मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

या गोष्टी reciprocal नकोत का?

सुधीर काळे ·

सुनील 07/09/2010 - 13:35
आपल्या सरबजीतसिंगला भेटायला आपण गेलो होतो कां? (वाचल्याचे आठवत नाहीं म्हणून लिहिले आहे) सरबजीतविरुद्ध भारतात काही गुन्ह्याची नोंद आहे का? (तसे काही वाचल्याचे आठवत नाही म्हणून लिहिले आहे). जर त्याने भारताविरुद्ध काही गुन्हा केलाच नसेल तर आपले जुडिशिअल पॅनल त्याची चौकशी कसली करणार? कसाबविरुद्ध पाकिस्तानात खटला दाखल आहे, हे लक्षात असू द्या. भारतीय अधिकार्‍यांनी अमेरिकेत जाऊन हेडलीची चौकशी केली होती, हे आठवत असेलच! जर पाकिस्तानी तुरुंगात असा कोणी कैदी असेल की ज्याच्याविरुद्ध भारतात खटला दाखल आहे/होऊ शकतो, तर गोष्ट वेगळी. अशी काही उदाहरणे दिलीत तर चर्चेला अर्थ आहे.

In reply to by सुनील

नगरीनिरंजन 07/09/2010 - 13:40
अगदी असेच म्हणतो. भारतात खटला दाखल झालेला कोणीही मनुष्य पाकिस्तानात कैदेत असू शकेल यावर माझा विश्वास नाही.

In reply to by सुधीर काळे

सुनील 07/09/2010 - 14:37
डी कंपनीचे भाई पकिस्तानच्या कैदेत आहेत? (वाचल्याचे आठवत नाही म्हणून लिहिले आहे) बाकी, त्याला भारतात फरफटत घेऊन येणार होते काही लोक. काय झाले त्याचे?

In reply to by नितिन थत्ते

सुधीर काळे 07/09/2010 - 15:22
आणि कोण आणणार होते? तेही आठवत नाहीं मला. पण "जगाचा, पाकिस्तानचा किंवा गोर्‍या जगताचाही आपल्या न्यायसंस्थेवर विश्वास असावा अशा अट्टाहासापायी ही सवलत दिली जाते आहे काय?" हा मुख्य मुद्दा बाजूला रहायला नको!

In reply to by नितिन थत्ते

सुनील 07/09/2010 - 15:26
मुसक्या बांधूनही असेल. नक्की आठवत नाही! पण हीच मंडळी एन्रॉनला अरबी समुद्रात बुडवणारदेखिल होती! (पुढे एन्रॉन अटलांटीक महासागरात बुडाली, पण ते बुडवणारे वेगळे!!)

मदनबाण 07/09/2010 - 15:39
आम्ही सत्तेवर आल्यास दाऊदच्या मुसक्या आवळून त्याला फरपटत आणू! http://www.loksatta.com/daily/20050609/lokma.htm हे देखील वाचा :--- http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=90938:2010-08-03-16-30-43&catid=49:2009-07-15-04-02-32&Itemid=60 बाकी चालु द्या...

In reply to by मदनबाण

सुनील 07/09/2010 - 16:02
दुसर्‍या दुव्याचा हेतू कळला नाही. तो आपल्या बाबू संस्कृतीतील अंगभूत भ्रष्टाचाराचा उत्तम नमुना आहे हे मान्य पण त्याचा इथे काय संबंध?

In reply to by सुनील

मदनबाण 07/09/2010 - 16:09
दुसर्‍या दुव्याचा हेतू कळला नाही. ह्म्म्म, आपण बाहेरुन पकडुन आणलेले गुन्हेगार इथे ऐषआरामात राहत असतील तर पाकिस्तानी judicial panelला परवानगी दिली यात नवल ते काय ? असा माझ्या टाळक्यातला इचार...

In reply to by मदनबाण

सुनील 07/09/2010 - 16:12
बाहेरून आणलेले? तुमच्या दुव्यात कुणा जवाहर दुबेचा उल्लेख आहे. थोडक्यात, पैसे दिले की सरकारी कर्मचारी विकले जातात, एवढेच त्यातून सिद्ध होते.

In reply to by सुनील

मदनबाण 07/09/2010 - 16:16
बाहेरून आणलेले? अबू सालेमला कुठुन आणले? (पोर्तुगालसोबत भारताच्या असलेल्या गुन्हेगार हस्तांतरण कायद्यानुसार इंटरपोलच्या मदतीने सीबीआयने नोव्हेंबर -2005 मध्ये अबू सालेमचा ताबा घेतला)

In reply to by सुनील

मदनबाण 07/09/2010 - 16:37
सनीलराव, अबू ,अफजल्या, कसाब ही मंडळी मस्त आयुष्य जगणार आणि आपण मात्र हा तमाशा पाहत राहणार. पाकड्यांची नाटके आपल्याला ठावुक नाहीत काय ? कसाब हा आमच्या देशाचा नागरिक नाही म्हणणारे पाकडेच होते ना ? मग असल्या फाजील वॄत्तीच्या पाकड्यांना सरकारने परवानगी देण्या संबंधी विचार का करावा ? आपण डी-कंपनी बद्धल केलेल्या मागणी बद्धल त्यांनी इतका विचार करायचे कष्ट घेतले होते का ? तसेही अवांतर झाले आहे त्या बद्धल क्षमस्व.

सुधीर काळे 07/09/2010 - 16:06
मदनबाण, http://www.loksatta.com/daily/20050609/lokma.htm ही २००५ची बातमी उघडली पण 'फाँट प्रॉब्लेम'मुळे वाचता आली नाहीं. त्यामुळे कोण कुणाच्या मुसक्या बांधणार होता ते कळले नाहीं. दुसरी लिंक उघडली वाचली पण या चर्चेशी काय संबंध ते कळले नाहीं. असो. विषयांतर होतय्. ""जगाचा, पाकिस्तानचा किंवा गोर्‍या जगताचाही आपल्या न्यायसंस्थेवर विश्वास असावा अशा अट्टाहासापायी ही सवलत दिली जाते आहे काय?" हा मुख्य मुद्दा बाजूला रहायला नको!

In reply to by सुधीर काळे

सुनील 07/09/2010 - 16:15
""जगाचा, पाकिस्तानचा किंवा गोर्‍या जगताचाही आपल्या न्यायसंस्थेवर विश्वास असावा अशा अट्टाहासापायी ही सवलत दिली जाते आहे काय?" अमेरिकेने भारताला हेडलीची चौकशी करण्याची परवानगी जगाचा अमेरिकेतील न्यायसंस्थेवर विश्वास असावा अशा अट्टाहासापायी दिली, असे तुम्हाला वाटते काय?

In reply to by सुधीर काळे

नितिन थत्ते 07/09/2010 - 16:21
ती बातमी नाही. वाचकांच्या पत्रातले पत्र आहे. २००५ मध्ये सरकारने मोफत विजेचा निर्णय मागे घेतल्यावर प्रमोद महाजन त्याला विश्वासघात म्हणाले. त्यावर एका वाचकाने "तुम्ही नाहीका.......आश्वासन दिले होते?" असे विचारले होते. परदेशात विश्वास बसावा म्हणूनच केले जात आहे. अन्यथा कसाब भारतीय नागरिक नाही हे सिद्ध झाल्यावर त्याला 'फेअर ट्रायल'चा हक्क लागू होत नव्हताच.

In reply to by नितिन थत्ते

सुनील 07/09/2010 - 16:33
कसाब भारतीय नागरिक नाही हे सिद्ध झाल्यावर त्याला 'फेअर ट्रायल'चा हक्क लागू होत नव्हताच. असे नसावे. भारतीय न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातील आरोपीला (तो कुठलाही नागरीक असो), फेअर ट्रायलचा हक्क असावा.

In reply to by नितिन थत्ते

विकास 07/09/2010 - 16:45
अन्यथा कसाब भारतीय नागरिक नाही हे सिद्ध झाल्यावर त्याला 'फेअर ट्रायल'चा हक्क लागू होत नव्हताच. ह्या वाक्याशी असहमत आहे. जर त्याला पकडता क्षणी मारले असते तर ते पूर्णपणे "फेअर" ठरले असते (जसे इतर दहशतवाद्यांना मारले गेले). मात्र एकदा पकडले म्हणल्यावर भारतीय ब्यायव्यवस्थेतील प्रस्थापित कायद्याप्रमाणेच त्याच्यावर कारवाई होत आहे. मला खात्री आहे की अनेक परदेशी नागरीकांच्या हातून गुन्हे झालेले असतील आणि त्यांच्यावर कशी कारवाई करावी यावर कायदे असतील. तेच युद्धकैद्यांबाबत देखील होतेच... हेच अमेरिकेत देखील आहे. म्हणूनच बुशच्या काळात त्यांनी युरोपात जेथे असे कायदे नाहीत अशा ठिकाणी तुरूंगात अनेकांना ठेवले आणि तसेच अमेरिकन जमिनीवर न आणता अनेकांना "गाँटानोमा बे क्यूबा" मध्ये अनेकांना ठेवले आणि न्यायव्यवस्थेचे हक्क नाकारायचा प्रयत्न केला गेला...

ऋषिकेश 07/09/2010 - 16:18
जगाचा, पाकिस्तानचा किंवा गोर्‍या जगताचाही आपल्या न्यायसंस्थेवर विश्वास असावा अशा अट्टाहासापायी ही सवलत दिली जाते आहे काय?
नाही. मुळात प्रश्नच गैरलागु आहे. त्यांनी एखाद्या भारतात असणार्‍या आरोपीची चौकशी केली यात आपली न्यायसंस्था कुठे आली? हे कळले नाही. इथे वाद 'पाकिस्तानच्या न्यायालयात' चालु आहे. आदेश त्यांच्याच न्यायालयाने दिले आहेत. परवानगी भारतीय गृहमंत्रालय देईल. असे असताना भारतीय न्यायसंस्थेवरचा विश्वास कसा काय वाढेल?

सुधीर काळे 07/09/2010 - 18:13
गुन्हा भारतात घडला, सुनावणी भारतात झाली, केस खतम! पाकिस्तान्यांना जर इथे येऊन चौकशी करायची असेल तर आपण "दाऊदला आमच्या हाती सोपवलेत तर परवानगी देऊ" किंवा "सरबजीत सिंगला सोडलेत तर परवानगी देऊ" अशी अट घालायला हरकत नव्हती. कारण हा तर वाटाघाटीचा (negotiationsचा) मुद्दा आहे. म्हणून मी म्हटले होते कीं या गोष्टी reciprocal हव्यात. अमेरिकेत डेव्हिड हेडलीला प्रश्न विचारण्यासाठी आपले Police/Investigating agencies गेल्या होत्या ना? पाकिस्तान पोलिस अधिकारी किंवा अन्वेषण अधिकारी कां पाठवीत नाहींय्? Judicial panel का पाठवत आहे? हा फरक कशासाठी आहे? "आपण किती न्यायी आहोत" यासाठी इतरांच्या पसंतीची मोहर कशाला?

In reply to by वेताळ

सुधीर काळे 07/09/2010 - 18:19
एप्रिल २०१२ ला भारतात येईन. मग भेटेन तुम्हाला! तेवढेच एक करायचे राहिले आहे! हाहाहा!

In reply to by सुधीर काळे

अवलिया 07/09/2010 - 18:23
२०१२? अच्छा अच्छा ! हीच का ती माया संस्कृतीनुसार जगबुडी का काय ते? ;)

In reply to by सुधीर काळे

मदनबाण 07/09/2010 - 18:41
सर्व चिनी वस्तूंवर वैयक्तिकरीत्या बहिष्कार घाला! अगदी सहमत... माझा अनुभव :--- मी कट्टर चीन विरोधक असुन सुद्धा मला चायना मोबाईल घ्यायचा मोह टाळता आला नव्हता,मग मस्त पैकी चायनीज मोबाईलची विविध मॉडेल्स शोधुन काढली आणि अगदी स्वस्तात टच स्कीन ड्युल सिम असलेला चायनीज मोबाईल घेतला. पेटी पॅक मोबाईल घरी आणला, उघडल्यावर त्याला माझ्या संगणकाला जोडले...लगेच अ‍ॅन्टीव्ह्यायरस ने त्या मोबाईल मधे व्ह्यायरस असल्याचे संकेत दिले. ते पाहिल्यावर असे लाखो मोबाईल भारतात विकले जात आहे आणि अशा सर्व मोबाईल मधे हे चीनी लोक व्ह्यायरस भरुन पाठवत असतील तर ? असा विचार माझ्या अती विचारी टाळक्यात आला. ;) चीनी मोबाईल मधले ते व्ह्यायरस डिलटवले आणि यापुढे चीनी वस्तुंना हात लावायचा नाही असे ठरवले.( हे कितपत शक्य आहे ? )

In reply to by मदनबाण

प्रदीप 07/09/2010 - 19:51
घेतलात तो चिनी बनावटीचा फोन? त्या म्यॅन्युफॅक्चररच्या अधिकृत विक्रेत्याकडून घेतला असेल तर तुम्ही त्याला कळवू शकता, तसे केलेत का?

In reply to by प्रदीप

मदनबाण 07/09/2010 - 20:09
म्यॅन्युफॅक्चररच्या अधिकृत विक्रेत्याकडून घेतला असेल तर तुम्ही त्याला कळवू शकता, तसे केलेत का? नाही बर्‍याच वेळी हे चीनी बनावटीचे फोन कुठल्याही प्रकारच्या नल्ला चीनी कंपनीने बनवलेले असतात,नोकियाची कॉपी टु कॉपी मारलेली असते.अगदी ब्लॅकबेरी सारखेच दिसणारेही फोन बाजारात आहेत्. मी जालावरुन मोबाईल साठी काही अपडेट मिळतो का हे पाहण्यासाठीच संगणकाला तो फोन जोडला होता. वॉरंटी फॉरंटी नसणार्‍या या मोबाईलची जालावर देखील विशेष माहिती सापडत नसल्याने तक्रार करण्यास वाव नाही.

In reply to by मदनबाण

चतुरंग 07/09/2010 - 21:41
अक्षरशः गल्लीबोळात फोन बनवावेत तशा कंपन्या हे बनवतात. पीसीबी ले आउटपासून, सॉफ्टवेअर पर्यंत भरपूर ढापाढापी असते. ट्रेस लागणे फार अवघड. भारतातल्या मार्केटात जेव्हा हे फोन येतात त्याचे सगळे धंदे कॅशनेच चालतात. पैसे टाकून दुकानाची पायरी उतरलात की वॉरंटी संपली! फोन डब्बा निघाला तुम्ही फसलात, बरा चालला तुम्ही नशीबवान! :( ही बघा ब्लॅकबेरीची कॉपी ब्लूबेरी! ;) http://www.tgdaily.com/mobility-features/50592-china-cracks-down-on-gray-market-cell-phones चतुरंग

वेताळ 07/09/2010 - 18:31
२०१२ आम्ही तव्यावर असणार बहुधा. काका कसाब ला पाशवी स्त्रियांच्या ताब्यात द्यावे काय?

In reply to by वेताळ

अवलिया 07/09/2010 - 18:44
अरे मग स्वल्पविराम द्यावा काका शब्दानंतर काका, कसाब असे. नेटके लिहा रे नेटके ! असो. ह्यापी गणेश चतुर्थी !

वेताळ 07/09/2010 - 18:53
माझ्यावर जाणवु लागला आहे. असो,पुढचे युग चीनी असल्यामुळे आम्ही आता चीनी शिकणार आहे. मिभो चीन मध्ये स्थायीक झालेवर रितसर त्याना विनंती करु.

मिसळभोक्ता 07/09/2010 - 19:38
काळे काका, तुमच्याशी अगदी सहमत आहे. (हे पण रेसिप्रोकल आहे. आता तुम्ही माझ्याशी सहमत व्हालच अशी अपेक्षा.) असो. पत्र लिहिले आहे. कुठे पाठवू ?

In reply to by मिसळभोक्ता

सुधीर काळे 08/09/2010 - 07:58
कुणाला लिहिले आहे आपण आपले पत्र? आपल्या पंतप्रधानांचा ई-मेल माझ्याकडे आहे, पण चीनच्या पंतप्रधानांचा ई-मेल माझ्याकडे नाहीं. आणि मँडॅरिन मध्ये लिहायलाही येत नाहीं.

In reply to by सुधीर काळे

विकास 08/09/2010 - 09:22
खालील वाक्यात मि. काळे: बायकॉट "मेड इन चायना" प्रॉडक्ट्स! असे लिहीले आहे.(चीनी भाषेत "सुधीर" हा शब्द नसावा. :) 先生羽衣甘蓝: 抵制“中国制造”商品

In reply to by विकास

सुधीर काळे 08/09/2010 - 12:12
मी एका चिनी वंशाच्या (चिनी नव्हे) इंडोनेशियन नागरिकाच्या कंपनीत काम करतो. इथल्या कांहींना (फारच थोड्या लोकांना) मँडॅरिन येते. त्यांना विचारून आधी खात्री करून घेतो आणि मग तुम्हाला परत कळवतो!

अर्धवटराव 08/09/2010 - 09:20
पाकिस्तानला भारताची खोड मोडायची संधी मिळाली, बाकि काहि नाहि. आता पाक कसाबच्या न्यायप्रक्रियेला २५ वर्षे लावणार. तोपर्यंत भारतात त्याला फाशी वगैरे देता येणार नाहि असा प्रयत्न करणार. भारत सरकार देखील "आता हे प्रकरण आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कक्षेत गेलय" वगैरे सांगत कसाबला पोसणार. मध्यंतरी पाकाडे काहि तिकडम करुन कसाबला सोडवायचा प्रयत्न करणार. नाहिच झालं तरि कसाब म्हातारपणाने येणार्‍या मृत्युने भारतात जेल मध्ये मरणार. आणि आपल्या राष्ट्रपतींचे त्याच्या दयेच्या अर्जावर विचार करण्याचे कष्ट वाचणार. अर्थात, हा सगळा माझा कल्पनाविस्तार आहे... पण असं सगळं होण्याचि पुसटशी शक्यता वाटते खरी. (शंकाखोर) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

नरेश धाल 08/09/2010 - 12:18
लवकरच राष्ट्रपती पाकला धमकी देणार आहे त्यातून पाक घाबरून सर्व अतिरेकी कराव्या बंद करून भारतात सामील होणार आहे. चीन पण आपली पाऊले रोखेल. आणि घाबरून बीजिंग शांघाई भारताला भेट देऊन टाकेल. भारत एक शॉट मध्ये महासत्ता. कसा वाटला कल्पना विस्तार आपल्या राष्ट्रपती अगोदरच खूप म्हातार्या आहेत. कसाब तर अजून २५ चा असेल. तो म्हातारा होईस्पर्यंत राष्ट्रपती कुठे पोहोचल्या असतील. असो हा पण माझा कल्पना विस्तार आहे.

In reply to by अर्धवटराव

सुधीर काळे 08/09/2010 - 12:57
कदाचित् असे(च) व्हावे ही श्रींची (किंवा श्रीमतींची) इच्छा असेल! म्हणजे अफजल गुरूच्या शिक्षेतील विलंबाबद्दल जसे काँग्रेसला (उगीचच?) जबाबदार धरले जाते तसा दोष दिला जाणार नाहीं!

सुनील 07/09/2010 - 13:35
आपल्या सरबजीतसिंगला भेटायला आपण गेलो होतो कां? (वाचल्याचे आठवत नाहीं म्हणून लिहिले आहे) सरबजीतविरुद्ध भारतात काही गुन्ह्याची नोंद आहे का? (तसे काही वाचल्याचे आठवत नाही म्हणून लिहिले आहे). जर त्याने भारताविरुद्ध काही गुन्हा केलाच नसेल तर आपले जुडिशिअल पॅनल त्याची चौकशी कसली करणार? कसाबविरुद्ध पाकिस्तानात खटला दाखल आहे, हे लक्षात असू द्या. भारतीय अधिकार्‍यांनी अमेरिकेत जाऊन हेडलीची चौकशी केली होती, हे आठवत असेलच! जर पाकिस्तानी तुरुंगात असा कोणी कैदी असेल की ज्याच्याविरुद्ध भारतात खटला दाखल आहे/होऊ शकतो, तर गोष्ट वेगळी. अशी काही उदाहरणे दिलीत तर चर्चेला अर्थ आहे.

In reply to by सुनील

नगरीनिरंजन 07/09/2010 - 13:40
अगदी असेच म्हणतो. भारतात खटला दाखल झालेला कोणीही मनुष्य पाकिस्तानात कैदेत असू शकेल यावर माझा विश्वास नाही.

In reply to by सुधीर काळे

सुनील 07/09/2010 - 14:37
डी कंपनीचे भाई पकिस्तानच्या कैदेत आहेत? (वाचल्याचे आठवत नाही म्हणून लिहिले आहे) बाकी, त्याला भारतात फरफटत घेऊन येणार होते काही लोक. काय झाले त्याचे?

In reply to by नितिन थत्ते

सुधीर काळे 07/09/2010 - 15:22
आणि कोण आणणार होते? तेही आठवत नाहीं मला. पण "जगाचा, पाकिस्तानचा किंवा गोर्‍या जगताचाही आपल्या न्यायसंस्थेवर विश्वास असावा अशा अट्टाहासापायी ही सवलत दिली जाते आहे काय?" हा मुख्य मुद्दा बाजूला रहायला नको!

In reply to by नितिन थत्ते

सुनील 07/09/2010 - 15:26
मुसक्या बांधूनही असेल. नक्की आठवत नाही! पण हीच मंडळी एन्रॉनला अरबी समुद्रात बुडवणारदेखिल होती! (पुढे एन्रॉन अटलांटीक महासागरात बुडाली, पण ते बुडवणारे वेगळे!!)

मदनबाण 07/09/2010 - 15:39
आम्ही सत्तेवर आल्यास दाऊदच्या मुसक्या आवळून त्याला फरपटत आणू! http://www.loksatta.com/daily/20050609/lokma.htm हे देखील वाचा :--- http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=90938:2010-08-03-16-30-43&catid=49:2009-07-15-04-02-32&Itemid=60 बाकी चालु द्या...

In reply to by मदनबाण

सुनील 07/09/2010 - 16:02
दुसर्‍या दुव्याचा हेतू कळला नाही. तो आपल्या बाबू संस्कृतीतील अंगभूत भ्रष्टाचाराचा उत्तम नमुना आहे हे मान्य पण त्याचा इथे काय संबंध?

In reply to by सुनील

मदनबाण 07/09/2010 - 16:09
दुसर्‍या दुव्याचा हेतू कळला नाही. ह्म्म्म, आपण बाहेरुन पकडुन आणलेले गुन्हेगार इथे ऐषआरामात राहत असतील तर पाकिस्तानी judicial panelला परवानगी दिली यात नवल ते काय ? असा माझ्या टाळक्यातला इचार...

In reply to by मदनबाण

सुनील 07/09/2010 - 16:12
बाहेरून आणलेले? तुमच्या दुव्यात कुणा जवाहर दुबेचा उल्लेख आहे. थोडक्यात, पैसे दिले की सरकारी कर्मचारी विकले जातात, एवढेच त्यातून सिद्ध होते.

In reply to by सुनील

मदनबाण 07/09/2010 - 16:16
बाहेरून आणलेले? अबू सालेमला कुठुन आणले? (पोर्तुगालसोबत भारताच्या असलेल्या गुन्हेगार हस्तांतरण कायद्यानुसार इंटरपोलच्या मदतीने सीबीआयने नोव्हेंबर -2005 मध्ये अबू सालेमचा ताबा घेतला)

In reply to by सुनील

मदनबाण 07/09/2010 - 16:37
सनीलराव, अबू ,अफजल्या, कसाब ही मंडळी मस्त आयुष्य जगणार आणि आपण मात्र हा तमाशा पाहत राहणार. पाकड्यांची नाटके आपल्याला ठावुक नाहीत काय ? कसाब हा आमच्या देशाचा नागरिक नाही म्हणणारे पाकडेच होते ना ? मग असल्या फाजील वॄत्तीच्या पाकड्यांना सरकारने परवानगी देण्या संबंधी विचार का करावा ? आपण डी-कंपनी बद्धल केलेल्या मागणी बद्धल त्यांनी इतका विचार करायचे कष्ट घेतले होते का ? तसेही अवांतर झाले आहे त्या बद्धल क्षमस्व.

सुधीर काळे 07/09/2010 - 16:06
मदनबाण, http://www.loksatta.com/daily/20050609/lokma.htm ही २००५ची बातमी उघडली पण 'फाँट प्रॉब्लेम'मुळे वाचता आली नाहीं. त्यामुळे कोण कुणाच्या मुसक्या बांधणार होता ते कळले नाहीं. दुसरी लिंक उघडली वाचली पण या चर्चेशी काय संबंध ते कळले नाहीं. असो. विषयांतर होतय्. ""जगाचा, पाकिस्तानचा किंवा गोर्‍या जगताचाही आपल्या न्यायसंस्थेवर विश्वास असावा अशा अट्टाहासापायी ही सवलत दिली जाते आहे काय?" हा मुख्य मुद्दा बाजूला रहायला नको!

In reply to by सुधीर काळे

सुनील 07/09/2010 - 16:15
""जगाचा, पाकिस्तानचा किंवा गोर्‍या जगताचाही आपल्या न्यायसंस्थेवर विश्वास असावा अशा अट्टाहासापायी ही सवलत दिली जाते आहे काय?" अमेरिकेने भारताला हेडलीची चौकशी करण्याची परवानगी जगाचा अमेरिकेतील न्यायसंस्थेवर विश्वास असावा अशा अट्टाहासापायी दिली, असे तुम्हाला वाटते काय?

In reply to by सुधीर काळे

नितिन थत्ते 07/09/2010 - 16:21
ती बातमी नाही. वाचकांच्या पत्रातले पत्र आहे. २००५ मध्ये सरकारने मोफत विजेचा निर्णय मागे घेतल्यावर प्रमोद महाजन त्याला विश्वासघात म्हणाले. त्यावर एका वाचकाने "तुम्ही नाहीका.......आश्वासन दिले होते?" असे विचारले होते. परदेशात विश्वास बसावा म्हणूनच केले जात आहे. अन्यथा कसाब भारतीय नागरिक नाही हे सिद्ध झाल्यावर त्याला 'फेअर ट्रायल'चा हक्क लागू होत नव्हताच.

In reply to by नितिन थत्ते

सुनील 07/09/2010 - 16:33
कसाब भारतीय नागरिक नाही हे सिद्ध झाल्यावर त्याला 'फेअर ट्रायल'चा हक्क लागू होत नव्हताच. असे नसावे. भारतीय न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातील आरोपीला (तो कुठलाही नागरीक असो), फेअर ट्रायलचा हक्क असावा.

In reply to by नितिन थत्ते

विकास 07/09/2010 - 16:45
अन्यथा कसाब भारतीय नागरिक नाही हे सिद्ध झाल्यावर त्याला 'फेअर ट्रायल'चा हक्क लागू होत नव्हताच. ह्या वाक्याशी असहमत आहे. जर त्याला पकडता क्षणी मारले असते तर ते पूर्णपणे "फेअर" ठरले असते (जसे इतर दहशतवाद्यांना मारले गेले). मात्र एकदा पकडले म्हणल्यावर भारतीय ब्यायव्यवस्थेतील प्रस्थापित कायद्याप्रमाणेच त्याच्यावर कारवाई होत आहे. मला खात्री आहे की अनेक परदेशी नागरीकांच्या हातून गुन्हे झालेले असतील आणि त्यांच्यावर कशी कारवाई करावी यावर कायदे असतील. तेच युद्धकैद्यांबाबत देखील होतेच... हेच अमेरिकेत देखील आहे. म्हणूनच बुशच्या काळात त्यांनी युरोपात जेथे असे कायदे नाहीत अशा ठिकाणी तुरूंगात अनेकांना ठेवले आणि तसेच अमेरिकन जमिनीवर न आणता अनेकांना "गाँटानोमा बे क्यूबा" मध्ये अनेकांना ठेवले आणि न्यायव्यवस्थेचे हक्क नाकारायचा प्रयत्न केला गेला...

ऋषिकेश 07/09/2010 - 16:18
जगाचा, पाकिस्तानचा किंवा गोर्‍या जगताचाही आपल्या न्यायसंस्थेवर विश्वास असावा अशा अट्टाहासापायी ही सवलत दिली जाते आहे काय?
नाही. मुळात प्रश्नच गैरलागु आहे. त्यांनी एखाद्या भारतात असणार्‍या आरोपीची चौकशी केली यात आपली न्यायसंस्था कुठे आली? हे कळले नाही. इथे वाद 'पाकिस्तानच्या न्यायालयात' चालु आहे. आदेश त्यांच्याच न्यायालयाने दिले आहेत. परवानगी भारतीय गृहमंत्रालय देईल. असे असताना भारतीय न्यायसंस्थेवरचा विश्वास कसा काय वाढेल?

सुधीर काळे 07/09/2010 - 18:13
गुन्हा भारतात घडला, सुनावणी भारतात झाली, केस खतम! पाकिस्तान्यांना जर इथे येऊन चौकशी करायची असेल तर आपण "दाऊदला आमच्या हाती सोपवलेत तर परवानगी देऊ" किंवा "सरबजीत सिंगला सोडलेत तर परवानगी देऊ" अशी अट घालायला हरकत नव्हती. कारण हा तर वाटाघाटीचा (negotiationsचा) मुद्दा आहे. म्हणून मी म्हटले होते कीं या गोष्टी reciprocal हव्यात. अमेरिकेत डेव्हिड हेडलीला प्रश्न विचारण्यासाठी आपले Police/Investigating agencies गेल्या होत्या ना? पाकिस्तान पोलिस अधिकारी किंवा अन्वेषण अधिकारी कां पाठवीत नाहींय्? Judicial panel का पाठवत आहे? हा फरक कशासाठी आहे? "आपण किती न्यायी आहोत" यासाठी इतरांच्या पसंतीची मोहर कशाला?

In reply to by वेताळ

सुधीर काळे 07/09/2010 - 18:19
एप्रिल २०१२ ला भारतात येईन. मग भेटेन तुम्हाला! तेवढेच एक करायचे राहिले आहे! हाहाहा!

In reply to by सुधीर काळे

अवलिया 07/09/2010 - 18:23
२०१२? अच्छा अच्छा ! हीच का ती माया संस्कृतीनुसार जगबुडी का काय ते? ;)

In reply to by सुधीर काळे

मदनबाण 07/09/2010 - 18:41
सर्व चिनी वस्तूंवर वैयक्तिकरीत्या बहिष्कार घाला! अगदी सहमत... माझा अनुभव :--- मी कट्टर चीन विरोधक असुन सुद्धा मला चायना मोबाईल घ्यायचा मोह टाळता आला नव्हता,मग मस्त पैकी चायनीज मोबाईलची विविध मॉडेल्स शोधुन काढली आणि अगदी स्वस्तात टच स्कीन ड्युल सिम असलेला चायनीज मोबाईल घेतला. पेटी पॅक मोबाईल घरी आणला, उघडल्यावर त्याला माझ्या संगणकाला जोडले...लगेच अ‍ॅन्टीव्ह्यायरस ने त्या मोबाईल मधे व्ह्यायरस असल्याचे संकेत दिले. ते पाहिल्यावर असे लाखो मोबाईल भारतात विकले जात आहे आणि अशा सर्व मोबाईल मधे हे चीनी लोक व्ह्यायरस भरुन पाठवत असतील तर ? असा विचार माझ्या अती विचारी टाळक्यात आला. ;) चीनी मोबाईल मधले ते व्ह्यायरस डिलटवले आणि यापुढे चीनी वस्तुंना हात लावायचा नाही असे ठरवले.( हे कितपत शक्य आहे ? )

In reply to by मदनबाण

प्रदीप 07/09/2010 - 19:51
घेतलात तो चिनी बनावटीचा फोन? त्या म्यॅन्युफॅक्चररच्या अधिकृत विक्रेत्याकडून घेतला असेल तर तुम्ही त्याला कळवू शकता, तसे केलेत का?

In reply to by प्रदीप

मदनबाण 07/09/2010 - 20:09
म्यॅन्युफॅक्चररच्या अधिकृत विक्रेत्याकडून घेतला असेल तर तुम्ही त्याला कळवू शकता, तसे केलेत का? नाही बर्‍याच वेळी हे चीनी बनावटीचे फोन कुठल्याही प्रकारच्या नल्ला चीनी कंपनीने बनवलेले असतात,नोकियाची कॉपी टु कॉपी मारलेली असते.अगदी ब्लॅकबेरी सारखेच दिसणारेही फोन बाजारात आहेत्. मी जालावरुन मोबाईल साठी काही अपडेट मिळतो का हे पाहण्यासाठीच संगणकाला तो फोन जोडला होता. वॉरंटी फॉरंटी नसणार्‍या या मोबाईलची जालावर देखील विशेष माहिती सापडत नसल्याने तक्रार करण्यास वाव नाही.

In reply to by मदनबाण

चतुरंग 07/09/2010 - 21:41
अक्षरशः गल्लीबोळात फोन बनवावेत तशा कंपन्या हे बनवतात. पीसीबी ले आउटपासून, सॉफ्टवेअर पर्यंत भरपूर ढापाढापी असते. ट्रेस लागणे फार अवघड. भारतातल्या मार्केटात जेव्हा हे फोन येतात त्याचे सगळे धंदे कॅशनेच चालतात. पैसे टाकून दुकानाची पायरी उतरलात की वॉरंटी संपली! फोन डब्बा निघाला तुम्ही फसलात, बरा चालला तुम्ही नशीबवान! :( ही बघा ब्लॅकबेरीची कॉपी ब्लूबेरी! ;) http://www.tgdaily.com/mobility-features/50592-china-cracks-down-on-gray-market-cell-phones चतुरंग

वेताळ 07/09/2010 - 18:31
२०१२ आम्ही तव्यावर असणार बहुधा. काका कसाब ला पाशवी स्त्रियांच्या ताब्यात द्यावे काय?

In reply to by वेताळ

अवलिया 07/09/2010 - 18:44
अरे मग स्वल्पविराम द्यावा काका शब्दानंतर काका, कसाब असे. नेटके लिहा रे नेटके ! असो. ह्यापी गणेश चतुर्थी !

वेताळ 07/09/2010 - 18:53
माझ्यावर जाणवु लागला आहे. असो,पुढचे युग चीनी असल्यामुळे आम्ही आता चीनी शिकणार आहे. मिभो चीन मध्ये स्थायीक झालेवर रितसर त्याना विनंती करु.

मिसळभोक्ता 07/09/2010 - 19:38
काळे काका, तुमच्याशी अगदी सहमत आहे. (हे पण रेसिप्रोकल आहे. आता तुम्ही माझ्याशी सहमत व्हालच अशी अपेक्षा.) असो. पत्र लिहिले आहे. कुठे पाठवू ?

In reply to by मिसळभोक्ता

सुधीर काळे 08/09/2010 - 07:58
कुणाला लिहिले आहे आपण आपले पत्र? आपल्या पंतप्रधानांचा ई-मेल माझ्याकडे आहे, पण चीनच्या पंतप्रधानांचा ई-मेल माझ्याकडे नाहीं. आणि मँडॅरिन मध्ये लिहायलाही येत नाहीं.

In reply to by सुधीर काळे

विकास 08/09/2010 - 09:22
खालील वाक्यात मि. काळे: बायकॉट "मेड इन चायना" प्रॉडक्ट्स! असे लिहीले आहे.(चीनी भाषेत "सुधीर" हा शब्द नसावा. :) 先生羽衣甘蓝: 抵制“中国制造”商品

In reply to by विकास

सुधीर काळे 08/09/2010 - 12:12
मी एका चिनी वंशाच्या (चिनी नव्हे) इंडोनेशियन नागरिकाच्या कंपनीत काम करतो. इथल्या कांहींना (फारच थोड्या लोकांना) मँडॅरिन येते. त्यांना विचारून आधी खात्री करून घेतो आणि मग तुम्हाला परत कळवतो!

अर्धवटराव 08/09/2010 - 09:20
पाकिस्तानला भारताची खोड मोडायची संधी मिळाली, बाकि काहि नाहि. आता पाक कसाबच्या न्यायप्रक्रियेला २५ वर्षे लावणार. तोपर्यंत भारतात त्याला फाशी वगैरे देता येणार नाहि असा प्रयत्न करणार. भारत सरकार देखील "आता हे प्रकरण आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कक्षेत गेलय" वगैरे सांगत कसाबला पोसणार. मध्यंतरी पाकाडे काहि तिकडम करुन कसाबला सोडवायचा प्रयत्न करणार. नाहिच झालं तरि कसाब म्हातारपणाने येणार्‍या मृत्युने भारतात जेल मध्ये मरणार. आणि आपल्या राष्ट्रपतींचे त्याच्या दयेच्या अर्जावर विचार करण्याचे कष्ट वाचणार. अर्थात, हा सगळा माझा कल्पनाविस्तार आहे... पण असं सगळं होण्याचि पुसटशी शक्यता वाटते खरी. (शंकाखोर) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

नरेश धाल 08/09/2010 - 12:18
लवकरच राष्ट्रपती पाकला धमकी देणार आहे त्यातून पाक घाबरून सर्व अतिरेकी कराव्या बंद करून भारतात सामील होणार आहे. चीन पण आपली पाऊले रोखेल. आणि घाबरून बीजिंग शांघाई भारताला भेट देऊन टाकेल. भारत एक शॉट मध्ये महासत्ता. कसा वाटला कल्पना विस्तार आपल्या राष्ट्रपती अगोदरच खूप म्हातार्या आहेत. कसाब तर अजून २५ चा असेल. तो म्हातारा होईस्पर्यंत राष्ट्रपती कुठे पोहोचल्या असतील. असो हा पण माझा कल्पना विस्तार आहे.

In reply to by अर्धवटराव

सुधीर काळे 08/09/2010 - 12:57
कदाचित् असे(च) व्हावे ही श्रींची (किंवा श्रीमतींची) इच्छा असेल! म्हणजे अफजल गुरूच्या शिक्षेतील विलंबाबद्दल जसे काँग्रेसला (उगीचच?) जबाबदार धरले जाते तसा दोष दिला जाणार नाहीं!
आज इंडियन एक्सप्रेसमध्ये खालील बातमी वाचली. या दुव्यावर सविस्तर वाचा. http://epaper.indianexpress.com/IE/IEH/2010/09/07/ArticleHtmls/07_09_2010_001_067.shtml?Mode=1 Govt may allow Pak judicial panel to visit, interrogate Kasab अशा तडजोडी एकतर्फी नाहीं कां वाटत? अशी परवानगी आपण पाकिस्तानी judicial panelला दिली तर त्या बदल्यात आपल्या judicial panel ने पाकिस्तानात जाऊन भारतीय कैद्यांची चौकशी करायची मागणी का करू नये? उदा. आपल्या सरबजीतसिंगला भेटायला आपण गेलो होतो कां?

राजीव'जींना ६६व्या जयन्तीनिमित्त विनम्र अभिवादन! ..... WE STILL MISS YOU..~~ RAJEEV'JI! LOVE YOU!

मृगनयनी ·

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मृगनयनी 20/08/2010 - 18:15
ह्म्म... बिपिन'दांशी सहमत! _________ आज राजीव'जी असते... तर देशात.. भ्रष्टाचार वगैरे.. झालाच नसता..... असं मी कधीच म्हणणार नाही... पण नेहरू-गांधी घराण्याचं वर्चस्व पाहता........ कदाचित आज मनमोहन-सिन्गांच्या ऐवजी "राजीवजी"च आपले पन्तप्रधान असते! :)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अर्धवट 20/08/2010 - 18:17
ह्येबी खरंय.. आन् चित्र थोडं वेगळं दिसलं असतं हे ही खरय.. अवांतर - हल्ली मला 'वेगळं' म्हटलं की चौकट राजा आठवतो..

In reply to by मेघवेडा

मृगनयनी 21/08/2010 - 11:42
काही लोकांचे डोक्याच्या पुढच्या भागातले केस फार लवकर उडतात नै! ;) ____ फार विचार करत असतील बहुधा ती लोकं!.. राजीव'जींसारखी! :)

In reply to by मेघवेडा

(अ)शुद्धलेखन आणि excess capitalization भडकपणे अंगावर आलं!! राजीव गांधींनी संगणक क्रांतीबरोबर इंग्लिश लेखनसरावही भारतात आणावयास हवा होता असं राहून राहून वाटलं!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मृगनयनी 21/08/2010 - 10:55
अरे बापरे! "स्कोअर लेवल" करायचा केवढा हा अट्टाहास !! ;) ;) :| असो! .... हा (अ)सभ्यपणा अंगावर आला बरं!!!! ;) ;) ;) __________________________ टीप : "ऑम्लेट" पचत नसेल.. तर रात्री हाजमोला वगैरे घेऊन झोपावे... आणि हो!.. आज शनिवार असल्यामुळे "ऑम्लेट" न खाणे उचित ठरेल!

राजीव गांधींच्या पुण्यतीथीच्या दिवशी धागा प्रवर्तिकेनी काढलेला जुना धागा आठवला. http://www.misalpav.com/node/12412 अर्थात जुन्या धाग्याचा मजकुरही काहिसा असाच होता. तिथे काही लोकांनी उत्तम चर्चा केली होती. त्यापेक्षा काही नवीन माहिती मिळाली तर ती वाचण्यास उत्सुक. अवांतर :- अश्या लोकांची जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी असती तर????

क्लिंटन 20/08/2010 - 19:27
जुन्यापुराण्या गोष्टींच्या जोखडातून बाहेर काढून देशाला आधुनिकतेची वाटचाल देऊ शकायची क्षमता ठेवणारा हा नेता असा अचानक गेला याचे वाईट वाटते.अर्थातच घरी/शाळेत/नातेवाईकांमध्ये/परिचयातील व्यक्तींमध्ये राजीवजींचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन न करता केवळ ’गांधी’ म्हणून त्यांच्यावर टिका करणारे बहुसंख्य लोक आसपास होते.त्याचा परिणाम होऊन मी सुध्दा अनेक वर्षे अशाच लोकांची री ओढत त्यांच्यावर टिका करत होतो.पण तटस्थपणे विचार करता असे जाणवते की हे सगळे लोक म्हणतात तितके राजीवजी वाईट नक्कीच नव्हते.भारतात संगणक आणि टेलिकॉम क्रांतीची मुहूर्तमेढ रोवायचा त्यांचा निर्णय आमच्या पुढीला आज खूपच फायदेशीर ठरत आहे. त्यांना श्रध्दांजली. क्लिंटन

मदनबाण 20/08/2010 - 19:31
लहानपणी मी आकाशात एखादे विमान ( खरेखुरे ) दिसले की उगाच... इंदिरा गांधी टाटा /राजीव गांधी टाटा असे बोंबलत सुटायचो ते आठवले. ;) शिवाय, हमे ये करना है आणि हमे वो करना ही वाक्य देखील आठवली. ;) बाकी चालु द्या.

In reply to by मदनबाण

चिरोटा 20/08/2010 - 22:13
आजच्या ठळक् बातम्यांमध्ये राजीव गांधीची बातमी नाही असे सहसा होत नसे.८:४० च्या समाचार मध्ये परत तेच. आणि ९:३०च्या news मध्ये परत तेच्!!विरोधी पक्ष नक्की आहेत तरी कोण हे कळतच नसे.

In reply to by मदनबाण

मृगनयनी 21/08/2010 - 10:59
लहानपणी मी आकाशात एखादे विमान ( खरेखुरे ) दिसले की उगाच... इंदिरा गांधी टाटा /राजीव गांधी टाटा असे बोंबलत सुटायचो ते आठवले. शिवाय, हमे ये करना है आणि हमे वो करना ही वाक्य देखील आठवली. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) सही! आम्ही "सोनिया गान्धी --टाटा"... "राहुलदादा- टाटा".. "प्रियान्का तै-टाटा" ..... असं ओरडायचो! ;) _____________________

विजुभाऊ 20/08/2010 - 20:21
राजीव गांधी एक द्रष्टा नेता होते हे मान्यच केले पाहिजे भारतात संगणक आणि टेलिकॉम क्रांतीची मुहूर्तमेढ रोवायचा त्यांचा निर्णय आमच्या पुढीला आज खूपच फायदेशीर ठरत आहे नुसते हेच नाही तर आज आपण भारतीय रस्त्यांवर जी नवी वाहने पहातो त्या साठी श्रेय राजीव गांधीनाच जाते. लोकानुनय करताना राजीव गांधींचे काही निर्णय चुकले असतील पण त्यांचे काही निर्णय त्या वेळच्या भविष्यकाळात म्हणजेच आजच्या वर्तमान काळात खूपच फायदेशीर ठरत आहेत. "द मारुती स्टोरी " पुस्तकात भारतात मारुती मोटार्स ने काय काय नवीन आणले याचा आढावा घेता येतो. मारुती ने केवळ नवी टेक्नीलॉजीच आणली असे नव्हे तर एक प्रॉडक्षन इंडस्ट्रीत एक नवी विचारसरणी ( चांगल्या अर्थाने एक नवी संस्कृती) आणली. ज्याचे फायदे आज आपण सर्वचजण घेतोय. राजीव गांधींच्या काळातील काही इतर नेते ( वि प्र सिंग्/देवेगौडा ) याना कोणतीच धोरणे नव्हती असेच म्हणावे लागेल. रथयात्रा आणि मंडल या नी लोकाना रोजगार /चैतन्य वगैरे देण्यापेक्षा भारताचे नुकसानच फार केले.

मिसळभोक्ता 20/08/2010 - 22:12
राजीव"जी"ंच्या जयंतीनिमित्त जाहिरातींचा खर्चः ३०० कोटी रुपये. लेह ला दिलेली मदतः १२५ कोटी रुपये. जय हिंद !

In reply to by मिसळभोक्ता

मराठी_माणूस 20/08/2011 - 14:09
राजीव"जी"ंच्या जयंतीनिमित्त जाहिरातींचा खर्चः ३०० कोटी रुपये. अण्णांच्या वाढदिवसाला २/३ लाख खर्च केले म्हणुन तो मनोज तिवारी बोंबलत होता. कदाचीत गांधी घराण्यातल्यां साठी ह्या गोष्टींचा विचार करण्याची गरज नसेल.

मिसळभोक्ता 20/08/2010 - 22:12
राजीव"जी"ंच्या जयंतीनिमित्त जाहिरातींचा खर्चः ३०० कोटी रुपये. लेह ला दिलेली मदतः १२५ कोटी रुपये. जय हिंद !

हुप्प्या 20/08/2010 - 22:20
आज भारत माहितीयुगाचा एक मोठा आधारस्तंभ बनला आहे ह्याचे सग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ळे श्रेय राजीवजींना आणि उरलेच तर सोनिया आणि राहुलला जाते. आणि हो, थोडे बिटिया प्रियांकालाही. हे सगळे लोक नसते तर कंप्युटर आणि कार तर सोडाच, आपण आकडेमोड, गणिते आणि बैलगाड्याही विसरलो असतो. थेट अश्मयुगात जाऊन पोचलो असतो. शेतीबिती विसरून पुन्हा आदिमानवासारखे शिकारी बनलो असतो. कंदमुळे खाऊन जगावे लागले असते. कुठली सुपरपावर आणि कुठले काय. राजीवजींसारखा गणकयंत्र तज्ञ लाभल्यामुळे आज प्रत्येक भारतीय आज गणकयंत्र साक्षर झालेला आहे. विप्रो, इन्फोसिस आणि सत्यम ही मंडळी गुगल, अ‍ॅपल, सिस्को, मायक्रोसॉफ्ट च्या डोळ्यासमोर तारे चमकतील असे नवनवे शोध लावत आहेत! राजीवजी अमर रहे!

In reply to by हुप्प्या

मिसळभोक्ता 20/08/2010 - 22:35
विप्रो, इन्फोसिस आणि सत्यम ही मंडळी गुगल, अ‍ॅपल, सिस्को, मायक्रोसॉफ्ट च्या डोळ्यासमोर तारे चमकतील असे नवनवे शोध लावत आहेत! अगदी अगदी !

In reply to by हुप्प्या

क्लिंटन 20/08/2010 - 23:01
कोणाही राजकिय/ऐतिहासिक व्यक्तीचा वस्तुनिष्ठ अभ्यास करून त्या विषयी मते बनवायचीच नाहीत तर केवळ भावनेच्या आहारी जाऊन पूर्वग्रहदुषित मते आधीच बनवायची आणि ती वारंवार ठासून सांगायची असा पणच केला असेल तर काही बोलायचे नाही. चालू द्या. राजीवजींनी भारतात संगणक आणायला सुरवात केली हे कोणी नाकारू शकेल का?टेलिकॉम क्षेत्राच्या विकासाची पायाभरणी सॅम पित्रोदांना हाताशी धरून राजीव सरकारनेच सुरू केली. त्यावेळी आपल्यासारख्या गरीब देशात ही थेरं परवडणार नाहीत असेच बहुसंख्यांचे मत होते.बहुसंख्य जनतेला दोन वेळेला खायला मिळत नाही मग करायचे काय ते संगणक आणि फोन असेच सर्वसाधारण मत त्याकाळी होते. अर्थात माझी माहिती वाचलेली आहे. राजीव गांधी पंतप्रधान असताना २०+ वयाचे असलेले मिपाकर याविषयी नक्कीच सांगू शकतील. मागे मिपावर राजीवजींच्या पुण्यतिथीवर चर्चा झाली होती तेव्हा कोणा मिपाकराने देवीलाल यांनी शेतकऱ्यांच्या सभेत बोलताना केलेल्या भाषणाचा उल्लेख केला होता. देवीलाल म्हणाले,"सरकार वीजप्रकल्पांसाठी वापरून सगळे कस गेलेले पाणी शेतीसाठी देते". अशा विरोधाला न जुमानता नव्या काळाशी अनुरूप प्रकल्प रेटणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. पुढे नरसिंह राव आणि मनमोहन सिंह यांनी मोठ्या प्रमाणावर सुधारणा घडवून आणल्या पण त्याची सुरवात काही प्रमाणात तरी राजीव गांधींच्या सरकारने केली होती हे मान्य करायला अडचण कोणती? कोणाही व्यक्तीची आंधळी भक्ती नको आणि उगीचच ठोकणे हा पण दृष्टीकोन नको.प्रत्येक व्यक्तीला तिने केलेल्या चांगल्या कामांचे श्रेय मिळाले पाहिजे आणि त्याचबरोबर तिने केलेल्या चुकींबद्दल दोषही आपण द्यायला हवा. पण आपल्याकडे ’राजीव गांधी’ हे नाव उच्चारले तरी काहीही ऐकून न घेता शिव्या घालायला सुरवात करायची हाच दृष्टीकोन दुर्दैवाने दिसतो. राजीव गांधींनंतर वि.प्र.सिंह, देवेगौडा यासारखे भविष्याचा काहीही अजेंडा नसलेले बिनडोक नेते आले. त्यातही वि.प्र.सिंहांनी मंडल आयोगाच्या निमित्ताने भारतीयांच्या एकात्मतेच्या मार्गात मोठी पाचर मारून ठेवली आहे आणि भारतमातेच्या पायात कधी न तुटणाऱ्या साखळ्या बांधून ठेवल्या आहेत हे लक्षात घेतले तर त्यापेक्षा राजीव गांधी अनेक पटीने चांगले होते हे मान्य करायला अडचण कोणती? राजीव गांधी नसते तर भारत अश्मयुगात गेला असता असे कोणीही म्हणत नाही.पण निदान त्यांनी भारतात संगणकीकरणाची सुरवात केली हे मान्य करून त्याचे श्रेय द्यायला काय हरकत आहे समजत नाही. बाकी चालू द्या.

In reply to by क्लिंटन

शिल्पा ब 21/08/2010 - 01:50
संगणक , मारुती , टेलेकॉमचे जाळे इ. त्यांनी पुढाकार घेतल्याने घडले हे सत्य आहे.. बाकी देवीलाल या माणसाचे "सरकार वीजप्रकल्पांसाठी वापरून सगळे कस गेलेले पाणी शेतीसाठी देते"हे मत वाचून किती मूर्ख लोक आपले प्रतिनिधित्व करत आहेत हे पुन्हा एकदा जाणवले. बाकी चालू द्या..

In reply to by शिल्पा ब

हुप्प्या 21/08/2010 - 07:28
देवीलाल पाण्यातली वीज काढून घेतली म्हणू शकणारा मूर्ख असेलही पण दुसरी अशी शक्यता आहे की त्याला खात्री होती की जनता मूर्ख आहे आणि आपण असले काही बोललो तरी ते लोकांना पटेल आणि रुचेल. अडाणी, अशिक्षित, उथळ मतदारांचे प्राबल्य असल्यामुळे असले सवंग डायलॉग मारले जातात आणि त्यावर निवडणूकाही जिंकल्या जात असतील. लालू यादव म्हणाला होता की तमाम पंतप्रधानपदाच्या उमेदवारांत एक अशी शर्यत लावा की सगळ्यांपुढे एक एक म्हैस ठेवा. जो गडी दिलेल्या वेळात सगळ्यात जास्त म्हशीचे दूध काढू शकेल तो पंतप्रधान. प्रेक्षकात अर्थातच जोरदार टाळ्या! हेही तितकेच बिनडोक वाक्य आहे. पण काँग्रेसने (होय तीच ती पार्टी जिने भारताला आधुनिक युगात नेले!) ह्याचे समर्थन घेतलेच की हो! अशी अनेक नमुनेदार वाक्ये शोधता येतील. जशी प्रजा तसा राजा असा लोकशाहीचा नियमच आहे. (अर्थात मोतीलालजी, जवाहरलालजी, इंदिराजी, संजयजी, राजीवजी, सोनियाजी, राहुलजी, प्रियांकाजी आणि त्यांची वर्तमान व भविष्यातली पिलावळजी यांना हे नियम लागू नाहीत बरं का. ते सगळे एकदम एलिट्स आणि जिनियसेस !)

In reply to by हुप्प्या

क्लिंटन 21/08/2010 - 14:34
काँग्रेसने (होय तीच ती पार्टी जिने भारताला आधुनिक युगात नेले!) ह्याचे समर्थन घेतलेच की हो!
तसाच संधीसाधूपणा सगळ्या पक्षांनी कधीनाकधी केलेला आहे. भाजपने अशा किती पक्षांचे समर्थन घेतले आहे याची गणतीच नाही.
देवीलाल पाण्यातली वीज काढून घेतली म्हणू शकणारा मूर्ख असेलही पण दुसरी अशी शक्यता आहे की त्याला खात्री होती की जनता मूर्ख आहे आणि आपण असले काही बोललो तरी ते लोकांना पटेल आणि रुचेल.
अशाच लोकांच्या सान्निध्यात संगणक आणि टेलिकॉम क्षेत्रांमध्ये नवे बदल घडवून आणणे अजिबात सोपे नव्हते.देवीलाल सारखे बिनडोक नेते याविरूध्द राळ उठविणार आणि त्याची किंमत कॉंग्रेस पक्षाला मतांच्या स्वरूपात द्यावी लागणार हे उघडउघड दिसत असूनही राजीवजींनी हे निर्णय पुढे रेटले. याच देवीलालांच्या लोकदलाने १९८७ मध्ये हरियाणा विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा ऐतिहासिक पराभव केला. अर्थात त्यामागे पंजाब प्रश्न आणि राजीव-लोंगोवाल करार आणि त्यात हरियाणावर झालेला कथित अन्याय ही कारणे जरूर होती पण देवीलालांनी राजीवजींविरूध्द अशा प्रश्नांवरून (आणि कोणताही पुरावा नसताना बोफोर्स प्रश्नावरून) उठवलेली राळ हे ही एक कारण होतेच. राजीवजींनी बन्सीलालसारख्या गणंगाला हरियाणाचे मुख्यमंत्री केले याचे अजिबात समर्थन नाही पण त्याचबरोबर भाजपने त्याच बन्सीलालला पुढे पाठिंबा दिला याचेही समर्थन होऊ शकत नाही. १९८७ मध्ये याच देवीलाल या बिनडोक माणसाला भाजपने पाठिंबा दिला होता. सुषमा स्वराज आणि सूरज भान हे भाजपचे ज्येष्ठ नेते देवीलाल यांच्या मंत्रीमंडळात मंत्रीपण होते. सांगायचा मुद्दा हा की अशा राजकिय वातावरणात आपल्याला मतांच्या स्वरूपात किंमत चुकती करावी लागणार आहे याची पुरेपूर जाण असूनही संगणक आणि टेलिकॉम क्षेत्रात बदल पुढे रेटणे ही गोष्ट साधी नव्हती. त्याचे काहीच श्रेय राजीवजींना नाही का? की केवळ ’राजीव गांधी’ हे नाव धारण केल्यामुळे त्यांना देय असलेले कोणतेच श्रेय द्यायचे नाही आणि कोणताही पुरावा नसताना बोफोर्स प्रकरणी राजीवजींनी पैसे खाल्ले असा निर्णय देऊन टाकायचा याला पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन सोडून दुसरे काय म्हणता येईल?
जशी प्रजा तसा राजा असा लोकशाहीचा नियमच आहे
या वाक्यासंबंधी दोन मुद्दे निघतात. १. आपली प्रजा संगणक आणि टेलिकॉम क्षेत्रातील बदल समजून घ्यायच्या परिपक्व अवस्थेत राजीवजींच्या पंतप्रधानपदाच्या कारिकिर्दीत नव्हती हे तर उघडच आहे. तरीही राजाकडे भविष्याची काहीतरी दृष्टी होती हे अमान्य कसे करता येईल? २. तुम्ही भाजप समर्थक आहात का ते माहित नाही. अनेकदा भाजप समर्थकांचे मत असते की १९९८-९९ मध्ये जनता परिपक्व होती कारण त्यांनी आम्हाला निवडून दिले.पण तीच जनता २००४-०९ मध्ये अपरिपक्व झाली आणि you get a government you deserve in a democracy असे त्यांचे मत असते. म्हणजे निवडणुकींचे निकाल आपल्याला अनुकूल झाले तर जनता चांगली आणि निकाल आपल्याविरूध्द लागला तर तीच जनता वाईट कशी? मग केवळ अशाचवेळी ’जशी प्रजा तसा राजा’ हे म्हणणे दुटप्पीपणा नाही का? क्लिंटन

In reply to by क्लिंटन

हुप्प्या 21/08/2010 - 19:26
देवीलालविषयी तीळमात्र आदर न बाळगता हे मी नक्की सांगेन की राजीवजींचे एकेकाळी टेलीकॉम हे जितके लाडके स्वप्न होते तितके देवीलालचे पाण्यातून वीज काढणे हे काही नव्हते. तो एक त्याच्या मूर्खपणाचा किस्सा आहे. पण ही ह्या राजकारण्याची संपूर्ण ओळख नव्हे. दुसरे असे की मला भाजपाबद्दल काहीही आदर नाही. मी एक वेळ काँग्रेसला मत देईन पण भाजपला नाही. यथा प्रजा तथा राजा हे मत नेहमीच लागू आहे असे मला वाटते. परमपूज्य राजीवजी नवे प्रयोग करु शकले याचे स्वच्छ कारण म्हणजे त्यांना गांधी घराण्यावरील लोकांची भक्ती. अगदी आणीबाणी हा अपवाद सोडला तर सहसा लोक त्यांची साथ सोडत नाहीत. काही प्रमाणात त्यांची राजेशाही असल्यामुळे त्यांना चोखाळलेली वाट सोडता आली. तळागाळातून आलेला राजकारणी असता तर अमक्या गटाला खूष करा, तमक्या लॉबीला खूष करा. ह्या जातीकडे बघा इ. कामात सगळा वेळ गेला असता. राजीवजी वरुन अलगत टपकले म्हणून आणि सॅम पित्रोडाशी मैत्री वगैरे गोष्टीमुळे हे घडले असावे. एक लहरी राजा होता. लहर आली, कर टेलिकॉम क्रांती, लहर आली धाड श्रीलंकेत सैन्य, लहर आली, फिरव शाह्बानोचा निर्णय , लहर आली, उघड अयोध्येच्या वादग्रस्त स्थळाचे कुलुप. भारतीय परिस्थितीचा फार सखोल अभ्यास, भारतीय मानसिकतेचा अभ्यास असे काही दिसत नाही. आपली प्रजा संगणक आणि टेलिकॉम क्षेत्रातील बदल समजून घ्यायच्या परिपक्व अवस्थेत राजीवजींच्या पंतप्रधानपदाच्या कारिकिर्दीत नव्हती हे तर उघडच आहे. तरीही राजाकडे भविष्याची काहीतरी दृष्टी होती हे अमान्य कसे करता येईल? अगदी असहमत. फोन यंत्रणा सुधारणे ह्या विचाराला जनता तयार नव्हती हा निष्कर्ष कसा काढला तुम्ही? उत्तम दळणवळणाला कोण नाही म्हणेल? का म्हणून? राजकारणी लोक ज्यांना तो पैसा इतरत्र वळवायचा असेल ते नाही म्हणतील पण जनता का बरे नाही म्हणेल?

In reply to by हुप्प्या

क्लिंटन 21/08/2010 - 20:50
राजीवजी वरुन अलगत टपकले म्हणून आणि सॅम पित्रोडाशी मैत्री वगैरे गोष्टीमुळे हे घडले असावे.
मी अमेरिकेत असताना माझ्या प्राध्यापकांचे सत्या एन. अतलुरी हे आर्यव्हाईन येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया येथील ज्येष्ठ प्राध्यापक हे मित्र-सहकारी होते.एका कॉन्फरन्सदरम्यान त्यांनी माझ्या प्राध्यापकांना आणि त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांना हॉटेलमध्ये डिनरसाठी बोलावले होते.त्यावेळी प्रा.अतलुरींना राजीव गांधींनी १९८८ मध्ये भारताला ’व्हिजन २०००’ साठी विशेष सल्लागार म्हणून बोलावून घेतले होते हे स्वत: अतलुरींनी बोलता बोलता आम्हाला सगळ्यांना सांगितले. वरील दुव्यावर प्रा.अतलुरींचा सीव्ही आहे आणि आधुनिक काळातील ऋषि हेच विशेषण त्यांना लागू पडेल हे त्यांच्या सीव्हीवर एक नजर फिरवली तरी आपल्या लक्षात येईल. आपल्याला वाचायला कंटाळा येतो पण अतलुरींच्या achievements संपतच नाहीत. त्यावेळी स्वत: अतलुरींनी राजीव गांधींना भविष्यकाळाचा दृष्टीकोन होता हे सांगितले. सॅम पित्रोदा हे नाव आपल्याला वर्तमानपत्रांमुळे माहित झाले. सत्या अतलुरी हे नाव मला स्वत: अतलुरींना भेटेपर्यंत माहित नव्हते आणि मिपावरील कोणालाही ते नाव आधी माहिती असायची शक्यता फारच थोडी आहे. अशा अनेक वेगवेगळ्या मोठ्या लोकांशी सल्लामसलत करून त्यांच्या सल्ल्याप्रमाणे पावले उचलायचा प्रामाणिक प्रयत्न राजीव गांधींनी केला होता असे अतलुरींनी मुद्दामून सांगितले. पण भारतातील परिस्थिती आणि लाल फित यामुळे त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना पाहिजे तितके यश आले नाही but Rajiv Gandhi meant business असे त्यांनी बोलताना म्हटले होते. तेव्हा एक लहरी राजा होता, आली लहर केली टेलिकॉम क्रांती इतका उथळ प्रकार हा नक्कीच नव्हता. बाकी चालू द्या.
परमपूज्य राजीवजी नवे प्रयोग करु शकले याचे स्वच्छ कारण म्हणजे त्यांना गांधी घराण्यावरील लोकांची भक्ती. अगदी आणीबाणी हा अपवाद सोडला तर सहसा लोक त्यांची साथ सोडत नाहीत.
हा निष्कर्ष तुम्ही कसा काढलात? राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या काळात ज्या निवडणुका झाल्या त्यात बहुसंख्य ठिकाणी त्यांचा पराभवच झाला.१९८४ च्या लोकसभा निवडणुकींमधील झंझावातानंतर मार्च १९८५ मध्ये कॉंग्रेस पक्ष उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान यासारख्या राज्यात जिंकला.पण प्रत्येक ठिकाणी त्या पक्षाचे बळ डिसेंबर १९८४ पेक्षा कमी झाले होते. उदाहरणार्थ डिसेंबर १९८४ मध्ये कॉंग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशात ८५ पैकी ८३ लोकसभेच्या जागा जिंकल्या.त्याच न्यायाने पक्षाने विधानसभेत विधानसभेत ४२५ पैकी किमान सव्वा तीनशे जागा जिंकायला हव्या होत्या. जिंकल्या किती? २६८! महाराष्ट्रात ४८ पैकी ४३ लोकसभा जागा जिंकणारा कॉंग्रेस पक्ष विधानसभेत मात्र २८८ पैकी १६७ जागाच जिंकू शकला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तर कॉंग्रेस पक्षाचा पराभवच झाला आणि रामकृष्ण हेगडे मुख्यमंत्री झाले.याच कर्नाटकात १९८४ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये कॉंग्रेसने मोठा विजय मिळवला होता. आंध्र प्रदेशात रामारावांनी परत एकदा कॉंग्रेस पक्षाला दणकून चोप आंध्र प्रदेशात दिला. पुढे कॉंग्रेस पक्षाचा सप्टेंबर १९८५ मध्ये पंजाबमध्ये तर नोव्हेंबर १९८५ मध्ये आसाममध्ये पराभव झाला.या राज्यांमधील पार्श्वभूमी वेगळी असल्यामुळे या राज्यांचा मुद्दा थोडा बाजूला ठेऊ या. पुढे मार्च १९८७ मध्ये केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टांनी असाच जोरदार चोप कॉंग्रेसला दिला. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाने पश्चिम बंगालमध्ये ४२ पैकी २० जागा जिंकल्या होत्या. खुद्द सोमनाथ चॅटर्जींचा पराभव झाला.या पार्श्वभूमीवर कम्युनिस्टांनी विधानसभेच्या २९४ पैकी २५०+ जागा जिंकणे म्हणजे कॉंग्रेसने खाल्लेली मोठीच आपटी नाही का?त्यानंतर राजीव गांधींना खरा धक्का बसला जून १९८७ मध्ये हरियाणामध्ये.९० पैकी अवघ्या चार जागा कॉंग्रेस पक्षाने जिंकल्या. खुद्द मुख्यमंत्री बन्सीलाल यांचा पराभव झाला. पुढे जानेवारी १९८९ मध्ये तामिळनाडूतील विधानसभा निवडणुका राजीव गांधींनी प्रतिष्ठेच्या केल्या आणि अण्णा द्रमुकशी युती न करता स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या. निकाल काय लागला? २३४ पैकी २६ जागा कॉंग्रेस पक्षाने जिंकल्या! वि.प्र.सिंह राजीव गांधींच्या मंत्रीमंडळातून आणि कॉंग्रेस पक्षातूनही बाहेर पडले आणि त्यांनी लोकसभेची पोटनिवडणुक कॉंग्रेसविरूध्द अलाहाबादेतून लढवली.त्या पोटनिवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. तेव्हा राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या कारिकिर्दीतही जनतेचा अबाधित पाठिंबा त्यांना होता आणि त्या जोरावर ते वाटेल ते करू शकत होते हे म्हणणे अप्रस्तुत वाटते.
भारतीय परिस्थितीचा फार सखोल अभ्यास, भारतीय मानसिकतेचा अभ्यास असे काही दिसत नाही.
यातही दोन मुद्दे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे हे दुर्दैवाने बहुसंख्य पंतप्रधानांविषयी खरे आहे. वाजपेयींविषयी बोलायचे झाले तर आली लहर गेले लाहोरला आणि केली लाहोर जाहिरनाम्यावर सही. मग कारगीलमध्ये कंबरड्यात मोठी लाथ बसली तेव्हा यांना जाग आली! इतकी वर्षे रामनामाचा जप केला त्या रामाला सत्ता मिळाल्यावर बासनात गुंडाळून ठेवले. पुढे २००१ मध्ये नागालॅंडच्या प्रश्नावर बृहद-नागालॅंडची निर्मिती करायचे आश्वासन देऊन बसले त्याविरूध्द मणिपूरमध्ये उग्र आंदोलन झाल्यावर यांना जाग आली. असे काहीनाकाही प्रत्येक पंतप्रधानाविषयी लिहिता येईल. आणि दुसरा मुद्दा म्हणजे भारतीय मानसिकता म्हणजे नक्की काय? आणि त्या मानसिकतेत जो सत्ताधीश गुरफटून राहिल तो भारताला नवी दिशा नक्कीच दाखवू शकणार नाही. भारतात आज जी प्रगती दिसते आहे ती मूठभर लोकांनी (ज्यांना आधुनिक काळाची जाण आहे आणि भविष्यकाळाचे व्हिजन आहे) केलेली आहे. बहुसंख्य जनता तर जातीपाती, रूढी-परंपरा यातच गुरफटलेली आहे.मग भारतीय मानसिकता म्हणजे ही बहुसंख्य लोकांची मानसिकता का? उत्तर प्रदेशातील बांदा-झाशी-चित्रकूट या बुंदेलखंडातील भागात सतीची परंपरा अजूनही चालते याविषयी डॉक्युमेन्टरी मी स्वत: एन.डी.टी.व्ही वर बघितली आहे.ही मानसिकता म्हणजे भारतीय मानसिकता का?अशा मानसिकतेत गुरफटलेला पंतप्रधान म्हणजे संकटास निमंत्रणच.
फोन यंत्रणा सुधारणे ह्या विचाराला जनता तयार नव्हती हा निष्कर्ष कसा काढला तुम्ही?
भारतातील बहुसंख्य (अगदी शिकल्या सवरलेल्यांनाही) लोकांचे भारतासारख्या गरीब लोकांच्या देशात फोन आणि संगणक गरजेचे नाहीत असेच मत होते. त्याकाळाशी संबंधित लेखांमधून मी हे नक्कीच वाचले आहे.तसेच पंगा या ज्येष्ठ मिपाकरांचे पूर्वी राजीव गांधींवर झालेल्या चर्चेतील हे मत बघा. विरोधी पक्षांचे तर सत्ताधारी पक्षाचे पाय खेचायचे परमकर्तव्य असते.तेव्हा गरीबांना ’तुझ्या भाकरीची सोय करायची सोडून राजीव सरकार फोन आणि संगणक आणत आहे’ असे राजकिय स्वार्थासाठी भडकावणे सोपे असते आणि देवीलालसारख्यांनी ते केले सुध्दा. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून नवीन बदलांना विरोध (केवळ फोन यंत्रणा सुधारणे असा संकुचित अर्थ कृपया घेऊ नको या) अशीच मानसिकता लोकांची होती.

