मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नमस्कार !!

पल्लवी ·

आनंदयात्री Fri, 05/09/2008 - 11:41
धमुदादा बद्दलचे मत पटले :) आमच्या वैनीबाईंना आज फोन टाकणार आहे :) फार दिवस झाले त्यांच्याशी गपा मारुन .. विचारीन लग्नाची तयारी कुठपर्यन्त आली ... सांगिन म्हणतो मिपावरच्या ४ गोष्टी ... (धमुदादा ... एक .. दोन .. तीन ) नवागतांसाठी: वैनीबाई म्हणजे सौभाग्यकांक्षिणी धमाल हो (थोडक्यात धमी) =))

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा Fri, 05/09/2008 - 12:14
आमच्या वैनीबाईंना आज फोन टाकणार आहे
निवांत गप्पा मार...पण लेका कागाळ्या करु नकोस...आजच चाललोय पुण्याला...पोचल्यापोचल्या जोडे खावे लागतील ;)
(थोडक्यात धमी)
=)) अ...श...क्य आहेस रे बबड्या तू!!! आता तिला अशीच हाक मारेन :))

धमाल मुलगा Fri, 05/09/2008 - 12:31
पल्लवीताई , आपलं मिपावर हार्दिक्क स्वाग्गत्त्त असो!! :) अशीच येत रहा, हसत रहा, खेळत रहा, सगळ्या चिंता विसरुन आनंदी रहा!!!! सुरुवात तुझ्याच ता.क. ने करतो :) मला नाही चालणार अरे तुरे केलेलं........धावेल...पळेल :)
"दादा" म्हणताना म'णा'ला काय वेद'णा' होतात....
नाहीच म्हणायचं मग...धम्या म्हण..धमाल्या म्हण... :)
धमुदादा, ही "तैलबुद्धी "कुठुन मिळवलीस बुवा !?
तैलबुध्दी???? हे काय असतं बॉ? आमच्या ल्हानपणी म्हातारीनं टाळू भरली त्यानंतर तेलच नाही लावलं, मग बुध्दीपर्यंत पोचेलच कसं ? काही नाही, अखिल भारतीय टवाळ मित्रमंडळाचा आजीवन सदस्य आहे, उगाच मारायच्या काहीतरी कोलांट्या झालं!
इथे लांबट चेहरे बघुन काव आलेला असताना तुझे एक-एक विनोद ऐकुन लै लै फरेश वाटतं बघ !
हे वाचून जिवाचं सार्थक झालं बॉ!
डांबिस काका ! खरंतर "काका" च्या आधी डाम्बिस लावायला कसंनुसं वाटतं हो !
वयाचा आदर ठेवायचा असतो म्हणून काका म्हणायचं नाहीतर....पोरासोरांना लाजवेल असा धूडगुस घालतो हा माणूस. तेव्हढाच तरलही लिहितो.
श्री. श्री.श्री. प.पू. तात्यारामजी बापू यांचे चरणी शतशः नमन !!
अग्ग्ग्गायायाया.....तात्या मला तुम्ही आसारामशेठ सारखे दिसायला लागलात हो :)) बाकी पल्लवीताई, आपल्या दोन दोन स्वातीताई पण सुगरण नंबर वन आहेत हो. आणि भडकमकर मास्तरांना बरी विसरलीस? लिही लिही, ह्यांच्यावरपण काहीतरी छान लिही :) मनोबा पण छान लिहितो हं...झालंच तर....(छ्या: प्रतिसाद देतोय का श्रेयनामावली? किती किती म्हणून नावं सांगू?) आपल्या प्रमोदकाकांचे लेख वाचलेस का? नितांत सुंदर लिहितात हो ते!
मी पण येणार मिपा कट्ट्यावर गप्पा झोडायला. तुम्ही सगळे (वर उल्लेख असलेले आणि नसलेले ) मला बापडीला सामावून घ्याल अशी आशा नव्हे, खात्री आहे.
हॅट्ट! हे असं फॉर्मॅलिटीत विचारलंस तर कोणीच नाही घेणार तुला :) यायचं आणि सुरु व्हायचं, कसें ? :D -(मोकळाढाकळा) ध मा ल.

मन Fri, 05/09/2008 - 13:04
सुस्वागतम पल्लवी. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

इनोबा म्हणे Fri, 05/09/2008 - 13:16
हॅट्ट! हे असं फॉर्मॅलिटीत विचारलंस तर कोणीच नाही घेणार तुला यायचं आणि सुरु व्हायचं, कसें ? इनोबा पण हेच म्हणे वैनीबाई म्हणजे सौभाग्यकांक्षिणी धमाल हो (थोडक्यात धमी) =)) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विसोबा खेचर Fri, 05/09/2008 - 15:41
असो. पण तात्यांना नमस्कार केल्याशिवाय कसं जाणार ? तर, श्री. श्री.श्री. प.पू. तात्यारामजी बापू यांचे चरणी शतशः नमन !! मी तुमचा ब्लॉगही अथपासुन इतिपर्यंत वाचला. नितांत सुन्दर लिहिता तुम्ही तात्या. आणि त्यात पु.लं. ची झाक येत असली तरी, येउ द्यात कि हो.. तेवढाच पुनःप्रत्ययाचा आनंद !! धन्यवाद पल्लवी, मिपावर मनापासून स्वागत...! आपला, (भाईकाकांचा शिष्य) तात्यारामजी बापू. :)

शितल Fri, 05/09/2008 - 17:40
द॑गेखोरा॑च्या टोळीत तुझे स्वागत आहे. नियम मात्र एक स्वतः आन॑द(कोणाचे नाव नव्हे) घ्या आणि दुसर्‍याला आन॑द द्या.

चतुरंग Fri, 05/09/2008 - 18:03
मिपा वर चौरंगी स्वागत! (स्वगत - माझ्यावर लिहायचं म्हणते आहे, काय लिहितेय कोण जाणे? चिंता लागून राहिली आहे! :? ) चतुरंग

पिवळा डांबिस Sat, 05/10/2008 - 02:06
तुमचं मिपाअड्डयावर स्वागत आहे. तुम्ही नवीन आहांत म्हणून सांगतो, इथे तसे दोन ग्रुप आहेत. एक म्हणजे चतुरंग, पेठकरकाका, सन्जोपराव, बिरुटेसर, भडक मकर, इत्यादि गंभीर आणि विद्वत्ताप्रचुर (जे एटले सूं हायकलास!!) लोकांचा घोळका, आणि मग मी, डॉन्या, धमाल्या, इनोबा, विजुभाऊ, इत्यादि टवाळखोरांचं टोळकं!!:)) तात्याश्री महाराज प्रसंग पाहून तळ्यात-मळ्यात करतात!! हल्ली त्यांचा बराचसा वेळ सरपंचांची लाठी फिरवण्यातच जातो!!:) तुम्हाला इंटरेस्ट असेल तर चारोळ्या (अरे देवा! आयडिया तर देत नाही ना मी कोणाला!!), रेसेपी, वगैरेचाही वर्ग आहे. "दोन सुलट्-तीन उलट" वगैरे विणकाम अजून तरी पहिलं नाही!!:) डांबिस काका ! खरंतर "काका" च्या आधी डाम्बिस लावायला कसंनुसं वाटतं हो ! मग नका लावू! सरळ "डांबिस" म्हणा! हे काका वगैरे काय खरं नाय हो!! त्या प्राजुची करणी आणि भोगायला फळं लागतायत आम्हांला!! वैनीबाई म्हणजे सौभाग्यकांक्षिणी धमाल हो (थोडक्यात धमी) हा, हा, हा!!!:)) धम्याची धमी!! हा धम्या जोडे खाणार आज! ते ही लेडीज खेटरं!!:)) पोरासोरांना लाजवेल असा धूडगुस घालतो हा माणूस. कोण म्हणतोय रे ते असं? खोट्टं-नाट्टं सांगतात मेले!! मी कधीपासून इथे आपला हाताची घडी-तोंडावर बोट घेऊन उभा आहे!! असो. पल्लवी तुमचे पुन्हा स्वागत! ही मिसळ तुम्हांला (तर्रीसकट) आवडो! -पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

प्रभाकर पेठकर Sat, 05/10/2008 - 08:44
एक म्हणजे चतुरंग, पेठकरकाका, सन्जोपराव, बिरुटेसर, भडक मकर, इत्यादि गंभीर आणि विद्वत्ताप्रचुर (जे एटले सूं हायकलास!!) लोकांचा घोळका, च्यायला, आता काहीतरी झणझणीत आणि खणखणीत लिहावं लागणार. लोकांचा फारच गैरसमज व्हायला लागलाय की....

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर Sun, 05/11/2008 - 13:30
तात्याश्री महाराज प्रसंग पाहून तळ्यात-मळ्यात करतात!! हल्ली त्यांचा बराचसा वेळ सरपंचांची लाठी फिरवण्यातच जातो!! सह्ही रे डांबिसा.. :)

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग Sun, 05/11/2008 - 20:24
एक म्हणजे चतुरंग, पेठकरकाका, सन्जोपराव, बिरुटेसर, भडक मकर, इत्यादि गंभीर आणि विद्वत्ताप्रचुर (जे एटले सूं हायकलास!!) लोकांचा घोळका गंभीर आणि विद्वत्ताप्रचुर काय!? ओ, डांबिसकाका, डांबिसपंत, डांबिसराव, डांबिसअण्णा तुम्हाला कोणत्या अँगलमधून मी गंभीर दिसलो हो? हे म्हणजे कसं झालं माहीत आहे का, आम्ही दंगाधोपा करायला येणार आणि हे म्हणणार आता आमची धुळवड करुन झाली, आता काय उपयोग! (स्वगत - गैरसमज दूर करायला काय करावं बरं? एखादं विडंबन टाकू की काय? कच्चा माल शोधायला हवा... :W ) चतुरंग

In reply to by पिवळा डांबिस

एक म्हणजे चतुरंग, पेठकरकाका, सन्जोपराव, बिरुटेसर, भडक मकर, इत्यादि गंभीर आणि विद्वत्ताप्रचुर (जे एटले सूं हायकलास!!) लोकांचा घोळका डांबिसराव, आम्ही गंभीर / विद्वत्ताप्रचुर आहोत असे म्हणुन आपण आमच्यावर जो गंभीर आरोप करत आहात त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. :) आम्हाला लवकरच संकेतस्थळावरील संत दिलीप बिरुटे यांच्याशी संकेतस्थळावरील रामेश्वर भट, मंबाजी गोसावी यांचा असामाजिक व्यवहार अशा एका विषयावर अभ्यासपुर्ण लिहिण्याची वेळ आले आहे असे वाटते. ;)

In reply to by वरदा

पिवळा डांबिस Sat, 05/10/2008 - 08:59
मला तर मज्जा वाटते काका म्हणायला.. तुला तर फटके मारले पाहिजेत! आता या नव्या पल्लवींबरोबर सांगणं ठीक होणार नाही म्हणून!!!:)

छोटा डॉन Sat, 05/10/2008 - 12:34
पल्लवी , आपलं मिपावर सहर्ष स्वागत आहे ! अशीच येत रहा, हसत रहा, खेळत रहा, सगळ्या चिंता विसरुन आनंदी रहा!!!! मिपा त्यासाठीच तर आहे ... खरंच, इथे आल्यापासुन ते आत्तापर्यंत त्रयस्थपणा कधी वाटलाच नाही. त्रयस्थपणा वाटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एकदम मोकळढाकळं रहा , कसे ! काय मनमुराद दंगा घालता तुम्ही सगळे.. लै आवडलं आपल्याला.. ही गोष्ट खरी आहे की मस्त मज्जा करतो, दंगा घालतो, झालच तर गजाल्या करतो पण हाच एकमेव उद्देश नाही मिपाचा, त्याचबरोबर आपल्याला असलेले ज्ञान दुसर्‍याला वाटतो, समाजकारण; राजकारण; अर्थकारण ह्यावरही अत्यंत सखोल आणि मार्गदर्शक चर्चा पण इथे होते हे पण आपल्या निदर्शनास आले असेलच .... बाकी कुणाला दादा, काका, मामा म्हणून आदर द्यायची गरज नाही, तो तुमच्या लिहण्यातुन व वागण्यातुन दिसणे अपेक्षित आहे ... स्वगत : च्यायला एकेकाळी लोकांनी "डॉनकाका" करुन डोक्याला काव आणला होता बाकी आमच्या "डांबिसकाका " [ च्यायला काका शब्दावर काट मारलेली दाखवायची सोय करायला निलकांतला सांगायला हवे ] मिपाच्या इतर टोळक्यांबद्दल व टवाळखोरांबद्दल सांगितलेच आहे. त्यापेक्षा मी अधिक काय बोलणार ? श्री. श्री.श्री. प.पू. संत तात्याकाम जाबाली ह्यांच्याबद्दल मी काय लिहणार ? आपण त्यांचा ब्लॉग व इथले लिखाण वाचले आहेच, त्यावरून त्यांच्या सामर्थ्याची कल्पना आलीच असेल. आता वर समावेश नसलेल्या परंतु चांगले लिहणारे एकदम मनमोकळे लोक म्हणजे "सर्कीट, प्राजू, आजानुकर्ण, निलकांत, आंद्या, जपानवाल्या स्वातीताई, ऑफीसात टाईमपासवाली वरदा, कोण काय खाते विचारणारी मनस्वी, स्वयंभू, अबबराव " ही पण मिपाच्या अनेक "रत्नांपैकी" काही नावे आहेत .... मी पण येणार मिपा कट्ट्यावर गप्पा झोडायला. तुम्ही सगळे (वर उल्लेख असलेले आणि नसलेले ) मला बापडीला सामावून घ्याल अशी आशा नव्हे, खात्री आहे. बस क्या, यहीच इज्जत की क्या आपुनकी ? आनेका, पढनेका, लिखनेका, हसनेका, रोनेका, टेन्शन नही लेनेका एकदम मोकळढाकळ रहनेका ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

अवलिया Sat, 05/10/2008 - 17:45
च्यायला :''( आजकाल मी जरा कमी येतो तर मला विसरुनच चालले लोक? हे काय खरे नाही एक नवीन भविष्यवाणी केलीच पाहिजे :P नाना

पल्लवी Mon, 05/12/2008 - 08:56
किती पटर-पटर करता रे... येवढाले रिप्लाय.. आपलं ते प्रतिसाद हो.. च्यायला, मागे २ कविता टाकल्या, त्याकडे कुनि ढुंकुन नाय पायलं ओ.. आता गप्पा हाणायला, सगळे पुढे लेकाचे.. :) डांबिस कुठले.. ओ काका तुम्हाला नाय बरका> आपलं मन कसं भरुन आलं बघा.. वा वा.. येवढं कौतिक होत नाय न कुणिकडं... असो.. आणि मी अत्ताच सान्गुन ठेवते काय.. (डिसक्लेमर कि काय म्हणतात ते) मला "पल्लवी ताई", "अहो पल्लवी", "तुम्ही" असलं विचित्र काय म्हणु नका बुआ.. यु सी.. यु सी.. आय अम जस्ट १६ यु सी.. सरळ पल्लवी म्हणा.. किंवा गेला बाजार, पल्ल + (ए/ई/आय/ओ/यु) ही चालेल. तसं तर सगळे म्हणजे सगळे प्रतिसाद वाचुन झ्याक वाटलं.. व्वा.. एवढ्या सगळ्या जणांचा मराठी ग्रुप..माझा ग्रुप !! बाकी, पेठकर काका, व्वा...! वसंत संपला आणि मिपाला पालवी फुटली. ह्या इवल्या नवचैतन्याचे स्वागत असो. हेहेहेहेहेहेहेहे.. हसुन हसुन पुरेवाट झाली हो.. अहो, इथे बसुन बसुन "वाढता वाढता वाढे" चाललय अहो.. आय्.टी मधे अजुन काय होणार म्हणा? पैसा बक्कळ देतात.. (किंवा असं बाकीच्यांना वाटतं) आणि तब्येतीची लागते वाट.. असो.. विषयांतर जहाले.. चला, मी आत्तापुरती कटते इथुन.. येइन अधेमधे.. टाटू... चांगला दिवस.. गुड-डे !!! :) :)

आनंदयात्री Fri, 05/09/2008 - 11:41
धमुदादा बद्दलचे मत पटले :) आमच्या वैनीबाईंना आज फोन टाकणार आहे :) फार दिवस झाले त्यांच्याशी गपा मारुन .. विचारीन लग्नाची तयारी कुठपर्यन्त आली ... सांगिन म्हणतो मिपावरच्या ४ गोष्टी ... (धमुदादा ... एक .. दोन .. तीन ) नवागतांसाठी: वैनीबाई म्हणजे सौभाग्यकांक्षिणी धमाल हो (थोडक्यात धमी) =))

In reply to by आनंदयात्री

धमाल मुलगा Fri, 05/09/2008 - 12:14
आमच्या वैनीबाईंना आज फोन टाकणार आहे
निवांत गप्पा मार...पण लेका कागाळ्या करु नकोस...आजच चाललोय पुण्याला...पोचल्यापोचल्या जोडे खावे लागतील ;)
(थोडक्यात धमी)
=)) अ...श...क्य आहेस रे बबड्या तू!!! आता तिला अशीच हाक मारेन :))

धमाल मुलगा Fri, 05/09/2008 - 12:31
पल्लवीताई , आपलं मिपावर हार्दिक्क स्वाग्गत्त्त असो!! :) अशीच येत रहा, हसत रहा, खेळत रहा, सगळ्या चिंता विसरुन आनंदी रहा!!!! सुरुवात तुझ्याच ता.क. ने करतो :) मला नाही चालणार अरे तुरे केलेलं........धावेल...पळेल :)
"दादा" म्हणताना म'णा'ला काय वेद'णा' होतात....
नाहीच म्हणायचं मग...धम्या म्हण..धमाल्या म्हण... :)
धमुदादा, ही "तैलबुद्धी "कुठुन मिळवलीस बुवा !?
तैलबुध्दी???? हे काय असतं बॉ? आमच्या ल्हानपणी म्हातारीनं टाळू भरली त्यानंतर तेलच नाही लावलं, मग बुध्दीपर्यंत पोचेलच कसं ? काही नाही, अखिल भारतीय टवाळ मित्रमंडळाचा आजीवन सदस्य आहे, उगाच मारायच्या काहीतरी कोलांट्या झालं!
इथे लांबट चेहरे बघुन काव आलेला असताना तुझे एक-एक विनोद ऐकुन लै लै फरेश वाटतं बघ !
हे वाचून जिवाचं सार्थक झालं बॉ!
डांबिस काका ! खरंतर "काका" च्या आधी डाम्बिस लावायला कसंनुसं वाटतं हो !
वयाचा आदर ठेवायचा असतो म्हणून काका म्हणायचं नाहीतर....पोरासोरांना लाजवेल असा धूडगुस घालतो हा माणूस. तेव्हढाच तरलही लिहितो.
श्री. श्री.श्री. प.पू. तात्यारामजी बापू यांचे चरणी शतशः नमन !!
अग्ग्ग्गायायाया.....तात्या मला तुम्ही आसारामशेठ सारखे दिसायला लागलात हो :)) बाकी पल्लवीताई, आपल्या दोन दोन स्वातीताई पण सुगरण नंबर वन आहेत हो. आणि भडकमकर मास्तरांना बरी विसरलीस? लिही लिही, ह्यांच्यावरपण काहीतरी छान लिही :) मनोबा पण छान लिहितो हं...झालंच तर....(छ्या: प्रतिसाद देतोय का श्रेयनामावली? किती किती म्हणून नावं सांगू?) आपल्या प्रमोदकाकांचे लेख वाचलेस का? नितांत सुंदर लिहितात हो ते!
मी पण येणार मिपा कट्ट्यावर गप्पा झोडायला. तुम्ही सगळे (वर उल्लेख असलेले आणि नसलेले ) मला बापडीला सामावून घ्याल अशी आशा नव्हे, खात्री आहे.
हॅट्ट! हे असं फॉर्मॅलिटीत विचारलंस तर कोणीच नाही घेणार तुला :) यायचं आणि सुरु व्हायचं, कसें ? :D -(मोकळाढाकळा) ध मा ल.

मन Fri, 05/09/2008 - 13:04
सुस्वागतम पल्लवी. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

इनोबा म्हणे Fri, 05/09/2008 - 13:16
हॅट्ट! हे असं फॉर्मॅलिटीत विचारलंस तर कोणीच नाही घेणार तुला यायचं आणि सुरु व्हायचं, कसें ? इनोबा पण हेच म्हणे वैनीबाई म्हणजे सौभाग्यकांक्षिणी धमाल हो (थोडक्यात धमी) =)) कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

विसोबा खेचर Fri, 05/09/2008 - 15:41
असो. पण तात्यांना नमस्कार केल्याशिवाय कसं जाणार ? तर, श्री. श्री.श्री. प.पू. तात्यारामजी बापू यांचे चरणी शतशः नमन !! मी तुमचा ब्लॉगही अथपासुन इतिपर्यंत वाचला. नितांत सुन्दर लिहिता तुम्ही तात्या. आणि त्यात पु.लं. ची झाक येत असली तरी, येउ द्यात कि हो.. तेवढाच पुनःप्रत्ययाचा आनंद !! धन्यवाद पल्लवी, मिपावर मनापासून स्वागत...! आपला, (भाईकाकांचा शिष्य) तात्यारामजी बापू. :)

शितल Fri, 05/09/2008 - 17:40
द॑गेखोरा॑च्या टोळीत तुझे स्वागत आहे. नियम मात्र एक स्वतः आन॑द(कोणाचे नाव नव्हे) घ्या आणि दुसर्‍याला आन॑द द्या.

चतुरंग Fri, 05/09/2008 - 18:03
मिपा वर चौरंगी स्वागत! (स्वगत - माझ्यावर लिहायचं म्हणते आहे, काय लिहितेय कोण जाणे? चिंता लागून राहिली आहे! :? ) चतुरंग

पिवळा डांबिस Sat, 05/10/2008 - 02:06
तुमचं मिपाअड्डयावर स्वागत आहे. तुम्ही नवीन आहांत म्हणून सांगतो, इथे तसे दोन ग्रुप आहेत. एक म्हणजे चतुरंग, पेठकरकाका, सन्जोपराव, बिरुटेसर, भडक मकर, इत्यादि गंभीर आणि विद्वत्ताप्रचुर (जे एटले सूं हायकलास!!) लोकांचा घोळका, आणि मग मी, डॉन्या, धमाल्या, इनोबा, विजुभाऊ, इत्यादि टवाळखोरांचं टोळकं!!:)) तात्याश्री महाराज प्रसंग पाहून तळ्यात-मळ्यात करतात!! हल्ली त्यांचा बराचसा वेळ सरपंचांची लाठी फिरवण्यातच जातो!!:) तुम्हाला इंटरेस्ट असेल तर चारोळ्या (अरे देवा! आयडिया तर देत नाही ना मी कोणाला!!), रेसेपी, वगैरेचाही वर्ग आहे. "दोन सुलट्-तीन उलट" वगैरे विणकाम अजून तरी पहिलं नाही!!:) डांबिस काका ! खरंतर "काका" च्या आधी डाम्बिस लावायला कसंनुसं वाटतं हो ! मग नका लावू! सरळ "डांबिस" म्हणा! हे काका वगैरे काय खरं नाय हो!! त्या प्राजुची करणी आणि भोगायला फळं लागतायत आम्हांला!! वैनीबाई म्हणजे सौभाग्यकांक्षिणी धमाल हो (थोडक्यात धमी) हा, हा, हा!!!:)) धम्याची धमी!! हा धम्या जोडे खाणार आज! ते ही लेडीज खेटरं!!:)) पोरासोरांना लाजवेल असा धूडगुस घालतो हा माणूस. कोण म्हणतोय रे ते असं? खोट्टं-नाट्टं सांगतात मेले!! मी कधीपासून इथे आपला हाताची घडी-तोंडावर बोट घेऊन उभा आहे!! असो. पल्लवी तुमचे पुन्हा स्वागत! ही मिसळ तुम्हांला (तर्रीसकट) आवडो! -पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

प्रभाकर पेठकर Sat, 05/10/2008 - 08:44
एक म्हणजे चतुरंग, पेठकरकाका, सन्जोपराव, बिरुटेसर, भडक मकर, इत्यादि गंभीर आणि विद्वत्ताप्रचुर (जे एटले सूं हायकलास!!) लोकांचा घोळका, च्यायला, आता काहीतरी झणझणीत आणि खणखणीत लिहावं लागणार. लोकांचा फारच गैरसमज व्हायला लागलाय की....

