मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लेखन मालिका

मनस्वी ·

धमाल मुलगा Mon, 03/31/2008 - 18:22
सहमत...सहमत...सहमत!!!!! तात्या अजुन रौशनीकडे बिर्याणी खात बसले आहेत. प॑ता॑चे गणपुले लग्नात "नारायण" होऊन फिरताहेत आणि आम्हाला खुर्चीत बसुन बसुन वाळवी लागायची वेळ आली आहे. ओ तात्या आता बास ना बिर्याणी खाण॑, अजीर्ण होईल ना ! :-) प॑त अहो ते गणपुले आता थकले ना असतील लग्नात काम॑ करकरुन :-)) आणि हो ........... माझ्या गरीब बिचार्‍या दरिद्री 'वि'स्मरणशक्तीनुसार अस॑ आठवत॑ की तात्याबा "हस्ताक्षरावरुन स्वभाव" देखील सा॑गणार होते ! (माझ्यासारख्या गिचमीड माणसाच्या वर्तनावरुन माझ॑ हस्ताक्षर कसे असेल ते सा॑गता येऊ शकते हा भाग निराळा) आयला हे बर॑य, आम्हाला तुमच्यासारख॑ लय भारी लिहीता येत नाही म्हणून का अस॑? तात्या, प॑त आणि सर्व सन्माननीय लेखकगण ह्या॑सी आमची णम्र इन॑ती की कृपया आता आम्हाला आणखी ताणू नका हो! -(चातक) ध मा ल.

विसोबा खेचर Mon, 03/31/2008 - 18:42
रौशनीच्या लेखनाला झालेल्या उशिराबद्दल मी रौशनीच्या सर्व वाचकांची त्यांना अद्याप ताटकळत ठेवल्याबद्दल जाहीर क्षमा मागत आहे. परंतु अद्याप रौशनीच्या पुढील भागाच्या लेखनाला मूड लागत नाहीये! रौशनीची मुलगी नीलम, मी तिला खूप लहान असताना पाहिली होती, ती सुदैवाने शरीरविक्रय करत नसली तरी फोरास रोडवरील बनारसी चाळीत मुजरा करते! दीदीच्या आग्रहावरून, मी एकदा तिच्या मुजर्‍याला गेलो होतो परंतु त्या नीलमला तिथे नाचताना मला बघवेना व मी मुजरा अर्धवट टाकून तिथून परत आलो होतो! ही दीदी म्हणजे रौशनीच्याच गणगोतातली. तिचा उल्लेख रौशनीच्या लेखनात येईलच! या नीलमला पुन्हा एकदा केव्हातरी भेटून येऊ की काय याचा विचार करतो आहे! पण तिथे जावसं वाटत नाही. पुन्हा एकदा तिथे गेलो तर रौशनीच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या होतील व पुढे काही भरभरून लिहावंसं वाटेल! परंतु अगदी कोवळ्या वयात पाहिलेल्या त्या नीलमला मुजर्‍यात नाचताना मला तरी बघवत नाही! बरं, माझ्यात एवढीही धम्मक नाही की त्या नीलमला तिथून बाहेर काढून एक चांगलं आयुष्य देऊ शकेन! कोरडी सहानुभूती काय कामाची? मुजर्‍यला गेलोच तर 'आओ सेठ, बैठो' असं म्हणून नीलमही माझं स्वागतच करेल. पण मी काय तिथे बसून दारू पिऊ आणि त्या नीलमचं गाणं ऐकत पैसे उधळू? असो, तूर्तास इथेच थांबतो. लवकरात लवकर पुढचा भाग लिहायच प्रयत्न करीन इतकंच तूर्तास आश्वासन देतो. परंतु तो मूड लागला पाहिजे आणि ते माझ्या हातात नाही! एक शिफारस : सर्व भाग लिहून अद्ययावत पूर्ण झाले की मग ठराविक अंतराने एक एक करून मिसळपाववर चढवावेत. रौशनीच्या बाबतीत या पुढे असंच करणार आहे. लेखन पूर्ण करूनच रौशनीला पुन्हा मिपासमोर आणीन. म्हणजे वाचकांना उगाच ताटकळायला लागणार नाही! असो, रौशनीला झालेल्या उशिराबद्दल मायबाप वाचक माझी बाजू समजून घेतील अशी आशा करतो! पुन्हा एकदा क्षमस्व! आपला, (रौशनीचा मित्र!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मनस्वी Mon, 03/31/2008 - 18:55
अहो तात्या क्षमा बिमा कसली मागताय? अहो हे एक Gentle Reminder होतं! :) पंगतीत बसल्यावर आपण मठ्ठ्याची वाट बघतो आणि शेवटी न रहावून मठ्ठेवाल्याला हात उंचावून बोलावतोना... अगदी तसं!

In reply to by मनस्वी

किंवा कुचूकुचू वाढणार्‍याला "थांब , आणि चांगले २ डाव आत्ताच वाढून जा!" असे सांगण्यासारखेही.... ह.घ्या. पुण्याचे पेशवे

प्राजु Mon, 03/31/2008 - 20:00
टान्गून ठेवतात नुस्ते.. आणी आमचा चक्का होतो.... हे एकदम आवडलं... आणि पटलंही.:)))) - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

चुटकीसरशी लिहून टाका बरं..... मला जर तुमच्याएवढी कल्पनाशक्ती असती तर साला मीच तुमची ती रोशनी का अच्युत गणपुले वगैरे लिहीले असते....अन् ते पण एकदम ४५०-५०० भाग..... - टिंग्या

In reply to by ब्रिटिश टिंग्या

विसोबा खेचर Wed, 04/02/2008 - 01:02
मला जर तुमच्याएवढी कल्पनाशक्ती असती तर साला मीच तुमची ती रोशनी का अच्युत गणपुले वगैरे लिहीले असते.... रौशनीचे लेखन हे कल्पनाशक्तिवर आधारीत नसून वास्तवावर अधारीत आहे.. असो... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बघा आम्हाला वास्तव आणि कल्पनाशक्तीतला फरकसुद्धा कळत नाही..... असो, वरील श्टेटमेंट फक्त ह घेण्याकरिता होते....फक्त ते तसे लिहीण्यास मात्र मी विसरलो ;) असो, 'वास्तववादी' रौशनी ६ च्या प्रतिक्षेत.... - टिंग्या

धमाल मुलगा Mon, 03/31/2008 - 18:22
सहमत...सहमत...सहमत!!!!! तात्या अजुन रौशनीकडे बिर्याणी खात बसले आहेत. प॑ता॑चे गणपुले लग्नात "नारायण" होऊन फिरताहेत आणि आम्हाला खुर्चीत बसुन बसुन वाळवी लागायची वेळ आली आहे. ओ तात्या आता बास ना बिर्याणी खाण॑, अजीर्ण होईल ना ! :-) प॑त अहो ते गणपुले आता थकले ना असतील लग्नात काम॑ करकरुन :-)) आणि हो ........... माझ्या गरीब बिचार्‍या दरिद्री 'वि'स्मरणशक्तीनुसार अस॑ आठवत॑ की तात्याबा "हस्ताक्षरावरुन स्वभाव" देखील सा॑गणार होते ! (माझ्यासारख्या गिचमीड माणसाच्या वर्तनावरुन माझ॑ हस्ताक्षर कसे असेल ते सा॑गता येऊ शकते हा भाग निराळा) आयला हे बर॑य, आम्हाला तुमच्यासारख॑ लय भारी लिहीता येत नाही म्हणून का अस॑? तात्या, प॑त आणि सर्व सन्माननीय लेखकगण ह्या॑सी आमची णम्र इन॑ती की कृपया आता आम्हाला आणखी ताणू नका हो! -(चातक) ध मा ल.

विसोबा खेचर Mon, 03/31/2008 - 18:42
रौशनीच्या लेखनाला झालेल्या उशिराबद्दल मी रौशनीच्या सर्व वाचकांची त्यांना अद्याप ताटकळत ठेवल्याबद्दल जाहीर क्षमा मागत आहे. परंतु अद्याप रौशनीच्या पुढील भागाच्या लेखनाला मूड लागत नाहीये! रौशनीची मुलगी नीलम, मी तिला खूप लहान असताना पाहिली होती, ती सुदैवाने शरीरविक्रय करत नसली तरी फोरास रोडवरील बनारसी चाळीत मुजरा करते! दीदीच्या आग्रहावरून, मी एकदा तिच्या मुजर्‍याला गेलो होतो परंतु त्या नीलमला तिथे नाचताना मला बघवेना व मी मुजरा अर्धवट टाकून तिथून परत आलो होतो! ही दीदी म्हणजे रौशनीच्याच गणगोतातली. तिचा उल्लेख रौशनीच्या लेखनात येईलच! या नीलमला पुन्हा एकदा केव्हातरी भेटून येऊ की काय याचा विचार करतो आहे! पण तिथे जावसं वाटत नाही. पुन्हा एकदा तिथे गेलो तर रौशनीच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या होतील व पुढे काही भरभरून लिहावंसं वाटेल! परंतु अगदी कोवळ्या वयात पाहिलेल्या त्या नीलमला मुजर्‍यात नाचताना मला तरी बघवत नाही! बरं, माझ्यात एवढीही धम्मक नाही की त्या नीलमला तिथून बाहेर काढून एक चांगलं आयुष्य देऊ शकेन! कोरडी सहानुभूती काय कामाची? मुजर्‍यला गेलोच तर 'आओ सेठ, बैठो' असं म्हणून नीलमही माझं स्वागतच करेल. पण मी काय तिथे बसून दारू पिऊ आणि त्या नीलमचं गाणं ऐकत पैसे उधळू? असो, तूर्तास इथेच थांबतो. लवकरात लवकर पुढचा भाग लिहायच प्रयत्न करीन इतकंच तूर्तास आश्वासन देतो. परंतु तो मूड लागला पाहिजे आणि ते माझ्या हातात नाही! एक शिफारस : सर्व भाग लिहून अद्ययावत पूर्ण झाले की मग ठराविक अंतराने एक एक करून मिसळपाववर चढवावेत. रौशनीच्या बाबतीत या पुढे असंच करणार आहे. लेखन पूर्ण करूनच रौशनीला पुन्हा मिपासमोर आणीन. म्हणजे वाचकांना उगाच ताटकळायला लागणार नाही! असो, रौशनीला झालेल्या उशिराबद्दल मायबाप वाचक माझी बाजू समजून घेतील अशी आशा करतो! पुन्हा एकदा क्षमस्व! आपला, (रौशनीचा मित्र!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

मनस्वी Mon, 03/31/2008 - 18:55
अहो तात्या क्षमा बिमा कसली मागताय? अहो हे एक Gentle Reminder होतं! :) पंगतीत बसल्यावर आपण मठ्ठ्याची वाट बघतो आणि शेवटी न रहावून मठ्ठेवाल्याला हात उंचावून बोलावतोना... अगदी तसं!