In reply to by क्लिंटन

हुप्प्या 21/08/2010 - 23:04
राजीव गांधींची टेलिकॉम क्रांती हा फार विचार करुन, अभ्यासाने घेतलेला निर्णय होता असे मला अजूनही वाटत नाही. मुळात हा गृहस्थ अभ्यासू होता ह्याचे पुरावे फारसे नाहीत. एखाद्या क्षेत्रात गाजलेल्या परदेशस्थ व्यक्तीने राजीव गांधींबद्दल चांगले मत व्यक्त केले म्हणून त्यांचे मत ग्राह्य मानायचे हे काही पटत नाही. नंतरचे राजीव गांधींचे निर्णय बघता हा माणूस फार विचारी वाटत नाही. चमचे, संधीसाधू लोकांचे सल्ले घेऊन काम करणारा वाटतो. >>हा निष्कर्ष तुम्ही कसा काढलात? राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या काळात ज्या निवडणुका झाल्या त्यात बहुसंख्य ठिकाणी त्यांचा पराभवच झाला.१९८४ च्या लोकसभा निवडणुकींमधील झंझावातानंतर मार्च १९८५ मध्ये कॉंग्रेस पक्ष उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान यासारख्या राज्यात जिंकला.पण प्रत्येक ठिकाणी त्या पक्षाचे बळ डिसेंबर १९८४ पेक्षा कमी झाले होते. भारतात केंद्रीय पातळीवर कुठले घराणे कायम वरचढ असते? अर्थातच गांधी घराणे. संख्याबळ वरखाली होत असले, लंबक इकडे तिकडे हेलकावे घेत असला तरी गांधी घराण्याला मरण नाही असेच इतिहास सांगतो. अनुभव इतका कमी असताना, (बहुधा) अगदी कमी कष्ट करुन, इतका विजय मिळवल्यामुळे राजा बेसावध झाला असणे शक्य आहे. बोफोर्स प्रकरणी ही बेसावधता दिसलीच. नंतर बोफोर्स प्रकरण शौरी वगैरेंनी उचलून धरल्यामुळे साहेब हरले. पण ती सगळी नंतरची गोष्ट. भारतात लोकांना चांगले फोन होते ही आपली माहिती साफ चुकीची आहे. माझ्या आसपासच्या लोकांचे तरी असे मत नव्हते. असे काही सर्वेक्षण वगैरे केले होते का? निव्वळ काही डाव्या विचारसारणीच्या लेखकांचे मत हे प्रातिनिधिक का मानायचे? >> यातही दोन मुद्दे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे हे दुर्दैवाने बहुसंख्य पंतप्रधानांविषयी खरे आहे. वाजपेयींविषयी बोलायचे झाले तर आली लहर गेले लाहोरला आणि केली लाहोर जाहिरनाम्यावर सही. मग कारगीलमध्ये कंबरड्यात मोठी लाथ बसली तेव्हा यांना जाग आली! इतकी वर्षे रामनामाचा जप केला त्या रामाला सत्ता मिळाल्यावर बासनात गुंडाळून ठेवले. पुढे २००१ मध्ये नागालॅंडच्या प्रश्नावर बृहद-नागालॅंडची निर्मिती करायचे आश्वासन देऊन बसले त्याविरूध्द मणिपूरमध्ये उग्र आंदोलन झाल्यावर यांना जाग आली. असे काहीनाकाही प्रत्येक पंतप्रधानाविषयी लिहिता येईल. आपल्याला वाजपेयींना शिव्या देण्याची फार हौस दिसते. मीही काही वाजपेयींचा चाहता नाही. हव्या तर मी आणखी शिव्या घालतो. पण विषय तो नाही. राजीवजी खूप खूप थोर आहेत हा ह्या लेखाचा विषय आहे. त्यामुळे इतर फालतू पंतप्रधान किती वाईट होते आणि त्यांचे कसे चुकले होते हे विषयांतर नको. दुसर्‍याचे चुकले म्हणून ह्यांची चूक ठीक होत नाही. भारतीय मानसिकता जाणणे म्हणजे निव्वळ भारतीयांना हवे तेच करणे असे नाही तर आपल्या देशाचा इतिहास, समाजशास्त्र जाणणे. त्या आधारावर आपल्या निर्णयाचे दूरगामी परिणाम ओळ्खणे. तो विचार करुन निर्णय घेणे. शाहबानोचा निर्णय फिरवताना भारतीय मुस्लिमांची, हिंदूंची मानसिकता जाणणे आवश्यक होते. तीच गोष्ट अयोध्येच्या वास्तूचे कुलुप उघडण्यापूर्वी. ह्या दोन्ही कृत्याचे अगदी वाईट परिणाम आहेत. आणि ते दीर्घकाळ टिकणार आहेत.

In reply to by हुप्प्या

क्लिंटन 21/08/2010 - 23:52
निदान आपली प्रगती ’राजीव गांधींची टेलिकॉम क्रांती’ हे म्हणण्याइतकी झाली हे पण काही कमी नाही. नाहीतर राजीव गांधींचे बहुसंख्य टिकाकार त्यांच्या यातला वाटाच मुळात नाकारतात.
मुळात हा गृहस्थ अभ्यासू होता ह्याचे पुरावे फारसे नाहीत.
मान्य.पण राजीव गांधी हे एक well meaning पंतप्रधान होते आणि भारताचे भवितव्य संगणक आणि टेलिफोन क्रांतीत आहे हे समजण्याइतकी पात्रता त्यांची होती.आणि त्यासाठीच त्यांनी सॅम पित्रोदा,सत्या अतलुरी यासारख्या नावाजलेल्या लोकांचे सल्ले घेऊन त्यादिशेने पावले टाकायला प्रारंभ केला होता.त्यात त्यांना यश पूर्णपणे आले नाही म्हणून त्यांच्या मूळ उद्देशालाच नाकारणे योग्य नाही.
एखाद्या क्षेत्रात गाजलेल्या परदेशस्थ व्यक्तीने राजीव गांधींबद्दल चांगले मत व्यक्त केले म्हणून त्यांचे मत ग्राह्य मानायचे हे काही पटत नाही.
मग कोणाचे मत ग्राह्य धरायचे?निदान नव्या सुधारणा घडवून आणण्यासाठी राजीव गांधींनी ज्यांना सल्लागार म्हणून नियुक्त केले आणि अशा सल्लागारांनी राजीव गांधींबरोबर जवळून काम केले अशांचे मत अधिक ग्राह्य की राजीव गांधी हे नाव ऐकताच त्यांना कसलेच (अगदी देय असलेलेही) श्रेय द्यायचे नाही असा पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन असलेल्यांचे?
बोफोर्स प्रकरणी ही बेसावधता दिसलीच.
बोफोर्स प्रकरणी बेसावधतेपेक्षा राजीव गांधी चाणक्यनितीचे खेळ खेळण्यात कमी पडले. ’मी बोफोर्स प्रकरणी पैसे घेतलेले नाहीत’ हे त्यांनी अनंतवेळा सांगितले.त्यातूनच बोफोर्स प्रकरण राजीव गांधींनी स्वत:हूनच लोकांच्या स्मरणात राहिल अशी व्य्वस्था करून ठेवली. याउलट नरसिंह रावांवर हर्षद मेहताने लाच दिल्याचा आरोप केला तर त्यावर रावांनी चकार शब्द काढला नाही. महिन्या दोन महिन्यात ते प्रकरण आपोआपच मागे पडले.
राजीवजी खूप खूप थोर आहेत हा ह्या लेखाचा विषय आहे.
नाही संदर्भ चुकला.मूळ लेखाचा विषय राजीव गांधींना त्यांच्या ६६व्या जयंतीनिमित्त श्रध्दांजली वाहणे हा आहे.आणि राजीव गांधी हे नाव ऐकतात तुमच्यासारखे लोक त्यांच्याविषयी पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन बाळगून त्यांना देय असलेले श्रेय द्यायलापण नकार देतात हे मला पूर्णपणे माहित असल्यामुळे त्यांच्याविषयीचे तटस्थ अभ्यासातून मी बनविलेले मत मांडणे हा माझ्यापुरता या लेखाचा उद्देश मी वाढविला असे म्हटले तरी चालेल. मी जेवढ्या हिरीरीने राजीव गांधींच्या नव्या काळानुरूप असलेल्या धोरणांचा पुरस्कार करतो तितक्याच हिरीरीने श्रीलंका प्रकरणी त्यांचा विरोधही करतो हे वरील एका प्रतिसादात दिसून आले असेलच. राजीव गांधी खूप खूप थोर आहेत असा म्हणायचा माझा मुळातच उद्देश नाही.माझा उद्देश एकच की त्यांच्या कारभाराचे वस्तुनिष्ठ मुल्यांकन करावे आणि बहुसंख्य लोक त्यांच्यावर टिका करतात त्याचबरोबर त्यांना देय असलेले श्रेयसुध्दा संकोच न करता द्यावे. कोणाही राजकिय/ऐतिहासिक व्यक्तीविषयी पूर्वग्रहदूषित मते ठेवणे ही वस्तुनिष्ठ अभ्यासाची पायरी नव्हे.
शाहबानोचा निर्णय फिरवताना भारतीय मुस्लिमांची, हिंदूंची मानसिकता जाणणे आवश्यक होते.
मागे मृगनयनी यांच्याच राजीव गांधींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रध्दांजली वाहायच्या चर्चेत आपण "मुस्लिमांकरता असणारे घटस्फोटविषयक कायदे हे कित्येक मुस्लिम देशांपेक्षा जुनाट, रानटी आणि असंस्कृत आहेत. त्याचे श्रेय ह्या महाभागलाच दिले पाहिजे" हे विधान केले होते. त्यावरील चर्चा मी परत जशीच्या तशी इथे चिकटवत आहे. त्यावेळी तुम्ही उत्तरे द्यायचे टाळले होतेत. ती उत्तरे आता देणार का? (माझा मूळ चर्चेवरील प्रतिसाद: इथे
"मुस्लिमांकरता असणारे घटस्फोटविषयक कायदे हे कित्येक मुस्लिम देशांपेक्षा जुनाट, रानटी आणि असंस्कृत आहेत. त्याचे श्रेय ह्या महाभागलाच दिले पाहिजे"
या वाक्याचा अधिक खुलासा करू शकाल का? माझ्या माहितीप्रमाणे शाहबानो या मुस्लिम महिलेस तिच्या नवऱ्याने ’तलाक’ दिला. शरियतप्रमाणे अशा तलाक दिलेल्या महिलेस पोटगीचा हक्क नाही. पण न्यायालयाने शाहबानोला पोटगी मिळावी असा आदेश दिला. त्यावर मुल्ला मौलवींचे पित्त खवळले आणि त्यांनी आंदोलनाची धमकी दिली. त्यापुढे राजीव सरकार नमले आणि संसदेत कायदा करून न्यायालयाचा निर्णय फिरविण्यात आला. ही माहिती चुकीची असल्यास बरोबर माहिती सांगावी ही विनंती. काही प्रश्न: १. राजीव सरकारने न्यायालयाचा निर्णय फिरविण्यापूर्वी या संदर्भातले कायदे कसे होते? २. राजीव सरकारने निर्णय फिरविल्यामुळे नक्की काय बदल झाला? ३. तुम्ही जे म्हणत आहात त्याप्रमाणे आपल्याकडील कायदे अनेक मुस्लिम देशांमधील कायद्यांपेक्षा जुनाट आणि असंस्कृत आहेत. नक्की कोणत्या मुस्लिम देशांमध्ये आपल्याकडील कायद्यांपेक्षा आधुनिक आणि सुसंस्कृत कायदे आहेत? त्यात नक्की फरक काय? याविषयी अधिक माहिती दिल्यास बरे होईल.
कॉंग्रेस धर्मपिसाट मुस्लिमांचे पाय चाटते हे सिद्ध करायला शाहबानो केस हे उदाहरण इतिहासात कायमचे राहील.
एकेकाळी मी स्वत: भाजपच्या कळपातला (कदाचित अडवाणी-वाजपेयींपेक्षा) कट्टर समर्थक होतो. त्याकाळी मी पण तसेच म्हणत असे. आणि पूर्णपणे तटस्थपणे विचार केला तर शाहबानो प्रकरणी न्यायालयाचा आदेश फिरविणे अयोग्य होते असे मला वाटते. आज आपण २०१० मध्ये आहोत आणि चर्चा करत आहोत १९८५-८६ च्या शाहबानो प्रकरणाची म्हणजे २५ वर्षे जुन्या प्रकरणाची. मी आपल्याला आणखी ३५ वर्षे मागे घेऊन जातो. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळात डॉ.आंबेडकर कायदामंत्री होते. त्यांनी नेहरू सरकारपुढे ’हिंदू कोड बिल’ आणण्यासाठी पाठपुरावा केला. पंडित नेहरूंचा या बिलाला तत्वत: पाठिंबा होता. तसेच समान नागरी कायदा आणायलाही नेहरूंचा तत्वत: पाठिंबा होता पण फाळणीच्या वेळी झालेल्या प्रचंड हिंसाचारामुळे त्यांनी समान नागरी कायदा आणायचा निर्णय पुढे ढकलला (संदर्भ: रामचंद्र गुहांचे India After Gandhi हे पुस्तक). आंबेडकरांचे हिंदू कोड बिल हे हिंदू समाजापुरते मर्यादित होते. आंबेडकरांच्या प्रस्तावित हिंदू कोड बिलाप्रमाणे एकापेक्षा अधिक लग्ने करण्यास बंदी, मुलींना संपत्तीत वाटा देणे, घटस्फोटांना मान्यता, मुली दत्तक घेण्यास परवानगी यासारखे भाग होते. तसेच सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हिंदू या शब्दाची व्याख्या जे मुस्लिम, ख्रिस्ती, पारशी आणि ज्यू नाहीत ते अशी केली. म्हणजे बौध्द, जैन आणि शीख हे पण हिंदू समुदायाचाच भाग म्हणून गणण्यात येणार होते. तसेच हिंदू समाजाला एक समाज म्हणून (जातींचा उल्लेख न करता) गणण्यात येणार होते. (संदर्भ: एक , दोन ) या प्रस्तावित हिंदू कोड बिलाविरूध्द हिंदुत्ववादी संघटनांनी राळ उठवली. निर्मलचंद्र चॅटर्जी (सोमनाथ चॅटर्जींचे वडिल) आणि शामाप्रसाद मुखर्जी या हिंदुत्ववादी नेत्यांनी हे बिल म्हणजे हिंदू समाजातील कुटुंब आणि विवाहविषयक परंपरांना धोका आहे असे म्हटले. करपात्री महाराजांची रामराज्य परिषद ही संघटना या बिलाविरूध्द केलेल्या आंदोलनातून उभी राहिली. शामाप्रसाद मुखर्जी म्हणाले की सरकारने मुस्लिम कायद्यांमध्ये काही बदल केलेला नाही. संदर्भ ते म्हणणे तथ्याला धरून होते. यावर पंडित नेहरूंचे उत्तर कोणते होते हे पण याच संदर्भात दिले आहे. पुढील काळात होणाऱ्या आंदोलनांना घाबरून नेहरू सरकारने हिंदू कोड बिल प्रस्तावित स्वरूपात आणले नाही आणि त्याच्या निषेधार्थ डॉ.आंबेडकरांनी कायदामंत्री पदाचा राजीनामा दिला. नंतरच्या काळात नेहरू सरकारने ४ वेगवेगळी बिले पास केली पण त्यात आंबेडकरांना अभिप्रेत असलेले हिंदू कोड बिल पूर्णपणे नव्हते. राष्ट्रपती राजेन्द्रप्रसाद यांचाही या बिलाला विरोध होता. काही प्रश्न: १. सरकारने मुस्लिम कायद्यांमध्ये बदल केले नाहीत हे म्हणणे बरोबरच होते. पण तत्वत: हिंदू कोड बिलात वाईट काय होते? तसाच बदल मुस्लिम कायद्यातही घडवावा असा आग्रह धरणे वेगळे आणि मुस्लिम समाज आपले जुनेपुराणे विचार सोडायला तयार नाही म्हणून आपणही ते सोडणार नाही असे म्हणणे आणि म्हणून बिलाला विरोध करणे वेगळे. २. हिंदू कोड बिलाला ’आमच्या परंपरांना धक्का लागेल’ असे म्हणून विरोध करणे समर्थनीय होते का? ३. ते समर्थनीय असेल तर मुस्लिम समाजाने न्यायालयाचा निर्णय म्हणजे त्यांच्या परंपरांना लावलेला धक्का असे म्हटले तर त्यात काय बिघडले? ४. राजीव सरकारने शाहबानो प्रकरणी मुस्लिम मूलतत्ववाद्यांपुढे लोटांगण घातले त्याचप्रमाणे नेहरू सरकारने हिंदू मूलतत्ववाद्यांपुढे लोटांगण घातले असे म्हटले तर काय चुकले? ५. राजीव सरकारने घातलेले लोटांगण हे धर्मांध मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळायला असेल तर नेहरू सरकारचे लोटांगण हे धर्मांध हिंदूंच्या कफन्या सांभाळायला घातलेले होते असे म्हटले तर त्यात काय चुकले? ६. पण स्वत:ला हिंदुत्ववादी समजणारे पक्ष असे म्हणत नाहीत. ते का? (अवांतर: हिंदुत्ववादी पक्ष गांधींनी १९१९ मध्ये खिलाफत चळवळीला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांच्यावर टिका करतात. पण लोकमान्य टिळकांनी मुस्लिम लीगशी त्यापूर्वी ३ वर्षे केलेल्या लखनौ कराराविषयी मौन का बाळतात? स्वातंत्र्यलढ्यात मुस्लिमांचे सहकार्य मिळावे हा जर टिळकांचा त्यामागचा उद्देश असेल तर तोच उद्देश गांधींचाही होता. मग टिका करताना टिळकांना आपल्या बाजूला ओढून घेऊन केवळ गांधींवर टिका का?) मला वाटते नेहरू सरकारने हिंदू कोड बिलावर घेतलेली माघार आणि राजीव सरकारने शाहबानो प्रकरणी घेतलेली माघार यासारख्या घटनांमागे सरकारचे अतिनेमस्त धोरण कारणीभूत आहे. हिंदू संघटनांनी मोठ्या आंदोलनाची धमकी दिली आणि नेहरू नमले. मुस्लिम संघटनांनी मोठ्या आंदोलनाची धमकी दिली आणि राजीव गांधी नमले. काही वाटेल ते झाले तरी चालेल कायद्यापुढे धमक्या चालायच्या नाहीत असे ठणकावून दोघांनीही सांगितले नाही. तसेच भारताचे विमान कंदाहारला पळवून नेल्यावर वाजपेयी नमले. काहीही झाले तरी दहशतवाद्यांपुढे लोटांगण घालणार नाही असे वाजपेयी ठणकावून सांगू शकले नाहीत. या सगळ्या घटनांचे कारण -- आपल्या समाजाचा (आणि म्हणून समाजानेच निवडून दिलेल्या सरकारचा) अति नेमस्तपणा हेच आहे असे मला वाटते. एकट्या राजीव-नेहरू-वाजपेयींना तरी का का दोष द्यावा? या प्रश्नांना तुम्ही मागे उत्तरे द्यायचे टाळले होतेत ती आता देणार का? मी राजीव सरकारच्या शाहबानो प्रकरणाबरोबरच नेहरू सरकारची हिंदू कोड बिलावरील माघारीवरही तितक्याच प्रमाणावर टिका करत आहे. क्लिंटन

In reply to by क्लिंटन

रमताराम 20/08/2011 - 14:39
टोपी काढली आहे सायबा. श्री. विल्यम जेफरसन क्लिंटन यांना इथे दिलेल्या एकाहुन अधिक साक्षेपी नि अभ्यासपूर्ण प्रतिसादांबद्दल आमच्याकडून एक भक्कमशी पार्टी लागू झालेली आहे. इतके तपशीलवार नि नि तरीही मुद्दे धरून प्रतिसाद फारच क्वचितच वाचायला मिळतात. मुद्दे १ ते ६ अतिशय मार्मिक आहेत. पण काय आहे माणूस हा प्राणीच असा आहे ज्याच्याबाबत 'आपला तो बाब्या' हे नेहमीच खरे असते. माझा धर्म बरोबर तुमचा भ्रष्ट, माझं ज्योतिष अचूक तुमची नाडीपट्टी खोटी, आमचे नेते स्वच्छ तुम्ही सगळे भ्रष्ट, आमचे लिखाणातील पुरावे मागायचे नाहीत आहे तसे मान्य करायलाच हवे तुम्ही, तुम्ही कितीही अभ्यासपूर्ण, टीपांसहित लिहिलेत तरी तुमचे संदर्भ खोटे, हा सारा मूर्खपणा सार्वत्रिक आहे, त्याला इलाज नाही. शेवटी काय 'आहे' हे समजून घेण्यापेक्षा काय 'असायला हवे' असे आपल्याला वाटते ते 'आहेच' असा समज करून घेणे सोपे नि डोस्क्याला ताप न देणारे असते साहेब. असा तुमच्यासारखा बयाजवार अब्यास करायला टैम हाय कुनाकडं राव. असो. पुन्हा एकवार टोपी काढतो आहे. हॅट्स ऑफ सरजी.

In reply to by क्लिंटन

चिंतामणी 20/08/2011 - 16:55
निदान आपली प्रगती ’राजीव गांधींची टेलिकॉम क्रांती’ हे म्हणण्याइतकी झाली हे पण काही कमी नाही. नाहीतर राजीव गांधींचे बहुसंख्य टिकाकार त्यांच्या यातला वाटाच मुळात नाकारतात. आज पुणे मुंबई प्रवास करताना फक्त एक्सप्रेस हायवेनेच अजेकजण प्रवास करतात. मुंबईत अनेक फ्लायओव्हर बांधुन वाहतुक खूप प्रमाणात प्रवाही झाली. पण त्या काळात "ही चैन कोणाला परडवणार आहे" असे अनेकजण बेँबीच्या देठापासुन ओरडत असत. वाजपेयीच्या काळात राष्ट्रीय महामार्ग आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना इत्यादीमुळे रस्ते मोठे व वाहतुक वेगाने होउ लागली. त्या काळात महागाई नव्हतीच असे म्हणले तर वावगे होउ नये. या आणि अश्या अनेक गोष्टी चांगल्या झाल्या होत्या. त्याला "चांगले" असे म्हणले का कधी त्यांच्या विरोधकांनी. तुझ्याच शब्दात सांगायचे तर "त्यात त्यांना यश पूर्णपणे आले नाही म्हणून त्यांच्या मूळ उद्देशालाच नाकारणे योग्य नाही." काही प्रश्न: १. सरकारने मुस्लिम कायद्यांमध्ये बदल केले नाहीत हे म्हणणे बरोबरच होते. पण तत्वत: हिंदू कोड बिलात वाईट काय होते? मा. आंबेडकरांनी मांडलेल्या बिलात काय काय तरतुदी होत्या आणि पं.नेहरूनी त्यांनी त्या बिलात (तु म्हणतो त्या प्रमाणे- हिंदूववादी संघटनांनी राळ उठवल्याने) जे बदल केले याचे तपशील तुला स्वत:ला माहीत आहेत काय???? २. हिंदू कोड बिलाला ’आमच्या परंपरांना धक्का लागेल’ असे म्हणून विरोध करणे समर्थनीय होते का? कोणी समर्थन केले (मुकर्जी आणि चटर्जी यांचे व्यतिरीक्त) याचा आणि हिंदू कोड बिलातील कोणत्या तरतुदींविरूध्द राळ उठवली याचा तपशील मिळाल्यावर मत व्यक्त केले जाईल. ३. ते समर्थनीय असेल तर मुस्लिम समाजाने न्यायालयाचा निर्णय म्हणजे त्यांच्या परंपरांना लावलेला धक्का असे म्हटले तर त्यात काय बिघडले? म्हणजे येथे कायदा निदान १९४७सालापासून अस्तीत्वात होता. नवीन कायदा केला त्या आधारे निर्णय दिला असे तर नव्हते. फक्त तो पर्यन्त कोणिही कोर्टात जाउन पोटगी मागीतली नव्हती. ती शहाबानोनी कायद्याला धरून मागीतली होती. तोडे विषयांतर होइल. पण आवश्यक आहे म्हणून विचारतो, कोर्ट अस्तीत्वात असताना "शरीयतप्रमाणे" निवाडा करणे योग्य आहे का? एकाच देशात वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे कायदे हे तत्व मान्य आहे का तुला????? ४. राजीव सरकारने शाहबानो प्रकरणी मुस्लिम मूलतत्ववाद्यांपुढे लोटांगण घातले त्याचप्रमाणे नेहरू सरकारने हिंदू मूलतत्ववाद्यांपुढे लोटांगण घातले असे म्हटले तर काय चुकले? ५. राजीव सरकारने घातलेले लोटांगण हे धर्मांध मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळायला असेल तर नेहरू सरकारचे लोटांगण हे धर्मांध हिंदूंच्या कफन्या सांभाळायला घातलेले होते असे म्हटले तर त्यात काय चुकले? वरील दोन्ही प्रश्णांचे उत्तर प्र.दोनला दिलेल्या उत्तराप्रमाणेच. ६. पण स्वत:ला हिंदुत्ववादी समजणारे पक्ष असे म्हणत नाहीत. ते का? (अवांतर: हिंदुत्ववादी पक्ष गांधींनी १९१९ मध्ये खिलाफत चळवळीला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांच्यावर टिका करतात. पण लोकमान्य टिळकांनी मुस्लिम लीगशी त्यापूर्वी ३ वर्षे केलेल्या लखनौ कराराविषयी मौन का बाळतात? स्वातंत्र्यलढ्यात मुस्लिमांचे सहकार्य मिळावे हा जर टिळकांचा त्यामागचा उद्देश असेल तर तोच उद्देश गांधींचाही होता. मग टिका करताना टिळकांना आपल्या बाजूला ओढून घेऊन केवळ गांधींवर टिका का?) तु ज्यापध्दतीने तुलना करीत आहेस ते बघता असे दिसत आहे की "खिलाफत चळवळ काय होती ते कदाचीत पुर्णपणे माहीत नसावे. आणि कदाचीत "लखनौ करारा विषयीसुद्धा हीच परीस्थीत असावे असे वाटते. म्हणून मत देत नाही. [ए. जी. (अब्दुल गफूर) नूरानी यांनी टिळक आणि जीना या दोघांच्या संबंधांवर एक ग्रंथ लिहिला आहे. ‘जीना अ‍ॅण्ड टिळक- कॉम्रेड्स इन द फ्रीडम स्ट्रगल’ त्यात लखनौ कराराविषयी सर्वात अधीकृत माहिती वाचायला मिळेल]

In reply to by हुप्प्या

बेसनलाडू 21/08/2010 - 03:38
विप्रो, इन्फोसिस आणि सत्यम ही मंडळी गुगल, अ‍ॅपल, सिस्को, मायक्रोसॉफ्ट च्या डोळ्यासमोर तारे चमकतील असे नवनवे शोध लावत आहेत! पडलोच! भारी!! (विनोदी)बेसनलाडू

In reply to by हुप्प्या

विंजिनेर 21/08/2010 - 18:36
विप्रो, इन्फोसिस आणि सत्यम ही मंडळी गुगल, अ‍ॅपल, सिस्को, मायक्रोसॉफ्ट च्या डोळ्यासमोर तारे चमकतील असे नवनवे शोध लावत आहेत!
ठार मेलो! हुच्च!

मृत्युन्जय 20/08/2010 - 23:10
हो आणि त्यांच्यामुळेच भारता बोफोर्स तोफा आल्या. त्यांचा कारगिलच्या युद्धात किती उपयोग झाला महितीये? भारतात जागतिकीकरणाचे वारे पण त्यांच्यामुळेच वाहायला लागले हे पण मान्य करायला लागेल.

हुप्प्या 21/08/2010 - 02:19
मला वाटते भारतीयांचा उद्धार करायला राजीवजींच्या रुपाने एक प्रेषितच देवाने भारतात धाडला. एका हातात टेलिफोन दुसर्‍या हातात संगणक, मागल्या खिशात कीबोर्ड आणि माऊस, कंबरेला सगळ्यांकरता केबल्स अशा अवतारात मारुती कारमधे स्वार होऊन हा महात्मा भारतात आला. (नंतर बहुधा स्वर्गात शोस्टॉपर बग आल्यामुळे देवाने त्यांना घाईघाईने परत बोलावले.) जाण्यापूर्वी चोरखिशात ठेवलेला एक मोबाईल फोन त्यांनी सोनियाजींना दिला आणि त्यामुळेच आपल्या देशात मोबाईलची क्रांती आली. मोझेस जसा दहा देवाज्ञा लिहिलेल्या शिळा घेऊन भूतलावर आला तसेच राजीवजीही नव्या युगाच्या शिळा घेऊन आले! आता राहुलजींमुळे गुगल, फेसबुक, आयफोन आणि अ‍ॅण्ड्रॉईडची क्राती येत आहे. तीन पिढ्या एकहाती अशी क्रांती घडवतायत असे दृश्य भूतलावर कुठेतरी पहायला मिळेल का?

राजीवजी दिसायला हॅन्डसम होते. म्हणून बर्‍याच बायकाना ते आवडायचे असे ऐकून आहे. धाग्याच्या शीर्षकातच मिस यु, लव्ह यु असं 'हरणासारखे डोळे' असलेल्या बाईंनी लिहिलं आहे. त्यावरुनच काय ते समजून जा.

In reply to by अप्पा जोगळेकर

मृगनयनी 21/08/2010 - 12:03
धाग्याच्या शीर्षकातच मिस यु, लव्ह यु असं 'हरणासारखे डोळे' असलेल्या बाईंनी लिहिलं आहे. त्यावरुनच काय ते समजून जा. हा हा हा हा हा !!! आप्पा!, राजीव'जी गेले...तेव्हा मी ४-५ वर्षांची होते हो फक्त! ;) पण तेव्हादेखील मला त्यांचे व्यक्तिमत्व आवडायचे! :) :)

In reply to by wings

मृगनयनी 21/08/2010 - 13:18
पंख्या उर्फ wings... :) तुमच्याकडे टी.व्ही. पण नव्हता.. का तेव्हा? कारण टीव्ही'वर राजीव'जींचे सगळे अन्त्यविधी दाखवत होते! रस्तोरस्ती.. लोक मूकमोर्चा काढत होते.... आमच्या पुण्यात देखील अनेक मुस्लिम लोक "नाचणीच्या भाकरी"ला करतात... तसा आक्रोश करत होते! ;) _________ आणि तुम्ही तेव्हा ६-७ वर्षांचे होतात... म्हणजे १ली किन्वा २ रीत नक्की असणार! आणि २ रीत असूनही तुम्हाला काही आठवत असेल... तर तुम्ही नक्कीच मठ्ठ असणार! ;) _________

In reply to by मृगनयनी

मृत्युन्जय 21/08/2010 - 14:55
तुमच्याकडे टी.व्ही. पण नव्हता.. का तेव्हा? कारण टीव्ही'वर राजीव'जींचे सगळे अन्त्यविधी दाखवत होते! अंत्यविधी बघता बघता आवडले तुम्हाला ते?

In reply to by मृगनयनी

भारतीय 21/08/2010 - 17:23
पंख्या उर्फ wings.. म्हणजे आम्हीच बरं का! भ्रमणध्वनीचा ऊपयोग करून मिपावर असलो कि आम्ही wings असतो! तेंव्हा फक्त वाचनमात्र असतो पण 'हरणांसारखे डोळे' असणार्‍या व्यक्ती जेंव्हा असामान्य प्रतिसाद देतात तेंव्हा रहावत नाही हो! असो.. >>तुमच्याकडे टी.व्ही. पण नव्हता.. का तेव्हा? कारण टीव्ही'वर राजीव'जींचे सगळे अन्त्यविधी दाखवत होते! आम्ही खेड्यात वाढलेले ! राजीवजींची क्रांती आमच्याकडे पोहोचायला १९९२ ऊजाडले व आमच्याकडे टी.व्ही. आला..!! पण दै. सकाळ मात्र मी जन्मायच्या अगोदरपासून घरी येत असे... त्यात राजीवजींना 'व्यवस्थित' कव्हर केले नसावे का? (केलेच असेल्...कदाचित आम्हीच मठ्ठ असू! किंवा मी 'मुलगी' व त्यातही 'हरणांचे डोळे' नसल्याने रजीवजींच्या फोटोकडे लक्षच गेले नसावे!) >>आमच्या पुण्यात देखील अनेक मुस्लिम लोक "नाचणीच्या भाकरी"ला करतात... तसा आक्रोश करत होते पुणे आमचे देखील बरं का.. गेली १५ वर्षे पुणेच आहे आमच्या आयुष्यात! बाकी आम्ही मठ्ठ हे एकदम मान्य! ;)

In reply to by भारतीय

मृगनयनी 21/08/2010 - 18:23
अय्या!... माझ्या हरणासारख्या डोळ्यांना फारच प्रसिद्धी मिळतेय बुवा! ;) __________________________________ असो... भारतीय पंखा..... उपयुक्त माहितीबद्दल आभारी आहे.... प्रतिसादाबद्दल धन्यवाद! अजून काही नवी माहिती असेल... राजीव'जींबद्दल.. तर कृपया इथे टंका... संकोच करू नका..... तुम्ही "भारतीय" असल्याने तुम्हाला घटनेने आणि मिसळपावच्या सम्पादकीय महा-मन्डळाने इथे टंकण्याचा अधिकार दिलेला आहे.... ___ हुश्श! :) --- मन्डळ आभारी आहे... __ सर्वांना विकान्ताच्या शुभेच्छा! :)

सुनील 21/08/2010 - 13:53
राजीव गांधींमुळे भारतात संगणकक्रांती झाली हे साफ़ चूक आहे. आमच्याकडे संगणक पूर्वीच होते. इतकेच काय, मोबाईल, विमाने इ. सगळे सगळे काही होते. (नाहीतर, अयोद्धेपासून थेट लंकेपर्यंत राम गूगलमॅपशिवाय जाऊ कसा शकेल?) परंतु, उदो उदो होतो तो केवळ राजघराण्याचा! कारण पाठ्यपुस्तकेच!. म्हणून आम्ही ही पाठ्यपुस्तकेच बदलायला निघालो होतो, पण जनतेने आम्हाला लागोपाठ दोन वेळा शत-प्रतिशत घरी बसवले! तरीही आम्ही हिंमत सोडली नाही. जमेल तिथे, जमेल तितक्या वेळा, कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रयक्ष, कधी बोंबलून तर कधी कुजबुजून, आम्ही राजघराण्याविरुद्ध शंख करायचे काही सोडले नाही. पण हाय रे दैवा! त्यांची चौथी पिढीच काय पण बाहेरून आलेली सूनदेखिल लोकप्रियता कमावत आहे. पण आम्ही हिंमत सोडणार नाही. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा गर्व महत्त्वाचा हे जनतेला एक दिवस कळेलच. बद्धकोष्ठ्बापूंचा राम आमचे युद्ध लढायला येणार आणि रावण मरणार, निश्चित!

In reply to by सुनील

मृगनयनी 21/08/2010 - 14:09
पण आम्ही हिंमत सोडणार नाही. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा गर्व महत्त्वाचा हे जनतेला एक दिवस कळेलच. इतकाही गर्व करू नका... कारण गर्वाचं घर खाली असतं! ;) ;) ;) आणि हो, राजीव गांधी, राजघराणे आणि पाठ्यपुस्तके असा एक वेगळा धागा काढून तिथे (अ)विचारप्रदर्शन करा.. इथे "राजीव गांधीं " बद्दल काही माहिती असेल. तर सांगू शकता.... बद्धकोष्ठता झाली असेल, तर "ऑम्लेट" खाणं कमी करा.... नैतर उगीच नन्तर पाण्याच प्रॉब्लेम झाला... तर आमच्या बापूंचेच नाव घ्यावे लागेल!

In reply to by मृगनयनी

सुनील 21/08/2010 - 15:28
कारण गर्वाचं घर खाली असतं हे बाकी बरोबर! शायनिंग अहुजाचं काय झालं बघितलत ना? इथे "राजीव गांधीं " बद्दल काही माहिती असेल नाय बॉ! आम्ही काही वाचत-बिचत नाही. खोटं कशाला बोला? हां पण आमची मतं बाकी एकदम ठाम बर्रका!! अजिबात बदलायची नाहीत ती! (गुर्जींची शिकवणच तशी!) "ऑम्लेट" खाणं कमी करा आरारारारारारारा.... श्रावणात आमलेट? छ्या छ्या भलतच काय? श्रावणात आम्ही फक्त पिठलं खातो! (हां, आता पिठल्यातल्या मिरच्या कुणाला झोंबल्या तर आम्ही काय करू शकत नाय बॉ!)

In reply to by सुनील

मृगनयनी 21/08/2010 - 15:40
नाय बॉ! आम्ही काही वाचत-बिचत नाही. खोटं कशाला बोला? हां पण आमची मतं बाकी एकदम ठाम बर्रका!! अजिबात बदलायची नाहीत ती! (गुर्जींची शिकवणच तशी!) ह्म्म्म!... वाचत बिचत नसलात, तरी "एखाद-दुसरी यत्ता" तरी शाळंला गेला असाल की न्हायी! ;) म्हणजे अक्षरओळख आहे.. असं गृहित धरायला हरकत नसावी! __ सांगायचा मुद्दा इतकाच, की राजीव गांधींव्यतिरिक्त काही लिहायचं असेल.. तर आपण नवीन धागा उघडु शकता! :) _______________ "ऑम्लेट" खाणं कमी करा आरारारारारारारा.... श्रावणात आमलेट? छ्या छ्या भलतच काय? श्रावणात आम्ही फक्त पिठलं खातो! अरे बापरे!... श्रावणात कान्दा-लसूण खाता तुम्ही ? चातुर्मास पाळत नाही वाटतं? असू दे.. असू दे! ... "ऑम्लेट्"पेक्षा बरं हो! ;) (हां, आता पिठल्यातल्या मिरच्या कुणाला झोंबल्या तर आम्ही काय करू शकत नाय बॉ!) आता "खाता" तुम्ही.. म्हणजे "झोम्बणार" तुम्हालाच की! ;) आणि नन्तर.....पाण्याची सोय तेवढी करून ठेवा! ;) ;) .. तुमच्यासाठीच हो! नाहीतर व्हायचं "गर्वाचं घर खाली!" =)) ;)

In reply to by सुनील

क्लिंटन 21/08/2010 - 15:41
गांधी घराण्याने फारसे कर्तृत्व दाखविलेले नाही असा ’शतप्रतिशत’ दावा असेल तर तो मुद्दा जनतेपुढे नेटाने लावून न धरता जो भाजपवाल्यांचा आक्रस्ताळेपणा चालतो त्यामुळे गांधी घराण्याला फारसे काही परिश्रम न घेताच जनतेची सहानुभूती मिळते आणि अनेकदा त्याचेच रूपांतर मतांमध्येही होते. इंदिरा गांधींच्या हत्येवरील या डॉक्युमेन्टरीमध्ये (किंवा डॉक्युमेन्टरीच्या १० पैकी दुसऱ्या कोणत्या भागात) सोनिया गांधींचा राजीव गांधींना पंतप्रधान व्हायला मुळातच विरोध होता असे स्पष्टपणे म्हटले आहे.तसेच निकोलस न्यूजंट यांनी लिहिलेल्या राजीव गांधींच्या चरित्रातही तसेच म्हटल्याचे वाचले आहे. राजीव गांधींनी मोठ्या प्रयासाने सोनिया गांधींची समजूत काढली. अन्यत्र एका मुलाखतीत सोनिया गांधींनी त्यांचा राजीव गांधींना पंतप्रधान व्हायला विरोध का होता याचे उत्तर दिले आहे. त्याचा नक्की दुवा माझ्याकडे नाही पण ती मुलाखत इंग्रजी चॅनेलवर मी बघितली होती.त्यात सोनिया गांधी म्हणतात--’ऑपरेशन ब्लू स्टारनंतर इंदिरा गांधींना आपले दिवस भारले आहेत हे जाणवले आणि तसे त्यांनी राजीव-सोनियांना अनेकदा बोलूनही दाखविले होते.३१ ऑक्टोबर १९८४ रोजी ती भिती प्रत्यक्षात उतरली आणि राजीव पंतप्रधान झाल्यास एकनाएक दिवस त्यांनाही असेच मारतील अशी भिती मला वाटत होती. आणि राजीव पंतप्रधान झाल्यानंतर मी माझ्या मनाची तयारी पण करून ठेवली की राजीव गांधींची पण एकनाएक दिवस अशीच हत्या होणार!’ अर्थात सोनियांनी १९९९ मध्ये शरद पवारांना पक्षातून का काढले किंवा २००४ मध्ये पहिल्यांदा खासदारांची यादी घेऊन राष्ट्रपतींकडे गेलेल्या सोनिया गांधी नंतर अचानक का बदलल्या असे काही अनुत्तरीत प्रश्न आहेत.पण अशा मुद्द्यांवर जनतेचे लक्ष वेधायचे सोडून भाजप व्यक्तिगत पातळीवर जाऊन सोनियांवर आरोप करतो आणि ज्या पध्दतीने सोनिया या वैयक्तिक प्रचाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात यातून जनतेच्या मनात भाजपची प्रतिमा डागाळते आणि सोनियांची अधिक उजळते यात शंका नाही. दुसरे म्हणजे ’राजीव गांधी देशाला खड्ड्यात घालून एक दिवस इटलीला पळून जाणार’ हे उद्गार मी अगदी माझ्या घरी, नातेवाईकांमध्येही ऐकले आहेत.१९८९ मध्ये निवडणुकीत पराभव झाल्यानंतर बोफोर्स प्रकरणातून वाचण्यासाठी राजीव गांधी इटलीला पळून जाणार हे अशा मंडळींनी अगदी गृहितच धरले होते.जणू काही राजीव गांधींना देशाबाहेर न्यायला दिल्ली विमानतळावर विमान तयारच आहे अशा थाटात अशा मंडळींना मी बोलताना बघितले आहे. अर्थातच तसे काही झाले नाही. नंतरच्या काळात राजीव गांधी तर गेलेच. त्यानंतरही सोनिया गांधी नाही त्या इटलीला पळून गेल्या? लग्न झाल्यानंतर स्त्रीने पतीच्या घराला आपले घर मानणे हीच भारतीय संस्कृती ना?इतकेच नव्हे तर पतीचे निधन झाल्यानंतरही त्या स्त्रीने त्या घराला अंतर न देणे ही पण भारतीय संस्कृती ना?त्यावेळी त्या इटलीला पळून गेल्या असत्या तर कोण काय बोलू शकणार होते? पण सोनिया गांधींनी ते केले नाही. (यावर त्यांची हांजीहांजी करायला दिल्लीत जसे हजारो लोक तत्पर होते तसे रोममध्ये नव्हते असे म्हणणारे महाभाग निघतीलच). याउलट पतीचे निधन झालेल्या (किंवा इतर कोणाही) स्त्रीवर वैयक्तिक पातळीवर जाऊन घाणेरडे आरोप करणे ही भारतीय संस्कृती अजिबात नाही. प्रमोद महाजनांनी तर एका परिने सोनिया गांधी आणि मोनिका ल्युईन्स्कीची तुलना १९९९ च्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती असे वाचल्याचे आठवते. मी सोनिया गांधी समर्थक अजिबात नाही.पण या काही गोष्टी मला जरूर खटकतात. स्वत:ला भारतीय संस्कृतीचे मोठे पाईक समजणाऱ्या पक्षाकडून असे भारतीय संस्कृतीविरूध्द वर्तन करणे आणि सोनिया गांधी त्याकडे जाणीवपूर्वक पूर्णपणे दुर्लक्ष करतात यातूनच सोनिया गांधींना आपोआप जनतेची सहानूभूती आणि मते मिळतात. क्लिंटन

In reply to by क्लिंटन

मराठी_माणूस 20/08/2011 - 15:30
त्यानंतरही सोनिया गांधी नाही त्या इटलीला पळून गेल्या? लग्न झाल्यानंतर स्त्रीने पतीच्या घराला आपले घर मानणे हीच भारतीय संस्कृती ना?इतकेच नव्हे तर पतीचे निधन झाल्यानंतरही त्या स्त्रीने त्या घराला अंतर न देणे ही पण भारतीय संस्कृती ना?त्यावेळी त्या इटलीला पळून गेल्या असत्या तर कोण काय बोलू शकणार होते? पण सोनिया गांधींनी ते केले नाही. हा वरवरचा मुलामा आहे, सामान्य लोकांसाठीचा भावनिक मुद्दा आहे. मूळात प्रचंड सत्तेचा मोह टाळता आला नाही. राहुलला पुरेसे सेट होईपर्यंत सत्ता स्वतःच्या घराण्याकडेच सलग राहीली पाहीजे हा हेतु आहे. (अवांतर : पंतप्रधान पद नाकारणे , हा पण राजकारणाचाच भाग आहे कारण पीएम कोणीही असुदे , आपण चालवु तसेच चालणार हा विश्वास आहे(कारण उर्वरीत लोक बिन कण्याचे आहेत हे माहीत आहे). सेनेत त्याल उघडपणे रीमोट म्हटले जाते. इथे म्हटले जात नाहे इतकाच फरक)

वेताळ 21/08/2010 - 17:44
पण तामिळ वाघानी राजीव गांधीची हत्या करुन एक मोठी घोडचुक केली असे कायम वाटते.कारण त्यावेळी राजीव गांधी हत्या झाली नसती तर आज देशाचे चित्र खरोखर वेगळे दिसले असते.निव्वळ सहानुभुतीवर ह्या कॉग्रेस कंरट्याच्या हातात त्यावेळी सत्ता मिळाली. पण ते देखणे होते हे जर एकच क्वॉलीफिकेशन त्याना लावायचे म्हटले तर आज कित्येक देखणे नट बॉलीवुड मध्ये काम करतात त्यापैकी एकाला कराना भारताचा पंतप्रधान..मग उजेड काय पाडतात ते दिसेल.राजीव गांधी जर गांधी नसते तर ते एक उच्चवर्तुळात वावरणारे वैमानिक इतकीच त्याची ओळख असती. क्लिंटन साहेब खरोखर जर चांगला राजकारणी व जनतेबद्दल काम करणारा नेता निवडायचा झाला तर नरेंद्र मोदी खेरीज आज कोणी नाही.दलीत कुटुंबात जेवणे,लोकल मधुन बोंबलत फिरणे,उगाच काम नसल्या प्रमाणे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या घराला भेट देणे (नवल म्हणजे ज्या ठिकाणी ह्याचे सरकार गेली १० ते १५ वर्षे आहे त्या आंध्र व महाराष्ट्रात ज्यादा शेतकरी आत्महत्या करतात) असली कामे म्हणजे जनतेच्या भावनाशी खेळुन ,लोंकाच्या डोळ्यात धुळफेक करणे व सत्तेत टिकुन राहणे इतकेच ह्या कुटुंबाचे आजपर्यतचे उद्योग आहेत.

In reply to by वेताळ

क्लिंटन 21/08/2010 - 18:17
पण ते देखणे होते हे जर एकच क्वॉलीफिकेशन त्याना लावायचे म्हटले तर आज कित्येक देखणे नट बॉलीवुड मध्ये काम करतात त्यापैकी एकाला कराना भारताचा पंतप्रधान.
राजीव गांधी देखणे किंवा चांगल्या व्यक्तीमत्वाचे होते हा मुद्दा माझ्या लेखी तरी पूर्णपणे बाद आहे.कोणाही राजकिय व्यक्तीचे मूल्यमापन करताना त्या व्यक्तीचा चेहरा किती चांगला किंवा वाईट होता हा मुद्दा मी आजपर्यंत कधीही ध्यानात घेतलेला नाही आणि यापुढेही घेणार नाही. दुसरे म्हणजे आपल्या राज्यपध्दतीत वय वर्षे २५ पूर्ण केलेल्या आणि लोकसभेत बहुमताचा पाठिंबा असलेल्या कोणाही भारतीय नागरिकास पंतप्रधान बनता येते. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर कॉंग्रेस संसदीय पक्षाने त्यांना रितसर नेता निवडले होते.त्यावेळी कॉंग्रेस पक्षाकडे लोकसभेत बहुमत होते त्यामुळे त्या पक्षाचा संसदेतील नेता आपोआप पंतप्रधान बनायला पात्र होता. तसेच १९८४ च्या निवडणुकांमध्ये त्यांना लोकसभेत बहुमत प्राप्त झाले होते त्यामुळे त्यांना पंतप्रधान बनण्यापासून कोणीही रोखू शकत नव्हते. आजसुध्दा हृतिक रोशनला किंवा तत्सम चेहऱ्याच्या इतर कोणालाही लोकसभेत बहुमत असेल तर त्यालाही पंतप्रधान बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.त्यामागे त्या माणसाचा चेहरा नव्हे तर लोकसभेतील बहुमत हाच एक निकष असेल.
राजीव गांधी जर गांधी नसते तर ते एक उच्चवर्तुळात वावरणारे वैमानिक इतकीच त्याची ओळख असती.
उच्च वर्तुळात वावरणारे का एक सामान्य वैमानिक यापेक्षा त्यांची ओळख जास्त नसती.किंबहुना गांधी म्हणून जन्माला येऊनही आपली ओळख त्यापेक्षा जास्त असावी ही महत्वाकांक्षा मुळातच त्यांना नव्हती. त्यांच्या ’महान’ बंधुराजांच्या कर्तृत्वाशी तुलना केल्यास ही गोष्ट लगेच लक्षात येते.पण हे सांगण्यामागचा तुमचा उद्देश काय हे लक्षात येत नाही.वर म्हटल्याप्रमाणे ते पंतप्रधान का झाले? कारण त्यांच्यामागे लोकसभेत बहुमत होते.ते गांधी घराण्यात जन्माला आले म्हणून नव्हे. १९८९ च्या निवडणुकींनंतर ते पंतप्रधान का बनू शकले नाहीत? कारण त्यांच्याकडे लोकसभेत बहुमत नव्हते. अशावेळी ’गांधी’ घराण्यातील असणे हे ’क्वालिफिकेशन’ उपयोगी पडले का?तरीही लोक त्यांच्या पंतप्रधान बनण्याशी घराणेशाहीचा संबंध जोडतात ते मला पटत नाही.
खरोखर जर चांगला राजकारणी व जनतेबद्दल काम करणारा नेता निवडायचा झाला तर नरेंद्र मोदी खेरीज आज कोणी नाही.
असे तुम्हाला वाटते.तेच मत मतदान यंत्रांमधून व्यक्त झाले आणि नरेंद्र मोदी त्याच्याआधी तुरूंगात गेलेले नसतील तर जरूर पंतप्रधान होतील.
लोंकाच्या डोळ्यात धुळफेक करणे व सत्तेत टिकुन राहणे इतकेच ह्या कुटुंबाचे आजपर्यतचे उद्योग आहेत.
पण अजून तरी भारतातील बहुसंख्य मतदारांचे मत ते नाही याचे काय?लोकशाही हा आकड्याचा खेळ असतो.ज्यावेळी बहुसंख्य मतदारांचे तेच मत होईल तेव्हा कॉंग्रेस पक्षाचा आपोआपच पराभव होईल.पण विरोधी पक्ष अजूनतरी असा मुद्देसूद प्रचार करून जनतेत जाऊन आपली बाजू मांडत आहेत असे दिसत नाही.

In reply to by क्लिंटन

वेताळ 21/08/2010 - 18:44
तोच न्याय जर राजीव गांधीना लावला तर????? नरेंद्रमोदीनी जर काही गुन्हा केला असेल व त्यात ते दोषी आढळले तर त्याना जरुर तुरुंगात पाठवावे. मी काही नरेंद्र मोदींचा किंवा भाजपाचा हिंतचिंतक आहे असे काही नाही.मोदीनी जर गुजरात दंगलीत निरपराध लोकांच्या हत्या घडवण्यात हातभार लावला असला तरी आज सामान्य गुजराती त्याना काय समजतो? तुम्ही अमहदाबाद मध्ये आहात म्हणुन हे तुम्हाला विचारतो आहे. त्यानी आज गुजरात मध्ये खरोखरीच खुप आमुलाग्रबद्दल घडवुन आणले आहेत. मोदी हे कोणत्याही घराण्याशी संबधित नाहीत तरीही भारतातील सर्व मुख्य उद्योग घराण्याना व विकासप्रेमी लोकांना तेच देशाचे पंतप्रधान व्हावे असे का वाटते? दुसरी बाजु.. राजीव गांधीची हत्या नेमक्या कोणत्या कारणा साठी झाली होती? त्यानी भारतीय शांतीसेना श्रीलंकेत पाठवुन तामिळ लोकांचे हत्याकांड घडवुन आणले व निरपराध तामिळींवर अत्याचार झाले त्याला तेच जबाबदार होते.आज जर सुदैवाने राजीव गांधी जर जिवंत असते तर कोणी त्याच्या विरुध्द सीबीआयचा हत्यारा सारखा वापर करुन तामिळवाघांच्या हत्याकांडाला त्याना जबाबदार ठरवु शकला असता. मग राजीव गांधीना शिक्षा झाली नसती कशावरुन? हे जर तरचे प्रश्न आहेत.दोन्ही नेत्यांची कारकिर्द तपासली तर राजीव गांधी हे नशीबवान राजकारणी होते जे नंतर कमनशीबी ठरले व मोदी नशीबवान राजकारणी आहेत त्याला त्यानी कर्तुत्वाची खुप मोठी जोड दिली आहे.

In reply to by वेताळ

अर्धवट 21/08/2010 - 18:47
अनपेक्षीत धाग्यावरची चांगली चर्चा वाचतोय.. फक्त इथं अडखळलो. >>त्यानी भारतीय शांतीसेना श्रीलंकेत पाठवुन तामिळ लोकांचे हत्याकांड घडवुन आणले व निरपराध तामिळींवर अत्याचार झाले त्याला तेच जबाबदार होते. आजच कळतय मला.. (बाकी आमच 'सखोल' ज्ञान बघता आश्चर्य नाही म्हणा.) पण अजुन जरा माहिती कळाली तर बरं होइल

In reply to by अर्धवट

वेताळ 21/08/2010 - 19:03
कायदा जोपर्यंत तुम्हाला दोषी ठरवत नही तो पर्यत तुम्हाला गुन्हेगार म्हणता येत नाही.मी वर जो मुद्दा मांडला आहे तो जर तर चा आहे.राजीव गांधीची हत्या कोणत्या कारणासाठी झाली? ती नक्कीच वैयक्तिक वादातुन झालेली नाही.त्याचा शांतीसेना पाठवण्याचा जो निर्णय होता,त्यातुन जी तामिळवाघाची हत्या श्रीलंकेत भारतिय सेनेकडुन झाली त्यामुळे बिथरुन जावुन तामिळी वाघानी त्याची हत्या घडवुन आणली.राजीव गांधीची हत्या ज्या मानवी बॉम्बने घडवुन आणली त्या मुलीच्या बहिणीवर लंकेत शांतीसेनेकडुन अत्याचार झाले होते म्हणुन ती सहभागी झाली होती असे त्यावेळच्या पेपरात मी वाचले होते.राजीव गांधीची हत्या झाली त्यावेळी मी देखिल लहान होतो व थोडेफार कळत देखिल होते.मी देखिल त्यावेळी खुपच भावनावश झालो होतो.म्हणुनच त्याची हत्या एक घोडचुक होती असे मी वर म्हटले देखिल आहे. पण आज जो कॉग्रेस वाल्यानी सीबीआयचा तपासाचा ससेमिरा आपल्या विरोधकांच्या मागे लावुन आपल्याला हवे ते साध्य करण्याचा पायंडा पाडला आहे. तसा कोणीही सीबीआयचा वापर करुन शांतीसेना लंकेत पाठवायला राजीव गांधी जबाबदार होते व त दोषी आहेत असा निष्कर्श काढला असता. मी फक्त जर तर असा उल्लेख वर मुद्दामहुन केला आहे.राजीव गांधी लंकेतील तामिळवाघाच्या नाशाला कितपत कारणीभुत होते कि नाही त्याचे सविस्तर उत्तर निदन आजतरी मी तुम्हाला देवु शकत नाही.

In reply to by वेताळ

क्लिंटन 21/08/2010 - 19:30
त्यानी आज गुजरात मध्ये खरोखरीच खुप आमुलाग्रबद्दल घडवुन आणले आहेत. मोदी हे कोणत्याही घराण्याशी संबधित नाहीत तरीही भारतातील सर्व मुख्य उद्योग घराण्याना व विकासप्रेमी लोकांना तेच देशाचे पंतप्रधान व्हावे असे का वाटते?
मोदींनी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास घडवून आणला आहे हे उघडच आहे.अगदी कच्छच्या वाळवंटात त्यांनी पिण्याचे पाणी नेऊन पोहोचवले आहे. अंबानी, रतन टाटा यासारख्यांनी मोदींची जाहिरपणे तारिफ केली आहे. २००३ मध्ये आमच्या आय.आय.एम मध्ये येऊन आझीम प्रेमजींनी मोदींवर टिका केली होती पण काही दिवसांपूर्वी याच आझीम प्रेमजींनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. यात दोन मुद्दे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे गोध्रासारखी महाभयंकर घटना घडूनही मरणारे हिंदू होते म्हणून की काय पण तथाकथित धर्मनिरपेक्ष मिडिया आणि राजकिय पक्षांनी गोध्रावर चकार शब्द न काढता दुसऱ्या दिवशी सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पावर जास्त लक्ष केंद्रित केले.गुजरात गांधींजींचा असूनही जातीय दंगलींची मोठी पार्श्वभूमी राज्याला आहे. १९६९ मध्ये चार महिने दंगली चालू होत्या आणि शेवटी खान अब्दुल गफार खानांना बोलावून घेऊन त्यांच्याकरवी शांततेचे आवाहन करावे लागले होते. तसेच १९८५ आणि १९९२-९३ मध्येही दंगली मोठ्या प्रमाणावर झाल्या होत्या.अशा परिस्थितीत जो भडका उडाला तेव्हा नरेन्द्र मोदीच काय अगदी शंकरसिंह वाघेला जरी मुख्यमंत्री असते तरी किती उपयोग झाला असता हे त्या भगवंतालाच ठाऊक. तरीही या दंगलींमध्ये मोदींनी खरोखरच भाग घेतला होता का हे अजून तरी सिध्द झालेले नाही.वर्तमानपत्रातील बातम्यांप्रमाणे तरी एहसान जाफरी हत्या आणि गुलबर्ग सोसायटी प्रकरणी ते अडचणीत यायची शक्यता आहे.एहसान जाफरींनी संरक्षणाची मागणी फोन करून केली असता त्यांना फोनवर शिवीगाळ करणे आणि ’मरा मी काही तुम्हाला संरक्षण देणार नाही’ असे मोदींनी म्हटल्याचे वर्तमानपत्रांमध्ये वाचनात आले आहे. कायद्याच्या दृष्टीने यातून मोदींवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका जरूर ठेवता येईल पण त्यांचा दंगलीत प्रत्यक्ष हात होता हे सिध्द करता येईल की नाही यासाठी काही महिने थांबावे लागेल. पण तसा हात मोदींचा असेल तर मात्र त्यांना तुरूंगात जावेच लागेल. दुसरा मुद्दा म्हणजे मोदी विरोधकांचे म्हणणे असे की मोदींची पक्की खात्री आहे की मुख्यमंत्रीपदावरून दूर होताच त्यांना तुरूंगात जावे लागेल.म्हणून त्यांना मुख्यमंत्री म्हणून चांगले काम करणे भागच आहे.कारण तिकडे जर आळस केला तर किंमत आहे तुरूंगवासाची! या प्रकरणी कायद्याला मान्य असेल ते होईल.मोदींचे नशीब चांगले असेल तर ते तुरूंगात जायच्या आधी पंतप्रधान होतीलही.आणि ते पंतप्रधान झाले तर निदान विकासाच्या बाबतीत तरी गुजरात मॉडेल त्यांनी देशभरात राबवावे असेच मला वाटते.
त्यानी भारतीय शांतीसेना श्रीलंकेत पाठवुन तामिळ लोकांचे हत्याकांड घडवुन आणले व निरपराध तामिळींवर अत्याचार झाले त्याला तेच जबाबदार होते.
अगदी इंदिरा गांधी, एम.जी.रामचंद्रन यांनी एल.टी.टी.ई ला अनूकूल भूमिका घेतली होती.इतकेच काय तर मे १९८७ मध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना जाफनामध्ये श्रीलंकन सैन्याने एल.टी.टी.ई ची कोंडी केल्यानंतर भारतीय हवाईदलाच्या विमानांनी श्रीलंकेची हवाईहद्द ओलांडून तामिळ लोकांच्या मानवी अधिकारांचे उल्लंघन होत आहे या नावाखाली अनेक टन धान्य आणि इतर सामुग्री टाकली होती.परराष्ट्र राज्यमंत्री नटवर सिंह यांनी श्रीलंकेच्या दिल्लीतील राजदूतास बोलावून घेऊन ’आमची विमाने तुमच्या देशात जाऊन तामिळ लोकांना मदत टाकून येणार आहेत आणि त्यावर हल्ले केल्यास गंभीर परिणाम होतील’ अशी धमकी दिली. माझ्या मते राजीव सरकारने उचललेले हे पाऊल सर्वथैव अयोग्य होते. उद्या काश्मीरी लोकांवर अन्याय होत आहे अशी हाकाटी करत पाकिस्तानची विमाने श्रीनगरमध्ये आली तर आपल्याला चालेल का? श्रीलंकेच्या सार्वभौमत्वाची अशी पायमल्ली करणे पूर्णपणे अयोग्य होते असे मला वाटते. भारतापुढे आपली धडगत नाही हे श्रीलंकन अध्यक्ष जयवर्धने यांना समजून चुकले आणि त्यातून जुलै १९८७ मध्ये श्रीलंका करार झाला. या कराराचा उद्देश तामिळ समस्येवर श्रीलंकेच्या एकात्मतेच्या चौकटीत तोडगा शोधणे हा होता. तसेच तामिळ वाघांना नि:शस्त्र करायला (साध्या शब्दात त्यांच्याशी लढायला) भारताची शांतीसेना पाठविण्यात आली. तेव्हा १. तामिळ लोकांवर अत्याचार करावेत यासाठी भारतीय शांतीसेना पाठविण्यात आलेली नव्हती. २. भारतीय सैन्याकडून तामिळ लोकांवर अत्याचार काही प्रमाणावर जरूर झाले. याचे कारण तामिळ जनतेत तामिळ वाघांविषयी काही प्रमाणात तरी सहानूभूती असल्यामुळे स्थानिक लोकांनी भारतीय सैन्याविरूध्द तामिळ वाघांना मदत केली आणि त्यातूनच पुढे काही प्रमाणावर त्यांच्यावर अत्याचार झाले. हाच प्रकार भारतात पंजाब, काश्मीर आणि पूर्वोत्तर भारतात बघायला मिळाला आहे. तेव्हा मुद्दा क्रमांक १ हा valid असल्यामुळे मुद्दा क्रमांक २ प्रमाणे झालेल्या अत्याचारांसाठी संबंधित सैनिक/अधिकारी यांना जबाबदार धरता येईल. तेव्हा अगदी निरपराध तामिळींवर जरी अत्याचार झाले असतील तरी त्यासाठी राजीव गांधींना (ते हयात असते तरीही) कोणतेही न्यायालय शिक्षा करू शकणार नाही. अनेक वर्षे तामिळ वाघांना भारत सरकारने पाठिंबा दिला होता पण अचानक त्यांच्याविरूध्द भारत सरकार (राजीव गांधींचे सरकार) उलटले याचा राग म्हणून पुढे राजीव गांधींची हत्या तामिळ वाघांनी केली.
सुदैवाने राजीव गांधी जर जिवंत असते तर कोणी त्याच्या विरुध्द सीबीआयचा हत्यारा सारखा वापर करुन तामिळवाघांच्या हत्याकांडाला त्याना जबाबदार ठरवु शकला असता. मग राजीव गांधीना शिक्षा झाली नसती कशावरुन
याचे उत्तर वर दिलेलेच आहे. पण नरेंद्र मोदींविरूध्दचे आरोप आणि राजीव गांधींविरूध्द काल्पनिक आरोप एका मापाने कसे तोलता येतील? तसा अर्थ आपल्या प्रतिसादातून ध्वनित होत आहे म्हणून मुद्दामून लिहावेसे वाटते.

भारतीय 21/08/2010 - 17:45
गांधी घराण्यातील काही (हा शब्दही मोठा वाटतोय !) अपवाद वगळता ईतरांबद्दल मला व्यक्तिशः काहीच आदर नाही.. काँग्रेसी लोक तर ज्याप्रकारे गाधी घराण्याचे लांगूलचालन करतात ते पाहून किव येते त्यांची.. मी अभ्यासलेल्या अथवा मला समजायला लागल्यापासून सर्व राजकारण्यांमधे अटलजींबद्दलच फक्त आदर होता.. पण आता सगळे एका माळेचे मणी! लक्षात घ्या राजीव गांधी नसते तर दूसरा कोणीतरी असता! 'बोफोर्स' तोफांचा व्यवहार (कि गैरव्यवहार?) त्यांच्याच काळातील होता.. बोफोर्स तोफा भारताला आवश्यक होत्याच, ते कारगिल युद्धात दिसलेच.. त्या राजीवजींच्या काळात खरेदी केल्या गेल्या म्हणून राजीव गांधी थोर होतात? त्या खरेदी करताना झालेल्या गैरव्यवहाराबद्दल काय? राजीवजी शुद्ध होते काय?.. मग नरसिंह रावही त्याच्यापेक्षा थोर म्हणावेत, कारण त्याच्याच कालखंडात भारताने खुले आर्थिक धोरण स्वीकारले.. पण नरसिंहांचे आडनाव 'गांधी' नव्हते ना ! म्हणून ते थोर नाहीत.. (नरसिंह रावांचे समर्थन करण्याचा प्रयत्न नाही, कॉंग्रेसची प्रकृती दाखवतोय..) राजीव गांधींनतर काँग्रेस गांधीमुक्त झाला होता.. पण सीताराम केसरींसारखे फुटकळ नेते काँग्रेसचे नेतृत्व करताना कॉग्रेसची हालत काय होती हे सर्व जाणतातच, 'गांधी' नावाचे टॉनिक काँग्रेसला म्हणूनच हवे होते, अन म्हणूनच सोनिया गांधींना राजकारणात आणले गेले... बाकी सोनियांबद्दल काही बोलणार नाही.. सध्या काँग्रेस सत्तेवर आहे ते केवळ "वासरांत लंगडी गाय शहाणी" म्हणून!

In reply to by भारतीय

क्लिंटन 21/08/2010 - 18:37
बोफोर्स तोफा भारताला आवश्यक होत्याच, ते कारगिल युद्धात दिसलेच.. त्या राजीवजींच्या काळात खरेदी केल्या गेल्या म्हणून राजीव गांधी थोर होतात?
या कारणावरून राजीव गांधींना थोर म्हणणारी मंडळी आहेतच.पण त्यांना थोर म्हणण्यासाठी हे पुरेसे सबळ कारण नाही असेच माझे तरी स्वत:चे मत आहे. तसेच राजीव गांधींना ’थोर’ मी तरी म्हटलेले नाही.माझा मुद्दा एवढाच की त्यांच्याकडे संगणक आणि टेलिकॉम क्षेत्रात विकास घडवून आणायची दूरदृष्टी होती (जी बहुसंख्य भारतीयांकडे त्याकाळी नव्हती) आणि ते बदल त्यांनी नेटाने घडवून आणले. आजच्या तरूण पिढीला त्याचा फायदा किती होत आहे हे समोर दिसतच आहे आणि त्याचे श्रेय त्यांना द्यायलाच हवे.
राजीवजी शुद्ध होते काय?
खरेखोटे त्या भगवंतालाच ठाऊक.पण कायद्याच्या दृष्टीने तरी त्यांचा कोणत्याही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सहभाग सिध्द होऊ शकलेला नाही.
मग नरसिंह रावही त्याच्यापेक्षा थोर म्हणावेत, कारण त्याच्याच कालखंडात भारताने खुले आर्थिक धोरण स्वीकारले.. पण नरसिंहांचे आडनाव 'गांधी' नव्हते ना ! म्हणून ते थोर नाहीत..
माझे स्वत:चे मत हे तर नरसिंह राव हे भारताचे सर्वोत्तम पंतप्रधान होते हेच आहे.विविध पंतप्रधानांच्या कारभाराचे मी माझ्या पातळीवर मूल्यमापन केले आहे त्यावरून माझे मत झाले आहे की नरसिंह रावांनी न बोलता देशासाठी खूप चांगले काम करून ठेवले.आणि हे मूल्यमापन करताना पंतप्रधानांचा पक्ष, चेहरा, व्यक्तिमत्व,ते जन्माला आले त्या घराण्याचे नाव या सगळ्या गोष्टी गौण मानून केवळ त्यांचे कार्य हा एकच मुद्दा मी ध्यानात घेतला होता. आणि नरसिंह राव गांधी नाहीत याच एका कारणावरून अर्जुन सिंहांसारखी झुरळे त्यांच्यावर टिका करतात ते पूर्णपणे अयोग्य आहे असेच माझे मत आहे.
सध्या काँग्रेस सत्तेवर आहे ते केवळ "वासरांत लंगडी गाय शहाणी" म्हणून!
हीच तर लोकशाही व्यवस्था आहे. ज्या क्षणी जनतेला कॉंग्रेसपेक्षा समर्थ पर्याय आहे असे वाटेल त्याक्षणी निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाचा पराभव होईल. भारतीय जनतेने हे यापूर्वी पण दाखवून दिले आहे आणि जनता यापुढेही ते दाखवून देईल याविषयी शंका नको.
समग्र देशव्यापी क्रांतीच्या प्रतिक्षेत.
फक्त ही देशव्यापी क्रांती मतदान यंत्रातूनच होऊ दे ही सदिच्छा.

मृगनयनी 20/08/2011 - 12:34
~*~*.|.*~*~ राजीव गान्धींना ६७व्या जयन्तीनिमित्त विनम्र अभिवादन!!! ~*~*.|.*~*~ राजीव'जी, तुमच्या राहुलमध्ये तुमच्यातले काही चान्गले गुण आले असते तर कदाचित आज आपल्या देशाचे चित्र खूपच वेगळे असते.... :| राजीव'जी, तुमचे कॉन्ग्रेसवाले ज्या म. गान्धींचा उदो उदो करून आजपर्यन्त लोकांच्या भावनांशी खेळत आले... त्याच गान्धींना दैवत मानणार्‍या अण्णा हजारेंच्यामुळे गान्धीवादाच्या शान्ततामय मार्गाने कॉन्ग्रेसी भ्रष्टाचाराविरूद्ध सम्पूर्ण भारत देश जागृत होऊन एकत्रितपणे लढा देत आहे... आणि आम्ही न पाहिलेली "ऑगस्ट क्रान्ती" पुन्हा घडवून आणत आहे.... या क्रान्तीमध्ये सहभागी होऊन भ्रष्टाचाराविरूद्ध खारीचा वाटा उचलण्याची सन्धी आम्हालाही मिळाल्याबद्दल अण्णा हजारेंचे शतशः आभार!!!.... राजीव'जी... तुम्ही पाहिलेल्या उज्ज्वल भारतवर्षाचे स्वप्न कदाचित देशातील जनता.... अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्याला अधिकाधिक मूर्त स्वरूप देऊन पूर्ण करेल...... अर्थात तुमच्या राहुलबाबाचा यात सहभाग असता..... तर कदाचित तुमच्याबद्दल, इन्दिराजींबद्दल आम्हाला वाटणारा आदर राहुल गान्धींबद्दलही वाटला असता...... || जयहिन्द ||

In reply to by मृगनयनी

मृगनयनी 20/08/2013 - 12:12
राजीव गांधीं'ना जयन्तीनिमित्त विनम्र अभिवादन ..._/\_ ..... *मानवी बॉम्ब'च्या माध्यमातून हत्या झालेल्या राजीव'जींच्या जयन्तीदिनाची सुरुवात एका सामाजिक कार्यकर्त्याच्या -नरेन्द्र दाभोळकरांच्या हत्येनेच व्हावी...... याचे खरोखर दु:ख वाटते.... :|

In reply to by मृगनयनी

मृगनयनी 20/08/2014 - 13:50
राजीव'जींना विनम्र अभिवादन!!!! :) राहुल'च्या जन्माच्या आधी सोनियाजीं'वर उचित गर्भसंस्कार झाले असते.. तर कदाचित आज परिस्थिती वेगळी असती!!!! :)

In reply to by प्यारे१

मदनबाण 22/08/2014 - 12:35
मॄग्गा... मॄग्गा अगं काय हे ? स्त्रीया दरवर्षी ज्या प्रमाणे वटसावित्रीची पुजा करुन वडाला चक्कर मारतात, तशी दरवर्षी या धाग्यावर तू चक्कर टाकताना दिसत आहेस हो. :P

In reply to by मदनबाण

मृगनयनी 22/08/2014 - 13:00
:) हो रे.. मदनबाण.. अ‍ॅक्चुली 'राजीव गान्धी' यांच्याबद्दल मला मनापासून आदर वाटतो. कंप्युटर-सिस्टीम भारतात त्यांच्यामुळे आली. इतर राजकारण्यांप्रमाणे राजीव'जींच्या नावावरही काही भ्रष्टाचार आहेत.. पण तरीही त्यांच्यात 'असं' काहीतरी निश्चित होतं..ज्यामुळे आजही ते गेल्यानंतर सुद्धा मला (इन्डिविड्ज्युअली) त्यांच्याबद्दल मनापासून आदर, प्रेम वाटते. तसे "ते" कायमच माझ्या मनात असतात. पण तरीही दरवर्षी त्यांच्या जयन्ती-पुण्यतिथी'ला इथे या मराठी संस्थळावर त्यांच्या स्मृती जागृत करताना मला विशेष आनन्द होतो. आय लव राजीव गान्धी!!!! राजीव'जींमधले व इंदिराजींमधले "नेतृत्वा"चे आणि समाजकारणा'चे गुण राहुल'मध्ये आलेले नाहीत.. त्यामुळे वाईटही वाटते... :) पण तरीही 'नरेन्द्र भाई मोदीं'च्या भगव्या राज्यात मी खूष आहे...... :)

In reply to by मृगनयनी

श्रीगुरुजी 22/08/2014 - 22:51
>>> कंप्युटर-सिस्टीम भारतात त्यांच्यामुळे आली. + १ त्याच प्रमाणे नरसिंहरावांमुळे भारतात केबल टीव्ही सुरू झाला, देवेगौडामुळे भारतात इंटरनेट सुरू झाले, गुजरालांमुळे भारतात मोबाईल फोन सुरू झाले आणि मनमोहन सिंगांमुळे स्मार्ट फोन आणि टॅब्ज.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मृगनयनी 20/08/2010 - 18:15
ह्म्म... बिपिन'दांशी सहमत! _________ आज राजीव'जी असते... तर देशात.. भ्रष्टाचार वगैरे.. झालाच नसता..... असं मी कधीच म्हणणार नाही... पण नेहरू-गांधी घराण्याचं वर्चस्व पाहता........ कदाचित आज मनमोहन-सिन्गांच्या ऐवजी "राजीवजी"च आपले पन्तप्रधान असते! :)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अर्धवट 20/08/2010 - 18:17
ह्येबी खरंय.. आन् चित्र थोडं वेगळं दिसलं असतं हे ही खरय.. अवांतर - हल्ली मला 'वेगळं' म्हटलं की चौकट राजा आठवतो..

In reply to by मेघवेडा

मृगनयनी 21/08/2010 - 11:42
काही लोकांचे डोक्याच्या पुढच्या भागातले केस फार लवकर उडतात नै! ;) ____ फार विचार करत असतील बहुधा ती लोकं!.. राजीव'जींसारखी! :)

In reply to by मेघवेडा

(अ)शुद्धलेखन आणि excess capitalization भडकपणे अंगावर आलं!! राजीव गांधींनी संगणक क्रांतीबरोबर इंग्लिश लेखनसरावही भारतात आणावयास हवा होता असं राहून राहून वाटलं!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मृगनयनी 21/08/2010 - 10:55
अरे बापरे! "स्कोअर लेवल" करायचा केवढा हा अट्टाहास !! ;) ;) :| असो! .... हा (अ)सभ्यपणा अंगावर आला बरं!!!! ;) ;) ;) __________________________ टीप : "ऑम्लेट" पचत नसेल.. तर रात्री हाजमोला वगैरे घेऊन झोपावे... आणि हो!.. आज शनिवार असल्यामुळे "ऑम्लेट" न खाणे उचित ठरेल!

राजीव गांधींच्या पुण्यतीथीच्या दिवशी धागा प्रवर्तिकेनी काढलेला जुना धागा आठवला. http://www.misalpav.com/node/12412 अर्थात जुन्या धाग्याचा मजकुरही काहिसा असाच होता. तिथे काही लोकांनी उत्तम चर्चा केली होती. त्यापेक्षा काही नवीन माहिती मिळाली तर ती वाचण्यास उत्सुक. अवांतर :- अश्या लोकांची जयंती आणि पुण्यतिथी एकाच दिवशी असती तर????

क्लिंटन 20/08/2010 - 19:27
जुन्यापुराण्या गोष्टींच्या जोखडातून बाहेर काढून देशाला आधुनिकतेची वाटचाल देऊ शकायची क्षमता ठेवणारा हा नेता असा अचानक गेला याचे वाईट वाटते.अर्थातच घरी/शाळेत/नातेवाईकांमध्ये/परिचयातील व्यक्तींमध्ये राजीवजींचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन न करता केवळ ’गांधी’ म्हणून त्यांच्यावर टिका करणारे बहुसंख्य लोक आसपास होते.त्याचा परिणाम होऊन मी सुध्दा अनेक वर्षे अशाच लोकांची री ओढत त्यांच्यावर टिका करत होतो.पण तटस्थपणे विचार करता असे जाणवते की हे सगळे लोक म्हणतात तितके राजीवजी वाईट नक्कीच नव्हते.भारतात संगणक आणि टेलिकॉम क्रांतीची मुहूर्तमेढ रोवायचा त्यांचा निर्णय आमच्या पुढीला आज खूपच फायदेशीर ठरत आहे. त्यांना श्रध्दांजली. क्लिंटन

मदनबाण 20/08/2010 - 19:31
लहानपणी मी आकाशात एखादे विमान ( खरेखुरे ) दिसले की उगाच... इंदिरा गांधी टाटा /राजीव गांधी टाटा असे बोंबलत सुटायचो ते आठवले. ;) शिवाय, हमे ये करना है आणि हमे वो करना ही वाक्य देखील आठवली. ;) बाकी चालु द्या.

In reply to by मदनबाण

चिरोटा 20/08/2010 - 22:13
आजच्या ठळक् बातम्यांमध्ये राजीव गांधीची बातमी नाही असे सहसा होत नसे.८:४० च्या समाचार मध्ये परत तेच. आणि ९:३०च्या news मध्ये परत तेच्!!विरोधी पक्ष नक्की आहेत तरी कोण हे कळतच नसे.

In reply to by मदनबाण

मृगनयनी 21/08/2010 - 10:59
लहानपणी मी आकाशात एखादे विमान ( खरेखुरे ) दिसले की उगाच... इंदिरा गांधी टाटा /राजीव गांधी टाटा असे बोंबलत सुटायचो ते आठवले. शिवाय, हमे ये करना है आणि हमे वो करना ही वाक्य देखील आठवली. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) सही! आम्ही "सोनिया गान्धी --टाटा"... "राहुलदादा- टाटा".. "प्रियान्का तै-टाटा" ..... असं ओरडायचो! ;) _____________________

विजुभाऊ 20/08/2010 - 20:21
राजीव गांधी एक द्रष्टा नेता होते हे मान्यच केले पाहिजे भारतात संगणक आणि टेलिकॉम क्रांतीची मुहूर्तमेढ रोवायचा त्यांचा निर्णय आमच्या पुढीला आज खूपच फायदेशीर ठरत आहे नुसते हेच नाही तर आज आपण भारतीय रस्त्यांवर जी नवी वाहने पहातो त्या साठी श्रेय राजीव गांधीनाच जाते. लोकानुनय करताना राजीव गांधींचे काही निर्णय चुकले असतील पण त्यांचे काही निर्णय त्या वेळच्या भविष्यकाळात म्हणजेच आजच्या वर्तमान काळात खूपच फायदेशीर ठरत आहेत. "द मारुती स्टोरी " पुस्तकात भारतात मारुती मोटार्स ने काय काय नवीन आणले याचा आढावा घेता येतो. मारुती ने केवळ नवी टेक्नीलॉजीच आणली असे नव्हे तर एक प्रॉडक्षन इंडस्ट्रीत एक नवी विचारसरणी ( चांगल्या अर्थाने एक नवी संस्कृती) आणली. ज्याचे फायदे आज आपण सर्वचजण घेतोय. राजीव गांधींच्या काळातील काही इतर नेते ( वि प्र सिंग्/देवेगौडा ) याना कोणतीच धोरणे नव्हती असेच म्हणावे लागेल. रथयात्रा आणि मंडल या नी लोकाना रोजगार /चैतन्य वगैरे देण्यापेक्षा भारताचे नुकसानच फार केले.

मिसळभोक्ता 20/08/2010 - 22:12
राजीव"जी"ंच्या जयंतीनिमित्त जाहिरातींचा खर्चः ३०० कोटी रुपये. लेह ला दिलेली मदतः १२५ कोटी रुपये. जय हिंद !

In reply to by मिसळभोक्ता

मराठी_माणूस 20/08/2011 - 14:09
राजीव"जी"ंच्या जयंतीनिमित्त जाहिरातींचा खर्चः ३०० कोटी रुपये. अण्णांच्या वाढदिवसाला २/३ लाख खर्च केले म्हणुन तो मनोज तिवारी बोंबलत होता. कदाचीत गांधी घराण्यातल्यां साठी ह्या गोष्टींचा विचार करण्याची गरज नसेल.

मिसळभोक्ता 20/08/2010 - 22:12
राजीव"जी"ंच्या जयंतीनिमित्त जाहिरातींचा खर्चः ३०० कोटी रुपये. लेह ला दिलेली मदतः १२५ कोटी रुपये. जय हिंद !

हुप्प्या 20/08/2010 - 22:20
आज भारत माहितीयुगाचा एक मोठा आधारस्तंभ बनला आहे ह्याचे सग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ळे श्रेय राजीवजींना आणि उरलेच तर सोनिया आणि राहुलला जाते. आणि हो, थोडे बिटिया प्रियांकालाही. हे सगळे लोक नसते तर कंप्युटर आणि कार तर सोडाच, आपण आकडेमोड, गणिते आणि बैलगाड्याही विसरलो असतो. थेट अश्मयुगात जाऊन पोचलो असतो. शेतीबिती विसरून पुन्हा आदिमानवासारखे शिकारी बनलो असतो. कंदमुळे खाऊन जगावे लागले असते. कुठली सुपरपावर आणि कुठले काय. राजीवजींसारखा गणकयंत्र तज्ञ लाभल्यामुळे आज प्रत्येक भारतीय आज गणकयंत्र साक्षर झालेला आहे. विप्रो, इन्फोसिस आणि सत्यम ही मंडळी गुगल, अ‍ॅपल, सिस्को, मायक्रोसॉफ्ट च्या डोळ्यासमोर तारे चमकतील असे नवनवे शोध लावत आहेत! राजीवजी अमर रहे!

In reply to by हुप्प्या

मिसळभोक्ता 20/08/2010 - 22:35
विप्रो, इन्फोसिस आणि सत्यम ही मंडळी गुगल, अ‍ॅपल, सिस्को, मायक्रोसॉफ्ट च्या डोळ्यासमोर तारे चमकतील असे नवनवे शोध लावत आहेत! अगदी अगदी !

In reply to by हुप्प्या

क्लिंटन 20/08/2010 - 23:01
कोणाही राजकिय/ऐतिहासिक व्यक्तीचा वस्तुनिष्ठ अभ्यास करून त्या विषयी मते बनवायचीच नाहीत तर केवळ भावनेच्या आहारी जाऊन पूर्वग्रहदुषित मते आधीच बनवायची आणि ती वारंवार ठासून सांगायची असा पणच केला असेल तर काही बोलायचे नाही. चालू द्या. राजीवजींनी भारतात संगणक आणायला सुरवात केली हे कोणी नाकारू शकेल का?टेलिकॉम क्षेत्राच्या विकासाची पायाभरणी सॅम पित्रोदांना हाताशी धरून राजीव सरकारनेच सुरू केली. त्यावेळी आपल्यासारख्या गरीब देशात ही थेरं परवडणार नाहीत असेच बहुसंख्यांचे मत होते.बहुसंख्य जनतेला दोन वेळेला खायला मिळत नाही मग करायचे काय ते संगणक आणि फोन असेच सर्वसाधारण मत त्याकाळी होते. अर्थात माझी माहिती वाचलेली आहे. राजीव गांधी पंतप्रधान असताना २०+ वयाचे असलेले मिपाकर याविषयी नक्कीच सांगू शकतील. मागे मिपावर राजीवजींच्या पुण्यतिथीवर चर्चा झाली होती तेव्हा कोणा मिपाकराने देवीलाल यांनी शेतकऱ्यांच्या सभेत बोलताना केलेल्या भाषणाचा उल्लेख केला होता. देवीलाल म्हणाले,"सरकार वीजप्रकल्पांसाठी वापरून सगळे कस गेलेले पाणी शेतीसाठी देते". अशा विरोधाला न जुमानता नव्या काळाशी अनुरूप प्रकल्प रेटणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. पुढे नरसिंह राव आणि मनमोहन सिंह यांनी मोठ्या प्रमाणावर सुधारणा घडवून आणल्या पण त्याची सुरवात काही प्रमाणात तरी राजीव गांधींच्या सरकारने केली होती हे मान्य करायला अडचण कोणती? कोणाही व्यक्तीची आंधळी भक्ती नको आणि उगीचच ठोकणे हा पण दृष्टीकोन नको.प्रत्येक व्यक्तीला तिने केलेल्या चांगल्या कामांचे श्रेय मिळाले पाहिजे आणि त्याचबरोबर तिने केलेल्या चुकींबद्दल दोषही आपण द्यायला हवा. पण आपल्याकडे ’राजीव गांधी’ हे नाव उच्चारले तरी काहीही ऐकून न घेता शिव्या घालायला सुरवात करायची हाच दृष्टीकोन दुर्दैवाने दिसतो. राजीव गांधींनंतर वि.प्र.सिंह, देवेगौडा यासारखे भविष्याचा काहीही अजेंडा नसलेले बिनडोक नेते आले. त्यातही वि.प्र.सिंहांनी मंडल आयोगाच्या निमित्ताने भारतीयांच्या एकात्मतेच्या मार्गात मोठी पाचर मारून ठेवली आहे आणि भारतमातेच्या पायात कधी न तुटणाऱ्या साखळ्या बांधून ठेवल्या आहेत हे लक्षात घेतले तर त्यापेक्षा राजीव गांधी अनेक पटीने चांगले होते हे मान्य करायला अडचण कोणती? राजीव गांधी नसते तर भारत अश्मयुगात गेला असता असे कोणीही म्हणत नाही.पण निदान त्यांनी भारतात संगणकीकरणाची सुरवात केली हे मान्य करून त्याचे श्रेय द्यायला काय हरकत आहे समजत नाही. बाकी चालू द्या.

In reply to by क्लिंटन

शिल्पा ब 21/08/2010 - 01:50
संगणक , मारुती , टेलेकॉमचे जाळे इ. त्यांनी पुढाकार घेतल्याने घडले हे सत्य आहे.. बाकी देवीलाल या माणसाचे "सरकार वीजप्रकल्पांसाठी वापरून सगळे कस गेलेले पाणी शेतीसाठी देते"हे मत वाचून किती मूर्ख लोक आपले प्रतिनिधित्व करत आहेत हे पुन्हा एकदा जाणवले. बाकी चालू द्या..

In reply to by शिल्पा ब

हुप्प्या 21/08/2010 - 07:28
देवीलाल पाण्यातली वीज काढून घेतली म्हणू शकणारा मूर्ख असेलही पण दुसरी अशी शक्यता आहे की त्याला खात्री होती की जनता मूर्ख आहे आणि आपण असले काही बोललो तरी ते लोकांना पटेल आणि रुचेल. अडाणी, अशिक्षित, उथळ मतदारांचे प्राबल्य असल्यामुळे असले सवंग डायलॉग मारले जातात आणि त्यावर निवडणूकाही जिंकल्या जात असतील. लालू यादव म्हणाला होता की तमाम पंतप्रधानपदाच्या उमेदवारांत एक अशी शर्यत लावा की सगळ्यांपुढे एक एक म्हैस ठेवा. जो गडी दिलेल्या वेळात सगळ्यात जास्त म्हशीचे दूध काढू शकेल तो पंतप्रधान. प्रेक्षकात अर्थातच जोरदार टाळ्या! हेही तितकेच बिनडोक वाक्य आहे. पण काँग्रेसने (होय तीच ती पार्टी जिने भारताला आधुनिक युगात नेले!) ह्याचे समर्थन घेतलेच की हो! अशी अनेक नमुनेदार वाक्ये शोधता येतील. जशी प्रजा तसा राजा असा लोकशाहीचा नियमच आहे. (अर्थात मोतीलालजी, जवाहरलालजी, इंदिराजी, संजयजी, राजीवजी, सोनियाजी, राहुलजी, प्रियांकाजी आणि त्यांची वर्तमान व भविष्यातली पिलावळजी यांना हे नियम लागू नाहीत बरं का. ते सगळे एकदम एलिट्स आणि जिनियसेस !)

In reply to by हुप्प्या

क्लिंटन 21/08/2010 - 14:34
काँग्रेसने (होय तीच ती पार्टी जिने भारताला आधुनिक युगात नेले!) ह्याचे समर्थन घेतलेच की हो!
तसाच संधीसाधूपणा सगळ्या पक्षांनी कधीनाकधी केलेला आहे. भाजपने अशा किती पक्षांचे समर्थन घेतले आहे याची गणतीच नाही.
देवीलाल पाण्यातली वीज काढून घेतली म्हणू शकणारा मूर्ख असेलही पण दुसरी अशी शक्यता आहे की त्याला खात्री होती की जनता मूर्ख आहे आणि आपण असले काही बोललो तरी ते लोकांना पटेल आणि रुचेल.
अशाच लोकांच्या सान्निध्यात संगणक आणि टेलिकॉम क्षेत्रांमध्ये नवे बदल घडवून आणणे अजिबात सोपे नव्हते.देवीलाल सारखे बिनडोक नेते याविरूध्द राळ उठविणार आणि त्याची किंमत कॉंग्रेस पक्षाला मतांच्या स्वरूपात द्यावी लागणार हे उघडउघड दिसत असूनही राजीवजींनी हे निर्णय पुढे रेटले. याच देवीलालांच्या लोकदलाने १९८७ मध्ये हरियाणा विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा ऐतिहासिक पराभव केला. अर्थात त्यामागे पंजाब प्रश्न आणि राजीव-लोंगोवाल करार आणि त्यात हरियाणावर झालेला कथित अन्याय ही कारणे जरूर होती पण देवीलालांनी राजीवजींविरूध्द अशा प्रश्नांवरून (आणि कोणताही पुरावा नसताना बोफोर्स प्रश्नावरून) उठवलेली राळ हे ही एक कारण होतेच. राजीवजींनी बन्सीलालसारख्या गणंगाला हरियाणाचे मुख्यमंत्री केले याचे अजिबात समर्थन नाही पण त्याचबरोबर भाजपने त्याच बन्सीलालला पुढे पाठिंबा दिला याचेही समर्थन होऊ शकत नाही. १९८७ मध्ये याच देवीलाल या बिनडोक माणसाला भाजपने पाठिंबा दिला होता. सुषमा स्वराज आणि सूरज भान हे भाजपचे ज्येष्ठ नेते देवीलाल यांच्या मंत्रीमंडळात मंत्रीपण होते. सांगायचा मुद्दा हा की अशा राजकिय वातावरणात आपल्याला मतांच्या स्वरूपात किंमत चुकती करावी लागणार आहे याची पुरेपूर जाण असूनही संगणक आणि टेलिकॉम क्षेत्रात बदल पुढे रेटणे ही गोष्ट साधी नव्हती. त्याचे काहीच श्रेय राजीवजींना नाही का? की केवळ ’राजीव गांधी’ हे नाव धारण केल्यामुळे त्यांना देय असलेले कोणतेच श्रेय द्यायचे नाही आणि कोणताही पुरावा नसताना बोफोर्स प्रकरणी राजीवजींनी पैसे खाल्ले असा निर्णय देऊन टाकायचा याला पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन सोडून दुसरे काय म्हणता येईल?
जशी प्रजा तसा राजा असा लोकशाहीचा नियमच आहे
या वाक्यासंबंधी दोन मुद्दे निघतात. १. आपली प्रजा संगणक आणि टेलिकॉम क्षेत्रातील बदल समजून घ्यायच्या परिपक्व अवस्थेत राजीवजींच्या पंतप्रधानपदाच्या कारिकिर्दीत नव्हती हे तर उघडच आहे. तरीही राजाकडे भविष्याची काहीतरी दृष्टी होती हे अमान्य कसे करता येईल? २. तुम्ही भाजप समर्थक आहात का ते माहित नाही. अनेकदा भाजप समर्थकांचे मत असते की १९९८-९९ मध्ये जनता परिपक्व होती कारण त्यांनी आम्हाला निवडून दिले.पण तीच जनता २००४-०९ मध्ये अपरिपक्व झाली आणि you get a government you deserve in a democracy असे त्यांचे मत असते. म्हणजे निवडणुकींचे निकाल आपल्याला अनुकूल झाले तर जनता चांगली आणि निकाल आपल्याविरूध्द लागला तर तीच जनता वाईट कशी? मग केवळ अशाचवेळी ’जशी प्रजा तसा राजा’ हे म्हणणे दुटप्पीपणा नाही का? क्लिंटन

In reply to by क्लिंटन

हुप्प्या 21/08/2010 - 19:26
देवीलालविषयी तीळमात्र आदर न बाळगता हे मी नक्की सांगेन की राजीवजींचे एकेकाळी टेलीकॉम हे जितके लाडके स्वप्न होते तितके देवीलालचे पाण्यातून वीज काढणे हे काही नव्हते. तो एक त्याच्या मूर्खपणाचा किस्सा आहे. पण ही ह्या राजकारण्याची संपूर्ण ओळख नव्हे. दुसरे असे की मला भाजपाबद्दल काहीही आदर नाही. मी एक वेळ काँग्रेसला मत देईन पण भाजपला नाही. यथा प्रजा तथा राजा हे मत नेहमीच लागू आहे असे मला वाटते. परमपूज्य राजीवजी नवे प्रयोग करु शकले याचे स्वच्छ कारण म्हणजे त्यांना गांधी घराण्यावरील लोकांची भक्ती. अगदी आणीबाणी हा अपवाद सोडला तर सहसा लोक त्यांची साथ सोडत नाहीत. काही प्रमाणात त्यांची राजेशाही असल्यामुळे त्यांना चोखाळलेली वाट सोडता आली. तळागाळातून आलेला राजकारणी असता तर अमक्या गटाला खूष करा, तमक्या लॉबीला खूष करा. ह्या जातीकडे बघा इ. कामात सगळा वेळ गेला असता. राजीवजी वरुन अलगत टपकले म्हणून आणि सॅम पित्रोडाशी मैत्री वगैरे गोष्टीमुळे हे घडले असावे. एक लहरी राजा होता. लहर आली, कर टेलिकॉम क्रांती, लहर आली धाड श्रीलंकेत सैन्य, लहर आली, फिरव शाह्बानोचा निर्णय , लहर आली, उघड अयोध्येच्या वादग्रस्त स्थळाचे कुलुप. भारतीय परिस्थितीचा फार सखोल अभ्यास, भारतीय मानसिकतेचा अभ्यास असे काही दिसत नाही. आपली प्रजा संगणक आणि टेलिकॉम क्षेत्रातील बदल समजून घ्यायच्या परिपक्व अवस्थेत राजीवजींच्या पंतप्रधानपदाच्या कारिकिर्दीत नव्हती हे तर उघडच आहे. तरीही राजाकडे भविष्याची काहीतरी दृष्टी होती हे अमान्य कसे करता येईल? अगदी असहमत. फोन यंत्रणा सुधारणे ह्या विचाराला जनता तयार नव्हती हा निष्कर्ष कसा काढला तुम्ही? उत्तम दळणवळणाला कोण नाही म्हणेल? का म्हणून? राजकारणी लोक ज्यांना तो पैसा इतरत्र वळवायचा असेल ते नाही म्हणतील पण जनता का बरे नाही म्हणेल?

In reply to by हुप्प्या

क्लिंटन 21/08/2010 - 20:50
राजीवजी वरुन अलगत टपकले म्हणून आणि सॅम पित्रोडाशी मैत्री वगैरे गोष्टीमुळे हे घडले असावे.
मी अमेरिकेत असताना माझ्या प्राध्यापकांचे सत्या एन. अतलुरी हे आर्यव्हाईन येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया येथील ज्येष्ठ प्राध्यापक हे मित्र-सहकारी होते.एका कॉन्फरन्सदरम्यान त्यांनी माझ्या प्राध्यापकांना आणि त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांना हॉटेलमध्ये डिनरसाठी बोलावले होते.त्यावेळी प्रा.अतलुरींना राजीव गांधींनी १९८८ मध्ये भारताला ’व्हिजन २०००’ साठी विशेष सल्लागार म्हणून बोलावून घेतले होते हे स्वत: अतलुरींनी बोलता बोलता आम्हाला सगळ्यांना सांगितले. वरील दुव्यावर प्रा.अतलुरींचा सीव्ही आहे आणि आधुनिक काळातील ऋषि हेच विशेषण त्यांना लागू पडेल हे त्यांच्या सीव्हीवर एक नजर फिरवली तरी आपल्या लक्षात येईल. आपल्याला वाचायला कंटाळा येतो पण अतलुरींच्या achievements संपतच नाहीत. त्यावेळी स्वत: अतलुरींनी राजीव गांधींना भविष्यकाळाचा दृष्टीकोन होता हे सांगितले. सॅम पित्रोदा हे नाव आपल्याला वर्तमानपत्रांमुळे माहित झाले. सत्या अतलुरी हे नाव मला स्वत: अतलुरींना भेटेपर्यंत माहित नव्हते आणि मिपावरील कोणालाही ते नाव आधी माहिती असायची शक्यता फारच थोडी आहे. अशा अनेक वेगवेगळ्या मोठ्या लोकांशी सल्लामसलत करून त्यांच्या सल्ल्याप्रमाणे पावले उचलायचा प्रामाणिक प्रयत्न राजीव गांधींनी केला होता असे अतलुरींनी मुद्दामून सांगितले. पण भारतातील परिस्थिती आणि लाल फित यामुळे त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना पाहिजे तितके यश आले नाही but Rajiv Gandhi meant business असे त्यांनी बोलताना म्हटले होते. तेव्हा एक लहरी राजा होता, आली लहर केली टेलिकॉम क्रांती इतका उथळ प्रकार हा नक्कीच नव्हता. बाकी चालू द्या.
परमपूज्य राजीवजी नवे प्रयोग करु शकले याचे स्वच्छ कारण म्हणजे त्यांना गांधी घराण्यावरील लोकांची भक्ती. अगदी आणीबाणी हा अपवाद सोडला तर सहसा लोक त्यांची साथ सोडत नाहीत.
हा निष्कर्ष तुम्ही कसा काढलात? राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या काळात ज्या निवडणुका झाल्या त्यात बहुसंख्य ठिकाणी त्यांचा पराभवच झाला.१९८४ च्या लोकसभा निवडणुकींमधील झंझावातानंतर मार्च १९८५ मध्ये कॉंग्रेस पक्ष उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान यासारख्या राज्यात जिंकला.पण प्रत्येक ठिकाणी त्या पक्षाचे बळ डिसेंबर १९८४ पेक्षा कमी झाले होते. उदाहरणार्थ डिसेंबर १९८४ मध्ये कॉंग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशात ८५ पैकी ८३ लोकसभेच्या जागा जिंकल्या.त्याच न्यायाने पक्षाने विधानसभेत विधानसभेत ४२५ पैकी किमान सव्वा तीनशे जागा जिंकायला हव्या होत्या. जिंकल्या किती? २६८! महाराष्ट्रात ४८ पैकी ४३ लोकसभा जागा जिंकणारा कॉंग्रेस पक्ष विधानसभेत मात्र २८८ पैकी १६७ जागाच जिंकू शकला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तर कॉंग्रेस पक्षाचा पराभवच झाला आणि रामकृष्ण हेगडे मुख्यमंत्री झाले.याच कर्नाटकात १९८४ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये कॉंग्रेसने मोठा विजय मिळवला होता. आंध्र प्रदेशात रामारावांनी परत एकदा कॉंग्रेस पक्षाला दणकून चोप आंध्र प्रदेशात दिला. पुढे कॉंग्रेस पक्षाचा सप्टेंबर १९८५ मध्ये पंजाबमध्ये तर नोव्हेंबर १९८५ मध्ये आसाममध्ये पराभव झाला.या राज्यांमधील पार्श्वभूमी वेगळी असल्यामुळे या राज्यांचा मुद्दा थोडा बाजूला ठेऊ या. पुढे मार्च १९८७ मध्ये केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टांनी असाच जोरदार चोप कॉंग्रेसला दिला. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाने पश्चिम बंगालमध्ये ४२ पैकी २० जागा जिंकल्या होत्या. खुद्द सोमनाथ चॅटर्जींचा पराभव झाला.या पार्श्वभूमीवर कम्युनिस्टांनी विधानसभेच्या २९४ पैकी २५०+ जागा जिंकणे म्हणजे कॉंग्रेसने खाल्लेली मोठीच आपटी नाही का?त्यानंतर राजीव गांधींना खरा धक्का बसला जून १९८७ मध्ये हरियाणामध्ये.९० पैकी अवघ्या चार जागा कॉंग्रेस पक्षाने जिंकल्या. खुद्द मुख्यमंत्री बन्सीलाल यांचा पराभव झाला. पुढे जानेवारी १९८९ मध्ये तामिळनाडूतील विधानसभा निवडणुका राजीव गांधींनी प्रतिष्ठेच्या केल्या आणि अण्णा द्रमुकशी युती न करता स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या. निकाल काय लागला? २३४ पैकी २६ जागा कॉंग्रेस पक्षाने जिंकल्या! वि.प्र.सिंह राजीव गांधींच्या मंत्रीमंडळातून आणि कॉंग्रेस पक्षातूनही बाहेर पडले आणि त्यांनी लोकसभेची पोटनिवडणुक कॉंग्रेसविरूध्द अलाहाबादेतून लढवली.त्या पोटनिवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. तेव्हा राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या कारिकिर्दीतही जनतेचा अबाधित पाठिंबा त्यांना होता आणि त्या जोरावर ते वाटेल ते करू शकत होते हे म्हणणे अप्रस्तुत वाटते.
भारतीय परिस्थितीचा फार सखोल अभ्यास, भारतीय मानसिकतेचा अभ्यास असे काही दिसत नाही.
यातही दोन मुद्दे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे हे दुर्दैवाने बहुसंख्य पंतप्रधानांविषयी खरे आहे. वाजपेयींविषयी बोलायचे झाले तर आली लहर गेले लाहोरला आणि केली लाहोर जाहिरनाम्यावर सही. मग कारगीलमध्ये कंबरड्यात मोठी लाथ बसली तेव्हा यांना जाग आली! इतकी वर्षे रामनामाचा जप केला त्या रामाला सत्ता मिळाल्यावर बासनात गुंडाळून ठेवले. पुढे २००१ मध्ये नागालॅंडच्या प्रश्नावर बृहद-नागालॅंडची निर्मिती करायचे आश्वासन देऊन बसले त्याविरूध्द मणिपूरमध्ये उग्र आंदोलन झाल्यावर यांना जाग आली. असे काहीनाकाही प्रत्येक पंतप्रधानाविषयी लिहिता येईल. आणि दुसरा मुद्दा म्हणजे भारतीय मानसिकता म्हणजे नक्की काय? आणि त्या मानसिकतेत जो सत्ताधीश गुरफटून राहिल तो भारताला नवी दिशा नक्कीच दाखवू शकणार नाही. भारतात आज जी प्रगती दिसते आहे ती मूठभर लोकांनी (ज्यांना आधुनिक काळाची जाण आहे आणि भविष्यकाळाचे व्हिजन आहे) केलेली आहे. बहुसंख्य जनता तर जातीपाती, रूढी-परंपरा यातच गुरफटलेली आहे.मग भारतीय मानसिकता म्हणजे ही बहुसंख्य लोकांची मानसिकता का? उत्तर प्रदेशातील बांदा-झाशी-चित्रकूट या बुंदेलखंडातील भागात सतीची परंपरा अजूनही चालते याविषयी डॉक्युमेन्टरी मी स्वत: एन.डी.टी.व्ही वर बघितली आहे.ही मानसिकता म्हणजे भारतीय मानसिकता का?अशा मानसिकतेत गुरफटलेला पंतप्रधान म्हणजे संकटास निमंत्रणच.
फोन यंत्रणा सुधारणे ह्या विचाराला जनता तयार नव्हती हा निष्कर्ष कसा काढला तुम्ही?
भारतातील बहुसंख्य (अगदी शिकल्या सवरलेल्यांनाही) लोकांचे भारतासारख्या गरीब लोकांच्या देशात फोन आणि संगणक गरजेचे नाहीत असेच मत होते. त्याकाळाशी संबंधित लेखांमधून मी हे नक्कीच वाचले आहे.तसेच पंगा या ज्येष्ठ मिपाकरांचे पूर्वी राजीव गांधींवर झालेल्या चर्चेतील हे मत बघा. विरोधी पक्षांचे तर सत्ताधारी पक्षाचे पाय खेचायचे परमकर्तव्य असते.तेव्हा गरीबांना ’तुझ्या भाकरीची सोय करायची सोडून राजीव सरकार फोन आणि संगणक आणत आहे’ असे राजकिय स्वार्थासाठी भडकावणे सोपे असते आणि देवीलालसारख्यांनी ते केले सुध्दा. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून नवीन बदलांना विरोध (केवळ फोन यंत्रणा सुधारणे असा संकुचित अर्थ कृपया घेऊ नको या) अशीच मानसिकता लोकांची होती.

In reply to by क्लिंटन

हुप्प्या 21/08/2010 - 23:04
राजीव गांधींची टेलिकॉम क्रांती हा फार विचार करुन, अभ्यासाने घेतलेला निर्णय होता असे मला अजूनही वाटत नाही. मुळात हा गृहस्थ अभ्यासू होता ह्याचे पुरावे फारसे नाहीत. एखाद्या क्षेत्रात गाजलेल्या परदेशस्थ व्यक्तीने राजीव गांधींबद्दल चांगले मत व्यक्त केले म्हणून त्यांचे मत ग्राह्य मानायचे हे काही पटत नाही. नंतरचे राजीव गांधींचे निर्णय बघता हा माणूस फार विचारी वाटत नाही. चमचे, संधीसाधू लोकांचे सल्ले घेऊन काम करणारा वाटतो. >>हा निष्कर्ष तुम्ही कसा काढलात? राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या काळात ज्या निवडणुका झाल्या त्यात बहुसंख्य ठिकाणी त्यांचा पराभवच झाला.१९८४ च्या लोकसभा निवडणुकींमधील झंझावातानंतर मार्च १९८५ मध्ये कॉंग्रेस पक्ष उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान यासारख्या राज्यात जिंकला.पण प्रत्येक ठिकाणी त्या पक्षाचे बळ डिसेंबर १९८४ पेक्षा कमी झाले होते. भारतात केंद्रीय पातळीवर कुठले घराणे कायम वरचढ असते? अर्थातच गांधी घराणे. संख्याबळ वरखाली होत असले, लंबक इकडे तिकडे हेलकावे घेत असला तरी गांधी घराण्याला मरण नाही असेच इतिहास सांगतो. अनुभव इतका कमी असताना, (बहुधा) अगदी कमी कष्ट करुन, इतका विजय मिळवल्यामुळे राजा बेसावध झाला असणे शक्य आहे. बोफोर्स प्रकरणी ही बेसावधता दिसलीच. नंतर बोफोर्स प्रकरण शौरी वगैरेंनी उचलून धरल्यामुळे साहेब हरले. पण ती सगळी नंतरची गोष्ट. भारतात लोकांना चांगले फोन होते ही आपली माहिती साफ चुकीची आहे. माझ्या आसपासच्या लोकांचे तरी असे मत नव्हते. असे काही सर्वेक्षण वगैरे केले होते का? निव्वळ काही डाव्या विचारसारणीच्या लेखकांचे मत हे प्रातिनिधिक का मानायचे? >> यातही दोन मुद्दे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे हे दुर्दैवाने बहुसंख्य पंतप्रधानांविषयी खरे आहे. वाजपेयींविषयी बोलायचे झाले तर आली लहर गेले लाहोरला आणि केली लाहोर जाहिरनाम्यावर सही. मग कारगीलमध्ये कंबरड्यात मोठी लाथ बसली तेव्हा यांना जाग आली! इतकी वर्षे रामनामाचा जप केला त्या रामाला सत्ता मिळाल्यावर बासनात गुंडाळून ठेवले. पुढे २००१ मध्ये नागालॅंडच्या प्रश्नावर बृहद-नागालॅंडची निर्मिती करायचे आश्वासन देऊन बसले त्याविरूध्द मणिपूरमध्ये उग्र आंदोलन झाल्यावर यांना जाग आली. असे काहीनाकाही प्रत्येक पंतप्रधानाविषयी लिहिता येईल. आपल्याला वाजपेयींना शिव्या देण्याची फार हौस दिसते. मीही काही वाजपेयींचा चाहता नाही. हव्या तर मी आणखी शिव्या घालतो. पण विषय तो नाही. राजीवजी खूप खूप थोर आहेत हा ह्या लेखाचा विषय आहे. त्यामुळे इतर फालतू पंतप्रधान किती वाईट होते आणि त्यांचे कसे चुकले होते हे विषयांतर नको. दुसर्‍याचे चुकले म्हणून ह्यांची चूक ठीक होत नाही. भारतीय मानसिकता जाणणे म्हणजे निव्वळ भारतीयांना हवे तेच करणे असे नाही तर आपल्या देशाचा इतिहास, समाजशास्त्र जाणणे. त्या आधारावर आपल्या निर्णयाचे दूरगामी परिणाम ओळ्खणे. तो विचार करुन निर्णय घेणे. शाहबानोचा निर्णय फिरवताना भारतीय मुस्लिमांची, हिंदूंची मानसिकता जाणणे आवश्यक होते. तीच गोष्ट अयोध्येच्या वास्तूचे कुलुप उघडण्यापूर्वी. ह्या दोन्ही कृत्याचे अगदी वाईट परिणाम आहेत. आणि ते दीर्घकाळ टिकणार आहेत.

In reply to by हुप्प्या

क्लिंटन 21/08/2010 - 23:52
निदान आपली प्रगती ’राजीव गांधींची टेलिकॉम क्रांती’ हे म्हणण्याइतकी झाली हे पण काही कमी नाही. नाहीतर राजीव गांधींचे बहुसंख्य टिकाकार त्यांच्या यातला वाटाच मुळात नाकारतात.
मुळात हा गृहस्थ अभ्यासू होता ह्याचे पुरावे फारसे नाहीत.
मान्य.पण राजीव गांधी हे एक well meaning पंतप्रधान होते आणि भारताचे भवितव्य संगणक आणि टेलिफोन क्रांतीत आहे हे समजण्याइतकी पात्रता त्यांची होती.आणि त्यासाठीच त्यांनी सॅम पित्रोदा,सत्या अतलुरी यासारख्या नावाजलेल्या लोकांचे सल्ले घेऊन त्यादिशेने पावले टाकायला प्रारंभ केला होता.त्यात त्यांना यश पूर्णपणे आले नाही म्हणून त्यांच्या मूळ उद्देशालाच नाकारणे योग्य नाही.
एखाद्या क्षेत्रात गाजलेल्या परदेशस्थ व्यक्तीने राजीव गांधींबद्दल चांगले मत व्यक्त केले म्हणून त्यांचे मत ग्राह्य मानायचे हे काही पटत नाही.
मग कोणाचे मत ग्राह्य धरायचे?निदान नव्या सुधारणा घडवून आणण्यासाठी राजीव गांधींनी ज्यांना सल्लागार म्हणून नियुक्त केले आणि अशा सल्लागारांनी राजीव गांधींबरोबर जवळून काम केले अशांचे मत अधिक ग्राह्य की राजीव गांधी हे नाव ऐकताच त्यांना कसलेच (अगदी देय असलेलेही) श्रेय द्यायचे नाही असा पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन असलेल्यांचे?
बोफोर्स प्रकरणी ही बेसावधता दिसलीच.
बोफोर्स प्रकरणी बेसावधतेपेक्षा राजीव गांधी चाणक्यनितीचे खेळ खेळण्यात कमी पडले. ’मी बोफोर्स प्रकरणी पैसे घेतलेले नाहीत’ हे त्यांनी अनंतवेळा सांगितले.त्यातूनच बोफोर्स प्रकरण राजीव गांधींनी स्वत:हूनच लोकांच्या स्मरणात राहिल अशी व्य्वस्था करून ठेवली. याउलट नरसिंह रावांवर हर्षद मेहताने लाच दिल्याचा आरोप केला तर त्यावर रावांनी चकार शब्द काढला नाही. महिन्या दोन महिन्यात ते प्रकरण आपोआपच मागे पडले.
राजीवजी खूप खूप थोर आहेत हा ह्या लेखाचा विषय आहे.
नाही संदर्भ चुकला.मूळ लेखाचा विषय राजीव गांधींना त्यांच्या ६६व्या जयंतीनिमित्त श्रध्दांजली वाहणे हा आहे.आणि राजीव गांधी हे नाव ऐकतात तुमच्यासारखे लोक त्यांच्याविषयी पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन बाळगून त्यांना देय असलेले श्रेय द्यायलापण नकार देतात हे मला पूर्णपणे माहित असल्यामुळे त्यांच्याविषयीचे तटस्थ अभ्यासातून मी बनविलेले मत मांडणे हा माझ्यापुरता या लेखाचा उद्देश मी वाढविला असे म्हटले तरी चालेल. मी जेवढ्या हिरीरीने राजीव गांधींच्या नव्या काळानुरूप असलेल्या धोरणांचा पुरस्कार करतो तितक्याच हिरीरीने श्रीलंका प्रकरणी त्यांचा विरोधही करतो हे वरील एका प्रतिसादात दिसून आले असेलच. राजीव गांधी खूप खूप थोर आहेत असा म्हणायचा माझा मुळातच उद्देश नाही.माझा उद्देश एकच की त्यांच्या कारभाराचे वस्तुनिष्ठ मुल्यांकन करावे आणि बहुसंख्य लोक त्यांच्यावर टिका करतात त्याचबरोबर त्यांना देय असलेले श्रेयसुध्दा संकोच न करता द्यावे. कोणाही राजकिय/ऐतिहासिक व्यक्तीविषयी पूर्वग्रहदूषित मते ठेवणे ही वस्तुनिष्ठ अभ्यासाची पायरी नव्हे.
शाहबानोचा निर्णय फिरवताना भारतीय मुस्लिमांची, हिंदूंची मानसिकता जाणणे आवश्यक होते.
मागे मृगनयनी यांच्याच राजीव गांधींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रध्दांजली वाहायच्या चर्चेत आपण "मुस्लिमांकरता असणारे घटस्फोटविषयक कायदे हे कित्येक मुस्लिम देशांपेक्षा जुनाट, रानटी आणि असंस्कृत आहेत. त्याचे श्रेय ह्या महाभागलाच दिले पाहिजे" हे विधान केले होते. त्यावरील चर्चा मी परत जशीच्या तशी इथे चिकटवत आहे. त्यावेळी तुम्ही उत्तरे द्यायचे टाळले होतेत. ती उत्तरे आता देणार का? (माझा मूळ चर्चेवरील प्रतिसाद: इथे
"मुस्लिमांकरता असणारे घटस्फोटविषयक कायदे हे कित्येक मुस्लिम देशांपेक्षा जुनाट, रानटी आणि असंस्कृत आहेत. त्याचे श्रेय ह्या महाभागलाच दिले पाहिजे"
या वाक्याचा अधिक खुलासा करू शकाल का? माझ्या माहितीप्रमाणे शाहबानो या मुस्लिम महिलेस तिच्या नवऱ्याने ’तलाक’ दिला. शरियतप्रमाणे अशा तलाक दिलेल्या महिलेस पोटगीचा हक्क नाही. पण न्यायालयाने शाहबानोला पोटगी मिळावी असा आदेश दिला. त्यावर मुल्ला मौलवींचे पित्त खवळले आणि त्यांनी आंदोलनाची धमकी दिली. त्यापुढे राजीव सरकार नमले आणि संसदेत कायदा करून न्यायालयाचा निर्णय फिरविण्यात आला. ही माहिती चुकीची असल्यास बरोबर माहिती सांगावी ही विनंती. काही प्रश्न: १. राजीव सरकारने न्यायालयाचा निर्णय फिरविण्यापूर्वी या संदर्भातले कायदे कसे होते? २. राजीव सरकारने निर्णय फिरविल्यामुळे नक्की काय बदल झाला? ३. तुम्ही जे म्हणत आहात त्याप्रमाणे आपल्याकडील कायदे अनेक मुस्लिम देशांमधील कायद्यांपेक्षा जुनाट आणि असंस्कृत आहेत. नक्की कोणत्या मुस्लिम देशांमध्ये आपल्याकडील कायद्यांपेक्षा आधुनिक आणि सुसंस्कृत कायदे आहेत? त्यात नक्की फरक काय? याविषयी अधिक माहिती दिल्यास बरे होईल.
कॉंग्रेस धर्मपिसाट मुस्लिमांचे पाय चाटते हे सिद्ध करायला शाहबानो केस हे उदाहरण इतिहासात कायमचे राहील.
एकेकाळी मी स्वत: भाजपच्या कळपातला (कदाचित अडवाणी-वाजपेयींपेक्षा) कट्टर समर्थक होतो. त्याकाळी मी पण तसेच म्हणत असे. आणि पूर्णपणे तटस्थपणे विचार केला तर शाहबानो प्रकरणी न्यायालयाचा आदेश फिरविणे अयोग्य होते असे मला वाटते. आज आपण २०१० मध्ये आहोत आणि चर्चा करत आहोत १९८५-८६ च्या शाहबानो प्रकरणाची म्हणजे २५ वर्षे जुन्या प्रकरणाची. मी आपल्याला आणखी ३५ वर्षे मागे घेऊन जातो. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळात डॉ.आंबेडकर कायदामंत्री होते. त्यांनी नेहरू सरकारपुढे ’हिंदू कोड बिल’ आणण्यासाठी पाठपुरावा केला. पंडित नेहरूंचा या बिलाला तत्वत: पाठिंबा होता. तसेच समान नागरी कायदा आणायलाही नेहरूंचा तत्वत: पाठिंबा होता पण फाळणीच्या वेळी झालेल्या प्रचंड हिंसाचारामुळे त्यांनी समान नागरी कायदा आणायचा निर्णय पुढे ढकलला (संदर्भ: रामचंद्र गुहांचे India After Gandhi हे पुस्तक). आंबेडकरांचे हिंदू कोड बिल हे हिंदू समाजापुरते मर्यादित होते. आंबेडकरांच्या प्रस्तावित हिंदू कोड बिलाप्रमाणे एकापेक्षा अधिक लग्ने करण्यास बंदी, मुलींना संपत्तीत वाटा देणे, घटस्फोटांना मान्यता, मुली दत्तक घेण्यास परवानगी यासारखे भाग होते. तसेच सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हिंदू या शब्दाची व्याख्या जे मुस्लिम, ख्रिस्ती, पारशी आणि ज्यू नाहीत ते अशी केली. म्हणजे बौध्द, जैन आणि शीख हे पण हिंदू समुदायाचाच भाग म्हणून गणण्यात येणार होते. तसेच हिंदू समाजाला एक समाज म्हणून (जातींचा उल्लेख न करता) गणण्यात येणार होते. (संदर्भ: एक , दोन ) या प्रस्तावित हिंदू कोड बिलाविरूध्द हिंदुत्ववादी संघटनांनी राळ उठवली. निर्मलचंद्र चॅटर्जी (सोमनाथ चॅटर्जींचे वडिल) आणि शामाप्रसाद मुखर्जी या हिंदुत्ववादी नेत्यांनी हे बिल म्हणजे हिंदू समाजातील कुटुंब आणि विवाहविषयक परंपरांना धोका आहे असे म्हटले. करपात्री महाराजांची रामराज्य परिषद ही संघटना या बिलाविरूध्द केलेल्या आंदोलनातून उभी राहिली. शामाप्रसाद मुखर्जी म्हणाले की सरकारने मुस्लिम कायद्यांमध्ये काही बदल केलेला नाही. संदर्भ ते म्हणणे तथ्याला धरून होते. यावर पंडित नेहरूंचे उत्तर कोणते होते हे पण याच संदर्भात दिले आहे. पुढील काळात होणाऱ्या आंदोलनांना घाबरून नेहरू सरकारने हिंदू कोड बिल प्रस्तावित स्वरूपात आणले नाही आणि त्याच्या निषेधार्थ डॉ.आंबेडकरांनी कायदामंत्री पदाचा राजीनामा दिला. नंतरच्या काळात नेहरू सरकारने ४ वेगवेगळी बिले पास केली पण त्यात आंबेडकरांना अभिप्रेत असलेले हिंदू कोड बिल पूर्णपणे नव्हते. राष्ट्रपती राजेन्द्रप्रसाद यांचाही या बिलाला विरोध होता. काही प्रश्न: १. सरकारने मुस्लिम कायद्यांमध्ये बदल केले नाहीत हे म्हणणे बरोबरच होते. पण तत्वत: हिंदू कोड बिलात वाईट काय होते? तसाच बदल मुस्लिम कायद्यातही घडवावा असा आग्रह धरणे वेगळे आणि मुस्लिम समाज आपले जुनेपुराणे विचार सोडायला तयार नाही म्हणून आपणही ते सोडणार नाही असे म्हणणे आणि म्हणून बिलाला विरोध करणे वेगळे. २. हिंदू कोड बिलाला ’आमच्या परंपरांना धक्का लागेल’ असे म्हणून विरोध करणे समर्थनीय होते का? ३. ते समर्थनीय असेल तर मुस्लिम समाजाने न्यायालयाचा निर्णय म्हणजे त्यांच्या परंपरांना लावलेला धक्का असे म्हटले तर त्यात काय बिघडले? ४. राजीव सरकारने शाहबानो प्रकरणी मुस्लिम मूलतत्ववाद्यांपुढे लोटांगण घातले त्याचप्रमाणे नेहरू सरकारने हिंदू मूलतत्ववाद्यांपुढे लोटांगण घातले असे म्हटले तर काय चुकले? ५. राजीव सरकारने घातलेले लोटांगण हे धर्मांध मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळायला असेल तर नेहरू सरकारचे लोटांगण हे धर्मांध हिंदूंच्या कफन्या सांभाळायला घातलेले होते असे म्हटले तर त्यात काय चुकले? ६. पण स्वत:ला हिंदुत्ववादी समजणारे पक्ष असे म्हणत नाहीत. ते का? (अवांतर: हिंदुत्ववादी पक्ष गांधींनी १९१९ मध्ये खिलाफत चळवळीला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांच्यावर टिका करतात. पण लोकमान्य टिळकांनी मुस्लिम लीगशी त्यापूर्वी ३ वर्षे केलेल्या लखनौ कराराविषयी मौन का बाळतात? स्वातंत्र्यलढ्यात मुस्लिमांचे सहकार्य मिळावे हा जर टिळकांचा त्यामागचा उद्देश असेल तर तोच उद्देश गांधींचाही होता. मग टिका करताना टिळकांना आपल्या बाजूला ओढून घेऊन केवळ गांधींवर टिका का?) मला वाटते नेहरू सरकारने हिंदू कोड बिलावर घेतलेली माघार आणि राजीव सरकारने शाहबानो प्रकरणी घेतलेली माघार यासारख्या घटनांमागे सरकारचे अतिनेमस्त धोरण कारणीभूत आहे. हिंदू संघटनांनी मोठ्या आंदोलनाची धमकी दिली आणि नेहरू नमले. मुस्लिम संघटनांनी मोठ्या आंदोलनाची धमकी दिली आणि राजीव गांधी नमले. काही वाटेल ते झाले तरी चालेल कायद्यापुढे धमक्या चालायच्या नाहीत असे ठणकावून दोघांनीही सांगितले नाही. तसेच भारताचे विमान कंदाहारला पळवून नेल्यावर वाजपेयी नमले. काहीही झाले तरी दहशतवाद्यांपुढे लोटांगण घालणार नाही असे वाजपेयी ठणकावून सांगू शकले नाहीत. या सगळ्या घटनांचे कारण -- आपल्या समाजाचा (आणि म्हणून समाजानेच निवडून दिलेल्या सरकारचा) अति नेमस्तपणा हेच आहे असे मला वाटते. एकट्या राजीव-नेहरू-वाजपेयींना तरी का का दोष द्यावा? या प्रश्नांना तुम्ही मागे उत्तरे द्यायचे टाळले होतेत ती आता देणार का? मी राजीव सरकारच्या शाहबानो प्रकरणाबरोबरच नेहरू सरकारची हिंदू कोड बिलावरील माघारीवरही तितक्याच प्रमाणावर टिका करत आहे. क्लिंटन

In reply to by क्लिंटन

रमताराम 20/08/2011 - 14:39
टोपी काढली आहे सायबा. श्री. विल्यम जेफरसन क्लिंटन यांना इथे दिलेल्या एकाहुन अधिक साक्षेपी नि अभ्यासपूर्ण प्रतिसादांबद्दल आमच्याकडून एक भक्कमशी पार्टी लागू झालेली आहे. इतके तपशीलवार नि नि तरीही मुद्दे धरून प्रतिसाद फारच क्वचितच वाचायला मिळतात. मुद्दे १ ते ६ अतिशय मार्मिक आहेत. पण काय आहे माणूस हा प्राणीच असा आहे ज्याच्याबाबत 'आपला तो बाब्या' हे नेहमीच खरे असते. माझा धर्म बरोबर तुमचा भ्रष्ट, माझं ज्योतिष अचूक तुमची नाडीपट्टी खोटी, आमचे नेते स्वच्छ तुम्ही सगळे भ्रष्ट, आमचे लिखाणातील पुरावे मागायचे नाहीत आहे तसे मान्य करायलाच हवे तुम्ही, तुम्ही कितीही अभ्यासपूर्ण, टीपांसहित लिहिलेत तरी तुमचे संदर्भ खोटे, हा सारा मूर्खपणा सार्वत्रिक आहे, त्याला इलाज नाही. शेवटी काय 'आहे' हे समजून घेण्यापेक्षा काय 'असायला हवे' असे आपल्याला वाटते ते 'आहेच' असा समज करून घेणे सोपे नि डोस्क्याला ताप न देणारे असते साहेब. असा तुमच्यासारखा बयाजवार अब्यास करायला टैम हाय कुनाकडं राव. असो. पुन्हा एकवार टोपी काढतो आहे. हॅट्स ऑफ सरजी.

In reply to by क्लिंटन

चिंतामणी 20/08/2011 - 16:55
निदान आपली प्रगती ’राजीव गांधींची टेलिकॉम क्रांती’ हे म्हणण्याइतकी झाली हे पण काही कमी नाही. नाहीतर राजीव गांधींचे बहुसंख्य टिकाकार त्यांच्या यातला वाटाच मुळात नाकारतात. आज पुणे मुंबई प्रवास करताना फक्त एक्सप्रेस हायवेनेच अजेकजण प्रवास करतात. मुंबईत अनेक फ्लायओव्हर बांधुन वाहतुक खूप प्रमाणात प्रवाही झाली. पण त्या काळात "ही चैन कोणाला परडवणार आहे" असे अनेकजण बेँबीच्या देठापासुन ओरडत असत. वाजपेयीच्या काळात राष्ट्रीय महामार्ग आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजना इत्यादीमुळे रस्ते मोठे व वाहतुक वेगाने होउ लागली. त्या काळात महागाई नव्हतीच असे म्हणले तर वावगे होउ नये. या आणि अश्या अनेक गोष्टी चांगल्या झाल्या होत्या. त्याला "चांगले" असे म्हणले का कधी त्यांच्या विरोधकांनी. तुझ्याच शब्दात सांगायचे तर "त्यात त्यांना यश पूर्णपणे आले नाही म्हणून त्यांच्या मूळ उद्देशालाच नाकारणे योग्य नाही." काही प्रश्न: १. सरकारने मुस्लिम कायद्यांमध्ये बदल केले नाहीत हे म्हणणे बरोबरच होते. पण तत्वत: हिंदू कोड बिलात वाईट काय होते? मा. आंबेडकरांनी मांडलेल्या बिलात काय काय तरतुदी होत्या आणि पं.नेहरूनी त्यांनी त्या बिलात (तु म्हणतो त्या प्रमाणे- हिंदूववादी संघटनांनी राळ उठवल्याने) जे बदल केले याचे तपशील तुला स्वत:ला माहीत आहेत काय???? २. हिंदू कोड बिलाला ’आमच्या परंपरांना धक्का लागेल’ असे म्हणून विरोध करणे समर्थनीय होते का? कोणी समर्थन केले (मुकर्जी आणि चटर्जी यांचे व्यतिरीक्त) याचा आणि हिंदू कोड बिलातील कोणत्या तरतुदींविरूध्द राळ उठवली याचा तपशील मिळाल्यावर मत व्यक्त केले जाईल. ३. ते समर्थनीय असेल तर मुस्लिम समाजाने न्यायालयाचा निर्णय म्हणजे त्यांच्या परंपरांना लावलेला धक्का असे म्हटले तर त्यात काय बिघडले? म्हणजे येथे कायदा निदान १९४७सालापासून अस्तीत्वात होता. नवीन कायदा केला त्या आधारे निर्णय दिला असे तर नव्हते. फक्त तो पर्यन्त कोणिही कोर्टात जाउन पोटगी मागीतली नव्हती. ती शहाबानोनी कायद्याला धरून मागीतली होती. तोडे विषयांतर होइल. पण आवश्यक आहे म्हणून विचारतो, कोर्ट अस्तीत्वात असताना "शरीयतप्रमाणे" निवाडा करणे योग्य आहे का? एकाच देशात वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे कायदे हे तत्व मान्य आहे का तुला????? ४. राजीव सरकारने शाहबानो प्रकरणी मुस्लिम मूलतत्ववाद्यांपुढे लोटांगण घातले त्याचप्रमाणे नेहरू सरकारने हिंदू मूलतत्ववाद्यांपुढे लोटांगण घातले असे म्हटले तर काय चुकले? ५. राजीव सरकारने घातलेले लोटांगण हे धर्मांध मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळायला असेल तर नेहरू सरकारचे लोटांगण हे धर्मांध हिंदूंच्या कफन्या सांभाळायला घातलेले होते असे म्हटले तर त्यात काय चुकले? वरील दोन्ही प्रश्णांचे उत्तर प्र.दोनला दिलेल्या उत्तराप्रमाणेच. ६. पण स्वत:ला हिंदुत्ववादी समजणारे पक्ष असे म्हणत नाहीत. ते का? (अवांतर: हिंदुत्ववादी पक्ष गांधींनी १९१९ मध्ये खिलाफत चळवळीला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांच्यावर टिका करतात. पण लोकमान्य टिळकांनी मुस्लिम लीगशी त्यापूर्वी ३ वर्षे केलेल्या लखनौ कराराविषयी मौन का बाळतात? स्वातंत्र्यलढ्यात मुस्लिमांचे सहकार्य मिळावे हा जर टिळकांचा त्यामागचा उद्देश असेल तर तोच उद्देश गांधींचाही होता. मग टिका करताना टिळकांना आपल्या बाजूला ओढून घेऊन केवळ गांधींवर टिका का?) तु ज्यापध्दतीने तुलना करीत आहेस ते बघता असे दिसत आहे की "खिलाफत चळवळ काय होती ते कदाचीत पुर्णपणे माहीत नसावे. आणि कदाचीत "लखनौ करारा विषयीसुद्धा हीच परीस्थीत असावे असे वाटते. म्हणून मत देत नाही. [ए. जी. (अब्दुल गफूर) नूरानी यांनी टिळक आणि जीना या दोघांच्या संबंधांवर एक ग्रंथ लिहिला आहे. ‘जीना अ‍ॅण्ड टिळक- कॉम्रेड्स इन द फ्रीडम स्ट्रगल’ त्यात लखनौ कराराविषयी सर्वात अधीकृत माहिती वाचायला मिळेल]

In reply to by हुप्प्या

बेसनलाडू 21/08/2010 - 03:38
विप्रो, इन्फोसिस आणि सत्यम ही मंडळी गुगल, अ‍ॅपल, सिस्को, मायक्रोसॉफ्ट च्या डोळ्यासमोर तारे चमकतील असे नवनवे शोध लावत आहेत! पडलोच! भारी!! (विनोदी)बेसनलाडू

In reply to by हुप्प्या

विंजिनेर 21/08/2010 - 18:36
विप्रो, इन्फोसिस आणि सत्यम ही मंडळी गुगल, अ‍ॅपल, सिस्को, मायक्रोसॉफ्ट च्या डोळ्यासमोर तारे चमकतील असे नवनवे शोध लावत आहेत!
ठार मेलो! हुच्च!

मृत्युन्जय 20/08/2010 - 23:10
हो आणि त्यांच्यामुळेच भारता बोफोर्स तोफा आल्या. त्यांचा कारगिलच्या युद्धात किती उपयोग झाला महितीये? भारतात जागतिकीकरणाचे वारे पण त्यांच्यामुळेच वाहायला लागले हे पण मान्य करायला लागेल.

हुप्प्या 21/08/2010 - 02:19
मला वाटते भारतीयांचा उद्धार करायला राजीवजींच्या रुपाने एक प्रेषितच देवाने भारतात धाडला. एका हातात टेलिफोन दुसर्‍या हातात संगणक, मागल्या खिशात कीबोर्ड आणि माऊस, कंबरेला सगळ्यांकरता केबल्स अशा अवतारात मारुती कारमधे स्वार होऊन हा महात्मा भारतात आला. (नंतर बहुधा स्वर्गात शोस्टॉपर बग आल्यामुळे देवाने त्यांना घाईघाईने परत बोलावले.) जाण्यापूर्वी चोरखिशात ठेवलेला एक मोबाईल फोन त्यांनी सोनियाजींना दिला आणि त्यामुळेच आपल्या देशात मोबाईलची क्रांती आली. मोझेस जसा दहा देवाज्ञा लिहिलेल्या शिळा घेऊन भूतलावर आला तसेच राजीवजीही नव्या युगाच्या शिळा घेऊन आले! आता राहुलजींमुळे गुगल, फेसबुक, आयफोन आणि अ‍ॅण्ड्रॉईडची क्राती येत आहे. तीन पिढ्या एकहाती अशी क्रांती घडवतायत असे दृश्य भूतलावर कुठेतरी पहायला मिळेल का?

राजीवजी दिसायला हॅन्डसम होते. म्हणून बर्‍याच बायकाना ते आवडायचे असे ऐकून आहे. धाग्याच्या शीर्षकातच मिस यु, लव्ह यु असं 'हरणासारखे डोळे' असलेल्या बाईंनी लिहिलं आहे. त्यावरुनच काय ते समजून जा.

In reply to by अप्पा जोगळेकर

मृगनयनी 21/08/2010 - 12:03
धाग्याच्या शीर्षकातच मिस यु, लव्ह यु असं 'हरणासारखे डोळे' असलेल्या बाईंनी लिहिलं आहे. त्यावरुनच काय ते समजून जा. हा हा हा हा हा !!! आप्पा!, राजीव'जी गेले...तेव्हा मी ४-५ वर्षांची होते हो फक्त! ;) पण तेव्हादेखील मला त्यांचे व्यक्तिमत्व आवडायचे! :) :)

In reply to by wings

मृगनयनी 21/08/2010 - 13:18
पंख्या उर्फ wings... :) तुमच्याकडे टी.व्ही. पण नव्हता.. का तेव्हा? कारण टीव्ही'वर राजीव'जींचे सगळे अन्त्यविधी दाखवत होते! रस्तोरस्ती.. लोक मूकमोर्चा काढत होते.... आमच्या पुण्यात देखील अनेक मुस्लिम लोक "नाचणीच्या भाकरी"ला करतात... तसा आक्रोश करत होते! ;) _________ आणि तुम्ही तेव्हा ६-७ वर्षांचे होतात... म्हणजे १ली किन्वा २ रीत नक्की असणार! आणि २ रीत असूनही तुम्हाला काही आठवत असेल... तर तुम्ही नक्कीच मठ्ठ असणार! ;) _________

In reply to by मृगनयनी

मृत्युन्जय 21/08/2010 - 14:55
तुमच्याकडे टी.व्ही. पण नव्हता.. का तेव्हा? कारण टीव्ही'वर राजीव'जींचे सगळे अन्त्यविधी दाखवत होते! अंत्यविधी बघता बघता आवडले तुम्हाला ते?

In reply to by मृगनयनी

भारतीय 21/08/2010 - 17:23
पंख्या उर्फ wings.. म्हणजे आम्हीच बरं का! भ्रमणध्वनीचा ऊपयोग करून मिपावर असलो कि आम्ही wings असतो! तेंव्हा फक्त वाचनमात्र असतो पण 'हरणांसारखे डोळे' असणार्‍या व्यक्ती जेंव्हा असामान्य प्रतिसाद देतात तेंव्हा रहावत नाही हो! असो.. >>तुमच्याकडे टी.व्ही. पण नव्हता.. का तेव्हा? कारण टीव्ही'वर राजीव'जींचे सगळे अन्त्यविधी दाखवत होते! आम्ही खेड्यात वाढलेले ! राजीवजींची क्रांती आमच्याकडे पोहोचायला १९९२ ऊजाडले व आमच्याकडे टी.व्ही. आला..!! पण दै. सकाळ मात्र मी जन्मायच्या अगोदरपासून घरी येत असे... त्यात राजीवजींना 'व्यवस्थित' कव्हर केले नसावे का? (केलेच असेल्...कदाचित आम्हीच मठ्ठ असू! किंवा मी 'मुलगी' व त्यातही 'हरणांचे डोळे' नसल्याने रजीवजींच्या फोटोकडे लक्षच गेले नसावे!) >>आमच्या पुण्यात देखील अनेक मुस्लिम लोक "नाचणीच्या भाकरी"ला करतात... तसा आक्रोश करत होते पुणे आमचे देखील बरं का.. गेली १५ वर्षे पुणेच आहे आमच्या आयुष्यात! बाकी आम्ही मठ्ठ हे एकदम मान्य! ;)

In reply to by भारतीय

मृगनयनी 21/08/2010 - 18:23
अय्या!... माझ्या हरणासारख्या डोळ्यांना फारच प्रसिद्धी मिळतेय बुवा! ;) __________________________________ असो... भारतीय पंखा..... उपयुक्त माहितीबद्दल आभारी आहे.... प्रतिसादाबद्दल धन्यवाद! अजून काही नवी माहिती असेल... राजीव'जींबद्दल.. तर कृपया इथे टंका... संकोच करू नका..... तुम्ही "भारतीय" असल्याने तुम्हाला घटनेने आणि मिसळपावच्या सम्पादकीय महा-मन्डळाने इथे टंकण्याचा अधिकार दिलेला आहे.... ___ हुश्श! :) --- मन्डळ आभारी आहे... __ सर्वांना विकान्ताच्या शुभेच्छा! :)

सुनील 21/08/2010 - 13:53
राजीव गांधींमुळे भारतात संगणकक्रांती झाली हे साफ़ चूक आहे. आमच्याकडे संगणक पूर्वीच होते. इतकेच काय, मोबाईल, विमाने इ. सगळे सगळे काही होते. (नाहीतर, अयोद्धेपासून थेट लंकेपर्यंत राम गूगलमॅपशिवाय जाऊ कसा शकेल?) परंतु, उदो उदो होतो तो केवळ राजघराण्याचा! कारण पाठ्यपुस्तकेच!. म्हणून आम्ही ही पाठ्यपुस्तकेच बदलायला निघालो होतो, पण जनतेने आम्हाला लागोपाठ दोन वेळा शत-प्रतिशत घरी बसवले! तरीही आम्ही हिंमत सोडली नाही. जमेल तिथे, जमेल तितक्या वेळा, कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रयक्ष, कधी बोंबलून तर कधी कुजबुजून, आम्ही राजघराण्याविरुद्ध शंख करायचे काही सोडले नाही. पण हाय रे दैवा! त्यांची चौथी पिढीच काय पण बाहेरून आलेली सूनदेखिल लोकप्रियता कमावत आहे. पण आम्ही हिंमत सोडणार नाही. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा गर्व महत्त्वाचा हे जनतेला एक दिवस कळेलच. बद्धकोष्ठ्बापूंचा राम आमचे युद्ध लढायला येणार आणि रावण मरणार, निश्चित!

In reply to by सुनील

मृगनयनी 21/08/2010 - 14:09
पण आम्ही हिंमत सोडणार नाही. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा गर्व महत्त्वाचा हे जनतेला एक दिवस कळेलच. इतकाही गर्व करू नका... कारण गर्वाचं घर खाली असतं! ;) ;) ;) आणि हो, राजीव गांधी, राजघराणे आणि पाठ्यपुस्तके असा एक वेगळा धागा काढून तिथे (अ)विचारप्रदर्शन करा.. इथे "राजीव गांधीं " बद्दल काही माहिती असेल. तर सांगू शकता.... बद्धकोष्ठता झाली असेल, तर "ऑम्लेट" खाणं कमी करा.... नैतर उगीच नन्तर पाण्याच प्रॉब्लेम झाला... तर आमच्या बापूंचेच नाव घ्यावे लागेल!

In reply to by मृगनयनी

सुनील 21/08/2010 - 15:28
कारण गर्वाचं घर खाली असतं हे बाकी बरोबर! शायनिंग अहुजाचं काय झालं बघितलत ना? इथे "राजीव गांधीं " बद्दल काही माहिती असेल नाय बॉ! आम्ही काही वाचत-बिचत नाही. खोटं कशाला बोला? हां पण आमची मतं बाकी एकदम ठाम बर्रका!! अजिबात बदलायची नाहीत ती! (गुर्जींची शिकवणच तशी!) "ऑम्लेट" खाणं कमी करा आरारारारारारारा.... श्रावणात आमलेट? छ्या छ्या भलतच काय? श्रावणात आम्ही फक्त पिठलं खातो! (हां, आता पिठल्यातल्या मिरच्या कुणाला झोंबल्या तर आम्ही काय करू शकत नाय बॉ!)

In reply to by सुनील

मृगनयनी 21/08/2010 - 15:40
नाय बॉ! आम्ही काही वाचत-बिचत नाही. खोटं कशाला बोला? हां पण आमची मतं बाकी एकदम ठाम बर्रका!! अजिबात बदलायची नाहीत ती! (गुर्जींची शिकवणच तशी!) ह्म्म्म!... वाचत बिचत नसलात, तरी "एखाद-दुसरी यत्ता" तरी शाळंला गेला असाल की न्हायी! ;) म्हणजे अक्षरओळख आहे.. असं गृहित धरायला हरकत नसावी! __ सांगायचा मुद्दा इतकाच, की राजीव गांधींव्यतिरिक्त काही लिहायचं असेल.. तर आपण नवीन धागा उघडु शकता! :) _______________ "ऑम्लेट" खाणं कमी करा आरारारारारारारा.... श्रावणात आमलेट? छ्या छ्या भलतच काय? श्रावणात आम्ही फक्त पिठलं खातो! अरे बापरे!... श्रावणात कान्दा-लसूण खाता तुम्ही ? चातुर्मास पाळत नाही वाटतं? असू दे.. असू दे! ... "ऑम्लेट्"पेक्षा बरं हो! ;) (हां, आता पिठल्यातल्या मिरच्या कुणाला झोंबल्या तर आम्ही काय करू शकत नाय बॉ!) आता "खाता" तुम्ही.. म्हणजे "झोम्बणार" तुम्हालाच की! ;) आणि नन्तर.....पाण्याची सोय तेवढी करून ठेवा! ;) ;) .. तुमच्यासाठीच हो! नाहीतर व्हायचं "गर्वाचं घर खाली!" =)) ;)

In reply to by सुनील

क्लिंटन 21/08/2010 - 15:41
गांधी घराण्याने फारसे कर्तृत्व दाखविलेले नाही असा ’शतप्रतिशत’ दावा असेल तर तो मुद्दा जनतेपुढे नेटाने लावून न धरता जो भाजपवाल्यांचा आक्रस्ताळेपणा चालतो त्यामुळे गांधी घराण्याला फारसे काही परिश्रम न घेताच जनतेची सहानुभूती मिळते आणि अनेकदा त्याचेच रूपांतर मतांमध्येही होते. इंदिरा गांधींच्या हत्येवरील या डॉक्युमेन्टरीमध्ये (किंवा डॉक्युमेन्टरीच्या १० पैकी दुसऱ्या कोणत्या भागात) सोनिया गांधींचा राजीव गांधींना पंतप्रधान व्हायला मुळातच विरोध होता असे स्पष्टपणे म्हटले आहे.तसेच निकोलस न्यूजंट यांनी लिहिलेल्या राजीव गांधींच्या चरित्रातही तसेच म्हटल्याचे वाचले आहे. राजीव गांधींनी मोठ्या प्रयासाने सोनिया गांधींची समजूत काढली. अन्यत्र एका मुलाखतीत सोनिया गांधींनी त्यांचा राजीव गांधींना पंतप्रधान व्हायला विरोध का होता याचे उत्तर दिले आहे. त्याचा नक्की दुवा माझ्याकडे नाही पण ती मुलाखत इंग्रजी चॅनेलवर मी बघितली होती.त्यात सोनिया गांधी म्हणतात--’ऑपरेशन ब्लू स्टारनंतर इंदिरा गांधींना आपले दिवस भारले आहेत हे जाणवले आणि तसे त्यांनी राजीव-सोनियांना अनेकदा बोलूनही दाखविले होते.३१ ऑक्टोबर १९८४ रोजी ती भिती प्रत्यक्षात उतरली आणि राजीव पंतप्रधान झाल्यास एकनाएक दिवस त्यांनाही असेच मारतील अशी भिती मला वाटत होती. आणि राजीव पंतप्रधान झाल्यानंतर मी माझ्या मनाची तयारी पण करून ठेवली की राजीव गांधींची पण एकनाएक दिवस अशीच हत्या होणार!’ अर्थात सोनियांनी १९९९ मध्ये शरद पवारांना पक्षातून का काढले किंवा २००४ मध्ये पहिल्यांदा खासदारांची यादी घेऊन राष्ट्रपतींकडे गेलेल्या सोनिया गांधी नंतर अचानक का बदलल्या असे काही अनुत्तरीत प्रश्न आहेत.पण अशा मुद्द्यांवर जनतेचे लक्ष वेधायचे सोडून भाजप व्यक्तिगत पातळीवर जाऊन सोनियांवर आरोप करतो आणि ज्या पध्दतीने सोनिया या वैयक्तिक प्रचाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात यातून जनतेच्या मनात भाजपची प्रतिमा डागाळते आणि सोनियांची अधिक उजळते यात शंका नाही. दुसरे म्हणजे ’राजीव गांधी देशाला खड्ड्यात घालून एक दिवस इटलीला पळून जाणार’ हे उद्गार मी अगदी माझ्या घरी, नातेवाईकांमध्येही ऐकले आहेत.१९८९ मध्ये निवडणुकीत पराभव झाल्यानंतर बोफोर्स प्रकरणातून वाचण्यासाठी राजीव गांधी इटलीला पळून जाणार हे अशा मंडळींनी अगदी गृहितच धरले होते.जणू काही राजीव गांधींना देशाबाहेर न्यायला दिल्ली विमानतळावर विमान तयारच आहे अशा थाटात अशा मंडळींना मी बोलताना बघितले आहे. अर्थातच तसे काही झाले नाही. नंतरच्या काळात राजीव गांधी तर गेलेच. त्यानंतरही सोनिया गांधी नाही त्या इटलीला पळून गेल्या? लग्न झाल्यानंतर स्त्रीने पतीच्या घराला आपले घर मानणे हीच भारतीय संस्कृती ना?इतकेच नव्हे तर पतीचे निधन झाल्यानंतरही त्या स्त्रीने त्या घराला अंतर न देणे ही पण भारतीय संस्कृती ना?त्यावेळी त्या इटलीला पळून गेल्या असत्या तर कोण काय बोलू शकणार होते? पण सोनिया गांधींनी ते केले नाही. (यावर त्यांची हांजीहांजी करायला दिल्लीत जसे हजारो लोक तत्पर होते तसे रोममध्ये नव्हते असे म्हणणारे महाभाग निघतीलच). याउलट पतीचे निधन झालेल्या (किंवा इतर कोणाही) स्त्रीवर वैयक्तिक पातळीवर जाऊन घाणेरडे आरोप करणे ही भारतीय संस्कृती अजिबात नाही. प्रमोद महाजनांनी तर एका परिने सोनिया गांधी आणि मोनिका ल्युईन्स्कीची तुलना १९९९ च्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती असे वाचल्याचे आठवते. मी सोनिया गांधी समर्थक अजिबात नाही.पण या काही गोष्टी मला जरूर खटकतात. स्वत:ला भारतीय संस्कृतीचे मोठे पाईक समजणाऱ्या पक्षाकडून असे भारतीय संस्कृतीविरूध्द वर्तन करणे आणि सोनिया गांधी त्याकडे जाणीवपूर्वक पूर्णपणे दुर्लक्ष करतात यातूनच सोनिया गांधींना आपोआप जनतेची सहानूभूती आणि मते मिळतात. क्लिंटन

In reply to by क्लिंटन

मराठी_माणूस 20/08/2011 - 15:30
त्यानंतरही सोनिया गांधी नाही त्या इटलीला पळून गेल्या? लग्न झाल्यानंतर स्त्रीने पतीच्या घराला आपले घर मानणे हीच भारतीय संस्कृती ना?इतकेच नव्हे तर पतीचे निधन झाल्यानंतरही त्या स्त्रीने त्या घराला अंतर न देणे ही पण भारतीय संस्कृती ना?त्यावेळी त्या इटलीला पळून गेल्या असत्या तर कोण काय बोलू शकणार होते? पण सोनिया गांधींनी ते केले नाही. हा वरवरचा मुलामा आहे, सामान्य लोकांसाठीचा भावनिक मुद्दा आहे. मूळात प्रचंड सत्तेचा मोह टाळता आला नाही. राहुलला पुरेसे सेट होईपर्यंत सत्ता स्वतःच्या घराण्याकडेच सलग राहीली पाहीजे हा हेतु आहे. (अवांतर : पंतप्रधान पद नाकारणे , हा पण राजकारणाचाच भाग आहे कारण पीएम कोणीही असुदे , आपण चालवु तसेच चालणार हा विश्वास आहे(कारण उर्वरीत लोक बिन कण्याचे आहेत हे माहीत आहे). सेनेत त्याल उघडपणे रीमोट म्हटले जाते. इथे म्हटले जात नाहे इतकाच फरक)

वेताळ 21/08/2010 - 17:44
पण तामिळ वाघानी राजीव गांधीची हत्या करुन एक मोठी घोडचुक केली असे कायम वाटते.कारण त्यावेळी राजीव गांधी हत्या झाली नसती तर आज देशाचे चित्र खरोखर वेगळे दिसले असते.निव्वळ सहानुभुतीवर ह्या कॉग्रेस कंरट्याच्या हातात त्यावेळी सत्ता मिळाली. पण ते देखणे होते हे जर एकच क्वॉलीफिकेशन त्याना लावायचे म्हटले तर आज कित्येक देखणे नट बॉलीवुड मध्ये काम करतात त्यापैकी एकाला कराना भारताचा पंतप्रधान..मग उजेड काय पाडतात ते दिसेल.राजीव गांधी जर गांधी नसते तर ते एक उच्चवर्तुळात वावरणारे वैमानिक इतकीच त्याची ओळख असती. क्लिंटन साहेब खरोखर जर चांगला राजकारणी व जनतेबद्दल काम करणारा नेता निवडायचा झाला तर नरेंद्र मोदी खेरीज आज कोणी नाही.दलीत कुटुंबात जेवणे,लोकल मधुन बोंबलत फिरणे,उगाच काम नसल्या प्रमाणे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या घराला भेट देणे (नवल म्हणजे ज्या ठिकाणी ह्याचे सरकार गेली १० ते १५ वर्षे आहे त्या आंध्र व महाराष्ट्रात ज्यादा शेतकरी आत्महत्या करतात) असली कामे म्हणजे जनतेच्या भावनाशी खेळुन ,लोंकाच्या डोळ्यात धुळफेक करणे व सत्तेत टिकुन राहणे इतकेच ह्या कुटुंबाचे आजपर्यतचे उद्योग आहेत.

In reply to by वेताळ

क्लिंटन 21/08/2010 - 18:17
पण ते देखणे होते हे जर एकच क्वॉलीफिकेशन त्याना लावायचे म्हटले तर आज कित्येक देखणे नट बॉलीवुड मध्ये काम करतात त्यापैकी एकाला कराना भारताचा पंतप्रधान.
राजीव गांधी देखणे किंवा चांगल्या व्यक्तीमत्वाचे होते हा मुद्दा माझ्या लेखी तरी पूर्णपणे बाद आहे.कोणाही राजकिय व्यक्तीचे मूल्यमापन करताना त्या व्यक्तीचा चेहरा किती चांगला किंवा वाईट होता हा मुद्दा मी आजपर्यंत कधीही ध्यानात घेतलेला नाही आणि यापुढेही घेणार नाही. दुसरे म्हणजे आपल्या राज्यपध्दतीत वय वर्षे २५ पूर्ण केलेल्या आणि लोकसभेत बहुमताचा पाठिंबा असलेल्या कोणाही भारतीय नागरिकास पंतप्रधान बनता येते. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर कॉंग्रेस संसदीय पक्षाने त्यांना रितसर नेता निवडले होते.त्यावेळी कॉंग्रेस पक्षाकडे लोकसभेत बहुमत होते त्यामुळे त्या पक्षाचा संसदेतील नेता आपोआप पंतप्रधान बनायला पात्र होता. तसेच १९८४ च्या निवडणुकांमध्ये त्यांना लोकसभेत बहुमत प्राप्त झाले होते त्यामुळे त्यांना पंतप्रधान बनण्यापासून कोणीही रोखू शकत नव्हते. आजसुध्दा हृतिक रोशनला किंवा तत्सम चेहऱ्याच्या इतर कोणालाही लोकसभेत बहुमत असेल तर त्यालाही पंतप्रधान बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.त्यामागे त्या माणसाचा चेहरा नव्हे तर लोकसभेतील बहुमत हाच एक निकष असेल.
राजीव गांधी जर गांधी नसते तर ते एक उच्चवर्तुळात वावरणारे वैमानिक इतकीच त्याची ओळख असती.
उच्च वर्तुळात वावरणारे का एक सामान्य वैमानिक यापेक्षा त्यांची ओळख जास्त नसती.किंबहुना गांधी म्हणून जन्माला येऊनही आपली ओळख त्यापेक्षा जास्त असावी ही महत्वाकांक्षा मुळातच त्यांना नव्हती. त्यांच्या ’महान’ बंधुराजांच्या कर्तृत्वाशी तुलना केल्यास ही गोष्ट लगेच लक्षात येते.पण हे सांगण्यामागचा तुमचा उद्देश काय हे लक्षात येत नाही.वर म्हटल्याप्रमाणे ते पंतप्रधान का झाले? कारण त्यांच्यामागे लोकसभेत बहुमत होते.ते गांधी घराण्यात जन्माला आले म्हणून नव्हे. १९८९ च्या निवडणुकींनंतर ते पंतप्रधान का बनू शकले नाहीत? कारण त्यांच्याकडे लोकसभेत बहुमत नव्हते. अशावेळी ’गांधी’ घराण्यातील असणे हे ’क्वालिफिकेशन’ उपयोगी पडले का?तरीही लोक त्यांच्या पंतप्रधान बनण्याशी घराणेशाहीचा संबंध जोडतात ते मला पटत नाही.
खरोखर जर चांगला राजकारणी व जनतेबद्दल काम करणारा नेता निवडायचा झाला तर नरेंद्र मोदी खेरीज आज कोणी नाही.
असे तुम्हाला वाटते.तेच मत मतदान यंत्रांमधून व्यक्त झाले आणि नरेंद्र मोदी त्याच्याआधी तुरूंगात गेलेले नसतील तर जरूर पंतप्रधान होतील.
लोंकाच्या डोळ्यात धुळफेक करणे व सत्तेत टिकुन राहणे इतकेच ह्या कुटुंबाचे आजपर्यतचे उद्योग आहेत.
पण अजून तरी भारतातील बहुसंख्य मतदारांचे मत ते नाही याचे काय?लोकशाही हा आकड्याचा खेळ असतो.ज्यावेळी बहुसंख्य मतदारांचे तेच मत होईल तेव्हा कॉंग्रेस पक्षाचा आपोआपच पराभव होईल.पण विरोधी पक्ष अजूनतरी असा मुद्देसूद प्रचार करून जनतेत जाऊन आपली बाजू मांडत आहेत असे दिसत नाही.

In reply to by क्लिंटन

वेताळ 21/08/2010 - 18:44
तोच न्याय जर राजीव गांधीना लावला तर????? नरेंद्रमोदीनी जर काही गुन्हा केला असेल व त्यात ते दोषी आढळले तर त्याना जरुर तुरुंगात पाठवावे. मी काही नरेंद्र मोदींचा किंवा भाजपाचा हिंतचिंतक आहे असे काही नाही.मोदीनी जर गुजरात दंगलीत निरपराध लोकांच्या हत्या घडवण्यात हातभार लावला असला तरी आज सामान्य गुजराती त्याना काय समजतो? तुम्ही अमहदाबाद मध्ये आहात म्हणुन हे तुम्हाला विचारतो आहे. त्यानी आज गुजरात मध्ये खरोखरीच खुप आमुलाग्रबद्दल घडवुन आणले आहेत. मोदी हे कोणत्याही घराण्याशी संबधित नाहीत तरीही भारतातील सर्व मुख्य उद्योग घराण्याना व विकासप्रेमी लोकांना तेच देशाचे पंतप्रधान व्हावे असे का वाटते? दुसरी बाजु.. राजीव गांधीची हत्या नेमक्या कोणत्या कारणा साठी झाली होती? त्यानी भारतीय शांतीसेना श्रीलंकेत पाठवुन तामिळ लोकांचे हत्याकांड घडवुन आणले व निरपराध तामिळींवर अत्याचार झाले त्याला तेच जबाबदार होते.आज जर सुदैवाने राजीव गांधी जर जिवंत असते तर कोणी त्याच्या विरुध्द सीबीआयचा हत्यारा सारखा वापर करुन तामिळवाघांच्या हत्याकांडाला त्याना जबाबदार ठरवु शकला असता. मग राजीव गांधीना शिक्षा झाली नसती कशावरुन? हे जर तरचे प्रश्न आहेत.दोन्ही नेत्यांची कारकिर्द तपासली तर राजीव गांधी हे नशीबवान राजकारणी होते जे नंतर कमनशीबी ठरले व मोदी नशीबवान राजकारणी आहेत त्याला त्यानी कर्तुत्वाची खुप मोठी जोड दिली आहे.

In reply to by वेताळ

अर्धवट 21/08/2010 - 18:47
अनपेक्षीत धाग्यावरची चांगली चर्चा वाचतोय.. फक्त इथं अडखळलो. >>त्यानी भारतीय शांतीसेना श्रीलंकेत पाठवुन तामिळ लोकांचे हत्याकांड घडवुन आणले व निरपराध तामिळींवर अत्याचार झाले त्याला तेच जबाबदार होते. आजच कळतय मला.. (बाकी आमच 'सखोल' ज्ञान बघता आश्चर्य नाही म्हणा.) पण अजुन जरा माहिती कळाली तर बरं होइल

In reply to by अर्धवट

वेताळ 21/08/2010 - 19:03
कायदा जोपर्यंत तुम्हाला दोषी ठरवत नही तो पर्यत तुम्हाला गुन्हेगार म्हणता येत नाही.मी वर जो मुद्दा मांडला आहे तो जर तर चा आहे.राजीव गांधीची हत्या कोणत्या कारणासाठी झाली? ती नक्कीच वैयक्तिक वादातुन झालेली नाही.त्याचा शांतीसेना पाठवण्याचा जो निर्णय होता,त्यातुन जी तामिळवाघाची हत्या श्रीलंकेत भारतिय सेनेकडुन झाली त्यामुळे बिथरुन जावुन तामिळी वाघानी त्याची हत्या घडवुन आणली.राजीव गांधीची हत्या ज्या मानवी बॉम्बने घडवुन आणली त्या मुलीच्या बहिणीवर लंकेत शांतीसेनेकडुन अत्याचार झाले होते म्हणुन ती सहभागी झाली होती असे त्यावेळच्या पेपरात मी वाचले होते.राजीव गांधीची हत्या झाली त्यावेळी मी देखिल लहान होतो व थोडेफार कळत देखिल होते.मी देखिल त्यावेळी खुपच भावनावश झालो होतो.म्हणुनच त्याची हत्या एक घोडचुक होती असे मी वर म्हटले देखिल आहे. पण आज जो कॉग्रेस वाल्यानी सीबीआयचा तपासाचा ससेमिरा आपल्या विरोधकांच्या मागे लावुन आपल्याला हवे ते साध्य करण्याचा पायंडा पाडला आहे. तसा कोणीही सीबीआयचा वापर करुन शांतीसेना लंकेत पाठवायला राजीव गांधी जबाबदार होते व त दोषी आहेत असा निष्कर्श काढला असता. मी फक्त जर तर असा उल्लेख वर मुद्दामहुन केला आहे.राजीव गांधी लंकेतील तामिळवाघाच्या नाशाला कितपत कारणीभुत होते कि नाही त्याचे सविस्तर उत्तर निदन आजतरी मी तुम्हाला देवु शकत नाही.

In reply to by वेताळ

क्लिंटन 21/08/2010 - 19:30
त्यानी आज गुजरात मध्ये खरोखरीच खुप आमुलाग्रबद्दल घडवुन आणले आहेत. मोदी हे कोणत्याही घराण्याशी संबधित नाहीत तरीही भारतातील सर्व मुख्य उद्योग घराण्याना व विकासप्रेमी लोकांना तेच देशाचे पंतप्रधान व्हावे असे का वाटते?
मोदींनी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास घडवून आणला आहे हे उघडच आहे.अगदी कच्छच्या वाळवंटात त्यांनी पिण्याचे पाणी नेऊन पोहोचवले आहे. अंबानी, रतन टाटा यासारख्यांनी मोदींची जाहिरपणे तारिफ केली आहे. २००३ मध्ये आमच्या आय.आय.एम मध्ये येऊन आझीम प्रेमजींनी मोदींवर टिका केली होती पण काही दिवसांपूर्वी याच आझीम प्रेमजींनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. यात दोन मुद्दे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे गोध्रासारखी महाभयंकर घटना घडूनही मरणारे हिंदू होते म्हणून की काय पण तथाकथित धर्मनिरपेक्ष मिडिया आणि राजकिय पक्षांनी गोध्रावर चकार शब्द न काढता दुसऱ्या दिवशी सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पावर जास्त लक्ष केंद्रित केले.गुजरात गांधींजींचा असूनही जातीय दंगलींची मोठी पार्श्वभूमी राज्याला आहे. १९६९ मध्ये चार महिने दंगली चालू होत्या आणि शेवटी खान अब्दुल गफार खानांना बोलावून घेऊन त्यांच्याकरवी शांततेचे आवाहन करावे लागले होते. तसेच १९८५ आणि १९९२-९३ मध्येही दंगली मोठ्या प्रमाणावर झाल्या होत्या.अशा परिस्थितीत जो भडका उडाला तेव्हा नरेन्द्र मोदीच काय अगदी शंकरसिंह वाघेला जरी मुख्यमंत्री असते तरी किती उपयोग झाला असता हे त्या भगवंतालाच ठाऊक. तरीही या दंगलींमध्ये मोदींनी खरोखरच भाग घेतला होता का हे अजून तरी सिध्द झालेले नाही.वर्तमानपत्रातील बातम्यांप्रमाणे तरी एहसान जाफरी हत्या आणि गुलबर्ग सोसायटी प्रकरणी ते अडचणीत यायची शक्यता आहे.एहसान जाफरींनी संरक्षणाची मागणी फोन करून केली असता त्यांना फोनवर शिवीगाळ करणे आणि ’मरा मी काही तुम्हाला संरक्षण देणार नाही’ असे मोदींनी म्हटल्याचे वर्तमानपत्रांमध्ये वाचनात आले आहे. कायद्याच्या दृष्टीने यातून मोदींवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका जरूर ठेवता येईल पण त्यांचा दंगलीत प्रत्यक्ष हात होता हे सिध्द करता येईल की नाही यासाठी काही महिने थांबावे लागेल. पण तसा हात मोदींचा असेल तर मात्र त्यांना तुरूंगात जावेच लागेल. दुसरा मुद्दा म्हणजे मोदी विरोधकांचे म्हणणे असे की मोदींची पक्की खात्री आहे की मुख्यमंत्रीपदावरून दूर होताच त्यांना तुरूंगात जावे लागेल.म्हणून त्यांना मुख्यमंत्री म्हणून चांगले काम करणे भागच आहे.कारण तिकडे जर आळस केला तर किंमत आहे तुरूंगवासाची! या प्रकरणी कायद्याला मान्य असेल ते होईल.मोदींचे नशीब चांगले असेल तर ते तुरूंगात जायच्या आधी पंतप्रधान होतीलही.आणि ते पंतप्रधान झाले तर निदान विकासाच्या बाबतीत तरी गुजरात मॉडेल त्यांनी देशभरात राबवावे असेच मला वाटते.
त्यानी भारतीय शांतीसेना श्रीलंकेत पाठवुन तामिळ लोकांचे हत्याकांड घडवुन आणले व निरपराध तामिळींवर अत्याचार झाले त्याला तेच जबाबदार होते.
अगदी इंदिरा गांधी, एम.जी.रामचंद्रन यांनी एल.टी.टी.ई ला अनूकूल भूमिका घेतली होती.इतकेच काय तर मे १९८७ मध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना जाफनामध्ये श्रीलंकन सैन्याने एल.टी.टी.ई ची कोंडी केल्यानंतर भारतीय हवाईदलाच्या विमानांनी श्रीलंकेची हवाईहद्द ओलांडून तामिळ लोकांच्या मानवी अधिकारांचे उल्लंघन होत आहे या नावाखाली अनेक टन धान्य आणि इतर सामुग्री टाकली होती.परराष्ट्र राज्यमंत्री नटवर सिंह यांनी श्रीलंकेच्या दिल्लीतील राजदूतास बोलावून घेऊन ’आमची विमाने तुमच्या देशात जाऊन तामिळ लोकांना मदत टाकून येणार आहेत आणि त्यावर हल्ले केल्यास गंभीर परिणाम होतील’ अशी धमकी दिली. माझ्या मते राजीव सरकारने उचललेले हे पाऊल सर्वथैव अयोग्य होते. उद्या काश्मीरी लोकांवर अन्याय होत आहे अशी हाकाटी करत पाकिस्तानची विमाने श्रीनगरमध्ये आली तर आपल्याला चालेल का? श्रीलंकेच्या सार्वभौमत्वाची अशी पायमल्ली करणे पूर्णपणे अयोग्य होते असे मला वाटते. भारतापुढे आपली धडगत नाही हे श्रीलंकन अध्यक्ष जयवर्धने यांना समजून चुकले आणि त्यातून जुलै १९८७ मध्ये श्रीलंका करार झाला. या कराराचा उद्देश तामिळ समस्येवर श्रीलंकेच्या एकात्मतेच्या चौकटीत तोडगा शोधणे हा होता. तसेच तामिळ वाघांना नि:शस्त्र करायला (साध्या शब्दात त्यांच्याशी लढायला) भारताची शांतीसेना पाठविण्यात आली. तेव्हा १. तामिळ लोकांवर अत्याचार करावेत यासाठी भारतीय शांतीसेना पाठविण्यात आलेली नव्हती. २. भारतीय सैन्याकडून तामिळ लोकांवर अत्याचार काही प्रमाणावर जरूर झाले. याचे कारण तामिळ जनतेत तामिळ वाघांविषयी काही प्रमाणात तरी सहानूभूती असल्यामुळे स्थानिक लोकांनी भारतीय सैन्याविरूध्द तामिळ वाघांना मदत केली आणि त्यातूनच पुढे काही प्रमाणावर त्यांच्यावर अत्याचार झाले. हाच प्रकार भारतात पंजाब, काश्मीर आणि पूर्वोत्तर भारतात बघायला मिळाला आहे. तेव्हा मुद्दा क्रमांक १ हा valid असल्यामुळे मुद्दा क्रमांक २ प्रमाणे झालेल्या अत्याचारांसाठी संबंधित सैनिक/अधिकारी यांना जबाबदार धरता येईल. तेव्हा अगदी निरपराध तामिळींवर जरी अत्याचार झाले असतील तरी त्यासाठी राजीव गांधींना (ते हयात असते तरीही) कोणतेही न्यायालय शिक्षा करू शकणार नाही. अनेक वर्षे तामिळ वाघांना भारत सरकारने पाठिंबा दिला होता पण अचानक त्यांच्याविरूध्द भारत सरकार (राजीव गांधींचे सरकार) उलटले याचा राग म्हणून पुढे राजीव गांधींची हत्या तामिळ वाघांनी केली.
सुदैवाने राजीव गांधी जर जिवंत असते तर कोणी त्याच्या विरुध्द सीबीआयचा हत्यारा सारखा वापर करुन तामिळवाघांच्या हत्याकांडाला त्याना जबाबदार ठरवु शकला असता. मग राजीव गांधीना शिक्षा झाली नसती कशावरुन
याचे उत्तर वर दिलेलेच आहे. पण नरेंद्र मोदींविरूध्दचे आरोप आणि राजीव गांधींविरूध्द काल्पनिक आरोप एका मापाने कसे तोलता येतील? तसा अर्थ आपल्या प्रतिसादातून ध्वनित होत आहे म्हणून मुद्दामून लिहावेसे वाटते.

भारतीय 21/08/2010 - 17:45
गांधी घराण्यातील काही (हा शब्दही मोठा वाटतोय !) अपवाद वगळता ईतरांबद्दल मला व्यक्तिशः काहीच आदर नाही.. काँग्रेसी लोक तर ज्याप्रकारे गाधी घराण्याचे लांगूलचालन करतात ते पाहून किव येते त्यांची.. मी अभ्यासलेल्या अथवा मला समजायला लागल्यापासून सर्व राजकारण्यांमधे अटलजींबद्दलच फक्त आदर होता.. पण आता सगळे एका माळेचे मणी! लक्षात घ्या राजीव गांधी नसते तर दूसरा कोणीतरी असता! 'बोफोर्स' तोफांचा व्यवहार (कि गैरव्यवहार?) त्यांच्याच काळातील होता.. बोफोर्स तोफा भारताला आवश्यक होत्याच, ते कारगिल युद्धात दिसलेच.. त्या राजीवजींच्या काळात खरेदी केल्या गेल्या म्हणून राजीव गांधी थोर होतात? त्या खरेदी करताना झालेल्या गैरव्यवहाराबद्दल काय? राजीवजी शुद्ध होते काय?.. मग नरसिंह रावही त्याच्यापेक्षा थोर म्हणावेत, कारण त्याच्याच कालखंडात भारताने खुले आर्थिक धोरण स्वीकारले.. पण नरसिंहांचे आडनाव 'गांधी' नव्हते ना ! म्हणून ते थोर नाहीत.. (नरसिंह रावांचे समर्थन करण्याचा प्रयत्न नाही, कॉंग्रेसची प्रकृती दाखवतोय..) राजीव गांधींनतर काँग्रेस गांधीमुक्त झाला होता.. पण सीताराम केसरींसारखे फुटकळ नेते काँग्रेसचे नेतृत्व करताना कॉग्रेसची हालत काय होती हे सर्व जाणतातच, 'गांधी' नावाचे टॉनिक काँग्रेसला म्हणूनच हवे होते, अन म्हणूनच सोनिया गांधींना राजकारणात आणले गेले... बाकी सोनियांबद्दल काही बोलणार नाही.. सध्या काँग्रेस सत्तेवर आहे ते केवळ "वासरांत लंगडी गाय शहाणी" म्हणून!

In reply to by भारतीय

क्लिंटन 21/08/2010 - 18:37
बोफोर्स तोफा भारताला आवश्यक होत्याच, ते कारगिल युद्धात दिसलेच.. त्या राजीवजींच्या काळात खरेदी केल्या गेल्या म्हणून राजीव गांधी थोर होतात?
या कारणावरून राजीव गांधींना थोर म्हणणारी मंडळी आहेतच.पण त्यांना थोर म्हणण्यासाठी हे पुरेसे सबळ कारण नाही असेच माझे तरी स्वत:चे मत आहे. तसेच राजीव गांधींना ’थोर’ मी तरी म्हटलेले नाही.माझा मुद्दा एवढाच की त्यांच्याकडे संगणक आणि टेलिकॉम क्षेत्रात विकास घडवून आणायची दूरदृष्टी होती (जी बहुसंख्य भारतीयांकडे त्याकाळी नव्हती) आणि ते बदल त्यांनी नेटाने घडवून आणले. आजच्या तरूण पिढीला त्याचा फायदा किती होत आहे हे समोर दिसतच आहे आणि त्याचे श्रेय त्यांना द्यायलाच हवे.
राजीवजी शुद्ध होते काय?
खरेखोटे त्या भगवंतालाच ठाऊक.पण कायद्याच्या दृष्टीने तरी त्यांचा कोणत्याही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सहभाग सिध्द होऊ शकलेला नाही.
मग नरसिंह रावही त्याच्यापेक्षा थोर म्हणावेत, कारण त्याच्याच कालखंडात भारताने खुले आर्थिक धोरण स्वीकारले.. पण नरसिंहांचे आडनाव 'गांधी' नव्हते ना ! म्हणून ते थोर नाहीत..
माझे स्वत:चे मत हे तर नरसिंह राव हे भारताचे सर्वोत्तम पंतप्रधान होते हेच आहे.विविध पंतप्रधानांच्या कारभाराचे मी माझ्या पातळीवर मूल्यमापन केले आहे त्यावरून माझे मत झाले आहे की नरसिंह रावांनी न बोलता देशासाठी खूप चांगले काम करून ठेवले.आणि हे मूल्यमापन करताना पंतप्रधानांचा पक्ष, चेहरा, व्यक्तिमत्व,ते जन्माला आले त्या घराण्याचे नाव या सगळ्या गोष्टी गौण मानून केवळ त्यांचे कार्य हा एकच मुद्दा मी ध्यानात घेतला होता. आणि नरसिंह राव गांधी नाहीत याच एका कारणावरून अर्जुन सिंहांसारखी झुरळे त्यांच्यावर टिका करतात ते पूर्णपणे अयोग्य आहे असेच माझे मत आहे.
सध्या काँग्रेस सत्तेवर आहे ते केवळ "वासरांत लंगडी गाय शहाणी" म्हणून!
हीच तर लोकशाही व्यवस्था आहे. ज्या क्षणी जनतेला कॉंग्रेसपेक्षा समर्थ पर्याय आहे असे वाटेल त्याक्षणी निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाचा पराभव होईल. भारतीय जनतेने हे यापूर्वी पण दाखवून दिले आहे आणि जनता यापुढेही ते दाखवून देईल याविषयी शंका नको.
समग्र देशव्यापी क्रांतीच्या प्रतिक्षेत.
फक्त ही देशव्यापी क्रांती मतदान यंत्रातूनच होऊ दे ही सदिच्छा.

