✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

उत्तर शोधायचे आहे!

ॐ
ॐकार यांनी
Mon, 03/31/2008 - 01:31  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4012 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Mon, 03/31/2008 - 02:32 नवीन

माझं मत..

१) आत्महत्या हा कोणत्याच समस्येवरचा तोडगा नाही. सहमत आहे! २) पण एकटा बलवान पुरुष बाकी ४९ पुरुष एकत्र आले तर त्यांच्याशी दोन हात करू शकणार नाही. हम्म! भिती रास्त आहे! ३) तिसर्‍या स्त्रीला तर ही समस्याच वाटत नाही. जे काही चालले आहे ते आलबेल आहे असे तिला तिचे अनुभव पटवून देत होते. अगदी बरोबर. मग तिसर्‍या स्त्रीचं चुकलं कुठे? तिने तिच्या अनुभवाप्रमाणे उत्तर दिलंन त्यात तिला त्या संताने नापास करण्यासारखं काय होतं? कदाचित, त्या वेश्येकडे जगाचा अनुभव त्या संतापेक्षाही अधिक असावा! तिने अधिक दुनिया पाहिली असावी, तिचं अनुभवचिश्व त्या संतापेक्षा अधिक वास्तव असावं असंच निदान आम्ही तरी म्हणू! असो.. :) ४) चौथ्या स्त्रीला मात्र आपले अज्ञान उमगले. या स्त्रीबद्दल काही अधिक माहिती मिळाली असती तर बरं झालं असतं! तिचं वय काय होतं? ती दिसायला कशी होती, वगैरे वगैरे! कदाचित, तो संत तिच्या रुपावर मोहीत झाला असेल आणि त्याने तिला शिष्य म्हणून पसंत केले असेल! शिवाय ती अज्ञानी आहे, अशी तिने स्वत:हूनच कबुली दिली होती, त्यामुळे तिला सगळ्या गोष्टी अगदी पहिल्यापासून शिकवणे अधिक सोयिस्कर असाही विचार त्या संताने केला असेल! असो, परंतु तिच्या वयाबद्दल आणि रुपाबद्दल पुरेसा विदा उपलब्ध नसल्यामुळे तूर्तास तरी आम्ही आमचं मत राखीव ठेवत आहोत! :) --संत तात्याबा महाराज.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 03/31/2008 - 07:16 नवीन

ऑल यु निड इज द फायटिंग स्पिरीट

१) आत्महत्या हा कोणत्याच समस्येवरचा तोडगा नाही. खरच आत्महत्या हा कोणत्याच समस्येवरचा तोडगा होउच शकत नाही. आजच्या तरुण पिढी मधे मात्र आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे असे दिसुन येते, सामुहिक आत्महत्येचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. (अख्खे कुटुंब आत्महत्या करते किंवा त्यांचा कुटुंबप्रमुख त्यांना मारुन स्वतः ला संपवतो) आत्महत्या ही आजच्या काळातील भिषण समस्या आहे. आत्महत्या हे कुठल्या ही समस्येचे उत्तर नसुन ,तो फक्त पळपुटेपणा आहे असे मला वाटते. २)ज्याला आपले अज्ञान उमगते त्यालाच ज्ञानाचा मार्ग दाखवता येतो. अगदी सहमत..... (उत्तराच्या शोधात) मदनबाण
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Mon, 03/31/2008 - 13:59 नवीन

अज्ञान...

पहिल्या तिघींनाही काही तरी ज्ञान होते म्हणून तो सूफी संत त्यांना परत पाठवून देतो. चौथी म्हणते. 'ह्याबाबतीत मी अज्ञानी आहे.' ह्या विधानातून, तिच्या जवळही 'बाकी ज्ञान आहे', असा ती इन्डायरेक्ट दावा करते आहे. तरीही तो सूफी संत तिला आपली (?) शिष्या म्हणून पत्करतो. म्हणजेच 'ह्याबाबतीतले' ज्ञान तिला मिळवून देण्यासाठीच (फक्त) तो तिला निवडतो असे 'वरकरणी' तरी दिसते आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा