✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शाकाहार :- काही नवीन पैलु

म
मन यांनी
Sat, 05/10/2008 - 05:25  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
54944 वाचन

💬 प्रतिसाद (93)

प्रतिक्रिया

प
पिवळा डांबिस Sat, 05/10/2008 - 08:42 नवीन

सपशेल पटलं!

मनजी, तुमचं म्हणणं अगदी पटलं. आजवर चूक झाली ती झाली... आजपासून फक्त शाकाहारच घेणार! आपला, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sat, 05/10/2008 - 09:13 नवीन

शाकाहार-मांसाहार....

मुळात, बहुतांश सर्व सस्तन प्राणी आणी पक्षी ह्यांचे प्रामुख्याने शाकाहारी आणि मांसाहारी असे वर्गीकरण करता येते. काही प्राणी दोन्ही वर्गात मोडणारे असतात. ते शाकाहारही करतात (झाडांची पाने, फळे इ.) तसेच इतर काही प्राणी. अस्वल फळे, मध खाते तसेच मासे किडे-मुंग्याही खाते. माकडाच्या काही जाती ही मांस भक्षण करतात. नेमके असेच दात मानवाला आहेत,ते म्हणजे त्याच्या दाढा. (जबड्याच्या आकारमानानुसार्, सर्वाधिक भुभागावर् हे दात पसरलेले आहेत.) ह्यानुसार, मानवाचा आहार् काय हवा? माणूस कच्चे मांस खात नाही म्हणून त्याला 'सुळ्यांची' गरज नाही. तो मांस शिजवून मऊ करून, पचायला योग्य अशा प्रकारे बनवून खातो. त्या साठी त्याच्या दाढा 'सुटेबल' असतात. आता तसेच सफरचंद आणि जिवंत कोंबडीचे पिल्लु एका निरागस , भुकेल्या ,(माणसाच्या)बालकाच्या समोर ठेवा. निरागस बालकासमोरच कशाला, (पोहोचलेल्या) मोठ्या माणसासमोर जरी ठेवले तरी तो पिल्लू खाणार नाही. कारण माणूस जिवंत प्राणी, कच्चे मांस खात नाही. फळे मात्र कच्चीच खाल्ली जातात. पण सफरचंद आणि चिकनकरी समोर ठेवली तर माणूस (मांसाहारी) आधी चिकन करी खाऊन नंतर टीव्ही बघत बघत सफरचंद खाईल आणि तृप्त होईल. मग ह्या सगळ्या गोष्टी बर्‍याचशा हेच सुचवतात की शारिरिक दृष्ट्या मानवाला प्रामुख्याने शाकाहार हाच सुटेबल् ठरतो. मला नाही वाटत. मानवाच्या उत्क्रातीपासूनच तो प्राण्यांच्या शिकारीवर जगत आला आहे. तरी देखिल त्याने इतकी प्रगती केली आहे. विज्ञानातील शोध लावले आहेत. दुसर्‍या ग्रहांवर पोहोचला आहे, मेडिकल सायन्समध्ये, गणितीशास्त्रात, कला क्षेत्रात्, साहित्यक्षेत्रात, पेहरावात, स्थापत्यशास्त्रात अनन्यसाधारण प्रगती केली आहे. आयुर्मान वाढवीले आहे. मांसाहार करून देखिल हे सर्व शक्य झाले आहे मग तो आहार अनसुटेबल कसा? अवांतर :"अन्न रगडण्याची " पुरेशी व्यवस्था नसल्याने)ह्या चावुन खाण्यादरम्यान, धाकाहारी प्राण्याच्या आहारात पुरेशी "लाळ"मिसळली जाते. म्हणजे बायकोच्या धाकात राहून आहार करणारा का?
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Sat, 05/10/2008 - 09:51 नवीन

जबरा !

दोघांचे ही मुद्दे पटले ! उपलब्ध परिस्थीतीने जे अन्न समोर दिले / आले ते खावे ह्या मताचा मी ! जेथे शाकाहार उपलब्ध आहे तेथे मांसाहार ची गरज नाही, पण जेथे शाकाहार शक्य नाही तेथे मांसाहार .... हरकत नसावी. काही माकडे मी मुंग्या खाताना / छोटे मोटे कीडे खाताना खुप वेळा पाहीले आहे व मी माकडाला लहानपणा पासूनच मांसाहारी समजतो. बाकी आपली शारीरीक (मानवाची ) रचना शाकाहार व मांसाहार दोन्ही प्रकारच्या भोजनास उत्तम आहे . राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
म
मन Sat, 05/10/2008 - 14:04 नवीन

छट्...

काही प्राणी दोन्ही वर्गात मोडणारे असतात. त्यांना मिश्राहारी म्हणतात. पण हे प्राणी प्रामुख्याने तिथं पाहायला मिळतात जिथं काही कारणानं त्यांना त्यांचे नैसर्गिक अन्न मिळत नाही. किंवा दुसरेच अन्न दिले जाते. ह्यासाठीच मी मांजराचे पिल्लु आणि मानवाचे बालक ह्यांची तुलना दिली आहे. मी म्हण्तोय की "पर्याय उप्लब्ध असताना,प्राप्त परिस्थितीत मानावाची निवड काय राहील,किंवा काय रहायला हवी , ते पहा." शाकाहाराला "प्रथम पसंती" किंवा "प्रेफरन्स " असणे इष्ट. मानवाच्या उत्क्रातीपासूनच तो प्राण्यांच्या शिकारीवर जगत आला आहे. नाही्ए काही संपुर्ण खरे नाही. माणुस शिकार करु लागला तो प्रामुख्याने हिम युग येउन गेल्यानंतर म्हणजे फार तर बारा ते पंधरा हजार वर्षे झाली असावीत. उत्क्रांतीच्या हिशेबाने हा काल्खंड नगण्य आहे.(तो लाखेक वर्षांच्याही पुढे आहे.) पृथ्वीवर हिम युगात जेव्हा एका एकी अति शीत वातावरण तयार होउन अन्नाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला, तेव्हा, केवळ नाइलाज म्हणून माणसाने शिकारीस सुरुवात केली. आजही मानव कच्चे मांस फारश्या प्रमाणात खाउ शकत नाही, हे कशाचे प्रमाण आहे? याउलट(सर्वच नाही) पण कित्येक शाकाहारी गोष्टी तुम्ही आजही कच्च्या खाउ शकता. अगदि टोकाची स्थिती गृहित धरुयात. सम्जा एखाद्याला ज्याला मांसाहार अत्यंत प्रिय आहे,अशा व्यक्तिला देखील जर तुम्ही कित्येक दिवस्-वर्षे फक्त मांसाहार सेवन करण्याची सक्ती केलीत, तर बघाल की त्याचे शरीर हे सहन करु शकत नाही. कारण इथे तुमचे 'सुटेबल' नैसर्गिक अन्न कोणते तेच शरीर मागत असते.तुम्ही त्या नैसर्गिक प्रेरणेस अधिक काळ दाबु शकत नाही. याउलट शाकाहाराची सक्ती करुन एखाद्याला वर्षानुवर्षे ठेवलेतं, तर त्याला फारशी अडचण येणार नाही. ....तरी देखिल त्याने इतकी प्रगती केली आहे. विज्ञानातील शोध लावले आहेत. दुसर्‍या ग्रहांवर पोहोचला आहे, मेडिकल सायन्समध्ये, गणितीशास्त्रात, कला क्षेत्रात्, साहित्यक्षेत्रात, पेहरावात, स्थापत्यशास्त्रात अनन्यसाधारण प्रगती केली आहे. आयुर्मान वाढवीले आहे. मांसाहार खाल्ल्याने विविध विषयात प्रगती होणार नाही असं आम्ही कुठं म्हणतोय? ती तशी होते हे सुर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे. मात्र तुमच्याकडे उपलब्ध (उत्तर)आयुष्यात कटकटी निर्माण होतात, त्याचे काही अंशी कारण मांसाहारावर भर असणे आहे. ("आम" निर्मिती , ह्रुदय रोग व इतर शारिरिक व्याधी) तेच उपलब्ध आयुष्य सुखकर ठेवायचे असेल, तर शाकाहार चांगला असं मी म्हणतोय. (कृपया माझा नीलकांत रावांना खाली दिलेला प्रतिसाद वाचा.) बाकी तुम्ही कच्चे मांस खाउ शकत नाही याचे कारण ती तुमची नैसर्गिक बुद्धी नाही. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Sat, 05/10/2008 - 15:45 नवीन

मी

मी म्हण्तोय की "पर्याय उप्लब्ध असताना,प्राप्त परिस्थितीत मानावाची निवड काय राहील,किंवा काय रहायला हवी , ते पहा." शाकाहाराला "प्रथम पसंती" किंवा "प्रेफरन्स " असणे इष्ट. 'पर्याय उपलब्ध असताना' हे महत्त्वाचे. मांजर दोन्ही खाऊ शकते. माणूस कच्चे मांस खाऊ शकत नाही. म्हण्जे मांजराला तुम्ही दोन्ही पर्याय उपलब्ध करून देता आहात आणि माणसाला सफरचंदाशीवाय पर्याय उपलब्ध करून दिलेला नाही. ही असमान तुलना झाली. माणुस शिकार करु लागला तो प्रामुख्याने हिम युग येउन गेल्यानंतर म्हणजे फार तर बारा ते पंधरा हजार वर्षे झाली असावीत. उत्क्रांतीच्या हिशेबाने हा काल्खंड नगण्य आहे.(तो लाखेक वर्षांच्याही पुढे आहे.) पृथ्वीवर हिम युगात जेव्हा एका एकी अति शीत वातावरण तयार होउन अन्नाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला, तेव्हा, केवळ नाइलाज म्हणून माणसाने शिकारीस सुरुवात केली. मान्य. माझे ह्या बाबतीत ज्ञान तुटपुंजे आहे. पण शब्दांवर न जाता आशय लक्षात घ्या. माणसांने बहुतांश शोध मांस खायला लागल्यावर लावले आहेत. मांस, जे तुमच्या मते 'अनसुटेबल' अन्न आहे ते खाऊनच माणसाने प्रगती केली आहे. प्रगती मध्ये बौद्धीक, शारीरिक, मानसिक वाढ अभिप्रेत आहे. ज्या अन्नाच्या सेवनाने माणसाने हे सर्व साध्य केले ते 'अनसुटेबल' कसे? आजही मानव कच्चे मांस फारश्या प्रमाणात खाउ शकत नाही, हे कशाचे प्रमाण आहे? शिजवण्याची प्रक्रिया करून खाल्ले तर ते घातक असते का? आजही तुम्ही-आम्ही बटाटा, फॉवर, वांगी, तांदूळ, गहू, बाजरी, मका, पडव़ळ, दोडकी, गिलकी, सुरण, तोंडली, पालक, हिरवा-लाल माठ, करडई, आंबट चुका, शोपू, डाळी, कडधान्ये, अळू असे अनेक पदार्थ शिजवण्याच्या प्रक्रिये शिवाय खाऊ शकत नाही. तेही सर्व अनसुटेबल मानायचे का? जर प्रक्रिया करून खाण्यासाठी ते सुटेबल असेल तर मांस सुद्धा तसेच प्रक्रिया करून खाण्यासाठी सुटेबल का मानू नये? दुजा भाव का? याउलट(सर्वच नाही) पण कित्येक शाकाहारी गोष्टी तुम्ही आजही कच्च्या खाउ शकता. किती? रोजच्या शाकाहारातील वरील सर्व गोष्टी तुम्ही कच्च्या खाऊ शकत नाही. सम्जा एखाद्याला ज्याला मांसाहार अत्यंत प्रिय आहे,अशा व्यक्तिला देखील जर तुम्ही कित्येक दिवस्-वर्षे फक्त मांसाहार सेवन करण्याची सक्ती केलीत, तर बघाल की त्याचे शरीर हे सहन करु शकत नाही. गैरसमज आहे. योग्यप्रमाणात खाल्ले तर शरीर जरूर सहन करू शकेल. मात्र प्रमाणा बाहेर सेवन केले तर ते हानिकारकच. मग तो मांसाहार असो वा शाकाहार. याउलट शाकाहाराची सक्ती करुन एखाद्याला वर्षानुवर्षे ठेवलेतं, तर त्याला फारशी अडचण येणार नाही. पण म्हणून शाकाहार हेच एकमेव 'सुटेबल' अन्न आहे ह सिद्ध होत नाही. शाकाहारवरही माणूस जगू शकतो असे फक्त म्हणता येईल. मांसाहार खाल्ल्याने विविध विषयात प्रगती होणार नाही असं आम्ही कुठं म्हणतोय? मांसाहाराला 'अनसुटेबल' असे लेबल लावून तुम्ही कमी लेखता आहात. जर 'अनसुटेबल' अन्न खाऊन माणूस इतकी प्रगती करू शकतो तर ते अन्न असुटेबल कसे? ती तशी होते हे सुर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे. म्हणजेच मांसाहार हा सुद्धा 'सुटेबल' आहे सुर्यप्रकाशा इतकेच स्वच्छ आहे. मात्र तुमच्याकडे उपलब्ध (उत्तर)आयुष्यात कटकटी निर्माण होतात, त्याचे काही अंशी कारण मांसाहारावर भर असणे आहे. अतिसेवन कुठलेही वाईट. मांसाहार करताना चवीसाठी भरमसाठ खायची सवय असेल तर त्रास हा होणारच. तेच उपलब्ध आयुष्य सुखकर ठेवायचे असेल, तर शाकाहार चांगला असं मी म्हणतोय. अतिसेवनाने रोगग्रस्त झालेली किती शाकाहारी उदाहरणे दाखवू? आपल्या कडील सर्व भाषकांमध्ये जे ब्राह्मण आहेत किंवा शुद्ध शाकाहारी आहेत ते सर्व व्याधीमुक्त जीवन जगतात असा आपला दावा आहे का? त्यांच्यातही व्याधीग्रस्त तितकेच असतात जितके मांसाहारींमध्ये. अतिसेवन हेच त्या मागिल कारण आहे. (असमतोल आहार हेही एक कारण असू शकते.) बाकी तुम्ही कच्चे मांस खाउ शकत नाही याचे कारण ती तुमची नैसर्गिक बुद्धी नाही. हे वाक्य कळले नाही. नैसर्गिक गरज नाही, नैसर्गिक आवड नाही, नैसर्गिक कल नाही समजू शकते. 'नैसर्गिक बुद्धी' शब्द मला नवीन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन
म
मन Sat, 05/10/2008 - 16:21 नवीन

मग ही घ्या उत्तरं

'पर्याय उपलब्ध असताना' हे महत्त्वाचे. मांजर दोन्ही खाऊ शकते. माणूस कच्चे मांस खाऊ शकत नाही. म्हण्जे मांजराला तुम्ही दोन्ही पर्याय उपलब्ध करून देता आहात आणि माणसाला सफरचंदाशीवाय पर्याय उपलब्ध करून दिलेला नाही तेच सांगतोय, मानवाला "कच्चे मांस(जिवंत कोंबडी!)" हा पर्याय जरी दिला, तरी तो त्याच्यासाठी पर्याय नसतोच. ही असमान तुलना कुठयं बुवा? दोघांना शेम टु शेम पदार्थच तर दिले आहेत. (कारण आक्खी चर्चाच त्या दोन पदार्थांबद्दल चालु आहे.) लोखंडाचा तुकडा कुठला आणि अस्सल सोन्याचा कुठला हे ओळखायचे(समजा एखाद्या अंध व्यक्तीला हे करायचे आहे.), तर काय होइल? दोन्हीला चुंबका जवळ आणा.जे चुंबका कडे आकृष्ट होते, ते लोखंड हा सरळ सधा "ले मॅन्स लॉजिक" वरुन आलेला उपाय आहे. (किंवा दुसरा उपाय(खात्री करुन घेण्यासाठी), :- दोन्हीला दिर्घ काळ पाण्याच्या सान्निध्यात म्हणजे जिथे लोखंड गंजु शकते, अशा ठिकाणी ठेवा.जे गंजेल तेच सोने. ) ही अशीच साधी सरळ कसोटी मी मांडलिए.त्यात कुठे असमानता आहे? आणि ती असलिच तर असमानता ही""पदार्थाच्या गुणधर्मात" आहे. सोने मुळातच चुंबकाकडे आकृष्ट होत नाही. कारण मुळातच सोने आणि लोखंड ह्यांच्या गुण धर्मात ती अचुकता आहे. याउलट(सर्वच नाही) पण कित्येक शाकाहारी गोष्टी तुम्ही आजही कच्च्या खाउ शकता. किती? रोजच्या शाकाहारातील वरील सर्व गोष्टी तुम्ही कच्च्या खाऊ शकत नाही. मी प्रश्नातच उत्तर दिलय त्याचं.आपण कित्येक फळे, कच्चे कणीस आणि अगदि धान्य सुद्धा कच्चे खाउ शकतों. नव्हे खातोच. (आठवा लुस लुशीत, कवळी कवळी धान्याची कणसे,जी क्वचितच का असेना पण आपण कच्ची खाल्ली आहेत.) (मी हे फक्त शाकाहार आपल्याला कसा योग्य ठरतो, त्यासाथी सांगतोय्.इतर तुम्ही उल्लेख केलेले प्दार्थ शिजवुन खातो, पण "आपण शाकाहार कच्चा खाउ शकतो," हे जीव शास्त्रिय दृष्ट्या कशाचे लक्षण आहे त्याचा विचार करावा ,यासाठी मी ते लिहिलयं.) तो आपल्या वागणुकी तील शिल्लक असलेला पुरावा आहे की शाकाहार शरीरास सुट होतो. पण आपण कुठलेच मांस कच्चे खाउ शकत नाही. गैरसमज आहे. योग्यप्रमाणात खाल्ले तर शरीर जरूर सहन करू शकेल. मात्र प्रमाणा बाहेर सेवन केले तर ते हानिकारकच. मग तो मांसाहार असो वा शाकाहार. का "योग्य" प्रमाणात का खायचं? मांसाहार जर शरीरास इतका उपकारक असेल, तर "फक्त मांसाहार(केवळ कच्चे मांस)" खाणे शक्य असायला हवे.ते तसे नाही, कारण ते शरीरास सुट होत नाही. माणुस प्रदुषित हवा, प्रदुषित पाणी आणि एकुणच प्रदुषित पर्यावरण ह्यात राहुनही करतोच की प्रगती. म्हणजे प्रदुषणाचा कुठला अपायच होत नाही. असं म्हट्ल्या सारखं आहे हे. अपाय होतोच. तो अल्प प्रमाणात पण सातत्याने होतो आणि साठत जातो. जेव्हा तो तसा पुर्ण साठतो, तेव्हाच तो""प्रकट" होतो.तो पर्यंत काही होत नाही म्हणुन आपले मांस खात सुटणे निश्चितच स्लो पोइझनिंग आहे. तुम्ही रस्त्यावरुन १० मिनिटे चक्कर टाकुन आलात आणि मग जर तुम्हाला काहिच त्रास होत नसेल, तर ह्याचा अर्थ असा नाही की रस्त्यावर वायु प्रदुषण ०% आहे. ते आहे, पण फक्त तुमच्या जाणिवेच्या पातळिच्या किंचित खाली आहे.(आणि हाच सर्वात मोठा धोका आहे.!!!) बाकी इथे अतिसेवनाचा मुद्दा पुर्ण गैर्लागु होइल असं मला वाटतं. तेच उपलब्ध आयुष्य सुखकर ठेवायचे असेल, तर शाकाहार चांगला असं मी म्हणतोय. ह्यासाठी मी निलकांत रावांना (ह्याच चर्चेत)प्रतिसाद दिलाय. तो आपण पाहिलात का? त्याबद्दल आपलं काय मत आहे? "नैसर्गिक बुद्धी" म्हण्जे मला "उपजत बुद्धी","उपजत ज्ञान " म्हणायचे आहे. (जे सहसा प्रौढ मानवाकडे अत्यल्प, प्राण्यांकडे भरपुर आणि मानवाच्य बालकांमध्ये काही प्रमाणात असते असे विज्ञान मानते.) (उप्जत ज्ञानाचे उदाहरणः- पोहणे. वगैरे.) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Sat, 05/10/2008 - 19:28 नवीन

तेच

तेच सांगतोय, मानवाला "कच्चे मांस(जिवंत कोंबडी!)" हा पर्याय जरी दिला, तरी तो त्याच्यासाठी पर्याय नसतोच. ही असमान तुलना कुठयं बुवा? दोघांना शेम टु शेम पदार्थच तर दिले आहेत. मांजरासाठी दोन्ही खाण्यालायक पदार्थ आहेत माणसासाठी कोंबडी प्रक्रियेविना खातायेण्यासारखी नाही. हीच दोघांना दिलेल्या पर्यायातली असमानता. कोल्हा आणि करकोच्याच्या गोष्टी सारखे दोघांनाही बशीतून दूध दिले तर कोल्हा ते पिऊ शकतो, करकोचा नाही. दूध पिण्याची दोघांना समान संधी मिळालेली नाही. (पदार्थ सेम असला तरीही). (किंवा दुसरा उपाय(खात्री करुन घेण्यासाठी), :- दोन्हीला दिर्घ काळ पाण्याच्या सान्निध्यात म्हणजे जिथे लोखंड गंजु शकते, अशा ठिकाणी ठेवा.जे गंजेल तेच सोने. ) ह्यावर मी काहीच मतप्रदर्शन करू शकत नाही. माझे मुद्दे मी मांडले आहेत. त्यावर त्याहून अधिक भाष्य करणे म्हणजे वेळेचा अपव्यय होईल किती? रोजच्या शाकाहारातील वरील सर्व गोष्टी तुम्ही कच्च्या खाऊ शकत नाही. किती? ह्या प्रश्नात 'अत्यल्प' हे उतर आहे. हा संपूर्ण 'आहार' होऊ शकत नाही. का "योग्य" प्रमाणात का खायचं? मांसाहार जर शरीरास इतका उपकारक असेल, तर "फक्त मांसाहार(केवळ कच्चे मांस)" खाणे शक्य असायला हवे.ते तसे नाही, कारण ते शरीरास सुट होत नाही. मांसाहारी माणसांनी फक्त मांसाहारच करावा का? सकाळी उठल्यावर ३-४ अंड्यांचे ऑम्लेट (पाव -पोळी काहीनाही), दुपारच्या जेवणात १-२ किलो कोंबडी (दुसरे तिसरे काहीच खायचे नाही), संध्याकाळी नाश्त्याला ४-५ फिश फ्राय आणि रात्री ए-दिड किलो मटण असा आहार आपल्याला अपेक्षित आहे का? तसे असेल तर आपला वाद मिटलेला आहे. इतका उपकारक मांसाहार शरीराला उपकारक आहे असे मी म्हंटलेले नाही. फक्त तो 'अनसुटेबल' नाही असे म्हंटले आहे. माणुस प्रदुषित हवा, प्रदुषित पाणी आणि एकुणच प्रदुषित पर्यावरण ह्यात राहुनही करतोच की प्रगती. म्हणजे प्रदुषणाचा कुठला अपायच होत नाही. असं म्हट्ल्या सारखं आहे हे. अपाय होतोच. तो अल्प प्रमाणात पण सातत्याने होतो आणि साठत जातो. जेव्हा तो तसा पुर्ण साठतो, तेव्हाच तो""प्रकट" होतो.तो पर्यंत काही होत नाही म्हणुन आपले मांस खात सुटणे निश्चितच स्लो पोइझनिंग आहे. जितकी वर्षे मानव मासाहार करीत आला आहे तितकी वर्षे प्रदुषणाचा सामना करावा लागला तर प्रगती करण्यासाठी माणूस उरणार नाही. मांसाहाराचा आणि प्रदुषणाच्या उदाहरणाचा संबंध पटत नाही. मांसाहाराचा संबंध जगातल्या प्रत्येक वाईटाशी जोडून वाद घालायचा म्हंटले तर मला तरी ते योग्य वाटत नाही. मुळात आपण मासाहार आणि शाकाहार ह्यांची तुलना करीत आहोत. वरील सोने आणि लोखंडाचे उदाहरणही विसंगत आहे. त्यातून 'मांसाहार चांगला आणि शाकाहार वाईट' अशी माझी मते असल्याचा तुम्ही गैरसमज करून घेता आहात. मुळ वादाचा मुद्दा असा की मांसाहार मानवाच्या शरिराला 'अनसुटेबल' आणि शाकाहारच फक्त 'सुटेबल' हा आहे. ह्यावर मी माझी मते मांडली. बाकी इथे अतिसेवनाचा मुद्दा पुर्ण गैर्लागु होइल असं मला वाटतं. का बरे गैरलागू? तेच उपलब्ध आयुष्य सुखकर ठेवायचे असेल, तर शाकाहार चांगला असं मी म्हणतोय. हा नवीन सुर तुम्ही आळवताहात. तुमच्या मुळ लेखात हा मुद्दा नव्हाता. तिथे मुद्दा होता फक्त शाकाहारच मानवी शरिराला 'सुटेबल' आहे, मांसाहार नाही. इथेच वादाला सुरुवात झाली. तुमच्या वरील वाक्याला मी जरूर समर्थन देईन. शाकाहाराला मी वाईट अजिबात म्हणत नाही. मांसाहार मानवी शरीराला 'अनसुटेबल' आहे असे तुम्ही म्हणू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन
प
पक्या Sat, 05/10/2008 - 23:01 नवीन

एक माहिती

अ़जूनही काही प्रमाणात काही ठिकाणी कच्चे मास खाल्ले जाते. उदा. जपानी लोक काही प्रकारचे मासे कच्चे खातात. सुशी ह्या जगप्रसिध्द डिश मधे कच्चा मासाच वापरतात. बरेच लोक अंडे पण कच्चे खातात. (दूधातून किन्वा तसेच.) (पण माझ्या माहीती प्रमाणे असे कच्चे खाणे योग्य नाही कारण त्यात bacteria ची वाढ होउ शकते. शिजवलेल्या पदार्थात उच्च तापमानामुळे bacteria मरून जातात. ) योग्य प्रमाणात मांसाहार केल्यास ठीक आहे पण अतिरेक नको. मांसाहारात fiber चे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळे पोटाच्या व्याधी होउ शकतात (अपचन, बध्द्कोष्ट वगैरे) - पक्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ग
गणपा Sat, 05/10/2008 - 15:34 नवीन

टु बी ऑर नॉट टु बी.

विषय वाचुन वाटल की मस्त गरमा गरम व्हेज v/s नॉनव्हेज चर्चा रंगणार. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार. लावणीत रंगतात त्याप्रमाणे सवाल्-जवाबाच्या फड उभा राहाणार . पण मना चा लेख वाचला आणि अगदी डांबिस काकां सारखी अवस्था झाली. मनाचे मुद्दे आम्ही इतके मनाला लावुन घेतले की वाटल की माताय मी पण शाकाहरीच व्हाव क्षण भर. (बायकोला फोन पण करणार होतो, की आज बोंबील नको, शेवग्याच्या शेंगा आणि व्हेज-कलेजी (वांगी हो) आण.) जरा खाली आलो नी पेठकर काकांचा सुंदर प्रतिसाद वाचला. पेठकर काकांनी प्रत्येक मुद्याला छान शब्दांनी(मुद्देसुद) उत्तर देउन, आमचं परत मतपरिवर्तन केल. आणि आम्ही परत मांसाहार करण्यास मोकळे झालो. धाकाहारी प्राण्याच्या आहारात.......... म्हणजे बायकोच्या धाकात राहून आहार करणारा का? काका छप्पर फाडके =)) =)) काकांमुळे माझा हॅमलेट होता होता राहिला. (आवांतरः हॅमलेट वरुन ऑम्लेट आठवल, चला नाष्ट्याला काय करायचे तो प्रश्न्न सुटला. नाहीतरी अंड दोन्ही वर्गात मोडत. शाकाहरी भी खुष, मांसाहारी भी खुष और हम भी ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
म
मन Sat, 05/10/2008 - 15:44 नवीन

हो,पण....

मी पेठकर काका आणि नीलकांत ह्यांच्या प्रतिसादांना उत्तर देताना काही मुद्दे मांडलेत. ते पाहिले सार्‍यांनी , तर बर होइल.... आपण ते पाहिलेत का? (मी शाकाहारी च्या ऐवजी 'धाकाहारी' लिवलं हाय. पन त्ये विवाहित पुरुषांना लयीच लागु पडतय.:-) ) आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
द
देवदत्त Sat, 05/10/2008 - 22:14 नवीन

पेठकर

पेठकर काकांशी पूर्णत: सहमत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
व
वेताळ Sat, 05/10/2008 - 09:44 नवीन

मस्त लिहिलेत प्रभाकर काका .

तस बघायला गेले तर आम्ही पण ज्यावेळी कोंबडीचा उतारा तिकाटण्यावर ठेवा म्हणुन सांगतो त्यावेळी जिवंत कोंबडी आम्हाला अभिप्रेत नसते.तर शिजवलेली कोंबडी असा अर्थ लोकानी घ्यावा.बाकी सुज्ञ लोकाना ज्यादा सांगण्याची गरज नाही. वि.सु.- उतारयात फक्त कोंबडीच देउ नका, बरोबर चपाती,भात,सुक्के व लिंबु पण ठेवा.आम्ही मिश्रहारी आहोत. आपला (उतारयाची वाट पाहणारा) वेताळ.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 05/10/2008 - 10:08 नवीन

मेल्याक म्हातारचळ लागलोसा!!

मेल्या वेतोबा, तुकां म्हातारचळ लागलोसां!! तुका आम्ही सांगूचा म्हणजे ल्हानतोंडात मोठो घास होतलो पण मेल्या, ह्यां चपाती, भात, लिंबू काय मागतंस? आंवशीक खांवक व्हरान! अरे वेताळ म्हणजे आमच्या भूतगणात सर्वश्रेष्ठ रे!! आणि मेल्या तू हंयसर चपाती-भात मागतंस!! त्यापेक्षा आमी पिवळो डांबिस बरे रे!! नेत्याविना निराश, पिवळो डांबिस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
प
प्रभाकर पेठकर Sat, 05/10/2008 - 10:36 नवीन

हाच शब्द....

आम्ही मिश्रहारी आहोत. 'मिश्रहारी', नेमका हाच शब्द मला आठवत नव्हता. मानव हा शाकाहारी, मांसाहारी नाही तर 'मिश्रहारी' आहे. त्यामुळे काय सुटेबल आणि काय अनसुटेबल हा प्रश्नच उद्भवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
न
नीलकांत Sat, 05/10/2008 - 10:03 नवीन

माझं मत...

अगदि त्याच प्रमाणे माणुस हा "ग्रेटर एप्स" ह्या प्रवर्गात मोडतो.(प्रवर्ग नामातील् चु.भु.द्या.घ्या. बायो लॉजी सोडुन काही युगे उलटली आहेत. ) त्यांतील प्राणी कोण? तर् ओरँग उटांग,चिंपांझी,गोरिला वगैरे. ह्यांचे मुख्य अन्न ते काय? तर् काही प्रमाणात् झाडपाला आणि उरवरीत फळे, काही प्रमाणात धान्य कण सुद्धा. ह्यानुसार, मानवाचा आहार् काय हवा?
ह्याच नियमाने आपण मांसाहार सोडायचा तर मला शंका आहे की उद्या आमच्या अधोवस्त्रांबद्दल तर तुम्ही शंका घेणार नाही ना? ;) अहो साहेब ह्या निसर्गातील कित्येक गोष्टी मानवाने आपल्याला नैसर्गीक अनुकुल नसल्या तरी त्यावर काही प्रक्रिया अथवा संस्कार करून त्या आपल्याला योग्य अश्या स्वरूपात रुपांतरीत करून त्याचा उपभोग घेतला आहे - घेतो आहे. आता कुठला नियम बघायचा ते तुम्ही ठरवा, नैसर्गीक न्यायाने बघायचे तर जो बलवान आहे तोच टिकणार. मानुस त्यात वर आहे. तो त्याला अनुकुल असे नियम बनवेल. जसं जंगलात सिंह करतो. त्याला अनुकुल अशी त्याची जीवनशैली असते. त्याला हवं त्या ओढ्यावर तो पाणी पितो. हवं ते भक्ष्य तो मारतो. तो त्याच्या खाण्याच्या नैसर्गीक शैलीव्यतिरिक्त काही खात नाही कारण त्याची ती क्षमता नसावी. मानवी मुल्यांचा विचार केला तर मांस हे अतिशय समृध्द अन्न आहे. जे की जगातल्या सर्व भागात सहज उपलब्ध आहे. मांसाहाराला जे पर्यायी अन्न म्हणून सांगीतल्या जातं ते जगात सर्वत्र उपलब्ध नाहीये. नैसर्गीक अवस्थेत मानुस कच्च मांस खात होता. आपल्या शरीराला भाजलेलं मांस अनुकुल आहे हे लक्षात आल्यावर त्याने ते भाजणं सुरू केलं. त्याचा हेतू जगण्यासाठी खाणं हा होता आणि आता तो शिजवून खातो. त्यात वेगवेगळे मसाले आणि पध्दती मिसळून तो त्या अन्नांचं स्वादिष्ट रुचकर भोजनात रुपांतर करतो आणि आमच्या सारखे पामर त्याला पुर्णब्रम्हं म्हणून सेवन करतात. असो. एक साधा विचार करा जगात समुद्राच्या किनारी राहणार्‍या लोकांनी मासे खायचं बंद केलं तर आपण त्याला पर्यायी अन्न पुरवू शकू का? मला वाटतं की शाकाहार मानसाचा नैसर्गीक आहार असेलही मात्र आजच्या उन्नत अवस्थेत मानसाने जसं इतर कित्येक बाबींवर आपल्याला अनुकुल संस्कार केले व हवे असलेले अनुकुल वातावरण तयार करून तो राहतो आहे त्यानुसार आहारात हा साधा बदल खुप क्रांतीकारक आहे असं मला वाटत नाही. नीलकांत
  • Log in or register to post comments
म
मन Sat, 05/10/2008 - 13:26 नवीन

मी म्हटलय ते असः-

अधोवस्त्रांबद्दल तर तुम्ही शंका घेणार नाही ना? :-)) :-) (अहो, त्याहिशेबाने खर्‍या "नैसर्गिक" अवस्थेत बॉलिवूड चाललेच आहे, माझ्या उपदेशाशिवाय! ;-) ) पण आता जरा मुद्द्याचं:- एक साधा विचार करा जगात समुद्राच्या किनारी राहणार्‍या लोकांनी मासे खायचं बंद केलं तर आपण त्याला पर्यायी अन्न पुरवू शकू का? हो. हे तर आहेच. जगातील आजची संपुर्ण मानवी लोकसंख्या १००% शाकाहारी राहणे शक्य नाही. कारण तेव्हढे (निव्वळ शाकाहारी)अन्न उपलब्ध नाही हे कटु वास्तव आहे.ह्यामुळेच विधान लिहिताना मी लिहिलय ते:- "ओरँग उटांग,चिंपांझी,गोरिला वगैरे. ह्यांचे मुख्य अन्न ते काय? तर् काही प्रमाणात् झाडपाला आणि उरवरीत फळे, काही प्रमाणात धान्य कण सुद्धा." असं लिहिलयं. ईतर कुणाच्या फायद्यासाठी नव्हे तर स्वतः च्या तब्येतीस अनुकुल असल्यामुळे शक्य तेव्हा शाकाहाराचा अन्नात समावेश असावा, असं मला वाटतं. (वाचा:- डॉ. अभय बंग ह्यांचे "माझा साक्षात्कारी हृदयरोग") (ज्यांना माहित नाही त्यांच्या साठी:- डॉ अभय बंग हे फिजिशियन ह्या अर्थाने "डॉक्टर" आहेत. सध्या चांदा,भंडारा,मेळघाट वा तत्सम जिल्ह्यांत त्यांचे समाजकार्य कित्येंकांना प्रेरणा/आदर्श ठरले आहे.) शिवाय, आयुर्वेदात "आहार्-विचार" करताना स्पष्ट पणे उल्लेख आहे तो असा:- "अन्नातील सर्व निरुप्योगी भाग विष्ठेतुन न जाता काही प्रमाणात शरीरात शिल्लक राहु शकतो. आयुर्वेदात ह्याला म्हणतात "आम". आम पुढे शारिरिक द्रव्यांसोबत मिसळुन विषारी/घातक सिद्ध होउ शकतो. " "आमा" ची सर्वाधिक निर्मिती ही प्राणिज अन्नाने होते, हे आयुर्वेदात सांगितले आहे. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
ई
ईश्वरी Sat, 05/10/2008 - 14:31 नवीन

वरील काही

वरील काही मुद्दे पटले (मनच्या लेखातील). पण तरीही काही वेळेस नुसतेच जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नव्हे तर पोषणमूल्यांची गरज म्हणून ही मांसाहार केला जातो. माझ्या परिचितांचे अनुभव देत आहे. माझी एक अमेरिकन मैत्रिण सान्गत होती..तिने व तिच्या नवरयाने काही महीने मांसाहार पूर्णपणे बंद केला होता. पण नंतर त्याना आहारात proteins ची कमतरता भासू लागली. (अमेरिकनान्च्या जेवणात आपल्यासारख्या डाळी नसतात उदा. मूग, तूर्, हरभरा वगैरे . इतर काही प्रकारचे beans ते खातात पण अगदी रोज नाही ..कधीतरीच.) त्यामुळे त्यांनी परत मांसाहार घेण्यास सुरवात केली. माझ्या अजून एका (देशी) मैत्रिणीच्या मुलीला मूग आणि तूर सोड्ल्यास इतर डाळींची ऍलर्जी आहे. मुलगी लहान असल्याने रोज एकाच प्रकारचे पदार्थ खाण्यास नकार देते. मध्यंतरी काही कारणास्तव डाक्टरी चेकअप झाल्यावर मुलीला आहारात proteins कमी पडत आहे हे समजले. त्यामुळे मैत्रिणी च्या घरी सर्व शाकाहारी असले तरी मुलीसाठी त्यांनी चिकन व फिश चे पदार्थ बनवण्यास सुरवात केली. अजुन एका परिचितांचे एक छोटेसे औपरेशन झाल्यावर डाक्टरांनी चिकन सूप भरपूर प्या असे सान्गितले होते. कारण चिकन सूप मध्ये protein भरपूर असते. आणि protein आजारपणात शक्ती भरून येण्यासाठी व शरीरावर काही जखम असेल तर ती लवकर भरून येण्यासाठी मदत करते. -- ईश्वरी
  • Log in or register to post comments
म
मन Sat, 05/10/2008 - 14:39 नवीन

होच मुळी.

ह्या स्थितीत मांसाची पोषक मुल्य म्हणुन गरज कुणीही नाकारु शकत नाही. म्हणुनच तर शाकाहार म्हण्जे "मुख्य अन्न" असं मी काळजी पुर्वक म्हटलय. मुख्य अन्नासोबत पूरक पदार्थ गरज्/नाइलाज म्हणुन घ्यायला अशा परिस्थितीत काहिच हरकत नाही. पण त्याचे अधिक सेवन करणे योग्य नाही,असं वाटतय. आपलाच, मनोबा (उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश्वरी
श
शितल Sat, 05/10/2008 - 15:55 नवीन

चर्चा र॑गली आहे.

छान प्रतिक्रीया आणि जोरदार मत मा॑डणी. शाकाहार की मा॑साहार हा ज्याचा त्या॑नी ठरवावा, जे पचेल आणि रुचेल ते खाण्यास हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 05/10/2008 - 23:51 नवीन

मांसाहार आणि शाकाहार हे दोन्ही आहार

माणसाला चालतात. दोन्ही आहारांमधून त्याच्या शरीराच्या वाढीसाठी पोषणासाठी लागणार्‍या विशिष्ठ गोष्टी त्याला प्राप्त होतात. दोन्ही प्रकारचे अन्न हे नेहेमीच्या आहाराचा भाग म्हणून सेवन करताना विशिष्ठ प्रकारे प्रक्रिया करुन/शिजवून घेणे इष्ट असते. पूर्वी कच्चे, त्यापुढच्या काळात भाजलेले, अजून प्रगतीनंतर भाजून मीठ-मीरपूड टाकलेले, आधुनिक काळात विविध मसाले घालून चविष्ट बनवलेले ह्या क्रमाने मांसाहारात (आणि शाकाहारात सुध्दा) प्रगती होत गेली हे मान्य व्हावे. भौगोलिक परिस्थितीनुसार आहार विहारात बदल होत गेले/जातात आणि ते त्या परिस्थितीला टिकून राहण्यासाठी आवश्यक ठरतात. जसे किनारपट्टीवरील माणसे जलचरांचा समावेश आहारात करणारच. अतिशीत प्रदेशात (जसे टुंड्रा) एस्कीमो हे प्रामुख्याने सील, वॉलरस, मासे ह्यांना खाणार. कारण भरपूर प्रोटीन्सची नैसर्गिक गरज दुसरे काही भागवू शकतच नाही. त्याव्यतिरिक्त तुम्ही जर सर्वसाधारण प्रदेशात रहात असलात, जसे महाराष्ट्रासारखे ठिकाण जिथे फार थंड किंवा वाळवंटी प्रदेशासारखे अतिउष्ण नाही तिथे योग्य प्रमाणात मिश्राहार चालू शकेल/चालतो. मना, तू जे आयुर्वेदाचे उदाहरण दिले आहेस - "आमा" ची सर्वाधिक निर्मिती ही प्राणिज अन्नाने होते, हे आयुर्वेदात सांगितले आहे. हे अयोग्य आहे. कारण आमाची मुख्य निर्मिती ही न पचलेल्या अन्नाने होते, त्यात शाकाहार की मांसाहार हा मुद्दा गौण. कडकडून भूक न लागता केवळ वेळ झाली म्हणून जेवणे, रात्री उशिरा भरपेट जेवणे, सतत तेलकट, तळलेले खाणे, व्यायामाचा अभाव असे संपूर्ण शाकाहार ठेवून केलेत तरी हृदयमित्र प्रतिष्ठानला आणखी एक हृदयरोगी देण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकणार नाही! त्याच आयुर्वेदाने "मटणाचे सूप हे अत्यंत ताकदवान असते आणि विशेषतः आजारी किंवा शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाला जरुर पाजावे" असेही सांगितले आहे. तेव्हा भौगोलिक परिस्थिती, उपलब्ध नैसर्गिक अन्नाचे स्रोत, ऊर्जेची एकूण गरज, ह्या सगळ्याचा तोल साधत केलेला मिश्राहार हा माणसाला घातक नाही. चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 05/11/2008 - 09:08 नवीन

धन्यवाव...

धन्यवाद चतुरंग साहेब, तेव्हा भौगोलिक परिस्थिती, उपलब्ध नैसर्गिक अन्नाचे स्रोत, ऊर्जेची एकूण गरज, ह्या सगळ्याचा तोल साधत केलेला मिश्राहार हा माणसाला घातक नाही. मलाही हेच म्हणायचे आहे. मांसाहार इतका घातक (अनसुटेबल) असता तर माणसाचे आयुर्मान वाढले नसते. मानव जात भूतलावर टिकून राहीली नसती. शाकाहार 'चांगला' की 'वाईट' ह्यावर मी तो 'चांगला' असेच मत देईन. पण ते माझे वैयक्तिक मत झाले. पण 'सुटेबल' आणि 'अनसुटेबल' असा फरक नाही करता येणार असे मला म्हणायचे आहे. कडकडून भूक न लागता केवळ वेळ झाली म्हणून जेवणे, रात्री उशिरा भरपेट जेवणे, सतत तेलकट, तळलेले खाणे, व्यायामाचा अभाव असे संपूर्ण शाकाहार ठेवून केलेत तरी हृदयमित्र प्रतिष्ठानला आणखी एक हृदयरोगी देण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकणार नाही! एक्झॅटली. अतिसेवन, चुकीच्या जीवन पद्धती वगैरे कारणांनी शाकाहारी माणसेही गंभीर आजारांना आमंत्रण देतातच की. नाहीतर सर्व हॉस्पिटल्स फक्त मांसाहारी रुग्णांनीच भरलेली असती. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
विसोबा खेचर Sun, 05/11/2008 - 09:28 नवीन

दोन्हीही प्रिय..

मी खाण्यात शाकाहार/मांसाहार असा भेदभाव करत नाही. फार विचार करत न बसता जे आवडतं ते चापून खातो, मग तो शाकाहार असो की मांसाहार! फार विचार करत बसलं की खाणं अंगी लागत नाही! :) आणि मी माझ्या पैशांनी खाणार, शिवाय खाण्यामुळे जे काही उपाय/अपाय होतील ते मला होणार, मग च्यामारी जगाची फिकीर मी करूच कशाला? :) आज रविवार आहे. आज मस्तपैकी मटणवडे झोडायचा बेत आहे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sun, 05/11/2008 - 09:38 नवीन

ये हुयी ना बात!!

शाब्बास!! आज मस्तपैकी मटणवडे झोडायचा बेत आहे! आणि असं बघा, मटण मांसाहारी आणि वडे शाकाहारी! त्यामुळे दोन्ही मतदारसंघ खूष!! तात्या, उगाच नाही तुम्ही संतपदाला पोहोचलांत!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Sun, 05/11/2008 - 09:39 नवीन

:)

आणि असं बघा, मटण मांसाहारी आणि वडे शाकाहारी! त्यामुळे दोन्ही मतदारसंघ खूष!! हा हा हा! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
प्रभाकर पेठकर Sun, 05/11/2008 - 10:21 नवीन

सहमत..

आणि मी माझ्या पैशांनी खाणार, शिवाय खाण्यामुळे जे काही उपाय/अपाय होतील ते मला होणार, मग च्यामारी जगाची फिकीर मी करूच कशाला? ह्हा:..ह्हा:.. ह्हा:... तात्या, तुमच्या ह्या प्रतिक्रियेने आम्हा वाद घालणार्‍यांना साफ वेड्यात काढलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
श
शिंगाड्या Sun, 05/11/2008 - 18:47 नवीन

अभ्यासपुर्ण लेखन

मुद्देसुद आणि अभ्यासपुर्ण लेखन..पटले..अर्थात काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे
  • Log in or register to post comments
म
मन गुरुवार, 05/15/2008 - 19:23 नवीन

समारोप...

पि.डा.,पेठकर काका, राजे,नीलकांत,गणपा,पक्या,शीतल ताइ, ईश्वरी ताई,शिंगाड्या राव, चतुरंग भौ आणी हो तात्या सुद्धा. सगळ्यांचे आभार मानतोय दखल घेतल्याबद्दल. काही नवीन मुद्दे दिलेत आपण, काही अहेत त्या मुद्द्यांना उत्तरं दिलीत. यथाशक्ती आपल्या प्रतिसादांना उत्तर् दिलीत.(आणि हा प्रतिसाद उशीरा दिल्या बद्दल दिलगीर आहे.) बाकी कोंबडी-बालक आणि मांजर ह्या उदाहरणाबद्दलः- कोंबडीच्या पिलाला न खाणे ही बालकाचे कृती आहे, पण त्यावरुन व्यक्तिगणिक निष्कर्श बदलताहेत.आणि हे स्वाभाविक् आहे. एकाच घटनेबद्दल आपले दृष्टिकोन वेगवेगळे असु शकतात, निष्कर्श वेगळे असु शकतात. (म्हनजे, बालक मोठे झाल्यावर खाइल्/खाणार नाही वगैरे.) आपल्या निष्कर्शाशी सहमत् नाही,पण नवीन मतं वाचायला मिळाली, याचा आनंद आहे. आपली मत, दृष्टिकोन् वाचले.काही पटले. माझ्या पुरता मी आता समारोप् करतोय. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )
  • Log in or register to post comments
म
मन Fri, 05/23/2008 - 22:26 नवीन

हां तर

मित्रहो, आत्ताच फॅमिली डॉक्टरचा ताजा अंक वाचला. (माहित नसणार्‍या व्यक्तिंसाठी:- फॅमिली डोक्टर ही आरोग्य विषयक पुरवणी दै.सकाळ मध्ये प्रकाशित होते. प्रस्तुत लेखक/संपादक ह्यांचा आयुर्वेदावर मोठाच अधिकार आहे. ) त्यात ही माहिती मिळाली आहे. पथ्यकल्पना ..... ......... मांसाहार वर्ज्य नसणाऱ्या व्यक्‍तींसाठी पथ्यकल्पनेत मांसरसाचा उल्लेख केलेला आहे. पाकपात्रे घृतं दद्यात्‌ तैलञ्च तदभावतः । तत्र हिंगु हरिद्रां च भर्जयेत्‌ तदनन्तरम्‌ ।। छागादेरास्थिरहितं मांसं तत्खण्डितं ध्रुवम्‌ । धौतं निर्गालितं तस्मिन्धृते तद्‌ भर्जयेत्‌ शनैः ।। ... भावप्रकाश मांस शिजविण्याच्या भांड्यात तूप किंवा तेल घ्यावे. तूप गरम झाले की त्यात हिंग व हळद टाकून परतावी. मग त्यात हाडे काढलेले बकरी वगैरे प्राण्यांचे मांस टाकावे. जरासे परतले की पुरेसे पाणी टाकून शिजवावे. मांस व्यवस्थित शिजले की त्यात जिरे, मोहरी, धणे, सुंठ, हिंग, हळद वगैरे मसाल्याची द्रव्ये टाकून पातळ मांसरस तयार करावा. मांसाहारी व्यक्‍तींना असा मांसरस घेता येतो. मांसरस वात-पित्तशामक, ताकद वाढविणारा असतो. हाडे सांधण्यास मदत करतो, क्षय-ज्वर वगैरे रोगांनी कृश झालेल्या व्यक्‍तींसाठी ताकद देणारा असतो. मांसरसाप्रमाणे "वेसवार' हाही एक प्रकार वर्णन केलेला आहे. मांसं निरस्थि सुस्विन्नं पुनर्दृषदि पेषितम्‌ । पिप्पली शुण्ठी मरिचगुडसर्पिः समान्वितम्‌ ।। ऐकध्यं पाचयेत्सम्यक्‌ वेसवार इति स्मृतः । ... सुश्रुत सूत्रस्थान हाडे काढून टाकलेले मांस पाण्यासह व्यवस्थित शिजवावे. शिजविलेले मांस योग्य साधनांच्या साहाय्याने वाटून बारीक करावे. भांड्यामध्ये तूप, मिरी, सुंठ, पिंपळी, मीठ, गूळ वगैरे द्रव्ये पुरेशा पाण्यासह पुन्हा सिद्ध करावे. द्रवस्वरूपाचा मांसरस तयार झाला की उतरवून वापरावा. यालाच वेसवार असेही म्हणतात. हा वेसवार पचायला जड, स्निग्ध गुणाचा, ताकद देणारा व वातामुळे होणाऱ्या वेदनांचे शमन करणारा असतो. या ठिकाणी एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा की मांसरस, वेसवार वगैरे कल्पना बनविताना वापरायचे मांस चांगल्या प्रतीचे असायला हवे. प्राण्याचे वजन लवकर वाढावे म्हणून त्यांना इंजेक्‍शन्स, औषधे वगैरे दिलेली नाहीत याची खात्री करून घ्यावी. अन्यथा मांसरसाच्या फायद्याऐवजी या औषधांचा दुष्परिणाम होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. - डॉ. श्री बालाजी तांबे विषयाशी संबंधित वाटली, म्हणुन इथे टाकतोय. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' खादाड अमेरिकनांचा निषेध्,निषेध, निषेध. )
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 05/23/2008 - 22:57 नवीन

धन्यवाद....

धन्यवाद श्री. मन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन
व
विसोबा खेचर Sat, 05/24/2008 - 01:38 नवीन

पूर्वापार..

अरे लेको आम्ही पूर्वापार मांसाहार करत आहोत! हा लेकाचा बालाजी तांबे आम्हाला मांस असं खा नी तसं खा असं शिकवणारा कोण लागून गेला आहे? :) मनोबा, त्या तांब्याला सांग की मला ओल्या जवळ्याची चटणी करून खायची आहे. कशी बनवायची ते सांग म्हणावं! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन
ई
ईश्वरी Sat, 05/24/2008 - 01:31 नवीन

फॅमिली डॉक्टर मधील

फॅमिली डॉक्टर मधील माहिती बद्द्ल धन्यवाद. छान आहे माहिती...उपयुक्त आहे. मी अधूनमधून वाचते ती पुरवणी पण नेहमीच वेळ होत नाही. आणि सकाळ वर मागचे अंक ही वाचायला मिळत नाही. त्यामुळे बरं झाल ही माहिती तुम्ही इथे टाकली. ईश्वरी
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Sat, 05/24/2008 - 18:55 नवीन

चरक संहितेत...

चरक संहितेत अनेक प्रकारच्या आहाराची चर्चा केलेली आहे. त्यात मांसाहाराचा सुध्दा उल्लेख आहे. कुठल्या प्राण्याचं मांस कसं असतं. कश्यासाठी उपयुक्त आहे आदी सगळी माहिती त्यात आहे. आश्चर्य वाटेल पण हा मांसरस खुप आजारांत आणि काही वेळातर शक्तीवर्धक म्हणून सुध्दा घेण्यास सांगीतलेला आहे. अजामांसरस वाजीकरणासाठी चांगला आहे असं म्हणतात. ;) असो. नीलकांत
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Mon, 07/02/2012 - 01:20 नवीन

अहो मालक,

नुसता मांसाहारच नव्हे तर त्यासोबत कोणत्या ऋतूत कोणते मद्य (मोहाचे, उसाचे इ.इ.) कोणत्या पात्रातून म्हणजे काशाचे/चांदीचे/मृत्तीकेचे इ. घ्यावे तेही लिहिलेले आहे बरे! अजामांसरस = मटन सूप. (ज्ञानानंदी) गोपाळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
स
सुनील Mon, 07/02/2012 - 21:20 नवीन

+१

हॅ हॅ हॅ आमचे पूर्वज हुशार खरे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
च
चित्रगुप्त Sun, 07/01/2012 - 19:27 नवीन

खास शाकाहारी लोकांसाठी एक सल्ला

खास शाकाहारी लोकांसाठी एक सल्ला: जगातले सर्व लोक जर शाकाहारी झाले, तर आज ज्या भाज्या उदाहरणार्थ साठ रुपये किलो मिळत आहेत, त्या सहा हजार रुपये किलो मिळतील, आणि उपासमारीची पाळी येइल. तस्मात शाकाहार्‍यांनी शाकाहार घेत रहावे आणि मासाहार्‍यांनी मासाहार. उगीच कुणी कसला प्रचार करत बसू नये, हेच बरे. (आम्ही स्वतः शाकाहारी, म्हणून उपासमारीची जास्त काळजी) :)
  • Log in or register to post comments
म
मन१ Sun, 07/01/2012 - 19:33 नवीन

+१

प्रत्येक वाक्याशी सहमत. ;) धागकर्ता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 07/02/2012 - 00:48 नवीन

हे फसवं आर्ग्युमेंट आहे

फसवं आर्ग्युमेंटः http://www.npr.org/blogs/thesalt/2012/06/27/155527365/visualizing-a-nation-of-meat-eaters?utm_source=nprpins&utm_medium=facebook&utm_campaign=20120627 http://www.vegsoc.org/page.aspx?pid=520 थोडक्यात शाकाहाराशी तुलना करता समान कॅलर्‍या मांसाहारी जेवणातू मिळवण्यासाठी अधिक पाणी, जमीन, वेळ खर्च होतो. चित्रगुप्त काकांनी व्यक्त केलेली भीती निराधार आहे. उलट अधिकाधिक लोकांनी मांसाहार सोडल्यास कदाचित जंगलं वाढायला अधिक जागा उपलब्ध होईल. जगाचं भलं करायचं असल्यास शाकाहारी व्हा. हेडॉनिस्ट मांसाहारी असाल तर सध्यातरी जगाचं भलं करण्याची वेळ आलेली नाही. (सवयीने शाकाहारी) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
आ
आनंदी गोपाळ Mon, 07/02/2012 - 01:37 नवीन

लॉजिकमधील चूक :

आदिती ताई, अ‍ॅनिमल प्रोटीन व प्लांट प्रोटिन प्रत्येकी १ किलो खाल्ले असता, सुमारे ९९% अ‍ॅनिमल प्रोटीन शरीर वापरात घेते, हेच प्रमाण प्लांट प्रोटीनमध्ये ४०% चे आसपास असते. आता, यातील विष्ठेद्वारे वाया जाणार्‍या भागाचा हिशोब पाणी जमीन व वेळेत कसा मोजणार? तुमच्या शरिराने डायजेशन व रिबिल्डिंग साठी खर्च केलेल्या उर्जा, एन्झाईम्स, व टाईमचा हिशोब कुठे? अ‍ॅनिमल फॅटमधून मिळणारी कॅलरी अन स्टार्च पासून मिळणारी कॅलरी यातील क्वालिटेटिव्ह व क्वांटीटेटिव्ह फरक किति? खाण्यासाठी मांस "तयार करणारे" प्राणी ज्या वनस्पती भक्षण करतात त्या प्रमाणे तुम्ही खाऊ शकत नाही. पालेभाज्यांतील सेल्युलोजही 'फायबर' म्हणून तसेच मानवी शरीराबाहेर फेकले जाते. तुम्ही आम्ही वनस्पतींचे फार्फार कमी भाग खाऊ शकतो, ज्यात बहुतांशी फक्त 'स्टोअर्ड फूड' तेही वनस्पतींनी त्यांच्या भ्रूणासाठी (बीजातील साठविलेले) वा आमिष म्हणून वापरलेले (बीज पसरविण्यासाठी वाहकांना आमिष म्हणून फळाचा गर) इतकेच असते. कणसातून दाणे काढून घेतल्यावर उदा. बाजरीच्या झाडातून फेकून दिलेल्या भागाचा हिशोब कुठे आहे??? प्राणी मारून खाल्ला अन धान्य खाल्ले, वेस्टेज परसेंटेज किती? मनुष्य प्राणी मिश्राहारी आहे. तशी त्याच्या शरीराची जडणघडण आहे. तुम्हाला 'आवडत नाही' म्हणून मांसाहार नको असे म्हणा. मी सहमत. पण ही असली आर्ग्युमेंट्स बिनबुडाची आहेत, हे कितीही वेळ वाद घालून सिद्ध करून देईन असे म्हणतो :) (भांडकुदळ) आनंदी गोपाळ संपादनः
उलट अधिकाधिक लोकांनी मांसाहार सोडल्यास कदाचित जंगलं वाढायला अधिक जागा उपलब्ध होईल.
पुन्हा दुसरी लॉजिकल चूक. जंगलातील प्राणी मारून खाण्याचे दिवस संपलेत कधीच. आजच्या घडीला शाकाहार फोफावला, तर शेतीसाठी जास्तच जंगले तोडावी लागतील.. शेती कमी करायची असेल, तर मांसाहारी व्हा. जगाच्या भल्यासाठी आता समुद्राची शेती करायची वेळ आली आहे. मांस नको तर मासे-आहारी तरी व्हाच असे माझे म्हणने आहे. जय प्लँक्टन्स : द बिगेस्ट प्लांट मास ऑन अर्थ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 07/02/2012 - 02:15 नवीन

फक्त डेव्हील्स अ‍ॅडव्होकेट म्हणून ...

उर्जा, एन्झाईम्स, व टाईमचा हिशोब कुठे?
या सगळ्या गोष्टी पुन्हा वनस्पतीजन्य आहारातून मानवाचं शरीर बनवणार. शरीर ज्या गोष्टी नाकारतं त्या पुन्हा काहीबाही करून जाळल्यास (उदा: बायोगॅस, खतं इ.) पुन्हा परिणाम एकच होणार. पृथ्वीच्या जीवावरच आपण आपलं आयुष्य जगणार. प्राणिजन्य आहारातून समप्रमाणात ऊर्जा मिळवण्यासाठी बर्‍याच अधिक प्रमाणात पाणी, जमीन, वेळ खर्च होतात असा दावा आहे. (यात कुठेही संपूर्ण पोषण याबद्दल चर्चा नाही.) सर्व लोक शाकाहारी झाल्यास सर्वांना पुरेसं अन्न मिळणार नाही असा जो दावा (का कोण जाणे!) केला जातो तो बिनबुडाचा आहे असा दावा आहे. या गणितात सहजच दिसणार्‍या अडचणीही मीच सांगते. पोषण मूल्य हा फार कटकटीचा भाग आहे. त्याशिवाय शेतीचं अर्थशास्त्र. कपास, नीळ, कॉफी, अफू वगैरे पदार्थ अन्न म्हणून खाल्ले जात नाहीत, त्यांचीही शेती होते. नगदी पिकं काढण्याकडे शेतकर्‍यांचा ओढा असतो. पिकाला पुरेसा भाव मिळाला नाही म्हणून पीक जाळलं जातं. इ. त्याशिवाय शेतीखालचा जमिनीचा भाग कमी झाल्यास, तिथे झाडं लावल्यासही पर्यावरणावर प्रचंड मोठा फरक दिसणार नाही. पर्यावरण म्हणजे हरित वायू परिणामामुळे होणारा परिणाम यासंदर्भात बघितल्यास, हवा 'शुद्ध' करण्याचं काम समुद्री जीव झाडांपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात करतात. आत्ता आहे त्यापेक्षा १०% झाडं अधिक झाल्यास फार फरक पडेलच असं नाही. (या गणिताचे स्रोत शोधण्यासाठी टैम्प्लीस.) त्याशिवाय मी सुरूवातीला केलेल्या विधानातल्या अधिक त्रुटी दाखवल्यास आवडेल. दुसर्‍या बाजूने मांसाहारातूनच मिळणारे काही आवश्यक पोषण (ब जीवनसत्त्वाचे काही प्रकार?) शाकाहारी लोकांना मिळत नाही किंवा पुरेसं मिळत नाही अशीही अडचण आहेच. शाकाहार्‍यांच्या आहारात दूध आणि अंडीही मोजलेली नाहीत. व्यक्तिशः माझा कोणाच्याही कोणत्याही प्रकारच्या आहाराला विरोध नाही. मी स्वतः शक्यतोवर शाकाहारी असले तरी माझ्याही अनेक चवी-ढवी आहेत. सगळ्याच भाज्या, फळं मला अगदी मनापासून आवडतात असं नाही. उलट आवडतं ते काहीही मिळालं नाही/मिळत नाही तेव्हा उपलब्ध असेल ते (बीफ्/पोर्क) आणि शैक्षणिक भूक म्हणून ससा, मोर, बेकन, सॉसेजेस, कोंबडी, हरीण, बकरा खाल्ले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 07/02/2012 - 23:29 नवीन

तुमचं संपादन थोडं उशीरा

तुमचं संपादन थोडं उशीरा पाहिलं. पण सध्या टैम्प्लीस. --- टैम्प्लीस सोडून ---
जंगलातील प्राणी मारून खाण्याचे दिवस संपलेत कधीच. आजच्या घडीला शाकाहार फोफावला, तर शेतीसाठी जास्तच जंगले तोडावी लागतील.. शेती कमी करायची असेल, तर मांसाहारी व्हा.
जंगलातले प्राणी पुरे पडण्याएवढी लोकसंख्या कमी होती तेव्हा ही अडचण नव्हतीच. आता (गेली अनेक शतकं) मांसाहारासाठीही पद्धतशीर शेती होते. १. या (प्राणी-)शेतीसाठी मोकळी जागा लागते. २. या प्राण्यांना खाऊ घालण्यासाठी आधी मुळात गवत, संत्र्याच्या साली, इ.इ. अनेक गोष्टी लागतात. कोंबड्यांना अ आणि ड जीवनसत्त्व टोचली जातात किंवा कोंबड्यांना टिपण्यासाठी बाहेर सोडलं जातं, पुन्हा अधिक जागेची आवश्यकता आहे. इतर सर्वच प्राण्यांच्या बाबतीत काही ना काही घटक येतातच. या प्राण्यांना पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी पाणी लागतं. या प्राण्यांच्या अन्नासाठी पाण्याची आवश्यकता असते. हे प्राणी जंगलात जाऊन खाऊन परत कत्तलखान्यात जात नाहीत. ३. मांसाहार मार्केटात येतो तो ही बराच प्रोसेस होऊन येतो. (भारतातलं मांसाचं मार्केट खूपच कमी आहे.) या प्रोसेसिंगसाठी जागा आणि चिक्कार प्रमाणात ऊर्जा+पाणी वापरले जातात. त्याची जागा धान्य, भाज्या, फळांनी घेतल्यास पाणी, जागा आणि ऊर्जा नक्कीच कमी वापरले जातील. थोडक्यात सूर्याकडून येणारी ऊर्जा आणि पृथ्वीकडून येणारं पाणी आणि इन/ऑरगॅनिक वस्तूमान झाडांवाटे माणसाच्या शरीरात येण्याऐवजी झाडांकडून प्राण्यांकडे आणि प्राण्यांकडून माणसाकडे तर ती क्रिया अधिक इन-एफिशियंट होणार. (यात पुन्हा आकडे देता येतील, पण थर्मोडायनामिक्सचा दुसरा नियम, वाढती एंट्रॉपी, परपेच्युअल मशीन किंवा १००% एफिशियन्सी असणारं मशीन बनवणं अशक्य असणं वगैरे पहाता यात आकडे देण्याची फार आवश्यकता नसावी.) अन्न साखळीत कोणताही प्राणी जेवढा वर चढणार तेवढं मूळ स्रोताकडून ऊर्जा मिळवणं इन-एफिशियंट (मराठी) होणार. मूळ स्रोत - सूर्य आणि पृथ्वी. सर्वांना मिळणारी ऊर्जा शेवटी तिथूनच येते. अन्न साखळीत वरच्या स्तरावर असणारे प्राणी, खालच्या स्तरावर असणार्‍या प्राण्यांपेक्षा खूपच कमी असतात त्याचं हेच कारण. मांसाहारी मनुष्य अन्न साखळीत वरच्या स्तरावर जातो. यांची संख्या बेसुमार वाढल्यास शेती करावी लागणार अन्यथा हे लोक मांसाहारी बनून टिकून राहू शकत नाहीत. माणूस खातो त्या माशांची बेसुमार मासेमारी केल्यासही समुद्री इकोसिस्टमवर त्याचे दुष्परिणाम होतात. तिथली अन्न-साखळी तुटते. पर्यावरणाचा मुद्दा कळीचा बनतो पाण्याच्या कमी/मर्यादित उपलब्धतेमुळे. तिसरं महायुद्ध पाण्यासाठीही होऊ शकतं असा एक दावा केला जातो. एखाद्या देशाकडून अन्न आयात करणं म्हणजे पाणीही आयात करणं. या संदर्भात मांसाहार खूपच कमी एफिशियंट आहे याचा विचार केला जातो. लाल मांसाच्या अतिसेवनामुळे होणारे रोग, मांसाहारी (कार्निव्होरस म्हणावे इतपत) लोकांना होणारे निरनिराळे कर्करोग यांचा विचार केलेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
आ
आनंदी गोपाळ गुरुवार, 07/05/2012 - 22:46 नवीन

'लाल मांस' अन 'यांचा विचार केलेला नाही.'

कोणत्याही हृदयरोग तज्ञाकडे जाऊन आपण 'पूर्ण' शाकाहारी आहात असे सांगा. पहिली तपासणी तो तुमच्या शरीरातील जीवनसत्वांच्या प्रमाणाची लिहून देईल. खासकरून ब जीवनसत्व समूह. शाकाहाराचा अतिरेक करणार्‍यांना या 'डेफिशिअन्सिज' होतात. व त्यांचे दुष्परिणामही होतात. रेड मीट, जेनेटिक बिल्डप, बॉडी फॅट डीस्ट्रिब्युशन यांचे विचार वेगळे आहेत. इथे चर्चा माणूस 'नॅचरली शाकाहारी की मांसाहारी' अशी आहे. दात असे म्हणुन शाकाहारी, शेपूट नाही म्हणून शाकाहारी इ.इ. बाष्कळ पुरावे. फक्त दोन टोके. मधला मूळ मिश्राहार सगळेच विसरलेत..असो. (तुमचा प्रतिसाद वाचून first impression उत्तर हे आहे. सविस्तर वाचून नंतर लिहिन. ३ दिवस रजेवर होतो.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ब
बॅटमॅन Sat, 07/07/2012 - 02:34 नवीन

+१ सहमत. शाकाहाराचे समर्थक

+१ सहमत. शाकाहाराचे समर्थक कधी कव्हर्ट पणे तर कधी उघडपणे असे बाष्कळ पुरावे मांडायला फार आतुर असतात असे एक निरीक्षण आहे. अशांना कसे आवरावे ते कळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 07/08/2012 - 04:57 नवीन

माझा मुद्दा तो नाहीच. जगातले

माझा मुद्दा तो नाहीच. जगातले सर्व लोक शाकाहारी झाल्यास जगाला अन्न कमी पडणार नाही असा मुद्दा मी मांडते आहे. मानवी शरीरात प्राणिजन्य प्रथिनांपेक्षा वनस्पतीजन्य प्रथिनं कमी शोषली जातात असा तुमचा मुद्दा होता. त्यात प्राण्यांची शरीरं जी वनस्पतीजन्य प्रथिनं टाकून देतात त्याचाही विचार करावा लागेल. पोषणमूल्य, आतड्याची लांबी, दातांची रचना हे विषयाशी संबंधित, पण मी मांडते आहे त्यापेक्षा संपूर्णतः वेगळे मुद्दे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
आ
आनंदी गोपाळ Sun, 07/08/2012 - 14:42 नवीन

कोणे एके काळी

पृथ्वीवर वर्चस्व गाजविणारे व प्रचंड संख्येने असलेले, व आकारानेही भलेप्रचण्ड असे डायनोसॉर बहुसंख्येने शाकाहारी होते. त्याकाळी शाकाहारी अन्न त्यांना कमी पडल्याने उपासमार होऊन ते मेले असावेत असा शोध लागलेला नाही. परंतू, माणसाच्या शाकाहारात अन प्राण्यांच्या शाकाहारात असलेला महत्वाचा फरक तुम्ही लक्षात घेत नाही आहात. मक्याचे झाड लावले असता माणूस फक्त कणसातले दाणे खातो, बाकीचे पूर्ण झाड 'वाया' जाते. हेच गायीच्या बाबतीत ती संपूर्ण झाड खाऊ शकते. व पचवूही शकते. हाही हिशोब करता, इतक्या प्रचण्ड संख्येने असलेल्या माणसाला खाऊ घालण्यासाठी शेती करणे व त्यासाठी एकोसिस्टीम्स नष्ट करणे हा उद्योग करावा लागेल. अन हे केवळ अनैसर्गिकरित्या मनुष्याला 'शुद्ध' शाकाहारी बनविल्यामुळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 07/13/2012 - 00:17 नवीन

मनुष्य गाय खातो तेव्हाही

मनुष्य गाय खातो तेव्हाही संपूर्ण गाय खात नाही, खाऊ शकत नाही, खाल्ल्यास तिचा काही भाग पुन्हा शरीराबाहेर अनावश्यक म्हणून बाहेर टाकणार. (इथे मी फार क्वालिटेटीव्ह (मराठी शब्द?) बोलते आहे हा आक्षेप मान्य आहे.) मुळात ऊर्जा सूर्याकडून आणि पोषण पृथ्वीकडून मिळणार. त्यात जेवढ्या अधिक पायर्‍या येणार तेवढं यंत्र inefficient होणार. आपण (प्राणी) photosynthesis करू शकत नाही म्हणून वनस्पतींची आवश्यकता आहे. झाडाचा आपण मोजका भागच खाऊ शकतो हे खरं आहे तेवढंच हे ही आहे की उरलेला भाग पुन्हा पृथ्वीमधे, हवेमधे परत जातो. सूर्याची ऊर्जा परत जात नाही, पण त्या ऊर्जेचं मुख्य काम catalyst चंच असतं. शिवाय सूर्याचं इंजिन अजून ५X१०९ वर्ष चालू रहाणार आहे. तत्संबंधात एक अवांतर प्रश्नः वाघाने (किंवा इतर मांसाहारी प्राण्याने) गवत, पालापाचोळा, शाकाहार घेतल्यास त्याच्यावर परिणाम काय होतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
आ
आनंदी गोपाळ Fri, 07/13/2012 - 11:08 नवीन

सध्या नोटाईम सो टाईमप्लीज.

पण लहानपणापासून, ‘फोटोसिंथेटिक’ माणूस तयार करता आला तर काय बहार येईल- अशी साय-फ़ाय स्वप्ने पहात आलो आहे.. बाकी वेळ मिळाल्यावर पुन्हा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 07/13/2012 - 19:02 नवीन

:-)

अतिशय मर्यादित अर्थाने हे अजूनही होतंच की! सूर्यप्रकाशात मनुष्याच्या शरीरात, त्वचेखाली ड जीवनसत्त्व तयार होतं. अवांतरः असं झाल्यास, सूर्यप्रकाशात लोळत पडलेले लोकं हे दृष्य कॉकेशन वंशाचे लोकं असणारे सोडून इतर देशांतही दिसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
म
मन१ Fri, 07/13/2012 - 19:46 नवीन

नको...

आपण आपले फोटोसिंथेसिस करु लागलो तर हळूहळू उभयचर(amphibian) कसे जमीनीवरच्या आणि पाण्यातल्या प्राण्यांचे गुणधर्म दाखवतात, तसे आपण दाखवू लागू. आपण "चालणारी वनस्पती" ह्या क्याटॅगरित येउ. वनस्पतीसारखे कोवळे लुसलुशीत,तुकतुकित,हिरवेगार दिसू. म्हणजेच समजा आपण दुपारी कधी डुलकी काढायला जायचो आणि आपले मनोहारी रूप पाहून एखादी शेळी, एखादे हरीण, ससा, कित्येक पक्षी ह्यांना आपला मोह पडून ते आपल्याला "कचाकचा" खायला धावतील. काही पक्षी आपल्याला फोडून तोडून घरटे बनवू पाहफोडून्कल्पना करा :- आपला एक डोळा फोडून चिमणीनं घरटं केलय. एक पाय तो क्रूर सुतार पक्षी फोडून्,कुरतडून राहिलाय. यक्क... नकोच ते. शिवाय इतके दिवस आपणच त्यातल्या कित्येकांची पैदास वाढवल्याने, त्यांची कमी नाही. आपल्या आजवरच्या पिढ्यांनी त्यांना कापून कापून जी मौज केली त्याची परतफेड अशी "उत्क्रांत" झालेल्या पिढीला करावी लागेल. बाब्बो. नकोच. शेळीनं तुम्हाला खाण्यापेक्षा तुम्ही शेळीला खाल्लेलं बरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ब
बॅटमॅन Fri, 07/13/2012 - 19:55 नवीन

किती "मना"पासून घाबरलाय मनराव

किती "मना"पासून घाबरलाय मनराव ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१
च
चित्रगुप्त Mon, 07/02/2012 - 02:12 नवीन

जीवो जीवस्य भोजनम

जीवो जीवस्य भोजनम. शाकाहार काय अथवा मासाहार काय, काहीतरी 'जीव' असलेलेच खावे लागते. 'निर्जीव' उदा. दगड, माती इ. खाऊन पोषण होत असल्याचे अद्याप ऐकिवात नाही.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा