागं च्यूत्यासारखे पळत आलो. त्यानं म्हनलं, केशवसुमारा, बर्‍या बोलानं परत ल्ह्यायला लाग, तरीबी केशवसुमार काय तोंडातली गुळनी सोडंना. मी म्हनलं, मायला आता एक लेखच लिहितो,"रसिकाग्रणी तात्या आनि मुजोर केशवसुमार". परिच्छेद ७ - तात्याचे लेख बघ 'बाबुजींच्या गाण्यातल्या हुकलेल्या जागा' आणि 'भाईकाका कुठे घसरले?' -तर 'तात्यासेठ, डोळ्यात पाणी आणलंत हो, जिंकला, जिंकला तुम्ही'या आशयाच्या पंचेचाळीस प्रतिक्रिया. तात्पर्य काय, तर असं मनाला लावून घ्यायचं नसतं... " आता बोला! अहो रावशेठ, अहो अजून किती चड्डी उतरवाल आमची?!:) पण बघा हां, पुन्हा त्यावर, 'आपुन तो साला हैइच नंगा फकीर!' असं म्हणून आम्ही मोकळे होऊ! :) तेव्हा राव साहेब, जरा विजूभाऊ म्हणतात त्याप्रमाणे पुढच्या पुलावात आम्हाला जरा वगळा आणि महिला मंडळालाही आणा! आम्ही जरा एखाद एपिसोड तरी पुलावाबाहेर राहू म्हणतो! :) पुढच्या वेळेला जरा सर्कीट, पोष्टमन व त्याची प्रसव ही कविता आणि चित्तरचा संताप, माधवी गाडगीळ, राजीव अनंत भिडे, शलाका पेंडसे, सर्कीटने केलेला पोष्टमनचा पर्दाफाश, डबक्यातल्या फालतू राजकारणामुळे वैतागलेली आमची सोनाली, मिपावर येऊन काही लोकं खरडीतनं 'यापेक्षा चांगली संस्थळं अजून शिल्लक आहेत' असं लिहून मिपाचे मेंबर फोडण्याचा नाकाम प्रयत्न करतात! ;), वगैरे कल्पनाकिस्से जरा रंगवा जोरदार! :) हां, वाटल्यास खयाली पुलावाच्या त्याच्या पुढच्या भागात पुन्हा तात्याला आणलंत तरी चालेल. चला, लगे हाथ तुम्हाला एक थीमही सुचवतो. आवडली, पसंद पडली तर अवश्य लिहा तिच्यावर. थीम अशी आहे की काही मराठी संस्थळांवर संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून झाली आहे म्हणून तात्या चेकाळला आहे आणि "साला, तो तिथे ज्ञानेश्वरी उतरवतो काय, थांब साला, मी पण मिपावर तुकारामाची गाथा उतरवून काढतो!" असा संतप्त होऊन 'पण' करतो आणि इतर मंडळी त्याला शांत करतात! :) बघा बुवा, थीम पसंद पडली तर अवश्य लिहा, आम्हाला वाचायाल मजा येईल! :) चला..! उशीर होतोय, आता निघायला हवं! विशेष्ठ सेवा पुरवणार्‍या बायकांच्या डोक्यावर शिकेकाई घालायला जायचंय आज! :) (स्वगत!) आपलाच, तात्या. -- पुढचा मिपाकट्टा पिरंगुट येथेच व्हायला हवा!!! :)

विजुभाऊ 04/04/2008 - 11:29
पुलावाच्या अजुन कोणकोणत्या व्हरायटीज येणार आहेत इथे? अवांतरः एक सहज म्हणुन विचारतो...पुलाव आणि बिर्याणी यात एक्झॅक्ट फरक काय( रंग सोडुन)

In reply to by विजुभाऊ

मनस्वी 04/04/2008 - 11:38
(१) बिर्याणी थर देउन बनवितात. पुलावामध्ये थर नसतात. (२) बिर्याणीचे मसाले पुलावाशी तुलना करता जास्त तीव्र असतात. (३) बिर्याणीला मटण / चिकन / भाज्या आणि भात वेगवेगळे शिजवून मग दम लावतात. पुलाव डायरेक्ट फोडणीत भाज्या आणि तांदुळ टाकून करतात.

In reply to by विजुभाऊ

मला जाणवलेला फरकः- बिर्याणीत तूप जास्त असते. बिर्याणी, भात आणि मटणाचे थर लावून केली जाते. मटण आणि भात वेगवेगळे शिजवून जशी बिर्याणी करतात तशीच कच्चे मटण आणि तांदूळ एकत्र थर लावूनही बिर्याणी करतात. बिर्याणीत जास्त कॅलरीज असतात. बिर्याणी पचायला जरा जड असते. बिर्याणी त्यातील मसाल्यांमुळे तसेच, पुदीना, कोथींबीर, केशर, तूप ह्या पदार्थांमुळे पुलावा पेक्षा एकदम वेगळी लागते. पुलाव मटण शिजवलेल्या पाण्यात करतात. त्याला मराठीत आखणीचा आणि उर्दूत या़खनीचा पुलाव असे म्हणतात. शिजवलेल्या मटणाची बारीक तुकडे (हाडे नाही) ह्या पुलावात घालतात. पुलावात गरम मसाले, तूप कमी प्रमाणात वापरतात. पुलाव, बिर्याणीपेक्षा पचायला हलका असतो. मटणाची याखनीमुळे पौष्टीक असतो. त्यामुळे दीर्घ आजारातून उठलेल्या माणसास शक्तीवर्धक आहार म्हणून देतात. बिर्याणी किंवा पुलाव हा फक्त मटणाचाच करतात. चिकन आणि व्हेज बिर्याणी आणि पुलाव हे सोयीनुसार शोधून काढलेले पदार्थ आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार
या आठवड्याची पाककृती - खयाली पुलाव
बेसनलाडवाने बाटलीतला सोनेरी रंगाचा द्रवपदार्थ अंदाजानेच एका ग्लासमध्ये ओतला. ग्लास डोळ्याशी आणून अंदाज घेतला आणि पुन्हा उगीच होय की नाही एवढी व्हिस्की त्यात टाकली. "पाणी की सोडा?" त्याने विचारले. "काही नको." केशवसुमार म्हणाला. "म्हणजे? नीट घेणार की काय तू केशवा? त्रास होईल हो..." बेसनलाडू काळजीच्या स्वरात म्हणाला. "नाही... काही नको, म्हणजे काहीच नको. मी पीत नाही." "तू... पीत... नाहीस?" बेसनलाडवाने आश्चर्याने विचारले. "बापरे! म्हणजे तू अजिबातच.. अरे बापरे!

आज अचानक लाथ पडे ...

केशवसुमार ·

दचकुनि जागा मी नीजेतून भार्येने धरले नरडे तद माताय! केश्या तु म्हणजे 'हम नही सुधरेंगे' आहेस.... हा हा हा!!!! १ नंबर झालयं विडंबन!!!! (केशाचा पंखा) टिंग्या ;)

ऋषिकेश 31/03/2008 - 22:51
असता मनिमानसी 'तसे' मम अवचित दृष्टिस दृष्ट भिडे
:)
'गूढ खूण' मम कळुन लाजुनी बघते ती इकडे तिकडे
:))
निसटुनि जाई संधीचा क्षण सदा तिचा संकोच नडे
:)))
दचकुनि जागा मी नीजेतून भार्येने धरले नरडे
हा हा हा हा :))))))))))))))))) लई भारी!!!!!!!!!!!!!!!!!!! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

सर्किट 31/03/2008 - 23:00
केशा, अंतरपटाचा ह्या सोझ्ज्वळ स्थळावर इतका स्पष्ट उल्लेख ! संपलास तू आता ! बाकी, विडंबन झक्कास ! - सर्किट

चतुरंग 31/03/2008 - 23:52
अहो 'केशवसुमार' म्हणताम्हणता एकदम 'केशवदेमार' झालंय की विडंबन!;)) आवडलं पण! (अवांतर - तसं देवादिकांचं गाणं नाहीये ना म्हणून प्रतिक्रीया तरी देता आली, नाहीतर लगेच बोंबाबोंब सुरुच झाली असती टेहळणी करुन सिलेक्टिव्ह प्रतिक्रीया देणार्‍यांची!:) चतुरंग

सर्किट 31/03/2008 - 23:54
ह्यावरून आठवले, प्रसंग असा: खूप घाईची लागली आहे.. पण पायजाम्याच्या नाडीची गाठ काही केल्या सुटत नाही... "आज अचानक गाठ पडे, भलत्या वेळी, भलतीचकडे"... - (घाईत) सर्किट

प्राजु 01/04/2008 - 05:03
दचकुनि जागा मी नीजेतून भार्येने धरले नरडे या ओळी आवडल्या... :)))) - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

बेसनलाडू 01/04/2008 - 08:25
विडंबन अजिबात आवडले नाही. अगदी इन्स्टन्ट प्रतिक्रिया 'बकवास' अशी होती. विषय वगैरे बाजूला ठवा; पण शब्दयोजनाही ओढूनताणून, एखादाच शब्द इकडेतिकडे करून/बदलून जुळवाजुळव केल्यासारखी झालीये. तुमच्या आधीच्या विडंबनांमध्ये शब्दयोजनेतला चपखलपणा तरी प्रशंसनीय असे. येथे त्याचा अभाव दिसला. असो. चांगल्या विडंबनासाठी शुभेच्छा. प्रा. म. रा. न. (सपष्ट)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार 01/04/2008 - 09:37
बेसनशेठ, आपल्याला आमची सगळीच विडंबने आवडावीत असे नाही. पण कमीत कमी शब्द बदलून / इकडेतिकडे करून विडंबन करण्याची मजा काही औरच असते.. असो.. सपष्ट प्रतिसादाबद्दल धन्यवाद. (बकवास)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

बेसनलाडू 01/04/2008 - 10:07
तुमची सगळीच विडंबने आम्हांला आवडली नाही, तरी धोरणी प्रतिसादांच्या किंवा राजकारणी अंधानुयायी नि चाहत्यांच्या गराड्यात आम्हांला आपली जी विडंबने सर्वार्थाने, मनापासून आवडतात, तेथे आवर्जून पहिला (झालंच तर दुसरा-तिसरा) स्तुतीपर प्रतिसाद टंकतो, त्या विडंबनातले काय विशेषकरून फार आवडले हे लिहितो, हे कदाचित आपल्या नजरेस आले नसावे. (सपष्ट)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार 01/04/2008 - 10:31
मात्र खरे बेसनशेठ... पण हे आमच्या नजरेस आले नाही असे नाही.. म्हणूनच म्हणालो 'सगळीच विडंबने आवडतील ( म्हणजे काही विडंबने आवडलेली आहेत हे अधोरेखीत होते असे वाटले) असे नाही' असो.. (सपष्टिकरण देणार) केशवसुमार अवांतरः आपला पहिला प्रतिसाद संपादित केलेला दिसतो ;)

In reply to by केशवसुमार

बेसनलाडू 02/04/2008 - 01:40
अवांतरः आपला पहिला प्रतिसाद संपादित केलेला दिसतो ;) 'त्या' संपादित प्रतिसादाचे कारणच न उरल्याने संपादन केले :) (स्पष्टीकारक)बेसनलाडू

धमाल मुलगा 01/04/2008 - 11:09
चला, एप्रिलफूल स॑पवून मुल्ला वापस मस्जीद लौटा!!!!! बर॑ वाटल॑ केसुशेठ :-))) आपला, - मस्त'मौला' ध मा ल.

केशवसुमार 01/04/2008 - 23:49
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार !! (आभारी) केशवसुमार

@आज अचानक लाथ पडे =))))) 'गूढ खूण' मम कळुन लाजुनी बघते ती इकडे तिकडे =))))) दचकुनि जागा मी नीजेतून भार्येने धरले नरडे =))))) वारलो..वारलो...रे!!!!!!! =)) केवळ आणि केवळ महान आहे हे!! =))

दचकुनि जागा मी नीजेतून भार्येने धरले नरडे तद माताय! केश्या तु म्हणजे 'हम नही सुधरेंगे' आहेस.... हा हा हा!!!! १ नंबर झालयं विडंबन!!!! (केशाचा पंखा) टिंग्या ;)

ऋषिकेश 31/03/2008 - 22:51
असता मनिमानसी 'तसे' मम अवचित दृष्टिस दृष्ट भिडे
:)
'गूढ खूण' मम कळुन लाजुनी बघते ती इकडे तिकडे
:))
निसटुनि जाई संधीचा क्षण सदा तिचा संकोच नडे
:)))
दचकुनि जागा मी नीजेतून भार्येने धरले नरडे
हा हा हा हा :))))))))))))))))) लई भारी!!!!!!!!!!!!!!!!!!! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

सर्किट 31/03/2008 - 23:00
केशा, अंतरपटाचा ह्या सोझ्ज्वळ स्थळावर इतका स्पष्ट उल्लेख ! संपलास तू आता ! बाकी, विडंबन झक्कास ! - सर्किट

चतुरंग 31/03/2008 - 23:52
अहो 'केशवसुमार' म्हणताम्हणता एकदम 'केशवदेमार' झालंय की विडंबन!;)) आवडलं पण! (अवांतर - तसं देवादिकांचं गाणं नाहीये ना म्हणून प्रतिक्रीया तरी देता आली, नाहीतर लगेच बोंबाबोंब सुरुच झाली असती टेहळणी करुन सिलेक्टिव्ह प्रतिक्रीया देणार्‍यांची!:) चतुरंग

सर्किट 31/03/2008 - 23:54
ह्यावरून आठवले, प्रसंग असा: खूप घाईची लागली आहे.. पण पायजाम्याच्या नाडीची गाठ काही केल्या सुटत नाही... "आज अचानक गाठ पडे, भलत्या वेळी, भलतीचकडे"... - (घाईत) सर्किट

प्राजु 01/04/2008 - 05:03
दचकुनि जागा मी नीजेतून भार्येने धरले नरडे या ओळी आवडल्या... :)))) - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

बेसनलाडू 01/04/2008 - 08:25
विडंबन अजिबात आवडले नाही. अगदी इन्स्टन्ट प्रतिक्रिया 'बकवास' अशी होती. विषय वगैरे बाजूला ठवा; पण शब्दयोजनाही ओढूनताणून, एखादाच शब्द इकडेतिकडे करून/बदलून जुळवाजुळव केल्यासारखी झालीये. तुमच्या आधीच्या विडंबनांमध्ये शब्दयोजनेतला चपखलपणा तरी प्रशंसनीय असे. येथे त्याचा अभाव दिसला. असो. चांगल्या विडंबनासाठी शुभेच्छा. प्रा. म. रा. न. (सपष्ट)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार 01/04/2008 - 09:37
बेसनशेठ, आपल्याला आमची सगळीच विडंबने आवडावीत असे नाही. पण कमीत कमी शब्द बदलून / इकडेतिकडे करून विडंबन करण्याची मजा काही औरच असते.. असो.. सपष्ट प्रतिसादाबद्दल धन्यवाद. (बकवास)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

बेसनलाडू 01/04/2008 - 10:07
तुमची सगळीच विडंबने आम्हांला आवडली नाही, तरी धोरणी प्रतिसादांच्या किंवा राजकारणी अंधानुयायी नि चाहत्यांच्या गराड्यात आम्हांला आपली जी विडंबने सर्वार्थाने, मनापासून आवडतात, तेथे आवर्जून पहिला (झालंच तर दुसरा-तिसरा) स्तुतीपर प्रतिसाद टंकतो, त्या विडंबनातले काय विशेषकरून फार आवडले हे लिहितो, हे कदाचित आपल्या नजरेस आले नसावे. (सपष्ट)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार 01/04/2008 - 10:31
मात्र खरे बेसनशेठ... पण हे आमच्या नजरेस आले नाही असे नाही.. म्हणूनच म्हणालो 'सगळीच विडंबने आवडतील ( म्हणजे काही विडंबने आवडलेली आहेत हे अधोरेखीत होते असे वाटले) असे नाही' असो.. (सपष्टिकरण देणार) केशवसुमार अवांतरः आपला पहिला प्रतिसाद संपादित केलेला दिसतो ;)

In reply to by केशवसुमार

बेसनलाडू 02/04/2008 - 01:40
अवांतरः आपला पहिला प्रतिसाद संपादित केलेला दिसतो ;) 'त्या' संपादित प्रतिसादाचे कारणच न उरल्याने संपादन केले :) (स्पष्टीकारक)बेसनलाडू

धमाल मुलगा 01/04/2008 - 11:09
चला, एप्रिलफूल स॑पवून मुल्ला वापस मस्जीद लौटा!!!!! बर॑ वाटल॑ केसुशेठ :-))) आपला, - मस्त'मौला' ध मा ल.

केशवसुमार 01/04/2008 - 23:49
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार !! (आभारी) केशवसुमार

@आज अचानक लाथ पडे =))))) 'गूढ खूण' मम कळुन लाजुनी बघते ती इकडे तिकडे =))))) दचकुनि जागा मी नीजेतून भार्येने धरले नरडे =))))) वारलो..वारलो...रे!!!!!!! =)) केवळ आणि केवळ महान आहे हे!! =))
लेखनविषय:
आमची प्रेरणा कवी अनिल यांची अप्रतिम रचना आज अचानक गाठ पडे... आज अचानक लाथ पडे नयन वळविता सहज कुठेतरि दिसले अंतरपट उघडे असता मनिमानसी 'तसे' मम अवचित दृष्टिस दृष्ट भिडे 'गूढ खूण' मम कळुन लाजुनी बघते ती इकडे तिकडे निसटुनि जाई संधीचा क्षण सदा तिचा संकोच नडे अयत्या वेळी अयत्या मेळी घडले हे भलतेच गडे दचकुनि जागा मी नीजेतून भार्येने धरले नरडे

भाग्यवान

सृष्टीलावण्या ·

चांगला विषय निवडलाय चर्चेसाठी..... आमच्या मते मधले भावंड होणे सर्वात चांगले..... त्याचा फायदा असा की मधले भावंड म्हणून छोट्याच्या समोर दादागिरी करता येते तसेच मोठ्यांच्या समोर बालीशपणादेखील करता येतो....डब्बल मज्जा!.... असो, हे आमचे वैयक्तिक मत आहे.....यास दुमत असु शकेल..... अवांतर : तरीही मला अजूनही प्रामाणिकपणे वाटते की मधले होणे ह्यासारखे वाईट काही नाही. यापेक्षा तरीही मला अजूनही प्रामाणिकपणे वाटते की मधले भावंड होणे ह्यासारखे वाईट काही नाही. असे लिहीले असते तर बरे झाले असते ;) ह घ्या (अवांतरीत)टिंग्या ;)

विजुभाऊ 31/03/2008 - 23:04
अरे बापरे एकुलते एक अपत्य? मी ते आत्तापर्यन्त भोगतोय ते. तसे तर कधीच नसावे देवा कोणाचाही नशीबी एकुलते होणे लिहु नको रे.स्वतःचे कोणतेही निर्णय घेता येत नाहीत्.शिक्षणापासुन बायको निवडण्यार्यन्त .प्रत्येक गोष्टी साठी संघर्ष करावा लागतो. आपली प्रत्येक गोष्ट पालकाना जगावेगळी वाटत असते. तुम्हाला काय समजणार ही दुख्खे. मला नेहमी दोन भाउ दोन्बहीणी किंवा भाउ बहीण एकमेकांत काय बोलतात याचे नेहमीच कुतुहल वाटत आले आहे . "चिपर बाय डझन" पुस्तक वाचल्यापासुन तर हे फार जाणवले.

In reply to by विजुभाऊ

बेसनलाडू 01/04/2008 - 08:41
एकुलते एक होणे जितके तुम्हांला जाणवले तितके वाईट नाही. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, बायको निवडण्याचे स्वातंत्र्य इ. वर गदाबिदा काही येत नाही. माझ्या बाबतीत याच्या अगदी विरुद्ध झाले आहे. तशी येत असेल, तर तो पालकांच्या विचारसरणीचा/व्यक्तिमत्त्वाचा/स्वभावाचा, भोवतालच्या परिस्थितीचा नि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आणि/किंवा स्वभावाचा परिणाम मानावा; एकुलते एक पणाचा नाही. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे पालकांकडून होणारी अतिकाळजी. पण तेही समजण्यासारखेच मानावे, असे मला वाटते. एक मात्र खरे, की काही विशिष्ट परिस्थितींमध्ये मोठ्या बहिणीचे/भावाचे अस्तित्त्व नसल्याची खंत मला फार जाणवत आली आहे. असो. (एकुलता एक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

कोलबेर 01/04/2008 - 09:56
एक मात्र खरे, की काही विशिष्ट परिस्थितींमध्ये तुम्हाला मोठ्या बहिणीचे/भावाचे अस्तित्त्व नसल्याची खंत आम्हालाही फार जाणवत आली आहे. :)) कृ .ह .घ्या.

In reply to by कोलबेर

बेसनलाडू 01/04/2008 - 10:13
ह घ्या लिहिले असले, तरी प्रतिसादातील रोख व संदिग्धता लक्षात घेता, आणि अर्थातच त्यामुळे प्रतिसाद नीट न समजल्याने ह घ्या कितपत ह घ्यावे, याबाबत संभ्रमित आहे. (संभ्रमित)बेसनलाडू

यापेक्षा तरीही मला अजूनही प्रामाणिकपणे वाटते की मधले भावंड होणे ह्यासारखे वाईट काही नाही. असे लिहीले असते तर बरे झाले असते टिंगीबुवा, तुम्हाला तर चित्रपटांचे संवाद लिहिण्याचेच काम मिळायला हवे. आपण तर भल्या भल्यांना गारद कराल (खरेतर झोपवाल असेच लिहिणार होते पण... जाऊ दे ना). > > वरि जोडे ब्रह्मसुख पवित्र, ते मर्‍हाटी बोलैन...

मदनबाण 01/04/2008 - 10:56
मला नेहमी दोन भाउ दोन्बहीणी किंवा भाउ बहीण एकमेकांत काय बोलतात याचे नेहमीच कुतुहल वाटत आले आहे . विजुभाऊंशी बर्‍याच प्रमाणत सहमत !!!!! (आमच्या तिर्थरुपांचा एकुलता एक कुलदीपक) मदनबाण

In reply to by मदनबाण

ते तर कुतुहल आम्ही ३ भावंड असून मला पण आहे कारण आम्ही मुद्द्याऐवजी गुद्द्यांनीच एकमेकांशी बोलायचो. शाळा, व्यायामशाळा, जेवण, वाचन आणि झोप (तेव्हा टीव्ही नावाचे विरंगुळा केंद्र आमच्याकडे आले नव्हते) यांची वेळ सोडली तर इतर वेळी आम्ही यथास्थित एकमेकांना बुकलून काढायचो. खास भांडणे ही तर रबर, पट्टी, पेन्सिल, करकटक, गुण्या, शाळेचा पट्टा, लाल रंगाच्या रीबिनी यांच्यासाठी रोज व्हायची. > > मधून मेघ हे नभास ग्रासती, मधेच ह्या विजा भयाण हासती, दहा दिशांतूनी तूफान व्हायचे..

मीनल 01/04/2008 - 17:28
मला सख्खे भाऊ बहिण नाहीत याचे कधीही दु:ख झाले नाही. कुणाला आहे म्हणून हेवा वाटला नाही. माझे चुलत /मामे /मावस भाऊही मला तितक्याच जवळचे आहेत.ते ही एकुलते एक आहेत.

