मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लाडकी झाली दोडकी...

बाजीगर ·
लेखनविषय:
लागली कडकी, घटली लाडकी ।। 9 लाख अपात्री, 135 कोटी/महिना खर्चाला कात्री ।। लाडकी बहिणीमुळे जिंकले, आता माशी शिंकली ।। चारचाकी नाहीना, कितीउत्पन्न महिना ?। आला 'त्यांचा ' आदेश, आता तपासा निकष ।। गरजू बहिणी राहूद्या अपात्र बहिणी जाऊद्या ।। म्हणे वेळ कमी होता, ना केलाआधार लिंक कोटा ।। 9 लाख मोठा आकडा, विरोधकांचा लावला निकाल वेडा वाकडा ।। नाना,दादा,भाऊ ची चलाखी, विरोधकांची केली हलाखी ।। आता गरज सरो, लाडकी मरो ।।

श्री अमृतानुभव अध्याय सातवा - अज्ञान खंडन

प्रसाद गोडबोले ·

विशेष आभार - श्री. किसनदेव संदर्भ - १. सार्थ श्री अमृतानुभव - ह.भ.प. विष्णुबुवा जोग २. सार्थ श्री अमृतानुभव - ह.भ.प. दत्तराज देशपांडे ३. अमृतानुभव - सत्संगधारा - https://satsangdhara.net/dn/amrut.htm ४. श्री. राजेश वैशंपायन ह्यांच्या सुरेल आवाजातील अमृतानुभव - https://www.youtube.com/watch?v=0Pg8p6N0_u8&t=4911s ५. आणि मी.

विशेष आभार - श्री. किसनदेव संदर्भ - १. सार्थ श्री अमृतानुभव - ह.भ.प. विष्णुबुवा जोग २. सार्थ श्री अमृतानुभव - ह.भ.प. दत्तराज देशपांडे ३. अमृतानुभव - सत्संगधारा - https://satsangdhara.net/dn/amrut.htm ४. श्री. राजेश वैशंपायन ह्यांच्या सुरेल आवाजातील अमृतानुभव - https://www.youtube.com/watch?v=0Pg8p6N0_u8&t=4911s ५. आणि मी.
लेखनविषय:
लेखनप्रकार
१. अमृतानुभव - अध्याय पहिला - शिवशक्तीसमावेशनमन - https://www.misalpav.com/node/44374 २. श्री अमृतानुभव अध्याय दुसरा - श्रीगुरुस्तवन - https://www.misalpav.com/node/44416 ३. श्री अमृतानुभव अध्याय तिसरा - वाचाऋणपरिहार - https://www.misalpav.com/node/46057 ४. श्री अमृतानुभव अध्याय चौथा- ज्ञानाज्ञानभेदकथन - https://www.misalpav.com/node/48807 ५.श्री अमृतानुभव अध्याय पाचवां - सच्चिदानंदपदत्रयविवरण - https://www.misalpav.com/node/48797 _________________________________________
श्री अमृतानुभव अध्याय सातवा - अज्ञान खंडन
अज्ञानखंडन - अमृतानुभवातील सर्वात प्रदीर्घ अध्याय !

फ्लॅट खरेदी ,शाप कि वरदान ( खास करुन नोकरी वाल्या लोकांसाठी)

स्वरुपसुमित ·

लग्नासाठी कोणी पोरगी देईना म्हणून माझ्या एका मित्राने वाकडमध्ये १ कोटींचा फ्लॅट विकत घेतला.त्यासाठी ४० लाख रुपये डाऊन पेमेंट केलं आणि उर्वरित ६० लाख रुपयांचं कर्ज काढलं. त्याचं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे फ्लॅट भाड्याने दिला. त्याला आता महिन्याकाठी ३० हजारांपेक्षाही कमी भाडं येतं तरिही आपण ३० हजार पकडुया. वाकडच्या ज्या पॉश बिल्डींगमध्ये त्याने फ्लॅट घेतला तिथे वर्षाला तो मेंटेनंस देतो १ लाखांचं. ६० लाखांच्या कर्जावर ९ टक्क्याने त्याला व्याज लागतंय. आणि EMI येतोय ३८ हजारच्या आसपास तसच प्रॉपर्टी टॅक्स वेगळा. त्याचबरोबर भाड्यावर इन्कम टॅक्स लागतो तो वेगळाच. वर्षाकाठी भाड्याचे ३ लाख ६० हजार येतात त्यापैकी मेंटेनन्स ची रक्कम वजा करून याला उरतात फक्त २ लाख २० हजार ते २ लाख ५० हजार. म्हणजे वर्षाला रेंटल यिल्ड झाला २.२% ते २.५ टक्के त्याला बिचाऱ्याला अजूनही वाटतं ही गुंतवणूक आहे या घराच्या रकमेतले त्याच्याकडचे ४० लाख जरी त्याने कमीतकमी १० टक्क्यांनी गुंतवले असते तर त्याला महिन्याकाठी 33 हजार आरामात मिळाले असते. (त्यावरचा compunding effect वेगळा) यात पुण्यात जरी तो आला तर 26 हजार तश्याच फ्लॅटमध्ये भाडं भरुन राहु शकला असता आणि वरच्या 7 हजारातून खर्च भागवू शकला असता. तसच कर्जावरचं व्याज वाचलं असतं ते वेगळं. इन्व्हेस्टमेंट म्हणून overhyped किमतीत फ्लॅट घेणं, आणि मग स्वतःच घर म्हणून भावनिक होणं आणि नंतर मी घेतलेल्या फ्लॅट ची किंमत 10 वर्षांनी कशी वाढणार याच्या फ्लॅट न विकता फक्त गप्पा आणि calculations करणं याला काहीही अर्थ नाही. जिथे पैसे आणि वेळ आपण गुंतवतो ते निर्णय अतिशय विचारपूर्वक घ्यायला पाह्यजे. आपला प्रवास आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होण्याकडे असला पाहिजे, आणखी liabilities वाढवण्याकडे नाही. त्यामुळे विशेषतः मुलींच्या पालकांना आणि मुलींनाही माझी विनंती आहे की लग्न करताना मुलाकडे फ्लॅट असावा ही अट ठेवणं तुमच्याच भवितव्याच्या दृष्टीने मारक आहे. सौरभ कोरटकर

कंजूस Tue, 02/25/2025 - 07:30
समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कामाच्या जागी जवळ घर असणे अगत्याचे. म्हणजे प्रवासात वेळ जाणार नाही. अगोदरच विकसित झालेल्या शहरांत वाहतूक आणि पाण्याचे प्रश्न बिकट होत आहेत. पूर्वी जी शहरे नावाजली होती त्यांची परिस्थिती आता वाईट होत आहे .( https://youtu.be/PG66ALzXPTs?si=O36jDZ5ZHEDD_TLZ ) . बजेटमध्ये मिळणारं सोयीचं पण लहान घर घेणे बरे. एवढंच सांगतो.

In reply to by कंजूस

विजुभाऊ Tue, 02/25/2025 - 14:00
कामाच्या जागी जवळ घर असणे अगत्याचे.
हे प्रत्येकाला शक्य नाहिय्ये. अगदी सरकारी नोकरीतदेखील बदली होत असते. आमच्यासारख्या आयटी हमालाना तर दर सहा सात महिन्यानी क्लायंट बदलत असतो.कामाचे ठिकाण बदलत असते, गाव बदलत असते. बहुतेकांच्या बाबतीत तीन चार वर्षांनी कंपनीही बदलत असते.

सुबोध खरे Tue, 02/25/2025 - 09:55
भाड्याचं घर आणि स्वतःचं घर यात ठेवलेली बाई आणि लग्नाची बायको या इतकाच फरक असतो. यात पाहिल्याला दुसऱ्यापेक्षा खर्च बराच कमी असतो. पण .... .... .... लोकांनी आपापल्या सोयी आणि स्वभावाप्रमाणे गाळलेल्या जागा भराव्या

अनामिक सदस्य Tue, 02/25/2025 - 11:40
आयकर सुटीसाठी ग्रुह कर्ज घेणे म्हणजे घी देखा मगर बडगा नही देखा अशी परिस्थिती आहे. आधी १०० रुपये व्याज भरायचे मग त्यातले ३० रुपये आयकरात वाचवायचे. (-१०० + ३० = -७०) मग कर्ज काढले नाही तर ७० रुपये वाचतील ना? (-० -३० = -३०) -३० > -७० घर घ्यायचच आहे, कर्ज काढावच लागणार आहे, मग भरलेल्या व्याजावर जरूर कर सवलत घ्या. पण त्यासाठी म्हणून कर्ज घेण्यात काय अर्थ आहे?

आंद्रे वडापाव Tue, 02/25/2025 - 12:23
गुंतवणुक म्हणुन फ्लॅट घेने किती सोयिस्कर? या प्रश्नाचे उत्तर द्यायला लगेचच उतावीळपणा मी करणार नाही ... मी विचारेन , आर यु शुअर ?? तुम्हाला "गुंतवणुक " म्हणून फ्लॅट घायचाय ? "गुंतवणुक " म्हणजे काय ? मी काही माझ्याकढील रक्कम कुठेतरी गुंतवली ... त्यावर मला काही परतावा मिळावा ... असा असेल ... तर मग, आपण अभ्यास वाढवला पाहिजे ... तुम्हाला गुंतवलेली रक्कम , एका विशिष्ट वर्षी विशिष्ट वेळेला हवीये ? उदा तुमच्या अपत्याचे परदेशी किंवा मेडिकल ला ऍडमिशन त्यावर्षी ?? मग तुम्ही ती फिक्स्ड डिपॉसिट किंवा टी बिल्स मध्ये गुंतवत राहणे .. फ्लॅट घेण्याच्या नादाला लागू नका .. तुमच्याकडच्या उत्पन्ना च्या मानाने तुमचा खर्च किती आहे याचा रेशो बघा .. तुम्हाला खात्री आहे तुमचा जॉब गारंटीड आहे पुढची २० वर्षे (जस कि सरकारी नोकरी पर्मनंट पोस्टवर ), मग तुम्ही विचार करू शकता .. पण तुम्हाला वाटत असेल मी आज १ करोडचा फ्लॅट घेईल आणि ५ वर्ष्यानी २ करोड ला विकेल, तर असं शक्यतो होत नाही .. बरेच छुपे खर्च , मनस्ताप असतात ..

विअर्ड विक्स Tue, 02/25/2025 - 13:02
घरामध्ये गुंतवणूक ( आर्थिक /मानसिक नव्हे ) हो १. काळे धन असेल तर २. रोख रक्कम हाती असेल तर ३. DP प्लॅन वा तत्सम आतल्या गोटातील पक्की खबर आपल्याजवळ असेल तर ( एअरपोर्ट/Highway /टाउनशिप etc ). कर्ज न घेता गुंतवणूक करणे नाही १. नोकरदार असाल व घर कर्ज घेणार असाल तर २. घर भाडेवर जीवन जगायचे असेल तर घर हे राहण्यासाठी घ्यावे गुंतवणुकीसाठी नव्हे अपवाद ( आपले आर्थिक उत्त्पन्न १ करोडच्या वर असेल तर ) बाकी सर्व मुद्दे आधी विस्तारात चर्चा झालेली आहे. जुने धागे पहा

सुबोध खरे Tue, 02/25/2025 - 13:15
मुळात स्वतःला राहायला घर हवे आहे कि अतिरिक्त उत्पन्न गुंतवणुकीसाठी एक पर्याय म्हणून घर घ्यायचे आहे ? स्वतःला राहायला घर हवे आहे तर त्याला पर्याय नाहीच. गुंतवणुकीसाठी घर घ्यायचे असेल तर त्यासाठी बऱ्याच गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. भाड्याने दिल्यास येणारा परतावा हा २-३ % च्या वर येत नाही आणि त्यात भाडेकरू ठेवणे घराच्या देखभालीचा खर्च सोसायटीची देणी त्यासाठी माराव्या लागणाऱ्या चकरा इ अनेक गोष्टी येतात. हे जर घर वाढत्या शहरात मोक्याच्या ठिकाणी स्वस्त मिळाले तर भांडवली परतावा सज्जड मिळू शकतो. उदा मी कासार वडवली ( ठाणे ) येथे १७ लाखात २००८ मध्ये घेतलेले घर ८ वर्षांनी २०१६ मध्ये ७० लाखाला विकले. याउलट एखाद्या वेळेस आपण घेतलेले उत्तम घर सुद्धा चुकीच्या काळात घेतले तर चांगला परतावा देत नाही. कारण नंतर निश्चलनीकरण झाले मग कोव्हीडची महामारी आली. यामुळे बाजारात पैशाची चणचण निर्माण झाली उदा मी बदलापूर येथे २५ लाखाला २०१५ मध्ये घेतलेले घर ९ वर्षांनी ३१ लाखाला मागच्या वर्षी विकले म्हणजेच अडीच टक्के दर साल परतावा मिळाला यात तेथे मिळणारे भाडे गृहीत धरले तरी हे तीन टक्के होतील. म्हणजे मी हेच पैसे साध्या मुदत ठेव खात्यात ठेवले असते तरी ३० % आयकर जाऊन ६. ३ % परतावा कोणतीही कटकट न करता मिळाला असता. गम्मत माहणजे हेच पैसे मी मागच्या वर्षी शेअर बाजारात गुंतवले तर एक वर्षात १० % नक्त परतावा मिळाला. कालाय तस्मै नमः

फ्लॅटमधील गुंतवणूक फायदेशीर असतेच असे नाही. प्लॉटमध्ये गुंतवणुक फयदेशीर ठरते. किमान ८-१० वर्षे थांबायची तयारी हवी.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विअर्ड विक्स Wed, 02/26/2025 - 13:03
प्लॉट संदर्भात गुंतवणुकीत मला रस आहे का नाही या द्वंद्वात आहे. आतपर्यंत जितका अभ्यास केला मला खालील प्रश्न पडलेले आहेत ज्याचे समाधानकारक उत्तर अजून कोणी देऊ शकला नाही १. NA प्लॉट हे कायम १ ते १.५ लाखात / गुंठा च का असतात ? सादर जमिनीचे सर्कल रेट हे ५०० ते १००० असतांना सुद्धा ? २. कब्जा व्हायची भीती त्यामुळे डेव्हलपर चे प्लॉट ज्यात वीज,पाणी व राखण भिंत याची सुरक्षितता असते त्यावर डेव्हलपर ने कमाल वा किमान किती प्रीमियम आकारावा ३. शेतजमीन गुंठेवारीत घेता येत नाही अधिक आपण शेतकरी असण्याचा पुरावा लागतो तशी काही आत NA प्लॉट ला असते का ? ४. NA प्लॉट ची resale विक्री होते का ? का जमीन पदरी पडली यातच सुख मानावे ?

सुबोध खरे Tue, 02/25/2025 - 18:46
प्लॉट वर अतिक्रमण होण्याची शक्यता खूप असते आणि मग ते काढायचं असेल तर फार कटकट होते. विशेषतः गावात जेथे आपली भावकी किंवा ओळख नसेल तेथे. आणि जमिनीची कज्जे दलाली, खटला वगैरे झाला तर २०-२५ वर्षे हरी हरी करत बसावे लागते. विकासक तुम्हाला विकून पैसे घेऊन मोकळा होतो आणि तुम्ही बसा बैलाच्या खाली दूध काढायला. माझ्या माहितीत अशा अनेक केसेस आहेत. तेंव्हा शहरी माणसाने भावकी किंवा ओळख नसलेल्या गावात/ छोट्या शहरात प्लॉट घेण्यापूर्वी चार वेळेस विचार जरूर करावा.

कपिलमुनी Wed, 02/26/2025 - 08:45
स्वतःला राहायला १ घर नक्की असावे. त्यामुळे १ फ्लॅट किंवा घर विकत घ्यावे . भले कितीही छोटे असू दे. गुंतवणूक म्हणून फ्लॅट परवडत नाही, कमर्शियल जागा, किंवा बॅलन्स पोर्ट फोलिओ उत्तम!

भीमराव Wed, 02/26/2025 - 21:22
मी २०२२ ला २७ लाख ला flat घेतला आज तिथं त्या flat ची किंमत ३७ लाख रुपये झाली आहे. ज्या वेळी flat घेतला होता त्यावेळी २०२२ ला त्या area मध्ये बिगरशेती जागा २५ लाख रुपये गुंठा होती ती आज ४३ लाख रुपये गुंठा चालू आहे. २०२० ला मला भाडे ८ हजार रुपये भारावे लागत होते ते २०२२ ला साडे दहा हजार झाले होते. तेच भाडे २०१५ ला साडेपाच हजार होते. आज २०२५ ला तेच भाडे १४ ते १५ हजार रुपये चालू आहे. गुंतवणूक म्हणून घर घेताना विकसनशील भागाला प्राधान्य द्यावे. भाडे वाढत जाणार आणि कर्ज कमी होत जाणार त्यामुळे १५ ते २० वर्षे नंतर चं गणित मांडावं

लग्नासाठी कोणी पोरगी देईना म्हणून माझ्या एका मित्राने वाकडमध्ये १ कोटींचा फ्लॅट विकत घेतला.त्यासाठी ४० लाख रुपये डाऊन पेमेंट केलं आणि उर्वरित ६० लाख रुपयांचं कर्ज काढलं. त्याचं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे फ्लॅट भाड्याने दिला. त्याला आता महिन्याकाठी ३० हजारांपेक्षाही कमी भाडं येतं तरिही आपण ३० हजार पकडुया. वाकडच्या ज्या पॉश बिल्डींगमध्ये त्याने फ्लॅट घेतला तिथे वर्षाला तो मेंटेनंस देतो १ लाखांचं. ६० लाखांच्या कर्जावर ९ टक्क्याने त्याला व्याज लागतंय. आणि EMI येतोय ३८ हजारच्या आसपास तसच प्रॉपर्टी टॅक्स वेगळा. त्याचबरोबर भाड्यावर इन्कम टॅक्स लागतो तो वेगळाच. वर्षाकाठी भाड्याचे ३ लाख ६० हजार येतात त्यापैकी मेंटेनन्स ची रक्कम वजा करून याला उरतात फक्त २ लाख २० हजार ते २ लाख ५० हजार. म्हणजे वर्षाला रेंटल यिल्ड झाला २.२% ते २.५ टक्के त्याला बिचाऱ्याला अजूनही वाटतं ही गुंतवणूक आहे या घराच्या रकमेतले त्याच्याकडचे ४० लाख जरी त्याने कमीतकमी १० टक्क्यांनी गुंतवले असते तर त्याला महिन्याकाठी 33 हजार आरामात मिळाले असते. (त्यावरचा compunding effect वेगळा) यात पुण्यात जरी तो आला तर 26 हजार तश्याच फ्लॅटमध्ये भाडं भरुन राहु शकला असता आणि वरच्या 7 हजारातून खर्च भागवू शकला असता. तसच कर्जावरचं व्याज वाचलं असतं ते वेगळं. इन्व्हेस्टमेंट म्हणून overhyped किमतीत फ्लॅट घेणं, आणि मग स्वतःच घर म्हणून भावनिक होणं आणि नंतर मी घेतलेल्या फ्लॅट ची किंमत 10 वर्षांनी कशी वाढणार याच्या फ्लॅट न विकता फक्त गप्पा आणि calculations करणं याला काहीही अर्थ नाही. जिथे पैसे आणि वेळ आपण गुंतवतो ते निर्णय अतिशय विचारपूर्वक घ्यायला पाह्यजे. आपला प्रवास आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होण्याकडे असला पाहिजे, आणखी liabilities वाढवण्याकडे नाही. त्यामुळे विशेषतः मुलींच्या पालकांना आणि मुलींनाही माझी विनंती आहे की लग्न करताना मुलाकडे फ्लॅट असावा ही अट ठेवणं तुमच्याच भवितव्याच्या दृष्टीने मारक आहे. सौरभ कोरटकर

कंजूस Tue, 02/25/2025 - 07:30
समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कामाच्या जागी जवळ घर असणे अगत्याचे. म्हणजे प्रवासात वेळ जाणार नाही. अगोदरच विकसित झालेल्या शहरांत वाहतूक आणि पाण्याचे प्रश्न बिकट होत आहेत. पूर्वी जी शहरे नावाजली होती त्यांची परिस्थिती आता वाईट होत आहे .( https://youtu.be/PG66ALzXPTs?si=O36jDZ5ZHEDD_TLZ ) . बजेटमध्ये मिळणारं सोयीचं पण लहान घर घेणे बरे. एवढंच सांगतो.

In reply to by कंजूस

विजुभाऊ Tue, 02/25/2025 - 14:00
कामाच्या जागी जवळ घर असणे अगत्याचे.
हे प्रत्येकाला शक्य नाहिय्ये. अगदी सरकारी नोकरीतदेखील बदली होत असते. आमच्यासारख्या आयटी हमालाना तर दर सहा सात महिन्यानी क्लायंट बदलत असतो.कामाचे ठिकाण बदलत असते, गाव बदलत असते. बहुतेकांच्या बाबतीत तीन चार वर्षांनी कंपनीही बदलत असते.

सुबोध खरे Tue, 02/25/2025 - 09:55
भाड्याचं घर आणि स्वतःचं घर यात ठेवलेली बाई आणि लग्नाची बायको या इतकाच फरक असतो. यात पाहिल्याला दुसऱ्यापेक्षा खर्च बराच कमी असतो. पण .... .... .... लोकांनी आपापल्या सोयी आणि स्वभावाप्रमाणे गाळलेल्या जागा भराव्या

अनामिक सदस्य Tue, 02/25/2025 - 11:40
आयकर सुटीसाठी ग्रुह कर्ज घेणे म्हणजे घी देखा मगर बडगा नही देखा अशी परिस्थिती आहे. आधी १०० रुपये व्याज भरायचे मग त्यातले ३० रुपये आयकरात वाचवायचे. (-१०० + ३० = -७०) मग कर्ज काढले नाही तर ७० रुपये वाचतील ना? (-० -३० = -३०) -३० > -७० घर घ्यायचच आहे, कर्ज काढावच लागणार आहे, मग भरलेल्या व्याजावर जरूर कर सवलत घ्या. पण त्यासाठी म्हणून कर्ज घेण्यात काय अर्थ आहे?

आंद्रे वडापाव Tue, 02/25/2025 - 12:23
गुंतवणुक म्हणुन फ्लॅट घेने किती सोयिस्कर? या प्रश्नाचे उत्तर द्यायला लगेचच उतावीळपणा मी करणार नाही ... मी विचारेन , आर यु शुअर ?? तुम्हाला "गुंतवणुक " म्हणून फ्लॅट घायचाय ? "गुंतवणुक " म्हणजे काय ? मी काही माझ्याकढील रक्कम कुठेतरी गुंतवली ... त्यावर मला काही परतावा मिळावा ... असा असेल ... तर मग, आपण अभ्यास वाढवला पाहिजे ... तुम्हाला गुंतवलेली रक्कम , एका विशिष्ट वर्षी विशिष्ट वेळेला हवीये ? उदा तुमच्या अपत्याचे परदेशी किंवा मेडिकल ला ऍडमिशन त्यावर्षी ?? मग तुम्ही ती फिक्स्ड डिपॉसिट किंवा टी बिल्स मध्ये गुंतवत राहणे .. फ्लॅट घेण्याच्या नादाला लागू नका .. तुमच्याकडच्या उत्पन्ना च्या मानाने तुमचा खर्च किती आहे याचा रेशो बघा .. तुम्हाला खात्री आहे तुमचा जॉब गारंटीड आहे पुढची २० वर्षे (जस कि सरकारी नोकरी पर्मनंट पोस्टवर ), मग तुम्ही विचार करू शकता .. पण तुम्हाला वाटत असेल मी आज १ करोडचा फ्लॅट घेईल आणि ५ वर्ष्यानी २ करोड ला विकेल, तर असं शक्यतो होत नाही .. बरेच छुपे खर्च , मनस्ताप असतात ..

विअर्ड विक्स Tue, 02/25/2025 - 13:02
घरामध्ये गुंतवणूक ( आर्थिक /मानसिक नव्हे ) हो १. काळे धन असेल तर २. रोख रक्कम हाती असेल तर ३. DP प्लॅन वा तत्सम आतल्या गोटातील पक्की खबर आपल्याजवळ असेल तर ( एअरपोर्ट/Highway /टाउनशिप etc ). कर्ज न घेता गुंतवणूक करणे नाही १. नोकरदार असाल व घर कर्ज घेणार असाल तर २. घर भाडेवर जीवन जगायचे असेल तर घर हे राहण्यासाठी घ्यावे गुंतवणुकीसाठी नव्हे अपवाद ( आपले आर्थिक उत्त्पन्न १ करोडच्या वर असेल तर ) बाकी सर्व मुद्दे आधी विस्तारात चर्चा झालेली आहे. जुने धागे पहा

सुबोध खरे Tue, 02/25/2025 - 13:15
मुळात स्वतःला राहायला घर हवे आहे कि अतिरिक्त उत्पन्न गुंतवणुकीसाठी एक पर्याय म्हणून घर घ्यायचे आहे ? स्वतःला राहायला घर हवे आहे तर त्याला पर्याय नाहीच. गुंतवणुकीसाठी घर घ्यायचे असेल तर त्यासाठी बऱ्याच गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. भाड्याने दिल्यास येणारा परतावा हा २-३ % च्या वर येत नाही आणि त्यात भाडेकरू ठेवणे घराच्या देखभालीचा खर्च सोसायटीची देणी त्यासाठी माराव्या लागणाऱ्या चकरा इ अनेक गोष्टी येतात. हे जर घर वाढत्या शहरात मोक्याच्या ठिकाणी स्वस्त मिळाले तर भांडवली परतावा सज्जड मिळू शकतो. उदा मी कासार वडवली ( ठाणे ) येथे १७ लाखात २००८ मध्ये घेतलेले घर ८ वर्षांनी २०१६ मध्ये ७० लाखाला विकले. याउलट एखाद्या वेळेस आपण घेतलेले उत्तम घर सुद्धा चुकीच्या काळात घेतले तर चांगला परतावा देत नाही. कारण नंतर निश्चलनीकरण झाले मग कोव्हीडची महामारी आली. यामुळे बाजारात पैशाची चणचण निर्माण झाली उदा मी बदलापूर येथे २५ लाखाला २०१५ मध्ये घेतलेले घर ९ वर्षांनी ३१ लाखाला मागच्या वर्षी विकले म्हणजेच अडीच टक्के दर साल परतावा मिळाला यात तेथे मिळणारे भाडे गृहीत धरले तरी हे तीन टक्के होतील. म्हणजे मी हेच पैसे साध्या मुदत ठेव खात्यात ठेवले असते तरी ३० % आयकर जाऊन ६. ३ % परतावा कोणतीही कटकट न करता मिळाला असता. गम्मत माहणजे हेच पैसे मी मागच्या वर्षी शेअर बाजारात गुंतवले तर एक वर्षात १० % नक्त परतावा मिळाला. कालाय तस्मै नमः

फ्लॅटमधील गुंतवणूक फायदेशीर असतेच असे नाही. प्लॉटमध्ये गुंतवणुक फयदेशीर ठरते. किमान ८-१० वर्षे थांबायची तयारी हवी.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विअर्ड विक्स Wed, 02/26/2025 - 13:03
प्लॉट संदर्भात गुंतवणुकीत मला रस आहे का नाही या द्वंद्वात आहे. आतपर्यंत जितका अभ्यास केला मला खालील प्रश्न पडलेले आहेत ज्याचे समाधानकारक उत्तर अजून कोणी देऊ शकला नाही १. NA प्लॉट हे कायम १ ते १.५ लाखात / गुंठा च का असतात ? सादर जमिनीचे सर्कल रेट हे ५०० ते १००० असतांना सुद्धा ? २. कब्जा व्हायची भीती त्यामुळे डेव्हलपर चे प्लॉट ज्यात वीज,पाणी व राखण भिंत याची सुरक्षितता असते त्यावर डेव्हलपर ने कमाल वा किमान किती प्रीमियम आकारावा ३. शेतजमीन गुंठेवारीत घेता येत नाही अधिक आपण शेतकरी असण्याचा पुरावा लागतो तशी काही आत NA प्लॉट ला असते का ? ४. NA प्लॉट ची resale विक्री होते का ? का जमीन पदरी पडली यातच सुख मानावे ?

