मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुन्हा एकदा गोलपिठा

धोंडोपंत ·

विसोबा खेचर Mon, 12/03/2007 - 21:19
पण 'प्रसिद्धि' श्री. नामदेव ढसाळांच्या 'गोलपिठा' या पुस्तकाने मिळवून दिली, हे वास्तव आहे. खरं आहे! आभाळाला आजोबा अन जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे चंद्रसूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे" क्या बात है, सुंदर ओळी... वा धोंड्या, ढसाळरावांच्या जळजळीत कवितेचे तेवढ्याच परखड शब्दात अगदी उत्तम निरुपण केले आहेस... माझ्या सुदैवाने म्हण किंवा दुर्दैवाने म्हण, (हवं तर नवलकर साहेबांचे शिष्यत्व पत्करल्यासारखे समज,) मी त्या फॉकलंड रोड आणि फोरास रोडच्या मुंबईतल्या रात्री उघड्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत, तिथली हालाखी पाहिली आहे! असो.. छान छान, गोड गोड, गुडी गुडी, सुसंस्कृत वगैरे मराठी लेखन इतर मराठी संकेतस्थळांवर निश्चितच वाचायला मिळेल, परंतु इतकं उघड उघड आणि वास्तववादी लेखन करण्याचं स्वातंत्र्य मिसळपाव व्यक्तिरिक्त इतरत्र नसेल/नसावं! असो.. धोंड्या, हा लेख वाचून मिसळपाववर खर्‍या अर्थाने झणझणीत तर्री खाल्ल्याचा आनंद झाला... मुळात अत्यंत हळवी आणि मृदू असणारी तुझी लेखणी वेळप्रसंगी अशीच तळपूही दे! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

केशवसुमार Tue, 12/04/2007 - 00:08
धोंड्या, हा लेख वाचून मिसळपाववर खर्‍या अर्थाने झणझणीत तर्री खाल्ल्याचा आनंद झाला... तात्यशेठ.. एकदम सहमत.. बा धोंडोपंता तुम्हाला दंडवत .. लेख उत्तम आहे.. आवडला.. (नतमस्तक)केशवसुमार..

सर्किट Tue, 12/04/2007 - 00:16
इथे ही कविता विश्वात्मक होते. शेटसावकारांची ' आय झवण्याची' भाषा करणारे ढसाळ मला इथे आभाळासारखे वाटतात. इथे ढसाळ एका जातीपुरते मर्यादित रहात नाहीत, एका धर्मापुरते मर्यादित रहात नाहीत, एका राज्यापुरते, एका भाषेपुरते मर्यादित रहात नाहीत, एका देशापुरते मर्यादित रहात नाहीत तर जगात ज्या ज्या माणसाचे शोषण झाले आहे, मग तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, देशाचा असो त्याचे होऊन जातात. अगदी खरे आहे. माझे मत. विद्रोहाचा शिव्यांशी जवळचा संबंध आहे, हे खरे. एलकुंचवार, तेंडुलकरांनी देखील नाटकांना सोवळ्यातून बाहेर आणण्याचा साहित्यिक विद्रोह केला, तो देखील शिव्या देऊनच. पण गार्बो म्हणा किंवा गिधाडे, त्यातील शिव्या म्हणजे "सोवळ्याचा पायजामा" शिवावा तशा आहेत. म्हणजे माफक विद्रोह. मध्यमवर्गीय वाचकांना झेपेल एवढा. पार्ल्यात किंवा धरमपेठेत, एवढा विद्रोह पुरेसा. ढसाळांच्या गोलपिठ्यात ह्या विद्रोहाचा स्फोट होतो, असे वाटल्याखेरीज रहात नाही. - सर्किट

पंत, लेखन आवडले. विद्रोही साहित्यात आजही गोलपिठा हा मैलाचा दगड मानला जातो. सहमत.......!!! विद्रोही चळवळीतल्या लेखकांनी वास्तववादी जीवन या आणि इतर अशा अनेक कविता,कथा, आत्मचरित्रातून मांडलेले आहे, या बद्दल आमच्या मनात तरी कोणतीही शंका नाही. अवांतर :- पंत, काल प्रा.केशव मेश्रामांच्या ज्ञानेश्वरीवर लिहिता-लिहिता, आज विद्रोही साहित्यातील वास्तववादावर लिहीले. मागे एकदा उर्दु गझलांवरचे लेखन असेच सुंदर होते. पुन्हा फलजोतिष, ग्रह-त्यांचे परिणाम आहेच. धोंडोपंत, आपल्या लेखनीने आम्ही भारावून गेलो आहोत. असेच लिहीत राहा !!! धोंडोपंताचा स्नेही. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किमयागार Tue, 12/04/2007 - 08:08
"त्यांच्या शिव्या खटकत नाहीत. कारण त्या इतक्या अस्सलपणे आलेल्या असतात की जखमेतून रक्त वहावे तशी ही कविता वहायला लागते." इथल्या 'नकली' अध्यक्षांना हे कोणी समजावयाचे आता?? -कि'गार *********************************** अल्कोहोलचा परिणाम दुसरे काय?

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Tue, 12/04/2007 - 08:31
इथल्या 'नकली' अध्यक्षांना हे कोणी समजावयाचे आता?? अद्याप तुम्हाला इथल्या 'नकली' अध्यक्षांचीच काळजी पडली आहे त्याबद्दल धन्यवाद! बाकी तुमच्या बर्‍याचश्या प्रतिसादांत इथल्या 'नकली' अध्यक्षांचा उल्लेख येतो त्यावरून त्यांचा तुमच्यावर किती जबरदस्त पगडा आहे याची कल्पना येते! :) असो, पंतांच्या या सुंदर लेखात आता अधिक विषयांतर न करता आम्ही इथेच थांबतो! तुमची गरळओक, जळजळ, मळमळ, पोटदुखी चालू द्या...:) तात्या.

बेसनलाडू Tue, 12/04/2007 - 08:57
पंत, ज्योतिष, शेअरबाजार, संतसाहित्य, गझल आणि आता हे विवेचन - तुमच्या लेखनवैविध्याला कुर्निसात! (नतमस्तक)बेसनलाडू

त्यांच्या शिव्या खटकत नाहीत. कारण त्या इतक्या अस्सलपणे आलेल्या असतात की जखमेतून रक्त वहावे तशी ही कविता वहायला लागते. तिला तिच्या अस्सल रूपात वहायला मिळते म्हणून ती प्रामाणिक वाटते. आणि ती प्रामाणिक असते म्हणून लोभसवाणी असते. वा काय बोललात धोंडोपंत. एकदा साडेनउ च्या बातम्यात पाहुणे म्हणुन आले होते. त्यावेळी बातम्या सांगणार्‍या निवेदिकेने त्यांना थेट ब्राह्मण द्वेषा विषयी विचारले. त्यावेळी ते म्हणाले " अहो ते केव्हाच भुर्र् र उडाले सिलिकीन व्हॅलीला, आता राहिलेत ते आपल्यातलेच" ढसाळांची मुलाखत मला विद्राहातुन विवेकाकडे प्रवासाची वाटली. अवांतर- असेच "दलित ब्राह्मण" हा कथासंग्रह लेखक शरणकुमार लिंबाळे ( बहुतेक खात्री नाही) अत्यंत सुंदर आहे. कथेतल्या नायकाची दोन्ही बाजूने होणारी घुसमट टिपली आहे. सदानंद मोरे यांचे एक नाटक ही असेच आहे. नाव आत्ता आठवत नाही. प्रकाश घाटपांडे

धोंडोपंत Wed, 12/05/2007 - 08:52
मित्रवर्य तात्या, केशवसुमार, सर्कीटराव, प्राध्यापक साहेब, कि'गार, बेसनलाडू, प्रकाशराव या अभिप्राय देणार्‍या सर्व मित्रांचे मनापासून आभार. आपणाला आमचे लेखन आवडले याचा आनंद आहे. आपला, (आभारी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

सर्किट Wed, 12/05/2007 - 09:12
धोंडोपंत, तात्याला मित्रवर्य लिहिलेत, आणि आम्हाला कोरडेपणाने "सर्किटराव" ? हे बरे नाही ! आपले लेखन नेहमीच आम्हाला आवडले आहे. (जरी आपल्या ज्योतिशास्त्राविषयी घृणा, नावड, आणि अविश्वास असला तरी, त्याला आम्ही मनोरंजक लिखाण म्हणतो ;-) - सर्किट

धोंडोपंत Wed, 12/05/2007 - 13:23
सर्कीट, तुमचा गैरसमज होतोय. आमच्या लिहीण्याचा उद्देश असा आहे की मित्रवर्य ...... कोण कोण? तर तात्या, केशवसुमार, सर्कीटराव, प्राध्यापक साहेब, कि'गार, बेसनलाडू, प्रकाशराव कृपया या पध्दतीने या वाक्याकडे पहावे. आता राव काढून टाकतो म्हणजे अडचण नको. आपला, (स्नेही) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मुक्तसुनीत गुरुवार, 12/06/2007 - 10:23
धोंडोपंतांचे अभिनंदन ! तुमच्या या लेखाचा तसा उद्देश नाही हे मला माहित आहे ; पण ढसाळांच्या राजकीय प्रवासाबद्द्ल मला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे. त्यांची शिवसेनासुद्धा घडलेली असावी हे तर मला अकल्पित वाटते. एकूणच , एक फार मोठा कवी , पण एक अतिसामान्य सामजिक-राजकीय कार्यकर्ता-नेता अशा काहीशा गोळाबेरजेकडे मी येतो. त्यांच्या काव्याची रेन्ज , त्यातील धगधगीतपणा, स्फोटकता याला मराठीमधे तरी मला समांतर काही सापडत नाही. पण माणूस म्हणून मलिका अमरशेख यानी आपल्या आत्मचरित्रात घडविलेले त्यांचे दर्शन , त्यांच्या एकूण राजकीय प्रवास या सार्‍यामुळे एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते असे मला वाटते. गोलपिठा आणि इतर कविता यांच्या पलिकडे तुम्हाला ढसाळ कसे दिसतात ? त्यांची वर्गवारी नक्की कुठल्या खात्यावर करायची ?

In reply to by मुक्तसुनीत

विसोबा खेचर गुरुवार, 12/06/2007 - 10:34
पण माणूस म्हणून मलिका अमरशेख यानी आपल्या आत्मचरित्रात घडविलेले त्यांचे दर्शन , त्यांच्या एकूण राजकीय प्रवास या सार्‍यामुळे एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते असे मला वाटते. विचार करण्याजोगा मुद्दा! गोलपिठा आणि इतर कविता यांच्या पलिकडे तुम्हाला ढसाळ कसे दिसतात ? त्यांची वर्गवारी नक्की कुठल्या खात्यावर करायची ? मुक्तसुनितांचा प्रतिसाद आवडला, धोंड्याकडून वरील प्रश्नाचे उत्तर अपेक्षित आहे... तात्या.

धोंडोपंत गुरुवार, 12/06/2007 - 11:09
मुक्तसुनीत यांस, सर्वप्रथम अभिप्रायाबद्दल धन्यवाद. अत्यंत लोभसवाणा, अत्यंत सुसंस्कृत, अत्यंत विचार करण्याजोगा अभिप्राय तुम्ही दिलात. या अभिप्रायाला सविस्तर उत्तर देण्याशिवाय पर्याय नाही. तुमच्या या लेखाचा तसा उद्देश नाही हे मला माहित आहे ; पण ढसाळांच्या राजकीय प्रवासाबद्द्ल मला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे. त्यांची शिवसेनासुद्धा घडलेली असावी हे तर मला अकल्पित वाटते. आमच्या लेखनाचा उद्देश हा केवळ त्यांच्या साहित्यापुरताच मर्यादित आहे. त्यातल्यात्यात फक्त 'गोलपिठा' पुरता. कारण आम्ही म्हटल्याप्रमाणे, 'गोलपिठा' हाच विद्रोही साहित्यातील मैलाचा दगड आहे. एकूणच , एक फार मोठा कवी , पण एक अतिसामान्य सामजिक-राजकीय कार्यकर्ता-नेता अशा काहीशा गोळाबेरजेकडे मी येतो. त्यांच्या काव्याची रेन्ज , त्यातील धगधगीतपणा, स्फोटकता याला मराठीमधे तरी मला समांतर काही सापडत नाही. गोळाबेरजेचे विधान सोडून इतर गोष्टींशी १००% सहमत. "अतिसामान्य सामाजिक कार्यकर्ता" या विधानाशी आम्ही सहमत नाही कारण "पँथरचे दिवस" वाचल्यावर ढसाळांना अतिसामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणवत नाही. पण माणूस म्हणून मलिका अमरशेख यानी आपल्या आत्मचरित्रात घडविलेले त्यांचे दर्शन , त्यांच्या एकूण राजकीय प्रवास या सार्‍यामुळे एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते असे मला वाटते. एखाद्या माणसाच्या वैवाहिक जीवनावर भाष्य करण्याचा आम्हाला अधिकार नाही त्यामुळे याविषयी आम्ही काही बोलत नाही. त्याचप्रमाणे कोणाच्या वैवाहिक जीवनाची वाताहात चविष्टपणे चघळण्यात आम्हाला आनंद वाटत नाही. गोलपिठा आणि इतर कविता यांच्या पलिकडे तुम्हाला ढसाळ कसे दिसतात ? त्यांची वर्गवारी नक्की कुठल्या खात्यावर करायची ? उत्तम प्रश्न. आम्ही ढसाळांकडे पाहतांना गोलपिठा, तुही इयत्ता कंची, खेळ, गांडू बगीच्या, या सत्तेत जीव रमत नाही, मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे आणि इतर ललित लेख याच्या पलिकडे जाऊन पहात नाही. कारण याच्या पलिकडे त्यांच्या खाजगी जीवनात डोकावणे आम्हांला प्रशस्त वाटत नाही. याचं कारण असं आहे की, आमची भूमिका ही आस्वादकाची आहे. कलाकाराच्या कलाकृतीशी आमचे नाते आहे. त्या पलिकडे त्या कलावंताचे खाजगी आणि वैयक्तिक आयुष्य, त्याची जातपात, त्याचा धर्म, त्याची धार्मिक मते, त्याचे राजकीय दृष्टीकोण या गोष्टींशी आमचा खरे तर काहीही संबंध नाही. आमचाच नव्हे तर कोणाचाही नाही. पुन्हा एकदा धन्यवाद. आपला, (आभारी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मुक्तसुनीत गुरुवार, 12/06/2007 - 11:21
यापुढची चर्चा म्हणजे कलास्वाद आणि इतर सामाजिक-राजकीय क्षेत्रे आणि एकूण आयुष्य यांच्यातील नाते , त्याना विभागणार्‍या सीमारेषा , एखाद्या व्यक्तिला अभ्यासताना "कुठे थांबावे" याबद्दलची नैतिकता यांची चर्चा होईल. पर्यायाने तुमच्या मूळ विषयापासून ते भरकटणार आणि ज्याना हा लेख वाचायचाय् आणि मनापासून प्रतिक्रिया द्यायचीय् त्याना गांगरवून सोडल्यासारखे होणार. तेव्हा मी माझी प्रश्नबाजी इथेच थांबवतो. गोलपिठाखेरीजच्या त्यांच्या कवितांचे असेच रसग्रहण/विश्लेषण तुम्ही केलेत , त्यातून त्यांच्या कवितेचा प्रवास कसा घडला हे दाखवलात तर फार मजा येईल. ते एक लेखमाला एका सायंदैनिकात लिहायचे. त्याबद्दलही जमल्यास लिहिलेत तर खूप आनंद होईल. तुम्हाला धन्यवाद.

धोंडोपंत गुरुवार, 12/06/2007 - 15:05
गोलपिठाखेरीजच्या त्यांच्या कवितांचे असेच रसग्रहण/विश्लेषण तुम्ही केलेत , त्यातून त्यांच्या कवितेचा प्रवास कसा घडला हे दाखवलात तर फार मजा येईल. ढसाळांच्या कवितेवर अजून काही लिहायचा तूर्तास विचार नाही. पण आरती प्रभूंच्या 'दिवेलागण' वर लिहायचे मनात आहे. अर्थात संपूर्ण १०५ कवितांवर लिहायला जमणार नाही पण.... ये रे घना ये रे घना न्हांवू घाल माझ्या मना तिच्या मनाच्या ऐलपैल मी श्वास पेरिले होते, चार डोळे: दोन काचा दोन खाचा मर्मावर मार घेत आम्ही जन्मा यावें आमुच्या गोवर्‍या | आम्हीच थापाव्या | आम्हीच राखाव्या | मरणापर्यंत या निवडक कवितांवर लिहावयाचे मन होत आहे. 'दिवेलागण' च्या मोहिनीतून आणि एकूणच खानोलकरांच्या साहित्याच्या नशेतून या जन्मी आम्ही बाहेर येऊ असे वाटत नाही. जगतात येथे कोणी, मनात कुजून तरी कसे फुलतात, गुलाब हे ताजे? कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे.....कुणाचे ओझे.. आपला, (खानोलकरभक्त) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by केशवसुमार

विसोबा खेचर गुरुवार, 12/06/2007 - 17:18
हेच म्हणतो..! धोंड्या, तुझ्याकडून खानोलकरसाहेब समजून घ्यायला नक्कीच आवडतील! लेखांची वाट पाहात आहे.... (आतूर) तात्या.

In reply to by धोंडोपंत

सर्किट गुरुवार, 12/06/2007 - 23:32
"नक्षत्रांचे देणे"" हे दिवेलागण मध्ये आहे का ? आरती प्रभूंचेच आहे ना ते ? धोंडोपंत, खानोलकरांविषयी लिहाच ! आम्ही वाचनास उत्सुक आहोत ! - सर्किट

In reply to by धोंडोपंत

अर्धवटराव Sat, 06/05/2010 - 04:50
मिपा वर धोंडोपंत नावाचा एक अवलीया वाचायला मिळतोय !! माझ्यापुरते तरी, या विद्रोहीसाहित्य वगैरे गोष्टी मला आपल्या सारख्या रसायनांकडुनच चाखायल मिळतात. त्यांच्याशी प्रत्यक्ष भिडण्याचि (कि पचवण्याचि??) माझी ईच्छा (कि हिम्मत??) नाहि. धन्यवाद पंत !! (वाचक) अर्धवटराव -रेडि टु थिंक

In reply to by अर्धवटराव

हल्ली धोंडोपंत लिहित नाहीत याचे आम्हाला दु:ख आहे. त्यांच्या ज्योतिषाच्या ब्लॉग वर ते नेहमी लिहितात. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

मुक्तसुनीत Fri, 12/07/2007 - 00:28
खरे सांगायचे तर खानोलकर, ग्रेस यासारख्या कवींबद्दल आता आपल्याला काय वाटते हे पुन्हा तपासून पहायची वेळ आली आहे असे मला केव्हापासून वाटते. नव्वदीच्या दशकापर्यंत आजुबाजुच्या वातावरणामधे , माध्यमांमधे , मित्रांमधे या दोन कवींना केव्हढे ग्लॅमर होते ! हृदयनाथ मंगेशकरांच्या लोकप्रियतेला ऐंशीच्या शेवटाला आणि नव्वदीच्या सुरुवातीच्या वर्षांत मोठा बहर आल होता. या सुमारास मला वाटते, संगीतकाराच्या आणि या कविंच्या लोकप्रियतेचा एकत्रित परिणाम खूप मोठा होता. या दोन (आणि इतरही काही) कविंकडे तरुण वाचकाना वळविण्याचे काही श्रेय या संगीतकाराला द्यायलाच हवे. अशाच स्वरूपाचा परिणाम त्याआधी एक-दोन दशके पु.लं.च्या एंडॉर्समेंटमुळे झाला होता असे म्हणता येईल. या दोन कवींना कमी लेखायचा माझा हेतु बिलकुल नाही. पण भूतकाळातील प्रत्येक गोष्टीप्रमाणे त्यांचेसुद्धा मूल्यमापन आपण कळत न कळत करतोच. तुमच्या खानोलकरवरील लिखाणाची आतुरतेने वाट पाहतो.

आपण सर्व अभासू, जिज्ञासू लोकांना एक साधा प्रश्न! "मैलाचा दगड" हा शब्दप्रयोग इंग्लीश milestone चं भाषांतर वाटतं. याला अस्सल मराठी पर्याय आहे का? आपण साहेबाच्या मागून लवकरच मैल सोडले आणि किलोमीटर वापरू लागलो पण तरीही मैलाचे दगड हटले नाहीत. संहिता

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धनंजय Fri, 12/07/2007 - 04:36
पण हा संस्कृतातून घेतलेला आहे, फोडला तर मराठीत अर्थ लागत नाही. मान = "मोजणे" असा अर्थ सामान्य नव्हे, अणि मोजण्याच्या पट्टीला "दंड" म्हणण्याची पद्धतही मराठी नव्हे. शिवाय "मानदंडा"ला स्वतःचे अर्थवलय आहे, त्यामुळे तो इथे चालणार नाही. मानदंडाने अनेक वस्तू पुन्हापुन्हा मोजल्या जातात, प्रवासात आपण एकदा मैलाच्या दगडाजवळ येतो, आणि मग पुढे चालत राहातो. खरे तर आजकाल मैल वापरत नाही, आणि दगडही वापरत नाहीत. बहुतेक नवीन रस्त्यांवर, महामार्गांवर "अंतराचे फलक" किंवा "अंतराच्या पाट्या" असतात. इंग्रजीतून मराठीकृत सर्वच शब्द टाकाऊ मानू नयेत. ज्या वस्तूचे आपल्याला प्राथमिक ज्ञान इंग्रजीतून झाले, त्याचा मराठी प्रतिशब्द इंग्रजीला समांतर असला तर काय वावगे? "मैलाचा दगड" ठीकच वाटतो.

In reply to by धनंजय

माझे आजोबा मला मैलांत अंतर सांगायचे आणि मी बाबांकडे प्रश्नार्थक चेहेय्राने पहायचे. नक्कीच आजपासून काही वर्षांनी मैलाचा दगड हा वाक्-प्रयोग कालबाह्य होईल. आजच्या किती (भारतीय) मुलांना मैलाचा दगड (/milestone) समजेल? U.K. मधे मैलाचा दगड भाषेत अडथळा आणणार नाही, कारण तिथे अजूनही अंतरं मैलांमधे मोजतात. प्रश्न फक्त अनुवादीत वाक्-प्रयोगांचा नाही तर कालबाह्य असण्या-नसण्याचाही आहे! संहिता.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धनंजय Fri, 12/07/2007 - 18:06
याबाबत उपक्रमावरील ही चर्चा वाचून गंमत वाटेल : http://mr.upakram.org/node/899 खरे म्हणजे या बाबतीत १.६१ हा आकडा नेमका माहीत नसून साहित्यिक अर्थ लागतो. मैल हा गावा-गावामधील अंतरांसाठी उपयोगी असलेले कुठलेसे अंतर होते असा साधारण अर्थ माहीत असला म्हणजे पुरे. तोळा-मासा, शेरास सव्वाशेर (म्हणजे नेमके किती वजन?) क्षणभर थांब (क्षण म्हणजे किती सेकंद हो भाऊ?), नमनाना घडीभर तेल (नेमके किती?), पल पल दिल के पास तुम रहती हो (यह 'पल' कितना समय है?) Give a camel an inch and he will take an ell. (हाऊ मच विल द कॅमल टेक, एग्झॅक्ट्ली?) या सगळ्या ठिकाणी (कंसातला) प्रश्न न विचारताही काही अर्थ कळतो, आणि जेवढा कळतो तो पूर्ण असतो. पण milestone च्या बाबतीत तुम्ही नवीन कुठला चित्रदर्शी शब्द वापरात आणायचे म्हणत आहात ते चांगलेच आहे. तसा सुटसुटीत शब्द कोणी वापरात आणला, तर मी वेळोवेळी जरूर वापरीन.

In reply to by धनंजय

मन Sat, 06/05/2010 - 15:08
हा शब्द कसा वाटतो? किंवा अमुक एका कलाकृतीनं त्या क्शेत्रात "मन्वंतर" घडावलं. किंवा नवं युग आणलं किंवा "युगांतर " केलं असा वाक्प्रचार सध्याही आहे कि आपल्या मायभाषेत. आपलाच, मनोबा

धनंजय Fri, 12/07/2007 - 18:08
या बाबतीत माझे वाचन फार तोकडे आहे. या तोंडओळखीने या विद्रोही कवितांबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे, संग्रह मिळवून वाचीन. धन्यवाद धोंडोपंत!

In reply to by धनंजय

नंदन Sun, 12/09/2007 - 04:09
म्हणतो. ढसाळ, खानोलकर यांच्याविषयी लिहिलेत तर वाचायला नक्की आवडेल. बाकी आपल्या चौफेर लेखनाबद्दल बेसनलाडवाशी सहमत आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

धोंडोपंत Sat, 12/08/2007 - 20:17
धन्यवाद धनंजयराव, या बाबतीत माझे वाचन फार तोकडे आहे. या तोंडओळखीने या विद्रोही कवितांबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे, संग्रह मिळवून वाचीन. धन्यवाद धोंडोपंत! आपले कुतूहल जागे झाले याचा आनंद आहे. विद्रोही साहित्य जरूर वाचा. माणसांनी आयुष्यात काय काय सोसलाय ते त्यातून कळतं. गोलपिठाबरोबर १) मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे २) गांडू बगीच्या ३) या सत्तेत जीव रमत नाही ४) तुही इयत्ता कंची ही पुस्तकेही वाचा. खरतरं कोणतेही साहित्य मनात कोणताही 'इझम' न ठेवता वाचले पाहिजे. तरच ते खर्‍या अर्थाने समजून घेता येते. पण अनेक लोकांना ते जमत नाही. त्यामुळे ढसाळांच्या लेखनात काही वाक्ये वाचनात आली की, मनातला सुप्त 'इझम' जागा होतो आणि त्या साहित्यातील वेदना समजून न घेता त्याचे एकांगी मूल्यमापन केले जाते. त्या पासून वाचले पाहिजे. आपला, (संतुलित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

दत्ता काळे Sat, 06/05/2010 - 16:29
आरती प्रभूंच्या निवडक काव्यांचे जाहीर वाचन पु.ल. आणि सुनीताबाई देशपांडे करत असंत , पण त्यावरचे भाष्य ( निरुपण ? ) मात्र फारसे होत नसे. कदाचित कार्यक्रमाला वेळेचं बंधन असावं . बर्‍याच कवितांना अर्थाचे एकापेक्षा अधिक पैलू असू शकतात, आणि आपण कविता विचारांच्या एकांगानेच वाचत असतो. त्या कवितेचा स्वभाव, तिच्यातल्या संवेदना समजून देणारे, त्यातला अर्थ उलगडणारे लेखन वाचायला निश्चित आवडेल. खरतरं कोणतेही साहित्य मनात कोणताही 'इझम' न ठेवता वाचले पाहिजे. तरच ते खर्‍या अर्थाने समजून घेता येते. पण अनेक लोकांना ते जमत नाही. - हे अगदी खरे आहे.

In reply to by जव्हेरगंज

बोका-ए-आझम Mon, 05/16/2016 - 22:14
ढसाळ म्हणजे उकळत्या पाण्याने एखाद्याला झोपेतून उठवण्यासारखं आहे. गोलपिठा आणि दया पवारांचं ' बलुतं ' हे जबरदस्त आहेत.

पथिक Mon, 05/16/2016 - 10:32
त्यांच्या शिव्या खटकत नाहीत. कारण त्या इतक्या अस्सलपणे आलेल्या असतात की जखमेतून रक्त वहावे तशी ही कविता वहायला लागते.
किती समर्पक ! खूप आवडले लेखन.

महासंग्राम Mon, 05/16/2016 - 16:41
ढसाळ कायम आवडत्या कवींपैकी एक होते , आजही त्यांचे लिखाण वाचले कि आजूबाजूच्या परिस्थितीवर नजर पडल्याशिवाय राहत नाही. जव्हेरगंज भाऊ खूप सुंदर धागा वर आणलात

कांदा लिंबू Tue, 07/16/2024 - 18:13
या धाग्यात उद्धृत केलेलया अवतरणांमधील तथाकथित "अस्सल" भाषा, त्या भाषेचे कौतुक करणारे कितीजण आपापल्या घरी, कुटुंबियांशी बोलताना वापरतात? --- आजचा सुविचार: थेट प्रश्नाला फाटे फोडण्याचा प्रयत्न ही एक क्षीण पळवाट असते.

विसोबा खेचर Mon, 12/03/2007 - 21:19
पण 'प्रसिद्धि' श्री. नामदेव ढसाळांच्या 'गोलपिठा' या पुस्तकाने मिळवून दिली, हे वास्तव आहे. खरं आहे! आभाळाला आजोबा अन जमिनीला आजी मानून त्यांच्या कुशीत गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे चंद्रसूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे" क्या बात है, सुंदर ओळी... वा धोंड्या, ढसाळरावांच्या जळजळीत कवितेचे तेवढ्याच परखड शब्दात अगदी उत्तम निरुपण केले आहेस... माझ्या सुदैवाने म्हण किंवा दुर्दैवाने म्हण, (हवं तर नवलकर साहेबांचे शिष्यत्व पत्करल्यासारखे समज,) मी त्या फॉकलंड रोड आणि फोरास रोडच्या मुंबईतल्या रात्री उघड्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत, तिथली हालाखी पाहिली आहे! असो.. छान छान, गोड गोड, गुडी गुडी, सुसंस्कृत वगैरे मराठी लेखन इतर मराठी संकेतस्थळांवर निश्चितच वाचायला मिळेल, परंतु इतकं उघड उघड आणि वास्तववादी लेखन करण्याचं स्वातंत्र्य मिसळपाव व्यक्तिरिक्त इतरत्र नसेल/नसावं! असो.. धोंड्या, हा लेख वाचून मिसळपाववर खर्‍या अर्थाने झणझणीत तर्री खाल्ल्याचा आनंद झाला... मुळात अत्यंत हळवी आणि मृदू असणारी तुझी लेखणी वेळप्रसंगी अशीच तळपूही दे! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

केशवसुमार Tue, 12/04/2007 - 00:08
धोंड्या, हा लेख वाचून मिसळपाववर खर्‍या अर्थाने झणझणीत तर्री खाल्ल्याचा आनंद झाला... तात्यशेठ.. एकदम सहमत.. बा धोंडोपंता तुम्हाला दंडवत .. लेख उत्तम आहे.. आवडला.. (नतमस्तक)केशवसुमार..

सर्किट Tue, 12/04/2007 - 00:16
इथे ही कविता विश्वात्मक होते. शेटसावकारांची ' आय झवण्याची' भाषा करणारे ढसाळ मला इथे आभाळासारखे वाटतात. इथे ढसाळ एका जातीपुरते मर्यादित रहात नाहीत, एका धर्मापुरते मर्यादित रहात नाहीत, एका राज्यापुरते, एका भाषेपुरते मर्यादित रहात नाहीत, एका देशापुरते मर्यादित रहात नाहीत तर जगात ज्या ज्या माणसाचे शोषण झाले आहे, मग तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, देशाचा असो त्याचे होऊन जातात. अगदी खरे आहे. माझे मत. विद्रोहाचा शिव्यांशी जवळचा संबंध आहे, हे खरे. एलकुंचवार, तेंडुलकरांनी देखील नाटकांना सोवळ्यातून बाहेर आणण्याचा साहित्यिक विद्रोह केला, तो देखील शिव्या देऊनच. पण गार्बो म्हणा किंवा गिधाडे, त्यातील शिव्या म्हणजे "सोवळ्याचा पायजामा" शिवावा तशा आहेत. म्हणजे माफक विद्रोह. मध्यमवर्गीय वाचकांना झेपेल एवढा. पार्ल्यात किंवा धरमपेठेत, एवढा विद्रोह पुरेसा. ढसाळांच्या गोलपिठ्यात ह्या विद्रोहाचा स्फोट होतो, असे वाटल्याखेरीज रहात नाही. - सर्किट

पंत, लेखन आवडले. विद्रोही साहित्यात आजही गोलपिठा हा मैलाचा दगड मानला जातो. सहमत.......!!! विद्रोही चळवळीतल्या लेखकांनी वास्तववादी जीवन या आणि इतर अशा अनेक कविता,कथा, आत्मचरित्रातून मांडलेले आहे, या बद्दल आमच्या मनात तरी कोणतीही शंका नाही. अवांतर :- पंत, काल प्रा.केशव मेश्रामांच्या ज्ञानेश्वरीवर लिहिता-लिहिता, आज विद्रोही साहित्यातील वास्तववादावर लिहीले. मागे एकदा उर्दु गझलांवरचे लेखन असेच सुंदर होते. पुन्हा फलजोतिष, ग्रह-त्यांचे परिणाम आहेच. धोंडोपंत, आपल्या लेखनीने आम्ही भारावून गेलो आहोत. असेच लिहीत राहा !!! धोंडोपंताचा स्नेही. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किमयागार Tue, 12/04/2007 - 08:08
"त्यांच्या शिव्या खटकत नाहीत. कारण त्या इतक्या अस्सलपणे आलेल्या असतात की जखमेतून रक्त वहावे तशी ही कविता वहायला लागते." इथल्या 'नकली' अध्यक्षांना हे कोणी समजावयाचे आता?? -कि'गार *********************************** अल्कोहोलचा परिणाम दुसरे काय?

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

विसोबा खेचर Tue, 12/04/2007 - 08:31
इथल्या 'नकली' अध्यक्षांना हे कोणी समजावयाचे आता?? अद्याप तुम्हाला इथल्या 'नकली' अध्यक्षांचीच काळजी पडली आहे त्याबद्दल धन्यवाद! बाकी तुमच्या बर्‍याचश्या प्रतिसादांत इथल्या 'नकली' अध्यक्षांचा उल्लेख येतो त्यावरून त्यांचा तुमच्यावर किती जबरदस्त पगडा आहे याची कल्पना येते! :) असो, पंतांच्या या सुंदर लेखात आता अधिक विषयांतर न करता आम्ही इथेच थांबतो! तुमची गरळओक, जळजळ, मळमळ, पोटदुखी चालू द्या...:) तात्या.

बेसनलाडू Tue, 12/04/2007 - 08:57
पंत, ज्योतिष, शेअरबाजार, संतसाहित्य, गझल आणि आता हे विवेचन - तुमच्या लेखनवैविध्याला कुर्निसात! (नतमस्तक)बेसनलाडू

त्यांच्या शिव्या खटकत नाहीत. कारण त्या इतक्या अस्सलपणे आलेल्या असतात की जखमेतून रक्त वहावे तशी ही कविता वहायला लागते. तिला तिच्या अस्सल रूपात वहायला मिळते म्हणून ती प्रामाणिक वाटते. आणि ती प्रामाणिक असते म्हणून लोभसवाणी असते. वा काय बोललात धोंडोपंत. एकदा साडेनउ च्या बातम्यात पाहुणे म्हणुन आले होते. त्यावेळी बातम्या सांगणार्‍या निवेदिकेने त्यांना थेट ब्राह्मण द्वेषा विषयी विचारले. त्यावेळी ते म्हणाले " अहो ते केव्हाच भुर्र् र उडाले सिलिकीन व्हॅलीला, आता राहिलेत ते आपल्यातलेच" ढसाळांची मुलाखत मला विद्राहातुन विवेकाकडे प्रवासाची वाटली. अवांतर- असेच "दलित ब्राह्मण" हा कथासंग्रह लेखक शरणकुमार लिंबाळे ( बहुतेक खात्री नाही) अत्यंत सुंदर आहे. कथेतल्या नायकाची दोन्ही बाजूने होणारी घुसमट टिपली आहे. सदानंद मोरे यांचे एक नाटक ही असेच आहे. नाव आत्ता आठवत नाही. प्रकाश घाटपांडे

धोंडोपंत Wed, 12/05/2007 - 08:52
मित्रवर्य तात्या, केशवसुमार, सर्कीटराव, प्राध्यापक साहेब, कि'गार, बेसनलाडू, प्रकाशराव या अभिप्राय देणार्‍या सर्व मित्रांचे मनापासून आभार. आपणाला आमचे लेखन आवडले याचा आनंद आहे. आपला, (आभारी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

सर्किट Wed, 12/05/2007 - 09:12
धोंडोपंत, तात्याला मित्रवर्य लिहिलेत, आणि आम्हाला कोरडेपणाने "सर्किटराव" ? हे बरे नाही ! आपले लेखन नेहमीच आम्हाला आवडले आहे. (जरी आपल्या ज्योतिशास्त्राविषयी घृणा, नावड, आणि अविश्वास असला तरी, त्याला आम्ही मनोरंजक लिखाण म्हणतो ;-) - सर्किट

धोंडोपंत Wed, 12/05/2007 - 13:23
सर्कीट, तुमचा गैरसमज होतोय. आमच्या लिहीण्याचा उद्देश असा आहे की मित्रवर्य ...... कोण कोण? तर तात्या, केशवसुमार, सर्कीटराव, प्राध्यापक साहेब, कि'गार, बेसनलाडू, प्रकाशराव कृपया या पध्दतीने या वाक्याकडे पहावे. आता राव काढून टाकतो म्हणजे अडचण नको. आपला, (स्नेही) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मुक्तसुनीत गुरुवार, 12/06/2007 - 10:23
धोंडोपंतांचे अभिनंदन ! तुमच्या या लेखाचा तसा उद्देश नाही हे मला माहित आहे ; पण ढसाळांच्या राजकीय प्रवासाबद्द्ल मला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे. त्यांची शिवसेनासुद्धा घडलेली असावी हे तर मला अकल्पित वाटते. एकूणच , एक फार मोठा कवी , पण एक अतिसामान्य सामजिक-राजकीय कार्यकर्ता-नेता अशा काहीशा गोळाबेरजेकडे मी येतो. त्यांच्या काव्याची रेन्ज , त्यातील धगधगीतपणा, स्फोटकता याला मराठीमधे तरी मला समांतर काही सापडत नाही. पण माणूस म्हणून मलिका अमरशेख यानी आपल्या आत्मचरित्रात घडविलेले त्यांचे दर्शन , त्यांच्या एकूण राजकीय प्रवास या सार्‍यामुळे एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते असे मला वाटते. गोलपिठा आणि इतर कविता यांच्या पलिकडे तुम्हाला ढसाळ कसे दिसतात ? त्यांची वर्गवारी नक्की कुठल्या खात्यावर करायची ?

In reply to by मुक्तसुनीत

विसोबा खेचर गुरुवार, 12/06/2007 - 10:34
पण माणूस म्हणून मलिका अमरशेख यानी आपल्या आत्मचरित्रात घडविलेले त्यांचे दर्शन , त्यांच्या एकूण राजकीय प्रवास या सार्‍यामुळे एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते असे मला वाटते. विचार करण्याजोगा मुद्दा! गोलपिठा आणि इतर कविता यांच्या पलिकडे तुम्हाला ढसाळ कसे दिसतात ? त्यांची वर्गवारी नक्की कुठल्या खात्यावर करायची ? मुक्तसुनितांचा प्रतिसाद आवडला, धोंड्याकडून वरील प्रश्नाचे उत्तर अपेक्षित आहे... तात्या.

धोंडोपंत गुरुवार, 12/06/2007 - 11:09
मुक्तसुनीत यांस, सर्वप्रथम अभिप्रायाबद्दल धन्यवाद. अत्यंत लोभसवाणा, अत्यंत सुसंस्कृत, अत्यंत विचार करण्याजोगा अभिप्राय तुम्ही दिलात. या अभिप्रायाला सविस्तर उत्तर देण्याशिवाय पर्याय नाही. तुमच्या या लेखाचा तसा उद्देश नाही हे मला माहित आहे ; पण ढसाळांच्या राजकीय प्रवासाबद्द्ल मला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे. त्यांची शिवसेनासुद्धा घडलेली असावी हे तर मला अकल्पित वाटते. आमच्या लेखनाचा उद्देश हा केवळ त्यांच्या साहित्यापुरताच मर्यादित आहे. त्यातल्यात्यात फक्त 'गोलपिठा' पुरता. कारण आम्ही म्हटल्याप्रमाणे, 'गोलपिठा' हाच विद्रोही साहित्यातील मैलाचा दगड आहे. एकूणच , एक फार मोठा कवी , पण एक अतिसामान्य सामजिक-राजकीय कार्यकर्ता-नेता अशा काहीशा गोळाबेरजेकडे मी येतो. त्यांच्या काव्याची रेन्ज , त्यातील धगधगीतपणा, स्फोटकता याला मराठीमधे तरी मला समांतर काही सापडत नाही. गोळाबेरजेचे विधान सोडून इतर गोष्टींशी १००% सहमत. "अतिसामान्य सामाजिक कार्यकर्ता" या विधानाशी आम्ही सहमत नाही कारण "पँथरचे दिवस" वाचल्यावर ढसाळांना अतिसामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणवत नाही. पण माणूस म्हणून मलिका अमरशेख यानी आपल्या आत्मचरित्रात घडविलेले त्यांचे दर्शन , त्यांच्या एकूण राजकीय प्रवास या सार्‍यामुळे एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते असे मला वाटते. एखाद्या माणसाच्या वैवाहिक जीवनावर भाष्य करण्याचा आम्हाला अधिकार नाही त्यामुळे याविषयी आम्ही काही बोलत नाही. त्याचप्रमाणे कोणाच्या वैवाहिक जीवनाची वाताहात चविष्टपणे चघळण्यात आम्हाला आनंद वाटत नाही. गोलपिठा आणि इतर कविता यांच्या पलिकडे तुम्हाला ढसाळ कसे दिसतात ? त्यांची वर्गवारी नक्की कुठल्या खात्यावर करायची ? उत्तम प्रश्न. आम्ही ढसाळांकडे पाहतांना गोलपिठा, तुही इयत्ता कंची, खेळ, गांडू बगीच्या, या सत्तेत जीव रमत नाही, मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे आणि इतर ललित लेख याच्या पलिकडे जाऊन पहात नाही. कारण याच्या पलिकडे त्यांच्या खाजगी जीवनात डोकावणे आम्हांला प्रशस्त वाटत नाही. याचं कारण असं आहे की, आमची भूमिका ही आस्वादकाची आहे. कलाकाराच्या कलाकृतीशी आमचे नाते आहे. त्या पलिकडे त्या कलावंताचे खाजगी आणि वैयक्तिक आयुष्य, त्याची जातपात, त्याचा धर्म, त्याची धार्मिक मते, त्याचे राजकीय दृष्टीकोण या गोष्टींशी आमचा खरे तर काहीही संबंध नाही. आमचाच नव्हे तर कोणाचाही नाही. पुन्हा एकदा धन्यवाद. आपला, (आभारी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मुक्तसुनीत गुरुवार, 12/06/2007 - 11:21
यापुढची चर्चा म्हणजे कलास्वाद आणि इतर सामाजिक-राजकीय क्षेत्रे आणि एकूण आयुष्य यांच्यातील नाते , त्याना विभागणार्‍या सीमारेषा , एखाद्या व्यक्तिला अभ्यासताना "कुठे थांबावे" याबद्दलची नैतिकता यांची चर्चा होईल. पर्यायाने तुमच्या मूळ विषयापासून ते भरकटणार आणि ज्याना हा लेख वाचायचाय् आणि मनापासून प्रतिक्रिया द्यायचीय् त्याना गांगरवून सोडल्यासारखे होणार. तेव्हा मी माझी प्रश्नबाजी इथेच थांबवतो. गोलपिठाखेरीजच्या त्यांच्या कवितांचे असेच रसग्रहण/विश्लेषण तुम्ही केलेत , त्यातून त्यांच्या कवितेचा प्रवास कसा घडला हे दाखवलात तर फार मजा येईल. ते एक लेखमाला एका सायंदैनिकात लिहायचे. त्याबद्दलही जमल्यास लिहिलेत तर खूप आनंद होईल. तुम्हाला धन्यवाद.

धोंडोपंत गुरुवार, 12/06/2007 - 15:05
गोलपिठाखेरीजच्या त्यांच्या कवितांचे असेच रसग्रहण/विश्लेषण तुम्ही केलेत , त्यातून त्यांच्या कवितेचा प्रवास कसा घडला हे दाखवलात तर फार मजा येईल. ढसाळांच्या कवितेवर अजून काही लिहायचा तूर्तास विचार नाही. पण आरती प्रभूंच्या 'दिवेलागण' वर लिहायचे मनात आहे. अर्थात संपूर्ण १०५ कवितांवर लिहायला जमणार नाही पण.... ये रे घना ये रे घना न्हांवू घाल माझ्या मना तिच्या मनाच्या ऐलपैल मी श्वास पेरिले होते, चार डोळे: दोन काचा दोन खाचा मर्मावर मार घेत आम्ही जन्मा यावें आमुच्या गोवर्‍या | आम्हीच थापाव्या | आम्हीच राखाव्या | मरणापर्यंत या निवडक कवितांवर लिहावयाचे मन होत आहे. 'दिवेलागण' च्या मोहिनीतून आणि एकूणच खानोलकरांच्या साहित्याच्या नशेतून या जन्मी आम्ही बाहेर येऊ असे वाटत नाही. जगतात येथे कोणी, मनात कुजून तरी कसे फुलतात, गुलाब हे ताजे? कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे.....कुणाचे ओझे.. आपला, (खानोलकरभक्त) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by केशवसुमार

विसोबा खेचर गुरुवार, 12/06/2007 - 17:18
हेच म्हणतो..! धोंड्या, तुझ्याकडून खानोलकरसाहेब समजून घ्यायला नक्कीच आवडतील! लेखांची वाट पाहात आहे.... (आतूर) तात्या.

In reply to by धोंडोपंत

सर्किट गुरुवार, 12/06/2007 - 23:32
"नक्षत्रांचे देणे"" हे दिवेलागण मध्ये आहे का ? आरती प्रभूंचेच आहे ना ते ? धोंडोपंत, खानोलकरांविषयी लिहाच ! आम्ही वाचनास उत्सुक आहोत ! - सर्किट

In reply to by धोंडोपंत

अर्धवटराव Sat, 06/05/2010 - 04:50
मिपा वर धोंडोपंत नावाचा एक अवलीया वाचायला मिळतोय !! माझ्यापुरते तरी, या विद्रोहीसाहित्य वगैरे गोष्टी मला आपल्या सारख्या रसायनांकडुनच चाखायल मिळतात. त्यांच्याशी प्रत्यक्ष भिडण्याचि (कि पचवण्याचि??) माझी ईच्छा (कि हिम्मत??) नाहि. धन्यवाद पंत !! (वाचक) अर्धवटराव -रेडि टु थिंक

In reply to by अर्धवटराव

हल्ली धोंडोपंत लिहित नाहीत याचे आम्हाला दु:ख आहे. त्यांच्या ज्योतिषाच्या ब्लॉग वर ते नेहमी लिहितात. प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

मुक्तसुनीत Fri, 12/07/2007 - 00:28
खरे सांगायचे तर खानोलकर, ग्रेस यासारख्या कवींबद्दल आता आपल्याला काय वाटते हे पुन्हा तपासून पहायची वेळ आली आहे असे मला केव्हापासून वाटते. नव्वदीच्या दशकापर्यंत आजुबाजुच्या वातावरणामधे , माध्यमांमधे , मित्रांमधे या दोन कवींना केव्हढे ग्लॅमर होते ! हृदयनाथ मंगेशकरांच्या लोकप्रियतेला ऐंशीच्या शेवटाला आणि नव्वदीच्या सुरुवातीच्या वर्षांत मोठा बहर आल होता. या सुमारास मला वाटते, संगीतकाराच्या आणि या कविंच्या लोकप्रियतेचा एकत्रित परिणाम खूप मोठा होता. या दोन (आणि इतरही काही) कविंकडे तरुण वाचकाना वळविण्याचे काही श्रेय या संगीतकाराला द्यायलाच हवे. अशाच स्वरूपाचा परिणाम त्याआधी एक-दोन दशके पु.लं.च्या एंडॉर्समेंटमुळे झाला होता असे म्हणता येईल. या दोन कवींना कमी लेखायचा माझा हेतु बिलकुल नाही. पण भूतकाळातील प्रत्येक गोष्टीप्रमाणे त्यांचेसुद्धा मूल्यमापन आपण कळत न कळत करतोच. तुमच्या खानोलकरवरील लिखाणाची आतुरतेने वाट पाहतो.

आपण सर्व अभासू, जिज्ञासू लोकांना एक साधा प्रश्न! "मैलाचा दगड" हा शब्दप्रयोग इंग्लीश milestone चं भाषांतर वाटतं. याला अस्सल मराठी पर्याय आहे का? आपण साहेबाच्या मागून लवकरच मैल सोडले आणि किलोमीटर वापरू लागलो पण तरीही मैलाचे दगड हटले नाहीत. संहिता

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धनंजय Fri, 12/07/2007 - 04:36
पण हा संस्कृतातून घेतलेला आहे, फोडला तर मराठीत अर्थ लागत नाही. मान = "मोजणे" असा अर्थ सामान्य नव्हे, अणि मोजण्याच्या पट्टीला "दंड" म्हणण्याची पद्धतही मराठी नव्हे. शिवाय "मानदंडा"ला स्वतःचे अर्थवलय आहे, त्यामुळे तो इथे चालणार नाही. मानदंडाने अनेक वस्तू पुन्हापुन्हा मोजल्या जातात, प्रवासात आपण एकदा मैलाच्या दगडाजवळ येतो, आणि मग पुढे चालत राहातो. खरे तर आजकाल मैल वापरत नाही, आणि दगडही वापरत नाहीत. बहुतेक नवीन रस्त्यांवर, महामार्गांवर "अंतराचे फलक" किंवा "अंतराच्या पाट्या" असतात. इंग्रजीतून मराठीकृत सर्वच शब्द टाकाऊ मानू नयेत. ज्या वस्तूचे आपल्याला प्राथमिक ज्ञान इंग्रजीतून झाले, त्याचा मराठी प्रतिशब्द इंग्रजीला समांतर असला तर काय वावगे? "मैलाचा दगड" ठीकच वाटतो.

In reply to by धनंजय

माझे आजोबा मला मैलांत अंतर सांगायचे आणि मी बाबांकडे प्रश्नार्थक चेहेय्राने पहायचे. नक्कीच आजपासून काही वर्षांनी मैलाचा दगड हा वाक्-प्रयोग कालबाह्य होईल. आजच्या किती (भारतीय) मुलांना मैलाचा दगड (/milestone) समजेल? U.K. मधे मैलाचा दगड भाषेत अडथळा आणणार नाही, कारण तिथे अजूनही अंतरं मैलांमधे मोजतात. प्रश्न फक्त अनुवादीत वाक्-प्रयोगांचा नाही तर कालबाह्य असण्या-नसण्याचाही आहे! संहिता.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धनंजय Fri, 12/07/2007 - 18:06
याबाबत उपक्रमावरील ही चर्चा वाचून गंमत वाटेल : http://mr.upakram.org/node/899 खरे म्हणजे या बाबतीत १.६१ हा आकडा नेमका माहीत नसून साहित्यिक अर्थ लागतो. मैल हा गावा-गावामधील अंतरांसाठी उपयोगी असलेले कुठलेसे अंतर होते असा साधारण अर्थ माहीत असला म्हणजे पुरे. तोळा-मासा, शेरास सव्वाशेर (म्हणजे नेमके किती वजन?) क्षणभर थांब (क्षण म्हणजे किती सेकंद हो भाऊ?), नमनाना घडीभर तेल (नेमके किती?), पल पल दिल के पास तुम रहती हो (यह 'पल' कितना समय है?) Give a camel an inch and he will take an ell. (हाऊ मच विल द कॅमल टेक, एग्झॅक्ट्ली?) या सगळ्या ठिकाणी (कंसातला) प्रश्न न विचारताही काही अर्थ कळतो, आणि जेवढा कळतो तो पूर्ण असतो. पण milestone च्या बाबतीत तुम्ही नवीन कुठला चित्रदर्शी शब्द वापरात आणायचे म्हणत आहात ते चांगलेच आहे. तसा सुटसुटीत शब्द कोणी वापरात आणला, तर मी वेळोवेळी जरूर वापरीन.

In reply to by धनंजय

मन Sat, 06/05/2010 - 15:08
हा शब्द कसा वाटतो? किंवा अमुक एका कलाकृतीनं त्या क्शेत्रात "मन्वंतर" घडावलं. किंवा नवं युग आणलं किंवा "युगांतर " केलं असा वाक्प्रचार सध्याही आहे कि आपल्या मायभाषेत. आपलाच, मनोबा

धनंजय Fri, 12/07/2007 - 18:08
या बाबतीत माझे वाचन फार तोकडे आहे. या तोंडओळखीने या विद्रोही कवितांबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे, संग्रह मिळवून वाचीन. धन्यवाद धोंडोपंत!

In reply to by धनंजय

नंदन Sun, 12/09/2007 - 04:09
म्हणतो. ढसाळ, खानोलकर यांच्याविषयी लिहिलेत तर वाचायला नक्की आवडेल. बाकी आपल्या चौफेर लेखनाबद्दल बेसनलाडवाशी सहमत आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

धोंडोपंत Sat, 12/08/2007 - 20:17
धन्यवाद धनंजयराव, या बाबतीत माझे वाचन फार तोकडे आहे. या तोंडओळखीने या विद्रोही कवितांबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे, संग्रह मिळवून वाचीन. धन्यवाद धोंडोपंत! आपले कुतूहल जागे झाले याचा आनंद आहे. विद्रोही साहित्य जरूर वाचा. माणसांनी आयुष्यात काय काय सोसलाय ते त्यातून कळतं. गोलपिठाबरोबर १) मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे २) गांडू बगीच्या ३) या सत्तेत जीव रमत नाही ४) तुही इयत्ता कंची ही पुस्तकेही वाचा. खरतरं कोणतेही साहित्य मनात कोणताही 'इझम' न ठेवता वाचले पाहिजे. तरच ते खर्‍या अर्थाने समजून घेता येते. पण अनेक लोकांना ते जमत नाही. त्यामुळे ढसाळांच्या लेखनात काही वाक्ये वाचनात आली की, मनातला सुप्त 'इझम' जागा होतो आणि त्या साहित्यातील वेदना समजून न घेता त्याचे एकांगी मूल्यमापन केले जाते. त्या पासून वाचले पाहिजे. आपला, (संतुलित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

दत्ता काळे Sat, 06/05/2010 - 16:29
आरती प्रभूंच्या निवडक काव्यांचे जाहीर वाचन पु.ल. आणि सुनीताबाई देशपांडे करत असंत , पण त्यावरचे भाष्य ( निरुपण ? ) मात्र फारसे होत नसे. कदाचित कार्यक्रमाला वेळेचं बंधन असावं . बर्‍याच कवितांना अर्थाचे एकापेक्षा अधिक पैलू असू शकतात, आणि आपण कविता विचारांच्या एकांगानेच वाचत असतो. त्या कवितेचा स्वभाव, तिच्यातल्या संवेदना समजून देणारे, त्यातला अर्थ उलगडणारे लेखन वाचायला निश्चित आवडेल. खरतरं कोणतेही साहित्य मनात कोणताही 'इझम' न ठेवता वाचले पाहिजे. तरच ते खर्‍या अर्थाने समजून घेता येते. पण अनेक लोकांना ते जमत नाही. - हे अगदी खरे आहे.

In reply to by जव्हेरगंज

बोका-ए-आझम Mon, 05/16/2016 - 22:14
ढसाळ म्हणजे उकळत्या पाण्याने एखाद्याला झोपेतून उठवण्यासारखं आहे. गोलपिठा आणि दया पवारांचं ' बलुतं ' हे जबरदस्त आहेत.

पथिक Mon, 05/16/2016 - 10:32
त्यांच्या शिव्या खटकत नाहीत. कारण त्या इतक्या अस्सलपणे आलेल्या असतात की जखमेतून रक्त वहावे तशी ही कविता वहायला लागते.
किती समर्पक ! खूप आवडले लेखन.

महासंग्राम Mon, 05/16/2016 - 16:41
ढसाळ कायम आवडत्या कवींपैकी एक होते , आजही त्यांचे लिखाण वाचले कि आजूबाजूच्या परिस्थितीवर नजर पडल्याशिवाय राहत नाही. जव्हेरगंज भाऊ खूप सुंदर धागा वर आणलात

कांदा लिंबू Tue, 07/16/2024 - 18:13
या धाग्यात उद्धृत केलेलया अवतरणांमधील तथाकथित "अस्सल" भाषा, त्या भाषेचे कौतुक करणारे कितीजण आपापल्या घरी, कुटुंबियांशी बोलताना वापरतात? --- आजचा सुविचार: थेट प्रश्नाला फाटे फोडण्याचा प्रयत्न ही एक क्षीण पळवाट असते.
बाकी ढसाळांच्या विद्रोहात सर्व गोष्टी "क्षम्य" असतात. सभ्य म्हणून गणले गेलेले प्रतिशब्द वापरले तर विद्रोहच संपून जाईल. विवेकवादी चळवळींमध्ये देखील विद्रोहाचे मान व भान राखावे लागते. आमचे विद्वान आणि नेमकेपणाने लेखन करणारे लेखक स्नेही श्री. प्रकाशराव घाटपांडे यांच्या वरील अभिप्रायावरून विद्रोही साहित्याबद्दल चर्चा घडवून आणण्यासाठी हा लेखनप्रपंच. विद्रोही साहित्याची परंपरा जरी जुनी असली तरी खर्‍या अर्थाने या प्रकारच्या साहित्याला, 'मान्यता' हा शब्द बरोबर वाटत नाही, पण 'प्रसिद्धि' श्री. नामदेव ढसाळांच्या 'गोलपिठा' या पुस्तकाने मिळवून दिली, हे वास्तव आहे.

काळजी करण्यासारखे काय आहे त्यात ???

छोटा डॉन ·

विसोबा खेचर Mon, 12/03/2007 - 16:08
आणि समजा चुकून नरकात गेलात [ जातालच ना ....] तर तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांना भेटण्यात येवढे मग्न व्हाल की तुमच्याकडे काळजी करण्यासाठी वेळच ऊरणार नाही......... हे बाकी खरं आहे! :) आपला, (निष्काळजी) तात्या.

विसोबा खेचर Mon, 12/03/2007 - 16:08
आणि समजा चुकून नरकात गेलात [ जातालच ना ....] तर तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांना भेटण्यात येवढे मग्न व्हाल की तुमच्याकडे काळजी करण्यासाठी वेळच ऊरणार नाही......... हे बाकी खरं आहे! :) आपला, (निष्काळजी) तात्या.
आधीच जाहीर करतो, इंटरनेट वरून साभार............... आज फक्त २ गोष्टी काळजी करण्यासारख्या आहेत ...... एक म्हणजे तुमची तब्येत चांगली आहे का तुम्ही आजारी आहेत ? जर तुमची तब्येत ठणठणीत असेल तर मग काळजी कशाची करता, मस्त जीवनाचा आनंद घ्या ....... पण जर तुमची तब्येत बरी नाही, तुम्ही आजारी आहात तर तुम्हाला २ गोष्टींची काळजी करायला हवी..... एक तर तुम्ही बरे व्हाल का आजारपणातच मरून जाल ? जर तुम्ही बरे होणार असाल तर काळजी करण्यासारखे काही नाही......... पण जर तुम्ही आजारपणातच मरण्याची शक्यता असल्यास तुम्हाला काळजी करण्यासारख्या २ गोष्टी आहेत.....

रौशनी.. ४

विसोबा खेचर ·

धोंडोपंत Mon, 12/03/2007 - 12:47
वा वा वा वा, तात्या, लई झकास. अस्सल लिखाण झाले आहे. असेच चालू दे. तथाकथित सभ्यतेची पुटे त्यावर चढवून त्यातला अस्सलपणा घालवू नकोस, वेदना मारू नकोस. हा लेख वाचल्यावर लगेच नामदेव ढसाळांचे 'गोलपीठा' आठवलं. त्यात नामदेव ढसाळ म्हणतात - "खद्र्या मैनांनो, तुमच्या उद्ध्वस्त पुच्यांचा मी नि:पक्ष भाष्यकार" समाजातल्या ह्या अतिशोषित वर्गावर लेखन करतांना हीच नि:पक्ष भाष्यकाराची भूमिका असली पाहिजे. आपला, (वाचक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

तथाकथित सभ्यतेची पुटे त्यावर चढवून त्यातला अस्सलपणा घालवू नकोस, वेदना मारू नकोस.>> "खद्र्या मैनांनो, तुमच्या उद्ध्वस्त पुच्यांचा मी नि:पक्ष भाष्यकार" ऑक्सफर्ड इंग्रजी -मराठी डिक्सनरीत (रमेश धोंगडे संकलित) cunt या शब्दाचा अर्थ पुच्ची असा दिला आहे. इथे सभ्यतेच्या मर्यादा पाळल्या नाहीत असे काही जणांना नक्की वाटेल. पण अर्थवैविध्याचा संकोच होउ नये म्हणुन ही "काळजी" संपादकांनी घेतली असावी. बाकी ढसाळांच्या विद्रोहात सर्व गोष्टी "क्षम्य" असतात. सभ्य म्हणून गणले गेलेले प्रतिशब्द वापरले तर विद्रोहच संपून जाईल. विवेकवादी चळवळींमध्ये देखील विद्रोहाचे मान व भान राखावे लागते. धोंडोपंतांशी सहमत आहे. प्रकाश घाटपांडे

विसुनाना Mon, 12/03/2007 - 13:29
तात्या, 'रोशनी' भन्नाट होत आहे. मावशी असूनही तिच्यातली सुसंस्कॄत स्त्री जिवंत आहे हे जाणवते. चांगलं काय आणि वाईट काय याचं (तथाकथित?) सभ्य समाजानं केलेलं वर्गीकरण तिला मान्य आहे. ती तुम्हाला त्या अर्थानंच 'सही आणि सीधेसाधे' समजते. आता तिची कहाणी ऐकल्यावर मगच ती मावशी का झाली याचा उलगडा होईल. प्रतिक्षेत. एक प्रश्न उभा राहतो - समाजाचे सांस्कृतिक मापदंड बदलत चालले आहेत का? या व्यवसायात उतरणार्‍या स्त्रियांची दु:खे, त्यांची आगतिकता गेल्या पिढीत फार चर्चिली गेली आणि या स्त्रिया केवळ परिस्थितीची शिकार होऊन हा 'धंदा' करतात असा सर्वसाधारण सूर होता. आता मात्र अनेक तरूण मुली स्वेच्छेने, केवळ भरपूर संपत्ती कमी वेळात मिळवता येईल असा हिशोब करून 'डान्स बार'च्या अथवा इतर नावांखाली हाच किंवा अशा प्रकारचा व्यवसाय करतात. इतकेच काय पण त्यांना यातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नांना - 'पण आमच्या आमदनीला धक्का न लावता' - ही पूर्वअट आहे. असं का झालं आहे?(की त्यावेळीही अशीच परिस्थिती होती?) आजची 'रोशनी' अशी आपल्या मैत्रिणीच्या मुलाचा उद्धार व्हावा याच्या तळमळीत असेल काय? तात्या, याबद्दल तुमचा अनुभव/मत काय?

In reply to by विसुनाना

प्रियाली Mon, 12/03/2007 - 17:25
समाजाचे सांस्कृतिक मापदंड बदलत चालले आहेत का? - समाजाचे सांस्कृतिक मापदंड हे काळानुसार बदलत असतातच. तेव्हा ते हल्ली आणि भविष्यात बदलत राहतील हे नि:संशय. आपण शरीरविक्रय करणार्‍या आणि बारबालांचा उद्योग करणार्‍या मुलींना सहज या ठीकाणी पाहतो. थोडा विचार करून पाहा, आपल्या आजूबाजूलाही अशा मुली दिसतात पण समाजातील कनिष्ठ वर्गाकडे आपण सहज बोट दाखवतो. या प्रतिष्ठित घराण्यांतील मुलींपैकी काही चित्रपटांच्या वेडाने, नाट्य, टीव्ही शृंखला इ.च्या वेडाने झपाटलेल्या असतात. कधी जाहीरात क्षेत्राकडे तर हवाईसुंदरी, हॉटेलिंग व्यवसाय यांतील असतात. (सरसकट ठपका ठेवण्याचा हेतू नाही परंतु हवाईसुंदरी आणि मोठमोठ्या हॉटेल्समधील काही व्यक्तींशी ओळख असल्याने त्यांच्या "विचारांत आचारांत" अचानक आलेले बदल अनुभवलेले आहेत. दुर्दैवाने, हे बदल त्यांच्या पांढरपेशा पालकांतही पाहिलेले आहेत. तेव्हा येथे मावशी कोण असा प्रश्न पडतो.) तरुण मुली सोडल्या तर हात आणि घरखर्चाला थोडे अधिक पैसे मिळावे म्हणून प्रतिष्ठीत घरांतील सुगृहिणीही असे 'पार्टटाईम' उद्योग करून असतात. ओम पुरी आणि रेखा अभिनीत 'आस्था' हा चित्रपट याच गोष्टीवर आधारित होता हे आठवते. तात्या, रोशनीचा ४था भाग आवडला. पुढच्या भागांसाठी उशीर नको.