चांगला विषय निवडलाय चर्चेसाठी..... आमच्या मते मधले भावंड होणे सर्वात चांगले..... त्याचा फायदा असा की मधले भावंड म्हणून छोट्याच्या समोर दादागिरी करता येते तसेच मोठ्यांच्या समोर बालीशपणादेखील करता येतो....डब्बल मज्जा!.... असो, हे आमचे वैयक्तिक मत आहे.....यास दुमत असु शकेल..... अवांतर : तरीही मला अजूनही प्रामाणिकपणे वाटते की मधले होणे ह्यासारखे वाईट काही नाही. यापेक्षा तरीही मला अजूनही प्रामाणिकपणे वाटते की मधले भावंड होणे ह्यासारखे वाईट काही नाही. असे लिहीले असते तर बरे झाले असते ;) ह घ्या (अवांतरीत)टिंग्या ;)

विजुभाऊ 31/03/2008 - 23:04
अरे बापरे एकुलते एक अपत्य? मी ते आत्तापर्यन्त भोगतोय ते. तसे तर कधीच नसावे देवा कोणाचाही नशीबी एकुलते होणे लिहु नको रे.स्वतःचे कोणतेही निर्णय घेता येत नाहीत्.शिक्षणापासुन बायको निवडण्यार्यन्त .प्रत्येक गोष्टी साठी संघर्ष करावा लागतो. आपली प्रत्येक गोष्ट पालकाना जगावेगळी वाटत असते. तुम्हाला काय समजणार ही दुख्खे. मला नेहमी दोन भाउ दोन्बहीणी किंवा भाउ बहीण एकमेकांत काय बोलतात याचे नेहमीच कुतुहल वाटत आले आहे . "चिपर बाय डझन" पुस्तक वाचल्यापासुन तर हे फार जाणवले.

In reply to by विजुभाऊ

बेसनलाडू 01/04/2008 - 08:41
एकुलते एक होणे जितके तुम्हांला जाणवले तितके वाईट नाही. निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, बायको निवडण्याचे स्वातंत्र्य इ. वर गदाबिदा काही येत नाही. माझ्या बाबतीत याच्या अगदी विरुद्ध झाले आहे. तशी येत असेल, तर तो पालकांच्या विचारसरणीचा/व्यक्तिमत्त्वाचा/स्वभावाचा, भोवतालच्या परिस्थितीचा नि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आणि/किंवा स्वभावाचा परिणाम मानावा; एकुलते एक पणाचा नाही. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे पालकांकडून होणारी अतिकाळजी. पण तेही समजण्यासारखेच मानावे, असे मला वाटते. एक मात्र खरे, की काही विशिष्ट परिस्थितींमध्ये मोठ्या बहिणीचे/भावाचे अस्तित्त्व नसल्याची खंत मला फार जाणवत आली आहे. असो. (एकुलता एक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

कोलबेर 01/04/2008 - 09:56
एक मात्र खरे, की काही विशिष्ट परिस्थितींमध्ये तुम्हाला मोठ्या बहिणीचे/भावाचे अस्तित्त्व नसल्याची खंत आम्हालाही फार जाणवत आली आहे. :)) कृ .ह .घ्या.

In reply to by कोलबेर

बेसनलाडू 01/04/2008 - 10:13
ह घ्या लिहिले असले, तरी प्रतिसादातील रोख व संदिग्धता लक्षात घेता, आणि अर्थातच त्यामुळे प्रतिसाद नीट न समजल्याने ह घ्या कितपत ह घ्यावे, याबाबत संभ्रमित आहे. (संभ्रमित)बेसनलाडू

यापेक्षा तरीही मला अजूनही प्रामाणिकपणे वाटते की मधले भावंड होणे ह्यासारखे वाईट काही नाही. असे लिहीले असते तर बरे झाले असते टिंगीबुवा, तुम्हाला तर चित्रपटांचे संवाद लिहिण्याचेच काम मिळायला हवे. आपण तर भल्या भल्यांना गारद कराल (खरेतर झोपवाल असेच लिहिणार होते पण... जाऊ दे ना). > > वरि जोडे ब्रह्मसुख पवित्र, ते मर्‍हाटी बोलैन...

मदनबाण 01/04/2008 - 10:56
मला नेहमी दोन भाउ दोन्बहीणी किंवा भाउ बहीण एकमेकांत काय बोलतात याचे नेहमीच कुतुहल वाटत आले आहे . विजुभाऊंशी बर्‍याच प्रमाणत सहमत !!!!! (आमच्या तिर्थरुपांचा एकुलता एक कुलदीपक) मदनबाण

In reply to by मदनबाण

ते तर कुतुहल आम्ही ३ भावंड असून मला पण आहे कारण आम्ही मुद्द्याऐवजी गुद्द्यांनीच एकमेकांशी बोलायचो. शाळा, व्यायामशाळा, जेवण, वाचन आणि झोप (तेव्हा टीव्ही नावाचे विरंगुळा केंद्र आमच्याकडे आले नव्हते) यांची वेळ सोडली तर इतर वेळी आम्ही यथास्थित एकमेकांना बुकलून काढायचो. खास भांडणे ही तर रबर, पट्टी, पेन्सिल, करकटक, गुण्या, शाळेचा पट्टा, लाल रंगाच्या रीबिनी यांच्यासाठी रोज व्हायची. > > मधून मेघ हे नभास ग्रासती, मधेच ह्या विजा भयाण हासती, दहा दिशांतूनी तूफान व्हायचे..

मीनल 01/04/2008 - 17:28
मला सख्खे भाऊ बहिण नाहीत याचे कधीही दु:ख झाले नाही. कुणाला आहे म्हणून हेवा वाटला नाही. माझे चुलत /मामे /मावस भाऊही मला तितक्याच जवळचे आहेत.ते ही एकुलते एक आहेत.
नक्की भाग्यवान कोण असतं असा मला सध्या प्रश्न पडला आहे. मी आम्हा भावंडांच्यात मधली होते. माझी मोठी बहिण बाबांची लाडकी आणि लहान भाऊ आईचा लाडका. त्यामुळे मला वाटायचे ते दोघेही भाग्यवान. लहान भावाला वाटायचे सगळ्यात लहान असले की सगळे हुकुम गाजवतात त्यामुळे सर्वांत मोठे होणे भाग्याचे. मोठ्या बहिणीला वाटायचे की मोठी म्हणून जबाबदारीची जाणीव लवकर येते त्यामुळे सर्वांत मोठे असण्यात हशील नाही. त्यापेक्षा शेंडेफळ होण्यात खरी मजा आहे. तरीही मला अजूनही प्रामाणिकपणे वाटते की मधले होणे ह्यासारखे वाईट काही नाही आणि एकुलते एक अपत्य असणे ह्यासारखे भाग्याचे काहीच नाही.

लेखन मालिका

मनस्वी ·

धमाल मुलगा 31/03/2008 - 18:22
सहमत...सहमत...सहमत!!!!! तात्या अजुन रौशनीकडे बिर्याणी खात बसले आहेत. प॑ता॑चे गणपुले लग्नात "नारायण" होऊन फिरताहेत आणि आम्हाला खुर्चीत बसुन बसुन वाळवी लागायची वेळ आली आहे. ओ तात्या आता बास ना बिर्याणी खाण॑, अजीर्ण होईल ना ! :-) प॑त अहो ते गणपुले आता थकले ना असतील लग्नात काम॑ करकरुन :-)) आणि हो ........... माझ्या गरीब बिचार्‍या दरिद्री 'वि'स्मरणशक्तीनुसार अस॑ आठवत॑ की तात्याबा "हस्ताक्षरावरुन स्वभाव" देखील सा॑गणार होते ! (माझ्यासारख्या गिचमीड माणसाच्या वर्तनावरुन माझ॑ हस्ताक्षर कसे असेल ते सा॑गता येऊ शकते हा भाग निराळा) आयला हे बर॑य, आम्हाला तुमच्यासारख॑ लय भारी लिहीता येत नाही म्हणून का अस॑? तात्या, प॑त आणि सर्व सन्माननीय लेखकगण ह्या॑सी आमची णम्र इन॑ती की कृपया आता आम्हाला आणखी ताणू नका हो! -(चातक) ध मा ल.

विसोबा खेचर 31/03/2008 - 18:42
रौशनीच्या लेखनाला झालेल्या उशिराबद्दल मी रौशनीच्या सर्व वाचकांची त्यांना अद्याप ताटकळत ठेवल्याबद्दल जाहीर क्षमा मागत आहे. परंतु अद्याप रौशनीच्या पुढील भागाच्या लेखनाला मूड लागत नाहीये! रौशनीची मुलगी नीलम, मी तिला खूप लहान असताना पाहिली होती, ती सुदैवाने शरीरविक्रय करत नसली तरी फोरास रोडवरील बनारसी चाळीत मुजरा करते! दीदीच्या आग्रहावरून, मी एकदा तिच्या मुजर्‍याला गेलो होतो परंतु त्या नीलमला तिथे नाचताना मला बघवेना व मी मुजरा अर्धवट टाकून तिथून परत आलो होतो! ही दीदी म्हणजे रौशनीच्याच गणगोतातली. तिचा उल्लेख रौशनीच्या लेखनात येईलच! या नीलमला पुन्हा एकदा केव्हातरी भेटून येऊ की काय याचा विचार करतो आहे! पण तिथे जावसं वाटत नाही. पुन्हा एकदा तिथे गेलो तर रौशनीच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या होतील व पुढे काही भरभरून लिहावंसं वाटेल! परंतु अगदी कोवळ्या वयात पाहिलेल्या त्या नीलमला मुजर्‍यात नाचताना मला तरी बघवत नाही! बरं, माझ्यात एवढीही धम्मक नाही की त्या नीलमला तिथून बाहेर काढून एक चांगलं आयुष्य देऊ शकेन! कोरडी सहानुभूती काय कामाची? मुजर्‍यला गेलोच तर 'आओ सेठ, बैठो' असं म्हणून नीलमही माझं स्वागतच करेल. पण मी काय तिथे बसून दारू पिऊ आणि त्या नीलमचं गाणं ऐकत पैसे उधळू? असो, तूर्तास इथेच थांबतो. लवकरात लवकर पुढचा भाग लिहायच प्रयत्न करीन इतकंच तूर्तास आश्वासन देतो. परंतु तो मूड लागला पाहिजे आणि ते माझ्या हातात नाही! एक शिफारस : सर्व भाग लिहून अद्ययावत पूर्ण झाले की मग ठराविक अंतराने एक एक करून मिसळपाववर चढवावेत. रौशनीच्या बाबतीत या पुढे असंच करणार आहे. लेखन पूर्ण करूनच रौशनीला पुन्हा मिपासमोर आणीन. म्हणजे वाचकांना उगाच ताटकळायला लागणार नाही! असो, रौशनीला झालेल्या उशिराबद्दल मायबाप वाचक माझी बाजू समजून घेतील अशी आशा करतो! पुन्हा एकदा क्षमस्व! आपला, (रौशनीचा मित्र!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मनस्वी 31/03/2008 - 18:55
अहो तात्या क्षमा बिमा कसली मागताय? अहो हे एक Gentle Reminder होतं! :) पंगतीत बसल्यावर आपण मठ्ठ्याची वाट बघतो आणि शेवटी न रहावून मठ्ठेवाल्याला हात उंचावून बोलावतोना... अगदी तसं!

In reply to by मनस्वी

किंवा कुचूकुचू वाढणार्‍याला "थांब , आणि चांगले २ डाव आत्ताच वाढून जा!" असे सांगण्यासारखेही.... ह.घ्या. पुण्याचे पेशवे

प्राजु 31/03/2008 - 20:00
टान्गून ठेवतात नुस्ते.. आणी आमचा चक्का होतो.... हे एकदम आवडलं... आणि पटलंही.:)))) - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

चुटकीसरशी लिहून टाका बरं..... मला जर तुमच्याएवढी कल्पनाशक्ती असती तर साला मीच तुमची ती रोशनी का अच्युत गणपुले वगैरे लिहीले असते....अन् ते पण एकदम ४५०-५०० भाग..... - टिंग्या

In reply to by ब्रिटिश टिंग्या

विसोबा खेचर 02/04/2008 - 01:02
मला जर तुमच्याएवढी कल्पनाशक्ती असती तर साला मीच तुमची ती रोशनी का अच्युत गणपुले वगैरे लिहीले असते.... रौशनीचे लेखन हे कल्पनाशक्तिवर आधारीत नसून वास्तवावर अधारीत आहे.. असो... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बघा आम्हाला वास्तव आणि कल्पनाशक्तीतला फरकसुद्धा कळत नाही..... असो, वरील श्टेटमेंट फक्त ह घेण्याकरिता होते....फक्त ते तसे लिहीण्यास मात्र मी विसरलो ;) असो, 'वास्तववादी' रौशनी ६ च्या प्रतिक्षेत.... - टिंग्या

धमाल मुलगा 31/03/2008 - 18:22
सहमत...सहमत...सहमत!!!!! तात्या अजुन रौशनीकडे बिर्याणी खात बसले आहेत. प॑ता॑चे गणपुले लग्नात "नारायण" होऊन फिरताहेत आणि आम्हाला खुर्चीत बसुन बसुन वाळवी लागायची वेळ आली आहे. ओ तात्या आता बास ना बिर्याणी खाण॑, अजीर्ण होईल ना ! :-) प॑त अहो ते गणपुले आता थकले ना असतील लग्नात काम॑ करकरुन :-)) आणि हो ........... माझ्या गरीब बिचार्‍या दरिद्री 'वि'स्मरणशक्तीनुसार अस॑ आठवत॑ की तात्याबा "हस्ताक्षरावरुन स्वभाव" देखील सा॑गणार होते ! (माझ्यासारख्या गिचमीड माणसाच्या वर्तनावरुन माझ॑ हस्ताक्षर कसे असेल ते सा॑गता येऊ शकते हा भाग निराळा) आयला हे बर॑य, आम्हाला तुमच्यासारख॑ लय भारी लिहीता येत नाही म्हणून का अस॑? तात्या, प॑त आणि सर्व सन्माननीय लेखकगण ह्या॑सी आमची णम्र इन॑ती की कृपया आता आम्हाला आणखी ताणू नका हो! -(चातक) ध मा ल.

विसोबा खेचर 31/03/2008 - 18:42
रौशनीच्या लेखनाला झालेल्या उशिराबद्दल मी रौशनीच्या सर्व वाचकांची त्यांना अद्याप ताटकळत ठेवल्याबद्दल जाहीर क्षमा मागत आहे. परंतु अद्याप रौशनीच्या पुढील भागाच्या लेखनाला मूड लागत नाहीये! रौशनीची मुलगी नीलम, मी तिला खूप लहान असताना पाहिली होती, ती सुदैवाने शरीरविक्रय करत नसली तरी फोरास रोडवरील बनारसी चाळीत मुजरा करते! दीदीच्या आग्रहावरून, मी एकदा तिच्या मुजर्‍याला गेलो होतो परंतु त्या नीलमला तिथे नाचताना मला बघवेना व मी मुजरा अर्धवट टाकून तिथून परत आलो होतो! ही दीदी म्हणजे रौशनीच्याच गणगोतातली. तिचा उल्लेख रौशनीच्या लेखनात येईलच! या नीलमला पुन्हा एकदा केव्हातरी भेटून येऊ की काय याचा विचार करतो आहे! पण तिथे जावसं वाटत नाही. पुन्हा एकदा तिथे गेलो तर रौशनीच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या होतील व पुढे काही भरभरून लिहावंसं वाटेल! परंतु अगदी कोवळ्या वयात पाहिलेल्या त्या नीलमला मुजर्‍यात नाचताना मला तरी बघवत नाही! बरं, माझ्यात एवढीही धम्मक नाही की त्या नीलमला तिथून बाहेर काढून एक चांगलं आयुष्य देऊ शकेन! कोरडी सहानुभूती काय कामाची? मुजर्‍यला गेलोच तर 'आओ सेठ, बैठो' असं म्हणून नीलमही माझं स्वागतच करेल. पण मी काय तिथे बसून दारू पिऊ आणि त्या नीलमचं गाणं ऐकत पैसे उधळू? असो, तूर्तास इथेच थांबतो. लवकरात लवकर पुढचा भाग लिहायच प्रयत्न करीन इतकंच तूर्तास आश्वासन देतो. परंतु तो मूड लागला पाहिजे आणि ते माझ्या हातात नाही! एक शिफारस : सर्व भाग लिहून अद्ययावत पूर्ण झाले की मग ठराविक अंतराने एक एक करून मिसळपाववर चढवावेत. रौशनीच्या बाबतीत या पुढे असंच करणार आहे. लेखन पूर्ण करूनच रौशनीला पुन्हा मिपासमोर आणीन. म्हणजे वाचकांना उगाच ताटकळायला लागणार नाही! असो, रौशनीला झालेल्या उशिराबद्दल मायबाप वाचक माझी बाजू समजून घेतील अशी आशा करतो! पुन्हा एकदा क्षमस्व! आपला, (रौशनीचा मित्र!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मनस्वी 31/03/2008 - 18:55
अहो तात्या क्षमा बिमा कसली मागताय? अहो हे एक Gentle Reminder होतं! :) पंगतीत बसल्यावर आपण मठ्ठ्याची वाट बघतो आणि शेवटी न रहावून मठ्ठेवाल्याला हात उंचावून बोलावतोना... अगदी तसं!

In reply to by मनस्वी

किंवा कुचूकुचू वाढणार्‍याला "थांब , आणि चांगले २ डाव आत्ताच वाढून जा!" असे सांगण्यासारखेही.... ह.घ्या. पुण्याचे पेशवे

प्राजु 31/03/2008 - 20:00
टान्गून ठेवतात नुस्ते.. आणी आमचा चक्का होतो.... हे एकदम आवडलं... आणि पटलंही.:)))) - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

चुटकीसरशी लिहून टाका बरं..... मला जर तुमच्याएवढी कल्पनाशक्ती असती तर साला मीच तुमची ती रोशनी का अच्युत गणपुले वगैरे लिहीले असते....अन् ते पण एकदम ४५०-५०० भाग..... - टिंग्या

In reply to by ब्रिटिश टिंग्या

विसोबा खेचर 02/04/2008 - 01:02
मला जर तुमच्याएवढी कल्पनाशक्ती असती तर साला मीच तुमची ती रोशनी का अच्युत गणपुले वगैरे लिहीले असते.... रौशनीचे लेखन हे कल्पनाशक्तिवर आधारीत नसून वास्तवावर अधारीत आहे.. असो... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बघा आम्हाला वास्तव आणि कल्पनाशक्तीतला फरकसुद्धा कळत नाही..... असो, वरील श्टेटमेंट फक्त ह घेण्याकरिता होते....फक्त ते तसे लिहीण्यास मात्र मी विसरलो ;) असो, 'वास्तववादी' रौशनी ६ च्या प्रतिक्षेत.... - टिंग्या
खालील मत हे मिसळपाववर प्रस्तुत होणार्‍या लेखन मालिकांच्या प्रेमापोटी आणि पुढील भागांच्या प्रतिक्षेपोटी आणि उत्सुकतेपोटी... (गैरसमज नसावा.) अहो वाट वाट म्हणजे बघायची तरी किती!! आज येईल पुढचा भाग... नाही उद्या नक्की येईल... नाही परवा येईल बहुतेक... या आठवड्यात तरी यायला हवा... ह्या महिन्यात येईल असं वाटतंय... पण छ्या... तात्यांचे रौशनी, सालस, धोंडोपंतांचे अच्युत गणपुले... एक ना अनेक! आम्ही मात्र ते वाचण्यासाठी इथे तिष्ठत असतो. मान्य आहे कामाच्या रगाड्यात नाही जमत एखाद्याला किंवा नाही बैठक जमत तशी जी त्या दुनियेत पुन्हा घेउन जाईल आणि शब्द न शब्द आपोआपच स्फुरेल... ह्रदयातून...

मी मराठी

आनंद घारे ·

धमाल मुलगा 31/03/2008 - 18:13
ज ह ब ह र्‍या!!!! खर॑च अस॑ होत॑ बॉ! कधी-मधी मलाही असा शुद्ध मराठीचा झटका येतो आणि मग मी घरादाराला वात आणतो :-) पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे ह॑! कारण काय आहे ना, की हल्ली मराठी वर्डस् रिमे॑बर करायला स्लाईटली डिफिकल्टच जात॑ हो. आता वर्डस् ची ही कथा तर तुम्हाला वस्तु काय मिळणार कप्पाळ? बाकी, एकदम खुसखुशीत लेख हो! आवडला आपल्याला. आपला, - (मराठीत) ध मा ल.

दादरला सुप्रसिद्ध कबुतरखाना आहे. तिथली दादरभर शीटा टाकत फिरणारी कबुतरे आणि त्यांचे जैन बांधवांकडून होणारे अवास्तव लाड हा समस्त जुन्या दादरकरांचा रागाचा विषय आहे. तिथे जवळच एक राम मंदीर आहे. एकदा माझ्या ओळखीच्या एका गृहस्थांनी शीवहून येताना एक राममंदीर द्या असे थाटात त्या थांब्याचे नाव सांगितले. त्यावर बस वाहकाच्या मेंदूची चक्र विचार करकरून थकली शेवटी तो म्हणाला, कुठे आले हे राममंदीर... त्यावर ह्यांनी त्या वाहकाला जवळपासच्या सगळ्या खुणा सांगितल्या. शेवटी तो कंटाळून म्हणाला, अहो काका, त्यापेक्षा कबुतरखाना म्हणाला असतात तर लगेच कळले असते. त्यावर ते मराठी-अभिमानी काका म्हणाले, काही नाही हो सकाळी सकाळी रामाचे नाव घेत होतो. तो बसवाहक असला तडकला. > > वरि जोडे ब्रह्मसुख पवित्र, ते मर्‍हाटी बोलैन...

In reply to by प्रभाकर पेठकर

सर्किट 31/03/2008 - 23:51
बिचारा राम तरी मराठी कुठे आहे? तो तर पक्का उत्तर प्रदेशी....... जेव्हा राम वनवासासाठी नाशिकजवळ आला होता, तेव्हाही एक "परप्रांतीयाविरुद्ध आंदोलन" झाले होते, असे ऐकिवात आहे. काही दाक्षिणात्य अतिरेक्यांनी तर ह्या परप्रांतीयाची बायकोच पळवून नेली म्हणतात ! कारण हे परप्रांतीय दक्षिणेत येऊन येथील दाक्षिणात्यांच्या चरितार्थाची साधने, म्हणजे यज्ञात विघ्ने निर्माण करणे, वगैरे हिरावून घेत होते ! - सर्किट

लेख मस्त आहे. बरीच करमणूक केली. मराठी भाषेने दुकान, रुमाल, मैदान पासून कोण कोणते शब्द दुसर्‍या भाषेतून घेतले आहेत ह्यावर विचार करून 'शुद्ध मराठीत' बोलायला गेले तर कोणाला कळणारही नाही असे वाटते. पण पिढ्या न् पिढ्या रुळलेले शब्द, पँट-शर्ट प्रमाणे, स्विकारून जमेल तितके आणि इतरांना समजताना कष्ट पडणार नाहीत इतके मराठी बोलत राहावे आणि निदान ह्या पुढे तरी मराठीचा र्‍हास होणार नाही ह्याची काळजी घ्यावी, कसें?

धनंजय 01/04/2008 - 22:09
खुसखुशीत तर आहेच - वाचणार्‍यांसाठी विचारप्रवर्तकही व्हावा ही आशा करूया.

आज पासून आपण वरील लेखका प्रमाणे वागायला लागलो तर? :)))) व्वा काय धमाल येईल नाही? धमाल = मजा/गंमत हा अर्थ घ्यावा. (मि.पा. च्या सदस्याचे नाव आहे म्हणून)

In reply to by स्वाती राजेश

धमाल मुलगा 02/04/2008 - 11:56
धमाल = मजा/गंमत हा अर्थ घ्यावा. (मि.पा. च्या सदस्याचे नाव आहे म्हणून) स्वातीताई, मि.पा. च्या सदस्याचे नाव =धमाल = मजा/गंमत हा अर्थ घ्यावा. ही णम्र इन॑ती! -ध मा ल (= मजा + ग॑मत)

सचिन 01/04/2008 - 22:20
जोक्स अपार्ट्...पण खरंच विचार करायला लावणारा लेख. अरेच्या !! पहिलेच दोन शब्द आपोआप आंग्ल भाषेतले आले की !