In reply to by मनस्वी

किंवा कुचूकुचू वाढणार्‍याला "थांब , आणि चांगले २ डाव आत्ताच वाढून जा!" असे सांगण्यासारखेही.... ह.घ्या. पुण्याचे पेशवे

प्राजु Mon, 03/31/2008 - 20:00
टान्गून ठेवतात नुस्ते.. आणी आमचा चक्का होतो.... हे एकदम आवडलं... आणि पटलंही.:)))) - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

चुटकीसरशी लिहून टाका बरं..... मला जर तुमच्याएवढी कल्पनाशक्ती असती तर साला मीच तुमची ती रोशनी का अच्युत गणपुले वगैरे लिहीले असते....अन् ते पण एकदम ४५०-५०० भाग..... - टिंग्या

In reply to by ब्रिटिश टिंग्या

विसोबा खेचर Wed, 04/02/2008 - 01:02
मला जर तुमच्याएवढी कल्पनाशक्ती असती तर साला मीच तुमची ती रोशनी का अच्युत गणपुले वगैरे लिहीले असते.... रौशनीचे लेखन हे कल्पनाशक्तिवर आधारीत नसून वास्तवावर अधारीत आहे.. असो... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बघा आम्हाला वास्तव आणि कल्पनाशक्तीतला फरकसुद्धा कळत नाही..... असो, वरील श्टेटमेंट फक्त ह घेण्याकरिता होते....फक्त ते तसे लिहीण्यास मात्र मी विसरलो ;) असो, 'वास्तववादी' रौशनी ६ च्या प्रतिक्षेत.... - टिंग्या
खालील मत हे मिसळपाववर प्रस्तुत होणार्‍या लेखन मालिकांच्या प्रेमापोटी आणि पुढील भागांच्या प्रतिक्षेपोटी आणि उत्सुकतेपोटी... (गैरसमज नसावा.) अहो वाट वाट म्हणजे बघायची तरी किती!! आज येईल पुढचा भाग... नाही उद्या नक्की येईल... नाही परवा येईल बहुतेक... या आठवड्यात तरी यायला हवा... ह्या महिन्यात येईल असं वाटतंय... पण छ्या... तात्यांचे रौशनी, सालस, धोंडोपंतांचे अच्युत गणपुले... एक ना अनेक! आम्ही मात्र ते वाचण्यासाठी इथे तिष्ठत असतो. मान्य आहे कामाच्या रगाड्यात नाही जमत एखाद्याला किंवा नाही बैठक जमत तशी जी त्या दुनियेत पुन्हा घेउन जाईल आणि शब्द न शब्द आपोआपच स्फुरेल... ह्रदयातून...

मी मराठी

आनंद घारे ·

धमाल मुलगा Mon, 03/31/2008 - 18:13
ज ह ब ह र्‍या!!!! खर॑च अस॑ होत॑ बॉ! कधी-मधी मलाही असा शुद्ध मराठीचा झटका येतो आणि मग मी घरादाराला वात आणतो :-) पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे ह॑! कारण काय आहे ना, की हल्ली मराठी वर्डस् रिमे॑बर करायला स्लाईटली डिफिकल्टच जात॑ हो. आता वर्डस् ची ही कथा तर तुम्हाला वस्तु काय मिळणार कप्पाळ? बाकी, एकदम खुसखुशीत लेख हो! आवडला आपल्याला. आपला, - (मराठीत) ध मा ल.

सृष्टीलावण्या Mon, 03/31/2008 - 22:35
दादरला सुप्रसिद्ध कबुतरखाना आहे. तिथली दादरभर शीटा टाकत फिरणारी कबुतरे आणि त्यांचे जैन बांधवांकडून होणारे अवास्तव लाड हा समस्त जुन्या दादरकरांचा रागाचा विषय आहे. तिथे जवळच एक राम मंदीर आहे. एकदा माझ्या ओळखीच्या एका गृहस्थांनी शीवहून येताना एक राममंदीर द्या असे थाटात त्या थांब्याचे नाव सांगितले. त्यावर बस वाहकाच्या मेंदूची चक्र विचार करकरून थकली शेवटी तो म्हणाला, कुठे आले हे राममंदीर... त्यावर ह्यांनी त्या वाहकाला जवळपासच्या सगळ्या खुणा सांगितल्या. शेवटी तो कंटाळून म्हणाला, अहो काका, त्यापेक्षा कबुतरखाना म्हणाला असतात तर लगेच कळले असते. त्यावर ते मराठी-अभिमानी काका म्हणाले, काही नाही हो सकाळी सकाळी रामाचे नाव घेत होतो. तो बसवाहक असला तडकला. > > वरि जोडे ब्रह्मसुख पवित्र, ते मर्‍हाटी बोलैन...

In reply to by प्रभाकर पेठकर

सर्किट Mon, 03/31/2008 - 23:51
बिचारा राम तरी मराठी कुठे आहे? तो तर पक्का उत्तर प्रदेशी....... जेव्हा राम वनवासासाठी नाशिकजवळ आला होता, तेव्हाही एक "परप्रांतीयाविरुद्ध आंदोलन" झाले होते, असे ऐकिवात आहे. काही दाक्षिणात्य अतिरेक्यांनी तर ह्या परप्रांतीयाची बायकोच पळवून नेली म्हणतात ! कारण हे परप्रांतीय दक्षिणेत येऊन येथील दाक्षिणात्यांच्या चरितार्थाची साधने, म्हणजे यज्ञात विघ्ने निर्माण करणे, वगैरे हिरावून घेत होते ! - सर्किट

प्रभाकर पेठकर Mon, 03/31/2008 - 23:25
लेख मस्त आहे. बरीच करमणूक केली. मराठी भाषेने दुकान, रुमाल, मैदान पासून कोण कोणते शब्द दुसर्‍या भाषेतून घेतले आहेत ह्यावर विचार करून 'शुद्ध मराठीत' बोलायला गेले तर कोणाला कळणारही नाही असे वाटते. पण पिढ्या न् पिढ्या रुळलेले शब्द, पँट-शर्ट प्रमाणे, स्विकारून जमेल तितके आणि इतरांना समजताना कष्ट पडणार नाहीत इतके मराठी बोलत राहावे आणि निदान ह्या पुढे तरी मराठीचा र्‍हास होणार नाही ह्याची काळजी घ्यावी, कसें?

धनंजय Tue, 04/01/2008 - 22:09
खुसखुशीत तर आहेच - वाचणार्‍यांसाठी विचारप्रवर्तकही व्हावा ही आशा करूया.

In reply to by चतुरंग

मला पण असेच म्हणायचे होते. पण नेमक्या शब्दात चतुरंगरावानी प्रतिक्रिया लिहीली आहे. पुण्याचे पेशवे

स्वाती राजेश Tue, 04/01/2008 - 22:16
आज पासून आपण वरील लेखका प्रमाणे वागायला लागलो तर? :)))) व्वा काय धमाल येईल नाही? धमाल = मजा/गंमत हा अर्थ घ्यावा. (मि.पा. च्या सदस्याचे नाव आहे म्हणून)

In reply to by स्वाती राजेश

धमाल मुलगा Wed, 04/02/2008 - 11:56
धमाल = मजा/गंमत हा अर्थ घ्यावा. (मि.पा. च्या सदस्याचे नाव आहे म्हणून) स्वातीताई, मि.पा. च्या सदस्याचे नाव =धमाल = मजा/गंमत हा अर्थ घ्यावा. ही णम्र इन॑ती! -ध मा ल (= मजा + ग॑मत)

सचिन Tue, 04/01/2008 - 22:20
जोक्स अपार्ट्...पण खरंच विचार करायला लावणारा लेख. अरेच्या !! पहिलेच दोन शब्द आपोआप आंग्ल भाषेतले आले की !

आनंद घारे Wed, 04/02/2008 - 11:26
मी कांही भाषातज्ञ नाही. पण माझ्या मते भाषा प्रवाही आणि नव्या शब्दांना व शब्दरचनांना सामावून घेणारी असावी. इंग्रजी भाषा तशी आहे. कॉम्प्यूटर युग आल्यापासून आणि विशेषतः इंटरनेटच्या प्रसारानंतर त्यात किती नवे शब्द आले आहेत आणि 'रन', 'सेव्ह', 'डिफॉल्ट', 'स्क्रॅप' आदि जुन्या शब्दांना नवे अर्थ प्राप्त झाले आहेत. चॅटिंगसाठी तर नवी लिपीच तयार झाली आहे. आपण ते सगळे सहजपणे वापरतो. त्यांऐवजी मराठीत 'धांवा', 'वाचवा' वगैरे म्हणतांना जीभ अडखळेल . आपण ठरवू किंवा न ठरवू , आपल्या मनातले विचार आपोआप सोयीस्कररित्या व्यक्त होतात. माझे आईवडील ज्या बोलीत माझ्या लहानपणी बोलत असत, ज्या शब्दात मी माझ्या मुलांशी बोलत होतो आणि आता ज्या भाषेत ते त्यांच्या मुलांशी संभाषण करतात या मराठी भाषेच्याच तीन भिन्न त-हा मी एकाच आयुष्यात पाहिल्या आहेत. त्या वेळेस आपण व्याकरणाचा किंवा भाषाशुध्दतेचा विचार करत नाही. आपले सांगणे ऐकणा-याला लगेच समजणे हे जास्त महत्वाचे असते. आपले लेखन वाचणारे अनेक लोक असतात. आपल्याला अभिप्रेत असलेला नेमका अर्थच त्यांना त्यातून कळावा यासाठी लेखनाच्या भाषेत शुध्दलेखनाचे थोडे पालन करणे आवश्यक असते.

धमाल मुलगा Mon, 03/31/2008 - 18:13
ज ह ब ह र्‍या!!!! खर॑च अस॑ होत॑ बॉ! कधी-मधी मलाही असा शुद्ध मराठीचा झटका येतो आणि मग मी घरादाराला वात आणतो :-) पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे ह॑! कारण काय आहे ना, की हल्ली मराठी वर्डस् रिमे॑बर करायला स्लाईटली डिफिकल्टच जात॑ हो. आता वर्डस् ची ही कथा तर तुम्हाला वस्तु काय मिळणार कप्पाळ? बाकी, एकदम खुसखुशीत लेख हो! आवडला आपल्याला. आपला, - (मराठीत) ध मा ल.

सृष्टीलावण्या Mon, 03/31/2008 - 22:35
दादरला सुप्रसिद्ध कबुतरखाना आहे. तिथली दादरभर शीटा टाकत फिरणारी कबुतरे आणि त्यांचे जैन बांधवांकडून होणारे अवास्तव लाड हा समस्त जुन्या दादरकरांचा रागाचा विषय आहे. तिथे जवळच एक राम मंदीर आहे. एकदा माझ्या ओळखीच्या एका गृहस्थांनी शीवहून येताना एक राममंदीर द्या असे थाटात त्या थांब्याचे नाव सांगितले. त्यावर बस वाहकाच्या मेंदूची चक्र विचार करकरून थकली शेवटी तो म्हणाला, कुठे आले हे राममंदीर... त्यावर ह्यांनी त्या वाहकाला जवळपासच्या सगळ्या खुणा सांगितल्या. शेवटी तो कंटाळून म्हणाला, अहो काका, त्यापेक्षा कबुतरखाना म्हणाला असतात तर लगेच कळले असते. त्यावर ते मराठी-अभिमानी काका म्हणाले, काही नाही हो सकाळी सकाळी रामाचे नाव घेत होतो. तो बसवाहक असला तडकला. > > वरि जोडे ब्रह्मसुख पवित्र, ते मर्‍हाटी बोलैन...