In reply to by प्रियाली

विसुनाना Mon, 12/03/2007 - 17:46
म्हणायचे होते. फक्त कनिष्ठ वर्गावर ठपका ठेवण्याचा हेतू नव्हता. इतकेच काय? तर रोशनीमध्येच मालिका अभिनेत्रीचे जे पात्र आले आहे त्यातून तात्यांना हेच (उच्चभ्रू म्हणवणार्‍या समाजाचे अधःपतन) दाखवावेसे वाटत असावे. पण माझा मुद्दा एवढाच की - पूर्वी वैयक्तिक फायद्यासाठी ऊर्ध्वगमन करण्याचे प्रयत्न चालत. (उदा. रोशनी कृष्णाला गर्तेतून बाहेर काढू इच्छिते, शिकवून शहाणा, नीतीमंत करू पहाते.) आता व्यक्तिगत अधोगतीतच फायदा दिसत आहे. (उदा. आजची रोशनी कृष्णाला म्हणेल - शिकून काय मिळणार? त्यापेक्षा मस्त दारूच्या अड्ड्यावर काम कर. 'दल्ला'ली कर. डॉन-बीन हो!) गेल्या दहा बारा वर्षात सांस्कृतिक मापदंडातला हा अमूलाग्र बदल (घूमजाव) पाहून भोवळ येते.

सहज Mon, 12/03/2007 - 14:48
रौशनी भाग ४ आला....... ...थोडे तरी मार्गी लागलो. आता जास्त वेळ वाट नका बघायला लावू... हा भाग देखील नेहमी सारखा मस्त चकचकीत... नो डाउट... आणि मला ती तिच्या पूर्वायुष्याबद्दल सगळं सांगणार होती! हे शेवटचे वाक्य मात्र सुत्रधार/नायकाने/लेखकाने कसे टाकले ते समजले नाही. रौशनी ,"जेव आधी, मग सांगते." असे कदाचित म्हणाली असेल. असो लवकर पुढचा भाग येऊ देत.

नंदन Mon, 12/03/2007 - 16:03
तात्या, इंतजार का फल मीठा होता है म्हणतात तसं वाटलं हा भाग वाचून. पुढच्या भागांबद्दल उत्सुकता लागली आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

कोलबेर Mon, 12/03/2007 - 19:32
आपण किती सहजपणे आपल्या नेहमीच्या बोलण्याचालण्यात 'हरामी', 'हरामखोर' हे शब्द वापरतो! पण आज मी प्रत्यक्ष एका 'हरामी' माणसाला बघत होतो! आवडले. पुढ्यच्या भागांच्या प्रतिक्षेत! -कोलबेर

बेसनलाडू Mon, 12/03/2007 - 23:45
आता कुठे गोष्टीला सुरुवात होते आहे. हा भाग आधीच्या भागांप्रमाणेच चांगला आणि पुढील भागांची उत्कंठा वाढवणारा. पुढचे भाग येऊ द्यात; आम्ही वाचत आहोतच. (वाचक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

धनंजय Tue, 12/04/2007 - 06:53
आताच कुठे कथा सुरू होते आहे, आधीच आवडलेली आणखीन आवडत आहे. (अवांतर १: मागे मी दुसर्‍या एका चित्रणाच्या बाबतीत म्हटले होते की "नकल केल्यासारखे वाटले", यावेळी ती तक्रार साफ खोटी पाडून मला शर्मिंदा केलेत! आणि या शरमेत मला अधिक सुख आहे, ते सांगावे लागू नये.) (अवांतर २: या कथेत एकही अश्लील शब्द किंवा वाक्य नाही. कारण "अश्लीलपणा" हा संदर्भाने होतो, शब्दाच्या उच्चाराने नाही. त्यामुळे उगाच माफी मागू नका बुवा - कोण्या अडाण्याला वाटेल की खरेच माफी मागण्यालायक काही आहे.)

In reply to by धनंजय

राजे Tue, 12/04/2007 - 21:39
शी सहमत. छान लेखन... आम्ही वाचतो आहोत.. पुढील भाग लवकर लिहा नाहीतर थांबाला चार-पाच महिने तो पर्यंत आम्ही सगळे विसरुन जाऊ व मग कोणीतरी चर्चा चालू करेल "रोशनी" चे काय ? तर अशी वेळ येऊ देऊ नका, लवकर लिहा. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

सर्किट Tue, 12/04/2007 - 00:06
हाही भाग छानच जमलाय तात्याशेठ ! येऊ द्या. आता कुठे गोष्टीला सुरुवात होते आहे. बेसनलाडवाशी सहमत ! - सर्किट

प्राजु Tue, 12/04/2007 - 00:28
आहे. अजून लवकर येऊदेत पुढचे भाग. रोशनीचे व्यक्तिमत्व कणखर दाखवले आहे... आवडले. पांढरपेशा समजातला "हा उद्योग" माहिती होता. पण नवे आलेले २ चित्रपट १. मुंबई सालसा २. दिल विल एक्सेट्रा... हे पाहून ही नवी फॅशन वाटते... कॉलेज जीवनात किवा शालेय जीवनातही.. १ पेक्षा जास्त व्यक्तींशी सबंध ठेवून.. त्यात काही गैर नाही अशी विचार सरणी असणे. किंवा त्यावर पैज लावणे. मला हे चित्रपट झेपलेच नाहीत. - प्राजु.

तात्या, रोशनीचा हा भाग ही आवडला. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. (आम्हालाही या लेखाच्या निमित्ताने नामदेव ढसाळांच्या कवितेतील वेगवेगळ्या शब्दांची आठवण झाली)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किमयागार Wed, 12/05/2007 - 09:04
अध्यक्ष महोदय, लेख मालिका संपेपर्यंत आम्ही आमचे मत राखून ठेवत आहोत. कळावे, -कि'गार ******************************************** अल्कोहोलचा परिणाम दुसरे काय?

विसोबा खेचर गुरुवार, 12/06/2007 - 08:17
सर्वांचे मनापासून आभार... नानासाहेब, आपले प्रश्न वाजवी आहेत, प्रियालीने दिलेल्या उत्तराशी मी सहमत आहे.. तात्या.

दिगम्भा गुरुवार, 12/06/2007 - 12:35
आपल्या मराठी लोकांना उर्दू विशेष समजत नसल्यामुळे हरामखोर आणि हरामज़ादा हे एकच किंवा जवळपासचे वाटतात. त्यातले वाईट नि जास्त वाईट (चुकून चागले-वाईट म्हणणार होतो) कळत नाही. ज्यांना अचूक शिव्या देण्यात रस आहे त्यांच्यासाठी हा खुलासा - खोर (ख़्वार) म्हणजे खाणारा -- हरामखोर म्ह. हरामाचे खाणारा, (धर्माला) निषिद्ध (असलेल्या) मार्गाने उदरनिर्वाह करणारा, स्त्रियांचा शरीरविक्रय करून जगणारा भडवा हा त्यापैकी एक; ज़ादा म्हणजे जन्मलेला किंवा मुलगा -- हरामातून जन्मलेला, (धर्माला) निषिद्ध (असलेल्या) मार्गाने जन्मलेला, लावारिस, अनौरस, अक्करमासा/शा, मराठीत सांगायचे तर बास्टर्ड. शिव्या देतांना हरामखोर ही काहीशी सौम्य तर हरामज़ादा ही तीव्र शिवी आहे, हे मराठी लोकांना कळले नाही तरी उत्तरेकडील लोकांना चांगले कळते हे ध्यानात ठेवावे व योग्य काळजी घ्यावी. रौशनीला हरामी म्हणजे हरामज़ादा अभिप्रेत होता असे वाटते, हरामखोर नव्हे. कथा आवडते आहे. अर्वाच्यता स्वाभाविकपणे आल्यासारखी वाटते. आधीचा एक लेख (व त्याखालील प्रतिसाद) केवळ अर्वाच्यतेसाठी लिहिल्यासारखा वाटला होता तसे येथे वाटत नाही. पुढील भागाची वाट पाहतो आहे. - दिगम्भा

धोंडोपंत Mon, 12/03/2007 - 12:47
वा वा वा वा, तात्या, लई झकास. अस्सल लिखाण झाले आहे. असेच चालू दे. तथाकथित सभ्यतेची पुटे त्यावर चढवून त्यातला अस्सलपणा घालवू नकोस, वेदना मारू नकोस. हा लेख वाचल्यावर लगेच नामदेव ढसाळांचे 'गोलपीठा' आठवलं. त्यात नामदेव ढसाळ म्हणतात - "खद्र्या मैनांनो, तुमच्या उद्ध्वस्त पुच्यांचा मी नि:पक्ष भाष्यकार" समाजातल्या ह्या अतिशोषित वर्गावर लेखन करतांना हीच नि:पक्ष भाष्यकाराची भूमिका असली पाहिजे. आपला, (वाचक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

तथाकथित सभ्यतेची पुटे त्यावर चढवून त्यातला अस्सलपणा घालवू नकोस, वेदना मारू नकोस.>> "खद्र्या मैनांनो, तुमच्या उद्ध्वस्त पुच्यांचा मी नि:पक्ष भाष्यकार" ऑक्सफर्ड इंग्रजी -मराठी डिक्सनरीत (रमेश धोंगडे संकलित) cunt या शब्दाचा अर्थ पुच्ची असा दिला आहे. इथे सभ्यतेच्या मर्यादा पाळल्या नाहीत असे काही जणांना नक्की वाटेल. पण अर्थवैविध्याचा संकोच होउ नये म्हणुन ही "काळजी" संपादकांनी घेतली असावी. बाकी ढसाळांच्या विद्रोहात सर्व गोष्टी "क्षम्य" असतात. सभ्य म्हणून गणले गेलेले प्रतिशब्द वापरले तर विद्रोहच संपून जाईल. विवेकवादी चळवळींमध्ये देखील विद्रोहाचे मान व भान राखावे लागते. धोंडोपंतांशी सहमत आहे. प्रकाश घाटपांडे

विसुनाना Mon, 12/03/2007 - 13:29
तात्या, 'रोशनी' भन्नाट होत आहे. मावशी असूनही तिच्यातली सुसंस्कॄत स्त्री जिवंत आहे हे जाणवते. चांगलं काय आणि वाईट काय याचं (तथाकथित?) सभ्य समाजानं केलेलं वर्गीकरण तिला मान्य आहे. ती तुम्हाला त्या अर्थानंच 'सही आणि सीधेसाधे' समजते. आता तिची कहाणी ऐकल्यावर मगच ती मावशी का झाली याचा उलगडा होईल. प्रतिक्षेत. एक प्रश्न उभा राहतो - समाजाचे सांस्कृतिक मापदंड बदलत चालले आहेत का? या व्यवसायात उतरणार्‍या स्त्रियांची दु:खे, त्यांची आगतिकता गेल्या पिढीत फार चर्चिली गेली आणि या स्त्रिया केवळ परिस्थितीची शिकार होऊन हा 'धंदा' करतात असा सर्वसाधारण सूर होता. आता मात्र अनेक तरूण मुली स्वेच्छेने, केवळ भरपूर संपत्ती कमी वेळात मिळवता येईल असा हिशोब करून 'डान्स बार'च्या अथवा इतर नावांखाली हाच किंवा अशा प्रकारचा व्यवसाय करतात. इतकेच काय पण त्यांना यातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नांना - 'पण आमच्या आमदनीला धक्का न लावता' - ही पूर्वअट आहे. असं का झालं आहे?(की त्यावेळीही अशीच परिस्थिती होती?) आजची 'रोशनी' अशी आपल्या मैत्रिणीच्या मुलाचा उद्धार व्हावा याच्या तळमळीत असेल काय? तात्या, याबद्दल तुमचा अनुभव/मत काय?

In reply to by विसुनाना

प्रियाली Mon, 12/03/2007 - 17:25
समाजाचे सांस्कृतिक मापदंड बदलत चालले आहेत का? - समाजाचे सांस्कृतिक मापदंड हे काळानुसार बदलत असतातच. तेव्हा ते हल्ली आणि भविष्यात बदलत राहतील हे नि:संशय. आपण शरीरविक्रय करणार्‍या आणि बारबालांचा उद्योग करणार्‍या मुलींना सहज या ठीकाणी पाहतो. थोडा विचार करून पाहा, आपल्या आजूबाजूलाही अशा मुली दिसतात पण समाजातील कनिष्ठ वर्गाकडे आपण सहज बोट दाखवतो. या प्रतिष्ठित घराण्यांतील मुलींपैकी काही चित्रपटांच्या वेडाने, नाट्य, टीव्ही शृंखला इ.च्या वेडाने झपाटलेल्या असतात. कधी जाहीरात क्षेत्राकडे तर हवाईसुंदरी, हॉटेलिंग व्यवसाय यांतील असतात. (सरसकट ठपका ठेवण्याचा हेतू नाही परंतु हवाईसुंदरी आणि मोठमोठ्या हॉटेल्समधील काही व्यक्तींशी ओळख असल्याने त्यांच्या "विचारांत आचारांत" अचानक आलेले बदल अनुभवलेले आहेत. दुर्दैवाने, हे बदल त्यांच्या पांढरपेशा पालकांतही पाहिलेले आहेत. तेव्हा येथे मावशी कोण असा प्रश्न पडतो.) तरुण मुली सोडल्या तर हात आणि घरखर्चाला थोडे अधिक पैसे मिळावे म्हणून प्रतिष्ठीत घरांतील सुगृहिणीही असे 'पार्टटाईम' उद्योग करून असतात. ओम पुरी आणि रेखा अभिनीत 'आस्था' हा चित्रपट याच गोष्टीवर आधारित होता हे आठवते. तात्या, रोशनीचा ४था भाग आवडला. पुढच्या भागांसाठी उशीर नको.

In reply to by प्रियाली

विसुनाना Mon, 12/03/2007 - 17:46
म्हणायचे होते. फक्त कनिष्ठ वर्गावर ठपका ठेवण्याचा हेतू नव्हता. इतकेच काय? तर रोशनीमध्येच मालिका अभिनेत्रीचे जे पात्र आले आहे त्यातून तात्यांना हेच (उच्चभ्रू म्हणवणार्‍या समाजाचे अधःपतन) दाखवावेसे वाटत असावे. पण माझा मुद्दा एवढाच की - पूर्वी वैयक्तिक फायद्यासाठी ऊर्ध्वगमन करण्याचे प्रयत्न चालत. (उदा. रोशनी कृष्णाला गर्तेतून बाहेर काढू इच्छिते, शिकवून शहाणा, नीतीमंत करू पहाते.) आता व्यक्तिगत अधोगतीतच फायदा दिसत आहे. (उदा. आजची रोशनी कृष्णाला म्हणेल - शिकून काय मिळणार? त्यापेक्षा मस्त दारूच्या अड्ड्यावर काम कर. 'दल्ला'ली कर. डॉन-बीन हो!) गेल्या दहा बारा वर्षात सांस्कृतिक मापदंडातला हा अमूलाग्र बदल (घूमजाव) पाहून भोवळ येते.

सहज Mon, 12/03/2007 - 14:48
रौशनी भाग ४ आला....... ...थोडे तरी मार्गी लागलो. आता जास्त वेळ वाट नका बघायला लावू... हा भाग देखील नेहमी सारखा मस्त चकचकीत... नो डाउट... आणि मला ती तिच्या पूर्वायुष्याबद्दल सगळं सांगणार होती! हे शेवटचे वाक्य मात्र सुत्रधार/नायकाने/लेखकाने कसे टाकले ते समजले नाही. रौशनी ,"जेव आधी, मग सांगते." असे कदाचित म्हणाली असेल. असो लवकर पुढचा भाग येऊ देत.

नंदन Mon, 12/03/2007 - 16:03
तात्या, इंतजार का फल मीठा होता है म्हणतात तसं वाटलं हा भाग वाचून. पुढच्या भागांबद्दल उत्सुकता लागली आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

कोलबेर Mon, 12/03/2007 - 19:32
आपण किती सहजपणे आपल्या नेहमीच्या बोलण्याचालण्यात 'हरामी', 'हरामखोर' हे शब्द वापरतो! पण आज मी प्रत्यक्ष एका 'हरामी' माणसाला बघत होतो! आवडले. पुढ्यच्या भागांच्या प्रतिक्षेत! -कोलबेर

बेसनलाडू Mon, 12/03/2007 - 23:45
आता कुठे गोष्टीला सुरुवात होते आहे. हा भाग आधीच्या भागांप्रमाणेच चांगला आणि पुढील भागांची उत्कंठा वाढवणारा. पुढचे भाग येऊ द्यात; आम्ही वाचत आहोतच. (वाचक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

धनंजय Tue, 12/04/2007 - 06:53
आताच कुठे कथा सुरू होते आहे, आधीच आवडलेली आणखीन आवडत आहे. (अवांतर १: मागे मी दुसर्‍या एका चित्रणाच्या बाबतीत म्हटले होते की "नकल केल्यासारखे वाटले", यावेळी ती तक्रार साफ खोटी पाडून मला शर्मिंदा केलेत! आणि या शरमेत मला अधिक सुख आहे, ते सांगावे लागू नये.) (अवांतर २: या कथेत एकही अश्लील शब्द किंवा वाक्य नाही. कारण "अश्लीलपणा" हा संदर्भाने होतो, शब्दाच्या उच्चाराने नाही. त्यामुळे उगाच माफी मागू नका बुवा - कोण्या अडाण्याला वाटेल की खरेच माफी मागण्यालायक काही आहे.)

In reply to by धनंजय

राजे Tue, 12/04/2007 - 21:39
शी सहमत. छान लेखन... आम्ही वाचतो आहोत.. पुढील भाग लवकर लिहा नाहीतर थांबाला चार-पाच महिने तो पर्यंत आम्ही सगळे विसरुन जाऊ व मग कोणीतरी चर्चा चालू करेल "रोशनी" चे काय ? तर अशी वेळ येऊ देऊ नका, लवकर लिहा. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

सर्किट Tue, 12/04/2007 - 00:06
हाही भाग छानच जमलाय तात्याशेठ ! येऊ द्या. आता कुठे गोष्टीला सुरुवात होते आहे. बेसनलाडवाशी सहमत ! - सर्किट

प्राजु Tue, 12/04/2007 - 00:28
आहे. अजून लवकर येऊदेत पुढचे भाग. रोशनीचे व्यक्तिमत्व कणखर दाखवले आहे... आवडले. पांढरपेशा समजातला "हा उद्योग" माहिती होता. पण नवे आलेले २ चित्रपट १. मुंबई सालसा २. दिल विल एक्सेट्रा... हे पाहून ही नवी फॅशन वाटते... कॉलेज जीवनात किवा शालेय जीवनातही.. १ पेक्षा जास्त व्यक्तींशी सबंध ठेवून.. त्यात काही गैर नाही अशी विचार सरणी असणे. किंवा त्यावर पैज लावणे. मला हे चित्रपट झेपलेच नाहीत. - प्राजु.

तात्या, रोशनीचा हा भाग ही आवडला. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. (आम्हालाही या लेखाच्या निमित्ताने नामदेव ढसाळांच्या कवितेतील वेगवेगळ्या शब्दांची आठवण झाली)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किमयागार Wed, 12/05/2007 - 09:04
अध्यक्ष महोदय, लेख मालिका संपेपर्यंत आम्ही आमचे मत राखून ठेवत आहोत. कळावे, -कि'गार ******************************************** अल्कोहोलचा परिणाम दुसरे काय?

विसोबा खेचर गुरुवार, 12/06/2007 - 08:17
सर्वांचे मनापासून आभार... नानासाहेब, आपले प्रश्न वाजवी आहेत, प्रियालीने दिलेल्या उत्तराशी मी सहमत आहे.. तात्या.

