मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साहित्य चोराला अद्दल घडवायचा निर्धोक स्वस्त व टिकाऊ उपाय

स्वरुपसुमित ·

Bhakti Tue, 03/11/2025 - 22:30
खुप तांत्रिक मुद्दे आहेत.निवांत समजून घेते.

Bhakti Tue, 03/11/2025 - 22:30
खुप तांत्रिक मुद्दे आहेत.निवांत समजून घेते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्रानो साहित्य चोरी हा प्रकार महाराष्ट्रात पार तुकाराम महाराज असल्यापासून लोकांना माहीत आहे ऑनलाईन विश्वात तर कॉपी पेस्ट लगेच शक्य असता फेसबुक आधी फक्त गुगल आणि ऑर्कुट ला शोधून आपले लिखाण चोरी शोधतात येत होती पण आता १७६० social नेटवर्किंग मुळे ते पण अवघड झाले परत कोणी साहित्य चोरी केली तर लोक आपापल्या वाल वर त्याच्या नावाने खडे फोडून ठणाणा करतात आतापर्यंत मराठी विश्वात तरी एखाद्या साहित्य चोराला चोरी खाली अटक किंवा जेल झाल्याचे ऐकिवात नाही २ वर्ष आधी एका कविता चोरी प्रकरणी पोलीस कम्प्लिन्ट ची कॉपी वायरल होत होती तोच सर्वात मोठा पराक्रम इथे वर्षानुवर्षे खून ,बलात्कार ,दरोडे लोकांना

धनवर्षाव (शतशब्दकथा)

अनन्त्_यात्री ·

विजुभाऊ Tue, 03/11/2025 - 13:42
फारच प्रेडिक्टेबल वाटली श श क. दुसरे म्हणजे त्यात दोन वाक्ये कॉन्ट्रॅडिक्टरी आहेत. याचे आई बाप काय करतील बाळ बळी गेल्याचं कळल्यावर? आणि फाशी ठोठावली... गुप्तधनासाठी..कन्याबळी देणाऱ्या बापाला.

अनन्त्_यात्री Tue, 03/11/2025 - 15:17
मांत्रिक किडनॅपर होता. आहुती देणाऱ्याला हे माहित नव्हते की आपलीच मुलगी किडनॅपरने आपल्यासमोर बळी देण्यासाठी ठेवलीय.

विजुभाऊ Tue, 03/11/2025 - 13:42
फारच प्रेडिक्टेबल वाटली श श क. दुसरे म्हणजे त्यात दोन वाक्ये कॉन्ट्रॅडिक्टरी आहेत. याचे आई बाप काय करतील बाळ बळी गेल्याचं कळल्यावर? आणि फाशी ठोठावली... गुप्तधनासाठी..कन्याबळी देणाऱ्या बापाला.

अनन्त्_यात्री Tue, 03/11/2025 - 15:17
मांत्रिक किडनॅपर होता. आहुती देणाऱ्याला हे माहित नव्हते की आपलीच मुलगी किडनॅपरने आपल्यासमोर बळी देण्यासाठी ठेवलीय.
लेखनविषय:
सर्वपित्रीची रात्र गावकुसाबाहेर तीन पिंपळामधल्या जागेत माझ्या चर्मासनासमोरचं धगधगतं, वखवखलेलं आहुतीकुंड. शेवटच्या आहुतीच्यावेळी मांत्रिकानं लालभडक पट्टीनं डोळे झाकलेयत माझे. ही महाआहुती ..कारण ती अर्भकाची. याचे आई बाप काय करतील बाळ बळी गेल्याचं कळल्यावर? आता असल्या वांझोट्या विचारांना थारा नाही.

माझी मदतनीस..

आजी ·

विजुभाऊ Mon, 03/10/2025 - 15:15
बरोबर आहे. मदतीनीसाना ही स्वतःच्या प्रगतीचा हक्क आहे. जसजसे शिक्षणाचे प्रमान वाअढत जाईल तसतसे ज्याना मदतनीस लागतात त्याना स्वावलम्बी व्हावे लागेल

स्वधर्म Mon, 03/10/2025 - 17:00
आजी, तुंम्ही अगदी पांढरपेशा माणुसकीने तुमच्या घरी येणार्या मदतनीस बाईंशी वागत आहात, ते ठीकच. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो: मुळात आपल्या समाजात काही लोकांना ही दुसर्यांची नकोशी कामे कमी पैशात करावीच का लागावीत? कोणत्याही प्रगत देशात असा दररोज दुसर्याच्या घरी येऊन काम करणारा वर्ग निदान एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. कारण? तिथे एवढी आर्थिक विषमता नाही. आपल्या देशात मध्यमवर्गीयांना सुध्दा अशी दररोज सेवा घेणे परवडते, कारण त्यांच्या आणि मदतनीसांच्या आर्थिक ऊत्पन्नात बरीच मोठी तफावत आहे. असा वर्ग उपलब्ध असणे, हे कमालीची आर्थिक विषमता असल्याचे लक्षण आहे, आणि ते योग्य नाही. बाकी आपण त्यांच्याशी व्यक्तीगत चांगले वागत असणे व त्याबद्दल स्वतःला बरे वाटणे हे ठीक, पण माणसाच्या श्रमांना एवढी किंमत आली पाहिजे की सर्वसाधारण मध्यमवर्गीयांना अशी सेवा घेणे परवडलेच नाही पाहिजे. अगदी अंथरुणाला खिळलेले, वयस्कर लोक यांना मदतनीस लागतात. काही शिक्षक घरी येऊन शिकवतात, पण त्यांना अशी माणुसकी पुरेशी नाही, तर त्यांचे आभार मानून त्यांना व्यवस्थित सन्मानपूर्वक पैसे द्यावे लागतात.

In reply to by स्वधर्म

खूप छान विचार स्वधर्म! खर आहे! १५००-२००० रुपयात महिनाभर भांडे घासणे नी लादी पुसणे हे कष्टाचे काम करणाऱ्या स्त्रियांबद्दल आदर वाटतो. त्यांचे वयही बऱ्याचदा ४०-५० च्या घरात असते तरीही न थकता त्या चार ते पाच घरे दिवसातून करतात. छोट्या मोठ्या दुकानात काम करणाऱ्या लोकांची देखील पिळवणूक होते, सकाळी ९ ते रात्री ९ ते १० अशी बऱ्याच दुकानांची वेळ असते, कामावर असलेल्या लोकाना रोज १० ते १२ तास १५-२० हजारात पिळून काढल्या जाते. सणासुदीला सुटीही नसते. अशी पिळवणूक अनेक ठिकाणी दिसते अश्या लोकांबद्दल वाईट वाटते. काही लोक कंटाळून काम सोडतात नी फळे, भाजीच्या गाड्या लावतात किंवा रिक्षा चालवणे वगैरे करतात! एकंदरीत ह्या परिस्थीतिला देशात प्रचंड असलेली लोकसंख्या कारणीभूत आहे असे वाटते! पण जिकडे मध्यम नी उच्च मध्यमवर्गीय लोक एका मुलानंतर दुसरे मूल जन्माला घालायला दोन ते तीनदा विचार करतात तिकडे हीच लोक हयगय न करता चार पाच तरी मूले सहज जन्माला घालतात! हा विरोधाभास का हे लक्षात येत नाही. कधी कधी वाटते हे परिस्थितीच्या रेट्यामुळे आहे कधीकधी वाटते ह्या लोकांनाच सुधारायचे नाही!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Bhakti Tue, 03/11/2025 - 08:59
हा विरोधाभास का हे लक्षात येत नाही.
शिक्षणाचा अभाव यामुळे हे घडतं. आणि अजून एक समान गोष्ट दिसते या मदतनीस बायकांचे नवरे दारूडेच,जुगारी वगैरेच कसे ? शून्य टक्के पोषण असलेल्या:'दारूवर बंदी' सरकार घालणार नाही,हे चक्र मोडायला बाईच झिजत राहणार :(

In reply to by Bhakti

ही काही पटलं नाही भक्ती ताई. काही मोजक्या लोकांना दारू पिणे निषिध्द आहे , ब्रह्महत्येचे पातक आहे पण इतरांनी दारू आवर्जून प्यावी . दारू पिण्यासारखी देशभक्ती नाही. दारू सिगारेट पिणे आणि पेट्रोलची गाडी चालवणे ही सर्वात मोठ्ठी देशभक्ती आहे कारण सर्वात जास्त कर ह्याच वस्तूंवर आहे. दारू पिऊन गाडी चालवणे हा तर देशभक्तीचा परमोच्च आदर्श आहे . दारूवरचा टॅक्स, पेट्रोल चां टॅक्स, RTO कडे दंड , कोर्टात सेटिंग , वकिलाना नोकरी , न्यायाधीशाला नोकरी . किती किती म्हणून आर्थिक उलाढाल होते ह्या दारू मुळे . उगाच दारूला बदनाम करू नका. - सुधाकर संस्थापक अध्यक्ष तळीराम फॅन क्लब आर्य मदिरा मंदिर =)))) {हलके घ्या. विनोद आहे =))))}

In reply to by प्रसाद गोडबोले

दारूवर सरसकट बंदी हवी, दारू पिताना एखादा सापडल्यास दारू बनवणारा नी पिणारा ह्याना दगडाला बांधून लादेनसारखे अरबी समुद्रात बुडवायला हवे! कितीतरी संसार दारूमुळे उध्वस्त होतात! - दारूला स्पर्श न केलेला बाहुबली!

In reply to by प्रसाद गोडबोले

खिक्क! तुम्ही गुरु म्हणून ४ वर्षाआधी भेटला असतात तर आज मस्त टाकी फुल्ल करून कुठे तरी पडून असतो. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विजुभाऊ Wed, 03/12/2025 - 09:48
छोट्या मोठ्या दुकानात काम करणाऱ्या लोकांची देखील पिळवणूक होते, सकाळी ९ ते रात्री ९ ते १० अशी बऱ्याच दुकानांची वेळ असते, कामावर असलेल्या लोकाना रोज १० ते १२ तास १५-२० हजारात पिळून काढल्या जाते
आयटी हमालांची अवस्था फार काही वेगळी नाहिय्ये. नवीन फ्रेशर्स ना १० ते १५ हजारांवर रबवून घेणार्‍या बर्‍याच कंपन्या आहेत. कितीतरी लोकासाठी तर फॅमिली लाईफ हा प्रकार म्हणजे लग्झरी असते. पण करतात ना. नाईलाज असतो. पोटासाठी आणि ब्यांकेच्या हप्त्यांसाठी करावी लागते अशी नोकरी

In reply to by स्वधर्म

Bhakti Tue, 03/11/2025 - 08:55
नाच गं घुमा हा काही महिन्यांपूर्वी आलेला सिनेमा पण मदतनीस आणि मालकीण यांच्या सौजन्यावर होता.या सिनेमा विषयी खूप मिश्र प्रतिक्रिया वाचल्या होत्या म्हणून पाहणार नव्हते.पण एकेदिवशी कंटाळा आला म्हणून पाहिला :) पण यातही हीच कहाणी आशाताई मदतनीस ची होती.आशाताई खतत्रुड नवरा, झोपडपट्टीतली आदळाआपट,मुलाची काळजी ,ट्रॅफिक, बसच्या वेळा या सगळ्यांची कसरत करून येतं.त्यात मालकीणचे अनेक गैरसमज होतं.पण शेवटी आशाताईच मालकीणचे खुप मोठ्ठे स्वप्न पूर्ण करायला मदत करते.आणि आशाताईलाही मालकीण खुप मदत करते.सिनेमा चांगला आहे,थोडा मिर्च मसाला अधिक आहे. पण आज मालकीण असो वा मदतनीस एक बाई दुसऱ्या बाईला समजून घेऊन पुढे जात आहेत,हे खुप मोलाचं आहे.

लेख आवडाला ! आता कम्युनिस्ट विचारसरणी स्विकारलेल्या लोकांना ह्या इथेही शोषक आणि शोषित अशी विभागणी दिसते, पण त्याला काय करणार , त्याला नाईलाज आहे ! ज्यांनी कॅपिटॅलिस्ट विचारसरणी स्विकारली आहे त्यांच्या लेखी मात्र - अशा कोणतेही कॅपिटल नसलेल्या व्यक्तींना, अन्स्किल्ड लेबरला तुम्ही व्यवसाय , रोजगार उत्पन्न करुन देत आहात, जीवनाचे साधन उपलब्ध करुन देत आहात ही खुप मोठ्ठी गोष्ट आहे ! आणि नुसतेच रोजगार निर्मिती न करता सदर व्यक्तीला "कामवाली" असे न संबोधता आदराने मदतनीस असे संबोधत आहात ही खुपच मोठ्ठी गोष्ट आहे ! शिवाय जास्त कामाचे जास्त पैसे देत आहात , जमेल तेव्हा गिफ्ट देत आहात , दिवाळीला बोनसही नक्की देत असाल , एकुणच हे सर्व दर्शवत आहे की तुम्ही क्रोनी कॅपिटॅलिस्ट नाही आहात ! तस्मात् तुमचे कौतुक करावे तितके थोडे आहे ! अशी, तुमच्यासारखी चांगली माणसे समाजात टिकली पाहिजेत , अन्यथा हे कम्युनिस्ट सोशॅलिस्ट लोकं जे की आता आर्मचेअर अ‍ॅक्टिविस्ट आणि अर्बन नक्षल चा बुरखा पांघरुन बसलेत ते एक ना एक दिवस अशा भोळ्या अशिक्षितीत लोकांची माथी भडकावुन "There will be blood." हे सत्य करुन दाखवतील , आणि अनस्किल्ड लेबरला देखील देशोधडीला लावतील ह्यातही शंका नाही ! :)

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि Tue, 03/11/2025 - 11:08
समाजवादी विचारसरणी प्रामाणिक नसते असे नव्हे. पण आदर्श, जे असायला हवे ते, डायरेक्ट "असावे".. अशी काहीशी मांडणी भासते. आदर्श पर्याय हा अशक्य असू शकतो, त्यातल्या त्यात आहे ती सिस्टीम हळूहळू बदलत जाईल पण आदर्श करू जाल तर सगळेच कोसळेल. अशी मध्यम मार्गाची आशा करावी लागते हे त्या विचारसरणीला फारसे रुचत नसावे. त्यांनी सुचवलेल्या उपायांनी "नाही रे" वर्गाची "नको रे" अवस्था होऊ शकते.

In reply to by गवि

अहो, समाजवादाच्या गफ्फा आहेत हो गफ्फा ! अहो, एक आंब्याचं पानदेखील नसतं हो दुसऱ्यासारखं. ब्रह्नदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडं निराळं. सगळ्या माणसांची नशिबं सारखी होतील कशी '? घटकाभर धरा, तुमचा आला समाजवाद ! तो आमचा रत्नांग्रीचा गावगांधी शिट्ट्या फुंकून फुंकून सांगतो तशी आली कोकण रेल्वे नि गेली पांडू गुरवाच्या परसातून -- म्हणून काय थोट्या पांडबाच्या खांद्याला हाताचे खुंट फुटणार काय ? आणि हात नाहीत म्हणजे मग कसेल त्याची जमीन नि दिसेल त्याची थैली ह्या तुमच्या राज्यात थोटा पांडू कसणार कसा आणि काय ? तो तसाच राहायचा ! स्वराज्य आलं म्हणून हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ झाला नाही नि महादेव गडबोल्याचं धोंद आत नाही गेलं ! हे डावंउजवं राहायचंच समाजात ! अहो, रामराज्यातदेखील मारूतीचं शेपूट उपटून रामानं आपल्या पाठीस नाही जोडलं -- हा नरच राहिला नि तो वानरच राहिला."

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म Tue, 03/11/2025 - 18:35
साधी गोष्ट होती: मुद्दा एक समाज म्हणून आपल्याकडे किती विषमता आहे, म्हणून काही लोकांना नाईलाजाने ही कामं करावी लागत आहेत, इतका साधा होता. कुणी पैसे दिले व माणुसकी दाखवली, हे ठीकच, त्यावर माझा काही आक्षेप नव्हता. असली कामं समाजातून कमी व्हायला पाहिजेत की नको? 'मदतनीस' स्वतःच म्हणत आहे 'जे जगणं माझ्या वाट्याला आलं ते तिच्या (मुलीच्या) वाट्याला नको.' हे त्यांचं असं जगणं चालूच रहावं, असं वाटणारी माणसं अजून समाजात आहेत, हेच मोठं दुर्दॅव आहे! अर्थात त्यामागे पिढ्यानुपिढ्यांच्या हितसंबंधांना धक्का लागू नये, प्रस्थापित प्रस्थापितच रहावेत, ही मूळ स्वार्थमूलक प्रेरणा आहे. झाडाचं एक पान दुसर्यासारखं नसतं वगैरे गैरलागू सिध्दांत तोंडावर फेकून कशाचंही समर्थन करता येतंच! बरं झालं असले लोक काही काळ तरी देशाच्या नेतृतवात नव्हते, नाहीतर डोक्यावरून मैला वाहून नेणार्याला काम व पैसे देऊन आंम्ही पुण्यच करत आहोत, असं म्हणत समाज तिथेच राहिला असता. अमेरिकेत अजूनही गुलामी प्रथा सुरू असती - गुलाम गुलाम म्हणून जन्माला आला त्यात आमचा काय दोष? त्याचं प्रारब्ध कर्मच तसं असणार असं आमचा वेदांत सांगतो ना. उलट त्याला पैसे व जेवण देऊन आंम्ही त्याच्यावर उपकारच करत आहोत म्हणत त्या अमानुष प्रथेचं समर्थन करत राहिले असते.

In reply to by स्वधर्म

गवि Tue, 03/11/2025 - 20:36
कधीतरी थिअरीज सोडून स्वार्थापलिकडचं सत्य बघा
कधीतरी बघा असे म्हणण्याइतका वाईट नाही हो मी. आणि अमुक एक असावे यात वाद नाहीच. पण त्यासाठी इम्प्लिमेंट काय करायचे?

In reply to by गवि

स्वधर्म Tue, 03/11/2025 - 22:17
गोडबोले यांनी समाजवादी गप्फा, 'झाडाचं पान...', शोषक शोषित इ. इ. ज्या थिअरीज सांगितल्या आहेत, त्यासाठी होता. माझा प्रतिसादही त्यांच्या प्रतिसादाखालीच दिसतोय, तुमच्या नाही. इंप्लीमेंट अनेक देशांनी, संस्थांनी केलंय. मुख्य गोष्ट ही की समाजातली आर्थिक विषमता कमी करणारी धोरणे आखली गेली पाहिजेत. शिक्षण व संधी तळागाळातल्या लोकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आता समाजातील यासारख्या खर्याखुर्या प्रश्नांवर काम करण्याऐवजी राज्य आणि केंद्र सरकारे भ्रामक गोष्टींवर काम करत आहेतः उदा. औरंगजेबाची कबर. नद्यांचं पाणी स्वच्छ करण्यासाठी खर्च न करता नाशिकच्या कुंभमेळा आयोजित करण्यावर हजारो कोटी खर्च करणार आहेत. खेडोपाडीच्या शाळांसाठी पैसे नाहीत, पण हजारो कोटी खर्च करून शक्तीपीठ महामार्ग, मोठमोठी स्मारके बांधायचीआहेत.

In reply to by गवि

राम राम गवि ! त्यांनी पु.लं देशपांडे ह्यांचे लेखन वाचल नाहीये , त्यांना अंतु बर्वा माहीत नाही , त्यांच्याशी काय बोलायचं =)))) ज्याला लोकं कॅपिटॅलिझम म्हणतात ते तत्वज्ञानाच्या परिप्रोक्ष्यातुन पाहिलं तर विशुध्द हे "सत्य" आहे "सत्य". सत्य म्हणजे ट्रुथ असे भाषांतर करुन शिकलेल्यांना कसं समजणार ! समाजामध्ये कायमच कोणाकडे तरी जास्त कॅपिटल असणार कोणाकडे तरी कमी ! माणसांचे सोडा , प्राण्यांना देखील कळतं हे, प्राणी आपली टेरेटरी जे की कॅपिटल , ते प्राणापणाने जपतात , वाढवण्याचा प्रयत्न करतात . प्राणी सोडा , झाडांना देखील कळातं हे ! मोठ्ठं झाड जास्तीत जास्त सुर्यप्रकाश घेतं, पाणी घेतं , पोषकतत्व घेतं अन अन्य छोट्या झाडांना झक मारत त्या झाडाच्या सहार्‍याने आसर्‍याने जगता येतं , पण म्हणुन मोठ्ठं झाड तोडलं तर सगळी एको सिस्टीम नष्ट होते अन सगळीच झाडे मरतात , अन मग ती जमीन ग्रास लॅन्ड होऊन जाते . अहो झाडांचं सोडा , निर्जीव ग्रहतार्‍यांनाही आपल्या ग्रॅव्हिटेशनल फिल्ड मध्ये येणारी प्रत्येक गोष्ट स्वतःमध्ये खेचुन घ्यावी , आणि आपले अस्तित्व वाढवावे , ही "जाणीव" आहे ! हे ते सत्यमेव जयते म्हणातात ना त्यातले सत्य आहे ! मानवी समाजातील कॅपिटल ची एक रचना नष्ट होईल , पण लागलीच दुसरी काही रचना त्याची जागा घेईल , कामवाल्या बाईची पोरगी शिकुन कॉर्पोरेट मध्ये गेली तर तिथे काय परिस्थिती आहे हे आम्ही पाहतो, मग कमावलेले पैसे मार्केट मध्ये टाकु लागली तर कॅपिटल मार्केट मध्ये काय स्थिती , आपण किती चिल्लर आहोत हेही आम्ही पहात आहोत , बरं राजकारणात गेली तर तिथे पॉवर डायनॅमिक्स कसले जबरदस्त आहे हे सगळेच बीड मध्ये पहात आहेत , वॉशिंग्टन डी.सी. मध्येही पहात आहेत ! ज्याला कळतं त्याला कळतं ! यु कॅनॉट एस्केप इट ! यु सिंपली कॅनॉट ! ! हे सत्य आहे सत्य. त्यालाच ऋत असाही अल्मोस्ट समानार्थी शब्द आहे . त्यालाच धर्म असा शब्द आहे . आणि ह्या धर्माचे मुर्तीमंत स्वरुप - तोच राम आहे ! रामो विग्रहवान धर्म : _______________________________________ पण असो. ह्या क्रांती ब्रिंतीच्या बाबतीत मात्र आमचा स्वधर्म ह्यांना फुल्ल सपोर्ट आहे ! कम्युनिझम चा भस्मासुर शेवटी स्वतःच्याच मस्तकावर हात ठेऊन स्वतःचाच नाश करुन घेतु ही वस्तुस्थिती आम्ही अभ्यासली आहे , क्युबा मध्ये पाहिलं , लॅटिन अमेरिकेत पाहिलं , नॉर्थ कोरियात पाहिलं , रशियात पाहिलं , चायना मध्येही कम्युनिस्ट सरकार समानता आणुन तेथील लोकांच्या हिताची काय काळजी घेत आहे हेही पहात आम्ही =)))) तस्मात ह्या बाबतीत , स्वधर्म आमचा तुम्हाला जोरदार पाठिंबा आहे , भिडा तुम्ही , उध्वस्त करुन टाका ही व्यवस्था ! मजा यायला हवा =)))) लाल सलाम ! क्रांती चिरायु होवो ! =)))) Samant

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म गुरुवार, 03/13/2025 - 06:41
>> त्यांनी पु.लं देशपांडे ह्यांचे लेखन वाचल नाहीये , त्यांना अंतु बर्वा माहीत नाही , त्यांच्याशी काय बोलायचं =)))) >> ज्याला कळतं त्याला कळतं ! शेवटी आलाच 'मला सगळं कळतं. त्यांना काहीच कळत नाही' यावर. कुठून येतो हा आत्मविश्वास? तो येतो जिथे तुंम्ही जन्माला आला त्या सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमीतून. माणसाला जे दिसतं, जाणवतं (किंवा दिसत नाही, जाणवतं नाही) ते त्याच्या या स्थानामुळेच. राहता राहिला प्रश्न पुलंचा. तुमचा कयास चुकवल्या बद्दल माफ करा, पण मी त्यांची पुस्तके, व्यक्ती आणि वल्ली वगैरे वाचलेली आहेत. पण बालबुध्दीने दिपून जाण्याचे दिवस संपल्यावर दृष्टी विस्तारित झाल्यावर काही वेगळे जाणवते. थोर लेखक होते, त्यांची विनोदबुद्धी तरल होती, भाषेवर हुकूमत होती, पण तेही तेच पाहू शकले जे त्यांना त्यांच्या स्थानावरुन दिसलं. तुंम्ही दुसरीकडे जन्माला आला असाल, तर काही वेगळं जाणवू लागतं. अंतू बर्वा, नंदा प्रधान, नानू सरंजामे यांना आडनावे आहेत, पण नामू परटालाच फक्त कसं बरं आडनांव नाही? त्याची जात हेच त्याचं आडनाव का? त्यांनी महिलांच्या जाडपणावर, रंगावर, गटणेच्या बावळटपणा वर केलेले हुकमी विनोद वेगळ्या प्रकारे दिसू लागले. ... ... चितळे मास्तर मात्र ‘ढ’ मुलांना अत्यंत आदराने पुकारीत. गोदी गुळवणी ही साक्षात ‘ढ’ होती. गोरी, घाऱ्या डोळ्यांची, भरल्या पोत्यासारखी ढब्बू गोदी चवथी-पाचवीपर्यंत जेमतेम शाळेत टिकली. शेवटी अण्णा गुळवण्यांनी तिला उजवली. हे असले विनोद बायकाही अगदी निरागसपणे एन्जॉय करतात, फक्त त्या गोदूसारख्या नसतील तर. अंतू बर्वा काय म्हणतो? ..पण इंग्रज गेला तो कंटाळून. अहो, लुटण्यासारखं काय शिल्लक होतं? धंदा बुडीत खाती जायला लागला - फुकलंनीत दिवाळं! कुंभार मडकी घेऊन गेला, तुम्ही फुंका उकिरडा!’’ ज्यांनी कधी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलाच नाही त्यांच्या मनातील अपराधीपणाची भावना कमी करण्याचं काम पु. ल. देशपांडें करत आहेत का? शिवाय इंग्रज भारत सोडून गेले ते कंटाळून असं बोलून ज्यांनी याकामी बलिदान दिलं त्यांचं श्रेयही काढून घेताहेत. अजून काय हवं? * * * अंतू बर्वा यांची समाजवाद, समता-विषमता याबाबतची मतं तर फारच प्रखर आहेत. कोकणात रेल्वेयेण्याचा आणि थोट्या पांडूला हात फुटण्याचा काही तरी संबंध आहे का? इथे एक उलटा प्रश्न विचारावासा वाटतो. थोट्या पांडूला हात फुटणार नसेल तर कोकणात रेल्वे आणणं रहित करायचं का? स्वराज्यात हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ होणार नाही म्हणून इंग्रजांना परत बोलवायचं का? पु. ल. देशपांडे यांच्या श्रीमंत भाषेच्या प्रभावातून बाहेर पडणं हे काम आहे. जे त्यांना दिसलं नाही, ते त्यांचं आ करुन वाचणाऱ्या तुंम्हाला काय दिसणार? जाऊ द्या, त्यापेक्षा तुंम्ही तुमच्या बालोद्यानात स्वांतसुखाय अध्यात्माचा आनंद घ्या. मी कुठेही साम्यवादाचं समर्थन केलेलं नाही, फक्त्यात समाजातली आर्थिक विषमता एवढाच मुद्दा होता. त्यामुळे क्रांती वगैरे पाल्हाळाबद्दल आमचा पास. दुसऱ्याला न मांडलेला मुद्दा चिकटवून झोपण्याची युक्ती जुनी झाली.