In reply to by प्रभाकर पेठकर

सर्किट Mon, 03/31/2008 - 23:51
बिचारा राम तरी मराठी कुठे आहे? तो तर पक्का उत्तर प्रदेशी....... जेव्हा राम वनवासासाठी नाशिकजवळ आला होता, तेव्हाही एक "परप्रांतीयाविरुद्ध आंदोलन" झाले होते, असे ऐकिवात आहे. काही दाक्षिणात्य अतिरेक्यांनी तर ह्या परप्रांतीयाची बायकोच पळवून नेली म्हणतात ! कारण हे परप्रांतीय दक्षिणेत येऊन येथील दाक्षिणात्यांच्या चरितार्थाची साधने, म्हणजे यज्ञात विघ्ने निर्माण करणे, वगैरे हिरावून घेत होते ! - सर्किट

प्रभाकर पेठकर Mon, 03/31/2008 - 23:25
लेख मस्त आहे. बरीच करमणूक केली. मराठी भाषेने दुकान, रुमाल, मैदान पासून कोण कोणते शब्द दुसर्‍या भाषेतून घेतले आहेत ह्यावर विचार करून 'शुद्ध मराठीत' बोलायला गेले तर कोणाला कळणारही नाही असे वाटते. पण पिढ्या न् पिढ्या रुळलेले शब्द, पँट-शर्ट प्रमाणे, स्विकारून जमेल तितके आणि इतरांना समजताना कष्ट पडणार नाहीत इतके मराठी बोलत राहावे आणि निदान ह्या पुढे तरी मराठीचा र्‍हास होणार नाही ह्याची काळजी घ्यावी, कसें?

धनंजय Tue, 04/01/2008 - 22:09
खुसखुशीत तर आहेच - वाचणार्‍यांसाठी विचारप्रवर्तकही व्हावा ही आशा करूया.

In reply to by चतुरंग

मला पण असेच म्हणायचे होते. पण नेमक्या शब्दात चतुरंगरावानी प्रतिक्रिया लिहीली आहे. पुण्याचे पेशवे

स्वाती राजेश Tue, 04/01/2008 - 22:16
आज पासून आपण वरील लेखका प्रमाणे वागायला लागलो तर? :)))) व्वा काय धमाल येईल नाही? धमाल = मजा/गंमत हा अर्थ घ्यावा. (मि.पा. च्या सदस्याचे नाव आहे म्हणून)

In reply to by स्वाती राजेश

धमाल मुलगा Wed, 04/02/2008 - 11:56
धमाल = मजा/गंमत हा अर्थ घ्यावा. (मि.पा. च्या सदस्याचे नाव आहे म्हणून) स्वातीताई, मि.पा. च्या सदस्याचे नाव =धमाल = मजा/गंमत हा अर्थ घ्यावा. ही णम्र इन॑ती! -ध मा ल (= मजा + ग॑मत)

सचिन Tue, 04/01/2008 - 22:20
जोक्स अपार्ट्...पण खरंच विचार करायला लावणारा लेख. अरेच्या !! पहिलेच दोन शब्द आपोआप आंग्ल भाषेतले आले की !

आनंद घारे Wed, 04/02/2008 - 11:26
मी कांही भाषातज्ञ नाही. पण माझ्या मते भाषा प्रवाही आणि नव्या शब्दांना व शब्दरचनांना सामावून घेणारी असावी. इंग्रजी भाषा तशी आहे. कॉम्प्यूटर युग आल्यापासून आणि विशेषतः इंटरनेटच्या प्रसारानंतर त्यात किती नवे शब्द आले आहेत आणि 'रन', 'सेव्ह', 'डिफॉल्ट', 'स्क्रॅप' आदि जुन्या शब्दांना नवे अर्थ प्राप्त झाले आहेत. चॅटिंगसाठी तर नवी लिपीच तयार झाली आहे. आपण ते सगळे सहजपणे वापरतो. त्यांऐवजी मराठीत 'धांवा', 'वाचवा' वगैरे म्हणतांना जीभ अडखळेल . आपण ठरवू किंवा न ठरवू , आपल्या मनातले विचार आपोआप सोयीस्कररित्या व्यक्त होतात. माझे आईवडील ज्या बोलीत माझ्या लहानपणी बोलत असत, ज्या शब्दात मी माझ्या मुलांशी बोलत होतो आणि आता ज्या भाषेत ते त्यांच्या मुलांशी संभाषण करतात या मराठी भाषेच्याच तीन भिन्न त-हा मी एकाच आयुष्यात पाहिल्या आहेत. त्या वेळेस आपण व्याकरणाचा किंवा भाषाशुध्दतेचा विचार करत नाही. आपले सांगणे ऐकणा-याला लगेच समजणे हे जास्त महत्वाचे असते. आपले लेखन वाचणारे अनेक लोक असतात. आपल्याला अभिप्रेत असलेला नेमका अर्थच त्यांना त्यातून कळावा यासाठी लेखनाच्या भाषेत शुध्दलेखनाचे थोडे पालन करणे आवश्यक असते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारताला स्वातंत्र्य मिळून साठ वर्षे झाली असली तरी इंग्रजांनी मागे ठेवलेली इंग्रजी भाषा आजही आपल्या माय मराठीवर आक्रमण करते आहे. "तुझा काय प्रॉब्लेम आहे? मी त्यात हेल्प करू कां?" अशा प्रकारची वाक्ये नेहमी कानावर पडतात. त्यातच 'भय्या' लोकांची हिंदी देखील मराठी भाषेत आपले 'हात पाय पसरू' लागली आहे. चित्रपट, दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्रे या सार्‍या प्रसारमाध्यमांमधून आपल्याला इंग्रजी व हिंदीमिश्रित मराठीचाच खुराक रोज मिळत आहे. त्यामुळे आपली भावी पिढी या खिचडीलाच मराठी भाषा समजेल आणि मूळ मराठी भाषा भ्रष्ट होऊन नष्ट होऊन जाईल अशी चिंता अनेक मराठी भाषाप्रेमी लोकांना सतावते आहे.

तुरुंग

गिरीराज ·

जसे नादति सूर सुखाचे दु:खाचीही किणकिण असते खरे आहे, ही 'दु:खाची किणकिण' तर अनेक उत्तमोत्तम काव्यांना जन्म देऊन गेली आहे. असेच स्मरतां तुझे हांसणे सुखदु:खाची सीमा विरते खरे आहे असतात अशा काही सुंदर्‍या ज्यांमुळे सुखदु:खाची सीमा खरोखरच उरत नाही. :) पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर Tue, 04/01/2008 - 08:12
कसे सोडवू या हृदयाला तुरूंग बटांचा;सहजी फसते कोण देश हा कसले जग हे? माझे मीपण मला न स्मरते! वा! कविता छानच लिहिली आहेस रे गिरीराज! तात्या.

बेसनलाडू Tue, 04/01/2008 - 10:10
चुंबूनी घेता तुझी कुंतले ओठांवरती धुसफूस दिसते वा! कसे सोडवू या हृदयाला तुरूंग बटांचा;सहजी फसते कल्पना आवडली. (आस्वादक)बेसनलाडू

जसे नादति सूर सुखाचे दु:खाचीही किणकिण असते खरे आहे, ही 'दु:खाची किणकिण' तर अनेक उत्तमोत्तम काव्यांना जन्म देऊन गेली आहे. असेच स्मरतां तुझे हांसणे सुखदु:खाची सीमा विरते खरे आहे असतात अशा काही सुंदर्‍या ज्यांमुळे सुखदु:खाची सीमा खरोखरच उरत नाही. :) पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर Tue, 04/01/2008 - 08:12
कसे सोडवू या हृदयाला तुरूंग बटांचा;सहजी फसते कोण देश हा कसले जग हे? माझे मीपण मला न स्मरते! वा! कविता छानच लिहिली आहेस रे गिरीराज! तात्या.

बेसनलाडू Tue, 04/01/2008 - 10:10
चुंबूनी घेता तुझी कुंतले ओठांवरती धुसफूस दिसते वा! कसे सोडवू या हृदयाला तुरूंग बटांचा;सहजी फसते कल्पना आवडली. (आस्वादक)बेसनलाडू
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
तुरुंग जसे नादति सूर सुखाचे दु:खाचीही किणकिण असते असेच स्मरतां तुझे हांसणे सुखदु:खाची सीमा विरते चुंबूनी घेता तुझी कुंतले ओठांवरती धुसफूस दिसते मजला ठाऊक त्यांची खोडी कशाकशाची भ्रांत न उरते कसे सोडवू या हृदयाला तुरूंग बटांचा;सहजी फसते कोण देश हा कसले जग हे? माझे मीपण मला न स्मरते! -गिरीराज

ईश्वर, सगुणातला आणि निर्गुणातला...!

विसोबा खेचर ·

आनंदयात्री Mon, 03/31/2008 - 15:40
छान वाटली. कला ही कला असते, तिच्यात लहानमोठं,डावं-उजवं असं काही नसतं! म्हटलं तर सर्व कला या एकमेकांना पूरक असतात आणि प्रत्यक्ष-प्रत्यक्षरित्या त्या ईश्वर नावाच्या दैवी शक्तिकडे आपल्याला घेऊन जातात, आत्मानंदाचा अनुभव देतात! हे वाक्य एकदम ढासु ! आवडले.

स्वाती राजेश Mon, 03/31/2008 - 15:46
तात्या, तुम्ही तुमची मस्त आठवण लिहिली आहे. खरचं तुमच्या या कथेमुळे कला ही कला असते, तिच्यात लहानमोठं,डावं-उजवं असं काही नसतं! म्हटलं तर सर्व कला या एकमेकांना पूरक असतात आणि प्रत्यक्ष-प्रत्यक्षरित्या त्या ईश्वर नावाच्या दैवी शक्तिकडे आपल्याला घेऊन जातात, आत्मानंदाचा अनुभव देतात! अहो सगुण स्वरुपातली ईश्वराची मूर्ती काय आणि निर्गुण स्वरुपातला, आत्मा तृप्त करणारा अनुभव काय, दोन्ही एकच! आणि हे सगुण-निर्गुण ईश्वरस्वरूप हेच तर सर्व कलांचं निधान, हेच सर्व कलांचं माहेरघर! हे पटते.. अवांतरः तुमच्या कॉलेज मधल्या मुलीसोबत खाल्लेले बटाटा भजीच्या आठवणींमधे ही सुद्धा आठवण येते हे खासच....

सहज Mon, 03/31/2008 - 15:57
ॐकार यांच्या कथेमुळे सुरू झालेली ही साखळी आवडली. तात्यांची अजुन एक आवड ओळखुन, "त्या" कलेला देखील ह्या साखळीत आणता आली. सरते शेवटी तो भक्त एका कवीला गाठतो.. तो कवी म्हणतो, "अरे बाबा, मला लागलीय भूक. जेवुन आत्मा तृप्त झाल्याशिवाय काही प्रेरणा येत नाही की शब्द सुचत नाहीत. भक्ताला कळते की म्हणजे आधी पोटापाण्याची सोय केली पाहीजे, पर्यायाने पाककलेला आमंत्रण द्यायला हवं! :)

धमाल मुलगा Mon, 03/31/2008 - 16:15
आता तात्याबा॑च्या लेखनावर आम्ही पामराने काय प्रतिक्रिया द्यावी ? छान लेख. सरते शेवटी तो भक्त एका कवीला गाठतो.. तो कवी म्हणतो, "अरे बाबा, मला लागलीय भूक. जेवुन आत्मा तृप्त झाल्याशिवाय काही प्रेरणा येत नाही की शब्द सुचत नाहीत. भक्ताला कळते की म्हणजे आधी पोटापाण्याची सोय केली पाहीजे, पर्यायाने पाककलेला आमंत्रण द्यायला हवं! :) चला सहजरावा॑च्या ह्या प्रतिसादाने ही साखळी पुढे चालू ठेवण्याची प्रक्रिया स्वातीताईच्या एखाद्या लेखाने होईल अस॑ दिसत॑य :-))

नंदन Mon, 03/31/2008 - 16:54
लिहिलं आहेस, तात्या. अगदी मनापासून. 'झाड फुलांनी आले बहरुन, तू न पाहिले डोळे उघडून' अशी बर्‍याचदा आपली स्थिती असते. ईश्वरप्राप्तीकरता कुठली मोठी पोथ्यापुराणं वाचातला नकोत की कुठले यागत्याग करायला नकोत! रसिकाच्या नजरेने एखाद्या कलेत मन रमवलं, त्या कलाकृतीशी एकरूप झालं की अगदी क्षणात तिथे ईश्वर दिसायला लागतो, त्याची साक्ष पटते, अनुभूती मिळते, आणि जीव तृप्त होतो! फक्त आपली नजर रसिकाची हवी, रसिकतेची साधना हवी, आपण रसिकाग्रणी हवं, मग ईश्वर फारसा लांब नाही!! -- अशी रसिकता असणं मोठं भाग्याचं. 'रसिकत्वी परतत्त्वस्पर्शु'चा अर्थही कदाचित असाच असावा.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

स्वाती दिनेश Mon, 03/31/2008 - 17:00
ईश्वरप्राप्तीकरता कुठली मोठी पोथ्यापुराणं वाचातला नकोत की कुठले यागत्याग करायला नकोत! रसिकाच्या नजरेने एखाद्या कलेत मन रमवलं, त्या कलाकृतीशी एकरूप झालं की अगदी क्षणात तिथे ईश्वर दिसायला लागतो, त्याची साक्ष पटते, अनुभूती मिळते, आणि जीव तृप्त होतो! फक्त आपली नजर रसिकाची हवी, रसिकतेची साधना हवी, आपण रसिकाग्रणी हवं, मग ईश्वर फारसा लांब नाही!! वा तात्या,हे फारच छान! स्वाती

धोंडोपंत Mon, 03/31/2008 - 17:37
अप्रतिम....केवळ अप्रतिम. शब्दच नाहीत वर्णन करायला. शब्द अन शब्द आवडला, पटला, भावला. तात्या, तुझे लेखन अतिशय प्रगल्भ होते आहे याचा आम्हांदिकांस आत्यंतिक आनंद आहे. असेच उत्तमोत्तम लेखन तुझ्याकडून होत राहो, या शुभेच्छा. आपला, (आनंदित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्राजु Mon, 03/31/2008 - 18:34
तात्या, खूप सुंदर जमला आहे लेख. आणि बाबूजी आणि सावरकरांची आठवण तर खासच..! कला ही कला आहे.. तिच्यामध्ये कमी जास्त, वाईट्-चांगले काहीही नसते.. हे अगदी खरंच आहे. ईश्वरप्राप्तीकरता कुठली मोठी पोथ्यापुराणं वाचातला नकोत की कुठले यागत्याग करायला नकोत! रसिकाच्या नजरेने एखाद्या कलेत मन रमवलं, त्या कलाकृतीशी एकरूप झालं की अगदी क्षणात तिथे ईश्वर दिसायला लागतो, त्याची साक्ष पटते, अनुभूती मिळते, आणि जीव तृप्त होतो! फक्त आपली नजर रसिकाची हवी, रसिकतेची साधना हवी, आपण रसिकाग्रणी हवं, मग ईश्वर फारसा लांब नाही!! हा या कथेतून घेण्यासारखा बोध आहे..असेच मी म्हणेन. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

ॐकार Mon, 03/31/2008 - 19:37
छान आहे. आता चित्रं काढायला वेळ काढलाच पाहिजे :) मित्रमंडळी गोळा करावीत आणि हार्मोनिअम काढून बसावे आणि गाणी बजावणी करावीत असं तुमचा लेख वाचल्यावर वाटू लागले आहे.

विसोबा खेचर Tue, 04/01/2008 - 01:35
आपुलकीने प्रतिसाद देणार्‍या सर्व मंडळींचे मनापासून आभार..! ज्या मंडळींना हे लेखन बरा-वाईट, असा कोणताच प्रतिसाद देण्याच्या लायकीचे वाटले नाही, त्यांचेही आभार..! :) तात्या.

बेसनलाडू Tue, 04/01/2008 - 08:31
छान! ष्टोरीच्या ओघात सहजपणे उलगडत गेलेले कलाविचार आवडले. (कलाकार)बेसनलाडू

आनंदयात्री Mon, 03/31/2008 - 15:40
छान वाटली. कला ही कला असते, तिच्यात लहानमोठं,डावं-उजवं असं काही नसतं! म्हटलं तर सर्व कला या एकमेकांना पूरक असतात आणि प्रत्यक्ष-प्रत्यक्षरित्या त्या ईश्वर नावाच्या दैवी शक्तिकडे आपल्याला घेऊन जातात, आत्मानंदाचा अनुभव देतात! हे वाक्य एकदम ढासु ! आवडले.

स्वाती राजेश Mon, 03/31/2008 - 15:46
तात्या, तुम्ही तुमची मस्त आठवण लिहिली आहे. खरचं तुमच्या या कथेमुळे कला ही कला असते, तिच्यात लहानमोठं,डावं-उजवं असं काही नसतं! म्हटलं तर सर्व कला या एकमेकांना पूरक असतात आणि प्रत्यक्ष-प्रत्यक्षरित्या त्या ईश्वर नावाच्या दैवी शक्तिकडे आपल्याला घेऊन जातात, आत्मानंदाचा अनुभव देतात! अहो सगुण स्वरुपातली ईश्वराची मूर्ती काय आणि निर्गुण स्वरुपातला, आत्मा तृप्त करणारा अनुभव काय, दोन्ही एकच! आणि हे सगुण-निर्गुण ईश्वरस्वरूप हेच तर सर्व कलांचं निधान, हेच सर्व कलांचं माहेरघर! हे पटते.. अवांतरः तुमच्या कॉलेज मधल्या मुलीसोबत खाल्लेले बटाटा भजीच्या आठवणींमधे ही सुद्धा आठवण येते हे खासच....

सहज Mon, 03/31/2008 - 15:57
ॐकार यांच्या कथेमुळे सुरू झालेली ही साखळी आवडली. तात्यांची अजुन एक आवड ओळखुन, "त्या" कलेला देखील ह्या साखळीत आणता आली. सरते शेवटी तो भक्त एका कवीला गाठतो.. तो कवी म्हणतो, "अरे बाबा, मला लागलीय भूक. जेवुन आत्मा तृप्त झाल्याशिवाय काही प्रेरणा येत नाही की शब्द सुचत नाहीत. भक्ताला कळते की म्हणजे आधी पोटापाण्याची सोय केली पाहीजे, पर्यायाने पाककलेला आमंत्रण द्यायला हवं! :)

धमाल मुलगा Mon, 03/31/2008 - 16:15
आता तात्याबा॑च्या लेखनावर आम्ही पामराने काय प्रतिक्रिया द्यावी ? छान लेख. सरते शेवटी तो भक्त एका कवीला गाठतो.. तो कवी म्हणतो, "अरे बाबा, मला लागलीय भूक. जेवुन आत्मा तृप्त झाल्याशिवाय काही प्रेरणा येत नाही की शब्द सुचत नाहीत. भक्ताला कळते की म्हणजे आधी पोटापाण्याची सोय केली पाहीजे, पर्यायाने पाककलेला आमंत्रण द्यायला हवं! :) चला सहजरावा॑च्या ह्या प्रतिसादाने ही साखळी पुढे चालू ठेवण्याची प्रक्रिया स्वातीताईच्या एखाद्या लेखाने होईल अस॑ दिसत॑य :-))

नंदन Mon, 03/31/2008 - 16:54
लिहिलं आहेस, तात्या. अगदी मनापासून. 'झाड फुलांनी आले बहरुन, तू न पाहिले डोळे उघडून' अशी बर्‍याचदा आपली स्थिती असते. ईश्वरप्राप्तीकरता कुठली मोठी पोथ्यापुराणं वाचातला नकोत की कुठले यागत्याग करायला नकोत! रसिकाच्या नजरेने एखाद्या कलेत मन रमवलं, त्या कलाकृतीशी एकरूप झालं की अगदी क्षणात तिथे ईश्वर दिसायला लागतो, त्याची साक्ष पटते, अनुभूती मिळते, आणि जीव तृप्त होतो! फक्त आपली नजर रसिकाची हवी, रसिकतेची साधना हवी, आपण रसिकाग्रणी हवं, मग ईश्वर फारसा लांब नाही!! -- अशी रसिकता असणं मोठं भाग्याचं. 'रसिकत्वी परतत्त्वस्पर्शु'चा अर्थही कदाचित असाच असावा.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

स्वाती दिनेश Mon, 03/31/2008 - 17:00
ईश्वरप्राप्तीकरता कुठली मोठी पोथ्यापुराणं वाचातला नकोत की कुठले यागत्याग करायला नकोत! रसिकाच्या नजरेने एखाद्या कलेत मन रमवलं, त्या कलाकृतीशी एकरूप झालं की अगदी क्षणात तिथे ईश्वर दिसायला लागतो, त्याची साक्ष पटते, अनुभूती मिळते, आणि जीव तृप्त होतो! फक्त आपली नजर रसिकाची हवी, रसिकतेची साधना हवी, आपण रसिकाग्रणी हवं, मग ईश्वर फारसा लांब नाही!! वा तात्या,हे फारच छान! स्वाती

धोंडोपंत Mon, 03/31/2008 - 17:37
अप्रतिम....केवळ अप्रतिम. शब्दच नाहीत वर्णन करायला. शब्द अन शब्द आवडला, पटला, भावला. तात्या, तुझे लेखन अतिशय प्रगल्भ होते आहे याचा आम्हांदिकांस आत्यंतिक आनंद आहे. असेच उत्तमोत्तम लेखन तुझ्याकडून होत राहो, या शुभेच्छा. आपला, (आनंदित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्राजु Mon, 03/31/2008 - 18:34
तात्या, खूप सुंदर जमला आहे लेख. आणि बाबूजी आणि सावरकरांची आठवण तर खासच..! कला ही कला आहे.. तिच्यामध्ये कमी जास्त, वाईट्-चांगले काहीही नसते.. हे अगदी खरंच आहे. ईश्वरप्राप्तीकरता कुठली मोठी पोथ्यापुराणं वाचातला नकोत की कुठले यागत्याग करायला नकोत! रसिकाच्या नजरेने एखाद्या कलेत मन रमवलं, त्या कलाकृतीशी एकरूप झालं की अगदी क्षणात तिथे ईश्वर दिसायला लागतो, त्याची साक्ष पटते, अनुभूती मिळते, आणि जीव तृप्त होतो! फक्त आपली नजर रसिकाची हवी, रसिकतेची साधना हवी, आपण रसिकाग्रणी हवं, मग ईश्वर फारसा लांब नाही!! हा या कथेतून घेण्यासारखा बोध आहे..असेच मी म्हणेन. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

ॐकार Mon, 03/31/2008 - 19:37
छान आहे. आता चित्रं काढायला वेळ काढलाच पाहिजे :) मित्रमंडळी गोळा करावीत आणि हार्मोनिअम काढून बसावे आणि गाणी बजावणी करावीत असं तुमचा लेख वाचल्यावर वाटू लागले आहे.

विसोबा खेचर Tue, 04/01/2008 - 01:35
आपुलकीने प्रतिसाद देणार्‍या सर्व मंडळींचे मनापासून आभार..! ज्या मंडळींना हे लेखन बरा-वाईट, असा कोणताच प्रतिसाद देण्याच्या लायकीचे वाटले नाही, त्यांचेही आभार..! :) तात्या.

बेसनलाडू Tue, 04/01/2008 - 08:31
छान! ष्टोरीच्या ओघात सहजपणे उलगडत गेलेले कलाविचार आवडले. (कलाकार)बेसनलाडू
लेखनप्रकार
राम राम मंडळी, आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे, ष्टोरीच म्हणा ना! :) कथा तशी जुनी आणि पारंपारिकच, १९९५/९६ साली ऐकलेली. खैरागढ विद्यापिठाच्या संगीत विभागात ख्याल गायकीची सौंदर्यस्थळे असं काहीसं शीर्षक असलेल्या कार्यशाळेत मला डॉ जंगम यांनी रसिक श्रोत्याची भूमिका मांडण्याकरता मुद्दाम बोलावलं होतं (येण्याजाण्याचा आणि राहण्याचा खर्च देऊन बरं का!), तेव्हा गप्पांच्या ओघात जंगम साहेबांनी ही कथा मला सांगितली होती. डॉ जंगम तेव्हा त्या विद्यापिठाच्या संगीत विभागाशी निगडित होते, परंतु बर्‍याच वेळेला मुंबईला यायचे व मुंबईतील गाण्याच्या मैफलींमधूनच त्यांची माझी ओळख झाली होती.

एप्रिल फुले(स्वरचित विडंबन गीत गायन)

प्रा सुरेश खेडकर ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
एप्रिल फुले(स्वरचित विडंबन गीत गायन) सादरकर्ते:प्रा.सुरेश खेडकर व सौ.आरती खेडकर निवेदन: किशोर गलांडे आयोजक:सकाळ, मधुरांगण(नागपूर) बुधवार,२ एप्रिल,सायंकाळी ६:३० वाजता मंगलदीप हॉल,छत्रपति चौक,वर्धारोड, नागपूर.

मुलीनेच का नेहमी सासरी जायचं ? - कविता

यशोदेचा घनश्याम ·

स्वाती राजेश Mon, 03/31/2008 - 15:10
आजीने मुलीला किती छान शब्दात उत्तर दिले. कविता आवडली. पण म्हणून नेहमी तीच्यापूढेच नतमस्तक होतात लोकं पापं धुवायला समुद्रात नाही गंगेतच जातत लोकं! खरेच आहे.

मला वाटतं की ही नदी आणि सागराची उपमा ठीक आहे पण याचा अर्थ असा घ्यावा का की लग्नं झालेल्या पुरुषांना कोणीही नमस्कार करत नाही. मला अजूनही काही प्रश्न पडले आहेत, लग्न झालं म्हणून मुलगी "बेकार"ची "गृहिणी" (housewife) का होते, मुलींनीच लग्न झाल्याची जाहिरात (मंगळसुत्र, बांगड्या घालणे इत्यादी) का करावी, नाव नाही बदललं तर काय जातं? मुली दुसरं घरही आपलं मानतात पण पुरुष नाही बायकोच्या माहेराला स्वतःचं घर मानू शकत याचं कारण पुरुषी अहंकार (male ego) हेच असावं असं मला (माझ्या स्वतःच्या अहंकारामुळे) वाटतं. आजच्या जगात जिथे दोघंही नोकरी-व्यवसाय करतात, कामानिमित्त दुसय्राच ठिकाणी जाउन रहातात, लग्नापूर्वी दोघांनाही स्वतःची ओळख (identity) असते त्या काळात ही कविता "इतिहास" म्हणून ठीक आहे पण सामाजिक मूल्यं शिकवण्यासाठी नाही. कविता म्हणून ठीक आहे पण विचार अगदीच मागस आणि सुमार आहेत. संहिता

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या कवितेत स्त्रीयांनीच फक्त जन्मभर त्याग करत रहावं, पुरुषांच्या ईगो पुढे झुकावं, जेणेकरून पूढे जाउन त्यांना दैवत्व दिले जाईल असा; किंवा लग्नं झालेल्या पुरुषांना कोणीही नमस्कार करत नाही असा मतितार्थ नाही असं मला स्पष्ट वाटतं.पुरूषार्थ या उक्तीत, पुरूष हा शब्द असला तरी ती काही पुरुषाची मक्तेदारी नाही हे बर्याच स्त्रीयांनी सिद्ध केले आहे. आणि खरे तर पुरूष आणि स्त्री किंवा आज काल चे पुरुष आणि स्त्री, त्यांचे ईगो आणि त्यामुळे होणारे प्रश्न या गोष्टी या कवितेमुळे पुढे येउ नयेत.
शब्दांच्या पलीकडचा अर्थ समजून घ्यावा. स्वतःकडील उत्तमोत्तम गुणधर्म इतरांना जे देऊ शकतात तेच, आजही श्रेष्ठ ठरतात, असा संदेश मला या कवितेतून मिळाला. जसे, नदी! स्वतःचे गोड पाणी समुद्राला देऊन, नदीचे गोड पाणी कधीच कमी होत नाही.
हा विचार, हा संदेश नक्कीच मागास नाही. सुमार तर नाहिच!... सनातन. हो, सनातन! नित्य नूतनः इति सनातनः. जे कधीही जूने नाही होउ शकत, नेहमी नवे असेच राहते ते सनातन. याअर्थी हा विचार सनातन आहे.
जितका अधिक समाजाशी आपण बांधिल राहू तितका, या मूल्याचा प्रत्यय, परत परत येत राहील, असे मला वाटते.

प्राजु Mon, 03/31/2008 - 18:25
बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतेल्या काही ओळी.. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते..... बस्स! - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

मनस्वी Mon, 03/31/2008 - 18:38
बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतेल्या काही ओळी.. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते.....
वा.. या ओळी झकासच! पण माझ्यामते आज काळ खूप बदलला आहे. आज माहेराशी, आईबाबांशी केवढे संबंध ठेवावेत हे सर्वस्वी मुलीच्या मनावर अवलंबून आहे... हो, आज आईबाबांकडे दुर्लक्ष्य करणार्‍या मुलीदेखील आहेत. आपण बरे, आपला नवरा बरा आणि आपली मुले बरी! आज मुलगी इतकी स्वावलंबी झाली आहे की ती स्वबळावर आईबाबांकडे पूर्ण लक्ष देउ शकते. आणि आजचे सासरही पूर्वीइतके कडक नसते, जर द्यायचेय मुलीला आईबाबांकडे लक्ष तर कोणी तिला आडवत नाही. चांगला जावई असेल तर तोही मुलासारखा रहातो. काहीठीकाणी नसते अशी परिस्थिती. पण अंतिमदर्शी सर्व मुलीच्याच मनावर असते.

विजुभाऊ Mon, 03/31/2008 - 23:25
मला प्रश्न पडतो :लग्नापूर्वी खूप काही तरी करत असणार्‍या मुली उदा: चांगली चित्रकला/ गाणे/ क्राफ्ट वर्क ई करत असणार्‍या मूलींचे नन्तर काय होते?त्यांची हुशारी कोठे जाते?

मीनल Tue, 04/01/2008 - 03:17
हा तर सॄष्टीचा नियम आहे नदी ,सागरापुरत ठिक आहे. पण मुलींनी सासरी जायच हा काही सॄष्टीचा नियम नाही. तो आपण माणसाने बनवलेला ,सामजिक नियम आहे.तोही भारतात मुख्यत्वे. तसं चीन ,कोरिया ,जपान वगैरे आशियी देशातही आहे . म्हणजे होता असं म्हणाव लागेल. चीन मधे तर ,मुलाच स्वतःच घर नसेल तर मुली लग्न करत नाहित.तश्याच एकत्र राहतात. हुशार आहेत की मुल होऊ देत नाहित. जपान, कोरिया अजूनही थोड परंपरा जपणार आहे .पण भारत सर्वात `बाप` आहे. अजूनही. मुलींनी का आपल अस्तित्व विसराव? पूर्वी असेल तस जेव्हा स्त्रीयांना स्वयंपाकघरात डांबून ठेवल होत. पण आता `आपल ओपिनियन` नसलेली बेअक्कल स्त्री कोणी बायको म्हणून स्विकारेल का? आपली बायको ही एक स्वतंत्र व्य क्तिमत्व आहे हे पुरूषांनी मान्य केले पाहिजे.नेहमीच.आपल्या सोयीनुसार नव्हे. लग्नापूर्वी खूप काही तरी करत असणार्‍या मुली उदा: चांगली चित्रकला/ गाणे/ क्राफ्ट वर्क ई करत असणार्‍या मूलींचे नन्तर काय होते?त्यांची हुशारी कोठे जाते? मी याच प्रकारातली. पण ते केले आही म्हणजे हुशारी जाते का? चित्र काढल नाही म्हणून ती कला जाते ?नाही.फक्त त्याचा व्यासंग चालू रहात नाही. जिवनातल्या प्रायोरिटिज बदलतात.जबाबदा-या वाढतात. हॉबी जपायला वेळ मिळत नाही.पण वेळ /संधी आलीच तर ती कला समोर येतेच अपोआप. आनंद देते ,आठवणींना उजाळा देते. त्यातून मिपासारखी स्थळ आहेतच आपली लेखन कला /बुध्दी /वैशिष्ट्य दाखवण्याचा.

स्वाती राजेश Mon, 03/31/2008 - 15:10
आजीने मुलीला किती छान शब्दात उत्तर दिले. कविता आवडली. पण म्हणून नेहमी तीच्यापूढेच नतमस्तक होतात लोकं पापं धुवायला समुद्रात नाही गंगेतच जातत लोकं! खरेच आहे.

मला वाटतं की ही नदी आणि सागराची उपमा ठीक आहे पण याचा अर्थ असा घ्यावा का की लग्नं झालेल्या पुरुषांना कोणीही नमस्कार करत नाही. मला अजूनही काही प्रश्न पडले आहेत, लग्न झालं म्हणून मुलगी "बेकार"ची "गृहिणी" (housewife) का होते, मुलींनीच लग्न झाल्याची जाहिरात (मंगळसुत्र, बांगड्या घालणे इत्यादी) का करावी, नाव नाही बदललं तर काय जातं? मुली दुसरं घरही आपलं मानतात पण पुरुष नाही बायकोच्या माहेराला स्वतःचं घर मानू शकत याचं कारण पुरुषी अहंकार (male ego) हेच असावं असं मला (माझ्या स्वतःच्या अहंकारामुळे) वाटतं. आजच्या जगात जिथे दोघंही नोकरी-व्यवसाय करतात, कामानिमित्त दुसय्राच ठिकाणी जाउन रहातात, लग्नापूर्वी दोघांनाही स्वतःची ओळख (identity) असते त्या काळात ही कविता "इतिहास" म्हणून ठीक आहे पण सामाजिक मूल्यं शिकवण्यासाठी नाही. कविता म्हणून ठीक आहे पण विचार अगदीच मागस आणि सुमार आहेत. संहिता

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या कवितेत स्त्रीयांनीच फक्त जन्मभर त्याग करत रहावं, पुरुषांच्या ईगो पुढे झुकावं, जेणेकरून पूढे जाउन त्यांना दैवत्व दिले जाईल असा; किंवा लग्नं झालेल्या पुरुषांना कोणीही नमस्कार करत नाही असा मतितार्थ नाही असं मला स्पष्ट वाटतं.पुरूषार्थ या उक्तीत, पुरूष हा शब्द असला तरी ती काही पुरुषाची मक्तेदारी नाही हे बर्याच स्त्रीयांनी सिद्ध केले आहे. आणि खरे तर पुरूष आणि स्त्री किंवा आज काल चे पुरुष आणि स्त्री, त्यांचे ईगो आणि त्यामुळे होणारे प्रश्न या गोष्टी या कवितेमुळे पुढे येउ नयेत.
शब्दांच्या पलीकडचा अर्थ समजून घ्यावा. स्वतःकडील उत्तमोत्तम गुणधर्म इतरांना जे देऊ शकतात तेच, आजही श्रेष्ठ ठरतात, असा संदेश मला या कवितेतून मिळाला. जसे, नदी! स्वतःचे गोड पाणी समुद्राला देऊन, नदीचे गोड पाणी कधीच कमी होत नाही.
हा विचार, हा संदेश नक्कीच मागास नाही. सुमार तर नाहिच!... सनातन. हो, सनातन! नित्य नूतनः इति सनातनः. जे कधीही जूने नाही होउ शकत, नेहमी नवे असेच राहते ते सनातन. याअर्थी हा विचार सनातन आहे.
जितका अधिक समाजाशी आपण बांधिल राहू तितका, या मूल्याचा प्रत्यय, परत परत येत राहील, असे मला वाटते.

प्राजु Mon, 03/31/2008 - 18:25
बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतेल्या काही ओळी.. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते..... बस्स! - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

मनस्वी Mon, 03/31/2008 - 18:38
बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतेल्या काही ओळी.. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते.....
वा.. या ओळी झकासच! पण माझ्यामते आज काळ खूप बदलला आहे. आज माहेराशी, आईबाबांशी केवढे संबंध ठेवावेत हे सर्वस्वी मुलीच्या मनावर अवलंबून आहे... हो, आज आईबाबांकडे दुर्लक्ष्य करणार्‍या मुलीदेखील आहेत. आपण बरे, आपला नवरा बरा आणि आपली मुले बरी! आज मुलगी इतकी स्वावलंबी झाली आहे की ती स्वबळावर आईबाबांकडे पूर्ण लक्ष देउ शकते. आणि आजचे सासरही पूर्वीइतके कडक नसते, जर द्यायचेय मुलीला आईबाबांकडे लक्ष तर कोणी तिला आडवत नाही. चांगला जावई असेल तर तोही मुलासारखा रहातो. काहीठीकाणी नसते अशी परिस्थिती. पण अंतिमदर्शी सर्व मुलीच्याच मनावर असते.

विजुभाऊ Mon, 03/31/2008 - 23:25
मला प्रश्न पडतो :लग्नापूर्वी खूप काही तरी करत असणार्‍या मुली उदा: चांगली चित्रकला/ गाणे/ क्राफ्ट वर्क ई करत असणार्‍या मूलींचे नन्तर काय होते?त्यांची हुशारी कोठे जाते?

मीनल Tue, 04/01/2008 - 03:17
हा तर सॄष्टीचा नियम आहे नदी ,सागरापुरत ठिक आहे. पण मुलींनी सासरी जायच हा काही सॄष्टीचा नियम नाही. तो आपण माणसाने बनवलेला ,सामजिक नियम आहे.तोही भारतात मुख्यत्वे. तसं चीन ,कोरिया ,जपान वगैरे आशियी देशातही आहे . म्हणजे होता असं म्हणाव लागेल. चीन मधे तर ,मुलाच स्वतःच घर नसेल तर मुली लग्न करत नाहित.तश्याच एकत्र राहतात. हुशार आहेत की मुल होऊ देत नाहित. जपान, कोरिया अजूनही थोड परंपरा जपणार आहे .पण भारत सर्वात `बाप` आहे. अजूनही. मुलींनी का आपल अस्तित्व विसराव? पूर्वी असेल तस जेव्हा स्त्रीयांना स्वयंपाकघरात डांबून ठेवल होत. पण आता `आपल ओपिनियन` नसलेली बेअक्कल स्त्री कोणी बायको म्हणून स्विकारेल का? आपली बायको ही एक स्वतंत्र व्य क्तिमत्व आहे हे पुरूषांनी मान्य केले पाहिजे.नेहमीच.आपल्या सोयीनुसार नव्हे. लग्नापूर्वी खूप काही तरी करत असणार्‍या मुली उदा: चांगली चित्रकला/ गाणे/ क्राफ्ट वर्क ई करत असणार्‍या मूलींचे नन्तर काय होते?त्यांची हुशारी कोठे जाते? मी याच प्रकारातली. पण ते केले आही म्हणजे हुशारी जाते का? चित्र काढल नाही म्हणून ती कला जाते ?नाही.फक्त त्याचा व्यासंग चालू रहात नाही. जिवनातल्या प्रायोरिटिज बदलतात.जबाबदा-या वाढतात. हॉबी जपायला वेळ मिळत नाही.पण वेळ /संधी आलीच तर ती कला समोर येतेच अपोआप. आनंद देते ,आठवणींना उजाळा देते. त्यातून मिपासारखी स्थळ आहेतच आपली लेखन कला /बुध्दी /वैशिष्ट्य दाखवण्याचा.
लेखनविषय:
एका ई-मेल मधून आलेली कविता - कवी / कवयित्री माहित नाहित. ती एकदा आजीला म्हणाली... मुलीनेच का गं नेहमी सासरी जायचं ? आपली माणसं सोडून तीनेच का परकं घर आपलं मानायचं? तिच्याकडूनच का अपेक्षा जूनं अस्तित्व विसरायची? तिच्यावरच का जबरदस्ती नवीन नाव वापरायची? आजी म्हणाली अगं वेडे हा तर सॄष्टीचा नियम आहे नदी नाही का जात सागराकडे आपलं घर सोडून! तो येतो का कधीतरी तिच्याकडे आपली वाट मोडून! तीचं पाणी किती गोड...

आईस्क्रीम वडे

मनापासुन ·

मनापासुन Mon, 03/31/2008 - 13:16
बेसन पीठ बाटावड्या साठी बिजवतात तेवढे पातळ भिजवावे. बेसन पीठ बटाटावड्या साठी भीजवतात तेवढे पातळ भिजवावे.. चूक भूल मनापासुन द्यावी घ्यावी

प्राजु Tue, 04/01/2008 - 04:56
नावावरून पदार्थ जरा विचित्रच वाटतो आहे. एक शंका : तळण्यासाठी तेलात घातल्यावर ते आईस्क्रिम वितळेल ना. आणि तेलात पसरेल. आणि मुख्य म्हणजे.. अगदी लगेच तळून काढले तर ते बेसन कच्चे राहिल असे वाटते. जरा सविस्तर शंका निरसन करावे. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

In reply to by विसोबा खेचर

प्रभाकर पेठकर Tue, 04/01/2008 - 10:11
आइस्क्रिम सॉफ्ट स्कूप वर्गीय नसावे. जरा कठीण असावे. वडे तीव्र आंचेवर तळल्यावर समस्या उद्भवू नये. तेल धूर येण्या इतपत तापलेले असावे. वडा तेलात सोडल्यावर वरील आवरण लगेच 'सेट' व्हावे आणि आंत पर्यंत उष्णता पोहोचायच्या आत आवरण शिजले पाहीजे. वडा जास्त वेळ तेलात राहता कामा नये.

मनापासुन Tue, 04/01/2008 - 10:48
पेटकर काका बरोबर आहे तुमचे. पण हे फ्राईड आईस्क्रीम नाही्आ आईस्क्रीम वडाच आहे. बेसन पीठ पातळ ठेवायचे म्हणजे ते कच्चे रहात नाही .उलत ते पातळ असल्याने मस्त कडक कुरकुरीत होते. पदार्थ नावावरुन च नव्हे तसाही थोडा विचित्र आहे. आवडला तर आपण त्याचे ऍडीक्ट होतो. नाही तर आयुष्यभर फजीती सांगत रहातो

मनापासुन Mon, 03/31/2008 - 13:16
बेसन पीठ बाटावड्या साठी बिजवतात तेवढे पातळ भिजवावे. बेसन पीठ बटाटावड्या साठी भीजवतात तेवढे पातळ भिजवावे.. चूक भूल मनापासुन द्यावी घ्यावी

प्राजु Tue, 04/01/2008 - 04:56
नावावरून पदार्थ जरा विचित्रच वाटतो आहे. एक शंका : तळण्यासाठी तेलात घातल्यावर ते आईस्क्रिम वितळेल ना. आणि तेलात पसरेल. आणि मुख्य म्हणजे.. अगदी लगेच तळून काढले तर ते बेसन कच्चे राहिल असे वाटते. जरा सविस्तर शंका निरसन करावे. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

In reply to by विसोबा खेचर

प्रभाकर पेठकर Tue, 04/01/2008 - 10:11
आइस्क्रिम सॉफ्ट स्कूप वर्गीय नसावे. जरा कठीण असावे. वडे तीव्र आंचेवर तळल्यावर समस्या उद्भवू नये. तेल धूर येण्या इतपत तापलेले असावे. वडा तेलात सोडल्यावर वरील आवरण लगेच 'सेट' व्हावे आणि आंत पर्यंत उष्णता पोहोचायच्या आत आवरण शिजले पाहीजे. वडा जास्त वेळ तेलात राहता कामा नये.

मनापासुन Tue, 04/01/2008 - 10:48
पेटकर काका बरोबर आहे तुमचे. पण हे फ्राईड आईस्क्रीम नाही्आ आईस्क्रीम वडाच आहे. बेसन पीठ पातळ ठेवायचे म्हणजे ते कच्चे रहात नाही .उलत ते पातळ असल्याने मस्त कडक कुरकुरीत होते. पदार्थ नावावरुन च नव्हे तसाही थोडा विचित्र आहे. आवडला तर आपण त्याचे ऍडीक्ट होतो. नाही तर आयुष्यभर फजीती सांगत रहातो
नवी पाक क्रुती: बेसन पीठ बाटावड्या साठी बिजवतात तेवढे पातळ भिजवावे.त्यात चवीसाठी मीठ जिरे टाकावे , त्यात हवे असल्यास काजु /बदाम कापुन टाकावेत. गोडे तेल कढईत उकळत ठेवावे. आईस क्रीम ( वॅनीला) स्कूप ( गोळा)घेउन तो बेसन पीठात वड्याप्रमाने बुडवुन घ्यावा.व तो पटकन तळुन घ्यावा. आईस क्रीम तेवढ्याच पटकन खावे...गरम वडा- गार आइस क्रीम झकास कॉम्बीनेशन होते सू:..हा पदार्थ दिल्लीत "नुरूलाज" ची स्पेशालीटी आहे.लोक रांगा लाउन खाण्यासाठी उभे असतात. उ.सु: वडे तळुन काढणे आणि खाणे यात अंतर असु नये.

जन्म चारोळीचा.....

उदय सप्रे ·

मनापासुन Mon, 03/31/2008 - 11:59
नको देवराया अंत आता पाहु चारोळी आरोळी बंद ठेव पाहु वांझोट्या प्रेमातुन चारोळी जन्मास आली प्रसव वेदना ईतरांस देउन गेली

मनापासुन Mon, 03/31/2008 - 11:59
नको देवराया अंत आता पाहु चारोळी आरोळी बंद ठेव पाहु वांझोट्या प्रेमातुन चारोळी जन्मास आली प्रसव वेदना ईतरांस देउन गेली
लेखनविषय:
मला तिष्ठत उभे ठेऊन तू नाही नाही ते बोललीस तू गेलीस आणि भानावर येत मनाची आरोळी आली तू दिलेल्या वेदनामय शब्दांना ओळीत उभे करून माझ्या "वांझोट्या" प्रेमाची चारोळी झाली !

गाण्यांच्या शोधात

ॐकार ·

मुक्तसुनीत Mon, 03/31/2008 - 04:20
ॐकाररावांचे मी सर्वप्रथम एका उत्तम प्रतीच्या स्फुटाच्या लिखाणाबद्दल अभिनंदन करतो. काही गोष्टी या अनेक वर्षांच्या सहवासाने , त्यांच्या वारंवार केलेल्या श्रवणाने, आवृतीने, दर्शनाने, (अगदी गंधाने सुद्धा !) आपल्या मनावर खोल संस्कार करतात. आणि काही थोड्या गोष्टी या आपल्या अबोध मनात वास करून असतात. ॐकार यांनी अशा जातीच्या एका अनुभवाला त्यांच्या अबोध मनातून एखाद्या प्रयोगशाळेतल्या वैज्ञानिकासारखे आपल्या शब्दांच्या चिमटीमधे पकडून , आपल्या विश्लेषणादि साधनांच्या मायक्रोस्कोपखाली घालून तपासले आहे. पण हा अभ्यास, हा मागोवा निर्जीव नाही., भावनारहित शुष्क नाही. या एका गाण्याचे नि आपले नाते काय ? त्या गाण्यातल्या व्यक्त झालेल्या अनुभवाचे नि आपले नाते काय ? एका पुरुषकवीने लिहिलेल्या एका स्त्रीच्या मनातील कल्लोळाला एक संगीतकार अशी , हृदयाच्या आर्त स्वरांच्या तारा छेडणारी चाल बांधतो. त्यातील निसर्गाच्या चित्रणाचे , त्या रौद्रभीषण पावसाळी रात्रीच्या पूराचे त्या चालीशी, त्यातल्या पार्श्वसंगीताशी असे काही नाते जुळलेले असते. आणि हे गाणे गाणारा तो दिव्य स्वर ! त्याचे वर्णन पामर शब्दानी काय करायचे ? आणि हे सगळे ऐकणारे आपण. >>>>> ह्या कडव्याचा मी अजून पत्ता शोधतो आहे. गाणं ऐकताना कधी मी या भावनेपर्यंत पोहोचलोच नाही. तेवढी कुवत माझ्या गाठीशी नसावी. चित्राचा हाच एक कोपरा. दुमडलेला. आज उद्या ठाव लागेलच. पण तोवर जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्ह्या परत हे चित्रं आणखी ताकदीनं समोर उभं राहतं. त्या दुमडलेल्या कोपर्‍यासहित! एखादे गाणे कोट्यावधी लोक शेकडोवेळा ऐकतात. पण कुणीसे म्हण्टले आहे ना , "बडी मुष्किलसे होता है चमन में दीदावर पैदा !" ॐकार यांच्या दीदावरीला माझा कुर्निसात.

मीनल Mon, 03/31/2008 - 07:20
सुंदर! स्वरांबद्दल ,शब्दांबद्दल ,त्यातून तुम्हाला कळलेल्या ,न कळलेल्या अर्थाबद्दल छान लिहिले आहे. कधी कधी ही जुनी गाणी नुसतीच ऐकतो आपण. पण विचारच करत नाही त्या विषयाचा! चाल आठवून गात राहिली जातात काही गाणी त्यांचा अर्थ असा शोधावासा वाटतो तुम्ही लिहिलेल्या लेखावरून. हे गाण म्हणजे एक चित्र.आणि तुम्ही एक कोपरा. सर्वसाधारण पणे वाचक ,श्रोता ,प्रेक्षक स्वतःला केंद्रस्थानी मानतो आणि कथा आपल्या भोवती गुंडाळून घेतो. इथे नेमक वेगळ आहे काहीसं! असाधारण! आपल्या चित्रातील `दुमडलेल्या कोप-याची ` उपमा अप्रतिम आहे. `एका पुरूषाने स्वतःला स्त्री रूपात पाहणे `हे त्या गाण्याच श्रेय.लिहिणा-याच आणि गाणा-याच. पण तो श्रोता तितक्या प्रामाणिकपणे त्यात मिसळून जातो ही त्या श्रोत्याची रसिकता! आपले अजून असेच लेख वाचायला मिळावेत अशी इच्छा आहे.

विसोबा खेचर Mon, 03/31/2008 - 07:42
क्या बात है ॐकारशेठ! या गाण्याचं तू अतिशय सुरेख रसग्रहण केलं आहेस! काही गाणी ही सहजसोपी असतात व तेवढीच सुंदर असतात, तर काही गाणी सुंदर असतात परंतु तेवढी सहज सोपी नसतात, कठीण असतात. हृदयनाथ मंगेशकरांची बरीचशी गाणी ही या दुसर्‍या प्रकारात मोडतात. म्हणजे सुरेख परंतु तेवढीच कठीण! मला विचारशील तर हे 'असा बेभान...' हे गाणंही सर्वच दृष्टीने (म्हणजे शब्द,चाल, म्हणणे) अतिशय कठीण गाणं आहे तरीही फार सुरेख आहे! आणि या कठीण परंतु अत्यंत सुरेख गाण्याचं तू तेवढंच सुरेख रसग्रहणही केलं आहेस हे मला विशेष वाटतं! मनापासून अभिनंदन...! गाणं ऐकताना कधी मी या भावनेपर्यंत पोहोचलोच नाही. तेवढी कुवत माझ्या गाठीशी नसावी. चित्राचा हाच एक कोपरा. दुमडलेला. आज उद्या ठाव लागेलच. नक्कीच लागेल! गाण्याची श्रवणभक्ति, गाण्याची साधना नेहमीच फलदायी होते! मात्र वारंवार डुबक्या मारून खोल समुद्राच्या तळाशी सतत जात राहिलं पाहिजे, त्यातली रत्न, माणिकमोती शोधण्यासाठी! एका सुंदर रसग्रहणाबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन! खूप सुंदररित्या तू या गाण्याकडे बघितलं आहेस! अजूनही अश्याच काही तुझ्या मनाचा ठाव घेतलेल्या गाण्यांबद्दल इथे लिही, ही विनंती... आपला, (गानप्रेमी!) तात्या.

मदनबाण Mon, 03/31/2008 - 08:07
ॐकार सर आपल गाण्याच भाव विष्लेषण अगदी जबरदस्त आहे. आपले अजुन असेच लेख वाचण्याचा आनंद सर्व मि.पा करांना सदैव मिळो..... (एक-दोन तोडके मोडके शब्द सुद्धा सरळ न लिहु शकणारा) मदनबाण

सहज Mon, 03/31/2008 - 08:36
ॐकार, अतिशय सुंदर रसास्वाद!! मुक्तसुनित यांचा प्रतिसाद देखील नेहमीप्रमाणेच सुबोध.

प्राजु Mon, 03/31/2008 - 08:45
ॐकार, अतिशय सुंदर.. आपण इतके सुंदर रसग्रहण केले आहे की आता लगेच हे गाणे ऐकण्याची इच्छा होते आहे. कितिदा ऐकले तरी समाधान होत नाही. आपले अभिनंदन या सुंदर गाण्याच्या सुरेख रसग्रहणाबद्दल. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

प्रमोद देव Mon, 03/31/2008 - 08:54
ॐकार अतिशय उत्तम असे रसग्रहण सादर केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! गाण्यातला भाव,त्या भावांना पोषक असे संगीत आणि रसिक श्रोत्याला त्यातून जाणवणारी अभिव्यक्ती , अशा तिन्ही अंगांचे अतिशय समर्पक शब्दात केलेले वर्णन आवडले.

आनंदयात्री Mon, 03/31/2008 - 10:38
हा बेभान ... हे गाणे तुम्ही म्हणता तसे खरोखरच चित्रदर्शी आहे. बाकी गाणे एकतांनाच्या रसग्रहणाचे, आपल्या मनातल्या भावभावनांचे तुम्ही अत्यंत सुंदर तरल पदर उलगडुन दाखवले आहेत, धन्यवाद. >>जास्त विचार केला तर अनेक शास्त्रीय कसोट्या सांगता येतील. त्या कसोट्यांची रसिकतेला मात्र काही गरज नाही. अंतर्बाह्य असतं ते गाणं. त्यात शब्द , ताल , सूर , लय काहीच वेगळं नसतं. सगळं एकजीव असतं. १००% सहमत. अशाच रितीने गाण्याचा निखळ आनंद घ्यायला आवडतो.

नीलकांत Mon, 03/31/2008 - 12:50
वाह ! ओंकार खुप छान लिहीलं आहेस. गाणं माझ्या आवडीचं आहेच आता ते अधीक गहीरं झालं असं मी म्हणू शकतो. उत्तम रसग्रहणाबद्दल धन्यवाद. नीलकांत

स्वाती राजेश Mon, 03/31/2008 - 15:25
प्रथम अभिनंदन कारण इतके सुंदर आणि सोपे रसग्रहण केले आहे म्हणून. आता विनंती अशाच सुंदर गाण्यांचे रसग्रहण आम्हाला वाचायला मिळू दे...

चतुरंग Mon, 03/31/2008 - 16:52
पाडगावकरांच्या ह्या शब्दांमागे काय भावना असतील ह्याचा शोध घेण्याचा अतिशय मर्मज्ञ प्रयत्न तुम्ही केलेला आहे त्याबद्दल तुमचे अभिनंदन! हृदयनाथांनी गाणे सुरू होतानाच्या वापरलेल्या व्हायोलिनच्या सूरलाटा एका क्षणात घोंघावणारे वारे आणि लाटांचा प्रत्ययकारी आसमंत उभा करतात आणि तीच लाट दीदी त्यांच्या स्वर्गीय आवाजाने कुठल्याकुठे घेऊन जातात, आताही माझ्या कानात ते गाणं घुमू लागलं आहे! चराचरातल्या अमरत्वाचा स्पर्श घेऊन आलेल्या अशा काही मोजक्याच कलाकृती असतात ज्या आपल्या दृश्य अस्तित्वापलीकडचा असा दिव्य अनुभव देऊन जातात जो ओंजळीत घेता येत नाही. तुमच्या रसग्रहणातून तुम्ही त्या मागच्या तुमच्या अनुभूती पोचवल्या आहेत की तुम्हाला आणि आम्हाला जोडून जातात! चतुरंग

केशवराव Mon, 03/31/2008 - 20:10
रसग्रहणाचा उत्तम नमुना पेश केल्याबद्दल खरच कौतूक. मनापासून कौतुक ! आपण गाणे कितीतरी वेळा ऐकतो. माझे अत्यंत आवडते गाणे. माझ्याच भावनांना आपण साकारल्या सारखे वाटले. हे श्रेय त्या गाण्याचे. अनेक जणांच्या मनांत एक सारखेच्य्ह चित्र साकारणे ,एकच परीणाम करणे, हे त्या गाण्याचेच श्रेय होय. ह्या गाण्याचे गीतकार, गायिका याचबरोबर संगितकार हा ही श्रेष्ठच होय . स्वरांतून चित्र उभे करणे निश्चीतच दाद देण्याजोगी गोष्ट आहे. पण या सर्वापेक्षा आपले रसग्रहण फारच उतम . त्रिवार कौतुक. - - - - - - - केशवराव.

मुक्तसुनीत Mon, 03/31/2008 - 04:20
ॐकाररावांचे मी सर्वप्रथम एका उत्तम प्रतीच्या स्फुटाच्या लिखाणाबद्दल अभिनंदन करतो. काही गोष्टी या अनेक वर्षांच्या सहवासाने , त्यांच्या वारंवार केलेल्या श्रवणाने, आवृतीने, दर्शनाने, (अगदी गंधाने सुद्धा !) आपल्या मनावर खोल संस्कार करतात. आणि काही थोड्या गोष्टी या आपल्या अबोध मनात वास करून असतात. ॐकार यांनी अशा जातीच्या एका अनुभवाला त्यांच्या अबोध मनातून एखाद्या प्रयोगशाळेतल्या वैज्ञानिकासारखे आपल्या शब्दांच्या चिमटीमधे पकडून , आपल्या विश्लेषणादि साधनांच्या मायक्रोस्कोपखाली घालून तपासले आहे. पण हा अभ्यास, हा मागोवा निर्जीव नाही., भावनारहित शुष्क नाही. या एका गाण्याचे नि आपले नाते काय ? त्या गाण्यातल्या व्यक्त झालेल्या अनुभवाचे नि आपले नाते काय ? एका पुरुषकवीने लिहिलेल्या एका स्त्रीच्या मनातील कल्लोळाला एक संगीतकार अशी , हृदयाच्या आर्त स्वरांच्या तारा छेडणारी चाल बांधतो. त्यातील निसर्गाच्या चित्रणाचे , त्या रौद्रभीषण पावसाळी रात्रीच्या पूराचे त्या चालीशी, त्यातल्या पार्श्वसंगीताशी असे काही नाते जुळलेले असते. आणि हे गाणे गाणारा तो दिव्य स्वर ! त्याचे वर्णन पामर शब्दानी काय करायचे ? आणि हे सगळे ऐकणारे आपण. >>>>> ह्या कडव्याचा मी अजून पत्ता शोधतो आहे. गाणं ऐकताना कधी मी या भावनेपर्यंत पोहोचलोच नाही. तेवढी कुवत माझ्या गाठीशी नसावी. चित्राचा हाच एक कोपरा. दुमडलेला. आज उद्या ठाव लागेलच. पण तोवर जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्ह्या परत हे चित्रं आणखी ताकदीनं समोर उभं राहतं. त्या दुमडलेल्या कोपर्‍यासहित! एखादे गाणे कोट्यावधी लोक शेकडोवेळा ऐकतात. पण कुणीसे म्हण्टले आहे ना , "बडी मुष्किलसे होता है चमन में दीदावर पैदा !" ॐकार यांच्या दीदावरीला माझा कुर्निसात.

मीनल Mon, 03/31/2008 - 07:20
सुंदर! स्वरांबद्दल ,शब्दांबद्दल ,त्यातून तुम्हाला कळलेल्या ,न कळलेल्या अर्थाबद्दल छान लिहिले आहे. कधी कधी ही जुनी गाणी नुसतीच ऐकतो आपण. पण विचारच करत नाही त्या विषयाचा! चाल आठवून गात राहिली जातात काही गाणी त्यांचा अर्थ असा शोधावासा वाटतो तुम्ही लिहिलेल्या लेखावरून. हे गाण म्हणजे एक चित्र.आणि तुम्ही एक कोपरा. सर्वसाधारण पणे वाचक ,श्रोता ,प्रेक्षक स्वतःला केंद्रस्थानी मानतो आणि कथा आपल्या भोवती गुंडाळून घेतो. इथे नेमक वेगळ आहे काहीसं! असाधारण! आपल्या चित्रातील `दुमडलेल्या कोप-याची ` उपमा अप्रतिम आहे. `एका पुरूषाने स्वतःला स्त्री रूपात पाहणे `हे त्या गाण्याच श्रेय.लिहिणा-याच आणि गाणा-याच. पण तो श्रोता तितक्या प्रामाणिकपणे त्यात मिसळून जातो ही त्या श्रोत्याची रसिकता! आपले अजून असेच लेख वाचायला मिळावेत अशी इच्छा आहे.

विसोबा खेचर Mon, 03/31/2008 - 07:42
क्या बात है ॐकारशेठ! या गाण्याचं तू अतिशय सुरेख रसग्रहण केलं आहेस! काही गाणी ही सहजसोपी असतात व तेवढीच सुंदर असतात, तर काही गाणी सुंदर असतात परंतु तेवढी सहज सोपी नसतात, कठीण असतात. हृदयनाथ मंगेशकरांची बरीचशी गाणी ही या दुसर्‍या प्रकारात मोडतात. म्हणजे सुरेख परंतु तेवढीच कठीण! मला विचारशील तर हे 'असा बेभान...' हे गाणंही सर्वच दृष्टीने (म्हणजे शब्द,चाल, म्हणणे) अतिशय कठीण गाणं आहे तरीही फार सुरेख आहे! आणि या कठीण परंतु अत्यंत सुरेख गाण्याचं तू तेवढंच सुरेख रसग्रहणही केलं आहेस हे मला विशेष वाटतं! मनापासून अभिनंदन...! गाणं ऐकताना कधी मी या भावनेपर्यंत पोहोचलोच नाही. तेवढी कुवत माझ्या गाठीशी नसावी. चित्राचा हाच एक कोपरा. दुमडलेला. आज उद्या ठाव लागेलच. नक्कीच लागेल! गाण्याची श्रवणभक्ति, गाण्याची साधना नेहमीच फलदायी होते! मात्र वारंवार डुबक्या मारून खोल समुद्राच्या तळाशी सतत जात राहिलं पाहिजे, त्यातली रत्न, माणिकमोती शोधण्यासाठी! एका सुंदर रसग्रहणाबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन! खूप सुंदररित्या तू या गाण्याकडे बघितलं आहेस! अजूनही अश्याच काही तुझ्या मनाचा ठाव घेतलेल्या गाण्यांबद्दल इथे लिही, ही विनंती... आपला, (गानप्रेमी!) तात्या.

मदनबाण Mon, 03/31/2008 - 08:07
ॐकार सर आपल गाण्याच भाव विष्लेषण अगदी जबरदस्त आहे. आपले अजुन असेच लेख वाचण्याचा आनंद सर्व मि.पा करांना सदैव मिळो..... (एक-दोन तोडके मोडके शब्द सुद्धा सरळ न लिहु शकणारा) मदनबाण

सहज Mon, 03/31/2008 - 08:36
ॐकार, अतिशय सुंदर रसास्वाद!! मुक्तसुनित यांचा प्रतिसाद देखील नेहमीप्रमाणेच सुबोध.

प्राजु Mon, 03/31/2008 - 08:45
ॐकार, अतिशय सुंदर.. आपण इतके सुंदर रसग्रहण केले आहे की आता लगेच हे गाणे ऐकण्याची इच्छा होते आहे. कितिदा ऐकले तरी समाधान होत नाही. आपले अभिनंदन या सुंदर गाण्याच्या सुरेख रसग्रहणाबद्दल. - (सर्वव्यापी)प्राजु www.praaju.blogspot.com

प्रमोद देव Mon, 03/31/2008 - 08:54
ॐकार अतिशय उत्तम असे रसग्रहण सादर केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! गाण्यातला भाव,त्या भावांना पोषक असे संगीत आणि रसिक श्रोत्याला त्यातून जाणवणारी अभिव्यक्ती , अशा तिन्ही अंगांचे अतिशय समर्पक शब्दात केलेले वर्णन आवडले.

आनंदयात्री Mon, 03/31/2008 - 10:38
हा बेभान ... हे गाणे तुम्ही म्हणता तसे खरोखरच चित्रदर्शी आहे. बाकी गाणे एकतांनाच्या रसग्रहणाचे, आपल्या मनातल्या भावभावनांचे तुम्ही अत्यंत सुंदर तरल पदर उलगडुन दाखवले आहेत, धन्यवाद. >>जास्त विचार केला तर अनेक शास्त्रीय कसोट्या सांगता येतील. त्या कसोट्यांची रसिकतेला मात्र काही गरज नाही. अंतर्बाह्य असतं ते गाणं. त्यात शब्द , ताल , सूर , लय काहीच वेगळं नसतं. सगळं एकजीव असतं. १००% सहमत. अशाच रितीने गाण्याचा निखळ आनंद घ्यायला आवडतो.

नीलकांत Mon, 03/31/2008 - 12:50
वाह ! ओंकार खुप छान लिहीलं आहेस. गाणं माझ्या आवडीचं आहेच आता ते अधीक गहीरं झालं असं मी म्हणू शकतो. उत्तम रसग्रहणाबद्दल धन्यवाद. नीलकांत

स्वाती राजेश Mon, 03/31/2008 - 15:25
प्रथम अभिनंदन कारण इतके सुंदर आणि सोपे रसग्रहण केले आहे म्हणून. आता विनंती अशाच सुंदर गाण्यांचे रसग्रहण आम्हाला वाचायला मिळू दे...

चतुरंग Mon, 03/31/2008 - 16:52
पाडगावकरांच्या ह्या शब्दांमागे काय भावना असतील ह्याचा शोध घेण्याचा अतिशय मर्मज्ञ प्रयत्न तुम्ही केलेला आहे त्याबद्दल तुमचे अभिनंदन! हृदयनाथांनी गाणे सुरू होतानाच्या वापरलेल्या व्हायोलिनच्या सूरलाटा एका क्षणात घोंघावणारे वारे आणि लाटांचा प्रत्ययकारी आसमंत उभा करतात आणि तीच लाट दीदी त्यांच्या स्वर्गीय आवाजाने कुठल्याकुठे घेऊन जातात, आताही माझ्या कानात ते गाणं घुमू लागलं आहे! चराचरातल्या अमरत्वाचा स्पर्श घेऊन आलेल्या अशा काही मोजक्याच कलाकृती असतात ज्या आपल्या दृश्य अस्तित्वापलीकडचा असा दिव्य अनुभव देऊन जातात जो ओंजळीत घेता येत नाही. तुमच्या रसग्रहणातून तुम्ही त्या मागच्या तुमच्या अनुभूती पोचवल्या आहेत की तुम्हाला आणि आम्हाला जोडून जातात! चतुरंग

केशवराव Mon, 03/31/2008 - 20:10
रसग्रहणाचा उत्तम नमुना पेश केल्याबद्दल खरच कौतूक. मनापासून कौतुक ! आपण गाणे कितीतरी वेळा ऐकतो. माझे अत्यंत आवडते गाणे. माझ्याच भावनांना आपण साकारल्या सारखे वाटले. हे श्रेय त्या गाण्याचे. अनेक जणांच्या मनांत एक सारखेच्य्ह चित्र साकारणे ,एकच परीणाम करणे, हे त्या गाण्याचेच श्रेय होय. ह्या गाण्याचे गीतकार, गायिका याचबरोबर संगितकार हा ही श्रेष्ठच होय . स्वरांतून चित्र उभे करणे निश्चीतच दाद देण्याजोगी गोष्ट आहे. पण या सर्वापेक्षा आपले रसग्रहण फारच उतम . त्रिवार कौतुक. - - - - - - - केशवराव.
कधी कधी बर्‍याच गाण्यांचा विचार डोक्यात घोळत असतो. विचार घोळवावा लागतो. गाणी एकरूपच असतात, ती घोळवावी लागत नाहीत. एखाद्या गाण्याचे शब्द, लय, ताल, राग, सुरावट लक्षात राहण्यामागे कारण काय असेल? जास्त विचार केला तर अनेक शास्त्रीय कसोट्या सांगता येतील. त्या कसोट्यांची रसिकतेला मात्र काही गरज नाही. अंतर्बाह्य असतं ते गाणं. त्यात शब्द , ताल , सूर , लय काहीच वेगळं नसतं. सगळं एकजीव असतं. उदाहरणं अनेक आहेत . असा बेभान हा वारा हे गाणं ऐकताना मी नेहमी मला एका चित्राचा कोपरा समजत आलो आहे. ते चित्र इतकं सजीव आहे की मला ते अगदी तसंच शब्दात बांधणं जमत नाही.