आनंद घारे 02/04/2008 - 11:26
मी कांही भाषातज्ञ नाही. पण माझ्या मते भाषा प्रवाही आणि नव्या शब्दांना व शब्दरचनांना सामावून घेणारी असावी. इंग्रजी भाषा तशी आहे. कॉम्प्यूटर युग आल्यापासून आणि विशेषतः इंटरनेटच्या प्रसारानंतर त्यात किती नवे शब्द आले आहेत आणि 'रन', 'सेव्ह', 'डिफॉल्ट', 'स्क्रॅप' आदि जुन्या शब्दांना नवे अर्थ प्राप्त झाले आहेत. चॅटिंगसाठी तर नवी लिपीच तयार झाली आहे. आपण ते सगळे सहजपणे वापरतो. त्यांऐवजी मराठीत 'धांवा', 'वाचवा' वगैरे म्हणतांना जीभ अडखळेल . आपण ठरवू किंवा न ठरवू , आपल्या मनातले विचार आपोआप सोयीस्कररित्या व्यक्त होतात. माझे आईवडील ज्या बोलीत माझ्या लहानपणी बोलत असत, ज्या शब्दात मी माझ्या मुलांशी बोलत होतो आणि आता ज्या भाषेत ते त्यांच्या मुलांशी संभाषण करतात या मराठी भाषेच्याच तीन भिन्न त-हा मी एकाच आयुष्यात पाहिल्या आहेत. त्या वेळेस आपण व्याकरणाचा किंवा भाषाशुध्दतेचा विचार करत नाही. आपले सांगणे ऐकणा-याला लगेच समजणे हे जास्त महत्वाचे असते. आपले लेखन वाचणारे अनेक लोक असतात. आपल्याला अभिप्रेत असलेला नेमका अर्थच त्यांना त्यातून कळावा यासाठी लेखनाच्या भाषेत शुध्दलेखनाचे थोडे पालन करणे आवश्यक असते.

धमाल मुलगा 31/03/2008 - 18:13
ज ह ब ह र्‍या!!!! खर॑च अस॑ होत॑ बॉ! कधी-मधी मलाही असा शुद्ध मराठीचा झटका येतो आणि मग मी घरादाराला वात आणतो :-) पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे ह॑! कारण काय आहे ना, की हल्ली मराठी वर्डस् रिमे॑बर करायला स्लाईटली डिफिकल्टच जात॑ हो. आता वर्डस् ची ही कथा तर तुम्हाला वस्तु काय मिळणार कप्पाळ? बाकी, एकदम खुसखुशीत लेख हो! आवडला आपल्याला. आपला, - (मराठीत) ध मा ल.

दादरला सुप्रसिद्ध कबुतरखाना आहे. तिथली दादरभर शीटा टाकत फिरणारी कबुतरे आणि त्यांचे जैन बांधवांकडून होणारे अवास्तव लाड हा समस्त जुन्या दादरकरांचा रागाचा विषय आहे. तिथे जवळच एक राम मंदीर आहे. एकदा माझ्या ओळखीच्या एका गृहस्थांनी शीवहून येताना एक राममंदीर द्या असे थाटात त्या थांब्याचे नाव सांगितले. त्यावर बस वाहकाच्या मेंदूची चक्र विचार करकरून थकली शेवटी तो म्हणाला, कुठे आले हे राममंदीर... त्यावर ह्यांनी त्या वाहकाला जवळपासच्या सगळ्या खुणा सांगितल्या. शेवटी तो कंटाळून म्हणाला, अहो काका, त्यापेक्षा कबुतरखाना म्हणाला असतात तर लगेच कळले असते. त्यावर ते मराठी-अभिमानी काका म्हणाले, काही नाही हो सकाळी सकाळी रामाचे नाव घेत होतो. तो बसवाहक असला तडकला. > > वरि जोडे ब्रह्मसुख पवित्र, ते मर्‍हाटी बोलैन...

In reply to by प्रभाकर पेठकर

सर्किट 31/03/2008 - 23:51
बिचारा राम तरी मराठी कुठे आहे? तो तर पक्का उत्तर प्रदेशी....... जेव्हा राम वनवासासाठी नाशिकजवळ आला होता, तेव्हाही एक "परप्रांतीयाविरुद्ध आंदोलन" झाले होते, असे ऐकिवात आहे. काही दाक्षिणात्य अतिरेक्यांनी तर ह्या परप्रांतीयाची बायकोच पळवून नेली म्हणतात ! कारण हे परप्रांतीय दक्षिणेत येऊन येथील दाक्षिणात्यांच्या चरितार्थाची साधने, म्हणजे यज्ञात विघ्ने निर्माण करणे, वगैरे हिरावून घेत होते ! - सर्किट

लेख मस्त आहे. बरीच करमणूक केली. मराठी भाषेने दुकान, रुमाल, मैदान पासून कोण कोणते शब्द दुसर्‍या भाषेतून घेतले आहेत ह्यावर विचार करून 'शुद्ध मराठीत' बोलायला गेले तर कोणाला कळणारही नाही असे वाटते. पण पिढ्या न् पिढ्या रुळलेले शब्द, पँट-शर्ट प्रमाणे, स्विकारून जमेल तितके आणि इतरांना समजताना कष्ट पडणार नाहीत इतके मराठी बोलत राहावे आणि निदान ह्या पुढे तरी मराठीचा र्‍हास होणार नाही ह्याची काळजी घ्यावी, कसें?

धनंजय 01/04/2008 - 22:09
खुसखुशीत तर आहेच - वाचणार्‍यांसाठी विचारप्रवर्तकही व्हावा ही आशा करूया.

आज पासून आपण वरील लेखका प्रमाणे वागायला लागलो तर? :)))) व्वा काय धमाल येईल नाही? धमाल = मजा/गंमत हा अर्थ घ्यावा. (मि.पा. च्या सदस्याचे नाव आहे म्हणून)

In reply to by स्वाती राजेश

धमाल मुलगा 02/04/2008 - 11:56
धमाल = मजा/गंमत हा अर्थ घ्यावा. (मि.पा. च्या सदस्याचे नाव आहे म्हणून) स्वातीताई, मि.पा. च्या सदस्याचे नाव =धमाल = मजा/गंमत हा अर्थ घ्यावा. ही णम्र इन॑ती! -ध मा ल (= मजा + ग॑मत)

सचिन 01/04/2008 - 22:20
जोक्स अपार्ट्...पण खरंच विचार करायला लावणारा लेख. अरेच्या !! पहिलेच दोन शब्द आपोआप आंग्ल भाषेतले आले की !

आनंद घारे 02/04/2008 - 11:26
मी कांही भाषातज्ञ नाही. पण माझ्या मते भाषा प्रवाही आणि नव्या शब्दांना व शब्दरचनांना सामावून घेणारी असावी. इंग्रजी भाषा तशी आहे. कॉम्प्यूटर युग आल्यापासून आणि विशेषतः इंटरनेटच्या प्रसारानंतर त्यात किती नवे शब्द आले आहेत आणि 'रन', 'सेव्ह', 'डिफॉल्ट', 'स्क्रॅप' आदि जुन्या शब्दांना नवे अर्थ प्राप्त झाले आहेत. चॅटिंगसाठी तर नवी लिपीच तयार झाली आहे. आपण ते सगळे सहजपणे वापरतो. त्यांऐवजी मराठीत 'धांवा', 'वाचवा' वगैरे म्हणतांना जीभ अडखळेल . आपण ठरवू किंवा न ठरवू , आपल्या मनातले विचार आपोआप सोयीस्कररित्या व्यक्त होतात. माझे आईवडील ज्या बोलीत माझ्या लहानपणी बोलत असत, ज्या शब्दात मी माझ्या मुलांशी बोलत होतो आणि आता ज्या भाषेत ते त्यांच्या मुलांशी संभाषण करतात या मराठी भाषेच्याच तीन भिन्न त-हा मी एकाच आयुष्यात पाहिल्या आहेत. त्या वेळेस आपण व्याकरणाचा किंवा भाषाशुध्दतेचा विचार करत नाही. आपले सांगणे ऐकणा-याला लगेच समजणे हे जास्त महत्वाचे असते. आपले लेखन वाचणारे अनेक लोक असतात. आपल्याला अभिप्रेत असलेला नेमका अर्थच त्यांना त्यातून कळावा यासाठी लेखनाच्या भाषेत शुध्दलेखनाचे थोडे पालन करणे आवश्यक असते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारताला स्वातंत्र्य मिळून साठ वर्षे झाली असली तरी इंग्रजांनी मागे ठेवलेली इंग्रजी भाषा आजही आपल्या माय मराठीवर आक्रमण करते आहे. "तुझा काय प्रॉब्लेम आहे? मी त्यात हेल्प करू कां?" अशा प्रकारची वाक्ये नेहमी कानावर पडतात. त्यातच 'भय्या' लोकांची हिंदी देखील मराठी भाषेत आपले 'हात पाय पसरू' लागली आहे. चित्रपट, दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्रे या सार्‍या प्रसारमाध्यमांमधून आपल्याला इंग्रजी व हिंदीमिश्रित मराठीचाच खुराक रोज मिळत आहे. त्यामुळे आपली भावी पिढी या खिचडीलाच मराठी भाषा समजेल आणि मूळ मराठी भाषा भ्रष्ट होऊन नष्ट होऊन जाईल अशी चिंता अनेक मराठी भाषाप्रेमी लोकांना सतावते आहे.

तुरुंग

गिरीराज ·

जसे नादति सूर सुखाचे दु:खाचीही किणकिण असते खरे आहे, ही 'दु:खाची किणकिण' तर अनेक उत्तमोत्तम काव्यांना जन्म देऊन गेली आहे. असेच स्मरतां तुझे हांसणे सुखदु:खाची सीमा विरते खरे आहे असतात अशा काही सुंदर्‍या ज्यांमुळे सुखदु:खाची सीमा खरोखरच उरत नाही. :) पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर 01/04/2008 - 08:12
कसे सोडवू या हृदयाला तुरूंग बटांचा;सहजी फसते कोण देश हा कसले जग हे? माझे मीपण मला न स्मरते! वा! कविता छानच लिहिली आहेस रे गिरीराज! तात्या.

बेसनलाडू 01/04/2008 - 10:10
चुंबूनी घेता तुझी कुंतले ओठांवरती धुसफूस दिसते वा! कसे सोडवू या हृदयाला तुरूंग बटांचा;सहजी फसते कल्पना आवडली. (आस्वादक)बेसनलाडू

जसे नादति सूर सुखाचे दु:खाचीही किणकिण असते खरे आहे, ही 'दु:खाची किणकिण' तर अनेक उत्तमोत्तम काव्यांना जन्म देऊन गेली आहे. असेच स्मरतां तुझे हांसणे सुखदु:खाची सीमा विरते खरे आहे असतात अशा काही सुंदर्‍या ज्यांमुळे सुखदु:खाची सीमा खरोखरच उरत नाही. :) पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर 01/04/2008 - 08:12
कसे सोडवू या हृदयाला तुरूंग बटांचा;सहजी फसते कोण देश हा कसले जग हे? माझे मीपण मला न स्मरते! वा! कविता छानच लिहिली आहेस रे गिरीराज! तात्या.

बेसनलाडू 01/04/2008 - 10:10
चुंबूनी घेता तुझी कुंतले ओठांवरती धुसफूस दिसते वा! कसे सोडवू या हृदयाला तुरूंग बटांचा;सहजी फसते कल्पना आवडली. (आस्वादक)बेसनलाडू
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
तुरुंग जसे नादति सूर सुखाचे दु:खाचीही किणकिण असते असेच स्मरतां तुझे हांसणे सुखदु:खाची सीमा विरते चुंबूनी घेता तुझी कुंतले ओठांवरती धुसफूस दिसते मजला ठाऊक त्यांची खोडी कशाकशाची भ्रांत न उरते कसे सोडवू या हृदयाला तुरूंग बटांचा;सहजी फसते कोण देश हा कसले जग हे? माझे मीपण मला न स्मरते! -गिरीराज

ईश्वर, सगुणातला आणि निर्गुणातला...!