सुबोध खरे Tue, 02/25/2025 - 18:46
प्लॉट वर अतिक्रमण होण्याची शक्यता खूप असते आणि मग ते काढायचं असेल तर फार कटकट होते. विशेषतः गावात जेथे आपली भावकी किंवा ओळख नसेल तेथे. आणि जमिनीची कज्जे दलाली, खटला वगैरे झाला तर २०-२५ वर्षे हरी हरी करत बसावे लागते. विकासक तुम्हाला विकून पैसे घेऊन मोकळा होतो आणि तुम्ही बसा बैलाच्या खाली दूध काढायला. माझ्या माहितीत अशा अनेक केसेस आहेत. तेंव्हा शहरी माणसाने भावकी किंवा ओळख नसलेल्या गावात/ छोट्या शहरात प्लॉट घेण्यापूर्वी चार वेळेस विचार जरूर करावा.

कपिलमुनी Wed, 02/26/2025 - 08:45
स्वतःला राहायला १ घर नक्की असावे. त्यामुळे १ फ्लॅट किंवा घर विकत घ्यावे . भले कितीही छोटे असू दे. गुंतवणूक म्हणून फ्लॅट परवडत नाही, कमर्शियल जागा, किंवा बॅलन्स पोर्ट फोलिओ उत्तम!

भीमराव Wed, 02/26/2025 - 21:22
मी २०२२ ला २७ लाख ला flat घेतला आज तिथं त्या flat ची किंमत ३७ लाख रुपये झाली आहे. ज्या वेळी flat घेतला होता त्यावेळी २०२२ ला त्या area मध्ये बिगरशेती जागा २५ लाख रुपये गुंठा होती ती आज ४३ लाख रुपये गुंठा चालू आहे. २०२० ला मला भाडे ८ हजार रुपये भारावे लागत होते ते २०२२ ला साडे दहा हजार झाले होते. तेच भाडे २०१५ ला साडेपाच हजार होते. आज २०२५ ला तेच भाडे १४ ते १५ हजार रुपये चालू आहे. गुंतवणूक म्हणून घर घेताना विकसनशील भागाला प्राधान्य द्यावे. भाडे वाढत जाणार आणि कर्ज कमी होत जाणार त्यामुळे १५ ते २० वर्षे नंतर चं गणित मांडावं
लेखनविषय:
लेखनप्रकार
गुंतवणुक म्हणुन फ्लॅट घेने किती सोयिस्कर? फायदे ,खास करुन नोकर दार लोकान साठी आयकर सुट हक्काचे घर मोड तोड स्वातंत्र्य कीमत वाढु शकते कायम ची गुंतवणुक सारखी घर बदलायचि कट कट नाही नुक्सान नोकरी ची जागा बदलली कि फ्लॅट बदलणे किवा लांब चा प्रवास गुंतवणुक आहे पण लगेच पैसे पाहिजे असल्यास फ्लॅट विकणे वेळ खाउ आहे भाडे हे. होम लोन हप्त्यां पेक्शा स्वस्त आहे शेजारि पाजारि आले कि फ्लॅट बदलता येत नाही, आहे त्यांना सहन करावे लागते

सतारीचे बोल

कर्नलतपस्वी ·

In reply to by कंजूस

कर्नलतपस्वी Mon, 02/24/2025 - 17:10
हाॅस्पिटल मधे आढ्याकडे बघताना काही ओळी सुचल्या त्या इथे व कायप्पावर डकवल्या एवढेच काय ते. हाय काय नाय काय...याच बरोबर मित्रपरिवारांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल एकत्रित आभार मानण्याचा प्रयत्न. मी मस्त आहे.

बाजीगर Tue, 02/25/2025 - 19:12
वाह वा सर काय बेफिकिर attitude आहे, मन जवा मर्द आहे,शरीर कुरकुर करतेय. काय शैलीदार ओळी लिहिल्यात... "हृदयाची सतार बिघडली होती !" काळजी घ्या गोळ्या,आहार विहार डॉक्टरांनी सल्ला दिल्याप्रमाने करा. (अस्मादिकांना सुद्धा १३ एप्रिल् २०२४ ला हार्ट अटॅक आला होता, मायबाप कतार सरकार ने तात्काळ एन्जिओप्लास्टी करून 2 स्टेन्ट टाकल्या, जीव वाचला, ह्या एप्रिल ला दक्षिण अमेरिका टुर ला जातोय, साजरा करायला.... माझा ब्लॉग https://www.blogger.com/blog/post/edit/5935388206732301965/2657780580706138001 )

In reply to by कंजूस

कर्नलतपस्वी Mon, 02/24/2025 - 17:10
हाॅस्पिटल मधे आढ्याकडे बघताना काही ओळी सुचल्या त्या इथे व कायप्पावर डकवल्या एवढेच काय ते. हाय काय नाय काय...याच बरोबर मित्रपरिवारांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल एकत्रित आभार मानण्याचा प्रयत्न. मी मस्त आहे.

बाजीगर Tue, 02/25/2025 - 19:12
वाह वा सर काय बेफिकिर attitude आहे, मन जवा मर्द आहे,शरीर कुरकुर करतेय. काय शैलीदार ओळी लिहिल्यात... "हृदयाची सतार बिघडली होती !" काळजी घ्या गोळ्या,आहार विहार डॉक्टरांनी सल्ला दिल्याप्रमाने करा. (अस्मादिकांना सुद्धा १३ एप्रिल् २०२४ ला हार्ट अटॅक आला होता, मायबाप कतार सरकार ने तात्काळ एन्जिओप्लास्टी करून 2 स्टेन्ट टाकल्या, जीव वाचला, ह्या एप्रिल ला दक्षिण अमेरिका टुर ला जातोय, साजरा करायला.... माझा ब्लॉग https://www.blogger.com/blog/post/edit/5935388206732301965/2657780580706138001 )
लेखनविषय:
काव्यरस
जरा सोडला लगाम ढिला, अंग प्रत्यंगाने संकेत दिला. हळूहळू कुरकूर करू लागलं. गोबरे झाले गाल,टम्मं पोट फुगलं. हात पायाच्या झाल्या काड्या, कांट्यांनी चढल्या नव्वद माड्या. कधी नव्हे तो पिंगळा साद देत होता. दिवसा घोरासुर कुस्ती खेळत होता. कधी माझ्या भोवती जग फिरले, तर कधी डोळ्यासमोर तारे विरले. भर दुपारी जगाला भोवळ आली. आणी बोळवण धन्वंतरींच्या घरी झाली. काही रक्तपिपासू रक्त शोषू लागले, तर प्रकांड पंडीत कारण शोधू लागले. हृदयाची सतार बिघडली होती दिड दा दिड दा लय बेकाबू होती गवसणीतूनच तारा छेडल्या सतारीच्या खुंट्या पिळल्या सतार झाली म्हातारी... तारा नाजूक झाल्यात. तार सप्तक लावू नका. आर्त स्

परीक्षा...कुणाची ?

बाजीगर ·

कर्नलतपस्वी Sun, 02/23/2025 - 13:08
कुंपणच शेत खाते पण किती असे इमानदार अधिकारी असतील ? शिक्षण म्हणजे सापशिडीचा खेळ, नववी इयत्ते पर्यंत सर्व पास मात्र ९९ वर गेल्यावर सापाच्या तोंडातून खाली येणार.

विवेकपटाईत गुरुवार, 02/27/2025 - 12:03
सर्वांना पास करा, सर्वांना डिग्री द्या. हाच खरा समाजवाद असतो. प्रत्येक राज्यांत दहावीचा परिणाम 95 टक्क्यांचा वर असतो. दोन दिवस आधी चॅम्पियन वाचून किंवा नकल करून सहज बीए पास होता येते. हिंदीत एमए झालेला मुलगा एक पान हिन्दीचे न चुकता वाचू शकत नाही. बाकी विषयांबाबत न बोलणे उचित. आजची शिक्षण व्यवस्था वयाच्या 22 वर्षापर्यंत कागदी ज्ञान असणार्‍या तरुणांना तैयार करत आहे. मग त्यांना मूर्ख बनविण्यासाठी आरक्षण इत्यादि खेळ सुरू होतात. हे माहीत असून ही 100 पैकी फक्त 3 तरुणांना सरकारी नौकरी मिळणार. बाकी वयाच्या 30-35 वर्षांपर्यंत सरकारी नौकरीची तैयारी करत बेरोजगार फिरणार. 50 टक्के पेक्षा जास्त मार्क्स असणार्‍या विद्यार्थ्यांना 8 पुढे शिक्षणाची अनुमति दिली पाहिजे. 60 टक्केहून जास्त मार्क्स असेल तरच कॉलेज शिक्षण.

कर्नलतपस्वी Sun, 02/23/2025 - 13:08
कुंपणच शेत खाते पण किती असे इमानदार अधिकारी असतील ? शिक्षण म्हणजे सापशिडीचा खेळ, नववी इयत्ते पर्यंत सर्व पास मात्र ९९ वर गेल्यावर सापाच्या तोंडातून खाली येणार.

विवेकपटाईत गुरुवार, 02/27/2025 - 12:03
सर्वांना पास करा, सर्वांना डिग्री द्या. हाच खरा समाजवाद असतो. प्रत्येक राज्यांत दहावीचा परिणाम 95 टक्क्यांचा वर असतो. दोन दिवस आधी चॅम्पियन वाचून किंवा नकल करून सहज बीए पास होता येते. हिंदीत एमए झालेला मुलगा एक पान हिन्दीचे न चुकता वाचू शकत नाही. बाकी विषयांबाबत न बोलणे उचित. आजची शिक्षण व्यवस्था वयाच्या 22 वर्षापर्यंत कागदी ज्ञान असणार्‍या तरुणांना तैयार करत आहे. मग त्यांना मूर्ख बनविण्यासाठी आरक्षण इत्यादि खेळ सुरू होतात. हे माहीत असून ही 100 पैकी फक्त 3 तरुणांना सरकारी नौकरी मिळणार. बाकी वयाच्या 30-35 वर्षांपर्यंत सरकारी नौकरीची तैयारी करत बेरोजगार फिरणार. 50 टक्के पेक्षा जास्त मार्क्स असणार्‍या विद्यार्थ्यांना 8 पुढे शिक्षणाची अनुमति दिली पाहिजे. 60 टक्केहून जास्त मार्क्स असेल तरच कॉलेज शिक्षण.
लेखनविषय:
परीक्षा...कुणाची? 'सी ई ओ'समोर पडला कॉप्यांचा पाऊस ! डोके गरगरले,संताप आला भाऊस ।। 'विकास मीना'- करारी, मारली धडक भरारी ।। बारावी चा गणिताचा पेपर, खोके भरून कॉप्या,गाईड, पाहून आले फेफरं ।। परीक्षाकेंद्रातून अनेकांनी मारली धूम, कॉपी फॅक्टरी हँडलूम ।। आता त्यांची सटकली, जबाबदारी ना झटकली ।। इमानदारीची लढाई आरपार, पूर्ण प्रशासन व पर्यवेक्षक यांच्यावर, केला पोलीस ठाण्यात FIR ।। आदर्श(?!)विद्यालय फुलंब्री संचालक पर्यवेक्षक नंबरी ।। कुंपण च शेत खाते, पर्यवेक्षक कॉपी देते ।। कशासाठी हे सर्व? शिक्षण न देता पास व्हावेत सर्व ।। विद्यार्थांना शिकायचे नाहीये. श

बाजाराचा कल : २४ फेब्रुवारीचा आठवडा

युयुत्सु ·

In reply to by आंद्रे वडापाव

युयुत्सु Sun, 02/23/2025 - 14:07
तुमची सूचना चांगली आहे. सोन्याचा डेटा मला माझ्या मेंबरशिपमध्ये मिळत नसल्याने मला त्याचा समावेश करता येणार नाही. माझ्या मेंबरशिपमध्ये मला फक्त एन्०एस०इ० आणि बि०एस्०इ० चा दिवस अखेरीचा डेटा मिळतो. सोन्याच्या भावांचा समावेश करता आला असता तर मॉडेल अधिक अचूक आणि विश्वासार्ह बनले असते.

