मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पावश्या लवकर आलाय का......!!!!

कर्नलतपस्वी ·

श्रीगुरुजी 30/03/2025 - 09:05
सुंदर चित्रे! काही वर्षांपूर्वी पावश्या अंगणातील वृक्षावर आला होता. बराच वेळ बसून आवाज काढत होता. मी तात्काळ काही प्रकाशचित्रे घेतली होती.

कंजूस 30/03/2025 - 09:23
गुढी पाडव्याची सुरुवात चांगली केली आहे. पावशा अजून पाहिला नाही कधी. तो काळा पांढरा चातक मात्र पाहिला आहे अलिबागमध्ये. टिटवीची अंडी लहानपणी सांगली जिल्ह्यात पाहिली आहेत. ही टिटवी लाल लोळीची आहे. एकूण तुमच्या परिसरात पक्षीगण भरपूर आहेत. असेच राहोत.

In reply to by मिसळपाव

मिसळपाव 30/03/2025 - 21:07
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

In reply to by Bhakti

मिसळपाव 01/04/2025 - 01:41
ओह, हा पावश्या होय? थँक्यू. एका जुन्या हिंदी गाण्यात हा बॅकग्राउंडला गातोय!! टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

होय, बहाव्याचा बहर सुद्धा अतिशय कमी होता. या सर्व खुणांमुळे पाऊस किती व केंव्हा हा एक प्रश्न मनात थैमान घालत आहेत. टिटवीची अंडी बघून अंदाज बांधता येईल असे वाटते.

शेतकरी तसेच ग्रामीण भागातील नागरिक अजूनही पारंपरिक भविष्यवाण्यांवर आणि पंचांगांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. महाराष्ट्रातील भेंडवळच्या घटमांडणीच्या आधारे येत्या अक्षय तृतीयेला पावसाचे अधिकृत भाकीत जाहीर होणार आहे. मात्र, पंचांगकर्त्यांनी यंदा सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविली आहे, ज्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईचा धोका वाढण्याची शक्यता आहे. अता अर्थात हे सर्व अंदाज आहेत. काही जरी असले तरी जल ही जीवन आहे तेव्हां भविष्यात निसर्ग संवर्धन आणी संरक्षण हे महत्वाचे ठरते.

सस्नेह 30/03/2025 - 12:54
इथेही भरपूर पक्षी आहेत पण नावे माहीत नाहीत, अभ्यास नाही पक्ष्यांचा. पहाटे कोकिळा , खंड्या आणि बरेच पक्षी जोरदार किलकिलाट करून सहाला उठायला भाग पाडतात. दर वर्षी जून महिन्यात मुनिया येतात गॅलरीत भाडेकरू. यावर्षी बघूया लवकर येतात का.

दर वर्षी जून महिन्यात मुनिया येतात गॅलरीत भाडेकरू. यावर्षी बघूया लवकर येतात का. माळ मुनीया,बुलबुल , सुर्यपक्षी रारखे छोटे जीव त्याच घरट्याचा पुन्हा पुन्हा वापर करतात. तेव्हां घरटे सुरक्षित असल्यामुळेच ते परत परत येतात. बाकी कावळा,घार, शिक्रा,कोतवाल सारखे दबंग पक्षी जीवावर आल्या सारखे एकावर एक काड्या रचून ओबडधोबड घरटे बनवतात ते पावसाळ्यात वाहून जाते. ते पुढील मोसमात नवीन बनवतात. म्हणूनच, कदाचित "चिमणे चिमणे दार उघड", अशी कावळ्या चिमणीची गोष्ट बनली असावी.

In reply to by कर्नलतपस्वी

सस्नेह 30/03/2025 - 18:16
छान राहतात मुनिया. कबुतरांसारखं घाण करत नाहीत. काहीच त्रास नसतो त्यांचा. करमणूक होते चांगली त्यांना पाहताना :)

कंजूस 30/03/2025 - 15:23
मुनिया ऑगस्टमध्ये घर बांधतात. .. तेव्हा गवताची लांब पाती मिळतात. पिलं झाल्यावर सप्टेंबरमध्ये किडेही भरपूर असतात पण मुनिया किडे खात नसावेत. त्यांना लागते गवताचे कोवळे बी ते मात्र भरपूर असते. म्हणून मुनिया जूनमध्ये घर बांधत नाहीत. आमच्या बाल्कनीत आहे एक. तीन वर्षं एक जोडी येते. नंतर घरट्याचे तोंड बंद करून जातात.

In reply to by कंजूस

सस्नेह 30/03/2025 - 18:14
घरटे जुलै ऑगस्टमध्ये तयार होते. पण आधी महिना दीड महिना टेहळणी आणि साहित्य जमवाजमवी चालू असते त्यांची. बाकी, मुनिया जुनेच घरटे वापरतात हे नव्हते माहिती. मी आपलं जुनं घरटं वाळून काड्या पडू लागल्या की काढून टाकते. यावर्षी नाही काढत आता :)

सौन्दर्य 31/03/2025 - 23:29
१९९३ ला मी बडोद्याला राहत होतो. त्यावर्षीच्या जुलै महिन्यात टिटवीच्या एका जोड्याने आमच्या घराच्या टेरेसवर असलेल्या पाण्याच्या टाकीवर अंडी दिली होती. यथावकाश त्यातून दोन पिल्ले बाहेर येऊन ती टेरेसभर फिरायची. ती जणूकाही कोंबडीची लहान पिल्ले पायांना उंच काठ्या बांधून चालतात तशी दिसायची. कधीकधी त्यातले एखाद चुकार पिल्लू टेरेसवरून खाली अंगणात पडायचे, अश्यावेळी टिटवीची जोडी सतत 'टीटीव, टीटीव' ओरडत आमच्यासमोरून उडायची. त्यांचे ते ओरडणे ऐकून आम्हाला जाणवायचे की त्यांना काहीतरी हवे आहे. नीट बघितल्यावर कळायचे की तिचे पिल्लू खाली पडले आहे. जवळजवळ वीस फूट उंचीवरून पडून देखील त्यांना फारशी इजा झालेली नसायची. मग त्यांना मी सुपात उचलून परत टेरेसवर नेऊन ठेवायचो. सुपात अशासाठी की काही पक्षांत माणसाचा स्पर्श झाला तर पिल्लाना मारून टाकतात असे ऐकले होते म्हणून. असे बऱ्याच वेळा घडायचे व त्या पिल्लाना परत टेरेसवर नेऊन ठेवण्याचे काम करायला लागायचे. टिटवी बहुधा अंडी जमिनीवरच देते, परंतु जर तिने अंडी उंचावर दिली तर त्यावर्षी पाऊस जास्त पडणार असे स्थानिक लोकं बोलायची. आणि खरंच त्यावर्षी खूप पाऊस पडला होता. पक्ष्यांना हे कसे कळत असावे ? हीच टिटवीची जोडी, उन्हाळ्यात आम्ही टेरेसवर मच्छरदाणी लावून झोपायचो त्यावेळी सूर्योदय झाला रे झाला, मच्छरदाणीवर उडत त्यांच्या टीटीव, टीटीव भाषेत आम्हाला जागे करायची. एखाद्या रविवारी अथवा सुट्टीच्या दिवशी आम्ही जर नाही उठलो तर चोचीने आमची पांघरुणे ओढायची. इतक्या जवळून टिटवी तेव्हा पहिल्यांदा व शेवटची पाहिली .

श्रीगुरुजी 31/03/2025 - 23:55
आमच्या सज्जात एका कोपऱ्यात अगदी वरच्या बाजूस लालगाल्या बुलबुलने अगदी लहान घरटे केले आहे. नुकतीच पिल्ले झाली आहेत. खरं तर बुलबुल साधारणपणे पावसाळा सुरू झाला की घरटे करतात व साधारणपणे ऑगस्ट/सप्टेंबर महिन्यात अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. मार्च महिन्यात पहिल्यांदाच बुलबुलांना पिल्ले झालेली पाहिली. आज त्या लहानश्या घरट्यातून एक पिल्लू खाली पडले. सज्जात गवताचा आभास निर्माण करणारे हिरव्या रंगाचे जाजम असल्याने पिल्लास फार लागले नसावे. जवळपास दोन तास पिल्लू चोच वासून आवाज काढत होते. त्याचे आईबाबा आलटून पालटून घरट्यावर बसून उर्वरीत पिल्लांना पकडून आणलेले फुलपाखरू किंवा नाकतोडा वगैरे भरवत होते, परंतु खाली पडलेल्या पिल्लाकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत होते. मी बराच वेळ प्रतीक्षा करीत होतो की एकदा तेथून बुलबुल दांपत्य उडून गेले की पिल्लास उचलून घरट्यात ठेवावे. परंतु बराच वेळ दोघांपैकी एक तरी बुलबुल घरट्यावर असायचाच/चीच. मागील वर्षी अंगणात जास्वंदीच्या रोपावर असेच घरटे होते व फुले काढण्यास जवळ जायला लागलो की बुलबुल अत्यंत वेगाने तोंडासमोर येऊन जवळपास तोंडास स्पर्श होईल इतपत जवळ येऊन उडायचा. त्यामुळे बुलबुल घरट्यावर बसलेला असताना पिल्लू उचलून घरट्यात ठेवणे शक्य नव्हते. शेवटी एकदाचे दोन्ही बुलबुल खाद्य आणण्यासाठी उडून गेल्यानंतर मी घाईघाईने लहानशी शिडी घरट्याजवळ लावून एका कागद ओंजळीसारखा करून पिल्लू कागदात घेऊन शिडीवरून अगदी सावकाश घरट्यात सोडले. सायंकाळी पाहिले तर त्या पिल्लास बुलबुल दांपत्याने स्वीकारले होते व सर्व पिल्लांना खाद्य भरविणे सुरू होते.

मी एकदा पवनचक्कीवर कमिशनिंग साठी गेलो होतो, बरेच दिवस पडून असल्याने त्या पवनचक्कीवर कबुतरानी प्रचंड घाण केली होती, कमीत कमी ३०० अंडी तरी असावीत, सर्व अंडी वरून खाली फेकायला माणसे पाठवली, ती लोक पाप करायला तयार होईनात, शेवटी कसेतरी एक दोन लोक तयार केले नी त्यांनी ते काम केले.

श्रीगुरुजी 30/03/2025 - 09:05
सुंदर चित्रे! काही वर्षांपूर्वी पावश्या अंगणातील वृक्षावर आला होता. बराच वेळ बसून आवाज काढत होता. मी तात्काळ काही प्रकाशचित्रे घेतली होती.

कंजूस 30/03/2025 - 09:23
गुढी पाडव्याची सुरुवात चांगली केली आहे. पावशा अजून पाहिला नाही कधी. तो काळा पांढरा चातक मात्र पाहिला आहे अलिबागमध्ये. टिटवीची अंडी लहानपणी सांगली जिल्ह्यात पाहिली आहेत. ही टिटवी लाल लोळीची आहे. एकूण तुमच्या परिसरात पक्षीगण भरपूर आहेत. असेच राहोत.

In reply to by मिसळपाव

मिसळपाव 30/03/2025 - 21:07
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

In reply to by Bhakti

मिसळपाव 01/04/2025 - 01:41
ओह, हा पावश्या होय? थँक्यू. एका जुन्या हिंदी गाण्यात हा बॅकग्राउंडला गातोय!! टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

होय, बहाव्याचा बहर सुद्धा अतिशय कमी होता. या सर्व खुणांमुळे पाऊस किती व केंव्हा हा एक प्रश्न मनात थैमान घालत आहेत. टिटवीची अंडी बघून अंदाज बांधता येईल असे वाटते.

शेतकरी तसेच ग्रामीण भागातील नागरिक अजूनही पारंपरिक भविष्यवाण्यांवर आणि पंचांगांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. महाराष्ट्रातील भेंडवळच्या घटमांडणीच्या आधारे येत्या अक्षय तृतीयेला पावसाचे अधिकृत भाकीत जाहीर होणार आहे. मात्र, पंचांगकर्त्यांनी यंदा सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविली आहे, ज्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईचा धोका वाढण्याची शक्यता आहे. अता अर्थात हे सर्व अंदाज आहेत. काही जरी असले तरी जल ही जीवन आहे तेव्हां भविष्यात निसर्ग संवर्धन आणी संरक्षण हे महत्वाचे ठरते.

सस्नेह 30/03/2025 - 12:54
इथेही भरपूर पक्षी आहेत पण नावे माहीत नाहीत, अभ्यास नाही पक्ष्यांचा. पहाटे कोकिळा , खंड्या आणि बरेच पक्षी जोरदार किलकिलाट करून सहाला उठायला भाग पाडतात. दर वर्षी जून महिन्यात मुनिया येतात गॅलरीत भाडेकरू. यावर्षी बघूया लवकर येतात का.

दर वर्षी जून महिन्यात मुनिया येतात गॅलरीत भाडेकरू. यावर्षी बघूया लवकर येतात का. माळ मुनीया,बुलबुल , सुर्यपक्षी रारखे छोटे जीव त्याच घरट्याचा पुन्हा पुन्हा वापर करतात. तेव्हां घरटे सुरक्षित असल्यामुळेच ते परत परत येतात. बाकी कावळा,घार, शिक्रा,कोतवाल सारखे दबंग पक्षी जीवावर आल्या सारखे एकावर एक काड्या रचून ओबडधोबड घरटे बनवतात ते पावसाळ्यात वाहून जाते. ते पुढील मोसमात नवीन बनवतात. म्हणूनच, कदाचित "चिमणे चिमणे दार उघड", अशी कावळ्या चिमणीची गोष्ट बनली असावी.

In reply to by कर्नलतपस्वी

सस्नेह 30/03/2025 - 18:16
छान राहतात मुनिया. कबुतरांसारखं घाण करत नाहीत. काहीच त्रास नसतो त्यांचा. करमणूक होते चांगली त्यांना पाहताना :)

कंजूस 30/03/2025 - 15:23
मुनिया ऑगस्टमध्ये घर बांधतात. .. तेव्हा गवताची लांब पाती मिळतात. पिलं झाल्यावर सप्टेंबरमध्ये किडेही भरपूर असतात पण मुनिया किडे खात नसावेत. त्यांना लागते गवताचे कोवळे बी ते मात्र भरपूर असते. म्हणून मुनिया जूनमध्ये घर बांधत नाहीत. आमच्या बाल्कनीत आहे एक. तीन वर्षं एक जोडी येते. नंतर घरट्याचे तोंड बंद करून जातात.

In reply to by कंजूस

सस्नेह 30/03/2025 - 18:14
घरटे जुलै ऑगस्टमध्ये तयार होते. पण आधी महिना दीड महिना टेहळणी आणि साहित्य जमवाजमवी चालू असते त्यांची. बाकी, मुनिया जुनेच घरटे वापरतात हे नव्हते माहिती. मी आपलं जुनं घरटं वाळून काड्या पडू लागल्या की काढून टाकते. यावर्षी नाही काढत आता :)

सौन्दर्य 31/03/2025 - 23:29
१९९३ ला मी बडोद्याला राहत होतो. त्यावर्षीच्या जुलै महिन्यात टिटवीच्या एका जोड्याने आमच्या घराच्या टेरेसवर असलेल्या पाण्याच्या टाकीवर अंडी दिली होती. यथावकाश त्यातून दोन पिल्ले बाहेर येऊन ती टेरेसभर फिरायची. ती जणूकाही कोंबडीची लहान पिल्ले पायांना उंच काठ्या बांधून चालतात तशी दिसायची. कधीकधी त्यातले एखाद चुकार पिल्लू टेरेसवरून खाली अंगणात पडायचे, अश्यावेळी टिटवीची जोडी सतत 'टीटीव, टीटीव' ओरडत आमच्यासमोरून उडायची. त्यांचे ते ओरडणे ऐकून आम्हाला जाणवायचे की त्यांना काहीतरी हवे आहे. नीट बघितल्यावर कळायचे की तिचे पिल्लू खाली पडले आहे. जवळजवळ वीस फूट उंचीवरून पडून देखील त्यांना फारशी इजा झालेली नसायची. मग त्यांना मी सुपात उचलून परत टेरेसवर नेऊन ठेवायचो. सुपात अशासाठी की काही पक्षांत माणसाचा स्पर्श झाला तर पिल्लाना मारून टाकतात असे ऐकले होते म्हणून. असे बऱ्याच वेळा घडायचे व त्या पिल्लाना परत टेरेसवर नेऊन ठेवण्याचे काम करायला लागायचे. टिटवी बहुधा अंडी जमिनीवरच देते, परंतु जर तिने अंडी उंचावर दिली तर त्यावर्षी पाऊस जास्त पडणार असे स्थानिक लोकं बोलायची. आणि खरंच त्यावर्षी खूप पाऊस पडला होता. पक्ष्यांना हे कसे कळत असावे ? हीच टिटवीची जोडी, उन्हाळ्यात आम्ही टेरेसवर मच्छरदाणी लावून झोपायचो त्यावेळी सूर्योदय झाला रे झाला, मच्छरदाणीवर उडत त्यांच्या टीटीव, टीटीव भाषेत आम्हाला जागे करायची. एखाद्या रविवारी अथवा सुट्टीच्या दिवशी आम्ही जर नाही उठलो तर चोचीने आमची पांघरुणे ओढायची. इतक्या जवळून टिटवी तेव्हा पहिल्यांदा व शेवटची पाहिली .

श्रीगुरुजी 31/03/2025 - 23:55
आमच्या सज्जात एका कोपऱ्यात अगदी वरच्या बाजूस लालगाल्या बुलबुलने अगदी लहान घरटे केले आहे. नुकतीच पिल्ले झाली आहेत. खरं तर बुलबुल साधारणपणे पावसाळा सुरू झाला की घरटे करतात व साधारणपणे ऑगस्ट/सप्टेंबर महिन्यात अंड्यातून पिल्ले बाहेर येतात. मार्च महिन्यात पहिल्यांदाच बुलबुलांना पिल्ले झालेली पाहिली. आज त्या लहानश्या घरट्यातून एक पिल्लू खाली पडले. सज्जात गवताचा आभास निर्माण करणारे हिरव्या रंगाचे जाजम असल्याने पिल्लास फार लागले नसावे. जवळपास दोन तास पिल्लू चोच वासून आवाज काढत होते. त्याचे आईबाबा आलटून पालटून घरट्यावर बसून उर्वरीत पिल्लांना पकडून आणलेले फुलपाखरू किंवा नाकतोडा वगैरे भरवत होते, परंतु खाली पडलेल्या पिल्लाकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत होते. मी बराच वेळ प्रतीक्षा करीत होतो की एकदा तेथून बुलबुल दांपत्य उडून गेले की पिल्लास उचलून घरट्यात ठेवावे. परंतु बराच वेळ दोघांपैकी एक तरी बुलबुल घरट्यावर असायचाच/चीच. मागील वर्षी अंगणात जास्वंदीच्या रोपावर असेच घरटे होते व फुले काढण्यास जवळ जायला लागलो की बुलबुल अत्यंत वेगाने तोंडासमोर येऊन जवळपास तोंडास स्पर्श होईल इतपत जवळ येऊन उडायचा. त्यामुळे बुलबुल घरट्यावर बसलेला असताना पिल्लू उचलून घरट्यात ठेवणे शक्य नव्हते. शेवटी एकदाचे दोन्ही बुलबुल खाद्य आणण्यासाठी उडून गेल्यानंतर मी घाईघाईने लहानशी शिडी घरट्याजवळ लावून एका कागद ओंजळीसारखा करून पिल्लू कागदात घेऊन शिडीवरून अगदी सावकाश घरट्यात सोडले. सायंकाळी पाहिले तर त्या पिल्लास बुलबुल दांपत्याने स्वीकारले होते व सर्व पिल्लांना खाद्य भरविणे सुरू होते.

मी एकदा पवनचक्कीवर कमिशनिंग साठी गेलो होतो, बरेच दिवस पडून असल्याने त्या पवनचक्कीवर कबुतरानी प्रचंड घाण केली होती, कमीत कमी ३०० अंडी तरी असावीत, सर्व अंडी वरून खाली फेकायला माणसे पाठवली, ती लोक पाप करायला तयार होईनात, शेवटी कसेतरी एक दोन लोक तयार केले नी त्यांनी ते काम केले.
gudhi ---- हिंदू नूतन वर्षाच्या मिपाकरांना हार्दिक शुभेछा . ------ चैत्र महिना सुरू होण्यापूर्वीच वैशाख वणवा जाणवू लागलाय.यावर्षी जरा लवकर उन्हाळा आलाय का? संक्रांती नंतर दुपार तापू लागली. होळी येण्या आगोदरच माठ, डेरे, पंखे सुरू झालेत.वातानुकूलित यंत्रांची खरेदी तपासणी, दुरूस्ती सुरू झाली आहे.कागदी लिंबू, काकड्या यांचे भाव कडाडले आहेत.टरबूज, खरबूज बाजारात मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.मार्तंडाने आता पासूनच आग पाखडायला सुरूवात केली आहे.

'भारताच्या ललाटरेषा' -लेखक- शं .रा.देवळे (ऐसी अक्षरे -२४)

Bhakti ·

ताई बराच मोठा लेख लिहिलास! एक सुधारणा, तापी आणि तिची एक उपनदी यांच्या संगमावर धुळ्यापासून वायव्येस सुमारे २५ मैलांवर 'प्रकाश' नावाचे एक पवित्र स्थळ आहे प्रकाशा धुळ्यापासून १०० किमीवर आहे. गोमती व तापीचा संगम तिथे आहे. बाकी कमी रहदारीमुळे धुळे नंदुरबार आणी जळगाव जिल्ह्यातील तापीच्या किनाऱ्यावरील पर्यटन स्थळे नी धरणे अतिशय सुंदर आहेत.

ताई बराच मोठा लेख लिहिलास! एक सुधारणा, तापी आणि तिची एक उपनदी यांच्या संगमावर धुळ्यापासून वायव्येस सुमारे २५ मैलांवर 'प्रकाश' नावाचे एक पवित्र स्थळ आहे प्रकाशा धुळ्यापासून १०० किमीवर आहे. गोमती व तापीचा संगम तिथे आहे. बाकी कमी रहदारीमुळे धुळे नंदुरबार आणी जळगाव जिल्ह्यातील तापीच्या किनाऱ्यावरील पर्यटन स्थळे नी धरणे अतिशय सुंदर आहेत.
सिंधूनदी sindhu हिमालयातील मानसरोवर जलाशयातून निघालेला सिंधूचा तो स्रोत तेथून सरळ वायव्येकडे धावत जातो. काश्मीरच्या लद्दाख भागातून हिमालयाला वळसा घालून काराकोरम पर्वताच्या पायथ्याशी जातो. गिलगिटजवळून ही नदी दक्षिणेकडे वळते. तेथे सिंधूला स्वाती नदी येऊन मिळते.

बाजाराचा कल : ३१ मार्चचा आठवडा

युयुत्सु ·

युयुत्सु 30/03/2025 - 09:57
मंडळी, मार्केटमध्ये जेव्हा रॅली येते तेव्हा ती टिकाऊ असते का या बाबत मतमतांतरे व्यक्त होतात. अशा वेळेला विश्वास नक्की कुणावर ठेवायचा? टिकाऊ रॅलीची काही संख्या शास्त्रीय वैशिष्ट्ये असतात. आत्ताच २१ मार्चला संपलेल्या आठवड्यात मार्केटने अपेक्षेप्रमाणे उसळी मारली. पण ही टिकाऊ आहे की नाही यावर काही तज्‍ज्ञांनी शंका व्यक्त केल्या. मी यातले तथ्य तपासण्यासाठी एक संख्याशास्त्रीय़ चाचणी (माझ्या आकलनानुसार) वापरून तपासायचे ठरवले. त्या अगोदर ही चाचणी भूतकाळातील टिकाऊ उसळ्या व्यवस्थित ओळखते का हे डीपसिकच्या मदतीने तपासले. माझे प्राथमिक समाधान झाल्याने २१ मार्चला संपलेल्या आठवड्यातील रॅलीला ही कसोटी लावून बघितली. तेव्हा ही रॅली टिकाऊ नाही असे उत्तर मिळाले. याचा एक अर्थ असा की अजूनही मोठ्या गुंतवणूकदारांना भारताच्या आर्थिक भविष्यावर तितकासा विश्वास नाही... आजच्या ’शुभ’ दिवशी नकारात्मक सूर आळवल्याबद्दल क्षमस्व, पण शेवटी गणित हे गणित असतं आणि तिथे भावनेला स्थान नसते...

In reply to by युयुत्सु

आजच्या ’शुभ’ दिवशी नकारात्मक सूर आळवल्याबद्दल क्षमस्व, पण शेवटी गणित हे गणित असतं आणि तिथे भावनेला स्थान नसते...
आजच्या शुभ दिवशी , आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने केलेल्या भाकिता ला जास्त किंमत आहे , मुहूर्तावर खरेदी करण्याच्या प्रथे पेक्षा ... गुढी पाडव्याच्या शुभेच्छा ! सर्वाना ...

वामन देशमुख 01/04/2025 - 09:46
या नि पुढच्या आठवड्यात कामाचे चार दिवस आहेत, त्यापुढच्या आठवड्यात तर तीनच दिवस आहेत. तुमच्या prediction (अंदाज?) मध्ये हे गृहीत धरले आहे का? त्याने काही फरक पडतो का? ---
नवीन आर्थिक वर्षाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
धन्स्! सर्व व्यापारी, गुंतवणूकदार यांना हे वर्ष भरपूर नफ्याचे व परताव्याचे जावो ही शुभेच्छा!

In reply to by वामन देशमुख

युयुत्सु 01/04/2025 - 11:49
पण ते जाऊ दे... समजा यामूळे जरी भाकीत चुकले तरी मॉडेल स्वत:ला अ‍ॅडजस्ट करते आणि पुढच्या भाकीतासाठी तयार होते. तेव्हा या कालावधीतील भाकीते जास्त काळजीपूर्वक घेणे किंवा भाकीतेच न करणे ... हा हा हा!

युयुत्सु 01/04/2025 - 11:35
तुमच्या prediction (अंदाज?) मध्ये हे गृहीत धरले आहे का? त्याने काही फरक पडतो का?> प्रश्न चांगला आहे. याचा माझ्या मॉडेल मध्ये विचार केलेला नाही. त्याची सध्या तरी आवश्यकता वाटत नाही कारण त्याचा विचार न करता भाकीते ब-यापैकी बरोबर ठरत आहेत. कामकाजाचे दिवस वाढले तर भाकीत चुकायची शक्यता आहे - कारण अधिक वेळ मिळाल्याने अधिक शक्यता निर्माण होतात. त्यामुळे भाकीत चुकू शकते. तसंच मला या पेक्षा प्रभावी घटक म्हणजे जागतिक बाजारांचा समावेश करायला आवडेल (ते आपल्या बाजारांवर प्रभाव पाडतात) पण सध्या माझ्याकडे पुरेशी कंप्युट पॉवर नाही आणि विश्वासार्ह आणि अखंडित डेटा नाही. तेव्हा सध्या जोपर्यंत I5+8GB आणि I7+16GB या दोन मशिन्स वर भागतंय तेव्हढ पुरेसे आहे. स्वगत - शेवटी आपण भारतीय "भागवा-भागवीमध्ये" आयुष्य घालवऊन तृप्तीच्या ढेकरा देणार...

In reply to by युयुत्सु

वामन देशमुख 04/04/2025 - 10:05
आज शेवटचा दिवस आहे. बाजार तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे दक्षिणेकडे जात आहे.
स्वगत - शेवटी आपण भारतीय "भागवा-भागवीमध्ये" आयुष्य घालवऊन तृप्तीच्या ढेकरा देणार...
मतभिन्नतेच्या आदरासहित: स्वतःच्याच, चांगल्या विषयावर काढलेल्या लेखमालेवर तुम्ही स्वतःच (वादाला तोंड फुटू शकते असे) अवांतर करू नये असे वाटते. आधीच चांगली-चांगली मिपाखरे इथल्या कर्कश्य कबुतरांच्या त्रासाला कंटाळून इथून उडून गेली आहेत, जी राहिली आहेत तीही जायला नकोत.

युयुत्सु 30/03/2025 - 09:57
मंडळी, मार्केटमध्ये जेव्हा रॅली येते तेव्हा ती टिकाऊ असते का या बाबत मतमतांतरे व्यक्त होतात. अशा वेळेला विश्वास नक्की कुणावर ठेवायचा? टिकाऊ रॅलीची काही संख्या शास्त्रीय वैशिष्ट्ये असतात. आत्ताच २१ मार्चला संपलेल्या आठवड्यात मार्केटने अपेक्षेप्रमाणे उसळी मारली. पण ही टिकाऊ आहे की नाही यावर काही तज्‍ज्ञांनी शंका व्यक्त केल्या. मी यातले तथ्य तपासण्यासाठी एक संख्याशास्त्रीय़ चाचणी (माझ्या आकलनानुसार) वापरून तपासायचे ठरवले. त्या अगोदर ही चाचणी भूतकाळातील टिकाऊ उसळ्या व्यवस्थित ओळखते का हे डीपसिकच्या मदतीने तपासले. माझे प्राथमिक समाधान झाल्याने २१ मार्चला संपलेल्या आठवड्यातील रॅलीला ही कसोटी लावून बघितली. तेव्हा ही रॅली टिकाऊ नाही असे उत्तर मिळाले. याचा एक अर्थ असा की अजूनही मोठ्या गुंतवणूकदारांना भारताच्या आर्थिक भविष्यावर तितकासा विश्वास नाही... आजच्या ’शुभ’ दिवशी नकारात्मक सूर आळवल्याबद्दल क्षमस्व, पण शेवटी गणित हे गणित असतं आणि तिथे भावनेला स्थान नसते...

In reply to by युयुत्सु

आजच्या ’शुभ’ दिवशी नकारात्मक सूर आळवल्याबद्दल क्षमस्व, पण शेवटी गणित हे गणित असतं आणि तिथे भावनेला स्थान नसते...
आजच्या शुभ दिवशी , आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने केलेल्या भाकिता ला जास्त किंमत आहे , मुहूर्तावर खरेदी करण्याच्या प्रथे पेक्षा ... गुढी पाडव्याच्या शुभेच्छा ! सर्वाना ...

वामन देशमुख 01/04/2025 - 09:46
या नि पुढच्या आठवड्यात कामाचे चार दिवस आहेत, त्यापुढच्या आठवड्यात तर तीनच दिवस आहेत. तुमच्या prediction (अंदाज?) मध्ये हे गृहीत धरले आहे का? त्याने काही फरक पडतो का? ---
नवीन आर्थिक वर्षाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
धन्स्! सर्व व्यापारी, गुंतवणूकदार यांना हे वर्ष भरपूर नफ्याचे व परताव्याचे जावो ही शुभेच्छा!

In reply to by वामन देशमुख

युयुत्सु 01/04/2025 - 11:49
पण ते जाऊ दे... समजा यामूळे जरी भाकीत चुकले तरी मॉडेल स्वत:ला अ‍ॅडजस्ट करते आणि पुढच्या भाकीतासाठी तयार होते. तेव्हा या कालावधीतील भाकीते जास्त काळजीपूर्वक घेणे किंवा भाकीतेच न करणे ... हा हा हा!

युयुत्सु 01/04/2025 - 11:35
तुमच्या prediction (अंदाज?) मध्ये हे गृहीत धरले आहे का? त्याने काही फरक पडतो का?> प्रश्न चांगला आहे. याचा माझ्या मॉडेल मध्ये विचार केलेला नाही. त्याची सध्या तरी आवश्यकता वाटत नाही कारण त्याचा विचार न करता भाकीते ब-यापैकी बरोबर ठरत आहेत. कामकाजाचे दिवस वाढले तर भाकीत चुकायची शक्यता आहे - कारण अधिक वेळ मिळाल्याने अधिक शक्यता निर्माण होतात. त्यामुळे भाकीत चुकू शकते. तसंच मला या पेक्षा प्रभावी घटक म्हणजे जागतिक बाजारांचा समावेश करायला आवडेल (ते आपल्या बाजारांवर प्रभाव पाडतात) पण सध्या माझ्याकडे पुरेशी कंप्युट पॉवर नाही आणि विश्वासार्ह आणि अखंडित डेटा नाही. तेव्हा सध्या जोपर्यंत I5+8GB आणि I7+16GB या दोन मशिन्स वर भागतंय तेव्हढ पुरेसे आहे. स्वगत - शेवटी आपण भारतीय "भागवा-भागवीमध्ये" आयुष्य घालवऊन तृप्तीच्या ढेकरा देणार...

In reply to by युयुत्सु

वामन देशमुख 04/04/2025 - 10:05
आज शेवटचा दिवस आहे. बाजार तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे दक्षिणेकडे जात आहे.
स्वगत - शेवटी आपण भारतीय "भागवा-भागवीमध्ये" आयुष्य घालवऊन तृप्तीच्या ढेकरा देणार...
मतभिन्नतेच्या आदरासहित: स्वतःच्याच, चांगल्या विषयावर काढलेल्या लेखमालेवर तुम्ही स्वतःच (वादाला तोंड फुटू शकते असे) अवांतर करू नये असे वाटते. आधीच चांगली-चांगली मिपाखरे इथल्या कर्कश्य कबुतरांच्या त्रासाला कंटाळून इथून उडून गेली आहेत, जी राहिली आहेत तीही जायला नकोत.
बाजाराचा कल : ३१ मार्चचा आठवडा ==================== मंडळी, नवीन आर्थिक वर्षाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! या खेपेला युयुत्सुनेट चुकलं की बरोबर ठरलं हे ठरवणं मला अवघड जातंय. कारण मला ज्या पातळीपासून बाजार उलट फिरेल असं वाटत होते, ती पातळी झुगारून २३८६९ ला जाऊन उलट फिरलं (हा उलट फिरण्याचा भाग खरा ठरला कारण युयुत्सुनेटला तेव्हढेच म्ह० पुढची दिशा ओळखायला शिकवले आहे). पण रेंजच्या बाबतीत हुलकावणी दिली. आठवडा अखेरीस बंद होताना आठवड्याच्या ओपन जवळच बाजार बंद झाला आहे. माझ्यामते ही त्रुटी "क्षम्य" आहे कारण पातळीचा अंदाज माझा होता, युयुत्सुनेटचा नव्हता.

सौगात-ए-मोदी

बाजीगर ·

श्रीगुरुजी 27/03/2025 - 20:27
उत्तम काव्य! परंतु खालील ओळ चुकीची आहे. करदात्यांचा अपमान, ही योजना सरकारी नसून भाजप पक्षाने आणली आहे. भाजप पक्षनिधीतून ही खिरापत वाटणार आहे.

सत्यानृता च परुषा प्रियवादिनी च हिंस्रा दयालुरपि चार्थपरावदान्या। नित्यव्यया प्रचुरनित्यधनागमा च वाराङ्गनेव नृपनीतिरनेकरुपा॥ -भर्तृहरि

In reply to by प्रसाद गोडबोले

चौथा कोनाडा 02/04/2025 - 22:03
ह्याचा अर्थच नाय कळला..
कधी] खरं [कधी] खोटे, कधी मधुर, कधी कठोर, केंव्हा निर्घूण तर कधी दयालू, कधी पैशांचा हव्यास असणारी तर कधी उदार, सतत पैसे लागणारी, सतत खर्च होतो असं राजनीति सतत बदलत राहणारी - वेश्येप्रमाणे असते.
.. म्हणुन शोधला अन इथे चिकटावला,

काव्यातील वेदना पोहोचल्या. गोबरभक्तांच्या भावनेचा कोणताही विचार न करता , त्यांच्या नाकावर टिच्चून घेतलेल्या धाडसी निर्णयाचं कौतुक केलं पाहिजे. =)) -दिलीप बिरुटे ( गाजर ए कोबीचा फॅन )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कदाचित शेण भरपूर वेळा तोंडांत गेल्यामुळे अस होत असेल. एखाद्या पदार्थ भरपूर वेळा खाल्ल्यास त्याची चव तोंडांत बसून जाते.

वामन देशमुख 01/04/2025 - 22:05
सौगात-ए-मोदी ने फुरोगामी लोक्स् का चिडले आहेत? खरंतर त्यांना आनंद व्हायला हवा! काँग्रेसी फुरोगामी नाईलाजाने टीका करत आहेत आणि भाजपेयी हिंदुत्ववादी नाईलाजाने समर्थन करत आहेत हे पाहून मौज वाटली!

श्रीगुरुजी 27/03/2025 - 20:27
उत्तम काव्य! परंतु खालील ओळ चुकीची आहे. करदात्यांचा अपमान, ही योजना सरकारी नसून भाजप पक्षाने आणली आहे. भाजप पक्षनिधीतून ही खिरापत वाटणार आहे.

सत्यानृता च परुषा प्रियवादिनी च हिंस्रा दयालुरपि चार्थपरावदान्या। नित्यव्यया प्रचुरनित्यधनागमा च वाराङ्गनेव नृपनीतिरनेकरुपा॥ -भर्तृहरि

In reply to by प्रसाद गोडबोले

चौथा कोनाडा 02/04/2025 - 22:03
ह्याचा अर्थच नाय कळला..
कधी] खरं [कधी] खोटे, कधी मधुर, कधी कठोर, केंव्हा निर्घूण तर कधी दयालू, कधी पैशांचा हव्यास असणारी तर कधी उदार, सतत पैसे लागणारी, सतत खर्च होतो असं राजनीति सतत बदलत राहणारी - वेश्येप्रमाणे असते.
.. म्हणुन शोधला अन इथे चिकटावला,

काव्यातील वेदना पोहोचल्या. गोबरभक्तांच्या भावनेचा कोणताही विचार न करता , त्यांच्या नाकावर टिच्चून घेतलेल्या धाडसी निर्णयाचं कौतुक केलं पाहिजे. =)) -दिलीप बिरुटे ( गाजर ए कोबीचा फॅन )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कदाचित शेण भरपूर वेळा तोंडांत गेल्यामुळे अस होत असेल. एखाद्या पदार्थ भरपूर वेळा खाल्ल्यास त्याची चव तोंडांत बसून जाते.

वामन देशमुख 01/04/2025 - 22:05
सौगात-ए-मोदी ने फुरोगामी लोक्स् का चिडले आहेत? खरंतर त्यांना आनंद व्हायला हवा! काँग्रेसी फुरोगामी नाईलाजाने टीका करत आहेत आणि भाजपेयी हिंदुत्ववादी नाईलाजाने समर्थन करत आहेत हे पाहून मौज वाटली!
म्हणे सौगात-ए-मोदी भाजपा देणार ईदी !! कमी करण्या हेट, मोदी देणार भेट ।। विरोध रेवडी संस्कृतीला, काय म्हणावे या कृती ला? नको हे लांगुलचालन, आठवा बटेंगे कटेंगे स्लोगन ।। मते मिळणार नाहीत, नाही का तुम्हा माहित ।। करदात्यांचा अपमान, थांबवा फुकट सामान ।।

'भाबडी', स्लोलर्नरतेची आजची कहाणी?

माहितगार ·

चित्रगुप्त 27/03/2025 - 14:29
वाचून हळहळ वाटली. माझे एक सीकेपी मित्र - समाजकार्य करणारे - आहेत, त्यांना विचारू शकतो. एका दिवंगत (पुणेकर) मिपाकराच्या बाबतीतही असेच काहीसे झालेले आहे की काय असे वाटते. नक्की माहिती मिळू शकलेली नाही. मदत करण्याची इच्छा असूनही संपर्क कसा साधावा हे ठाऊक नाही. कुणाला या बाबतीत काही करावेसे वाटत असेल तर व्यनि करावा.

कंजूस 27/03/2025 - 20:00
जबाबदारी कोण घेणार.
भारतीय संस्कृतीचे आमेरीकीकरणाच्या ओघात एकत्र कुटंब पद्धती.....
यात अमेरिका कुठून आली? कुटंब पद्धतीच शहराशहरांतून बदलत चालली आहे. आमेरिकेसारखी म्हणायचं का?

अशा अनेक भाबड्या व्यक्ती मी खूप जवळून पाहिल्या आहेत. यातील एक व्यक्ती खूपच अफलातून होती. होती म्हणजे काही वर्षांपूर्वी त्यांनी देह ठेवला , तेव्हा बहुतेक 55 च्या आसपास वय होते त्याचे. ते अखंड "श्रीराम जय राम जय जय राम" म्हणत असत. त्यांच्या चेहऱ्यावर कायम लहान बाळासारखे हास्य असायचे. मला भेटले की नेहमी चौकशी करायचे : "काय प्रसाद , सर्व उत्तम ना , श्रीराम समर्थ !" त्यांना लोकांचे व्यवहार अजिबात कळायचे नाहीत. ते पहाटे उठून बागेतून फुले तोडून लोकांना घरी जाऊन वाटायचे, कोणाकडून पैसे घ्यायचे नाहीत. कोणी दिलेच पैसे तर त्याचे अगरबत्ती , गुळ खोबरे वगैरे देवाला दाखवायचे अन् उरलेले पैसे पेटीत टाकायचे. पैसे साठवावेत, आपल्यासाठी काहीतरी घ्यावं हा विचार त्यांच्या मनातच यायचा नाही. देवाच्या कृपेने त्यांची आई जिवंत होती, इतर भाऊ आणि बहिणी ह्यांना त्यांच्या हा भोळेपणा ( आणि काही लोकांच्या मते वेडेपणा ) माहित होता त्यामुळे ते आर्थिक मदत करत असावेत. त्यामुळे त्यांना अन्न वस्त्र निवारा आधी मूलभूत चिंता कधी भेडसावल्या नसाव्यात. किंवा असल्या तरी त्यांनी त्या रामनामाचा अखंड प्रवाहात वाहून टाकलेल्या होत्या. किंवा कदाचित मुळात त्यांना चिंता म्हणजे काय हेच माहीत नसावे. "ज्याने चोच दिली, तो दाणा ही देईल" असा ठाम विश्वास होता त्यांना. (हेही माझे शब्दांकन झाले, ते इतका विचारही करत नसावेत. ) त्यांच्या साठी फक्त "राम" हाच आधार होता. आता मागे वळून पाहिलं तर अशी, सहजस्थिती मध्ये जगणारी, कोणीतरी व्यक्ती माझ्या जवळपास होती, ह्यावर माझाच विश्वास बसत नाही. ते गेले तेही अचानक. शेवटी भेटायचा योग ही आला नाही. त्यांना अजून एकदा तरी वाकून नमस्कार करायला हवा होता असे मनात परत परत वाटत राहते. लहानपणी त्यांना वाकून नमस्कार केल्यावर त्याचा तो सहज उत्स्फूर्तपणे दिलेला आशीर्वाद अजूनही कानात घुमत आहे ... "श्रीराम समर्थ".

स्वधर्म 10/04/2025 - 21:47
आणि उत्तर सोपे नाही. एक खरे की पूर्वी एकत्र कुटुंब पध्दतीत अशा व्यक्तींची काळजी घरातले कोणी ना कोणी तरी घ्यायचे. दहा पंधरा माणसात असे एखादे माणूस खपून जायचे. आता मात्र तसे सोपे नाही. काही दिवसांपूर्वी प्रसन्न जोशी यांनी घेतलेली अतुल कुलकर्णी यांची मुलाखत पाहिली. त्यात ते म्हणतात की आपण सर्व जण मरणार आहोत आणी क्षमता कमी होत होत मरणार आहोत. मोठे दु:खद सत्य! प्रत्येकाचे रूपांतर अशा एका 'भाबड्या' माणसात होणार आहे, ज्याला कुणाचा तरी आधार लागणारच आहे. सध्या तर आईवडीलही जड होण्याचा काळ आहे. एक लंडनमध्ये राहणारे कुटुंब माहितीत आहे. त्यांच्या मुलीची अवस्था आणखीणच बिकट आहे. ७-८ वर्षे वय पण चालता व बोलता येत नाही. त्यांनी मुलीला स्पेशल मुलांच्या शाळेत घातले आहे. त्यांच्या मते ते काही झाले तरी इथेच रहाणार आहेत, कारण त्यांच्या मुलीची काळजी घेण्याची जी व्यवस्था युकेत आहे, तशी भारतात अजिबात नाही. सांगायचा मुद्दा हा की 'अमेरिकेच्या' / पाश्चात्य संस्कतीच्या प्रभावाने आपल्याकडे हा प्रश्न उग्र झाला म्हणावे तर त्या देशांमधे अशा व्यक्तींचे आयुष्य अधिक चांगले आहे, ही वस्तुस्थिती आहे. असो. 'भाबडी'ला आधार लाभो हीच इच्छा.

चित्रगुप्त 27/03/2025 - 14:29
वाचून हळहळ वाटली. माझे एक सीकेपी मित्र - समाजकार्य करणारे - आहेत, त्यांना विचारू शकतो. एका दिवंगत (पुणेकर) मिपाकराच्या बाबतीतही असेच काहीसे झालेले आहे की काय असे वाटते. नक्की माहिती मिळू शकलेली नाही. मदत करण्याची इच्छा असूनही संपर्क कसा साधावा हे ठाऊक नाही. कुणाला या बाबतीत काही करावेसे वाटत असेल तर व्यनि करावा.

कंजूस 27/03/2025 - 20:00
जबाबदारी कोण घेणार.
भारतीय संस्कृतीचे आमेरीकीकरणाच्या ओघात एकत्र कुटंब पद्धती.....
यात अमेरिका कुठून आली? कुटंब पद्धतीच शहराशहरांतून बदलत चालली आहे. आमेरिकेसारखी म्हणायचं का?

अशा अनेक भाबड्या व्यक्ती मी खूप जवळून पाहिल्या आहेत. यातील एक व्यक्ती खूपच अफलातून होती. होती म्हणजे काही वर्षांपूर्वी त्यांनी देह ठेवला , तेव्हा बहुतेक 55 च्या आसपास वय होते त्याचे. ते अखंड "श्रीराम जय राम जय जय राम" म्हणत असत. त्यांच्या चेहऱ्यावर कायम लहान बाळासारखे हास्य असायचे. मला भेटले की नेहमी चौकशी करायचे : "काय प्रसाद , सर्व उत्तम ना , श्रीराम समर्थ !" त्यांना लोकांचे व्यवहार अजिबात कळायचे नाहीत. ते पहाटे उठून बागेतून फुले तोडून लोकांना घरी जाऊन वाटायचे, कोणाकडून पैसे घ्यायचे नाहीत. कोणी दिलेच पैसे तर त्याचे अगरबत्ती , गुळ खोबरे वगैरे देवाला दाखवायचे अन् उरलेले पैसे पेटीत टाकायचे. पैसे साठवावेत, आपल्यासाठी काहीतरी घ्यावं हा विचार त्यांच्या मनातच यायचा नाही. देवाच्या कृपेने त्यांची आई जिवंत होती, इतर भाऊ आणि बहिणी ह्यांना त्यांच्या हा भोळेपणा ( आणि काही लोकांच्या मते वेडेपणा ) माहित होता त्यामुळे ते आर्थिक मदत करत असावेत. त्यामुळे त्यांना अन्न वस्त्र निवारा आधी मूलभूत चिंता कधी भेडसावल्या नसाव्यात. किंवा असल्या तरी त्यांनी त्या रामनामाचा अखंड प्रवाहात वाहून टाकलेल्या होत्या. किंवा कदाचित मुळात त्यांना चिंता म्हणजे काय हेच माहीत नसावे. "ज्याने चोच दिली, तो दाणा ही देईल" असा ठाम विश्वास होता त्यांना. (हेही माझे शब्दांकन झाले, ते इतका विचारही करत नसावेत. ) त्यांच्या साठी फक्त "राम" हाच आधार होता. आता मागे वळून पाहिलं तर अशी, सहजस्थिती मध्ये जगणारी, कोणीतरी व्यक्ती माझ्या जवळपास होती, ह्यावर माझाच विश्वास बसत नाही. ते गेले तेही अचानक. शेवटी भेटायचा योग ही आला नाही. त्यांना अजून एकदा तरी वाकून नमस्कार करायला हवा होता असे मनात परत परत वाटत राहते. लहानपणी त्यांना वाकून नमस्कार केल्यावर त्याचा तो सहज उत्स्फूर्तपणे दिलेला आशीर्वाद अजूनही कानात घुमत आहे ... "श्रीराम समर्थ".

स्वधर्म 10/04/2025 - 21:47
आणि उत्तर सोपे नाही. एक खरे की पूर्वी एकत्र कुटुंब पध्दतीत अशा व्यक्तींची काळजी घरातले कोणी ना कोणी तरी घ्यायचे. दहा पंधरा माणसात असे एखादे माणूस खपून जायचे. आता मात्र तसे सोपे नाही. काही दिवसांपूर्वी प्रसन्न जोशी यांनी घेतलेली अतुल कुलकर्णी यांची मुलाखत पाहिली. त्यात ते म्हणतात की आपण सर्व जण मरणार आहोत आणी क्षमता कमी होत होत मरणार आहोत. मोठे दु:खद सत्य! प्रत्येकाचे रूपांतर अशा एका 'भाबड्या' माणसात होणार आहे, ज्याला कुणाचा तरी आधार लागणारच आहे. सध्या तर आईवडीलही जड होण्याचा काळ आहे. एक लंडनमध्ये राहणारे कुटुंब माहितीत आहे. त्यांच्या मुलीची अवस्था आणखीणच बिकट आहे. ७-८ वर्षे वय पण चालता व बोलता येत नाही. त्यांनी मुलीला स्पेशल मुलांच्या शाळेत घातले आहे. त्यांच्या मते ते काही झाले तरी इथेच रहाणार आहेत, कारण त्यांच्या मुलीची काळजी घेण्याची जी व्यवस्था युकेत आहे, तशी भारतात अजिबात नाही. सांगायचा मुद्दा हा की 'अमेरिकेच्या' / पाश्चात्य संस्कतीच्या प्रभावाने आपल्याकडे हा प्रश्न उग्र झाला म्हणावे तर त्या देशांमधे अशा व्यक्तींचे आयुष्य अधिक चांगले आहे, ही वस्तुस्थिती आहे. असो. 'भाबडी'ला आधार लाभो हीच इच्छा.
स्थळ कोथरूड माझ्या फ्लॅटच्या डोक्यावरचा फ्लॅट म्हणजे एका अर्थाने सख्खे डोके शेजारी, आडनाव वरळीकर (मी त्यांच्या प्रायव्हसीसाठी अल्प बदललेल) . बहुधा इस्वीसन २०००च्या आसपास गुजराथेहून पुण्यात येऊन स्थायिक झालेल एक सालस पण वयस्क कुटूंब, अर्ली रिटायर्ड नवरा, बँक मॅनेजर बायको आणि त्यांची एक मुलगी आपण तीच नाव ठेऊ 'भाबडी. भाबडीचे पालक आणि भाबडी यांच्या वयातील फरक बराच मोठा असावा त्यामुळे भाबडी दत्तक घेतलेली असू शकते अशी सोसायटीतील दबल्या आवाजातील चर्चा. आता नक्की आठवत नाही पण भाबडी बिल्डिंग्मध्ये रहाण्यास आली तेव्हा सहा किंवा आठ वर्षांची असेल आणि माझी मुलगी एखाद दिड वर्षांची.

असत्यवक्ता स्वर्णकेश:

युयुत्सु ·

कषायपेय विक्रेतुः कृते एकः सन्देशः सर्वथा सुकरं वचनं, दुष्करं प्रतिपालनम् | मूर्खस्य पञ्च चिन्हानि गर्वो दुर्वचनं तथा। क्रोधश्च दृढवादश्च परवाक्येष्वनादरः॥

सागरे वर्षति वृष्टिः किं फलाय भवेत्? दीपस्य संनिधौ दीपः किं प्रकाशाय योग्यः? | यत्र ज्ञानं न विद्येत तत्र यत्नो व्यर्थकः अन्धभक्तैः सह चर्चा निःफला न संशयः ||

हा लेख अन त्यावरील प्रतिसाद हा कसला उत्तम पुरावा आहे ! आर्टिफिशियल इन्टेलिजन्स हे तुमचेच पुर्वग्रह तुमच्यावर रीइन्फोर्स करत आहे . आणि ते ही ढ अडाणी लोकांच्या बाबतीत नव्हे तर उच्च शिक्षित सुज्ञ लोकांच्या बाबतीत ! थोडेच दिवसात ए.आय हे डेमोक्रसी खर्‍याखुर्‍या अर्थाने हॅक करेल तेही ई.व्ही.एम मशीनला हातही न लावता ! ह्यात तीळमात्र शंका नाही ! वेलकम टू द रीअ‍ॅल वर्ल्ड , सायबॉर्ग्स !

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु 29/03/2025 - 09:24
आर्टिफिशियल इन्टेलिजन्स हे तुमचेच पुर्वग्रह तुमच्यावर रीइन्फोर्स करत आहे .> पूर्णपणे असहमत! ए०आय० च्या उथळ वापराने असे मत बनू शकते. ए० आय० ची नवीन मॉडेल्स अचंबित करणारी कामगिरी करत आहे.

In reply to by युयुत्सु

ए०आय० च्या उथळ वापराने असे मत बनू शकते.
युयुत्सु जी, त्यांना उथळ वापरकर्ता म्हणून बोलू नका.. त्यांनी अंत्यंत सखोल संधोधना अंती एक आय चा वापरकरून डीप सिक ला शरम वाटेल असेल... अती अँडव्हान्स मॉडेल तयार केलेले. . राम ...

In reply to by आंद्रे वडापाव

अहाहा ! मनःपुर्वक धन्यवाद ! "राम" ह्या नामस्मरणाच्या आमच्या न्युरल नेटवर्कला , ह्या साधनेच्या मार्गाला तुम्ही माझ्या नावे केले ह्या बद्दल आभार मानायला माझ्या कडे शब्द नाहीत ! "हरि मुखे म्हणा | हरि मुखे म्हणा | पुण्याची गणना | कोण करी !! " हे म्हणणारे ज्ञानेश्वर माऊली किंवा "नाम संकीर्तन साधन पै सोपे " हे म्हणणारे तुकोबा , " बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वलप सोपे फुकाचे " असे म्हआणाणारे समर्थ , आणि एकुणच नामाचा महिमा गाणार्‍या सर्व संतांच्या मेळ्यात मिसळुन गेल्याचा आनंद झाला !! मागे एकदा मी संत ज्ञानेश्वर ह्यांचा एक दुर्मिळ अभंग मिपावर लिहिला होता तेव्हा एका मिपाकराने "गोडबोले पंत , तुम्ही तुमच्या कविता ज्ञानेश्वरांच्या नावावर खपवायचे बंद करा " अशी टीका केली होती ! ज्ञानेश्वरांचे लेखन त्यांना माझे लेखन वाटले होते ! अहाहा !! तेव्हा मला जो अप्रतिम शब्दातीत आनंद झाला होता त्याचाच आज पुनःप्रत्यय आला ! मनःपुर्वक धन्यवाद ! रामनामाचा काही कॉपीराईट घेता येणार नाही पण राम ह्या न्युरल नेटवर्क संकल्पनेचा कॉपीराईट घेऊन ठेवतो - राम_न्युरल_नेटवर्क © राम

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु 29/03/2025 - 09:41
श्री० गोडबोले, तुम्ही असा विचार करा - चीनकडे ब-यापैकी संस्कृत रचना करणारा ए०आय० आहे, पण भारताकडे तो अजुनही नाही.

In reply to by युयुत्सु

हे विषयांतर झाले ! मी काही इतरांप्रमाणे विषयांतर करुन लेखन प्रतिसाद भरकटवायला आलेलो नाही! माझा मुद्दा इतकाच होता की - तुम्ही आर्टिफिशियल इन्टेलिजन्स वापरुन तयार केलेल्या संस्कृत श्लोकातुनही तुमचा ट्रंप विषयीचा पुर्वग्रह दिसुन येत आहे ! ट्रंप - अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष - भारताचा आठपट जास्त ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्शन असणार्‍या देशाचा , जगातील बहुतांश मल्टी बिलियन आणि काही काही मल्टी ट्रिलियन डोलर कंपन्या स्थापन केलेल्या आणि चालवणार्‍या जीनीयस लोकांच्या देशात रीतसर लोकशाही पध्दतीनी निर्विवाद बहुमताने निवडुन आलेल्या , तेही लोकप्रतिनिधी नव्हेतर डायरेक्ट जनतेने दिलेल्या सुस्पष्ट कौलाने निवडुन आलेला ट्रंप ! वरील परिच्छेद कोणत्याही प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरुन लिहिलेला नाही ! असो. मजा म्हणुन चालु दे ! त्याने ना ट्रंप ला फरक पडतो ना चीन ला , ना मिपाला ना आम्हाला ! बाकी "आर्टीफिशियल इंटेलिजन्स मध्ये भारतमागे का ह्या विषयावर व्याख्यान द्यायला तुमचे पुण्यात स्वागत आहेच. " =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

लोकशाही पध्दतीनी निर्विवाद बहुमताने निवडुन आलेल्या , तेही लोकप्रतिनिधी नव्हेतर डायरेक्ट जनतेने दिलेल्या सुस्पष्ट कौलाने निवडुन आलेला ट्रंप !
अभ्यास वाढवा...

In reply to by आंद्रे वडापाव

Trump won the national popular vote with a plurality of 49.8% making him the first Republican to win the popular vote since George W. Bush in 2004. संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/2024_United_States_presidential_election पण असो. व्यक्तिगत द्वेषाला औषध नाही . राम

In reply to by प्रसाद गोडबोले

The election of the president and for vice president of the United States is an indirect election in which citizens of the United States who are registered to vote in one of the fifty U.S. states or in Washington, D.C., cast ballots not directly for those offices, but instead for members of the Electoral College.[note 1] These electors then cast direct votes, known as electoral votes, for president and for vice president. The candidate who receives an absolute majority of electoral votes (at least 270 out of 538, since the Twenty-third Amendment granted voting rights to citizens of D.C.) is then elected to that office. #https://en.wikipedia.org/wiki/United_States_presidential_election असो पण छपरी टाईप ए आय मॉडेल (सिंगल इनपुट आणि सिंगल आउटपुट ) ला घेऊन , स्वतःच स्वतःची पाठ थोपटणार्यांना ... काय सांगणार !! त्यामुळे... असोच ... केचन जनाः समानमानसिकतायां तिष्ठन्तु, यथा रथचक्रं गड्ढे अटति ।

असत्यवक्ता स्वर्णकेश: ट्रंप: उध्दतमानसः। जगत्पीडनतत्पर: निन्द्योऽस्ति विदुषकोत्तम:॥ तात्यांवरील टिकेला खाली उत्तर! ट्रंपः शत्रुभिराक्रान्तः, निन्दितोऽपि पुनः पुनः। स्वकर्मणा स शोभेत, सूर्यवत् तेजसा भुवि॥

कषायपेय विक्रेतुः कृते एकः सन्देशः सर्वथा सुकरं वचनं, दुष्करं प्रतिपालनम् | मूर्खस्य पञ्च चिन्हानि गर्वो दुर्वचनं तथा। क्रोधश्च दृढवादश्च परवाक्येष्वनादरः॥

सागरे वर्षति वृष्टिः किं फलाय भवेत्? दीपस्य संनिधौ दीपः किं प्रकाशाय योग्यः? | यत्र ज्ञानं न विद्येत तत्र यत्नो व्यर्थकः अन्धभक्तैः सह चर्चा निःफला न संशयः ||

हा लेख अन त्यावरील प्रतिसाद हा कसला उत्तम पुरावा आहे ! आर्टिफिशियल इन्टेलिजन्स हे तुमचेच पुर्वग्रह तुमच्यावर रीइन्फोर्स करत आहे . आणि ते ही ढ अडाणी लोकांच्या बाबतीत नव्हे तर उच्च शिक्षित सुज्ञ लोकांच्या बाबतीत ! थोडेच दिवसात ए.आय हे डेमोक्रसी खर्‍याखुर्‍या अर्थाने हॅक करेल तेही ई.व्ही.एम मशीनला हातही न लावता ! ह्यात तीळमात्र शंका नाही ! वेलकम टू द रीअ‍ॅल वर्ल्ड , सायबॉर्ग्स !

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु 29/03/2025 - 09:24
आर्टिफिशियल इन्टेलिजन्स हे तुमचेच पुर्वग्रह तुमच्यावर रीइन्फोर्स करत आहे .> पूर्णपणे असहमत! ए०आय० च्या उथळ वापराने असे मत बनू शकते. ए० आय० ची नवीन मॉडेल्स अचंबित करणारी कामगिरी करत आहे.

In reply to by युयुत्सु

ए०आय० च्या उथळ वापराने असे मत बनू शकते.
युयुत्सु जी, त्यांना उथळ वापरकर्ता म्हणून बोलू नका.. त्यांनी अंत्यंत सखोल संधोधना अंती एक आय चा वापरकरून डीप सिक ला शरम वाटेल असेल... अती अँडव्हान्स मॉडेल तयार केलेले. . राम ...

In reply to by आंद्रे वडापाव

अहाहा ! मनःपुर्वक धन्यवाद ! "राम" ह्या नामस्मरणाच्या आमच्या न्युरल नेटवर्कला , ह्या साधनेच्या मार्गाला तुम्ही माझ्या नावे केले ह्या बद्दल आभार मानायला माझ्या कडे शब्द नाहीत ! "हरि मुखे म्हणा | हरि मुखे म्हणा | पुण्याची गणना | कोण करी !! " हे म्हणणारे ज्ञानेश्वर माऊली किंवा "नाम संकीर्तन साधन पै सोपे " हे म्हणणारे तुकोबा , " बहु चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वलप सोपे फुकाचे " असे म्हआणाणारे समर्थ , आणि एकुणच नामाचा महिमा गाणार्‍या सर्व संतांच्या मेळ्यात मिसळुन गेल्याचा आनंद झाला !! मागे एकदा मी संत ज्ञानेश्वर ह्यांचा एक दुर्मिळ अभंग मिपावर लिहिला होता तेव्हा एका मिपाकराने "गोडबोले पंत , तुम्ही तुमच्या कविता ज्ञानेश्वरांच्या नावावर खपवायचे बंद करा " अशी टीका केली होती ! ज्ञानेश्वरांचे लेखन त्यांना माझे लेखन वाटले होते ! अहाहा !! तेव्हा मला जो अप्रतिम शब्दातीत आनंद झाला होता त्याचाच आज पुनःप्रत्यय आला ! मनःपुर्वक धन्यवाद ! रामनामाचा काही कॉपीराईट घेता येणार नाही पण राम ह्या न्युरल नेटवर्क संकल्पनेचा कॉपीराईट घेऊन ठेवतो - राम_न्युरल_नेटवर्क © राम

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु 29/03/2025 - 09:41
श्री० गोडबोले, तुम्ही असा विचार करा - चीनकडे ब-यापैकी संस्कृत रचना करणारा ए०आय० आहे, पण भारताकडे तो अजुनही नाही.

In reply to by युयुत्सु

हे विषयांतर झाले ! मी काही इतरांप्रमाणे विषयांतर करुन लेखन प्रतिसाद भरकटवायला आलेलो नाही! माझा मुद्दा इतकाच होता की - तुम्ही आर्टिफिशियल इन्टेलिजन्स वापरुन तयार केलेल्या संस्कृत श्लोकातुनही तुमचा ट्रंप विषयीचा पुर्वग्रह दिसुन येत आहे ! ट्रंप - अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष - भारताचा आठपट जास्त ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्शन असणार्‍या देशाचा , जगातील बहुतांश मल्टी बिलियन आणि काही काही मल्टी ट्रिलियन डोलर कंपन्या स्थापन केलेल्या आणि चालवणार्‍या जीनीयस लोकांच्या देशात रीतसर लोकशाही पध्दतीनी निर्विवाद बहुमताने निवडुन आलेल्या , तेही लोकप्रतिनिधी नव्हेतर डायरेक्ट जनतेने दिलेल्या सुस्पष्ट कौलाने निवडुन आलेला ट्रंप ! वरील परिच्छेद कोणत्याही प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरुन लिहिलेला नाही ! असो. मजा म्हणुन चालु दे ! त्याने ना ट्रंप ला फरक पडतो ना चीन ला , ना मिपाला ना आम्हाला ! बाकी "आर्टीफिशियल इंटेलिजन्स मध्ये भारतमागे का ह्या विषयावर व्याख्यान द्यायला तुमचे पुण्यात स्वागत आहेच. " =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

लोकशाही पध्दतीनी निर्विवाद बहुमताने निवडुन आलेल्या , तेही लोकप्रतिनिधी नव्हेतर डायरेक्ट जनतेने दिलेल्या सुस्पष्ट कौलाने निवडुन आलेला ट्रंप !
अभ्यास वाढवा...

In reply to by आंद्रे वडापाव

Trump won the national popular vote with a plurality of 49.8% making him the first Republican to win the popular vote since George W. Bush in 2004. संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/2024_United_States_presidential_election पण असो. व्यक्तिगत द्वेषाला औषध नाही . राम

In reply to by प्रसाद गोडबोले

The election of the president and for vice president of the United States is an indirect election in which citizens of the United States who are registered to vote in one of the fifty U.S. states or in Washington, D.C., cast ballots not directly for those offices, but instead for members of the Electoral College.[note 1] These electors then cast direct votes, known as electoral votes, for president and for vice president. The candidate who receives an absolute majority of electoral votes (at least 270 out of 538, since the Twenty-third Amendment granted voting rights to citizens of D.C.) is then elected to that office. #https://en.wikipedia.org/wiki/United_States_presidential_election असो पण छपरी टाईप ए आय मॉडेल (सिंगल इनपुट आणि सिंगल आउटपुट ) ला घेऊन , स्वतःच स्वतःची पाठ थोपटणार्यांना ... काय सांगणार !! त्यामुळे... असोच ... केचन जनाः समानमानसिकतायां तिष्ठन्तु, यथा रथचक्रं गड्ढे अटति ।

असत्यवक्ता स्वर्णकेश: ट्रंप: उध्दतमानसः। जगत्पीडनतत्पर: निन्द्योऽस्ति विदुषकोत्तम:॥ तात्यांवरील टिकेला खाली उत्तर! ट्रंपः शत्रुभिराक्रान्तः, निन्दितोऽपि पुनः पुनः। स्वकर्मणा स शोभेत, सूर्यवत् तेजसा भुवि॥
Composed with the help of DeepSeek - असत्यवक्ता स्वर्णकेश: ट्रंप: उध्दतमानसः। जगत्पीडनतत्पर: निन्द्योऽस्ति विदुषकोत्तम:॥

दोष व्हीआयपी सुरक्षा यंत्रणेचा: स्वर्गीय इंदिरा गांधी आणि छत्रपति संभाजी राजे

विवेकपटाईत ·

आपल्याकडे गेल्या १२-१४ वर्ष्यात, चित्रपट पाहून इतिहासाचे आकलन करण्याचे फॅड पुन्हा वाढीस लागले आहे. कि जे समाजासाठी धोकादायक आहे पण असो ... चित्रपट निंर्माता दिग्दर्शक कलाकार , "सदर कलाकृती काल्पनिक आहे " असे डिस्क्लेमर देऊन , (उतेकर आणि कौशल ) करोडो कमावून , सध्याला विदेशात चिल मध्ये सुट्टी उपभोगत आहे ... ते हि असो .. दोन तीन वेगवेगळ्या घटना (वेगळ्या कालखंडात झालेल्या ) यांची सरमिसळ करून , "आधीच आपुल्या मनीचे टार्गेट पर्यंत कन्क्लुजन येईल अश्या पद्धतीने लेख लिहिण्याची परंपरेला अनुसरून , काही लेख वाचनात येत असतात. छत्रपती संभाजी महाराज यांच्या करंट लोकेशन आणि त्यांचे संख्याबळ याबाबतची अल्ट्रा सेंसेटिव्ह बित्तं बातमी, शत्रूला कंसीस्टंली , महाराजांचे स्वकीय नातेवाईक व काही थिंक टॅंक स्ट्रॅटेजिस्ट प्रोव्हाइड करत होते ... महाराज पकडले गेले तत्क्षणी त्यांची हत्या न करता त्यांना टॉर्चर करत पुढील एक महिना व अधिक दिवस ठेवण्यात आलेले ... त्या काळात कुठलाही मराठा, ब्राम्हण, किंवा कुठल्याही समाजाने सुटकेचे प्रयन्त केलेले दिसत नाही ... कारण युनिव्हर्सल होते , "स्वतः चा फायदा /स्वार्थ"... १८व्या शतकातील संभाजी महाराजांच्या बलिदानाचे पुनरुत्थान आज २१ व्या शतकात ,अनेक संघटना/ नेते/ पक्ष / व्हाट्सअप ग्रुप करताना दिसत आहे.. त्याही मागे तेच कारण युनिव्हर्सल आहे , "स्वतः चा फायदा /स्वार्थ"... ज्यांना आज पुळका उमाळा आला आहे त्यात दोन गट आहे १. प्रत्यक्ष सत्ता लाभार्थी (०.०१ %) यातून मिळणारा लाभ घेणारे २. पढत मूर्ख (काहीही लाभ होणार नसणारे ९९.९९%) तुम्ही ठरवा मिपाकर वाचक (रिऍक्ट होणारे ) कुठल्या गटात येतील ... पण तुमची आयडिया चांगलीये ... अनेक गोष्टींची सरमिसळ करून लेख लिहिण्याची ...

In reply to by स्वरुपसुमित

१८व्या शतकातील संभाजी महाराजांच्या बलिदानाचे पुनरुत्थान आज २१ व्या शतकात ,अनेक संघटना/ नेते/ पक्ष / व्हाट्सअप ग्रुप करताना दिसत आहे.. त्याही मागे तेच कारण युनिव्हर्सल आहे , "स्वतः चा फायदा /स्वार्थ"... ज्यांना आज पुळका उमाळा आला आहे त्यात दोन गट आहे १. प्रत्यक्ष सत्ता लाभार्थी (०.०१ %) यातून मिळणारा लाभ घेणारे २. पढत मूर्ख (काहीही लाभ होणार नसणारे ९९.९९%) तुम्ही ठरवा मिपाकर वाचक (रिऍक्ट होणारे ) कुठल्या गटात येतील ...

१९९९ किंवा २००० सालची गोष्ट असेल. इंग्लिश भाषेवर चांगली पकड यावी म्हणून मी त्याकाळी दररोज 'द हिंदू' हे वर्तमानपत्र वाचायचो. त्यातील लेखांमधील राजकीय मते अजिबात म्हणजे अजिबात पटायची नाहीत. तरीही त्या लेखांमधील इंग्लिश भाषेची पातळी अगदी उच्च दर्जाची असायची म्हणून मी ते वर्तमानपत्र दररोज वाचायचो. त्यात कोणा पत्रकाराचा लेख आला होता. त्यात त्याने पंडित नेहरूंची आठवण सांगितली होती. गोष्ट होती १९६३ सालची. तेव्हा नेहरू ओरिसात राऊरकेलाला गेले होते आणि तो लेख लिहिणारे पत्रकार तेव्हा नुकतेच कॉलेजात गेले होते म्हणजे १६-१७ वर्षे वयाचे असतील. त्या पत्रकाराला नेहरूंची सही पाहिजे होती. नेहरू उघड्या जीपमधून जात असताना आजूबाजूला लोक उभे होते त्यांनी केलेले अभिवादन स्विकारत, मधेमधे एखाद मिनिट थांबत नेहरू पुढे चालले होते. पत्रकार नेहरूंच्या जीपजवळ गेला आणि आपली वही पुढे करत- 'पंडितजी तुमची सही हवी होती' अशाप्रकारचे वाक्य बोलला. त्याने वही पुढे केली खरी पण गर्दीमध्ये त्याच्याकडचे पेन कुठेतरी खाली पडले होते. तेव्हा त्याचा कावराबावरा झालेला चेहरा बघून नेहरूंनी हसत त्याला म्हटले- अरे काही हरकत नाही. माझ्याकडे पेन आहे. असे म्हणत आपल्याकडील पेन घेऊन त्यांनी त्या वहीवर सही करून त्याला दिली. त्याकाळी पंतप्रधानांची सुरक्षाव्यवस्था तितकी कडक नसायची असे दिसते. माझ्या संस्थेत दीक्षांत समारंभाला तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग आले होते कारण आमच्या संस्थेला त्यावर्षी ५० वर्षे पूर्ण झाली होती. आमच्याच संस्थेत जुने फोटो लावले होते त्यावरून समजले की १९६८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी दीक्षांत समारंभाला आल्या होत्या आणि त्यांच्या आजूबाजूला विद्यार्थी पण वावरत होते. आमच्या दीक्षांत समारंभाला मात्र पंतप्रधानांच्या आजूबाजूलाही कोणालाही फिरकायची संधी नव्हती. तसेच उभे राहून कोणीही फोनवर फोटो काढू नयेत अशी सक्त ताकिद आम्हाला दिली होती. पंतप्रधान येणार ते गेट आणि आजूबाजूचा परिसर ते यायच्या तासभर आधीच सील केला होता आणि तिथून कोणालाही सोडत नव्हते. त्यामुळे आम्हाला तिथे आधीच जाऊन उन्हात बसावे लागले होते. मे १९७१ मध्ये स्टेट बँकेच्या संसद भवन मार्गावरील शाखेत पंतप्रधान इंदिरा गांधींच्या कार्यालयातून त्यांचे सचिव पी.एन.हक्सर यांनी मॅनेजर वेदप्रकाश मल्होत्रांना फोन केला आणि पंतप्रधानांना तुमच्याशी बोलायचे आहे असे म्हटले. थेट पंतप्रधानांना आपल्याशी का बोलायचे असेल हा विचार ते करत असताना पलीकडून इंदिरा गांधींसारखा आवाज आला आणि थोड्या वेळात तिथे एक व्यक्ती येईल त्या व्यक्तीला ६० लाख रूपये द्यावेत असे सांगितले गेले. बांगलादेशात एका महत्वाच्या सिक्रेट मिशनसाठी ते पैसे वापरायचे आहेत असे सांगितले गेले. त्याप्रमाणे वेदप्रकाश मल्होत्रांनी एका गोर्‍या गोमट्या व्यक्तीला ६० लाख रूपये दिले. त्याकाळी ६० लाख ही आतापेक्षा कितीतरी मोठी रक्कम होती. आपल्याला फसविले गेले आहे अशी कुणकुण लागताच वेदप्रकाश मल्होत्रांनी थेट संसदभवनात धडक मारली आणि पहिल्यांदा पी.एन.हक्सर यांची आणि नंतर इंदिरा गांधींचीही भेट घेतली. संसदेचे अधिवेशन चालू असल्याने इंदिरा गांधी संसदभवनातील आपल्या कार्यालयात होत्या. दोघांनीही आपण असा कोणताही फोन केला नसल्याचे सांगितले. ते पैसे घेणारा माणूस होता रूस्तम सोहराब नगरवाला हा गृहस्थ आणि ते नगरवाला प्रकरण १९७१ मध्ये खूप गाजले होते. सांगायचा मुद्दा म्हणजे असा कोणीही माणूस त्यावेळेस थेट आधी अपॉईंटमेंट न घेता पंतप्रधानांना जाऊन भेटू शकत होता. आताच्या काळात पंतप्रधान सोडाच त्यांच्या कार्यालयातील कनिष्ठ अधिकार्‍यालाही असे थेट भेटता येईल का याची शंकाच वाटते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मनो 26/03/2025 - 20:24
बहुदा विजय तेंडुलकरांनी असाच एक किस्सा लिहिला आहे, मला आठवतो तेवढे लिहितो. जुन्या काळी गृहमंत्री सरदार पटेल लोकांना सकाळी त्यांच्या प्रभात फेरीच्या वेळी भेटीची वेळ देत, त्यावेळी त्यांच्या फिरण्याच्या मार्गावर, म्हणजे आंब्याच्या झाडाखाली, लिंबाच्या झाडाखाली अशी ठिकाणे ते नेमून देत, आणि त्या जागी पहाटे लोक त्यांना भेटत. एकदा पेपरात नेहरू पुण्यात येणार अशी बातमी एका तरुण पत्रकाराने वाचली. त्यांचा मुक्काम राजभवनात असणार, हे माहीत झाल्याने तो नेहरूंची मुलाखत घेण्यास थेट तिकडे पोचला. तिथल्या खोलीचे दार वाजल्यावर खुद्द नेहरूंनीच दार उघडले, आणि विचारले, "यंग मॅन, व्हॉट डू यू वॉन्ट?" थेट पंतप्रधान असे भेटतील आणि दार उघडतील ही अपेक्षा त्या पत्रकाराला नसल्यामुळे त्याची दातखिळीच बसली आणि त्याला काहीही बोलता येईना. काही वेळाने त्याची परिस्थिती नेहरूंच्या लक्षात आल्यावर मग त्याची भीती घालवून त्याची योग्य ती संभावना करून त्याला परत पाठवले. एकंदर सुरक्षेचे अवडंबर ही आपल्या पिढीत आलेली गोष्ट आहे, ती पूर्वी नव्हती.

In reply to by मनो

सुरक्षेची गरज ही केवळ वी.आय.पी मंडळींसाठीच अशी राहीलेली नाही. सर्वसामान्या सार्वजनिक जागीही झाली आहे. जुन्या हिंदी वगैरे चित्रपटांमध्ये मुंबई व दिल्लीविमानतळे दिसतात तेव्हा सध्या कार्यरत असलेली सुरक्षा यंत्रणेचा मागमूस अजिबात दिसत नाही. व्ही.आय.पीं साठी लागणार्या कठोर सुरक्षा यंत्रणेचे भूत हे आत्मघातकी हल्लेखोरांमुळे अस्तित्वात आलेले आहे आणि विमानतळ वा तत्सम ठिकाणी असलेली सुरक्षा यंत्रणा ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर अजुनच कठोर झाली.

विवेकपटाईत 25/03/2025 - 11:45
या लेखात फक्त सुरक्षा यंत्रणाची चूक दाखवली आहे. राजनेता फक्त आजच्या व्होट बँक साठी जातीची राजनीति करतात. त्यांच्या आहारी जाऊन प्रतिसाद देतांना कोणालाही दोष देऊ नये, कारण या धाग्याचा तो हेतु नाही. बाकी कुणालाही त्या वेळची परिस्थिति माहीत नाही.

माझ्या वडिलांनी सांगितलेला किस्सा केव्हातरी साल माहीत नाही पण वडील १२-१४ वर्षांचे असतील. इंदिरा गांधी धुळ्यात येणार होत्या, प्रचंड गर्दी जमलेली होती, हेलिकॉप्टर ला हेलिपॅड दिसले नाही किंवा गर्दी हेलिपॅड पर्यंत पोहोचली असे काहीतरी झाले असावे पण हेलिकॉप्टर नियोजित जागी ना उतरता त्याच मैदानापासून थोडे लाम्ब एका पटांगणात उतरले, आजबाजूला काहीही नव्हते, वडील त्यावेळी जवळच होते, ते हेलिकॉप्टर जवळ पोहोचले ५-१० मिनिटानी २ अँबेसेडर आणी एक पोलीस गाडी आली आल्या त्यातून २ स्थानिक नेते उतरले, हेलिकॉप्टर मधून इंदिरा गांधी उतरल्या, हार तुरे झाले, इंदिरा गांधीनी घातलेला हार वडिलांच्या हातात दिला नी त्या एम्बेसेडर मधून मार्गस्थ झाल्या त्यावेळी तिथे फक्त ५ लोक होते.