In reply to by स्वधर्म

प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/13/2025 - 10:38
त्यापेक्षा तुंम्ही तुमच्या बालोद्यानात स्वांतसुखाय अध्यात्माचा आनंद घ्या.
मी तेच करतो हो आता . तुका म्हणे आता खेळतो कौतुके l झाले तुझे सुख अंतर्बाही ll मी काय तुम्हाला टॅग केलेलं का माझ्या प्रतिसादात, का अक्षता पाठवलेल्या माझ्या प्रतिसादावर तुम्ही प्रतिसाद द्यायला या म्हणून =)))) मी आपला विनोदी प्रतिसाद दिलेला होता. पण आता तुम्हाला विनोदातही जात दिसायला लागली त्याला मी काय करू =)))) बाकी तुम्हाला जाणवत नसेल पण तुम्ही ज्याप्रकारे मते मांडता की समाजात कायम शोषक शोषित अशी विभागणी असणार , आर्थिक विषमता असणार, संघर्ष केला पाहिजे वगैरे वगैरे ही साम्यवादी मांडणीच आहे . जे तुमच्यात अंतर्बाह्य आहे ते मला तुम्हाला चिकटवायची गरज नाही. असो. चालू द्या तुमचं. बालपण देगा देवा l मुंगी साखरेचा रवा l ऐरावत रत्न थोर l तया अंकुशाचा मार ll अथक प्रयत्नांनी परत मिळवलं आहे हे बालपण आम्ही. आमचं आम्ही बालोद्यानात खेळत राहतो मजेत . राम

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म Sat, 03/15/2025 - 20:03
>> मी आपला विनोदी प्रतिसाद दिलेला होता. पण आता तुम्हाला विनोदातही जात दिसायला लागली. जात मला नाही, तुंम्ही टर उडवण्यासाठी जो उतारा वापरला, त्या पुस्तकातच होती. अगदी स्पष्टपणे! मी फक्त ती नीट संदर्भासहित दाखवून दिली. ती मी चर्चेत आणली असा खोटा कांगावा नका करू. >> कोकणात रेल्वेयेण्याचा आणि थोट्या पांडूला हात फुटण्याचा काही तरी संबंध आहे का? इथे एक उलटा प्रश्न विचारावासा वाटतो. थोट्या पांडूला हात फुटणार नसेल तर कोकणात रेल्वे आणणं रहित करायचं का? स्वराज्यात हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ होणार नाही म्हणून इंग्रजांना परत बोलवायचं का? याला उत्तर न देता पळ काढला आणि अंगावर शेकतंय म्हटलं की दुसर्‍यांवर जातीवाचक आरोप करायचे! भले शाब्बास!!

In reply to by स्वधर्म

कंटाळा आला ह्या भंपकपणाचा =))))
जात मला नाही, तुंम्ही टर उडवण्यासाठी जो उतारा वापरला, त्या पुस्तकातच होती
आम्हातरी कधीही जात दिसली नाही पुलंच्या लेखनात . महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांनाही दिसलेली नाही, अजुन कोणी पुलंच्या पुस्तकाचे दहन बिहन केल्याचे ऐकिवात नाही. तुम्हाला जात दिसली हा तुमचा प्रॉब्लेम आहे , पुलंचा नाही अन माझाही नाही ! बाष्कळ प्रश्नांना काय उत्तरे देत बसणार ? मुळ मुद्दा हा होता की ही समाजवादी विचारसरणी भंपक आहे , समाजात वर खाली , डावे उजवे , श्रीमंत गरीब, हे भेद होतेच अन राहणारच , तुम्ही जाणुन बुजुन ओढुन ताणुन ते मिटवायचा प्रयत्न केला म्हणुन ते मिटणार नाही , त्याचे फक्त रुप पालटेल. थोटा पांडु, तिरळा हरी साठ्या , हे स्वातंत्र्यात होते , पारतंत्र्यात होते , इंग्रज अन कोण कोकणा रेल्वे अन स्वातंत्र्य प्रगती बिगती बगैरे कितीही झाले तरी हे भेदाभेद राहणारच आहेत . पण म्हणुन ह्या भेदांचे भांडवल करुन सामयवादी शोषक विरुध्द शोशित असा कायमचा संघर्ष जो तुम्ही मांडत आहात तो मात्र तद्दन निरर्थक आहे. अन काय बोलता , पळ काढणे =)))) अंगावर शेकणे =)))) तुमच्या इन जनरल विचारसरणीतील भंपकपणाचा कंटाळा आल्याने उत्तर द्यायची इच्छा नाही. मी कधीही जातिवाचक बोलत नाही कारण मी जाती मानतच नाही . माझ्या लेखी फक्त गट आहेत , जाती नाहीत ! जातीचा उल्लेख तुम्ही केला आहे ह्या प्रतिसादात नामु च्या निमित्ताने "https://www.misalpav.com/comment/1190789#comment-1190789" मी तसा उल्लेख केलेला नाही . चुकुनही कधी केलेला नाही . आता बास =)))) धुळवड पुरे . माझं काही तुम्हाला पटणारं नाहीये, अन तुमचं काही मला पटाणारं नाहीये , मग कशाला उगाच कळफलक बडवत बसा =)))) संघर्ष करा ! संघर्षच करत रहा !

In reply to by स्वधर्म

Bhakti गुरुवार, 03/13/2025 - 10:56
बाकी खुप चांगलं लिहलंय.. पण हे खाली लिहिलेलं टाळू शकला असता तर बरं वाटलं असतं.
शेवटी आलाच 'मला सगळं कळतं. त्यांना काहीच कळत नाही' यावर. कुठून येतो हा आत्मविश्वास? तो येतो जिथे तुंम्ही जन्माला आला त्या सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमीतून. माणसाला जे दिसतं, जाणवतं (किंवा दिसत नाही, जाणवतं नाही) ते त्याच्या या स्थानामुळेच.
ते प्रगो याला संस्कार नाव देतात आणि तुम्ही सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी म्हणताय!मला हेच कळत दोन्ही कडचे लोकं जन्मावरच का घसरतात.खेदकारक!

In reply to by Bhakti

प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/13/2025 - 12:38
ते प्रगो याला संस्कार नाव देतात आणि तुम्ही सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी म्हणताय!मला हेच कळत दोन्ही कडचे लोकं जन्मावरच का घसरतात.
कारण ती वस्तुस्थिती आहे म्हणुन ! ह्यात खेदकारक असं काहीच नाही . एखादा व्यक्ती एखाद्या विशिष्ठ कुटुंबातच का जन्म घेत असावा ? कोणी श्रीमंत कोणी गरीब, कोणी सेलिब्रिटी कोणी भिकारी, कोणी शुद्र कोणी ब्राह्मण, कोणी सुसंकृत कोणी संस्कृती विध्वंसक , कोणी आहे रे , कोणी नाही रे . असं का असावं ? ह्याला व्यवस्थित रितसर तत्वज्ञानाच्या दृष्टीने, अध्यात्मिक उत्तर आहे. आणि पुढे जाऊन तुम्ही ज्या परिस्थितीत जन्माला आलात त्या परिस्थितीतच राहाता असेही नाही , तुम्ही तुमच्या कर्माने तुम्हाला पाहिजे तसे बदल घडवताच ! आमच्या स्टॅटिस्टिक्स मध्ये आम्ही जी लिनियर मॉडेल्स बनवतो त्यानुसार बोलायचे झाले तर तुमची सद्य स्थिती = तुमची प्रारब्ध्द कर्मे + संचित कर्मे + क्रियामाण कर्मे + ईश्वरेच्छा अशी समष्ठी असते ! जे संचित आहे ते संचित आहे ! तुम्ही तुमच्या क्रियामाण कर्माने ते ओव्हर राईड करु शकताच ! त्या कामवाल्या बाईंची मुलगी ने कष्ट केले तर तेही उच्च पदस्थ होऊ शकतेच ! (आणि एखाद्या उच्च स्थितीतील व्यक्तीने कर्मे केले नाही तर तो देशोधडीला लागु शकतोच . एकीकडे मुकेस भाई पोरांच्या लग्नांवर अब्जावधी रुपये खर्च करत असताना , त्यांचा सख्खा भाऊ , की ज्याला वडीलोपार्जित इस्टेटीत जास्त माल मिळाला होता , तो अनिल भाई अक्षरशः भिकारी होण्याच्या मार्गावर आहे !) ह्यात काहीही खेदजनक नाही. ज्याक्षणी तुम्हाला ह्या सर्व मॅट्रिक्स चे टर्निंग गेयर्स लक्षात येतात , जेव्हा ह्या मॅट्रिक्स चे अनादी अनंत अस्तित्व लक्षात येते तेव्हा तुम्हाला खेद वगैरे काहीही वाटायचेच बंद होते . त्यानंतर all you can do after that is to appreciate how exquisitely beautifully its designed ! असो हा स्वतंत्र लेखाचा विषय असल्याने इथे जास्त लिहित नाही !

In reply to by Bhakti

स्वधर्म Sat, 03/15/2025 - 19:44
तुमच्यासारख्या संवेदनशील व्यक्तीला जन्मावर माणसाचं भवितव्य ठरू नये, असं वाटणं सहाजिक आहे. पण तुंम्हा आंम्हाला काहीही वाटो, जन्मावर बरंच काही ठरतं ही वस्तुस्थिती आहेच. आपल्याला मिळणारी आर्थिक सामाजिक परिस्थिती जन्मावरच अवलंबून नाही का? माणसाला वाढीच्या वयात येणारे अनुभव त्याच्या आर्थिक सामाजिक व भौगोलिक परिस्थितीनुसारच ठरणार. आणि मग पुढे त्याच्या धारणा, मते, दृष्टिकोन हे आजूबाजूला जे मिळतं (शिक्षण, वाचन, संगत इ.) त्यावर ठरणार. ज्याची समज वाढलेली आहे, फक्त त्यालाच या अदृष्य पिंजर्‍याच्या पलीकडे काही दुसरे दृष्टीकोन आहेत हे कळणार. मान्य करणे ही अधिक पुढची पायरी झाली. कोणी कुठे जन्म घ्यावा, हे काही त्या व्यक्तीच्या हातात नाही. कदाचित समाजात संपूर्ण समता (संधी, शिक्षण, व्यवसाय) असणे हि अत्यंत आदर्श अवस्था कधीच येऊ शकणार नाही. पण जगभरातली सरकारे, जी लोककल्याणकारी आहेत त्यांनी हे केले आहे व परिणामतः त्यांच्याकडे विषमता कमी होऊन जीवनाचा दर्जा सुधारलेला आहे, हे तर स्पष्ट आहे. कोण कुठे जन्माला आला याला काही भ्रामक अध्यात्मिक कार्यकारणभाव चिकटवणे व म्हणून समाजात समता असणे याची टर उडवणे, हे मात्र समर्थनीय नाही.

In reply to by स्वधर्म

कर्नलतपस्वी गुरुवार, 03/13/2025 - 11:38
असे माझे मत आहे. विषमता आहे म्हणून स्पर्धा आहे. स्पर्धा आहे म्हणून विकास/प्रगती आहे. विषमतेवर कसा विजय मिळवायचा किंवा आहे त्या परिस्थितीत खुश रहायचं किंवा रडत बसायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. जगात अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर कुरघोडी करून अविश्वसनीय असा बदल घडवून आणला. माझ्याच समोरचे एक उदाहरण. छोटे कुटुंब, आई,वडील एक मुलगा ,मुलगी. आई क्षयरोगी अतिंम टप्प्यात. वडिल नालायक, लंब्या,लंब्या फेकणारे. मुलांच्या जीवावर बांडगुळ म्हणावे लागेल.अर्थिक परिस्थिती हलाखीची. मुलगा स्टॅन्ड वर भाजभाजलेल्या शेंगा विकायचा तर मुलगी लोकांची धुणी भांडी. आई वारली,वडिलांनी दुसरे लग्न केले,मुलांना वाऱ्यावर सोडले. भावंडानी एकमेला आधार दिला. शिक्षण पुढे चालू ठेवले. गावातच काॅलेज असल्याने फारसा खर्च नव्हता. घरभाडे माफक व मुलांची धडपड बघून गल्लीतील लोंकानी शक्य होईल तशी मदत दिली. पुढे मुलगी बि एड,एम एड झाली आज गावातच प्रथितयश ट्युशन्स संस्थेची मालकीण तर मुलगा पुढे बि काॅम,सी ए झाला व स्वताची फर्म टाकली आहे. असो,मुळ विषय साधा सरळ होता. घरातील नोकरांना माणुसकीची वागणूक आणी योग्य मेहेनताना देण्याबाबत. त्याला इतर देशातील परिस्थितीशी तुलना करत भारतीय समाजिक विषमता कशी समाज वाद विरोधी आहे हा मुद्दा उपस्थित करून विषयांतर केले जात आहे. सामाजीक विषमतेला अनेक कारणे आहेत परंतू विषयांतर होईल म्हणून टाळून एवढेच म्हणतो की आपल्या बरोबर जे गरीब आपल्यासाठी काम करतात त्यांना य्योग्य वागणूक व सद्यपरिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करावी. माझ्या पत्नीला घरकामात मदत करण्यासाठी एकच कामवाली बाई गेले तेरा वर्ष नोकरीत आहे.थोडीफार शिक्षण झालेली,अकुशल. नवरा अशीच छोटी मोठी कामे करतो. दोन मुलं नुकतीच दहावी बारावी झालीत. वेळोवेळी जाहीर झालेल्या सरकारी योजनांचा कसा लाभ घ्यायचा हे माझ्या पत्नीने तीला मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री आवास योजनेचा फार्म भरायला लावला. आज तीचे स्वताचे घर झाले आहे. तीनचार अन्य घरात काम करते म्हणून हप्त्यात वाॅशिंग मशीन घेऊन दिले कारण तीच्या घरातील कपडे धुण्याचे श्रम आणी वेळ वाचावा, पिठ दळण्याची विजेची चक्की घ्यायला लावली. आता मुले फावल्या वेळात आसपास च्या घरातील दळणे दळून देतात व अतिरिक्त अर्थार्जन करतात. घर महिलेच्या नावावर असल्याने नवर्‍याची दादागिरी कमी झाली आहे. सरकारच्या लाडक्या बहिणाबाई म्हणून महिना भाऊबीज चालू झाली आहे. अर्थिक परिस्थितीत सुधार होतोय. आता मुलांवर अवलंबून आहे की ते आपल्या आईच्या कष्टाचे कसे परिमार्जन करतात. तर माईसाहेबांनी मांडलेला मुद्दा उचलून धरत एवढेच म्हणेन, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. लहान मोठे,गरीब श्रीमंत हा भेद यावत्चंद्रदिवाकरौ रहाणारच आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/13/2025 - 12:44
यावत्चंद्रदिवाकरौ
तत्वज्ञान असं आहे की दिवाकराचे अर्थात सुर्याचं चंद्रापेक्षा मोठ्ठं असणे, जास्त तेजस्वी असणं , स्वयं प्रकाशमान असणं , दाहकारक असणं हेही विषमतेचे प्रतिक आहे , अन्याय आहे वगैरे वगैरे . =))))

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म Fri, 03/14/2025 - 17:06
विषमता हा निसर्गाचा मूळ गुणधर्म आहे, हे निसर्गव्यवहारात ठीक. निसर्गव्यवहारात जंगलातील बलवान प्राणी दुर्बल प्राण्यांना खाणारच. मानवी व्यवहारात असं चालेल काय? पूर्वी असेच होते, राजाला सर्वाधिकार होते. मनात येईल त्याला शिक्षा करण्याचा अधिकार होता. का बरं हे बदललं असावं? मानवी व्यवहारात सामाजिक आर्थिक विषमता टिकवायची का? मानवी व्यवहारात समता (समानता नव्हे) आणण्याचे प्रयत्न कोणत्याही कल्याणकारी राज्याकडून केले जातात. ते थांबवावे का?

In reply to by स्वधर्म

कर्नलतपस्वी Fri, 03/14/2025 - 19:57
कशी मिटवणार? एकाच आई-वडीलांची चार मुले. समान संधी णण एक भरपूर शिकतो डाॅक्टर इंजिनियर होतो. एक शिक्षणात सुमार काहीतरी धंदा काढतो,एक उनाड,मवालीगीरी करतो आता यात समता कुठुन येणार.. प्रत्येक घरात अशी उदाहरणे मिळतील. धंदेवाला खुप पैसा कमवतो तर शिक्षित सन्मान पुर्वक जिवन यापन करतो तर एक गुंडगीरी करून ..... अर्थात काहीही होऊ शकते. गुंडा भरपूर पैसे कमवतो तर धंद्यात नुकसान झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलतो वगैरे,वगैरे....

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म Sat, 03/15/2025 - 19:53
तुमची गल्लत होते आहे. अंतीम अवस्था (इंजिनिअर की मवाली इ.) समान असणे म्हणजे समता नव्हे. ते कधीही होऊ शकणार नाही, हे स्पष्टच आहे. सर्वांना जास्तीत जास्त समान संधी, शिक्षण, सन्मान, उपभोगाचे, साधनसंपत्तीवरचे अधिकार मिळणे ही समता.

वामन देशमुख Tue, 03/11/2025 - 12:02
आजी, नेहमीप्रमाणे हा लेखही प्रामाणिक निवेदन-मांडणीमुळे आवडला. माझ्या मते, "मदतनीस" वा इतर कुणीही आपल्याकडे - घरी किंवा ऑफिसात काम करणे आणि आपण त्याचा मोबदला देणे हा एक शुद्ध व्यवहार असतो. त्यात चांगले-वाईट असे काही नसते. त्यांच्या वेळेपेक्षा आपला वेळ अधिक किंमतीचा असतो आणि आपण आपल्याला परवडेल तितके पैसे देऊन तो वेळ विकत घेतो. या व्यवहारात दोघांचाही फायदा असतो. फायदा दिसत नसेल तर व्यवहारात कुणी उतरत नाही, टिकून राहत नाही. यात श्रीमंत, गरीब असाही काही भाग नाही. ज्यांना तसे वाटते त्यांना शुभेच्छा. प्रत्येकच जण कुणापेक्षा तरी श्रीमंत आणि इतर कुणापेक्षा गरीब असतो. वाजवी किंमतीत जमेल तेवढा इतरांना रोजगार देणे हीच खरी मानवता / माणुसकी असे मला वाटते. ठरलेल्या पगारापेक्षा अधिक पैसे देणे किंवा ठरल्यापेक्षा अधिक काम करणे हा त्या त्या व्यक्तींच्या चांगुलपणाचा भाग आहे.

सुबोध खरे Wed, 03/12/2025 - 19:53
मागणी आणि पुरवठा हे तत्व जगभर सर्वत्र काम करताना दिसते. त्यातून सर्वजण एकाच पातळीवर जन्माला येतात आणि परिस्थितीप्रमाणे त्यांचा उद्धार होतो किंवा नाही हे समाजवादी तत्व चूक आहे हे अनेक पातळ्यांवर सिद्ध झालेलं आहे. आमचे वडील नेसत्या वस्त्रानिशी १९५४ मध्ये मुंबईत आले. माटुंग्याच्या रेल्वे वर्क शॉप मध्ये सहाय्यक(अँप्रेन्टिस) म्हणून चिकटले. उरलेल्या वेळात स्टेनोग्राफी आणि टायपिंग शिकले तेथे कामगार म्हणून नोकरी मिळाली नाही. मग औषध कंपनीत टायपिस्ट म्हणून नोकरीस लागले. लग्न आणि मुले झाल्यावरही नोकरी सांभाळून बी ए केले, एल एल बी केले नंतर जमनालाल बजाज सारख्या संस्थेत डी बी एम केले. चतुर्थ श्रेणीतून चढत चढत प्रथम श्रेणीत पोहोचले. वडिलांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आमच्या आईने शिक्षण चालू केले. तिने पण बी ए , एम ए आणि बी एड केले. आम्ही कॉलेजात जाईपर्यंत आमचे आईवडील शिकत होते. वयाच्या ४३ व्य वर्षी आई परत शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीस लागली आणि शेवटी ५८ व्य वर्षी मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाली. एके ठिकाणी एका अतिशय खालच्या भाषेत बोलणाऱ्या इसमाला मी या शब्दात सुनावले होते कि जेंव्हा तुमचे वडील आठवड्याच्या अखेरीस "कुठे बसायचे" म्हणून ठरवत असताना आमचे वडील अभ्यास करत होते आणि थोडी थोडकी नव्हे तर लग्नानंतर ९ वर्षे शिकत होते. यानंतर आमच्या आईने ८ वर्षे शिक्षण घेतले. त्यांच्या खांद्यावर उभे राहून मी आणि माझा भाऊ उच्चशिक्षित झालो आणि सुखवस्तू झालो. संधी मिळाली नाही म्हणून रडत बसणारे असंख्य इसम गेली कित्येक वर्षे पाहत आलो आहे. पण जवळून पहिले असताना त्यांना आतूनच आपल्या उद्धाराची आच नाही असे बऱ्याच वेळेस लक्षात आले. अनेक इसमांना मदत करण्याचा प्रयत्न केला असताना फक्त काही लोकांनाच अशी आतून आच असते हे लक्षात आले. बाकी ध्यान फक्त परिस्थितीबद्दल रडारड करायची असते. आपल्या सहाय्यिकेस नमस्कार आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 03/13/2025 - 12:44
मी माझ्या घरी काम करणाऱ्या बाईला कधीच, कामवाली, मोलकरीण, धुणीभांडीवाली, झाडूपोछावाली असं म्हणत नाही. मी त्यांच्या तोंडावर त्यांना त्यांच्या नावाने हाक मारते आणि त्यांच्या मागे त्यांचा उल्लेख माझी मदतनीस, माझी साहाय्यक, माझी असिस्टंट असा करते.
समाजवादी समतावादी मूल्यांमधे जगणार्‍या संवेदनशील माणसांना विषमता हे वास्तव आहे याचे भान त्रास देते. आपण ही यांच्या शोषणाचा घटक आहोत या जाणीव होते मग तो अपराधगंड दूर करण्यासाठी ते विशेषणेच बदलतात. अपंगांना दिव्यांग म्हणणॆ, बलात्कार पीडीतेला निर्भया म्हणणे, मानसिक रुग्णांना शुभार्थी म्हणणॆ, कोरडवाहू शेतकर्‍याला बळीराजा म्हणणे वगैरे..

कर्नलतपस्वी गुरुवार, 03/13/2025 - 15:05
काम हवे असणारा व काम देणारा असे दोन घटक आहेत. ज्याला जसे परवडते तसे तो स्विकारत असतो. परदेशातही पाळणाघरे आहेत. कामवाल्या बायका आहेत. माळी आहेत. तीथे ज्यांना परवडते ते हायर करतात. पाळणाघरासाठी वयोमानानुसार दर आकारण्यात येतो. चार वर्षाचा नातू आहे काही शे डाॅलरा (म्हणजे जवळपास एखाद लाख) दरमहा द्यावे लागतात. विकसित देशामधे सुद्धा विषमता आहे. आता तिकडच्या कामवालीला ताशी शंभर रुपये जरी मिळत असले तरी ती कामवालीच असते. झाडू, पोचा,बर्तन,लाॅण्ड्री सारखी कामे यंत्रांने सहज बिनबोभाट होतात. बहुतेक फ्लोरिंग कार्पेटेड असल्याने व घरात सेंट्रल ए सी असल्याने धुळ नसतेच. रोबोट प्रशीक्षीत केला की मग नंतर तो बिघडे पर्यंत चुपचाप काम करतो. पगार मागत नाही,संप करत नाही,मोर्चे काढत नाही,काम सोडून जात नाही. इतर यंत्रांचे पण असेच असते. सर्वसाधारण पणे ही यंत्रे पाच वर्षांत करता बनलेली आणतात. त्यानंतर फेकून देतात व नवीन आणतात. आवारातील झाडे कापणे,लाॅन ड्रेसिंग करणे यासाठी सुद्धा स्वयंचलित यंत्रे उपलब्ध आहेत. मनुष्यबळ कमी व महागडे तर सहायक यंत्रे तुलनेत स्वस्त व अधीक फायदेशीर. त्यामुळे सर्वसामान्य (विकसीत देशातील) नागरीक सहायक मनुष्यबळाचा मागे न जाता यंत्रे वापरतात. हे माझे बारा महिन्यांच्या वास्तव्यातील निरीक्षण आहे.

कर्नलतपस्वी गुरुवार, 03/13/2025 - 15:11
कधीकाळी महान शास्त्रज्ञ,प्रेसिडेंट भारतरत्न पुरस्कृत महामानवाने सुद्धा वर्तमानपत्रे विकली आहेत असे ऐकले आहे. कुठलेही काम लहान मोठे नसते ते फक्त एका साठी अर्थार्जन तर दुसऱ्या साठी सोय असते.

प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/13/2025 - 15:29
कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसत पण त्याला काविळीचे औषध दिलं की सगळं बरं होऊन नॉर्मल दिसायला लागत. पण ज्यानं पिवळा चष्मा घातला आहे अन् सगळं पिवळं आहे असा बोभाटा करत आहे त्याला काय औषध देणार ? एकदा का जगात "शोषक आणि शोषित " अशी विभागणी बघायची सवय झाली आणि सतत एक गट दुसऱ्या गटावर अन्याय करतोय अन् दुसऱ्या गटाने पेटून उठून क्रांती केली पाहिजे वगैरे वगैरे विचारसरणी झाली की त्याला औषध नाही. साम्यवादी , समाजवादी , एलोन मास्क म्हणतो त्या शब्दात बोलायचं झालं तर Woke mind virus ला औषध नाही. असो. अशी माणसं रामाच्या काळात होती, कृष्णाच्या काळात होती, आपल्याही काळात आहेत. त्यांना " संघर्ष करा, संघर्ष च करत रहा " असे काहीसे सांगितलं गेले आहे ते तसे वागत राहतात. त्यात त्यांचा काय दोष ! आम्ही आपलं कृष्णाने सांगितलं तसं "सर्वत्र समबुद्धय:" व्हायचा प्रयत्न करत राहतो. :)

धर्मराजमुटके Fri, 03/14/2025 - 18:19
आजींच्या साध्याभोळ्या, घरगुती लेखावर जडबंबाळ तात्विक चर्चा करणार्‍या डाव्यांचा आणि उजव्यांचा तीव्र निषेध. आज्जे, तुझे नशीब चांगले हो की तुला चांगल्या कामवाल्या बायका मिळाल्या. आजकाल कामाला माणसे मिळत नाहीत, माणसाला काम मिळत नाही आणि कामाला मिळालेली माणसे काम चांगलं करत नाहीत.

In reply to by धर्मराजमुटके

आजकाल कामाला माणसे मिळत नाहीत, माणसाला काम मिळत नाही आणि कामाला मिळालेली माणसे काम चांगलं करत नाहीत. खिक्क!

विअर्ड विक्स Fri, 03/14/2025 - 19:44
नोकर असो वा हाताखालचे कामगार वा पांढरपेशी, नोकर वर्ग मालकाने माणूस म्हणून वागवले तर काही वेळेस अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळतो वा काही वेळेस नोकर वर्ग डोक्यावर बसतो . यामध्ये दुसरी शक्यता विचारात घेऊन अनेकजण निर्दयी बनण्याचा प्रयत्न करतात याउलट नम्रता व आदर हि कायमच उत्तम परतावा देते, हा माझा अनुभव आहे. बंगालसारख्या डाव्यांच्या वर्चस्व असलेल्या प्रदेशात कामगार कसे काम नि पैसे चोरी करतात हे अनुभवले आहे . याउलट त्यांच्याशी आदराने वागले तर ते बिनदिक्कत पडेल ते काम करतात. या जगात पोटाची गरज भागवण्यासाठी शिक्षित ,अशिक्षित अनेक जण दुय्यम दर्जाची कामे करतात याला इलाज नाही कारण सगळेच काही फुंसुक वंगडु नसतात.

आजी Sat, 03/22/2025 - 09:10
या लेखावर भरभरून प्रतिसाद आला. खूप चांगली चर्चा घडली. आनंद झाला. या निमित्ताने लिहिलेले उत्तर खूपच मोठे झाल्याने नवीन लेखाच्या रुपात प्रकाशित करत आहे. https://www.misalpav.com/node/52806 सर्वांचे आभार..

विजुभाऊ Mon, 03/10/2025 - 15:15
बरोबर आहे. मदतीनीसाना ही स्वतःच्या प्रगतीचा हक्क आहे. जसजसे शिक्षणाचे प्रमान वाअढत जाईल तसतसे ज्याना मदतनीस लागतात त्याना स्वावलम्बी व्हावे लागेल

स्वधर्म Mon, 03/10/2025 - 17:00
आजी, तुंम्ही अगदी पांढरपेशा माणुसकीने तुमच्या घरी येणार्या मदतनीस बाईंशी वागत आहात, ते ठीकच. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो: मुळात आपल्या समाजात काही लोकांना ही दुसर्यांची नकोशी कामे कमी पैशात करावीच का लागावीत? कोणत्याही प्रगत देशात असा दररोज दुसर्याच्या घरी येऊन काम करणारा वर्ग निदान एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. कारण? तिथे एवढी आर्थिक विषमता नाही. आपल्या देशात मध्यमवर्गीयांना सुध्दा अशी दररोज सेवा घेणे परवडते, कारण त्यांच्या आणि मदतनीसांच्या आर्थिक ऊत्पन्नात बरीच मोठी तफावत आहे. असा वर्ग उपलब्ध असणे, हे कमालीची आर्थिक विषमता असल्याचे लक्षण आहे, आणि ते योग्य नाही. बाकी आपण त्यांच्याशी व्यक्तीगत चांगले वागत असणे व त्याबद्दल स्वतःला बरे वाटणे हे ठीक, पण माणसाच्या श्रमांना एवढी किंमत आली पाहिजे की सर्वसाधारण मध्यमवर्गीयांना अशी सेवा घेणे परवडलेच नाही पाहिजे. अगदी अंथरुणाला खिळलेले, वयस्कर लोक यांना मदतनीस लागतात. काही शिक्षक घरी येऊन शिकवतात, पण त्यांना अशी माणुसकी पुरेशी नाही, तर त्यांचे आभार मानून त्यांना व्यवस्थित सन्मानपूर्वक पैसे द्यावे लागतात.