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर Sun, 05/11/2008 - 13:30
तात्याश्री महाराज प्रसंग पाहून तळ्यात-मळ्यात करतात!! हल्ली त्यांचा बराचसा वेळ सरपंचांची लाठी फिरवण्यातच जातो!! सह्ही रे डांबिसा.. :)

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग Sun, 05/11/2008 - 20:24
एक म्हणजे चतुरंग, पेठकरकाका, सन्जोपराव, बिरुटेसर, भडक मकर, इत्यादि गंभीर आणि विद्वत्ताप्रचुर (जे एटले सूं हायकलास!!) लोकांचा घोळका गंभीर आणि विद्वत्ताप्रचुर काय!? ओ, डांबिसकाका, डांबिसपंत, डांबिसराव, डांबिसअण्णा तुम्हाला कोणत्या अँगलमधून मी गंभीर दिसलो हो? हे म्हणजे कसं झालं माहीत आहे का, आम्ही दंगाधोपा करायला येणार आणि हे म्हणणार आता आमची धुळवड करुन झाली, आता काय उपयोग! (स्वगत - गैरसमज दूर करायला काय करावं बरं? एखादं विडंबन टाकू की काय? कच्चा माल शोधायला हवा... :W ) चतुरंग

In reply to by पिवळा डांबिस

एक म्हणजे चतुरंग, पेठकरकाका, सन्जोपराव, बिरुटेसर, भडक मकर, इत्यादि गंभीर आणि विद्वत्ताप्रचुर (जे एटले सूं हायकलास!!) लोकांचा घोळका डांबिसराव, आम्ही गंभीर / विद्वत्ताप्रचुर आहोत असे म्हणुन आपण आमच्यावर जो गंभीर आरोप करत आहात त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. :) आम्हाला लवकरच संकेतस्थळावरील संत दिलीप बिरुटे यांच्याशी संकेतस्थळावरील रामेश्वर भट, मंबाजी गोसावी यांचा असामाजिक व्यवहार अशा एका विषयावर अभ्यासपुर्ण लिहिण्याची वेळ आले आहे असे वाटते. ;)

In reply to by वरदा

पिवळा डांबिस Sat, 05/10/2008 - 08:59
मला तर मज्जा वाटते काका म्हणायला.. तुला तर फटके मारले पाहिजेत! आता या नव्या पल्लवींबरोबर सांगणं ठीक होणार नाही म्हणून!!!:)

छोटा डॉन Sat, 05/10/2008 - 12:34
पल्लवी , आपलं मिपावर सहर्ष स्वागत आहे ! अशीच येत रहा, हसत रहा, खेळत रहा, सगळ्या चिंता विसरुन आनंदी रहा!!!! मिपा त्यासाठीच तर आहे ... खरंच, इथे आल्यापासुन ते आत्तापर्यंत त्रयस्थपणा कधी वाटलाच नाही. त्रयस्थपणा वाटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एकदम मोकळढाकळं रहा , कसे ! काय मनमुराद दंगा घालता तुम्ही सगळे.. लै आवडलं आपल्याला.. ही गोष्ट खरी आहे की मस्त मज्जा करतो, दंगा घालतो, झालच तर गजाल्या करतो पण हाच एकमेव उद्देश नाही मिपाचा, त्याचबरोबर आपल्याला असलेले ज्ञान दुसर्‍याला वाटतो, समाजकारण; राजकारण; अर्थकारण ह्यावरही अत्यंत सखोल आणि मार्गदर्शक चर्चा पण इथे होते हे पण आपल्या निदर्शनास आले असेलच .... बाकी कुणाला दादा, काका, मामा म्हणून आदर द्यायची गरज नाही, तो तुमच्या लिहण्यातुन व वागण्यातुन दिसणे अपेक्षित आहे ... स्वगत : च्यायला एकेकाळी लोकांनी "डॉनकाका" करुन डोक्याला काव आणला होता बाकी आमच्या "डांबिसकाका " [ च्यायला काका शब्दावर काट मारलेली दाखवायची सोय करायला निलकांतला सांगायला हवे ] मिपाच्या इतर टोळक्यांबद्दल व टवाळखोरांबद्दल सांगितलेच आहे. त्यापेक्षा मी अधिक काय बोलणार ? श्री. श्री.श्री. प.पू. संत तात्याकाम जाबाली ह्यांच्याबद्दल मी काय लिहणार ? आपण त्यांचा ब्लॉग व इथले लिखाण वाचले आहेच, त्यावरून त्यांच्या सामर्थ्याची कल्पना आलीच असेल. आता वर समावेश नसलेल्या परंतु चांगले लिहणारे एकदम मनमोकळे लोक म्हणजे "सर्कीट, प्राजू, आजानुकर्ण, निलकांत, आंद्या, जपानवाल्या स्वातीताई, ऑफीसात टाईमपासवाली वरदा, कोण काय खाते विचारणारी मनस्वी, स्वयंभू, अबबराव " ही पण मिपाच्या अनेक "रत्नांपैकी" काही नावे आहेत .... मी पण येणार मिपा कट्ट्यावर गप्पा झोडायला. तुम्ही सगळे (वर उल्लेख असलेले आणि नसलेले ) मला बापडीला सामावून घ्याल अशी आशा नव्हे, खात्री आहे. बस क्या, यहीच इज्जत की क्या आपुनकी ? आनेका, पढनेका, लिखनेका, हसनेका, रोनेका, टेन्शन नही लेनेका एकदम मोकळढाकळ रहनेका ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

अवलिया Sat, 05/10/2008 - 17:45
च्यायला :''( आजकाल मी जरा कमी येतो तर मला विसरुनच चालले लोक? हे काय खरे नाही एक नवीन भविष्यवाणी केलीच पाहिजे :P नाना

पल्लवी Mon, 05/12/2008 - 08:56
किती पटर-पटर करता रे... येवढाले रिप्लाय.. आपलं ते प्रतिसाद हो.. च्यायला, मागे २ कविता टाकल्या, त्याकडे कुनि ढुंकुन नाय पायलं ओ.. आता गप्पा हाणायला, सगळे पुढे लेकाचे.. :) डांबिस कुठले.. ओ काका तुम्हाला नाय बरका> आपलं मन कसं भरुन आलं बघा.. वा वा.. येवढं कौतिक होत नाय न कुणिकडं... असो.. आणि मी अत्ताच सान्गुन ठेवते काय.. (डिसक्लेमर कि काय म्हणतात ते) मला "पल्लवी ताई", "अहो पल्लवी", "तुम्ही" असलं विचित्र काय म्हणु नका बुआ.. यु सी.. यु सी.. आय अम जस्ट १६ यु सी.. सरळ पल्लवी म्हणा.. किंवा गेला बाजार, पल्ल + (ए/ई/आय/ओ/यु) ही चालेल. तसं तर सगळे म्हणजे सगळे प्रतिसाद वाचुन झ्याक वाटलं.. व्वा.. एवढ्या सगळ्या जणांचा मराठी ग्रुप..माझा ग्रुप !! बाकी, पेठकर काका, व्वा...! वसंत संपला आणि मिपाला पालवी फुटली. ह्या इवल्या नवचैतन्याचे स्वागत असो. हेहेहेहेहेहेहेहे.. हसुन हसुन पुरेवाट झाली हो.. अहो, इथे बसुन बसुन "वाढता वाढता वाढे" चाललय अहो.. आय्.टी मधे अजुन काय होणार म्हणा? पैसा बक्कळ देतात.. (किंवा असं बाकीच्यांना वाटतं) आणि तब्येतीची लागते वाट.. असो.. विषयांतर जहाले.. चला, मी आत्तापुरती कटते इथुन.. येइन अधेमधे.. टाटू... चांगला दिवस.. गुड-डे !!! :) :)
नमस्कार मंडळी ! मी पल्लवी.. मिपाचं सदस्यत्व घेउन २-३ आठवडे झालेत आणि ह्या दिवसांत इथे मनसोक्त भटकंती केली आणि हापिसातली टाळकी माझ्यावर हसेपर्यंत खो खो खिदळून घेतलं.. :) म्हटलं आज औपचारिक राम-राम करुनच टाकावा.. खरंच, इथे आल्यापासुन ते आत्तापर्यंत त्रयस्थपणा कधी वाटलाच नाही. काय मनमुराद दंगा घालता तुम्ही सगळे.. लै आवडलं आपल्याला.. :) आता इथे हिंडताना भेटलेल्या आणि आवडलेल्या (;)) लोकांबद्दल. सुरुवात कुठुन करावी ह्या विचारात असताना, आधी डोक्यात आला धमुदादा.. ("दादा" म्हणताना म'णा'ला काय वेद'णा' होतात. : पण काय करणार ? धमुदादाचं लग्न (३ भागांत) उरकलंनीत की तुम्ही..

पिसि जेसि चा पुढला भाग.

रामदास ·

प्रभाकर पेठकर Sat, 05/10/2008 - 10:49
वाचताना अंगावर काटा येतो. क्षणाक्षणातले विचार आणि घटना मांडण्याची घाटणी मस्त आहे. आवडली. क्वचित, कोण, कोणाला बोलतय ह्याचा गोंधळ होतो. बाकी लेखन प्रभावशाली झाले आहे. अभिनंदन. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. (असेल तर. कारण 'क्रमशः' लिहीलेले नाही.)

अभिज्ञ Sat, 05/10/2008 - 11:20
अभिनंदन.लेखन छान झालेय.कुठली तरी कादंबरि वाचतोय असाच भास होतो. लिखाणाची शैली आवडली.वाचताना "पुढे काय ?"अशी सतत उत्सुकता लागून रहाते. मागचा भागहि छानच झाला आहे. असेच लेखन येउद्यात. .... अबब

राजे Sat, 05/10/2008 - 12:20
अबब शी सहमत. खरोखरचा अनुभव आहे की कल्पनाविलास ? हा एक प्रश्न मनी राहीला आहे ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मन Sat, 05/10/2008 - 15:03
आता थोड थोडं कळु लागलं आहे. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

भडकमकर मास्तर Sat, 05/10/2008 - 15:18
ओहो, रामदास साहेब, मस्त झालंय... लिहा अजून लिहा.... पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत...( आणि नक्की अपहार कसा झालाय हे समजून घ्यायच्या प्रतीक्षेत) .... ( प्रथम पुरुषी लिहिल्यामुळे ही कथा भलतीच अंगावर येते.. असे आमचे निरीक्षण आहे)

झकासराव Sat, 05/10/2008 - 17:27
आता उत्कंठा वाढली आहे. :) पहिल्या भागात वाचताना अस वाटल होत कथा सांगणार्‍याच पोलिसाबरोबर सेटिंग आहे म्हणून तो टेन्शन फ्री आहे पण ह्या भागात तर त्याला पण घेतला की. हाणामारीच वर्णन डेंजर हाय राव. नुसत वाचुन भ्या वाटल. पुढचा भाग येवु दे. अवांतर :चेक फोर्जरीच्या सत्यकथांवर ह्या आधी (बरेच वर्ष झाले म्हणा) एक पुस्तकच वाचल होतं. अर्थात आता सारखं नेटबॅन्किंग वै नव्हत. तरिही लोक लोच्या करायचे. त्या कथा लेखकाच नाव आता आठवत नाहिये पण पोलिसी कथा लिहायचे ते. त्यांच नाव प्रकाश होत की काय आठवत नाहिये ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

गणपा Sat, 05/10/2008 - 18:02
रामदासबुवा, पिसि जेसि चे दोन्ही भाग आवडले. या भागा खाली क्रमशः लिहायच राहुन गेलय अशी अपेक्षा करतोय. -(पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत....)गणपा

विद्याधर३१ Sat, 05/10/2008 - 18:14
पण पहिला भाग मिळाला नाहि. त्याचा दुवा देता येणार नाही का? एकंदरीत कथा छान पकड घेणारी वाटली.... विद्याधर

In reply to by विजुभाऊ

रामदास Sat, 05/10/2008 - 21:29
होय. मी वाचायचो ते . आजही सायबर गुन्ह्याचा तपास सोडला तर तपास कामाची दिशा तशीच असते. नंतर दक्षताचा फक्त दिवाळी अंक मिळायचा.

स्वाती दिनेश Sat, 05/10/2008 - 19:08
पहिला भागही वेगळाच होता,हा भाग सुरुवातीला दिलेल्या स्पष्टीकरणामुळे क्लिअर होतो आहे आणि कथेतील "पुढे काय?"ची उत्सुकता वाढली आहे, गोष्ट आवडते आहे,पुढचा भाग लवकर येऊ दे.. स्वाती

मस्तच आहे.... आता हळू हळू समजतंय.... 'सुशि' (सुहास शिरवळकर) ची आठवण येते आहे. गोष्ट तर उत्कंठावर्धक आहेच आणि तुमची शैली पण झकास, पण घोटाळा कसा झाला हे तुम्ही लिहिले आहे ते नीटसे समजले नाही. बिपिन.

चतुरंग Sun, 05/11/2008 - 22:46
बँकेत सगळं आलबेल चालतं, इतक्या प्रकारचे सिक्योरिटी चेक्स आहेत आपला पैसा जाईल कुठे असं वाटतानाच एवढाले फ्रॉड्स होताना बघून मन बधिरलं! पोलीसी खक्याची आणि माराची वर्णनं एकदम कडक! माझा अगदी जवळचा नातेवाईक आय्.पी.एस. आहे त्याने सांगितलेले काही अनुभव असेच होते. अंगावर काटा येतो. पुढचा भाग वाचायची उत्सुकता लागली आहे. चतुरंग

धमाल मुलगा Tue, 05/13/2008 - 11:55
रामदास काका, खरंच चांगलं लिहिलंय. मास्तर म्हणाले तसं, प्रथम पुरुषी लेखन असल्यामुळे जास्तचं अंगावर येतंय. सॉलीड टरकतेय नजरेसमोर चित्र उभं केल्यावर! बाकी, खास पोलिसी भाषा अगदी जशीच्या तशी पकडलीये. 'डिपारम्येंटला' बरेच मित्र दिसताहेत :)) छोट्याशाच लेखात असे झरझर सीन्स बदलण्याची शैली आवडली. एकदम 'कॅमेरा आऊट' - 'कॅमेरा इन' इफेक्ट दिलाय. बढिया! आणि वीरकरचा एक पोलीस, एक पुरुष आणि एक माणूस असा भावनांचा बदलता प्रवास छान जाणवतोय. मिपाचे 'पॉल एर्डमन', आता घोटाळ्यात शिरु द्या कथा....उत्सुकता लागून राहिलिये भटानं, मेहतानं, मिश्रानं कसे पैसे हडप केले...काय खेळ्या केल्या.... (तेव्हढंच ज्ञानात मौलिक भर की हो आमच्या!!!!) पु.ले.शु. -ध मा ल.

अनिल हटेला Wed, 05/28/2008 - 12:22
मस्त जमलीये कथा!! कादम्बरी म्हनू हव तर.... पूढील भागाच्या प्रतीक्षेत...........

डॉ.प्रसाद दाढे Wed, 05/28/2008 - 17:21
अ॑गावर काटा उभा राहतोय माराचे वर्णन वाचून..मास्तर मागे म्हणाले तस॑ पोलीस आपल्याला मारणार ह्या कल्पनेनेच टरकते. (अवा॑तरः पूर्वी मला आयपीएस अधिकारी होण्याची इच्छा होती पण हे वाचून बर॑ वाटत॑य त्या लायनीला न गेल्याबद्दल :) त्याला काळीज पत्थर हव॑.. हे आपले काम नाही.. डॉक्टरकी बरी :) बाकी आर्थिक गुन्हे हा एक सर्वस्वी वेगळाच प्रकार आहे.. नेहमीच्या घरफोडी, खून-दरोडा वगैरे प्रकरणात जी नावे सहसा दिसत नाहीत अशी नावे त्यात दिसतात.. त्या॑च्या तो॑डून कबूलीजवाब घ्यायला पोलीसा॑ना फारसा वेळ लागत नसावा.. पण गुन्ह्याची पद्धत शोधायला अवघड जात असेल. पुण्यातील काही पोलीस अधिकारी असे गुन्हे शोधण्यात तरबेज आहेत (पो. निरिक्षक राजेन्द्र जोशी, भानूप्रताप बर्गे ही नावे ह्या स॑दर्भात खूप वेळा ऐकली आहेत.) असे गुन्हे शोधणार्‍या पोलीसा॑ना सलाम! 'कॅच मी इफ यू कॅन' हा लिओ कॅप्रियोचा मस्त चित्रपट अशाच एका सराईत आर्थिक गुन्हेगारावर आहे.. शेवटी त्या गुन्हेगारालाच असले इतर गुन्हे शोधण्यासाठी पोलीसात नेमतात !

डॉ.प्रसाद दाढे Wed, 05/28/2008 - 22:47
आणखी एक किस्सा आठवला.. एका पेश॑ट बॅ॑क अधिकार्‍याने सा॑गितलेला. एका गृहस्था॑चे खात्यातले पैसे आपोआप कमी होत असत. एटीएम कार्ड तर त्या॑च्याच कपाटात सुरक्षित होते, चोरीला गेले नव्हते. तरीही कार्डच्या माध्यमातूनच पैसे काढल्याचे स॑गणक दाखवित होता. असे थोडे-थोडे करीत ऐ॑शी हजार काढले गेले होते. सगळेच बुचकळ्यात पडले. अखेर बॅ॑केच्या लोका॑नी एटीएम के॑द्रातील कॅमेर्‍यावरील त्या विवक्षित वेळेचे चित्रण पाहिले तर एक व्यक्ती कार्ड वापरता॑ना दिसली. त्या गृहस्था॑ना बोलावून चित्रफीत दाखविली असता त्या॑ना आश्चर्याचा प्रच॑ड धक्का बसला..कारण ती व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून त्या॑ची 'सूनच' होती! ती सासर्‍या॑चे कार्ड चोरून वापरून झाले की गुपचूप होते तिथे ठेवीत असे म्हणे..!!

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

रामदास गुरुवार, 05/29/2008 - 12:05
असे बरेच किस्से एकत्र कुटुंबात घडलेले दिसतात. घरातल्या बायकांची उपेक्षा हे एकच कारण. कर्मठ मारवाडी कुटुंबात असे कायम घडत राहते. एका अधीकार्‍याने मला सांगीतलेले कारण मला पटले. त्याच्या म्हणण्याप्रमाणे अशा कुटुंबामध्ये सासू आणि सून यांच्या वयात अंतर कमी असते. सासूची आसक्ती संपलेली नसते आणि सुनेची वाढत असते. पोलीस अशा मॅटरमध्ये चांगले समपुदेशन करतात.

प्रभाकर पेठकर Sat, 05/10/2008 - 10:49
वाचताना अंगावर काटा येतो. क्षणाक्षणातले विचार आणि घटना मांडण्याची घाटणी मस्त आहे. आवडली. क्वचित, कोण, कोणाला बोलतय ह्याचा गोंधळ होतो. बाकी लेखन प्रभावशाली झाले आहे. अभिनंदन. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. (असेल तर. कारण 'क्रमशः' लिहीलेले नाही.)

अभिज्ञ Sat, 05/10/2008 - 11:20
अभिनंदन.लेखन छान झालेय.कुठली तरी कादंबरि वाचतोय असाच भास होतो. लिखाणाची शैली आवडली.वाचताना "पुढे काय ?"अशी सतत उत्सुकता लागून रहाते. मागचा भागहि छानच झाला आहे. असेच लेखन येउद्यात. .... अबब

राजे Sat, 05/10/2008 - 12:20
अबब शी सहमत. खरोखरचा अनुभव आहे की कल्पनाविलास ? हा एक प्रश्न मनी राहीला आहे ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मन Sat, 05/10/2008 - 15:03
आता थोड थोडं कळु लागलं आहे. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

भडकमकर मास्तर Sat, 05/10/2008 - 15:18
ओहो, रामदास साहेब, मस्त झालंय... लिहा अजून लिहा.... पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत...( आणि नक्की अपहार कसा झालाय हे समजून घ्यायच्या प्रतीक्षेत) .... ( प्रथम पुरुषी लिहिल्यामुळे ही कथा भलतीच अंगावर येते.. असे आमचे निरीक्षण आहे)

झकासराव Sat, 05/10/2008 - 17:27
आता उत्कंठा वाढली आहे. :) पहिल्या भागात वाचताना अस वाटल होत कथा सांगणार्‍याच पोलिसाबरोबर सेटिंग आहे म्हणून तो टेन्शन फ्री आहे पण ह्या भागात तर त्याला पण घेतला की. हाणामारीच वर्णन डेंजर हाय राव. नुसत वाचुन भ्या वाटल. पुढचा भाग येवु दे. अवांतर :चेक फोर्जरीच्या सत्यकथांवर ह्या आधी (बरेच वर्ष झाले म्हणा) एक पुस्तकच वाचल होतं. अर्थात आता सारखं नेटबॅन्किंग वै नव्हत. तरिही लोक लोच्या करायचे. त्या कथा लेखकाच नाव आता आठवत नाहिये पण पोलिसी कथा लिहायचे ते. त्यांच नाव प्रकाश होत की काय आठवत नाहिये ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

गणपा Sat, 05/10/2008 - 18:02
रामदासबुवा, पिसि जेसि चे दोन्ही भाग आवडले. या भागा खाली क्रमशः लिहायच राहुन गेलय अशी अपेक्षा करतोय. -(पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत....)गणपा

विद्याधर३१ Sat, 05/10/2008 - 18:14
पण पहिला भाग मिळाला नाहि. त्याचा दुवा देता येणार नाही का? एकंदरीत कथा छान पकड घेणारी वाटली.... विद्याधर

In reply to by विजुभाऊ

रामदास Sat, 05/10/2008 - 21:29
होय. मी वाचायचो ते . आजही सायबर गुन्ह्याचा तपास सोडला तर तपास कामाची दिशा तशीच असते. नंतर दक्षताचा फक्त दिवाळी अंक मिळायचा.

स्वाती दिनेश Sat, 05/10/2008 - 19:08
पहिला भागही वेगळाच होता,हा भाग सुरुवातीला दिलेल्या स्पष्टीकरणामुळे क्लिअर होतो आहे आणि कथेतील "पुढे काय?"ची उत्सुकता वाढली आहे, गोष्ट आवडते आहे,पुढचा भाग लवकर येऊ दे.. स्वाती

मस्तच आहे.... आता हळू हळू समजतंय.... 'सुशि' (सुहास शिरवळकर) ची आठवण येते आहे. गोष्ट तर उत्कंठावर्धक आहेच आणि तुमची शैली पण झकास, पण घोटाळा कसा झाला हे तुम्ही लिहिले आहे ते नीटसे समजले नाही. बिपिन.

चतुरंग Sun, 05/11/2008 - 22:46
बँकेत सगळं आलबेल चालतं, इतक्या प्रकारचे सिक्योरिटी चेक्स आहेत आपला पैसा जाईल कुठे असं वाटतानाच एवढाले फ्रॉड्स होताना बघून मन बधिरलं! पोलीसी खक्याची आणि माराची वर्णनं एकदम कडक! माझा अगदी जवळचा नातेवाईक आय्.पी.एस. आहे त्याने सांगितलेले काही अनुभव असेच होते. अंगावर काटा येतो. पुढचा भाग वाचायची उत्सुकता लागली आहे. चतुरंग

धमाल मुलगा Tue, 05/13/2008 - 11:55
रामदास काका, खरंच चांगलं लिहिलंय. मास्तर म्हणाले तसं, प्रथम पुरुषी लेखन असल्यामुळे जास्तचं अंगावर येतंय. सॉलीड टरकतेय नजरेसमोर चित्र उभं केल्यावर! बाकी, खास पोलिसी भाषा अगदी जशीच्या तशी पकडलीये. 'डिपारम्येंटला' बरेच मित्र दिसताहेत :)) छोट्याशाच लेखात असे झरझर सीन्स बदलण्याची शैली आवडली. एकदम 'कॅमेरा आऊट' - 'कॅमेरा इन' इफेक्ट दिलाय. बढिया! आणि वीरकरचा एक पोलीस, एक पुरुष आणि एक माणूस असा भावनांचा बदलता प्रवास छान जाणवतोय. मिपाचे 'पॉल एर्डमन', आता घोटाळ्यात शिरु द्या कथा....उत्सुकता लागून राहिलिये भटानं, मेहतानं, मिश्रानं कसे पैसे हडप केले...काय खेळ्या केल्या.... (तेव्हढंच ज्ञानात मौलिक भर की हो आमच्या!!!!) पु.ले.शु. -ध मा ल.

अनिल हटेला Wed, 05/28/2008 - 12:22
मस्त जमलीये कथा!! कादम्बरी म्हनू हव तर.... पूढील भागाच्या प्रतीक्षेत...........

डॉ.प्रसाद दाढे Wed, 05/28/2008 - 17:21
अ॑गावर काटा उभा राहतोय माराचे वर्णन वाचून..मास्तर मागे म्हणाले तस॑ पोलीस आपल्याला मारणार ह्या कल्पनेनेच टरकते. (अवा॑तरः पूर्वी मला आयपीएस अधिकारी होण्याची इच्छा होती पण हे वाचून बर॑ वाटत॑य त्या लायनीला न गेल्याबद्दल :) त्याला काळीज पत्थर हव॑.. हे आपले काम नाही.. डॉक्टरकी बरी :) बाकी आर्थिक गुन्हे हा एक सर्वस्वी वेगळाच प्रकार आहे.. नेहमीच्या घरफोडी, खून-दरोडा वगैरे प्रकरणात जी नावे सहसा दिसत नाहीत अशी नावे त्यात दिसतात.. त्या॑च्या तो॑डून कबूलीजवाब घ्यायला पोलीसा॑ना फारसा वेळ लागत नसावा.. पण गुन्ह्याची पद्धत शोधायला अवघड जात असेल. पुण्यातील काही पोलीस अधिकारी असे गुन्हे शोधण्यात तरबेज आहेत (पो. निरिक्षक राजेन्द्र जोशी, भानूप्रताप बर्गे ही नावे ह्या स॑दर्भात खूप वेळा ऐकली आहेत.) असे गुन्हे शोधणार्‍या पोलीसा॑ना सलाम! 'कॅच मी इफ यू कॅन' हा लिओ कॅप्रियोचा मस्त चित्रपट अशाच एका सराईत आर्थिक गुन्हेगारावर आहे.. शेवटी त्या गुन्हेगारालाच असले इतर गुन्हे शोधण्यासाठी पोलीसात नेमतात !

डॉ.प्रसाद दाढे Wed, 05/28/2008 - 22:47
आणखी एक किस्सा आठवला.. एका पेश॑ट बॅ॑क अधिकार्‍याने सा॑गितलेला. एका गृहस्था॑चे खात्यातले पैसे आपोआप कमी होत असत. एटीएम कार्ड तर त्या॑च्याच कपाटात सुरक्षित होते, चोरीला गेले नव्हते. तरीही कार्डच्या माध्यमातूनच पैसे काढल्याचे स॑गणक दाखवित होता. असे थोडे-थोडे करीत ऐ॑शी हजार काढले गेले होते. सगळेच बुचकळ्यात पडले. अखेर बॅ॑केच्या लोका॑नी एटीएम के॑द्रातील कॅमेर्‍यावरील त्या विवक्षित वेळेचे चित्रण पाहिले तर एक व्यक्ती कार्ड वापरता॑ना दिसली. त्या गृहस्था॑ना बोलावून चित्रफीत दाखविली असता त्या॑ना आश्चर्याचा प्रच॑ड धक्का बसला..कारण ती व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून त्या॑ची 'सूनच' होती! ती सासर्‍या॑चे कार्ड चोरून वापरून झाले की गुपचूप होते तिथे ठेवीत असे म्हणे..!!

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

रामदास गुरुवार, 05/29/2008 - 12:05
असे बरेच किस्से एकत्र कुटुंबात घडलेले दिसतात. घरातल्या बायकांची उपेक्षा हे एकच कारण. कर्मठ मारवाडी कुटुंबात असे कायम घडत राहते. एका अधीकार्‍याने मला सांगीतलेले कारण मला पटले. त्याच्या म्हणण्याप्रमाणे अशा कुटुंबामध्ये सासू आणि सून यांच्या वयात अंतर कमी असते. सासूची आसक्ती संपलेली नसते आणि सुनेची वाढत असते. पोलीस अशा मॅटरमध्ये चांगले समपुदेशन करतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

शेतकर्‍याची कर्जमाफि !

विजय भांबेरे ·

नीलकांत गुरुवार, 05/08/2008 - 23:30
कर्जमाफीचा निकष ठरवतांना आमच्या मा. कृषीमंत्र्यांनी आपल्या आवडत्या राजकिय आखाड्यात म्हणजे प. महाराष्ट्रातील सर्वसाधारण धारणाक्षेत्र समोर ठेवलेले लक्षात येते. कारण फक्त दोन हेक्टर जमीन असलेल्या शेतकर्‍यांनाच ही कर्जमाफी आहे. ऊस आणि इतर बागायती पिकांसाठी दोन हेक्टर हे क्षेत्र जास्त किंवा पुरेसं असेल कदाचीत मात्र विदर्भासारख्या भागात कोरडवाहू शेतीत दोन हेक्टर कापसाची शेती कुठल्याच प्रकारे फायद्याची होऊ शकत नाही. विदर्भात धारणा क्षेत्र चार हेक्टर व त्या पेक्षा जास्त असेच आहे. शेती चार हेक्टर पेक्षा जास्त आहे म्हणून तो शेतकरी लागलीच श्रीमंत होत नाही. तर कोरडवाहू आणि बागायती असा मोठा फरक बा़की असतो. मात्र आमच्या सरकारला सब घोडे बारा टक्के आहेत असं वाटतं. म्हणूनच सर्वात जास्त कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या विदर्भात झालेल्या आहेत आणि कर्जमाफीचा सर्वात जास्त फायदा प. महाराष्ट्राला ! विदर्भातील एकून लाभार्थीं पैकी केवळ १६.०८% लोकांना या कर्जमाफीचा फायदा झालेला आहे. ( संदर्भ - सकाळ सर्वेक्षण ) त्यामुळे ह्या अश्या निकषांचा आणि वास्तवाचा कसा ताळमेळ बसवावा याचाच विचार आता चाललेला आहे. विदर्भासाठी आलेल्या पॅकेजचे सुध्दा असेच हाल आहेत. निधी पडून आहे किंवा कागदोपत्री वापरला जातो आहे. अपवादानेच शेता पर्यंत पोहोचतो आहे. माझ्या मते कर्जमाफी हा उपाय होऊच शकत नाही. शासनाने ही परिस्थिती का आली याचा विचार करायला हवा आणि अश्या परिस्थितीशी शेतकर्‍याला लढता आलं पाहिजे अशी काहीतरी व्यवस्था तयार करायला हवी. येत्या दहा वर्षासाठीचा आराखडा तयार करून मग त्यासाठी वार्षीक नीधीची तरतूद असायला हवी. नीलकांत

पान्डू हवालदार गुरुवार, 05/15/2008 - 22:46
क्रुषी मन्त्र्याना काही म्हणुन होणार नाही .. कृषीमंत्र्यांनी प. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठीच हे पॅकेज दिले ... विदर्भाच्या मंत्र्यांनी एकजुट होउन स्वतत्र पॅकेज मागीतले तरच हि कर्जमाफि विदर्भच्या शेतकर्‍यासाठी फायदेशिर ठरेल.