कंजूस 25/03/2025 - 18:43
अनेक वर्षांपासून त्यांची ड्यूटी प्रधानमंत्रीच्या निवासस्थानी होती.
पण ते अंगरक्षक बरीच वर्षे प्रधानमंत्री सुरक्षा सेवेत होते त्यांना बदलणे इंदिरा गांधींना योग्य वाटले नाही. कारण असं आहे की केवळ शीख धर्माचे आहेत म्हणून बदली करणे योग्य नव्हते. अतिरेकी खलिस्तानवाल्यांनी पवित्र सुवर्ण मंदिराचा आश्रय घेणे हे कित्येक शिखांनाही पसंत पडले नव्हते. लेखक खुशवंत सिंहांनाही हे चुकीचे वाटलेले.

In reply to by श्रीगुरुजी

कंजूस 25/03/2025 - 20:58
धरलं तर चालतंय आणि सोडलं तर पळतंय ही गत झाली होती. बोलणी करून मिटवणेही शक्य नव्हते. अतिरेकींचा उत्साह वाढला होता.

In reply to by कंजूस

कुठे त्या पोलादी इंदिरा गांधी! कुठे ते अतिरेक्यांपुढे गुडघे टेकून अतिरेकी कंदहारला सोडणारे! असो!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

युयुत्सु 26/03/2025 - 11:49
अनेक वर्षांपूर्वी या प्रकरणाच्या अंतःप्रवाहांवर उजेड टा़कणारा एक लेख म्०टा० मध्ये प्रसिद्ध झाला होता. कुणी लिहीला ते आठवत नाही पण त्यात असा खुलासा केला गेला होता की त्या विमानात एक 'अतिमहत्त्वाची व्यक्ती' होती. त्या व्यक्तीला वाचविण्यासाठी काही युरोपिअन देशांचा दबाव होता. आता ही कहाणी खरी की खोटी हे कळायला मार्ग नाही.

In reply to by युयुत्सु

वाजपेयींचा पीए की पीए चे नातेवाईक असे काहीतरी प्रकरण होते, त्याना वाचवण्यासाठी अतिरेक्याना पाहिजे त्या सवलती देण्यात आल्या! व्हीआयपी कल्चर हो व्हीआयपी! असो. ह्या धाग्याचा मुख्य उद्देश सुरक्षे संबंधी आहे.

In reply to by युयुत्सु

कोण 27/03/2025 - 16:08
https://www.newindianexpress.com/nation/2024/Sep/06/a-vip-passenger-a-shady-business-little-known-facts-about-the-ic-814-hijack https://www.indiatoday.in/india/story/ic-814-kandahar-hijack-spy-on-flight-ghost-passenger-shashi-bhushan-singh-tomar-raw-station-head-kathmandu-as-dulat-2593312-2024-09-04

In reply to by कोण

रामचंद्र 27/03/2025 - 16:46
दुसऱ्या दुव्यानुसार तोमरप्रकरणी कुठलीही कारवाई तर झाली नाहीच मात्र अमेरिकेतलं उत्तम पोस्टिंग मिळालं हे वाचून अशाच इतर घटनांची आठवण झाली. आपल्याकडं जनहित, देशहितापेक्षा बड्या लोकांशी असलेले संबंध, वशिले महत्त्वाचे ठरतात हेच खरं.

In reply to by कोण

श्रीगुरुजी 27/03/2025 - 19:59
जवळपास २५ वर्षांनंतर ही माहिती कोठून मिळाली? मुळात त्या विमानात डेलारू चा एक मुख्य माणूस होता ही माहिती कोठेही नाही. तो जर अब्जाधीश होता तर जनता वर्गातून का प्रवास करेल? रॉकडे म्हणे अपहरणाची माहिती होती? अशी माहिती होती व विमानात एक अतिमहत्त्वाचा माणूस होता तर रॉ का गप्प राहील? मुळात मूर्ख नेपाळ्यांनी अनेक पाकिस्तानी अतिरेक्यांना मोकळे रान दिले होते. भारत-नेपाळ सीमेवर त्या काळात मदरशांची संख्या अडीच पट वाढली होती व भारतात घुसण्यासाठी पाकडे अतिरेकी नेपाळमध्ये येऊन मदरशात राहून भारतात घुसायचे. विमान अपहरणाचा कट नेपाळमध्ये शिजला. एका पाकिस्तानी विमानातून ते ४-५ अतिरेकी नेपाळमध्ये विमान उतरल्यानंतर टर्मिनलमध्ये जाण्याऐवजी थेट इंडियन एअरलाईन्सच्या विमानात गेले. काठमांडू विमानतळावरील नेपाळी कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठी बोर्डिंग पास तयार ठेवले होते व कोणतीही तपासणी न होते त्यांना थेट विमानतळ प्रांगणातून इंडियन एअरलाईन्सच्या विमानात जाऊ दिले गेले. त्यातूनच पुढे अपहरण झाले. ते विमान अमृतसरला जेमतेम ३५-४० मिनिटे होते. इतक्या कमी वेळात कोणतेही कमांडो दिल्लीतून तेथे पोहोचणे अशक्य होते. इतक्या कमी वेळात प्रवाशांना इजा होऊ न देता अतिरेक्यांना अडविण्यासाठी एखादी योजना बनविणे सुद्धा अशक्य होते. विमानात इंधन भरण्यासाठी जाणाऱ्या टँकरमधून शार्प शूटर पाठवून सर्वप्रथम विमानाची चाके पंक्चर करणे असा एक निर्णय घेतला गेला. परंतु टँकर जवळ येताना अतिरेक्यांना संशय आला व त्यांनी वैमानिकाच्या गळ्याला चाकू लावून विमानोड्डण करायला लावले. तेथून लाहोरमध्ये नेऊन इंधन भरून दुबई व तेथून कंदाहारला नेण्यात आले. दरम्यान रूपेन कट्यालला अत्यंत क्रूर पद्धतीने मारून दुबई विमानतळावर त्याचा मृतदेह फेकण्यात आला. कंदाहारला पोहोचल्यावर तालिबानने तात्काळ विमानाभोवती धावपट्टीवर रणगाडे उभे करून व शेकडो तालिबानी सैनिक उभे करून कोणत्याही प्रकारची कारवाई अशक्य करून टाकली. १७० प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी अत्यंत नाईलाजाने भारताला ३ अतिरेकी सोडावे लागले. सुरूवातीला चाच्यांनी ४० अतिरेकी सोडण्याची मागणी केली होती. परंतु अजित डोवाल व इतरांनी अतिशय चतुराईने बोलणी करून ही मागणी ३ अतिरेक्यांवर आणली. सर्वात प्रमुख धाडस परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह यांचे होते. १७० प्रवाशांना सुखरूप सोडवून आणण्यासाठी ते स्वतःहून कंदाहारला गेले. ते तेथे पोहोचल्यावर चाच्यांनी त्यांनाही डांबून ठेवून अधिक मागण्या केल्या असत्या तर परिस्थिती अजून खूप अवघड झाली असती कारण भारताकडे एकही पर्याय नव्हता. ८-९ दिवस विमानात डांबून ठेवलेल्या १७० प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सर्व स्वच्छतागृहे पूर्ण भरून तुंबली होती. २४ तास आसनात बसून रहावे लागले. लहान मुले, महिला, वृद्ध यांचे खूप छान हाल झाले. रूग्णांना ८ दिवस औषधे मिळाली नाही. संपूर्ण विमानाचा नरक झाला होता. अश्या परिस्थितीत त्यातल्या त्यात कमी किंमत देऊन भारताने यशस्वीपणे एक वगळता उर्वरीत सर्व प्रवासी सुखरूप परत आणले. मूर्ख नेपाळी आणि दुष्ट पाकडे व तालिबान्यांमुळे भारताला हे सहन करावे लागले. नेपाळवर विश्वास ठेवल्याची प्रचंड किंमत भारताला मोजावी लागली. भारताने गुडघे टेकले वगैरे जे बरळतात ते महामूर्ख आहेत. त्यांना काडीचीही अक्कल नाही हे अनेकदा सिद्ध झाले आहे. अपहरणकर्त्यांच्या मागण्या मान्य करणे हे भारतात व अनेक देशात अनेकदा घडले आहे कारण मानवी जीवनाला सर्वाधिक महत्त्व द्यावे लागते. भारतात यापूर्वी १९८९ मध्ये ५ अतिरेकी, १९९१ मध्ये २-३ अतिरेकी व त्यानंतरही अनेकदा अतिरेक्यांना सोडण्यात आले होते. १९९३ मध्ये लष्कराने हजरतबाल मशिदीत अडकविलेल्या ७-८ अतिरेक्यांना सुखरूप पाकिस्तानला पोहोचते करण्यात आले होते कारण त्यांनी मशीद उडवायची धमकी दिली होती. काही वर्षांपूर्वी हमासने पकडलेल्या २ इस्राएली सैनिकांच्या सुटकेसाठी इस्राएलने शेकडो हिजबोल्ला अतिरेकी सोडले होते कारण त्यांच्यासाठी त्या २ सैनिकांचे प्राण महत्त्वाचे होते. त्या विमानातील १७० प्रवाशांना सुखरूप परत आणणे हे भारताचे मोठे यश होते. आता काही महामूर्ख शेणके आपली नसलेली अक्कल पाजळत येतील. अश्यांच्या बरळण्याला कोणीही काडीचीही किंमत देत नाही. या अपहरण कांडावर मिपावर ३-४ धागे आहेत. त्यात अत्यंत सविस्तर चर्चा झाली आहे.

In reply to by श्रीगुरुजी

ते विमान लाहोरमध्ये उतरताना जवळपास इंधन संपले होते आणि विमान पडता पडता वाचले होते. एक गोष्ट कळत नाही. कॅप्टन देवी शरणने ते विमान पाकिस्तानात पाडले असते तर बरे झाले असते. जर दाट लोकवस्तीत किंवा धरण/उर्जा प्रकल्प अशा ठिकाणी पाडले असते तर अधिक चांगले. एक तर आपल्या सगळ्यांना ठार मारणार किंवा सगळ्यांना ओलीस ठेऊन दहशतवादी सोडवायची मागणी करणार हे त्या वेळची परिस्थिती पाहता त्याच्या लक्षात आले नसेल का? त्यावेळेस कारगील ५-६ महिने आधीच झाले होते आणि कारगील नंतर दहशतवादी हल्ले वाढायला लागले होते. नाहीतरी आपण एकतर मरणार आहोत किंवा जगलो तरी आयुष्यभर त्या प्रसंगाची आठवण जाणार नाही आणि आपल्याला ढाल बनवून काही हरामखोरांना सोडायला लागले ही त्रासदायक जाणीव घेऊन पुढचे आयुष्य जगावे लागणार त्यापेक्षा मरतामरता शत्रूचे पण होईल तितके नुकसान करावे हा विचार त्याने केला असता तर बरे झाले असते. समजा नागरी वस्तीत विमान पाडून तिकडच्या निरपराधांना मारायचे नसेल तरी मग उतरताना धावपट्टीवर त्याला विमान पाडता आले नसते का?समजा लाहोरमध्ये काय करायचे हे त्याला आयत्या वेळेस सुचले नसेल तर कंदाहारमध्ये उतरताना क्रॅशलँड करता आले नसते का हा प्रश्न नेहमी पडतो. आता भविष्यात समजा तशी वेळ परत आली आणि दहशतवादी ते विमान पाकिस्तानात उतरवायला भाग पाडत असतील तर ते विमान पाडावे ही सूचना आपल्या सगळ्या वैमानिकांना द्यायला हवी.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

९/११ च्या हल्ल्याच्या वेळेस युनायटेड एअरलाईन्सचे एक विमान युए-९३ चे पण अपहरण झाले होते. आतल्या प्रवाशांना दोन विमाने न्यू यॉर्कमध्ये आणि एक वॉशिंग्टन डी.सी मध्ये इमारतीवर धडकले आहे हे कदाचित कळले असावे असे म्हणायला जागा आहे. आतल्या अनेक प्रवाशांनी घरी फोन केले होते आणि त्यातून इतर अपहरण केलेली विमाने वापरून असे हल्ले झाल्याचे त्यांना कळले असावे. तेव्हा प्रवाशांनी कॉकपिटच्या दारावर धडका देऊन कॉकपिटचे दार उघडले आणि विमान उडविणार्‍या अपहरणकर्त्यांशी झटापट सुरू केली. आपल्याच देशातल्या कुठल्यातरी महत्वाच्या इमारतीवर आपले विमान आदळण्यापेक्षा एवीतेवी मरणारच आहोत तर ते नुकसान टाळावे हा विचार त्या विमानातील प्रवाशांनी केला. शेवटी ते विमान पेनसिल्वेनियात एके ठिकाणी कोसळले. ते विमान कुठे पडेल,नागरी वस्तीत पडेल का की अन्य कुठे पडेल यावर आतल्या प्रवाशांचे काहीही नियंत्रण नव्हते. आयसी-८१४ च्या बाबतीत तर ते विमान पाकिस्तानात कुठेही पडले असते तरी नुकसान तिकडच्याच घाणेरड्या लोकांचे झाले असते. म्हणून वैमानिकाने ते विमान पाकिस्तानात पाडायला हवे होते असे नेहमी वाटते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

+१ पण वर अतिशय बुळचट अश्या नेत्यांची बाजू घेऊन त्याच्या समर्थनार्थ अनेक मुद्दे उपस्थित केले गेलेत! मुळात भाजपच्या नेत्याना विमानातील प्रवाशांची काहीही पडली नव्हती तर विमानातील एका खास व्हिआयपी साठी त्यांनी अतिरेक्यांपुढे गुडघे टेकून अतिरेकी सोडले, सोडलेल्या अतिरेक्याने पुढे काय कारनामे केले हे उघड आहे. भाजपच्या नेत्यांना व्हीआयपी लोकांना वाचवण्यासाठी अतिरेक्यापुढे गुडघे टेकण्याबद्दल काहीही लाजलज्जा वाटली नाही. मुळात विमानातील प्रवासी मेले असते तरी ते देशासाठीच मेले असते. सीमेवर सैनिक बलिदान देतात, हे विमानातले लोक देशासाठी मेले असते तर त्यांच्यासाठी तो सन्मानच असता! देशासाठी बलिदान काय फक्त सैनिकांच द्यायचे का? पण येणेकेन प्रकारे बुळचट नेत्यांचे समर्थन सुरुय!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुम्ही +१ म्हणून जे काही लिहिले आहे त्याचा मी जे काही लिहिले आहे त्याच्याशी काडीमात्र संबंध नाहीये हे लक्षात आले नाही का? माझा मुद्दा हा की वैमानिकाने ते विमान पाकिस्तानात कुठेतरी- नागरी वस्तीत नाहीतर निदान लाहोर विमानतळावर उतरताना तरी पाडायला हवे होते. तुम्ही +१ म्हणत जे काही लिहिले आहे त्याचा या मुद्द्याशी काय संबंध आहे? विमान एकदा कंदाहारला उतरल्यावर आपल्याला दहशतवादी सोडण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिला नव्हता हे पण तितकेच खरे. तालिबान आणि दहशतवाद्यांनी जसवंतसिंगांनाच बंदी बनवले असते तर मात्र आपले पूर्ण हसे झाले असते. नशीबाने तसे काही झाले नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ओके! लक्षात आले, तुमचे मत होते वैमानिकाने हे करायला हवे होते नाहीतरी मरणारच आहोत तर! त्याला सहमती म्हणून +१ दिला! पुढील प्रतिसादात मला म्हणायचे आहे की भारत सरकारने काही साले तरी अतिरेकी सोडायला नको होते भलेही ते १७० प्रवासी मेले असते. पण जेवढे मी वाचले आहे त्यानुसार विमानातील काही “खास” लोकांसाठी विमान कंधाहार पर्यंत जाऊ देण्यात आले नी नंतर आपल्याला काही करता येणार नाही असा देखावा उभा करून भारत सरकारने अतिरेकी सोडले. (काहीशे कोटींची रक्कमही दिली असेही वाचल्याचे आठवते.)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

संग्राम 27/03/2025 - 21:30
तेव्हाची परिस्थिती आणि टेक्नॉलॉजी पाहता "आतल्या अनेक प्रवाशांनी घरी फोन केले होते आणि त्यातून इतर अपहरण केलेली विमाने वापरून असे हल्ले झाल्याचे त्यांना कळले असावे." हे शक्य नसावे ...

In reply to by संग्राम

९/११ च्या विमानांमधील प्रवाशांनी घरी कॉल्स केले होते हे त्यावेळेसही आले होते. आता आंतरजालावर पुढील दुवा मिळाला- https://www.nps.gov/flni/learn/historyculture/phone-calls-from-flight-93.htm हा दुवा .गोव्ह डोमेनवरचा म्हणजे अमेरिका सरकारच्या अधिकृत संकेतस्थळांपैकी एका पानावर आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी 27/03/2025 - 21:39
भारतातील वैमानिकांना अपहरणाचा अनुभव किती होता? यापूर्वी १९७९ मध्ये इंदिरा गांधींना तुरूंगातून सोडा या मागणीसाठी बिहारमधील कॉंग्रेस कार्यकर्ते पांडे बंधूंनी देशांतर्गत विमानाचे अपहरण केले होते. त्यांना नंतर इंदिरा गांधींनी आमदारकी व मंत्रीपदे अशी कठोर शिक्षा दिली होती. अपहरण झाले आहे हे लक्षात आल्यानंतर पुढे काय होणार, विमान कोठे नेणार, मागण्या काय आहेत हे देवी शरण यांना लगेच समजले असण्याची अजिबात शक्यता नाही. सर्वप्रथम प्रवाश्यांना सुरक्षित ठेवावे व दरम्यानच्या काळात भारत सरकार सुटकेसाठी प्रयत्न करेलच या विश्वासावर अत्यंत कणखरपणे त्यांनी परिस्थिती हाताळली. विमान पाकिस्तानवर आदळा हे सांगणे सोपे असते. जगातील कोणताही वैमानिक त्या प्रसंगात तसाच वागला असता.

In reply to by श्रीगुरुजी

भारतातील वैमानिकांना अपहरणाचा अनुभव किती होता?
तसा आपत्कालीन स्थितीचा- पाण्यावर विमान उतरवावे लागणे, विमानातील इंधन संपलेले असणे, विमानातील काही महत्वाची उपकरणे बंद पडणे, आग लागणे, ऑक्सिजन मास्क खाली येणे, विमानाला भोक पडून सीट बेल्ट न बांधलेले प्रवासी विमानाच्या बाहेर फेकले जाणे वगैरे घटनांचा प्रत्यक्ष सामना करावा लागणारे वैमानिक आणि कर्मचारी तसे कमीच असतात. तरीही यापैकी कोणतीही घटना घडल्यास परिस्थितीला कसे सामोरे जायचे याचे प्रशिक्षण वैमानिकांना आणि कर्मचार्‍यांना देतात. १९८० आणि ९० च्या दशकात भारतात विमान अपहरणाच्या कित्येक घटना घडल्या होत्या. १९८० च्या दशकात ६, त्यापैकी १९८४ मध्येच ४ आणि नंतर १९९३ मध्ये भारतीय विमान अपहरणाच्या ४ घटना घडल्या होत्या. त्यामुळे विमान अपहरण झाले तर काय करावे याविषयी काहीही सूचना भारतातील वैमानिकांना दिली गेली नसेल हे असंभवनीय आहे, मला वाटते विमान अपहरण झाल्यास अपहरणकर्ते म्हणतील तसे करा पण प्रवाशांना सुरक्षित ठेवा अशीच सूचना वैमानिकांना दिली जाते. आपण मरणारच असू तर मरता मरता शत्रूचे नुकसान करू ही 'किलर इन्स्टिंक्ट' आपल्या समाजात नाही. त्यामुळे वैमानिकाने तसे विमान लाहोरमध्ये पाडणे फारच कठीण होते. पण पाडले असते तर चांगले झाले असते. निदान यापुढील काळात तरी तशी वेळ आल्यास वैमानिकांनी तसे करावे असे वाटते. असो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी 27/03/2025 - 21:20
असं काही डोक्यात येण्यासाठी मेंदू शांत असावा लागतो. विमानातील इंधन संपत आलेले, विमानात बॉम्ब घेऊन ४-५ दहशतवादी, विमानात १७० प्रवासी अश्या परिस्थितीत कोणताही वैमानिक प्रवाश्यांच्या सुरक्षेलाच सर्वाधिक महत्त्व देणार. अश्या अपहरणप्रसंगी कसे वागायचे याचे प्रशिक्षण वैमानिकांना दिलेले असते का? विमान नागरी वस्तीवर आदळायचे किंवा कंदाहार्मध्ये क्रॅश लँडिंग करायहे हे सांगायला ठीक आहे. चाच्यांच्या नक्की काय मागण्या होत्या हे त्यावेळी देवी शरण यांना माहिती झाले होते का? प्रत्यक्षात विमानातील १७० प्रवाशांचे प्राण वाचविणे हेच वैमानिकाचे एकमेव काम असते आणि ते त्यांनी प्रचंड दबावाखाली भीषण परिस्थितीत उत्तम पार पाडले.

In reply to by श्रीगुरुजी

बुळचट असला म्हणून काय झाले भाजपाचा आहे म्हणून घे बाजू! हा प्रकार अत्यंत डोक्यात जाणारा आहे. म्हात्रे पूल मात्र यास अपवाद आहे. नाव हीच या पुलाची ओळख आहे. परंतु, पुलावरून मार्गस्थ होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हे म्हात्रे कोण, असा प्रश्न मात्र जरूर पडत असेल. तर हे म्हात्रे म्हणजे हुतात्मा रवींद्र म्हात्रे. मकबूल बट्ट या दहशतवाद्याला एका पोलिस अधिकाऱ्याच्या खून प्रकरणात जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या अमानुल्लाखान या दहशतवाद्याने मकबूल बट्टला मुक्त करण्याची केलेली मागणी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी धुडकावली. यामुळे अमानुल्ला खानने भारताचे ब्रिटनमधील उपउच्चायुक्त रवींद्र म्हात्रे यांचे अपहरण केले. मकबूल बट्टच्या मुक्ततेच्या बदल्यात म्हात्रे यांची सुटका करण्यात येईल, असा प्रस्ताव त्याने समोर ठेवला; पण बट्टची सुटका केली जाणार नाही याची खात्री पटल्यावर म्हात्रे यांची हत्या करून त्यांचे शव बर्मिंगहॅमच्या रस्त्यावर फेकून देण्यात आले. त्यानंतर बट्टला ११ फेब्रुवारी १९८४ रोजी तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली. 'आपल्या मुलाचा जीव वाचवणे शक्य नव्हते, कारण देश महत्त्वाचा होता. मी तुमची वैयक्तिकदृष्ट्या अपराधी आहे,' अशा शब्दांत इंदिरा गांधी यांनी म्हात्रे यांच्या आई-वडिलांचे सांत्वन केले होते. देशासाठी वीरमरण पत्करणाऱ्या रवींद्र म्हात्रे यांचे नाव या पुलाला देण्याचा ठराव पुणे महापालिकेने केला. या पुलामुळे कर्वे रस्ता आणि सिंहगड रस्ता यांना पर्याय मिळाला आणि आसपासचा परिसर आणखी जवळ आला आहे. तेव्हापासून हा पूल 'म्हात्रे पूल' म्हणून ओळखला जातो. इतिहास अभ्यासक प्रा. प्र. के. घाणेकर यांनी 'मटा'शी बोलताना या इतिहासाला उजाळा दिला. https://marathi.indiatimes.com/maharashtra/pune-news/mhatre-pool-symbol-of-patriotism/amp_articleshow/74212098.cms इंदिरा गांधींना ही बुळचट पणा दाखवून अतिरेक्यांपुढे गुडघे टेकण्याची संधी होती पण त्या भाजपच्या नव्हत्या नी देशभक्त देखील होत्या.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

'आपल्या मुलाचा जीव वाचवणे शक्य नव्हते, कारण देश महत्त्वाचा होता. मी तुमची वैयक्तिकदृष्ट्या अपराधी आहे,' अशा शब्दांत इंदिरा गांधी यांनी म्हात्रे यांच्या आई-वडिलांचे सांत्वन केले होते. असे सात्वन त्या व्हीआयपीच्या आई वडिलांचेही करता आले असते भाजपेयीना! पण भाजपेयींच्या दृष्टीने देश कधीही महत्वाचा नसतो!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

श्रीगुरुजी 27/03/2025 - 21:43
अजिबात अक्कल नसलेला इतका मूर्ख माणूस वारंवार प्रत्येक धाग्यावर अत्यंत मुर्खासारखे बरळत असतो, याची शरम वाटते.

In reply to by श्रीगुरुजी

प्रतिवाद करणे जमत नसेल तर तसे सांगा! वर मी इंदिरा गांधींचेही उदाहरण दिले आहे, ते पण बरळणे का? असो! ह्यापुढे मी तुमच्या कुठल्याही प्रतिसादाला प्रतिवाद करणार नाही!

In reply to by श्रीगुरुजी

सुबोध खरे 28/03/2025 - 10:25
श्रीगुरुजी कशाला त्या भुजबळांच्या नादाला लागताय? कळफलक आहे म्हणून तो बडवलाच पाहिजे या मनोवृत्तीच्या माणसाशी वाद घालण्याचा फायदा काय?

