मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रत्यक्षातला कामाठीपुरा आणि बुधवार पेठ

मन ·

मदनबाण गुरुवार, 05/22/2008 - 20:49
आपल्या देशातील लोकांची पतनाकडे जोरदार रेस चालु आहे..... अरे इंटरनेट वर सुद्दा कुठे लक्ष आहे सरकारच ? इंटरनेटवर सहजरित्या उपलब्ध अश्लील साहित्य भारतात दिसणे कोणी रोखु शकेल काय? कुठल्याही देशाला नष्ट करायचे असेल तर त्यांची संस्कृती नष्ट करा म्हणजे तो देश आपोआप पांगळा होईल !!!!! हेच चाललय आपल्या देशाबरोबर....वेळीच जागे झाले पाहिजे. स्वतः अशा व्यवसायाचा ग्राहक न होणे, ही झाली एक वैयक्तिक पायरी .हीच महत्वाची पायरी आहे.....आणि प्रत्येक हिंदूस्थानी युवकांनी वेळीच ओलांडायला हवी..... (* चीन मधे गुगल साईट आधी ब्लोक होती असे ऐकुन आहे...आणि जर समजा ती तशी ब्लोक झाली असेल तर माझा प्रश्न आहे की जर गुगल ब्लोक होऊ शकत असेल तर अशा तर्‍हेचे फक्त अश्लील साईट ब्लोक करण्याचा निर्णय आपला देशाच सरकार घेऊ शकेल काय ?

In reply to by मदनबाण

कोलबेर गुरुवार, 05/22/2008 - 21:05
चीन मधे गुगल साईट आधी ब्लोक होती असे ऐकुन आहे...आणि जर समजा ती तशी ब्लोक झाली असेल तर माझा प्रश्न आहे की जर गुगल ब्लोक होऊ शकत असेल तर अशा तर्‍हेचे फक्त अश्लील साईट ब्लोक करण्याचा निर्णय आपला देशाच सरकार घेऊ शकेल काय ?
नाही. कारण सुदैवाने भारत म्हणजे चीन नाही!

कोलबेर गुरुवार, 05/22/2008 - 21:07
ह्या विषयाचा गाढा अभ्यास असलेले प्रा. डॉ. विसोबा खेचर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील.

बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 05/22/2008 - 21:08
चीन मधे गूगल नाही तर त्यातले सर्च रिझल्ट्स फिल्टर होतात. आणि साईट ब्लॉकिंग तर बहुधा सगळीकडेच आहे. इथे दुबई मधे सुद्धा बर्‍याच साईट्स ब्लॉक आहेत. सौदी अरेबिया, कुवेत, बाहरिन सगळीकडेच तसे आहे. सौदी अरेबिया मधे तर केवळ पोर्नोग्राफिकच नव्हे तर धार्मिक (गैर मुस्लिम), राजकिय अश्या सगळ्याच साईट्स ब्लॉक आहेत. जेव्हा ह्य साईट्स वर जायचा प्रयत्न केला तर चक्क स्क्रीनवर संदेश येतो की 'हे स्थळ सौदी अरेबियाच्या संस्कृतिला अनुसरून नाही' ... पण गंमत अशी की हे ब्लॉक बायपास करायचे पण तितकेच मार्ग उपलब्ध आहेत. असो... मला असे वाटते अश्या प्रकारचे उपजिविकेचे साधन ह्या स्त्रिया (आणि पुरुषही, हा पण धंदा तेजीत आहे) केवळ मजबूरी म्हणूनच स्वीकारतात. बरेच वेळा बळजबरी असते. पण हेही इथे नमूद करावेसे वाटते की आजकाल बोकाळलेल्या चंगळवादामुळे बरेचजण अगदी पूर्ण पणे स्वेच्छेने ह्यात भाग घेतात, केवळ झटपट पैसा मिळावा म्हणून. (आठवा 'तरन्नुम' प्रकरण) तुम्ही म्हटल्याप्रमाणे ह्यात भाग न घेणे हा एक उपाय आहे पण तो 'पॅसिव्ह' आहे. 'ऍक्टिव्ह' उपाय म्हणजे सावधान सारख्या संघटना जे ह्या मुलींना सोडवण्याचे किंवा त्यांची सुटका झाल्यावर त्यांचे पुनर्वसन करणे वगैरे... आमच्या माहितीतल्या एक बाई खूप वर्षांपूर्वी असे काम करायच्या असे आठवते.

वेलदोडा गुरुवार, 05/22/2008 - 21:09
>>चीन मधे गुगल साईट आधी ब्लोक होती असे ऐकुन आहे माझ्या माहीतीत दुबई मध्ये तर अशा सर्वच साईट्स (ज्या वर अश्लील साहित्य , फोटोज वगैरे उपलब्ध असते ) ब्लॉक केलेल्या आहेत. आणि हे तेथील सरकारी आदेशावरून करण्यात आलेले आहे. जवळ्चा एक मित्र दुबईत असल्याने त्याच्याकडून ही माहिती मिळाली . दुबईत हे शक्य आहे तर भारतात ही असे लागू करणे अजिबातच अवघड नसणार.

In reply to by वेलदोडा

कोलबेर गुरुवार, 05/22/2008 - 21:15
दुबईत हे शक्य आहे तर भारतात ही असे लागू करणे अजिबातच अवघड नसणार.
हा हा हा!! मुंबईचे शांघाय करू अश्या घोषणा देणार्‍या नेत्यांनी मुंबईचे दुबई करु अश्या घोषणा द्याव्यात. यमकही जुळतेय. मुंबईचे दुबई आणि जमल्यास भारताचा सौदी अरेबीया करणे देखिल अजिबात अवघड नसणार. अवांतर : जमल्यास पुण्याचेही मस्कत करू म्हणजे पेठकर काकांना आपली दोन्ही हाटेलं इथेच बसुन चालवता येतील :)

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/22/2008 - 22:19
म्हणजे मुळात शरीर विक्रय हा भारतीय कायद्यानुसार अधिकृत/कायदेशीर आहे काय? माझ्या ऐकिव माहितीनुसार हा व्यवसाय कायदेशिर आहे. राज्य सरकार्/म्युनिसिपालटी अशा व्यावसायिकांना परवाना (लायसन्स) देते. वेळोवेळी आरोग्यविभागा कडून शारीरिक आरोग्य तपासणीही होते. (हेही बंधनकारक आहे). ह्यात होणारा भ्रष्टाचारही भरपूर आहे. नैतिक/अनैतिक च्या आपल्या कल्पना आणि दारिद्र्याचा अक्राळ वि़क्राळ राक्षस ह्यांची सांगड घालता येत नाही. ह्या व्यवसायातून जन्मास आलेल्या मुलींना बाहेरील समाज स्विकारत नाही त्यामुळे नाईलाजाने (आणि वातावरणाची सवय असल्यामुळेही) त्या मुली ह्या व्यवसायातच येतात. चंगळवादाच्या बळी सुशिक्षित मुलीही थ्रिल म्हणून, पैसे मिळतात म्हणून उच्चभ्रू वर्तुळात हा व्यवसाय करतात. तसेच, पैसे नाही पण काही मोबदला (सिनेमा, सिरियल्स मधील भूमिका) मिळविण्याच्या नादातही हा 'त्याग' करतात असे ऐकले आहे. ह्या सर्व गोष्टींपासून दूर राहणे हेच उत्तम. शेवटी, 'मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक'.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण Fri, 05/23/2008 - 12:34
चंगळवादाच्या बळी सुशिक्षित मुलीही थ्रिल म्हणून, पैसे मिळतात म्हणून उच्चभ्रू वर्तुळात हा व्यवसाय करतात. तसेच, पैसे नाही पण काही मोबदला (सिनेमा, सिरियल्स मधील भूमिका) मिळविण्याच्या नादातही हा 'त्याग' करतात असे ऐकले आहे. चांगल्या घरातल्या स्त्रीया,सुशिक्षित मुलीही हा व्यवसाय करतात्,,,,हा प्रकार तर आता एवढा बोकाळला आहे की विचारु नका....बर्‍याच बातम्या हल्लीच पाहावयास मिळाल्या आहेत !!!!! दिल्ली तर अशा स्त्रीयांनी या सर्व मौजेसाठी (लेट्स हॅव फन...अस काहीस आजच्या या स्त्रीया म्हणतात आणि मुल सुद्दा)एका हॉटेल मधील एक खोलीच महिनाभर बुक करुन ठेवली होती..... आणि काही दिवसांपुर्वीच कोल्हापुरातच एका लॉज वर धाड टाकुन अशाच काही महिलांना अटक करण्यात आली होती.... न्युज चॅनेल खाली कॅप्शन मधे सांगत होत्ते या सर्व चांगल्या घरातील मुली आणि स्त्रीया आहेत !!!!!.....म्हणजे नवरा कामावर गेलेला आणि बायको लॉज वर.....तरी या सर्व चांगल्या घरातील आहेत?.....हे प्रकार वाढत का चालले आहेत ? माझ्या मते ही हिंदूस्थानात वाढलेल्या भोगवादाची ही ल़क्षणे आहेत..... सिनेमा, सिरियल्स मधील भूमिका करणार्‍या आणि भूमिका मिळवण्यासाठी मुली हा त्याग करतात,,,,, हा कुठला त्याग म्हणायचा?...काही अभिनेत्र्या बुरखा घालुन पंचतारांकीत हॉटेल मधे काही तासाचे लाखो रुपये मिळवण्यासाठी कशा येतात हे ही आता उघडकीस आलेल आहे...... मला वाटत ज्या प्रमाणे चीन,सौदी अरेबियाच्या येथे पोर्नोग्राफिक साईट ब्लॉक आहेत त्या प्रमाणे आपल्या येथेही त्या ब्लॉक झाल्या पाहिजे..... हल्ली बर्‍याच घरात इंटरनेट कनेक्शन आलेले आहे...पालक कामा निमित्त्य घराबाहेर पडतात पण आपला मुलगा / मुलगी नेट वर काय करतात याचा थांगपत्ताही त्यांना लागत नाही..... हा पोर्नोग्राफिचा विळखा या आपल्या तरुण पिढीला आवळल्या शिवाय राहणार नाही.... काही आकडे :-- ३७२million या फक्त पोर्नोग्राफिक साईट आहेत.... ३५% डाऊनलोड हे पोर्नोग्राफिक कंटेन्ट च आहे..... दर दिवसाला २६६ अशा नवीन साईट या जालावर येतात..... ३% हे साहित्य युके मधे बनते. 4% हे साहित्य जर्मनी मधे बनते. 89% हे साहित्य अमेरिकेत बनते. US revenue from internet porn in 2006 $ 2.84 Billion..... हे जरा पहा :-- http://www.youtube.com/watch?v=BSX9zRJUa2c http://www.youtube.com/watch?v=SHm4de0UfVc खरचं हे सर्व भयानक आहे..... (युवा पिढी या विळख्यात अडकणार का ?)या विचारात पडलेला मदनबाण.....

अभिता Fri, 05/23/2008 - 01:28
मुंबईचे दुबई आणि जमल्यास भारताचा सौदी अरेबीया करणे देखिल अजिबात अवघड नसणार. मग आपल्या इथल्या अरबांनी कुठे जायाच.

पक्या Fri, 05/23/2008 - 02:46
>> माझ्या माहिती प्रमाणे इथे युरोप मध्येही शरीर विक्रय चालतो. अहो मनराव, अशी बाळबोधासारखी कसली माहिती देताय. :) हे तर सर्व जगात चालू आहे. ..all over the world ऍम्स्टरडॅम ( नेदरर्लॅड्स मधील) तर 'ह्या' ची राजधानी म्हणावी लागेल. येथील रेड लाईट डिस्ट्रीक्ट जगप्रसिध्द आहे. आणि त्यास सरकारी मान्यता आहे. इथे आलेले इतर देशातील पर्यटक खास या स्थळाला भेट देतात. बार . कॉफीशॉप्स, पब्ज, क्ल्ब्ज, म्यझिक वगैरेंची इथे रेलचेल आहे. ईथल्या बायकाना सरकारचे लायसन्स मिळालेले असते आणि इतर कोणत्याही कमावत्या नागरिका सारखे त्या इन्कम टॅक्स ही भरतात. असाच दुसरा देश म्हणजे थायलंड. थायलंड मधील वेशाव्यवसाय हा अनेक शतकांपासून थाई संस्कृतीचा एक भाग बनलेला आहे. आणि हे त्या देशात अगदी सहजरित्या स्विकारलं गेलेलं आहे. दारीद्र्य आणि घरातील खाणार्‍यांची जास्त तोंडे हे मुख्य कारण या मागे आहे. इतर व्यवसांयाप्रमाणे हा ही एक व्यवसाय आहे असे इथे समजले जाते. पटाया या शहरात हा व्यवसाय सर्वाधिक वाढीस लागलेला आहे. त्या नंतर बॅकॉक, क्राबी , फुकेट या ठिकाणांची नावे घेता येतील. व्हिएतनाम युध्दाच्या वेळेस अमेरिकन सैनिकांसाठी थायलंड चा वापर R&R Spot म्हणुन केला होता. (रेस्ट ऍन्ड रिलॅक्सेशन). लिओनार्दो चा 'द बीच' , श्रेयस तळपदे चा 'बॉम्बे टू बॅकॉक ' या सिनेमांमध्ये थायलंड च्या या ' संस्कृतीची ' झलक बघावयास मिळते. यूएस मधील लासवेगास हे शहर देखील वरील शहरांच्या रांगेत जाउन बसेल असे म्हट्ल्यास अतिशयोक्ती होणार नाही. येथे legal prostitution (म्हणजे लायसेन्स्ड ) मान्यता प्राप्त आहे. जपान मधील गेशांचा (geisha) व्यवसाय पण असाच परंपरागत. पण त्यांचे काम नाचगाण्यापुरते मर्यादित. हल्लीच्या गेशा तर इन्ग्लीश ग्राहकांसाठी म्हणुन इन्ग्लिश भाषा आत्मसात करू लागल्या आहेत. अवांतरः २-३ वर्षापूर्वी Memoirs of a Geisha हा एक सिनेमा आला होता. त्यात सायुरी नावाच्या गेशा चा जीवनपट उलगडून दाखवला होता. संगीत, कला दिग्दर्शन , कॉस्ट्युम डिझाईन वगैरे साठी या सिनेमाला २००६ चे ऍकॅड्मी ऍवॉर्ड (ऑस्कर) मिळाले होते. पुण्यातील बुधवार पेठेलाही पेशेवेकालीन इतिहास आहे.

शैलेन्द्र Fri, 05/23/2008 - 11:49
याचे अनेक पैलू आहेत, आणि खरतर यात फक्त बळजबरी नसेल तर हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न होतो. वेश्या व्यवसाय कितिहि वाइट असला तरि एक वास्तव आहे. आणि तुम्हि ते स्विकारता कि नाहि याचिहि कुनाला पड्लेली नाहि. जर आपन आपल्या स्वत्।च्या शरिरचा वापर, तेच शरिर पोसन्यासाठी करत असु तर त्यात वाइट काय, असा काहिसा युक्तिवाद ऐकीवात आला होता. मुळात स्त्री पुरुष सम्बन्धात केवल शरिर हेच ज्यान्च साध्य असत, अशा लोकांमुळेच हा प्रश्न आहे, जर हि विचार सरनी बदलली तर हेहि बदलेल..

मदनबाण गुरुवार, 05/22/2008 - 20:49
आपल्या देशातील लोकांची पतनाकडे जोरदार रेस चालु आहे..... अरे इंटरनेट वर सुद्दा कुठे लक्ष आहे सरकारच ? इंटरनेटवर सहजरित्या उपलब्ध अश्लील साहित्य भारतात दिसणे कोणी रोखु शकेल काय? कुठल्याही देशाला नष्ट करायचे असेल तर त्यांची संस्कृती नष्ट करा म्हणजे तो देश आपोआप पांगळा होईल !!!!! हेच चाललय आपल्या देशाबरोबर....वेळीच जागे झाले पाहिजे. स्वतः अशा व्यवसायाचा ग्राहक न होणे, ही झाली एक वैयक्तिक पायरी .हीच महत्वाची पायरी आहे.....आणि प्रत्येक हिंदूस्थानी युवकांनी वेळीच ओलांडायला हवी..... (* चीन मधे गुगल साईट आधी ब्लोक होती असे ऐकुन आहे...आणि जर समजा ती तशी ब्लोक झाली असेल तर माझा प्रश्न आहे की जर गुगल ब्लोक होऊ शकत असेल तर अशा तर्‍हेचे फक्त अश्लील साईट ब्लोक करण्याचा निर्णय आपला देशाच सरकार घेऊ शकेल काय ?

In reply to by मदनबाण

कोलबेर गुरुवार, 05/22/2008 - 21:05
चीन मधे गुगल साईट आधी ब्लोक होती असे ऐकुन आहे...आणि जर समजा ती तशी ब्लोक झाली असेल तर माझा प्रश्न आहे की जर गुगल ब्लोक होऊ शकत असेल तर अशा तर्‍हेचे फक्त अश्लील साईट ब्लोक करण्याचा निर्णय आपला देशाच सरकार घेऊ शकेल काय ?
नाही. कारण सुदैवाने भारत म्हणजे चीन नाही!

कोलबेर गुरुवार, 05/22/2008 - 21:07
ह्या विषयाचा गाढा अभ्यास असलेले प्रा. डॉ. विसोबा खेचर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील.

बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 05/22/2008 - 21:08
चीन मधे गूगल नाही तर त्यातले सर्च रिझल्ट्स फिल्टर होतात. आणि साईट ब्लॉकिंग तर बहुधा सगळीकडेच आहे. इथे दुबई मधे सुद्धा बर्‍याच साईट्स ब्लॉक आहेत. सौदी अरेबिया, कुवेत, बाहरिन सगळीकडेच तसे आहे. सौदी अरेबिया मधे तर केवळ पोर्नोग्राफिकच नव्हे तर धार्मिक (गैर मुस्लिम), राजकिय अश्या सगळ्याच साईट्स ब्लॉक आहेत. जेव्हा ह्य साईट्स वर जायचा प्रयत्न केला तर चक्क स्क्रीनवर संदेश येतो की 'हे स्थळ सौदी अरेबियाच्या संस्कृतिला अनुसरून नाही' ... पण गंमत अशी की हे ब्लॉक बायपास करायचे पण तितकेच मार्ग उपलब्ध आहेत. असो... मला असे वाटते अश्या प्रकारचे उपजिविकेचे साधन ह्या स्त्रिया (आणि पुरुषही, हा पण धंदा तेजीत आहे) केवळ मजबूरी म्हणूनच स्वीकारतात. बरेच वेळा बळजबरी असते. पण हेही इथे नमूद करावेसे वाटते की आजकाल बोकाळलेल्या चंगळवादामुळे बरेचजण अगदी पूर्ण पणे स्वेच्छेने ह्यात भाग घेतात, केवळ झटपट पैसा मिळावा म्हणून. (आठवा 'तरन्नुम' प्रकरण) तुम्ही म्हटल्याप्रमाणे ह्यात भाग न घेणे हा एक उपाय आहे पण तो 'पॅसिव्ह' आहे. 'ऍक्टिव्ह' उपाय म्हणजे सावधान सारख्या संघटना जे ह्या मुलींना सोडवण्याचे किंवा त्यांची सुटका झाल्यावर त्यांचे पुनर्वसन करणे वगैरे... आमच्या माहितीतल्या एक बाई खूप वर्षांपूर्वी असे काम करायच्या असे आठवते.

वेलदोडा गुरुवार, 05/22/2008 - 21:09
>>चीन मधे गुगल साईट आधी ब्लोक होती असे ऐकुन आहे माझ्या माहीतीत दुबई मध्ये तर अशा सर्वच साईट्स (ज्या वर अश्लील साहित्य , फोटोज वगैरे उपलब्ध असते ) ब्लॉक केलेल्या आहेत. आणि हे तेथील सरकारी आदेशावरून करण्यात आलेले आहे. जवळ्चा एक मित्र दुबईत असल्याने त्याच्याकडून ही माहिती मिळाली . दुबईत हे शक्य आहे तर भारतात ही असे लागू करणे अजिबातच अवघड नसणार.

In reply to by वेलदोडा

कोलबेर गुरुवार, 05/22/2008 - 21:15
दुबईत हे शक्य आहे तर भारतात ही असे लागू करणे अजिबातच अवघड नसणार.
हा हा हा!! मुंबईचे शांघाय करू अश्या घोषणा देणार्‍या नेत्यांनी मुंबईचे दुबई करु अश्या घोषणा द्याव्यात. यमकही जुळतेय. मुंबईचे दुबई आणि जमल्यास भारताचा सौदी अरेबीया करणे देखिल अजिबात अवघड नसणार. अवांतर : जमल्यास पुण्याचेही मस्कत करू म्हणजे पेठकर काकांना आपली दोन्ही हाटेलं इथेच बसुन चालवता येतील :)

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/22/2008 - 22:19
म्हणजे मुळात शरीर विक्रय हा भारतीय कायद्यानुसार अधिकृत/कायदेशीर आहे काय? माझ्या ऐकिव माहितीनुसार हा व्यवसाय कायदेशिर आहे. राज्य सरकार्/म्युनिसिपालटी अशा व्यावसायिकांना परवाना (लायसन्स) देते. वेळोवेळी आरोग्यविभागा कडून शारीरिक आरोग्य तपासणीही होते. (हेही बंधनकारक आहे). ह्यात होणारा भ्रष्टाचारही भरपूर आहे. नैतिक/अनैतिक च्या आपल्या कल्पना आणि दारिद्र्याचा अक्राळ वि़क्राळ राक्षस ह्यांची सांगड घालता येत नाही. ह्या व्यवसायातून जन्मास आलेल्या मुलींना बाहेरील समाज स्विकारत नाही त्यामुळे नाईलाजाने (आणि वातावरणाची सवय असल्यामुळेही) त्या मुली ह्या व्यवसायातच येतात. चंगळवादाच्या बळी सुशिक्षित मुलीही थ्रिल म्हणून, पैसे मिळतात म्हणून उच्चभ्रू वर्तुळात हा व्यवसाय करतात. तसेच, पैसे नाही पण काही मोबदला (सिनेमा, सिरियल्स मधील भूमिका) मिळविण्याच्या नादातही हा 'त्याग' करतात असे ऐकले आहे. ह्या सर्व गोष्टींपासून दूर राहणे हेच उत्तम. शेवटी, 'मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक'.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण Fri, 05/23/2008 - 12:34
चंगळवादाच्या बळी सुशिक्षित मुलीही थ्रिल म्हणून, पैसे मिळतात म्हणून उच्चभ्रू वर्तुळात हा व्यवसाय करतात. तसेच, पैसे नाही पण काही मोबदला (सिनेमा, सिरियल्स मधील भूमिका) मिळविण्याच्या नादातही हा 'त्याग' करतात असे ऐकले आहे. चांगल्या घरातल्या स्त्रीया,सुशिक्षित मुलीही हा व्यवसाय करतात्,,,,हा प्रकार तर आता एवढा बोकाळला आहे की विचारु नका....बर्‍याच बातम्या हल्लीच पाहावयास मिळाल्या आहेत !!!!! दिल्ली तर अशा स्त्रीयांनी या सर्व मौजेसाठी (लेट्स हॅव फन...अस काहीस आजच्या या स्त्रीया म्हणतात आणि मुल सुद्दा)एका हॉटेल मधील एक खोलीच महिनाभर बुक करुन ठेवली होती..... आणि काही दिवसांपुर्वीच कोल्हापुरातच एका लॉज वर धाड टाकुन अशाच काही महिलांना अटक करण्यात आली होती.... न्युज चॅनेल खाली कॅप्शन मधे सांगत होत्ते या सर्व चांगल्या घरातील मुली आणि स्त्रीया आहेत !!!!!.....म्हणजे नवरा कामावर गेलेला आणि बायको लॉज वर.....तरी या सर्व चांगल्या घरातील आहेत?.....हे प्रकार वाढत का चालले आहेत ? माझ्या मते ही हिंदूस्थानात वाढलेल्या भोगवादाची ही ल़क्षणे आहेत..... सिनेमा, सिरियल्स मधील भूमिका करणार्‍या आणि भूमिका मिळवण्यासाठी मुली हा त्याग करतात,,,,, हा कुठला त्याग म्हणायचा?...काही अभिनेत्र्या बुरखा घालुन पंचतारांकीत हॉटेल मधे काही तासाचे लाखो रुपये मिळवण्यासाठी कशा येतात हे ही आता उघडकीस आलेल आहे...... मला वाटत ज्या प्रमाणे चीन,सौदी अरेबियाच्या येथे पोर्नोग्राफिक साईट ब्लॉक आहेत त्या प्रमाणे आपल्या येथेही त्या ब्लॉक झाल्या पाहिजे..... हल्ली बर्‍याच घरात इंटरनेट कनेक्शन आलेले आहे...पालक कामा निमित्त्य घराबाहेर पडतात पण आपला मुलगा / मुलगी नेट वर काय करतात याचा थांगपत्ताही त्यांना लागत नाही..... हा पोर्नोग्राफिचा विळखा या आपल्या तरुण पिढीला आवळल्या शिवाय राहणार नाही.... काही आकडे :-- ३७२million या फक्त पोर्नोग्राफिक साईट आहेत.... ३५% डाऊनलोड हे पोर्नोग्राफिक कंटेन्ट च आहे..... दर दिवसाला २६६ अशा नवीन साईट या जालावर येतात..... ३% हे साहित्य युके मधे बनते. 4% हे साहित्य जर्मनी मधे बनते. 89% हे साहित्य अमेरिकेत बनते. US revenue from internet porn in 2006 $ 2.84 Billion..... हे जरा पहा :-- http://www.youtube.com/watch?v=BSX9zRJUa2c http://www.youtube.com/watch?v=SHm4de0UfVc खरचं हे सर्व भयानक आहे..... (युवा पिढी या विळख्यात अडकणार का ?)या विचारात पडलेला मदनबाण.....

अभिता Fri, 05/23/2008 - 01:28
मुंबईचे दुबई आणि जमल्यास भारताचा सौदी अरेबीया करणे देखिल अजिबात अवघड नसणार. मग आपल्या इथल्या अरबांनी कुठे जायाच.

पक्या Fri, 05/23/2008 - 02:46
>> माझ्या माहिती प्रमाणे इथे युरोप मध्येही शरीर विक्रय चालतो. अहो मनराव, अशी बाळबोधासारखी कसली माहिती देताय. :) हे तर सर्व जगात चालू आहे. ..all over the world ऍम्स्टरडॅम ( नेदरर्लॅड्स मधील) तर 'ह्या' ची राजधानी म्हणावी लागेल. येथील रेड लाईट डिस्ट्रीक्ट जगप्रसिध्द आहे. आणि त्यास सरकारी मान्यता आहे. इथे आलेले इतर देशातील पर्यटक खास या स्थळाला भेट देतात. बार . कॉफीशॉप्स, पब्ज, क्ल्ब्ज, म्यझिक वगैरेंची इथे रेलचेल आहे. ईथल्या बायकाना सरकारचे लायसन्स मिळालेले असते आणि इतर कोणत्याही कमावत्या नागरिका सारखे त्या इन्कम टॅक्स ही भरतात. असाच दुसरा देश म्हणजे थायलंड. थायलंड मधील वेशाव्यवसाय हा अनेक शतकांपासून थाई संस्कृतीचा एक भाग बनलेला आहे. आणि हे त्या देशात अगदी सहजरित्या स्विकारलं गेलेलं आहे. दारीद्र्य आणि घरातील खाणार्‍यांची जास्त तोंडे हे मुख्य कारण या मागे आहे. इतर व्यवसांयाप्रमाणे हा ही एक व्यवसाय आहे असे इथे समजले जाते. पटाया या शहरात हा व्यवसाय सर्वाधिक वाढीस लागलेला आहे. त्या नंतर बॅकॉक, क्राबी , फुकेट या ठिकाणांची नावे घेता येतील. व्हिएतनाम युध्दाच्या वेळेस अमेरिकन सैनिकांसाठी थायलंड चा वापर R&R Spot म्हणुन केला होता. (रेस्ट ऍन्ड रिलॅक्सेशन). लिओनार्दो चा 'द बीच' , श्रेयस तळपदे चा 'बॉम्बे टू बॅकॉक ' या सिनेमांमध्ये थायलंड च्या या ' संस्कृतीची ' झलक बघावयास मिळते. यूएस मधील लासवेगास हे शहर देखील वरील शहरांच्या रांगेत जाउन बसेल असे म्हट्ल्यास अतिशयोक्ती होणार नाही. येथे legal prostitution (म्हणजे लायसेन्स्ड ) मान्यता प्राप्त आहे. जपान मधील गेशांचा (geisha) व्यवसाय पण असाच परंपरागत. पण त्यांचे काम नाचगाण्यापुरते मर्यादित. हल्लीच्या गेशा तर इन्ग्लीश ग्राहकांसाठी म्हणुन इन्ग्लिश भाषा आत्मसात करू लागल्या आहेत. अवांतरः २-३ वर्षापूर्वी Memoirs of a Geisha हा एक सिनेमा आला होता. त्यात सायुरी नावाच्या गेशा चा जीवनपट उलगडून दाखवला होता. संगीत, कला दिग्दर्शन , कॉस्ट्युम डिझाईन वगैरे साठी या सिनेमाला २००६ चे ऍकॅड्मी ऍवॉर्ड (ऑस्कर) मिळाले होते. पुण्यातील बुधवार पेठेलाही पेशेवेकालीन इतिहास आहे.

शैलेन्द्र Fri, 05/23/2008 - 11:49
याचे अनेक पैलू आहेत, आणि खरतर यात फक्त बळजबरी नसेल तर हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न होतो. वेश्या व्यवसाय कितिहि वाइट असला तरि एक वास्तव आहे. आणि तुम्हि ते स्विकारता कि नाहि याचिहि कुनाला पड्लेली नाहि. जर आपन आपल्या स्वत्।च्या शरिरचा वापर, तेच शरिर पोसन्यासाठी करत असु तर त्यात वाइट काय, असा काहिसा युक्तिवाद ऐकीवात आला होता. मुळात स्त्री पुरुष सम्बन्धात केवल शरिर हेच ज्यान्च साध्य असत, अशा लोकांमुळेच हा प्रश्न आहे, जर हि विचार सरनी बदलली तर हेहि बदलेल..
"काठावरून निरखलेला कामाठीपुरा " वाचला.

फोडणे-वाढवणे

अन्या दातार ·

ऋचा गुरुवार, 05/22/2008 - 17:13
बांगडी वाढली असे म्हणतात कारण पुर्वी च्या काळी बांगडी फुटणे अशुभ मानले जात असे. मग अश्यावेळी बांगडी वाढते म्हणजे नविन बांगड्या घेतल्या जातात कारण बांगड्या हे सौभाग्याचे लक्षण आहे. असे मला वाटते. :B

हर्षद बर्वे गुरुवार, 05/22/2008 - 18:03
पूर्वी स्त्री विधवा झाली की ती बांगड्या फ़ोडत असे.त्यानंतर बांगड्या वापरत नसे. बांगड्या(हिरव्या काचेच्या) सऊभाग्य-अलंकारामध्ये मोडतात. म्ह्णून चुकीने जरी बांगडी फ़ुटली तरी अशुभ...म्हणून वाढवली असे म्हणण्याचा प्रघात पडला. आपला हर्षद

In reply to by हर्षद बर्वे

मनिष गुरुवार, 05/22/2008 - 18:15
बांगडी वाढवली म्हणजे "नवरे वाढवले" असे तर नव्हते ना? ह. घ्या. ;) मला हे वाक्प्रचार माहित नव्हते. नारळ फुटला, बांगडी फुटली असेच आजीसकट सगळे लहानपणापासून म्हणायचे. 'बळी चढवला' हे मात्र ऐकले आहे.

धमाल मुलगा गुरुवार, 05/22/2008 - 18:21
अरे पण अजुन नारळाचा मुद्दा तसाच राहिला की. मी एकदाच म्हणालो होतो घरी, "मी फोडतो नारळ" आजीनं इतकं सुनावलं..."आजकालची कार्टी तुम्ही जळ्ळी अक्कल म्हणून नाही..आपण काय बोलतो, काय शब्द वापरतो जरा नीट विचार करुन बोलावं" अजुनपर्यंत मला माझं काय चुकलं हेच कळलं नाहीय्ये! का बुवा "नारळ वाढवणे" म्हणत असावेत?

मन गुरुवार, 05/22/2008 - 18:25
छान माहिती मिळतिये. चालु द्या. आपलाच, (शाळेतील भांडणात कित्येकांचे डोके,कित्येकांच्या पाट्या,कित्येक खिडक्या "वाढवलेला") मनोबा

विजुभाऊ गुरुवार, 05/22/2008 - 18:31
शेंडी डोळे असतात म्हणुन नारळ हे नरमुंडाचे प्रतीक म्हणुन वापरले जाते. नारळ फोडतो म्हणजे आपण लौकिक अर्थाने नरबळी देत असतो. उद्घाटन करताना / शुभारंभ करताना नारळ फोडण्यामागचा हा अशुभ अभद्र अर्थ निघुन जावा म्हणुन श्रीफळ वाढवले जात

ऋचा गुरुवार, 05/22/2008 - 18:31
माणुस मेल्यावर जेंव्हा त्याला जाळतात तेंव्हा चितेवर त्याच्याबरोबर सोबत म्हणुन नारळ पाठवतात. त्याला नारळ फुटणे असे म्हणतात. म्हणुन आजी ने तुमची तासंपट्टी केलि असवी.

अभिता Fri, 05/23/2008 - 00:53
असेच कुंकू पुसले असे म्हणत नाहित कुंकू वाढवले असे म्हणतात ऋचा शी सहमत आहे.

मंगळ्सुत्र पण वाढवले असेच म्हणतात.. सौभाग्याचे लक्षण म्हणुन अशुभ शब्द टाळत असावेत. >>शुभारंभ करताना नारळ फोडण्यामागचा हा अशुभ अभद्र अर्थ निघुन जावा म्हणुन श्रीफळ वाढवले जात - बरोबर

शैलेन्द्र Sat, 05/24/2008 - 12:25
पिढिजात व्यापारी, दुकान बंद केले(रात्री) अस न म्हणता दुकान वाढवले अस म्हणतात..

हेरंब Sun, 05/25/2008 - 22:14
भारतीय समाजात 'ढोंगीपणा' हा राजमान्यच आहे. म्हणूनच नागडे सत्य कोणी स्वीकारु शकत नाही. त्यामुळे मग अशा प्रकारांना गोंडस रुप दिले जाते. निरोप घेताना 'मी जातो' न म्हणता 'मी येतो' असं म्हणतात तोही यातलाच प्रकार! जातो म्हटले की परत येणारच नाही हे कशावरुन ? त्या भीतिने उलट का बोलायचं ?

तर्री Sat, 09/01/2012 - 20:57
हया प्रकाराला इंग्रजी मध्ये युफेमिझम म्हणतात. तो भाषेचा / बोली भाषेचा अलंकार आहे . ( हयाला ढोगीपणा म्हणार्याना सा. न ) अशुभ बोलणे टाळावे हा त्या मागचा भाव ! मला हया मध्ये खूप "स"कार दिसतो. आज कदाचित हे असे बोलणे (शहरात ) कालबाह्य वाटत असेलही पण हाच प्रकार इग्रंजी असता तर आपण ग्रामर चे २/५ मार्क मिळवण्यात धन्यता मानली असती.

In reply to by तर्री

अत्रन्गि पाउस Mon, 05/06/2013 - 10:04
अहो इंग्लंड मध्ये सुद्द्धा नॉट bad म्हणजे चांगला अमेरिकेत फिझीकाली / मेंटली chalenged असे अनुक्रमे अपंग / मतीमंद साठी वापरतात... कुठलीही नकारात्मकता टाळणे हा भंपक /ढोंगी पणा नाहीच!!!

चौकटराजा Sat, 09/01/2012 - 21:28
आपल्याकडे काही सांस्कृतिक आचरणपणाचे नमुने आहेत त्यातीलच हे काही प्रकार आहेत. उदा. मी जातो असो म्हणायचे नाही तर बरं येतो असे म्हणायचे. किंवा नुकत्याच कोंब फुटलेल्या रोपाला सरळ तर्जनीने निर्देश न करता तर्जनीच्या मधल्या पेराच्या टोकाने निर्देशित करणे का तर ? डायरेक्ट तर्जनी दाखविली तर रोप खुजे निपजते म्हणे.

अप्पा जोगळेकर Sun, 09/02/2012 - 12:05
जर एखाद्याने नारळ/बांगडी फुटला/फुटली ऐवजी नारळ वाढवला/वाढली असे म्हटले किंवा जातो ऐवजी येतो असे म्हटले तर लगेचच त्याला ढोंगीपणा, सांस्कॄतिक आचरटपणा असे म्हणून हिणवण्याची काय गरज आहे ? अमुक माणुस खपला/मेला/गचकला, खूप जोरात हगायला लागली आहे किंवा ढमक्या माणसाचे नुकतेच लग्न झाले. बायकोला ठोकण्यासाठी नैनितालला घेउन गेलाय. अशा भाषेत बोलण्याऐवजी ते गॄहस्थ वारले, जोरदार प्रेशर आले आहे, हनिमूनला ते दोघे नैनितालला गेलेत असेच वाक्प्रयोग वापरतात. यालासुद्धा सांस्कॄतिक आचरटपणा किंवा ढोंगीपणा म्हणायचे का ?

In reply to by अप्पा जोगळेकर

चौकटराजा Sun, 09/02/2012 - 15:58
आमचे 'वाढवला' या क्रियापदाशी वाकडे नाहीये. ते तसे कुणीही वापरावे .आम्ही नारळ फोडला असे म्हणालो की " याला संस्कृति कळत नाही" असा पवित्रा घेउ नये . अशा पवित्र्याला आम्ही आचरटपणा म्हणतो. दुसरे असे की बायकोला ***** यात ***** हे मूळ क्रियापद नाही. तसे फोडणे या क्रियापदाचे नाही. नारळ फोडणे यात वाढविणे यापेक्षा फोडणे हे जास्त वापरले जाणारे आहे. तसे **** या क्रियापदाचे नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

बाळ सप्रे Mon, 05/06/2013 - 10:45
एखादा मनुष्य ज्याच्याविषयी काही आपुलकी असते तो/ती गेल्यावर 'वारला/ली' वगैरे शब्दप्रयोग वापरला जातो. पण तोच रस्त्यावरील भिकारी/ दारुडा खपला/गचकला असेच म्हटले जाते. तसेच बांगडी हा नुसता अलंकार न मानता सौभाग्याचा अलंकार मानणे, नारळ हे साधे फळ न नसून पवित्र फळ असणे हा विचार सर्वसामान्यपणे फार कमी झाला असल्याने नारळ फुटणे, बांगडी फुटणे हाच शब्द्प्रयोग सामान्य जीवनात जास्त योग्य वाटतो. त्याची तुलना "बायकोला ठोकण्यासाठी " वगैरे शब्दप्रयोगाशी करणे विनोदी/ लोकप्रिय वगैरे असली फारच अतिरंजित आहे. बिनतोड युक्तिवाद नक्कीच नाही!!

चिगो Sun, 09/02/2012 - 17:09
अमुक माणुस खपला/मेला/गचकला, खूप जोरात हगायला लागली आहे किंवा ढमक्या माणसाचे नुकतेच लग्न झाले. बायकोला ठोकण्यासाठी नैनितालला घेउन गेलाय. अशा भाषेत बोलण्याऐवजी ते गॄहस्थ वारले, जोरदार प्रेशर आले आहे, हनिमूनला ते दोघे नैनततालला गेलेत
अयाया... खपलो, मेलो, गचकलो.. :-) हाण्णा तिच्यायला.. :-D

ऋचा गुरुवार, 05/22/2008 - 17:13
बांगडी वाढली असे म्हणतात कारण पुर्वी च्या काळी बांगडी फुटणे अशुभ मानले जात असे. मग अश्यावेळी बांगडी वाढते म्हणजे नविन बांगड्या घेतल्या जातात कारण बांगड्या हे सौभाग्याचे लक्षण आहे. असे मला वाटते. :B

हर्षद बर्वे गुरुवार, 05/22/2008 - 18:03
पूर्वी स्त्री विधवा झाली की ती बांगड्या फ़ोडत असे.त्यानंतर बांगड्या वापरत नसे. बांगड्या(हिरव्या काचेच्या) सऊभाग्य-अलंकारामध्ये मोडतात. म्ह्णून चुकीने जरी बांगडी फ़ुटली तरी अशुभ...म्हणून वाढवली असे म्हणण्याचा प्रघात पडला. आपला हर्षद

In reply to by हर्षद बर्वे

मनिष गुरुवार, 05/22/2008 - 18:15
बांगडी वाढवली म्हणजे "नवरे वाढवले" असे तर नव्हते ना? ह. घ्या. ;) मला हे वाक्प्रचार माहित नव्हते. नारळ फुटला, बांगडी फुटली असेच आजीसकट सगळे लहानपणापासून म्हणायचे. 'बळी चढवला' हे मात्र ऐकले आहे.

धमाल मुलगा गुरुवार, 05/22/2008 - 18:21
अरे पण अजुन नारळाचा मुद्दा तसाच राहिला की. मी एकदाच म्हणालो होतो घरी, "मी फोडतो नारळ" आजीनं इतकं सुनावलं..."आजकालची कार्टी तुम्ही जळ्ळी अक्कल म्हणून नाही..आपण काय बोलतो, काय शब्द वापरतो जरा नीट विचार करुन बोलावं" अजुनपर्यंत मला माझं काय चुकलं हेच कळलं नाहीय्ये! का बुवा "नारळ वाढवणे" म्हणत असावेत?

मन गुरुवार, 05/22/2008 - 18:25
छान माहिती मिळतिये. चालु द्या. आपलाच, (शाळेतील भांडणात कित्येकांचे डोके,कित्येकांच्या पाट्या,कित्येक खिडक्या "वाढवलेला") मनोबा

विजुभाऊ गुरुवार, 05/22/2008 - 18:31
शेंडी डोळे असतात म्हणुन नारळ हे नरमुंडाचे प्रतीक म्हणुन वापरले जाते. नारळ फोडतो म्हणजे आपण लौकिक अर्थाने नरबळी देत असतो. उद्घाटन करताना / शुभारंभ करताना नारळ फोडण्यामागचा हा अशुभ अभद्र अर्थ निघुन जावा म्हणुन श्रीफळ वाढवले जात

ऋचा गुरुवार, 05/22/2008 - 18:31
माणुस मेल्यावर जेंव्हा त्याला जाळतात तेंव्हा चितेवर त्याच्याबरोबर सोबत म्हणुन नारळ पाठवतात. त्याला नारळ फुटणे असे म्हणतात. म्हणुन आजी ने तुमची तासंपट्टी केलि असवी.

अभिता Fri, 05/23/2008 - 00:53
असेच कुंकू पुसले असे म्हणत नाहित कुंकू वाढवले असे म्हणतात ऋचा शी सहमत आहे.

मंगळ्सुत्र पण वाढवले असेच म्हणतात.. सौभाग्याचे लक्षण म्हणुन अशुभ शब्द टाळत असावेत. >>शुभारंभ करताना नारळ फोडण्यामागचा हा अशुभ अभद्र अर्थ निघुन जावा म्हणुन श्रीफळ वाढवले जात - बरोबर

शैलेन्द्र Sat, 05/24/2008 - 12:25
पिढिजात व्यापारी, दुकान बंद केले(रात्री) अस न म्हणता दुकान वाढवले अस म्हणतात..

हेरंब Sun, 05/25/2008 - 22:14
भारतीय समाजात 'ढोंगीपणा' हा राजमान्यच आहे. म्हणूनच नागडे सत्य कोणी स्वीकारु शकत नाही. त्यामुळे मग अशा प्रकारांना गोंडस रुप दिले जाते. निरोप घेताना 'मी जातो' न म्हणता 'मी येतो' असं म्हणतात तोही यातलाच प्रकार! जातो म्हटले की परत येणारच नाही हे कशावरुन ? त्या भीतिने उलट का बोलायचं ?

तर्री Sat, 09/01/2012 - 20:57
हया प्रकाराला इंग्रजी मध्ये युफेमिझम म्हणतात. तो भाषेचा / बोली भाषेचा अलंकार आहे . ( हयाला ढोगीपणा म्हणार्याना सा. न ) अशुभ बोलणे टाळावे हा त्या मागचा भाव ! मला हया मध्ये खूप "स"कार दिसतो. आज कदाचित हे असे बोलणे (शहरात ) कालबाह्य वाटत असेलही पण हाच प्रकार इग्रंजी असता तर आपण ग्रामर चे २/५ मार्क मिळवण्यात धन्यता मानली असती.

In reply to by तर्री

अत्रन्गि पाउस Mon, 05/06/2013 - 10:04
अहो इंग्लंड मध्ये सुद्द्धा नॉट bad म्हणजे चांगला अमेरिकेत फिझीकाली / मेंटली chalenged असे अनुक्रमे अपंग / मतीमंद साठी वापरतात... कुठलीही नकारात्मकता टाळणे हा भंपक /ढोंगी पणा नाहीच!!!

चौकटराजा Sat, 09/01/2012 - 21:28
आपल्याकडे काही सांस्कृतिक आचरणपणाचे नमुने आहेत त्यातीलच हे काही प्रकार आहेत. उदा. मी जातो असो म्हणायचे नाही तर बरं येतो असे म्हणायचे. किंवा नुकत्याच कोंब फुटलेल्या रोपाला सरळ तर्जनीने निर्देश न करता तर्जनीच्या मधल्या पेराच्या टोकाने निर्देशित करणे का तर ? डायरेक्ट तर्जनी दाखविली तर रोप खुजे निपजते म्हणे.

अप्पा जोगळेकर Sun, 09/02/2012 - 12:05
जर एखाद्याने नारळ/बांगडी फुटला/फुटली ऐवजी नारळ वाढवला/वाढली असे म्हटले किंवा जातो ऐवजी येतो असे म्हटले तर लगेचच त्याला ढोंगीपणा, सांस्कॄतिक आचरटपणा असे म्हणून हिणवण्याची काय गरज आहे ? अमुक माणुस खपला/मेला/गचकला, खूप जोरात हगायला लागली आहे किंवा ढमक्या माणसाचे नुकतेच लग्न झाले. बायकोला ठोकण्यासाठी नैनितालला घेउन गेलाय. अशा भाषेत बोलण्याऐवजी ते गॄहस्थ वारले, जोरदार प्रेशर आले आहे, हनिमूनला ते दोघे नैनितालला गेलेत असेच वाक्प्रयोग वापरतात. यालासुद्धा सांस्कॄतिक आचरटपणा किंवा ढोंगीपणा म्हणायचे का ?

In reply to by अप्पा जोगळेकर

चौकटराजा Sun, 09/02/2012 - 15:58
आमचे 'वाढवला' या क्रियापदाशी वाकडे नाहीये. ते तसे कुणीही वापरावे .आम्ही नारळ फोडला असे म्हणालो की " याला संस्कृति कळत नाही" असा पवित्रा घेउ नये . अशा पवित्र्याला आम्ही आचरटपणा म्हणतो. दुसरे असे की बायकोला ***** यात ***** हे मूळ क्रियापद नाही. तसे फोडणे या क्रियापदाचे नाही. नारळ फोडणे यात वाढविणे यापेक्षा फोडणे हे जास्त वापरले जाणारे आहे. तसे **** या क्रियापदाचे नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

बाळ सप्रे Mon, 05/06/2013 - 10:45
एखादा मनुष्य ज्याच्याविषयी काही आपुलकी असते तो/ती गेल्यावर 'वारला/ली' वगैरे शब्दप्रयोग वापरला जातो. पण तोच रस्त्यावरील भिकारी/ दारुडा खपला/गचकला असेच म्हटले जाते. तसेच बांगडी हा नुसता अलंकार न मानता सौभाग्याचा अलंकार मानणे, नारळ हे साधे फळ न नसून पवित्र फळ असणे हा विचार सर्वसामान्यपणे फार कमी झाला असल्याने नारळ फुटणे, बांगडी फुटणे हाच शब्द्प्रयोग सामान्य जीवनात जास्त योग्य वाटतो. त्याची तुलना "बायकोला ठोकण्यासाठी " वगैरे शब्दप्रयोगाशी करणे विनोदी/ लोकप्रिय वगैरे असली फारच अतिरंजित आहे. बिनतोड युक्तिवाद नक्कीच नाही!!

चिगो Sun, 09/02/2012 - 17:09
अमुक माणुस खपला/मेला/गचकला, खूप जोरात हगायला लागली आहे किंवा ढमक्या माणसाचे नुकतेच लग्न झाले. बायकोला ठोकण्यासाठी नैनितालला घेउन गेलाय. अशा भाषेत बोलण्याऐवजी ते गॄहस्थ वारले, जोरदार प्रेशर आले आहे, हनिमूनला ते दोघे नैनततालला गेलेत
अयाया... खपलो, मेलो, गचकलो.. :-) हाण्णा तिच्यायला.. :-D
आपण जेंव्हा देवाला वगैरे जातो व नारळ फोडतो. पण नारळ फोडण्याच्या कृतीस नारळ वाढवणे असे म्हणतात. जेंव्हा बांगडी फुटते तेंव्हा सुद्धा बांगडी फुटली असे न म्हणता बांगडी वाढली असे म्हणतात. ज्या गोष्टी आपण अक्षरशः फोडतो, त्याला वाढवणे हे गोंडस नाव का द्यावे याचा बोध काही केल्या झालेला नाही. देवाच्या ठिकाणी फोडलेल्या नारळाला 'नारळ वाढवणे' असं म्हणायचं; तेच निवडणुका लागल्या की वर्तमानपत्रात बातमी येते की 'अमूक अमूक यांच्या हस्ते भागातल्या प्रचाराचा नारळ फुटला.' त्याला मात्र नारळ वाढवला असे म्हणायचं नाही.

एक स्वप्न प्रवास.(५)

विजुभाऊ ·

धमाल मुलगा गुरुवार, 05/22/2008 - 17:24
हम्म्म... हे आपले विजुभाऊ स्वप्न बघतात का गंमत करतात? कुठुनही कसेही काहीही केव्हाही करतात..काय स्वप्न आहेत का "द मेट्रीक्स" ?
"ढग आणा नाहीतर आमरण उपोषणाला बसेन अशी धमकी दिली. माझ्या धमकी चा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. तेथिल लोकानी उलट माझ्या सत्कारासाठी हार फ़ुले आणायला माणुस पाठवला.
:)) काय राव, बारामतीतल्या माणसांना उपोषणाच्या धमक्या देता होय? असंच होणार की मग.
"जाउदे सालं ...तुझ्या स्वप्नात जायचं....गेलं ढगात" एवढे बोलतो न बोलतो तोच मला जाणीव झाली....मी खरंच ढगात गेलो होतो.
हे हे हे...चला, म्हणजे फायनली तुम्हाला ढगाची वडाप मिळाली तर :)
(क्रमश:)............................................
च्यामारी टोपी ह्या क्रमशःची! काय करावं बरं ह्या संसर्गजन्य विकाराला :?

राजे गुरुवार, 05/22/2008 - 17:35
विजूभाऊ ! हे मात्र जबरा ! त्या गाण्यात मिळणारा पैसा खोटा असतो हे ठाऊक झाल्यापासुन पाउसही गाने ऐकुन येत नाही.उलट पावसाची कशी फ़जीती झाली म्हणुन हजर असलेले दोन चार ढग कडाडकन टाळ्या वाजवतात इतकेच्. ढगाला बालकामगार म्हणुन वागवल्याची मला शिक्षा झाली असती. अजब स्वप्न प्रवास आहे तुमचा ... वाचतो आहे लिहीत जा ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

स्वाती राजेश गुरुवार, 05/22/2008 - 20:22
ढ्ग आणायला मी "कारे मेघा कारे मेघा पानी तो बरसा" वगैरे फ़िल्मी गाणी म्हणुन पाहीली पण ती सगळी आकाशात असलेल्या ढगांना उद्देशुन होती. नसलेल्या ढगाला बोलावण्यासाठी एकही गाणे सापडले नाही. शेवटी मी "येउन येउन येणार कोण ढगाशिवाय आहेच कोण असे ओरडुनही पाहीले". निवडणुकीला उभे राहिल्याप्रमाणे वाटले:))) मस्त स्वप्नप्रवास झाला....आणि वैतागुन म्हणालो सुद्धा "जाउदे सालं ...तुझ्या स्वप्नात जायचं....गेलं ढगात"वैतागून म्हटले वाटते?...कारण तिला भेटायची अजुनी आस आहे आणि ती मिळत नाही लवकर हे जाणवते.....

वरदा गुरुवार, 05/22/2008 - 20:39
मुम्बैत पूर्वी कापड गिरण्या होत्या त्यांच्या धूराड्यामुळे हमखास ढग सापडायचे. दादर च्या पुढे परळ गिरणगाव येथे तर कोणत्याही वेळी ढग असायचे.पण गिरण्यांचे मॊल झाल्यापासुन तेथले हवामन स्वच्छ झाले आणि ढग नाहीसे झाले होते. खरं आहे हो! भीषण सत्य...किती लोक बेरोजगार झाले ..:( आता मॆचेस एकाचवेळेस इतक्या ठिकाणे असतात की नक्की कोठी जायचे असा ढगांनाच प्रश्न पडतो. झक्कास! क्रिकेट मॅच च्या कॉन्सेप्ट्चीच वाट लावलेय अगदी हल्ली...तुमच्याशी सहमत... स्वगतः आता कुठला मार्ग उरला बर? पत्रातून पोचायचा? एखाद्या पक्षाच्या पाठीवर बसून वगैरे उडतील विजुभाऊ पुढच्या स्वप्नात?

पिवळा डांबिस Fri, 05/23/2008 - 02:26
ए विजुभाव, तुजा भेजा मंजे शाला असली हाय हां! हे क्लाऊडच्या आयडिया लयी चोक्कस!! हल्ली "अर्धविझल्या उदबत्त्या . रक्त गाभुळली वटवाघळे आणि उप्पीटम" हे पुस्तक वाचुन ही झोप येत नसे त्यापेक्षा काहीतरी स्ट्रॊन्ग् उपाय करायला हवा तेच्यासाठी तू शाला दुसरे साईटवर का गेला? इथे मिपावरच्या समदा पोएट्री वाच्यला असतां ना तर कुंभकरण सारखा झ्योपला असता सिक्स मंथ!!:) मुम्बैत पूर्वी कापड गिरण्या होत्या त्यांच्या धूराड्यामुळे हमखास ढग सापडायचे. दादर च्या पुढे परळ गिरणगाव येथे तर कोणत्याही वेळी ढग असायचे. हां! आपन तिथेच मिलमदी काम केला, विव्हिंगमाष्टर!! तीस वरस सर्विस करून रिटायर झ्याला. अरे पन त्ये कालच्या ढगच वेगला!! असला मरियल नवतां!! मी मराथी गाण्यांचा शोध घेतला. पन तरीही निराशाच. मराठीतही ढगांना बोलावण्यासाठी एकही गाणे नव्हते. काय गांडी वार्ता करते? तू "ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना" कवा ऐकला नाय के? माजा ते लई फेवरिट गाना हाय! अजूनपन मुंबईथी नलाला पानी नाय आला तर मी निस्ता ते गाना म्हनते आनि आंगाला पावडर लावते!!:) कॊल सेंटर वाल्यांचे धूर तर तीन वेगवेगळ्या पातळ्यात विभागले होते. अमेरिकन ऎक्सेंट वाल्याने सोडलेला धूर हा ब्रिटीश ऎक्सेंट वाल्याने सोडलेल्या धूरापेक्षा दोन इंच वरच रहात होता. ते शाला तुमच्या घाटी तात्या लोगच्या तसाच हाय! जरा इंग्लीश आला तर लगेच ऍक्सेंट मारते! आता मी बघ किती झकास मराटी बोलते, जरापन ऍक्सेंट हाय काय?:) आपण स्वत:ला बाटलीत बंद करुन घेउ आणि ती बाटली समुद्रात फ़ेकुयात हे मस्त सुच्यवला! आता तू जास्त बोर करायला लागला की तुलाच्य बाटलीत भरून बाटली दरयामधी फेकून नाखू या! शाला घंपतीबाप्पा मोरया!!!:)) बाकी हा पोर्शन लिवलाय च्यांगला! ते फायरवोल वगेरेपेक्षा घणा सरस! आपल्याला आवडला!! सिन्सियरली, यलो दांबिसवाला

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग Fri, 05/23/2008 - 03:22
तू आज ते पेस्तनकाकाची श्टोरी ऐकली दिसते, बराबर के? ते तू ऐकली ना के मग असाच होउन जाते, थोदा वेल टायपिंगमदी पन गुजराति इफेक्ट येते! ए तो अपनु भाईकाकानो जबरा इफेक्ट छे! :) चतुरंग

In reply to by चतुरंग

पिवळा डांबिस Fri, 05/23/2008 - 06:39
नाय मंजे ते तुमचा लोगचा भाईकाका तर ज्यबरदस्त खराच, आमी त्येचा बराच बुक वाच्यला हाय!! पन आमी हे शिकला आमच्ये एक प्रोफेसरकडून! आमी झेवियरला असताना बे साल त्याच्या हाताखाली रिसर्च प्रोजेक्ट केला होता... शाला तेच्या डोका घणो सूपीक, आपले हे विजुभावसारखाच, पण आटाबी सटकलेला, आपले हे **भावसारखाच!! (विजुभाव, ते तुमच्ये क्लाऊडपेक्षा हे लाईटली घ्या!!:) अरे, हे तर आमी अगदी सिंपल राईट केला, एकबी पारसी-गुजराती गाळी नाय दिला! शाला हे न्हल्ली-न्हल्ली डिकरी लोग हे साईट वाच्यते, आपल्याला "काका" बोलते, उगाच तेनला एंबरेसमेंट नको शाला!!:)) परफॅक्ट जंटलमेन, यलो दांबिसवाला. पीएसः ए चतुरंग! ते पारसी-गुजरातीमदी "इफेक्ट" नसते, "इफॅक्ट" असते! :)) ट्यूशन लावते का माझी ट्यूशन, आं!!!:))

बकुळफुले Sat, 05/24/2008 - 10:22
शिवाय पाउस पाडण्या अगोदर डकवर्थ-लुइस चा नियम समजून घ्या असा आदेश काढला गेला तर काय ? या धास्तीने ढगानी मॆचला येणेच सोडुन दिले होते. =)) हे बेष्टच हो विजुभौ. बाकी हा नियम भडकमकर क्लासेस मधे समजाउन सांगतात का हो? हे वाचुन आनंदीत झालेली बकुळफुले

धमाल मुलगा गुरुवार, 05/22/2008 - 17:24
हम्म्म... हे आपले विजुभाऊ स्वप्न बघतात का गंमत करतात? कुठुनही कसेही काहीही केव्हाही करतात..काय स्वप्न आहेत का "द मेट्रीक्स" ?
"ढग आणा नाहीतर आमरण उपोषणाला बसेन अशी धमकी दिली. माझ्या धमकी चा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. तेथिल लोकानी उलट माझ्या सत्कारासाठी हार फ़ुले आणायला माणुस पाठवला.
:)) काय राव, बारामतीतल्या माणसांना उपोषणाच्या धमक्या देता होय? असंच होणार की मग.
"जाउदे सालं ...तुझ्या स्वप्नात जायचं....गेलं ढगात" एवढे बोलतो न बोलतो तोच मला जाणीव झाली....मी खरंच ढगात गेलो होतो.
हे हे हे...चला, म्हणजे फायनली तुम्हाला ढगाची वडाप मिळाली तर :)
(क्रमश:)............................................
च्यामारी टोपी ह्या क्रमशःची! काय करावं बरं ह्या संसर्गजन्य विकाराला :?

राजे गुरुवार, 05/22/2008 - 17:35
विजूभाऊ ! हे मात्र जबरा ! त्या गाण्यात मिळणारा पैसा खोटा असतो हे ठाऊक झाल्यापासुन पाउसही गाने ऐकुन येत नाही.उलट पावसाची कशी फ़जीती झाली म्हणुन हजर असलेले दोन चार ढग कडाडकन टाळ्या वाजवतात इतकेच्. ढगाला बालकामगार म्हणुन वागवल्याची मला शिक्षा झाली असती. अजब स्वप्न प्रवास आहे तुमचा ... वाचतो आहे लिहीत जा ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

स्वाती राजेश गुरुवार, 05/22/2008 - 20:22
ढ्ग आणायला मी "कारे मेघा कारे मेघा पानी तो बरसा" वगैरे फ़िल्मी गाणी म्हणुन पाहीली पण ती सगळी आकाशात असलेल्या ढगांना उद्देशुन होती. नसलेल्या ढगाला बोलावण्यासाठी एकही गाणे सापडले नाही. शेवटी मी "येउन येउन येणार कोण ढगाशिवाय आहेच कोण असे ओरडुनही पाहीले". निवडणुकीला उभे राहिल्याप्रमाणे वाटले:))) मस्त स्वप्नप्रवास झाला....आणि वैतागुन म्हणालो सुद्धा "जाउदे सालं ...तुझ्या स्वप्नात जायचं....गेलं ढगात"वैतागून म्हटले वाटते?...कारण तिला भेटायची अजुनी आस आहे आणि ती मिळत नाही लवकर हे जाणवते.....

वरदा गुरुवार, 05/22/2008 - 20:39
मुम्बैत पूर्वी कापड गिरण्या होत्या त्यांच्या धूराड्यामुळे हमखास ढग सापडायचे. दादर च्या पुढे परळ गिरणगाव येथे तर कोणत्याही वेळी ढग असायचे.पण गिरण्यांचे मॊल झाल्यापासुन तेथले हवामन स्वच्छ झाले आणि ढग नाहीसे झाले होते. खरं आहे हो! भीषण सत्य...किती लोक बेरोजगार झाले ..:( आता मॆचेस एकाचवेळेस इतक्या ठिकाणे असतात की नक्की कोठी जायचे असा ढगांनाच प्रश्न पडतो. झक्कास! क्रिकेट मॅच च्या कॉन्सेप्ट्चीच वाट लावलेय अगदी हल्ली...तुमच्याशी सहमत... स्वगतः आता कुठला मार्ग उरला बर? पत्रातून पोचायचा? एखाद्या पक्षाच्या पाठीवर बसून वगैरे उडतील विजुभाऊ पुढच्या स्वप्नात?

पिवळा डांबिस Fri, 05/23/2008 - 02:26
ए विजुभाव, तुजा भेजा मंजे शाला असली हाय हां! हे क्लाऊडच्या आयडिया लयी चोक्कस!! हल्ली "अर्धविझल्या उदबत्त्या . रक्त गाभुळली वटवाघळे आणि उप्पीटम" हे पुस्तक वाचुन ही झोप येत नसे त्यापेक्षा काहीतरी स्ट्रॊन्ग् उपाय करायला हवा तेच्यासाठी तू शाला दुसरे साईटवर का गेला? इथे मिपावरच्या समदा पोएट्री वाच्यला असतां ना तर कुंभकरण सारखा झ्योपला असता सिक्स मंथ!!:) मुम्बैत पूर्वी कापड गिरण्या होत्या त्यांच्या धूराड्यामुळे हमखास ढग सापडायचे. दादर च्या पुढे परळ गिरणगाव येथे तर कोणत्याही वेळी ढग असायचे. हां! आपन तिथेच मिलमदी काम केला, विव्हिंगमाष्टर!! तीस वरस सर्विस करून रिटायर झ्याला. अरे पन त्ये कालच्या ढगच वेगला!! असला मरियल नवतां!! मी मराथी गाण्यांचा शोध घेतला. पन तरीही निराशाच. मराठीतही ढगांना बोलावण्यासाठी एकही गाणे नव्हते. काय गांडी वार्ता करते? तू "ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना" कवा ऐकला नाय के? माजा ते लई फेवरिट गाना हाय! अजूनपन मुंबईथी नलाला पानी नाय आला तर मी निस्ता ते गाना म्हनते आनि आंगाला पावडर लावते!!:) कॊल सेंटर वाल्यांचे धूर तर तीन वेगवेगळ्या पातळ्यात विभागले होते. अमेरिकन ऎक्सेंट वाल्याने सोडलेला धूर हा ब्रिटीश ऎक्सेंट वाल्याने सोडलेल्या धूरापेक्षा दोन इंच वरच रहात होता. ते शाला तुमच्या घाटी तात्या लोगच्या तसाच हाय! जरा इंग्लीश आला तर लगेच ऍक्सेंट मारते! आता मी बघ किती झकास मराटी बोलते, जरापन ऍक्सेंट हाय काय?:) आपण स्वत:ला बाटलीत बंद करुन घेउ आणि ती बाटली समुद्रात फ़ेकुयात हे मस्त सुच्यवला! आता तू जास्त बोर करायला लागला की तुलाच्य बाटलीत भरून बाटली दरयामधी फेकून नाखू या! शाला घंपतीबाप्पा मोरया!!!:)) बाकी हा पोर्शन लिवलाय च्यांगला! ते फायरवोल वगेरेपेक्षा घणा सरस! आपल्याला आवडला!! सिन्सियरली, यलो दांबिसवाला

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग Fri, 05/23/2008 - 03:22
तू आज ते पेस्तनकाकाची श्टोरी ऐकली दिसते, बराबर के? ते तू ऐकली ना के मग असाच होउन जाते, थोदा वेल टायपिंगमदी पन गुजराति इफेक्ट येते! ए तो अपनु भाईकाकानो जबरा इफेक्ट छे! :) चतुरंग

In reply to by चतुरंग

पिवळा डांबिस Fri, 05/23/2008 - 06:39
नाय मंजे ते तुमचा लोगचा भाईकाका तर ज्यबरदस्त खराच, आमी त्येचा बराच बुक वाच्यला हाय!! पन आमी हे शिकला आमच्ये एक प्रोफेसरकडून! आमी झेवियरला असताना बे साल त्याच्या हाताखाली रिसर्च प्रोजेक्ट केला होता... शाला तेच्या डोका घणो सूपीक, आपले हे विजुभावसारखाच, पण आटाबी सटकलेला, आपले हे **भावसारखाच!! (विजुभाव, ते तुमच्ये क्लाऊडपेक्षा हे लाईटली घ्या!!:) अरे, हे तर आमी अगदी सिंपल राईट केला, एकबी पारसी-गुजराती गाळी नाय दिला! शाला हे न्हल्ली-न्हल्ली डिकरी लोग हे साईट वाच्यते, आपल्याला "काका" बोलते, उगाच तेनला एंबरेसमेंट नको शाला!!:)) परफॅक्ट जंटलमेन, यलो दांबिसवाला. पीएसः ए चतुरंग! ते पारसी-गुजरातीमदी "इफेक्ट" नसते, "इफॅक्ट" असते! :)) ट्यूशन लावते का माझी ट्यूशन, आं!!!:))

बकुळफुले Sat, 05/24/2008 - 10:22
शिवाय पाउस पाडण्या अगोदर डकवर्थ-लुइस चा नियम समजून घ्या असा आदेश काढला गेला तर काय ? या धास्तीने ढगानी मॆचला येणेच सोडुन दिले होते. =)) हे बेष्टच हो विजुभौ. बाकी हा नियम भडकमकर क्लासेस मधे समजाउन सांगतात का हो? हे वाचुन आनंदीत झालेली बकुळफुले
लेखनविषय:
लेखनप्रकार
3

सार काही क्षम्य असतं

विजुभाऊ ·

मनिष गुरुवार, 05/22/2008 - 14:38
कधी कातरवेळी.... संध्याकाळी ..... आठवणी जागवुन हे सगळे क्षण पुन्हा अनुभवणं... जगणं.... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे डोळ्यातुन पाण्याच्या धारा लागणंही क्षम्य असतं.......
सकस छे!!! :)

धमाल मुलगा गुरुवार, 05/22/2008 - 14:48
पण तुझं ते ओठांचा चम्बु करुन मान हलवत बोलणं अन मानेच्या हालचाली बरोबर ते कानातल्या लोलकांचे डुलणं ..... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे उशीर झाल्याची शंभर कारणं सांगणही क्षम्य असतं....... वार्‍यामुळे अवखळुन केसांचं तुझ्या गालांवर रुंजी घालणं...... तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं..... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं.......
हाय्य !!!! खल्लास आपण.... एकदम वास्तववादी तरीही रमणीय :) सुंदर !
माझं अधांतरी जगत स्वप्नं रंगवणं.... त्या स्वप्नांना तू जमिनीवर आणणं... आणि मी कावराबावरा असताना तुझं मला स्पर्ष करणं.... त्या स्पर्षाचा निरागसपणा अनुभवणं...... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे हजार चिंतांचा भार वाहणंही क्षम्य असतं.......
लाखमोलाची गोष्ट ४-६ ओळीत सांगितलीत भाऊ. मस्त.
कधी कातरवेळी.... संध्याकाळी ..... आठवणी जागवुन हे सगळे क्षण पुन्हा अनुभवणं... जगणं....
हम्म्म....छानच. म्हणजे, ...नकोच बुवा...नाही त्या गोष्टी नको त्या वेळी नकोत बोलायला. लगे रहो विजुभाऊ :)

मनिष गुरुवार, 05/22/2008 - 14:55
अगदीच राहवले नाही म्हणून माझ्या आवडत्या ओळींचे, जमेल तसे स्वैर भाषांतर....
मेरा युंही ख्वाबों मे खोये रहेना, और तुम्हारा वो ख्वाबों की तावीर की बातें करना, मै सहम जाऊ तो वो हलकेसे मुझे छू लेना... तुम्हारे छुने का अहेसास, वो छूने की मासुमियत, ये सब इतना लुभावना है, के हजार गमों को भी इनमे बह जाना है|
विजुभाऊ - जियो!

मनस्वी गुरुवार, 05/22/2008 - 15:29
त्यापुढे हजार चिंतांचा भार वाहणंही क्षम्य असतं....... त्यापुढे डोळ्यातुन पाण्याच्या धारा लागणंही क्षम्य असतं.......
छान जमलंय.

राजे गुरुवार, 05/22/2008 - 17:36
वार्‍यामुळे अवखळुन केसांचं तुझ्या गालांवर रुंजी घालणं...... तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं..... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं....... :) हे खास ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

विसोबा खेचर गुरुवार, 05/22/2008 - 17:40
आल्यावर डोळ्याच्या कोपर्‍यातुन मी किती रागावलोय ; याचा अंदाज घेणं..... तुझं हे असं पहाणं...... क्या बात है...! वार्‍यामुळे अवखळुन केसांचं तुझ्या गालांवर रुंजी घालणं...... तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं..... मार डाला! विजूभाऊ, सुंदर कविता...! तात्या.

शितल गुरुवार, 05/22/2008 - 17:47
वीजुभाऊ एकदम अफलातुन काव्य रचना,मस्त. स्वप्नातुन उतरून एवढे खतरनाक वास्तविक काव्य सही.

शितल गुरुवार, 05/22/2008 - 17:48
काव्यासाठी वेगळा विभाग सुरू करायला हवा. तात्या ऐकताय ना ?

वरदा गुरुवार, 05/22/2008 - 17:59
झक्कास्.....खूपच सुंदर कविता.... वार्‍यामुळे अवखळुन केसांचं तुझ्या गालांवर रुंजी घालणं...... तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं..... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं....... आय हाय!

प्राजु गुरुवार, 05/22/2008 - 18:59
माझं अधांतरी जगत स्वप्नं रंगवणं.... त्या स्वप्नांना तू जमिनीवर आणणं... आणि मी कावराबावरा असताना तुझं मला स्पर्ष करणं.... त्या स्पर्षाचा निरागसपणा अनुभवणं...... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे हजार चिंतांचा भार वाहणंही क्षम्य असतं....... हे अतिशय छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

स्वाती राजेश गुरुवार, 05/22/2008 - 20:30
कधी कातरवेळी.... संध्याकाळी ..... आठवणी जागवुन हे सगळे क्षण पुन्हा अनुभवणं... जगणं.... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे डोळ्यातुन पाण्याच्या धारा लागणंही क्षम्य असतं....... या ओळी खासच... आवडल्या.... बाकी, तुम्ही काव्य कधी पासून करायला सुरवात केली? सही आहे वरील कविता...

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 05/22/2008 - 20:59
विजुभाऊ, सगळीच कविता इतकी आवडली कि कुठल्या १-२ ओळिच आवडल्या म्हणून उल्लेखच करू शकत नाही. एकदम मस्त. (सुंदर कविता वाचून नि:शब्द झालेला) डॅनी. पुण्याचे पेशवे

यशोधरा गुरुवार, 05/22/2008 - 22:20
वार्‍यामुळे अवखळुन केसांचं तुझ्या गालांवर रुंजी घालणं...... तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं..... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं....... आय हाय! अगदी अगदी!! एकदमच आय हाय!! मस्तच लिहीलय!

धनंजय Fri, 05/23/2008 - 00:07
रम्य कल्पना. ती शेवटच्या कडव्यातील कल्पना फार आवडली! (पण शेवटचे कडवे बाकीच्या कवितेशी प्रवाहीपणे जोडलेले वाटत नाही - माझे तसे वाटणे क्षम्य असावे... )

विजुभौ,

प्रेमावर कितीही वेळ बोलत राहिलो, लिहित राहिलो तरी विषय कधीच न संपणारा,
रिकाम्या वेळात तो अनुभव आपल्या मनाभोवती पिंगा घालत असतो. तशी आपली
मनभर फिरणारी....सुंदर कविता.

'' क्लासला दांडी मारुन माझं बसस्टॊप वर
विनाकारण उभे रहाणं क्षम्य असत ''

आपण  बस स्टॉपवर तासन तास  वाट पाहावी,
अन् तिने आपल्या असण्याचा  लांबून अंदाज घ्यायचा अन
निघुन जायचं, हे तर फार जिव्हारी लागतं...!!!!


'' पण तुझं ते ओठांचा चम्बु करुन मान हलवत बोलणं
अन मानेच्या हालचाली बरोबर
ते कानातल्या लोलकांचे डुलणं .....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे उशीर झाल्याची शंभर कारणं सांगणही क्षम्य असतं "

बस, याचसाठी केला अट्टाहास तो क्षण सुखाचा व्हावा !!!!
अजूनही फावल्या वेळात सुंदर स्त्रीयांची  निरिक्षणे चालली,  तर कानातल्या लोलकांवर आमची  नजर हमखास जातेच.
टिकली जर चंद्रकोर असेल तर मेलोच आम्ही :)

''वार्‍यामुळे अवखळुन केसांचं
तुझ्या गालांवर रुंजी घालणं......
तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं.....
हे इतकं रम्य असतं की''

विजुभौ,  दिलसे  प्रेम ज्यानं  केलं, त्याला हे सर्व आठवतं, सुचतं.....
वा-यामुळे भुरभुरणा-या  केसांची बट मागे घेण्याची तिची अदा
जीवघेणीच...
.. आणि  हे सर्व केव्हा आठवतं माहित आहे

कधी कातरवेळी.... संध्याकाळी .....
आठवणी जागवुन हे सगळे क्षण
पुन्हा अनुभवणं... जगणं....
हे इतकं रम्य असतं की

डोळे खरंच भरतात की असे वाटायला लागते. या निमित्ताने  आम्हाला एका कवीच्या कवितेची आठवण होते.

" माझ्याच प्राक्तनात
का वैशाख उन आले,

जेथे विसावलो मी
तिथे तुफान आले. "

सारांश कविता तुमची असेल, पण अनुभव अनेकांचा  मांडला राव !!! लिखते रहो, विजुभौ

- दिलीप बिरुटे

गणा मास्तर Fri, 05/23/2008 - 20:05
वार्‍यामुळे अवखळुन केसांचं तुझ्या गालांवर रुंजी घालणं...... तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं..... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं....... हय क्या बात कही है

मदनबाण Sat, 05/24/2008 - 05:00
वार्‍यामुळे अवखळुन केसांचं तुझ्या गालांवर रुंजी घालणं...... तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं..... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं....... हे लई बेस्ट..... (अवखळ पोरगा) मदनबाण.....

बकुळफुले Sat, 05/24/2008 - 10:39
विजुभाउ प्रेमात पडलात की काय त्या मलेशियन ऍन ताइंच्या. बाकी मस्तच आहेत तुमचे शब्द. तुम्ही कविता लिहित असाल हे आमच्या स्वप्नात ही आले नव्हते ( तुमच्या स्वप्नात आले असेल आणि तुम्ही त्या धक्क्याने जागे झाले असाल) फक्त एक करा कविता तेवढ्या क्रमशः लिहु नका तुमच्या लेखनाचा आस्वाद घेणारी बकुळफुले

अजिंक्य गुरुवार, 05/29/2008 - 12:49
कधी कातरवेळी.... संध्याकाळी ..... आठवणी जागवुन हे सगळे क्षण पुन्हा अनुभवणं... जगणं.... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे डोळ्यातुन पाण्याच्या धारा लागणंही क्षम्य असतं....... क्या बात है!! मस्तच!! लगे रहो!!!

मृगनयनी Mon, 09/15/2008 - 12:52
ते कानातल्या लोलकांचे डुलणं ..... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे उशीर झाल्याची शंभर कारणं सांगणही क्षम्य असतं....... मस्त!!!!.......... जबरा!!!......... चाबुक..... फंडु..... ..... ... .. . नि:शब्द!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! :) विजुभौ... परत १ कुतुहलः तुमचा 'प्रेम-विवाह' झालाये का?

In reply to by मृगनयनी

प्रभाकर पेठकर Mon, 09/15/2008 - 13:05
विजुभौ... परत १ कुतुहलः तुमचा 'प्रेम-विवाह' झालाये का? का त्या जखमी सैनिकाच्या जखमा डिवचता आहात? कविता छान आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

जैनाचं कार्ट Mon, 09/15/2008 - 13:10
>>>का त्या जखमी सैनिकाच्या जखमा डिवचता आहात? =)) का उगाच मीठ चोळत आहात असे देखील वाक्य येथे चालू शकेल ना पेठेकर'काका ;) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

विजुभाऊ Mon, 09/15/2008 - 13:18
मरहम लगाने के बहाने से सौ आयेंगे मरहम लगाने के बजाय जख्म कुरेद जायेंगे पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

मनिष गुरुवार, 05/22/2008 - 14:38
कधी कातरवेळी.... संध्याकाळी ..... आठवणी जागवुन हे सगळे क्षण पुन्हा अनुभवणं... जगणं.... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे डोळ्यातुन पाण्याच्या धारा लागणंही क्षम्य असतं.......
सकस छे!!! :)

धमाल मुलगा गुरुवार, 05/22/2008 - 14:48
पण तुझं ते ओठांचा चम्बु करुन मान हलवत बोलणं अन मानेच्या हालचाली बरोबर ते कानातल्या लोलकांचे डुलणं ..... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे उशीर झाल्याची शंभर कारणं सांगणही क्षम्य असतं....... वार्‍यामुळे अवखळुन केसांचं तुझ्या गालांवर रुंजी घालणं...... तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं..... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं.......
हाय्य !!!! खल्लास आपण.... एकदम वास्तववादी तरीही रमणीय :) सुंदर !
माझं अधांतरी जगत स्वप्नं रंगवणं.... त्या स्वप्नांना तू जमिनीवर आणणं... आणि मी कावराबावरा असताना तुझं मला स्पर्ष करणं.... त्या स्पर्षाचा निरागसपणा अनुभवणं...... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे हजार चिंतांचा भार वाहणंही क्षम्य असतं.......
लाखमोलाची गोष्ट ४-६ ओळीत सांगितलीत भाऊ. मस्त.
कधी कातरवेळी.... संध्याकाळी ..... आठवणी जागवुन हे सगळे क्षण पुन्हा अनुभवणं... जगणं....
हम्म्म....छानच. म्हणजे, ...नकोच बुवा...नाही त्या गोष्टी नको त्या वेळी नकोत बोलायला. लगे रहो विजुभाऊ :)

मनिष गुरुवार, 05/22/2008 - 14:55
अगदीच राहवले नाही म्हणून माझ्या आवडत्या ओळींचे, जमेल तसे स्वैर भाषांतर....
मेरा युंही ख्वाबों मे खोये रहेना, और तुम्हारा वो ख्वाबों की तावीर की बातें करना, मै सहम जाऊ तो वो हलकेसे मुझे छू लेना... तुम्हारे छुने का अहेसास, वो छूने की मासुमियत, ये सब इतना लुभावना है, के हजार गमों को भी इनमे बह जाना है|
विजुभाऊ - जियो!

मनस्वी गुरुवार, 05/22/2008 - 15:29
त्यापुढे हजार चिंतांचा भार वाहणंही क्षम्य असतं....... त्यापुढे डोळ्यातुन पाण्याच्या धारा लागणंही क्षम्य असतं.......
छान जमलंय.

राजे गुरुवार, 05/22/2008 - 17:36
वार्‍यामुळे अवखळुन केसांचं तुझ्या गालांवर रुंजी घालणं...... तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं..... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं....... :) हे खास ! राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

विसोबा खेचर गुरुवार, 05/22/2008 - 17:40
आल्यावर डोळ्याच्या कोपर्‍यातुन मी किती रागावलोय ; याचा अंदाज घेणं..... तुझं हे असं पहाणं...... क्या बात है...! वार्‍यामुळे अवखळुन केसांचं तुझ्या गालांवर रुंजी घालणं...... तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं..... मार डाला! विजूभाऊ, सुंदर कविता...! तात्या.

शितल गुरुवार, 05/22/2008 - 17:47
वीजुभाऊ एकदम अफलातुन काव्य रचना,मस्त. स्वप्नातुन उतरून एवढे खतरनाक वास्तविक काव्य सही.

शितल गुरुवार, 05/22/2008 - 17:48
काव्यासाठी वेगळा विभाग सुरू करायला हवा. तात्या ऐकताय ना ?

वरदा गुरुवार, 05/22/2008 - 17:59
झक्कास्.....खूपच सुंदर कविता.... वार्‍यामुळे अवखळुन केसांचं तुझ्या गालांवर रुंजी घालणं...... तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं..... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं....... आय हाय!

प्राजु गुरुवार, 05/22/2008 - 18:59
माझं अधांतरी जगत स्वप्नं रंगवणं.... त्या स्वप्नांना तू जमिनीवर आणणं... आणि मी कावराबावरा असताना तुझं मला स्पर्ष करणं.... त्या स्पर्षाचा निरागसपणा अनुभवणं...... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे हजार चिंतांचा भार वाहणंही क्षम्य असतं....... हे अतिशय छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

स्वाती राजेश गुरुवार, 05/22/2008 - 20:30
कधी कातरवेळी.... संध्याकाळी ..... आठवणी जागवुन हे सगळे क्षण पुन्हा अनुभवणं... जगणं.... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे डोळ्यातुन पाण्याच्या धारा लागणंही क्षम्य असतं....... या ओळी खासच... आवडल्या.... बाकी, तुम्ही काव्य कधी पासून करायला सुरवात केली? सही आहे वरील कविता...

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 05/22/2008 - 20:59
विजुभाऊ, सगळीच कविता इतकी आवडली कि कुठल्या १-२ ओळिच आवडल्या म्हणून उल्लेखच करू शकत नाही. एकदम मस्त. (सुंदर कविता वाचून नि:शब्द झालेला) डॅनी. पुण्याचे पेशवे

यशोधरा गुरुवार, 05/22/2008 - 22:20
वार्‍यामुळे अवखळुन केसांचं तुझ्या गालांवर रुंजी घालणं...... तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं..... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं....... आय हाय! अगदी अगदी!! एकदमच आय हाय!! मस्तच लिहीलय!

धनंजय Fri, 05/23/2008 - 00:07
रम्य कल्पना. ती शेवटच्या कडव्यातील कल्पना फार आवडली! (पण शेवटचे कडवे बाकीच्या कवितेशी प्रवाहीपणे जोडलेले वाटत नाही - माझे तसे वाटणे क्षम्य असावे... )

विजुभौ,

प्रेमावर कितीही वेळ बोलत राहिलो, लिहित राहिलो तरी विषय कधीच न संपणारा,
रिकाम्या वेळात तो अनुभव आपल्या मनाभोवती पिंगा घालत असतो. तशी आपली
मनभर फिरणारी....सुंदर कविता.

'' क्लासला दांडी मारुन माझं बसस्टॊप वर
विनाकारण उभे रहाणं क्षम्य असत ''

आपण  बस स्टॉपवर तासन तास  वाट पाहावी,
अन् तिने आपल्या असण्याचा  लांबून अंदाज घ्यायचा अन
निघुन जायचं, हे तर फार जिव्हारी लागतं...!!!!


'' पण तुझं ते ओठांचा चम्बु करुन मान हलवत बोलणं
अन मानेच्या हालचाली बरोबर
ते कानातल्या लोलकांचे डुलणं .....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे उशीर झाल्याची शंभर कारणं सांगणही क्षम्य असतं "

बस, याचसाठी केला अट्टाहास तो क्षण सुखाचा व्हावा !!!!
अजूनही फावल्या वेळात सुंदर स्त्रीयांची  निरिक्षणे चालली,  तर कानातल्या लोलकांवर आमची  नजर हमखास जातेच.
टिकली जर चंद्रकोर असेल तर मेलोच आम्ही :)

''वार्‍यामुळे अवखळुन केसांचं
तुझ्या गालांवर रुंजी घालणं......
तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं.....
हे इतकं रम्य असतं की''

विजुभौ,  दिलसे  प्रेम ज्यानं  केलं, त्याला हे सर्व आठवतं, सुचतं.....
वा-यामुळे भुरभुरणा-या  केसांची बट मागे घेण्याची तिची अदा
जीवघेणीच...
.. आणि  हे सर्व केव्हा आठवतं माहित आहे

कधी कातरवेळी.... संध्याकाळी .....
आठवणी जागवुन हे सगळे क्षण
पुन्हा अनुभवणं... जगणं....
हे इतकं रम्य असतं की

डोळे खरंच भरतात की असे वाटायला लागते. या निमित्ताने  आम्हाला एका कवीच्या कवितेची आठवण होते.

" माझ्याच प्राक्तनात
का वैशाख उन आले,

जेथे विसावलो मी
तिथे तुफान आले. "

सारांश कविता तुमची असेल, पण अनुभव अनेकांचा  मांडला राव !!! लिखते रहो, विजुभौ

- दिलीप बिरुटे

गणा मास्तर Fri, 05/23/2008 - 20:05
वार्‍यामुळे अवखळुन केसांचं तुझ्या गालांवर रुंजी घालणं...... तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं..... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं....... हय क्या बात कही है

मदनबाण Sat, 05/24/2008 - 05:00
वार्‍यामुळे अवखळुन केसांचं तुझ्या गालांवर रुंजी घालणं...... तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं..... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं....... हे लई बेस्ट..... (अवखळ पोरगा) मदनबाण.....

बकुळफुले Sat, 05/24/2008 - 10:39
विजुभाउ प्रेमात पडलात की काय त्या मलेशियन ऍन ताइंच्या. बाकी मस्तच आहेत तुमचे शब्द. तुम्ही कविता लिहित असाल हे आमच्या स्वप्नात ही आले नव्हते ( तुमच्या स्वप्नात आले असेल आणि तुम्ही त्या धक्क्याने जागे झाले असाल) फक्त एक करा कविता तेवढ्या क्रमशः लिहु नका तुमच्या लेखनाचा आस्वाद घेणारी बकुळफुले

अजिंक्य गुरुवार, 05/29/2008 - 12:49
कधी कातरवेळी.... संध्याकाळी ..... आठवणी जागवुन हे सगळे क्षण पुन्हा अनुभवणं... जगणं.... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे डोळ्यातुन पाण्याच्या धारा लागणंही क्षम्य असतं....... क्या बात है!! मस्तच!! लगे रहो!!!

मृगनयनी Mon, 09/15/2008 - 12:52
ते कानातल्या लोलकांचे डुलणं ..... हे इतकं रम्य असतं की त्यापुढे उशीर झाल्याची शंभर कारणं सांगणही क्षम्य असतं....... मस्त!!!!.......... जबरा!!!......... चाबुक..... फंडु..... ..... ... .. . नि:शब्द!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! :) विजुभौ... परत १ कुतुहलः तुमचा 'प्रेम-विवाह' झालाये का?

In reply to by मृगनयनी

प्रभाकर पेठकर Mon, 09/15/2008 - 13:05
विजुभौ... परत १ कुतुहलः तुमचा 'प्रेम-विवाह' झालाये का? का त्या जखमी सैनिकाच्या जखमा डिवचता आहात? कविता छान आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

जैनाचं कार्ट Mon, 09/15/2008 - 13:10
>>>का त्या जखमी सैनिकाच्या जखमा डिवचता आहात? =)) का उगाच मीठ चोळत आहात असे देखील वाक्य येथे चालू शकेल ना पेठेकर'काका ;) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

विजुभाऊ Mon, 09/15/2008 - 13:18
मरहम लगाने के बहाने से सौ आयेंगे मरहम लगाने के बजाय जख्म कुरेद जायेंगे पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
लेखनविषय:
म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सार काही क्षम्य असतं पण प्रेमात पडतानाचा क्षण अनुभवणं....... हे इतके रम्य असते की त्यापुढे तू दिसावीस म्हणुन ; क्लासला दांडी मारुन माझं बसस्टॊप वर विनाकारण उभे रहाणं क्षम्य असतं त्यामुळे परिक्षेची एक दोन युद्ध हरणं ही क्षम्य असतं......... माझं ताटकळतं तुझी वाट पहात असणं...तुझं येणं... आल्यावर डोळ्याच्या कोपर्‍यातुन मी किती रागावलोय ; याचा अंदाज घेणं..... तुझं हे असं पहाणं...... हे इतके रम्य असतं की त्यापुढे तुझं मला तासभर उन्हात ताटकळवणंही क्षम्य असतं.......

वडाप

शैलेन्द्र ·

In reply to by आनंदयात्री

कुंदन गुरुवार, 05/22/2008 - 14:47
खाजगी जीप्स ला वडाप म्हणत असावेत से वाटते , जस्से ६ आसनी ला डुक्कर रिक्षा ऐकल्याचे स्मरते ...

In reply to by आनंदयात्री

भडकमकर मास्तर गुरुवार, 05/22/2008 - 14:52
( भरपूर प्रवासी कोंबून) शेअर पद्धतीने चालवल्या जाणार्‍या वाहनाला ( जीप / रिक्षा ) वडाप असे म्हणतात... हा शब्द मी कोल्हापूर सांगली भागात जास्त वापरला जाताना पाहिला आहे... बाकीकडे ही असेल... __________________- लेख सुरुवात छान आहे...पण प्लीज टाकायची घाई नका बुवा करू... निवांत लिहा.... लेख पूर्ण करा ,मग वाट्टेल तेवढ्या भागात टाका... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मनस्वी गुरुवार, 05/22/2008 - 15:14
लेख पूर्ण करा ,मग वाट्टेल तेवढ्या भागात टाका...
सहमत.

मनस्वी गुरुवार, 05/22/2008 - 14:52
चांगले लिहिलेय. वडाप म्हणजे काय. कसारा लोकलने मी पण प्रवास करते.. मामाकडे जाताना.. वाशिंद / खर्डी / नाशिक :) भाग जरा मोठे लिहि शैलेंद्र.

धमाल मुलगा गुरुवार, 05/22/2008 - 14:56
येऊद्या अजुन, छान लिहिता आहात की :)
(पुढे लवकरच, पहिलाच प्रयत्न, टक लेखनास वेळ लागतोय)
असं मुळीच वाटत नाहीय्ये.
टक लेखनास वेळ लागतोय
सोप्पं आहे. http://www.misalpav.com/node/1312 हे एका खिडकीत उघडून ठेवा...फटाफट काम होईल. :) पु.ले.शु. थोरले आनंदराव, वडाप म्हणजे 'भाड्याची गाडी' (इथं शिवी नाहीय्ये..नीट वाचावे.) जश्या चेंबूरहून / वाशी-नाक्यावरुन पुण्याला जायला सुमो, तवेरा, स्कॉर्पिओ इ.इ. गाड्या असतात, त्या वडाप (जरा दिसायला बिसायला लैच भारी असतात नै नावापेक्षा?) हा शब्द सांगली-मिरज-कोल्हापूरकडे जास्त ऐकायला मिळतो :) तिथे ६ आसनी रिक्षांनाही वडाप म्हणतात.

शैलेन्द्र गुरुवार, 05/22/2008 - 15:00
मोठच लिहायच होत, पण अजुन कि बोर्ड वर हात नहि बसलेला.. वडाप म्हणजे खाजगी , ट्प्प्याचि वाहतुक करणारि वाहन..

तात्या विंचू गुरुवार, 05/22/2008 - 16:18
थोडक्यात वडाप म्हणजे.... कितिपण बसवा आणि वडा (ओढा)... रिक्षा टॅक्सी इ. वाहनाना प्रवासी बसवून घ्यायची मर्यादा असते..... वडापला ती मर्यादा नसते....... अतिशय स्वस्तात आपण जाउ शकतो....... -(वडाप प्रेमी) तो मी नव्हेच

सुमीत गुरुवार, 05/22/2008 - 20:02
सुरूवात अप्रतिम, छान लिहित आहात. पुढचा भाग येऊ दे लवकर

झकासराव गुरुवार, 05/22/2008 - 20:29
हा शब्द कोल्हापुर सांगली बाजुलाच वापरला जातो. वडापचा अर्थ बेकायदेशीर पणे केलेली टप्पा वाहतुक. कोल्हापुर जोतिबा, कोल्हापुर मलकापुर/ बांबवडे ह्या रूट वर वडाप जोरात सुरु असते. एका जीप मध्ये भरपुर प्रवासी कोंबुन वाहतुक असते. त्यातली सगळ्यात मोठी गम्मत म्हणजे पुढे ड्रायव्हर कोठे बसला आहे हे नीरखुन पहावे लागते कारण पुढे बसवलेली माणसं. सुरवात तर छान झाली आहे. पुढचे भाग पटापट येवुदेत. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

विसोबा खेचर Fri, 05/23/2008 - 09:00
ष्टोरी अंमळ इंटरेस्टिंग वाटते आहे.. फुडला पर्ट येऊ द्या सत्वर झणी! तात्या.

In reply to by आनंदयात्री

कुंदन गुरुवार, 05/22/2008 - 14:47
खाजगी जीप्स ला वडाप म्हणत असावेत से वाटते , जस्से ६ आसनी ला डुक्कर रिक्षा ऐकल्याचे स्मरते ...

In reply to by आनंदयात्री

भडकमकर मास्तर गुरुवार, 05/22/2008 - 14:52
( भरपूर प्रवासी कोंबून) शेअर पद्धतीने चालवल्या जाणार्‍या वाहनाला ( जीप / रिक्षा ) वडाप असे म्हणतात... हा शब्द मी कोल्हापूर सांगली भागात जास्त वापरला जाताना पाहिला आहे... बाकीकडे ही असेल... __________________- लेख सुरुवात छान आहे...पण प्लीज टाकायची घाई नका बुवा करू... निवांत लिहा.... लेख पूर्ण करा ,मग वाट्टेल तेवढ्या भागात टाका... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

मनस्वी गुरुवार, 05/22/2008 - 15:14
लेख पूर्ण करा ,मग वाट्टेल तेवढ्या भागात टाका...
सहमत.

मनस्वी गुरुवार, 05/22/2008 - 14:52
चांगले लिहिलेय. वडाप म्हणजे काय. कसारा लोकलने मी पण प्रवास करते.. मामाकडे जाताना.. वाशिंद / खर्डी / नाशिक :) भाग जरा मोठे लिहि शैलेंद्र.

धमाल मुलगा गुरुवार, 05/22/2008 - 14:56
येऊद्या अजुन, छान लिहिता आहात की :)
(पुढे लवकरच, पहिलाच प्रयत्न, टक लेखनास वेळ लागतोय)
असं मुळीच वाटत नाहीय्ये.
टक लेखनास वेळ लागतोय
सोप्पं आहे. http://www.misalpav.com/node/1312 हे एका खिडकीत उघडून ठेवा...फटाफट काम होईल. :) पु.ले.शु. थोरले आनंदराव, वडाप म्हणजे 'भाड्याची गाडी' (इथं शिवी नाहीय्ये..नीट वाचावे.) जश्या चेंबूरहून / वाशी-नाक्यावरुन पुण्याला जायला सुमो, तवेरा, स्कॉर्पिओ इ.इ. गाड्या असतात, त्या वडाप (जरा दिसायला बिसायला लैच भारी असतात नै नावापेक्षा?) हा शब्द सांगली-मिरज-कोल्हापूरकडे जास्त ऐकायला मिळतो :) तिथे ६ आसनी रिक्षांनाही वडाप म्हणतात.

शैलेन्द्र गुरुवार, 05/22/2008 - 15:00
मोठच लिहायच होत, पण अजुन कि बोर्ड वर हात नहि बसलेला.. वडाप म्हणजे खाजगी , ट्प्प्याचि वाहतुक करणारि वाहन..

तात्या विंचू गुरुवार, 05/22/2008 - 16:18
थोडक्यात वडाप म्हणजे.... कितिपण बसवा आणि वडा (ओढा)... रिक्षा टॅक्सी इ. वाहनाना प्रवासी बसवून घ्यायची मर्यादा असते..... वडापला ती मर्यादा नसते....... अतिशय स्वस्तात आपण जाउ शकतो....... -(वडाप प्रेमी) तो मी नव्हेच

सुमीत गुरुवार, 05/22/2008 - 20:02
सुरूवात अप्रतिम, छान लिहित आहात. पुढचा भाग येऊ दे लवकर

झकासराव गुरुवार, 05/22/2008 - 20:29
हा शब्द कोल्हापुर सांगली बाजुलाच वापरला जातो. वडापचा अर्थ बेकायदेशीर पणे केलेली टप्पा वाहतुक. कोल्हापुर जोतिबा, कोल्हापुर मलकापुर/ बांबवडे ह्या रूट वर वडाप जोरात सुरु असते. एका जीप मध्ये भरपुर प्रवासी कोंबुन वाहतुक असते. त्यातली सगळ्यात मोठी गम्मत म्हणजे पुढे ड्रायव्हर कोठे बसला आहे हे नीरखुन पहावे लागते कारण पुढे बसवलेली माणसं. सुरवात तर छान झाली आहे. पुढचे भाग पटापट येवुदेत. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

विसोबा खेचर Fri, 05/23/2008 - 09:00
ष्टोरी अंमळ इंटरेस्टिंग वाटते आहे.. फुडला पर्ट येऊ द्या सत्वर झणी! तात्या.
लेखनविषय:
लेखनप्रकार
वडाप.. सेन्ट्रल लाईनवरच शेवटच स्टेशन... कसारा.... लोकल मधुन ऊतरलेली गर्दी, उताराकडे वाहणारया पाण्यासारखी एकाच दिशेने वाहते आणि ऊभ्या आड्व्या लावलेल्या बस आणि जीप वर आदळत तिथेच जिरते. घाट माथ्यावर असलेल्या या गावाच हेच प्रयोजन आहे.. या गावात उतरलेली सगळी गर्दी पोटात घेवून महामन्ड्ळाचे लाल डबे आणि खाजगी जीप्स फुर्फुरत घाट चढायला लागतात.. नाशिकच्या दिशेने.. तिथेच तो ऊभा असयचा, कचरू , कचरूच नाव होत त्याच बहुदा.. बहुतेक सगळ्या गाड्या नाशिककडे जायच्या.

नेहमीच धडकी भरते...!

बेसनलाडू ·

धमाल मुलगा गुरुवार, 05/22/2008 - 12:39
ही शांत, सुभगशी संध्या पण किंचित उदासवाणी... ! ओट्यावर, ज़मिनीवर ना सांडले दूध वा पाणी... ?
:)
झटक्यात उगवशी केव्हा मी वडे,भजी तळताना... ! मोरीत उगवशी माझ्या कांतीला उजळवताना... !
अरे वा... हे असं पण असु शकतं? आयला, कसं काय जमतं बुवा तुम्हा लोकांना एव्हढ्याश्या गोष्टींवरुन सुध्दा कविता गज़ला करायला? छान. चालू द्या... अवांतरः बेसनलाडूचे दर्शन बर्‍याच दिवसांनी घडले...छान!

फटू Fri, 05/23/2008 - 01:01
तशा कविता आम्हीही लिहितो... पण आमची प्रतीभा अश्रू आणि प्रेम याच्यापुढे एक पाऊलही टाकायला मागत नाही... लय भारी राव... अगदी छान जमलं आहे विडंबन... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

चतुरंग Fri, 05/23/2008 - 01:43
छान विडंबन. (स्वगत - हम्म्..केशवा, बिघडायला लागली बरं का रे मंडळी एकेक करुन. ह्याच साठी केला होता अट्टाहास! ;) ) चतुरंग

केशवसुमार Fri, 05/23/2008 - 09:52
बेसनशेठ, विडंबन आवडले.. मोरीत उगवशी माझ्या कांतीला उजळवताना... ! ह्या वरून आम्हाला आमच्या कंदिल - द दिवा विडंबनातला मी दार लावलेले, वरती कुलूप सुद्धा बोका घुसे कसा हा न्हाणीघरात माझ्या? ह्या द्विपदी आठवल्या.. (वाचक) केशवसुमार

धमाल मुलगा गुरुवार, 05/22/2008 - 12:39
ही शांत, सुभगशी संध्या पण किंचित उदासवाणी... ! ओट्यावर, ज़मिनीवर ना सांडले दूध वा पाणी... ?
:)
झटक्यात उगवशी केव्हा मी वडे,भजी तळताना... ! मोरीत उगवशी माझ्या कांतीला उजळवताना... !
अरे वा... हे असं पण असु शकतं? आयला, कसं काय जमतं बुवा तुम्हा लोकांना एव्हढ्याश्या गोष्टींवरुन सुध्दा कविता गज़ला करायला? छान. चालू द्या... अवांतरः बेसनलाडूचे दर्शन बर्‍याच दिवसांनी घडले...छान!

फटू Fri, 05/23/2008 - 01:01
तशा कविता आम्हीही लिहितो... पण आमची प्रतीभा अश्रू आणि प्रेम याच्यापुढे एक पाऊलही टाकायला मागत नाही... लय भारी राव... अगदी छान जमलं आहे विडंबन... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

चतुरंग Fri, 05/23/2008 - 01:43
छान विडंबन. (स्वगत - हम्म्..केशवा, बिघडायला लागली बरं का रे मंडळी एकेक करुन. ह्याच साठी केला होता अट्टाहास! ;) ) चतुरंग

केशवसुमार Fri, 05/23/2008 - 09:52
बेसनशेठ, विडंबन आवडले.. मोरीत उगवशी माझ्या कांतीला उजळवताना... ! ह्या वरून आम्हाला आमच्या कंदिल - द दिवा विडंबनातला मी दार लावलेले, वरती कुलूप सुद्धा बोका घुसे कसा हा न्हाणीघरात माझ्या? ह्या द्विपदी आठवल्या.. (वाचक) केशवसुमार
लेखनविषय:
प्रदीप कुलकर्णींच्या प्राणाची तुळस बहरलेली पाहून आम्हांला मात्र धडकी भरली :) भरदार तुझ्या दिसण्याने नेहमीच धडकी भरते... ! झाडु घेउनी उभा ज़री बिन् दिक्कत ही अवतरते... ! तो तुझाच - खोलीमधला कुरतडला गाउन, सदरा... ! अन् तुझ्याच हाय कृपेने भार्येचा चढतो पारा... ! या मंत्रभारल्या वेळी मी इथे एकटा नाही... ! ते तुझेच - उंदिर,झुरळे मावश्या नि बोके काही... ! ही शांत, सुभगशी संध्या पण किंचित उदासवाणी... ! ओट्यावर, ज़मिनीवर ना सांडले दूध वा पाणी... ? झटक्यात उगवशी केव्हा मी वडे,भजी तळताना... ! मोरीत उगवशी माझ्या कांतीला उजळवताना...

सुंदरा मनामधे..

ऋचा ·

आर्य गुरुवार, 05/22/2008 - 16:00
सुंदरा मना मधे भरली, जरा नाही ठरली । हवेलीत शिरली, मोत्याच भांग ॥ सिंह सम कटी, ऊभी ऐकटी...........गळ्या मधे हार अंगी तारुण्याचा बहर ज्वानीचा कहर, मारीते लहर मदन तलवार । (मराठा सरदार) आर्य

विसोबा खेचर Fri, 05/23/2008 - 09:08
मस्त ठसकेवाज लावणी आहे. अगदी सुरेल आणि खड्या आवाजात गायली आहे, काव्यही झकास आहे... मजा आली ऐकायला.. आपला, (लावणीप्रेमी) तात्यासरपंच.

फटू Fri, 05/23/2008 - 09:36
आमचे डिसोझा सर त्यांच्या अमराठी मराठी मध्ये ही कविता अशी काही शिकवायचे की बास... त्यांचं ते सुंदरेचं वर्णन चुकुन राम जोशानी ऐकलं असतं तर कपाळावर हात मारुन घेतला असता... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

नीलकांत Sat, 05/24/2008 - 18:55
राम जोशींची ही लावणी शाळेत असल्यापासून आवडती आहे. युट्युबवर हल्ली खुप मराठी व्हिडीओज सापडतात. मजा आहे. नीलकांत

In reply to by नीलकांत

पिवळा डांबिस Mon, 05/26/2008 - 09:34
सुंदर लावणी आहे. गायलीयही मस्त!! नीलकांतराव, तुमचा कंप्यूटर आणि आंतरजालावरचा अनुभव मोठा आहे म्हणून विचारतो, तुम्हाला कुठे "महाराष्ट्रदेश सुंदरा" ही लावणी दृक वा श्राव्य स्वरूपात कुठे आढळली का हो? बर्‍याच दिवसापासून मी शोधतो आहे, तिची सुरवात, "अहा! हा देश कैसा छान.... जसं केवड्याचं रान...." अशी आहे बहुतेक..... -डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

नीलकांत Tue, 05/27/2008 - 10:24
ही लावणी अद्याप ऐकली नाही. वाचण्यात सुध्दा नाही आली. काही दुर्मीळ मराठी गाणी येथे मिळतात. मात्र तेथे सुध्दा शोध घेतला असता ही लावणी सापडली नाही. http://www.cooltoad.com http://www.esnips.com नीलकांत

मदनबाण Mon, 05/26/2008 - 09:33
दुव्या बद्दल धन्यवाद.....मला लावणी ऐकण्यास फार आवडते. लावण्यांमधील सवाल-जवाब हा प्रकार फार आवडतो... अवांतर :-- मला आवडणार एक गाण..(ही लावणी नाही..) http://www.youtube.com/watch?v=QjZ_9XD1njY&feature=related

नीलकांत Tue, 05/27/2008 - 11:11
वार्‍यावरती वरात मधे ही लावणी असेल तर मग तर अगदी सोपं झालंय. युट्युब वर वार्‍यावरती वरातचा मूळ व्हिडीओ आहे. ज्यात भाईकाकांनी काम केलंय. त्याचा दूवा हा. शेजारच्या खिडकीत पुढील भागांचे दूवे मिळतील. जरा गुगल केलं की हे व्हिडीओ उतरवून घेता येतात. ह्या नाटकाचे mp3 येथे आहेत. येथून सुध्दा गाणी उतरवून घेता येतात. हा दूवा वापरता येईल. येथील चौकटीत दूवा द्या आणि टिचकी मारा. नव्या पानावर उतरवून घेण्याजोगा दूवा असेल. नीलकांत

आर्य गुरुवार, 05/22/2008 - 16:00
सुंदरा मना मधे भरली, जरा नाही ठरली । हवेलीत शिरली, मोत्याच भांग ॥ सिंह सम कटी, ऊभी ऐकटी...........गळ्या मधे हार अंगी तारुण्याचा बहर ज्वानीचा कहर, मारीते लहर मदन तलवार । (मराठा सरदार) आर्य

विसोबा खेचर Fri, 05/23/2008 - 09:08
मस्त ठसकेवाज लावणी आहे. अगदी सुरेल आणि खड्या आवाजात गायली आहे, काव्यही झकास आहे... मजा आली ऐकायला.. आपला, (लावणीप्रेमी) तात्यासरपंच.

फटू Fri, 05/23/2008 - 09:36
आमचे डिसोझा सर त्यांच्या अमराठी मराठी मध्ये ही कविता अशी काही शिकवायचे की बास... त्यांचं ते सुंदरेचं वर्णन चुकुन राम जोशानी ऐकलं असतं तर कपाळावर हात मारुन घेतला असता... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

नीलकांत Sat, 05/24/2008 - 18:55
राम जोशींची ही लावणी शाळेत असल्यापासून आवडती आहे. युट्युबवर हल्ली खुप मराठी व्हिडीओज सापडतात. मजा आहे. नीलकांत

In reply to by नीलकांत

पिवळा डांबिस Mon, 05/26/2008 - 09:34
सुंदर लावणी आहे. गायलीयही मस्त!! नीलकांतराव, तुमचा कंप्यूटर आणि आंतरजालावरचा अनुभव मोठा आहे म्हणून विचारतो, तुम्हाला कुठे "महाराष्ट्रदेश सुंदरा" ही लावणी दृक वा श्राव्य स्वरूपात कुठे आढळली का हो? बर्‍याच दिवसापासून मी शोधतो आहे, तिची सुरवात, "अहा! हा देश कैसा छान.... जसं केवड्याचं रान...." अशी आहे बहुतेक..... -डांबिसकाका

In reply to by पिवळा डांबिस

नीलकांत Tue, 05/27/2008 - 10:24
ही लावणी अद्याप ऐकली नाही. वाचण्यात सुध्दा नाही आली. काही दुर्मीळ मराठी गाणी येथे मिळतात. मात्र तेथे सुध्दा शोध घेतला असता ही लावणी सापडली नाही. http://www.cooltoad.com http://www.esnips.com नीलकांत

मदनबाण Mon, 05/26/2008 - 09:33
दुव्या बद्दल धन्यवाद.....मला लावणी ऐकण्यास फार आवडते. लावण्यांमधील सवाल-जवाब हा प्रकार फार आवडतो... अवांतर :-- मला आवडणार एक गाण..(ही लावणी नाही..) http://www.youtube.com/watch?v=QjZ_9XD1njY&feature=related

नीलकांत Tue, 05/27/2008 - 11:11
वार्‍यावरती वरात मधे ही लावणी असेल तर मग तर अगदी सोपं झालंय. युट्युब वर वार्‍यावरती वरातचा मूळ व्हिडीओ आहे. ज्यात भाईकाकांनी काम केलंय. त्याचा दूवा हा. शेजारच्या खिडकीत पुढील भागांचे दूवे मिळतील. जरा गुगल केलं की हे व्हिडीओ उतरवून घेता येतात. ह्या नाटकाचे mp3 येथे आहेत. येथून सुध्दा गाणी उतरवून घेता येतात. हा दूवा वापरता येईल. येथील चौकटीत दूवा द्या आणि टिचकी मारा. नव्या पानावर उतरवून घेण्याजोगा दूवा असेल. नीलकांत
लेखनविषय:
लेखनप्रकार
हा दुवा पहा http://www.youtube.com/watch?v=e7zWwlSZPHo ही लावणी मला अगदी लहानपणा पासुन म्हणजे १० असल्यापासुन आवडते. (१० ही कविता होती मराठीत) ह्यातीम उपमा फारच सुंदर आहेत.

लेमन राईस

शितल ·

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/22/2008 - 23:21
ह्या भाताला थोडा लिंबू रंग जरूर असावा. त्यासाठी अगदी किंचित हळद (२ वाट्या भाताला १/८ टीस्पून किंवा कमी) वापरावी. तसेच लिंबाचे साल किसून तेही मिसळावे म्हणजे लिंबाचा नुसता आंबटपणा न येता त्याची ताजी लिंबूचवही येते.

स्वाती राजेश Fri, 05/23/2008 - 00:04
मी फोडणी मधे वाळलेल्या लाल मिरच्या ,उडिदडाळ १ च.,हरभराडाळ १च.टाकते. साउथ इंडियन मैत्रिणीकडून शिकले.. बाकी रेसिपी सेम....

In reply to by स्वाती राजेश

स्वाती दिनेश Fri, 05/23/2008 - 11:52
मी फोडणी मधे वाळलेल्या लाल मिरच्या ,उडिदडाळ १ च.,हरभराडाळ १च.टाकते. मी सुध्दा,:) आणि लिंबाचा रस गॅस बंद केल्यावर टाकते आणि सगळीकडे लागेल असा एकत्र करुन घेते. स्वाती

चिमणराव Fri, 05/23/2008 - 10:01
आमच्या काऊला हे करायला सांगतो, अगं......... काऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ अरे मोर्‍या, तुझ्या आईला सांग की बाबा बोलवतायतं.

प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/22/2008 - 23:21
ह्या भाताला थोडा लिंबू रंग जरूर असावा. त्यासाठी अगदी किंचित हळद (२ वाट्या भाताला १/८ टीस्पून किंवा कमी) वापरावी. तसेच लिंबाचे साल किसून तेही मिसळावे म्हणजे लिंबाचा नुसता आंबटपणा न येता त्याची ताजी लिंबूचवही येते.

स्वाती राजेश Fri, 05/23/2008 - 00:04
मी फोडणी मधे वाळलेल्या लाल मिरच्या ,उडिदडाळ १ च.,हरभराडाळ १च.टाकते. साउथ इंडियन मैत्रिणीकडून शिकले.. बाकी रेसिपी सेम....

In reply to by स्वाती राजेश

स्वाती दिनेश Fri, 05/23/2008 - 11:52
मी फोडणी मधे वाळलेल्या लाल मिरच्या ,उडिदडाळ १ च.,हरभराडाळ १च.टाकते. मी सुध्दा,:) आणि लिंबाचा रस गॅस बंद केल्यावर टाकते आणि सगळीकडे लागेल असा एकत्र करुन घेते. स्वाती

चिमणराव Fri, 05/23/2008 - 10:01
आमच्या काऊला हे करायला सांगतो, अगं......... काऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ अरे मोर्‍या, तुझ्या आईला सांग की बाबा बोलवतायतं.
साहित्य :- १. भात २ वाटी, (शीळा असल्यास उत्तम) २. मोहरी, जीरे, कडीपत्ता, हिरवी मिरची, लि॑बु, तेल, साखर, मीठ, तुप, कोथ॑बीर. कृती :- भात मोकळा करून घ्यावा, फोडणीसाठी तीन चमचे तेल घ्यावे, तेल तापल्यावर त्या मध्ये हि.मिरची चे बारीक तुकडे टाकावेत, न॑तर कडिपत्ता टाकावा, मग मोहरी, जीरे टाकुन भात त्याफोडणीत भात घालावा, मीठ, साखर घालावे (अ॑दाजे स्वतःला लागणार्‍या गोडी नुसार), लि॑बु पिळावा (जास्त दाबुन नको नाहीतर सालीचा कडवटपणा ही त्यात उतरेल) व भात छान परतावा. (साधारण दोन वाट्याला अर्धा लि॑बु लागेल, लि॑बाचा आकारावर आणि आ॑बटपणावर ते अवल॑बुन आहे.

माझे मन तुझे झाले...

विसोबा खेचर ·

ऍडीजोशी Wed, 05/21/2008 - 21:13
तात्या आपले आभार कसे मानू हे कळत नाहिये. मी सुद्ध हे गाणं कधी पासून शोधत होतो. पुन्हा एकदा धन्यवाद. अक्षरश: भिडतं उलट प्रेम तर बर्‍याचदा मुकंच असतं! ते एकमेकांचं एकमेकांनी समजून घ्यायचं असतं! १०००००% सहमत आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

वाटाड्या... Wed, 05/21/2008 - 21:15
वाह, तात्या... आज बर्‍याच दिवसांनी संगिताच्या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद. पुरियाधनश्री मध्ये इतकी आर्तता दुसर्‍या कुठल्या रागात क्वचीतच आढळते. फारच छान राग. शब्द भिडतात ह्या गाण्याचे... असेच संगीत विषयक रागदारी लेख येऊ द्यात हीच विनंती. आपला, मुकुल

अप्रतिम. तुझे वेदनेवरचे भाष्य पण खरे आहे. जगातील बहुतेक सर्व महान साहित्यकृति ह्या वेदनेतूनच जन्माला आल्या आहेत किंवा परिणत झाल्या आहेत. रामायण हे क्रौंच युगुलाच्या वेदनेने प्रेरित झाले तर महाभारतामध्ये सुद्धा जगातील काही महानतम वेदनादायक घटना आहेत. अभिजात प्राचीन ग्रीक साहित्य तर 'ट्रॅजेडी' साठीच प्रसिद्ध आहे. दुव्या साठी धन्यवाद. (मृणाल कुलकर्णीचा फॅन) बिपिन. अवांतरः 'दुव्या साठी' की 'दुव्यासाठी' :D

मानस Wed, 05/21/2008 - 21:41
फारच सुरेख, इतक्या हळुवारपणे या गाण्याचं विश्लेषण केलं आहे .......... गाण्याला व तात्यांना दोघांना मनापासून दाद.

ईश्वरी Wed, 05/21/2008 - 21:48
फारच छान लिहीलंत तात्या. गाण्याचं विश्लेषण समर्पक शब्दात केले आहे. या निमित्ताने 'स्वामी ' मालिकेची आठवण जागी झाली. त्याकाळची माझी आवडती मालिका होती गाण्याला व तात्यांना दोघांना मनापासून दाद. -- हेच म्हणते मी ईश्वरी

वरदा Wed, 05/21/2008 - 22:12
तात्या मस्तच लिहिलय्... हे गाणं मलाही खूप आवडतं....छान वाटलं एकदम...

प्रभाकर पेठकर Wed, 05/21/2008 - 22:22
गाण्यातील व्याकरण समजले नाही तरी गोडवा जाणवतो. स्वामी ही एक उत्कट मालीका होती. रविंद्र मांकणींचा कसदार अभिनय, मृणाल कुळकर्णींची लावण्यवती रमा, राघोबादादांमधील 'राघोबत्व' ह्या सर्व जमेच्या बाजूंनी 'स्वामी' अजरामर झाले. धन्यवाद तात्या.

विसोबा खेचर गुरुवार, 05/22/2008 - 00:34
यावरून थोरले आबासाहेब व सईबाईसाहेबांचा विचार मनात येतो! सईबाई ही थोरल्या आबासाहेबांची अत्यंत लाडकी! परंतु थोरले आबासाहेब सतत मोहिमेवर! त्यातच सईबाईंचे निधनही फार लवकरच झाले. त्यामुळे त्याही थोरल्या आबासाहेबांना फारश्या लाभल्या नाहीत! थोरल्या आबासाहेबांची राजकीय कारकीर्द तर तुम्हाआम्हाला तोंडपाठ आहे. परंतु सईबाईच्या निधनामुळे तो पहाड मनातल्या मनात किती ढासळला असेल, आतल्या आत किती दु:खी झाला असेल हे तुम्हाआम्हाला कधी कळलंच नाही आणि कळणारही नाही! अजून एक पुरियाधनाश्री! दुसरं काय?! आपला, (थोरल्या आबासाहेबांचा निस्सीम भक्त!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रशु Tue, 03/23/2010 - 00:19
तात्या टचकन डोळ्यात पाणी ऊभं केलत. ह्या असामान्य लोकांच्या खाजगी आयुष्यात ह्या अश्या घटना नेहमी आढळतात...

प्रियाली गुरुवार, 05/22/2008 - 00:57
हे शीर्षक गीत आणि स्वामी मालिका डोक्यात फिट्ट आहेत परंतु वरील गाणे विस्मृतीत गेले होते. तात्या लेख आवडला आणि स्वामी मालिकेच्या आठवणी जाग्या झाल्या.

In reply to by प्रियाली

ऍडीजोशी गुरुवार, 05/22/2008 - 10:32
जो जनतेचे रक्षण करतो, पालन करतो हे गाणं कुठे मिळू शकेल का? किमान लिरीक्स??? आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

अर्धवटराव गुरुवार, 11/25/2010 - 07:28
जो जनतेचे रक्षण करितो... पोषण करितो... पालन करितो... तोच पीता... साक्षात मानावा... जन्म दे तो.. निमित्त केवळ. अर्धवटराव

विकास गुरुवार, 05/22/2008 - 01:32
शिर्षक गीत (जो जनतेचे..) आणि अंतीम गीत (माझे मन...) दोन्ही डोक्यात बसलेली गाणी. पुरीयाधनश्रीच्या माहीतीबद्दल धन्यवाद! >>>ऐन तारुण्यात माधवरावांच्या आयुष्याची संध्याकाळ व्हावी आणि ही भावना, ही पार्श्वभूमी हे गाणं ऐकत असताना सतत कुठेतरी जाणवते! म्हणून तर मोघेसाहेबांनी या गाण्याकरता पुरियाधनाश्री निवडला असेल आणि एका विराणी स्वरुपात हे गाणं आपल्यापुढे मांडलं असेल असं मला वाटतं! छान विश्लेषण. १००% पटले. ________ या गाण्या संदर्भात अजून एक आठवत असलेला भागः स्वामी मालीका चालू असताना अथवा त्याच सुमारास राजस्थान मधील रूपकंवरच्या सतीचा किस्सा घडला होता. आणि त्यावर स्वाभावीक आरडाओरडा चालू होता. त्यात स्वामी नाटकाचा शेवट हा रमाबाईंच्या सती जाण्याने असल्यामुळे काही संघटना ते दाखवायला अथवा त्याचा उल्लेख करायला विरोध करत होत्या. तो भाग न सांगणे म्हणजे कादंबरी आणि इतिहासावर अन्याय असे इतरांचे म्हणणे. त्यातून कल्पकता दाखवून या गाण्याचा उपयोग केला गेला होता. स्वामी कादंबरीत माधवरावांच्या निधनाच्या वेळचे जे हेलावून टाकनारे वर्णन आहे, ते चित्ररूपाने दाखवत त्यांनी त्यांचे डोळे मिटताच बाकी "फिल्मी सेंटीमेंटलपणा" न करता दोन पांढरे पक्षि एकत्र उडत आकाशात जात असताना आणि त्याच वेळेस तीच जोगीण हे गाणे म्हणत रानावनातून फिरताना दाखवली होती. अर्थातच हा प्रसंग फिल्मी नसला तरी भावनात्मक नक्कीच झाला आणि म्हणूनच दिग्दर्शकाच्या (आणि माझ्या सारख्या प्रेक्षकांच्या) दृष्टीने यशस्वीपण ठरला. त्यामुळे दोन आत्मे एकमेकात विलीन होत असताना ते, ते एकमेकांना संबोधून आणि जोगीण तेच गाणे ईश्वराला संबोधून म्हणत संसारापासून लांब जात आहे असा "सटल" अर्थ त्यातून ध्वनीत केला गेला आणि रमाबाई सती गेली, कशी गेली, त्याला प्रोत्साहन दिले का नाही इत्यादी प्रश्न दूर राहीले!

In reply to by विकास

विसोबा खेचर गुरुवार, 05/22/2008 - 06:11
चित्ररूपाने दाखवत त्यांनी त्यांचे डोळे मिटताच बाकी "फिल्मी सेंटीमेंटलपणा" न करता दोन पांढरे पक्षि एकत्र उडत आकाशात जात असताना आणि त्याच वेळेस तीच जोगीण हे गाणे म्हणत रानावनातून फिरताना दाखवली होती. विकासराव, आपली आठवण अगदी बरोबर आहे. ती जोगिण हे गाणं गात आहे आणि या गाण्याच्या पार्श्वभूमीवर दोन पक्षी आकाशात उडत गेलेले दाखवत या मालिकेचा अतिशय सुंदर व टचिंग शेवट साधला होता... तात्या.

In reply to by विकास

ए.चंद्रशेखर गुरुवार, 11/25/2010 - 07:49
श्री. विकास यांनी सांगितलेली आठवण अगदी बरोबर आहे. स्वामी मालिकेचे जे चित्रीकरण प्रथम झाले होते त्यात रमाबाई सती जाते असा प्रसंग शेवटच्या भागात होता. त्याच सुमारास राजस्थानमधे रूपकुंवर ही महिला सती गेली व त्यावरून प्रचंड वादळ उठले. सतीच्या प्रथेचे कोणत्याही प्रकाराने गौरवीकरण माध्यमातून केले जाऊ नये असा योग्य निर्णय त्यावेळी सरकारने घेतला. मूळ कथेतील गंभीरता तर टिकली पाहिजे पण सती जाणे या परंपरेचा साधा उल्लेखही होता कामा नये या कात्रीत सापडलेले मालिकेचे लेखक व दिग्दर्शक यांनी हे गाणे वापरून या मालिकेची हृदयाला भिड्णारी समाप्ती केली होती.

शितल गुरुवार, 05/22/2008 - 05:58
तात्या, गाणे ऐकुन खुप छान वाटले. स्वामी का॑दबरी वाचली पण सिरीअल पाहिली नाही एकाचित बाल्य अवस्थेत असु त्यावेळी.

डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 05/22/2008 - 08:10
'स्वामी' काद॑बरी म्हणजे एक साहित्यलेण॑च आहे.. सुदैवाने त्यावर आधारित मालिकाही चा॑गली झाली होती. गजानन जागीरदारा॑सारखे अनुभवी दिग्दर्शक आणि श्रीका॑त मोघे॑सारखे कल्पक निर्माते लाभल्यामुळे मालिका जमली. सगळी पात्रे काद॑बरी वाचता॑ना जशी इमॅजिन केली होती तशीच होती. माधवराव- रवि॑द्र म॑कणी, रमाबाई- मृणाल देव, गोपिकाबाई- दया डो॑गरे, राघोबा- श्रीका॑त मोघे, सखारामबापू- सुधीर दळवी, त्र्य॑बकमामा पेठे- रवि पटवर्धन, ग॑गोबातात्या- बाळ कर्वे, श्रीपती- उदय टिकेकर, विसाजीप॑त लेले- अन॑त जोग, मल्हाररा॑व होळकर- सूर्यका॑त, रामशास्त्री- अभ्य॑कर (नाव विसरलो) अशी सॉलिड स्टारकास्ट होती. स्वामीचे चित्रिकरण पुण्यातल्या विश्रामबागवाड्यात झाले होते. मस्त लिहिले आहेत तात्या.. पुरिया धनश्रीतल्या 'पायलिया झनकार..' ची रम्य आठवण झाली. हाच राग ए.आर. रहमानने 'हाये रामा ये क्या हुआ' (र॑गीला) या गाण्यात मस्त वापरला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/22/2008 - 08:30
तात्या, गाण्याचं विश्लेषण मस्त केले आहे, लेखन आवडले. पुरियाधनाश्री म्हणजे प्रार्थना, पुरियाधनाश्री म्हणजे आर्तता! केवळ अन् केवळ समर्पणाची भावना असलेला, असा हा एक विलक्षण स्वरसामर्थ्य असलेला राग! क्या बात है !!! पुरियाधनाश्रीची ओळख आवडली.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनंदयात्री गुरुवार, 05/22/2008 - 10:43
सुंदर लेख तात्या, स्वामी मालिका आठवत नाही निटशी :( , लहान असुत तेव्हा बहुदा. पण कादंबरी अत्युत्कृष्ट. त्या अनुंषंगाने दिलेले गाण्याचे विवेचन आवडले.

मनिष गुरुवार, 05/22/2008 - 11:13
व्हीडीओ मोठा आहे, सवडीने बघतो, पुरियाधनाश्रीची सुरावट कशी असते?

In reply to by मनिष

भडकमकर मास्तर गुरुवार, 05/22/2008 - 14:23
हाय रामा ये क्या हुआ रंगीला रुत आ गयी रे १९४७ - अर्थ लबोंसे चूम लो, आंखोंसे थाम लो मुझको आस्था कितने दिनोंके बाद है आयी ,सजना रात मिलनकी..." आये मिलन की रात रंग और नूर की बारात किसे पेश करूं ..( फिल्म आठवत नाही...) अहाहा आत्ता सगळी गाणी जमेल तशी वाजवून पाहत आहे... मजाय हं यात.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 05/22/2008 - 16:29
रंग और नूर की बारात किसे पेश करूं ..( फिल्म आठवत नाही...) गझल.. स॑गीत मदनमोहन नामक एक शापित यक्ष.. मनाला विव्हल करणारे अप्रतिम गाणे रफीसाहेबा॑च्या स्वर्गीय सु॑दर आवाजात सुनील दत्तने पडद्यावर साकार केले आहे. त्याच चित्रपटातले 'नगमा और शेर कि' हेही गाणे असेच सैरभैर करणारे आहे.. (मदन मोहनचा वेडा) प्रसाद

मनस्वी गुरुवार, 05/22/2008 - 11:41
तात्या स्वामी मालिकेच्या वेळेस लहान असल्याने गाण्यातला मर्म कळलाच नाही. दुवा दिल्याबद्दल शतशः आभार. तुमचे विश्लेषण सुरेख! गाणे खरोखरीच भिडते!

प्राजु गुरुवार, 05/22/2008 - 11:49
तात्या, खरंच प्रेम हे मुकंच असतं. समजून घेणार्‍याला ते कळलं तर प्रेम करणारा नशिबवान असतो... अतृप्तीची भावना वाईट नसते! आयुष्याच्या सार्थकतेची, भरभरून जगलेल्या सहजीवनाची किनार जर त्या भावनेला असेल तर त्या अतृप्तीतही कुठेतरी एक आनंद असतो, एक समाधान असतं! परंतु जर तिथे अकाली, ऐन तारुण्यात आलेल्या मृत्युची एक भकास किनार असेल तर त्यातून आलेली अतृप्ती ही जीवघेणी ठरते, सरभैर, बेचैन करणारी ठरते! एकदम पटलं. वेदना जेवढी सुंदर बोलते तेवढं कुणीच बोलत नाही! हे अगदी खरंय. अतिशय सुंदर विश्लेषण केलं आहे गाण्याचं. मालिका थोडिफारच आठवते. पण कादंबरीची पारायणं केली आहेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

स्वाती राजेश गुरुवार, 05/22/2008 - 13:37
सुंदर गाणे.... छान आठवणी स्वामी मालिकेच्या च्या.... अतृप्तीची भावना वाईट नसते! आयुष्याच्या सार्थकतेची, भरभरून जगलेल्या सहजीवनाची किनार जर त्या भावनेला असेल तर त्या अतृप्तीतही कुठेतरी एक आनंद असतो, एक समाधान असतं! परंतु जर तिथे अकाली, ऐन तारुण्यात आलेल्या मृत्युची एक भकास किनार असेल तर त्यातून आलेली अतृप्ती ही जीवघेणी ठरते, सरभैर, बेचैन करणारी ठरते! मस्त ओळी.....

कलंत्री गुरुवार, 05/22/2008 - 13:53
तात्यांनी अगदी भारावुन लिहिल्यामूळे सर्वच लिखाण मनाला भिडते. माधवारावांचा गुणग्राहकत्व मनालाही प्रत्यक्ष इतिहास वाचताना मनाला भिडते. सखारामबापू हे साडेतिन शहाण्या पैकी एक. दुर्दैवाने त्यांचे आणि माधवरावांचे पटले नाही. त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. नागपूरचे भोसले माधवरावांच्या विरुद्ध आणि त्यांनी लढ्यासाठी पुण्याकडे प्रयाण केले अशी पार्श्वभूमी, माधवरावांना हा लढा नको होता त्याचबरोबर हा टाळता येणार नाही हेही समजले होते. अश्या पार्श्वभूमीवर भोसल्यांचा वकिल सखारामबापू बोकिल यांना भेटण्याची अनुमती मागतो. माधवराव परवानगी देतात. बापू आणि वकिल २ तास एकत्र बसतात आणि संवादा शिवाय बैठक संपते. माधवराव हेराला विचारतात काय वार्ता झाली काय? तो म्हणतो काहीच बोलणे झाले नाही, फक्त एकदा बुद्धिबळाचा खेळ चालु असतांना बापू बोलले की राजा दोन घरे मागे घ्या. ८/१० दिवसांनतर कळते की भोसल्यांचे सैन्य माघारी गेले आहे. माधवराव बापुंना चांदीचा बुध्दिबळाचा संच भेट म्हणून पाठवतात. मराठ्यांच्या राजकारणातील हा परमोच्च बिंदु असावा. इतिहास तज्ज्ञ आणि विष्लेषक ( १/२ शहाणा) कलंत्री

भडकमकर मास्तर गुरुवार, 05/22/2008 - 14:34
स्वामी मालिका फारच छान होती... ते शेवटचे गाणे आत्ता आठवत नव्हते... लिन्क पाहिली.... खूप छान... मंडळी, पुरियाधनाश्री बद्दल मी काय लिहू? माझे शब्द खूप तोकडे आहेत! पुरियाधनाश्री म्हणजे प्रार्थना, पुरियाधनाश्री म्हणजे आर्तता! केवळ अन् केवळ समर्पणाची भावना असलेला, असा हा एक विलक्षण स्वरसामर्थ्य असलेला राग! उत्तर संध्याकाळच्या सुमारास गायला जाणारा. ...जर तिथे अकाली, ऐन तारुण्यात आलेल्या मृत्युची एक भकास किनार असेल तर त्यातून आलेली अतृप्ती ही जीवघेणी ठरते, सरभैर, बेचैन करणारी ठरते! वाह तात्या...काय एकेका रागात साली ताकद असते... उत्तम लेख... मजा आली.... ........ अवांतर : आम्हाला मारवा रागाने सुद्धा सालं असंच भकास, अतृप्त, सैरभैर आणि बेचैन वाटतं.... ( पुरिया मारवा थाटातलाच का? ) तुम्ही अजून वेगवेगळ्या रागांबद्दल असंच लिहा.. _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चतुरंग Fri, 05/23/2008 - 00:38
मस्त. हे गाणं मी विसरुन गेलो होतो पण तुमच्या लेखाने पुन्हा ते ऐकण्याचा आनंद दिलात. अप्रतिम काव्य, तेवढीच उत्तम चाल आणि सुरेल आवाज! क्या बात है! 'पूरियाधनश्री' ने हेलावून जायला होतं. धन्यवाद तात्या. (स्वगत - 'बसंतच्या' लग्नाचा समारंभ पुढे कधी सुरु होणार? :W :? ) चतुरंग

ऋषिकेश Fri, 05/23/2008 - 00:45
वा तात्या वा!.. लेख फार आवडला. मालिका नीट आठवत नाहि पण कादंबरी मात्र सुंदर आहे. -('मिसळ'लेला) ऋषिकेश

विसोबा खेचर Fri, 05/23/2008 - 08:44
प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकांचे मनापासून आभार... आपला, (कृतज्ञ) तात्या.

मदनबाण Fri, 05/23/2008 - 12:48
तात्या दुव्याबद्दल आभार..... लेख मला फार आवडला. गाण अजुन गुणगुणतो आहे...... खरचं मनाला चटका लागावा असचं हे गाण आहे. मदनबाण.....

सखी Fri, 05/23/2008 - 17:32
अप्रतिम लेख झाला आहे. खरच ह्या गाण्याचे शब्द, सुर, गायिकेचा भावपूर्ण आवाज, दिग्दर्शन आणि कलाकारांचा साधा अभिनय सगळच सुरेख! मी ही हे गाणे खूप दिवस शोधत होते, निदान नुसते ऐकायला तरी मिळेल म्हणुन, पण त्याबरोबर व्हिडीओ दुवा आणि तुमचा अप्रतिम लेखही मिळाला म्हणजे दुग्धशर्करा योग! धन्यवाद!

स्वाती दिनेश Fri, 05/23/2008 - 18:20
तात्या,लेख सुंदर झाला आहे,सुरुवातीचे गाणे..जो जनतेचे रक्षण करतो.. आणि माझे मन.. दोन्ही गाणी आणि स्वामी मालिकेची आठवण करून दिलीस. स्वाती

शुचि Sat, 03/20/2010 - 00:45
>>उलट प्रेम तर बर्‍याचदा मुकंच असतं! ते एकमेकांचं एकमेकांनी समजून घ्यायचं असतं!>> खूप दिवसांनी मनमोकळं रडले..... कचेरीत असूनही स्वतःला लपवून रडले. इतकं सुंदर, इतकं सुंदर कोणी लिहू शकतं सहजीवनाबद्दल? किती हळूवार .... किती किती सुरेख. विश्वास .... सहजीवनाचा पाया!!! तात्या मला फार अवडला हा लेख .... माझी पहीली -वहीली वाचन-खूण भलतीच गोजीरवाणी निघाली. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

अरुंधती Sat, 03/20/2010 - 01:02
अतिशय सुरेख गाणे, मनाला भिडणारे शब्द आणि पूरियाधनश्री! शिवाय ज्यांच्यावर हे गाणं बेतलंय ती रमामाधवासारखी मनाला हुरहूर लावणारी जोडी! त्या सुरांत जी डोळ्यांत टचकन पाणी आणण्याची ताकद आहे त्यांचे वर्णन काय करावे? केवळ अप्रतिम! धन्यवाद तात्या, इतक्या सुंदर गाण्याची अशी हळूवार आठवण करून दिल्याबद्दल! अरुंधती http://iravatik.blogspot.com/

sur_nair Sat, 03/20/2010 - 01:53
अतिशय सुरेख राग आणि तितकंच सुंदर गाणं. मला 'मालवून टाक दीप' ऐकताना सुद्धा नेहमी असंच एखादं महालातलं राजेशाही तरुण जोडपं डोळ्यासमोर येतं. का कोण जाणे पण या रागांच्या स्वरांनाच ( कोमल रिषभ, तीव्र मध्यम, शुद्ध निषाद ) असं काही खानदानी वजन आहे असं वाटतं.

शशिकांत ओक Sun, 03/21/2010 - 14:45
तात्या, अगदी भारावून टाकणारे लिखाण. संगीत व इतिहास आपले हातखंडा विषय मग काय बहारच बहार. आणखी येऊ द्या हो. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

नितिन थत्ते Sun, 03/21/2010 - 21:40
तात्या विंग कमांडरांना आणखी येऊद्या म्हणणार आणि विंग कमांडर तात्यांना. त्यातलं तात्यांना येऊद्या म्हणणं मान्यच. नितिन थत्ते

पिंगू Sun, 03/21/2010 - 23:08
राग काय कळत न्हाय बुवा!!!!!! हे गाणे मात्र सुरेख आणि मनाला भिडणारे ह्यात तिळमात्रही शंका नाही......

समंजस Mon, 03/22/2010 - 11:01
मंत्रमुग्ध करणारे शब्द आणि तशीच चाल, गायन @) शब्दांना पुर्ण गुण द्यावेत की गायनाला ? काही कळत नाही :? पहिल्यांदा मालिका बघीतली तेव्हा हे गाणं एवढं काही कळलं नाही(कदाचीत वयामुळे :) ) पण आता हे गाणं परत ऐकून, जी काही अवस्था झालीय ती शब्दात नाही सांगता येणार : धन्यवाद तात्या!

ऍडीजोशी Wed, 05/21/2008 - 21:13
तात्या आपले आभार कसे मानू हे कळत नाहिये. मी सुद्ध हे गाणं कधी पासून शोधत होतो. पुन्हा एकदा धन्यवाद. अक्षरश: भिडतं उलट प्रेम तर बर्‍याचदा मुकंच असतं! ते एकमेकांचं एकमेकांनी समजून घ्यायचं असतं! १०००००% सहमत आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

वाटाड्या... Wed, 05/21/2008 - 21:15
वाह, तात्या... आज बर्‍याच दिवसांनी संगिताच्या विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद. पुरियाधनश्री मध्ये इतकी आर्तता दुसर्‍या कुठल्या रागात क्वचीतच आढळते. फारच छान राग. शब्द भिडतात ह्या गाण्याचे... असेच संगीत विषयक रागदारी लेख येऊ द्यात हीच विनंती. आपला, मुकुल

अप्रतिम. तुझे वेदनेवरचे भाष्य पण खरे आहे. जगातील बहुतेक सर्व महान साहित्यकृति ह्या वेदनेतूनच जन्माला आल्या आहेत किंवा परिणत झाल्या आहेत. रामायण हे क्रौंच युगुलाच्या वेदनेने प्रेरित झाले तर महाभारतामध्ये सुद्धा जगातील काही महानतम वेदनादायक घटना आहेत. अभिजात प्राचीन ग्रीक साहित्य तर 'ट्रॅजेडी' साठीच प्रसिद्ध आहे. दुव्या साठी धन्यवाद. (मृणाल कुलकर्णीचा फॅन) बिपिन. अवांतरः 'दुव्या साठी' की 'दुव्यासाठी' :D

मानस Wed, 05/21/2008 - 21:41
फारच सुरेख, इतक्या हळुवारपणे या गाण्याचं विश्लेषण केलं आहे .......... गाण्याला व तात्यांना दोघांना मनापासून दाद.

ईश्वरी Wed, 05/21/2008 - 21:48
फारच छान लिहीलंत तात्या. गाण्याचं विश्लेषण समर्पक शब्दात केले आहे. या निमित्ताने 'स्वामी ' मालिकेची आठवण जागी झाली. त्याकाळची माझी आवडती मालिका होती गाण्याला व तात्यांना दोघांना मनापासून दाद. -- हेच म्हणते मी ईश्वरी

वरदा Wed, 05/21/2008 - 22:12
तात्या मस्तच लिहिलय्... हे गाणं मलाही खूप आवडतं....छान वाटलं एकदम...

प्रभाकर पेठकर Wed, 05/21/2008 - 22:22
गाण्यातील व्याकरण समजले नाही तरी गोडवा जाणवतो. स्वामी ही एक उत्कट मालीका होती. रविंद्र मांकणींचा कसदार अभिनय, मृणाल कुळकर्णींची लावण्यवती रमा, राघोबादादांमधील 'राघोबत्व' ह्या सर्व जमेच्या बाजूंनी 'स्वामी' अजरामर झाले. धन्यवाद तात्या.

विसोबा खेचर गुरुवार, 05/22/2008 - 00:34
यावरून थोरले आबासाहेब व सईबाईसाहेबांचा विचार मनात येतो! सईबाई ही थोरल्या आबासाहेबांची अत्यंत लाडकी! परंतु थोरले आबासाहेब सतत मोहिमेवर! त्यातच सईबाईंचे निधनही फार लवकरच झाले. त्यामुळे त्याही थोरल्या आबासाहेबांना फारश्या लाभल्या नाहीत! थोरल्या आबासाहेबांची राजकीय कारकीर्द तर तुम्हाआम्हाला तोंडपाठ आहे. परंतु सईबाईच्या निधनामुळे तो पहाड मनातल्या मनात किती ढासळला असेल, आतल्या आत किती दु:खी झाला असेल हे तुम्हाआम्हाला कधी कळलंच नाही आणि कळणारही नाही! अजून एक पुरियाधनाश्री! दुसरं काय?! आपला, (थोरल्या आबासाहेबांचा निस्सीम भक्त!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

प्रशु Tue, 03/23/2010 - 00:19
तात्या टचकन डोळ्यात पाणी ऊभं केलत. ह्या असामान्य लोकांच्या खाजगी आयुष्यात ह्या अश्या घटना नेहमी आढळतात...

प्रियाली गुरुवार, 05/22/2008 - 00:57
हे शीर्षक गीत आणि स्वामी मालिका डोक्यात फिट्ट आहेत परंतु वरील गाणे विस्मृतीत गेले होते. तात्या लेख आवडला आणि स्वामी मालिकेच्या आठवणी जाग्या झाल्या.

In reply to by प्रियाली

ऍडीजोशी गुरुवार, 05/22/2008 - 10:32
जो जनतेचे रक्षण करतो, पालन करतो हे गाणं कुठे मिळू शकेल का? किमान लिरीक्स??? आपला, ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

अर्धवटराव गुरुवार, 11/25/2010 - 07:28
जो जनतेचे रक्षण करितो... पोषण करितो... पालन करितो... तोच पीता... साक्षात मानावा... जन्म दे तो.. निमित्त केवळ. अर्धवटराव

विकास गुरुवार, 05/22/2008 - 01:32
शिर्षक गीत (जो जनतेचे..) आणि अंतीम गीत (माझे मन...) दोन्ही डोक्यात बसलेली गाणी. पुरीयाधनश्रीच्या माहीतीबद्दल धन्यवाद! >>>ऐन तारुण्यात माधवरावांच्या आयुष्याची संध्याकाळ व्हावी आणि ही भावना, ही पार्श्वभूमी हे गाणं ऐकत असताना सतत कुठेतरी जाणवते! म्हणून तर मोघेसाहेबांनी या गाण्याकरता पुरियाधनाश्री निवडला असेल आणि एका विराणी स्वरुपात हे गाणं आपल्यापुढे मांडलं असेल असं मला वाटतं! छान विश्लेषण. १००% पटले. ________ या गाण्या संदर्भात अजून एक आठवत असलेला भागः स्वामी मालीका चालू असताना अथवा त्याच सुमारास राजस्थान मधील रूपकंवरच्या सतीचा किस्सा घडला होता. आणि त्यावर स्वाभावीक आरडाओरडा चालू होता. त्यात स्वामी नाटकाचा शेवट हा रमाबाईंच्या सती जाण्याने असल्यामुळे काही संघटना ते दाखवायला अथवा त्याचा उल्लेख करायला विरोध करत होत्या. तो भाग न सांगणे म्हणजे कादंबरी आणि इतिहासावर अन्याय असे इतरांचे म्हणणे. त्यातून कल्पकता दाखवून या गाण्याचा उपयोग केला गेला होता. स्वामी कादंबरीत माधवरावांच्या निधनाच्या वेळचे जे हेलावून टाकनारे वर्णन आहे, ते चित्ररूपाने दाखवत त्यांनी त्यांचे डोळे मिटताच बाकी "फिल्मी सेंटीमेंटलपणा" न करता दोन पांढरे पक्षि एकत्र उडत आकाशात जात असताना आणि त्याच वेळेस तीच जोगीण हे गाणे म्हणत रानावनातून फिरताना दाखवली होती. अर्थातच हा प्रसंग फिल्मी नसला तरी भावनात्मक नक्कीच झाला आणि म्हणूनच दिग्दर्शकाच्या (आणि माझ्या सारख्या प्रेक्षकांच्या) दृष्टीने यशस्वीपण ठरला. त्यामुळे दोन आत्मे एकमेकात विलीन होत असताना ते, ते एकमेकांना संबोधून आणि जोगीण तेच गाणे ईश्वराला संबोधून म्हणत संसारापासून लांब जात आहे असा "सटल" अर्थ त्यातून ध्वनीत केला गेला आणि रमाबाई सती गेली, कशी गेली, त्याला प्रोत्साहन दिले का नाही इत्यादी प्रश्न दूर राहीले!

In reply to by विकास

विसोबा खेचर गुरुवार, 05/22/2008 - 06:11
चित्ररूपाने दाखवत त्यांनी त्यांचे डोळे मिटताच बाकी "फिल्मी सेंटीमेंटलपणा" न करता दोन पांढरे पक्षि एकत्र उडत आकाशात जात असताना आणि त्याच वेळेस तीच जोगीण हे गाणे म्हणत रानावनातून फिरताना दाखवली होती. विकासराव, आपली आठवण अगदी बरोबर आहे. ती जोगिण हे गाणं गात आहे आणि या गाण्याच्या पार्श्वभूमीवर दोन पक्षी आकाशात उडत गेलेले दाखवत या मालिकेचा अतिशय सुंदर व टचिंग शेवट साधला होता... तात्या.

In reply to by विकास

ए.चंद्रशेखर गुरुवार, 11/25/2010 - 07:49
श्री. विकास यांनी सांगितलेली आठवण अगदी बरोबर आहे. स्वामी मालिकेचे जे चित्रीकरण प्रथम झाले होते त्यात रमाबाई सती जाते असा प्रसंग शेवटच्या भागात होता. त्याच सुमारास राजस्थानमधे रूपकुंवर ही महिला सती गेली व त्यावरून प्रचंड वादळ उठले. सतीच्या प्रथेचे कोणत्याही प्रकाराने गौरवीकरण माध्यमातून केले जाऊ नये असा योग्य निर्णय त्यावेळी सरकारने घेतला. मूळ कथेतील गंभीरता तर टिकली पाहिजे पण सती जाणे या परंपरेचा साधा उल्लेखही होता कामा नये या कात्रीत सापडलेले मालिकेचे लेखक व दिग्दर्शक यांनी हे गाणे वापरून या मालिकेची हृदयाला भिड्णारी समाप्ती केली होती.

शितल गुरुवार, 05/22/2008 - 05:58
तात्या, गाणे ऐकुन खुप छान वाटले. स्वामी का॑दबरी वाचली पण सिरीअल पाहिली नाही एकाचित बाल्य अवस्थेत असु त्यावेळी.

डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 05/22/2008 - 08:10
'स्वामी' काद॑बरी म्हणजे एक साहित्यलेण॑च आहे.. सुदैवाने त्यावर आधारित मालिकाही चा॑गली झाली होती. गजानन जागीरदारा॑सारखे अनुभवी दिग्दर्शक आणि श्रीका॑त मोघे॑सारखे कल्पक निर्माते लाभल्यामुळे मालिका जमली. सगळी पात्रे काद॑बरी वाचता॑ना जशी इमॅजिन केली होती तशीच होती. माधवराव- रवि॑द्र म॑कणी, रमाबाई- मृणाल देव, गोपिकाबाई- दया डो॑गरे, राघोबा- श्रीका॑त मोघे, सखारामबापू- सुधीर दळवी, त्र्य॑बकमामा पेठे- रवि पटवर्धन, ग॑गोबातात्या- बाळ कर्वे, श्रीपती- उदय टिकेकर, विसाजीप॑त लेले- अन॑त जोग, मल्हाररा॑व होळकर- सूर्यका॑त, रामशास्त्री- अभ्य॑कर (नाव विसरलो) अशी सॉलिड स्टारकास्ट होती. स्वामीचे चित्रिकरण पुण्यातल्या विश्रामबागवाड्यात झाले होते. मस्त लिहिले आहेत तात्या.. पुरिया धनश्रीतल्या 'पायलिया झनकार..' ची रम्य आठवण झाली. हाच राग ए.आर. रहमानने 'हाये रामा ये क्या हुआ' (र॑गीला) या गाण्यात मस्त वापरला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/22/2008 - 08:30
तात्या, गाण्याचं विश्लेषण मस्त केले आहे, लेखन आवडले. पुरियाधनाश्री म्हणजे प्रार्थना, पुरियाधनाश्री म्हणजे आर्तता! केवळ अन् केवळ समर्पणाची भावना असलेला, असा हा एक विलक्षण स्वरसामर्थ्य असलेला राग! क्या बात है !!! पुरियाधनाश्रीची ओळख आवडली.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनंदयात्री गुरुवार, 05/22/2008 - 10:43
सुंदर लेख तात्या, स्वामी मालिका आठवत नाही निटशी :( , लहान असुत तेव्हा बहुदा. पण कादंबरी अत्युत्कृष्ट. त्या अनुंषंगाने दिलेले गाण्याचे विवेचन आवडले.

मनिष गुरुवार, 05/22/2008 - 11:13
व्हीडीओ मोठा आहे, सवडीने बघतो, पुरियाधनाश्रीची सुरावट कशी असते?

In reply to by मनिष

भडकमकर मास्तर गुरुवार, 05/22/2008 - 14:23
हाय रामा ये क्या हुआ रंगीला रुत आ गयी रे १९४७ - अर्थ लबोंसे चूम लो, आंखोंसे थाम लो मुझको आस्था कितने दिनोंके बाद है आयी ,सजना रात मिलनकी..." आये मिलन की रात रंग और नूर की बारात किसे पेश करूं ..( फिल्म आठवत नाही...) अहाहा आत्ता सगळी गाणी जमेल तशी वाजवून पाहत आहे... मजाय हं यात.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

In reply to by भडकमकर मास्तर

डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 05/22/2008 - 16:29
रंग और नूर की बारात किसे पेश करूं ..( फिल्म आठवत नाही...) गझल.. स॑गीत मदनमोहन नामक एक शापित यक्ष.. मनाला विव्हल करणारे अप्रतिम गाणे रफीसाहेबा॑च्या स्वर्गीय सु॑दर आवाजात सुनील दत्तने पडद्यावर साकार केले आहे. त्याच चित्रपटातले 'नगमा और शेर कि' हेही गाणे असेच सैरभैर करणारे आहे.. (मदन मोहनचा वेडा) प्रसाद

मनस्वी गुरुवार, 05/22/2008 - 11:41
तात्या स्वामी मालिकेच्या वेळेस लहान असल्याने गाण्यातला मर्म कळलाच नाही. दुवा दिल्याबद्दल शतशः आभार. तुमचे विश्लेषण सुरेख! गाणे खरोखरीच भिडते!

प्राजु गुरुवार, 05/22/2008 - 11:49
तात्या, खरंच प्रेम हे मुकंच असतं. समजून घेणार्‍याला ते कळलं तर प्रेम करणारा नशिबवान असतो... अतृप्तीची भावना वाईट नसते! आयुष्याच्या सार्थकतेची, भरभरून जगलेल्या सहजीवनाची किनार जर त्या भावनेला असेल तर त्या अतृप्तीतही कुठेतरी एक आनंद असतो, एक समाधान असतं! परंतु जर तिथे अकाली, ऐन तारुण्यात आलेल्या मृत्युची एक भकास किनार असेल तर त्यातून आलेली अतृप्ती ही जीवघेणी ठरते, सरभैर, बेचैन करणारी ठरते! एकदम पटलं. वेदना जेवढी सुंदर बोलते तेवढं कुणीच बोलत नाही! हे अगदी खरंय. अतिशय सुंदर विश्लेषण केलं आहे गाण्याचं. मालिका थोडिफारच आठवते. पण कादंबरीची पारायणं केली आहेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

स्वाती राजेश गुरुवार, 05/22/2008 - 13:37
सुंदर गाणे.... छान आठवणी स्वामी मालिकेच्या च्या.... अतृप्तीची भावना वाईट नसते! आयुष्याच्या सार्थकतेची, भरभरून जगलेल्या सहजीवनाची किनार जर त्या भावनेला असेल तर त्या अतृप्तीतही कुठेतरी एक आनंद असतो, एक समाधान असतं! परंतु जर तिथे अकाली, ऐन तारुण्यात आलेल्या मृत्युची एक भकास किनार असेल तर त्यातून आलेली अतृप्ती ही जीवघेणी ठरते, सरभैर, बेचैन करणारी ठरते! मस्त ओळी.....

कलंत्री गुरुवार, 05/22/2008 - 13:53
तात्यांनी अगदी भारावुन लिहिल्यामूळे सर्वच लिखाण मनाला भिडते. माधवारावांचा गुणग्राहकत्व मनालाही प्रत्यक्ष इतिहास वाचताना मनाला भिडते. सखारामबापू हे साडेतिन शहाण्या पैकी एक. दुर्दैवाने त्यांचे आणि माधवरावांचे पटले नाही. त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. नागपूरचे भोसले माधवरावांच्या विरुद्ध आणि त्यांनी लढ्यासाठी पुण्याकडे प्रयाण केले अशी पार्श्वभूमी, माधवरावांना हा लढा नको होता त्याचबरोबर हा टाळता येणार नाही हेही समजले होते. अश्या पार्श्वभूमीवर भोसल्यांचा वकिल सखारामबापू बोकिल यांना भेटण्याची अनुमती मागतो. माधवराव परवानगी देतात. बापू आणि वकिल २ तास एकत्र बसतात आणि संवादा शिवाय बैठक संपते. माधवराव हेराला विचारतात काय वार्ता झाली काय? तो म्हणतो काहीच बोलणे झाले नाही, फक्त एकदा बुद्धिबळाचा खेळ चालु असतांना बापू बोलले की राजा दोन घरे मागे घ्या. ८/१० दिवसांनतर कळते की भोसल्यांचे सैन्य माघारी गेले आहे. माधवराव बापुंना चांदीचा बुध्दिबळाचा संच भेट म्हणून पाठवतात. मराठ्यांच्या राजकारणातील हा परमोच्च बिंदु असावा. इतिहास तज्ज्ञ आणि विष्लेषक ( १/२ शहाणा) कलंत्री

भडकमकर मास्तर गुरुवार, 05/22/2008 - 14:34
स्वामी मालिका फारच छान होती... ते शेवटचे गाणे आत्ता आठवत नव्हते... लिन्क पाहिली.... खूप छान... मंडळी, पुरियाधनाश्री बद्दल मी काय लिहू? माझे शब्द खूप तोकडे आहेत! पुरियाधनाश्री म्हणजे प्रार्थना, पुरियाधनाश्री म्हणजे आर्तता! केवळ अन् केवळ समर्पणाची भावना असलेला, असा हा एक विलक्षण स्वरसामर्थ्य असलेला राग! उत्तर संध्याकाळच्या सुमारास गायला जाणारा. ...जर तिथे अकाली, ऐन तारुण्यात आलेल्या मृत्युची एक भकास किनार असेल तर त्यातून आलेली अतृप्ती ही जीवघेणी ठरते, सरभैर, बेचैन करणारी ठरते! वाह तात्या...काय एकेका रागात साली ताकद असते... उत्तम लेख... मजा आली.... ........ अवांतर : आम्हाला मारवा रागाने सुद्धा सालं असंच भकास, अतृप्त, सैरभैर आणि बेचैन वाटतं.... ( पुरिया मारवा थाटातलाच का? ) तुम्ही अजून वेगवेगळ्या रागांबद्दल असंच लिहा.. _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चतुरंग Fri, 05/23/2008 - 00:38
मस्त. हे गाणं मी विसरुन गेलो होतो पण तुमच्या लेखाने पुन्हा ते ऐकण्याचा आनंद दिलात. अप्रतिम काव्य, तेवढीच उत्तम चाल आणि सुरेल आवाज! क्या बात है! 'पूरियाधनश्री' ने हेलावून जायला होतं. धन्यवाद तात्या. (स्वगत - 'बसंतच्या' लग्नाचा समारंभ पुढे कधी सुरु होणार? :W :? ) चतुरंग

ऋषिकेश Fri, 05/23/2008 - 00:45
वा तात्या वा!.. लेख फार आवडला. मालिका नीट आठवत नाहि पण कादंबरी मात्र सुंदर आहे. -('मिसळ'लेला) ऋषिकेश

विसोबा खेचर Fri, 05/23/2008 - 08:44
प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकांचे मनापासून आभार... आपला, (कृतज्ञ) तात्या.

मदनबाण Fri, 05/23/2008 - 12:48
तात्या दुव्याबद्दल आभार..... लेख मला फार आवडला. गाण अजुन गुणगुणतो आहे...... खरचं मनाला चटका लागावा असचं हे गाण आहे. मदनबाण.....

सखी Fri, 05/23/2008 - 17:32
अप्रतिम लेख झाला आहे. खरच ह्या गाण्याचे शब्द, सुर, गायिकेचा भावपूर्ण आवाज, दिग्दर्शन आणि कलाकारांचा साधा अभिनय सगळच सुरेख! मी ही हे गाणे खूप दिवस शोधत होते, निदान नुसते ऐकायला तरी मिळेल म्हणुन, पण त्याबरोबर व्हिडीओ दुवा आणि तुमचा अप्रतिम लेखही मिळाला म्हणजे दुग्धशर्करा योग! धन्यवाद!

स्वाती दिनेश Fri, 05/23/2008 - 18:20
तात्या,लेख सुंदर झाला आहे,सुरुवातीचे गाणे..जो जनतेचे रक्षण करतो.. आणि माझे मन.. दोन्ही गाणी आणि स्वामी मालिकेची आठवण करून दिलीस. स्वाती

शुचि Sat, 03/20/2010 - 00:45
>>उलट प्रेम तर बर्‍याचदा मुकंच असतं! ते एकमेकांचं एकमेकांनी समजून घ्यायचं असतं!>> खूप दिवसांनी मनमोकळं रडले..... कचेरीत असूनही स्वतःला लपवून रडले. इतकं सुंदर, इतकं सुंदर कोणी लिहू शकतं सहजीवनाबद्दल? किती हळूवार .... किती किती सुरेख. विश्वास .... सहजीवनाचा पाया!!! तात्या मला फार अवडला हा लेख .... माझी पहीली -वहीली वाचन-खूण भलतीच गोजीरवाणी निघाली. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला, जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

अरुंधती Sat, 03/20/2010 - 01:02
अतिशय सुरेख गाणे, मनाला भिडणारे शब्द आणि पूरियाधनश्री! शिवाय ज्यांच्यावर हे गाणं बेतलंय ती रमामाधवासारखी मनाला हुरहूर लावणारी जोडी! त्या सुरांत जी डोळ्यांत टचकन पाणी आणण्याची ताकद आहे त्यांचे वर्णन काय करावे? केवळ अप्रतिम! धन्यवाद तात्या, इतक्या सुंदर गाण्याची अशी हळूवार आठवण करून दिल्याबद्दल! अरुंधती http://iravatik.blogspot.com/

sur_nair Sat, 03/20/2010 - 01:53
अतिशय सुरेख राग आणि तितकंच सुंदर गाणं. मला 'मालवून टाक दीप' ऐकताना सुद्धा नेहमी असंच एखादं महालातलं राजेशाही तरुण जोडपं डोळ्यासमोर येतं. का कोण जाणे पण या रागांच्या स्वरांनाच ( कोमल रिषभ, तीव्र मध्यम, शुद्ध निषाद ) असं काही खानदानी वजन आहे असं वाटतं.

शशिकांत ओक Sun, 03/21/2010 - 14:45
तात्या, अगदी भारावून टाकणारे लिखाण. संगीत व इतिहास आपले हातखंडा विषय मग काय बहारच बहार. आणखी येऊ द्या हो. नाडीग्रंथांवर अधिक माहितीसाठी http://www.naadiguruonweb.org/ शशिकांत

नितिन थत्ते Sun, 03/21/2010 - 21:40
तात्या विंग कमांडरांना आणखी येऊद्या म्हणणार आणि विंग कमांडर तात्यांना. त्यातलं तात्यांना येऊद्या म्हणणं मान्यच. नितिन थत्ते

पिंगू Sun, 03/21/2010 - 23:08
राग काय कळत न्हाय बुवा!!!!!! हे गाणे मात्र सुरेख आणि मनाला भिडणारे ह्यात तिळमात्रही शंका नाही......

समंजस Mon, 03/22/2010 - 11:01
मंत्रमुग्ध करणारे शब्द आणि तशीच चाल, गायन @) शब्दांना पुर्ण गुण द्यावेत की गायनाला ? काही कळत नाही :? पहिल्यांदा मालिका बघीतली तेव्हा हे गाणं एवढं काही कळलं नाही(कदाचीत वयामुळे :) ) पण आता हे गाणं परत ऐकून, जी काही अवस्था झालीय ती शब्दात नाही सांगता येणार : धन्यवाद तात्या!
लेखनविषय:
लेखनप्रकार
राम राम मिपाकरहो, कृपया यूट्यूबवरील हा दुवा पाहा. यात एक सुंदर गाणं आहे, त्या गाण्याबदल मी दोन शब्द लिहिणार आहे! काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर थोरल्या माधवरावांवरची 'स्वामी' ही मालिका दाखवली होती, त्यातल्या एका भागात हे नितांतसुंदर गाणं होतं. गेले अनेक दिवस मी या गाण्याच्या शोधात होतो. आज जालावर मुशाफिरी करताना अचानक यूट्यूबवर स्वामी मालिकेचा हा भाग आणि हे गाणं कानी पडलं व विलक्षण सांगितिक तृप्ती अनुभवली. तिच इथे आपल्यापुढे मांडायचा एक छोटेखानी प्रयत्न करत आहे.

केळ्याच्या पोळ्या

ऋचा ·

आनंदयात्री Wed, 05/21/2008 - 16:34
वाचुनच खाव्याश्या वाटतायेत, लै भारी ! आम्हाला आत्तापर्यन्त केळ्याचे शिकरणच माहित होते फक्त :)

वरदा Wed, 05/21/2008 - 17:43
मी लहान असताना आई करायची करुन पाहिली पाहिजे....मस्त सुचवलस...

सहज गुरुवार, 05/22/2008 - 06:05
लहान मुलांसाठी मस्त पदार्थ, न्याहरीला अजुन एक पर्याय. धन्यवाद ऋचा.

विसोबा खेचर गुरुवार, 05/22/2008 - 06:18
साधी व सोपी परंतु तेवढीच सुंदर पाकृ! छ्या! साला केळं-पोळी, शिक्रण-पोळी, मोरांबा-पोळी यातलं ममत्व दुसर्‍या कशातच नाही! आपला, (हळवा) तात्या.

मदनबाण गुरुवार, 05/22/2008 - 06:35
केळ-साखर्+तुप हे एकत्र करुन ते पोळी बरोबर खाल्ले आहे..पण केळ्याच्या पोळ्या हे काही ट्राय केल नाही..हे हे ट्राय करुन पहाव म्हणतो..... (वेलची केळ्याची शिक्रण हादणारा) मदनबाण.....

आनंदयात्री Wed, 05/21/2008 - 16:34
वाचुनच खाव्याश्या वाटतायेत, लै भारी ! आम्हाला आत्तापर्यन्त केळ्याचे शिकरणच माहित होते फक्त :)

वरदा Wed, 05/21/2008 - 17:43
मी लहान असताना आई करायची करुन पाहिली पाहिजे....मस्त सुचवलस...

सहज गुरुवार, 05/22/2008 - 06:05
लहान मुलांसाठी मस्त पदार्थ, न्याहरीला अजुन एक पर्याय. धन्यवाद ऋचा.

विसोबा खेचर गुरुवार, 05/22/2008 - 06:18
साधी व सोपी परंतु तेवढीच सुंदर पाकृ! छ्या! साला केळं-पोळी, शिक्रण-पोळी, मोरांबा-पोळी यातलं ममत्व दुसर्‍या कशातच नाही! आपला, (हळवा) तात्या.

मदनबाण गुरुवार, 05/22/2008 - 06:35
केळ-साखर्+तुप हे एकत्र करुन ते पोळी बरोबर खाल्ले आहे..पण केळ्याच्या पोळ्या हे काही ट्राय केल नाही..हे हे ट्राय करुन पहाव म्हणतो..... (वेलची केळ्याची शिक्रण हादणारा) मदनबाण.....
पिकलेली केळी २ तेल कणीक २ वाट्या चवी पुरती साखर केळी कुस्करुन घ्या त्यात थोडी (१-२ चमचे) साखर घाला. त्यात बसेल इतकी कणीक (गव्हाचे पीठ) घाला सैलसर मळून घ्या. हलक्या हाताने पोळी लाटून भाजा. भाजताना थोडे तेल दोन्ही बाजूंनी सोडा. ह्या फार खुसखुशीत आणि चवदार लागतात. आंबटगोड चटणी बरोबर खा.