माझी मायभू
लेखनप्रकार
प्राचीन काळापासूनची आपली संस्कृती बहुतांशी टिकवून ठेवणारा, विविध परकियांचे आकर्षणस्थान झाल्याने व त्यांच्या आक्रमणांमुळे या संस्कृतीत किंवा संस्कृतीतून जरी काही घटक समाविष्ट अथवा नाहीसे झालेे असले, तरी न ढळता अभिमानाने जगात मान उंचावणारा, जीवसृष्टी व लोकसृष्टीत अमाप प्रमाणात विविधता असलेला, विकासाच्या दिशेने रोज पाऊले पुढे टाकत जगावर छाप पाडणारा, असा हा भारत देश.
ह्या देशावर सर्वप्रथम आर्य, त्यानंतर शक, मग मौर्य, मग ग्रीक, इत्यादी प्रबळ राजवटींनी देशाचा कायापालट करून त्याचे जणू सुवर्ण संास्कृतिक भूमीत रूपांतर केले.
भारताने 1 ते 9 हे अंक अस्तित्वात आणले. शून्याचा शोध भारतीयांनी लावला.
त्यानंतर अरबांशी केलेल्या व्यापारामुळे व यवनांच्या राजवटीत भारत जगप्रसिध्द देश झाला. या कालावधीत देशातील लोकविविधता वाढली, काही प्रमाणात देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली. पण शिल्पकला व वास्तुकौशल्याला प्राधान्य मिळून देशाचे सौंदर्य वाढले.
त्याच्या पुढील काळात मुघल व त्यानंतर मराठे भारताच्या राजवटीवर आले. त्यांना कपट-कारस्थानाने पराभूत करून व औद्योगिक दृष्ट्या पुष्कळ संपत्ती असलेल्या या देशात पूर्णपणे धूमाकूळ माजवून संपूर्ण देशावर आपली जुलमी राजवट प्रस्थापित केलेल्या ब्रिटिशांमुळे देशाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. पण काही प्रमाणात देशाचा फायदा झाला.
ब्रिटिशांच्या राजवटीत देशात अनेक विचारवंत उदयाला आले. लोकशाहीची कल्पना आली. जुन्या रुढी- परंपरा यांना विरोध केला गेला, व वैविध्यपूर्ण असा भारत जगापुढे उभा ठाकला.
भारताने यवनांच्या काळापासून ते ब्रिटिशांच्या राजवटीपर्यंत सुमारे एक हजार वर्षे पारतंत्र्यात काढली. नुकतेच 25 ऑक्टोबरला भारताच्या ग्रीकांविरोधात असलेल्या पहिल्या स्वातंत्र्यसंग्रामाला सुमारे 3200 वर्षे पूर्ण झाली. तेव्हापासून आतापर्यंत भारत केवळ आपल्या स्वत:च्या हक्कांसाठी व स्वातंत्र्यासाठी लढा देत आला आहे. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यसंग्राम हा जगातील सर्वांत मोठा लढा मानला जातो. ह्या लढयाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ह्या प्रदीर्घकाळ चालू असलेल्या संग्रामात जगातील इतर संग्रामांच्या मानाने कमीत कमी जीवीतहानी झाली.
ह्या सहस्र वर्षांच्या पारतंत्री राजवटीत ब्रिटिशाची राजवट दीडशे वर्षे एवढी होती. म्हणजेच पारतंत्री काळापेक्षा सुमारे सहापटींनी लहान होती. या काळात भारतातून एवढी संपत्ती लुटली गेली, की जिचे मूल्य आत्ताच्या बाजारपेठांमध्ये जवळजवळ चारशे निखर्व अमेरिकन डॉलर्स एवढे होईल. असे असूनही भारत अजूनही बऱ्याच प्रमाणात विकसित झाला आहे. विचारवंतांच्या हिशेबाप्रमाणे भारत इसवी सन 2050 पर्यंत जगातील सर्वात मोठी महासत्ता होणार आहे.
भारत हा विकसनशील देश असून त्याने आत्तापर्यंत बऱ्याच क्षेत्रात प्रगती केली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात हरितक्रांती व धवलक्रांती घडून आली. त्यामुळे बहुतांशी ग्रामीण जीवन सुधारले.
उद्योगधंद्यांच्या क्षेत्रातदेखील आधुनिक तंत्रांचा वापर करून आपण लक्षणीय प्रगती केली आहे. माहिती, तंत्रज्ञान, संगणक क्षेत्र, अवकाश संशोधन, उपग्रहाद्वारे माहिती संकलन, अणुऊर्जा, इत्यादी क्षेत्रात भारताची प्रमुख राष्टांत गणना केली जाते.
भारताला दक्षिणेला हिन्दी महासागर, उत्तरेला हिमालय पर्वत, यांसारखे भौगोलिक विविधता असलेले वातावरण प्राप्त झाले आहे.
अशाप्रकारे भाषा, संस्कृती, इतिहास, गणित, विज्ञान, भूगोल, औद्योगिक तत्त्वे, इत्यादी घटकांद्वारे भारताने जगाला मोठ्या प्रमाणात देणगी दिली आहे. त्यामुळे आज भारतात मी एक अभिमानी दृष्टिकोन बाळगून राहतो. माझ्या भारताला एखाद्या स्वप्ननगरीसारखे पहाण्याची गरजच नाही; कारण भारत हीच अशी एक सुंदर स्वप्ननगरी आहे, जी कोणत्याही देशाच्या तुलनेत उत्तमच आहे. जी सर्वात प्राचीन संस्कृती बाळगणारी असून अजूनपर्यंत प्रगतदृष्ट्या अस्तित्वात आहे. 'भारत कसा असावा', ह्याचा विचार करत बसण्यापेक्षा भारताच्या प्रगतीपथावरून वाटचाल करत आपल्यामागून येणाऱ्या इतर भारतीयांसाठी हा विकासाचा प्रवास सोपा करून द्यावा व 2050 च्या आधीच सर्वांत मोठी महासत्ता होऊन अखिल जगाला चकित करावे.
। जय हिन्द ।
वाचने
5441
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
छान लेख, परंतु...
सहमत...
जेथे
In reply to जेथे by राजे (verified= न पडताळणी केलेला)
श्री. राजे
चॉकलेट
परकी यांनी ......
जय हो इंडीया की!!!!!!!!!!
हा निबंध वाचा
In reply to हा निबंध वाचा by जालिम लोशन
बापरे 11 वर्षे झाली हे लिहून ?