एक ओपन व्यथा १
….
साधारण संध्याकाळची वेळ… गावातलं एक साधारण मध्यवर्ती पेठ… खूप सारी गर्दी...
एक जण (डोकावत) : काय हो?
दुसरा (तोही मान उंचावत गर्दीत बघतोय): काय?
तोच एक जण: काय झालंय?
तोच दुसरा जण: काय माहित… गर्दी दिसली म्हणून घुसलोय.. काय झालंय देव जाणे…
तो एक जण पुन्हा एका तिसर्याला: ओ…
तिसरा: काय?
एक जण: काय झालंय?
तिसरा: नाही ओ माहित काही… काहीतरी झालंय खरं…
एक जण: ते तर मलापण कळतंय…
तिसरा: बहुतेक कोणीतरी मेलंय…
पुन्हा तो एक जण: मेलंय??? कि मारलंय??
तिसरा: काय माहित… पण असंच काहीतरी झालंय खरं…