दिगम्भा गुरुवार, 12/06/2007 - 12:35
आपल्या मराठी लोकांना उर्दू विशेष समजत नसल्यामुळे हरामखोर आणि हरामज़ादा हे एकच किंवा जवळपासचे वाटतात. त्यातले वाईट नि जास्त वाईट (चुकून चागले-वाईट म्हणणार होतो) कळत नाही. ज्यांना अचूक शिव्या देण्यात रस आहे त्यांच्यासाठी हा खुलासा - खोर (ख़्वार) म्हणजे खाणारा -- हरामखोर म्ह. हरामाचे खाणारा, (धर्माला) निषिद्ध (असलेल्या) मार्गाने उदरनिर्वाह करणारा, स्त्रियांचा शरीरविक्रय करून जगणारा भडवा हा त्यापैकी एक; ज़ादा म्हणजे जन्मलेला किंवा मुलगा -- हरामातून जन्मलेला, (धर्माला) निषिद्ध (असलेल्या) मार्गाने जन्मलेला, लावारिस, अनौरस, अक्करमासा/शा, मराठीत सांगायचे तर बास्टर्ड. शिव्या देतांना हरामखोर ही काहीशी सौम्य तर हरामज़ादा ही तीव्र शिवी आहे, हे मराठी लोकांना कळले नाही तरी उत्तरेकडील लोकांना चांगले कळते हे ध्यानात ठेवावे व योग्य काळजी घ्यावी. रौशनीला हरामी म्हणजे हरामज़ादा अभिप्रेत होता असे वाटते, हरामखोर नव्हे. कथा आवडते आहे. अर्वाच्यता स्वाभाविकपणे आल्यासारखी वाटते. आधीचा एक लेख (व त्याखालील प्रतिसाद) केवळ अर्वाच्यतेसाठी लिहिल्यासारखा वाटला होता तसे येथे वाटत नाही. पुढील भागाची वाट पाहतो आहे. - दिगम्भा
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

नव्हाळी

जयवी ·

धोंडोपंत Mon, 12/03/2007 - 13:32
छान कविता. अभिनंदन. आपला, (संतुष्ट) धोंडोपंत काही ठिकाणी वृत्त ख़ारि़ज झाले आहे. इतकं चांगलं काव्य वाचतांना वृत्तात झालेली चूक बिर्याणीत दाताखाली येणार्‍या खड्यासारखी वाटते. उदाहरणार्थ - ताटवा जुना जरी, सुगंध हा नवा नवा तोच चांदवा जरी, गारवा नवा नवा इतक्या चांगल्या कडव्यात (शेर म्हणणे टाळतो) सुगंध या एका शब्दाने वृत्ताची हानी केली आहे. सुगंध म्हणण्याऐवजी "गंध हा नवा नवा..." असे केल्यास अर्थाला धक्का न लागता वृत्त सांभाळले जाईल. गंध हा शब्द आपण सुगंध ह्याच अर्थाने घेतो . ही ग़ज़ल नसल्यामुळे तुम्हाला क़ाफ़िया निभावण्याची बंधने नाहीत. त्यामुळे भरपूर चांगले शब्द उपलब्धआहेत. ग़ज़लेत ही सूट मिळत नाही. तिथे प्रत्येक शब्दाला कस लागतो. ( हेच तिचे वैशिष्ठ्य आहे, हीच तिची ख़ासियत आहे. असो.) तर सांगायचा मुद्दा हा की, याप्रमाणे इतर ठिकाणीही योग्य ते बदल केल्यास कवितेत कोणताही दोष न राहता ती तंत्रशुद्ध होईल. कृपया राग मानू नये. ( मराठी संकेतस्थळावर कोणाला काही चांगले सांगायला गेलो की ते लगेच रागावतात असा आमचा अनुभव आहे.) त्यामुळे आम्ही कोणाला सुधारणा सुचवत नाही. पण ही कविता आम्हाला इतकी आवडली की, ती निर्दोष व्हावी असे मनापासून वाटले म्हणून एवढे लिहीले. करविली तैसी | केली कटकट | वाकडी का नीट | देव जाणे आपला, (रत्नपारखी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

जयवी Mon, 12/03/2007 - 17:07
धोंडोपंत, तुमच्या इतक्या मनापासून केलेल्या सूचनांबद्दल धन्यवाद ! राग मानायचं कारणच नाही हो...... उलट बरंच काही शिकायला मिळालं :) वृत्त भंग झालाय काही ठिकाणी :( सुगंध-गंध ही सुधारणा लगेच करतेय. जर बाकीच्या ही जागा सांगितल्यात तर ज्ञानात भर पडेल हो...... प्लीज सांगाल का ?

In reply to by जयवी

धोंडोपंत Mon, 12/03/2007 - 18:33
जर बाकीच्या ही जागा सांगितल्यात तर ज्ञानात भर पडेल हो...... तुमच्या या वाक्याने आम्ही जरा गडबडलो. कारण आम्ही सूचना तुमच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी केल्या नसून कवितेतील त्रुटी दूर करण्यासाठी केल्या होत्या. तुमच्या विधानाचा एकंदर सूर पाहता तुम्हाला काही सांगावे की नाही असा संभ्रम आम्हाला निर्माण झाला आहे. पण ही कविता आम्हाला अत्यंत आवडल्याने आम्ही दुरूस्ती कोठे करायला पाहिजे ते सांगतो. खरं तर कविता तिचे वृत्त घेऊनच जन्माला येते. आणि शब्द कोठे खटकत आहेत याची जाणीव कवीला सर्वप्रथम होते. असो. या कवितेतील खालील शब्द वृत्तात बसत नाहीत. संवाद, संगीत, आवेग, सावरणे, हे भिजणे, हे फुलणे. वरील शब्दांत बदल केल्यास कविता तंत्रशुद्ध होईल असे वाटते. आपला, (चिकित्सक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

जयवी Mon, 12/03/2007 - 18:54
कृपया गैरसमज नसावा..... मी खरंच अगदी मनापासून विचारलं होतं. तुम्ही सांगितलेले शब्द बसवायचा प्रयत्न करेन....! तुम्ही म्हणताय ते पटतंय की कविता वृत्त घेऊनच जन्माला येते. पण कधी कधी saturation होऊन काही सुचेनासं होतं. आणि मग घाईघाईने उरकल्यासारखी कविता संपते( हे सगळं माझ्याबद्दलच सांगतेय हं) पण ह्यापुढे नक्की काळजी घेईन. तुमच्या सारख्या लोकांकडून काही टीप्स मिळाल्या तर खरंच हव्या आहेत...... ह्यापुढेही !

In reply to by जयवी

धनंजय Mon, 12/03/2007 - 20:29
आधी मनात एक ठेका धरावा. मग त्या ठेक्यात बसत नाही तो वृत्तभंग... (नाहीतर लघुगुरू मोजायला शिकावे लागते. मनात ठेका धरता आला तर मोजण्याची आवश्यकता नाही.) तुम्ही केलेले काही बदल आणखी गडबड करतात. (उदाहरणे पोष्टकार्डाने) चिंता करू नका - अर्थाच्या दृष्टीने तुमचे गीत सुंदर आहे - हे साधणे कठिण असते. सवयीने वृत्त जमेल, ते तर केवळ तंत्र असते. बहुतेक ठिकाणी तुमचे वृत्त ठीक आहे, म्हणजे तुम्हाला उपजत जाण आहे, आता फक्त सरावाची गरज आहे. (कौतुक करणारा) धनंजय

विसोबा खेचर Mon, 12/03/2007 - 13:17
छानच प्रतिसाद दिला आहेस..तुझ्यासारख्या तंत्रशुद्ध कवीच्या सूचनांचा लाभ सर्वांनाच व्हावा असे वाटते! बाकी जयूची कविता मलाही आवडली.. जयूचं मिसळपाववर मनापासून स्वागत... तात्या. खेळ हा जुना जरी, डाव हा नवा नवा वाद हा जुना जरी, संवाद हा नवा नवा शब्द हे जुने जरी, वेध हे नवे नवे गूढ हे जुने जरी, उकलणे नवे नवे सगळीच कविता सुंदर आहे परंतु वरील ओळी अधिक आवडल्या. आपला, (जुना जुना, नवा नवा) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

जयवी Mon, 12/03/2007 - 17:10
तात्या, तहे दिल से शुक्रिया :) मस्त झालीये साईट्........अभिनंदन :) इथे इमोशन्स मात्र हवीत हो.......!! बघा ना काही करता आलं तर :)

धोंडोपंत Mon, 12/03/2007 - 13:32
छान कविता. अभिनंदन. आपला, (संतुष्ट) धोंडोपंत काही ठिकाणी वृत्त ख़ारि़ज झाले आहे. इतकं चांगलं काव्य वाचतांना वृत्तात झालेली चूक बिर्याणीत दाताखाली येणार्‍या खड्यासारखी वाटते. उदाहरणार्थ - ताटवा जुना जरी, सुगंध हा नवा नवा तोच चांदवा जरी, गारवा नवा नवा इतक्या चांगल्या कडव्यात (शेर म्हणणे टाळतो) सुगंध या एका शब्दाने वृत्ताची हानी केली आहे. सुगंध म्हणण्याऐवजी "गंध हा नवा नवा..." असे केल्यास अर्थाला धक्का न लागता वृत्त सांभाळले जाईल. गंध हा शब्द आपण सुगंध ह्याच अर्थाने घेतो . ही ग़ज़ल नसल्यामुळे तुम्हाला क़ाफ़िया निभावण्याची बंधने नाहीत. त्यामुळे भरपूर चांगले शब्द उपलब्धआहेत. ग़ज़लेत ही सूट मिळत नाही. तिथे प्रत्येक शब्दाला कस लागतो. ( हेच तिचे वैशिष्ठ्य आहे, हीच तिची ख़ासियत आहे. असो.) तर सांगायचा मुद्दा हा की, याप्रमाणे इतर ठिकाणीही योग्य ते बदल केल्यास कवितेत कोणताही दोष न राहता ती तंत्रशुद्ध होईल. कृपया राग मानू नये. ( मराठी संकेतस्थळावर कोणाला काही चांगले सांगायला गेलो की ते लगेच रागावतात असा आमचा अनुभव आहे.) त्यामुळे आम्ही कोणाला सुधारणा सुचवत नाही. पण ही कविता आम्हाला इतकी आवडली की, ती निर्दोष व्हावी असे मनापासून वाटले म्हणून एवढे लिहीले. करविली तैसी | केली कटकट | वाकडी का नीट | देव जाणे आपला, (रत्नपारखी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

जयवी Mon, 12/03/2007 - 17:07
धोंडोपंत, तुमच्या इतक्या मनापासून केलेल्या सूचनांबद्दल धन्यवाद ! राग मानायचं कारणच नाही हो...... उलट बरंच काही शिकायला मिळालं :) वृत्त भंग झालाय काही ठिकाणी :( सुगंध-गंध ही सुधारणा लगेच करतेय. जर बाकीच्या ही जागा सांगितल्यात तर ज्ञानात भर पडेल हो...... प्लीज सांगाल का ?

In reply to by जयवी

धोंडोपंत Mon, 12/03/2007 - 18:33
जर बाकीच्या ही जागा सांगितल्यात तर ज्ञानात भर पडेल हो...... तुमच्या या वाक्याने आम्ही जरा गडबडलो. कारण आम्ही सूचना तुमच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी केल्या नसून कवितेतील त्रुटी दूर करण्यासाठी केल्या होत्या. तुमच्या विधानाचा एकंदर सूर पाहता तुम्हाला काही सांगावे की नाही असा संभ्रम आम्हाला निर्माण झाला आहे. पण ही कविता आम्हाला अत्यंत आवडल्याने आम्ही दुरूस्ती कोठे करायला पाहिजे ते सांगतो. खरं तर कविता तिचे वृत्त घेऊनच जन्माला येते. आणि शब्द कोठे खटकत आहेत याची जाणीव कवीला सर्वप्रथम होते. असो. या कवितेतील खालील शब्द वृत्तात बसत नाहीत. संवाद, संगीत, आवेग, सावरणे, हे भिजणे, हे फुलणे. वरील शब्दांत बदल केल्यास कविता तंत्रशुद्ध होईल असे वाटते. आपला, (चिकित्सक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

जयवी Mon, 12/03/2007 - 18:54
कृपया गैरसमज नसावा..... मी खरंच अगदी मनापासून विचारलं होतं. तुम्ही सांगितलेले शब्द बसवायचा प्रयत्न करेन....! तुम्ही म्हणताय ते पटतंय की कविता वृत्त घेऊनच जन्माला येते. पण कधी कधी saturation होऊन काही सुचेनासं होतं. आणि मग घाईघाईने उरकल्यासारखी कविता संपते( हे सगळं माझ्याबद्दलच सांगतेय हं) पण ह्यापुढे नक्की काळजी घेईन. तुमच्या सारख्या लोकांकडून काही टीप्स मिळाल्या तर खरंच हव्या आहेत...... ह्यापुढेही !

In reply to by जयवी

धनंजय Mon, 12/03/2007 - 20:29
आधी मनात एक ठेका धरावा. मग त्या ठेक्यात बसत नाही तो वृत्तभंग... (नाहीतर लघुगुरू मोजायला शिकावे लागते. मनात ठेका धरता आला तर मोजण्याची आवश्यकता नाही.) तुम्ही केलेले काही बदल आणखी गडबड करतात. (उदाहरणे पोष्टकार्डाने) चिंता करू नका - अर्थाच्या दृष्टीने तुमचे गीत सुंदर आहे - हे साधणे कठिण असते. सवयीने वृत्त जमेल, ते तर केवळ तंत्र असते. बहुतेक ठिकाणी तुमचे वृत्त ठीक आहे, म्हणजे तुम्हाला उपजत जाण आहे, आता फक्त सरावाची गरज आहे. (कौतुक करणारा) धनंजय

विसोबा खेचर Mon, 12/03/2007 - 13:17
छानच प्रतिसाद दिला आहेस..तुझ्यासारख्या तंत्रशुद्ध कवीच्या सूचनांचा लाभ सर्वांनाच व्हावा असे वाटते! बाकी जयूची कविता मलाही आवडली.. जयूचं मिसळपाववर मनापासून स्वागत... तात्या. खेळ हा जुना जरी, डाव हा नवा नवा वाद हा जुना जरी, संवाद हा नवा नवा शब्द हे जुने जरी, वेध हे नवे नवे गूढ हे जुने जरी, उकलणे नवे नवे सगळीच कविता सुंदर आहे परंतु वरील ओळी अधिक आवडल्या. आपला, (जुना जुना, नवा नवा) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

जयवी Mon, 12/03/2007 - 17:10
तात्या, तहे दिल से शुक्रिया :) मस्त झालीये साईट्........अभिनंदन :) इथे इमोशन्स मात्र हवीत हो.......!! बघा ना काही करता आलं तर :)
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
नव्हाळी प्रीत ही जुनी जरी, रीत ही नवी नवी जोड हा जुना जरी, ओढ ही नवी नवी खेळ हा जुना जरी, डाव हा नवा नवा वाद हा जुना जरी, संवाद हा नवा नवा शब्द हे जुने जरी, वेध हे नवे नवे गूढ हे जुने जरी, उकलणे नवे नवे गीत हे जुने जरी, संगीत हे नवे नवे गुंतणे जुने जरी, सावरणे नवे नवे गोडवा जुना जरी, स्वाद हा नवा नवा वेग हा जुना जरी, आवेग हा नवा नवा ताटवा जुना जरी, गंध हा नवा नवा तोच चांदवा जरी, गारवा नवा नवा बरसणे जुने जरी, भिजणे नवे नवे बहर तो जुना जरी, फ़ुलणे नवे नवे साद ही जुनी जरी, गवसणे नवे नवे समजणे जुने जरी, उमजणे नवे नवे जयश्री

एक ढासळलेली अर्थव्यवस्था

देवदत्त ·

विसोबा खेचर Mon, 12/03/2007 - 00:20
देवदत्तराव, लेख छान लिहिला आहे, मनमोकळा व प्रांजळ वाटला. बाकी, कॉलेज जीवनातील कडकीची मजा काही वेगळीच! :) शिग्रेटींवरून चष्मेबद्दूर (फारुक शेख, राकेश बेदी) या चित्रपटाची आठवण झाली. त्यातही असंच कडकीमध्ये एक सिग्रेट तिघांनी पुरवून पुरवून प्यायचा शीन आहे! :) आपला, (१९८८ साली बारा तास काम व महिना तीनशे रुपये पगारावर पहिली नोकरी केलेला!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

देवदत्त Mon, 12/03/2007 - 01:30
धन्यवाद तात्या, तो सिनेमा तर मस्तच आहे. नेहमी बघण्यासारखा.. आणि कॉलेज जीवनाची आठवण देणारा.... खरोखर लिहिताना भरपूर काही मनात असल्याने बहुधा त्या चित्रपटाबद्दल लिहिण्याचे सुचले नाही :(

धनंजय Mon, 12/03/2007 - 08:30
ब्लॅक करंट आईसक्रीमच्या कथेवरून आठवले... हल्लीच कोणाकडूनतरी "उर्दूत हॉटेलातला मेनू वाचणे" असा शब्दप्रयोग ऐकला (बहुधा मि.पा.वरच असेल.) म्हणजे आधी उजवीकडची किंमत वाचायची आणि मग डावीकडे पदार्थाचे नाव. ही सवय मी वसतीगृहावर असतानाच लागली - कारण देवदत्त म्हणतात तेच, नेहमीचे खर्च केल्यानंतर "चैनीसाठी" थोडे पैसे उरायचे, पण थोडेच. त्या वेळी ती "उर्दूत" मेनू वाचायची सवय इतकी जाम घट्ट चिकटली आहे, की कमाई मिळवायला लागून आता कितीतरी वर्षे झाली, तरी ती सवय कायम आहे!

सहज Mon, 12/03/2007 - 09:47
हं.. हं...कॉलेजचे दिवस व खर्चापानी ... जुन्या आठवणी....:-) देवदत्ता तू, ( कॅलेंडरमधे बघीतला तर जुना, पण मनातला कालपरवाचा )जुना काळ चांगला ढवळलास. :-) गाणे बघा उर्दूत मेनूकार्ड वाचणे प्रयोग आवडला. सगळ्यांनाच ही भाषा अवगत होती अर्थात २० ते ३० तारीख ह्या दिवसातच चांगलीच. ह्या दिवसात ज्यांचा वाढदिवस यायचा म्हणजे पार्टी मिळायची त्याचा जास्त आनंद असायचा. एक दुकानदार काका चांगले होते, थम्स अप व चीप्स उधारीवर द्यायचे पण कॅड्बरी मागीतली की लगेच विशेष खुश होऊन द्यायचे, ती कॅडबरी कुठलीतरी सुंदर मुलगी खाणार ह्याचा आनंद त्यांना माझ्यापेक्षा जास्त होत असावा. ;-) परमेश्वर त्यांना सुखी ठेवो. :-) रम्य आठवणी.

In reply to by सहज

देवदत्त Mon, 12/03/2007 - 23:32
हे गाणे आम्ही कॉलेज मध्ये होतोच तेव्हाच आले होते. सर्वांना खूप आवडले. आता आम्ही ह्यातील जवळपास सर्व गोष्टी केल्या असल्याने ते आपल्या हृदयातील गाणेच वाटते. :) पुन्हा पाहिले ते गाणे आता... हृदय एकदम भरून येते हो.... वाढदिवसाची पार्टी म्हणजे तर मज्जाच. आम्ही जे साधे मिल्कशेक प्यायचो ते ५ रू ला वगैरे मिळायचे. मँगो मिल्क शेक ७ रू. मग शेवटच्या वर्षापर्यंत त्यांची किंमत वाढून साधे १० व मँगो १२/१४ रू झाले होते. त्यामुळे वाढदिवसाच्या पार्टीत मॅगो मिल्कशेक हेच ठरलेले असायचे. :) तुमचे ते काका म्हणजे चश्मे बद्दूर मधील लल्लन मियाँच की हो किती चॉकोलेट घेतले होते? :D चित्रपटातील फारूख शेख आणि सईद जाफरीचे संवाद अजूनही समोर चालत आहे असे वाटते.

प्रमोद देव Mon, 12/03/2007 - 10:03
देवदत्तराव तुमच्याही आठवणी रम्य आहेत की. वाचताना मजा आली. माझे सगळेच शिक्षण घरी राहूनच झाले त्यामुळे मला हे अनुभव खूपच नवीन आणि मजेशीर वाटले. येऊ द्या असेच तुमच्याही पोतडीतून बाहेर! अवांतरः सहजराव! अशा किती वेळा कॅडबर्‍या उधारीवर घेतल्यात आणि किती मुलींना खुष करायचा प्रयत्न केला? जरा येऊ द्या की तुमचेही अनुभव बाहेर! करा जरा उत्खनन! आमच्यासाठी हे सगळे नवीन आणि अद्भुतही आहे हो!

देवदत्त Mon, 12/03/2007 - 23:21
प्रमोदजी, अजूनही माझे म्हणणे असते की हॉस्टेलचा अनुभव आयुष्यात एकदा तरी घेतलाच पाहिजे :)

सर्किट Tue, 12/04/2007 - 00:03
होस्टेलातले आमचेही अनुभव साधारणतः सारखेच आहेत. होस्टेल-मेसचे बिल दिल्यावर उरलेल्या १०-१५ रुपयात महिना काढणे. बचतीचे बाळकडूच म्हणा ना ! अजूनही खर्च करताना ते दिवस आठवतात, आणि हात पाकिटाकडे जाऊ धजावत नाही ;-) - (कंजूष) सर्किट

विसोबा खेचर Mon, 12/03/2007 - 00:20
देवदत्तराव, लेख छान लिहिला आहे, मनमोकळा व प्रांजळ वाटला. बाकी, कॉलेज जीवनातील कडकीची मजा काही वेगळीच! :) शिग्रेटींवरून चष्मेबद्दूर (फारुक शेख, राकेश बेदी) या चित्रपटाची आठवण झाली. त्यातही असंच कडकीमध्ये एक सिग्रेट तिघांनी पुरवून पुरवून प्यायचा शीन आहे! :) आपला, (१९८८ साली बारा तास काम व महिना तीनशे रुपये पगारावर पहिली नोकरी केलेला!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

देवदत्त Mon, 12/03/2007 - 01:30
धन्यवाद तात्या, तो सिनेमा तर मस्तच आहे. नेहमी बघण्यासारखा.. आणि कॉलेज जीवनाची आठवण देणारा.... खरोखर लिहिताना भरपूर काही मनात असल्याने बहुधा त्या चित्रपटाबद्दल लिहिण्याचे सुचले नाही :(

धनंजय Mon, 12/03/2007 - 08:30
ब्लॅक करंट आईसक्रीमच्या कथेवरून आठवले... हल्लीच कोणाकडूनतरी "उर्दूत हॉटेलातला मेनू वाचणे" असा शब्दप्रयोग ऐकला (बहुधा मि.पा.वरच असेल.) म्हणजे आधी उजवीकडची किंमत वाचायची आणि मग डावीकडे पदार्थाचे नाव. ही सवय मी वसतीगृहावर असतानाच लागली - कारण देवदत्त म्हणतात तेच, नेहमीचे खर्च केल्यानंतर "चैनीसाठी" थोडे पैसे उरायचे, पण थोडेच. त्या वेळी ती "उर्दूत" मेनू वाचायची सवय इतकी जाम घट्ट चिकटली आहे, की कमाई मिळवायला लागून आता कितीतरी वर्षे झाली, तरी ती सवय कायम आहे!

सहज Mon, 12/03/2007 - 09:47
हं.. हं...कॉलेजचे दिवस व खर्चापानी ... जुन्या आठवणी....:-) देवदत्ता तू, ( कॅलेंडरमधे बघीतला तर जुना, पण मनातला कालपरवाचा )जुना काळ चांगला ढवळलास. :-) गाणे बघा उर्दूत मेनूकार्ड वाचणे प्रयोग आवडला. सगळ्यांनाच ही भाषा अवगत होती अर्थात २० ते ३० तारीख ह्या दिवसातच चांगलीच. ह्या दिवसात ज्यांचा वाढदिवस यायचा म्हणजे पार्टी मिळायची त्याचा जास्त आनंद असायचा. एक दुकानदार काका चांगले होते, थम्स अप व चीप्स उधारीवर द्यायचे पण कॅड्बरी मागीतली की लगेच विशेष खुश होऊन द्यायचे, ती कॅडबरी कुठलीतरी सुंदर मुलगी खाणार ह्याचा आनंद त्यांना माझ्यापेक्षा जास्त होत असावा. ;-) परमेश्वर त्यांना सुखी ठेवो. :-) रम्य आठवणी.

In reply to by सहज

देवदत्त Mon, 12/03/2007 - 23:32
हे गाणे आम्ही कॉलेज मध्ये होतोच तेव्हाच आले होते. सर्वांना खूप आवडले. आता आम्ही ह्यातील जवळपास सर्व गोष्टी केल्या असल्याने ते आपल्या हृदयातील गाणेच वाटते. :) पुन्हा पाहिले ते गाणे आता... हृदय एकदम भरून येते हो.... वाढदिवसाची पार्टी म्हणजे तर मज्जाच. आम्ही जे साधे मिल्कशेक प्यायचो ते ५ रू ला वगैरे मिळायचे. मँगो मिल्क शेक ७ रू. मग शेवटच्या वर्षापर्यंत त्यांची किंमत वाढून साधे १० व मँगो १२/१४ रू झाले होते. त्यामुळे वाढदिवसाच्या पार्टीत मॅगो मिल्कशेक हेच ठरलेले असायचे. :) तुमचे ते काका म्हणजे चश्मे बद्दूर मधील लल्लन मियाँच की हो किती चॉकोलेट घेतले होते? :D चित्रपटातील फारूख शेख आणि सईद जाफरीचे संवाद अजूनही समोर चालत आहे असे वाटते.

प्रमोद देव Mon, 12/03/2007 - 10:03
देवदत्तराव तुमच्याही आठवणी रम्य आहेत की. वाचताना मजा आली. माझे सगळेच शिक्षण घरी राहूनच झाले त्यामुळे मला हे अनुभव खूपच नवीन आणि मजेशीर वाटले. येऊ द्या असेच तुमच्याही पोतडीतून बाहेर! अवांतरः सहजराव! अशा किती वेळा कॅडबर्‍या उधारीवर घेतल्यात आणि किती मुलींना खुष करायचा प्रयत्न केला? जरा येऊ द्या की तुमचेही अनुभव बाहेर! करा जरा उत्खनन! आमच्यासाठी हे सगळे नवीन आणि अद्भुतही आहे हो!

देवदत्त Mon, 12/03/2007 - 23:21
प्रमोदजी, अजूनही माझे म्हणणे असते की हॉस्टेलचा अनुभव आयुष्यात एकदा तरी घेतलाच पाहिजे :)

सर्किट Tue, 12/04/2007 - 00:03
होस्टेलातले आमचेही अनुभव साधारणतः सारखेच आहेत. होस्टेल-मेसचे बिल दिल्यावर उरलेल्या १०-१५ रुपयात महिना काढणे. बचतीचे बाळकडूच म्हणा ना ! अजूनही खर्च करताना ते दिवस आठवतात, आणि हात पाकिटाकडे जाऊ धजावत नाही ;-) - (कंजूष) सर्किट
लेखनप्रकार
अर्थव्यवस्था म्हटले की समोर येते शेअर बाजार, सेन्सेक्स,विदेशी गुंतवणूक, चलनाचे दर, कर्ज, भाववाढ वगैरे वगैरे. पण ह्यात मी ह्याबद्दल काही लिहिणार नाही. इथे आहेत ते फक्त मी एक कॉलेज विद्यार्थी म्हणून माझे अनुभव. आता त्यात पैसे कमावण्याचा संबंध फारच कमी लोकांचा येतो. असतो तो फक्त खर्च. आईवडिलांनी दिलेल्या पैशांचा. कधीतरी लिहिल्याप्रमाणे, आज काल जेव्हापासून नोकरी करतोय तेव्हापासून पैसे हातात असतात. स्वत:चा/घराचा खर्च करू शकतो. अर्थात त्यामुळे उगाच उधळणे करत नाही. पण कधीही पैसे खर्च करताना कमी पडले की वसतीगृहातील अनुभव आठवतात. आजकाल ते दिवस आठवले मन भरून येते.

सिद्धहस्त कवी, लेखक ,समीक्षक : प्रा. केशव मेश्राम

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·

आजानुकर्ण Sat, 12/01/2007 - 21:32
आक्रस्ताळेपणा न करता संयमित भाषेत लेखन करणारे लेखक. त्यांचे एक पुस्तक वाचले आहे. (नाव आठवत नाही.) शिवाय शालेय अभ्यासक्रमात त्यांचा एक धडाही होता. विनम्र श्रद्धांजली. - आजानुकर्ण

विसोबा खेचर Sun, 12/02/2007 - 00:30
बिरुटेसाहेब, प्रा केशव मेश्राम यांच्या साहित्यिक वाटचालीचा आपण मोजक्या शब्दात परंतु अत्यंत योग्य असा मागोवा घेतला आहे. मेश्रामसाहेबांच्या स्मृतीस माझीही विनम्र आदरांजली.... तात्या.

धोंडोपंत Sun, 12/02/2007 - 15:34
प्राध्यापक साहेब, सरांना आमची भावपूर्ण आदरांजली. एक निगर्वी, सात्विक आणि संयम ठेऊन लेखन करणारा प्रतिभावंत काळाच्या पडद्याआड गेला. आपला, (खिन्न) धोंडोपंत आपला लेख उत्तम झाला आहे. आपला, (वाचक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धोंडोपंत Sun, 12/02/2007 - 15:39
सरांना ज्ञानेश्वरीबद्दल अतीव प्रेम होते हे फार कमी लोकांना माहीत असेल. ज्ञानेश्वरीचा विषय निघाला की ते खुलून बोलत. त्यांचा ज्ञानेश्वरीचा व्यासंगही दांडगा होता. आपला, (वारकरी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

सरांना ज्ञानेश्वरीबद्दल अतीव प्रेम होते हे फार कमी लोकांना माहीत असेल. धोंडोपंत, वाचकांची अभिरुची संकुचीत स्वरुपाची असु नये या मताचे आम्ही. त्यामुळेच हा विषय आम्ही येथे टंकीला. ज्ञानेश्वरीचा विषय निघाला की ते जसे खूलुन बोलत तसे ते तुकारामाचा विषय निघाला की, तब्येतीने बोलत. त्यांचा एक लेख आहे, 'तुकारामः समुहाचा वाटाड्या, आणि 'गाथा तुकारामांची' या शिर्षकाचा. ते म्हणतात ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या लोकप्रियतेचा एक निकष म्हणजे या संताचा अध्यात्मिक अविष्कार हा तर आहेच पण लौकिक जीवनातही टक्केटोणपे सहन करणा-या जनसामान्यांच्या अडीअडचणींशी असलेले त्यांचे नाते हे देखील आहे. त्यांच्याबद्दल त्यांनी इतके भरभरुने लिहिले आहे की, विचारु नका...! ते सुद्धा अनेकांना माहित नसेल. पंत, लिहू आम्ही त्याच्याबद्द्लही भविष्यात कोणत्यातरी निमित्ताने ..........!!! आपला. साहित्याचा वारकरी प्रा.डॉ.दिलीप बिरुटे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अवलिया Mon, 07/19/2010 - 17:58
पंत, लिहू आम्ही त्याच्याबद्द्लही भविष्यात कोणत्यातरी निमित्ताने ..........!!! या आठवड्यात आषाढी एकादशी आहे. यापरते गोमटे निमित्त मिळणार नाही. वाट पाहात आहे.... विठठल ...विठठल.. !! --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

प्रमोद देव Sun, 12/02/2007 - 21:19
प्राध्यापक केशव मेश्राम ह्यांना माझीही श्रद्धांजली. मराठीतील माझे साहित्यवाचन अतिशय तुटपुंजे असल्यामुळे(आणि मराठी व्यतिरिक्त मी दुसर्‍या कोणत्याही भाषेतले काही वाचत नाही. का? अहो इथे समजतंय कुणाला?) मला स्वतःला प्रा.केशव मेश्राम सरांबद्दल विशेष माहिती नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते एक वर्ष अध्यक्ष होते इतपतच त्यांची माहिती आहे. तेव्हा बिरुटेसाहेब आपल्यासारख्यांच्या लेखनातून आमच्यासारख्या अल्पवाचन असणार्‍या लोकांना अशीच माहिती वेळोवेळी मिळत राहो अशी विनंती करतो.

धोंडोपंत Mon, 12/03/2007 - 10:33
ते म्हणतात ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या लोकप्रियतेचा एक निकष म्हणजे या संताचा अध्यात्मिक अविष्कार हा तर आहेच पण लौकिक जीवनातही टक्केटोणपे सहन करणा-या जनसामान्यांच्या अडीअडचणींशी असलेले त्यांचे नाते हे देखील आहे. त्यांच्याबद्दल त्यांनी इतके भरभरुने लिहिले आहे की, विचारु नका...! ते सुद्धा अनेकांना माहित नसेल. वा वा प्राध्यापक साहेब, आपल्या लेखाची आतुरतेने वाट पहात आहे. दादांचा शेर आठवला ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे...... ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, चोखोबा, सेनामहाराज, निळोबा, मुक्ताई,जनाई यांच्याबद्दल जेवढे लिहाल तेवढा आम्हाला आनंद आहे, कारण ही आमची वंशावळ आहे असे आम्ही मानतो. झाडू संतांचे मारग | आडरानी भरले जग| उच्छिष्टाचा भाग | शेष उरला तो सेवू अर्थे लोपली पुराणे | नाश केला शब्दज्ञाने | विषयलोभी मने | साधना बुडविली पिटू भक्तिचा डांगोरा | कळीकाळासी दरारा | तुका म्हणे करा | जयजयकार आनंद हे आमचे जगण्याचे तत्वज्ञान आहे. त्यामुळेच दूरदर्शन वरील एखाद्या "पंचतारांकित" स्वामींपेक्षा - "ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा काय भुललासी वरलीया रंगा ?" हे म्हणणारा आमचा चोखोबा आम्हाला "आपला" वाटतो. आपला, (संतचरणरज) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मितभाषी Mon, 07/19/2010 - 17:11
दलित साहित्य, त्याच्या संकल्पना, त्या अनुषंगानेच्या चळवळी तसेच लोककलेच्या अनुभवाचे जागरुक मंथन त्यांनी केले.
हम्म्म.. मेश्रामसरांना नाशिकच्या साहित्यसंमेलनात पाहीले होते. एका पुस्तकाच्या स्टॉलवर बसलेले होते. एकदम साधा माणुस. विद्वत्तेचा, मोठेपणाचा कुठलाही आव नाही. नंदा मेश्रामांची 'मी नंदा' आताच वाचले. छान लिहिले आहे. मेश्रामसरांचे ही साहित्य वाचायचे आहे.

आजानुकर्ण Sat, 12/01/2007 - 21:32
आक्रस्ताळेपणा न करता संयमित भाषेत लेखन करणारे लेखक. त्यांचे एक पुस्तक वाचले आहे. (नाव आठवत नाही.) शिवाय शालेय अभ्यासक्रमात त्यांचा एक धडाही होता. विनम्र श्रद्धांजली. - आजानुकर्ण

विसोबा खेचर Sun, 12/02/2007 - 00:30
बिरुटेसाहेब, प्रा केशव मेश्राम यांच्या साहित्यिक वाटचालीचा आपण मोजक्या शब्दात परंतु अत्यंत योग्य असा मागोवा घेतला आहे. मेश्रामसाहेबांच्या स्मृतीस माझीही विनम्र आदरांजली.... तात्या.

धोंडोपंत Sun, 12/02/2007 - 15:34
प्राध्यापक साहेब, सरांना आमची भावपूर्ण आदरांजली. एक निगर्वी, सात्विक आणि संयम ठेऊन लेखन करणारा प्रतिभावंत काळाच्या पडद्याआड गेला. आपला, (खिन्न) धोंडोपंत आपला लेख उत्तम झाला आहे. आपला, (वाचक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धोंडोपंत Sun, 12/02/2007 - 15:39
सरांना ज्ञानेश्वरीबद्दल अतीव प्रेम होते हे फार कमी लोकांना माहीत असेल. ज्ञानेश्वरीचा विषय निघाला की ते खुलून बोलत. त्यांचा ज्ञानेश्वरीचा व्यासंगही दांडगा होता. आपला, (वारकरी) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

सरांना ज्ञानेश्वरीबद्दल अतीव प्रेम होते हे फार कमी लोकांना माहीत असेल. धोंडोपंत, वाचकांची अभिरुची संकुचीत स्वरुपाची असु नये या मताचे आम्ही. त्यामुळेच हा विषय आम्ही येथे टंकीला. ज्ञानेश्वरीचा विषय निघाला की ते जसे खूलुन बोलत तसे ते तुकारामाचा विषय निघाला की, तब्येतीने बोलत. त्यांचा एक लेख आहे, 'तुकारामः समुहाचा वाटाड्या, आणि 'गाथा तुकारामांची' या शिर्षकाचा. ते म्हणतात ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या लोकप्रियतेचा एक निकष म्हणजे या संताचा अध्यात्मिक अविष्कार हा तर आहेच पण लौकिक जीवनातही टक्केटोणपे सहन करणा-या जनसामान्यांच्या अडीअडचणींशी असलेले त्यांचे नाते हे देखील आहे. त्यांच्याबद्दल त्यांनी इतके भरभरुने लिहिले आहे की, विचारु नका...! ते सुद्धा अनेकांना माहित नसेल. पंत, लिहू आम्ही त्याच्याबद्द्लही भविष्यात कोणत्यातरी निमित्ताने ..........!!! आपला. साहित्याचा वारकरी प्रा.डॉ.दिलीप बिरुटे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अवलिया Mon, 07/19/2010 - 17:58
पंत, लिहू आम्ही त्याच्याबद्द्लही भविष्यात कोणत्यातरी निमित्ताने ..........!!! या आठवड्यात आषाढी एकादशी आहे. यापरते गोमटे निमित्त मिळणार नाही. वाट पाहात आहे.... विठठल ...विठठल.. !! --अवलिया आपला तो बाब्या दुस-याचं ते कार्ट, असं धो धो रण करणारं धोरण सगळ्यांचच असतं, आपल्यासाठी एक अन् दुस-यासाठी वेगळं :)

प्रमोद देव Sun, 12/02/2007 - 21:19
प्राध्यापक केशव मेश्राम ह्यांना माझीही श्रद्धांजली. मराठीतील माझे साहित्यवाचन अतिशय तुटपुंजे असल्यामुळे(आणि मराठी व्यतिरिक्त मी दुसर्‍या कोणत्याही भाषेतले काही वाचत नाही. का? अहो इथे समजतंय कुणाला?) मला स्वतःला प्रा.केशव मेश्राम सरांबद्दल विशेष माहिती नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते एक वर्ष अध्यक्ष होते इतपतच त्यांची माहिती आहे. तेव्हा बिरुटेसाहेब आपल्यासारख्यांच्या लेखनातून आमच्यासारख्या अल्पवाचन असणार्‍या लोकांना अशीच माहिती वेळोवेळी मिळत राहो अशी विनंती करतो.

धोंडोपंत Mon, 12/03/2007 - 10:33
ते म्हणतात ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या लोकप्रियतेचा एक निकष म्हणजे या संताचा अध्यात्मिक अविष्कार हा तर आहेच पण लौकिक जीवनातही टक्केटोणपे सहन करणा-या जनसामान्यांच्या अडीअडचणींशी असलेले त्यांचे नाते हे देखील आहे. त्यांच्याबद्दल त्यांनी इतके भरभरुने लिहिले आहे की, विचारु नका...! ते सुद्धा अनेकांना माहित नसेल. वा वा प्राध्यापक साहेब, आपल्या लेखाची आतुरतेने वाट पहात आहे. दादांचा शेर आठवला ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे...... ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, चोखोबा, सेनामहाराज, निळोबा, मुक्ताई,जनाई यांच्याबद्दल जेवढे लिहाल तेवढा आम्हाला आनंद आहे, कारण ही आमची वंशावळ आहे असे आम्ही मानतो. झाडू संतांचे मारग | आडरानी भरले जग| उच्छिष्टाचा भाग | शेष उरला तो सेवू अर्थे लोपली पुराणे | नाश केला शब्दज्ञाने | विषयलोभी मने | साधना बुडविली पिटू भक्तिचा डांगोरा | कळीकाळासी दरारा | तुका म्हणे करा | जयजयकार आनंद हे आमचे जगण्याचे तत्वज्ञान आहे. त्यामुळेच दूरदर्शन वरील एखाद्या "पंचतारांकित" स्वामींपेक्षा - "ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा काय भुललासी वरलीया रंगा ?" हे म्हणणारा आमचा चोखोबा आम्हाला "आपला" वाटतो. आपला, (संतचरणरज) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मितभाषी Mon, 07/19/2010 - 17:11
दलित साहित्य, त्याच्या संकल्पना, त्या अनुषंगानेच्या चळवळी तसेच लोककलेच्या अनुभवाचे जागरुक मंथन त्यांनी केले.
हम्म्म.. मेश्रामसरांना नाशिकच्या साहित्यसंमेलनात पाहीले होते. एका पुस्तकाच्या स्टॉलवर बसलेले होते. एकदम साधा माणुस. विद्वत्तेचा, मोठेपणाचा कुठलाही आव नाही. नंदा मेश्रामांची 'मी नंदा' आताच वाचले. छान लिहिले आहे. मेश्रामसरांचे ही साहित्य वाचायचे आहे.
लेखनप्रकार

                     प्रा. केशव मेश्राम यांची काही व्याख्याने ऐकण्याचा योग प्रबोधन वर्गाच्या निमित्ताने आम्हास आलेला आहे. अतिशय साधा माणूस. आपण मोठे साहित्यिक आहोत असा आव कधी दिसला नाही. दलित साहित्य, दलित चळवळ, आणि नवलेखकांना प्रेरणा देणारा साहित्यिक म्हणजे, प्रा. केशव मेश्राम. साठोत्तरी साहित्यानंतर ज्या विविध साहित्यप्रकारांनी जन्म घेतला आणि दलित साहित्याकडे वाचक जेव्हा कुतुहलाने पाहू लागला तेव्हा चळवळीला आणि दलित साहित्याला दिशा आणि गती देणारे जे साहित्यिक होते.

बिननावाची कथा - १

आजानुकर्ण ·

विसोबा खेचर गुरुवार, 11/29/2007 - 11:45
कथा चांगली वाटते आहे, इंटरेस्टींगही वाटते आहे. परंतु भाषा साधी, सहजसोपी, संवाद साधल्यासारखी असती तर बरे झाले असते. लेखन काही ठिकाणी उगाचंच शब्दबंबाळ आणि वर्णनबंबाळ वाटते आहे.. माझ्यासारख्याला अशी भाषा फारच जड जाते, वाचायला कठीण जाते... असो, पुढील भागांकरता अनेकानेक शुभेच्छा... आपला, (सहजसोप्या, साध्यासुध्या भाषेतल्या लेखनाचा फ्यॅन) तात्या.

आनंदयात्री गुरुवार, 11/29/2007 - 12:04
कथाबीज तगडे असेल असे वाटते आहे. ओघावती भाषा आली तर अजुन छान होइल कथा. कुटीसमोरील औदुंबराच्या झाडाच्या तिसर्‍या फांदीवरील अगदी बुंध्याजवळच्या पानांना सूर्यकिरणे सोनेरी मुलामा चढवत होती. बाकी असे वाक्य वाचतांना उगाचच अभ्यास केल्यासारखे वाटते. कुटीसमोरील औदुंबराच्या झाडावर उन आले होते. असेही चालले असते, पण हे अगदी वैयक्तिक मत बरका, आधी म्हटल्या प्रमाणे कथाबीज तगडे असेल असे वाटते आहे. (उत्कृष्ट कथा असेल अशी आशा असणारा) आनंदयात्री

नंदन गुरुवार, 11/29/2007 - 13:27
सुरुवात चांगली झालीय. जी.एं.ची शैलीही जमते आहे. विस्मृतीसंबंधात कथा आहे असं वाटतंय, तेव्हा 'स्मरणाचा उत्सव जागून' हे शीर्षक चालू शकेल का? (ग्रेसच्या कवितेतली ओळ - अंधार असा घनभारी, चंद्रातून चंद्र बुडाले, स्मरणाचा उत्सव जागून जणू दु:ख घराला आले.) पुढील भागांची वाट पाहतो आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

जुना अभिजित गुरुवार, 11/29/2007 - 13:36
अर्थातच जीएंची भ्रष्ट नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतःच्या शैलीत लिहिली तर कथेत अधिक इन्वॉल्व(!) होता येईल. लिहिणार्‍यालाही आणि वाचणार्‍यालाही. दुसर्‍याच्या शैलीत लिहिणे म्हणजे एक तर त्याचे विडंबन केल्यासारखे वाटते किंवा आपली शैली विकसित होत नाही. हे माझे अगदी वैयक्तिक मत आहे. कथा एकदम सशक्त आहे. वातावरणनिर्मिती छान झाली आहे. पुढच्या भागात कथा कशी वळणार आहे माहित नाही तरी 'गुरुदक्षिणा' नाव(डोहकाळिमा, रमलखुणा, पिंगळावेळ धर्तीवर ;-)) सुचवतो. अन्यथा आहे हे नाव उत्तम आहे. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

आजानुकर्ण गुरुवार, 11/29/2007 - 13:45
स्वतंत्र शैली विकसित करायला अजून वेळ आहे. ;) सध्या चांगल्या अक्षरांवर गिरवलेले उत्तम. ;) गुरुदक्षिणा नाव योग्य ठरणार नाही. कारण गुरु निमित्तमात्र आहेत. मूळ कथा स्मरण किंवा विस्मरणावरच आहे. बिननावाची कथा हे चुकून बिनपावाची कथा असे मीच वाचले ... मिसळपाव मनात घोळत असल्यामुळे असेल ... ;) - आजानुकर्ण

विसुनाना गुरुवार, 11/29/2007 - 15:26
आजानुकर्ण, आपल्या सांगण्यानुसार मूळ लेख वाचला. आपली कथा चांगली रंगतदार होते आहे. पुढचे भागही लवकर टाका. 'स्मरणकळा' किंवा 'आठववेणा' कसे वाटेल? (मलाही एखादी कथा लिहाविशी वाटली.;))

देवदत्त गुरुवार, 11/29/2007 - 20:07
शैलीमुळे जरा वेळ लागतोय समजायला. असो, पूर्ण कथा हळू हळू उलगडेल असे वाटते. बिननावाची कथा हे चुकून बिनपावाची कथा असे मीच वाचले . होऊ शकते. कविता आणि आजकाल तर लेख/कथांचेही लगेच विडंबन होते. त्यामुळे असे वाटणे स्वाभाविक आहे :)

धनंजय गुरुवार, 11/29/2007 - 21:17
जी.एं.ची शैली साधली आहे खास. स्मृतीविषयी ही कथा असू शकेल हे नंदन यांचे मत पटते. तसे असल्यास "बिननावाची कथा" हे शीर्षक ठीक आहे. एखादी वस्तू स्मृतीत ठेवण्यासाठी पुष्कळदा तिचे नाव लक्षात राहाणे सोयीचे असते. नाहीतर अमुक दृश्य, तमुक गंध, ढमुक ध्वनी असलेली ती अनुभूती स्मरणात एकत्र नोंदली जात नाही. (संगणकावर फाईलला नाव असावे असा संकेत आहे. फाईलसिस्टिमचा विदा असतो, त्यातील नावाची नोंदणी खोडली की फाईलच पुसून टाकली असे मानले जाते.) या बाबतीत आठवते लुइस कॅरॉलने "ऍलिस" पुस्तकांत एका वनाचे वर्णन केले आहे, त्या वनात कोणालाच/कशालाच नावे नाहीत. http://www.cs.indiana.edu/metastuff/looking/ch3.html.gz त्यात ऍलिसला एक हरिणशावक भेटते. "आपण कोण" हे ठाऊक नसल्यामुळे शावक तिच्याबरोबर निर्भयपणे बागडते. वनातून बाहेर पडताच आपण "भित्रे हरिणशावक" असल्याची त्याला जाणीव होऊन, ते धूम पळून जाते!

चित्रा Fri, 11/30/2007 - 01:08
उत्सुकता वाढली आहे. अवांतरः नावे का अशी? यनावालांच्या कोड्यांची आठवण झाली :-)

धनंजय Fri, 11/30/2007 - 04:15
> ज्याचा घोडा सर्वात मागे राहील तो या स्पर्धेचा > विजेता आणि भेटवस्तू प्रथम निवडीचे स्वातंत्र्य त्यालाच. हे वाक्य वाचण्यापूर्वी घोड्यांच्या आदलाबदलीने स्पर्धा कशी बदलली ते कळले नाही. पण ही युक्ती चालण्यासाठी सर्वंजयाला माघार घेणे जरुरीचे नव्हते. तिघे आपला सोडून वेगळ्या घोड्यावर बसले असते, तरीही हिरिरीने पुढे गेलेच असते. कारण आपण दुसरा घोडा आधी पोचवला, किंवा दुसर्‍या क्रमांकावर पोचवला, तर आपला मुळातला घोडा "जिंकायची" शक्यता ५०% असते. आपण शेवटी राहिलो तर आपला घोडा "जिंकायची" शक्यता ०% असते, म्हणून तिघेही शेवटी राहाण्यापेक्षा पुढेपुढे नेटाने जात राहातील.

In reply to by धनंजय

जुना अभिजित Fri, 11/30/2007 - 08:46
पण घोड्यासह त्यावर बसलेला स्वारही जिंकला पाहिजे. स्पर्धा घोड्यांची नाहीये असं मला वाटतं. उद्या शुमाकर दुसर्‍याच्या गाडीत बसुन जिंकला तर ती गाडी जिंकली का शुमाकर? मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

विसोबा खेचर गुरुवार, 11/29/2007 - 11:45
कथा चांगली वाटते आहे, इंटरेस्टींगही वाटते आहे. परंतु भाषा साधी, सहजसोपी, संवाद साधल्यासारखी असती तर बरे झाले असते. लेखन काही ठिकाणी उगाचंच शब्दबंबाळ आणि वर्णनबंबाळ वाटते आहे.. माझ्यासारख्याला अशी भाषा फारच जड जाते, वाचायला कठीण जाते... असो, पुढील भागांकरता अनेकानेक शुभेच्छा... आपला, (सहजसोप्या, साध्यासुध्या भाषेतल्या लेखनाचा फ्यॅन) तात्या.

आनंदयात्री गुरुवार, 11/29/2007 - 12:04
कथाबीज तगडे असेल असे वाटते आहे. ओघावती भाषा आली तर अजुन छान होइल कथा. कुटीसमोरील औदुंबराच्या झाडाच्या तिसर्‍या फांदीवरील अगदी बुंध्याजवळच्या पानांना सूर्यकिरणे सोनेरी मुलामा चढवत होती. बाकी असे वाक्य वाचतांना उगाचच अभ्यास केल्यासारखे वाटते. कुटीसमोरील औदुंबराच्या झाडावर उन आले होते. असेही चालले असते, पण हे अगदी वैयक्तिक मत बरका, आधी म्हटल्या प्रमाणे कथाबीज तगडे असेल असे वाटते आहे. (उत्कृष्ट कथा असेल अशी आशा असणारा) आनंदयात्री

नंदन गुरुवार, 11/29/2007 - 13:27
सुरुवात चांगली झालीय. जी.एं.ची शैलीही जमते आहे. विस्मृतीसंबंधात कथा आहे असं वाटतंय, तेव्हा 'स्मरणाचा उत्सव जागून' हे शीर्षक चालू शकेल का? (ग्रेसच्या कवितेतली ओळ - अंधार असा घनभारी, चंद्रातून चंद्र बुडाले, स्मरणाचा उत्सव जागून जणू दु:ख घराला आले.) पुढील भागांची वाट पाहतो आहे. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

जुना अभिजित गुरुवार, 11/29/2007 - 13:36
अर्थातच जीएंची भ्रष्ट नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतःच्या शैलीत लिहिली तर कथेत अधिक इन्वॉल्व(!) होता येईल. लिहिणार्‍यालाही आणि वाचणार्‍यालाही. दुसर्‍याच्या शैलीत लिहिणे म्हणजे एक तर त्याचे विडंबन केल्यासारखे वाटते किंवा आपली शैली विकसित होत नाही. हे माझे अगदी वैयक्तिक मत आहे. कथा एकदम सशक्त आहे. वातावरणनिर्मिती छान झाली आहे. पुढच्या भागात कथा कशी वळणार आहे माहित नाही तरी 'गुरुदक्षिणा' नाव(डोहकाळिमा, रमलखुणा, पिंगळावेळ धर्तीवर ;-)) सुचवतो. अन्यथा आहे हे नाव उत्तम आहे. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

आजानुकर्ण गुरुवार, 11/29/2007 - 13:45
स्वतंत्र शैली विकसित करायला अजून वेळ आहे. ;) सध्या चांगल्या अक्षरांवर गिरवलेले उत्तम. ;) गुरुदक्षिणा नाव योग्य ठरणार नाही. कारण गुरु निमित्तमात्र आहेत. मूळ कथा स्मरण किंवा विस्मरणावरच आहे. बिननावाची कथा हे चुकून बिनपावाची कथा असे मीच वाचले ... मिसळपाव मनात घोळत असल्यामुळे असेल ... ;) - आजानुकर्ण

विसुनाना गुरुवार, 11/29/2007 - 15:26
आजानुकर्ण, आपल्या सांगण्यानुसार मूळ लेख वाचला. आपली कथा चांगली रंगतदार होते आहे. पुढचे भागही लवकर टाका. 'स्मरणकळा' किंवा 'आठववेणा' कसे वाटेल? (मलाही एखादी कथा लिहाविशी वाटली.;))

देवदत्त गुरुवार, 11/29/2007 - 20:07
शैलीमुळे जरा वेळ लागतोय समजायला. असो, पूर्ण कथा हळू हळू उलगडेल असे वाटते. बिननावाची कथा हे चुकून बिनपावाची कथा असे मीच वाचले . होऊ शकते. कविता आणि आजकाल तर लेख/कथांचेही लगेच विडंबन होते. त्यामुळे असे वाटणे स्वाभाविक आहे :)

धनंजय गुरुवार, 11/29/2007 - 21:17
जी.एं.ची शैली साधली आहे खास. स्मृतीविषयी ही कथा असू शकेल हे नंदन यांचे मत पटते. तसे असल्यास "बिननावाची कथा" हे शीर्षक ठीक आहे. एखादी वस्तू स्मृतीत ठेवण्यासाठी पुष्कळदा तिचे नाव लक्षात राहाणे सोयीचे असते. नाहीतर अमुक दृश्य, तमुक गंध, ढमुक ध्वनी असलेली ती अनुभूती स्मरणात एकत्र नोंदली जात नाही. (संगणकावर फाईलला नाव असावे असा संकेत आहे. फाईलसिस्टिमचा विदा असतो, त्यातील नावाची नोंदणी खोडली की फाईलच पुसून टाकली असे मानले जाते.) या बाबतीत आठवते लुइस कॅरॉलने "ऍलिस" पुस्तकांत एका वनाचे वर्णन केले आहे, त्या वनात कोणालाच/कशालाच नावे नाहीत. http://www.cs.indiana.edu/metastuff/looking/ch3.html.gz त्यात ऍलिसला एक हरिणशावक भेटते. "आपण कोण" हे ठाऊक नसल्यामुळे शावक तिच्याबरोबर निर्भयपणे बागडते. वनातून बाहेर पडताच आपण "भित्रे हरिणशावक" असल्याची त्याला जाणीव होऊन, ते धूम पळून जाते!

चित्रा Fri, 11/30/2007 - 01:08
उत्सुकता वाढली आहे. अवांतरः नावे का अशी? यनावालांच्या कोड्यांची आठवण झाली :-)

धनंजय Fri, 11/30/2007 - 04:15
> ज्याचा घोडा सर्वात मागे राहील तो या स्पर्धेचा > विजेता आणि भेटवस्तू प्रथम निवडीचे स्वातंत्र्य त्यालाच. हे वाक्य वाचण्यापूर्वी घोड्यांच्या आदलाबदलीने स्पर्धा कशी बदलली ते कळले नाही. पण ही युक्ती चालण्यासाठी सर्वंजयाला माघार घेणे जरुरीचे नव्हते. तिघे आपला सोडून वेगळ्या घोड्यावर बसले असते, तरीही हिरिरीने पुढे गेलेच असते. कारण आपण दुसरा घोडा आधी पोचवला, किंवा दुसर्‍या क्रमांकावर पोचवला, तर आपला मुळातला घोडा "जिंकायची" शक्यता ५०% असते. आपण शेवटी राहिलो तर आपला घोडा "जिंकायची" शक्यता ०% असते, म्हणून तिघेही शेवटी राहाण्यापेक्षा पुढेपुढे नेटाने जात राहातील.

In reply to by धनंजय

जुना अभिजित Fri, 11/30/2007 - 08:46
पण घोड्यासह त्यावर बसलेला स्वारही जिंकला पाहिजे. स्पर्धा घोड्यांची नाहीये असं मला वाटतं. उद्या शुमाकर दुसर्‍याच्या गाडीत बसुन जिंकला तर ती गाडी जिंकली का शुमाकर? मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
लेखनविषय:
लेखनप्रकार
नॅशनल जिओग्राफिकच्या बहुधा नोव्हेंबरच्या अंकात मानवी स्मरणशक्तीवर एक अप्रतिम लेख आला होता. त्यापूर्वी सायंटिफिक अमेरिकन मासिकाच्या जुलै मधील अंकात "द मेमरी कोड" नावाने एक सुंदर लेख आला होता. हे लेख वाचून एक कथा सुचली. अद्याप अपूर्ण आहे. अर्थातच जीएंची भ्रष्ट नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे. वेळेअभावी अद्यापि पूर्ण करणे जमले नाही. मात्र कथा कशी विकसित होत आहे हे हॉटेलातील मंडळींकडून ऐकायला आवडेल. शिवाय कथेला नावही अजून दिलेले नाही. एक नाव मनामध्ये आहे. पण ते देण्यापूर्वी तुम्ही याला काय नाव द्याल?

उन्हाळ्यातले थेंब (हायकू)

धनंजय ·

सर्किट गुरुवार, 11/29/2007 - 09:44
क्या बात है धनंजय !!!!!! हृदयविकाराविषयी संशोधन करता करता, असले शब्द तुमच्या मेंदूला स्फुरतात, ह्याचे किती कौतिक करावे तेवढे थोडेच.... सूर्य उगवला दवाची उठलेली वाफ कोरड पांघरते क्या बात है !!!!! - (दिगभ्भांपाठोपाठ धनंजयचा मेजर फ्यान) सर्किट

जुना अभिजित गुरुवार, 11/29/2007 - 09:52
तापली धूळ बसून पानावर नक्षी दिसते सुकल्या दवाची या पेक्षा जास्त शब्दांची गरज वाटत नाही. अमूर्त भावनांचा नावाने निर्देश निषिद्ध आहे. हा काव्यप्रकार तरी सुटला म्हणायचा प्रेमभंगविरांच्या तावडीतून. अभिजित

मनिष गुरुवार, 11/29/2007 - 10:32
निरभ्र निळे नभ भगभगते मृद्गंध उठला (अजून एक फ्यान्) मनिष

किमयागार गुरुवार, 11/29/2007 - 10:41
कविराज, शब्द त्रिकुटे थोडीशी आतून आलेली न वाटता मेकॅनीकल वाटली इतकी माफक तक्रार सोडली तर कलेचा तुम्ही अतिशय उच्च अविष्कार घडवला आहे. तिकडे तत्वांना गद्ध्याच्या **त सारुन ढोंगी राजकारण खेळणारे बेगडी राजकारणी आणि त्यांची प्यादी, अपशब्द चिखल फेकाफेकी आणि मी पणाचा असह्य दर्प मारणारे 'सो कॉल्ड' तंत्रज्ञ आणि त्यांचे फॅनक्लब ह्या सगळ्या गदारोळात आपला पांढरा शुभ्र स्वच्छ शर्ट तुम्ही भट्टीतून आणल्यासारखा सुरकुत्या विरहीत कसा काय ठेवता बुवा? -कि'गार **************************************************************** अल्कोहोलचा परिणाम दुसरे काय?

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय Fri, 11/30/2007 - 07:35
एकच उत्तम हायकू लिहायला (आणि एक लिहून झाल्यावर थांबायला!) आध्यात्मिक पोच लागते. म्हणजे वर्षांच्या विचाराचा अर्क अल्पाक्षरात, पण उत्स्फूर्त असा सांगावा लागतो. इथे संच बनवणार असे आधी ठरवल्यामुळे काही थोडी कडवी उत्स्फूर्त आहेत, आणि काही त्या अनुषंगाने विचाराअंती रचलेली आहेत. त्यामुळे काही प्रमाणात ओतीव पेक्षा घडीव आकृती दिसते. अभिप्रायाबाबत धन्यवाद.

आनंदयात्री गुरुवार, 11/29/2007 - 11:10
मातीचे मोती जियो धनंजय जियो !! अत्यंत सुंदर कल्पना, नवीन आहे. अंतर्मनात भावनागर्भाचा साक्षात्कार होण्यातच हायकूचे साफल्य आहे. अगदी खरे. धनंजयराव, मानले बुवा तुम्हाला, ते आधी केलेले क्लिष्ट गोष्टीचे भाषांतर अन आता ही हायकुची मेजवानी !! धन्यवाद. (धनंजय फ्यान क्लबात सामील) प्रसाद मुळे ता.क. आमच्या जापानी जाणकार गँगला ही लिंक पाठवायला विसरलो नाही :)

विसोबा खेचर गुरुवार, 11/29/2007 - 11:17
तुझ्या प्रतिभेला दंडवत रे बाबा! फारच सुंदर आणि कल्पक लिहिलं आहेस.. तुझ्यासारख्या प्रतिभावंताचा मिसळपावला अभिमान वाटतो...! अजूनही लिही, अगदी भरपूर लिही, मनमुराद लिही, हीच तुला रिक्वेष्ट...:) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू गुरुवार, 11/29/2007 - 11:18
अजूनही लिही, अगदी भरपूर लिही, मनमुराद लिही, हीच तुला रिक्वेष्ट...:) सहमत आहे . म्हणजे जरा दर्जेदार मराठी संकेतस्थळावर वावरतोय, असे तरी वाटेल :) (सहमत)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर गुरुवार, 11/29/2007 - 11:30
म्हणजे जरा दर्जेदार मराठी संकेतस्थळावर वावरतोय, असे तरी वाटेल :) अरे बेसनाच्या लाडवा, मिसळपाव दर्जेदारच आहे तेव्हा त्यात वेगळं काय वाटायचंय? :) ते जर दर्जेदार नसतं तर तिथे तुझ्यासारखी, धन्याशेठसारखी प्रतिभावान लोकं आलीच नसती! काय खरं की नाही? :) हां परंतु या संस्थळाचं नांव 'मिसळपाव' असल्यामुळे इथे काहीच वर्ज्य नाही. भल्याबुर्‍याची, दर्जा-दर्जाहीनतेची ही एक मिसळच आहे! :) असो, आता मी इथेच थांबतो. इथे पुन्हा नव्याने आपल्या दोघांचे तिरके तिरके प्रतिसाद नकोत! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण गुरुवार, 11/29/2007 - 11:33
असो, आता मी इथेच थांबतो. इथे पुन्हा नव्याने आपल्या दोघांचे तिरके तिरके प्रतिसाद नकोत! :) कुठे थांबावे हे कळणे हेच सर्वात महत्त्वाचे. - आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

बेसनलाडू गुरुवार, 11/29/2007 - 11:41
आता मी इथेच थांबतो. इथे पुन्हा नव्याने आपल्या दोघांचे तिरके तिरके प्रतिसाद नकोत! :) --- बघताना आकाराने तिरके तिरके चालतील हो ;) पण 'तिरके' नकोत ;) ('तिरका')बेसनलाडू कुठे थांबावे हे कळणे हेच सर्वात महत्त्वाचे. --- सहमत. (सहमत)बेसनलाडू

सहज गुरुवार, 11/29/2007 - 11:48
ह्या थेंबांनी अजुनच तहान जागवली. अगदी मनमुराद चिंब भिजवले गेलो तरी देखील... सुरेख!

नंदन गुरुवार, 11/29/2007 - 13:34
हायकू. डी. एफ. सी. (धनंजय फॅन क्लब) मध्ये मीही सामील :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

विसुनाना गुरुवार, 11/29/2007 - 14:42
मी आणखी एक सदस्य... मानले बुवा! धनंजय ही एकच व्यक्ती नसून लेखक, कवी, भाषांतरकार, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, इतिहासतज्ञ यांची सिंडीकेट आहे असे वाटू लागले आहे. :) उत्तम हायकूमाला...

In reply to by विसुनाना

कोलबेर गुरुवार, 11/29/2007 - 21:25
मानले बुवा! धनंजय ही एकच व्यक्ती नसून लेखक, कवी, भाषांतरकार, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, इतिहासतज्ञ यांची सिंडीकेट आहे असे वाटू लागले आहे. :) (डी.एफ्.सी लाईफ मेंबर) कोलबेर

धनंजय Fri, 11/30/2007 - 07:24
अहो इतके नका हरभर्‍याच्या झाडावर चढवू! पुढचा प्रयोग पडला की सरासरी पुन्हा मध्यावर येईल :-) पण चांगल्या अभिप्रायाने उत्साह वाढतो हे मात्र नक्की. मनापासून धन्यवाद.

In reply to by धनंजय

सर्किट Fri, 11/30/2007 - 07:49
धनंजय, आमच्या अभिप्रायाने आपला साहित्यिक उत्साह वाढतोय हे खरे. पण आम्हाला येत्या पाच-दहा वर्षांत हृदयविकाराचा झटका आला, आणि त्यात आम्ही दगावलो, तर ह्या उत्तेजक प्रतिसादांना आम्ही दोष देणार हे नक्क्की ! नरकातून काहीतरी स्फोटक लिहू मिसळपावावर (नाहीतरी इथले *** सदस्य नरकातच असतील, तेव्हा)! कारण ह्याच उत्तेजक प्रतिसादांमुळे आपण *आमच्या* हृदयाविषयी संशोधन रहित करून असे हायकू/भषांतरे/व्याकरणविषयक लेख लिहीत बसणार, आणि एल डी एल कमी करण्याच्या पद्धतींविषयीचे आपले संशोधन कमी करणार. ह्या हायकूंनी फार फार तर आमच्या मनाला बरे वाटते. पण आम्ही जगलोच नाही तर कोण आपले हाय्कू एन्जॉय करणार ? तेव्हा आमच्या जनुकांचा आमच्या एल डी एल चा संबंध, ह्या संशोधनात पूर्ण वेळ घालवा. हायकू काय आम्ही पण करू. धनंजय रावांचे हृदय संशोधन संपले आणि आमचे हृदय निकामी कसे आहे ?? - सर्किट

गुंडोपंत गुरुवार, 12/09/2010 - 05:16
असे अजून हवे! हे हायकू परत एकदा वाचून मस्त वाटले... अधिक लेखनाची वाट पाहतो आहे.

राजेश घासकडवी गुरुवार, 12/09/2010 - 10:28
हायकू (अनेकवचन माहीत नाही...) आवडली. धनंजयनी म्हटलं आहे की
वाटल्यास वरील ९ स्वतंत्र हायकू म्हणून वाचावेत. वाटल्यास आडव्या पंक्तीत लिहिलेल्या, वाटल्यास उभ्या रांगांमध्ये लिहिलेल्या, तीनतीन कडव्यांच्या तीन कविता म्हणून वाचाव्यात.
याही पुढची पायरी मला दिसते. ती म्हणजे काही हायकूंच्या संगमांतून नवीन हायकू तयार होतात. उदाहरणार्थ - लाल धूळकण दवाची उठलेली वाफ मृद्गंध उठला सूर्य उगवला नभ भगभगते भर वैषाखात ऊन धुळीत थेंब दवाची उठलेली वाफ मातीचे मोती ऊन धुळीत थेंब वाहातायत सैरभैर मृद्गंध उठला तापली धूळ, बसून कोळपली पालवी वाफवून कोरड पांघरते सूर्य उगवला पानावर नक्षी दिसते तसा जड नाही तो अशा तयार केलेल्या सर्वच हायकूंमधून भावगर्भ साक्षात्कार होईलच असं नाही. पण काहींमधून होतो हेच अचंबित करणारं. लाजवाब.

कवितानागेश गुरुवार, 12/09/2010 - 11:13
फार वर्षांनी हायकू वाचायला मिळाले. छान वाटलं. तुमच्यासाठी धन्यवादाचा हायकू: लालबुंद तर्री गरमगरम मिसळ शेव ओली पाव ओला

उल्का गुरुवार, 06/09/2016 - 12:28
कोणाला हायकू मध्ये रस असेल अथवा जाणून घ्यायचे असेल तर ह्या लिंक्स वाचाव्या. गुगलवून मिळवल्या आहेत. कष्टाने शोधल्या म्हणून वाटलं इतरांना पण फायदा होऊ दे. आवड नसल्यास दुर्लक्ष करावे. हाकानाका. :) (जमतंय की मिपा भाषेत लिहायला) http://mumbaitarunbharat.in/Encyc/2016/1/23/‘हायकू-.aspx#.V1kMlkThUwg http://www.mr.upakram.org/node/2342

उल्का गुरुवार, 06/09/2016 - 12:40
ती लिंक ब्रह्माण्ड व्यापायाला गेली. पूर्वपरिक्षण केलं नव्हतं मी गडबडीत. हायकू लेख तरुण भारत आणखी एक लेख आत्ता होईल नीट अस वाटतंय. गोंधलाबद्दल माफी असावी.

मारवा गुरुवार, 06/09/2016 - 17:17
काय सुंदर धागा आहे. अनेक दिवसांच्या रखरखीत कोरड्या जमिनीवर पावसाचा शिडकावा व्हावा तस वाटल. आणि आजच्या जुन महीन्यातल्या दिवसात कसला मॅच झालाय धागा. धनंजय मराठी संस्थळावरील असामान्य प्रतिभेचा माणुस आहे. अशी प्रतिभा दुर्मिळच ही उल्का अशीच कोसळत राहो.

सर्किट गुरुवार, 11/29/2007 - 09:44
क्या बात है धनंजय !!!!!! हृदयविकाराविषयी संशोधन करता करता, असले शब्द तुमच्या मेंदूला स्फुरतात, ह्याचे किती कौतिक करावे तेवढे थोडेच.... सूर्य उगवला दवाची उठलेली वाफ कोरड पांघरते क्या बात है !!!!! - (दिगभ्भांपाठोपाठ धनंजयचा मेजर फ्यान) सर्किट

जुना अभिजित गुरुवार, 11/29/2007 - 09:52
तापली धूळ बसून पानावर नक्षी दिसते सुकल्या दवाची या पेक्षा जास्त शब्दांची गरज वाटत नाही. अमूर्त भावनांचा नावाने निर्देश निषिद्ध आहे. हा काव्यप्रकार तरी सुटला म्हणायचा प्रेमभंगविरांच्या तावडीतून. अभिजित

मनिष गुरुवार, 11/29/2007 - 10:32
निरभ्र निळे नभ भगभगते मृद्गंध उठला (अजून एक फ्यान्) मनिष

किमयागार गुरुवार, 11/29/2007 - 10:41
कविराज, शब्द त्रिकुटे थोडीशी आतून आलेली न वाटता मेकॅनीकल वाटली इतकी माफक तक्रार सोडली तर कलेचा तुम्ही अतिशय उच्च अविष्कार घडवला आहे. तिकडे तत्वांना गद्ध्याच्या **त सारुन ढोंगी राजकारण खेळणारे बेगडी राजकारणी आणि त्यांची प्यादी, अपशब्द चिखल फेकाफेकी आणि मी पणाचा असह्य दर्प मारणारे 'सो कॉल्ड' तंत्रज्ञ आणि त्यांचे फॅनक्लब ह्या सगळ्या गदारोळात आपला पांढरा शुभ्र स्वच्छ शर्ट तुम्ही भट्टीतून आणल्यासारखा सुरकुत्या विरहीत कसा काय ठेवता बुवा? -कि'गार **************************************************************** अल्कोहोलचा परिणाम दुसरे काय?

In reply to by किमयागार (verified= न पडताळणी केलेला)

धनंजय Fri, 11/30/2007 - 07:35
एकच उत्तम हायकू लिहायला (आणि एक लिहून झाल्यावर थांबायला!) आध्यात्मिक पोच लागते. म्हणजे वर्षांच्या विचाराचा अर्क अल्पाक्षरात, पण उत्स्फूर्त असा सांगावा लागतो. इथे संच बनवणार असे आधी ठरवल्यामुळे काही थोडी कडवी उत्स्फूर्त आहेत, आणि काही त्या अनुषंगाने विचाराअंती रचलेली आहेत. त्यामुळे काही प्रमाणात ओतीव पेक्षा घडीव आकृती दिसते. अभिप्रायाबाबत धन्यवाद.

आनंदयात्री गुरुवार, 11/29/2007 - 11:10
मातीचे मोती जियो धनंजय जियो !! अत्यंत सुंदर कल्पना, नवीन आहे. अंतर्मनात भावनागर्भाचा साक्षात्कार होण्यातच हायकूचे साफल्य आहे. अगदी खरे. धनंजयराव, मानले बुवा तुम्हाला, ते आधी केलेले क्लिष्ट गोष्टीचे भाषांतर अन आता ही हायकुची मेजवानी !! धन्यवाद. (धनंजय फ्यान क्लबात सामील) प्रसाद मुळे ता.क. आमच्या जापानी जाणकार गँगला ही लिंक पाठवायला विसरलो नाही :)

विसोबा खेचर गुरुवार, 11/29/2007 - 11:17
तुझ्या प्रतिभेला दंडवत रे बाबा! फारच सुंदर आणि कल्पक लिहिलं आहेस.. तुझ्यासारख्या प्रतिभावंताचा मिसळपावला अभिमान वाटतो...! अजूनही लिही, अगदी भरपूर लिही, मनमुराद लिही, हीच तुला रिक्वेष्ट...:) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू गुरुवार, 11/29/2007 - 11:18
अजूनही लिही, अगदी भरपूर लिही, मनमुराद लिही, हीच तुला रिक्वेष्ट...:) सहमत आहे . म्हणजे जरा दर्जेदार मराठी संकेतस्थळावर वावरतोय, असे तरी वाटेल :) (सहमत)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर गुरुवार, 11/29/2007 - 11:30
म्हणजे जरा दर्जेदार मराठी संकेतस्थळावर वावरतोय, असे तरी वाटेल :) अरे बेसनाच्या लाडवा, मिसळपाव दर्जेदारच आहे तेव्हा त्यात वेगळं काय वाटायचंय? :) ते जर दर्जेदार नसतं तर तिथे तुझ्यासारखी, धन्याशेठसारखी प्रतिभावान लोकं आलीच नसती! काय खरं की नाही? :) हां परंतु या संस्थळाचं नांव 'मिसळपाव' असल्यामुळे इथे काहीच वर्ज्य नाही. भल्याबुर्‍याची, दर्जा-दर्जाहीनतेची ही एक मिसळच आहे! :) असो, आता मी इथेच थांबतो. इथे पुन्हा नव्याने आपल्या दोघांचे तिरके तिरके प्रतिसाद नकोत! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण गुरुवार, 11/29/2007 - 11:33
असो, आता मी इथेच थांबतो. इथे पुन्हा नव्याने आपल्या दोघांचे तिरके तिरके प्रतिसाद नकोत! :) कुठे थांबावे हे कळणे हेच सर्वात महत्त्वाचे. - आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

बेसनलाडू गुरुवार, 11/29/2007 - 11:41
आता मी इथेच थांबतो. इथे पुन्हा नव्याने आपल्या दोघांचे तिरके तिरके प्रतिसाद नकोत! :) --- बघताना आकाराने तिरके तिरके चालतील हो ;) पण 'तिरके' नकोत ;) ('तिरका')बेसनलाडू कुठे थांबावे हे कळणे हेच सर्वात महत्त्वाचे. --- सहमत. (सहमत)बेसनलाडू

सहज गुरुवार, 11/29/2007 - 11:48
ह्या थेंबांनी अजुनच तहान जागवली. अगदी मनमुराद चिंब भिजवले गेलो तरी देखील... सुरेख!

नंदन गुरुवार, 11/29/2007 - 13:34
हायकू. डी. एफ. सी. (धनंजय फॅन क्लब) मध्ये मीही सामील :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

विसुनाना गुरुवार, 11/29/2007 - 14:42
मी आणखी एक सदस्य... मानले बुवा! धनंजय ही एकच व्यक्ती नसून लेखक, कवी, भाषांतरकार, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, इतिहासतज्ञ यांची सिंडीकेट आहे असे वाटू लागले आहे. :) उत्तम हायकूमाला...

In reply to by विसुनाना

कोलबेर गुरुवार, 11/29/2007 - 21:25
मानले बुवा! धनंजय ही एकच व्यक्ती नसून लेखक, कवी, भाषांतरकार, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, इतिहासतज्ञ यांची सिंडीकेट आहे असे वाटू लागले आहे. :) (डी.एफ्.सी लाईफ मेंबर) कोलबेर

धनंजय Fri, 11/30/2007 - 07:24
अहो इतके नका हरभर्‍याच्या झाडावर चढवू! पुढचा प्रयोग पडला की सरासरी पुन्हा मध्यावर येईल :-) पण चांगल्या अभिप्रायाने उत्साह वाढतो हे मात्र नक्की. मनापासून धन्यवाद.

In reply to by धनंजय

सर्किट Fri, 11/30/2007 - 07:49
धनंजय, आमच्या अभिप्रायाने आपला साहित्यिक उत्साह वाढतोय हे खरे. पण आम्हाला येत्या पाच-दहा वर्षांत हृदयविकाराचा झटका आला, आणि त्यात आम्ही दगावलो, तर ह्या उत्तेजक प्रतिसादांना आम्ही दोष देणार हे नक्क्की ! नरकातून काहीतरी स्फोटक लिहू मिसळपावावर (नाहीतरी इथले *** सदस्य नरकातच असतील, तेव्हा)! कारण ह्याच उत्तेजक प्रतिसादांमुळे आपण *आमच्या* हृदयाविषयी संशोधन रहित करून असे हायकू/भषांतरे/व्याकरणविषयक लेख लिहीत बसणार, आणि एल डी एल कमी करण्याच्या पद्धतींविषयीचे आपले संशोधन कमी करणार. ह्या हायकूंनी फार फार तर आमच्या मनाला बरे वाटते. पण आम्ही जगलोच नाही तर कोण आपले हाय्कू एन्जॉय करणार ? तेव्हा आमच्या जनुकांचा आमच्या एल डी एल चा संबंध, ह्या संशोधनात पूर्ण वेळ घालवा. हायकू काय आम्ही पण करू. धनंजय रावांचे हृदय संशोधन संपले आणि आमचे हृदय निकामी कसे आहे ?? - सर्किट

गुंडोपंत गुरुवार, 12/09/2010 - 05:16
असे अजून हवे! हे हायकू परत एकदा वाचून मस्त वाटले... अधिक लेखनाची वाट पाहतो आहे.

राजेश घासकडवी गुरुवार, 12/09/2010 - 10:28
हायकू (अनेकवचन माहीत नाही...) आवडली. धनंजयनी म्हटलं आहे की
वाटल्यास वरील ९ स्वतंत्र हायकू म्हणून वाचावेत. वाटल्यास आडव्या पंक्तीत लिहिलेल्या, वाटल्यास उभ्या रांगांमध्ये लिहिलेल्या, तीनतीन कडव्यांच्या तीन कविता म्हणून वाचाव्यात.
याही पुढची पायरी मला दिसते. ती म्हणजे काही हायकूंच्या संगमांतून नवीन हायकू तयार होतात. उदाहरणार्थ - लाल धूळकण दवाची उठलेली वाफ मृद्गंध उठला सूर्य उगवला नभ भगभगते भर वैषाखात ऊन धुळीत थेंब दवाची उठलेली वाफ मातीचे मोती ऊन धुळीत थेंब वाहातायत सैरभैर मृद्गंध उठला तापली धूळ, बसून कोळपली पालवी वाफवून कोरड पांघरते सूर्य उगवला पानावर नक्षी दिसते तसा जड नाही तो अशा तयार केलेल्या सर्वच हायकूंमधून भावगर्भ साक्षात्कार होईलच असं नाही. पण काहींमधून होतो हेच अचंबित करणारं. लाजवाब.

कवितानागेश गुरुवार, 12/09/2010 - 11:13
फार वर्षांनी हायकू वाचायला मिळाले. छान वाटलं. तुमच्यासाठी धन्यवादाचा हायकू: लालबुंद तर्री गरमगरम मिसळ शेव ओली पाव ओला

उल्का गुरुवार, 06/09/2016 - 12:28
कोणाला हायकू मध्ये रस असेल अथवा जाणून घ्यायचे असेल तर ह्या लिंक्स वाचाव्या. गुगलवून मिळवल्या आहेत. कष्टाने शोधल्या म्हणून वाटलं इतरांना पण फायदा होऊ दे. आवड नसल्यास दुर्लक्ष करावे. हाकानाका. :) (जमतंय की मिपा भाषेत लिहायला) http://mumbaitarunbharat.in/Encyc/2016/1/23/‘हायकू-.aspx#.V1kMlkThUwg http://www.mr.upakram.org/node/2342

उल्का गुरुवार, 06/09/2016 - 12:40
ती लिंक ब्रह्माण्ड व्यापायाला गेली. पूर्वपरिक्षण केलं नव्हतं मी गडबडीत. हायकू लेख तरुण भारत आणखी एक लेख आत्ता होईल नीट अस वाटतंय. गोंधलाबद्दल माफी असावी.

मारवा गुरुवार, 06/09/2016 - 17:17
काय सुंदर धागा आहे. अनेक दिवसांच्या रखरखीत कोरड्या जमिनीवर पावसाचा शिडकावा व्हावा तस वाटल. आणि आजच्या जुन महीन्यातल्या दिवसात कसला मॅच झालाय धागा. धनंजय मराठी संस्थळावरील असामान्य प्रतिभेचा माणुस आहे. अशी प्रतिभा दुर्मिळच ही उल्का अशीच कोसळत राहो.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
उन्हाळ्यातले थेंब (तिहेरी तिहाई)
* तापली धूळ बसून पानावर नक्षी दिसते सुकल्या दवाची * * *
* * लाल धूळकण वाहातायत सैरभैर खार तुषार * *
* * * ऊन धुळीत थेंब कोळपली पालवी वाफवून मलूल करतात *
* दवाचा एक बिंदू पानाला लोंबतो तसा जड नाही तो * * *
* * मागे ठिबक ठिबक समोर

...बरसात

दिनेश५७ ·

सहज गुरुवार, 11/29/2007 - 05:22
तिच्या हालचालींचा अर्थ शोधताना मी उगीचच हरवत चाललो होतो. मस्तच. लेख आवडला. दिनेशराव आता यापुढे तुमचे नाव "नवे लेखन" मधे दिसते आहे की नाही याकडे आमचे लक्ष असणारं बर का!

ध्रुव गुरुवार, 11/29/2007 - 11:28
फारच सुरेख झाला आहे हा लेख. प्रत्येक शब्दाबरोबर आम्हालाही तिच्या समाधानाची जाणीव होत गेली. छान वाटलं. -- ध्रुव

आनंदयात्री गुरुवार, 11/29/2007 - 12:09
झाला आहे लेख. त्या पोरीला झालेला आनंद अनुभवला असे वाटले, अजुन येउद्या असे अनुभव चित्रण.

नंदन गुरुवार, 11/29/2007 - 13:31
लिहिलं आहे. साधासा प्रसंग सुरेख रीतीने खुलवला आहे. मीही खिडकीबाहेर डोकावत रस्त्यावरल्या गर्दीचा चेहेरा मनावर कोरू लागलो. - हे वाक्य विशेष आवडले. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

सहज गुरुवार, 11/29/2007 - 05:22
तिच्या हालचालींचा अर्थ शोधताना मी उगीचच हरवत चाललो होतो. मस्तच. लेख आवडला. दिनेशराव आता यापुढे तुमचे नाव "नवे लेखन" मधे दिसते आहे की नाही याकडे आमचे लक्ष असणारं बर का!

ध्रुव गुरुवार, 11/29/2007 - 11:28
फारच सुरेख झाला आहे हा लेख. प्रत्येक शब्दाबरोबर आम्हालाही तिच्या समाधानाची जाणीव होत गेली. छान वाटलं. -- ध्रुव

आनंदयात्री गुरुवार, 11/29/2007 - 12:09
झाला आहे लेख. त्या पोरीला झालेला आनंद अनुभवला असे वाटले, अजुन येउद्या असे अनुभव चित्रण.

नंदन गुरुवार, 11/29/2007 - 13:31
लिहिलं आहे. साधासा प्रसंग सुरेख रीतीने खुलवला आहे. मीही खिडकीबाहेर डोकावत रस्त्यावरल्या गर्दीचा चेहेरा मनावर कोरू लागलो. - हे वाक्य विशेष आवडले. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
लेखनविषय:
लेखनप्रकार
स स्टॉपवर येऊन थांबली, आणि घाईघाईनं रांगेतली गर्दी पुढंपुढं सरकू लागली. रांगेबाहेरच्या त्या काहीश्या वयस्कर इसमाशी बोलणार्‍या तिला बहुधा गर्दीची ही घाई कळलीच नव्हती. मागून दोनचार जणांनी आवाज दिल्यावर तिची पावलं जडपणे पुढं सरकली. तो इसमही तिच्याइतक्याच जडपणानं बाजूनं पुढेपुढे सरकत चालत होता. रांगेबरोबर तीदेखील एखाद्या यंत्रासारखी बसमध्ये चढली आणि रिकाम्या राहिलेल्या एकमेव बाकावर चक्क विंडो मिळाल्यानं तिचा चेहेरा खुलला. तो इसमही मग बसबाहेर विंडोजवळ येऊन उभा राहिला. आता बस जवळपास भरली होती. पुढचा सिग्नल बंद होता म्हणून ती स्टॉपवर उभी होती.