In reply to by स्वधर्म

खूप छान विचार स्वधर्म! खर आहे! १५००-२००० रुपयात महिनाभर भांडे घासणे नी लादी पुसणे हे कष्टाचे काम करणाऱ्या स्त्रियांबद्दल आदर वाटतो. त्यांचे वयही बऱ्याचदा ४०-५० च्या घरात असते तरीही न थकता त्या चार ते पाच घरे दिवसातून करतात. छोट्या मोठ्या दुकानात काम करणाऱ्या लोकांची देखील पिळवणूक होते, सकाळी ९ ते रात्री ९ ते १० अशी बऱ्याच दुकानांची वेळ असते, कामावर असलेल्या लोकाना रोज १० ते १२ तास १५-२० हजारात पिळून काढल्या जाते. सणासुदीला सुटीही नसते. अशी पिळवणूक अनेक ठिकाणी दिसते अश्या लोकांबद्दल वाईट वाटते. काही लोक कंटाळून काम सोडतात नी फळे, भाजीच्या गाड्या लावतात किंवा रिक्षा चालवणे वगैरे करतात! एकंदरीत ह्या परिस्थीतिला देशात प्रचंड असलेली लोकसंख्या कारणीभूत आहे असे वाटते! पण जिकडे मध्यम नी उच्च मध्यमवर्गीय लोक एका मुलानंतर दुसरे मूल जन्माला घालायला दोन ते तीनदा विचार करतात तिकडे हीच लोक हयगय न करता चार पाच तरी मूले सहज जन्माला घालतात! हा विरोधाभास का हे लक्षात येत नाही. कधी कधी वाटते हे परिस्थितीच्या रेट्यामुळे आहे कधीकधी वाटते ह्या लोकांनाच सुधारायचे नाही!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Bhakti Tue, 03/11/2025 - 08:59
हा विरोधाभास का हे लक्षात येत नाही.
शिक्षणाचा अभाव यामुळे हे घडतं. आणि अजून एक समान गोष्ट दिसते या मदतनीस बायकांचे नवरे दारूडेच,जुगारी वगैरेच कसे ? शून्य टक्के पोषण असलेल्या:'दारूवर बंदी' सरकार घालणार नाही,हे चक्र मोडायला बाईच झिजत राहणार :(

In reply to by Bhakti

ही काही पटलं नाही भक्ती ताई. काही मोजक्या लोकांना दारू पिणे निषिध्द आहे , ब्रह्महत्येचे पातक आहे पण इतरांनी दारू आवर्जून प्यावी . दारू पिण्यासारखी देशभक्ती नाही. दारू सिगारेट पिणे आणि पेट्रोलची गाडी चालवणे ही सर्वात मोठ्ठी देशभक्ती आहे कारण सर्वात जास्त कर ह्याच वस्तूंवर आहे. दारू पिऊन गाडी चालवणे हा तर देशभक्तीचा परमोच्च आदर्श आहे . दारूवरचा टॅक्स, पेट्रोल चां टॅक्स, RTO कडे दंड , कोर्टात सेटिंग , वकिलाना नोकरी , न्यायाधीशाला नोकरी . किती किती म्हणून आर्थिक उलाढाल होते ह्या दारू मुळे . उगाच दारूला बदनाम करू नका. - सुधाकर संस्थापक अध्यक्ष तळीराम फॅन क्लब आर्य मदिरा मंदिर =)))) {हलके घ्या. विनोद आहे =))))}

In reply to by प्रसाद गोडबोले

दारूवर सरसकट बंदी हवी, दारू पिताना एखादा सापडल्यास दारू बनवणारा नी पिणारा ह्याना दगडाला बांधून लादेनसारखे अरबी समुद्रात बुडवायला हवे! कितीतरी संसार दारूमुळे उध्वस्त होतात! - दारूला स्पर्श न केलेला बाहुबली!

In reply to by प्रसाद गोडबोले

खिक्क! तुम्ही गुरु म्हणून ४ वर्षाआधी भेटला असतात तर आज मस्त टाकी फुल्ल करून कुठे तरी पडून असतो. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विजुभाऊ Wed, 03/12/2025 - 09:48
छोट्या मोठ्या दुकानात काम करणाऱ्या लोकांची देखील पिळवणूक होते, सकाळी ९ ते रात्री ९ ते १० अशी बऱ्याच दुकानांची वेळ असते, कामावर असलेल्या लोकाना रोज १० ते १२ तास १५-२० हजारात पिळून काढल्या जाते
आयटी हमालांची अवस्था फार काही वेगळी नाहिय्ये. नवीन फ्रेशर्स ना १० ते १५ हजारांवर रबवून घेणार्‍या बर्‍याच कंपन्या आहेत. कितीतरी लोकासाठी तर फॅमिली लाईफ हा प्रकार म्हणजे लग्झरी असते. पण करतात ना. नाईलाज असतो. पोटासाठी आणि ब्यांकेच्या हप्त्यांसाठी करावी लागते अशी नोकरी

In reply to by स्वधर्म

Bhakti Tue, 03/11/2025 - 08:55
नाच गं घुमा हा काही महिन्यांपूर्वी आलेला सिनेमा पण मदतनीस आणि मालकीण यांच्या सौजन्यावर होता.या सिनेमा विषयी खूप मिश्र प्रतिक्रिया वाचल्या होत्या म्हणून पाहणार नव्हते.पण एकेदिवशी कंटाळा आला म्हणून पाहिला :) पण यातही हीच कहाणी आशाताई मदतनीस ची होती.आशाताई खतत्रुड नवरा, झोपडपट्टीतली आदळाआपट,मुलाची काळजी ,ट्रॅफिक, बसच्या वेळा या सगळ्यांची कसरत करून येतं.त्यात मालकीणचे अनेक गैरसमज होतं.पण शेवटी आशाताईच मालकीणचे खुप मोठ्ठे स्वप्न पूर्ण करायला मदत करते.आणि आशाताईलाही मालकीण खुप मदत करते.सिनेमा चांगला आहे,थोडा मिर्च मसाला अधिक आहे. पण आज मालकीण असो वा मदतनीस एक बाई दुसऱ्या बाईला समजून घेऊन पुढे जात आहेत,हे खुप मोलाचं आहे.

लेख आवडाला ! आता कम्युनिस्ट विचारसरणी स्विकारलेल्या लोकांना ह्या इथेही शोषक आणि शोषित अशी विभागणी दिसते, पण त्याला काय करणार , त्याला नाईलाज आहे ! ज्यांनी कॅपिटॅलिस्ट विचारसरणी स्विकारली आहे त्यांच्या लेखी मात्र - अशा कोणतेही कॅपिटल नसलेल्या व्यक्तींना, अन्स्किल्ड लेबरला तुम्ही व्यवसाय , रोजगार उत्पन्न करुन देत आहात, जीवनाचे साधन उपलब्ध करुन देत आहात ही खुप मोठ्ठी गोष्ट आहे ! आणि नुसतेच रोजगार निर्मिती न करता सदर व्यक्तीला "कामवाली" असे न संबोधता आदराने मदतनीस असे संबोधत आहात ही खुपच मोठ्ठी गोष्ट आहे ! शिवाय जास्त कामाचे जास्त पैसे देत आहात , जमेल तेव्हा गिफ्ट देत आहात , दिवाळीला बोनसही नक्की देत असाल , एकुणच हे सर्व दर्शवत आहे की तुम्ही क्रोनी कॅपिटॅलिस्ट नाही आहात ! तस्मात् तुमचे कौतुक करावे तितके थोडे आहे ! अशी, तुमच्यासारखी चांगली माणसे समाजात टिकली पाहिजेत , अन्यथा हे कम्युनिस्ट सोशॅलिस्ट लोकं जे की आता आर्मचेअर अ‍ॅक्टिविस्ट आणि अर्बन नक्षल चा बुरखा पांघरुन बसलेत ते एक ना एक दिवस अशा भोळ्या अशिक्षितीत लोकांची माथी भडकावुन "There will be blood." हे सत्य करुन दाखवतील , आणि अनस्किल्ड लेबरला देखील देशोधडीला लावतील ह्यातही शंका नाही ! :)

In reply to by प्रसाद गोडबोले

गवि Tue, 03/11/2025 - 11:08
समाजवादी विचारसरणी प्रामाणिक नसते असे नव्हे. पण आदर्श, जे असायला हवे ते, डायरेक्ट "असावे".. अशी काहीशी मांडणी भासते. आदर्श पर्याय हा अशक्य असू शकतो, त्यातल्या त्यात आहे ती सिस्टीम हळूहळू बदलत जाईल पण आदर्श करू जाल तर सगळेच कोसळेल. अशी मध्यम मार्गाची आशा करावी लागते हे त्या विचारसरणीला फारसे रुचत नसावे. त्यांनी सुचवलेल्या उपायांनी "नाही रे" वर्गाची "नको रे" अवस्था होऊ शकते.

In reply to by गवि

अहो, समाजवादाच्या गफ्फा आहेत हो गफ्फा ! अहो, एक आंब्याचं पानदेखील नसतं हो दुसऱ्यासारखं. ब्रह्नदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडं निराळं. सगळ्या माणसांची नशिबं सारखी होतील कशी '? घटकाभर धरा, तुमचा आला समाजवाद ! तो आमचा रत्नांग्रीचा गावगांधी शिट्ट्या फुंकून फुंकून सांगतो तशी आली कोकण रेल्वे नि गेली पांडू गुरवाच्या परसातून -- म्हणून काय थोट्या पांडबाच्या खांद्याला हाताचे खुंट फुटणार काय ? आणि हात नाहीत म्हणजे मग कसेल त्याची जमीन नि दिसेल त्याची थैली ह्या तुमच्या राज्यात थोटा पांडू कसणार कसा आणि काय ? तो तसाच राहायचा ! स्वराज्य आलं म्हणून हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ झाला नाही नि महादेव गडबोल्याचं धोंद आत नाही गेलं ! हे डावंउजवं राहायचंच समाजात ! अहो, रामराज्यातदेखील मारूतीचं शेपूट उपटून रामानं आपल्या पाठीस नाही जोडलं -- हा नरच राहिला नि तो वानरच राहिला."

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म Tue, 03/11/2025 - 18:35
साधी गोष्ट होती: मुद्दा एक समाज म्हणून आपल्याकडे किती विषमता आहे, म्हणून काही लोकांना नाईलाजाने ही कामं करावी लागत आहेत, इतका साधा होता. कुणी पैसे दिले व माणुसकी दाखवली, हे ठीकच, त्यावर माझा काही आक्षेप नव्हता. असली कामं समाजातून कमी व्हायला पाहिजेत की नको? 'मदतनीस' स्वतःच म्हणत आहे 'जे जगणं माझ्या वाट्याला आलं ते तिच्या (मुलीच्या) वाट्याला नको.' हे त्यांचं असं जगणं चालूच रहावं, असं वाटणारी माणसं अजून समाजात आहेत, हेच मोठं दुर्दॅव आहे! अर्थात त्यामागे पिढ्यानुपिढ्यांच्या हितसंबंधांना धक्का लागू नये, प्रस्थापित प्रस्थापितच रहावेत, ही मूळ स्वार्थमूलक प्रेरणा आहे. झाडाचं एक पान दुसर्यासारखं नसतं वगैरे गैरलागू सिध्दांत तोंडावर फेकून कशाचंही समर्थन करता येतंच! बरं झालं असले लोक काही काळ तरी देशाच्या नेतृतवात नव्हते, नाहीतर डोक्यावरून मैला वाहून नेणार्याला काम व पैसे देऊन आंम्ही पुण्यच करत आहोत, असं म्हणत समाज तिथेच राहिला असता. अमेरिकेत अजूनही गुलामी प्रथा सुरू असती - गुलाम गुलाम म्हणून जन्माला आला त्यात आमचा काय दोष? त्याचं प्रारब्ध कर्मच तसं असणार असं आमचा वेदांत सांगतो ना. उलट त्याला पैसे व जेवण देऊन आंम्ही त्याच्यावर उपकारच करत आहोत म्हणत त्या अमानुष प्रथेचं समर्थन करत राहिले असते.

In reply to by स्वधर्म

गवि Tue, 03/11/2025 - 20:36
कधीतरी थिअरीज सोडून स्वार्थापलिकडचं सत्य बघा
कधीतरी बघा असे म्हणण्याइतका वाईट नाही हो मी. आणि अमुक एक असावे यात वाद नाहीच. पण त्यासाठी इम्प्लिमेंट काय करायचे?

In reply to by गवि

स्वधर्म Tue, 03/11/2025 - 22:17
गोडबोले यांनी समाजवादी गप्फा, 'झाडाचं पान...', शोषक शोषित इ. इ. ज्या थिअरीज सांगितल्या आहेत, त्यासाठी होता. माझा प्रतिसादही त्यांच्या प्रतिसादाखालीच दिसतोय, तुमच्या नाही. इंप्लीमेंट अनेक देशांनी, संस्थांनी केलंय. मुख्य गोष्ट ही की समाजातली आर्थिक विषमता कमी करणारी धोरणे आखली गेली पाहिजेत. शिक्षण व संधी तळागाळातल्या लोकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आता समाजातील यासारख्या खर्याखुर्या प्रश्नांवर काम करण्याऐवजी राज्य आणि केंद्र सरकारे भ्रामक गोष्टींवर काम करत आहेतः उदा. औरंगजेबाची कबर. नद्यांचं पाणी स्वच्छ करण्यासाठी खर्च न करता नाशिकच्या कुंभमेळा आयोजित करण्यावर हजारो कोटी खर्च करणार आहेत. खेडोपाडीच्या शाळांसाठी पैसे नाहीत, पण हजारो कोटी खर्च करून शक्तीपीठ महामार्ग, मोठमोठी स्मारके बांधायचीआहेत.

In reply to by गवि

राम राम गवि ! त्यांनी पु.लं देशपांडे ह्यांचे लेखन वाचल नाहीये , त्यांना अंतु बर्वा माहीत नाही , त्यांच्याशी काय बोलायचं =)))) ज्याला लोकं कॅपिटॅलिझम म्हणतात ते तत्वज्ञानाच्या परिप्रोक्ष्यातुन पाहिलं तर विशुध्द हे "सत्य" आहे "सत्य". सत्य म्हणजे ट्रुथ असे भाषांतर करुन शिकलेल्यांना कसं समजणार ! समाजामध्ये कायमच कोणाकडे तरी जास्त कॅपिटल असणार कोणाकडे तरी कमी ! माणसांचे सोडा , प्राण्यांना देखील कळतं हे, प्राणी आपली टेरेटरी जे की कॅपिटल , ते प्राणापणाने जपतात , वाढवण्याचा प्रयत्न करतात . प्राणी सोडा , झाडांना देखील कळातं हे ! मोठ्ठं झाड जास्तीत जास्त सुर्यप्रकाश घेतं, पाणी घेतं , पोषकतत्व घेतं अन अन्य छोट्या झाडांना झक मारत त्या झाडाच्या सहार्‍याने आसर्‍याने जगता येतं , पण म्हणुन मोठ्ठं झाड तोडलं तर सगळी एको सिस्टीम नष्ट होते अन सगळीच झाडे मरतात , अन मग ती जमीन ग्रास लॅन्ड होऊन जाते . अहो झाडांचं सोडा , निर्जीव ग्रहतार्‍यांनाही आपल्या ग्रॅव्हिटेशनल फिल्ड मध्ये येणारी प्रत्येक गोष्ट स्वतःमध्ये खेचुन घ्यावी , आणि आपले अस्तित्व वाढवावे , ही "जाणीव" आहे ! हे ते सत्यमेव जयते म्हणातात ना त्यातले सत्य आहे ! मानवी समाजातील कॅपिटल ची एक रचना नष्ट होईल , पण लागलीच दुसरी काही रचना त्याची जागा घेईल , कामवाल्या बाईची पोरगी शिकुन कॉर्पोरेट मध्ये गेली तर तिथे काय परिस्थिती आहे हे आम्ही पाहतो, मग कमावलेले पैसे मार्केट मध्ये टाकु लागली तर कॅपिटल मार्केट मध्ये काय स्थिती , आपण किती चिल्लर आहोत हेही आम्ही पहात आहोत , बरं राजकारणात गेली तर तिथे पॉवर डायनॅमिक्स कसले जबरदस्त आहे हे सगळेच बीड मध्ये पहात आहेत , वॉशिंग्टन डी.सी. मध्येही पहात आहेत ! ज्याला कळतं त्याला कळतं ! यु कॅनॉट एस्केप इट ! यु सिंपली कॅनॉट ! ! हे सत्य आहे सत्य. त्यालाच ऋत असाही अल्मोस्ट समानार्थी शब्द आहे . त्यालाच धर्म असा शब्द आहे . आणि ह्या धर्माचे मुर्तीमंत स्वरुप - तोच राम आहे ! रामो विग्रहवान धर्म : _______________________________________ पण असो. ह्या क्रांती ब्रिंतीच्या बाबतीत मात्र आमचा स्वधर्म ह्यांना फुल्ल सपोर्ट आहे ! कम्युनिझम चा भस्मासुर शेवटी स्वतःच्याच मस्तकावर हात ठेऊन स्वतःचाच नाश करुन घेतु ही वस्तुस्थिती आम्ही अभ्यासली आहे , क्युबा मध्ये पाहिलं , लॅटिन अमेरिकेत पाहिलं , नॉर्थ कोरियात पाहिलं , रशियात पाहिलं , चायना मध्येही कम्युनिस्ट सरकार समानता आणुन तेथील लोकांच्या हिताची काय काळजी घेत आहे हेही पहात आम्ही =)))) तस्मात ह्या बाबतीत , स्वधर्म आमचा तुम्हाला जोरदार पाठिंबा आहे , भिडा तुम्ही , उध्वस्त करुन टाका ही व्यवस्था ! मजा यायला हवा =)))) लाल सलाम ! क्रांती चिरायु होवो ! =)))) Samant

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म गुरुवार, 03/13/2025 - 06:41
>> त्यांनी पु.लं देशपांडे ह्यांचे लेखन वाचल नाहीये , त्यांना अंतु बर्वा माहीत नाही , त्यांच्याशी काय बोलायचं =)))) >> ज्याला कळतं त्याला कळतं ! शेवटी आलाच 'मला सगळं कळतं. त्यांना काहीच कळत नाही' यावर. कुठून येतो हा आत्मविश्वास? तो येतो जिथे तुंम्ही जन्माला आला त्या सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमीतून. माणसाला जे दिसतं, जाणवतं (किंवा दिसत नाही, जाणवतं नाही) ते त्याच्या या स्थानामुळेच. राहता राहिला प्रश्न पुलंचा. तुमचा कयास चुकवल्या बद्दल माफ करा, पण मी त्यांची पुस्तके, व्यक्ती आणि वल्ली वगैरे वाचलेली आहेत. पण बालबुध्दीने दिपून जाण्याचे दिवस संपल्यावर दृष्टी विस्तारित झाल्यावर काही वेगळे जाणवते. थोर लेखक होते, त्यांची विनोदबुद्धी तरल होती, भाषेवर हुकूमत होती, पण तेही तेच पाहू शकले जे त्यांना त्यांच्या स्थानावरुन दिसलं. तुंम्ही दुसरीकडे जन्माला आला असाल, तर काही वेगळं जाणवू लागतं. अंतू बर्वा, नंदा प्रधान, नानू सरंजामे यांना आडनावे आहेत, पण नामू परटालाच फक्त कसं बरं आडनांव नाही? त्याची जात हेच त्याचं आडनाव का? त्यांनी महिलांच्या जाडपणावर, रंगावर, गटणेच्या बावळटपणा वर केलेले हुकमी विनोद वेगळ्या प्रकारे दिसू लागले. ... ... चितळे मास्तर मात्र ‘ढ’ मुलांना अत्यंत आदराने पुकारीत. गोदी गुळवणी ही साक्षात ‘ढ’ होती. गोरी, घाऱ्या डोळ्यांची, भरल्या पोत्यासारखी ढब्बू गोदी चवथी-पाचवीपर्यंत जेमतेम शाळेत टिकली. शेवटी अण्णा गुळवण्यांनी तिला उजवली. हे असले विनोद बायकाही अगदी निरागसपणे एन्जॉय करतात, फक्त त्या गोदूसारख्या नसतील तर. अंतू बर्वा काय म्हणतो? ..पण इंग्रज गेला तो कंटाळून. अहो, लुटण्यासारखं काय शिल्लक होतं? धंदा बुडीत खाती जायला लागला - फुकलंनीत दिवाळं! कुंभार मडकी घेऊन गेला, तुम्ही फुंका उकिरडा!’’ ज्यांनी कधी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलाच नाही त्यांच्या मनातील अपराधीपणाची भावना कमी करण्याचं काम पु. ल. देशपांडें करत आहेत का? शिवाय इंग्रज भारत सोडून गेले ते कंटाळून असं बोलून ज्यांनी याकामी बलिदान दिलं त्यांचं श्रेयही काढून घेताहेत. अजून काय हवं? * * * अंतू बर्वा यांची समाजवाद, समता-विषमता याबाबतची मतं तर फारच प्रखर आहेत. कोकणात रेल्वेयेण्याचा आणि थोट्या पांडूला हात फुटण्याचा काही तरी संबंध आहे का? इथे एक उलटा प्रश्न विचारावासा वाटतो. थोट्या पांडूला हात फुटणार नसेल तर कोकणात रेल्वे आणणं रहित करायचं का? स्वराज्यात हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ होणार नाही म्हणून इंग्रजांना परत बोलवायचं का? पु. ल. देशपांडे यांच्या श्रीमंत भाषेच्या प्रभावातून बाहेर पडणं हे काम आहे. जे त्यांना दिसलं नाही, ते त्यांचं आ करुन वाचणाऱ्या तुंम्हाला काय दिसणार? जाऊ द्या, त्यापेक्षा तुंम्ही तुमच्या बालोद्यानात स्वांतसुखाय अध्यात्माचा आनंद घ्या. मी कुठेही साम्यवादाचं समर्थन केलेलं नाही, फक्त्यात समाजातली आर्थिक विषमता एवढाच मुद्दा होता. त्यामुळे क्रांती वगैरे पाल्हाळाबद्दल आमचा पास. दुसऱ्याला न मांडलेला मुद्दा चिकटवून झोपण्याची युक्ती जुनी झाली.

In reply to by स्वधर्म

प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/13/2025 - 10:38
त्यापेक्षा तुंम्ही तुमच्या बालोद्यानात स्वांतसुखाय अध्यात्माचा आनंद घ्या.
मी तेच करतो हो आता . तुका म्हणे आता खेळतो कौतुके l झाले तुझे सुख अंतर्बाही ll मी काय तुम्हाला टॅग केलेलं का माझ्या प्रतिसादात, का अक्षता पाठवलेल्या माझ्या प्रतिसादावर तुम्ही प्रतिसाद द्यायला या म्हणून =)))) मी आपला विनोदी प्रतिसाद दिलेला होता. पण आता तुम्हाला विनोदातही जात दिसायला लागली त्याला मी काय करू =)))) बाकी तुम्हाला जाणवत नसेल पण तुम्ही ज्याप्रकारे मते मांडता की समाजात कायम शोषक शोषित अशी विभागणी असणार , आर्थिक विषमता असणार, संघर्ष केला पाहिजे वगैरे वगैरे ही साम्यवादी मांडणीच आहे . जे तुमच्यात अंतर्बाह्य आहे ते मला तुम्हाला चिकटवायची गरज नाही. असो. चालू द्या तुमचं. बालपण देगा देवा l मुंगी साखरेचा रवा l ऐरावत रत्न थोर l तया अंकुशाचा मार ll अथक प्रयत्नांनी परत मिळवलं आहे हे बालपण आम्ही. आमचं आम्ही बालोद्यानात खेळत राहतो मजेत . राम

In reply to by प्रसाद गोडबोले

स्वधर्म Sat, 03/15/2025 - 20:03
>> मी आपला विनोदी प्रतिसाद दिलेला होता. पण आता तुम्हाला विनोदातही जात दिसायला लागली. जात मला नाही, तुंम्ही टर उडवण्यासाठी जो उतारा वापरला, त्या पुस्तकातच होती. अगदी स्पष्टपणे! मी फक्त ती नीट संदर्भासहित दाखवून दिली. ती मी चर्चेत आणली असा खोटा कांगावा नका करू. >> कोकणात रेल्वेयेण्याचा आणि थोट्या पांडूला हात फुटण्याचा काही तरी संबंध आहे का? इथे एक उलटा प्रश्न विचारावासा वाटतो. थोट्या पांडूला हात फुटणार नसेल तर कोकणात रेल्वे आणणं रहित करायचं का? स्वराज्यात हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ होणार नाही म्हणून इंग्रजांना परत बोलवायचं का? याला उत्तर न देता पळ काढला आणि अंगावर शेकतंय म्हटलं की दुसर्‍यांवर जातीवाचक आरोप करायचे! भले शाब्बास!!

In reply to by स्वधर्म

कंटाळा आला ह्या भंपकपणाचा =))))
जात मला नाही, तुंम्ही टर उडवण्यासाठी जो उतारा वापरला, त्या पुस्तकातच होती
आम्हातरी कधीही जात दिसली नाही पुलंच्या लेखनात . महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांनाही दिसलेली नाही, अजुन कोणी पुलंच्या पुस्तकाचे दहन बिहन केल्याचे ऐकिवात नाही. तुम्हाला जात दिसली हा तुमचा प्रॉब्लेम आहे , पुलंचा नाही अन माझाही नाही ! बाष्कळ प्रश्नांना काय उत्तरे देत बसणार ? मुळ मुद्दा हा होता की ही समाजवादी विचारसरणी भंपक आहे , समाजात वर खाली , डावे उजवे , श्रीमंत गरीब, हे भेद होतेच अन राहणारच , तुम्ही जाणुन बुजुन ओढुन ताणुन ते मिटवायचा प्रयत्न केला म्हणुन ते मिटणार नाही , त्याचे फक्त रुप पालटेल. थोटा पांडु, तिरळा हरी साठ्या , हे स्वातंत्र्यात होते , पारतंत्र्यात होते , इंग्रज अन कोण कोकणा रेल्वे अन स्वातंत्र्य प्रगती बिगती बगैरे कितीही झाले तरी हे भेदाभेद राहणारच आहेत . पण म्हणुन ह्या भेदांचे भांडवल करुन सामयवादी शोषक विरुध्द शोशित असा कायमचा संघर्ष जो तुम्ही मांडत आहात तो मात्र तद्दन निरर्थक आहे. अन काय बोलता , पळ काढणे =)))) अंगावर शेकणे =)))) तुमच्या इन जनरल विचारसरणीतील भंपकपणाचा कंटाळा आल्याने उत्तर द्यायची इच्छा नाही. मी कधीही जातिवाचक बोलत नाही कारण मी जाती मानतच नाही . माझ्या लेखी फक्त गट आहेत , जाती नाहीत ! जातीचा उल्लेख तुम्ही केला आहे ह्या प्रतिसादात नामु च्या निमित्ताने "https://www.misalpav.com/comment/1190789#comment-1190789" मी तसा उल्लेख केलेला नाही . चुकुनही कधी केलेला नाही . आता बास =)))) धुळवड पुरे . माझं काही तुम्हाला पटणारं नाहीये, अन तुमचं काही मला पटाणारं नाहीये , मग कशाला उगाच कळफलक बडवत बसा =)))) संघर्ष करा ! संघर्षच करत रहा !

In reply to by स्वधर्म

Bhakti गुरुवार, 03/13/2025 - 10:56
बाकी खुप चांगलं लिहलंय.. पण हे खाली लिहिलेलं टाळू शकला असता तर बरं वाटलं असतं.
शेवटी आलाच 'मला सगळं कळतं. त्यांना काहीच कळत नाही' यावर. कुठून येतो हा आत्मविश्वास? तो येतो जिथे तुंम्ही जन्माला आला त्या सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमीतून. माणसाला जे दिसतं, जाणवतं (किंवा दिसत नाही, जाणवतं नाही) ते त्याच्या या स्थानामुळेच.
ते प्रगो याला संस्कार नाव देतात आणि तुम्ही सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी म्हणताय!मला हेच कळत दोन्ही कडचे लोकं जन्मावरच का घसरतात.खेदकारक!