In reply to by युयुत्सु

युयुत्सु Sun, 02/23/2025 - 14:30
अरेच्चा! माझ्या मेंबरशिपमध्ये सोन्याचा डेटा पण मिळतो असे ल़क्षात आले आहे. पण अगोदर थोडे प्रयोग करून बघावे लागतील.

नमस्कार ! बाकी इतर विषयांवर पटो न पटो , पण मला आपले हे लेखन फार आवडते ! आपण अन्यथा घेणार नसलात तर काही नम्र सुचना (सजेशन्स) देऊ इच्छितो ... आपले ग्राफ हे इन्टर्प्रेट करायला काहीसे अवघड आहे, आपणे निफ्टीची किंवा बी.एस.ई ची संभाव्य रेंज आणि त्याची शक्यता (प्रोबॅबिलिटी) असे काहीसे सोपे प्रेडिक्शन लिहिल्यास आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना समजायला सोप्पे जाईल लिहित रहा !

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु Sun, 02/23/2025 - 15:08
श्री० प्रसाद गोडबोले प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणि सूचनेबद्दल आभार! बाजाराचा नुसता कल ओळखणे हे खूप मोठ्ठे आह्वान असल्याने सध्या मी त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. हळूहळु तुमच्या सूचनेचा अवश्य विचार करीन. माझे आलेख सुरुवातीला समजायला अवघड वाटणे अवघड स्वाभाविक आहे. पण थोडक्यात समजावतो. उच्च न्यायालयाचे जसे खंडपीठ असते तसे मी १० किंवा २० मॉडेल्सचे खंडपीठ तयार करतो. मग या खंडपीठातील प्रत्येक मॉडेल आलेल्या डेटाचे विश्लेषण करून भाकीत करते. भाकीत वर जाणार असेल तर हिरव्या बार ने दाखवले जाते. बाजार खाली जाणार असेल तर लाल रंगाने दाखवले जाते. वरील "खण्ड्पीठ" वीस मॉडेलचे असल्याने २० बार दाखवले आहेत. जाता जाता - बाकीचे मतभेद असले तरी आपल्याबद्दल बेसिक आदर नक्की राहील. चिंता नसावी.

युयुत्सु Sun, 02/23/2025 - 14:55
आग्या १९९० यांच्या मागणीनुसार सोन्याच्या दराचे पुढील आठड्यासाठी (केवळ प्रयोगात्मक) भाकीत सोने खाली येते तेव्हा स्टॉक वर जातात या सार्वकालिक तत्त्वाचा युयुत्सुनेट ने आदर केलेला दिसतो.

युयुत्सु Mon, 02/24/2025 - 00:03
मंडळी श्री० गोडबोले यांनी मला मार्केट्ची संभाव्य रेंज आणि त्याची संभाव्यता (प्रोबॅबिलीटी) देण्याबद्दल सुचवले. आत्ताच मला मी स्वतः विकसित केलेल्या "क्लेमास्पेस डायग्रॅमची आठवण झाली त्यात मला मार्केट वर किंवा खाली जायची शक्यता किती या प्रश्नाचे उत्तर देता येते. पुढील आठवड्यासाठीचा क्लेमास्पेस डायाग्रॅम असा दिसतो. पिवळा धमक दिसणारा 'डोळा' मार्केटला आपल्याकडे खेचायचा प्रयत्न करतो. याचे गणित इथे आणि मराठीत देणे अवघड आहे. तर या तंत्राप्रमाणे पुढच्या आठवड्यात निफ्टी वर जायची शक्यता ८१.४ % इतकीआहे.   पण मला दर वेळेला क्लेमास्पेस डायग्रॅम इथे डकवणे जिकीरीचे आहे. त्यामुळे मी फक्त प्रोबॅबिलीटी चे आकडे इथे देईन.

युयुत्सु Tue, 02/25/2025 - 08:36
क्लेमास्पेस डायग्रॅम हे मी माझ्या स्वतःच्या काही गरजा पूर्ण करणयासाठी विकसित केलेले एक गुणी तंत्र आहे. :) परवा हा आलेख मी जेव्हा काढला तेव्हा बाजार वर जायची संभाव्यता ~८१% होती. कालच्या घसरणीमुळे ही शक्यता आता ~९५% पर्यंत वाढली आहे. मग आता मार्केट वर जाणार की खाली जाणार? तर वर दिलेल्या आलेखात निळी रेघ कालचे मार्केट कुठे होते दाखवते. निळ्या रेघे खाली भूतकाळात मार्केट गेलेले दिसत आहे, पण ते तिथे जाऊन उलट फिरले आहे. त्यामुळे अजुन एका डुबकीची शक्यता नाकारता येत नाही. थोडकयात शेवटच्या थेंबापर्यंत चिपाड चरकातून काढणार...  तसेच वरील आलेखाचा एक चुलतभाऊ पुढे दिला आहे. त्यात तांबंडा बिंदू मार्केट सध्या कुठे आहे ते दाखवत आहे. मार्केट पिवळ्या डोळ्याकडे सतत झेपावत असते. हा "पितनेत्र " तांबड्या बिंदूचच्या डाव्या बाजूला असल्याने आणखी विक्री होऊन मग मार्केट परतीचा रस्ता काही कालावधी साठी पकडेल, (नवीन अर्निंग सिझन) असे वाटते.

दीपक११७७ Tue, 02/25/2025 - 14:03
कमेंटमध्ये सांगितल्याप्रमाणे मला चार्ट दिसत नाहीये, माझ्या पीसीमध्ये काही सेटिंग समस्या आहे का की या धाग्या सोबत कोणताही चार्ट जोडलेला नाहीये.

In reply to by आंद्रे वडापाव

युयुत्सु Sun, 02/23/2025 - 14:07
तुमची सूचना चांगली आहे. सोन्याचा डेटा मला माझ्या मेंबरशिपमध्ये मिळत नसल्याने मला त्याचा समावेश करता येणार नाही. माझ्या मेंबरशिपमध्ये मला फक्त एन्०एस०इ० आणि बि०एस्०इ० चा दिवस अखेरीचा डेटा मिळतो. सोन्याच्या भावांचा समावेश करता आला असता तर मॉडेल अधिक अचूक आणि विश्वासार्ह बनले असते.

In reply to by युयुत्सु

युयुत्सु Sun, 02/23/2025 - 14:30
अरेच्चा! माझ्या मेंबरशिपमध्ये सोन्याचा डेटा पण मिळतो असे ल़क्षात आले आहे. पण अगोदर थोडे प्रयोग करून बघावे लागतील.

नमस्कार ! बाकी इतर विषयांवर पटो न पटो , पण मला आपले हे लेखन फार आवडते ! आपण अन्यथा घेणार नसलात तर काही नम्र सुचना (सजेशन्स) देऊ इच्छितो ... आपले ग्राफ हे इन्टर्प्रेट करायला काहीसे अवघड आहे, आपणे निफ्टीची किंवा बी.एस.ई ची संभाव्य रेंज आणि त्याची शक्यता (प्रोबॅबिलिटी) असे काहीसे सोपे प्रेडिक्शन लिहिल्यास आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना समजायला सोप्पे जाईल लिहित रहा !

In reply to by प्रसाद गोडबोले

युयुत्सु Sun, 02/23/2025 - 15:08
श्री० प्रसाद गोडबोले प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणि सूचनेबद्दल आभार! बाजाराचा नुसता कल ओळखणे हे खूप मोठ्ठे आह्वान असल्याने सध्या मी त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. हळूहळु तुमच्या सूचनेचा अवश्य विचार करीन. माझे आलेख सुरुवातीला समजायला अवघड वाटणे अवघड स्वाभाविक आहे. पण थोडक्यात समजावतो. उच्च न्यायालयाचे जसे खंडपीठ असते तसे मी १० किंवा २० मॉडेल्सचे खंडपीठ तयार करतो. मग या खंडपीठातील प्रत्येक मॉडेल आलेल्या डेटाचे विश्लेषण करून भाकीत करते. भाकीत वर जाणार असेल तर हिरव्या बार ने दाखवले जाते. बाजार खाली जाणार असेल तर लाल रंगाने दाखवले जाते. वरील "खण्ड्पीठ" वीस मॉडेलचे असल्याने २० बार दाखवले आहेत. जाता जाता - बाकीचे मतभेद असले तरी आपल्याबद्दल बेसिक आदर नक्की राहील. चिंता नसावी.

युयुत्सु Sun, 02/23/2025 - 14:55
आग्या १९९० यांच्या मागणीनुसार सोन्याच्या दराचे पुढील आठड्यासाठी (केवळ प्रयोगात्मक) भाकीत सोने खाली येते तेव्हा स्टॉक वर जातात या सार्वकालिक तत्त्वाचा युयुत्सुनेट ने आदर केलेला दिसतो.

युयुत्सु Mon, 02/24/2025 - 00:03
मंडळी श्री० गोडबोले यांनी मला मार्केट्ची संभाव्य रेंज आणि त्याची संभाव्यता (प्रोबॅबिलीटी) देण्याबद्दल सुचवले. आत्ताच मला मी स्वतः विकसित केलेल्या "क्लेमास्पेस डायग्रॅमची आठवण झाली त्यात मला मार्केट वर किंवा खाली जायची शक्यता किती या प्रश्नाचे उत्तर देता येते. पुढील आठवड्यासाठीचा क्लेमास्पेस डायाग्रॅम असा दिसतो. पिवळा धमक दिसणारा 'डोळा' मार्केटला आपल्याकडे खेचायचा प्रयत्न करतो. याचे गणित इथे आणि मराठीत देणे अवघड आहे. तर या तंत्राप्रमाणे पुढच्या आठवड्यात निफ्टी वर जायची शक्यता ८१.४ % इतकीआहे.   पण मला दर वेळेला क्लेमास्पेस डायग्रॅम इथे डकवणे जिकीरीचे आहे. त्यामुळे मी फक्त प्रोबॅबिलीटी चे आकडे इथे देईन.

युयुत्सु Tue, 02/25/2025 - 08:36
क्लेमास्पेस डायग्रॅम हे मी माझ्या स्वतःच्या काही गरजा पूर्ण करणयासाठी विकसित केलेले एक गुणी तंत्र आहे. :) परवा हा आलेख मी जेव्हा काढला तेव्हा बाजार वर जायची संभाव्यता ~८१% होती. कालच्या घसरणीमुळे ही शक्यता आता ~९५% पर्यंत वाढली आहे. मग आता मार्केट वर जाणार की खाली जाणार? तर वर दिलेल्या आलेखात निळी रेघ कालचे मार्केट कुठे होते दाखवते. निळ्या रेघे खाली भूतकाळात मार्केट गेलेले दिसत आहे, पण ते तिथे जाऊन उलट फिरले आहे. त्यामुळे अजुन एका डुबकीची शक्यता नाकारता येत नाही. थोडकयात शेवटच्या थेंबापर्यंत चिपाड चरकातून काढणार...  तसेच वरील आलेखाचा एक चुलतभाऊ पुढे दिला आहे. त्यात तांबंडा बिंदू मार्केट सध्या कुठे आहे ते दाखवत आहे. मार्केट पिवळ्या डोळ्याकडे सतत झेपावत असते. हा "पितनेत्र " तांबड्या बिंदूचच्या डाव्या बाजूला असल्याने आणखी विक्री होऊन मग मार्केट परतीचा रस्ता काही कालावधी साठी पकडेल, (नवीन अर्निंग सिझन) असे वाटते.

दीपक११७७ Tue, 02/25/2025 - 14:03
कमेंटमध्ये सांगितल्याप्रमाणे मला चार्ट दिसत नाहीये, माझ्या पीसीमध्ये काही सेटिंग समस्या आहे का की या धाग्या सोबत कोणताही चार्ट जोडलेला नाहीये.
लेखनविषय:
लेखनप्रकार
बाजाराचा कल : २४ फेब्रुवारीचा आठवडा ========================= मंडळी मागील आठवड्यात जे नकारात्मक चित्र युयुत्सु-नेट ने दाखवले त्या प्रमाणे परत एकदा मार्केटने आपला मगदूर दाखवला. या आठवड्यात मात्र चित्र वेगळे आहे. बाजारात अजून करेक्शन येणं बाकी आहे असं तज्ञ मंडळी सांगत असताना मॉडेल मात्र चढा-सूर आळवत आहे. कदाचित या खेपेस युयुत्सु-नेट याखेपेला नक्की गंडेल असे वाटते. त्यामुळे माझी उत्सूकता किंचित ताणली गेली आहे.

शिक्षण आणि विटाळ पाळणे

विवेकपटाईत ·

आग्या१९९० Sun, 02/23/2025 - 14:28
कुंकवाचा बाण वर्मी लागल्याने धागा काढला का? असो. शाळेत असताना शाखेत जाणाऱ्या मित्राने विटाळशीणला इंग्रजीत bricklazy म्हणतात असे सांगून माझ्या ज्ञानात भर घातली होती. का तर म्हणे पाळीच्या काळात विटकरी रंगाच्या स्त्रावामुळे स्त्री आळशी बनते. शिव शिव शिव ! शाखेत असं शिकवले जाते?

आंद्रे वडापाव Sun, 02/23/2025 - 17:20
मुख्य प्रश्न "विटाळ" निति का अमलात आणली गेली ?.... याचे उत्तर बीबीसी युट्यूब चॅनेल वर, साहित्य संमेलन अध्यक्ष, तारा भवाळकर, यांच्या मुलाखतीचा ९ ~१० मिनिटाचा तुकडा पहा... "बापाला बापपण सिद्ध करावं लागतं"....

