मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दह्या वर भागवावे ते असे !

मुन्गी ·

राजे 10/05/2008 - 12:56
L) एक गोष्ट सांगू का ? ह्याचा अर्थ देखील कळाला नाही व अनर्थ देखील ! समजावून सांगावे.. माझ्या अल्प बुध्दीला आपला विनोद कळाला नाही. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

अरुण मनोहर 10/05/2008 - 13:40
येवढ्या गर्दीत बसमधे महीलांची एक जागा रिकामी का राहीली ह्यावर तर्क करावे.(तक्र नको, कारण दही आंबट होते) ~X( ~X( १) त्या सीट्वर कोणी घाण सांडली असेल. २) बसमधे आतापर्यंत फक्त महिलाच असतील. .... आणखी काही?

अभिज्ञ 10/05/2008 - 14:13
राजे म्हणतात त्याप्रमाणे "ह्याचा अर्थ देखील कळाला नाही " असेच आमचेही मत आहे. मुंगी ताई/दादा , आपण मि.पा. वर नवीन दिसताय. त्यामुळेच आपण हे गद्य लिखाण जे न देखे रवी...ह्या सदरात सुरु केले आहे. हे सदर पद्य लिखाणाकरीता आहे. "लेखन करा" हा दुवा जेंव्हा आपण उघडला असेल तेंव्हा तिथेच आपल्या लेखनाच्या प्रकारानुसार विविध सदरे दिलेली आहेत. ती सदरे कशी असतात ते अनुक्रमणिकेतील कुठलाहि धागा उघडून आपल्याला पाहता येइल. तसेच हा धागा सुरु करायचे प्रयोजन हि समजले नाहि. आपला मागील धागाहि हा असाच काहितरी होता. आपल्याला काहि विनोद सांगायचे आहेत का? तसे असेल तर धाग्याच्या सुरुवातीलाच तसे स्पष्ट करावे.तसेच सर्वच विनोद एकाच धाग्यात दिलेत तर उत्तम. प्रत्येक विनोदाकरिता नवीन धागा नसावा. खास आपल्या विचारांतून आलेले नवीन व सकस असे काहितरी वाचायला मिळावे अशी आम्हि अपे़क्षा करतो. अबब.

In reply to by अभिज्ञ

मुन्गी 10/05/2008 - 14:49
दोन्हि धागे विनोद या लेखन्प्रकारात टाकायला हवे होते , लक्शात ठेवेन. आपल्याला कळेल असेच काहीतरी लिहिण्याचे प्रयत्न करेन.

राजे 10/05/2008 - 12:56
L) एक गोष्ट सांगू का ? ह्याचा अर्थ देखील कळाला नाही व अनर्थ देखील ! समजावून सांगावे.. माझ्या अल्प बुध्दीला आपला विनोद कळाला नाही. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

अरुण मनोहर 10/05/2008 - 13:40
येवढ्या गर्दीत बसमधे महीलांची एक जागा रिकामी का राहीली ह्यावर तर्क करावे.(तक्र नको, कारण दही आंबट होते) ~X( ~X( १) त्या सीट्वर कोणी घाण सांडली असेल. २) बसमधे आतापर्यंत फक्त महिलाच असतील. .... आणखी काही?

अभिज्ञ 10/05/2008 - 14:13
राजे म्हणतात त्याप्रमाणे "ह्याचा अर्थ देखील कळाला नाही " असेच आमचेही मत आहे. मुंगी ताई/दादा , आपण मि.पा. वर नवीन दिसताय. त्यामुळेच आपण हे गद्य लिखाण जे न देखे रवी...ह्या सदरात सुरु केले आहे. हे सदर पद्य लिखाणाकरीता आहे. "लेखन करा" हा दुवा जेंव्हा आपण उघडला असेल तेंव्हा तिथेच आपल्या लेखनाच्या प्रकारानुसार विविध सदरे दिलेली आहेत. ती सदरे कशी असतात ते अनुक्रमणिकेतील कुठलाहि धागा उघडून आपल्याला पाहता येइल. तसेच हा धागा सुरु करायचे प्रयोजन हि समजले नाहि. आपला मागील धागाहि हा असाच काहितरी होता. आपल्याला काहि विनोद सांगायचे आहेत का? तसे असेल तर धाग्याच्या सुरुवातीलाच तसे स्पष्ट करावे.तसेच सर्वच विनोद एकाच धाग्यात दिलेत तर उत्तम. प्रत्येक विनोदाकरिता नवीन धागा नसावा. खास आपल्या विचारांतून आलेले नवीन व सकस असे काहितरी वाचायला मिळावे अशी आम्हि अपे़क्षा करतो. अबब.

In reply to by अभिज्ञ

मुन्गी 10/05/2008 - 14:49
दोन्हि धागे विनोद या लेखन्प्रकारात टाकायला हवे होते , लक्शात ठेवेन. आपल्याला कळेल असेच काहीतरी लिहिण्याचे प्रयत्न करेन.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
एक दूधवाला भय्या दही घेउन बेस्ट बस मधे चढ्तो (त्याच्या साइकली ची कुणितरी अगदी 'मनसे' लावलेली असते) बस मधे खुप गर्दी असते पण पुढे एक जागा रिकामी दिसते , तर तो तिथे जाउन बसतो , त्याला माहीत नसते कि ती ज़ागा महिलांसाठी राखीव आहे . पुढ्च्या स्टाप ला काही बायका बस पकडतात , पुढे येतात अन त्याला म्ह्ण्तात - बाई : " ओ भय्या उठो , ये ज़ागा हमारी है , हम महिलाए हैं " भय्या : " अरे बेहेनजी , ठीक है आप महिलाए हैं लेकिन हम भी तो दही लाये हैं " ~X(

एक नीरीक्शन

नन्या ·

राजे 10/05/2008 - 12:46
तुम्हाला मिसळपाव वर वाचण्यासाठी फक्त "हॉटेलात आलेली माणसं" ह्याचीच लिस्ट का दिसावी ? फालतू कारणासाठी मिसळपावचा वापर करु नका... तब्येत बिघडेल (पंच साहेब ह्या लेखाची वाट लावतील) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

फालतू कारणासाठी मिसळपावचा वापर करु नका... सहमत आहे !!! (पंच साहेब ह्या लेखाची वाट लावतील) या चर्चाप्रस्तावाबरोबर काही चर्चा प्रस्तावांची (त्याचबरोबर काही फाल्तु प्रतिसादांचीही) वाट लावली पाहिजे किंवा काही मर्यादा घातल्या पाहिजे असे वाटते.:)

छोटा डॉन 10/05/2008 - 13:03
त्याच काय आहे, मी आहे मिपाचा कायमचा पडीक सदस्य, त्यामुळे हजरी तर लावावीच लागते मग ती पाहुणा म्हणून का असेना ... सकाळी मी "सदस्य" म्हणून येतो कारण सकाळी मला भरपूर वेळ असतो. बायको सकाळ्-सकाळ चहा करून देते तो पित मस्त सदस्य म्हणून वावरतो ... एकदा का दुपार झाली की मग माझ्या कामाला सुरवार होते. मग मला भाज्या चिरणे, स्वयंपाक करणे, कपडे धुणे, भांडी घासणे यासारखी कामे करावी लागतात, सकाळीच "चहा" केल्याने बायकोचे काम संपले असते. आता ही सर्व कामे करताना मला "लॉग्-इन" करता येत नाही कारण लॅपटॉप बायकोकडे असतो. मग आपलं तिच लक्ष नाही असं पाहून मी दुपारी चोरुन "पाहूणा" म्हणून वावरतो ... दुपारी झोप झाल्यावर संध्याकाळी बायको पोराला घेउन फिरायला बाहेर पडते मग मात्र मला टाईम भेटून मी पुन्हा "सदस्य" म्हणून वावरतो ... रात्री पुन्हा आमच्या नशिबी "दुपारसारखे भोग" असतात, त्यामुळे पुन्हा मला "पाहुणा" म्हणून यावे लागते. जेवणं झाल्यावर, भांडी घासून ती जागेवर ठेउन झाल्यावर, पोराला झोपवल्यावर, झालच तर बायकोला झोपवल्यावर मला पुन्हा एकदा टाईम भेटतो व मी पुन्हा "सदस्य" म्हणून अवतरतो ... आता माझ्यासारखी "लाईफस्टाईल" बर्‍याच लोकांची असणाची शक्यता असल्याने आपले नीरीक्शन " सकाळी सदस्य बरेच पण पाहुणे कमी, दुपारी पाहुणे बरेच, सदस्य कमी. " असे झाले असेल .... अवांतर : हा एक विनोद होता. खरे कारण मला तरी माहित नाही ... अतिअवांतर : अशा गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा जर काही लिहले, वाचले, चर्चा केली तर कल्याणच होईल !!! पळून पळून दमलेला छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मन 10/05/2008 - 14:16
फालतू कारणासाठी मिसळपावचा वापर करु नका... सहमत आहे !!! बिरुटे सर्,वेताळ साअहेब आणि राजे, एक कळलं नाहे. ह्या चर्चा प्रस्तावात "फालतु" काय आहे? (माझ्या माहिती प्रमाणे इथे फालतु म्हण्जे वैयक्तिक रोखाने केलेलं, किंवा अश्लिल्/गचाळ उद्देशानं लिहिलेलं, किम्वा काहितरी उगिचच आग खाउ लिहिलेलं इथलं लिखाण. बरोबर?) मग यात फालतु काय आहे? हा चर्चा विषय (माझ्याप्रमाअणेच) तुम्हालाही बोरिंग/कंटाळ्वणा/निरर्थक वाटु शकतो मान्य आहे. पण "फालतु" म्हणण्यासारखं काय आहे ह्यत? (पंच साहेब ह्या लेखाची वाट लावतील) का वाट लावतील? किंवा का लावायला हवी? या चर्चाप्रस्तावाबरोबर काही चर्चा प्रस्तावांची (त्याचबरोबर काही फाल्तु प्रतिसादांचीही) वाट लावली पाहिजे किंवा काही मर्यादा घातल्या पाहिजे असे वाटते. का म्हणुन?? आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

राजे 10/05/2008 - 14:29
मी फालतू हा शब्द निरर्थक 8} ह्या अर्थाने वापरला आहे, मला माझ्या नजरेने वरील लिखाण निरर्थक वाटत आहे व सरपंचांनी ते नष्ट करावी ही देखील ईच्छा माझ्या मनी आहे. का म्हणुन?? असेच रोज दोन-चार चर्चा व लेख येऊ देत मग तुम्हाला देखील कळेल की का नष्ट करावे. त्यावेळी तुम्ही का म्हणून असे विचारणार देखील नाही ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

मन 10/05/2008 - 14:43
ही सापेक्ष गोष्ट आहे. तुम्हाला हे निरर्थक वाटते(माझ्याप्रमाणेच.)पण म्हणून काही ते सर्वांसाठीच निरुपयोगी किंवा कुणासाठिच घातक सिद्ध होत नाही. इथं येणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला (किंवा मला!) अर्थ पुर्ण वाटलिच पाहिजे असं काही नाही. किंवा ती तुम्हाला आणि मला अर्थ पुर्ण वाटली तरच ठेवायची असही नाही. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

राजे 10/05/2008 - 14:52
येथे तुमची व माझी गोष्ट चालू नाही आहे, हे सार्वजनिक संस्थळ आहे तेव्हा अश्या फालतू गोष्टी टाळल्या जाव्यात ह्याच मताचा मी आहे, तुमचे मत माझ्या मताच्या विरुध्द असले तरी मी तुमच्या मताचा आदर करत आहेच. माझा तर्फे हा विषय संपला, एका निरर्थक चर्चेसाठी मीच फालतू मध्ये दोन-तीन प्रतिसाद दिले. :( राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

मन 10/05/2008 - 15:06
माझा तर्फे हा विषय संपला, एका निरर्थक चर्चेसाठी मीच फालतू मध्ये दोन-तीन प्रतिसाद दिले :-) मीही आता माझ्यातर्फे थांबवतोय. (एनी वेज् , येक शंका,ज्याच्यासाठी भांडतोय तो शिंचा लेखक कुठे गेलाय्?का मग मीच बिनडोक पणा करीत होतो इथं लिहुन? ) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

येथे तुमची व माझी गोष्ट चालू नाही आहे, हे सार्वजनिक संस्थळ आहे तेव्हा अश्या फालतू गोष्टी टाळल्या जाव्यात ह्याच मताचा मी आहे, तुमचे मत माझ्या मताच्या विरुध्द असले तरी मी तुमच्या मताचा आदर करत आहेच. माझा तर्फे हा विषय संपला, एका निरर्थक चर्चेसाठी मीच फालतू मध्ये दोन-तीन प्रतिसाद दिले. राजे, तुमच्यामुळे आम्ही या भानगडीत पडलो. नाही तर आम्ही निरर्थक प्रतिसाद आणि चर्चेकडे ढुंकूनही पाहत नाही. कधी कधी नुसताच पाहतो. पण प्रतिसाद वगैरे लिहीत नाही ;) आपला, प्रा.डॉ. ( निरर्थक प्रतिसाद लिहिल्यामुळे अपराधीपणाच्या भावनेने भिंतीला बुक्के मारणारा :) )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छोटा डॉन 10/05/2008 - 15:43
सर तुमची , राजेंची व मनची चर्चा वाचून मला पटले की अशा फालतू विषयांसाठी हे स्थळ नाही ... पहिल्यांदा मी "विनोदाच्या भावनेने " एक प्रतिसाद देऊन टाकला. पण तो पण नको द्यायला हवा होता असे आता माझे मत झाले आहे ... असो. तुमच्या सर्वांचे म्हणणे पटले ... भाविष्यात काळजी घेतली जाईल .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

मी फालतू हा शब्द निरर्थक ह्या अर्थाने वापरला आहे. आम्हीही निरर्थक याच अर्थाने तो शब्द वापरला आहे.

वेताळ 10/05/2008 - 17:37
आज आपण सर्व मिपा करानी दाखवुन दिले कि आपण एकाद्या फालतु व निर्रथक विषयावर किती गहन चर्चा करु शकतो.त्याबद्दल सर्व विचारवंताचे हार्दिक अभिनंदन.मलाही काही प्रश्न पडले आहेतं. नन्या मिपाचा सदस्य पण आहे आणि स्वःताला पाहुणा हि समजतो.तो नेमका कोण आहे. त्यात सकाळी तो काय म्हणुन येतो? दुपारी काय म्हणुन तो असतो?त्यात तो कसले डोंबलाचे नीरीक्शन करतो? ह्याप्रश्नांची जर बरोबर उत्तरे दिली नाहीत तर तुमच्या डोक्याची शंभर शकले होतील. (वैतागलेला) वेताळ

राजे 10/05/2008 - 12:46
तुम्हाला मिसळपाव वर वाचण्यासाठी फक्त "हॉटेलात आलेली माणसं" ह्याचीच लिस्ट का दिसावी ? फालतू कारणासाठी मिसळपावचा वापर करु नका... तब्येत बिघडेल (पंच साहेब ह्या लेखाची वाट लावतील) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

फालतू कारणासाठी मिसळपावचा वापर करु नका... सहमत आहे !!! (पंच साहेब ह्या लेखाची वाट लावतील) या चर्चाप्रस्तावाबरोबर काही चर्चा प्रस्तावांची (त्याचबरोबर काही फाल्तु प्रतिसादांचीही) वाट लावली पाहिजे किंवा काही मर्यादा घातल्या पाहिजे असे वाटते.:)

छोटा डॉन 10/05/2008 - 13:03
त्याच काय आहे, मी आहे मिपाचा कायमचा पडीक सदस्य, त्यामुळे हजरी तर लावावीच लागते मग ती पाहुणा म्हणून का असेना ... सकाळी मी "सदस्य" म्हणून येतो कारण सकाळी मला भरपूर वेळ असतो. बायको सकाळ्-सकाळ चहा करून देते तो पित मस्त सदस्य म्हणून वावरतो ... एकदा का दुपार झाली की मग माझ्या कामाला सुरवार होते. मग मला भाज्या चिरणे, स्वयंपाक करणे, कपडे धुणे, भांडी घासणे यासारखी कामे करावी लागतात, सकाळीच "चहा" केल्याने बायकोचे काम संपले असते. आता ही सर्व कामे करताना मला "लॉग्-इन" करता येत नाही कारण लॅपटॉप बायकोकडे असतो. मग आपलं तिच लक्ष नाही असं पाहून मी दुपारी चोरुन "पाहूणा" म्हणून वावरतो ... दुपारी झोप झाल्यावर संध्याकाळी बायको पोराला घेउन फिरायला बाहेर पडते मग मात्र मला टाईम भेटून मी पुन्हा "सदस्य" म्हणून वावरतो ... रात्री पुन्हा आमच्या नशिबी "दुपारसारखे भोग" असतात, त्यामुळे पुन्हा मला "पाहुणा" म्हणून यावे लागते. जेवणं झाल्यावर, भांडी घासून ती जागेवर ठेउन झाल्यावर, पोराला झोपवल्यावर, झालच तर बायकोला झोपवल्यावर मला पुन्हा एकदा टाईम भेटतो व मी पुन्हा "सदस्य" म्हणून अवतरतो ... आता माझ्यासारखी "लाईफस्टाईल" बर्‍याच लोकांची असणाची शक्यता असल्याने आपले नीरीक्शन " सकाळी सदस्य बरेच पण पाहुणे कमी, दुपारी पाहुणे बरेच, सदस्य कमी. " असे झाले असेल .... अवांतर : हा एक विनोद होता. खरे कारण मला तरी माहित नाही ... अतिअवांतर : अशा गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा जर काही लिहले, वाचले, चर्चा केली तर कल्याणच होईल !!! पळून पळून दमलेला छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मन 10/05/2008 - 14:16
फालतू कारणासाठी मिसळपावचा वापर करु नका... सहमत आहे !!! बिरुटे सर्,वेताळ साअहेब आणि राजे, एक कळलं नाहे. ह्या चर्चा प्रस्तावात "फालतु" काय आहे? (माझ्या माहिती प्रमाणे इथे फालतु म्हण्जे वैयक्तिक रोखाने केलेलं, किंवा अश्लिल्/गचाळ उद्देशानं लिहिलेलं, किम्वा काहितरी उगिचच आग खाउ लिहिलेलं इथलं लिखाण. बरोबर?) मग यात फालतु काय आहे? हा चर्चा विषय (माझ्याप्रमाअणेच) तुम्हालाही बोरिंग/कंटाळ्वणा/निरर्थक वाटु शकतो मान्य आहे. पण "फालतु" म्हणण्यासारखं काय आहे ह्यत? (पंच साहेब ह्या लेखाची वाट लावतील) का वाट लावतील? किंवा का लावायला हवी? या चर्चाप्रस्तावाबरोबर काही चर्चा प्रस्तावांची (त्याचबरोबर काही फाल्तु प्रतिसादांचीही) वाट लावली पाहिजे किंवा काही मर्यादा घातल्या पाहिजे असे वाटते. का म्हणुन?? आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

राजे 10/05/2008 - 14:29
मी फालतू हा शब्द निरर्थक 8} ह्या अर्थाने वापरला आहे, मला माझ्या नजरेने वरील लिखाण निरर्थक वाटत आहे व सरपंचांनी ते नष्ट करावी ही देखील ईच्छा माझ्या मनी आहे. का म्हणुन?? असेच रोज दोन-चार चर्चा व लेख येऊ देत मग तुम्हाला देखील कळेल की का नष्ट करावे. त्यावेळी तुम्ही का म्हणून असे विचारणार देखील नाही ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

मन 10/05/2008 - 14:43
ही सापेक्ष गोष्ट आहे. तुम्हाला हे निरर्थक वाटते(माझ्याप्रमाणेच.)पण म्हणून काही ते सर्वांसाठीच निरुपयोगी किंवा कुणासाठिच घातक सिद्ध होत नाही. इथं येणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला (किंवा मला!) अर्थ पुर्ण वाटलिच पाहिजे असं काही नाही. किंवा ती तुम्हाला आणि मला अर्थ पुर्ण वाटली तरच ठेवायची असही नाही. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

राजे 10/05/2008 - 14:52
येथे तुमची व माझी गोष्ट चालू नाही आहे, हे सार्वजनिक संस्थळ आहे तेव्हा अश्या फालतू गोष्टी टाळल्या जाव्यात ह्याच मताचा मी आहे, तुमचे मत माझ्या मताच्या विरुध्द असले तरी मी तुमच्या मताचा आदर करत आहेच. माझा तर्फे हा विषय संपला, एका निरर्थक चर्चेसाठी मीच फालतू मध्ये दोन-तीन प्रतिसाद दिले. :( राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

मन 10/05/2008 - 15:06
माझा तर्फे हा विषय संपला, एका निरर्थक चर्चेसाठी मीच फालतू मध्ये दोन-तीन प्रतिसाद दिले :-) मीही आता माझ्यातर्फे थांबवतोय. (एनी वेज् , येक शंका,ज्याच्यासाठी भांडतोय तो शिंचा लेखक कुठे गेलाय्?का मग मीच बिनडोक पणा करीत होतो इथं लिहुन? ) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

येथे तुमची व माझी गोष्ट चालू नाही आहे, हे सार्वजनिक संस्थळ आहे तेव्हा अश्या फालतू गोष्टी टाळल्या जाव्यात ह्याच मताचा मी आहे, तुमचे मत माझ्या मताच्या विरुध्द असले तरी मी तुमच्या मताचा आदर करत आहेच. माझा तर्फे हा विषय संपला, एका निरर्थक चर्चेसाठी मीच फालतू मध्ये दोन-तीन प्रतिसाद दिले. राजे, तुमच्यामुळे आम्ही या भानगडीत पडलो. नाही तर आम्ही निरर्थक प्रतिसाद आणि चर्चेकडे ढुंकूनही पाहत नाही. कधी कधी नुसताच पाहतो. पण प्रतिसाद वगैरे लिहीत नाही ;) आपला, प्रा.डॉ. ( निरर्थक प्रतिसाद लिहिल्यामुळे अपराधीपणाच्या भावनेने भिंतीला बुक्के मारणारा :) )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छोटा डॉन 10/05/2008 - 15:43
सर तुमची , राजेंची व मनची चर्चा वाचून मला पटले की अशा फालतू विषयांसाठी हे स्थळ नाही ... पहिल्यांदा मी "विनोदाच्या भावनेने " एक प्रतिसाद देऊन टाकला. पण तो पण नको द्यायला हवा होता असे आता माझे मत झाले आहे ... असो. तुमच्या सर्वांचे म्हणणे पटले ... भाविष्यात काळजी घेतली जाईल .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

मी फालतू हा शब्द निरर्थक ह्या अर्थाने वापरला आहे. आम्हीही निरर्थक याच अर्थाने तो शब्द वापरला आहे.

वेताळ 10/05/2008 - 17:37
आज आपण सर्व मिपा करानी दाखवुन दिले कि आपण एकाद्या फालतु व निर्रथक विषयावर किती गहन चर्चा करु शकतो.त्याबद्दल सर्व विचारवंताचे हार्दिक अभिनंदन.मलाही काही प्रश्न पडले आहेतं. नन्या मिपाचा सदस्य पण आहे आणि स्वःताला पाहुणा हि समजतो.तो नेमका कोण आहे. त्यात सकाळी तो काय म्हणुन येतो? दुपारी काय म्हणुन तो असतो?त्यात तो कसले डोंबलाचे नीरीक्शन करतो? ह्याप्रश्नांची जर बरोबर उत्तरे दिली नाहीत तर तुमच्या डोक्याची शंभर शकले होतील. (वैतागलेला) वेताळ
मी नन्या, बरेच वेळा मीपा ला, पाहुणा आसतो. पण नीरीक्शन असे की, सकाळी सदस्य बरेच पण पाहुणे कमी, दुपारी पाहुणे बरेच, सदस्य कमी. असे का?

शाकाहार :- काही नवीन पैलु

मन ·

मुळात, बहुतांश सर्व सस्तन प्राणी आणी पक्षी ह्यांचे प्रामुख्याने शाकाहारी आणि मांसाहारी असे वर्गीकरण करता येते. काही प्राणी दोन्ही वर्गात मोडणारे असतात. ते शाकाहारही करतात (झाडांची पाने, फळे इ.) तसेच इतर काही प्राणी. अस्वल फळे, मध खाते तसेच मासे किडे-मुंग्याही खाते. माकडाच्या काही जाती ही मांस भक्षण करतात. नेमके असेच दात मानवाला आहेत,ते म्हणजे त्याच्या दाढा. (जबड्याच्या आकारमानानुसार्, सर्वाधिक भुभागावर् हे दात पसरलेले आहेत.) ह्यानुसार, मानवाचा आहार् काय हवा? माणूस कच्चे मांस खात नाही म्हणून त्याला 'सुळ्यांची' गरज नाही. तो मांस शिजवून मऊ करून, पचायला योग्य अशा प्रकारे बनवून खातो. त्या साठी त्याच्या दाढा 'सुटेबल' असतात. आता तसेच सफरचंद आणि जिवंत कोंबडीचे पिल्लु एका निरागस , भुकेल्या ,(माणसाच्या)बालकाच्या समोर ठेवा. निरागस बालकासमोरच कशाला, (पोहोचलेल्या) मोठ्या माणसासमोर जरी ठेवले तरी तो पिल्लू खाणार नाही. कारण माणूस जिवंत प्राणी, कच्चे मांस खात नाही. फळे मात्र कच्चीच खाल्ली जातात. पण सफरचंद आणि चिकनकरी समोर ठेवली तर माणूस (मांसाहारी) आधी चिकन करी खाऊन नंतर टीव्ही बघत बघत सफरचंद खाईल आणि तृप्त होईल. मग ह्या सगळ्या गोष्टी बर्‍याचशा हेच सुचवतात की शारिरिक दृष्ट्या मानवाला प्रामुख्याने शाकाहार हाच सुटेबल् ठरतो. मला नाही वाटत. मानवाच्या उत्क्रातीपासूनच तो प्राण्यांच्या शिकारीवर जगत आला आहे. तरी देखिल त्याने इतकी प्रगती केली आहे. विज्ञानातील शोध लावले आहेत. दुसर्‍या ग्रहांवर पोहोचला आहे, मेडिकल सायन्समध्ये, गणितीशास्त्रात, कला क्षेत्रात्, साहित्यक्षेत्रात, पेहरावात, स्थापत्यशास्त्रात अनन्यसाधारण प्रगती केली आहे. आयुर्मान वाढवीले आहे. मांसाहार करून देखिल हे सर्व शक्य झाले आहे मग तो आहार अनसुटेबल कसा? अवांतर :"अन्न रगडण्याची " पुरेशी व्यवस्था नसल्याने)ह्या चावुन खाण्यादरम्यान, धाकाहारी प्राण्याच्या आहारात पुरेशी "लाळ"मिसळली जाते. म्हणजे बायकोच्या धाकात राहून आहार करणारा का?

In reply to by प्रभाकर पेठकर

राजे 10/05/2008 - 09:51
दोघांचे ही मुद्दे पटले ! उपलब्ध परिस्थीतीने जे अन्न समोर दिले / आले ते खावे ह्या मताचा मी ! जेथे शाकाहार उपलब्ध आहे तेथे मांसाहार ची गरज नाही, पण जेथे शाकाहार शक्य नाही तेथे मांसाहार .... हरकत नसावी. काही माकडे मी मुंग्या खाताना / छोटे मोटे कीडे खाताना खुप वेळा पाहीले आहे व मी माकडाला लहानपणा पासूनच मांसाहारी समजतो. बाकी आपली शारीरीक (मानवाची ) रचना शाकाहार व मांसाहार दोन्ही प्रकारच्या भोजनास उत्तम आहे . राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by प्रभाकर पेठकर

मन 10/05/2008 - 14:04
काही प्राणी दोन्ही वर्गात मोडणारे असतात. त्यांना मिश्राहारी म्हणतात. पण हे प्राणी प्रामुख्याने तिथं पाहायला मिळतात जिथं काही कारणानं त्यांना त्यांचे नैसर्गिक अन्न मिळत नाही. किंवा दुसरेच अन्न दिले जाते. ह्यासाठीच मी मांजराचे पिल्लु आणि मानवाचे बालक ह्यांची तुलना दिली आहे. मी म्हण्तोय की "पर्याय उप्लब्ध असताना,प्राप्त परिस्थितीत मानावाची निवड काय राहील,किंवा काय रहायला हवी , ते पहा." शाकाहाराला "प्रथम पसंती" किंवा "प्रेफरन्स " असणे इष्ट. मानवाच्या उत्क्रातीपासूनच तो प्राण्यांच्या शिकारीवर जगत आला आहे. नाही्ए काही संपुर्ण खरे नाही. माणुस शिकार करु लागला तो प्रामुख्याने हिम युग येउन गेल्यानंतर म्हणजे फार तर बारा ते पंधरा हजार वर्षे झाली असावीत. उत्क्रांतीच्या हिशेबाने हा काल्खंड नगण्य आहे.(तो लाखेक वर्षांच्याही पुढे आहे.) पृथ्वीवर हिम युगात जेव्हा एका एकी अति शीत वातावरण तयार होउन अन्नाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला, तेव्हा, केवळ नाइलाज म्हणून माणसाने शिकारीस सुरुवात केली. आजही मानव कच्चे मांस फारश्या प्रमाणात खाउ शकत नाही, हे कशाचे प्रमाण आहे? याउलट(सर्वच नाही) पण कित्येक शाकाहारी गोष्टी तुम्ही आजही कच्च्या खाउ शकता. अगदि टोकाची स्थिती गृहित धरुयात. सम्जा एखाद्याला ज्याला मांसाहार अत्यंत प्रिय आहे,अशा व्यक्तिला देखील जर तुम्ही कित्येक दिवस्-वर्षे फक्त मांसाहार सेवन करण्याची सक्ती केलीत, तर बघाल की त्याचे शरीर हे सहन करु शकत नाही. कारण इथे तुमचे 'सुटेबल' नैसर्गिक अन्न कोणते तेच शरीर मागत असते.तुम्ही त्या नैसर्गिक प्रेरणेस अधिक काळ दाबु शकत नाही. याउलट शाकाहाराची सक्ती करुन एखाद्याला वर्षानुवर्षे ठेवलेतं, तर त्याला फारशी अडचण येणार नाही. ....तरी देखिल त्याने इतकी प्रगती केली आहे. विज्ञानातील शोध लावले आहेत. दुसर्‍या ग्रहांवर पोहोचला आहे, मेडिकल सायन्समध्ये, गणितीशास्त्रात, कला क्षेत्रात्, साहित्यक्षेत्रात, पेहरावात, स्थापत्यशास्त्रात अनन्यसाधारण प्रगती केली आहे. आयुर्मान वाढवीले आहे. मांसाहार खाल्ल्याने विविध विषयात प्रगती होणार नाही असं आम्ही कुठं म्हणतोय? ती तशी होते हे सुर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे. मात्र तुमच्याकडे उपलब्ध (उत्तर)आयुष्यात कटकटी निर्माण होतात, त्याचे काही अंशी कारण मांसाहारावर भर असणे आहे. ("आम" निर्मिती , ह्रुदय रोग व इतर शारिरिक व्याधी) तेच उपलब्ध आयुष्य सुखकर ठेवायचे असेल, तर शाकाहार चांगला असं मी म्हणतोय. (कृपया माझा नीलकांत रावांना खाली दिलेला प्रतिसाद वाचा.) बाकी तुम्ही कच्चे मांस खाउ शकत नाही याचे कारण ती तुमची नैसर्गिक बुद्धी नाही. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

मी म्हण्तोय की "पर्याय उप्लब्ध असताना,प्राप्त परिस्थितीत मानावाची निवड काय राहील,किंवा काय रहायला हवी , ते पहा." शाकाहाराला "प्रथम पसंती" किंवा "प्रेफरन्स " असणे इष्ट. 'पर्याय उपलब्ध असताना' हे महत्त्वाचे. मांजर दोन्ही खाऊ शकते. माणूस कच्चे मांस खाऊ शकत नाही. म्हण्जे मांजराला तुम्ही दोन्ही पर्याय उपलब्ध करून देता आहात आणि माणसाला सफरचंदाशीवाय पर्याय उपलब्ध करून दिलेला नाही. ही असमान तुलना झाली. माणुस शिकार करु लागला तो प्रामुख्याने हिम युग येउन गेल्यानंतर म्हणजे फार तर बारा ते पंधरा हजार वर्षे झाली असावीत. उत्क्रांतीच्या हिशेबाने हा काल्खंड नगण्य आहे.(तो लाखेक वर्षांच्याही पुढे आहे.) पृथ्वीवर हिम युगात जेव्हा एका एकी अति शीत वातावरण तयार होउन अन्नाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला, तेव्हा, केवळ नाइलाज म्हणून माणसाने शिकारीस सुरुवात केली. मान्य. माझे ह्या बाबतीत ज्ञान तुटपुंजे आहे. पण शब्दांवर न जाता आशय लक्षात घ्या. माणसांने बहुतांश शोध मांस खायला लागल्यावर लावले आहेत. मांस, जे तुमच्या मते 'अनसुटेबल' अन्न आहे ते खाऊनच माणसाने प्रगती केली आहे. प्रगती मध्ये बौद्धीक, शारीरिक, मानसिक वाढ अभिप्रेत आहे. ज्या अन्नाच्या सेवनाने माणसाने हे सर्व साध्य केले ते 'अनसुटेबल' कसे? आजही मानव कच्चे मांस फारश्या प्रमाणात खाउ शकत नाही, हे कशाचे प्रमाण आहे? शिजवण्याची प्रक्रिया करून खाल्ले तर ते घातक असते का? आजही तुम्ही-आम्ही बटाटा, फॉवर, वांगी, तांदूळ, गहू, बाजरी, मका, पडव़ळ, दोडकी, गिलकी, सुरण, तोंडली, पालक, हिरवा-लाल माठ, करडई, आंबट चुका, शोपू, डाळी, कडधान्ये, अळू असे अनेक पदार्थ शिजवण्याच्या प्रक्रिये शिवाय खाऊ शकत नाही. तेही सर्व अनसुटेबल मानायचे का? जर प्रक्रिया करून खाण्यासाठी ते सुटेबल असेल तर मांस सुद्धा तसेच प्रक्रिया करून खाण्यासाठी सुटेबल का मानू नये? दुजा भाव का? याउलट(सर्वच नाही) पण कित्येक शाकाहारी गोष्टी तुम्ही आजही कच्च्या खाउ शकता. किती? रोजच्या शाकाहारातील वरील सर्व गोष्टी तुम्ही कच्च्या खाऊ शकत नाही. सम्जा एखाद्याला ज्याला मांसाहार अत्यंत प्रिय आहे,अशा व्यक्तिला देखील जर तुम्ही कित्येक दिवस्-वर्षे फक्त मांसाहार सेवन करण्याची सक्ती केलीत, तर बघाल की त्याचे शरीर हे सहन करु शकत नाही. गैरसमज आहे. योग्यप्रमाणात खाल्ले तर शरीर जरूर सहन करू शकेल. मात्र प्रमाणा बाहेर सेवन केले तर ते हानिकारकच. मग तो मांसाहार असो वा शाकाहार. याउलट शाकाहाराची सक्ती करुन एखाद्याला वर्षानुवर्षे ठेवलेतं, तर त्याला फारशी अडचण येणार नाही. पण म्हणून शाकाहार हेच एकमेव 'सुटेबल' अन्न आहे ह सिद्ध होत नाही. शाकाहारवरही माणूस जगू शकतो असे फक्त म्हणता येईल. मांसाहार खाल्ल्याने विविध विषयात प्रगती होणार नाही असं आम्ही कुठं म्हणतोय? मांसाहाराला 'अनसुटेबल' असे लेबल लावून तुम्ही कमी लेखता आहात. जर 'अनसुटेबल' अन्न खाऊन माणूस इतकी प्रगती करू शकतो तर ते अन्न असुटेबल कसे? ती तशी होते हे सुर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे. म्हणजेच मांसाहार हा सुद्धा 'सुटेबल' आहे सुर्यप्रकाशा इतकेच स्वच्छ आहे. मात्र तुमच्याकडे उपलब्ध (उत्तर)आयुष्यात कटकटी निर्माण होतात, त्याचे काही अंशी कारण मांसाहारावर भर असणे आहे. अतिसेवन कुठलेही वाईट. मांसाहार करताना चवीसाठी भरमसाठ खायची सवय असेल तर त्रास हा होणारच. तेच उपलब्ध आयुष्य सुखकर ठेवायचे असेल, तर शाकाहार चांगला असं मी म्हणतोय. अतिसेवनाने रोगग्रस्त झालेली किती शाकाहारी उदाहरणे दाखवू? आपल्या कडील सर्व भाषकांमध्ये जे ब्राह्मण आहेत किंवा शुद्ध शाकाहारी आहेत ते सर्व व्याधीमुक्त जीवन जगतात असा आपला दावा आहे का? त्यांच्यातही व्याधीग्रस्त तितकेच असतात जितके मांसाहारींमध्ये. अतिसेवन हेच त्या मागिल कारण आहे. (असमतोल आहार हेही एक कारण असू शकते.) बाकी तुम्ही कच्चे मांस खाउ शकत नाही याचे कारण ती तुमची नैसर्गिक बुद्धी नाही. हे वाक्य कळले नाही. नैसर्गिक गरज नाही, नैसर्गिक आवड नाही, नैसर्गिक कल नाही समजू शकते. 'नैसर्गिक बुद्धी' शब्द मला नवीन आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मन 10/05/2008 - 16:21
'पर्याय उपलब्ध असताना' हे महत्त्वाचे. मांजर दोन्ही खाऊ शकते. माणूस कच्चे मांस खाऊ शकत नाही. म्हण्जे मांजराला तुम्ही दोन्ही पर्याय उपलब्ध करून देता आहात आणि माणसाला सफरचंदाशीवाय पर्याय उपलब्ध करून दिलेला नाही तेच सांगतोय, मानवाला "कच्चे मांस(जिवंत कोंबडी!)" हा पर्याय जरी दिला, तरी तो त्याच्यासाठी पर्याय नसतोच. ही असमान तुलना कुठयं बुवा? दोघांना शेम टु शेम पदार्थच तर दिले आहेत. (कारण आक्खी चर्चाच त्या दोन पदार्थांबद्दल चालु आहे.) लोखंडाचा तुकडा कुठला आणि अस्सल सोन्याचा कुठला हे ओळखायचे(समजा एखाद्या अंध व्यक्तीला हे करायचे आहे.), तर काय होइल? दोन्हीला चुंबका जवळ आणा.जे चुंबका कडे आकृष्ट होते, ते लोखंड हा सरळ सधा "ले मॅन्स लॉजिक" वरुन आलेला उपाय आहे. (किंवा दुसरा उपाय(खात्री करुन घेण्यासाठी), :- दोन्हीला दिर्घ काळ पाण्याच्या सान्निध्यात म्हणजे जिथे लोखंड गंजु शकते, अशा ठिकाणी ठेवा.जे गंजेल तेच सोने. ) ही अशीच साधी सरळ कसोटी मी मांडलिए.त्यात कुठे असमानता आहे? आणि ती असलिच तर असमानता ही""पदार्थाच्या गुणधर्मात" आहे. सोने मुळातच चुंबकाकडे आकृष्ट होत नाही. कारण मुळातच सोने आणि लोखंड ह्यांच्या गुण धर्मात ती अचुकता आहे. याउलट(सर्वच नाही) पण कित्येक शाकाहारी गोष्टी तुम्ही आजही कच्च्या खाउ शकता. किती? रोजच्या शाकाहारातील वरील सर्व गोष्टी तुम्ही कच्च्या खाऊ शकत नाही. मी प्रश्नातच उत्तर दिलय त्याचं.आपण कित्येक फळे, कच्चे कणीस आणि अगदि धान्य सुद्धा कच्चे खाउ शकतों. नव्हे खातोच. (आठवा लुस लुशीत, कवळी कवळी धान्याची कणसे,जी क्वचितच का असेना पण आपण कच्ची खाल्ली आहेत.) (मी हे फक्त शाकाहार आपल्याला कसा योग्य ठरतो, त्यासाथी सांगतोय्.इतर तुम्ही उल्लेख केलेले प्दार्थ शिजवुन खातो, पण "आपण शाकाहार कच्चा खाउ शकतो," हे जीव शास्त्रिय दृष्ट्या कशाचे लक्षण आहे त्याचा विचार करावा ,यासाठी मी ते लिहिलयं.) तो आपल्या वागणुकी तील शिल्लक असलेला पुरावा आहे की शाकाहार शरीरास सुट होतो. पण आपण कुठलेच मांस कच्चे खाउ शकत नाही. गैरसमज आहे. योग्यप्रमाणात खाल्ले तर शरीर जरूर सहन करू शकेल. मात्र प्रमाणा बाहेर सेवन केले तर ते हानिकारकच. मग तो मांसाहार असो वा शाकाहार. का "योग्य" प्रमाणात का खायचं? मांसाहार जर शरीरास इतका उपकारक असेल, तर "फक्त मांसाहार(केवळ कच्चे मांस)" खाणे शक्य असायला हवे.ते तसे नाही, कारण ते शरीरास सुट होत नाही. माणुस प्रदुषित हवा, प्रदुषित पाणी आणि एकुणच प्रदुषित पर्यावरण ह्यात राहुनही करतोच की प्रगती. म्हणजे प्रदुषणाचा कुठला अपायच होत नाही. असं म्हट्ल्या सारखं आहे हे. अपाय होतोच. तो अल्प प्रमाणात पण सातत्याने होतो आणि साठत जातो. जेव्हा तो तसा पुर्ण साठतो, तेव्हाच तो""प्रकट" होतो.तो पर्यंत काही होत नाही म्हणुन आपले मांस खात सुटणे निश्चितच स्लो पोइझनिंग आहे. तुम्ही रस्त्यावरुन १० मिनिटे चक्कर टाकुन आलात आणि मग जर तुम्हाला काहिच त्रास होत नसेल, तर ह्याचा अर्थ असा नाही की रस्त्यावर वायु प्रदुषण ०% आहे. ते आहे, पण फक्त तुमच्या जाणिवेच्या पातळिच्या किंचित खाली आहे.(आणि हाच सर्वात मोठा धोका आहे.!!!) बाकी इथे अतिसेवनाचा मुद्दा पुर्ण गैर्लागु होइल असं मला वाटतं. तेच उपलब्ध आयुष्य सुखकर ठेवायचे असेल, तर शाकाहार चांगला असं मी म्हणतोय. ह्यासाठी मी निलकांत रावांना (ह्याच चर्चेत)प्रतिसाद दिलाय. तो आपण पाहिलात का? त्याबद्दल आपलं काय मत आहे? "नैसर्गिक बुद्धी" म्हण्जे मला "उपजत बुद्धी","उपजत ज्ञान " म्हणायचे आहे. (जे सहसा प्रौढ मानवाकडे अत्यल्प, प्राण्यांकडे भरपुर आणि मानवाच्य बालकांमध्ये काही प्रमाणात असते असे विज्ञान मानते.) (उप्जत ज्ञानाचे उदाहरणः- पोहणे. वगैरे.) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

तेच सांगतोय, मानवाला "कच्चे मांस(जिवंत कोंबडी!)" हा पर्याय जरी दिला, तरी तो त्याच्यासाठी पर्याय नसतोच. ही असमान तुलना कुठयं बुवा? दोघांना शेम टु शेम पदार्थच तर दिले आहेत. मांजरासाठी दोन्ही खाण्यालायक पदार्थ आहेत माणसासाठी कोंबडी प्रक्रियेविना खातायेण्यासारखी नाही. हीच दोघांना दिलेल्या पर्यायातली असमानता. कोल्हा आणि करकोच्याच्या गोष्टी सारखे दोघांनाही बशीतून दूध दिले तर कोल्हा ते पिऊ शकतो, करकोचा नाही. दूध पिण्याची दोघांना समान संधी मिळालेली नाही. (पदार्थ सेम असला तरीही). (किंवा दुसरा उपाय(खात्री करुन घेण्यासाठी), :- दोन्हीला दिर्घ काळ पाण्याच्या सान्निध्यात म्हणजे जिथे लोखंड गंजु शकते, अशा ठिकाणी ठेवा.जे गंजेल तेच सोने. ) ह्यावर मी काहीच मतप्रदर्शन करू शकत नाही. माझे मुद्दे मी मांडले आहेत. त्यावर त्याहून अधिक भाष्य करणे म्हणजे वेळेचा अपव्यय होईल किती? रोजच्या शाकाहारातील वरील सर्व गोष्टी तुम्ही कच्च्या खाऊ शकत नाही. किती? ह्या प्रश्नात 'अत्यल्प' हे उतर आहे. हा संपूर्ण 'आहार' होऊ शकत नाही. का "योग्य" प्रमाणात का खायचं? मांसाहार जर शरीरास इतका उपकारक असेल, तर "फक्त मांसाहार(केवळ कच्चे मांस)" खाणे शक्य असायला हवे.ते तसे नाही, कारण ते शरीरास सुट होत नाही. मांसाहारी माणसांनी फक्त मांसाहारच करावा का? सकाळी उठल्यावर ३-४ अंड्यांचे ऑम्लेट (पाव -पोळी काहीनाही), दुपारच्या जेवणात १-२ किलो कोंबडी (दुसरे तिसरे काहीच खायचे नाही), संध्याकाळी नाश्त्याला ४-५ फिश फ्राय आणि रात्री ए-दिड किलो मटण असा आहार आपल्याला अपेक्षित आहे का? तसे असेल तर आपला वाद मिटलेला आहे. इतका उपकारक मांसाहार शरीराला उपकारक आहे असे मी म्हंटलेले नाही. फक्त तो 'अनसुटेबल' नाही असे म्हंटले आहे. माणुस प्रदुषित हवा, प्रदुषित पाणी आणि एकुणच प्रदुषित पर्यावरण ह्यात राहुनही करतोच की प्रगती. म्हणजे प्रदुषणाचा कुठला अपायच होत नाही. असं म्हट्ल्या सारखं आहे हे. अपाय होतोच. तो अल्प प्रमाणात पण सातत्याने होतो आणि साठत जातो. जेव्हा तो तसा पुर्ण साठतो, तेव्हाच तो""प्रकट" होतो.तो पर्यंत काही होत नाही म्हणुन आपले मांस खात सुटणे निश्चितच स्लो पोइझनिंग आहे. जितकी वर्षे मानव मासाहार करीत आला आहे तितकी वर्षे प्रदुषणाचा सामना करावा लागला तर प्रगती करण्यासाठी माणूस उरणार नाही. मांसाहाराचा आणि प्रदुषणाच्या उदाहरणाचा संबंध पटत नाही. मांसाहाराचा संबंध जगातल्या प्रत्येक वाईटाशी जोडून वाद घालायचा म्हंटले तर मला तरी ते योग्य वाटत नाही. मुळात आपण मासाहार आणि शाकाहार ह्यांची तुलना करीत आहोत. वरील सोने आणि लोखंडाचे उदाहरणही विसंगत आहे. त्यातून 'मांसाहार चांगला आणि शाकाहार वाईट' अशी माझी मते असल्याचा तुम्ही गैरसमज करून घेता आहात. मुळ वादाचा मुद्दा असा की मांसाहार मानवाच्या शरिराला 'अनसुटेबल' आणि शाकाहारच फक्त 'सुटेबल' हा आहे. ह्यावर मी माझी मते मांडली. बाकी इथे अतिसेवनाचा मुद्दा पुर्ण गैर्लागु होइल असं मला वाटतं. का बरे गैरलागू? तेच उपलब्ध आयुष्य सुखकर ठेवायचे असेल, तर शाकाहार चांगला असं मी म्हणतोय. हा नवीन सुर तुम्ही आळवताहात. तुमच्या मुळ लेखात हा मुद्दा नव्हाता. तिथे मुद्दा होता फक्त शाकाहारच मानवी शरिराला 'सुटेबल' आहे, मांसाहार नाही. इथेच वादाला सुरुवात झाली. तुमच्या वरील वाक्याला मी जरूर समर्थन देईन. शाकाहाराला मी वाईट अजिबात म्हणत नाही. मांसाहार मानवी शरीराला 'अनसुटेबल' आहे असे तुम्ही म्हणू नका.

In reply to by प्रभाकर पेठकर

पक्या 10/05/2008 - 23:01
अ़जूनही काही प्रमाणात काही ठिकाणी कच्चे मास खाल्ले जाते. उदा. जपानी लोक काही प्रकारचे मासे कच्चे खातात. सुशी ह्या जगप्रसिध्द डिश मधे कच्चा मासाच वापरतात. बरेच लोक अंडे पण कच्चे खातात. (दूधातून किन्वा तसेच.) (पण माझ्या माहीती प्रमाणे असे कच्चे खाणे योग्य नाही कारण त्यात bacteria ची वाढ होउ शकते. शिजवलेल्या पदार्थात उच्च तापमानामुळे bacteria मरून जातात. ) योग्य प्रमाणात मांसाहार केल्यास ठीक आहे पण अतिरेक नको. मांसाहारात fiber चे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळे पोटाच्या व्याधी होउ शकतात (अपचन, बध्द्कोष्ट वगैरे) - पक्या

In reply to by प्रभाकर पेठकर

गणपा 10/05/2008 - 15:34
विषय वाचुन वाटल की मस्त गरमा गरम व्हेज v/s नॉनव्हेज चर्चा रंगणार. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार. लावणीत रंगतात त्याप्रमाणे सवाल्-जवाबाच्या फड उभा राहाणार . पण मना चा लेख वाचला आणि अगदी डांबिस काकां सारखी अवस्था झाली. मनाचे मुद्दे आम्ही इतके मनाला लावुन घेतले की वाटल की माताय मी पण शाकाहरीच व्हाव क्षण भर. (बायकोला फोन पण करणार होतो, की आज बोंबील नको, शेवग्याच्या शेंगा आणि व्हेज-कलेजी (वांगी हो) आण.) जरा खाली आलो नी पेठकर काकांचा सुंदर प्रतिसाद वाचला. पेठकर काकांनी प्रत्येक मुद्याला छान शब्दांनी(मुद्देसुद) उत्तर देउन, आमचं परत मतपरिवर्तन केल. आणि आम्ही परत मांसाहार करण्यास मोकळे झालो. धाकाहारी प्राण्याच्या आहारात.......... म्हणजे बायकोच्या धाकात राहून आहार करणारा का? काका छप्पर फाडके =)) =)) काकांमुळे माझा हॅमलेट होता होता राहिला. (आवांतरः हॅमलेट वरुन ऑम्लेट आठवल, चला नाष्ट्याला काय करायचे तो प्रश्न्न सुटला. नाहीतरी अंड दोन्ही वर्गात मोडत. शाकाहरी भी खुष, मांसाहारी भी खुष और हम भी ;) )

In reply to by गणपा

मन 10/05/2008 - 15:44
मी पेठकर काका आणि नीलकांत ह्यांच्या प्रतिसादांना उत्तर देताना काही मुद्दे मांडलेत. ते पाहिले सार्‍यांनी , तर बर होइल.... आपण ते पाहिलेत का? (मी शाकाहारी च्या ऐवजी 'धाकाहारी' लिवलं हाय. पन त्ये विवाहित पुरुषांना लयीच लागु पडतय.:-) ) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

वेताळ 10/05/2008 - 09:44
तस बघायला गेले तर आम्ही पण ज्यावेळी कोंबडीचा उतारा तिकाटण्यावर ठेवा म्हणुन सांगतो त्यावेळी जिवंत कोंबडी आम्हाला अभिप्रेत नसते.तर शिजवलेली कोंबडी असा अर्थ लोकानी घ्यावा.बाकी सुज्ञ लोकाना ज्यादा सांगण्याची गरज नाही. वि.सु.- उतारयात फक्त कोंबडीच देउ नका, बरोबर चपाती,भात,सुक्के व लिंबु पण ठेवा.आम्ही मिश्रहारी आहोत. आपला (उतारयाची वाट पाहणारा) वेताळ.

In reply to by वेताळ

मेल्या वेतोबा, तुकां म्हातारचळ लागलोसां!! तुका आम्ही सांगूचा म्हणजे ल्हानतोंडात मोठो घास होतलो पण मेल्या, ह्यां चपाती, भात, लिंबू काय मागतंस? आंवशीक खांवक व्हरान! अरे वेताळ म्हणजे आमच्या भूतगणात सर्वश्रेष्ठ रे!! आणि मेल्या तू हंयसर चपाती-भात मागतंस!! त्यापेक्षा आमी पिवळो डांबिस बरे रे!! नेत्याविना निराश, पिवळो डांबिस

In reply to by वेताळ

आम्ही मिश्रहारी आहोत. 'मिश्रहारी', नेमका हाच शब्द मला आठवत नव्हता. मानव हा शाकाहारी, मांसाहारी नाही तर 'मिश्रहारी' आहे. त्यामुळे काय सुटेबल आणि काय अनसुटेबल हा प्रश्नच उद्भवत नाही.

नीलकांत 10/05/2008 - 10:03
अगदि त्याच प्रमाणे माणुस हा "ग्रेटर एप्स" ह्या प्रवर्गात मोडतो.(प्रवर्ग नामातील् चु.भु.द्या.घ्या. बायो लॉजी सोडुन काही युगे उलटली आहेत. ) त्यांतील प्राणी कोण? तर् ओरँग उटांग,चिंपांझी,गोरिला वगैरे. ह्यांचे मुख्य अन्न ते काय? तर् काही प्रमाणात् झाडपाला आणि उरवरीत फळे, काही प्रमाणात धान्य कण सुद्धा. ह्यानुसार, मानवाचा आहार् काय हवा?
ह्याच नियमाने आपण मांसाहार सोडायचा तर मला शंका आहे की उद्या आमच्या अधोवस्त्रांबद्दल तर तुम्ही शंका घेणार नाही ना? ;) अहो साहेब ह्या निसर्गातील कित्येक गोष्टी मानवाने आपल्याला नैसर्गीक अनुकुल नसल्या तरी त्यावर काही प्रक्रिया अथवा संस्कार करून त्या आपल्याला योग्य अश्या स्वरूपात रुपांतरीत करून त्याचा उपभोग घेतला आहे - घेतो आहे. आता कुठला नियम बघायचा ते तुम्ही ठरवा, नैसर्गीक न्यायाने बघायचे तर जो बलवान आहे तोच टिकणार. मानुस त्यात वर आहे. तो त्याला अनुकुल असे नियम बनवेल. जसं जंगलात सिंह करतो. त्याला अनुकुल अशी त्याची जीवनशैली असते. त्याला हवं त्या ओढ्यावर तो पाणी पितो. हवं ते भक्ष्य तो मारतो. तो त्याच्या खाण्याच्या नैसर्गीक शैलीव्यतिरिक्त काही खात नाही कारण त्याची ती क्षमता नसावी. मानवी मुल्यांचा विचार केला तर मांस हे अतिशय समृध्द अन्न आहे. जे की जगातल्या सर्व भागात सहज उपलब्ध आहे. मांसाहाराला जे पर्यायी अन्न म्हणून सांगीतल्या जातं ते जगात सर्वत्र उपलब्ध नाहीये. नैसर्गीक अवस्थेत मानुस कच्च मांस खात होता. आपल्या शरीराला भाजलेलं मांस अनुकुल आहे हे लक्षात आल्यावर त्याने ते भाजणं सुरू केलं. त्याचा हेतू जगण्यासाठी खाणं हा होता आणि आता तो शिजवून खातो. त्यात वेगवेगळे मसाले आणि पध्दती मिसळून तो त्या अन्नांचं स्वादिष्ट रुचकर भोजनात रुपांतर करतो आणि आमच्या सारखे पामर त्याला पुर्णब्रम्हं म्हणून सेवन करतात. असो. एक साधा विचार करा जगात समुद्राच्या किनारी राहणार्‍या लोकांनी मासे खायचं बंद केलं तर आपण त्याला पर्यायी अन्न पुरवू शकू का? मला वाटतं की शाकाहार मानसाचा नैसर्गीक आहार असेलही मात्र आजच्या उन्नत अवस्थेत मानसाने जसं इतर कित्येक बाबींवर आपल्याला अनुकुल संस्कार केले व हवे असलेले अनुकुल वातावरण तयार करून तो राहतो आहे त्यानुसार आहारात हा साधा बदल खुप क्रांतीकारक आहे असं मला वाटत नाही. नीलकांत

In reply to by नीलकांत

मन 10/05/2008 - 13:26
अधोवस्त्रांबद्दल तर तुम्ही शंका घेणार नाही ना? :-)) :-) (अहो, त्याहिशेबाने खर्‍या "नैसर्गिक" अवस्थेत बॉलिवूड चाललेच आहे, माझ्या उपदेशाशिवाय! ;-) ) पण आता जरा मुद्द्याचं:- एक साधा विचार करा जगात समुद्राच्या किनारी राहणार्‍या लोकांनी मासे खायचं बंद केलं तर आपण त्याला पर्यायी अन्न पुरवू शकू का? हो. हे तर आहेच. जगातील आजची संपुर्ण मानवी लोकसंख्या १००% शाकाहारी राहणे शक्य नाही. कारण तेव्हढे (निव्वळ शाकाहारी)अन्न उपलब्ध नाही हे कटु वास्तव आहे.ह्यामुळेच विधान लिहिताना मी लिहिलय ते:- "ओरँग उटांग,चिंपांझी,गोरिला वगैरे. ह्यांचे मुख्य अन्न ते काय? तर् काही प्रमाणात् झाडपाला आणि उरवरीत फळे, काही प्रमाणात धान्य कण सुद्धा." असं लिहिलयं. ईतर कुणाच्या फायद्यासाठी नव्हे तर स्वतः च्या तब्येतीस अनुकुल असल्यामुळे शक्य तेव्हा शाकाहाराचा अन्नात समावेश असावा, असं मला वाटतं. (वाचा:- डॉ. अभय बंग ह्यांचे "माझा साक्षात्कारी हृदयरोग") (ज्यांना माहित नाही त्यांच्या साठी:- डॉ अभय बंग हे फिजिशियन ह्या अर्थाने "डॉक्टर" आहेत. सध्या चांदा,भंडारा,मेळघाट वा तत्सम जिल्ह्यांत त्यांचे समाजकार्य कित्येंकांना प्रेरणा/आदर्श ठरले आहे.) शिवाय, आयुर्वेदात "आहार्-विचार" करताना स्पष्ट पणे उल्लेख आहे तो असा:- "अन्नातील सर्व निरुप्योगी भाग विष्ठेतुन न जाता काही प्रमाणात शरीरात शिल्लक राहु शकतो. आयुर्वेदात ह्याला म्हणतात "आम". आम पुढे शारिरिक द्रव्यांसोबत मिसळुन विषारी/घातक सिद्ध होउ शकतो. " "आमा" ची सर्वाधिक निर्मिती ही प्राणिज अन्नाने होते, हे आयुर्वेदात सांगितले आहे. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे

ईश्वरी 10/05/2008 - 14:31
वरील काही मुद्दे पटले (मनच्या लेखातील). पण तरीही काही वेळेस नुसतेच जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नव्हे तर पोषणमूल्यांची गरज म्हणून ही मांसाहार केला जातो. माझ्या परिचितांचे अनुभव देत आहे. माझी एक अमेरिकन मैत्रिण सान्गत होती..तिने व तिच्या नवरयाने काही महीने मांसाहार पूर्णपणे बंद केला होता. पण नंतर त्याना आहारात proteins ची कमतरता भासू लागली. (अमेरिकनान्च्या जेवणात आपल्यासारख्या डाळी नसतात उदा. मूग, तूर्, हरभरा वगैरे . इतर काही प्रकारचे beans ते खातात पण अगदी रोज नाही ..कधीतरीच.) त्यामुळे त्यांनी परत मांसाहार घेण्यास सुरवात केली. माझ्या अजून एका (देशी) मैत्रिणीच्या मुलीला मूग आणि तूर सोड्ल्यास इतर डाळींची ऍलर्जी आहे. मुलगी लहान असल्याने रोज एकाच प्रकारचे पदार्थ खाण्यास नकार देते. मध्यंतरी काही कारणास्तव डाक्टरी चेकअप झाल्यावर मुलीला आहारात proteins कमी पडत आहे हे समजले. त्यामुळे मैत्रिणी च्या घरी सर्व शाकाहारी असले तरी मुलीसाठी त्यांनी चिकन व फिश चे पदार्थ बनवण्यास सुरवात केली. अजुन एका परिचितांचे एक छोटेसे औपरेशन झाल्यावर डाक्टरांनी चिकन सूप भरपूर प्या असे सान्गितले होते. कारण चिकन सूप मध्ये protein भरपूर असते. आणि protein आजारपणात शक्ती भरून येण्यासाठी व शरीरावर काही जखम असेल तर ती लवकर भरून येण्यासाठी मदत करते. -- ईश्वरी

In reply to by ईश्वरी

मन 10/05/2008 - 14:39
ह्या स्थितीत मांसाची पोषक मुल्य म्हणुन गरज कुणीही नाकारु शकत नाही. म्हणुनच तर शाकाहार म्हण्जे "मुख्य अन्न" असं मी काळजी पुर्वक म्हटलय. मुख्य अन्नासोबत पूरक पदार्थ गरज्/नाइलाज म्हणुन घ्यायला अशा परिस्थितीत काहिच हरकत नाही. पण त्याचे अधिक सेवन करणे योग्य नाही,असं वाटतय. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

शितल 10/05/2008 - 15:55
छान प्रतिक्रीया आणि जोरदार मत मा॑डणी. शाकाहार की मा॑साहार हा ज्याचा त्या॑नी ठरवावा, जे पचेल आणि रुचेल ते खाण्यास हरकत नसावी.

चतुरंग 10/05/2008 - 23:51
माणसाला चालतात. दोन्ही आहारांमधून त्याच्या शरीराच्या वाढीसाठी पोषणासाठी लागणार्‍या विशिष्ठ गोष्टी त्याला प्राप्त होतात. दोन्ही प्रकारचे अन्न हे नेहेमीच्या आहाराचा भाग म्हणून सेवन करताना विशिष्ठ प्रकारे प्रक्रिया करुन/शिजवून घेणे इष्ट असते. पूर्वी कच्चे, त्यापुढच्या काळात भाजलेले, अजून प्रगतीनंतर भाजून मीठ-मीरपूड टाकलेले, आधुनिक काळात विविध मसाले घालून चविष्ट बनवलेले ह्या क्रमाने मांसाहारात (आणि शाकाहारात सुध्दा) प्रगती होत गेली हे मान्य व्हावे. भौगोलिक परिस्थितीनुसार आहार विहारात बदल होत गेले/जातात आणि ते त्या परिस्थितीला टिकून राहण्यासाठी आवश्यक ठरतात. जसे किनारपट्टीवरील माणसे जलचरांचा समावेश आहारात करणारच. अतिशीत प्रदेशात (जसे टुंड्रा) एस्कीमो हे प्रामुख्याने सील, वॉलरस, मासे ह्यांना खाणार. कारण भरपूर प्रोटीन्सची नैसर्गिक गरज दुसरे काही भागवू शकतच नाही. त्याव्यतिरिक्त तुम्ही जर सर्वसाधारण प्रदेशात रहात असलात, जसे महाराष्ट्रासारखे ठिकाण जिथे फार थंड किंवा वाळवंटी प्रदेशासारखे अतिउष्ण नाही तिथे योग्य प्रमाणात मिश्राहार चालू शकेल/चालतो. मना, तू जे आयुर्वेदाचे उदाहरण दिले आहेस - "आमा" ची सर्वाधिक निर्मिती ही प्राणिज अन्नाने होते, हे आयुर्वेदात सांगितले आहे. हे अयोग्य आहे. कारण आमाची मुख्य निर्मिती ही न पचलेल्या अन्नाने होते, त्यात शाकाहार की मांसाहार हा मुद्दा गौण. कडकडून भूक न लागता केवळ वेळ झाली म्हणून जेवणे, रात्री उशिरा भरपेट जेवणे, सतत तेलकट, तळलेले खाणे, व्यायामाचा अभाव असे संपूर्ण शाकाहार ठेवून केलेत तरी हृदयमित्र प्रतिष्ठानला आणखी एक हृदयरोगी देण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकणार नाही! त्याच आयुर्वेदाने "मटणाचे सूप हे अत्यंत ताकदवान असते आणि विशेषतः आजारी किंवा शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाला जरुर पाजावे" असेही सांगितले आहे. तेव्हा भौगोलिक परिस्थिती, उपलब्ध नैसर्गिक अन्नाचे स्रोत, ऊर्जेची एकूण गरज, ह्या सगळ्याचा तोल साधत केलेला मिश्राहार हा माणसाला घातक नाही. चतुरंग

In reply to by चतुरंग

धन्यवाद चतुरंग साहेब, तेव्हा भौगोलिक परिस्थिती, उपलब्ध नैसर्गिक अन्नाचे स्रोत, ऊर्जेची एकूण गरज, ह्या सगळ्याचा तोल साधत केलेला मिश्राहार हा माणसाला घातक नाही. मलाही हेच म्हणायचे आहे. मांसाहार इतका घातक (अनसुटेबल) असता तर माणसाचे आयुर्मान वाढले नसते. मानव जात भूतलावर टिकून राहीली नसती. शाकाहार 'चांगला' की 'वाईट' ह्यावर मी तो 'चांगला' असेच मत देईन. पण ते माझे वैयक्तिक मत झाले. पण 'सुटेबल' आणि 'अनसुटेबल' असा फरक नाही करता येणार असे मला म्हणायचे आहे. कडकडून भूक न लागता केवळ वेळ झाली म्हणून जेवणे, रात्री उशिरा भरपेट जेवणे, सतत तेलकट, तळलेले खाणे, व्यायामाचा अभाव असे संपूर्ण शाकाहार ठेवून केलेत तरी हृदयमित्र प्रतिष्ठानला आणखी एक हृदयरोगी देण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकणार नाही! एक्झॅटली. अतिसेवन, चुकीच्या जीवन पद्धती वगैरे कारणांनी शाकाहारी माणसेही गंभीर आजारांना आमंत्रण देतातच की. नाहीतर सर्व हॉस्पिटल्स फक्त मांसाहारी रुग्णांनीच भरलेली असती. असो.

विसोबा खेचर 11/05/2008 - 09:28
मी खाण्यात शाकाहार/मांसाहार असा भेदभाव करत नाही. फार विचार करत न बसता जे आवडतं ते चापून खातो, मग तो शाकाहार असो की मांसाहार! फार विचार करत बसलं की खाणं अंगी लागत नाही! :) आणि मी माझ्या पैशांनी खाणार, शिवाय खाण्यामुळे जे काही उपाय/अपाय होतील ते मला होणार, मग च्यामारी जगाची फिकीर मी करूच कशाला? :) आज रविवार आहे. आज मस्तपैकी मटणवडे झोडायचा बेत आहे! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

शाब्बास!! आज मस्तपैकी मटणवडे झोडायचा बेत आहे! आणि असं बघा, मटण मांसाहारी आणि वडे शाकाहारी! त्यामुळे दोन्ही मतदारसंघ खूष!! तात्या, उगाच नाही तुम्ही संतपदाला पोहोचलांत!!

In reply to by विसोबा खेचर

आणि मी माझ्या पैशांनी खाणार, शिवाय खाण्यामुळे जे काही उपाय/अपाय होतील ते मला होणार, मग च्यामारी जगाची फिकीर मी करूच कशाला? ह्हा:..ह्हा:.. ह्हा:... तात्या, तुमच्या ह्या प्रतिक्रियेने आम्हा वाद घालणार्‍यांना साफ वेड्यात काढलेत.

मन 15/05/2008 - 19:23
पि.डा.,पेठकर काका, राजे,नीलकांत,गणपा,पक्या,शीतल ताइ, ईश्वरी ताई,शिंगाड्या राव, चतुरंग भौ आणी हो तात्या सुद्धा. सगळ्यांचे आभार मानतोय दखल घेतल्याबद्दल. काही नवीन मुद्दे दिलेत आपण, काही अहेत त्या मुद्द्यांना उत्तरं दिलीत. यथाशक्ती आपल्या प्रतिसादांना उत्तर् दिलीत.(आणि हा प्रतिसाद उशीरा दिल्या बद्दल दिलगीर आहे.) बाकी कोंबडी-बालक आणि मांजर ह्या उदाहरणाबद्दलः- कोंबडीच्या पिलाला न खाणे ही बालकाचे कृती आहे, पण त्यावरुन व्यक्तिगणिक निष्कर्श बदलताहेत.आणि हे स्वाभाविक् आहे. एकाच घटनेबद्दल आपले दृष्टिकोन वेगवेगळे असु शकतात, निष्कर्श वेगळे असु शकतात. (म्हनजे, बालक मोठे झाल्यावर खाइल्/खाणार नाही वगैरे.) आपल्या निष्कर्शाशी सहमत् नाही,पण नवीन मतं वाचायला मिळाली, याचा आनंद आहे. आपली मत, दृष्टिकोन् वाचले.काही पटले. माझ्या पुरता मी आता समारोप् करतोय. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

मन 23/05/2008 - 22:26
मित्रहो, आत्ताच फॅमिली डॉक्टरचा ताजा अंक वाचला. (माहित नसणार्‍या व्यक्तिंसाठी:- फॅमिली डोक्टर ही आरोग्य विषयक पुरवणी दै.सकाळ मध्ये प्रकाशित होते. प्रस्तुत लेखक/संपादक ह्यांचा आयुर्वेदावर मोठाच अधिकार आहे. ) त्यात ही माहिती मिळाली आहे. पथ्यकल्पना ..... ......... मांसाहार वर्ज्य नसणाऱ्या व्यक्‍तींसाठी पथ्यकल्पनेत मांसरसाचा उल्लेख केलेला आहे. पाकपात्रे घृतं दद्यात्‌ तैलञ्च तदभावतः । तत्र हिंगु हरिद्रां च भर्जयेत्‌ तदनन्तरम्‌ ।। छागादेरास्थिरहितं मांसं तत्खण्डितं ध्रुवम्‌ । धौतं निर्गालितं तस्मिन्धृते तद्‌ भर्जयेत्‌ शनैः ।। ... भावप्रकाश मांस शिजविण्याच्या भांड्यात तूप किंवा तेल घ्यावे. तूप गरम झाले की त्यात हिंग व हळद टाकून परतावी. मग त्यात हाडे काढलेले बकरी वगैरे प्राण्यांचे मांस टाकावे. जरासे परतले की पुरेसे पाणी टाकून शिजवावे. मांस व्यवस्थित शिजले की त्यात जिरे, मोहरी, धणे, सुंठ, हिंग, हळद वगैरे मसाल्याची द्रव्ये टाकून पातळ मांसरस तयार करावा. मांसाहारी व्यक्‍तींना असा मांसरस घेता येतो. मांसरस वात-पित्तशामक, ताकद वाढविणारा असतो. हाडे सांधण्यास मदत करतो, क्षय-ज्वर वगैरे रोगांनी कृश झालेल्या व्यक्‍तींसाठी ताकद देणारा असतो. मांसरसाप्रमाणे "वेसवार' हाही एक प्रकार वर्णन केलेला आहे. मांसं निरस्थि सुस्विन्नं पुनर्दृषदि पेषितम्‌ । पिप्पली शुण्ठी मरिचगुडसर्पिः समान्वितम्‌ ।। ऐकध्यं पाचयेत्सम्यक्‌ वेसवार इति स्मृतः । ... सुश्रुत सूत्रस्थान हाडे काढून टाकलेले मांस पाण्यासह व्यवस्थित शिजवावे. शिजविलेले मांस योग्य साधनांच्या साहाय्याने वाटून बारीक करावे. भांड्यामध्ये तूप, मिरी, सुंठ, पिंपळी, मीठ, गूळ वगैरे द्रव्ये पुरेशा पाण्यासह पुन्हा सिद्ध करावे. द्रवस्वरूपाचा मांसरस तयार झाला की उतरवून वापरावा. यालाच वेसवार असेही म्हणतात. हा वेसवार पचायला जड, स्निग्ध गुणाचा, ताकद देणारा व वातामुळे होणाऱ्या वेदनांचे शमन करणारा असतो. या ठिकाणी एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा की मांसरस, वेसवार वगैरे कल्पना बनविताना वापरायचे मांस चांगल्या प्रतीचे असायला हवे. प्राण्याचे वजन लवकर वाढावे म्हणून त्यांना इंजेक्‍शन्स, औषधे वगैरे दिलेली नाहीत याची खात्री करून घ्यावी. अन्यथा मांसरसाच्या फायद्याऐवजी या औषधांचा दुष्परिणाम होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. - डॉ. श्री बालाजी तांबे विषयाशी संबंधित वाटली, म्हणुन इथे टाकतोय. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' खादाड अमेरिकनांचा निषेध्,निषेध, निषेध. )

In reply to by मन

विसोबा खेचर 24/05/2008 - 01:38
अरे लेको आम्ही पूर्वापार मांसाहार करत आहोत! हा लेकाचा बालाजी तांबे आम्हाला मांस असं खा नी तसं खा असं शिकवणारा कोण लागून गेला आहे? :) मनोबा, त्या तांब्याला सांग की मला ओल्या जवळ्याची चटणी करून खायची आहे. कशी बनवायची ते सांग म्हणावं! :) तात्या.

ईश्वरी 24/05/2008 - 01:31
फॅमिली डॉक्टर मधील माहिती बद्द्ल धन्यवाद. छान आहे माहिती...उपयुक्त आहे. मी अधूनमधून वाचते ती पुरवणी पण नेहमीच वेळ होत नाही. आणि सकाळ वर मागचे अंक ही वाचायला मिळत नाही. त्यामुळे बरं झाल ही माहिती तुम्ही इथे टाकली. ईश्वरी

नीलकांत 24/05/2008 - 18:55
चरक संहितेत अनेक प्रकारच्या आहाराची चर्चा केलेली आहे. त्यात मांसाहाराचा सुध्दा उल्लेख आहे. कुठल्या प्राण्याचं मांस कसं असतं. कश्यासाठी उपयुक्त आहे आदी सगळी माहिती त्यात आहे. आश्चर्य वाटेल पण हा मांसरस खुप आजारांत आणि काही वेळातर शक्तीवर्धक म्हणून सुध्दा घेण्यास सांगीतलेला आहे. अजामांसरस वाजीकरणासाठी चांगला आहे असं म्हणतात. ;) असो. नीलकांत

In reply to by नीलकांत

आनंदी गोपाळ 02/07/2012 - 01:20
नुसता मांसाहारच नव्हे तर त्यासोबत कोणत्या ऋतूत कोणते मद्य (मोहाचे, उसाचे इ.इ.) कोणत्या पात्रातून म्हणजे काशाचे/चांदीचे/मृत्तीकेचे इ. घ्यावे तेही लिहिलेले आहे बरे! अजामांसरस = मटन सूप. (ज्ञानानंदी) गोपाळ

चित्रगुप्त 01/07/2012 - 19:27
खास शाकाहारी लोकांसाठी एक सल्ला: जगातले सर्व लोक जर शाकाहारी झाले, तर आज ज्या भाज्या उदाहरणार्थ साठ रुपये किलो मिळत आहेत, त्या सहा हजार रुपये किलो मिळतील, आणि उपासमारीची पाळी येइल. तस्मात शाकाहार्‍यांनी शाकाहार घेत रहावे आणि मासाहार्‍यांनी मासाहार. उगीच कुणी कसला प्रचार करत बसू नये, हेच बरे. (आम्ही स्वतः शाकाहारी, म्हणून उपासमारीची जास्त काळजी) :)

In reply to by चित्रगुप्त

फसवं आर्ग्युमेंटः http://www.npr.org/blogs/thesalt/2012/06/27/155527365/visualizing-a-nation-of-meat-eaters?utm_source=nprpins&utm_medium=facebook&utm_campaign=20120627 http://www.vegsoc.org/page.aspx?pid=520 थोडक्यात शाकाहाराशी तुलना करता समान कॅलर्‍या मांसाहारी जेवणातू मिळवण्यासाठी अधिक पाणी, जमीन, वेळ खर्च होतो. चित्रगुप्त काकांनी व्यक्त केलेली भीती निराधार आहे. उलट अधिकाधिक लोकांनी मांसाहार सोडल्यास कदाचित जंगलं वाढायला अधिक जागा उपलब्ध होईल. जगाचं भलं करायचं असल्यास शाकाहारी व्हा. हेडॉनिस्ट मांसाहारी असाल तर सध्यातरी जगाचं भलं करण्याची वेळ आलेली नाही. (सवयीने शाकाहारी) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आनंदी गोपाळ 02/07/2012 - 01:37
आदिती ताई, अ‍ॅनिमल प्रोटीन व प्लांट प्रोटिन प्रत्येकी १ किलो खाल्ले असता, सुमारे ९९% अ‍ॅनिमल प्रोटीन शरीर वापरात घेते, हेच प्रमाण प्लांट प्रोटीनमध्ये ४०% चे आसपास असते. आता, यातील विष्ठेद्वारे वाया जाणार्‍या भागाचा हिशोब पाणी जमीन व वेळेत कसा मोजणार? तुमच्या शरिराने डायजेशन व रिबिल्डिंग साठी खर्च केलेल्या उर्जा, एन्झाईम्स, व टाईमचा हिशोब कुठे? अ‍ॅनिमल फॅटमधून मिळणारी कॅलरी अन स्टार्च पासून मिळणारी कॅलरी यातील क्वालिटेटिव्ह व क्वांटीटेटिव्ह फरक किति? खाण्यासाठी मांस "तयार करणारे" प्राणी ज्या वनस्पती भक्षण करतात त्या प्रमाणे तुम्ही खाऊ शकत नाही. पालेभाज्यांतील सेल्युलोजही 'फायबर' म्हणून तसेच मानवी शरीराबाहेर फेकले जाते. तुम्ही आम्ही वनस्पतींचे फार्फार कमी भाग खाऊ शकतो, ज्यात बहुतांशी फक्त 'स्टोअर्ड फूड' तेही वनस्पतींनी त्यांच्या भ्रूणासाठी (बीजातील साठविलेले) वा आमिष म्हणून वापरलेले (बीज पसरविण्यासाठी वाहकांना आमिष म्हणून फळाचा गर) इतकेच असते. कणसातून दाणे काढून घेतल्यावर उदा. बाजरीच्या झाडातून फेकून दिलेल्या भागाचा हिशोब कुठे आहे??? प्राणी मारून खाल्ला अन धान्य खाल्ले, वेस्टेज परसेंटेज किती? मनुष्य प्राणी मिश्राहारी आहे. तशी त्याच्या शरीराची जडणघडण आहे. तुम्हाला 'आवडत नाही' म्हणून मांसाहार नको असे म्हणा. मी सहमत. पण ही असली आर्ग्युमेंट्स बिनबुडाची आहेत, हे कितीही वेळ वाद घालून सिद्ध करून देईन असे म्हणतो :) (भांडकुदळ) आनंदी गोपाळ संपादनः
उलट अधिकाधिक लोकांनी मांसाहार सोडल्यास कदाचित जंगलं वाढायला अधिक जागा उपलब्ध होईल.
पुन्हा दुसरी लॉजिकल चूक. जंगलातील प्राणी मारून खाण्याचे दिवस संपलेत कधीच. आजच्या घडीला शाकाहार फोफावला, तर शेतीसाठी जास्तच जंगले तोडावी लागतील.. शेती कमी करायची असेल, तर मांसाहारी व्हा. जगाच्या भल्यासाठी आता समुद्राची शेती करायची वेळ आली आहे. मांस नको तर मासे-आहारी तरी व्हाच असे माझे म्हणने आहे. जय प्लँक्टन्स : द बिगेस्ट प्लांट मास ऑन अर्थ!

In reply to by आनंदी गोपाळ

उर्जा, एन्झाईम्स, व टाईमचा हिशोब कुठे?
या सगळ्या गोष्टी पुन्हा वनस्पतीजन्य आहारातून मानवाचं शरीर बनवणार. शरीर ज्या गोष्टी नाकारतं त्या पुन्हा काहीबाही करून जाळल्यास (उदा: बायोगॅस, खतं इ.) पुन्हा परिणाम एकच होणार. पृथ्वीच्या जीवावरच आपण आपलं आयुष्य जगणार. प्राणिजन्य आहारातून समप्रमाणात ऊर्जा मिळवण्यासाठी बर्‍याच अधिक प्रमाणात पाणी, जमीन, वेळ खर्च होतात असा दावा आहे. (यात कुठेही संपूर्ण पोषण याबद्दल चर्चा नाही.) सर्व लोक शाकाहारी झाल्यास सर्वांना पुरेसं अन्न मिळणार नाही असा जो दावा (का कोण जाणे!) केला जातो तो बिनबुडाचा आहे असा दावा आहे. या गणितात सहजच दिसणार्‍या अडचणीही मीच सांगते. पोषण मूल्य हा फार कटकटीचा भाग आहे. त्याशिवाय शेतीचं अर्थशास्त्र. कपास, नीळ, कॉफी, अफू वगैरे पदार्थ अन्न म्हणून खाल्ले जात नाहीत, त्यांचीही शेती होते. नगदी पिकं काढण्याकडे शेतकर्‍यांचा ओढा असतो. पिकाला पुरेसा भाव मिळाला नाही म्हणून पीक जाळलं जातं. इ. त्याशिवाय शेतीखालचा जमिनीचा भाग कमी झाल्यास, तिथे झाडं लावल्यासही पर्यावरणावर प्रचंड मोठा फरक दिसणार नाही. पर्यावरण म्हणजे हरित वायू परिणामामुळे होणारा परिणाम यासंदर्भात बघितल्यास, हवा 'शुद्ध' करण्याचं काम समुद्री जीव झाडांपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात करतात. आत्ता आहे त्यापेक्षा १०% झाडं अधिक झाल्यास फार फरक पडेलच असं नाही. (या गणिताचे स्रोत शोधण्यासाठी टैम्प्लीस.) त्याशिवाय मी सुरूवातीला केलेल्या विधानातल्या अधिक त्रुटी दाखवल्यास आवडेल. दुसर्‍या बाजूने मांसाहारातूनच मिळणारे काही आवश्यक पोषण (ब जीवनसत्त्वाचे काही प्रकार?) शाकाहारी लोकांना मिळत नाही किंवा पुरेसं मिळत नाही अशीही अडचण आहेच. शाकाहार्‍यांच्या आहारात दूध आणि अंडीही मोजलेली नाहीत. व्यक्तिशः माझा कोणाच्याही कोणत्याही प्रकारच्या आहाराला विरोध नाही. मी स्वतः शक्यतोवर शाकाहारी असले तरी माझ्याही अनेक चवी-ढवी आहेत. सगळ्याच भाज्या, फळं मला अगदी मनापासून आवडतात असं नाही. उलट आवडतं ते काहीही मिळालं नाही/मिळत नाही तेव्हा उपलब्ध असेल ते (बीफ्/पोर्क) आणि शैक्षणिक भूक म्हणून ससा, मोर, बेकन, सॉसेजेस, कोंबडी, हरीण, बकरा खाल्ले आहेत.

In reply to by आनंदी गोपाळ

तुमचं संपादन थोडं उशीरा पाहिलं. पण सध्या टैम्प्लीस. --- टैम्प्लीस सोडून ---
जंगलातील प्राणी मारून खाण्याचे दिवस संपलेत कधीच. आजच्या घडीला शाकाहार फोफावला, तर शेतीसाठी जास्तच जंगले तोडावी लागतील.. शेती कमी करायची असेल, तर मांसाहारी व्हा.
जंगलातले प्राणी पुरे पडण्याएवढी लोकसंख्या कमी होती तेव्हा ही अडचण नव्हतीच. आता (गेली अनेक शतकं) मांसाहारासाठीही पद्धतशीर शेती होते. १. या (प्राणी-)शेतीसाठी मोकळी जागा लागते. २. या प्राण्यांना खाऊ घालण्यासाठी आधी मुळात गवत, संत्र्याच्या साली, इ.इ. अनेक गोष्टी लागतात. कोंबड्यांना अ आणि ड जीवनसत्त्व टोचली जातात किंवा कोंबड्यांना टिपण्यासाठी बाहेर सोडलं जातं, पुन्हा अधिक जागेची आवश्यकता आहे. इतर सर्वच प्राण्यांच्या बाबतीत काही ना काही घटक येतातच. या प्राण्यांना पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी पाणी लागतं. या प्राण्यांच्या अन्नासाठी पाण्याची आवश्यकता असते. हे प्राणी जंगलात जाऊन खाऊन परत कत्तलखान्यात जात नाहीत. ३. मांसाहार मार्केटात येतो तो ही बराच प्रोसेस होऊन येतो. (भारतातलं मांसाचं मार्केट खूपच कमी आहे.) या प्रोसेसिंगसाठी जागा आणि चिक्कार प्रमाणात ऊर्जा+पाणी वापरले जातात. त्याची जागा धान्य, भाज्या, फळांनी घेतल्यास पाणी, जागा आणि ऊर्जा नक्कीच कमी वापरले जातील. थोडक्यात सूर्याकडून येणारी ऊर्जा आणि पृथ्वीकडून येणारं पाणी आणि इन/ऑरगॅनिक वस्तूमान झाडांवाटे माणसाच्या शरीरात येण्याऐवजी झाडांकडून प्राण्यांकडे आणि प्राण्यांकडून माणसाकडे तर ती क्रिया अधिक इन-एफिशियंट होणार. (यात पुन्हा आकडे देता येतील, पण थर्मोडायनामिक्सचा दुसरा नियम, वाढती एंट्रॉपी, परपेच्युअल मशीन किंवा १००% एफिशियन्सी असणारं मशीन बनवणं अशक्य असणं वगैरे पहाता यात आकडे देण्याची फार आवश्यकता नसावी.) अन्न साखळीत कोणताही प्राणी जेवढा वर चढणार तेवढं मूळ स्रोताकडून ऊर्जा मिळवणं इन-एफिशियंट (मराठी) होणार. मूळ स्रोत - सूर्य आणि पृथ्वी. सर्वांना मिळणारी ऊर्जा शेवटी तिथूनच येते. अन्न साखळीत वरच्या स्तरावर असणारे प्राणी, खालच्या स्तरावर असणार्‍या प्राण्यांपेक्षा खूपच कमी असतात त्याचं हेच कारण. मांसाहारी मनुष्य अन्न साखळीत वरच्या स्तरावर जातो. यांची संख्या बेसुमार वाढल्यास शेती करावी लागणार अन्यथा हे लोक मांसाहारी बनून टिकून राहू शकत नाहीत. माणूस खातो त्या माशांची बेसुमार मासेमारी केल्यासही समुद्री इकोसिस्टमवर त्याचे दुष्परिणाम होतात. तिथली अन्न-साखळी तुटते. पर्यावरणाचा मुद्दा कळीचा बनतो पाण्याच्या कमी/मर्यादित उपलब्धतेमुळे. तिसरं महायुद्ध पाण्यासाठीही होऊ शकतं असा एक दावा केला जातो. एखाद्या देशाकडून अन्न आयात करणं म्हणजे पाणीही आयात करणं. या संदर्भात मांसाहार खूपच कमी एफिशियंट आहे याचा विचार केला जातो. लाल मांसाच्या अतिसेवनामुळे होणारे रोग, मांसाहारी (कार्निव्होरस म्हणावे इतपत) लोकांना होणारे निरनिराळे कर्करोग यांचा विचार केलेला नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आनंदी गोपाळ 05/07/2012 - 22:46
कोणत्याही हृदयरोग तज्ञाकडे जाऊन आपण 'पूर्ण' शाकाहारी आहात असे सांगा. पहिली तपासणी तो तुमच्या शरीरातील जीवनसत्वांच्या प्रमाणाची लिहून देईल. खासकरून ब जीवनसत्व समूह. शाकाहाराचा अतिरेक करणार्‍यांना या 'डेफिशिअन्सिज' होतात. व त्यांचे दुष्परिणामही होतात. रेड मीट, जेनेटिक बिल्डप, बॉडी फॅट डीस्ट्रिब्युशन यांचे विचार वेगळे आहेत. इथे चर्चा माणूस 'नॅचरली शाकाहारी की मांसाहारी' अशी आहे. दात असे म्हणुन शाकाहारी, शेपूट नाही म्हणून शाकाहारी इ.इ. बाष्कळ पुरावे. फक्त दोन टोके. मधला मूळ मिश्राहार सगळेच विसरलेत..असो. (तुमचा प्रतिसाद वाचून first impression उत्तर हे आहे. सविस्तर वाचून नंतर लिहिन. ३ दिवस रजेवर होतो.)

In reply to by आनंदी गोपाळ

बॅटमॅन 07/07/2012 - 02:34
+१ सहमत. शाकाहाराचे समर्थक कधी कव्हर्ट पणे तर कधी उघडपणे असे बाष्कळ पुरावे मांडायला फार आतुर असतात असे एक निरीक्षण आहे. अशांना कसे आवरावे ते कळत नाही.

In reply to by आनंदी गोपाळ

माझा मुद्दा तो नाहीच. जगातले सर्व लोक शाकाहारी झाल्यास जगाला अन्न कमी पडणार नाही असा मुद्दा मी मांडते आहे. मानवी शरीरात प्राणिजन्य प्रथिनांपेक्षा वनस्पतीजन्य प्रथिनं कमी शोषली जातात असा तुमचा मुद्दा होता. त्यात प्राण्यांची शरीरं जी वनस्पतीजन्य प्रथिनं टाकून देतात त्याचाही विचार करावा लागेल. पोषणमूल्य, आतड्याची लांबी, दातांची रचना हे विषयाशी संबंधित, पण मी मांडते आहे त्यापेक्षा संपूर्णतः वेगळे मुद्दे आहेत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आनंदी गोपाळ 08/07/2012 - 14:42
पृथ्वीवर वर्चस्व गाजविणारे व प्रचंड संख्येने असलेले, व आकारानेही भलेप्रचण्ड असे डायनोसॉर बहुसंख्येने शाकाहारी होते. त्याकाळी शाकाहारी अन्न त्यांना कमी पडल्याने उपासमार होऊन ते मेले असावेत असा शोध लागलेला नाही. परंतू, माणसाच्या शाकाहारात अन प्राण्यांच्या शाकाहारात असलेला महत्वाचा फरक तुम्ही लक्षात घेत नाही आहात. मक्याचे झाड लावले असता माणूस फक्त कणसातले दाणे खातो, बाकीचे पूर्ण झाड 'वाया' जाते. हेच गायीच्या बाबतीत ती संपूर्ण झाड खाऊ शकते. व पचवूही शकते. हाही हिशोब करता, इतक्या प्रचण्ड संख्येने असलेल्या माणसाला खाऊ घालण्यासाठी शेती करणे व त्यासाठी एकोसिस्टीम्स नष्ट करणे हा उद्योग करावा लागेल. अन हे केवळ अनैसर्गिकरित्या मनुष्याला 'शुद्ध' शाकाहारी बनविल्यामुळे.

In reply to by आनंदी गोपाळ

मनुष्य गाय खातो तेव्हाही संपूर्ण गाय खात नाही, खाऊ शकत नाही, खाल्ल्यास तिचा काही भाग पुन्हा शरीराबाहेर अनावश्यक म्हणून बाहेर टाकणार. (इथे मी फार क्वालिटेटीव्ह (मराठी शब्द?) बोलते आहे हा आक्षेप मान्य आहे.) मुळात ऊर्जा सूर्याकडून आणि पोषण पृथ्वीकडून मिळणार. त्यात जेवढ्या अधिक पायर्‍या येणार तेवढं यंत्र inefficient होणार. आपण (प्राणी) photosynthesis करू शकत नाही म्हणून वनस्पतींची आवश्यकता आहे. झाडाचा आपण मोजका भागच खाऊ शकतो हे खरं आहे तेवढंच हे ही आहे की उरलेला भाग पुन्हा पृथ्वीमधे, हवेमधे परत जातो. सूर्याची ऊर्जा परत जात नाही, पण त्या ऊर्जेचं मुख्य काम catalyst चंच असतं. शिवाय सूर्याचं इंजिन अजून ५X१० वर्ष चालू रहाणार आहे. तत्संबंधात एक अवांतर प्रश्नः वाघाने (किंवा इतर मांसाहारी प्राण्याने) गवत, पालापाचोळा, शाकाहार घेतल्यास त्याच्यावर परिणाम काय होतो?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आनंदी गोपाळ 13/07/2012 - 11:08
पण लहानपणापासून, ‘फोटोसिंथेटिक’ माणूस तयार करता आला तर काय बहार येईल- अशी साय-फ़ाय स्वप्ने पहात आलो आहे.. बाकी वेळ मिळाल्यावर पुन्हा

In reply to by आनंदी गोपाळ

अतिशय मर्यादित अर्थाने हे अजूनही होतंच की! सूर्यप्रकाशात मनुष्याच्या शरीरात, त्वचेखाली ड जीवनसत्त्व तयार होतं. अवांतरः असं झाल्यास, सूर्यप्रकाशात लोळत पडलेले लोकं हे दृष्य कॉकेशन वंशाचे लोकं असणारे सोडून इतर देशांतही दिसेल.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मन१ 13/07/2012 - 19:46
आपण आपले फोटोसिंथेसिस करु लागलो तर हळूहळू उभयचर(amphibian) कसे जमीनीवरच्या आणि पाण्यातल्या प्राण्यांचे गुणधर्म दाखवतात, तसे आपण दाखवू लागू. आपण "चालणारी वनस्पती" ह्या क्याटॅगरित येउ. वनस्पतीसारखे कोवळे लुसलुशीत,तुकतुकित,हिरवेगार दिसू. म्हणजेच समजा आपण दुपारी कधी डुलकी काढायला जायचो आणि आपले मनोहारी रूप पाहून एखादी शेळी, एखादे हरीण, ससा, कित्येक पक्षी ह्यांना आपला मोह पडून ते आपल्याला "कचाकचा" खायला धावतील. काही पक्षी आपल्याला फोडून तोडून घरटे बनवू पाहफोडून्कल्पना करा :- आपला एक डोळा फोडून चिमणीनं घरटं केलय. एक पाय तो क्रूर सुतार पक्षी फोडून्,कुरतडून राहिलाय. यक्क... नकोच ते. शिवाय इतके दिवस आपणच त्यातल्या कित्येकांची पैदास वाढवल्याने, त्यांची कमी नाही. आपल्या आजवरच्या पिढ्यांनी त्यांना कापून कापून जी मौज केली त्याची परतफेड अशी "उत्क्रांत" झालेल्या पिढीला करावी लागेल. बाब्बो. नकोच. शेळीनं तुम्हाला खाण्यापेक्षा तुम्ही शेळीला खाल्लेलं बरं.

चित्रगुप्त 02/07/2012 - 02:12
जीवो जीवस्य भोजनम. शाकाहार काय अथवा मासाहार काय, काहीतरी 'जीव' असलेलेच खावे लागते. 'निर्जीव' उदा. दगड, माती इ. खाऊन पोषण होत असल्याचे अद्याप ऐकिवात नाही.

रमताराम 02/07/2012 - 18:08
चिंम्प्स शिकार करतात हो, अगदी सजातीय प्राण्यांची म्हणजे छोट्या माकडांची शिकार तर प्राधान्याने करतात. छोट्या माकडांचे वसतीस्थान हेरून आधी आसपासची सारी झाडे पकडून बसतात, जणू वेढाच घालतात. नि मग मुख्य नर मधल्या झाडांवरील माकडांवर हल्ला चढवतो. आजूबाजूचे त्यांना दुसर्‍या झाडावर उडी मारून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना रोखतात किंवा शिकार करतात. मग आता माणूस स्वजनाहारी (कॅनिबल) झाला तर योग्य ठरेल का हो? याशिवाय काही लहानसहान प्राण्यांची शिकारदेखील करतात. चिम्प्स मुळीच शाकाहारी नाहीत. बाकीचे शाकाहार/मांसाहार वगैरेचे कवित्व आमच्या विट्रेंस्टचे नसल्याने तुमचे चालू द्या.

गोंधळी 02/07/2012 - 21:00
माणसाने शाकाहारी असावे की मांसाहारी असावे ही त्या माणसाची व्ययक्तिक बाब आहे. मला तरी व्ययक्तिकरीत्या(माझ्यापुरता )शाकाहार चांगला वाटतो.

In reply to by गोंधळी

शाकाहार नक्कीच चांगला आहे. पण शरीराच्या प्रथिनांच्या गरजेच्या पूर्ततेसाठी रोजच्या जेवणात कडधान्ये असावीत. कडधान्यातून प्रथिने मिळतात पण त्यांना 'अपूर्ण प्रथिने' म्हणतात ती शरीरात पूर्णपणे शोषली जात नाहीत. त्यासाठी त्या बरोबर कार्बोहायड्रेट्स असावेत. जसे, भात, भाकरी इ. म्हणूनच आपल्याकडे वरण भात, मुगाच्या डाळीची आणि तांदूळाची खिचडी खायची पद्धत आहे, तांदूळ+उडीदाची डाळ असलेली इडली अशा पदार्थांचा आहारात समावेश जास्त असावा. मांसाहारी पदार्थात प्रथिने अधिक असतात आणि ती 'पूर्ण' प्रथिने ह्या सदरात मोडतात आणि शरीरात पूर्णपणे शोषली जातात. आयुष्यभर शरीराला प्रथिनांची कमतरता भासली तर म्हातारपणी काही विशिष्ट आजार (पाय असह्य दुखणे इ.इ.) होऊ शकतात. माझ्या आईला ह्याचा त्रास झाला होता. पूर्ण शाकाहारी व्यक्तींमध्ये ह्याचे प्रमाण अधिक आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

गोंधळी 02/07/2012 - 21:48
मांसाहारी पदार्थात प्रथिने अधिक असतात आणि ती 'पूर्ण' प्रथिने ह्या सदरात मोडतात आणि शरीरात पूर्णपणे शोषली जातात. सहमत. पूर्ण शाकाहारी व्यक्तींमध्ये ह्याचे प्रमाण अधिक आहे. असहमत.मला वाटते हा संशोधनाचा विषय आहे. आणि काका मला शाकाहार चांगला किं मांसाहार चांगला या वादात पडायचे नाहि आहे.हा ज्याचा त्याचा व्ययक्तिक प्रश्न आहे. ------------------- जय आदिवासी.

In reply to by गोंधळी

मला वाटते हा संशोधनाचा विषय आहे. माझ्या आईच्या आजारपणात तज्ज्ञ फिजिशियन कडून ही माहिती मिळाली. त्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात शिकविले जाते त्या अर्थी कांही तरी तथ्य असावे असे मला वाटते. बाकी ह्या विषयावर मी जास्त अधिकारवाणीने बोलू/लिहू शकत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

गोंधळी 04/07/2012 - 13:20
मटण खाणाऱ्या व्यक्तींना कर्करोग होण्याची शक्‍यता अधिक असल्याचा दावा "ग्लोबल ऍग्रीकल्चरल इन्फॉर्मेशन नेटवर्क'ने (ग्लोबोकॅन) प्रसिद्ध केलेल्या अहवालात केला आहे. ही महिती आजच्या सकाळ मधिल आहे. http://www.esakal.com/esakal/20120704/5665452963893279664.htm

सुनील 02/07/2012 - 22:15
निरिक्षण १ - चिम्स हे केवळ मांसाहारीच नव्हे तर, स्वजातभक्षीदेखिल आहेत, हे वर ररांनी सांगितलेच आहे. तेव्हा हा मुद्दा बाद. निरिक्षण २ - मनुष्य कच्चे मांस खात नाही. सबब, त्याला तीक्ष्ण दातांची वा सुळ्यांची आवश्यकता नाही. हा मुद्दादेखिल बाद. निरिक्षण ३ - मुद्दा नीट समजला नाही. मनुष्य मांसाहारदेखिल चावूनच खातो, गिळून नव्हे :) निरिक्षण ४ - मानवी शरीरातील एक हल्ली वापर होत नसलेला भाग यातच सगळे आले, नाही का? निरिक्षण ५ - काय पण तुलना? बालक कोंबडीचे पिल्लू कसे खाईल? त्याऐवजी सफरंचंद आणि मस्त भाजलेली चिकन तंदूरी ठेवा आणि मग बघा, ते बालक काय करते ते ;) थोडक्यात, ज्याला जे हवे, ते त्याने खावे. नसती कारणमिमांसा देत बसू नये :)

In reply to by सुनील

निरिक्षण २ - मनुष्य कच्चे मांस खात नाही. सबब, त्याला तीक्ष्ण दातांची वा सुळ्यांची आवश्यकता नाही. हा मुद्दादेखिल बाद.
अनेक भाज्या, धान्येही आधुनिक मनुष्य कच्च्या खात नाही, बर्‍याच प्रक्रिया करून खातो. कच्ची पीठं खाल्ल्यास अनेकांना पोटदुखी इत्याही होतात. (निदान कणीक भिजवल्यावर आई अशी तंबी देतेच देते.)
ज्याला जे हवे, ते त्याने खावे. नसती कारणमिमांसा देत बसू नये
सहमत आहे.

मनोबांचा धागा ग्रेट, आणी पेठकर काकांचे एकाहुन एक मुहतोड जबाब त्याहुन ग्रेट...! व्वा..! चर्चा व्हावी तर ती अशी. शिवाय आयुर्वेदातले उल्लेखही बारकावे हेरणारे आहेत. मला तर असं वाटतं की हा अख्खा धागाच एका छोट्याश्या पुस्तकात रुपांतरीत करुन(आणखि आवश्यक भर घालुन) हे पुस्तक शाकाहारी आणी मांसाहारी अश्या दोन्ही प्रकारच्या लोकांना मोफत लस म्हणुन वाटावे. कारण दोघांमधेही त्या त्या मताचा व्हायरस असतोच..!

रमेश आठवले 07/07/2012 - 02:30
प्राण्यांच्या उत्क्रांती प्रक्रियेचा वर वर अभ्यास केला तर असे लक्ष्यात येते कि प्रत्येक प्राणीमात्रात त्याच्या उदरभरणासाठी लागणारे अन्न मिळवण्यासाठी स्वयम्भूत साधने असतात. मांसाहारी प्राण्यान्जवळ नखे, सुळे अशी शिकारीची साधने असतात. मनुष्यामध्ये अशी साधने नाहीत ह्यांचे कारण मानव हा शाकाहारी घडविला गेला आहे. त्याने नंतर बुद्धीचा वापर करून काठी, बाण,सापळा व इतर बाह्य साधनांचा वापर करून शिकार करावयास सुरुवात केली आणि ह्यामुळे तो मांसाहारी होऊ शकला, बाकी नैसर्गिक पणे तो शाकाहारीच घडला आहे.

In reply to by रमेश आठवले

आनंदी गोपाळ 08/07/2012 - 01:02
i-lA~रमेशचे अनेक अर्थ आथवले मला. असो. महोदय! तुम्ही 'वर वर' अभ्यास केला तर मी तुम्हाला, 'खाली खाली' हाका मारीन. अन प्रश्न विचारीन. हे 'वर वर अभ्यास' काय आहे? तुमच्या उदरात उंदीर भरला अन गवत भरले, तर उंदराने जिवंत रहाल की गवताने? खाली खाली विचार केला तर गवत पचवता येत नाही. त्यातले ना क्लोरोफिल पचते, ना सेल्युलोज. (सेल्युलोज ही एक प्रकारची 'साखर' असते हे आपणास अथवते का?) या उलट उंदरातील बरेच काही पचते. उगंच काहीतरी आथवले म्हनून काहीतरी टंकले असे करू नये, ही णम्र इणंटी.

In reply to by आनंदी गोपाळ

गोपाळा,,,हसवुन हसवुन मारलस रे बाबा...! उगंच काहीतरी आथवले म्हनून काहीतरी टंकले असे करू नये, ही णम्र इणंटी. >>>

In reply to by आनंदी गोपाळ

रमेश आठवले 08/07/2012 - 23:36
ध चा मा करणारया एक आनंदीबाई रघुनाथराव होवून गेल्या. आता आणखी एक आनंदीबाई अवतरल्या आहेत असे वाटते. लेखनात सभ्यपणा वापरण्याची शिकवण या नवीन आनंदीबैना मिळालेली नाही असे दिसते. या बाबत गोपाळराव यांस विचारावयास हवे.

In reply to by रमेश आठवले

आनंदी गोपाळ 09/07/2012 - 22:38
आपण सरपंचां कडे तक्रार केलीत, इतपत माझ्या प्रतिक्रीयेने दुखावलात, हेच जर मला उलट प्रश्न करून विचारले असतेत, तर समजवून सांगितले असते. उत्क्रांतीच काय तर कोणत्याही जीवशास्त्रीय विषयांचा तुमचा अभ्यास शून्य आहे असे साडेतीन रुपयांची पैज लाऊन इथे सांगतो. (माझी ऐपत तितकी आहे. म्हणून तितकी पैज.) आनंदी अन गोपाळ याचे स्पष्टीकरण जरा माझी स्वाक्षरी पहाल तर समजेलच.

In reply to by रमेश आठवले

आनंदी गोपाळ 09/07/2012 - 22:51
प्राण्यांच्या उत्क्रांती प्रक्रियेचा वर वर अभ्यास केला तर असे लक्ष्यात येते कि प्रत्येक प्राणीमात्रात त्याच्या उदरभरणासाठी लागणारे अन्न मिळवण्यासाठी स्वयम्भूत साधने असतात.
उत्क्रांती प्रक्रिया ही स्वत:च ती साधने बनविते. ती 'असत' नाहीत.
मांसाहारी प्राण्यान्जवळ नखे, सुळे अशी शिकारीची साधने असतात. मनुष्यामध्ये अशी साधने नाहीत ह्यांचे कारण मानव हा शाकाहारी घडविला गेला आहे. त्याने नंतर बुद्धीचा वापर करून काठी, बाण,सापळा व इतर बाह्य साधनांचा वापर करून शिकार करावयास सुरुवात केली आणि ह्यामुळे तो मांसाहारी होऊ शकला, बाकी नैसर्गिक पणे तो शाकाहारीच घडला आहे.
बुद्धी नावाचे शस्त्र उत्क्रांतीतून मिळाल्यावर इतर सगळी शस्त्रे क्षुल्लक व कुचकामी ठरली, सबब त्यागली गेली. अक्कल वापरून अन्न मिळविणे जास्त सोपे होते. उगा धारदार सुळे अन बळकट बाहू कशाला हवेत? आम्ही प्राणी पाळू लागलो अन शेती करताना झाडेही पाळू लागलो. उत्क्रांतीचा 'वरवर' नाही नुसता ८वी यत्तेइतका अभ्यास केला असतात, किंबहुना वर्गात शिक्षक बोलले ते थोडे जागेपणी ऐकले असतेत, तरी इतके समजले असते. उगा प्रतिसाद टंकताना 'अमुक शास्त्राचा 'वरवर' अभ्यास केला असता असे दिसून येते' स्टाईल वाक्ये टंकून स्वतःच्या अज्ञानाला वजन देण्याचा प्रयत्न केलात तर माझ्या सारखे लोक मी टंकले तसे खडूस प्रतिसाद लिहीणारच. ती मिपाची प्रकृती आहे.

In reply to by रमेश आठवले

वेताळ 12/07/2012 - 17:40
उत्क्राती काळात मानव सर्वप्रथम शाकाहारी होता ह्याबद्दल आपण संशोधन केले आहे काय? असल्यास त्याबद्दल अधिक माहिती द्या.

In reply to by वेताळ

रमेश आठवले 13/07/2012 - 22:20
या विषयावर मी लिहिले आहे त्याची आणि माझ्या ज्ञानाची टर न उडवता आपण मला अधिक माहिती द्यावयास सांगितले याबद्दल धन्यवाद. निरोगी चर्चा हि अशीच असावयास हवी असे माझे मत आहे. मिपाच्या संपादक मंडळींचेही असेच मत आहे असे मी मानतो. खाली दिलेल्या धाग्यावर मानवाची शरीर रचना आणि त्याची पचन प्रक्रिया हि शाकाहारी प्राण्यांसारखी आहे आणि मांसाहारी प्राण्यांच्या सारखी नाही हे पटवून दिले आहे. http://www.stevepavlina.com/blog/2005/09/are-humans-carnivores-or-herbivores-2/

In reply to by रमेश आठवले

बॅटमॅन 13/07/2012 - 22:52
जी लिंक आपण दिलीत तो स्टीव्ह पावलिना हा दीपक चोप्रा वैग्रे प्रमाणे ग्रोथ गुरु आहे, आहारतज्ञ नाही, सबब त्याची मते ग्राह्य मानता येत नाहीत.

In reply to by रमेश आठवले

बॅटमॅन 14/07/2012 - 02:32
तुम्ही दिलेला दुवा तद्दन गल्लाभरू छाप आहे हे माहिती असूनदेखील तिकडे दुर्लक्ष करून "आशया"कडे जातो. तो जो "आशय" दिलेला आहे, त्याशी मानवजातीचा इतिहास सुसंगत नाही. शेतीचा शोध लागण्याआधी माणूस अगदी खुंदल खुंदल के शिकार करून खात होता. त्यावेळी बरा आला नाही त्याला कुठलाही प्रॉब्लेम? माणसाचे अतिशय जवळचे जेनेटिक बांधव चिंप्स देखील नॉनव्हेज खातात. इतकेच नव्हे तर वैदिक वाङ्मय, महाभारत, आयुर्वेद, इ. ठिकाणी देखील मांसाहाराचे वर्णन खूप ठिकाणी येते. त्याचा निषेध हा देखील खूप नंतरच्या काळातील आहे. भारतच का, उर्वरित जगातदेखील मांसाहार खूप जोरात केला जायचा आणि आत्तादेखील जातो. हे सर्व आणि इतरही बरेच मुद्दे या चर्चेत ऑलरेडी बहुत वेळेस आलेले आहेत. ते थोडे तरी पहा, त्यातल्या विसंगती स्पष्ट करा आणि मग बोला. कुठल्याही बाजूने चिक्कार लिंका मीपण देऊ शकेन आत्ताच्या आत्ता. पण त्याला काही अर्थ नाही.

In reply to by रमेश आठवले

आपल्या मतांचा आदर आहेच. परंतु, कुठले, कोणाचे वैचारिक विश्लेषण वाचून आपले मत बनविण्यापेक्षा योग्य प्रमाणात मांसाहार, शाकाहार आणि मिश्राहार घेणार्‍या वेगवेगळ्या समुदायाचे अल्पायुष्य आणि दीर्घायुष्य ह्या मोजपट्टीवर मापन केले (तसा विदा उपलब्ध असेल तर) तर जे निष्कर्ष समोर येतील ते जास्त विश्वासार्ह म्हणावे लागतील. योग्य प्रमाणात घेतलेला मांसाहार, शाकाहार आणि मिश्राहार कितपत आरोग्यदायी ठरतो ह्याचे काही सर्वमान्य पुरावे उपलब्ध असतील तर चर्चेला दिशा मिळेल. नाहीतर तिन्ही आहार पद्धतींचे समर्थन आणि खंडन करणारे अनेक जणं असतात त्यामुळे जगाच्या अंतापर्यंत ही चर्चा चालू शकेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

बॅटमॅन 14/07/2012 - 02:03
योग्य प्रमाणात घेतलेला मांसाहार, शाकाहार आणि मिश्राहार कितपत आरोग्यदायी ठरतो ह्याचे काही सर्वमान्य पुरावे उपलब्ध असतील तर चर्चेला दिशा मिळेल. नाहीतर तिन्ही आहार पद्धतींचे समर्थन आणि खंडन करणारे अनेक जणं असतात त्यामुळे जगाच्या अंतापर्यंत ही चर्चा चालू शकेल.
एग्जॅक्टलि!!! थोडेसे गुगलून पाहिले असता एक पेपर सापडला. यात त्यांनी व्हेजवाले आणि हेल्थ कॉन्शस नोनव्हेजवाले यांची तुलना करून निष्कर्ष काढले ते त्यांच्याच शब्दांत देतो. शीर्षकः Vegetarian diets, chronic diseases and longevity. सारांशः प्युअर व्हेजवाल्यांच्या मते व्हेज खाण्यामुळे आयुर्मान वाढते, विविध रोगांची रिस्क कमी होते, इ.इ. पण युरोपमधील सर्वांत जास्त हेल्दी लोक उदा. स्कँडेनेव्हियन्स..ते तर लै मांस खातात. व्हेज खाण्यामुळे लट्ठपणा कमी होतो, तसेच हृदयरोगाची रिस्क कमी होते, पण विविध प्रकारच्या कॅन्सर बद्दलची रिस्क आजिबात कमी होत नाही. शिवाय नॉनव्हेज खाण्यामुळे हिंसक स्वभाव बनतो असे जे अडाणचोट विधान आहे त्याला दुजोरा देणारी कसलीही माहिती आजपर्यंत पुढे आलेली नाही. आणि अलीकडच्या खादाड समाजात व्हेज म्हणजे एक प्रकारचे आहारनियमनच असल्यामुळे त्याचा काही अंशी फायदा होतो. व्हेजमध्ये फळे वैग्रे खा ल्ल्यामुळे फायदा होतो, निव्वळ मांस न खाल्ल्यामुळे नाही. पान क्र. २ वर पहावे, आईसलँड मधील आहाराच्या सवयी खुंदल खुंदल के नॉनव्हेज वाल्या असूनदेखील त्यांचे आयुर्मान जास्त आहे. हेल्थ कॉन्शस नॉनव्हेजवाले आणि व्हेजवाले यांची तुलना केल्यास बर्‍याच प्रचलित समजुतींना तडा जाऊ शकतो हे या ४ पानी पेपरावरुनदेखील सिद्ध होते.

अनेक शाकाहारी पदार्थ आणि सगळे मांसाहारी पदार्थ प्रक्रिया केल्याशिवाय खाणे आजमितीस तरी अशक्य आहे. एकेकाळी माणूससुद्धा कच्चे मांस खात असेल पण उत्क्रांतीच्या प्रक्रियेत अन्न शिजवून खाण्याच्या सवयीमुळे कदाचित पचनशक्ती दुबळी होत गेली असावी असे वाटते. शारिरिक दृष्ट्या मानवाला प्रामुख्याने शाकाहार हाच सुटेबल् ठरतो. ज्यांना अधिक शारिरीक उर्जेची गरज असते असे लोक जसे - फुटबॉलर, अ‍ॅथलीट, बॉक्सर अशांचा मांसाहाराशिवाय निभाव लागणार नाही असे वाटते. अनेक दुबळ्या, अशक्त किंवा क्षयासारख्या आजारातून उठलेल्या माणसांना अंडी , चिकन सूप किंवा तत्सम आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. याउलट हार्ट पेशंट, अति लट्ट माणसे, कोलेस्टेरॉल जास्त असणारे लोक यांना सक्तीने शाकाहार घेण्याचा आणि मांसाहार टाळण्याचा सल्ला दिला जातो. तेंव्हा मानवी शरीराला मांसाहार योग्य किंवा शाकाहार योग्य असा सरसकट इन्फरन्स कसा काढणार ? फक्त मांसाहार सेवन करण्याची सक्ती केलीत, तर बघाल की त्याचे शरीर हे सहन करु शकत नाही. प्रत्येकाच्या शरीराला कोणत्या अन्नाची सवय आहे यावर बरेच काही अवलंबून आहे. दररोज मांस खाणारा माझा एक किरिस्ताव मित्र मी पाहिलेला आहे. अनेक वंगबंधू, कोळी समाजाचे लोकं हे दररोज मांसाहार करतच असतात. माझ्या जुन्या ऑफिसातला एक मित्र त्याच्या डब्यामध्ये 'फॉर अ चेंज' व्हेज आणत असे. तेंव्हा माणसाचे शरीर कायम मांसाहार करु शकत नाही हेदेखील तितकेसे पटत नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

बॅटमॅन 07/07/2012 - 15:16
+१. हा तिसरा मुद्दा ढोंगी शाकाहारमार्तंड जरा जास्तच लावून धरतात. स्वतःची तथाकथित नैतिक श्रेष्ठता प्रस्थापित करायची लै हौस असते त्यांना.

चित्रगुप्त 08/07/2012 - 14:21
कलेच्या प्रांतात पारंपारिक (अर्थात पाश्चात्य पारंपारिक) वास्तववादी कलेचे समर्थक आणि आधुनिक कलेचे समर्थक एकमेकांना वाट चुकलेली कोकरे समजून आपल्या विचारसरणीचा बाप्तिस्मा देऊन आपल्या कळपात ओढू बघत असतात, तसेच शाका-मासा. चे होत असतेसे दिसते. :)

In reply to by चित्रगुप्त

@आपल्या विचारसरणीचा बाप्तिस्मा देऊन आपल्या कळपात ओढू बघत असतात, तसेच शाका-मासा. चे होत असतेसे दिसते. Smile अतिशय समर्पक प्रतिसाद...

In reply to by चित्रगुप्त

बॅटमॅन 08/07/2012 - 15:28
शाकाहारी आणि मांसाहारी पारंपरिक कलासमर्थक आणि आधुनिक कलासमर्थक मार्क्सवादी आणि हिंदुत्ववादी अँटी-पुणे आणि पुण्याचे वकील निवासी आणि अनिवासी वेगवेगळ्या आब्राहमिक धर्मांचे अनुयायी अशी ही थोडीशी मोठी लिस्ट आहे ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन 08/07/2012 - 20:59
तुमच्या स्मायल्यांचा स्रोत आत्ताच्या आत्ता सांगा नैतर बाटलीत भरून कैद करतो बघा तुम्हाला ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

मराठे 10/07/2012 - 00:08
च्यायला ! तुम्ही आधी प्रतिसाद टंकून मग स्मायली शोधता, की स्मायली सापडली की त्याप्रमाणे प्रतिसाद लिहीता?

धाग्याचं शीर्षक वाचूनच त्यातले मुद्दे आणि आणि पुढचे प्रतिसाद काय येणार ह्याचा अंदाज आला होताच. आणि अगदी "जे जे वांछील तो ते खावो" हे कंक्लूजनसुद्धा कळलं होतं. पण जसे फिक्स केलेल्या मॅच मध्येदेखील काही एक्साइटिंग गोष्टी घडतातच - तसे, पेठकरकाकांचे प्रतिसाद, मनोबाचे मुद्दे, आयुर्वेदातले दाखले, अदिती वि. आनंदी गोपाळचं "बॅटल विदिन अ बॅटल"..... शेवट माहित असलेली सास-बहू सीरियल बघतोय असं वाटलं. अर्थात ज्ञानात भर पडली - मतांत फरक (अर्थातच्) पडला नाही. (आज रात्री मटण सूप पिण्याची इच्छा असलेला) जे पी

मन१ 12/07/2012 - 13:01
धागा वर आणलेला दिसतोय, मुद्दे वाधलेले दिसताहेत. पाहून छान वाटलं. सविस्तर निवांत टंकेन.

In reply to by गवि

गणपा 12/07/2012 - 15:53
या धाग्यावराचा सर्वोच्च प्रतिसाद. ;) बादावे शेवटच्या ताटातली रश्याची वाटी फारच प्रेमाने आणुन दिलेली दिसते. ;)

In reply to by गवि

नंदन 13/07/2012 - 11:12
या धाग्यावराचा सर्वोच्च प्रतिसाद.
असेच म्हणतो. त्यातही परमेश्वराच्या प्रथम अवतारास अग्रस्थानाचा मान देणे हे तर अगदी समर्पक! :)

चित्रगुप्त 15/07/2012 - 07:59
गुडघेदुखी ही चाळीशीच्या पुढील स्त्रियांमधे विशेषतः भारतात फार आढळते. युरोपात अगदी म्हातार्‍या (गोर्‍या) स्त्रियासुद्धा अगदी टुणटुणीत, स्लिम असलेल्या दिसतात, तर तेथील अगदी तरूण हबशी स्त्रियासुद्धा भलत्याच लठ्ठ असतात, (असे माझे निरिक्षण आहे, चू.भू.द्या.घ्या.) या गोष्टीचा आहाराशी काय संबंध आहे, हे तज्ञांनी स्पष्ट करावे.

In reply to by चित्रगुप्त

अर्धवटराव 15/07/2012 - 10:34
त्याचा आहाराशी फार काहि संबंध नाहि. काळ्या अफ्रिकन लोकांच्या जीन्स मधे चरबी साठवुन ठेवणारे हार्मोन्स नसतात. त्यामुळे चरबी कंट्रोल करणारे हार्मोन्स पण नसतात. जर एखादं हायब्रीड प्रॉडक्ट ( उदा. काळं + पांढरं )असेल आणि त्यात पांढर्‍याकडुन चरबी साठवणारे हार्मोन्स आले तर त्यांना अडवणारे एण्टी चरबी हार्मोन्स च्या अभावामुळे ते बेहिसाब लठ्ठ होतात. ढिशक्लेमर : १) हि सर्व ऐकिव माहिती आहे. संदर्भ देणे, ऑथेण्टीक माहितीचे दुवे लक्षात ठेवणे अश्या भानगडीत आम्हि पडत नाहि २) जीन्स, हार्मोन्स वगैरे शब्द प्रतिसादाला केवळ भारदस्तपणा येण्यासाठी वापरले आहेत. "केमीकल लोचे" या एकाच पिशवीत हि मंडई निपटता येईल. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

"केमीकल लोचे" या एकाच पिशवीत हि मंडई निपटता येईल. एखाद्या चित्रपटात, समुहनृत्यात नायिकेपेक्षा, समुहातली एकदम मागची, एखादी दुय्यम नर्तिका अतिशय गोड दिसत असावी आणि आपल्या नृत्य कौशल्याने नायिकेपेक्षा स्वतःकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असावी तसे हे, डिस्क्लेमरच्या अगदी शेवटच्या कोपर्‍यातलं, वाक्य फार आवडलं.

मुळात, बहुतांश सर्व सस्तन प्राणी आणी पक्षी ह्यांचे प्रामुख्याने शाकाहारी आणि मांसाहारी असे वर्गीकरण करता येते. काही प्राणी दोन्ही वर्गात मोडणारे असतात. ते शाकाहारही करतात (झाडांची पाने, फळे इ.) तसेच इतर काही प्राणी. अस्वल फळे, मध खाते तसेच मासे किडे-मुंग्याही खाते. माकडाच्या काही जाती ही मांस भक्षण करतात. नेमके असेच दात मानवाला आहेत,ते म्हणजे त्याच्या दाढा. (जबड्याच्या आकारमानानुसार्, सर्वाधिक भुभागावर् हे दात पसरलेले आहेत.) ह्यानुसार, मानवाचा आहार् काय हवा? माणूस कच्चे मांस खात नाही म्हणून त्याला 'सुळ्यांची' गरज नाही. तो मांस शिजवून मऊ करून, पचायला योग्य अशा प्रकारे बनवून खातो. त्या साठी त्याच्या दाढा 'सुटेबल' असतात. आता तसेच सफरचंद आणि जिवंत कोंबडीचे पिल्लु एका निरागस , भुकेल्या ,(माणसाच्या)बालकाच्या समोर ठेवा. निरागस बालकासमोरच कशाला, (पोहोचलेल्या) मोठ्या माणसासमोर जरी ठेवले तरी तो पिल्लू खाणार नाही. कारण माणूस जिवंत प्राणी, कच्चे मांस खात नाही. फळे मात्र कच्चीच खाल्ली जातात. पण सफरचंद आणि चिकनकरी समोर ठेवली तर माणूस (मांसाहारी) आधी चिकन करी खाऊन नंतर टीव्ही बघत बघत सफरचंद खाईल आणि तृप्त होईल. मग ह्या सगळ्या गोष्टी बर्‍याचशा हेच सुचवतात की शारिरिक दृष्ट्या मानवाला प्रामुख्याने शाकाहार हाच सुटेबल् ठरतो. मला नाही वाटत. मानवाच्या उत्क्रातीपासूनच तो प्राण्यांच्या शिकारीवर जगत आला आहे. तरी देखिल त्याने इतकी प्रगती केली आहे. विज्ञानातील शोध लावले आहेत. दुसर्‍या ग्रहांवर पोहोचला आहे, मेडिकल सायन्समध्ये, गणितीशास्त्रात, कला क्षेत्रात्, साहित्यक्षेत्रात, पेहरावात, स्थापत्यशास्त्रात अनन्यसाधारण प्रगती केली आहे. आयुर्मान वाढवीले आहे. मांसाहार करून देखिल हे सर्व शक्य झाले आहे मग तो आहार अनसुटेबल कसा? अवांतर :"अन्न रगडण्याची " पुरेशी व्यवस्था नसल्याने)ह्या चावुन खाण्यादरम्यान, धाकाहारी प्राण्याच्या आहारात पुरेशी "लाळ"मिसळली जाते. म्हणजे बायकोच्या धाकात राहून आहार करणारा का?

In reply to by प्रभाकर पेठकर

राजे 10/05/2008 - 09:51
दोघांचे ही मुद्दे पटले ! उपलब्ध परिस्थीतीने जे अन्न समोर दिले / आले ते खावे ह्या मताचा मी ! जेथे शाकाहार उपलब्ध आहे तेथे मांसाहार ची गरज नाही, पण जेथे शाकाहार शक्य नाही तेथे मांसाहार .... हरकत नसावी. काही माकडे मी मुंग्या खाताना / छोटे मोटे कीडे खाताना खुप वेळा पाहीले आहे व मी माकडाला लहानपणा पासूनच मांसाहारी समजतो. बाकी आपली शारीरीक (मानवाची ) रचना शाकाहार व मांसाहार दोन्ही प्रकारच्या भोजनास उत्तम आहे . राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by प्रभाकर पेठकर

मन 10/05/2008 - 14:04
काही प्राणी दोन्ही वर्गात मोडणारे असतात. त्यांना मिश्राहारी म्हणतात. पण हे प्राणी प्रामुख्याने तिथं पाहायला मिळतात जिथं काही कारणानं त्यांना त्यांचे नैसर्गिक अन्न मिळत नाही. किंवा दुसरेच अन्न दिले जाते. ह्यासाठीच मी मांजराचे पिल्लु आणि मानवाचे बालक ह्यांची तुलना दिली आहे. मी म्हण्तोय की "पर्याय उप्लब्ध असताना,प्राप्त परिस्थितीत मानावाची निवड काय राहील,किंवा काय रहायला हवी , ते पहा." शाकाहाराला "प्रथम पसंती" किंवा "प्रेफरन्स " असणे इष्ट. मानवाच्या उत्क्रातीपासूनच तो प्राण्यांच्या शिकारीवर जगत आला आहे. नाही्ए काही संपुर्ण खरे नाही. माणुस शिकार करु लागला तो प्रामुख्याने हिम युग येउन गेल्यानंतर म्हणजे फार तर बारा ते पंधरा हजार वर्षे झाली असावीत. उत्क्रांतीच्या हिशेबाने हा काल्खंड नगण्य आहे.(तो लाखेक वर्षांच्याही पुढे आहे.) पृथ्वीवर हिम युगात जेव्हा एका एकी अति शीत वातावरण तयार होउन अन्नाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला, तेव्हा, केवळ नाइलाज म्हणून माणसाने शिकारीस सुरुवात केली. आजही मानव कच्चे मांस फारश्या प्रमाणात खाउ शकत नाही, हे कशाचे प्रमाण आहे? याउलट(सर्वच नाही) पण कित्येक शाकाहारी गोष्टी तुम्ही आजही कच्च्या खाउ शकता. अगदि टोकाची स्थिती गृहित धरुयात. सम्जा एखाद्याला ज्याला मांसाहार अत्यंत प्रिय आहे,अशा व्यक्तिला देखील जर तुम्ही कित्येक दिवस्-वर्षे फक्त मांसाहार सेवन करण्याची सक्ती केलीत, तर बघाल की त्याचे शरीर हे सहन करु शकत नाही. कारण इथे तुमचे 'सुटेबल' नैसर्गिक अन्न कोणते तेच शरीर मागत असते.तुम्ही त्या नैसर्गिक प्रेरणेस अधिक काळ दाबु शकत नाही. याउलट शाकाहाराची सक्ती करुन एखाद्याला वर्षानुवर्षे ठेवलेतं, तर त्याला फारशी अडचण येणार नाही. ....तरी देखिल त्याने इतकी प्रगती केली आहे. विज्ञानातील शोध लावले आहेत. दुसर्‍या ग्रहांवर पोहोचला आहे, मेडिकल सायन्समध्ये, गणितीशास्त्रात, कला क्षेत्रात्, साहित्यक्षेत्रात, पेहरावात, स्थापत्यशास्त्रात अनन्यसाधारण प्रगती केली आहे. आयुर्मान वाढवीले आहे. मांसाहार खाल्ल्याने विविध विषयात प्रगती होणार नाही असं आम्ही कुठं म्हणतोय? ती तशी होते हे सुर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे. मात्र तुमच्याकडे उपलब्ध (उत्तर)आयुष्यात कटकटी निर्माण होतात, त्याचे काही अंशी कारण मांसाहारावर भर असणे आहे. ("आम" निर्मिती , ह्रुदय रोग व इतर शारिरिक व्याधी) तेच उपलब्ध आयुष्य सुखकर ठेवायचे असेल, तर शाकाहार चांगला असं मी म्हणतोय. (कृपया माझा नीलकांत रावांना खाली दिलेला प्रतिसाद वाचा.) बाकी तुम्ही कच्चे मांस खाउ शकत नाही याचे कारण ती तुमची नैसर्गिक बुद्धी नाही. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

मी म्हण्तोय की "पर्याय उप्लब्ध असताना,प्राप्त परिस्थितीत मानावाची निवड काय राहील,किंवा काय रहायला हवी , ते पहा." शाकाहाराला "प्रथम पसंती" किंवा "प्रेफरन्स " असणे इष्ट. 'पर्याय उपलब्ध असताना' हे महत्त्वाचे. मांजर दोन्ही खाऊ शकते. माणूस कच्चे मांस खाऊ शकत नाही. म्हण्जे मांजराला तुम्ही दोन्ही पर्याय उपलब्ध करून देता आहात आणि माणसाला सफरचंदाशीवाय पर्याय उपलब्ध करून दिलेला नाही. ही असमान तुलना झाली. माणुस शिकार करु लागला तो प्रामुख्याने हिम युग येउन गेल्यानंतर म्हणजे फार तर बारा ते पंधरा हजार वर्षे झाली असावीत. उत्क्रांतीच्या हिशेबाने हा काल्खंड नगण्य आहे.(तो लाखेक वर्षांच्याही पुढे आहे.) पृथ्वीवर हिम युगात जेव्हा एका एकी अति शीत वातावरण तयार होउन अन्नाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला, तेव्हा, केवळ नाइलाज म्हणून माणसाने शिकारीस सुरुवात केली. मान्य. माझे ह्या बाबतीत ज्ञान तुटपुंजे आहे. पण शब्दांवर न जाता आशय लक्षात घ्या. माणसांने बहुतांश शोध मांस खायला लागल्यावर लावले आहेत. मांस, जे तुमच्या मते 'अनसुटेबल' अन्न आहे ते खाऊनच माणसाने प्रगती केली आहे. प्रगती मध्ये बौद्धीक, शारीरिक, मानसिक वाढ अभिप्रेत आहे. ज्या अन्नाच्या सेवनाने माणसाने हे सर्व साध्य केले ते 'अनसुटेबल' कसे? आजही मानव कच्चे मांस फारश्या प्रमाणात खाउ शकत नाही, हे कशाचे प्रमाण आहे? शिजवण्याची प्रक्रिया करून खाल्ले तर ते घातक असते का? आजही तुम्ही-आम्ही बटाटा, फॉवर, वांगी, तांदूळ, गहू, बाजरी, मका, पडव़ळ, दोडकी, गिलकी, सुरण, तोंडली, पालक, हिरवा-लाल माठ, करडई, आंबट चुका, शोपू, डाळी, कडधान्ये, अळू असे अनेक पदार्थ शिजवण्याच्या प्रक्रिये शिवाय खाऊ शकत नाही. तेही सर्व अनसुटेबल मानायचे का? जर प्रक्रिया करून खाण्यासाठी ते सुटेबल असेल तर मांस सुद्धा तसेच प्रक्रिया करून खाण्यासाठी सुटेबल का मानू नये? दुजा भाव का? याउलट(सर्वच नाही) पण कित्येक शाकाहारी गोष्टी तुम्ही आजही कच्च्या खाउ शकता. किती? रोजच्या शाकाहारातील वरील सर्व गोष्टी तुम्ही कच्च्या खाऊ शकत नाही. सम्जा एखाद्याला ज्याला मांसाहार अत्यंत प्रिय आहे,अशा व्यक्तिला देखील जर तुम्ही कित्येक दिवस्-वर्षे फक्त मांसाहार सेवन करण्याची सक्ती केलीत, तर बघाल की त्याचे शरीर हे सहन करु शकत नाही. गैरसमज आहे. योग्यप्रमाणात खाल्ले तर शरीर जरूर सहन करू शकेल. मात्र प्रमाणा बाहेर सेवन केले तर ते हानिकारकच. मग तो मांसाहार असो वा शाकाहार. याउलट शाकाहाराची सक्ती करुन एखाद्याला वर्षानुवर्षे ठेवलेतं, तर त्याला फारशी अडचण येणार नाही. पण म्हणून शाकाहार हेच एकमेव 'सुटेबल' अन्न आहे ह सिद्ध होत नाही. शाकाहारवरही माणूस जगू शकतो असे फक्त म्हणता येईल. मांसाहार खाल्ल्याने विविध विषयात प्रगती होणार नाही असं आम्ही कुठं म्हणतोय? मांसाहाराला 'अनसुटेबल' असे लेबल लावून तुम्ही कमी लेखता आहात. जर 'अनसुटेबल' अन्न खाऊन माणूस इतकी प्रगती करू शकतो तर ते अन्न असुटेबल कसे? ती तशी होते हे सुर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे. म्हणजेच मांसाहार हा सुद्धा 'सुटेबल' आहे सुर्यप्रकाशा इतकेच स्वच्छ आहे. मात्र तुमच्याकडे उपलब्ध (उत्तर)आयुष्यात कटकटी निर्माण होतात, त्याचे काही अंशी कारण मांसाहारावर भर असणे आहे. अतिसेवन कुठलेही वाईट. मांसाहार करताना चवीसाठी भरमसाठ खायची सवय असेल तर त्रास हा होणारच. तेच उपलब्ध आयुष्य सुखकर ठेवायचे असेल, तर शाकाहार चांगला असं मी म्हणतोय. अतिसेवनाने रोगग्रस्त झालेली किती शाकाहारी उदाहरणे दाखवू? आपल्या कडील सर्व भाषकांमध्ये जे ब्राह्मण आहेत किंवा शुद्ध शाकाहारी आहेत ते सर्व व्याधीमुक्त जीवन जगतात असा आपला दावा आहे का? त्यांच्यातही व्याधीग्रस्त तितकेच असतात जितके मांसाहारींमध्ये. अतिसेवन हेच त्या मागिल कारण आहे. (असमतोल आहार हेही एक कारण असू शकते.) बाकी तुम्ही कच्चे मांस खाउ शकत नाही याचे कारण ती तुमची नैसर्गिक बुद्धी नाही. हे वाक्य कळले नाही. नैसर्गिक गरज नाही, नैसर्गिक आवड नाही, नैसर्गिक कल नाही समजू शकते. 'नैसर्गिक बुद्धी' शब्द मला नवीन आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

मन 10/05/2008 - 16:21
'पर्याय उपलब्ध असताना' हे महत्त्वाचे. मांजर दोन्ही खाऊ शकते. माणूस कच्चे मांस खाऊ शकत नाही. म्हण्जे मांजराला तुम्ही दोन्ही पर्याय उपलब्ध करून देता आहात आणि माणसाला सफरचंदाशीवाय पर्याय उपलब्ध करून दिलेला नाही तेच सांगतोय, मानवाला "कच्चे मांस(जिवंत कोंबडी!)" हा पर्याय जरी दिला, तरी तो त्याच्यासाठी पर्याय नसतोच. ही असमान तुलना कुठयं बुवा? दोघांना शेम टु शेम पदार्थच तर दिले आहेत. (कारण आक्खी चर्चाच त्या दोन पदार्थांबद्दल चालु आहे.) लोखंडाचा तुकडा कुठला आणि अस्सल सोन्याचा कुठला हे ओळखायचे(समजा एखाद्या अंध व्यक्तीला हे करायचे आहे.), तर काय होइल? दोन्हीला चुंबका जवळ आणा.जे चुंबका कडे आकृष्ट होते, ते लोखंड हा सरळ सधा "ले मॅन्स लॉजिक" वरुन आलेला उपाय आहे. (किंवा दुसरा उपाय(खात्री करुन घेण्यासाठी), :- दोन्हीला दिर्घ काळ पाण्याच्या सान्निध्यात म्हणजे जिथे लोखंड गंजु शकते, अशा ठिकाणी ठेवा.जे गंजेल तेच सोने. ) ही अशीच साधी सरळ कसोटी मी मांडलिए.त्यात कुठे असमानता आहे? आणि ती असलिच तर असमानता ही""पदार्थाच्या गुणधर्मात" आहे. सोने मुळातच चुंबकाकडे आकृष्ट होत नाही. कारण मुळातच सोने आणि लोखंड ह्यांच्या गुण धर्मात ती अचुकता आहे. याउलट(सर्वच नाही) पण कित्येक शाकाहारी गोष्टी तुम्ही आजही कच्च्या खाउ शकता. किती? रोजच्या शाकाहारातील वरील सर्व गोष्टी तुम्ही कच्च्या खाऊ शकत नाही. मी प्रश्नातच उत्तर दिलय त्याचं.आपण कित्येक फळे, कच्चे कणीस आणि अगदि धान्य सुद्धा कच्चे खाउ शकतों. नव्हे खातोच. (आठवा लुस लुशीत, कवळी कवळी धान्याची कणसे,जी क्वचितच का असेना पण आपण कच्ची खाल्ली आहेत.) (मी हे फक्त शाकाहार आपल्याला कसा योग्य ठरतो, त्यासाथी सांगतोय्.इतर तुम्ही उल्लेख केलेले प्दार्थ शिजवुन खातो, पण "आपण शाकाहार कच्चा खाउ शकतो," हे जीव शास्त्रिय दृष्ट्या कशाचे लक्षण आहे त्याचा विचार करावा ,यासाठी मी ते लिहिलयं.) तो आपल्या वागणुकी तील शिल्लक असलेला पुरावा आहे की शाकाहार शरीरास सुट होतो. पण आपण कुठलेच मांस कच्चे खाउ शकत नाही. गैरसमज आहे. योग्यप्रमाणात खाल्ले तर शरीर जरूर सहन करू शकेल. मात्र प्रमाणा बाहेर सेवन केले तर ते हानिकारकच. मग तो मांसाहार असो वा शाकाहार. का "योग्य" प्रमाणात का खायचं? मांसाहार जर शरीरास इतका उपकारक असेल, तर "फक्त मांसाहार(केवळ कच्चे मांस)" खाणे शक्य असायला हवे.ते तसे नाही, कारण ते शरीरास सुट होत नाही. माणुस प्रदुषित हवा, प्रदुषित पाणी आणि एकुणच प्रदुषित पर्यावरण ह्यात राहुनही करतोच की प्रगती. म्हणजे प्रदुषणाचा कुठला अपायच होत नाही. असं म्हट्ल्या सारखं आहे हे. अपाय होतोच. तो अल्प प्रमाणात पण सातत्याने होतो आणि साठत जातो. जेव्हा तो तसा पुर्ण साठतो, तेव्हाच तो""प्रकट" होतो.तो पर्यंत काही होत नाही म्हणुन आपले मांस खात सुटणे निश्चितच स्लो पोइझनिंग आहे. तुम्ही रस्त्यावरुन १० मिनिटे चक्कर टाकुन आलात आणि मग जर तुम्हाला काहिच त्रास होत नसेल, तर ह्याचा अर्थ असा नाही की रस्त्यावर वायु प्रदुषण ०% आहे. ते आहे, पण फक्त तुमच्या जाणिवेच्या पातळिच्या किंचित खाली आहे.(आणि हाच सर्वात मोठा धोका आहे.!!!) बाकी इथे अतिसेवनाचा मुद्दा पुर्ण गैर्लागु होइल असं मला वाटतं. तेच उपलब्ध आयुष्य सुखकर ठेवायचे असेल, तर शाकाहार चांगला असं मी म्हणतोय. ह्यासाठी मी निलकांत रावांना (ह्याच चर्चेत)प्रतिसाद दिलाय. तो आपण पाहिलात का? त्याबद्दल आपलं काय मत आहे? "नैसर्गिक बुद्धी" म्हण्जे मला "उपजत बुद्धी","उपजत ज्ञान " म्हणायचे आहे. (जे सहसा प्रौढ मानवाकडे अत्यल्प, प्राण्यांकडे भरपुर आणि मानवाच्य बालकांमध्ये काही प्रमाणात असते असे विज्ञान मानते.) (उप्जत ज्ञानाचे उदाहरणः- पोहणे. वगैरे.) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

तेच सांगतोय, मानवाला "कच्चे मांस(जिवंत कोंबडी!)" हा पर्याय जरी दिला, तरी तो त्याच्यासाठी पर्याय नसतोच. ही असमान तुलना कुठयं बुवा? दोघांना शेम टु शेम पदार्थच तर दिले आहेत. मांजरासाठी दोन्ही खाण्यालायक पदार्थ आहेत माणसासाठी कोंबडी प्रक्रियेविना खातायेण्यासारखी नाही. हीच दोघांना दिलेल्या पर्यायातली असमानता. कोल्हा आणि करकोच्याच्या गोष्टी सारखे दोघांनाही बशीतून दूध दिले तर कोल्हा ते पिऊ शकतो, करकोचा नाही. दूध पिण्याची दोघांना समान संधी मिळालेली नाही. (पदार्थ सेम असला तरीही). (किंवा दुसरा उपाय(खात्री करुन घेण्यासाठी), :- दोन्हीला दिर्घ काळ पाण्याच्या सान्निध्यात म्हणजे जिथे लोखंड गंजु शकते, अशा ठिकाणी ठेवा.जे गंजेल तेच सोने. ) ह्यावर मी काहीच मतप्रदर्शन करू शकत नाही. माझे मुद्दे मी मांडले आहेत. त्यावर त्याहून अधिक भाष्य करणे म्हणजे वेळेचा अपव्यय होईल किती? रोजच्या शाकाहारातील वरील सर्व गोष्टी तुम्ही कच्च्या खाऊ शकत नाही. किती? ह्या प्रश्नात 'अत्यल्प' हे उतर आहे. हा संपूर्ण 'आहार' होऊ शकत नाही. का "योग्य" प्रमाणात का खायचं? मांसाहार जर शरीरास इतका उपकारक असेल, तर "फक्त मांसाहार(केवळ कच्चे मांस)" खाणे शक्य असायला हवे.ते तसे नाही, कारण ते शरीरास सुट होत नाही. मांसाहारी माणसांनी फक्त मांसाहारच करावा का? सकाळी उठल्यावर ३-४ अंड्यांचे ऑम्लेट (पाव -पोळी काहीनाही), दुपारच्या जेवणात १-२ किलो कोंबडी (दुसरे तिसरे काहीच खायचे नाही), संध्याकाळी नाश्त्याला ४-५ फिश फ्राय आणि रात्री ए-दिड किलो मटण असा आहार आपल्याला अपेक्षित आहे का? तसे असेल तर आपला वाद मिटलेला आहे. इतका उपकारक मांसाहार शरीराला उपकारक आहे असे मी म्हंटलेले नाही. फक्त तो 'अनसुटेबल' नाही असे म्हंटले आहे. माणुस प्रदुषित हवा, प्रदुषित पाणी आणि एकुणच प्रदुषित पर्यावरण ह्यात राहुनही करतोच की प्रगती. म्हणजे प्रदुषणाचा कुठला अपायच होत नाही. असं म्हट्ल्या सारखं आहे हे. अपाय होतोच. तो अल्प प्रमाणात पण सातत्याने होतो आणि साठत जातो. जेव्हा तो तसा पुर्ण साठतो, तेव्हाच तो""प्रकट" होतो.तो पर्यंत काही होत नाही म्हणुन आपले मांस खात सुटणे निश्चितच स्लो पोइझनिंग आहे. जितकी वर्षे मानव मासाहार करीत आला आहे तितकी वर्षे प्रदुषणाचा सामना करावा लागला तर प्रगती करण्यासाठी माणूस उरणार नाही. मांसाहाराचा आणि प्रदुषणाच्या उदाहरणाचा संबंध पटत नाही. मांसाहाराचा संबंध जगातल्या प्रत्येक वाईटाशी जोडून वाद घालायचा म्हंटले तर मला तरी ते योग्य वाटत नाही. मुळात आपण मासाहार आणि शाकाहार ह्यांची तुलना करीत आहोत. वरील सोने आणि लोखंडाचे उदाहरणही विसंगत आहे. त्यातून 'मांसाहार चांगला आणि शाकाहार वाईट' अशी माझी मते असल्याचा तुम्ही गैरसमज करून घेता आहात. मुळ वादाचा मुद्दा असा की मांसाहार मानवाच्या शरिराला 'अनसुटेबल' आणि शाकाहारच फक्त 'सुटेबल' हा आहे. ह्यावर मी माझी मते मांडली. बाकी इथे अतिसेवनाचा मुद्दा पुर्ण गैर्लागु होइल असं मला वाटतं. का बरे गैरलागू? तेच उपलब्ध आयुष्य सुखकर ठेवायचे असेल, तर शाकाहार चांगला असं मी म्हणतोय. हा नवीन सुर तुम्ही आळवताहात. तुमच्या मुळ लेखात हा मुद्दा नव्हाता. तिथे मुद्दा होता फक्त शाकाहारच मानवी शरिराला 'सुटेबल' आहे, मांसाहार नाही. इथेच वादाला सुरुवात झाली. तुमच्या वरील वाक्याला मी जरूर समर्थन देईन. शाकाहाराला मी वाईट अजिबात म्हणत नाही. मांसाहार मानवी शरीराला 'अनसुटेबल' आहे असे तुम्ही म्हणू नका.

In reply to by प्रभाकर पेठकर

पक्या 10/05/2008 - 23:01
अ़जूनही काही प्रमाणात काही ठिकाणी कच्चे मास खाल्ले जाते. उदा. जपानी लोक काही प्रकारचे मासे कच्चे खातात. सुशी ह्या जगप्रसिध्द डिश मधे कच्चा मासाच वापरतात. बरेच लोक अंडे पण कच्चे खातात. (दूधातून किन्वा तसेच.) (पण माझ्या माहीती प्रमाणे असे कच्चे खाणे योग्य नाही कारण त्यात bacteria ची वाढ होउ शकते. शिजवलेल्या पदार्थात उच्च तापमानामुळे bacteria मरून जातात. ) योग्य प्रमाणात मांसाहार केल्यास ठीक आहे पण अतिरेक नको. मांसाहारात fiber चे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळे पोटाच्या व्याधी होउ शकतात (अपचन, बध्द्कोष्ट वगैरे) - पक्या

In reply to by प्रभाकर पेठकर

गणपा 10/05/2008 - 15:34
विषय वाचुन वाटल की मस्त गरमा गरम व्हेज v/s नॉनव्हेज चर्चा रंगणार. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार. लावणीत रंगतात त्याप्रमाणे सवाल्-जवाबाच्या फड उभा राहाणार . पण मना चा लेख वाचला आणि अगदी डांबिस काकां सारखी अवस्था झाली. मनाचे मुद्दे आम्ही इतके मनाला लावुन घेतले की वाटल की माताय मी पण शाकाहरीच व्हाव क्षण भर. (बायकोला फोन पण करणार होतो, की आज बोंबील नको, शेवग्याच्या शेंगा आणि व्हेज-कलेजी (वांगी हो) आण.) जरा खाली आलो नी पेठकर काकांचा सुंदर प्रतिसाद वाचला. पेठकर काकांनी प्रत्येक मुद्याला छान शब्दांनी(मुद्देसुद) उत्तर देउन, आमचं परत मतपरिवर्तन केल. आणि आम्ही परत मांसाहार करण्यास मोकळे झालो. धाकाहारी प्राण्याच्या आहारात.......... म्हणजे बायकोच्या धाकात राहून आहार करणारा का? काका छप्पर फाडके =)) =)) काकांमुळे माझा हॅमलेट होता होता राहिला. (आवांतरः हॅमलेट वरुन ऑम्लेट आठवल, चला नाष्ट्याला काय करायचे तो प्रश्न्न सुटला. नाहीतरी अंड दोन्ही वर्गात मोडत. शाकाहरी भी खुष, मांसाहारी भी खुष और हम भी ;) )

In reply to by गणपा

मन 10/05/2008 - 15:44
मी पेठकर काका आणि नीलकांत ह्यांच्या प्रतिसादांना उत्तर देताना काही मुद्दे मांडलेत. ते पाहिले सार्‍यांनी , तर बर होइल.... आपण ते पाहिलेत का? (मी शाकाहारी च्या ऐवजी 'धाकाहारी' लिवलं हाय. पन त्ये विवाहित पुरुषांना लयीच लागु पडतय.:-) ) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

वेताळ 10/05/2008 - 09:44
तस बघायला गेले तर आम्ही पण ज्यावेळी कोंबडीचा उतारा तिकाटण्यावर ठेवा म्हणुन सांगतो त्यावेळी जिवंत कोंबडी आम्हाला अभिप्रेत नसते.तर शिजवलेली कोंबडी असा अर्थ लोकानी घ्यावा.बाकी सुज्ञ लोकाना ज्यादा सांगण्याची गरज नाही. वि.सु.- उतारयात फक्त कोंबडीच देउ नका, बरोबर चपाती,भात,सुक्के व लिंबु पण ठेवा.आम्ही मिश्रहारी आहोत. आपला (उतारयाची वाट पाहणारा) वेताळ.

In reply to by वेताळ

मेल्या वेतोबा, तुकां म्हातारचळ लागलोसां!! तुका आम्ही सांगूचा म्हणजे ल्हानतोंडात मोठो घास होतलो पण मेल्या, ह्यां चपाती, भात, लिंबू काय मागतंस? आंवशीक खांवक व्हरान! अरे वेताळ म्हणजे आमच्या भूतगणात सर्वश्रेष्ठ रे!! आणि मेल्या तू हंयसर चपाती-भात मागतंस!! त्यापेक्षा आमी पिवळो डांबिस बरे रे!! नेत्याविना निराश, पिवळो डांबिस

In reply to by वेताळ

आम्ही मिश्रहारी आहोत. 'मिश्रहारी', नेमका हाच शब्द मला आठवत नव्हता. मानव हा शाकाहारी, मांसाहारी नाही तर 'मिश्रहारी' आहे. त्यामुळे काय सुटेबल आणि काय अनसुटेबल हा प्रश्नच उद्भवत नाही.

नीलकांत 10/05/2008 - 10:03
अगदि त्याच प्रमाणे माणुस हा "ग्रेटर एप्स" ह्या प्रवर्गात मोडतो.(प्रवर्ग नामातील् चु.भु.द्या.घ्या. बायो लॉजी सोडुन काही युगे उलटली आहेत. ) त्यांतील प्राणी कोण? तर् ओरँग उटांग,चिंपांझी,गोरिला वगैरे. ह्यांचे मुख्य अन्न ते काय? तर् काही प्रमाणात् झाडपाला आणि उरवरीत फळे, काही प्रमाणात धान्य कण सुद्धा. ह्यानुसार, मानवाचा आहार् काय हवा?
ह्याच नियमाने आपण मांसाहार सोडायचा तर मला शंका आहे की उद्या आमच्या अधोवस्त्रांबद्दल तर तुम्ही शंका घेणार नाही ना? ;) अहो साहेब ह्या निसर्गातील कित्येक गोष्टी मानवाने आपल्याला नैसर्गीक अनुकुल नसल्या तरी त्यावर काही प्रक्रिया अथवा संस्कार करून त्या आपल्याला योग्य अश्या स्वरूपात रुपांतरीत करून त्याचा उपभोग घेतला आहे - घेतो आहे. आता कुठला नियम बघायचा ते तुम्ही ठरवा, नैसर्गीक न्यायाने बघायचे तर जो बलवान आहे तोच टिकणार. मानुस त्यात वर आहे. तो त्याला अनुकुल असे नियम बनवेल. जसं जंगलात सिंह करतो. त्याला अनुकुल अशी त्याची जीवनशैली असते. त्याला हवं त्या ओढ्यावर तो पाणी पितो. हवं ते भक्ष्य तो मारतो. तो त्याच्या खाण्याच्या नैसर्गीक शैलीव्यतिरिक्त काही खात नाही कारण त्याची ती क्षमता नसावी. मानवी मुल्यांचा विचार केला तर मांस हे अतिशय समृध्द अन्न आहे. जे की जगातल्या सर्व भागात सहज उपलब्ध आहे. मांसाहाराला जे पर्यायी अन्न म्हणून सांगीतल्या जातं ते जगात सर्वत्र उपलब्ध नाहीये. नैसर्गीक अवस्थेत मानुस कच्च मांस खात होता. आपल्या शरीराला भाजलेलं मांस अनुकुल आहे हे लक्षात आल्यावर त्याने ते भाजणं सुरू केलं. त्याचा हेतू जगण्यासाठी खाणं हा होता आणि आता तो शिजवून खातो. त्यात वेगवेगळे मसाले आणि पध्दती मिसळून तो त्या अन्नांचं स्वादिष्ट रुचकर भोजनात रुपांतर करतो आणि आमच्या सारखे पामर त्याला पुर्णब्रम्हं म्हणून सेवन करतात. असो. एक साधा विचार करा जगात समुद्राच्या किनारी राहणार्‍या लोकांनी मासे खायचं बंद केलं तर आपण त्याला पर्यायी अन्न पुरवू शकू का? मला वाटतं की शाकाहार मानसाचा नैसर्गीक आहार असेलही मात्र आजच्या उन्नत अवस्थेत मानसाने जसं इतर कित्येक बाबींवर आपल्याला अनुकुल संस्कार केले व हवे असलेले अनुकुल वातावरण तयार करून तो राहतो आहे त्यानुसार आहारात हा साधा बदल खुप क्रांतीकारक आहे असं मला वाटत नाही. नीलकांत

In reply to by नीलकांत

मन 10/05/2008 - 13:26
अधोवस्त्रांबद्दल तर तुम्ही शंका घेणार नाही ना? :-)) :-) (अहो, त्याहिशेबाने खर्‍या "नैसर्गिक" अवस्थेत बॉलिवूड चाललेच आहे, माझ्या उपदेशाशिवाय! ;-) ) पण आता जरा मुद्द्याचं:- एक साधा विचार करा जगात समुद्राच्या किनारी राहणार्‍या लोकांनी मासे खायचं बंद केलं तर आपण त्याला पर्यायी अन्न पुरवू शकू का? हो. हे तर आहेच. जगातील आजची संपुर्ण मानवी लोकसंख्या १००% शाकाहारी राहणे शक्य नाही. कारण तेव्हढे (निव्वळ शाकाहारी)अन्न उपलब्ध नाही हे कटु वास्तव आहे.ह्यामुळेच विधान लिहिताना मी लिहिलय ते:- "ओरँग उटांग,चिंपांझी,गोरिला वगैरे. ह्यांचे मुख्य अन्न ते काय? तर् काही प्रमाणात् झाडपाला आणि उरवरीत फळे, काही प्रमाणात धान्य कण सुद्धा." असं लिहिलयं. ईतर कुणाच्या फायद्यासाठी नव्हे तर स्वतः च्या तब्येतीस अनुकुल असल्यामुळे शक्य तेव्हा शाकाहाराचा अन्नात समावेश असावा, असं मला वाटतं. (वाचा:- डॉ. अभय बंग ह्यांचे "माझा साक्षात्कारी हृदयरोग") (ज्यांना माहित नाही त्यांच्या साठी:- डॉ अभय बंग हे फिजिशियन ह्या अर्थाने "डॉक्टर" आहेत. सध्या चांदा,भंडारा,मेळघाट वा तत्सम जिल्ह्यांत त्यांचे समाजकार्य कित्येंकांना प्रेरणा/आदर्श ठरले आहे.) शिवाय, आयुर्वेदात "आहार्-विचार" करताना स्पष्ट पणे उल्लेख आहे तो असा:- "अन्नातील सर्व निरुप्योगी भाग विष्ठेतुन न जाता काही प्रमाणात शरीरात शिल्लक राहु शकतो. आयुर्वेदात ह्याला म्हणतात "आम". आम पुढे शारिरिक द्रव्यांसोबत मिसळुन विषारी/घातक सिद्ध होउ शकतो. " "आमा" ची सर्वाधिक निर्मिती ही प्राणिज अन्नाने होते, हे आयुर्वेदात सांगितले आहे. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे

ईश्वरी 10/05/2008 - 14:31
वरील काही मुद्दे पटले (मनच्या लेखातील). पण तरीही काही वेळेस नुसतेच जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नव्हे तर पोषणमूल्यांची गरज म्हणून ही मांसाहार केला जातो. माझ्या परिचितांचे अनुभव देत आहे. माझी एक अमेरिकन मैत्रिण सान्गत होती..तिने व तिच्या नवरयाने काही महीने मांसाहार पूर्णपणे बंद केला होता. पण नंतर त्याना आहारात proteins ची कमतरता भासू लागली. (अमेरिकनान्च्या जेवणात आपल्यासारख्या डाळी नसतात उदा. मूग, तूर्, हरभरा वगैरे . इतर काही प्रकारचे beans ते खातात पण अगदी रोज नाही ..कधीतरीच.) त्यामुळे त्यांनी परत मांसाहार घेण्यास सुरवात केली. माझ्या अजून एका (देशी) मैत्रिणीच्या मुलीला मूग आणि तूर सोड्ल्यास इतर डाळींची ऍलर्जी आहे. मुलगी लहान असल्याने रोज एकाच प्रकारचे पदार्थ खाण्यास नकार देते. मध्यंतरी काही कारणास्तव डाक्टरी चेकअप झाल्यावर मुलीला आहारात proteins कमी पडत आहे हे समजले. त्यामुळे मैत्रिणी च्या घरी सर्व शाकाहारी असले तरी मुलीसाठी त्यांनी चिकन व फिश चे पदार्थ बनवण्यास सुरवात केली. अजुन एका परिचितांचे एक छोटेसे औपरेशन झाल्यावर डाक्टरांनी चिकन सूप भरपूर प्या असे सान्गितले होते. कारण चिकन सूप मध्ये protein भरपूर असते. आणि protein आजारपणात शक्ती भरून येण्यासाठी व शरीरावर काही जखम असेल तर ती लवकर भरून येण्यासाठी मदत करते. -- ईश्वरी

In reply to by ईश्वरी

मन 10/05/2008 - 14:39
ह्या स्थितीत मांसाची पोषक मुल्य म्हणुन गरज कुणीही नाकारु शकत नाही. म्हणुनच तर शाकाहार म्हण्जे "मुख्य अन्न" असं मी काळजी पुर्वक म्हटलय. मुख्य अन्नासोबत पूरक पदार्थ गरज्/नाइलाज म्हणुन घ्यायला अशा परिस्थितीत काहिच हरकत नाही. पण त्याचे अधिक सेवन करणे योग्य नाही,असं वाटतय. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

शितल 10/05/2008 - 15:55
छान प्रतिक्रीया आणि जोरदार मत मा॑डणी. शाकाहार की मा॑साहार हा ज्याचा त्या॑नी ठरवावा, जे पचेल आणि रुचेल ते खाण्यास हरकत नसावी.

चतुरंग 10/05/2008 - 23:51
माणसाला चालतात. दोन्ही आहारांमधून त्याच्या शरीराच्या वाढीसाठी पोषणासाठी लागणार्‍या विशिष्ठ गोष्टी त्याला प्राप्त होतात. दोन्ही प्रकारचे अन्न हे नेहेमीच्या आहाराचा भाग म्हणून सेवन करताना विशिष्ठ प्रकारे प्रक्रिया करुन/शिजवून घेणे इष्ट असते. पूर्वी कच्चे, त्यापुढच्या काळात भाजलेले, अजून प्रगतीनंतर भाजून मीठ-मीरपूड टाकलेले, आधुनिक काळात विविध मसाले घालून चविष्ट बनवलेले ह्या क्रमाने मांसाहारात (आणि शाकाहारात सुध्दा) प्रगती होत गेली हे मान्य व्हावे. भौगोलिक परिस्थितीनुसार आहार विहारात बदल होत गेले/जातात आणि ते त्या परिस्थितीला टिकून राहण्यासाठी आवश्यक ठरतात. जसे किनारपट्टीवरील माणसे जलचरांचा समावेश आहारात करणारच. अतिशीत प्रदेशात (जसे टुंड्रा) एस्कीमो हे प्रामुख्याने सील, वॉलरस, मासे ह्यांना खाणार. कारण भरपूर प्रोटीन्सची नैसर्गिक गरज दुसरे काही भागवू शकतच नाही. त्याव्यतिरिक्त तुम्ही जर सर्वसाधारण प्रदेशात रहात असलात, जसे महाराष्ट्रासारखे ठिकाण जिथे फार थंड किंवा वाळवंटी प्रदेशासारखे अतिउष्ण नाही तिथे योग्य प्रमाणात मिश्राहार चालू शकेल/चालतो. मना, तू जे आयुर्वेदाचे उदाहरण दिले आहेस - "आमा" ची सर्वाधिक निर्मिती ही प्राणिज अन्नाने होते, हे आयुर्वेदात सांगितले आहे. हे अयोग्य आहे. कारण आमाची मुख्य निर्मिती ही न पचलेल्या अन्नाने होते, त्यात शाकाहार की मांसाहार हा मुद्दा गौण. कडकडून भूक न लागता केवळ वेळ झाली म्हणून जेवणे, रात्री उशिरा भरपेट जेवणे, सतत तेलकट, तळलेले खाणे, व्यायामाचा अभाव असे संपूर्ण शाकाहार ठेवून केलेत तरी हृदयमित्र प्रतिष्ठानला आणखी एक हृदयरोगी देण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकणार नाही! त्याच आयुर्वेदाने "मटणाचे सूप हे अत्यंत ताकदवान असते आणि विशेषतः आजारी किंवा शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाला जरुर पाजावे" असेही सांगितले आहे. तेव्हा भौगोलिक परिस्थिती, उपलब्ध नैसर्गिक अन्नाचे स्रोत, ऊर्जेची एकूण गरज, ह्या सगळ्याचा तोल साधत केलेला मिश्राहार हा माणसाला घातक नाही. चतुरंग

In reply to by चतुरंग

धन्यवाद चतुरंग साहेब, तेव्हा भौगोलिक परिस्थिती, उपलब्ध नैसर्गिक अन्नाचे स्रोत, ऊर्जेची एकूण गरज, ह्या सगळ्याचा तोल साधत केलेला मिश्राहार हा माणसाला घातक नाही. मलाही हेच म्हणायचे आहे. मांसाहार इतका घातक (अनसुटेबल) असता तर माणसाचे आयुर्मान वाढले नसते. मानव जात भूतलावर टिकून राहीली नसती. शाकाहार 'चांगला' की 'वाईट' ह्यावर मी तो 'चांगला' असेच मत देईन. पण ते माझे वैयक्तिक मत झाले. पण 'सुटेबल' आणि 'अनसुटेबल' असा फरक नाही करता येणार असे मला म्हणायचे आहे. कडकडून भूक न लागता केवळ वेळ झाली म्हणून जेवणे, रात्री उशिरा भरपेट जेवणे, सतत तेलकट, तळलेले खाणे, व्यायामाचा अभाव असे संपूर्ण शाकाहार ठेवून केलेत तरी हृदयमित्र प्रतिष्ठानला आणखी एक हृदयरोगी देण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकणार नाही! एक्झॅटली. अतिसेवन, चुकीच्या जीवन पद्धती वगैरे कारणांनी शाकाहारी माणसेही गंभीर आजारांना आमंत्रण देतातच की. नाहीतर सर्व हॉस्पिटल्स फक्त मांसाहारी रुग्णांनीच भरलेली असती. असो.

विसोबा खेचर 11/05/2008 - 09:28
मी खाण्यात शाकाहार/मांसाहार असा भेदभाव करत नाही. फार विचार करत न बसता जे आवडतं ते चापून खातो, मग तो शाकाहार असो की मांसाहार! फार विचार करत बसलं की खाणं अंगी लागत नाही! :) आणि मी माझ्या पैशांनी खाणार, शिवाय खाण्यामुळे जे काही उपाय/अपाय होतील ते मला होणार, मग च्यामारी जगाची फिकीर मी करूच कशाला? :) आज रविवार आहे. आज मस्तपैकी मटणवडे झोडायचा बेत आहे! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

शाब्बास!! आज मस्तपैकी मटणवडे झोडायचा बेत आहे! आणि असं बघा, मटण मांसाहारी आणि वडे शाकाहारी! त्यामुळे दोन्ही मतदारसंघ खूष!! तात्या, उगाच नाही तुम्ही संतपदाला पोहोचलांत!!

In reply to by विसोबा खेचर

आणि मी माझ्या पैशांनी खाणार, शिवाय खाण्यामुळे जे काही उपाय/अपाय होतील ते मला होणार, मग च्यामारी जगाची फिकीर मी करूच कशाला? ह्हा:..ह्हा:.. ह्हा:... तात्या, तुमच्या ह्या प्रतिक्रियेने आम्हा वाद घालणार्‍यांना साफ वेड्यात काढलेत.

मन 15/05/2008 - 19:23
पि.डा.,पेठकर काका, राजे,नीलकांत,गणपा,पक्या,शीतल ताइ, ईश्वरी ताई,शिंगाड्या राव, चतुरंग भौ आणी हो तात्या सुद्धा. सगळ्यांचे आभार मानतोय दखल घेतल्याबद्दल. काही नवीन मुद्दे दिलेत आपण, काही अहेत त्या मुद्द्यांना उत्तरं दिलीत. यथाशक्ती आपल्या प्रतिसादांना उत्तर् दिलीत.(आणि हा प्रतिसाद उशीरा दिल्या बद्दल दिलगीर आहे.) बाकी कोंबडी-बालक आणि मांजर ह्या उदाहरणाबद्दलः- कोंबडीच्या पिलाला न खाणे ही बालकाचे कृती आहे, पण त्यावरुन व्यक्तिगणिक निष्कर्श बदलताहेत.आणि हे स्वाभाविक् आहे. एकाच घटनेबद्दल आपले दृष्टिकोन वेगवेगळे असु शकतात, निष्कर्श वेगळे असु शकतात. (म्हनजे, बालक मोठे झाल्यावर खाइल्/खाणार नाही वगैरे.) आपल्या निष्कर्शाशी सहमत् नाही,पण नवीन मतं वाचायला मिळाली, याचा आनंद आहे. आपली मत, दृष्टिकोन् वाचले.काही पटले. माझ्या पुरता मी आता समारोप् करतोय. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

मन 23/05/2008 - 22:26
मित्रहो, आत्ताच फॅमिली डॉक्टरचा ताजा अंक वाचला. (माहित नसणार्‍या व्यक्तिंसाठी:- फॅमिली डोक्टर ही आरोग्य विषयक पुरवणी दै.सकाळ मध्ये प्रकाशित होते. प्रस्तुत लेखक/संपादक ह्यांचा आयुर्वेदावर मोठाच अधिकार आहे. ) त्यात ही माहिती मिळाली आहे. पथ्यकल्पना ..... ......... मांसाहार वर्ज्य नसणाऱ्या व्यक्‍तींसाठी पथ्यकल्पनेत मांसरसाचा उल्लेख केलेला आहे. पाकपात्रे घृतं दद्यात्‌ तैलञ्च तदभावतः । तत्र हिंगु हरिद्रां च भर्जयेत्‌ तदनन्तरम्‌ ।। छागादेरास्थिरहितं मांसं तत्खण्डितं ध्रुवम्‌ । धौतं निर्गालितं तस्मिन्धृते तद्‌ भर्जयेत्‌ शनैः ।। ... भावप्रकाश मांस शिजविण्याच्या भांड्यात तूप किंवा तेल घ्यावे. तूप गरम झाले की त्यात हिंग व हळद टाकून परतावी. मग त्यात हाडे काढलेले बकरी वगैरे प्राण्यांचे मांस टाकावे. जरासे परतले की पुरेसे पाणी टाकून शिजवावे. मांस व्यवस्थित शिजले की त्यात जिरे, मोहरी, धणे, सुंठ, हिंग, हळद वगैरे मसाल्याची द्रव्ये टाकून पातळ मांसरस तयार करावा. मांसाहारी व्यक्‍तींना असा मांसरस घेता येतो. मांसरस वात-पित्तशामक, ताकद वाढविणारा असतो. हाडे सांधण्यास मदत करतो, क्षय-ज्वर वगैरे रोगांनी कृश झालेल्या व्यक्‍तींसाठी ताकद देणारा असतो. मांसरसाप्रमाणे "वेसवार' हाही एक प्रकार वर्णन केलेला आहे. मांसं निरस्थि सुस्विन्नं पुनर्दृषदि पेषितम्‌ । पिप्पली शुण्ठी मरिचगुडसर्पिः समान्वितम्‌ ।। ऐकध्यं पाचयेत्सम्यक्‌ वेसवार इति स्मृतः । ... सुश्रुत सूत्रस्थान हाडे काढून टाकलेले मांस पाण्यासह व्यवस्थित शिजवावे. शिजविलेले मांस योग्य साधनांच्या साहाय्याने वाटून बारीक करावे. भांड्यामध्ये तूप, मिरी, सुंठ, पिंपळी, मीठ, गूळ वगैरे द्रव्ये पुरेशा पाण्यासह पुन्हा सिद्ध करावे. द्रवस्वरूपाचा मांसरस तयार झाला की उतरवून वापरावा. यालाच वेसवार असेही म्हणतात. हा वेसवार पचायला जड, स्निग्ध गुणाचा, ताकद देणारा व वातामुळे होणाऱ्या वेदनांचे शमन करणारा असतो. या ठिकाणी एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा की मांसरस, वेसवार वगैरे कल्पना बनविताना वापरायचे मांस चांगल्या प्रतीचे असायला हवे. प्राण्याचे वजन लवकर वाढावे म्हणून त्यांना इंजेक्‍शन्स, औषधे वगैरे दिलेली नाहीत याची खात्री करून घ्यावी. अन्यथा मांसरसाच्या फायद्याऐवजी या औषधांचा दुष्परिणाम होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. - डॉ. श्री बालाजी तांबे विषयाशी संबंधित वाटली, म्हणुन इथे टाकतोय. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' खादाड अमेरिकनांचा निषेध्,निषेध, निषेध. )

In reply to by मन

विसोबा खेचर 24/05/2008 - 01:38
अरे लेको आम्ही पूर्वापार मांसाहार करत आहोत! हा लेकाचा बालाजी तांबे आम्हाला मांस असं खा नी तसं खा असं शिकवणारा कोण लागून गेला आहे? :) मनोबा, त्या तांब्याला सांग की मला ओल्या जवळ्याची चटणी करून खायची आहे. कशी बनवायची ते सांग म्हणावं! :) तात्या.

ईश्वरी 24/05/2008 - 01:31
फॅमिली डॉक्टर मधील माहिती बद्द्ल धन्यवाद. छान आहे माहिती...उपयुक्त आहे. मी अधूनमधून वाचते ती पुरवणी पण नेहमीच वेळ होत नाही. आणि सकाळ वर मागचे अंक ही वाचायला मिळत नाही. त्यामुळे बरं झाल ही माहिती तुम्ही इथे टाकली. ईश्वरी

नीलकांत 24/05/2008 - 18:55
चरक संहितेत अनेक प्रकारच्या आहाराची चर्चा केलेली आहे. त्यात मांसाहाराचा सुध्दा उल्लेख आहे. कुठल्या प्राण्याचं मांस कसं असतं. कश्यासाठी उपयुक्त आहे आदी सगळी माहिती त्यात आहे. आश्चर्य वाटेल पण हा मांसरस खुप आजारांत आणि काही वेळातर शक्तीवर्धक म्हणून सुध्दा घेण्यास सांगीतलेला आहे. अजामांसरस वाजीकरणासाठी चांगला आहे असं म्हणतात. ;) असो. नीलकांत

In reply to by नीलकांत

आनंदी गोपाळ 02/07/2012 - 01:20
नुसता मांसाहारच नव्हे तर त्यासोबत कोणत्या ऋतूत कोणते मद्य (मोहाचे, उसाचे इ.इ.) कोणत्या पात्रातून म्हणजे काशाचे/चांदीचे/मृत्तीकेचे इ. घ्यावे तेही लिहिलेले आहे बरे! अजामांसरस = मटन सूप. (ज्ञानानंदी) गोपाळ

चित्रगुप्त 01/07/2012 - 19:27
खास शाकाहारी लोकांसाठी एक सल्ला: जगातले सर्व लोक जर शाकाहारी झाले, तर आज ज्या भाज्या उदाहरणार्थ साठ रुपये किलो मिळत आहेत, त्या सहा हजार रुपये किलो मिळतील, आणि उपासमारीची पाळी येइल. तस्मात शाकाहार्‍यांनी शाकाहार घेत रहावे आणि मासाहार्‍यांनी मासाहार. उगीच कुणी कसला प्रचार करत बसू नये, हेच बरे. (आम्ही स्वतः शाकाहारी, म्हणून उपासमारीची जास्त काळजी) :)

In reply to by चित्रगुप्त

फसवं आर्ग्युमेंटः http://www.npr.org/blogs/thesalt/2012/06/27/155527365/visualizing-a-nation-of-meat-eaters?utm_source=nprpins&utm_medium=facebook&utm_campaign=20120627 http://www.vegsoc.org/page.aspx?pid=520 थोडक्यात शाकाहाराशी तुलना करता समान कॅलर्‍या मांसाहारी जेवणातू मिळवण्यासाठी अधिक पाणी, जमीन, वेळ खर्च होतो. चित्रगुप्त काकांनी व्यक्त केलेली भीती निराधार आहे. उलट अधिकाधिक लोकांनी मांसाहार सोडल्यास कदाचित जंगलं वाढायला अधिक जागा उपलब्ध होईल. जगाचं भलं करायचं असल्यास शाकाहारी व्हा. हेडॉनिस्ट मांसाहारी असाल तर सध्यातरी जगाचं भलं करण्याची वेळ आलेली नाही. (सवयीने शाकाहारी) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आनंदी गोपाळ 02/07/2012 - 01:37
आदिती ताई, अ‍ॅनिमल प्रोटीन व प्लांट प्रोटिन प्रत्येकी १ किलो खाल्ले असता, सुमारे ९९% अ‍ॅनिमल प्रोटीन शरीर वापरात घेते, हेच प्रमाण प्लांट प्रोटीनमध्ये ४०% चे आसपास असते. आता, यातील विष्ठेद्वारे वाया जाणार्‍या भागाचा हिशोब पाणी जमीन व वेळेत कसा मोजणार? तुमच्या शरिराने डायजेशन व रिबिल्डिंग साठी खर्च केलेल्या उर्जा, एन्झाईम्स, व टाईमचा हिशोब कुठे? अ‍ॅनिमल फॅटमधून मिळणारी कॅलरी अन स्टार्च पासून मिळणारी कॅलरी यातील क्वालिटेटिव्ह व क्वांटीटेटिव्ह फरक किति? खाण्यासाठी मांस "तयार करणारे" प्राणी ज्या वनस्पती भक्षण करतात त्या प्रमाणे तुम्ही खाऊ शकत नाही. पालेभाज्यांतील सेल्युलोजही 'फायबर' म्हणून तसेच मानवी शरीराबाहेर फेकले जाते. तुम्ही आम्ही वनस्पतींचे फार्फार कमी भाग खाऊ शकतो, ज्यात बहुतांशी फक्त 'स्टोअर्ड फूड' तेही वनस्पतींनी त्यांच्या भ्रूणासाठी (बीजातील साठविलेले) वा आमिष म्हणून वापरलेले (बीज पसरविण्यासाठी वाहकांना आमिष म्हणून फळाचा गर) इतकेच असते. कणसातून दाणे काढून घेतल्यावर उदा. बाजरीच्या झाडातून फेकून दिलेल्या भागाचा हिशोब कुठे आहे??? प्राणी मारून खाल्ला अन धान्य खाल्ले, वेस्टेज परसेंटेज किती? मनुष्य प्राणी मिश्राहारी आहे. तशी त्याच्या शरीराची जडणघडण आहे. तुम्हाला 'आवडत नाही' म्हणून मांसाहार नको असे म्हणा. मी सहमत. पण ही असली आर्ग्युमेंट्स बिनबुडाची आहेत, हे कितीही वेळ वाद घालून सिद्ध करून देईन असे म्हणतो :) (भांडकुदळ) आनंदी गोपाळ संपादनः
उलट अधिकाधिक लोकांनी मांसाहार सोडल्यास कदाचित जंगलं वाढायला अधिक जागा उपलब्ध होईल.
पुन्हा दुसरी लॉजिकल चूक. जंगलातील प्राणी मारून खाण्याचे दिवस संपलेत कधीच. आजच्या घडीला शाकाहार फोफावला, तर शेतीसाठी जास्तच जंगले तोडावी लागतील.. शेती कमी करायची असेल, तर मांसाहारी व्हा. जगाच्या भल्यासाठी आता समुद्राची शेती करायची वेळ आली आहे. मांस नको तर मासे-आहारी तरी व्हाच असे माझे म्हणने आहे. जय प्लँक्टन्स : द बिगेस्ट प्लांट मास ऑन अर्थ!

In reply to by आनंदी गोपाळ

उर्जा, एन्झाईम्स, व टाईमचा हिशोब कुठे?
या सगळ्या गोष्टी पुन्हा वनस्पतीजन्य आहारातून मानवाचं शरीर बनवणार. शरीर ज्या गोष्टी नाकारतं त्या पुन्हा काहीबाही करून जाळल्यास (उदा: बायोगॅस, खतं इ.) पुन्हा परिणाम एकच होणार. पृथ्वीच्या जीवावरच आपण आपलं आयुष्य जगणार. प्राणिजन्य आहारातून समप्रमाणात ऊर्जा मिळवण्यासाठी बर्‍याच अधिक प्रमाणात पाणी, जमीन, वेळ खर्च होतात असा दावा आहे. (यात कुठेही संपूर्ण पोषण याबद्दल चर्चा नाही.) सर्व लोक शाकाहारी झाल्यास सर्वांना पुरेसं अन्न मिळणार नाही असा जो दावा (का कोण जाणे!) केला जातो तो बिनबुडाचा आहे असा दावा आहे. या गणितात सहजच दिसणार्‍या अडचणीही मीच सांगते. पोषण मूल्य हा फार कटकटीचा भाग आहे. त्याशिवाय शेतीचं अर्थशास्त्र. कपास, नीळ, कॉफी, अफू वगैरे पदार्थ अन्न म्हणून खाल्ले जात नाहीत, त्यांचीही शेती होते. नगदी पिकं काढण्याकडे शेतकर्‍यांचा ओढा असतो. पिकाला पुरेसा भाव मिळाला नाही म्हणून पीक जाळलं जातं. इ. त्याशिवाय शेतीखालचा जमिनीचा भाग कमी झाल्यास, तिथे झाडं लावल्यासही पर्यावरणावर प्रचंड मोठा फरक दिसणार नाही. पर्यावरण म्हणजे हरित वायू परिणामामुळे होणारा परिणाम यासंदर्भात बघितल्यास, हवा 'शुद्ध' करण्याचं काम समुद्री जीव झाडांपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात करतात. आत्ता आहे त्यापेक्षा १०% झाडं अधिक झाल्यास फार फरक पडेलच असं नाही. (या गणिताचे स्रोत शोधण्यासाठी टैम्प्लीस.) त्याशिवाय मी सुरूवातीला केलेल्या विधानातल्या अधिक त्रुटी दाखवल्यास आवडेल. दुसर्‍या बाजूने मांसाहारातूनच मिळणारे काही आवश्यक पोषण (ब जीवनसत्त्वाचे काही प्रकार?) शाकाहारी लोकांना मिळत नाही किंवा पुरेसं मिळत नाही अशीही अडचण आहेच. शाकाहार्‍यांच्या आहारात दूध आणि अंडीही मोजलेली नाहीत. व्यक्तिशः माझा कोणाच्याही कोणत्याही प्रकारच्या आहाराला विरोध नाही. मी स्वतः शक्यतोवर शाकाहारी असले तरी माझ्याही अनेक चवी-ढवी आहेत. सगळ्याच भाज्या, फळं मला अगदी मनापासून आवडतात असं नाही. उलट आवडतं ते काहीही मिळालं नाही/मिळत नाही तेव्हा उपलब्ध असेल ते (बीफ्/पोर्क) आणि शैक्षणिक भूक म्हणून ससा, मोर, बेकन, सॉसेजेस, कोंबडी, हरीण, बकरा खाल्ले आहेत.

In reply to by आनंदी गोपाळ

तुमचं संपादन थोडं उशीरा पाहिलं. पण सध्या टैम्प्लीस. --- टैम्प्लीस सोडून ---
जंगलातील प्राणी मारून खाण्याचे दिवस संपलेत कधीच. आजच्या घडीला शाकाहार फोफावला, तर शेतीसाठी जास्तच जंगले तोडावी लागतील.. शेती कमी करायची असेल, तर मांसाहारी व्हा.
जंगलातले प्राणी पुरे पडण्याएवढी लोकसंख्या कमी होती तेव्हा ही अडचण नव्हतीच. आता (गेली अनेक शतकं) मांसाहारासाठीही पद्धतशीर शेती होते. १. या (प्राणी-)शेतीसाठी मोकळी जागा लागते. २. या प्राण्यांना खाऊ घालण्यासाठी आधी मुळात गवत, संत्र्याच्या साली, इ.इ. अनेक गोष्टी लागतात. कोंबड्यांना अ आणि ड जीवनसत्त्व टोचली जातात किंवा कोंबड्यांना टिपण्यासाठी बाहेर सोडलं जातं, पुन्हा अधिक जागेची आवश्यकता आहे. इतर सर्वच प्राण्यांच्या बाबतीत काही ना काही घटक येतातच. या प्राण्यांना पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी पाणी लागतं. या प्राण्यांच्या अन्नासाठी पाण्याची आवश्यकता असते. हे प्राणी जंगलात जाऊन खाऊन परत कत्तलखान्यात जात नाहीत. ३. मांसाहार मार्केटात येतो तो ही बराच प्रोसेस होऊन येतो. (भारतातलं मांसाचं मार्केट खूपच कमी आहे.) या प्रोसेसिंगसाठी जागा आणि चिक्कार प्रमाणात ऊर्जा+पाणी वापरले जातात. त्याची जागा धान्य, भाज्या, फळांनी घेतल्यास पाणी, जागा आणि ऊर्जा नक्कीच कमी वापरले जातील. थोडक्यात सूर्याकडून येणारी ऊर्जा आणि पृथ्वीकडून येणारं पाणी आणि इन/ऑरगॅनिक वस्तूमान झाडांवाटे माणसाच्या शरीरात येण्याऐवजी झाडांकडून प्राण्यांकडे आणि प्राण्यांकडून माणसाकडे तर ती क्रिया अधिक इन-एफिशियंट होणार. (यात पुन्हा आकडे देता येतील, पण थर्मोडायनामिक्सचा दुसरा नियम, वाढती एंट्रॉपी, परपेच्युअल मशीन किंवा १००% एफिशियन्सी असणारं मशीन बनवणं अशक्य असणं वगैरे पहाता यात आकडे देण्याची फार आवश्यकता नसावी.) अन्न साखळीत कोणताही प्राणी जेवढा वर चढणार तेवढं मूळ स्रोताकडून ऊर्जा मिळवणं इन-एफिशियंट (मराठी) होणार. मूळ स्रोत - सूर्य आणि पृथ्वी. सर्वांना मिळणारी ऊर्जा शेवटी तिथूनच येते. अन्न साखळीत वरच्या स्तरावर असणारे प्राणी, खालच्या स्तरावर असणार्‍या प्राण्यांपेक्षा खूपच कमी असतात त्याचं हेच कारण. मांसाहारी मनुष्य अन्न साखळीत वरच्या स्तरावर जातो. यांची संख्या बेसुमार वाढल्यास शेती करावी लागणार अन्यथा हे लोक मांसाहारी बनून टिकून राहू शकत नाहीत. माणूस खातो त्या माशांची बेसुमार मासेमारी केल्यासही समुद्री इकोसिस्टमवर त्याचे दुष्परिणाम होतात. तिथली अन्न-साखळी तुटते. पर्यावरणाचा मुद्दा कळीचा बनतो पाण्याच्या कमी/मर्यादित उपलब्धतेमुळे. तिसरं महायुद्ध पाण्यासाठीही होऊ शकतं असा एक दावा केला जातो. एखाद्या देशाकडून अन्न आयात करणं म्हणजे पाणीही आयात करणं. या संदर्भात मांसाहार खूपच कमी एफिशियंट आहे याचा विचार केला जातो. लाल मांसाच्या अतिसेवनामुळे होणारे रोग, मांसाहारी (कार्निव्होरस म्हणावे इतपत) लोकांना होणारे निरनिराळे कर्करोग यांचा विचार केलेला नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आनंदी गोपाळ 05/07/2012 - 22:46
कोणत्याही हृदयरोग तज्ञाकडे जाऊन आपण 'पूर्ण' शाकाहारी आहात असे सांगा. पहिली तपासणी तो तुमच्या शरीरातील जीवनसत्वांच्या प्रमाणाची लिहून देईल. खासकरून ब जीवनसत्व समूह. शाकाहाराचा अतिरेक करणार्‍यांना या 'डेफिशिअन्सिज' होतात. व त्यांचे दुष्परिणामही होतात. रेड मीट, जेनेटिक बिल्डप, बॉडी फॅट डीस्ट्रिब्युशन यांचे विचार वेगळे आहेत. इथे चर्चा माणूस 'नॅचरली शाकाहारी की मांसाहारी' अशी आहे. दात असे म्हणुन शाकाहारी, शेपूट नाही म्हणून शाकाहारी इ.इ. बाष्कळ पुरावे. फक्त दोन टोके. मधला मूळ मिश्राहार सगळेच विसरलेत..असो. (तुमचा प्रतिसाद वाचून first impression उत्तर हे आहे. सविस्तर वाचून नंतर लिहिन. ३ दिवस रजेवर होतो.)

In reply to by आनंदी गोपाळ

बॅटमॅन 07/07/2012 - 02:34
+१ सहमत. शाकाहाराचे समर्थक कधी कव्हर्ट पणे तर कधी उघडपणे असे बाष्कळ पुरावे मांडायला फार आतुर असतात असे एक निरीक्षण आहे. अशांना कसे आवरावे ते कळत नाही.

In reply to by आनंदी गोपाळ

माझा मुद्दा तो नाहीच. जगातले सर्व लोक शाकाहारी झाल्यास जगाला अन्न कमी पडणार नाही असा मुद्दा मी मांडते आहे. मानवी शरीरात प्राणिजन्य प्रथिनांपेक्षा वनस्पतीजन्य प्रथिनं कमी शोषली जातात असा तुमचा मुद्दा होता. त्यात प्राण्यांची शरीरं जी वनस्पतीजन्य प्रथिनं टाकून देतात त्याचाही विचार करावा लागेल. पोषणमूल्य, आतड्याची लांबी, दातांची रचना हे विषयाशी संबंधित, पण मी मांडते आहे त्यापेक्षा संपूर्णतः वेगळे मुद्दे आहेत.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आनंदी गोपाळ 08/07/2012 - 14:42
पृथ्वीवर वर्चस्व गाजविणारे व प्रचंड संख्येने असलेले, व आकारानेही भलेप्रचण्ड असे डायनोसॉर बहुसंख्येने शाकाहारी होते. त्याकाळी शाकाहारी अन्न त्यांना कमी पडल्याने उपासमार होऊन ते मेले असावेत असा शोध लागलेला नाही. परंतू, माणसाच्या शाकाहारात अन प्राण्यांच्या शाकाहारात असलेला महत्वाचा फरक तुम्ही लक्षात घेत नाही आहात. मक्याचे झाड लावले असता माणूस फक्त कणसातले दाणे खातो, बाकीचे पूर्ण झाड 'वाया' जाते. हेच गायीच्या बाबतीत ती संपूर्ण झाड खाऊ शकते. व पचवूही शकते. हाही हिशोब करता, इतक्या प्रचण्ड संख्येने असलेल्या माणसाला खाऊ घालण्यासाठी शेती करणे व त्यासाठी एकोसिस्टीम्स नष्ट करणे हा उद्योग करावा लागेल. अन हे केवळ अनैसर्गिकरित्या मनुष्याला 'शुद्ध' शाकाहारी बनविल्यामुळे.

In reply to by आनंदी गोपाळ

मनुष्य गाय खातो तेव्हाही संपूर्ण गाय खात नाही, खाऊ शकत नाही, खाल्ल्यास तिचा काही भाग पुन्हा शरीराबाहेर अनावश्यक म्हणून बाहेर टाकणार. (इथे मी फार क्वालिटेटीव्ह (मराठी शब्द?) बोलते आहे हा आक्षेप मान्य आहे.) मुळात ऊर्जा सूर्याकडून आणि पोषण पृथ्वीकडून मिळणार. त्यात जेवढ्या अधिक पायर्‍या येणार तेवढं यंत्र inefficient होणार. आपण (प्राणी) photosynthesis करू शकत नाही म्हणून वनस्पतींची आवश्यकता आहे. झाडाचा आपण मोजका भागच खाऊ शकतो हे खरं आहे तेवढंच हे ही आहे की उरलेला भाग पुन्हा पृथ्वीमधे, हवेमधे परत जातो. सूर्याची ऊर्जा परत जात नाही, पण त्या ऊर्जेचं मुख्य काम catalyst चंच असतं. शिवाय सूर्याचं इंजिन अजून ५X१० वर्ष चालू रहाणार आहे. तत्संबंधात एक अवांतर प्रश्नः वाघाने (किंवा इतर मांसाहारी प्राण्याने) गवत, पालापाचोळा, शाकाहार घेतल्यास त्याच्यावर परिणाम काय होतो?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आनंदी गोपाळ 13/07/2012 - 11:08
पण लहानपणापासून, ‘फोटोसिंथेटिक’ माणूस तयार करता आला तर काय बहार येईल- अशी साय-फ़ाय स्वप्ने पहात आलो आहे.. बाकी वेळ मिळाल्यावर पुन्हा

In reply to by आनंदी गोपाळ

अतिशय मर्यादित अर्थाने हे अजूनही होतंच की! सूर्यप्रकाशात मनुष्याच्या शरीरात, त्वचेखाली ड जीवनसत्त्व तयार होतं. अवांतरः असं झाल्यास, सूर्यप्रकाशात लोळत पडलेले लोकं हे दृष्य कॉकेशन वंशाचे लोकं असणारे सोडून इतर देशांतही दिसेल.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मन१ 13/07/2012 - 19:46
आपण आपले फोटोसिंथेसिस करु लागलो तर हळूहळू उभयचर(amphibian) कसे जमीनीवरच्या आणि पाण्यातल्या प्राण्यांचे गुणधर्म दाखवतात, तसे आपण दाखवू लागू. आपण "चालणारी वनस्पती" ह्या क्याटॅगरित येउ. वनस्पतीसारखे कोवळे लुसलुशीत,तुकतुकित,हिरवेगार दिसू. म्हणजेच समजा आपण दुपारी कधी डुलकी काढायला जायचो आणि आपले मनोहारी रूप पाहून एखादी शेळी, एखादे हरीण, ससा, कित्येक पक्षी ह्यांना आपला मोह पडून ते आपल्याला "कचाकचा" खायला धावतील. काही पक्षी आपल्याला फोडून तोडून घरटे बनवू पाहफोडून्कल्पना करा :- आपला एक डोळा फोडून चिमणीनं घरटं केलय. एक पाय तो क्रूर सुतार पक्षी फोडून्,कुरतडून राहिलाय. यक्क... नकोच ते. शिवाय इतके दिवस आपणच त्यातल्या कित्येकांची पैदास वाढवल्याने, त्यांची कमी नाही. आपल्या आजवरच्या पिढ्यांनी त्यांना कापून कापून जी मौज केली त्याची परतफेड अशी "उत्क्रांत" झालेल्या पिढीला करावी लागेल. बाब्बो. नकोच. शेळीनं तुम्हाला खाण्यापेक्षा तुम्ही शेळीला खाल्लेलं बरं.

चित्रगुप्त 02/07/2012 - 02:12
जीवो जीवस्य भोजनम. शाकाहार काय अथवा मासाहार काय, काहीतरी 'जीव' असलेलेच खावे लागते. 'निर्जीव' उदा. दगड, माती इ. खाऊन पोषण होत असल्याचे अद्याप ऐकिवात नाही.

रमताराम 02/07/2012 - 18:08
चिंम्प्स शिकार करतात हो, अगदी सजातीय प्राण्यांची म्हणजे छोट्या माकडांची शिकार तर प्राधान्याने करतात. छोट्या माकडांचे वसतीस्थान हेरून आधी आसपासची सारी झाडे पकडून बसतात, जणू वेढाच घालतात. नि मग मुख्य नर मधल्या झाडांवरील माकडांवर हल्ला चढवतो. आजूबाजूचे त्यांना दुसर्‍या झाडावर उडी मारून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना रोखतात किंवा शिकार करतात. मग आता माणूस स्वजनाहारी (कॅनिबल) झाला तर योग्य ठरेल का हो? याशिवाय काही लहानसहान प्राण्यांची शिकारदेखील करतात. चिम्प्स मुळीच शाकाहारी नाहीत. बाकीचे शाकाहार/मांसाहार वगैरेचे कवित्व आमच्या विट्रेंस्टचे नसल्याने तुमचे चालू द्या.

गोंधळी 02/07/2012 - 21:00
माणसाने शाकाहारी असावे की मांसाहारी असावे ही त्या माणसाची व्ययक्तिक बाब आहे. मला तरी व्ययक्तिकरीत्या(माझ्यापुरता )शाकाहार चांगला वाटतो.

In reply to by गोंधळी

शाकाहार नक्कीच चांगला आहे. पण शरीराच्या प्रथिनांच्या गरजेच्या पूर्ततेसाठी रोजच्या जेवणात कडधान्ये असावीत. कडधान्यातून प्रथिने मिळतात पण त्यांना 'अपूर्ण प्रथिने' म्हणतात ती शरीरात पूर्णपणे शोषली जात नाहीत. त्यासाठी त्या बरोबर कार्बोहायड्रेट्स असावेत. जसे, भात, भाकरी इ. म्हणूनच आपल्याकडे वरण भात, मुगाच्या डाळीची आणि तांदूळाची खिचडी खायची पद्धत आहे, तांदूळ+उडीदाची डाळ असलेली इडली अशा पदार्थांचा आहारात समावेश जास्त असावा. मांसाहारी पदार्थात प्रथिने अधिक असतात आणि ती 'पूर्ण' प्रथिने ह्या सदरात मोडतात आणि शरीरात पूर्णपणे शोषली जातात. आयुष्यभर शरीराला प्रथिनांची कमतरता भासली तर म्हातारपणी काही विशिष्ट आजार (पाय असह्य दुखणे इ.इ.) होऊ शकतात. माझ्या आईला ह्याचा त्रास झाला होता. पूर्ण शाकाहारी व्यक्तींमध्ये ह्याचे प्रमाण अधिक आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

गोंधळी 02/07/2012 - 21:48
मांसाहारी पदार्थात प्रथिने अधिक असतात आणि ती 'पूर्ण' प्रथिने ह्या सदरात मोडतात आणि शरीरात पूर्णपणे शोषली जातात. सहमत. पूर्ण शाकाहारी व्यक्तींमध्ये ह्याचे प्रमाण अधिक आहे. असहमत.मला वाटते हा संशोधनाचा विषय आहे. आणि काका मला शाकाहार चांगला किं मांसाहार चांगला या वादात पडायचे नाहि आहे.हा ज्याचा त्याचा व्ययक्तिक प्रश्न आहे. ------------------- जय आदिवासी.

In reply to by गोंधळी

मला वाटते हा संशोधनाचा विषय आहे. माझ्या आईच्या आजारपणात तज्ज्ञ फिजिशियन कडून ही माहिती मिळाली. त्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात शिकविले जाते त्या अर्थी कांही तरी तथ्य असावे असे मला वाटते. बाकी ह्या विषयावर मी जास्त अधिकारवाणीने बोलू/लिहू शकत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

गोंधळी 04/07/2012 - 13:20
मटण खाणाऱ्या व्यक्तींना कर्करोग होण्याची शक्‍यता अधिक असल्याचा दावा "ग्लोबल ऍग्रीकल्चरल इन्फॉर्मेशन नेटवर्क'ने (ग्लोबोकॅन) प्रसिद्ध केलेल्या अहवालात केला आहे. ही महिती आजच्या सकाळ मधिल आहे. http://www.esakal.com/esakal/20120704/5665452963893279664.htm

सुनील 02/07/2012 - 22:15
निरिक्षण १ - चिम्स हे केवळ मांसाहारीच नव्हे तर, स्वजातभक्षीदेखिल आहेत, हे वर ररांनी सांगितलेच आहे. तेव्हा हा मुद्दा बाद. निरिक्षण २ - मनुष्य कच्चे मांस खात नाही. सबब, त्याला तीक्ष्ण दातांची वा सुळ्यांची आवश्यकता नाही. हा मुद्दादेखिल बाद. निरिक्षण ३ - मुद्दा नीट समजला नाही. मनुष्य मांसाहारदेखिल चावूनच खातो, गिळून नव्हे :) निरिक्षण ४ - मानवी शरीरातील एक हल्ली वापर होत नसलेला भाग यातच सगळे आले, नाही का? निरिक्षण ५ - काय पण तुलना? बालक कोंबडीचे पिल्लू कसे खाईल? त्याऐवजी सफरंचंद आणि मस्त भाजलेली चिकन तंदूरी ठेवा आणि मग बघा, ते बालक काय करते ते ;) थोडक्यात, ज्याला जे हवे, ते त्याने खावे. नसती कारणमिमांसा देत बसू नये :)

In reply to by सुनील

निरिक्षण २ - मनुष्य कच्चे मांस खात नाही. सबब, त्याला तीक्ष्ण दातांची वा सुळ्यांची आवश्यकता नाही. हा मुद्दादेखिल बाद.
अनेक भाज्या, धान्येही आधुनिक मनुष्य कच्च्या खात नाही, बर्‍याच प्रक्रिया करून खातो. कच्ची पीठं खाल्ल्यास अनेकांना पोटदुखी इत्याही होतात. (निदान कणीक भिजवल्यावर आई अशी तंबी देतेच देते.)
ज्याला जे हवे, ते त्याने खावे. नसती कारणमिमांसा देत बसू नये
सहमत आहे.

मनोबांचा धागा ग्रेट, आणी पेठकर काकांचे एकाहुन एक मुहतोड जबाब त्याहुन ग्रेट...! व्वा..! चर्चा व्हावी तर ती अशी. शिवाय आयुर्वेदातले उल्लेखही बारकावे हेरणारे आहेत. मला तर असं वाटतं की हा अख्खा धागाच एका छोट्याश्या पुस्तकात रुपांतरीत करुन(आणखि आवश्यक भर घालुन) हे पुस्तक शाकाहारी आणी मांसाहारी अश्या दोन्ही प्रकारच्या लोकांना मोफत लस म्हणुन वाटावे. कारण दोघांमधेही त्या त्या मताचा व्हायरस असतोच..!

रमेश आठवले 07/07/2012 - 02:30
प्राण्यांच्या उत्क्रांती प्रक्रियेचा वर वर अभ्यास केला तर असे लक्ष्यात येते कि प्रत्येक प्राणीमात्रात त्याच्या उदरभरणासाठी लागणारे अन्न मिळवण्यासाठी स्वयम्भूत साधने असतात. मांसाहारी प्राण्यान्जवळ नखे, सुळे अशी शिकारीची साधने असतात. मनुष्यामध्ये अशी साधने नाहीत ह्यांचे कारण मानव हा शाकाहारी घडविला गेला आहे. त्याने नंतर बुद्धीचा वापर करून काठी, बाण,सापळा व इतर बाह्य साधनांचा वापर करून शिकार करावयास सुरुवात केली आणि ह्यामुळे तो मांसाहारी होऊ शकला, बाकी नैसर्गिक पणे तो शाकाहारीच घडला आहे.

In reply to by रमेश आठवले

आनंदी गोपाळ 08/07/2012 - 01:02
i-lA~रमेशचे अनेक अर्थ आथवले मला. असो. महोदय! तुम्ही 'वर वर' अभ्यास केला तर मी तुम्हाला, 'खाली खाली' हाका मारीन. अन प्रश्न विचारीन. हे 'वर वर अभ्यास' काय आहे? तुमच्या उदरात उंदीर भरला अन गवत भरले, तर उंदराने जिवंत रहाल की गवताने? खाली खाली विचार केला तर गवत पचवता येत नाही. त्यातले ना क्लोरोफिल पचते, ना सेल्युलोज. (सेल्युलोज ही एक प्रकारची 'साखर' असते हे आपणास अथवते का?) या उलट उंदरातील बरेच काही पचते. उगंच काहीतरी आथवले म्हनून काहीतरी टंकले असे करू नये, ही णम्र इणंटी.

In reply to by आनंदी गोपाळ

गोपाळा,,,हसवुन हसवुन मारलस रे बाबा...! उगंच काहीतरी आथवले म्हनून काहीतरी टंकले असे करू नये, ही णम्र इणंटी. >>>

In reply to by आनंदी गोपाळ

रमेश आठवले 08/07/2012 - 23:36
ध चा मा करणारया एक आनंदीबाई रघुनाथराव होवून गेल्या. आता आणखी एक आनंदीबाई अवतरल्या आहेत असे वाटते. लेखनात सभ्यपणा वापरण्याची शिकवण या नवीन आनंदीबैना मिळालेली नाही असे दिसते. या बाबत गोपाळराव यांस विचारावयास हवे.

In reply to by रमेश आठवले

आनंदी गोपाळ 09/07/2012 - 22:38
आपण सरपंचां कडे तक्रार केलीत, इतपत माझ्या प्रतिक्रीयेने दुखावलात, हेच जर मला उलट प्रश्न करून विचारले असतेत, तर समजवून सांगितले असते. उत्क्रांतीच काय तर कोणत्याही जीवशास्त्रीय विषयांचा तुमचा अभ्यास शून्य आहे असे साडेतीन रुपयांची पैज लाऊन इथे सांगतो. (माझी ऐपत तितकी आहे. म्हणून तितकी पैज.) आनंदी अन गोपाळ याचे स्पष्टीकरण जरा माझी स्वाक्षरी पहाल तर समजेलच.

In reply to by रमेश आठवले

आनंदी गोपाळ 09/07/2012 - 22:51
प्राण्यांच्या उत्क्रांती प्रक्रियेचा वर वर अभ्यास केला तर असे लक्ष्यात येते कि प्रत्येक प्राणीमात्रात त्याच्या उदरभरणासाठी लागणारे अन्न मिळवण्यासाठी स्वयम्भूत साधने असतात.
उत्क्रांती प्रक्रिया ही स्वत:च ती साधने बनविते. ती 'असत' नाहीत.
मांसाहारी प्राण्यान्जवळ नखे, सुळे अशी शिकारीची साधने असतात. मनुष्यामध्ये अशी साधने नाहीत ह्यांचे कारण मानव हा शाकाहारी घडविला गेला आहे. त्याने नंतर बुद्धीचा वापर करून काठी, बाण,सापळा व इतर बाह्य साधनांचा वापर करून शिकार करावयास सुरुवात केली आणि ह्यामुळे तो मांसाहारी होऊ शकला, बाकी नैसर्गिक पणे तो शाकाहारीच घडला आहे.
बुद्धी नावाचे शस्त्र उत्क्रांतीतून मिळाल्यावर इतर सगळी शस्त्रे क्षुल्लक व कुचकामी ठरली, सबब त्यागली गेली. अक्कल वापरून अन्न मिळविणे जास्त सोपे होते. उगा धारदार सुळे अन बळकट बाहू कशाला हवेत? आम्ही प्राणी पाळू लागलो अन शेती करताना झाडेही पाळू लागलो. उत्क्रांतीचा 'वरवर' नाही नुसता ८वी यत्तेइतका अभ्यास केला असतात, किंबहुना वर्गात शिक्षक बोलले ते थोडे जागेपणी ऐकले असतेत, तरी इतके समजले असते. उगा प्रतिसाद टंकताना 'अमुक शास्त्राचा 'वरवर' अभ्यास केला असता असे दिसून येते' स्टाईल वाक्ये टंकून स्वतःच्या अज्ञानाला वजन देण्याचा प्रयत्न केलात तर माझ्या सारखे लोक मी टंकले तसे खडूस प्रतिसाद लिहीणारच. ती मिपाची प्रकृती आहे.

In reply to by रमेश आठवले

वेताळ 12/07/2012 - 17:40
उत्क्राती काळात मानव सर्वप्रथम शाकाहारी होता ह्याबद्दल आपण संशोधन केले आहे काय? असल्यास त्याबद्दल अधिक माहिती द्या.

In reply to by वेताळ

रमेश आठवले 13/07/2012 - 22:20
या विषयावर मी लिहिले आहे त्याची आणि माझ्या ज्ञानाची टर न उडवता आपण मला अधिक माहिती द्यावयास सांगितले याबद्दल धन्यवाद. निरोगी चर्चा हि अशीच असावयास हवी असे माझे मत आहे. मिपाच्या संपादक मंडळींचेही असेच मत आहे असे मी मानतो. खाली दिलेल्या धाग्यावर मानवाची शरीर रचना आणि त्याची पचन प्रक्रिया हि शाकाहारी प्राण्यांसारखी आहे आणि मांसाहारी प्राण्यांच्या सारखी नाही हे पटवून दिले आहे. http://www.stevepavlina.com/blog/2005/09/are-humans-carnivores-or-herbivores-2/

In reply to by रमेश आठवले

बॅटमॅन 13/07/2012 - 22:52
जी लिंक आपण दिलीत तो स्टीव्ह पावलिना हा दीपक चोप्रा वैग्रे प्रमाणे ग्रोथ गुरु आहे, आहारतज्ञ नाही, सबब त्याची मते ग्राह्य मानता येत नाहीत.

In reply to by रमेश आठवले

बॅटमॅन 14/07/2012 - 02:32
तुम्ही दिलेला दुवा तद्दन गल्लाभरू छाप आहे हे माहिती असूनदेखील तिकडे दुर्लक्ष करून "आशया"कडे जातो. तो जो "आशय" दिलेला आहे, त्याशी मानवजातीचा इतिहास सुसंगत नाही. शेतीचा शोध लागण्याआधी माणूस अगदी खुंदल खुंदल के शिकार करून खात होता. त्यावेळी बरा आला नाही त्याला कुठलाही प्रॉब्लेम? माणसाचे अतिशय जवळचे जेनेटिक बांधव चिंप्स देखील नॉनव्हेज खातात. इतकेच नव्हे तर वैदिक वाङ्मय, महाभारत, आयुर्वेद, इ. ठिकाणी देखील मांसाहाराचे वर्णन खूप ठिकाणी येते. त्याचा निषेध हा देखील खूप नंतरच्या काळातील आहे. भारतच का, उर्वरित जगातदेखील मांसाहार खूप जोरात केला जायचा आणि आत्तादेखील जातो. हे सर्व आणि इतरही बरेच मुद्दे या चर्चेत ऑलरेडी बहुत वेळेस आलेले आहेत. ते थोडे तरी पहा, त्यातल्या विसंगती स्पष्ट करा आणि मग बोला. कुठल्याही बाजूने चिक्कार लिंका मीपण देऊ शकेन आत्ताच्या आत्ता. पण त्याला काही अर्थ नाही.

In reply to by रमेश आठवले

आपल्या मतांचा आदर आहेच. परंतु, कुठले, कोणाचे वैचारिक विश्लेषण वाचून आपले मत बनविण्यापेक्षा योग्य प्रमाणात मांसाहार, शाकाहार आणि मिश्राहार घेणार्‍या वेगवेगळ्या समुदायाचे अल्पायुष्य आणि दीर्घायुष्य ह्या मोजपट्टीवर मापन केले (तसा विदा उपलब्ध असेल तर) तर जे निष्कर्ष समोर येतील ते जास्त विश्वासार्ह म्हणावे लागतील. योग्य प्रमाणात घेतलेला मांसाहार, शाकाहार आणि मिश्राहार कितपत आरोग्यदायी ठरतो ह्याचे काही सर्वमान्य पुरावे उपलब्ध असतील तर चर्चेला दिशा मिळेल. नाहीतर तिन्ही आहार पद्धतींचे समर्थन आणि खंडन करणारे अनेक जणं असतात त्यामुळे जगाच्या अंतापर्यंत ही चर्चा चालू शकेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

बॅटमॅन 14/07/2012 - 02:03
योग्य प्रमाणात घेतलेला मांसाहार, शाकाहार आणि मिश्राहार कितपत आरोग्यदायी ठरतो ह्याचे काही सर्वमान्य पुरावे उपलब्ध असतील तर चर्चेला दिशा मिळेल. नाहीतर तिन्ही आहार पद्धतींचे समर्थन आणि खंडन करणारे अनेक जणं असतात त्यामुळे जगाच्या अंतापर्यंत ही चर्चा चालू शकेल.
एग्जॅक्टलि!!! थोडेसे गुगलून पाहिले असता एक पेपर सापडला. यात त्यांनी व्हेजवाले आणि हेल्थ कॉन्शस नोनव्हेजवाले यांची तुलना करून निष्कर्ष काढले ते त्यांच्याच शब्दांत देतो. शीर्षकः Vegetarian diets, chronic diseases and longevity. सारांशः प्युअर व्हेजवाल्यांच्या मते व्हेज खाण्यामुळे आयुर्मान वाढते, विविध रोगांची रिस्क कमी होते, इ.इ. पण युरोपमधील सर्वांत जास्त हेल्दी लोक उदा. स्कँडेनेव्हियन्स..ते तर लै मांस खातात. व्हेज खाण्यामुळे लट्ठपणा कमी होतो, तसेच हृदयरोगाची रिस्क कमी होते, पण विविध प्रकारच्या कॅन्सर बद्दलची रिस्क आजिबात कमी होत नाही. शिवाय नॉनव्हेज खाण्यामुळे हिंसक स्वभाव बनतो असे जे अडाणचोट विधान आहे त्याला दुजोरा देणारी कसलीही माहिती आजपर्यंत पुढे आलेली नाही. आणि अलीकडच्या खादाड समाजात व्हेज म्हणजे एक प्रकारचे आहारनियमनच असल्यामुळे त्याचा काही अंशी फायदा होतो. व्हेजमध्ये फळे वैग्रे खा ल्ल्यामुळे फायदा होतो, निव्वळ मांस न खाल्ल्यामुळे नाही. पान क्र. २ वर पहावे, आईसलँड मधील आहाराच्या सवयी खुंदल खुंदल के नॉनव्हेज वाल्या असूनदेखील त्यांचे आयुर्मान जास्त आहे. हेल्थ कॉन्शस नॉनव्हेजवाले आणि व्हेजवाले यांची तुलना केल्यास बर्‍याच प्रचलित समजुतींना तडा जाऊ शकतो हे या ४ पानी पेपरावरुनदेखील सिद्ध होते.

अनेक शाकाहारी पदार्थ आणि सगळे मांसाहारी पदार्थ प्रक्रिया केल्याशिवाय खाणे आजमितीस तरी अशक्य आहे. एकेकाळी माणूससुद्धा कच्चे मांस खात असेल पण उत्क्रांतीच्या प्रक्रियेत अन्न शिजवून खाण्याच्या सवयीमुळे कदाचित पचनशक्ती दुबळी होत गेली असावी असे वाटते. शारिरिक दृष्ट्या मानवाला प्रामुख्याने शाकाहार हाच सुटेबल् ठरतो. ज्यांना अधिक शारिरीक उर्जेची गरज असते असे लोक जसे - फुटबॉलर, अ‍ॅथलीट, बॉक्सर अशांचा मांसाहाराशिवाय निभाव लागणार नाही असे वाटते. अनेक दुबळ्या, अशक्त किंवा क्षयासारख्या आजारातून उठलेल्या माणसांना अंडी , चिकन सूप किंवा तत्सम आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. याउलट हार्ट पेशंट, अति लट्ट माणसे, कोलेस्टेरॉल जास्त असणारे लोक यांना सक्तीने शाकाहार घेण्याचा आणि मांसाहार टाळण्याचा सल्ला दिला जातो. तेंव्हा मानवी शरीराला मांसाहार योग्य किंवा शाकाहार योग्य असा सरसकट इन्फरन्स कसा काढणार ? फक्त मांसाहार सेवन करण्याची सक्ती केलीत, तर बघाल की त्याचे शरीर हे सहन करु शकत नाही. प्रत्येकाच्या शरीराला कोणत्या अन्नाची सवय आहे यावर बरेच काही अवलंबून आहे. दररोज मांस खाणारा माझा एक किरिस्ताव मित्र मी पाहिलेला आहे. अनेक वंगबंधू, कोळी समाजाचे लोकं हे दररोज मांसाहार करतच असतात. माझ्या जुन्या ऑफिसातला एक मित्र त्याच्या डब्यामध्ये 'फॉर अ चेंज' व्हेज आणत असे. तेंव्हा माणसाचे शरीर कायम मांसाहार करु शकत नाही हेदेखील तितकेसे पटत नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

बॅटमॅन 07/07/2012 - 15:16
+१. हा तिसरा मुद्दा ढोंगी शाकाहारमार्तंड जरा जास्तच लावून धरतात. स्वतःची तथाकथित नैतिक श्रेष्ठता प्रस्थापित करायची लै हौस असते त्यांना.

चित्रगुप्त 08/07/2012 - 14:21
कलेच्या प्रांतात पारंपारिक (अर्थात पाश्चात्य पारंपारिक) वास्तववादी कलेचे समर्थक आणि आधुनिक कलेचे समर्थक एकमेकांना वाट चुकलेली कोकरे समजून आपल्या विचारसरणीचा बाप्तिस्मा देऊन आपल्या कळपात ओढू बघत असतात, तसेच शाका-मासा. चे होत असतेसे दिसते. :)

In reply to by चित्रगुप्त

@आपल्या विचारसरणीचा बाप्तिस्मा देऊन आपल्या कळपात ओढू बघत असतात, तसेच शाका-मासा. चे होत असतेसे दिसते. Smile अतिशय समर्पक प्रतिसाद...

In reply to by चित्रगुप्त

बॅटमॅन 08/07/2012 - 15:28
शाकाहारी आणि मांसाहारी पारंपरिक कलासमर्थक आणि आधुनिक कलासमर्थक मार्क्सवादी आणि हिंदुत्ववादी अँटी-पुणे आणि पुण्याचे वकील निवासी आणि अनिवासी वेगवेगळ्या आब्राहमिक धर्मांचे अनुयायी अशी ही थोडीशी मोठी लिस्ट आहे ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

बॅटमॅन 08/07/2012 - 20:59
तुमच्या स्मायल्यांचा स्रोत आत्ताच्या आत्ता सांगा नैतर बाटलीत भरून कैद करतो बघा तुम्हाला ;)

In reply to by अत्रुप्त आत्मा

मराठे 10/07/2012 - 00:08
च्यायला ! तुम्ही आधी प्रतिसाद टंकून मग स्मायली शोधता, की स्मायली सापडली की त्याप्रमाणे प्रतिसाद लिहीता?

धाग्याचं शीर्षक वाचूनच त्यातले मुद्दे आणि आणि पुढचे प्रतिसाद काय येणार ह्याचा अंदाज आला होताच. आणि अगदी "जे जे वांछील तो ते खावो" हे कंक्लूजनसुद्धा कळलं होतं. पण जसे फिक्स केलेल्या मॅच मध्येदेखील काही एक्साइटिंग गोष्टी घडतातच - तसे, पेठकरकाकांचे प्रतिसाद, मनोबाचे मुद्दे, आयुर्वेदातले दाखले, अदिती वि. आनंदी गोपाळचं "बॅटल विदिन अ बॅटल"..... शेवट माहित असलेली सास-बहू सीरियल बघतोय असं वाटलं. अर्थात ज्ञानात भर पडली - मतांत फरक (अर्थातच्) पडला नाही. (आज रात्री मटण सूप पिण्याची इच्छा असलेला) जे पी

मन१ 12/07/2012 - 13:01
धागा वर आणलेला दिसतोय, मुद्दे वाधलेले दिसताहेत. पाहून छान वाटलं. सविस्तर निवांत टंकेन.

In reply to by गवि

गणपा 12/07/2012 - 15:53
या धाग्यावराचा सर्वोच्च प्रतिसाद. ;) बादावे शेवटच्या ताटातली रश्याची वाटी फारच प्रेमाने आणुन दिलेली दिसते. ;)

In reply to by गवि

नंदन 13/07/2012 - 11:12
या धाग्यावराचा सर्वोच्च प्रतिसाद.
असेच म्हणतो. त्यातही परमेश्वराच्या प्रथम अवतारास अग्रस्थानाचा मान देणे हे तर अगदी समर्पक! :)

चित्रगुप्त 15/07/2012 - 07:59
गुडघेदुखी ही चाळीशीच्या पुढील स्त्रियांमधे विशेषतः भारतात फार आढळते. युरोपात अगदी म्हातार्‍या (गोर्‍या) स्त्रियासुद्धा अगदी टुणटुणीत, स्लिम असलेल्या दिसतात, तर तेथील अगदी तरूण हबशी स्त्रियासुद्धा भलत्याच लठ्ठ असतात, (असे माझे निरिक्षण आहे, चू.भू.द्या.घ्या.) या गोष्टीचा आहाराशी काय संबंध आहे, हे तज्ञांनी स्पष्ट करावे.

In reply to by चित्रगुप्त

अर्धवटराव 15/07/2012 - 10:34
त्याचा आहाराशी फार काहि संबंध नाहि. काळ्या अफ्रिकन लोकांच्या जीन्स मधे चरबी साठवुन ठेवणारे हार्मोन्स नसतात. त्यामुळे चरबी कंट्रोल करणारे हार्मोन्स पण नसतात. जर एखादं हायब्रीड प्रॉडक्ट ( उदा. काळं + पांढरं )असेल आणि त्यात पांढर्‍याकडुन चरबी साठवणारे हार्मोन्स आले तर त्यांना अडवणारे एण्टी चरबी हार्मोन्स च्या अभावामुळे ते बेहिसाब लठ्ठ होतात. ढिशक्लेमर : १) हि सर्व ऐकिव माहिती आहे. संदर्भ देणे, ऑथेण्टीक माहितीचे दुवे लक्षात ठेवणे अश्या भानगडीत आम्हि पडत नाहि २) जीन्स, हार्मोन्स वगैरे शब्द प्रतिसादाला केवळ भारदस्तपणा येण्यासाठी वापरले आहेत. "केमीकल लोचे" या एकाच पिशवीत हि मंडई निपटता येईल. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

"केमीकल लोचे" या एकाच पिशवीत हि मंडई निपटता येईल. एखाद्या चित्रपटात, समुहनृत्यात नायिकेपेक्षा, समुहातली एकदम मागची, एखादी दुय्यम नर्तिका अतिशय गोड दिसत असावी आणि आपल्या नृत्य कौशल्याने नायिकेपेक्षा स्वतःकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असावी तसे हे, डिस्क्लेमरच्या अगदी शेवटच्या कोपर्‍यातलं, वाक्य फार आवडलं.
मित्रहो, जीवाची हत्या करणे वाइट,म्हणुन मांसाहार वाइट आणी म्हणुनच तो अयोग्य.शाकाहार तेव्हढा चांगला. ह्यातील माझं काहीही म्हणणं नाही. मी मानवी शरीर,प्रकृती ह्यासाठी स्वाभावीक अन्न कुठलं आहे, ते शोधतोय. मुळात, बहुतांश सर्व सस्तन प्राणी आणी पक्षी ह्यांचे प्रामुख्याने शाकाहारी आणि मांसाहारी असे वर्गीकरण करता येते. जे प्रामुख्याने वनस्पती खातात, ते शाकाहारी. जे प्रामुख्याने इतर वनस्पतींशिवाय इतर सजीव(प्राणी,पक्षी )भक्ष्य म्हणुन खातात(स्वजातीतील् सुद्धा) ते मांसाहारी. माझे काही तर्क, निरिक्षण आणि वाचनातील् काही भागानुसार मानवी शरीरा बद्दल हे विचारः- १.एकाच प्रवर्गातील किंवा परीवारातील(स्पेसीज् किंव

रंगीत मिरच्या - रेसिपी सुचवाल ?

ईश्वरी ·

वरदा 10/05/2008 - 02:54
जर सुकवून तळली तर? आणि त्यात दहि मीठ घालून खायचं तळल्यावर तिखट्पणा थोडा कमी होईल आणि दही घातलं की अजुन कमी होईल्...बाकि एक्स्पर्ट्स सांगतीलच स्वगतः ही का चिडवतेय मला..बाहेर बदाबदा पाऊस कोसळतोय माझं ऑफिसमधलं काम संपलं नाहीये आणि ही भज्यांचं चित्र टाकते... :(

वेलदोडा 10/05/2008 - 03:10
मिरच्यांची भजी !!! व्वा ...झकास. पाणी सुटलय तोन्डाला =P~ भरली मिरची हा प्रकार करता येईल. पण सारण काय भरावे हे जाणकार सान्गू शकतील. सॅलड मध्ये पण वापरू शकता. पण त्या आधी व्हिनेगर मधे बुडवून ठेवाव्या लागतील्...म्हणजे तिखटपणा कमी होईल. आत बिया असतील तर त्याही काढून टाका कारण बियांमुळे तिखटपणा जास्त वाढतो. -- वेलदोडा

धनंजय 10/05/2008 - 03:48
पण रंगांची गंमत दिसण्यासाठी हळद घालू नये - खूप कमी घालावी. रंगीबेरंगी ठेचा : लिंबाचा रस आणि मीठ घालून मिरच्यांचा ठेचा करावा - प्रत्येक रंगाच्या मिरच्या वेगवेगळ्या करून. वाढताना वेगवेगळे रंग सुशोभित दिसतील असे शेजारी-शेजारी वाढावेत. (ठेचण्यापूर्वी मिरच्या चुलीच्या/गॅसच्या जाळाशेजारी शेजारी ठेवून भाजल्या, सालपटे काढली-न काढली तर ठेचा खमंग होतो. सालपटे नाही काढलीत तर तर भाजलेल्या सालाचा काळा रंग ठेच्याला येतो.) लिंबाने-मिठाने आणि भाजल्याने तिखटपणा थोडा कमी होतो. तुमची भजीची कल्पना तर मस्तच आहे.

गृहिणि 10/05/2008 - 04:07
काचेच्या पारदर्शक बाटलित विनेगर मध्ये बुडवलेल्या मिरच्या वापरुन छानस शोपिस करता येइल. बाजारात असे शोपिस मिळतात त्यात मिरच्या, गाजराचे तुकडे, लसणाच्या पाकळ्या इत्यादि घालुन रंगसंगति साधलि असते.

ईश्वरी 11/05/2008 - 14:23
वरदा , वेलदोडा, धनंजय, गृहिणि तुम्हा सर्वाना प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद. रंगीबेरंगी ठेच्याची कल्पना मस्त आहे. करून बघायला हरकत नाही. शोपिस ची कल्पना ही छान आहे पण त्यासाठी बाटली हवाबंद करावी लागेल . ते थोडे अवघड काम वाटते. --ईश्वरी

मानस 10/05/2008 - 08:25
कसं करायचं माहीत नाही पण अशा प्रकारच्या मिरच्यांचे "सालन" फारच छान लागतं. बर्‍यांच वेळेस खाल्लं आहे. पाक़-कृती मिळाल्यास येथे नक्की देइन.

मिरच्यांचा तिखटपणा कमी करण्यासाठी मिरचीला उभी चीर देऊन आतील बिया आणि प्लासेंटा काढून टाकावा. १) भजी करायची असतील आणि अजून तिखटपणा कमी करायचा असेल तर उकळत्या पाण्यात वरील मिरच्या शिजवून नंतर कोरड्या करून हळद, मीठ घातलेल्या बेसनात (चण्याच्या पिठात) घोळवून तळायच्या. पण रंगांची मजा मिळत नाही. २) मिरच्यांच्या बिया आणि प्लासेंटा काढून टाकून मिरच्या अगदी पातळ चिराव्यात आणि वेगवेगळ्या रंगाना मिसळून पांढर्‍या शुभ्र पुलावात वापराव्यात. पुलावात अगदी बारीक चिरलेला (किंवा किसलेला) कांदा, काजू, मनुका टाकाव्यात. ३) वरील प्रमाणेच पुलाव करून (पिवळ्या रंगाच्या मिरच्या वगळून) पुलावात किंचित हळद टाकून पुलाव पिवळा करावा आणि पनीरचे तुकडे (साधारणपणे १ सेंटी आकाराचे), गर काढून टाकलेल्या टोमॅटोचे चौकोनी तुकडे आणि हिरव्यागार कोथिंबीरीने सुशोभित करावा. शुभेच्छा....!

In reply to by प्रभाकर पेठकर

ईश्वरी 10/05/2008 - 13:40
वा काका, तुम्ही एखाद्या सुगरणीलाही लाजवाल अशा टीप्स दिल्या आहेत. वर लिहिलेले प्रकाशित केल्यावर मी आवर्जून तुमच्या प्रतिक्रियेची वाट पहात होते. तुम्ही सागिंतलेल्या पुलावाची रेसिपी छान आहे. धन्यवाद. ईश्वरी

मिरच्या मस्त दिसत आहेत.पेठकरांनी सांगितले आहेच तसे पुलावात वापर कर, तसेच चायनिज प्राईड राईस,न्यूडल्स मध्ये वापरता येतील. पनिर चिली करता येईल. स्टफ्ड मिरच्या करता येतील.(स्टफ्ड सिमला मिर्च सारख्या बटाट्याचे सारण भरून) बेसन, मीठ,डेसिकेटेड कोकोनट/सुके खोबरे/ओले खोबरे,धने जीरे पूड आणि थोडी साखर सगळे एकत्र करून थोड्या चिंचेच्या कोळात भिजव.दाटसर व्हायला हवे. हे स्टफिंग मिरच्यात भर आणि फोडणीला टाक,हळद अगदी कमी म्हणजे रंगांची मजा जाणार नाही.परतून भाजी कर..कोथिंबिरीने सजव्...मस्त्त्त्त्त्त भाजी होते.आमच्या इथे बर्‍याच तुर्की दुकानात अशा मिरच्या हमखास मिळतात मी त्यांची भजी आणि भाजी दोन्ही करते,:) तसेच न्यूडल्स,फ्राईड राईस,पुलाव इ. मध्येही वापरते.

ईश्वरी 10/05/2008 - 13:48
मानस, सालन करून बघायला आवडेल. मी कधी केलेले नाही. पाक़-कृती ची वाट पहात आहे. स्वाती, पनीर चिली, स्टफ्ड मिरच्या , भाजी छानच सुचवले आहे सर्व. आता अजुन मिरच्या आणून ठेवीन. एकेक हे सर्व पदार्थ करून बघण्यासाठी. धन्यवाद. ईश्वरी

पक्या 10/05/2008 - 14:49
भजी मस्तच दिसतायेत. ह्या मिरच्यांचे चिली मश्रूम हा पदार्थ करता येईल. गूगल केल्यास रेसिपी मिळेल. बार्बेक्यूसाठी पण वापरता येतील. -- पक्या

शितल 10/05/2008 - 17:11
मिरच्याचा ठेचा, पेठकरकाका॑नी सुचवलेली भजी, पुलाव हे तर खुपच छान, ईश्वरी ताई कधी करताय हे सर्व आणि आम्हाला बोलवताय.

१.बिया काढून मिरच्यांचे चौकोनी तुकडे करुन घेणे,कांदा चौकोनी चिरुन त्यात घालणे,चाट मसाला,मीठ घालणे एक सारखे करुन पावात भरणे आणि टोस्ट सँडविच करणे .टोमॅटो सॉस बरोबर गरम गरम मस्त लागतात.. २.ह्या सगळ्या रंगीत मिरच्या,कांदा,बटाटा,फ्लॉवर,मटार इ.घालून मिक्स रस्सा करता येईल. ३.किवा वरील सगळ्या भाज्या+ पनीर +गरम मसाला घालून मिक्स भाजी करता येईल.क्रीम+कोथिंबिरीने सजवून त्याला व्हेज कढाई,व्हेज कोल्हापूरी ..तत्सम काही नाव देऊन पंजाबी डिश म्हणून सर्व्ह करता येईल,:) स्वाती

ईश्वरी 10/05/2008 - 22:42
स्वाती, छान आहेत तुझ्या रेसिपीज (तू चालेल ना म्हट्लेलं ?) मला टोस्ट सँडविच ची कल्पना फारच आवडली. शीतल - you are most welcome. ईश्वरी

मिरचीमधे मसाला भरून त्या उन्हात चांगल्या वाळवल्यास तर तुला वर्षभर वापरता येतील, ती फोडणीत वापरून किंवा नुसती तळुन तु दहीभात, दहीपोहे, खिचडीत वापरू शकतेस. तसेच पापड तळताना नुसती तळून सुद्धा छान लागते. भाकरी बरोबर दह्यात कुस्करून सुद्धा छान लागते. मिरचीत भरायला मसाला काय घालायचा हे माहीत नसेल तर सांग मी सांगेन तुला....:) ठेचा सुद्धा छान होतो, व्हिनेगर पेक्षा लिंबूरस वापर आणि हवाबंद बरणीत ठेव.... लोणचे सुद्धा होईल.

मस्त बार्बेक्यूचा बेत करावा. ही भेट ज्यांनी दिली त्या परिचितांनाही बार्बेक्यूला बोलवावे. सर्व मिरच्या नीट धुवून घ्याव्यात आणि कापडाने स्वच्छ पुसून कोरड्या कराव्यात. बार्बेक्यूचे निखारे नीट पेटू द्यावेत. निखारे रसरसून फुलले की त्यावर या मिरच्या टाकून त्याची त्या परिचितांना चांगली धुरी द्यावी!!!:)) .... च्यायला! काय पण परिचित आहेत!! या उन्हाळ्यात चांगले आंबे, स्ट्रॉबेरी (जिथे असाल त्याप्रमाणे!), नाही तर नाही, गेला बाजार कलिंगडाची तरी भेट द्यायची सोडून मिरच्या कसल्या भेट म्हणून देतात!!!:)) रोखठोक, पिवळा डांबिस

वेलदोडा 11/05/2008 - 05:09
निखारे रसरसून फुलले की त्यावर या मिरच्या टाकून त्याची त्या परिचितांना चांगली धुरी द्यावी!!! -- हे लिहीण्यातील तुमचा उद्देश समजला नाही. फालतू काहि तरी आहे म्हणुन टर उडवणे, या साईट वर रेसिपी विचारू नये म्हणून, तुम्हाला वाचताना फार त्रासदायक वाट्ले म्हणून ते व्यक्त करण्यासाठी की सहज काहीतरी गमतीशीर लिहावे म्हणून तुम्ही ही प्रतिक्रिया दिली आहे ? कोणी कोणाला काय भेटवस्तू द्यावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुमच्या रोखठोक पणा पेक्षा तुम्ही उगाच पिडताय असे वाटते.

In reply to by वेलदोडा

जाऊद्या, उद्देश समजला नाही तर सोडून द्या. अहो जगात सगळ्यांना सगळं समजलंच पाहिजे असं थोडंच आहे? आमच्या प्रतिक्रियेबद्द्ल म्हणाल तर खालील वाक्य वाचून. या उन्हाळ्यात चांगले आंबे, स्ट्रॉबेरी (जिथे असाल त्याप्रमाणे!), नाही तर नाही, गेला बाजार कलिंगडाची तरी भेट द्यायची सोडून मिरच्या कसल्या भेट म्हणून देतात!!! आणि दोन खदाखदा हसणार्‍या स्माईलीज पाहून या प्रतिक्रियेमागचा मिश्किल अप्रोच मिपाकरांच्या लक्षात येणार नाही असे आम्हांला वाटत नाही. आमचा मिपाकरांच्या आणि हा धागा सुरु करणार्‍या ईश्वरीताईंच्याही विनोदबुद्धीवर (सेन्स ऑफ ह्यूमर) पूर्ण विश्वास आहे. तुमच्यासाठी म्हणाल तर तुम्हीच तीन-चार पर्याय सुचवले आहेत. तेंव्हा तुम्ही "अडम् तडम् तडतड बाजा" करून त्यातील एक पर्याय निवडण्यास आमची हरकत नाही.:)

In reply to by पिवळा डांबिस

विजुभाऊ 12/05/2008 - 19:05
जाउ देत हो डाम्बिस काका ज्याचे नावच वेलदोडा आहे त्याला मिरच्या कशा सोसायच्या? तुम्ही एकतरी पाककृती पाहिली आहे का की जीत मिरच्यां बरोबर वेलदोडा टाकतात. हैद्राबादी बिर्याणीत वेलदोडी असतात पण मिरच्या गायब असतात. त्या सालन सोबत येतात. त्या गरिब वेलदोड्याला गोडाबरोबर राहुद्या ना. केरळी वेलदोड्याची जोडी कोल्हापुरी मिरची बरोबर ..जोडा शोभुन दिसत नाय डाम्बीस बाव खरे असा का नाय ता सांगा. आच्च गोयकरां खरां ताच उलय. तुझो गोयंकर मित्र इजुभऊ

विसोबा खेचर 11/05/2008 - 09:08
मिरच्या बेट्या काय सुरेख दिसताहेत! मिरची भज्यांची पाकृ आणि फोटूही फार सुरेख! :) ईश्वरी, अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ मिपावर येऊ देत ही विनंती... तात्या.

ईश्वरी 11/05/2008 - 11:51
मिरची भज्यांची पाकृ आणि फोटूही फार सुरेख! ईश्वरी, अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ मिपावर येऊ देत ही विनंती... -- तात्यांची प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटले. अशा उत्तेजनात्मक प्रतिक्रियेबद्द्ल आणि वेगळा खास पाकक्रिया विभाग सुरू केल्याबद्द्ल तात्यांना मनापासून धन्यवाद. डाम्बिसकाका, तुमचा सेन्स ओफ ह्युमर मस्त च आहे. खरय, मिरच्यांची भेट जरा वेगळीच म्हणावी लागेल. -- ईश्वरी

विजुभाऊ 11/05/2008 - 19:05
मला या एका गोष्टीसाठी मि पा आवडते. मनमोकळे काहीही लिहिता येते. विद्वत्त्तेच्या झिरमिळ्या बाजुला करुन घरात बहीणीशी / काकुशी /काकाशी /वहीनीशी गप्पा मारतो तसे इथे सगळे बोलत असतात. इथले सगळे मला माझ्या परिवारातले वाटतात. मिपा चे वैषिष्ठ्य काय हे आत्ता नक्की समजले. मिपा परिवारातला सदस्य विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर 11/05/2008 - 23:39
विद्वत्त्तेच्या झिरमिळ्या बाजुला करुन घरात बहीणीशी / काकुशी /काकाशी /वहीनीशी गप्पा मारतो तसे इथे सगळे बोलत असतात. क्य बात है विजूभाऊ! :)

चतुरंग 11/05/2008 - 23:32
बघून एक क्षणभर पोपट असल्यासारखे वाटले! आपल्या पायात एकेक मिरची उचलून, अलगद फोडून, त्यातली एकेक बी अणकुचिदार आकडेबाज चोचीने सोलून खाणारा मिठूमिया! ईश्वरी, ह्या मिरच्यांचीही पा.कृ. होऊ शकते हे नव्याने समजले. धन्यवाद! चतुरंग

पल्लवी 12/05/2008 - 11:00
त्या गुलाबी मिरच्या काय गोड दिसतायेत.. गुलाबी ड्रेसवर मिरच्यांची माळ भारी दिसेल ना..... B)

वरदा 10/05/2008 - 02:54
जर सुकवून तळली तर? आणि त्यात दहि मीठ घालून खायचं तळल्यावर तिखट्पणा थोडा कमी होईल आणि दही घातलं की अजुन कमी होईल्...बाकि एक्स्पर्ट्स सांगतीलच स्वगतः ही का चिडवतेय मला..बाहेर बदाबदा पाऊस कोसळतोय माझं ऑफिसमधलं काम संपलं नाहीये आणि ही भज्यांचं चित्र टाकते... :(

वेलदोडा 10/05/2008 - 03:10
मिरच्यांची भजी !!! व्वा ...झकास. पाणी सुटलय तोन्डाला =P~ भरली मिरची हा प्रकार करता येईल. पण सारण काय भरावे हे जाणकार सान्गू शकतील. सॅलड मध्ये पण वापरू शकता. पण त्या आधी व्हिनेगर मधे बुडवून ठेवाव्या लागतील्...म्हणजे तिखटपणा कमी होईल. आत बिया असतील तर त्याही काढून टाका कारण बियांमुळे तिखटपणा जास्त वाढतो. -- वेलदोडा

धनंजय 10/05/2008 - 03:48
पण रंगांची गंमत दिसण्यासाठी हळद घालू नये - खूप कमी घालावी. रंगीबेरंगी ठेचा : लिंबाचा रस आणि मीठ घालून मिरच्यांचा ठेचा करावा - प्रत्येक रंगाच्या मिरच्या वेगवेगळ्या करून. वाढताना वेगवेगळे रंग सुशोभित दिसतील असे शेजारी-शेजारी वाढावेत. (ठेचण्यापूर्वी मिरच्या चुलीच्या/गॅसच्या जाळाशेजारी शेजारी ठेवून भाजल्या, सालपटे काढली-न काढली तर ठेचा खमंग होतो. सालपटे नाही काढलीत तर तर भाजलेल्या सालाचा काळा रंग ठेच्याला येतो.) लिंबाने-मिठाने आणि भाजल्याने तिखटपणा थोडा कमी होतो. तुमची भजीची कल्पना तर मस्तच आहे.

गृहिणि 10/05/2008 - 04:07
काचेच्या पारदर्शक बाटलित विनेगर मध्ये बुडवलेल्या मिरच्या वापरुन छानस शोपिस करता येइल. बाजारात असे शोपिस मिळतात त्यात मिरच्या, गाजराचे तुकडे, लसणाच्या पाकळ्या इत्यादि घालुन रंगसंगति साधलि असते.

ईश्वरी 11/05/2008 - 14:23
वरदा , वेलदोडा, धनंजय, गृहिणि तुम्हा सर्वाना प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद. रंगीबेरंगी ठेच्याची कल्पना मस्त आहे. करून बघायला हरकत नाही. शोपिस ची कल्पना ही छान आहे पण त्यासाठी बाटली हवाबंद करावी लागेल . ते थोडे अवघड काम वाटते. --ईश्वरी

मानस 10/05/2008 - 08:25
कसं करायचं माहीत नाही पण अशा प्रकारच्या मिरच्यांचे "सालन" फारच छान लागतं. बर्‍यांच वेळेस खाल्लं आहे. पाक़-कृती मिळाल्यास येथे नक्की देइन.

मिरच्यांचा तिखटपणा कमी करण्यासाठी मिरचीला उभी चीर देऊन आतील बिया आणि प्लासेंटा काढून टाकावा. १) भजी करायची असतील आणि अजून तिखटपणा कमी करायचा असेल तर उकळत्या पाण्यात वरील मिरच्या शिजवून नंतर कोरड्या करून हळद, मीठ घातलेल्या बेसनात (चण्याच्या पिठात) घोळवून तळायच्या. पण रंगांची मजा मिळत नाही. २) मिरच्यांच्या बिया आणि प्लासेंटा काढून टाकून मिरच्या अगदी पातळ चिराव्यात आणि वेगवेगळ्या रंगाना मिसळून पांढर्‍या शुभ्र पुलावात वापराव्यात. पुलावात अगदी बारीक चिरलेला (किंवा किसलेला) कांदा, काजू, मनुका टाकाव्यात. ३) वरील प्रमाणेच पुलाव करून (पिवळ्या रंगाच्या मिरच्या वगळून) पुलावात किंचित हळद टाकून पुलाव पिवळा करावा आणि पनीरचे तुकडे (साधारणपणे १ सेंटी आकाराचे), गर काढून टाकलेल्या टोमॅटोचे चौकोनी तुकडे आणि हिरव्यागार कोथिंबीरीने सुशोभित करावा. शुभेच्छा....!

In reply to by प्रभाकर पेठकर

ईश्वरी 10/05/2008 - 13:40
वा काका, तुम्ही एखाद्या सुगरणीलाही लाजवाल अशा टीप्स दिल्या आहेत. वर लिहिलेले प्रकाशित केल्यावर मी आवर्जून तुमच्या प्रतिक्रियेची वाट पहात होते. तुम्ही सागिंतलेल्या पुलावाची रेसिपी छान आहे. धन्यवाद. ईश्वरी

मिरच्या मस्त दिसत आहेत.पेठकरांनी सांगितले आहेच तसे पुलावात वापर कर, तसेच चायनिज प्राईड राईस,न्यूडल्स मध्ये वापरता येतील. पनिर चिली करता येईल. स्टफ्ड मिरच्या करता येतील.(स्टफ्ड सिमला मिर्च सारख्या बटाट्याचे सारण भरून) बेसन, मीठ,डेसिकेटेड कोकोनट/सुके खोबरे/ओले खोबरे,धने जीरे पूड आणि थोडी साखर सगळे एकत्र करून थोड्या चिंचेच्या कोळात भिजव.दाटसर व्हायला हवे. हे स्टफिंग मिरच्यात भर आणि फोडणीला टाक,हळद अगदी कमी म्हणजे रंगांची मजा जाणार नाही.परतून भाजी कर..कोथिंबिरीने सजव्...मस्त्त्त्त्त्त भाजी होते.आमच्या इथे बर्‍याच तुर्की दुकानात अशा मिरच्या हमखास मिळतात मी त्यांची भजी आणि भाजी दोन्ही करते,:) तसेच न्यूडल्स,फ्राईड राईस,पुलाव इ. मध्येही वापरते.

ईश्वरी 10/05/2008 - 13:48
मानस, सालन करून बघायला आवडेल. मी कधी केलेले नाही. पाक़-कृती ची वाट पहात आहे. स्वाती, पनीर चिली, स्टफ्ड मिरच्या , भाजी छानच सुचवले आहे सर्व. आता अजुन मिरच्या आणून ठेवीन. एकेक हे सर्व पदार्थ करून बघण्यासाठी. धन्यवाद. ईश्वरी

पक्या 10/05/2008 - 14:49
भजी मस्तच दिसतायेत. ह्या मिरच्यांचे चिली मश्रूम हा पदार्थ करता येईल. गूगल केल्यास रेसिपी मिळेल. बार्बेक्यूसाठी पण वापरता येतील. -- पक्या

शितल 10/05/2008 - 17:11
मिरच्याचा ठेचा, पेठकरकाका॑नी सुचवलेली भजी, पुलाव हे तर खुपच छान, ईश्वरी ताई कधी करताय हे सर्व आणि आम्हाला बोलवताय.

१.बिया काढून मिरच्यांचे चौकोनी तुकडे करुन घेणे,कांदा चौकोनी चिरुन त्यात घालणे,चाट मसाला,मीठ घालणे एक सारखे करुन पावात भरणे आणि टोस्ट सँडविच करणे .टोमॅटो सॉस बरोबर गरम गरम मस्त लागतात.. २.ह्या सगळ्या रंगीत मिरच्या,कांदा,बटाटा,फ्लॉवर,मटार इ.घालून मिक्स रस्सा करता येईल. ३.किवा वरील सगळ्या भाज्या+ पनीर +गरम मसाला घालून मिक्स भाजी करता येईल.क्रीम+कोथिंबिरीने सजवून त्याला व्हेज कढाई,व्हेज कोल्हापूरी ..तत्सम काही नाव देऊन पंजाबी डिश म्हणून सर्व्ह करता येईल,:) स्वाती

ईश्वरी 10/05/2008 - 22:42
स्वाती, छान आहेत तुझ्या रेसिपीज (तू चालेल ना म्हट्लेलं ?) मला टोस्ट सँडविच ची कल्पना फारच आवडली. शीतल - you are most welcome. ईश्वरी

मिरचीमधे मसाला भरून त्या उन्हात चांगल्या वाळवल्यास तर तुला वर्षभर वापरता येतील, ती फोडणीत वापरून किंवा नुसती तळुन तु दहीभात, दहीपोहे, खिचडीत वापरू शकतेस. तसेच पापड तळताना नुसती तळून सुद्धा छान लागते. भाकरी बरोबर दह्यात कुस्करून सुद्धा छान लागते. मिरचीत भरायला मसाला काय घालायचा हे माहीत नसेल तर सांग मी सांगेन तुला....:) ठेचा सुद्धा छान होतो, व्हिनेगर पेक्षा लिंबूरस वापर आणि हवाबंद बरणीत ठेव.... लोणचे सुद्धा होईल.

मस्त बार्बेक्यूचा बेत करावा. ही भेट ज्यांनी दिली त्या परिचितांनाही बार्बेक्यूला बोलवावे. सर्व मिरच्या नीट धुवून घ्याव्यात आणि कापडाने स्वच्छ पुसून कोरड्या कराव्यात. बार्बेक्यूचे निखारे नीट पेटू द्यावेत. निखारे रसरसून फुलले की त्यावर या मिरच्या टाकून त्याची त्या परिचितांना चांगली धुरी द्यावी!!!:)) .... च्यायला! काय पण परिचित आहेत!! या उन्हाळ्यात चांगले आंबे, स्ट्रॉबेरी (जिथे असाल त्याप्रमाणे!), नाही तर नाही, गेला बाजार कलिंगडाची तरी भेट द्यायची सोडून मिरच्या कसल्या भेट म्हणून देतात!!!:)) रोखठोक, पिवळा डांबिस

वेलदोडा 11/05/2008 - 05:09
निखारे रसरसून फुलले की त्यावर या मिरच्या टाकून त्याची त्या परिचितांना चांगली धुरी द्यावी!!! -- हे लिहीण्यातील तुमचा उद्देश समजला नाही. फालतू काहि तरी आहे म्हणुन टर उडवणे, या साईट वर रेसिपी विचारू नये म्हणून, तुम्हाला वाचताना फार त्रासदायक वाट्ले म्हणून ते व्यक्त करण्यासाठी की सहज काहीतरी गमतीशीर लिहावे म्हणून तुम्ही ही प्रतिक्रिया दिली आहे ? कोणी कोणाला काय भेटवस्तू द्यावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुमच्या रोखठोक पणा पेक्षा तुम्ही उगाच पिडताय असे वाटते.

In reply to by वेलदोडा

जाऊद्या, उद्देश समजला नाही तर सोडून द्या. अहो जगात सगळ्यांना सगळं समजलंच पाहिजे असं थोडंच आहे? आमच्या प्रतिक्रियेबद्द्ल म्हणाल तर खालील वाक्य वाचून. या उन्हाळ्यात चांगले आंबे, स्ट्रॉबेरी (जिथे असाल त्याप्रमाणे!), नाही तर नाही, गेला बाजार कलिंगडाची तरी भेट द्यायची सोडून मिरच्या कसल्या भेट म्हणून देतात!!! आणि दोन खदाखदा हसणार्‍या स्माईलीज पाहून या प्रतिक्रियेमागचा मिश्किल अप्रोच मिपाकरांच्या लक्षात येणार नाही असे आम्हांला वाटत नाही. आमचा मिपाकरांच्या आणि हा धागा सुरु करणार्‍या ईश्वरीताईंच्याही विनोदबुद्धीवर (सेन्स ऑफ ह्यूमर) पूर्ण विश्वास आहे. तुमच्यासाठी म्हणाल तर तुम्हीच तीन-चार पर्याय सुचवले आहेत. तेंव्हा तुम्ही "अडम् तडम् तडतड बाजा" करून त्यातील एक पर्याय निवडण्यास आमची हरकत नाही.:)

In reply to by पिवळा डांबिस

विजुभाऊ 12/05/2008 - 19:05
जाउ देत हो डाम्बिस काका ज्याचे नावच वेलदोडा आहे त्याला मिरच्या कशा सोसायच्या? तुम्ही एकतरी पाककृती पाहिली आहे का की जीत मिरच्यां बरोबर वेलदोडा टाकतात. हैद्राबादी बिर्याणीत वेलदोडी असतात पण मिरच्या गायब असतात. त्या सालन सोबत येतात. त्या गरिब वेलदोड्याला गोडाबरोबर राहुद्या ना. केरळी वेलदोड्याची जोडी कोल्हापुरी मिरची बरोबर ..जोडा शोभुन दिसत नाय डाम्बीस बाव खरे असा का नाय ता सांगा. आच्च गोयकरां खरां ताच उलय. तुझो गोयंकर मित्र इजुभऊ

विसोबा खेचर 11/05/2008 - 09:08
मिरच्या बेट्या काय सुरेख दिसताहेत! मिरची भज्यांची पाकृ आणि फोटूही फार सुरेख! :) ईश्वरी, अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ मिपावर येऊ देत ही विनंती... तात्या.

ईश्वरी 11/05/2008 - 11:51
मिरची भज्यांची पाकृ आणि फोटूही फार सुरेख! ईश्वरी, अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ मिपावर येऊ देत ही विनंती... -- तात्यांची प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटले. अशा उत्तेजनात्मक प्रतिक्रियेबद्द्ल आणि वेगळा खास पाकक्रिया विभाग सुरू केल्याबद्द्ल तात्यांना मनापासून धन्यवाद. डाम्बिसकाका, तुमचा सेन्स ओफ ह्युमर मस्त च आहे. खरय, मिरच्यांची भेट जरा वेगळीच म्हणावी लागेल. -- ईश्वरी

विजुभाऊ 11/05/2008 - 19:05
मला या एका गोष्टीसाठी मि पा आवडते. मनमोकळे काहीही लिहिता येते. विद्वत्त्तेच्या झिरमिळ्या बाजुला करुन घरात बहीणीशी / काकुशी /काकाशी /वहीनीशी गप्पा मारतो तसे इथे सगळे बोलत असतात. इथले सगळे मला माझ्या परिवारातले वाटतात. मिपा चे वैषिष्ठ्य काय हे आत्ता नक्की समजले. मिपा परिवारातला सदस्य विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर 11/05/2008 - 23:39
विद्वत्त्तेच्या झिरमिळ्या बाजुला करुन घरात बहीणीशी / काकुशी /काकाशी /वहीनीशी गप्पा मारतो तसे इथे सगळे बोलत असतात. क्य बात है विजूभाऊ! :)

चतुरंग 11/05/2008 - 23:32
बघून एक क्षणभर पोपट असल्यासारखे वाटले! आपल्या पायात एकेक मिरची उचलून, अलगद फोडून, त्यातली एकेक बी अणकुचिदार आकडेबाज चोचीने सोलून खाणारा मिठूमिया! ईश्वरी, ह्या मिरच्यांचीही पा.कृ. होऊ शकते हे नव्याने समजले. धन्यवाद! चतुरंग

पल्लवी 12/05/2008 - 11:00
त्या गुलाबी मिरच्या काय गोड दिसतायेत.. गुलाबी ड्रेसवर मिरच्यांची माळ भारी दिसेल ना..... B)
परवाच एका परिचितांनी एक रन्गीत पाकीट दिले...भेट म्हणून. Mixed hot chilli peppers असे त्यावर लिहीले होते. ह्य पाकीटामधे रंगीबेरंगी , जरा जाडसर आणि लांबट आकाराच्या ३५-४० मिरच्या होत्या.

दुसरी संधी

मुक्तसुनीत ·

वरदा 10/05/2008 - 02:38
खरं आहे..दुसरी संधी नसती तर मी कितीतरी गोष्टी करु शकले नसते... ५ वीत असतानाची गोष्ट मी वक्तॄत्व स्पर्धेत पहिल्यांदा भाग घेतला तेव्हा घशाला कोरड पडली आणि काहीच बोलता आलं नाही.. मॅडमनी सांगितलं सगळ्यांचं झालं की तू परत प्रयत्न कर्....मग ठरवलं बोलायचं जे जमेल ते... लिहून ठेवलेलं भाषण संपवून पुढे ही खूप बडबड केली..पहिलं बक्षीस मिळालं त्यानंतर मी कुठेच बोलायला घाबरले नाही..अजुनही ग्लोबल मिटींगमधे बिंधास्त जाऊन प्रेझेंटेशन देऊ शकते... अशा कितीतरी गोष्टी आहेत.....तुमचा मुद्दा आवडला..

In reply to by वरदा

भाग्यश्री 10/05/2008 - 04:33
छान विषय.. मला सुद्धा आयुष्यात दुसरी संधी मिळाली नसती तर काय झालं असतं देवाला ठाऊक! पण हो, नक्कीच दुसरी संधी मिळते..आणि आपण त्याचा फायदा उठवला पाहीजे...

मानस 10/05/2008 - 08:05
एका छान विषयाला हात घातला आहे. आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात आणि किंबहुना सर्वांनाच दुसरी संधी मिळतेच असेही नाही. मिपाकरांचे अनुभव जाणून घ्यायला आवडेल. दुसर्‍या संधीच्या शोधात ..... दुसर्‍या संधीची आतुरतेने वाट पहाणारा मानस

माझ्या लहानपणी, माझी अर्धशिक्षित आई नेहमी सांगायची. आयुष्याचा प्रवास हा नदी सारखा असावा. मार्गात एखादा अडथळा आला म्हणून नदी तिथेच थांबत नाही. डोंगरा एवढ्या अडथळ्यालासुद्धा वळसा घालून पुढे पुढे जात राहते. तिचे उद्दीष्ट्य (सागराला मिळण्याचे) ती साध्य करतेच. तद्वत, सतत दुसरी संधी शोधत राहा, प्रगती करीत राहा.

In reply to by प्रभाकर पेठकर

मुक्तसुनीत 10/05/2008 - 09:25
अशा व्यक्तिला अर्धशिक्षित म्हणणे चुकीचे आहे. बहिणाबाई चौधरी , नरेंद्र जाधवांचे बडील ('आमचा बाप आन् आम्ही' चे चरित्रनायक) हे सर्व 'अर्धशिक्षित' तुमच्याआमच्यासारख्या पूर्णशिक्षितांच्या गुरुंचे गुरु ठरतात !

In reply to by मुक्तसुनीत

अर्धशिक्षित हा शब्दप्रयोग शालेय शिक्षणा संदर्भात आहे. बहिणाबाई चौधरी , नरेंद्र जाधवांचे बडील ('आमचा बाप आन् आम्ही' चे चरित्रनायक) हे जीवनाचे सार कोळून प्यायलेले 'उच्चशिक्षित' म्हणावे लागतील.

दोन खानदानी नबाब स्टेशन वर आगगाडीत चढताना 'पहिले आप' 'पहिले आप' करत दोघांचीही गाडी सुटुने जाते. प्रकाश घाटपांडे

In reply to by मुक्तसुनीत

'तो' त्यांचा पहिला चान्स असतो. दुसरी गाडी येते (सेकंड चान्स) तेंव्हा ते पहिले आप - पहिले आप करीत बसत नाहीत. पटकन उडी मारून गाडी पकडतात.

आम्हाला दुसरी संधीच अधिक मिळते. पहिल्या संधीला ब-याचदा मी पात्रच नसतो. निसर्गाने याबाबतीत आमच्यावर जरा अन्यायच केला आहे. आमच्यापेक्षा पहिली संधी मिळवणा-याच्या बाबतीत देवाने त्यांना भरपूर 'दानं' टाकली आणि मग शिल्लक आम्हाला दिली. :)

विकास 10/05/2008 - 18:07
विषय एकदम आवडला... पण याबाबत आत्ता काही लिहीणे म्हणजे स्वतःच्या भूतकाळात डोकावून पहाणे (जसे आपण पाहीलेत तसे)... त्याची आत्ता इच्छा नाही. त्यात आपण म्हणता तसे लिहायचे ठरवले तर आत्मचरीत्रच होईल की काय अशी भिती वाटते :-) आपण म्हणता तसे प्रवेशासंदर्भात माझे ही झाले होते जरी "शून्य" गुणांनी झाले नसले तरी किरकोळ फरकाने. त्यावेळेस तो प्रकार खूप मोठा, वयाला अनुकूल अस्वस्थ करणारा होता. आज लक्षातपण नाही.... बाकी अमेरिकेत राहून काही अनुभवातून आणि बरेच पाहून या संदर्भात लक्षात आलेले म्हणजे: winner never quites and quitter never wins (ह्याचा अर्थ रडीचा डाव करायचा असा नाही, पण जिद्दिने प्रयत्न करायचे इतकाच when going gets tough, tough gets going . असे अनेक खर्‍या अर्थी भारतात पण विविध क्षेत्रातील आदर्श दिसतील - लता, आशा, भिमसेन, धिरूबाई, इंदीरा गांधी, अटलजी (८४ साली त्यांना सारे देश मे एक भिकारी अटलबिहारी अटलबिहारी असे म्हणले गेले होते), - हे पटकन डोक्यात आले... करंटे ते की ज्याना दुसरी काय , डझनावारी संधी मिळतात या संदर्भात मात्र गदीमांच्या ओळी आठवतात : सतत वाहते उदंड पाणी, कुणी न वळवून घेई रानी, आळशास ही व्हावी कैसी, गंगा फलदायी

In reply to by विकास

आनंदयात्री 12/05/2008 - 11:38
पण याबाबत आत्ता काही लिहीणे म्हणजे स्वतःच्या भूतकाळात डोकावून पहाणे (जसे आपण पाहीलेत तसे)... त्याची आत्ता इच्छा नाही.
पण सेकंड चान्स हा अविभाज्य घटक आयुष्याचा हे खरेच, या लेखाने "सेकंड चान्स" ने आपल्याला काय काय दिले याचा अंदाज आला, यापुढचे सेकंड चान्स जरा जास्त सिरिअसली घेतले जातील :)

चतुरंग 10/05/2008 - 18:14
'चिमणरावाचे चर्‍हाट' ह्या पुस्तकात चिमणराव जसे म्हणतात "काड्यापेटीतली पहिली काडी ओढली ती विझली, दुसरी ओढली तीही विझली म्हणून मग तिसरी न ओढता एकदम चौथी ओढली!" ;) त्याचप्रमाणे कित्येक वेळा मी पहिली संधी हीच दुसरी आहे असे समजून घेतली! :) असो विनोदाचा भाग सोडला तर एक-दोनंच नव्हे तर आयुष्य हे संधींनी पुरेपूर भरलेलं असतं असं माझं मत. गतानुगतिकतेमुळे आपण कित्येकवेळा संधी समोर दिसत असूनही नाकारतो आणि नाकर्ते होतो त्यावेळी आपल्यातल्या कल्पकतेचा एक अंश मारुन टाकत असतो. तथाकथित उच्चशिक्षिततेमुळे आपण चाकोरीत फिरायला शिकतो की काय असे मला बर्‍याचवेळा वाटून जाते. महत्त्वाच्या परीक्षेत पहिल्याच वेळी मला गणितासारख्या हातखंडा विषयानेच दणका दिला त्यावेळी धाबे दणाणले आणि संधी गेल्याची भावना मनात येऊन गेली पण नंतर त्याच विषयाचा जोरदार अभ्यास करुन मी विद्यापीठात त्या विषयातले सर्वोच्च गुण मिळवून उत्तीर्ण झालो आणि दुसर्‍या संधीचं महत्त्व मनात ठसलं. मी स्वतःचा सुरु केलेला धंदा अनेक प्रयत्न करुनही बंद करावा लागला त्यावेळी असेच वाटून गेले की 'आता पुढे काय'? पण जरा वेगळ्याच क्षेत्रातली एक संधी पुढे आली आणि त्यानंतर पूर्ण आयुष्यानेच एक छानदार वळण घेतले ते आजतागायत! अल्बर्ट आईनस्टाईन म्हणून गेलाय "संधी ही सर्व अडचणींच्या मधेच दडलेली असते!" आणि मार्क ट्वेन म्हणतो "हातून निसटेपर्यंत एखादी गोष्ट संधी होती हे मला क्वचितच लक्षात आलंय!" चतुरंग

In reply to by चतुरंग

कुंदन 11/05/2008 - 16:42
१००००००० % सहमत. २० मार्च , २००८ ची संध्याकाळ. एक तातडीचे काम दिले माझ्या व्यवस्थापकाने. प्रचंड अडचणी आल्या एका साध्या सोप्या कामात. याच क्षेत्रात काम करणार्‍या मित्रांशी संपर्क साधला , पण कोणाकडेच त्या कामाला उपयोगी पडतील अशी प्रणाली मिळाली नाही. अख्खी रात्र कार्यालयात काढावी लागली. च्यायला आपले डोकेच सरकले. म्हटले , काही तरी नवीन उपाय शोधायला पाहीजे. २-३ दिवस विचार करण्यात , जालावर माहिती शोधण्यात गेले. ४थ्या दिवशी सकाळी उत्तर सापडले. १००-१५० ओळींच्या प्रणालीला , १० ओळींची सोपी पर्यायी प्रणाली तयार झाली. "संधी ही सर्व अडचणींच्या मधेच दडलेली असते!"....... हा विश्वास अधिकच दृढ झाला.

In reply to by चतुरंग

प्राजु 15/05/2008 - 16:32
अल्बर्ट आईनस्टाईन म्हणून गेलाय "संधी ही सर्व अडचणींच्या मधेच दडलेली असते!" आणि मार्क ट्वेन म्हणतो "हातून निसटेपर्यंत एखादी गोष्ट संधी होती हे मला क्वचितच लक्षात आलंय!" आवडलं... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

शितल 10/05/2008 - 18:24
चतुर॑गजी, तुमची प्रतिक्रिया खुप छान आहे. जे होते ते चा॑गल्यासाठीच होते, हे मी जेव्हा जेव्हा पहिल्या स॑धीला हुकले त्या त्या वेळी मनात ठासले. दुसरे ही पर्याय खुप छान असतात हे मला पटले. :)

कलंत्री 10/05/2008 - 18:41
माझ्या मते आले तसे जगायला हवे. संधी, यशापयश याच्यापलिकडे जाऊन प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे.

In reply to by कलंत्री

माझ्या मते आले तसे जगायला हवे. संधी, यशापयश याच्यापलिकडे जाऊन प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे. भावनिक विश्वात तुमचे म्हणणे १०० टक्के मान्य व्हावे. पण व्यावहारिक जगात संधी शोधाव्या लागतात, त्यांचे सोने करावे लागते.

विसोबा खेचर 11/05/2008 - 16:42
आमच्या आयुष्यात आजपवेतो तश्या बर्‍याच संध्या आल्या, त्यातल्या काही निसटून गेल्या, काहींचा फायदा करून घ्यायला आमचा मूड नव्हता! :) आणि उरलेल्या संध्यांचा आम्ही थोडाफार फायदा करून घेतला. यातली पहिली कोणती होती, दुसरी कोणती होती हे आम्हाला आठवत नाही! एक मात्र खरं, की जी काही मिळायची आहे/मिळणार आहे ती वेळोवारी मिळावी, नाहीतर तिची वाट पाहता पाहता आयुष्याचा संधीकाल जवळ यायचा! :) बाकी मुक्तराव, चर्चाविषय मस्त आहे. ही संधी तुम्ही बरी घेतलीत! :) आपला, (संधीसाधू) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विकास 15/05/2008 - 15:10
>>>आमच्या आयुष्यात आजपवेतो तश्या बर्‍याच संध्या आल्या, त्यातल्या काही निसटून गेल्या, काहींचा फायदा करून घ्यायला आमचा मूड नव्हता! आणि उरलेल्या संध्यांचा आम्ही थोडाफार फायदा करून घेतला. यातली पहिली कोणती होती, दुसरी कोणती होती हे आम्हाला आठवत नाही! आपल्या विधानांत "संधी" शब्दाचे अनेक वचन आल्याने वरील वाक्ये वाचताना वेगळाच अर्थ वाटल्याने अंमळ गोंधळलो :-))

राजे 11/05/2008 - 23:19
"लाईफ इज ऑल अबाऊट सेकंड चान्सेस" लाईफ - जिवन ! मागील वर्षीच मी व माझी नवीन बुलेट. एक आठवडाच झाला होता बुलेट घेऊन... माझे मित्र मला शिव्या देत होते .. लेका तू चार हाडाचा सापळा... व ही भली मोठी बुलेट... जोडी जमत नाही लेका ! पण मीच त्याना समजावले की दणकट आहे म्हणून घेतली आहे ! बुलेट घेतली म्हणून रात्री रुमवर पार्टी चालू होती मी जरा अती जास्तच घेतली व एका मित्रा बरोबर भांडलो... नशे नशे मध्येच माझेच घर... रुम सोडून मी सरळ बाहेर आलो व बुलेट चालू केली... फक्त इतकेच आठवते... दुसरा दिवस ... >> रविवार सकाळ सकाळी सगळे मित्र जमा ! काय झाले रे ... सकाळ सकाळी माझ्या कडे कसे ? मेहता अंकल नी सरळ न काही विचारता कानाखाली जाळ काढला व म्हणाले " आदमी है या जानवर ! रात को कहा गया था ? " मी जरा चरकलोच... च्यायला... विक्या बरोबर भांडलो व बुलेट चालू केली ... पण पुढे काय ? डोके काही चालेना व काही आठवेना ! सगळ्याची रात्र मला शोधण्यात गेली होती... व शेवटी पोलिसांना कळवणे बाकी होते. मेहता अंकल म्हणाले " जरा निचे जा. बुलेट देख अपनी " मी पळतच गेलो व जे पाहीले ते जन्म भर न विसरण्यासारखे ! हेड लाईट गायब.... पुढील रीम ला बेंड... मागील रीमचे तुकडे तुकडे .... एक बाजूचा गाडीचा रंग उडालेला... सायलेंन्सर गायब.... काहीच कळेना ! काय झाले होते मी गेलो कुठे होतो.. बुलेट बरोबर झाले काय.... आलो कसा परत... बुलेट वरुनच परत आलो तर ही बुलेट चाललीच कशी.... मागचे चाकाची रीम तर तुटलेली होती.. बर मला कुठे ही जरा ही खरचटले देखील नव्हते... मग हा हाल बुलेटचा झालाच कसा ! सर्विस सेंटर च्या कारागीराने सांगितले " साब, आपने पता नहीं कैसे गाडी चलायी है.. पर एक बात है.. शुक्र करो भगवान का ! यह बुलेट थी !" त्याच वेळी मी कानला खडा लावला दारु व गाडी ..."नो वे" त्याच वेळी पाठीमागून मेहता अंकल म्हणाले " तुम्हे दुसरा चान्स मिला है बेटा " खरोखर दुसरा चान्स ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

मुक्तसुनीत 12/05/2008 - 02:41
राज साहेब यांच्या सारख्यांच्या बाबतीत "दुसरा चान्स" सारख्या गोष्टींचे स्वरूप फुटकळ ठरते. त्यांच्या आयुष्याच्या विलक्षण प्रवासाबद्दल त्यांच्याच शब्दात लिहीलेली गाथा आम्हा सर्वांनी वाचलेली आहे. आमच्यासारख्यांची जी नळाची धार ती त्यांच्या बाबतीत धबधबा आहे ! आणि नदीचा प्रवाह बदलत रहावा तसे त्यांच्याबाबतीत झाले आहे. कसला फुटकळ दुसरा चान्स बोलताय राव , इथे रोजचा दिवस एक नवा प्रयोग आहे आणि रोज एका नव्या प्रदेशाची मुशाफिरी आहे :)

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

ते वाहतूक नियम ८८ चे कलम १८५ पुन्हा आठवले...( ते आकडे असेच काहीसे होते...चू.भू माफ करा)

अरुण मनोहर 15/05/2008 - 06:59
राजकारणी नेत्यांना तर मतदार दुसराच काय पण तिसरा चवथा, पाचवा कितीतरी चान्स देतात. ते काय दिवे लावतात ते दिसतेच आहे. आता मतदार असहाय म्हणायचे की नेते निगरगट्ट?

वरदा 10/05/2008 - 02:38
खरं आहे..दुसरी संधी नसती तर मी कितीतरी गोष्टी करु शकले नसते... ५ वीत असतानाची गोष्ट मी वक्तॄत्व स्पर्धेत पहिल्यांदा भाग घेतला तेव्हा घशाला कोरड पडली आणि काहीच बोलता आलं नाही.. मॅडमनी सांगितलं सगळ्यांचं झालं की तू परत प्रयत्न कर्....मग ठरवलं बोलायचं जे जमेल ते... लिहून ठेवलेलं भाषण संपवून पुढे ही खूप बडबड केली..पहिलं बक्षीस मिळालं त्यानंतर मी कुठेच बोलायला घाबरले नाही..अजुनही ग्लोबल मिटींगमधे बिंधास्त जाऊन प्रेझेंटेशन देऊ शकते... अशा कितीतरी गोष्टी आहेत.....तुमचा मुद्दा आवडला..

In reply to by वरदा

भाग्यश्री 10/05/2008 - 04:33
छान विषय.. मला सुद्धा आयुष्यात दुसरी संधी मिळाली नसती तर काय झालं असतं देवाला ठाऊक! पण हो, नक्कीच दुसरी संधी मिळते..आणि आपण त्याचा फायदा उठवला पाहीजे...

मानस 10/05/2008 - 08:05
एका छान विषयाला हात घातला आहे. आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात आणि किंबहुना सर्वांनाच दुसरी संधी मिळतेच असेही नाही. मिपाकरांचे अनुभव जाणून घ्यायला आवडेल. दुसर्‍या संधीच्या शोधात ..... दुसर्‍या संधीची आतुरतेने वाट पहाणारा मानस

माझ्या लहानपणी, माझी अर्धशिक्षित आई नेहमी सांगायची. आयुष्याचा प्रवास हा नदी सारखा असावा. मार्गात एखादा अडथळा आला म्हणून नदी तिथेच थांबत नाही. डोंगरा एवढ्या अडथळ्यालासुद्धा वळसा घालून पुढे पुढे जात राहते. तिचे उद्दीष्ट्य (सागराला मिळण्याचे) ती साध्य करतेच. तद्वत, सतत दुसरी संधी शोधत राहा, प्रगती करीत राहा.

In reply to by प्रभाकर पेठकर

मुक्तसुनीत 10/05/2008 - 09:25
अशा व्यक्तिला अर्धशिक्षित म्हणणे चुकीचे आहे. बहिणाबाई चौधरी , नरेंद्र जाधवांचे बडील ('आमचा बाप आन् आम्ही' चे चरित्रनायक) हे सर्व 'अर्धशिक्षित' तुमच्याआमच्यासारख्या पूर्णशिक्षितांच्या गुरुंचे गुरु ठरतात !

In reply to by मुक्तसुनीत

अर्धशिक्षित हा शब्दप्रयोग शालेय शिक्षणा संदर्भात आहे. बहिणाबाई चौधरी , नरेंद्र जाधवांचे बडील ('आमचा बाप आन् आम्ही' चे चरित्रनायक) हे जीवनाचे सार कोळून प्यायलेले 'उच्चशिक्षित' म्हणावे लागतील.

दोन खानदानी नबाब स्टेशन वर आगगाडीत चढताना 'पहिले आप' 'पहिले आप' करत दोघांचीही गाडी सुटुने जाते. प्रकाश घाटपांडे

In reply to by मुक्तसुनीत

'तो' त्यांचा पहिला चान्स असतो. दुसरी गाडी येते (सेकंड चान्स) तेंव्हा ते पहिले आप - पहिले आप करीत बसत नाहीत. पटकन उडी मारून गाडी पकडतात.

आम्हाला दुसरी संधीच अधिक मिळते. पहिल्या संधीला ब-याचदा मी पात्रच नसतो. निसर्गाने याबाबतीत आमच्यावर जरा अन्यायच केला आहे. आमच्यापेक्षा पहिली संधी मिळवणा-याच्या बाबतीत देवाने त्यांना भरपूर 'दानं' टाकली आणि मग शिल्लक आम्हाला दिली. :)

विकास 10/05/2008 - 18:07
विषय एकदम आवडला... पण याबाबत आत्ता काही लिहीणे म्हणजे स्वतःच्या भूतकाळात डोकावून पहाणे (जसे आपण पाहीलेत तसे)... त्याची आत्ता इच्छा नाही. त्यात आपण म्हणता तसे लिहायचे ठरवले तर आत्मचरीत्रच होईल की काय अशी भिती वाटते :-) आपण म्हणता तसे प्रवेशासंदर्भात माझे ही झाले होते जरी "शून्य" गुणांनी झाले नसले तरी किरकोळ फरकाने. त्यावेळेस तो प्रकार खूप मोठा, वयाला अनुकूल अस्वस्थ करणारा होता. आज लक्षातपण नाही.... बाकी अमेरिकेत राहून काही अनुभवातून आणि बरेच पाहून या संदर्भात लक्षात आलेले म्हणजे: winner never quites and quitter never wins (ह्याचा अर्थ रडीचा डाव करायचा असा नाही, पण जिद्दिने प्रयत्न करायचे इतकाच when going gets tough, tough gets going . असे अनेक खर्‍या अर्थी भारतात पण विविध क्षेत्रातील आदर्श दिसतील - लता, आशा, भिमसेन, धिरूबाई, इंदीरा गांधी, अटलजी (८४ साली त्यांना सारे देश मे एक भिकारी अटलबिहारी अटलबिहारी असे म्हणले गेले होते), - हे पटकन डोक्यात आले... करंटे ते की ज्याना दुसरी काय , डझनावारी संधी मिळतात या संदर्भात मात्र गदीमांच्या ओळी आठवतात : सतत वाहते उदंड पाणी, कुणी न वळवून घेई रानी, आळशास ही व्हावी कैसी, गंगा फलदायी

In reply to by विकास

आनंदयात्री 12/05/2008 - 11:38
पण याबाबत आत्ता काही लिहीणे म्हणजे स्वतःच्या भूतकाळात डोकावून पहाणे (जसे आपण पाहीलेत तसे)... त्याची आत्ता इच्छा नाही.
पण सेकंड चान्स हा अविभाज्य घटक आयुष्याचा हे खरेच, या लेखाने "सेकंड चान्स" ने आपल्याला काय काय दिले याचा अंदाज आला, यापुढचे सेकंड चान्स जरा जास्त सिरिअसली घेतले जातील :)

चतुरंग 10/05/2008 - 18:14
'चिमणरावाचे चर्‍हाट' ह्या पुस्तकात चिमणराव जसे म्हणतात "काड्यापेटीतली पहिली काडी ओढली ती विझली, दुसरी ओढली तीही विझली म्हणून मग तिसरी न ओढता एकदम चौथी ओढली!" ;) त्याचप्रमाणे कित्येक वेळा मी पहिली संधी हीच दुसरी आहे असे समजून घेतली! :) असो विनोदाचा भाग सोडला तर एक-दोनंच नव्हे तर आयुष्य हे संधींनी पुरेपूर भरलेलं असतं असं माझं मत. गतानुगतिकतेमुळे आपण कित्येकवेळा संधी समोर दिसत असूनही नाकारतो आणि नाकर्ते होतो त्यावेळी आपल्यातल्या कल्पकतेचा एक अंश मारुन टाकत असतो. तथाकथित उच्चशिक्षिततेमुळे आपण चाकोरीत फिरायला शिकतो की काय असे मला बर्‍याचवेळा वाटून जाते. महत्त्वाच्या परीक्षेत पहिल्याच वेळी मला गणितासारख्या हातखंडा विषयानेच दणका दिला त्यावेळी धाबे दणाणले आणि संधी गेल्याची भावना मनात येऊन गेली पण नंतर त्याच विषयाचा जोरदार अभ्यास करुन मी विद्यापीठात त्या विषयातले सर्वोच्च गुण मिळवून उत्तीर्ण झालो आणि दुसर्‍या संधीचं महत्त्व मनात ठसलं. मी स्वतःचा सुरु केलेला धंदा अनेक प्रयत्न करुनही बंद करावा लागला त्यावेळी असेच वाटून गेले की 'आता पुढे काय'? पण जरा वेगळ्याच क्षेत्रातली एक संधी पुढे आली आणि त्यानंतर पूर्ण आयुष्यानेच एक छानदार वळण घेतले ते आजतागायत! अल्बर्ट आईनस्टाईन म्हणून गेलाय "संधी ही सर्व अडचणींच्या मधेच दडलेली असते!" आणि मार्क ट्वेन म्हणतो "हातून निसटेपर्यंत एखादी गोष्ट संधी होती हे मला क्वचितच लक्षात आलंय!" चतुरंग

In reply to by चतुरंग

कुंदन 11/05/2008 - 16:42
१००००००० % सहमत. २० मार्च , २००८ ची संध्याकाळ. एक तातडीचे काम दिले माझ्या व्यवस्थापकाने. प्रचंड अडचणी आल्या एका साध्या सोप्या कामात. याच क्षेत्रात काम करणार्‍या मित्रांशी संपर्क साधला , पण कोणाकडेच त्या कामाला उपयोगी पडतील अशी प्रणाली मिळाली नाही. अख्खी रात्र कार्यालयात काढावी लागली. च्यायला आपले डोकेच सरकले. म्हटले , काही तरी नवीन उपाय शोधायला पाहीजे. २-३ दिवस विचार करण्यात , जालावर माहिती शोधण्यात गेले. ४थ्या दिवशी सकाळी उत्तर सापडले. १००-१५० ओळींच्या प्रणालीला , १० ओळींची सोपी पर्यायी प्रणाली तयार झाली. "संधी ही सर्व अडचणींच्या मधेच दडलेली असते!"....... हा विश्वास अधिकच दृढ झाला.

In reply to by चतुरंग

प्राजु 15/05/2008 - 16:32
अल्बर्ट आईनस्टाईन म्हणून गेलाय "संधी ही सर्व अडचणींच्या मधेच दडलेली असते!" आणि मार्क ट्वेन म्हणतो "हातून निसटेपर्यंत एखादी गोष्ट संधी होती हे मला क्वचितच लक्षात आलंय!" आवडलं... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

शितल 10/05/2008 - 18:24
चतुर॑गजी, तुमची प्रतिक्रिया खुप छान आहे. जे होते ते चा॑गल्यासाठीच होते, हे मी जेव्हा जेव्हा पहिल्या स॑धीला हुकले त्या त्या वेळी मनात ठासले. दुसरे ही पर्याय खुप छान असतात हे मला पटले. :)

कलंत्री 10/05/2008 - 18:41
माझ्या मते आले तसे जगायला हवे. संधी, यशापयश याच्यापलिकडे जाऊन प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे.

In reply to by कलंत्री

माझ्या मते आले तसे जगायला हवे. संधी, यशापयश याच्यापलिकडे जाऊन प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे. भावनिक विश्वात तुमचे म्हणणे १०० टक्के मान्य व्हावे. पण व्यावहारिक जगात संधी शोधाव्या लागतात, त्यांचे सोने करावे लागते.

विसोबा खेचर 11/05/2008 - 16:42
आमच्या आयुष्यात आजपवेतो तश्या बर्‍याच संध्या आल्या, त्यातल्या काही निसटून गेल्या, काहींचा फायदा करून घ्यायला आमचा मूड नव्हता! :) आणि उरलेल्या संध्यांचा आम्ही थोडाफार फायदा करून घेतला. यातली पहिली कोणती होती, दुसरी कोणती होती हे आम्हाला आठवत नाही! एक मात्र खरं, की जी काही मिळायची आहे/मिळणार आहे ती वेळोवारी मिळावी, नाहीतर तिची वाट पाहता पाहता आयुष्याचा संधीकाल जवळ यायचा! :) बाकी मुक्तराव, चर्चाविषय मस्त आहे. ही संधी तुम्ही बरी घेतलीत! :) आपला, (संधीसाधू) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विकास 15/05/2008 - 15:10
>>>आमच्या आयुष्यात आजपवेतो तश्या बर्‍याच संध्या आल्या, त्यातल्या काही निसटून गेल्या, काहींचा फायदा करून घ्यायला आमचा मूड नव्हता! आणि उरलेल्या संध्यांचा आम्ही थोडाफार फायदा करून घेतला. यातली पहिली कोणती होती, दुसरी कोणती होती हे आम्हाला आठवत नाही! आपल्या विधानांत "संधी" शब्दाचे अनेक वचन आल्याने वरील वाक्ये वाचताना वेगळाच अर्थ वाटल्याने अंमळ गोंधळलो :-))

राजे 11/05/2008 - 23:19
"लाईफ इज ऑल अबाऊट सेकंड चान्सेस" लाईफ - जिवन ! मागील वर्षीच मी व माझी नवीन बुलेट. एक आठवडाच झाला होता बुलेट घेऊन... माझे मित्र मला शिव्या देत होते .. लेका तू चार हाडाचा सापळा... व ही भली मोठी बुलेट... जोडी जमत नाही लेका ! पण मीच त्याना समजावले की दणकट आहे म्हणून घेतली आहे ! बुलेट घेतली म्हणून रात्री रुमवर पार्टी चालू होती मी जरा अती जास्तच घेतली व एका मित्रा बरोबर भांडलो... नशे नशे मध्येच माझेच घर... रुम सोडून मी सरळ बाहेर आलो व बुलेट चालू केली... फक्त इतकेच आठवते... दुसरा दिवस ... >> रविवार सकाळ सकाळी सगळे मित्र जमा ! काय झाले रे ... सकाळ सकाळी माझ्या कडे कसे ? मेहता अंकल नी सरळ न काही विचारता कानाखाली जाळ काढला व म्हणाले " आदमी है या जानवर ! रात को कहा गया था ? " मी जरा चरकलोच... च्यायला... विक्या बरोबर भांडलो व बुलेट चालू केली ... पण पुढे काय ? डोके काही चालेना व काही आठवेना ! सगळ्याची रात्र मला शोधण्यात गेली होती... व शेवटी पोलिसांना कळवणे बाकी होते. मेहता अंकल म्हणाले " जरा निचे जा. बुलेट देख अपनी " मी पळतच गेलो व जे पाहीले ते जन्म भर न विसरण्यासारखे ! हेड लाईट गायब.... पुढील रीम ला बेंड... मागील रीमचे तुकडे तुकडे .... एक बाजूचा गाडीचा रंग उडालेला... सायलेंन्सर गायब.... काहीच कळेना ! काय झाले होते मी गेलो कुठे होतो.. बुलेट बरोबर झाले काय.... आलो कसा परत... बुलेट वरुनच परत आलो तर ही बुलेट चाललीच कशी.... मागचे चाकाची रीम तर तुटलेली होती.. बर मला कुठे ही जरा ही खरचटले देखील नव्हते... मग हा हाल बुलेटचा झालाच कसा ! सर्विस सेंटर च्या कारागीराने सांगितले " साब, आपने पता नहीं कैसे गाडी चलायी है.. पर एक बात है.. शुक्र करो भगवान का ! यह बुलेट थी !" त्याच वेळी मी कानला खडा लावला दारु व गाडी ..."नो वे" त्याच वेळी पाठीमागून मेहता अंकल म्हणाले " तुम्हे दुसरा चान्स मिला है बेटा " खरोखर दुसरा चान्स ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

मुक्तसुनीत 12/05/2008 - 02:41
राज साहेब यांच्या सारख्यांच्या बाबतीत "दुसरा चान्स" सारख्या गोष्टींचे स्वरूप फुटकळ ठरते. त्यांच्या आयुष्याच्या विलक्षण प्रवासाबद्दल त्यांच्याच शब्दात लिहीलेली गाथा आम्हा सर्वांनी वाचलेली आहे. आमच्यासारख्यांची जी नळाची धार ती त्यांच्या बाबतीत धबधबा आहे ! आणि नदीचा प्रवाह बदलत रहावा तसे त्यांच्याबाबतीत झाले आहे. कसला फुटकळ दुसरा चान्स बोलताय राव , इथे रोजचा दिवस एक नवा प्रयोग आहे आणि रोज एका नव्या प्रदेशाची मुशाफिरी आहे :)

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

ते वाहतूक नियम ८८ चे कलम १८५ पुन्हा आठवले...( ते आकडे असेच काहीसे होते...चू.भू माफ करा)

अरुण मनोहर 15/05/2008 - 06:59
राजकारणी नेत्यांना तर मतदार दुसराच काय पण तिसरा चवथा, पाचवा कितीतरी चान्स देतात. ते काय दिवे लावतात ते दिसतेच आहे. आता मतदार असहाय म्हणायचे की नेते निगरगट्ट?
परवा रात्री पडल्यापडल्या झोपायच्या काही क्षण आधी सरलेल्या वर्षांचा आढावा मनात नकळत घेतला जात होता. सतत बदलत असणार्‍या आपल्या आयुष्यातल्या चढउताराकडे पाहताना प्रश्न पडत होता : बापरे , तोच का मी हा ? हेही झाले आपल्याबाबतीत , नाही का ? "कहां कहां से गुजर गये" या सारखे विचार येत होते. सर्वच गोष्टी काही काळवंडून टाकणार्‍या नव्हत्या. काही आनंदाचे क्षण होते , काही चिमूटभर यशाचे , काही रोमांचक प्रसंगही. झोप लागता लागता एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली : "लाईफ इज ऑल अबाऊट सेकंड चान्सेस" - अर्थात "दुसर्‍यांदा मिळणारी संधी हाच तुमच्या आमच्या आयुष्याचा स्थायिभाव आहे".

विडंबन

केशवसुमार ·

इनोबा म्हणे 10/05/2008 - 00:17
केशवा. मस्त हाणलेस रे! फक्त मी नावास कर्ता शेष आता बायको ही लांडगा मी मेष आता एकही ना ठेवला खात्यात पैसा आणि बचतीचा मला उपदेश आता ह्या ओळी तर जबराच कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मदनबाण 10/05/2008 - 00:21
सारखी येते तिला ऊर्मी लढ्याची राहिला नाही मला आवेश आता घास उतरावा कसा खाली घशाच्या? काल चे सारे, न काही फ्रेश आता व्वा रे भिडु.....मस्तच...... मदनबाण.....

चतुरंग 10/05/2008 - 00:54
छान, मूळ गजलेतल्या प्रत्येक शेराला विडंबन प्रतिशेर (किंवा शेराला 'सव्वाशेर' ;)! (स्वगत - आता ह्या गजलेला छान म्हणून मी घरी एक नवे भांडण ओढवून घेणार की काय? :?) चतुरंग

In reply to by चतुरंग

प्राजु 20/05/2008 - 19:15
छान, मूळ गजलेतल्या प्रत्येक शेराला विडंबन प्रतिशेर (किंवा शेराला 'सव्वाशेर' !) असेच म्हणते. विडंबन आवडले.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विजुभाऊ 10/05/2008 - 18:30
एकही ना ठेवला खात्यात पैसा आणि बचतीचा मला उपदेश आता झकास. सासरा, दारू, विडी, आणीक, लफडी हे उल्लेखाला आलेच की :)

घास उतरावा कसा खाली घशाच्या? काल चे सारे, न काही फ्रेश आता क्या बात है! केशवसुमारजी, फस्क्लास झालीय हो गझल! -डांबिसकाका

केशवसुमार 12/05/2008 - 08:47
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी)केशवसुमार

अरुण मनोहर 16/05/2008 - 10:05
प्रतिक्रिया न दिलेला एक लिहीतो आहे. आतापर्यंत वाचलेच नव्ह्ते. वाचल्याबरोबर लिहावेसे वाटले. अतीउत्तम. आणखी येऊदे. एकही ना ठेवला खात्यात पैसा आणि बचतीचा मला उपदेश आता बचके रहना रे बाबा बचके रहना रे!

मित 19/05/2008 - 11:08
माला पन थोड बोलयच आहे कराया गेलो सुखानचि बेरीज राहीले न काही शेष आता !!!! पुर्षाथाला ही वाटे लाज पाहुन माझे अवशेष आता !!!!

कैलासराजा 21/05/2008 - 14:02
नाथा पुरे आता बायकोवर करीशी गझल कुटवर गेली ही मजल.... शाब्बास केशवा...............

इनोबा म्हणे 10/05/2008 - 00:17
केशवा. मस्त हाणलेस रे! फक्त मी नावास कर्ता शेष आता बायको ही लांडगा मी मेष आता एकही ना ठेवला खात्यात पैसा आणि बचतीचा मला उपदेश आता ह्या ओळी तर जबराच कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मदनबाण 10/05/2008 - 00:21
सारखी येते तिला ऊर्मी लढ्याची राहिला नाही मला आवेश आता घास उतरावा कसा खाली घशाच्या? काल चे सारे, न काही फ्रेश आता व्वा रे भिडु.....मस्तच...... मदनबाण.....

चतुरंग 10/05/2008 - 00:54
छान, मूळ गजलेतल्या प्रत्येक शेराला विडंबन प्रतिशेर (किंवा शेराला 'सव्वाशेर' ;)! (स्वगत - आता ह्या गजलेला छान म्हणून मी घरी एक नवे भांडण ओढवून घेणार की काय? :?) चतुरंग

In reply to by चतुरंग

प्राजु 20/05/2008 - 19:15
छान, मूळ गजलेतल्या प्रत्येक शेराला विडंबन प्रतिशेर (किंवा शेराला 'सव्वाशेर' !) असेच म्हणते. विडंबन आवडले.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विजुभाऊ 10/05/2008 - 18:30
एकही ना ठेवला खात्यात पैसा आणि बचतीचा मला उपदेश आता झकास. सासरा, दारू, विडी, आणीक, लफडी हे उल्लेखाला आलेच की :)

घास उतरावा कसा खाली घशाच्या? काल चे सारे, न काही फ्रेश आता क्या बात है! केशवसुमारजी, फस्क्लास झालीय हो गझल! -डांबिसकाका

केशवसुमार 12/05/2008 - 08:47
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी)केशवसुमार

अरुण मनोहर 16/05/2008 - 10:05
प्रतिक्रिया न दिलेला एक लिहीतो आहे. आतापर्यंत वाचलेच नव्ह्ते. वाचल्याबरोबर लिहावेसे वाटले. अतीउत्तम. आणखी येऊदे. एकही ना ठेवला खात्यात पैसा आणि बचतीचा मला उपदेश आता बचके रहना रे बाबा बचके रहना रे!

मित 19/05/2008 - 11:08
माला पन थोड बोलयच आहे कराया गेलो सुखानचि बेरीज राहीले न काही शेष आता !!!! पुर्षाथाला ही वाटे लाज पाहुन माझे अवशेष आता !!!!

कैलासराजा 21/05/2008 - 14:02
नाथा पुरे आता बायकोवर करीशी गझल कुटवर गेली ही मजल.... शाब्बास केशवा...............
लेखनविषय:

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची अप्रतिम गझल

फक्त मी नावास कर्ता शेष आता
बायको ही लांडगा मी मेष आता

केस पिकले, दात पडले, भिंग सजले
केव्हढा बदलून गेला वेष आता

म्हैस ही बसते, पुन्हा उठतेच कोठे!!
आणि लाजेचा न उरला लेश आता

नाते ना 'ते' राहीले

भ्रमर ·

कविता छानच आहे. प्रेम करणार्‍याने असं घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नसतं!! हा डांबिस काकांचा प्रतिसाद सुद्धा पटतो कारण जरी प्रेमविवाह घराच्यांचा विरोध पत्करून केला तरी नंतर हा विरोध निवळतो.... कारण शेवटी प्रेमाचे नाते हे असतेच.:) ते सदैव राहते.

मन 10/05/2008 - 00:38
प्रेम करणार्‍याने असं घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नसतं!! हा डांबिस काकांचा प्रतिसाद सुद्धा पटतो आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

वेलदोडा 13/05/2008 - 11:49
कुठे आहे हा प्रतिसाद? - प्रेम करणार्‍याने असं घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नसतं!! इथे मिळेल.. http://misalpav.com/node/1714 शीतल यांचा 'प्रेमाची सन्ध्याकाळ ' या लेखात 'धत तेरेकी' नावाचा प्रतिसाद आहे तिथे हे वाक्य सापडेल.

विसोबा खेचर 13/05/2008 - 11:37
घरदार सोडुनी आले मायेस पारखी झाले ?? आलीस ना घरदार सोडून? मग आता मारे मातेबियेची नाटकं कशाला? :) झाली बरीच जगती आबाळ या जीवाची स्फुंदुनी सांगू कशी मी मातेस मी दुरीची मग मरायला आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध पळून जाऊन लग्न केलंस कशाला? आता मारे आईवडिलांच्या आठवणीने गळे काढाण्यात काय अर्थ आहे? यू कॅनॉट इट द ब्रेड ऍन्ड हॅव इट टू! :) आपला, (प्रॅक्टिकल) तात्या.

कविता छानच आहे. प्रेम करणार्‍याने असं घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नसतं!! हा डांबिस काकांचा प्रतिसाद सुद्धा पटतो कारण जरी प्रेमविवाह घराच्यांचा विरोध पत्करून केला तरी नंतर हा विरोध निवळतो.... कारण शेवटी प्रेमाचे नाते हे असतेच.:) ते सदैव राहते.

मन 10/05/2008 - 00:38
प्रेम करणार्‍याने असं घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नसतं!! हा डांबिस काकांचा प्रतिसाद सुद्धा पटतो आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

वेलदोडा 13/05/2008 - 11:49
कुठे आहे हा प्रतिसाद? - प्रेम करणार्‍याने असं घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडायचं नसतं!! इथे मिळेल.. http://misalpav.com/node/1714 शीतल यांचा 'प्रेमाची सन्ध्याकाळ ' या लेखात 'धत तेरेकी' नावाचा प्रतिसाद आहे तिथे हे वाक्य सापडेल.

विसोबा खेचर 13/05/2008 - 11:37
घरदार सोडुनी आले मायेस पारखी झाले ?? आलीस ना घरदार सोडून? मग आता मारे मातेबियेची नाटकं कशाला? :) झाली बरीच जगती आबाळ या जीवाची स्फुंदुनी सांगू कशी मी मातेस मी दुरीची मग मरायला आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध पळून जाऊन लग्न केलंस कशाला? आता मारे आईवडिलांच्या आठवणीने गळे काढाण्यात काय अर्थ आहे? यू कॅनॉट इट द ब्रेड ऍन्ड हॅव इट टू! :) आपला, (प्रॅक्टिकल) तात्या.
Taxonomy upgrade extras
माझी ही कविता जवळपास एक वर्षापूर्वी लिहीली होती. कवितेचा वरील विषय लोकसत्ताच्या 'चतुरा' या मासिकाने दिला होता व त्यावरुन मला ही कविता सुचली होती. परंतू दिरंगाई केल्याने कविता पाठविली नाही. बिचारी माझ्या वहीत अशीच पडुन होती. मिसळपावमुळे तिला प्रकाशात येता आले. कविता लिहिण्याआधी तिची थोडी पार्श्वभूमी सांगणे आवश्यक वाटते.

मी गेल्यावर

पुष्कराज ·
लेखनविषय:
मी गेल्यावर वि़झुनी जातील रत्नदीप आकाशी मी गेल्यावर थांबून राहील वीज तशी मेघाशी मी गेल्यावर पोर्णिमेसही चंद्र यायचा नाही मी गेल्यावर रवी तळपूनी तेज द्यायचा नाही मी मी माझे किती कल्पना किती मानसी वेड गेल्यानंतर सरणावरती दोन क्षणांचा खेळ शूरवीर बलशाली राजे किती जाहले येथे स्मरण तयांचे या जगताला कुठे आज रे होते नररत्नांची ही पहा अवस्था काय आपुले आहे आपुल्यानंतर कशास वेड्या नाव आपुले राहे चैनीमध्ये दिवस संपला धुंदीमध्ये राती भोगून भोगून क्षीण जाहली आयुष्याची ज्योती तरीही वाटे मनास माझ्

लग्न लवकर जमण्यासाठी थोडे इंग्रजी आलेच पाहिजे....

कलंत्री ·

मन 09/05/2008 - 19:40
ह्ये असेल तुमचे मत. आम्हाला पटत नाही. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

माझेही मन हे मानायला तयार नाही पण कलंत्री साहेब म्हणतात ते काहीसे खरे आहे. शेवटी 'कालाय तस्मै नमः ' हेच खरे. जोपर्यंत मने बदलत नाहीत तोपर्यंत कोण काय करणार. मी पाहील्या आहेत अशा मुली ज्या अगदी मराठी वातावरणात वाढल्या आहेत पण आता अगदी स्वतःला कॉस्मोपॉलिटन म्हणवून घेण्यात धन्य मानतात. मी अगदीच हट्टी आहे मराठीशिवाय इतर भाषेत मी ढीम्म काही बोलत नाही म्हणून उपकार केल्यासारखे माझ्याशी मराठीत बोलतात. असो पण मी तरीही माझा ठेका सोडला नाहीये. मी मराठीतच बोलणार. (हट्टी) पुण्याचे पेशवे

यशोधरा 09/05/2008 - 19:43
नाही हे काही मला. केवळ काही इंग्लिश शब्द येतात म्हणून एखादी व्यक्ती शिकल्यासारखी वाटते, असे कसे म्हणता येईल?

In reply to by यशोधरा

स्वयंभू 09/05/2008 - 20:04
मलाबी हे झेपेश नाय झालं आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

मन 09/05/2008 - 20:25
असाच एक आग्रह माझ्यामाहितीतील एका ताईचा होता. काय , तर म्हणे मुलगा केवळ आय टी वाला हवा. बाकी कुठलाही(अगदी बँक किंवा इतर ठिकाणी मानाचे काम असले तरी नको.) पुढे काय झाले कसे झाले माहित नाही.पण तिचे मत बदलले. इतके, की आय टी वाला नकोच असे म्हणु लागली. (बहुदा माझ्या सारखाच एखादा रिकाम्चोट आणि निरुद्योगी प्राणी तिच्या पाहण्यात आला असावा.) सांगायचे एवढेच, की हे वर वर असलेल्या माहिती मुळे,गैर समजामुळे अशी मागणी होत असावी. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

गृहिणि 09/05/2008 - 21:06
मला वाटतय कि हा प्रश्न सुशिक्षित असण्याचा नसुन भासवण्याचा आहे. म्हणजे नोकरि साठि मुलाखत देताना विशेषतः पहिल्या दुसर्या नोकरिच्या वेळि (जेंव्हा अनुभव कमि असतो), तेन्व्हा एखाद्या फारशि माहिति नसलेल्या विषयाबद्दल प्रश्न विचारले तर अगदिच 'हे' वाटु नये म्हणुन कश्याप्रकारे उत्तर द्यायचि याचा विचार आपण करतो ना. तसच काहिस आहे हे. कंलत्रि ३०-३५ वर्षांपुर्विचि गोष्ट सांगतायत. त्याकाळि लग्न ह्या प्रकारात मुलाकडच्यांचा किति वरचष्मा असायचा हे वेगळ सांगायला नको. मग एखाद्या वधुपित्याने असा सल्ला दिला तर आश्चर्य वाटयाला नको. शिवाय या उपायानेच त्या मुलिच लग्न जमल अस नाहि. फक्त आपल्याकडुन प्रयत्नात कुठल्याहि प्रकारचि कमतरता रहायला नको असा विचार त्या मागे असावा. 'मरता क्या न करता' अश्या प्रकारच्या मनःस्थितित दिलेला सल्ला वाटतो. मला हा सल्ला अजिबात खटकला नाहि उलट ३०-३५ वर्षांपुर्वि हा विचार सुचावा ह्याच अप्रुप वाटल. मला स्वतःला अश्याच प्रकारचा अनुभव आल्यामुळे मला ह्या विचारातलि व्यवहार्यता एकदम पटलि. माझा अनुभव खालि देतेय. १०-१२ वर्षांपुर्वि (मी १२ वित असताना), मला दाढ्दुखिचा त्रास झाला. Govt. Medical College (नागपुरातल) माझ्या शिकवणिच्या वाटेवर असल्यामुळे मी तिथे गेले. पैसे भरणे, X Ray, अजुन काय काय अश्या ५-७ वेगवेगळ्या रांगामध्ये उभे राहिल्यावर शेवटि एकदाच Doctor च दर्शन झाल. माझ्या उपचारासाठि आवश्यक असणार एक उपकरण त्यांच्याकडे नव्हत म्हणुन त्यांनि मला(च!) दुसर्याएका विभागात ते आणायला पाठवल. तिथे incharge असलेलि Doctor अगदिच पोरगेलिशि होति, पण माझ्या एकंदरित अवताराकडे पाहुन (तेल लावुन केसांचि घट्ट वेणि, सुति सलवार कुडता इत्यादि परत त्यात ३-४ तास घालवल्यानंतर आलेल desparation) मला राग द्यायला सुरुवात केलि कि असच कस काय देवु, त्यांनि तुला का पाठवल इत्यादि. ति हिंदित बोलत होति आणि माझ हिंदि काहि फारस चांगल नव्हत म्हणुन मी तिला म्हंटल, " Actually the instrument wasn't available there. Dr. XYZ said it will be better for her if I'll get it so she can check some other patient during that time." इंग्रजिच्या वापराने डाक्तरिण्बाइंच माझ्याबद्दलच मतपरिवर्तन मी त्यांच्या चेहर्यावरच्या झरझर बदलणार्या भावांतुन टिपल. त्यांनिहि मग अजिबात खळखळ न करता ते उपकरण लगेच मला दिल!

भ्रमर 09/05/2008 - 21:43
लहानपणीचा अनुभव. आईच्या डोळ्यांतील वाचलेले भाव. कलंत्रीसाहेब खरोखरच स्तुत्य. अनेक लोक आजही केवळ आपला प्रभाव इतरांवर पडावा यासाठी इंग्रजी शब्दांचा वापर करताना आढळुन येतात. अशा लोकांच्यात न्यूनगंडाची भावना असते त्यामुळेच ते अशी युक्ती वापण्याकडे झुकतात. तुमच्या मामांना तर त्यांच्या मुलीसाठी वरसंशोधन करावयाचे होते. तेही ३०-३५ वर्षांपुर्वी. अशा वेळी वधूपित्याची मानसिक अवस्था निश्चितच अतिशय प्रवाही (मला Volatile म्हणायचेय) असते. त्यावेळी त्यांनी व्यक्त केले ते त्यांचे दृढ मत होते असे म्हणणे त्यांच्यावर अन्याय करणारे ठरेल. त्यांनी समाजात पसरत असलेल्या अयोग्य चालीकडे सर्व उपस्थितांचे लक्ष वेधले असेच म्हणावे लागेल. मला वाटते ते त्यांच्या प्रयत्नात यशस्वीही झाले. त्यावेळी हजर असणाय्रा एका व्यक्तीला ते आवडले नाही आणि तिच्या मुलाने आजन्म मराठी भाषेचा आग्रह धरण्याचे व्रत स्विकारले. यासाठी तुम्ही मामांचे आभार मानावेत ही विनंती. सावरकरांइतका प्रखर आग्रह आणि अभिमान आपल्याला पेलवणे अंमळ कठीणच दिसते. मात्र शक्य तेवढे आपल्या परीने जपायला हवे असे वाटते. मराठीचा (सार्थ) अभिमानी भ्रमर

In reply to by भ्रमर

अशा लोकांच्यात न्यूनगंडाची भावना असते त्यामुळेच ते अशी युक्ती वापण्याकडे झुकतात अशा लोकांपेक्षा आपल्या समाजातच ही न्यूनगंडाची भावना अधिक असते. इंग्रजी भाषेचा वापर अशा लोकांसमोर फार उपयोगी पडतो. भाडणात जर तुम्ही खणखणीत शब्दात प्रवाही इंग्रजीचा वापर केला तर समोरचा अर्धा नरमतो. (कारण त्याचा न्यूनगंड). मुंबई विमानतळावर मी वेटींग लिस्टवर सर्वात वरच्या क्रमांकावर असताना मला डावलून एका एअरलाईन्स कर्मचार्‍याच्या फॅमिलीला सीट दिली आणि मला नकार दिला तेंव्हा मी प्रचंड आरडाओरडा (अर्थात इंग्रजीत) केला. सगळ्या काउंटरवरचे काम थांबून सर्वजण माझा काय प्रॉब्लेम आहे हे पाहू लागले. स्टेशन सुपरिंटेंडन्ट धावत आला. मला शांत करून इकॉनॉमी क्लास मधून फर्स्ट क्लासला प्रमोट करून मला त्याच विमानात जागा मिळवून दिली.

मुक्तसुनीत 09/05/2008 - 23:54
एका साध्या संभाषणामधे अनेक स्तर असू शकतात याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. मुलीचे लग्न "सुस्थळी" व्हावे असे वाटणारा पिता, मग सुस्थळ म्हणजे नक्की काय , ठरविलेल्या लग्नात आधुनिकतेची प्रतिमा निर्माण करणे , एखाद्या इंग्रजी शब्दामुळे कुणी आधुनिक ठरू/दिसू शकेल काय , ठरवून दिलेले लग्न हाच मुळी मनामनांच्या संयोगापेक्षा एक ठरवून दिलेला व्यवहार असतो की काय असे अनेकानेक प्रश्न एका प्रसंगामुळे निर्माण होतात. प्रसंगलेखकाने या सार्‍या गोष्टींच्या मुळाचा , त्यांच्या एकमेकामधे गुंतलेले असण्याचा पुरता छडा लावण्याचा प्रयत्न केला नाही असे मला वाटले. आपल्या मामांबद्दल त्याना वाटणारा स्नेह मी समजू शकतो; पण त्यांना जो द्रष्टेपणा वाटतो , त्यालाच , एका मोठ्या अवकाशामधे संकुचितपणा म्हणावे लागेल का याचा विचार लेखकाने पुरेसा केलेला नाही. कलंत्री यांच्या आईंच्या मनाला नकळत झालेली वेदना आणि केवळ डोळ्यातील भावांवरून त्यांनी वाचलेला मनीचा भाव या गोष्टी हृद्य आहेत, चटका लावणार्‍या आहेत.

कलंत्री 10/05/2008 - 19:18
मला माझा मुद्दा आणि त्यामागचा विचार नेमका मांडता आला नाही असे वाटते. लग्नासारख्या विषयात एक प्रचंड प्रकारची अनिश्चितीतता असतेच असते. कोणा एकाशी सामान्य असताना लग्न करावे आणि काही वर्षात त्याने प्रचंड सुबत्ता मिळवावी ( "मराठी शिकलेला नवरा नको गं बाई" यात चांगले उदाहरण दिले आहेच.) किंवा आपण सामान्यपेक्षा चांगले असताना काही वर्षानंतर आपला जोडीदार विशेषतः आपला नवरा सामान्य असावा , आपल्या मैत्रिणी याबाबतीत कितीतरी पूढे आहेत असे घडताना आपण पाहत असालच. हा मुद्दा अधोरेखीत आहेच. दुसरा म्हणजे ३०/३५ वर्षापूर्वी मुलगा पसंत असेलच तर मुलाला मुली बघण्याचे निमंत्रण दिले जात असे. आता काय परिस्थिती आहे हे माहित नाही. अश्या वेळेस आपली मुलगी एखादा इंग्रजी शब्द वापरत आहे आणि त्याचा प्रभाव अथवा चांगले मत बनत आहे ही कल्पनाच करणे आणि ती प्रत्यक्ष मांडणे, त्याला सर्वांची स्विकृती मिळवणे याचे मला अप्रुप वाटते. त्यासाठी इंग्रजीच्या शिडीचा वापर करणे मला त्याज्य वाटत होते आणि वाटते, असा विचार करणारा आमचा मातृकुलप्रमुख का असेना! आता दुसरा भाग म्हणजे आपण अनेक लग्नपत्रिका क्षमा करा कार्डस् घेत असतो, लग्नामध्ये भाग घेत असतो त्यात अश्या पाट्या, शब्दात इंग्रजीचा वापर करतो अथवा ऐकत असतो. ( बुफे, रिसेप्शन, मॅरेज, हनीमुन, पार्टी, डेट इत्यादी इत्यादी) अश्या इंग्रजीचा सौम्य अथवा तीव्र निषेध करत रहावा अशी माझी अपेक्षा आहे. बाकी काही प्रतिसादांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. भ्रमर : अश्या अनेक घटनानी मला मराठीचा पुरस्कार करण्यास शिकविले. माझ्या मते भाषा आणि आपण याचे आई आणि मुलाचे नाते आहे. मुक्तसुनित : एखाद्या गोष्टीचे महत्व वाढणार आहे हे जाणणारा म्हणजे द्रष्टा. बाकी सर्वांचे विशेष आभार. लग्नासारख्या ठिकाणी म्हणजे मुलीचे लग्न करण्याचा विचार करण्यापासून ते घरात एक बाळ येई पर्यंत मराठीभाषेचाच वापर करा. ही कळकळीची विनंती.

विसोबा खेचर 13/05/2008 - 11:58
भाषा आपल्या सांकृतिक जीवनात कशी ढवळाढवळ करत असते ना? हम्म! खरं आहे...! तात्या.

In reply to by ऋचा

कलंत्री 13/05/2008 - 12:42
ऋचा, थोडे जास्त आणि आपल्या मत, विचार आणि भावना शब्दात अचूक आणि समर्पक पणे व्यक्त करता यायला हवे. नेमके काय पटले नाही, आपला काही अनुकुल / प्रतिकुल अनुभव आणि शेवटी आपले आयुष्य कसे समृध्द होईल असे लिखाणाची अपेक्षा आहे. सर्वात महत्वाचे आपले एकमत कधी अशक्य असेल पण संवाद तर शक्य आहेना.... आपला, कलंत्री

धमाल मुलगा 13/05/2008 - 13:41
कलंत्रीसाहेब, शिर्षकात 'इंग्रजी आलेच पाहिजे' ऐवजी 'इंग्रजी आल्याचे भासवता आले पाहिजे' असं हवं होतं काहो? आपल्याला नसलं पटत, तरीही दुर्दैवानं हे असंच घडतं आहे. शिक्षित म्हणजे इंग्रजी आलंच पाहिजे, किंबहुना, ते आलं तरच शिक्षित, इंप्रेस करण्याचं साधन इ.इ. मुळे हे असं घडत असावा असा माझा कयास आहे. बरेच सन्माननिय अपवाद असतीलही, पण बहुतांश ठिकाणी असं घडत हे मात्र खरं.

मन 09/05/2008 - 19:40
ह्ये असेल तुमचे मत. आम्हाला पटत नाही. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

माझेही मन हे मानायला तयार नाही पण कलंत्री साहेब म्हणतात ते काहीसे खरे आहे. शेवटी 'कालाय तस्मै नमः ' हेच खरे. जोपर्यंत मने बदलत नाहीत तोपर्यंत कोण काय करणार. मी पाहील्या आहेत अशा मुली ज्या अगदी मराठी वातावरणात वाढल्या आहेत पण आता अगदी स्वतःला कॉस्मोपॉलिटन म्हणवून घेण्यात धन्य मानतात. मी अगदीच हट्टी आहे मराठीशिवाय इतर भाषेत मी ढीम्म काही बोलत नाही म्हणून उपकार केल्यासारखे माझ्याशी मराठीत बोलतात. असो पण मी तरीही माझा ठेका सोडला नाहीये. मी मराठीतच बोलणार. (हट्टी) पुण्याचे पेशवे

यशोधरा 09/05/2008 - 19:43
नाही हे काही मला. केवळ काही इंग्लिश शब्द येतात म्हणून एखादी व्यक्ती शिकल्यासारखी वाटते, असे कसे म्हणता येईल?

In reply to by यशोधरा

स्वयंभू 09/05/2008 - 20:04
मलाबी हे झेपेश नाय झालं आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

मन 09/05/2008 - 20:25
असाच एक आग्रह माझ्यामाहितीतील एका ताईचा होता. काय , तर म्हणे मुलगा केवळ आय टी वाला हवा. बाकी कुठलाही(अगदी बँक किंवा इतर ठिकाणी मानाचे काम असले तरी नको.) पुढे काय झाले कसे झाले माहित नाही.पण तिचे मत बदलले. इतके, की आय टी वाला नकोच असे म्हणु लागली. (बहुदा माझ्या सारखाच एखादा रिकाम्चोट आणि निरुद्योगी प्राणी तिच्या पाहण्यात आला असावा.) सांगायचे एवढेच, की हे वर वर असलेल्या माहिती मुळे,गैर समजामुळे अशी मागणी होत असावी. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

गृहिणि 09/05/2008 - 21:06
मला वाटतय कि हा प्रश्न सुशिक्षित असण्याचा नसुन भासवण्याचा आहे. म्हणजे नोकरि साठि मुलाखत देताना विशेषतः पहिल्या दुसर्या नोकरिच्या वेळि (जेंव्हा अनुभव कमि असतो), तेन्व्हा एखाद्या फारशि माहिति नसलेल्या विषयाबद्दल प्रश्न विचारले तर अगदिच 'हे' वाटु नये म्हणुन कश्याप्रकारे उत्तर द्यायचि याचा विचार आपण करतो ना. तसच काहिस आहे हे. कंलत्रि ३०-३५ वर्षांपुर्विचि गोष्ट सांगतायत. त्याकाळि लग्न ह्या प्रकारात मुलाकडच्यांचा किति वरचष्मा असायचा हे वेगळ सांगायला नको. मग एखाद्या वधुपित्याने असा सल्ला दिला तर आश्चर्य वाटयाला नको. शिवाय या उपायानेच त्या मुलिच लग्न जमल अस नाहि. फक्त आपल्याकडुन प्रयत्नात कुठल्याहि प्रकारचि कमतरता रहायला नको असा विचार त्या मागे असावा. 'मरता क्या न करता' अश्या प्रकारच्या मनःस्थितित दिलेला सल्ला वाटतो. मला हा सल्ला अजिबात खटकला नाहि उलट ३०-३५ वर्षांपुर्वि हा विचार सुचावा ह्याच अप्रुप वाटल. मला स्वतःला अश्याच प्रकारचा अनुभव आल्यामुळे मला ह्या विचारातलि व्यवहार्यता एकदम पटलि. माझा अनुभव खालि देतेय. १०-१२ वर्षांपुर्वि (मी १२ वित असताना), मला दाढ्दुखिचा त्रास झाला. Govt. Medical College (नागपुरातल) माझ्या शिकवणिच्या वाटेवर असल्यामुळे मी तिथे गेले. पैसे भरणे, X Ray, अजुन काय काय अश्या ५-७ वेगवेगळ्या रांगामध्ये उभे राहिल्यावर शेवटि एकदाच Doctor च दर्शन झाल. माझ्या उपचारासाठि आवश्यक असणार एक उपकरण त्यांच्याकडे नव्हत म्हणुन त्यांनि मला(च!) दुसर्याएका विभागात ते आणायला पाठवल. तिथे incharge असलेलि Doctor अगदिच पोरगेलिशि होति, पण माझ्या एकंदरित अवताराकडे पाहुन (तेल लावुन केसांचि घट्ट वेणि, सुति सलवार कुडता इत्यादि परत त्यात ३-४ तास घालवल्यानंतर आलेल desparation) मला राग द्यायला सुरुवात केलि कि असच कस काय देवु, त्यांनि तुला का पाठवल इत्यादि. ति हिंदित बोलत होति आणि माझ हिंदि काहि फारस चांगल नव्हत म्हणुन मी तिला म्हंटल, " Actually the instrument wasn't available there. Dr. XYZ said it will be better for her if I'll get it so she can check some other patient during that time." इंग्रजिच्या वापराने डाक्तरिण्बाइंच माझ्याबद्दलच मतपरिवर्तन मी त्यांच्या चेहर्यावरच्या झरझर बदलणार्या भावांतुन टिपल. त्यांनिहि मग अजिबात खळखळ न करता ते उपकरण लगेच मला दिल!

भ्रमर 09/05/2008 - 21:43
लहानपणीचा अनुभव. आईच्या डोळ्यांतील वाचलेले भाव. कलंत्रीसाहेब खरोखरच स्तुत्य. अनेक लोक आजही केवळ आपला प्रभाव इतरांवर पडावा यासाठी इंग्रजी शब्दांचा वापर करताना आढळुन येतात. अशा लोकांच्यात न्यूनगंडाची भावना असते त्यामुळेच ते अशी युक्ती वापण्याकडे झुकतात. तुमच्या मामांना तर त्यांच्या मुलीसाठी वरसंशोधन करावयाचे होते. तेही ३०-३५ वर्षांपुर्वी. अशा वेळी वधूपित्याची मानसिक अवस्था निश्चितच अतिशय प्रवाही (मला Volatile म्हणायचेय) असते. त्यावेळी त्यांनी व्यक्त केले ते त्यांचे दृढ मत होते असे म्हणणे त्यांच्यावर अन्याय करणारे ठरेल. त्यांनी समाजात पसरत असलेल्या अयोग्य चालीकडे सर्व उपस्थितांचे लक्ष वेधले असेच म्हणावे लागेल. मला वाटते ते त्यांच्या प्रयत्नात यशस्वीही झाले. त्यावेळी हजर असणाय्रा एका व्यक्तीला ते आवडले नाही आणि तिच्या मुलाने आजन्म मराठी भाषेचा आग्रह धरण्याचे व्रत स्विकारले. यासाठी तुम्ही मामांचे आभार मानावेत ही विनंती. सावरकरांइतका प्रखर आग्रह आणि अभिमान आपल्याला पेलवणे अंमळ कठीणच दिसते. मात्र शक्य तेवढे आपल्या परीने जपायला हवे असे वाटते. मराठीचा (सार्थ) अभिमानी भ्रमर

In reply to by भ्रमर

अशा लोकांच्यात न्यूनगंडाची भावना असते त्यामुळेच ते अशी युक्ती वापण्याकडे झुकतात अशा लोकांपेक्षा आपल्या समाजातच ही न्यूनगंडाची भावना अधिक असते. इंग्रजी भाषेचा वापर अशा लोकांसमोर फार उपयोगी पडतो. भाडणात जर तुम्ही खणखणीत शब्दात प्रवाही इंग्रजीचा वापर केला तर समोरचा अर्धा नरमतो. (कारण त्याचा न्यूनगंड). मुंबई विमानतळावर मी वेटींग लिस्टवर सर्वात वरच्या क्रमांकावर असताना मला डावलून एका एअरलाईन्स कर्मचार्‍याच्या फॅमिलीला सीट दिली आणि मला नकार दिला तेंव्हा मी प्रचंड आरडाओरडा (अर्थात इंग्रजीत) केला. सगळ्या काउंटरवरचे काम थांबून सर्वजण माझा काय प्रॉब्लेम आहे हे पाहू लागले. स्टेशन सुपरिंटेंडन्ट धावत आला. मला शांत करून इकॉनॉमी क्लास मधून फर्स्ट क्लासला प्रमोट करून मला त्याच विमानात जागा मिळवून दिली.

मुक्तसुनीत 09/05/2008 - 23:54
एका साध्या संभाषणामधे अनेक स्तर असू शकतात याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. मुलीचे लग्न "सुस्थळी" व्हावे असे वाटणारा पिता, मग सुस्थळ म्हणजे नक्की काय , ठरविलेल्या लग्नात आधुनिकतेची प्रतिमा निर्माण करणे , एखाद्या इंग्रजी शब्दामुळे कुणी आधुनिक ठरू/दिसू शकेल काय , ठरवून दिलेले लग्न हाच मुळी मनामनांच्या संयोगापेक्षा एक ठरवून दिलेला व्यवहार असतो की काय असे अनेकानेक प्रश्न एका प्रसंगामुळे निर्माण होतात. प्रसंगलेखकाने या सार्‍या गोष्टींच्या मुळाचा , त्यांच्या एकमेकामधे गुंतलेले असण्याचा पुरता छडा लावण्याचा प्रयत्न केला नाही असे मला वाटले. आपल्या मामांबद्दल त्याना वाटणारा स्नेह मी समजू शकतो; पण त्यांना जो द्रष्टेपणा वाटतो , त्यालाच , एका मोठ्या अवकाशामधे संकुचितपणा म्हणावे लागेल का याचा विचार लेखकाने पुरेसा केलेला नाही. कलंत्री यांच्या आईंच्या मनाला नकळत झालेली वेदना आणि केवळ डोळ्यातील भावांवरून त्यांनी वाचलेला मनीचा भाव या गोष्टी हृद्य आहेत, चटका लावणार्‍या आहेत.

कलंत्री 10/05/2008 - 19:18
मला माझा मुद्दा आणि त्यामागचा विचार नेमका मांडता आला नाही असे वाटते. लग्नासारख्या विषयात एक प्रचंड प्रकारची अनिश्चितीतता असतेच असते. कोणा एकाशी सामान्य असताना लग्न करावे आणि काही वर्षात त्याने प्रचंड सुबत्ता मिळवावी ( "मराठी शिकलेला नवरा नको गं बाई" यात चांगले उदाहरण दिले आहेच.) किंवा आपण सामान्यपेक्षा चांगले असताना काही वर्षानंतर आपला जोडीदार विशेषतः आपला नवरा सामान्य असावा , आपल्या मैत्रिणी याबाबतीत कितीतरी पूढे आहेत असे घडताना आपण पाहत असालच. हा मुद्दा अधोरेखीत आहेच. दुसरा म्हणजे ३०/३५ वर्षापूर्वी मुलगा पसंत असेलच तर मुलाला मुली बघण्याचे निमंत्रण दिले जात असे. आता काय परिस्थिती आहे हे माहित नाही. अश्या वेळेस आपली मुलगी एखादा इंग्रजी शब्द वापरत आहे आणि त्याचा प्रभाव अथवा चांगले मत बनत आहे ही कल्पनाच करणे आणि ती प्रत्यक्ष मांडणे, त्याला सर्वांची स्विकृती मिळवणे याचे मला अप्रुप वाटते. त्यासाठी इंग्रजीच्या शिडीचा वापर करणे मला त्याज्य वाटत होते आणि वाटते, असा विचार करणारा आमचा मातृकुलप्रमुख का असेना! आता दुसरा भाग म्हणजे आपण अनेक लग्नपत्रिका क्षमा करा कार्डस् घेत असतो, लग्नामध्ये भाग घेत असतो त्यात अश्या पाट्या, शब्दात इंग्रजीचा वापर करतो अथवा ऐकत असतो. ( बुफे, रिसेप्शन, मॅरेज, हनीमुन, पार्टी, डेट इत्यादी इत्यादी) अश्या इंग्रजीचा सौम्य अथवा तीव्र निषेध करत रहावा अशी माझी अपेक्षा आहे. बाकी काही प्रतिसादांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. भ्रमर : अश्या अनेक घटनानी मला मराठीचा पुरस्कार करण्यास शिकविले. माझ्या मते भाषा आणि आपण याचे आई आणि मुलाचे नाते आहे. मुक्तसुनित : एखाद्या गोष्टीचे महत्व वाढणार आहे हे जाणणारा म्हणजे द्रष्टा. बाकी सर्वांचे विशेष आभार. लग्नासारख्या ठिकाणी म्हणजे मुलीचे लग्न करण्याचा विचार करण्यापासून ते घरात एक बाळ येई पर्यंत मराठीभाषेचाच वापर करा. ही कळकळीची विनंती.

विसोबा खेचर 13/05/2008 - 11:58
भाषा आपल्या सांकृतिक जीवनात कशी ढवळाढवळ करत असते ना? हम्म! खरं आहे...! तात्या.

In reply to by ऋचा

कलंत्री 13/05/2008 - 12:42
ऋचा, थोडे जास्त आणि आपल्या मत, विचार आणि भावना शब्दात अचूक आणि समर्पक पणे व्यक्त करता यायला हवे. नेमके काय पटले नाही, आपला काही अनुकुल / प्रतिकुल अनुभव आणि शेवटी आपले आयुष्य कसे समृध्द होईल असे लिखाणाची अपेक्षा आहे. सर्वात महत्वाचे आपले एकमत कधी अशक्य असेल पण संवाद तर शक्य आहेना.... आपला, कलंत्री

धमाल मुलगा 13/05/2008 - 13:41
कलंत्रीसाहेब, शिर्षकात 'इंग्रजी आलेच पाहिजे' ऐवजी 'इंग्रजी आल्याचे भासवता आले पाहिजे' असं हवं होतं काहो? आपल्याला नसलं पटत, तरीही दुर्दैवानं हे असंच घडतं आहे. शिक्षित म्हणजे इंग्रजी आलंच पाहिजे, किंबहुना, ते आलं तरच शिक्षित, इंप्रेस करण्याचं साधन इ.इ. मुळे हे असं घडत असावा असा माझा कयास आहे. बरेच सन्माननिय अपवाद असतीलही, पण बहुतांश ठिकाणी असं घडत हे मात्र खरं.
(प्रस्तावना : लग्न ही एखाद्या व्यक्तीच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट असते. त्यात कळत नकळतच काही आशय निर्माण होत जातात. या सामाजिक अभिसरण प्रक्रियेत भाषा हा कसा प्रभावशाली भाग बनत आहे यासाठी अनुभवजन्य प्रसंगातून घेतलेला हा मागोवा.) ही गोष्ट अंदाजे २५/३० वर्षांपूर्वीची घडलेली आहे. आमच्या मामा आणि मावश्यांचे एक बरे मोठे असे कुटुंब होते. ( त्यातले बरेचसे काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. ) तर अश्याच एका सुट्टीमध्ये माझी सर्व भावंडे, मी आणि माझी आई माझ्या मामाकडे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामाकडे गेलो होतो. मामा आणि माझ्या ५ मावश्या अश्याच गप्पागोष्टी करत होते.

तुझ्यावीना मी कसा जगलो (भाग - १)

नि३ ·

नि३ 09/05/2008 - 20:33
वाईट असो वा चांगली आपल्या प्रतीक्रीयेच्या प्रतीक्षेत.................... (संत्राच्या बागेत रमणारा) नितिन

नि३ 09/05/2008 - 20:33
वाईट असो वा चांगली आपल्या प्रतीक्रीयेच्या प्रतीक्षेत.................... (संत्राच्या बागेत रमणारा) नितिन
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज समीरचे कामात लक्षच लागत नव्ह्ते आज ऑफीसमधे पुन्हा त्याला so called analysis of code चे काम मिळाले होते.जेव्हा तो कंपनी मधे कामावर रुजु झाला होता तेव्हा तो खुप उत्सुक होता काही चांगले काम करण्याकरीता पण खुपलवकरच त्याला वास्तवाची जाण आली. सॉफ्टवेअर कंपनी म्हणजे एक मॄगजळ आहे जे दुरुणच चांगले वाटते हे तो लवकरच जाणुन चुकला. तर तो पुन्हा तेच crap work करत बसला होता.सेकंड शिफ्ट होती (दुपारी २.०० ते १०.३०) ह्या शिफ्ट चा एक फायदा जरुर असतो कि हे PL,ML लोक चांगले आपल्या सोयीनुसार जनरल शिफ्ट मधे येतात(सकाळी ९.०० ते६.००)आणि ६ वाजता निघुन जातात.