In reply to by Bhakti

प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/13/2025 - 12:38
ते प्रगो याला संस्कार नाव देतात आणि तुम्ही सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी म्हणताय!मला हेच कळत दोन्ही कडचे लोकं जन्मावरच का घसरतात.
कारण ती वस्तुस्थिती आहे म्हणुन ! ह्यात खेदकारक असं काहीच नाही . एखादा व्यक्ती एखाद्या विशिष्ठ कुटुंबातच का जन्म घेत असावा ? कोणी श्रीमंत कोणी गरीब, कोणी सेलिब्रिटी कोणी भिकारी, कोणी शुद्र कोणी ब्राह्मण, कोणी सुसंकृत कोणी संस्कृती विध्वंसक , कोणी आहे रे , कोणी नाही रे . असं का असावं ? ह्याला व्यवस्थित रितसर तत्वज्ञानाच्या दृष्टीने, अध्यात्मिक उत्तर आहे. आणि पुढे जाऊन तुम्ही ज्या परिस्थितीत जन्माला आलात त्या परिस्थितीतच राहाता असेही नाही , तुम्ही तुमच्या कर्माने तुम्हाला पाहिजे तसे बदल घडवताच ! आमच्या स्टॅटिस्टिक्स मध्ये आम्ही जी लिनियर मॉडेल्स बनवतो त्यानुसार बोलायचे झाले तर तुमची सद्य स्थिती = तुमची प्रारब्ध्द कर्मे + संचित कर्मे + क्रियामाण कर्मे + ईश्वरेच्छा अशी समष्ठी असते ! जे संचित आहे ते संचित आहे ! तुम्ही तुमच्या क्रियामाण कर्माने ते ओव्हर राईड करु शकताच ! त्या कामवाल्या बाईंची मुलगी ने कष्ट केले तर तेही उच्च पदस्थ होऊ शकतेच ! (आणि एखाद्या उच्च स्थितीतील व्यक्तीने कर्मे केले नाही तर तो देशोधडीला लागु शकतोच . एकीकडे मुकेस भाई पोरांच्या लग्नांवर अब्जावधी रुपये खर्च करत असताना , त्यांचा सख्खा भाऊ , की ज्याला वडीलोपार्जित इस्टेटीत जास्त माल मिळाला होता , तो अनिल भाई अक्षरशः भिकारी होण्याच्या मार्गावर आहे !) ह्यात काहीही खेदजनक नाही. ज्याक्षणी तुम्हाला ह्या सर्व मॅट्रिक्स चे टर्निंग गेयर्स लक्षात येतात , जेव्हा ह्या मॅट्रिक्स चे अनादी अनंत अस्तित्व लक्षात येते तेव्हा तुम्हाला खेद वगैरे काहीही वाटायचेच बंद होते . त्यानंतर all you can do after that is to appreciate how exquisitely beautifully its designed ! असो हा स्वतंत्र लेखाचा विषय असल्याने इथे जास्त लिहित नाही !

In reply to by Bhakti

स्वधर्म Sat, 03/15/2025 - 19:44
तुमच्यासारख्या संवेदनशील व्यक्तीला जन्मावर माणसाचं भवितव्य ठरू नये, असं वाटणं सहाजिक आहे. पण तुंम्हा आंम्हाला काहीही वाटो, जन्मावर बरंच काही ठरतं ही वस्तुस्थिती आहेच. आपल्याला मिळणारी आर्थिक सामाजिक परिस्थिती जन्मावरच अवलंबून नाही का? माणसाला वाढीच्या वयात येणारे अनुभव त्याच्या आर्थिक सामाजिक व भौगोलिक परिस्थितीनुसारच ठरणार. आणि मग पुढे त्याच्या धारणा, मते, दृष्टिकोन हे आजूबाजूला जे मिळतं (शिक्षण, वाचन, संगत इ.) त्यावर ठरणार. ज्याची समज वाढलेली आहे, फक्त त्यालाच या अदृष्य पिंजर्‍याच्या पलीकडे काही दुसरे दृष्टीकोन आहेत हे कळणार. मान्य करणे ही अधिक पुढची पायरी झाली. कोणी कुठे जन्म घ्यावा, हे काही त्या व्यक्तीच्या हातात नाही. कदाचित समाजात संपूर्ण समता (संधी, शिक्षण, व्यवसाय) असणे हि अत्यंत आदर्श अवस्था कधीच येऊ शकणार नाही. पण जगभरातली सरकारे, जी लोककल्याणकारी आहेत त्यांनी हे केले आहे व परिणामतः त्यांच्याकडे विषमता कमी होऊन जीवनाचा दर्जा सुधारलेला आहे, हे तर स्पष्ट आहे. कोण कुठे जन्माला आला याला काही भ्रामक अध्यात्मिक कार्यकारणभाव चिकटवणे व म्हणून समाजात समता असणे याची टर उडवणे, हे मात्र समर्थनीय नाही.

In reply to by स्वधर्म

कर्नलतपस्वी गुरुवार, 03/13/2025 - 11:38
असे माझे मत आहे. विषमता आहे म्हणून स्पर्धा आहे. स्पर्धा आहे म्हणून विकास/प्रगती आहे. विषमतेवर कसा विजय मिळवायचा किंवा आहे त्या परिस्थितीत खुश रहायचं किंवा रडत बसायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. जगात अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर कुरघोडी करून अविश्वसनीय असा बदल घडवून आणला. माझ्याच समोरचे एक उदाहरण. छोटे कुटुंब, आई,वडील एक मुलगा ,मुलगी. आई क्षयरोगी अतिंम टप्प्यात. वडिल नालायक, लंब्या,लंब्या फेकणारे. मुलांच्या जीवावर बांडगुळ म्हणावे लागेल.अर्थिक परिस्थिती हलाखीची. मुलगा स्टॅन्ड वर भाजभाजलेल्या शेंगा विकायचा तर मुलगी लोकांची धुणी भांडी. आई वारली,वडिलांनी दुसरे लग्न केले,मुलांना वाऱ्यावर सोडले. भावंडानी एकमेला आधार दिला. शिक्षण पुढे चालू ठेवले. गावातच काॅलेज असल्याने फारसा खर्च नव्हता. घरभाडे माफक व मुलांची धडपड बघून गल्लीतील लोंकानी शक्य होईल तशी मदत दिली. पुढे मुलगी बि एड,एम एड झाली आज गावातच प्रथितयश ट्युशन्स संस्थेची मालकीण तर मुलगा पुढे बि काॅम,सी ए झाला व स्वताची फर्म टाकली आहे. असो,मुळ विषय साधा सरळ होता. घरातील नोकरांना माणुसकीची वागणूक आणी योग्य मेहेनताना देण्याबाबत. त्याला इतर देशातील परिस्थितीशी तुलना करत भारतीय समाजिक विषमता कशी समाज वाद विरोधी आहे हा मुद्दा उपस्थित करून विषयांतर केले जात आहे. सामाजीक विषमतेला अनेक कारणे आहेत परंतू विषयांतर होईल म्हणून टाळून एवढेच म्हणतो की आपल्या बरोबर जे गरीब आपल्यासाठी काम करतात त्यांना य्योग्य वागणूक व सद्यपरिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करावी. माझ्या पत्नीला घरकामात मदत करण्यासाठी एकच कामवाली बाई गेले तेरा वर्ष नोकरीत आहे.थोडीफार शिक्षण झालेली,अकुशल. नवरा अशीच छोटी मोठी कामे करतो. दोन मुलं नुकतीच दहावी बारावी झालीत. वेळोवेळी जाहीर झालेल्या सरकारी योजनांचा कसा लाभ घ्यायचा हे माझ्या पत्नीने तीला मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री आवास योजनेचा फार्म भरायला लावला. आज तीचे स्वताचे घर झाले आहे. तीनचार अन्य घरात काम करते म्हणून हप्त्यात वाॅशिंग मशीन घेऊन दिले कारण तीच्या घरातील कपडे धुण्याचे श्रम आणी वेळ वाचावा, पिठ दळण्याची विजेची चक्की घ्यायला लावली. आता मुले फावल्या वेळात आसपास च्या घरातील दळणे दळून देतात व अतिरिक्त अर्थार्जन करतात. घर महिलेच्या नावावर असल्याने नवर्‍याची दादागिरी कमी झाली आहे. सरकारच्या लाडक्या बहिणाबाई म्हणून महिना भाऊबीज चालू झाली आहे. अर्थिक परिस्थितीत सुधार होतोय. आता मुलांवर अवलंबून आहे की ते आपल्या आईच्या कष्टाचे कसे परिमार्जन करतात. तर माईसाहेबांनी मांडलेला मुद्दा उचलून धरत एवढेच म्हणेन, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. लहान मोठे,गरीब श्रीमंत हा भेद यावत्चंद्रदिवाकरौ रहाणारच आहे.

In reply to by कर्नलतपस्वी

प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/13/2025 - 12:44
यावत्चंद्रदिवाकरौ
तत्वज्ञान असं आहे की दिवाकराचे अर्थात सुर्याचं चंद्रापेक्षा मोठ्ठं असणे, जास्त तेजस्वी असणं , स्वयं प्रकाशमान असणं , दाहकारक असणं हेही विषमतेचे प्रतिक आहे , अन्याय आहे वगैरे वगैरे . =))))

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म Fri, 03/14/2025 - 17:06
विषमता हा निसर्गाचा मूळ गुणधर्म आहे, हे निसर्गव्यवहारात ठीक. निसर्गव्यवहारात जंगलातील बलवान प्राणी दुर्बल प्राण्यांना खाणारच. मानवी व्यवहारात असं चालेल काय? पूर्वी असेच होते, राजाला सर्वाधिकार होते. मनात येईल त्याला शिक्षा करण्याचा अधिकार होता. का बरं हे बदललं असावं? मानवी व्यवहारात सामाजिक आर्थिक विषमता टिकवायची का? मानवी व्यवहारात समता (समानता नव्हे) आणण्याचे प्रयत्न कोणत्याही कल्याणकारी राज्याकडून केले जातात. ते थांबवावे का?

In reply to by स्वधर्म

कर्नलतपस्वी Fri, 03/14/2025 - 19:57
कशी मिटवणार? एकाच आई-वडीलांची चार मुले. समान संधी णण एक भरपूर शिकतो डाॅक्टर इंजिनियर होतो. एक शिक्षणात सुमार काहीतरी धंदा काढतो,एक उनाड,मवालीगीरी करतो आता यात समता कुठुन येणार.. प्रत्येक घरात अशी उदाहरणे मिळतील. धंदेवाला खुप पैसा कमवतो तर शिक्षित सन्मान पुर्वक जिवन यापन करतो तर एक गुंडगीरी करून ..... अर्थात काहीही होऊ शकते. गुंडा भरपूर पैसे कमवतो तर धंद्यात नुकसान झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलतो वगैरे,वगैरे....

In reply to by कर्नलतपस्वी

स्वधर्म Sat, 03/15/2025 - 19:53
तुमची गल्लत होते आहे. अंतीम अवस्था (इंजिनिअर की मवाली इ.) समान असणे म्हणजे समता नव्हे. ते कधीही होऊ शकणार नाही, हे स्पष्टच आहे. सर्वांना जास्तीत जास्त समान संधी, शिक्षण, सन्मान, उपभोगाचे, साधनसंपत्तीवरचे अधिकार मिळणे ही समता.

वामन देशमुख Tue, 03/11/2025 - 12:02
आजी, नेहमीप्रमाणे हा लेखही प्रामाणिक निवेदन-मांडणीमुळे आवडला. माझ्या मते, "मदतनीस" वा इतर कुणीही आपल्याकडे - घरी किंवा ऑफिसात काम करणे आणि आपण त्याचा मोबदला देणे हा एक शुद्ध व्यवहार असतो. त्यात चांगले-वाईट असे काही नसते. त्यांच्या वेळेपेक्षा आपला वेळ अधिक किंमतीचा असतो आणि आपण आपल्याला परवडेल तितके पैसे देऊन तो वेळ विकत घेतो. या व्यवहारात दोघांचाही फायदा असतो. फायदा दिसत नसेल तर व्यवहारात कुणी उतरत नाही, टिकून राहत नाही. यात श्रीमंत, गरीब असाही काही भाग नाही. ज्यांना तसे वाटते त्यांना शुभेच्छा. प्रत्येकच जण कुणापेक्षा तरी श्रीमंत आणि इतर कुणापेक्षा गरीब असतो. वाजवी किंमतीत जमेल तेवढा इतरांना रोजगार देणे हीच खरी मानवता / माणुसकी असे मला वाटते. ठरलेल्या पगारापेक्षा अधिक पैसे देणे किंवा ठरल्यापेक्षा अधिक काम करणे हा त्या त्या व्यक्तींच्या चांगुलपणाचा भाग आहे.

सुबोध खरे Wed, 03/12/2025 - 19:53
मागणी आणि पुरवठा हे तत्व जगभर सर्वत्र काम करताना दिसते. त्यातून सर्वजण एकाच पातळीवर जन्माला येतात आणि परिस्थितीप्रमाणे त्यांचा उद्धार होतो किंवा नाही हे समाजवादी तत्व चूक आहे हे अनेक पातळ्यांवर सिद्ध झालेलं आहे. आमचे वडील नेसत्या वस्त्रानिशी १९५४ मध्ये मुंबईत आले. माटुंग्याच्या रेल्वे वर्क शॉप मध्ये सहाय्यक(अँप्रेन्टिस) म्हणून चिकटले. उरलेल्या वेळात स्टेनोग्राफी आणि टायपिंग शिकले तेथे कामगार म्हणून नोकरी मिळाली नाही. मग औषध कंपनीत टायपिस्ट म्हणून नोकरीस लागले. लग्न आणि मुले झाल्यावरही नोकरी सांभाळून बी ए केले, एल एल बी केले नंतर जमनालाल बजाज सारख्या संस्थेत डी बी एम केले. चतुर्थ श्रेणीतून चढत चढत प्रथम श्रेणीत पोहोचले. वडिलांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आमच्या आईने शिक्षण चालू केले. तिने पण बी ए , एम ए आणि बी एड केले. आम्ही कॉलेजात जाईपर्यंत आमचे आईवडील शिकत होते. वयाच्या ४३ व्य वर्षी आई परत शाळेत शिक्षिका म्हणून नोकरीस लागली आणि शेवटी ५८ व्य वर्षी मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाली. एके ठिकाणी एका अतिशय खालच्या भाषेत बोलणाऱ्या इसमाला मी या शब्दात सुनावले होते कि जेंव्हा तुमचे वडील आठवड्याच्या अखेरीस "कुठे बसायचे" म्हणून ठरवत असताना आमचे वडील अभ्यास करत होते आणि थोडी थोडकी नव्हे तर लग्नानंतर ९ वर्षे शिकत होते. यानंतर आमच्या आईने ८ वर्षे शिक्षण घेतले. त्यांच्या खांद्यावर उभे राहून मी आणि माझा भाऊ उच्चशिक्षित झालो आणि सुखवस्तू झालो. संधी मिळाली नाही म्हणून रडत बसणारे असंख्य इसम गेली कित्येक वर्षे पाहत आलो आहे. पण जवळून पहिले असताना त्यांना आतूनच आपल्या उद्धाराची आच नाही असे बऱ्याच वेळेस लक्षात आले. अनेक इसमांना मदत करण्याचा प्रयत्न केला असताना फक्त काही लोकांनाच अशी आतून आच असते हे लक्षात आले. बाकी ध्यान फक्त परिस्थितीबद्दल रडारड करायची असते. आपल्या सहाय्यिकेस नमस्कार आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 03/13/2025 - 12:44
मी माझ्या घरी काम करणाऱ्या बाईला कधीच, कामवाली, मोलकरीण, धुणीभांडीवाली, झाडूपोछावाली असं म्हणत नाही. मी त्यांच्या तोंडावर त्यांना त्यांच्या नावाने हाक मारते आणि त्यांच्या मागे त्यांचा उल्लेख माझी मदतनीस, माझी साहाय्यक, माझी असिस्टंट असा करते.
समाजवादी समतावादी मूल्यांमधे जगणार्‍या संवेदनशील माणसांना विषमता हे वास्तव आहे याचे भान त्रास देते. आपण ही यांच्या शोषणाचा घटक आहोत या जाणीव होते मग तो अपराधगंड दूर करण्यासाठी ते विशेषणेच बदलतात. अपंगांना दिव्यांग म्हणणॆ, बलात्कार पीडीतेला निर्भया म्हणणे, मानसिक रुग्णांना शुभार्थी म्हणणॆ, कोरडवाहू शेतकर्‍याला बळीराजा म्हणणे वगैरे..

कर्नलतपस्वी गुरुवार, 03/13/2025 - 15:05
काम हवे असणारा व काम देणारा असे दोन घटक आहेत. ज्याला जसे परवडते तसे तो स्विकारत असतो. परदेशातही पाळणाघरे आहेत. कामवाल्या बायका आहेत. माळी आहेत. तीथे ज्यांना परवडते ते हायर करतात. पाळणाघरासाठी वयोमानानुसार दर आकारण्यात येतो. चार वर्षाचा नातू आहे काही शे डाॅलरा (म्हणजे जवळपास एखाद लाख) दरमहा द्यावे लागतात. विकसित देशामधे सुद्धा विषमता आहे. आता तिकडच्या कामवालीला ताशी शंभर रुपये जरी मिळत असले तरी ती कामवालीच असते. झाडू, पोचा,बर्तन,लाॅण्ड्री सारखी कामे यंत्रांने सहज बिनबोभाट होतात. बहुतेक फ्लोरिंग कार्पेटेड असल्याने व घरात सेंट्रल ए सी असल्याने धुळ नसतेच. रोबोट प्रशीक्षीत केला की मग नंतर तो बिघडे पर्यंत चुपचाप काम करतो. पगार मागत नाही,संप करत नाही,मोर्चे काढत नाही,काम सोडून जात नाही. इतर यंत्रांचे पण असेच असते. सर्वसाधारण पणे ही यंत्रे पाच वर्षांत करता बनलेली आणतात. त्यानंतर फेकून देतात व नवीन आणतात. आवारातील झाडे कापणे,लाॅन ड्रेसिंग करणे यासाठी सुद्धा स्वयंचलित यंत्रे उपलब्ध आहेत. मनुष्यबळ कमी व महागडे तर सहायक यंत्रे तुलनेत स्वस्त व अधीक फायदेशीर. त्यामुळे सर्वसामान्य (विकसीत देशातील) नागरीक सहायक मनुष्यबळाचा मागे न जाता यंत्रे वापरतात. हे माझे बारा महिन्यांच्या वास्तव्यातील निरीक्षण आहे.

कर्नलतपस्वी गुरुवार, 03/13/2025 - 15:11
कधीकाळी महान शास्त्रज्ञ,प्रेसिडेंट भारतरत्न पुरस्कृत महामानवाने सुद्धा वर्तमानपत्रे विकली आहेत असे ऐकले आहे. कुठलेही काम लहान मोठे नसते ते फक्त एका साठी अर्थार्जन तर दुसऱ्या साठी सोय असते.

प्रसाद गोडबोले गुरुवार, 03/13/2025 - 15:29
कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळं दिसत पण त्याला काविळीचे औषध दिलं की सगळं बरं होऊन नॉर्मल दिसायला लागत. पण ज्यानं पिवळा चष्मा घातला आहे अन् सगळं पिवळं आहे असा बोभाटा करत आहे त्याला काय औषध देणार ? एकदा का जगात "शोषक आणि शोषित " अशी विभागणी बघायची सवय झाली आणि सतत एक गट दुसऱ्या गटावर अन्याय करतोय अन् दुसऱ्या गटाने पेटून उठून क्रांती केली पाहिजे वगैरे वगैरे विचारसरणी झाली की त्याला औषध नाही. साम्यवादी , समाजवादी , एलोन मास्क म्हणतो त्या शब्दात बोलायचं झालं तर Woke mind virus ला औषध नाही. असो. अशी माणसं रामाच्या काळात होती, कृष्णाच्या काळात होती, आपल्याही काळात आहेत. त्यांना " संघर्ष करा, संघर्ष च करत रहा " असे काहीसे सांगितलं गेले आहे ते तसे वागत राहतात. त्यात त्यांचा काय दोष ! आम्ही आपलं कृष्णाने सांगितलं तसं "सर्वत्र समबुद्धय:" व्हायचा प्रयत्न करत राहतो. :)

धर्मराजमुटके Fri, 03/14/2025 - 18:19
आजींच्या साध्याभोळ्या, घरगुती लेखावर जडबंबाळ तात्विक चर्चा करणार्‍या डाव्यांचा आणि उजव्यांचा तीव्र निषेध. आज्जे, तुझे नशीब चांगले हो की तुला चांगल्या कामवाल्या बायका मिळाल्या. आजकाल कामाला माणसे मिळत नाहीत, माणसाला काम मिळत नाही आणि कामाला मिळालेली माणसे काम चांगलं करत नाहीत.

In reply to by धर्मराजमुटके

आजकाल कामाला माणसे मिळत नाहीत, माणसाला काम मिळत नाही आणि कामाला मिळालेली माणसे काम चांगलं करत नाहीत. खिक्क!

विअर्ड विक्स Fri, 03/14/2025 - 19:44
नोकर असो वा हाताखालचे कामगार वा पांढरपेशी, नोकर वर्ग मालकाने माणूस म्हणून वागवले तर काही वेळेस अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळतो वा काही वेळेस नोकर वर्ग डोक्यावर बसतो . यामध्ये दुसरी शक्यता विचारात घेऊन अनेकजण निर्दयी बनण्याचा प्रयत्न करतात याउलट नम्रता व आदर हि कायमच उत्तम परतावा देते, हा माझा अनुभव आहे. बंगालसारख्या डाव्यांच्या वर्चस्व असलेल्या प्रदेशात कामगार कसे काम नि पैसे चोरी करतात हे अनुभवले आहे . याउलट त्यांच्याशी आदराने वागले तर ते बिनदिक्कत पडेल ते काम करतात. या जगात पोटाची गरज भागवण्यासाठी शिक्षित ,अशिक्षित अनेक जण दुय्यम दर्जाची कामे करतात याला इलाज नाही कारण सगळेच काही फुंसुक वंगडु नसतात.

आजी Sat, 03/22/2025 - 09:10
या लेखावर भरभरून प्रतिसाद आला. खूप चांगली चर्चा घडली. आनंद झाला. या निमित्ताने लिहिलेले उत्तर खूपच मोठे झाल्याने नवीन लेखाच्या रुपात प्रकाशित करत आहे. https://www.misalpav.com/node/52806 सर्वांचे आभार..
लेखनप्रकार
मी माझ्या घरी काम करणाऱ्या बाईला कधीच, कामवाली, मोलकरीण, धुणीभांडीवाली, झाडूपोछावाली असं म्हणत नाही. मी त्यांच्या तोंडावर त्यांना त्यांच्या नावाने हाक मारते आणि त्यांच्या मागे त्यांचा उल्लेख माझी मदतनीस, माझी साहाय्यक, माझी असिस्टंट असा करते. माझा मुलगा, सून, नातू हेही त्यांना ताई किंवा बाई, काकू, मावशी अशी त्यांच्या वयाकडे बघून हाक मारतात. त्यांना अहो जाहो करतात. माझ्या एक सांसारिक बाई म्हणून असलेल्या आयुष्यात अनेक मदतनीस आल्या. माझ्या घरी त्या अनेक वर्षे टिकायच्या. माझी बदली होईपर्यंत त्या माझं काम सोडायच्या नाहीत. घरी मी, माझे मिस्टर, मुलगा, सासू सासरे होते.

नववधू प्रिया मी..

सर्वसाक्षी ·

सर्वसाक्षी Sun, 03/09/2025 - 00:37
निघण्यापूर्वी विजाचा आणि स्त्रियांचा निरोप घेतला कृपया विजाचा आणि सरिताचा असे वाचावे. ( स्वयंसुधारणेचा प्रताप)

विजुभाऊ Mon, 03/10/2025 - 11:10
हे अशी मंडळी असतात काही. अगदी कोत्या मनाची. आयुष्यात आलेल्या संधीचा उपयोग करून बरोअब्बर वेळेवर इतराना त्रास द्यायची हौस भागवून घेतात

सौंदाळा Mon, 03/10/2025 - 12:56
काहीतरी भन्नाट वाचायला मिळेल म्हणून उत्सुकता होती पण वहिनीने वाट लावली सगळ्याची. असो लेख छान झालाय. पण समजा ब्लॉकची चावी मिळाली असती तर काय 'सजावट' करायचा विचार होता हे पण सांगून टाका.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

विजुभाऊ Mon, 03/10/2025 - 15:12
साक्षी भाऊ लिहीते झाले ते महत्वाचे. साक्षी भाऊ फोटो चांगले काढतात कॅमेर्याने . आता एखादे फोटो सेशन येऊद्या...... निसर्गाचे

चौथा कोनाडा Mon, 03/17/2025 - 13:00
साक्षीभाऊंनी त्या काळची नवविवाहित जोडप्यांची अस्सल समस्या कुशलतेने मांडलीय. त्या वेळचा पतिपत्नी रोमान्स हा जोडप्याचा रोमान्स नसून कौटुंबिक रोमान्स असायचा .... आहे त्यात जोडप्याने अ‍ॅडजेस्ट करत यातुन एकांत शोधत नातं दृढ करायचं. आम्ही पण यातून तावून सुलाखून गेलोय.. यशस्वी झालोय ! साक्षीभाऊ अश्या कहाण्या येउंद्या आजून !

श्वेता२४ Mon, 03/17/2025 - 15:54
वहीनीची कृती कुचकेपणाची होती यात काही वाद नाही. पण त्यामागे तीला यात पराकोटीची तडजोड करावी लागलेली असणार असे दिसते. स्वताच्या लग्नात दोन्ही भाऊ सोबत राहत नसतानाही नवीन फ्लॅट घ्यायचा 'समजुतदारपणा' दाखविणाऱ्या विजूने दादा-वहीनीच्या प्रायव्हसी बाबत कोणताही समजूतदारपणा भूतकाळात दाखविेलेला दिसत नाही. त्याचाच वचपा वहीनीने काढलेला दिसतो. माझ्या माझ्या एका मित्राने लग्न झाल्यानंतर हनिमूनला जाण्याचे नियोजन केले होते. त्याच्या घरात त्याच्या वहिनीने असाच दंगा केला. त्यांच्या घरात लग्न झाल्यानंतर असे फिरायला जाण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे लग्नानंतर लगेचच त्याच्या मोठ्या भावाला कोणीही फिरायला जाऊ दिले नाही. लग्नानंतर महिन्यांनी त्याचा भाऊ वहिनीला घेऊन तिच्या माहेरी गेला आणि तिथून ते गुपचूप फिरायला गेले होते. त्यामुळे त्याच्या वहिनीने लग्नानंतर माझ्या मित्राने हनिमूनला जाऊ नये असा पवित्रा घेतला. माझा मित्र त्याच्या आई-वडिलांचा अत्यंत लाडका होता. ३-४ वर्षाच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असल्यामुळे आई-वडीलही आता नव्या गोष्टी स्वीकारू लागले होते. त्यामुळे मित्राच्या हनिमूनला त्यांचा विरोध नव्हता. मित्राने हे मला सांगताच मी त्यांला हेच म्हणले की ज्यावेळी तुझ्या भावाच्या हनिमूनची गोष्ट होती त्यावेळी त्या दोघांनी हनिमूनला जावे याबाबत तू काय स्टॅन्ड घेतला होतास? त्यावर तो म्हणाला की मी काहीच बोललो नाही. घरचे सगळेच त्या विरोधात होते. त्यामुळे आई-बाबांना मी कसा विरोध करणार? त्यावर मी त्याला म्हणले तू काही इतका लहान नक्कीच नव्हतास की याबाबत एक भूमिका घेऊ शकशील. तू तुझ्या आई-वडिलांचे मत बदलायला हवे होतेस. कमीत कमी दादा वहिनी च्या बाजूने बोलला असतास तर आज वहिनीने इतका विरोध केला नसता.....

सर्वसाक्षी Sun, 03/09/2025 - 00:37
निघण्यापूर्वी विजाचा आणि स्त्रियांचा निरोप घेतला कृपया विजाचा आणि सरिताचा असे वाचावे. ( स्वयंसुधारणेचा प्रताप)

विजुभाऊ Mon, 03/10/2025 - 11:10
हे अशी मंडळी असतात काही. अगदी कोत्या मनाची. आयुष्यात आलेल्या संधीचा उपयोग करून बरोअब्बर वेळेवर इतराना त्रास द्यायची हौस भागवून घेतात

सौंदाळा Mon, 03/10/2025 - 12:56
काहीतरी भन्नाट वाचायला मिळेल म्हणून उत्सुकता होती पण वहिनीने वाट लावली सगळ्याची. असो लेख छान झालाय. पण समजा ब्लॉकची चावी मिळाली असती तर काय 'सजावट' करायचा विचार होता हे पण सांगून टाका.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

विजुभाऊ Mon, 03/10/2025 - 15:12
साक्षी भाऊ लिहीते झाले ते महत्वाचे. साक्षी भाऊ फोटो चांगले काढतात कॅमेर्याने . आता एखादे फोटो सेशन येऊद्या...... निसर्गाचे

चौथा कोनाडा Mon, 03/17/2025 - 13:00
साक्षीभाऊंनी त्या काळची नवविवाहित जोडप्यांची अस्सल समस्या कुशलतेने मांडलीय. त्या वेळचा पतिपत्नी रोमान्स हा जोडप्याचा रोमान्स नसून कौटुंबिक रोमान्स असायचा .... आहे त्यात जोडप्याने अ‍ॅडजेस्ट करत यातुन एकांत शोधत नातं दृढ करायचं. आम्ही पण यातून तावून सुलाखून गेलोय.. यशस्वी झालोय ! साक्षीभाऊ अश्या कहाण्या येउंद्या आजून !

श्वेता२४ Mon, 03/17/2025 - 15:54
वहीनीची कृती कुचकेपणाची होती यात काही वाद नाही. पण त्यामागे तीला यात पराकोटीची तडजोड करावी लागलेली असणार असे दिसते. स्वताच्या लग्नात दोन्ही भाऊ सोबत राहत नसतानाही नवीन फ्लॅट घ्यायचा 'समजुतदारपणा' दाखविणाऱ्या विजूने दादा-वहीनीच्या प्रायव्हसी बाबत कोणताही समजूतदारपणा भूतकाळात दाखविेलेला दिसत नाही. त्याचाच वचपा वहीनीने काढलेला दिसतो. माझ्या माझ्या एका मित्राने लग्न झाल्यानंतर हनिमूनला जाण्याचे नियोजन केले होते. त्याच्या घरात त्याच्या वहिनीने असाच दंगा केला. त्यांच्या घरात लग्न झाल्यानंतर असे फिरायला जाण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे लग्नानंतर लगेचच त्याच्या मोठ्या भावाला कोणीही फिरायला जाऊ दिले नाही. लग्नानंतर महिन्यांनी त्याचा भाऊ वहिनीला घेऊन तिच्या माहेरी गेला आणि तिथून ते गुपचूप फिरायला गेले होते. त्यामुळे त्याच्या वहिनीने लग्नानंतर माझ्या मित्राने हनिमूनला जाऊ नये असा पवित्रा घेतला. माझा मित्र त्याच्या आई-वडिलांचा अत्यंत लाडका होता. ३-४ वर्षाच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले असल्यामुळे आई-वडीलही आता नव्या गोष्टी स्वीकारू लागले होते. त्यामुळे मित्राच्या हनिमूनला त्यांचा विरोध नव्हता. मित्राने हे मला सांगताच मी त्यांला हेच म्हणले की ज्यावेळी तुझ्या भावाच्या हनिमूनची गोष्ट होती त्यावेळी त्या दोघांनी हनिमूनला जावे याबाबत तू काय स्टॅन्ड घेतला होतास? त्यावर तो म्हणाला की मी काहीच बोललो नाही. घरचे सगळेच त्या विरोधात होते. त्यामुळे आई-बाबांना मी कसा विरोध करणार? त्यावर मी त्याला म्हणले तू काही इतका लहान नक्कीच नव्हतास की याबाबत एक भूमिका घेऊ शकशील. तू तुझ्या आई-वडिलांचे मत बदलायला हवे होतेस. कमीत कमी दादा वहिनी च्या बाजूने बोलला असतास तर आज वहिनीने इतका विरोध केला नसता.....
लेखनप्रकार
साधारण पस्तीस वर्षे झाली असतील या गोष्टीला विजा लग्न ठरल्याची बातमी घेऊन आला. आमच्या मित्रपरिवारामध्ये सर्वात लहान. गेल्या पाचेक वर्षात एकेक करून जवळपास सगळ्यांची लग्न होऊन गेली होती. नेहमी प्रमाणे सर्वांनी मुलगी कोण कुठली काय करते अशी सरबत्ती केली. वर पार्टीची मागणी होतीच. सगळ्यांनाच हुरूप आला, एक नवा कार्यक्रम मिळाला. त्या काळात इव्हेंट मॅनेजमेंट वगैरे सबकुछ मित्र मंडळी सांभाळायची. सर्वांचं एकमेकांच्या घरी जाणं येणं होतं सर्वांचे आईवडील आपल्या मुलांच्या मित्रांना घरचेच समजायचे. लग्न पार पडणं ही सामूहिक जबाबदारी असायची आणि ती हौसेने पार पाडली जायची.

बाजाराचा कल : १० मार्चचा आठवडा

युयुत्सु ·

In reply to by आंद्रे वडापाव

आंद्रे वडापाव Sun, 03/09/2025 - 13:49
दुरुस्ती: 21500 - 19800 ही रेंज ... पुढच्या आठवड्यात येईल असं मला म्हणायचं नाहीये... तरसवत तरसवत नेतील....२-३ महिने तर सहज घेतील....

युयुत्सु Mon, 03/10/2025 - 11:50
शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी काही निर्णायक माहितीची आणि त्यातून मिळणार्‍या आघाडीची ("एज") गरज असते. डेटाची कल्पकतेने मांडणी करून वेगवेगळी कल्पनाचित्रणे (व्हिज्युअलायझेशन) तयार करून अशी निर्णायक आघाडी मिळू शकते. पुढे ओएन्जीसीच्या एका मॉडेलचे ३डी कल्पनाचित्र तुफान खरेदीचा सपाटा दाखवत आहे. अशी सपाटून खरेदी झाली की किंमत पण किंचित भरकटते आणि मग नंतरच्या सत्रात शेअर घसरतो  आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे वेगवेगळे फॅन्सी मॉडेलचे नखरे कशासाठी? तर त्याचे उत्तर असे - वेगवेगळी मॉडेल्स जेव्हा एकच गोष्ट सुचवतात, ते घडायची शक्यता खुप असते.

युयुत्सु Wed, 03/12/2025 - 10:34
मंडळी, कळविण्यास अत्यंत आनंद वाटतो की युयुत्सू-नेट आता "पूर्णत्वास" पोचले आहे! प्रायोगिक चाचण्यांमध्ये ते पैसे कमवण्यात यशस्वी झाले असून त्याची भूतकालीन कामगिरी पुढील आकृतीमध्ये स्पष्ट दिसत आहे. यात फक्त ब्रोकरेज आणि वेगवेगळे कर यांचा विचार केलेला नाही. पुढील आकृतीत तांबडा आलेख भाकीतांनी मिळवलेले पैसे दाखवतो, काळा आलेख प्रत्यक्ष निफ्टीची कामगिरी दाखवतो. आता काळी रेघ वर हवी की खाली यावर काही जण आक्षेप घेऊ शकतात पण भविष्यात युयुत्सुनेट चांगली कामगिरी करेल याची मला खात्री आहे.

In reply to by आंद्रे वडापाव

आंद्रे वडापाव Sun, 03/09/2025 - 13:49
दुरुस्ती: 21500 - 19800 ही रेंज ... पुढच्या आठवड्यात येईल असं मला म्हणायचं नाहीये... तरसवत तरसवत नेतील....२-३ महिने तर सहज घेतील....

युयुत्सु Mon, 03/10/2025 - 11:50
शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी काही निर्णायक माहितीची आणि त्यातून मिळणार्‍या आघाडीची ("एज") गरज असते. डेटाची कल्पकतेने मांडणी करून वेगवेगळी कल्पनाचित्रणे (व्हिज्युअलायझेशन) तयार करून अशी निर्णायक आघाडी मिळू शकते. पुढे ओएन्जीसीच्या एका मॉडेलचे ३डी कल्पनाचित्र तुफान खरेदीचा सपाटा दाखवत आहे. अशी सपाटून खरेदी झाली की किंमत पण किंचित भरकटते आणि मग नंतरच्या सत्रात शेअर घसरतो  आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे वेगवेगळे फॅन्सी मॉडेलचे नखरे कशासाठी? तर त्याचे उत्तर असे - वेगवेगळी मॉडेल्स जेव्हा एकच गोष्ट सुचवतात, ते घडायची शक्यता खुप असते.

युयुत्सु Wed, 03/12/2025 - 10:34
मंडळी, कळविण्यास अत्यंत आनंद वाटतो की युयुत्सू-नेट आता "पूर्णत्वास" पोचले आहे! प्रायोगिक चाचण्यांमध्ये ते पैसे कमवण्यात यशस्वी झाले असून त्याची भूतकालीन कामगिरी पुढील आकृतीमध्ये स्पष्ट दिसत आहे. यात फक्त ब्रोकरेज आणि वेगवेगळे कर यांचा विचार केलेला नाही. पुढील आकृतीत तांबडा आलेख भाकीतांनी मिळवलेले पैसे दाखवतो, काळा आलेख प्रत्यक्ष निफ्टीची कामगिरी दाखवतो. आता काळी रेघ वर हवी की खाली यावर काही जण आक्षेप घेऊ शकतात पण भविष्यात युयुत्सुनेट चांगली कामगिरी करेल याची मला खात्री आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
बाजाराचा कल : १० मार्चचा आठवडा ==================== मागच्या भाकीतात क्लेमास्पेस डायग्रॅममध्ये मार्केट वर जाण्याची शक्यता १००% दाखवली होती, तसेच मार्केट डुबकी मारून स्थिर होईल असे सांगितले होते. त्याप्रमाणे मार्केटने अगोदर तळ गाठला आणि मग उसळी मारली. माझ्या अल्पमती प्रमाणे मार्केटने सध्या तरी तळ गाठला आहे, पण हे माझे वैयक्तिक मत आहे. काही तज्‍ज्ञ अजूनही घसरगुंडीची शक्यता असल्याचे सांगत आहेत. पुढच्या तिमाहीने निराशाजनक आकडे दाखवले तर कदाचित हे शक्य आहे.

द स्टोरीटेलर (सिनेमा)

Bhakti ·

कर्नलतपस्वी Sat, 03/08/2025 - 06:17
गंमत म्हणजे जे काही आकलन‌ ते इथे खरडायची खोड असल्यामुळे ज्या त्या वेळी ते वाचून मी तशीच आहे असा इथे अनेकांचा गैरसमज होतो. असो कधीही टोकाला न जाता सगळ्या विचारसरणीत मी सम्यकता शोधत असते. सहमत आहे. आपण प्रत्येक विषयाची मांडणी अतिशय व्यवस्थित करता त्यामुळेच वाचकांचा असा गैरसमज होणे सहाजिकच आहे. कथानक आवडले .

धर्मराजमुटके Sat, 03/08/2025 - 08:29
छान ओऴख . लेख लिहिताना तो सिनेमा कुठे पाहता येईल हे देखील सांगावे म्हणजे "ढूंढो ढूंढो रे साजना" चे कष्ट कमी होतील :)

कर्नलतपस्वी Mon, 03/10/2025 - 11:36
तसे बघायला गेले तर प्रत्येक कथा एक घटना असते. त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र वेगळा असतो. त्यानुसार पात्रे, स्थान वेळ काळ बदलून नवीन कथा तयार होऊ शकते. म्हणूनच तारीणीबाबू म्हणतात नकल करने के लिए अकल भी तो होनी चाहीये. अप्रतिम मांडणी व सर्व कलाकार आपआपल्या भुमिकेत चपखल बसले आहे. धन्यवाद भक्ती आपल्या मुळे एक छान चित्रपट बघायला मिळाला.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti Mon, 03/10/2025 - 14:18
तसे बघायला गेले तर प्रत्येक कथा एक घटना असते. त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र वेगळा असतो. त्यानुसार पात्रे, स्थान वेळ काळ बदलून नवीन कथा तयार होऊ शकते. म्हणूनच तारीणीबाबू म्हणतात नकल करने के लिए अकल भी तो होनी चाहीये.

कर्नलतपस्वी Sat, 03/08/2025 - 06:17
गंमत म्हणजे जे काही आकलन‌ ते इथे खरडायची खोड असल्यामुळे ज्या त्या वेळी ते वाचून मी तशीच आहे असा इथे अनेकांचा गैरसमज होतो. असो कधीही टोकाला न जाता सगळ्या विचारसरणीत मी सम्यकता शोधत असते. सहमत आहे. आपण प्रत्येक विषयाची मांडणी अतिशय व्यवस्थित करता त्यामुळेच वाचकांचा असा गैरसमज होणे सहाजिकच आहे. कथानक आवडले .

धर्मराजमुटके Sat, 03/08/2025 - 08:29
छान ओऴख . लेख लिहिताना तो सिनेमा कुठे पाहता येईल हे देखील सांगावे म्हणजे "ढूंढो ढूंढो रे साजना" चे कष्ट कमी होतील :)

कर्नलतपस्वी Mon, 03/10/2025 - 11:36
तसे बघायला गेले तर प्रत्येक कथा एक घटना असते. त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र वेगळा असतो. त्यानुसार पात्रे, स्थान वेळ काळ बदलून नवीन कथा तयार होऊ शकते. म्हणूनच तारीणीबाबू म्हणतात नकल करने के लिए अकल भी तो होनी चाहीये. अप्रतिम मांडणी व सर्व कलाकार आपआपल्या भुमिकेत चपखल बसले आहे. धन्यवाद भक्ती आपल्या मुळे एक छान चित्रपट बघायला मिळाला.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti Mon, 03/10/2025 - 14:18
तसे बघायला गेले तर प्रत्येक कथा एक घटना असते. त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र वेगळा असतो. त्यानुसार पात्रे, स्थान वेळ काळ बदलून नवीन कथा तयार होऊ शकते. म्हणूनच तारीणीबाबू म्हणतात नकल करने के लिए अकल भी तो होनी चाहीये.
लेखनविषय:
लेखनप्रकार
कोणतीही गोष्ट अभ्यास करून नाकारायची किंवा स्वीकारायची असा माझा पिंड आहे.मी बरोबरीनेच उजव्या विचारसरणीचा अभ्यास करताना त्यासंबंधी पोस्ट व्हायच्या.डायटविषयी समजून घेतांना वैज्ञानिक पोस्ट असायच्या.भारतीय तत्वज्ञानचा, पाश्चात्य तत्वज्ञान वगैरे वगैरे त्यावेळी तशा..

नको रे मना मत्सरू..(शतशब्दकथा)

अनन्त्_यात्री ·

खेडूत Fri, 03/07/2025 - 21:37
छान! अशी कथा लिहायला जिपट्याला कितीतरी अभ्यास करावा लागेल.

खेडूत Fri, 03/07/2025 - 21:37
छान! अशी कथा लिहायला जिपट्याला कितीतरी अभ्यास करावा लागेल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
षड्रिपुंवरच्या माझ्या पाच शतशब्दकथांना मिळून जितके प्रतिसाद नाहीत त्याहीपेक्षा जास्त प्रतिसाद त्या महामायेच्या एकमेव शशकाला? प्रतिभेची पारखच नाही कुण्णाला उरलेली. काय नाहीये माझ्या पाच शशकांत? माझी "काम" शशक वाचून खजुराहोची मैथुनशिल्पं पेन्शनीत जातील. "क्रोध" वाचून शिवशंभू तृतीयनेत्र गॉगलवतील. "लोभ" वाचून कवडीचुंबकही लंगर उघडेल, "मोह" वाचून भस्मासूर मोहिनीअट्टम विसरेल.

शिवसृष्टी पुणे

आकाश खोत ·

धर्मराजमुटके गुरुवार, 03/06/2025 - 11:37
छान ओळख. एका चांगल्या उपक्रमाची ओळख करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद ! लवकर भेट देण्याचा प्रयत्न करतो.

Bhakti गुरुवार, 03/06/2025 - 12:38
आम्ही दीड वर्षांपूर्वी गेलो होतो,दिवाळीत.तेव्हा नुकतेच सुरू झाले होते,पहिलाच टप्पा पूर्ण झाला होता.मला खुपच आवडले.मी परत जाणार आहे.
वर सांगितलेल्या सर्व गोष्टी बघायला जवळपास ४ तास लागतात. त्यामुळे तशा तयारीने यावे.
हे आम्हाला तेव्हा माहिती नव्हते,व उपहारगृह सुरू झाले नव्हते.त्यामुळे मुलं थोडी चुळबुळ करीत होती पण माहिती इतकी छान मिळत होती की हे पूर्ण पाहूनच जाऊ म्हणाली ;)

कंजूस Fri, 03/07/2025 - 19:05
सुंदर. आहे. चित्रे सुस्पष्ट आली आहेत. पुतळे पाहण्यासाठी सहाशे रुपये फारच वाटतात. ( चरित्र वाचून महाराज अधिक समजतात. ) म्हणून गर्दी नसेल. तिकिट शंभर/पन्नास ठेवल्यास खूप जण येतील आणि खर्च लवकर वसूल होईल. उपहारगृहात पाटी लावावी लागणार नाही.

In reply to by कंजूस

मनो Sat, 03/08/2025 - 08:19
काकांशी सहमत आहे. इतिहास जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर तिकीट कमी असणे आवश्यक आहे. ते जमणार नसेल तर महिन्यातून एक दिवस स्थानिक लोकांना फुकट किंवा माफक दरात प्रवेश द्यावा. दुसरा मार्ग म्हणजे एखादा कॉर्पोरेट किंवा श्रीमंत स्पॉन्सर मिळाला तर त्याच्या नावाने एक दिवस स्पॉन्सर करायचा, त्यावेळी कमी दरात किंवा फुकट प्रवेश देता येईल. त्या मार्गाने तिकीट परवडणारे आणि न परवडणारे या दोघांनाही इतिहास समजून घेता येईल.

In reply to by कंजूस

कंजूस Sat, 03/08/2025 - 12:19
माथेरानमधले शिवसंग्रहालय माथेरानला बरेच पर्यटक येतात आणि शार्लोट लेकला जातात. तिथे वाटेवरच एक लहानसे शिवसंग्रहालय (शिवसृष्टी ) उभारले आहे. तिकीट फक्त दहा रुपये आहे. माथेरानच्या पन्नास रुपयांच्या प्रवेशात कितीतरी करमणूक आहेच त्यात हा एक लाभ. काही पुस्तके विकण्यासाठी ठेवली तर तीही पर्यटक घेतील. https://youtu.be/DIYR3xDY0R8?si=Nhko1tgcd5BEN9RQ (१४:००)

In reply to by कंजूस

आकाश खोत Mon, 03/10/2025 - 15:16
सर, लेख वाचल्याबद्दल धन्यवाद. पण फक्त पुतळे पाहण्यासाठी ५००-६०० रुपये खूप होतात हे वाचुन तुम्ही लेख आणि विभागवार माहिती पूर्ण वाचली का अशी शंका आली.  पूर्ण वाचला असेल किंवा जाऊन आला असाल आणि तरी तुमचं असं मत असेल तर तुमच्या मताचा मी आदर करतो. मी असहमत आहे, आणि त्यामुळे प्रकल्पाच्या बाजूने काही मुद्दे मांडतो:  इथे फक्त जाऊन काही मिनिटात पुतळे शस्त्रे बघुन बाहेर निघण्याचा प्रकार नाही, त्याव्यतिरिक्त किती गोष्टींवर मेहनत घेतलेली आहे, नवीन प्रयोग आहेत, त्यासाठी एवढी सचित्र माहिती लिहिली आहे. अर्थात फक्त फोटोमधुन पूर्ण अंदाज येत नाही आणि सगळ्याचे अथ: ते इति व्हिडीओ काढुन टाकले तर तिथे जायचे प्रयॊजन राहत नाही.  तुम्ही दिलेला माथेरानचा व्हिडीओ पाहिला, आणि त्याठिकाणी १० रुपये तिकीट असलेल्या संग्रहालयाचा भाग पाहिला. त्यात आणि शिवसृष्टीत जमीन अस्मानचा फरक आहे. प्रकल्पाचा आकार, आवाका, विस्तार सर्वच शिवसृष्टीमधे फार मोठे आहे.  माथेरानसारखे संग्रहालय सुद्धा असावेत पण सर्व तसेच आणि तेवढ्याच तिकिटात असावेत असं नाही. एक स्थायी वस्तूंचे संग्रहालय केवळ साफसफाई आणि लाईट्स एवढ्या मोजक्या गोष्टींवर चालु शकते. त्यावर नवा खर्च नसतो.  शिवसृष्टीत प्रत्येक विभागाचे वेगळे विशिष्ट हेतूने बनवलेले प्रेक्षागृह आहे. वेगवेगळ्या तंत्राने बनवलेल्या चित्रफिती आहेत. गुंतवणुक प्रचंड आहे. आणि त्याला प्रतिसाद मिळत राहिला तरच आणखी गुंतवणूक आणि आणखी मोठे प्रयोग इथे आणि इतरत्र होऊ शकतील.  तुमचे चरित्र वाचुन महाराज आणखी समजतात हे मत योग्यच आहे. मी स्वतः बखरी आणि संदर्भग्रंथ वाचले नसले तरी चरित्रात्मक ऐतिहासिक कादंबऱ्या आवडीने वाचल्या आहेत. पण ऐतिहासिक साधने वाचणाऱ्यांपेक्षा कादंबऱ्या वाचणाऱ्यांची संख्या जास्त, कादंबऱ्या वाचणाऱ्यांपेक्षा मालिका चित्रपट बघणाऱ्यांची संख्या जास्त.. असेच असते. आणि अशा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इतिहास पोहोचवण्यासाठी अशा प्रयोगांची गरज असते.  हि चरित्रे कित्येक वर्षांपासुन बाजारात आहेत, तरीही छावा चित्रपट आल्यावर आम्हाला संभाजी महाराजांची एवढी माहितीच नव्हती असे म्हणणारे भरपूर लोक आहेत.  छावा वरून आठवलं.. छावा आणि पुष्पा २ या चित्रपटांचा फक्त महाराष्ट्रातला गल्ला २५० कोटींच्या वर असल्याचं वाचलं. म्हणजेच महागडी तिकिटे घेण्यासाठी खर्च करणारे लोक आपल्याकडे आहेत. :-) पण हाच गल्ला छत्रपती संभाजी महाराजांवर दोन मराठी चित्रपट येऊन गेले त्यांना जमला नाही.  मराठी लोकांनी मराठीत बनवलेला चित्रपट चालला नाही, हिंदी लोकांना हिंदीत घेऊन केला तेव्हा मराठी कलाकार मिळाला नाही का अशी टीका झाली पण चालला तोच. म्हणजे दुसऱ्यांनी येऊन आपल्याला आपला इतिहास दाखवला कि मग आपण प्रतिसाद देतो.  तान्हाजी हा चित्रपट चालला नसता तर छावावर एवढी गुंतवणूक हिंदी मध्ये आली असती का? या दोन्ही चित्रपटांची निर्मितीमूल्ये मराठीपेक्षा सरस आहेत हे खरंच. शेवटी निर्मितीमूल्ये वाढवलं तर अपेक्षा वाढते आणि प्रतिसाद मिळाला तर आणखी गुंतवणूक येते.  त्यामुळे मला वाटतं आपल्या लोकांनी असे महत्वाकांक्षी प्रकल्प केले कि आपण त्याला उचलुन धरलं पाहिजे.  आणखी एक उदाहरण आनंदनगरी आणि इमॅजिका सारख्या थीम अम्युझमेंट पार्कचं. शहरात येणाऱ्या आनंदनगरीमधले खेळ स्वस्त असतात, त्याच प्रकारचे खेळ आणखी मोठ्या प्रमाणावर, आणखी रोमांचक पद्धतीने इमॅजिका मध्ये असतात तिथे तिकीट जास्त असतं. दोन्हीकडे भरपुर प्रतिसाद असतो.  आणखी एक मुद्दा म्हणजे फुकट किंवा स्वस्तात मिळालेल्या गोष्टींची किंमत कमी होते. कमी तिकीट असले तर सगळे विभाग पाहुयात, प्रत्येक फलक वाचूयात अशी इच्छा होत नाही. पण तेच जास्त तिकीट असेल तर आपल्याला तिकिटात मिळणारं सगळं वसुल करायचंय, सगळे खेळ बघायचे आहेत असं वाटतं.  त्यामुळे मला वाटतं सर्व प्रकारच्या गोष्टींची स्पेस आहे. आपला इतिहास फक्त सरकारी अनुदानावर, सरकारी संस्थांवर अवलंबुन नसला पाहिजे. त्याला जिवंत रोमांचक आकर्षक पद्धतीने पुढे पोहोचवण्यासाठी आपण पदरमोड केली पाहिजे. 

In reply to by आकाश खोत

कंजूस Tue, 03/11/2025 - 06:57
विस्तृत प्रतिसाद आणि उत्तर आवडले आहे. पण शेवटी बजेटचा प्रश्न येतोच. आज दहा लोकांनी सहाशे रुपये देऊन प्रवेश घेतला तर आवक झाली सहा हजार रुपये. पन्नास/शंभर रुपये देऊन शंभर प्रेक्षक आले तर आठ दहा हजारांचा गल्ला जमा होईल ना? हा माझा मुद्दा आहे. वाचनालयात इतिहासावर बरीच पुस्तके असतात. ती चाळून आवडलेली विकत घेऊन संग्रही ठेवू शकतो. त्यासाठी सिनेमाचं पाहायला हवा असं नसतं. विविध घटनांवरही पुस्तके असतात. त्यावर वेगवेगळ्या लेखकांची वाचली पाहिजेत. केवळ आपल्याला आवडलेलाच इतिहासाचा आपल्या आवडत्या लेखकाने लिहिलेला भाग वाचून काय होणार? पानिपतचे युद्ध किंवा तिथे झालेल्या तीन लढाया, १८५७ चा उठाव यावरही शाळेत चार ओळीत माहिती घेतली. सावरकरांचे ही पुस्तकं वाचले. पण William Darlymple याचेही the Last Mughal वाचले पाहिजे. पानिपतावर मिपाकर मनो यांनीही वेगळी माहिती त्यांच्या पुस्तकात दिली आहे. इतिहासाचे वाचन सैन्यदळालाही करावे लागते अभ्यासम्हणून. लढाईतील शस्त्रे, बळ, वाहतूक, सैन्याची तयारी आणि क्षमता,व्यूहरचना, इतर राजांची मदत, वातावरण यांचा अभ्यास. राज्याला शत्रू असतात तसे राजाला आंतरिक शत्रूही असतात तेसुद्धा लढाईचा निकाल फिरवतात. हे सर्व पुतळे पाहून कळणार नाही. मुलांच्यामध्ये इतिहासाची गोडी निर्माण करणे, अभ्यासुपणा वाढवणे इकडे लक्ष द्यायला हवे.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा Fri, 03/14/2025 - 14:22
अपला मुद्दा लक्षात आला... माझ्या मते अश्या ठिकाणी जास्त पर्यटक / शिवभक्त यावेत म्हणून नक्कीच प्रवेशदर कमीतकमी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. हाच प्रयत्न शिवसृष्टी वाल्यांनी ही केला असेल अशी आशा करतो. सुरूवातीला तर कमी ठेवायलाच लागतात नाही तर पर्यटक फिरकत नाहीत आणि प्रकल्प बंद पडतात !

चौथा कोनाडा Fri, 03/07/2025 - 20:20
नितांत सुंदर स्थळ दर्शन वृत्तांत.... ...... प्रचि तर सुंदर आहेतच.... .............पण लेखनही अतिशय सुंदर ! कोणालाही या शिवसृष्टीला भेट द्यायची असेल तर हा धागा बघावाच लागेल. धन्यवाद आकाश खोत ! असेच लेखन येत राहू देत

अगम्य Sat, 03/08/2025 - 07:14
अतिशय सुंदर ठिकाण आहे. तिथे इतकं काही असेल आणि इतका वेळ लागेल असं माहित नव्हतं. आम्ही बंद व्हायला दीड तास शिल्लक असताना गेलो होतो. तरी वेळ संपल्यावर सुद्धा तिथल्या लोकांनी आम्हाला आणखी दीड तास सगळं व्यवस्थित दाखवून सांगितलं. काही exhibits अगदी अमेरिकेतल्या थीम पार्क मध्ये असतात तशा होत्या. निर्मितीमूल्ये उच्च आहेत. तिथले माहिती देणारे लोक व्यवस्थित युनिफॉर्म मध्ये असतात आणि त्यांना चांगली माहिती आहे. अतिशय प्रोफेशनल पद्धतीने सर्व दाखवले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुण्यात असूनसुद्धा तिथले माहिती देणारे व्यवस्थित मराठी बोलत होते! इथे जायचं तर चार तास (आणि मध्ये खायचं वगैरे असेल तर त्याचा आणखी वेळ) धरून जायला हवे. ज्यांना आवड आहे, किंवा मुलांना काही वेगळं, माहितीप्रद, स्फूर्तिदायक दाखवायचं आहे त्यांना सहाशे रुपयांना सुद्धा नक्कीच worthwhile आहे. जनरल पब्लिकच्या दृष्टीने सिनेमा नाटकाच्या तिकिटाच्या दरा इतके competitive तिकीट ठेवले तर जास्त लोक येतील.

आकाश खोत Mon, 03/10/2025 - 14:32
सर्व वाचकांचे आभार. प्रतिक्रिया देणाऱ्यांचे आभार. ज्यांनी वाचुन जायचं ठरवलं त्यांचे पुन्हा आभार. तुम्ही जायचं ठरवलंत त्यात या लेखाचा उद्देश सफल झाला. :-)

आकाश खोत Wed, 07/16/2025 - 20:52
शिवसृष्टीला एका संस्थेतर्फे मिळालेल्या भरघोस देणगीमुळे मर्यादित कालावधीसाठी फक्त ५० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. १५ ऑगस्टपर्यंत ही सवलत उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व शिवप्रेमींनी जरूर या प्रकल्पाला भेट द्यावी. या योजनेमुळे प्रचंड गर्दी होत असल्याने थेट जाऊन तिकीट काढण्याऐवजी ऑनलाईन बुक केलेलं बरे अशी माहिती मिळाली आहे. जय शिवराय।

अगम्य Sat, 07/19/2025 - 06:02
संस्थेला भरघोस देणगी मिळाली हे चांगले आहे. पण म्हणून तिकीट एकदम सहाशेवरून पन्नासवर खाली आणणे हे अनाकलनीय आहे. अजिबात गर्दी नसणे हे एक टोक, आणि एका महिन्यातच प्रचंड गर्दी हे दुसरे टोक. आता १५ ऑगस्ट नंतर पुन्हा ओस पडेल. लोकांचा अँकर आता ५० ला सेट झाला आहे. ह्यापुढे आधी कदाचित सहाशे रुपये तिकीट काढून जे गेले असते तेही फेरविचार करतील. त्यापेक्षा तिकीट २००-३०० केले असते (किंवा ५०% फॅमिली डिस्काउंट वगैरे दिला असता) तर खरा रस असणारे, पण सहाशे रुपये जास्त वाटणारे असे कुंपणावरचे बरेच लोक गेले असते. योजना जास्त कालावधीसाठी चालवता आली असती आणि लोकांचा ओघ बऱ्यापैकी मॅनेजेबल गर्दीत बरेच महिने सुरु राहिला असता. त्यांच्या माऊथ पब्लिसिटीमुळे पुढे तिकीट पुन्हा सहाशे केले तरी बऱ्यापैकी लोक येऊ लागले असते. ठिकठिकाणी पुतळे किंवा विद्रुप कमानी उभारण्यावर पैसे खर्च करण्याऐवजी राज्य सरकारने शिवसृष्टीला काही अनुदान देऊन तिकिटांच्या किमती खाली आणल्या तर बरे होईल.

In reply to by अगम्य

मनो Sat, 08/09/2025 - 10:20
+१ गेल्या महिन्यात भारत भेटीत मुलाला आणि बायकोला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रचंड गर्दीमुळे आम्हाला पार्किंगमधूनच परत पाठवण्यात आले. बाहेरचे सुरक्षारक्षकच वैतागलेले होते. दोन-अडीच तास वेटींग आहे आणि त्यानंतर पाच तास लागतील, त्यामुळं लवकर येऊन नंबर लावा, ऑनलाईन बुकिंग चालत नाही अशी माहिती मिळाली. त्यामुळं आमचा लांबूनच रामराम. पुन्हा गर्दी ओसरल्यावर पाहू.

चौथा कोनाडा Sun, 08/10/2025 - 19:55
जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ऑनलाईन तिकिट काढण्यासाठी रोज बसत होतो पण काही प्रयोग (स्लॉट) सोल्ड आऊट दाखवत होते ... आणि काही स्लॉट मोकळे दाखवत होते, पण तिकीट काढले जात नव्हते .. फोन करुन चौकशी केली तर १५ ऑ पर्यन्त सर्व बुक असे सांगत होते .. कदाचित विविध संस्थाना ते दिले असतील असा अंदाज बांधून नाद सोडून दिला. पण अचानक एका ग्रुप मध्ये काही जण कॅन्सल झाल्याने ८ ऑ चे तिकिट मिळून गेले. खुप सुंदर आहे... मजा आली ... ४ तासांची वेळ कमी पडली. शाळांच्या सहली आल्यामुळे गर्दी होती... त्यांच्या गलक्याच्या थोडाफार त्रास झाला. वर्थ पेयींग रु ६०० /- असा भव्य आहे हा प्रकल्प. (तिकिट आणखी कमी करता आले तर प्रचंड प्रतिसाद लाभेल.) आवरजुन पहा... पहायला सांगा. शक्य झाल्यास कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांना नक्क्की दाखवा.

चौथा कोनाडा गुरुवार, 08/14/2025 - 17:59
आता ३१ ऑक्टोबरपर्यंत सवलतीच्या दरात पाहता येणार शिवसृष्टी पुणे : १५ मे पासून मागील तीन महिन्यात शिवसृष्टीला तब्बल दीड लाखांहून अधिक शिवप्रेमींनी भेट दिल्याच्या पार्श्वभूमीवर ही सवलत आणखी वाढवावी या जनभावनेचा आदर करीत पुढील ३१ ऑक्टोबरपर्यंत रुपये ७५ इतक्या नाममात्र दरात नागरिकांना शिवसृष्टी पाहता येणार असल्याची घोषणा आज आयोजित पत्रकार परिषदेत महाराजा शिवछ्त्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त व शिवसृष्टी प्रकल्पाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी केली.

फोटो (१)
भव्य असे भवानी मंदिर


लेखन लेखन लेखन

फोटो (२)
भवानी मंदिर समोर आमचा गट


फोटो (३)
आणखी एक प्रचि


आमच्या शिवसॄष्टी सहलीतील काही प्रचि

धर्मराजमुटके गुरुवार, 03/06/2025 - 11:37
छान ओळख. एका चांगल्या उपक्रमाची ओळख करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद ! लवकर भेट देण्याचा प्रयत्न करतो.

Bhakti गुरुवार, 03/06/2025 - 12:38
आम्ही दीड वर्षांपूर्वी गेलो होतो,दिवाळीत.तेव्हा नुकतेच सुरू झाले होते,पहिलाच टप्पा पूर्ण झाला होता.मला खुपच आवडले.मी परत जाणार आहे.
वर सांगितलेल्या सर्व गोष्टी बघायला जवळपास ४ तास लागतात. त्यामुळे तशा तयारीने यावे.
हे आम्हाला तेव्हा माहिती नव्हते,व उपहारगृह सुरू झाले नव्हते.त्यामुळे मुलं थोडी चुळबुळ करीत होती पण माहिती इतकी छान मिळत होती की हे पूर्ण पाहूनच जाऊ म्हणाली ;)

कंजूस Fri, 03/07/2025 - 19:05
सुंदर. आहे. चित्रे सुस्पष्ट आली आहेत. पुतळे पाहण्यासाठी सहाशे रुपये फारच वाटतात. ( चरित्र वाचून महाराज अधिक समजतात. ) म्हणून गर्दी नसेल. तिकिट शंभर/पन्नास ठेवल्यास खूप जण येतील आणि खर्च लवकर वसूल होईल. उपहारगृहात पाटी लावावी लागणार नाही.

In reply to by कंजूस

मनो Sat, 03/08/2025 - 08:19
काकांशी सहमत आहे. इतिहास जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर तिकीट कमी असणे आवश्यक आहे. ते जमणार नसेल तर महिन्यातून एक दिवस स्थानिक लोकांना फुकट किंवा माफक दरात प्रवेश द्यावा. दुसरा मार्ग म्हणजे एखादा कॉर्पोरेट किंवा श्रीमंत स्पॉन्सर मिळाला तर त्याच्या नावाने एक दिवस स्पॉन्सर करायचा, त्यावेळी कमी दरात किंवा फुकट प्रवेश देता येईल. त्या मार्गाने तिकीट परवडणारे आणि न परवडणारे या दोघांनाही इतिहास समजून घेता येईल.

In reply to by कंजूस

कंजूस Sat, 03/08/2025 - 12:19
माथेरानमधले शिवसंग्रहालय माथेरानला बरेच पर्यटक येतात आणि शार्लोट लेकला जातात. तिथे वाटेवरच एक लहानसे शिवसंग्रहालय (शिवसृष्टी ) उभारले आहे. तिकीट फक्त दहा रुपये आहे. माथेरानच्या पन्नास रुपयांच्या प्रवेशात कितीतरी करमणूक आहेच त्यात हा एक लाभ. काही पुस्तके विकण्यासाठी ठेवली तर तीही पर्यटक घेतील. https://youtu.be/DIYR3xDY0R8?si=Nhko1tgcd5BEN9RQ (१४:००)

In reply to by कंजूस

आकाश खोत Mon, 03/10/2025 - 15:16
सर, लेख वाचल्याबद्दल धन्यवाद. पण फक्त पुतळे पाहण्यासाठी ५००-६०० रुपये खूप होतात हे वाचुन तुम्ही लेख आणि विभागवार माहिती पूर्ण वाचली का अशी शंका आली.  पूर्ण वाचला असेल किंवा जाऊन आला असाल आणि तरी तुमचं असं मत असेल तर तुमच्या मताचा मी आदर करतो. मी असहमत आहे, आणि त्यामुळे प्रकल्पाच्या बाजूने काही मुद्दे मांडतो:  इथे फक्त जाऊन काही मिनिटात पुतळे शस्त्रे बघुन बाहेर निघण्याचा प्रकार नाही, त्याव्यतिरिक्त किती गोष्टींवर मेहनत घेतलेली आहे, नवीन प्रयोग आहेत, त्यासाठी एवढी सचित्र माहिती लिहिली आहे. अर्थात फक्त फोटोमधुन पूर्ण अंदाज येत नाही आणि सगळ्याचे अथ: ते इति व्हिडीओ काढुन टाकले तर तिथे जायचे प्रयॊजन राहत नाही.  तुम्ही दिलेला माथेरानचा व्हिडीओ पाहिला, आणि त्याठिकाणी १० रुपये तिकीट असलेल्या संग्रहालयाचा भाग पाहिला. त्यात आणि शिवसृष्टीत जमीन अस्मानचा फरक आहे. प्रकल्पाचा आकार, आवाका, विस्तार सर्वच शिवसृष्टीमधे फार मोठे आहे.  माथेरानसारखे संग्रहालय सुद्धा असावेत पण सर्व तसेच आणि तेवढ्याच तिकिटात असावेत असं नाही. एक स्थायी वस्तूंचे संग्रहालय केवळ साफसफाई आणि लाईट्स एवढ्या मोजक्या गोष्टींवर चालु शकते. त्यावर नवा खर्च नसतो.  शिवसृष्टीत प्रत्येक विभागाचे वेगळे विशिष्ट हेतूने बनवलेले प्रेक्षागृह आहे. वेगवेगळ्या तंत्राने बनवलेल्या चित्रफिती आहेत. गुंतवणुक प्रचंड आहे. आणि त्याला प्रतिसाद मिळत राहिला तरच आणखी गुंतवणूक आणि आणखी मोठे प्रयोग इथे आणि इतरत्र होऊ शकतील.  तुमचे चरित्र वाचुन महाराज आणखी समजतात हे मत योग्यच आहे. मी स्वतः बखरी आणि संदर्भग्रंथ वाचले नसले तरी चरित्रात्मक ऐतिहासिक कादंबऱ्या आवडीने वाचल्या आहेत. पण ऐतिहासिक साधने वाचणाऱ्यांपेक्षा कादंबऱ्या वाचणाऱ्यांची संख्या जास्त, कादंबऱ्या वाचणाऱ्यांपेक्षा मालिका चित्रपट बघणाऱ्यांची संख्या जास्त.. असेच असते. आणि अशा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इतिहास पोहोचवण्यासाठी अशा प्रयोगांची गरज असते.  हि चरित्रे कित्येक वर्षांपासुन बाजारात आहेत, तरीही छावा चित्रपट आल्यावर आम्हाला संभाजी महाराजांची एवढी माहितीच नव्हती असे म्हणणारे भरपूर लोक आहेत.  छावा वरून आठवलं.. छावा आणि पुष्पा २ या चित्रपटांचा फक्त महाराष्ट्रातला गल्ला २५० कोटींच्या वर असल्याचं वाचलं. म्हणजेच महागडी तिकिटे घेण्यासाठी खर्च करणारे लोक आपल्याकडे आहेत. :-) पण हाच गल्ला छत्रपती संभाजी महाराजांवर दोन मराठी चित्रपट येऊन गेले त्यांना जमला नाही.  मराठी लोकांनी मराठीत बनवलेला चित्रपट चालला नाही, हिंदी लोकांना हिंदीत घेऊन केला तेव्हा मराठी कलाकार मिळाला नाही का अशी टीका झाली पण चालला तोच. म्हणजे दुसऱ्यांनी येऊन आपल्याला आपला इतिहास दाखवला कि मग आपण प्रतिसाद देतो.  तान्हाजी हा चित्रपट चालला नसता तर छावावर एवढी गुंतवणूक हिंदी मध्ये आली असती का? या दोन्ही चित्रपटांची निर्मितीमूल्ये मराठीपेक्षा सरस आहेत हे खरंच. शेवटी निर्मितीमूल्ये वाढवलं तर अपेक्षा वाढते आणि प्रतिसाद मिळाला तर आणखी गुंतवणूक येते.  त्यामुळे मला वाटतं आपल्या लोकांनी असे महत्वाकांक्षी प्रकल्प केले कि आपण त्याला उचलुन धरलं पाहिजे.  आणखी एक उदाहरण आनंदनगरी आणि इमॅजिका सारख्या थीम अम्युझमेंट पार्कचं. शहरात येणाऱ्या आनंदनगरीमधले खेळ स्वस्त असतात, त्याच प्रकारचे खेळ आणखी मोठ्या प्रमाणावर, आणखी रोमांचक पद्धतीने इमॅजिका मध्ये असतात तिथे तिकीट जास्त असतं. दोन्हीकडे भरपुर प्रतिसाद असतो.  आणखी एक मुद्दा म्हणजे फुकट किंवा स्वस्तात मिळालेल्या गोष्टींची किंमत कमी होते. कमी तिकीट असले तर सगळे विभाग पाहुयात, प्रत्येक फलक वाचूयात अशी इच्छा होत नाही. पण तेच जास्त तिकीट असेल तर आपल्याला तिकिटात मिळणारं सगळं वसुल करायचंय, सगळे खेळ बघायचे आहेत असं वाटतं.  त्यामुळे मला वाटतं सर्व प्रकारच्या गोष्टींची स्पेस आहे. आपला इतिहास फक्त सरकारी अनुदानावर, सरकारी संस्थांवर अवलंबुन नसला पाहिजे. त्याला जिवंत रोमांचक आकर्षक पद्धतीने पुढे पोहोचवण्यासाठी आपण पदरमोड केली पाहिजे. 

In reply to by आकाश खोत

कंजूस Tue, 03/11/2025 - 06:57
विस्तृत प्रतिसाद आणि उत्तर आवडले आहे. पण शेवटी बजेटचा प्रश्न येतोच. आज दहा लोकांनी सहाशे रुपये देऊन प्रवेश घेतला तर आवक झाली सहा हजार रुपये. पन्नास/शंभर रुपये देऊन शंभर प्रेक्षक आले तर आठ दहा हजारांचा गल्ला जमा होईल ना? हा माझा मुद्दा आहे. वाचनालयात इतिहासावर बरीच पुस्तके असतात. ती चाळून आवडलेली विकत घेऊन संग्रही ठेवू शकतो. त्यासाठी सिनेमाचं पाहायला हवा असं नसतं. विविध घटनांवरही पुस्तके असतात. त्यावर वेगवेगळ्या लेखकांची वाचली पाहिजेत. केवळ आपल्याला आवडलेलाच इतिहासाचा आपल्या आवडत्या लेखकाने लिहिलेला भाग वाचून काय होणार? पानिपतचे युद्ध किंवा तिथे झालेल्या तीन लढाया, १८५७ चा उठाव यावरही शाळेत चार ओळीत माहिती घेतली. सावरकरांचे ही पुस्तकं वाचले. पण William Darlymple याचेही the Last Mughal वाचले पाहिजे. पानिपतावर मिपाकर मनो यांनीही वेगळी माहिती त्यांच्या पुस्तकात दिली आहे. इतिहासाचे वाचन सैन्यदळालाही करावे लागते अभ्यासम्हणून. लढाईतील शस्त्रे, बळ, वाहतूक, सैन्याची तयारी आणि क्षमता,व्यूहरचना, इतर राजांची मदत, वातावरण यांचा अभ्यास. राज्याला शत्रू असतात तसे राजाला आंतरिक शत्रूही असतात तेसुद्धा लढाईचा निकाल फिरवतात. हे सर्व पुतळे पाहून कळणार नाही. मुलांच्यामध्ये इतिहासाची गोडी निर्माण करणे, अभ्यासुपणा वाढवणे इकडे लक्ष द्यायला हवे.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा Fri, 03/14/2025 - 14:22
अपला मुद्दा लक्षात आला... माझ्या मते अश्या ठिकाणी जास्त पर्यटक / शिवभक्त यावेत म्हणून नक्कीच प्रवेशदर कमीतकमी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. हाच प्रयत्न शिवसृष्टी वाल्यांनी ही केला असेल अशी आशा करतो. सुरूवातीला तर कमी ठेवायलाच लागतात नाही तर पर्यटक फिरकत नाहीत आणि प्रकल्प बंद पडतात !

चौथा कोनाडा Fri, 03/07/2025 - 20:20
नितांत सुंदर स्थळ दर्शन वृत्तांत.... ...... प्रचि तर सुंदर आहेतच.... .............पण लेखनही अतिशय सुंदर ! कोणालाही या शिवसृष्टीला भेट द्यायची असेल तर हा धागा बघावाच लागेल. धन्यवाद आकाश खोत ! असेच लेखन येत राहू देत

अगम्य Sat, 03/08/2025 - 07:14
अतिशय सुंदर ठिकाण आहे. तिथे इतकं काही असेल आणि इतका वेळ लागेल असं माहित नव्हतं. आम्ही बंद व्हायला दीड तास शिल्लक असताना गेलो होतो. तरी वेळ संपल्यावर सुद्धा तिथल्या लोकांनी आम्हाला आणखी दीड तास सगळं व्यवस्थित दाखवून सांगितलं. काही exhibits अगदी अमेरिकेतल्या थीम पार्क मध्ये असतात तशा होत्या. निर्मितीमूल्ये उच्च आहेत. तिथले माहिती देणारे लोक व्यवस्थित युनिफॉर्म मध्ये असतात आणि त्यांना चांगली माहिती आहे. अतिशय प्रोफेशनल पद्धतीने सर्व दाखवले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुण्यात असूनसुद्धा तिथले माहिती देणारे व्यवस्थित मराठी बोलत होते! इथे जायचं तर चार तास (आणि मध्ये खायचं वगैरे असेल तर त्याचा आणखी वेळ) धरून जायला हवे. ज्यांना आवड आहे, किंवा मुलांना काही वेगळं, माहितीप्रद, स्फूर्तिदायक दाखवायचं आहे त्यांना सहाशे रुपयांना सुद्धा नक्कीच worthwhile आहे. जनरल पब्लिकच्या दृष्टीने सिनेमा नाटकाच्या तिकिटाच्या दरा इतके competitive तिकीट ठेवले तर जास्त लोक येतील.

आकाश खोत Mon, 03/10/2025 - 14:32
सर्व वाचकांचे आभार. प्रतिक्रिया देणाऱ्यांचे आभार. ज्यांनी वाचुन जायचं ठरवलं त्यांचे पुन्हा आभार. तुम्ही जायचं ठरवलंत त्यात या लेखाचा उद्देश सफल झाला. :-)

आकाश खोत Wed, 07/16/2025 - 20:52
शिवसृष्टीला एका संस्थेतर्फे मिळालेल्या भरघोस देणगीमुळे मर्यादित कालावधीसाठी फक्त ५० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. १५ ऑगस्टपर्यंत ही सवलत उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व शिवप्रेमींनी जरूर या प्रकल्पाला भेट द्यावी. या योजनेमुळे प्रचंड गर्दी होत असल्याने थेट जाऊन तिकीट काढण्याऐवजी ऑनलाईन बुक केलेलं बरे अशी माहिती मिळाली आहे. जय शिवराय।

अगम्य Sat, 07/19/2025 - 06:02
संस्थेला भरघोस देणगी मिळाली हे चांगले आहे. पण म्हणून तिकीट एकदम सहाशेवरून पन्नासवर खाली आणणे हे अनाकलनीय आहे. अजिबात गर्दी नसणे हे एक टोक, आणि एका महिन्यातच प्रचंड गर्दी हे दुसरे टोक. आता १५ ऑगस्ट नंतर पुन्हा ओस पडेल. लोकांचा अँकर आता ५० ला सेट झाला आहे. ह्यापुढे आधी कदाचित सहाशे रुपये तिकीट काढून जे गेले असते तेही फेरविचार करतील. त्यापेक्षा तिकीट २००-३०० केले असते (किंवा ५०% फॅमिली डिस्काउंट वगैरे दिला असता) तर खरा रस असणारे, पण सहाशे रुपये जास्त वाटणारे असे कुंपणावरचे बरेच लोक गेले असते. योजना जास्त कालावधीसाठी चालवता आली असती आणि लोकांचा ओघ बऱ्यापैकी मॅनेजेबल गर्दीत बरेच महिने सुरु राहिला असता. त्यांच्या माऊथ पब्लिसिटीमुळे पुढे तिकीट पुन्हा सहाशे केले तरी बऱ्यापैकी लोक येऊ लागले असते. ठिकठिकाणी पुतळे किंवा विद्रुप कमानी उभारण्यावर पैसे खर्च करण्याऐवजी राज्य सरकारने शिवसृष्टीला काही अनुदान देऊन तिकिटांच्या किमती खाली आणल्या तर बरे होईल.

In reply to by अगम्य

मनो Sat, 08/09/2025 - 10:20
+१ गेल्या महिन्यात भारत भेटीत मुलाला आणि बायकोला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रचंड गर्दीमुळे आम्हाला पार्किंगमधूनच परत पाठवण्यात आले. बाहेरचे सुरक्षारक्षकच वैतागलेले होते. दोन-अडीच तास वेटींग आहे आणि त्यानंतर पाच तास लागतील, त्यामुळं लवकर येऊन नंबर लावा, ऑनलाईन बुकिंग चालत नाही अशी माहिती मिळाली. त्यामुळं आमचा लांबूनच रामराम. पुन्हा गर्दी ओसरल्यावर पाहू.

चौथा कोनाडा Sun, 08/10/2025 - 19:55
जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ऑनलाईन तिकिट काढण्यासाठी रोज बसत होतो पण काही प्रयोग (स्लॉट) सोल्ड आऊट दाखवत होते ... आणि काही स्लॉट मोकळे दाखवत होते, पण तिकीट काढले जात नव्हते .. फोन करुन चौकशी केली तर १५ ऑ पर्यन्त सर्व बुक असे सांगत होते .. कदाचित विविध संस्थाना ते दिले असतील असा अंदाज बांधून नाद सोडून दिला. पण अचानक एका ग्रुप मध्ये काही जण कॅन्सल झाल्याने ८ ऑ चे तिकिट मिळून गेले. खुप सुंदर आहे... मजा आली ... ४ तासांची वेळ कमी पडली. शाळांच्या सहली आल्यामुळे गर्दी होती... त्यांच्या गलक्याच्या थोडाफार त्रास झाला. वर्थ पेयींग रु ६०० /- असा भव्य आहे हा प्रकल्प. (तिकिट आणखी कमी करता आले तर प्रचंड प्रतिसाद लाभेल.) आवरजुन पहा... पहायला सांगा. शक्य झाल्यास कुटुंबीय आणि मित्रमंडळी यांना नक्क्की दाखवा.

चौथा कोनाडा गुरुवार, 08/14/2025 - 17:59
आता ३१ ऑक्टोबरपर्यंत सवलतीच्या दरात पाहता येणार शिवसृष्टी पुणे : १५ मे पासून मागील तीन महिन्यात शिवसृष्टीला तब्बल दीड लाखांहून अधिक शिवप्रेमींनी भेट दिल्याच्या पार्श्वभूमीवर ही सवलत आणखी वाढवावी या जनभावनेचा आदर करीत पुढील ३१ ऑक्टोबरपर्यंत रुपये ७५ इतक्या नाममात्र दरात नागरिकांना शिवसृष्टी पाहता येणार असल्याची घोषणा आज आयोजित पत्रकार परिषदेत महाराजा शिवछ्त्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त व शिवसृष्टी प्रकल्पाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी केली.

फोटो (१)
भव्य असे भवानी मंदिर


लेखन लेखन लेखन

फोटो (२)
भवानी मंदिर समोर आमचा गट


फोटो (३)
आणखी एक प्रचि


आमच्या शिवसॄष्टी सहलीतील काही प्रचि
लेखनविषय:
लेखनप्रकार
महाशिवरात्रीच्या दिवशी मुलांना शाळेला सुट्टी असल्यामुळे त्यांना कुठे तरी नेऊन आणावं असा विचार आला. कात्रज रोडला असलेल्या शिवसृष्टीची आठवण झाली आणि तिथे जायचं ठरवलं.

राजकुमार, बुटका आणि राक्षस: नवी कहाणी

विवेकपटाईत ·

चित्रगुप्त Wed, 03/05/2025 - 13:33
रशियाचे तुकडे झाले तेंव्हा
-- म्हणजे सोव्हिएत युनियनचे ना ? गेल्या ३- ४ शतकांतला युक्रेन/रशियाचा इतिहास काय आहे तेही या निमित्ताने धागाकर्त्याने अभ्यास करून लिहावे, ही विनंती.

युक्रेन युरोप-अमेरिकेला प्रसन्न करण्यासाठी रशिया विरोधी भूमिका घेत राहिला
युक्रेनच्या दृष्टीने विचार केला तर त्यांनी रशियाविरोधी भूमिका घेणे पूर्णपणे समजता येते. गेल्या काही शतकांच्या इतिहासात युक्रेन फारच कमी काळ स्वतंत्र राहिला होता. कधी रशियन, कधी पोलिश, कधी लिथुएनियन साम्राज्याचा भाग तो राहिला. युक्रेन इतरांना लाख हवा असेल पण युक्रेनच्या लोकांना स्वतंत्र राहायचे असेल तर काय? मग संघर्ष अटळ आहेच. २० व्या शतकात १९२२ मध्ये युक्रेन सोव्हिएट युनियनचा भाग झाल्यानंतर १९३० च्या दशकात स्टालिनने केलेल्या सामुहिक शेतीच्या तुघलकी शेख महंमदी प्रयोगामुळे युक्रेनमध्ये मानवनिर्मित दुष्काळ आला आणि लाखो लोक मारले गेले. स्टालिनच्या अत्याचारांचा वरवंटा युक्रेनमध्ये जोरदार चालला. खरं तर हिटलरने सोव्हिएट युनियनवर हल्ला केला तेव्हा सुरवातीला बर्‍याच ठिकाणी नाझी सैन्याचे मुक्तीदाते म्हणून स्थानिक लोकांनी स्वागत केले होते इतके अत्याचार स्टालिनने केले होते. दुसरे महायुध्द संपल्यावरही सोव्हिएट वरवंटा युक्रेनमध्ये चालू होताच. दुसर्‍या महायुध्दात युक्रेनमध्ये प्रचंड हानी झाली होती. त्यामुळे तिथे पुनर्निमाणासाठी मदत म्हणून रशियन लोक युक्रेनच्या पूर्व भागात वसविले गेले. डॉनबास भागात रशियन लोकांची बहुसंख्या दिसते त्याचे कारण ते आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये रशियाविरोधी वातावरण असेल तर त्यात धक्कादायक असे काहीच नाही. मुळात सोव्हिएट युनियन मध्ये जे १५ प्रदेश होते त्यातील एक बेलारूस वगळता बर्‍याचशा इतर प्रदेशांचे रशियाशी काहीही घेणेदेणे नव्हते. लेनिन आणि त्यापेक्षा मोठ्या स्टालिन या दोन बोक्यांनी ते प्रदेश आपल्या टाचेखाली आणले होते. इस्टोनिया, लाटव्हिया आणि लिथुएनिया या बाल्टिक देशांना आणि मोल्दोवाला स्टालिनने दुसरे महायुध्द संपताना आपल्याकडे ओढून घेतले होते. अशा देशांमध्ये रशियाविरोधी वातावरण असले तर त्यात नवल काय? तेव्हा युक्रेन रशियाविरोधी भूमिका घेत होता हे म्हणणे ठीक आहे पण तशी भूमिका तो का घेत होता हे पण बघायला हवे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

युक्रेन इतरांना लाख हवा असेल पण युक्रेनच्या लोकांना स्वतंत्र राहायचे असेल तर काय?
बरोब्बर. आताही हाच मुद्दा आहे. पुतिन आणी कंपनीचा ईतिहास सर्वाना माहित आहे. फक्त बलाढ्य आहे म्हणुन युक्रेनने शरण जावे असे वाटणे वेडेपणाचे आहे. युक्रेनमधील सरकार अस्थिर करणे, नेत्यांना/सरकारी अधिकार्याना पैसे चारुन व्यवस्था खिळखिळी करणे हे उद्योग पुतिन ह्यांनी अनेक वर्षे आरंभले आहेत. सध्याचे व्हिडियो/अहवाल पाहिलेत तर दिसते की युक्रेनमधील नागरिक मरायलाही तयार आहेत. 'मेलो तेरी बेहत्तर पण रशियाला शरण जायचे नाही' ही तेथील लोकभावना आहे.लोकांना भुकेले ठेउन मारणे, विष घालुन मारणे.. हे प्रकार रशियन सत्ताधार्यांनी अनेक्वेळा केले आहेत व पुतिन ते अनेकवेळा करतात. तेव्हा रशियाला शरण गेलो तर आपली पुढची पिढी पुतिन बरबाद करतील ही भीती नागरिकांना आहे.

