मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाल आणि बालाजी

कैलासराजा ·

वेलदोडा Wed, 05/21/2008 - 13:51
देवाला केस वाह्ण्याची तिथे री त आहे. तिथे देवाला केस वाहणे हे पुण्यकर्म , एक धार्मिक कार्य समजतात. त्यामुळे दर्शनाला जाण्यापूर्वी लोक मुंडन अर्थात टक्कल करतात बाकी अशी रीत का आहे ह्याचा जाणकारांनी उलगडा करावा. हे केस लिलावात मोठमोठ्या किमंतीना विकले जातात. अनेक फार्मास्युटिकल , कॉस्मॅटिक कम्पन्या हे केस विकत घेतात.

In reply to by वेलदोडा

प्रियाली Wed, 05/21/2008 - 18:18
असे वाहलेले केस विकण्यापासून भारतात सुमारे ६२ मि. डॉ.चा व्यवसाय होतो असे कालच वाचले. हे केस प्रामुख्याने ज्यू लोक विकत घेत असत. ज्यू धर्मसंकल्पनेप्रमाणे बायकांनी केस दाखवू नयेत असा संकेत असल्याने बायका हे विग्ज वापरत असत. जेव्हा हिंदू देवाला दान केलेल्या केसांचे विग आपण वापरतो हे त्यांना कळले तेव्हा अशा केसांची जाहिर होळी करण्यात आली. संदर्भः डोन्ट नो मच अबाऊट मायथॉलॉजी - केनेथ डेविस

श्रीनिवास Wed, 05/21/2008 - 14:23
माझ्या मते कारण असं असावं की देव आपल्याला इतकं देतो तर आपण त्याची परतपफेड कशी करणार ? म्हणून आपण असं काही तरी द्यायचं की जे मोजता येणं केवळ अशक्य असेल. आता केस हे अगणित असल्यामुळे तिथे केस दान करत असावेत.

विसोबा खेचर Wed, 05/21/2008 - 16:59
केस हा माणसाचा मानबिंदू असतो. आपल्या केशरचनेच्या बाबतीत माणूस अत्यंत जागरूक व आग्रही असतो. भांग पाडण्याची ष्टाईल, केसांची निगा राखणे, आरशात पाहून ठीकठाक केस विंचरून आपण नीट दिसतो आहोत ना, इत्यादी गोष्टी माणूस वारंवार अन् वरचेचर करत असतो. माणसाचा सारा अभिमान त्याच्या केसात असतो असं मानलं गेलं आहे. आणि म्हणूनच तिरुपतीला जाऊन गोटा करून घेऊन सगळा अभिमान प्रतिकात्मक रुपाने ईश्वरासमोर उतरवायचा असतो अशी धारणा आहे.. आपला, तात्याबालाजी.

In reply to by विसोबा खेचर

भडकमकर मास्तर Wed, 05/21/2008 - 18:14
माझा एक मित्र ( जो एरवी देव देव करणारा नाही आणि इतर देवस्थानांची मॅनेजमेंट वगैरे वरती फारसे बरे बोलत नाही) तो तिकडे एकदा केस उतरवून आला आणि भारावून असेच बोलत होता... की शब्दांत सांगणं कठीण आहे पण एकदम सगळा गर्व उतरून गेल्यासारखे वाटले... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आर्य Wed, 05/21/2008 - 18:06
केस दान करून घेऊन सगळा अभिमान प्रतिकात्मक रुपाने ईश्वरासमोर उतरवायचा असतो अशी धारणा आहे हेच कारण माझ्याही ऐकीवात आहे. काही लोकांना सर्वस्व दान केल्यावरही मंदिर ऊत्पनाची माहीती हवी असते, यांच्या अधिक माहीती साठी - मंदिराचे वार्षिक अंदाजपत्रक -अंदाजे १२१६ कोटी (०७-०८) (ऊत्पन - ४२५ कोटी निव्वळ हुंडीतुन, ३११ कोटी गुंतवणुकीतुन, १०० कोटी केस दानातुन + ईतर) ( अन्य हुंडी उत्पन्न - ५ किलो हिरे +रत्न , २ किलो मोती + ३५० किलो सोनं, ३५०० किलो चांदी ईत्यादी) भाविक - ५० हजार ते १ लाख प्रतिदिन (५ लाख प्रतिदिन ब्रह्मोत्सव काळात) मंदिर पुजारी - ८०० (२००७ पर्यंत) + १५०० सेवेकरी + अन्य =ऐकुण १४००० क्षेत्र - ८०,६२८ ऐकर (हिंदू क्षेत्र -या क्षेत्रात हिंदूंखेरीज अन्य कोणत्याही धर्माला / कार्याला मज्जाव आहे.) यादेवाची गोष्टही फार गंमतशीर आहे लवकरच सांगतो. श्रीनिवास भक्त आर्य भक्त वत्सल लक्ष्मीकांत व्यंकटरमणा गोविंदा - गोविंदा

In reply to by आर्य

कैलासराजा Fri, 05/23/2008 - 08:33
सन्मित्र श्रीनिवास जी, सान्गणार बालाजी भगवाची कथा सान्गणार होता ती वाचण्याची मी वाट पहात आहे.... आपका स्नेहाभिलाशी कैलासराजा.....

वेताळ Wed, 05/21/2008 - 22:43
केस हे मनुष्याच्या अहंकाराचे प्रतीक आहे. आपण आपला अहंकार बाजुला ठेवुन देवाच्या दर्शनाला गेलो तर देव आपल्यावर प्रसन्न होतो अशी धारणा आहे.केस पुर्ण काढल्या मुळे आपला अहंकार नष्ट पावतो व आपण खरया अर्थाने देवासमोर नतमस्तक होतो. म्हनुन केशदान करुन तिरुपतीचे दर्शन घेतले जाते. अशी माहिती मला मिळाली. जय गोविंदा वेताळ

वेलदोडा Wed, 05/21/2008 - 13:51
देवाला केस वाह्ण्याची तिथे री त आहे. तिथे देवाला केस वाहणे हे पुण्यकर्म , एक धार्मिक कार्य समजतात. त्यामुळे दर्शनाला जाण्यापूर्वी लोक मुंडन अर्थात टक्कल करतात बाकी अशी रीत का आहे ह्याचा जाणकारांनी उलगडा करावा. हे केस लिलावात मोठमोठ्या किमंतीना विकले जातात. अनेक फार्मास्युटिकल , कॉस्मॅटिक कम्पन्या हे केस विकत घेतात.

In reply to by वेलदोडा

प्रियाली Wed, 05/21/2008 - 18:18
असे वाहलेले केस विकण्यापासून भारतात सुमारे ६२ मि. डॉ.चा व्यवसाय होतो असे कालच वाचले. हे केस प्रामुख्याने ज्यू लोक विकत घेत असत. ज्यू धर्मसंकल्पनेप्रमाणे बायकांनी केस दाखवू नयेत असा संकेत असल्याने बायका हे विग्ज वापरत असत. जेव्हा हिंदू देवाला दान केलेल्या केसांचे विग आपण वापरतो हे त्यांना कळले तेव्हा अशा केसांची जाहिर होळी करण्यात आली. संदर्भः डोन्ट नो मच अबाऊट मायथॉलॉजी - केनेथ डेविस

श्रीनिवास Wed, 05/21/2008 - 14:23
माझ्या मते कारण असं असावं की देव आपल्याला इतकं देतो तर आपण त्याची परतपफेड कशी करणार ? म्हणून आपण असं काही तरी द्यायचं की जे मोजता येणं केवळ अशक्य असेल. आता केस हे अगणित असल्यामुळे तिथे केस दान करत असावेत.

विसोबा खेचर Wed, 05/21/2008 - 16:59
केस हा माणसाचा मानबिंदू असतो. आपल्या केशरचनेच्या बाबतीत माणूस अत्यंत जागरूक व आग्रही असतो. भांग पाडण्याची ष्टाईल, केसांची निगा राखणे, आरशात पाहून ठीकठाक केस विंचरून आपण नीट दिसतो आहोत ना, इत्यादी गोष्टी माणूस वारंवार अन् वरचेचर करत असतो. माणसाचा सारा अभिमान त्याच्या केसात असतो असं मानलं गेलं आहे. आणि म्हणूनच तिरुपतीला जाऊन गोटा करून घेऊन सगळा अभिमान प्रतिकात्मक रुपाने ईश्वरासमोर उतरवायचा असतो अशी धारणा आहे.. आपला, तात्याबालाजी.

In reply to by विसोबा खेचर

भडकमकर मास्तर Wed, 05/21/2008 - 18:14
माझा एक मित्र ( जो एरवी देव देव करणारा नाही आणि इतर देवस्थानांची मॅनेजमेंट वगैरे वरती फारसे बरे बोलत नाही) तो तिकडे एकदा केस उतरवून आला आणि भारावून असेच बोलत होता... की शब्दांत सांगणं कठीण आहे पण एकदम सगळा गर्व उतरून गेल्यासारखे वाटले... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आर्य Wed, 05/21/2008 - 18:06
केस दान करून घेऊन सगळा अभिमान प्रतिकात्मक रुपाने ईश्वरासमोर उतरवायचा असतो अशी धारणा आहे हेच कारण माझ्याही ऐकीवात आहे. काही लोकांना सर्वस्व दान केल्यावरही मंदिर ऊत्पनाची माहीती हवी असते, यांच्या अधिक माहीती साठी - मंदिराचे वार्षिक अंदाजपत्रक -अंदाजे १२१६ कोटी (०७-०८) (ऊत्पन - ४२५ कोटी निव्वळ हुंडीतुन, ३११ कोटी गुंतवणुकीतुन, १०० कोटी केस दानातुन + ईतर) ( अन्य हुंडी उत्पन्न - ५ किलो हिरे +रत्न , २ किलो मोती + ३५० किलो सोनं, ३५०० किलो चांदी ईत्यादी) भाविक - ५० हजार ते १ लाख प्रतिदिन (५ लाख प्रतिदिन ब्रह्मोत्सव काळात) मंदिर पुजारी - ८०० (२००७ पर्यंत) + १५०० सेवेकरी + अन्य =ऐकुण १४००० क्षेत्र - ८०,६२८ ऐकर (हिंदू क्षेत्र -या क्षेत्रात हिंदूंखेरीज अन्य कोणत्याही धर्माला / कार्याला मज्जाव आहे.) यादेवाची गोष्टही फार गंमतशीर आहे लवकरच सांगतो. श्रीनिवास भक्त आर्य भक्त वत्सल लक्ष्मीकांत व्यंकटरमणा गोविंदा - गोविंदा

In reply to by आर्य

कैलासराजा Fri, 05/23/2008 - 08:33
सन्मित्र श्रीनिवास जी, सान्गणार बालाजी भगवाची कथा सान्गणार होता ती वाचण्याची मी वाट पहात आहे.... आपका स्नेहाभिलाशी कैलासराजा.....

वेताळ Wed, 05/21/2008 - 22:43
केस हे मनुष्याच्या अहंकाराचे प्रतीक आहे. आपण आपला अहंकार बाजुला ठेवुन देवाच्या दर्शनाला गेलो तर देव आपल्यावर प्रसन्न होतो अशी धारणा आहे.केस पुर्ण काढल्या मुळे आपला अहंकार नष्ट पावतो व आपण खरया अर्थाने देवासमोर नतमस्तक होतो. म्हनुन केशदान करुन तिरुपतीचे दर्शन घेतले जाते. अशी माहिती मला मिळाली. जय गोविंदा वेताळ
तिरुपती बालाजी ला जावून लोक टक्कल का करतात ?

शंकरपाळे

स्वाती दिनेश ·

आर्य Wed, 05/21/2008 - 14:04
स्वाती ताई, पाक कृती छानच आहे पण.......... स्वाती ताई (दोन्ही), वरदा ताई आणि सर्व सुगरीणी / बल्लवाचारी सर्वांना नम्र विनंती, आपण देत असलेल्या पाककृती, नवशिक्या / होतकरु / प्रयोगशील गृहिणीही वाचत असतात आणि प्रयोग करु शकतात हे ध्यानात ठेवावे. किंबहुना अनेक मि-पाव कर अशा घातक प्रयोगांना बळी पडलेले आहेत. हि धोक्याची सुचना लक्षात धेऊन प्रयोगातीत (पाककृतीतील) खाचाखोचा / ऊप सुचना / वि.सु. / ता.क्./ टिपा/वैधानिक ईशारा यांचा जरुर ऊपयोग करावा. यातून कोणत्याही सुगरीणीचा अथवा बल्लवाचार्‍याचा ऊपमर्द अथवा खच्चीकरण करण्याचा हेतू नाही. (अहो काय सांगु- आमच्या हिने ऐक पाककृती मिपावार वाचुन बनवली आणी विचारले ओळख काय आहे बरं? - काय झाली असेल माझी अवस्था हे माझे मिपा.करांना वेगळे सांगावे न लागे. लवकरच किस्सा सांगतो) आपला (प्रयोगाचा ऊंदीर आर्य ) O:)

In reply to by आर्य

प्रभाकर पेठकर Wed, 05/21/2008 - 14:29
(पाककृतीतील) खाचाखोचा / ऊप सुचना / वि.सु. / ता.क्./ टिपा/वैधानिक ईशारा यांचा जरुर ऊपयोग करावा. सहमत आहे. बहुतेक सदस्य तशी काळजी घेतातही. सुचना/उपसुचना/टिपा वगैरे दिलेल्या असतात. तसेच सगळे प्रतिसाद वाचले तर त्यातुनही अनेक प्रश्नांना दिलेली उत्तरे आणि इतर सदस्यांचे अनुभव, त्याच्या सुचवण्याही विचारात घेता येतात. आपल्या सदस्यांना बेसिक स्वयंपाक येतोच असे गृहीत धरलेले असते. पाककृती तंतोतंत (पहिल्यांदा तरी) करण्याचा प्रयत्न करावा, दिलेल्या छायाचित्राचा फायनल प्रॉडक्ट म्हणून तुलना करण्यासाठी वापर करावा. तुमची पाककृती त्याच्या जवळपास होते. त्यात मग तुमच्या कौशल्याने (नंतरच्या प्रयोगांमध्ये..) आवश्यक तो बदल करावा आणि तीच पाककृती अधिक चांगली बनवावी. पहिल्या प्रयोगात पाककृती जमली नाही म्हणून नाऊमेद होऊ नये. पहिल्या प्रयोगातील चुका दुसर्‍या प्रयोगात टाळाव्यात. 'युरेका..युरेका' ओरडण्याची वेळ तुमच्यावरही येईल. तुमच्या सौं.ची पाककृती बिघडली असेल तर हिणवू नका. पुढील प्रयोगांसाठी धीर, प्रोत्साहन द्या. एखादी पाककृती कधी कधी कधीच जमत नाही. सोडून द्या. पाकशास्त्रात अनेकविध पदार्थ आहेत. एखादी पाककृती जमली नाही म्हणून विशेष फरक पडत नाही. (रसगुल्ले, जिलेबी मलाही अजून जमत नाही, तयार आणून खायचे. वाईट कशाकरीता वाटून घ्यावे?)

In reply to by प्रभाकर पेठकर

चकली Sat, 05/24/2008 - 00:02
>>> तुमच्या सौं.ची पाककृती बिघडली असेल तर हिणवू नका. पुढील प्रयोगांसाठी धीर, प्रोत्साहन द्या. हे एकदम बरोबर ..सगळे प्रयोग सहन केले आणि सुधारणा करत गेले कि मग तुम्हाला "masterpiece" चाखायला मिळेल चकली http://chakali.blogspot.com

प्राजु Wed, 05/21/2008 - 15:08
एकतर रवा आणि मैदा भिजवून ती कुटाकुटी नाही करावी लागत. आणि पटकन होतात. आणि एक वाटी साखर आणि एक वाटी दूध या प्रमाणात भरपूर होतात. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा Wed, 05/21/2008 - 17:47
अगदी अस्संच करते मी....त्यामुळे कुटायला लागत नाही....आणि मैदा जरा तळला की छान खुसखुशीत होतो...ओल्या नारळाच्या करंज्याही अशा करुन पाहिल्यात मी झक्कास होतात्...काही कळत नाही नुसता मैदा आहे ते....

मदनबाण Sat, 05/24/2008 - 11:34
हा पदार्थ समोर दिसताच त्याचा अगदी तोबरा भरतो मी..... (हवरट) मदनबाण.....

आर्य Wed, 05/21/2008 - 14:04
स्वाती ताई, पाक कृती छानच आहे पण.......... स्वाती ताई (दोन्ही), वरदा ताई आणि सर्व सुगरीणी / बल्लवाचारी सर्वांना नम्र विनंती, आपण देत असलेल्या पाककृती, नवशिक्या / होतकरु / प्रयोगशील गृहिणीही वाचत असतात आणि प्रयोग करु शकतात हे ध्यानात ठेवावे. किंबहुना अनेक मि-पाव कर अशा घातक प्रयोगांना बळी पडलेले आहेत. हि धोक्याची सुचना लक्षात धेऊन प्रयोगातीत (पाककृतीतील) खाचाखोचा / ऊप सुचना / वि.सु. / ता.क्./ टिपा/वैधानिक ईशारा यांचा जरुर ऊपयोग करावा. यातून कोणत्याही सुगरीणीचा अथवा बल्लवाचार्‍याचा ऊपमर्द अथवा खच्चीकरण करण्याचा हेतू नाही. (अहो काय सांगु- आमच्या हिने ऐक पाककृती मिपावार वाचुन बनवली आणी विचारले ओळख काय आहे बरं? - काय झाली असेल माझी अवस्था हे माझे मिपा.करांना वेगळे सांगावे न लागे. लवकरच किस्सा सांगतो) आपला (प्रयोगाचा ऊंदीर आर्य ) O:)

In reply to by आर्य

प्रभाकर पेठकर Wed, 05/21/2008 - 14:29
(पाककृतीतील) खाचाखोचा / ऊप सुचना / वि.सु. / ता.क्./ टिपा/वैधानिक ईशारा यांचा जरुर ऊपयोग करावा. सहमत आहे. बहुतेक सदस्य तशी काळजी घेतातही. सुचना/उपसुचना/टिपा वगैरे दिलेल्या असतात. तसेच सगळे प्रतिसाद वाचले तर त्यातुनही अनेक प्रश्नांना दिलेली उत्तरे आणि इतर सदस्यांचे अनुभव, त्याच्या सुचवण्याही विचारात घेता येतात. आपल्या सदस्यांना बेसिक स्वयंपाक येतोच असे गृहीत धरलेले असते. पाककृती तंतोतंत (पहिल्यांदा तरी) करण्याचा प्रयत्न करावा, दिलेल्या छायाचित्राचा फायनल प्रॉडक्ट म्हणून तुलना करण्यासाठी वापर करावा. तुमची पाककृती त्याच्या जवळपास होते. त्यात मग तुमच्या कौशल्याने (नंतरच्या प्रयोगांमध्ये..) आवश्यक तो बदल करावा आणि तीच पाककृती अधिक चांगली बनवावी. पहिल्या प्रयोगात पाककृती जमली नाही म्हणून नाऊमेद होऊ नये. पहिल्या प्रयोगातील चुका दुसर्‍या प्रयोगात टाळाव्यात. 'युरेका..युरेका' ओरडण्याची वेळ तुमच्यावरही येईल. तुमच्या सौं.ची पाककृती बिघडली असेल तर हिणवू नका. पुढील प्रयोगांसाठी धीर, प्रोत्साहन द्या. एखादी पाककृती कधी कधी कधीच जमत नाही. सोडून द्या. पाकशास्त्रात अनेकविध पदार्थ आहेत. एखादी पाककृती जमली नाही म्हणून विशेष फरक पडत नाही. (रसगुल्ले, जिलेबी मलाही अजून जमत नाही, तयार आणून खायचे. वाईट कशाकरीता वाटून घ्यावे?)

In reply to by प्रभाकर पेठकर

चकली Sat, 05/24/2008 - 00:02
>>> तुमच्या सौं.ची पाककृती बिघडली असेल तर हिणवू नका. पुढील प्रयोगांसाठी धीर, प्रोत्साहन द्या. हे एकदम बरोबर ..सगळे प्रयोग सहन केले आणि सुधारणा करत गेले कि मग तुम्हाला "masterpiece" चाखायला मिळेल चकली http://chakali.blogspot.com

प्राजु Wed, 05/21/2008 - 15:08
एकतर रवा आणि मैदा भिजवून ती कुटाकुटी नाही करावी लागत. आणि पटकन होतात. आणि एक वाटी साखर आणि एक वाटी दूध या प्रमाणात भरपूर होतात. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा Wed, 05/21/2008 - 17:47
अगदी अस्संच करते मी....त्यामुळे कुटायला लागत नाही....आणि मैदा जरा तळला की छान खुसखुशीत होतो...ओल्या नारळाच्या करंज्याही अशा करुन पाहिल्यात मी झक्कास होतात्...काही कळत नाही नुसता मैदा आहे ते....

मदनबाण Sat, 05/24/2008 - 11:34
हा पदार्थ समोर दिसताच त्याचा अगदी तोबरा भरतो मी..... (हवरट) मदनबाण.....
शंकरपाळे खूप प्रकारांनी करता येतात,म्हणजे पाक करुनकरतात,रवा +मैदा घालून करतात. खुसखशीत शंकरपाळ्यांची ही एक अगदी सोपी कृती.. साहित्य-१ वाटी दूध,१ वाटी पिठीसाखर,३/४ वाटी तूप,१/२ चमचा मीठ,१ ते २ टे-स्पून कणीक,मावेल तेवढा मैदा, तळणीसाठी तूप/तेल कृती-तूप,साखर,मीठ एकत्र करून फेसून घ्या.त्यात कणीक,दूध आणि मावेल तितका मैदा घालून भिजवा.तो गोळा ३०-३५ मिनीटे झाकून ठेवा. नंतर लाटून शंकरपाळे कापा व तळा.

एका तळ्यात होते....

अरुण मनोहर ·

धनंजय Wed, 05/21/2008 - 08:32
मोठी कल्पक कविता. (त्यातल्या त्यात शेवटची ओळ कमजोर वाटते. एवढ्या सशक्त कल्पनेचा शेवट प्रसिद्ध कवितेचे "कोटेशन" करून केलात ते बरे वाटले नाही.)

अरुण मनोहर Wed, 05/21/2008 - 08:45
धनंजयजी अगदी मनातल बोलला. मी ही कविता दोन वर्षांपुर्वी लिहीली. मला शेवटच्या चार ओळीं आवड्ल्याच नाही. त्यानंतर ह्या कवितेच्या त्या चार ओळी बदलण्यासाठी खुपदा विचार केला. पण काहीच जमले नाही. धनंजयांची कौमेन्ट वाचून जुने दुखः पुन्हा भळभळले. ह्या निमित्याने मिपाच्या कवी रसिकांना विनंती करीत आहे. कवितेचा वेधक शेवट कोणी सुचवेल का? I think I should clarify the central concept of this poem, to find appropriate ending---> जगात वावरतांना खुपदा असे प्रकर्षाने जाणवते की आपल्यापेक्षा कमी लायक लोकांना खूप काही यश मिळाले आहे. असेच लोक आपल्याला शिकवण देऊन हिणवायलाही कमी करत नाहीत..... बघुया. मिपावर माझी दोन वर्षांची ख्वाहिश पूर्ण होते का..... ....चातक......

अरुण मनोहर Wed, 05/21/2008 - 08:52
टंकराक्षसाची गडबड! ...............................ह्याचे अंगणच वाकडे ...............................गात लंगडे नाचले वाचावे-----> ...............................ह्याचे अंगणच वाकडे ...............................गात नाचले लंगडे

आनंद Wed, 05/21/2008 - 13:10
कविता मस्तच आहे. शेवटच्या चार ओळी काढुन टाकुन कविता तिथेच थांबवली तरी चालेल. किंवा शेवट हे तर असच चालत राहणार आहे. रामचंद्र सियाला म्हणाले. ------------------------ हा कसा वाटतोय. ---आनंद

धनंजय Wed, 05/21/2008 - 23:11
> आपल्यापेक्षा कमी लायक लोकांना खूप काही यश मिळाले आहे. असेच > लोक आपल्याला शिकवण देऊन हिणवायलाही कमी करत नाहीत..... ही कल्पना पहिल्या ८ कडव्यात आलेलीच आहे. पण अंत कुठल्या रसात करायचा होता? १. जगाची ही रीत किती करुण हा रस २. ही बंधने फोडणार हा वीररस ३. हे समजून उमजून अंतर्मुख असा शांत रस... तुमच्या दोन वर्षांपूर्वीच्या स्फूर्तीला नीट आठवून त्या प्रकारे अंत करावा. येथे माझी आशावादी सुचवणी : -------------------------------------------- तुरुंगातही त्याचे मन मुक्त राहिले ...............................शहाणे झपाटलेपण ...............................बघ, नाचले, गायले.... -------------------------------------------- पण तुमच्या अनुभवाचा तीव्रपणा, आणि ती स्फूर्ती नसल्यामुळे, माझा सुचवलेला अंत थोडासा मोघम आहे.

चतुरंग गुरुवार, 05/22/2008 - 00:54
शेवट असा केलात तर .... नक्की कसा मी? त्याने स्वतःला विचारले ...............................मनाच्या आरशात त्याला ...............................अदृष्टाचं रुप दिसले.... चतुरंग

अरुण मनोहर Fri, 05/23/2008 - 07:24
सर्व कल्पनांसाठी आभार. चतुरंगाचे सजेशन आवडले. नक्की कसा मी? त्याने स्वतःला विचारले "इतका का मी वाईट? त्याने स्वतःला विचारले" पेक्षा छान आहे. हा धागा घेऊन शेवट पूर्ण करतो. नक्की कसा मी?.........त्याने स्वतःला विचारले जसा तू तसाच तू.........नको मानू प्रमाण उपर्‍यांचे

धनंजय Wed, 05/21/2008 - 08:32
मोठी कल्पक कविता. (त्यातल्या त्यात शेवटची ओळ कमजोर वाटते. एवढ्या सशक्त कल्पनेचा शेवट प्रसिद्ध कवितेचे "कोटेशन" करून केलात ते बरे वाटले नाही.)

अरुण मनोहर Wed, 05/21/2008 - 08:45
धनंजयजी अगदी मनातल बोलला. मी ही कविता दोन वर्षांपुर्वी लिहीली. मला शेवटच्या चार ओळीं आवड्ल्याच नाही. त्यानंतर ह्या कवितेच्या त्या चार ओळी बदलण्यासाठी खुपदा विचार केला. पण काहीच जमले नाही. धनंजयांची कौमेन्ट वाचून जुने दुखः पुन्हा भळभळले. ह्या निमित्याने मिपाच्या कवी रसिकांना विनंती करीत आहे. कवितेचा वेधक शेवट कोणी सुचवेल का? I think I should clarify the central concept of this poem, to find appropriate ending---> जगात वावरतांना खुपदा असे प्रकर्षाने जाणवते की आपल्यापेक्षा कमी लायक लोकांना खूप काही यश मिळाले आहे. असेच लोक आपल्याला शिकवण देऊन हिणवायलाही कमी करत नाहीत..... बघुया. मिपावर माझी दोन वर्षांची ख्वाहिश पूर्ण होते का..... ....चातक......

अरुण मनोहर Wed, 05/21/2008 - 08:52
टंकराक्षसाची गडबड! ...............................ह्याचे अंगणच वाकडे ...............................गात लंगडे नाचले वाचावे-----> ...............................ह्याचे अंगणच वाकडे ...............................गात नाचले लंगडे

आनंद Wed, 05/21/2008 - 13:10
कविता मस्तच आहे. शेवटच्या चार ओळी काढुन टाकुन कविता तिथेच थांबवली तरी चालेल. किंवा शेवट हे तर असच चालत राहणार आहे. रामचंद्र सियाला म्हणाले. ------------------------ हा कसा वाटतोय. ---आनंद

धनंजय Wed, 05/21/2008 - 23:11
> आपल्यापेक्षा कमी लायक लोकांना खूप काही यश मिळाले आहे. असेच > लोक आपल्याला शिकवण देऊन हिणवायलाही कमी करत नाहीत..... ही कल्पना पहिल्या ८ कडव्यात आलेलीच आहे. पण अंत कुठल्या रसात करायचा होता? १. जगाची ही रीत किती करुण हा रस २. ही बंधने फोडणार हा वीररस ३. हे समजून उमजून अंतर्मुख असा शांत रस... तुमच्या दोन वर्षांपूर्वीच्या स्फूर्तीला नीट आठवून त्या प्रकारे अंत करावा. येथे माझी आशावादी सुचवणी : -------------------------------------------- तुरुंगातही त्याचे मन मुक्त राहिले ...............................शहाणे झपाटलेपण ...............................बघ, नाचले, गायले.... -------------------------------------------- पण तुमच्या अनुभवाचा तीव्रपणा, आणि ती स्फूर्ती नसल्यामुळे, माझा सुचवलेला अंत थोडासा मोघम आहे.

चतुरंग गुरुवार, 05/22/2008 - 00:54
शेवट असा केलात तर .... नक्की कसा मी? त्याने स्वतःला विचारले ...............................मनाच्या आरशात त्याला ...............................अदृष्टाचं रुप दिसले.... चतुरंग

अरुण मनोहर Fri, 05/23/2008 - 07:24
सर्व कल्पनांसाठी आभार. चतुरंगाचे सजेशन आवडले. नक्की कसा मी? त्याने स्वतःला विचारले "इतका का मी वाईट? त्याने स्वतःला विचारले" पेक्षा छान आहे. हा धागा घेऊन शेवट पूर्ण करतो. नक्की कसा मी?.........त्याने स्वतःला विचारले जसा तू तसाच तू.........नको मानू प्रमाण उपर्‍यांचे
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
शहाण्याने गप्पच बसावे दीडशहाण्यांनी बजावले ...............................मुर्खांनी विवादात त्याला ...............................दिड शहाणा ठरवले ह्याला दूरदृष्टी नाही असे आंधळ्यांना दिसले ...............................बिच्यार्‍याचा आवाज बसला ...............................मुके ठणाण बोंबलले कोणाचे ऐकतच नाही बहिर्‍यांनी ऐकवले ...............................ह्याचे अंगणच वाकडे ...............................गात लंगडे नाचले वेड्यांनी वेड पांघरून पेडगावला पाठवले ...............................चोरांनी उचलून बांधून ...............................तुरुंगात डांबले इतका का मी वाईट

तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्या माध्यमातुन शिक्षण देत आहात कि॑वा द्याल

गणा मास्तर ·

गणा मास्तर Wed, 05/21/2008 - 05:58
हल्ली इंग्रजीतुन शिकण्याचे फॅड वाढत आहे. मायबोलीतुन शिकलो तर इंग्रजी येणार नाही , नोकरी मिळणार नाही अशा भितीने पालक मुलांना इंग्रजी माध्यमात घालत आहेत. माझ्या मते मराठीतुन शिकल्याने विषय व्यवस्थित समजतात. स॑वादासाठीचे इंग्रजी सहज शिकता येते. इंग्रजीची भिती बाळगायची गरज नाही. या विषयावर चर्चा व्हावी म्हनुन हा कौल.

बेसनलाडू Wed, 05/21/2008 - 10:14
मुख्य कारणे दोन - १. मराठी ही ज्ञानभाषा होईस्तोवर माझ्या मुलांची मुले किंवा त्यांचीही मुले झाली असण्याइतका वेळ गेलेला असू शकतो. आणि नसेल तर तेव्हाही मराठीचे ज्ञानभाषा म्हणून अस्तित्त्व असेल की नाही याबद्दल साशंक आहे. २. मराठी माध्यमातून शिक्षण देणार्‍या नामांकित शाळांची सध्याची स्थिती, त्यांच्या नामशेष होण्याच्या वाटेवरची स्थिती याचि देही याचि डोळा पाहिल्याने मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवायचा विचार प्रबळ झाला आहे. मराठी माध्यमाच्या शाळाच उरल्या नसतील, तर कसे बरे शिकवायचे मुलांना मराठी माध्यमातून? (विचारशील)बेसनलाडू

limbutimbu Wed, 05/21/2008 - 10:44
केवळ इन्ग्रजी नीट बोलता यावे याकरता मला माझ्या मुलान्ना "देशी इन्ग्रज" बनवायचे नाहीयेत इन्ग्रजीच काय, कोणतीही भाषा शिकायला तिचा अभ्यास करणे महत्वाचे अस्ते, पण आयुष्यातली महत्वाची शालेय जीवनातली वर्षे परक्या भाषेच्या जोखडाखाली माझ्या मुलान्नी काढावीत असे मला वाटत नाही जीवनविषयक आणि सन्स्क्रुती विषयक बाबी मात्रुभाषेतूनच शिकल्यागेल्या पाहिजेत, तर त्याला अर्थ हे! अन्यथा परक्या भाषेचा स्विकार हे जवळपास "परक्या राष्ट्राचा स्विकार करण्यायेवढे" महा पातक ठरू शकेल सबब मराठी अर्थात मात्रुभाषेचे माध्यम! लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

ईश्वरी Wed, 05/21/2008 - 11:55
मी युएस मधे असल्याने इंग्लीश की मराठी असा पर्यायच नाहीये. जेव्हा केव्हा भारतात परत जाऊ तेव्हा मुलांना मराठी माध्यमातून शिकणे जड जाईल. त्यामुळे भारतात परतणे झाले तर मुलांना इंग्लीश माध्यमाच्याच शाळेत घालावे लागणार. ईथे आम्ही घरात मराठीच बोलतो. मुले सुध्दा छान मराठी बोलतात. शिवाय मी त्यांना घरी मराठी लिहायला व वाचायला शिकवत आहे. अक्षर ओळख झालेली आहे. येत्या उन्हाळी सुट्टीत बाराखडी शिकवायचे ठरवले आहे. बाकी बेसनलाडू यांनी वर सांगितलेच आहे....त्यांच्या मताशी सहमत त्यामुळे जरी मी भारतातच असते तरी मुलांना इंग्लीश माध्यमाच्या शाळेत घातले असते . माझ्या मते मराठीतुन शिकल्याने विषय व्यवस्थित समजतात -- असहमत. मला तरी असा अनुभव नाहीये की मराठीतुन शिकल्यानेच विषय व्यवस्थित समजतात्..ईग्लीश मधुन शिकल्याने डोक्यावरुन जाते. आणि मुलांच्या बाबतीतही असा अनुभव नाहिये.. ईश्वरी

In reply to by ईश्वरी

गणा मास्तर Sat, 05/24/2008 - 06:00
तुम्ही मुलांना घरी मराठी लिहायला वाचायला शिकवता वाचुन आनंद वाटला. मात्रुभाषेतुन शिकल्याने विषय चांगले समजतात असे भाषातज्ञ आणि शिक्षण तज्ञांचे मत आहे. आणि माझा अनुभव पण आत्ता या क्षणी संदर्भ देता येत नाही पण सकाळमध्ये पुर्वी लेख प्रसिद्ध झाल्याचे आठवते.

माझी दोन्ही मुले मराठी तुन च शिकत आहेत. आज जेव्हा माझा ८ वर्षाचा मुलगा फास्टर फेणे, श्यामची आई, बोक्या सातबंडे अगदी माण्देशी माणसं वाचतो, त्यावर स्वतःचे मत मांडतो, दिलीप प्रभावळ्करांना पत्र लिहुन दाद देतो ,तेव्हा वाटतं निर्णय योग्य आहे.. पण लोकांच्या प्रतिक्रिया मात्र अनेकदा कमी लेखणार्‍या, मुर्ख ठरवणार्‍या असतात हा अनुभव. योग्य-अयोग्य काळ च ठरवतो, पण निदान मी मुलांना आयुष्यातली महत्वाची शालेय जीवनातली वर्षे परक्या भाषेच्या जोखडाखाली घालवायला लावली नाहीत याचे समाधान.

In reply to by पद्मश्री चित्रे

आनंदयात्री Wed, 05/21/2008 - 12:19
छान प्रतिसाद फुलवाराव पण असहमत. >>योग्य-अयोग्य काळ च ठरवतो, पण अहो असे झाले तर अडाणी माणुस म्हणेल की "आमी कुठं शिकलो, आम्ही काय कमवत नाही मिठ मिरची ?" >>आयुष्यातली महत्वाची शालेय जीवनातली वर्षे परक्या भाषेच्या जोखडाखाली अजिबात जोखड वैगेरे नाही हो, जसे वर काही लोकांनी आपल्या मुलांना स्वतः मराठी शिकवण्याचा उपक्रम अवलंबला आहे, तश्या मताचा मी आहे. >>स्वतःचे मत मांडतो, दिलीप प्रभावळ्करांना पत्र लिहुन दाद देतो खुप छान, पोरगा चुणचुणीत दिसतो. सर मी जर इंग्रजी माध्यमात शिकलो असतो ना तर मी जेव्हा वुडहाउस पहिल्यांदा वाचला तेव्हा खुप छान समजला असता, अगदी वेगळी मजा अनुभवता आली असती असे वाटत असते कधीकधी, असो.

In reply to by आनंदयात्री

>>अजिबात जोखड वैगेरे नाही हो, जसे वर काही लोकांनी आपल्या मुलांना स्वतः मराठी शिकवण्याचा उपक्रम अवलंबला आहे, तश्या मताचा मी आहे. भाषा शिकणे आणि भाषेतुन शिकणे यात फरक आहे ना आनंदयात्री? >>अहो असे झाले तर अडाणी माणुस म्हणेल की "आमी कुठं शिकलो, आम्ही काय कमवत नाही मिठ मिरची ?" अडाणी रहा असे कुठे म्हटले मी? >>खुप छान, पोरगा चुणचुणीत दिसतो.-धन्यवाद. आणि हो, मी फुलवा "राव " नाही :))

In reply to by पद्मश्री चित्रे

आनंदयात्री Wed, 05/21/2008 - 12:44
>>भाषा शिकणे आणि भाषेतुन शिकणे यात फरक आहे ना अगदी हेच्च म्हणतोय मी फुलवाताई (राव साठी माफी द्यावी) .. अहो पोरगा त्या भाषेतुन शिकला तर लहानपणाच्या तीव्र आकलनशक्ती मुळे तो ती भाषा उत्तम जाणेल, त्यात त्याला उत्तम गती येईल. उद्या किती चॅलेंजेस आहेत, आजुबाजुला सगळे लोक थोड्या फार फरकाने सारख्याच कॅपॅबिलिटीचे असतात हो, गती महत्वाची, जो गतिमान तो पुढे जाईल ! चुक भुल द्या घ्या. (थोडक्यात ठोकु नका :) ) आपलाच - कासवयात्री

वेलदोडा Wed, 05/21/2008 - 13:28
--अहो पोरगा त्या भाषेतुन शिकला तर लहानपणाच्या तीव्र आकलनशक्ती मुळे तो ती भाषा उत्तम जाणेल, त्यात त्याला उत्तम गती येईल. उद्या किती चॅलेंजेस आहेत, आजुबाजुला सगळे लोक थोड्या फार फरकाने सारख्याच कॅपॅबिलिटीचे असतात हो, गती महत्वाची, जो गतिमान तो पुढे जाईल ! ह्या आनंदयात्री यांच्या मताशी पूर्णपणे सहमत. --आज जेव्हा माझा ८ वर्षाचा मुलगा फास्टर फेणे, श्यामची आई, बोक्या सातबंडे अगदी माण्देशी माणसं वाचतो, अहो फुलवा ताई, शामची आई , फास्टर फेणे एकवेळ मुलाने नाही वाचले तर त्यामुळे व्यावहारीक दुनियेत मुलाचे काही नुकसान होणार नाही. शेवटी घरातून होणारे सन्स्कार महत्वाचे असतात. इंग्लीश भाषेतही उत्तम साहित्य आहे. इंग्लीश माध्यमातील मुले ईंग्लीश साहित्य वाचतील. विषयाचे आकलन होणे महत्वाचे. माझी मुलगी (वय ७ वर्ष) ईन्ग्लीश पुस्तके वाचते. मराठी सध्या घरी शिकत आहे. त्यामुळे मराठी पुस्तके मी तिला वाचून दाखवतो. कालांतराने ती मराठी ही वाचू लागेल. तिला दोन्ही भाषा चांगल्या समजतात. द्वैभाषिक ( bilingual) म्हणून परिचितांनाही तिचे कौतुकच वाटते. सध्या सर्वत्र जागतीकरणाचा जोर वाढत आहे. ज्ञानाच्या अनेक शाखा उदयास येत आहेत. अत्याधुनिक ज्ञान सध्या तरी ईन्ग्लीश भाषेत उपलब्ध आहे. ज्ञानभाषा म्हणून ईन्ग्लीश येणे ही काळाची गरज बनली आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत ईन्ग्लीश मराठी तून शिकवले जाते. म्हणजे तास ईन्ग्लीश विषयाचा पण शिक्षक- मुले यांचा संवाद मराठीतून. जर मराठी माध्यमात शिकलेला मुलगा शालेय शिक्षण पूर्ण होऊन बाहेर पडल्यावर ईन्ग्लीश मध्ये सहज बोलत असेल.. ईन्ग्लीश मध्ये व्यवस्थित वाचन लिखाण करी त असेल, त्याच्या मनात ईन्ग्लीश ची भिती राहीलेली नसेल तर आमचीही मराठी माध्यमात मुलांना शिकवायला ना नाही. पण असे होताना दिसत नाही. उलट मराठी माध्यमातील मुलांना शाळेतून बाहेर पडल्यावर कॉलेजमध्ये वा नोकरी च्या ठिकाणी इन्ग्लीश fluently बोलण्यासाठी , समजण्यासाठी जादा परिश्रम घ्यावे लागतात.

In reply to by वेलदोडा

>>मराठी सध्या घरी शिकत आहे. त्यामुळे मराठी पुस्तके मी तिला वाचून दाखवतो. कालांतराने ती मराठी ही वाचू लागेल-मी इन्ग्लीश वाचुन दाखवते ,हाच फरक आहे. तो ही वाचेल नन्तर. ईन्ग्लीश ची भिती -ही आपणच निर्माण केलेला बागुलबुवा आहे. आजकाल, सर्व मराठी शाळांत ५ वी पासुन सेमी-इन्ग्लीश आहे,त्यामुळे एवढा मोठा प्रश्ण येणार नाही. गरज आहे, आपली मानसिकता बदलण्याची. >>शामची आई , फास्टर फेणे एकवेळ मुलाने नाही वाचले तर त्यामुळे व्यावहारीक दुनियेत मुलाचे काही नुकसान होणार नाही.>> या ला काही अर्थ नाही! जे काही ही वाचन करत नाहीत , त्यांचे ही व्यावहारीक दुनियेत काही नुकसान होत नाही ,हो!

विसुनाना Wed, 05/21/2008 - 16:01
माझी दोन्ही मुले इंग्रजी शाळेतच शिकत आहेत. पण घरात मराठीचे दृढ संस्कार असल्याने काही नुकसान होत नाही. आज जेव्हा माझा ११ वर्षाचा मुलगा एकीकडे एनसायक्लोपेडिया, रोशन दलालांचे 'पफिन हिस्टरी ऑफ इंडिया' , इंग्रजी वृत्तपत्रे वाचतो , समग्र हॅरी पॉटर वाचून त्यावर आपले मत मांडतो तर दुसरीकडे फास्टर फेणे, श्यामची आई, बोक्या सातबंडे, गोट्या, चिंगी, खडकावरला अंकुर, बंडखोर बंड्या वाचतो - स्वतःचे मत मांडतो, मराठी बालनाट्यात भाग घेतो, तेव्हा वाटतं निर्णय योग्य आहे... ज्ञानभाषा आणि मातृभाषा यांचा समतोल कुटुंबियांकडून सांभाळला गेला तर मराठीला दुय्यम स्थान मिळणार नाही.

भाई Wed, 05/21/2008 - 17:26
महाराष्ट्रात असेन तर मराठी माध्यमच. १. शाळांच्या गुणवत्तेचा मुद्दा विनाधार आहे. इंग्लिश शाळांची सरसकट गुणवत्ता जास्त चांगली आहे हे कशावरून मांडले? वस्तुतः आजकाल शाळा काढणे हा मोठा पैसे कमावण्याचा धंदा झालेला आहे आणि इंग्लिश माध्यमाच्या शाळा तर सोन्याची अंडे देणारी कोंबडी. पुण्यात यावर्षी आलेल्या नविन शाळा काढण्यासाठीच्या अर्जाचे आकडे काय सांगतात? हे सारे लोक समाजसेवा म्हणून या शाळा काढत आहेत असे मानायला आधार नाही. २. चीन, जपान, कोरीया इ. पूर्वेकडील व जर्मनीसह सर्व युरोपियन देश यातील मुलांना इंग्लिश माध्यमाची गरज पडत नाही. ते देश बहुतेक सर्व बाबतीत भारतापेक्षा प्रगत आहेत, राहतील असेही दिसत आहे. तिथेही कित्येक मुले इंग्लिश शिकतात पण भाषा म्हणून. ३. मातृभाषेतून शिक्षण घेतलेले खूप मोठे व यशस्वी लोक होत आलेत. गुजराती व मारवाडी समाज इंग्लिशच्या मदतीशिवायच सर्वत्र यशस्वी ठरलेला आहे. यशस्वी होणारे लोक त्यांच्या अंगच्या इतर गुणांमुळे यशस्वी होतात तर अयशस्वी लोकांपैकी काही लोक खापर फोडायला भाषेची सबब पुढे करतात. ४. इंग्लिश भाषा येण्यासाठी ती इतर विषय शिकण्याचे माध्यम म्हणून कशाला लागते? इतिहास हा विषय इंग्लिश माध्यमातून शिकण्याचा उपयोग नक्की काय? ५. भारतात इंग्लिश माध्यम हे प्रतिष्ठेचे लक्षण म्हणून पाहीले जाते, अंगभूत गुणांमुळे नाही. हा सामजिक प्रश्न झालेला आहे. वरचा वर्ग इंग्लिश माध्यमाच्या शाळेत जातो मग मध्यम वर्गाला वाटते मराठी माध्यमात 'खालच्या वर्गाचे लोक' जातात. आपले मूल त्या वातावरणात नको. ६. भारतात अनेक भाषा असूनही लोकांचे इतर भाषिक प्रांतांमध्ये सहज स्थलांतर होते आणि त्याचाही इंग्लिश माध्यमांच्या गरीमेला हातभार लागतो. ७. इंग्लिश माध्यमातून शिकलेली मुले पुढे जाऊन मराठी साहित्यनिर्मिती करतात? जर तसे नसेल तर सद्य कल पाहता लवकरच मराठी साहीत्य निर्मिती प्रभावीत होणार या शंकेला वाव आहे. नविन साहित्य निर्मितीविना भाषा किती काळ जगू शकते? मुळात भाषेची आवश्यकता जर संपायला लागलेली असेल तर ती भाषा किती काळ तग धरू शकेल? घरात मराठी शिकविणे पुरेसे ठरणार नाही असा माझा कयास आहे. जर तो चुकीचा ठरला तर मला फार आनंद वाटेल. वूडहाउस वाचणारी इतर मुले आहेत त्यामुळे वुडहाउसची काळजी नाही. पु. ल. किती दिवस वाचला जाईल? आणि उपयुक्ततावादाच्या सध्याच्या काळात "पु.ल. (किंवा तसे इतर साहीत्य) नाही वाचले तर काय फरक पडतो" असे ऐकायला नक्कीच मिळेल. हा र्‍हास लगेच दिसत नाही. जेव्हा त्याचे परीणाम दिसायला लागतात तेव्हा इतका उशीर झालेला असतो की ती प्रक्रिया सहजासहजी थांबवता येत नाही. जेव्हा सर्वसामान्य माणूस मराठीला दूर लोटतोय. आता शि़क्षणाच्या माध्यमाची पाळी आहे की जी सुरुवात आहे. इंग्लिश माध्यमातून शिकलेल्या मुलांना मराठीची गरज कशाला वाटेल? संस्कृत का मृत झाली याबद्दल मला निश्चित माहीती नाही पण मराठीचे आयुष्य लोकभाषा म्हणून फार नाही असे या सर्व प्रवाहाकडे पाहून वाटते. भाई

In reply to by भाई

मी देखील वूडहाऊस वाचायचा प्रयत्न केला. नाही कळले इतके. कुठे बिघडते? पु.ल. वाचून अनुभवता आले हे काय कमी आहे? आणि इंग्रजी शाळांमधे जाणारी किती मुले शेक्सपियर किंवा वूडहाऊस वाचतात. मी माझ्या एका कॉन्व्हेंटी मित्राला विचारले कि 'तू वाचले आहेस का रे वूडहाऊस' तर तो म्हणे 'नाही रे. होमवर्क मधून वेळच नाही मिळत.' आता घरच्या अभ्यासाला होमवर्क म्हणावे लागते. प्रश्न राहीला मराठी ज्ञानभाषा बनण्याचा. ती तर कधीच बनू शकेल असे वाटत नाही. कारण त्यासाठी इच्छाशक्ती लागते आणि ती मराठी माणसाकडे नाही. पूर्वी मराठीला ज्ञानभाषा बनविण्याचे प्रयत्न झाले असतील त्यामुळे बर्‍याच इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द आले असावेत. पण आता ते शब्द वापरणे म्हणजे मागास पणाचे लक्षण मानले जाते. मराठी शाळा काढली आणि त्याला मुलेच मिळाली नाहीत तर करणार काय? कदाचित सर्वाना आपापल्या मुलाना ज्ञानभाषेत शिकवायचे असेल तर कशाला पाहीजे मराठीचा अभिमान, मातृभाषा वगैरे सर्वकाही. जर आपली मातृभाषा आपण आपली ज्ञानभाषा बनवू शकत नसू तर कसले आम्ही मातृभाषेचे अभिमानी..? पुण्याचे पेशवे

चतुरंग Wed, 05/21/2008 - 19:13
मुलगा शाळेत इंग्लिश व्यतिरिक्त स्पॅनिशही शिकतोय. आम्ही घरी प्रामुख्याने मराठीच बोलतो त्यालाही मराठी चांगले बोलता येते/समजते. अजून देवनागरी लिपीची ओळख करुन दिलेली नाही, लवकरच देणार आहे. लहान वयात मुले अनेक भाषा सहज आत्मसात करतात त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न राहील. सध्या तरी इंग्लिश ही व्यवहारासाठी ज्ञानभाषा आहे हे वास्तव नाकारुन चालणार नाही. भारतात इंग्लिश माध्यमाच्या कित्येक शाळा हे पैसे कमाऊ कुरण झाले आहे तसेच कित्येक नामवंत मराठी शाळा दैन्यावस्थेत गेल्या आहेत/जात आहेत तेव्हा योग्य तो व्यावहारिक निर्णय त्या वेळच्या परिस्थितीवरच अवलंबून असेल. बहुतांशी भारतात परतल्यावरही मी इंग्लिश माध्यम कायम ठेवेन कारण सुरुवातीची बरीच वर्षे त्यातूनच शिकलेला असणार पण मराठीची नाळ तुटणार नाही ह्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न राहील. भ्रष्ट नक्कल करुन इंग्रजाळलेले असणे आणि इंग्लिश माध्यमातून शिक्षण घेतलेले असणे ह्याचा अर्थाअर्थी संबंध असतोच असे नाही. आणि हे बर्‍यापैकी वेळा पालकांच्या वागणुकीवर अवलंबून असते. पुढे मोठा झाल्यावर काय वाचायचे अशा गोष्टींबद्दल आडाखे बांधणे अवघड असते. त्यामुळे अमूकच वाच अट्टाहास नाही. पण इंग्लिशबरोबरच मराठीतले उत्तमोत्तम साहित्य त्याला आस्वादता आले तर आनंदच असेल. चतुरंग

प्रियाली Wed, 05/21/2008 - 19:31
माझी मुलगी अमेरिकेत असल्याने इंग्रजी शाळेत शिकते. तिला मराठी अक्षरांची ओळख स्वतःचे नाव लिहिण्यापुरती आहे. बरेचदा सुट्टीत लहान शब्द लिहिता येतात पण नंतर विसरून जायला होते आणि फक्त नावे लिहिण्यापुरती मराठी आठवते. आम्हाला भारतात परतायची इच्छा नाही त्यामुळे इंग्रजीतूनच शिकणार.

चित्रा गुरुवार, 05/22/2008 - 00:57
आमची मुलगी इंग्रजी शाळेत शिकते अमेरिकेत असल्याने. भारतात असले तरी मुद्दाम मराठी शाळेत घालेन असेही नाही. कधीतरी तिच्या लक्षात आले की तिला लिहीलेले मराठी कळत नाही / वाचता येत नाही, त्यामुळे अहंकार दुखावला गेला असल्याने हल्ली मराठी शब्द "लावून" वाचण्याचा प्रयत्न करते. मराठी व्यवस्थित बोलते. मराठी उच्चार बर्‍यापैकी "मराठी" आहेत. पूर्वी मला मराठी माध्यमातूनच महाराष्ट्रातील मुलांनी शिकावे असे वाटे. अजूनही वाटते. भाषेमुळे समाजाशी संबंध राहतो. ज्या समाजात राहतो त्या समाजाची भाषा येत नसली तर ते चुकीचे आहे. तसेच मराठी शाळेत घातले की मराठी येतेच असे नाही, मराठी वाचण्या-लिहीण्याची आवड कशी निर्माण करतो त्यावर सर्व अवलंबून आहे असे वाटते. असेच इंग्रजीचे. ---शाळेत घातले की ---- येतेच असे नाही, --- वाचण्या-लिहीण्याची आवड कशी निर्माण करतो त्यावर सर्व अवलंबून आहे असे वाटते - हे असे कुठच्याही भाषेसाठी लागू होईल. आमची मुलगी मोठी झाल्यावर इंग्रजी किंवा मराठी यापैकी कुठच्याही भाषेतून काही उत्तम लिहू शकली तर आम्हाला आवडेल.

धनंजय गुरुवार, 05/22/2008 - 03:27
(१) स्वतः मराठी माध्यमिक शाळेत शिकलात का असा कौल, आणि (२) हा वरील कौल एकत्रित घेतला तर माहितीपूर्ण वाटतो. प्रथम कौल रोचक वाटला होताच. पण त्यातून निघणारा अर्थ इतपत होता: मराठी संकेतस्थळावर येणारे बहुतेक सर्वजण मराठी माध्यमिक शाळेत शिकलेले आहेत. याचा समाजाला नेमका कसा अर्थ लावायचा हा विचार थोडा क्लिष्ट होता. आंतर्जाल वापरणार्‍या मराठीभाषकांपैकी किती लोक मराठी स्थळांवर येतात, हे ज्ञान माझ्यापाशी नाही. कदाचित मराठीभाषकांच्या इंग्रजी स्थळांवर कौल लावला असता तर वेगळी काही आकडेवारी दिसली असती. तो कौल मात्र येथील कौल साठी संदर्भ पुरवतो. असे दिसते की बहुतेक मराठी माध्यमात शिकलेले संकेतस्थळ-वापरणारे मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवतात. याचे दोन पैलू आहेत : १. संस्थळ वापरणारे मराठी-माध्यम-सुशिक्षित महाराष्ट्र सोडून अन्यत्र जातात, तिथे मराठी शाळा उपलब्ध नसतात. (पण या कारणाने पूर्ण हिशोब लागत नाही.) २. संस्थळ वापरणारे मराठी-माध्यम-सुशिक्षित महाराष्ट्रात राहातात, तेही काही प्रमाणात मुलांना इंग्रजी माध्यमात शिकायला पाठवतात. मुद्दा २. हे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे खरे, पण एकत्रित आकडा म्हणजे बाजारशास्त्रीय/सामाजिक पाहाणीही आहे. लोकांना स्वतःचे "सफल" उदाहरण गाठीशी असून सुद्धा आजूबाजूला इंग्रजी माध्यमातली "सफल" उदाहरणे जास्त दिसतात का? असा प्रश्न मनात येतो. अथवा मराठी माध्यमिक म्हणून स्सफल""सफल" असलो, तरी आजूबाजूला अधिक मराठी माध्यमिक "असफल" लोक दिसतात का? ("सफल" हे "-" मध्ये टाकले, कारण केवळ बाजारू साफल्याबद्दल बोलत आहे.) मराठी माध्यमिक शिक्षण दर्जेदार असूनसुद्धा मराठी माध्यमाचा र्‍हास होत आहे, होत राहील असे भाकीत करण्यास धजावतो. थोडे वाईट वाटते आहे. कौल अर्थात पूर्णपणे वैज्ञानिक नाहीत, तरी त्यांतून काही माहिती मिळते. दोन्ही कौल टाकणार्‍यांना धन्यवाद.

गणा मास्तर गुरुवार, 05/22/2008 - 06:49
२. मराठी माध्यमातून शिक्षण देणार्‍या नामांकित शाळांची सध्याची स्थिती, त्यांच्या नामशेष होण्याच्या वाटेवरची स्थिती याचि देही याचि डोळा पाहिल्याने मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवायचा विचार प्रबळ झाला आहे. मराठी माध्यमाच्या शाळाच उरल्या नसतील, तर कसे बरे शिकवायचे मुलांना मराठी माध्यमातून? आपणच आपल्या मुलांना मराठी शाळांत पाठवले नाही तर त्या कशा उरतील बरे. आपण पुढे होउन परिस्थिती बदलली पाहिजे.

In reply to by गणा मास्तर

बेसनलाडू Fri, 05/23/2008 - 09:24
तुम्ही येथे ठळकावलेला दुसरा मुद्दा पहिल्या मुद्द्याशी निगडीत आहे. त्यावर काही ठाम भाष्य करत असाल,तरच पुढे चर्चा करण्यात अर्थ उरतो. (सुस्पष्ट)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

गणा मास्तर Sat, 05/24/2008 - 06:12
मराठी ज्ञानभाषा होने कठीण आहे. आज आपला व्यापार परकीय देशांशी जास्त चालतो त्यामुळे ईन्ग्रजीची गरज भासनारच . पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मराठी माध्यमातुन शिकलात तर तुम्हाला ईंग्रजी भाषेतुन कधीच बोलता येणार नाही. ईंग्रजीची भीती न बाळगता मराठी माध्यमांच्या शाळांत ईग्रजी संवाद कौशल्य शिकवणे गरजेचे आहे फक्त. बाकी भाईंची प्रतिक्रिया या विषयच्या सामाजीक कारणांवर चांगला प्रकाश टाकते. आपला अनिकेत

In reply to by गणा मास्तर

बेसनलाडू Sat, 05/24/2008 - 08:59
मराठी ज्ञानभाषा होने कठीण आहे. आज आपला व्यापार परकीय देशांशी जास्त चालतो त्यामुळे ईन्ग्रजीची गरज भासनारच . --- मराठी ज्ञानभाषा होणार नाही ना? तुम्हीच म्हणताय ते इथे. मग का शिकवू मुलांना मराठी माध्यमातून? आणि ज्ञानभाषा केवळ व्यापारापुरतीच मर्यादित नसते, असे (निदान मला तरी)वाटते. शास्त्रीय संशोधन; सामाजिक,सांस्कृतिक व वैचारीक मूल्यांचे आदानप्रदान;अभ्यास या सगळ्याशी ती फार जवळून निगडीत असते. आणि आज तुम्ही म्हणताय तो व्यापार किंवा मी म्हणतोय ते संशोधनादी संवाद यांपैकी काहीही केवळ महाराष्ट्र पातळीवर राहिलेले नाही, वैश्विक झाले आहे. आणि विश्वाची ज्ञानार्जनाची व संवादाची भाषा इंग्रजी आहे, हे आता तरी स्वीकारा! माधव त्र्यंबक पटवर्धनांनी उगाचच इंग्रजीला वाघिणीचे दूध म्हटले काय? मराठी शाळांचा आग्रह धरणारे शालेय शिक्षणोत्तर वाटचालीतही मराठीतूनच शिकायचा,परीक्षा द्यायचाघ्यायचा आग्रह का धरीत नाहीत? कारण ते किती अव्यवहार्य आहे, हे त्यांनाही चांगलेच(!) माहीत असावे! ईन्ग्रजीची गरज भासनारच --- हो ना? मग शिकवा की मुलांना इंग्रजी माध्यमातून! प्रॉब्लेम काय आहे?मध्यंतरी कुठेतरी एका अतिशय चांगल्या उपवर मुलाला केवळ त्याचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे, म्हणून मुलीने नकार दिल्याचे मिसळपाववरच वाचनात आले आणि त्यावरची मनोरंजक चर्चाही. त्या मुलीचा निर्णय चूक की बरोबर वगैरे मुद्दे थोडा वेळ बाजूला ठेवू. पण (या बाबतीत दुर्दैवाने झाले तसे) मातृभाषेतून झालेले शिक्षण हे उच्च शिक्षण, सामाजिक प्रतिष्ठा, नोकरीचाकरी व अर्थार्जन यांच्याही पलीकडे जाऊन जोडीदार निवडानिवडीतही नाक खुपसू लागले तर झक् मारली आणि मराठी मिडिअममधून शिकलो, असा एखाद्याचा ग्रह झाल्यास नवल वाटू नये. ऐन उमेदीच्या काळात असा न्यूनगंड निर्माण होणे खचितच चांगले नाही. अर्थात, तो तसा होऊ नये यासाठी मानसिकदृष्ट्या कोण किती सक्षम इ. बाबी मुद्दा मांडताना वगळल्या आहेत. 'वर्स्ट केस'मध्ये तो मुलगा तितका कणखर नाही व 'ऍवरेज केस'मध्ये तो मुलगा बंडखोर किंवा लोकापवाद नाही, असे मानूया. सामाजिक राजकारणाबाबत मांडले गेलेले अनेक मुद्दे अतिशय वास्तविक आणि विचार करण्याजोगे आहेत. जाताजाता इतकेच म्हणवेसे वाटते की संस्कार,जीवनशैली,ज्ञानार्जन,स्वसंस्कृतीबद्दल प्रेम व आदर,सर्वांगीण प्रगती या बाबी मराठी किंवा कोणतीही मातृभाषा - फक्त यांवरच - अवलंबून नसतात. त्याहीपेक्षा महत्त्वाचा असतो तो आत्मविश्वास, व्यापक व सर्वसमावेशक नि डोळस दृष्टिकोन. आणि त्यासोबत वैयक्तिक आचारविचार नि आवडीनिवडी व सद्सद्विवेकबुद्धी. मराठीचा आग्रह धरा नक्कीच पण त्याचे रुपांतर दुराग्रहात होऊ देऊ नकात.मराठीतीलच एक ख्यातनाम साहित्यिक दत्तो वामन पोतदार यांचा 'बहुभाषक व्हा' हा संदेश येथे उधृत करायचा मोह आवरत नाही. याबद्दल अधिक ऊहापोह येथे वाचता येईल. (सविस्तर)बेसनलाडू

फटू Fri, 05/23/2008 - 07:23
मी जर महाराष्ट्रात राहत असेन तर माझी मुलं मराठी माध्यमाच्या शाळेतुनच शिकतील... माणसाचं आयुष्यात पुढं जाणं हे तो कुठल्या माध्यमाच्या शाळेतुन शिकला यावरच मुळीच अवलंबुन नसतं. तसंच ते तो कुठल्या वातावरणात शिकला यावरही अवलंबुन नसतं. तसं असतं आज माझ्यासारखी शेतकरी कुटुंबात वाढलेली, गावांमधल्या मराठी माध्यमाच्या शाळांमधून शिकलेली मुलं कधीच आयुष्यात काही करू शकली नसती... आयुष्यात काही मिळवायचं असेल तर आवश्यक असते गती... येणार्‍या अडीअडचणीन्वर मात करून पुढे जाण्याची जिद्द.. आज सारेच ओरडत आहेत की मराठी माध्यमाच्या शाळांमधला शिक्षणाचा दर्जा खूप खालावला आहे. काही ठिकाणी काही प्रमाणात ते खरं आहे सुध्दा (उदाहरणार्थ मुंबई महानगर पालिकेच्या मराठी शाळा - पोरं सातवी आठवीत जातात तरी एक वाक्य न अडखळता वाचता येत असेल तर शप्पथ). पण मराठी माध्यमाच्या चांगल्या शाळा सुद्दा आहेत... मराठी शाळांमध्ये शिकवत नाहीत अशी जे खोटी बॉम्ब मारतात, त्याना त्यांच्या मूलाना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवायचं असतं... कारण तो त्यांच्या 'स्टेटस' चा सवाल असतो... जर शिक्षणाच्या माध्यमाने काही फरक पडत नसतो तर का आपण मूलाना मराठीतून शिकवू नये ? किंवा इंग्रजीतूनच शिकवण्याचा अट्टाहास का ? पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

विजुभाऊ Fri, 05/23/2008 - 10:26
अनिकेत भौ तुमचे नाव अनिकेतकेदारी हे अगदी त्या सारे कळतनकळतच घडते सारखे वाटते.

प्रभाकर पेठकर Fri, 05/23/2008 - 14:37
परीस्थितीत झपाट्याने बदल झाला आहे. आमच्या काळी कॉन्व्हेंट किंवा इंग्रजी माध्यमातून शिकणे तितकेसे 'कॉमन' नव्हते. त्याला कारण.... १) अशा शाळांची न परवडणारी फी २) घरी मुलांचा इंग्रजीतून अभ्यास घेण्याची पालकांची (विशेषतः आयांची) असमर्थता ३) स्थानिय क्षेत्रा बाहेरील नोकर्‍यांचे अनाकर्षण आणि ४) सर्वसाधारण मध्यम वर्गातील सर्व मुले मराठी शाळेतच जात असल्यामुळे आपणही तसेच करण्याचा कल. इत्यादी. आता परिस्थिती खूप बदलली आहे. १) आमदनीतील भरमसाठ वाढ. इंग्रजी माध्यम शाळा परवडण्याच्या आवाक्यात आल्यात. २) नवरा-बायको दोघेही ग्रॅज्युएट्/उच्चशिक्षित असल्यामुळे इंग्रजीतून घरचा अभ्यास घेणे ही समस्याच उरली नाही. ३) टीव्ही आणि इतर प्रसार माध्यमांनी विविध क्षेत्रातील संधींच्या उपलब्धतेवर सततचा टाकलेला प्रकाशझोत मध्यमवर्गालाही आकर्षित करीत आहे. ४) इंग्रजी माध्यमाक्डे वळणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत झालेली भरमसाठ वाढ, आपले पाल्य ह्या स्पर्धेत मागे तर पडणार नाही नं! ही भिती. ५) सर्व समाज, (देशीय-आंतरदेशीय) एकमेकात मिसळ्यामुळे पुर्वी नव्हते इतके इंग्रजी भाषेला महत्त्व प्राप्त झाले आहे. इंग्रजीतून प्रभावी संभाषण करू शकणार्‍यांची छाप लगेच पडते ही सामजिक मानसिकता/वास्तविकता आहे. इंग्रजी भाषा येणं ही भावी यशाची पहिली पायरी समजली जाते. 'जो बोलतो त्याच्या शेणीसुद्धा विकल्या जातात जो बोलत नाही त्याचे मोती पण विकले जात नाहीत' असे म्हणतात. त्यात फक्त 'इंग्रजी' हा शब्द जोडला तर ती आजची परिस्थिती आहे असे म्हणायला हरकत नसावी. मातृभाषा, राष्ट्रभाषा आणि जगाची भाषा ह्यात पहिल्या दोन सहज जमतात तिसरी शिकून घ्यावी लागते. ह्यातली कुठलीही एक शिकल्यामुळे दुसरी भाषा मागे पडते असे नाही. त्यामुळे इग्रजी शिकल्याने मराठी मागे पडते आहे, मराठीचे नुकसान होते आहे असे म्हणणे गैर आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करून नये. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताना मातृभाषाही तोंडवळणी पाडून घ्यावी. इंग्रजी साहित्याबरोबरच मराठी साहित्यही वाचावे. गरज असेल तिथे इंग्रजी आणि इतर वेळी मातृभाषेचा वापर आवर्जून करावा. दोन्ही भाषांच्या शुद्धतेचा आग्रह धरावा. धेडगुजरी भाषा बोलून दोन्ही भाषांवर अन्याय करू नये. इंग्रजांकडून आपण पँट-शर्ट घेतले ते आपल्या आंगवळणी पडले. त्याने आपले मराठीपण कुठेही डागाळले नाही. पण पँट-शर्टावर आपण पागोटे-मुंडासे बांधत नाही. धोतर नेसून त्यात शर्ट खोचत नाही. एका पायात चप्पल आणि दुसर्‍या पायात बुट वापरत नाही. मग भाषेतच धेडगुजरीपणा का असावा? जी भाषा वापराल तीही शक्यतो शुद्धच असावी. हेच संस्कार स्वतःवर आणि मुलांवरही प्रयत्नपुर्वक केले तर मराठी भाषा, मराठीपण मरणार नाही. आपल्या मुलांना/पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिकवणारे सर्व मराठी भाषेचे शत्रू ही भूमिका बाळगू नये. उलट आज मराठी माणूस मी आणि माझं शहर्/खेडं ह्यातून बाहेर पडून 'ग्लोबल' होत आहे ह्याचा अभिमान बाळगावा. त्याच बरोबर मराठी पुस्तके 'विकत' घेऊन वाचावीत. लग्नकार्यात, मुंजीत, वाढदिवसाला किंवा सहजही वाचनिय मराठी पुस्तके एकमेकांना भेट द्यावी. खेळणी, पुष्पगुच्छ आणि 'बंद पाकिटं' देण्यापेक्षा हे कितीतरी चांगले कार्य होईल्.मराठी नाटके, सिनेमा, काव्यवाचन आदी कार्यक्रम पाहून त्यावर घरात/मित्रांमध्ये चर्चा करावी. बाहेर भेटणार्‍या प्रत्येक अनोळखी माणसाशी प्रथम मुद्दाम मराठीतून बोलावे. त्याला समजले नाही तर (आणि तरच) हिन्दी/इंग्रजी भाषेत बोलावे. मी मराठीला कमी लेखत नाही पण इंग्रजी माध्यमातून शिक्षणाचे समर्थन करतो. मी आणि माझी पत्नी आम्ही मराठी माध्यमतून शिकलो आहोत. आमचा मुलगा इंग्रजी माध्यमातून शिकला आहे. पण त्याला आम्ही नुसते मराठी शब्द आणि वाक्य शिकवत नाही तर 'मराठी भाषा' शिकविण्याचा प्रयत्न करतो. भाषेचे सौंदर्य समजाऊन देतो. साहित्याचे रसग्रहण शिकविण्याचा प्रयत्न करतो. मराठी भाषेची कठोरता, कोमलता आणि लवचिकता शिकविण्याचा प्रयत्न करतो. असो. बर्गर्/पिझ्झा खाल्ला म्हणून झणझणीत मिसळ-पाव विसरत नाही.

गणा मास्तर Sat, 05/24/2008 - 06:43
पेठकर काका आपले भाषेच्या जतनाबाबतचे विचार पटले. ईंग्रजी काळाची गरज आहे हेही खरेच. पण त्यासाठी ईंग्रजी माध्यम हाच एक पर्याय आहे असे नव्हे. मराठी माध्यमांच्या शाळांत ईग्रजी संवाद कौशल्य शिकवले तर ईंग्रजी सहज बोलता येईल. भाषा धेडगुजरी बोलली जाउ नये हेही खरे पंण ते होताना दिसत नाही. सगळेच पालक आपल्यासारखे सुजाण नसतात. तसे असते तर किती बरे झाले असते. ईंग्रजी माध्यमातली मुले जास्त धेडगुजरी बोलतात. बाजरतुन पायनापल आणले . मी मिल्क पिले आम्ही अंदमान आयलंडला गेलो होतो. ही काही प्रातिनिधिक उदाहरणे. वारांची नावे ,भाज्यांची नावे ही बर्याचदा ईंग्रजीत घेतली जातात. माझ्या एका मित्राला तर "महासागर" हा शब्दच माहीत नव्हता. म्हणुन मराठीतुन शिकु आणि भाषा म्हणुन ईम्ग्रजी व्यवस्थित शिकावी असे वाटते. धंनजय प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. लोकांना स्वतःचे "सफल" उदाहरण गाठीशी असून सुद्धा आजूबाजूला इंग्रजी माध्यमातली "सफल" उदाहरणे जास्त दिसतात का? हाच प्रश्न मलाही पडलाय. आणि खरेतर माझ्या आजुबाजुला इंग्रजी माध्यमातली "असफल" उदाहरणेही आहेत बरीच ज्यांना धड ईंग्रजीही येत नाही आणि मराठीही. माणुस स्वतच्या हुशारीवर पुढे जातो हेच खरे. जी मंडळी आपल्या मुलांना परदेशात राहुनही मराठी शिकवत आहेत त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे.

In reply to by गणा मास्तर

प्रभाकर पेठकर Sun, 05/25/2008 - 23:46
ईंग्रजी माध्यमातली मुले जास्त धेडगुजरी बोलतात. मला असे वाटत नाही. इंग्रजी माध्यमात शिकलेल्या कितीतरी मुला-मुलींना मी चांगले (उत्कृष्ट नाही) मराठी बोलताना पाहिले आहे. इंग्रजी माध्यमातून शिकल्यावर मराठी मुद्दामहून आत्मसात करावे लागते. त्या साठी त्यांना काही अवकाश द्या. मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी कॉलेजात जाऊन फाडफाड इंग्रजी बोलतो का? त्याला फाडफाड इंग्रजी येण्यासाठी कॉलेज नंतरही खूप काळ जावा लागतो. तो शिकतो आणि बोलतोही. तसेच इंग्रजी माध्यमातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचे आहे. त्यांना मराठी शिकायला थोडा अवकाश हा लागणारच. आपण (मराठी माध्यमवाले) इंग्रजी बोलायला मुद्दामहून शिकतो. कारण ऑफिसात, बाहेरच्या जगात, व्यवहारात त्याची आपल्याला पदोपदी गरज भासते. पण, मराठीचे तसे होत नाही. मराठी येत नसेल तरी ऑफिसात, बाहेरच्या जगात, व्यवहारात आपले विशेष काही अडत नाही. त्यामुळे इंग्रजी माध्यमवाले मराठी शिकतात, ती आपली मातृभाषा आहे म्हणून. कदाचीत भाषेवर प्रेम आहे म्हणून. पण विशेष काही अडत नसल्यामुळे मराठी भाषा शिकण्याची गती बरीच मंद असते. असो. बाजरतुन पायनापल आणले . 'पायनॅपल' इंग्रजी शब्द आहे तर, 'अननस' अरबी (की इराणी?) शब्द आहे. अरबी आणि इराणी दोन्ही भाषात 'अननस' शब्द आहे. मग, शुद्ध मराठी शब्द काय आहे? आपण सॉरी, थँक्यू, रेल्वे, स्टेशन, पँट, शर्ट, बूट, शूज, सॉक्स, पँट-पिस, शर्ट-पिस्, मटन, फिश करी, ऑम्लेट, सिग्नल, ट्रॅफिक, पोलीस, कोर्ट, जज्, कार, बाईक, स्कूटर असे अनेक शब्द वापरतो. मग एखाद्याने पायनॅपल शब्द वापरला तर त्यालाच फक्त 'चूक' असे का म्हणावे? मी मिल्क पिले वरील मुद्दा इथेही लागू होतो. पण अजूनही 'दूध' 'कॉमन वर्ड' असल्यामुळे जरा विचित्र वाटते. पण मला तर 'पिले' हा शब्दही चुकीचा वाटतो. तो 'प्यायले' असा असावा असे वाटते. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

गणा मास्तर Mon, 05/26/2008 - 06:01
बाजरतुन पायनापल आणले कदाचित अननस आपल्याकडे अरबस्थानातुन किंवा इराणमधुन आले असावे, म्हणुन त्याला अननस म्हनत असावेत असा अंदाज आहे. मग एखाद्याने पायनॅपल शब्द वापरला तर त्यालाच फक्त 'चूक' असे का म्हणावे? ही चुक नाही असे म्हटले तर भाषा धेडगुजरी बनत नाही का? दोन्ही भाषांच्या शुद्धतेचा आग्रह धरावा. धेडगुजरी भाषा बोलून दोन्ही भाषांवर अन्याय करू नये. हे तुमचेच मत ना? आपण सॉरी, थँक्यू, रेल्वे, स्टेशन, पँट, शर्ट, बूट, शूज, सॉक्स, पँट-पिस, शर्ट-पिस्, मटन, फिश करी, ऑम्लेट, सिग्नल, ट्रॅफिक, पोलीस, कोर्ट, जज्, कार, बाईक, स्कूटर असे अनेक शब्द वापरतो. हे मराठीत रुळलेले शब्द आहेत. त्यासाठी कठीण मराठी प्रतिशब्द वापरणे चुकिचे वाटते. पण मला तर 'पिले' हा शब्दही चुकीचा वाटतो. तो 'प्यायले' असा असावा असे वाटते बोली भाषेत `पिले` पन बरोबर आहे असे वाटते. इंग्रजी माध्यमवाले मराठी शिकतात, ती आपली मातृभाषा आहे म्हणून. कदाचीत भाषेवर प्रेम आहे म्हणून. पण विशेष काही अडत नसल्यामुळे मराठी भाषा शिकण्याची गती बरीच मंद असते काका फार कमी लोकांचे प्रेम असते हो मायबोलीवर. .... ह्या सगळ्या मुद्द्यात "मराठी शाळांमध्ये शिकुन ईग्रजी संवाद कौशल्य विकसित करता येणार नाही का" हा मुद्दा दुर्लक्षित रहातोय असे वाटते.

In reply to by गणा मास्तर

प्रभाकर पेठकर Mon, 05/26/2008 - 15:08
दोन्ही भाषांच्या शुद्धतेचा आग्रह धरावा. धेडगुजरी भाषा बोलून दोन्ही भाषांवर अन्याय करू नये. हे तुमचेच मत ना? होय माझेच मत. पण शुद्धतेच्या हव्यासापायी बोली भाषा बोजड (अग्नीरथ आवक्-जावक सुचक पट्टी सारखे) करू नये असेही माझे मत आहे. इंग्रजांची शर्ट-पँट आपण स्विकारली आहेच त्यामुळे छोट्या गोष्टींचा बाऊ करू नये. असे मला म्हणायचे आहे. 'अननसा' ऐवजी कोणी 'पायनॅपल' म्हणाले म्हणून लगेच भुवया उंचावू नये. असे मी म्हणतो. पण त्याच बरोबर 'बघ नं आई! हा सारखा सारखा चेअर वरून खाली जंपतो' असे संवाद अंगवळणी पडू नयेत. हा एका लहान मुलीचा संवाद होता. तसेच, 'तुमच्या घरी यायचे म्हणजे चार जिने चढावे लागतात. फार श्रम्स् पडतात' हे एका कॉलेजकन्यकेचे वाक्यही चुकीचे आहे. बोली भाषेत `पिले` पन बरोबर आहे असे वाटते. बोली भाषेतही 'पिले' आणि 'पन' हे चूकिचेच आहे, असे माझे मत आहे.

वेलदोडा Sat, 05/24/2008 - 23:32
पेठकर काका, अगदी मुद्देसूद तुम्ही तुमचे विचार मांडले आहेत. इंग्रजी शाळांबद्द्ल पूर्वग्रह असणार्‍यांना तुमचे विचार वाचून इंग्रजी भाषेचे महत्व समजायला हरकत नाही. धन्यवाद त्या बद्द्ल. शेवटी अनिकेत केदारी यांनी पण हे मान्य केले की इंग्रजी काळाची गरज आहे . >>बाजरतुन पायनापल आणले . मी मिल्क पिले ...असे बोलणारे काही असू शकतील. पण इंग्रजी शाळेत शिकणार्‍या सर्वाना हे सरसकट लागू होत नाही. घरात वा मराठी वर्तूळात व्यवस्थित मराठी आणि जिथे इंग्रजी बोलण्याची गरज आहे तिथे व्यवस्थित इंग्रजी बोलणारे माझ्या बघण्यात भरपूर जण आहेत. मराठी माध्यमांच्या शाळांत ईग्रजी संवाद कौशल्य शिकवले तर ईंग्रजी सहज बोलता येईल. हेच मी माझ्या आधीच्या प्रतिक्रिये मध्ये लिहीलेले आहे. पण असे होताना दिसते काय? सध्या तरी उत्तर नाही असेच आहे. मराठी शाळेत इंग्रजी मराठी मधुन शिकवतात. संवाद कौशल्य शिकवण्यावर तर अजिबातच भर नसतो. >>मराठी शाळांमध्ये शिकवत नाहीत अशी जे खोटी बॉम्ब मारतात, त्याना त्यांच्या मूलाना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवायचं असतं... कारण तो त्यांच्या 'स्टेटस' चा सवाल असतो... इथे सवाल स्टेटस चा नाहीचये. हा मुद्दा चुकी चा आहे. काळाची गरज आणि म्हणून ज्ञानभाषा आत्मसात करणे ही कारणे या मागे आहेत. तहान लागल्यावर विही र खणण्यात काही अर्थ नाही. शालेय शिक्षण संपल्यावर इन्ग्लीश येण्यासाठी मराठी माध्यमातील मुलांना जादा परिश्रम घ्यावे लागतात. हल्लीच्या गतिमान जीवनात प्रत्येकाकडेच वेळ असेल असे नाही. शिवाय प्रत्येक मूल हे हुशार असेलच असे नाही. काहींना हे जमले म्हणजे सरसकट सर्वांना जमेलच असे नाही. पण लहान वयातच ईन्ग्लिश सम्वाद्कौशल्य व्यवस्थित शिकले तर मोठेपणी त्याचा जास्तीत जास्त फायदाच होणार आहे. >>मराठी माध्यमांच्या शाळांत ईग्रजी संवाद कौशल्य शिकवले तर ईंग्रजी सहज बोलता येईल. ह्यासाठी स्वतः अनिकेत केदारी काय प्रयत्न करणार आहेत?

In reply to by वेलदोडा

गणा मास्तर Sun, 05/25/2008 - 14:24
माझा असा विचार चालु आहे की आपण जवळ्च्या मराठी शाळांमध्ये जाउन ईग्रजी संवाद कौशल्य शिकवण्याबाबत विनंती करावी. आणि सक्रीय सहाय्य करावे. जसे की स्वत: जाऊन शिकवणे वगैरे. तुमच्या काही कल्पना असतील तर जरूर सांगा. शेवटी या चर्चेतुन आपल्या मायबोलीला जिवंत ठेवण्यासाठी मार्ग शोधले पहिजेत. स्टेटसचा मुद्दा मात्र चुकिचा नाही. भाईंनी लिहिल्याप्रमाणे "भारतात इंग्लिश माध्यम हे प्रतिष्ठेचे लक्षण म्हणून पाहीले जाते, अंगभूत गुणांमुळे नाही". ईग्रजी संवाद कौशल्याच्या मुद्द्यशी तुम्ही सहमत आहात हे ऐकुन बरे वाटले. धनंजयनी म्हटल्याप्रमाणे "आपण असफल उदाहरणे बघतो स्वतःचे सफल उदाहरण बघत नाही" जे मराठीतुन शिकले पण मुले मागे पडू नयेत म्हणुन मुलांना ईंग्रजी माध्यमात घालतात. ते लोक असा विचार का करत नाहीत की आपण जसे ईंग्रजी स्वताहुन शिकलो तसे मुलेही शिकतील. मुले ८-१०वीत गेल्यावर ईंग्रजी संवाद कौशल्यासाठी मदत करावी. सोबत थोडा सराव करावा. असे केले तर मराठी शाळा पण टिकतील, मराठीपण टिकेल आणि ईंग्रजीची भितीपण वाटणार नाही.

In reply to by गणा मास्तर

>>माझा असा विचार चालु आहे की आपण जवळ्च्या मराठी शाळांमध्ये जाउन ईग्रजी संवाद कौशल्य शिकवण्याबाबत विनंती करावी. आणि सक्रीय सहाय्य करावे. जसे की स्वत: जाऊन शिकवणे वगैरे. तुमच्या काही कल्पना असतील तर जरूर सांगा हल्लि जवळ जवळ सर्व मराठी शाळांत 'conversational english' हा शाळेतर्फे पण बाहेरिल संस्थेकडुन चालवला जाणारा उपक्रम आहे. यात ४ ग्रेडस असतात. शिक्षणाचा दर्जा ही चांगला आहे. यात सार्वजनिक ठिकाणी -हॉटेल इ. कसे बोलावे, रोजच्या बातम्या हे संवादरुपाने शिकवतात. ( मी अजुन १ ली ग्रेड च अनुभवली आहे). मला तरी ते खुप फायदेशीर वाटले. "मी क्लास मधे टॉक केलं, म्हणुन टिचर ने मला पनिश केलं" -असे 'मराठी" ऐकायचे नसेल , तर तुमच्या सारख्या अनेकांची गरज आहे-हे नक्की.

In reply to by पद्मश्री चित्रे

वेलदोडा Wed, 05/28/2008 - 23:07
हल्लि जवळ जवळ सर्व मराठी शाळांत 'conversational english' हा शाळेतर्फे पण बाहेरिल संस्थेकडुन चालवला जाणारा उपक्रम आहे. एक प्रश्नः जवळ जवळ सर्व मराठी शाळा ? जवळ जवळ म्हणजे किती? ९९% , ९०%, ८०%, ७०%...... आणि पुणे , मुंबई, ठाणे वगैरे ठिकाणच्या मराठी शाळा सोडल्या तर इतर शहरातील , लहान गावातील शाळेचे काय? शिवाय महानगरपालिकेच्या शाळेतही हा उपक्रम चालवला जातो काय?

In reply to by वेलदोडा

पद्मश्री चित्रे गुरुवार, 05/29/2008 - 12:11
>>जवळ जवळ सर्व मराठी शाळा ? जवळ जवळ म्हणजे किती? ९९% , ९०%, ८०%, ७०%...... मी शिक्षणतज्ज्ञ नाही, त्यामुळे ही टक्केवारी नाही देवु शकत. काही शाळांत म्हणते हव तर. इतर प्रश्णांच्या बाबत पण हेच. असा उपक्रम आहे, हा उद्देश हे लिहीण्यामगे होता. भितीने मुलांना मराठी शाळेत न घालणार्‍यांसाठी एक माहिती म्हणुन.बाकी, ज्या लोकांना हा विचार च पटत नाही, त्यांना टक्केवारी काही असली तरि काय फरक पडतो?

ऋषिकेश Sun, 05/25/2008 - 13:05
मी अजून अविवाहीत आहे (व मला मुलेही नाहित :) ) त्यामुळे या चर्चेत भाग घेता येणार नाहि. पण विचार केल्यास माझी नोकरी अशी आहे की मी सलग १० वर्षे भारतातच (त्यातही महाराष्ट्रातच) राहिन याची खात्री नाही. जर दिर्घकाळासाठी जर मला परदेशात वास्तव्य करावे लागले तर मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उद्भवेल या प्रमुख कारणासाठी मी बहुतेक माझ्या मुलांना इंग्रजी माध्यमातूनच शिकवेन. परंतु आवड विचाराल तर मी जसा शिकलो तसा सेमी इंग्रजीतून (विज्ञान-गणित इग्रजी व इतर विषय मराठीतून) मुलांना शिकवायला आवडेल -('मिसळ'लेला) ऋषिकेश

अजिंक्य गुरुवार, 05/29/2008 - 13:27
मला वाटतं, सेमी इंग्रजी हा पर्याय बहुधा कोणी विचारात घेतलेला दिसत नाहीये..... जरी पुढील शिक्षण इंग्रजीमधून घ्यायचे असले, तरीही, भाषा म्हणून तरी मराठी शिकणे आवश्यक आहे. आणि ती फक्त गुण मिळवण्यासाठी किंवा एक विषय म्हणून नव्हे, तर मातृभाषा या नात्याने शिकणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे, इतिहास, भूगोल असे विषय देखील मराठीमधून शिकण्यास काहीही हरकत नसावी. तेच जास्त सोयीचे आहे. पण गणित, विज्ञानासारखे विषय - जे पुढे इंग्रजी मधूनच शिकायचे असतात - आधीही त्याच माध्यमातून शिकल्यास पुढील शिक्षण घेताना फायदा होतो.

In reply to by अजिंक्य

पद्मश्री चित्रे गुरुवार, 05/29/2008 - 14:24
मला सेमी-इंग्रजी च म्हणायचे आहे. ५ वी पासुन सेमी-इंग्रजी हा उत्तम पर्याय आहे -असे मला वाटते. अर्थात, यात मुळ माध्यम मराठी च असते.

वेलदोडा Fri, 05/30/2008 - 02:09
मी क्लास मधे टॉक केलं, म्हणुन टिचर ने मला पनिश केलं" -असे 'मराठी" ऐकायचे नसेल तर... मग मी टिव्ही वर सिरीयल पाहत आहे. तुमचा मोबाईल नंबर देता का प्लीज? आज कॉलेज ला काळे मॅडम चे लेक्चर बन्क केले. सिनेमा फारच बोअर होता कार चे टायर पंन्क्चर झाल्याने बस ने आलो. ........ ...... ...... हे कोणते 'मराठी' बॉ ?

मन Fri, 05/30/2008 - 02:22
मी आणि माझी (भावी) बायको अविवाहित आहोत!! अजुन पुत्री-हिरकणी आम्हाला प्राप्त झालेली नाही. त्यामुळे प्रतिक्रिया द्यायला तितकासा समर्थ नाही. तरीही, आमची भावी पिढी मराठी माध्यमातच जाइल असे दिसते. आपलाच, मनोबा

गणा मास्तर Wed, 05/21/2008 - 05:58
हल्ली इंग्रजीतुन शिकण्याचे फॅड वाढत आहे. मायबोलीतुन शिकलो तर इंग्रजी येणार नाही , नोकरी मिळणार नाही अशा भितीने पालक मुलांना इंग्रजी माध्यमात घालत आहेत. माझ्या मते मराठीतुन शिकल्याने विषय व्यवस्थित समजतात. स॑वादासाठीचे इंग्रजी सहज शिकता येते. इंग्रजीची भिती बाळगायची गरज नाही. या विषयावर चर्चा व्हावी म्हनुन हा कौल.

बेसनलाडू Wed, 05/21/2008 - 10:14
मुख्य कारणे दोन - १. मराठी ही ज्ञानभाषा होईस्तोवर माझ्या मुलांची मुले किंवा त्यांचीही मुले झाली असण्याइतका वेळ गेलेला असू शकतो. आणि नसेल तर तेव्हाही मराठीचे ज्ञानभाषा म्हणून अस्तित्त्व असेल की नाही याबद्दल साशंक आहे. २. मराठी माध्यमातून शिक्षण देणार्‍या नामांकित शाळांची सध्याची स्थिती, त्यांच्या नामशेष होण्याच्या वाटेवरची स्थिती याचि देही याचि डोळा पाहिल्याने मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवायचा विचार प्रबळ झाला आहे. मराठी माध्यमाच्या शाळाच उरल्या नसतील, तर कसे बरे शिकवायचे मुलांना मराठी माध्यमातून? (विचारशील)बेसनलाडू

limbutimbu Wed, 05/21/2008 - 10:44
केवळ इन्ग्रजी नीट बोलता यावे याकरता मला माझ्या मुलान्ना "देशी इन्ग्रज" बनवायचे नाहीयेत इन्ग्रजीच काय, कोणतीही भाषा शिकायला तिचा अभ्यास करणे महत्वाचे अस्ते, पण आयुष्यातली महत्वाची शालेय जीवनातली वर्षे परक्या भाषेच्या जोखडाखाली माझ्या मुलान्नी काढावीत असे मला वाटत नाही जीवनविषयक आणि सन्स्क्रुती विषयक बाबी मात्रुभाषेतूनच शिकल्यागेल्या पाहिजेत, तर त्याला अर्थ हे! अन्यथा परक्या भाषेचा स्विकार हे जवळपास "परक्या राष्ट्राचा स्विकार करण्यायेवढे" महा पातक ठरू शकेल सबब मराठी अर्थात मात्रुभाषेचे माध्यम! लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

ईश्वरी Wed, 05/21/2008 - 11:55
मी युएस मधे असल्याने इंग्लीश की मराठी असा पर्यायच नाहीये. जेव्हा केव्हा भारतात परत जाऊ तेव्हा मुलांना मराठी माध्यमातून शिकणे जड जाईल. त्यामुळे भारतात परतणे झाले तर मुलांना इंग्लीश माध्यमाच्याच शाळेत घालावे लागणार. ईथे आम्ही घरात मराठीच बोलतो. मुले सुध्दा छान मराठी बोलतात. शिवाय मी त्यांना घरी मराठी लिहायला व वाचायला शिकवत आहे. अक्षर ओळख झालेली आहे. येत्या उन्हाळी सुट्टीत बाराखडी शिकवायचे ठरवले आहे. बाकी बेसनलाडू यांनी वर सांगितलेच आहे....त्यांच्या मताशी सहमत त्यामुळे जरी मी भारतातच असते तरी मुलांना इंग्लीश माध्यमाच्या शाळेत घातले असते . माझ्या मते मराठीतुन शिकल्याने विषय व्यवस्थित समजतात -- असहमत. मला तरी असा अनुभव नाहीये की मराठीतुन शिकल्यानेच विषय व्यवस्थित समजतात्..ईग्लीश मधुन शिकल्याने डोक्यावरुन जाते. आणि मुलांच्या बाबतीतही असा अनुभव नाहिये.. ईश्वरी

In reply to by ईश्वरी

गणा मास्तर Sat, 05/24/2008 - 06:00
तुम्ही मुलांना घरी मराठी लिहायला वाचायला शिकवता वाचुन आनंद वाटला. मात्रुभाषेतुन शिकल्याने विषय चांगले समजतात असे भाषातज्ञ आणि शिक्षण तज्ञांचे मत आहे. आणि माझा अनुभव पण आत्ता या क्षणी संदर्भ देता येत नाही पण सकाळमध्ये पुर्वी लेख प्रसिद्ध झाल्याचे आठवते.

माझी दोन्ही मुले मराठी तुन च शिकत आहेत. आज जेव्हा माझा ८ वर्षाचा मुलगा फास्टर फेणे, श्यामची आई, बोक्या सातबंडे अगदी माण्देशी माणसं वाचतो, त्यावर स्वतःचे मत मांडतो, दिलीप प्रभावळ्करांना पत्र लिहुन दाद देतो ,तेव्हा वाटतं निर्णय योग्य आहे.. पण लोकांच्या प्रतिक्रिया मात्र अनेकदा कमी लेखणार्‍या, मुर्ख ठरवणार्‍या असतात हा अनुभव. योग्य-अयोग्य काळ च ठरवतो, पण निदान मी मुलांना आयुष्यातली महत्वाची शालेय जीवनातली वर्षे परक्या भाषेच्या जोखडाखाली घालवायला लावली नाहीत याचे समाधान.

In reply to by पद्मश्री चित्रे

आनंदयात्री Wed, 05/21/2008 - 12:19
छान प्रतिसाद फुलवाराव पण असहमत. >>योग्य-अयोग्य काळ च ठरवतो, पण अहो असे झाले तर अडाणी माणुस म्हणेल की "आमी कुठं शिकलो, आम्ही काय कमवत नाही मिठ मिरची ?" >>आयुष्यातली महत्वाची शालेय जीवनातली वर्षे परक्या भाषेच्या जोखडाखाली अजिबात जोखड वैगेरे नाही हो, जसे वर काही लोकांनी आपल्या मुलांना स्वतः मराठी शिकवण्याचा उपक्रम अवलंबला आहे, तश्या मताचा मी आहे. >>स्वतःचे मत मांडतो, दिलीप प्रभावळ्करांना पत्र लिहुन दाद देतो खुप छान, पोरगा चुणचुणीत दिसतो. सर मी जर इंग्रजी माध्यमात शिकलो असतो ना तर मी जेव्हा वुडहाउस पहिल्यांदा वाचला तेव्हा खुप छान समजला असता, अगदी वेगळी मजा अनुभवता आली असती असे वाटत असते कधीकधी, असो.

In reply to by आनंदयात्री

>>अजिबात जोखड वैगेरे नाही हो, जसे वर काही लोकांनी आपल्या मुलांना स्वतः मराठी शिकवण्याचा उपक्रम अवलंबला आहे, तश्या मताचा मी आहे. भाषा शिकणे आणि भाषेतुन शिकणे यात फरक आहे ना आनंदयात्री? >>अहो असे झाले तर अडाणी माणुस म्हणेल की "आमी कुठं शिकलो, आम्ही काय कमवत नाही मिठ मिरची ?" अडाणी रहा असे कुठे म्हटले मी? >>खुप छान, पोरगा चुणचुणीत दिसतो.-धन्यवाद. आणि हो, मी फुलवा "राव " नाही :))

In reply to by पद्मश्री चित्रे

आनंदयात्री Wed, 05/21/2008 - 12:44
>>भाषा शिकणे आणि भाषेतुन शिकणे यात फरक आहे ना अगदी हेच्च म्हणतोय मी फुलवाताई (राव साठी माफी द्यावी) .. अहो पोरगा त्या भाषेतुन शिकला तर लहानपणाच्या तीव्र आकलनशक्ती मुळे तो ती भाषा उत्तम जाणेल, त्यात त्याला उत्तम गती येईल. उद्या किती चॅलेंजेस आहेत, आजुबाजुला सगळे लोक थोड्या फार फरकाने सारख्याच कॅपॅबिलिटीचे असतात हो, गती महत्वाची, जो गतिमान तो पुढे जाईल ! चुक भुल द्या घ्या. (थोडक्यात ठोकु नका :) ) आपलाच - कासवयात्री

वेलदोडा Wed, 05/21/2008 - 13:28
--अहो पोरगा त्या भाषेतुन शिकला तर लहानपणाच्या तीव्र आकलनशक्ती मुळे तो ती भाषा उत्तम जाणेल, त्यात त्याला उत्तम गती येईल. उद्या किती चॅलेंजेस आहेत, आजुबाजुला सगळे लोक थोड्या फार फरकाने सारख्याच कॅपॅबिलिटीचे असतात हो, गती महत्वाची, जो गतिमान तो पुढे जाईल ! ह्या आनंदयात्री यांच्या मताशी पूर्णपणे सहमत. --आज जेव्हा माझा ८ वर्षाचा मुलगा फास्टर फेणे, श्यामची आई, बोक्या सातबंडे अगदी माण्देशी माणसं वाचतो, अहो फुलवा ताई, शामची आई , फास्टर फेणे एकवेळ मुलाने नाही वाचले तर त्यामुळे व्यावहारीक दुनियेत मुलाचे काही नुकसान होणार नाही. शेवटी घरातून होणारे सन्स्कार महत्वाचे असतात. इंग्लीश भाषेतही उत्तम साहित्य आहे. इंग्लीश माध्यमातील मुले ईंग्लीश साहित्य वाचतील. विषयाचे आकलन होणे महत्वाचे. माझी मुलगी (वय ७ वर्ष) ईन्ग्लीश पुस्तके वाचते. मराठी सध्या घरी शिकत आहे. त्यामुळे मराठी पुस्तके मी तिला वाचून दाखवतो. कालांतराने ती मराठी ही वाचू लागेल. तिला दोन्ही भाषा चांगल्या समजतात. द्वैभाषिक ( bilingual) म्हणून परिचितांनाही तिचे कौतुकच वाटते. सध्या सर्वत्र जागतीकरणाचा जोर वाढत आहे. ज्ञानाच्या अनेक शाखा उदयास येत आहेत. अत्याधुनिक ज्ञान सध्या तरी ईन्ग्लीश भाषेत उपलब्ध आहे. ज्ञानभाषा म्हणून ईन्ग्लीश येणे ही काळाची गरज बनली आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत ईन्ग्लीश मराठी तून शिकवले जाते. म्हणजे तास ईन्ग्लीश विषयाचा पण शिक्षक- मुले यांचा संवाद मराठीतून. जर मराठी माध्यमात शिकलेला मुलगा शालेय शिक्षण पूर्ण होऊन बाहेर पडल्यावर ईन्ग्लीश मध्ये सहज बोलत असेल.. ईन्ग्लीश मध्ये व्यवस्थित वाचन लिखाण करी त असेल, त्याच्या मनात ईन्ग्लीश ची भिती राहीलेली नसेल तर आमचीही मराठी माध्यमात मुलांना शिकवायला ना नाही. पण असे होताना दिसत नाही. उलट मराठी माध्यमातील मुलांना शाळेतून बाहेर पडल्यावर कॉलेजमध्ये वा नोकरी च्या ठिकाणी इन्ग्लीश fluently बोलण्यासाठी , समजण्यासाठी जादा परिश्रम घ्यावे लागतात.

In reply to by वेलदोडा

>>मराठी सध्या घरी शिकत आहे. त्यामुळे मराठी पुस्तके मी तिला वाचून दाखवतो. कालांतराने ती मराठी ही वाचू लागेल-मी इन्ग्लीश वाचुन दाखवते ,हाच फरक आहे. तो ही वाचेल नन्तर. ईन्ग्लीश ची भिती -ही आपणच निर्माण केलेला बागुलबुवा आहे. आजकाल, सर्व मराठी शाळांत ५ वी पासुन सेमी-इन्ग्लीश आहे,त्यामुळे एवढा मोठा प्रश्ण येणार नाही. गरज आहे, आपली मानसिकता बदलण्याची. >>शामची आई , फास्टर फेणे एकवेळ मुलाने नाही वाचले तर त्यामुळे व्यावहारीक दुनियेत मुलाचे काही नुकसान होणार नाही.>> या ला काही अर्थ नाही! जे काही ही वाचन करत नाहीत , त्यांचे ही व्यावहारीक दुनियेत काही नुकसान होत नाही ,हो!

विसुनाना Wed, 05/21/2008 - 16:01
माझी दोन्ही मुले इंग्रजी शाळेतच शिकत आहेत. पण घरात मराठीचे दृढ संस्कार असल्याने काही नुकसान होत नाही. आज जेव्हा माझा ११ वर्षाचा मुलगा एकीकडे एनसायक्लोपेडिया, रोशन दलालांचे 'पफिन हिस्टरी ऑफ इंडिया' , इंग्रजी वृत्तपत्रे वाचतो , समग्र हॅरी पॉटर वाचून त्यावर आपले मत मांडतो तर दुसरीकडे फास्टर फेणे, श्यामची आई, बोक्या सातबंडे, गोट्या, चिंगी, खडकावरला अंकुर, बंडखोर बंड्या वाचतो - स्वतःचे मत मांडतो, मराठी बालनाट्यात भाग घेतो, तेव्हा वाटतं निर्णय योग्य आहे... ज्ञानभाषा आणि मातृभाषा यांचा समतोल कुटुंबियांकडून सांभाळला गेला तर मराठीला दुय्यम स्थान मिळणार नाही.

भाई Wed, 05/21/2008 - 17:26
महाराष्ट्रात असेन तर मराठी माध्यमच. १. शाळांच्या गुणवत्तेचा मुद्दा विनाधार आहे. इंग्लिश शाळांची सरसकट गुणवत्ता जास्त चांगली आहे हे कशावरून मांडले? वस्तुतः आजकाल शाळा काढणे हा मोठा पैसे कमावण्याचा धंदा झालेला आहे आणि इंग्लिश माध्यमाच्या शाळा तर सोन्याची अंडे देणारी कोंबडी. पुण्यात यावर्षी आलेल्या नविन शाळा काढण्यासाठीच्या अर्जाचे आकडे काय सांगतात? हे सारे लोक समाजसेवा म्हणून या शाळा काढत आहेत असे मानायला आधार नाही. २. चीन, जपान, कोरीया इ. पूर्वेकडील व जर्मनीसह सर्व युरोपियन देश यातील मुलांना इंग्लिश माध्यमाची गरज पडत नाही. ते देश बहुतेक सर्व बाबतीत भारतापेक्षा प्रगत आहेत, राहतील असेही दिसत आहे. तिथेही कित्येक मुले इंग्लिश शिकतात पण भाषा म्हणून. ३. मातृभाषेतून शिक्षण घेतलेले खूप मोठे व यशस्वी लोक होत आलेत. गुजराती व मारवाडी समाज इंग्लिशच्या मदतीशिवायच सर्वत्र यशस्वी ठरलेला आहे. यशस्वी होणारे लोक त्यांच्या अंगच्या इतर गुणांमुळे यशस्वी होतात तर अयशस्वी लोकांपैकी काही लोक खापर फोडायला भाषेची सबब पुढे करतात. ४. इंग्लिश भाषा येण्यासाठी ती इतर विषय शिकण्याचे माध्यम म्हणून कशाला लागते? इतिहास हा विषय इंग्लिश माध्यमातून शिकण्याचा उपयोग नक्की काय? ५. भारतात इंग्लिश माध्यम हे प्रतिष्ठेचे लक्षण म्हणून पाहीले जाते, अंगभूत गुणांमुळे नाही. हा सामजिक प्रश्न झालेला आहे. वरचा वर्ग इंग्लिश माध्यमाच्या शाळेत जातो मग मध्यम वर्गाला वाटते मराठी माध्यमात 'खालच्या वर्गाचे लोक' जातात. आपले मूल त्या वातावरणात नको. ६. भारतात अनेक भाषा असूनही लोकांचे इतर भाषिक प्रांतांमध्ये सहज स्थलांतर होते आणि त्याचाही इंग्लिश माध्यमांच्या गरीमेला हातभार लागतो. ७. इंग्लिश माध्यमातून शिकलेली मुले पुढे जाऊन मराठी साहित्यनिर्मिती करतात? जर तसे नसेल तर सद्य कल पाहता लवकरच मराठी साहीत्य निर्मिती प्रभावीत होणार या शंकेला वाव आहे. नविन साहित्य निर्मितीविना भाषा किती काळ जगू शकते? मुळात भाषेची आवश्यकता जर संपायला लागलेली असेल तर ती भाषा किती काळ तग धरू शकेल? घरात मराठी शिकविणे पुरेसे ठरणार नाही असा माझा कयास आहे. जर तो चुकीचा ठरला तर मला फार आनंद वाटेल. वूडहाउस वाचणारी इतर मुले आहेत त्यामुळे वुडहाउसची काळजी नाही. पु. ल. किती दिवस वाचला जाईल? आणि उपयुक्ततावादाच्या सध्याच्या काळात "पु.ल. (किंवा तसे इतर साहीत्य) नाही वाचले तर काय फरक पडतो" असे ऐकायला नक्कीच मिळेल. हा र्‍हास लगेच दिसत नाही. जेव्हा त्याचे परीणाम दिसायला लागतात तेव्हा इतका उशीर झालेला असतो की ती प्रक्रिया सहजासहजी थांबवता येत नाही. जेव्हा सर्वसामान्य माणूस मराठीला दूर लोटतोय. आता शि़क्षणाच्या माध्यमाची पाळी आहे की जी सुरुवात आहे. इंग्लिश माध्यमातून शिकलेल्या मुलांना मराठीची गरज कशाला वाटेल? संस्कृत का मृत झाली याबद्दल मला निश्चित माहीती नाही पण मराठीचे आयुष्य लोकभाषा म्हणून फार नाही असे या सर्व प्रवाहाकडे पाहून वाटते. भाई

In reply to by भाई

मी देखील वूडहाऊस वाचायचा प्रयत्न केला. नाही कळले इतके. कुठे बिघडते? पु.ल. वाचून अनुभवता आले हे काय कमी आहे? आणि इंग्रजी शाळांमधे जाणारी किती मुले शेक्सपियर किंवा वूडहाऊस वाचतात. मी माझ्या एका कॉन्व्हेंटी मित्राला विचारले कि 'तू वाचले आहेस का रे वूडहाऊस' तर तो म्हणे 'नाही रे. होमवर्क मधून वेळच नाही मिळत.' आता घरच्या अभ्यासाला होमवर्क म्हणावे लागते. प्रश्न राहीला मराठी ज्ञानभाषा बनण्याचा. ती तर कधीच बनू शकेल असे वाटत नाही. कारण त्यासाठी इच्छाशक्ती लागते आणि ती मराठी माणसाकडे नाही. पूर्वी मराठीला ज्ञानभाषा बनविण्याचे प्रयत्न झाले असतील त्यामुळे बर्‍याच इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द आले असावेत. पण आता ते शब्द वापरणे म्हणजे मागास पणाचे लक्षण मानले जाते. मराठी शाळा काढली आणि त्याला मुलेच मिळाली नाहीत तर करणार काय? कदाचित सर्वाना आपापल्या मुलाना ज्ञानभाषेत शिकवायचे असेल तर कशाला पाहीजे मराठीचा अभिमान, मातृभाषा वगैरे सर्वकाही. जर आपली मातृभाषा आपण आपली ज्ञानभाषा बनवू शकत नसू तर कसले आम्ही मातृभाषेचे अभिमानी..? पुण्याचे पेशवे

चतुरंग Wed, 05/21/2008 - 19:13
मुलगा शाळेत इंग्लिश व्यतिरिक्त स्पॅनिशही शिकतोय. आम्ही घरी प्रामुख्याने मराठीच बोलतो त्यालाही मराठी चांगले बोलता येते/समजते. अजून देवनागरी लिपीची ओळख करुन दिलेली नाही, लवकरच देणार आहे. लहान वयात मुले अनेक भाषा सहज आत्मसात करतात त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न राहील. सध्या तरी इंग्लिश ही व्यवहारासाठी ज्ञानभाषा आहे हे वास्तव नाकारुन चालणार नाही. भारतात इंग्लिश माध्यमाच्या कित्येक शाळा हे पैसे कमाऊ कुरण झाले आहे तसेच कित्येक नामवंत मराठी शाळा दैन्यावस्थेत गेल्या आहेत/जात आहेत तेव्हा योग्य तो व्यावहारिक निर्णय त्या वेळच्या परिस्थितीवरच अवलंबून असेल. बहुतांशी भारतात परतल्यावरही मी इंग्लिश माध्यम कायम ठेवेन कारण सुरुवातीची बरीच वर्षे त्यातूनच शिकलेला असणार पण मराठीची नाळ तुटणार नाही ह्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न राहील. भ्रष्ट नक्कल करुन इंग्रजाळलेले असणे आणि इंग्लिश माध्यमातून शिक्षण घेतलेले असणे ह्याचा अर्थाअर्थी संबंध असतोच असे नाही. आणि हे बर्‍यापैकी वेळा पालकांच्या वागणुकीवर अवलंबून असते. पुढे मोठा झाल्यावर काय वाचायचे अशा गोष्टींबद्दल आडाखे बांधणे अवघड असते. त्यामुळे अमूकच वाच अट्टाहास नाही. पण इंग्लिशबरोबरच मराठीतले उत्तमोत्तम साहित्य त्याला आस्वादता आले तर आनंदच असेल. चतुरंग

प्रियाली Wed, 05/21/2008 - 19:31
माझी मुलगी अमेरिकेत असल्याने इंग्रजी शाळेत शिकते. तिला मराठी अक्षरांची ओळख स्वतःचे नाव लिहिण्यापुरती आहे. बरेचदा सुट्टीत लहान शब्द लिहिता येतात पण नंतर विसरून जायला होते आणि फक्त नावे लिहिण्यापुरती मराठी आठवते. आम्हाला भारतात परतायची इच्छा नाही त्यामुळे इंग्रजीतूनच शिकणार.

चित्रा गुरुवार, 05/22/2008 - 00:57
आमची मुलगी इंग्रजी शाळेत शिकते अमेरिकेत असल्याने. भारतात असले तरी मुद्दाम मराठी शाळेत घालेन असेही नाही. कधीतरी तिच्या लक्षात आले की तिला लिहीलेले मराठी कळत नाही / वाचता येत नाही, त्यामुळे अहंकार दुखावला गेला असल्याने हल्ली मराठी शब्द "लावून" वाचण्याचा प्रयत्न करते. मराठी व्यवस्थित बोलते. मराठी उच्चार बर्‍यापैकी "मराठी" आहेत. पूर्वी मला मराठी माध्यमातूनच महाराष्ट्रातील मुलांनी शिकावे असे वाटे. अजूनही वाटते. भाषेमुळे समाजाशी संबंध राहतो. ज्या समाजात राहतो त्या समाजाची भाषा येत नसली तर ते चुकीचे आहे. तसेच मराठी शाळेत घातले की मराठी येतेच असे नाही, मराठी वाचण्या-लिहीण्याची आवड कशी निर्माण करतो त्यावर सर्व अवलंबून आहे असे वाटते. असेच इंग्रजीचे. ---शाळेत घातले की ---- येतेच असे नाही, --- वाचण्या-लिहीण्याची आवड कशी निर्माण करतो त्यावर सर्व अवलंबून आहे असे वाटते - हे असे कुठच्याही भाषेसाठी लागू होईल. आमची मुलगी मोठी झाल्यावर इंग्रजी किंवा मराठी यापैकी कुठच्याही भाषेतून काही उत्तम लिहू शकली तर आम्हाला आवडेल.

धनंजय गुरुवार, 05/22/2008 - 03:27
(१) स्वतः मराठी माध्यमिक शाळेत शिकलात का असा कौल, आणि (२) हा वरील कौल एकत्रित घेतला तर माहितीपूर्ण वाटतो. प्रथम कौल रोचक वाटला होताच. पण त्यातून निघणारा अर्थ इतपत होता: मराठी संकेतस्थळावर येणारे बहुतेक सर्वजण मराठी माध्यमिक शाळेत शिकलेले आहेत. याचा समाजाला नेमका कसा अर्थ लावायचा हा विचार थोडा क्लिष्ट होता. आंतर्जाल वापरणार्‍या मराठीभाषकांपैकी किती लोक मराठी स्थळांवर येतात, हे ज्ञान माझ्यापाशी नाही. कदाचित मराठीभाषकांच्या इंग्रजी स्थळांवर कौल लावला असता तर वेगळी काही आकडेवारी दिसली असती. तो कौल मात्र येथील कौल साठी संदर्भ पुरवतो. असे दिसते की बहुतेक मराठी माध्यमात शिकलेले संकेतस्थळ-वापरणारे मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवतात. याचे दोन पैलू आहेत : १. संस्थळ वापरणारे मराठी-माध्यम-सुशिक्षित महाराष्ट्र सोडून अन्यत्र जातात, तिथे मराठी शाळा उपलब्ध नसतात. (पण या कारणाने पूर्ण हिशोब लागत नाही.) २. संस्थळ वापरणारे मराठी-माध्यम-सुशिक्षित महाराष्ट्रात राहातात, तेही काही प्रमाणात मुलांना इंग्रजी माध्यमात शिकायला पाठवतात. मुद्दा २. हे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे खरे, पण एकत्रित आकडा म्हणजे बाजारशास्त्रीय/सामाजिक पाहाणीही आहे. लोकांना स्वतःचे "सफल" उदाहरण गाठीशी असून सुद्धा आजूबाजूला इंग्रजी माध्यमातली "सफल" उदाहरणे जास्त दिसतात का? असा प्रश्न मनात येतो. अथवा मराठी माध्यमिक म्हणून स्सफल""सफल" असलो, तरी आजूबाजूला अधिक मराठी माध्यमिक "असफल" लोक दिसतात का? ("सफल" हे "-" मध्ये टाकले, कारण केवळ बाजारू साफल्याबद्दल बोलत आहे.) मराठी माध्यमिक शिक्षण दर्जेदार असूनसुद्धा मराठी माध्यमाचा र्‍हास होत आहे, होत राहील असे भाकीत करण्यास धजावतो. थोडे वाईट वाटते आहे. कौल अर्थात पूर्णपणे वैज्ञानिक नाहीत, तरी त्यांतून काही माहिती मिळते. दोन्ही कौल टाकणार्‍यांना धन्यवाद.

गणा मास्तर गुरुवार, 05/22/2008 - 06:49
२. मराठी माध्यमातून शिक्षण देणार्‍या नामांकित शाळांची सध्याची स्थिती, त्यांच्या नामशेष होण्याच्या वाटेवरची स्थिती याचि देही याचि डोळा पाहिल्याने मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवायचा विचार प्रबळ झाला आहे. मराठी माध्यमाच्या शाळाच उरल्या नसतील, तर कसे बरे शिकवायचे मुलांना मराठी माध्यमातून? आपणच आपल्या मुलांना मराठी शाळांत पाठवले नाही तर त्या कशा उरतील बरे. आपण पुढे होउन परिस्थिती बदलली पाहिजे.

In reply to by गणा मास्तर

बेसनलाडू Fri, 05/23/2008 - 09:24
तुम्ही येथे ठळकावलेला दुसरा मुद्दा पहिल्या मुद्द्याशी निगडीत आहे. त्यावर काही ठाम भाष्य करत असाल,तरच पुढे चर्चा करण्यात अर्थ उरतो. (सुस्पष्ट)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

गणा मास्तर Sat, 05/24/2008 - 06:12
मराठी ज्ञानभाषा होने कठीण आहे. आज आपला व्यापार परकीय देशांशी जास्त चालतो त्यामुळे ईन्ग्रजीची गरज भासनारच . पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मराठी माध्यमातुन शिकलात तर तुम्हाला ईंग्रजी भाषेतुन कधीच बोलता येणार नाही. ईंग्रजीची भीती न बाळगता मराठी माध्यमांच्या शाळांत ईग्रजी संवाद कौशल्य शिकवणे गरजेचे आहे फक्त. बाकी भाईंची प्रतिक्रिया या विषयच्या सामाजीक कारणांवर चांगला प्रकाश टाकते. आपला अनिकेत

In reply to by गणा मास्तर

बेसनलाडू Sat, 05/24/2008 - 08:59
मराठी ज्ञानभाषा होने कठीण आहे. आज आपला व्यापार परकीय देशांशी जास्त चालतो त्यामुळे ईन्ग्रजीची गरज भासनारच . --- मराठी ज्ञानभाषा होणार नाही ना? तुम्हीच म्हणताय ते इथे. मग का शिकवू मुलांना मराठी माध्यमातून? आणि ज्ञानभाषा केवळ व्यापारापुरतीच मर्यादित नसते, असे (निदान मला तरी)वाटते. शास्त्रीय संशोधन; सामाजिक,सांस्कृतिक व वैचारीक मूल्यांचे आदानप्रदान;अभ्यास या सगळ्याशी ती फार जवळून निगडीत असते. आणि आज तुम्ही म्हणताय तो व्यापार किंवा मी म्हणतोय ते संशोधनादी संवाद यांपैकी काहीही केवळ महाराष्ट्र पातळीवर राहिलेले नाही, वैश्विक झाले आहे. आणि विश्वाची ज्ञानार्जनाची व संवादाची भाषा इंग्रजी आहे, हे आता तरी स्वीकारा! माधव त्र्यंबक पटवर्धनांनी उगाचच इंग्रजीला वाघिणीचे दूध म्हटले काय? मराठी शाळांचा आग्रह धरणारे शालेय शिक्षणोत्तर वाटचालीतही मराठीतूनच शिकायचा,परीक्षा द्यायचाघ्यायचा आग्रह का धरीत नाहीत? कारण ते किती अव्यवहार्य आहे, हे त्यांनाही चांगलेच(!) माहीत असावे! ईन्ग्रजीची गरज भासनारच --- हो ना? मग शिकवा की मुलांना इंग्रजी माध्यमातून! प्रॉब्लेम काय आहे?मध्यंतरी कुठेतरी एका अतिशय चांगल्या उपवर मुलाला केवळ त्याचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे, म्हणून मुलीने नकार दिल्याचे मिसळपाववरच वाचनात आले आणि त्यावरची मनोरंजक चर्चाही. त्या मुलीचा निर्णय चूक की बरोबर वगैरे मुद्दे थोडा वेळ बाजूला ठेवू. पण (या बाबतीत दुर्दैवाने झाले तसे) मातृभाषेतून झालेले शिक्षण हे उच्च शिक्षण, सामाजिक प्रतिष्ठा, नोकरीचाकरी व अर्थार्जन यांच्याही पलीकडे जाऊन जोडीदार निवडानिवडीतही नाक खुपसू लागले तर झक् मारली आणि मराठी मिडिअममधून शिकलो, असा एखाद्याचा ग्रह झाल्यास नवल वाटू नये. ऐन उमेदीच्या काळात असा न्यूनगंड निर्माण होणे खचितच चांगले नाही. अर्थात, तो तसा होऊ नये यासाठी मानसिकदृष्ट्या कोण किती सक्षम इ. बाबी मुद्दा मांडताना वगळल्या आहेत. 'वर्स्ट केस'मध्ये तो मुलगा तितका कणखर नाही व 'ऍवरेज केस'मध्ये तो मुलगा बंडखोर किंवा लोकापवाद नाही, असे मानूया. सामाजिक राजकारणाबाबत मांडले गेलेले अनेक मुद्दे अतिशय वास्तविक आणि विचार करण्याजोगे आहेत. जाताजाता इतकेच म्हणवेसे वाटते की संस्कार,जीवनशैली,ज्ञानार्जन,स्वसंस्कृतीबद्दल प्रेम व आदर,सर्वांगीण प्रगती या बाबी मराठी किंवा कोणतीही मातृभाषा - फक्त यांवरच - अवलंबून नसतात. त्याहीपेक्षा महत्त्वाचा असतो तो आत्मविश्वास, व्यापक व सर्वसमावेशक नि डोळस दृष्टिकोन. आणि त्यासोबत वैयक्तिक आचारविचार नि आवडीनिवडी व सद्सद्विवेकबुद्धी. मराठीचा आग्रह धरा नक्कीच पण त्याचे रुपांतर दुराग्रहात होऊ देऊ नकात.मराठीतीलच एक ख्यातनाम साहित्यिक दत्तो वामन पोतदार यांचा 'बहुभाषक व्हा' हा संदेश येथे उधृत करायचा मोह आवरत नाही. याबद्दल अधिक ऊहापोह येथे वाचता येईल. (सविस्तर)बेसनलाडू

फटू Fri, 05/23/2008 - 07:23
मी जर महाराष्ट्रात राहत असेन तर माझी मुलं मराठी माध्यमाच्या शाळेतुनच शिकतील... माणसाचं आयुष्यात पुढं जाणं हे तो कुठल्या माध्यमाच्या शाळेतुन शिकला यावरच मुळीच अवलंबुन नसतं. तसंच ते तो कुठल्या वातावरणात शिकला यावरही अवलंबुन नसतं. तसं असतं आज माझ्यासारखी शेतकरी कुटुंबात वाढलेली, गावांमधल्या मराठी माध्यमाच्या शाळांमधून शिकलेली मुलं कधीच आयुष्यात काही करू शकली नसती... आयुष्यात काही मिळवायचं असेल तर आवश्यक असते गती... येणार्‍या अडीअडचणीन्वर मात करून पुढे जाण्याची जिद्द.. आज सारेच ओरडत आहेत की मराठी माध्यमाच्या शाळांमधला शिक्षणाचा दर्जा खूप खालावला आहे. काही ठिकाणी काही प्रमाणात ते खरं आहे सुध्दा (उदाहरणार्थ मुंबई महानगर पालिकेच्या मराठी शाळा - पोरं सातवी आठवीत जातात तरी एक वाक्य न अडखळता वाचता येत असेल तर शप्पथ). पण मराठी माध्यमाच्या चांगल्या शाळा सुद्दा आहेत... मराठी शाळांमध्ये शिकवत नाहीत अशी जे खोटी बॉम्ब मारतात, त्याना त्यांच्या मूलाना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवायचं असतं... कारण तो त्यांच्या 'स्टेटस' चा सवाल असतो... जर शिक्षणाच्या माध्यमाने काही फरक पडत नसतो तर का आपण मूलाना मराठीतून शिकवू नये ? किंवा इंग्रजीतूनच शिकवण्याचा अट्टाहास का ? पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

विजुभाऊ Fri, 05/23/2008 - 10:26
अनिकेत भौ तुमचे नाव अनिकेतकेदारी हे अगदी त्या सारे कळतनकळतच घडते सारखे वाटते.

प्रभाकर पेठकर Fri, 05/23/2008 - 14:37
परीस्थितीत झपाट्याने बदल झाला आहे. आमच्या काळी कॉन्व्हेंट किंवा इंग्रजी माध्यमातून शिकणे तितकेसे 'कॉमन' नव्हते. त्याला कारण.... १) अशा शाळांची न परवडणारी फी २) घरी मुलांचा इंग्रजीतून अभ्यास घेण्याची पालकांची (विशेषतः आयांची) असमर्थता ३) स्थानिय क्षेत्रा बाहेरील नोकर्‍यांचे अनाकर्षण आणि ४) सर्वसाधारण मध्यम वर्गातील सर्व मुले मराठी शाळेतच जात असल्यामुळे आपणही तसेच करण्याचा कल. इत्यादी. आता परिस्थिती खूप बदलली आहे. १) आमदनीतील भरमसाठ वाढ. इंग्रजी माध्यम शाळा परवडण्याच्या आवाक्यात आल्यात. २) नवरा-बायको दोघेही ग्रॅज्युएट्/उच्चशिक्षित असल्यामुळे इंग्रजीतून घरचा अभ्यास घेणे ही समस्याच उरली नाही. ३) टीव्ही आणि इतर प्रसार माध्यमांनी विविध क्षेत्रातील संधींच्या उपलब्धतेवर सततचा टाकलेला प्रकाशझोत मध्यमवर्गालाही आकर्षित करीत आहे. ४) इंग्रजी माध्यमाक्डे वळणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत झालेली भरमसाठ वाढ, आपले पाल्य ह्या स्पर्धेत मागे तर पडणार नाही नं! ही भिती. ५) सर्व समाज, (देशीय-आंतरदेशीय) एकमेकात मिसळ्यामुळे पुर्वी नव्हते इतके इंग्रजी भाषेला महत्त्व प्राप्त झाले आहे. इंग्रजीतून प्रभावी संभाषण करू शकणार्‍यांची छाप लगेच पडते ही सामजिक मानसिकता/वास्तविकता आहे. इंग्रजी भाषा येणं ही भावी यशाची पहिली पायरी समजली जाते. 'जो बोलतो त्याच्या शेणीसुद्धा विकल्या जातात जो बोलत नाही त्याचे मोती पण विकले जात नाहीत' असे म्हणतात. त्यात फक्त 'इंग्रजी' हा शब्द जोडला तर ती आजची परिस्थिती आहे असे म्हणायला हरकत नसावी. मातृभाषा, राष्ट्रभाषा आणि जगाची भाषा ह्यात पहिल्या दोन सहज जमतात तिसरी शिकून घ्यावी लागते. ह्यातली कुठलीही एक शिकल्यामुळे दुसरी भाषा मागे पडते असे नाही. त्यामुळे इग्रजी शिकल्याने मराठी मागे पडते आहे, मराठीचे नुकसान होते आहे असे म्हणणे गैर आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करून नये. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताना मातृभाषाही तोंडवळणी पाडून घ्यावी. इंग्रजी साहित्याबरोबरच मराठी साहित्यही वाचावे. गरज असेल तिथे इंग्रजी आणि इतर वेळी मातृभाषेचा वापर आवर्जून करावा. दोन्ही भाषांच्या शुद्धतेचा आग्रह धरावा. धेडगुजरी भाषा बोलून दोन्ही भाषांवर अन्याय करू नये. इंग्रजांकडून आपण पँट-शर्ट घेतले ते आपल्या आंगवळणी पडले. त्याने आपले मराठीपण कुठेही डागाळले नाही. पण पँट-शर्टावर आपण पागोटे-मुंडासे बांधत नाही. धोतर नेसून त्यात शर्ट खोचत नाही. एका पायात चप्पल आणि दुसर्‍या पायात बुट वापरत नाही. मग भाषेतच धेडगुजरीपणा का असावा? जी भाषा वापराल तीही शक्यतो शुद्धच असावी. हेच संस्कार स्वतःवर आणि मुलांवरही प्रयत्नपुर्वक केले तर मराठी भाषा, मराठीपण मरणार नाही. आपल्या मुलांना/पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिकवणारे सर्व मराठी भाषेचे शत्रू ही भूमिका बाळगू नये. उलट आज मराठी माणूस मी आणि माझं शहर्/खेडं ह्यातून बाहेर पडून 'ग्लोबल' होत आहे ह्याचा अभिमान बाळगावा. त्याच बरोबर मराठी पुस्तके 'विकत' घेऊन वाचावीत. लग्नकार्यात, मुंजीत, वाढदिवसाला किंवा सहजही वाचनिय मराठी पुस्तके एकमेकांना भेट द्यावी. खेळणी, पुष्पगुच्छ आणि 'बंद पाकिटं' देण्यापेक्षा हे कितीतरी चांगले कार्य होईल्.मराठी नाटके, सिनेमा, काव्यवाचन आदी कार्यक्रम पाहून त्यावर घरात/मित्रांमध्ये चर्चा करावी. बाहेर भेटणार्‍या प्रत्येक अनोळखी माणसाशी प्रथम मुद्दाम मराठीतून बोलावे. त्याला समजले नाही तर (आणि तरच) हिन्दी/इंग्रजी भाषेत बोलावे. मी मराठीला कमी लेखत नाही पण इंग्रजी माध्यमातून शिक्षणाचे समर्थन करतो. मी आणि माझी पत्नी आम्ही मराठी माध्यमतून शिकलो आहोत. आमचा मुलगा इंग्रजी माध्यमातून शिकला आहे. पण त्याला आम्ही नुसते मराठी शब्द आणि वाक्य शिकवत नाही तर 'मराठी भाषा' शिकविण्याचा प्रयत्न करतो. भाषेचे सौंदर्य समजाऊन देतो. साहित्याचे रसग्रहण शिकविण्याचा प्रयत्न करतो. मराठी भाषेची कठोरता, कोमलता आणि लवचिकता शिकविण्याचा प्रयत्न करतो. असो. बर्गर्/पिझ्झा खाल्ला म्हणून झणझणीत मिसळ-पाव विसरत नाही.

गणा मास्तर Sat, 05/24/2008 - 06:43
पेठकर काका आपले भाषेच्या जतनाबाबतचे विचार पटले. ईंग्रजी काळाची गरज आहे हेही खरेच. पण त्यासाठी ईंग्रजी माध्यम हाच एक पर्याय आहे असे नव्हे. मराठी माध्यमांच्या शाळांत ईग्रजी संवाद कौशल्य शिकवले तर ईंग्रजी सहज बोलता येईल. भाषा धेडगुजरी बोलली जाउ नये हेही खरे पंण ते होताना दिसत नाही. सगळेच पालक आपल्यासारखे सुजाण नसतात. तसे असते तर किती बरे झाले असते. ईंग्रजी माध्यमातली मुले जास्त धेडगुजरी बोलतात. बाजरतुन पायनापल आणले . मी मिल्क पिले आम्ही अंदमान आयलंडला गेलो होतो. ही काही प्रातिनिधिक उदाहरणे. वारांची नावे ,भाज्यांची नावे ही बर्याचदा ईंग्रजीत घेतली जातात. माझ्या एका मित्राला तर "महासागर" हा शब्दच माहीत नव्हता. म्हणुन मराठीतुन शिकु आणि भाषा म्हणुन ईम्ग्रजी व्यवस्थित शिकावी असे वाटते. धंनजय प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. लोकांना स्वतःचे "सफल" उदाहरण गाठीशी असून सुद्धा आजूबाजूला इंग्रजी माध्यमातली "सफल" उदाहरणे जास्त दिसतात का? हाच प्रश्न मलाही पडलाय. आणि खरेतर माझ्या आजुबाजुला इंग्रजी माध्यमातली "असफल" उदाहरणेही आहेत बरीच ज्यांना धड ईंग्रजीही येत नाही आणि मराठीही. माणुस स्वतच्या हुशारीवर पुढे जातो हेच खरे. जी मंडळी आपल्या मुलांना परदेशात राहुनही मराठी शिकवत आहेत त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे.

In reply to by गणा मास्तर

प्रभाकर पेठकर Sun, 05/25/2008 - 23:46
ईंग्रजी माध्यमातली मुले जास्त धेडगुजरी बोलतात. मला असे वाटत नाही. इंग्रजी माध्यमात शिकलेल्या कितीतरी मुला-मुलींना मी चांगले (उत्कृष्ट नाही) मराठी बोलताना पाहिले आहे. इंग्रजी माध्यमातून शिकल्यावर मराठी मुद्दामहून आत्मसात करावे लागते. त्या साठी त्यांना काही अवकाश द्या. मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी कॉलेजात जाऊन फाडफाड इंग्रजी बोलतो का? त्याला फाडफाड इंग्रजी येण्यासाठी कॉलेज नंतरही खूप काळ जावा लागतो. तो शिकतो आणि बोलतोही. तसेच इंग्रजी माध्यमातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचे आहे. त्यांना मराठी शिकायला थोडा अवकाश हा लागणारच. आपण (मराठी माध्यमवाले) इंग्रजी बोलायला मुद्दामहून शिकतो. कारण ऑफिसात, बाहेरच्या जगात, व्यवहारात त्याची आपल्याला पदोपदी गरज भासते. पण, मराठीचे तसे होत नाही. मराठी येत नसेल तरी ऑफिसात, बाहेरच्या जगात, व्यवहारात आपले विशेष काही अडत नाही. त्यामुळे इंग्रजी माध्यमवाले मराठी शिकतात, ती आपली मातृभाषा आहे म्हणून. कदाचीत भाषेवर प्रेम आहे म्हणून. पण विशेष काही अडत नसल्यामुळे मराठी भाषा शिकण्याची गती बरीच मंद असते. असो. बाजरतुन पायनापल आणले . 'पायनॅपल' इंग्रजी शब्द आहे तर, 'अननस' अरबी (की इराणी?) शब्द आहे. अरबी आणि इराणी दोन्ही भाषात 'अननस' शब्द आहे. मग, शुद्ध मराठी शब्द काय आहे? आपण सॉरी, थँक्यू, रेल्वे, स्टेशन, पँट, शर्ट, बूट, शूज, सॉक्स, पँट-पिस, शर्ट-पिस्, मटन, फिश करी, ऑम्लेट, सिग्नल, ट्रॅफिक, पोलीस, कोर्ट, जज्, कार, बाईक, स्कूटर असे अनेक शब्द वापरतो. मग एखाद्याने पायनॅपल शब्द वापरला तर त्यालाच फक्त 'चूक' असे का म्हणावे? मी मिल्क पिले वरील मुद्दा इथेही लागू होतो. पण अजूनही 'दूध' 'कॉमन वर्ड' असल्यामुळे जरा विचित्र वाटते. पण मला तर 'पिले' हा शब्दही चुकीचा वाटतो. तो 'प्यायले' असा असावा असे वाटते. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

गणा मास्तर Mon, 05/26/2008 - 06:01
बाजरतुन पायनापल आणले कदाचित अननस आपल्याकडे अरबस्थानातुन किंवा इराणमधुन आले असावे, म्हणुन त्याला अननस म्हनत असावेत असा अंदाज आहे. मग एखाद्याने पायनॅपल शब्द वापरला तर त्यालाच फक्त 'चूक' असे का म्हणावे? ही चुक नाही असे म्हटले तर भाषा धेडगुजरी बनत नाही का? दोन्ही भाषांच्या शुद्धतेचा आग्रह धरावा. धेडगुजरी भाषा बोलून दोन्ही भाषांवर अन्याय करू नये. हे तुमचेच मत ना? आपण सॉरी, थँक्यू, रेल्वे, स्टेशन, पँट, शर्ट, बूट, शूज, सॉक्स, पँट-पिस, शर्ट-पिस्, मटन, फिश करी, ऑम्लेट, सिग्नल, ट्रॅफिक, पोलीस, कोर्ट, जज्, कार, बाईक, स्कूटर असे अनेक शब्द वापरतो. हे मराठीत रुळलेले शब्द आहेत. त्यासाठी कठीण मराठी प्रतिशब्द वापरणे चुकिचे वाटते. पण मला तर 'पिले' हा शब्दही चुकीचा वाटतो. तो 'प्यायले' असा असावा असे वाटते बोली भाषेत `पिले` पन बरोबर आहे असे वाटते. इंग्रजी माध्यमवाले मराठी शिकतात, ती आपली मातृभाषा आहे म्हणून. कदाचीत भाषेवर प्रेम आहे म्हणून. पण विशेष काही अडत नसल्यामुळे मराठी भाषा शिकण्याची गती बरीच मंद असते काका फार कमी लोकांचे प्रेम असते हो मायबोलीवर. .... ह्या सगळ्या मुद्द्यात "मराठी शाळांमध्ये शिकुन ईग्रजी संवाद कौशल्य विकसित करता येणार नाही का" हा मुद्दा दुर्लक्षित रहातोय असे वाटते.

In reply to by गणा मास्तर

प्रभाकर पेठकर Mon, 05/26/2008 - 15:08
दोन्ही भाषांच्या शुद्धतेचा आग्रह धरावा. धेडगुजरी भाषा बोलून दोन्ही भाषांवर अन्याय करू नये. हे तुमचेच मत ना? होय माझेच मत. पण शुद्धतेच्या हव्यासापायी बोली भाषा बोजड (अग्नीरथ आवक्-जावक सुचक पट्टी सारखे) करू नये असेही माझे मत आहे. इंग्रजांची शर्ट-पँट आपण स्विकारली आहेच त्यामुळे छोट्या गोष्टींचा बाऊ करू नये. असे मला म्हणायचे आहे. 'अननसा' ऐवजी कोणी 'पायनॅपल' म्हणाले म्हणून लगेच भुवया उंचावू नये. असे मी म्हणतो. पण त्याच बरोबर 'बघ नं आई! हा सारखा सारखा चेअर वरून खाली जंपतो' असे संवाद अंगवळणी पडू नयेत. हा एका लहान मुलीचा संवाद होता. तसेच, 'तुमच्या घरी यायचे म्हणजे चार जिने चढावे लागतात. फार श्रम्स् पडतात' हे एका कॉलेजकन्यकेचे वाक्यही चुकीचे आहे. बोली भाषेत `पिले` पन बरोबर आहे असे वाटते. बोली भाषेतही 'पिले' आणि 'पन' हे चूकिचेच आहे, असे माझे मत आहे.

वेलदोडा Sat, 05/24/2008 - 23:32
पेठकर काका, अगदी मुद्देसूद तुम्ही तुमचे विचार मांडले आहेत. इंग्रजी शाळांबद्द्ल पूर्वग्रह असणार्‍यांना तुमचे विचार वाचून इंग्रजी भाषेचे महत्व समजायला हरकत नाही. धन्यवाद त्या बद्द्ल. शेवटी अनिकेत केदारी यांनी पण हे मान्य केले की इंग्रजी काळाची गरज आहे . >>बाजरतुन पायनापल आणले . मी मिल्क पिले ...असे बोलणारे काही असू शकतील. पण इंग्रजी शाळेत शिकणार्‍या सर्वाना हे सरसकट लागू होत नाही. घरात वा मराठी वर्तूळात व्यवस्थित मराठी आणि जिथे इंग्रजी बोलण्याची गरज आहे तिथे व्यवस्थित इंग्रजी बोलणारे माझ्या बघण्यात भरपूर जण आहेत. मराठी माध्यमांच्या शाळांत ईग्रजी संवाद कौशल्य शिकवले तर ईंग्रजी सहज बोलता येईल. हेच मी माझ्या आधीच्या प्रतिक्रिये मध्ये लिहीलेले आहे. पण असे होताना दिसते काय? सध्या तरी उत्तर नाही असेच आहे. मराठी शाळेत इंग्रजी मराठी मधुन शिकवतात. संवाद कौशल्य शिकवण्यावर तर अजिबातच भर नसतो. >>मराठी शाळांमध्ये शिकवत नाहीत अशी जे खोटी बॉम्ब मारतात, त्याना त्यांच्या मूलाना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवायचं असतं... कारण तो त्यांच्या 'स्टेटस' चा सवाल असतो... इथे सवाल स्टेटस चा नाहीचये. हा मुद्दा चुकी चा आहे. काळाची गरज आणि म्हणून ज्ञानभाषा आत्मसात करणे ही कारणे या मागे आहेत. तहान लागल्यावर विही र खणण्यात काही अर्थ नाही. शालेय शिक्षण संपल्यावर इन्ग्लीश येण्यासाठी मराठी माध्यमातील मुलांना जादा परिश्रम घ्यावे लागतात. हल्लीच्या गतिमान जीवनात प्रत्येकाकडेच वेळ असेल असे नाही. शिवाय प्रत्येक मूल हे हुशार असेलच असे नाही. काहींना हे जमले म्हणजे सरसकट सर्वांना जमेलच असे नाही. पण लहान वयातच ईन्ग्लिश सम्वाद्कौशल्य व्यवस्थित शिकले तर मोठेपणी त्याचा जास्तीत जास्त फायदाच होणार आहे. >>मराठी माध्यमांच्या शाळांत ईग्रजी संवाद कौशल्य शिकवले तर ईंग्रजी सहज बोलता येईल. ह्यासाठी स्वतः अनिकेत केदारी काय प्रयत्न करणार आहेत?

In reply to by वेलदोडा

गणा मास्तर Sun, 05/25/2008 - 14:24
माझा असा विचार चालु आहे की आपण जवळ्च्या मराठी शाळांमध्ये जाउन ईग्रजी संवाद कौशल्य शिकवण्याबाबत विनंती करावी. आणि सक्रीय सहाय्य करावे. जसे की स्वत: जाऊन शिकवणे वगैरे. तुमच्या काही कल्पना असतील तर जरूर सांगा. शेवटी या चर्चेतुन आपल्या मायबोलीला जिवंत ठेवण्यासाठी मार्ग शोधले पहिजेत. स्टेटसचा मुद्दा मात्र चुकिचा नाही. भाईंनी लिहिल्याप्रमाणे "भारतात इंग्लिश माध्यम हे प्रतिष्ठेचे लक्षण म्हणून पाहीले जाते, अंगभूत गुणांमुळे नाही". ईग्रजी संवाद कौशल्याच्या मुद्द्यशी तुम्ही सहमत आहात हे ऐकुन बरे वाटले. धनंजयनी म्हटल्याप्रमाणे "आपण असफल उदाहरणे बघतो स्वतःचे सफल उदाहरण बघत नाही" जे मराठीतुन शिकले पण मुले मागे पडू नयेत म्हणुन मुलांना ईंग्रजी माध्यमात घालतात. ते लोक असा विचार का करत नाहीत की आपण जसे ईंग्रजी स्वताहुन शिकलो तसे मुलेही शिकतील. मुले ८-१०वीत गेल्यावर ईंग्रजी संवाद कौशल्यासाठी मदत करावी. सोबत थोडा सराव करावा. असे केले तर मराठी शाळा पण टिकतील, मराठीपण टिकेल आणि ईंग्रजीची भितीपण वाटणार नाही.

In reply to by गणा मास्तर

>>माझा असा विचार चालु आहे की आपण जवळ्च्या मराठी शाळांमध्ये जाउन ईग्रजी संवाद कौशल्य शिकवण्याबाबत विनंती करावी. आणि सक्रीय सहाय्य करावे. जसे की स्वत: जाऊन शिकवणे वगैरे. तुमच्या काही कल्पना असतील तर जरूर सांगा हल्लि जवळ जवळ सर्व मराठी शाळांत 'conversational english' हा शाळेतर्फे पण बाहेरिल संस्थेकडुन चालवला जाणारा उपक्रम आहे. यात ४ ग्रेडस असतात. शिक्षणाचा दर्जा ही चांगला आहे. यात सार्वजनिक ठिकाणी -हॉटेल इ. कसे बोलावे, रोजच्या बातम्या हे संवादरुपाने शिकवतात. ( मी अजुन १ ली ग्रेड च अनुभवली आहे). मला तरी ते खुप फायदेशीर वाटले. "मी क्लास मधे टॉक केलं, म्हणुन टिचर ने मला पनिश केलं" -असे 'मराठी" ऐकायचे नसेल , तर तुमच्या सारख्या अनेकांची गरज आहे-हे नक्की.

In reply to by पद्मश्री चित्रे

वेलदोडा Wed, 05/28/2008 - 23:07
हल्लि जवळ जवळ सर्व मराठी शाळांत 'conversational english' हा शाळेतर्फे पण बाहेरिल संस्थेकडुन चालवला जाणारा उपक्रम आहे. एक प्रश्नः जवळ जवळ सर्व मराठी शाळा ? जवळ जवळ म्हणजे किती? ९९% , ९०%, ८०%, ७०%...... आणि पुणे , मुंबई, ठाणे वगैरे ठिकाणच्या मराठी शाळा सोडल्या तर इतर शहरातील , लहान गावातील शाळेचे काय? शिवाय महानगरपालिकेच्या शाळेतही हा उपक्रम चालवला जातो काय?

In reply to by वेलदोडा

पद्मश्री चित्रे गुरुवार, 05/29/2008 - 12:11
>>जवळ जवळ सर्व मराठी शाळा ? जवळ जवळ म्हणजे किती? ९९% , ९०%, ८०%, ७०%...... मी शिक्षणतज्ज्ञ नाही, त्यामुळे ही टक्केवारी नाही देवु शकत. काही शाळांत म्हणते हव तर. इतर प्रश्णांच्या बाबत पण हेच. असा उपक्रम आहे, हा उद्देश हे लिहीण्यामगे होता. भितीने मुलांना मराठी शाळेत न घालणार्‍यांसाठी एक माहिती म्हणुन.बाकी, ज्या लोकांना हा विचार च पटत नाही, त्यांना टक्केवारी काही असली तरि काय फरक पडतो?

ऋषिकेश Sun, 05/25/2008 - 13:05
मी अजून अविवाहीत आहे (व मला मुलेही नाहित :) ) त्यामुळे या चर्चेत भाग घेता येणार नाहि. पण विचार केल्यास माझी नोकरी अशी आहे की मी सलग १० वर्षे भारतातच (त्यातही महाराष्ट्रातच) राहिन याची खात्री नाही. जर दिर्घकाळासाठी जर मला परदेशात वास्तव्य करावे लागले तर मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उद्भवेल या प्रमुख कारणासाठी मी बहुतेक माझ्या मुलांना इंग्रजी माध्यमातूनच शिकवेन. परंतु आवड विचाराल तर मी जसा शिकलो तसा सेमी इंग्रजीतून (विज्ञान-गणित इग्रजी व इतर विषय मराठीतून) मुलांना शिकवायला आवडेल -('मिसळ'लेला) ऋषिकेश

अजिंक्य गुरुवार, 05/29/2008 - 13:27
मला वाटतं, सेमी इंग्रजी हा पर्याय बहुधा कोणी विचारात घेतलेला दिसत नाहीये..... जरी पुढील शिक्षण इंग्रजीमधून घ्यायचे असले, तरीही, भाषा म्हणून तरी मराठी शिकणे आवश्यक आहे. आणि ती फक्त गुण मिळवण्यासाठी किंवा एक विषय म्हणून नव्हे, तर मातृभाषा या नात्याने शिकणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे, इतिहास, भूगोल असे विषय देखील मराठीमधून शिकण्यास काहीही हरकत नसावी. तेच जास्त सोयीचे आहे. पण गणित, विज्ञानासारखे विषय - जे पुढे इंग्रजी मधूनच शिकायचे असतात - आधीही त्याच माध्यमातून शिकल्यास पुढील शिक्षण घेताना फायदा होतो.

In reply to by अजिंक्य

पद्मश्री चित्रे गुरुवार, 05/29/2008 - 14:24
मला सेमी-इंग्रजी च म्हणायचे आहे. ५ वी पासुन सेमी-इंग्रजी हा उत्तम पर्याय आहे -असे मला वाटते. अर्थात, यात मुळ माध्यम मराठी च असते.

वेलदोडा Fri, 05/30/2008 - 02:09
मी क्लास मधे टॉक केलं, म्हणुन टिचर ने मला पनिश केलं" -असे 'मराठी" ऐकायचे नसेल तर... मग मी टिव्ही वर सिरीयल पाहत आहे. तुमचा मोबाईल नंबर देता का प्लीज? आज कॉलेज ला काळे मॅडम चे लेक्चर बन्क केले. सिनेमा फारच बोअर होता कार चे टायर पंन्क्चर झाल्याने बस ने आलो. ........ ...... ...... हे कोणते 'मराठी' बॉ ?

मन Fri, 05/30/2008 - 02:22
मी आणि माझी (भावी) बायको अविवाहित आहोत!! अजुन पुत्री-हिरकणी आम्हाला प्राप्त झालेली नाही. त्यामुळे प्रतिक्रिया द्यायला तितकासा समर्थ नाही. तरीही, आमची भावी पिढी मराठी माध्यमातच जाइल असे दिसते. आपलाच, मनोबा

काही सुधाराव्याशा वाटणार्‍या ( प्रसिद्ध) सिनेमांच्या कथा...

भडकमकर मास्तर ·

मन Wed, 05/21/2008 - 03:05
मनातले प्रश्न बोललात. मलाही हेच सारे(आणि इतरही अशेच अनेक) प्रश्न पडलेत. पण आपण अगदी नेमक्या शब्दात बोललात. (आणखी एक उदाहरणः- दि.चा है मध्ये ही प्रीती झिंटा-आमिर प्रकरणाचा एंड असाच आहे. थोडक्यात काय एखाद्याची होणारी बायको पळवल्याशिवाय ह्या हीरो मंडळींना चैन पडेनासं झालय.) आपलाच, मनोबा

In reply to by मन

अन्या दातार Wed, 07/16/2008 - 23:50
दि.चा. है मध्ये प्रिती झिंटा आणि आमीर यांच्यातील प्रेम अव्यक्त आहे. ते दोघे परस्परांना मित्र म्हणूनच भेटत असत. दिदुलेजा मध्ये नायिका(?) प्रेमाचा इजहार वगैरे करुन बसली आहे. दिचाहै मध्ये नायक तिला सर्वात शेवटी प्रेमाचा इजहार करतो. ही बाब लक्षात घ्यायला हवी. आपला, अन्या

In reply to by अन्या दातार

टारझन गुरुवार, 07/17/2008 - 00:20
दिल चाहता है आम्ही थेटरात ३ दा आणि कंप्युटर वर ३५ वेळा पाहीलाय बहुतेक.. ३० नंतर काऊंट सोडलेला.. तो एक अमेझिंग चित्रपट आहे. त्यात कुठेही कसलीही अतिशयोक्ती किंवा अव्यवहारिक वाटलेलं नाही.... आमच्या भावना दुखावता ? ---(यदा कदाचित -२ मधला अफझल्या) कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...

धनंजय Wed, 05/21/2008 - 04:27
एका नात्यातल्या मुलीला मुलाने होकार दिला, आणि साखरपुडा होण्यापूर्वी (हे तरी बरे) आपले खरे प्रेम दुसर्‍या कोणावर आहे, लग्न नको, म्हणून सांगितले. एका काकूंच्या मुलाने साखरपुड्यानंतर लग्न मोडले, आणि "खर्‍या" प्रेयसीशी त्यानंतर कायमसाठी बिनसले म्हणून पुन्हा मोडलेल्या मुलीच्या घरच्यांच्याकडे विचारणा केली!!!! त्यांनी अर्थात अपमानास्पदपणे "चालता हो" म्हटले, हे बरेच केले. पण एक बघायला पाहिजे ना - लग्न म्हणजे एक महत्त्वाच्या वस्तूची खरेदी आहे. एखादी सुंदर आणि महाग मोटारगाडी घेताना, आपल्याला किती आवडली, आई-बाबांना किती आवडली, कसल्या वळणाची आहे, कसल्या रंगाची आहे, हे सगळे गुण बघणे आलेच. सर्व गुण संपन्न असतीलच असे नाही. शिवाय कुठला गुण जास्त महत्त्वाचा वाटतो तेही सकाळ-संध्याकाळ बदलू शकते. म्हणजे मित्रांबरोबर असताना होंडा-सिटीचे गुण जास्त दिसतात, आई-बाबांशी बोलताना ह्युन्डाई ऍक्सेंटचे. मग कधी या डीलरकडे "कार विकत घेतो" असे म्हणणार, कधी त्या डीलरकडे. आधी एकाला "हो" म्हणून मग दुसर्‍यापाशी गाडी विकत घेतली तर पहिल्या डीलरचा पचकाच झाला... त्यामुळे कंत्राटावर सही केल्याशिवाय कार विकली नाही; अक्षता डोक्यावर पडल्याशिवाय वर-वधू खपली नाही. (स्पष्टीकरण : वधू-वर-संयोजन हा एक बाजारही असल्यामुळे त्याचे बाजारशास्त्रीय विश्लेषण केले आहे. तो बाजार थोडाफार अनैतिक आहे, असे माझे मत आहे. खोटे बोलून किंवा अर्धसत्य झुलवत ठेवून कुठल्याही मनुष्याच्या भावनांशी खेळणे मला अनैतिक वाटते.)

In reply to by धनंजय

भडकमकर मास्तर Wed, 05/21/2008 - 09:43
खोटे बोलून किंवा अर्धसत्य झुलवत ठेवून कुठल्याही मनुष्याच्या भावनांशी खेळणे मला अनैतिक वाटते.) एकदम खरे... पण ह्या असल्या कथानकांमुळे उगीचच वेगळाच संदेश जात असेल ( सिनेमा एवढा कोणी सीरियसली घेत नाही, हे खरे आहे.......पण ऊठसूठ " घराने के संस्कार रीतीरिवाज , पिताजीकी भावनाएं " याची चाड पोरीला फार आहे असे दाखवायचे पण त्याच वेळी एका संपूर्ण कुटुंबाला फसवत राहायचे , ते सुद्धा काही तास किंवा एखादा दुसरा दिवस ( हा की तो , हा निर्णय न होण्याच्या काळात , समजा मुलगा बघताना वगैरे...)नव्हे तर महिनाभर आणि त्यांच्या नकळत केलेल्या प्रेमचेष्टांचे उदात्तीकरण करायचे ...... हा तद्दन भंपकपणा आहे)... बरं ही नैतिकतेच्या मार्गावरून अल्पकाळासाठी का होईना पाय घसरलेल्या एका मुलीची गोष्ट असती तर एक वेळ ठीक होते, पण अर्थातच तसले काही दाखवायचे नाहीये ... ( आणि तिला तिच्या चुकांची जाणीव होते आणि ती त्या मुलाला सॉरी म्हणते, इतपत तरी काहीतरी घडायला हवे होते) कॉलेजात असतानाही ग्रुप मधल्या काही मुलींशी मी बोललो तेव्हा त्यांना त्या हीरॉईनची काही चूक आहे असे वाट्लेच नाही, "प्रेमासाठी तिने केवढे रिस्क घेतले "अशा अर्थाचे बर्‍याचशा मुलींचे मत पडले....... कमाल आहे च्यायला.. अरे रिस्कच घ्यायचे तर बापाचा आणि कुटुंबाचा राग पत्कर, त्यांना समजावायचा प्रयत्न कर आणि ते होत नसेल तर घर सोडून जा आणि स्वतःच्या हिमेतीवर स्वतःचे घर उभार... ही खरी रिस्क ..... तुझे कौटुंबिक संबंध नीट रहावेत म्हणून लोकांना कसा काय मनस्ताप देऊ शकता ? आणि पुन्हा आमची ही नेहमीची चिडचिड की बर्‍याच मंडळींना विशेषतः महिलावर्गाला हे जाणवतच नाही...... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मदनबाण Wed, 05/21/2008 - 06:09
खोटारडा असला तरी पैसेवाला एकुलता एक लंडनचा आहे... आता सोडावं झालं पोरीला...".... :D हा मोकॅम्बो आतल्या आत फारच खुष झाला असणार बघा..... (मिस्टर इंडिया चा पंखा) मदनबाण.....

फटू Wed, 05/21/2008 - 07:10
पण कधी कधी असंही होतं... म्हणजे ती पुण्याला बी ए एम एस ला होती... वैद्यकी शिकता शिकता आपल्या एका वर्गमीत्राच्या प्रेमात पडली... बी ए एम एस संपलं... दोघांनीही लग्न करायचं ठरवलं... तो तिचा भावी नवरा म्हणून तिच्या घरी येऊन गेला... आणि तिला परदेशस्थ डॉक्‍टर मुलाचं स्थळ सांगून आलं... झालं त्या मुलीने आपल्या प्रियकराचा पत्ता काटला अन् त्या परदेशस्थ डॉक्‍टर मुलाशी लग्न केलं... आता बोला... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

विसोबा खेचर Wed, 05/21/2008 - 08:53
याला आधीच चांगला पिटून काढला बरे झाले....ही ही पोरगी पण एक नंबरची अडाणी...आमच्या या मूर्ख पोरीने इतके गुण उधळले आहेत की सगळ्या गावात आता बदनामी झाली आहे.... कोण बोंबलायला आता हिच्याशी लग्न करणार आहे देव जाणे... आणि हा भडवा तर बापाबरोबर चालला...ह्याच्यायला ह्याच्या... हा कसला जातोय? हा थांबणार... थांबायलाच पाहिजे यानं... अरे महिनाभर बोंबलत इथे रंगढंग केलेस ना आमच्या नकळत ? तुला भाड्या आता जबाबदारी नको घ्यायला ? खुशाल हिला अशीच टाकून जातोस ? काय की... अरे गाडी सुटली की रे...उतर रे उतर...चाललाच वाटतं...जरासा वेडझवाच दिसतो हा ... हं.... किंवा भलताच पोचलेला आहे ... साल्याला माझी गोची कळलीय वाटतं... खरंतर असल्या मूर्ख, नालायक, वेंधळ्या आणि फ़सवणूक करणार्या या माणसाची अजिबात लायकी नाही...पण आता आपल्या मूर्ख आणि बदनाम पोरीला तरी कोण मिळणार याच्यापेक्षा बरा?? खोटारडा असला तरी पैसेवाला एकुलता एक लंडनचा आहे... आता सोडावं झालं पोरीला...".... जा बाई जा... हा हा हा! आमरसपुरीचे हे स्वागत क्लासच आहे! मुलीचा हात सोडण्यापूर्वी क्षणभर त्याचा चेहरा दाखवला आहे त्यावर मास्तर म्हणतात तेच स्वगताचे भाव अगदी नेमके दिसतात! :) मास्तर, अजूनही शिणेमे येऊ द्यात... आपला, (काजोलप्रेमी) तात्या देवगण.

भडकमकर मास्तर Wed, 05/21/2008 - 09:46
मुलीचा हात सोडण्यापूर्वी क्षणभर त्याचा चेहरा दाखवला आहे त्यावर मास्तर म्हणतात तेच स्वगताचे भाव अगदी नेमके दिसतात धन्यवाद तात्या.... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भडकमकर मास्तर Wed, 05/21/2008 - 10:13
आमची अजून दोन निरीक्षणे आहेत... १. कुकुहोहै, जप्याकिहोहै, दिचाहै,दितोपाहै या सर्व सिनेमांमध्ये थोड्याफार फरकाने "दुसर्‍याच्या लग्नात जाऊन आपली प्रेयसी पळवून आणणे " हा कार्यक्रम दिसतो परंतु सर्वात जास्त त्रास देणारा चित्रपट मला दिदुलेजाच वाटतो... असं का बरं होत असावं? २. वर उल्लेखिलेल्या सर्व सिनेमांमध्ये कथा अशाच बांधलेल्या दिसतात की हीरॉईनचं नक्की ठरत नाहीये आणि ती ऐन वेळी एका दुसर्‍याच ( म्हणजे आधीच्याच प्रियकर ) माणसाबरोबर लग्न करते... हेच पुरुषाने केले तर त्याला इतकी सहानुभूती कोणी देईल का ?... मग तो बरोबर व्हिलन ठरेल...मला आत्ता या क्षणी तरी असे सिनेमे आठवत नाहीयेत की ज्यात ( १.पुरुष ऐन वेळी लग्नाला नकार देतो आणि पळून जातो + २. त्याचे त्याच वेळी उदात्तीकरणही केले जाते...) .... असो... याचे स्त्रीमुक्तीवादी उत्तर हे असणार की १. पुरुषांवर लग्नासाठी कुटुंबाचे इतके प्रेशर नसते, त्यामुळे त्याला सहानुभूती कशाला कोण द्यायला बसलंय ? तो वाईटच.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मन Wed, 05/21/2008 - 13:57
हेच पुरुषाने केले तर त्याला इतकी सहानुभूती कोणी देईल का ?... मग तो बरोबर व्हिलन ठरेल... जबरान... :-) आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

In reply to by भडकमकर मास्तर

धनंजय Wed, 05/21/2008 - 21:53
( १.पुरुष ऐन वेळी लग्नाला नकार देतो आणि पळून जातो + २. त्याचे त्याच वेळी उदात्तीकरणही केले जाते...) अगदी नेमके असे केलेला म्हणजे नारायण ठोसर हा मुलगा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. (पण तो दुसर्‍या कुठल्या मुलीबरोबर लग्न करत नाही. हा लहान मुलगा विश्वाची चिंता करण्याइतका मनाने प्रौढ होता, पण आईवडलांच्या आग्रहाखातर बोहोल्यावर चढलाच.) आणखीनही उदाहरणे असावीत. दुसरे लग्न करणारा कुठलाही वीरपुरुष पहिल्या बायकोच्या जीवनाचे काही प्रमाणात मातेरे करतो असो मानता येईल. (हे मातेरे लग्नाआधी नसून लग्नानंतर असते, पण अधिक वाईट कुठले, ते सांगता येत नाही.) अशा वीरांचे, 'राज्याला वारस पुरवण्यासाठी कर्तव्य करणारा' म्हणून उदात्तीकरण होते. वरील दोन्ही उदाहरणे ऐतिहासिक आहेत, पण त्या उदाहरणांचे उदात्तीकरण मात्र आधुनिक आहे. (सगळ्या टीव्ही मालिका मला एकसारख्या वाटतात - पण अशी एक साचेबद्ध कथा बरेचदा दिसते ना? श्रीमंत उपवर तरुणाशी लग्न करायचा घाट एक पाताळयंत्री सुंदर तरुणी घालते, आणि लग्न पक्के होते. पण लग्नाआधी मुलाला तिचा नीचपणा समजतो. आणि त्याच्यावर प्रेम करणार्‍या सोज्ज्वळ पण सुशील मुलीबरोबर तो लग्न करतो...)

In reply to by धनंजय

संताजी धनाजी Tue, 12/16/2008 - 18:39
अगदी नेमके असे केलेला म्हणजे नारायण ठोसर हा मुलगा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. =)) ह्या मुलाचा आम्ही पंखा आहोत.

साथिया चित्रपटात राणी मुखर्जी च्या वडिलांचा विवेक ओबेरॉय च्या वडिलांकडून अपमान होतो...याबद्दल राणी ला राग येतो पण तो थोड्याच वेळासाठी आणि नंतर चक्क त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न करते. इथपर्यंत सुद्धा ठीक ... पण लग्नानंतर ते आपापल्या घरी राहतात!!! (याला हिंमत म्हणावी की शुद्ध बावळट पणा?) हे कमी की काय म्हणून बघायला आलेल्या पाहुण्यांसमोर सांगून टाकते की मी आधीच लग्न केलं आहे!! (पाहुण्यांसमोर सांगून आई बापाची इज्जत का घालवायची? :( )

वेताळ गुरुवार, 05/22/2008 - 10:12
हे पण अश्याच सिनेमात घडत असते. प्रथम छपरी हिरोशी उदांत प्रेम करायचे. गळ्यात गळे घालुन फिरायचे. चुम्माचाटी करायची. आणि दुसरा मुलगा बघायला येण्याआधी घरी बोंबलायचे,उल्ट्या करायच्या आणि हाच संवाद फेकायचा " मैं मां बननेवाली हुं".पण हेच तिला आधी का कळत नाही.ह्यात पण सगळी सहानुभुती त्या मुलीला. कारण ह्यात तिचा दोष नसतो दोष तिला मां बनवणारयाचा असतो. अजब तर्क. वेताळ

In reply to by वेताळ

विसोबा खेचर गुरुवार, 05/22/2008 - 12:31
गळ्यात गळे घालुन फिरायचे. चुम्माचाटी करायची. वा! मागे केव्हातरी ऐकल्यासारखा वाटतो, 'चुम्माचाटी' हा शब्द क्लासच आहे!..:) आपला, (जुम्म्याला चुम्मा देणारा!) तात्या.

धमाल मुलगा गुरुवार, 05/22/2008 - 12:19
मुलाचा चांगुलपणा, हुशारी, सचोटी , मेहनती वृत्ती , प्रामाणिकपणा वगैरे आवडून बाप प्रभावित झाला नाही तर " माझ्या बदनाम पोरीशी लग्न करायला कोण येणार आता?" या भावनेने नाईलाजाने तो यांच्या लग्नाला तयार झाला असे वाटते... मग हीरोने हिरॊईनच्या आईपुढे मारलेले डायलॊग सगळे गेले ना बाराच्या भावात... मग सिनेमाचा संपूर्ण दुसरा भाग ज्या गोष्टीसाठी बिल्ड अप केला आहे त्याचीच वाट लागली... आणि आम्हाला येडा का बनवले?
हे हे हे....आमचं पण हेच मत झालं होतं :) आणि तो बाप तरी कसा असा एकदम चंबू? शेवटपर्यंत आजिबात कळत नाही त्याला, हा बकरा में में करत आपल्या पोरीच्या लग्नघरात का फिरतोय? बाकी त्याचं स्वगत एकदम झक्कास! येऊ दे अजुन... स्वगतः आमच्या भावी सासर्‍याचं पण हेच स्वगत असावं काय? :?

झकासराव गुरुवार, 05/22/2008 - 19:13
मुलाचा चांगुलपणा, हुशारी, सचोटी , मेहनती वृत्ती , प्रामाणिकपणा व>>>> =)) मास्तर तुम्ही तर त्या दिलवाले ची बिनपाण्याने केलीत की. :) आवडल आपल्याला तुमच मत. मी अजुन देखील हा चित्रपट पाहिलेला नाहिये. फुकटात सुद्धा. आणि हो त्या मंदीराला शाहरुखने फसवलेच की त्याच वाइट नाही का वाटल??? ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by झकासराव

भडकमकर मास्तर Fri, 05/23/2008 - 13:58
आणि हो त्या मंदीराला शाहरुखने फसवलेच की त्याच वाइट नाही का वाटल??? तसं तिच्याबद्दल थोडं वाईट वाटलं... जास्त नाही कारण या पोरानं काही कमिट केलं नव्हतं तिला...( नव्हतं बहुतेक, आता काय नीट आठवेना... की त्यांच्या आई बापाचं काहीसं बोलणं झालं होतं?...??... ) हां..बरोबर ..मग तिचीसुद्धा झालीच की फसवणूक... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by झकासराव

टारझन Tue, 07/15/2008 - 17:56
मी अजुन देखील हा चित्रपट पाहिलेला नाहिये. फुकटात सुद्धा. आणि हो त्या मंदीराला शाहरुखने फसवलेच की त्याच वाइट नाही का वाटल??? खोटं बोलतोस ? चित्रपट पाहीला नाही ? मग रुकरुक आणि बधिरा बद्दल एवढ डिटेल कसं माहीत आ? कस्सा पकडला चोर ? ;) असो.. त्या शाहरूक चे सरसकट सगळेच चित्रपट बावळट असतात... सगळ्यात हाईट म्हणजे .. मोहोब्बते.... आरे काय ? तो बच्चन बिचारा शिस्त लावतो.. अभ्यासाच्या वेळी अभ्यास करा ...आणि हा बहाद्दर पोरांना लफडी करायला शिकवतो ! केवळ बच्चनचा विरोध म्हणून..आणि मग ती अती स्कॉलर पोरं पण लफडी करून डॉक्टर होतात... च्यायला डोक्यात जातो रे तो.... काहीही ... हाणा तद् माताय(विजाभौ प्रसन्न) (रुकरुक चा अँटीफॅन) कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...

राजे गुरुवार, 05/22/2008 - 19:16
मास्तर..... ज्यावेळी हे चित्रपट आले होते खास करुन डीडीएलजे ;) त्यावेळी असे काही वाटत नव्हते .. पण आज पुन्हा त्रयस्थ नजरे ने काही चित्रपट पाहीले की त्या चित्रपटाची मजाच जाते ! उदा. मोहरा त्याकाळी गाजलेला चित्रपट .... मी कमीत कमी ५ वेळा पाहीला होता.... पण आज तो चित्रपट १० मिनिटे पाहणे म्हणजे भयंकर सजा आहे असे वाटत :)) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

"...खुशाल हिला अशीच टाकून जातोस ? काय की... अरे गाडी सुटली की रे...उतर रे उतर...चाललाच वाटतं...जरासा वेडझवाच दिसतो हा ... हं.... किंवा भलताच पोचलेला आहे ... साल्याला माझी गोची कळलीय वाटतं... " अमरिश पुरीचं स्वगत वाचून हसता हसता लोळायची वेळ आली खरोखर. अफलातून. :) असाच मनस्ताप मला 'हम दिल दे चुके सनम' बघताना झाला होता. बाई ग, तुझं प्रेमबिम आहे ना सलमानवर? मग लग्न का करतेस दुसर्‍या माणसाशी? हे मनमानी आईबाप पोरांचं न ऐकता लग्न ठरवतात इथपर्यंत ठीक. पण ही मूर्ख पोरं बोहल्यावर कशी चढतात? तिथल्या तिथे बोंबाबोंब नाही का करता येत? एरवी एवढी येता जाता बापाच्या गळ्यात पडत असतेस ना बये, मग आता थोबाड उघडायला काय धाड भरली? बाप नाही तर नाही ऐकत, त्या बिचार्‍या अजय देवगणला सरळ सांगता येत नाही, की बाबा रे, असं असं आहे... लग्न-बिग्न नको. फुकटच्या फाकट लग्न करून बसला ना तो? बरं, ठीक आहे, लग्न केलं. मग तरी गप बसायचं. तेपण नाही. नंतर सांगायचा धीर आला. आला तर आला. मग जायचं सलमानसोबत. तोतरी सुखी. तेही नाही. एकदम चार रात्रींमधे सलमानवरचं प्रेम उडून अजयवर? कारण काय, तर मंगळसूत्र. अरे काय चाललंय काय? पोरखेळ आहे का? हे मंगळसूत्र आणि लग्नाची गाठ भलतेच पॉवरफुल्ल असतात एवढाच सगळ्या लव्हस्टोरीचा अर्थ. मूर्ख लेकाचे.

In reply to by मेघना भुस्कुटे

धमाल मुलगा Fri, 05/23/2008 - 10:37
जबरान् !!!!! आयला, मीपण असाच वैतागलो होतो 'हम दिल दे चुके सनम' पाहून. एक तो सलमान, काय ते येडं भंजाळल्यासारखं आकाशाकडं बघून जोरजोरात एकटंच गप्पा हाणत असतं, आमच्या गावात आहेत अशी एक-दोन वेडी माणसं :) बरं, मान्य आहे बाबा तू हाडाचा गायक बियक आहेस..म्हणजे ते काय म्हणतात बरं...हां, जन्मजात कलाकार आहेस, अरे पण म्हणून इतकं खुळ्यासारखं वागायचं? कलाकार काय अक्कलशुन्य असतात का? दुसरी ती ऐश्वर्या, तीच्या आयुष्यात नक्की काय प्रॉब्लेम आहे हेच कळत नाही..आपण काय करतोय, काय करायचंय, काय होइल...कश्शा-कश्शाचाच विचार नाही? आज काय म्हणे सलमानवर प्रेम....उद्या काय म्हणे बाबा म्हणतात ह्याच्याशी लग्न करायचं म्हणून एकदम "निंबुडा निंबुडा" करुन नाचत लग्नाला तयार, परवा काय तर त्या अजय देवगणासमोर अचानक पहिल्या प्रेमाचा साक्षात्कार... तो बिचारा शिगारेटी फुंकुन फुंकुन छातीचं खोकडं करुन घेतोय, आणि ही हिंडतीये त्या सलमानला शोधत.... बरं तो भेटल्यावर तरी गप त्याच्याबरोबर सुखानं संसार करावा, तेही नाही...परत अजय देवगणकडे गाडी वळलेली... काय बाई आहे का भिंताड? येऊन जाऊन त्या अजय देवगणनं साकारलेला संयत, समजुतदार, भल्या मनाचा नवरा हेच काय ते दु:खात सुख! आणि "अलबेला सजन आयो..." एएएएएकदम मस्त!!!!!! केवळ त्यासाठी भन्साळ्याचे सगळे गुन्हे माफ !

In reply to by मेघना भुस्कुटे

भडकमकर मास्तर Fri, 05/23/2008 - 13:39
एकाच पात्राच्या किती चुका... १.बाप नाही तर नाही ऐकत, त्या बिचार्‍या अजय देवगणला सरळ सांगता येत नाही, की बाबा रे, असं असं आहे... लग्न-बिग्न नको _ २.बरं, ठीक आहे, लग्न केलं. मग तरी गप बसायचं. तेपण नाही. नंतर नवर्‍याला सांगायचा धीर आला. ३.मग जायचं सलमानसोबत. तोतरी सुखी. तेही नाही. एकदम चार रात्रींमधे सलमानवरचं प्रेम उडून अजयवर? कारण काय, तर मंगळसूत्र पण पहिल्यांदा बघताना जास्त जाणवल्या नाहीत चुका... ऐश्वर्याचं दिसणं, उत्तम संगीत आणि गाणी यात आख्खा सलमान सहन केला...( ऐश्वर्याच्या डीव्हीडी कॅप्चर्सवरून कोलाजेस , वॉलपेपर्स बनवणे हा आमचा त्या काळातला आवडता उद्योग) अजयचं पात्र बेष्ट रंगवलंय... ( मला या सिनेमात एक मर्मभेदक ऍडिशन सुचतेय की अजय देवगण शेवटी ती बोंबलत तिच्याकडे आल्यावर तिला म्हणतो, "...आज आलीस उद्या परत तिसर्‍याकडे जाशील... तुझ्या आवडत्या खेळापायी मला का त्रास सारखा? या टायमाला युरोप दर्शन झालं, पुन्हा म्हणशील आता ऑस्ट्रेलियात फिरूयात...अशी मानसिकदृष्ट्या अस्थिर चंचल स्वभावाची बायको मला नको .. चल हो बाहेर..." ... मग अगदी काव्यात्म न्याय मिळाल्यासारखं झालं असतं... :)) :)) _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

विसोबा खेचर Fri, 05/23/2008 - 13:42
"...आज आलीस उद्या परत तिसर्‍याकडे जाशील... तुझ्या आवडत्या खेळापायी मला का त्रास सारखा? या टायमाला युरोप दर्शन झालं, पुन्हा म्हणशील आता ऑस्ट्रेलियात फिरूयात...अशी मानसिकदृष्ट्या अस्थिर चंचल स्वभावाची बायको मला नको .. चल हो बाहेर..." =)) हा हा हा मास्तर, तुमची मर्मभेदक ऍडिशन लै भारी आहे! :))

In reply to by विसोबा खेचर

मन Fri, 05/23/2008 - 16:55
मला सुचली ती अशी... समजा हा पिकचर करण जोहर ह्या प्रेमाच्या घाउक विक्रेत्याला दिला असता, तर त्याने:- येक शाहरुख वाढवला असता.जो, मुळात नाराज अजयचे मन वळवुन त्या सटवीला सलमानच्या दारात सोडुन ये म्हणतो. आता,शाहरुख ने य्व्हढे उप्कार केलेच आहेत म्हणल्यावर त्याची "परतफेड" कशी करावी या विवंचनेत असलेली ती येडझवी नायिका त्याच्याही प्रेमात पडली असती! मग झाला असता साक्षात्कारः- शाहरुख तर आधिच त्याची "मैत्रिण" काजोल(किंवा राणी) ह्यांच्या प्रेमात आहे. मग त्याला खुश कसे करणार्?त्या काजोलच्या गळ्यात मारुन! पण काजोल सलमानच्या प्रेमात आणी सलमान ऐश्वर्याच्या विरहात व्याकुळ का काय म्हणतात ते झाला आहे. मग? करणार कसं? हे त्या येड्यालाही कळलं नसतं आणि तो जे दाखवेल, ते प्रेक्षकांनाही कळलं नसतं! ज्याने जो अर्थ घ्यायचाय , तो घेतला असता! (हाच चित्रपट दीपा मेहता(फायर, अर्थ्,वॉटर वाली) हीनं घेतला असता, तर शेवट दाखवला असता की, त्या भामट्या ऍश ला अद्दल घडवण्यासाठी सलमान्-अजय लग्न करतात क्यानडात जाउन! आणि मस्त ऍवार्डस वगैरे मारले असते ह्या बाईनं.म्हंजे ते दोघही खुश, ऍश ला अद्दल घडली ती वेगळीच. सगळाच कसा सुखांत!) आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

In reply to by मन

भडकमकर मास्तर Fri, 05/23/2008 - 17:14
(हाच चित्रपट दीपा मेहता हीनं घेतला असता, तर शेवट दाखवला असता की, त्या भामट्या ऍश ला अद्दल घडवण्यासाठी सलमान्-अजय लग्न करतात क्यानडात जाउन! हहाहा... हे फारच आवडले... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by मन

झकासराव Fri, 05/23/2008 - 19:32
हाच चित्रपट दीपा मेहता(फायर, अर्थ्,वॉटर वाली) हीनं घेतला असता, तर शेवट दाखवला असता की, त्या भामट्या ऍश ला अद्दल घडवण्यासाठी सलमान्-अजय लग्न करतात क्यानडात जाउन! आणि मस्त ऍवार्डस वगैरे मारले असते ह्या बाईनं.म्हंजे ते दोघही खुश, ऍश ला अद्दल घडली ती वेगळीच. सगळाच कसा सुखांत =)) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

चावटमेला Fri, 05/23/2008 - 14:12
मस्तच मास्तर, लै भारी.. ह्या सीन मध्ये अमरिश पुरी प्रमाणेच मंदीराच्या मनात खालील विचार चालले असतील "अगं सटवे, अशी डाव खेळलीस काय ?इकडे माझ्या भावाला नादी लावलेस आणि तिकडे ह्याच्याबरोबर गुलछर्रे उडवित होतीस काय्?इथे हे आम्हाला समजले म्हणून बरे, नाहीतर, तिकडे त्या इंग्लंडात अजून काय धंदे केले असतील देवच जाणे??? आणि हा मुडदा सुध्दा काय निर्लज्ज आहे. एवढा मरेपर्यंत मार खावून सुद्धा कसा उजळमाथ्याने चालला आहे.बरं झालं , चांगलंच बदडलं ह्याला, मी तर म्हणते छान चेचून काढायला हवं होतं. मीच कपाळकरन्टी म्हणून ह्या नरसाळ्यावर भाळले होते.वेळीच समजलं म्हणून बरे, नाहीतर, मै मा बननेवालि हू म्हणायची वेळसुद्धा आणली असती ह्याने माझ्यावर, ह्या बाजारबसवीसाठी हा नरसाळाच ठीक आहे, जा आता आणि बसा गळ्यात गळे घालून( आणि मी जाते क्रिकेट कॉमेन्ट्री करायला गळा उघडा टाकून ;) )"

In reply to by चावटमेला

धमाल मुलगा Fri, 05/23/2008 - 14:17
सटवी काय, नरसाळा काय, मुडदा काय.... अगाबाबो..... त्यांच्यापैकी कोणी हे वाचलं तर झीट येऊन पडतील की :)
मै मा बननेवालि हू म्हणायची वेळसुद्धा आणली असती ह्याने माझ्यावर, ह्या बाजारबसवीसाठी हा नरसाळाच ठीक आहे, जा आता आणि बसा गळ्यात गळे घालून
:))
( आणि मी जाते क्रिकेट कॉमेन्ट्री करायला गळा उघडा टाकून Wink )"
=)) =)) =)) स्वगताचा शेवट मात्र एकदम वास्तवदर्शी आहे हो चावटशेठ ;)

निरंजन मालशे Fri, 05/23/2008 - 17:03
अरे सकळ्या त्रिकोणी लव्हस्टोर्या अशाच असतात. मला आजही कळलेल नाही की सलमान अस काय सांगतो म्हणून दोन सीन पुर्वी दोन्ही नायकांच्या नावाने शिमगा करणारी माधुरी संजय दत्तशी लग्न करायला तयार होते.

शितल Sat, 05/24/2008 - 03:40
मास्तरा॑नी डीडीएलजी ची केलेली शाळा आणि त्या वरच्या सर्वच प्रतिक्रिया ह्या अफलातुन आहेत. चावटमेला साहेबा॑नी तर हातच॑ काहीच राखुन लिहिले नाही आहे. त्यामुळे हि॑दी पिक्कचर आणि त्यात ते करण जोहर असेल पैसे घालुन बघणे म्हणजे, आ बैल मुझे मार हा प्रकार. प्रेमाच्या भानगडी शिवाय हे हि॑दी पिक्कचर निर्माते पिक्कचर बनवु शकत नाहीत का ?

मनिष Tue, 05/27/2008 - 17:50
कदाचित संजय लीला भंसाळी नीट दाखवू/पट्वू शकला नसेल पण सिनेमात 'प्रेम करणे' आणि 'प्रेम निभावणे' यातला फरक ऐश्वर्याला (नंदिनीला) लग्नानंतर जाणवतो - सलमान (समीर) हा वेगळ्या वातावरणात वाढलेला, अवखळ, मजेशीर पुरुष - नंदिनी त्याच्या प्रेमात पडते आणि अजय देवगण (नाव काय त्याचे सिनेमात) फक्त तिच्या प्रेमाखातर आणि तिच्या इच्छेखातर तिला सलमानकडे घेऊन जातो. त्यात तिला जाणवणारा त्याचा दुहेरी पराभव ('इस मे दोनो तरफ हार मेरीही आहे') -- नवर्‍याबरोबर राहिली तर तिच्या मानाविरुद्ध रहाते आणि झुरते म्हणून तर सलमान (तिचे प्रेम) कडे नेले तर ती त्याच्याबरोबर जाणार म्हणून. असे असूनही तिला खरच तो भेटावा म्हणून अजय चा सच्चा प्रयत्न. त्या प्रवासात, प्रयासात त्यांच्यात तिला जाणवणारा 'प्रेमात पडणे'/आकर्षण (infatuation) आणि प्रेम निभावणे/खरे प्रेम (love) ह्यातला फरक -- त्याच्यात निर्माण होणारे नाजूक बंध हे सगळे जर नैसर्गिकपणे उलगडत/उमगत गेले तर मला वाटते हे इतके विचित्र वाटत नाही. भंसाळी चा प्रयत्न खूपच चांगला वाटला. तो जर कुठे फसला/अपयशी ठरला असेल तर तो माझ्या मते असा - (१) सलमान चा अतिशय पोरकट अभिनय (त्यात नवीन काय म्हणा?) -- ते वडिलांशी बोलण्याविषयी - भंसाळी म्हणे बोलायचा असा कल्पनेत त्याच्या वडिलांशी (तसे बरेच जण बोलतात कल्पनेत त्यांच्या प्रिय व्यक्तीशी/support system, त्या व्यक्तीच्या निधनानंतर) -- आणि एक दिवस सलमान्ने फोने करून त्याला विचारले कि असे करूया का? भंसाळी भारावला आणि त्याला वाटले की सलमान खूपच जोडला गेला आहे त्या स्क्रिप्टशी - हे भंसाळीनेच एका मुलाखातीत सांगितलेले आठवते. अर्थात चांगल्या कल्पनेची प्रत्यक्षात माती करावी तर सलमाननेच....ते प्रत्यक्षात इंटेन्स वाटण्याऐवजी विनोदीच वाटले. (२) अजय आणि ऐश्वर्याचे नाते फुलतांना अजून छान दाखवायला हवे होते - तिला होणारी प्रेमाची जाणीव, तिचे अजयमधे गुंतणे हे जरा प्रभावीपणे यायला हवे होते. त्या मनाने तिला जाणवणारे अजयचे प्रेम जाणवते. पण जेवढ्या तीव्रतेने तिचे समीरमधे गुंतणे, त्याच्या विरहात व्याकुळ होणे येते - तेवढ्या प्रभावीपणे अजयचे आणि तिचे नाते दिसत नाही. तसेच अपेक्षित शेवटाकडे जातांना भंसाळीने ऐश्वर्याच्या व्याकुळतेची तीव्रता कमी होतांना दाखवायला हवी होती - 'अरे खरच काय मी कशाच्या शोधात आहे, मला वाटलेल्या प्रेमाच्या मृगजळाच्या की माझा नवरा जे जीवापाड प्रेम करतो आहे ते खरे आहे?' हे नाही तितक्या प्रभावीपणे जाणवू शकले. (३) अजय आणि सलमानची भेट ही अतिशय वाईट कल्पना - अजयला वाटणारी असूया हि एक स्वाभाविक प्रतिक्रिया होती - ती तशीच राहू द्यायला हवी होती. त्यांना 'फिल्मी योगायोगाने' मित्र बनवण्याची काहिच गरज नव्हती. मला वाटते, भंसाळी काही सीनच्या, गाण्याच्या आणि visualizations च्या प्रेमात पडला नसता (उदा.ढोली तारो ढोल बाजे) तर स्क्रीप्टला न्याय मिळाला असता. जितक्या प्रभावीपणे सलमान-ऐश्वर्याचे नाते येते तितक्या प्रभावीपणे अजय-ऐश्वर्याचे जुळणारे नाते येत नाही. हा भंसाळीचा पराभव. मंगळसुत्र हे commitment किंवा 'प्रेम निभावणे' (love is a verb, not noun) या सहज प्रतिकात्मक अर्थाने न येता पारंपारिक, फिल्मी पद्धतीने 'Cliché' होऊन येते. पण तरीही मला एकूण सिनेमा इतका विचित्र/विनोदी वाटला नाही. 'वो सात दिन' हाही असाच एक सिनेमा - त्यातही बरीचशी अशीच ट्रिटमेंट जाणवली. बाकी - धमु ने म्हटल्याप्रमाणे 'अलबेला सजन आयो रे...' साठी हजार चुका माफ! खर तर ह्यातली सगळीच गाणी अप्रतीम आहेत - दरबारीतला 'अलबेला सजन..' आणि 'तडप तडप के....' वर जीव ओवाळून टाकावासा वाटतो. असो! फारच सविस्तर झाले.... - (फिल्मी) मनिष अवांतर - नुकत्याच आलेल्या 'यू, मी और हम' मधेही हिच love is a verb, not noun कल्पना होती पण त्याचा साग्रसंगीत बट्ट्याबोळ केला आहे! :) कदाचित आपल्या 'प्यार किया नही जाता, हो जाता है" फिल्मवाल्यांना हि कल्पना माहित असेल पण अजून नीट उमजलीच नसेल.

In reply to by मनिष

धमाल मुलगा Tue, 05/27/2008 - 18:18
मनिष, छान सांगितलस :) माझ्यासारखं टोकाची भुमिका न घेता सांगोपांग विचार करुन सौम्य शब्दात योग्य भावना पोहोचवल्यास. अभिनंदन !
जितक्या प्रभावीपणे सलमान-ऐश्वर्याचे नाते येते तितक्या प्रभावीपणे अजय-ऐश्वर्याचे जुळणारे नाते येत नाही. हा भंसाळीचा पराभव.
+++१
तसेच अपेक्षित शेवटाकडे जातांना भंसाळीने ऐश्वर्याच्या व्याकुळतेची तीव्रता कमी होतांना दाखवायला हवी होती
सही रे भिडू!

In reply to by मनिष

भडकमकर मास्तर Wed, 05/28/2008 - 14:13
फारच छान मनीष.. हम दिल दे चुके सनमचे अप्रतिम विश्लेषण....तुझे तीनही मुद्दे एकदम पटले... वो सात दिन सुद्धा तसाच आहे, मला थोडा जास्त छान वाटतो... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by मनिष

मनीष, मग तिच्या आधीच्या प्रेमभावनेचं काय? तिला वाटले ते नुसतेच आकर्षण? की एक माणूस आपल्यावर इतकं समजूतदार इत्यादी प्रेम करतो आहे, म्हणून आपणच निर्माण केलेल्या आधीच्या नात्यांना मोडीत काढायचे? (सलमानचं कॆरेक्टर अत्यंत आचरटपणे रंगवल्यामुळे मला काही काळ ’बरे झाले’ असा एक आसुरी आनंद झाला, नाही असे नाही! पण) मंगळसूत्र क्लिशे होऊन येते हे खरेच आहे. पण समजा असे गृहित धरू, की तो क्लिशे नाही. तरीही ऐश्वर्या आपल्याच नात्याला तिलांजली देऊन नव्या नात्यात अडकते? मला हे फार उथळ वाटते. त्यापेक्षा भन्साळीच्याच ’सॉंवरिया’मधली प्रेयसी मला सच्ची आणि पुरेशी हट्टी वाटली होती. (बाकी सिनेमाबद्दल न बोलणे बरे!) एका ठिकाणी गुंतलेला जीव असा इतक्या सहजासहजी उचकटला जात नाही. मग समोरचा माणूस कितीही जिवापाड प्रेम करत असो. त्याचे प्रेम हे बर्‌याचदा आपण बाहेरूनच पाहू शकतो... असो. वाद नव्हे.... पण नाही पटले खरे... खूप समंजस शब्दांत उकलून दाखवले आहे तुम्ही.

In reply to by मेघना भुस्कुटे

मनिष Sat, 05/31/2008 - 11:10
खरे आहे....जर आधीची प्रेमभावना स्ट्रॉंग सेल तर तू (चालेल ना?) म्हणते ते बरोबर आहे. पण भंसाळीला ते दखवायचे नव्हते - त्याला अपेक्षित असलेल्या कथेच्या दृष्टीने मी सांगत होतो. आपल्या सारख्या स्वतंत्र वृत्तीने वाढलेल्यांना पटणार नाही हे, पण काही वेळा असे होते हे समजून घेता येईल.

In reply to by मनिष

मनीष, अर्थातच ’तू’ चालेल! काही वेळा असे होते खरे. बाकी भन्साळीच्या एकंदर आवाक्याचा विचार करता आपण त्यावर इतके शब्द उधळावेत का, असा एक पोटप्रश्न पडतो आहे मला. बाय दी वे, कुणाला ’कभी अलविदा ना केहना’ वर काहीच म्हणायचं नाहीय का? मुळात विवाहबाह्य संबंध हा करण जोहरच्या दृष्टीनं ’अब्रह्मण्यम्‌’ विषय. तो त्यानं निवडला हीच एक मोठ्ठ्ठ्ठी अचीव्हमेंट. पुढचा सगळा शेणकाला आपण त्याच्याकडे दयार्द्र दृष्टीनं पाहून माफ केला पाहिजे, असा माझा एकंदर दृष्टिकोन होता. पण सिनेमा पाहिल्यावर तो मला चक्क आवडला. अमिताभचा ’सेक्सी सॅम’ आचरटपणा किंवा राणी मुखर्जीचा निरागस मूर्खपणा (दुकानातल्या बेडवर बसून इतक्या संशयास्पद पद्धतीनं रात्रीच्या सीनची तालीम करतं कुणी? आचरट नाहीतर...) करणबद्दलच्या एकूण अपेक्षांना साजेसा होता. पण नात्यांबद्दलची जाण चक्क प्रगल्भ म्हणावी अशी होती. ’अर्धी-मुर्धी नाती असण्यापेक्षा ती तोडून टाकणे उत्तम’ ही स्पष्टोक्ती किंवा प्रामाणिकपणा या भावनेला महत्त्व देऊन तथाकथित पवित्र विवाहसंस्थेशी बेईमानी करणे किंवा ’इस घरमें मर्द मैं हूं’ असा प्रीती झिंटाचा स्पष्ट बोचरा उद्गार... सुखद धक्का. ध्यानीमनी नसताना. (तरी शाहरुख खान, प्रीती झिंटा, अभिषेक आणि राणी यथाशक्ती डॉक्यात गेलेच.) असे अजून काही सिनेमे आठवताहेत?

In reply to by मेघना भुस्कुटे

भडकमकर मास्तर Sun, 06/01/2008 - 01:11
मुळात विवाहबाह्य संबंध हा करण जोहरच्या दृष्टीनं ’अब्रह्मण्यम्‌’ विषय. तो त्यानं निवडला हीच एक मोठ्ठ्ठ्ठी अचीव्हमेंट. हे खरं..तो इतपत रिस्क घेइल असे कधीच वाटले नव्हते ... निदान विषय निवडीसाठी त्याला बरे मार्क... पण पुढे सिनेमाभर प्रत्येक कॅरेक्टर विचित्र वागत राहते... ( ते सरप्राईज करायचे प्रसंग वगैरे) घडोघडी वैताग येत राहतो... मात्र प्रीती झिन्टा शाहरूखच्या कानाखाली ठेवून देते हा प्रसंग लै मज्जा आणतो... ... दोन किरकिरे जीव आधीच्या संसारातून भांडून एकत्र येतात ,...ठीकच आहे...पण ते पुढे एकमेकांबरोबर सुखाने राहतात की नाही हाच एक मोठा प्रश्न... तात्पर्य : दुरून दुसर्‍याच्या बायका (किंवा दुसर्‍यांचे नवरे ) कितीही साजरे दिसले तरी त्या स्वतःच्या बायका (किंवा स्वतःचे नवरे ) होतील तेव्हा साजरे नसतात ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मनिष Tue, 05/27/2008 - 20:27
काही खरच डोक्यात जाणार्‍या सिनेमांच्या कथा... काही खरच डो़क फिरवणार्‍या कथा/सिनेमे असे आहेत की डायरेक्टर भेटला की डायरेक्ट त्याच्या श्रीमुखात द्यावी असे वातते. आठवेल तसे लिहितो इथे - चुपके-चुपके - मागच्या वर्षी आलेला शाहिद कपूर - करीना कपूर ह्यांचा सिनेमा. त्यात शाहिद चे गावात सुषमा रेड्डीवर प्रेम, इकडे काही अतर्क्य घतनानंतर साहेब करीनाच्या प्रेमात - त्याचा गैरसमज की सुषमा रेड्डीचे लग्ना झले आहे - करीना शाहिद च्या प्रेमाचा रस्ता मोकळा - मोकळा म्हणजे एकदम हायवे होतो (नाही, सैफ नव्हता सिनेमात! :)); इतका की सिनेमाभर गुजरातचे गोडवे गाणारे कुटुंब एकदम पंजाबी गाणे गाऊन आनंद साजरा करते..जाऊ दे. माफ प्रियदर्शनला! पण हाईट म्हण्जे, सिनेमाच्या शेवटी सुषमा रेड्डी लग्नघरी येते आणि सगळा खुलासा होतो - आता शहिदची अगदी शाही पंचायत -- आणि प्रियदर्शनची पण. काय करावा साहेबांनी क्लायमॅक्स?? तर सुषमा रेड्डी शहिदला म्हणते (करीनाचा आग्रह करून झाल्यावर) - तू करीनाशी लग्न कर,कारण?......कारण का तर म्हणे ती मुकी आहे?? 'उसे सहारा दो!' अरे किती मुर्ख आणि क्रूर कारण? दया म्हणून प्रेम/लग्न?? किती हॉरीबल??? हाच का तो हेराफेरी देणारा प्रियदर्शन?? कितीही विसरू म्हटले तरी हा क्लायमॅक्स डोक्यात जातो!!!

In reply to by मनिष

मनिष Wed, 05/28/2008 - 11:42
शाहिद कपूर - करीना ह्यांच्या सिनेमाचे नाव "चुप-चुपके" होते! चुकीबद्द्ल क्षमस्व. - मनिष स्वगत : तसेही कोणी वाचलेले दिसत नाही! :)

मनिष Tue, 05/27/2008 - 20:46
बेनाम बादशाह - आयुष्यात बकवास सिनेमे (थिएटर मधे जाऊन) बघण्याची पापे खूप केली, पण जेवढा संताप/उद्वेग/वैताग ह्या चित्रपटाने आला, तेवढा कुठल्याही इतर सिनेमाने आला नाही. ह्याची कथा साधारण अशी - अनिल कपूर असाच एक अनाथ, मवाली सुपारी घेणारा. एक दिवस सुपारी घेऊन तो (अनोळखी) जुही चावलावर बलात्कार करतो, ती मुर्ख मुलगी इतर काही करण्याऐवजी (जसे बदला) त्याच्या मागे लागते लग्न कर म्हणून. किती हिडिस कल्पना आहे ही?? काही बोलवत ही नाही. हे दोघेही तसे नावाजलेले कलाकार - त्यांनी होकार दिलाच कसा असा सिनेमा करायला? आणि डायरेक्टर कोणी 'के. रवी शंकर' म्हणून...त्याला भेटून एकदा कानाखाली जाळ काढायची खूप इच्छा आहे..किंवा विचारावेसे वाटते, जर असेच तुझ्या मुलीच्या बाबतीत झाले तर काय करशील?? किळसवाणा सिनेमा आहे खरच - जर 'रारंग ढांग' सारख्या कथेला सेन्सॉर परवानगी देत नसे, तर अशा कथेला कशी परवानगी मिळते?? मुर्खपणा सगळाच...

In reply to by मनिष

भडकमकर मास्तर Wed, 05/28/2008 - 14:10
किती हिडिस कल्पना आहे ही?? खरंच...साउथचे सिनेमे भडक असतात माहित होते पण हा काय सिनेमा झाला? कसली गोष्ट? .. त्यातलं एक टुकार गाणं आठवतंय...( का आठवतंय कोण जाणे ?) बेवडा अनिल कपूर बोंबलत हिंडत गाणं म्हणत असतो, " माता कौन पिता कौन, कचरे के डिब्बे में गिराया गया कचरे के डिब्बेसे उठाया गया...." ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भडकमकर मास्तर Wed, 05/28/2008 - 14:26
लक्ष्य हा डोक्यात जाणारा सिनेमा नाही... चांगला आहे...गोष्ट अभिनय गाणी नृत्य ( मै ऐसाही हूं) चगैरे मस्तच.... . ..पण एक मुद्दा नेहमी खटकत / जाणवत असे, ______ ही गोष्ट जर एका एमलेस माणसाला त्याचे ध्येय सापडणे यावर आहे, आणि त्याची एक प्रोमोज मध्ये जहिरात असे की " ही डिस्कव्हर्ड व्हॉट ही वाँटेड इन लाईफ ऍट अमुक अमुक थाउजंड फीट" ( शब्द थोडेफार वेगळे असतील ) अशा अर्थाची काहीतरी.... मग पिक्चर पाहिल्यावर असे वाटले, की ज्या क्षणी त्याने त्याचा आळशीपणा सोडला आणि आय एम ए गंभीररित्या (एकदा पळून आल्यानंतर पुन्हा ) जॉइन केली तेव्हा गोष्ट पूर्ण झाली, ही डिस्कव्हर्ड व्हॉट ही वॉन्टेड इन लाईफ..... मग पुढे तो सैनिक होतो, कारगिल मध्ये पराक्रम गाजवतो की नाही, युद्धात जिंकतो की नाही , मरतो का वाचतो हा प्रश्न लांबचा.... मुख्य सिनेमा कधीच संपला... ( म्हणजे प्रीमाईस यशस्वी होणे किंवा न होणे असा नसून ध्येय सापडणे असा आहे) हे मी कोणाला कधी बोललो नाही, पण एकदा जावेद अख्तरची मुलाखत चालली होती ,( कोणता सिनेमा चुका सुधारून पुन्हा लिहायला आवडेल? अशा प्रश्नावर त्याने मेरी जंग आणि लक्ष्य या दोन सिनेमांची नावे घेतली होती)) तेव्हा तोही असेच म्हणाला... (म्हटलं बेष्ट... लै खुश झालो...) लक्ष्य ची स्टोरी स्क्रीनप्ले जावेद चा की फरहानचा? कोणाला माहित आहे का? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

ऋचा Wed, 05/28/2008 - 14:36
अस्साच एक डोक्यात जाणारा चित्रपट म्हणजे "कभी खुषी कभी गम" ~X(

In reply to by ऋचा

आईबापावर प्रेम करण्याचे दोनच मार्ग. त्यांच्या गळ्यात पडणे नाहीतर त्यांच्या पायांवर लोळण घेणे. मग ते चुकीचं सांगत असोत, बरोबर सांगत असोत, काहीही फरक पडत नाही. 'माफी माँगनेसे आदमी छोटा नहीं हो जाता' हे वर. म्हणजे? काही चुकलं नसेल तरी उग्ग्ग्ग्गाच माफी मागायची? का म्हणून? आणि लग्नासारख्या गोष्टीत मनमानी करायला येणारे आईबाप हा पुरातनकालीन विषय आपण कधी बंद करणार आहोत? (करण जोहरकडून ही अपेक्षा म्हणजे फारच झाले म्हणा!) त्यात आणि ती डॉक्यात जाणारी करीनाची 'पू'. आणि तिला 'कपडे घाल, कपडे घाल' म्हणून पिडणारा शाहरुख खान. भारतीय संस्कृती जपणारी काजोल. (केवळ काजोल होती म्हणूनच. नाहीतर...)

In reply to by मेघना भुस्कुटे

कोलबेर Sat, 05/31/2008 - 10:17
मस्त!! ह्यावर एक स्वतंत्र लेखच टाका! अवांतरः ह्या पंजाब्यांचं माहित नाही पण 'पू' म्हंटलं की आमच्या डोक्यात तरी जखमेतुन वाहणारा एक दुर्गंधीयुक्त स्त्राव येतो!!

मन Wed, 05/28/2008 - 14:44
हा चित्रपट पाहुन अब "प्र्क्षक क्या करे" तेच कळलं नाय. त्यो अजय देवगण म्हणे त्या (अविवाहित्/कुमारी) काजोलला वाचवतो. कुणापासुन काय म्हणताय? अर्थातच गुंडांपासुन,ते ही त्यांनी काही "भलतसलतं" करायच्या आत. आनि तत्काळ लगेच तेच "भलत सलतं" स्वतःच करुन मोकळा होतो, येका रात्रित,ट्रेन मधी. (थोडक्यात काय, तर तो गुंडांना जे करण्यापासुन अडवतो, तेच स्वतः खुशाल करुन मोकळा होतो.) आणि तोंडाला काळं लावुन जो पसार होतो, तो पुन्हा गावतच नाय लवकर. इकडे काजोलला (विवाहपुर्व)अपत्यप्राप्ती होतेच(अपेक्षेप्रमाणे). आणी तिथुन पुढं काय तर "मनाचा-गुंता", "तरल्-नाती" असला भुक्कड मालमसाला भरलाय. बाकी गाणी अप्रतिम,(केवळ त्यासाठी शिणुमा पुन्हा पुन्हा बघायची तयारी आहे आपली.) (हद्द हिच, की, अशा प्रकारे पसार होउन, कित्येक तपांनंतर हे महाशय जेव्हा गावतात त्या काजोलला, तेव्हा ती बया त्याच्या दोन मुस्काडात देण्याऐवजी,किंवा स्वतःवर आनी त्याच्यावर खजील राहण्याऐवजी खनकळत "नकळत" पुन्हा त्याच्या वर फिदा. हाय रे कर्मा. काय काय बघाव आता उघड्या डोळ्यांनी.) तर ह्या शिणुमातुन लेकी-बाळिंना संदेश्/उपदेश येकच, बायांनो, जो तुम्हाला "वाचवायला" येइल, त्याच्यापासुन जरा "वाचुन"(आणी वचकुनच) रहा. आपलाच, मनोबा

यशोधरा Wed, 05/28/2008 - 23:52
>>> लक्ष्य ची स्टोरी स्क्रीनप्ले जावेद चा की फरहानचा? जावेद अख्तर यांचा. दिग्दर्शन फरहानचे.

'लक्ष्य' पाहून मलाही असंच वाटलं होतं. ध्येय सापडणं आणि यशस्वी होणं या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत खर्‍या. आणि कहर वाटली होती ती हृतिकची व्यक्तिरेखा. पूर्वार्धात तो किती बालिशपणे वागतो! प्रीती झिंटा आणि तो एकमेकांच्या खरेच प्रेमात पडले आहेत, की 'बरी मैत्री आहे... सोयीचे आहे झाले' म्हणून ते प्रेमगाणी गाताहेत हेच कळत नाही. त्यांच्यात 'रोमान्स' कुठे दिसतच नाही. दिसते ती फक्त जुन्या मित्रमंडळींबद्दल होते ती सवयीची भावना. एकमेकांना आवडीने 'चालवून' घेणे. मग एकदम 'कितनी बातें केहनेकी हैं..'मधे रोमान्स. त्यांच्यात इतकं सगळं आठवण्याइतकं घडलं तरी कधी, आपण तेव्हा कुठे होतो... असे प्रश्न पडतात ते गाणं पाहताना.

In reply to by मेघना भुस्कुटे

कोलबेर Sat, 05/31/2008 - 11:35
अगदी खरंय...अरे तुच का तो 'दिल चाहता है' बनवणारा??? असा पश्चात्ताप करत बाहेर पडलो होतो.

In reply to by मेघना भुस्कुटे

भडकमकर मास्तर Sun, 06/01/2008 - 01:00
_मग एकदम 'कितनी बातें केहनेकी हैं..'मधे रोमान्स. त्यांच्यात इतकं सगळं आठवण्याइतकं घडलं तरी कधी, आपण तेव्हा कुठे होतो... असे प्रश्न पडतात ते गाणं पाहताना. _ फार छान वाक्य... अगदी हेच म्हणतो... ____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भडकमकर मास्तर Sun, 07/13/2008 - 16:19
आता थोडं लिहितो ओम शांती ओम बद्दल... मी या सिनेमाबद्दल अजिबात अपेक्षा न ठेवता गेलो होतो त्यामुळे मला बरा वाटला... दीपिका तर लै बेष्ट.. श्रेयसने सुद्धा छान काम केले आहे.. ( म्हातारा मात्र अजिबात दिसला नाही, श्रेयस म्हातारा आणि शाहरूख तरूण असलं पहायचं जीवावर आलं खरं)... ते जाऊदेत.. __________ शेवट थोडा अजून योग्य करता आला असता...ते झुंबर पडून अर्जुन मरतो वगैरे ठीकठाक.... मुख्य म्हणजे त्यानंतर हीरोला कळते की खरंच भूत हे सारे प्रकार करत होते... पण ही गोष्ट अर्जुनला कळायला नको का? नाहीतर त्याला इतकेच वाटणार की झुंबर पडायच्या अपघाताने आपण गेलो... मग इतके सारे प्रयत्न करून एवढी गोष्ट पाहून काय उपयोग? गोष्टीत दुष्टाला शासन हवेच पण त्याला ते कळायलाही हवे तर प्रेमाईस सिद्ध होणार ना... त्यातल्या झुंबराखाली पडलेल्या अर्जुनला दोन्ही दीपिका दिसतात आणि भूत त्याला त्या त्याच्व्या दुष्कृत्याची जाणीव करून देते आणि त्याची हीच शिक्षा आहे असे म्हणते ... आणि मरता मरता अर्जुन त्याच्या गुन्हयाची कबुली देतो..आणि ते दृश्य सारे लोक ( क्लोज सर्कीटवर पाहतात, किंवा चॆनलवाले ्शूट करून दाखवतात..) मृत्यूबरोबरच एखाद्याची संपूर्ण इमेज / जनमानसातली प्रतिमा संपणे ही मोठी शिक्षा आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मला नाही असं वाटलं. शांतिप्रिया सांगते की त्याला - मेरी सांसे चल रही थी... असं. आता हे थोडंच शाहरुखला माहीत असणारेय? म्हणजे ही ओरिजिनल शांती आणि हा तिनं घेतलेला सूड हे अर्जुनला कळणारच. त्यासाठी दोन दोन शांत्या (!) दाखवायची काय गरज आहे?

In reply to by मेघना भुस्कुटे

भडकमकर मास्तर Wed, 07/16/2008 - 21:42
आता हे थोडंच शाहरुखला माहीत असणारेय? आता त्याला तर सगळंच आठवतंय म्हणून तर हे सारं करतोय तो...आणि ती काहीही बोलली असली तरी अर्जुनला तर असंच वाटत असणार की ही अभिनय करणारी नटी शाहरूखने शिकवलेले डायलॉग बोलतेय..( मला तरी असेच वाटले)......त्याला तिच्याबद्दल संशय आलेला आहेच... ... त्यामुळे आपल्याला दुसरी मानव दीपिका दिसल्यानंतरच नक्की कळते की हे आधीचे भूतच्...पण त्यांची अर्जुनशी काहीच इन्टरॅक्शन नाही , कारण तो आधीच मरतो... मग भुताचा सूड अगदी पक्केपणे कुठे दिसला ? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

छोट्या Tue, 07/15/2008 - 16:31
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ... कोणती तरि expectional गोष्ट असल्याशिवाय कोणी चित्रपट करत नाही (कमीत कमी चोप्रा family). अशा गोष्टिंमुळेच तर चित्रपट पहायला लोकं जातात. डोकं - बिकं लावून love story बघायच्या नसतात. त्यासाठी समांतर सिनेमे आहेत. मग चोप्रानीं कोन्या 'मास्तर' च्या जिंदगीवर पिक्चर काढायचा का? आणि तुमच्या डोक्यात जे प्रश्न आहेत त्याची थोडी फार उत्तरे आहेत पिक्चरमधे... उदा:: माझ्या बदनाम पोरीशी लग्न करायला कोण येणार आता?" किंवा त्या १५ २० सेकंदातले अमरीश पुरीचे स्वगत. याचं उत्तर तर लगेच सापडलं असतं... तिच्यासाठी तो 'कुलजीत' का कोण तो ..... कायम तयार असतो. आणि फसवा-फसवी च्या वर्तनावर जो आपला आक्षेप आहे तो पण काही बरोबर नाही वाटत... १०० पैकी ९५ love story मधे हा प्रकार सुरु असतो.... कोणी काही बापाची परवानगी घेउन असले उद्योग करत नाही.(काही सन्माननीय अपवाद सोडुन). मग चोप्रा दाखवले तर काय बिघडले??? त्यामुळे असल्या पिक्चरला उगाच नावे ठेवण्यात अर्थ नाही.

In reply to by छोट्या

भडकमकर मास्तर Wed, 07/16/2008 - 21:31
तुझ्या भावना दुखावल्या असतील तर सॉरी रे बाबा..... लव्ह स्टोरी पाहताना सुद्धा डोके लावण्याची चूक झाली माझी... धन्यवाद, सल्ल्याबद्दल... आणि ९५ % लव्ह स्टोर्‍यांमध्ये कसा प्रकार चालू असतो ते सांगितल्याबद्दल सुद्धा धन्यवाद... तेवढे या सर्व्हेचे डीटेल्स दे म्हणजे झाले, का इथे सुद्धा डोके लावायचे नाही?? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

छोट्या गुरुवार, 07/17/2008 - 12:30
काय मास्तर, आता या 'छोट्या' ने तुम्हाला शिकवायचं का? शेवटी डोकं आहे... कोणी कुठे लावायचं हा ज्याच्या त्याच्या डोक्याचा प्रश्न आहे. उगाच 'तुझ्या- माझ्या' करुन त्रागा नाही करुन घ्यायचा. आणि भावनांचं म्हणाल तर त्या 'पिक्चर' सारख्या फुटकळ गोष्टीत लावुन त्यांचा अपमान नाही करायचा!!! ;) ;) :P

In reply to by छोट्या

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 07/17/2008 - 13:47
>> आणि भावनांचं म्हणाल तर त्या 'पिक्चर' सारख्या फुटकळ गोष्टीत लावुन त्यांचा अपमान नाही करायचा =)) पण हे मात्र मान्य की मास्तरांमुळेच जाम करमणूक झाली. येऊ द्या. (टुकार सिनेमांची चाहती) अदिती

गिरीराज गुरुवार, 07/17/2008 - 15:54
आयला, मीपण असाच वैतागलो होतो 'हम दिल दे चुके सनम' पाहून>>>>> अहो असे म्हणा: "हम दिल देके चुके सनम"

मध्यमवर्गीय गुरुवार, 09/18/2008 - 20:33
मला या ठिकाणी एक नमूद करवेसे वाटते कि चित्रपट पाहताना असल्या तार्किक गोंष्टिंचा विचार करून चित्रपटाची मजा घालवू नये. व.पु. च्या कुठल्याश्या कथेमध्ये वाचले होते...चित्रपट म्हणजे ३ तासांचे एक सुन्दर स्वप्न. त्यामध्ये हे असेच का, ते तसेच का असे प्रश्न विचारून त्या स्वप्नाची मजा घालवू नये. जर चित्रपटात असे दाखवले कि नायक राकेलच्या रांगेत उभा आहे, तर कसे वाटेल. असे चित्रपट आपण बघु का? अरे आपल्या रोजच्याच जीवनातल्या समस्या पडद्यावर दाखवल्यातर ते पाहण्यासाठि कोण येइल? आणि मुख्य म्हणजे आपल्याला ते आवडेल का? तसेहि माणसाची प्रव्रुत्ती असते कि त्याला दुसर्‍याच्या पायात काय अडकले आहे ते बघण्याची उत्सुकता. आणि त्यात गैर काहि नाहि. तेवढेच निवांत क्षण/विरंगुळा आपल्या रोजच्या दगदगीतून आणि कटकटीतून. स्वप्नात काहिहि घडू शकते राव. त्याचा त्रास नाहि करुन घ्यायचा. त्यामुळे "रजनीकांत"चे चित्रपट पाहताना सुद्धा मी ऍंजाय करतो. (रजानीकांत केवळ मराठी आहे म्हणून मी तमिळ भाषेतील चित्रपट पाहण्याचे धाडस केले, आणि आपण एक स्वप्न पाहत आहोत एव्हढा एकच द्रुष्टीकोन असल्यामुळे त्याचे चित्रपट आवडले. त्यावेळी "हा असा काय हवेत उडतो" म्हणून मनाला त्रास करून नाही घेतला.) पण मला, भडकमकर मास्तरांनी लिहिलेले आमरस पुरि चे स्वगत आवडले....स्वप्न पाहण्याचा आणखी एक द्रुष्टिकोन. प्रत्येकाने आपापल्या द्रुष्टिने स्वप्न पाहावे अशा मताचा मी आहे. एखाद्या चित्रपटाचे/स्वप्नाचे अशा रितीने काथ्याकूट करणे मलाहि आवडेल.

In reply to by मध्यमवर्गीय

भडकमकर मास्तर Sat, 09/27/2008 - 00:06
एखाद्या चित्रपटाचे/स्वप्नाचे अशा रितीने काथ्याकूट करणे मलाहि आवडेल. लिहा.. मग मीही त्यावर लिहीन की असल्या तार्किक गोंष्टिंचा विचार करून चित्रपटाची मजा घालवू नये ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

फारएन्ड Fri, 09/10/2010 - 05:46
एकदम आवडला :) मला या चित्रपटातील गाणी आणि बराच भाग आवडतो, पण हा शेवटचा भाग अजिबात आवडला नव्हता. त्या परमजीत ची काहीही चूक नसताना (मला नीट आठवत नाही) त्याचा उगाचच पचका केलेला आहे.

चिगो Sun, 09/12/2010 - 12:10
मस्त हाणामारी, चिरफाड केलीय... आणि DDLJ मला अजिबात न पचलेल्या पिक्चरपैकी एक आहे.. बाकी आपल्याला रजनीकांतचे पिक्चर आवडतात. डोकं शिणून दमतं आणि हलकं वाटतं बघा...

चिंतामणी Sun, 09/12/2010 - 13:00
जी पुढे कुकुहोहै, जप्याकिहोहै सारख्या अनेक सिनेमांमध्ये सुद्धा दिसली. चो चो (पक्षी चोरी चोरी) जप्याकिहोहैच्या आधिचा सिनेमा आहे. त्यातसुध्दा लग्नाच्या मांडवातुन नायीका नायकाबरोबर पळुन जाते. ही परंपरा या सिनेमाने सुरू केली आअहे असे म्हणले तर????????

In reply to by चिंतामणी

भडकमकर मास्तर Sun, 09/12/2010 - 23:40
त्यातसुध्दा लग्नाच्या मांडवातुन नायीका नायकाबरोबर पळुन जाते. मुद्दा अमान्य कारण चोरीचोरीमध्ये ती नायकाबरोबर पळून जात नाही तर नुसतीच पळून जाते आणि त्यानंतर तिला बसमध्ये नायक भेटतो...

In reply to by भडकमकर मास्तर

मास्तर ब्याक इन फॉर्म! :-D मास्तर, आणखी कोणत्या पिच्चरची मापं काढा की! लै दिवस झाले तुमच्या लेखणीतून काही दमदार धागा आल्याला!

मन Wed, 05/21/2008 - 03:05
मनातले प्रश्न बोललात. मलाही हेच सारे(आणि इतरही अशेच अनेक) प्रश्न पडलेत. पण आपण अगदी नेमक्या शब्दात बोललात. (आणखी एक उदाहरणः- दि.चा है मध्ये ही प्रीती झिंटा-आमिर प्रकरणाचा एंड असाच आहे. थोडक्यात काय एखाद्याची होणारी बायको पळवल्याशिवाय ह्या हीरो मंडळींना चैन पडेनासं झालय.) आपलाच, मनोबा

In reply to by मन

अन्या दातार Wed, 07/16/2008 - 23:50
दि.चा. है मध्ये प्रिती झिंटा आणि आमीर यांच्यातील प्रेम अव्यक्त आहे. ते दोघे परस्परांना मित्र म्हणूनच भेटत असत. दिदुलेजा मध्ये नायिका(?) प्रेमाचा इजहार वगैरे करुन बसली आहे. दिचाहै मध्ये नायक तिला सर्वात शेवटी प्रेमाचा इजहार करतो. ही बाब लक्षात घ्यायला हवी. आपला, अन्या

In reply to by अन्या दातार

टारझन गुरुवार, 07/17/2008 - 00:20
दिल चाहता है आम्ही थेटरात ३ दा आणि कंप्युटर वर ३५ वेळा पाहीलाय बहुतेक.. ३० नंतर काऊंट सोडलेला.. तो एक अमेझिंग चित्रपट आहे. त्यात कुठेही कसलीही अतिशयोक्ती किंवा अव्यवहारिक वाटलेलं नाही.... आमच्या भावना दुखावता ? ---(यदा कदाचित -२ मधला अफझल्या) कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...

धनंजय Wed, 05/21/2008 - 04:27
एका नात्यातल्या मुलीला मुलाने होकार दिला, आणि साखरपुडा होण्यापूर्वी (हे तरी बरे) आपले खरे प्रेम दुसर्‍या कोणावर आहे, लग्न नको, म्हणून सांगितले. एका काकूंच्या मुलाने साखरपुड्यानंतर लग्न मोडले, आणि "खर्‍या" प्रेयसीशी त्यानंतर कायमसाठी बिनसले म्हणून पुन्हा मोडलेल्या मुलीच्या घरच्यांच्याकडे विचारणा केली!!!! त्यांनी अर्थात अपमानास्पदपणे "चालता हो" म्हटले, हे बरेच केले. पण एक बघायला पाहिजे ना - लग्न म्हणजे एक महत्त्वाच्या वस्तूची खरेदी आहे. एखादी सुंदर आणि महाग मोटारगाडी घेताना, आपल्याला किती आवडली, आई-बाबांना किती आवडली, कसल्या वळणाची आहे, कसल्या रंगाची आहे, हे सगळे गुण बघणे आलेच. सर्व गुण संपन्न असतीलच असे नाही. शिवाय कुठला गुण जास्त महत्त्वाचा वाटतो तेही सकाळ-संध्याकाळ बदलू शकते. म्हणजे मित्रांबरोबर असताना होंडा-सिटीचे गुण जास्त दिसतात, आई-बाबांशी बोलताना ह्युन्डाई ऍक्सेंटचे. मग कधी या डीलरकडे "कार विकत घेतो" असे म्हणणार, कधी त्या डीलरकडे. आधी एकाला "हो" म्हणून मग दुसर्‍यापाशी गाडी विकत घेतली तर पहिल्या डीलरचा पचकाच झाला... त्यामुळे कंत्राटावर सही केल्याशिवाय कार विकली नाही; अक्षता डोक्यावर पडल्याशिवाय वर-वधू खपली नाही. (स्पष्टीकरण : वधू-वर-संयोजन हा एक बाजारही असल्यामुळे त्याचे बाजारशास्त्रीय विश्लेषण केले आहे. तो बाजार थोडाफार अनैतिक आहे, असे माझे मत आहे. खोटे बोलून किंवा अर्धसत्य झुलवत ठेवून कुठल्याही मनुष्याच्या भावनांशी खेळणे मला अनैतिक वाटते.)

In reply to by धनंजय

भडकमकर मास्तर Wed, 05/21/2008 - 09:43
खोटे बोलून किंवा अर्धसत्य झुलवत ठेवून कुठल्याही मनुष्याच्या भावनांशी खेळणे मला अनैतिक वाटते.) एकदम खरे... पण ह्या असल्या कथानकांमुळे उगीचच वेगळाच संदेश जात असेल ( सिनेमा एवढा कोणी सीरियसली घेत नाही, हे खरे आहे.......पण ऊठसूठ " घराने के संस्कार रीतीरिवाज , पिताजीकी भावनाएं " याची चाड पोरीला फार आहे असे दाखवायचे पण त्याच वेळी एका संपूर्ण कुटुंबाला फसवत राहायचे , ते सुद्धा काही तास किंवा एखादा दुसरा दिवस ( हा की तो , हा निर्णय न होण्याच्या काळात , समजा मुलगा बघताना वगैरे...)नव्हे तर महिनाभर आणि त्यांच्या नकळत केलेल्या प्रेमचेष्टांचे उदात्तीकरण करायचे ...... हा तद्दन भंपकपणा आहे)... बरं ही नैतिकतेच्या मार्गावरून अल्पकाळासाठी का होईना पाय घसरलेल्या एका मुलीची गोष्ट असती तर एक वेळ ठीक होते, पण अर्थातच तसले काही दाखवायचे नाहीये ... ( आणि तिला तिच्या चुकांची जाणीव होते आणि ती त्या मुलाला सॉरी म्हणते, इतपत तरी काहीतरी घडायला हवे होते) कॉलेजात असतानाही ग्रुप मधल्या काही मुलींशी मी बोललो तेव्हा त्यांना त्या हीरॉईनची काही चूक आहे असे वाट्लेच नाही, "प्रेमासाठी तिने केवढे रिस्क घेतले "अशा अर्थाचे बर्‍याचशा मुलींचे मत पडले....... कमाल आहे च्यायला.. अरे रिस्कच घ्यायचे तर बापाचा आणि कुटुंबाचा राग पत्कर, त्यांना समजावायचा प्रयत्न कर आणि ते होत नसेल तर घर सोडून जा आणि स्वतःच्या हिमेतीवर स्वतःचे घर उभार... ही खरी रिस्क ..... तुझे कौटुंबिक संबंध नीट रहावेत म्हणून लोकांना कसा काय मनस्ताप देऊ शकता ? आणि पुन्हा आमची ही नेहमीची चिडचिड की बर्‍याच मंडळींना विशेषतः महिलावर्गाला हे जाणवतच नाही...... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मदनबाण Wed, 05/21/2008 - 06:09
खोटारडा असला तरी पैसेवाला एकुलता एक लंडनचा आहे... आता सोडावं झालं पोरीला...".... :D हा मोकॅम्बो आतल्या आत फारच खुष झाला असणार बघा..... (मिस्टर इंडिया चा पंखा) मदनबाण.....

फटू Wed, 05/21/2008 - 07:10
पण कधी कधी असंही होतं... म्हणजे ती पुण्याला बी ए एम एस ला होती... वैद्यकी शिकता शिकता आपल्या एका वर्गमीत्राच्या प्रेमात पडली... बी ए एम एस संपलं... दोघांनीही लग्न करायचं ठरवलं... तो तिचा भावी नवरा म्हणून तिच्या घरी येऊन गेला... आणि तिला परदेशस्थ डॉक्‍टर मुलाचं स्थळ सांगून आलं... झालं त्या मुलीने आपल्या प्रियकराचा पत्ता काटला अन् त्या परदेशस्थ डॉक्‍टर मुलाशी लग्न केलं... आता बोला... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

विसोबा खेचर Wed, 05/21/2008 - 08:53
याला आधीच चांगला पिटून काढला बरे झाले....ही ही पोरगी पण एक नंबरची अडाणी...आमच्या या मूर्ख पोरीने इतके गुण उधळले आहेत की सगळ्या गावात आता बदनामी झाली आहे.... कोण बोंबलायला आता हिच्याशी लग्न करणार आहे देव जाणे... आणि हा भडवा तर बापाबरोबर चालला...ह्याच्यायला ह्याच्या... हा कसला जातोय? हा थांबणार... थांबायलाच पाहिजे यानं... अरे महिनाभर बोंबलत इथे रंगढंग केलेस ना आमच्या नकळत ? तुला भाड्या आता जबाबदारी नको घ्यायला ? खुशाल हिला अशीच टाकून जातोस ? काय की... अरे गाडी सुटली की रे...उतर रे उतर...चाललाच वाटतं...जरासा वेडझवाच दिसतो हा ... हं.... किंवा भलताच पोचलेला आहे ... साल्याला माझी गोची कळलीय वाटतं... खरंतर असल्या मूर्ख, नालायक, वेंधळ्या आणि फ़सवणूक करणार्या या माणसाची अजिबात लायकी नाही...पण आता आपल्या मूर्ख आणि बदनाम पोरीला तरी कोण मिळणार याच्यापेक्षा बरा?? खोटारडा असला तरी पैसेवाला एकुलता एक लंडनचा आहे... आता सोडावं झालं पोरीला...".... जा बाई जा... हा हा हा! आमरसपुरीचे हे स्वागत क्लासच आहे! मुलीचा हात सोडण्यापूर्वी क्षणभर त्याचा चेहरा दाखवला आहे त्यावर मास्तर म्हणतात तेच स्वगताचे भाव अगदी नेमके दिसतात! :) मास्तर, अजूनही शिणेमे येऊ द्यात... आपला, (काजोलप्रेमी) तात्या देवगण.

भडकमकर मास्तर Wed, 05/21/2008 - 09:46
मुलीचा हात सोडण्यापूर्वी क्षणभर त्याचा चेहरा दाखवला आहे त्यावर मास्तर म्हणतात तेच स्वगताचे भाव अगदी नेमके दिसतात धन्यवाद तात्या.... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भडकमकर मास्तर Wed, 05/21/2008 - 10:13
आमची अजून दोन निरीक्षणे आहेत... १. कुकुहोहै, जप्याकिहोहै, दिचाहै,दितोपाहै या सर्व सिनेमांमध्ये थोड्याफार फरकाने "दुसर्‍याच्या लग्नात जाऊन आपली प्रेयसी पळवून आणणे " हा कार्यक्रम दिसतो परंतु सर्वात जास्त त्रास देणारा चित्रपट मला दिदुलेजाच वाटतो... असं का बरं होत असावं? २. वर उल्लेखिलेल्या सर्व सिनेमांमध्ये कथा अशाच बांधलेल्या दिसतात की हीरॉईनचं नक्की ठरत नाहीये आणि ती ऐन वेळी एका दुसर्‍याच ( म्हणजे आधीच्याच प्रियकर ) माणसाबरोबर लग्न करते... हेच पुरुषाने केले तर त्याला इतकी सहानुभूती कोणी देईल का ?... मग तो बरोबर व्हिलन ठरेल...मला आत्ता या क्षणी तरी असे सिनेमे आठवत नाहीयेत की ज्यात ( १.पुरुष ऐन वेळी लग्नाला नकार देतो आणि पळून जातो + २. त्याचे त्याच वेळी उदात्तीकरणही केले जाते...) .... असो... याचे स्त्रीमुक्तीवादी उत्तर हे असणार की १. पुरुषांवर लग्नासाठी कुटुंबाचे इतके प्रेशर नसते, त्यामुळे त्याला सहानुभूती कशाला कोण द्यायला बसलंय ? तो वाईटच.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मन Wed, 05/21/2008 - 13:57
हेच पुरुषाने केले तर त्याला इतकी सहानुभूती कोणी देईल का ?... मग तो बरोबर व्हिलन ठरेल... जबरान... :-) आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

In reply to by भडकमकर मास्तर

धनंजय Wed, 05/21/2008 - 21:53
( १.पुरुष ऐन वेळी लग्नाला नकार देतो आणि पळून जातो + २. त्याचे त्याच वेळी उदात्तीकरणही केले जाते...) अगदी नेमके असे केलेला म्हणजे नारायण ठोसर हा मुलगा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. (पण तो दुसर्‍या कुठल्या मुलीबरोबर लग्न करत नाही. हा लहान मुलगा विश्वाची चिंता करण्याइतका मनाने प्रौढ होता, पण आईवडलांच्या आग्रहाखातर बोहोल्यावर चढलाच.) आणखीनही उदाहरणे असावीत. दुसरे लग्न करणारा कुठलाही वीरपुरुष पहिल्या बायकोच्या जीवनाचे काही प्रमाणात मातेरे करतो असो मानता येईल. (हे मातेरे लग्नाआधी नसून लग्नानंतर असते, पण अधिक वाईट कुठले, ते सांगता येत नाही.) अशा वीरांचे, 'राज्याला वारस पुरवण्यासाठी कर्तव्य करणारा' म्हणून उदात्तीकरण होते. वरील दोन्ही उदाहरणे ऐतिहासिक आहेत, पण त्या उदाहरणांचे उदात्तीकरण मात्र आधुनिक आहे. (सगळ्या टीव्ही मालिका मला एकसारख्या वाटतात - पण अशी एक साचेबद्ध कथा बरेचदा दिसते ना? श्रीमंत उपवर तरुणाशी लग्न करायचा घाट एक पाताळयंत्री सुंदर तरुणी घालते, आणि लग्न पक्के होते. पण लग्नाआधी मुलाला तिचा नीचपणा समजतो. आणि त्याच्यावर प्रेम करणार्‍या सोज्ज्वळ पण सुशील मुलीबरोबर तो लग्न करतो...)

In reply to by धनंजय

संताजी धनाजी Tue, 12/16/2008 - 18:39
अगदी नेमके असे केलेला म्हणजे नारायण ठोसर हा मुलगा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. =)) ह्या मुलाचा आम्ही पंखा आहोत.

साथिया चित्रपटात राणी मुखर्जी च्या वडिलांचा विवेक ओबेरॉय च्या वडिलांकडून अपमान होतो...याबद्दल राणी ला राग येतो पण तो थोड्याच वेळासाठी आणि नंतर चक्क त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न करते. इथपर्यंत सुद्धा ठीक ... पण लग्नानंतर ते आपापल्या घरी राहतात!!! (याला हिंमत म्हणावी की शुद्ध बावळट पणा?) हे कमी की काय म्हणून बघायला आलेल्या पाहुण्यांसमोर सांगून टाकते की मी आधीच लग्न केलं आहे!! (पाहुण्यांसमोर सांगून आई बापाची इज्जत का घालवायची? :( )

वेताळ गुरुवार, 05/22/2008 - 10:12
हे पण अश्याच सिनेमात घडत असते. प्रथम छपरी हिरोशी उदांत प्रेम करायचे. गळ्यात गळे घालुन फिरायचे. चुम्माचाटी करायची. आणि दुसरा मुलगा बघायला येण्याआधी घरी बोंबलायचे,उल्ट्या करायच्या आणि हाच संवाद फेकायचा " मैं मां बननेवाली हुं".पण हेच तिला आधी का कळत नाही.ह्यात पण सगळी सहानुभुती त्या मुलीला. कारण ह्यात तिचा दोष नसतो दोष तिला मां बनवणारयाचा असतो. अजब तर्क. वेताळ

In reply to by वेताळ

विसोबा खेचर गुरुवार, 05/22/2008 - 12:31
गळ्यात गळे घालुन फिरायचे. चुम्माचाटी करायची. वा! मागे केव्हातरी ऐकल्यासारखा वाटतो, 'चुम्माचाटी' हा शब्द क्लासच आहे!..:) आपला, (जुम्म्याला चुम्मा देणारा!) तात्या.

धमाल मुलगा गुरुवार, 05/22/2008 - 12:19
मुलाचा चांगुलपणा, हुशारी, सचोटी , मेहनती वृत्ती , प्रामाणिकपणा वगैरे आवडून बाप प्रभावित झाला नाही तर " माझ्या बदनाम पोरीशी लग्न करायला कोण येणार आता?" या भावनेने नाईलाजाने तो यांच्या लग्नाला तयार झाला असे वाटते... मग हीरोने हिरॊईनच्या आईपुढे मारलेले डायलॊग सगळे गेले ना बाराच्या भावात... मग सिनेमाचा संपूर्ण दुसरा भाग ज्या गोष्टीसाठी बिल्ड अप केला आहे त्याचीच वाट लागली... आणि आम्हाला येडा का बनवले?
हे हे हे....आमचं पण हेच मत झालं होतं :) आणि तो बाप तरी कसा असा एकदम चंबू? शेवटपर्यंत आजिबात कळत नाही त्याला, हा बकरा में में करत आपल्या पोरीच्या लग्नघरात का फिरतोय? बाकी त्याचं स्वगत एकदम झक्कास! येऊ दे अजुन... स्वगतः आमच्या भावी सासर्‍याचं पण हेच स्वगत असावं काय? :?

झकासराव गुरुवार, 05/22/2008 - 19:13
मुलाचा चांगुलपणा, हुशारी, सचोटी , मेहनती वृत्ती , प्रामाणिकपणा व>>>> =)) मास्तर तुम्ही तर त्या दिलवाले ची बिनपाण्याने केलीत की. :) आवडल आपल्याला तुमच मत. मी अजुन देखील हा चित्रपट पाहिलेला नाहिये. फुकटात सुद्धा. आणि हो त्या मंदीराला शाहरुखने फसवलेच की त्याच वाइट नाही का वाटल??? ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by झकासराव

भडकमकर मास्तर Fri, 05/23/2008 - 13:58
आणि हो त्या मंदीराला शाहरुखने फसवलेच की त्याच वाइट नाही का वाटल??? तसं तिच्याबद्दल थोडं वाईट वाटलं... जास्त नाही कारण या पोरानं काही कमिट केलं नव्हतं तिला...( नव्हतं बहुतेक, आता काय नीट आठवेना... की त्यांच्या आई बापाचं काहीसं बोलणं झालं होतं?...??... ) हां..बरोबर ..मग तिचीसुद्धा झालीच की फसवणूक... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by झकासराव

टारझन Tue, 07/15/2008 - 17:56
मी अजुन देखील हा चित्रपट पाहिलेला नाहिये. फुकटात सुद्धा. आणि हो त्या मंदीराला शाहरुखने फसवलेच की त्याच वाइट नाही का वाटल??? खोटं बोलतोस ? चित्रपट पाहीला नाही ? मग रुकरुक आणि बधिरा बद्दल एवढ डिटेल कसं माहीत आ? कस्सा पकडला चोर ? ;) असो.. त्या शाहरूक चे सरसकट सगळेच चित्रपट बावळट असतात... सगळ्यात हाईट म्हणजे .. मोहोब्बते.... आरे काय ? तो बच्चन बिचारा शिस्त लावतो.. अभ्यासाच्या वेळी अभ्यास करा ...आणि हा बहाद्दर पोरांना लफडी करायला शिकवतो ! केवळ बच्चनचा विरोध म्हणून..आणि मग ती अती स्कॉलर पोरं पण लफडी करून डॉक्टर होतात... च्यायला डोक्यात जातो रे तो.... काहीही ... हाणा तद् माताय(विजाभौ प्रसन्न) (रुकरुक चा अँटीफॅन) कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...

राजे गुरुवार, 05/22/2008 - 19:16
मास्तर..... ज्यावेळी हे चित्रपट आले होते खास करुन डीडीएलजे ;) त्यावेळी असे काही वाटत नव्हते .. पण आज पुन्हा त्रयस्थ नजरे ने काही चित्रपट पाहीले की त्या चित्रपटाची मजाच जाते ! उदा. मोहरा त्याकाळी गाजलेला चित्रपट .... मी कमीत कमी ५ वेळा पाहीला होता.... पण आज तो चित्रपट १० मिनिटे पाहणे म्हणजे भयंकर सजा आहे असे वाटत :)) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

"...खुशाल हिला अशीच टाकून जातोस ? काय की... अरे गाडी सुटली की रे...उतर रे उतर...चाललाच वाटतं...जरासा वेडझवाच दिसतो हा ... हं.... किंवा भलताच पोचलेला आहे ... साल्याला माझी गोची कळलीय वाटतं... " अमरिश पुरीचं स्वगत वाचून हसता हसता लोळायची वेळ आली खरोखर. अफलातून. :) असाच मनस्ताप मला 'हम दिल दे चुके सनम' बघताना झाला होता. बाई ग, तुझं प्रेमबिम आहे ना सलमानवर? मग लग्न का करतेस दुसर्‍या माणसाशी? हे मनमानी आईबाप पोरांचं न ऐकता लग्न ठरवतात इथपर्यंत ठीक. पण ही मूर्ख पोरं बोहल्यावर कशी चढतात? तिथल्या तिथे बोंबाबोंब नाही का करता येत? एरवी एवढी येता जाता बापाच्या गळ्यात पडत असतेस ना बये, मग आता थोबाड उघडायला काय धाड भरली? बाप नाही तर नाही ऐकत, त्या बिचार्‍या अजय देवगणला सरळ सांगता येत नाही, की बाबा रे, असं असं आहे... लग्न-बिग्न नको. फुकटच्या फाकट लग्न करून बसला ना तो? बरं, ठीक आहे, लग्न केलं. मग तरी गप बसायचं. तेपण नाही. नंतर सांगायचा धीर आला. आला तर आला. मग जायचं सलमानसोबत. तोतरी सुखी. तेही नाही. एकदम चार रात्रींमधे सलमानवरचं प्रेम उडून अजयवर? कारण काय, तर मंगळसूत्र. अरे काय चाललंय काय? पोरखेळ आहे का? हे मंगळसूत्र आणि लग्नाची गाठ भलतेच पॉवरफुल्ल असतात एवढाच सगळ्या लव्हस्टोरीचा अर्थ. मूर्ख लेकाचे.

In reply to by मेघना भुस्कुटे

धमाल मुलगा Fri, 05/23/2008 - 10:37
जबरान् !!!!! आयला, मीपण असाच वैतागलो होतो 'हम दिल दे चुके सनम' पाहून. एक तो सलमान, काय ते येडं भंजाळल्यासारखं आकाशाकडं बघून जोरजोरात एकटंच गप्पा हाणत असतं, आमच्या गावात आहेत अशी एक-दोन वेडी माणसं :) बरं, मान्य आहे बाबा तू हाडाचा गायक बियक आहेस..म्हणजे ते काय म्हणतात बरं...हां, जन्मजात कलाकार आहेस, अरे पण म्हणून इतकं खुळ्यासारखं वागायचं? कलाकार काय अक्कलशुन्य असतात का? दुसरी ती ऐश्वर्या, तीच्या आयुष्यात नक्की काय प्रॉब्लेम आहे हेच कळत नाही..आपण काय करतोय, काय करायचंय, काय होइल...कश्शा-कश्शाचाच विचार नाही? आज काय म्हणे सलमानवर प्रेम....उद्या काय म्हणे बाबा म्हणतात ह्याच्याशी लग्न करायचं म्हणून एकदम "निंबुडा निंबुडा" करुन नाचत लग्नाला तयार, परवा काय तर त्या अजय देवगणासमोर अचानक पहिल्या प्रेमाचा साक्षात्कार... तो बिचारा शिगारेटी फुंकुन फुंकुन छातीचं खोकडं करुन घेतोय, आणि ही हिंडतीये त्या सलमानला शोधत.... बरं तो भेटल्यावर तरी गप त्याच्याबरोबर सुखानं संसार करावा, तेही नाही...परत अजय देवगणकडे गाडी वळलेली... काय बाई आहे का भिंताड? येऊन जाऊन त्या अजय देवगणनं साकारलेला संयत, समजुतदार, भल्या मनाचा नवरा हेच काय ते दु:खात सुख! आणि "अलबेला सजन आयो..." एएएएएकदम मस्त!!!!!! केवळ त्यासाठी भन्साळ्याचे सगळे गुन्हे माफ !

In reply to by मेघना भुस्कुटे

भडकमकर मास्तर Fri, 05/23/2008 - 13:39
एकाच पात्राच्या किती चुका... १.बाप नाही तर नाही ऐकत, त्या बिचार्‍या अजय देवगणला सरळ सांगता येत नाही, की बाबा रे, असं असं आहे... लग्न-बिग्न नको _ २.बरं, ठीक आहे, लग्न केलं. मग तरी गप बसायचं. तेपण नाही. नंतर नवर्‍याला सांगायचा धीर आला. ३.मग जायचं सलमानसोबत. तोतरी सुखी. तेही नाही. एकदम चार रात्रींमधे सलमानवरचं प्रेम उडून अजयवर? कारण काय, तर मंगळसूत्र पण पहिल्यांदा बघताना जास्त जाणवल्या नाहीत चुका... ऐश्वर्याचं दिसणं, उत्तम संगीत आणि गाणी यात आख्खा सलमान सहन केला...( ऐश्वर्याच्या डीव्हीडी कॅप्चर्सवरून कोलाजेस , वॉलपेपर्स बनवणे हा आमचा त्या काळातला आवडता उद्योग) अजयचं पात्र बेष्ट रंगवलंय... ( मला या सिनेमात एक मर्मभेदक ऍडिशन सुचतेय की अजय देवगण शेवटी ती बोंबलत तिच्याकडे आल्यावर तिला म्हणतो, "...आज आलीस उद्या परत तिसर्‍याकडे जाशील... तुझ्या आवडत्या खेळापायी मला का त्रास सारखा? या टायमाला युरोप दर्शन झालं, पुन्हा म्हणशील आता ऑस्ट्रेलियात फिरूयात...अशी मानसिकदृष्ट्या अस्थिर चंचल स्वभावाची बायको मला नको .. चल हो बाहेर..." ... मग अगदी काव्यात्म न्याय मिळाल्यासारखं झालं असतं... :)) :)) _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

विसोबा खेचर Fri, 05/23/2008 - 13:42
"...आज आलीस उद्या परत तिसर्‍याकडे जाशील... तुझ्या आवडत्या खेळापायी मला का त्रास सारखा? या टायमाला युरोप दर्शन झालं, पुन्हा म्हणशील आता ऑस्ट्रेलियात फिरूयात...अशी मानसिकदृष्ट्या अस्थिर चंचल स्वभावाची बायको मला नको .. चल हो बाहेर..." =)) हा हा हा मास्तर, तुमची मर्मभेदक ऍडिशन लै भारी आहे! :))

In reply to by विसोबा खेचर

मन Fri, 05/23/2008 - 16:55
मला सुचली ती अशी... समजा हा पिकचर करण जोहर ह्या प्रेमाच्या घाउक विक्रेत्याला दिला असता, तर त्याने:- येक शाहरुख वाढवला असता.जो, मुळात नाराज अजयचे मन वळवुन त्या सटवीला सलमानच्या दारात सोडुन ये म्हणतो. आता,शाहरुख ने य्व्हढे उप्कार केलेच आहेत म्हणल्यावर त्याची "परतफेड" कशी करावी या विवंचनेत असलेली ती येडझवी नायिका त्याच्याही प्रेमात पडली असती! मग झाला असता साक्षात्कारः- शाहरुख तर आधिच त्याची "मैत्रिण" काजोल(किंवा राणी) ह्यांच्या प्रेमात आहे. मग त्याला खुश कसे करणार्?त्या काजोलच्या गळ्यात मारुन! पण काजोल सलमानच्या प्रेमात आणी सलमान ऐश्वर्याच्या विरहात व्याकुळ का काय म्हणतात ते झाला आहे. मग? करणार कसं? हे त्या येड्यालाही कळलं नसतं आणि तो जे दाखवेल, ते प्रेक्षकांनाही कळलं नसतं! ज्याने जो अर्थ घ्यायचाय , तो घेतला असता! (हाच चित्रपट दीपा मेहता(फायर, अर्थ्,वॉटर वाली) हीनं घेतला असता, तर शेवट दाखवला असता की, त्या भामट्या ऍश ला अद्दल घडवण्यासाठी सलमान्-अजय लग्न करतात क्यानडात जाउन! आणि मस्त ऍवार्डस वगैरे मारले असते ह्या बाईनं.म्हंजे ते दोघही खुश, ऍश ला अद्दल घडली ती वेगळीच. सगळाच कसा सुखांत!) आपलाच, मनोबा (जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!' )

In reply to by मन

भडकमकर मास्तर Fri, 05/23/2008 - 17:14
(हाच चित्रपट दीपा मेहता हीनं घेतला असता, तर शेवट दाखवला असता की, त्या भामट्या ऍश ला अद्दल घडवण्यासाठी सलमान्-अजय लग्न करतात क्यानडात जाउन! हहाहा... हे फारच आवडले... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by मन

झकासराव Fri, 05/23/2008 - 19:32
हाच चित्रपट दीपा मेहता(फायर, अर्थ्,वॉटर वाली) हीनं घेतला असता, तर शेवट दाखवला असता की, त्या भामट्या ऍश ला अद्दल घडवण्यासाठी सलमान्-अजय लग्न करतात क्यानडात जाउन! आणि मस्त ऍवार्डस वगैरे मारले असते ह्या बाईनं.म्हंजे ते दोघही खुश, ऍश ला अद्दल घडली ती वेगळीच. सगळाच कसा सुखांत =)) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

चावटमेला Fri, 05/23/2008 - 14:12
मस्तच मास्तर, लै भारी.. ह्या सीन मध्ये अमरिश पुरी प्रमाणेच मंदीराच्या मनात खालील विचार चालले असतील "अगं सटवे, अशी डाव खेळलीस काय ?इकडे माझ्या भावाला नादी लावलेस आणि तिकडे ह्याच्याबरोबर गुलछर्रे उडवित होतीस काय्?इथे हे आम्हाला समजले म्हणून बरे, नाहीतर, तिकडे त्या इंग्लंडात अजून काय धंदे केले असतील देवच जाणे??? आणि हा मुडदा सुध्दा काय निर्लज्ज आहे. एवढा मरेपर्यंत मार खावून सुद्धा कसा उजळमाथ्याने चालला आहे.बरं झालं , चांगलंच बदडलं ह्याला, मी तर म्हणते छान चेचून काढायला हवं होतं. मीच कपाळकरन्टी म्हणून ह्या नरसाळ्यावर भाळले होते.वेळीच समजलं म्हणून बरे, नाहीतर, मै मा बननेवालि हू म्हणायची वेळसुद्धा आणली असती ह्याने माझ्यावर, ह्या बाजारबसवीसाठी हा नरसाळाच ठीक आहे, जा आता आणि बसा गळ्यात गळे घालून( आणि मी जाते क्रिकेट कॉमेन्ट्री करायला गळा उघडा टाकून ;) )"

In reply to by चावटमेला

धमाल मुलगा Fri, 05/23/2008 - 14:17
सटवी काय, नरसाळा काय, मुडदा काय.... अगाबाबो..... त्यांच्यापैकी कोणी हे वाचलं तर झीट येऊन पडतील की :)
मै मा बननेवालि हू म्हणायची वेळसुद्धा आणली असती ह्याने माझ्यावर, ह्या बाजारबसवीसाठी हा नरसाळाच ठीक आहे, जा आता आणि बसा गळ्यात गळे घालून
:))
( आणि मी जाते क्रिकेट कॉमेन्ट्री करायला गळा उघडा टाकून Wink )"
=)) =)) =)) स्वगताचा शेवट मात्र एकदम वास्तवदर्शी आहे हो चावटशेठ ;)

निरंजन मालशे Fri, 05/23/2008 - 17:03
अरे सकळ्या त्रिकोणी लव्हस्टोर्या अशाच असतात. मला आजही कळलेल नाही की सलमान अस काय सांगतो म्हणून दोन सीन पुर्वी दोन्ही नायकांच्या नावाने शिमगा करणारी माधुरी संजय दत्तशी लग्न करायला तयार होते.

शितल Sat, 05/24/2008 - 03:40
मास्तरा॑नी डीडीएलजी ची केलेली शाळा आणि त्या वरच्या सर्वच प्रतिक्रिया ह्या अफलातुन आहेत. चावटमेला साहेबा॑नी तर हातच॑ काहीच राखुन लिहिले नाही आहे. त्यामुळे हि॑दी पिक्कचर आणि त्यात ते करण जोहर असेल पैसे घालुन बघणे म्हणजे, आ बैल मुझे मार हा प्रकार. प्रेमाच्या भानगडी शिवाय हे हि॑दी पिक्कचर निर्माते पिक्कचर बनवु शकत नाहीत का ?

मनिष Tue, 05/27/2008 - 17:50
कदाचित संजय लीला भंसाळी नीट दाखवू/पट्वू शकला नसेल पण सिनेमात 'प्रेम करणे' आणि 'प्रेम निभावणे' यातला फरक ऐश्वर्याला (नंदिनीला) लग्नानंतर जाणवतो - सलमान (समीर) हा वेगळ्या वातावरणात वाढलेला, अवखळ, मजेशीर पुरुष - नंदिनी त्याच्या प्रेमात पडते आणि अजय देवगण (नाव काय त्याचे सिनेमात) फक्त तिच्या प्रेमाखातर आणि तिच्या इच्छेखातर तिला सलमानकडे घेऊन जातो. त्यात तिला जाणवणारा त्याचा दुहेरी पराभव ('इस मे दोनो तरफ हार मेरीही आहे') -- नवर्‍याबरोबर राहिली तर तिच्या मानाविरुद्ध रहाते आणि झुरते म्हणून तर सलमान (तिचे प्रेम) कडे नेले तर ती त्याच्याबरोबर जाणार म्हणून. असे असूनही तिला खरच तो भेटावा म्हणून अजय चा सच्चा प्रयत्न. त्या प्रवासात, प्रयासात त्यांच्यात तिला जाणवणारा 'प्रेमात पडणे'/आकर्षण (infatuation) आणि प्रेम निभावणे/खरे प्रेम (love) ह्यातला फरक -- त्याच्यात निर्माण होणारे नाजूक बंध हे सगळे जर नैसर्गिकपणे उलगडत/उमगत गेले तर मला वाटते हे इतके विचित्र वाटत नाही. भंसाळी चा प्रयत्न खूपच चांगला वाटला. तो जर कुठे फसला/अपयशी ठरला असेल तर तो माझ्या मते असा - (१) सलमान चा अतिशय पोरकट अभिनय (त्यात नवीन काय म्हणा?) -- ते वडिलांशी बोलण्याविषयी - भंसाळी म्हणे बोलायचा असा कल्पनेत त्याच्या वडिलांशी (तसे बरेच जण बोलतात कल्पनेत त्यांच्या प्रिय व्यक्तीशी/support system, त्या व्यक्तीच्या निधनानंतर) -- आणि एक दिवस सलमान्ने फोने करून त्याला विचारले कि असे करूया का? भंसाळी भारावला आणि त्याला वाटले की सलमान खूपच जोडला गेला आहे त्या स्क्रिप्टशी - हे भंसाळीनेच एका मुलाखातीत सांगितलेले आठवते. अर्थात चांगल्या कल्पनेची प्रत्यक्षात माती करावी तर सलमाननेच....ते प्रत्यक्षात इंटेन्स वाटण्याऐवजी विनोदीच वाटले. (२) अजय आणि ऐश्वर्याचे नाते फुलतांना अजून छान दाखवायला हवे होते - तिला होणारी प्रेमाची जाणीव, तिचे अजयमधे गुंतणे हे जरा प्रभावीपणे यायला हवे होते. त्या मनाने तिला जाणवणारे अजयचे प्रेम जाणवते. पण जेवढ्या तीव्रतेने तिचे समीरमधे गुंतणे, त्याच्या विरहात व्याकुळ होणे येते - तेवढ्या प्रभावीपणे अजयचे आणि तिचे नाते दिसत नाही. तसेच अपेक्षित शेवटाकडे जातांना भंसाळीने ऐश्वर्याच्या व्याकुळतेची तीव्रता कमी होतांना दाखवायला हवी होती - 'अरे खरच काय मी कशाच्या शोधात आहे, मला वाटलेल्या प्रेमाच्या मृगजळाच्या की माझा नवरा जे जीवापाड प्रेम करतो आहे ते खरे आहे?' हे नाही तितक्या प्रभावीपणे जाणवू शकले. (३) अजय आणि सलमानची भेट ही अतिशय वाईट कल्पना - अजयला वाटणारी असूया हि एक स्वाभाविक प्रतिक्रिया होती - ती तशीच राहू द्यायला हवी होती. त्यांना 'फिल्मी योगायोगाने' मित्र बनवण्याची काहिच गरज नव्हती. मला वाटते, भंसाळी काही सीनच्या, गाण्याच्या आणि visualizations च्या प्रेमात पडला नसता (उदा.ढोली तारो ढोल बाजे) तर स्क्रीप्टला न्याय मिळाला असता. जितक्या प्रभावीपणे सलमान-ऐश्वर्याचे नाते येते तितक्या प्रभावीपणे अजय-ऐश्वर्याचे जुळणारे नाते येत नाही. हा भंसाळीचा पराभव. मंगळसुत्र हे commitment किंवा 'प्रेम निभावणे' (love is a verb, not noun) या सहज प्रतिकात्मक अर्थाने न येता पारंपारिक, फिल्मी पद्धतीने 'Cliché' होऊन येते. पण तरीही मला एकूण सिनेमा इतका विचित्र/विनोदी वाटला नाही. 'वो सात दिन' हाही असाच एक सिनेमा - त्यातही बरीचशी अशीच ट्रिटमेंट जाणवली. बाकी - धमु ने म्हटल्याप्रमाणे 'अलबेला सजन आयो रे...' साठी हजार चुका माफ! खर तर ह्यातली सगळीच गाणी अप्रतीम आहेत - दरबारीतला 'अलबेला सजन..' आणि 'तडप तडप के....' वर जीव ओवाळून टाकावासा वाटतो. असो! फारच सविस्तर झाले.... - (फिल्मी) मनिष अवांतर - नुकत्याच आलेल्या 'यू, मी और हम' मधेही हिच love is a verb, not noun कल्पना होती पण त्याचा साग्रसंगीत बट्ट्याबोळ केला आहे! :) कदाचित आपल्या 'प्यार किया नही जाता, हो जाता है" फिल्मवाल्यांना हि कल्पना माहित असेल पण अजून नीट उमजलीच नसेल.

In reply to by मनिष

धमाल मुलगा Tue, 05/27/2008 - 18:18
मनिष, छान सांगितलस :) माझ्यासारखं टोकाची भुमिका न घेता सांगोपांग विचार करुन सौम्य शब्दात योग्य भावना पोहोचवल्यास. अभिनंदन !
जितक्या प्रभावीपणे सलमान-ऐश्वर्याचे नाते येते तितक्या प्रभावीपणे अजय-ऐश्वर्याचे जुळणारे नाते येत नाही. हा भंसाळीचा पराभव.
+++१
तसेच अपेक्षित शेवटाकडे जातांना भंसाळीने ऐश्वर्याच्या व्याकुळतेची तीव्रता कमी होतांना दाखवायला हवी होती
सही रे भिडू!

In reply to by मनिष

भडकमकर मास्तर Wed, 05/28/2008 - 14:13
फारच छान मनीष.. हम दिल दे चुके सनमचे अप्रतिम विश्लेषण....तुझे तीनही मुद्दे एकदम पटले... वो सात दिन सुद्धा तसाच आहे, मला थोडा जास्त छान वाटतो... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by मनिष

मनीष, मग तिच्या आधीच्या प्रेमभावनेचं काय? तिला वाटले ते नुसतेच आकर्षण? की एक माणूस आपल्यावर इतकं समजूतदार इत्यादी प्रेम करतो आहे, म्हणून आपणच निर्माण केलेल्या आधीच्या नात्यांना मोडीत काढायचे? (सलमानचं कॆरेक्टर अत्यंत आचरटपणे रंगवल्यामुळे मला काही काळ ’बरे झाले’ असा एक आसुरी आनंद झाला, नाही असे नाही! पण) मंगळसूत्र क्लिशे होऊन येते हे खरेच आहे. पण समजा असे गृहित धरू, की तो क्लिशे नाही. तरीही ऐश्वर्या आपल्याच नात्याला तिलांजली देऊन नव्या नात्यात अडकते? मला हे फार उथळ वाटते. त्यापेक्षा भन्साळीच्याच ’सॉंवरिया’मधली प्रेयसी मला सच्ची आणि पुरेशी हट्टी वाटली होती. (बाकी सिनेमाबद्दल न बोलणे बरे!) एका ठिकाणी गुंतलेला जीव असा इतक्या सहजासहजी उचकटला जात नाही. मग समोरचा माणूस कितीही जिवापाड प्रेम करत असो. त्याचे प्रेम हे बर्‌याचदा आपण बाहेरूनच पाहू शकतो... असो. वाद नव्हे.... पण नाही पटले खरे... खूप समंजस शब्दांत उकलून दाखवले आहे तुम्ही.

In reply to by मेघना भुस्कुटे

मनिष Sat, 05/31/2008 - 11:10
खरे आहे....जर आधीची प्रेमभावना स्ट्रॉंग सेल तर तू (चालेल ना?) म्हणते ते बरोबर आहे. पण भंसाळीला ते दखवायचे नव्हते - त्याला अपेक्षित असलेल्या कथेच्या दृष्टीने मी सांगत होतो. आपल्या सारख्या स्वतंत्र वृत्तीने वाढलेल्यांना पटणार नाही हे, पण काही वेळा असे होते हे समजून घेता येईल.

In reply to by मनिष

मनीष, अर्थातच ’तू’ चालेल! काही वेळा असे होते खरे. बाकी भन्साळीच्या एकंदर आवाक्याचा विचार करता आपण त्यावर इतके शब्द उधळावेत का, असा एक पोटप्रश्न पडतो आहे मला. बाय दी वे, कुणाला ’कभी अलविदा ना केहना’ वर काहीच म्हणायचं नाहीय का? मुळात विवाहबाह्य संबंध हा करण जोहरच्या दृष्टीनं ’अब्रह्मण्यम्‌’ विषय. तो त्यानं निवडला हीच एक मोठ्ठ्ठ्ठी अचीव्हमेंट. पुढचा सगळा शेणकाला आपण त्याच्याकडे दयार्द्र दृष्टीनं पाहून माफ केला पाहिजे, असा माझा एकंदर दृष्टिकोन होता. पण सिनेमा पाहिल्यावर तो मला चक्क आवडला. अमिताभचा ’सेक्सी सॅम’ आचरटपणा किंवा राणी मुखर्जीचा निरागस मूर्खपणा (दुकानातल्या बेडवर बसून इतक्या संशयास्पद पद्धतीनं रात्रीच्या सीनची तालीम करतं कुणी? आचरट नाहीतर...) करणबद्दलच्या एकूण अपेक्षांना साजेसा होता. पण नात्यांबद्दलची जाण चक्क प्रगल्भ म्हणावी अशी होती. ’अर्धी-मुर्धी नाती असण्यापेक्षा ती तोडून टाकणे उत्तम’ ही स्पष्टोक्ती किंवा प्रामाणिकपणा या भावनेला महत्त्व देऊन तथाकथित पवित्र विवाहसंस्थेशी बेईमानी करणे किंवा ’इस घरमें मर्द मैं हूं’ असा प्रीती झिंटाचा स्पष्ट बोचरा उद्गार... सुखद धक्का. ध्यानीमनी नसताना. (तरी शाहरुख खान, प्रीती झिंटा, अभिषेक आणि राणी यथाशक्ती डॉक्यात गेलेच.) असे अजून काही सिनेमे आठवताहेत?

In reply to by मेघना भुस्कुटे

भडकमकर मास्तर Sun, 06/01/2008 - 01:11
मुळात विवाहबाह्य संबंध हा करण जोहरच्या दृष्टीनं ’अब्रह्मण्यम्‌’ विषय. तो त्यानं निवडला हीच एक मोठ्ठ्ठ्ठी अचीव्हमेंट. हे खरं..तो इतपत रिस्क घेइल असे कधीच वाटले नव्हते ... निदान विषय निवडीसाठी त्याला बरे मार्क... पण पुढे सिनेमाभर प्रत्येक कॅरेक्टर विचित्र वागत राहते... ( ते सरप्राईज करायचे प्रसंग वगैरे) घडोघडी वैताग येत राहतो... मात्र प्रीती झिन्टा शाहरूखच्या कानाखाली ठेवून देते हा प्रसंग लै मज्जा आणतो... ... दोन किरकिरे जीव आधीच्या संसारातून भांडून एकत्र येतात ,...ठीकच आहे...पण ते पुढे एकमेकांबरोबर सुखाने राहतात की नाही हाच एक मोठा प्रश्न... तात्पर्य : दुरून दुसर्‍याच्या बायका (किंवा दुसर्‍यांचे नवरे ) कितीही साजरे दिसले तरी त्या स्वतःच्या बायका (किंवा स्वतःचे नवरे ) होतील तेव्हा साजरे नसतात ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मनिष Tue, 05/27/2008 - 20:27
काही खरच डोक्यात जाणार्‍या सिनेमांच्या कथा... काही खरच डो़क फिरवणार्‍या कथा/सिनेमे असे आहेत की डायरेक्टर भेटला की डायरेक्ट त्याच्या श्रीमुखात द्यावी असे वातते. आठवेल तसे लिहितो इथे - चुपके-चुपके - मागच्या वर्षी आलेला शाहिद कपूर - करीना कपूर ह्यांचा सिनेमा. त्यात शाहिद चे गावात सुषमा रेड्डीवर प्रेम, इकडे काही अतर्क्य घतनानंतर साहेब करीनाच्या प्रेमात - त्याचा गैरसमज की सुषमा रेड्डीचे लग्ना झले आहे - करीना शाहिद च्या प्रेमाचा रस्ता मोकळा - मोकळा म्हणजे एकदम हायवे होतो (नाही, सैफ नव्हता सिनेमात! :)); इतका की सिनेमाभर गुजरातचे गोडवे गाणारे कुटुंब एकदम पंजाबी गाणे गाऊन आनंद साजरा करते..जाऊ दे. माफ प्रियदर्शनला! पण हाईट म्हण्जे, सिनेमाच्या शेवटी सुषमा रेड्डी लग्नघरी येते आणि सगळा खुलासा होतो - आता शहिदची अगदी शाही पंचायत -- आणि प्रियदर्शनची पण. काय करावा साहेबांनी क्लायमॅक्स?? तर सुषमा रेड्डी शहिदला म्हणते (करीनाचा आग्रह करून झाल्यावर) - तू करीनाशी लग्न कर,कारण?......कारण का तर म्हणे ती मुकी आहे?? 'उसे सहारा दो!' अरे किती मुर्ख आणि क्रूर कारण? दया म्हणून प्रेम/लग्न?? किती हॉरीबल??? हाच का तो हेराफेरी देणारा प्रियदर्शन?? कितीही विसरू म्हटले तरी हा क्लायमॅक्स डोक्यात जातो!!!

In reply to by मनिष

मनिष Wed, 05/28/2008 - 11:42
शाहिद कपूर - करीना ह्यांच्या सिनेमाचे नाव "चुप-चुपके" होते! चुकीबद्द्ल क्षमस्व. - मनिष स्वगत : तसेही कोणी वाचलेले दिसत नाही! :)

मनिष Tue, 05/27/2008 - 20:46
बेनाम बादशाह - आयुष्यात बकवास सिनेमे (थिएटर मधे जाऊन) बघण्याची पापे खूप केली, पण जेवढा संताप/उद्वेग/वैताग ह्या चित्रपटाने आला, तेवढा कुठल्याही इतर सिनेमाने आला नाही. ह्याची कथा साधारण अशी - अनिल कपूर असाच एक अनाथ, मवाली सुपारी घेणारा. एक दिवस सुपारी घेऊन तो (अनोळखी) जुही चावलावर बलात्कार करतो, ती मुर्ख मुलगी इतर काही करण्याऐवजी (जसे बदला) त्याच्या मागे लागते लग्न कर म्हणून. किती हिडिस कल्पना आहे ही?? काही बोलवत ही नाही. हे दोघेही तसे नावाजलेले कलाकार - त्यांनी होकार दिलाच कसा असा सिनेमा करायला? आणि डायरेक्टर कोणी 'के. रवी शंकर' म्हणून...त्याला भेटून एकदा कानाखाली जाळ काढायची खूप इच्छा आहे..किंवा विचारावेसे वाटते, जर असेच तुझ्या मुलीच्या बाबतीत झाले तर काय करशील?? किळसवाणा सिनेमा आहे खरच - जर 'रारंग ढांग' सारख्या कथेला सेन्सॉर परवानगी देत नसे, तर अशा कथेला कशी परवानगी मिळते?? मुर्खपणा सगळाच...

In reply to by मनिष

भडकमकर मास्तर Wed, 05/28/2008 - 14:10
किती हिडिस कल्पना आहे ही?? खरंच...साउथचे सिनेमे भडक असतात माहित होते पण हा काय सिनेमा झाला? कसली गोष्ट? .. त्यातलं एक टुकार गाणं आठवतंय...( का आठवतंय कोण जाणे ?) बेवडा अनिल कपूर बोंबलत हिंडत गाणं म्हणत असतो, " माता कौन पिता कौन, कचरे के डिब्बे में गिराया गया कचरे के डिब्बेसे उठाया गया...." ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भडकमकर मास्तर Wed, 05/28/2008 - 14:26
लक्ष्य हा डोक्यात जाणारा सिनेमा नाही... चांगला आहे...गोष्ट अभिनय गाणी नृत्य ( मै ऐसाही हूं) चगैरे मस्तच.... . ..पण एक मुद्दा नेहमी खटकत / जाणवत असे, ______ ही गोष्ट जर एका एमलेस माणसाला त्याचे ध्येय सापडणे यावर आहे, आणि त्याची एक प्रोमोज मध्ये जहिरात असे की " ही डिस्कव्हर्ड व्हॉट ही वाँटेड इन लाईफ ऍट अमुक अमुक थाउजंड फीट" ( शब्द थोडेफार वेगळे असतील ) अशा अर्थाची काहीतरी.... मग पिक्चर पाहिल्यावर असे वाटले, की ज्या क्षणी त्याने त्याचा आळशीपणा सोडला आणि आय एम ए गंभीररित्या (एकदा पळून आल्यानंतर पुन्हा ) जॉइन केली तेव्हा गोष्ट पूर्ण झाली, ही डिस्कव्हर्ड व्हॉट ही वॉन्टेड इन लाईफ..... मग पुढे तो सैनिक होतो, कारगिल मध्ये पराक्रम गाजवतो की नाही, युद्धात जिंकतो की नाही , मरतो का वाचतो हा प्रश्न लांबचा.... मुख्य सिनेमा कधीच संपला... ( म्हणजे प्रीमाईस यशस्वी होणे किंवा न होणे असा नसून ध्येय सापडणे असा आहे) हे मी कोणाला कधी बोललो नाही, पण एकदा जावेद अख्तरची मुलाखत चालली होती ,( कोणता सिनेमा चुका सुधारून पुन्हा लिहायला आवडेल? अशा प्रश्नावर त्याने मेरी जंग आणि लक्ष्य या दोन सिनेमांची नावे घेतली होती)) तेव्हा तोही असेच म्हणाला... (म्हटलं बेष्ट... लै खुश झालो...) लक्ष्य ची स्टोरी स्क्रीनप्ले जावेद चा की फरहानचा? कोणाला माहित आहे का? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

ऋचा Wed, 05/28/2008 - 14:36
अस्साच एक डोक्यात जाणारा चित्रपट म्हणजे "कभी खुषी कभी गम" ~X(

In reply to by ऋचा

आईबापावर प्रेम करण्याचे दोनच मार्ग. त्यांच्या गळ्यात पडणे नाहीतर त्यांच्या पायांवर लोळण घेणे. मग ते चुकीचं सांगत असोत, बरोबर सांगत असोत, काहीही फरक पडत नाही. 'माफी माँगनेसे आदमी छोटा नहीं हो जाता' हे वर. म्हणजे? काही चुकलं नसेल तरी उग्ग्ग्ग्गाच माफी मागायची? का म्हणून? आणि लग्नासारख्या गोष्टीत मनमानी करायला येणारे आईबाप हा पुरातनकालीन विषय आपण कधी बंद करणार आहोत? (करण जोहरकडून ही अपेक्षा म्हणजे फारच झाले म्हणा!) त्यात आणि ती डॉक्यात जाणारी करीनाची 'पू'. आणि तिला 'कपडे घाल, कपडे घाल' म्हणून पिडणारा शाहरुख खान. भारतीय संस्कृती जपणारी काजोल. (केवळ काजोल होती म्हणूनच. नाहीतर...)

In reply to by मेघना भुस्कुटे

कोलबेर Sat, 05/31/2008 - 10:17
मस्त!! ह्यावर एक स्वतंत्र लेखच टाका! अवांतरः ह्या पंजाब्यांचं माहित नाही पण 'पू' म्हंटलं की आमच्या डोक्यात तरी जखमेतुन वाहणारा एक दुर्गंधीयुक्त स्त्राव येतो!!

मन Wed, 05/28/2008 - 14:44
हा चित्रपट पाहुन अब "प्र्क्षक क्या करे" तेच कळलं नाय. त्यो अजय देवगण म्हणे त्या (अविवाहित्/कुमारी) काजोलला वाचवतो. कुणापासुन काय म्हणताय? अर्थातच गुंडांपासुन,ते ही त्यांनी काही "भलतसलतं" करायच्या आत. आनि तत्काळ लगेच तेच "भलत सलतं" स्वतःच करुन मोकळा होतो, येका रात्रित,ट्रेन मधी. (थोडक्यात काय, तर तो गुंडांना जे करण्यापासुन अडवतो, तेच स्वतः खुशाल करुन मोकळा होतो.) आणि तोंडाला काळं लावुन जो पसार होतो, तो पुन्हा गावतच नाय लवकर. इकडे काजोलला (विवाहपुर्व)अपत्यप्राप्ती होतेच(अपेक्षेप्रमाणे). आणी तिथुन पुढं काय तर "मनाचा-गुंता", "तरल्-नाती" असला भुक्कड मालमसाला भरलाय. बाकी गाणी अप्रतिम,(केवळ त्यासाठी शिणुमा पुन्हा पुन्हा बघायची तयारी आहे आपली.) (हद्द हिच, की, अशा प्रकारे पसार होउन, कित्येक तपांनंतर हे महाशय जेव्हा गावतात त्या काजोलला, तेव्हा ती बया त्याच्या दोन मुस्काडात देण्याऐवजी,किंवा स्वतःवर आनी त्याच्यावर खजील राहण्याऐवजी खनकळत "नकळत" पुन्हा त्याच्या वर फिदा. हाय रे कर्मा. काय काय बघाव आता उघड्या डोळ्यांनी.) तर ह्या शिणुमातुन लेकी-बाळिंना संदेश्/उपदेश येकच, बायांनो, जो तुम्हाला "वाचवायला" येइल, त्याच्यापासुन जरा "वाचुन"(आणी वचकुनच) रहा. आपलाच, मनोबा

यशोधरा Wed, 05/28/2008 - 23:52
>>> लक्ष्य ची स्टोरी स्क्रीनप्ले जावेद चा की फरहानचा? जावेद अख्तर यांचा. दिग्दर्शन फरहानचे.

'लक्ष्य' पाहून मलाही असंच वाटलं होतं. ध्येय सापडणं आणि यशस्वी होणं या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत खर्‍या. आणि कहर वाटली होती ती हृतिकची व्यक्तिरेखा. पूर्वार्धात तो किती बालिशपणे वागतो! प्रीती झिंटा आणि तो एकमेकांच्या खरेच प्रेमात पडले आहेत, की 'बरी मैत्री आहे... सोयीचे आहे झाले' म्हणून ते प्रेमगाणी गाताहेत हेच कळत नाही. त्यांच्यात 'रोमान्स' कुठे दिसतच नाही. दिसते ती फक्त जुन्या मित्रमंडळींबद्दल होते ती सवयीची भावना. एकमेकांना आवडीने 'चालवून' घेणे. मग एकदम 'कितनी बातें केहनेकी हैं..'मधे रोमान्स. त्यांच्यात इतकं सगळं आठवण्याइतकं घडलं तरी कधी, आपण तेव्हा कुठे होतो... असे प्रश्न पडतात ते गाणं पाहताना.

In reply to by मेघना भुस्कुटे

कोलबेर Sat, 05/31/2008 - 11:35
अगदी खरंय...अरे तुच का तो 'दिल चाहता है' बनवणारा??? असा पश्चात्ताप करत बाहेर पडलो होतो.

In reply to by मेघना भुस्कुटे

भडकमकर मास्तर Sun, 06/01/2008 - 01:00
_मग एकदम 'कितनी बातें केहनेकी हैं..'मधे रोमान्स. त्यांच्यात इतकं सगळं आठवण्याइतकं घडलं तरी कधी, आपण तेव्हा कुठे होतो... असे प्रश्न पडतात ते गाणं पाहताना. _ फार छान वाक्य... अगदी हेच म्हणतो... ____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भडकमकर मास्तर Sun, 07/13/2008 - 16:19
आता थोडं लिहितो ओम शांती ओम बद्दल... मी या सिनेमाबद्दल अजिबात अपेक्षा न ठेवता गेलो होतो त्यामुळे मला बरा वाटला... दीपिका तर लै बेष्ट.. श्रेयसने सुद्धा छान काम केले आहे.. ( म्हातारा मात्र अजिबात दिसला नाही, श्रेयस म्हातारा आणि शाहरूख तरूण असलं पहायचं जीवावर आलं खरं)... ते जाऊदेत.. __________ शेवट थोडा अजून योग्य करता आला असता...ते झुंबर पडून अर्जुन मरतो वगैरे ठीकठाक.... मुख्य म्हणजे त्यानंतर हीरोला कळते की खरंच भूत हे सारे प्रकार करत होते... पण ही गोष्ट अर्जुनला कळायला नको का? नाहीतर त्याला इतकेच वाटणार की झुंबर पडायच्या अपघाताने आपण गेलो... मग इतके सारे प्रयत्न करून एवढी गोष्ट पाहून काय उपयोग? गोष्टीत दुष्टाला शासन हवेच पण त्याला ते कळायलाही हवे तर प्रेमाईस सिद्ध होणार ना... त्यातल्या झुंबराखाली पडलेल्या अर्जुनला दोन्ही दीपिका दिसतात आणि भूत त्याला त्या त्याच्व्या दुष्कृत्याची जाणीव करून देते आणि त्याची हीच शिक्षा आहे असे म्हणते ... आणि मरता मरता अर्जुन त्याच्या गुन्हयाची कबुली देतो..आणि ते दृश्य सारे लोक ( क्लोज सर्कीटवर पाहतात, किंवा चॆनलवाले ्शूट करून दाखवतात..) मृत्यूबरोबरच एखाद्याची संपूर्ण इमेज / जनमानसातली प्रतिमा संपणे ही मोठी शिक्षा आहे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मला नाही असं वाटलं. शांतिप्रिया सांगते की त्याला - मेरी सांसे चल रही थी... असं. आता हे थोडंच शाहरुखला माहीत असणारेय? म्हणजे ही ओरिजिनल शांती आणि हा तिनं घेतलेला सूड हे अर्जुनला कळणारच. त्यासाठी दोन दोन शांत्या (!) दाखवायची काय गरज आहे?

In reply to by मेघना भुस्कुटे

भडकमकर मास्तर Wed, 07/16/2008 - 21:42
आता हे थोडंच शाहरुखला माहीत असणारेय? आता त्याला तर सगळंच आठवतंय म्हणून तर हे सारं करतोय तो...आणि ती काहीही बोलली असली तरी अर्जुनला तर असंच वाटत असणार की ही अभिनय करणारी नटी शाहरूखने शिकवलेले डायलॉग बोलतेय..( मला तरी असेच वाटले)......त्याला तिच्याबद्दल संशय आलेला आहेच... ... त्यामुळे आपल्याला दुसरी मानव दीपिका दिसल्यानंतरच नक्की कळते की हे आधीचे भूतच्...पण त्यांची अर्जुनशी काहीच इन्टरॅक्शन नाही , कारण तो आधीच मरतो... मग भुताचा सूड अगदी पक्केपणे कुठे दिसला ? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

छोट्या Tue, 07/15/2008 - 16:31
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ... कोणती तरि expectional गोष्ट असल्याशिवाय कोणी चित्रपट करत नाही (कमीत कमी चोप्रा family). अशा गोष्टिंमुळेच तर चित्रपट पहायला लोकं जातात. डोकं - बिकं लावून love story बघायच्या नसतात. त्यासाठी समांतर सिनेमे आहेत. मग चोप्रानीं कोन्या 'मास्तर' च्या जिंदगीवर पिक्चर काढायचा का? आणि तुमच्या डोक्यात जे प्रश्न आहेत त्याची थोडी फार उत्तरे आहेत पिक्चरमधे... उदा:: माझ्या बदनाम पोरीशी लग्न करायला कोण येणार आता?" किंवा त्या १५ २० सेकंदातले अमरीश पुरीचे स्वगत. याचं उत्तर तर लगेच सापडलं असतं... तिच्यासाठी तो 'कुलजीत' का कोण तो ..... कायम तयार असतो. आणि फसवा-फसवी च्या वर्तनावर जो आपला आक्षेप आहे तो पण काही बरोबर नाही वाटत... १०० पैकी ९५ love story मधे हा प्रकार सुरु असतो.... कोणी काही बापाची परवानगी घेउन असले उद्योग करत नाही.(काही सन्माननीय अपवाद सोडुन). मग चोप्रा दाखवले तर काय बिघडले??? त्यामुळे असल्या पिक्चरला उगाच नावे ठेवण्यात अर्थ नाही.

In reply to by छोट्या

भडकमकर मास्तर Wed, 07/16/2008 - 21:31
तुझ्या भावना दुखावल्या असतील तर सॉरी रे बाबा..... लव्ह स्टोरी पाहताना सुद्धा डोके लावण्याची चूक झाली माझी... धन्यवाद, सल्ल्याबद्दल... आणि ९५ % लव्ह स्टोर्‍यांमध्ये कसा प्रकार चालू असतो ते सांगितल्याबद्दल सुद्धा धन्यवाद... तेवढे या सर्व्हेचे डीटेल्स दे म्हणजे झाले, का इथे सुद्धा डोके लावायचे नाही?? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

छोट्या गुरुवार, 07/17/2008 - 12:30
काय मास्तर, आता या 'छोट्या' ने तुम्हाला शिकवायचं का? शेवटी डोकं आहे... कोणी कुठे लावायचं हा ज्याच्या त्याच्या डोक्याचा प्रश्न आहे. उगाच 'तुझ्या- माझ्या' करुन त्रागा नाही करुन घ्यायचा. आणि भावनांचं म्हणाल तर त्या 'पिक्चर' सारख्या फुटकळ गोष्टीत लावुन त्यांचा अपमान नाही करायचा!!! ;) ;) :P

In reply to by छोट्या

३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 07/17/2008 - 13:47
>> आणि भावनांचं म्हणाल तर त्या 'पिक्चर' सारख्या फुटकळ गोष्टीत लावुन त्यांचा अपमान नाही करायचा =)) पण हे मात्र मान्य की मास्तरांमुळेच जाम करमणूक झाली. येऊ द्या. (टुकार सिनेमांची चाहती) अदिती

गिरीराज गुरुवार, 07/17/2008 - 15:54
आयला, मीपण असाच वैतागलो होतो 'हम दिल दे चुके सनम' पाहून>>>>> अहो असे म्हणा: "हम दिल देके चुके सनम"

मध्यमवर्गीय गुरुवार, 09/18/2008 - 20:33
मला या ठिकाणी एक नमूद करवेसे वाटते कि चित्रपट पाहताना असल्या तार्किक गोंष्टिंचा विचार करून चित्रपटाची मजा घालवू नये. व.पु. च्या कुठल्याश्या कथेमध्ये वाचले होते...चित्रपट म्हणजे ३ तासांचे एक सुन्दर स्वप्न. त्यामध्ये हे असेच का, ते तसेच का असे प्रश्न विचारून त्या स्वप्नाची मजा घालवू नये. जर चित्रपटात असे दाखवले कि नायक राकेलच्या रांगेत उभा आहे, तर कसे वाटेल. असे चित्रपट आपण बघु का? अरे आपल्या रोजच्याच जीवनातल्या समस्या पडद्यावर दाखवल्यातर ते पाहण्यासाठि कोण येइल? आणि मुख्य म्हणजे आपल्याला ते आवडेल का? तसेहि माणसाची प्रव्रुत्ती असते कि त्याला दुसर्‍याच्या पायात काय अडकले आहे ते बघण्याची उत्सुकता. आणि त्यात गैर काहि नाहि. तेवढेच निवांत क्षण/विरंगुळा आपल्या रोजच्या दगदगीतून आणि कटकटीतून. स्वप्नात काहिहि घडू शकते राव. त्याचा त्रास नाहि करुन घ्यायचा. त्यामुळे "रजनीकांत"चे चित्रपट पाहताना सुद्धा मी ऍंजाय करतो. (रजानीकांत केवळ मराठी आहे म्हणून मी तमिळ भाषेतील चित्रपट पाहण्याचे धाडस केले, आणि आपण एक स्वप्न पाहत आहोत एव्हढा एकच द्रुष्टीकोन असल्यामुळे त्याचे चित्रपट आवडले. त्यावेळी "हा असा काय हवेत उडतो" म्हणून मनाला त्रास करून नाही घेतला.) पण मला, भडकमकर मास्तरांनी लिहिलेले आमरस पुरि चे स्वगत आवडले....स्वप्न पाहण्याचा आणखी एक द्रुष्टिकोन. प्रत्येकाने आपापल्या द्रुष्टिने स्वप्न पाहावे अशा मताचा मी आहे. एखाद्या चित्रपटाचे/स्वप्नाचे अशा रितीने काथ्याकूट करणे मलाहि आवडेल.

In reply to by मध्यमवर्गीय

भडकमकर मास्तर Sat, 09/27/2008 - 00:06
एखाद्या चित्रपटाचे/स्वप्नाचे अशा रितीने काथ्याकूट करणे मलाहि आवडेल. लिहा.. मग मीही त्यावर लिहीन की असल्या तार्किक गोंष्टिंचा विचार करून चित्रपटाची मजा घालवू नये ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

फारएन्ड Fri, 09/10/2010 - 05:46
एकदम आवडला :) मला या चित्रपटातील गाणी आणि बराच भाग आवडतो, पण हा शेवटचा भाग अजिबात आवडला नव्हता. त्या परमजीत ची काहीही चूक नसताना (मला नीट आठवत नाही) त्याचा उगाचच पचका केलेला आहे.

चिगो Sun, 09/12/2010 - 12:10
मस्त हाणामारी, चिरफाड केलीय... आणि DDLJ मला अजिबात न पचलेल्या पिक्चरपैकी एक आहे.. बाकी आपल्याला रजनीकांतचे पिक्चर आवडतात. डोकं शिणून दमतं आणि हलकं वाटतं बघा...

चिंतामणी Sun, 09/12/2010 - 13:00
जी पुढे कुकुहोहै, जप्याकिहोहै सारख्या अनेक सिनेमांमध्ये सुद्धा दिसली. चो चो (पक्षी चोरी चोरी) जप्याकिहोहैच्या आधिचा सिनेमा आहे. त्यातसुध्दा लग्नाच्या मांडवातुन नायीका नायकाबरोबर पळुन जाते. ही परंपरा या सिनेमाने सुरू केली आअहे असे म्हणले तर????????

In reply to by चिंतामणी

भडकमकर मास्तर Sun, 09/12/2010 - 23:40
त्यातसुध्दा लग्नाच्या मांडवातुन नायीका नायकाबरोबर पळुन जाते. मुद्दा अमान्य कारण चोरीचोरीमध्ये ती नायकाबरोबर पळून जात नाही तर नुसतीच पळून जाते आणि त्यानंतर तिला बसमध्ये नायक भेटतो...

In reply to by भडकमकर मास्तर

मास्तर ब्याक इन फॉर्म! :-D मास्तर, आणखी कोणत्या पिच्चरची मापं काढा की! लै दिवस झाले तुमच्या लेखणीतून काही दमदार धागा आल्याला!
लेखनविषय:
१. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे तो दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे १९९५ ऑक्टोबर ला आल्यापासून मग अनेक वर्षे की काय तो एका थिएटराला चालला... आम्ही १९९५ मध्ये सुट्टीत पाहिल्यानन्तर पुन्हा कॉलेज ग्रुपबरोबर परत पाहिला... इतरांना जाम आवडला...

पण काहितरी बदलतयं...

मनिष ·

प्राजु Tue, 05/20/2008 - 19:56
सुंदर मुक्तछंदातले काव्य.. शेवटचं कडवं तर खूप छान. खास करून, तिच्या डोळ्यात हरवलेलं काहीतरी गवसतयं तिच्या स्पर्शात सगळं दुःख विरघळतयं समजावता येणार नाही असं काही माझं मलाच उमगतयं एक वेगळंच जग दुरुनच खुणावतयं माझ्या नकळत मीहि स्वप्नात रमतोयं फुंकुन राख सगळी, निखारे पुन्हा पेटवतोय बदलता येईल सगळं असे कुठेतरी वाटतयं! आवडलं... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा Tue, 05/20/2008 - 21:19
तिच्या आठवणींने चेहर्यावर हसु फुलतयं तिच्या डोळ्यतील भाबडेपणा मनोमन भावतोय तिचा माझ्यावरील विश्वास आत खोलवर सुखावतोयं तिची हसरी नजर मलाही हसवतेयं हे जास्त आवडलं...

मदनबाण Wed, 05/21/2008 - 04:26
तिच्या डोळ्यतील भाबडेपणा मनोमन भावतोय तिचा माझ्यावरील विश्वास आत खोलवर सुखावतोयं हे मस्तच..... तू काय पाहिलसं माझ्यात हा प्रश्नही अनुत्तरीत :? फुंकुन राख सगळी, निखारे पुन्हा पेटवतोय बदलता येईल सगळं असे कुठेतरी वाटतयं! व्वा क्या बात है | (बदलता येईल सगळं ) असेच म्हणणारा..... मदनबाण.....

फटू Wed, 05/21/2008 - 06:51
तिच्या डोळ्यात हरवलेलं काहीतरी गवसतयं तिच्या स्पर्शात सगळं दुःख विरघळतयं समजावता येणार नाही असं काही माझं मलाच उमगतयं एक वेगळंच जग दुरुनच खुणावतयं माझ्या नकळत मीहि स्वप्नात रमतोयं फुंकुन राख सगळी, निखारे पुन्हा पेटवतोय बदलता येईल सगळं असे कुठेतरी वाटतयं! पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

अरुण मनोहर Wed, 05/21/2008 - 07:31
तिच्या भाबडेपणा, तिचा विश्वास, तिची श्रध्दा सगळंच अपरिचित ती भरेलही कदाचित सगळ्या जखमा भाबडेपणा म्हणजे निरागस लहान मूल. तिथे देवाचा अंश असतो. ह्याच दैवी प्रकटनाकडे कवी आकर्षीत झाला नसेल ना?..... खूप सकारात्मक कविता...

विसोबा खेचर Wed, 05/21/2008 - 09:16
वा मनिषराव! सुरेख कविता.... तिच्या आठवणींने चेहर्यावर हसु फुलतयं तिच्या डोळ्यतील भाबडेपणा मनोमन भावतोय तिचा माझ्यावरील विश्वास आत खोलवर सुखावतोयं या ओळी क्लासच! आपला, (कविताप्रेमी) तात्या. अवांतर - हे लिखाण आधी माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध केले होते, बाकी फक्त 'मिसळपाव' साठी! जियो...! आपला, (मिसळपावकर) तात्या.

मनिष Wed, 05/21/2008 - 12:28
बापरे! एवढे सारे प्रतिसाद मला खरच अपेक्षित नव्ह्ते...मि.पा. ची जिंदादिली जिंदाबाद! :) आणि सर्वांना मनापासून धन्यवाद! [:)] @ अरुण मनोहर - भाबडेपणा, निरागसपणात एक विलक्षण "healing, soothing power" असते हे मला कित्येक वेळा अनुभवायला आले आहे. मला लहान मुलांबरोबर खेळणे/बोलणे हा एक उत्कृष्ट स्ट्रेस-बस्टर वाटतो. अवांतर - कवितेतील "ती" आता नुकतीच बायको झाली आहे. :) कधी कधी रोजच्या व्यवहारात तिच्या ह्याच भाबडेपणाचा वैताग येऊन वाटते, "इतकी कशी तू/ही बावळट पणे वागू शकतेस?" -- आणि मग मी ह्याच भाबडेपणावर कसा फिदा होतो हेही आठवते (नाहितर ती आठवण करून देतेच!:)), आणि मी स्वत:लाच समजावतो. कवितारुपी 'लिखित पुराव्याचा" असाही एक उपयोग!! (फायदा की तोटा ते ज्याने त्याने ठरवावे! :D) बाकी व.पु. म्हणाले तसं "क्षण एक भाळण्याचा, बाकी सांभाळण्याचे" चा प्रत्यय येतच असतो - दोघांनाही! :) सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद! - मनिष स्वगत : अवांतर जरा 'जास्तच' झालं का?

आनंदयात्री Wed, 05/21/2008 - 12:34
मनिष .. सह्ही कविता .. च्यामारी काय अचुक उतरवलय भावनांना शब्दात .. कविता लै लै आवडली.

आनंदयात्री Wed, 05/21/2008 - 12:37
मी तसा चिडणारा, कपाळाला आठी घेउन वावरणारा सगळे घाव, वेदना न विसरता जगणारा एकटाच चालणारा आणि एकाकीच राहणारा पण काहितरी बदलतयं… तिच्या आठवणींने चेहर्यावर हसु फुलतयं सहीये बॉस्स ... परत वाचली .. परत वाचली अन वाचतच राहिलोय .. आपण तर फ्यान बॉ तुमचे !!

मनिष Wed, 05/21/2008 - 17:52
@ आनंदयात्री - धन्यवाद! :)

मनस्वी Wed, 05/21/2008 - 18:21
मनिष.. कोणत्या ओळी क्वोट करू.. सगळ्याच आवडल्या..
समजावता येणार नाही असं काही माझं मलाच उमगतयं बदलता येईल सगळं असे कुठेतरी वाटतयं!
विचार छान उतरलेत.

बेसनलाडू Wed, 05/21/2008 - 20:22
कविता आवडली. काही ठिकाणी संदिग्ध वाटली; पण एकंदर छान. लिहीत रहा. (वाचक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

मनिष गुरुवार, 05/22/2008 - 11:05
नक्की काय संदिग्ध वाटले हे जाणून घ्यायला आवडेल. कदाचित संतर्भ माझ्या मनात स्पष्ट होते, पण लिहितांना संदिग्ध झाले असतील. तुला काय/कुठल्या ओळी संदिग्ध वाटल्या? सर्वच प्रतिक्रिया देणार्‍यांचे आभार! - मनिष

In reply to by मनिष

बेसनलाडू गुरुवार, 05/22/2008 - 11:20
काही ठराविक ओळींकडे स्पष्ट निर्देष करता येत नाही; पण आठ्या विसरणे,जखमा पुसणे,भाबडेपणा आवडणे,तिचे हसणे, समजावणे या संदर्भांचे कवितेतील नेमके स्थान लक्षात घेतले तर पूर्ण कविता समजून घ्यायला (निदान मला तरी) बरेचदा खालीवर करावे लागले. यात वाचक म्हणून माझी फ्रेम ऑफ रेफरन्स/ओरिजिन हरवली/ले असू शकते. कविता टॉप टू बॉटम पद्धतीने वाचून समजली तर खुमारी वाढते (असे मला वाटते). मग ती भले २-३दा वाचायला लागो. पण या कवितेच्या बाबतीत मला बरेचदा खालीवर नाचानाची करावी लागली. पुढचे समजून घेताना मागे काय म्हटलंय याचा पुनर्विचार, त्यासाठी पुन्हा मागे जाऊन पुनर्वाचन. गद्य लेखनात एकवेळ चालूनही जाते, विशेषतः वैचारीक स्वरूपाच्या लेखनात. पण कवितेत असे होऊ नये असे वाटते. चूभूद्याघ्या. (सविस्तर)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

मनिष गुरुवार, 05/22/2008 - 14:25
मला वाटले की तो फ्लो सरळ आहे गद्यासारखा, पण हे लक्षात ठेवेन. खालीवर करावे लागू नये असे मलाही वाटते - ह्या कवितेत ते तसे नाही असे मला वातले - पण कदाचित मी आत्ता पुर्ण त्रयस्थासारखा नाही वाचू शकत माझीच कविता.

शितल गुरुवार, 05/22/2008 - 05:20
एकदम अफलातुन रचना, मस्त भाव छेडलेत. आणखी काय बोलु शब्दच हरवलेत.

प्राजु Tue, 05/20/2008 - 19:56
सुंदर मुक्तछंदातले काव्य.. शेवटचं कडवं तर खूप छान. खास करून, तिच्या डोळ्यात हरवलेलं काहीतरी गवसतयं तिच्या स्पर्शात सगळं दुःख विरघळतयं समजावता येणार नाही असं काही माझं मलाच उमगतयं एक वेगळंच जग दुरुनच खुणावतयं माझ्या नकळत मीहि स्वप्नात रमतोयं फुंकुन राख सगळी, निखारे पुन्हा पेटवतोय बदलता येईल सगळं असे कुठेतरी वाटतयं! आवडलं... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा Tue, 05/20/2008 - 21:19
तिच्या आठवणींने चेहर्यावर हसु फुलतयं तिच्या डोळ्यतील भाबडेपणा मनोमन भावतोय तिचा माझ्यावरील विश्वास आत खोलवर सुखावतोयं तिची हसरी नजर मलाही हसवतेयं हे जास्त आवडलं...

मदनबाण Wed, 05/21/2008 - 04:26
तिच्या डोळ्यतील भाबडेपणा मनोमन भावतोय तिचा माझ्यावरील विश्वास आत खोलवर सुखावतोयं हे मस्तच..... तू काय पाहिलसं माझ्यात हा प्रश्नही अनुत्तरीत :? फुंकुन राख सगळी, निखारे पुन्हा पेटवतोय बदलता येईल सगळं असे कुठेतरी वाटतयं! व्वा क्या बात है | (बदलता येईल सगळं ) असेच म्हणणारा..... मदनबाण.....

फटू Wed, 05/21/2008 - 06:51
तिच्या डोळ्यात हरवलेलं काहीतरी गवसतयं तिच्या स्पर्शात सगळं दुःख विरघळतयं समजावता येणार नाही असं काही माझं मलाच उमगतयं एक वेगळंच जग दुरुनच खुणावतयं माझ्या नकळत मीहि स्वप्नात रमतोयं फुंकुन राख सगळी, निखारे पुन्हा पेटवतोय बदलता येईल सगळं असे कुठेतरी वाटतयं! पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

अरुण मनोहर Wed, 05/21/2008 - 07:31
तिच्या भाबडेपणा, तिचा विश्वास, तिची श्रध्दा सगळंच अपरिचित ती भरेलही कदाचित सगळ्या जखमा भाबडेपणा म्हणजे निरागस लहान मूल. तिथे देवाचा अंश असतो. ह्याच दैवी प्रकटनाकडे कवी आकर्षीत झाला नसेल ना?..... खूप सकारात्मक कविता...

विसोबा खेचर Wed, 05/21/2008 - 09:16
वा मनिषराव! सुरेख कविता.... तिच्या आठवणींने चेहर्यावर हसु फुलतयं तिच्या डोळ्यतील भाबडेपणा मनोमन भावतोय तिचा माझ्यावरील विश्वास आत खोलवर सुखावतोयं या ओळी क्लासच! आपला, (कविताप्रेमी) तात्या. अवांतर - हे लिखाण आधी माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध केले होते, बाकी फक्त 'मिसळपाव' साठी! जियो...! आपला, (मिसळपावकर) तात्या.

मनिष Wed, 05/21/2008 - 12:28
बापरे! एवढे सारे प्रतिसाद मला खरच अपेक्षित नव्ह्ते...मि.पा. ची जिंदादिली जिंदाबाद! :) आणि सर्वांना मनापासून धन्यवाद! [:)] @ अरुण मनोहर - भाबडेपणा, निरागसपणात एक विलक्षण "healing, soothing power" असते हे मला कित्येक वेळा अनुभवायला आले आहे. मला लहान मुलांबरोबर खेळणे/बोलणे हा एक उत्कृष्ट स्ट्रेस-बस्टर वाटतो. अवांतर - कवितेतील "ती" आता नुकतीच बायको झाली आहे. :) कधी कधी रोजच्या व्यवहारात तिच्या ह्याच भाबडेपणाचा वैताग येऊन वाटते, "इतकी कशी तू/ही बावळट पणे वागू शकतेस?" -- आणि मग मी ह्याच भाबडेपणावर कसा फिदा होतो हेही आठवते (नाहितर ती आठवण करून देतेच!:)), आणि मी स्वत:लाच समजावतो. कवितारुपी 'लिखित पुराव्याचा" असाही एक उपयोग!! (फायदा की तोटा ते ज्याने त्याने ठरवावे! :D) बाकी व.पु. म्हणाले तसं "क्षण एक भाळण्याचा, बाकी सांभाळण्याचे" चा प्रत्यय येतच असतो - दोघांनाही! :) सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद! - मनिष स्वगत : अवांतर जरा 'जास्तच' झालं का?

आनंदयात्री Wed, 05/21/2008 - 12:34
मनिष .. सह्ही कविता .. च्यामारी काय अचुक उतरवलय भावनांना शब्दात .. कविता लै लै आवडली.

आनंदयात्री Wed, 05/21/2008 - 12:37
मी तसा चिडणारा, कपाळाला आठी घेउन वावरणारा सगळे घाव, वेदना न विसरता जगणारा एकटाच चालणारा आणि एकाकीच राहणारा पण काहितरी बदलतयं… तिच्या आठवणींने चेहर्यावर हसु फुलतयं सहीये बॉस्स ... परत वाचली .. परत वाचली अन वाचतच राहिलोय .. आपण तर फ्यान बॉ तुमचे !!

मनिष Wed, 05/21/2008 - 17:52
@ आनंदयात्री - धन्यवाद! :)

मनस्वी Wed, 05/21/2008 - 18:21
मनिष.. कोणत्या ओळी क्वोट करू.. सगळ्याच आवडल्या..
समजावता येणार नाही असं काही माझं मलाच उमगतयं बदलता येईल सगळं असे कुठेतरी वाटतयं!
विचार छान उतरलेत.

बेसनलाडू Wed, 05/21/2008 - 20:22
कविता आवडली. काही ठिकाणी संदिग्ध वाटली; पण एकंदर छान. लिहीत रहा. (वाचक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

मनिष गुरुवार, 05/22/2008 - 11:05
नक्की काय संदिग्ध वाटले हे जाणून घ्यायला आवडेल. कदाचित संतर्भ माझ्या मनात स्पष्ट होते, पण लिहितांना संदिग्ध झाले असतील. तुला काय/कुठल्या ओळी संदिग्ध वाटल्या? सर्वच प्रतिक्रिया देणार्‍यांचे आभार! - मनिष

In reply to by मनिष

बेसनलाडू गुरुवार, 05/22/2008 - 11:20
काही ठराविक ओळींकडे स्पष्ट निर्देष करता येत नाही; पण आठ्या विसरणे,जखमा पुसणे,भाबडेपणा आवडणे,तिचे हसणे, समजावणे या संदर्भांचे कवितेतील नेमके स्थान लक्षात घेतले तर पूर्ण कविता समजून घ्यायला (निदान मला तरी) बरेचदा खालीवर करावे लागले. यात वाचक म्हणून माझी फ्रेम ऑफ रेफरन्स/ओरिजिन हरवली/ले असू शकते. कविता टॉप टू बॉटम पद्धतीने वाचून समजली तर खुमारी वाढते (असे मला वाटते). मग ती भले २-३दा वाचायला लागो. पण या कवितेच्या बाबतीत मला बरेचदा खालीवर नाचानाची करावी लागली. पुढचे समजून घेताना मागे काय म्हटलंय याचा पुनर्विचार, त्यासाठी पुन्हा मागे जाऊन पुनर्वाचन. गद्य लेखनात एकवेळ चालूनही जाते, विशेषतः वैचारीक स्वरूपाच्या लेखनात. पण कवितेत असे होऊ नये असे वाटते. चूभूद्याघ्या. (सविस्तर)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

मनिष गुरुवार, 05/22/2008 - 14:25
मला वाटले की तो फ्लो सरळ आहे गद्यासारखा, पण हे लक्षात ठेवेन. खालीवर करावे लागू नये असे मलाही वाटते - ह्या कवितेत ते तसे नाही असे मला वातले - पण कदाचित मी आत्ता पुर्ण त्रयस्थासारखा नाही वाचू शकत माझीच कविता.

शितल गुरुवार, 05/22/2008 - 05:20
एकदम अफलातुन रचना, मस्त भाव छेडलेत. आणखी काय बोलु शब्दच हरवलेत.
लेखनविषय:
मी तसा चिडणारा, कपाळाला आठी घेउन वावरणारा सगळे घाव, वेदना न विसरता जगणारा एकटाच चालणारा आणि एकाकीच राहणारा पण काहितरी बदलतयं… तिच्या आठवणींने चेहर्यावर हसु फुलतयं तिच्या डोळ्यतील भाबडेपणा मनोमन भावतोय तिचा माझ्यावरील विश्वास आत खोलवर सुखावतोयं तिची हसरी नजर मलाही हसवतेयं ‘सगळं छान होईल’ ती मला समजवतेयं तिच्या भाबडेपणा, तिचा विश्वास, तिची श्रध्दा सगळंच अपरिचित आणि तिचं माझ्यावरील प्रेम अगदिचं अनपेक्षित तू काय पाहिलसं माझ्यात हा प्रश्नही अनुत्तरीत आणि तिच्या डोळ्यात प्रश्नच हरवतात हा शोधही अवचित पण काहितरी बदलतयं… कपाळावरील आठी जाऊन स्मित हळुच फुलतयं ती भरेलही कदाचित सगळ्या जखमा असं उगाचंच वाट

मी पाहिलेले मयत

आंबोळी ·

प्राजु Tue, 05/20/2008 - 20:02
आधी वाटले, हे काहीतरी गंभिर लेखन असेल.... पण पेटत्या चितेवर अंग शेकणारा आणि विडी शिलगावणारा माणूस... हे वाचून एकदम हसू आले. प्रसंग डोळ्यापुढे आला आणि तुमची काय अवस्था झाली असेल ही कल्पना आली. चांगले लेखन. पुढचा भाग लवकर येऊद्यात. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आयला हा आंबोळी सगळ्या अशा मरणाशी संबंधीत कथा का लिहीत आहे? तो काय मृत्यूचा दूत वगैरे आहे का? का त्याला 'अंधेरा कायम रहे ' वाल्याने सर्वाना घाबरवण्याचे कंत्राट दिले आहे. :) (ह.घ्या.) पण बाकी याने मयत आणि बाकी सर्व गोष्टींचे वर्णन भारी केले आहे. मागे एकदा मी माझ्या आजोळी केळशीला गेलो होतो, ८-९ वीत(इयत्तेत) असेन तेव्हा. तिथे छान उथळ असा समुद्रकिनारा आहे मस्त डुंबता येते. आम्ही सर्वजण समुद्रावर खेळायला आणि डुंबायला गेलो होतो. तिथेच समुद्रकिनार्‍यावर एक स्मशान पण आहे. स्मशान म्हणजे फक्त एक चौथरा ज्यावर चिता रचण्यासाठी ६ लोखंडी दांडे उभे पुरलेले असतात आणि त्यावर एक पत्र्याची शेड असते. मी तेव्हा अगदी चिता रचण्या पासून ते अग्नि देईपर्यंत सगळे विधी पाहीले होते. आणि तेवढ्यात कोणाच्यातरी लक्षात आले की मी सर्व खेळणार्‍या मुलांच्यात नाहीये. मग शोधाशोध सुरू झाली. पण लगेच मी या स्मशानातल्या गर्दीत सापडलो. लगेच मला आजोबांनी समुद्रात बुडी मारून यायला लावली . आणि मी पाण्यात गेल्यावर हळूहळू सर्वजण पाण्यात उतरून खेळायला लागले. :) पुण्याचे पेशवे

स्वयंभू Tue, 05/20/2008 - 21:04
आम्ही एकदा कोकणात फिरत असताना नदीचा एक सुन्दर घाट दिसला. बाईक्स थांबवून जरा आम्ही तिथले सौंदर्य बघत होतो. बरंच अंतर कापायचं असल्याने मोठ्या मुश्कीलीने नदीत उतरायचा मोह टाळला. पण पायर्‍यांवर बसून फोटो वगरे काढले. नि तेवढ्यात एक मित्र ओरडला 'आयला ते बघ काय', बघितलं तर एक छोटसं मडकं पाण्यात तरंगत होतं. शंका आली म्हणून आजू बाजूला बघितलं तर जवळच स्मशान होतं नी तो घाट अस्थीविसर्जनाचा होता. आम्ही घाबरलो वगरे नाही. पण इतकं अप्रतीम निसर्ग सौंदर्य नी स्मशान ह काँट्रास्ट मात्र जाणवून गेला. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

मन Tue, 05/20/2008 - 22:19
छान लिहिता तुम्ही आंबोळीराव. पण सारखं सारखं ते मरणाचं(विविध अँगल मधुन का असेना) वाचुन घाबरायला होतं हो! :-) (कधी कधी वाटतं, एखाद दिवस तुमच्या लेखनावर प्रतिसाद देउन आम्ही पण "गुढ"रित्या गचकायचो, आणि तुम्ही त्याची बी ष्टोरी करनार :-) ह.घ्या.) आपलाच जाम टरकलेला, मनोबा

भयानक आवडली गोष्ट. पण अहो तुम्ही बघितलेला माणूस सभ्य होता असंच म्हणावं लागेल. आमच्या गोरेगावला एक 'अंत्यसंस्कार' फेम गुरूजी होते ते तर विधी संपून चिता पेटली रे पेटली की मस्त छान त्याच चितेवर बीडी वगैरे पेटवून मोकळे. माणूस गप्पिष्ट. बाकीचे लोक जायला नुघाले की आग्रह वगैरे करून थांबवायचे, म्हणायचे "थांबा हो, जायचा तो गेला, तुम्ही थांबा" बिपिन.

विकास Wed, 05/21/2008 - 01:06
हा लेख वाचताना आठवलेल्या दोन गोष्टी: (जशी आठवत तशी:) सुधीर गाडगीळांनी एकदा त्यांच्या कार्यक्रमात पुण्यातील अशा केवळ अंत्यसंस्कार करणार्‍या पुजारी कुटूंबाबद्दल सांगीतले होते (आडनाव विसरलो). त्यांनी त्यातील एका गुरूजींना स्मशानभूमीत प्रश्न विचारला की तुमचे यावर कसे भागते? त्यावर ते म्हणाले की अहो कधी कधी मृत व्यक्तींच्या अंगात दागीने ठेवले जातात ते आम्हीच घेतो वगैरे... नंतर काही काळाने गाडगीळ कुणाच्या तरी अंत्यसंस्काराला वैकुंठ स्मशानभूमीत गेले असताना ते गुरूजी परत भेटले तर ते तावातावाने चिडून म्हणाले की गाडगीळ तुमच्या अंत्यसंस्काराला आम्ही कोणी येणार नाही... का म्हणून गाडगीळांनी विचारले तर म्हणाले की मागच्या वेळेस माझी घेत असलेली मुलाखत ही प्रक्षेपित होणार आहे हे माहीत नव्हते (थोडक्यात धंद्याचे गुपीत उघडकीस आले). ---------------------------- कधी काळी मित्र कॉळेजच्या परीक्षा संपल्यावर अलीबाग/मुरूड जंजीरा ह्या भागातील पण कुठल्याशा वेगळ्या समुद्र किनार्‍यावर गेलो होतो. समुद्रात पाय घालून ओले झाल्यावर वाळू झटकायला म्हणून बाजूच्या दगडी कट्ट्यावर पाय हलवत आम्ही बसलो. तेव्हढ्यात (उभा असलेल्या) एकाची नजर त्या कट्ट्याच्या भिंतीवर लिहीलेल्या सुचनेकडे गेली: (या अर्थी) "मयताला ठेवायची जागा" - त्याने मोठ्यांदा वाचताच सर्वजण दचकून उठले आणि मुकाट्याने गाडीकडे वळले!

In reply to by विकास

मदनबाण Wed, 05/21/2008 - 05:10
हा लेख वाचुन मला मी १० वी मधे असताना असलेला मराठी धडा स्मशानातल सोन आठवला..... मदनबाण.....

चतुरंग Wed, 05/21/2008 - 01:19
शेवटी तो अग्नीच, त्यामुळे थंडीपासून रक्षण करणार्‍या त्या आगीकडे तो माणूस आपसूक आला आणि अंग शेकून गेला इतकच नाही तर बिडीसुद्धा पेटवून गेला! तुमची काहीवेळ पाचावर धारण बसली असणार ह्याचा विचार मनात येऊन हसू आले! :) (स्वगत - ह्या अंबोळीकडचा तो कंदिल आता कुठल्या अवस्थेत असेल बरे? :? ) चतुरंग

वरदा Wed, 05/21/2008 - 02:50
कधी कधी वाटतं, एखाद दिवस तुमच्या लेखनावर प्रतिसाद देउन आम्ही पण "गुढ"रित्या गचकायचो, आणि तुम्ही त्याची बी ष्टोरी करनार किती हो मरणावर लिहिणार जरा जगण्यावर लिहा ना.... :S स्वगतः ह्या आंबोळी दादांनी कधी मुलगी पटवायचा प्रयत्न केला असेल का? त्या मुली घाबरुन पळून गेल्या असाव्यात.... :?

भडकमकर मास्तर Wed, 05/21/2008 - 03:02
कसला तो अनुभव... टरकावून टाकणारा.. >:) अवांतर : ओ मतकरी, दुसरं काहीतरी लिहा... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

भडकमकर मास्तर Wed, 05/21/2008 - 10:38
अहाहा. इथे इतके वेगवेगळ्या जॉनरचे ( लेखनप्रकार असा एक फालतु प्रतिशब्द सध्या सुचतो आहे , पण तो अपुरा आहे हे ठाऊक असल्याने ..."जॉनरच " )... लिहिणारे लोक आहेत की एकदम बेष्ट वाटते... ... आंबोळीराव, तुमची काळजी वाटते हो... तुम्ही जरा उतारा म्हणून हलक्या फुलक्या निसर्ग, प्रेम, पाखरे , नदी नाले, दर्‍याखोर्‍या यांच्या चारोळ्या वाचत आणि पाडत चला..... थोडं ऑर्कुट वरती गेल्यासारखं वाटेल पण मानसोपचारतज्ञाला त्रास आणि पैसे देण्यापेक्षा हे फार बरे... काही नमुने... ______________________________________ " तू आलीस तिकडून सखे आनंदाचा पूर आला भावनांनी माझा ऊर भरून आला... सखे तुझ्या पावलांची मंद सळसळ पैंजणांची तर रूणझूण , खचितच माझ्या वेड लावते गे जीवाला...." _____________________ तू कधी येणार? वाट पाहतोय.. येशील ना? ______________-- फुलणार फुलणार... आमच्या प्रतिभेचा चाफा फुलणार? काय गं? ओळख आहे ना? ________________________ ओढ वाटते जीवाला , सारखी तुझीच आठवण... ध्यास तुझा , कधी फळेल हे जीवन... __________________________________ असलं काहीबाही पाडत रहा नाहीतर मानसिक त्रास होईल.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सहज Wed, 05/21/2008 - 09:33
टरकथा लेखक. :-) कंदिल.... आता मयत.. चांगले आहे. चालु द्या. "वाचतोय व बहुतेक वाचु" ;-)

ऋचा Wed, 05/21/2008 - 09:39
>>हा लेख वाचुन मला मी १० वी मधे असताना असलेला मराठी धडा स्मशानातल सोन आठवला..... खरचं तो भीमा असेल असं वाटलं

आंबोळी म्हटला की ते मरणाचा 'कंदील' आठवतो. च्यायला येऊन जाऊन मरणाचाच विषय कसा सुचतो राव तुम्हाला !!! बाकी मयताचे वर्णन तर असे केले की आम्हीही आपल्याबरोबर तो कार्यक्रम अटेंड केल्यासारखा वाटला. बाकी त्या धिप्पाड माणसाची इंट्री मस्तच झाली !!! येऊ दे !!! येऊ दे !!! आम्हालाही आंबोळीच्या लेखनाचे व्यसन लागेल असे वाटते. :)

मनस्वी Wed, 05/21/2008 - 10:34
मस्त लिहिलयस रे आंबोळ्या.. हे "क्रमशः" कुठुन शिकलास??

केशवसुमार Wed, 05/21/2008 - 11:42
अंबोळीशेठ, लेख चांगला झाला आहे..प्रसंगाचे वर्णन उत्तम :SS ..पुढचा भाग लवकर येऊदे.. (वाचक) केशवसुमार स्वगतः रात्री कुणाचा त्रास नको म्हणून स्मशानात दारू पिणारे आणि जुगार खेळणारे आणि भूक लागल्यावर अता बाहेर कुठे जायचे म्हणून पिंडाचा भात कावळ्यांना हकलून खाणारे बघितले आहेत त्या मुळे चितेच्या धगीवर हात शेकण्याचे काहीच वाटले नाही >:P

विजुभाऊ Wed, 05/21/2008 - 12:36
कधी कधी वाटतं, एखाद दिवस तुमच्या लेखनावर प्रतिसाद देउन आम्ही पण "गुढ"रित्या गचकायचो, आणि तुम्ही त्याची बी ष्टोरी करनार =)) कन्दील नरेश आम्बोळी ...कन्दील काय ?मयत काय? आता या पुढचे लिखाणाचे विषय " मृत्युच्या सूचना आणि मृत्युनन्तरचे जिवन" असा घे बघ. मजा येइल. आणि त्या पुढचा विषय "पुनर्जन्म" हा घे. त्या पुढे जाऊन आणखी विषय मिपा चे गवकरी देतिलच. बाकी प्रगती बेष्टच. कन्दीलाची एजन्सी कोणाला दिलीस? आंबोळ्या.. हे "क्रमशः" कुठुन शिकलास?? तू सरळ दाम्बीस काकांचे नाव ठोकुन दे असल्या प्रश्नावर. मी तेच करतो.

डॉ.प्रसाद दाढे Wed, 05/21/2008 - 12:56
केवळ अंत्यसंस्कार करणार्‍या पुजारी कुटूंबाबद्दल सांगीतले होते मोघे गुरूजी वाचका॑चे प्रतिसाद पाहून द.मा.मिरासदारा॑ची 'विर॑गुळा' नावाची गोष्ट आठवली, त्यातल्या तात्या देशपा॑डे॑ना असल्या' गोष्टीत भय॑कर रस असतो..

मला हे वाचुन राम नगरकरांच्या 'रामनगरी' तील वर्‍हाडाचा प्रसंग आठवला. नवरामुलगा प्रेताला टेकुन आराम करत असतो.. तो प्रसंग. छान आहे लेखन..

अभिज्ञ गुरुवार, 05/22/2008 - 13:57
ह्या वेगळ्या विषयावर छान लिहिले आहे. मिपावर एकाच विषयावर सातत्याने आणि कसबीने लिहिणारे आपण बहुधा पहिलेच असाल. ;) बाकी ,स्मशानातला प्रसंग फार घाईत उरकल्यासारखा वाटतो.अजुन खुलवून लिहिता आला असता. स्मशानातील भाषणेबिषणे वगैरे कव्हर कराल असे वाटले होते. जमल्यास पुढच्या भागात येउ देत. आंबोळीराव , तुम्ही ,लोकांनी दिलेले सल्ले/उपदेश जास्त मनावर घेउ नका हो. तुम्हाला जे आवडते ते लिहा.लेखन हे प्रसिद्धिकरीता नसून स्वसमाधानाकरीता असावे असे वाटते. फक्त लेखन हे किती सकस आहे हेच महत्वाचे. पुढील भागाची वाट पहात आहे. अभिज्ञ. B)

आंबोळी गुरुवार, 05/22/2008 - 16:27
सर्व प्रतिक्रिया देणार्‍यांचे व वाचणार्‍यांचे आभार. मिसळपाव वर जीवनाच्या विविध पैलूंवर उत्कृष्ठ लेखन (लेख/चर्चा/कविता) करणारे खूप लेखक आहेत. त्यामुळे मिसळपाववर स्वतः लेखन करण्यापेक्षा या लेखकांचे लेखन वाचायलाच जास्त मजा येते असा माझा अनुभव आहे. आणि मी तेच करत असतो. फक्त मरण या शाश्वत गोष्टीबद्दल कोणी फारसे लिहिताना आढळले नाही. ती राहिलेली फट बुजवण्याचा हा प्रमाणिक प्रयत्न. आपण सर्वानी गोड (?) मानुन घ्या. >>पण सारखं सारखं ते मरणाचं(विविध अँगल मधुन का असेना) वाचुन घाबरायला होतं हो! अहो इथे घाबरलात की इतर लेखकांचे अल्हादायी लेखन वाचतानाचा आनंद द्वीगुणीत होइल. >>(स्वगत - ह्या अंबोळीकडचा तो कंदिल आता कुठल्या अवस्थेत असेल बरे? ) माळ्यावर ठेवलाय. यावेळी घरी गेलो की लाउन बघावा म्हणतो..... बरेच वर्षात लावला नाही. निट काम देतोय की नाही ते पाहीले पाहिजे एकदा. >>आम्हालाही आंबोळीच्या लेखनाचे व्यसन लागेल असे वाटते. आयला... माझे लेखन व्यसन लागण्याइतके नशीली आसेल असे मला स्वप्नातसुध्धा वाटले नव्हते. (बहुतेक "रक्तगाभुळली वटवाघळे,उप्पिटम" वगैरे वाचुन प्रवास करत नसल्यामुळे स्वप्नात तसे वाटत नसेल.....) >>मस्त लिहिलयस रे आंबोळ्या.. हे "क्रमशः" कुठुन शिकलास?? स्वप्नभटके विजुभौ >>स्मशानातला प्रसंग फार घाईत उरकल्यासारखा वाटतो.अजुन खुलवून लिहिता आला असता>> अहो मी फक्त घडलेला प्रसंग सांगीतला. पण पुढच्यावेळी लक्षात ठेवीन. >>तुम्ही ,लोकांनी दिलेले सल्ले/उपदेश जास्त मनावर घेउ नका हो. या दिलेल्या सल्ल्याविषयीही आपले हेच मत आहे? ;) >>स्वगतः ह्या आंबोळी दादांनी कधी मुलगी पटवायचा प्रयत्न केला असेल का? त्या मुली घाबरुन पळून गेल्या असाव्यात.... आरे हो ती स्टोरी सांगायची राहिली. पुर्वी आम्ही एक पोरगी पटवली होती. म्हन्जे जातायेता इशारे, खाणाखुणा आणि पत्रव्यवहार इथपर्यंतच मामला होता. शेवटी आम्ही एकदा भेटून प्रेमाच्या आणाभाका घ्यायचे ठरवले. आता गावात एकांत मिळेल असे एकच ठिकाण होते ते म्हंजे स्मशान. तेंव्हा संध्याकाळी ७ नंतर तिथे भेटायचे ठरले. आम्ही निघालो. थंडीचे दिवस आसल्याने लवकर अंधार पडेल म्हणुन आम्ही बरोबर "कंदील" घेतला होता. जाताना वाटेतच तो लावावा लागला. स्मशानात चौथर्‍यावर बसुन आम्ही तासभर गप्पा मारल्या. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. आता परत कधी भेटायचे हे ठरवतच होतो की चाहुल लागली आणि लोक येताना दिसले. बघतो तर गल्लीतले आणि तिच्या घरचे लोक तिच्या आजोबाना घेउन येत होते. माझ्या हातातला कंदील भेसुर जळत होता. (वरच्या स्टोरीतली सर्व पात्रे व प्रसंग काल्पनिक आहेत) (कृतज्ञ)आंबोळी

In reply to by आंबोळी

प्रमोद देव गुरुवार, 05/22/2008 - 19:12
थंडीचे दिवस आसल्याने लवकर अंधार पडेल म्हणुन आम्ही बरोबर "कंदील" घेतला होता. जाताना वाटेतच तो लावावा लागला. स्मशानात चौथर्‍यावर बसुन आम्ही तासभर गप्पा मारल्या. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. आता परत कधी भेटायचे हे ठरवतच होतो की चाहुल लागली आणि लोक येताना दिसले. बघतो तर गल्लीतले आणि तिच्या घरचे लोक तिच्या आजोबाना घेउन येत होते. माझ्या हातातला कंदील भेसुर जळत होता. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by आंबोळी

विसोबा खेचर Fri, 05/23/2008 - 07:43
मिसळपाव वर जीवनाच्या विविध पैलूंवर उत्कृष्ठ लेखन (लेख/चर्चा/कविता) करणारे खूप लेखक आहेत. धन्यवाद आंबोळीराव! अहो पण जरा हळू बोला! मिपाच्या हितशत्रूंना हे वाक्य आवडणार नाही! त्यांना असं वाटतं की मिपा हे फक्त काहितरी पोरकट टाईमपास असणारं, व सतत काहितरी फालतूगिरी चालू असलेलं संस्थळ आहे! हां, आता वडील वारल्यासारखे चेहरे करून सतत दुसर्‍याच्या शुद्धलेखनाच्या व व्याकरणाच्या चुका काढण्यातच मिपाकर धन्यता मानत नाहीत, त्याला काय इलाज बरं?! :) असो... तात्या.

धमाल मुलगा गुरुवार, 05/22/2008 - 16:50
च्यायला, लै म्हणजे लैच उशीर घडला बॉ प्रतिक्रिया द्यायला :( आम्बोळ्या, भौ हे खरंच असं घडलं होतं? आयला, चितेवर बिडी पेटवायची म्हणजे काय गंमत आहे का? नेहमीप्रमाणे लेख उत्तम आहेच हे वे.सां.न.ल. :)
...प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. आता परत कधी भेटायचे हे ठरवतच होतो की चाहुल लागली आणि लोक येताना दिसले. बघतो तर गल्लीतले आणि तिच्या घरचे लोक तिच्या आजोबाना घेउन येत होते. माझ्या हातातला कंदील भेसुर जळत होता.
हाण तिच्याआयला! एकदम जब्राट! च्यायला हा किस्सा तर लैच भारी! अवांतरः नाही नाही त्या गोष्टी शिकवून बायकोचे कान भरणार्‍या तिच्या माहेरच्या भोचक नातेवाईकांवर हा कंदील काम करतो का?
मी पण पाहिलेली मयत :
आम्ही साधारण १२वीत असु. एक मित्र, पराग नाव त्याचं, नुकताच गाडी शिकला होता आणि त्याच्या बा नं त्याला यामाहा घेऊन दिली होती. मग काय हो...भर गावातून बुंग..बुंग करत हिंडायचो आम्ही. एक दिवस असेच सुसाट फिरत होतो, तर समोरुन एक अंत्ययात्रा आली, म्हण्जे अंत्ययात्रा चाललीच होती, आम्ही तिच्यासमोर आलो. पर्‍याचा गाडीवर काहीकेल्या ताबा राहिना....टरकून मी मागच्यामागं उडी टाकली. आणि हा बहाद्दर........ गेलेल्या माणसाला जे चार खांदेकरी घेऊन चालले होते, सरळ त्यांच्यातच गाडी घेऊन घुसला...अरारारा...तिरडी टाकून जी काय पळापळ झाली....हातात मडकं घेऊन पुढं चालणारा त्या मयताचा मुलगा मडक्यासकट सांडला. ती तिरडी, तिच्यावरचं ते प्रेत आणि तो पडलेला मुलगा हे सगळं जस्संच्या तस्संच ठेऊन त्या सगळ्यांनी पर्‍याला बेक्कार धूतला :( नंतर पोलिसकेस केली...ह्या सगळ्या गडबडीत पर्‍याच्या बापसाला आणायला म्हणून मी गेलो तो परत येऊन पाहतो तर पर्‍या एका बाजुला डोकं धरुन बसलेला, मामालोकांनी पंचनामा करुन घेतलेला, रस्त्यात वेडावाकडा पडलेला मुलगा, ते मडकं तिरडी इ.इ. सगळं खडूनं आखून घेतलेलं.... काय तिच्यामारी एकेक अनुभव आहेत आमचे!

In reply to by धमाल मुलगा

शिद Fri, 02/21/2014 - 18:50
नेहमीच्या रटाळ धाग्यांना कंटाळुन जरा जुने लेख चाळत होतो त्यामधे हे रत्न सापडले... धमाल मुलगा ह्यांचा हा प्रतिसाद पण एक्दम जबरा... ठ्या करुन फोटलो एक्दम... =)) =)) अवांतरः आंबोळी यांचे 'कंदील व कंदील-२' हे लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचावे हे नम्रपणे सुचवतो.

वरदा गुरुवार, 05/22/2008 - 17:53
मानलं तुम्हाला...धन्य आहात कसली ष्टोरी आहे जबराट पुढं हे नाही सांगितलं आजोबांना पाहीलं आणि मागे पाहिलं तर ती मुलगी गायब झालेली.....कोण होती ती? ........ कुठुन सुचतं हो... माळ्यावर ठेवलाय. यावेळी घरी गेलो की लाउन बघावा म्हणतो..... बरेच वर्षात लावला नाही. निट काम देतोय की नाही ते पाहीले पाहिजे एकदा. :O

आनंदयात्री गुरुवार, 05/22/2008 - 19:00
>>माळ्यावर ठेवलाय. यावेळी घरी गेलो की लाउन बघावा म्हणतो..... बरेच वर्षात लावला नाही. निट काम देतोय की नाही ते पाहीले >>पाहिजे एकदा. विसर शिंच्या नाव विसर माझे ...

आंबोळी गुरुवार, 05/22/2008 - 19:46
येथे जातीने उपस्थीत राहून माझ्या मयताला खांदा दिल्याबद्दल तात्या व इतर गावकरी मंडळींचे मनःपुर्वक आभार !!! असाच योग पुन्हःपुन्हा येवो. (आभारी) आंबोळी

अभिता Fri, 05/23/2008 - 01:58
मिसळपाव वर जीवनाच्या विविध पैलूंवर उत्कृष्ठ लेखन (लेख/चर्चा/कविता) करणारे खूप लेखक आहेत. त्यामुळे मिसळपाववर स्वतः लेखन करण्यापेक्षा या लेखकांचे लेखन वाचायलाच जास्त मजा येते स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्सहमत१००%.

In reply to by अभिता

मन Fri, 05/23/2008 - 17:00
मिसळपाववर स्वतः लेखन करण्यापेक्षा या लेखकांचे लेखन वाचायलाच जास्त मजा येते स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्सहमत१००%. नक्किच. १००००% मान्य्. आपलाच, मनोबा

In reply to by अनुप ढेरे

सोत्रि Fri, 02/21/2014 - 20:31
शेम टो शेम हेच म्हणतो. हे असले जुने लेख खाणकाम करुन काढत राहिले पाहिजे. जरा तजेला येइल इथे परत! - (जुना मिपाकर) सोकाजी

कंजूस Sun, 02/23/2014 - 06:07
हा धागा उघडला तर २००८ सालचा आता खणून वर काढलेला . उत्सुकता म्हणून वाचून काढला . "क्रमश:" हा शब्द बऱ्याच जणांच्या भावना दुखावणारा वाटला .पण यात तांत्रिक दृषट्या गैर काहीच वाटले नाही . हापण विषय क्रमश: होऊ शकतो . आता मूळ धागाकर्ता जोपर्यंत काही नवीन भर घालत नाही तोपर्यँत प्रतिसाद वाढवण्यात काहीच उपयोग नाही .यात्रेचे मजेदार अनुभव असू शकतात यावर आपल्या विनोदी लेखकांनी प्रकाशकांचा सल्याने कमीच लिहिले आहे .

प्राजु Tue, 05/20/2008 - 20:02
आधी वाटले, हे काहीतरी गंभिर लेखन असेल.... पण पेटत्या चितेवर अंग शेकणारा आणि विडी शिलगावणारा माणूस... हे वाचून एकदम हसू आले. प्रसंग डोळ्यापुढे आला आणि तुमची काय अवस्था झाली असेल ही कल्पना आली. चांगले लेखन. पुढचा भाग लवकर येऊद्यात. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आयला हा आंबोळी सगळ्या अशा मरणाशी संबंधीत कथा का लिहीत आहे? तो काय मृत्यूचा दूत वगैरे आहे का? का त्याला 'अंधेरा कायम रहे ' वाल्याने सर्वाना घाबरवण्याचे कंत्राट दिले आहे. :) (ह.घ्या.) पण बाकी याने मयत आणि बाकी सर्व गोष्टींचे वर्णन भारी केले आहे. मागे एकदा मी माझ्या आजोळी केळशीला गेलो होतो, ८-९ वीत(इयत्तेत) असेन तेव्हा. तिथे छान उथळ असा समुद्रकिनारा आहे मस्त डुंबता येते. आम्ही सर्वजण समुद्रावर खेळायला आणि डुंबायला गेलो होतो. तिथेच समुद्रकिनार्‍यावर एक स्मशान पण आहे. स्मशान म्हणजे फक्त एक चौथरा ज्यावर चिता रचण्यासाठी ६ लोखंडी दांडे उभे पुरलेले असतात आणि त्यावर एक पत्र्याची शेड असते. मी तेव्हा अगदी चिता रचण्या पासून ते अग्नि देईपर्यंत सगळे विधी पाहीले होते. आणि तेवढ्यात कोणाच्यातरी लक्षात आले की मी सर्व खेळणार्‍या मुलांच्यात नाहीये. मग शोधाशोध सुरू झाली. पण लगेच मी या स्मशानातल्या गर्दीत सापडलो. लगेच मला आजोबांनी समुद्रात बुडी मारून यायला लावली . आणि मी पाण्यात गेल्यावर हळूहळू सर्वजण पाण्यात उतरून खेळायला लागले. :) पुण्याचे पेशवे

स्वयंभू Tue, 05/20/2008 - 21:04
आम्ही एकदा कोकणात फिरत असताना नदीचा एक सुन्दर घाट दिसला. बाईक्स थांबवून जरा आम्ही तिथले सौंदर्य बघत होतो. बरंच अंतर कापायचं असल्याने मोठ्या मुश्कीलीने नदीत उतरायचा मोह टाळला. पण पायर्‍यांवर बसून फोटो वगरे काढले. नि तेवढ्यात एक मित्र ओरडला 'आयला ते बघ काय', बघितलं तर एक छोटसं मडकं पाण्यात तरंगत होतं. शंका आली म्हणून आजू बाजूला बघितलं तर जवळच स्मशान होतं नी तो घाट अस्थीविसर्जनाचा होता. आम्ही घाबरलो वगरे नाही. पण इतकं अप्रतीम निसर्ग सौंदर्य नी स्मशान ह काँट्रास्ट मात्र जाणवून गेला. आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

मन Tue, 05/20/2008 - 22:19
छान लिहिता तुम्ही आंबोळीराव. पण सारखं सारखं ते मरणाचं(विविध अँगल मधुन का असेना) वाचुन घाबरायला होतं हो! :-) (कधी कधी वाटतं, एखाद दिवस तुमच्या लेखनावर प्रतिसाद देउन आम्ही पण "गुढ"रित्या गचकायचो, आणि तुम्ही त्याची बी ष्टोरी करनार :-) ह.घ्या.) आपलाच जाम टरकलेला, मनोबा

भयानक आवडली गोष्ट. पण अहो तुम्ही बघितलेला माणूस सभ्य होता असंच म्हणावं लागेल. आमच्या गोरेगावला एक 'अंत्यसंस्कार' फेम गुरूजी होते ते तर विधी संपून चिता पेटली रे पेटली की मस्त छान त्याच चितेवर बीडी वगैरे पेटवून मोकळे. माणूस गप्पिष्ट. बाकीचे लोक जायला नुघाले की आग्रह वगैरे करून थांबवायचे, म्हणायचे "थांबा हो, जायचा तो गेला, तुम्ही थांबा" बिपिन.

विकास Wed, 05/21/2008 - 01:06
हा लेख वाचताना आठवलेल्या दोन गोष्टी: (जशी आठवत तशी:) सुधीर गाडगीळांनी एकदा त्यांच्या कार्यक्रमात पुण्यातील अशा केवळ अंत्यसंस्कार करणार्‍या पुजारी कुटूंबाबद्दल सांगीतले होते (आडनाव विसरलो). त्यांनी त्यातील एका गुरूजींना स्मशानभूमीत प्रश्न विचारला की तुमचे यावर कसे भागते? त्यावर ते म्हणाले की अहो कधी कधी मृत व्यक्तींच्या अंगात दागीने ठेवले जातात ते आम्हीच घेतो वगैरे... नंतर काही काळाने गाडगीळ कुणाच्या तरी अंत्यसंस्काराला वैकुंठ स्मशानभूमीत गेले असताना ते गुरूजी परत भेटले तर ते तावातावाने चिडून म्हणाले की गाडगीळ तुमच्या अंत्यसंस्काराला आम्ही कोणी येणार नाही... का म्हणून गाडगीळांनी विचारले तर म्हणाले की मागच्या वेळेस माझी घेत असलेली मुलाखत ही प्रक्षेपित होणार आहे हे माहीत नव्हते (थोडक्यात धंद्याचे गुपीत उघडकीस आले). ---------------------------- कधी काळी मित्र कॉळेजच्या परीक्षा संपल्यावर अलीबाग/मुरूड जंजीरा ह्या भागातील पण कुठल्याशा वेगळ्या समुद्र किनार्‍यावर गेलो होतो. समुद्रात पाय घालून ओले झाल्यावर वाळू झटकायला म्हणून बाजूच्या दगडी कट्ट्यावर पाय हलवत आम्ही बसलो. तेव्हढ्यात (उभा असलेल्या) एकाची नजर त्या कट्ट्याच्या भिंतीवर लिहीलेल्या सुचनेकडे गेली: (या अर्थी) "मयताला ठेवायची जागा" - त्याने मोठ्यांदा वाचताच सर्वजण दचकून उठले आणि मुकाट्याने गाडीकडे वळले!

In reply to by विकास

मदनबाण Wed, 05/21/2008 - 05:10
हा लेख वाचुन मला मी १० वी मधे असताना असलेला मराठी धडा स्मशानातल सोन आठवला..... मदनबाण.....

चतुरंग Wed, 05/21/2008 - 01:19
शेवटी तो अग्नीच, त्यामुळे थंडीपासून रक्षण करणार्‍या त्या आगीकडे तो माणूस आपसूक आला आणि अंग शेकून गेला इतकच नाही तर बिडीसुद्धा पेटवून गेला! तुमची काहीवेळ पाचावर धारण बसली असणार ह्याचा विचार मनात येऊन हसू आले! :) (स्वगत - ह्या अंबोळीकडचा तो कंदिल आता कुठल्या अवस्थेत असेल बरे? :? ) चतुरंग

वरदा Wed, 05/21/2008 - 02:50
कधी कधी वाटतं, एखाद दिवस तुमच्या लेखनावर प्रतिसाद देउन आम्ही पण "गुढ"रित्या गचकायचो, आणि तुम्ही त्याची बी ष्टोरी करनार किती हो मरणावर लिहिणार जरा जगण्यावर लिहा ना.... :S स्वगतः ह्या आंबोळी दादांनी कधी मुलगी पटवायचा प्रयत्न केला असेल का? त्या मुली घाबरुन पळून गेल्या असाव्यात.... :?

भडकमकर मास्तर Wed, 05/21/2008 - 03:02
कसला तो अनुभव... टरकावून टाकणारा.. >:) अवांतर : ओ मतकरी, दुसरं काहीतरी लिहा... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

भडकमकर मास्तर Wed, 05/21/2008 - 10:38
अहाहा. इथे इतके वेगवेगळ्या जॉनरचे ( लेखनप्रकार असा एक फालतु प्रतिशब्द सध्या सुचतो आहे , पण तो अपुरा आहे हे ठाऊक असल्याने ..."जॉनरच " )... लिहिणारे लोक आहेत की एकदम बेष्ट वाटते... ... आंबोळीराव, तुमची काळजी वाटते हो... तुम्ही जरा उतारा म्हणून हलक्या फुलक्या निसर्ग, प्रेम, पाखरे , नदी नाले, दर्‍याखोर्‍या यांच्या चारोळ्या वाचत आणि पाडत चला..... थोडं ऑर्कुट वरती गेल्यासारखं वाटेल पण मानसोपचारतज्ञाला त्रास आणि पैसे देण्यापेक्षा हे फार बरे... काही नमुने... ______________________________________ " तू आलीस तिकडून सखे आनंदाचा पूर आला भावनांनी माझा ऊर भरून आला... सखे तुझ्या पावलांची मंद सळसळ पैंजणांची तर रूणझूण , खचितच माझ्या वेड लावते गे जीवाला...." _____________________ तू कधी येणार? वाट पाहतोय.. येशील ना? ______________-- फुलणार फुलणार... आमच्या प्रतिभेचा चाफा फुलणार? काय गं? ओळख आहे ना? ________________________ ओढ वाटते जीवाला , सारखी तुझीच आठवण... ध्यास तुझा , कधी फळेल हे जीवन... __________________________________ असलं काहीबाही पाडत रहा नाहीतर मानसिक त्रास होईल.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सहज Wed, 05/21/2008 - 09:33
टरकथा लेखक. :-) कंदिल.... आता मयत.. चांगले आहे. चालु द्या. "वाचतोय व बहुतेक वाचु" ;-)

ऋचा Wed, 05/21/2008 - 09:39
>>हा लेख वाचुन मला मी १० वी मधे असताना असलेला मराठी धडा स्मशानातल सोन आठवला..... खरचं तो भीमा असेल असं वाटलं

आंबोळी म्हटला की ते मरणाचा 'कंदील' आठवतो. च्यायला येऊन जाऊन मरणाचाच विषय कसा सुचतो राव तुम्हाला !!! बाकी मयताचे वर्णन तर असे केले की आम्हीही आपल्याबरोबर तो कार्यक्रम अटेंड केल्यासारखा वाटला. बाकी त्या धिप्पाड माणसाची इंट्री मस्तच झाली !!! येऊ दे !!! येऊ दे !!! आम्हालाही आंबोळीच्या लेखनाचे व्यसन लागेल असे वाटते. :)

मनस्वी Wed, 05/21/2008 - 10:34
मस्त लिहिलयस रे आंबोळ्या.. हे "क्रमशः" कुठुन शिकलास??

केशवसुमार Wed, 05/21/2008 - 11:42
अंबोळीशेठ, लेख चांगला झाला आहे..प्रसंगाचे वर्णन उत्तम :SS ..पुढचा भाग लवकर येऊदे.. (वाचक) केशवसुमार स्वगतः रात्री कुणाचा त्रास नको म्हणून स्मशानात दारू पिणारे आणि जुगार खेळणारे आणि भूक लागल्यावर अता बाहेर कुठे जायचे म्हणून पिंडाचा भात कावळ्यांना हकलून खाणारे बघितले आहेत त्या मुळे चितेच्या धगीवर हात शेकण्याचे काहीच वाटले नाही >:P

विजुभाऊ Wed, 05/21/2008 - 12:36
कधी कधी वाटतं, एखाद दिवस तुमच्या लेखनावर प्रतिसाद देउन आम्ही पण "गुढ"रित्या गचकायचो, आणि तुम्ही त्याची बी ष्टोरी करनार =)) कन्दील नरेश आम्बोळी ...कन्दील काय ?मयत काय? आता या पुढचे लिखाणाचे विषय " मृत्युच्या सूचना आणि मृत्युनन्तरचे जिवन" असा घे बघ. मजा येइल. आणि त्या पुढचा विषय "पुनर्जन्म" हा घे. त्या पुढे जाऊन आणखी विषय मिपा चे गवकरी देतिलच. बाकी प्रगती बेष्टच. कन्दीलाची एजन्सी कोणाला दिलीस? आंबोळ्या.. हे "क्रमशः" कुठुन शिकलास?? तू सरळ दाम्बीस काकांचे नाव ठोकुन दे असल्या प्रश्नावर. मी तेच करतो.

डॉ.प्रसाद दाढे Wed, 05/21/2008 - 12:56
केवळ अंत्यसंस्कार करणार्‍या पुजारी कुटूंबाबद्दल सांगीतले होते मोघे गुरूजी वाचका॑चे प्रतिसाद पाहून द.मा.मिरासदारा॑ची 'विर॑गुळा' नावाची गोष्ट आठवली, त्यातल्या तात्या देशपा॑डे॑ना असल्या' गोष्टीत भय॑कर रस असतो..

मला हे वाचुन राम नगरकरांच्या 'रामनगरी' तील वर्‍हाडाचा प्रसंग आठवला. नवरामुलगा प्रेताला टेकुन आराम करत असतो.. तो प्रसंग. छान आहे लेखन..

अभिज्ञ गुरुवार, 05/22/2008 - 13:57
ह्या वेगळ्या विषयावर छान लिहिले आहे. मिपावर एकाच विषयावर सातत्याने आणि कसबीने लिहिणारे आपण बहुधा पहिलेच असाल. ;) बाकी ,स्मशानातला प्रसंग फार घाईत उरकल्यासारखा वाटतो.अजुन खुलवून लिहिता आला असता. स्मशानातील भाषणेबिषणे वगैरे कव्हर कराल असे वाटले होते. जमल्यास पुढच्या भागात येउ देत. आंबोळीराव , तुम्ही ,लोकांनी दिलेले सल्ले/उपदेश जास्त मनावर घेउ नका हो. तुम्हाला जे आवडते ते लिहा.लेखन हे प्रसिद्धिकरीता नसून स्वसमाधानाकरीता असावे असे वाटते. फक्त लेखन हे किती सकस आहे हेच महत्वाचे. पुढील भागाची वाट पहात आहे. अभिज्ञ. B)

आंबोळी गुरुवार, 05/22/2008 - 16:27
सर्व प्रतिक्रिया देणार्‍यांचे व वाचणार्‍यांचे आभार. मिसळपाव वर जीवनाच्या विविध पैलूंवर उत्कृष्ठ लेखन (लेख/चर्चा/कविता) करणारे खूप लेखक आहेत. त्यामुळे मिसळपाववर स्वतः लेखन करण्यापेक्षा या लेखकांचे लेखन वाचायलाच जास्त मजा येते असा माझा अनुभव आहे. आणि मी तेच करत असतो. फक्त मरण या शाश्वत गोष्टीबद्दल कोणी फारसे लिहिताना आढळले नाही. ती राहिलेली फट बुजवण्याचा हा प्रमाणिक प्रयत्न. आपण सर्वानी गोड (?) मानुन घ्या. >>पण सारखं सारखं ते मरणाचं(विविध अँगल मधुन का असेना) वाचुन घाबरायला होतं हो! अहो इथे घाबरलात की इतर लेखकांचे अल्हादायी लेखन वाचतानाचा आनंद द्वीगुणीत होइल. >>(स्वगत - ह्या अंबोळीकडचा तो कंदिल आता कुठल्या अवस्थेत असेल बरे? ) माळ्यावर ठेवलाय. यावेळी घरी गेलो की लाउन बघावा म्हणतो..... बरेच वर्षात लावला नाही. निट काम देतोय की नाही ते पाहीले पाहिजे एकदा. >>आम्हालाही आंबोळीच्या लेखनाचे व्यसन लागेल असे वाटते. आयला... माझे लेखन व्यसन लागण्याइतके नशीली आसेल असे मला स्वप्नातसुध्धा वाटले नव्हते. (बहुतेक "रक्तगाभुळली वटवाघळे,उप्पिटम" वगैरे वाचुन प्रवास करत नसल्यामुळे स्वप्नात तसे वाटत नसेल.....) >>मस्त लिहिलयस रे आंबोळ्या.. हे "क्रमशः" कुठुन शिकलास?? स्वप्नभटके विजुभौ >>स्मशानातला प्रसंग फार घाईत उरकल्यासारखा वाटतो.अजुन खुलवून लिहिता आला असता>> अहो मी फक्त घडलेला प्रसंग सांगीतला. पण पुढच्यावेळी लक्षात ठेवीन. >>तुम्ही ,लोकांनी दिलेले सल्ले/उपदेश जास्त मनावर घेउ नका हो. या दिलेल्या सल्ल्याविषयीही आपले हेच मत आहे? ;) >>स्वगतः ह्या आंबोळी दादांनी कधी मुलगी पटवायचा प्रयत्न केला असेल का? त्या मुली घाबरुन पळून गेल्या असाव्यात.... आरे हो ती स्टोरी सांगायची राहिली. पुर्वी आम्ही एक पोरगी पटवली होती. म्हन्जे जातायेता इशारे, खाणाखुणा आणि पत्रव्यवहार इथपर्यंतच मामला होता. शेवटी आम्ही एकदा भेटून प्रेमाच्या आणाभाका घ्यायचे ठरवले. आता गावात एकांत मिळेल असे एकच ठिकाण होते ते म्हंजे स्मशान. तेंव्हा संध्याकाळी ७ नंतर तिथे भेटायचे ठरले. आम्ही निघालो. थंडीचे दिवस आसल्याने लवकर अंधार पडेल म्हणुन आम्ही बरोबर "कंदील" घेतला होता. जाताना वाटेतच तो लावावा लागला. स्मशानात चौथर्‍यावर बसुन आम्ही तासभर गप्पा मारल्या. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. आता परत कधी भेटायचे हे ठरवतच होतो की चाहुल लागली आणि लोक येताना दिसले. बघतो तर गल्लीतले आणि तिच्या घरचे लोक तिच्या आजोबाना घेउन येत होते. माझ्या हातातला कंदील भेसुर जळत होता. (वरच्या स्टोरीतली सर्व पात्रे व प्रसंग काल्पनिक आहेत) (कृतज्ञ)आंबोळी

In reply to by आंबोळी

प्रमोद देव गुरुवार, 05/22/2008 - 19:12
थंडीचे दिवस आसल्याने लवकर अंधार पडेल म्हणुन आम्ही बरोबर "कंदील" घेतला होता. जाताना वाटेतच तो लावावा लागला. स्मशानात चौथर्‍यावर बसुन आम्ही तासभर गप्पा मारल्या. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. आता परत कधी भेटायचे हे ठरवतच होतो की चाहुल लागली आणि लोक येताना दिसले. बघतो तर गल्लीतले आणि तिच्या घरचे लोक तिच्या आजोबाना घेउन येत होते. माझ्या हातातला कंदील भेसुर जळत होता. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

In reply to by आंबोळी

विसोबा खेचर Fri, 05/23/2008 - 07:43
मिसळपाव वर जीवनाच्या विविध पैलूंवर उत्कृष्ठ लेखन (लेख/चर्चा/कविता) करणारे खूप लेखक आहेत. धन्यवाद आंबोळीराव! अहो पण जरा हळू बोला! मिपाच्या हितशत्रूंना हे वाक्य आवडणार नाही! त्यांना असं वाटतं की मिपा हे फक्त काहितरी पोरकट टाईमपास असणारं, व सतत काहितरी फालतूगिरी चालू असलेलं संस्थळ आहे! हां, आता वडील वारल्यासारखे चेहरे करून सतत दुसर्‍याच्या शुद्धलेखनाच्या व व्याकरणाच्या चुका काढण्यातच मिपाकर धन्यता मानत नाहीत, त्याला काय इलाज बरं?! :) असो... तात्या.

धमाल मुलगा गुरुवार, 05/22/2008 - 16:50
च्यायला, लै म्हणजे लैच उशीर घडला बॉ प्रतिक्रिया द्यायला :( आम्बोळ्या, भौ हे खरंच असं घडलं होतं? आयला, चितेवर बिडी पेटवायची म्हणजे काय गंमत आहे का? नेहमीप्रमाणे लेख उत्तम आहेच हे वे.सां.न.ल. :)
...प्रेमाच्या आणाभाका घेतल्या. आता परत कधी भेटायचे हे ठरवतच होतो की चाहुल लागली आणि लोक येताना दिसले. बघतो तर गल्लीतले आणि तिच्या घरचे लोक तिच्या आजोबाना घेउन येत होते. माझ्या हातातला कंदील भेसुर जळत होता.
हाण तिच्याआयला! एकदम जब्राट! च्यायला हा किस्सा तर लैच भारी! अवांतरः नाही नाही त्या गोष्टी शिकवून बायकोचे कान भरणार्‍या तिच्या माहेरच्या भोचक नातेवाईकांवर हा कंदील काम करतो का?
मी पण पाहिलेली मयत :
आम्ही साधारण १२वीत असु. एक मित्र, पराग नाव त्याचं, नुकताच गाडी शिकला होता आणि त्याच्या बा नं त्याला यामाहा घेऊन दिली होती. मग काय हो...भर गावातून बुंग..बुंग करत हिंडायचो आम्ही. एक दिवस असेच सुसाट फिरत होतो, तर समोरुन एक अंत्ययात्रा आली, म्हण्जे अंत्ययात्रा चाललीच होती, आम्ही तिच्यासमोर आलो. पर्‍याचा गाडीवर काहीकेल्या ताबा राहिना....टरकून मी मागच्यामागं उडी टाकली. आणि हा बहाद्दर........ गेलेल्या माणसाला जे चार खांदेकरी घेऊन चालले होते, सरळ त्यांच्यातच गाडी घेऊन घुसला...अरारारा...तिरडी टाकून जी काय पळापळ झाली....हातात मडकं घेऊन पुढं चालणारा त्या मयताचा मुलगा मडक्यासकट सांडला. ती तिरडी, तिच्यावरचं ते प्रेत आणि तो पडलेला मुलगा हे सगळं जस्संच्या तस्संच ठेऊन त्या सगळ्यांनी पर्‍याला बेक्कार धूतला :( नंतर पोलिसकेस केली...ह्या सगळ्या गडबडीत पर्‍याच्या बापसाला आणायला म्हणून मी गेलो तो परत येऊन पाहतो तर पर्‍या एका बाजुला डोकं धरुन बसलेला, मामालोकांनी पंचनामा करुन घेतलेला, रस्त्यात वेडावाकडा पडलेला मुलगा, ते मडकं तिरडी इ.इ. सगळं खडूनं आखून घेतलेलं.... काय तिच्यामारी एकेक अनुभव आहेत आमचे!

In reply to by धमाल मुलगा

शिद Fri, 02/21/2014 - 18:50
नेहमीच्या रटाळ धाग्यांना कंटाळुन जरा जुने लेख चाळत होतो त्यामधे हे रत्न सापडले... धमाल मुलगा ह्यांचा हा प्रतिसाद पण एक्दम जबरा... ठ्या करुन फोटलो एक्दम... =)) =)) अवांतरः आंबोळी यांचे 'कंदील व कंदील-२' हे लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचावे हे नम्रपणे सुचवतो.

वरदा गुरुवार, 05/22/2008 - 17:53
मानलं तुम्हाला...धन्य आहात कसली ष्टोरी आहे जबराट पुढं हे नाही सांगितलं आजोबांना पाहीलं आणि मागे पाहिलं तर ती मुलगी गायब झालेली.....कोण होती ती? ........ कुठुन सुचतं हो... माळ्यावर ठेवलाय. यावेळी घरी गेलो की लाउन बघावा म्हणतो..... बरेच वर्षात लावला नाही. निट काम देतोय की नाही ते पाहीले पाहिजे एकदा. :O

आनंदयात्री गुरुवार, 05/22/2008 - 19:00
>>माळ्यावर ठेवलाय. यावेळी घरी गेलो की लाउन बघावा म्हणतो..... बरेच वर्षात लावला नाही. निट काम देतोय की नाही ते पाहीले >>पाहिजे एकदा. विसर शिंच्या नाव विसर माझे ...

आंबोळी गुरुवार, 05/22/2008 - 19:46
येथे जातीने उपस्थीत राहून माझ्या मयताला खांदा दिल्याबद्दल तात्या व इतर गावकरी मंडळींचे मनःपुर्वक आभार !!! असाच योग पुन्हःपुन्हा येवो. (आभारी) आंबोळी

अभिता Fri, 05/23/2008 - 01:58
मिसळपाव वर जीवनाच्या विविध पैलूंवर उत्कृष्ठ लेखन (लेख/चर्चा/कविता) करणारे खूप लेखक आहेत. त्यामुळे मिसळपाववर स्वतः लेखन करण्यापेक्षा या लेखकांचे लेखन वाचायलाच जास्त मजा येते स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्सहमत१००%.

In reply to by अभिता

मन Fri, 05/23/2008 - 17:00
मिसळपाववर स्वतः लेखन करण्यापेक्षा या लेखकांचे लेखन वाचायलाच जास्त मजा येते स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्सहमत१००%. नक्किच. १००००% मान्य्. आपलाच, मनोबा

In reply to by अनुप ढेरे

सोत्रि Fri, 02/21/2014 - 20:31
शेम टो शेम हेच म्हणतो. हे असले जुने लेख खाणकाम करुन काढत राहिले पाहिजे. जरा तजेला येइल इथे परत! - (जुना मिपाकर) सोकाजी

कंजूस Sun, 02/23/2014 - 06:07
हा धागा उघडला तर २००८ सालचा आता खणून वर काढलेला . उत्सुकता म्हणून वाचून काढला . "क्रमश:" हा शब्द बऱ्याच जणांच्या भावना दुखावणारा वाटला .पण यात तांत्रिक दृषट्या गैर काहीच वाटले नाही . हापण विषय क्रमश: होऊ शकतो . आता मूळ धागाकर्ता जोपर्यंत काही नवीन भर घालत नाही तोपर्यँत प्रतिसाद वाढवण्यात काहीच उपयोग नाही .यात्रेचे मजेदार अनुभव असू शकतात यावर आपल्या विनोदी लेखकांनी प्रकाशकांचा सल्याने कमीच लिहिले आहे .
लेखनविषय:
लेखनप्रकार
साधारण ७-८ वर्षापूर्वीची कथा. आषाढातला रविवार. पाउस धो धो कोसळत होता. दुपारची जेवणे होउन जरा पडापड होतेय तेवढ्यात फोन वाजला. गावाकडे चुलत आजी वारल्याची बातमी आली. सगळी आवराआवर करुन आम्ही घरातले सगळे २० मैलावर आसलेल्या गावी निघालो. गावाकडचा आमचा दुमजली वाडा एकदम टिपिकल आहे. दगडी पायर्‍या. दींडी दरवाजा , तटबंदी,पायर्‍यांना लागुन डाव्याबाजुला दगडी कट्टा. पायर्‍यांच्या उजव्या बाजुला मोकळे वावर. तिथे म्हशींचे गोठे. गोबरग्यासची टाकी. दरवाज्यातून आत गेले की मोठे अंगण. खालचा सोपा, वरचा सोपा, माजघर, स्वयंपाकघर. ७-७ फूटी मातीच्या भिंती. भिंतीतून वर जायला जिने. मागच्याबाजुला २ एकराचे परस.

(पीस)

केशवसुमार ·

प्राजु Tue, 05/20/2008 - 20:05
लय भारी.. अर्थ भलते लावले शब्दांतले चंडिका होउन मग थरथरलीस तू लोक जमले ऐकुनी आरोह तो येव्हढे जोरात ओरडलीस तू!! सह्ह्ह्ही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आंबोळी Tue, 05/20/2008 - 20:08
मानले बॉ तुला.... शब्द प्रेमाचा कसा मोडेन मी? ठेवला आहेस मज ओलीस तू! मी असे लाचार नवरा शेवटी शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू... अरे वैश्विक सत्य सांगून मोकळा झालास की रे...... लाख दंडवत रे तुला.

चतुरंग Tue, 05/20/2008 - 20:45
शब्द प्रेमाचा कसा मोडेन मी? ठेवला आहेस मज ओलीस तू! मी असे लाचार नवरा शेवटी शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू... एकदम दे दणादण! ;) चतुरंग

मदनबाण Wed, 05/21/2008 - 05:49
शब्द प्रेमाचा कसा मोडेन मी? ठेवला आहेस मज ओलीस तू! मी असे लाचार नवरा शेवटी शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू... जबरदस्त..... मदनबाण.....

विसोबा खेचर Wed, 05/21/2008 - 09:29
मी असे लाचार नवरा शेवटी शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू... वा वा! सुंदर रे केशवा.... आपला, (मिपाकर) तात्या.

बेसनलाडू Wed, 05/21/2008 - 10:17
पाहिले मी काल, आवडलीस तू काय नखरा, काय रुपडे, 'पीस' तू अर्थ भलते लावले शब्दांतले चंडिका होउन मग थरथरलीस तू लोक जमले ऐकुनी आरोह तो येव्हढे जोरात ओरडलीस तू!! हाहाहा (वाचक)बेसनलाडू

केशवसुमार Fri, 05/23/2008 - 10:09
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी) केशवसुमार

अजिंक्य Tue, 05/27/2008 - 12:45
लोक जमले ऐकुनी आरोह तो येव्हढे जोरात ओरडलीस तू!! क्या बात है!! मी असे लाचार नवरा शेवटी शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू... मार डाला!!! मस्त!

प्राजु Tue, 05/20/2008 - 20:05
लय भारी.. अर्थ भलते लावले शब्दांतले चंडिका होउन मग थरथरलीस तू लोक जमले ऐकुनी आरोह तो येव्हढे जोरात ओरडलीस तू!! सह्ह्ह्ही. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

आंबोळी Tue, 05/20/2008 - 20:08
मानले बॉ तुला.... शब्द प्रेमाचा कसा मोडेन मी? ठेवला आहेस मज ओलीस तू! मी असे लाचार नवरा शेवटी शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू... अरे वैश्विक सत्य सांगून मोकळा झालास की रे...... लाख दंडवत रे तुला.

चतुरंग Tue, 05/20/2008 - 20:45
शब्द प्रेमाचा कसा मोडेन मी? ठेवला आहेस मज ओलीस तू! मी असे लाचार नवरा शेवटी शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू... एकदम दे दणादण! ;) चतुरंग

मदनबाण Wed, 05/21/2008 - 05:49
शब्द प्रेमाचा कसा मोडेन मी? ठेवला आहेस मज ओलीस तू! मी असे लाचार नवरा शेवटी शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू... जबरदस्त..... मदनबाण.....

विसोबा खेचर Wed, 05/21/2008 - 09:29
मी असे लाचार नवरा शेवटी शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू... वा वा! सुंदर रे केशवा.... आपला, (मिपाकर) तात्या.

बेसनलाडू Wed, 05/21/2008 - 10:17
पाहिले मी काल, आवडलीस तू काय नखरा, काय रुपडे, 'पीस' तू अर्थ भलते लावले शब्दांतले चंडिका होउन मग थरथरलीस तू लोक जमले ऐकुनी आरोह तो येव्हढे जोरात ओरडलीस तू!! हाहाहा (वाचक)बेसनलाडू

केशवसुमार Fri, 05/23/2008 - 10:09
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार! (आभारी) केशवसुमार

अजिंक्य Tue, 05/27/2008 - 12:45
लोक जमले ऐकुनी आरोह तो येव्हढे जोरात ओरडलीस तू!! क्या बात है!! मी असे लाचार नवरा शेवटी शेवटी, अर्धांगिनी, ठरलीस तू... मार डाला!!! मस्त!
लेखनविषय:

मिलिंद फणसें  पीस बघून मोहरले पण आम्हाला 'पीस' बघून आलेला अनुभव फार भयंकर होता.

आपण कोणत्या माध्यमातून शिक्षण घेतलेत?

भाई ·

भाई Tue, 05/20/2008 - 11:36
गेल्या ३ वर्षांत कोणत्या माध्यमात किती मुलांनी प्रवेश घेतला याबाबत गेल्या आठवड्यात एक अहवाल प्रसिध्द झाला. हिंदी, मराठी नंतर इंग्लिशचा क्रमांक लागला. इथे एक उत्सुकता म्हणून हा कौल (किंवा सर्वेक्षण म्हणा) घेत आहे. मिपा सदस्यांमध्ये हे प्रमाण कसे आहे? हा, जरी उत्सुकता म्हणून हे सर्वेक्षण घेतले असले तरी त्यावरून काही निष्कर्ष काढण्याचे हक्क सर्वांनाच देत आहे :-) -भाई (मराठी माध्यमवाला)

भडकमकर मास्तर Tue, 05/20/2008 - 16:22
मी मराठीमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतले....... शास्त्र गणित सगळं मराठीत.... आपला ( डिंभकाच्या ग्रसनीमध्यकर्णनलिकेचे एकप्रतलीय समद्विभुज त्रिकोणासारखे क्षेत्रफळ काढणारा ) भडकमकर ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

आंबोळी Tue, 05/20/2008 - 19:56
( डिंभकाच्या ग्रसनीमध्यकर्णनलिकेचे एकप्रतलीय समद्विभुज त्रिकोणासारखे क्षेत्रफळ काढणारा ) =)) =)) =)) =)) (जलव्यालाच्या तंतूमधिल स्फटिकांचे सूक्ष्मदर्शकाखाली रसग्रहण करणारा)आंबोळी

यशोधरा Tue, 05/20/2008 - 16:49
माझेही शालेय शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले, आणि नशीबाने इतक्या उत्तम शिक्षिका मिळाल्या! त्याबाबतीत मी स्वतःला खूप नशीबवान समजते.

In reply to by यशोधरा

संदीप चित्रे गुरुवार, 05/22/2008 - 23:39
मी सुद्धा मराठी माध्यमात दहावीपर्यंत शिकलो . नववी-दहावीला मराठीच्या ज्या शिक्षिका होत्या त्यांच्या अजूनही संपर्कात आहे :) विशेष म्हणजे माझी आई त्याच शाळेच्या इंग्लिश माध्यमाला हिंदी आणि मराठीची शिक्षिका होती :) ती आता निवृत्त झालीय. ----- अवांतरः कुणाला उत्सुकता असल्यास -- महाराष्ट्रीय मंडळ, गुलटेकडी - पुणे.

राजे Tue, 05/20/2008 - 17:10
८ वी - ड नुतन मराठी विद्यालय, कोल्हापुर ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

वरदा Tue, 05/20/2008 - 17:30
माझेही शालेय शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले, आणि नशीबाने इतक्या उत्तम शिक्षिका मिळाल्या नाहीत! पण काय करणार आम्ही शिकलो आई बाबांनी शिकवून आणि क्लासमधे जाऊन....

शितल Tue, 05/20/2008 - 17:45
राजे, तुम्ही नुतन मराठी कोल्हापुर, मी प्रायव्हेट हायस्कुल, कोल्हापुर, तुमची शाळा आमच्या शाळेची शाखा आहे.

In reply to by शितल

राजे Tue, 05/20/2008 - 17:49
अरे वा ! मिरजकर टिकटी जवळ ना :) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by स्वाती राजेश

राजे Tue, 05/20/2008 - 17:55
अरे वा ! तुम्ही पण कोल्हापुरकर का ? राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by स्वाती राजेश

तात्या विंचू Wed, 05/21/2008 - 21:31
१ ते ४ थी : रा ना सामाणी विद्यालय,कोल्हापूर. ५ ते १० वी : स म लोहिया हायस्कूल,कोल्हापूर. ११,१२ वी : न्यू कॉलेज ,कोल्हापूर. संगणक अभियांत्रिकी : शासकीय महाविद्यालय, पुणे - ५ (सीओईपी)....

In reply to by तात्या विंचू

छोटा डॉन गुरुवार, 05/22/2008 - 08:10
>>संगणक अभियांत्रिकी : शासकीय महाविद्यालय, पुणे - ५ (सीओईपी).... मी पण तिथलाच ... कुठली बॅच ? व्य. नी. वरुन संपर्क साधा ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आर्य Tue, 05/20/2008 - 18:42
१० वी 'अ' - सांगली उच्चशिक्षण पुणे - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे. (कृष्णा काठी रमणारा) आर्य

आनंदयात्री Tue, 05/20/2008 - 18:48
प्रसाद मुळे इयत्ता १ ली फ सरस्वती भुवन प्रशाला औरंगाबाद ४३१००१ (१ली ते १०वी जवळ्पास प्रत्येक मास्तराचे टोले अन प्रत्येक मास्तरणीच्या चापटा खाल्लेला) (१ली ते १०वी जवळ्पास दिवसातुन एकदा तरी वर्गाबाहेर अंगठे धरलेला) (शाळा संपल्यावर सुटकेचा नि:श्वास सोडलेला) -आंद्या फ

चतुरंग Tue, 05/20/2008 - 19:16
नवीन मराठी शाळा, अहमदनगर (अत्यंत उत्तम शिक्षक/शिक्षिका लाभले हे भाग्य! अवांतर - ह्या शाळेत लाकडी पट्ट्यांची मारामारी आणि सतरंजीत गुंडाळून मुलांना चोपणे हे नियमाने केले.) पाचवी ते दहावी - अहमदनगर एज्यूकेशन सोसायटीचे भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल. (पुन्हा एकदा तळमळीने शिकवणारे शिक्षक भेटले ही आयुष्यभराची शिदोरी मानतो! :) अवांतर - सायकलीवरुन पाठलाग आणि पाडापाडी, चेंडूने रप्पाधप्पी पासून ते मल्लखांबाच्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळणे इत्यादी सर्व उद्योग केले. ) चतुरंग

१-४ भावे प्राथमिक, सदाशिव पेठ, पुणे ३० ५ वी भावे हायस्कूल, सदाशिव पेठ, पुणे ३० ६वी ७वी जोग हायस्कूल, कोथरुड पुणे २९ ८वी ते १०वी सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूल, डेक्कन जिमखाना पुणे ४ असा होता माझा शिक्षण प्रवास. एकदा आमच्या शाळेतल्या म्हेत्रे सरांना मी म्हणले होते "सर , मी लई शाळा पाहील्या आहेत." :) पुण्याचे पेशवे

शिंगाड्या Tue, 05/20/2008 - 20:27
मराठी १ ते ४ थी ...आलेगावकर प्रशाला..खडकी,पुणे ... (शाळेच्या पहिल्याच दिवशी बाईना येनार्‍या संकटांची जाणिव झाली असावी...अन् थोडयाच काळात 'डोक्यावर मिरे वाटतोस' असा म्हणनार्‍या व्यक्तिंच्या संख्येत भर पडली :) ४ थी ते १०वी स्वामी विवेकानंद,दापोडी,पुणे..१२ (हा पिनकोडयोग अगदी जुळुन आलाय ;)

ईश्वरी Tue, 05/20/2008 - 21:43
मी ही मराठी माध्यम - हुजूरपागा हायस्कूल, पुणे ३० फक्त - ८ ते १० वी सायन्स व गणित इंग्लीश माध्यम ईश्वरी

धनंजय Tue, 05/20/2008 - 21:47
आणि शाळेत कोंकणी बोलू नये असा दंडक होता. पण तो कडकपणे पाळला जात नसे. त्यामुळे शाळेत वर्गाबाहेर अर्धा वेळ मुले कोंकणीत बोलत. घरी फक्त मराठीत बोलणेच चाले. लहान मुलांची मासिके फक्त मराठीच विकत आणत. इंग्रजी बोलणे घरात (गृहपाठ, घोकंपट्टी सोडल्यात) वर्ज्य नव्हते. वाचणे, लिहिणे अर्थातच कुठल्याही भाषेत आमच्या घरात वर्ज्य नव्हते. शालेय वयात लिखाण ९०% इंग्रजीतच झाले. मराठी लेखनाचा मला सराव नाही, म्हणून त्यात कमकुवतपणा जाणवतो. मिपा वगैरे संकेतस्थळांवर मराठीतून लिहून उणीव भरून काढण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे : "डिंभकाच्या ग्रसनीमध्यकर्णनलिकेचे एकप्रतलीय समद्विभुज त्रिकोणासारखे क्षेत्रफळ काढणारा" मध्ये फक्त "डिंभक" शब्दाचा माझा अर्थ चुकला, बाकी शब्द समजले. स्वतःची पाठ थोपटून घेताना हात मुरगळला, तो आता दुखतो आहे.

एक Tue, 05/20/2008 - 21:55
१ ते १० तुकडी अ (अपवाद २ री ब) म.ए.सो. प्राथमिक आणि पेरूगेट हायस्कूल. ८ वी पर्यंत मराठी त्यानंतर शास्त्र, गणित इंग्लीश मधे.. आम्हाला इंग्लिश शिकवणार्‍या बाई मराठी मधून ईंग्लिश शिकवायच्या :-)

In reply to by एक

धमाल मुलगा गुरुवार, 05/22/2008 - 15:23
५ ते १० तुकडी अ म.ए.सो. माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक विद्यालय, बारामती. १०वी पर्यंत सुध्द म्हराटी ;) आमच्या शाळेत भावे सरांचा मराठीचा तास संस्कृतप्रचुर, इंग्रजीच्या पोतनीस सरांचा तास चित्रकलासंपन्न आणि संस्कृतचा तास पुन्हा भावे सरांचा तोही छान मराठीपुर्ण :) बाकी यत्ता ९वीत वेलणकर मास्तरांचा इंग्रजीचा तास त्यांच्या थापा ऐकायसाठी म्हणून आम्ही आवडीने बसायचो ;)

विकास Tue, 05/20/2008 - 23:01
१० वी पर्यंत मराठीतूनच शिक्षण झाले. फक्त ८ ते १० वी शास्त्र-गणित इंग्रजीतून. शिक्षक-शिक्षिका चांगल्या भेटल्या. त्यांना तसे वाटते का ते माहीत नाही, कारण अजून पण आमची आठवण काढतात असे ऐकून आहे :-)

In reply to by विकास

स्वाती दिनेश Wed, 05/21/2008 - 12:17
१० वी पर्यंत मराठीतूनच शिक्षण झाले. फक्त ८ ते १० वी शास्त्र-गणित इंग्रजीतून.शाळेत आमची बॅच शास्त्रगणित इंग्रजीतूनची पहिली बॅच! शिक्षक-शिक्षिका चांगल्याच भेटल्या, अजूनही आमची ,आमच्या सगळ्या बॅचची आठवण काढतात,:) हे नुसते ऐकूनच नाही तर मागच्या भारतवारीत शाळेत गेले असताना काही जुन्या शिक्षकांच्या भेटीचा योग आला,त्यांच्याकडूनच ऐकले,:)(अर्थात आता आमच्या वेळचे एखाददोन वगळता जवळ जवळ सगळे शिक्षक निवृत्त झाले असल्याने ती पूर्वीची शाळा राहिली नाही असे वाटले खरे..) स्वाती

देवदत्त Tue, 05/20/2008 - 23:11
मी ही दहावीपर्यंत मराठीत १ली ते २ री - श्रीरंग, ठाणे २ री ते ३ री - दांडेकरवाडी, भिवंडी ४थी- विद्याविहार, अंधेरी ५ ते १०वी वर्सोवा वेल्फेअर, सात बंगला, अंधेरी

भाग्यश्री Wed, 05/21/2008 - 00:00
मी १ली ते १०वी मराठी माध्यम.. ८वी ते १०वी सायन्स, गणित इंग्लिश मधून.. १ली ते ६वी - अभिनव मराठी... ७वी ते १०वी - म्.ए.सो. चे सौ विमलाबाई गरवारे हायस्कुल..! चांगले शिक्षक? ह्म्म.. माहीत नाही.. त्यांना काही फार गुणी स्टुडंट मिळाली नाही इतकं नक्की.. :)) (वर्गात अखंड बडबड करणारी)भाग्यश्री...

रविराज Wed, 05/21/2008 - 00:12
१० वी ड. आण्णासाहेब कल्याणी विद्यालय रयत शिक्षण संस्था. कॅम्प सातारा. जिंकून जिंकून जिंकणार कोणं? दहावी ड शिवाय हायच कोणं!

विसोबा खेचर Wed, 05/21/2008 - 08:33
१ ते ४ तुकडी अ - पी ई एस टी ची प्राथमिक शाळा. (मराठी माध्यम) ५ ते १० वी - मो ह विद्यालय, ठाणे. (मराठी माध्यम) आपला, (शाळाप्रेमी) तात्या.

गणा मास्तर Wed, 05/21/2008 - 09:45
मराठी नाना मी तुमच्याशी सहमत आहे. मी एक नवीन कौल लावलाय " तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्या माध्यमातुन शिक्षण देत आहात कि॑वा द्याल" त्याचा निकाल हेच दाखवतो. ९८ टक्के लोक मराठीत शिकुन चांगले कर्तेसवरते कमावते चांगल्या कंपनीत कामाला आहेत पण स्वतःच्या पोरामचे नुकसान (म्हणजे नक्की काय) होवु नये म्हणुन आंग्ल भाषेच्या शाळेत घालुन त्यांचा पोपट (अककल शुन्य बडबड करणारा ) करतात मराठीत शिकुन तुम्ही जर कर्तृत्व गाजवु शकता तर तुमची मुले गाजवणार नाहित कशावरुन? पण लोकान्ना पटत नाही. खुप दु:ख वाटते. मराठी माणसा जागा हो रे. बातमी वाचा मराठी असे आमुची शिक्षणभाषा http://esakal.com/esakal/esakal/05022008/rightframe.html

limbutimbu Wed, 05/21/2008 - 10:50
मात्रुभाषा मराठितून शिक्षण घेतल, अन त्यामूळे आम्हाला काही तोटा झाल्याच अजुनतरी दिसत नाहीये आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

ईश्वरी Wed, 05/21/2008 - 12:43
--समृद्ध गुलाम बिचारे नाना चेंगट यांनी वापरलेल्या या शब्दांवर माझा आक्षेप आहे. असच म्हणायच असेल तर जे जे लोक नोकरी करतात त्या सर्वानाच गुलाम म्हणावे लागेल. फक्त अनिवासी महाराष्ट्रीयनच का? शिवाय कित्येक निवासी महाराष्ट्रीयनही भारतातील कंपनी मधे नोकरी करीत असताना कंपनीच्या कामासाठी दिर्घकालीन परदेशी वास्तव्य करून आहेत. ईश्वरी

बालवाडी ते बारावी! बालवाडी ते ७वी - मराठी माध्यम ८वी ते १० वी - सेमी इंग्रजी ११वी ते १२वी - इंग्रजी (ए तुकडीतला वात्रट कार्टा) टिंग्या ;) अवांतर - आमचा वात्रटपणा तेव्हापासुनचा बरं का! :D

In reply to by ब्रिटिश टिंग्या

नूमवीयांचा एकच बाणा हाती घ्याल ते घरी न्या ! असे माझे नूमवीय मित्र सांगत असत. ;) (हघ्याहेवेसांनल) पुण्याचे पेशवे

डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 05/22/2008 - 07:44
आमचे शालेय शिक्षण डो॑बिवली येथे 'टिळकनगर विद्याम॑दिर' नामक एका नामी शाळेत झाले, फार चा॑गले शिक्षक लाभले.. (पळधे बाई॑चा आवडता विद्यार्थी) प्रसाद

कावळा गुरुवार, 05/22/2008 - 11:58
नमस्कार शुभ सकाळ मित्रा॑नो माझे सर्व शिक्षण सुभेदार वाडा (कल्याण)नामक मराठी माध्यमातील शाळेत झाले. अगदी महाविद्यालया पर्य॑त (बिर्ला महाविद्यालय) आपलाच (सोमण मास्तरा॑चा प्रेमळ विद्यार्थी ) विवेक वि.

एडिसन गुरुवार, 05/22/2008 - 13:25
१ ते ४ थी : बापट बाल विद्यामंदिर, सांगली (तुकडी 'ड'). ५ ते १० वी : सिटी हायस्कूल, सांगली (तुकडी 'अ'). ११,१२ वी : विलिंग्डन महाविद्यालय, सांगली. विद्युत अभियांत्रिकी: वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली. सध्या भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, मुंबई येथे विद्यावाचस्पती (ओळखा पाहू, म्हणजे काय ते? ;) ) पदवीसाठी कार्यरत आहे.

भोचक गुरुवार, 05/22/2008 - 16:21
१-४ जिल्हा परिषद शाळा, मोखाडा (जि. ठाणे) ५-१० रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल, मोखाडा ११-१५ केटिएचएम कॉलेज नाशिक पत्रकारिता एचपीटी कॉलेज, नाशिक दहावीपर्यंतच्या शाळेत आदिवासी विद्यार्थी बहुसंख्याक होते. त्यातही रयतच्या शाळेचे नियम फारच वेगळे. डोक्यावर पांढरी गांधी टोपी. हाफ चड्डी (दहावीपर्यंत) आणि मुलींनाही फ्रॉक. आदिवासी मुले मुळातच उशीरा शाळेत दाखल व्हायची. त्यामुळे दहावीतला मुलगाही अनेकदा सतरा, अठरा वर्षासारखा असायचा. काहींची तर लग्न झालेली, ठरलेली असायची. (मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असता ना माझ्या एका आदिवासी मित्राला तीन मुले झाली होती.). शाळेतली शिक्षकही भारी. यल, यम, यन अशी इंग्रजी बाराखडी शिकवणारे. पाचवीत आलो तेव्हा गोटखिंडीकर सर नावाचे मुख्याध्यापक होते. यांना इंग्रजी बोलण्याचा भारी सोस. शाळेतल्या जेमतेम चौथी शिकलेल्या शिपायाशी ते इंग्रजीत बोलत. पण मुले जवळपास सगळीच दारिद्र्य रेषेच्या खालची. काही तर अतिशय हुषार. पण पैसा नसल्याने शिकायच्या वाटा बंद झालेली. कधी कधी काहींच्या आठवणीने विषण्ण व्हायला होतं.

चावटमेला गुरुवार, 05/22/2008 - 18:53
१० वी अ , सिटी हायस्कूल, सान्गली. परमाणुशास्त्र अभियान्त्रिकी, वालचन्द अभियान्त्रिकी महाविद्यालय , सान्गली सध्या - पुणे/यु.के. (तळ्यात/मळ्यात) (अखेरच्या श्वासापर्यन्त मराठी) चावटमेला

In reply to by चावटमेला

एडिसन गुरुवार, 05/22/2008 - 19:20
चावटमेल्या, कोणती बॅच तुझी? मी पण सिटी हायस्कूलचा विद्यार्थी...१९९७ ची बॅच! आणि नंतर वालचंदला पण होतो..२००३ ला बी.ई. झालो.

अभिता Fri, 05/23/2008 - 00:22
मला इग्रंजी येत नाहि.कारण जेव्हा ५वी त इग्रंजी सुरु झाले तेव्हा पुर्ण वर्ष वर्गाबाहेर उभे राहुन शिकले. सरस्वती सेंकडरी स्कूल.(टिळक सरांची शाळा) मराठी माध्यम ५ ते १० वी ब वर्ग.

ऋषिकेश Fri, 05/23/2008 - 00:38
सेमी इंग्रजी!! शास्त्र, गणित इंग्रजीतून आणि बाकी विषयमराठीतून :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

फटू Fri, 05/23/2008 - 07:42
आमचं मराठी (किंवा आमचं इंग्रजी ) यावर आम्ही इथं खूप काही लिहिलं आहे. आणि तेही सगळं खरं खरं... अगदी अक्षर नं अक्षर खरं आहे.... तरीही थोडंसं इथेही लिहीण्याचा मोह आवरत नाहीये म्हणून... आम्ही पहीली ते चौथी आमच्या गावातल्या शाळेत शिकलो... शाळेचं नाव रायगड जिल्हा परिषद शाळा वडगाव कॉंड पाचवी ते बारावी आम्ही गोरेगावच्या शाळेत शिकलो...शाळेचं नाव ना म जोशी विद्याभवन गोरेगाव - रायगड दोन्ही शाळा मराठीच (अगदी अकरावी बारावीला विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम इंग्रजीत होता तरी प्राध्यापक मराठीतच शिकवायचे. परीक्षा मात्र इंग्रजीत द्यावी लागायची) जाता जाता पुन्हा सागांवंसं वाटतं... आम्ही मराठीतूनच शिकलो... आणि तरीही आम्ही कुठे मागे पडलो नाही... हा आता थोडी जास्त मेहनत घ्यावी लागली... पण त्यात काही विशेष नाही... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

चावटमेला Fri, 05/23/2008 - 11:25
चावटमेल्या, कोणती बॅच तुझी? मी पण सिटी हायस्कूलचा विद्यार्थी...१९९७ ची बॅच! आणि नंतर वालचंदला पण होतो..२००३ ला बी.ई. झालो. मी २००० च्या सिटी हायस्कूल बॅच चा विद्यार्थी, २००६ ला वालचंद मधून बी.ई. झालो. (कृष्णाकाठचे ऋण कधीही न विसरु शकणारा) चावटमेला

निरंजन मालशे Fri, 05/23/2008 - 17:10
माझ शिक्षण १००% मराठी शाळेतून झालय आज जेव्हा मी फ्रेंच भाषांतरकार दुभाषा( ट्रांस्लेटर इंटरप्रिटर) म्हणून काम करतो तेव्हा मी ही गोष्ट अभिमानाने सांगतो

दवबिन्दु गुरुवार, 04/30/2009 - 08:51
इगलिश स्कुलमधी शिकलो. इंगलिश भाषाच नोकरी देनारी आहे. फोनवर स्मुथ इंगलिश बोल्ता आल पाह्यजे. तर नोकरी मिलनार. . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?

यन्ना _रास्कला गुरुवार, 04/30/2009 - 09:52
१ ली ते ४ थी गुजराती माध्यम सुर्तेला मग ५ ते १० मराठी माध्यम खोडाल्याला. मग ११ वी dnanvardhini baswant college शापुरात. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

भोचक गुरुवार, 04/30/2009 - 11:37
१ ते ४ थी जिल्हा परिषद शाळा मोखाडा (जि. ठाणे) ५ ते १० रयत शिक्षण संस्थेचे विद्यालय मोखाडा (जि. ठाणे) ११ ते १५- केटिएचएम कॉलेज नाशिक (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

संताजी धनाजी गुरुवार, 04/30/2009 - 15:46
१ली ते ४थी - पुणे विद्यार्थी गृह, पुणे ५वी ते ७वी - ए एम आय [ऑल महाराष्ट्र इंस्टिट्युट], पुणे. ही शाळा लॉ कॉलेज रस्त्यावर आहे. आता नाव बदललेले आहे. ८वी ते १०वी - एम आय टी, पुणे. सेमी ईंग्लिश. एक दीड वर्षाचा असताना भिवंडिजवळ पडघे नावाचे गाव आहे, तेथे रहात होतो. वडिल भिवंडिला मराविमंमध्ये होते. तर पडघ्याला कॉन्हेंट बालवाडीत जायचो, एका चर्चमध्ये. पण नंतर पुण्याला आल्यानंतर मराठी शाळेत [बालवाडी] जावु लागलो. सुरवातीला मराठी [अबकड] काही समजायचेच नाही त्यामुळे झोपुन जायचो :) - संताजी धनाजी

हर्षद बर्वे गुरुवार, 04/30/2009 - 15:53
शिशू वर्ग ते ४थी ब्राह्मण शिक्षण मंडळाचे, ब्राह्मण विद्यालय ठाणे. ५ वी ते १० वी पी. ई. सोसाईटीचे न्यू इंग्लिश स्कूल {संपूर्ण मराठी माध्यम (८- १० विज्ञान आणि बीजगणित सुद्धा) } ठाणे. आजही तेथील जुने शिक्षक भेटले की आनंद होतो....मलाही आणि त्यांनाही....{ म्हणजे दिसताच गल्लीत पळ काढणे, रस्ता ओलांडणे असे प्रकार दोन्ही बाजूनी घडत नाहीत :) } एच.बी. ठाणे

नितिन थत्ते गुरुवार, 04/30/2009 - 17:31
मराठीतूनच शिक्षण मॉण्टेसरी ते १० वी डॉ बेडेकर विद्या मंदिर ठाणे, मुलीला मराठी शाळेतच घातली आहे. (मोठेपणी नुकसान केले म्हणून शिव्या खायची तयारी ठेवली आहे). खराटा (रंग माझा वेगळा)

भाई Tue, 05/20/2008 - 11:36
गेल्या ३ वर्षांत कोणत्या माध्यमात किती मुलांनी प्रवेश घेतला याबाबत गेल्या आठवड्यात एक अहवाल प्रसिध्द झाला. हिंदी, मराठी नंतर इंग्लिशचा क्रमांक लागला. इथे एक उत्सुकता म्हणून हा कौल (किंवा सर्वेक्षण म्हणा) घेत आहे. मिपा सदस्यांमध्ये हे प्रमाण कसे आहे? हा, जरी उत्सुकता म्हणून हे सर्वेक्षण घेतले असले तरी त्यावरून काही निष्कर्ष काढण्याचे हक्क सर्वांनाच देत आहे :-) -भाई (मराठी माध्यमवाला)

भडकमकर मास्तर Tue, 05/20/2008 - 16:22
मी मराठीमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतले....... शास्त्र गणित सगळं मराठीत.... आपला ( डिंभकाच्या ग्रसनीमध्यकर्णनलिकेचे एकप्रतलीय समद्विभुज त्रिकोणासारखे क्षेत्रफळ काढणारा ) भडकमकर ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

आंबोळी Tue, 05/20/2008 - 19:56
( डिंभकाच्या ग्रसनीमध्यकर्णनलिकेचे एकप्रतलीय समद्विभुज त्रिकोणासारखे क्षेत्रफळ काढणारा ) =)) =)) =)) =)) (जलव्यालाच्या तंतूमधिल स्फटिकांचे सूक्ष्मदर्शकाखाली रसग्रहण करणारा)आंबोळी

यशोधरा Tue, 05/20/2008 - 16:49
माझेही शालेय शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले, आणि नशीबाने इतक्या उत्तम शिक्षिका मिळाल्या! त्याबाबतीत मी स्वतःला खूप नशीबवान समजते.

In reply to by यशोधरा

संदीप चित्रे गुरुवार, 05/22/2008 - 23:39
मी सुद्धा मराठी माध्यमात दहावीपर्यंत शिकलो . नववी-दहावीला मराठीच्या ज्या शिक्षिका होत्या त्यांच्या अजूनही संपर्कात आहे :) विशेष म्हणजे माझी आई त्याच शाळेच्या इंग्लिश माध्यमाला हिंदी आणि मराठीची शिक्षिका होती :) ती आता निवृत्त झालीय. ----- अवांतरः कुणाला उत्सुकता असल्यास -- महाराष्ट्रीय मंडळ, गुलटेकडी - पुणे.

राजे Tue, 05/20/2008 - 17:10
८ वी - ड नुतन मराठी विद्यालय, कोल्हापुर ;) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

वरदा Tue, 05/20/2008 - 17:30
माझेही शालेय शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले, आणि नशीबाने इतक्या उत्तम शिक्षिका मिळाल्या नाहीत! पण काय करणार आम्ही शिकलो आई बाबांनी शिकवून आणि क्लासमधे जाऊन....

शितल Tue, 05/20/2008 - 17:45
राजे, तुम्ही नुतन मराठी कोल्हापुर, मी प्रायव्हेट हायस्कुल, कोल्हापुर, तुमची शाळा आमच्या शाळेची शाखा आहे.

In reply to by शितल

राजे Tue, 05/20/2008 - 17:49
अरे वा ! मिरजकर टिकटी जवळ ना :) राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by स्वाती राजेश

राजे Tue, 05/20/2008 - 17:55
अरे वा ! तुम्ही पण कोल्हापुरकर का ? राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

In reply to by स्वाती राजेश

तात्या विंचू Wed, 05/21/2008 - 21:31
१ ते ४ थी : रा ना सामाणी विद्यालय,कोल्हापूर. ५ ते १० वी : स म लोहिया हायस्कूल,कोल्हापूर. ११,१२ वी : न्यू कॉलेज ,कोल्हापूर. संगणक अभियांत्रिकी : शासकीय महाविद्यालय, पुणे - ५ (सीओईपी)....

In reply to by तात्या विंचू

छोटा डॉन गुरुवार, 05/22/2008 - 08:10
>>संगणक अभियांत्रिकी : शासकीय महाविद्यालय, पुणे - ५ (सीओईपी).... मी पण तिथलाच ... कुठली बॅच ? व्य. नी. वरुन संपर्क साधा ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आर्य Tue, 05/20/2008 - 18:42
१० वी 'अ' - सांगली उच्चशिक्षण पुणे - शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे. (कृष्णा काठी रमणारा) आर्य

आनंदयात्री Tue, 05/20/2008 - 18:48
प्रसाद मुळे इयत्ता १ ली फ सरस्वती भुवन प्रशाला औरंगाबाद ४३१००१ (१ली ते १०वी जवळ्पास प्रत्येक मास्तराचे टोले अन प्रत्येक मास्तरणीच्या चापटा खाल्लेला) (१ली ते १०वी जवळ्पास दिवसातुन एकदा तरी वर्गाबाहेर अंगठे धरलेला) (शाळा संपल्यावर सुटकेचा नि:श्वास सोडलेला) -आंद्या फ

चतुरंग Tue, 05/20/2008 - 19:16
नवीन मराठी शाळा, अहमदनगर (अत्यंत उत्तम शिक्षक/शिक्षिका लाभले हे भाग्य! अवांतर - ह्या शाळेत लाकडी पट्ट्यांची मारामारी आणि सतरंजीत गुंडाळून मुलांना चोपणे हे नियमाने केले.) पाचवी ते दहावी - अहमदनगर एज्यूकेशन सोसायटीचे भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल. (पुन्हा एकदा तळमळीने शिकवणारे शिक्षक भेटले ही आयुष्यभराची शिदोरी मानतो! :) अवांतर - सायकलीवरुन पाठलाग आणि पाडापाडी, चेंडूने रप्पाधप्पी पासून ते मल्लखांबाच्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळणे इत्यादी सर्व उद्योग केले. ) चतुरंग

१-४ भावे प्राथमिक, सदाशिव पेठ, पुणे ३० ५ वी भावे हायस्कूल, सदाशिव पेठ, पुणे ३० ६वी ७वी जोग हायस्कूल, कोथरुड पुणे २९ ८वी ते १०वी सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूल, डेक्कन जिमखाना पुणे ४ असा होता माझा शिक्षण प्रवास. एकदा आमच्या शाळेतल्या म्हेत्रे सरांना मी म्हणले होते "सर , मी लई शाळा पाहील्या आहेत." :) पुण्याचे पेशवे

शिंगाड्या Tue, 05/20/2008 - 20:27
मराठी १ ते ४ थी ...आलेगावकर प्रशाला..खडकी,पुणे ... (शाळेच्या पहिल्याच दिवशी बाईना येनार्‍या संकटांची जाणिव झाली असावी...अन् थोडयाच काळात 'डोक्यावर मिरे वाटतोस' असा म्हणनार्‍या व्यक्तिंच्या संख्येत भर पडली :) ४ थी ते १०वी स्वामी विवेकानंद,दापोडी,पुणे..१२ (हा पिनकोडयोग अगदी जुळुन आलाय ;)

ईश्वरी Tue, 05/20/2008 - 21:43
मी ही मराठी माध्यम - हुजूरपागा हायस्कूल, पुणे ३० फक्त - ८ ते १० वी सायन्स व गणित इंग्लीश माध्यम ईश्वरी

धनंजय Tue, 05/20/2008 - 21:47
आणि शाळेत कोंकणी बोलू नये असा दंडक होता. पण तो कडकपणे पाळला जात नसे. त्यामुळे शाळेत वर्गाबाहेर अर्धा वेळ मुले कोंकणीत बोलत. घरी फक्त मराठीत बोलणेच चाले. लहान मुलांची मासिके फक्त मराठीच विकत आणत. इंग्रजी बोलणे घरात (गृहपाठ, घोकंपट्टी सोडल्यात) वर्ज्य नव्हते. वाचणे, लिहिणे अर्थातच कुठल्याही भाषेत आमच्या घरात वर्ज्य नव्हते. शालेय वयात लिखाण ९०% इंग्रजीतच झाले. मराठी लेखनाचा मला सराव नाही, म्हणून त्यात कमकुवतपणा जाणवतो. मिपा वगैरे संकेतस्थळांवर मराठीतून लिहून उणीव भरून काढण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यामुळे : "डिंभकाच्या ग्रसनीमध्यकर्णनलिकेचे एकप्रतलीय समद्विभुज त्रिकोणासारखे क्षेत्रफळ काढणारा" मध्ये फक्त "डिंभक" शब्दाचा माझा अर्थ चुकला, बाकी शब्द समजले. स्वतःची पाठ थोपटून घेताना हात मुरगळला, तो आता दुखतो आहे.

एक Tue, 05/20/2008 - 21:55
१ ते १० तुकडी अ (अपवाद २ री ब) म.ए.सो. प्राथमिक आणि पेरूगेट हायस्कूल. ८ वी पर्यंत मराठी त्यानंतर शास्त्र, गणित इंग्लीश मधे.. आम्हाला इंग्लिश शिकवणार्‍या बाई मराठी मधून ईंग्लिश शिकवायच्या :-)

In reply to by एक

धमाल मुलगा गुरुवार, 05/22/2008 - 15:23
५ ते १० तुकडी अ म.ए.सो. माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक विद्यालय, बारामती. १०वी पर्यंत सुध्द म्हराटी ;) आमच्या शाळेत भावे सरांचा मराठीचा तास संस्कृतप्रचुर, इंग्रजीच्या पोतनीस सरांचा तास चित्रकलासंपन्न आणि संस्कृतचा तास पुन्हा भावे सरांचा तोही छान मराठीपुर्ण :) बाकी यत्ता ९वीत वेलणकर मास्तरांचा इंग्रजीचा तास त्यांच्या थापा ऐकायसाठी म्हणून आम्ही आवडीने बसायचो ;)

विकास Tue, 05/20/2008 - 23:01
१० वी पर्यंत मराठीतूनच शिक्षण झाले. फक्त ८ ते १० वी शास्त्र-गणित इंग्रजीतून. शिक्षक-शिक्षिका चांगल्या भेटल्या. त्यांना तसे वाटते का ते माहीत नाही, कारण अजून पण आमची आठवण काढतात असे ऐकून आहे :-)

In reply to by विकास

स्वाती दिनेश Wed, 05/21/2008 - 12:17
१० वी पर्यंत मराठीतूनच शिक्षण झाले. फक्त ८ ते १० वी शास्त्र-गणित इंग्रजीतून.शाळेत आमची बॅच शास्त्रगणित इंग्रजीतूनची पहिली बॅच! शिक्षक-शिक्षिका चांगल्याच भेटल्या, अजूनही आमची ,आमच्या सगळ्या बॅचची आठवण काढतात,:) हे नुसते ऐकूनच नाही तर मागच्या भारतवारीत शाळेत गेले असताना काही जुन्या शिक्षकांच्या भेटीचा योग आला,त्यांच्याकडूनच ऐकले,:)(अर्थात आता आमच्या वेळचे एखाददोन वगळता जवळ जवळ सगळे शिक्षक निवृत्त झाले असल्याने ती पूर्वीची शाळा राहिली नाही असे वाटले खरे..) स्वाती

देवदत्त Tue, 05/20/2008 - 23:11
मी ही दहावीपर्यंत मराठीत १ली ते २ री - श्रीरंग, ठाणे २ री ते ३ री - दांडेकरवाडी, भिवंडी ४थी- विद्याविहार, अंधेरी ५ ते १०वी वर्सोवा वेल्फेअर, सात बंगला, अंधेरी

भाग्यश्री Wed, 05/21/2008 - 00:00
मी १ली ते १०वी मराठी माध्यम.. ८वी ते १०वी सायन्स, गणित इंग्लिश मधून.. १ली ते ६वी - अभिनव मराठी... ७वी ते १०वी - म्.ए.सो. चे सौ विमलाबाई गरवारे हायस्कुल..! चांगले शिक्षक? ह्म्म.. माहीत नाही.. त्यांना काही फार गुणी स्टुडंट मिळाली नाही इतकं नक्की.. :)) (वर्गात अखंड बडबड करणारी)भाग्यश्री...

रविराज Wed, 05/21/2008 - 00:12
१० वी ड. आण्णासाहेब कल्याणी विद्यालय रयत शिक्षण संस्था. कॅम्प सातारा. जिंकून जिंकून जिंकणार कोणं? दहावी ड शिवाय हायच कोणं!

विसोबा खेचर Wed, 05/21/2008 - 08:33
१ ते ४ तुकडी अ - पी ई एस टी ची प्राथमिक शाळा. (मराठी माध्यम) ५ ते १० वी - मो ह विद्यालय, ठाणे. (मराठी माध्यम) आपला, (शाळाप्रेमी) तात्या.

गणा मास्तर Wed, 05/21/2008 - 09:45
मराठी नाना मी तुमच्याशी सहमत आहे. मी एक नवीन कौल लावलाय " तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्या माध्यमातुन शिक्षण देत आहात कि॑वा द्याल" त्याचा निकाल हेच दाखवतो. ९८ टक्के लोक मराठीत शिकुन चांगले कर्तेसवरते कमावते चांगल्या कंपनीत कामाला आहेत पण स्वतःच्या पोरामचे नुकसान (म्हणजे नक्की काय) होवु नये म्हणुन आंग्ल भाषेच्या शाळेत घालुन त्यांचा पोपट (अककल शुन्य बडबड करणारा ) करतात मराठीत शिकुन तुम्ही जर कर्तृत्व गाजवु शकता तर तुमची मुले गाजवणार नाहित कशावरुन? पण लोकान्ना पटत नाही. खुप दु:ख वाटते. मराठी माणसा जागा हो रे. बातमी वाचा मराठी असे आमुची शिक्षणभाषा http://esakal.com/esakal/esakal/05022008/rightframe.html

limbutimbu Wed, 05/21/2008 - 10:50
मात्रुभाषा मराठितून शिक्षण घेतल, अन त्यामूळे आम्हाला काही तोटा झाल्याच अजुनतरी दिसत नाहीये आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

ईश्वरी Wed, 05/21/2008 - 12:43
--समृद्ध गुलाम बिचारे नाना चेंगट यांनी वापरलेल्या या शब्दांवर माझा आक्षेप आहे. असच म्हणायच असेल तर जे जे लोक नोकरी करतात त्या सर्वानाच गुलाम म्हणावे लागेल. फक्त अनिवासी महाराष्ट्रीयनच का? शिवाय कित्येक निवासी महाराष्ट्रीयनही भारतातील कंपनी मधे नोकरी करीत असताना कंपनीच्या कामासाठी दिर्घकालीन परदेशी वास्तव्य करून आहेत. ईश्वरी

बालवाडी ते बारावी! बालवाडी ते ७वी - मराठी माध्यम ८वी ते १० वी - सेमी इंग्रजी ११वी ते १२वी - इंग्रजी (ए तुकडीतला वात्रट कार्टा) टिंग्या ;) अवांतर - आमचा वात्रटपणा तेव्हापासुनचा बरं का! :D

In reply to by ब्रिटिश टिंग्या

नूमवीयांचा एकच बाणा हाती घ्याल ते घरी न्या ! असे माझे नूमवीय मित्र सांगत असत. ;) (हघ्याहेवेसांनल) पुण्याचे पेशवे

डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 05/22/2008 - 07:44
आमचे शालेय शिक्षण डो॑बिवली येथे 'टिळकनगर विद्याम॑दिर' नामक एका नामी शाळेत झाले, फार चा॑गले शिक्षक लाभले.. (पळधे बाई॑चा आवडता विद्यार्थी) प्रसाद

कावळा गुरुवार, 05/22/2008 - 11:58
नमस्कार शुभ सकाळ मित्रा॑नो माझे सर्व शिक्षण सुभेदार वाडा (कल्याण)नामक मराठी माध्यमातील शाळेत झाले. अगदी महाविद्यालया पर्य॑त (बिर्ला महाविद्यालय) आपलाच (सोमण मास्तरा॑चा प्रेमळ विद्यार्थी ) विवेक वि.

एडिसन गुरुवार, 05/22/2008 - 13:25
१ ते ४ थी : बापट बाल विद्यामंदिर, सांगली (तुकडी 'ड'). ५ ते १० वी : सिटी हायस्कूल, सांगली (तुकडी 'अ'). ११,१२ वी : विलिंग्डन महाविद्यालय, सांगली. विद्युत अभियांत्रिकी: वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली. सध्या भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, मुंबई येथे विद्यावाचस्पती (ओळखा पाहू, म्हणजे काय ते? ;) ) पदवीसाठी कार्यरत आहे.

भोचक गुरुवार, 05/22/2008 - 16:21
१-४ जिल्हा परिषद शाळा, मोखाडा (जि. ठाणे) ५-१० रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल, मोखाडा ११-१५ केटिएचएम कॉलेज नाशिक पत्रकारिता एचपीटी कॉलेज, नाशिक दहावीपर्यंतच्या शाळेत आदिवासी विद्यार्थी बहुसंख्याक होते. त्यातही रयतच्या शाळेचे नियम फारच वेगळे. डोक्यावर पांढरी गांधी टोपी. हाफ चड्डी (दहावीपर्यंत) आणि मुलींनाही फ्रॉक. आदिवासी मुले मुळातच उशीरा शाळेत दाखल व्हायची. त्यामुळे दहावीतला मुलगाही अनेकदा सतरा, अठरा वर्षासारखा असायचा. काहींची तर लग्न झालेली, ठरलेली असायची. (मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असता ना माझ्या एका आदिवासी मित्राला तीन मुले झाली होती.). शाळेतली शिक्षकही भारी. यल, यम, यन अशी इंग्रजी बाराखडी शिकवणारे. पाचवीत आलो तेव्हा गोटखिंडीकर सर नावाचे मुख्याध्यापक होते. यांना इंग्रजी बोलण्याचा भारी सोस. शाळेतल्या जेमतेम चौथी शिकलेल्या शिपायाशी ते इंग्रजीत बोलत. पण मुले जवळपास सगळीच दारिद्र्य रेषेच्या खालची. काही तर अतिशय हुषार. पण पैसा नसल्याने शिकायच्या वाटा बंद झालेली. कधी कधी काहींच्या आठवणीने विषण्ण व्हायला होतं.

चावटमेला गुरुवार, 05/22/2008 - 18:53
१० वी अ , सिटी हायस्कूल, सान्गली. परमाणुशास्त्र अभियान्त्रिकी, वालचन्द अभियान्त्रिकी महाविद्यालय , सान्गली सध्या - पुणे/यु.के. (तळ्यात/मळ्यात) (अखेरच्या श्वासापर्यन्त मराठी) चावटमेला

In reply to by चावटमेला

एडिसन गुरुवार, 05/22/2008 - 19:20
चावटमेल्या, कोणती बॅच तुझी? मी पण सिटी हायस्कूलचा विद्यार्थी...१९९७ ची बॅच! आणि नंतर वालचंदला पण होतो..२००३ ला बी.ई. झालो.

अभिता Fri, 05/23/2008 - 00:22
मला इग्रंजी येत नाहि.कारण जेव्हा ५वी त इग्रंजी सुरु झाले तेव्हा पुर्ण वर्ष वर्गाबाहेर उभे राहुन शिकले. सरस्वती सेंकडरी स्कूल.(टिळक सरांची शाळा) मराठी माध्यम ५ ते १० वी ब वर्ग.

ऋषिकेश Fri, 05/23/2008 - 00:38
सेमी इंग्रजी!! शास्त्र, गणित इंग्रजीतून आणि बाकी विषयमराठीतून :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

फटू Fri, 05/23/2008 - 07:42
आमचं मराठी (किंवा आमचं इंग्रजी ) यावर आम्ही इथं खूप काही लिहिलं आहे. आणि तेही सगळं खरं खरं... अगदी अक्षर नं अक्षर खरं आहे.... तरीही थोडंसं इथेही लिहीण्याचा मोह आवरत नाहीये म्हणून... आम्ही पहीली ते चौथी आमच्या गावातल्या शाळेत शिकलो... शाळेचं नाव रायगड जिल्हा परिषद शाळा वडगाव कॉंड पाचवी ते बारावी आम्ही गोरेगावच्या शाळेत शिकलो...शाळेचं नाव ना म जोशी विद्याभवन गोरेगाव - रायगड दोन्ही शाळा मराठीच (अगदी अकरावी बारावीला विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम इंग्रजीत होता तरी प्राध्यापक मराठीतच शिकवायचे. परीक्षा मात्र इंग्रजीत द्यावी लागायची) जाता जाता पुन्हा सागांवंसं वाटतं... आम्ही मराठीतूनच शिकलो... आणि तरीही आम्ही कुठे मागे पडलो नाही... हा आता थोडी जास्त मेहनत घ्यावी लागली... पण त्यात काही विशेष नाही... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

चावटमेला Fri, 05/23/2008 - 11:25
चावटमेल्या, कोणती बॅच तुझी? मी पण सिटी हायस्कूलचा विद्यार्थी...१९९७ ची बॅच! आणि नंतर वालचंदला पण होतो..२००३ ला बी.ई. झालो. मी २००० च्या सिटी हायस्कूल बॅच चा विद्यार्थी, २००६ ला वालचंद मधून बी.ई. झालो. (कृष्णाकाठचे ऋण कधीही न विसरु शकणारा) चावटमेला

निरंजन मालशे Fri, 05/23/2008 - 17:10
माझ शिक्षण १००% मराठी शाळेतून झालय आज जेव्हा मी फ्रेंच भाषांतरकार दुभाषा( ट्रांस्लेटर इंटरप्रिटर) म्हणून काम करतो तेव्हा मी ही गोष्ट अभिमानाने सांगतो

दवबिन्दु गुरुवार, 04/30/2009 - 08:51
इगलिश स्कुलमधी शिकलो. इंगलिश भाषाच नोकरी देनारी आहे. फोनवर स्मुथ इंगलिश बोल्ता आल पाह्यजे. तर नोकरी मिलनार. . अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?

यन्ना _रास्कला गुरुवार, 04/30/2009 - 09:52
१ ली ते ४ थी गुजराती माध्यम सुर्तेला मग ५ ते १० मराठी माध्यम खोडाल्याला. मग ११ वी dnanvardhini baswant college शापुरात. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

भोचक गुरुवार, 04/30/2009 - 11:37
१ ते ४ थी जिल्हा परिषद शाळा मोखाडा (जि. ठाणे) ५ ते १० रयत शिक्षण संस्थेचे विद्यालय मोखाडा (जि. ठाणे) ११ ते १५- केटिएचएम कॉलेज नाशिक (भोचक) आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो... http://bhochak.mywebdunia.com/

संताजी धनाजी गुरुवार, 04/30/2009 - 15:46
१ली ते ४थी - पुणे विद्यार्थी गृह, पुणे ५वी ते ७वी - ए एम आय [ऑल महाराष्ट्र इंस्टिट्युट], पुणे. ही शाळा लॉ कॉलेज रस्त्यावर आहे. आता नाव बदललेले आहे. ८वी ते १०वी - एम आय टी, पुणे. सेमी ईंग्लिश. एक दीड वर्षाचा असताना भिवंडिजवळ पडघे नावाचे गाव आहे, तेथे रहात होतो. वडिल भिवंडिला मराविमंमध्ये होते. तर पडघ्याला कॉन्हेंट बालवाडीत जायचो, एका चर्चमध्ये. पण नंतर पुण्याला आल्यानंतर मराठी शाळेत [बालवाडी] जावु लागलो. सुरवातीला मराठी [अबकड] काही समजायचेच नाही त्यामुळे झोपुन जायचो :) - संताजी धनाजी

हर्षद बर्वे गुरुवार, 04/30/2009 - 15:53
शिशू वर्ग ते ४थी ब्राह्मण शिक्षण मंडळाचे, ब्राह्मण विद्यालय ठाणे. ५ वी ते १० वी पी. ई. सोसाईटीचे न्यू इंग्लिश स्कूल {संपूर्ण मराठी माध्यम (८- १० विज्ञान आणि बीजगणित सुद्धा) } ठाणे. आजही तेथील जुने शिक्षक भेटले की आनंद होतो....मलाही आणि त्यांनाही....{ म्हणजे दिसताच गल्लीत पळ काढणे, रस्ता ओलांडणे असे प्रकार दोन्ही बाजूनी घडत नाहीत :) } एच.बी. ठाणे

नितिन थत्ते गुरुवार, 04/30/2009 - 17:31
मराठीतूनच शिक्षण मॉण्टेसरी ते १० वी डॉ बेडेकर विद्या मंदिर ठाणे, मुलीला मराठी शाळेतच घातली आहे. (मोठेपणी नुकसान केले म्हणून शिव्या खायची तयारी ठेवली आहे). खराटा (रंग माझा वेगळा)

मेथी पापडनु शाक

विजुभाऊ ·

वरदा Tue, 05/20/2008 - 17:24
आळस म्हणुन पापड आख्खा टाकु नये. काय विजुभाऊ आम्ही सगळ्या (सुगरणी :$ ) काय तुम्हाला अशा वाटलो? इतक्या नाही काही आम्ही आळशी... फोडणीत हिंग हळद टाकायची की नाही का? किती वेळ आधी करुन ठेवलं तर चालेल?

In reply to by वरदा

आनंदयात्री Tue, 05/20/2008 - 18:28
आळस म्हणुन पापड आख्खा टाकु नये. विजुभाउ ८ दिवसांपासुन पुण्यात आलेत, वारं लागलं वाटत :)

स्वाती राजेश Tue, 05/20/2008 - 18:05
मेथीच्या दाण्यामुळे कडवट होत नाही ना? कारण तुम्ही तिखट कमी घालायला सांगितले म्हणून विचारले? शिवाय साखर/गुळ नाही...:) बाकी रेसिपी छान वाटते. मेथी पौष्टीक असल्यामुळे छान आहे मुलांसाठी सुद्धा, नक्की करून पाहीन.:)

In reply to by स्वाती राजेश

विजुभाऊ Tue, 05/20/2008 - 18:18
किंचीत कडवट आंबट तिखट अशी नेहमीच्यापेक्षा वेगळी टेस्ट आहे फार तिखट केल्यास मेथीची चव लागत नाही. तसेच लसुण व कांदा वापरला तरीही तसेच होते. तरीही आवडीनुसार प्रमाण बदलावे. फोडणीत हिंग टाकुन मी पाहिले नाही. हळद चालेल.

मनस्वी Tue, 05/20/2008 - 18:26
विजुभाऊ "शाक" या शब्दाचा अर्थ काय? उडदाचेच पापड वापरायचे का? कच्चा पापड दातांना चिकटत नाही का? पदार्थ जास्तीत जास्त किती वेळात संपवणे गृहित आहे? हे रायत्यासारखे खावे का? रेसिपी छान वाटतीये. तसंही साखर-गूळ कमीच वापरते मी स्वयंपाकात. लसूण नाही पण कांदा नक्की टाकेन मी.

विजुभाऊ Tue, 05/20/2008 - 19:00
पापड टाकल्यानन्तर फार वेळ उकळु नये. पापड दाताना चिकटत नाही गुजरातीमध्ये शाक म्हणजे भाजी. पालेभाजी नव्हे त्याला फक्त भाजी म्हणतात. उडदाचेच पापड वापरायचे का? हो मी इतर पापड वापरुन पाहीले नाहित. पदार्थ जास्तीत जास्त किती वेळात संपवणे गृहित आहे? एका जेवणात. हा पदार्थ शिल्लक रहात नाही. दही व उडीद एकत्र फारवेळ ठेवत नाहीत. हे रायत्यासारखे खावे का? याबद्दल काय सांगु...........

प्राजु Tue, 05/20/2008 - 19:04
वेगळी रेसिपि. नक्क्की करून बघेन.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

स्वाती दिनेश Tue, 05/20/2008 - 21:36
वेगळा प्रकार दिसतो आहे,करुन पाहिला पाहिजे. अवांतर-विजुभाऊ मेथीचं शाक पाकक्रिया विभागात का नाही लिहिलंत? स्वाती

प्रभाकर पेठकर Tue, 05/20/2008 - 23:03
मेथी पापडनु शाक बहु सारू लागे छे! आवता रविवारे करीश. चोक्कस! एक विचारवू हतु, पापडना टुकडा वधाने नाना कर्या तो चालसे के? डाळ ढोकळी जेवा?

In reply to by प्रभाकर पेठकर

विजुभाऊ Wed, 05/21/2008 - 12:40
पापडना टुकडा वधाने नाना कर्या तो चालसे के? घणा नाना नै करशो . नै तो एनी स्पागेटी बनी जशे. दाळ ढोकळी मा ढोकळी माटे जे रोटली वणो छो एना कटका जाडा होय छे ते माटे नाना होय छे. पापड तो पातळो होय छे. एटले घणा नाना कटका न चाले.

In reply to by विजुभाऊ

प्रभाकर पेठकर Wed, 05/21/2008 - 13:31
भले. मुद्दो सांभळ्यो. हवे जाणी-जोईने शाक बनाविश. धन्यवाद विजुभाऊ. पापडना टुकडा वधाने नाना कर्या तो चालसे के? एक नानकडी टायपिंग मिश्टेक थई. आ शब्द वधारे एवो वाचजो. सोरी.

वरदा Wed, 05/21/2008 - 00:50
सह्ही गुजराथी बोलता तुम्ही एकदम... पापडना टुकडा वधाने नाना कर्या तो चालसे के? म्हणजे काय?

In reply to by वरदा

प्रभाकर पेठकर Wed, 05/21/2008 - 13:34
पापडना टुकडा वधाने नाना कर्या तो चालसे के? टंकलेखनात जरा चूक झाली. वधाने नाही, वधारे असे वाचावे. वाक्याचा अर्थ, 'पापडाचे तुकडे जास्त लहान केले तर चालतील का?' असा आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

वरदा Wed, 05/21/2008 - 22:16
आता कळ्ळं..गुजराथी शिकावं म्हणते...मला शिकवाल का पेठकर काका आणि विजुभाऊ तुम्ही?

वाचून तरी ही पाककृती फार मस्त लागत असेल असे वाटते. स्वगतः कोणीतरी पाककृतीमधे इंटरेस्टेड माणूस शोधून त्याला ही पाककृती द्यावी आणि आपण स्वतः फुकट चापायला जावे. पुण्याचे पेशवे

मनिष Wed, 05/21/2008 - 13:06
आमची आई अशीच "पापडाची भाजी" म्हणऊन करते; फक्त ती दही टाकत नाही. आता दही टाकून प्रयत्न करुया! - (खवैया) मनिष अवांतर : त्या कच्च्या पापडांमधल्या सोड्यामुळे मला चव फारशी आवडली नव्हती असे आठवते.

वरदा Tue, 05/20/2008 - 17:24
आळस म्हणुन पापड आख्खा टाकु नये. काय विजुभाऊ आम्ही सगळ्या (सुगरणी :$ ) काय तुम्हाला अशा वाटलो? इतक्या नाही काही आम्ही आळशी... फोडणीत हिंग हळद टाकायची की नाही का? किती वेळ आधी करुन ठेवलं तर चालेल?

In reply to by वरदा

आनंदयात्री Tue, 05/20/2008 - 18:28
आळस म्हणुन पापड आख्खा टाकु नये. विजुभाउ ८ दिवसांपासुन पुण्यात आलेत, वारं लागलं वाटत :)

स्वाती राजेश Tue, 05/20/2008 - 18:05
मेथीच्या दाण्यामुळे कडवट होत नाही ना? कारण तुम्ही तिखट कमी घालायला सांगितले म्हणून विचारले? शिवाय साखर/गुळ नाही...:) बाकी रेसिपी छान वाटते. मेथी पौष्टीक असल्यामुळे छान आहे मुलांसाठी सुद्धा, नक्की करून पाहीन.:)

In reply to by स्वाती राजेश

विजुभाऊ Tue, 05/20/2008 - 18:18
किंचीत कडवट आंबट तिखट अशी नेहमीच्यापेक्षा वेगळी टेस्ट आहे फार तिखट केल्यास मेथीची चव लागत नाही. तसेच लसुण व कांदा वापरला तरीही तसेच होते. तरीही आवडीनुसार प्रमाण बदलावे. फोडणीत हिंग टाकुन मी पाहिले नाही. हळद चालेल.

मनस्वी Tue, 05/20/2008 - 18:26
विजुभाऊ "शाक" या शब्दाचा अर्थ काय? उडदाचेच पापड वापरायचे का? कच्चा पापड दातांना चिकटत नाही का? पदार्थ जास्तीत जास्त किती वेळात संपवणे गृहित आहे? हे रायत्यासारखे खावे का? रेसिपी छान वाटतीये. तसंही साखर-गूळ कमीच वापरते मी स्वयंपाकात. लसूण नाही पण कांदा नक्की टाकेन मी.

विजुभाऊ Tue, 05/20/2008 - 19:00
पापड टाकल्यानन्तर फार वेळ उकळु नये. पापड दाताना चिकटत नाही गुजरातीमध्ये शाक म्हणजे भाजी. पालेभाजी नव्हे त्याला फक्त भाजी म्हणतात. उडदाचेच पापड वापरायचे का? हो मी इतर पापड वापरुन पाहीले नाहित. पदार्थ जास्तीत जास्त किती वेळात संपवणे गृहित आहे? एका जेवणात. हा पदार्थ शिल्लक रहात नाही. दही व उडीद एकत्र फारवेळ ठेवत नाहीत. हे रायत्यासारखे खावे का? याबद्दल काय सांगु...........

प्राजु Tue, 05/20/2008 - 19:04
वेगळी रेसिपि. नक्क्की करून बघेन.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

स्वाती दिनेश Tue, 05/20/2008 - 21:36
वेगळा प्रकार दिसतो आहे,करुन पाहिला पाहिजे. अवांतर-विजुभाऊ मेथीचं शाक पाकक्रिया विभागात का नाही लिहिलंत? स्वाती

प्रभाकर पेठकर Tue, 05/20/2008 - 23:03
मेथी पापडनु शाक बहु सारू लागे छे! आवता रविवारे करीश. चोक्कस! एक विचारवू हतु, पापडना टुकडा वधाने नाना कर्या तो चालसे के? डाळ ढोकळी जेवा?

In reply to by प्रभाकर पेठकर

विजुभाऊ Wed, 05/21/2008 - 12:40
पापडना टुकडा वधाने नाना कर्या तो चालसे के? घणा नाना नै करशो . नै तो एनी स्पागेटी बनी जशे. दाळ ढोकळी मा ढोकळी माटे जे रोटली वणो छो एना कटका जाडा होय छे ते माटे नाना होय छे. पापड तो पातळो होय छे. एटले घणा नाना कटका न चाले.

In reply to by विजुभाऊ

प्रभाकर पेठकर Wed, 05/21/2008 - 13:31
भले. मुद्दो सांभळ्यो. हवे जाणी-जोईने शाक बनाविश. धन्यवाद विजुभाऊ. पापडना टुकडा वधाने नाना कर्या तो चालसे के? एक नानकडी टायपिंग मिश्टेक थई. आ शब्द वधारे एवो वाचजो. सोरी.

वरदा Wed, 05/21/2008 - 00:50
सह्ही गुजराथी बोलता तुम्ही एकदम... पापडना टुकडा वधाने नाना कर्या तो चालसे के? म्हणजे काय?

In reply to by वरदा

प्रभाकर पेठकर Wed, 05/21/2008 - 13:34
पापडना टुकडा वधाने नाना कर्या तो चालसे के? टंकलेखनात जरा चूक झाली. वधाने नाही, वधारे असे वाचावे. वाक्याचा अर्थ, 'पापडाचे तुकडे जास्त लहान केले तर चालतील का?' असा आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

वरदा Wed, 05/21/2008 - 22:16
आता कळ्ळं..गुजराथी शिकावं म्हणते...मला शिकवाल का पेठकर काका आणि विजुभाऊ तुम्ही?

वाचून तरी ही पाककृती फार मस्त लागत असेल असे वाटते. स्वगतः कोणीतरी पाककृतीमधे इंटरेस्टेड माणूस शोधून त्याला ही पाककृती द्यावी आणि आपण स्वतः फुकट चापायला जावे. पुण्याचे पेशवे

मनिष Wed, 05/21/2008 - 13:06
आमची आई अशीच "पापडाची भाजी" म्हणऊन करते; फक्त ती दही टाकत नाही. आता दही टाकून प्रयत्न करुया! - (खवैया) मनिष अवांतर : त्या कच्च्या पापडांमधल्या सोड्यामुळे मला चव फारशी आवडली नव्हती असे आठवते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
मेथी पापडनु शाक साहित्य : मेथीचे दाणे ५ टी स्पून ,किंचीत आंबट दही १ वाटी , पाणी अर्धा वाटी , कच्चे पापड ५, आवडत असल्यास टोमॆटो २ , मोहोरी , हळद एक चमचा , मीठ , तीखट , तूप/ तेल फ़ोडणी साठी साधरण एक तास अगोदर मेथीचे दाणे भिजत ठेवावे,दही घोटुन घ्यावे. एका जाड बुडाच्या पातेल्यात फ़ोडणीसाठी तूप/तेल(२/३ चमचे) तापवत ठेवावे.चांगले तापले की त्यात मोहोरी टाकावी , ही फ़ोडणी झाली की त्याच भांड्यात घोटलेले दही. थोडे पातळ करण्यासाठी त्यात थोडे पाणी टाकावे. त्यात भिजवलेले मेथीचे दाणे टाकावे हळद , तिखट चवीपुरते घालावे.