मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

औट घटकेचा पाहुणा...

प्राजु ·

ऋचा Wed, 05/14/2008 - 09:34
खुप छान वाचताना समोर घडतय असं वाटत होतं. :) खुप छान मांडणी केली आहेस..

In reply to by चित्रा

सकेत गुरुवार, 05/15/2008 - 14:16
सुन्दर लिहिले आहेस्.........खुप छान............. =D>

विसोबा खेचर Wed, 05/14/2008 - 09:52
ह्या पोपटासाठी मी / आम्ही काय काय नाही केलं??? मी त्याला पकडण्यासाठी स्वतःची बोटं जखमी करून घेतली.... श्वान, मार्जार या सारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून त्याचं रक्षण केलं.... त्याला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... भर तळपत्या उन्हांत जाऊन त्याच्यासाठी ... त्या दुकानदारशी हुज्जत घालून स्कूटरवरून कसरत करत पिंजरा आणला... त्याला खायला घालण्यासाठी चांगल्या कपांचे कान फोडले.. मी आईच्या शिव्या खाल्ल्या.... आणि इतके करून... तो शुक्रवारी आलेला शुकाचार्य त्याचदिवशी निघून गेला. ...जाताना मात्र माझ्या मनाला उगाचच उदास करून गेला.. प्राजु, सुंदर लिहिलं आहेस. ही हकिकत प्रत्यक्ष तुझ्याकडून ऐकली होती त्यापेक्षा वाचताना अधिक मजा आली! मस्त अनुभवकथन! :) तात्या.

सहज Wed, 05/14/2008 - 09:52
तो पोपट नंतर काय बरे त्याच्या जातभाईंना स्टोरी ऐकवत असेल? :-) त्या कारवानां पासुन सुटका झाली आता मी मुक्त झालो म्हणले तर....कुत्री, मांजर व दोन बायका सगळे त्याच्या मागे लागले होते.... जाउ दे बॅक टु पॅव्हीलियन. असो. प्राजु बोट बरी आहेत ना आता? एक भन्नाट आठवण ठेवुन गेला पाहूणा.

पुर्वार्धातील अनुभव अनुभवलेला, आणि अनेकदा वाचलेला असल्यामुळे हा अनुभव तितका 'टच' झाला नाही. यातला उत्तरार्ध अनपेक्षीत आहे आणि तो आवडला. बाकी पोपटाचं कडकडून चावणे क्या कहने !!! बोट बरं असेल ना आता :)

मदनबाण Wed, 05/14/2008 - 11:05
ताई अगदी असाच अनुभव माझा ही आहे..... तो अवचित आलेला पाहुणा फार आनंद देऊन गेला..... लहानपणाच्या आठवणी जाग्या झाल्या... (विठु विठु प्रेमी) मदनबाण.....

In reply to by चतुरंग

प्राजु Wed, 05/14/2008 - 14:22
बोटं बरी आहेत. त्याचीही गम्मत झाली. पोपट चावला म्हणून फॅमिली डॉक्टरनी अँटी टीटॅनस चं इंजेक्शन दिलं दंडात. तर दुसरे दिवशी ते ही सुजलं आणि काळंनिळं पडलं होतं... :( - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

राजे Wed, 05/14/2008 - 17:08
त्याच वेळी तूम्ही आपली कुंडली धोंडोपतांना दाखवावयास हवी होती..... ;) छान अनुभव !! असेच लिहीत राहा ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

यशोधरा Wed, 05/14/2008 - 11:32
मस्तच लिहिलय... :) पोपट वाचला म्हणायचा तुमच्यामुळे :) बोट कसं आहे आता? >> त्याचे पंख कापले होते :(

स्वाती दिनेश Wed, 05/14/2008 - 12:55
प्राजु, पाहुण्याची गोष्ट आवडली...खूप छान! तुझ्या हाता,बोटांना जखमा झाल्या तरी तो वाचल्यामुळे मनाला किती आनंद झाला असेल ना? स्वाती

प्रगती Wed, 05/14/2008 - 12:40
ह्या पोपटासाठी मी / आम्ही काय काय नाही केलं??? मी त्याला पकडण्यासाठी स्वतःची बोटं जखमी करून घेतली.... श्वान, मार्जार या सारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून त्याचं रक्षण केलं.... त्याला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... भर तळपत्या उन्हांत जाऊन त्याच्यासाठी ... त्या दुकानदारशी हुज्जत घालून स्कूटरवरून कसरत करत पिंजरा आणला... त्याला खायला घालण्यासाठी चांगल्या कपांचे कान फोडले.. मी आईच्या शिव्या खाल्ल्या.... आणि इतके करून... तो शुक्रवारी आलेला शुकाचार्य त्याचदिवशी निघून गेला. ...जाताना मात्र माझ्या मनाला उगाचच उदास करून गेला लेख अगदी जिवंत वाटतो आहे.

इनोबा म्हणे Wed, 05/14/2008 - 12:54
ओघावते लिखाण .. पोपट तुमचा पोपट करुन गेला म्हणायचा की ! हेच म्हणतो. :)) बाकी लेख मस्तच. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

प्रभाकर पेठकर Wed, 05/14/2008 - 13:05
त्याचे पंख कापले होते म्हणून त्याला उडता येत नव्हते. काय हे क्रौर्य....! आपल्या घरून पोपट उडून जाऊ नये म्हणून त्याचे पंख कापायचे? तसेही मला पक्ष्यांना पिंजर्‍यात जखडून ठेवायला आवडत नाही. बाकी गोष्ट छान आहे.

स्वाती राजेश Wed, 05/14/2008 - 14:03
प्राजु, मस्त लिहिले आहेस. प्रत्यक्ष समोर घटना घडत आहे असे वाटते.:) आता काय???? ह्या पोपटासाठी मी / आम्ही काय काय नाही केलं??? मी त्याला पकडण्यासाठी स्वतःची बोटं जखमी करून घेतली.... श्वान, मार्जार या सारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून त्याचं रक्षण केलं.... त्याला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... भर तळपत्या उन्हांत जाऊन त्याच्यासाठी ... त्या दुकानदारशी हुज्जत घालून स्कूटरवरून कसरत करत पिंजरा आणला... त्याला खायला घालण्यासाठी चांगल्या कपांचे कान फोडले.. मी आईच्या शिव्या खाल्ल्या.... आणि इतके करून... तो शुक्रवारी आलेला शुकाचार्य त्याचदिवशी निघून गेला. ...जाताना मात्र माझ्या मनाला उगाचच उदास करून गेला.. सोप्या भाषेत छान वर्णन केले आहेस.

प्राजु Wed, 05/14/2008 - 15:01
माझा तो पोपट मला सोडून निघून गेला.. पण आपण सर्वांनी माझा अनुभव ऐकून माझ्यासाठी सहानुभूती दाखवलीत त्याबद्दल मी आभारी आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मन Wed, 05/14/2008 - 15:23
त्या पोपटाला वाचवायची धडपड आवडली. पण तिथुन पुढं त्याला कायम पिंजर्‍यात ठेवायचा प्लॅन असेल तर अजिबात आवडलं नाही. म्हंजे पिंजर्‍यात ठेउन त्याला आपली भाषा शिकवणं वगैरे. पण त्याच्यासाठी केलेली धडपड चटका लावुन गेली. (बाकी,त्या पंख कापणार्‍याबद्दल काय बोलाव?) आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

धमाल मुलगा Wed, 05/14/2008 - 16:15
अरेरे... एव्हढा चांगला पोपट मिळाला, तो कसाबसा पकडला आणि संध्याकाळपर्यंत त्याला दुसरेच कोणीतरी घेऊन गेले :( च्यामारी पोपटच झाला की! बाकी, लेख नेहमीप्रमाणेच खास प्राजुताई स्पेशल :) छानच जमलंय..साधं-सोपं...गप्पा मारल्यासारखं :) खुप खुप वाईट वाटतं ना असं कोणी आपल्या घरातून आपण आपला मानलेला प्राणी-पक्षी कोणी घेऊन गेलं की :(
पोपट चावला म्हणून फॅमिली डॉक्टरनी अँटी टीटॅनस चं इंजेक्शन दिलं दंडात. तर दुसरे दिवशी ते ही सुजलं आणि काळंनिळं पडलं होतं
:/ आँ...इंजेक्शन कसं काळंनिळं पडलं गं ? :P आणि तो पोपट तुला इतक्यांदा चावला, आता तोही खुप बडबड्या झाला असेल ना गं? (..हौस्.हौस..फटके खायची...धम्या लेका आता सोडेल का प्राजुताई? आता खा तीचे फटके !!!)

In reply to by धमाल मुलगा

पिवळा डांबिस Wed, 05/14/2008 - 19:25
एव्हढा चांगला पोपट मिळाला, तो कसाबसा पकडला आणि संध्याकाळपर्यंत त्याला दुसरेच कोणीतरी घेऊन गेले च्यामारी पोपटच झाला की! शाधा नायी काई धमुदादा, एकदम शप्तलंगी पोपट झाला की, आप्ल्या प्लाजुताईचा!!:)) आणि तो पोपट तुला इतक्यांदा चावला, आता तोही खुप बडबड्या झाला असेल ना गं? अरे पोपटाचं काय घेऊन बसलास, मला तर वाटतं की ते इंजेक्शन-सिरिंज सुद्धा बडबडं झालं असेल आत्तापर्यंत!!:)) पुणे आकाशवाणीवरून बातम्या देत असेल!!:)) -डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

आंबोळी गुरुवार, 05/15/2008 - 13:15
आणि तो पोपट तुला इतक्यांदा चावला, आता तोही खुप बडबड्या झाला असेल ना गं? नुसता बडबड्या? त्याने अत्तापर्यंत "मिरचीडाळ.कॉम" वर त्याचा हा अनुभवसुध्धा लिहिला आसेल...... औट घटकेचा यजमान "त्या कारवानांडून कशीबशी सुटका करुन पळालो.... पण त्या दुष्टानी रावणाने जटायुचे कापावेत तसे माझे पंख छाटले होते म्हणून उडू न शकल्याने एका अंगणात उडी मारली... तर दोन कुत्री आणि एक मांजर मला खायला आले. ते कमी म्हणुन कि काय एक मुलगी त्याना हाकलून माझ्या मागे लागली. तिलाही मला खायचे असावे. (अमेरिकेहून कोल्हापूरला आल्यापासुन ती मांसभक्षी झाल्याचे ऐकिवात आहे. आणि ती आपल्या मिसळपाव वरील मित्र्-मैत्रिणींना जेवायला बोलावत असल्याचेही ऐकिवात आहे. त्यांच्या साठीच तर पकडत नसेल ही मला? ). मी सुटकेसाठी तिच्या बोटांना कडकडून चावलो पण तिने मला सोडले नाही. माझ्यासारख्या पूर्णवैराग्याला तिने आगोदर कांद्याबटाट्याच्या दुरडीत डांबले...नंतर माझ्यासाठी एक तुरूंग घेउन आली आणि मी इतक्यावेळा ओरडून सांगीतले कि मला मिरची डाळ द्या तर न ऐकता मला कान फुटक्या कपातून पाणी आणि पोळी दिली. शेवटी त्या कारवानांनीच येउन माझी सुटका केली". अवांतरः प्राजुताई तुमच्या सारखे मस्त आणि टची अनुभव नाही मांडता आले.... तुमची अनुभव मांडण्याची हातोटी खरच लाजवाब आहे. सुंदर. अतिअवांतर : केशवसुमार, याला लेखाचे विडंबन म्हणता येइल का हो?

वरदा Wed, 05/14/2008 - 17:20
प्राजु बिच्चारी अगं किती मेहेनत घेतली होतीस... पण लिहिलयस झकास्..ए वन... मला प्राण्यांचा काहीच अनुभव नाही त्यामुळे मला तर सहीच वाटलं वाचायला.. तु खुप सुंदर लिहितेस रंगवून सांगायची कला खूप मस्त.... आता बोटाला जप म्हणजे लवकर बरं वाटेल्..मला तर एकदा लागलं की त्याच त्याच ठीकाणी परत परत धडपडायची सवय आहे...तसं करु नकोस... अवांतरः लहानपणी आमच्या घराला तारेचं कुंपण होतं किती वेळा टिटॅनस घेतलंय काही गणतीच नाही...गाय अंगणात आली हाकलवताना आपटा कुंपणावर..बॅडमिंटनचं फुल बाजुच्या अंगणात पडलय कोण जाईल लांबून फाटकातून वगैरे गायीने वाकवलेल्या तारेतुन घुसा शेजार्‍यांच्या अंगणात्.....खूप खूप आठवणी जाग्या झाल्या गं....

शितल Wed, 05/14/2008 - 18:01
प्राजु छान लिहले आहेस, पोपटाच्या चोचीला तीक्ष्ण धार असते, ते तर कधी कधी त्या॑ना पकडायला गेल्या चोच मारून आतील मा॑स देखिल काढतात. काय हे पक्षी देखिल आता माणसा॑चा पोपट करू लागले आहेत.

गणपा Wed, 05/14/2008 - 18:47
प्राजुताई, मस्त लिहिलयस. आवडलं. लहान असताना मी कोंबडीच पिल्लु पाळल होत त्याची आठवण झाली. भलतच करमती होत ते.

देवदत्त Wed, 05/14/2008 - 19:37
अनुभव कथन छान लिहिले आहे. आता काय???? ह्या पोपटासाठी मी / आम्ही काय काय नाही केलं??? मी त्याला पकडण्यासाठी स्वतःची बोटं जखमी करून घेतली.... श्वान, मार्जार या सारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून त्याचं रक्षण केलं.... त्याला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... भर तळपत्या उन्हांत जाऊन त्याच्यासाठी ... त्या दुकानदारशी हुज्जत घालून स्कूटरवरून कसरत करत पिंजरा आणला... त्याला खायला घालण्यासाठी चांगल्या कपांचे कान फोडले.. मी आईच्या शिव्या खाल्ल्या.... आणि इतके करून... तो शुक्रवारी आलेला शुकाचार्य त्याचदिवशी निघून गेला. ...जाताना मात्र माझ्या मनाला उगाचच उदास करून गेला.. सब मोहमाया है. त्याला एक दिवस तुमचा पाहुणचार घ्यायचा होता, घेतला आणि गेला निघून :)

In reply to by देवदत्त

विसोबा खेचर गुरुवार, 05/15/2008 - 00:14
सब मोहमाया है. त्याला एक दिवस तुमचा पाहुणचार घ्यायचा होता, घेतला आणि गेला निघून हेच खरं! अवांतर - मला कोणतेही प्राणी पाळायला आवडत नाहीत. त्यांना पाळून बंदिस्त करण्याचा आपल्याला हक्क नाही. त्यांना त्यांचं आयुष्य त्यांच्याप्रमाणे जगू द्या! तात्या.

अव्यक्त Wed, 05/14/2008 - 20:10
....राणीचा बाग... ....राणीचा बाग...हा फक्त मुबई मध्येच आहे असा समज होता माझा....पण साक्शात कोल्हापुर मध्येही आहे. वाचुन विलक्शण उडालोच्....काय काय पालल आहेस्...कुत्रा, मान्जर, पोपट, कोम्बडि, आणि कोण? आनि पोपटाला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... त्यापेक्शा विरकर डिक्शनरी द्यायचिस्.....तुझा लढ्वय्या बाणा कामि आला....माझ्याशि भान्डुन भान्डुन तु क्षत्रिय धर्माचे पालन करायचिस...कामि आले...

ईश्वरी Wed, 05/14/2008 - 21:54
अनुभव छान मांडला आहे. वाचायला छान वाटले. माझी ही एक जुनी आठवण जागी झाली. असाच आम्हालाही एक लव बर्ड सापडला होता. तो घरातून उडुनही जात नव्हता. त्यात कोणीतरी सांगितले की असेच त्याला सोडुन दिले तर कावळे चोची मारून जखमी करतील. म्हणुन मग पिंजरा आणुन त्यात त्याला ठेवले. त्याला वाटीत खायला ठेवले तरी घरातील आमच्या पैकी कोणीतरी भरवल्याशिवाय तो अजिबात खात नसे. त्याचे खाणे तो खायचाच.(जे बाजारात पक्ष्यांचे खाद्य मिळ्ते ते) पण उपमा, पोहे , मटारचे (वाफवलेले ) दाणे हे विशेष आवडीचे. एक घास (त्याचा घास म्हणजे २-३ शिते) खाऊन झाला की पुढचा घास घेण्यासाठी चोच उघडुन 'आणखी हवे' असे सांगायचा. खाण्याचा स्पीड ही चान्गला..पटापट खायचा. उभ्या जागी गिरकी घेउन किंवा २-३ उड्या मारून ' खायला दिलेले आवडले' ह्याचि पावती द्यायचा. आणि परत चोच उघडलेली...आणखी खाण्यासाठी. त्याचे नुसते निरीक्षण करीत बसले तरी वेळ छान जायचा. कधीतरी एकदा घरगड्याच्या हातून पिंजर्‍याच्या दाराला कडी घालायची राहून गेल्याने तो उडुन गेला. त्याचे पंख कापले होते म्हणून त्याला उडता येत नव्हते. खरच काय हे क्रौर्य ! ईश्वरी

गृहिणि Wed, 05/14/2008 - 23:49
फार छान जमलाय लेख. छोटिशि गोष्ट पण सांगण्याच कसब वाखाणण्यासारख आहे तुझ. बोटांचि काळजि घे. रागावु नकोस पण मला विशेषतः पक्ष्यांना पिंजर्यात ठेवण अजिबात आवडत नाहि. कितिहि मोठा असला तरि त्यांना मोकळ वाटेल एवढा मोठा नसतो ना पिंजरा.

जयवी गुरुवार, 05/15/2008 - 12:26
प्राजु....... खूप छान लिहिलं आहेस गं...... अगदी समोर घडतंय सगळं असं वाटलं. इतकी धडपड करुन पोपट मात्र गेला..... वाईट वाटलं. आधी नाक झालं......आता बोटावर संक्रांत का गं....;)

प्राजु गुरुवार, 05/15/2008 - 16:01
आणि तो पोपट तुला इतक्यांदा चावला, आता तोही खुप बडबड्या झाला असेल ना गं? बडबड्या... छे. काहीतरीच... तो तर विठूविठूड्या झाला असेल. अरे पोपटाचं काय घेऊन बसलास, मला तर वाटतं की ते इंजेक्शन-सिरिंज सुद्धा बडबडं झालं असेल आत्तापर्यंत!! पुणे आकाशवाणीवरून बातम्या देत असेल!! असेल नक्की देत असेल बातम्या.... प्राजक्ताच्या जागी.. नुसता बडबड्या? त्याने अत्तापर्यंत "मिरचीडाळ.कॉम" वर त्याचा हा अनुभवसुध्धा लिहिला आसेल...... ही शक्यताही नाकारता येत नही. निलकांता, बघ बरं जरा मिरचीडाळ्.कॉम ची बांधणी कुठे चालू आहे का? प्राजु बिच्चारी अगं किती मेहेनत घेतली होतीस... हो ना गं. वरदा, तूच सख्खी मैत्रीण आहेस बघ. माझं दु:ख तू एकटीच समजू शकलीस. तुझा लढ्वय्या बाणा कामि आला म्हणूनच मी स्वतःला झाशीची राणी म्हणवून घेतलं... :) आधी नाक झालं......आता बोटावर संक्रांत का गं.... हो गं जयूताई, आधी नाक झालं आता बोटं.. बाबा म्हणतात मला, कायम वुंडेड सोल्जर असते प्राजू... :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा Sat, 05/17/2008 - 04:03
कायम वुंडेड सोल्जर असते प्राजू मलाही तेच म्हणायचे बाबा लहान असताना. ते म्हणायचे लाल औषधाचा हौद बांधून तुला त्यात ठेवलं पाहीजे...:))

अभिता Sat, 05/17/2008 - 18:17
असाच अनुभव (पोपट पकडण्याचा )माझासुध्दा आहे.कारवानच्याजागी कातकरी असे वाचावे.आम्ही तेव्हा नुकतेच घर बांधले होते.त्यामुळे आपणहि काहि तरी पाळावे असे वाटत होते व आयताच पाहुणा आला म्हणुन फार आंनंद झाला होता.जिचा पोपट होता ती तो घेउन गेली . नंतर ४/५ वर्षानी ती आमच्याकडे कामाला आली .पण आमचा तिच्यावर कायम सूक्शम राग राहिला. आम्ही म्हणजे मी व माझा भाऊ.

ऋचा Wed, 05/14/2008 - 09:34
खुप छान वाचताना समोर घडतय असं वाटत होतं. :) खुप छान मांडणी केली आहेस..

In reply to by चित्रा

सकेत गुरुवार, 05/15/2008 - 14:16
सुन्दर लिहिले आहेस्.........खुप छान............. =D>

विसोबा खेचर Wed, 05/14/2008 - 09:52
ह्या पोपटासाठी मी / आम्ही काय काय नाही केलं??? मी त्याला पकडण्यासाठी स्वतःची बोटं जखमी करून घेतली.... श्वान, मार्जार या सारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून त्याचं रक्षण केलं.... त्याला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... भर तळपत्या उन्हांत जाऊन त्याच्यासाठी ... त्या दुकानदारशी हुज्जत घालून स्कूटरवरून कसरत करत पिंजरा आणला... त्याला खायला घालण्यासाठी चांगल्या कपांचे कान फोडले.. मी आईच्या शिव्या खाल्ल्या.... आणि इतके करून... तो शुक्रवारी आलेला शुकाचार्य त्याचदिवशी निघून गेला. ...जाताना मात्र माझ्या मनाला उगाचच उदास करून गेला.. प्राजु, सुंदर लिहिलं आहेस. ही हकिकत प्रत्यक्ष तुझ्याकडून ऐकली होती त्यापेक्षा वाचताना अधिक मजा आली! मस्त अनुभवकथन! :) तात्या.

सहज Wed, 05/14/2008 - 09:52
तो पोपट नंतर काय बरे त्याच्या जातभाईंना स्टोरी ऐकवत असेल? :-) त्या कारवानां पासुन सुटका झाली आता मी मुक्त झालो म्हणले तर....कुत्री, मांजर व दोन बायका सगळे त्याच्या मागे लागले होते.... जाउ दे बॅक टु पॅव्हीलियन. असो. प्राजु बोट बरी आहेत ना आता? एक भन्नाट आठवण ठेवुन गेला पाहूणा.

पुर्वार्धातील अनुभव अनुभवलेला, आणि अनेकदा वाचलेला असल्यामुळे हा अनुभव तितका 'टच' झाला नाही. यातला उत्तरार्ध अनपेक्षीत आहे आणि तो आवडला. बाकी पोपटाचं कडकडून चावणे क्या कहने !!! बोट बरं असेल ना आता :)

मदनबाण Wed, 05/14/2008 - 11:05
ताई अगदी असाच अनुभव माझा ही आहे..... तो अवचित आलेला पाहुणा फार आनंद देऊन गेला..... लहानपणाच्या आठवणी जाग्या झाल्या... (विठु विठु प्रेमी) मदनबाण.....

In reply to by चतुरंग

प्राजु Wed, 05/14/2008 - 14:22
बोटं बरी आहेत. त्याचीही गम्मत झाली. पोपट चावला म्हणून फॅमिली डॉक्टरनी अँटी टीटॅनस चं इंजेक्शन दिलं दंडात. तर दुसरे दिवशी ते ही सुजलं आणि काळंनिळं पडलं होतं... :( - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

राजे Wed, 05/14/2008 - 17:08
त्याच वेळी तूम्ही आपली कुंडली धोंडोपतांना दाखवावयास हवी होती..... ;) छान अनुभव !! असेच लिहीत राहा ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

यशोधरा Wed, 05/14/2008 - 11:32
मस्तच लिहिलय... :) पोपट वाचला म्हणायचा तुमच्यामुळे :) बोट कसं आहे आता? >> त्याचे पंख कापले होते :(

स्वाती दिनेश Wed, 05/14/2008 - 12:55
प्राजु, पाहुण्याची गोष्ट आवडली...खूप छान! तुझ्या हाता,बोटांना जखमा झाल्या तरी तो वाचल्यामुळे मनाला किती आनंद झाला असेल ना? स्वाती

प्रगती Wed, 05/14/2008 - 12:40
ह्या पोपटासाठी मी / आम्ही काय काय नाही केलं??? मी त्याला पकडण्यासाठी स्वतःची बोटं जखमी करून घेतली.... श्वान, मार्जार या सारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून त्याचं रक्षण केलं.... त्याला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... भर तळपत्या उन्हांत जाऊन त्याच्यासाठी ... त्या दुकानदारशी हुज्जत घालून स्कूटरवरून कसरत करत पिंजरा आणला... त्याला खायला घालण्यासाठी चांगल्या कपांचे कान फोडले.. मी आईच्या शिव्या खाल्ल्या.... आणि इतके करून... तो शुक्रवारी आलेला शुकाचार्य त्याचदिवशी निघून गेला. ...जाताना मात्र माझ्या मनाला उगाचच उदास करून गेला लेख अगदी जिवंत वाटतो आहे.

इनोबा म्हणे Wed, 05/14/2008 - 12:54
ओघावते लिखाण .. पोपट तुमचा पोपट करुन गेला म्हणायचा की ! हेच म्हणतो. :)) बाकी लेख मस्तच. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

प्रभाकर पेठकर Wed, 05/14/2008 - 13:05
त्याचे पंख कापले होते म्हणून त्याला उडता येत नव्हते. काय हे क्रौर्य....! आपल्या घरून पोपट उडून जाऊ नये म्हणून त्याचे पंख कापायचे? तसेही मला पक्ष्यांना पिंजर्‍यात जखडून ठेवायला आवडत नाही. बाकी गोष्ट छान आहे.

स्वाती राजेश Wed, 05/14/2008 - 14:03
प्राजु, मस्त लिहिले आहेस. प्रत्यक्ष समोर घटना घडत आहे असे वाटते.:) आता काय???? ह्या पोपटासाठी मी / आम्ही काय काय नाही केलं??? मी त्याला पकडण्यासाठी स्वतःची बोटं जखमी करून घेतली.... श्वान, मार्जार या सारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून त्याचं रक्षण केलं.... त्याला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... भर तळपत्या उन्हांत जाऊन त्याच्यासाठी ... त्या दुकानदारशी हुज्जत घालून स्कूटरवरून कसरत करत पिंजरा आणला... त्याला खायला घालण्यासाठी चांगल्या कपांचे कान फोडले.. मी आईच्या शिव्या खाल्ल्या.... आणि इतके करून... तो शुक्रवारी आलेला शुकाचार्य त्याचदिवशी निघून गेला. ...जाताना मात्र माझ्या मनाला उगाचच उदास करून गेला.. सोप्या भाषेत छान वर्णन केले आहेस.

प्राजु Wed, 05/14/2008 - 15:01
माझा तो पोपट मला सोडून निघून गेला.. पण आपण सर्वांनी माझा अनुभव ऐकून माझ्यासाठी सहानुभूती दाखवलीत त्याबद्दल मी आभारी आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मन Wed, 05/14/2008 - 15:23
त्या पोपटाला वाचवायची धडपड आवडली. पण तिथुन पुढं त्याला कायम पिंजर्‍यात ठेवायचा प्लॅन असेल तर अजिबात आवडलं नाही. म्हंजे पिंजर्‍यात ठेउन त्याला आपली भाषा शिकवणं वगैरे. पण त्याच्यासाठी केलेली धडपड चटका लावुन गेली. (बाकी,त्या पंख कापणार्‍याबद्दल काय बोलाव?) आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

धमाल मुलगा Wed, 05/14/2008 - 16:15
अरेरे... एव्हढा चांगला पोपट मिळाला, तो कसाबसा पकडला आणि संध्याकाळपर्यंत त्याला दुसरेच कोणीतरी घेऊन गेले :( च्यामारी पोपटच झाला की! बाकी, लेख नेहमीप्रमाणेच खास प्राजुताई स्पेशल :) छानच जमलंय..साधं-सोपं...गप्पा मारल्यासारखं :) खुप खुप वाईट वाटतं ना असं कोणी आपल्या घरातून आपण आपला मानलेला प्राणी-पक्षी कोणी घेऊन गेलं की :(
पोपट चावला म्हणून फॅमिली डॉक्टरनी अँटी टीटॅनस चं इंजेक्शन दिलं दंडात. तर दुसरे दिवशी ते ही सुजलं आणि काळंनिळं पडलं होतं
:/ आँ...इंजेक्शन कसं काळंनिळं पडलं गं ? :P आणि तो पोपट तुला इतक्यांदा चावला, आता तोही खुप बडबड्या झाला असेल ना गं? (..हौस्.हौस..फटके खायची...धम्या लेका आता सोडेल का प्राजुताई? आता खा तीचे फटके !!!)

In reply to by धमाल मुलगा

पिवळा डांबिस Wed, 05/14/2008 - 19:25
एव्हढा चांगला पोपट मिळाला, तो कसाबसा पकडला आणि संध्याकाळपर्यंत त्याला दुसरेच कोणीतरी घेऊन गेले च्यामारी पोपटच झाला की! शाधा नायी काई धमुदादा, एकदम शप्तलंगी पोपट झाला की, आप्ल्या प्लाजुताईचा!!:)) आणि तो पोपट तुला इतक्यांदा चावला, आता तोही खुप बडबड्या झाला असेल ना गं? अरे पोपटाचं काय घेऊन बसलास, मला तर वाटतं की ते इंजेक्शन-सिरिंज सुद्धा बडबडं झालं असेल आत्तापर्यंत!!:)) पुणे आकाशवाणीवरून बातम्या देत असेल!!:)) -डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

आंबोळी गुरुवार, 05/15/2008 - 13:15
आणि तो पोपट तुला इतक्यांदा चावला, आता तोही खुप बडबड्या झाला असेल ना गं? नुसता बडबड्या? त्याने अत्तापर्यंत "मिरचीडाळ.कॉम" वर त्याचा हा अनुभवसुध्धा लिहिला आसेल...... औट घटकेचा यजमान "त्या कारवानांडून कशीबशी सुटका करुन पळालो.... पण त्या दुष्टानी रावणाने जटायुचे कापावेत तसे माझे पंख छाटले होते म्हणून उडू न शकल्याने एका अंगणात उडी मारली... तर दोन कुत्री आणि एक मांजर मला खायला आले. ते कमी म्हणुन कि काय एक मुलगी त्याना हाकलून माझ्या मागे लागली. तिलाही मला खायचे असावे. (अमेरिकेहून कोल्हापूरला आल्यापासुन ती मांसभक्षी झाल्याचे ऐकिवात आहे. आणि ती आपल्या मिसळपाव वरील मित्र्-मैत्रिणींना जेवायला बोलावत असल्याचेही ऐकिवात आहे. त्यांच्या साठीच तर पकडत नसेल ही मला? ). मी सुटकेसाठी तिच्या बोटांना कडकडून चावलो पण तिने मला सोडले नाही. माझ्यासारख्या पूर्णवैराग्याला तिने आगोदर कांद्याबटाट्याच्या दुरडीत डांबले...नंतर माझ्यासाठी एक तुरूंग घेउन आली आणि मी इतक्यावेळा ओरडून सांगीतले कि मला मिरची डाळ द्या तर न ऐकता मला कान फुटक्या कपातून पाणी आणि पोळी दिली. शेवटी त्या कारवानांनीच येउन माझी सुटका केली". अवांतरः प्राजुताई तुमच्या सारखे मस्त आणि टची अनुभव नाही मांडता आले.... तुमची अनुभव मांडण्याची हातोटी खरच लाजवाब आहे. सुंदर. अतिअवांतर : केशवसुमार, याला लेखाचे विडंबन म्हणता येइल का हो?

वरदा Wed, 05/14/2008 - 17:20
प्राजु बिच्चारी अगं किती मेहेनत घेतली होतीस... पण लिहिलयस झकास्..ए वन... मला प्राण्यांचा काहीच अनुभव नाही त्यामुळे मला तर सहीच वाटलं वाचायला.. तु खुप सुंदर लिहितेस रंगवून सांगायची कला खूप मस्त.... आता बोटाला जप म्हणजे लवकर बरं वाटेल्..मला तर एकदा लागलं की त्याच त्याच ठीकाणी परत परत धडपडायची सवय आहे...तसं करु नकोस... अवांतरः लहानपणी आमच्या घराला तारेचं कुंपण होतं किती वेळा टिटॅनस घेतलंय काही गणतीच नाही...गाय अंगणात आली हाकलवताना आपटा कुंपणावर..बॅडमिंटनचं फुल बाजुच्या अंगणात पडलय कोण जाईल लांबून फाटकातून वगैरे गायीने वाकवलेल्या तारेतुन घुसा शेजार्‍यांच्या अंगणात्.....खूप खूप आठवणी जाग्या झाल्या गं....

शितल Wed, 05/14/2008 - 18:01
प्राजु छान लिहले आहेस, पोपटाच्या चोचीला तीक्ष्ण धार असते, ते तर कधी कधी त्या॑ना पकडायला गेल्या चोच मारून आतील मा॑स देखिल काढतात. काय हे पक्षी देखिल आता माणसा॑चा पोपट करू लागले आहेत.

गणपा Wed, 05/14/2008 - 18:47
प्राजुताई, मस्त लिहिलयस. आवडलं. लहान असताना मी कोंबडीच पिल्लु पाळल होत त्याची आठवण झाली. भलतच करमती होत ते.

देवदत्त Wed, 05/14/2008 - 19:37
अनुभव कथन छान लिहिले आहे. आता काय???? ह्या पोपटासाठी मी / आम्ही काय काय नाही केलं??? मी त्याला पकडण्यासाठी स्वतःची बोटं जखमी करून घेतली.... श्वान, मार्जार या सारख्या हिंस्त्र प्राण्यांपासून त्याचं रक्षण केलं.... त्याला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... भर तळपत्या उन्हांत जाऊन त्याच्यासाठी ... त्या दुकानदारशी हुज्जत घालून स्कूटरवरून कसरत करत पिंजरा आणला... त्याला खायला घालण्यासाठी चांगल्या कपांचे कान फोडले.. मी आईच्या शिव्या खाल्ल्या.... आणि इतके करून... तो शुक्रवारी आलेला शुकाचार्य त्याचदिवशी निघून गेला. ...जाताना मात्र माझ्या मनाला उगाचच उदास करून गेला.. सब मोहमाया है. त्याला एक दिवस तुमचा पाहुणचार घ्यायचा होता, घेतला आणि गेला निघून :)

In reply to by देवदत्त

विसोबा खेचर गुरुवार, 05/15/2008 - 00:14
सब मोहमाया है. त्याला एक दिवस तुमचा पाहुणचार घ्यायचा होता, घेतला आणि गेला निघून हेच खरं! अवांतर - मला कोणतेही प्राणी पाळायला आवडत नाहीत. त्यांना पाळून बंदिस्त करण्याचा आपल्याला हक्क नाही. त्यांना त्यांचं आयुष्य त्यांच्याप्रमाणे जगू द्या! तात्या.

अव्यक्त Wed, 05/14/2008 - 20:10
....राणीचा बाग... ....राणीचा बाग...हा फक्त मुबई मध्येच आहे असा समज होता माझा....पण साक्शात कोल्हापुर मध्येही आहे. वाचुन विलक्शण उडालोच्....काय काय पालल आहेस्...कुत्रा, मान्जर, पोपट, कोम्बडि, आणि कोण? आनि पोपटाला ऑक्सफर्ड डिक्शनरी दिली वाचायला.... त्यापेक्शा विरकर डिक्शनरी द्यायचिस्.....तुझा लढ्वय्या बाणा कामि आला....माझ्याशि भान्डुन भान्डुन तु क्षत्रिय धर्माचे पालन करायचिस...कामि आले...

ईश्वरी Wed, 05/14/2008 - 21:54
अनुभव छान मांडला आहे. वाचायला छान वाटले. माझी ही एक जुनी आठवण जागी झाली. असाच आम्हालाही एक लव बर्ड सापडला होता. तो घरातून उडुनही जात नव्हता. त्यात कोणीतरी सांगितले की असेच त्याला सोडुन दिले तर कावळे चोची मारून जखमी करतील. म्हणुन मग पिंजरा आणुन त्यात त्याला ठेवले. त्याला वाटीत खायला ठेवले तरी घरातील आमच्या पैकी कोणीतरी भरवल्याशिवाय तो अजिबात खात नसे. त्याचे खाणे तो खायचाच.(जे बाजारात पक्ष्यांचे खाद्य मिळ्ते ते) पण उपमा, पोहे , मटारचे (वाफवलेले ) दाणे हे विशेष आवडीचे. एक घास (त्याचा घास म्हणजे २-३ शिते) खाऊन झाला की पुढचा घास घेण्यासाठी चोच उघडुन 'आणखी हवे' असे सांगायचा. खाण्याचा स्पीड ही चान्गला..पटापट खायचा. उभ्या जागी गिरकी घेउन किंवा २-३ उड्या मारून ' खायला दिलेले आवडले' ह्याचि पावती द्यायचा. आणि परत चोच उघडलेली...आणखी खाण्यासाठी. त्याचे नुसते निरीक्षण करीत बसले तरी वेळ छान जायचा. कधीतरी एकदा घरगड्याच्या हातून पिंजर्‍याच्या दाराला कडी घालायची राहून गेल्याने तो उडुन गेला. त्याचे पंख कापले होते म्हणून त्याला उडता येत नव्हते. खरच काय हे क्रौर्य ! ईश्वरी

गृहिणि Wed, 05/14/2008 - 23:49
फार छान जमलाय लेख. छोटिशि गोष्ट पण सांगण्याच कसब वाखाणण्यासारख आहे तुझ. बोटांचि काळजि घे. रागावु नकोस पण मला विशेषतः पक्ष्यांना पिंजर्यात ठेवण अजिबात आवडत नाहि. कितिहि मोठा असला तरि त्यांना मोकळ वाटेल एवढा मोठा नसतो ना पिंजरा.

जयवी गुरुवार, 05/15/2008 - 12:26
प्राजु....... खूप छान लिहिलं आहेस गं...... अगदी समोर घडतंय सगळं असं वाटलं. इतकी धडपड करुन पोपट मात्र गेला..... वाईट वाटलं. आधी नाक झालं......आता बोटावर संक्रांत का गं....;)

प्राजु गुरुवार, 05/15/2008 - 16:01
आणि तो पोपट तुला इतक्यांदा चावला, आता तोही खुप बडबड्या झाला असेल ना गं? बडबड्या... छे. काहीतरीच... तो तर विठूविठूड्या झाला असेल. अरे पोपटाचं काय घेऊन बसलास, मला तर वाटतं की ते इंजेक्शन-सिरिंज सुद्धा बडबडं झालं असेल आत्तापर्यंत!! पुणे आकाशवाणीवरून बातम्या देत असेल!! असेल नक्की देत असेल बातम्या.... प्राजक्ताच्या जागी.. नुसता बडबड्या? त्याने अत्तापर्यंत "मिरचीडाळ.कॉम" वर त्याचा हा अनुभवसुध्धा लिहिला आसेल...... ही शक्यताही नाकारता येत नही. निलकांता, बघ बरं जरा मिरचीडाळ्.कॉम ची बांधणी कुठे चालू आहे का? प्राजु बिच्चारी अगं किती मेहेनत घेतली होतीस... हो ना गं. वरदा, तूच सख्खी मैत्रीण आहेस बघ. माझं दु:ख तू एकटीच समजू शकलीस. तुझा लढ्वय्या बाणा कामि आला म्हणूनच मी स्वतःला झाशीची राणी म्हणवून घेतलं... :) आधी नाक झालं......आता बोटावर संक्रांत का गं.... हो गं जयूताई, आधी नाक झालं आता बोटं.. बाबा म्हणतात मला, कायम वुंडेड सोल्जर असते प्राजू... :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा Sat, 05/17/2008 - 04:03
कायम वुंडेड सोल्जर असते प्राजू मलाही तेच म्हणायचे बाबा लहान असताना. ते म्हणायचे लाल औषधाचा हौद बांधून तुला त्यात ठेवलं पाहीजे...:))

अभिता Sat, 05/17/2008 - 18:17
असाच अनुभव (पोपट पकडण्याचा )माझासुध्दा आहे.कारवानच्याजागी कातकरी असे वाचावे.आम्ही तेव्हा नुकतेच घर बांधले होते.त्यामुळे आपणहि काहि तरी पाळावे असे वाटत होते व आयताच पाहुणा आला म्हणुन फार आंनंद झाला होता.जिचा पोपट होता ती तो घेउन गेली . नंतर ४/५ वर्षानी ती आमच्याकडे कामाला आली .पण आमचा तिच्यावर कायम सूक्शम राग राहिला. आम्ही म्हणजे मी व माझा भाऊ.
लेखनप्रकार
मंडळी, परवाच्या शुक्रवारी आमच्याकडे एक भन्नाट घटना घडली... सांगू?? सांगतेच. तर झालं असं.... आमच्या कडे सकाळी सकाळी ७.०० वाजता पाणी येतं कार्पोरेशनचं. ते आलेलं होतं आणि आई अंगणात पाणी मारत होती. ते झाल्यावर तिने काही झाडांनाही पाणी घातलं. हे सगळं काम आई अंगणात आमच्या २ कुत्र्यांना सोबत घेऊन करते. म्हणजे ती कुत्री सकाळी अंगणात तिच्यासोबत हिंडत असतात. तर त्यादिवशी पाणी मारत असताना एकदम धप्प असा आवाज आला. आईने जाऊन पाहिले तर एक पिलू असलेला पोपट अंगणातल्या फरशीवर पडला होता. तो पडला, तसाच उठला आणि उडायचे सोडून चालू लागला. आमची कुत्री ताबडतोब शिकार मिळाल्याच्या आनंदात त्या पोपटावर धावून गेली.

म्हणी व वाकप्रचार यांचा उगम.

गणपा ·

ऋचा Tue, 05/13/2008 - 18:34
आता म्हणींची ष्टोरी म्हणजे लै झाला बॉ!!! 8|

विजुभाऊ Tue, 05/13/2008 - 19:14
"भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी" ही म्हण कशावरुन आली असेल याचे मला नेहमी कुतुहल आहे. ( यात काहीही जातिवाचक नाही ) वागायला भट असणारा विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

मन Tue, 05/13/2008 - 21:10
"बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना' हे कुठुन आलं? कुअणाची शादी? आणि कुठला वाला अब्दुल्ला नक्की/ आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

In reply to by विजुभाऊ

गणपा Wed, 05/14/2008 - 16:59
ओ विजुभौ हल्ली भैय्याला दिली मुंबई भैय्या हात पाय पसरी अस वाचलय ;) (मुंबई ऐवजी ज्याला हव त्याने आप-आपल्या शहराच नाव टाकवं.)

विसोबा खेचर Wed, 05/14/2008 - 00:30
उंटावरच्या शहाण्याची ष्टोरी आवडली रे गणप्या! मस्त आहे! :) बाकी, म्हणींच्या उगमकथा हा काथ्याकुटाचा धागा छान आहे... आपला, उंटावरचा तात्या!

ऋचा Wed, 05/14/2008 - 14:02
एक पुजारी असतो. त्याची बायको त्याला तेल आणायला सांगते. पण तेल घेऊन येण्यासाठी एक धुपाटणं देते. (पुजारी नेहमी गरीब असतात. :) ) पुजारी दुकानात जातो आणि तेल घेतो तो दुकानदार त्याला सांगतो की तुप सुध्दा छान आहे. पण त्याच्याकडे तुप न्यायला दुसरं भांड नसतं. तेंव्हा तो दुकानदार त्याला सांगतो की धुपाटण्याची खालची बाजु वर करुन त्यात तुप घ्या. आणि कसलाही विचार न करता पुजारी धुपाटणं उलटं करतो. आणि घरी गेल्यावर बायको तेल मागते. तेंव्हा तो परत धुपाटणं सरळ करतो. त्यामुळे तेल जातं तुप जातं आणि त्याच्याक्डे उरत धुपाटणं. :) :)

आनंदयात्री Wed, 05/14/2008 - 14:39
छान धागा गणपाराव. दोन्ही गोष्टी आवडल्या. बाकी आमच्या शरुबाबाची "मि नहि त्यतलि कडि घाल आतलि" ही अत्यंत प्रिय म्हण आहे, तो सांगेल त्याची श्टोरी :))

आर्य Wed, 05/14/2008 - 15:12
टांगा पलटी, घोडे फरार या आशयाची म्हणं संस्कृत मध्ये होती - 'नष्टाश्वदग्धरथन्यास'- घोडा हरवलेला आणि रथ जळालेला. तमोदीपन्याय - अंधार बधायला दिवा. भटाच्या बायकोला स्वयंपाक करताना घरातली तुरीची डाळ संपल्याचे लक्षात आले. तीने भटाला बाजारातून डाळ आणायला सांगीतले. त्यावर भटाने तिला विचारले काय करणार ? ती म्हणाली आमटी, भट म्हणाला वरण. या वरुन दोधात जोरात भांडण झालं अगदी मारा-मारी पर्यंत....आणिम्हणं पडली - बाजारात तुरी भट भटीणीला मारी परोपदेशे पांडित्यं सर्वेषां सुकरं नॄणाम् धर्मे स्वीयमनुष्ठानं कस्यचित् सुमहात्मन: - लोका सांगी ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. न भूतपूर्व न कदापि वार्ता हेम्न: कुरङ्ग: न कदापि दॄष्ट: । तथापि तॄष्णा रघुनन्दनस्य विनाशकाले विपरीतबुद्धि ॥ न कूपखननं युक्तं प्रदीप्ते वह्निना गृहे आग लागल्यावर विहीर खणणे

मस्त धागा सुरु केला आहे. ब-याच म्हणींची स्टोरी आपल्याला माहित नसते, या निमित्ताने ब-याच म्हणींचा उलगडा होईल असे वाटते. 'गोसाव्याशी झगडा आणि राखाडीशी भेट' याची स्टोरी कोणास माहित आहे का ?

गणपा Wed, 05/14/2008 - 16:29
प्रतिक्रिये बद्दल सर्वांचे आभार... बिरुटेशेठ खरय तुमच म्हणणं, या म्हणी, वाक्यप्रचार आपण अगदी लाहान पणापासुन ऐकत आलोय. कधी काळी आज्जी आजोबा, आई बाबां कडुन या म्हणी कश्या पडल्या या सुसर कथाही ऐकल्या असतिल. हल्ली इंग्रजी माध्यमात जाणार्‍या आपल्या मुलांना या म्हणी नि वाक्यप्रचार तरी माहिति असतील का ही शंका आहे. आणि हल्लीची मुलं पण इतकी चौकस असतात (त्यामानाने आम्ही कीती बावळट होतो) कि विचारुनका. एखादा वाक्यप्रचार वा म्हण बोलता बोलता निघुन गेली की माझी ३ वर्षांची चीमुरडी तर इतके प्रश्न विचारुन भंडावुन सोडते कि बस. म्हणुन हा उपापोह. :) माझ्या तर्फे अजुन एक गोष्ट. खुप वर्षांपुर्वी एका लहान खेड्यात एक ब्राम्हण राहत होता. त्याच्या घरी अठराविश्वे दारिद्र्य नांदत होतं. ब्राम्हणाची बायको या सर्वाला जाम वैतागली होती. रोज च्या रोज त्याची काही ना काही कारणांवरून भांडणं होत असत. ब्राम्हणाच भिक्षुकी हेच मुख्य उदरभरणाच माध्यम होतं, कधी काळी एखादी पुजा, मुंज वा एखादं लग्नाकार्य असलं तर तेवढेच चार दिवस काय ते बरे जायचे. एकदा असच एका पुजेच आमंत्रण त्याला आल होतं. ब्राम्हण छान सत्यनारायणाची पुजा मांडली, उल्कामुक राजाची कथा सांगीतली, सगळ यथासांग पार पडलं. घरी जाताना यजमानाने पाच पुरणपोळ्या ब्राम्हणाला बांधून दिल्या. पुरणपोळ्या पाहुन ब्राम्हणाची बायको खुप खुष जाली. लगेच तिने दोन ताटं आणून एका ताटात दोन पुरणपोळ्या वाढून नवर्‍याला दिल्या, आणि स्वतः तीन घेतल्या. ब्राम्हणाला आला राग. म्हणाला मी जाउन पुजा सांगून आलो त्यामुळे मला तीन पुरणपोळ्या हव्या. तर बायकोच म्हणणं की मी धरात इतके कष्ट उपसते म्हणून मलाच तीन पुरणपोळ्या. होता होता त्यांच भांडण खुप वाढलं. शेजारी-पाजारी गोळा झाले. लोकांनी सांगीतलं की अरे भांडू नका, अडीच-अडीच पोळी घ्या. पण दोधे जाम हट्टाला पेटलेले, कुणाच ऐकतील तर शप्पथ. शेवटी भांडून भांडून दोघे थकले व तसेच उपाशी पोटी झोपले. सकाळी जाग आल्यावर त्याना भांडणाचा पश्चाताप झाला आणि दोघांनी पोळ्या वाटून घ्यायच ठरवलं. ताटाकडे लक्ष गेलं, पाहातात तर काय, एक कुत्रं मजेत शेवटची पुरणपोळी हादडत होत. भांडणाच्या नादात ब्राम्हणाची बायको पोळ्या जाकून ठेवायला विसरली आणि ब्राम्हण दार लावायला. लागले परत भांडायला. ब्राम्हण बायकोवर खेकसला मला नं तुला, घाल कुत्र्याला.

In reply to by गणपा

'मराठी म्हणी व वाक्प्रचार कोश' हे स. ध.झांबरे......यांचे पुस्तक माझ्याकडे आहे. त्याच्यात किती तरी म्हणी आणि त्यांचे अर्थ दिले आहेत. पण गणपासेठ आपण देत आहात तशा कथा किंवा तशी माहिती त्याच्यात नाही. आपल्या म्हणींच्या निमित्ताने येणा-या कथा आम्ही आवर्जून वाचतोय. येऊ दे आणखी !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आर्य Wed, 05/14/2008 - 16:19
खाई त्याला खवखवे सुंठेवाचून खोकला गेला अवघड जागी दुखणे आणि जावई वैद्य आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून कशात काय अन फाटक्यात पाय घरचं झालं थोडं अन् व्याह्यांनी धाडलं घोडं ज्याचं जळतं त्यालाच कळतं तरण्या झाल्या बरण्या आणि म्हातार्‍या झाल्या हरण्या पुराला न्हाणीत बोळा अणि दरवाजा मोकळा पाटलाचं घोडं महाराला भुषण पादऱ्याला पावट्याचे निमित्त

ऋचा Wed, 05/14/2008 - 16:30
पुराला न्हाणीत बोळा अणि दरवाजा मोकळा म्हणजे काय? जरा अर्थ तरी सांगा. :W

In reply to by ऋचा

आनंदयात्री Wed, 05/14/2008 - 16:35
पुर आल्यावर गटारांमधले पाणी पहिल्यांदा न्हाणीतल्या आउट्लेट मधुन रिव्हर्स येउन घरात शिरते, म्हणुन ते अडवायला तिथे बोळा कोंबतात, पण दार तर उघडेच असते की हो, तिथुन पाणी शिरतेच. असा अर्थ असावा. -सज्जनयात्री :)

In reply to by ऋचा

गणपा Wed, 05/14/2008 - 16:44
अग ऋचा, पुर्वी न्हाणीघर मुख्य घरात नसे, ते अंगणात असे. आणि सांडपाणी वाहुन नेण्या करता एक छोटा पाइप असे जो बाहेर रस्त्याच्या गटारा पर्यंत जात असे. त्या पाइप मधुन एखादा किडा वा साप घरात येउ नये म्हणुन त्यात, बोळा कोंबुन ठेवत. पण एवढे प्रयत्न करुन अंगणाचा मुख्य दरवाजा मात्र सताड उघडा. त्यावरुन ही म्हण अस्तित्वात आली आसा कयास आहे. --(शंकानिरसनी ) गणपा.

ऋचा Wed, 05/14/2008 - 17:07
बरं कळाले.. #:S धन्यवाद आनंदयात्री,गणपा . अजुन कही म्हणी. बैल गेला नी झोपा केला. लाकडाच्या वखारीत माकडाचा दवाखाना तिथे येती रोगी नाना नाव सोनुबाई हाती कथिलाचा वाळा

देवदत्त Wed, 05/14/2008 - 19:23
कथा दिल्याबद्दल धन्यवाद... चला आता म्हणींचे नेमके अर्थ ही कळतील :)

पोटाला नाई आटा आन म्हन चोटाला उटन वाटा ज्याच्यासाठी लुगडं त्येच उघडं मी नाई बाई त्यातली अन कडी लाव आतली शुभ बोल रे नार्‍या त म्हन मांडवाला लागली आग ढवळ्या शेजारी बांधला पवळा वान नाई पन गुन लाग्ला. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर गुरुवार, 05/15/2008 - 00:24
मी नाई बाई त्यातली अन कडी लाव आतली हा हा हा! अश्या काही स्त्रिया माझ्या परिचयाच्या (म्हणजे फक्त ओळखीत बरं का!) आहेत! खूप छान आहे त्यांचा स्वभाव! आवडतो मला! त्याही आवडतात! :) आपला, (कडीकुलपातला) तात्या.

डोमकावळा गुरुवार, 05/15/2008 - 12:39
आधीच उल्हास अन् त्यात फाल्गून मास आंधळं दळतं आणि कुत्र पिठ खातं बायकोचा भाऊ आणि लोण्याहून मऊ काही नवीन..... बायकोनी दिली झोळी अन् मेव्हणी दळण दळी आयडिया केली आणि वाया गेली ह्त्यार भारी तर गि-हाइक दारी :) - डोम

ऋचा गुरुवार, 05/15/2008 - 12:46
अशीच १ फार टुकार म्हण आहे आमच्या कोकणात.. हागलं नाही पोट गेलं अर्थ माहीत नाही :/

स्वाती दिनेश गुरुवार, 05/15/2008 - 12:54
म्हणी बर्‍याच माहिती आहेत पण त्यामागच्या गोष्टी मात्र सगळ्याच माहित नव्हत्या,त्या वाचायला मजा येते आहे.. स्वाती

गणपा गुरुवार, 05/15/2008 - 17:38
मंडळी प्रोत्साहना बद्दल आभर, आज अजून एका म्हणीची उगम कथा सांगतोय पहा आवडते का, आपण लाहान पणापासून बैल गेला नि झोपा (झापा) केला ही म्हण ऐकत आलोत. पण लेको जर मी तुम्हाला आज अस सांगीतल की ही म्हण चुकीची आहे तर ? गावी अंगणात (गोठ्याला) जे फाटक असायचं त्याला झापा म्हणत. त्यामुळे मला वाटायच कि कदाचीत गोठ्याला झापा नसावा आधी नी एखादा बैल पळून गेल्या नंतर मग झापा केला असेल.(हल्ली गावात गायी, बैल , बैलगाड्या राहील्याच कुठे, घोडे (दुचाक्या हो) आले नी गोठ्याची गॅरेजं झाली) पण खरी म्हण आहे बाईल गेलिया झोंपा केला. यामागची ही मजेशिर कथा ..... एका गावत एक तरुण राहत होता. त्याच एका सुंदर मुली (बाई)वर प्रेम जडलं. पण होता बिचारा गरिब. त्याने बरिच वचनं देउन तिला लग्नाला राजी केलं. बाईने काही महिने कळ काढली, पण निदान राहत घर(झोपा) तरी चांगल असाव म्हणून तिने त्याच्याकडे भुणभूण लावली की चांगल घर बांध. बिचारा तरुण पै पै साठवत राहीला. पण दरम्यान वैतागून बाई त्याला सोडून निघून गेली व तिने दुसरा घरोबा केला. काही काळाने पैसे जमल्यावर त्या तरुंणाने चांगल घर (झोपा) बांधल. तेव्हा लोक म्हणाले की बाईल गेलिया जोपा केला. सारः एखादी गोष्ट जर वेळिच नाही केली तर नंतर ती करुन सुद्धा तिच महत्व राहात नाही काळाच्या ओघात 'बाईल'च बैल नि 'गेलिया'च गेला कधी झालं कळलच नाही. :))

अभिता Sat, 05/17/2008 - 19:28
"म्हणीच्या गोष्टी "असे अनमोल प्रकाशनचे पुस्तक आहे यात खुपगोष्टी आहेत म्हणीवरुन.

बैलगाडीच्या चाकांच्या आंसावर ल्युब्रिकेशन साठी वंगण( तेल)लागते. ते ठेवण्यासाठी एक बांबूची ( किंवा पत्र्याची) नळी व त्यांत ,तेल लावण्यासाठी चिंधी बांधलेली तार ( किंवा काडी)असते. गाड्याबरोबर त्या नळ्याची पण यात्रा होत असते. तसेच एखाद्या महत्वाच्या व्यक्तीबरोबर साधारण माणसाला आवश्यक नसतांना यात्रा घडणे वा मान मिळणे, म्हणजे "गाड्या बरोबर नळ्याची यात्रा."

In reply to by प्रा सुरेश खेडकर

वपाडाव Fri, 02/25/2011 - 15:45
पण मी जे ऐकलंय ते काही वेगळं आहे. म्हणजे गाडीशी नाही तर तिचा संबंध घोड्याशी आहे. घोडा जेव्हा पळु लागतो, त्यावेळी त्याच्या पायात, म्हणजेच टाचेत/खुरांत लोखंडाची एक पट्टी रोवली जाते. ती 'U' आकाराची असते. तिला नाळ असे संबोधतात. आणी पुर्वीच्या काळी जेव्हा घोडे घेउन लोक यात्रेला जायचे त्यावेळी, घोड्यासोबत नाळंची यात्रा अशी म्हण रुढ झाली.

In reply to by वपाडाव

पंगा Fri, 02/25/2011 - 21:00
घोडा जेव्हा पळु लागतो, त्यावेळी त्याच्या पायात, म्हणजेच टाचेत/खुरांत लोखंडाची एक पट्टी रोवली जाते. ती 'U' आकाराची असते. तिला नाळ असे संबोधतात.
त्या पट्टीस 'नाल' असे संबोधतात. 'नाळ' असे नव्हे. 'नाळ' या संज्ञेचा अर्थ खूपच वेगळा आहे. त्याचा गाडी किंवा घोडा यांच्याशी दूरान्वयानेही संबंध नाही. वर प्रा. म्हणतात ती व्युत्पत्ती सयुक्तिक वाटते.

मस्त कलंदर Sat, 02/26/2011 - 11:18
माझ्या घरी माझ्या लहानपणी उद्गमकथा नावाचं पुस्तक होतं. त्यात अशा बर्‍याचशा म्हणींचे अर्थ दिले होते. आता जसे आठवतील तसे ते इथे लिहिते. १. घोडं पेंड खातं.. ही पेंड नाही, तो पेण या शब्दाचा अपभ्रंश आहे. पेण म्हणजे टप्पा. जुन्या काळी साधारणपणे तळकोकणातून मुंबईला बैलगाडीने थवा मुख्यतः घोड्यावरून येणार्‍या लोकांना टप्पा घ्यावा लागे. कधी कधी काही कारणाने हा टप्पा इतका लांबे की प्रवास लवकर संपतच नसे. म्हणून एखादं काम अडलं की "अरे काय करू, तिथंच तर माझं घोडं पेण(टप्पा) खातंय" असं म्हणण्याची पद्धत रूढ झाली. त्या पेणचाही अपभ्रंश होऊन आणि घोडा प्राणी आहे तर तो काहीतरी खाण्याचीच वस्तू खाणार म्हणून त्या पेणचं पेंड झालं. पेण हे गाव मुंबई आणि कोकणास सोयीस्कर पडत असल्याने त्या ठिकाणी आधी असे टप्पे घेतले जात, यावरूनच त्याचं नांव पेण असं पडलं असावं.. (असं त्या पुस्तकात लिहिलं होतं :-) ) असो, पेंड खाणारा घोडा अजूनतरी माझ्या ऐकण्यात नाही. २. रिकामा न्हावी, भिंतीला तुंबड्या लावी.. इथे वरती दिलेली गोष्ट माझ्यासाठी नवीन आहे. मी वाचलेली कथा अशी की, तुंबडा/ड्या हे तुंबा=गडूचं अपभ्रंशित रूप. एका गावच्या न्हाव्याला सतत काही काम हवं असे. तेव्हा तो रिकामा असेल तर कुडाच्या भिंतींना भोपळ्याचे केलेले तुंबडे सतत अडकवत व काढत बसे.. ३. तू तांडेल, मी तांडेल, तर घमत कोण सांडेल? ही म्हण मी फक्त त्या पुस्तकातच वाचली.. पण मानवीस्वभावास लागू पडेल अशीच आहे. तांडेल म्हणजे छोट्या नावेचा कप्तान. आणि घमत म्हणजे समुद्राचं नावेत झिरपून येणारं पाणी. हे पाणी काही काळानं काढून टाकावं लागतं, नाहीतर घमत साठून साठून नाव बुडण्याची वेळ यायची. घमत काढण्याचं काम खलाशी/तत्सम खालच्या दर्जाचे लोक करतात. तर काही कारणांनी दोन बुडित तांडेलांनी एकत्र येऊन एक नाव घेतली व व्यवसाय सुरू केला. बाकी सगळं ठीक चालं होतं, पण नावेत घमत साठणं चालूच होतं. नावेवर दोघेच असल्याने दोघांचीही "मी तांडेल आहे, घमत काढणार नाही" अशी जुंपली. परिणामी नाव समुद्रात बुडाली. खोट्या प्रतिष्टेच्या कल्पनांना बळी जाऊन लोक स्वतःचा र्‍हास होत असेल तरी त्यांना त्याची पर्वा कशी नसते, यासाठी हे म्हण अगदी चपखल उदाहरण आहे. असो, आतापुरतं इतकंच... संध्याकाळी आणखी काही भर घालेन.

In reply to by मस्त कलंदर

आनंदी गोपाळ Sun, 09/16/2012 - 11:20
तुंबडी = जळू. न्हावी हे हजामतीसोबत मायनर सर्जिकल वर्क करण्यासाठी प्रसिद्ध होते. (शिवकालीन सैन्यात जखमा धुणे, त्यांना ड्रेसिंग करणे, टाके घालणे इ. कामे न्हावी करीत.) जळू लावून हिमॅटोमा पक्षी मुकामार लागून साकळलेले रक्त काढून टाकीत. (आयुर्वेदात जलुकावतरण व रक्तमोक्षण इ. आहेत.) रिकामा न्हावी काम नसले की ती जळू भिंतीला चिकटवीत बसतो, अशा अर्थाची ती म्हण आहे. तुम्बा नव्हे

In reply to by मस्त कलंदर

सस्नेह Sun, 09/16/2012 - 14:39
रिकामा न्हावी, भिंतीला तुंबड्या लावी, या म्हणीची पार्श्वभूमी अशी. पूर्वी जखमा चिघळून पू झाल्यावर दूषित रक्त काढण्यासाठी जखमेवर जळवा लावत. त्या जळवांनी दूषित रक्त शोषून घेतल्यावर चुना लावून जळवा काढीत. हे काम न्हाव्याचे असे. न्हावी लोक यासाठी जळवा बाळगत. या न्हाव्याला काम नसले, की बरणीतल्या जळवा काढून उगा आपलं भिंतीला चिकटवण्याचा रिकामा उद्योग. म्हणून ही म्हण.

सस्नेह Sun, 09/16/2012 - 12:33
नाचता येईना अंगण वाकडे, चूल पेटेना ओली लाकडे. का गं बाई रोड, तर हिला सासरची ओढ. अगं अगं म्हशी, मला कुठं नेशी. छप्पन लुगडी अन भागाबाई उघडी. हातच्या काकणाला आरसा कशाला ? दिवस गेला रेटारेटी अन चांदण्यात कापूस पेटी. काखेत कळसा अन गावाला वळसा.

ज्ञानराम Sun, 09/16/2012 - 13:17
मस्त धागा गणपा भाऊ ..... माहीती मिळाली ,,, आणी म्हणीच्या मागची पार्श्वभूमी कळाली... सही... वाचतोय आम्ही,,, आणखी येऊद्यात. :)

बॅटमॅन Sun, 09/16/2012 - 16:19
मराठी म्हणींचे एक अगदी वर्गीकरणासहित खंप्लीट कलेक्शन एका इंग्रजाने केलेले इथे बघा. अजून एक कलेक्शन कुणी भिडेशास्त्र्यांनी केलेले ऐसी/उपक्रमावरती वाचले होते, ते आठवले की टाकतो.

वामन देशमुख Mon, 09/17/2012 - 18:18
कानामागून आली अन् तिखट झाली- गाई-म्हशींना जन्मत: कान असतात आणि ते शेवटपर्यंत नरम राहतात. शिंगे मात्र कानामागून येतात अन् तिखट होतात! -इतरांच्या नंतर येऊन शिरजोर होणार्‍या व्यक्तींचे वर्णन

ऋचा Tue, 05/13/2008 - 18:34
आता म्हणींची ष्टोरी म्हणजे लै झाला बॉ!!! 8|

विजुभाऊ Tue, 05/13/2008 - 19:14
"भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी" ही म्हण कशावरुन आली असेल याचे मला नेहमी कुतुहल आहे. ( यात काहीही जातिवाचक नाही ) वागायला भट असणारा विजुभाऊ

In reply to by विजुभाऊ

मन Tue, 05/13/2008 - 21:10
"बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना' हे कुठुन आलं? कुअणाची शादी? आणि कुठला वाला अब्दुल्ला नक्की/ आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

In reply to by विजुभाऊ

गणपा Wed, 05/14/2008 - 16:59
ओ विजुभौ हल्ली भैय्याला दिली मुंबई भैय्या हात पाय पसरी अस वाचलय ;) (मुंबई ऐवजी ज्याला हव त्याने आप-आपल्या शहराच नाव टाकवं.)

विसोबा खेचर Wed, 05/14/2008 - 00:30
उंटावरच्या शहाण्याची ष्टोरी आवडली रे गणप्या! मस्त आहे! :) बाकी, म्हणींच्या उगमकथा हा काथ्याकुटाचा धागा छान आहे... आपला, उंटावरचा तात्या!

ऋचा Wed, 05/14/2008 - 14:02
एक पुजारी असतो. त्याची बायको त्याला तेल आणायला सांगते. पण तेल घेऊन येण्यासाठी एक धुपाटणं देते. (पुजारी नेहमी गरीब असतात. :) ) पुजारी दुकानात जातो आणि तेल घेतो तो दुकानदार त्याला सांगतो की तुप सुध्दा छान आहे. पण त्याच्याकडे तुप न्यायला दुसरं भांड नसतं. तेंव्हा तो दुकानदार त्याला सांगतो की धुपाटण्याची खालची बाजु वर करुन त्यात तुप घ्या. आणि कसलाही विचार न करता पुजारी धुपाटणं उलटं करतो. आणि घरी गेल्यावर बायको तेल मागते. तेंव्हा तो परत धुपाटणं सरळ करतो. त्यामुळे तेल जातं तुप जातं आणि त्याच्याक्डे उरत धुपाटणं. :) :)

आनंदयात्री Wed, 05/14/2008 - 14:39
छान धागा गणपाराव. दोन्ही गोष्टी आवडल्या. बाकी आमच्या शरुबाबाची "मि नहि त्यतलि कडि घाल आतलि" ही अत्यंत प्रिय म्हण आहे, तो सांगेल त्याची श्टोरी :))

आर्य Wed, 05/14/2008 - 15:12
टांगा पलटी, घोडे फरार या आशयाची म्हणं संस्कृत मध्ये होती - 'नष्टाश्वदग्धरथन्यास'- घोडा हरवलेला आणि रथ जळालेला. तमोदीपन्याय - अंधार बधायला दिवा. भटाच्या बायकोला स्वयंपाक करताना घरातली तुरीची डाळ संपल्याचे लक्षात आले. तीने भटाला बाजारातून डाळ आणायला सांगीतले. त्यावर भटाने तिला विचारले काय करणार ? ती म्हणाली आमटी, भट म्हणाला वरण. या वरुन दोधात जोरात भांडण झालं अगदी मारा-मारी पर्यंत....आणिम्हणं पडली - बाजारात तुरी भट भटीणीला मारी परोपदेशे पांडित्यं सर्वेषां सुकरं नॄणाम् धर्मे स्वीयमनुष्ठानं कस्यचित् सुमहात्मन: - लोका सांगी ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. न भूतपूर्व न कदापि वार्ता हेम्न: कुरङ्ग: न कदापि दॄष्ट: । तथापि तॄष्णा रघुनन्दनस्य विनाशकाले विपरीतबुद्धि ॥ न कूपखननं युक्तं प्रदीप्ते वह्निना गृहे आग लागल्यावर विहीर खणणे

मस्त धागा सुरु केला आहे. ब-याच म्हणींची स्टोरी आपल्याला माहित नसते, या निमित्ताने ब-याच म्हणींचा उलगडा होईल असे वाटते. 'गोसाव्याशी झगडा आणि राखाडीशी भेट' याची स्टोरी कोणास माहित आहे का ?

गणपा Wed, 05/14/2008 - 16:29
प्रतिक्रिये बद्दल सर्वांचे आभार... बिरुटेशेठ खरय तुमच म्हणणं, या म्हणी, वाक्यप्रचार आपण अगदी लाहान पणापासुन ऐकत आलोय. कधी काळी आज्जी आजोबा, आई बाबां कडुन या म्हणी कश्या पडल्या या सुसर कथाही ऐकल्या असतिल. हल्ली इंग्रजी माध्यमात जाणार्‍या आपल्या मुलांना या म्हणी नि वाक्यप्रचार तरी माहिति असतील का ही शंका आहे. आणि हल्लीची मुलं पण इतकी चौकस असतात (त्यामानाने आम्ही कीती बावळट होतो) कि विचारुनका. एखादा वाक्यप्रचार वा म्हण बोलता बोलता निघुन गेली की माझी ३ वर्षांची चीमुरडी तर इतके प्रश्न विचारुन भंडावुन सोडते कि बस. म्हणुन हा उपापोह. :) माझ्या तर्फे अजुन एक गोष्ट. खुप वर्षांपुर्वी एका लहान खेड्यात एक ब्राम्हण राहत होता. त्याच्या घरी अठराविश्वे दारिद्र्य नांदत होतं. ब्राम्हणाची बायको या सर्वाला जाम वैतागली होती. रोज च्या रोज त्याची काही ना काही कारणांवरून भांडणं होत असत. ब्राम्हणाच भिक्षुकी हेच मुख्य उदरभरणाच माध्यम होतं, कधी काळी एखादी पुजा, मुंज वा एखादं लग्नाकार्य असलं तर तेवढेच चार दिवस काय ते बरे जायचे. एकदा असच एका पुजेच आमंत्रण त्याला आल होतं. ब्राम्हण छान सत्यनारायणाची पुजा मांडली, उल्कामुक राजाची कथा सांगीतली, सगळ यथासांग पार पडलं. घरी जाताना यजमानाने पाच पुरणपोळ्या ब्राम्हणाला बांधून दिल्या. पुरणपोळ्या पाहुन ब्राम्हणाची बायको खुप खुष जाली. लगेच तिने दोन ताटं आणून एका ताटात दोन पुरणपोळ्या वाढून नवर्‍याला दिल्या, आणि स्वतः तीन घेतल्या. ब्राम्हणाला आला राग. म्हणाला मी जाउन पुजा सांगून आलो त्यामुळे मला तीन पुरणपोळ्या हव्या. तर बायकोच म्हणणं की मी धरात इतके कष्ट उपसते म्हणून मलाच तीन पुरणपोळ्या. होता होता त्यांच भांडण खुप वाढलं. शेजारी-पाजारी गोळा झाले. लोकांनी सांगीतलं की अरे भांडू नका, अडीच-अडीच पोळी घ्या. पण दोधे जाम हट्टाला पेटलेले, कुणाच ऐकतील तर शप्पथ. शेवटी भांडून भांडून दोघे थकले व तसेच उपाशी पोटी झोपले. सकाळी जाग आल्यावर त्याना भांडणाचा पश्चाताप झाला आणि दोघांनी पोळ्या वाटून घ्यायच ठरवलं. ताटाकडे लक्ष गेलं, पाहातात तर काय, एक कुत्रं मजेत शेवटची पुरणपोळी हादडत होत. भांडणाच्या नादात ब्राम्हणाची बायको पोळ्या जाकून ठेवायला विसरली आणि ब्राम्हण दार लावायला. लागले परत भांडायला. ब्राम्हण बायकोवर खेकसला मला नं तुला, घाल कुत्र्याला.

In reply to by गणपा

'मराठी म्हणी व वाक्प्रचार कोश' हे स. ध.झांबरे......यांचे पुस्तक माझ्याकडे आहे. त्याच्यात किती तरी म्हणी आणि त्यांचे अर्थ दिले आहेत. पण गणपासेठ आपण देत आहात तशा कथा किंवा तशी माहिती त्याच्यात नाही. आपल्या म्हणींच्या निमित्ताने येणा-या कथा आम्ही आवर्जून वाचतोय. येऊ दे आणखी !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आर्य Wed, 05/14/2008 - 16:19
खाई त्याला खवखवे सुंठेवाचून खोकला गेला अवघड जागी दुखणे आणि जावई वैद्य आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून कशात काय अन फाटक्यात पाय घरचं झालं थोडं अन् व्याह्यांनी धाडलं घोडं ज्याचं जळतं त्यालाच कळतं तरण्या झाल्या बरण्या आणि म्हातार्‍या झाल्या हरण्या पुराला न्हाणीत बोळा अणि दरवाजा मोकळा पाटलाचं घोडं महाराला भुषण पादऱ्याला पावट्याचे निमित्त

ऋचा Wed, 05/14/2008 - 16:30
पुराला न्हाणीत बोळा अणि दरवाजा मोकळा म्हणजे काय? जरा अर्थ तरी सांगा. :W

In reply to by ऋचा

आनंदयात्री Wed, 05/14/2008 - 16:35
पुर आल्यावर गटारांमधले पाणी पहिल्यांदा न्हाणीतल्या आउट्लेट मधुन रिव्हर्स येउन घरात शिरते, म्हणुन ते अडवायला तिथे बोळा कोंबतात, पण दार तर उघडेच असते की हो, तिथुन पाणी शिरतेच. असा अर्थ असावा. -सज्जनयात्री :)

In reply to by ऋचा

गणपा Wed, 05/14/2008 - 16:44
अग ऋचा, पुर्वी न्हाणीघर मुख्य घरात नसे, ते अंगणात असे. आणि सांडपाणी वाहुन नेण्या करता एक छोटा पाइप असे जो बाहेर रस्त्याच्या गटारा पर्यंत जात असे. त्या पाइप मधुन एखादा किडा वा साप घरात येउ नये म्हणुन त्यात, बोळा कोंबुन ठेवत. पण एवढे प्रयत्न करुन अंगणाचा मुख्य दरवाजा मात्र सताड उघडा. त्यावरुन ही म्हण अस्तित्वात आली आसा कयास आहे. --(शंकानिरसनी ) गणपा.

ऋचा Wed, 05/14/2008 - 17:07
बरं कळाले.. #:S धन्यवाद आनंदयात्री,गणपा . अजुन कही म्हणी. बैल गेला नी झोपा केला. लाकडाच्या वखारीत माकडाचा दवाखाना तिथे येती रोगी नाना नाव सोनुबाई हाती कथिलाचा वाळा

देवदत्त Wed, 05/14/2008 - 19:23
कथा दिल्याबद्दल धन्यवाद... चला आता म्हणींचे नेमके अर्थ ही कळतील :)

पोटाला नाई आटा आन म्हन चोटाला उटन वाटा ज्याच्यासाठी लुगडं त्येच उघडं मी नाई बाई त्यातली अन कडी लाव आतली शुभ बोल रे नार्‍या त म्हन मांडवाला लागली आग ढवळ्या शेजारी बांधला पवळा वान नाई पन गुन लाग्ला. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर गुरुवार, 05/15/2008 - 00:24
मी नाई बाई त्यातली अन कडी लाव आतली हा हा हा! अश्या काही स्त्रिया माझ्या परिचयाच्या (म्हणजे फक्त ओळखीत बरं का!) आहेत! खूप छान आहे त्यांचा स्वभाव! आवडतो मला! त्याही आवडतात! :) आपला, (कडीकुलपातला) तात्या.

डोमकावळा गुरुवार, 05/15/2008 - 12:39
आधीच उल्हास अन् त्यात फाल्गून मास आंधळं दळतं आणि कुत्र पिठ खातं बायकोचा भाऊ आणि लोण्याहून मऊ काही नवीन..... बायकोनी दिली झोळी अन् मेव्हणी दळण दळी आयडिया केली आणि वाया गेली ह्त्यार भारी तर गि-हाइक दारी :) - डोम

ऋचा गुरुवार, 05/15/2008 - 12:46
अशीच १ फार टुकार म्हण आहे आमच्या कोकणात.. हागलं नाही पोट गेलं अर्थ माहीत नाही :/

स्वाती दिनेश गुरुवार, 05/15/2008 - 12:54
म्हणी बर्‍याच माहिती आहेत पण त्यामागच्या गोष्टी मात्र सगळ्याच माहित नव्हत्या,त्या वाचायला मजा येते आहे.. स्वाती

गणपा गुरुवार, 05/15/2008 - 17:38
मंडळी प्रोत्साहना बद्दल आभर, आज अजून एका म्हणीची उगम कथा सांगतोय पहा आवडते का, आपण लाहान पणापासून बैल गेला नि झोपा (झापा) केला ही म्हण ऐकत आलोत. पण लेको जर मी तुम्हाला आज अस सांगीतल की ही म्हण चुकीची आहे तर ? गावी अंगणात (गोठ्याला) जे फाटक असायचं त्याला झापा म्हणत. त्यामुळे मला वाटायच कि कदाचीत गोठ्याला झापा नसावा आधी नी एखादा बैल पळून गेल्या नंतर मग झापा केला असेल.(हल्ली गावात गायी, बैल , बैलगाड्या राहील्याच कुठे, घोडे (दुचाक्या हो) आले नी गोठ्याची गॅरेजं झाली) पण खरी म्हण आहे बाईल गेलिया झोंपा केला. यामागची ही मजेशिर कथा ..... एका गावत एक तरुण राहत होता. त्याच एका सुंदर मुली (बाई)वर प्रेम जडलं. पण होता बिचारा गरिब. त्याने बरिच वचनं देउन तिला लग्नाला राजी केलं. बाईने काही महिने कळ काढली, पण निदान राहत घर(झोपा) तरी चांगल असाव म्हणून तिने त्याच्याकडे भुणभूण लावली की चांगल घर बांध. बिचारा तरुण पै पै साठवत राहीला. पण दरम्यान वैतागून बाई त्याला सोडून निघून गेली व तिने दुसरा घरोबा केला. काही काळाने पैसे जमल्यावर त्या तरुंणाने चांगल घर (झोपा) बांधल. तेव्हा लोक म्हणाले की बाईल गेलिया जोपा केला. सारः एखादी गोष्ट जर वेळिच नाही केली तर नंतर ती करुन सुद्धा तिच महत्व राहात नाही काळाच्या ओघात 'बाईल'च बैल नि 'गेलिया'च गेला कधी झालं कळलच नाही. :))

अभिता Sat, 05/17/2008 - 19:28
"म्हणीच्या गोष्टी "असे अनमोल प्रकाशनचे पुस्तक आहे यात खुपगोष्टी आहेत म्हणीवरुन.

बैलगाडीच्या चाकांच्या आंसावर ल्युब्रिकेशन साठी वंगण( तेल)लागते. ते ठेवण्यासाठी एक बांबूची ( किंवा पत्र्याची) नळी व त्यांत ,तेल लावण्यासाठी चिंधी बांधलेली तार ( किंवा काडी)असते. गाड्याबरोबर त्या नळ्याची पण यात्रा होत असते. तसेच एखाद्या महत्वाच्या व्यक्तीबरोबर साधारण माणसाला आवश्यक नसतांना यात्रा घडणे वा मान मिळणे, म्हणजे "गाड्या बरोबर नळ्याची यात्रा."

In reply to by प्रा सुरेश खेडकर

वपाडाव Fri, 02/25/2011 - 15:45
पण मी जे ऐकलंय ते काही वेगळं आहे. म्हणजे गाडीशी नाही तर तिचा संबंध घोड्याशी आहे. घोडा जेव्हा पळु लागतो, त्यावेळी त्याच्या पायात, म्हणजेच टाचेत/खुरांत लोखंडाची एक पट्टी रोवली जाते. ती 'U' आकाराची असते. तिला नाळ असे संबोधतात. आणी पुर्वीच्या काळी जेव्हा घोडे घेउन लोक यात्रेला जायचे त्यावेळी, घोड्यासोबत नाळंची यात्रा अशी म्हण रुढ झाली.

In reply to by वपाडाव

पंगा Fri, 02/25/2011 - 21:00
घोडा जेव्हा पळु लागतो, त्यावेळी त्याच्या पायात, म्हणजेच टाचेत/खुरांत लोखंडाची एक पट्टी रोवली जाते. ती 'U' आकाराची असते. तिला नाळ असे संबोधतात.
त्या पट्टीस 'नाल' असे संबोधतात. 'नाळ' असे नव्हे. 'नाळ' या संज्ञेचा अर्थ खूपच वेगळा आहे. त्याचा गाडी किंवा घोडा यांच्याशी दूरान्वयानेही संबंध नाही. वर प्रा. म्हणतात ती व्युत्पत्ती सयुक्तिक वाटते.

मस्त कलंदर Sat, 02/26/2011 - 11:18
माझ्या घरी माझ्या लहानपणी उद्गमकथा नावाचं पुस्तक होतं. त्यात अशा बर्‍याचशा म्हणींचे अर्थ दिले होते. आता जसे आठवतील तसे ते इथे लिहिते. १. घोडं पेंड खातं.. ही पेंड नाही, तो पेण या शब्दाचा अपभ्रंश आहे. पेण म्हणजे टप्पा. जुन्या काळी साधारणपणे तळकोकणातून मुंबईला बैलगाडीने थवा मुख्यतः घोड्यावरून येणार्‍या लोकांना टप्पा घ्यावा लागे. कधी कधी काही कारणाने हा टप्पा इतका लांबे की प्रवास लवकर संपतच नसे. म्हणून एखादं काम अडलं की "अरे काय करू, तिथंच तर माझं घोडं पेण(टप्पा) खातंय" असं म्हणण्याची पद्धत रूढ झाली. त्या पेणचाही अपभ्रंश होऊन आणि घोडा प्राणी आहे तर तो काहीतरी खाण्याचीच वस्तू खाणार म्हणून त्या पेणचं पेंड झालं. पेण हे गाव मुंबई आणि कोकणास सोयीस्कर पडत असल्याने त्या ठिकाणी आधी असे टप्पे घेतले जात, यावरूनच त्याचं नांव पेण असं पडलं असावं.. (असं त्या पुस्तकात लिहिलं होतं :-) ) असो, पेंड खाणारा घोडा अजूनतरी माझ्या ऐकण्यात नाही. २. रिकामा न्हावी, भिंतीला तुंबड्या लावी.. इथे वरती दिलेली गोष्ट माझ्यासाठी नवीन आहे. मी वाचलेली कथा अशी की, तुंबडा/ड्या हे तुंबा=गडूचं अपभ्रंशित रूप. एका गावच्या न्हाव्याला सतत काही काम हवं असे. तेव्हा तो रिकामा असेल तर कुडाच्या भिंतींना भोपळ्याचे केलेले तुंबडे सतत अडकवत व काढत बसे.. ३. तू तांडेल, मी तांडेल, तर घमत कोण सांडेल? ही म्हण मी फक्त त्या पुस्तकातच वाचली.. पण मानवीस्वभावास लागू पडेल अशीच आहे. तांडेल म्हणजे छोट्या नावेचा कप्तान. आणि घमत म्हणजे समुद्राचं नावेत झिरपून येणारं पाणी. हे पाणी काही काळानं काढून टाकावं लागतं, नाहीतर घमत साठून साठून नाव बुडण्याची वेळ यायची. घमत काढण्याचं काम खलाशी/तत्सम खालच्या दर्जाचे लोक करतात. तर काही कारणांनी दोन बुडित तांडेलांनी एकत्र येऊन एक नाव घेतली व व्यवसाय सुरू केला. बाकी सगळं ठीक चालं होतं, पण नावेत घमत साठणं चालूच होतं. नावेवर दोघेच असल्याने दोघांचीही "मी तांडेल आहे, घमत काढणार नाही" अशी जुंपली. परिणामी नाव समुद्रात बुडाली. खोट्या प्रतिष्टेच्या कल्पनांना बळी जाऊन लोक स्वतःचा र्‍हास होत असेल तरी त्यांना त्याची पर्वा कशी नसते, यासाठी हे म्हण अगदी चपखल उदाहरण आहे. असो, आतापुरतं इतकंच... संध्याकाळी आणखी काही भर घालेन.

In reply to by मस्त कलंदर

आनंदी गोपाळ Sun, 09/16/2012 - 11:20
तुंबडी = जळू. न्हावी हे हजामतीसोबत मायनर सर्जिकल वर्क करण्यासाठी प्रसिद्ध होते. (शिवकालीन सैन्यात जखमा धुणे, त्यांना ड्रेसिंग करणे, टाके घालणे इ. कामे न्हावी करीत.) जळू लावून हिमॅटोमा पक्षी मुकामार लागून साकळलेले रक्त काढून टाकीत. (आयुर्वेदात जलुकावतरण व रक्तमोक्षण इ. आहेत.) रिकामा न्हावी काम नसले की ती जळू भिंतीला चिकटवीत बसतो, अशा अर्थाची ती म्हण आहे. तुम्बा नव्हे

In reply to by मस्त कलंदर

सस्नेह Sun, 09/16/2012 - 14:39
रिकामा न्हावी, भिंतीला तुंबड्या लावी, या म्हणीची पार्श्वभूमी अशी. पूर्वी जखमा चिघळून पू झाल्यावर दूषित रक्त काढण्यासाठी जखमेवर जळवा लावत. त्या जळवांनी दूषित रक्त शोषून घेतल्यावर चुना लावून जळवा काढीत. हे काम न्हाव्याचे असे. न्हावी लोक यासाठी जळवा बाळगत. या न्हाव्याला काम नसले, की बरणीतल्या जळवा काढून उगा आपलं भिंतीला चिकटवण्याचा रिकामा उद्योग. म्हणून ही म्हण.

सस्नेह Sun, 09/16/2012 - 12:33
नाचता येईना अंगण वाकडे, चूल पेटेना ओली लाकडे. का गं बाई रोड, तर हिला सासरची ओढ. अगं अगं म्हशी, मला कुठं नेशी. छप्पन लुगडी अन भागाबाई उघडी. हातच्या काकणाला आरसा कशाला ? दिवस गेला रेटारेटी अन चांदण्यात कापूस पेटी. काखेत कळसा अन गावाला वळसा.

ज्ञानराम Sun, 09/16/2012 - 13:17
मस्त धागा गणपा भाऊ ..... माहीती मिळाली ,,, आणी म्हणीच्या मागची पार्श्वभूमी कळाली... सही... वाचतोय आम्ही,,, आणखी येऊद्यात. :)

बॅटमॅन Sun, 09/16/2012 - 16:19
मराठी म्हणींचे एक अगदी वर्गीकरणासहित खंप्लीट कलेक्शन एका इंग्रजाने केलेले इथे बघा. अजून एक कलेक्शन कुणी भिडेशास्त्र्यांनी केलेले ऐसी/उपक्रमावरती वाचले होते, ते आठवले की टाकतो.

वामन देशमुख Mon, 09/17/2012 - 18:18
कानामागून आली अन् तिखट झाली- गाई-म्हशींना जन्मत: कान असतात आणि ते शेवटपर्यंत नरम राहतात. शिंगे मात्र कानामागून येतात अन् तिखट होतात! -इतरांच्या नंतर येऊन शिरजोर होणार्‍या व्यक्तींचे वर्णन
आपल्या नेहमीच्या बोलण्यात बरेच वेळा आपण म्हणी, वाकप्रचार याचां उपयोग करतो. बर्‍याच वेळा आश्या म्हणी व वाकप्रचार यांच्या मागे काही धटना, गोष्टी धडलेल्या असतात. आपल्या पैकी कुणाला जर आश्या गोष्टी आठवत असतील तर त्याची इथे देवाण-घेवाण करु. (जर असा घागा आधीच कुणी चालू केला असेल तर सरपंचाना हा धागा उडवण्याची नम्र विनंती. ) सुरुवात मीच करतो. ऊंटावरचा शहाणा. एका खेड्यात एक शेतकरी राहात होता. त्याच्या जवळ म्हैस होती. ही भली मोठ्ठी शिंग होती तिला . ती शेतकर्‍याची एकदम लाडकी होती.

व्हेज मांचुरिअन

स्वाती दिनेश ·

राजे Tue, 05/13/2008 - 17:38
वाह ! आज माझी आवडती डीश (थाळी =ज्यांना कळत नाही त्याच्यासाठी) स्वाती धन्यवाद. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

शितल Tue, 05/13/2008 - 18:33
बरेच दिवस मनात आहे करायचे आता तुमच्या लेखी मार्गदर्शना नुसार करावयास सोपे जाईल. तुमच्या घरातल्या॑ची चैनी आहे. मस्त मस्त नुसते खा.

वरदा Tue, 05/13/2008 - 18:38
ह्या विकेंडला नवर्‍याचा एक फ्रेंड येणारे...करतेच मी आता....सोप्पं दिसतंय....

In reply to by वरदा

विसोबा खेचर Wed, 05/14/2008 - 00:05
ह्या विकेंडला नवर्‍याचा एक फ्रेंड येणारे...करतेच मी आता....सोप्पं दिसतंय.... सोप्पं दिसतंय? हा हा हा वरदा, मला त्या फ्रेंडची अंमळ काळजीच वाटते! :)) आपला, (वरदाला मुळीच स्वयंपाक करता येत नाही यावर ठाम विश्वास असलेला!) तात्या. तिला स्वयंपाक येतो हे तिने मला आठ दिवस निरनिराळे पदार्थ करून खायला घालून सिद्ध करावे, त्याशिवाय आपण मानणार नाही! :) बाकी, मिपाच्या भगिनीवर्गातला आपापसात चाललेला सुखसंवाद वाचायला चांगला वाटतो आहे! स्वाती, मी पण येईन हो तुझ्या जर्मनीला. मस्तपैकी खादाडी करीन तुझ्याकडे आठ दिवस! :) व्हेज मांचुरियनची पाकृ झकास! फोटूही सुरेखच आला आहे.. :) तुझा, (शाळूसोबती) तात्या.

प्राजु Tue, 05/13/2008 - 18:41
ये तूने क्या किया?? रेसिपी दे दी और फोटो भी दिया... जले पे नमक क्यों छीडका?? स्वाती, सह्ही फोटो आणि रेसिपी.... माझा विचार बदलला आहे. आता रिटर्न फ्लाईट जर्मनीत हॉल्ट घेऊनच पुढे न्यू यॉर्कला जाईल.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

स्वाती दिनेश Tue, 05/13/2008 - 23:06
ये,स्वागत आहे! इथून जाताना तुमच्या अमेरिकन कट्ट्यासाठी काय देऊ बोल?म्हणजे तसं तयारीला लागायला बरं,:)

वरदा Tue, 05/13/2008 - 19:29
प्राजु मग जर्मनी वरून पॅक करुन खूप पदार्थ घेऊन लगेच इस्ट कोस्ट स्पेश्शल कट्ट्यासाठी माझ्याकडे येईल आणि मी पण चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेईन 8>

In reply to by स्वाती राजेश

स्वाती दिनेश Tue, 05/13/2008 - 23:08
अग येते आहेस ना तू जर्मनीत? मग ये की इथे..एक डिश काय हवे तेवढे खायला घालते...शेवटी आपण नावभगिनी ना?

चकली Tue, 05/13/2008 - 23:23
मांचुरिअन माझी आवडती डीश आहे. माझे मांचुरिअन चे बरेच प्रयोग झाल्यावर मला पाण्याऐवजी vegetable stock वापरून जास्त चांगली चव येते असे वाटते. आणि corn starch ने ही थोडा फरक पडतो. बाकी रेसीपी ए - १ ! चकली http://chakali.blogspot.com

वरदा Tue, 05/13/2008 - 23:35
किती गं हुशार सुगरणी तुम्ही सगळ्या..आता आणेन व्हेजिटेबल स्टॉक सुद्धा....

वरदा Wed, 05/14/2008 - 00:46
तिला स्वयंपाक येतो हे तिने मला आठ दिवस निरनिराळे पदार्थ करून खायला घालून सिद्ध करावे, त्याशिवाय आपण मानणार नाही! आणि यासाठी तात्यांनी ८ दिवस अमेरिकेत रहायला यावे त्याशिवाय मी तुम्हाला खायला घालणार नाही :)))

ईश्वरी Wed, 05/14/2008 - 01:43
छान आहे रेसिपी. मी ही करायचे मान्चुरिअन पण एवढ्यात केलं नाही. आता करीन म्हणते. ह्या मान्चुरिअनची जी ग्रेव्ही आहे त्यातील सिमला मिरची वगळून भजी न टाकल्यास ते चायनीज (hot n sour) सूप होऊ शकेल.. याच ग्रेव्ही मधे भाज्या(सिमला मिरची, कान्दा, कान्दा पात ) न वापरता एक फेट्लेले अंडे घातल्यास एग ड्रॉप सूप होईल. फेट्लेले अंडे एकदम न ओतता थेंब थेंब घालून ढवळावे . फक्त ग्रेव्हीइतके सूप घट्ट असू नये. पाण्याऐवजी व्हेजिटेबल / चिकन स्टॉक वापरावा. फोटो मस्त. ईश्वरी

पल्लवी Wed, 05/14/2008 - 07:37
स्वाती ताई.. अहाहा.. सक्काळी सक्काळी भूक चाळवलीस ग.. मस्तच.. ग्रेव्हीला आलं-लसणाची काय सही चव येते.. =P~

सहज Wed, 05/14/2008 - 07:40
व्हेज मांचुरिअन - डिमिस्टीफाईड!! सॉलीड आवड्या!!!

राजे Tue, 05/13/2008 - 17:38
वाह ! आज माझी आवडती डीश (थाळी =ज्यांना कळत नाही त्याच्यासाठी) स्वाती धन्यवाद. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

शितल Tue, 05/13/2008 - 18:33
बरेच दिवस मनात आहे करायचे आता तुमच्या लेखी मार्गदर्शना नुसार करावयास सोपे जाईल. तुमच्या घरातल्या॑ची चैनी आहे. मस्त मस्त नुसते खा.

वरदा Tue, 05/13/2008 - 18:38
ह्या विकेंडला नवर्‍याचा एक फ्रेंड येणारे...करतेच मी आता....सोप्पं दिसतंय....

In reply to by वरदा

विसोबा खेचर Wed, 05/14/2008 - 00:05
ह्या विकेंडला नवर्‍याचा एक फ्रेंड येणारे...करतेच मी आता....सोप्पं दिसतंय.... सोप्पं दिसतंय? हा हा हा वरदा, मला त्या फ्रेंडची अंमळ काळजीच वाटते! :)) आपला, (वरदाला मुळीच स्वयंपाक करता येत नाही यावर ठाम विश्वास असलेला!) तात्या. तिला स्वयंपाक येतो हे तिने मला आठ दिवस निरनिराळे पदार्थ करून खायला घालून सिद्ध करावे, त्याशिवाय आपण मानणार नाही! :) बाकी, मिपाच्या भगिनीवर्गातला आपापसात चाललेला सुखसंवाद वाचायला चांगला वाटतो आहे! स्वाती, मी पण येईन हो तुझ्या जर्मनीला. मस्तपैकी खादाडी करीन तुझ्याकडे आठ दिवस! :) व्हेज मांचुरियनची पाकृ झकास! फोटूही सुरेखच आला आहे.. :) तुझा, (शाळूसोबती) तात्या.

प्राजु Tue, 05/13/2008 - 18:41
ये तूने क्या किया?? रेसिपी दे दी और फोटो भी दिया... जले पे नमक क्यों छीडका?? स्वाती, सह्ही फोटो आणि रेसिपी.... माझा विचार बदलला आहे. आता रिटर्न फ्लाईट जर्मनीत हॉल्ट घेऊनच पुढे न्यू यॉर्कला जाईल.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

स्वाती दिनेश Tue, 05/13/2008 - 23:06
ये,स्वागत आहे! इथून जाताना तुमच्या अमेरिकन कट्ट्यासाठी काय देऊ बोल?म्हणजे तसं तयारीला लागायला बरं,:)

वरदा Tue, 05/13/2008 - 19:29
प्राजु मग जर्मनी वरून पॅक करुन खूप पदार्थ घेऊन लगेच इस्ट कोस्ट स्पेश्शल कट्ट्यासाठी माझ्याकडे येईल आणि मी पण चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेईन 8>

In reply to by स्वाती राजेश

स्वाती दिनेश Tue, 05/13/2008 - 23:08
अग येते आहेस ना तू जर्मनीत? मग ये की इथे..एक डिश काय हवे तेवढे खायला घालते...शेवटी आपण नावभगिनी ना?

चकली Tue, 05/13/2008 - 23:23
मांचुरिअन माझी आवडती डीश आहे. माझे मांचुरिअन चे बरेच प्रयोग झाल्यावर मला पाण्याऐवजी vegetable stock वापरून जास्त चांगली चव येते असे वाटते. आणि corn starch ने ही थोडा फरक पडतो. बाकी रेसीपी ए - १ ! चकली http://chakali.blogspot.com

वरदा Tue, 05/13/2008 - 23:35
किती गं हुशार सुगरणी तुम्ही सगळ्या..आता आणेन व्हेजिटेबल स्टॉक सुद्धा....

वरदा Wed, 05/14/2008 - 00:46
तिला स्वयंपाक येतो हे तिने मला आठ दिवस निरनिराळे पदार्थ करून खायला घालून सिद्ध करावे, त्याशिवाय आपण मानणार नाही! आणि यासाठी तात्यांनी ८ दिवस अमेरिकेत रहायला यावे त्याशिवाय मी तुम्हाला खायला घालणार नाही :)))

ईश्वरी Wed, 05/14/2008 - 01:43
छान आहे रेसिपी. मी ही करायचे मान्चुरिअन पण एवढ्यात केलं नाही. आता करीन म्हणते. ह्या मान्चुरिअनची जी ग्रेव्ही आहे त्यातील सिमला मिरची वगळून भजी न टाकल्यास ते चायनीज (hot n sour) सूप होऊ शकेल.. याच ग्रेव्ही मधे भाज्या(सिमला मिरची, कान्दा, कान्दा पात ) न वापरता एक फेट्लेले अंडे घातल्यास एग ड्रॉप सूप होईल. फेट्लेले अंडे एकदम न ओतता थेंब थेंब घालून ढवळावे . फक्त ग्रेव्हीइतके सूप घट्ट असू नये. पाण्याऐवजी व्हेजिटेबल / चिकन स्टॉक वापरावा. फोटो मस्त. ईश्वरी

पल्लवी Wed, 05/14/2008 - 07:37
स्वाती ताई.. अहाहा.. सक्काळी सक्काळी भूक चाळवलीस ग.. मस्तच.. ग्रेव्हीला आलं-लसणाची काय सही चव येते.. =P~

सहज Wed, 05/14/2008 - 07:40
व्हेज मांचुरिअन - डिमिस्टीफाईड!! सॉलीड आवड्या!!!
मांचुरियनला जरी आपण चायनीज म्हणत असलो तरी ती चिनी आवरणातली भारतीय सुंदरी आहे. साहित्य भज्यांसाठी- १ वाटी किसलेला कोबी,१ वाटी किसलेली गाजरे,१ टे स्पून आलं मिरची लसूण पेस्ट,१ टीस्पून सोया सॉस, प्रत्येकी १.५ ते २ टे स्पून मैदा व कॉर्नफ्लोअर ,मीठ,अजिनोमोटो चवीनुसार,१/२ वाटी भात(शिळा असल्यास उत्तम) तळणीसाठी तेल कृती- कोबी,गाजर एकत्र करणे.मैदा+कॉर्नफ्लोअर त्यात घालणे.आलं,लसूण मिरची पेस्ट घालणे,सोयासॉस घालणे,मीठ आणि अजिनोमोटो चवीनुसार घालणे.

लिटल बॉय नावाच्या एका एकांकिकेचे परीक्षण

भडकमकर मास्तर ·

आनंदयात्री Tue, 05/13/2008 - 16:16
ती एवढी सक्षम असती तर तो संबंध ठेवायला जबरदस्ती करतो हे एवढेच कारण त्याला सोडायला पुरेसे नाही का? नाही कारण वर लेखात म्हटल्याप्रमाणे ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत, हा सोडुन बाकी मुद्यांशी सहमत.

In reply to by आनंदयात्री

भडकमकर मास्तर Tue, 05/13/2008 - 16:50
दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत म्हणून केली गेलेली जबरदस्ती दुर्लक्षणीय ठरते?मला नाही वाटत... उलट लग्नापूर्वी हा भाई असा वागतो, माझ्या मतांना याच्या लेखी काडीची किंमत नाही, तर नंतर कसा वागेल...असा विचार येऊन मी असल्या बॉयफ्रेंडला अगदी लई वेळा लाथ घातली असती... ... असो... मात्र "प्रेमात पडल्यावर मला तर बाई जबरदस्तीच आवडते" असं मानण्याचा एखाद्या व्यक्तीला पूर्ण अधिकार आहे, तिच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा माझा हेतू नाही... ( स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता) भडकमकर

ऋचा Tue, 05/13/2008 - 16:35
प्रेम म्हणजे जबरदस्ती नाही. आणि जर त्यांचं प्रेम होतं तर त्यात जबरदस्ती येऊच नये.

धमाल मुलगा Tue, 05/13/2008 - 16:56
गेली कित्येक वर्षं आम्ही असा येक बाळबोध विचार मनी धरून होतो की हे असे विषय ही समांतर आणि विद्रोही वाल्यांची मक्तेदारी आहे. तिथे विकृत मनोवृत्तीचं उदात्तिकरण केलेलं चालतं, भडक भावना रंगवून रंजक(!) करण्याची हातोटीही तिकडचीच. मागे एकदा, स्पर्धेसाठी करावी म्हणून एक एकांकिका (नाव आठवत नाही आता..) वाचली आणि झीट येऊन पडलो. त्यात एक चौकोनी कुटुंब असतं, बाप चिक्कार पैसा मिळवायला आखातात गेलेला, आई पार्ट्या झोडत हिंडतेय, आणि लफडी करतही... एकदा तो प्रकार त्यांची मुलगी पाहते आणि सुरुवातीला रडते, मग भावाशी बोलते...त्यांचे आधूनिक विचार ऐकून आपण अश्मयुगिन असल्याची भावना वाढीस लागते...तिथेच ब्लॅक आउट ची कंसातली सुचना..आणि मग दोघं बहिण-भाऊ भेसुर चेहर्‍याने एकमेकांकडे पाहताहेत....कारण काय तर बंधूंनी हा आधुनिक विचार बहिणीला फारच सखोल समजावलेला असतो.... मग हे घरी कळणं...एकमेकांना दोष देणं...आणि प्रत्येकानं आपापल्या भूमिकेचं समर्थन करणं........ धन्य झालो होतो वाचूनच...करायला घ्यायची हिंमतच नाही झाली! त्यापुढे हे लिटिल बॉय तर काय चीज आहे हो?

In reply to by भडकमकर मास्तर

इनोबा म्हणे Tue, 05/13/2008 - 17:13
धमाल्या , आम्हाला आपली नुसती झलक वाचूनच झीट आली... बाप रे... याच्यापुढे अगदीच लिटील बॉय आहे ही म्हणजे.... हेच म्हणतो.... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

धमाल मुलगा Tue, 05/13/2008 - 17:38
मास्तर, इनोबा, तो लेखक इतका भारी होता, की बरेच दिवस त्याचे ते विचार डोक्यात घोळत होते! अतिरेक्यांना जसं धार्मिक शिक्षण देऊन ब्रेनवॉशिंग केलं जातं तसं काहीसं व्हायला लागलं होतं...नशीब, लवकर डोकं ताळ्यावर आलं नाहीतर जनावरात जमा व्हायची लक्षणं दिसायला लागली होती. पण काय साल्यानं ठासून मुद्दे मांडले होते...आठवलं तरी आता गरगरायला होतं

In reply to by धमाल मुलगा

राजे Tue, 05/13/2008 - 17:43
लवकर डोकं ताळ्यावर आलं नाहीतर जनावरात जमा व्हायची लक्षणं दिसायला लागली होती. 8} माझे नशीब मी आज पर्यंत एक ही मराठी प्रायोगीक नाटक पाहीलेले नाही ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

धमाल मुलगा Tue, 05/13/2008 - 17:52
राजे... सुखी आहात.... हल्ली प्रायोगिक च्या नावाखाली काय काय चाललंय ह्याची सुदैवानं मलाही फारशी कल्पना नाही! आणि दुर्दैवानं माझी प्रायोगिकची खाज परत जोर धरायला लागली आहे...त्यात असं माझ्या डोक्याला सारखं तोच तो विचार देऊन तेल ओतायचं काम आमचे भडकमकर मास्तर मोठ्या नेटानं करताहेत.... मराठी रंगभूमीचं दुर्दैव, दुसरं काय !!! (हे दुर्दैव आम्ही स्वतःच्या अस्तित्वाबद्दल म्हणतोय, मास्तरांचं काम बरंच उत्तम आणि मोठं आहे. त्यांचा आणि ह्या दुर्दैवाचा काडीमात्र संबंध लावण्यात येऊ नये, ही विनंती)

In reply to by धमाल मुलगा

मन Tue, 05/13/2008 - 21:05
"राजा ओयदीपौस"(राजा एडिपस) ह्या नाटकाची. काय धमाल्या, आठवतय ना? नै, रंगभुमेवर वावरलेला दिसतोस, म्हणुन विचारतोय.(त्याविषयी ह्या "सभ्य" लोकांत बोलायची हिम्मत होत नाहिये.) आणि हो. ही असलीच घटना एम.पी मध्ये एका आदिवासी टोळक्यात प्रत्यक्षात घडली होती(५-७ वर्षं झाली असतील आता.). मुळात "वंश शुद्धी" टिकावी म्हणुन केवळ स्वतःच्या सख्ख्या नातलगांपासुनच अपत्य प्राप्ती करण्याची प्रथा काही "शाक्य" कुळात फार पुर्विपासुन होती.(अपत्य प्राप्ती मुख्यत्वे "भाउ-बहीण" ह्यातुन व्हायची.)(गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील अनेक कुळांपैकी एकाचा युवराज होता.) त्यानंतर ती भारतात(विशेषतः पुर्व आणि मध्य भारतात आणि नेपाळ मध्ये) कित्येक राज घराणी पाळत होती. (रामायणाच्या तिबेटी व्हर्जन मध्ये सीतेला रामाची बहीण व पत्नी मानतात!!) ह्या गधड्यांना धड नाटक रचण्याची अक्कल नाहीये. आजकाल कोणीही मनुष्य असे जनावरासारखे आचरण करणार नाही. पण ह्या बिनडोकांना तथाकथित "ज्वलंत" विषय मांडुन प्रसिद्धी मिळवायची (विरोध का असेना लोकांचा पण ती दीपा मेहता नाही का प्रसिद्ध झाली "फायर " वगैरे मधुन.) होती, तर नीट "चुझ" तरी करायला हवी होती मांडणी. म्हणजे, भारतिय इतिहासाचा दाखला दिला तर ह्यांना निदान पाठिंबा देणारी तीन्-चार तथाकथित पुरोगामी टाळकी तरी मिळाली असती.निदान माझा सल्ला घ्यायचा ह्यांनी की फुकटात बोंबाबोंब करण्याचे हम्खास मार्ग कुठले आहेत ह्याबद्दल... आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

In reply to by मन

आंबोळी Wed, 05/14/2008 - 14:41
मुळात "वंश शुद्धी" टिकावी म्हणुन केवळ स्वतःच्या सख्ख्या नातलगांपासुनच अपत्य प्राप्ती करण्याची प्रथा काही "शाक्य" कुळात फार पुर्विपासुन होती.(अपत्य प्राप्ती मुख्यत्वे "भाउ-बहीण" ह्यातुन व्हायची.)(गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील अनेक कुळांपैकी एकाचा युवराज होता.) त्यानंतर ती भारतात(विशेषतः पुर्व आणि मध्य भारतात आणि नेपाळ मध्ये) कित्येक राज घराणी पाळत होती. (रामायणाच्या तिबेटी व्हर्जन मध्ये सीतेला रामाची बहीण व पत्नी मानतात!!) आयला असला प्रकार भारतात होता हे नविनच ऐकतोय..... रोमच्या राजघराण्यात हे प्रकार शुध्ध रक्तासाठी चालत असे ऐकले होते. पण असेच प्रकार भारतात असल्याचे इतके दिवस ऐकीवात नाही. व्यासानी जग उष्ट केल पण या प्रकाराला तोंड लावले नाही त्याअर्थी हा प्रकार भारतात नसावा असे वाटते. मिपावरील इतिहासतज्ञ यावर प्रकाश टाकतील काय?

In reply to by आंबोळी

मन Wed, 05/14/2008 - 15:41
थोडासा आठवतोय तो असा:- रं. ना गायधनी ह्यांचे "यु पी एस सी"साठी वापरण्यात येणारे "प्राचीन भारताचा इतिहास" ह्यात तेवढा इतिहास्स थोड्क्यात दिलाय. ही पद्धत मुख्यत्वे होती तो भागः- नेपाळ्,तिबेट्,त्यांच्या सीमेलगतचा आजच्या भारतातील भाग(मुख्यत्वे छोटी छोटी राज्ये आणि काही गणराज्ये) षोडश् महाजन पदांपैकी इतरांचा ह्या प्रथेला कठोर विरोध होता. (पुढे त्यांचेच म्हणणे टिकले, आणि ह्या प्रथा जवळ जवळ संपुर्ण बंद झाल्या.) हवं तर ह्यासाठी इतिहास वाल्या मंडळींनी नवीन धागा सुरु करावा. (नक्क्की आठवत नाहिये, पण यम्-यमी का असलीच कुठलितरी आणखी एक भारतीय आख्यायिका तिबेट मध्ये नवरा-बायको हे नातेही धारण करते.(जी आपल्याकडे भाउ-बहीण आहे.) ) आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 17:04
नमस्कार मास्तर, परिक्षणवजा लेख खूप चांगला वाटला. अहो नाही हो, लग्नपूर्व संबंध किंवा मोबाईलवरती क्लिपा काढणे यावर आमचा आक्षेप नाहीच आहे, ( हा ज्याच्या त्याच्या प्राधान्यक्रमाचा वैयक्तिक प्रश्न आहे) पण तुमच्या जोडीदाराच्या परवानगीने हे उद्योग नको का करायला? साधी गोष्ट आहे ...नाहीतर मग हा सरळ बलात्काराचा गुन्हा ( आणि सायबर क्राईम) ठरतो.. अगदी खरं आहे! नाटक म्हणजे नुसते अभिनय आणि नेपथ्य प्रकाश असे असते का ? त्यातला विचार कोणापर्यंत कसा पोचतो हेही महत्त्वाचे आहे.... पूर्णत: सहमत आहे. ( ... मला जाणवते ते इतर कोणालाही आक्षेपार्ह वाटत नाही हे पाहून माझी सुरुवातीला फ़ार चिडचिड झाली , अजूनही आश्चर्य वाटते..त्यामुळेच हे एवढे लेखन..)... मास्तर, आपल्या मनातले विचार,तळमळ, चिडचिड आपण या निमित्ताने मनमोकळेपणाने मिपावर व्यक्त केलीत हे बरेच झाले! मिपा त्याकरताच आहे! अजूनही असेच आपल्या मनातील विचार मिपावर व्यक्त होऊ द्या, ही विनंती! अवांतर - या नाटकाशी संबंधित मंडळींनी हे लेखन आवर्जून वाचावे असे वाटते! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

राजे Tue, 05/13/2008 - 17:34
मास्तर, आपल्या मनातले विचार,तळमळ, चिडचिड आपण या निमित्ताने मनमोकळेपणाने मिपावर व्यक्त केलीत हे बरेच झाले! मिपा त्याकरताच आहे! अजूनही असेच आपल्या मनातील विचार मिपावर व्यक्त होऊ द्या, ही विनंती! सहमत १००% राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मनस्वी Tue, 05/13/2008 - 17:11
या एकांकीचे नाव "लिटल बॉय"?? काही आंतर महाविद्यालयीन एकांकीका खरंच दिव्य असतात. त्यांना दाखवून द्यायचे असते की - आम्ही किती सखोल / बदलत्या समाजानुरुप / परिस्थितीचा किती बारकाईने अभ्यास करतो / पुढच्या शतकाला शोभणारे (त्यांच्या मते) विचार कसे आत्ताच मांडू शकतो - काय देव जाणे!

In reply to by मनस्वी

मास्तर, एकांकिकेतील विषयाच्या बाबतीत आपल्या मताशी सहमत आहे. त्यांना दाखवून द्यायचे असते की - आम्ही किती सखोल / बदलत्या समाजानुरुप / परिस्थितीचा किती बारकाईने अभ्यास करतो / पुढच्या शतकाला शोभणारे (त्यांच्या मते) विचार कसे आत्ताच मांडू शकतो - एकदम बरोबर !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वेताळ Tue, 05/13/2008 - 18:10
जबरदस्ती करताना त्याचे भ्रमणध्वनी वर चलतचित्रण कसे काय करता येईल? आईला, माझा डो़क्याचा पार भुगा झाला आहे विचार करुन. एक तर तिला त्याची जबरदस्ती आवडली असावी म्हणुन तीने चित्रिकरणाला परवानगी दिली असावी. परंतु त्या चित्रिकरणा चा प्रसार फुकट अन तीच्या अनुमती शिवाय केल्याबद्दल तिला त्याचा राग आला असावा.मास्तर आपणास ह्या एकांकिकेच्या लेखक महाशयाचे नाव ठाउक आहे का? भेटुन चलतचित्रण कसे केले समजाउन घेतले असते. वेताळ.

मी पाहिली ती एकांकिका... आम्हाला आवडली होती पाहून...पण तेव्हा एवढा विचार नव्हता केला मी... असो...भडकमकरांचे विचार पटले .. अवांतर सूचना : या कॉलेजातल्या पोरांचं काय हो, इतके मनावर घेऊ नका सर...

शितल Tue, 05/13/2008 - 18:11
>> पण संवादातून असे स्पष्ट कळते की जबरदस्तीने आणि तिच्या नकळत त्याने हे सारे केले आहे. या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या .... मग हे दोन स्पष्ट मोठे गुन्हे झाले... एकदम सहमत. गुन्हाला शिक्षा ही आलीच. प्रियकर -प्रेयसीच्या नात्यात जबरदस्तीला स्थान असुच नये, त्यामुळे प्रेमाचे स्थान दुय्य्म होते, आणि मग त्यात वासना शिरल्यासारखी वाटते.

वेताळ Tue, 05/13/2008 - 18:52
ही एकांकिका सु(?)प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट वर बेतल्याची वाटते.तो प्रियकर व महेश भट्ट ह्याच्यात साम्य आढळते.तेही आपल्या सर्व चित्रपटात प्रेयसीला नैसर्गिक अवस्थेत लोकाना दाखवायला उत्सुक असतात. वेताळ.

In reply to by वेताळ

भडकमकर मास्तर Wed, 05/14/2008 - 00:08
तेही आपल्या सर्व चित्रपटात प्रेयसीला नैसर्गिक अवस्थेत लोकाना दाखवायला उत्सुक असतात. पण फरक इतकाच की ती नटी कोणते कपडे घालत आहे किंवा कोणते कपडे घालत नाहीये याची तिला पूर्ण कल्पना असते... मला वाटते, इथे तिच्या नकळत शूटिंग करणे हा विषय चालू आहे ,... असो...

चतुरंग Tue, 05/13/2008 - 19:18
एकांकिकेचे नाव द्यायला लेखक महाशय जरासे चुकले आहेत असे वाटते. नाव हवे होते 'सटल प्ले बॉय'! बाकी असल्या एकांकिका लिहिणारे आणि त्याला बक्षिसे वगैरे देणारे असल्यावर म्या पामराने बोलण्यासारखे काही नाही! चतुरंग

In reply to by चतुरंग

भडकमकर मास्तर Wed, 05/14/2008 - 00:01
'सटल प्ले बॉय'! =D> =D> =D> रंगदेवता आणि रसिकप्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सादर करत आहोत, एक काळाच्या पुढचं तरूणाईचं नाटक 'सटल प्ले बॉय'! टाळ्या टाळ्या.... :O) :O) :O)

प्रभाकर पेठकर Tue, 05/13/2008 - 20:16
श्री. भडकमकर मास्तर, आपल्या सर्व मतांशी मी सहमत आहे. प्रस्थापितांविरूद्ध बंड करणे म्हणजे 'मॉड' पणा हे समीकरण खूप जणांच्या डोक्यात असतं. त्याच मुळे प्रस्थापित संस्कार, नीतीमुल्ये पायदळी तुडवून नेमके त्या विरूद्ध वागणे म्हणजे आपले सुधारलेपण असे मानणारा गट असतो. ही एकांकिका अशा विकृत विचारांचेच अपत्य वाटते आहे. दोघे कितीही प्रेमात पडले तरीही आपल्या प्रेमसंबंधांचे, शरीर संबंधांचे 'चित्रीकरण' करणे मनाला पटत नाही. त्यातून जोडीदाराच्या नकळत, म्हणजेच फसवून, चित्रिकरण करणे गंभीर गुन्हाच मानला पाहीजे. असे चित्रीकरण चुकून स्प्रेड होण्यामागे बेजबाबदारपणा, बेफिकिरी आणि जोडीदाराविषयी अनादर तर दिसून येतोच पण 'प्रेम' ह्या उच्च संकल्पनेलाही पायदळी तुडविल्याचे दिसून येते. इथे हे कृत्य करणार्‍याच्या मनात 'प्रेमभावने'पेक्षा शरीरसंबंध, त्याचे चित्रीकरण आणि ते मिटक्या मारीत पाहणे, एंजॉय करणे ही विकृत भावना प्रकर्षाने दिसून येते. अशा माणसाला समजून घ्यायचे म्हणजे काय करायचे? कुठल्याही कोनातून हे कृत्य समर्थनीय वाटत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

भडकमकर मास्तर Wed, 05/14/2008 - 00:04
इथे हे कृत्य करणार्‍याच्या मनात 'प्रेमभावने'पेक्षा शरीरसंबंध, त्याचे चित्रीकरण आणि ते मिटक्या मारीत पाहणे, एंजॉय करणे ही विकृत भावना प्रकर्षाने दिसून येते. अशा माणसाला समजून घ्यायचे म्हणजे काय करायचे? कुठल्याही कोनातून हे कृत्य समर्थनीय वाटत नाही. काय बोललात काका...मस्त... B) B)

In reply to by प्रभाकर पेठकर

आंबोळी Wed, 05/14/2008 - 00:17
दोघे कितीही प्रेमात पडले तरीही आपल्या प्रेमसंबंधांचे, शरीर संबंधांचे 'चित्रीकरण' करणे मनाला पटत नाही. त्यातून जोडीदाराच्या नकळत, म्हणजेच फसवून, चित्रिकरण करणे गंभीर गुन्हाच मानला पाहीजे. असे चित्रीकरण चुकून स्प्रेड होण्यामागे बेजबाबदारपणा, बेफिकिरी आणि जोडीदाराविषयी अनादर तर दिसून येतोच पण 'प्रेम' ह्या उच्च संकल्पनेलाही पायदळी तुडविल्याचे दिसून येते. पेठकर साहेब तुमचे विचार योग्यच आहेत. आणि माझे त्याविषयी अजिबात दुमत नाही. तरी "प्रेमात पडल्यावर मला तर बाई जबरदस्तीच आवडते"(या वाक्याबद्दल मास्तराना दंडवत) च्या धरतीवर "ह्यानी केलेली जबरदस्ती ४ चौघाना दाखवल्यशिवाय मला बाई चैनच पडत नाही" अशी मानसिकता असेल तर कसला आलाय बेजबाबदारपणा, बेफिकिरी आणि अनादर? ही तर श्वान योनीची लक्षणे.(अधिक माहीतीसाठी भेटा अगर लिहा "धोंडोपंत"). बाकी भडकमकर मास्तरानी आपली केस एकदम स्ट्राँग उभी केली आहे..... त्यामुळे अता नाटक बघायला गेलो तरी ते मास्तरांच्या चष्म्यातूनच पाहीले जाणार..... असो. पण लोक ती एकांकीका पाहुन भारावले म्हन्जे कलाकारानी उत्तम काम करुन कथेतील उणिवा झाकण्यचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. फक्त ते भडकमकर मास्तराना नाही फसवू शकले.... (मास्तरांच्य क्लासचे नसणार..... पोरानो वेळीच क्लास लावला आसता तर अशी जाहीर चिरफाडीची वेळ नसती आली.....)

In reply to by आंबोळी

भडकमकर मास्तर Wed, 05/14/2008 - 00:35
बाकी भडकमकर मास्तरानी आपली केस एकदम स्ट्राँग उभी केली आहे..... त्यामुळे अता नाटक बघायला गेलो तरी ते मास्तरांच्या चष्म्यातूनच पाहीले जाणार..... असो. :)) :)) धन्यवाद.. पण लोक ती एकांकीका पाहुन भारावले म्हन्जे कलाकारानी उत्तम काम करुन कथेतील उणिवा झाकण्यचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. हे बाकी अगदी खरे... मी वर लिहिल्याप्रमाणे अभिनेते चांगलेच आहेत, नेपथ्य ,प्रकाश उत्तम... त्यामुळे मूळ कथेच्या आत न जाता वरवर सगळे झकासच वाटते.

वरदा Tue, 05/13/2008 - 23:31
माझे नशीब मी आज पर्यंत एक ही मराठी प्रायोगीक नाटक पाहीलेले नाही अगदी हेच वाटलं..काय वाट्टेल ते लिहितात का नाटक म्हणून? भडकमकर सर तुमच्याशी १०१ % सहमत.

अभिज्ञ Wed, 05/14/2008 - 01:37
माझे नशीब मी आज पर्यंत एक ही मराठी प्रायोगीक नाटक पाहीलेले नाही या एकाच नाटकावरून आपण सर्वच प्रायोगिक नाटकांबद्दल "वाइटच"असे मत कसे काय व्यक्त करु शकता? "प्रायोगिक" रंगभूमी वर असे प्रकार नवीन नाहित. खुद्द भडकमकर मास्तरांनाहि अशा प्रकारच्या वेगळ्य़ा वाटेच्या नाट्याचा मोह आवरलेला दिसत नाहि. बाकि पेठकर काकांनी मांडलेले मुद्दे पटतात. अभिनय वगैरे करणारी मंडळी चांगली होती, प्रयोग शिस्तशीर छान होता, नेपथ्य प्रकाशयोजना मस्त.. पण पाहताना सतत अस्वस्थ वाटत होते... गोष्ट अपूर्ण राहिली आहे असे वाटत होते. हे पटत नाहि.मुळात लेखकाचा पर्स्पे़क्टिव हा फक्त "घडणारी " घटना आणि त्यातून त्या नाट्याच्या "(खल)नायकाचि" कुचंबणा एव्हढाच असावा.आणि मुळात आदिने आपला गुन्हा /चुक मान्य केलीच आहे.त्यामुळे तो गुन्ह्याची शिक्षा भोगेलच हे प्रेक्षक समजून घेतील अशिही लेखकाचि धारणा असावि. त्यात त्याला वाईट्ट शिक्षा होताना दाखवणे हे जरा फिल्मी झाले असते. इथले परिक्षण हे फक्त विषयाच्या आशयावरच दिसते आहे. बा़किचे पैलु आपण शिताफीने टाळले आहेत असे वाटते. असो, एका गंभीर विषयावर इथे चांगलि व सकस चर्चा वाचायला मिळाली. अबब

In reply to by अभिज्ञ

भडकमकर मास्तर Wed, 05/14/2008 - 09:44
खुद्द भडकमकर मास्तरांनाहि अशा प्रकारच्या वेगळ्य़ा वाटेच्या नाट्याचा मोह आवरलेला दिसत नाहि. अबबराव, आम्ही कसले प्रायोगिक आणि वेगळी वाटवाले?? , दोन माणसं ग्राउंडवर बसून भाराभर बोलतात...यात काय प्रायोगिक आहे? उलट त्या ग्राऊंडवर उंट येतो आणि जोर्ज बुश येतो मग दोघे मिळून या हीरो हीरॊइनमध्ये फ़ूट पाडतात , मग एक कुत्रा आणि लिन्कनचा पुतळा येतो मग ते अणुबॊम्बच्या जन्मकथेबद्दल एका आदिमानवाला गोष्ट सांगतात...तोच कुत्रा खदाखदा हसत मी जिराफ असतो तर किती बरे झाले असते असे हीरोला सांगत असतानाच ते हीरो आणि हेरॊइन स्वप्नातून जागे होतात आणि तो तिला म्हणतो, " आज इकडे कुठे ताई?" मग ती म्हणते " थांब लक्ष्मी कुंकू लावते " मग सगळे लोक स्टेजवर येतात आणि चरखा चला चलाके लेंगे स्वराज लेंगे असे म्हणतात ...पडदा... असं असतं प्रायोगिक नाटक... आम्ही आपले असेच सामान्य .... इथले परिक्षण हे फक्त विषयाच्या आशयावरच दिसते आहे. बा़किचे पैलु आपण शिताफीने टाळले आहेत असे वाटते. जेव्हा मूळ गोष्टच पटत नाही तेव्हा बाकीचे कितीही चांगले असले तरी जे पटले नाही त्यावरच आम्ही बोलणार... शिवाय बाकीच्या गोष्टींची आम्ही ( शक्य तेवढी ) दोन शब्दांत स्तुती केलीच आहे... ( नुकत्याच समीक्षणाच्या क्लासहून आलोय ना..त्यामुळे जास्त कौतुक नाही...इव्हेंट मॅनेजमेंट वरून आलो असतो , तर लै कौतुक दिसले असते)

धनंजय Wed, 05/14/2008 - 02:49
मास्तरांचे विचार मग्न करायला लावतात. पैकी हा एक पूर्णच पटतो: > ४. जर्नालिझम शिकणारी स्ट्रॊंग मुलगी ऋता आदिला शेवटी सोडून जाते.... > ती एवढी सक्षम असती तर तो संबंध ठेवायला जबरदस्ती करतो हे एवढेच कारण > त्याला सोडायला पुरेसे नाही का? त्यासाठी क्लिप पसरायची वाट कशाला पहायला > पाहिजे? आणि समजा ती जबरदस्ती सौम्य होती "गुस्से में तुम और भी सुंदर लगती हो" श्टाईलची, तरीही ती चूकच. चित्रण नसते तर ही चूक ऋताच्या पाया पडून तिने माफ करण्यालायक होती-नव्हती हे ऋताने ठरवायचे. चित्रण करायचे होते तर ऋताची परवानगी आवश्यकच होती. क्लिप पसरली नसती, तरी ऋताने त्याला सोडण्यासाठी ही चित्रणाची बाब पुरेशी होती. परवानगी देण्यास हरकत असू शकते. नसूही शकते. हे पूर्ण ऋताच्यावर अवलंबून आहे. चित्रण ही काही अतिरेकी विकृत भावना नव्हे. छोटे-छोटे कॅमेरे नव्हते तेव्हापासून कुंचलेबहाद्दर चित्रकार आपल्या प्रेयसींची नग्न रूपे चित्रित करतच होते. खजुराहे किंवा कोणार्कच्या सूर्यमंदिरावर संभोगाची शिल्पे कोरणारे बहुधा आपल्या अनुभवालाच शिल्पित करत होते. पण हे सर्व अवांतर आहे, कारण (१) जबरदस्ती झाली, आणि (२) विनापरवानगी चित्रण झाले. एवढ्यावरच नैतिक घात झाला आहे. चित्रण पसरले हा मुद्दा नैतिकदृष्ट्या गौण आहे, पण कथानकाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. अति-अवांतर : स्वतःवर जबरदस्ती होण्यात कोणाला लैगिक सुख मिळत असेल, तर ती केलेली "जबरदस्ती" केवळ नाटक असते. अशा परिस्थितीत भाषा ही कुचकामी ठरते, कारण या नाटकात "थांब, थांब" किंवा "नको, नको" हे त्या नाटकातले संवाद असतात. अशी आवड असणार्‍यांनी सुरुवातीला "काही ठेवणीतले शब्द नाटकाबाहेरचे, खर्‍या अर्थाचे आहेत" हे आपापसात ठरवलेले बरे. नव्हे, आवश्यक. या सेफवर्ड=सुरक्षित शब्दांबाबत विकिपीडियाचा दुवा.

मन Wed, 05/14/2008 - 03:13
चित्रण करायचे होते तर ऋताची परवानगी आवश्यकच होती. म्हणजे काय? (क्षणभरासाठी समजा की परवानगी देण्याइतकी ती येडी आहे.)तिची परवानगी असेल तरी असं करणं बरोबर वाटत नाही. जानेवारी २००६ मध्ये एका मराठवाड्यातल्याच एका कॉलेजची अशी केस उघड झाली होती. बातमी सगळीकडे(क्लिप सहीत) दाखवली गेली""सबसे तेज " वाहिनी वर. तेव्हा जी काही फौजदारी केस झाली, त्यानुसार चोउकशीला आलेल्या पोलिसांनी सांगितलं की, एखाद्या जोडप्याने दोघांची संमती असतानाही अशी क्लिप बनवुन वितरीत केली, तरी तो दखल्पात्र गुन्हा आहे. स्वतः फौज दाराने त्या संस्थाप्रमुखाला सांगितले होते.(आम्ही काही फुटांवरुन ऐकत होतो.) तस्मात्, अशी क्लिप बनविणे सध्या फौजदारी गुन्हा आहे. (सदर मुलगा-मुलगी दोघांची संमती असे चित्रण होउ देण्यास असतानाही) (ज्या कलमाखाली पॉर्न/अश्लील चित्रपटांना शिक्शा आहे, तेच कलम इथेही लागु होइल. व सदर मुलगा, मुलगी ह्यांना ती शिक्षा होइल;) आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

In reply to by मन

भडकमकर मास्तर Wed, 05/14/2008 - 09:02
एखाद्या जोडप्याने दोघांची संमती असतानाही अशी क्लिप बनवुन वितरीत केली, तरी तो दखल्पात्र गुन्हा आहे. वितरित झाली की गुन्हा झालाच हो, पण वितरित व्हायच्या आधी ??

धनंजय Wed, 05/14/2008 - 05:11
विकृत मनोवृत्तीचे सिनेमात किंवा नाटकात सहानुभूतीपूर्वक चित्रण करणे थोडे धाडसी असते. नाटककार-दिग्दर्शक-अभिनेता यथातथाच असला तर विकृत मनोवृत्तीचे ते अनैतिक पात्र प्रेक्षकाला केवळ राक्षसच वाटते. त्यात काही नवीन जाणीव नाही. उत्कृष्ट नाटककार-दिग्दर्शक-कलाकार विकृत किंवा दुष्ट पात्रही मनुष्य म्हणून सहानुभूतीच्या योग्य दाखवू शकतो. लेडी मॅक्बेथला राक्षसीण म्हणून दाखवण्यात काय खास? पण एखादी तोडीची अभिनेत्री या खुनशी बाईला अशी काही वठवते, की आपल्याला तात्पुरता तिचा राजद्रोह, पतीची चिथवणी पटायला लागते. प्रेक्षक विचारी असला, तर त्याला ही नवी अनुभूती मोठी भयानक असते. शेक्स्पियर+दिग्दर्शक+अभिनेत्री आपल्याला जाणीव करून देतात, की आपल्यातही तो दुष्टपणा दडलेला आहे. आपल्याकडून झालेल्या पापांचे आपण असेच समर्थन करत असले पाहिजेत. या खुनशी बाईबद्दल सहानुभूती वाटते, तर स्वतःच्या बारीकसारीक पातकांची आपण काय सारवासारव करत असू, हा विचार स्तिमित करतो. विकृत लैंगिक वृत्ती आणि जबरदस्तीबद्दल एक चित्रपट मला असाच हेलकावून गेला - तो होता Talk to her (स्पॅनिशमध्ये) Hable con ella. (आय एम डी बी दुवा, सोनी पिक्चर्स दुवा-इंग्रजी) दोन कोमामध्ये बेशुद्ध स्त्रिया आणि दोन पुरुष यांच्याबद्दल ही कथा आहे. एक पुरुष पत्रकार आहे, आणि त्याचे बेशुद्ध पडलेल्या एका प्रसिद्ध बैल-झुंजवणारीवर प्रेम आहे. दुसरा पुरुष परिचारक (दवाखान्यातला मदतनीस) आहे, आणि बेशुद्ध पडलेल्या आपल्या तरुण शेजारणीवर त्याचे प्रेम आहे. शुद्धीवर असताना पैकी कुठल्याही बाईने त्या-त्या पुरुषावर अनुग्रह केला नव्हता, पण त्या होकार द्यायच्या मार्गावर होत्या, असा त्या दोघा पुरुषांनी आपापला गैरसमज करून घेतला होता. पत्रकाराचे वागणे कायद्यास धरून, कोणीही सभ्य म्हणेल असेच आहे. परिचारक मात्र बेशुद्ध स्त्रीशी संभोग करतो (कुठल्याही कायद्यात हा बलात्कारच). पुढे याला अटक होते आणि तुरुंगात तो आत्महत्या करतो. (म्हणजे लिटल बॉय नाटकापेक्षा इतकेतरी बरे...) पण त्याच्याबद्दल आपल्याला कमालीची सहानुभूती वाटू लागते. तो सभ्य पत्रकार मनातून जे करत असतो, तो हा विकृत मनुष्य शरिराने करतो. हा चित्रपट बघून स्पष्ट नैतिकता विरुद्ध माणसाच्या विकृत स्वभावाबद्दल सह-अनुभूती वाटून मन अगदी कसावीस झाले होते. त्यामुळे "लिटल बॉय"ने प्रयत्न करण्यात काही वावगे नाही, असे मला वाटते. नैतिकतेची ही परीक्षा पेलू शकणारा प्रेक्षकही धाडसी हवा, नाटककारही धाडसी हवा. असल्या हलाहलाचा खेळ करून दाखवायचा असेल, तर दिग्दर्शन-नेपथ्य उत्तम हवेच.

In reply to by धनंजय

भडकमकर मास्तर Wed, 05/14/2008 - 09:27
त्यामुळे "लिटल बॉय"ने प्रयत्न करण्यात काही वावगे नाही, असे मला वाटते. नैतिकतेची ही परीक्षा पेलू शकणारा प्रेक्षकही धाडसी हवा, नाटककारही धाडसी हवा. असल्या हलाहलाचा खेळ करून दाखवायचा असेल, तर दिग्दर्शन-नेपथ्य उत्तम हवेच. असला खेळ लिटल बॉय ला दाखवायचा असता तर मला फार आवडले असते...पण गंमत अशी की हे लोक "तो वाईट नाहीच, त्याच्याकडून एक छोटीशी चूक घडलेली आहे " या गोष्टीपलिकडे जायला तयार नाहीत.... असा खेळ दाखवायला आधी आपले पात्र कसे आहे , कितपत वाईट आहे, दुष्ट आहे, हे ऍक्सेप्ट करणे आवश्यक आहे, एकदा विषय धाडसी निवडल्यानन्तर मग पुन्हा मागे जाण्यात अर्थ नाही, ( तो चांगलाय, चांगलाय, मला समजून घ्या वगैरे)...त्यामुळेच विचार करणार्‍या प्रेक्षकाला आदिला इतरांनी सहानुभूती देण्याचे कारण कळत नाही... त्याच्या चुका काय आहेत हे तरी त्यांना क्लीअर नको का...क्लिप स्प्रेड होणे यापलिकडे त्यांना आदिची चूक वाटत नाही, हा माझा मुख्य आक्षेप आहे..... निदान त्याला एखाद्या पात्राने त्याच्या महत्त्वाच्या चुकांची ( १.जबरदस्ती + २.नकळत चित्रण) जाणीव तरी करून देणे आवश्यक होते....तेही नाही... (हे लोक पात्राला सहानुभूती अशी देत होते की जणू १. चित्रण भलत्यानेच केले आहे, दोघांच्या नकळत आणि मग क्लिप स्प्रेड झाली आहे. २. याने जबरदस्ती केली नाही... दोन कन्सेंटिंग ऍडल्ट्स मधलं मॅटर ....).... त्यामुळे आपण म्हणता त्याप्रमाणे स्पष्ट नैतिकता विरुद्ध माणसाच्या विकृत स्वभावाबद्दल सह-अनुभूती , असा गंभीर विषय त्यांना दाखवायचा नसावा, आणि मनात असले तरी झेपला नसावा असे मला वाटते..

वाचक Wed, 05/14/2008 - 08:19
वेगळ्या दृष्टीकोनातून पहायचा प्रयत्न करत आहे - समर्थन / उदात्तीकरण / विद्रोह वगैरे काहीही नाही. मास्तरानींच म्हंट्ल्याप्रमाणे 'कॉलेज तरूण क्लिप च्या प्रकारा सरावलेले दिसले' म्हणजेच 'ऋता' चाही त्या गोष्टीला विषेश आक्षेप असणार नाही. जबरदस्ती वर तिची मते काय आहेत हे इतरत्र मांडलेले नाही / मला अंदाज करता येत नाही. संशयाचा फायदा द्यायचाच झाला तर 'त्यावेळी तू असे वागायला नको होते पण तारुण्याच्या उन्मादात असे घडून गेले - असो' असेही एक मत असू शकते. त्यामुळे ह्या 'सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम' म्हणून ऋता त्याला सोडून गेली असे मी मानतो. वर सांगितल्या प्रमाणे सगळे मित्र सोडून गेले, प्रेयसी सोडून गेली आणि सगळीकडे बदनामी (?) झाली. कायद्यानुसार गुन्हा दाखल होउ शकतो की नाही हा मुद्दा बाजूला ठेवला घटकाभर तर 'शिक्षा' झालेलीच आहे ना त्याला... किंवा शेवट प्रेक्षकांवर सुद्धा सोडला असेल....

आनंदयात्री Tue, 05/13/2008 - 16:16
ती एवढी सक्षम असती तर तो संबंध ठेवायला जबरदस्ती करतो हे एवढेच कारण त्याला सोडायला पुरेसे नाही का? नाही कारण वर लेखात म्हटल्याप्रमाणे ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत, हा सोडुन बाकी मुद्यांशी सहमत.

In reply to by आनंदयात्री

भडकमकर मास्तर Tue, 05/13/2008 - 16:50
दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत म्हणून केली गेलेली जबरदस्ती दुर्लक्षणीय ठरते?मला नाही वाटत... उलट लग्नापूर्वी हा भाई असा वागतो, माझ्या मतांना याच्या लेखी काडीची किंमत नाही, तर नंतर कसा वागेल...असा विचार येऊन मी असल्या बॉयफ्रेंडला अगदी लई वेळा लाथ घातली असती... ... असो... मात्र "प्रेमात पडल्यावर मला तर बाई जबरदस्तीच आवडते" असं मानण्याचा एखाद्या व्यक्तीला पूर्ण अधिकार आहे, तिच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा माझा हेतू नाही... ( स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता) भडकमकर

ऋचा Tue, 05/13/2008 - 16:35
प्रेम म्हणजे जबरदस्ती नाही. आणि जर त्यांचं प्रेम होतं तर त्यात जबरदस्ती येऊच नये.

धमाल मुलगा Tue, 05/13/2008 - 16:56
गेली कित्येक वर्षं आम्ही असा येक बाळबोध विचार मनी धरून होतो की हे असे विषय ही समांतर आणि विद्रोही वाल्यांची मक्तेदारी आहे. तिथे विकृत मनोवृत्तीचं उदात्तिकरण केलेलं चालतं, भडक भावना रंगवून रंजक(!) करण्याची हातोटीही तिकडचीच. मागे एकदा, स्पर्धेसाठी करावी म्हणून एक एकांकिका (नाव आठवत नाही आता..) वाचली आणि झीट येऊन पडलो. त्यात एक चौकोनी कुटुंब असतं, बाप चिक्कार पैसा मिळवायला आखातात गेलेला, आई पार्ट्या झोडत हिंडतेय, आणि लफडी करतही... एकदा तो प्रकार त्यांची मुलगी पाहते आणि सुरुवातीला रडते, मग भावाशी बोलते...त्यांचे आधूनिक विचार ऐकून आपण अश्मयुगिन असल्याची भावना वाढीस लागते...तिथेच ब्लॅक आउट ची कंसातली सुचना..आणि मग दोघं बहिण-भाऊ भेसुर चेहर्‍याने एकमेकांकडे पाहताहेत....कारण काय तर बंधूंनी हा आधुनिक विचार बहिणीला फारच सखोल समजावलेला असतो.... मग हे घरी कळणं...एकमेकांना दोष देणं...आणि प्रत्येकानं आपापल्या भूमिकेचं समर्थन करणं........ धन्य झालो होतो वाचूनच...करायला घ्यायची हिंमतच नाही झाली! त्यापुढे हे लिटिल बॉय तर काय चीज आहे हो?

In reply to by भडकमकर मास्तर

इनोबा म्हणे Tue, 05/13/2008 - 17:13
धमाल्या , आम्हाला आपली नुसती झलक वाचूनच झीट आली... बाप रे... याच्यापुढे अगदीच लिटील बॉय आहे ही म्हणजे.... हेच म्हणतो.... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

धमाल मुलगा Tue, 05/13/2008 - 17:38
मास्तर, इनोबा, तो लेखक इतका भारी होता, की बरेच दिवस त्याचे ते विचार डोक्यात घोळत होते! अतिरेक्यांना जसं धार्मिक शिक्षण देऊन ब्रेनवॉशिंग केलं जातं तसं काहीसं व्हायला लागलं होतं...नशीब, लवकर डोकं ताळ्यावर आलं नाहीतर जनावरात जमा व्हायची लक्षणं दिसायला लागली होती. पण काय साल्यानं ठासून मुद्दे मांडले होते...आठवलं तरी आता गरगरायला होतं

In reply to by धमाल मुलगा

राजे Tue, 05/13/2008 - 17:43
लवकर डोकं ताळ्यावर आलं नाहीतर जनावरात जमा व्हायची लक्षणं दिसायला लागली होती. 8} माझे नशीब मी आज पर्यंत एक ही मराठी प्रायोगीक नाटक पाहीलेले नाही ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

धमाल मुलगा Tue, 05/13/2008 - 17:52
राजे... सुखी आहात.... हल्ली प्रायोगिक च्या नावाखाली काय काय चाललंय ह्याची सुदैवानं मलाही फारशी कल्पना नाही! आणि दुर्दैवानं माझी प्रायोगिकची खाज परत जोर धरायला लागली आहे...त्यात असं माझ्या डोक्याला सारखं तोच तो विचार देऊन तेल ओतायचं काम आमचे भडकमकर मास्तर मोठ्या नेटानं करताहेत.... मराठी रंगभूमीचं दुर्दैव, दुसरं काय !!! (हे दुर्दैव आम्ही स्वतःच्या अस्तित्वाबद्दल म्हणतोय, मास्तरांचं काम बरंच उत्तम आणि मोठं आहे. त्यांचा आणि ह्या दुर्दैवाचा काडीमात्र संबंध लावण्यात येऊ नये, ही विनंती)

In reply to by धमाल मुलगा

मन Tue, 05/13/2008 - 21:05
"राजा ओयदीपौस"(राजा एडिपस) ह्या नाटकाची. काय धमाल्या, आठवतय ना? नै, रंगभुमेवर वावरलेला दिसतोस, म्हणुन विचारतोय.(त्याविषयी ह्या "सभ्य" लोकांत बोलायची हिम्मत होत नाहिये.) आणि हो. ही असलीच घटना एम.पी मध्ये एका आदिवासी टोळक्यात प्रत्यक्षात घडली होती(५-७ वर्षं झाली असतील आता.). मुळात "वंश शुद्धी" टिकावी म्हणुन केवळ स्वतःच्या सख्ख्या नातलगांपासुनच अपत्य प्राप्ती करण्याची प्रथा काही "शाक्य" कुळात फार पुर्विपासुन होती.(अपत्य प्राप्ती मुख्यत्वे "भाउ-बहीण" ह्यातुन व्हायची.)(गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील अनेक कुळांपैकी एकाचा युवराज होता.) त्यानंतर ती भारतात(विशेषतः पुर्व आणि मध्य भारतात आणि नेपाळ मध्ये) कित्येक राज घराणी पाळत होती. (रामायणाच्या तिबेटी व्हर्जन मध्ये सीतेला रामाची बहीण व पत्नी मानतात!!) ह्या गधड्यांना धड नाटक रचण्याची अक्कल नाहीये. आजकाल कोणीही मनुष्य असे जनावरासारखे आचरण करणार नाही. पण ह्या बिनडोकांना तथाकथित "ज्वलंत" विषय मांडुन प्रसिद्धी मिळवायची (विरोध का असेना लोकांचा पण ती दीपा मेहता नाही का प्रसिद्ध झाली "फायर " वगैरे मधुन.) होती, तर नीट "चुझ" तरी करायला हवी होती मांडणी. म्हणजे, भारतिय इतिहासाचा दाखला दिला तर ह्यांना निदान पाठिंबा देणारी तीन्-चार तथाकथित पुरोगामी टाळकी तरी मिळाली असती.निदान माझा सल्ला घ्यायचा ह्यांनी की फुकटात बोंबाबोंब करण्याचे हम्खास मार्ग कुठले आहेत ह्याबद्दल... आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

In reply to by मन

आंबोळी Wed, 05/14/2008 - 14:41
मुळात "वंश शुद्धी" टिकावी म्हणुन केवळ स्वतःच्या सख्ख्या नातलगांपासुनच अपत्य प्राप्ती करण्याची प्रथा काही "शाक्य" कुळात फार पुर्विपासुन होती.(अपत्य प्राप्ती मुख्यत्वे "भाउ-बहीण" ह्यातुन व्हायची.)(गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील अनेक कुळांपैकी एकाचा युवराज होता.) त्यानंतर ती भारतात(विशेषतः पुर्व आणि मध्य भारतात आणि नेपाळ मध्ये) कित्येक राज घराणी पाळत होती. (रामायणाच्या तिबेटी व्हर्जन मध्ये सीतेला रामाची बहीण व पत्नी मानतात!!) आयला असला प्रकार भारतात होता हे नविनच ऐकतोय..... रोमच्या राजघराण्यात हे प्रकार शुध्ध रक्तासाठी चालत असे ऐकले होते. पण असेच प्रकार भारतात असल्याचे इतके दिवस ऐकीवात नाही. व्यासानी जग उष्ट केल पण या प्रकाराला तोंड लावले नाही त्याअर्थी हा प्रकार भारतात नसावा असे वाटते. मिपावरील इतिहासतज्ञ यावर प्रकाश टाकतील काय?

In reply to by आंबोळी

मन Wed, 05/14/2008 - 15:41
थोडासा आठवतोय तो असा:- रं. ना गायधनी ह्यांचे "यु पी एस सी"साठी वापरण्यात येणारे "प्राचीन भारताचा इतिहास" ह्यात तेवढा इतिहास्स थोड्क्यात दिलाय. ही पद्धत मुख्यत्वे होती तो भागः- नेपाळ्,तिबेट्,त्यांच्या सीमेलगतचा आजच्या भारतातील भाग(मुख्यत्वे छोटी छोटी राज्ये आणि काही गणराज्ये) षोडश् महाजन पदांपैकी इतरांचा ह्या प्रथेला कठोर विरोध होता. (पुढे त्यांचेच म्हणणे टिकले, आणि ह्या प्रथा जवळ जवळ संपुर्ण बंद झाल्या.) हवं तर ह्यासाठी इतिहास वाल्या मंडळींनी नवीन धागा सुरु करावा. (नक्क्की आठवत नाहिये, पण यम्-यमी का असलीच कुठलितरी आणखी एक भारतीय आख्यायिका तिबेट मध्ये नवरा-बायको हे नातेही धारण करते.(जी आपल्याकडे भाउ-बहीण आहे.) ) आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 17:04
नमस्कार मास्तर, परिक्षणवजा लेख खूप चांगला वाटला. अहो नाही हो, लग्नपूर्व संबंध किंवा मोबाईलवरती क्लिपा काढणे यावर आमचा आक्षेप नाहीच आहे, ( हा ज्याच्या त्याच्या प्राधान्यक्रमाचा वैयक्तिक प्रश्न आहे) पण तुमच्या जोडीदाराच्या परवानगीने हे उद्योग नको का करायला? साधी गोष्ट आहे ...नाहीतर मग हा सरळ बलात्काराचा गुन्हा ( आणि सायबर क्राईम) ठरतो.. अगदी खरं आहे! नाटक म्हणजे नुसते अभिनय आणि नेपथ्य प्रकाश असे असते का ? त्यातला विचार कोणापर्यंत कसा पोचतो हेही महत्त्वाचे आहे.... पूर्णत: सहमत आहे. ( ... मला जाणवते ते इतर कोणालाही आक्षेपार्ह वाटत नाही हे पाहून माझी सुरुवातीला फ़ार चिडचिड झाली , अजूनही आश्चर्य वाटते..त्यामुळेच हे एवढे लेखन..)... मास्तर, आपल्या मनातले विचार,तळमळ, चिडचिड आपण या निमित्ताने मनमोकळेपणाने मिपावर व्यक्त केलीत हे बरेच झाले! मिपा त्याकरताच आहे! अजूनही असेच आपल्या मनातील विचार मिपावर व्यक्त होऊ द्या, ही विनंती! अवांतर - या नाटकाशी संबंधित मंडळींनी हे लेखन आवर्जून वाचावे असे वाटते! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

राजे Tue, 05/13/2008 - 17:34
मास्तर, आपल्या मनातले विचार,तळमळ, चिडचिड आपण या निमित्ताने मनमोकळेपणाने मिपावर व्यक्त केलीत हे बरेच झाले! मिपा त्याकरताच आहे! अजूनही असेच आपल्या मनातील विचार मिपावर व्यक्त होऊ द्या, ही विनंती! सहमत १००% राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मनस्वी Tue, 05/13/2008 - 17:11
या एकांकीचे नाव "लिटल बॉय"?? काही आंतर महाविद्यालयीन एकांकीका खरंच दिव्य असतात. त्यांना दाखवून द्यायचे असते की - आम्ही किती सखोल / बदलत्या समाजानुरुप / परिस्थितीचा किती बारकाईने अभ्यास करतो / पुढच्या शतकाला शोभणारे (त्यांच्या मते) विचार कसे आत्ताच मांडू शकतो - काय देव जाणे!

In reply to by मनस्वी

मास्तर, एकांकिकेतील विषयाच्या बाबतीत आपल्या मताशी सहमत आहे. त्यांना दाखवून द्यायचे असते की - आम्ही किती सखोल / बदलत्या समाजानुरुप / परिस्थितीचा किती बारकाईने अभ्यास करतो / पुढच्या शतकाला शोभणारे (त्यांच्या मते) विचार कसे आत्ताच मांडू शकतो - एकदम बरोबर !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वेताळ Tue, 05/13/2008 - 18:10
जबरदस्ती करताना त्याचे भ्रमणध्वनी वर चलतचित्रण कसे काय करता येईल? आईला, माझा डो़क्याचा पार भुगा झाला आहे विचार करुन. एक तर तिला त्याची जबरदस्ती आवडली असावी म्हणुन तीने चित्रिकरणाला परवानगी दिली असावी. परंतु त्या चित्रिकरणा चा प्रसार फुकट अन तीच्या अनुमती शिवाय केल्याबद्दल तिला त्याचा राग आला असावा.मास्तर आपणास ह्या एकांकिकेच्या लेखक महाशयाचे नाव ठाउक आहे का? भेटुन चलतचित्रण कसे केले समजाउन घेतले असते. वेताळ.

मी पाहिली ती एकांकिका... आम्हाला आवडली होती पाहून...पण तेव्हा एवढा विचार नव्हता केला मी... असो...भडकमकरांचे विचार पटले .. अवांतर सूचना : या कॉलेजातल्या पोरांचं काय हो, इतके मनावर घेऊ नका सर...

शितल Tue, 05/13/2008 - 18:11
>> पण संवादातून असे स्पष्ट कळते की जबरदस्तीने आणि तिच्या नकळत त्याने हे सारे केले आहे. या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या .... मग हे दोन स्पष्ट मोठे गुन्हे झाले... एकदम सहमत. गुन्हाला शिक्षा ही आलीच. प्रियकर -प्रेयसीच्या नात्यात जबरदस्तीला स्थान असुच नये, त्यामुळे प्रेमाचे स्थान दुय्य्म होते, आणि मग त्यात वासना शिरल्यासारखी वाटते.

वेताळ Tue, 05/13/2008 - 18:52
ही एकांकिका सु(?)प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट वर बेतल्याची वाटते.तो प्रियकर व महेश भट्ट ह्याच्यात साम्य आढळते.तेही आपल्या सर्व चित्रपटात प्रेयसीला नैसर्गिक अवस्थेत लोकाना दाखवायला उत्सुक असतात. वेताळ.

In reply to by वेताळ

भडकमकर मास्तर Wed, 05/14/2008 - 00:08
तेही आपल्या सर्व चित्रपटात प्रेयसीला नैसर्गिक अवस्थेत लोकाना दाखवायला उत्सुक असतात. पण फरक इतकाच की ती नटी कोणते कपडे घालत आहे किंवा कोणते कपडे घालत नाहीये याची तिला पूर्ण कल्पना असते... मला वाटते, इथे तिच्या नकळत शूटिंग करणे हा विषय चालू आहे ,... असो...

चतुरंग Tue, 05/13/2008 - 19:18
एकांकिकेचे नाव द्यायला लेखक महाशय जरासे चुकले आहेत असे वाटते. नाव हवे होते 'सटल प्ले बॉय'! बाकी असल्या एकांकिका लिहिणारे आणि त्याला बक्षिसे वगैरे देणारे असल्यावर म्या पामराने बोलण्यासारखे काही नाही! चतुरंग

In reply to by चतुरंग

भडकमकर मास्तर Wed, 05/14/2008 - 00:01
'सटल प्ले बॉय'! =D> =D> =D> रंगदेवता आणि रसिकप्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सादर करत आहोत, एक काळाच्या पुढचं तरूणाईचं नाटक 'सटल प्ले बॉय'! टाळ्या टाळ्या.... :O) :O) :O)

प्रभाकर पेठकर Tue, 05/13/2008 - 20:16
श्री. भडकमकर मास्तर, आपल्या सर्व मतांशी मी सहमत आहे. प्रस्थापितांविरूद्ध बंड करणे म्हणजे 'मॉड' पणा हे समीकरण खूप जणांच्या डोक्यात असतं. त्याच मुळे प्रस्थापित संस्कार, नीतीमुल्ये पायदळी तुडवून नेमके त्या विरूद्ध वागणे म्हणजे आपले सुधारलेपण असे मानणारा गट असतो. ही एकांकिका अशा विकृत विचारांचेच अपत्य वाटते आहे. दोघे कितीही प्रेमात पडले तरीही आपल्या प्रेमसंबंधांचे, शरीर संबंधांचे 'चित्रीकरण' करणे मनाला पटत नाही. त्यातून जोडीदाराच्या नकळत, म्हणजेच फसवून, चित्रिकरण करणे गंभीर गुन्हाच मानला पाहीजे. असे चित्रीकरण चुकून स्प्रेड होण्यामागे बेजबाबदारपणा, बेफिकिरी आणि जोडीदाराविषयी अनादर तर दिसून येतोच पण 'प्रेम' ह्या उच्च संकल्पनेलाही पायदळी तुडविल्याचे दिसून येते. इथे हे कृत्य करणार्‍याच्या मनात 'प्रेमभावने'पेक्षा शरीरसंबंध, त्याचे चित्रीकरण आणि ते मिटक्या मारीत पाहणे, एंजॉय करणे ही विकृत भावना प्रकर्षाने दिसून येते. अशा माणसाला समजून घ्यायचे म्हणजे काय करायचे? कुठल्याही कोनातून हे कृत्य समर्थनीय वाटत नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

भडकमकर मास्तर Wed, 05/14/2008 - 00:04
इथे हे कृत्य करणार्‍याच्या मनात 'प्रेमभावने'पेक्षा शरीरसंबंध, त्याचे चित्रीकरण आणि ते मिटक्या मारीत पाहणे, एंजॉय करणे ही विकृत भावना प्रकर्षाने दिसून येते. अशा माणसाला समजून घ्यायचे म्हणजे काय करायचे? कुठल्याही कोनातून हे कृत्य समर्थनीय वाटत नाही. काय बोललात काका...मस्त... B) B)

In reply to by प्रभाकर पेठकर

आंबोळी Wed, 05/14/2008 - 00:17
दोघे कितीही प्रेमात पडले तरीही आपल्या प्रेमसंबंधांचे, शरीर संबंधांचे 'चित्रीकरण' करणे मनाला पटत नाही. त्यातून जोडीदाराच्या नकळत, म्हणजेच फसवून, चित्रिकरण करणे गंभीर गुन्हाच मानला पाहीजे. असे चित्रीकरण चुकून स्प्रेड होण्यामागे बेजबाबदारपणा, बेफिकिरी आणि जोडीदाराविषयी अनादर तर दिसून येतोच पण 'प्रेम' ह्या उच्च संकल्पनेलाही पायदळी तुडविल्याचे दिसून येते. पेठकर साहेब तुमचे विचार योग्यच आहेत. आणि माझे त्याविषयी अजिबात दुमत नाही. तरी "प्रेमात पडल्यावर मला तर बाई जबरदस्तीच आवडते"(या वाक्याबद्दल मास्तराना दंडवत) च्या धरतीवर "ह्यानी केलेली जबरदस्ती ४ चौघाना दाखवल्यशिवाय मला बाई चैनच पडत नाही" अशी मानसिकता असेल तर कसला आलाय बेजबाबदारपणा, बेफिकिरी आणि अनादर? ही तर श्वान योनीची लक्षणे.(अधिक माहीतीसाठी भेटा अगर लिहा "धोंडोपंत"). बाकी भडकमकर मास्तरानी आपली केस एकदम स्ट्राँग उभी केली आहे..... त्यामुळे अता नाटक बघायला गेलो तरी ते मास्तरांच्या चष्म्यातूनच पाहीले जाणार..... असो. पण लोक ती एकांकीका पाहुन भारावले म्हन्जे कलाकारानी उत्तम काम करुन कथेतील उणिवा झाकण्यचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. फक्त ते भडकमकर मास्तराना नाही फसवू शकले.... (मास्तरांच्य क्लासचे नसणार..... पोरानो वेळीच क्लास लावला आसता तर अशी जाहीर चिरफाडीची वेळ नसती आली.....)

In reply to by आंबोळी

भडकमकर मास्तर Wed, 05/14/2008 - 00:35
बाकी भडकमकर मास्तरानी आपली केस एकदम स्ट्राँग उभी केली आहे..... त्यामुळे अता नाटक बघायला गेलो तरी ते मास्तरांच्या चष्म्यातूनच पाहीले जाणार..... असो. :)) :)) धन्यवाद.. पण लोक ती एकांकीका पाहुन भारावले म्हन्जे कलाकारानी उत्तम काम करुन कथेतील उणिवा झाकण्यचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. हे बाकी अगदी खरे... मी वर लिहिल्याप्रमाणे अभिनेते चांगलेच आहेत, नेपथ्य ,प्रकाश उत्तम... त्यामुळे मूळ कथेच्या आत न जाता वरवर सगळे झकासच वाटते.

वरदा Tue, 05/13/2008 - 23:31
माझे नशीब मी आज पर्यंत एक ही मराठी प्रायोगीक नाटक पाहीलेले नाही अगदी हेच वाटलं..काय वाट्टेल ते लिहितात का नाटक म्हणून? भडकमकर सर तुमच्याशी १०१ % सहमत.

अभिज्ञ Wed, 05/14/2008 - 01:37
माझे नशीब मी आज पर्यंत एक ही मराठी प्रायोगीक नाटक पाहीलेले नाही या एकाच नाटकावरून आपण सर्वच प्रायोगिक नाटकांबद्दल "वाइटच"असे मत कसे काय व्यक्त करु शकता? "प्रायोगिक" रंगभूमी वर असे प्रकार नवीन नाहित. खुद्द भडकमकर मास्तरांनाहि अशा प्रकारच्या वेगळ्य़ा वाटेच्या नाट्याचा मोह आवरलेला दिसत नाहि. बाकि पेठकर काकांनी मांडलेले मुद्दे पटतात. अभिनय वगैरे करणारी मंडळी चांगली होती, प्रयोग शिस्तशीर छान होता, नेपथ्य प्रकाशयोजना मस्त.. पण पाहताना सतत अस्वस्थ वाटत होते... गोष्ट अपूर्ण राहिली आहे असे वाटत होते. हे पटत नाहि.मुळात लेखकाचा पर्स्पे़क्टिव हा फक्त "घडणारी " घटना आणि त्यातून त्या नाट्याच्या "(खल)नायकाचि" कुचंबणा एव्हढाच असावा.आणि मुळात आदिने आपला गुन्हा /चुक मान्य केलीच आहे.त्यामुळे तो गुन्ह्याची शिक्षा भोगेलच हे प्रेक्षक समजून घेतील अशिही लेखकाचि धारणा असावि. त्यात त्याला वाईट्ट शिक्षा होताना दाखवणे हे जरा फिल्मी झाले असते. इथले परिक्षण हे फक्त विषयाच्या आशयावरच दिसते आहे. बा़किचे पैलु आपण शिताफीने टाळले आहेत असे वाटते. असो, एका गंभीर विषयावर इथे चांगलि व सकस चर्चा वाचायला मिळाली. अबब

In reply to by अभिज्ञ

भडकमकर मास्तर Wed, 05/14/2008 - 09:44
खुद्द भडकमकर मास्तरांनाहि अशा प्रकारच्या वेगळ्य़ा वाटेच्या नाट्याचा मोह आवरलेला दिसत नाहि. अबबराव, आम्ही कसले प्रायोगिक आणि वेगळी वाटवाले?? , दोन माणसं ग्राउंडवर बसून भाराभर बोलतात...यात काय प्रायोगिक आहे? उलट त्या ग्राऊंडवर उंट येतो आणि जोर्ज बुश येतो मग दोघे मिळून या हीरो हीरॊइनमध्ये फ़ूट पाडतात , मग एक कुत्रा आणि लिन्कनचा पुतळा येतो मग ते अणुबॊम्बच्या जन्मकथेबद्दल एका आदिमानवाला गोष्ट सांगतात...तोच कुत्रा खदाखदा हसत मी जिराफ असतो तर किती बरे झाले असते असे हीरोला सांगत असतानाच ते हीरो आणि हेरॊइन स्वप्नातून जागे होतात आणि तो तिला म्हणतो, " आज इकडे कुठे ताई?" मग ती म्हणते " थांब लक्ष्मी कुंकू लावते " मग सगळे लोक स्टेजवर येतात आणि चरखा चला चलाके लेंगे स्वराज लेंगे असे म्हणतात ...पडदा... असं असतं प्रायोगिक नाटक... आम्ही आपले असेच सामान्य .... इथले परिक्षण हे फक्त विषयाच्या आशयावरच दिसते आहे. बा़किचे पैलु आपण शिताफीने टाळले आहेत असे वाटते. जेव्हा मूळ गोष्टच पटत नाही तेव्हा बाकीचे कितीही चांगले असले तरी जे पटले नाही त्यावरच आम्ही बोलणार... शिवाय बाकीच्या गोष्टींची आम्ही ( शक्य तेवढी ) दोन शब्दांत स्तुती केलीच आहे... ( नुकत्याच समीक्षणाच्या क्लासहून आलोय ना..त्यामुळे जास्त कौतुक नाही...इव्हेंट मॅनेजमेंट वरून आलो असतो , तर लै कौतुक दिसले असते)

धनंजय Wed, 05/14/2008 - 02:49
मास्तरांचे विचार मग्न करायला लावतात. पैकी हा एक पूर्णच पटतो: > ४. जर्नालिझम शिकणारी स्ट्रॊंग मुलगी ऋता आदिला शेवटी सोडून जाते.... > ती एवढी सक्षम असती तर तो संबंध ठेवायला जबरदस्ती करतो हे एवढेच कारण > त्याला सोडायला पुरेसे नाही का? त्यासाठी क्लिप पसरायची वाट कशाला पहायला > पाहिजे? आणि समजा ती जबरदस्ती सौम्य होती "गुस्से में तुम और भी सुंदर लगती हो" श्टाईलची, तरीही ती चूकच. चित्रण नसते तर ही चूक ऋताच्या पाया पडून तिने माफ करण्यालायक होती-नव्हती हे ऋताने ठरवायचे. चित्रण करायचे होते तर ऋताची परवानगी आवश्यकच होती. क्लिप पसरली नसती, तरी ऋताने त्याला सोडण्यासाठी ही चित्रणाची बाब पुरेशी होती. परवानगी देण्यास हरकत असू शकते. नसूही शकते. हे पूर्ण ऋताच्यावर अवलंबून आहे. चित्रण ही काही अतिरेकी विकृत भावना नव्हे. छोटे-छोटे कॅमेरे नव्हते तेव्हापासून कुंचलेबहाद्दर चित्रकार आपल्या प्रेयसींची नग्न रूपे चित्रित करतच होते. खजुराहे किंवा कोणार्कच्या सूर्यमंदिरावर संभोगाची शिल्पे कोरणारे बहुधा आपल्या अनुभवालाच शिल्पित करत होते. पण हे सर्व अवांतर आहे, कारण (१) जबरदस्ती झाली, आणि (२) विनापरवानगी चित्रण झाले. एवढ्यावरच नैतिक घात झाला आहे. चित्रण पसरले हा मुद्दा नैतिकदृष्ट्या गौण आहे, पण कथानकाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. अति-अवांतर : स्वतःवर जबरदस्ती होण्यात कोणाला लैगिक सुख मिळत असेल, तर ती केलेली "जबरदस्ती" केवळ नाटक असते. अशा परिस्थितीत भाषा ही कुचकामी ठरते, कारण या नाटकात "थांब, थांब" किंवा "नको, नको" हे त्या नाटकातले संवाद असतात. अशी आवड असणार्‍यांनी सुरुवातीला "काही ठेवणीतले शब्द नाटकाबाहेरचे, खर्‍या अर्थाचे आहेत" हे आपापसात ठरवलेले बरे. नव्हे, आवश्यक. या सेफवर्ड=सुरक्षित शब्दांबाबत विकिपीडियाचा दुवा.

मन Wed, 05/14/2008 - 03:13
चित्रण करायचे होते तर ऋताची परवानगी आवश्यकच होती. म्हणजे काय? (क्षणभरासाठी समजा की परवानगी देण्याइतकी ती येडी आहे.)तिची परवानगी असेल तरी असं करणं बरोबर वाटत नाही. जानेवारी २००६ मध्ये एका मराठवाड्यातल्याच एका कॉलेजची अशी केस उघड झाली होती. बातमी सगळीकडे(क्लिप सहीत) दाखवली गेली""सबसे तेज " वाहिनी वर. तेव्हा जी काही फौजदारी केस झाली, त्यानुसार चोउकशीला आलेल्या पोलिसांनी सांगितलं की, एखाद्या जोडप्याने दोघांची संमती असतानाही अशी क्लिप बनवुन वितरीत केली, तरी तो दखल्पात्र गुन्हा आहे. स्वतः फौज दाराने त्या संस्थाप्रमुखाला सांगितले होते.(आम्ही काही फुटांवरुन ऐकत होतो.) तस्मात्, अशी क्लिप बनविणे सध्या फौजदारी गुन्हा आहे. (सदर मुलगा-मुलगी दोघांची संमती असे चित्रण होउ देण्यास असतानाही) (ज्या कलमाखाली पॉर्न/अश्लील चित्रपटांना शिक्शा आहे, तेच कलम इथेही लागु होइल. व सदर मुलगा, मुलगी ह्यांना ती शिक्षा होइल;) आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

In reply to by मन

भडकमकर मास्तर Wed, 05/14/2008 - 09:02
एखाद्या जोडप्याने दोघांची संमती असतानाही अशी क्लिप बनवुन वितरीत केली, तरी तो दखल्पात्र गुन्हा आहे. वितरित झाली की गुन्हा झालाच हो, पण वितरित व्हायच्या आधी ??

धनंजय Wed, 05/14/2008 - 05:11
विकृत मनोवृत्तीचे सिनेमात किंवा नाटकात सहानुभूतीपूर्वक चित्रण करणे थोडे धाडसी असते. नाटककार-दिग्दर्शक-अभिनेता यथातथाच असला तर विकृत मनोवृत्तीचे ते अनैतिक पात्र प्रेक्षकाला केवळ राक्षसच वाटते. त्यात काही नवीन जाणीव नाही. उत्कृष्ट नाटककार-दिग्दर्शक-कलाकार विकृत किंवा दुष्ट पात्रही मनुष्य म्हणून सहानुभूतीच्या योग्य दाखवू शकतो. लेडी मॅक्बेथला राक्षसीण म्हणून दाखवण्यात काय खास? पण एखादी तोडीची अभिनेत्री या खुनशी बाईला अशी काही वठवते, की आपल्याला तात्पुरता तिचा राजद्रोह, पतीची चिथवणी पटायला लागते. प्रेक्षक विचारी असला, तर त्याला ही नवी अनुभूती मोठी भयानक असते. शेक्स्पियर+दिग्दर्शक+अभिनेत्री आपल्याला जाणीव करून देतात, की आपल्यातही तो दुष्टपणा दडलेला आहे. आपल्याकडून झालेल्या पापांचे आपण असेच समर्थन करत असले पाहिजेत. या खुनशी बाईबद्दल सहानुभूती वाटते, तर स्वतःच्या बारीकसारीक पातकांची आपण काय सारवासारव करत असू, हा विचार स्तिमित करतो. विकृत लैंगिक वृत्ती आणि जबरदस्तीबद्दल एक चित्रपट मला असाच हेलकावून गेला - तो होता Talk to her (स्पॅनिशमध्ये) Hable con ella. (आय एम डी बी दुवा, सोनी पिक्चर्स दुवा-इंग्रजी) दोन कोमामध्ये बेशुद्ध स्त्रिया आणि दोन पुरुष यांच्याबद्दल ही कथा आहे. एक पुरुष पत्रकार आहे, आणि त्याचे बेशुद्ध पडलेल्या एका प्रसिद्ध बैल-झुंजवणारीवर प्रेम आहे. दुसरा पुरुष परिचारक (दवाखान्यातला मदतनीस) आहे, आणि बेशुद्ध पडलेल्या आपल्या तरुण शेजारणीवर त्याचे प्रेम आहे. शुद्धीवर असताना पैकी कुठल्याही बाईने त्या-त्या पुरुषावर अनुग्रह केला नव्हता, पण त्या होकार द्यायच्या मार्गावर होत्या, असा त्या दोघा पुरुषांनी आपापला गैरसमज करून घेतला होता. पत्रकाराचे वागणे कायद्यास धरून, कोणीही सभ्य म्हणेल असेच आहे. परिचारक मात्र बेशुद्ध स्त्रीशी संभोग करतो (कुठल्याही कायद्यात हा बलात्कारच). पुढे याला अटक होते आणि तुरुंगात तो आत्महत्या करतो. (म्हणजे लिटल बॉय नाटकापेक्षा इतकेतरी बरे...) पण त्याच्याबद्दल आपल्याला कमालीची सहानुभूती वाटू लागते. तो सभ्य पत्रकार मनातून जे करत असतो, तो हा विकृत मनुष्य शरिराने करतो. हा चित्रपट बघून स्पष्ट नैतिकता विरुद्ध माणसाच्या विकृत स्वभावाबद्दल सह-अनुभूती वाटून मन अगदी कसावीस झाले होते. त्यामुळे "लिटल बॉय"ने प्रयत्न करण्यात काही वावगे नाही, असे मला वाटते. नैतिकतेची ही परीक्षा पेलू शकणारा प्रेक्षकही धाडसी हवा, नाटककारही धाडसी हवा. असल्या हलाहलाचा खेळ करून दाखवायचा असेल, तर दिग्दर्शन-नेपथ्य उत्तम हवेच.

In reply to by धनंजय

भडकमकर मास्तर Wed, 05/14/2008 - 09:27
त्यामुळे "लिटल बॉय"ने प्रयत्न करण्यात काही वावगे नाही, असे मला वाटते. नैतिकतेची ही परीक्षा पेलू शकणारा प्रेक्षकही धाडसी हवा, नाटककारही धाडसी हवा. असल्या हलाहलाचा खेळ करून दाखवायचा असेल, तर दिग्दर्शन-नेपथ्य उत्तम हवेच. असला खेळ लिटल बॉय ला दाखवायचा असता तर मला फार आवडले असते...पण गंमत अशी की हे लोक "तो वाईट नाहीच, त्याच्याकडून एक छोटीशी चूक घडलेली आहे " या गोष्टीपलिकडे जायला तयार नाहीत.... असा खेळ दाखवायला आधी आपले पात्र कसे आहे , कितपत वाईट आहे, दुष्ट आहे, हे ऍक्सेप्ट करणे आवश्यक आहे, एकदा विषय धाडसी निवडल्यानन्तर मग पुन्हा मागे जाण्यात अर्थ नाही, ( तो चांगलाय, चांगलाय, मला समजून घ्या वगैरे)...त्यामुळेच विचार करणार्‍या प्रेक्षकाला आदिला इतरांनी सहानुभूती देण्याचे कारण कळत नाही... त्याच्या चुका काय आहेत हे तरी त्यांना क्लीअर नको का...क्लिप स्प्रेड होणे यापलिकडे त्यांना आदिची चूक वाटत नाही, हा माझा मुख्य आक्षेप आहे..... निदान त्याला एखाद्या पात्राने त्याच्या महत्त्वाच्या चुकांची ( १.जबरदस्ती + २.नकळत चित्रण) जाणीव तरी करून देणे आवश्यक होते....तेही नाही... (हे लोक पात्राला सहानुभूती अशी देत होते की जणू १. चित्रण भलत्यानेच केले आहे, दोघांच्या नकळत आणि मग क्लिप स्प्रेड झाली आहे. २. याने जबरदस्ती केली नाही... दोन कन्सेंटिंग ऍडल्ट्स मधलं मॅटर ....).... त्यामुळे आपण म्हणता त्याप्रमाणे स्पष्ट नैतिकता विरुद्ध माणसाच्या विकृत स्वभावाबद्दल सह-अनुभूती , असा गंभीर विषय त्यांना दाखवायचा नसावा, आणि मनात असले तरी झेपला नसावा असे मला वाटते..

वाचक Wed, 05/14/2008 - 08:19
वेगळ्या दृष्टीकोनातून पहायचा प्रयत्न करत आहे - समर्थन / उदात्तीकरण / विद्रोह वगैरे काहीही नाही. मास्तरानींच म्हंट्ल्याप्रमाणे 'कॉलेज तरूण क्लिप च्या प्रकारा सरावलेले दिसले' म्हणजेच 'ऋता' चाही त्या गोष्टीला विषेश आक्षेप असणार नाही. जबरदस्ती वर तिची मते काय आहेत हे इतरत्र मांडलेले नाही / मला अंदाज करता येत नाही. संशयाचा फायदा द्यायचाच झाला तर 'त्यावेळी तू असे वागायला नको होते पण तारुण्याच्या उन्मादात असे घडून गेले - असो' असेही एक मत असू शकते. त्यामुळे ह्या 'सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम' म्हणून ऋता त्याला सोडून गेली असे मी मानतो. वर सांगितल्या प्रमाणे सगळे मित्र सोडून गेले, प्रेयसी सोडून गेली आणि सगळीकडे बदनामी (?) झाली. कायद्यानुसार गुन्हा दाखल होउ शकतो की नाही हा मुद्दा बाजूला ठेवला घटकाभर तर 'शिक्षा' झालेलीच आहे ना त्याला... किंवा शेवट प्रेक्षकांवर सुद्धा सोडला असेल....
आधी थोडक्यात जशी आठवते तशी गोष्ट लिहितो. तीन मुलगे, दोन मुली एकाच कॊलेजातले, जर्नालिझम करणारे ... त्यातले आदि आणि ऋता प्रेमात पडलेले...ते दोघे आधी स्टेजवर दिसतात..ऋता कुठेतरी दूरगावी प्रोजेक्ट साठी निघालेली आहे... त्यांचे इतर मित्र नंतर येतात, त्यांच्या गप्पा, मोबाईल, अलेक पदमसीचे ऐकलेले लेक्चर वगैरे...त्याचे क्लिपिंग मोबाईलवरून ब्लूटूथ ऑन करून दुसर्‍याला देणे असे चालू असते....

रंगपंचमी (उत्तरार्ध)

बट्ट्याबोळ ·

केसं कलर केली होती.. एकदम चपखल.. एकूणच पुण्यातल्या राजकीय बोलीचा अभ्यास आपला लैच भारी दिसत आहे, पण भाग थोडे तुटक वाटले. जरा जास्त लिहा की. पुण्याचे पेशवे

वेलदोडा Tue, 05/13/2008 - 12:03
प्रत्येक कार्यकर्ता आन्नाच्या गालावर दोन रंगीत बोटं फिरवून क्रुत:क्रुत्य होत होता. आन्ना पण नवरदेवाचा हळदीचा कार्यक्रम असावा तसा सगळी कौतुकं करून घेत होता (आयला यडपट !!). वरतुन बायको पहात होती. नव-याच्या कर्त्रुत्वाने तिचा ऊर भरून आला. आईचा कंठ उगाचच दाटला. "बाप पडला पन पोरगा नाव काढणार. ह्म्म्...छान चाललीये रंगपंचमी..पण थोडक्यातच आटोपली असे वाटतय. जरा अ़जून लिहायला हवे / वाचायला मिळायला हवे होते असे वाटले. किन्वा २ भागात लिहिण्यापेक्षा एकच मोठा भाग केला असता तर मजा आली असती. २ भागांमुळे गोष्टीची लिन्क तुटल्यासारखी वाटली. गल्लीबोळातल्या कार्यकर्त्यांची भाषा , त्यांचे राहणीमान, बोलण्यावागण्याची पध्दत अचूक मांडली आहे.

बट्ट्याबोळ Tue, 05/13/2008 - 22:13
पुढील लेखन करताना सूचना ध्यानात ठेवल्या जातील. दिलखुलास प्रतिक्रियांबद्दल मनःपुर्वक आभार!! -बट्ट्या.

केसं कलर केली होती.. एकदम चपखल.. एकूणच पुण्यातल्या राजकीय बोलीचा अभ्यास आपला लैच भारी दिसत आहे, पण भाग थोडे तुटक वाटले. जरा जास्त लिहा की. पुण्याचे पेशवे

वेलदोडा Tue, 05/13/2008 - 12:03
प्रत्येक कार्यकर्ता आन्नाच्या गालावर दोन रंगीत बोटं फिरवून क्रुत:क्रुत्य होत होता. आन्ना पण नवरदेवाचा हळदीचा कार्यक्रम असावा तसा सगळी कौतुकं करून घेत होता (आयला यडपट !!). वरतुन बायको पहात होती. नव-याच्या कर्त्रुत्वाने तिचा ऊर भरून आला. आईचा कंठ उगाचच दाटला. "बाप पडला पन पोरगा नाव काढणार. ह्म्म्...छान चाललीये रंगपंचमी..पण थोडक्यातच आटोपली असे वाटतय. जरा अ़जून लिहायला हवे / वाचायला मिळायला हवे होते असे वाटले. किन्वा २ भागात लिहिण्यापेक्षा एकच मोठा भाग केला असता तर मजा आली असती. २ भागांमुळे गोष्टीची लिन्क तुटल्यासारखी वाटली. गल्लीबोळातल्या कार्यकर्त्यांची भाषा , त्यांचे राहणीमान, बोलण्यावागण्याची पध्दत अचूक मांडली आहे.

बट्ट्याबोळ Tue, 05/13/2008 - 22:13
पुढील लेखन करताना सूचना ध्यानात ठेवल्या जातील. दिलखुलास प्रतिक्रियांबद्दल मनःपुर्वक आभार!! -बट्ट्या.
लेखनप्रकार
(पात्र व घटना काल्पनीक) रफ़िक शेख आले खरे, पण रातच्याला वशाट जास्त झाल्याने आणि सकाळीच "समाधान" चा कटींग मारल्याने त्यांना जरा अवळून आलं. आल्या आल्या ते लागलीच निघून गेले. सेनावाल्यांनी एकमेकांकडे "ह्यांनी दाखवली आपली ...." अशा थाटात पाहिलं, आणि "आयला महाराष्ट्रात एकच मर्द" अस म्हणून मा.शि.बा.ठां. ना एकदा मनातल्या मनात नमन केलं. "माझा लढा ... विठ्ठल ... **डवे (ब?)..." असही काहीतरी पुटपुटले. चिखलात पाय पडून बाजूचं पाणी जस गढूळ व्हाव, तशी गढूळता क्शणभर पसरली. खर कारण"समाधान" हे होतं हा भाग वेगळाच. इकडे "आळेकर टावर" मधून पोट्टी जमत होती. र्हावल्या पन आला. नाश्ता करून.

मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ८)

चतुरंग ·

केशवसुमार Tue, 05/13/2008 - 09:00
चतुरंगशेठ, उत्तम..बर्‍याच अंतराने आलेला हा भाग ही उत्तम आहे..उरलेले भाग ही लवकर येऊदेत.. =D> चालीत गुणगुणताना काही ठिकाणी अडखळायला होते आहे त्या कडे जरा लक्ष द्यावे ही विनंती... :B (आस्वादक)केशवसुमार (स्वगतः बरेच दिवसात कुठल्या मधुशालेत चकणा खाल्लेला नाही.. 8} काही तरी करायला हवे :W ) (चकणे बहाद्दर)केशवसुमार

विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 10:06
हाती घेऊन प्याला मुरली बनुनी आली मधुबाला, हिंदोळत जणु घेऊन येई अधर-सुधा-रस मदिरेला, तिच्या संगती योगिराजही पोचुन जाई महत्पदी, कुणाकुणाही पहा नाचवी कैसी येथे मधुशाला ||४०|| वा! नेहमीप्रमाणेच अप्रतीम! तात्या.

In reply to by कलंत्री

विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 17:12
एकदा की सर्व भावानुवाद झाला की काव्यवाचनाचा समारंभ ठेवा. यातून खरा आनंद मिळेल. मथुरादासांशी सहमत आहे! रंगा, भारतात आलास की ठाण्याला अवश्य भेट दे. मी स्वत: काही रसिक श्रोत्यांसमोर तुझ्या या मराठी मधुशालेच्या वाचनाचा कार्यक्रम ठेवीन. काही निवडक रुबायांचे वाचन व सोबत ओघवत्या वाणीतला त्यांचा रसास्वाद, असा हा कार्यक्रम रसिकांना निश्चितच आवडेल याची मला खात्री वाटते... तात्या.

धनंजय Wed, 05/14/2008 - 00:26
आणखी एक उत्तम भाग. काही बारीकसारीक प्रश्न : ३६: "प्रकृति" शब्दाचा हिंदी अर्थ "निसर्ग" हा प्रसिद्ध आहे. मराठीत "तब्येत" हा अर्थ अधिक प्रसिद्ध आहे. भावानुवादात "निसर्ग" शब्द बसवता येईल का? ३७: हिंदीत > सुरा-सुप्त होते मद-लोभी जागृत रहती मधुशाला।।३७।। मराठीत मात्र > सुरेत लुप्तचि होत मद्यपी, राहे जागृत मधुशाला ||३७|| मराठीतही "सुप्त" असेच ठेवा अशी माझी फर्माईश आहे. "सुप्त-जागृत" ही जोडी "लुप्त-जागृत" पेक्षा प्रभावी वाटते. ३८: >किरण किरण में जो छलकाती जाम जुम्हाई का हाला, याचा भावानुवाद > किरणा-किरणातुनि हिंदोळे बघ मद्याचा जणु प्याला, बच्चनांची "जुम्हाई" भावली नाही का? हिंदीतल्या रुबाईत जुम्हाई घेणारा "तू"="पीनेवाला" आहे. म्हणून तिथे शेवटच्या ओळीचा अर्थ लागतो - > तारकदल से पीनेवाले, रात नहीं है, मधुशाला।।३८। रात ही जर मद्यप-रूपक असती, तर "पीनेवाली" असे बच्चन म्हणाले असते. "पीनेवाले" म्हणजे "तू", "जुम्हाई"ची मदिरा पीत आहेस, चंद्राची कोर किरणांनी ती मदिरा तुझ्या ओठात छलकत आहे. आणखी एक छोटेसे कोडे: बच्चन म्हणतात - > सुन्दर साकी शशिबाला भावानुवाद > शशि सुंदर साकीबाला "साकी सुंदर शशिबाला" किंवा "सुंदर साकी शशिबाला" असेही वृत्तात बसते... बच्चनांची चंद्र-बालिका तुम्हाला पटली नाही का? सारांश : या रुबाईचा तुमचा भावार्थ बच्चनांच्या रुबाईपासून खूप वेगळा वाटत आहे. (तरी भावार्थ सुंदर आहे, हे सांगणे नलगे.) ३९ : > किसी ओर देखूं, दिखलाई पड़ती मुझको मधुशाला।।३९।। >जिकडे तिकडे दिसे मला तरी सखीच माझी मधुशाला ||३९|| मुळात मधुशाला ही "सखी" नाही, चराचर सृष्टी आहे. तुमच्या भावार्थात "सखी" आहे, आणि अर्थ सुंदरच आहे. (पण मुळातला अर्थ भावला नाही का?) ४० : > योगिराज कर संगत उसकी नटवर नागर कहलाए, याचे > तिच्या संगती योगिराजही पोचुन जाई महत्पदी, म्हणजे आमचा आवडता मुरलीधर कृष्ण हाकलला की तुम्ही :-( ;-) बासरीच्या संगतीने योगिराज कृष्ण नटवर = उत्कृष्ट नट ("नाच्या") होतो. अशा प्रकारे ही मुरली साकी असलेली मधुशाला भल्याभल्यांना नाचवते. असा काही अर्थ हिंदी रुबाईत आहे, तो मराठीत जरा स्पष्ट करावा, ही फर्माईश. आणि ब्रेव्हो! मस्त चालू आहे. आगे बढो, चतुरंग - हम तुम्हारे साथ हैं!

In reply to by धनंजय

चतुरंग Mon, 05/19/2008 - 04:21
नेते आहे तेव्हां त्याचे आभार मानून मी परकेपणाचा भाव तिथे निर्माण करु इच्छित नाही. धन्यवाद! ३६: पटले - योग्य बदल केलाय. ३७: हेही पटले आणि तसा बदल केलाय. ३८: 'जुम्हाई' ह्या शब्दाचा 'जांभई' असा अर्थ मला न लागल्यामुळे माझ्या भावानुवादात तो गोंधळ जाणवला. नवीन अर्थ कळल्यानंतर मूळ रुबाईची खुमारी अधिकच जाणवली आणि योग्य तो बदल घडविल्याशिवाय चैन पडेना. 'जांभई' सारखा पद्यहानी करणारा शब्द अनुवादात घालवेना तेव्हा थोडा बदल करण्याचे स्वातंत्र्य घेऊन 'निद्रेचा' समावेश केलाय. 'शशि सुंदर साकीबाला' हे मात्र मला अधिक भावले म्हणून ते तसेच ठेवले. ३९: 'सखी मधुशाला' हाही अर्थ मला अधिक भावला त्यामुळे त्यातही काही बदल नाही. ४०: इथेही योगिराज कृष्णाला हाकलले नव्हते पण मी केलेल्या अनुवादातून पुरेसा स्पष्ट अर्थ ध्वनित होत नाही असे जाणवल्यावर योग्य बदल घडवून पुन्हा अनुवाद पेश केला आहे. चतुरंग

प्राजु Wed, 05/14/2008 - 14:29
धुंदच होती, हरवुनि जाती, पिऊन मादक मदिरेला, तारकांतुनी प्राशुन घेती, निशा नाही, जणु मधुशाला क्या बात है.... कुठे जरी मी नयन वळवितो, मद्य तरीही दिसे मला, पुन्हा तरी मी नजर फेरतो, तरीही भेटते प्याल्याला, बघता इकडे अथवा तिकडे, मधुबालेविण नाही कुणी, जिकडे तिकडे दिसे मला तरी सखीच माझी मधुशाला ||३९|| अतिशय सुंदर.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंग Mon, 05/19/2008 - 04:26
डॉ.साहेब, कलंत्री तुम्हा सर्वांच्या भक्कम पाठिंब्यामुळे तुम्हा ही वाटचाल सुरु ठेवायला मला बळ मिळते आहे. तुम्हा सर्वांना आणि इतरही सर्व अप्रकट मिपाकर रसिकांना धन्यवाद! काव्य आता हळूहळू कठिण होते आहे त्यामुळे जरा वेळ लागू शकेल तेव्हा सबुरी असावी. चतुरंग

मदनबाण Mon, 05/19/2008 - 04:27
कुठे जरी मी नयन वळवितो, मद्य तरीही दिसे मला, पुन्हा तरी मी नजर फेरतो, तरीही भेटते प्याल्याला, बघता इकडे अथवा तिकडे, मधुबालेविण नाही कुणी, जिकडे तिकडे दिसे मला तरी सखीच माझी मधुशाला व्वा मस्तच..... मदनबाण.....

केशवसुमार Tue, 05/13/2008 - 09:00
चतुरंगशेठ, उत्तम..बर्‍याच अंतराने आलेला हा भाग ही उत्तम आहे..उरलेले भाग ही लवकर येऊदेत.. =D> चालीत गुणगुणताना काही ठिकाणी अडखळायला होते आहे त्या कडे जरा लक्ष द्यावे ही विनंती... :B (आस्वादक)केशवसुमार (स्वगतः बरेच दिवसात कुठल्या मधुशालेत चकणा खाल्लेला नाही.. 8} काही तरी करायला हवे :W ) (चकणे बहाद्दर)केशवसुमार

विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 10:06
हाती घेऊन प्याला मुरली बनुनी आली मधुबाला, हिंदोळत जणु घेऊन येई अधर-सुधा-रस मदिरेला, तिच्या संगती योगिराजही पोचुन जाई महत्पदी, कुणाकुणाही पहा नाचवी कैसी येथे मधुशाला ||४०|| वा! नेहमीप्रमाणेच अप्रतीम! तात्या.

In reply to by कलंत्री

विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 17:12
एकदा की सर्व भावानुवाद झाला की काव्यवाचनाचा समारंभ ठेवा. यातून खरा आनंद मिळेल. मथुरादासांशी सहमत आहे! रंगा, भारतात आलास की ठाण्याला अवश्य भेट दे. मी स्वत: काही रसिक श्रोत्यांसमोर तुझ्या या मराठी मधुशालेच्या वाचनाचा कार्यक्रम ठेवीन. काही निवडक रुबायांचे वाचन व सोबत ओघवत्या वाणीतला त्यांचा रसास्वाद, असा हा कार्यक्रम रसिकांना निश्चितच आवडेल याची मला खात्री वाटते... तात्या.

धनंजय Wed, 05/14/2008 - 00:26
आणखी एक उत्तम भाग. काही बारीकसारीक प्रश्न : ३६: "प्रकृति" शब्दाचा हिंदी अर्थ "निसर्ग" हा प्रसिद्ध आहे. मराठीत "तब्येत" हा अर्थ अधिक प्रसिद्ध आहे. भावानुवादात "निसर्ग" शब्द बसवता येईल का? ३७: हिंदीत > सुरा-सुप्त होते मद-लोभी जागृत रहती मधुशाला।।३७।। मराठीत मात्र > सुरेत लुप्तचि होत मद्यपी, राहे जागृत मधुशाला ||३७|| मराठीतही "सुप्त" असेच ठेवा अशी माझी फर्माईश आहे. "सुप्त-जागृत" ही जोडी "लुप्त-जागृत" पेक्षा प्रभावी वाटते. ३८: >किरण किरण में जो छलकाती जाम जुम्हाई का हाला, याचा भावानुवाद > किरणा-किरणातुनि हिंदोळे बघ मद्याचा जणु प्याला, बच्चनांची "जुम्हाई" भावली नाही का? हिंदीतल्या रुबाईत जुम्हाई घेणारा "तू"="पीनेवाला" आहे. म्हणून तिथे शेवटच्या ओळीचा अर्थ लागतो - > तारकदल से पीनेवाले, रात नहीं है, मधुशाला।।३८। रात ही जर मद्यप-रूपक असती, तर "पीनेवाली" असे बच्चन म्हणाले असते. "पीनेवाले" म्हणजे "तू", "जुम्हाई"ची मदिरा पीत आहेस, चंद्राची कोर किरणांनी ती मदिरा तुझ्या ओठात छलकत आहे. आणखी एक छोटेसे कोडे: बच्चन म्हणतात - > सुन्दर साकी शशिबाला भावानुवाद > शशि सुंदर साकीबाला "साकी सुंदर शशिबाला" किंवा "सुंदर साकी शशिबाला" असेही वृत्तात बसते... बच्चनांची चंद्र-बालिका तुम्हाला पटली नाही का? सारांश : या रुबाईचा तुमचा भावार्थ बच्चनांच्या रुबाईपासून खूप वेगळा वाटत आहे. (तरी भावार्थ सुंदर आहे, हे सांगणे नलगे.) ३९ : > किसी ओर देखूं, दिखलाई पड़ती मुझको मधुशाला।।३९।। >जिकडे तिकडे दिसे मला तरी सखीच माझी मधुशाला ||३९|| मुळात मधुशाला ही "सखी" नाही, चराचर सृष्टी आहे. तुमच्या भावार्थात "सखी" आहे, आणि अर्थ सुंदरच आहे. (पण मुळातला अर्थ भावला नाही का?) ४० : > योगिराज कर संगत उसकी नटवर नागर कहलाए, याचे > तिच्या संगती योगिराजही पोचुन जाई महत्पदी, म्हणजे आमचा आवडता मुरलीधर कृष्ण हाकलला की तुम्ही :-( ;-) बासरीच्या संगतीने योगिराज कृष्ण नटवर = उत्कृष्ट नट ("नाच्या") होतो. अशा प्रकारे ही मुरली साकी असलेली मधुशाला भल्याभल्यांना नाचवते. असा काही अर्थ हिंदी रुबाईत आहे, तो मराठीत जरा स्पष्ट करावा, ही फर्माईश. आणि ब्रेव्हो! मस्त चालू आहे. आगे बढो, चतुरंग - हम तुम्हारे साथ हैं!

In reply to by धनंजय

चतुरंग Mon, 05/19/2008 - 04:21
नेते आहे तेव्हां त्याचे आभार मानून मी परकेपणाचा भाव तिथे निर्माण करु इच्छित नाही. धन्यवाद! ३६: पटले - योग्य बदल केलाय. ३७: हेही पटले आणि तसा बदल केलाय. ३८: 'जुम्हाई' ह्या शब्दाचा 'जांभई' असा अर्थ मला न लागल्यामुळे माझ्या भावानुवादात तो गोंधळ जाणवला. नवीन अर्थ कळल्यानंतर मूळ रुबाईची खुमारी अधिकच जाणवली आणि योग्य तो बदल घडविल्याशिवाय चैन पडेना. 'जांभई' सारखा पद्यहानी करणारा शब्द अनुवादात घालवेना तेव्हा थोडा बदल करण्याचे स्वातंत्र्य घेऊन 'निद्रेचा' समावेश केलाय. 'शशि सुंदर साकीबाला' हे मात्र मला अधिक भावले म्हणून ते तसेच ठेवले. ३९: 'सखी मधुशाला' हाही अर्थ मला अधिक भावला त्यामुळे त्यातही काही बदल नाही. ४०: इथेही योगिराज कृष्णाला हाकलले नव्हते पण मी केलेल्या अनुवादातून पुरेसा स्पष्ट अर्थ ध्वनित होत नाही असे जाणवल्यावर योग्य बदल घडवून पुन्हा अनुवाद पेश केला आहे. चतुरंग

प्राजु Wed, 05/14/2008 - 14:29
धुंदच होती, हरवुनि जाती, पिऊन मादक मदिरेला, तारकांतुनी प्राशुन घेती, निशा नाही, जणु मधुशाला क्या बात है.... कुठे जरी मी नयन वळवितो, मद्य तरीही दिसे मला, पुन्हा तरी मी नजर फेरतो, तरीही भेटते प्याल्याला, बघता इकडे अथवा तिकडे, मधुबालेविण नाही कुणी, जिकडे तिकडे दिसे मला तरी सखीच माझी मधुशाला ||३९|| अतिशय सुंदर.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंग Mon, 05/19/2008 - 04:26
डॉ.साहेब, कलंत्री तुम्हा सर्वांच्या भक्कम पाठिंब्यामुळे तुम्हा ही वाटचाल सुरु ठेवायला मला बळ मिळते आहे. तुम्हा सर्वांना आणि इतरही सर्व अप्रकट मिपाकर रसिकांना धन्यवाद! काव्य आता हळूहळू कठिण होते आहे त्यामुळे जरा वेळ लागू शकेल तेव्हा सबुरी असावी. चतुरंग

मदनबाण Mon, 05/19/2008 - 04:27
कुठे जरी मी नयन वळवितो, मद्य तरीही दिसे मला, पुन्हा तरी मी नजर फेरतो, तरीही भेटते प्याल्याला, बघता इकडे अथवा तिकडे, मधुबालेविण नाही कुणी, जिकडे तिकडे दिसे मला तरी सखीच माझी मधुशाला व्वा मस्तच..... मदनबाण.....
लेखनविषय:
3

शनी मंगळ युती

धोंडोपंत ·

मन Mon, 05/12/2008 - 19:31
पटवुन घ्यायचा खुप प्रयत्न केला, पण छ्या.जमलं नाही. त्याच त्या फल-ज्योतिषाबद्दलच्या शंका डोक्यात येउ लागल्या. पण ते काही असो, आपली सल्ला देण्यामागची भावना,आपुलकी पोचली. त्याबद्दल धन्यवाद. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

चतुरंग Mon, 05/12/2008 - 19:47
७.८रिश्टर स्केलचा भूकंप झालाय. म्यानमार मधे नुकतेच भयावह चक्रीवादळ येऊन गेले. अशा मोठ्या नैसर्गिक आपत्ती आणि शनि-मंगळा सारख्या युती ह्यांचा कार्यकारण संबंध दाखवायचा झाल्यास अशा आपत्ती युती काळात किती आलेल्या आहेत, त्यांची संख्या, तीव्रता, वारंवारता आणि सर्वसाधारण परिस्थितीत (अशी युती) नसताना आलेल्या आपत्ती त्यांची संख्या, तीव्रता, वारंवारता ह्याचा सांख्यिकी अभ्यास झाला तर ह्या दिशेने अधिक संशोधन व्हावे ह्याला पुष्टी मिळेल किंवा त्यात तथ्य नाही असे नक्की होईल. चतुरंग

In reply to by चतुरंग

मन Mon, 05/12/2008 - 19:59
या ठिकाणी पहा.थोडाफार तुम्हाला अपेक्षित असलेला प्रयोगच चालु आहे. आपल्या मि.पा आणि उपक्रमावरचे प्रकाशकाकांचं सुद्धा ह्यात नाव आहे. पाहुयात काय होतय ते. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

एक Mon, 05/12/2008 - 21:42
"तसेच व्यक्तिगत पातळीवर कुंडलीत ज्या स्थानात ही युती पडते, त्या स्थानाने दर्शविलेल्या बाबतीत एखादे जबरदस्त अशुभ फळ मिळते..." हे स्थान गोचरी चा शनि ज्या स्थानात आहे ते धरायचं का मुळ पत्रिकेत ज्या स्थानात आहे ते धरायचं? (धनू राशीला बहुतेक नववा शनी आहे.. म्हणजे नवव्या स्थानात युती चं फळ मिळणार का?)

वेताळ Mon, 05/12/2008 - 23:07
अजुन एक प्रश्न विचारायचा होता तो म्हणजे माया इंका संस्कृतीचे पचांग १२/१२/२०१२ पर्यतच कालगणना दाखवते. म्हणजे २०१२ नंतर काय होणार ? वेताळ

मनस्वी Tue, 05/13/2008 - 15:10
"तसेच व्यक्तिगत पातळीवर कुंडलीत ज्या स्थानात ही युती पडते, त्या स्थानाने दर्शविलेल्या बाबतीत एखादे जबरदस्त अशुभ फळ मिळते..." हे कसं समजायचं... (१) कोणतं स्थान कशाशी निगडीत आहे. (२) कोणत्या स्थानात युती पडतीये.

पंत, शनी मंगळ पासून सावध केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. खरं तर नेहमीप्रमाणे अशा गोष्टींवर आमचा विश्वास आहे, आणि नाहीही :) पंत, म्यानमारमधील चक्रीवादळाने हजारो लोक मरण पावले आणि ते जुंटा सरकार जीवंत असलेल्या लोकांपर्यंत मदत पोहचवु देत नाही. त्या सरकारच्या धोरणात बदल संभवतो का ?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनंदयात्री Tue, 05/13/2008 - 15:17
जुंटा सरकार माजोरडे आहे, लष्करी कारवाई करुन चेचायला पाहिजे साल्यांना. अवांतरः निलकांत ने Aung San Suu Kyi यांच्यावर एखादा फर्मास लेख लिहावा अशी या निमित्ताने विनंती.

In reply to by आनंदयात्री

मदनबाण Tue, 05/13/2008 - 15:27
अवांतरः निलकांत ने Aung San Suu Kyi यांच्यावर एखादा फर्मास लेख लिहावा अशी या निमित्ताने विनंती. मलाही वाचायला आवडेल या विषयावर.... (मिपा वाचक) मदनबाण.....

मन Tue, 05/13/2008 - 16:05
मोठे अपघात, ज्यात अनेक माणसे मृत्युमुखी पडतात अशी नैसर्गिक अरिष्टे, वादळे, घातपाती कारवाया, रक्तपात, दहशतवाद, इमारती कोसळणे, बॉम्बस्फोट, भूकंप, मोठमोठ्या आगी, रसायन आणि वायुगळती अशा प्रकारची फळे मिळतात. ह्या मध्ये नेमके आपल्या आवडीचे संकेत स्थळ बंद होणे., त्याला तांत्रिक अडचणी येउन त्यातील सगळ्यांचे छान छान लेख खड्ड्यात जाणे., असले योग पण घडतात का हो? आता थोडे व्यक्तिगत दुष्परीणामांबद्दल:- सर्वांचे लेख जरी शाबुत आणि ठणठणीत राहिले, तरी सरपंचाची एखाद्या लेखावर (उगिचच) नाराजी होउन ते उडवुन देतील काय हो? का शनीची एखाद्यावर दृष्टी वक्री असल्याने,तो लिहिल ते सर्व मान्य होइल.(म्हण्जे कितीही प्रयत्न केला तरी त्याच्याकडुन चांगला झकास वाद घाल्ता येइल ,असं काही लिहिलच जाणार नाहि.आणि वाद नाही,प्रतिसाद नाही म्हंजे लेखाची पॉप्युल्यारिटी ग्येलीच की चुलित.)हे सगळं ,किंवा ह्यातील काही होइल का हो? आता थोडं समुह्-मती-भ्रष्ट योगा बद्दलः- त्या भैय्यांच्या डोक्यावर परिणाम होउन ते चक्क चांगले वागु लागतील काय हो? माझा म्यानेजर वेड्यासारखं वागुन, मी केलेल्या कामचं श्रेय घेणं सोडुन देइल काय हो? हे मराठी खेकडे इतर मराठी माणसांचे पाय ओढण्याचा स्वभाव सोडतील काय हो? तो बुश डोक्याचे नियंत्रण गेल्यामुळे चक्क चांगला वागेल काय हो?तो भारताला खोटी दूषणे देणे सोडील काय हो? ह्या नेते लोकांची मती फिरुन ते गरीब्,जनसामान्यांचे(आणि पर्यायाने देशाचे) वाटोळे करणे थांबव्तील काय हो? ह्या शेवटच्या परिच्छेदातील काही गोष्टी होणार असतील(लोकांची डोकी फिरुन क असेना) तर काय हरकत आहे? मी तर म्हणतो मग शनी-मंगळच शनी आणि इतर सार्‍या ग्रहांची अशी युती सदैव होउ दे....... (माझ्या कुंडलीत चं-बु का चं-गु युती असल्याने दिलेल्या विषयाचे विषयांतर करण्याचे कसब आहे. शिवाय हर्शल का नेपच्युन म्हणतात तो,गुढ विद्येचा कारक उच्चीचा आहे.पण गुढ विद्या तर सोडाच, साध्या अभ्यासातही,विद्येतही "ढ गोळा" हीच आमची ख्याती आहे. (किमान दहा ज्योतिष्यांनी आजवर हे ऐकवलय कि "गुढ विद्या" मला प्राप्त आहे.पण च्यामारी, माझ्या आअधी त्यांनाच ह्याचा पत्ता कसा लागला?) ) आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

नंदा प्रधान Wed, 05/14/2008 - 07:45
धोंडोपंत, नेहमी प्रमाणे चर्चा/लेख टाकुन पसार झालात. वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे द्या की. -नंदा

आनंद Wed, 05/14/2008 - 10:40
धोंडोपंतानी सावध गिरीचा सल्ला दिला होता आणि कालच जयपुर मध्ये बॉम्बस्फोट झाले. अवकाशातल्या ग्रहाचां आणि आपला खरच काही संबध असतो कि काय या विचारात पडलो आहे. का अतेरेकी आजकाल ग्रहांची स्थिती बघुन कारवाया करतात. ---आनंद.

मन Mon, 05/12/2008 - 19:31
पटवुन घ्यायचा खुप प्रयत्न केला, पण छ्या.जमलं नाही. त्याच त्या फल-ज्योतिषाबद्दलच्या शंका डोक्यात येउ लागल्या. पण ते काही असो, आपली सल्ला देण्यामागची भावना,आपुलकी पोचली. त्याबद्दल धन्यवाद. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

चतुरंग Mon, 05/12/2008 - 19:47
७.८रिश्टर स्केलचा भूकंप झालाय. म्यानमार मधे नुकतेच भयावह चक्रीवादळ येऊन गेले. अशा मोठ्या नैसर्गिक आपत्ती आणि शनि-मंगळा सारख्या युती ह्यांचा कार्यकारण संबंध दाखवायचा झाल्यास अशा आपत्ती युती काळात किती आलेल्या आहेत, त्यांची संख्या, तीव्रता, वारंवारता आणि सर्वसाधारण परिस्थितीत (अशी युती) नसताना आलेल्या आपत्ती त्यांची संख्या, तीव्रता, वारंवारता ह्याचा सांख्यिकी अभ्यास झाला तर ह्या दिशेने अधिक संशोधन व्हावे ह्याला पुष्टी मिळेल किंवा त्यात तथ्य नाही असे नक्की होईल. चतुरंग

In reply to by चतुरंग

मन Mon, 05/12/2008 - 19:59
या ठिकाणी पहा.थोडाफार तुम्हाला अपेक्षित असलेला प्रयोगच चालु आहे. आपल्या मि.पा आणि उपक्रमावरचे प्रकाशकाकांचं सुद्धा ह्यात नाव आहे. पाहुयात काय होतय ते. आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

एक Mon, 05/12/2008 - 21:42
"तसेच व्यक्तिगत पातळीवर कुंडलीत ज्या स्थानात ही युती पडते, त्या स्थानाने दर्शविलेल्या बाबतीत एखादे जबरदस्त अशुभ फळ मिळते..." हे स्थान गोचरी चा शनि ज्या स्थानात आहे ते धरायचं का मुळ पत्रिकेत ज्या स्थानात आहे ते धरायचं? (धनू राशीला बहुतेक नववा शनी आहे.. म्हणजे नवव्या स्थानात युती चं फळ मिळणार का?)

वेताळ Mon, 05/12/2008 - 23:07
अजुन एक प्रश्न विचारायचा होता तो म्हणजे माया इंका संस्कृतीचे पचांग १२/१२/२०१२ पर्यतच कालगणना दाखवते. म्हणजे २०१२ नंतर काय होणार ? वेताळ

मनस्वी Tue, 05/13/2008 - 15:10
"तसेच व्यक्तिगत पातळीवर कुंडलीत ज्या स्थानात ही युती पडते, त्या स्थानाने दर्शविलेल्या बाबतीत एखादे जबरदस्त अशुभ फळ मिळते..." हे कसं समजायचं... (१) कोणतं स्थान कशाशी निगडीत आहे. (२) कोणत्या स्थानात युती पडतीये.

पंत, शनी मंगळ पासून सावध केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. खरं तर नेहमीप्रमाणे अशा गोष्टींवर आमचा विश्वास आहे, आणि नाहीही :) पंत, म्यानमारमधील चक्रीवादळाने हजारो लोक मरण पावले आणि ते जुंटा सरकार जीवंत असलेल्या लोकांपर्यंत मदत पोहचवु देत नाही. त्या सरकारच्या धोरणात बदल संभवतो का ?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनंदयात्री Tue, 05/13/2008 - 15:17
जुंटा सरकार माजोरडे आहे, लष्करी कारवाई करुन चेचायला पाहिजे साल्यांना. अवांतरः निलकांत ने Aung San Suu Kyi यांच्यावर एखादा फर्मास लेख लिहावा अशी या निमित्ताने विनंती.

In reply to by आनंदयात्री

मदनबाण Tue, 05/13/2008 - 15:27
अवांतरः निलकांत ने Aung San Suu Kyi यांच्यावर एखादा फर्मास लेख लिहावा अशी या निमित्ताने विनंती. मलाही वाचायला आवडेल या विषयावर.... (मिपा वाचक) मदनबाण.....

मन Tue, 05/13/2008 - 16:05
मोठे अपघात, ज्यात अनेक माणसे मृत्युमुखी पडतात अशी नैसर्गिक अरिष्टे, वादळे, घातपाती कारवाया, रक्तपात, दहशतवाद, इमारती कोसळणे, बॉम्बस्फोट, भूकंप, मोठमोठ्या आगी, रसायन आणि वायुगळती अशा प्रकारची फळे मिळतात. ह्या मध्ये नेमके आपल्या आवडीचे संकेत स्थळ बंद होणे., त्याला तांत्रिक अडचणी येउन त्यातील सगळ्यांचे छान छान लेख खड्ड्यात जाणे., असले योग पण घडतात का हो? आता थोडे व्यक्तिगत दुष्परीणामांबद्दल:- सर्वांचे लेख जरी शाबुत आणि ठणठणीत राहिले, तरी सरपंचाची एखाद्या लेखावर (उगिचच) नाराजी होउन ते उडवुन देतील काय हो? का शनीची एखाद्यावर दृष्टी वक्री असल्याने,तो लिहिल ते सर्व मान्य होइल.(म्हण्जे कितीही प्रयत्न केला तरी त्याच्याकडुन चांगला झकास वाद घाल्ता येइल ,असं काही लिहिलच जाणार नाहि.आणि वाद नाही,प्रतिसाद नाही म्हंजे लेखाची पॉप्युल्यारिटी ग्येलीच की चुलित.)हे सगळं ,किंवा ह्यातील काही होइल का हो? आता थोडं समुह्-मती-भ्रष्ट योगा बद्दलः- त्या भैय्यांच्या डोक्यावर परिणाम होउन ते चक्क चांगले वागु लागतील काय हो? माझा म्यानेजर वेड्यासारखं वागुन, मी केलेल्या कामचं श्रेय घेणं सोडुन देइल काय हो? हे मराठी खेकडे इतर मराठी माणसांचे पाय ओढण्याचा स्वभाव सोडतील काय हो? तो बुश डोक्याचे नियंत्रण गेल्यामुळे चक्क चांगला वागेल काय हो?तो भारताला खोटी दूषणे देणे सोडील काय हो? ह्या नेते लोकांची मती फिरुन ते गरीब्,जनसामान्यांचे(आणि पर्यायाने देशाचे) वाटोळे करणे थांबव्तील काय हो? ह्या शेवटच्या परिच्छेदातील काही गोष्टी होणार असतील(लोकांची डोकी फिरुन क असेना) तर काय हरकत आहे? मी तर म्हणतो मग शनी-मंगळच शनी आणि इतर सार्‍या ग्रहांची अशी युती सदैव होउ दे....... (माझ्या कुंडलीत चं-बु का चं-गु युती असल्याने दिलेल्या विषयाचे विषयांतर करण्याचे कसब आहे. शिवाय हर्शल का नेपच्युन म्हणतात तो,गुढ विद्येचा कारक उच्चीचा आहे.पण गुढ विद्या तर सोडाच, साध्या अभ्यासातही,विद्येतही "ढ गोळा" हीच आमची ख्याती आहे. (किमान दहा ज्योतिष्यांनी आजवर हे ऐकवलय कि "गुढ विद्या" मला प्राप्त आहे.पण च्यामारी, माझ्या आअधी त्यांनाच ह्याचा पत्ता कसा लागला?) ) आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

नंदा प्रधान Wed, 05/14/2008 - 07:45
धोंडोपंत, नेहमी प्रमाणे चर्चा/लेख टाकुन पसार झालात. वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे द्या की. -नंदा

आनंद Wed, 05/14/2008 - 10:40
धोंडोपंतानी सावध गिरीचा सल्ला दिला होता आणि कालच जयपुर मध्ये बॉम्बस्फोट झाले. अवकाशातल्या ग्रहाचां आणि आपला खरच काही संबध असतो कि काय या विचारात पडलो आहे. का अतेरेकी आजकाल ग्रहांची स्थिती बघुन कारवाया करतात. ---आनंद.
लेखनविषय:
लेखनप्रकार
लोकहो, ज्योतिष्यातील अत्यंत वाईट समजल्या गेलेल्या शनी मंगळ युतीवर आम्ही आज भाष्य करीत आहोत. ही युती दिनांक २१ जून रोजी होणार आहे. युतीचे दिप्तांश १० अंश आहेत. म्हणजे मंगळ हा शनीजवळ १० अंश आल्यापासून ते शनीपासून १० अंश जाईपर्यंत या युतीचे परिणाम जाणवतील. दिनांक २१ जून रोजी मंगळ कर्केत २९ अंश ४३ कलांवर असेल व त्या दिवशी शनी सिंहेत ०९ अंश ४२ कलांवर असेल. त्या दिवसापासून ही युती सुरु होईल. दिनांक १० जुलै रोजी ही युती एका अंशात म्हणजे अंशात्मक असेल.

अरण्यातील प्रकाशवाटा....

प्रगती ·

राजे Tue, 05/13/2008 - 17:32
धन्यवाद. आपण खुपच उच्च्-कोटीचे काम आपण समाजासमोर आणले व त्याचे कार्य तथा महती येथे प्रकाशीत केली. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

धमाल मुलगा Tue, 05/13/2008 - 17:43
प्रगतीताई, धन्यवाद, ही इतकी चांगली माहिती दिल्याबद्दल. सोबत मदत पाठवण्याचा पत्ताही दिलात हे उत्तम झालं. आभारी आहे.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री Wed, 05/14/2008 - 12:09
म्हणतो, माहितीबद्दल धन्यवाद. महाराष्ट्रातही इतकी आदिवासी गाव असु शकते हे समजुन अचंबा वाटला. आमटे कुटुंबियांच्या कार्याला सलाम.

प्राजु Tue, 05/13/2008 - 18:52
अतिशय माहितीपूर्ण लेख. सोबत निरोप्याचा पत्ता आहे हे छान. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

शितल Tue, 05/13/2008 - 18:59
प्रगती ताई तुम्ही धनादेश पाठविण्याच्या पत्ता सह माहिती पुरवलीत तुमचे आभार. समाजाचा आपण ही काही भाग आहोत आणि समाजाच्या उन्नतीसाठी आम्ही देणे आहोत याची जाणिव आहे आम्हाला. आणि आमची तनानी नाही तर धनानी तरी मदत करू आणि ती योग्य व्यक्ती पर्य॑त पोहचते हे समाधान आहे.

मदनबाण Tue, 05/13/2008 - 19:30
खरच हे खुप महान कार्य आहे.....प्रगतीजी खरच खुप माहिती पुर्ण लेख आहे . मदनबाण.

In reply to by मदनबाण

इनोबा म्हणे Wed, 05/14/2008 - 20:27
हेच म्हणतो. आपापल्या कुवतीनुसार नक्कीच मदत पाठवायला हवी. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

प्रभाकर पेठकर Tue, 05/13/2008 - 22:08
ह्या लेखामागिल हेतू नक्कीच अगदी उदात्त आहे. मदतीचे आवाहन करताना सोबत पत्ताही दिला आहे हेही खूप चांगले केलेत. संपूर्ण लेख वाचून श्री. बाबा आमटे, श्री. प्रकाश आमटे आणि सौ. मंदाकिनी आमटे ह्यांनी समर्पित भावनेने केलेले समाजकार्य वाचकांच्या नजरे समोर येते. धन्यवाद. जरूर मदत करू. अशा प्रकल्पाचा आपल्याच नशेत असलेल्या लोकांना याचा नीटसा परीचय नाही सर्वसामान्य माणूस कुठल्याही प्रकारच्या नशेत नसतो. तो महागाईने पिचलेला असतो. महिन्याचा खर्च कसा चालवावा ह्या विवंचनेत असतो. मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरातील ज्येष्ठांच्या आजारपणाचा खर्च, कुटुंबप्रमुखावर अवलंबित सदस्यांच्या इच्छा-आकांक्षा आणि ह्यातील कितीतरी बाबींमध्ये आपण कमी पडत आहोत ही मन जाळणारी भावना, त्यातुन निर्माण होणारे ताण-तणाव, मानसिक दौर्बल्य, हीन-दीन आणि असहाय्यतेची भावना ह्यांनी खचत असतो. भ्रष्टाचार, जनतेच्या पैशांचा होणार अपहार, राजकारण्यांची नीती शून्यता, पोलीसांच्या पक्षपाती धोरणांमुळे असुरक्षिततेची भावना, समजातील गुंडाची दहशत, आपल्या सुंदर मुलीच्या सुरक्षिततेची काळजी अशा अनेक दडपणांखाली दडपलेला, असहाय्य, दिसून येणार नाही पण तरीही 'विकलांग' असा असतो. तरीपण, तो त्याच्यापरीने गरीबांना, आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना, गरजवंत विद्यार्थ्यांना मदत करीतच असतो. रस्त्यातून येता जाता भेटणार्‍या, देवळासमोर बसणार्‍या भिकार्‍यांना मदत करतो. आपल्या सोसायटीच्या वॉचमनच्या मुलीच्या आजारपणात आर्थिक मदत करतो, देवळात दानपेट्यांमध्ये मदत टाकतो, कष्टकरी गरीबांच्या सेवा घेऊन त्यांना आर्थिक हातभार लावित असतो, प्रत्येक टॅक्स भरत असतो. अशाप्रकारे तो त्याच्या क्षमतेनुसार समाजातील गरजूंना मदत करीत असतो. तो आपल्याच नशेत नसतो.

विसोबा खेचर Wed, 05/14/2008 - 00:17
या लेखामुळे मिपाचा दर्जा खूप उंचावला आहे! सुरेख, माहितीपूर्ण लेखन... आत्ता जरा सवडीने प्रतिसाद देत आहे, खारीच्या वाट्याचा धनादेश आज दुपारीच पाठवला. या आभाळाइतक्या मोठ्या माणसांना माझा सलाम...! आपला, (बाबांपुढे सदैव नतमस्तक) तात्या.

प्रगती Wed, 05/14/2008 - 12:25
बाबा आमटे हे काही तरी समाजकार्य करतात(महारोगी व अदीवासींसाठि) व त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. मला फक्त एवढीच माहीती होती. परंतु जेव्हा ठाण्याच्या 'लोक बिरादरी' प्रदर्शना ला मी भेट दिली तेव्हा त्याबद्द्ल विस्तॄत माहीती मला समजली ती सर्व मि.पा. करांना समजावी या हेतुने आम्ही प्रस्तुत लेख लिहिला, सर्व मि.पा. करांना माझी कळकळ जाणवली त्याबद्द्ल आभारी आहे

धोंडोपंत गुरुवार, 05/15/2008 - 17:36
अत्यंत माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद. सामाजिक जाणीवेतून केलेल्या लेखनाचे स्वागत आहेच. आम्ही आमच्यापरीने या उदात्त कार्यात खारीचा वाटा उचलू या आश्वासनासह. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

राजे Tue, 05/13/2008 - 17:32
धन्यवाद. आपण खुपच उच्च्-कोटीचे काम आपण समाजासमोर आणले व त्याचे कार्य तथा महती येथे प्रकाशीत केली. राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

धमाल मुलगा Tue, 05/13/2008 - 17:43
प्रगतीताई, धन्यवाद, ही इतकी चांगली माहिती दिल्याबद्दल. सोबत मदत पाठवण्याचा पत्ताही दिलात हे उत्तम झालं. आभारी आहे.

In reply to by धमाल मुलगा

आनंदयात्री Wed, 05/14/2008 - 12:09
म्हणतो, माहितीबद्दल धन्यवाद. महाराष्ट्रातही इतकी आदिवासी गाव असु शकते हे समजुन अचंबा वाटला. आमटे कुटुंबियांच्या कार्याला सलाम.

प्राजु Tue, 05/13/2008 - 18:52
अतिशय माहितीपूर्ण लेख. सोबत निरोप्याचा पत्ता आहे हे छान. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

शितल Tue, 05/13/2008 - 18:59
प्रगती ताई तुम्ही धनादेश पाठविण्याच्या पत्ता सह माहिती पुरवलीत तुमचे आभार. समाजाचा आपण ही काही भाग आहोत आणि समाजाच्या उन्नतीसाठी आम्ही देणे आहोत याची जाणिव आहे आम्हाला. आणि आमची तनानी नाही तर धनानी तरी मदत करू आणि ती योग्य व्यक्ती पर्य॑त पोहचते हे समाधान आहे.

मदनबाण Tue, 05/13/2008 - 19:30
खरच हे खुप महान कार्य आहे.....प्रगतीजी खरच खुप माहिती पुर्ण लेख आहे . मदनबाण.

In reply to by मदनबाण

इनोबा म्हणे Wed, 05/14/2008 - 20:27
हेच म्हणतो. आपापल्या कुवतीनुसार नक्कीच मदत पाठवायला हवी. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

प्रभाकर पेठकर Tue, 05/13/2008 - 22:08
ह्या लेखामागिल हेतू नक्कीच अगदी उदात्त आहे. मदतीचे आवाहन करताना सोबत पत्ताही दिला आहे हेही खूप चांगले केलेत. संपूर्ण लेख वाचून श्री. बाबा आमटे, श्री. प्रकाश आमटे आणि सौ. मंदाकिनी आमटे ह्यांनी समर्पित भावनेने केलेले समाजकार्य वाचकांच्या नजरे समोर येते. धन्यवाद. जरूर मदत करू. अशा प्रकल्पाचा आपल्याच नशेत असलेल्या लोकांना याचा नीटसा परीचय नाही सर्वसामान्य माणूस कुठल्याही प्रकारच्या नशेत नसतो. तो महागाईने पिचलेला असतो. महिन्याचा खर्च कसा चालवावा ह्या विवंचनेत असतो. मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घरातील ज्येष्ठांच्या आजारपणाचा खर्च, कुटुंबप्रमुखावर अवलंबित सदस्यांच्या इच्छा-आकांक्षा आणि ह्यातील कितीतरी बाबींमध्ये आपण कमी पडत आहोत ही मन जाळणारी भावना, त्यातुन निर्माण होणारे ताण-तणाव, मानसिक दौर्बल्य, हीन-दीन आणि असहाय्यतेची भावना ह्यांनी खचत असतो. भ्रष्टाचार, जनतेच्या पैशांचा होणार अपहार, राजकारण्यांची नीती शून्यता, पोलीसांच्या पक्षपाती धोरणांमुळे असुरक्षिततेची भावना, समजातील गुंडाची दहशत, आपल्या सुंदर मुलीच्या सुरक्षिततेची काळजी अशा अनेक दडपणांखाली दडपलेला, असहाय्य, दिसून येणार नाही पण तरीही 'विकलांग' असा असतो. तरीपण, तो त्याच्यापरीने गरीबांना, आर्थिक दृष्ट्या दुर्बलांना, गरजवंत विद्यार्थ्यांना मदत करीतच असतो. रस्त्यातून येता जाता भेटणार्‍या, देवळासमोर बसणार्‍या भिकार्‍यांना मदत करतो. आपल्या सोसायटीच्या वॉचमनच्या मुलीच्या आजारपणात आर्थिक मदत करतो, देवळात दानपेट्यांमध्ये मदत टाकतो, कष्टकरी गरीबांच्या सेवा घेऊन त्यांना आर्थिक हातभार लावित असतो, प्रत्येक टॅक्स भरत असतो. अशाप्रकारे तो त्याच्या क्षमतेनुसार समाजातील गरजूंना मदत करीत असतो. तो आपल्याच नशेत नसतो.

विसोबा खेचर Wed, 05/14/2008 - 00:17
या लेखामुळे मिपाचा दर्जा खूप उंचावला आहे! सुरेख, माहितीपूर्ण लेखन... आत्ता जरा सवडीने प्रतिसाद देत आहे, खारीच्या वाट्याचा धनादेश आज दुपारीच पाठवला. या आभाळाइतक्या मोठ्या माणसांना माझा सलाम...! आपला, (बाबांपुढे सदैव नतमस्तक) तात्या.

प्रगती Wed, 05/14/2008 - 12:25
बाबा आमटे हे काही तरी समाजकार्य करतात(महारोगी व अदीवासींसाठि) व त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. मला फक्त एवढीच माहीती होती. परंतु जेव्हा ठाण्याच्या 'लोक बिरादरी' प्रदर्शना ला मी भेट दिली तेव्हा त्याबद्द्ल विस्तॄत माहीती मला समजली ती सर्व मि.पा. करांना समजावी या हेतुने आम्ही प्रस्तुत लेख लिहिला, सर्व मि.पा. करांना माझी कळकळ जाणवली त्याबद्द्ल आभारी आहे

धोंडोपंत गुरुवार, 05/15/2008 - 17:36
अत्यंत माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद. सामाजिक जाणीवेतून केलेल्या लेखनाचे स्वागत आहेच. आम्ही आमच्यापरीने या उदात्त कार्यात खारीचा वाटा उचलू या आश्वासनासह. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
मित्र हो, आजपर्यत आपण अनेक गोष्टीं वर बोललो ,हसलो, गंभीर झालो आपापली मते दिली. आता आपण खूप मोठे नाही पण एक छोटेसे काम करुया, आपण पण कोणाला तरी सहाय्य करुन त्यांचे जीवन घडविण्यासाठी थोडा हातभार लावूया. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी २३ डिंसे. १९७३ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात 'हेमलकसा' या गावी माडीया गोंड या अति मागास अदिवासी लोकांच्या उत्थानासाठी "लोकबिरादरी" प्रकल्प चालू केला. त्यांच्या जोडीला त्यांचा मुलगा डॉ.

संडे स्पेशल ( सत्यविनायकाच्या प्रसादाचे मोदक)

स्वाती राजेश ·

वरदा Mon, 05/12/2008 - 17:59
खरंच कीती थॅंक्यू म्हटलं तरी कमीच आहे.... एक शंका थोडा मैदा घालू का ह्यात? नुसता रवा खूप कुटावा लागेल ना... ह्या विकेंडला करते आणि इथे फोटोच टाकते....खूप खूप खूप धन्यवाद!!!

स्वाती राजेश Mon, 05/12/2008 - 18:32
तू रव्यात, मैदा/ कणिक घालून सुद्धा थोड्या करून पाहा. कारण वरील मोदक हे खुसखुशीत आणि किंचित कडक होतात. पण चावले जातात.चिवट लागत नाहीत.:) मी करताना फक्त कणिक आणि थोडा रवा घालून पीठ मळते. हे थोडे मऊ होतात. तु दोन्ही प्रयोग कर म्हणजे तुला लक्षात येईल कि तुला कसे करायचे ते!!!!!!!!!!!

वरदा Mon, 05/12/2008 - 17:59
खरंच कीती थॅंक्यू म्हटलं तरी कमीच आहे.... एक शंका थोडा मैदा घालू का ह्यात? नुसता रवा खूप कुटावा लागेल ना... ह्या विकेंडला करते आणि इथे फोटोच टाकते....खूप खूप खूप धन्यवाद!!!

स्वाती राजेश Mon, 05/12/2008 - 18:32
तू रव्यात, मैदा/ कणिक घालून सुद्धा थोड्या करून पाहा. कारण वरील मोदक हे खुसखुशीत आणि किंचित कडक होतात. पण चावले जातात.चिवट लागत नाहीत.:) मी करताना फक्त कणिक आणि थोडा रवा घालून पीठ मळते. हे थोडे मऊ होतात. तु दोन्ही प्रयोग कर म्हणजे तुला लक्षात येईल कि तुला कसे करायचे ते!!!!!!!!!!!
मोदक साहित्यः सव्वा वाटी खवा सव्वा वाटी पिठीसाखर ७-८ वेलदोड्यांची पूड सव्वा पावशेर बारीक रवा पीठ भिजवण्याकरता दूध २ टे.स्पून कडकडीत तेल तळण्याकरता तूप १.खवा हाताने मोकळा करून कढईत मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजावा. कोमट असताना हाताने मळून पिठीसाखर मिसळावी व वेलदोडा पूड घालावी.

क्रमशः

नारदाचार्य ·

राजे Mon, 05/12/2008 - 17:22
काहीच मत नाही कारण माझी सफर चे मी १५ भाग क्रमशः प्रसिध्द येथेच केले आहेत..... :$ राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

मन Mon, 05/12/2008 - 17:35
म्हणजे, काहिच मत नाही , ह्याच्याशी सहमत. आपल्याला तर बुवा तो "क्रमशः" मधला पि.डा. काकांचा "अब्दुल खान" लै आवडला होता. ""क्रमशः " लिखाणाच्या दॄष्टीने तर ते सगळ्यांनी आदर्श ठेवावा असे लिखाण आहे.) त्यामुळे वाचक म्हणुन "क्रमशः " ला आपल्याला काय बी हरकत नाय. (व्यक्तिशः माझं जे काही उद्बोधन पर, विचार्प्रवर्तक , सार गर्भ ,भव्य दिव्य लिखाण ;-) असतं ते पान भरात सहज बसतं. त्यामुळं मला स्वतः ला हा लेख लागु होत नाही.(मी लिहायचं म्हटलं तर.) ) आपलाच, जोर्ज बर्नाड शॉ,शेक्स्पियर,वुडहाउस,कालिदास ह्यांचे महत्व टिकुन रहावे ह्यासाठी कमित कमी लिहिणारा, आणि स्वतः ची प्रतिभा दाबुन ठेवणारा मनोबा :-)

बट्ट्याबोळ Mon, 05/12/2008 - 17:32
भा. पो. पुढचा भाग लिहून तयार आहे. मि.पा. वर प्रसिद्ध करण्याची आमची पहिलीच वेळ असल्याने प्रतिक्रिया घेऊन पुढील लेखन प्रसिद्ध करण्याचा आमचा मानस आहे. तरीही आपल्या सूचनेप्रमाणे लवकरच प्रसिद्ध केलं जाईल. नारायण नारायण :)

विजुभाऊ Mon, 05/12/2008 - 17:43
क्रमशः लिहीण्याबाबत खुलासा क्रमशः वाचणे मलासुद्धा आवडत नाही. आपण एरव्ही छापील वाचतो आणि जालावर वाचतो यात फरक आहे . आपल्याला वाचनाची सवय असते ती मुख्यतः पान जमीनीला समांतर ठेउन वाचतो .जालावरुन/मॉनिटर वर वाचताना हा कोण बदलतो. लेख तीस ओळींपेक्षा मोठा असल्यास वाचताना लेखाची संलग्नता /वाचकाची एकाग्रता रहात नाही. त्यामुळे मोठे लिखाण क्रमशः च लिहावे लागते. तीन वेगवेगळ्या विषयावरचे लिखाण क्रमशः लिहिणारा विजुभाऊ

नारदाचार्य Mon, 05/12/2008 - 17:50
चर्चा प्रस्तावात आम्ही क्रमशः लेखनाला विरोध केलेला नाही. क्रमशः लेखन एकाचवेळी प्रसिद्ध करावे असे मत आम्ही मांडले आहे. ३० ओळींबाबत विजूभाऊंनी केलेला खुलासा पूर्ण मान्य आहे. चर्चा प्रस्तावातही लेखनाच्या सोयीसाठी तुकडे करणे उचितच आहे, असे म्हटले आहे. एक भाग आज वाचायचा, दुसरा चार दिवसांनी, तिसरा पुढं काही दिवसांनी यातून जी गंमत जाते तिचाच फक्त मुद्दा आहे. अब्दुल खानचा विशेष उल्लेख करावयाचा झाला तर त्यांनी कालबद्धतेची मर्यादा बरीचशी सांभाळत ते भाग प्रसिद्ध केले त्यामुळे खुमारी कायम राहिली.

विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 11:50
वाचनाचा आस्वाद अधिक मधूर व्हावा हाच या चर्चाप्रस्तावाचा हेतू आहे. हम्म! आपले विचार स्पृहणीय आहेत! :) आपला, (क्रमश:) तात्या.

राजे Mon, 05/12/2008 - 17:22
काहीच मत नाही कारण माझी सफर चे मी १५ भाग क्रमशः प्रसिध्द येथेच केले आहेत..... :$ राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by राजे (verified= न पडताळणी केलेला)

मन Mon, 05/12/2008 - 17:35
म्हणजे, काहिच मत नाही , ह्याच्याशी सहमत. आपल्याला तर बुवा तो "क्रमशः" मधला पि.डा. काकांचा "अब्दुल खान" लै आवडला होता. ""क्रमशः " लिखाणाच्या दॄष्टीने तर ते सगळ्यांनी आदर्श ठेवावा असे लिखाण आहे.) त्यामुळे वाचक म्हणुन "क्रमशः " ला आपल्याला काय बी हरकत नाय. (व्यक्तिशः माझं जे काही उद्बोधन पर, विचार्प्रवर्तक , सार गर्भ ,भव्य दिव्य लिखाण ;-) असतं ते पान भरात सहज बसतं. त्यामुळं मला स्वतः ला हा लेख लागु होत नाही.(मी लिहायचं म्हटलं तर.) ) आपलाच, जोर्ज बर्नाड शॉ,शेक्स्पियर,वुडहाउस,कालिदास ह्यांचे महत्व टिकुन रहावे ह्यासाठी कमित कमी लिहिणारा, आणि स्वतः ची प्रतिभा दाबुन ठेवणारा मनोबा :-)

बट्ट्याबोळ Mon, 05/12/2008 - 17:32
भा. पो. पुढचा भाग लिहून तयार आहे. मि.पा. वर प्रसिद्ध करण्याची आमची पहिलीच वेळ असल्याने प्रतिक्रिया घेऊन पुढील लेखन प्रसिद्ध करण्याचा आमचा मानस आहे. तरीही आपल्या सूचनेप्रमाणे लवकरच प्रसिद्ध केलं जाईल. नारायण नारायण :)

विजुभाऊ Mon, 05/12/2008 - 17:43
क्रमशः लिहीण्याबाबत खुलासा क्रमशः वाचणे मलासुद्धा आवडत नाही. आपण एरव्ही छापील वाचतो आणि जालावर वाचतो यात फरक आहे . आपल्याला वाचनाची सवय असते ती मुख्यतः पान जमीनीला समांतर ठेउन वाचतो .जालावरुन/मॉनिटर वर वाचताना हा कोण बदलतो. लेख तीस ओळींपेक्षा मोठा असल्यास वाचताना लेखाची संलग्नता /वाचकाची एकाग्रता रहात नाही. त्यामुळे मोठे लिखाण क्रमशः च लिहावे लागते. तीन वेगवेगळ्या विषयावरचे लिखाण क्रमशः लिहिणारा विजुभाऊ

नारदाचार्य Mon, 05/12/2008 - 17:50
चर्चा प्रस्तावात आम्ही क्रमशः लेखनाला विरोध केलेला नाही. क्रमशः लेखन एकाचवेळी प्रसिद्ध करावे असे मत आम्ही मांडले आहे. ३० ओळींबाबत विजूभाऊंनी केलेला खुलासा पूर्ण मान्य आहे. चर्चा प्रस्तावातही लेखनाच्या सोयीसाठी तुकडे करणे उचितच आहे, असे म्हटले आहे. एक भाग आज वाचायचा, दुसरा चार दिवसांनी, तिसरा पुढं काही दिवसांनी यातून जी गंमत जाते तिचाच फक्त मुद्दा आहे. अब्दुल खानचा विशेष उल्लेख करावयाचा झाला तर त्यांनी कालबद्धतेची मर्यादा बरीचशी सांभाळत ते भाग प्रसिद्ध केले त्यामुळे खुमारी कायम राहिली.

विसोबा खेचर Tue, 05/13/2008 - 11:50
वाचनाचा आस्वाद अधिक मधूर व्हावा हाच या चर्चाप्रस्तावाचा हेतू आहे. हम्म! आपले विचार स्पृहणीय आहेत! :) आपला, (क्रमश:) तात्या.
दीर्घ लेखन मालिकेच्या स्वरूपात टाकण्याची एक पद्धत रूढ होऊन गेली आहे. क्रमशः हा त्यासाठी अगदी सोप्पा मार्ग ठरतो की काय अशी भीती वाटावी अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. काही मालिका उचितच असतात; पण प्रत्येक लेखन हे मालिकेच्या साच्यात बसते असे नाही. अशा वेळी तुकड्यांमध्ये मांडले जाणारे पण कालबद्धता नसणारे लेखन आस्वादाची गंमत घालवून टाकते. लेखनाच्या सोयीसाठी लेखनाचे तुकडे करणे उचितच आहे, पण त्यासाठी आस्वादाच्या बाबीचाही विचार होणे आवश्यक नाही का? लेखनाचा आस्वाददेखील तुकड्यांमधून अधिक चांगल्या पद्धतीने वाचकाला घेऊ द्यावा याची खूणगाठ लेखकानीही मनाशी बांधलेली असावीच.