विसोबा खेचर ·

आनंदयात्री 31/03/2008 - 15:40
छान वाटली. कला ही कला असते, तिच्यात लहानमोठं,डावं-उजवं असं काही नसतं! म्हटलं तर सर्व कला या एकमेकांना पूरक असतात आणि प्रत्यक्ष-प्रत्यक्षरित्या त्या ईश्वर नावाच्या दैवी शक्तिकडे आपल्याला घेऊन जातात, आत्मानंदाचा अनुभव देतात! हे वाक्य एकदम ढासु ! आवडले.

तात्या, तुम्ही तुमची मस्त आठवण लिहिली आहे. खरचं तुमच्या या कथेमुळे कला ही कला असते, तिच्यात लहानमोठं,डावं-उजवं असं काही नसतं! म्हटलं तर सर्व कला या एकमेकांना पूरक असतात आणि प्रत्यक्ष-प्रत्यक्षरित्या त्या ईश्वर नावाच्या दैवी शक्तिकडे आपल्याला घेऊन जातात, आत्मानंदाचा अनुभव देतात! अहो सगुण स्वरुपातली ईश्वराची मूर्ती काय आणि निर्गुण स्वरुपातला, आत्मा तृप्त करणारा अनुभव काय, दोन्ही एकच! आणि हे सगुण-निर्गुण ईश्वरस्वरूप हेच तर सर्व कलांचं निधान, हेच सर्व कलांचं माहेरघर! हे पटते.. अवांतरः तुमच्या कॉलेज मधल्या मुलीसोबत खाल्लेले बटाटा भजीच्या आठवणींमधे ही सुद्धा आठवण येते हे खासच....

सहज 31/03/2008 - 15:57
ॐकार यांच्या कथेमुळे सुरू झालेली ही साखळी आवडली. तात्यांची अजुन एक आवड ओळखुन, "त्या" कलेला देखील ह्या साखळीत आणता आली. सरते शेवटी तो भक्त एका कवीला गाठतो.. तो कवी म्हणतो, "अरे बाबा, मला लागलीय भूक. जेवुन आत्मा तृप्त झाल्याशिवाय काही प्रेरणा येत नाही की शब्द सुचत नाहीत. भक्ताला कळते की म्हणजे आधी पोटापाण्याची सोय केली पाहीजे, पर्यायाने पाककलेला आमंत्रण द्यायला हवं! :)

धमाल मुलगा 31/03/2008 - 16:15
आता तात्याबा॑च्या लेखनावर आम्ही पामराने काय प्रतिक्रिया द्यावी ? छान लेख. सरते शेवटी तो भक्त एका कवीला गाठतो.. तो कवी म्हणतो, "अरे बाबा, मला लागलीय भूक. जेवुन आत्मा तृप्त झाल्याशिवाय काही प्रेरणा येत नाही की शब्द सुचत नाहीत. भक्ताला कळते की म्हणजे आधी पोटापाण्याची सोय केली पाहीजे, पर्यायाने पाककलेला आमंत्रण द्यायला हवं! :) चला सहजरावा॑च्या ह्या प्रतिसादाने ही साखळी पुढे चालू ठेवण्याची प्रक्रिया स्वातीताईच्या एखाद्या लेखाने होईल अस॑ दिसत॑य :-))

नंदन 31/03/2008 - 16:54
लिहिलं आहेस, तात्या. अगदी मनापासून. 'झाड फुलांनी आले बहरुन, तू न पाहिले डोळे उघडून' अशी बर्‍याचदा आपली स्थिती असते. ईश्वरप्राप्तीकरता कुठली मोठी पोथ्यापुराणं वाचातला नकोत की कुठले यागत्याग करायला नकोत! रसिकाच्या नजरेने एखाद्या कलेत मन रमवलं, त्या कलाकृतीशी एकरूप झालं की अगदी क्षणात तिथे ईश्वर दिसायला लागतो, त्याची साक्ष पटते, अनुभूती मिळते, आणि जीव तृप्त होतो! फक्त आपली नजर रसिकाची हवी, रसिकतेची साधना हवी, आपण रसिकाग्रणी हवं, मग ईश्वर फारसा लांब नाही!! -- अशी रसिकता असणं मोठं भाग्याचं. 'रसिकत्वी परतत्त्वस्पर्शु'चा अर्थही कदाचित असाच असावा.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

ईश्वरप्राप्तीकरता कुठली मोठी पोथ्यापुराणं वाचातला नकोत की कुठले यागत्याग करायला नकोत! रसिकाच्या नजरेने एखाद्या कलेत मन रमवलं, त्या कलाकृतीशी एकरूप झालं की अगदी क्षणात तिथे ईश्वर दिसायला लागतो, त्याची साक्ष पटते, अनुभूती मिळते, आणि जीव तृप्त होतो! फक्त आपली नजर रसिकाची हवी, रसिकतेची साधना हवी, आपण रसिकाग्रणी हवं, मग ईश्वर फारसा लांब नाही!! वा तात्या,हे फारच छान! स्वाती

धोंडोपंत 31/03/2008 - 17:37
अप्रतिम....केवळ अप्रतिम. शब्दच नाहीत वर्णन करायला. शब्द अन शब्द आवडला, पटला, भावला. तात्या, तुझे लेखन अतिशय प्रगल्भ होते आहे याचा आम्हांदिकांस आत्यंतिक आनंद आहे. असेच उत्तमोत्तम लेखन तुझ्याकडून होत राहो, या शुभेच्छा. आपला, (आनंदित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्राजु 31/03/2008 - 18:34
तात्या, खूप सुंदर जमला आहे लेख. आणि बाबूजी आणि सावरकरांची आठवण तर खासच..! कला ही कला आहे.. तिच्यामध्ये कमी जास्त, वाईट्-चांगले काहीही नसते.. हे अगदी खरंच आहे. ईश्वरप्राप्तीकरता कुठली मोठी पोथ्यापुराणं वाचातला नकोत की कुठले यागत्याग करायला नकोत! रसिकाच्या नजरेने एखाद्या कलेत मन रमवलं, त्या कलाकृतीशी एकरूप झालं की अगदी क्षणात तिथे ईश्वर दिसायला लागतो, त्याची साक्ष पटते, अनुभूती मिळते, आणि जीव तृप्त होतो! फक्त आपली नजर रसिकाची हवी, रसिकतेची साधना हवी, आपण रसिकाग्रणी हवं, मग ईश्वर फारसा लांब नाही!! हा या कथेतून घेण्यासारखा बोध आहे..असेच मी म्हणेन. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

ॐकार 31/03/2008 - 19:37
छान आहे. आता चित्रं काढायला वेळ काढलाच पाहिजे :) मित्रमंडळी गोळा करावीत आणि हार्मोनिअम काढून बसावे आणि गाणी बजावणी करावीत असं तुमचा लेख वाचल्यावर वाटू लागले आहे.

विसोबा खेचर 01/04/2008 - 01:35
आपुलकीने प्रतिसाद देणार्‍या सर्व मंडळींचे मनापासून आभार..! ज्या मंडळींना हे लेखन बरा-वाईट, असा कोणताच प्रतिसाद देण्याच्या लायकीचे वाटले नाही, त्यांचेही आभार..! :) तात्या.

बेसनलाडू 01/04/2008 - 08:31
छान! ष्टोरीच्या ओघात सहजपणे उलगडत गेलेले कलाविचार आवडले. (कलाकार)बेसनलाडू

आनंदयात्री 31/03/2008 - 15:40
छान वाटली. कला ही कला असते, तिच्यात लहानमोठं,डावं-उजवं असं काही नसतं! म्हटलं तर सर्व कला या एकमेकांना पूरक असतात आणि प्रत्यक्ष-प्रत्यक्षरित्या त्या ईश्वर नावाच्या दैवी शक्तिकडे आपल्याला घेऊन जातात, आत्मानंदाचा अनुभव देतात! हे वाक्य एकदम ढासु ! आवडले.

तात्या, तुम्ही तुमची मस्त आठवण लिहिली आहे. खरचं तुमच्या या कथेमुळे कला ही कला असते, तिच्यात लहानमोठं,डावं-उजवं असं काही नसतं! म्हटलं तर सर्व कला या एकमेकांना पूरक असतात आणि प्रत्यक्ष-प्रत्यक्षरित्या त्या ईश्वर नावाच्या दैवी शक्तिकडे आपल्याला घेऊन जातात, आत्मानंदाचा अनुभव देतात! अहो सगुण स्वरुपातली ईश्वराची मूर्ती काय आणि निर्गुण स्वरुपातला, आत्मा तृप्त करणारा अनुभव काय, दोन्ही एकच! आणि हे सगुण-निर्गुण ईश्वरस्वरूप हेच तर सर्व कलांचं निधान, हेच सर्व कलांचं माहेरघर! हे पटते.. अवांतरः तुमच्या कॉलेज मधल्या मुलीसोबत खाल्लेले बटाटा भजीच्या आठवणींमधे ही सुद्धा आठवण येते हे खासच....

सहज 31/03/2008 - 15:57
ॐकार यांच्या कथेमुळे सुरू झालेली ही साखळी आवडली. तात्यांची अजुन एक आवड ओळखुन, "त्या" कलेला देखील ह्या साखळीत आणता आली. सरते शेवटी तो भक्त एका कवीला गाठतो.. तो कवी म्हणतो, "अरे बाबा, मला लागलीय भूक. जेवुन आत्मा तृप्त झाल्याशिवाय काही प्रेरणा येत नाही की शब्द सुचत नाहीत. भक्ताला कळते की म्हणजे आधी पोटापाण्याची सोय केली पाहीजे, पर्यायाने पाककलेला आमंत्रण द्यायला हवं! :)

धमाल मुलगा 31/03/2008 - 16:15
आता तात्याबा॑च्या लेखनावर आम्ही पामराने काय प्रतिक्रिया द्यावी ? छान लेख. सरते शेवटी तो भक्त एका कवीला गाठतो.. तो कवी म्हणतो, "अरे बाबा, मला लागलीय भूक. जेवुन आत्मा तृप्त झाल्याशिवाय काही प्रेरणा येत नाही की शब्द सुचत नाहीत. भक्ताला कळते की म्हणजे आधी पोटापाण्याची सोय केली पाहीजे, पर्यायाने पाककलेला आमंत्रण द्यायला हवं! :) चला सहजरावा॑च्या ह्या प्रतिसादाने ही साखळी पुढे चालू ठेवण्याची प्रक्रिया स्वातीताईच्या एखाद्या लेखाने होईल अस॑ दिसत॑य :-))

नंदन 31/03/2008 - 16:54
लिहिलं आहेस, तात्या. अगदी मनापासून. 'झाड फुलांनी आले बहरुन, तू न पाहिले डोळे उघडून' अशी बर्‍याचदा आपली स्थिती असते. ईश्वरप्राप्तीकरता कुठली मोठी पोथ्यापुराणं वाचातला नकोत की कुठले यागत्याग करायला नकोत! रसिकाच्या नजरेने एखाद्या कलेत मन रमवलं, त्या कलाकृतीशी एकरूप झालं की अगदी क्षणात तिथे ईश्वर दिसायला लागतो, त्याची साक्ष पटते, अनुभूती मिळते, आणि जीव तृप्त होतो! फक्त आपली नजर रसिकाची हवी, रसिकतेची साधना हवी, आपण रसिकाग्रणी हवं, मग ईश्वर फारसा लांब नाही!! -- अशी रसिकता असणं मोठं भाग्याचं. 'रसिकत्वी परतत्त्वस्पर्शु'चा अर्थही कदाचित असाच असावा.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

ईश्वरप्राप्तीकरता कुठली मोठी पोथ्यापुराणं वाचातला नकोत की कुठले यागत्याग करायला नकोत! रसिकाच्या नजरेने एखाद्या कलेत मन रमवलं, त्या कलाकृतीशी एकरूप झालं की अगदी क्षणात तिथे ईश्वर दिसायला लागतो, त्याची साक्ष पटते, अनुभूती मिळते, आणि जीव तृप्त होतो! फक्त आपली नजर रसिकाची हवी, रसिकतेची साधना हवी, आपण रसिकाग्रणी हवं, मग ईश्वर फारसा लांब नाही!! वा तात्या,हे फारच छान! स्वाती

धोंडोपंत 31/03/2008 - 17:37
अप्रतिम....केवळ अप्रतिम. शब्दच नाहीत वर्णन करायला. शब्द अन शब्द आवडला, पटला, भावला. तात्या, तुझे लेखन अतिशय प्रगल्भ होते आहे याचा आम्हांदिकांस आत्यंतिक आनंद आहे. असेच उत्तमोत्तम लेखन तुझ्याकडून होत राहो, या शुभेच्छा. आपला, (आनंदित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्राजु 31/03/2008 - 18:34
तात्या, खूप सुंदर जमला आहे लेख. आणि बाबूजी आणि सावरकरांची आठवण तर खासच..! कला ही कला आहे.. तिच्यामध्ये कमी जास्त, वाईट्-चांगले काहीही नसते.. हे अगदी खरंच आहे. ईश्वरप्राप्तीकरता कुठली मोठी पोथ्यापुराणं वाचातला नकोत की कुठले यागत्याग करायला नकोत! रसिकाच्या नजरेने एखाद्या कलेत मन रमवलं, त्या कलाकृतीशी एकरूप झालं की अगदी क्षणात तिथे ईश्वर दिसायला लागतो, त्याची साक्ष पटते, अनुभूती मिळते, आणि जीव तृप्त होतो! फक्त आपली नजर रसिकाची हवी, रसिकतेची साधना हवी, आपण रसिकाग्रणी हवं, मग ईश्वर फारसा लांब नाही!! हा या कथेतून घेण्यासारखा बोध आहे..असेच मी म्हणेन. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

ॐकार 31/03/2008 - 19:37
छान आहे. आता चित्रं काढायला वेळ काढलाच पाहिजे :) मित्रमंडळी गोळा करावीत आणि हार्मोनिअम काढून बसावे आणि गाणी बजावणी करावीत असं तुमचा लेख वाचल्यावर वाटू लागले आहे.

विसोबा खेचर 01/04/2008 - 01:35
आपुलकीने प्रतिसाद देणार्‍या सर्व मंडळींचे मनापासून आभार..! ज्या मंडळींना हे लेखन बरा-वाईट, असा कोणताच प्रतिसाद देण्याच्या लायकीचे वाटले नाही, त्यांचेही आभार..! :) तात्या.

बेसनलाडू 01/04/2008 - 08:31
छान! ष्टोरीच्या ओघात सहजपणे उलगडत गेलेले कलाविचार आवडले. (कलाकार)बेसनलाडू
लेखनप्रकार
राम राम मंडळी, आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे, ष्टोरीच म्हणा ना! :) कथा तशी जुनी आणि पारंपारिकच, १९९५/९६ साली ऐकलेली. खैरागढ विद्यापिठाच्या संगीत विभागात ख्याल गायकीची सौंदर्यस्थळे असं काहीसं शीर्षक असलेल्या कार्यशाळेत मला डॉ जंगम यांनी रसिक श्रोत्याची भूमिका मांडण्याकरता मुद्दाम बोलावलं होतं (येण्याजाण्याचा आणि राहण्याचा खर्च देऊन बरं का!), तेव्हा गप्पांच्या ओघात जंगम साहेबांनी ही कथा मला सांगितली होती. डॉ जंगम तेव्हा त्या विद्यापिठाच्या संगीत विभागाशी निगडित होते, परंतु बर्‍याच वेळेला मुंबईला यायचे व मुंबईतील गाण्याच्या मैफलींमधूनच त्यांची माझी ओळख झाली होती.

एप्रिल फुले(स्वरचित विडंबन गीत गायन)

प्रा सुरेश खेडकर ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
एप्रिल फुले(स्वरचित विडंबन गीत गायन) सादरकर्ते:प्रा.सुरेश खेडकर व सौ.आरती खेडकर निवेदन: किशोर गलांडे आयोजक:सकाळ, मधुरांगण(नागपूर) बुधवार,२ एप्रिल,सायंकाळी ६:३० वाजता मंगलदीप हॉल,छत्रपति चौक,वर्धारोड, नागपूर.

मुलीनेच का नेहमी सासरी जायचं ? - कविता

यशोदेचा घनश्याम ·

आजीने मुलीला किती छान शब्दात उत्तर दिले. कविता आवडली. पण म्हणून नेहमी तीच्यापूढेच नतमस्तक होतात लोकं पापं धुवायला समुद्रात नाही गंगेतच जातत लोकं! खरेच आहे.

मला वाटतं की ही नदी आणि सागराची उपमा ठीक आहे पण याचा अर्थ असा घ्यावा का की लग्नं झालेल्या पुरुषांना कोणीही नमस्कार करत नाही. मला अजूनही काही प्रश्न पडले आहेत, लग्न झालं म्हणून मुलगी "बेकार"ची "गृहिणी" (housewife) का होते, मुलींनीच लग्न झाल्याची जाहिरात (मंगळसुत्र, बांगड्या घालणे इत्यादी) का करावी, नाव नाही बदललं तर काय जातं? मुली दुसरं घरही आपलं मानतात पण पुरुष नाही बायकोच्या माहेराला स्वतःचं घर मानू शकत याचं कारण पुरुषी अहंकार (male ego) हेच असावं असं मला (माझ्या स्वतःच्या अहंकारामुळे) वाटतं. आजच्या जगात जिथे दोघंही नोकरी-व्यवसाय करतात, कामानिमित्त दुसय्राच ठिकाणी जाउन रहातात, लग्नापूर्वी दोघांनाही स्वतःची ओळख (identity) असते त्या काळात ही कविता "इतिहास" म्हणून ठीक आहे पण सामाजिक मूल्यं शिकवण्यासाठी नाही. कविता म्हणून ठीक आहे पण विचार अगदीच मागस आणि सुमार आहेत. संहिता

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या कवितेत स्त्रीयांनीच फक्त जन्मभर त्याग करत रहावं, पुरुषांच्या ईगो पुढे झुकावं, जेणेकरून पूढे जाउन त्यांना दैवत्व दिले जाईल असा; किंवा लग्नं झालेल्या पुरुषांना कोणीही नमस्कार करत नाही असा मतितार्थ नाही असं मला स्पष्ट वाटतं.पुरूषार्थ या उक्तीत, पुरूष हा शब्द असला तरी ती काही पुरुषाची मक्तेदारी नाही हे बर्याच स्त्रीयांनी सिद्ध केले आहे. आणि खरे तर पुरूष आणि स्त्री किंवा आज काल चे पुरुष आणि स्त्री, त्यांचे ईगो आणि त्यामुळे होणारे प्रश्न या गोष्टी या कवितेमुळे पुढे येउ नयेत.
शब्दांच्या पलीकडचा अर्थ समजून घ्यावा. स्वतःकडील उत्तमोत्तम गुणधर्म इतरांना जे देऊ शकतात तेच, आजही श्रेष्ठ ठरतात, असा संदेश मला या कवितेतून मिळाला. जसे, नदी! स्वतःचे गोड पाणी समुद्राला देऊन, नदीचे गोड पाणी कधीच कमी होत नाही.
हा विचार, हा संदेश नक्कीच मागास नाही. सुमार तर नाहिच!... सनातन. हो, सनातन! नित्य नूतनः इति सनातनः. जे कधीही जूने नाही होउ शकत, नेहमी नवे असेच राहते ते सनातन. याअर्थी हा विचार सनातन आहे.
जितका अधिक समाजाशी आपण बांधिल राहू तितका, या मूल्याचा प्रत्यय, परत परत येत राहील, असे मला वाटते.

प्राजु 31/03/2008 - 18:25
बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतेल्या काही ओळी.. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते..... बस्स! - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

मनस्वी 31/03/2008 - 18:38
बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतेल्या काही ओळी.. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते.....
वा.. या ओळी झकासच! पण माझ्यामते आज काळ खूप बदलला आहे. आज माहेराशी, आईबाबांशी केवढे संबंध ठेवावेत हे सर्वस्वी मुलीच्या मनावर अवलंबून आहे... हो, आज आईबाबांकडे दुर्लक्ष्य करणार्‍या मुलीदेखील आहेत. आपण बरे, आपला नवरा बरा आणि आपली मुले बरी! आज मुलगी इतकी स्वावलंबी झाली आहे की ती स्वबळावर आईबाबांकडे पूर्ण लक्ष देउ शकते. आणि आजचे सासरही पूर्वीइतके कडक नसते, जर द्यायचेय मुलीला आईबाबांकडे लक्ष तर कोणी तिला आडवत नाही. चांगला जावई असेल तर तोही मुलासारखा रहातो. काहीठीकाणी नसते अशी परिस्थिती. पण अंतिमदर्शी सर्व मुलीच्याच मनावर असते.

विजुभाऊ 31/03/2008 - 23:25
मला प्रश्न पडतो :लग्नापूर्वी खूप काही तरी करत असणार्‍या मुली उदा: चांगली चित्रकला/ गाणे/ क्राफ्ट वर्क ई करत असणार्‍या मूलींचे नन्तर काय होते?त्यांची हुशारी कोठे जाते?

मीनल 01/04/2008 - 03:17
हा तर सॄष्टीचा नियम आहे नदी ,सागरापुरत ठिक आहे. पण मुलींनी सासरी जायच हा काही सॄष्टीचा नियम नाही. तो आपण माणसाने बनवलेला ,सामजिक नियम आहे.तोही भारतात मुख्यत्वे. तसं चीन ,कोरिया ,जपान वगैरे आशियी देशातही आहे . म्हणजे होता असं म्हणाव लागेल. चीन मधे तर ,मुलाच स्वतःच घर नसेल तर मुली लग्न करत नाहित.तश्याच एकत्र राहतात. हुशार आहेत की मुल होऊ देत नाहित. जपान, कोरिया अजूनही थोड परंपरा जपणार आहे .पण भारत सर्वात `बाप` आहे. अजूनही. मुलींनी का आपल अस्तित्व विसराव? पूर्वी असेल तस जेव्हा स्त्रीयांना स्वयंपाकघरात डांबून ठेवल होत. पण आता `आपल ओपिनियन` नसलेली बेअक्कल स्त्री कोणी बायको म्हणून स्विकारेल का? आपली बायको ही एक स्वतंत्र व्य क्तिमत्व आहे हे पुरूषांनी मान्य केले पाहिजे.नेहमीच.आपल्या सोयीनुसार नव्हे. लग्नापूर्वी खूप काही तरी करत असणार्‍या मुली उदा: चांगली चित्रकला/ गाणे/ क्राफ्ट वर्क ई करत असणार्‍या मूलींचे नन्तर काय होते?त्यांची हुशारी कोठे जाते? मी याच प्रकारातली. पण ते केले आही म्हणजे हुशारी जाते का? चित्र काढल नाही म्हणून ती कला जाते ?नाही.फक्त त्याचा व्यासंग चालू रहात नाही. जिवनातल्या प्रायोरिटिज बदलतात.जबाबदा-या वाढतात. हॉबी जपायला वेळ मिळत नाही.पण वेळ /संधी आलीच तर ती कला समोर येतेच अपोआप. आनंद देते ,आठवणींना उजाळा देते. त्यातून मिपासारखी स्थळ आहेतच आपली लेखन कला /बुध्दी /वैशिष्ट्य दाखवण्याचा.

आजीने मुलीला किती छान शब्दात उत्तर दिले. कविता आवडली. पण म्हणून नेहमी तीच्यापूढेच नतमस्तक होतात लोकं पापं धुवायला समुद्रात नाही गंगेतच जातत लोकं! खरेच आहे.

मला वाटतं की ही नदी आणि सागराची उपमा ठीक आहे पण याचा अर्थ असा घ्यावा का की लग्नं झालेल्या पुरुषांना कोणीही नमस्कार करत नाही. मला अजूनही काही प्रश्न पडले आहेत, लग्न झालं म्हणून मुलगी "बेकार"ची "गृहिणी" (housewife) का होते, मुलींनीच लग्न झाल्याची जाहिरात (मंगळसुत्र, बांगड्या घालणे इत्यादी) का करावी, नाव नाही बदललं तर काय जातं? मुली दुसरं घरही आपलं मानतात पण पुरुष नाही बायकोच्या माहेराला स्वतःचं घर मानू शकत याचं कारण पुरुषी अहंकार (male ego) हेच असावं असं मला (माझ्या स्वतःच्या अहंकारामुळे) वाटतं. आजच्या जगात जिथे दोघंही नोकरी-व्यवसाय करतात, कामानिमित्त दुसय्राच ठिकाणी जाउन रहातात, लग्नापूर्वी दोघांनाही स्वतःची ओळख (identity) असते त्या काळात ही कविता "इतिहास" म्हणून ठीक आहे पण सामाजिक मूल्यं शिकवण्यासाठी नाही. कविता म्हणून ठीक आहे पण विचार अगदीच मागस आणि सुमार आहेत. संहिता

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या कवितेत स्त्रीयांनीच फक्त जन्मभर त्याग करत रहावं, पुरुषांच्या ईगो पुढे झुकावं, जेणेकरून पूढे जाउन त्यांना दैवत्व दिले जाईल असा; किंवा लग्नं झालेल्या पुरुषांना कोणीही नमस्कार करत नाही असा मतितार्थ नाही असं मला स्पष्ट वाटतं.पुरूषार्थ या उक्तीत, पुरूष हा शब्द असला तरी ती काही पुरुषाची मक्तेदारी नाही हे बर्याच स्त्रीयांनी सिद्ध केले आहे. आणि खरे तर पुरूष आणि स्त्री किंवा आज काल चे पुरुष आणि स्त्री, त्यांचे ईगो आणि त्यामुळे होणारे प्रश्न या गोष्टी या कवितेमुळे पुढे येउ नयेत.
शब्दांच्या पलीकडचा अर्थ समजून घ्यावा. स्वतःकडील उत्तमोत्तम गुणधर्म इतरांना जे देऊ शकतात तेच, आजही श्रेष्ठ ठरतात, असा संदेश मला या कवितेतून मिळाला. जसे, नदी! स्वतःचे गोड पाणी समुद्राला देऊन, नदीचे गोड पाणी कधीच कमी होत नाही.
हा विचार, हा संदेश नक्कीच मागास नाही. सुमार तर नाहिच!... सनातन. हो, सनातन! नित्य नूतनः इति सनातनः. जे कधीही जूने नाही होउ शकत, नेहमी नवे असेच राहते ते सनातन. याअर्थी हा विचार सनातन आहे.
जितका अधिक समाजाशी आपण बांधिल राहू तितका, या मूल्याचा प्रत्यय, परत परत येत राहील, असे मला वाटते.

प्राजु 31/03/2008 - 18:25
बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतेल्या काही ओळी.. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते..... बस्स! - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

मनस्वी 31/03/2008 - 18:38
बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतेल्या काही ओळी.. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते.....
वा.. या ओळी झकासच! पण माझ्यामते आज काळ खूप बदलला आहे. आज माहेराशी, आईबाबांशी केवढे संबंध ठेवावेत हे सर्वस्वी मुलीच्या मनावर अवलंबून आहे... हो, आज आईबाबांकडे दुर्लक्ष्य करणार्‍या मुलीदेखील आहेत. आपण बरे, आपला नवरा बरा आणि आपली मुले बरी! आज मुलगी इतकी स्वावलंबी झाली आहे की ती स्वबळावर आईबाबांकडे पूर्ण लक्ष देउ शकते. आणि आजचे सासरही पूर्वीइतके कडक नसते, जर द्यायचेय मुलीला आईबाबांकडे लक्ष तर कोणी तिला आडवत नाही. चांगला जावई असेल तर तोही मुलासारखा रहातो. काहीठीकाणी नसते अशी परिस्थिती. पण अंतिमदर्शी सर्व मुलीच्याच मनावर असते.

विजुभाऊ 31/03/2008 - 23:25
मला प्रश्न पडतो :लग्नापूर्वी खूप काही तरी करत असणार्‍या मुली उदा: चांगली चित्रकला/ गाणे/ क्राफ्ट वर्क ई करत असणार्‍या मूलींचे नन्तर काय होते?त्यांची हुशारी कोठे जाते?

मीनल 01/04/2008 - 03:17
हा तर सॄष्टीचा नियम आहे नदी ,सागरापुरत ठिक आहे. पण मुलींनी सासरी जायच हा काही सॄष्टीचा नियम नाही. तो आपण माणसाने बनवलेला ,सामजिक नियम आहे.तोही भारतात मुख्यत्वे. तसं चीन ,कोरिया ,जपान वगैरे आशियी देशातही आहे . म्हणजे होता असं म्हणाव लागेल. चीन मधे तर ,मुलाच स्वतःच घर नसेल तर मुली लग्न करत नाहित.तश्याच एकत्र राहतात. हुशार आहेत की मुल होऊ देत नाहित. जपान, कोरिया अजूनही थोड परंपरा जपणार आहे .पण भारत सर्वात `बाप` आहे. अजूनही. मुलींनी का आपल अस्तित्व विसराव? पूर्वी असेल तस जेव्हा स्त्रीयांना स्वयंपाकघरात डांबून ठेवल होत. पण आता `आपल ओपिनियन` नसलेली बेअक्कल स्त्री कोणी बायको म्हणून स्विकारेल का? आपली बायको ही एक स्वतंत्र व्य क्तिमत्व आहे हे पुरूषांनी मान्य केले पाहिजे.नेहमीच.आपल्या सोयीनुसार नव्हे. लग्नापूर्वी खूप काही तरी करत असणार्‍या मुली उदा: चांगली चित्रकला/ गाणे/ क्राफ्ट वर्क ई करत असणार्‍या मूलींचे नन्तर काय होते?त्यांची हुशारी कोठे जाते? मी याच प्रकारातली. पण ते केले आही म्हणजे हुशारी जाते का? चित्र काढल नाही म्हणून ती कला जाते ?नाही.फक्त त्याचा व्यासंग चालू रहात नाही. जिवनातल्या प्रायोरिटिज बदलतात.जबाबदा-या वाढतात. हॉबी जपायला वेळ मिळत नाही.पण वेळ /संधी आलीच तर ती कला समोर येतेच अपोआप. आनंद देते ,आठवणींना उजाळा देते. त्यातून मिपासारखी स्थळ आहेतच आपली लेखन कला /बुध्दी /वैशिष्ट्य दाखवण्याचा.
लेखनविषय:
एका ई-मेल मधून आलेली कविता - कवी / कवयित्री माहित नाहित. ती एकदा आजीला म्हणाली... मुलीनेच का गं नेहमी सासरी जायचं ? आपली माणसं सोडून तीनेच का परकं घर आपलं मानायचं? तिच्याकडूनच का अपेक्षा जूनं अस्तित्व विसरायची? तिच्यावरच का जबरदस्ती नवीन नाव वापरायची? आजी म्हणाली अगं वेडे हा तर सॄष्टीचा नियम आहे नदी नाही का जात सागराकडे आपलं घर सोडून! तो येतो का कधीतरी तिच्याकडे आपली वाट मोडून! तीचं पाणी किती गोड...

आईस्क्रीम वडे

मनापासुन ·

मनापासुन 31/03/2008 - 13:16
बेसन पीठ बाटावड्या साठी बिजवतात तेवढे पातळ भिजवावे. बेसन पीठ बटाटावड्या साठी भीजवतात तेवढे पातळ भिजवावे.. चूक भूल मनापासुन द्यावी घ्यावी

प्राजु 01/04/2008 - 04:56
नावावरून पदार्थ जरा विचित्रच वाटतो आहे. एक शंका : तळण्यासाठी तेलात घातल्यावर ते आईस्क्रिम वितळेल ना. आणि तेलात पसरेल. आणि मुख्य म्हणजे.. अगदी लगेच तळून काढले तर ते बेसन कच्चे राहिल असे वाटते. जरा सविस्तर शंका निरसन करावे. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

In reply to by विसोबा खेचर

आइस्क्रिम सॉफ्ट स्कूप वर्गीय नसावे. जरा कठीण असावे. वडे तीव्र आंचेवर तळल्यावर समस्या उद्भवू नये. तेल धूर येण्या इतपत तापलेले असावे. वडा तेलात सोडल्यावर वरील आवरण लगेच 'सेट' व्हावे आणि आंत पर्यंत उष्णता पोहोचायच्या आत आवरण शिजले पाहीजे. वडा जास्त वेळ तेलात राहता कामा नये.

मनापासुन 01/04/2008 - 10:48
पेटकर काका बरोबर आहे तुमचे. पण हे फ्राईड आईस्क्रीम नाही्आ आईस्क्रीम वडाच आहे. बेसन पीठ पातळ ठेवायचे म्हणजे ते कच्चे रहात नाही .उलत ते पातळ असल्याने मस्त कडक कुरकुरीत होते. पदार्थ नावावरुन च नव्हे तसाही थोडा विचित्र आहे. आवडला तर आपण त्याचे ऍडीक्ट होतो. नाही तर आयुष्यभर फजीती सांगत रहातो

मनापासुन 31/03/2008 - 13:16
बेसन पीठ बाटावड्या साठी बिजवतात तेवढे पातळ भिजवावे. बेसन पीठ बटाटावड्या साठी भीजवतात तेवढे पातळ भिजवावे.. चूक भूल मनापासुन द्यावी घ्यावी

प्राजु 01/04/2008 - 04:56
नावावरून पदार्थ जरा विचित्रच वाटतो आहे. एक शंका : तळण्यासाठी तेलात घातल्यावर ते आईस्क्रिम वितळेल ना. आणि तेलात पसरेल. आणि मुख्य म्हणजे.. अगदी लगेच तळून काढले तर ते बेसन कच्चे राहिल असे वाटते. जरा सविस्तर शंका निरसन करावे. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

In reply to by विसोबा खेचर

आइस्क्रिम सॉफ्ट स्कूप वर्गीय नसावे. जरा कठीण असावे. वडे तीव्र आंचेवर तळल्यावर समस्या उद्भवू नये. तेल धूर येण्या इतपत तापलेले असावे. वडा तेलात सोडल्यावर वरील आवरण लगेच 'सेट' व्हावे आणि आंत पर्यंत उष्णता पोहोचायच्या आत आवरण शिजले पाहीजे. वडा जास्त वेळ तेलात राहता कामा नये.

मनापासुन 01/04/2008 - 10:48
पेटकर काका बरोबर आहे तुमचे. पण हे फ्राईड आईस्क्रीम नाही्आ आईस्क्रीम वडाच आहे. बेसन पीठ पातळ ठेवायचे म्हणजे ते कच्चे रहात नाही .उलत ते पातळ असल्याने मस्त कडक कुरकुरीत होते. पदार्थ नावावरुन च नव्हे तसाही थोडा विचित्र आहे. आवडला तर आपण त्याचे ऍडीक्ट होतो. नाही तर आयुष्यभर फजीती सांगत रहातो
नवी पाक क्रुती: बेसन पीठ बाटावड्या साठी बिजवतात तेवढे पातळ भिजवावे.त्यात चवीसाठी मीठ जिरे टाकावे , त्यात हवे असल्यास काजु /बदाम कापुन टाकावेत. गोडे तेल कढईत उकळत ठेवावे. आईस क्रीम ( वॅनीला) स्कूप ( गोळा)घेउन तो बेसन पीठात वड्याप्रमाने बुडवुन घ्यावा.व तो पटकन तळुन घ्यावा. आईस क्रीम तेवढ्याच पटकन खावे...गरम वडा- गार आइस क्रीम झकास कॉम्बीनेशन होते सू:..हा पदार्थ दिल्लीत "नुरूलाज" ची स्पेशालीटी आहे.लोक रांगा लाउन खाण्यासाठी उभे असतात. उ.सु: वडे तळुन काढणे आणि खाणे यात अंतर असु नये.