आंद्रे वडापाव Wed, 03/05/2025 - 17:04
तुमचे लाडके ट्रम्प तात्या, बघा काय बोलत आहेत, भारताबद्दल ... Donald Trump ने अमेरिकी कांग्रेस को संबोधित करते हुए India, Pakistan पर क्या कहा? (BBC Hindi) #https://www.youtube.com/watch?v=YvHaYiWyCeI

In reply to by आंद्रे वडापाव

'ट्रम्प आमचे ,बायडेन तुमचे' करणार्या काही भारतियांसाठी हा धडा आहे. उद्या एखाद्याची एच.वन.बी व्हिसाची मुदत संपली तर त्याचे हात-पाय नेट्वर्क केबलने बांधुन, गळ्यात लॅपटॉप अडकवुन भारतात पाठवायला ट्रम्प कमी करणार नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

वामन देशमुख Wed, 03/05/2025 - 18:34
'ट्रम्प आमचे ,बायडेन तुमचे' करणार्या काही भारतियांसाठी हा धडा आहे.
"बायडेन आमचे, ट्रम्प तुमचे" करणाऱ्या काही भारतीयांसाठी काय धडा आहे?

In reply to by वामन देशमुख

सध्या तरी बायडेन सरकार परवडले असेच सगळे जग म्हणतय ना?. २०१६-२०२० ह्या कालवधीत जेवढा घातला होता त्याहुन अधिक धिंगाणा ट्रम्प घालेल असे दिसतय. अध्य़क्ष झाल्यापासुन त्यानी डझनावारी खोटी विधाने केली आहेत(बर्नी सँडर्स ह्यांचे भाषण ऐका). 'बिनधास्त फेकायचे कारण झेलायला अनेकजण आहेत.' भविष्यात कळेलच.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

उद्या एखाद्याची एच.वन.बी व्हिसाची मुदत संपली तर त्याचे हात-पाय नेट्वर्क केबलने बांधुन, गळ्यात लॅपटॉप अडकवुन भारतात पाठवायला ट्रम्प कमी करणार नाही.
बरं मग?समजा एच-१ ची मुदत संपली, रिन्युअल होत नसेल आणि तरीही संबंधित मनुष्य अमेरिकेतच राहात असेल तर अशा व्यक्तीविषयी अमेरिका सरकारने काय करावे असे वाटते? एच-१ व्हिसा हा मर्यादित कालावधीसाठी कायदेशीर स्टेटसवर काम करण्यासाठी परदेशी नागरीकांना दिलेला व्हिसा असतो ना? तसा व्हिसा मिळणे हा काय भारतीयांचा जन्मसिध्द अधिकार आहे का? व्हिसाची मुदत संपत असेल तर अशा परदेशी नागरीकांनी आपण होऊन निघून जावे अशी अपेक्षा अमेरिका सरकारची असेल तर त्यात काय चूक आहे? व्हिसाची मुदत संपल्यावरही परदेश सोडून न जाणे हा गुन्हा आहे. अशा गुन्हेगारांना अमेरिका सरकारने का म्हणून सहानुभूती दाखवायची? जाता जाता- मी अमेरिकेत विद्यार्थी म्हणून राहिलो आहे. आणि तिथे भारतीय विद्यार्थी नोकर्‍या मिळवायला कसले एकेक जुगाड करतात हे अगदी जवळून बघितले आहे. आमच्या विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांनी, अगदी माझ्या मित्रांनीही ते जुगाड केले आहेत. असले जुगाड करून देणारे कन्सलटन्ट्स असतात. ते त्या विद्यार्थ्यांना त्यांचा सीव्ही बनवून देतात. त्या विद्यार्थ्यांना आपलाच सीव्ही बघितला तर त्यातील नाव वगळता काहीही परिचयाचे दिसायचे नाही कारण सीव्ही बनविताना ते खोटा अनुभव दाखवतात, एखाद्या क्षेत्रात (समजा जावा) काम करायचा अनुभव शून्य असेल तरी चार वर्षे त्यात काम केले आहे असे सीव्हीवर दाखवतात. असा खोटा अनुभव दाखविताना ज्या ठिकाणी संबंधित विद्यार्थी चांगला आहे असा रेफरन्स देणारे कन्सल्टन्टचे लोक पेरलेले असतात त्याच कंपनीचा अनुभव दाखविला जातो. ते विद्यार्थी ओपीटीवर असताना कन्सलटन्ट त्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच जाळ्यातून पूर्वी गेलेल्यांकडून ट्रेनिंग देतात आणि इंटरव्ह्यू पार पाडता येईल इतके बाळकडू देतात. तो विद्यार्थी कागदावर त्या कन्सलटन्टकडे नोकरीला असतो आणि तो कन्सलटन्ट त्यांना क्लाएंट साईटवर कुठेतरी पाठवतो. क्लाएंटला जितके बिलिंग करतात त्याच्या ५०-६०% रक्कम विद्यार्थ्याला दिली जाते आणि उरलेली तो कन्सलटन्ट स्वतः ठेवतो. त्यावर जॉब सपोर्ट म्हणून आणखी एक प्रकार असतो. एखाद्याने चार वर्षाचा खोटा अनुभव दाखवला तर त्याच्याकडून ज्या पातळीचे काम केले जाईल ही अपेक्षा असेल ती कशी पूर्ण होणार? मग एखादा कठीण प्रश्न आला की फक्त I will get back to you on this tomorrow असे म्हणायचे आणि कन्सलटन्टच्या जॉब सपोर्टवाल्यांना फोन करून त्या प्रश्नाचे उत्तर मिळवायचे आणि दुसर्‍या दिवशी ते द्यायचे. असला सगळा जुगाडू प्रकार चालू असतो. अशातून तरून गेलेले लोक ओपीटीवरून एच-१ वर गेले आहेत. हा सगळा गोलमाल करणार्‍यांचे समर्थन का करायचे? ते भारतीय आहेत म्हणून? आता ट्रम्पतात्यांचे सरकार असले प्रकार करणार्‍या कन्सलटन्ट लोकांवर उठले आहे असे दिसते. https://timesofindia.indiatimes.com/world/us/us-and-world/international-students-who-were-victims-of-opt-fraud-have-more-to-worry-about-must-take-legal-recourse-to-clear-their-name/articleshow/118730845.cms त्यात तात्यांचे काहीही चुकले असे वाटत नाही. असला खोटारडेपणा करून अमेरिकेत राहणारे परदेशी लोक त्यांना नको असतील तर अमेरिकेचे अध्यक्ष या नात्याने त्यांचे नक्की काय चुकले? वरील बातमीत आणखी एक गोष्ट दिली आहे. असले प्रकार करून ओपीटीवरून एच-१ वर पूर्वी गेलेल्या काहींना भारत भेटीनंतर अमेरिकेला परत जाताना विमानतळावरच प्रवेश नाकारला गेला. त्यात तात्यांच्या सरकारचे नक्की काय चुकले? शेवटी चोरी ती चोरीच ना? अशी चोरी पकडली जाईल तेव्हा शिक्षा दिली तर काय चुकले? इतकी वर्षे आम्हाला शिक्षा दिली नाही आणि आता कशी देता असा बचाव चोर करू शकतो? एकूणच तात्या भरपूर रॅश आहेत, आक्रस्ताळे आहेत, मनाला येईल ते वाटेल ते बोलतात वगैरे सगळ्या गोष्टी मान्य. पण ते करत आहेत त्यातील अनेक गोष्टी अमेरिकेच्या (आणि जगाच्याही) हिताच्या आहेत असे दिसते. युएस एडच्या नावाने घाना की बुर्किना फासो मध्ये ट्रान्सजेंडर लोकांच्या ऑपरेशनसाठी पैसे अमेरिकेच्या करदात्यांनी का भरायचे? कोणत्या कोणत्या देशात रेजिम चेंजसाठी, मतदान प्रभावित करायला पैसे अमेरिकेच्या करदात्यांनी का भरायचे?भारतातही एकेकाळी शेतकरी आंदोलनाच्या वेळेस त्या रिकामटेकड्यांना पिझ्झा काय आणि मसाज काय आणि इतर ऐशोरामांची व्यवस्था केली गेली होती. आता अगदी भगवंत माननेही तथाकथित शेतकरी आंदोलकांवर बडगा उगारलेला दिसत आहे. तिकडून येणारा पैसा आटला म्हणून ते होत आहे की नाही मला माहित नाही. बायडन आजोबा अध्यक्ष असताना एखादा माणूस एल.जी.बी.टी. क्यू + आणि आणखी काय काय नसेल तर त्याच्यात काहीतरी खोट आहे असे वाटावे असे वातावरण निर्माण होत आहे की काय असे एखाद्याला वाटावे. असला प्रकार तात्यांच्या काळात बंद केला जात आहे. दुसर्‍या महायुध्दापासून अमेरिकेच्या प्रत्येक अध्यक्षाने इतर अनेक देशात जाऊन काड्या घातल्या आहेत. अगदी गोग्गोड बोलून मोठ्या मोठ्या गप्पा मारणार्‍या ओबामानेही सिरीया आणि लिबियात काड्याच घातल्या होत्या. बायडनने बांगलादेशात काड्या घातल्या होत्या. महंमद युनूसला प्रेसिडेंशिअल मेडल ऑफ फ्रिडम ओबामानेच दिले होते. बहुदा त्याच्या काळापासूनच बांगलादेशात काड्या घालायचा प्रयत्न चालू झाला असावा. जगात जिथेतिथे नाक खुपसायची अमेरिकेची घाणेरडी सवय कमी करून आमचे आम्ही बघतो असे कोणी अध्यक्ष करत असेल तर त्याचे स्वागत करायचे की त्यालाच विरोध करायचा? टॅरीफ वगैरे प्रकरणात तात्या आपल्याला पाहिजे तशी भूमिका घेत नसतीलही. पण कोणीही अमेरिकन अध्यक्ष १००% आपल्याला अनुकूल करेल अशी अपेक्षा कशी करता येईल? बेकायदेशीरपणे घुसलेल्यांना किंवा व्हिसा संपल्यावरही तिथे राहणार्‍यांना ट्रम्पतात्या हाकलत असतील तर त्यात त्यांचे काही चुकले असे मला तरी अजिबात वाटत नाही. बाकी कोणी काहीही म्हणो. मी तर ट्रम्पतात्यांचा या घडीला तरी मोठ्ठा फॅन आहे. त्यातून भविष्यात तात्या दुसरे निक्सन किंवा रेगन झाले तर त्यांना पण विरोधच करू. तशी अमेरिकेच्या अध्यक्षांना विरोध करायची एक भारतीय म्हणून आपल्याला सवयच आहे. ट्रम्पतात्या तसेच वागायला लागले तर त्यांनाही विरोध करू. हाकानाका. तसाही आपण विरोध करून किंवा आपण त्यांचे फॅन असून कोणाला घंटा फरक पडतो? व्हाईट हाऊसच्या प्रांगणातील झाडाचे एक पानही त्यामुळे पडायचे नाही. ट्रम्पतात्या या घडीला माझ्यासारखे तुमच्या बरोबरच.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

"अमेरिका सरकारने काय करावे असे वाटते?" ट्रम्पोजीच्या आक्रस्ताळी स्वभावाबद्दल म्हणत आहे. अमेरिकेने व्हीसा मुदत संपलेल्या लोकांवर उपकार करावेत असे कोणीच म्हणत नाही. असो. कॅनडाच्या जस्टिन ट्रुडोनी अमेरिकेला ऐकवलेच.(https://www.youtube.com/watch?v=wz_42pckM7w&t=159s ) चीनने ही प्रत्युत्तर दिले (https://www.youtube.com/watch?v=RyHbpiOotB8 ) भारतात अजूनही शांतताच पसरली आहे.(कूटनीती इन प्रोग्रेस ?)

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 03/06/2025 - 00:05
ट्रम्पतात्या या घडीला माझ्यासारखे तुमच्या बरोबरच. अहो मी तर तात्यांचा २०१६ पासून फॅन आहे. तात्या म्हणजे काळीज! मला तात्याभक्त म्हटले तरीही चालेल!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

डोनाल्ड ट्रम्पास तात्या म्हंटले की गुजरातमधील जवाहिर्यांच्या/कारगिरांच्या आत्महत्या कमी होणार आहेत का? २ एप्रिलपासुन ट्रम्पाने आयात शुल्क २०% वर नेले की मग आतमह्त्या वाढण्याची शक्यता आहे. https://www.youtube.com/watch?v=KkttlEK_wg8

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अहो माई, तात्यांनी समजा तसे काही केले आणि समजा त्यामुळे गुजरात किंवा इतर ठिकाणच्या ५०-१०० कारागिरांनी आत्महत्या केल्या तर वाईटच. त्याविषयी काहीच दुसरे मत असू शकणार नाही. पण दुसरी बाजू पण लक्षात घे की. अमेरिकेच्या आधीच्या अध्यक्षांनी जगात विविध ठिकाणी किती लाख लोकांना मारले होते? जर तात्या इतर देशांमधील अमेरिकेची नाक खुपसायची घाणेरडी सवय कमी करत असतील तर ते चांगले नाही का?५०-१००-५००-१००० कारागिर मारले जाणे वाईटच पण लाखो लोक मारले जाण्यापेक्षा त्या मानाने कमी वाईट नाही का?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई आपल्या देशात झालेल्या आत्महत्यांना दुसऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष कसा जबाबदार असेल? आपल्या पंतप्रधान जबाबदार असेल ना? आपण कुणाशी संबंध चांगले ठेवले आहेत?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

"डोनाल्ड ट्रम्प माझे मित्र आहेत" असे पंतप्रधानच म्हणत होते ना? भारतावर आयात शुल्क आधीसारखेच असेल असे ह्यांनाही वाटले होते. ट्रम्प ह्यांची निवड झाल्या झाल्या जयशंकर ताबडतोब अमेरिकेला रवाना झाले होते.ट्रम्प भारत्,चीन्,कॅनडा ह्यांना एकाच तराजुत तोलत असतील तर मग ईतके दिवस गप्प राहण्याचा आणी तिकडे जाउन 'चर्चा' करण्याचा फायदा काय झाला?

धर्मराजमुटके Wed, 03/05/2025 - 23:16
रशियाचे तुकडे झाले तेंव्हा युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिण भागात रशियन बोलणारे जास्त होते. त्या वेळी रशियन बोलणारा भाग रशियात विलीन झाला असता तर आज ही समस्या उत्पन्न झाली नसती.
याच न्यायाने भारतातील पंजाब पाकीस्तानात आणि भारतातील बंगाल बांग्लादेशात जायला हवे काय ?

In reply to by धर्मराजमुटके

सुबोध खरे गुरुवार, 03/06/2025 - 09:45
मी उलट म्हणतो, पाकिस्तानी पंजाब आणि बांगला देश भारतात यायला हवा. कारण हे भाग मूळ भारताचे होते. परंतु भारतात फाळणी हि भाषेवरआधारित झालेली नसून धर्मावर आधारित झालेली आहे त्यामुळे हे उदाहरण तसे गैरलागू आहे

विवेकपटाईत Fri, 03/07/2025 - 13:06
अमेरिकेची शत्रुता महागात पडते पण मैत्री विनाशाला कारणीभूत ठरते. अमेरिकेने सुरवातीला शस्त्र मदत दिली नसती तर किमान युक्रेन ने शांततेसाठी रशियाची वाटाघाटी केली असती. https://www.facebook.com/share/v/17TtUzNXxN/

In reply to by विवेकपटाईत

आंद्रे वडापाव Fri, 03/07/2025 - 13:19
व्वा काका , एक तर फेसबुक च्या लिंक देताय ... तुम्हाला एक सुचवणी करू का ? तुम्ही थोडा इतिहास वाचा किंवा जाणून घ्या , या भागाचा ... मग तुम्ही मत व्यक्त कराल का ? तुम्हाला माहिती आहे का अमेरिकेच्याच सांगण्यावरून युक्रेनला आण्विक शस्त्र सोडून द्यावी लागली कारण त्याबदल्यात अमेरिका सुरक्षा छत्र देणार होता ..

In reply to by आंद्रे वडापाव

आंद्रे वडापाव Fri, 03/07/2025 - 13:22
Ukraine once had the world’s 3rd largest nuclear arsenal; but gave up its weapons for this reason Read more at: https://economictimes.indiatimes.com/news/international/us/ukraine-once-had-the-worlds-3rd-largest-nuclear-arsenal-but-gave-up-its-weapons-for-this-reason/articleshow/118765127.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst Ukraine made a significant move in 1994 when it signed the Budapest Memorandum. The United States, the United Kingdom, and Russia were also signatories. Ukraine agreed to remove all its nuclear weapons in return for a guarantee of sovereignty and territorial integrity of the country. The memorandum also provided that these three nations would not attack Ukraine militarily and would request the UN to intervene in case of any threat to the sovereignty of the country. #https://economictimes.indiatimes.com/news/international/us/ukraine-once-had-the-worlds-3rd-largest-nuclear-arsenal-but-gave-up-its-weapons-for-this-reason/articleshow/118765127.cms?from=mdr

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे गुरुवार, 03/13/2025 - 20:08
@आंद्रे वडापाव There were several important reasons that led Ukraine towards nuclear disarmament. First of all, although it had the weapons at its disposal, it was unable to launch them on its own. The launch keys and other controls were left with Moscow, making the weapon system ineffective as a deterrent. आपण दिलेला दुवा आपणच वाचलेला दिसत नाही. युक्रेन कझाखस्तान सारख्या सोव्हिएत युनियनच्या देशांनी आपली अण्वस्त्रे परत केली ते काही सभ्य आणि सुसंस्कृत आहेत म्हणून नव्हे तर त्याचा वापर त्यांना करणे अशक्य होते म्हणून आणि ठेवल्या जागी गंज लागला तर त्यातून होणार किरणोत्सार भीषण असतो. यामुळेच अण्वस्त्रे म्हणजे काही सोने नव्हे कि काही ना करता तिजोरीत ठेवले तर तसेच राहते. त्यांची वेळोवेळी देखभाल करावीच लागते. हे सर्व सव्यापसव्य करणं युक्रेनला अशक्य होतं. बाकी झेलेन्स्की आम्ही शांततेचे दूत असून शांततेसाठी अण्वस्त्रे परत केली असे कधी म्हणाल्याचे आठवत नाही. अण्वस्त्रधारी देशांचे पंतप्रधान किंवा अध्यक्ष आपल्याबरोबर काही हौसेनं ब्रिफ केस घेऊन फिरत नाहीत. त्यात या अण्वस्त्रांची आणि ती धारण केलेल्या क्षेपणास्त्रांची कोड त्यांच्या कडे सुरक्षित असतात. एखादा माथेफिरू लष्करी अधिकारी सहज दुसऱ्या देशावर अण्वस्त्रे डागेल अशी शक्यता शून्य असते. बाकी तुमचं चालू द्या

In reply to by सुबोध खरे

आंद्रे वडापाव गुरुवार, 03/13/2025 - 23:24
कदाचित आपल्याला कल्पना नसेल, अण्वस्त्रां तुलनेत, क्षेपणास्त्र आणि विमान (डिलिव्हरी सिस्टिम) तंत्रज्ञान तुलनेत जास्त सोपे असते. अण्वस्त्रां आणि त्याचे तंत्रज्ञान अवाच्या सव्वा किमतीला हसत हसत खरेदी इच्छुक इराण आणि इराक सारखे जगात खूप आहेत/होते. असो लेख मी पूर्ण वाचूनच प्रतिक्रिया देतो... पण आपणास लेखाचा मुद्दा समजला नाहीये बहुदा.. बाकी चालू द्यात...

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे Wed, 03/19/2025 - 20:14
The launch keys and other controls were left with Moscow, making the weapon system ineffective as a deterrent. हे आपणच दिलेल्या दुव्यात आहे. माझे ज्ञान नाही. अण्वस्त्रे नेणारी क्षेपणास्त्रे तयार करणे आणि ती उत्तम स्थितीत ठेवणे हि आपण म्हणता तशी भाजी आणण्यासारखी बाजारात पैसे टाकून आणण्याची वस्तू नाही. तसे असते तर इराण ने आतापर्यंत इस्रायल वर अणुहल्ला करून त्याचा विध्वंस केला असता. किंवा इंग्लंड सारखा एकेकाळी बलाढ्य असणाऱ्या आणि जगावर राज्य करणाऱ्या देशाने अमेरिकेचे ट्रायडेंट हे क्षेपणास्त्र आपल्या अणुपाणबुड्यांवर ठेवले नसते. ""अण्वस्त्रां तुलनेत, क्षेपणास्त्र आणि विमान (डिलिव्हरी सिस्टिम) तंत्रज्ञान तुलनेत जास्त सोपे असते."" नक्की का? मग भारताचे राजकारणी आणि शास्त्रज्ञ मूर्ख असावेत. कारण भारताने १९७४ मध्ये पहिला अणुस्फोट केला. पृथ्वी हे आपले पहिले क्षेपणास्त्र याचा प्रकल्प १९८३ मध्ये चालू झाला आणि पहिले सफल परीक्षण १९८८ साली झाले. तेजस अणुबॉम्ब नेऊ शकेल का याबद्दल मला माहिती नाही. परंतु अणुबॉम्ब नेण्यासाठी भारत मिराज २०००, जग्वार सुखोई ३० आणि आता राफेल या परदेशी विमानांवर अवलंबून आहे बाकी आपण सर्वज्ञ आहात तेंव्हा यावर मी अधिक बोलू इच्छित नाही

In reply to by आंद्रे वडापाव

विवेकपटाईत Mon, 03/10/2025 - 11:38
मला इतिहास ही माहीत आहे आणि सीआयए कशी काम करते इथल्या सर्वांपेक्षा उत्तम माहीत आहे. कारण मी प्रत्यक्ष काम केलेले आहे. बाकी अमेरिकेने बुटक्याला शस्त्र दिले आणि त्याला राक्षसा विरुद्ध सोडले. हे सर्वांनी प्रत्यक्ष बघितले आहे. अफगाणिस्तान असो वा विएतनाम अमेरिका तेथे अमेरिकेच्या तालावर नाचणार्‍या सत्ताधार्‍यांना वार्‍यावर सोडून अमेरिकेने माघार घेतली होती. हा इतिहास बहुतेक तुम्ही वाचला नसावा. युक्रेनच्या जनतेने अमेरिका आणि युरोप प्रायोजित झेलेंस्कीला निवडले त्याचे परिणाम युक्रेनची जनता भोगणार.

In reply to by विवेकपटाईत

आंद्रे वडापाव Mon, 03/10/2025 - 11:48
सीआयए कशी काम करते इथल्या सर्वांपेक्षा उत्तम माहीत आहे.
अहो काका त्याच्याच मुळे आधी लिहिलय ... भारतामध्ये "जे एन दीक्षित" नंतर... पटाईत काकाच एकमेव फक्त ... जयशंकर तर पटाइटांच्या पासंगालाही पुरणार नाही ... कारण जी काय अक्कल आहे ती आपल्यालाच आहे , असा गंड मला तरी नाही ...

In reply to by आंद्रे वडापाव

विवेकपटाईत Sun, 03/16/2025 - 19:37
मला कसलाही अहंगंड आणि घेऊन न्यूनगंड नाही. फक्त तुमच्या प्रतिक्रियेचे उत्तर दिले. बाकी फक्त एक अजेंडा मनात ठेवून परिस्थितीचे विश्लेषण करणे बंद करा डोळे उघडून सत्य पाहायला शिका.

In reply to by विवेकपटाईत

आंद्रे वडापाव Mon, 03/17/2025 - 09:17
बाकी फक्त एक अजेंडा मनात ठेवून परिस्थितीचे विश्लेषण करणे बंद करा डोळे उघडून सत्य पाहायला शिका.
हेच मी तुम्हाला सान्गत होतो वरती .. पण फक्त अप्रत्यक्श्पणे

यूक्रेनपुढे दोनच पर्याय आहेत! रशियाच्या संगतीने गरीब राहणे किंवा अमेरिका/युरोपच्या नादी लागून रशियाविरोधात जाऊन मरणे! माझ्यामते गरीब राहणे मारण्यापेक्षा चांगले आहे.

आंद्रे वडापाव Mon, 03/10/2025 - 14:36
तुम्हाला इंटरनॅशनल-डंकापती चा -भक्त व्हायचं का? जरूर व्हा. आमचे काही म्हणणे नाही.... पहिली गोष्ट म्हणजे- कसलाही न्यूनगंड बाळगू नका. आणि प्रत्येक बाबतीमध्ये डंकापती सारखे मत व्यक्त करायला शिका. म्हणजे आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्त्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं. विषय कुठलाही असो. म्हणजे आता "युक्रेनची भु राजकीय सामरिक घडी नीट बसवण्याचा खरा मार्ग कोणता?" या विषयावरती, आपण स्वतः शासनात भलेही, उंदीर मारायच्या विभागात नोकरीला होतो, हे विसरून मत ठणकावता आले पाहिजे. युक्रेनची भु राजकीय सामरिक स्थिती - ठोका...

निनाद Sun, 03/23/2025 - 13:31
रशिया-युक्रेन युद्धाच्या पैलूंचे चांगले विश्लेषण. या युद्धामध्ये माहिती युद्धाचे महत्त्व दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही. दोन्ही बाजूंकडून प्रसार माध्यमांचा वापर करून जनतेची मते प्रभावित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि आपण सर्व त्याचे बळी आहोत. विचारप्रवर्तक लेखन आहे. ऐतिहासिक संदर्भ, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि आर्थिक परिणाम यांसारख्या विषयांवर प्रकाश टाकल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन.

चित्रगुप्त Wed, 03/05/2025 - 13:33
रशियाचे तुकडे झाले तेंव्हा
-- म्हणजे सोव्हिएत युनियनचे ना ? गेल्या ३- ४ शतकांतला युक्रेन/रशियाचा इतिहास काय आहे तेही या निमित्ताने धागाकर्त्याने अभ्यास करून लिहावे, ही विनंती.

युक्रेन युरोप-अमेरिकेला प्रसन्न करण्यासाठी रशिया विरोधी भूमिका घेत राहिला
युक्रेनच्या दृष्टीने विचार केला तर त्यांनी रशियाविरोधी भूमिका घेणे पूर्णपणे समजता येते. गेल्या काही शतकांच्या इतिहासात युक्रेन फारच कमी काळ स्वतंत्र राहिला होता. कधी रशियन, कधी पोलिश, कधी लिथुएनियन साम्राज्याचा भाग तो राहिला. युक्रेन इतरांना लाख हवा असेल पण युक्रेनच्या लोकांना स्वतंत्र राहायचे असेल तर काय? मग संघर्ष अटळ आहेच. २० व्या शतकात १९२२ मध्ये युक्रेन सोव्हिएट युनियनचा भाग झाल्यानंतर १९३० च्या दशकात स्टालिनने केलेल्या सामुहिक शेतीच्या तुघलकी शेख महंमदी प्रयोगामुळे युक्रेनमध्ये मानवनिर्मित दुष्काळ आला आणि लाखो लोक मारले गेले. स्टालिनच्या अत्याचारांचा वरवंटा युक्रेनमध्ये जोरदार चालला. खरं तर हिटलरने सोव्हिएट युनियनवर हल्ला केला तेव्हा सुरवातीला बर्‍याच ठिकाणी नाझी सैन्याचे मुक्तीदाते म्हणून स्थानिक लोकांनी स्वागत केले होते इतके अत्याचार स्टालिनने केले होते. दुसरे महायुध्द संपल्यावरही सोव्हिएट वरवंटा युक्रेनमध्ये चालू होताच. दुसर्‍या महायुध्दात युक्रेनमध्ये प्रचंड हानी झाली होती. त्यामुळे तिथे पुनर्निमाणासाठी मदत म्हणून रशियन लोक युक्रेनच्या पूर्व भागात वसविले गेले. डॉनबास भागात रशियन लोकांची बहुसंख्या दिसते त्याचे कारण ते आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये रशियाविरोधी वातावरण असेल तर त्यात धक्कादायक असे काहीच नाही. मुळात सोव्हिएट युनियन मध्ये जे १५ प्रदेश होते त्यातील एक बेलारूस वगळता बर्‍याचशा इतर प्रदेशांचे रशियाशी काहीही घेणेदेणे नव्हते. लेनिन आणि त्यापेक्षा मोठ्या स्टालिन या दोन बोक्यांनी ते प्रदेश आपल्या टाचेखाली आणले होते. इस्टोनिया, लाटव्हिया आणि लिथुएनिया या बाल्टिक देशांना आणि मोल्दोवाला स्टालिनने दुसरे महायुध्द संपताना आपल्याकडे ओढून घेतले होते. अशा देशांमध्ये रशियाविरोधी वातावरण असले तर त्यात नवल काय? तेव्हा युक्रेन रशियाविरोधी भूमिका घेत होता हे म्हणणे ठीक आहे पण तशी भूमिका तो का घेत होता हे पण बघायला हवे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

युक्रेन इतरांना लाख हवा असेल पण युक्रेनच्या लोकांना स्वतंत्र राहायचे असेल तर काय?
बरोब्बर. आताही हाच मुद्दा आहे. पुतिन आणी कंपनीचा ईतिहास सर्वाना माहित आहे. फक्त बलाढ्य आहे म्हणुन युक्रेनने शरण जावे असे वाटणे वेडेपणाचे आहे. युक्रेनमधील सरकार अस्थिर करणे, नेत्यांना/सरकारी अधिकार्याना पैसे चारुन व्यवस्था खिळखिळी करणे हे उद्योग पुतिन ह्यांनी अनेक वर्षे आरंभले आहेत. सध्याचे व्हिडियो/अहवाल पाहिलेत तर दिसते की युक्रेनमधील नागरिक मरायलाही तयार आहेत. 'मेलो तेरी बेहत्तर पण रशियाला शरण जायचे नाही' ही तेथील लोकभावना आहे.लोकांना भुकेले ठेउन मारणे, विष घालुन मारणे.. हे प्रकार रशियन सत्ताधार्यांनी अनेक्वेळा केले आहेत व पुतिन ते अनेकवेळा करतात. तेव्हा रशियाला शरण गेलो तर आपली पुढची पिढी पुतिन बरबाद करतील ही भीती नागरिकांना आहे.

आंद्रे वडापाव Wed, 03/05/2025 - 17:04
तुमचे लाडके ट्रम्प तात्या, बघा काय बोलत आहेत, भारताबद्दल ... Donald Trump ने अमेरिकी कांग्रेस को संबोधित करते हुए India, Pakistan पर क्या कहा? (BBC Hindi) #https://www.youtube.com/watch?v=YvHaYiWyCeI

In reply to by आंद्रे वडापाव

'ट्रम्प आमचे ,बायडेन तुमचे' करणार्या काही भारतियांसाठी हा धडा आहे. उद्या एखाद्याची एच.वन.बी व्हिसाची मुदत संपली तर त्याचे हात-पाय नेट्वर्क केबलने बांधुन, गळ्यात लॅपटॉप अडकवुन भारतात पाठवायला ट्रम्प कमी करणार नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

वामन देशमुख Wed, 03/05/2025 - 18:34
'ट्रम्प आमचे ,बायडेन तुमचे' करणार्या काही भारतियांसाठी हा धडा आहे.
"बायडेन आमचे, ट्रम्प तुमचे" करणाऱ्या काही भारतीयांसाठी काय धडा आहे?

In reply to by वामन देशमुख

सध्या तरी बायडेन सरकार परवडले असेच सगळे जग म्हणतय ना?. २०१६-२०२० ह्या कालवधीत जेवढा घातला होता त्याहुन अधिक धिंगाणा ट्रम्प घालेल असे दिसतय. अध्य़क्ष झाल्यापासुन त्यानी डझनावारी खोटी विधाने केली आहेत(बर्नी सँडर्स ह्यांचे भाषण ऐका). 'बिनधास्त फेकायचे कारण झेलायला अनेकजण आहेत.' भविष्यात कळेलच.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

उद्या एखाद्याची एच.वन.बी व्हिसाची मुदत संपली तर त्याचे हात-पाय नेट्वर्क केबलने बांधुन, गळ्यात लॅपटॉप अडकवुन भारतात पाठवायला ट्रम्प कमी करणार नाही.
बरं मग?समजा एच-१ ची मुदत संपली, रिन्युअल होत नसेल आणि तरीही संबंधित मनुष्य अमेरिकेतच राहात असेल तर अशा व्यक्तीविषयी अमेरिका सरकारने काय करावे असे वाटते? एच-१ व्हिसा हा मर्यादित कालावधीसाठी कायदेशीर स्टेटसवर काम करण्यासाठी परदेशी नागरीकांना दिलेला व्हिसा असतो ना? तसा व्हिसा मिळणे हा काय भारतीयांचा जन्मसिध्द अधिकार आहे का? व्हिसाची मुदत संपत असेल तर अशा परदेशी नागरीकांनी आपण होऊन निघून जावे अशी अपेक्षा अमेरिका सरकारची असेल तर त्यात काय चूक आहे? व्हिसाची मुदत संपल्यावरही परदेश सोडून न जाणे हा गुन्हा आहे. अशा गुन्हेगारांना अमेरिका सरकारने का म्हणून सहानुभूती दाखवायची? जाता जाता- मी अमेरिकेत विद्यार्थी म्हणून राहिलो आहे. आणि तिथे भारतीय विद्यार्थी नोकर्‍या मिळवायला कसले एकेक जुगाड करतात हे अगदी जवळून बघितले आहे. आमच्या विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांनी, अगदी माझ्या मित्रांनीही ते जुगाड केले आहेत. असले जुगाड करून देणारे कन्सलटन्ट्स असतात. ते त्या विद्यार्थ्यांना त्यांचा सीव्ही बनवून देतात. त्या विद्यार्थ्यांना आपलाच सीव्ही बघितला तर त्यातील नाव वगळता काहीही परिचयाचे दिसायचे नाही कारण सीव्ही बनविताना ते खोटा अनुभव दाखवतात, एखाद्या क्षेत्रात (समजा जावा) काम करायचा अनुभव शून्य असेल तरी चार वर्षे त्यात काम केले आहे असे सीव्हीवर दाखवतात. असा खोटा अनुभव दाखविताना ज्या ठिकाणी संबंधित विद्यार्थी चांगला आहे असा रेफरन्स देणारे कन्सल्टन्टचे लोक पेरलेले असतात त्याच कंपनीचा अनुभव दाखविला जातो. ते विद्यार्थी ओपीटीवर असताना कन्सलटन्ट त्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच जाळ्यातून पूर्वी गेलेल्यांकडून ट्रेनिंग देतात आणि इंटरव्ह्यू पार पाडता येईल इतके बाळकडू देतात. तो विद्यार्थी कागदावर त्या कन्सलटन्टकडे नोकरीला असतो आणि तो कन्सलटन्ट त्यांना क्लाएंट साईटवर कुठेतरी पाठवतो. क्लाएंटला जितके बिलिंग करतात त्याच्या ५०-६०% रक्कम विद्यार्थ्याला दिली जाते आणि उरलेली तो कन्सलटन्ट स्वतः ठेवतो. त्यावर जॉब सपोर्ट म्हणून आणखी एक प्रकार असतो. एखाद्याने चार वर्षाचा खोटा अनुभव दाखवला तर त्याच्याकडून ज्या पातळीचे काम केले जाईल ही अपेक्षा असेल ती कशी पूर्ण होणार? मग एखादा कठीण प्रश्न आला की फक्त I will get back to you on this tomorrow असे म्हणायचे आणि कन्सलटन्टच्या जॉब सपोर्टवाल्यांना फोन करून त्या प्रश्नाचे उत्तर मिळवायचे आणि दुसर्‍या दिवशी ते द्यायचे. असला सगळा जुगाडू प्रकार चालू असतो. अशातून तरून गेलेले लोक ओपीटीवरून एच-१ वर गेले आहेत. हा सगळा गोलमाल करणार्‍यांचे समर्थन का करायचे? ते भारतीय आहेत म्हणून? आता ट्रम्पतात्यांचे सरकार असले प्रकार करणार्‍या कन्सलटन्ट लोकांवर उठले आहे असे दिसते. https://timesofindia.indiatimes.com/world/us/us-and-world/international-students-who-were-victims-of-opt-fraud-have-more-to-worry-about-must-take-legal-recourse-to-clear-their-name/articleshow/118730845.cms त्यात तात्यांचे काहीही चुकले असे वाटत नाही. असला खोटारडेपणा करून अमेरिकेत राहणारे परदेशी लोक त्यांना नको असतील तर अमेरिकेचे अध्यक्ष या नात्याने त्यांचे नक्की काय चुकले? वरील बातमीत आणखी एक गोष्ट दिली आहे. असले प्रकार करून ओपीटीवरून एच-१ वर पूर्वी गेलेल्या काहींना भारत भेटीनंतर अमेरिकेला परत जाताना विमानतळावरच प्रवेश नाकारला गेला. त्यात तात्यांच्या सरकारचे नक्की काय चुकले? शेवटी चोरी ती चोरीच ना? अशी चोरी पकडली जाईल तेव्हा शिक्षा दिली तर काय चुकले? इतकी वर्षे आम्हाला शिक्षा दिली नाही आणि आता कशी देता असा बचाव चोर करू शकतो? एकूणच तात्या भरपूर रॅश आहेत, आक्रस्ताळे आहेत, मनाला येईल ते वाटेल ते बोलतात वगैरे सगळ्या गोष्टी मान्य. पण ते करत आहेत त्यातील अनेक गोष्टी अमेरिकेच्या (आणि जगाच्याही) हिताच्या आहेत असे दिसते. युएस एडच्या नावाने घाना की बुर्किना फासो मध्ये ट्रान्सजेंडर लोकांच्या ऑपरेशनसाठी पैसे अमेरिकेच्या करदात्यांनी का भरायचे? कोणत्या कोणत्या देशात रेजिम चेंजसाठी, मतदान प्रभावित करायला पैसे अमेरिकेच्या करदात्यांनी का भरायचे?भारतातही एकेकाळी शेतकरी आंदोलनाच्या वेळेस त्या रिकामटेकड्यांना पिझ्झा काय आणि मसाज काय आणि इतर ऐशोरामांची व्यवस्था केली गेली होती. आता अगदी भगवंत माननेही तथाकथित शेतकरी आंदोलकांवर बडगा उगारलेला दिसत आहे. तिकडून येणारा पैसा आटला म्हणून ते होत आहे की नाही मला माहित नाही. बायडन आजोबा अध्यक्ष असताना एखादा माणूस एल.जी.बी.टी. क्यू + आणि आणखी काय काय नसेल तर त्याच्यात काहीतरी खोट आहे असे वाटावे असे वातावरण निर्माण होत आहे की काय असे एखाद्याला वाटावे. असला प्रकार तात्यांच्या काळात बंद केला जात आहे. दुसर्‍या महायुध्दापासून अमेरिकेच्या प्रत्येक अध्यक्षाने इतर अनेक देशात जाऊन काड्या घातल्या आहेत. अगदी गोग्गोड बोलून मोठ्या मोठ्या गप्पा मारणार्‍या ओबामानेही सिरीया आणि लिबियात काड्याच घातल्या होत्या. बायडनने बांगलादेशात काड्या घातल्या होत्या. महंमद युनूसला प्रेसिडेंशिअल मेडल ऑफ फ्रिडम ओबामानेच दिले होते. बहुदा त्याच्या काळापासूनच बांगलादेशात काड्या घालायचा प्रयत्न चालू झाला असावा. जगात जिथेतिथे नाक खुपसायची अमेरिकेची घाणेरडी सवय कमी करून आमचे आम्ही बघतो असे कोणी अध्यक्ष करत असेल तर त्याचे स्वागत करायचे की त्यालाच विरोध करायचा? टॅरीफ वगैरे प्रकरणात तात्या आपल्याला पाहिजे तशी भूमिका घेत नसतीलही. पण कोणीही अमेरिकन अध्यक्ष १००% आपल्याला अनुकूल करेल अशी अपेक्षा कशी करता येईल? बेकायदेशीरपणे घुसलेल्यांना किंवा व्हिसा संपल्यावरही तिथे राहणार्‍यांना ट्रम्पतात्या हाकलत असतील तर त्यात त्यांचे काही चुकले असे मला तरी अजिबात वाटत नाही. बाकी कोणी काहीही म्हणो. मी तर ट्रम्पतात्यांचा या घडीला तरी मोठ्ठा फॅन आहे. त्यातून भविष्यात तात्या दुसरे निक्सन किंवा रेगन झाले तर त्यांना पण विरोधच करू. तशी अमेरिकेच्या अध्यक्षांना विरोध करायची एक भारतीय म्हणून आपल्याला सवयच आहे. ट्रम्पतात्या तसेच वागायला लागले तर त्यांनाही विरोध करू. हाकानाका. तसाही आपण विरोध करून किंवा आपण त्यांचे फॅन असून कोणाला घंटा फरक पडतो? व्हाईट हाऊसच्या प्रांगणातील झाडाचे एक पानही त्यामुळे पडायचे नाही. ट्रम्पतात्या या घडीला माझ्यासारखे तुमच्या बरोबरच.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

"अमेरिका सरकारने काय करावे असे वाटते?" ट्रम्पोजीच्या आक्रस्ताळी स्वभावाबद्दल म्हणत आहे. अमेरिकेने व्हीसा मुदत संपलेल्या लोकांवर उपकार करावेत असे कोणीच म्हणत नाही. असो. कॅनडाच्या जस्टिन ट्रुडोनी अमेरिकेला ऐकवलेच.(https://www.youtube.com/watch?v=wz_42pckM7w&t=159s ) चीनने ही प्रत्युत्तर दिले (https://www.youtube.com/watch?v=RyHbpiOotB8 ) भारतात अजूनही शांतताच पसरली आहे.(कूटनीती इन प्रोग्रेस ?)

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 03/06/2025 - 00:05
ट्रम्पतात्या या घडीला माझ्यासारखे तुमच्या बरोबरच. अहो मी तर तात्यांचा २०१६ पासून फॅन आहे. तात्या म्हणजे काळीज! मला तात्याभक्त म्हटले तरीही चालेल!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

डोनाल्ड ट्रम्पास तात्या म्हंटले की गुजरातमधील जवाहिर्यांच्या/कारगिरांच्या आत्महत्या कमी होणार आहेत का? २ एप्रिलपासुन ट्रम्पाने आयात शुल्क २०% वर नेले की मग आतमह्त्या वाढण्याची शक्यता आहे. https://www.youtube.com/watch?v=KkttlEK_wg8

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

अहो माई, तात्यांनी समजा तसे काही केले आणि समजा त्यामुळे गुजरात किंवा इतर ठिकाणच्या ५०-१०० कारागिरांनी आत्महत्या केल्या तर वाईटच. त्याविषयी काहीच दुसरे मत असू शकणार नाही. पण दुसरी बाजू पण लक्षात घे की. अमेरिकेच्या आधीच्या अध्यक्षांनी जगात विविध ठिकाणी किती लाख लोकांना मारले होते? जर तात्या इतर देशांमधील अमेरिकेची नाक खुपसायची घाणेरडी सवय कमी करत असतील तर ते चांगले नाही का?५०-१००-५००-१००० कारागिर मारले जाणे वाईटच पण लाखो लोक मारले जाण्यापेक्षा त्या मानाने कमी वाईट नाही का?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई आपल्या देशात झालेल्या आत्महत्यांना दुसऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष कसा जबाबदार असेल? आपल्या पंतप्रधान जबाबदार असेल ना? आपण कुणाशी संबंध चांगले ठेवले आहेत?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

"डोनाल्ड ट्रम्प माझे मित्र आहेत" असे पंतप्रधानच म्हणत होते ना? भारतावर आयात शुल्क आधीसारखेच असेल असे ह्यांनाही वाटले होते. ट्रम्प ह्यांची निवड झाल्या झाल्या जयशंकर ताबडतोब अमेरिकेला रवाना झाले होते.ट्रम्प भारत्,चीन्,कॅनडा ह्यांना एकाच तराजुत तोलत असतील तर मग ईतके दिवस गप्प राहण्याचा आणी तिकडे जाउन 'चर्चा' करण्याचा फायदा काय झाला?

धर्मराजमुटके Wed, 03/05/2025 - 23:16
रशियाचे तुकडे झाले तेंव्हा युक्रेनच्या पूर्व आणि दक्षिण भागात रशियन बोलणारे जास्त होते. त्या वेळी रशियन बोलणारा भाग रशियात विलीन झाला असता तर आज ही समस्या उत्पन्न झाली नसती.
याच न्यायाने भारतातील पंजाब पाकीस्तानात आणि भारतातील बंगाल बांग्लादेशात जायला हवे काय ?

In reply to by धर्मराजमुटके

सुबोध खरे गुरुवार, 03/06/2025 - 09:45
मी उलट म्हणतो, पाकिस्तानी पंजाब आणि बांगला देश भारतात यायला हवा. कारण हे भाग मूळ भारताचे होते. परंतु भारतात फाळणी हि भाषेवरआधारित झालेली नसून धर्मावर आधारित झालेली आहे त्यामुळे हे उदाहरण तसे गैरलागू आहे

विवेकपटाईत Fri, 03/07/2025 - 13:06
अमेरिकेची शत्रुता महागात पडते पण मैत्री विनाशाला कारणीभूत ठरते. अमेरिकेने सुरवातीला शस्त्र मदत दिली नसती तर किमान युक्रेन ने शांततेसाठी रशियाची वाटाघाटी केली असती. https://www.facebook.com/share/v/17TtUzNXxN/

In reply to by विवेकपटाईत

आंद्रे वडापाव Fri, 03/07/2025 - 13:19
व्वा काका , एक तर फेसबुक च्या लिंक देताय ... तुम्हाला एक सुचवणी करू का ? तुम्ही थोडा इतिहास वाचा किंवा जाणून घ्या , या भागाचा ... मग तुम्ही मत व्यक्त कराल का ? तुम्हाला माहिती आहे का अमेरिकेच्याच सांगण्यावरून युक्रेनला आण्विक शस्त्र सोडून द्यावी लागली कारण त्याबदल्यात अमेरिका सुरक्षा छत्र देणार होता ..

In reply to by आंद्रे वडापाव

आंद्रे वडापाव Fri, 03/07/2025 - 13:22
Ukraine once had the world’s 3rd largest nuclear arsenal; but gave up its weapons for this reason Read more at: https://economictimes.indiatimes.com/news/international/us/ukraine-once-had-the-worlds-3rd-largest-nuclear-arsenal-but-gave-up-its-weapons-for-this-reason/articleshow/118765127.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst Ukraine made a significant move in 1994 when it signed the Budapest Memorandum. The United States, the United Kingdom, and Russia were also signatories. Ukraine agreed to remove all its nuclear weapons in return for a guarantee of sovereignty and territorial integrity of the country. The memorandum also provided that these three nations would not attack Ukraine militarily and would request the UN to intervene in case of any threat to the sovereignty of the country. #https://economictimes.indiatimes.com/news/international/us/ukraine-once-had-the-worlds-3rd-largest-nuclear-arsenal-but-gave-up-its-weapons-for-this-reason/articleshow/118765127.cms?from=mdr

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे गुरुवार, 03/13/2025 - 20:08
@आंद्रे वडापाव There were several important reasons that led Ukraine towards nuclear disarmament. First of all, although it had the weapons at its disposal, it was unable to launch them on its own. The launch keys and other controls were left with Moscow, making the weapon system ineffective as a deterrent. आपण दिलेला दुवा आपणच वाचलेला दिसत नाही. युक्रेन कझाखस्तान सारख्या सोव्हिएत युनियनच्या देशांनी आपली अण्वस्त्रे परत केली ते काही सभ्य आणि सुसंस्कृत आहेत म्हणून नव्हे तर त्याचा वापर त्यांना करणे अशक्य होते म्हणून आणि ठेवल्या जागी गंज लागला तर त्यातून होणार किरणोत्सार भीषण असतो. यामुळेच अण्वस्त्रे म्हणजे काही सोने नव्हे कि काही ना करता तिजोरीत ठेवले तर तसेच राहते. त्यांची वेळोवेळी देखभाल करावीच लागते. हे सर्व सव्यापसव्य करणं युक्रेनला अशक्य होतं. बाकी झेलेन्स्की आम्ही शांततेचे दूत असून शांततेसाठी अण्वस्त्रे परत केली असे कधी म्हणाल्याचे आठवत नाही. अण्वस्त्रधारी देशांचे पंतप्रधान किंवा अध्यक्ष आपल्याबरोबर काही हौसेनं ब्रिफ केस घेऊन फिरत नाहीत. त्यात या अण्वस्त्रांची आणि ती धारण केलेल्या क्षेपणास्त्रांची कोड त्यांच्या कडे सुरक्षित असतात. एखादा माथेफिरू लष्करी अधिकारी सहज दुसऱ्या देशावर अण्वस्त्रे डागेल अशी शक्यता शून्य असते. बाकी तुमचं चालू द्या

In reply to by सुबोध खरे

आंद्रे वडापाव गुरुवार, 03/13/2025 - 23:24
कदाचित आपल्याला कल्पना नसेल, अण्वस्त्रां तुलनेत, क्षेपणास्त्र आणि विमान (डिलिव्हरी सिस्टिम) तंत्रज्ञान तुलनेत जास्त सोपे असते. अण्वस्त्रां आणि त्याचे तंत्रज्ञान अवाच्या सव्वा किमतीला हसत हसत खरेदी इच्छुक इराण आणि इराक सारखे जगात खूप आहेत/होते. असो लेख मी पूर्ण वाचूनच प्रतिक्रिया देतो... पण आपणास लेखाचा मुद्दा समजला नाहीये बहुदा.. बाकी चालू द्यात...

In reply to by आंद्रे वडापाव

सुबोध खरे Wed, 03/19/2025 - 20:14
The launch keys and other controls were left with Moscow, making the weapon system ineffective as a deterrent. हे आपणच दिलेल्या दुव्यात आहे. माझे ज्ञान नाही. अण्वस्त्रे नेणारी क्षेपणास्त्रे तयार करणे आणि ती उत्तम स्थितीत ठेवणे हि आपण म्हणता तशी भाजी आणण्यासारखी बाजारात पैसे टाकून आणण्याची वस्तू नाही. तसे असते तर इराण ने आतापर्यंत इस्रायल वर अणुहल्ला करून त्याचा विध्वंस केला असता. किंवा इंग्लंड सारखा एकेकाळी बलाढ्य असणाऱ्या आणि जगावर राज्य करणाऱ्या देशाने अमेरिकेचे ट्रायडेंट हे क्षेपणास्त्र आपल्या अणुपाणबुड्यांवर ठेवले नसते. ""अण्वस्त्रां तुलनेत, क्षेपणास्त्र आणि विमान (डिलिव्हरी सिस्टिम) तंत्रज्ञान तुलनेत जास्त सोपे असते."" नक्की का? मग भारताचे राजकारणी आणि शास्त्रज्ञ मूर्ख असावेत. कारण भारताने १९७४ मध्ये पहिला अणुस्फोट केला. पृथ्वी हे आपले पहिले क्षेपणास्त्र याचा प्रकल्प १९८३ मध्ये चालू झाला आणि पहिले सफल परीक्षण १९८८ साली झाले. तेजस अणुबॉम्ब नेऊ शकेल का याबद्दल मला माहिती नाही. परंतु अणुबॉम्ब नेण्यासाठी भारत मिराज २०००, जग्वार सुखोई ३० आणि आता राफेल या परदेशी विमानांवर अवलंबून आहे बाकी आपण सर्वज्ञ आहात तेंव्हा यावर मी अधिक बोलू इच्छित नाही

In reply to by आंद्रे वडापाव

विवेकपटाईत Mon, 03/10/2025 - 11:38
मला इतिहास ही माहीत आहे आणि सीआयए कशी काम करते इथल्या सर्वांपेक्षा उत्तम माहीत आहे. कारण मी प्रत्यक्ष काम केलेले आहे. बाकी अमेरिकेने बुटक्याला शस्त्र दिले आणि त्याला राक्षसा विरुद्ध सोडले. हे सर्वांनी प्रत्यक्ष बघितले आहे. अफगाणिस्तान असो वा विएतनाम अमेरिका तेथे अमेरिकेच्या तालावर नाचणार्‍या सत्ताधार्‍यांना वार्‍यावर सोडून अमेरिकेने माघार घेतली होती. हा इतिहास बहुतेक तुम्ही वाचला नसावा. युक्रेनच्या जनतेने अमेरिका आणि युरोप प्रायोजित झेलेंस्कीला निवडले त्याचे परिणाम युक्रेनची जनता भोगणार.

In reply to by विवेकपटाईत

आंद्रे वडापाव Mon, 03/10/2025 - 11:48
सीआयए कशी काम करते इथल्या सर्वांपेक्षा उत्तम माहीत आहे.
अहो काका त्याच्याच मुळे आधी लिहिलय ... भारतामध्ये "जे एन दीक्षित" नंतर... पटाईत काकाच एकमेव फक्त ... जयशंकर तर पटाइटांच्या पासंगालाही पुरणार नाही ... कारण जी काय अक्कल आहे ती आपल्यालाच आहे , असा गंड मला तरी नाही ...

In reply to by आंद्रे वडापाव

विवेकपटाईत Sun, 03/16/2025 - 19:37
मला कसलाही अहंगंड आणि घेऊन न्यूनगंड नाही. फक्त तुमच्या प्रतिक्रियेचे उत्तर दिले. बाकी फक्त एक अजेंडा मनात ठेवून परिस्थितीचे विश्लेषण करणे बंद करा डोळे उघडून सत्य पाहायला शिका.

In reply to by विवेकपटाईत

आंद्रे वडापाव Mon, 03/17/2025 - 09:17
बाकी फक्त एक अजेंडा मनात ठेवून परिस्थितीचे विश्लेषण करणे बंद करा डोळे उघडून सत्य पाहायला शिका.
हेच मी तुम्हाला सान्गत होतो वरती .. पण फक्त अप्रत्यक्श्पणे

यूक्रेनपुढे दोनच पर्याय आहेत! रशियाच्या संगतीने गरीब राहणे किंवा अमेरिका/युरोपच्या नादी लागून रशियाविरोधात जाऊन मरणे! माझ्यामते गरीब राहणे मारण्यापेक्षा चांगले आहे.

आंद्रे वडापाव Mon, 03/10/2025 - 14:36
तुम्हाला इंटरनॅशनल-डंकापती चा -भक्त व्हायचं का? जरूर व्हा. आमचे काही म्हणणे नाही.... पहिली गोष्ट म्हणजे- कसलाही न्यूनगंड बाळगू नका. आणि प्रत्येक बाबतीमध्ये डंकापती सारखे मत व्यक्त करायला शिका. म्हणजे आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण कर्तृत्त्व काय, याचा अजिबात विचार न करता मत ठोकून द्यायचं. विषय कुठलाही असो. म्हणजे आता "युक्रेनची भु राजकीय सामरिक घडी नीट बसवण्याचा खरा मार्ग कोणता?" या विषयावरती, आपण स्वतः शासनात भलेही, उंदीर मारायच्या विभागात नोकरीला होतो, हे विसरून मत ठणकावता आले पाहिजे. युक्रेनची भु राजकीय सामरिक स्थिती - ठोका...

निनाद Sun, 03/23/2025 - 13:31
रशिया-युक्रेन युद्धाच्या पैलूंचे चांगले विश्लेषण. या युद्धामध्ये माहिती युद्धाचे महत्त्व दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही. दोन्ही बाजूंकडून प्रसार माध्यमांचा वापर करून जनतेची मते प्रभावित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि आपण सर्व त्याचे बळी आहोत. विचारप्रवर्तक लेखन आहे. ऐतिहासिक संदर्भ, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि आर्थिक परिणाम यांसारख्या विषयांवर प्रकाश टाकल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन.
लेखनविषय:
लेखनप्रकार
एक जुनी भारतीय नीति कथा - राजकुमाराने बुटक्याच्या मदतीने राक्षसाला ठार मारले. राजकुमारला राजकुमारी मिळाली. युद्धात बुटक्याचे हात पाय तुटले. बुटक्याच्या नशीबी भीक मागण्याची पाळी आली. आजच्या कथेत फरक एवढाच राजकुमार स्वत: युद्धात उतरला नाही. त्याने बुटक्याला युद्धासाठी अस्त्र-शस्त्र दिले. राक्षस तर मेला नाही पण बुटका युद्धात जबर जखमी झाला. एवढेच नव्हे तर राक्षसाने बुटक्याचे अर्धे राज्य ही गिळंकृत केले. आता राजकुमाराला अस्त्र-शस्त्रांच्या मोबदल्यात बुटक्याचे उरलेले अर्धे राज्य पाहिजे.

नाराजीनामा

बाजीगर ·

चौथा कोनाडा Wed, 03/05/2025 - 22:52
पोलीस,राजकारणी, मीडिया, डॉक्टर, न्याय, सर्वांची आहे मिलीभगत, वोटर जनता पाहतेय भांबावल्यागत ।। - दुर्दैवी सत्य परिस्थिती

चौथा कोनाडा Wed, 03/05/2025 - 22:52
पोलीस,राजकारणी, मीडिया, डॉक्टर, न्याय, सर्वांची आहे मिलीभगत, वोटर जनता पाहतेय भांबावल्यागत ।। - दुर्दैवी सत्य परिस्थिती
लेखनविषय:
अखेर ते घडले दागी मंत्री पडले ।। मंत्रिपदाचे ते कवच, भ्रष्टांना असते हवंच ।। कवच असता न्याय ओलीस, कवच नसता ओढतील पोलीस ।। म्हणे फोटो पाहून हेलावले, राजीनाम्याला पेन लावले ।। पोलीस,राजकारणी, मीडिया, डॉक्टर, न्याय, सर्वांची आहे मिलीभगत, वोटर जनता पाहतेय भांबावल्यागत ।। एकेक निर्णयाला लागतेय सदी, एक पडला, दुसरा कधी ?!