पण ते अंगरक्षक बरीच वर्षे प्रधानमंत्री सुरक्षा सेवेत होते त्यांना बदलणे इंदिरा गांधींना योग्य वाटले नाही. कारण असं आहे की केवळ शीख धर्माचे आहेत म्हणून बदली करणे योग्य नव्हते. कवीवर्य सुधीर मोघे म्हणतात, मनं काळोखाची गुंफा,मनं तेजाचे राऊळ मनाचा ठाव कुणालाच लागत नाही....... शिख समुदाय हा अतिशय धार्मिक आपल्या धर्मासाठी काहिही करण्यास तयार असतो. काहिही म्हणजे स्वताचे प्राण सुद्धा. शिखांच्या गुरूनीं स्वता आणी कुटुंब धर्म रक्षणार्थ खर्ची घालून एक उदाहरण कायम केले. अशा कट्टर समुदायाच्या खोलवर, शतकानुशतके रूजलेल्या श्रद्धास्थानवर हल्ला झाला तर समुदाय काय आणी कसे रिऍक्ट करेल याचा अंदाज लावणे कठीण आहे. शतकानुशतके इमानदार आणी कर्तव्यदक्ष, कर्तव्यनिष्ठ अशा शिख पलटणीने उठाव केलाच ना! मग अफवा, चिथावणी,गैरसमज, राजकारण काहीही कारण असो. तत्कालीन पंतप्रधान यांनी भावना,राजकारण इत्यादीच्या अहारी जाऊन सुरक्षा सल्लागारांची म्हणणे डावलले. दोन अंगरक्षक तात्पुरते हटवले असते तर पुढचे परिणाम झाले नसते. यातही अनेक निरपराध लोकंच गेले त्यात शिखांची संख्या जास्तच असेल. चार वर्ष पंजाब मधे ऑपरेशन ब्लू स्टार च्या कालावधीत बघितलेली,अनुभवलेल्या परिस्थितीनुरूप माझे मत बनले आहे. दिल्लीत झालेल्या दंगलीच्या काळात मी दिल्लीतच होतो. हे माझे वैयक्तिक मत आहे. इंदिराजी एक सशक्त प्रधान मंत्री होत्या यात शंकाच नाही तसेच शिख समुदाय या बद्दल ही नितांत आदर आहे. @अबा नीं या प्रसंगाला कंदाहार बरोबर जोडून जी काही गरळ ओकली आहे ती चुकीची आहे.

@अबा नीं या प्रसंगाला कंदाहार बरोबर जोडून जी काही गरळ ओकली आहे ती चुकीची आहे. माफ करा कर्नल साहेब! पण देशासाठी भावना वगैरे बाजूला ठेवून कर्तव्यदक्षता दाखवणे सोपे नाही. इंदिराजींनी ते दाखवले! असो! विषयांतर होईल इथे म्हणून जास्त लिहीत नाही. हवे तर खफ वर लिहिता येईल.

परदेशात मोठ्या पदावरील व्यक्ती अधिक मोकळेपणाने सामान्यांमध्ये वावरतात असे वाटते. आपल्याकडे बोफोर्स प्रकरण गाजत होते तेव्हा बोफोर्स कंपनी स्वीडनची असल्याने तिथेही काही प्रमाणात ते प्रकरण गाजत होते. त्यावेळेस स्वीडनचे पंतप्रधान ऑलेफ पामे यांची राजधानी स्टॉकहोममध्ये हत्या झाली. ती कधी? तर ते चित्रपटगृहातून चित्रपट बघून बाहेर पडून रात्री मेट्रो स्टेशनवर जात असताना. म्हणजे देशाचे पंतप्रधान सामान्य लोकांप्रमाणे चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघतात, इतकेच नव्हे तर मेट्रो पकडून आपल्या घरी परत जातात ही परिस्थिती तेव्हा तिकडे होती. फुकाच्या मानवतावादाच्या मागे लागून निर्वासितांच्या नावावर रानटी टोळ्या आपल्या देशात घेण्यापूर्वी स्वीडन, फिनलंड आणि नॉर्वे हे नॉर्डिक देश हे सर्वार्थाने भूतलावरील स्वर्ग होते असे म्हणायला हवे. पण आता नाही :( ओलाफ पामेंच्या हत्येच्या संदर्भात सुरक्षायंत्रणांना काही खबरा मिळाल्या होत्या की नाही कल्पना नाही. की १९८० च्या दशकात पंतप्रधानांसाठी खूप सुरक्षाव्यवस्था ठेवायचीच मुळात गरज वाटली नव्हती कोणाला माहिती. अमेरिकेतील २००८ च्या अध्यक्षीय निवडणुकांचे निकाल लागल्याच्या दुसर्‍या दिवशी पराभूत उमेदवार आणि अ‍ॅरिझोनाचे सिनेटर जॉन मॅककेन फिनिक्स शहरात सुपरमार्केटमध्ये खरेदी करत होते हे त्यावेळेस बातम्यांमध्ये बघितल्याचे आठवते. आपल्याकडे असे होईल का? नेटफ्लिक्सवर पूर्वी 'रोड टो द व्हाईट हाऊस' म्हणून एक मस्त सिरीज बघितली होती. दुर्दैवाने ती सिरीज आता नेटफ्लिक्सवर उपलब्ध नाही. त्यात बघितले की बिल क्लिंटन १९९२ च्या निवडणुकांमध्ये जिंकले. त्याच्या एक वर्ष आधी म्हणजे नोव्हेंबर १९९१ मध्ये ते त्यांच्या सहकार्‍याबरोबर वॉशिंग्टन डी.सी मध्ये एका कॅफेमध्ये कॉफी प्यायला गेले होते. त्यावेळेस बिल क्लिंटन हे अरकॉन्सॉ या राज्याचे गव्हर्नर होते. आपल्याकडे एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री- समजा देवेंद्र फडणवीस, नितीश कुमार किंवा सिद्दरामय्या वगैरे दिल्लीत अशा कोणत्या ठिकाणी जाऊन सहजपणे वावरतील का? शक्यता कमी.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

परदेशात मोठ्या पदावरील व्यक्ती अधिक मोकळेपणाने सामान्यांमध्ये वावरतात असे वाटते. गेले २ दिवस हा व्हिडिओ शोधत होतो, शेवटी मिळालाच! बल्गेरियाच्या अध्यक्षांचा हा मजेशीर व्हिडिओ नक्की पहा! https://youtu.be/UXpdzojh27c?si=NToE3zRlxB-m5vX2

सुबोध खरे 27/03/2025 - 19:13
बहुसंख्य युरोपीय देशांत अनेक पक्षांचे कडबोळे सरकार असते त्यामुले एका वर्षात तीन चार पंतप्रधान पण असू शकतात. अगदी इंग्लंड मध्ये सुद्धा गेल्या १० वर्षात सहा पंतप्रधान झाले आणि फ्रान्स मध्ये सात. ( फ्रान्स मध्ये पंतप्रधानापेक्षा राष्ट्राध्यक्ष जास्त महत्त्वाचा असतो) Italy has its 68th government in 76 years. Why such a high turnover? https://www.euronews.com/my-europe/2022/10/21/italy-is-set-for-its-68th-government-in-76-years-why-such-a-high-turnover त्यामुळे एक पंतप्रधान "गेला" तर तितका फरक पडत नाही. याउलट भारतात, अमेरिकेत, चीन मध्ये किंवा रशिया सारख्या देशात पंतप्रधान/अध्यक्ष हा अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहे आणि त्याच्या केवळ आजारी पडण्यामुळे किंवा जखमी होण्यामुळे फार मोठी उलथा पालथ होऊ शकते. यामुळे या देशांत पंतप्रधान/अध्यक्ष याना प्रचंड सुरक्षा व्यवस्था लागते. जॉर्ज सोरोस सारखे पाताळयंत्री जगभर अशी उलथापालथ करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करत असतात. आताच अमेरिकन निवडणुकीपूर्वी श्री ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न झाला त्यातून ते सुदैवाने वाचले. यातून इस्लामी दहशतवाद जन्माला आल्यापासून जगभर सुरक्षा व्यवस्थांचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढला आहे. ९/११ झाल्यानंतर विमानतळ आणि विमानांच्या सुरक्षेसाठी प्रचंड पैसे आणि प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाया जात आहे. २००० साली गोव्याला मी आईला सोडण्यासाठी लष्करी गणवेशात विमानापर्यंत गेलो होते. आता हि गोष्ट अशक्य आहे. बाकी श्री लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू संशयास्पद स्थितीत झाला. अशीच स्थिती डॉ होमी भाभा आणि अनेक अणुशास्त्रज्ञांची झाली आहे. 11 Indian Nuclear Scientists Died Unnatural Deaths in 4 Years:https://www.ndtv.com/india-news/11-indian-nuclear-scientists-died-unnatural-deaths-in-4-years-1229793 हि २०१५ ची बातमी आहे. यानंतर भारत सरकारने त्यांची सुरक्षा आणि गुप्तहेरखाते यायचा भरीव वाढ केली आहे

वर चर्चा झालेल्या कंदहार प्रकरणातील काही महत्त्वाचे मुद्दे: 1. अमृतसरमध्ये वेळ वाया घालवणे – अपहरणकर्त्यांना मदत? • विमान अमृतसरमध्ये 45 मिनिटे थांबले होते, आणि तेव्हा कारवाई करणे सर्वांत सोपे होते. • एनएसजी (कमांडो) पथक वेळेत पोहोचले नाही, आदेश मिळाले नाहीत, आणि विमान सहज निघून गेले. • काही अहवालांनुसार, हा उशीर मुद्दाम घडवून आणण्यात आला. 2. सरकारला आधीच माहिती होती? • अपहरण झाल्याच्या काही दिवसांपूर्वी भारतीय गुप्तचर यंत्रणांना “हायजॅकिंगचा धोका” असल्याची माहिती मिळाली होती. • तरीही नेपाळमध्ये सुरक्षा ढिसाळ ठेवण्यात आली आणि अपहरणकर्ते सहज आत गेले. 3. सरकारने दबाव न आणता दहशतवाद्यांना सहज मागण्या मान्य केल्या? • तीन कुख्यात दहशतवाद्यांची सुटका तर केलीच, पण त्यांच्यासोबत काहीशे कोटी रुपयेही दिले गेल्याची शक्यता आहे. • मसूद अझहर, उमर शेख यांना सोडल्यामुळे पुढे 2001 चे संसदेवरील हल्ले आणि 2008 च्या मुंबई हल्ल्यासारख्या मोठ्या दहशतवादी घटना घडल्या. • जर सरकार खरोखरच प्रयत्न करत असते, तर किमान एक-दोन अटींवर तडजोड करून हा सौदा केला असता. 4. कंदहारला विमान जाऊ दिल्यावर भारत हतबल बनला – हे ठरवून केलं गेलं? • एकदा विमान तालिबानच्या ताब्यात असलेल्या कंदहारमध्ये गेले की, भारताला लष्करी कारवाई करणे अशक्य होणार हे सरकारला माहीत होते. • मग “आमच्याकडे पर्याय नव्हता” असा प्रचार केला गेला. • जर सरकारला थांबवायचे असते, तर अमृतसरमध्येच एखादी युक्ती केली असती. 5. सरकारमध्ये अंतर्गत मतभेद आणि गुप्त डील? • तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांनी नंतर सांगितले की, “मी या निर्णयाच्या विरोधात होतो, पण मला वेगळ्या परिस्थितीबद्दल सांगण्यात आलं.” • यावरून असे वाटते की सरकारच्या उच्च पातळीवर काही वेगळाच खेळ सुरू होता.

एक प्रश्न आहे, समजा आज भारत पाकिस्तान बांगलादेश मिळून अखंड भारत असता! भारत आज राजकारणाच्या बाबतीत बराच सुशिक्षित आहे, सत्ता मिळवायची म्हणून मोठ्या नेत्यांच्या हत्या भारतात झालेल्या नाहीत, इंदिरा गांधी नी राजीव गांधी ह्यांच्या हत्या झाल्या पण त्यामागे मोठे राजकीय कारण होते त्या हत्या कुणातरी नेत्याने आपल्या मार्गातील काटा काढावा म्हणून झालेल्या नाहीत, पण पाकिस्तानात मात्र अश्या हत्यांची मोठी परंपरा आहे, समजा अखंड भारत असता तर आज पाकिस्तातील नेते भारतीय नेत्यात राहून सुशिक्षित राजकारणी असते की भारतीय राजकारणी त्यांच्यात राहून बिघडले असते?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अखंड भारत असला असता तर लोकसंख्येतील मुस्लिमांची टक्केवारी प्रचंड वाढली असती. आणि आपली परिस्थिती सध्याच्या पाकिस्तान सारखी झाली असती. फाळणी झाली ती नशीब पण अजून चांगल्या प्रकारे फाळणी होऊ शकली असती.

In reply to by रात्रीचे चांदणे

अखंड भारत असला असता तर लोकसंख्येतील मुस्लिमांची टक्केवारी प्रचंड वाढली असती. आणि आपली परिस्थिती सध्याच्या पाकिस्तान सारखी झाली असती.
सहमत आहे. pathan असल्या घाणीबरोबर आपण सुखाने राहू शकलो असतो अशी कल्पना करणेच मुळात चुकीचे आहे.
फाळणी झाली ती नशीब पण अजून चांगल्या प्रकारे फाळणी होऊ शकली असती.
सहमत. फाळणी झाली त्यात लाहोर तिकडे गेले हे वाईट झाले. १९४७ मध्येही लाहोरमध्ये हिंदू आणि शीख बहुसंख्या होती. असे म्हणतात की नेहरूंना काश्मीरला (खरं तर जम्मूला) भारताशी जोडणारा एकमेव रस्ता पठाणकोटमार्गे जात होता त्यामुळे पठाणकोट असलेला गुरदासपूर जिल्हा भारतात पाहिजे होता. त्या जिल्ह्यात ५१% मुस्लिम होते आणि ४९% हिंदू-शीख. एक शक्करगड तालुका वगळता उरलेला गुरदासपूर जिल्हा भारतात आला. आणि त्या बदल्यात लाहोरवरील हक्क सोडला. खखोदेजा. त्यातून वाईट असे झाले की मार्च-एप्रिल १९४७ मध्येच रावळपिंडी आणि वायव्य सरहद्द प्रांतात दंगली सुरू झाल्यावर सुरवातीला अनेक हिंदू आणि शीख निर्वासित लाहोरला आले कारण लाहोर पाकिस्तानात जाणार नाही हा विश्वास होता. त्यांना दुसर्‍यांदा विस्थापित व्हावे लागले. पाकड्यांच्या मागण्या तर भयानक होत्या. त्यांना दिल्ली आणि कलकत्ता पण पाकिस्तानात हवे होते. दिल्ली शहरात त्यावेळी थोडीशी मुस्लिम बहुसंख्या होती. जो काही पाकिस्तान मिळाला त्याला ते 'मॉथ इटन पाकिस्तान' असे म्हणायचे.

आपल्याकडे गेल्या १२-१४ वर्ष्यात, चित्रपट पाहून इतिहासाचे आकलन करण्याचे फॅड पुन्हा वाढीस लागले आहे. कि जे समाजासाठी धोकादायक आहे पण असो ... चित्रपट निंर्माता दिग्दर्शक कलाकार , "सदर कलाकृती काल्पनिक आहे " असे डिस्क्लेमर देऊन , (उतेकर आणि कौशल ) करोडो कमावून , सध्याला विदेशात चिल मध्ये सुट्टी उपभोगत आहे ... ते हि असो .. दोन तीन वेगवेगळ्या घटना (वेगळ्या कालखंडात झालेल्या ) यांची सरमिसळ करून , "आधीच आपुल्या मनीचे टार्गेट पर्यंत कन्क्लुजन येईल अश्या पद्धतीने लेख लिहिण्याची परंपरेला अनुसरून , काही लेख वाचनात येत असतात. छत्रपती संभाजी महाराज यांच्या करंट लोकेशन आणि त्यांचे संख्याबळ याबाबतची अल्ट्रा सेंसेटिव्ह बित्तं बातमी, शत्रूला कंसीस्टंली , महाराजांचे स्वकीय नातेवाईक व काही थिंक टॅंक स्ट्रॅटेजिस्ट प्रोव्हाइड करत होते ... महाराज पकडले गेले तत्क्षणी त्यांची हत्या न करता त्यांना टॉर्चर करत पुढील एक महिना व अधिक दिवस ठेवण्यात आलेले ... त्या काळात कुठलाही मराठा, ब्राम्हण, किंवा कुठल्याही समाजाने सुटकेचे प्रयन्त केलेले दिसत नाही ... कारण युनिव्हर्सल होते , "स्वतः चा फायदा /स्वार्थ"... १८व्या शतकातील संभाजी महाराजांच्या बलिदानाचे पुनरुत्थान आज २१ व्या शतकात ,अनेक संघटना/ नेते/ पक्ष / व्हाट्सअप ग्रुप करताना दिसत आहे.. त्याही मागे तेच कारण युनिव्हर्सल आहे , "स्वतः चा फायदा /स्वार्थ"... ज्यांना आज पुळका उमाळा आला आहे त्यात दोन गट आहे १. प्रत्यक्ष सत्ता लाभार्थी (०.०१ %) यातून मिळणारा लाभ घेणारे २. पढत मूर्ख (काहीही लाभ होणार नसणारे ९९.९९%) तुम्ही ठरवा मिपाकर वाचक (रिऍक्ट होणारे ) कुठल्या गटात येतील ... पण तुमची आयडिया चांगलीये ... अनेक गोष्टींची सरमिसळ करून लेख लिहिण्याची ...

In reply to by स्वरुपसुमित

१८व्या शतकातील संभाजी महाराजांच्या बलिदानाचे पुनरुत्थान आज २१ व्या शतकात ,अनेक संघटना/ नेते/ पक्ष / व्हाट्सअप ग्रुप करताना दिसत आहे.. त्याही मागे तेच कारण युनिव्हर्सल आहे , "स्वतः चा फायदा /स्वार्थ"... ज्यांना आज पुळका उमाळा आला आहे त्यात दोन गट आहे १. प्रत्यक्ष सत्ता लाभार्थी (०.०१ %) यातून मिळणारा लाभ घेणारे २. पढत मूर्ख (काहीही लाभ होणार नसणारे ९९.९९%) तुम्ही ठरवा मिपाकर वाचक (रिऍक्ट होणारे ) कुठल्या गटात येतील ...

१९९९ किंवा २००० सालची गोष्ट असेल. इंग्लिश भाषेवर चांगली पकड यावी म्हणून मी त्याकाळी दररोज 'द हिंदू' हे वर्तमानपत्र वाचायचो. त्यातील लेखांमधील राजकीय मते अजिबात म्हणजे अजिबात पटायची नाहीत. तरीही त्या लेखांमधील इंग्लिश भाषेची पातळी अगदी उच्च दर्जाची असायची म्हणून मी ते वर्तमानपत्र दररोज वाचायचो. त्यात कोणा पत्रकाराचा लेख आला होता. त्यात त्याने पंडित नेहरूंची आठवण सांगितली होती. गोष्ट होती १९६३ सालची. तेव्हा नेहरू ओरिसात राऊरकेलाला गेले होते आणि तो लेख लिहिणारे पत्रकार तेव्हा नुकतेच कॉलेजात गेले होते म्हणजे १६-१७ वर्षे वयाचे असतील. त्या पत्रकाराला नेहरूंची सही पाहिजे होती. नेहरू उघड्या जीपमधून जात असताना आजूबाजूला लोक उभे होते त्यांनी केलेले अभिवादन स्विकारत, मधेमधे एखाद मिनिट थांबत नेहरू पुढे चालले होते. पत्रकार नेहरूंच्या जीपजवळ गेला आणि आपली वही पुढे करत- 'पंडितजी तुमची सही हवी होती' अशाप्रकारचे वाक्य बोलला. त्याने वही पुढे केली खरी पण गर्दीमध्ये त्याच्याकडचे पेन कुठेतरी खाली पडले होते. तेव्हा त्याचा कावराबावरा झालेला चेहरा बघून नेहरूंनी हसत त्याला म्हटले- अरे काही हरकत नाही. माझ्याकडे पेन आहे. असे म्हणत आपल्याकडील पेन घेऊन त्यांनी त्या वहीवर सही करून त्याला दिली. त्याकाळी पंतप्रधानांची सुरक्षाव्यवस्था तितकी कडक नसायची असे दिसते. माझ्या संस्थेत दीक्षांत समारंभाला तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग आले होते कारण आमच्या संस्थेला त्यावर्षी ५० वर्षे पूर्ण झाली होती. आमच्याच संस्थेत जुने फोटो लावले होते त्यावरून समजले की १९६८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी दीक्षांत समारंभाला आल्या होत्या आणि त्यांच्या आजूबाजूला विद्यार्थी पण वावरत होते. आमच्या दीक्षांत समारंभाला मात्र पंतप्रधानांच्या आजूबाजूलाही कोणालाही फिरकायची संधी नव्हती. तसेच उभे राहून कोणीही फोनवर फोटो काढू नयेत अशी सक्त ताकिद आम्हाला दिली होती. पंतप्रधान येणार ते गेट आणि आजूबाजूचा परिसर ते यायच्या तासभर आधीच सील केला होता आणि तिथून कोणालाही सोडत नव्हते. त्यामुळे आम्हाला तिथे आधीच जाऊन उन्हात बसावे लागले होते. मे १९७१ मध्ये स्टेट बँकेच्या संसद भवन मार्गावरील शाखेत पंतप्रधान इंदिरा गांधींच्या कार्यालयातून त्यांचे सचिव पी.एन.हक्सर यांनी मॅनेजर वेदप्रकाश मल्होत्रांना फोन केला आणि पंतप्रधानांना तुमच्याशी बोलायचे आहे असे म्हटले. थेट पंतप्रधानांना आपल्याशी का बोलायचे असेल हा विचार ते करत असताना पलीकडून इंदिरा गांधींसारखा आवाज आला आणि थोड्या वेळात तिथे एक व्यक्ती येईल त्या व्यक्तीला ६० लाख रूपये द्यावेत असे सांगितले गेले. बांगलादेशात एका महत्वाच्या सिक्रेट मिशनसाठी ते पैसे वापरायचे आहेत असे सांगितले गेले. त्याप्रमाणे वेदप्रकाश मल्होत्रांनी एका गोर्‍या गोमट्या व्यक्तीला ६० लाख रूपये दिले. त्याकाळी ६० लाख ही आतापेक्षा कितीतरी मोठी रक्कम होती. आपल्याला फसविले गेले आहे अशी कुणकुण लागताच वेदप्रकाश मल्होत्रांनी थेट संसदभवनात धडक मारली आणि पहिल्यांदा पी.एन.हक्सर यांची आणि नंतर इंदिरा गांधींचीही भेट घेतली. संसदेचे अधिवेशन चालू असल्याने इंदिरा गांधी संसदभवनातील आपल्या कार्यालयात होत्या. दोघांनीही आपण असा कोणताही फोन केला नसल्याचे सांगितले. ते पैसे घेणारा माणूस होता रूस्तम सोहराब नगरवाला हा गृहस्थ आणि ते नगरवाला प्रकरण १९७१ मध्ये खूप गाजले होते. सांगायचा मुद्दा म्हणजे असा कोणीही माणूस त्यावेळेस थेट आधी अपॉईंटमेंट न घेता पंतप्रधानांना जाऊन भेटू शकत होता. आताच्या काळात पंतप्रधान सोडाच त्यांच्या कार्यालयातील कनिष्ठ अधिकार्‍यालाही असे थेट भेटता येईल का याची शंकाच वाटते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मनो 26/03/2025 - 20:24
बहुदा विजय तेंडुलकरांनी असाच एक किस्सा लिहिला आहे, मला आठवतो तेवढे लिहितो. जुन्या काळी गृहमंत्री सरदार पटेल लोकांना सकाळी त्यांच्या प्रभात फेरीच्या वेळी भेटीची वेळ देत, त्यावेळी त्यांच्या फिरण्याच्या मार्गावर, म्हणजे आंब्याच्या झाडाखाली, लिंबाच्या झाडाखाली अशी ठिकाणे ते नेमून देत, आणि त्या जागी पहाटे लोक त्यांना भेटत. एकदा पेपरात नेहरू पुण्यात येणार अशी बातमी एका तरुण पत्रकाराने वाचली. त्यांचा मुक्काम राजभवनात असणार, हे माहीत झाल्याने तो नेहरूंची मुलाखत घेण्यास थेट तिकडे पोचला. तिथल्या खोलीचे दार वाजल्यावर खुद्द नेहरूंनीच दार उघडले, आणि विचारले, "यंग मॅन, व्हॉट डू यू वॉन्ट?" थेट पंतप्रधान असे भेटतील आणि दार उघडतील ही अपेक्षा त्या पत्रकाराला नसल्यामुळे त्याची दातखिळीच बसली आणि त्याला काहीही बोलता येईना. काही वेळाने त्याची परिस्थिती नेहरूंच्या लक्षात आल्यावर मग त्याची भीती घालवून त्याची योग्य ती संभावना करून त्याला परत पाठवले. एकंदर सुरक्षेचे अवडंबर ही आपल्या पिढीत आलेली गोष्ट आहे, ती पूर्वी नव्हती.

In reply to by मनो

सुरक्षेची गरज ही केवळ वी.आय.पी मंडळींसाठीच अशी राहीलेली नाही. सर्वसामान्या सार्वजनिक जागीही झाली आहे. जुन्या हिंदी वगैरे चित्रपटांमध्ये मुंबई व दिल्लीविमानतळे दिसतात तेव्हा सध्या कार्यरत असलेली सुरक्षा यंत्रणेचा मागमूस अजिबात दिसत नाही. व्ही.आय.पीं साठी लागणार्या कठोर सुरक्षा यंत्रणेचे भूत हे आत्मघातकी हल्लेखोरांमुळे अस्तित्वात आलेले आहे आणि विमानतळ वा तत्सम ठिकाणी असलेली सुरक्षा यंत्रणा ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर अजुनच कठोर झाली.

विवेकपटाईत 25/03/2025 - 11:45
या लेखात फक्त सुरक्षा यंत्रणाची चूक दाखवली आहे. राजनेता फक्त आजच्या व्होट बँक साठी जातीची राजनीति करतात. त्यांच्या आहारी जाऊन प्रतिसाद देतांना कोणालाही दोष देऊ नये, कारण या धाग्याचा तो हेतु नाही. बाकी कुणालाही त्या वेळची परिस्थिति माहीत नाही.

माझ्या वडिलांनी सांगितलेला किस्सा केव्हातरी साल माहीत नाही पण वडील १२-१४ वर्षांचे असतील. इंदिरा गांधी धुळ्यात येणार होत्या, प्रचंड गर्दी जमलेली होती, हेलिकॉप्टर ला हेलिपॅड दिसले नाही किंवा गर्दी हेलिपॅड पर्यंत पोहोचली असे काहीतरी झाले असावे पण हेलिकॉप्टर नियोजित जागी ना उतरता त्याच मैदानापासून थोडे लाम्ब एका पटांगणात उतरले, आजबाजूला काहीही नव्हते, वडील त्यावेळी जवळच होते, ते हेलिकॉप्टर जवळ पोहोचले ५-१० मिनिटानी २ अँबेसेडर आणी एक पोलीस गाडी आली आल्या त्यातून २ स्थानिक नेते उतरले, हेलिकॉप्टर मधून इंदिरा गांधी उतरल्या, हार तुरे झाले, इंदिरा गांधीनी घातलेला हार वडिलांच्या हातात दिला नी त्या एम्बेसेडर मधून मार्गस्थ झाल्या त्यावेळी तिथे फक्त ५ लोक होते.

कंजूस 25/03/2025 - 18:43
अनेक वर्षांपासून त्यांची ड्यूटी प्रधानमंत्रीच्या निवासस्थानी होती.
पण ते अंगरक्षक बरीच वर्षे प्रधानमंत्री सुरक्षा सेवेत होते त्यांना बदलणे इंदिरा गांधींना योग्य वाटले नाही. कारण असं आहे की केवळ शीख धर्माचे आहेत म्हणून बदली करणे योग्य नव्हते. अतिरेकी खलिस्तानवाल्यांनी पवित्र सुवर्ण मंदिराचा आश्रय घेणे हे कित्येक शिखांनाही पसंत पडले नव्हते. लेखक खुशवंत सिंहांनाही हे चुकीचे वाटलेले.

In reply to by श्रीगुरुजी

कंजूस 25/03/2025 - 20:58
धरलं तर चालतंय आणि सोडलं तर पळतंय ही गत झाली होती. बोलणी करून मिटवणेही शक्य नव्हते. अतिरेकींचा उत्साह वाढला होता.

In reply to by कंजूस

कुठे त्या पोलादी इंदिरा गांधी! कुठे ते अतिरेक्यांपुढे गुडघे टेकून अतिरेकी कंदहारला सोडणारे! असो!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

युयुत्सु 26/03/2025 - 11:49
अनेक वर्षांपूर्वी या प्रकरणाच्या अंतःप्रवाहांवर उजेड टा़कणारा एक लेख म्०टा० मध्ये प्रसिद्ध झाला होता. कुणी लिहीला ते आठवत नाही पण त्यात असा खुलासा केला गेला होता की त्या विमानात एक 'अतिमहत्त्वाची व्यक्ती' होती. त्या व्यक्तीला वाचविण्यासाठी काही युरोपिअन देशांचा दबाव होता. आता ही कहाणी खरी की खोटी हे कळायला मार्ग नाही.

In reply to by युयुत्सु

वाजपेयींचा पीए की पीए चे नातेवाईक असे काहीतरी प्रकरण होते, त्याना वाचवण्यासाठी अतिरेक्याना पाहिजे त्या सवलती देण्यात आल्या! व्हीआयपी कल्चर हो व्हीआयपी! असो. ह्या धाग्याचा मुख्य उद्देश सुरक्षे संबंधी आहे.

In reply to by युयुत्सु

कोण 27/03/2025 - 16:08
https://www.newindianexpress.com/nation/2024/Sep/06/a-vip-passenger-a-shady-business-little-known-facts-about-the-ic-814-hijack https://www.indiatoday.in/india/story/ic-814-kandahar-hijack-spy-on-flight-ghost-passenger-shashi-bhushan-singh-tomar-raw-station-head-kathmandu-as-dulat-2593312-2024-09-04

In reply to by कोण

रामचंद्र 27/03/2025 - 16:46
दुसऱ्या दुव्यानुसार तोमरप्रकरणी कुठलीही कारवाई तर झाली नाहीच मात्र अमेरिकेतलं उत्तम पोस्टिंग मिळालं हे वाचून अशाच इतर घटनांची आठवण झाली. आपल्याकडं जनहित, देशहितापेक्षा बड्या लोकांशी असलेले संबंध, वशिले महत्त्वाचे ठरतात हेच खरं.

In reply to by कोण

श्रीगुरुजी 27/03/2025 - 19:59
जवळपास २५ वर्षांनंतर ही माहिती कोठून मिळाली? मुळात त्या विमानात डेलारू चा एक मुख्य माणूस होता ही माहिती कोठेही नाही. तो जर अब्जाधीश होता तर जनता वर्गातून का प्रवास करेल? रॉकडे म्हणे अपहरणाची माहिती होती? अशी माहिती होती व विमानात एक अतिमहत्त्वाचा माणूस होता तर रॉ का गप्प राहील? मुळात मूर्ख नेपाळ्यांनी अनेक पाकिस्तानी अतिरेक्यांना मोकळे रान दिले होते. भारत-नेपाळ सीमेवर त्या काळात मदरशांची संख्या अडीच पट वाढली होती व भारतात घुसण्यासाठी पाकडे अतिरेकी नेपाळमध्ये येऊन मदरशात राहून भारतात घुसायचे. विमान अपहरणाचा कट नेपाळमध्ये शिजला. एका पाकिस्तानी विमानातून ते ४-५ अतिरेकी नेपाळमध्ये विमान उतरल्यानंतर टर्मिनलमध्ये जाण्याऐवजी थेट इंडियन एअरलाईन्सच्या विमानात गेले. काठमांडू विमानतळावरील नेपाळी कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठी बोर्डिंग पास तयार ठेवले होते व कोणतीही तपासणी न होते त्यांना थेट विमानतळ प्रांगणातून इंडियन एअरलाईन्सच्या विमानात जाऊ दिले गेले. त्यातूनच पुढे अपहरण झाले. ते विमान अमृतसरला जेमतेम ३५-४० मिनिटे होते. इतक्या कमी वेळात कोणतेही कमांडो दिल्लीतून तेथे पोहोचणे अशक्य होते. इतक्या कमी वेळात प्रवाशांना इजा होऊ न देता अतिरेक्यांना अडविण्यासाठी एखादी योजना बनविणे सुद्धा अशक्य होते. विमानात इंधन भरण्यासाठी जाणाऱ्या टँकरमधून शार्प शूटर पाठवून सर्वप्रथम विमानाची चाके पंक्चर करणे असा एक निर्णय घेतला गेला. परंतु टँकर जवळ येताना अतिरेक्यांना संशय आला व त्यांनी वैमानिकाच्या गळ्याला चाकू लावून विमानोड्डण करायला लावले. तेथून लाहोरमध्ये नेऊन इंधन भरून दुबई व तेथून कंदाहारला नेण्यात आले. दरम्यान रूपेन कट्यालला अत्यंत क्रूर पद्धतीने मारून दुबई विमानतळावर त्याचा मृतदेह फेकण्यात आला. कंदाहारला पोहोचल्यावर तालिबानने तात्काळ विमानाभोवती धावपट्टीवर रणगाडे उभे करून व शेकडो तालिबानी सैनिक उभे करून कोणत्याही प्रकारची कारवाई अशक्य करून टाकली. १७० प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी अत्यंत नाईलाजाने भारताला ३ अतिरेकी सोडावे लागले. सुरूवातीला चाच्यांनी ४० अतिरेकी सोडण्याची मागणी केली होती. परंतु अजित डोवाल व इतरांनी अतिशय चतुराईने बोलणी करून ही मागणी ३ अतिरेक्यांवर आणली. सर्वात प्रमुख धाडस परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह यांचे होते. १७० प्रवाशांना सुखरूप सोडवून आणण्यासाठी ते स्वतःहून कंदाहारला गेले. ते तेथे पोहोचल्यावर चाच्यांनी त्यांनाही डांबून ठेवून अधिक मागण्या केल्या असत्या तर परिस्थिती अजून खूप अवघड झाली असती कारण भारताकडे एकही पर्याय नव्हता. ८-९ दिवस विमानात डांबून ठेवलेल्या १७० प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सर्व स्वच्छतागृहे पूर्ण भरून तुंबली होती. २४ तास आसनात बसून रहावे लागले. लहान मुले, महिला, वृद्ध यांचे खूप छान हाल झाले. रूग्णांना ८ दिवस औषधे मिळाली नाही. संपूर्ण विमानाचा नरक झाला होता. अश्या परिस्थितीत त्यातल्या त्यात कमी किंमत देऊन भारताने यशस्वीपणे एक वगळता उर्वरीत सर्व प्रवासी सुखरूप परत आणले. मूर्ख नेपाळी आणि दुष्ट पाकडे व तालिबान्यांमुळे भारताला हे सहन करावे लागले. नेपाळवर विश्वास ठेवल्याची प्रचंड किंमत भारताला मोजावी लागली. भारताने गुडघे टेकले वगैरे जे बरळतात ते महामूर्ख आहेत. त्यांना काडीचीही अक्कल नाही हे अनेकदा सिद्ध झाले आहे. अपहरणकर्त्यांच्या मागण्या मान्य करणे हे भारतात व अनेक देशात अनेकदा घडले आहे कारण मानवी जीवनाला सर्वाधिक महत्त्व द्यावे लागते. भारतात यापूर्वी १९८९ मध्ये ५ अतिरेकी, १९९१ मध्ये २-३ अतिरेकी व त्यानंतरही अनेकदा अतिरेक्यांना सोडण्यात आले होते. १९९३ मध्ये लष्कराने हजरतबाल मशिदीत अडकविलेल्या ७-८ अतिरेक्यांना सुखरूप पाकिस्तानला पोहोचते करण्यात आले होते कारण त्यांनी मशीद उडवायची धमकी दिली होती. काही वर्षांपूर्वी हमासने पकडलेल्या २ इस्राएली सैनिकांच्या सुटकेसाठी इस्राएलने शेकडो हिजबोल्ला अतिरेकी सोडले होते कारण त्यांच्यासाठी त्या २ सैनिकांचे प्राण महत्त्वाचे होते. त्या विमानातील १७० प्रवाशांना सुखरूप परत आणणे हे भारताचे मोठे यश होते. आता काही महामूर्ख शेणके आपली नसलेली अक्कल पाजळत येतील. अश्यांच्या बरळण्याला कोणीही काडीचीही किंमत देत नाही. या अपहरण कांडावर मिपावर ३-४ धागे आहेत. त्यात अत्यंत सविस्तर चर्चा झाली आहे.

In reply to by श्रीगुरुजी

ते विमान लाहोरमध्ये उतरताना जवळपास इंधन संपले होते आणि विमान पडता पडता वाचले होते. एक गोष्ट कळत नाही. कॅप्टन देवी शरणने ते विमान पाकिस्तानात पाडले असते तर बरे झाले असते. जर दाट लोकवस्तीत किंवा धरण/उर्जा प्रकल्प अशा ठिकाणी पाडले असते तर अधिक चांगले. एक तर आपल्या सगळ्यांना ठार मारणार किंवा सगळ्यांना ओलीस ठेऊन दहशतवादी सोडवायची मागणी करणार हे त्या वेळची परिस्थिती पाहता त्याच्या लक्षात आले नसेल का? त्यावेळेस कारगील ५-६ महिने आधीच झाले होते आणि कारगील नंतर दहशतवादी हल्ले वाढायला लागले होते. नाहीतरी आपण एकतर मरणार आहोत किंवा जगलो तरी आयुष्यभर त्या प्रसंगाची आठवण जाणार नाही आणि आपल्याला ढाल बनवून काही हरामखोरांना सोडायला लागले ही त्रासदायक जाणीव घेऊन पुढचे आयुष्य जगावे लागणार त्यापेक्षा मरतामरता शत्रूचे पण होईल तितके नुकसान करावे हा विचार त्याने केला असता तर बरे झाले असते. समजा नागरी वस्तीत विमान पाडून तिकडच्या निरपराधांना मारायचे नसेल तरी मग उतरताना धावपट्टीवर त्याला विमान पाडता आले नसते का?समजा लाहोरमध्ये काय करायचे हे त्याला आयत्या वेळेस सुचले नसेल तर कंदाहारमध्ये उतरताना क्रॅशलँड करता आले नसते का हा प्रश्न नेहमी पडतो. आता भविष्यात समजा तशी वेळ परत आली आणि दहशतवादी ते विमान पाकिस्तानात उतरवायला भाग पाडत असतील तर ते विमान पाडावे ही सूचना आपल्या सगळ्या वैमानिकांना द्यायला हवी.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

९/११ च्या हल्ल्याच्या वेळेस युनायटेड एअरलाईन्सचे एक विमान युए-९३ चे पण अपहरण झाले होते. आतल्या प्रवाशांना दोन विमाने न्यू यॉर्कमध्ये आणि एक वॉशिंग्टन डी.सी मध्ये इमारतीवर धडकले आहे हे कदाचित कळले असावे असे म्हणायला जागा आहे. आतल्या अनेक प्रवाशांनी घरी फोन केले होते आणि त्यातून इतर अपहरण केलेली विमाने वापरून असे हल्ले झाल्याचे त्यांना कळले असावे. तेव्हा प्रवाशांनी कॉकपिटच्या दारावर धडका देऊन कॉकपिटचे दार उघडले आणि विमान उडविणार्‍या अपहरणकर्त्यांशी झटापट सुरू केली. आपल्याच देशातल्या कुठल्यातरी महत्वाच्या इमारतीवर आपले विमान आदळण्यापेक्षा एवीतेवी मरणारच आहोत तर ते नुकसान टाळावे हा विचार त्या विमानातील प्रवाशांनी केला. शेवटी ते विमान पेनसिल्वेनियात एके ठिकाणी कोसळले. ते विमान कुठे पडेल,नागरी वस्तीत पडेल का की अन्य कुठे पडेल यावर आतल्या प्रवाशांचे काहीही नियंत्रण नव्हते. आयसी-८१४ च्या बाबतीत तर ते विमान पाकिस्तानात कुठेही पडले असते तरी नुकसान तिकडच्याच घाणेरड्या लोकांचे झाले असते. म्हणून वैमानिकाने ते विमान पाकिस्तानात पाडायला हवे होते असे नेहमी वाटते.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

+१ पण वर अतिशय बुळचट अश्या नेत्यांची बाजू घेऊन त्याच्या समर्थनार्थ अनेक मुद्दे उपस्थित केले गेलेत! मुळात भाजपच्या नेत्याना विमानातील प्रवाशांची काहीही पडली नव्हती तर विमानातील एका खास व्हिआयपी साठी त्यांनी अतिरेक्यांपुढे गुडघे टेकून अतिरेकी सोडले, सोडलेल्या अतिरेक्याने पुढे काय कारनामे केले हे उघड आहे. भाजपच्या नेत्यांना व्हीआयपी लोकांना वाचवण्यासाठी अतिरेक्यापुढे गुडघे टेकण्याबद्दल काहीही लाजलज्जा वाटली नाही. मुळात विमानातील प्रवासी मेले असते तरी ते देशासाठीच मेले असते. सीमेवर सैनिक बलिदान देतात, हे विमानातले लोक देशासाठी मेले असते तर त्यांच्यासाठी तो सन्मानच असता! देशासाठी बलिदान काय फक्त सैनिकांच द्यायचे का? पण येणेकेन प्रकारे बुळचट नेत्यांचे समर्थन सुरुय!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुम्ही +१ म्हणून जे काही लिहिले आहे त्याचा मी जे काही लिहिले आहे त्याच्याशी काडीमात्र संबंध नाहीये हे लक्षात आले नाही का? माझा मुद्दा हा की वैमानिकाने ते विमान पाकिस्तानात कुठेतरी- नागरी वस्तीत नाहीतर निदान लाहोर विमानतळावर उतरताना तरी पाडायला हवे होते. तुम्ही +१ म्हणत जे काही लिहिले आहे त्याचा या मुद्द्याशी काय संबंध आहे? विमान एकदा कंदाहारला उतरल्यावर आपल्याला दहशतवादी सोडण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिला नव्हता हे पण तितकेच खरे. तालिबान आणि दहशतवाद्यांनी जसवंतसिंगांनाच बंदी बनवले असते तर मात्र आपले पूर्ण हसे झाले असते. नशीबाने तसे काही झाले नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ओके! लक्षात आले, तुमचे मत होते वैमानिकाने हे करायला हवे होते नाहीतरी मरणारच आहोत तर! त्याला सहमती म्हणून +१ दिला! पुढील प्रतिसादात मला म्हणायचे आहे की भारत सरकारने काही साले तरी अतिरेकी सोडायला नको होते भलेही ते १७० प्रवासी मेले असते. पण जेवढे मी वाचले आहे त्यानुसार विमानातील काही “खास” लोकांसाठी विमान कंधाहार पर्यंत जाऊ देण्यात आले नी नंतर आपल्याला काही करता येणार नाही असा देखावा उभा करून भारत सरकारने अतिरेकी सोडले. (काहीशे कोटींची रक्कमही दिली असेही वाचल्याचे आठवते.)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

संग्राम 27/03/2025 - 21:30
तेव्हाची परिस्थिती आणि टेक्नॉलॉजी पाहता "आतल्या अनेक प्रवाशांनी घरी फोन केले होते आणि त्यातून इतर अपहरण केलेली विमाने वापरून असे हल्ले झाल्याचे त्यांना कळले असावे." हे शक्य नसावे ...

In reply to by संग्राम

९/११ च्या विमानांमधील प्रवाशांनी घरी कॉल्स केले होते हे त्यावेळेसही आले होते. आता आंतरजालावर पुढील दुवा मिळाला- https://www.nps.gov/flni/learn/historyculture/phone-calls-from-flight-93.htm हा दुवा .गोव्ह डोमेनवरचा म्हणजे अमेरिका सरकारच्या अधिकृत संकेतस्थळांपैकी एका पानावर आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी 27/03/2025 - 21:39
भारतातील वैमानिकांना अपहरणाचा अनुभव किती होता? यापूर्वी १९७९ मध्ये इंदिरा गांधींना तुरूंगातून सोडा या मागणीसाठी बिहारमधील कॉंग्रेस कार्यकर्ते पांडे बंधूंनी देशांतर्गत विमानाचे अपहरण केले होते. त्यांना नंतर इंदिरा गांधींनी आमदारकी व मंत्रीपदे अशी कठोर शिक्षा दिली होती. अपहरण झाले आहे हे लक्षात आल्यानंतर पुढे काय होणार, विमान कोठे नेणार, मागण्या काय आहेत हे देवी शरण यांना लगेच समजले असण्याची अजिबात शक्यता नाही. सर्वप्रथम प्रवाश्यांना सुरक्षित ठेवावे व दरम्यानच्या काळात भारत सरकार सुटकेसाठी प्रयत्न करेलच या विश्वासावर अत्यंत कणखरपणे त्यांनी परिस्थिती हाताळली. विमान पाकिस्तानवर आदळा हे सांगणे सोपे असते. जगातील कोणताही वैमानिक त्या प्रसंगात तसाच वागला असता.

In reply to by श्रीगुरुजी

भारतातील वैमानिकांना अपहरणाचा अनुभव किती होता?
तसा आपत्कालीन स्थितीचा- पाण्यावर विमान उतरवावे लागणे, विमानातील इंधन संपलेले असणे, विमानातील काही महत्वाची उपकरणे बंद पडणे, आग लागणे, ऑक्सिजन मास्क खाली येणे, विमानाला भोक पडून सीट बेल्ट न बांधलेले प्रवासी विमानाच्या बाहेर फेकले जाणे वगैरे घटनांचा प्रत्यक्ष सामना करावा लागणारे वैमानिक आणि कर्मचारी तसे कमीच असतात. तरीही यापैकी कोणतीही घटना घडल्यास परिस्थितीला कसे सामोरे जायचे याचे प्रशिक्षण वैमानिकांना आणि कर्मचार्‍यांना देतात. १९८० आणि ९० च्या दशकात भारतात विमान अपहरणाच्या कित्येक घटना घडल्या होत्या. १९८० च्या दशकात ६, त्यापैकी १९८४ मध्येच ४ आणि नंतर १९९३ मध्ये भारतीय विमान अपहरणाच्या ४ घटना घडल्या होत्या. त्यामुळे विमान अपहरण झाले तर काय करावे याविषयी काहीही सूचना भारतातील वैमानिकांना दिली गेली नसेल हे असंभवनीय आहे, मला वाटते विमान अपहरण झाल्यास अपहरणकर्ते म्हणतील तसे करा पण प्रवाशांना सुरक्षित ठेवा अशीच सूचना वैमानिकांना दिली जाते. आपण मरणारच असू तर मरता मरता शत्रूचे नुकसान करू ही 'किलर इन्स्टिंक्ट' आपल्या समाजात नाही. त्यामुळे वैमानिकाने तसे विमान लाहोरमध्ये पाडणे फारच कठीण होते. पण पाडले असते तर चांगले झाले असते. निदान यापुढील काळात तरी तशी वेळ आल्यास वैमानिकांनी तसे करावे असे वाटते. असो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

श्रीगुरुजी 27/03/2025 - 21:20
असं काही डोक्यात येण्यासाठी मेंदू शांत असावा लागतो. विमानातील इंधन संपत आलेले, विमानात बॉम्ब घेऊन ४-५ दहशतवादी, विमानात १७० प्रवासी अश्या परिस्थितीत कोणताही वैमानिक प्रवाश्यांच्या सुरक्षेलाच सर्वाधिक महत्त्व देणार. अश्या अपहरणप्रसंगी कसे वागायचे याचे प्रशिक्षण वैमानिकांना दिलेले असते का? विमान नागरी वस्तीवर आदळायचे किंवा कंदाहार्मध्ये क्रॅश लँडिंग करायहे हे सांगायला ठीक आहे. चाच्यांच्या नक्की काय मागण्या होत्या हे त्यावेळी देवी शरण यांना माहिती झाले होते का? प्रत्यक्षात विमानातील १७० प्रवाशांचे प्राण वाचविणे हेच वैमानिकाचे एकमेव काम असते आणि ते त्यांनी प्रचंड दबावाखाली भीषण परिस्थितीत उत्तम पार पाडले.

In reply to by श्रीगुरुजी

बुळचट असला म्हणून काय झाले भाजपाचा आहे म्हणून घे बाजू! हा प्रकार अत्यंत डोक्यात जाणारा आहे. म्हात्रे पूल मात्र यास अपवाद आहे. नाव हीच या पुलाची ओळख आहे. परंतु, पुलावरून मार्गस्थ होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हे म्हात्रे कोण, असा प्रश्न मात्र जरूर पडत असेल. तर हे म्हात्रे म्हणजे हुतात्मा रवींद्र म्हात्रे. मकबूल बट्ट या दहशतवाद्याला एका पोलिस अधिकाऱ्याच्या खून प्रकरणात जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या अमानुल्लाखान या दहशतवाद्याने मकबूल बट्टला मुक्त करण्याची केलेली मागणी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी धुडकावली. यामुळे अमानुल्ला खानने भारताचे ब्रिटनमधील उपउच्चायुक्त रवींद्र म्हात्रे यांचे अपहरण केले. मकबूल बट्टच्या मुक्ततेच्या बदल्यात म्हात्रे यांची सुटका करण्यात येईल, असा प्रस्ताव त्याने समोर ठेवला; पण बट्टची सुटका केली जाणार नाही याची खात्री पटल्यावर म्हात्रे यांची हत्या करून त्यांचे शव बर्मिंगहॅमच्या रस्त्यावर फेकून देण्यात आले. त्यानंतर बट्टला ११ फेब्रुवारी १९८४ रोजी तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली. 'आपल्या मुलाचा जीव वाचवणे शक्य नव्हते, कारण देश महत्त्वाचा होता. मी तुमची वैयक्तिकदृष्ट्या अपराधी आहे,' अशा शब्दांत इंदिरा गांधी यांनी म्हात्रे यांच्या आई-वडिलांचे सांत्वन केले होते. देशासाठी वीरमरण पत्करणाऱ्या रवींद्र म्हात्रे यांचे नाव या पुलाला देण्याचा ठराव पुणे महापालिकेने केला. या पुलामुळे कर्वे रस्ता आणि सिंहगड रस्ता यांना पर्याय मिळाला आणि आसपासचा परिसर आणखी जवळ आला आहे. तेव्हापासून हा पूल 'म्हात्रे पूल' म्हणून ओळखला जातो. इतिहास अभ्यासक प्रा. प्र. के. घाणेकर यांनी 'मटा'शी बोलताना या इतिहासाला उजाळा दिला. https://marathi.indiatimes.com/maharashtra/pune-news/mhatre-pool-symbol-of-patriotism/amp_articleshow/74212098.cms इंदिरा गांधींना ही बुळचट पणा दाखवून अतिरेक्यांपुढे गुडघे टेकण्याची संधी होती पण त्या भाजपच्या नव्हत्या नी देशभक्त देखील होत्या.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

'आपल्या मुलाचा जीव वाचवणे शक्य नव्हते, कारण देश महत्त्वाचा होता. मी तुमची वैयक्तिकदृष्ट्या अपराधी आहे,' अशा शब्दांत इंदिरा गांधी यांनी म्हात्रे यांच्या आई-वडिलांचे सांत्वन केले होते. असे सात्वन त्या व्हीआयपीच्या आई वडिलांचेही करता आले असते भाजपेयीना! पण भाजपेयींच्या दृष्टीने देश कधीही महत्वाचा नसतो!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

श्रीगुरुजी 27/03/2025 - 21:43
अजिबात अक्कल नसलेला इतका मूर्ख माणूस वारंवार प्रत्येक धाग्यावर अत्यंत मुर्खासारखे बरळत असतो, याची शरम वाटते.

In reply to by श्रीगुरुजी

प्रतिवाद करणे जमत नसेल तर तसे सांगा! वर मी इंदिरा गांधींचेही उदाहरण दिले आहे, ते पण बरळणे का? असो! ह्यापुढे मी तुमच्या कुठल्याही प्रतिसादाला प्रतिवाद करणार नाही!

In reply to by श्रीगुरुजी

सुबोध खरे 28/03/2025 - 10:25
श्रीगुरुजी कशाला त्या भुजबळांच्या नादाला लागताय? कळफलक आहे म्हणून तो बडवलाच पाहिजे या मनोवृत्तीच्या माणसाशी वाद घालण्याचा फायदा काय?

पण ते अंगरक्षक बरीच वर्षे प्रधानमंत्री सुरक्षा सेवेत होते त्यांना बदलणे इंदिरा गांधींना योग्य वाटले नाही. कारण असं आहे की केवळ शीख धर्माचे आहेत म्हणून बदली करणे योग्य नव्हते. कवीवर्य सुधीर मोघे म्हणतात, मनं काळोखाची गुंफा,मनं तेजाचे राऊळ मनाचा ठाव कुणालाच लागत नाही....... शिख समुदाय हा अतिशय धार्मिक आपल्या धर्मासाठी काहिही करण्यास तयार असतो. काहिही म्हणजे स्वताचे प्राण सुद्धा. शिखांच्या गुरूनीं स्वता आणी कुटुंब धर्म रक्षणार्थ खर्ची घालून एक उदाहरण कायम केले. अशा कट्टर समुदायाच्या खोलवर, शतकानुशतके रूजलेल्या श्रद्धास्थानवर हल्ला झाला तर समुदाय काय आणी कसे रिऍक्ट करेल याचा अंदाज लावणे कठीण आहे. शतकानुशतके इमानदार आणी कर्तव्यदक्ष, कर्तव्यनिष्ठ अशा शिख पलटणीने उठाव केलाच ना! मग अफवा, चिथावणी,गैरसमज, राजकारण काहीही कारण असो. तत्कालीन पंतप्रधान यांनी भावना,राजकारण इत्यादीच्या अहारी जाऊन सुरक्षा सल्लागारांची म्हणणे डावलले. दोन अंगरक्षक तात्पुरते हटवले असते तर पुढचे परिणाम झाले नसते. यातही अनेक निरपराध लोकंच गेले त्यात शिखांची संख्या जास्तच असेल. चार वर्ष पंजाब मधे ऑपरेशन ब्लू स्टार च्या कालावधीत बघितलेली,अनुभवलेल्या परिस्थितीनुरूप माझे मत बनले आहे. दिल्लीत झालेल्या दंगलीच्या काळात मी दिल्लीतच होतो. हे माझे वैयक्तिक मत आहे. इंदिराजी एक सशक्त प्रधान मंत्री होत्या यात शंकाच नाही तसेच शिख समुदाय या बद्दल ही नितांत आदर आहे. @अबा नीं या प्रसंगाला कंदाहार बरोबर जोडून जी काही गरळ ओकली आहे ती चुकीची आहे.

@अबा नीं या प्रसंगाला कंदाहार बरोबर जोडून जी काही गरळ ओकली आहे ती चुकीची आहे. माफ करा कर्नल साहेब! पण देशासाठी भावना वगैरे बाजूला ठेवून कर्तव्यदक्षता दाखवणे सोपे नाही. इंदिराजींनी ते दाखवले! असो! विषयांतर होईल इथे म्हणून जास्त लिहीत नाही. हवे तर खफ वर लिहिता येईल.

परदेशात मोठ्या पदावरील व्यक्ती अधिक मोकळेपणाने सामान्यांमध्ये वावरतात असे वाटते. आपल्याकडे बोफोर्स प्रकरण गाजत होते तेव्हा बोफोर्स कंपनी स्वीडनची असल्याने तिथेही काही प्रमाणात ते प्रकरण गाजत होते. त्यावेळेस स्वीडनचे पंतप्रधान ऑलेफ पामे यांची राजधानी स्टॉकहोममध्ये हत्या झाली. ती कधी? तर ते चित्रपटगृहातून चित्रपट बघून बाहेर पडून रात्री मेट्रो स्टेशनवर जात असताना. म्हणजे देशाचे पंतप्रधान सामान्य लोकांप्रमाणे चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघतात, इतकेच नव्हे तर मेट्रो पकडून आपल्या घरी परत जातात ही परिस्थिती तेव्हा तिकडे होती. फुकाच्या मानवतावादाच्या मागे लागून निर्वासितांच्या नावावर रानटी टोळ्या आपल्या देशात घेण्यापूर्वी स्वीडन, फिनलंड आणि नॉर्वे हे नॉर्डिक देश हे सर्वार्थाने भूतलावरील स्वर्ग होते असे म्हणायला हवे. पण आता नाही :( ओलाफ पामेंच्या हत्येच्या संदर्भात सुरक्षायंत्रणांना काही खबरा मिळाल्या होत्या की नाही कल्पना नाही. की १९८० च्या दशकात पंतप्रधानांसाठी खूप सुरक्षाव्यवस्था ठेवायचीच मुळात गरज वाटली नव्हती कोणाला माहिती. अमेरिकेतील २००८ च्या अध्यक्षीय निवडणुकांचे निकाल लागल्याच्या दुसर्‍या दिवशी पराभूत उमेदवार आणि अ‍ॅरिझोनाचे सिनेटर जॉन मॅककेन फिनिक्स शहरात सुपरमार्केटमध्ये खरेदी करत होते हे त्यावेळेस बातम्यांमध्ये बघितल्याचे आठवते. आपल्याकडे असे होईल का? नेटफ्लिक्सवर पूर्वी 'रोड टो द व्हाईट हाऊस' म्हणून एक मस्त सिरीज बघितली होती. दुर्दैवाने ती सिरीज आता नेटफ्लिक्सवर उपलब्ध नाही. त्यात बघितले की बिल क्लिंटन १९९२ च्या निवडणुकांमध्ये जिंकले. त्याच्या एक वर्ष आधी म्हणजे नोव्हेंबर १९९१ मध्ये ते त्यांच्या सहकार्‍याबरोबर वॉशिंग्टन डी.सी मध्ये एका कॅफेमध्ये कॉफी प्यायला गेले होते. त्यावेळेस बिल क्लिंटन हे अरकॉन्सॉ या राज्याचे गव्हर्नर होते. आपल्याकडे एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री- समजा देवेंद्र फडणवीस, नितीश कुमार किंवा सिद्दरामय्या वगैरे दिल्लीत अशा कोणत्या ठिकाणी जाऊन सहजपणे वावरतील का? शक्यता कमी.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

परदेशात मोठ्या पदावरील व्यक्ती अधिक मोकळेपणाने सामान्यांमध्ये वावरतात असे वाटते. गेले २ दिवस हा व्हिडिओ शोधत होतो, शेवटी मिळालाच! बल्गेरियाच्या अध्यक्षांचा हा मजेशीर व्हिडिओ नक्की पहा! https://youtu.be/UXpdzojh27c?si=NToE3zRlxB-m5vX2

सुबोध खरे 27/03/2025 - 19:13
बहुसंख्य युरोपीय देशांत अनेक पक्षांचे कडबोळे सरकार असते त्यामुले एका वर्षात तीन चार पंतप्रधान पण असू शकतात. अगदी इंग्लंड मध्ये सुद्धा गेल्या १० वर्षात सहा पंतप्रधान झाले आणि फ्रान्स मध्ये सात. ( फ्रान्स मध्ये पंतप्रधानापेक्षा राष्ट्राध्यक्ष जास्त महत्त्वाचा असतो) Italy has its 68th government in 76 years. Why such a high turnover? https://www.euronews.com/my-europe/2022/10/21/italy-is-set-for-its-68th-government-in-76-years-why-such-a-high-turnover त्यामुळे एक पंतप्रधान "गेला" तर तितका फरक पडत नाही. याउलट भारतात, अमेरिकेत, चीन मध्ये किंवा रशिया सारख्या देशात पंतप्रधान/अध्यक्ष हा अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आहे आणि त्याच्या केवळ आजारी पडण्यामुळे किंवा जखमी होण्यामुळे फार मोठी उलथा पालथ होऊ शकते. यामुळे या देशांत पंतप्रधान/अध्यक्ष याना प्रचंड सुरक्षा व्यवस्था लागते. जॉर्ज सोरोस सारखे पाताळयंत्री जगभर अशी उलथापालथ करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करत असतात. आताच अमेरिकन निवडणुकीपूर्वी श्री ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न झाला त्यातून ते सुदैवाने वाचले. यातून इस्लामी दहशतवाद जन्माला आल्यापासून जगभर सुरक्षा व्यवस्थांचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढला आहे. ९/११ झाल्यानंतर विमानतळ आणि विमानांच्या सुरक्षेसाठी प्रचंड पैसे आणि प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाया जात आहे. २००० साली गोव्याला मी आईला सोडण्यासाठी लष्करी गणवेशात विमानापर्यंत गेलो होते. आता हि गोष्ट अशक्य आहे. बाकी श्री लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू संशयास्पद स्थितीत झाला. अशीच स्थिती डॉ होमी भाभा आणि अनेक अणुशास्त्रज्ञांची झाली आहे. 11 Indian Nuclear Scientists Died Unnatural Deaths in 4 Years:https://www.ndtv.com/india-news/11-indian-nuclear-scientists-died-unnatural-deaths-in-4-years-1229793 हि २०१५ ची बातमी आहे. यानंतर भारत सरकारने त्यांची सुरक्षा आणि गुप्तहेरखाते यायचा भरीव वाढ केली आहे

वर चर्चा झालेल्या कंदहार प्रकरणातील काही महत्त्वाचे मुद्दे: 1. अमृतसरमध्ये वेळ वाया घालवणे – अपहरणकर्त्यांना मदत? • विमान अमृतसरमध्ये 45 मिनिटे थांबले होते, आणि तेव्हा कारवाई करणे सर्वांत सोपे होते. • एनएसजी (कमांडो) पथक वेळेत पोहोचले नाही, आदेश मिळाले नाहीत, आणि विमान सहज निघून गेले. • काही अहवालांनुसार, हा उशीर मुद्दाम घडवून आणण्यात आला. 2. सरकारला आधीच माहिती होती? • अपहरण झाल्याच्या काही दिवसांपूर्वी भारतीय गुप्तचर यंत्रणांना “हायजॅकिंगचा धोका” असल्याची माहिती मिळाली होती. • तरीही नेपाळमध्ये सुरक्षा ढिसाळ ठेवण्यात आली आणि अपहरणकर्ते सहज आत गेले. 3. सरकारने दबाव न आणता दहशतवाद्यांना सहज मागण्या मान्य केल्या? • तीन कुख्यात दहशतवाद्यांची सुटका तर केलीच, पण त्यांच्यासोबत काहीशे कोटी रुपयेही दिले गेल्याची शक्यता आहे. • मसूद अझहर, उमर शेख यांना सोडल्यामुळे पुढे 2001 चे संसदेवरील हल्ले आणि 2008 च्या मुंबई हल्ल्यासारख्या मोठ्या दहशतवादी घटना घडल्या. • जर सरकार खरोखरच प्रयत्न करत असते, तर किमान एक-दोन अटींवर तडजोड करून हा सौदा केला असता. 4. कंदहारला विमान जाऊ दिल्यावर भारत हतबल बनला – हे ठरवून केलं गेलं? • एकदा विमान तालिबानच्या ताब्यात असलेल्या कंदहारमध्ये गेले की, भारताला लष्करी कारवाई करणे अशक्य होणार हे सरकारला माहीत होते. • मग “आमच्याकडे पर्याय नव्हता” असा प्रचार केला गेला. • जर सरकारला थांबवायचे असते, तर अमृतसरमध्येच एखादी युक्ती केली असती. 5. सरकारमध्ये अंतर्गत मतभेद आणि गुप्त डील? • तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण आडवाणी यांनी नंतर सांगितले की, “मी या निर्णयाच्या विरोधात होतो, पण मला वेगळ्या परिस्थितीबद्दल सांगण्यात आलं.” • यावरून असे वाटते की सरकारच्या उच्च पातळीवर काही वेगळाच खेळ सुरू होता.

एक प्रश्न आहे, समजा आज भारत पाकिस्तान बांगलादेश मिळून अखंड भारत असता! भारत आज राजकारणाच्या बाबतीत बराच सुशिक्षित आहे, सत्ता मिळवायची म्हणून मोठ्या नेत्यांच्या हत्या भारतात झालेल्या नाहीत, इंदिरा गांधी नी राजीव गांधी ह्यांच्या हत्या झाल्या पण त्यामागे मोठे राजकीय कारण होते त्या हत्या कुणातरी नेत्याने आपल्या मार्गातील काटा काढावा म्हणून झालेल्या नाहीत, पण पाकिस्तानात मात्र अश्या हत्यांची मोठी परंपरा आहे, समजा अखंड भारत असता तर आज पाकिस्तातील नेते भारतीय नेत्यात राहून सुशिक्षित राजकारणी असते की भारतीय राजकारणी त्यांच्यात राहून बिघडले असते?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अखंड भारत असला असता तर लोकसंख्येतील मुस्लिमांची टक्केवारी प्रचंड वाढली असती. आणि आपली परिस्थिती सध्याच्या पाकिस्तान सारखी झाली असती. फाळणी झाली ती नशीब पण अजून चांगल्या प्रकारे फाळणी होऊ शकली असती.

In reply to by रात्रीचे चांदणे

अखंड भारत असला असता तर लोकसंख्येतील मुस्लिमांची टक्केवारी प्रचंड वाढली असती. आणि आपली परिस्थिती सध्याच्या पाकिस्तान सारखी झाली असती.
सहमत आहे. pathan असल्या घाणीबरोबर आपण सुखाने राहू शकलो असतो अशी कल्पना करणेच मुळात चुकीचे आहे.
फाळणी झाली ती नशीब पण अजून चांगल्या प्रकारे फाळणी होऊ शकली असती.
सहमत. फाळणी झाली त्यात लाहोर तिकडे गेले हे वाईट झाले. १९४७ मध्येही लाहोरमध्ये हिंदू आणि शीख बहुसंख्या होती. असे म्हणतात की नेहरूंना काश्मीरला (खरं तर जम्मूला) भारताशी जोडणारा एकमेव रस्ता पठाणकोटमार्गे जात होता त्यामुळे पठाणकोट असलेला गुरदासपूर जिल्हा भारतात पाहिजे होता. त्या जिल्ह्यात ५१% मुस्लिम होते आणि ४९% हिंदू-शीख. एक शक्करगड तालुका वगळता उरलेला गुरदासपूर जिल्हा भारतात आला. आणि त्या बदल्यात लाहोरवरील हक्क सोडला. खखोदेजा. त्यातून वाईट असे झाले की मार्च-एप्रिल १९४७ मध्येच रावळपिंडी आणि वायव्य सरहद्द प्रांतात दंगली सुरू झाल्यावर सुरवातीला अनेक हिंदू आणि शीख निर्वासित लाहोरला आले कारण लाहोर पाकिस्तानात जाणार नाही हा विश्वास होता. त्यांना दुसर्‍यांदा विस्थापित व्हावे लागले. पाकड्यांच्या मागण्या तर भयानक होत्या. त्यांना दिल्ली आणि कलकत्ता पण पाकिस्तानात हवे होते. दिल्ली शहरात त्यावेळी थोडीशी मुस्लिम बहुसंख्या होती. जो काही पाकिस्तान मिळाला त्याला ते 'मॉथ इटन पाकिस्तान' असे म्हणायचे.
देशात छावा चित्रपट गाजला. माझ्या एका मित्राने फोन वर मला विचारले, विवेक तू तर देशातील सर्वोच्च सुरक्षा अधिकार्‍यांच्या अखत्यारीत आणि एसपीजीत काम केले आहे. या विषयावर तुझे विचार काय आहे. मराठी इतिहासबाबत थोडे बहुत ही लिहले आणि ते जनतेला पटले नाही तर जन भावनांचा भडका उडू शकतो. बिना कुणाच्या भावना दुखविता यावर भाष्य करणे म्हणजे तारेवरची कसरत. तरी ही सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टीकोणातून हा लेख लिहण्याचा प्रयत्न केला आहे. महाभारताच्या युद्धाच्या सुरवात होण्यापूर्वी दुर्योधन सर्व सेनापतींना उद्देश्यून म्हणतो, पितामह भीष्मच्या नेतृत्वात आपले सैन्य अजेय आहे. सर्वांनी पितामह भीष्माची रक्षा करावी.

अमरेंद्र बाहुबली आणी मिपाकरांच्या भेटी!

अमरेंद्र बाहुबली ·

चामुंडराय 24/03/2025 - 20:53
अरे व्वा, भारी ! फक्त दोघांचा कट्टा किंवा गटग छान झाला. प्रत्येक मोठ्या शहरात शोधला तर एक तरी मिपाकर किंवा माबोकर सापडतोच. आणि दिल्लीकर मंडळींच्या आदरातिथ्य आणि अगत्याबद्दल तर प्रश्नच नाही. दिलखुलास असतात दिल्लीकर. वृत्तांत वाचून मजा आली. आबांना आता जास्तीत जास्त मिपाकरांना भेटलेला आयडी असा किताब द्यायला हरकत नाही.

In reply to by चामुंडराय

धन्यवाद! आबांना आता जास्तीत जास्त मिपाकरांना भेटलेला आयडी असा किताब द्यायला हरकत नाही. अरे वा! गिनिज बुक ऑफ मिपा रेकॉर्ड मध्ये मला स्थान मिळायलाच हवे! :)

कंजूस 24/03/2025 - 21:02
भेट आवडली. एकेकटे भेटता त्यामुळे खूप गप्पा होत असतील. आठ दहा जणांचा कट्टा झाला की तेवढ्या व्यापक गप्पा होत नाहीत. तुम्हा दोघांकडे विषयांचा स्टॉक भरपूर असतो. यावरून आठवलं की फार मागे पुणेकर मिपाकर घारापुरी लेणी पाहायला येणार होते. मी लॉन्च तिकिट खिडकीपाशी थांबलो होतो आणि आलेल्यांना पाठवत होतो. दोघे जण गप्पा मारत बाजूच्या कट्ट्यावर बसले होते. अंदाजाने त्यांना विचारले की मिसळपाव कट्ट्यासाठी आला आहात का? तर हो म्हणाले. ( पेठकर काका आणि दीपक कुवेत यांच्या हॉटेल चालवणे या विषयावर गप्पा होत्या.) त्यांच्याशी ओळख करून घेऊन तिथे थोडा वेळ बसलो होतो. हल्ली दोघेही दिसत नाहीत.

ग्रेट भेट, योगायोगाने मिपाकर गणेश पांडे ह्यांची भेट झाली. झालं असकी हैदराबादेत कुठे फिरायचे असा प्लान मी काल विचारला होता. मग कर्नल साहेबांच्या सल्ल्याप्रमाणे मी कुठेही फिरायला न जाता १० वाजेपर्यंत ताणून द्यायची ठरवले. पण सकाळी ९ पर्यंतच झोपू शकलो. आवरून ९:४५ पर्यंत हाटेलात नाश्ता करायला गेलो गणेश सरांचा व्हॉट्सअप मॅसेज होता लोकेशनसह, जवळ असेल तर भेटू. गुगल मॅप उघडलं तर काय आश्चर्य? ह्या अफाट पसरलेल्या निजामाच्या जुन्या राजधानीत गणेश साहेब माझ्यापासून अवघे २५० मीटर वर होते, काल येताना मला गेटवर कारंजे असलेली नी विद्युतरोषणाईने झगमगणारी सुंदर इमारती असलेली सोसायटी दिसली होती त्यातच गणेश सर राहत होते, मग फोनफोनी करुन नाश्ता अर्धाच सोडून निघालो कारण मिपाकर नाश्ता चहा केल्याशिवाय सोडत नाही ह्याचा मला दांडगा अनुभव आहे. गणेश पांडें गेट वर न्यायला आले होते मग त्यांची नेत्रदीपक सोसायटी पाहत घरी पोहोचलो आणी मग दीड तास गप्पात कसे गेले कळालेच नाही, योगायोगाने त्यांचे वडिलही होते हैदराबादेत असा अस्सल रांगडा मराठी पेहराव पाहून मला खूप आनंद झाला, गावाकडची माणसेच संस्कृती जपतात हे पुन्हा एकदा दिसले. त्यांच्याशीही भरपूर गप्पा मारल्या. ते घड्याळ रिपिअरिंग ची कामे करायचे जुन्या काळात ह्यावरून मला नरेंद्र जाधवांचे “आमचा बाप आणी आम्ही” हे पुस्तक आठवले. गणेश पांडे सरानी देखील नरेंद्र जाधवांसारखी उत्तुंग झेप घेतलीय. त्यांचा दांडगा पुस्तक संग्रहदेखील पाहिला, आजचा दिवस सार्थकी लागला, मिपाकर अमरेंद्र बाहुबली ह्यांच्या मिपाकरांच्या भेटी घेण्यात शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.

अबा,कुप्रसिद्ध असलात तरी प्रसिद्धच आहात. आता कु का सु ते इतरांनाच ठरवू द्यात. मस्त वृतांत. कुठल्याही मिपाकराची भेट ही दोन अनोळखी फौजींच्या भेटी सारखीच असते. आम्हां फौजींना ओळख लागत नाही. तसेच मिपाकरांनाही असा माझाही अनुभव आहे. फक्त कळाले की मग तो वर्षानुवर्ष ओळखीचा असल्या सारखेच वाटते.

सौन्दर्य 24/03/2025 - 23:14
सर्व प्रथम आपणा दोघांना प्रत्यक्ष्य (फोटोत का होईना ) भेटून आनंद झाला. माझ्या दुर्दैवाने मी आजपर्यत एकाही मिपाकराला भेटू शकलो नाही. नावाला जर चेहऱ्याची जोड असली की आपुलकी जरा जास्तच वाढते असा माझा अनुभव आहे. मी अमेरिकेत ह्युस्टनला असतो पण पुढच्या वर्षी भारत भेटीला यायची इच्छा आहे, त्यावेळी मिपावर पोस्ट टाकीनच व जमेल तितक्या मिपाकरांना भेटीन.

अरे आणखी एक मिपाकर राहिले, त्याना भेटलोय पण यादीत टाकायचे विसरलो. अमरेंद्र बाहुबली आणि भेटलेले मिपाकर मी ह्या मिपाकरांना कट्ट्याव्यतिरिक्त प्रत्यक्ष भेटलोय: १) श्रीगुरुजी - पुणे २) गणेश गोळे - भोसरी ३) पाषाणभेद - नाशिक ४) सचिन जाधव - नाशिक ५) कुळदादा - नागपूर ६) कर्नल तपस्वी - पुणे ७) राजेंद्र मेहंदळे - पन्हाळगड ते विशाळगड पायी ट्रेक दरम्यान ८) डॉ. दाते - मंचर ९) सस्नेह - इचलकरंजी १०) दुर्गविहारी - कराड ११) प्रकाश घाटपांडे - पुणे १२) श्री. हार्डीकर - पुणे १३) डॉ. दातरंगे - नाशिक १४) भक्तिताई - अहमदनगर १५) रामचंद्र कुळकर्णी - पुणे १६) चित्रगुप्त काका - महू, इंदोर १७) गणेश पांडे - हैदराबाद १८) कौस्तुभ पोंक्षे - पुणे १९) विवेक पटाईत - दिल्ली २०) तुषार कामोद, नाशिक. ऐकून २० झाले.

विवेकपटाईत 25/03/2025 - 07:51
शाळांची सुट्टी असल्याने नातवंडे घरी आली होती. त्यामुळे पाच सहा दिवसांपासून लेपटॉप वर बसलो नव्हतो. पण मोबाइल वर आलेल्या ईमेल वर बाहुबलींचा निरोप मिळाला. त्यांचाशी संपर्क साधला. ते मेरठ इथे होते. आमच्या 22 व्या माल्याचा फ्लॅट मधून नाकाच्या रेषेत मेरठ हाइवे जास्तीस्जास्त एक किलोमीटर दूर असला तरी समोर नोयेडा अथॉरिटीचा मोठा पार्क आणि नंतर एक गाव असल्याने सहज दिसतो. सोमवारी बाहुबली साडे दहा वाजता घरी आले. त्यांची शरीर यष्टी बाहुबली सारखीच आहे. स्वभाव ही अत्यंत प्रेमळ आहे. त्यांच्या जवळ वेळ कमी होता. टॅक्सी खाली थांबलेली होती. घरगुती चर्चा झाल्या. आम्ही मीपाववर असलेल्या एकाही धाग्यावर चर्चा केली नाही. फक्त प्रधानमंत्री कार्यालयाचे काम काय असते यावर दोन किंवा चार मिनिट त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. सौ ने पोहे केले आणि सोबत अनारसे. (सौ. आणि ला ही आवडत असल्याने आमच्या घरी अनरस्याचे पीठ सौ. करून फ्रीज मध्ये ठेवते). त्यांना घर दाखविताना मेरठ हाइवे ही दाखविण्याचा प्रयत्न केला पण वारा चालत नसल्याने आ नि आकाशातील प्रदूषण मुळे स्पष्ट दिसला नाही. आज तर प्रदूषण आणिक जास्त आहे. पण बाहुबली समोर प्रदूषणाचा उल्लेख केला नाही. तसे ही एनसीआर मध्ये पावसाळा आणि संक्रांती ते होळी वारे चालतात फक्त तेंव्हाच प्रदूषण कमी असते. उन्हाळ्यात जेंव्हा लू चालते तेंव्हा वार्‍या सोबत धूळ ही भरपूर असते. त्या मुळे प्रदूषण ही भरपूर असते. बाकी अर्धा-पाऊण तास घरी थांबले असले तरी त्यांची दिल्ली भेटीची आठवण नेहमीच राहील.

सस्नेह 26/03/2025 - 21:11
वाह.. पटाईत काका जुने अन जाणते मिपाकर ! वृत्तांत छान रसभरीत वर्णन.. स्नेहा

जुइ 27/03/2025 - 22:07
विवेकपटाईत काका आणि तुमच्या भेटीचे वर्णन छान! तुम्ही आवर्जून मिपाकराना भेटत राहतात याचे कौतुक वाटते!.

पटाईट साहेब दिसायला भारी आहेत. चेहरा पट्टीवरुन माणूस चांगला, गोड वगैरे आणि प्रेमळ वगैरे वाटतात, तसे असतीलही. आता विचार आणि दळणाच्या बाबतीत थोडं गाय,गोबर, कबर वगैरे आहेत पण एवढं तेवढं चालायचंच. आबा आणि पटाईट हे जालावर विचारांच्या बाबतीत एकदम शेवटची टोकं असे असूनही भेटी-गाठी झाल्या, चहा-पान झालं. हे पाहुन वाचून छान आणि आनंद वाटला. मिपा संस्थापक तात्या म्हणायचा आमचं भांडण आचा-याशी त्याच्या जिल्बीशी नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा 28/03/2025 - 14:02
"पटाईट " असं वाचून खुर्चीतच टाईट होऊन बसलो. प-टाईट असं लिहून काय स्लेष साधला आहे कोण जाणे ! टेक इट हलकेली, प्राडॉ आणि विवेकपटाईत जी ! :-)

In reply to by चौथा कोनाडा

टेक इट हलकेली, प्राडॉ आणि विवेकपटाईत जी !
ट चा अनुप्रासिक वापर पाहुन मी चुकुन वरील वाक्य टेक इट हलकटली, प्राडॉ आणि विवेकपटाईत जी ! असे वाचले.!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विवेकपटाईत 28/03/2025 - 16:44
तुलसीदास म्हणतात "जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखि तीन तैसी"। ज्याच्या डोक्यात जे भरलेले असेल तेच दिसणार.

In reply to by विवेकपटाईत

व्यायामासाठी शाखेत सॉरी आपलं कोणत्या ग्राउंडवर जाता की नाही ? आपल्या चेह-यावरील तकाकी पाहता व्यायाम, प्राणायम याची आवड़ दिसते. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विवेकपटाईत 02/04/2025 - 10:21
आम्ही (नया बाजारातील मराठी मुले आणि रेल्वे कोलोंनीतील) सुट्ट्यांच्या दिवशी कंपनी बागेत (आता काळाच्या ओघात नष्ट झाली) क्रिकेट खेळायचो तिथे शाखा ही लगायची. मोठा भाऊ शाखेत जात असे अर्थात वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत. त्यामुळे आमचे संबंध हिन्दी चीनी भाई भाई सारखे झाले होते. मी घरात इंदिरा गांधींचा मोठे चित्र लाऊन ठेवले होते. बाकी माझे विचार महाविद्वान प्रधानमंत्री ज्यांच्या सोबत अनेक परदेसी दौरे ही केले, काळात बदलले. बाकी मला व्यायामाची आवड कधीच नव्हती आणि वेळ ही मिळत नव्हता.

In reply to by रामचंद्र

सुबोध खरे 02/04/2025 - 20:10
छे छे अशा लेखनाने येथे अनेकांची मूळव्याध, बद्धकोष्ठ, जुना खोकला, मस्तकशूळ सर्व परत नव्याने उपटेल. २०२४ च्या जखमा अजून भळभळत आहेत.

. आज पुन्हा एकदा मिपाकर रामचंद्रकाका ह्यांची भेट घेतली! भरपूर गप्पा नी चहा- निरा - चहा असा बेत झाला! काकांच्या मदतीमुळे एक मोठे कार्य तडीस गेले. ह्याबद्दल काकांचे आभार!

चामुंडराय 24/03/2025 - 20:53
अरे व्वा, भारी ! फक्त दोघांचा कट्टा किंवा गटग छान झाला. प्रत्येक मोठ्या शहरात शोधला तर एक तरी मिपाकर किंवा माबोकर सापडतोच. आणि दिल्लीकर मंडळींच्या आदरातिथ्य आणि अगत्याबद्दल तर प्रश्नच नाही. दिलखुलास असतात दिल्लीकर. वृत्तांत वाचून मजा आली. आबांना आता जास्तीत जास्त मिपाकरांना भेटलेला आयडी असा किताब द्यायला हरकत नाही.

In reply to by चामुंडराय

धन्यवाद! आबांना आता जास्तीत जास्त मिपाकरांना भेटलेला आयडी असा किताब द्यायला हरकत नाही. अरे वा! गिनिज बुक ऑफ मिपा रेकॉर्ड मध्ये मला स्थान मिळायलाच हवे! :)

कंजूस 24/03/2025 - 21:02
भेट आवडली. एकेकटे भेटता त्यामुळे खूप गप्पा होत असतील. आठ दहा जणांचा कट्टा झाला की तेवढ्या व्यापक गप्पा होत नाहीत. तुम्हा दोघांकडे विषयांचा स्टॉक भरपूर असतो. यावरून आठवलं की फार मागे पुणेकर मिपाकर घारापुरी लेणी पाहायला येणार होते. मी लॉन्च तिकिट खिडकीपाशी थांबलो होतो आणि आलेल्यांना पाठवत होतो. दोघे जण गप्पा मारत बाजूच्या कट्ट्यावर बसले होते. अंदाजाने त्यांना विचारले की मिसळपाव कट्ट्यासाठी आला आहात का? तर हो म्हणाले. ( पेठकर काका आणि दीपक कुवेत यांच्या हॉटेल चालवणे या विषयावर गप्पा होत्या.) त्यांच्याशी ओळख करून घेऊन तिथे थोडा वेळ बसलो होतो. हल्ली दोघेही दिसत नाहीत.

ग्रेट भेट, योगायोगाने मिपाकर गणेश पांडे ह्यांची भेट झाली. झालं असकी हैदराबादेत कुठे फिरायचे असा प्लान मी काल विचारला होता. मग कर्नल साहेबांच्या सल्ल्याप्रमाणे मी कुठेही फिरायला न जाता १० वाजेपर्यंत ताणून द्यायची ठरवले. पण सकाळी ९ पर्यंतच झोपू शकलो. आवरून ९:४५ पर्यंत हाटेलात नाश्ता करायला गेलो गणेश सरांचा व्हॉट्सअप मॅसेज होता लोकेशनसह, जवळ असेल तर भेटू. गुगल मॅप उघडलं तर काय आश्चर्य? ह्या अफाट पसरलेल्या निजामाच्या जुन्या राजधानीत गणेश साहेब माझ्यापासून अवघे २५० मीटर वर होते, काल येताना मला गेटवर कारंजे असलेली नी विद्युतरोषणाईने झगमगणारी सुंदर इमारती असलेली सोसायटी दिसली होती त्यातच गणेश सर राहत होते, मग फोनफोनी करुन नाश्ता अर्धाच सोडून निघालो कारण मिपाकर नाश्ता चहा केल्याशिवाय सोडत नाही ह्याचा मला दांडगा अनुभव आहे. गणेश पांडें गेट वर न्यायला आले होते मग त्यांची नेत्रदीपक सोसायटी पाहत घरी पोहोचलो आणी मग दीड तास गप्पात कसे गेले कळालेच नाही, योगायोगाने त्यांचे वडिलही होते हैदराबादेत असा अस्सल रांगडा मराठी पेहराव पाहून मला खूप आनंद झाला, गावाकडची माणसेच संस्कृती जपतात हे पुन्हा एकदा दिसले. त्यांच्याशीही भरपूर गप्पा मारल्या. ते घड्याळ रिपिअरिंग ची कामे करायचे जुन्या काळात ह्यावरून मला नरेंद्र जाधवांचे “आमचा बाप आणी आम्ही” हे पुस्तक आठवले. गणेश पांडे सरानी देखील नरेंद्र जाधवांसारखी उत्तुंग झेप घेतलीय. त्यांचा दांडगा पुस्तक संग्रहदेखील पाहिला, आजचा दिवस सार्थकी लागला, मिपाकर अमरेंद्र बाहुबली ह्यांच्या मिपाकरांच्या भेटी घेण्यात शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.

अबा,कुप्रसिद्ध असलात तरी प्रसिद्धच आहात. आता कु का सु ते इतरांनाच ठरवू द्यात. मस्त वृतांत. कुठल्याही मिपाकराची भेट ही दोन अनोळखी फौजींच्या भेटी सारखीच असते. आम्हां फौजींना ओळख लागत नाही. तसेच मिपाकरांनाही असा माझाही अनुभव आहे. फक्त कळाले की मग तो वर्षानुवर्ष ओळखीचा असल्या सारखेच वाटते.

सौन्दर्य 24/03/2025 - 23:14
सर्व प्रथम आपणा दोघांना प्रत्यक्ष्य (फोटोत का होईना ) भेटून आनंद झाला. माझ्या दुर्दैवाने मी आजपर्यत एकाही मिपाकराला भेटू शकलो नाही. नावाला जर चेहऱ्याची जोड असली की आपुलकी जरा जास्तच वाढते असा माझा अनुभव आहे. मी अमेरिकेत ह्युस्टनला असतो पण पुढच्या वर्षी भारत भेटीला यायची इच्छा आहे, त्यावेळी मिपावर पोस्ट टाकीनच व जमेल तितक्या मिपाकरांना भेटीन.

अरे आणखी एक मिपाकर राहिले, त्याना भेटलोय पण यादीत टाकायचे विसरलो. अमरेंद्र बाहुबली आणि भेटलेले मिपाकर मी ह्या मिपाकरांना कट्ट्याव्यतिरिक्त प्रत्यक्ष भेटलोय: १) श्रीगुरुजी - पुणे २) गणेश गोळे - भोसरी ३) पाषाणभेद - नाशिक ४) सचिन जाधव - नाशिक ५) कुळदादा - नागपूर ६) कर्नल तपस्वी - पुणे ७) राजेंद्र मेहंदळे - पन्हाळगड ते विशाळगड पायी ट्रेक दरम्यान ८) डॉ. दाते - मंचर ९) सस्नेह - इचलकरंजी १०) दुर्गविहारी - कराड ११) प्रकाश घाटपांडे - पुणे १२) श्री. हार्डीकर - पुणे १३) डॉ. दातरंगे - नाशिक १४) भक्तिताई - अहमदनगर १५) रामचंद्र कुळकर्णी - पुणे १६) चित्रगुप्त काका - महू, इंदोर १७) गणेश पांडे - हैदराबाद १८) कौस्तुभ पोंक्षे - पुणे १९) विवेक पटाईत - दिल्ली २०) तुषार कामोद, नाशिक. ऐकून २० झाले.

विवेकपटाईत 25/03/2025 - 07:51
शाळांची सुट्टी असल्याने नातवंडे घरी आली होती. त्यामुळे पाच सहा दिवसांपासून लेपटॉप वर बसलो नव्हतो. पण मोबाइल वर आलेल्या ईमेल वर बाहुबलींचा निरोप मिळाला. त्यांचाशी संपर्क साधला. ते मेरठ इथे होते. आमच्या 22 व्या माल्याचा फ्लॅट मधून नाकाच्या रेषेत मेरठ हाइवे जास्तीस्जास्त एक किलोमीटर दूर असला तरी समोर नोयेडा अथॉरिटीचा मोठा पार्क आणि नंतर एक गाव असल्याने सहज दिसतो. सोमवारी बाहुबली साडे दहा वाजता घरी आले. त्यांची शरीर यष्टी बाहुबली सारखीच आहे. स्वभाव ही अत्यंत प्रेमळ आहे. त्यांच्या जवळ वेळ कमी होता. टॅक्सी खाली थांबलेली होती. घरगुती चर्चा झाल्या. आम्ही मीपाववर असलेल्या एकाही धाग्यावर चर्चा केली नाही. फक्त प्रधानमंत्री कार्यालयाचे काम काय असते यावर दोन किंवा चार मिनिट त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. सौ ने पोहे केले आणि सोबत अनारसे. (सौ. आणि ला ही आवडत असल्याने आमच्या घरी अनरस्याचे पीठ सौ. करून फ्रीज मध्ये ठेवते). त्यांना घर दाखविताना मेरठ हाइवे ही दाखविण्याचा प्रयत्न केला पण वारा चालत नसल्याने आ नि आकाशातील प्रदूषण मुळे स्पष्ट दिसला नाही. आज तर प्रदूषण आणिक जास्त आहे. पण बाहुबली समोर प्रदूषणाचा उल्लेख केला नाही. तसे ही एनसीआर मध्ये पावसाळा आणि संक्रांती ते होळी वारे चालतात फक्त तेंव्हाच प्रदूषण कमी असते. उन्हाळ्यात जेंव्हा लू चालते तेंव्हा वार्‍या सोबत धूळ ही भरपूर असते. त्या मुळे प्रदूषण ही भरपूर असते. बाकी अर्धा-पाऊण तास घरी थांबले असले तरी त्यांची दिल्ली भेटीची आठवण नेहमीच राहील.

सस्नेह 26/03/2025 - 21:11
वाह.. पटाईत काका जुने अन जाणते मिपाकर ! वृत्तांत छान रसभरीत वर्णन.. स्नेहा

जुइ 27/03/2025 - 22:07
विवेकपटाईत काका आणि तुमच्या भेटीचे वर्णन छान! तुम्ही आवर्जून मिपाकराना भेटत राहतात याचे कौतुक वाटते!.

पटाईट साहेब दिसायला भारी आहेत. चेहरा पट्टीवरुन माणूस चांगला, गोड वगैरे आणि प्रेमळ वगैरे वाटतात, तसे असतीलही. आता विचार आणि दळणाच्या बाबतीत थोडं गाय,गोबर, कबर वगैरे आहेत पण एवढं तेवढं चालायचंच. आबा आणि पटाईट हे जालावर विचारांच्या बाबतीत एकदम शेवटची टोकं असे असूनही भेटी-गाठी झाल्या, चहा-पान झालं. हे पाहुन वाचून छान आणि आनंद वाटला. मिपा संस्थापक तात्या म्हणायचा आमचं भांडण आचा-याशी त्याच्या जिल्बीशी नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा 28/03/2025 - 14:02
"पटाईट " असं वाचून खुर्चीतच टाईट होऊन बसलो. प-टाईट असं लिहून काय स्लेष साधला आहे कोण जाणे ! टेक इट हलकेली, प्राडॉ आणि विवेकपटाईत जी ! :-)

In reply to by चौथा कोनाडा

टेक इट हलकेली, प्राडॉ आणि विवेकपटाईत जी !
ट चा अनुप्रासिक वापर पाहुन मी चुकुन वरील वाक्य टेक इट हलकटली, प्राडॉ आणि विवेकपटाईत जी ! असे वाचले.!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विवेकपटाईत 28/03/2025 - 16:44
तुलसीदास म्हणतात "जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखि तीन तैसी"। ज्याच्या डोक्यात जे भरलेले असेल तेच दिसणार.

In reply to by विवेकपटाईत

व्यायामासाठी शाखेत सॉरी आपलं कोणत्या ग्राउंडवर जाता की नाही ? आपल्या चेह-यावरील तकाकी पाहता व्यायाम, प्राणायम याची आवड़ दिसते. ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विवेकपटाईत 02/04/2025 - 10:21
आम्ही (नया बाजारातील मराठी मुले आणि रेल्वे कोलोंनीतील) सुट्ट्यांच्या दिवशी कंपनी बागेत (आता काळाच्या ओघात नष्ट झाली) क्रिकेट खेळायचो तिथे शाखा ही लगायची. मोठा भाऊ शाखेत जात असे अर्थात वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत. त्यामुळे आमचे संबंध हिन्दी चीनी भाई भाई सारखे झाले होते. मी घरात इंदिरा गांधींचा मोठे चित्र लाऊन ठेवले होते. बाकी माझे विचार महाविद्वान प्रधानमंत्री ज्यांच्या सोबत अनेक परदेसी दौरे ही केले, काळात बदलले. बाकी मला व्यायामाची आवड कधीच नव्हती आणि वेळ ही मिळत नव्हता.

In reply to by रामचंद्र

सुबोध खरे 02/04/2025 - 20:10
छे छे अशा लेखनाने येथे अनेकांची मूळव्याध, बद्धकोष्ठ, जुना खोकला, मस्तकशूळ सर्व परत नव्याने उपटेल. २०२४ च्या जखमा अजून भळभळत आहेत.

. आज पुन्हा एकदा मिपाकर रामचंद्रकाका ह्यांची भेट घेतली! भरपूर गप्पा नी चहा- निरा - चहा असा बेत झाला! काकांच्या मदतीमुळे एक मोठे कार्य तडीस गेले. ह्याबद्दल काकांचे आभार!
कुप्रसिद्ध मिपाकर अमरेंद्र बाहुबली ह्यांची दिल्लीवारी – एक संस्मरणीय भेट . दिल्लीला काही कामानिमित्त जाण्याचा योग आला. राजधानीत पाऊल टाकताच, मनात एक विचार आला—मिपाकर विवेककाका पटाईत ह्यांची भेट घ्यावी! पण ते व्यस्त असतील का? संदेश वाचतील का? याची खात्री नव्हती, इंडियागेट पाहून झाल्यावर मी त्यांना मिपावर मेसेज पाठवला आणि सोबतच एक ई-मेलही केला. आश्चर्य म्हणजे, दुसऱ्याच क्षणी काकांचा फोन आला!

स्त्रीत्वाचे शीलहरण!

गंगाधर मुटे ·
स्त्रीत्वाचे शीलहरण!
 
स्त्रियाच करिती परस्परांचे 
शीलचारित्र्य हनन मस्त 
मातृत्वाचे वस्त्र फाडणे 
त्यांच्या लेखी दिसते स्वस्त
 
तारतम्य अन विवेकाचे
उरत नसते त्यांना  भान
कुस्करती मग एकमेकींचा 
स्त्रीयाच स्त्रीत्वाचा सन्मान
 
बघुनी नागड्या नालस्तीला
बीभत्सतेला येते ग्लानी
निती, सभ्यता, मानवताही
वितळून होती पाणी पाणी

बाजाराचा कल: २४ मार्चचा आठवडा

युयुत्सु ·

तसा मी मिपावर शनिवार रविवार फिरकत नाही .. पण युयुत्सु आपल्या या भाकितासाठी एक डोळा ठेवून येतो गेल्या काही आठवड्यांपासून ... आपल्या भाकिताजवळपास माझीही या येत्या आठवड्यकडून अपेक्षा आहे .. देशी बैल २३७०० पर्यंत नेल्यासारखं दाखवतील पण बाजार तिकडून पलटी मारेल ६६% अपेक्षा किंवा सरप्राईस देण्यासाठी २४७०० पर्यंत नेतील अन तिकडून पलटी मारतील ३४% अपेक्षा ... पण आपल्या अपेक्षांना बाजार काय भीक घालेल (अशी भीती माझ्या मनात ) जर मी (ऍव्हरेज पर्सन) या अपेक्षा ठेवून आहे ... हे तर ऑपेरेटर्सला सुद्धा माहिती असेल ... म्हणून ते कधी दारामागून येऊन आपल्याला भॉ करून दचकवतील ... त्यामुळे हीच धाकधूक ठेवून घाबरत घाबरत एक एक दिवस घालवावा लागतो मला ...

In reply to by युयुत्सु

२३७०० हा पाहिला रेसिस्टेन्स वाटतोय (किंवा माझी श्रद्धा आहे म्हणा ) २४७०० हा दुसरा रेसिस्टेन्स वाटतोय (किंवा माझी श्रद्धा आहे म्हणा )

In reply to by आंद्रे वडापाव

आग्या१९९० 22/03/2025 - 14:37
RSI ६६ च्या आसपास आहे ओव्हर बॉटच्या जवळ असल्याने प्रॉफिट बुकिंगची शक्यता वाढली आहे. मार्च अखेरचा निफ्टी रेसिस्टेन्स २४३८१ आहे.

In reply to by आग्या१९९०

युयुत्सु 22/03/2025 - 18:26
आग्या१९९० मालक, RSI आणि इतर अनेक इंडिकेटरचा पार चिपाड होई पर्यंत कीस काढला आहे. त्यात असे लक्षात आले की त्याला प्रेडीक्टीव्ह व्हॅल्यू काहीही नाही. तो lagging indicator आहे. RSI ठराविक असताना व्हॉल्युम कसा अहे यावर त्याची उपयुकतता ठरते.

In reply to by युयुत्सु

आग्या१९९० 22/03/2025 - 19:22
बरोबर आहे. कुठल्याच एका इंडिकेटरवर भरोसा ठेवून ट्रेडिंग करणे धोकादायक असते. तरीही ठराविक इंडिकेटरचा वापर करून चांगला नफा कमावता येतो.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु 22/03/2025 - 18:19
युरो ९१.३ पर्यंत खाली येईल असा माझा अंदाज आहे. कधी ते सांगता येत नाही. युयुत्सुनेट इथे वापरता आले नाही कारण व्हॉल्युम उपलब्ध नाही.

युयुत्सु 23/03/2025 - 12:00
इकड्चं तिकडचं १. काल एक माहितीपट बघत असताना काही मनोरंजक माहिती समजली की डीपसिकचा संस्थापक अगोदर एक ट्रेडर होता आणि हेज फंड चालवायचा. त्याने तयार केलेल्या अल्गोरिदमने खुप पैसा मिळवून दिला. या पैशातून त्याने जीपीयु खरेदी केले आणि डीपसिक ए०आय० ची निर्मिती केली. २. ग्रोक ए०आय० ने भारत सरकारला उचकवलं असलं तरी "संशोधन-मदतनीस" म्हणून त्याचे काम बघून मी प्रभावित झालो आहे. त्यात थापा सध्यातरी कमी सापडल्या आणी अहवालाचा दर्जा उत्तम होता भारतीय लोक अजूनही ए०आय० बद्दल किरकिरच जास्त करत आहेत. ग्रोक वर बंदी घातली तर मी सरकारवर बंदी घालणार हे मात्र नक्की :)

In reply to by युयुत्सु

अवांतर: यु एस कडे चाट जिपि टी, ग्रोक आहे... चायना कडे डीप सिक आहे, कारण त्यांच्याकडं सायंटिफिक टेम्परामेंट आहे, ए आय त्यांची प्रायोरिटी आहे... आपल्याकडे औरंगजेबचा आत्मा आहे...

वामन देशमुख 27/03/2025 - 05:28
या धाग्यातील युयुत्सु-नेट चे भाकीत खरे होताना दिसत आहे, अजून दोन दिवस आहेत हा आठवडा, महिना आणि वर्ष संपायला. --- या धाग्यावर तरी अप्रस्तुत प्रतिसाद येऊ नयेत ही वेडी आशा.

तसा मी मिपावर शनिवार रविवार फिरकत नाही .. पण युयुत्सु आपल्या या भाकितासाठी एक डोळा ठेवून येतो गेल्या काही आठवड्यांपासून ... आपल्या भाकिताजवळपास माझीही या येत्या आठवड्यकडून अपेक्षा आहे .. देशी बैल २३७०० पर्यंत नेल्यासारखं दाखवतील पण बाजार तिकडून पलटी मारेल ६६% अपेक्षा किंवा सरप्राईस देण्यासाठी २४७०० पर्यंत नेतील अन तिकडून पलटी मारतील ३४% अपेक्षा ... पण आपल्या अपेक्षांना बाजार काय भीक घालेल (अशी भीती माझ्या मनात ) जर मी (ऍव्हरेज पर्सन) या अपेक्षा ठेवून आहे ... हे तर ऑपेरेटर्सला सुद्धा माहिती असेल ... म्हणून ते कधी दारामागून येऊन आपल्याला भॉ करून दचकवतील ... त्यामुळे हीच धाकधूक ठेवून घाबरत घाबरत एक एक दिवस घालवावा लागतो मला ...

In reply to by युयुत्सु

२३७०० हा पाहिला रेसिस्टेन्स वाटतोय (किंवा माझी श्रद्धा आहे म्हणा ) २४७०० हा दुसरा रेसिस्टेन्स वाटतोय (किंवा माझी श्रद्धा आहे म्हणा )

In reply to by आंद्रे वडापाव

आग्या१९९० 22/03/2025 - 14:37
RSI ६६ च्या आसपास आहे ओव्हर बॉटच्या जवळ असल्याने प्रॉफिट बुकिंगची शक्यता वाढली आहे. मार्च अखेरचा निफ्टी रेसिस्टेन्स २४३८१ आहे.

In reply to by आग्या१९९०

युयुत्सु 22/03/2025 - 18:26
आग्या१९९० मालक, RSI आणि इतर अनेक इंडिकेटरचा पार चिपाड होई पर्यंत कीस काढला आहे. त्यात असे लक्षात आले की त्याला प्रेडीक्टीव्ह व्हॅल्यू काहीही नाही. तो lagging indicator आहे. RSI ठराविक असताना व्हॉल्युम कसा अहे यावर त्याची उपयुकतता ठरते.

In reply to by युयुत्सु

आग्या१९९० 22/03/2025 - 19:22
बरोबर आहे. कुठल्याच एका इंडिकेटरवर भरोसा ठेवून ट्रेडिंग करणे धोकादायक असते. तरीही ठराविक इंडिकेटरचा वापर करून चांगला नफा कमावता येतो.

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु 22/03/2025 - 18:19
युरो ९१.३ पर्यंत खाली येईल असा माझा अंदाज आहे. कधी ते सांगता येत नाही. युयुत्सुनेट इथे वापरता आले नाही कारण व्हॉल्युम उपलब्ध नाही.

युयुत्सु 23/03/2025 - 12:00
इकड्चं तिकडचं १. काल एक माहितीपट बघत असताना काही मनोरंजक माहिती समजली की डीपसिकचा संस्थापक अगोदर एक ट्रेडर होता आणि हेज फंड चालवायचा. त्याने तयार केलेल्या अल्गोरिदमने खुप पैसा मिळवून दिला. या पैशातून त्याने जीपीयु खरेदी केले आणि डीपसिक ए०आय० ची निर्मिती केली. २. ग्रोक ए०आय० ने भारत सरकारला उचकवलं असलं तरी "संशोधन-मदतनीस" म्हणून त्याचे काम बघून मी प्रभावित झालो आहे. त्यात थापा सध्यातरी कमी सापडल्या आणी अहवालाचा दर्जा उत्तम होता भारतीय लोक अजूनही ए०आय० बद्दल किरकिरच जास्त करत आहेत. ग्रोक वर बंदी घातली तर मी सरकारवर बंदी घालणार हे मात्र नक्की :)

In reply to by युयुत्सु

अवांतर: यु एस कडे चाट जिपि टी, ग्रोक आहे... चायना कडे डीप सिक आहे, कारण त्यांच्याकडं सायंटिफिक टेम्परामेंट आहे, ए आय त्यांची प्रायोरिटी आहे... आपल्याकडे औरंगजेबचा आत्मा आहे...

वामन देशमुख 27/03/2025 - 05:28
या धाग्यातील युयुत्सु-नेट चे भाकीत खरे होताना दिसत आहे, अजून दोन दिवस आहेत हा आठवडा, महिना आणि वर्ष संपायला. --- या धाग्यावर तरी अप्रस्तुत प्रतिसाद येऊ नयेत ही वेडी आशा.
बाजाराचा कल: २४ मार्चचा आठवडा ==================== मंडळी, युयुत्सुनेटच्या भाकीतानुसार मार्केटने दमदार रिकव्हरी केली आहे. आता पुढे काय? मार्केट सध्या प्रतिरोध क्षेत्राजवळ असल्याने तेथपर्यंत (२३५५०) जायचा प्रयत्न करेल असा १ अंदाज आहे. पण दुसरा अंदाज आहे युयुत्सुनेटचा - आहे त्या पातळीपासून थोडे मागे फिरेल (महिना अखेर असल्याने) आणि परत २३५५० पर्यंत वर जाईल.  आकृती १ - निफ्टीचा साप्ताहिक आलेख. या आलेखात दोन तांबड्या रेघा हाय आणि लो ची सरासरी दाखवतात.