In reply to by आंद्रे वडापाव

लिंक देत चला हो. शोधुनही सापडला नाही हा विडीओ =)))) सोप्पं आहे नुसतं कॉपी पेस्ट तर करायचं असतं . उदाहरणार्थ हे पहा : https://www.youtube.com/watch?v=s-4fGFGdg-U बाकी तुम्ही म्हणता तो व्हिडीओ पाहिला नसला तरी नुसते टायटल "बापाला बापपण सिद्ध करावं लागतं" वाचुन सहित्य सम्मेलनाचे माजी अध्यक्ष - पाद्री फ्रान्सिस डिब्रिटो ह्यांची प्रकर्षाने आठवण झाली. बापाला बापपण सिद्ध करावं लागतं हे ऐकुन त्यांना काय वाटलं असतं ह्या विषयी फार उत्सुकता वाटली =)))) j

In reply to by प्रसाद गोडबोले

आंद्रे वडापाव Mon, 02/24/2025 - 09:31
Marathi Sahitya Sammelan अध्यक्ष तारा भवाळकर पुरुषसत्ताक समाज, परंपरेच्या ओझ्यावर काय म्हणाल्या? #https://youtu.be/HWAuiSPJZJE?si=n43SNKE5cemjvl5p

मुक्त विहारि Sun, 02/23/2025 - 19:32
त्या काळांत, स्त्रीला जास्तीत जास्त आराम आणि पौष्टिक खाणे देणे उत्तम, असे माझे आजोबा ( ते डॉक्टर होते.) म्हणायचे. एरवीही स्त्रीला चौरस आहार मिळाला पाहिजे, असा त्यांचा दंडक होता. इतर डॉक्टरांच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत आहे...

आंद्रे वडापाव Mon, 02/24/2025 - 13:24
विटाळा वाचूनि उत्पत्तीचे स्थान। कोणी देह निर्माण नाही जगी।। म्हणूनि पांडुरंगा वानितसे थोरी। विटाळ देहांतरी वसतसे।। देहीचा विटाळ देहीच निर्धारी। म्हणते महारी चोखीयाची।। फुकटची वीज हडपणाऱ्या, स्वस्तात दारू पाहिजे असणाऱ्या, फुकट्या दिल्लीकरांना, महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाची प्रगल्भता कशी कळणार !

धर्मराजमुटके Mon, 02/24/2025 - 21:41
अरे भाई कहना क्या चाहते हो ? लेख वाचून काहीच कळाले नाही. आजकाल असेच लेख सर्वत्र वाचनात येतात. म्हणजे चुकीची का होईना पण स्पष्ट बाजू घ्यायची नाही. नेहमी माझ्यासारखे (म्हणजे त्या धर्मराजासारखे) नरो वा कुंजरो वा:
मासिक पाळीच्या काळात विटाळ पाळणे अपमानकारक नव्हे तर स्त्रीच्या स्वास्थ्य दृष्टीने सर्वोत्तम होते, हे एका निरक्षर व्यक्तीला ही समजते.
ओके. मग आताच्या काळाबद्दल तुम्ही काय सल्ला द्याल ? आजच्या काळात विटाळ पाळणे स्त्रीच्या स्वास्थ्य दृष्टीने सर्वोत्तम आहे काय ? याचे हो किंवा नाही असे उत्तर द्या. विटाळशी स्त्री ने कुणाला शिवाशिव केली, तर तिला फार श्रम व्हायचे काय ? केवळ तिला आराम मिळावा म्हणून तिला हाडतूड केली जायची का ?
त्या काळच्या शिक्षित आणि ज्ञानी वर्गाने स्त्रीला विहीरीतून पाणी काढणे, जात्यावर पीठ दळने, इत्यादि अनेक शारीरिक कष्टांच्या कामांपासून दूर ठेवण्याची व्यवस्था केली.
आणि
मासिक पाळीच्या काळात विटाळ पाळणे अपमानकारक नव्हे तर स्त्रीच्या स्वास्थ्य दृष्टीने सर्वोत्तम होते, हे एका निरक्षर व्यक्तीला ही समजते.
ही दोन्ही वाक्ये समानार्थी आहेत काय ?

आग्या१९९० Sun, 02/23/2025 - 14:28
कुंकवाचा बाण वर्मी लागल्याने धागा काढला का? असो. शाळेत असताना शाखेत जाणाऱ्या मित्राने विटाळशीणला इंग्रजीत bricklazy म्हणतात असे सांगून माझ्या ज्ञानात भर घातली होती. का तर म्हणे पाळीच्या काळात विटकरी रंगाच्या स्त्रावामुळे स्त्री आळशी बनते. शिव शिव शिव ! शाखेत असं शिकवले जाते?

आंद्रे वडापाव Sun, 02/23/2025 - 17:20
मुख्य प्रश्न "विटाळ" निति का अमलात आणली गेली ?.... याचे उत्तर बीबीसी युट्यूब चॅनेल वर, साहित्य संमेलन अध्यक्ष, तारा भवाळकर, यांच्या मुलाखतीचा ९ ~१० मिनिटाचा तुकडा पहा... "बापाला बापपण सिद्ध करावं लागतं"....

In reply to by आंद्रे वडापाव

लिंक देत चला हो. शोधुनही सापडला नाही हा विडीओ =)))) सोप्पं आहे नुसतं कॉपी पेस्ट तर करायचं असतं . उदाहरणार्थ हे पहा : https://www.youtube.com/watch?v=s-4fGFGdg-U बाकी तुम्ही म्हणता तो व्हिडीओ पाहिला नसला तरी नुसते टायटल "बापाला बापपण सिद्ध करावं लागतं" वाचुन सहित्य सम्मेलनाचे माजी अध्यक्ष - पाद्री फ्रान्सिस डिब्रिटो ह्यांची प्रकर्षाने आठवण झाली. बापाला बापपण सिद्ध करावं लागतं हे ऐकुन त्यांना काय वाटलं असतं ह्या विषयी फार उत्सुकता वाटली =)))) j

In reply to by प्रसाद गोडबोले

आंद्रे वडापाव Mon, 02/24/2025 - 09:31
Marathi Sahitya Sammelan अध्यक्ष तारा भवाळकर पुरुषसत्ताक समाज, परंपरेच्या ओझ्यावर काय म्हणाल्या? #https://youtu.be/HWAuiSPJZJE?si=n43SNKE5cemjvl5p

मुक्त विहारि Sun, 02/23/2025 - 19:32
त्या काळांत, स्त्रीला जास्तीत जास्त आराम आणि पौष्टिक खाणे देणे उत्तम, असे माझे आजोबा ( ते डॉक्टर होते.) म्हणायचे. एरवीही स्त्रीला चौरस आहार मिळाला पाहिजे, असा त्यांचा दंडक होता. इतर डॉक्टरांच्या प्रतिसादाच्या अपेक्षेत आहे...

आंद्रे वडापाव Mon, 02/24/2025 - 13:24
विटाळा वाचूनि उत्पत्तीचे स्थान। कोणी देह निर्माण नाही जगी।। म्हणूनि पांडुरंगा वानितसे थोरी। विटाळ देहांतरी वसतसे।। देहीचा विटाळ देहीच निर्धारी। म्हणते महारी चोखीयाची।। फुकटची वीज हडपणाऱ्या, स्वस्तात दारू पाहिजे असणाऱ्या, फुकट्या दिल्लीकरांना, महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाची प्रगल्भता कशी कळणार !

धर्मराजमुटके Mon, 02/24/2025 - 21:41
अरे भाई कहना क्या चाहते हो ? लेख वाचून काहीच कळाले नाही. आजकाल असेच लेख सर्वत्र वाचनात येतात. म्हणजे चुकीची का होईना पण स्पष्ट बाजू घ्यायची नाही. नेहमी माझ्यासारखे (म्हणजे त्या धर्मराजासारखे) नरो वा कुंजरो वा:
मासिक पाळीच्या काळात विटाळ पाळणे अपमानकारक नव्हे तर स्त्रीच्या स्वास्थ्य दृष्टीने सर्वोत्तम होते, हे एका निरक्षर व्यक्तीला ही समजते.
ओके. मग आताच्या काळाबद्दल तुम्ही काय सल्ला द्याल ? आजच्या काळात विटाळ पाळणे स्त्रीच्या स्वास्थ्य दृष्टीने सर्वोत्तम आहे काय ? याचे हो किंवा नाही असे उत्तर द्या. विटाळशी स्त्री ने कुणाला शिवाशिव केली, तर तिला फार श्रम व्हायचे काय ? केवळ तिला आराम मिळावा म्हणून तिला हाडतूड केली जायची का ?
त्या काळच्या शिक्षित आणि ज्ञानी वर्गाने स्त्रीला विहीरीतून पाणी काढणे, जात्यावर पीठ दळने, इत्यादि अनेक शारीरिक कष्टांच्या कामांपासून दूर ठेवण्याची व्यवस्था केली.
आणि
मासिक पाळीच्या काळात विटाळ पाळणे अपमानकारक नव्हे तर स्त्रीच्या स्वास्थ्य दृष्टीने सर्वोत्तम होते, हे एका निरक्षर व्यक्तीला ही समजते.
ही दोन्ही वाक्ये समानार्थी आहेत काय ?
लेखनविषय:
लेखनप्रकार
"शिक्षण प्राप्ती नंतर तुम्ही शहाणे नाही झाला तर तुम्ही अशिक्षित आहात". हे विधान शंभर टक्के खरे आहे. पण शिक्षित म्हणजे कोण? हा प्रश्न मनात येणारच. ज्ञान आपण गुरु/ शिक्षकाकडून मौखिक आणि पुस्तकी स्वरुपात प्राप्त करतो. या शिवाय जगाचा व्यवहार पाहून ही आपण ज्ञान प्राप्त करतो. ज्याला प्राप्त ज्ञानाचा अर्थ कळतो आणि प्राप्त ज्ञान कृतीत उतरवू शकतो तो व्यक्ति शिक्षित, असे म्हणता येईल. एक निरक्षर व्यक्तीही शिक्षित असू शकतो आणि उच्च शिक्षित डॉक्टर, इंजीनियर आणि अर्थशास्त्री ही अर्ध-शिक्षित असू शकतात.

शिवजयंती

अनुस्वार ·

Bhakti Wed, 02/19/2025 - 19:32
सुंदर!
शिवाजी म्हणजे तुम्ही, मी, आपण बस्स! कारण शिवाजी शब्दांत बांधता येत नाही, केवळ सिंहासनावर बसवता येत नाही, शिवाजी फक्त जिवंत राहतो. जिवंत माणसांत! जिवंत मनांत! जिवंत मातीत!

किसन शिंदे गुरुवार, 02/20/2025 - 11:57
हे आवडलंय!
शिवाजी म्हणजे तुम्ही, मी, आपण बस्स! कारण शिवाजी शब्दांत बांधता येत नाही, केवळ सिंहासनावर बसवता येत नाही, शिवाजी फक्त जिवंत राहतो. जिवंत माणसांत! जिवंत मनांत! जिवंत मातीत! मनुष्य ज्या प्रेरणेने जगतो ती प्रेरणा म्हणजे शिवाजी. तीच स्वातंत्र्य प्रेरणा जी मनुष्यांना इतर प्राण्यांहून वेगळी ठरवते.

Bhakti Wed, 02/19/2025 - 19:32
सुंदर!
शिवाजी म्हणजे तुम्ही, मी, आपण बस्स! कारण शिवाजी शब्दांत बांधता येत नाही, केवळ सिंहासनावर बसवता येत नाही, शिवाजी फक्त जिवंत राहतो. जिवंत माणसांत! जिवंत मनांत! जिवंत मातीत!

किसन शिंदे गुरुवार, 02/20/2025 - 11:57
हे आवडलंय!
शिवाजी म्हणजे तुम्ही, मी, आपण बस्स! कारण शिवाजी शब्दांत बांधता येत नाही, केवळ सिंहासनावर बसवता येत नाही, शिवाजी फक्त जिवंत राहतो. जिवंत माणसांत! जिवंत मनांत! जिवंत मातीत! मनुष्य ज्या प्रेरणेने जगतो ती प्रेरणा म्हणजे शिवाजी. तीच स्वातंत्र्य प्रेरणा जी मनुष्यांना इतर प्राण्यांहून वेगळी ठरवते.
लेखनविषय:
त्या पोराचे वडील तसे नामी सरदार होते बरं. आज आपण उपहासाने जो जहागीरदार शब्द वापरतो तसा त्या मुलाचा बाप खरंच खूप मोठा जहागीरदार होता. पैशापाण्याची, सेवेकऱ्यांची कमी नव्हती. त्या तरुणाने सगळी हयात मजा मारण्यात घालवली असती तरीसुद्धा तो काही चुकला असं कुणीही म्हणू शकलं नसतं. परंतु गर्व आजपर्यंत कुणाला चुकला? तुम्ही पुराणे उचकून पहा, परमेश्वरी अवतारांना सुद्धा गर्वाची बाधा झाल्याचे क्षण तुम्हाला सापडतील. असाच गर्व या विश्वाची निर्मिती करणाऱ्या आदियोगी-आदिशक्तीला झाला. आणि अनंत विश्वातल्या अनंत चुका अनंत चाचण्यांनी सुद्धा ज्याच्यात सापडणार नाहीत असा युगपुरुष निर्माण करण्याची नियतीला इच्छा झाली.

त्र्यंबकेश्वरमधील योग शिबिर आणि निसर्गाचा सत्संग

मार्गी ·
लेखनप्रकार
✪ त्र्यंबकेश्वरमध्ये बिहार स्कूल ऑफ योगाचं योग शिबिर ✪ पण त्याआधी प्रसिद्ध संस्थानाच्या नावाने झालेली ऑनलाईन फसवणूक ✪ "अखंड सावधान असावे दुश्चित कदापि नसावे!" ✪ परमहंस निरंजनानंद सरस्वतींच्या उपस्थितीतील सत्संग ✪ "चार मिले, चौसठ खिले, बीस करें जोड़" ✪ BSY चं सुंदर आयोजन आणि सत्रांची मेजवानी ✪ आदर्श गुरू बरोबर आदर्श शिष्यत्वाचं उदाहरण! ✪ साधकांची मांदियाळीसह कीर्तन, भजन आणि ध्यान ✪ त्र्यंबकेश्वर भटकंती व ब्रह्मगिरीचा अविस्मरणीय ट्रेक सर्वांना नमस्कार. नुकताच त्र्यंबकेश्वरमध्ये झालेल्या बिहार स्कूल ऑफ योगा ह्या मोठ्या योग विद्यापीठाच्या एका योग शिबिरामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.

पत्रास कारण की

युयुत्सु ·

सुबोध खरे Tue, 02/18/2025 - 11:55
संविधानिक आणि इतर मोठ्यापदांवरील व्यक्तींकडून वापरल्या जाणार्‍या हिंसक भाषेला आळा घालायची गरज निर्माण झाली आहे. भाषा हिंसक आहे हे कुणी ठरवायचे? कुराणात काफिरांना छळ करून देहदंड द्या असे तीन चार ठिकाणी स्पष्ट म्हटलेले आहे. कुराणावर बंदी घाला असा अर्ज का करत नाही आपण ?

संदर्भ कळेल का? बाकी सरन्यायाधीशाना पत्र लिहिलेत ते ठिकाय पण राष्ट्रपती नी पंतप्रधान ह्यांना कशाला? खासकरून पंतप्रधान? म्हणजे त्यांच्या कडून अपेक्षा ठेवणे म्हणजे…..

In reply to by अमरेंद्र बाहुबली

उगी उगी
खासकरून पंतप्रधान? म्हणजे त्यांच्या कडून अपेक्षा ठेवणे म्हणजे…..
तेच की. कतले दुत्त दुत्त हाहेत ते. आपन ना त्याचं गल उन्हात बांधू ! मी दोन हजाल एकोनतीस मध्ये त्यांना पादनालच आहे इलेक्शन मध्ये ! तो पलयंत गत्ती फू आहे मी त्यांच्याशी. दुत्त कुतले !!

In reply to by प्रसाद गोडबोले

वामन देशमुख Tue, 02/18/2025 - 15:06
काहीही हं, प्रगो!
मी दोन हजाल एकोनतीस मध्ये त्यांना पादनालच आहे इलेक्शन मध्ये !
हे वाचून पहिल्यांदा तर मला असेच काहीतरी वाटले! fart आम्ही असेच पांचट लोकं! काय करणार? बाकी, तुम्ही वर म्हटल्याप्रमाणे, इथे भरपूर मजा येणार आहे हे नक्की!

In reply to by प्रसाद गोडबोले

मी दोन हजाल एकोनतीस मध्ये त्यांना पादनालच आहे इलेक्शन मध्ये ! २०२९ पर्यन्त वायू कसा रोखून धरणार? :)

वामन देशमुख Tue, 02/18/2025 - 15:07
मुख्य म्ह० संविधानिक पदावरील व्यक्ती क्षुल्लक कारणा करता शिवराळ आणि हिंसक भाषेचा अवलंब करतात तेव्हा तर ही चिंता जास्त गडद होत जाते.
नेमकं कुठे काय घडलं ते तरी सांगा.

In reply to by वामन देशमुख

विजुभाऊ Tue, 02/18/2025 - 16:56
नेमके कुठे घडले ते सांगतो त्यासाठी काही उदाहरणे • 3 charges under IPC Section-506 related to Punishment for criminal intimidation • 1 charge under IPC Section-409 related to Criminal breach of trust by a public servant, or by banker, merchant or agent • 1 charge under IPC Section-363 related to Punishment for kidnapping • 1 charge under IPC Section-365 related to Kidnapping or abducting with intent secretly and wrongfully to confine a person • 1 charge under IPC Section-368 related to Wrongfully concealing or keeping in confinement, a kidnapped or abducted person • 1 charge under IPC Section-324 related to Voluntarily causing hurt by dangerous weapons or means • 1 charge under IPC Section-420 related to Cheating and dishonestly inducing delivery of property • 9 charges under IPC Section-143 related to Punishment for Being a member of an unlawful assembly • 6 charges under IPC Section-149 related to Every member of unlawful assembly guilty of an offence committed in prosecution of a common object • 5 charges under IPC Section-147 related to Punishment for Rioting • 4 charges under IPC Section-341 related to Punishment for wrongful restraint • 4 charges under IPC Section-145 related to Joining or continuing in unlawful assembly, knowing it has been commanded to disperse • 3 charges under IPC Section-144 related to Joining unlawful assembly armed with a deadly weapon • 3 charges under IPC Section-188 related to Disobedience to order duly promulgated by a public servant • 2 charges under IPC Section-290 related to Punishment for public nuisance in cases not otherwise provided for • 2 charges under IPC Section-291 related to Continuance of nuisance after injunction to discontinue • 2 charges under IPC Section-146 related to Rioting • 2 charges under IPC Section-148 related to Rioting, armed with a deadly weapon • 2 charges under IPC Section-323 related to Punishment for voluntarily causing hurt • 2 charges under IPC Section-504 related to Intentional insult with intent to provoke breach of the peace • 2 charges under IPC Section-427 related to Mischief causing damage to the amount of fifty rupees • 1 charge under IPC Section-109 related to Punishment of abetment, if the act abetted, is committed in consequence, and where no express provision is made for its punishment • 1 charge under IPC Section-447 related to Punishment for criminal trespass • 1 charge under IPC Section-336 related to an Act endangering the life or personal safety of others • 1 charge under IPC Section-153 related to Wantonly giving provocation with intent to cause riot-if rioting to be committed-if not committed • 1 charge under IPC Section-186 related to Obstructing public servants in the discharge of public functions • 1 charge under IPC Section-141 related to Unlawful assembly • या सगळ्या केसेस एकाच व्यक्तीवर आहेत. या व्कतीबाबत आणखी एक क्लू देतो या माणसाने अनंत करमुसे या व्यक्तीला पोलीस आणि आपले खाजगी अंगरक्षकांकरवी मारहाण केली. आणखी एक विश्वप्रवक्ते आणि सर्वविषयातले जाणकार सामना या जगद्विख्यात दैनीकाचे संपादक.यांचे कर्तृत्व सर्वच जण जाणतात. स्वप्ना पाटकर या स्त्रीला अश्लाघ्य भाषेत शिव्या देणे वगैरे , किंवा कंगना राणावतचे घर तोडणे इत्यादी अश्राप बाललीला यांसाठी प्रसिद्ध आहेत. फक्त काही वानगीदाखल हे लिहिलेय

In reply to by विजुभाऊ

श्रीगुरुजी Tue, 02/18/2025 - 17:15
इतके गंभीर गुन्हे असूनही हे गुंड कोणत्याही कारवाईविना मोकळे का आहेत? या तक्षकांना कोणत्या इंद्राने संरक्षण दिले आहे?

In reply to by विजुभाऊ

श्रीगुरुजी Tue, 02/18/2025 - 19:12
त्यांना अधिकार नाही. अधिकार असलेला इंद्र वेगळा आहे. त्याने अश्या सर्व तक्षकांना संरक्षण दिलंय.

In reply to by विजुभाऊ

म्हणजे सरळ सांगा की मावीआच्या नेत्यांविरुद्ध धागा काढलाय तर. अनंत करमुसे हा काही साधू महात्मा होता का? तसेच कंगना रानवताचे घर अतिक्रमणात होते. सरन्यायाधीशांनी ह्या पत्राची दखल घेऊन ह्याना चांगला जबर दंड ठोकावा नि जमेल तर चार दोन महिने आई सहाल घडवून आणावी! म्हणजे सरन्यायाधीश नी मीपकरांचा वेळ वाचेल!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

धागा ऐवजी प्रतिसाद वाचावे, विजूभाऊ, भाजप नेत्यांवर किती केसेस आहे यादी देऊ का? चांगल्या कामासाठी नाही बर का! तोडीपणी, भ्रष्टाचार गुंडगिरी ह्यासाठीचे?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विजुभाऊ Wed, 02/19/2025 - 10:34
राऊत आणि जितुद्दीन हे अत्यंत सालस आणि सोज्वल प्रवृत्तीचे नेते आहेत असे म्हणयचे आहे का? दूरदर्शनवर राऊत ज्या पद्धतीने महिलाम्बद्दल बोलतात किंवा विचार मांडतात त्याचा कुठेच साधा निषेधही करावासा वाटत नसेल तर तुम्ही त्या भाषेचे आणि वृत्तीचे समर्थन करताय असेच म्हणावे लागेल. असो. मला मड रेसलिंग मधे यत्ज्किंचितही रस नसल्याने इथेच थाम्बतो.

In reply to by विजुभाऊ

मला मड रेसलिंग मधे यत्ज्किंचितही रस नसल्याने इथेच थाम्बतो. वा वा वा, आधी चिखलात उतरून इतराना कुस्ती खेळा म्हणून दंड थोपटायचे नि बेडकुळ्या दाखवायच्या मग एखाद्याने भाजप नेत्यांची तीच बाजू दाखवली तर “मला मड रेसलिंग मध्ये रस नाही” म्हणून पळ काढायचा. ह्याला काय अर्थ आहे? दूरदर्शनवर राऊत ज्या पद्धतीने महिलाम्बद्दल बोलतात किंवा विचार मांडतात त्याचा कुठेच साधा निषेधही करावासा वाटत नसेल अनेक भाजप नेते महिलांबद्दल वाईट बोलले आहेत गेला बाजार मूनगांटीवर हे लोकसभेवेळी प्रियांका गांधी ह्यांच्या बद्दल तर विखे पाटील ह्यांच्या सभेत कुणीतरी देशमुख नावाचा भाजप नेता बाळासाहेब थोरातांच्या लेकीबद्दल अतिशय खालच्या भाषेत बोलला होता तेव्हा कुठे तुम्ही निषेध व्यक्त केला होता?? दाखवता का? येऊन जाऊन फक्त राऊत नि आव्हाडांविरुद्ध गरळ ओकायची नि पळ काढायचा ह्याला काय अर्थ आहे? चालले इतरांना ज्ञान द्यायला.

चित्रगुप्त Tue, 02/18/2025 - 15:27
संविधानिक पदावरील व्यक्ती क्षुल्लक कारणा करता शिवराळ आणि हिंसक भाषेचा अवलंब करतात तेव्हा तर ही चिंता जास्त गडद होत जाते.
--- संदर्भासह स्पष्टीकरण द्या.

युयुत्सु Tue, 02/18/2025 - 15:42
मुळात कोणताही धर्म देशाच्या संविधानापेक्षा मोठा असू शकत नाही, त्यामुळे संविधानात्मक पदावरील व्यक्तीने "जीभ छाटण्यासाठी" बक्षिस जाहिर करणे, "गोळ्या घालण्याचे" किंवा "ठेचून काढायचे" आवाहन करणे हे रोगापेक्षा इलाज भयंकर या प्रकारात मोडते. अशा वक्तव्याचा प्रत्यक्ष परिणाम समाजाच्या मानसिकतेवर होत असतो. रणवीर अलाहाबदियाचे विधान कितीही चूकीचे असले तरी त्याला शिक्षा करायचा अधिकार फक्त सक्षम यंत्रणाना आहे. त्याला मारण्याची धमकी देण्या इतका हा गंभीर गुन्हा आहे का? वि० त्याने बिनशर्त माफी मागितलेली असताना...माणसाचा विवेक २४/७ १००% जागा राहू शकत नाही. ते जैविकदृष्ट्या अशक्य आहे. आउट ऑफ कॉटेक्स्ट म्ह० संदर्भ सोडून वाचायची सध्या सर्वत्र साथ असल्याने जास्त तपशीलात जाऊ शकत नाही, त्या बद्दल क्षमस्व! ज्याना काफिरांना मारण्याच्या आदेशाबद्दल आक्षेप आहे, त्यांनी मनुस्मृती मधील पुढील श्लोक अवश्य वाचावा - "गुरुं वा बालवृद्धौ वा ब्राह्मणं वा बहुश्रुतम् । आततायिनं आयान्तं हन्यादेवाविचारयन्"

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी Tue, 02/18/2025 - 15:56
त्यामुळे संविधानात्मक पदावरील व्यक्तीने "जीभ छाटण्यासाठी" बक्षिस जाहिर करणे, "गोळ्या घालण्याचे" किंवा "ठेचून काढायचे" आवाहन करणे हे रोगापेक्षा इलाज भयंकर या प्रकारात मोडते. सहमत. फक्त संविधानात्मक व्यक्तीने नव्हे, तर कोणत्याही व्यक्तीने असे हिंसात्मक आवाहन करणे अत्यंत भयंकर गुन्हा समजून कायदेशीर कारवाई व्हायला हवी. ज्याना काफिरांना मारण्याच्या आदेशाबद्दल आक्षेप आहे, त्यांनी मनुस्मृती मधील पुढील श्लोक अवश्य वाचावा - कोणत्या देशात मनुस्मृतीला राज्यघटनेचे स्थान देऊन त्यानुसार अंमलबजावणी करतात? कोणत्या देशात मनुस्मृती अभ्यासक्रमात आहे?

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु Tue, 02/18/2025 - 15:59
कोणत्या देशात मनुस्मृतीला राज्यघटनेचे स्थान देऊन त्यानुसार अंमलबजावणी करतात? कोणत्या देशात मनुस्मृती अभ्यासक्रमात आहे?म हिंदु लॉसाठी स्मृती महत्त्वाचा आधार मानल्या गेल्या आहेत. मला मनुस्मृती टिळक विद्यापिठात विशारद्च्या दुस-या वर्षाला अभ्यासाला होती. सध्याचे माहित नाही.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी Tue, 02/18/2025 - 16:20
हिंदू लॉ मधील कोणते कायदे मनुस्मृतीवर आधारीत आहेत? कोणत्या पदवीसाठी मनुस्मृती अभ्यासक्रमात आहे?

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु Tue, 02/18/2025 - 16:30
हे प्रश्न कृपया ए० आय० ला विचारायची सवय लावावी. प्र० Which part of Hindu law is borrowed from Smriti literarture? उ० The part of Hindu law that is borrowed from Smriti literature is the concept of "Dharma" and the rules governing social and familial relationships, such as: - Laws of inheritance (Dayabhaga and Mitakshara) - Laws of marriage (types of marriages, rules of marriage, etc.) - Laws of adoption - Laws of partition and joint family property - Rules of caste and social hierarchy Smriti literature, which includes texts like the Manusmriti, Yajnavalkyasmriti, and Naradasmriti, provides guidance on these aspects of Hindu law. These texts are considered authoritative and have been influential in shaping Hindu law and customs.

In reply to by युयुत्सु

वामन देशमुख Tue, 02/18/2025 - 16:16
मनुस्मृती मधील पुढील श्लोक अवश्य वाचावा -
हा नेहमीचाच डावा डाव आहे. आधी खाजवून खरूज काढायचे आणि मग victim blaming करायची. संबंध नसताना मनुस्मृती आणायची मग हिंदूंना झोडायचे. जगाला पोखरणारी डावी वाळवी नष्ट करणे हे महत्वाचे आहे.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Wed, 02/19/2025 - 11:47
मनुस्मृती मधील पुढील श्लोक .... मनुस्मृती आणि कुराण दोन्ही वर बंदी घालण्यासाठी अर्ज करा. सरन्यायाधीश, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या कडे आहे का हिम्मत? असले मुळमुळीत अर्ज केवळ सवंग लोकप्रियतेसाठी मिपा वर लिहिण्यात काय हशील आहे?

In reply to by सुबोध खरे

कॉमी Wed, 02/19/2025 - 13:35
सर "अमुक पुस्तकात आक्षेपार्ह गोष्ट आहे म्हणून त्या पुस्तकावरच सरसकट बंदी घाला" आणि "संसदिय पदावर आणि इतर जबाबदारीच्या पब्लिक ऑफिस मध्ये असलेल्या लोकांनी तारतम्य बाळगावे, हिंसेला खतपाणी घालणारी वक्तव्ये करू नयेत. तसे होत असेल तर त्यांच्या वरिष्ठ व्यक्तीने समज द्यावी" हया दोन्ही अत्यंत वेगळ्या गोष्टी नाहीत का?

मनुवादी स्वतला उजवे समजतात खर तर ते डाव्यांपेक्षा जास्त धोकेदायक आहेत, भारताला पोखरणारी मनुवादी डावी वाळवी नष्ट करणे हे महत्वाचे आहे. बाकी युयुत्सु सरांवर आता मनुवादी तोंडसुख घेतील.

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी Wed, 02/19/2025 - 13:15
कोणत्याही विषयावर धागा असो, खफ असो . . . हे तेथे जाऊन घाण करतातच. बरं त्या विषयातलं काही समजत असतं, काही विश्वसनीय माहिती दिली असती, काही विचारी प्रतिसाद दिले असते तर विरूद्ध लिहिलेले सुद्धा चाललं असतं. पण कोणत्याही विषयातील कणभरही माहिती नाही, विषय अजिबात समजत नाही पण तरीही सातत्याने पिंका टाकून धाग्याचा सत्यानाश करण्याचे घाणेरडे व्यसन जाणार तरी कधी?

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, विद ड्यू रिस्पेक्ट, तुम्ही नि तुमच्या सारखे अनेक जाणकार मीपावर आहेत. प्रत्येक वेळी माहिती असेल तरच लिहायचे का? काही वेळा माहिती मिळवायला किंवा चुकीची माहिती दुरुस्त करून घ्यायला देखील प्रतिसाद दिला जातो ह्याचा अर्थ असा नाही की धाग्याचा सत्यानाश करतो. भावना समजून घ्याल अशी अपेक्षा! _/\_

युयुत्सु Sat, 07/19/2025 - 09:30
हे खुले पत्र लिहील्यानंतर ते कदाचित व्हायरल झालं असावं कारण तेव्हाचा सोलापूरकर इशू शांत झाला. कदाचित ते तेव्हाच्या सरन्यायाधीशांपर्यंत कुणीतरी पोचवले असावे (अर्थात या माझ्या भाबड्या स्मजुती आहेत) कारण नंतर फेबु मला पिपल यु मे नो मध्ये जस्टीस संजीव खन्नांचे नाव बरेच दिवस दाखवत असे. पण या पत्रावर कार्यवाही झाली असती तर कालचा विधानभवनातला राडा कदाचित टळला असता. "अतिडाव्या" विचारसरणीने चिंतेत असलेले मा०मु० असे राडे टाळ्ण्यासाठी कोणते कायदे करणार? का हाणामारी अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये येते?

गामा पैलवान Sat, 07/19/2025 - 17:51
युयुत्सु,
"गुरुं वा बालवृद्धौ वा ब्राह्मणं वा बहुश्रुतम् । आततायिनं आयान्तं हन्यादेवाविचारयन्"
रोचक विधान आहे. माझ्या आकलनानुसार याचा आर्थ अतिरेक्यास ताबडतोब ठार मारावे असा आहे. भले आतंकी गुरू, वृद्ध, बालक वा बहुश्रुत ब्राह्मण असला तरीही. मग कसाबवर खटला चालवायचा खटाटोप कशासाठी? आणि अफजल गुरूसाठी रात्री न्यायालय का म्हणून उघडायचं? सरळ उडवून टाकायचं की त्याला. अतिरेक्यांना वठणीवर आणण्यासाठी मनुस्मृतीतला सदर श्लोक एकदम जालीम उपाय आहे. आ.न., -गा.पै.

युयुत्सु Sat, 07/19/2025 - 18:22
मग कसाबवर खटला चालवायचा खटाटोप कशासाठी? हिंदू लॉ स्मृतींवर आधारीत असला तरी भारतीय न्यायव्यवस्था मनुस्मृतीवर आधारित नाही. याशिवाय काही गोष्टी आंतरराष्ट्रीय समुदायापुढे आपली प्रतिमा सांभाळण्यासाठी केल्या जातात.

सुबोध खरे Tue, 02/18/2025 - 11:55
संविधानिक आणि इतर मोठ्यापदांवरील व्यक्तींकडून वापरल्या जाणार्‍या हिंसक भाषेला आळा घालायची गरज निर्माण झाली आहे. भाषा हिंसक आहे हे कुणी ठरवायचे? कुराणात काफिरांना छळ करून देहदंड द्या असे तीन चार ठिकाणी स्पष्ट म्हटलेले आहे. कुराणावर बंदी घाला असा अर्ज का करत नाही आपण ?

संदर्भ कळेल का? बाकी सरन्यायाधीशाना पत्र लिहिलेत ते ठिकाय पण राष्ट्रपती नी पंतप्रधान ह्यांना कशाला? खासकरून पंतप्रधान? म्हणजे त्यांच्या कडून अपेक्षा ठेवणे म्हणजे…..

In reply to by अमरेंद्र बाहुबली

उगी उगी
खासकरून पंतप्रधान? म्हणजे त्यांच्या कडून अपेक्षा ठेवणे म्हणजे…..
तेच की. कतले दुत्त दुत्त हाहेत ते. आपन ना त्याचं गल उन्हात बांधू ! मी दोन हजाल एकोनतीस मध्ये त्यांना पादनालच आहे इलेक्शन मध्ये ! तो पलयंत गत्ती फू आहे मी त्यांच्याशी. दुत्त कुतले !!

In reply to by प्रसाद गोडबोले

वामन देशमुख Tue, 02/18/2025 - 15:06
काहीही हं, प्रगो!
मी दोन हजाल एकोनतीस मध्ये त्यांना पादनालच आहे इलेक्शन मध्ये !
हे वाचून पहिल्यांदा तर मला असेच काहीतरी वाटले! fart आम्ही असेच पांचट लोकं! काय करणार? बाकी, तुम्ही वर म्हटल्याप्रमाणे, इथे भरपूर मजा येणार आहे हे नक्की!

In reply to by प्रसाद गोडबोले

मी दोन हजाल एकोनतीस मध्ये त्यांना पादनालच आहे इलेक्शन मध्ये ! २०२९ पर्यन्त वायू कसा रोखून धरणार? :)

वामन देशमुख Tue, 02/18/2025 - 15:07
मुख्य म्ह० संविधानिक पदावरील व्यक्ती क्षुल्लक कारणा करता शिवराळ आणि हिंसक भाषेचा अवलंब करतात तेव्हा तर ही चिंता जास्त गडद होत जाते.
नेमकं कुठे काय घडलं ते तरी सांगा.

In reply to by वामन देशमुख

विजुभाऊ Tue, 02/18/2025 - 16:56
नेमके कुठे घडले ते सांगतो त्यासाठी काही उदाहरणे • 3 charges under IPC Section-506 related to Punishment for criminal intimidation • 1 charge under IPC Section-409 related to Criminal breach of trust by a public servant, or by banker, merchant or agent • 1 charge under IPC Section-363 related to Punishment for kidnapping • 1 charge under IPC Section-365 related to Kidnapping or abducting with intent secretly and wrongfully to confine a person • 1 charge under IPC Section-368 related to Wrongfully concealing or keeping in confinement, a kidnapped or abducted person • 1 charge under IPC Section-324 related to Voluntarily causing hurt by dangerous weapons or means • 1 charge under IPC Section-420 related to Cheating and dishonestly inducing delivery of property • 9 charges under IPC Section-143 related to Punishment for Being a member of an unlawful assembly • 6 charges under IPC Section-149 related to Every member of unlawful assembly guilty of an offence committed in prosecution of a common object • 5 charges under IPC Section-147 related to Punishment for Rioting • 4 charges under IPC Section-341 related to Punishment for wrongful restraint • 4 charges under IPC Section-145 related to Joining or continuing in unlawful assembly, knowing it has been commanded to disperse • 3 charges under IPC Section-144 related to Joining unlawful assembly armed with a deadly weapon • 3 charges under IPC Section-188 related to Disobedience to order duly promulgated by a public servant • 2 charges under IPC Section-290 related to Punishment for public nuisance in cases not otherwise provided for • 2 charges under IPC Section-291 related to Continuance of nuisance after injunction to discontinue • 2 charges under IPC Section-146 related to Rioting • 2 charges under IPC Section-148 related to Rioting, armed with a deadly weapon • 2 charges under IPC Section-323 related to Punishment for voluntarily causing hurt • 2 charges under IPC Section-504 related to Intentional insult with intent to provoke breach of the peace • 2 charges under IPC Section-427 related to Mischief causing damage to the amount of fifty rupees • 1 charge under IPC Section-109 related to Punishment of abetment, if the act abetted, is committed in consequence, and where no express provision is made for its punishment • 1 charge under IPC Section-447 related to Punishment for criminal trespass • 1 charge under IPC Section-336 related to an Act endangering the life or personal safety of others • 1 charge under IPC Section-153 related to Wantonly giving provocation with intent to cause riot-if rioting to be committed-if not committed • 1 charge under IPC Section-186 related to Obstructing public servants in the discharge of public functions • 1 charge under IPC Section-141 related to Unlawful assembly • या सगळ्या केसेस एकाच व्यक्तीवर आहेत. या व्कतीबाबत आणखी एक क्लू देतो या माणसाने अनंत करमुसे या व्यक्तीला पोलीस आणि आपले खाजगी अंगरक्षकांकरवी मारहाण केली. आणखी एक विश्वप्रवक्ते आणि सर्वविषयातले जाणकार सामना या जगद्विख्यात दैनीकाचे संपादक.यांचे कर्तृत्व सर्वच जण जाणतात. स्वप्ना पाटकर या स्त्रीला अश्लाघ्य भाषेत शिव्या देणे वगैरे , किंवा कंगना राणावतचे घर तोडणे इत्यादी अश्राप बाललीला यांसाठी प्रसिद्ध आहेत. फक्त काही वानगीदाखल हे लिहिलेय

In reply to by विजुभाऊ

श्रीगुरुजी Tue, 02/18/2025 - 17:15
इतके गंभीर गुन्हे असूनही हे गुंड कोणत्याही कारवाईविना मोकळे का आहेत? या तक्षकांना कोणत्या इंद्राने संरक्षण दिले आहे?

In reply to by विजुभाऊ

श्रीगुरुजी Tue, 02/18/2025 - 19:12
त्यांना अधिकार नाही. अधिकार असलेला इंद्र वेगळा आहे. त्याने अश्या सर्व तक्षकांना संरक्षण दिलंय.

In reply to by विजुभाऊ

म्हणजे सरळ सांगा की मावीआच्या नेत्यांविरुद्ध धागा काढलाय तर. अनंत करमुसे हा काही साधू महात्मा होता का? तसेच कंगना रानवताचे घर अतिक्रमणात होते. सरन्यायाधीशांनी ह्या पत्राची दखल घेऊन ह्याना चांगला जबर दंड ठोकावा नि जमेल तर चार दोन महिने आई सहाल घडवून आणावी! म्हणजे सरन्यायाधीश नी मीपकरांचा वेळ वाचेल!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

धागा ऐवजी प्रतिसाद वाचावे, विजूभाऊ, भाजप नेत्यांवर किती केसेस आहे यादी देऊ का? चांगल्या कामासाठी नाही बर का! तोडीपणी, भ्रष्टाचार गुंडगिरी ह्यासाठीचे?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विजुभाऊ Wed, 02/19/2025 - 10:34
राऊत आणि जितुद्दीन हे अत्यंत सालस आणि सोज्वल प्रवृत्तीचे नेते आहेत असे म्हणयचे आहे का? दूरदर्शनवर राऊत ज्या पद्धतीने महिलाम्बद्दल बोलतात किंवा विचार मांडतात त्याचा कुठेच साधा निषेधही करावासा वाटत नसेल तर तुम्ही त्या भाषेचे आणि वृत्तीचे समर्थन करताय असेच म्हणावे लागेल. असो. मला मड रेसलिंग मधे यत्ज्किंचितही रस नसल्याने इथेच थाम्बतो.

In reply to by विजुभाऊ

मला मड रेसलिंग मधे यत्ज्किंचितही रस नसल्याने इथेच थाम्बतो. वा वा वा, आधी चिखलात उतरून इतराना कुस्ती खेळा म्हणून दंड थोपटायचे नि बेडकुळ्या दाखवायच्या मग एखाद्याने भाजप नेत्यांची तीच बाजू दाखवली तर “मला मड रेसलिंग मध्ये रस नाही” म्हणून पळ काढायचा. ह्याला काय अर्थ आहे? दूरदर्शनवर राऊत ज्या पद्धतीने महिलाम्बद्दल बोलतात किंवा विचार मांडतात त्याचा कुठेच साधा निषेधही करावासा वाटत नसेल अनेक भाजप नेते महिलांबद्दल वाईट बोलले आहेत गेला बाजार मूनगांटीवर हे लोकसभेवेळी प्रियांका गांधी ह्यांच्या बद्दल तर विखे पाटील ह्यांच्या सभेत कुणीतरी देशमुख नावाचा भाजप नेता बाळासाहेब थोरातांच्या लेकीबद्दल अतिशय खालच्या भाषेत बोलला होता तेव्हा कुठे तुम्ही निषेध व्यक्त केला होता?? दाखवता का? येऊन जाऊन फक्त राऊत नि आव्हाडांविरुद्ध गरळ ओकायची नि पळ काढायचा ह्याला काय अर्थ आहे? चालले इतरांना ज्ञान द्यायला.

चित्रगुप्त Tue, 02/18/2025 - 15:27
संविधानिक पदावरील व्यक्ती क्षुल्लक कारणा करता शिवराळ आणि हिंसक भाषेचा अवलंब करतात तेव्हा तर ही चिंता जास्त गडद होत जाते.
--- संदर्भासह स्पष्टीकरण द्या.

युयुत्सु Tue, 02/18/2025 - 15:42
मुळात कोणताही धर्म देशाच्या संविधानापेक्षा मोठा असू शकत नाही, त्यामुळे संविधानात्मक पदावरील व्यक्तीने "जीभ छाटण्यासाठी" बक्षिस जाहिर करणे, "गोळ्या घालण्याचे" किंवा "ठेचून काढायचे" आवाहन करणे हे रोगापेक्षा इलाज भयंकर या प्रकारात मोडते. अशा वक्तव्याचा प्रत्यक्ष परिणाम समाजाच्या मानसिकतेवर होत असतो. रणवीर अलाहाबदियाचे विधान कितीही चूकीचे असले तरी त्याला शिक्षा करायचा अधिकार फक्त सक्षम यंत्रणाना आहे. त्याला मारण्याची धमकी देण्या इतका हा गंभीर गुन्हा आहे का? वि० त्याने बिनशर्त माफी मागितलेली असताना...माणसाचा विवेक २४/७ १००% जागा राहू शकत नाही. ते जैविकदृष्ट्या अशक्य आहे. आउट ऑफ कॉटेक्स्ट म्ह० संदर्भ सोडून वाचायची सध्या सर्वत्र साथ असल्याने जास्त तपशीलात जाऊ शकत नाही, त्या बद्दल क्षमस्व! ज्याना काफिरांना मारण्याच्या आदेशाबद्दल आक्षेप आहे, त्यांनी मनुस्मृती मधील पुढील श्लोक अवश्य वाचावा - "गुरुं वा बालवृद्धौ वा ब्राह्मणं वा बहुश्रुतम् । आततायिनं आयान्तं हन्यादेवाविचारयन्"

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी Tue, 02/18/2025 - 15:56
त्यामुळे संविधानात्मक पदावरील व्यक्तीने "जीभ छाटण्यासाठी" बक्षिस जाहिर करणे, "गोळ्या घालण्याचे" किंवा "ठेचून काढायचे" आवाहन करणे हे रोगापेक्षा इलाज भयंकर या प्रकारात मोडते. सहमत. फक्त संविधानात्मक व्यक्तीने नव्हे, तर कोणत्याही व्यक्तीने असे हिंसात्मक आवाहन करणे अत्यंत भयंकर गुन्हा समजून कायदेशीर कारवाई व्हायला हवी. ज्याना काफिरांना मारण्याच्या आदेशाबद्दल आक्षेप आहे, त्यांनी मनुस्मृती मधील पुढील श्लोक अवश्य वाचावा - कोणत्या देशात मनुस्मृतीला राज्यघटनेचे स्थान देऊन त्यानुसार अंमलबजावणी करतात? कोणत्या देशात मनुस्मृती अभ्यासक्रमात आहे?

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु Tue, 02/18/2025 - 15:59
कोणत्या देशात मनुस्मृतीला राज्यघटनेचे स्थान देऊन त्यानुसार अंमलबजावणी करतात? कोणत्या देशात मनुस्मृती अभ्यासक्रमात आहे?म हिंदु लॉसाठी स्मृती महत्त्वाचा आधार मानल्या गेल्या आहेत. मला मनुस्मृती टिळक विद्यापिठात विशारद्च्या दुस-या वर्षाला अभ्यासाला होती. सध्याचे माहित नाही.

In reply to by युयुत्सु

श्रीगुरुजी Tue, 02/18/2025 - 16:20
हिंदू लॉ मधील कोणते कायदे मनुस्मृतीवर आधारीत आहेत? कोणत्या पदवीसाठी मनुस्मृती अभ्यासक्रमात आहे?

In reply to by श्रीगुरुजी

युयुत्सु Tue, 02/18/2025 - 16:30
हे प्रश्न कृपया ए० आय० ला विचारायची सवय लावावी. प्र० Which part of Hindu law is borrowed from Smriti literarture? उ० The part of Hindu law that is borrowed from Smriti literature is the concept of "Dharma" and the rules governing social and familial relationships, such as: - Laws of inheritance (Dayabhaga and Mitakshara) - Laws of marriage (types of marriages, rules of marriage, etc.) - Laws of adoption - Laws of partition and joint family property - Rules of caste and social hierarchy Smriti literature, which includes texts like the Manusmriti, Yajnavalkyasmriti, and Naradasmriti, provides guidance on these aspects of Hindu law. These texts are considered authoritative and have been influential in shaping Hindu law and customs.

In reply to by युयुत्सु

वामन देशमुख Tue, 02/18/2025 - 16:16
मनुस्मृती मधील पुढील श्लोक अवश्य वाचावा -
हा नेहमीचाच डावा डाव आहे. आधी खाजवून खरूज काढायचे आणि मग victim blaming करायची. संबंध नसताना मनुस्मृती आणायची मग हिंदूंना झोडायचे. जगाला पोखरणारी डावी वाळवी नष्ट करणे हे महत्वाचे आहे.

In reply to by युयुत्सु

सुबोध खरे Wed, 02/19/2025 - 11:47
मनुस्मृती मधील पुढील श्लोक .... मनुस्मृती आणि कुराण दोन्ही वर बंदी घालण्यासाठी अर्ज करा. सरन्यायाधीश, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या कडे आहे का हिम्मत? असले मुळमुळीत अर्ज केवळ सवंग लोकप्रियतेसाठी मिपा वर लिहिण्यात काय हशील आहे?

In reply to by सुबोध खरे

कॉमी Wed, 02/19/2025 - 13:35
सर "अमुक पुस्तकात आक्षेपार्ह गोष्ट आहे म्हणून त्या पुस्तकावरच सरसकट बंदी घाला" आणि "संसदिय पदावर आणि इतर जबाबदारीच्या पब्लिक ऑफिस मध्ये असलेल्या लोकांनी तारतम्य बाळगावे, हिंसेला खतपाणी घालणारी वक्तव्ये करू नयेत. तसे होत असेल तर त्यांच्या वरिष्ठ व्यक्तीने समज द्यावी" हया दोन्ही अत्यंत वेगळ्या गोष्टी नाहीत का?

मनुवादी स्वतला उजवे समजतात खर तर ते डाव्यांपेक्षा जास्त धोकेदायक आहेत, भारताला पोखरणारी मनुवादी डावी वाळवी नष्ट करणे हे महत्वाचे आहे. बाकी युयुत्सु सरांवर आता मनुवादी तोंडसुख घेतील.

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी Wed, 02/19/2025 - 13:15
कोणत्याही विषयावर धागा असो, खफ असो . . . हे तेथे जाऊन घाण करतातच. बरं त्या विषयातलं काही समजत असतं, काही विश्वसनीय माहिती दिली असती, काही विचारी प्रतिसाद दिले असते तर विरूद्ध लिहिलेले सुद्धा चाललं असतं. पण कोणत्याही विषयातील कणभरही माहिती नाही, विषय अजिबात समजत नाही पण तरीही सातत्याने पिंका टाकून धाग्याचा सत्यानाश करण्याचे घाणेरडे व्यसन जाणार तरी कधी?

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, विद ड्यू रिस्पेक्ट, तुम्ही नि तुमच्या सारखे अनेक जाणकार मीपावर आहेत. प्रत्येक वेळी माहिती असेल तरच लिहायचे का? काही वेळा माहिती मिळवायला किंवा चुकीची माहिती दुरुस्त करून घ्यायला देखील प्रतिसाद दिला जातो ह्याचा अर्थ असा नाही की धाग्याचा सत्यानाश करतो. भावना समजून घ्याल अशी अपेक्षा! _/\_

युयुत्सु Sat, 07/19/2025 - 09:30
हे खुले पत्र लिहील्यानंतर ते कदाचित व्हायरल झालं असावं कारण तेव्हाचा सोलापूरकर इशू शांत झाला. कदाचित ते तेव्हाच्या सरन्यायाधीशांपर्यंत कुणीतरी पोचवले असावे (अर्थात या माझ्या भाबड्या स्मजुती आहेत) कारण नंतर फेबु मला पिपल यु मे नो मध्ये जस्टीस संजीव खन्नांचे नाव बरेच दिवस दाखवत असे. पण या पत्रावर कार्यवाही झाली असती तर कालचा विधानभवनातला राडा कदाचित टळला असता. "अतिडाव्या" विचारसरणीने चिंतेत असलेले मा०मु० असे राडे टाळ्ण्यासाठी कोणते कायदे करणार? का हाणामारी अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये येते?

गामा पैलवान Sat, 07/19/2025 - 17:51
युयुत्सु,
"गुरुं वा बालवृद्धौ वा ब्राह्मणं वा बहुश्रुतम् । आततायिनं आयान्तं हन्यादेवाविचारयन्"
रोचक विधान आहे. माझ्या आकलनानुसार याचा आर्थ अतिरेक्यास ताबडतोब ठार मारावे असा आहे. भले आतंकी गुरू, वृद्ध, बालक वा बहुश्रुत ब्राह्मण असला तरीही. मग कसाबवर खटला चालवायचा खटाटोप कशासाठी? आणि अफजल गुरूसाठी रात्री न्यायालय का म्हणून उघडायचं? सरळ उडवून टाकायचं की त्याला. अतिरेक्यांना वठणीवर आणण्यासाठी मनुस्मृतीतला सदर श्लोक एकदम जालीम उपाय आहे. आ.न., -गा.पै.

युयुत्सु Sat, 07/19/2025 - 18:22
मग कसाबवर खटला चालवायचा खटाटोप कशासाठी? हिंदू लॉ स्मृतींवर आधारीत असला तरी भारतीय न्यायव्यवस्था मनुस्मृतीवर आधारित नाही. याशिवाय काही गोष्टी आंतरराष्ट्रीय समुदायापुढे आपली प्रतिमा सांभाळण्यासाठी केल्या जातात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मा० राष्ट्रपती मा० पंतप्रधान मा० सरन्यायाधीश, भारत सरकार स० न० वि० वि० या देशाचा नियमित कर भरणारा आणि कायद्याला भिणारा एक नागरिक म्हणून मला देशातील अधिकाधिक गढूळ वातावरणाची चिंता वाटते. आजचे गढूळ वातावरण भविष्याचा पाया असल्याने ते जास्त धोकादायक आहे. मुख्य म्ह० संविधानिक पदावरील व्यक्ती क्षुल्लक कारणा करता शिवराळ आणि हिंसक भाषेचा अवलंब करतात तेव्हा तर ही चिंता जास्त गडद होत जाते. माझ्या अल्पमती धारणेनुसार अस्मिता माणसाला एक प्रकारे मानसिक ताकद देते. त्या ताकदीतून आत्मविश्वासाची आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते.