मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गुरुविण कोण दाखविल वाट ?

संजीव नाईक ·

प्राजु Fri, 03/28/2008 - 08:27
गुरूर्ब्रम्हा गुरूर्विष्णु गुरूर्देवो महेश्वरः। गुरू: साक्षात परःब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥ - (सर्वव्यापी)प्राजु

संजिव साहेब, आयुष्याच्या वाटेवर प्रवास करतांना मार्गदर्शकाची गरज असते. आपण म्हणता त्या प्रमाणे जीवनाच्या प्रत्येक प्रक्रियेशी त्याचा निकटचा संबध असु शकतो नव्हे, असतोच. शिक्षक व गुरु याच्यात फरक असतो. शिक्षक पोट भरण्याची कला शिकवतो. तर गुरु हात धरुन जीवनाच्या अंगणात घेऊन जातो व जीवन जगणयाची कला शिकवतो. गुरुकुलातील जीवन केवढे अद्भुत असेल. आपल्या लेखनाने आम्हाला गुरु सांदिपनि आणि त्याचा शिष्य श्रीकृष्णाची आठवण झाली. असो, भाग लहान झाला आहे, असे वाटले. गुरु कोण ? गुरुचे वैशिष्टे ? गुरु करणे ? असेही चिंतन आले असते तर, या लेखनाची उंची अधिक वाढली असती असे वाटते. पुढील लेखनास शुभेच्छा !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 08:39
संजिवराव, आपला छोटेखानी लेख चांगला आहे! गुरुशिश्य परंपरा आम्हीही खूप मानतो. आम्ही वैयक्तिरित्या काही व्यक्तिंना आमचे गुरू मानले आहे आणि आजपर्यंत त्यांच्याकडून आम्हाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे खूप काही मिळालेले आहे.. परंतु.. आपल्या वैभवशाली गुरुशिष्य परंपरेमध्ये एक गोष्ट मात्र (अर्थात, ती खरी असेल तर!) खूप खटकते. ती म्हणजे ज्या एकल्व्याने द्रोणाचार्याला मनोमन गुरू मानले आणि साधना केली त्याच हलकट द्रोणाचार्याने एकलव्याकडे धनुष्यबाण चालवण्याकरता ज्याची अत्यंत गरज असते असा आंगठाच कापून मागितला! आता बोला..! अवांतर - व्यास हा जगत्गुरू आहे अश्या अर्थाचे एक संस्कृत सुभाषित आहे. मी मात्र व्यक्तिश: त्या आठ आठ दिवस साधी अंघोळही न करणार्‍या गोसावड्याला माझा गुरू मानत नाही! :) धन्यवाद, आपला, (अण्णा, बाबूजी आणि भाईकाकांचा मानसशिष्य) तात्या.

सन्जोप राव Fri, 03/28/2008 - 08:46
मध्ये एका मराठी संकेतस्थळावर एका महिलेने (किंवा महिलेच्या नावाने लिहिणार्‍याने) दारुबंदी, दारुची दुकाने फोडणे, व्यसनमुक्ती अशा विषयांवरील लेखांची बरसात केली होती. तंतोतंत त्याची आठवण झाली. लेख फारच आवडला. आपण अशाच जोशाने लिहीत रहाल अशी आशा आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा! (तेवढं ते 'संजिव' मधलं 'जी' दीर्घ करता येतं का पहा. एक शैली म्हणून असेल तर ठीक आहे. विषय जरा घरचा आहे.) सन्जोप राव

आर्य Fri, 03/28/2008 - 09:41
गुरु हा फक्त आध्यात्मिक क्षेत्रापुरताच मर्यादित नाही..................मग विविध क्षेत्रात /वेगवेगळ्या प्रयोजना करीता अनेक गुरु असू शकतात नही का?...........मग तुमच्या निष्ठेचे कय ? गुरु या शब्दा खरा अर्थ जणुन घेण्याची गरज आहे ....................सद्य स्थितीत हा अर्थ /व्यप्ती फक्त आध्यात्मिक क्षेत्रापुरताच मर्यादित आहे. तुम्ही दिलेले दखले हि हेच सांगतायत........ ध्येयप्राप्ती दृष्टिपथात येऊ शकेल...........ध्येय कोण ठरवणार ? गुरु की शिष्य ? मार्गदर्शनाची आवश्यकता - गुरु-शिष्यांचे नाते - प्रेम व भक्ति - श्रध्दा बसते- आत्म-विश्वास आणि मग गुरुला ओव्हरटेक........तदानुषंगिक इतर ज्ञानांचा फुलोरा फुलत जातो.........न पटण्या जोगा सिद्धांत आहे. श्रध्दा नसेल तर भक्ति करणे फार कठिण आहे. नात्यातून प्रेम / स्नेह ठिक आहे पण तुम्ही ती थेट भक्तीच केलीत. आणि हा फार मोठा टप्पा जो कि आपण ऐका दमात गठलाय...........काय हा आपला अनूभव आहे? कि ग्रंथ हे गुरु.... पण हे मान्य कि गुरु ची ऊंची हि शिष्या वरुन ठरवतात ............पण गुरुची विद्या गुरुला फळली तर ??? आपल्या मागील लेखातील "गुरुविण कोण लाविल वाट " या माझ्या प्रश्ण आद्याप अनुत्तरीत आहे ?

मनापासुन Fri, 03/28/2008 - 21:20
गुरुवीण कोण लावील वाट ...........हे पटले.... "पुर्ष्या शिंच्या.......ती शीडी आडवी का काढलीस् " बघताँय ह मी बघताँय तो डुक्कर त्या गाढवाच्या कानात काय सांगतोय ते बघताँय मी " मनापसुन पटले

प्राजु Fri, 03/28/2008 - 08:27
गुरूर्ब्रम्हा गुरूर्विष्णु गुरूर्देवो महेश्वरः। गुरू: साक्षात परःब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥ - (सर्वव्यापी)प्राजु

संजिव साहेब, आयुष्याच्या वाटेवर प्रवास करतांना मार्गदर्शकाची गरज असते. आपण म्हणता त्या प्रमाणे जीवनाच्या प्रत्येक प्रक्रियेशी त्याचा निकटचा संबध असु शकतो नव्हे, असतोच. शिक्षक व गुरु याच्यात फरक असतो. शिक्षक पोट भरण्याची कला शिकवतो. तर गुरु हात धरुन जीवनाच्या अंगणात घेऊन जातो व जीवन जगणयाची कला शिकवतो. गुरुकुलातील जीवन केवढे अद्भुत असेल. आपल्या लेखनाने आम्हाला गुरु सांदिपनि आणि त्याचा शिष्य श्रीकृष्णाची आठवण झाली. असो, भाग लहान झाला आहे, असे वाटले. गुरु कोण ? गुरुचे वैशिष्टे ? गुरु करणे ? असेही चिंतन आले असते तर, या लेखनाची उंची अधिक वाढली असती असे वाटते. पुढील लेखनास शुभेच्छा !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 08:39
संजिवराव, आपला छोटेखानी लेख चांगला आहे! गुरुशिश्य परंपरा आम्हीही खूप मानतो. आम्ही वैयक्तिरित्या काही व्यक्तिंना आमचे गुरू मानले आहे आणि आजपर्यंत त्यांच्याकडून आम्हाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे खूप काही मिळालेले आहे.. परंतु.. आपल्या वैभवशाली गुरुशिष्य परंपरेमध्ये एक गोष्ट मात्र (अर्थात, ती खरी असेल तर!) खूप खटकते. ती म्हणजे ज्या एकल्व्याने द्रोणाचार्याला मनोमन गुरू मानले आणि साधना केली त्याच हलकट द्रोणाचार्याने एकलव्याकडे धनुष्यबाण चालवण्याकरता ज्याची अत्यंत गरज असते असा आंगठाच कापून मागितला! आता बोला..! अवांतर - व्यास हा जगत्गुरू आहे अश्या अर्थाचे एक संस्कृत सुभाषित आहे. मी मात्र व्यक्तिश: त्या आठ आठ दिवस साधी अंघोळही न करणार्‍या गोसावड्याला माझा गुरू मानत नाही! :) धन्यवाद, आपला, (अण्णा, बाबूजी आणि भाईकाकांचा मानसशिष्य) तात्या.

सन्जोप राव Fri, 03/28/2008 - 08:46
मध्ये एका मराठी संकेतस्थळावर एका महिलेने (किंवा महिलेच्या नावाने लिहिणार्‍याने) दारुबंदी, दारुची दुकाने फोडणे, व्यसनमुक्ती अशा विषयांवरील लेखांची बरसात केली होती. तंतोतंत त्याची आठवण झाली. लेख फारच आवडला. आपण अशाच जोशाने लिहीत रहाल अशी आशा आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा! (तेवढं ते 'संजिव' मधलं 'जी' दीर्घ करता येतं का पहा. एक शैली म्हणून असेल तर ठीक आहे. विषय जरा घरचा आहे.) सन्जोप राव

आर्य Fri, 03/28/2008 - 09:41
गुरु हा फक्त आध्यात्मिक क्षेत्रापुरताच मर्यादित नाही..................मग विविध क्षेत्रात /वेगवेगळ्या प्रयोजना करीता अनेक गुरु असू शकतात नही का?...........मग तुमच्या निष्ठेचे कय ? गुरु या शब्दा खरा अर्थ जणुन घेण्याची गरज आहे ....................सद्य स्थितीत हा अर्थ /व्यप्ती फक्त आध्यात्मिक क्षेत्रापुरताच मर्यादित आहे. तुम्ही दिलेले दखले हि हेच सांगतायत........ ध्येयप्राप्ती दृष्टिपथात येऊ शकेल...........ध्येय कोण ठरवणार ? गुरु की शिष्य ? मार्गदर्शनाची आवश्यकता - गुरु-शिष्यांचे नाते - प्रेम व भक्ति - श्रध्दा बसते- आत्म-विश्वास आणि मग गुरुला ओव्हरटेक........तदानुषंगिक इतर ज्ञानांचा फुलोरा फुलत जातो.........न पटण्या जोगा सिद्धांत आहे. श्रध्दा नसेल तर भक्ति करणे फार कठिण आहे. नात्यातून प्रेम / स्नेह ठिक आहे पण तुम्ही ती थेट भक्तीच केलीत. आणि हा फार मोठा टप्पा जो कि आपण ऐका दमात गठलाय...........काय हा आपला अनूभव आहे? कि ग्रंथ हे गुरु.... पण हे मान्य कि गुरु ची ऊंची हि शिष्या वरुन ठरवतात ............पण गुरुची विद्या गुरुला फळली तर ??? आपल्या मागील लेखातील "गुरुविण कोण लाविल वाट " या माझ्या प्रश्ण आद्याप अनुत्तरीत आहे ?

मनापासुन Fri, 03/28/2008 - 21:20
गुरुवीण कोण लावील वाट ...........हे पटले.... "पुर्ष्या शिंच्या.......ती शीडी आडवी का काढलीस् " बघताँय ह मी बघताँय तो डुक्कर त्या गाढवाच्या कानात काय सांगतोय ते बघताँय मी " मनापसुन पटले
गुरुविण कोण दाखविल वाट ? संवेदनाशील व्यक्तिमत्वच चाकोरीबाहेरील जीवनाचा विचार करु शकते. प्राप्त जीवनात काहीतरी करायचे आहे या ध्येयवादाने पछाडले गेलेले असे व्यक्तिमत्व मग गुरुच्या शोधास लागते. एकदा खात्री झाली की आपणाला याच मार्गदर्शनाची आवश्यकता आहे की मग नकळत गुरु-शिष्यांचे नाते निर्माण होते. प्रेम व भक्ति जागृत होते. श्रध्दा बसते. श्रध्देमध्ये जबरदस्त शक्ति असते. आत्म-विश्वास निर्माण होतो. आणि नकळत शिष्याची मजल गुरुच्याही पुढे जाते. गुरुपासून ज्ञानप्राप्ती करुन घेत असता शिष्याची अभ्यासू वृत्ती वृध्दिंगत होते. पर्यायाने इच्छित ज्ञानाबरोबरच तदानुषंगिक इतर ज्ञानांचा फुलोरा फुलत जातो.

आमचा निर्णय...

केशवसुमार ·

प्राजु Fri, 03/28/2008 - 02:22
अहो विडंबन करण्यावर बंदी नाही.. तर विडंबन कोणत्या गाण्याचे आहे त्यावर अवलंबून आहे. आज देहाची तिजोरी वर दारू चे विडंबन.. उद्या पसायदानावर जर विडंबन झाले तर अवघड होईल.. तुमचि विडंबने खूप आवडतात आम्हाला.. पण दारू सोडून इतर भरपूर विषयावर विडंबन करावे ही विनंती.. मी आपली शिष्या आहे . हे नका विसरू.. :) - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

सर्किट Fri, 03/28/2008 - 02:26
पसायदानाचे विडंबन करायला घेतले आहे. लवकरच प्रकाअशित करू. त्याने अच्वघड काय होईल, ते जरा विस्ताराने कळवावे. - सर्किट विठ्ठलपंत कुलकर्णी

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 02:35
पसायदानाचे विडंबन करायला घेतले आहे. लवकरच प्रकाअशित करू. ते कदाचित अप्रकाशितही होऊ शकेल हे जाणून इथे प्रकाशित करायचे किंवा नाही ते पहावे! तात्या.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

चतुरंग Fri, 03/28/2008 - 02:37
पसायदानातच "जो जे वांछील तो ते लाहो" म्हणून ठेवलेलं आहे माउलीने तेव्हा तुमच्या विटंबनेने त्याचे काही बिघडणार नाही पण लोकांचे जोडे पडले तर तयार रहा! चतुरंग

In reply to by चतुरंग

सर्किट Fri, 03/28/2008 - 02:47
मुळात विडंबनाने मूळ कवीचे काही "बिघडते" असे म्हणणे चुकीचे आहे. आणि जोड्यांचे म्हणाल, तर जिहादी लोकांचे जोडे पुष्पगुच्छांसारखे आजवर झेलले आहेत, त्यात नवीन काय ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

चतुरंग Fri, 03/28/2008 - 02:50
तुम्हीच म्हणाला होतात ना संकेतस्थळावर वावरताना 'गेंड्याची कातडी' लागते म्हणून? मग तुम्हाला काहीही अशक्य नाही! चतुरंग

In reply to by चतुरंग

सर्किट Fri, 03/28/2008 - 03:10
परित्राणाय जालानाम विनाशायच प्रशासकां! मराठी संकेतस्थलार्थाय 'मिसळपाव' युगेयुगे!! हे आपलेच ना ? ह्यामुळे कुणाचे बिघडले ? व्यासांचे की कृष्णाचे ? - सर्किट वसुदेव यादव

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

चतुरंग Fri, 03/28/2008 - 03:23
ह्याने आमचेच बिघडले आहे बाकी कुणाचे असो वा नसो आणि म्हणूनच मी अशा प्रकारचे विडंबन न करण्याचा निर्णय घेतला आहे! चतुरंग

In reply to by चतुरंग

सर्किट Fri, 03/28/2008 - 03:36
अहो, पण आम्हाला आपले हे विडंबन खूपच आवडले आहे !!! (आणि इतर अनेकांना पण !) आणि तुमचे काय बुवा बिघडले ? उलट विडंबनकार म्हणून आदरच निर्माण झाला सर्वांना तुमच्याबद्दल. - सर्किट

In reply to by प्राजु

विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 02:32
अहो विडंबन करण्यावर बंदी नाही.. तर विडंबन कोणत्या गाण्याचे आहे त्यावर अवलंबून आहे. आज देहाची तिजोरी वर दारू चे विडंबन.. उद्या पसायदानावर जर विडंबन झाले तर अवघड होईल.. प्राजूशी सहमत! मला वाटतं केशवाने सारासार विचार करून पुन्हा एकदा आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा...! अर्थात, केशव जो निर्णय घेईल/किंवा त्याने घेतला आहे तो त्याने पूर्णपणे त्याच्या सद्सतविवेकबुद्धीला स्मरूनच घेतला आहे/असावा, असे मी तूर्तास तरी मानायला तयार नाही! पुढे मर्जी केशवाची! अजून काय लिहू? आपला, (दु:खी) तात्या.

In reply to by प्राजु

सुशील Fri, 03/28/2008 - 08:21
प्राजुताईशी सहमत आहे. दारू सोडून इतर भरपूर विषयावर विडंबन करावे तरच वाचायला मजा येते अन्यथा केशवने थोडा ब्रेक घेतलेलाच बरा.

विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 02:23
चला बरं झालं, आता रंगाच्या बरोबरीनेच आमचा केशवही उतरला आहे मैदानात! अब मजा आयेगा खेल का! :) बाय द वे केशवा, तुझी विडंबने बहुत करून इतर स्थळांवर किंवा मिपावर प्रकाशित झालेल्या कविता/गझलांवर असतात, प्रासंगिक असतात, तसेच ती विडंबने खमंगही असतात! त्यामुळे तुला इथे विडंबनं लिहायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं! सबब, तू तुझ्या निर्णयाचा फेरविचार करावास ही माझी वैयक्तिक विनंती! शेवटी मर्जी तुझी!... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सृष्टीलावण्या Fri, 03/28/2008 - 07:46
केशवा, तुझी विडंबने बहुत करून इतर स्थळांवर किंवा मिपावर प्रकाशित झालेल्या कविता/गझलांवर असतात, प्रासंगिक असतात, तसेच ती विडंबने खमंगही असतात! मी सुद्धा तुमच्या लिखाणाचा पंखा आहे. तुमच्या एका विडंबनाने माझे पुढील ३-४ दिवस मस्त जातात. ठोस चे तुम्ही ढोस केले की धम्माल वाटते. मी एकच म्हणेन की देवभक्तीच काय इतर कुठल्याही प्रसिद्ध कवींचे गीत सुद्धा विडंबन करायला काहीच हरकत नाही पण देवभक्ती गाण्याचे अगदी मदिरा, सुरा इ.इ. हीन पातळीवर नको (जे तुम्ही तसे पण कधीच करत नाही) . आपल्या काव्य प्रतिभा कौशल्याचा गरगरणारा पंखा, सृला. (आणि हो, तुम्हाला एकदा केशवकाका म्हटल्याबद्दल माफ करा. मी तुम्हाला केस पांढरे होऊ लागलेला मध्यमवयीन माणूस समजत होते पण पुणे कट्ट्याचे फोटो पाहिले आणि चूक लक्षात आली.) > > नणदेचं कार्ट किरकिर करतंय, खरुज होऊ दे त्याला, ग भवानी आई रोडगा वाहिन तुला..

सर्किट Fri, 03/28/2008 - 02:24
केशवसुमार, मिसळपावावरील एक दु:खद घटना असे आपल्या निर्णयाचे वर्णन करावे लागेल. आपल्या विडंबनांना प्रतिसाद (बहुतेकवेळा) न देणार्‍यांमध्ये आम्ही होतो. आता प्रतिसाद न दिल्याबद्दल आमचे आभार कोण मानणार ? - सर्किट (कृपया आपल्या अनुदिनीचा दुवा द्यावा. आम्ही तेथे येऊन वाचत जाऊ.)

इनोबा म्हणे Fri, 03/28/2008 - 02:33
निर्णय चूकीचा वाटतो. एक वाचक(आणि 'केश्या'चा पंखा) म्हणून फेरविचार करावा एवढीच इच्छा! बाकी मर्जी आपली. ('केश्या'चा पंखा) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

बेसनलाडू Fri, 03/28/2008 - 02:41
विषायातील वैविध्य साधण्यासाठी, योग्य रचनांची निवड करण्याचे भान येण्यासाठी काही काळ ब्रेक घेणे इष्ट. त्यामुळे लेखन थांबवणे काही ठराविक काळासाठी असेल, तर निर्णय स्वागतार्ह वाटतो; पण कायमचे विडंबन करणे आणि/अथवा येथे प्रकाशित करणे थांबविणे, हा निर्णय आततायीपणाचा/घाईघाईत घेतल्यासारखा वाटल्याने पुनर्विचार करण्याची विनंती . (समजूतदार)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सर्किट Fri, 03/28/2008 - 02:50
नाही, कल्पना तशी बरी आहे. उदा तात्यांना संगीतापासून आणि व्यक्तिचित्रांपासून ब्रेक.. प्राजुला चारोळ्यांपासून आणि "मन" ह्या विषायापासून ब्रेक.. इनोबांना "मराठी अस्मिता" पासून ब्रेक.. अनेक डॉन लोकांना दारू पासून ब्रेक.. प्रियालीला इतिहासापासून ब्रेक.. चित्तर ला गझलांपासून ब्रेक.. असे झाले, तर आम्हालाही मिसळपावापासून ब्रेक घेणे आवश्यक ठरेल. अर्थात वाईट काअहीच नाही म्हणा त्यात. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

इनोबा म्हणे Fri, 03/28/2008 - 02:57
असे झाले, तर आम्हालाही मिसळपावापासून ब्रेक घेणे आवश्यक ठरेल. बरं मग,कधी घेताय? "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

सर्किट Fri, 03/28/2008 - 02:58
बरं मग,कधी घेताय? अर्थातच, "असे झाले तर".. आता असे म्हणजे काय हे विचारू नका बुवा ! कारण ते वरच लिहिले आहे. - सर्किट

सचिन Fri, 03/28/2008 - 02:55
मला वाटते केशवसुमारांना योग्य वाटेल तो निर्णय ते घेतीलच. परंतु, एक गोष्ट येथे नमूद करावीशी वाटते. येथे कोणत्याही आभिजात साहित्यिकांना व वाचकांना पोटशूळ उठला आहे असे मला वाटत नाही. विडंबनांचा सध्या अतिरेक झाला होता आणि विषयांमधेही अत्यंत एकसुरीपणा (दारू..) आला होता, हे त्यांनाही मान्य करावेच लागेल. उत्तमोत्तम आणि लोकप्रिय कविता / गाण्यांचे विडंबन त्यांनी "क्षमा मागून" केले असले तरी, त्या मूळ कविता / गाण्यांच्या चाहत्यांना ते आवडेलच असे नाही, हे सत्य मान्य करायला हवे. त्या भावनांचा आदर करण्याऐवजी, त्याला पोटशूळ म्हणू नये, ही विनंती.

मुक्तसुनीत Fri, 03/28/2008 - 03:33
...इतकेच म्हणतो. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. विडंबन हे आनंदाचे एक हलकेफुलके साधन आहे. भावनेच्या भरात , तिरीमिरीमधे अशा छोट्या छोट्या आनंदाला आपण पारखे होऊ नये आणि इतरानाही करू नये. मधुशालेसारखी महाकाव्ये मद्यावर निर्माण झाली आहेत, उर्दु काव्यात मद्य , प्रेयसीवर आधारित एक स्वयंपूर्ण असा प्रतिमांचा/रूपकांचा/उपमांचा कोषच निर्माण झाला आहे. काव्यात परमेश्वर , प्रेम, नशा , प्रेयसी, या इतर असंख्य अशा कुठल्याच विचाराना बंदी कधी नव्हती आणि नाही. सांगण्याचा उद्देश इतकाच की, इथे येण्याचा उद्देशच मूळी आनंदाच्या देवाणघेवाणीकरता आहे. ही जी मूळ दिशा आहे ती हरवली नाही तरच इथला प्रवास सुखकर होईल. माझी अशी खात्री आहे की केशवसुमार यावर नीट विचार करतील आणि आपल्याला पुन्हा त्यांच्या गमतीशीर कविता वाचायला मिळतील.

धोंडोपंत Fri, 03/28/2008 - 07:51
केशवसुमार, आम्ही आपल्या लेखन बंद करण्याच्या मताशी असहमत आहोत. हा निर्णय धक्कादायक आहे. तुमचे मनोधैर्य खचविण्याच्या उद्देशाने कुणीतरी केलेल्या वायफळ टीकेमुळे तुम्ही जर लेखन बंद करण्याचा निर्णय घेण्याइतपत पुढे जात असाल तर ते धक्कादायक आहे. निंदकाचे घर| असावे शेजारी|| या ओळी लक्षात ठेवा आणि लेखनाला प्रवृत्त व्हा. कुणाच्यातरी आरोप आक्षेपाला बळी पडून तुम्ही लेखन बंद करणार असाल तर याचा अर्थ तुमच्या चाहत्यांपेक्षा टीकाकारांना तुम्ही जास्त महत्व देता असा होतो. तसे करू नये. मराठी समीक्षेची पातळी एवढी चांगली नाही की ती इतक्या गांभीर्याने घ्यावी. यावर विचार करावा. एखाद्याच्या लेखनावरील जळफळाट व्यक्त करण्यासाठी मराठीत समीक्षा एक माध्यम वरून वापरली जाते असे आमचे निरीक्षण आहे. आपला, (चाहता) धोंडोपंत अवांतरः- आम्ही तुमची कुंडली अत्यंत सखोलपणे पाहिली आहे. तुमच्या लेखनाच्या उत्कृष्ट दर्जाला कोणते ग्रह कारणीभूत आहेत, हे आम्ही आपल्याला विस्तृतपणे सांगितले आहे. त्याचप्रमाणे तुम्ही विडंबनेच का करता? आणि करावीत? याची कारणेही आम्ही आपल्याला सांगितली आहेत. आपल्या लेखनाला रसिकमान्यता मिळेल आणि ती कशामुळे मिळेल , तुमचे क्षेत्र विडंबनच का? हे ही आम्ही आपणास तुमच्या कुंडलीतील बुध शुक्राचे कारकत्व समजावून देतांना सांगितलेले आहे. इतक्या चांगल्या ग्रहस्थितीचा फायदा तुम्ही घेतला नाहीत तर कठीण आहे. म्हणजे आम्ही पुढे काही बोलूच शकत नाही. ज्या गोष्टी आम्ही तुम्हांला सांगितलेल्या आहेत त्यावर विचार करा आणि लिहिते व्हा. आपला, (ज्योतिषभास्कर) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

सर्किट Fri, 03/28/2008 - 08:45
मराठी समीक्षेची पातळी एवढी चांगली नाही की ती इतक्या गांभीर्याने घ्यावी. यावर विचार करावा. एखाद्याच्या लेखनावरील जळफळाट व्यक्त करण्यासाठी मराठीत समीक्षा एक माध्यम वरून वापरली जाते असे आमचे निरीक्षण आहे. अगदी अचूक !! त्रिवार सहमत !!!!! सहमत ! सहमत !! सहमत !!! ह्यातील काही जळफळाटी समीक्षक तिरपे तिरपे प्रतिसाद देण्यात माहीर आहेत. असे आमचे निरीक्षण आहे. - सर्किट

विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 08:00
तुला एकदा नीट, इमानदरीत, शांतपणे, सांगून झालेलं आहे, तरीही जर तू ऐकलं नाहीस तर मात्र तुला धरून फटकावावा लागेल! :) तेवढा अधिकार मला आहे, परंतु तो वापरायला लावू नकोस आणि पुन्हा चुपचाप विडंबने लिहिणे सुरू कर! :) अर्थात, तुला काही दिवसांकरता ब्रेक घ्यायचा असेल, किंवा थोडा कुलिंग ऑफ कालावधी हवा असेल तर जरूर घे. आमचं काहीच म्हणणं नाही. वाटल्यास तोपर्यंत आजूबाजूला दिसलेला कच्चा माल हेरून ठेव! :) परंतु तुला पुन्हा विडंबने ही लिहावीच लागतील एवढं मात्र लक्षात ठेव! नायतर तात्याच्या मैत्रीला मुकशील एवढंच सांगतो! :) आता निर्णय तुझाच आहे... तात्या.

सन्जोप राव Fri, 03/28/2008 - 08:53
जाहीरपणे लिहिण्याचे प्रयोजन कळाले नाही. असे न करताही शांतपणे विडंबन करणे थांबवता आले असते. काही काकदृष्टीच्या लोकांना हा 'पब्लिसिटी स्टंट' ही वाटू शकतो. एरवी आपल्या अनुदिनीवर आपल्याला हवे ते लिहीत रहाणे हा मला उत्तम मार्ग वाटतो. वाचणारे तिथे येऊन वाचतीलच. सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

सर्किट Fri, 03/28/2008 - 08:55
काही काकदृष्टीच्या लोकांना हा 'पब्लिसिटी स्टंट' ही वाटू शकतो. चुकून "काकादृष्टीच्या लोकांना" असे वाचले. सॉरी ! काही काकांनी अजाणतेपणे तुमचे मिसळपावावरून मन उडवले होते, असे ऐकिवात आहे, म्हणून.. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 09:07
काही काकांनी अजाणतेपणे तुमचे मिसळपावावरून मन उडवले होते, असे ऐकिवात आहे, म्हणून.. चालायचंच! :) ते काका बगलेत ज्ञानेश्वरी घेऊन असेच धंदे करत मराठी आंतरजालावर नेहमीच फिरत असतात! बाय द वे, आमच्या एका मैत्रिणींने अलिकडेच आमच्याशी केलेल्या लेखनव्यवहारात त्यांचा 'काकाबा महाराज 'असा उल्लेख केला तो मात्र आम्हाला अनवट व अभिनव वाटला आणि आवडला! :) बाकी संजोपकाकांबद्दल म्हणाल तर शेवटी तेही एक माणूसच आहेत आणि एखाद्या गोष्टीवरून माणसाचं मन तात्पुरतं उडू शकतं! परंतु मूलत: त्यांचं मिपावर आणि मिपाच्या मालकावर मनापासून प्रेम आहे त्यामुळे मिपावरून त्यांचं मन कायमस्वरुपी कधीच उडणार नाही याची आम्हाला खात्री आहे! टेंपरवारी उडाल्यास आम्ही त्यांची समजूत घालू! :) असो... तात्या.

In reply to by सन्जोप राव

सुशील Fri, 03/28/2008 - 08:59
सहमत आहे. मलातरी स्टंत वाटत नसला तरी शक्तिप्रदर्शन वाटले. म्हणजे आता तात्या, धोंडोपंत, सर्किट मागे लागले आहेत लिही लिही म्हणून. आता हळूच ते लिहायला सुरू करतील हे नक्की.

In reply to by सुशील

केशवसुमार Fri, 03/28/2008 - 10:09
शक्तिप्रदर्शन .... हा हा हा.. वा सुशिलशेठ बर्‍याच दिवसांनी आपण इथे लिहते झालत बर वाटल.. चलू द्या..चालू द्या.. (शक्तीमान्)केशवसुमार

विजुभाऊ Fri, 03/28/2008 - 10:35
विडंबानाशिवाय केशव म्हणजे नुसतेच शव "के" हे त्याच्या बुद्धीचे नाव.... केशवसुमार्.....तुमचे हे असे शव होउ देउ नका जोरदार होउ द्या तुमचा एक सध्या गरगर फिरणारा पंखा.....विजुभाऊ

ऋषिकेश Fri, 03/28/2008 - 11:26
विडंबने लिहिणे आणि मिपावर प्रकाशित करणे बंद करु नयेत ही कळकळीची विनंती.. ज्यांना आवडत नसतील त्यांनी वाचु नयेत. मिपावर विडंबने टाकु नयेत हे का सांगवे हे कळले नाही. -('मिसळ'लेला) ऋषिकेश

सुवर्णमयी Fri, 03/28/2008 - 17:41
केशवसुमार, कोण काय म्हणत या पेक्षा तुम्हाला काय करावेसे वाटते याला तुम्ही महत्त्व अधिक दिले असेल आणि हा निर्णय घेतला असेल असे समजते. लिहिणे आणि प्रकाशित करणे दोन्ही बंद करू नका असे म्हणेन. निदान आपण सध्या विडंबने अप्रकाशित ठेऊन ती कालांतराने पुस्तकरूपाने प्रकाशित करावी अशी विनंती. लेट्स होप फॉर द बेस्ट. लेखनास शुभेच्छा. सोनाली

प्रियाली Fri, 03/28/2008 - 18:05
केशवसुमार, काल रात्रीची थोडी...... म्हणून हा निर्णय का काय? अहो, लिहा बिनधास्त. ज्यांना नाही वाचायचं ते नाही वाचणार. ज्यांना नाही प्रकाशित करायचं ते नाही करणार. विडंबनात तुम्ही आक्षेपार्ह किंवा उगीच कागाळ्या प्रसवत नाही ना मग झालं तर? त्यातून तुम्हाला स्वतःलाच तोच तोचपणा वाटत असेल तर तात्पुरते थांबवा! बरं, तुमची विडंबने कधी पुस्तकरूपाने प्रकाशित केलीत तर पिशाच दिसे बाई पिशाच दिसे हे पहिल्या पानावर टाका. ;-)

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 18:12
विडंबनात तुम्ही आक्षेपार्ह किंवा उगीच कागाळ्या प्रसवत नाही ना मग झालं तर? हा हा हा! :) प्रियाली, तुम नही सुधरोगी! :) तात्या.

In reply to by प्रियाली

मनापासुन Fri, 03/28/2008 - 18:15
बरे झाले तुम्ही हे लिहिलेत ते....आता लेखन थांबवणार नाही अस पण करावा लागेल नाहीतरी तुम्ही विडंबने लोकाना अनन्द यावा म्हणुनच लिहित होतात ना

केशवसुमार,
विडंबने  लिहिण्याचे थांबवू नये. अहो, आपल्या विडंबनाने आयुष्याच्या रहाटगाड्यातील दोन क्षण आनंदात जातात.
लिहा बिनधास्त. ज्यांना नाही वाचायचं ते नाही वाचणार.  आम्ही आपले नेहमीप्रमाणे आपल्या  आवडलेल्या विडंबनाला दाद देत राहू !!!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिखाळ Fri, 03/28/2008 - 19:36
आपली अनेक विडंबने चांगली असतात. लिहित रहावे ही विनंती. --लिखाळ. सामर्थ्य आहे बडबडीचे जो जो करील तयाचे -पुल.

सुधीर कांदळकर Fri, 03/28/2008 - 20:00
बंदिस्त होऊ नये ही सदिच्छा. टीव्हीचा रिमोट जसा आपल्या हातात असतो तसेच विडंबन न आवडणारे वाचक डोळे बंद करून घेतील. तरीही कृपया देवाधर्मादि संवेदनाशील विषयावर लिहू नये ही केशवसुमारांचे चरणीं प्रार्थना. धर्ममार्तंडांनी सॉक्रेटिसाला,गॅलिलिओला सोडले नाही. तर तुम्हाला सोडतील? सगळेच धर्म आणि धर्मिष्ट, हिंदु देखील असहिष्णु आहेत. गाढवाच्या मागे उभे कधी राहू नये राव. चांगल्या विडंबनासाठी अनेक शुभेच्छा. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

सर्वसाक्षी Sat, 03/29/2008 - 00:14
महाराज, निर्णय घेतलाच आहात तर एक विनंती. कृपया आपले विडंबन आपल्या जालनिशीवर वा अन्यत्र लिहित रहा/ प्रकाशित करत रहा. (माझ्यासारखे) ते ज्यांना आवडते त्यांना वाचता येईल. न पेक्षा व्यनि ने पाठवा. बाकी हा महिना संपूदे एकदाचा. आपण प्रत्यक्ष भेटुन एक मस्तपैकी 'विडंबन विशेष' संमेलन करू. पुढील विडंबनांसाठी शुभेच्छा.

विसोबा खेचर Sat, 03/29/2008 - 00:28
इतक्या लोकांनी एवढं प्रेमाने समजावूनदेखील त्याला केशवाची साधी एका ओळीची पोच नाही, उत्तर नाही, ऍक्नॉलेजमेन्ट नाही याचा खरंच अचंबा वाटतो! त्याने इतक्या सार्‍या मंडळींचा प्रेमळ आग्रह डावलला आहे आणि डावलला आहे तो आहे, वर शिवाय साधी दोन ओळींची पोचही/उत्तरही तो देत नाही हे पाहून मला व्यक्तिश: खरंच खूप दु:ख वाटले! मी देखील माझ्या आयुष्यात खूप मोठी माणसे अगदी जवळून पाहिली आहेत, परंतु ती देखील केशवाएवढी मोठी नव्हती असंच आता म्हणायला हवं!! असो, त्याच्या निर्णंयाचा मी आदर करतो आणि त्याला त्याच्या पुढील वाटचालीकरता मन:पूर्वक शुभेच्छा देतो! (अर्थात, त्याला त्याची गरज नाही, हा भाग वेगळा!) तात्या.

अनेक समीक्षक स्वतः एकही ओळ न लिहिता साहित्यिकांना व त्यातल्या त्यात लोकप्रिय साहित्यिकांना व त्यांच्या साहित्याला तुच्छ लेखतात.परंतु कै.म.वा.धोंड(जे नुकतेच वयाच्या ९३व्या वर्षी वारले)याला अपवाद होते.ते लेखकाच्या कलाकृतीला आपल्या समीक्षेपेक्षा मोठे समजत.आपली समीक्षा परिपूर्ण नाही ह्याचे भान ठेवतांना त्यांनी आपल्या समीक्षा पुस्तकाला नाव ठेवले "जाळ्यातील चंद्र". या नावाचे स्पष्टीकरण देतांना त्यांनी ज्ञानेश्वरीतील पुढील ओवी दिली आहे. "जे जालं जली पांगिले|तेथ प्रतिबिंब दिसे कीरू आतुडले| मग थडिये काढूनि झाडिले|तेव्हलि बिंब के सांघै ||" (अर्थात,कोणतेही व्यक्तिमत्त्व किंवा काव्य स्वतःच्या शब्दात पकडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे समुद्रात जाळे पांगून त्यात आकाशातील चंद्राचे प्रतिबिंब पकडण्याचा प्रयास करणे.जाळे पांगलेले असेपर्यंत त्यात प्रतिबिंब अडकल्याचा भास होतो.परंतु किना~यावर आणून ते झटकले की त्यातून ते निसटल्याचे आढळून येते.

विडंबन काव्यावरील ही साधक-बाधक चर्चा अतिशय मोलाची असून ती एखाद्या पुस्तकात जतन करून ठेवली पाहिजे. ऑरकुट व इतर संकेत स्थळावरील जाणकार रसिकांसाठी सुध्दा ती उपलब्ध झाली पाहिजे म्हणून हा छोटासा प्रयत्न. पहा. http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=28868095&tid=2591450425237531522&na=4

विडंबन काव्यावरील ही साधक-बाधक चर्चा अतिशय मोलाची असून ती एखाद्या पुस्तकात जतन करून ठेवली पाहिजे. ऑरकुट व इतर संकेत स्थळावरील जाणकार रसिकांसाठी सुध्दा ती उपलब्ध झाली पाहिजे म्हणून हा आणखी एक छोटासा प्रयत्न. पहा.http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=826350&tid=2591452877663857538

प्राजु Fri, 03/28/2008 - 02:22
अहो विडंबन करण्यावर बंदी नाही.. तर विडंबन कोणत्या गाण्याचे आहे त्यावर अवलंबून आहे. आज देहाची तिजोरी वर दारू चे विडंबन.. उद्या पसायदानावर जर विडंबन झाले तर अवघड होईल.. तुमचि विडंबने खूप आवडतात आम्हाला.. पण दारू सोडून इतर भरपूर विषयावर विडंबन करावे ही विनंती.. मी आपली शिष्या आहे . हे नका विसरू.. :) - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

सर्किट Fri, 03/28/2008 - 02:26
पसायदानाचे विडंबन करायला घेतले आहे. लवकरच प्रकाअशित करू. त्याने अच्वघड काय होईल, ते जरा विस्ताराने कळवावे. - सर्किट विठ्ठलपंत कुलकर्णी

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 02:35
पसायदानाचे विडंबन करायला घेतले आहे. लवकरच प्रकाअशित करू. ते कदाचित अप्रकाशितही होऊ शकेल हे जाणून इथे प्रकाशित करायचे किंवा नाही ते पहावे! तात्या.

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

चतुरंग Fri, 03/28/2008 - 02:37
पसायदानातच "जो जे वांछील तो ते लाहो" म्हणून ठेवलेलं आहे माउलीने तेव्हा तुमच्या विटंबनेने त्याचे काही बिघडणार नाही पण लोकांचे जोडे पडले तर तयार रहा! चतुरंग

In reply to by चतुरंग

सर्किट Fri, 03/28/2008 - 02:47
मुळात विडंबनाने मूळ कवीचे काही "बिघडते" असे म्हणणे चुकीचे आहे. आणि जोड्यांचे म्हणाल, तर जिहादी लोकांचे जोडे पुष्पगुच्छांसारखे आजवर झेलले आहेत, त्यात नवीन काय ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

चतुरंग Fri, 03/28/2008 - 02:50
तुम्हीच म्हणाला होतात ना संकेतस्थळावर वावरताना 'गेंड्याची कातडी' लागते म्हणून? मग तुम्हाला काहीही अशक्य नाही! चतुरंग

In reply to by चतुरंग

सर्किट Fri, 03/28/2008 - 03:10
परित्राणाय जालानाम विनाशायच प्रशासकां! मराठी संकेतस्थलार्थाय 'मिसळपाव' युगेयुगे!! हे आपलेच ना ? ह्यामुळे कुणाचे बिघडले ? व्यासांचे की कृष्णाचे ? - सर्किट वसुदेव यादव

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

चतुरंग Fri, 03/28/2008 - 03:23
ह्याने आमचेच बिघडले आहे बाकी कुणाचे असो वा नसो आणि म्हणूनच मी अशा प्रकारचे विडंबन न करण्याचा निर्णय घेतला आहे! चतुरंग

In reply to by चतुरंग

सर्किट Fri, 03/28/2008 - 03:36
अहो, पण आम्हाला आपले हे विडंबन खूपच आवडले आहे !!! (आणि इतर अनेकांना पण !) आणि तुमचे काय बुवा बिघडले ? उलट विडंबनकार म्हणून आदरच निर्माण झाला सर्वांना तुमच्याबद्दल. - सर्किट

In reply to by प्राजु

विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 02:32
अहो विडंबन करण्यावर बंदी नाही.. तर विडंबन कोणत्या गाण्याचे आहे त्यावर अवलंबून आहे. आज देहाची तिजोरी वर दारू चे विडंबन.. उद्या पसायदानावर जर विडंबन झाले तर अवघड होईल.. प्राजूशी सहमत! मला वाटतं केशवाने सारासार विचार करून पुन्हा एकदा आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा...! अर्थात, केशव जो निर्णय घेईल/किंवा त्याने घेतला आहे तो त्याने पूर्णपणे त्याच्या सद्सतविवेकबुद्धीला स्मरूनच घेतला आहे/असावा, असे मी तूर्तास तरी मानायला तयार नाही! पुढे मर्जी केशवाची! अजून काय लिहू? आपला, (दु:खी) तात्या.

In reply to by प्राजु

सुशील Fri, 03/28/2008 - 08:21
प्राजुताईशी सहमत आहे. दारू सोडून इतर भरपूर विषयावर विडंबन करावे तरच वाचायला मजा येते अन्यथा केशवने थोडा ब्रेक घेतलेलाच बरा.

विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 02:23
चला बरं झालं, आता रंगाच्या बरोबरीनेच आमचा केशवही उतरला आहे मैदानात! अब मजा आयेगा खेल का! :) बाय द वे केशवा, तुझी विडंबने बहुत करून इतर स्थळांवर किंवा मिपावर प्रकाशित झालेल्या कविता/गझलांवर असतात, प्रासंगिक असतात, तसेच ती विडंबने खमंगही असतात! त्यामुळे तुला इथे विडंबनं लिहायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं! सबब, तू तुझ्या निर्णयाचा फेरविचार करावास ही माझी वैयक्तिक विनंती! शेवटी मर्जी तुझी!... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सृष्टीलावण्या Fri, 03/28/2008 - 07:46
केशवा, तुझी विडंबने बहुत करून इतर स्थळांवर किंवा मिपावर प्रकाशित झालेल्या कविता/गझलांवर असतात, प्रासंगिक असतात, तसेच ती विडंबने खमंगही असतात! मी सुद्धा तुमच्या लिखाणाचा पंखा आहे. तुमच्या एका विडंबनाने माझे पुढील ३-४ दिवस मस्त जातात. ठोस चे तुम्ही ढोस केले की धम्माल वाटते. मी एकच म्हणेन की देवभक्तीच काय इतर कुठल्याही प्रसिद्ध कवींचे गीत सुद्धा विडंबन करायला काहीच हरकत नाही पण देवभक्ती गाण्याचे अगदी मदिरा, सुरा इ.इ. हीन पातळीवर नको (जे तुम्ही तसे पण कधीच करत नाही) . आपल्या काव्य प्रतिभा कौशल्याचा गरगरणारा पंखा, सृला. (आणि हो, तुम्हाला एकदा केशवकाका म्हटल्याबद्दल माफ करा. मी तुम्हाला केस पांढरे होऊ लागलेला मध्यमवयीन माणूस समजत होते पण पुणे कट्ट्याचे फोटो पाहिले आणि चूक लक्षात आली.) > > नणदेचं कार्ट किरकिर करतंय, खरुज होऊ दे त्याला, ग भवानी आई रोडगा वाहिन तुला..

सर्किट Fri, 03/28/2008 - 02:24
केशवसुमार, मिसळपावावरील एक दु:खद घटना असे आपल्या निर्णयाचे वर्णन करावे लागेल. आपल्या विडंबनांना प्रतिसाद (बहुतेकवेळा) न देणार्‍यांमध्ये आम्ही होतो. आता प्रतिसाद न दिल्याबद्दल आमचे आभार कोण मानणार ? - सर्किट (कृपया आपल्या अनुदिनीचा दुवा द्यावा. आम्ही तेथे येऊन वाचत जाऊ.)

इनोबा म्हणे Fri, 03/28/2008 - 02:33
निर्णय चूकीचा वाटतो. एक वाचक(आणि 'केश्या'चा पंखा) म्हणून फेरविचार करावा एवढीच इच्छा! बाकी मर्जी आपली. ('केश्या'चा पंखा) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

बेसनलाडू Fri, 03/28/2008 - 02:41
विषायातील वैविध्य साधण्यासाठी, योग्य रचनांची निवड करण्याचे भान येण्यासाठी काही काळ ब्रेक घेणे इष्ट. त्यामुळे लेखन थांबवणे काही ठराविक काळासाठी असेल, तर निर्णय स्वागतार्ह वाटतो; पण कायमचे विडंबन करणे आणि/अथवा येथे प्रकाशित करणे थांबविणे, हा निर्णय आततायीपणाचा/घाईघाईत घेतल्यासारखा वाटल्याने पुनर्विचार करण्याची विनंती . (समजूतदार)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सर्किट Fri, 03/28/2008 - 02:50
नाही, कल्पना तशी बरी आहे. उदा तात्यांना संगीतापासून आणि व्यक्तिचित्रांपासून ब्रेक.. प्राजुला चारोळ्यांपासून आणि "मन" ह्या विषायापासून ब्रेक.. इनोबांना "मराठी अस्मिता" पासून ब्रेक.. अनेक डॉन लोकांना दारू पासून ब्रेक.. प्रियालीला इतिहासापासून ब्रेक.. चित्तर ला गझलांपासून ब्रेक.. असे झाले, तर आम्हालाही मिसळपावापासून ब्रेक घेणे आवश्यक ठरेल. अर्थात वाईट काअहीच नाही म्हणा त्यात. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

इनोबा म्हणे Fri, 03/28/2008 - 02:57
असे झाले, तर आम्हालाही मिसळपावापासून ब्रेक घेणे आवश्यक ठरेल. बरं मग,कधी घेताय? "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

सर्किट Fri, 03/28/2008 - 02:58
बरं मग,कधी घेताय? अर्थातच, "असे झाले तर".. आता असे म्हणजे काय हे विचारू नका बुवा ! कारण ते वरच लिहिले आहे. - सर्किट

सचिन Fri, 03/28/2008 - 02:55
मला वाटते केशवसुमारांना योग्य वाटेल तो निर्णय ते घेतीलच. परंतु, एक गोष्ट येथे नमूद करावीशी वाटते. येथे कोणत्याही आभिजात साहित्यिकांना व वाचकांना पोटशूळ उठला आहे असे मला वाटत नाही. विडंबनांचा सध्या अतिरेक झाला होता आणि विषयांमधेही अत्यंत एकसुरीपणा (दारू..) आला होता, हे त्यांनाही मान्य करावेच लागेल. उत्तमोत्तम आणि लोकप्रिय कविता / गाण्यांचे विडंबन त्यांनी "क्षमा मागून" केले असले तरी, त्या मूळ कविता / गाण्यांच्या चाहत्यांना ते आवडेलच असे नाही, हे सत्य मान्य करायला हवे. त्या भावनांचा आदर करण्याऐवजी, त्याला पोटशूळ म्हणू नये, ही विनंती.

मुक्तसुनीत Fri, 03/28/2008 - 03:33
...इतकेच म्हणतो. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. विडंबन हे आनंदाचे एक हलकेफुलके साधन आहे. भावनेच्या भरात , तिरीमिरीमधे अशा छोट्या छोट्या आनंदाला आपण पारखे होऊ नये आणि इतरानाही करू नये. मधुशालेसारखी महाकाव्ये मद्यावर निर्माण झाली आहेत, उर्दु काव्यात मद्य , प्रेयसीवर आधारित एक स्वयंपूर्ण असा प्रतिमांचा/रूपकांचा/उपमांचा कोषच निर्माण झाला आहे. काव्यात परमेश्वर , प्रेम, नशा , प्रेयसी, या इतर असंख्य अशा कुठल्याच विचाराना बंदी कधी नव्हती आणि नाही. सांगण्याचा उद्देश इतकाच की, इथे येण्याचा उद्देशच मूळी आनंदाच्या देवाणघेवाणीकरता आहे. ही जी मूळ दिशा आहे ती हरवली नाही तरच इथला प्रवास सुखकर होईल. माझी अशी खात्री आहे की केशवसुमार यावर नीट विचार करतील आणि आपल्याला पुन्हा त्यांच्या गमतीशीर कविता वाचायला मिळतील.

धोंडोपंत Fri, 03/28/2008 - 07:51
केशवसुमार, आम्ही आपल्या लेखन बंद करण्याच्या मताशी असहमत आहोत. हा निर्णय धक्कादायक आहे. तुमचे मनोधैर्य खचविण्याच्या उद्देशाने कुणीतरी केलेल्या वायफळ टीकेमुळे तुम्ही जर लेखन बंद करण्याचा निर्णय घेण्याइतपत पुढे जात असाल तर ते धक्कादायक आहे. निंदकाचे घर| असावे शेजारी|| या ओळी लक्षात ठेवा आणि लेखनाला प्रवृत्त व्हा. कुणाच्यातरी आरोप आक्षेपाला बळी पडून तुम्ही लेखन बंद करणार असाल तर याचा अर्थ तुमच्या चाहत्यांपेक्षा टीकाकारांना तुम्ही जास्त महत्व देता असा होतो. तसे करू नये. मराठी समीक्षेची पातळी एवढी चांगली नाही की ती इतक्या गांभीर्याने घ्यावी. यावर विचार करावा. एखाद्याच्या लेखनावरील जळफळाट व्यक्त करण्यासाठी मराठीत समीक्षा एक माध्यम वरून वापरली जाते असे आमचे निरीक्षण आहे. आपला, (चाहता) धोंडोपंत अवांतरः- आम्ही तुमची कुंडली अत्यंत सखोलपणे पाहिली आहे. तुमच्या लेखनाच्या उत्कृष्ट दर्जाला कोणते ग्रह कारणीभूत आहेत, हे आम्ही आपल्याला विस्तृतपणे सांगितले आहे. त्याचप्रमाणे तुम्ही विडंबनेच का करता? आणि करावीत? याची कारणेही आम्ही आपल्याला सांगितली आहेत. आपल्या लेखनाला रसिकमान्यता मिळेल आणि ती कशामुळे मिळेल , तुमचे क्षेत्र विडंबनच का? हे ही आम्ही आपणास तुमच्या कुंडलीतील बुध शुक्राचे कारकत्व समजावून देतांना सांगितलेले आहे. इतक्या चांगल्या ग्रहस्थितीचा फायदा तुम्ही घेतला नाहीत तर कठीण आहे. म्हणजे आम्ही पुढे काही बोलूच शकत नाही. ज्या गोष्टी आम्ही तुम्हांला सांगितलेल्या आहेत त्यावर विचार करा आणि लिहिते व्हा. आपला, (ज्योतिषभास्कर) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

सर्किट Fri, 03/28/2008 - 08:45
मराठी समीक्षेची पातळी एवढी चांगली नाही की ती इतक्या गांभीर्याने घ्यावी. यावर विचार करावा. एखाद्याच्या लेखनावरील जळफळाट व्यक्त करण्यासाठी मराठीत समीक्षा एक माध्यम वरून वापरली जाते असे आमचे निरीक्षण आहे. अगदी अचूक !! त्रिवार सहमत !!!!! सहमत ! सहमत !! सहमत !!! ह्यातील काही जळफळाटी समीक्षक तिरपे तिरपे प्रतिसाद देण्यात माहीर आहेत. असे आमचे निरीक्षण आहे. - सर्किट

विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 08:00
तुला एकदा नीट, इमानदरीत, शांतपणे, सांगून झालेलं आहे, तरीही जर तू ऐकलं नाहीस तर मात्र तुला धरून फटकावावा लागेल! :) तेवढा अधिकार मला आहे, परंतु तो वापरायला लावू नकोस आणि पुन्हा चुपचाप विडंबने लिहिणे सुरू कर! :) अर्थात, तुला काही दिवसांकरता ब्रेक घ्यायचा असेल, किंवा थोडा कुलिंग ऑफ कालावधी हवा असेल तर जरूर घे. आमचं काहीच म्हणणं नाही. वाटल्यास तोपर्यंत आजूबाजूला दिसलेला कच्चा माल हेरून ठेव! :) परंतु तुला पुन्हा विडंबने ही लिहावीच लागतील एवढं मात्र लक्षात ठेव! नायतर तात्याच्या मैत्रीला मुकशील एवढंच सांगतो! :) आता निर्णय तुझाच आहे... तात्या.

सन्जोप राव Fri, 03/28/2008 - 08:53
जाहीरपणे लिहिण्याचे प्रयोजन कळाले नाही. असे न करताही शांतपणे विडंबन करणे थांबवता आले असते. काही काकदृष्टीच्या लोकांना हा 'पब्लिसिटी स्टंट' ही वाटू शकतो. एरवी आपल्या अनुदिनीवर आपल्याला हवे ते लिहीत रहाणे हा मला उत्तम मार्ग वाटतो. वाचणारे तिथे येऊन वाचतीलच. सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

सर्किट Fri, 03/28/2008 - 08:55
काही काकदृष्टीच्या लोकांना हा 'पब्लिसिटी स्टंट' ही वाटू शकतो. चुकून "काकादृष्टीच्या लोकांना" असे वाचले. सॉरी ! काही काकांनी अजाणतेपणे तुमचे मिसळपावावरून मन उडवले होते, असे ऐकिवात आहे, म्हणून.. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 09:07
काही काकांनी अजाणतेपणे तुमचे मिसळपावावरून मन उडवले होते, असे ऐकिवात आहे, म्हणून.. चालायचंच! :) ते काका बगलेत ज्ञानेश्वरी घेऊन असेच धंदे करत मराठी आंतरजालावर नेहमीच फिरत असतात! बाय द वे, आमच्या एका मैत्रिणींने अलिकडेच आमच्याशी केलेल्या लेखनव्यवहारात त्यांचा 'काकाबा महाराज 'असा उल्लेख केला तो मात्र आम्हाला अनवट व अभिनव वाटला आणि आवडला! :) बाकी संजोपकाकांबद्दल म्हणाल तर शेवटी तेही एक माणूसच आहेत आणि एखाद्या गोष्टीवरून माणसाचं मन तात्पुरतं उडू शकतं! परंतु मूलत: त्यांचं मिपावर आणि मिपाच्या मालकावर मनापासून प्रेम आहे त्यामुळे मिपावरून त्यांचं मन कायमस्वरुपी कधीच उडणार नाही याची आम्हाला खात्री आहे! टेंपरवारी उडाल्यास आम्ही त्यांची समजूत घालू! :) असो... तात्या.

In reply to by सन्जोप राव

सुशील Fri, 03/28/2008 - 08:59
सहमत आहे. मलातरी स्टंत वाटत नसला तरी शक्तिप्रदर्शन वाटले. म्हणजे आता तात्या, धोंडोपंत, सर्किट मागे लागले आहेत लिही लिही म्हणून. आता हळूच ते लिहायला सुरू करतील हे नक्की.

In reply to by सुशील

केशवसुमार Fri, 03/28/2008 - 10:09
शक्तिप्रदर्शन .... हा हा हा.. वा सुशिलशेठ बर्‍याच दिवसांनी आपण इथे लिहते झालत बर वाटल.. चलू द्या..चालू द्या.. (शक्तीमान्)केशवसुमार

विजुभाऊ Fri, 03/28/2008 - 10:35
विडंबानाशिवाय केशव म्हणजे नुसतेच शव "के" हे त्याच्या बुद्धीचे नाव.... केशवसुमार्.....तुमचे हे असे शव होउ देउ नका जोरदार होउ द्या तुमचा एक सध्या गरगर फिरणारा पंखा.....विजुभाऊ

ऋषिकेश Fri, 03/28/2008 - 11:26
विडंबने लिहिणे आणि मिपावर प्रकाशित करणे बंद करु नयेत ही कळकळीची विनंती.. ज्यांना आवडत नसतील त्यांनी वाचु नयेत. मिपावर विडंबने टाकु नयेत हे का सांगवे हे कळले नाही. -('मिसळ'लेला) ऋषिकेश

सुवर्णमयी Fri, 03/28/2008 - 17:41
केशवसुमार, कोण काय म्हणत या पेक्षा तुम्हाला काय करावेसे वाटते याला तुम्ही महत्त्व अधिक दिले असेल आणि हा निर्णय घेतला असेल असे समजते. लिहिणे आणि प्रकाशित करणे दोन्ही बंद करू नका असे म्हणेन. निदान आपण सध्या विडंबने अप्रकाशित ठेऊन ती कालांतराने पुस्तकरूपाने प्रकाशित करावी अशी विनंती. लेट्स होप फॉर द बेस्ट. लेखनास शुभेच्छा. सोनाली

प्रियाली Fri, 03/28/2008 - 18:05
केशवसुमार, काल रात्रीची थोडी...... म्हणून हा निर्णय का काय? अहो, लिहा बिनधास्त. ज्यांना नाही वाचायचं ते नाही वाचणार. ज्यांना नाही प्रकाशित करायचं ते नाही करणार. विडंबनात तुम्ही आक्षेपार्ह किंवा उगीच कागाळ्या प्रसवत नाही ना मग झालं तर? त्यातून तुम्हाला स्वतःलाच तोच तोचपणा वाटत असेल तर तात्पुरते थांबवा! बरं, तुमची विडंबने कधी पुस्तकरूपाने प्रकाशित केलीत तर पिशाच दिसे बाई पिशाच दिसे हे पहिल्या पानावर टाका. ;-)

In reply to by प्रियाली

विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 18:12
विडंबनात तुम्ही आक्षेपार्ह किंवा उगीच कागाळ्या प्रसवत नाही ना मग झालं तर? हा हा हा! :) प्रियाली, तुम नही सुधरोगी! :) तात्या.

In reply to by प्रियाली

मनापासुन Fri, 03/28/2008 - 18:15
बरे झाले तुम्ही हे लिहिलेत ते....आता लेखन थांबवणार नाही अस पण करावा लागेल नाहीतरी तुम्ही विडंबने लोकाना अनन्द यावा म्हणुनच लिहित होतात ना

केशवसुमार,
विडंबने  लिहिण्याचे थांबवू नये. अहो, आपल्या विडंबनाने आयुष्याच्या रहाटगाड्यातील दोन क्षण आनंदात जातात.
लिहा बिनधास्त. ज्यांना नाही वाचायचं ते नाही वाचणार.  आम्ही आपले नेहमीप्रमाणे आपल्या  आवडलेल्या विडंबनाला दाद देत राहू !!!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिखाळ Fri, 03/28/2008 - 19:36
आपली अनेक विडंबने चांगली असतात. लिहित रहावे ही विनंती. --लिखाळ. सामर्थ्य आहे बडबडीचे जो जो करील तयाचे -पुल.

सुधीर कांदळकर Fri, 03/28/2008 - 20:00
बंदिस्त होऊ नये ही सदिच्छा. टीव्हीचा रिमोट जसा आपल्या हातात असतो तसेच विडंबन न आवडणारे वाचक डोळे बंद करून घेतील. तरीही कृपया देवाधर्मादि संवेदनाशील विषयावर लिहू नये ही केशवसुमारांचे चरणीं प्रार्थना. धर्ममार्तंडांनी सॉक्रेटिसाला,गॅलिलिओला सोडले नाही. तर तुम्हाला सोडतील? सगळेच धर्म आणि धर्मिष्ट, हिंदु देखील असहिष्णु आहेत. गाढवाच्या मागे उभे कधी राहू नये राव. चांगल्या विडंबनासाठी अनेक शुभेच्छा. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

सर्वसाक्षी Sat, 03/29/2008 - 00:14
महाराज, निर्णय घेतलाच आहात तर एक विनंती. कृपया आपले विडंबन आपल्या जालनिशीवर वा अन्यत्र लिहित रहा/ प्रकाशित करत रहा. (माझ्यासारखे) ते ज्यांना आवडते त्यांना वाचता येईल. न पेक्षा व्यनि ने पाठवा. बाकी हा महिना संपूदे एकदाचा. आपण प्रत्यक्ष भेटुन एक मस्तपैकी 'विडंबन विशेष' संमेलन करू. पुढील विडंबनांसाठी शुभेच्छा.

विसोबा खेचर Sat, 03/29/2008 - 00:28
इतक्या लोकांनी एवढं प्रेमाने समजावूनदेखील त्याला केशवाची साधी एका ओळीची पोच नाही, उत्तर नाही, ऍक्नॉलेजमेन्ट नाही याचा खरंच अचंबा वाटतो! त्याने इतक्या सार्‍या मंडळींचा प्रेमळ आग्रह डावलला आहे आणि डावलला आहे तो आहे, वर शिवाय साधी दोन ओळींची पोचही/उत्तरही तो देत नाही हे पाहून मला व्यक्तिश: खरंच खूप दु:ख वाटले! मी देखील माझ्या आयुष्यात खूप मोठी माणसे अगदी जवळून पाहिली आहेत, परंतु ती देखील केशवाएवढी मोठी नव्हती असंच आता म्हणायला हवं!! असो, त्याच्या निर्णंयाचा मी आदर करतो आणि त्याला त्याच्या पुढील वाटचालीकरता मन:पूर्वक शुभेच्छा देतो! (अर्थात, त्याला त्याची गरज नाही, हा भाग वेगळा!) तात्या.

अनेक समीक्षक स्वतः एकही ओळ न लिहिता साहित्यिकांना व त्यातल्या त्यात लोकप्रिय साहित्यिकांना व त्यांच्या साहित्याला तुच्छ लेखतात.परंतु कै.म.वा.धोंड(जे नुकतेच वयाच्या ९३व्या वर्षी वारले)याला अपवाद होते.ते लेखकाच्या कलाकृतीला आपल्या समीक्षेपेक्षा मोठे समजत.आपली समीक्षा परिपूर्ण नाही ह्याचे भान ठेवतांना त्यांनी आपल्या समीक्षा पुस्तकाला नाव ठेवले "जाळ्यातील चंद्र". या नावाचे स्पष्टीकरण देतांना त्यांनी ज्ञानेश्वरीतील पुढील ओवी दिली आहे. "जे जालं जली पांगिले|तेथ प्रतिबिंब दिसे कीरू आतुडले| मग थडिये काढूनि झाडिले|तेव्हलि बिंब के सांघै ||" (अर्थात,कोणतेही व्यक्तिमत्त्व किंवा काव्य स्वतःच्या शब्दात पकडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे समुद्रात जाळे पांगून त्यात आकाशातील चंद्राचे प्रतिबिंब पकडण्याचा प्रयास करणे.जाळे पांगलेले असेपर्यंत त्यात प्रतिबिंब अडकल्याचा भास होतो.परंतु किना~यावर आणून ते झटकले की त्यातून ते निसटल्याचे आढळून येते.

विडंबन काव्यावरील ही साधक-बाधक चर्चा अतिशय मोलाची असून ती एखाद्या पुस्तकात जतन करून ठेवली पाहिजे. ऑरकुट व इतर संकेत स्थळावरील जाणकार रसिकांसाठी सुध्दा ती उपलब्ध झाली पाहिजे म्हणून हा छोटासा प्रयत्न. पहा. http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=28868095&tid=2591450425237531522&na=4

विडंबन काव्यावरील ही साधक-बाधक चर्चा अतिशय मोलाची असून ती एखाद्या पुस्तकात जतन करून ठेवली पाहिजे. ऑरकुट व इतर संकेत स्थळावरील जाणकार रसिकांसाठी सुध्दा ती उपलब्ध झाली पाहिजे म्हणून हा आणखी एक छोटासा प्रयत्न. पहा.http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=826350&tid=2591452877663857538
लेखनविषय:
आमच्या विडंबन करण्या मुळे मराठी साहित्याची होणारी हनी आणि आभिजात साहित्यिकांना व वाचकांना उठणारा पोटशूळ लक्षात घेता आज पासून आम्ही विडंबने प्रसिद्ध करणे थांबत आहोत..आज पर्यंत ज्या वाचकांनी प्रतिसाद/ दाद/ प्रेत्साहन दिले त्या सगळ्यांचे मनापासून आभार. केशवसुमार

मन आंब्याचा मोहोर....!

प्राजु ·

विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 02:11
वा प्राजू, केवळ अप्रतीम कविता...! मन आंब्याचा मोहोर, सुवर्णाचे जणू दान.. मन बसंत बहार,मधुर कोकीळ गान.. मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा.. मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा... या ओळी सर्वात जास्त भावल्या! आपला, (मनवेल्हाळ!) तात्या.

इनोबा म्हणे Fri, 03/28/2008 - 02:19
प्राजु....जबरा कविता बरं का! मन इवलेसे फूल,नटे प्राजक्ताची फांदी.. मन मातीचा तो गंध, चढे नभालाही धुंदी.. मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा.. मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा... मन कुंकवाची रेघ, भांगामध्ये रेखलेली.. मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली.. मन सवाष्ण शृंगार, सुवासिनिचं ते लेणं... मन चांदणं ठिपूर, जणू नक्षत्रांचं देणं... या ओळी विशेष आवडल्या... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

चकली Fri, 03/28/2008 - 02:28
प्राजु....मस्त कविता पण मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली..म्हणजे काय ? मला नीट समजले नाही.. सांगशील का चकली http://chakali.blogspot.com

In reply to by चकली

इनोबा म्हणे Fri, 03/28/2008 - 02:45
मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली..म्हणजे काय ? मला नीट समजले नाही.. आपल्याला नातवंडांवर प्रेम करणारी आजी माहीतीय का हो! खेडेगावात म्हातार्‍या माणसाला 'वाळली काठी' किंवा 'वाकली काठी' असे म्हणतात.(जून्या मराठी पिक्चरमधे ऐकले नाही का?"मी काय बाबा! वाळली काठी,कधी कटकन मोडेन सांगता येत नाय") :) आम्हाला जे समजले ते आम्ही सांगीतले,तरीही समजले नसेल तर प्राजुलाच विचारा. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

चतुरंग Fri, 03/28/2008 - 02:41
किती बरं वाटलं म्हणून सांगू!फारच छान काव्य, सर्व ओळी आवडल्या! बहुधा विडंबनावरच्या वेदनेतून जन्माला आले असावे!:) चतुरंग

सचिन Fri, 03/28/2008 - 03:12
प्राजु, अतिशय उत्तम कविता ! मन कुंकवाची रेघ, भांगामध्ये रेखलेली.. मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली.. ... हे म्हणजे एकदम उच्च !! कसं काय सुचतं बुवा !!!

मीनल Fri, 03/28/2008 - 03:41
माझं मन हिला कसं काय कळ्ळल? माझं एकटीच ?की तुमचं ही ? आपल्या सर्वांच????? मन वढाय वढाय ,नाही कधी समजले.. मन माझं अन तुझं,तेच प्राजुने लिहिले.

प्राजु Fri, 03/28/2008 - 05:25
तात्या, इनोबा, सचिन, धन्यवाद. चकली ताई, इनोबांनी सांगितलेला अर्थ बरोबर आहे. चतुरंग, धन्यवाद. मलाही खूप बरं वाटलं.. मिनल, एकदम भारीच... धन्यवाद प्रतिसादासाठी. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

चकली Fri, 03/28/2008 - 21:42
धन्यवाद! मला अंदाज होता पण कुतुहूल होते कि तुम्हाला काय म्हणायचे आहे..बाकी छान. आवड्ली. चकली http://chakali.blogspot.com

वरदा Fri, 03/28/2008 - 08:47
प्राजु शब्दच नाहीत मस्तच आहे मन मोत्याचा तो थेंब, उठे पाण्यात तरंग.. मन पावसाची धार, भिजवील अंग अंग.. किती छान लिहिलयस्....खूप अर्थपूर्ण...

बेसनलाडू Fri, 03/28/2008 - 08:49
छान. कविता आवडली. मन कुंकवाची रेघ, भांगामध्ये रेखलेली.. मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली.. मन सवाष्ण शृंगार, सुवासिनिचं ते लेणं... मन चांदणं ठिपूर, जणू नक्षत्रांचं देणं... हे विशेष आवडले. अवांतर - टिपूर चे टंकताना चुकून 'ठिपूर' झाले आहे का? मला 'पिठूर' सुचले (पिठूर चांदणे). असो. (वाचक)बेसनलाडू

प्राजु Fri, 03/28/2008 - 08:57
बे.ला. , ते ठिपूर चुकुन झाले आहे.. पण संपादन कसे करणार? आणि पिठूरही छान आहे. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु

प्रमोद देव Fri, 03/28/2008 - 09:40
प्राजु इतक्या सुंदर कवितेबद्दल तुझे मन:पूर्वक अभिनंदन मन इवलेसे फूल,नटे प्राजक्ताची फांदी.. मन मातीचा तो गंध, चढे नभालाही धुंदी.. मन आंब्याचा मोहोर, सुवर्णाचे जणू दान.. मन बसंत बहार,मधुर कोकीळ गान.. मन मोत्याचा तो थेंब, उठे पाण्यात तरंग.. मन पावसाची धार, भिजवील अंग अंग.. मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा.. मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा... ह्या ओळी तर खासच आहेत.

चेतन Fri, 03/28/2008 - 11:28
मस्तचं... मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा.. मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा... अप्रतीम! लयं भारी... प्राजु ताई थोडे माझेही शब्दं मनं नाठाळं हे घोडं, भावनांच्या प्रांगणातं मनं थांबेल का थोडं, स्वप्नांच्या आननातं... मनं मलाही तुलाही, का नाही एकंसारखं मनं माझेही तुझेही, मुक्तं चारोळ्यांसारखं... आपला पंखा (मनस्वी) चेतन

स्वाती राजेश Fri, 03/28/2008 - 15:20
प्राजु कविता मस्त आहे गं... मन बगळ्यांची माळ,निळ्या नभाच्या प्रांगणी मन प्रतिबिंब वेडे, वेड्या तळ्याच्या दर्पणी ही पहिलीच ओळ खास आहे..

सुवर्णमयी Fri, 03/28/2008 - 17:11
प्राजु कविता आवडली. मन इवलेसे फूल,नटे प्राजक्ताची फांदी.. मन मातीचा तो गंध, चढे नभालाही धुंदी.. मस्तच!

शैलेश Fri, 03/28/2008 - 21:46
कविता खूपच सुंदर झाली आहे. सहज ओघ आणि आशयघन, एकमद मस्त! शैलेश

विसोबा खेचर Sat, 03/29/2008 - 00:17
हजारांच्या संख्येत सभासद असलेल्या काही संस्थळावर एवढ्या सुंदर कवितेला अवघे ५-६ प्रतिसाद मिळावेत आणि अवघ्या सातशेच्या घरात सभासद असलेल्या आमच्या मिपावर चांगले १७ ते १८ दिलखुलास दाद देणारे प्रतिसाद मिळावेत ही मी मिपाची रसिकता मानतो आणि तिला दाद देतो! आपला, (कट्टर मिपाकर!) तात्या.

मीनल Sat, 03/29/2008 - 04:04
आधी लिहायच राहून गेले.म्हणून अजून भर घालते आहे.---- ओळीचा पुर्वार्ध आणि उत्तरार्ध यांचा उत्तम मेळ आहे. तसेच आधीची ओळ आणि त्या नंतरची ओळ यात ही संबंध आहे. ते संबंध मग मनाशी जोडलेले आहे. तेच आपल्या मनाला भिडतात. वाचकाला विचार करायला लावतात या ओळी. म्हणजे मन हे आकाशातल्या अंगणातली बगळ्यांची माळ कशी? मन हे प्रतिबिंब कसे? मग फूल कसे ,थेंब कसे ,पात कसे ? वगैरे वगैरे. वाचक आपला अर्थ लावतो.तो `मना`ला जोडतो . अर्थ उलगडत जातात.कविता अधिकाधिक अर्थपूर्ण,खरी,वास्तव होत जाते. कवयित्रीने सरळ सरळ काहीच सांगितले नाही मनाबद्दल. मन `हे` `ते`च आहे असे म्हणते. दोन गोष्टींचे साम्य दाखवते आहे.पण `सारखे ,जसे ,तसे ,या प्रमाणे``या शब्दांचा वापर केलेला नाही. Simile नाही .तर Metaphor आहे. यामुळे ते विचार करायला लावते. दोहोंमधले साम्य शोधायला लावते. कधी सोपे आहे .कधी आडवळणाचे! यमक ही ओढून ताणून जुळवलेले नाही. बहिणा बाईंच्या `मन वढाय वढाय ` या अष्टाक्षरी सारखे आसल्यामुळे मी ही कविता त्या चालीवर गायली. अधिक गोड वाटते. भूपाळी ,समयी ,समई,कुंकू ,सुहासिनी याशब्दांअधून सोज्ज्वळता दिसते आहे.`परंपरे`चा पुसटसा स्पर्श आहे. तळ ,कोकिळा ,मोती ,चांदण यातून वातावरणात साधेपणा उभा केला आहे .मनाला भावतो तो. खरी कवयित्री जाणून बूजून काही करत नाही.फक्त छान छान ओळी लिहित जाते. प्राजूचे ही `साम्याचा शोध घ्यायला लावणे` ,`Metaphor मुद्दाम वापरणे` असे हेतूपूर्वक केलेले नाही हे स्पष्ट आहे. मीच विचार केला कवितेचा ,ती का आवडली ?याचा.ही उत्तर मिळाली मला. ती लिहून काढली इथे मिपावर. म॑ला वाटायला लागले आहे की प्राजूने ही इतका विचार केला नसेल `मन` लिहिताना. म्हणजे मनाचा केला असेल (कारण त्या शिवाय इतके सुंदर कसं लिहायला जमेल?) पण कवितेचा नाही. अजून खूप आहे लिहिण्यासारख.नाही का? ते तुम्ही लिहा.

In reply to by मीनल

प्राजु Sat, 03/29/2008 - 06:17
मिनल, अगं मी ही नव्हता इतका विचार केला माझ्याच या कवितेचा. पण तुझं रसग्रहण वाचून खूप बरं वाटलं. तू हि कविता किती वेळा वाचलीस आणि इतका सुंदर अर्थ लावलास? ही कविता तुझ्याच नावावर करून टाकावी असे वाटते आहे मला.. :)) - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

कारकुन Sat, 03/29/2008 - 04:15
प्रयत्न चांगल आहे पण बगळ्यांची माळ..प्राजक्ताची फांदी..मातीचा गंध.. आंब्याचा मोहोर.. पावसाची धार.. भूपाळीचा सूर .. कुंकवाची रेघ..सुवासिनिचं लेणं...नक्षत्रांचं देणं...असल्या चोथा झालेल्या कविकल्पना गोळा करुन त्यावर मन, प्रेम, जीवन, आत्मा असलं काहीही लिहुन पाडता येणार्‍या कविता आम्हालातरी आवडत नाहीत. पुढील लेखनासाठी शुभेच्छा! -कारकुन

वरदा Sat, 03/29/2008 - 05:26
तुम्हाला काहीच नाही बुवा आवडत्..लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला नाही आवडत्..इतक्या सुंदर ओळीतला अर्थ नाही भावत असं करा ना तुम्ही जाऊन कारकुनीच करा .......

In reply to by वरदा

प्राजु Sat, 03/29/2008 - 06:19
अगं सोडून दे ना.... असतात काही माणसं अरसिक आणि माणूसघाणी... काय करणार त्याला आपण? :)) पण जगन्मित्र तात्यांच्या मिपावर अशी माणसेही प्रेमळ आणि रसिक होतील अशी आशा आहे. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

In reply to by प्राजु

कारकुन Sat, 03/29/2008 - 07:23
प्राजुताई तुमची कविता टूकार वाटली म्हणून कोणीही माणूसघाणी आणि अरसिक बनत नसतं. तुमच्या अश्या व्यक्तिगत पातळीवर उतरण्याने लोक तुम्हाला फक्त 'वा वा' म्हणत राहतील पण तुम्हाला तुमचे कच्चे दुवे कधीच कळणार नाहीत. तुम्हीच तुमची कविता प्रेम/हृदय/आयुष्य/जीवन असले शब्द मनाच्या ठीकाणी घालून वाचून बघा. असो! पुढच्यावेळेस काहीतरी सकस लिहा. आणि जरा वृत्त/छंद ह्याकडॅ पण बघा काव्यात गेयता देखिल असवी (अरसिक) कारकुन

In reply to by कारकुन

मीनल Sat, 03/29/2008 - 07:42
तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रेम/हृदय/आयुष्य/जीवन असले शब्द मनाच्या ठीकाणी घालून वाचून बघीतली. खरे आहे तुमचे म्हणणे. पण असे आधिच लिहिले असते तर मला वाटत अधिक पटले असते. कविता गेय आहे .मन वढाय वढाय ची साधीशी चाल जमते आहे . प्रत्येक कविता गेय नसते. कविता `पाडणे `हे जरा दुखवणारे होते असे मला वाटते. प्रतिक्रिया देताना जरा संभाळून शब्दाचा वापर केल्यास तो जास्त परिणाम कारक असतो असा माझा अनुभव आहे. हे कुठेही लागू होते नाही का ? लहान मुलीने काढलेले चित्र कितिही बेकार असल तरी ते कसे चांगले करता येईल हे सांगणे अधिक परिणाम दखवेल. That`s it ! End of topic from my side .

In reply to by वरदा

विसोबा खेचर Sat, 03/29/2008 - 06:39
असं करा ना तुम्ही जाऊन कारकुनीच करा ....... हे मस्त! :) अगं जाऊ दे वरदा, तू उगाच अशी भडकू नकोस. त्याने प्राजूच्या कवितेवर त्याचं वैयक्तिक मत दिलं आहे त्याचा आदर आपण केला पाहिजे... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कारकुन Sat, 03/29/2008 - 07:12
त्याने प्राजूच्या कवितेवर त्याचं वैयक्तिक मत दिलं आहे त्याचा आदर आपण केला पाहिजे... धन्यवाद तात्या! तुझ्याकडून हेच अपेक्षीत होतं. नाहीतर सुमार कवितांना कुणी सुमार म्हणायला धजावणारच नाही. 'माणुसघाणा' 'अरसिक' असल्या उपाध्या घेउन वैयक्तिक हल्ले होणार!!

In reply to by कारकुन

विसोबा खेचर Sat, 03/29/2008 - 07:18
नाहीतर सुमार कवितांना कुणी सुमार म्हणायला धजावणारच नाही. ती कविता सुमार होती हे पुन्हा तुझं वैयक्तिक मत आहे असं धरून चालतो! :) एकंदरीत मिपावर अगदी विरुद्ध आवडीनिवडीची मंडळी आहेत हे चांगलंच आहे. मीनलसारखी कुणी या कवितेचं सुंदर रसग्रहण करते, तर तुझ्यासारख्या कुणाला ती सुमार वाटते. चलता है..! असो, संपवुया हा विषया आता इथेच... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कारकुन Sat, 03/29/2008 - 07:25
हे पुन्हा तुझं वैयक्तिक मत आहे असं धरून चालतो! :) अर्थातच तात्या.माझ्यासाठी देखिल विषय संपला.

पिवळा डांबिस Sat, 03/29/2008 - 06:49
मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा.. मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा... हे विशेष आवडलं. मन प्रसन्न झालं

मीनल Sat, 03/29/2008 - 07:27
प्राजु ,वरदा , तात्या म्हणतात ते बरोबर आहे. कारकून साहेबांनी त्याचे मत सांगितले .त्याचा आदर करावा. `सगळ्यांना आपले लिखाण आवडावे `ही अपेक्षा रास्त वाटत असली तरी नेहमी शक्य नाही. तिसरं माणूस होऊन त्रयस्त नजरेने पाहिल तर -- करकून साहेबांनी लिहिल्या प्रमाणे बगळ्यांची माळ..प्राजक्ताची फांदी..मातीचा गंध.. आंब्याचा मोहोर.. पावसाची धार.. भूपाळीचा सूर .. कुंकवाची रेघ..सुवासिनिचं लेणं...नक्षत्रांचं देणं...या विषयांवर अनेकांनी लिखाण केले आहे हे खरे की नाही? त्याचा चोथा झाला की मुरंबा हा मुद्दा वादाचा आहे. कारकुनांच्या मते चोथा झाला. पाण तोच `चोथा वापरून तू काही लिहून पाडलेस. माझ्या आणि अजून काहींच्या मते रुचकर मुरंबा केलास! मला तरी चोथ्या पासून काही नविन करता येणार नाही.एक वाक्य ही नाही.कविता `पाडायचं`तर दूरच! पण मला वाटत की स्वतःच्या मत प्रदर्शनाला मिपावर मोकळिक असावी. दु.म्.--कारकून साहेबांचा विषयाशी आक्षेप दिसतो आहे. तुझ्या लेखन शैलीशी नसावा. कारकून साहेब , कविता `पाडायची `म्हटली तरी सोपी आहे का हो? तसले(चकलीच्या साच्यासारखे) साचे कुठे मिळतात? मी पण एक घेऊन ठेवावा म्हणते.कधीतरी सणावारात,सभा ,समारंभात उपयोगी होईल हो . तुम्ही पाडल्या आहेत का कविता?एखादी तरी? आम्हाला वाचायला आवडतील.

In reply to by मीनल

सर्किट Sat, 03/29/2008 - 07:39
कविता `पाडायची `म्हटली तरी सोपी आहे का हो? हा हा हा ! खूपच सोपी आहे, थोदे मन, थोडी मैत्री, थोडे चोथे.. की झाली कविता... जसे, थोडी दारू, अर्धांगिनी, तिचा बाप, की झाले विडंबन.. - सर्किट

सर्किट Sat, 03/29/2008 - 07:37
असो. माझे मत कार्कुनासारखेच आहे.. तोच तोच चोथा, पुन्हा त्याच मनाच्या शेपटीच्या बोडख्याला तूप लावले आहे. काय तरी नवीन टाका बॉ ! प्राजू, कविता तशी वाईट नाहीये. पण अगं ह्या सगळ्या उपमा, रूपके ह्यांची इतकी चवून चावून माती झालीये (सगळ्या पचनेंद्रियांमधून जाऊन) की उगाच वा वा म्हणण्यात काय अर्थ आहे ? सुमार म्हणण्यासारखी नाही नक्कीच.. पण एक लक्षात घे , की दिल ह्या शब्दाने सुरू होणार्‍या आणि संवादात किमान ३०% वेळा दिल असणारे चित्रपट आपण खरंच मनावर घेतो का ? मी ह्या तुझ्या कवितेचे विडंबन करायला घेणार होतो.. हिंदी-मराठी मिश्रीत.. प्रत्येक मन ह्या शब्दाच्या ठिकाणी दिल टाकायचे, आणि मग मजाच मजा.. उदा: दिल मानता नही है, जरी मानवांचा दिल दिल चष्मा हा आजीचा, जरी दोन नंबरचा.. किंवा असेच काही तरी.. तुझ्या प्रत्येक दोन ओळीत अशींच डिस्कनेक्ट आहे ग ! उगाच वाकलेल्या शरीराचा आणि काठीचा उल्लेख करून माझ्या सारख्या सर्व सामन्य रसिकांना रडायला येत नाही ! तुझी मैत्रिण असतो, तर मीही रसग्रहण वगैरे लिहिले असते. पण मी चीनच्या प्रेमातही नाही, आणि तुझी मैत्रिणही नाही, मग काय करू सांग. दिल वाकले शरीर, दिल काठीचा फटका दिल दिलातून वाहे, दिल दिलाचा झटका !! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मीनल Sat, 03/29/2008 - 07:50
चीनच्या प्रेमाच काय कनेक्षन ? डिस्कनेक्टेड आहे ते इथे! आता पुठिल रसग्रहण सर्किटच्या लेखानाचं बर का? कारण तो माझा मित्र ना?मग काय करू ?सांगा बरे? रसग्रहण आणि मैत्री हे तेवढ कनेक्टेड .कसं????????

In reply to by मीनल

सर्किट Sat, 03/29/2008 - 07:58
ये पुठिल पुठिल क्या है ? मीनलताई, आपले गद्यच इतके डिस्कनेक्टेड आहे ना, की पद्य किती असेल, ह्या गंभीर विचारात मी आहे ! - (आपला मित्र) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

डॉ. सर्कीट,

दिल मानता नही है, जरी मानवांचा दिल
दिल चष्मा हा आजीचा, जरी दोन नंबरचा..


या पेक्षा.......

दिल वाकले शरीर, दिल काठीचा फटका
दिल दिलातून वाहे, दिल दिलाचा झटका !!


या ओळींना मी दाद देईन !!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोलबेर Sat, 03/29/2008 - 09:45
दिल वाकले शरीर, दिल काठीचा फटका दिल दिलातून वाहे, दिल दिलाचा झटका !!
दिलीप नाव सार्थकी लागले. आजपासून आम्ही तुम्हाला 'दिलवाले दिलीप बिरुटे' म्हणून ओळखू :))

विसोबा खेचर Sat, 03/29/2008 - 07:47
प्राजूच्या कवितेइतकीच मी मीनलच्या प्रतिसादांनाही दाद देईन! खूपच बॅलन्स माईंडेड प्रतिसाद...! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मीनल Sat, 03/29/2008 - 07:58
आभार तात्या. आता `मन` हा विषय नक्की नक्की संपला माझ्या साठी . आता फक्त वाचन करणार या विषयाचे. किती काथ्याकूट करणार हो एखाद्या विषयाचा? कंटाळा येतो .चोथा होतो त्या विषयाचा. . . . . हे पहा पुन्हा `चोथा`!! बस !! पुरे झाल आता.

In reply to by मीनल

सर्किट Sat, 03/29/2008 - 08:02
आता `मन` हा विषय नक्की नक्की संपला माझ्या साठी . धन्यवाद !!!! जियो !! जसे येथील धर्ममार्तंडांनी (सॉरी धर्ममार्तंडकाकांनी) दारू हा विषय विडंबनकारांसाठी रद्द ठरवला आहे, तसेच सर्व कवींनी, ह्या धर्ममार्तंडांची तक्रार येण्याआधी "मन" हा विषय संपवला, तरच इष्ट होईल. - (दारू काय आणी मन काय, एकच, असे मानणारा) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Sun, 03/30/2008 - 00:18
दारू काय आणी मन काय, एकच, असे मानणारा
मन स्कॉचचा हो पेग.. सोडा नाही त्यात सांभाळावा वेग मन मिलिट्रीची रम.. भरपूर सोडा, पाणी त्यात कम (मनकवडा) कोलबेर डिस्क्लेमर : हे लिखाण विडंबन (म्हणण्याच्या लायकीचे) नाही.. समस्त धर्ममार्तंड काकांनी नोंद घ्यावी :))

वरदा Sun, 03/30/2008 - 00:07
मलाही कविता मनापासुन आवडली..अगं हेच सगळे शब्द आम्हीही ऐकलेत आणि वाचलेत पण सगळ्यांना जमतय का चार ओळी तरी लिहायला... निदान मला तरी नाही... माझा नुसता कविता वाईट म्हणण्यावर आक्षेप नव्हता पण कविता त्याच झाल्यात...वाढदिवस शुभेच्छा देणं नेहेमीच झालंय्..हा सूर चुकीचा आहे....अशा कितीतरी गोष्टी नेहेमीच्या असतात तरीही त्या पुन्हा पहायला ऐकायला मजा येते.....म्हणून सारखा हा रडका सूर लावू नये......तुम्हाला नसेल करायचं विश कुणाला तर नका करु काय बोर आहे हे कशाला?

विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 02:11
वा प्राजू, केवळ अप्रतीम कविता...! मन आंब्याचा मोहोर, सुवर्णाचे जणू दान.. मन बसंत बहार,मधुर कोकीळ गान.. मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा.. मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा... या ओळी सर्वात जास्त भावल्या! आपला, (मनवेल्हाळ!) तात्या.

इनोबा म्हणे Fri, 03/28/2008 - 02:19
प्राजु....जबरा कविता बरं का! मन इवलेसे फूल,नटे प्राजक्ताची फांदी.. मन मातीचा तो गंध, चढे नभालाही धुंदी.. मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा.. मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा... मन कुंकवाची रेघ, भांगामध्ये रेखलेली.. मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली.. मन सवाष्ण शृंगार, सुवासिनिचं ते लेणं... मन चांदणं ठिपूर, जणू नक्षत्रांचं देणं... या ओळी विशेष आवडल्या... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

चकली Fri, 03/28/2008 - 02:28
प्राजु....मस्त कविता पण मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली..म्हणजे काय ? मला नीट समजले नाही.. सांगशील का चकली http://chakali.blogspot.com

In reply to by चकली

इनोबा म्हणे Fri, 03/28/2008 - 02:45
मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली..म्हणजे काय ? मला नीट समजले नाही.. आपल्याला नातवंडांवर प्रेम करणारी आजी माहीतीय का हो! खेडेगावात म्हातार्‍या माणसाला 'वाळली काठी' किंवा 'वाकली काठी' असे म्हणतात.(जून्या मराठी पिक्चरमधे ऐकले नाही का?"मी काय बाबा! वाळली काठी,कधी कटकन मोडेन सांगता येत नाय") :) आम्हाला जे समजले ते आम्ही सांगीतले,तरीही समजले नसेल तर प्राजुलाच विचारा. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

चतुरंग Fri, 03/28/2008 - 02:41
किती बरं वाटलं म्हणून सांगू!फारच छान काव्य, सर्व ओळी आवडल्या! बहुधा विडंबनावरच्या वेदनेतून जन्माला आले असावे!:) चतुरंग

सचिन Fri, 03/28/2008 - 03:12
प्राजु, अतिशय उत्तम कविता ! मन कुंकवाची रेघ, भांगामध्ये रेखलेली.. मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली.. ... हे म्हणजे एकदम उच्च !! कसं काय सुचतं बुवा !!!

मीनल Fri, 03/28/2008 - 03:41
माझं मन हिला कसं काय कळ्ळल? माझं एकटीच ?की तुमचं ही ? आपल्या सर्वांच????? मन वढाय वढाय ,नाही कधी समजले.. मन माझं अन तुझं,तेच प्राजुने लिहिले.

प्राजु Fri, 03/28/2008 - 05:25
तात्या, इनोबा, सचिन, धन्यवाद. चकली ताई, इनोबांनी सांगितलेला अर्थ बरोबर आहे. चतुरंग, धन्यवाद. मलाही खूप बरं वाटलं.. मिनल, एकदम भारीच... धन्यवाद प्रतिसादासाठी. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

चकली Fri, 03/28/2008 - 21:42
धन्यवाद! मला अंदाज होता पण कुतुहूल होते कि तुम्हाला काय म्हणायचे आहे..बाकी छान. आवड्ली. चकली http://chakali.blogspot.com

वरदा Fri, 03/28/2008 - 08:47
प्राजु शब्दच नाहीत मस्तच आहे मन मोत्याचा तो थेंब, उठे पाण्यात तरंग.. मन पावसाची धार, भिजवील अंग अंग.. किती छान लिहिलयस्....खूप अर्थपूर्ण...

बेसनलाडू Fri, 03/28/2008 - 08:49
छान. कविता आवडली. मन कुंकवाची रेघ, भांगामध्ये रेखलेली.. मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली.. मन सवाष्ण शृंगार, सुवासिनिचं ते लेणं... मन चांदणं ठिपूर, जणू नक्षत्रांचं देणं... हे विशेष आवडले. अवांतर - टिपूर चे टंकताना चुकून 'ठिपूर' झाले आहे का? मला 'पिठूर' सुचले (पिठूर चांदणे). असो. (वाचक)बेसनलाडू

प्राजु Fri, 03/28/2008 - 08:57
बे.ला. , ते ठिपूर चुकुन झाले आहे.. पण संपादन कसे करणार? आणि पिठूरही छान आहे. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु

प्रमोद देव Fri, 03/28/2008 - 09:40
प्राजु इतक्या सुंदर कवितेबद्दल तुझे मन:पूर्वक अभिनंदन मन इवलेसे फूल,नटे प्राजक्ताची फांदी.. मन मातीचा तो गंध, चढे नभालाही धुंदी.. मन आंब्याचा मोहोर, सुवर्णाचे जणू दान.. मन बसंत बहार,मधुर कोकीळ गान.. मन मोत्याचा तो थेंब, उठे पाण्यात तरंग.. मन पावसाची धार, भिजवील अंग अंग.. मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा.. मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा... ह्या ओळी तर खासच आहेत.

चेतन Fri, 03/28/2008 - 11:28
मस्तचं... मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा.. मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा... अप्रतीम! लयं भारी... प्राजु ताई थोडे माझेही शब्दं मनं नाठाळं हे घोडं, भावनांच्या प्रांगणातं मनं थांबेल का थोडं, स्वप्नांच्या आननातं... मनं मलाही तुलाही, का नाही एकंसारखं मनं माझेही तुझेही, मुक्तं चारोळ्यांसारखं... आपला पंखा (मनस्वी) चेतन

स्वाती राजेश Fri, 03/28/2008 - 15:20
प्राजु कविता मस्त आहे गं... मन बगळ्यांची माळ,निळ्या नभाच्या प्रांगणी मन प्रतिबिंब वेडे, वेड्या तळ्याच्या दर्पणी ही पहिलीच ओळ खास आहे..

सुवर्णमयी Fri, 03/28/2008 - 17:11
प्राजु कविता आवडली. मन इवलेसे फूल,नटे प्राजक्ताची फांदी.. मन मातीचा तो गंध, चढे नभालाही धुंदी.. मस्तच!

शैलेश Fri, 03/28/2008 - 21:46
कविता खूपच सुंदर झाली आहे. सहज ओघ आणि आशयघन, एकमद मस्त! शैलेश

विसोबा खेचर Sat, 03/29/2008 - 00:17
हजारांच्या संख्येत सभासद असलेल्या काही संस्थळावर एवढ्या सुंदर कवितेला अवघे ५-६ प्रतिसाद मिळावेत आणि अवघ्या सातशेच्या घरात सभासद असलेल्या आमच्या मिपावर चांगले १७ ते १८ दिलखुलास दाद देणारे प्रतिसाद मिळावेत ही मी मिपाची रसिकता मानतो आणि तिला दाद देतो! आपला, (कट्टर मिपाकर!) तात्या.

मीनल Sat, 03/29/2008 - 04:04
आधी लिहायच राहून गेले.म्हणून अजून भर घालते आहे.---- ओळीचा पुर्वार्ध आणि उत्तरार्ध यांचा उत्तम मेळ आहे. तसेच आधीची ओळ आणि त्या नंतरची ओळ यात ही संबंध आहे. ते संबंध मग मनाशी जोडलेले आहे. तेच आपल्या मनाला भिडतात. वाचकाला विचार करायला लावतात या ओळी. म्हणजे मन हे आकाशातल्या अंगणातली बगळ्यांची माळ कशी? मन हे प्रतिबिंब कसे? मग फूल कसे ,थेंब कसे ,पात कसे ? वगैरे वगैरे. वाचक आपला अर्थ लावतो.तो `मना`ला जोडतो . अर्थ उलगडत जातात.कविता अधिकाधिक अर्थपूर्ण,खरी,वास्तव होत जाते. कवयित्रीने सरळ सरळ काहीच सांगितले नाही मनाबद्दल. मन `हे` `ते`च आहे असे म्हणते. दोन गोष्टींचे साम्य दाखवते आहे.पण `सारखे ,जसे ,तसे ,या प्रमाणे``या शब्दांचा वापर केलेला नाही. Simile नाही .तर Metaphor आहे. यामुळे ते विचार करायला लावते. दोहोंमधले साम्य शोधायला लावते. कधी सोपे आहे .कधी आडवळणाचे! यमक ही ओढून ताणून जुळवलेले नाही. बहिणा बाईंच्या `मन वढाय वढाय ` या अष्टाक्षरी सारखे आसल्यामुळे मी ही कविता त्या चालीवर गायली. अधिक गोड वाटते. भूपाळी ,समयी ,समई,कुंकू ,सुहासिनी याशब्दांअधून सोज्ज्वळता दिसते आहे.`परंपरे`चा पुसटसा स्पर्श आहे. तळ ,कोकिळा ,मोती ,चांदण यातून वातावरणात साधेपणा उभा केला आहे .मनाला भावतो तो. खरी कवयित्री जाणून बूजून काही करत नाही.फक्त छान छान ओळी लिहित जाते. प्राजूचे ही `साम्याचा शोध घ्यायला लावणे` ,`Metaphor मुद्दाम वापरणे` असे हेतूपूर्वक केलेले नाही हे स्पष्ट आहे. मीच विचार केला कवितेचा ,ती का आवडली ?याचा.ही उत्तर मिळाली मला. ती लिहून काढली इथे मिपावर. म॑ला वाटायला लागले आहे की प्राजूने ही इतका विचार केला नसेल `मन` लिहिताना. म्हणजे मनाचा केला असेल (कारण त्या शिवाय इतके सुंदर कसं लिहायला जमेल?) पण कवितेचा नाही. अजून खूप आहे लिहिण्यासारख.नाही का? ते तुम्ही लिहा.

In reply to by मीनल

प्राजु Sat, 03/29/2008 - 06:17
मिनल, अगं मी ही नव्हता इतका विचार केला माझ्याच या कवितेचा. पण तुझं रसग्रहण वाचून खूप बरं वाटलं. तू हि कविता किती वेळा वाचलीस आणि इतका सुंदर अर्थ लावलास? ही कविता तुझ्याच नावावर करून टाकावी असे वाटते आहे मला.. :)) - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

कारकुन Sat, 03/29/2008 - 04:15
प्रयत्न चांगल आहे पण बगळ्यांची माळ..प्राजक्ताची फांदी..मातीचा गंध.. आंब्याचा मोहोर.. पावसाची धार.. भूपाळीचा सूर .. कुंकवाची रेघ..सुवासिनिचं लेणं...नक्षत्रांचं देणं...असल्या चोथा झालेल्या कविकल्पना गोळा करुन त्यावर मन, प्रेम, जीवन, आत्मा असलं काहीही लिहुन पाडता येणार्‍या कविता आम्हालातरी आवडत नाहीत. पुढील लेखनासाठी शुभेच्छा! -कारकुन

वरदा Sat, 03/29/2008 - 05:26
तुम्हाला काहीच नाही बुवा आवडत्..लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला नाही आवडत्..इतक्या सुंदर ओळीतला अर्थ नाही भावत असं करा ना तुम्ही जाऊन कारकुनीच करा .......

In reply to by वरदा

प्राजु Sat, 03/29/2008 - 06:19
अगं सोडून दे ना.... असतात काही माणसं अरसिक आणि माणूसघाणी... काय करणार त्याला आपण? :)) पण जगन्मित्र तात्यांच्या मिपावर अशी माणसेही प्रेमळ आणि रसिक होतील अशी आशा आहे. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

In reply to by प्राजु

कारकुन Sat, 03/29/2008 - 07:23
प्राजुताई तुमची कविता टूकार वाटली म्हणून कोणीही माणूसघाणी आणि अरसिक बनत नसतं. तुमच्या अश्या व्यक्तिगत पातळीवर उतरण्याने लोक तुम्हाला फक्त 'वा वा' म्हणत राहतील पण तुम्हाला तुमचे कच्चे दुवे कधीच कळणार नाहीत. तुम्हीच तुमची कविता प्रेम/हृदय/आयुष्य/जीवन असले शब्द मनाच्या ठीकाणी घालून वाचून बघा. असो! पुढच्यावेळेस काहीतरी सकस लिहा. आणि जरा वृत्त/छंद ह्याकडॅ पण बघा काव्यात गेयता देखिल असवी (अरसिक) कारकुन

In reply to by कारकुन

मीनल Sat, 03/29/2008 - 07:42
तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रेम/हृदय/आयुष्य/जीवन असले शब्द मनाच्या ठीकाणी घालून वाचून बघीतली. खरे आहे तुमचे म्हणणे. पण असे आधिच लिहिले असते तर मला वाटत अधिक पटले असते. कविता गेय आहे .मन वढाय वढाय ची साधीशी चाल जमते आहे . प्रत्येक कविता गेय नसते. कविता `पाडणे `हे जरा दुखवणारे होते असे मला वाटते. प्रतिक्रिया देताना जरा संभाळून शब्दाचा वापर केल्यास तो जास्त परिणाम कारक असतो असा माझा अनुभव आहे. हे कुठेही लागू होते नाही का ? लहान मुलीने काढलेले चित्र कितिही बेकार असल तरी ते कसे चांगले करता येईल हे सांगणे अधिक परिणाम दखवेल. That`s it ! End of topic from my side .

In reply to by वरदा

विसोबा खेचर Sat, 03/29/2008 - 06:39
असं करा ना तुम्ही जाऊन कारकुनीच करा ....... हे मस्त! :) अगं जाऊ दे वरदा, तू उगाच अशी भडकू नकोस. त्याने प्राजूच्या कवितेवर त्याचं वैयक्तिक मत दिलं आहे त्याचा आदर आपण केला पाहिजे... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कारकुन Sat, 03/29/2008 - 07:12
त्याने प्राजूच्या कवितेवर त्याचं वैयक्तिक मत दिलं आहे त्याचा आदर आपण केला पाहिजे... धन्यवाद तात्या! तुझ्याकडून हेच अपेक्षीत होतं. नाहीतर सुमार कवितांना कुणी सुमार म्हणायला धजावणारच नाही. 'माणुसघाणा' 'अरसिक' असल्या उपाध्या घेउन वैयक्तिक हल्ले होणार!!

In reply to by कारकुन

विसोबा खेचर Sat, 03/29/2008 - 07:18
नाहीतर सुमार कवितांना कुणी सुमार म्हणायला धजावणारच नाही. ती कविता सुमार होती हे पुन्हा तुझं वैयक्तिक मत आहे असं धरून चालतो! :) एकंदरीत मिपावर अगदी विरुद्ध आवडीनिवडीची मंडळी आहेत हे चांगलंच आहे. मीनलसारखी कुणी या कवितेचं सुंदर रसग्रहण करते, तर तुझ्यासारख्या कुणाला ती सुमार वाटते. चलता है..! असो, संपवुया हा विषया आता इथेच... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कारकुन Sat, 03/29/2008 - 07:25
हे पुन्हा तुझं वैयक्तिक मत आहे असं धरून चालतो! :) अर्थातच तात्या.माझ्यासाठी देखिल विषय संपला.

पिवळा डांबिस Sat, 03/29/2008 - 06:49
मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा.. मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा... हे विशेष आवडलं. मन प्रसन्न झालं

मीनल Sat, 03/29/2008 - 07:27
प्राजु ,वरदा , तात्या म्हणतात ते बरोबर आहे. कारकून साहेबांनी त्याचे मत सांगितले .त्याचा आदर करावा. `सगळ्यांना आपले लिखाण आवडावे `ही अपेक्षा रास्त वाटत असली तरी नेहमी शक्य नाही. तिसरं माणूस होऊन त्रयस्त नजरेने पाहिल तर -- करकून साहेबांनी लिहिल्या प्रमाणे बगळ्यांची माळ..प्राजक्ताची फांदी..मातीचा गंध.. आंब्याचा मोहोर.. पावसाची धार.. भूपाळीचा सूर .. कुंकवाची रेघ..सुवासिनिचं लेणं...नक्षत्रांचं देणं...या विषयांवर अनेकांनी लिखाण केले आहे हे खरे की नाही? त्याचा चोथा झाला की मुरंबा हा मुद्दा वादाचा आहे. कारकुनांच्या मते चोथा झाला. पाण तोच `चोथा वापरून तू काही लिहून पाडलेस. माझ्या आणि अजून काहींच्या मते रुचकर मुरंबा केलास! मला तरी चोथ्या पासून काही नविन करता येणार नाही.एक वाक्य ही नाही.कविता `पाडायचं`तर दूरच! पण मला वाटत की स्वतःच्या मत प्रदर्शनाला मिपावर मोकळिक असावी. दु.म्.--कारकून साहेबांचा विषयाशी आक्षेप दिसतो आहे. तुझ्या लेखन शैलीशी नसावा. कारकून साहेब , कविता `पाडायची `म्हटली तरी सोपी आहे का हो? तसले(चकलीच्या साच्यासारखे) साचे कुठे मिळतात? मी पण एक घेऊन ठेवावा म्हणते.कधीतरी सणावारात,सभा ,समारंभात उपयोगी होईल हो . तुम्ही पाडल्या आहेत का कविता?एखादी तरी? आम्हाला वाचायला आवडतील.

In reply to by मीनल

सर्किट Sat, 03/29/2008 - 07:39
कविता `पाडायची `म्हटली तरी सोपी आहे का हो? हा हा हा ! खूपच सोपी आहे, थोदे मन, थोडी मैत्री, थोडे चोथे.. की झाली कविता... जसे, थोडी दारू, अर्धांगिनी, तिचा बाप, की झाले विडंबन.. - सर्किट

सर्किट Sat, 03/29/2008 - 07:37
असो. माझे मत कार्कुनासारखेच आहे.. तोच तोच चोथा, पुन्हा त्याच मनाच्या शेपटीच्या बोडख्याला तूप लावले आहे. काय तरी नवीन टाका बॉ ! प्राजू, कविता तशी वाईट नाहीये. पण अगं ह्या सगळ्या उपमा, रूपके ह्यांची इतकी चवून चावून माती झालीये (सगळ्या पचनेंद्रियांमधून जाऊन) की उगाच वा वा म्हणण्यात काय अर्थ आहे ? सुमार म्हणण्यासारखी नाही नक्कीच.. पण एक लक्षात घे , की दिल ह्या शब्दाने सुरू होणार्‍या आणि संवादात किमान ३०% वेळा दिल असणारे चित्रपट आपण खरंच मनावर घेतो का ? मी ह्या तुझ्या कवितेचे विडंबन करायला घेणार होतो.. हिंदी-मराठी मिश्रीत.. प्रत्येक मन ह्या शब्दाच्या ठिकाणी दिल टाकायचे, आणि मग मजाच मजा.. उदा: दिल मानता नही है, जरी मानवांचा दिल दिल चष्मा हा आजीचा, जरी दोन नंबरचा.. किंवा असेच काही तरी.. तुझ्या प्रत्येक दोन ओळीत अशींच डिस्कनेक्ट आहे ग ! उगाच वाकलेल्या शरीराचा आणि काठीचा उल्लेख करून माझ्या सारख्या सर्व सामन्य रसिकांना रडायला येत नाही ! तुझी मैत्रिण असतो, तर मीही रसग्रहण वगैरे लिहिले असते. पण मी चीनच्या प्रेमातही नाही, आणि तुझी मैत्रिणही नाही, मग काय करू सांग. दिल वाकले शरीर, दिल काठीचा फटका दिल दिलातून वाहे, दिल दिलाचा झटका !! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मीनल Sat, 03/29/2008 - 07:50
चीनच्या प्रेमाच काय कनेक्षन ? डिस्कनेक्टेड आहे ते इथे! आता पुठिल रसग्रहण सर्किटच्या लेखानाचं बर का? कारण तो माझा मित्र ना?मग काय करू ?सांगा बरे? रसग्रहण आणि मैत्री हे तेवढ कनेक्टेड .कसं????????

In reply to by मीनल

सर्किट Sat, 03/29/2008 - 07:58
ये पुठिल पुठिल क्या है ? मीनलताई, आपले गद्यच इतके डिस्कनेक्टेड आहे ना, की पद्य किती असेल, ह्या गंभीर विचारात मी आहे ! - (आपला मित्र) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

डॉ. सर्कीट,

दिल मानता नही है, जरी मानवांचा दिल
दिल चष्मा हा आजीचा, जरी दोन नंबरचा..


या पेक्षा.......

दिल वाकले शरीर, दिल काठीचा फटका
दिल दिलातून वाहे, दिल दिलाचा झटका !!


या ओळींना मी दाद देईन !!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोलबेर Sat, 03/29/2008 - 09:45
दिल वाकले शरीर, दिल काठीचा फटका दिल दिलातून वाहे, दिल दिलाचा झटका !!
दिलीप नाव सार्थकी लागले. आजपासून आम्ही तुम्हाला 'दिलवाले दिलीप बिरुटे' म्हणून ओळखू :))

विसोबा खेचर Sat, 03/29/2008 - 07:47
प्राजूच्या कवितेइतकीच मी मीनलच्या प्रतिसादांनाही दाद देईन! खूपच बॅलन्स माईंडेड प्रतिसाद...! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मीनल Sat, 03/29/2008 - 07:58
आभार तात्या. आता `मन` हा विषय नक्की नक्की संपला माझ्या साठी . आता फक्त वाचन करणार या विषयाचे. किती काथ्याकूट करणार हो एखाद्या विषयाचा? कंटाळा येतो .चोथा होतो त्या विषयाचा. . . . . हे पहा पुन्हा `चोथा`!! बस !! पुरे झाल आता.

In reply to by मीनल

सर्किट Sat, 03/29/2008 - 08:02
आता `मन` हा विषय नक्की नक्की संपला माझ्या साठी . धन्यवाद !!!! जियो !! जसे येथील धर्ममार्तंडांनी (सॉरी धर्ममार्तंडकाकांनी) दारू हा विषय विडंबनकारांसाठी रद्द ठरवला आहे, तसेच सर्व कवींनी, ह्या धर्ममार्तंडांची तक्रार येण्याआधी "मन" हा विषय संपवला, तरच इष्ट होईल. - (दारू काय आणी मन काय, एकच, असे मानणारा) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Sun, 03/30/2008 - 00:18
दारू काय आणी मन काय, एकच, असे मानणारा
मन स्कॉचचा हो पेग.. सोडा नाही त्यात सांभाळावा वेग मन मिलिट्रीची रम.. भरपूर सोडा, पाणी त्यात कम (मनकवडा) कोलबेर डिस्क्लेमर : हे लिखाण विडंबन (म्हणण्याच्या लायकीचे) नाही.. समस्त धर्ममार्तंड काकांनी नोंद घ्यावी :))

वरदा Sun, 03/30/2008 - 00:07
मलाही कविता मनापासुन आवडली..अगं हेच सगळे शब्द आम्हीही ऐकलेत आणि वाचलेत पण सगळ्यांना जमतय का चार ओळी तरी लिहायला... निदान मला तरी नाही... माझा नुसता कविता वाईट म्हणण्यावर आक्षेप नव्हता पण कविता त्याच झाल्यात...वाढदिवस शुभेच्छा देणं नेहेमीच झालंय्..हा सूर चुकीचा आहे....अशा कितीतरी गोष्टी नेहेमीच्या असतात तरीही त्या पुन्हा पहायला ऐकायला मजा येते.....म्हणून सारखा हा रडका सूर लावू नये......तुम्हाला नसेल करायचं विश कुणाला तर नका करु काय बोर आहे हे कशाला?
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मन बगळ्यांची माळ,निळ्या नभाच्या प्रांगणी.. मन प्रतिबिंब वेडे, वेड्या तळ्याच्या दर्पणी.. मन इवलेसे फूल,नटे प्राजक्ताची फांदी.. मन मातीचा तो गंध, चढे नभालाही धुंदी.. मन आंब्याचा मोहोर, सुवर्णाचे जणू दान.. मन बसंत बहार,मधुर कोकीळ गान.. मन मोत्याचा तो थेंब, उठे पाण्यात तरंग.. मन पावसाची धार, भिजवील अंग अंग.. मन भूपाळीचा सूर, पहाटेच्या समयीचा.. मन तेवता प्रकाश, गाभार्‍यातल्या समईचा... मन विद्युल्ल्ता पात,धरेवर कोपणारा.. मन बरसता मेघ,जलामृत सांडणारा.. मन कुंकवाची रेघ, भांगामध्ये रेखलेली.. मन मायेची ती काठी, कमरेत वाकलेली.. मन सवाष्ण शृंगार, सुवासिनिचं ते लेणं... मन चांदणं टिपूर, जणू नक्षत्रां

विडंबनासंबंधी निवेदन

चतुरंग ·

सर्किट Fri, 03/28/2008 - 01:22
प्रत्येकाची श्रद्धा अभंगात किंवा देवाच्या गाण्यात असेलच असे नाही. माझ्या सारखे काही लोक भट, विंदा वगैरे लोकांच्या रचनांची देखील भावभक्तीने पारायणे करतो. तेव्हा स्वतःवर बंधनेच घालून घेणार असाल, तर आमच्या भावनांची देखील पर्वा करावी, ही विनंती. तोवर आम्ही "घालून लोटांगण वर करी ढुं**" म्हणतो, चालीत. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

चतुरंग Fri, 03/28/2008 - 01:38
पण ते उत्तम असेल तर मला वर्ज्य नाही कारण अभंग/देवाची गाणी ह्यातल्या भावना ते लिहिणारी संत मंडळी आणि गज़ला ह्यात मी फरक करतो. बाकी तुमचं ते "घालून लोटांगण वर करी ढुं**" चालू दे!! चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 01:48
कारण अभंग/देवाची गाणी ह्यातल्या भावना ते लिहिणारी संत मंडळी आणि गज़ला ह्यात मी फरक करतो. हम्म! हे मात्र पटले...! इव्हन, उद्या कुणी उठून जर बाबूजींच्या, 'दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगति पुत्र मनवाचा' या अत्यंत उच्च दर्जा असलेल्या गाण्याचे जर काही वायफळ विडंबन करू लागला तर मलाही ते सहन होणार नाही! असो, गेल्या काही दिवसांपासून मिपावरील विडंबनाचं गळू खूप सुजलं होतं. या चर्चाप्रस्तावाच्या निमित्ताने रंगाने त्या गळवाला सुई लावलीन हे एका अर्थी बरंच झालं! आता मिपावरील मंडळींचे याला काय नी कसे प्रतिसाद येतात, त्या प्रतिसादांतील एकंदरीत सूर कसा आहे हे पाहून मिपावर केले गेलेले विडंबन तसेच ठेवायचे की अप्रकाशित करायचे यावर जनरल डायर काय तो निर्णय घेतीलच! अर्थात, मिपावरील मंडळींचे या विषयावरील एकंदरीत सारासार मत लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला जाईल! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Fri, 03/28/2008 - 01:50
एकसाथ पेले भरता, दोष ना कुणाचा सुराधीन आहे जगती, पुत्रमानवाचा पण हे गाणे गदिमांनी लिहिलेले आहे. आता अपमान त्यांचा झाला की बाबूजींचा ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू Fri, 03/28/2008 - 02:00
हे वाचून गदिमांनी हा विषय, पेले भरणे, ढोसणे, सुराधीनता इ. इ. त्यांच्या रचनांमधून/विडंबनांतून किती वेळा चघळले आहे, याची सांख्यिकीय तपासणी करायचा मोह झाला. (संख्याशास्त्री)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सर्किट Fri, 03/28/2008 - 02:04
मुळात गदिमांनी विडंबने केली आहेत का ? माझ्या तरी वाचण्यात नाहीत. तुमचे सांख्यिकीचे अर्धे काम तर निपटले. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 02:07
कान्ट से! त्याकरता मला विडंबन पूर्ण वाचावं लागेल. शिवाय मूळ गाणंही गदिमांचंच आहे तेव्हा त्यांना त्याच गाण्याच्या विडंबनाचाही अधिकार आहे असं मला वाटतं! आणि मुळात त्याकरता, जरा मरण यातून सुटला कोण प्राणिजात, दु:खमुक्त जगला कुणी जीवनात वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा! यासारख्या ओळी लिहायची विडंबनकाराची ताकद हवी, आणि ती गदिमांची होती! तेव्हा त्यांच्याच गाण्याचं विडंबन जर गदीमांनी केलं तर तो त्यांचा अधिकार आहे असं मला वाटतं, परंतु उद्या खुद्द गदिमांनी जरी 'गर्जा जयजयकार क्रांतीचा' या कुसुमाग्रजांच्या कवितेचं काही वायफळ विडंबन केलं तरी ते मला खटकेलच! आणि मी बाबूजींचा अपमान होतो आहे असं कुठेही म्हटलेलं नाही! आपण कृपया माझे प्रतिसाद नीट वाचत जावे ही विनंती... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Fri, 03/28/2008 - 02:13
यासारख्या ओळी लिहायची विडंबनकाराची ताकद हवी, आणि ती गदिमांची होती! हेच तर म्हणतो. विडंबनकाराची ताकद असती तर त्याने विडंबने का केली असती ? अशा ताकदवान ओळीच लिहिल्या असत्या की ! तेव्हा त्यांच्याच गाण्याचं विडंबन जर गदीमांनी केलं तर तो त्यांचा अधिकार आहे असं मला वाटतं म्हणजे, फक्त स्वतःच्याच कवितांचे/गझलांचे/अभंगांचे विडंबन करावे, असे तुमचे म्हणणे आहे का ? परंतु उद्या खुद्द गदिमांनी जरी 'गर्जा जयजयकार क्रांतीचा' या कुसुमाग्रजांच्या कवितेचं काही वायफळ विडंबन केलं तरी ते मला खटकेलच! केशवसुतांच्या "आम्ही कोण म्हणूनी.." चे अत्र्यांनी केलेले विडंबनही तुम्हाला वायफळ वाटते का ? की फक्त अत्रे इतरही काही लिहायचे, म्हणून ते विडंबन चांगले ? - सर्किट

In reply to by चतुरंग

प्राजु Fri, 03/28/2008 - 02:05
मि.पा. वर चालू असलेले विडंबनसत्र आता बर्‍याचवेळा विटंबनसत्र होते की काय असे वाटू लागले आहे! आणि त्यावरील वेगवेगळ्या प्रकाराचे चर्वितचर्वण वाचून मला उबगल्यासारखे झाले आहे. अगदी खरे बोललात... मलाही असेच झाले आहे. आणि आपल्या निर्णयाचा मी आदर करते. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आम्हाला आपल्या भावनांची कदर आहे. पण मग तुम्ही पण भट, विंदा वगैरे लोकांच्या रचनांची विडंबने करू आणि वाचू नका. वाचलात तर प्रतिसाद देऊ नका. तोपर्यंत आम्ही पण "भिजूनी पाण्यात सार्‍या बो* माझा कोरडा" असे म्हणतो चालीत. पुण्याचे पेशवे

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सन्जोप राव Fri, 03/28/2008 - 08:32
माझ्या सारखे काही लोक भट, विंदा वगैरे लोकांच्या रचनांची देखील भावभक्तीने पारायणे करतो. हे पटले. सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

सर्किट Fri, 03/28/2008 - 08:51
संजू, तुला पटणारच ! वेगळे काहीतरी असेल तर सांग ! - सर्किट

In reply to by चतुरंग

बेसनलाडू Fri, 03/28/2008 - 01:57
मि.पा. वर चालू असलेले विडंबनसत्र आता बर्‍याचवेळा विटंबनसत्र होते की काय असे वाटू लागले आहे! आणि त्यावरील वेगवेगळ्या प्रकाराचे चर्वितचर्वण वाचून मला उबगल्यासारखे झाले आहे. --- सहमत आहे. येथे कोणीतरी समदु:खी भेटल्याचे/ने बरे वाटले. तेव्हा माझ्यापुरते एक बंधन मी घालून घेतो आहे की कोणत्याही अभंगाचे वा देवाच्या गाण्याचे विडंबन मी करणार नाही व तशा कुठल्याही विडंबनांना चांगला/वाईट प्रतिसादही देणार नाही. --- हे वाचूनही बरे वाटले. म्हणूनच एकूण निवेदन वाचून ((प्राप्त परिस्थिती कशीही असली तरी) जरा तरी)बरे वाटले, असे म्हटले. (स्पष्टीकारक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

चतुरंग Fri, 03/28/2008 - 02:02
आधीच्या प्रतिसादातल्या 'जर तरी' मधे तो 'जरा तरी' होता हे मला समजले नाही आणि म्हणून विचारले. धन्यवाद!! चतुरंग

विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 01:36
की कोणत्याही अभंगाचे वा देवाच्या गाण्याचे विडंबन मी करणार नाही व तशा कुठल्याही विडंबनांना चांगला/वाईट प्रतिसादही देणार नाही. मी ही हेच म्हणू पाहतो! परंतु अद्याप नक्की नाही! :) बाकी, रंगाचं निवेदन पाहून थोडासा विचारात पडलो आहे! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कारकुन Sat, 03/29/2008 - 04:21
तात्या काय हे? विडंबना सारखा आमच्या जीव्हाळ्याच्या विषयावर चक्क तुम्ही बंदी आणायची भाषा करता आहात? (व्यथित) कारकुन

चतुरंग Fri, 03/28/2008 - 02:14
योग्य विडंबनांनाही इतके पटापट प्रतिसाद येत नाहीत पण इथे चर्चा मात्र कशी घसरवत न्यायची त्याला फाटे कसे फोडायचे बघण्यासारखे आहे! का कोण जाणे पण वैफल्यग्रस्त मनोवृत्तीचे निदर्शक आहे की काय असे वाटते. चतुरंग

In reply to by चतुरंग

सर्किट Fri, 03/28/2008 - 02:16
अहो, चर्चा म्हटले की हे होणारच. स्वानुभवावरून सांगतो ! असे वाईट नका वाटून घेऊ बुवा. सार्वजनिक संकेतस्थळावर वावरण्यासाठी गेंड्याची कातडी लागते. :-) - सर्किट

सचिन Fri, 03/28/2008 - 02:33
या विषयाला हात घातल्याबद्दल चतुरंगांचे आभार. मी मिपाचा नव्यातला सदस्य आहे..आणि कवितांमधे जास्त स्वारस्य असलेला. परंतु, गेले काही दिवस विडंबनाच्या अतिरेकामुळे अक्षरशः उबग आला आहे. (उबग येण्याच्या पुढच्या परिस्थितीला काय म्हणतात ते माहीत नाही..). कशाचे आणि कसे विडंबन करावे यावर कोणी काही बंधने (स्वतःवर अथवा दुसर्‍यावर) - घालोत वा न घालोत, पण कवितांचे वाचन बंद करून मी माझ्यापुरता प्रश्न सोडविला आहे. कविता वाईटच आहेत असे मी म्हणत नाही, मीही काही कविता आवडल्याचे प्रतिसाद दिले आहेत, पण अशा कवितांचा अतिरेक मात्र निश्चितच झाला आहे, आणि "जे न देखे..." मधले वैविध्य नष्ट झाले आहे. (वि.सू. : कोणत्याही विडंबनकारास दुखावण्याचा हेतू नाही..)

In reply to by सचिन

सर्किट Fri, 03/28/2008 - 02:54
पण कवितांचे वाचन बंद करून मी माझ्यापुरता प्रश्न सोडविला आहे. हा अगदी अचूक निर्णय. कुणी काय लिहावे किंवा लिहू नये, ह्याबद्दल उपदेशामृत पाजण्यापेक्षा, स्वतः काय वाचावे अगर वाचू नये, हा निर्णय घेण्याइतपत येथील सदस्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे, असे वाटते. - सर्किट

कोलबेर Fri, 03/28/2008 - 03:02
अर्थात, मिपावरील मंडळींचे या विषयावरील एकंदरीत सारासार मत लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला जाईल!
डायर साहेबांना जर बंदीच घालायची आहे आणि ती सदस्यांच्या आवडी निवडीवर आधारीत आणायची आहे तर मला, हिंदुत्ववादी/सनातनी, ज्योतिष, तंत्र मंत्र स्तोत्र, भाकड अंधश्रद्धा आणि चारोळ्या असल्या लिखाणावर विडंबनांआधी बंदी आणलेली आवडेल. (बिल्ला क्र. २१) कोलबेर

पिवळा डांबिस Fri, 03/28/2008 - 06:45
मिपा वर आणि लेखननियंत्रण? मला वाटत होतं की मिपा चा जन्मच मुळी अशा प्रकारच्या नियंत्रणांविरुद्ध बंडखोरी म्हणून झाला होता... कुणी काय लिहावे किंवा लिहू नये, ह्याबद्दल उपदेशामृत पाजण्यापेक्षा, स्वतः काय वाचावे अगर वाचू नये, हा निर्णय घेण्याइतपत येथील सदस्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे, असे वाटते. संपूर्ण सहमत! डायर साहेबांना जर बंदीच घालायची आहे आणि ती सदस्यांच्या आवडी निवडीवर आधारीत आणायची आहे तर मला, हिंदुत्ववादी/सनातनी, ज्योतिष, तंत्र मंत्र स्तोत्र, भाकड अंधश्रद्धा आणि चारोळ्या असल्या लिखाणावर विडंबनांआधी बंदी आणलेली आवडेल. भावनांशी सहमत, पण त्याची जरूर आहे असे वाटत नाही!! अर्थात, मिपावरील मंडळींचे या विषयावरील एकंदरीत सारासार मत लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला जाईल! संपादकांनी वरील वाक्य म्हटल्यामुळेच आम्ही आमचे विचार इथे मांडत आहोत (नाहीतर या साठमारीत शिरण्याची आमची छाती नाही!!!!:)) विडंबन हा एक मान्यताप्राप्त साहित्यप्रकार आहे. कवीने कोणत्या काव्याचे विडंबन करावे आणि कोणत्या नाही हे ठरवण्याचा वाचकांना अधिकार आहे असे मला वाटत नाही. वाचकांना असे लिखाण न वाचण्याचा वा त्या लिखाणावर त्यांची अनुकूल/ प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा जरूर अधिकार आहे. व्यक्तिगत टीका किंवा भांडणे चालू असतील तर संपादक मंडळाने जरूर हस्तक्षेप करावा. कोणी जर संकेतस्थळाच्या नियमांचे उल्लंघन करीत असेल (कॉपीराईट वगैरे) तर जरूर लेखकाला समज द्यावी पण विषयाच्या/ लेखनाच्या प्रकाराच्या निवडीत हस्तक्षेप करू नये असे मला वाटते. जर विषय वा केलेले लिखाण फालतू असेल तर त्याचा प्रतिक्रियेतून समाचार घ्यायला सभासद समर्थ आहेतच की!! :))) मिपा चा सभासदवर्ग हा विस्तृत आहे त्यामुळे इथे वेगवेगळ्या विचारांची/ स्वभावांची माणसे येणार हे सहाजिकच आहे. सर्वांना सर्वच विषय/ लेखनप्रकार आवडतील असे मुळीच नाही. तेंव्हा आपल्याला जे रुचते ते वाचावे/ लिहावे, त्यावर प्रतिक्रिया द्यावी हे उत्तम!! आम्हाला खादाडी करायला आवडते पण पाककलेतील काही शष्प कळत नाही. तरीसुद्धा मामलेदाराच्या मिसळीची अचूक रेसेपी मिळाल्याबद्दल त्या लेखकांचे (स्वाती राजेश आणि पेठकरबुवा) आम्ही अनंत आभारी आहोत. मन जरा मोकळं ठेवलं की असे अनेक अनाहूत लाभ होतात... मिपा वर काय विषयावर लिखाण होतं आणि काय लेखनप्रकार हाताळले जातात यापेक्षा मिपावर अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे ही आम्हाला सर्वात आवडणारी गोष्ट आहे. आता अभिव्यक्तिस्वातंत्र्य असलं की त्याचा थोडाफार डावा-उजवा उपयोग केला जातोच. पण त्याविरुद्ध उपाय म्हणून एखाद्या विषयावर किंवा साहित्यप्रकारावर बहिष्कार टाकायचा ही भूमिका पटू शकत नाही. विशेषतः विडंबन हे अतिप्रसिध्द साहित्याचंच होतं. हे विडंबन आहे हे माहिती व्हायला वाचकांना मूळ साहित्यकृती माहिती असणे आवश्यक असते. अप्रसिद्ध साहित्याचे विडंबन करण्यात काहीच अर्थ नसतो. त्यामुळे प्रसिध्द गाणी/ कविता, अभंग/ओव्या यांचे विडंबनच प्रामुख्याने होणार! आता सेन्सेटिव्ह व्यक्ती त्यामुळे नाराज होण्याची शक्यता आम्ही नाकारीत नाही, पण त्यांच्यापुढे अशा प्रकारचे लेखन न वाचण्याचा पर्याय असतो. आणि ही सेंन्सिटिव्हिटी कालानुरूप बदलत असते. "आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेतही न वाली" हे काव्य रविकिरणमंडळाच्या काळात अनेकांना धक्का देउन गेलेच असते... असो. मिपा बद्दल आमच्या मनात आत्मियता व कौतुक आहे ते त्याने केलेल्या प्रस्थापितांविरुद्धच्या बंडखोरीबद्दल आणि येथील अभिव्यक्तिस्वातंत्र्याबद्दल! त्यामुळे आम्ही इतर कुठेही न लिहिता फक्त मिपावर लिहितो. म्हणून रहावले नाही आणि चार शब्द लिहिले. बाकी सर्व संपादकमंडळाच्या आणि मालकांच्या हाती! अधिकउणे लिहिले गेले असेल तर क्षमा असावी. -पिवळा डांबिस

सुशील Fri, 03/28/2008 - 08:24
सर्कीट साहेब आणी सर्व विडंबन समर्थक, त्या जोनी लिव्हर नावाच्या आचरट माकडान मागे एकदा राष्त्रगितावर नृत्य केले होते त्याविशयी आपले मत काय? उद्या इथे कोणि जन गण मन चे विडंबन केलेतर तुम्ही त्याचे स्वागतच करनार का? उत्तराचि वाट पहात आहे.

In reply to by सुशील

सर्किट Fri, 03/28/2008 - 08:40
नक्कीच. तो त्याचा अधिकार आहे ! (आता, जन गण मन चे विडंबन प्रकाशित करणार, नक्कीच. सर्व माकडांनी आपापल्या शेपट्या आवश्यक ठिकाणी घालाव्यात, ही विनंती.) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू Fri, 03/28/2008 - 08:44
ते विडंबन प्रकाशित करू देणार का/मिपावर राहू देणार का, याची उत्सुकता राहील. त्यावरून मिपाचे विडंबनविषयक धोरणही (हळूहळू)स्पष्ट होईल(च!) (उत्सुक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सर्किट Fri, 03/28/2008 - 08:49
आपले तिरके प्रतिसाद कितीही आले, तरी आम्ही ते इथे टाकणारच, बेला ! आमच्या नावाखाली टाकणार, इतरांच्या नव्हे ! त्याची पूर्ण जबाबदारीही आमचीच, इतरांच्या टोपणनावाखाली नाही ते आम्ही ढकलणार. शेपट्या घालणारे माउली भक्त आम्ही नाही ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू Fri, 03/28/2008 - 08:52
आम्ही फक्त काय होईल, काय नाही याबद्दल जास्त उत्सुक. धोरणांबद्दल उत्सुक. विडंबनाबद्दल कमी किंवा नल्. कुणी सांगावे, कदाचित एखादे जबरा टाकालही, जेणेकरून आपल्या पुढच्या कलाकृतींची उत्सुकता वाढेल. आपल्या हातचे असे काही वाचले नाही ना अजून! बाकी चालू द्यात तुमचे. (उत्सुक)बेसनलाडू

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

व्यंकट Fri, 03/28/2008 - 11:56
आमच्या मताला फारशी किंमत नाही हे आम्ही जाणून आहोत म्हणून आमच्या पुढील संभाव्यतः प्रक्षोभक वाक्यावरून गदारोळ होवू नये. जन, गण, मन हेच विडंबन आहे असे आमचे मत आहे. व्यंकट

In reply to by व्यंकट

धमाल मुलगा Fri, 03/28/2008 - 12:15
व्य॑कोबा, आपल्याशी सहमत. राजा जॉर्ज च्या स्तुतीप्रित्यर्थ हे गायले (भारतभाग्यविधाता) अस॑ वाचल्याच॑ स्मरत॑. असो, पुन्हा ह्यावर वाद होतील. सध्या वातावरण बिघडल॑ आहे ! आपला, -(सहमत) ध मा ल.

प्रमोद देव Fri, 03/28/2008 - 08:28
मिपा वर काय विषयावर लिखाण होतं आणि काय लेखनप्रकार हाताळले जातात यापेक्षा मिपावर अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे ही आम्हाला सर्वात आवडणारी गोष्ट आहे. आता अभिव्यक्तिस्वातंत्र्य असलं की त्याचा थोडाफार डावा-उजवा उपयोग केला जातोच. पण त्याविरुद्ध उपाय म्हणून एखाद्या विषयावर किंवा साहित्यप्रकारावर बहिष्कार टाकायचा ही भूमिका पटू शकत नाही. विशेषतः विडंबन हे अतिप्रसिध्द साहित्याचंच होतं. हे विडंबन आहे हे माहिती व्हायला वाचकांना मूळ साहित्यकृती माहिती असणे आवश्यक असते. अप्रसिद्ध साहित्याचे विडंबन करण्यात काहीच अर्थ नसतो. त्यामुळे प्रसिध्द गाणी/ कविता, अभंग/ओव्या यांचे विडंबनच प्रामुख्याने होणार! डांबीसरावांशी ह्या बाबतीत सहमत आहे. मि.पा. वर चालू असलेले विडंबनसत्र आता बर्‍याचवेळा विटंबनसत्र होते की काय असे वाटू लागले आहे! रंगरावांशी ह्या बाबतीत सहमत आहे. ह्यातला विटंबनसत्र हा शब्द महत्वाचा. आता माझे मतः विडंबन कुणी करावे,का करावे,कशाचे करावे आणि कसे करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्यात एक किमान दर्जा असावा अशी अपेक्षा मी एक वाचक म्हणून करतो. तसेच घेतले एखादे गीत,कविता,अभंग वगैरे वगैर आणि पँटमध्ये शर्ट खोचावा त्या पद्धतीने त्यात बाई,बाटली(हे फारच वाढलंय हल्ली) आणि तत्सम शब्द अधून मधून पेरले की झाले विडंबन.... असे बर्‍याच जणांना वाटते. क्षणभर एक गंमत म्हणून ते चालूनही जाते. पण माझ्या मते ते विडंबन नसून विटंबन(ना) असते. हातात कुंचला आणि काळ्या रंगाचा डबा आहे आणि दिसेल तिथे तो रंग फासायचा... अशा तर्‍हेचा अट्टाहास वाटतो त्यामागे. तेव्हा समस्त प्रतिभावंतांना माझी विनंती आहे की.... विडंबन आपण जरूर करा. त्यात दारू,बाई वगैरे विषय वर्ज्य नाहीत. पण दळण दळल्यासारखे प्रत्येक विडंबनात तीच तीच रुपके वापरू नका. त्यात खरे तर तुमचेच कल्पनादारिद्र्य दिसून येते. म्हणून त्यात वैविध्य आणा आणि मुख्य म्हणजे विडंबनात कुठेही वैयक्तिक आकस,दुस्वास,शेरेबाजी असल्या गोष्टी येऊ देऊ नका. इथल्या समस्त विडंबनकारांनी हे आव्हान ताकतीने पेलावे असे मी त्यांना आवाहन करतो.

प्राजु Fri, 03/28/2008 - 08:55
तेव्हा समस्त प्रतिभावंतांना माझी विनंती आहे की.... विडंबन आपण जरूर करा. त्यात दारू,बाई वगैरे विषय वर्ज्य नाहीत. पण दळण दळल्यासारखे प्रत्येक विडंबनात तीच तीच रुपके वापरू नका. त्यात खरे तर तुमचेच कल्पनादारिद्र्य दिसून येते. म्हणून त्यात वैविध्य आणा आणि मुख्य म्हणजे विडंबनात कुठेही वैयक्तिक आकस,दुस्वास,शेरेबाजी असल्या गोष्टी येऊ देऊ नका. प्रमोदकाका, हे म्हणणे तुमचे एकदम पटले... पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

सुशील Fri, 03/28/2008 - 09:05
पण दळण दळल्यासारखे प्रत्येक विडंबनात तीच तीच रुपके वापरू नका. प्राजुताई तुम्ही काही बोलु नका. मध्यंतरी दळण दळल्या सारखं तुम्ही देखिल चारोळ्या टाकल्या होत्यात तेव्हा सगळयांच्या टिकेमुळे मलापण माझे लिखाण थांबवावे लागले. मला खरं तर चारोळ्या लिहायला खुप आवडत पण त्यामुळे लिहु शकलो नाही ना. प्रामाणीकपणे सांगतो आहे कृपया राग मानु नका.

In reply to by सुशील

प्राजु Fri, 03/28/2008 - 09:14
प्राजुताई तुम्ही काही बोलु नका. मी बोलायचं की नाही हे तुम्ही नका ठरवू. तुम्हांला जे जमतं ते करा. मध्यंतरी दळण दळल्या सारखं तुम्ही देखिल चारोळ्या टाकल्या होत्यात तेव्हा सगळयांच्या टिकेमुळे मलापण माझे लिखाण थांबवावे लागले. मला खरं तर चारोळ्या लिहायला खुप आवडत पण त्यामुळे लिहु शकलो नाही ना. माफ करा.. पण मी त्या एकटिने नव्हत्या टाकल्या, मिपावरचे बरेच लोक होते इथे आणि मुख्य म्हणजे त्यामध्ये एकच विषय नव्हता. तेव्हा सगळ्यांनी टिका केली असे कोणी सांगितले तुम्हाला? तेव्हा काय झाले हे माहिती नसेल तर तुम्हांला बोलण्याचा अधिकार नाही. आणि जमल्यास तो धागा काढून वाचा आणि तुम्ही लिहिलेल्या चारोळ्या आणि त्या धाग्यातील चारोळ्या यांचि तुलना करा.. म्हणजे तुम्ही कुठे आहात हे तुम्हालाच समजेल. आणि तुमच्या चारोळ्या जर चांगल्या असत्या तर त्याला नक्की प्रतिसाद मिळाला असता.. यावरूनच तुम्हि लक्षात घ्या काय ते. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

सुशील Fri, 03/28/2008 - 09:22
माफ करा प्राजुताई मी राग मानु नका म्हणुन पण तुम्ही रागावलात. पण मला सांगा चारोळ्या टाकणारे अनेकजण असले तरी विडंबन टाकणारेपण अनेकच आहेत. आणि त्यामध्ये बहुतेक वेळा प्रेम वगैरे असा एकच विषय पण होता. तसेच माझ्या चारोळीना आलेले प्रतिसाद पुन्हा बघा. प्रतिसाद आणि वाचने मिळाले होते. मि कुठे आहे ते मला माहित आहे पण तुम्ही अशी माझी जागा दाखवुन तुम्ही कुठे आहेत ते दाखवले. यापुढे मला तुमच्याशी बोलायचे नाहि.

In reply to by सुशील

प्राजु Fri, 03/28/2008 - 18:35
तुमच्या या निर्णयाचा तुमच्या पेक्षा मलाच जास्ती आनंद झाला.... कीप इट अप. - (सर्वव्यापी)प्राजु

तेव्हा माझ्यापुरते एक बंधन मी घालून घेतो आहे की कोणत्याही अभंगाचे वा देवाच्या गाण्याचे विडंबन मी करणार नाही व तशा कुठल्याही विडंबनांना चांगला/वाईट प्रतिसादही देणार नाही. मात्र चांगला/वाइट प्रतिसाद लिहिण्याचे शहाणपण सुदैवाने येथील वाचकाजवळ आहे, ज्याचा त्याचा निर्णय ज्याने त्याने घ्यावा. आम्ही आम्हाला आवडणार्‍या विडंबनांना विषय कोणतेही असले तरी दाद देत राहू . कुणी काय लिहावे किंवा लिहू नये, ह्याबद्दल उपदेशामृत पाजण्यापेक्षा, स्वतः काय वाचावे अगर वाचू नये, हा निर्णय घेण्याइतपत येथील सदस्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे, असे वाटते. सहमत आहे. मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर कोणत्याही लेखनावर बंदीचा विचार येणार नाही, किंवा असे लेखन अप्रकाशित होणार नाही, याची आम्हास पुर्ण खात्री आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्किट Fri, 03/28/2008 - 09:02
मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर कोणत्याही लेखनावर बंदीचा विचार येणार नाही, याची आम्हास पुर्ण खात्री आहे. आपण प्राडॉ डायर आहात का ? - (अचंभित) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आपण प्राडॉ डायर आहात का ? नाही, आम्ही येथे आपल्यासारखेच एक वाचक आहोत. वाचक म्हणुन अशा लेखनावर बंदी किंवा असे लेखन अप्रकाशित होऊ नये असे वाटते. ( आपण कामात असता त्याचा आम्हाला आनंद असतो. आपण हे असे रिकामे झाले की आम्हाला आपल्याला प्रत्येक शब्दा शब्दाचे स्पष्टीकरण द्यावे लागते. )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुशील Fri, 03/28/2008 - 09:25
सर मी पण तुम्हाला संपादक समजत होतो तुम्ही जर फक्त वाचक आहे म्हणता आहात तर इतक्या ठोसपणे हे कसे म्हणालात? मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर कोणत्याही लेखनावर बंदीचा विचार येणार नाही, किंवा असे लेखन अप्रकाशित होणार नाही, याची आम्हास पुर्ण खात्री आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेसनलाडू Fri, 03/28/2008 - 09:06
सर, कोणत्याही प्रकारच्या लेखनावर बंदी येणार नाही म्हणालात; पण आध्यात्मिक लेखन किंवा त्याच्या माध्यमातून पसरवले जाणारे (गैर)समज, (अंध)श्रद्धा, चमत्कार याबाबत अंतिम निर्णय डायर साहेबांचा असेल, असे जाहीर झाले आहे ना इकडेच? काय वाचावे, काय वाचू नये हे ठरवायचा वाचकांना अधिकार आहे, तर आध्यात्मिक गुरूंना बापड्यांन लिहऊ देत की. त्यावर बंदीची भाषा, पूर्वभाष्य अगर त्याची अंमलबजावणी कशासाठी? वाचायचे अगर नाही, मुद्दे खोडायचे की उचलून धरायचे हे सगळे सहभागी वाचक बघून घेतीलच ना? (मुद्देसूद)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 09:13
त्यावर बंदीची भाषा, पूर्वभाष्य अगर त्याची अंमलबजावणी कशासाठी? वाचायचे अगर नाही, मुद्दे खोडायचे की उचलून धरायचे हे सगळे सहभागी वाचक बघून घेतीलच ना? आणीबाणीसदृष परिस्थितीत प्रश्न विचारायचे नसतात अशी आमची माहिती आहे! बाय द वे, जनरल डायर आत्ता या क्षणी काल रात्री चिक्कार उसाचा रस प्यायल्यामुळे गाढ झोपले आहेत! :) ते उठल्यावर तुमचे हे प्रश्न इथे शिल्लक राहतील किंवा नाही या बाबत आम्ही साशंक आहोत! :) बाकी चालू द्या! :) तात्या.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सन्जोप राव Fri, 03/28/2008 - 11:28
मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर कोणत्याही लेखनावर बंदीचा विचार येणार नाही, किंवा असे लेखन अप्रकाशित होणार नाही, याची आम्हास पुर्ण खात्री आहे. मिसळपावाच्या मालकांविषयी वैयक्तिक टिप्प्णी करणारा एक तुकडा इथे वाचला होता. तो आता दिसत नाही, हे कसे काय ,प्राध्यापक डॉक्टरसाहेब? सन्जोप राव

आनंदयात्री Fri, 03/28/2008 - 10:58
खरे तर अजिबात तोंड घालायची इच्छा नव्हती; कारण आम्ही विडंबने वाचायची तर सोडलीच आहेत इव्हन त्यावर गप्पा मारण्याचे पण सोडले आहे. या अशा कविता पडल्या पडल्या दुसर्‍या मिनिटाला होणार्‍या विडंबनांची तुलना मी रेल्वे स्टेशन वर मिळनार्‍या पिवळ्या पुस्तंकाशी मी करतो; रद्दी; दुर्लक्ष करण्याजोगी. चला पण वरिल चर्चेत अनेकांचा दुटप्पीपणा दिसुन आला, एरवी विडंबन पडल्या पडल्या त्यावर लगेच "वा वा","शवटुकार तुमच्या प्रतिभेला सलाम" वैगेरे वैगेरे प्रतिसाद देणारे लोक आता वेगळी वेगळी मते मांडतांना दिसत आहेत.

In reply to by आनंदयात्री

विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 11:22
एकिकडे आपण, कारण आम्ही विडंबने वाचायची तर सोडलीच आहेत इव्हन त्यावर गप्पा मारण्याचे पण सोडले आहे. असं म्हणता, व लगेच एरवी विडंबन पडल्या पडल्या त्यावर लगेच "वा वा","शवटुकार तुमच्या प्रतिभेला सलाम" विडंबनांना कुणाचे काय प्रतिसाद येतात हेही आपल्याला ठाऊक आहे याचे राहून राहून नवल वाटले! गंमतच आहे बॉ!:) यावरून विडंबनांचे आपले वाचन कुठपर्यंत सुरू होते आणि नेमकी कुठून आपण विडंबने वाचायची सोडून दिलीत हा एक अवांतर प्रश्न आम्हाला पडला आहे! :) असो, आपलाच, तात्या.

शेखर Fri, 03/28/2008 - 12:57
आपपसातील वादानेच किंवा हेव्यादाव्याने मराठेशाही बुडाली ...... याचे स्मरण असुद्या. - शेखर

In reply to by शेखर

धमाल मुलगा Fri, 03/28/2008 - 13:27
शेखरशेठ, आपपसातील वादानेच किंवा हेव्यादाव्याने मराठेशाही बुडाली ...... याचे स्मरण असुद्या. अगदी लाख बोललात ! हल्ली काय चालल॑य काही कळत नाही. लवकर ही परिस्थिती सुधारो हीच श्रीश॑भूचरणि प्रार्थना! -(व्यथित) ध मा ल.

लिखाळ Fri, 03/28/2008 - 19:34
विडंबने कशी असावित, असावित का? इत्यादी मते वैयक्तिक आहेत. वाचकांनी चांगले वाईट प्रतिसाद द्यावेत. त्यातून जे राहिल ते इथल्यांना आवडते असे समजले जाईल. बंदी वगैरे आणावी असे वाटत नाही. चतुरंग यांनी सुद्धा असे काही सुचवले नाही हे चांगलेच. --लिखाळ. सामर्थ्य आहे बडबडीचे जो जो करील तयाचे - पुल.

वरदा Sat, 03/29/2008 - 05:13
काय चाल्लंय्...चारोळ्याही आपण सगळ्यांनी एन्जॉय केल्या आणि बरीचशी विडंबनंही आपल्याला आवडली...थोडी अतिशयोक्ति झाली असेल तर होईल कमी आपोआप कुणी प्रतिसाद दिले नाहीत तर्..जी छान विडंबन असतील ती वाचूया बाकीची सोडून देऊ....सुशील तुम्हालाही आवडत होतं चारोळ्या लिहायला आणि तिथे लिहावसं वाटत नव्हतं तर वेगळा धागा उघडायचा माझ्या वेगळ्या चारोळ्या म्हणून....उगाच कशाला बोलता... आम्ही तर मस्त एन्जॉय केलं.... हल्ली काय चालल॑य काही कळत नाही. लवकर ही परिस्थिती सुधारो हीच श्रीश॑भूचरणि प्रार्थना! धमु १००% सहमत.... अरे तुम्ही सगळे एप्रिल फुल नाही ना करत? कालपर्यंत तर आपण सगळे धमाल करायचो मधेच काय झालं काय? सारखी ऑफिस आणि घरची टेन्शन्स असह्य झाली की आपण इथे येतॉ जरावेळ मजा करतो कीती बरं वाट्टं..इथेही तसच असेल तर कसं वाटेल यावसं?

In reply to by वरदा

विसोबा खेचर Sat, 03/29/2008 - 07:52
वरदा, तुझे प्रतिसाद वाचताना कॉलेजातली तेरावी, चौदावीतली एखादी मुलगी माझ्याशी बोलते आहे की काय असं वाटतं! :) स्वभावातला अवखळपणा, निरागसपणा असाच राहू दे! जप त्याला नेहमी... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Sat, 03/29/2008 - 08:05
वरदा, तुझे प्रतिसाद वाचताना कॉलेजातली तेरावी, चौदावीतली एखादी मुलगी माझ्याशी बोलते आहे की काय असं वाटतं! :) सांभाळून राहा हो ! अशा प्रतिसादांमुळे "तेराव्या चौदावीतल्या" मुलींना किती धोका आहे, हे सहज लक्षात येते ! - (खट्याळ) सर्किट

विडंबन काव्यावरील ही साधक-बाधक चर्चा अतिशय मोलाची असून ती एखाद्या पुस्तकात जतन करून ठेवली पाहिजे. ऑरकुट व इतर संकेत स्थळावरील जाणकार रसिकांसाठी सुध्दा ती उपलब्ध झाली पाहिजे म्हणून हा छोटासा प्रयत्न. पहा. http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=28868095&tid=2591450425237531522&... »

प्रभाकर पेठकर Sat, 03/29/2008 - 15:08
प्रत्येक वाचकाचा वाचनाधिकार अबाधित आहे. विडंबनकारांवर बंदी आणू नये. वाचकांनी आपापला वाचनाधिकार वापरावा. 'मला आवडत नाही ते साहित्य वाईट' असा संकुचित एप्रोच नसावा. (हा कुणावरही वैयक्तिक शेरा नाही.)

प्रत्येक वाचकाचा वाचनाधिकार अबाधित आहे. विडंबनकारांवर बंदी आणू नये. वाचकांनी आपापला वाचनाधिकार वापरावा. 'मला आवडत नाही ते साहित्य वाईट' असा संकुचित एप्रोच नसावा. (हा कुणावरही वैयक्तिक शेरा नाही.) » श्री. प्रभाकर पेठकर(खरं खुरं नांव वाचून आनंद झाला) यांच्या मताशी सहमत. चांगले/वाईट साहित्य असा भेद असूनही "माझ्या आवडीचे/नावडीचे" असाहि भेद नक्कीच असू शकतो.

In reply to by प्रा सुरेश खेडकर

विसोबा खेचर Sun, 03/30/2008 - 12:51
श्री. प्रभाकर पेठकर(खरं खुरं नांव वाचून आनंद झाला) अहो पण 'प्रभाकर पेठकर' हे नांव तरी खरंखुरं कशावरून? त्यांचं खरं नांव 'धुरंधर भाटवडेकर' असंही एखादं असू शकतं! :)) आपला, तात्याभैय्या देवासकर.

सर्किट Fri, 03/28/2008 - 01:22
प्रत्येकाची श्रद्धा अभंगात किंवा देवाच्या गाण्यात असेलच असे नाही. माझ्या सारखे काही लोक भट, विंदा वगैरे लोकांच्या रचनांची देखील भावभक्तीने पारायणे करतो. तेव्हा स्वतःवर बंधनेच घालून घेणार असाल, तर आमच्या भावनांची देखील पर्वा करावी, ही विनंती. तोवर आम्ही "घालून लोटांगण वर करी ढुं**" म्हणतो, चालीत. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

चतुरंग Fri, 03/28/2008 - 01:38
पण ते उत्तम असेल तर मला वर्ज्य नाही कारण अभंग/देवाची गाणी ह्यातल्या भावना ते लिहिणारी संत मंडळी आणि गज़ला ह्यात मी फरक करतो. बाकी तुमचं ते "घालून लोटांगण वर करी ढुं**" चालू दे!! चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 01:48
कारण अभंग/देवाची गाणी ह्यातल्या भावना ते लिहिणारी संत मंडळी आणि गज़ला ह्यात मी फरक करतो. हम्म! हे मात्र पटले...! इव्हन, उद्या कुणी उठून जर बाबूजींच्या, 'दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगति पुत्र मनवाचा' या अत्यंत उच्च दर्जा असलेल्या गाण्याचे जर काही वायफळ विडंबन करू लागला तर मलाही ते सहन होणार नाही! असो, गेल्या काही दिवसांपासून मिपावरील विडंबनाचं गळू खूप सुजलं होतं. या चर्चाप्रस्तावाच्या निमित्ताने रंगाने त्या गळवाला सुई लावलीन हे एका अर्थी बरंच झालं! आता मिपावरील मंडळींचे याला काय नी कसे प्रतिसाद येतात, त्या प्रतिसादांतील एकंदरीत सूर कसा आहे हे पाहून मिपावर केले गेलेले विडंबन तसेच ठेवायचे की अप्रकाशित करायचे यावर जनरल डायर काय तो निर्णय घेतीलच! अर्थात, मिपावरील मंडळींचे या विषयावरील एकंदरीत सारासार मत लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला जाईल! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Fri, 03/28/2008 - 01:50
एकसाथ पेले भरता, दोष ना कुणाचा सुराधीन आहे जगती, पुत्रमानवाचा पण हे गाणे गदिमांनी लिहिलेले आहे. आता अपमान त्यांचा झाला की बाबूजींचा ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू Fri, 03/28/2008 - 02:00
हे वाचून गदिमांनी हा विषय, पेले भरणे, ढोसणे, सुराधीनता इ. इ. त्यांच्या रचनांमधून/विडंबनांतून किती वेळा चघळले आहे, याची सांख्यिकीय तपासणी करायचा मोह झाला. (संख्याशास्त्री)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सर्किट Fri, 03/28/2008 - 02:04
मुळात गदिमांनी विडंबने केली आहेत का ? माझ्या तरी वाचण्यात नाहीत. तुमचे सांख्यिकीचे अर्धे काम तर निपटले. - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 02:07
कान्ट से! त्याकरता मला विडंबन पूर्ण वाचावं लागेल. शिवाय मूळ गाणंही गदिमांचंच आहे तेव्हा त्यांना त्याच गाण्याच्या विडंबनाचाही अधिकार आहे असं मला वाटतं! आणि मुळात त्याकरता, जरा मरण यातून सुटला कोण प्राणिजात, दु:खमुक्त जगला कुणी जीवनात वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा! यासारख्या ओळी लिहायची विडंबनकाराची ताकद हवी, आणि ती गदिमांची होती! तेव्हा त्यांच्याच गाण्याचं विडंबन जर गदीमांनी केलं तर तो त्यांचा अधिकार आहे असं मला वाटतं, परंतु उद्या खुद्द गदिमांनी जरी 'गर्जा जयजयकार क्रांतीचा' या कुसुमाग्रजांच्या कवितेचं काही वायफळ विडंबन केलं तरी ते मला खटकेलच! आणि मी बाबूजींचा अपमान होतो आहे असं कुठेही म्हटलेलं नाही! आपण कृपया माझे प्रतिसाद नीट वाचत जावे ही विनंती... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Fri, 03/28/2008 - 02:13
यासारख्या ओळी लिहायची विडंबनकाराची ताकद हवी, आणि ती गदिमांची होती! हेच तर म्हणतो. विडंबनकाराची ताकद असती तर त्याने विडंबने का केली असती ? अशा ताकदवान ओळीच लिहिल्या असत्या की ! तेव्हा त्यांच्याच गाण्याचं विडंबन जर गदीमांनी केलं तर तो त्यांचा अधिकार आहे असं मला वाटतं म्हणजे, फक्त स्वतःच्याच कवितांचे/गझलांचे/अभंगांचे विडंबन करावे, असे तुमचे म्हणणे आहे का ? परंतु उद्या खुद्द गदिमांनी जरी 'गर्जा जयजयकार क्रांतीचा' या कुसुमाग्रजांच्या कवितेचं काही वायफळ विडंबन केलं तरी ते मला खटकेलच! केशवसुतांच्या "आम्ही कोण म्हणूनी.." चे अत्र्यांनी केलेले विडंबनही तुम्हाला वायफळ वाटते का ? की फक्त अत्रे इतरही काही लिहायचे, म्हणून ते विडंबन चांगले ? - सर्किट

In reply to by चतुरंग

प्राजु Fri, 03/28/2008 - 02:05
मि.पा. वर चालू असलेले विडंबनसत्र आता बर्‍याचवेळा विटंबनसत्र होते की काय असे वाटू लागले आहे! आणि त्यावरील वेगवेगळ्या प्रकाराचे चर्वितचर्वण वाचून मला उबगल्यासारखे झाले आहे. अगदी खरे बोललात... मलाही असेच झाले आहे. आणि आपल्या निर्णयाचा मी आदर करते. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आम्हाला आपल्या भावनांची कदर आहे. पण मग तुम्ही पण भट, विंदा वगैरे लोकांच्या रचनांची विडंबने करू आणि वाचू नका. वाचलात तर प्रतिसाद देऊ नका. तोपर्यंत आम्ही पण "भिजूनी पाण्यात सार्‍या बो* माझा कोरडा" असे म्हणतो चालीत. पुण्याचे पेशवे

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

सन्जोप राव Fri, 03/28/2008 - 08:32
माझ्या सारखे काही लोक भट, विंदा वगैरे लोकांच्या रचनांची देखील भावभक्तीने पारायणे करतो. हे पटले. सन्जोप राव

In reply to by सन्जोप राव

सर्किट Fri, 03/28/2008 - 08:51
संजू, तुला पटणारच ! वेगळे काहीतरी असेल तर सांग ! - सर्किट

In reply to by चतुरंग

बेसनलाडू Fri, 03/28/2008 - 01:57
मि.पा. वर चालू असलेले विडंबनसत्र आता बर्‍याचवेळा विटंबनसत्र होते की काय असे वाटू लागले आहे! आणि त्यावरील वेगवेगळ्या प्रकाराचे चर्वितचर्वण वाचून मला उबगल्यासारखे झाले आहे. --- सहमत आहे. येथे कोणीतरी समदु:खी भेटल्याचे/ने बरे वाटले. तेव्हा माझ्यापुरते एक बंधन मी घालून घेतो आहे की कोणत्याही अभंगाचे वा देवाच्या गाण्याचे विडंबन मी करणार नाही व तशा कुठल्याही विडंबनांना चांगला/वाईट प्रतिसादही देणार नाही. --- हे वाचूनही बरे वाटले. म्हणूनच एकूण निवेदन वाचून ((प्राप्त परिस्थिती कशीही असली तरी) जरा तरी)बरे वाटले, असे म्हटले. (स्पष्टीकारक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

चतुरंग Fri, 03/28/2008 - 02:02
आधीच्या प्रतिसादातल्या 'जर तरी' मधे तो 'जरा तरी' होता हे मला समजले नाही आणि म्हणून विचारले. धन्यवाद!! चतुरंग

विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 01:36
की कोणत्याही अभंगाचे वा देवाच्या गाण्याचे विडंबन मी करणार नाही व तशा कुठल्याही विडंबनांना चांगला/वाईट प्रतिसादही देणार नाही. मी ही हेच म्हणू पाहतो! परंतु अद्याप नक्की नाही! :) बाकी, रंगाचं निवेदन पाहून थोडासा विचारात पडलो आहे! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

कारकुन Sat, 03/29/2008 - 04:21
तात्या काय हे? विडंबना सारखा आमच्या जीव्हाळ्याच्या विषयावर चक्क तुम्ही बंदी आणायची भाषा करता आहात? (व्यथित) कारकुन

चतुरंग Fri, 03/28/2008 - 02:14
योग्य विडंबनांनाही इतके पटापट प्रतिसाद येत नाहीत पण इथे चर्चा मात्र कशी घसरवत न्यायची त्याला फाटे कसे फोडायचे बघण्यासारखे आहे! का कोण जाणे पण वैफल्यग्रस्त मनोवृत्तीचे निदर्शक आहे की काय असे वाटते. चतुरंग

In reply to by चतुरंग

सर्किट Fri, 03/28/2008 - 02:16
अहो, चर्चा म्हटले की हे होणारच. स्वानुभवावरून सांगतो ! असे वाईट नका वाटून घेऊ बुवा. सार्वजनिक संकेतस्थळावर वावरण्यासाठी गेंड्याची कातडी लागते. :-) - सर्किट

सचिन Fri, 03/28/2008 - 02:33
या विषयाला हात घातल्याबद्दल चतुरंगांचे आभार. मी मिपाचा नव्यातला सदस्य आहे..आणि कवितांमधे जास्त स्वारस्य असलेला. परंतु, गेले काही दिवस विडंबनाच्या अतिरेकामुळे अक्षरशः उबग आला आहे. (उबग येण्याच्या पुढच्या परिस्थितीला काय म्हणतात ते माहीत नाही..). कशाचे आणि कसे विडंबन करावे यावर कोणी काही बंधने (स्वतःवर अथवा दुसर्‍यावर) - घालोत वा न घालोत, पण कवितांचे वाचन बंद करून मी माझ्यापुरता प्रश्न सोडविला आहे. कविता वाईटच आहेत असे मी म्हणत नाही, मीही काही कविता आवडल्याचे प्रतिसाद दिले आहेत, पण अशा कवितांचा अतिरेक मात्र निश्चितच झाला आहे, आणि "जे न देखे..." मधले वैविध्य नष्ट झाले आहे. (वि.सू. : कोणत्याही विडंबनकारास दुखावण्याचा हेतू नाही..)

In reply to by सचिन

सर्किट Fri, 03/28/2008 - 02:54
पण कवितांचे वाचन बंद करून मी माझ्यापुरता प्रश्न सोडविला आहे. हा अगदी अचूक निर्णय. कुणी काय लिहावे किंवा लिहू नये, ह्याबद्दल उपदेशामृत पाजण्यापेक्षा, स्वतः काय वाचावे अगर वाचू नये, हा निर्णय घेण्याइतपत येथील सदस्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे, असे वाटते. - सर्किट

कोलबेर Fri, 03/28/2008 - 03:02
अर्थात, मिपावरील मंडळींचे या विषयावरील एकंदरीत सारासार मत लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला जाईल!
डायर साहेबांना जर बंदीच घालायची आहे आणि ती सदस्यांच्या आवडी निवडीवर आधारीत आणायची आहे तर मला, हिंदुत्ववादी/सनातनी, ज्योतिष, तंत्र मंत्र स्तोत्र, भाकड अंधश्रद्धा आणि चारोळ्या असल्या लिखाणावर विडंबनांआधी बंदी आणलेली आवडेल. (बिल्ला क्र. २१) कोलबेर

पिवळा डांबिस Fri, 03/28/2008 - 06:45
मिपा वर आणि लेखननियंत्रण? मला वाटत होतं की मिपा चा जन्मच मुळी अशा प्रकारच्या नियंत्रणांविरुद्ध बंडखोरी म्हणून झाला होता... कुणी काय लिहावे किंवा लिहू नये, ह्याबद्दल उपदेशामृत पाजण्यापेक्षा, स्वतः काय वाचावे अगर वाचू नये, हा निर्णय घेण्याइतपत येथील सदस्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे, असे वाटते. संपूर्ण सहमत! डायर साहेबांना जर बंदीच घालायची आहे आणि ती सदस्यांच्या आवडी निवडीवर आधारीत आणायची आहे तर मला, हिंदुत्ववादी/सनातनी, ज्योतिष, तंत्र मंत्र स्तोत्र, भाकड अंधश्रद्धा आणि चारोळ्या असल्या लिखाणावर विडंबनांआधी बंदी आणलेली आवडेल. भावनांशी सहमत, पण त्याची जरूर आहे असे वाटत नाही!! अर्थात, मिपावरील मंडळींचे या विषयावरील एकंदरीत सारासार मत लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला जाईल! संपादकांनी वरील वाक्य म्हटल्यामुळेच आम्ही आमचे विचार इथे मांडत आहोत (नाहीतर या साठमारीत शिरण्याची आमची छाती नाही!!!!:)) विडंबन हा एक मान्यताप्राप्त साहित्यप्रकार आहे. कवीने कोणत्या काव्याचे विडंबन करावे आणि कोणत्या नाही हे ठरवण्याचा वाचकांना अधिकार आहे असे मला वाटत नाही. वाचकांना असे लिखाण न वाचण्याचा वा त्या लिखाणावर त्यांची अनुकूल/ प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा जरूर अधिकार आहे. व्यक्तिगत टीका किंवा भांडणे चालू असतील तर संपादक मंडळाने जरूर हस्तक्षेप करावा. कोणी जर संकेतस्थळाच्या नियमांचे उल्लंघन करीत असेल (कॉपीराईट वगैरे) तर जरूर लेखकाला समज द्यावी पण विषयाच्या/ लेखनाच्या प्रकाराच्या निवडीत हस्तक्षेप करू नये असे मला वाटते. जर विषय वा केलेले लिखाण फालतू असेल तर त्याचा प्रतिक्रियेतून समाचार घ्यायला सभासद समर्थ आहेतच की!! :))) मिपा चा सभासदवर्ग हा विस्तृत आहे त्यामुळे इथे वेगवेगळ्या विचारांची/ स्वभावांची माणसे येणार हे सहाजिकच आहे. सर्वांना सर्वच विषय/ लेखनप्रकार आवडतील असे मुळीच नाही. तेंव्हा आपल्याला जे रुचते ते वाचावे/ लिहावे, त्यावर प्रतिक्रिया द्यावी हे उत्तम!! आम्हाला खादाडी करायला आवडते पण पाककलेतील काही शष्प कळत नाही. तरीसुद्धा मामलेदाराच्या मिसळीची अचूक रेसेपी मिळाल्याबद्दल त्या लेखकांचे (स्वाती राजेश आणि पेठकरबुवा) आम्ही अनंत आभारी आहोत. मन जरा मोकळं ठेवलं की असे अनेक अनाहूत लाभ होतात... मिपा वर काय विषयावर लिखाण होतं आणि काय लेखनप्रकार हाताळले जातात यापेक्षा मिपावर अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे ही आम्हाला सर्वात आवडणारी गोष्ट आहे. आता अभिव्यक्तिस्वातंत्र्य असलं की त्याचा थोडाफार डावा-उजवा उपयोग केला जातोच. पण त्याविरुद्ध उपाय म्हणून एखाद्या विषयावर किंवा साहित्यप्रकारावर बहिष्कार टाकायचा ही भूमिका पटू शकत नाही. विशेषतः विडंबन हे अतिप्रसिध्द साहित्याचंच होतं. हे विडंबन आहे हे माहिती व्हायला वाचकांना मूळ साहित्यकृती माहिती असणे आवश्यक असते. अप्रसिद्ध साहित्याचे विडंबन करण्यात काहीच अर्थ नसतो. त्यामुळे प्रसिध्द गाणी/ कविता, अभंग/ओव्या यांचे विडंबनच प्रामुख्याने होणार! आता सेन्सेटिव्ह व्यक्ती त्यामुळे नाराज होण्याची शक्यता आम्ही नाकारीत नाही, पण त्यांच्यापुढे अशा प्रकारचे लेखन न वाचण्याचा पर्याय असतो. आणि ही सेंन्सिटिव्हिटी कालानुरूप बदलत असते. "आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेतही न वाली" हे काव्य रविकिरणमंडळाच्या काळात अनेकांना धक्का देउन गेलेच असते... असो. मिपा बद्दल आमच्या मनात आत्मियता व कौतुक आहे ते त्याने केलेल्या प्रस्थापितांविरुद्धच्या बंडखोरीबद्दल आणि येथील अभिव्यक्तिस्वातंत्र्याबद्दल! त्यामुळे आम्ही इतर कुठेही न लिहिता फक्त मिपावर लिहितो. म्हणून रहावले नाही आणि चार शब्द लिहिले. बाकी सर्व संपादकमंडळाच्या आणि मालकांच्या हाती! अधिकउणे लिहिले गेले असेल तर क्षमा असावी. -पिवळा डांबिस

सुशील Fri, 03/28/2008 - 08:24
सर्कीट साहेब आणी सर्व विडंबन समर्थक, त्या जोनी लिव्हर नावाच्या आचरट माकडान मागे एकदा राष्त्रगितावर नृत्य केले होते त्याविशयी आपले मत काय? उद्या इथे कोणि जन गण मन चे विडंबन केलेतर तुम्ही त्याचे स्वागतच करनार का? उत्तराचि वाट पहात आहे.

In reply to by सुशील

सर्किट Fri, 03/28/2008 - 08:40
नक्कीच. तो त्याचा अधिकार आहे ! (आता, जन गण मन चे विडंबन प्रकाशित करणार, नक्कीच. सर्व माकडांनी आपापल्या शेपट्या आवश्यक ठिकाणी घालाव्यात, ही विनंती.) - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू Fri, 03/28/2008 - 08:44
ते विडंबन प्रकाशित करू देणार का/मिपावर राहू देणार का, याची उत्सुकता राहील. त्यावरून मिपाचे विडंबनविषयक धोरणही (हळूहळू)स्पष्ट होईल(च!) (उत्सुक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सर्किट Fri, 03/28/2008 - 08:49
आपले तिरके प्रतिसाद कितीही आले, तरी आम्ही ते इथे टाकणारच, बेला ! आमच्या नावाखाली टाकणार, इतरांच्या नव्हे ! त्याची पूर्ण जबाबदारीही आमचीच, इतरांच्या टोपणनावाखाली नाही ते आम्ही ढकलणार. शेपट्या घालणारे माउली भक्त आम्ही नाही ! - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

बेसनलाडू Fri, 03/28/2008 - 08:52
आम्ही फक्त काय होईल, काय नाही याबद्दल जास्त उत्सुक. धोरणांबद्दल उत्सुक. विडंबनाबद्दल कमी किंवा नल्. कुणी सांगावे, कदाचित एखादे जबरा टाकालही, जेणेकरून आपल्या पुढच्या कलाकृतींची उत्सुकता वाढेल. आपल्या हातचे असे काही वाचले नाही ना अजून! बाकी चालू द्यात तुमचे. (उत्सुक)बेसनलाडू

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

व्यंकट Fri, 03/28/2008 - 11:56
आमच्या मताला फारशी किंमत नाही हे आम्ही जाणून आहोत म्हणून आमच्या पुढील संभाव्यतः प्रक्षोभक वाक्यावरून गदारोळ होवू नये. जन, गण, मन हेच विडंबन आहे असे आमचे मत आहे. व्यंकट

In reply to by व्यंकट

धमाल मुलगा Fri, 03/28/2008 - 12:15
व्य॑कोबा, आपल्याशी सहमत. राजा जॉर्ज च्या स्तुतीप्रित्यर्थ हे गायले (भारतभाग्यविधाता) अस॑ वाचल्याच॑ स्मरत॑. असो, पुन्हा ह्यावर वाद होतील. सध्या वातावरण बिघडल॑ आहे ! आपला, -(सहमत) ध मा ल.

प्रमोद देव Fri, 03/28/2008 - 08:28
मिपा वर काय विषयावर लिखाण होतं आणि काय लेखनप्रकार हाताळले जातात यापेक्षा मिपावर अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे ही आम्हाला सर्वात आवडणारी गोष्ट आहे. आता अभिव्यक्तिस्वातंत्र्य असलं की त्याचा थोडाफार डावा-उजवा उपयोग केला जातोच. पण त्याविरुद्ध उपाय म्हणून एखाद्या विषयावर किंवा साहित्यप्रकारावर बहिष्कार टाकायचा ही भूमिका पटू शकत नाही. विशेषतः विडंबन हे अतिप्रसिध्द साहित्याचंच होतं. हे विडंबन आहे हे माहिती व्हायला वाचकांना मूळ साहित्यकृती माहिती असणे आवश्यक असते. अप्रसिद्ध साहित्याचे विडंबन करण्यात काहीच अर्थ नसतो. त्यामुळे प्रसिध्द गाणी/ कविता, अभंग/ओव्या यांचे विडंबनच प्रामुख्याने होणार! डांबीसरावांशी ह्या बाबतीत सहमत आहे. मि.पा. वर चालू असलेले विडंबनसत्र आता बर्‍याचवेळा विटंबनसत्र होते की काय असे वाटू लागले आहे! रंगरावांशी ह्या बाबतीत सहमत आहे. ह्यातला विटंबनसत्र हा शब्द महत्वाचा. आता माझे मतः विडंबन कुणी करावे,का करावे,कशाचे करावे आणि कसे करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण त्यात एक किमान दर्जा असावा अशी अपेक्षा मी एक वाचक म्हणून करतो. तसेच घेतले एखादे गीत,कविता,अभंग वगैरे वगैर आणि पँटमध्ये शर्ट खोचावा त्या पद्धतीने त्यात बाई,बाटली(हे फारच वाढलंय हल्ली) आणि तत्सम शब्द अधून मधून पेरले की झाले विडंबन.... असे बर्‍याच जणांना वाटते. क्षणभर एक गंमत म्हणून ते चालूनही जाते. पण माझ्या मते ते विडंबन नसून विटंबन(ना) असते. हातात कुंचला आणि काळ्या रंगाचा डबा आहे आणि दिसेल तिथे तो रंग फासायचा... अशा तर्‍हेचा अट्टाहास वाटतो त्यामागे. तेव्हा समस्त प्रतिभावंतांना माझी विनंती आहे की.... विडंबन आपण जरूर करा. त्यात दारू,बाई वगैरे विषय वर्ज्य नाहीत. पण दळण दळल्यासारखे प्रत्येक विडंबनात तीच तीच रुपके वापरू नका. त्यात खरे तर तुमचेच कल्पनादारिद्र्य दिसून येते. म्हणून त्यात वैविध्य आणा आणि मुख्य म्हणजे विडंबनात कुठेही वैयक्तिक आकस,दुस्वास,शेरेबाजी असल्या गोष्टी येऊ देऊ नका. इथल्या समस्त विडंबनकारांनी हे आव्हान ताकतीने पेलावे असे मी त्यांना आवाहन करतो.

प्राजु Fri, 03/28/2008 - 08:55
तेव्हा समस्त प्रतिभावंतांना माझी विनंती आहे की.... विडंबन आपण जरूर करा. त्यात दारू,बाई वगैरे विषय वर्ज्य नाहीत. पण दळण दळल्यासारखे प्रत्येक विडंबनात तीच तीच रुपके वापरू नका. त्यात खरे तर तुमचेच कल्पनादारिद्र्य दिसून येते. म्हणून त्यात वैविध्य आणा आणि मुख्य म्हणजे विडंबनात कुठेही वैयक्तिक आकस,दुस्वास,शेरेबाजी असल्या गोष्टी येऊ देऊ नका. प्रमोदकाका, हे म्हणणे तुमचे एकदम पटले... पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

सुशील Fri, 03/28/2008 - 09:05
पण दळण दळल्यासारखे प्रत्येक विडंबनात तीच तीच रुपके वापरू नका. प्राजुताई तुम्ही काही बोलु नका. मध्यंतरी दळण दळल्या सारखं तुम्ही देखिल चारोळ्या टाकल्या होत्यात तेव्हा सगळयांच्या टिकेमुळे मलापण माझे लिखाण थांबवावे लागले. मला खरं तर चारोळ्या लिहायला खुप आवडत पण त्यामुळे लिहु शकलो नाही ना. प्रामाणीकपणे सांगतो आहे कृपया राग मानु नका.

In reply to by सुशील

प्राजु Fri, 03/28/2008 - 09:14
प्राजुताई तुम्ही काही बोलु नका. मी बोलायचं की नाही हे तुम्ही नका ठरवू. तुम्हांला जे जमतं ते करा. मध्यंतरी दळण दळल्या सारखं तुम्ही देखिल चारोळ्या टाकल्या होत्यात तेव्हा सगळयांच्या टिकेमुळे मलापण माझे लिखाण थांबवावे लागले. मला खरं तर चारोळ्या लिहायला खुप आवडत पण त्यामुळे लिहु शकलो नाही ना. माफ करा.. पण मी त्या एकटिने नव्हत्या टाकल्या, मिपावरचे बरेच लोक होते इथे आणि मुख्य म्हणजे त्यामध्ये एकच विषय नव्हता. तेव्हा सगळ्यांनी टिका केली असे कोणी सांगितले तुम्हाला? तेव्हा काय झाले हे माहिती नसेल तर तुम्हांला बोलण्याचा अधिकार नाही. आणि जमल्यास तो धागा काढून वाचा आणि तुम्ही लिहिलेल्या चारोळ्या आणि त्या धाग्यातील चारोळ्या यांचि तुलना करा.. म्हणजे तुम्ही कुठे आहात हे तुम्हालाच समजेल. आणि तुमच्या चारोळ्या जर चांगल्या असत्या तर त्याला नक्की प्रतिसाद मिळाला असता.. यावरूनच तुम्हि लक्षात घ्या काय ते. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

सुशील Fri, 03/28/2008 - 09:22
माफ करा प्राजुताई मी राग मानु नका म्हणुन पण तुम्ही रागावलात. पण मला सांगा चारोळ्या टाकणारे अनेकजण असले तरी विडंबन टाकणारेपण अनेकच आहेत. आणि त्यामध्ये बहुतेक वेळा प्रेम वगैरे असा एकच विषय पण होता. तसेच माझ्या चारोळीना आलेले प्रतिसाद पुन्हा बघा. प्रतिसाद आणि वाचने मिळाले होते. मि कुठे आहे ते मला माहित आहे पण तुम्ही अशी माझी जागा दाखवुन तुम्ही कुठे आहेत ते दाखवले. यापुढे मला तुमच्याशी बोलायचे नाहि.

In reply to by सुशील

प्राजु Fri, 03/28/2008 - 18:35
तुमच्या या निर्णयाचा तुमच्या पेक्षा मलाच जास्ती आनंद झाला.... कीप इट अप. - (सर्वव्यापी)प्राजु

तेव्हा माझ्यापुरते एक बंधन मी घालून घेतो आहे की कोणत्याही अभंगाचे वा देवाच्या गाण्याचे विडंबन मी करणार नाही व तशा कुठल्याही विडंबनांना चांगला/वाईट प्रतिसादही देणार नाही. मात्र चांगला/वाइट प्रतिसाद लिहिण्याचे शहाणपण सुदैवाने येथील वाचकाजवळ आहे, ज्याचा त्याचा निर्णय ज्याने त्याने घ्यावा. आम्ही आम्हाला आवडणार्‍या विडंबनांना विषय कोणतेही असले तरी दाद देत राहू . कुणी काय लिहावे किंवा लिहू नये, ह्याबद्दल उपदेशामृत पाजण्यापेक्षा, स्वतः काय वाचावे अगर वाचू नये, हा निर्णय घेण्याइतपत येथील सदस्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ आहे, असे वाटते. सहमत आहे. मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर कोणत्याही लेखनावर बंदीचा विचार येणार नाही, किंवा असे लेखन अप्रकाशित होणार नाही, याची आम्हास पुर्ण खात्री आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्किट Fri, 03/28/2008 - 09:02
मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर कोणत्याही लेखनावर बंदीचा विचार येणार नाही, याची आम्हास पुर्ण खात्री आहे. आपण प्राडॉ डायर आहात का ? - (अचंभित) सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

आपण प्राडॉ डायर आहात का ? नाही, आम्ही येथे आपल्यासारखेच एक वाचक आहोत. वाचक म्हणुन अशा लेखनावर बंदी किंवा असे लेखन अप्रकाशित होऊ नये असे वाटते. ( आपण कामात असता त्याचा आम्हाला आनंद असतो. आपण हे असे रिकामे झाले की आम्हाला आपल्याला प्रत्येक शब्दा शब्दाचे स्पष्टीकरण द्यावे लागते. )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुशील Fri, 03/28/2008 - 09:25
सर मी पण तुम्हाला संपादक समजत होतो तुम्ही जर फक्त वाचक आहे म्हणता आहात तर इतक्या ठोसपणे हे कसे म्हणालात? मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर कोणत्याही लेखनावर बंदीचा विचार येणार नाही, किंवा असे लेखन अप्रकाशित होणार नाही, याची आम्हास पुर्ण खात्री आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेसनलाडू Fri, 03/28/2008 - 09:06
सर, कोणत्याही प्रकारच्या लेखनावर बंदी येणार नाही म्हणालात; पण आध्यात्मिक लेखन किंवा त्याच्या माध्यमातून पसरवले जाणारे (गैर)समज, (अंध)श्रद्धा, चमत्कार याबाबत अंतिम निर्णय डायर साहेबांचा असेल, असे जाहीर झाले आहे ना इकडेच? काय वाचावे, काय वाचू नये हे ठरवायचा वाचकांना अधिकार आहे, तर आध्यात्मिक गुरूंना बापड्यांन लिहऊ देत की. त्यावर बंदीची भाषा, पूर्वभाष्य अगर त्याची अंमलबजावणी कशासाठी? वाचायचे अगर नाही, मुद्दे खोडायचे की उचलून धरायचे हे सगळे सहभागी वाचक बघून घेतीलच ना? (मुद्देसूद)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 09:13
त्यावर बंदीची भाषा, पूर्वभाष्य अगर त्याची अंमलबजावणी कशासाठी? वाचायचे अगर नाही, मुद्दे खोडायचे की उचलून धरायचे हे सगळे सहभागी वाचक बघून घेतीलच ना? आणीबाणीसदृष परिस्थितीत प्रश्न विचारायचे नसतात अशी आमची माहिती आहे! बाय द वे, जनरल डायर आत्ता या क्षणी काल रात्री चिक्कार उसाचा रस प्यायल्यामुळे गाढ झोपले आहेत! :) ते उठल्यावर तुमचे हे प्रश्न इथे शिल्लक राहतील किंवा नाही या बाबत आम्ही साशंक आहोत! :) बाकी चालू द्या! :) तात्या.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सन्जोप राव Fri, 03/28/2008 - 11:28
मिसळपाव या मराठी संकेतस्थळावर कोणत्याही लेखनावर बंदीचा विचार येणार नाही, किंवा असे लेखन अप्रकाशित होणार नाही, याची आम्हास पुर्ण खात्री आहे. मिसळपावाच्या मालकांविषयी वैयक्तिक टिप्प्णी करणारा एक तुकडा इथे वाचला होता. तो आता दिसत नाही, हे कसे काय ,प्राध्यापक डॉक्टरसाहेब? सन्जोप राव

आनंदयात्री Fri, 03/28/2008 - 10:58
खरे तर अजिबात तोंड घालायची इच्छा नव्हती; कारण आम्ही विडंबने वाचायची तर सोडलीच आहेत इव्हन त्यावर गप्पा मारण्याचे पण सोडले आहे. या अशा कविता पडल्या पडल्या दुसर्‍या मिनिटाला होणार्‍या विडंबनांची तुलना मी रेल्वे स्टेशन वर मिळनार्‍या पिवळ्या पुस्तंकाशी मी करतो; रद्दी; दुर्लक्ष करण्याजोगी. चला पण वरिल चर्चेत अनेकांचा दुटप्पीपणा दिसुन आला, एरवी विडंबन पडल्या पडल्या त्यावर लगेच "वा वा","शवटुकार तुमच्या प्रतिभेला सलाम" वैगेरे वैगेरे प्रतिसाद देणारे लोक आता वेगळी वेगळी मते मांडतांना दिसत आहेत.

In reply to by आनंदयात्री

विसोबा खेचर Fri, 03/28/2008 - 11:22
एकिकडे आपण, कारण आम्ही विडंबने वाचायची तर सोडलीच आहेत इव्हन त्यावर गप्पा मारण्याचे पण सोडले आहे. असं म्हणता, व लगेच एरवी विडंबन पडल्या पडल्या त्यावर लगेच "वा वा","शवटुकार तुमच्या प्रतिभेला सलाम" विडंबनांना कुणाचे काय प्रतिसाद येतात हेही आपल्याला ठाऊक आहे याचे राहून राहून नवल वाटले! गंमतच आहे बॉ!:) यावरून विडंबनांचे आपले वाचन कुठपर्यंत सुरू होते आणि नेमकी कुठून आपण विडंबने वाचायची सोडून दिलीत हा एक अवांतर प्रश्न आम्हाला पडला आहे! :) असो, आपलाच, तात्या.

शेखर Fri, 03/28/2008 - 12:57
आपपसातील वादानेच किंवा हेव्यादाव्याने मराठेशाही बुडाली ...... याचे स्मरण असुद्या. - शेखर

In reply to by शेखर

धमाल मुलगा Fri, 03/28/2008 - 13:27
शेखरशेठ, आपपसातील वादानेच किंवा हेव्यादाव्याने मराठेशाही बुडाली ...... याचे स्मरण असुद्या. अगदी लाख बोललात ! हल्ली काय चालल॑य काही कळत नाही. लवकर ही परिस्थिती सुधारो हीच श्रीश॑भूचरणि प्रार्थना! -(व्यथित) ध मा ल.

लिखाळ Fri, 03/28/2008 - 19:34
विडंबने कशी असावित, असावित का? इत्यादी मते वैयक्तिक आहेत. वाचकांनी चांगले वाईट प्रतिसाद द्यावेत. त्यातून जे राहिल ते इथल्यांना आवडते असे समजले जाईल. बंदी वगैरे आणावी असे वाटत नाही. चतुरंग यांनी सुद्धा असे काही सुचवले नाही हे चांगलेच. --लिखाळ. सामर्थ्य आहे बडबडीचे जो जो करील तयाचे - पुल.

वरदा Sat, 03/29/2008 - 05:13
काय चाल्लंय्...चारोळ्याही आपण सगळ्यांनी एन्जॉय केल्या आणि बरीचशी विडंबनंही आपल्याला आवडली...थोडी अतिशयोक्ति झाली असेल तर होईल कमी आपोआप कुणी प्रतिसाद दिले नाहीत तर्..जी छान विडंबन असतील ती वाचूया बाकीची सोडून देऊ....सुशील तुम्हालाही आवडत होतं चारोळ्या लिहायला आणि तिथे लिहावसं वाटत नव्हतं तर वेगळा धागा उघडायचा माझ्या वेगळ्या चारोळ्या म्हणून....उगाच कशाला बोलता... आम्ही तर मस्त एन्जॉय केलं.... हल्ली काय चालल॑य काही कळत नाही. लवकर ही परिस्थिती सुधारो हीच श्रीश॑भूचरणि प्रार्थना! धमु १००% सहमत.... अरे तुम्ही सगळे एप्रिल फुल नाही ना करत? कालपर्यंत तर आपण सगळे धमाल करायचो मधेच काय झालं काय? सारखी ऑफिस आणि घरची टेन्शन्स असह्य झाली की आपण इथे येतॉ जरावेळ मजा करतो कीती बरं वाट्टं..इथेही तसच असेल तर कसं वाटेल यावसं?

In reply to by वरदा

विसोबा खेचर Sat, 03/29/2008 - 07:52
वरदा, तुझे प्रतिसाद वाचताना कॉलेजातली तेरावी, चौदावीतली एखादी मुलगी माझ्याशी बोलते आहे की काय असं वाटतं! :) स्वभावातला अवखळपणा, निरागसपणा असाच राहू दे! जप त्याला नेहमी... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Sat, 03/29/2008 - 08:05
वरदा, तुझे प्रतिसाद वाचताना कॉलेजातली तेरावी, चौदावीतली एखादी मुलगी माझ्याशी बोलते आहे की काय असं वाटतं! :) सांभाळून राहा हो ! अशा प्रतिसादांमुळे "तेराव्या चौदावीतल्या" मुलींना किती धोका आहे, हे सहज लक्षात येते ! - (खट्याळ) सर्किट

विडंबन काव्यावरील ही साधक-बाधक चर्चा अतिशय मोलाची असून ती एखाद्या पुस्तकात जतन करून ठेवली पाहिजे. ऑरकुट व इतर संकेत स्थळावरील जाणकार रसिकांसाठी सुध्दा ती उपलब्ध झाली पाहिजे म्हणून हा छोटासा प्रयत्न. पहा. http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=28868095&tid=2591450425237531522&... »

प्रभाकर पेठकर Sat, 03/29/2008 - 15:08
प्रत्येक वाचकाचा वाचनाधिकार अबाधित आहे. विडंबनकारांवर बंदी आणू नये. वाचकांनी आपापला वाचनाधिकार वापरावा. 'मला आवडत नाही ते साहित्य वाईट' असा संकुचित एप्रोच नसावा. (हा कुणावरही वैयक्तिक शेरा नाही.)

प्रत्येक वाचकाचा वाचनाधिकार अबाधित आहे. विडंबनकारांवर बंदी आणू नये. वाचकांनी आपापला वाचनाधिकार वापरावा. 'मला आवडत नाही ते साहित्य वाईट' असा संकुचित एप्रोच नसावा. (हा कुणावरही वैयक्तिक शेरा नाही.) » श्री. प्रभाकर पेठकर(खरं खुरं नांव वाचून आनंद झाला) यांच्या मताशी सहमत. चांगले/वाईट साहित्य असा भेद असूनही "माझ्या आवडीचे/नावडीचे" असाहि भेद नक्कीच असू शकतो.

In reply to by प्रा सुरेश खेडकर

विसोबा खेचर Sun, 03/30/2008 - 12:51
श्री. प्रभाकर पेठकर(खरं खुरं नांव वाचून आनंद झाला) अहो पण 'प्रभाकर पेठकर' हे नांव तरी खरंखुरं कशावरून? त्यांचं खरं नांव 'धुरंधर भाटवडेकर' असंही एखादं असू शकतं! :)) आपला, तात्याभैय्या देवासकर.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मि.पा. वर चालू असलेले विडंबनसत्र आता बर्‍याचवेळा विटंबनसत्र होते की काय असे वाटू लागले आहे! आणि त्यावरील वेगवेगळ्या प्रकाराचे चर्वितचर्वण वाचून मला उबगल्यासारखे झाले आहे. तेव्हा माझ्यापुरते एक बंधन मी घालून घेतो आहे की कोणत्याही अभंगाचे वा देवाच्या गाण्याचे विडंबन मी करणार नाही व तशा कुठल्याही विडंबनांना चांगला/वाईट प्रतिसादही देणार नाही. चतुरंग

मोबाइल उचलला

प्रा सुरेश खेडकर ·

सुशील Fri, 03/28/2008 - 08:27
तात्या काय हे? इतके होउनही ज्ञनेश्वरांचे विडंबन इथे आहे. मलातर हा मुद्दाम केलेला वात्रटपणा वाटतो आहे.

सुशील Fri, 03/28/2008 - 08:27
तात्या काय हे? इतके होउनही ज्ञनेश्वरांचे विडंबन इथे आहे. मलातर हा मुद्दाम केलेला वात्रटपणा वाटतो आहे.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मोबाइल उचलला, कानी लावियला संत ज्ञानेश्वरांची क्षमा मागून , वेगळ्या विषयावरचे ( म्हणजे लठ्ठ बाई व दारू या व्यतिरिक्त)स्वरचित विडंबन गीत. मोबाइल उचलला, कानी लावियला पैसे वेचिता बहुल, सर्वा हाती आला. इवलेसे पोर,मिरविते भारी. तयाचा बिलू,गेला गगनावरी. शेजारचा बंटी, असाच वाया गेला, बाप त्याचा आईवरी,उगाचाच डाफरला. मोबाइल उचलला, कानी लावियला पैसे वेचिता बहुल, सर्वा हाती आला. प्रा.सुरेश खेडकर ,नागपूर. पाईक, "झेंडूची फुले परंपरा"

भटकंती गाणी -१

सृष्टीलावण्या ·

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/27/2008 - 20:03
की प्रत्येक जण आपापल्या आवडीप्रमाणे भर घालायचा... > > नणदेचं कार्ट किरकिर करतंय, खरुज होऊ दे त्याला, ग भवानी आई रोडगा वाहिन तुला..

सुधीर कांदळकर गुरुवार, 03/27/2008 - 22:41
सकालच्या पाराला सुटलाय वारा तू उभी कला मगे दारा सांजचा टोला कोंबरा आरवला तू उभी कला मगे दारा पॅक पॅक पॅक ह्यो बदक पलाला तू उभी कला मगे दारा चून चून चून ह्यो डुक्कर पलाला तू उभी कला मगे दारा २. पहिल्या गारीमधे कोन आ ....ला कोन आ ....ला $$$ आला मागच्या गारीतून कोन आ......ली कोन आ ....ली @@@ आली ही गाणी पिकनिक साँग्स आहेत. मस्त कोरसमध्ये गाता येतात. अशी अनेक अहेत. ब-याच जणांना येत असतील. फू बाई फू तर सगळ्यांनाच ठाऊक असेल. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

अभिता गुरुवार, 04/03/2008 - 03:38
मेरी तुझे केस लाब लाब बाहेर नको येऊ तुझे पापा बघतात. पापा बघतात पापा बघतात हलूच आईला दोला घालतात

मानस गुरुवार, 04/03/2008 - 04:44
उंच होती, टंच होती ... होती गोरी गोरी पान कंबर चोविस, बाकी छत्तिस ...... तीच माझी सुशिला ..................... एके दिवशी संध्याकाळी, गेली होती फिरायला हात पसरुन, पाय घसरुन .... पडली माझी सुशिला ...................... असेही, आम्ही म्हणत असू.

मानस गुरुवार, 04/03/2008 - 04:50
ए जाने डार्लिंग टूमॉरो मॉर्निंग एसटि च्या थांब्यावर भेटशील का? एसटि च्या थांब्यावरच पुढची मला अपॉईन्टमेंट देशिल का? असही एक भन्नाट गाणं आम्ही म्हणायचो .................

In reply to by मानस

सृष्टीलावण्या गुरुवार, 04/03/2008 - 07:54
एस्टीच्या थांब्यावर लोकांची घाई, कुनीबी आपल्याला बघायचं नाही, तिथे तू भेट ना जराशी खेट ना, .............................. > > मधून मेघ हे नभास ग्रासती, मधेच ह्या विजा भयाण हासती, दहा दिशांतूनी तूफान व्हायचे..

बन्ड्या Sat, 04/05/2008 - 19:48
गोमु गोमु तुला फिरायला नेतो........नेतो भेल पुरी खायाला देतो ..........देतो पुरीचा आकार गोल गोल .......गोल गोल आता तरी मझ्याशी गोड बोल....गोड बोल गोमु तुला रुप्याची माळ घे ......माळ घे माळ परिस लेडिज घड्याळ घे...घड्याळ घे घड्याळाचा आकार गोल गोल ....गोल गोल आता तरी मझ्याशी गोड बोल....गोड बोल गोमु तुझा बा हाय टकल्या ...... टकल्या टकल्याला आवडतात चकल्या...चकल्या चकल्यांचा आकार गोल गोल .....गोल गोल आता तरी मझ्याशी गोड बोल....गोड बोल गोमु तुझी आई आहे काळी........ काळी काळीला आवडते गोळी ..........गोळी गोळीचा आकार गोल गोल .......गोल गोल आता तरी मझ्याशी गोड बोल....गोड बोल ............................................. सोनतळी वरच्या कॅंपातला.... बन्ड्या

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/27/2008 - 20:03
की प्रत्येक जण आपापल्या आवडीप्रमाणे भर घालायचा... > > नणदेचं कार्ट किरकिर करतंय, खरुज होऊ दे त्याला, ग भवानी आई रोडगा वाहिन तुला..

सुधीर कांदळकर गुरुवार, 03/27/2008 - 22:41
सकालच्या पाराला सुटलाय वारा तू उभी कला मगे दारा सांजचा टोला कोंबरा आरवला तू उभी कला मगे दारा पॅक पॅक पॅक ह्यो बदक पलाला तू उभी कला मगे दारा चून चून चून ह्यो डुक्कर पलाला तू उभी कला मगे दारा २. पहिल्या गारीमधे कोन आ ....ला कोन आ ....ला $$$ आला मागच्या गारीतून कोन आ......ली कोन आ ....ली @@@ आली ही गाणी पिकनिक साँग्स आहेत. मस्त कोरसमध्ये गाता येतात. अशी अनेक अहेत. ब-याच जणांना येत असतील. फू बाई फू तर सगळ्यांनाच ठाऊक असेल. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

अभिता गुरुवार, 04/03/2008 - 03:38
मेरी तुझे केस लाब लाब बाहेर नको येऊ तुझे पापा बघतात. पापा बघतात पापा बघतात हलूच आईला दोला घालतात

मानस गुरुवार, 04/03/2008 - 04:44
उंच होती, टंच होती ... होती गोरी गोरी पान कंबर चोविस, बाकी छत्तिस ...... तीच माझी सुशिला ..................... एके दिवशी संध्याकाळी, गेली होती फिरायला हात पसरुन, पाय घसरुन .... पडली माझी सुशिला ...................... असेही, आम्ही म्हणत असू.

मानस गुरुवार, 04/03/2008 - 04:50
ए जाने डार्लिंग टूमॉरो मॉर्निंग एसटि च्या थांब्यावर भेटशील का? एसटि च्या थांब्यावरच पुढची मला अपॉईन्टमेंट देशिल का? असही एक भन्नाट गाणं आम्ही म्हणायचो .................

In reply to by मानस

सृष्टीलावण्या गुरुवार, 04/03/2008 - 07:54
एस्टीच्या थांब्यावर लोकांची घाई, कुनीबी आपल्याला बघायचं नाही, तिथे तू भेट ना जराशी खेट ना, .............................. > > मधून मेघ हे नभास ग्रासती, मधेच ह्या विजा भयाण हासती, दहा दिशांतूनी तूफान व्हायचे..

बन्ड्या Sat, 04/05/2008 - 19:48
गोमु गोमु तुला फिरायला नेतो........नेतो भेल पुरी खायाला देतो ..........देतो पुरीचा आकार गोल गोल .......गोल गोल आता तरी मझ्याशी गोड बोल....गोड बोल गोमु तुला रुप्याची माळ घे ......माळ घे माळ परिस लेडिज घड्याळ घे...घड्याळ घे घड्याळाचा आकार गोल गोल ....गोल गोल आता तरी मझ्याशी गोड बोल....गोड बोल गोमु तुझा बा हाय टकल्या ...... टकल्या टकल्याला आवडतात चकल्या...चकल्या चकल्यांचा आकार गोल गोल .....गोल गोल आता तरी मझ्याशी गोड बोल....गोड बोल गोमु तुझी आई आहे काळी........ काळी काळीला आवडते गोळी ..........गोळी गोळीचा आकार गोल गोल .......गोल गोल आता तरी मझ्याशी गोड बोल....गोड बोल ............................................. सोनतळी वरच्या कॅंपातला.... बन्ड्या
लेखनप्रकार
3

भाषा इंदुरी

भोचक ·

विजुभाऊ गुरुवार, 03/27/2008 - 19:11
इंदोरी मराठी " तुझे आहे तुजपाशी" मधे छान घेतले आहे पु ल नी....... ऐकुन एकदम तबियत खुष होते...त्यचा लेहेजा ही खूब असतो..... इंदोर ( मराठी: इंदूर) मधे असताना आपण महराष्ट्रात आहोत असेच वाटत असते.....इथले पोहे थोडे वेगळे असतात्..त्यात कांदे नसतात...... फोडणी झाल्यावर वर गाठीया आणि बडीशेप ( सौंफ) टाकतात...... सर्राफ्फा /५६दुकान हे भाग म्हणजे खवैयांची चंगळ.... इथला प्रत्येक माणुस घरी जाताना सामोसे /पोहे /ढोकळा असे पदार्थ घेउनच जातो.....त्या प्रत्येका सोबत बारीक शेव ही इथली स्पेश्यालीटी....... इंदोर एकुणच अजुनही रीलॅक्स आपल्याच मस्तीत जगते..... इंदोरची आणखी खासीयत म्हणजे इथली घरे....एकेक पहात रहावी अशी डीझाइन्स असतात.

विसोबा खेचर गुरुवार, 03/27/2008 - 19:27
कुणीही बोलत असलं की आपण हो किंवा होय असं म्हणतो. इथं 'हाऊ' असं म्हणण्याची प्रथा आहे. सहमत आहे. इंदुरी मराठीत जसं हो चं हाऊ होतं तसंच हैद्राबादी हिंदीतही 'हां, किंवा जी हां' चं 'हौ' होतं! :) अवांतर - हैद्राबादी हिंदीचा गोडवाही काही औरच! असो... येथे लोक छान किंवा मजेत नसतात, तर 'बढिया' असतात. क्या बात है! :) इथल्या मराठी बोलीने हिंदी ताल धरला आहे. अतिशय सुंदर वाक्य! या मराठीला मुंबई, पुण्याचे लोक धेडगुजरी असं म्हणतात. पण ते चुकीचं आहे. इथल्या मराठीवर हिंदीचा प्रभाव अपरिहार्य आहे. उलट माझ्या मते अनेक मराठी कुटुंबाच्या पिढ्या येथे जाऊनही ती मराठी बोलतात, हे विशेष आहे. हिंदीच्या आधाराने का होईना पण मराठी टिकून आहे. इथले मराठी लोक साहित्यातही पुष्कळ आहे. त्यांच्या मराठी लेखनातही हिंदी शब्द असतात. मला त्याचेही कौतुक वाटते. भाषकदृष्ट्या आपल्याला ती चुक दिसेल. पण माझ्या मते हे लोक मराठीत साहित्य निर्मिती करतात हे जास्त महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रात मराठी विविध पदरी असताना इंदूरमध्ये ती वेगळे रूप घेऊन जिवंत आहे. त्यामुळे तिची उपेक्षा करण्यापेक्षा तिला बोलीचा दर्जा दिला तर ते जास्त योग्य ठरेल. हा शेवटचा परिच्छेद अतिशय चांगला झाला आहे असे आवर्जून सांगावेसे वाटते! वा भोचकगुरुजी, आपण फार छान लेख लिहिला आहे. आपला बोलीभाषांचा चांगला अभ्यास दिसतो! आमचाही 'बोलीभाषा' हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे बोलीभाषेशी निगडीत लेख आम्हालाही वाचायला आवडतात. आपल्याकडून अशाच उत्तमोत्तम लेखांची अपेक्षा आहे. एका चांगल्या लेखाबद्दल मनापासून अभिनंदन... आपलाच, तात्याभैय्या देवासकर, देवासकरांची कोठी, इंदौर.

चतुरंग गुरुवार, 03/27/2008 - 19:54
सुंदर लेख. इंदौरबद्दल खूप ऐकून आहे पण मला अजून एकदाही तिथे जाण्याचा योग आलेला नाही ;(. आपला लेख वाचून पुन्हा एकदा मनात तिथे जाण्याच्या इच्छेने जोम धरलाय. मराठी भाषिक लोक मध्यप्रदेशात बर्‍याच ठिकाणी आहेत आणि त्यांची भाषिक सरमिसळ मजेदार बोली भाषा निर्माण करते हे ऐकायला खरेच खूप आवडेल. (शिवाय चाट, सामोसे, फरसाण, खमण हे तर खुणावत आहेतच!;) असेच अजून लिखाण वाचायला नक्कीच आवडेल. चतुरंग

In reply to by चतुरंग

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/27/2008 - 20:17
त्यांची भाषिक सरमिसळ मजेदार बोली भाषा निर्माण करते हे ऐकायला खरेच खूप आवडेल. बोलीभाषांना एक विशेष गोडवा असतो. कारण त्यांच्यावर माणसे, तो भूप्रदेश, तिथले पाणी सर्वांचा प्रभाव पडलेला असतो आणि त्यातील शब्द तर चपखल असतात. आता भोचक हाच शब्द पहा ना मूळ शब्द भूचक्र. दिवाळीत लावले जाणारे भूईचक्र जसे गरागरा फिरत कुठेही जाते तसा भोचक माणूस हा अगोचरपणे कुठेही जाऊन कोणत्याही विषयात / प्रसंगात तोंड घालतो. म्हणून त्याला भोचक म्हटले जाते. दुसरा शब्द झकास. आकाशात वीज चमकण्याला मूळ शब्द आहे चकास् त्याचे बोलीभाषेत झकास असे रुपांतर होते जे मूळ चकास् पेक्षा सुद्धा छान वाटते. > > नणदेचं कार्ट किरकिर करतंय, खरुज होऊ दे त्याला, ग भवानी आई रोडगा वाहिन तुला..

ठणठणपाळ गुरुवार, 03/27/2008 - 21:33
माझा इंदौरमधे राहणारा एक लहान भाऊ एकदा झाडावर माकड चढताना बघून ओरडला, "ते बघा, पेडावरती बंदर चढून राहिलंय..

सुधीर कांदळकर गुरुवार, 03/27/2008 - 22:43
पेडावरचा. मस्त जमलेला लेख. बोली गोडच असते. बोलीतील गोडवा लेखातहि उतरलाय. धन्यवाद. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

मीनल Fri, 03/28/2008 - 04:02
तिथे मराठी भाषा वेगळी आहे ते खर. तसेच तिथले आदरातिथ्य विचारा. आग्रह इतका की वरून खालून बाहेर येई पर्यंत खावे लागते. आग्रह न मोडता येण्या जोगा असतो. खाना पिना व्हरायटी इतकी ,की सर्वच नवनविन.

विजुभाऊ गुरुवार, 03/27/2008 - 19:11
इंदोरी मराठी " तुझे आहे तुजपाशी" मधे छान घेतले आहे पु ल नी....... ऐकुन एकदम तबियत खुष होते...त्यचा लेहेजा ही खूब असतो..... इंदोर ( मराठी: इंदूर) मधे असताना आपण महराष्ट्रात आहोत असेच वाटत असते.....इथले पोहे थोडे वेगळे असतात्..त्यात कांदे नसतात...... फोडणी झाल्यावर वर गाठीया आणि बडीशेप ( सौंफ) टाकतात...... सर्राफ्फा /५६दुकान हे भाग म्हणजे खवैयांची चंगळ.... इथला प्रत्येक माणुस घरी जाताना सामोसे /पोहे /ढोकळा असे पदार्थ घेउनच जातो.....त्या प्रत्येका सोबत बारीक शेव ही इथली स्पेश्यालीटी....... इंदोर एकुणच अजुनही रीलॅक्स आपल्याच मस्तीत जगते..... इंदोरची आणखी खासीयत म्हणजे इथली घरे....एकेक पहात रहावी अशी डीझाइन्स असतात.

विसोबा खेचर गुरुवार, 03/27/2008 - 19:27
कुणीही बोलत असलं की आपण हो किंवा होय असं म्हणतो. इथं 'हाऊ' असं म्हणण्याची प्रथा आहे. सहमत आहे. इंदुरी मराठीत जसं हो चं हाऊ होतं तसंच हैद्राबादी हिंदीतही 'हां, किंवा जी हां' चं 'हौ' होतं! :) अवांतर - हैद्राबादी हिंदीचा गोडवाही काही औरच! असो... येथे लोक छान किंवा मजेत नसतात, तर 'बढिया' असतात. क्या बात है! :) इथल्या मराठी बोलीने हिंदी ताल धरला आहे. अतिशय सुंदर वाक्य! या मराठीला मुंबई, पुण्याचे लोक धेडगुजरी असं म्हणतात. पण ते चुकीचं आहे. इथल्या मराठीवर हिंदीचा प्रभाव अपरिहार्य आहे. उलट माझ्या मते अनेक मराठी कुटुंबाच्या पिढ्या येथे जाऊनही ती मराठी बोलतात, हे विशेष आहे. हिंदीच्या आधाराने का होईना पण मराठी टिकून आहे. इथले मराठी लोक साहित्यातही पुष्कळ आहे. त्यांच्या मराठी लेखनातही हिंदी शब्द असतात. मला त्याचेही कौतुक वाटते. भाषकदृष्ट्या आपल्याला ती चुक दिसेल. पण माझ्या मते हे लोक मराठीत साहित्य निर्मिती करतात हे जास्त महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रात मराठी विविध पदरी असताना इंदूरमध्ये ती वेगळे रूप घेऊन जिवंत आहे. त्यामुळे तिची उपेक्षा करण्यापेक्षा तिला बोलीचा दर्जा दिला तर ते जास्त योग्य ठरेल. हा शेवटचा परिच्छेद अतिशय चांगला झाला आहे असे आवर्जून सांगावेसे वाटते! वा भोचकगुरुजी, आपण फार छान लेख लिहिला आहे. आपला बोलीभाषांचा चांगला अभ्यास दिसतो! आमचाही 'बोलीभाषा' हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे बोलीभाषेशी निगडीत लेख आम्हालाही वाचायला आवडतात. आपल्याकडून अशाच उत्तमोत्तम लेखांची अपेक्षा आहे. एका चांगल्या लेखाबद्दल मनापासून अभिनंदन... आपलाच, तात्याभैय्या देवासकर, देवासकरांची कोठी, इंदौर.

चतुरंग गुरुवार, 03/27/2008 - 19:54
सुंदर लेख. इंदौरबद्दल खूप ऐकून आहे पण मला अजून एकदाही तिथे जाण्याचा योग आलेला नाही ;(. आपला लेख वाचून पुन्हा एकदा मनात तिथे जाण्याच्या इच्छेने जोम धरलाय. मराठी भाषिक लोक मध्यप्रदेशात बर्‍याच ठिकाणी आहेत आणि त्यांची भाषिक सरमिसळ मजेदार बोली भाषा निर्माण करते हे ऐकायला खरेच खूप आवडेल. (शिवाय चाट, सामोसे, फरसाण, खमण हे तर खुणावत आहेतच!;) असेच अजून लिखाण वाचायला नक्कीच आवडेल. चतुरंग

In reply to by चतुरंग

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/27/2008 - 20:17
त्यांची भाषिक सरमिसळ मजेदार बोली भाषा निर्माण करते हे ऐकायला खरेच खूप आवडेल. बोलीभाषांना एक विशेष गोडवा असतो. कारण त्यांच्यावर माणसे, तो भूप्रदेश, तिथले पाणी सर्वांचा प्रभाव पडलेला असतो आणि त्यातील शब्द तर चपखल असतात. आता भोचक हाच शब्द पहा ना मूळ शब्द भूचक्र. दिवाळीत लावले जाणारे भूईचक्र जसे गरागरा फिरत कुठेही जाते तसा भोचक माणूस हा अगोचरपणे कुठेही जाऊन कोणत्याही विषयात / प्रसंगात तोंड घालतो. म्हणून त्याला भोचक म्हटले जाते. दुसरा शब्द झकास. आकाशात वीज चमकण्याला मूळ शब्द आहे चकास् त्याचे बोलीभाषेत झकास असे रुपांतर होते जे मूळ चकास् पेक्षा सुद्धा छान वाटते. > > नणदेचं कार्ट किरकिर करतंय, खरुज होऊ दे त्याला, ग भवानी आई रोडगा वाहिन तुला..

ठणठणपाळ गुरुवार, 03/27/2008 - 21:33
माझा इंदौरमधे राहणारा एक लहान भाऊ एकदा झाडावर माकड चढताना बघून ओरडला, "ते बघा, पेडावरती बंदर चढून राहिलंय..

सुधीर कांदळकर गुरुवार, 03/27/2008 - 22:43
पेडावरचा. मस्त जमलेला लेख. बोली गोडच असते. बोलीतील गोडवा लेखातहि उतरलाय. धन्यवाद. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

मीनल Fri, 03/28/2008 - 04:02
तिथे मराठी भाषा वेगळी आहे ते खर. तसेच तिथले आदरातिथ्य विचारा. आग्रह इतका की वरून खालून बाहेर येई पर्यंत खावे लागते. आग्रह न मोडता येण्या जोगा असतो. खाना पिना व्हरायटी इतकी ,की सर्वच नवनविन.
लेखनविषय:
लेखनप्रकार
इंदूरची भाषा खास इंदूरी आहे. म्हणजे आहे ती हिंदीच पण तिच्यातही बरेच प्रादेशिक रंगही मिसळेले आहेत. त्यामुळे इथली हिंदी उत्तरेतल्या हिंदीपेक्षा काहीशी वेगळी वाटणारी आहे. म्हणजे कहॉं से आ रहे हो, कहॉं जा रहे हो हे हिंदी रूप इंदूरमध्ये आल्यानंतर मात्र कहॉंसे आ रीया, कहॉं से जा रीया होतं. इथला सामान्य माणूस याच भाषेत बोलतो. हे ऐकताना आपल्याला वेगळं वाटत असलं तरी त्यांना काहीही वाटत नाही. हिंदी भाषक दुसर्‍या प्रदेशातून आलेल्यांनाही इथलं हिंदी विचित्र वाटतं. कुणीही बोलत असलं की आपण हो किंवा होय असं म्हणतो. इथं 'हाऊ' असं म्हणण्याची प्रथा आहे. स्त्री असो की पुरूष सगळे असंच बोलतात.

उत्तर द्या

प्रेमसाई ·

वरदा गुरुवार, 03/27/2008 - 18:30
उद्या कायम असतोच्...दुसरा दिवस नेहेमी येतोच्....त्याची आशा असणं हीच १००% घडणारी गोष्टं....

विसोबा खेचर गुरुवार, 03/27/2008 - 18:55
१००% घड्णारि गोश्ट कोणती ? मृत्यू! तो अटळ आहे. एखादी व्यक्ति जन्माला आली की ती डॉक्टर होईल, की इंजिनियर होईल, की हमाल होईल, तिला मानसन्मान मिळतील का?, तिचं आयुष्य कसं जाईल, खडतर की सुखी?, ती रसिक असेल का?, ती इतरांना प्रेम देईल का? इत्यादी इत्यादी इत्यादी कशाबद्दलच काहीही सांगता येत नाही. मात्र ती व्यक्ति 'मरेल' एवढी एकच गोष्ट मात्र तिच्याबाबत निश्चित सांगता येते! कारण मृत्यू ही एकमेव गोष्ट १००% घडणारी आहे, अटळ आहे, शाश्वत आहे! आपला, (मॉर्टल!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

गोट्या गुरुवार, 03/27/2008 - 19:17
शंभर टक्के सहमत. खुपच उत्तम व योग्य असा प्रतिसाद. मृत्यु हीच एकमेव गोष्ट आहे जी १००% होणार म्हणजे होणारच, अमर असा कोणीच नाही.... (ह्या जगात जेथे परमेश्वराला देखील मरण टाळता आले नाही तर सामान्यांची काय गोष्ट ) राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by विसोबा खेचर

देवदत्त गुरुवार, 03/27/2008 - 20:53
मृत्यू ही एकमेव गोष्ट १००% घडणारी आहे, अटळ आहे, शाश्वत आहे! पूर्णतः सहमत. हेच उत्तर मी ही देईन.

विजुभाऊ गुरुवार, 03/27/2008 - 19:16
तात्या हे म्हणजे अस्सल एल आय सी एजन्टाने द्यावे तसे उत्तर आहे......शंकाच घेतली तर जगातली कोणतीही गोष्ट चुकु शकते....विश्वास असेल तर बर्‍याचशा गोष्टी १००% घडत असतात

सुधीर कांदळकर गुरुवार, 03/27/2008 - 21:59
दुसरे काय? १००% घडल्याशिवाय घटना घडूच शकत नाही. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/27/2008 - 23:22
सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत, वियोगार्थ मीलन होते नेम हा जगाचा... जिवासवें जन्मे मृत्यु, जोड जन्मजात > > नणदेचं कार्ट किरकिर करतंय, खरुज होऊ दे त्याला, ग भवानी आई रोडगा वाहिन तुला..

धनश्रीदिनेश Fri, 03/28/2008 - 05:59
सुर्योदय आणि सुर्यास्त, नदिच वाह्ता प्रवाह, सागराच्या लाटा, बाळाच हसन्,ह्रदयाच धड्धड, रोज एक प्रेमगाट तयार होते [माझी नाही ], रोज एक नवा जिव जगात जन्म घेतो, भरपुर अजुन आहे परन्तु वेळ कमि आहे

धनश्रीदिनेश Fri, 03/28/2008 - 05:59
सुर्योदय आणि सुर्यास्त, नदिच वाह्ता प्रवाह, सागराच्या लाटा, बाळाच हसन्,ह्रदयाच धड्धड, रोज एक प्रेमगाट तयार होते [माझी नाही ], रोज एक नवा जिव जगात जन्म घेतो, भरपुर अजुन आहे परन्तु वेळ कमि आहे

धनश्रीदिनेश Fri, 03/28/2008 - 05:59
सुर्योदय आणि सुर्यास्त, नदिच वाह्ता प्रवाह, सागराच्या लाटा, बाळाच हसन्,ह्रदयाच धड्धड, रोज एक प्रेमगाट तयार होते [माझी नाही ], रोज एक नवा जिव जगात जन्म घेतो, भरपुर अजुन आहे परन्तु वेळ कमि आहे

उदय सप्रे Fri, 03/28/2008 - 13:43
या जगात १००% एकच गोष्ट घडत असते : "बदल" , या क्षणासारखा पुढचा क्षण असत नाही - काही ना काही "बदल" असतोच !

वरदा गुरुवार, 03/27/2008 - 18:30
उद्या कायम असतोच्...दुसरा दिवस नेहेमी येतोच्....त्याची आशा असणं हीच १००% घडणारी गोष्टं....

विसोबा खेचर गुरुवार, 03/27/2008 - 18:55
१००% घड्णारि गोश्ट कोणती ? मृत्यू! तो अटळ आहे. एखादी व्यक्ति जन्माला आली की ती डॉक्टर होईल, की इंजिनियर होईल, की हमाल होईल, तिला मानसन्मान मिळतील का?, तिचं आयुष्य कसं जाईल, खडतर की सुखी?, ती रसिक असेल का?, ती इतरांना प्रेम देईल का? इत्यादी इत्यादी इत्यादी कशाबद्दलच काहीही सांगता येत नाही. मात्र ती व्यक्ति 'मरेल' एवढी एकच गोष्ट मात्र तिच्याबाबत निश्चित सांगता येते! कारण मृत्यू ही एकमेव गोष्ट १००% घडणारी आहे, अटळ आहे, शाश्वत आहे! आपला, (मॉर्टल!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

गोट्या गुरुवार, 03/27/2008 - 19:17
शंभर टक्के सहमत. खुपच उत्तम व योग्य असा प्रतिसाद. मृत्यु हीच एकमेव गोष्ट आहे जी १००% होणार म्हणजे होणारच, अमर असा कोणीच नाही.... (ह्या जगात जेथे परमेश्वराला देखील मरण टाळता आले नाही तर सामान्यांची काय गोष्ट ) राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

In reply to by विसोबा खेचर

देवदत्त गुरुवार, 03/27/2008 - 20:53
मृत्यू ही एकमेव गोष्ट १००% घडणारी आहे, अटळ आहे, शाश्वत आहे! पूर्णतः सहमत. हेच उत्तर मी ही देईन.

विजुभाऊ गुरुवार, 03/27/2008 - 19:16
तात्या हे म्हणजे अस्सल एल आय सी एजन्टाने द्यावे तसे उत्तर आहे......शंकाच घेतली तर जगातली कोणतीही गोष्ट चुकु शकते....विश्वास असेल तर बर्‍याचशा गोष्टी १००% घडत असतात

सुधीर कांदळकर गुरुवार, 03/27/2008 - 21:59
दुसरे काय? १००% घडल्याशिवाय घटना घडूच शकत नाही. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/27/2008 - 23:22
सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत, वियोगार्थ मीलन होते नेम हा जगाचा... जिवासवें जन्मे मृत्यु, जोड जन्मजात > > नणदेचं कार्ट किरकिर करतंय, खरुज होऊ दे त्याला, ग भवानी आई रोडगा वाहिन तुला..

धनश्रीदिनेश Fri, 03/28/2008 - 05:59
सुर्योदय आणि सुर्यास्त, नदिच वाह्ता प्रवाह, सागराच्या लाटा, बाळाच हसन्,ह्रदयाच धड्धड, रोज एक प्रेमगाट तयार होते [माझी नाही ], रोज एक नवा जिव जगात जन्म घेतो, भरपुर अजुन आहे परन्तु वेळ कमि आहे

धनश्रीदिनेश Fri, 03/28/2008 - 05:59
सुर्योदय आणि सुर्यास्त, नदिच वाह्ता प्रवाह, सागराच्या लाटा, बाळाच हसन्,ह्रदयाच धड्धड, रोज एक प्रेमगाट तयार होते [माझी नाही ], रोज एक नवा जिव जगात जन्म घेतो, भरपुर अजुन आहे परन्तु वेळ कमि आहे

धनश्रीदिनेश Fri, 03/28/2008 - 05:59
सुर्योदय आणि सुर्यास्त, नदिच वाह्ता प्रवाह, सागराच्या लाटा, बाळाच हसन्,ह्रदयाच धड्धड, रोज एक प्रेमगाट तयार होते [माझी नाही ], रोज एक नवा जिव जगात जन्म घेतो, भरपुर अजुन आहे परन्तु वेळ कमि आहे

उदय सप्रे Fri, 03/28/2008 - 13:43
या जगात १००% एकच गोष्ट घडत असते : "बदल" , या क्षणासारखा पुढचा क्षण असत नाही - काही ना काही "बदल" असतोच !
या जगातिल १००% घड्णारि गोश्ट कोणती ? माझे उत्तर उद्या देतो प्रेमसाई

कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी :कामाचा ताण :एक आसन

विजुभाऊ ·

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 03/27/2008 - 20:09
तसेच उत्तम appraisal व्हावे यासाठी पण काहीतरी उपाय सांगावा. १. आपल्या वरीष्ठ मुकादमाची 'हाँ जी , हाँ जी ' करणे. २. ते जमत नसल्यास आपण केलेल्या छोट्यात छोट्या कामाची मोठ्यात मोठी जाहीरात करणे. ३.कँटीन मधे आपला साहेब आजूबाजूला असताना (आपल्या बरोबर नव्हे इतर टेबलावर)आपल्या कामाचे मोठ्या आवाजात(बाजूच्या टेबलावरील मॅनेजरला ऐकू जाईल इतपत मोठ्या) विष्लेशण करणे. आणि आपल्या बरोबरच्या मित्राला म्हणायला सांगणे 'किती काम करतोस रे तू!' आणि माझ्या मते सर्वात महत्वाचे म्हणजे "आपले स्वतःचे काम व्यवस्थित करणे" पुण्याचे पेशवे ता.क. इतर अनेक मार्ग उपलब्ध असतील तर सुचवावे.

वरदा गुरुवार, 03/27/2008 - 21:02
तेच खरं...त्यातून अप्रेझल ला फायदा झाला नाही झाला आपल्याला फायदा नक्की होतो रोज काम करताना..... बाकी ते आसन सहीच्...मी करून पाहिलं.... मी इथे ओरडले कं जाऊदे खड्यात म्हणून तरी कुण्णाला काही कळत नाही.......तेव्हा वरीष्ठातील वरीष्ठ असला समोर म्हणून काय झालं.......

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/27/2008 - 23:14
श्वास कायमचा सोडला तर चालेल का? खदखदून जास्त हसल्याने डोळ्यात पाणी आले आहे.. > > नणदेचं कार्ट किरकिर करतंय, खरुज होऊ दे त्याला, ग भवानी आई रोडगा वाहिन तुला..

मीनल Fri, 03/28/2008 - 04:14
हे आसन घरच्या कामाचा ताणही हलका करेल का? कुठल्या टेबलावरील काम थोडे बाजुला करावे? कुठली खुर्ची टेबलापासुन थोडी मागे घ्यायची? काय `खड्ड्यात जाउ दे` असे त्वेशाने पुट्पुटावे? घरातले वरीष्ठ मुकदाम कोण? मुकादम तर एकदमच खालची पातळी झाली . माझा नवरा मलाच होम मिनिस्टर म्हणतो.

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 03/27/2008 - 20:09
तसेच उत्तम appraisal व्हावे यासाठी पण काहीतरी उपाय सांगावा. १. आपल्या वरीष्ठ मुकादमाची 'हाँ जी , हाँ जी ' करणे. २. ते जमत नसल्यास आपण केलेल्या छोट्यात छोट्या कामाची मोठ्यात मोठी जाहीरात करणे. ३.कँटीन मधे आपला साहेब आजूबाजूला असताना (आपल्या बरोबर नव्हे इतर टेबलावर)आपल्या कामाचे मोठ्या आवाजात(बाजूच्या टेबलावरील मॅनेजरला ऐकू जाईल इतपत मोठ्या) विष्लेशण करणे. आणि आपल्या बरोबरच्या मित्राला म्हणायला सांगणे 'किती काम करतोस रे तू!' आणि माझ्या मते सर्वात महत्वाचे म्हणजे "आपले स्वतःचे काम व्यवस्थित करणे" पुण्याचे पेशवे ता.क. इतर अनेक मार्ग उपलब्ध असतील तर सुचवावे.

वरदा गुरुवार, 03/27/2008 - 21:02
तेच खरं...त्यातून अप्रेझल ला फायदा झाला नाही झाला आपल्याला फायदा नक्की होतो रोज काम करताना..... बाकी ते आसन सहीच्...मी करून पाहिलं.... मी इथे ओरडले कं जाऊदे खड्यात म्हणून तरी कुण्णाला काही कळत नाही.......तेव्हा वरीष्ठातील वरीष्ठ असला समोर म्हणून काय झालं.......

सृष्टीलावण्या गुरुवार, 03/27/2008 - 23:14
श्वास कायमचा सोडला तर चालेल का? खदखदून जास्त हसल्याने डोळ्यात पाणी आले आहे.. > > नणदेचं कार्ट किरकिर करतंय, खरुज होऊ दे त्याला, ग भवानी आई रोडगा वाहिन तुला..

मीनल Fri, 03/28/2008 - 04:14
हे आसन घरच्या कामाचा ताणही हलका करेल का? कुठल्या टेबलावरील काम थोडे बाजुला करावे? कुठली खुर्ची टेबलापासुन थोडी मागे घ्यायची? काय `खड्ड्यात जाउ दे` असे त्वेशाने पुट्पुटावे? घरातले वरीष्ठ मुकदाम कोण? मुकादम तर एकदमच खालची पातळी झाली . माझा नवरा मलाच होम मिनिस्टर म्हणतो.
कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी...........कामाचे ओझे जास्त असल्यास खालील आसनाचा प्रयोग करुन पहा....कामाचा ताण नक्की कमी झालेला जाणवेल १) प्रथम टेबलावरील काम थोडे बाजुला करावे... २) ते जमत नसल्यास तुमची खुर्ची टेबलापासुन थोडी मागे घ्या.. ३) डोळे मिटा..हात डोक्या मागे घ्या ४) दीर्घ श्वास घ्या ५) श्वास हळू सोडा ( असे पाच वेळा करा) ६) पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या ( डोळे बंदच राहु द्या ७) या वेळी श्वास जोरात सोडा ८) श्वास सोडताना हात झटका ९) हात झटकताना तेव्हढ्याच त्वेशाने पुट्पुटा .............( खड्ड्यात जाउदे कंपनी.....) कामाचा ताण नक्की कमी झालेला जाणवेल सू्: हे आसन वरीष्ठ मुकदामासमोर करु नये........