मन Fri, 05/16/2008 - 02:02
केंद्र सरकारच्या अंदाजानुसार हे विधेयक समोर ठेवण्यात आलं ते देशातील अति संकट ग्रस्त अशा ४ कोटी अल्प्-भुधारक शेतकृयांना कर्जातुन सवलत देण्यासाठी. रक्कम किती देण्यात आली सगळ्यांना मिळुन? तर केवळ ६० हजार कोटी! (दिसायला ही रक्कम खुप मोठी वाटेल, पण दिसण्यापुरतीच.) म्हंजे दर शेतकर्‍याला सरासरी जास्तित जास्त मिळणार १५ हजार. मित्रहो, मला सांगा खरच की :- १.हे १५ हजार पुर्ण त्याच्या पर्यंत खरच पोहोचतील का?त्याची गळती होणार नाही का? २.गळती झाल्यानंतर जी रक्कम उरेल,ती आत्महत्या थांबण्यासाठी पुरेशी असेल का? (मुळात १५ हजार तरी पुरेशे आहेत का?) ३. ही रक्कम माफ होइल ती ज्यांनी शासकिय, निम्-शासकिय बँकातुन कर्जॅ घेतली आहेत, त्यांच्यासाठी. पण माझ्या माहिती प्रमाणे खाजगी कर्जे,खाजगी सावकारी हे ही ह्या आत्म्हत्यांमागील महत्वाचं कारण आहे. खाजगी कर्जे,खाजगी सावकारी ह्यातुन रक्कम घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या फार मोठी आहे.(विदर्भात तर प्रकर्षाने.) प्रत्यक्ष आत्महत्या ह्या रोगाचे कर्ज माफी हेच औषध आहे, असं मला तरी वाटत नाही. माझ्या माहिती प्रमाणे दिग्गज कृषी मंत्र्यांना शेतकर्‍याच्या प्रश्नाची चांगली जाण आहे. (ह्यातील त्यांना "on field"अनुभव आहे. तरीही असल निष्प्रभ औषध त्यांच्या कडुन सुचवण्यात आलय, ह्याचं सखेद आश्चर्य वाटतं.) शिवाय केवळ सततच्या कर्ज माफीतुन शेतीची प्रगती होइल, असं समजणं म्हणजे भ्रामक कल्पना वाटते. आपलाच, मनोबा

नीलकांत गुरुवार, 05/08/2008 - 23:30
कर्जमाफीचा निकष ठरवतांना आमच्या मा. कृषीमंत्र्यांनी आपल्या आवडत्या राजकिय आखाड्यात म्हणजे प. महाराष्ट्रातील सर्वसाधारण धारणाक्षेत्र समोर ठेवलेले लक्षात येते. कारण फक्त दोन हेक्टर जमीन असलेल्या शेतकर्‍यांनाच ही कर्जमाफी आहे. ऊस आणि इतर बागायती पिकांसाठी दोन हेक्टर हे क्षेत्र जास्त किंवा पुरेसं असेल कदाचीत मात्र विदर्भासारख्या भागात कोरडवाहू शेतीत दोन हेक्टर कापसाची शेती कुठल्याच प्रकारे फायद्याची होऊ शकत नाही. विदर्भात धारणा क्षेत्र चार हेक्टर व त्या पेक्षा जास्त असेच आहे. शेती चार हेक्टर पेक्षा जास्त आहे म्हणून तो शेतकरी लागलीच श्रीमंत होत नाही. तर कोरडवाहू आणि बागायती असा मोठा फरक बा़की असतो. मात्र आमच्या सरकारला सब घोडे बारा टक्के आहेत असं वाटतं. म्हणूनच सर्वात जास्त कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या विदर्भात झालेल्या आहेत आणि कर्जमाफीचा सर्वात जास्त फायदा प. महाराष्ट्राला ! विदर्भातील एकून लाभार्थीं पैकी केवळ १६.०८% लोकांना या कर्जमाफीचा फायदा झालेला आहे. ( संदर्भ - सकाळ सर्वेक्षण ) त्यामुळे ह्या अश्या निकषांचा आणि वास्तवाचा कसा ताळमेळ बसवावा याचाच विचार आता चाललेला आहे. विदर्भासाठी आलेल्या पॅकेजचे सुध्दा असेच हाल आहेत. निधी पडून आहे किंवा कागदोपत्री वापरला जातो आहे. अपवादानेच शेता पर्यंत पोहोचतो आहे. माझ्या मते कर्जमाफी हा उपाय होऊच शकत नाही. शासनाने ही परिस्थिती का आली याचा विचार करायला हवा आणि अश्या परिस्थितीशी शेतकर्‍याला लढता आलं पाहिजे अशी काहीतरी व्यवस्था तयार करायला हवी. येत्या दहा वर्षासाठीचा आराखडा तयार करून मग त्यासाठी वार्षीक नीधीची तरतूद असायला हवी. नीलकांत

पान्डू हवालदार गुरुवार, 05/15/2008 - 22:46
क्रुषी मन्त्र्याना काही म्हणुन होणार नाही .. कृषीमंत्र्यांनी प. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठीच हे पॅकेज दिले ... विदर्भाच्या मंत्र्यांनी एकजुट होउन स्वतत्र पॅकेज मागीतले तरच हि कर्जमाफि विदर्भच्या शेतकर्‍यासाठी फायदेशिर ठरेल.

मन Fri, 05/16/2008 - 02:02
केंद्र सरकारच्या अंदाजानुसार हे विधेयक समोर ठेवण्यात आलं ते देशातील अति संकट ग्रस्त अशा ४ कोटी अल्प्-भुधारक शेतकृयांना कर्जातुन सवलत देण्यासाठी. रक्कम किती देण्यात आली सगळ्यांना मिळुन? तर केवळ ६० हजार कोटी! (दिसायला ही रक्कम खुप मोठी वाटेल, पण दिसण्यापुरतीच.) म्हंजे दर शेतकर्‍याला सरासरी जास्तित जास्त मिळणार १५ हजार. मित्रहो, मला सांगा खरच की :- १.हे १५ हजार पुर्ण त्याच्या पर्यंत खरच पोहोचतील का?त्याची गळती होणार नाही का? २.गळती झाल्यानंतर जी रक्कम उरेल,ती आत्महत्या थांबण्यासाठी पुरेशी असेल का? (मुळात १५ हजार तरी पुरेशे आहेत का?) ३. ही रक्कम माफ होइल ती ज्यांनी शासकिय, निम्-शासकिय बँकातुन कर्जॅ घेतली आहेत, त्यांच्यासाठी. पण माझ्या माहिती प्रमाणे खाजगी कर्जे,खाजगी सावकारी हे ही ह्या आत्म्हत्यांमागील महत्वाचं कारण आहे. खाजगी कर्जे,खाजगी सावकारी ह्यातुन रक्कम घेणार्‍या शेतकर्‍यांची संख्या फार मोठी आहे.(विदर्भात तर प्रकर्षाने.) प्रत्यक्ष आत्महत्या ह्या रोगाचे कर्ज माफी हेच औषध आहे, असं मला तरी वाटत नाही. माझ्या माहिती प्रमाणे दिग्गज कृषी मंत्र्यांना शेतकर्‍याच्या प्रश्नाची चांगली जाण आहे. (ह्यातील त्यांना "on field"अनुभव आहे. तरीही असल निष्प्रभ औषध त्यांच्या कडुन सुचवण्यात आलय, ह्याचं सखेद आश्चर्य वाटतं.) शिवाय केवळ सततच्या कर्ज माफीतुन शेतीची प्रगती होइल, असं समजणं म्हणजे भ्रामक कल्पना वाटते. आपलाच, मनोबा
नुकतेच केन्द्र सरकारने शेतकर्‍याना कर्जमाफि दिली परन्तु हि कर्जमाफि विदर्भच्या शेतकर्‍यासाठी कितपत फायदेशिर ठरलि या विशयावर चर्चा व्हावी ! आपली मते मांडा !

राजू परूळेकरांची मतं

रम्या ·

अभिरत भिरभि-या गुरुवार, 05/08/2008 - 19:31
दोन्ही लेख उत्तम आहेत .. मनापासून धन्यवाद .. अक्षरशः कोट्यावधींची लोकसंख्या असताना मराठीसारखा एक भाषिक समाज दुस-याच्या आधिपत्याखाली इतका सहजपणे कसा दबला जातो याचे राहून राहून नवल वाटते ...

सुवर्णमयी गुरुवार, 05/08/2008 - 23:11
परूळेकरांचा आताचा नवीन लेखही उत्तम आहे, तुम्ही दुव्यात दिलेले लेखही आवडले.

इनोबा म्हणे Fri, 05/09/2008 - 03:37
या दूव्यांबद्दल धन्यवाद रे! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

नीलकांत Fri, 05/09/2008 - 13:57
राजू परूळेकर आणि इतरांचे मराठी विषयी नक्की वाचावेत असे काही लेख खाली देत आहे. जरूर वाचा. http://www.loksatta.com/lokprabha/20080425/good.htm http://www.loksatta.com/lokprabha/20080328/good.htm http://www.loksatta.com/lokprabha/20080307/good.htm http://www.loksatta.com/lokprabha/20080229/good.htm http://www.loksatta.com/lokprabha/20080215/good.htm http://www.loksatta.com/lokprabha/20080222/cover.htm http://www.loksatta.com/lokprabha/20080307/cover02.htm नीलकांत

रम्या Fri, 05/09/2008 - 16:47
सगळेच लेख फार छान आहेत. यापुर्वीही मी जोपासत असलेल्या प्रांतवादाची व्याप्ती आणि त्याचा अर्थ एवढा विशाल आहे हे मात्र आताच कळलं. सारेच दुवे फारच माहीतीपुर्ण आहेत.

इनोबा म्हणे Fri, 05/09/2008 - 18:28
नीलकांता, मस्तच रे! माहीतीपुर्ण लेख आहेत. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

चिन्या१९८५ Wed, 05/14/2008 - 14:51
राजु परुळेकरांच्या लेखाबद्दल माझी मते - **तुम्ही तुमच्या लेखात आंबेडकर्,अत्रे यांचे वारसदार दिवाळखोर निघाले म्हटले आहे.आंबेडकरांचे राहु द्या पण अत्र्यांचे वारसदार म्हणजे आजचे पत्रकार('मर्‍हाटा'काढल्यामुळे अत्र्यांनाही पत्रकार म्हणायला हरकत नसावी) तर नंबर एकचे दिवाळखोर आहेत.एव्हढेच नव्हे तर 'पत्रकार धर्म' विसरुन राजकीय कंपुबाजीत सगळे धन्यता मानत आहेत. राजु परुळेकरही त्यातलेच.'१९९० पासुन बाळासाहेबांनी महाराष्ट्र धर्माला नख लावायला सुरुवात केली' म्हणतात्.मग तुम्ही १८ वर्ष मुग गिळून का बसला होता???राज ठाकर्‍यांनी सेना सोडण्यापुर्वी(सोडल्यानंतरही) तुम्ही अनेकदा सेनाप्रमुखांवर स्तुतीसुमने उधळली होती.तेंव्हा कुठे गेला होता तुमचा 'महाराष्ट्र धर्म'??अत्र्यांनी त्यांच्या वृत्तपत्रातुन सतत मराठीचा मुद्दा धगधगत ठेवला.पण राजु परुळेकर मायावाती,मोदी व इतर अनेकविध विषयांवर आपली मते मांडत होते. अरे मराठीची इतकी वाईट परिस्थिती असताना तुम्हाला ती पुढे आणण्यासाठी आंदोलनाची गरजच का पडते??आंदोलन नव्हते तेंव्हा तुम्ही का लोकांना या विषयावर जागरुक केले नाही???तुमच्याकडे बंदुकिपेक्षाही घातक लेखणी नावाचे अस्त्र होते ते तुम्ही म्यानात ठेवुन 'चिल्लर' गोष्टींवर स्वतःचा स्तंभ भरवत होता.कधी राजकारण तर कधी काय. सगळ नॉन सेंस.मायमराठी भरडली जात असताना तुम्ही स्वतः त्याबद्दल लिहुन जनजागृती केली असती त्याला काही अर्थ होता.** पुर्ण लेख वाचा- http://gandharvablog.blogspot.com/

In reply to by चिन्या१९८५

मन Wed, 05/14/2008 - 15:27
"काय" म्हटलयं ते पहा. त्याच्या म्हणण्यात तथ्य आहे ना.(भले त्यानं त्यासाठी काही केलं नसेल.) त्याचे आणि राज ने उपस्थित केलेले मुद्दे चुक ठरतात का? नाही ना?मग त्या बद्दल बोला ना.इथे चर्चा केवळ व्यक्तिची नाही तर त्या व्यक्तिनं मांडलेल्या मतांचीही चालु आहे. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

चिन्या१९८५ Fri, 05/16/2008 - 02:23
कृपया माझा ब्लॉग वाचा म्हणजे सर्व मुद्दे व्यवस्थित कळतील. 'त्या' व्यक्तीने पक्षपातीपणा,द्वेशभावनेवर आधारीत मुद्दे लिहुन दिशाभुल केली आहे. तुम्ही माझा ब्लॉग वाचा,त्यात सर्व सविस्तर लिहिले आहे.मुळात प्रश्न त्यांच्या आंदोलनाचा नाहीये.प्रश्न 'त्याने' लिहिलेल्या 'त्या' लेखाचा आहे.

नमस्कार. मी आधी च हे दोन्ही लेख वाचले आहेत. मला असे वाटते की महाराष्ट्राला राजकीय नेत्यांच्या अकलेची दिवाळ्खोरी नवीन नाही पण सध्या महाराष्ट्राच्या लोकांचे हित न पहाता केवळ उत्तर भारतियांची दादागिरी खपवुन घेणारे आणि त्यांची चमचेगिरी करणारे नेते महाराष्ट्राला काय प्रगतीपथावर नेणार? राजू परुळेकरांवर कदाचित निष्क्रियतेचा आरोप असेल ही ....पण त्यांचे मुद्दे डावलता येणे खरेच कठीण आहे...वर उल्लेखिल्याप्रमाणे "इथे चर्चा केवळ व्यक्तिची नाही तर त्या व्यक्तिनं मांडलेल्या मतांचीही चालु आहे" विचारांची काहीच दिशा नसलेले नेते फक्त महाराष्ट्राला अधिकाधिक खड्ड्यात घालत आहेत...आणि त्यान्ना निवडून देणारे आम्ही "सुजाण नागरिक" फक्त तमाशा पहात आहोत..... त्यामुळे माझ्या मते आपण आपल्या परीने स्वभाषेचा आग्रह, स्व-प्रांताचा अभिमान आणि उपर्या न्ना विरोध ही त्रिसूत्री आचरणात आणावी इतकीच विनंती.

चिन्या१९८५ Fri, 05/16/2008 - 21:16
तेच तर मी सांगतोय की त्या व्यक्तीने चुकिचि मते मांडली आहेत. तुम्ही माझा ब्लॉग वाचा. मी त्यात त्या व्यक्तीने 'काय' चुकिचे लिहिलेय ते लिहिले आहे. वाचा- http://gandharvablog.blogspot.com/

अभिरत भिरभि-या गुरुवार, 05/08/2008 - 19:31
दोन्ही लेख उत्तम आहेत .. मनापासून धन्यवाद .. अक्षरशः कोट्यावधींची लोकसंख्या असताना मराठीसारखा एक भाषिक समाज दुस-याच्या आधिपत्याखाली इतका सहजपणे कसा दबला जातो याचे राहून राहून नवल वाटते ...

सुवर्णमयी गुरुवार, 05/08/2008 - 23:11
परूळेकरांचा आताचा नवीन लेखही उत्तम आहे, तुम्ही दुव्यात दिलेले लेखही आवडले.

इनोबा म्हणे Fri, 05/09/2008 - 03:37
या दूव्यांबद्दल धन्यवाद रे! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

नीलकांत Fri, 05/09/2008 - 13:57
राजू परूळेकर आणि इतरांचे मराठी विषयी नक्की वाचावेत असे काही लेख खाली देत आहे. जरूर वाचा. http://www.loksatta.com/lokprabha/20080425/good.htm http://www.loksatta.com/lokprabha/20080328/good.htm http://www.loksatta.com/lokprabha/20080307/good.htm http://www.loksatta.com/lokprabha/20080229/good.htm http://www.loksatta.com/lokprabha/20080215/good.htm http://www.loksatta.com/lokprabha/20080222/cover.htm http://www.loksatta.com/lokprabha/20080307/cover02.htm नीलकांत

रम्या Fri, 05/09/2008 - 16:47
सगळेच लेख फार छान आहेत. यापुर्वीही मी जोपासत असलेल्या प्रांतवादाची व्याप्ती आणि त्याचा अर्थ एवढा विशाल आहे हे मात्र आताच कळलं. सारेच दुवे फारच माहीतीपुर्ण आहेत.

इनोबा म्हणे Fri, 05/09/2008 - 18:28
नीलकांता, मस्तच रे! माहीतीपुर्ण लेख आहेत. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

चिन्या१९८५ Wed, 05/14/2008 - 14:51
राजु परुळेकरांच्या लेखाबद्दल माझी मते - **तुम्ही तुमच्या लेखात आंबेडकर्,अत्रे यांचे वारसदार दिवाळखोर निघाले म्हटले आहे.आंबेडकरांचे राहु द्या पण अत्र्यांचे वारसदार म्हणजे आजचे पत्रकार('मर्‍हाटा'काढल्यामुळे अत्र्यांनाही पत्रकार म्हणायला हरकत नसावी) तर नंबर एकचे दिवाळखोर आहेत.एव्हढेच नव्हे तर 'पत्रकार धर्म' विसरुन राजकीय कंपुबाजीत सगळे धन्यता मानत आहेत. राजु परुळेकरही त्यातलेच.'१९९० पासुन बाळासाहेबांनी महाराष्ट्र धर्माला नख लावायला सुरुवात केली' म्हणतात्.मग तुम्ही १८ वर्ष मुग गिळून का बसला होता???राज ठाकर्‍यांनी सेना सोडण्यापुर्वी(सोडल्यानंतरही) तुम्ही अनेकदा सेनाप्रमुखांवर स्तुतीसुमने उधळली होती.तेंव्हा कुठे गेला होता तुमचा 'महाराष्ट्र धर्म'??अत्र्यांनी त्यांच्या वृत्तपत्रातुन सतत मराठीचा मुद्दा धगधगत ठेवला.पण राजु परुळेकर मायावाती,मोदी व इतर अनेकविध विषयांवर आपली मते मांडत होते. अरे मराठीची इतकी वाईट परिस्थिती असताना तुम्हाला ती पुढे आणण्यासाठी आंदोलनाची गरजच का पडते??आंदोलन नव्हते तेंव्हा तुम्ही का लोकांना या विषयावर जागरुक केले नाही???तुमच्याकडे बंदुकिपेक्षाही घातक लेखणी नावाचे अस्त्र होते ते तुम्ही म्यानात ठेवुन 'चिल्लर' गोष्टींवर स्वतःचा स्तंभ भरवत होता.कधी राजकारण तर कधी काय. सगळ नॉन सेंस.मायमराठी भरडली जात असताना तुम्ही स्वतः त्याबद्दल लिहुन जनजागृती केली असती त्याला काही अर्थ होता.** पुर्ण लेख वाचा- http://gandharvablog.blogspot.com/

In reply to by चिन्या१९८५

मन Wed, 05/14/2008 - 15:27
"काय" म्हटलयं ते पहा. त्याच्या म्हणण्यात तथ्य आहे ना.(भले त्यानं त्यासाठी काही केलं नसेल.) त्याचे आणि राज ने उपस्थित केलेले मुद्दे चुक ठरतात का? नाही ना?मग त्या बद्दल बोला ना.इथे चर्चा केवळ व्यक्तिची नाही तर त्या व्यक्तिनं मांडलेल्या मतांचीही चालु आहे. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

चिन्या१९८५ Fri, 05/16/2008 - 02:23
कृपया माझा ब्लॉग वाचा म्हणजे सर्व मुद्दे व्यवस्थित कळतील. 'त्या' व्यक्तीने पक्षपातीपणा,द्वेशभावनेवर आधारीत मुद्दे लिहुन दिशाभुल केली आहे. तुम्ही माझा ब्लॉग वाचा,त्यात सर्व सविस्तर लिहिले आहे.मुळात प्रश्न त्यांच्या आंदोलनाचा नाहीये.प्रश्न 'त्याने' लिहिलेल्या 'त्या' लेखाचा आहे.

नमस्कार. मी आधी च हे दोन्ही लेख वाचले आहेत. मला असे वाटते की महाराष्ट्राला राजकीय नेत्यांच्या अकलेची दिवाळ्खोरी नवीन नाही पण सध्या महाराष्ट्राच्या लोकांचे हित न पहाता केवळ उत्तर भारतियांची दादागिरी खपवुन घेणारे आणि त्यांची चमचेगिरी करणारे नेते महाराष्ट्राला काय प्रगतीपथावर नेणार? राजू परुळेकरांवर कदाचित निष्क्रियतेचा आरोप असेल ही ....पण त्यांचे मुद्दे डावलता येणे खरेच कठीण आहे...वर उल्लेखिल्याप्रमाणे "इथे चर्चा केवळ व्यक्तिची नाही तर त्या व्यक्तिनं मांडलेल्या मतांचीही चालु आहे" विचारांची काहीच दिशा नसलेले नेते फक्त महाराष्ट्राला अधिकाधिक खड्ड्यात घालत आहेत...आणि त्यान्ना निवडून देणारे आम्ही "सुजाण नागरिक" फक्त तमाशा पहात आहोत..... त्यामुळे माझ्या मते आपण आपल्या परीने स्वभाषेचा आग्रह, स्व-प्रांताचा अभिमान आणि उपर्या न्ना विरोध ही त्रिसूत्री आचरणात आणावी इतकीच विनंती.

चिन्या१९८५ Fri, 05/16/2008 - 21:16
तेच तर मी सांगतोय की त्या व्यक्तीने चुकिचि मते मांडली आहेत. तुम्ही माझा ब्लॉग वाचा. मी त्यात त्या व्यक्तीने 'काय' चुकिचे लिहिलेय ते लिहिले आहे. वाचा- http://gandharvablog.blogspot.com/
राजू परूळेकरांचा लोकप्रभामधील लेख वाचून फार बरं वाटलं. पण राजू परूळेकरांचा या विषयावरील हा एकमेव लेख नाही असं लक्षात आलं. राजू परुळेकरांनी एक वर्षापुर्वी हीच भूमिका मांडली होती. हे लेख मिपाच्या वाचकांपर्यंत पोहोचावेत असं वाटलं. या लेखांचे दुवे खालील प्रमाणे. http://www.loksatta.com/lokprabha/20070216/good.htm http://www.loksatta.com/lokprabha/20070323/good.htm पण तात्या एकाच प्रकारचे लिखाण म्हणून हे उडवू नयेत ही विनंती. :)

मराठी शिकलेला नवरा नको गं बाई....

कलंत्री ·

मनस्वी गुरुवार, 05/08/2008 - 17:07
नकार द्यायला खरेच हेच कारण आहे, का नकार देण्यासाठी हे कारण पुढे केले जात आहे - हे ताडून घ्यायला हवे.

In reply to by मनस्वी

कलंत्री गुरुवार, 05/08/2008 - 17:20
खेड्यातील लोकांचे एक मानसशास्त्र असते. तेथे आहे तसेच सांगितले जाते. या गोष्टीची मी माझ्या आईकडूनही खात्री करून घेतली आहे. वरील गोष्टीच्या गावाची संख्या अंदाजे २५००० असावी आणि ही संख्या अनेक जातीजमातीत विखुरलेली असते. असो. पण ही वार्ता खरी असेल तर मराठी माध्यमात शिकलेला आहे म्हणून नवरा नाकारणे योग्य आहे काय? अवांतर : हा मुलगा संगणक अभियंता म्हणून पुण्यात नौकरीला असतो असेही मी ऐकले आहे, पण इंग्रजी मुलांसारखी सफाई मराठी मुलांमध्ये नसते अशी पुस्ती ऐकल्याचे आठवते. त्यामुळे कॉन्वेंट मध्ये शिकलेला आणि उच्चविद्याविभुषित मुलाची अपेक्षा आहे असे मी ऐकल्याचे आठवते.

In reply to by कलंत्री

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/08/2008 - 17:25
हा मुलगा संगणक अभियंता म्हणून पुण्यात नौकरीला असतो असेही मी ऐकले आहे, पण इंग्रजी मुलांसारखी सफाई मराठी मुलांमध्ये नसते अशी पुस्ती ऐकल्याचे आठवते. त्यामुळे कॉन्वेंट मध्ये शिकलेला आणि उच्चविद्याविभुषित मुलाची अपेक्षा आहे असे मी ऐकल्याचे आठवते. द्वारकानाथजी, आपण कोणासाठी कोण शोधताय? मूळ लेखात मुलीसाठी मुलगा शोधत आहात असे जाणवले. आता मुलासाठी मुलगा?

In reply to by प्रभाकर पेठकर

कलंत्री गुरुवार, 05/08/2008 - 17:42
प्रभाकरपंत, मी त्या नकार दिल्या गेलेल्या मुलाबद्दलची माहिती लिहिली आहे. ( अभियंता इत्यादी). त्या मुलीला कॉन्वेंट च्याच मुलाची अपेक्षा आहे असे मी ऐकले आहे. द्वारकानाथ या निमित्त्याने एका सामाजीक समस्येचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे. सर्वसाधारण पणे लग्न ही आर्थिक पायावर जमतात. आता भाषा हाही निकष आला तर काय होईल असा विचार मनात येत आहे. इतर प्रतिसादात मुलेही इंग्रजी येत नाही म्हणून मुली नाकारतात असे वाचल्यावर समस्या बरीच खोल आहे असे वाटते.

In reply to by कलंत्री

मनस्वी गुरुवार, 05/08/2008 - 17:31
पण ही वार्ता खरी असेल तर मराठी माध्यमात शिकलेला आहे म्हणून नवरा नाकारणे योग्य आहे काय?
नाही. जर मुलगा खरोखरीच चांगला असेल तर या कारणावरून नाकारणे हा खरोखरीच वेडेपणा आहे.
त्यामुळे कॉन्वेंट मध्ये शिकलेला आणि उच्चविद्याविभुषित मुलाची अपेक्षा आहे असे मी ऐकल्याचे आठवते.
मग असा मुलगा खेड्यातील मुलीला पसंत करेल काय? (१-२% अपवाद वगळता)

In reply to by खरा डॉन

कलंत्री Fri, 05/09/2008 - 11:08
लग्न कसे घडतात या प्रक्रियेचा अभ्यास केला तर हे शक्य आहे. ठरवुन केलेल्या लग्नासाठी आर्थिक निकष, नातेवाईक-मित्रमंडळाची शिफारस, मुलाच्या मोठ्या भावाची निवड, खेड्यातील असली तरी मुलीमध्ये आगळे वेगळे असलेले चैतन्य ( स्पार्क) आणि आपल्याला नेमके काय हवे आहे हे जर उपवराला ठाऊक असेल तर हे निश्चितच शक्य आहे. वडाची साल वांग्याला -> सयाजीराव गायकवाड यांची दत्तक निवड सुद्धा अश्याच दुरदुरच्या खेड्यातून झाली होती याचे स्मरण होत आहे.

प्रियाली गुरुवार, 05/08/2008 - 17:15
आणि हे केवळ मुलींच्याच बाबतीत नाही तर मुलगेही असेच असतात म्हणजे आपली बायकोशी आपण इंग्रजीत संभाषण करतो हे दाखवण्यासाठी त्यांनाही इंग्रजी बोलणार्‍या बायका हव्या असतात आजकाल. हा बहुधा मराठी शिक्षणाला कमी गणले गेल्याने आलेला गंड असावा. मराठी भाषेचा न्यूनगंड बाळगण्यासारखं काय आहे तेच कळत नाही.

In reply to by प्रियाली

स्वाती दिनेश गुरुवार, 05/08/2008 - 17:34
मराठी भाषेचा न्यूनगंड बाळगण्यासारखं काय आहे तेच कळत नाही. अगदी खरे, इतर भारतीय भाषक मात्र एकत्र आले की आपल्या मातृभाषेतच संवाद करतात.एवढेच नव्हे तर जर्मनी,इटाली, जपान, स्पेन इ.सारख्या बिगर इंग्रजी भाषक देशात त्यांचे इंग्रजीवाचून काही विशेष अडत नाही आणि आपण कोणाला काही विचारलेच,अर्थातच इंग्रजीमधून तर "आय नो नो इंग्लिश.." असं साधं उत्तरही बरेचदा ऐकायला मिळते. स्वाती

वेताळ गुरुवार, 05/08/2008 - 18:21
दोघी खेड्यात रहात असल्यामुळे फक्त इंग्रजी भाषा येत असावी.त्यामुळे हा प्रश्न उधभवला असावा.सदर मुलीला जर ब्रिटन ला पाठवले तर तिचा प्रश्न सुटु शकेल.तसेच अस्स्लिखित इंग्रजी बोलणारे कान्हेन्ट मुले १२ झाली की पुढे शिक्षण घेण्यापेक्षा कालसेंटर मध्ये काम करण्यात धन्यता मानतात व त्याना खेड्यातली मुलगी पसंद पडेल का? शंका वाटते. (फिरंगी) वेताळ

मुक्तसुनीत गुरुवार, 05/08/2008 - 18:26
मराठी भाषेबद्दलचा न्यूनगंड हा विषय आपल्या सगळ्याना चिरपरिचित आणि म्हणूनच जिव्हाळ्याचा आहे. या न्यूनगंडाचे सर्वात स्पष्ट प्रतिबिंब वयात येणार्‍या पिढीमधे पडलेले दिसते. इलेक्ट्रॉनिक मिडीआ , सिनेमा , जाहिरातींची दुनिया या सगळ्या लोकप्रिय गोष्टी या गंडाला पोषक ठरतील अशीच मूल्ये युवाविढीसमोर ठेवताना दिसतात. ब्रँडनेम्स ची उत्पादने वापरणे , अत्याधुनिक फॅशनची वस्त्रेप्रावरणे यांचा अंगिकार करणे, व्यवसायात आणि उद्यमशीलता या सगळ्यातील यशाचा संबंध इंग्रजी भाषेशी - आणि मुख्य म्हणजे "स्लँग"शी आहे असे मनीमानसी ठसविले जाते. या सर्व गोष्टींचा पगडा सहजासहजी न झुगारता येण्याजोगा आहे यात शंका नाही. शेवटी सामाजिक मान्यता , आर्थिक संपन्नतेची स्वप्ने , आर्थिक बंधनातून , सामाजिक बंधनातून "मुक्त" अशी जीवनशैली या सार्‍याचे आकर्षण कुणाला वाटणार नाही ? किंबहुना , वर निर्देशित केलेल्या गोष्टीच , आत्मोन्नतीच्या दृष्टीने प्रवास करायला तरुण व्यक्तीला उत्साहित करतात. आणि या सार्‍याची नाळ शेवटी बांधली जाते इंग्रजीशी , पर्यायाने , मातृभाषेशी नाते तोडण्याशी. या सर्व परिस्थितीचा उलगडा तुम्हाआम्हा व्यक्तिना होतो तेव्हा पौगंडावस्था उलटलेली असते. अर्थात आपल्यापैकी बर्‍याच जणांना हा सर्व भुलभुलैय्या आहे याची जाणीव "न कळत्या" वयातही होत असतेच. पण ज्याना ती होत नाही त्यांच्याकरताच तर हे जाळे असते. कलंत्रीनी वर्णिलेल्या प्रसंगातली तरुणी या जाळ्यात अडकलेली आहे. या सर्वावरचा उपाय काय ? तर प्रबोधन. (शेवटी कुठल्याही सामाजिक समस्येचा अक्सीर इलाज हाच असतो म्हणा !) मराठी भाषेत शिकलेल्या जितक्या जास्त जास्त व्यक्ती लोकंसमोर येतील तितके कमी लोक उपरनिर्देशित जाळ्यात अडकतील. किंबहुना यश म्हणजे काय , आयुष्यातील श्रेयस म्हणजे काय याच्या व्याख्या जसजशा जास्त जास्त लोकांना कळू लागतील तितके असे प्रसंग घडण्याची शक्यता कमी कमी होईल.

In reply to by मुक्तसुनीत

नीलकांत Fri, 05/09/2008 - 22:43
मराठी भाषेत शिकलेल्या जितक्या जास्त जास्त व्यक्ती लोकंसमोर येतील तितके कमी लोक उपरनिर्देशित जाळ्यात अडकतील. किंबहुना यश म्हणजे काय , आयुष्यातील श्रेयस म्हणजे काय याच्या व्याख्या जसजशा जास्त जास्त लोकांना कळू लागतील तितके असे प्रसंग घडण्याची शक्यता कमी कमी होईल.
मुक्तसुनीत साहेब अगदी मनातलं बोललात. नीलकांत

भाग्यश्री गुरुवार, 05/08/2008 - 22:19
अशी उदाहरणं दुर्दैवाने आहेत आजूबाजूला.. माझ्या वहीनीच्या बहीणीने असंच एक चांगलं स्थळ नाकारलं होतं.. का तर तो मुलगा भेटायला आला तेव्हा मराठीतून बोलत होता, इंग्लिश नाही.. !! आता दोघांची मातृभाषा मराठी असताना , शिवाय लग्नासारख्या गोष्टी होताना कोण इंग्लिश मधे बोलायला जाईल!! काहीही.. मुर्ख असतात अशी लोकं! निव्वळ वेडेपणा!

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/08/2008 - 22:20
बहुतेक अशा मुलींचे अतिंम ध्येय नवरदेवाची शीडी वापरून परदेशात (युरोप-अमेरिकेत) 'सेट्ल' होण्याचे असते. कॉन्व्हेंट किंवा इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांना अशा संधी जास्त येतात असा एक गैरसमज त्या मागे असू शकतो. तसेच, कॉन्व्हेंट किंवा इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांमध्ये इंग्रजी भाषेचा भयगंड नसल्यामुळे मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलांपेक्षा जगातील कुठल्याही देशात राहण्या-फिरण्याचा, नोकरीचा आत्मविश्वास जास्त असतो (गैरसमज क्र.२). मराठी माध्यमातून शिकलेली मुले 'मराठी मध्यमवर्गीय विचारसरणीची' असतात त्यामुळे आपल्या विवाहोत्तर स्वातंत्र्यावर गदा येऊन धुणी-भांडी, उष्टी-खरकटी काढण्यात उर्वरीत आयुष्य कंठावे लागेल असाही गैरसमज असू शकतो. अशा अनेक गैरसमजांवर उभारलेली गोजीरवाणी स्वप्ने जेंव्हा वास्तवाच्या ठोकरीत चक्काचूर होतात तेंव्हाच ह्यांचे डोळे (कदाचित) उघडतात. पण तेंव्हा खूप उशीर झालेला असतो. ह्यांचा आयुष्याकडे, भौतिक सुखांकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. 'लग्न' ह्या विषयाकडे आपले आर्थिक, सामाजिक स्तर उंचावण्याची एकमेव संधी अशा दृष्टीने पाहण्याकडे कल दिसतो. अशा मुली 'भावी पिढी' काय आणि कशी घडविणार हा अत्यंत भितीदायक प्रश्न आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

रविराज Fri, 05/09/2008 - 06:51
गैरसमज क्र.२ हा पुर्णपणे गैरसमज नाहीये. मी मराठी माध्यमातून शिकलो आहे. इंग्रजी बोलताना थोडासा(स्वगतः थोडासा की भरपूर?) न्यूनगंड हा जाणवतोच. त्यामुळे मग वाटत की इंग्रजी माध्यमातून शिकलो असतो तर बर झाल असतं! (पुन्हा स्वगत : पण जर मी इंग्रजी माध्यमातून शिकलो असतो तर मि.पा. चा खरा आनंद मला लुटता आला असता का? ) रवी

In reply to by रविराज

स्वयंभू Fri, 05/09/2008 - 22:02
माफ करा, मी आपल्याल ओळखत नाही पण तरी बोलल्या शिवाय रहावत नाही कारण हा विषय माझ्याही जिव्हाळ्याचा आहे. मला असं वाटतं इथे चुकताय आपण. सुरुवातीला त्रास होणे समजु शकतो. पण त्यावर मात करणंही आपल्याच हातात आहे. मराठीतून शिक्षण घेतलं म्हणून इंग्रजीचा भयगंड असेल तर तो एक वैयक्तीक पराभव आहे असं मी मानतो. मी मराठी माध्यमातून शिकलो. कॉलेज मधेही मराठी मित्रांचाच कंपू होता. आणि आज मी जगातल्या नं १ च्या ऍड एजन्सी मधे इंग्रजी जाहीरात लेखक (Copywriter) म्हणून कामाला आहे. आणि मि. पा. चा आनंदही व्यवस्थीत लुटतो आहे. मला कुठलाही न्युनगंड जाणवत नाही. सुरुवातीला जम बसवताना त्रास झाला. मराठी माध्यमाचा म्हणून बर्याच मरठी लोकांनीही जॉब नाकारला. पण स्वतः मधे सुधारणा करणं आपल्याच हातात आहे. ह्या खरडी मागचा अर्थ स्वत:ची लाल करणे नसून ' केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे' ह्या उक्ती वर विश्वास ठेवा हे सांगणे हा आहे. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

In reply to by स्वयंभू (verified= न पडताळणी केलेला)

मन Fri, 05/09/2008 - 22:24
...पण स्वतः मधे सुधारणा करणं आपल्याच हातात आहे. बिल्कुल कबुल. प्रयत्न करतो आहे. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by स्वयंभू (verified= न पडताळणी केलेला)

माझेही काहीसे ऍडी जोशी सारखे आहे. त्यात मराठी माध्यमातूम शिक्षणाच्या जोडीला त्याच्या जाज्वल्य अभिमानाची पण जोड होतीच. पूर्वी मी माझ्या कॉलेजकंपू मधे इंग्रजी बोलता येत नाही म्हणून हिंदी बोलणारे अनेक जण पाहीले त्यांचा मनोमन फार राग यायचा पण काय करणार मलाही धड इंग्रजी बोलता येत नव्हते. तेव्हा माझ्या क्लासच्या सरांनी सांगितले की "इंग्लिश बोलता येत नाही म्हणून हिंदी बोलणे या गोष्टीने ज्या मराठी भाषेवर प्रेम करतोस तिचे नुकसान आणि अपमान करत आहेस. जर इंग्रजी बोलता येत नसेल तर प्रयत्नपूर्वक ते शिक. रोज इंग्रजी वृत्तपत्र मोठ्याने वाचत जा. एकदा जीभ वळायला लागली की नक्की जमेल. आणि एखादे वाक्य नाही जमले इंग्रजी मधे बोलायला तर बेलाशक ते मराठी मधे बोलून टाक. आपल्या मातृभाषेची लाज वाटणे हा नुसता करंटेपणाच नाही तर षंढपणाही आहे. चुकलं तर चुकूदे पण प्रयत्नपूर्वक सुधारणा कर." माझे इंग्रजी बोलणे त्यामुळे सुधारले आणि IT हमाल म्हणून का होईना पण अमेरीकेत येण्यापर्यंत प्रगती झाली. 'केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे' हेच खरे. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मन Sat, 05/10/2008 - 04:16
तुमच्या मी. आंग्ल भाषेत वाचण्याचा ,बोलण्याचा सरावा तर सदोदित सुरु असतो. नाही जमलं तर इथं साहेबाच्या देशातही मराठीच बोलतो(सहकर्‍यांमध्ये). प्रयत्न करुन जेवढं इंग्रजी जमलं, त्या जोरावर थेट इथे इंग्लंडात आलो. समज्तं,बोलताही येतं.पण.... "thinking in English"म्हणतात ते जमत नाहिये.(परिणामी वादावादीचा प्रसंग आला आणि संभाषण इंग्लिश मध्ये असेल तर आमची स्पीड आणी त्यामुळे वाद घालायचा जोर आपोआप कमी होतो.) पण , प्रयत्न चालु आहेत, नेटाचे. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by स्वयंभू (verified= न पडताळणी केलेला)

रविराज Sat, 05/10/2008 - 05:18
स्वयंभू आणि पेशवे साहेब, प्रोत्साहना बद्घल धन्यवाद. तुमच्या प्रतिसादांमुळे हुरुप आला! >:D प्रयत्न मी नक्कीच करेल. पण हे वाघीणीचे दुध मला पचते की नाही या बाबत शंकाच आहे. =)) समज कॉटेंक्स्ट स्पेसिफीक तोडकमोड्क इंग्रजी बोलताही आलं मला, पण अनौपचारीक संभाषण सुधारण्या साठी पेपर वाचणे सोडून दुसरा काही रामबाण उपाय आहे का हो? अवांतर : आमच्या ऑफीस बाहेर कॉल सेंटर ची मुले मुली सिगरेटी फुकत इंग्रजी मधून बोलत असतात, त्यांच बोलण चोरुन ऐकण्याने फार फायदा होतो असा माझा अनुभव आहे. ;)

In reply to by रविराज

चतुरंग Tue, 05/13/2008 - 02:02
त्या भाषेतील चित्रपट पाहणे ह्याने बोलीभाषा चटकन सुधारते. काही स्लँग वर्डस असतात पण ते थोड्या प्रयत्नाने आपण टाळू शकतो. हमखास लागू पडणारा आणखी एक उपाय म्हणजे भाषांतर करणे. छोटा ५-१० ओळींपर्यंतचा एखादा इंग्रजी वर्तमानपत्रातील/पुस्तकातील परिच्छेद घेऊन तो भाषांतरित करण्याचा प्रयत्न केलात तरी तुम्हाला किती पायर्‍यांमधून जावे लागेल पहा - आधी वाचन --> अर्थ समजावून घेणे - त्यासाठी शब्दकोश धुंडाळणे --> मराठीतील प्रतिशब्द शोधणे --> वाक्यरचना समजावून घेणे --> मग भाषांतर पूर्ण करणे. ह्याने विचार करण्याच्या पद्धतीमधे बदल होत जातो. करुन पहा. चतुरंग

In reply to by स्वयंभू (verified= न पडताळणी केलेला)

प्रभाकर पेठकर Sat, 05/10/2008 - 08:06
सुरुवातीला त्रास होणे समजु शकतो. पण त्यावर मात करणंही आपल्याच हातात आहे. मराठीतून शिक्षण घेतलं म्हणून इंग्रजीचा भयगंड असेल तर तो एक वैयक्तीक पराभव आहे असं मी मानतो. श्री. स्वयंभू ह्यांच्या वरील मताशी १०० % सहमत आहे. कुठे-कुठे आपल्यातली कमतरता जाणवली तरी ती प्रयत्नपूर्वक दूर करणे शक्य असते. इंग्रजी कादंबर्‍या वाचल्यानेही (त्यातील स्लँग भाषा वगळून) बराच फायदा होतो. इंग्रजी पेपर्स वाचताना, नुसते शब्द-वाक्ये न वाचता, लेखनशैली समजावून घेण्याचा, आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे ज्ञान मिळविले आहे, जे शब्दभांडार वाढवीले आहे त्याचा तात्काळ आणि सातत्याने वापर करणे गरजेचे असते. इंग्रजी भाषेतील सौंदर्यस्थळे शोधून, समजावून घेऊन त्यांचा अंतर्भाव आपल्या संभाषणात करणे आदी गोष्टींनी हळू हळू भाषेची भीती दूर होऊन आत्मविश्वास वाढतो. मीही मराठी माध्यमातून शिकलो आहे. नोकरी निमित्ताने गोर्‍यांशी संबंध आले पण त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत वाद घालताना संकोच बाळगला नाही. तसेच, मराठी माध्यमातून शिकल्यामुळे माझे कुठे नुकसानही झाले नाही. काही इंग्रजी माध्यमातून शिकलेली मुले आपल्या पुढे जाताना दिसतात पण अशा वेळी 'कोल्ह्याला द्राक्षे आंबट' वृत्तीने ,' तो इंग्रजी माध्यमातून शिकला आहे, फाड्फाड इंग्रजी बोलतो म्हणून पुढे गेला' असा विचार न करता तो आपल्या पेक्षा 'हुशार'ही आहे हे वास्तव मनाशी स्विकारावे. आपल्या हुशारीतही 'वाढ' करण्याचा प्रयत्न करावा. तुरळक घटनांमध्ये इंग्रजी भाषेच्या प्रभुत्त्वामुळे कोणी पुढे जातोही पण त्याचा प्रवास फार लांबचा ठरत नाही. नुसते भाषेवरील प्रभुत्त्व आहे आणि हुशारी शून्य असेल तर लवकरच पितळ उघडे पडते. संकोच बाळगून मागे राहू नये. सतत चौकस राहून आत्मोन्नती घडवून आणावी.

चतुरंग गुरुवार, 05/08/2008 - 22:46
इंग्रजीबद्दलच्या अवास्तव कल्पना, आजूबाजूला दिसणारे तद्दन ढोंगी वातावरण, ह्या बरोबरच मराठी बोलण्याचा न्यूनगंड घरातूनच जोपासला जातो हे त्याचे मूळ कारण आहे. माझ्या अगदी परिचयातले नेहेमी येणारे अनुभव म्हणून सांगतो - इथे अमेरिकेतही किराणा मालाच्या दुकानात किंवा इतरत्रही मला नवरा-बायको मराठीत कुजबुजत असलेले दिसले आणि माझ्या बायकोशी किंवा मुलाशी मी मराठीत बोललेला त्यांना दिसलो की ते आमच्याकडे एक ओशाळता, चोरटा कटाक्ष टाकून आपापसात लगेच इंग्रजीत बोलायला सुरुवात करतात! (तुमच्या पैकी परदेशात असलेल्या अनेकांना असे अनुभव आले असतील/येत असतील.) त्याच जागी तमिळ, तेलुगु, हिंदी, गुजराती, पंजाबी असे इतर भाषिक दणादण त्यांच्या भाषेत संवाद साधतात. किंबहुना त्यांना समभाषिक भेटल्याचा जेवढा आनंद होतो (किंवा किमान तसा ते दाखवतात) तेवढा आपल्या मराठी लोकांना होत नाही! हे का व्हावे? मध्यमवर्गीय मूल्ये अजिबात चुकीची किंवा वाईट नाहीत. त्या मूल्यांमधे कालानुरुप योग्य ते बदल केले आणि त्यांचा डोळस स्वीकार केला तर आपलं भलंच होणार असतं. खर्‍या आयुष्याशी यशस्वी मैत्री करायला हीच मूल्ये उपयोगी पडत आलेली मी आजपर्यंत पहात आलेलो आहे. तेव्हा काहीजण इतरांच्या अनुभवातून शिकतात आणि काही स्वतः खड्ड्यात पडून, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. (प्रबोधनाने खड्ड्यात उडी मारणार्‍यांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.) चतुरंग

यशोधरा गुरुवार, 05/08/2008 - 23:01
>>> तुमच्या पैकी परदेशात असलेल्या अनेकांना असे अनुभव आले असतील/येत असतील परदेशातच कशाला, इथे, भारतातही असे अनुभव येतात. माझा एक सहकारी मराठीच आहे, आणि कधीही त्या माणसाच्या तोंडून मी मराठी ऐकलेले नाही!! म्हणजे त्याने विंग्रजी झाडायचे अन मी मात्र मराठीतूनच त्याच्याशी बोलायचे हा प्रकार सतत सुरुच असे!! शेवटी एकदा त्याला विचारले, की, मराठी बोलायला काही त्रास होतो का? जीभ वळत नाही की काय??? ..... संताप होतो असे लोक पाहिले की!!

प्रियाली गुरुवार, 05/08/2008 - 23:53
वरील कथा पहिल्यांदा ऐकली तेव्हा मराठीचा न्यूनगंड का वाटावा असे वाटून इतरांप्रमाणेच पहिला प्रतिसाद दिला. या गोष्टीवर अधिक विचार करता हे जाणवले की त्या मुलीचे सर्वच चुकीचे नाही. तिच्या बाजूने विचार करता कदाचित तिलाही बाजू असू शकेल. (क्षणभर, येथे मराठी बोलणारा मुलगा म्हणजे इंग्रजी न येणारा मुलगा असा गैरसमज नाही हे धरून चालू) ही गोष्ट लग्नाची आहे आणि लग्न हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे सदर मुलीने लग्नासाठी कोणत्या अटी घालाव्यात हा तिचा प्रश्न कारण परिणामही तिलाच भोगायचे आहेत. इतरत्र आपल्याच जातीतील मुले हवीत (का तर रहाणी, वागणूक समान मिळते), गोरी मुलगी हवी (का तर शोभून दिसेल..याहीपुढे जाऊन आमच्या घरात एकही सावळा रंग असणारा माणूस नाही), उच्चशिक्षित मुलगा हवा (का तर सुखात ठेवेल), एकुलता/ती एक मुलगा/गी नको (का तर सासूसासर्‍यांच लोढणं गळ्यात पडेल), भरल्या घरातले भरपूर भाऊ-बहिणी असलेला मुलगा नको (का तर आपल्या मुलीला सर्वांची उस्तवार करावी लागेल) जर असे सर्व प्रकार, अटी इ. चालतात तर या पोरीने इंग्रजी बोलणारा मुलगा हवा सांगून काय घोडं मारलं आहे? मराठी भाषा ही भरपूर पैसा मिळवून देवू शकत नाही ही आजकाल सर्वच समाजाची धारणा आहे म्हणूनच मुलं इंग्रजी शाळांत जातात आणि मराठी शाळा बंद पडतात ना. मग तोच विचार जाहिर या मुलीने मांडला (भले तो चुकीचा असेल पण मग इतर तरी कुठे बरोबर आहेत) तर काय मोठं झालं? अधिक विचार करता मला असं वाटतं की आपला जोडीदार कसा हवा हे ठरवण्याचा पूर्ण हक्क त्या मुलीला आहे. त्यातून चुकली तर निस्तरेलही तिच.

In reply to by प्रियाली

भडकमकर मास्तर Fri, 05/09/2008 - 00:01
अधिक विचार करता मला असं वाटतं की आपला जोडीदार कसा हवा हे ठरवण्याचा पूर्ण हक्क त्या मुलीला आहे. त्यातून चुकली तर निस्तरेलही तिच. याच विचाराचं एक्स्टेन्शन म्हणून मला असं वाटतं की असल्या विचाराच्या मुलीने नकार देण्यातच त्या मुलग्याचं भलं आहे...वाचला बिचारा...

In reply to by भडकमकर मास्तर

प्रियाली Fri, 05/09/2008 - 03:46
याच विचाराचं एक्स्टेन्शन म्हणून मला असं वाटतं की असल्या विचाराच्या मुलीने नकार देण्यातच त्या मुलग्याचं भलं आहे...वाचला बिचारा...
यात मुलाचं भलं ते काय? त्या मुलीने काही त्याची फसवणूक केलेली नाही किंवा आधी हो म्हणून नंतर लग्न मोडलेलं नाही. किंवा कोणाचे तोंडावर अपमान केले असेही वर सांगितलेले नाही. तेव्हा त्या मुलीने नकार देण्यात त्या मुलाचे भले आहे पर्यंत गाडीच पोहोचलेली नाही. ती जर तिच्या मतावर ठाम असेल (चूक की बरोबर ते नंतर बघू) तर इथली ४ डोकी कोण तिला नावं ठेवणार? किंवा जे नावं ठेवायला जातात ते लग्नाच्या बाजारात उभे होते तेव्हा कोणकोणत्या अटी घेऊन उभे होते ते पाहावे. तिची काही (चुकीची किंवा बरोबर) स्वप्न असतील त्याचा पाठपुरावा करण्याचा पूर्ण हक्क तिला आहे कारण लग्न ही तिची वैयक्तिक बाब आहे.

In reply to by प्रियाली

राजे Fri, 05/09/2008 - 16:10
पुर्णतः सहमत. तिची काही (चुकीची किंवा बरोबर) स्वप्न असतील त्याचा पाठपुरावा करण्याचा पूर्ण हक्क तिला आहे राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by प्रियाली

भडकमकर मास्तर Fri, 05/09/2008 - 17:39
कारण लग्न ही तिची वैयक्तिक बाब आहे. अगदी खरंय... मान्य... पण आम्ही तिला अजिबात नावे ठेवली नाहीत... तिचे आणि त्याचे दोघांचे भले झाले.... ( इथे सगळ्यांना वाटतंय की त्याच्यावर अन्याय झालाय, पण आम्हाला वाटतंय की छान झाले) आम्हाला फक्त इतकेच म्हणायचे होते की लग्नानन्तर त्रागा, भांडणे करण्यापेक्षा आधीच नकार देणारी ही मुलगी महान आहे.... आणि तिने नकार दिलेला मुलगा भाग्यवान आहे, कारण लग्न झाले असते तर तिच्या दु:खाचा सारा भार जन्मभर तो नवरा वाहत राहिला असता.....म्हणून वाचला बिचारा... ... तिला जपानी, जर्मन, इंग्रजी,ताहितिअन, सोमाली, यिडिश, अझरबैजानी, तुर्क, मेक्सिकन, स्पॅनिश ज्या कोणत्या माध्यमात शिकलेला नवरा हवा आहे, तो नवरा मिळवायचा तिला हक्क आहे आणि त्यासाठी तिच्या मनात येइल त्या माणसाला नकार द्यायचा तिला हक्क आहे, यासाठी तिला जो झगडा समाजाशी, कुटुम्बाशी आणि या विश्वातल्या प्रत्येक घटकाशी जरी करायचा असेल तरी माझा तिला तन, मन आणि धनाने पाठिंबा आहे ... .. ( स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता ) ( आणि जन्मभर बायकोच्या दु:खाचे पहाड वाहणारे नवरे पाहणारा) भडकमकर

ईश्वरी Fri, 05/09/2008 - 02:43
माझा नवरा आणि त्याचे कितीतरी मित्र मराठी माध्यमात शिकलेले आहेत (१ ते १० वी). तरी ते सफाईदार ईन्ग्लिश बोलतात आणि परदेशी उच्च पदाच्या नोकर् या करीत आहेत. मला नाही वाटत मराठी माध्यम ईन्ग्लिश बोलण्यात अडसर ठरू शकते. करिअर च्या द्रुष्टीने काही प्रकारच्या नोकर्यान्मधे सध्या असलेले ईन्ग्लिश चे महत्व नाकारता येणार नाही. त्या मुलीने सरळ नकार देण्याऐवजी मुलगा जरी मराठी माध्यमात शिकलेला असला तरी त्याला सफाईदार पणे ईन्ग्लिश बोलता येते कि नाही हे पडताळून पहायला काही हरकत नाही. एकदम टोकाचा विचार करू नये असे मला वाटते. ईश्वरी

मन Fri, 05/09/2008 - 03:10
त्या कार्टीला कन्नड माध्यमात शिकलेला मुलगा चालेल का? कारण तिनं "मराठी" नको असं सांगितलेलं दिसतय. "इंग्लिश" हवयं असं कुठं म्हटलय? हे तर उगिच सगळे गृहितक (ऍझम्पशन)धरुन चालले आहे... आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

वेलदोडा Fri, 05/09/2008 - 04:21
त्या कार्टीला कन्नड माध्यमात शिकलेला मुलगा चालेल का? कारण तिनं "मराठी" नको असं सांगितलेलं दिसतय. "इंग्लिश" हवयं असं कुठं म्हटलय? हे तर उगिच सगळे गृहितक (ऍझम्पशन)धरुन चालले आहे... --- पण मराठी माध्यम नको म्हणजे कोन्व्हेंट मध्ये शिकलेला मुलगा हवाय असं सरळ आहे. (मुलगी मराठी भाषिक आहे हे ऍझम्पशन आहे..कल्नत्री यान्नी ते स्पष्ट केल्यास बरे होईल ) -- वेलदोडा

धमाल मुलगा Fri, 05/09/2008 - 11:38
प्रियालीताईच्या मुद्द्याशी सहमत. ही बाब त्या मुलीची वैयक्तिक आहे. तीने योग्य गुण पारखून घ्यायचे की आभासामागे धावायचं हा प्रश्न तीचाच.! तरीही, एक मनोवृत्ती म्हणून विचार केला तर हे वागणं नक्कीच खटकण्याजोगं. हल्ली शहरांत तर सर्रास मराठी मुलं ही इंग्रजी माध्यमाच्याच शाळेत जातात..(ह्याचा अर्थ मराठी शाळा ओस पडताहेत असा कोणी काढू नये!)..तालुक्याच्या ठिकाणीही तुम्ही पाहिलंत तर 'आमचा मुलगा / मुलगी कॉन्व्हेंट मध्ये जाते' हे सांगताना आईबापाच्या नजरेत अभिमान तरळताना दिसतो. मुळात 'कॉन्व्हेंट' चा अर्थ किती जणांना ठाऊक असतो? :) बरं, ही मुलं फाडफाड इंग्रजी बोलत असतात (कधी व्याकरण तपासा त्यांच्या संवादातलं...तर्खडकर झीट येऊन पडतील!) त्याचा प्रभाव पडतोच. कारण शतकानुशतकं साहेबाचं लांगुलचालन करण्याची, त्यांचं तेच सर्वोत्तम हे मानण्याची भारतीय मनोवृत्ती आणि इंग्रजीत बोलण्याचा सराव नसल्याकारणाने त त प प...किमानपक्षी थोडंसं अडखळत बोलणारी मराठी माध्यमाची मुलं ह्यात इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी जास्त सरस वाटतात. इंग्रजी माध्यमात शिकल्यानंतर, काही प्रमाणात का होइना 'पर्सनॅलिटी ग्रुमिंग' नावाचा प्रकार आपोआप घडत जातो जितका मराठी माध्यमाच्या शाळांत नाही होत, त्यामुळे पॉलिश्ड वागणं-बोलणं ह्याचा प्रभाव पडतोच....हे झालं दिखाऊपणाबद्दल...म्हणजे दृश्य स्वरुपासंदर्भात. वर चर्चिलेले गैरसमज (काही प्रमाणात...मराठीच्या विद्यार्थ्यांना न्युनगंड खचितच वाटतो. निदान सुरुवातीला तरी) समाजात फार मोठ्या प्रमाणात आहेत...काही प्रमाणात त्यात तथ्यही आहेच..पण काही प्रमाणातच. त्याचाच हा परिणाम वाटतो. मनस्वीने म्हणल्याप्रमाणे असा एखादा मुलगा, खेड्यातली मुलगी पसंत करेल काय? त्यालाही इंग्रजी माध्यमातच शिकलेली मुलगी हवी असणार..त्याच्यासारखीच पॉलिश्ड! नाही का? चालायचंच, आपण कोणाकोणाला शिकवायला जाणार? ज्यानं त्यानं सुरुवात आपल्या घरापासून करावी हेच खरं!!!!! मुक्तसुनितराव,
यश म्हणजे काय , आयुष्यातील श्रेयस म्हणजे काय याच्या व्याख्या जसजशा जास्त जास्त लोकांना कळू लागतील तितके असे प्रसंग घडण्याची शक्यता कमी कमी होईल.
अगदी टाळीचं वाक्य! लाखमोलाचं बोललात :)

अभिता Sat, 05/10/2008 - 01:15
ह्याचा अर्थ मराठी शाळा ओस पडताहेत असा कोणी काढू नये!).. असहमत पुण्यातील मराठी शाळेतील शिक्षक जुन महिन्यात पटसंख्या पुर्ण होण्यासाठी फिरतात्.वर्गातील मुलाची संख्या कमी झाली आहे.म्हणून काहि वर्ग बंद केले जात आहेत्.आणि त्याच वेळेला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गर्दी वाढत आहे.

नेत्रेश Sat, 05/10/2008 - 04:25
आमच्या नात्यातील एक डॉक्टर मुलगी खुप चांगली, शीकलेली मुले नाकारुन बसली होती. तीची आई एकादा माझ्या मामाच्या दुकानात आली आणी मुलीची तक्रार सांगु लागली. मामा म्हणाला उद्या तीला दुकानात पाठव, एक चांगला मुलगा आहे. मी बघतो काही जमते का. पण मुलगा फक्त १२वी पास आहे हे समजल्यावर त्यांचा उत्साह मावळला कारण मुलगी हा मुलगाही नाकारणार याची त्यांना खात्री होती. तरीही दुसर्या दिवशी ती मुलगी दुकानात आली. तो मुलगाही आला. एक शीक्षण सोडले तर दोघे एकमेकांना अनुरूप होते. मुलीने त्याचे शीक्षण समजल्यावर तीथेच नकार दिला. हे अपेक्षीतच होते. पण मामाने तीला समजावले, मुलगा हुशार आहे. उद्योग धंदा करत आहे. थोड्यादीवसात त्याचा चांगला जम बसेल. तीने इंग्रजी चा वीषय काढला. मामाने त्याच्या दुकानात असलेले २ गोदरेज च्या एजन्सी चे इंग्रजीत असलेले अप्लीकेशन फॉर्म्स काढले आणी त्या दोघांना ते पुर्ण भरायला सांगितले. त्या मुलाने तो फॉर्म २० मिनीटात पुर्ण भरला, आणी त्या डॉक्टर मुलीला १ तास झाला तरी अर्धा फॉर्म भरता आला नाही. मामाने मुलीला समजावले जे व्यवहारात उपयोगी नाही असे इंग्रजी काय कामाचे. एक शीक्षण सोडले तर मुलगा तुझ्या पेक्षा सरस आहे. आणी कमाई तो २ वर्षांनी तुझ्या दुप्पट करेल. आणी नवल म्हणजे मामाचे सांगणे तीला पटले. त्यांचे लग्न झाले. मामाचा विश्वास सार्थ होता. आज तो मुलगा त्याच्या डॉक्टर बायकोच्या कीतीतारी पट जास्त कमावतो. आणी अर्थातच इंग्रजीचा कधीही प्रोब्लेम आल नाही.

In reply to by नेत्रेश

भडकमकर मास्तर Tue, 05/13/2008 - 10:01
छान गोष्ट नेत्रेश.... धन्यवाद सांगितल्याबद्दल... अवांतर ...त्या डॉक्टर मुलीला १ तास झाला तरी अर्धा फॉर्म भरता आला नाही अजिबात आश्चर्य वाटले नाही... :)) :))

वेताळ Sat, 05/10/2008 - 13:52
असाच किस्सा माझ्या बहिणीबाबत घडला होता. माझे भाउजी माझ्या बहिणी पेक्षा कमी शिकलेले आहेत. पण त्याच्या धंध्यामध्ये ते खुप्च यशस्वी झाले आहेत. आयटी वाला पण त्याच्या इतके कमवत नसेल.खर तर शिक्षण चांगले संस्कार माणसावर घडवते. काही लोक त्याचा गर्व करतात.त्याचा त्याना कधीतरी पश्चाताप होणार हे नक्की. राजा परुळेकराचे हे वाक्य त्या मुलीला ऐकवा. तुम्ही कोणत्या भाषेत बोलता यापेक्षा काय बोलता याचं महत्व अधिक आहे. असं नसतं तर बहिणाबाई चौधरी महान कवयित्री आणि लक्ष्मीबाई टिळक श्रेष्ठ लेखिका ठरल्या नसत्या आणि वॉटर प्युरीफायर विकायला टाय लावुन येणारा सेल्समन फाड्फाड इंग्रजी बोलतो म्हणुन तत्वज्ञ थरला असता. तिने लग्न कोणाशी करावे हा तिचा वैयक्तिक प्रश्न नक्कीच आहे. परंतु तिला तिचा मुर्खपणा दाखवुन देणे आपले काम आहे. वेताळ

मनस्वी गुरुवार, 05/08/2008 - 17:07
नकार द्यायला खरेच हेच कारण आहे, का नकार देण्यासाठी हे कारण पुढे केले जात आहे - हे ताडून घ्यायला हवे.

In reply to by मनस्वी

कलंत्री गुरुवार, 05/08/2008 - 17:20
खेड्यातील लोकांचे एक मानसशास्त्र असते. तेथे आहे तसेच सांगितले जाते. या गोष्टीची मी माझ्या आईकडूनही खात्री करून घेतली आहे. वरील गोष्टीच्या गावाची संख्या अंदाजे २५००० असावी आणि ही संख्या अनेक जातीजमातीत विखुरलेली असते. असो. पण ही वार्ता खरी असेल तर मराठी माध्यमात शिकलेला आहे म्हणून नवरा नाकारणे योग्य आहे काय? अवांतर : हा मुलगा संगणक अभियंता म्हणून पुण्यात नौकरीला असतो असेही मी ऐकले आहे, पण इंग्रजी मुलांसारखी सफाई मराठी मुलांमध्ये नसते अशी पुस्ती ऐकल्याचे आठवते. त्यामुळे कॉन्वेंट मध्ये शिकलेला आणि उच्चविद्याविभुषित मुलाची अपेक्षा आहे असे मी ऐकल्याचे आठवते.

In reply to by कलंत्री

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/08/2008 - 17:25
हा मुलगा संगणक अभियंता म्हणून पुण्यात नौकरीला असतो असेही मी ऐकले आहे, पण इंग्रजी मुलांसारखी सफाई मराठी मुलांमध्ये नसते अशी पुस्ती ऐकल्याचे आठवते. त्यामुळे कॉन्वेंट मध्ये शिकलेला आणि उच्चविद्याविभुषित मुलाची अपेक्षा आहे असे मी ऐकल्याचे आठवते. द्वारकानाथजी, आपण कोणासाठी कोण शोधताय? मूळ लेखात मुलीसाठी मुलगा शोधत आहात असे जाणवले. आता मुलासाठी मुलगा?

In reply to by प्रभाकर पेठकर

कलंत्री गुरुवार, 05/08/2008 - 17:42
प्रभाकरपंत, मी त्या नकार दिल्या गेलेल्या मुलाबद्दलची माहिती लिहिली आहे. ( अभियंता इत्यादी). त्या मुलीला कॉन्वेंट च्याच मुलाची अपेक्षा आहे असे मी ऐकले आहे. द्वारकानाथ या निमित्त्याने एका सामाजीक समस्येचा शोध घेण्याचा प्रयत्न आहे. सर्वसाधारण पणे लग्न ही आर्थिक पायावर जमतात. आता भाषा हाही निकष आला तर काय होईल असा विचार मनात येत आहे. इतर प्रतिसादात मुलेही इंग्रजी येत नाही म्हणून मुली नाकारतात असे वाचल्यावर समस्या बरीच खोल आहे असे वाटते.

In reply to by कलंत्री

मनस्वी गुरुवार, 05/08/2008 - 17:31
पण ही वार्ता खरी असेल तर मराठी माध्यमात शिकलेला आहे म्हणून नवरा नाकारणे योग्य आहे काय?
नाही. जर मुलगा खरोखरीच चांगला असेल तर या कारणावरून नाकारणे हा खरोखरीच वेडेपणा आहे.
त्यामुळे कॉन्वेंट मध्ये शिकलेला आणि उच्चविद्याविभुषित मुलाची अपेक्षा आहे असे मी ऐकल्याचे आठवते.
मग असा मुलगा खेड्यातील मुलीला पसंत करेल काय? (१-२% अपवाद वगळता)

In reply to by खरा डॉन

कलंत्री Fri, 05/09/2008 - 11:08
लग्न कसे घडतात या प्रक्रियेचा अभ्यास केला तर हे शक्य आहे. ठरवुन केलेल्या लग्नासाठी आर्थिक निकष, नातेवाईक-मित्रमंडळाची शिफारस, मुलाच्या मोठ्या भावाची निवड, खेड्यातील असली तरी मुलीमध्ये आगळे वेगळे असलेले चैतन्य ( स्पार्क) आणि आपल्याला नेमके काय हवे आहे हे जर उपवराला ठाऊक असेल तर हे निश्चितच शक्य आहे. वडाची साल वांग्याला -> सयाजीराव गायकवाड यांची दत्तक निवड सुद्धा अश्याच दुरदुरच्या खेड्यातून झाली होती याचे स्मरण होत आहे.

प्रियाली गुरुवार, 05/08/2008 - 17:15
आणि हे केवळ मुलींच्याच बाबतीत नाही तर मुलगेही असेच असतात म्हणजे आपली बायकोशी आपण इंग्रजीत संभाषण करतो हे दाखवण्यासाठी त्यांनाही इंग्रजी बोलणार्‍या बायका हव्या असतात आजकाल. हा बहुधा मराठी शिक्षणाला कमी गणले गेल्याने आलेला गंड असावा. मराठी भाषेचा न्यूनगंड बाळगण्यासारखं काय आहे तेच कळत नाही.

In reply to by प्रियाली

स्वाती दिनेश गुरुवार, 05/08/2008 - 17:34
मराठी भाषेचा न्यूनगंड बाळगण्यासारखं काय आहे तेच कळत नाही. अगदी खरे, इतर भारतीय भाषक मात्र एकत्र आले की आपल्या मातृभाषेतच संवाद करतात.एवढेच नव्हे तर जर्मनी,इटाली, जपान, स्पेन इ.सारख्या बिगर इंग्रजी भाषक देशात त्यांचे इंग्रजीवाचून काही विशेष अडत नाही आणि आपण कोणाला काही विचारलेच,अर्थातच इंग्रजीमधून तर "आय नो नो इंग्लिश.." असं साधं उत्तरही बरेचदा ऐकायला मिळते. स्वाती

वेताळ गुरुवार, 05/08/2008 - 18:21
दोघी खेड्यात रहात असल्यामुळे फक्त इंग्रजी भाषा येत असावी.त्यामुळे हा प्रश्न उधभवला असावा.सदर मुलीला जर ब्रिटन ला पाठवले तर तिचा प्रश्न सुटु शकेल.तसेच अस्स्लिखित इंग्रजी बोलणारे कान्हेन्ट मुले १२ झाली की पुढे शिक्षण घेण्यापेक्षा कालसेंटर मध्ये काम करण्यात धन्यता मानतात व त्याना खेड्यातली मुलगी पसंद पडेल का? शंका वाटते. (फिरंगी) वेताळ

मुक्तसुनीत गुरुवार, 05/08/2008 - 18:26
मराठी भाषेबद्दलचा न्यूनगंड हा विषय आपल्या सगळ्याना चिरपरिचित आणि म्हणूनच जिव्हाळ्याचा आहे. या न्यूनगंडाचे सर्वात स्पष्ट प्रतिबिंब वयात येणार्‍या पिढीमधे पडलेले दिसते. इलेक्ट्रॉनिक मिडीआ , सिनेमा , जाहिरातींची दुनिया या सगळ्या लोकप्रिय गोष्टी या गंडाला पोषक ठरतील अशीच मूल्ये युवाविढीसमोर ठेवताना दिसतात. ब्रँडनेम्स ची उत्पादने वापरणे , अत्याधुनिक फॅशनची वस्त्रेप्रावरणे यांचा अंगिकार करणे, व्यवसायात आणि उद्यमशीलता या सगळ्यातील यशाचा संबंध इंग्रजी भाषेशी - आणि मुख्य म्हणजे "स्लँग"शी आहे असे मनीमानसी ठसविले जाते. या सर्व गोष्टींचा पगडा सहजासहजी न झुगारता येण्याजोगा आहे यात शंका नाही. शेवटी सामाजिक मान्यता , आर्थिक संपन्नतेची स्वप्ने , आर्थिक बंधनातून , सामाजिक बंधनातून "मुक्त" अशी जीवनशैली या सार्‍याचे आकर्षण कुणाला वाटणार नाही ? किंबहुना , वर निर्देशित केलेल्या गोष्टीच , आत्मोन्नतीच्या दृष्टीने प्रवास करायला तरुण व्यक्तीला उत्साहित करतात. आणि या सार्‍याची नाळ शेवटी बांधली जाते इंग्रजीशी , पर्यायाने , मातृभाषेशी नाते तोडण्याशी. या सर्व परिस्थितीचा उलगडा तुम्हाआम्हा व्यक्तिना होतो तेव्हा पौगंडावस्था उलटलेली असते. अर्थात आपल्यापैकी बर्‍याच जणांना हा सर्व भुलभुलैय्या आहे याची जाणीव "न कळत्या" वयातही होत असतेच. पण ज्याना ती होत नाही त्यांच्याकरताच तर हे जाळे असते. कलंत्रीनी वर्णिलेल्या प्रसंगातली तरुणी या जाळ्यात अडकलेली आहे. या सर्वावरचा उपाय काय ? तर प्रबोधन. (शेवटी कुठल्याही सामाजिक समस्येचा अक्सीर इलाज हाच असतो म्हणा !) मराठी भाषेत शिकलेल्या जितक्या जास्त जास्त व्यक्ती लोकंसमोर येतील तितके कमी लोक उपरनिर्देशित जाळ्यात अडकतील. किंबहुना यश म्हणजे काय , आयुष्यातील श्रेयस म्हणजे काय याच्या व्याख्या जसजशा जास्त जास्त लोकांना कळू लागतील तितके असे प्रसंग घडण्याची शक्यता कमी कमी होईल.

In reply to by मुक्तसुनीत

नीलकांत Fri, 05/09/2008 - 22:43
मराठी भाषेत शिकलेल्या जितक्या जास्त जास्त व्यक्ती लोकंसमोर येतील तितके कमी लोक उपरनिर्देशित जाळ्यात अडकतील. किंबहुना यश म्हणजे काय , आयुष्यातील श्रेयस म्हणजे काय याच्या व्याख्या जसजशा जास्त जास्त लोकांना कळू लागतील तितके असे प्रसंग घडण्याची शक्यता कमी कमी होईल.
मुक्तसुनीत साहेब अगदी मनातलं बोललात. नीलकांत

भाग्यश्री गुरुवार, 05/08/2008 - 22:19
अशी उदाहरणं दुर्दैवाने आहेत आजूबाजूला.. माझ्या वहीनीच्या बहीणीने असंच एक चांगलं स्थळ नाकारलं होतं.. का तर तो मुलगा भेटायला आला तेव्हा मराठीतून बोलत होता, इंग्लिश नाही.. !! आता दोघांची मातृभाषा मराठी असताना , शिवाय लग्नासारख्या गोष्टी होताना कोण इंग्लिश मधे बोलायला जाईल!! काहीही.. मुर्ख असतात अशी लोकं! निव्वळ वेडेपणा!

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/08/2008 - 22:20
बहुतेक अशा मुलींचे अतिंम ध्येय नवरदेवाची शीडी वापरून परदेशात (युरोप-अमेरिकेत) 'सेट्ल' होण्याचे असते. कॉन्व्हेंट किंवा इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांना अशा संधी जास्त येतात असा एक गैरसमज त्या मागे असू शकतो. तसेच, कॉन्व्हेंट किंवा इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांमध्ये इंग्रजी भाषेचा भयगंड नसल्यामुळे मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलांपेक्षा जगातील कुठल्याही देशात राहण्या-फिरण्याचा, नोकरीचा आत्मविश्वास जास्त असतो (गैरसमज क्र.२). मराठी माध्यमातून शिकलेली मुले 'मराठी मध्यमवर्गीय विचारसरणीची' असतात त्यामुळे आपल्या विवाहोत्तर स्वातंत्र्यावर गदा येऊन धुणी-भांडी, उष्टी-खरकटी काढण्यात उर्वरीत आयुष्य कंठावे लागेल असाही गैरसमज असू शकतो. अशा अनेक गैरसमजांवर उभारलेली गोजीरवाणी स्वप्ने जेंव्हा वास्तवाच्या ठोकरीत चक्काचूर होतात तेंव्हाच ह्यांचे डोळे (कदाचित) उघडतात. पण तेंव्हा खूप उशीर झालेला असतो. ह्यांचा आयुष्याकडे, भौतिक सुखांकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. 'लग्न' ह्या विषयाकडे आपले आर्थिक, सामाजिक स्तर उंचावण्याची एकमेव संधी अशा दृष्टीने पाहण्याकडे कल दिसतो. अशा मुली 'भावी पिढी' काय आणि कशी घडविणार हा अत्यंत भितीदायक प्रश्न आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

रविराज Fri, 05/09/2008 - 06:51
गैरसमज क्र.२ हा पुर्णपणे गैरसमज नाहीये. मी मराठी माध्यमातून शिकलो आहे. इंग्रजी बोलताना थोडासा(स्वगतः थोडासा की भरपूर?) न्यूनगंड हा जाणवतोच. त्यामुळे मग वाटत की इंग्रजी माध्यमातून शिकलो असतो तर बर झाल असतं! (पुन्हा स्वगत : पण जर मी इंग्रजी माध्यमातून शिकलो असतो तर मि.पा. चा खरा आनंद मला लुटता आला असता का? ) रवी

In reply to by रविराज

स्वयंभू Fri, 05/09/2008 - 22:02
माफ करा, मी आपल्याल ओळखत नाही पण तरी बोलल्या शिवाय रहावत नाही कारण हा विषय माझ्याही जिव्हाळ्याचा आहे. मला असं वाटतं इथे चुकताय आपण. सुरुवातीला त्रास होणे समजु शकतो. पण त्यावर मात करणंही आपल्याच हातात आहे. मराठीतून शिक्षण घेतलं म्हणून इंग्रजीचा भयगंड असेल तर तो एक वैयक्तीक पराभव आहे असं मी मानतो. मी मराठी माध्यमातून शिकलो. कॉलेज मधेही मराठी मित्रांचाच कंपू होता. आणि आज मी जगातल्या नं १ च्या ऍड एजन्सी मधे इंग्रजी जाहीरात लेखक (Copywriter) म्हणून कामाला आहे. आणि मि. पा. चा आनंदही व्यवस्थीत लुटतो आहे. मला कुठलाही न्युनगंड जाणवत नाही. सुरुवातीला जम बसवताना त्रास झाला. मराठी माध्यमाचा म्हणून बर्याच मरठी लोकांनीही जॉब नाकारला. पण स्वतः मधे सुधारणा करणं आपल्याच हातात आहे. ह्या खरडी मागचा अर्थ स्वत:ची लाल करणे नसून ' केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे' ह्या उक्ती वर विश्वास ठेवा हे सांगणे हा आहे. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

In reply to by स्वयंभू (verified= न पडताळणी केलेला)

मन Fri, 05/09/2008 - 22:24
...पण स्वतः मधे सुधारणा करणं आपल्याच हातात आहे. बिल्कुल कबुल. प्रयत्न करतो आहे. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by स्वयंभू (verified= न पडताळणी केलेला)

माझेही काहीसे ऍडी जोशी सारखे आहे. त्यात मराठी माध्यमातूम शिक्षणाच्या जोडीला त्याच्या जाज्वल्य अभिमानाची पण जोड होतीच. पूर्वी मी माझ्या कॉलेजकंपू मधे इंग्रजी बोलता येत नाही म्हणून हिंदी बोलणारे अनेक जण पाहीले त्यांचा मनोमन फार राग यायचा पण काय करणार मलाही धड इंग्रजी बोलता येत नव्हते. तेव्हा माझ्या क्लासच्या सरांनी सांगितले की "इंग्लिश बोलता येत नाही म्हणून हिंदी बोलणे या गोष्टीने ज्या मराठी भाषेवर प्रेम करतोस तिचे नुकसान आणि अपमान करत आहेस. जर इंग्रजी बोलता येत नसेल तर प्रयत्नपूर्वक ते शिक. रोज इंग्रजी वृत्तपत्र मोठ्याने वाचत जा. एकदा जीभ वळायला लागली की नक्की जमेल. आणि एखादे वाक्य नाही जमले इंग्रजी मधे बोलायला तर बेलाशक ते मराठी मधे बोलून टाक. आपल्या मातृभाषेची लाज वाटणे हा नुसता करंटेपणाच नाही तर षंढपणाही आहे. चुकलं तर चुकूदे पण प्रयत्नपूर्वक सुधारणा कर." माझे इंग्रजी बोलणे त्यामुळे सुधारले आणि IT हमाल म्हणून का होईना पण अमेरीकेत येण्यापर्यंत प्रगती झाली. 'केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे' हेच खरे. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मन Sat, 05/10/2008 - 04:16
तुमच्या मी. आंग्ल भाषेत वाचण्याचा ,बोलण्याचा सरावा तर सदोदित सुरु असतो. नाही जमलं तर इथं साहेबाच्या देशातही मराठीच बोलतो(सहकर्‍यांमध्ये). प्रयत्न करुन जेवढं इंग्रजी जमलं, त्या जोरावर थेट इथे इंग्लंडात आलो. समज्तं,बोलताही येतं.पण.... "thinking in English"म्हणतात ते जमत नाहिये.(परिणामी वादावादीचा प्रसंग आला आणि संभाषण इंग्लिश मध्ये असेल तर आमची स्पीड आणी त्यामुळे वाद घालायचा जोर आपोआप कमी होतो.) पण , प्रयत्न चालु आहेत, नेटाचे. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by स्वयंभू (verified= न पडताळणी केलेला)

रविराज Sat, 05/10/2008 - 05:18
स्वयंभू आणि पेशवे साहेब, प्रोत्साहना बद्घल धन्यवाद. तुमच्या प्रतिसादांमुळे हुरुप आला! >:D प्रयत्न मी नक्कीच करेल. पण हे वाघीणीचे दुध मला पचते की नाही या बाबत शंकाच आहे. =)) समज कॉटेंक्स्ट स्पेसिफीक तोडकमोड्क इंग्रजी बोलताही आलं मला, पण अनौपचारीक संभाषण सुधारण्या साठी पेपर वाचणे सोडून दुसरा काही रामबाण उपाय आहे का हो? अवांतर : आमच्या ऑफीस बाहेर कॉल सेंटर ची मुले मुली सिगरेटी फुकत इंग्रजी मधून बोलत असतात, त्यांच बोलण चोरुन ऐकण्याने फार फायदा होतो असा माझा अनुभव आहे. ;)

In reply to by रविराज

चतुरंग Tue, 05/13/2008 - 02:02
त्या भाषेतील चित्रपट पाहणे ह्याने बोलीभाषा चटकन सुधारते. काही स्लँग वर्डस असतात पण ते थोड्या प्रयत्नाने आपण टाळू शकतो. हमखास लागू पडणारा आणखी एक उपाय म्हणजे भाषांतर करणे. छोटा ५-१० ओळींपर्यंतचा एखादा इंग्रजी वर्तमानपत्रातील/पुस्तकातील परिच्छेद घेऊन तो भाषांतरित करण्याचा प्रयत्न केलात तरी तुम्हाला किती पायर्‍यांमधून जावे लागेल पहा - आधी वाचन --> अर्थ समजावून घेणे - त्यासाठी शब्दकोश धुंडाळणे --> मराठीतील प्रतिशब्द शोधणे --> वाक्यरचना समजावून घेणे --> मग भाषांतर पूर्ण करणे. ह्याने विचार करण्याच्या पद्धतीमधे बदल होत जातो. करुन पहा. चतुरंग

In reply to by स्वयंभू (verified= न पडताळणी केलेला)

प्रभाकर पेठकर Sat, 05/10/2008 - 08:06
सुरुवातीला त्रास होणे समजु शकतो. पण त्यावर मात करणंही आपल्याच हातात आहे. मराठीतून शिक्षण घेतलं म्हणून इंग्रजीचा भयगंड असेल तर तो एक वैयक्तीक पराभव आहे असं मी मानतो. श्री. स्वयंभू ह्यांच्या वरील मताशी १०० % सहमत आहे. कुठे-कुठे आपल्यातली कमतरता जाणवली तरी ती प्रयत्नपूर्वक दूर करणे शक्य असते. इंग्रजी कादंबर्‍या वाचल्यानेही (त्यातील स्लँग भाषा वगळून) बराच फायदा होतो. इंग्रजी पेपर्स वाचताना, नुसते शब्द-वाक्ये न वाचता, लेखनशैली समजावून घेण्याचा, आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे ज्ञान मिळविले आहे, जे शब्दभांडार वाढवीले आहे त्याचा तात्काळ आणि सातत्याने वापर करणे गरजेचे असते. इंग्रजी भाषेतील सौंदर्यस्थळे शोधून, समजावून घेऊन त्यांचा अंतर्भाव आपल्या संभाषणात करणे आदी गोष्टींनी हळू हळू भाषेची भीती दूर होऊन आत्मविश्वास वाढतो. मीही मराठी माध्यमातून शिकलो आहे. नोकरी निमित्ताने गोर्‍यांशी संबंध आले पण त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत वाद घालताना संकोच बाळगला नाही. तसेच, मराठी माध्यमातून शिकल्यामुळे माझे कुठे नुकसानही झाले नाही. काही इंग्रजी माध्यमातून शिकलेली मुले आपल्या पुढे जाताना दिसतात पण अशा वेळी 'कोल्ह्याला द्राक्षे आंबट' वृत्तीने ,' तो इंग्रजी माध्यमातून शिकला आहे, फाड्फाड इंग्रजी बोलतो म्हणून पुढे गेला' असा विचार न करता तो आपल्या पेक्षा 'हुशार'ही आहे हे वास्तव मनाशी स्विकारावे. आपल्या हुशारीतही 'वाढ' करण्याचा प्रयत्न करावा. तुरळक घटनांमध्ये इंग्रजी भाषेच्या प्रभुत्त्वामुळे कोणी पुढे जातोही पण त्याचा प्रवास फार लांबचा ठरत नाही. नुसते भाषेवरील प्रभुत्त्व आहे आणि हुशारी शून्य असेल तर लवकरच पितळ उघडे पडते. संकोच बाळगून मागे राहू नये. सतत चौकस राहून आत्मोन्नती घडवून आणावी.

चतुरंग गुरुवार, 05/08/2008 - 22:46
इंग्रजीबद्दलच्या अवास्तव कल्पना, आजूबाजूला दिसणारे तद्दन ढोंगी वातावरण, ह्या बरोबरच मराठी बोलण्याचा न्यूनगंड घरातूनच जोपासला जातो हे त्याचे मूळ कारण आहे. माझ्या अगदी परिचयातले नेहेमी येणारे अनुभव म्हणून सांगतो - इथे अमेरिकेतही किराणा मालाच्या दुकानात किंवा इतरत्रही मला नवरा-बायको मराठीत कुजबुजत असलेले दिसले आणि माझ्या बायकोशी किंवा मुलाशी मी मराठीत बोललेला त्यांना दिसलो की ते आमच्याकडे एक ओशाळता, चोरटा कटाक्ष टाकून आपापसात लगेच इंग्रजीत बोलायला सुरुवात करतात! (तुमच्या पैकी परदेशात असलेल्या अनेकांना असे अनुभव आले असतील/येत असतील.) त्याच जागी तमिळ, तेलुगु, हिंदी, गुजराती, पंजाबी असे इतर भाषिक दणादण त्यांच्या भाषेत संवाद साधतात. किंबहुना त्यांना समभाषिक भेटल्याचा जेवढा आनंद होतो (किंवा किमान तसा ते दाखवतात) तेवढा आपल्या मराठी लोकांना होत नाही! हे का व्हावे? मध्यमवर्गीय मूल्ये अजिबात चुकीची किंवा वाईट नाहीत. त्या मूल्यांमधे कालानुरुप योग्य ते बदल केले आणि त्यांचा डोळस स्वीकार केला तर आपलं भलंच होणार असतं. खर्‍या आयुष्याशी यशस्वी मैत्री करायला हीच मूल्ये उपयोगी पडत आलेली मी आजपर्यंत पहात आलेलो आहे. तेव्हा काहीजण इतरांच्या अनुभवातून शिकतात आणि काही स्वतः खड्ड्यात पडून, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. (प्रबोधनाने खड्ड्यात उडी मारणार्‍यांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.) चतुरंग

यशोधरा गुरुवार, 05/08/2008 - 23:01
>>> तुमच्या पैकी परदेशात असलेल्या अनेकांना असे अनुभव आले असतील/येत असतील परदेशातच कशाला, इथे, भारतातही असे अनुभव येतात. माझा एक सहकारी मराठीच आहे, आणि कधीही त्या माणसाच्या तोंडून मी मराठी ऐकलेले नाही!! म्हणजे त्याने विंग्रजी झाडायचे अन मी मात्र मराठीतूनच त्याच्याशी बोलायचे हा प्रकार सतत सुरुच असे!! शेवटी एकदा त्याला विचारले, की, मराठी बोलायला काही त्रास होतो का? जीभ वळत नाही की काय??? ..... संताप होतो असे लोक पाहिले की!!

प्रियाली गुरुवार, 05/08/2008 - 23:53
वरील कथा पहिल्यांदा ऐकली तेव्हा मराठीचा न्यूनगंड का वाटावा असे वाटून इतरांप्रमाणेच पहिला प्रतिसाद दिला. या गोष्टीवर अधिक विचार करता हे जाणवले की त्या मुलीचे सर्वच चुकीचे नाही. तिच्या बाजूने विचार करता कदाचित तिलाही बाजू असू शकेल. (क्षणभर, येथे मराठी बोलणारा मुलगा म्हणजे इंग्रजी न येणारा मुलगा असा गैरसमज नाही हे धरून चालू) ही गोष्ट लग्नाची आहे आणि लग्न हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे सदर मुलीने लग्नासाठी कोणत्या अटी घालाव्यात हा तिचा प्रश्न कारण परिणामही तिलाच भोगायचे आहेत. इतरत्र आपल्याच जातीतील मुले हवीत (का तर रहाणी, वागणूक समान मिळते), गोरी मुलगी हवी (का तर शोभून दिसेल..याहीपुढे जाऊन आमच्या घरात एकही सावळा रंग असणारा माणूस नाही), उच्चशिक्षित मुलगा हवा (का तर सुखात ठेवेल), एकुलता/ती एक मुलगा/गी नको (का तर सासूसासर्‍यांच लोढणं गळ्यात पडेल), भरल्या घरातले भरपूर भाऊ-बहिणी असलेला मुलगा नको (का तर आपल्या मुलीला सर्वांची उस्तवार करावी लागेल) जर असे सर्व प्रकार, अटी इ. चालतात तर या पोरीने इंग्रजी बोलणारा मुलगा हवा सांगून काय घोडं मारलं आहे? मराठी भाषा ही भरपूर पैसा मिळवून देवू शकत नाही ही आजकाल सर्वच समाजाची धारणा आहे म्हणूनच मुलं इंग्रजी शाळांत जातात आणि मराठी शाळा बंद पडतात ना. मग तोच विचार जाहिर या मुलीने मांडला (भले तो चुकीचा असेल पण मग इतर तरी कुठे बरोबर आहेत) तर काय मोठं झालं? अधिक विचार करता मला असं वाटतं की आपला जोडीदार कसा हवा हे ठरवण्याचा पूर्ण हक्क त्या मुलीला आहे. त्यातून चुकली तर निस्तरेलही तिच.

In reply to by प्रियाली

भडकमकर मास्तर Fri, 05/09/2008 - 00:01
अधिक विचार करता मला असं वाटतं की आपला जोडीदार कसा हवा हे ठरवण्याचा पूर्ण हक्क त्या मुलीला आहे. त्यातून चुकली तर निस्तरेलही तिच. याच विचाराचं एक्स्टेन्शन म्हणून मला असं वाटतं की असल्या विचाराच्या मुलीने नकार देण्यातच त्या मुलग्याचं भलं आहे...वाचला बिचारा...

In reply to by भडकमकर मास्तर

प्रियाली Fri, 05/09/2008 - 03:46
याच विचाराचं एक्स्टेन्शन म्हणून मला असं वाटतं की असल्या विचाराच्या मुलीने नकार देण्यातच त्या मुलग्याचं भलं आहे...वाचला बिचारा...
यात मुलाचं भलं ते काय? त्या मुलीने काही त्याची फसवणूक केलेली नाही किंवा आधी हो म्हणून नंतर लग्न मोडलेलं नाही. किंवा कोणाचे तोंडावर अपमान केले असेही वर सांगितलेले नाही. तेव्हा त्या मुलीने नकार देण्यात त्या मुलाचे भले आहे पर्यंत गाडीच पोहोचलेली नाही. ती जर तिच्या मतावर ठाम असेल (चूक की बरोबर ते नंतर बघू) तर इथली ४ डोकी कोण तिला नावं ठेवणार? किंवा जे नावं ठेवायला जातात ते लग्नाच्या बाजारात उभे होते तेव्हा कोणकोणत्या अटी घेऊन उभे होते ते पाहावे. तिची काही (चुकीची किंवा बरोबर) स्वप्न असतील त्याचा पाठपुरावा करण्याचा पूर्ण हक्क तिला आहे कारण लग्न ही तिची वैयक्तिक बाब आहे.

In reply to by प्रियाली

राजे Fri, 05/09/2008 - 16:10
पुर्णतः सहमत. तिची काही (चुकीची किंवा बरोबर) स्वप्न असतील त्याचा पाठपुरावा करण्याचा पूर्ण हक्क तिला आहे राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by प्रियाली

भडकमकर मास्तर Fri, 05/09/2008 - 17:39
कारण लग्न ही तिची वैयक्तिक बाब आहे. अगदी खरंय... मान्य... पण आम्ही तिला अजिबात नावे ठेवली नाहीत... तिचे आणि त्याचे दोघांचे भले झाले.... ( इथे सगळ्यांना वाटतंय की त्याच्यावर अन्याय झालाय, पण आम्हाला वाटतंय की छान झाले) आम्हाला फक्त इतकेच म्हणायचे होते की लग्नानन्तर त्रागा, भांडणे करण्यापेक्षा आधीच नकार देणारी ही मुलगी महान आहे.... आणि तिने नकार दिलेला मुलगा भाग्यवान आहे, कारण लग्न झाले असते तर तिच्या दु:खाचा सारा भार जन्मभर तो नवरा वाहत राहिला असता.....म्हणून वाचला बिचारा... ... तिला जपानी, जर्मन, इंग्रजी,ताहितिअन, सोमाली, यिडिश, अझरबैजानी, तुर्क, मेक्सिकन, स्पॅनिश ज्या कोणत्या माध्यमात शिकलेला नवरा हवा आहे, तो नवरा मिळवायचा तिला हक्क आहे आणि त्यासाठी तिच्या मनात येइल त्या माणसाला नकार द्यायचा तिला हक्क आहे, यासाठी तिला जो झगडा समाजाशी, कुटुम्बाशी आणि या विश्वातल्या प्रत्येक घटकाशी जरी करायचा असेल तरी माझा तिला तन, मन आणि धनाने पाठिंबा आहे ... .. ( स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता ) ( आणि जन्मभर बायकोच्या दु:खाचे पहाड वाहणारे नवरे पाहणारा) भडकमकर

ईश्वरी Fri, 05/09/2008 - 02:43
माझा नवरा आणि त्याचे कितीतरी मित्र मराठी माध्यमात शिकलेले आहेत (१ ते १० वी). तरी ते सफाईदार ईन्ग्लिश बोलतात आणि परदेशी उच्च पदाच्या नोकर् या करीत आहेत. मला नाही वाटत मराठी माध्यम ईन्ग्लिश बोलण्यात अडसर ठरू शकते. करिअर च्या द्रुष्टीने काही प्रकारच्या नोकर्यान्मधे सध्या असलेले ईन्ग्लिश चे महत्व नाकारता येणार नाही. त्या मुलीने सरळ नकार देण्याऐवजी मुलगा जरी मराठी माध्यमात शिकलेला असला तरी त्याला सफाईदार पणे ईन्ग्लिश बोलता येते कि नाही हे पडताळून पहायला काही हरकत नाही. एकदम टोकाचा विचार करू नये असे मला वाटते. ईश्वरी

मन Fri, 05/09/2008 - 03:10
त्या कार्टीला कन्नड माध्यमात शिकलेला मुलगा चालेल का? कारण तिनं "मराठी" नको असं सांगितलेलं दिसतय. "इंग्लिश" हवयं असं कुठं म्हटलय? हे तर उगिच सगळे गृहितक (ऍझम्पशन)धरुन चालले आहे... आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

वेलदोडा Fri, 05/09/2008 - 04:21
त्या कार्टीला कन्नड माध्यमात शिकलेला मुलगा चालेल का? कारण तिनं "मराठी" नको असं सांगितलेलं दिसतय. "इंग्लिश" हवयं असं कुठं म्हटलय? हे तर उगिच सगळे गृहितक (ऍझम्पशन)धरुन चालले आहे... --- पण मराठी माध्यम नको म्हणजे कोन्व्हेंट मध्ये शिकलेला मुलगा हवाय असं सरळ आहे. (मुलगी मराठी भाषिक आहे हे ऍझम्पशन आहे..कल्नत्री यान्नी ते स्पष्ट केल्यास बरे होईल ) -- वेलदोडा

धमाल मुलगा Fri, 05/09/2008 - 11:38
प्रियालीताईच्या मुद्द्याशी सहमत. ही बाब त्या मुलीची वैयक्तिक आहे. तीने योग्य गुण पारखून घ्यायचे की आभासामागे धावायचं हा प्रश्न तीचाच.! तरीही, एक मनोवृत्ती म्हणून विचार केला तर हे वागणं नक्कीच खटकण्याजोगं. हल्ली शहरांत तर सर्रास मराठी मुलं ही इंग्रजी माध्यमाच्याच शाळेत जातात..(ह्याचा अर्थ मराठी शाळा ओस पडताहेत असा कोणी काढू नये!)..तालुक्याच्या ठिकाणीही तुम्ही पाहिलंत तर 'आमचा मुलगा / मुलगी कॉन्व्हेंट मध्ये जाते' हे सांगताना आईबापाच्या नजरेत अभिमान तरळताना दिसतो. मुळात 'कॉन्व्हेंट' चा अर्थ किती जणांना ठाऊक असतो? :) बरं, ही मुलं फाडफाड इंग्रजी बोलत असतात (कधी व्याकरण तपासा त्यांच्या संवादातलं...तर्खडकर झीट येऊन पडतील!) त्याचा प्रभाव पडतोच. कारण शतकानुशतकं साहेबाचं लांगुलचालन करण्याची, त्यांचं तेच सर्वोत्तम हे मानण्याची भारतीय मनोवृत्ती आणि इंग्रजीत बोलण्याचा सराव नसल्याकारणाने त त प प...किमानपक्षी थोडंसं अडखळत बोलणारी मराठी माध्यमाची मुलं ह्यात इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी जास्त सरस वाटतात. इंग्रजी माध्यमात शिकल्यानंतर, काही प्रमाणात का होइना 'पर्सनॅलिटी ग्रुमिंग' नावाचा प्रकार आपोआप घडत जातो जितका मराठी माध्यमाच्या शाळांत नाही होत, त्यामुळे पॉलिश्ड वागणं-बोलणं ह्याचा प्रभाव पडतोच....हे झालं दिखाऊपणाबद्दल...म्हणजे दृश्य स्वरुपासंदर्भात. वर चर्चिलेले गैरसमज (काही प्रमाणात...मराठीच्या विद्यार्थ्यांना न्युनगंड खचितच वाटतो. निदान सुरुवातीला तरी) समाजात फार मोठ्या प्रमाणात आहेत...काही प्रमाणात त्यात तथ्यही आहेच..पण काही प्रमाणातच. त्याचाच हा परिणाम वाटतो. मनस्वीने म्हणल्याप्रमाणे असा एखादा मुलगा, खेड्यातली मुलगी पसंत करेल काय? त्यालाही इंग्रजी माध्यमातच शिकलेली मुलगी हवी असणार..त्याच्यासारखीच पॉलिश्ड! नाही का? चालायचंच, आपण कोणाकोणाला शिकवायला जाणार? ज्यानं त्यानं सुरुवात आपल्या घरापासून करावी हेच खरं!!!!! मुक्तसुनितराव,
यश म्हणजे काय , आयुष्यातील श्रेयस म्हणजे काय याच्या व्याख्या जसजशा जास्त जास्त लोकांना कळू लागतील तितके असे प्रसंग घडण्याची शक्यता कमी कमी होईल.
अगदी टाळीचं वाक्य! लाखमोलाचं बोललात :)

अभिता Sat, 05/10/2008 - 01:15
ह्याचा अर्थ मराठी शाळा ओस पडताहेत असा कोणी काढू नये!).. असहमत पुण्यातील मराठी शाळेतील शिक्षक जुन महिन्यात पटसंख्या पुर्ण होण्यासाठी फिरतात्.वर्गातील मुलाची संख्या कमी झाली आहे.म्हणून काहि वर्ग बंद केले जात आहेत्.आणि त्याच वेळेला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गर्दी वाढत आहे.

नेत्रेश Sat, 05/10/2008 - 04:25
आमच्या नात्यातील एक डॉक्टर मुलगी खुप चांगली, शीकलेली मुले नाकारुन बसली होती. तीची आई एकादा माझ्या मामाच्या दुकानात आली आणी मुलीची तक्रार सांगु लागली. मामा म्हणाला उद्या तीला दुकानात पाठव, एक चांगला मुलगा आहे. मी बघतो काही जमते का. पण मुलगा फक्त १२वी पास आहे हे समजल्यावर त्यांचा उत्साह मावळला कारण मुलगी हा मुलगाही नाकारणार याची त्यांना खात्री होती. तरीही दुसर्या दिवशी ती मुलगी दुकानात आली. तो मुलगाही आला. एक शीक्षण सोडले तर दोघे एकमेकांना अनुरूप होते. मुलीने त्याचे शीक्षण समजल्यावर तीथेच नकार दिला. हे अपेक्षीतच होते. पण मामाने तीला समजावले, मुलगा हुशार आहे. उद्योग धंदा करत आहे. थोड्यादीवसात त्याचा चांगला जम बसेल. तीने इंग्रजी चा वीषय काढला. मामाने त्याच्या दुकानात असलेले २ गोदरेज च्या एजन्सी चे इंग्रजीत असलेले अप्लीकेशन फॉर्म्स काढले आणी त्या दोघांना ते पुर्ण भरायला सांगितले. त्या मुलाने तो फॉर्म २० मिनीटात पुर्ण भरला, आणी त्या डॉक्टर मुलीला १ तास झाला तरी अर्धा फॉर्म भरता आला नाही. मामाने मुलीला समजावले जे व्यवहारात उपयोगी नाही असे इंग्रजी काय कामाचे. एक शीक्षण सोडले तर मुलगा तुझ्या पेक्षा सरस आहे. आणी कमाई तो २ वर्षांनी तुझ्या दुप्पट करेल. आणी नवल म्हणजे मामाचे सांगणे तीला पटले. त्यांचे लग्न झाले. मामाचा विश्वास सार्थ होता. आज तो मुलगा त्याच्या डॉक्टर बायकोच्या कीतीतारी पट जास्त कमावतो. आणी अर्थातच इंग्रजीचा कधीही प्रोब्लेम आल नाही.

In reply to by नेत्रेश

भडकमकर मास्तर Tue, 05/13/2008 - 10:01
छान गोष्ट नेत्रेश.... धन्यवाद सांगितल्याबद्दल... अवांतर ...त्या डॉक्टर मुलीला १ तास झाला तरी अर्धा फॉर्म भरता आला नाही अजिबात आश्चर्य वाटले नाही... :)) :))

वेताळ Sat, 05/10/2008 - 13:52
असाच किस्सा माझ्या बहिणीबाबत घडला होता. माझे भाउजी माझ्या बहिणी पेक्षा कमी शिकलेले आहेत. पण त्याच्या धंध्यामध्ये ते खुप्च यशस्वी झाले आहेत. आयटी वाला पण त्याच्या इतके कमवत नसेल.खर तर शिक्षण चांगले संस्कार माणसावर घडवते. काही लोक त्याचा गर्व करतात.त्याचा त्याना कधीतरी पश्चाताप होणार हे नक्की. राजा परुळेकराचे हे वाक्य त्या मुलीला ऐकवा. तुम्ही कोणत्या भाषेत बोलता यापेक्षा काय बोलता याचं महत्व अधिक आहे. असं नसतं तर बहिणाबाई चौधरी महान कवयित्री आणि लक्ष्मीबाई टिळक श्रेष्ठ लेखिका ठरल्या नसत्या आणि वॉटर प्युरीफायर विकायला टाय लावुन येणारा सेल्समन फाड्फाड इंग्रजी बोलतो म्हणुन तत्वज्ञ थरला असता. तिने लग्न कोणाशी करावे हा तिचा वैयक्तिक प्रश्न नक्कीच आहे. परंतु तिला तिचा मुर्खपणा दाखवुन देणे आपले काम आहे. वेताळ
(या मेच्या सुट्टीमध्ये गावाकडे गेलो असताना हा किस्सा घडला. ) आमच्या गावाकडे असणाऱ्या एका मित्राच्या बायकोने तिच्या उपवर आणि सुशिक्षित मुलीसाठी काही मुले पाहण्यासाठी मला सांगितले, त्याप्रमाणे मी तिला तसे आश्वासन दिले आणि ही गोष्ट अश्याच गप्पागोष्टीत माझ्या एका मित्राला सांगितली. माझ्या त्या मित्राने मला विचारले की तुला त्या मुलीबद्दल काय माहीत आहे, यावर मी नकारार्थी उत्तर दिले. त्याने दुसरा प्रश्न विचारला की आपल्या गावामध्ये अश्या कामासाठी मदत करणारे असतील का नसतील.

आधुनिक कृष्ण

काळा_पहाड ·

मनस्वी गुरुवार, 05/08/2008 - 15:08
कविता आवडली.
देवकीला विसरुन कंसाचा होई कंस आणि कृष्ण भेद काही होईना कृष्णाला आरशातला कंस काही भ्याईना.

मदनबाण गुरुवार, 05/08/2008 - 15:29
कृष्णाला आता नाही भेटत सांदिपनी संस्काराशिवायच मग भौतिकीची उजळणी कला आणि शास्त्राला आयटीची फोडणी जग एक बाजार बाजारात कृष्ण 'अर्था' संबंधीच फक्त सारे प्रश्न >>मस्तच..... (हरे कृष्णा हरे रामा ) असे म्हणणारा..... मदनबाण.

मनस्वी गुरुवार, 05/08/2008 - 15:08
कविता आवडली.
देवकीला विसरुन कंसाचा होई कंस आणि कृष्ण भेद काही होईना कृष्णाला आरशातला कंस काही भ्याईना.

मदनबाण गुरुवार, 05/08/2008 - 15:29
कृष्णाला आता नाही भेटत सांदिपनी संस्काराशिवायच मग भौतिकीची उजळणी कला आणि शास्त्राला आयटीची फोडणी जग एक बाजार बाजारात कृष्ण 'अर्था' संबंधीच फक्त सारे प्रश्न >>मस्तच..... (हरे कृष्णा हरे रामा ) असे म्हणणारा..... मदनबाण.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
जन्माचे भोग भोगांसाठी जन्म आईच्या दुधातुन भोगांकडे स्त्रवणे मातेची ममता अन् बापाचा धाक पाळणाघरातल्या कृष्णाला यशोदेची हाक दिवसा यशोदा अन् रात्री देवकी वसुदेव की नंद सगळाच आनंद रंगतो रोजच कृष्ण-देवकी भेटीचा प्रयोग सुटीच्या दिवशी यशोदेला वियोग ना झोपेला अंगाई ना भुकेला लोणी जन्मला कृष्ण गातो नर्सरीची गाणी वाघीणीच्या दुधावर गोमुत्राची शिंपवणी कृष्णाला आता नाही भेटत सांदिपनी संस्काराशिवायच मग भौतिकीची उजळणी कला आणि शास्त्राला आयटीची फोडणी जग एक बाजार बाजारात कृष्ण 'अर्था' संबंधीच फक्त सारे प्रश्न यशोदेला सोडुन कृष्ण मथुरेला येई देवकीला विसरुन कंसाचा होई कंस आणि कृष

ऑफीस मध्ये झोप येऊ नये म्हणून काही उपाय आहेत का?

ऋचा ·

ध्रुव गुरुवार, 05/08/2008 - 13:58
खरं सांगू का? कुठलाही उपाय न करता झोपुन जायचे. :) -- ध्रुव

ऋचा गुरुवार, 05/08/2008 - 14:03
नावाप्रमाणे उपाय सुचऊ नका उपाय वाचुन सुन्न झाले पक्या भाऊ :O

कुंदन गुरुवार, 05/08/2008 - 14:07
कळफलक दूर सारून मेजावर प्रकल्पासंबंधीचे बाड ठेवा. हाताचे कोपर मेजावर टेकवा. तळहातावर हनुवटी टेकवून गंभीर पणे प्रकल्पासंबंधीचे कागद वाचत आहात असा आभास निर्माण करा. आणि मग हळूच डुलकी काढा. सुरुवातीला थोडा त्रास होईल. पण हळू हळू सवयीने जमून जाईल. मी असेच करतो ...

अन्जलि गुरुवार, 05/08/2008 - 14:09
मिसल्पव वर जा झोप उदुन जैल चत्तिन्ग कधि सुरु होतेय मग मस्त गप्पआ मारु तोपर्यन्त वात बघ अनि झओपु नकोस बोस्स नमक प्रनि दोले मोथे करुन बघेल

In reply to by अन्जलि

कुंदन गुरुवार, 05/08/2008 - 14:21
हे तर लै भारी.... अंजली ताईंचे नेहेमीचे प्रतिसाद वाचा. अंजली ताईंच्या खरडवहीत काहीतरी खरडा , त्यावर त्यांचे प्रतिसाद येतील , ते ही वाचा ... अक्षरे जुळवता जुळवता झोप उडून जाईल.... मात्र ते प्रतिसाद घरी गेल्यावर अजिबात आठवू नका , नाही तर घरी देखील रात्री झोप येणार नाही ... अंजली ताईं : ह. घ्या.

In reply to by अन्जलि

नारदाचार्य गुरुवार, 05/08/2008 - 15:09
माझी झोप पार उडाली. कसे काय विचारताय? हे जे लिहिले आहे ते वाचून त्यातील शब्द समजून घेऊन आणि मग त्यांचा अर्थ समजून घेऊन...

In reply to by अन्जलि

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/08/2008 - 16:06
मिसल्पव वर जा झोप उदुन जैल चत्तिन्ग कधि सुरु होतेय मग मस्त गप्पआ मारु तोपर्यन्त वात बघ अनि झओपु नकोस बोस्स नमक प्रनि दोले मोथे करुन बघेल असेच मनतो. मिसल्पव वर आल्यावर आपल परतिसाद अला की मल लै हसुन हसुन येदेवानी होतं. :) अवांतर : संस्कृत भाषेला घरघर लागल्यावर 'प्राकृत' बोली अशीच असेल असे वाटते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छोटा डॉन गुरुवार, 05/08/2008 - 16:26
>>मिसल्पव वर आल्यावर आपल परतिसाद अला की मल लै हसुन हसुन येदेवानी होतं. सर कय राव गरिभाचि घेतय... बकि म्हल पन हे वचुण असच लै येद्यासारख वातत... प्राकॄत बोलीवाला छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मन गुरुवार, 05/08/2008 - 14:11
१.कंपनी सोडणारा पुढला कोण? ह्य प्रश्नाच उत्तर शोधण्यासठी एक गुप्त हेर एजन्सी सुरु करा. २. तुमच्या बॉस ला "ब्लँक कॉल" करा. ३.तुम्ही बसता तिथले फर्निचर पार हल्वुन सोडा. शेजार्‍याच्या खुर्चिशी तो पार चवताळॅ पर्यंत काड्या करा. ४.कंटाळा येइस्तोवर, हाता पायाची बोटे आधि सरळ आणि मग उलट क्रमाने मोजा. ५.मीटिंग मध्ये फालतु प्रश्न विचारुन त्या लांबवा. ६.लोकांचे काम करतान्चे विचित्र हाव भावाचे निरिक्षण करुन, स्वतः ही तस्सेच करण्याचा प्रयत्न करा. ७.शिट्ट्या मारत सुटा. ८.कॉफी कप बरोअबर कचरापेटीत फेकायचा सराव करा. ९. तुमचा पी सी एका वेळेस किती जास्तित जास्त किती ऍप्लिकशन उघडु शकतो हे शोधा.(खुप सार्‍याअ विंडोज् उघडुन) १०.एखाद्या कडे पाहुन कल्पना करा:- हे कार्ट ५ वर्षाचं असताना कसं असेल? लग्नाच्या वेळेस कसं वेंधळेपणा करेल(केलेला असेल)? ११. चाहाच्या वेळेतुन "वर्क ब्रेक्स" घ्या! १२.लोकंचे डोके खात चला. म्हंजे टेंशन त्यांना.आपल्याला नाही. आणि हो. बालिके, हे सर्व करताना काही क्षुद्र तथाकथित "मॅच्युअर्ड" लोक विचित्र पाहतील्.तिकडे साफ दुर्लक्ष कर.शेवटी आपला दिवस चांगला जाने महत्वाचे. काय? :-) :-)) ;-० ;-) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

ऋचा गुरुवार, 05/08/2008 - 14:13
अहो अंजली देवी. काय आहे हे??? वाचता येइल अस खरडा की काहीतरी ~X( डोळे फुटले की अक्षर जुळवुन जुळवुन

केशवसुमार गुरुवार, 05/08/2008 - 14:19
ऋचाताई, तुमच्यासाहेबाचा इमेल आयडी द्या B) .. मग बघू कशी झोप येते :W (साहेब)केशवसुमार स्वगतः- हिचा साहेब माझ्या सारखा झोपणारा (|: असला तर काय करवे ?? :\

अभिज्ञ गुरुवार, 05/08/2008 - 14:23
उगाच काहितरी... म्हणे ऑफीस मध्ये झोप येऊ नये म्हणून काही उपाय आहेत का? कशाला?मला तर अजिबात जमणार नाही. X( कारण, अलिकडेच डॉक्टरांनी मला दुपारचे जागरण बंद करायला सांगितले आहे. :D अबब

In reply to by केशवसुमार

कुंदन गुरुवार, 05/08/2008 - 14:35
एकदम सही .... माझेही हेच मत आहे. विकांताला घरची कामे उरकल्यावर श्रमपरिहार ऑफिसमधे नाही करणार तर कुठे करणार. शिवाय घरी असताना भार नियमनामुळे पंखा नाही चालत , मग झोप नाही होत बा नीट आपली. =))

अन्जलि गुरुवार, 05/08/2008 - 14:32
केशव्कुमार अगदि बरोबर. मि किति बरोबर लिहिलेय न? बाल हलुहलु शिक्तेय चुकाचि मफि असवि

In reply to by अन्जलि

मनस्वी गुरुवार, 05/08/2008 - 14:39
ह------------------------------------------लु------------------------------------------ह------------------------------------------लु------------------------------------------!

ऋचा गुरुवार, 05/08/2008 - 14:37
ते बरोबर आहे पण मी जेंव्हा झोपते तेव्हाच नेमका येतो हो तो ~X( झोप डोळ्यात असते आणि तो काय बोलत असतो ते शुंभा सारख ऐकाव लागतं.. डोक्यात काही शीरत नाही :(

शेखर गुरुवार, 05/08/2008 - 14:43
जी संस्था आपल्याला कामा साठी पैसे देते , त्या पैश्याला जागुन काम करा. म्हणजे झोप येणार नाही. - (कामसु) शेखर

In reply to by शेखर

एक गुरुवार, 05/08/2008 - 21:48
मॅनेजर झाले की झोप उडते.. स्वःता झोपत नाहीत आणि दुसर्‍याला पण झोपू देत नाहीत..पुढच्या जन्मी अजगर व्हाल.. ह. घ्या.. मी झोपेत आहे.

जादू गुरुवार, 05/08/2008 - 14:51
मन यांचे उपाय फार छान आहेत करुन पहा झोप येणार नाही.

कुंदन गुरुवार, 05/08/2008 - 14:57
हे बाकी खरे आहे. मी हा उपाय करून बघितला : सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार हा व्यायाम करतो. ऑफिसला येण्यापूर्वीच सकाळी (७:३० ला) घरून जेवणच करून येतो. दुपारचे जेवणाला सुट्टी. दुपारी एखादे सफरचंद खातो. झोप येत नाही. -- ( काम असेल तेव्हां २४ * ७ काम करणारा ) कुंदन

ऋचा गुरुवार, 05/08/2008 - 15:08
कुंदन तुमचा उपाय छान आहे पण दुसरा जेवण करणार असेल तर..... :W

मन गुरुवार, 05/08/2008 - 15:08
काम असताना कुणीही काम करेल. काम नसताना कुणीही आराम करेल. त्यात काय एवढं? खरी मजा ह्यातच की, काम भरपूर आहे,भन्नाट लोड ने सगळ्यांनी हाय खाल्ल्लीए,आणि आपण मात्र तरीही संतांच्या शिकवणीनुसार स्थित्प्रज्ञ राहुन आराम करतोय. समर्थ म्हणतातः- "दास डोंगरी राहतो उत्सव रामाचा पाहतो." तर तात्पर्य हेच की:- तुम्ही मनाए एखाद्या हिल स्तेशन ला जा.(डोंगरावर) आणि रामाचा उत्सव पहा.(ही सृष्ती,त्यात होणारे बदल्,पाउस्,वर्षा ,वसंत्,सारं सारं काही) पहा प्रसन्न वाटतं की नाही. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

वरदा गुरुवार, 05/08/2008 - 17:20
ही तर माझ्या वर निघाली..झकास गं रूचा....मी नुसताच टाईमपास करते ही तर झोपतेच..... :D

In reply to by वरदा

कैलासराजा Fri, 05/09/2008 - 12:25
आयुर्वेदात दुपारी झोप येवू नये यासाटी "निद्रानाशान्तक" गोल्या हायेत झ्वापातून उटण्यापूरवी दोन अन् झ्वाप लागल्यावर् चार पाटणकराच्या काड्यात घे पोरी आयूरवैदू..........कैलासराजा

छोटा डॉन गुरुवार, 05/08/2008 - 17:40
हम्म् , झोप न येण्याचा उपाय !!! आत्ता लगेच सांगायला हवा का ? सध्या मला अंमळ कंटाळा येऊन झोप येते आहे ... तेवढी क्षणिक डूलकी झाली की सांगतो ... पण समजा ऑफीसमध्ये झोपले नाही तर करणार काय ८-१० तास ? त्या "डॉर्मेट्रीत" काय "मधमाश्यापालनकेंद्र" उघडायचे काय ? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

ईश्वरी Fri, 05/09/2008 - 01:42
अग ऋचा, ऑफीस मध्ये झोप येते म्हणजे रात्री तुला पुरेशी झोप मिळत नसावी . रात्री ही मीपावरच पडी क असते का? रोज सलग ७ ते ८ तास झोप उत्तम आरोग्यासाठी अत्यावश्यक असते. झोपेचे नीट नियोजन कर म्हणजे ऑफीस मध्ये झोप येणार नाही. ईश्वरी

वेलदोडा Fri, 05/09/2008 - 02:16
दिवसा ऑफीस ...रात्री मीपा झोप काढणार कधी? त्यासाठी एक काम करा... रात्री झोपत जा. आणि ऑफीस मध्ये मीपा वाचत जा. नाहीतरी तुम्ही ऑफीस मध्ये झोपतातच . मग मीपा वाचत जा. झोपलेले दिसण्यापेक्षा atleast काहीतरी काम करीत आहात असे तरी boss ला वाटेल. -- वेलदोडा

ऋचा Fri, 05/09/2008 - 09:36
:) अरे दादा... काम काय केलं हे पण दाखवावं लागत शुक्रवारी नाही तर हजेरी होते...

वेलदोडा Fri, 05/09/2008 - 11:18
अरे दादा... काम काय केलं हे पण दाखवावं लागत शुक्रवारी नाही तर हजेरी होते... मग एक काम करा ताई...रात्री व्यवस्थित झोप काढा. (झोप की मीपा ह्यात कशाला प्राधान्य दयायचे ते ठरवा.)

ध्रुव गुरुवार, 05/08/2008 - 13:58
खरं सांगू का? कुठलाही उपाय न करता झोपुन जायचे. :) -- ध्रुव

ऋचा गुरुवार, 05/08/2008 - 14:03
नावाप्रमाणे उपाय सुचऊ नका उपाय वाचुन सुन्न झाले पक्या भाऊ :O

कुंदन गुरुवार, 05/08/2008 - 14:07
कळफलक दूर सारून मेजावर प्रकल्पासंबंधीचे बाड ठेवा. हाताचे कोपर मेजावर टेकवा. तळहातावर हनुवटी टेकवून गंभीर पणे प्रकल्पासंबंधीचे कागद वाचत आहात असा आभास निर्माण करा. आणि मग हळूच डुलकी काढा. सुरुवातीला थोडा त्रास होईल. पण हळू हळू सवयीने जमून जाईल. मी असेच करतो ...

अन्जलि गुरुवार, 05/08/2008 - 14:09
मिसल्पव वर जा झोप उदुन जैल चत्तिन्ग कधि सुरु होतेय मग मस्त गप्पआ मारु तोपर्यन्त वात बघ अनि झओपु नकोस बोस्स नमक प्रनि दोले मोथे करुन बघेल

In reply to by अन्जलि

कुंदन गुरुवार, 05/08/2008 - 14:21
हे तर लै भारी.... अंजली ताईंचे नेहेमीचे प्रतिसाद वाचा. अंजली ताईंच्या खरडवहीत काहीतरी खरडा , त्यावर त्यांचे प्रतिसाद येतील , ते ही वाचा ... अक्षरे जुळवता जुळवता झोप उडून जाईल.... मात्र ते प्रतिसाद घरी गेल्यावर अजिबात आठवू नका , नाही तर घरी देखील रात्री झोप येणार नाही ... अंजली ताईं : ह. घ्या.

In reply to by अन्जलि

नारदाचार्य गुरुवार, 05/08/2008 - 15:09
माझी झोप पार उडाली. कसे काय विचारताय? हे जे लिहिले आहे ते वाचून त्यातील शब्द समजून घेऊन आणि मग त्यांचा अर्थ समजून घेऊन...

In reply to by अन्जलि

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/08/2008 - 16:06
मिसल्पव वर जा झोप उदुन जैल चत्तिन्ग कधि सुरु होतेय मग मस्त गप्पआ मारु तोपर्यन्त वात बघ अनि झओपु नकोस बोस्स नमक प्रनि दोले मोथे करुन बघेल असेच मनतो. मिसल्पव वर आल्यावर आपल परतिसाद अला की मल लै हसुन हसुन येदेवानी होतं. :) अवांतर : संस्कृत भाषेला घरघर लागल्यावर 'प्राकृत' बोली अशीच असेल असे वाटते.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छोटा डॉन गुरुवार, 05/08/2008 - 16:26
>>मिसल्पव वर आल्यावर आपल परतिसाद अला की मल लै हसुन हसुन येदेवानी होतं. सर कय राव गरिभाचि घेतय... बकि म्हल पन हे वचुण असच लै येद्यासारख वातत... प्राकॄत बोलीवाला छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मन गुरुवार, 05/08/2008 - 14:11
१.कंपनी सोडणारा पुढला कोण? ह्य प्रश्नाच उत्तर शोधण्यासठी एक गुप्त हेर एजन्सी सुरु करा. २. तुमच्या बॉस ला "ब्लँक कॉल" करा. ३.तुम्ही बसता तिथले फर्निचर पार हल्वुन सोडा. शेजार्‍याच्या खुर्चिशी तो पार चवताळॅ पर्यंत काड्या करा. ४.कंटाळा येइस्तोवर, हाता पायाची बोटे आधि सरळ आणि मग उलट क्रमाने मोजा. ५.मीटिंग मध्ये फालतु प्रश्न विचारुन त्या लांबवा. ६.लोकांचे काम करतान्चे विचित्र हाव भावाचे निरिक्षण करुन, स्वतः ही तस्सेच करण्याचा प्रयत्न करा. ७.शिट्ट्या मारत सुटा. ८.कॉफी कप बरोअबर कचरापेटीत फेकायचा सराव करा. ९. तुमचा पी सी एका वेळेस किती जास्तित जास्त किती ऍप्लिकशन उघडु शकतो हे शोधा.(खुप सार्‍याअ विंडोज् उघडुन) १०.एखाद्या कडे पाहुन कल्पना करा:- हे कार्ट ५ वर्षाचं असताना कसं असेल? लग्नाच्या वेळेस कसं वेंधळेपणा करेल(केलेला असेल)? ११. चाहाच्या वेळेतुन "वर्क ब्रेक्स" घ्या! १२.लोकंचे डोके खात चला. म्हंजे टेंशन त्यांना.आपल्याला नाही. आणि हो. बालिके, हे सर्व करताना काही क्षुद्र तथाकथित "मॅच्युअर्ड" लोक विचित्र पाहतील्.तिकडे साफ दुर्लक्ष कर.शेवटी आपला दिवस चांगला जाने महत्वाचे. काय? :-) :-)) ;-० ;-) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

ऋचा गुरुवार, 05/08/2008 - 14:13
अहो अंजली देवी. काय आहे हे??? वाचता येइल अस खरडा की काहीतरी ~X( डोळे फुटले की अक्षर जुळवुन जुळवुन

केशवसुमार गुरुवार, 05/08/2008 - 14:19
ऋचाताई, तुमच्यासाहेबाचा इमेल आयडी द्या B) .. मग बघू कशी झोप येते :W (साहेब)केशवसुमार स्वगतः- हिचा साहेब माझ्या सारखा झोपणारा (|: असला तर काय करवे ?? :\

अभिज्ञ गुरुवार, 05/08/2008 - 14:23
उगाच काहितरी... म्हणे ऑफीस मध्ये झोप येऊ नये म्हणून काही उपाय आहेत का? कशाला?मला तर अजिबात जमणार नाही. X( कारण, अलिकडेच डॉक्टरांनी मला दुपारचे जागरण बंद करायला सांगितले आहे. :D अबब

In reply to by केशवसुमार

कुंदन गुरुवार, 05/08/2008 - 14:35
एकदम सही .... माझेही हेच मत आहे. विकांताला घरची कामे उरकल्यावर श्रमपरिहार ऑफिसमधे नाही करणार तर कुठे करणार. शिवाय घरी असताना भार नियमनामुळे पंखा नाही चालत , मग झोप नाही होत बा नीट आपली. =))

अन्जलि गुरुवार, 05/08/2008 - 14:32
केशव्कुमार अगदि बरोबर. मि किति बरोबर लिहिलेय न? बाल हलुहलु शिक्तेय चुकाचि मफि असवि

In reply to by अन्जलि

मनस्वी गुरुवार, 05/08/2008 - 14:39
ह------------------------------------------लु------------------------------------------ह------------------------------------------लु------------------------------------------!

ऋचा गुरुवार, 05/08/2008 - 14:37
ते बरोबर आहे पण मी जेंव्हा झोपते तेव्हाच नेमका येतो हो तो ~X( झोप डोळ्यात असते आणि तो काय बोलत असतो ते शुंभा सारख ऐकाव लागतं.. डोक्यात काही शीरत नाही :(

शेखर गुरुवार, 05/08/2008 - 14:43
जी संस्था आपल्याला कामा साठी पैसे देते , त्या पैश्याला जागुन काम करा. म्हणजे झोप येणार नाही. - (कामसु) शेखर

In reply to by शेखर

एक गुरुवार, 05/08/2008 - 21:48
मॅनेजर झाले की झोप उडते.. स्वःता झोपत नाहीत आणि दुसर्‍याला पण झोपू देत नाहीत..पुढच्या जन्मी अजगर व्हाल.. ह. घ्या.. मी झोपेत आहे.

जादू गुरुवार, 05/08/2008 - 14:51
मन यांचे उपाय फार छान आहेत करुन पहा झोप येणार नाही.

कुंदन गुरुवार, 05/08/2008 - 14:57
हे बाकी खरे आहे. मी हा उपाय करून बघितला : सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार हा व्यायाम करतो. ऑफिसला येण्यापूर्वीच सकाळी (७:३० ला) घरून जेवणच करून येतो. दुपारचे जेवणाला सुट्टी. दुपारी एखादे सफरचंद खातो. झोप येत नाही. -- ( काम असेल तेव्हां २४ * ७ काम करणारा ) कुंदन

ऋचा गुरुवार, 05/08/2008 - 15:08
कुंदन तुमचा उपाय छान आहे पण दुसरा जेवण करणार असेल तर..... :W

मन गुरुवार, 05/08/2008 - 15:08
काम असताना कुणीही काम करेल. काम नसताना कुणीही आराम करेल. त्यात काय एवढं? खरी मजा ह्यातच की, काम भरपूर आहे,भन्नाट लोड ने सगळ्यांनी हाय खाल्ल्लीए,आणि आपण मात्र तरीही संतांच्या शिकवणीनुसार स्थित्प्रज्ञ राहुन आराम करतोय. समर्थ म्हणतातः- "दास डोंगरी राहतो उत्सव रामाचा पाहतो." तर तात्पर्य हेच की:- तुम्ही मनाए एखाद्या हिल स्तेशन ला जा.(डोंगरावर) आणि रामाचा उत्सव पहा.(ही सृष्ती,त्यात होणारे बदल्,पाउस्,वर्षा ,वसंत्,सारं सारं काही) पहा प्रसन्न वाटतं की नाही. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

वरदा गुरुवार, 05/08/2008 - 17:20
ही तर माझ्या वर निघाली..झकास गं रूचा....मी नुसताच टाईमपास करते ही तर झोपतेच..... :D

In reply to by वरदा

कैलासराजा Fri, 05/09/2008 - 12:25
आयुर्वेदात दुपारी झोप येवू नये यासाटी "निद्रानाशान्तक" गोल्या हायेत झ्वापातून उटण्यापूरवी दोन अन् झ्वाप लागल्यावर् चार पाटणकराच्या काड्यात घे पोरी आयूरवैदू..........कैलासराजा

छोटा डॉन गुरुवार, 05/08/2008 - 17:40
हम्म् , झोप न येण्याचा उपाय !!! आत्ता लगेच सांगायला हवा का ? सध्या मला अंमळ कंटाळा येऊन झोप येते आहे ... तेवढी क्षणिक डूलकी झाली की सांगतो ... पण समजा ऑफीसमध्ये झोपले नाही तर करणार काय ८-१० तास ? त्या "डॉर्मेट्रीत" काय "मधमाश्यापालनकेंद्र" उघडायचे काय ? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

ईश्वरी Fri, 05/09/2008 - 01:42
अग ऋचा, ऑफीस मध्ये झोप येते म्हणजे रात्री तुला पुरेशी झोप मिळत नसावी . रात्री ही मीपावरच पडी क असते का? रोज सलग ७ ते ८ तास झोप उत्तम आरोग्यासाठी अत्यावश्यक असते. झोपेचे नीट नियोजन कर म्हणजे ऑफीस मध्ये झोप येणार नाही. ईश्वरी

वेलदोडा Fri, 05/09/2008 - 02:16
दिवसा ऑफीस ...रात्री मीपा झोप काढणार कधी? त्यासाठी एक काम करा... रात्री झोपत जा. आणि ऑफीस मध्ये मीपा वाचत जा. नाहीतरी तुम्ही ऑफीस मध्ये झोपतातच . मग मीपा वाचत जा. झोपलेले दिसण्यापेक्षा atleast काहीतरी काम करीत आहात असे तरी boss ला वाटेल. -- वेलदोडा

ऋचा Fri, 05/09/2008 - 09:36
:) अरे दादा... काम काय केलं हे पण दाखवावं लागत शुक्रवारी नाही तर हजेरी होते...

वेलदोडा Fri, 05/09/2008 - 11:18
अरे दादा... काम काय केलं हे पण दाखवावं लागत शुक्रवारी नाही तर हजेरी होते... मग एक काम करा ताई...रात्री व्यवस्थित झोप काढा. (झोप की मीपा ह्यात कशाला प्राधान्य दयायचे ते ठरवा.)
ऑफीस मध्ये दुपारचे जेवण झाले की झोप न यायचे काही उपाय ... (बाहेर जायचा उपाय सांगू नका खुप ऊन असतं.. (खुप झोप अलेली मी) I)

धोतर (हे लिखाण काढून टाकण्यात आले आहे.)

कैलासराजा ·

मन गुरुवार, 05/08/2008 - 13:55
जरा संदर्भ देउन नीट लिहिता आलं (सध्या भोळ्या माणसाला समजेल असं) तर फार बरं होइल. बाकी सध्या ह्या लिहिलेल्या वाक्यातुन एक अत्यंत थर्ड क्लास अर्थ ध्वनित होतोय. मला वाटतय की माझ्याच समजण्यातील ती तशी चुक असावी,आणि आपण जर व्यवस्थित संदर्भ दिलात, कशाबद्दल बोलताय हे सांगितलत तर मी चांगला अर्थ घ्यायचा प्रयत्न करीन. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

कैलासराजा Fri, 05/09/2008 - 11:38
अर्थाचा अनर्थ आणि भागवताच्या चिन्ध्या करु नका कर्तबगार पुरुष आपली जीवनभराची कमाई बाहेरख्याली पणामुळे वाईट स्रीच्या नादीलागून दरिद्री होतो. ( आमच्या गावाकडल्या गावटी मिसळीचा रस्सा फारच झोबला की काय राव ? ) रागावू नका. उत्तराबद्द्ल धन्यवाद !!!!!!!!

In reply to by ऋचा

कैलासराजा Fri, 05/09/2008 - 12:01
बकवास माझ्या धोतर या चा अर्थ आपणास कळाला असे मी समजतो पण आपले ध्यान हे "जीवनी ध्यानि असे बक ,मनी ध्यातसे उचलील मिन" पाण्यात उभा बगळयाचे ध्यान हे तप नसून मासे उचलण्याची क्लूप्ती आहे आपल्या बक-वास चा अर्थ मी बक---बगळा वास---वास्तव्य असा घेतो

उदय ४२ गुरुवार, 05/08/2008 - 16:32
कैलास राजाजी, तुम्ही नवीन अहात इथे,जरा संभाळुन.धोतरही फिटायचं नि लुगडंही. (मिसळीतला रस्सा भूरकणारा)

सत्या Sat, 05/10/2008 - 11:00
आरे त्या "धोतरात " नेमक काय होत.( क्रुपया अर्थाचा अनर्थ करु नका.)

मन गुरुवार, 05/08/2008 - 13:55
जरा संदर्भ देउन नीट लिहिता आलं (सध्या भोळ्या माणसाला समजेल असं) तर फार बरं होइल. बाकी सध्या ह्या लिहिलेल्या वाक्यातुन एक अत्यंत थर्ड क्लास अर्थ ध्वनित होतोय. मला वाटतय की माझ्याच समजण्यातील ती तशी चुक असावी,आणि आपण जर व्यवस्थित संदर्भ दिलात, कशाबद्दल बोलताय हे सांगितलत तर मी चांगला अर्थ घ्यायचा प्रयत्न करीन. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

In reply to by मन

कैलासराजा Fri, 05/09/2008 - 11:38
अर्थाचा अनर्थ आणि भागवताच्या चिन्ध्या करु नका कर्तबगार पुरुष आपली जीवनभराची कमाई बाहेरख्याली पणामुळे वाईट स्रीच्या नादीलागून दरिद्री होतो. ( आमच्या गावाकडल्या गावटी मिसळीचा रस्सा फारच झोबला की काय राव ? ) रागावू नका. उत्तराबद्द्ल धन्यवाद !!!!!!!!

In reply to by ऋचा

कैलासराजा Fri, 05/09/2008 - 12:01
बकवास माझ्या धोतर या चा अर्थ आपणास कळाला असे मी समजतो पण आपले ध्यान हे "जीवनी ध्यानि असे बक ,मनी ध्यातसे उचलील मिन" पाण्यात उभा बगळयाचे ध्यान हे तप नसून मासे उचलण्याची क्लूप्ती आहे आपल्या बक-वास चा अर्थ मी बक---बगळा वास---वास्तव्य असा घेतो

उदय ४२ गुरुवार, 05/08/2008 - 16:32
कैलास राजाजी, तुम्ही नवीन अहात इथे,जरा संभाळुन.धोतरही फिटायचं नि लुगडंही. (मिसळीतला रस्सा भूरकणारा)

सत्या Sat, 05/10/2008 - 11:00
आरे त्या "धोतरात " नेमक काय होत.( क्रुपया अर्थाचा अनर्थ करु नका.)
मि.पा.वर लेखन करण्यापूर्वी 'हे वाचा', अशी स्पष्ट सूचना देऊनही विषयाचा आगापीछा नसलेले आणि मि.पा.च्या रसिकांचा अपमान होईल असे वाह्यात लिखाण येथून काढून टाकण्यात आले आहे.

व्योमक्षेमं वहाम्यहम्

हेरंब ·

झकासराव गुरुवार, 05/08/2008 - 18:10
"औषध व्योम 'गे' मजला" अशी झालेली असते.>>>>>>>>>>>>>>. जबरा कोटी :) हे नाटक पाहता पाहता राहुन गेलय सु-दर्शन निगडीपासुन लांब आहे म्हणून. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 05/08/2008 - 21:51
वसंतराव देशपांडे 'मराठी संगीत नाटकाची वाटचाल' असा एक कार्यक्रम करत असत. त्यात त्यानी वर्णन केले होते की पूर्वी नाटकाना येवढी गर्दी होत असे कारण तेव्हा नाटक सोपे होते आणि सामान्य माणसाला कळत होते. आता सारखे नव्हे. म्हणजे पहील्या अंकात 'आपण फक्त नाटक पहायला आलो आहोत इतकेच कळ्ते'. दुसर्‍या अंकात 'अरेच्चा, असे असेल का हे नाटक' असे वाटते. आणि तिसर्‍या अंकात 'अच्छा अच्छा असे होते होय नाटक 'असे वाटते. आता मराठी नाटक जास्त उत्क्रांत झाले असे आहे असे वाटते. कारण ते वसंतरावांनी सांगितलेल्या वर्णनापेक्षाही जास्त क्लिष्ट वाटत आहे. कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत कळतच नाही की या नाटकात नक्की काय आहे ते. :) पुण्याचे पेशवे

झकासराव गुरुवार, 05/08/2008 - 18:10
"औषध व्योम 'गे' मजला" अशी झालेली असते.>>>>>>>>>>>>>>. जबरा कोटी :) हे नाटक पाहता पाहता राहुन गेलय सु-दर्शन निगडीपासुन लांब आहे म्हणून. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 05/08/2008 - 21:51
वसंतराव देशपांडे 'मराठी संगीत नाटकाची वाटचाल' असा एक कार्यक्रम करत असत. त्यात त्यानी वर्णन केले होते की पूर्वी नाटकाना येवढी गर्दी होत असे कारण तेव्हा नाटक सोपे होते आणि सामान्य माणसाला कळत होते. आता सारखे नव्हे. म्हणजे पहील्या अंकात 'आपण फक्त नाटक पहायला आलो आहोत इतकेच कळ्ते'. दुसर्‍या अंकात 'अरेच्चा, असे असेल का हे नाटक' असे वाटते. आणि तिसर्‍या अंकात 'अच्छा अच्छा असे होते होय नाटक 'असे वाटते. आता मराठी नाटक जास्त उत्क्रांत झाले असे आहे असे वाटते. कारण ते वसंतरावांनी सांगितलेल्या वर्णनापेक्षाही जास्त क्लिष्ट वाटत आहे. कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत कळतच नाही की या नाटकात नक्की काय आहे ते. :) पुण्याचे पेशवे
लेखनविषय:
लेखनप्रकार
'मिपा' च्या वाचकांना 'प्रेमाची गोष्ट' वर लिहिलेले आवडले, म्हणून अजुन एक प्रायोगिक नाटक पाहिले होते, त्यावरचे लिखाण पाठवत आहे. आमची प्रायोगिक नाटकांची आवड तशी खूप जुनी. अगदी छबिलदास चळवळीपासून. त्यामुळे ,प्रायोगिक नाटक लागले की पाय तिथे आपोआप वळणारच! कधी फजितीही होते, सगळं डोक्यावरुन जातं. मग डोक्याला ताप. ह्याला विचार, त्याला विचार, असं चालतं, आपण इतके निर्बुद्ध कसे असे वाटून स्वतःचाच राग येतो. तरी पुढली वारी काही चुकत नाही. दहा नाटके डोक्यावरुन गेली तरी चालेल, पण एखादंच असं आनंद देऊन जातं की बस! 'अमृता सुभाष' , ही एक अत्यंत हुशार अभिनेत्री!

अब्दुल खान - ४

पिवळा डांबिस ·

सहज गुरुवार, 05/08/2008 - 07:18
आवडले. अब्दुल खान आता अमेरिकेत डॉ. आहेत का? मुले अमेरिकेत आली का? लग्न झाले का? कळले तर बरे होईल. याराना झाला ना ह्या "काल्पनिक" लेखनातुन राव. असे अर्धवट नका सोडु हो... हा कसला "काल्पनिक" इंडियन दोस्त, अपने दोस्तो की खबर नही रखता.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/08/2008 - 08:17
श्री. पिवळा डांबिस, अब्दुलखानेचे शब्दचित्र अतिशय भावूक आणि नेमक्या शब्दात, प्रभावीपणे मांडले आहे. वाचताना आपण कुणी त्रयस्थ वाचक आहोत हे भान रहात नाही. कथानकाचाच एक भाग बनून जातो. तुमच्या संवेदनशील लेखनकौशल्याने हृदयाचा ठाव घेतला. ह्या शेवटच्या भागाने डोळ्यात पाणी आणले. तुम्हाला, अब्दुलखानला आणि तुमच्या मैत्रीला लाख-लाख सलाम....! अभिनंदन.

In reply to by प्रभाकर पेठकर

केशवसुमार गुरुवार, 05/08/2008 - 16:24
डांबिसशेठ, सगळे भाग वाचले.. कथा संपलीकी एकत्र प्रतिसाद द्यावा असे ठरवले होते..(हा पुणेरी चिंगूस पाणा नव्हे) पेठकरशेठशी एकदम सहमत.. हेच म्हणतो....(हा ही पुणेरी चिंगूस पाणा नव्हे)..खानाचे पुढे काय झाले असा उगाच एक भुंगा डोक्यात घुसला आहे..आता त्याचे काय करावे? सुरेख लेख आवडला.. (अस्वादक)केशवसुमार (स्वगतः- डांबिस नावाचा माणुस अशी कथा कशी काय लिहू शकतो बाबा? :? निदान अस चांगल लिहिताना नाव बदला बॉ.. :> )

ऋचा गुरुवार, 05/08/2008 - 09:12
खरच तुम्ही खुप छान लिहीता अगदी अस वाटलं कि हे खरच आहे... अब्दुलखानला आणि तुमच्या मैत्रीला लाख-लाख सलाम....!

यशोधरा गुरुवार, 05/08/2008 - 09:25
अतिशय मनस्पर्शी झाले आहेत सगळेच भाग!! अब्दुल खान खूपच आवडला. त्याने निवडलेल्या आयुष्यात तो सुखी असावा, हीच शुभेच्छा आणि प्रार्थना. एकदम सुरेख लिहिले आहे.

मनस्वी गुरुवार, 05/08/2008 - 09:46
डांबिसकाका, आमच्याही डोळ्यातून नकळत आंसू ओघळले. तुमच्या मैत्रीला लाख-लाख सलाम....! आणि तेवढं अब्दुलखान आणि शबनमचं लग्न झालं का आणि त्यांची मुलं तिकडे आली का? ते रेसिडेन्सीची परिक्षा पास झाले का? त्यांना नोकरी मिळाली का - तेवढं सांगा की म्हणजे मनाला रुखरुख लागून रहाणार नाही. शेवटी "क्रमशः" वाचायला अधिक आवडले असते :)

स्वाती दिनेश गुरुवार, 05/08/2008 - 11:52
अब्दुल खानाची विलक्षण कथा ऐकताना डोळे भरुन आले,एका रांगड्या पठाणातला कोमल बाप,हळवा मित्र मन हेलावून गेला.तुमचा हा मित्र आता उत्तम रीत्या डॉक्टरी करत शबनम आणि मुलांबरोबर सुखाने आयुष्य व्यतित करत असेल,ही आशा..कारण त्याचाच आशावाद.. "इन्शाल्ला, सब ठीक हो जायेगा...." सुलेशबाबू ,'क्रमश:' हुकुमी जागी सोडणे ,योग्य गॅपने पुढचा भाग चढवणे आणि पाल्हाळ न लावता पाणी घालून क्रमशः न करता योग्य ठिकाणी संपवणे ह्यामुळे तुमचे हे व्यक्तिचित्र अतिशय दर्जेदार झाले आहे. A genius is a one who knows where to stop! Hats off!!! स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

मनस्वी गुरुवार, 05/08/2008 - 12:12
सुलेशबाबू ,'क्रमश:' हुकुमी जागी सोडणे ,योग्य गॅपने पुढचा भाग चढवणे आणि पाल्हाळ न लावता पाणी घालून क्रमशः न करता योग्य ठिकाणी संपवणे ह्यामुळे तुमचे हे व्यक्तिचित्र अतिशय दर्जेदार झाले आहे.
+१

मन गुरुवार, 05/08/2008 - 13:19
नुसतीच लेखन शैलीच नाही ,तर "कंटेंट" सुद्धा एकदम खास आहे. "पठान" च्या भाषेत "काबिल्-ए-तारीफ" है. बहुत ही बेहतरीन! आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

वरदा गुरुवार, 05/08/2008 - 17:32
कुछ केहेनेकाभी होश नही है..डोळ्यात पाणी आलय आणि स्क्रीन दिसत नाहीये..खूपच मस्त लिहिलय... पण ते सांगा तो आहे का इथे अजुन? आली का त्याची मुलं इथे....न्युजर्सीत असेल तर भेटूनच येईन म्हणते एकदा..

शितल गुरुवार, 05/08/2008 - 17:59
आता पर्य॑त खान साहेब आमच्याही ओळखीचे झाले आहे, सुद॑र वर्णन असे वाटते ते प्रस॑ग डोळ्यासमोर घडत आहेत हे तुमच्या लिखानाची जादु आहे. एक छान कथानक आम्हाला वाचायला मिळाले, या बद्दल तुमचे आभार. :)

झकासराव गुरुवार, 05/08/2008 - 18:03
क्या लिखेला है सुलेश बहोत बढिया. मस्तच. :) तुमचा खान आवडला. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

विसोबा खेचर गुरुवार, 05/08/2008 - 18:28
अरे डांबिसा, तुझा अब्दुल खान हा मिपाच्या शिरपेचातील एक मानाचा तुरा ठरला आहे असं म्हणावंसं वाटतं! आपला सलाम...! अजूनही असंच सकस लेखन मिपावर येऊ दे रे प्लीज... तात्या.

मुक्तसुनीत गुरुवार, 05/08/2008 - 18:43
ललित लिखाणाच्या यादीत या लिखाणाचा नंबर एकदम वरचा लागेल ! मात्र हे सर्व पूर्णपणे काल्पनिक लिखाण आहे यावर एक वाचक म्हणून भरवसा ठेवता येत नाही (सस्पेन्शन ऑफ डिस्-बेलिफ) , इतके हे लिखाण अस्सल वठले आहे.

चतुरंग गुरुवार, 05/08/2008 - 20:20
अपत्यविरहानं व्याकूळ आणि बायकोनं केलेल्या प्रतारणेनं खचलेल्या अब्दुलखानाने मनाचा ठाव घेतला; ते कातर, हळवं झालं! तुमची लिखाणाची शैली फारच ओघवती आहे. नेमक्या शब्दात प्रसंग मांडण्याचे कसब लाजवाब! असेच सकस लिखाण अजून आवडेल. अनेक शुभेच्छा! (अवांतर - हे लिखाण काल्पनिक आहे ह्यावर माझा तरी विश्वास बसत नाहीये. की हा ही एक डांबिसपणाच? :) ) चतुरंग

वाचक गुरुवार, 05/08/2008 - 23:57
थोरा मोठ्या लेखकांच्या पंक्तीत सहजगत्या नेउन ठेवेल असे सहज सुंदर, प्रभावी लेखन. नकळत "काबुलीवाला" ची आठवण झाली. हे सगळे 'एकत्र' वाचायला मिळेल अशी सोय करता येईल का ? कृपया विचार व्हावा.

सुरेख व्यक्तीचित्रण अन् ओघवती शैली.....आवडले आपल्याला! सर्व भाग योग्य ठिकाणी क्रमश: करुन उत्कंठा वाढविण्याचे कसब तर लैच भारी! असो, अजुन एखादा भाग वाचायला निश्चितच आवडला असता. >>अरे डांबिसा, तुझा अब्दुल खान हा मिपाच्या शिरपेचातील एक मानाचा तुरा ठरला आहे असं म्हणावंसं वाटतं! सहमत! टिंग्या

भडकमकर मास्तर Fri, 05/09/2008 - 01:28
झकास लिखाण ,. मस्त शेवट... .......... आणि उत्सुकता ताणली जाईल पण तुटणार नाही, अशा योग्य वेळानंतर पुढचा भाग टाकण्याची हातोटी खासच आहे...

खरा डॉन Fri, 05/09/2008 - 07:38
वा सुलेश तुने तो खूश कर दिया यार. बर्‍याच दिवसानी मिसळपाव वर काहीतरी सकस वाचायला मिळाले. स्वगतः च्यायला त्या गटण्याचे निरर्थक/निर्बुद्ध काथ्याकूट आणि धमु-डॉन-आंद्या गँगचे पानचट प्रतिसाद वाचून पार वीट आला होता बुवा..छ्या मिसळपावची क्वालीती जरा घसरत चालली आहे बॉ..

पिवळा डांबिस Fri, 05/09/2008 - 08:39
वरील प्रतिक्रियेतील अब्दुल खान या आयडी धारकाचा आमच्या अब्दुल खानशी वा पिवळा डांबिस याच्याशी संबंध नाही. मला प्रथम ही कुणीतरी करत असलेली गंमत आहे असे वाटून मी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं पण इतरही धाग्यांवर तो दिसू लागल्याने हे स्पष्टीकरण! http://www.misalpav.com/node/1725#comment-23083 कुणी ते नांव घ्यायला आमची हरकत अर्थातच नाही, पण इतर वाचकांचा आम्हीच काड्या करतो आहोत असा गैरसमज होऊ नये यासाठी हा खुलासा... आपला, पिवळा डांबिस

सखाराम_गटणे™ Fri, 05/09/2008 - 08:59
पण तो 'अब्दुल खान ' स्वतः ला तुमचाच 'अब्दुल खान' समजतो आहे. त्याचे ले़खन वाचा. http://misalpav.com/node/1725#new

In reply to by सखाराम_गटणे™

पिवळा डांबिस Fri, 05/09/2008 - 09:08
जाऊ द्या, आपण सोडून द्यायचं झालं.... आता आंतरजाल म्हटलं की तिथे हरतर्‍हेचे नमुने मिळायचेच की! आपण आपला त्यात काही संबंध नाही एव्हढं जाहीर केलं म्हणजे झालं... कदाचित कुणीतरी निखळ गंमत करत असेल...

सुमीत Fri, 05/09/2008 - 12:48
वाट पहात होतो ह्या भागाची, एकदम कलाटाणी वाटली जेव्हा टीप वाचली. इतके सुरेख व्यक्तीचित्रण आणि कल्पित. फर फर सुरेख.

गृहिणि Fri, 05/09/2008 - 21:28
फारच सुरेख! अब्दुल खान ला भेट्ल्यासारख वाटल. फारच जिवंत व्यक्तिचित्रण आहे.

गणपा Sat, 05/10/2008 - 16:16
काका, (इथे डांबिसकाका म्हणवत नाही) सर्वात उशीरा प्रतिसाद दिल्या बद्दल क्षमस्व आणि खानाची परत भेट घालुन दिल्याबद्दल थँक्स. कधी न्हवे त्या क्रमशः ची अपेक्षा ठेवावीशी वाटली आणि (संपूर्ण) हाती आलं. टीपः या कथेतील सर्व व्यक्तिरेखा व प्रसंग काल्पनिक आहेत. ही ओळ वाचे पर्यंत मुळ्ळीच वाटल नाही कि हा खान्या ही एक काल्पनिक वल्ली आहे. तुमच्या लेखन कौशल्यास प्रणाम. अजूनही असंच सकस लेखन मिपावर येऊ दे रे प्लीज... तात्या. हेच म्हणतो. -गणपा.

विजुभाऊ Sun, 05/11/2008 - 19:25
हे लिखाण काल्पनिक आहे ह्यावर माझा तरी विश्वास बसत नाहीये. की हा ही एक डांबिसपणाच? हो डाम्बीसपणाच असावा :) माणुस कायकाय लिहील सांगता येत नाही. पण एकंदरीत मस्त लिहितो डाम्बीस काका. डाम्बीसपणावर खुष असलेला विजुभाऊ

प्रास Tue, 06/05/2012 - 20:08
पुन्हा वाचले !
मी पण.....
मस्त वाटले !!
मला पण..... सुंदर लिखाणाबद्दल पिंडाकाकांचा आणि चांगल्या खोदकामासाठी नानाचा आभारी आहे.

टर्मीनेटर Fri, 03/26/2021 - 18:57
मिपाच्या खजिन्यात अशी किती रत्ने आहेत त्याचा अंदाज बांधणे कठीण आहे. काय अफलातून लिहिलंय राव, जाम आवडले. आणि हो, हे कथानक काल्पनिक आहे असं तुम्ही म्हटलंय खरं पण त्यावर विश्वास बसत नाहीये.

पिवळा डांबिस Fri, 03/26/2021 - 23:25
बापरे, हे लिखाण अजून टिकून आहे मिपावर? मला वाटलं होतं की काळाच्या ओघात गडप झालं असेल. :) ॲबसेंट माईंडेड आणि टर्मिनेटर, धन्यवाद हे नजरेस आणून दिल्याबद्दल...

सुसदा Mon, 03/29/2021 - 04:10
बरेच दिवसांनी मिपा वर आले, बरंच झालं. चारही भाग एकत्र वाचता आले. सुंदर व्यक्तीचित्रण आणि ओघवत्या भाषेमुळे हे प्रसंग काल्पनीक नसुन खरेच घडले असावेत असं वाटल. अप्रतीम!! शेवटच्या भागात काबुलीवाल्याची आठवण झाली.

सहज गुरुवार, 05/08/2008 - 07:18
आवडले. अब्दुल खान आता अमेरिकेत डॉ. आहेत का? मुले अमेरिकेत आली का? लग्न झाले का? कळले तर बरे होईल. याराना झाला ना ह्या "काल्पनिक" लेखनातुन राव. असे अर्धवट नका सोडु हो... हा कसला "काल्पनिक" इंडियन दोस्त, अपने दोस्तो की खबर नही रखता.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/08/2008 - 08:17
श्री. पिवळा डांबिस, अब्दुलखानेचे शब्दचित्र अतिशय भावूक आणि नेमक्या शब्दात, प्रभावीपणे मांडले आहे. वाचताना आपण कुणी त्रयस्थ वाचक आहोत हे भान रहात नाही. कथानकाचाच एक भाग बनून जातो. तुमच्या संवेदनशील लेखनकौशल्याने हृदयाचा ठाव घेतला. ह्या शेवटच्या भागाने डोळ्यात पाणी आणले. तुम्हाला, अब्दुलखानला आणि तुमच्या मैत्रीला लाख-लाख सलाम....! अभिनंदन.

In reply to by प्रभाकर पेठकर

केशवसुमार गुरुवार, 05/08/2008 - 16:24
डांबिसशेठ, सगळे भाग वाचले.. कथा संपलीकी एकत्र प्रतिसाद द्यावा असे ठरवले होते..(हा पुणेरी चिंगूस पाणा नव्हे) पेठकरशेठशी एकदम सहमत.. हेच म्हणतो....(हा ही पुणेरी चिंगूस पाणा नव्हे)..खानाचे पुढे काय झाले असा उगाच एक भुंगा डोक्यात घुसला आहे..आता त्याचे काय करावे? सुरेख लेख आवडला.. (अस्वादक)केशवसुमार (स्वगतः- डांबिस नावाचा माणुस अशी कथा कशी काय लिहू शकतो बाबा? :? निदान अस चांगल लिहिताना नाव बदला बॉ.. :> )

ऋचा गुरुवार, 05/08/2008 - 09:12
खरच तुम्ही खुप छान लिहीता अगदी अस वाटलं कि हे खरच आहे... अब्दुलखानला आणि तुमच्या मैत्रीला लाख-लाख सलाम....!

यशोधरा गुरुवार, 05/08/2008 - 09:25
अतिशय मनस्पर्शी झाले आहेत सगळेच भाग!! अब्दुल खान खूपच आवडला. त्याने निवडलेल्या आयुष्यात तो सुखी असावा, हीच शुभेच्छा आणि प्रार्थना. एकदम सुरेख लिहिले आहे.

मनस्वी गुरुवार, 05/08/2008 - 09:46
डांबिसकाका, आमच्याही डोळ्यातून नकळत आंसू ओघळले. तुमच्या मैत्रीला लाख-लाख सलाम....! आणि तेवढं अब्दुलखान आणि शबनमचं लग्न झालं का आणि त्यांची मुलं तिकडे आली का? ते रेसिडेन्सीची परिक्षा पास झाले का? त्यांना नोकरी मिळाली का - तेवढं सांगा की म्हणजे मनाला रुखरुख लागून रहाणार नाही. शेवटी "क्रमशः" वाचायला अधिक आवडले असते :)

स्वाती दिनेश गुरुवार, 05/08/2008 - 11:52
अब्दुल खानाची विलक्षण कथा ऐकताना डोळे भरुन आले,एका रांगड्या पठाणातला कोमल बाप,हळवा मित्र मन हेलावून गेला.तुमचा हा मित्र आता उत्तम रीत्या डॉक्टरी करत शबनम आणि मुलांबरोबर सुखाने आयुष्य व्यतित करत असेल,ही आशा..कारण त्याचाच आशावाद.. "इन्शाल्ला, सब ठीक हो जायेगा...." सुलेशबाबू ,'क्रमश:' हुकुमी जागी सोडणे ,योग्य गॅपने पुढचा भाग चढवणे आणि पाल्हाळ न लावता पाणी घालून क्रमशः न करता योग्य ठिकाणी संपवणे ह्यामुळे तुमचे हे व्यक्तिचित्र अतिशय दर्जेदार झाले आहे. A genius is a one who knows where to stop! Hats off!!! स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

मनस्वी गुरुवार, 05/08/2008 - 12:12
सुलेशबाबू ,'क्रमश:' हुकुमी जागी सोडणे ,योग्य गॅपने पुढचा भाग चढवणे आणि पाल्हाळ न लावता पाणी घालून क्रमशः न करता योग्य ठिकाणी संपवणे ह्यामुळे तुमचे हे व्यक्तिचित्र अतिशय दर्जेदार झाले आहे.
+१

मन गुरुवार, 05/08/2008 - 13:19
नुसतीच लेखन शैलीच नाही ,तर "कंटेंट" सुद्धा एकदम खास आहे. "पठान" च्या भाषेत "काबिल्-ए-तारीफ" है. बहुत ही बेहतरीन! आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

वरदा गुरुवार, 05/08/2008 - 17:32
कुछ केहेनेकाभी होश नही है..डोळ्यात पाणी आलय आणि स्क्रीन दिसत नाहीये..खूपच मस्त लिहिलय... पण ते सांगा तो आहे का इथे अजुन? आली का त्याची मुलं इथे....न्युजर्सीत असेल तर भेटूनच येईन म्हणते एकदा..

शितल गुरुवार, 05/08/2008 - 17:59
आता पर्य॑त खान साहेब आमच्याही ओळखीचे झाले आहे, सुद॑र वर्णन असे वाटते ते प्रस॑ग डोळ्यासमोर घडत आहेत हे तुमच्या लिखानाची जादु आहे. एक छान कथानक आम्हाला वाचायला मिळाले, या बद्दल तुमचे आभार. :)

झकासराव गुरुवार, 05/08/2008 - 18:03
क्या लिखेला है सुलेश बहोत बढिया. मस्तच. :) तुमचा खान आवडला. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

विसोबा खेचर गुरुवार, 05/08/2008 - 18:28
अरे डांबिसा, तुझा अब्दुल खान हा मिपाच्या शिरपेचातील एक मानाचा तुरा ठरला आहे असं म्हणावंसं वाटतं! आपला सलाम...! अजूनही असंच सकस लेखन मिपावर येऊ दे रे प्लीज... तात्या.

मुक्तसुनीत गुरुवार, 05/08/2008 - 18:43
ललित लिखाणाच्या यादीत या लिखाणाचा नंबर एकदम वरचा लागेल ! मात्र हे सर्व पूर्णपणे काल्पनिक लिखाण आहे यावर एक वाचक म्हणून भरवसा ठेवता येत नाही (सस्पेन्शन ऑफ डिस्-बेलिफ) , इतके हे लिखाण अस्सल वठले आहे.

चतुरंग गुरुवार, 05/08/2008 - 20:20
अपत्यविरहानं व्याकूळ आणि बायकोनं केलेल्या प्रतारणेनं खचलेल्या अब्दुलखानाने मनाचा ठाव घेतला; ते कातर, हळवं झालं! तुमची लिखाणाची शैली फारच ओघवती आहे. नेमक्या शब्दात प्रसंग मांडण्याचे कसब लाजवाब! असेच सकस लिखाण अजून आवडेल. अनेक शुभेच्छा! (अवांतर - हे लिखाण काल्पनिक आहे ह्यावर माझा तरी विश्वास बसत नाहीये. की हा ही एक डांबिसपणाच? :) ) चतुरंग

वाचक गुरुवार, 05/08/2008 - 23:57
थोरा मोठ्या लेखकांच्या पंक्तीत सहजगत्या नेउन ठेवेल असे सहज सुंदर, प्रभावी लेखन. नकळत "काबुलीवाला" ची आठवण झाली. हे सगळे 'एकत्र' वाचायला मिळेल अशी सोय करता येईल का ? कृपया विचार व्हावा.

सुरेख व्यक्तीचित्रण अन् ओघवती शैली.....आवडले आपल्याला! सर्व भाग योग्य ठिकाणी क्रमश: करुन उत्कंठा वाढविण्याचे कसब तर लैच भारी! असो, अजुन एखादा भाग वाचायला निश्चितच आवडला असता. >>अरे डांबिसा, तुझा अब्दुल खान हा मिपाच्या शिरपेचातील एक मानाचा तुरा ठरला आहे असं म्हणावंसं वाटतं! सहमत! टिंग्या

भडकमकर मास्तर Fri, 05/09/2008 - 01:28
झकास लिखाण ,. मस्त शेवट... .......... आणि उत्सुकता ताणली जाईल पण तुटणार नाही, अशा योग्य वेळानंतर पुढचा भाग टाकण्याची हातोटी खासच आहे...

खरा डॉन Fri, 05/09/2008 - 07:38
वा सुलेश तुने तो खूश कर दिया यार. बर्‍याच दिवसानी मिसळपाव वर काहीतरी सकस वाचायला मिळाले. स्वगतः च्यायला त्या गटण्याचे निरर्थक/निर्बुद्ध काथ्याकूट आणि धमु-डॉन-आंद्या गँगचे पानचट प्रतिसाद वाचून पार वीट आला होता बुवा..छ्या मिसळपावची क्वालीती जरा घसरत चालली आहे बॉ..

पिवळा डांबिस Fri, 05/09/2008 - 08:39
वरील प्रतिक्रियेतील अब्दुल खान या आयडी धारकाचा आमच्या अब्दुल खानशी वा पिवळा डांबिस याच्याशी संबंध नाही. मला प्रथम ही कुणीतरी करत असलेली गंमत आहे असे वाटून मी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं पण इतरही धाग्यांवर तो दिसू लागल्याने हे स्पष्टीकरण! http://www.misalpav.com/node/1725#comment-23083 कुणी ते नांव घ्यायला आमची हरकत अर्थातच नाही, पण इतर वाचकांचा आम्हीच काड्या करतो आहोत असा गैरसमज होऊ नये यासाठी हा खुलासा... आपला, पिवळा डांबिस

सखाराम_गटणे™ Fri, 05/09/2008 - 08:59
पण तो 'अब्दुल खान ' स्वतः ला तुमचाच 'अब्दुल खान' समजतो आहे. त्याचे ले़खन वाचा. http://misalpav.com/node/1725#new

In reply to by सखाराम_गटणे™

पिवळा डांबिस Fri, 05/09/2008 - 09:08
जाऊ द्या, आपण सोडून द्यायचं झालं.... आता आंतरजाल म्हटलं की तिथे हरतर्‍हेचे नमुने मिळायचेच की! आपण आपला त्यात काही संबंध नाही एव्हढं जाहीर केलं म्हणजे झालं... कदाचित कुणीतरी निखळ गंमत करत असेल...

सुमीत Fri, 05/09/2008 - 12:48
वाट पहात होतो ह्या भागाची, एकदम कलाटाणी वाटली जेव्हा टीप वाचली. इतके सुरेख व्यक्तीचित्रण आणि कल्पित. फर फर सुरेख.

गृहिणि Fri, 05/09/2008 - 21:28
फारच सुरेख! अब्दुल खान ला भेट्ल्यासारख वाटल. फारच जिवंत व्यक्तिचित्रण आहे.

गणपा Sat, 05/10/2008 - 16:16
काका, (इथे डांबिसकाका म्हणवत नाही) सर्वात उशीरा प्रतिसाद दिल्या बद्दल क्षमस्व आणि खानाची परत भेट घालुन दिल्याबद्दल थँक्स. कधी न्हवे त्या क्रमशः ची अपेक्षा ठेवावीशी वाटली आणि (संपूर्ण) हाती आलं. टीपः या कथेतील सर्व व्यक्तिरेखा व प्रसंग काल्पनिक आहेत. ही ओळ वाचे पर्यंत मुळ्ळीच वाटल नाही कि हा खान्या ही एक काल्पनिक वल्ली आहे. तुमच्या लेखन कौशल्यास प्रणाम. अजूनही असंच सकस लेखन मिपावर येऊ दे रे प्लीज... तात्या. हेच म्हणतो. -गणपा.

विजुभाऊ Sun, 05/11/2008 - 19:25
हे लिखाण काल्पनिक आहे ह्यावर माझा तरी विश्वास बसत नाहीये. की हा ही एक डांबिसपणाच? हो डाम्बीसपणाच असावा :) माणुस कायकाय लिहील सांगता येत नाही. पण एकंदरीत मस्त लिहितो डाम्बीस काका. डाम्बीसपणावर खुष असलेला विजुभाऊ

प्रास Tue, 06/05/2012 - 20:08
पुन्हा वाचले !
मी पण.....
मस्त वाटले !!
मला पण..... सुंदर लिखाणाबद्दल पिंडाकाकांचा आणि चांगल्या खोदकामासाठी नानाचा आभारी आहे.

टर्मीनेटर Fri, 03/26/2021 - 18:57
मिपाच्या खजिन्यात अशी किती रत्ने आहेत त्याचा अंदाज बांधणे कठीण आहे. काय अफलातून लिहिलंय राव, जाम आवडले. आणि हो, हे कथानक काल्पनिक आहे असं तुम्ही म्हटलंय खरं पण त्यावर विश्वास बसत नाहीये.

पिवळा डांबिस Fri, 03/26/2021 - 23:25
बापरे, हे लिखाण अजून टिकून आहे मिपावर? मला वाटलं होतं की काळाच्या ओघात गडप झालं असेल. :) ॲबसेंट माईंडेड आणि टर्मिनेटर, धन्यवाद हे नजरेस आणून दिल्याबद्दल...

सुसदा Mon, 03/29/2021 - 04:10
बरेच दिवसांनी मिपा वर आले, बरंच झालं. चारही भाग एकत्र वाचता आले. सुंदर व्यक्तीचित्रण आणि ओघवत्या भाषेमुळे हे प्रसंग काल्पनीक नसुन खरेच घडले असावेत असं वाटल. अप्रतीम!! शेवटच्या भागात काबुलीवाल्याची आठवण झाली.
लेखनविषय:
3