मृगनयनी 20/08/2011 - 12:34
~*~*.|.*~*~ राजीव गान्धींना ६७व्या जयन्तीनिमित्त विनम्र अभिवादन!!! ~*~*.|.*~*~ राजीव'जी, तुमच्या राहुलमध्ये तुमच्यातले काही चान्गले गुण आले असते तर कदाचित आज आपल्या देशाचे चित्र खूपच वेगळे असते.... :| राजीव'जी, तुमचे कॉन्ग्रेसवाले ज्या म. गान्धींचा उदो उदो करून आजपर्यन्त लोकांच्या भावनांशी खेळत आले... त्याच गान्धींना दैवत मानणार्‍या अण्णा हजारेंच्यामुळे गान्धीवादाच्या शान्ततामय मार्गाने कॉन्ग्रेसी भ्रष्टाचाराविरूद्ध सम्पूर्ण भारत देश जागृत होऊन एकत्रितपणे लढा देत आहे... आणि आम्ही न पाहिलेली "ऑगस्ट क्रान्ती" पुन्हा घडवून आणत आहे.... या क्रान्तीमध्ये सहभागी होऊन भ्रष्टाचाराविरूद्ध खारीचा वाटा उचलण्याची सन्धी आम्हालाही मिळाल्याबद्दल अण्णा हजारेंचे शतशः आभार!!!.... राजीव'जी... तुम्ही पाहिलेल्या उज्ज्वल भारतवर्षाचे स्वप्न कदाचित देशातील जनता.... अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्याला अधिकाधिक मूर्त स्वरूप देऊन पूर्ण करेल...... अर्थात तुमच्या राहुलबाबाचा यात सहभाग असता..... तर कदाचित तुमच्याबद्दल, इन्दिराजींबद्दल आम्हाला वाटणारा आदर राहुल गान्धींबद्दलही वाटला असता...... || जयहिन्द ||

In reply to by मृगनयनी

मृगनयनी 20/08/2013 - 12:12
राजीव गांधीं'ना जयन्तीनिमित्त विनम्र अभिवादन ..._/\_ ..... *मानवी बॉम्ब'च्या माध्यमातून हत्या झालेल्या राजीव'जींच्या जयन्तीदिनाची सुरुवात एका सामाजिक कार्यकर्त्याच्या -नरेन्द्र दाभोळकरांच्या हत्येनेच व्हावी...... याचे खरोखर दु:ख वाटते.... :|

In reply to by मृगनयनी

मृगनयनी 20/08/2014 - 13:50
राजीव'जींना विनम्र अभिवादन!!!! :) राहुल'च्या जन्माच्या आधी सोनियाजीं'वर उचित गर्भसंस्कार झाले असते.. तर कदाचित आज परिस्थिती वेगळी असती!!!! :)

In reply to by प्यारे१

मदनबाण 22/08/2014 - 12:35
मॄग्गा... मॄग्गा अगं काय हे ? स्त्रीया दरवर्षी ज्या प्रमाणे वटसावित्रीची पुजा करुन वडाला चक्कर मारतात, तशी दरवर्षी या धाग्यावर तू चक्कर टाकताना दिसत आहेस हो. :P

In reply to by मदनबाण

मृगनयनी 22/08/2014 - 13:00
:) हो रे.. मदनबाण.. अ‍ॅक्चुली 'राजीव गान्धी' यांच्याबद्दल मला मनापासून आदर वाटतो. कंप्युटर-सिस्टीम भारतात त्यांच्यामुळे आली. इतर राजकारण्यांप्रमाणे राजीव'जींच्या नावावरही काही भ्रष्टाचार आहेत.. पण तरीही त्यांच्यात 'असं' काहीतरी निश्चित होतं..ज्यामुळे आजही ते गेल्यानंतर सुद्धा मला (इन्डिविड्ज्युअली) त्यांच्याबद्दल मनापासून आदर, प्रेम वाटते. तसे "ते" कायमच माझ्या मनात असतात. पण तरीही दरवर्षी त्यांच्या जयन्ती-पुण्यतिथी'ला इथे या मराठी संस्थळावर त्यांच्या स्मृती जागृत करताना मला विशेष आनन्द होतो. आय लव राजीव गान्धी!!!! राजीव'जींमधले व इंदिराजींमधले "नेतृत्वा"चे आणि समाजकारणा'चे गुण राहुल'मध्ये आलेले नाहीत.. त्यामुळे वाईटही वाटते... :) पण तरीही 'नरेन्द्र भाई मोदीं'च्या भगव्या राज्यात मी खूष आहे...... :)

In reply to by मृगनयनी

श्रीगुरुजी 22/08/2014 - 22:51
>>> कंप्युटर-सिस्टीम भारतात त्यांच्यामुळे आली. + १ त्याच प्रमाणे नरसिंहरावांमुळे भारतात केबल टीव्ही सुरू झाला, देवेगौडामुळे भारतात इंटरनेट सुरू झाले, गुजरालांमुळे भारतात मोबाईल फोन सुरू झाले आणि मनमोहन सिंगांमुळे स्मार्ट फोन आणि टॅब्ज.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~ आज २० ऑगस्ट, २०१० राजीव'जी, तुमच्या ६६व्या जन्मदिनानिमित्त तुम्हाला विनम्र अभिवादन! आज तुम्ही असता.... तर देशाचे चित्र कदाचित वेगळे असते! ...... WE MISS YOU!

एक मत

शिल्पा ब ·

मिपावर फक्त सोमवार, गुरूवार आणि शनिवारीच चर्चांची परवानगी द्यावी. एका चर्चेवर, एका प्रतिसादकाला, एका आयडीने एकच प्रतिसाद देता येईल अशी सोय असावी. शिवाय कविता, कथा, प्रवासवर्णनं (विशेषतः भारताबाहेरची आणि भारतातल्या धार्मिक स्थळांची), इत्यादी ललित साहित्यांवर प्रतिक्रिया देताना चार ओळींची प्रतिसाद मर्यादा घालावी. पंगा आणि चोता दोन या मेगाबायटी प्रतिसादकांसाठी त्यातून काही अपवाद निर्माण करता येतील का यावर श्री. निखिल देशपांडे यांनी उजेड टाकावा. कौलावर मात्र बंधने घालू नयेत. कौलात प्रतिसादकांनाही जास्तीचे पर्याय घालता येतील अशी सोय असावी.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शिल्पा ब 18/08/2010 - 22:16
पंगा, चोता दोन याशिवाय इंद्रजीत पवार हेसुद्धा एक मेगाबायटी लेखक आहेत...साधं सहमत आहे या वाक्यावरसुद्धा ते एक पानभर लिहू शकतील..

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पाषाणभेद 19/08/2010 - 09:29
सोमवार, गुरूवार आणि शनिवारीच चर्चा करण्यापेक्षा मंगळवार, बुधवार अन शुक्रवारी चर्चा केली तर नाही का चालणार? एकादशीच्या दिवशी एखादे काव्यच वाचणे अथवा लिहीणे किंवा काव्याचाच धागा मिपावर ठेवणे व अन्य धागे दिसणेही बंद करणे, चतूर्थीला चर्चासत्र दिसू देणे व इतर बंद करणे, रमजान मध्ये शांततेचेच धागे दिसू देणे, शिळासप्तमीस खादाडी दिसू देणे, पारशी नवरोज च्या दिवशी नविन वर्षाच्या सुभेच्छांचेच धागे दिसू देणे, पोंगल च्या दिवशी शेतीविषयक धागे, ख्रिसमस च्या दिवशी पार्टी, पब पार्टी, आदींचे धागे, महाराष्ट्रदिनी शिवाजीमहाराज, इदीच्या दिवशी खिरखुर्म्याचे, मटनाचे खायचे पदार्थ दिसू देणे, महाविरजयंतीदिनी मंगल गाणी दंगल गाणी, बैसाखीनिमित्त शिखांचे धागे असे सर्व केल्याने सर्व समाज एकरूप होईल. प्रत्येकाला ज्याचात्याचा वार मिळेल. संपादकांनाही त्यांचे त्यांचे दिवस वाटून घेता येईल. सर्वत्र आनंदी आनंद होईल. भांडन तंटा वादविवाद, मतमतांतर होणार नाही. तिखटमिसळीपेक्षा गुळवणी चांगली की नाही? त्याचप्रमाणे राहू काळात चर्चा केल्याने चर्चा करणार्‍याला पुढच्या दोन दिवसात वाईट काळ संभवतो असे त्याच्या त्याच्या नाडीत लिहील्याचे आम्हास एका हात पाहणार्‍या ज्योतिषाने पायाच्या अंगट्याचे भविष्य पाहतांना आमच्या कपाळावर पाहून सांगितले असल्याचे आम्हास स्मरत आहे.

In reply to by शिल्पा ब

मला वाटतं त्यांचं नाव इंद्रराज पवार असं आहे. क्रेमर, राजेश घासकडवी हेसुद्धा मेगा बायटी लेखक आहेत असे आमचे मत आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

आता शिल्पाताई आणि अप्पा जोगळेकर यांच्या प्रतिसादावर मी "इन्द्रजीत" की "इन्द्रराज" यावर खुलासा द्यायचे म्हटले तर तो मेगाबाईटचा व्हायलाच हवा, नाहीतर वाचणारे म्हणतील 'साधा खुलासा अमान्य'. प्रिय संपादक मंडळींनी अजून तरी मला "इतके मोठे प्रतिसाद चालणार नाहीत, भाऊ" अशी सूचना केलेली नाही, त्यामुळे सबब प्रतिसाद गरगरीत तब्येतीत देणे चालू आहे. धागाधारकांचीही काही तक्रार नाही. ~~ असो. डाय हार्ड हॅबिट.

In reply to by इन्द्र्राज पवार

अरे नीलकांत, निखिल, हसून लोळणारा इमोटीकॉन परत आणा रे ... एक मेगाबायटी प्रतिसादक स्वतःची प्रतिमा धुळीस मिळवत आहे. ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चिन्मना 18/08/2010 - 23:08
>> एका चर्चेवर, एका प्रतिसादकाला, एका आयडीने एकच प्रतिसाद देता येईल अशी सोय असावी. अहो प्रतिवादांमुळे तर चर्चा खुलतात आणि बर्‍याच लोकांना त्यातून नवीन माहिती कळते. एकदाच प्रतिसाद द्यायची मर्यदा ठेवली तर कुठलीच चर्चा कधीच रंगणार नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

असुर 19/08/2010 - 01:32
आजाबात चालाच नाय! जरा कुठे लोक चर्चा वगैरे करतात, थोडेफार हमरीतुमरीवर येतात. कसं बरं वाटतं, आमच्यासारखे लोक अशी एखादी म्याच, एखादं चांगलं झाड, पॉप-कॉर्न आणि कोक घेऊन एन्जॉय करतात. ;-) हे असलं उपासाच्या वारांचं बंधन घातलं तर आम्ही म्याच पाहायला कुठे जाणार? ते काही नाही, चर्चा झालीच पाहिजे, मनमुराद म्याचेस खेळता आल्याच पाहिजेत, आणि त्या पाहण्यासाठी तिकीट नाय पायजे! ;-) काय पाहिजे तेव्हढे प्रतिसाद कुटता आले पाहिजेत. असले रूल लावले तर प्रतीसादपाडू लेखांनी कुणाकडे पाहायचं ओ? ;-) --असुर

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विजुभाऊ 19/08/2010 - 13:57
कौलात प्रतिसादकांनाही जास्तीचे पर्याय घालता येतील अशी सोय असावी. ही तर धाग्याच अख फ करायची "पाक" कृती लै भारी. आता त्या पर्यायात दहा पैकी तीन उर्टच्या ढगाबद्दल असावेत ( उदा पत्रीकेत उर्टच्या ढगाचे स्थान कोणते वगैरे. दोन नाडीबद्दल असावेत आणि उरलेले पाच पाध्येगिरी वर असावेत) कौलारू धागे काढताना जर ते स्वयंपाक घराबद्दल असतील तर तीन पैकी किमान एक फोडणीच्या कालच्या भाताचे आज काय कराल अशा पैकी असावेत. जसे विडंबनकाव्यात बायको,ऑफिस आणि साहेब या घटकाना ऑप्शन नसतो तसे कौलात सुद्धा किमान एखादा ऑप्शन नसलेला पर्याय ठेवावा

अहं ! खुशाल वाटेल ते बोलू द्यावे. वाटेल तशा चर्चा होऊ द्याव्या. श्लील-अश्लील, नीती-अनीती, योग्य-अयोग्य, अशा पलिकडे मिपा जावे असे वाटते. ''अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ असल्यामुळे '' लिहिण्या-बोलण्याची कोणतीच कसर राहू नये असे मला वाटते. काही अधिक - उणे असेल तर काळजी घेणारी मंडळी इथे आहेच. तेव्हा आपण काही मर्यादा वगैरे आखून घेतल्या पाहिजेत असे मला तरी वाटत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेसनलाडू 18/08/2010 - 22:48
कोणात्याही स्वरूपाची मर्यादा नको. चर्चांवर तर नाहीच नाही. (अमर्याद)बेसनलाडू

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चिन्मना 18/08/2010 - 23:04
सहमत आहे. कुणाला त्याने वेळ वाया जातो असे वाटत असेल तर फाट्यावर मारण्याचे स्वातंत्र्य आहेच की! प्रत्येक चर्चेत हिरीरीने भाग घेतला पाहिजे असे नाही.

"थोरामोठ्यांकडून" आता यात मी (आणि असेही असू शकेल की अजुन बरेच...) या गटात बसण्यासाठी "क्वालिफाईड" नाही; त्यामुळे मत व्यक्त करताना "टु बी ऑर नॉट टु बी" अशी अवस्था आहे. तरीही धागा रोचक आहे म्हणून थोडे मत मांडतो. कोणत्याही चर्चेला कुठपर्यंत जावू द्यायचे आणि कोणता धागा "फक्त वाचनमात्र" ठेवायचा, कुठला "आता धाग्याने वादग्रस्त वळण घेतले..." म्हणून काढून टाकायचा, या बाबी संपादक मंडळाच्या अखत्यारीतील बाबी आहेत, आणि त्याप्रमाणे वेळोवेळी तशी कार्यवाही (जरी धागा प्रतिसादाने वाढत जात असला तरी) झालेली आहेच. त्यामुळे "धरबंधा" चा लगाम सर्वस्वी त्या टॉवरकडे आहे, जिथे "बिग ब्रदर इज वॉचिंग" अशी स्थिती आहे. काही धाग्यांचे काही विषय प्रक्षोभक तर काही माहितीपूर्वक, तर मनोरंकनात्मक असू शकतात, होऊ शकतात (उदा. अगदी लेटेस्ट 'रोजा', "विवाह कौल", "मुली आणि मदिरापान') पण त्यामुळे कित्येकवेळा कित्येकाना माहितीचे नवनवे कंगोरे मिळू शकतात व अशाच चर्चेतून उपधागेदेखील सुचू शकतात. "रोजा" च्या निमित्ताने मला एका सदस्याने "अमुक एक इंग्रजी पुस्तक जरूर वाचा..." अशी खरडीद्वारे सूचना केली. ते पुस्तक मला नवीन होते आणि त्यावरील परिक्षण वाचल्यावर समजले की किती एखाद्या विषयावरील किती सखोल माहिती मला मिळू शकते. हे सर्व धागा चहुबाजूनी फुलू लागला तरच शक्य आहे. काही सदस्यांनी "विवाह कौल" वरील चर्चा वाचून मला "५२% रिझर्व्हेशनबद्दल अजून सविस्तर लिहा" अशी विनंतीही केली. या निमित्ताने माझेही अवांतर वाचन घडून येईल. अशा विस्तारित स्वरूपाच्या संबंधामुळे धाग्यांचे आणि त्यावरील चर्चेचे प्रमाण याला कुठले आणि कसले मीटर असावे असा प्रश्न पडू नये असे वाटते. शेवटी प्रवास करणार्‍याला रेल्वेचा डबा मोकळा काय, भरलेला असला काय, तो प्रवास हा करणारच. त्यासाठी कौल काढावा लागू नये, ही अपेक्षा.

शानबा५१२ 18/08/2010 - 23:02
लेखिकेशी सहमत पण.....एक सुधारणा करतो. एका सदस्याला एका आठवड्यात कीती लेख (काव्य,कौल काहीही) प्रकाशित करता येतील ह्यावर बंधन असावे. हे पण जरा कीचकट वाटत आहे,पण लेखिकेला मिपाची फार काळजी आहे हे दीसते,त्यांनी अजुन एखादा पर्याय समोर आणावा अस वाटत. धन्यवाद्,शिल्पा मॅडम,आपण सर्व मराठी संस्थळावर अश्याच आवडीने लिहत रहावे व सुधारणासाठी उपाय सुचवावेत.........नाही उगाच नाही लिहीत खरच आपण जो प्रस्ताव मांडला आहे तो काबिले-ए-तारीफ आहे,ह्यामुळे वायफळ चर्चांना आळा बसेल व चर्चेत गंभीरता येईल अस मला वाटत. पण हो आपण सर्वीकडे असाच रस घ्या,ह्यानिमित्ताने मराठी,संस्थळावर तरी एकत्र येउ देत. जय हींद!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

शानबा५१२ 18/08/2010 - 23:18
बीपीनदा,ते करण्याआधी ह्यांचा आयडी एक आठवडाभर ब्लॉक करुन टाका,काही न सांगता,मुद्दाम. मग एक आठड्यानंतर जेव्हा ह्या ईथे येतील तेव्हा बघा.त्या स्वःताच आपला प्रस्ताव विसरतील्,व नंतर महीन्यात व्हायला हवी तेवढी चर्चा एका दीवसात होईल..............सॉरी सॉरी नॉट चर्चा,बोंबाबोंब म्हणा ना!. नाही पण त्यांनी जे लिहलय तेही बरोबर आहे,त्यांच्याकडे पाउसात ५ फुट पाणी जमा होत्,अस ऐकलय,मग असल्या भयंकर वातावरणात रहाणा-यांच्या अपेक्षा पण अश्याच भयंकर असणार ना! YOU ARE GOOD AT INDUCING SOMEONE TO DO GOOD THINGS,SO APPLY YOUR SKILLS FOR WELFARE OF NEEDY PEOPLE. BYE, GOOD NIGHT,SWEET DREAM!

In reply to by शानबा५१२

शिल्पा ब 18/08/2010 - 23:40
नाही पण त्यांनी जे लिहलय तेही बरोबर आहे,त्यांच्याकडे पाउसात ५ फुट पाणी जमा होत्,अस ऐकलय, अहो जरा तुमच्या डबक्यातून बाहेर येऊन पाहत चला...मुंबईत पाऊस पडला कि पेपर पाहत चला म्हणजे कळेल...बाकी माझ्या प्रस्तावामुळे आपल्यालाच खूप दुखः होणार हे अपेक्षितच आहे. बाकी पुस्तकं न वाचताच आणि सिनेमा न पाहताच मत देणारे थोर आपण...सध्या मुंबईतल्या पावसाबद्दल काय घेऊन बसलात..

In reply to by अप्पा जोगळेकर

शानबा५१२ 19/08/2010 - 23:02
आता समजल का की मराठी का पुढे जत नाही ते? अरे तुझ्यासरखे लोक माझ्यासारख्या क्रांतिकारी विचाराच्या माणसाचाच पाठींबा काढायला लागले तर कठीण आहे रे बाबा!! अणि हो,शिल्पा मॅडम्,मिपावर सदस्यांनी फक्त लिहायच आणि वाचायच असत्,असे सल्ले अमंलात आणले जातील अस नाही वाटत. ईथे कोण आहे ज्यांनी पावसाळ्यात ५ फुट पाणी चालुन कींवा पोहुन पार केले आहे,कींवा मानववस्ती असणा-या ठीकाणावर एवढे पाणी पाहीले आहे??

In reply to by शानबा५१२

शिल्पा ब 18/08/2010 - 23:33
एका सदस्याला एका आठवड्यात कीती लेख (काव्य,कौल काहीही) प्रकाशित करता येतील ह्यावर बंधन असावे. हे चक्क तुम्ही म्हणताय? अहो मग तुमच्या लेखांचे काय? आता प्रकाशित झाल्यावर काही लगेचच तर काही थोड्या प्रतिसादानंतर काढून टाकावे लागतात हा भाग निराळा.

हे काय आहे खुळचटासारखं....म्हणजे मनात आलं कि न लिहिता आधी उपास लक्षात ठेवल्यासारखे वार लक्षात ठेवायचे? छे.. मि,पा. वर होणार्‍या चर्चा अशाच असल्या पाहिजेत . मनात आलेले विचार अगदि मुक्त पणाने व्यक्त होतात.यातच तर मि,पा. चा जीव आहे यार! आणि अमुक विषयावर तमुक दिवशी याच विषयावर चर्चा होणार हे असे मि.पा. काही रुचेल असे वाटत नाही, गुळचट्,छान छान वाटणारे गंमत वाटणारे विषयच चर्चेला घ्यायचे हा एक अजुन बुळचट नियम. होउ द्या ना मनमुराद गप्पा...चर्वण्...असे का नियम आणि बंधने इथेही? आणि कधी कधी जेव्हा मर्यादा ओलांडल्या जातात्,सभ्यपणाला विसंगत वक्तव्ये केली जातात त्यावेळी योग्य असे संपादन केले जाते आहे... so what's the harm in there?

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

शानबा५१२ 18/08/2010 - 23:27
आता गुमान आपला विरोध मागे घ्या,बाईंना त्यांचा विरोध केलेले चालत नाही,बाहेर फळ्यावर वाचल नाही का? नाही मागे घ्यायचा ना विरोध्,मग खावा छडीचा मार!

In reply to by शानबा५१२

शिल्पा ब 18/08/2010 - 23:35
अहो सगळेच तुमच्यासारखे छडीचा मार खाणारे नसतात...बहुतौंशी लोकांना बोललेले समजते...अर्थात आपल्यासारखे थोर अपवाद आहेत म्हणूनच जग चालले आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

पर्‍या, असले प्रश्न विचारू नयेत. मारुती कांबळेचं काय झालं माहीत आहे ना? परा कांबळे होईल. अवांतरः प्रविन भप्करचे काय झाले?

In reply to by llपुण्याचे पेशवेll

काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच.

भारतीय 19/08/2010 - 11:58
>>महिन्यातून किती वेळा अशा चर्चा व्हाव्यात? महिन्यातून २१ दिवस, दिवसातून २ वेळा, रात्री झोपण्यापूर्वी मुली-दारू/ स्वयंपाक व तत्सम धाग्यांवर चर्चा करावी.. सकाळी ऊठल्यानंतर जरा वेळ ध्यानमग्न राहून 'प्रविन्भपकरचे काय झाले' याचा विचार करावा व मगच मिपावर लॉगीन व्हावे व नवीन विषय सुरू करावेत... कधी कधी कटाळा आल्यास नितिन थत्ते, श्री बिरुटे, श्री दिवटे आदी मान्यवरांच्या लेखांना प्रतिसाद द्यावेत.. आरोग्य ऊत्तम राहील याची खात्रीशीर ग्यारंटी!!

ठराविक दिवशी ठराविक प्रकार हे वाचुन दूरदर्शनवर मंगळवारी रात्री फ्क्त प्रौढांसाठीचे चित्रपट दाखवत असत त्याची आठवण झाली.तो वार व ती वेळ ही कायम लक्षात ठेवत असु.(पुढे केबल आल्यावर तर ठराविक दिवशी मध्यरात्री तसले चित्रपट दाखवले जायचे.) बाकी चालु द्या!

In reply to by परिकथेतील राजकुमार

म्हणजे कुठले ?
ते जाऊ द्या हो. पण तिथेही पोपट व्हायचाच.तारवटलेल्या डोळ्यांनी,टी.वीचा आवाज कमी करुन काहीतरी पाहायला मिळेल म्हणुन एरवी पचनी न पडणारे चित्रपट पाहायचो आणि एखाद दुसर्या चुंबन दृष्यानेच बोळवण व्हायची.(दूरदर्शनही तसली दृष्ये संपादीत करत असे.) तो प्रकार म्हणजे "तुम्हाला ह्या पानापाशी पोचण्याची मुभा नाही" अथवा "प्रतिसाद संपादीत"चे आद्यरुपच होते म्हणा ना.

तो प्रकार म्हणजे "तुम्हाला ह्या पानापाशी पोचण्याची मुभा नाही" अथवा "प्रतिसाद संपादीत"चे आद्यरुपच होते म्हणा ना.
+ शमत आहे. सुषमा स्वराज ह्यांच्या कृपेने आता एच बी ओ, स्टार मुव्हिजचे सुद्धा आस्था चॅनेल होउ लागलेले आहे. काही दिवसांनी बहुदा ह्या चॅनेल्सवर पण फुलाला फुल चिकटलेले पाहावे लागणार असे वाटते. सगळ्यात भिकारचोटपणा म्हणजे सबटायटल्स मध्ये सुद्धा एखाद्या पात्राने बुलशिट म्हणले की bull**** असे लिहुन येते =))

In reply to by परिकथेतील राजकुमार

"सबटायटल्स मध्ये सुद्धा एखाद्या पात्राने बुलशिट म्हणले की bull**** असे लिहुन येते =))" + सहमत. तसेच Damn you चे Darn you “f***” याच्यावर तर इतकी कुर्‍हाड आहे की "एचबीओ" वर ज्यावेळी ऑलिव्हर स्टोनचा ऑस्कर विनर "प्लटून" लागला होता त्यावेळी सबटायटलमध्ये नुसत्या चांदण्याचा महापूर होता.

शिल्पाताईंना शतकी कल्पना सुचली आहे. ती ही कुणाचाही रोष ओढवून न घेता. ( कुणाचाही => पुणेकर, मुंबईकर, पुरुष, स्त्रिया, IT वाले, Non-IT वाले, रिक्षाने प्रवास करणारे, बस ने प्रवास करणारे, पायी प्रवास करणारे, प्रवासच न करणारे, दारू पिणारे, न पिणारे, सिगारेटी फुंकणारे, न फुंकणारे, शाकाहारी, मांसाहारी, मस्त्याहारी, फलाहारी... झालेच तर सरपंच, संपादक इ इ..... ) वा शिल्पाताई, आवडले आपल्याला !!!!! आता अशीच एक कल्पना मलापण सुचली पाहिजे, मग त्रिशतकच हाणतो बघा !!! ह. घ्या. हे. वे. सां. न. ल.

मिपावर फक्त सोमवार, गुरूवार आणि शनिवारीच चर्चांची परवानगी द्यावी. एका चर्चेवर, एका प्रतिसादकाला, एका आयडीने एकच प्रतिसाद देता येईल अशी सोय असावी. शिवाय कविता, कथा, प्रवासवर्णनं (विशेषतः भारताबाहेरची आणि भारतातल्या धार्मिक स्थळांची), इत्यादी ललित साहित्यांवर प्रतिक्रिया देताना चार ओळींची प्रतिसाद मर्यादा घालावी. पंगा आणि चोता दोन या मेगाबायटी प्रतिसादकांसाठी त्यातून काही अपवाद निर्माण करता येतील का यावर श्री. निखिल देशपांडे यांनी उजेड टाकावा. कौलावर मात्र बंधने घालू नयेत. कौलात प्रतिसादकांनाही जास्तीचे पर्याय घालता येतील अशी सोय असावी.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शिल्पा ब 18/08/2010 - 22:16
पंगा, चोता दोन याशिवाय इंद्रजीत पवार हेसुद्धा एक मेगाबायटी लेखक आहेत...साधं सहमत आहे या वाक्यावरसुद्धा ते एक पानभर लिहू शकतील..

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पाषाणभेद 19/08/2010 - 09:29
सोमवार, गुरूवार आणि शनिवारीच चर्चा करण्यापेक्षा मंगळवार, बुधवार अन शुक्रवारी चर्चा केली तर नाही का चालणार? एकादशीच्या दिवशी एखादे काव्यच वाचणे अथवा लिहीणे किंवा काव्याचाच धागा मिपावर ठेवणे व अन्य धागे दिसणेही बंद करणे, चतूर्थीला चर्चासत्र दिसू देणे व इतर बंद करणे, रमजान मध्ये शांततेचेच धागे दिसू देणे, शिळासप्तमीस खादाडी दिसू देणे, पारशी नवरोज च्या दिवशी नविन वर्षाच्या सुभेच्छांचेच धागे दिसू देणे, पोंगल च्या दिवशी शेतीविषयक धागे, ख्रिसमस च्या दिवशी पार्टी, पब पार्टी, आदींचे धागे, महाराष्ट्रदिनी शिवाजीमहाराज, इदीच्या दिवशी खिरखुर्म्याचे, मटनाचे खायचे पदार्थ दिसू देणे, महाविरजयंतीदिनी मंगल गाणी दंगल गाणी, बैसाखीनिमित्त शिखांचे धागे असे सर्व केल्याने सर्व समाज एकरूप होईल. प्रत्येकाला ज्याचात्याचा वार मिळेल. संपादकांनाही त्यांचे त्यांचे दिवस वाटून घेता येईल. सर्वत्र आनंदी आनंद होईल. भांडन तंटा वादविवाद, मतमतांतर होणार नाही. तिखटमिसळीपेक्षा गुळवणी चांगली की नाही? त्याचप्रमाणे राहू काळात चर्चा केल्याने चर्चा करणार्‍याला पुढच्या दोन दिवसात वाईट काळ संभवतो असे त्याच्या त्याच्या नाडीत लिहील्याचे आम्हास एका हात पाहणार्‍या ज्योतिषाने पायाच्या अंगट्याचे भविष्य पाहतांना आमच्या कपाळावर पाहून सांगितले असल्याचे आम्हास स्मरत आहे.

In reply to by शिल्पा ब

मला वाटतं त्यांचं नाव इंद्रराज पवार असं आहे. क्रेमर, राजेश घासकडवी हेसुद्धा मेगा बायटी लेखक आहेत असे आमचे मत आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

आता शिल्पाताई आणि अप्पा जोगळेकर यांच्या प्रतिसादावर मी "इन्द्रजीत" की "इन्द्रराज" यावर खुलासा द्यायचे म्हटले तर तो मेगाबाईटचा व्हायलाच हवा, नाहीतर वाचणारे म्हणतील 'साधा खुलासा अमान्य'. प्रिय संपादक मंडळींनी अजून तरी मला "इतके मोठे प्रतिसाद चालणार नाहीत, भाऊ" अशी सूचना केलेली नाही, त्यामुळे सबब प्रतिसाद गरगरीत तब्येतीत देणे चालू आहे. धागाधारकांचीही काही तक्रार नाही. ~~ असो. डाय हार्ड हॅबिट.

In reply to by इन्द्र्राज पवार

अरे नीलकांत, निखिल, हसून लोळणारा इमोटीकॉन परत आणा रे ... एक मेगाबायटी प्रतिसादक स्वतःची प्रतिमा धुळीस मिळवत आहे. ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चिन्मना 18/08/2010 - 23:08
>> एका चर्चेवर, एका प्रतिसादकाला, एका आयडीने एकच प्रतिसाद देता येईल अशी सोय असावी. अहो प्रतिवादांमुळे तर चर्चा खुलतात आणि बर्‍याच लोकांना त्यातून नवीन माहिती कळते. एकदाच प्रतिसाद द्यायची मर्यदा ठेवली तर कुठलीच चर्चा कधीच रंगणार नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

असुर 19/08/2010 - 01:32
आजाबात चालाच नाय! जरा कुठे लोक चर्चा वगैरे करतात, थोडेफार हमरीतुमरीवर येतात. कसं बरं वाटतं, आमच्यासारखे लोक अशी एखादी म्याच, एखादं चांगलं झाड, पॉप-कॉर्न आणि कोक घेऊन एन्जॉय करतात. ;-) हे असलं उपासाच्या वारांचं बंधन घातलं तर आम्ही म्याच पाहायला कुठे जाणार? ते काही नाही, चर्चा झालीच पाहिजे, मनमुराद म्याचेस खेळता आल्याच पाहिजेत, आणि त्या पाहण्यासाठी तिकीट नाय पायजे! ;-) काय पाहिजे तेव्हढे प्रतिसाद कुटता आले पाहिजेत. असले रूल लावले तर प्रतीसादपाडू लेखांनी कुणाकडे पाहायचं ओ? ;-) --असुर

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विजुभाऊ 19/08/2010 - 13:57
कौलात प्रतिसादकांनाही जास्तीचे पर्याय घालता येतील अशी सोय असावी. ही तर धाग्याच अख फ करायची "पाक" कृती लै भारी. आता त्या पर्यायात दहा पैकी तीन उर्टच्या ढगाबद्दल असावेत ( उदा पत्रीकेत उर्टच्या ढगाचे स्थान कोणते वगैरे. दोन नाडीबद्दल असावेत आणि उरलेले पाच पाध्येगिरी वर असावेत) कौलारू धागे काढताना जर ते स्वयंपाक घराबद्दल असतील तर तीन पैकी किमान एक फोडणीच्या कालच्या भाताचे आज काय कराल अशा पैकी असावेत. जसे विडंबनकाव्यात बायको,ऑफिस आणि साहेब या घटकाना ऑप्शन नसतो तसे कौलात सुद्धा किमान एखादा ऑप्शन नसलेला पर्याय ठेवावा

अहं ! खुशाल वाटेल ते बोलू द्यावे. वाटेल तशा चर्चा होऊ द्याव्या. श्लील-अश्लील, नीती-अनीती, योग्य-अयोग्य, अशा पलिकडे मिपा जावे असे वाटते. ''अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ असल्यामुळे '' लिहिण्या-बोलण्याची कोणतीच कसर राहू नये असे मला वाटते. काही अधिक - उणे असेल तर काळजी घेणारी मंडळी इथे आहेच. तेव्हा आपण काही मर्यादा वगैरे आखून घेतल्या पाहिजेत असे मला तरी वाटत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बेसनलाडू 18/08/2010 - 22:48
कोणात्याही स्वरूपाची मर्यादा नको. चर्चांवर तर नाहीच नाही. (अमर्याद)बेसनलाडू

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चिन्मना 18/08/2010 - 23:04
सहमत आहे. कुणाला त्याने वेळ वाया जातो असे वाटत असेल तर फाट्यावर मारण्याचे स्वातंत्र्य आहेच की! प्रत्येक चर्चेत हिरीरीने भाग घेतला पाहिजे असे नाही.

"थोरामोठ्यांकडून" आता यात मी (आणि असेही असू शकेल की अजुन बरेच...) या गटात बसण्यासाठी "क्वालिफाईड" नाही; त्यामुळे मत व्यक्त करताना "टु बी ऑर नॉट टु बी" अशी अवस्था आहे. तरीही धागा रोचक आहे म्हणून थोडे मत मांडतो. कोणत्याही चर्चेला कुठपर्यंत जावू द्यायचे आणि कोणता धागा "फक्त वाचनमात्र" ठेवायचा, कुठला "आता धाग्याने वादग्रस्त वळण घेतले..." म्हणून काढून टाकायचा, या बाबी संपादक मंडळाच्या अखत्यारीतील बाबी आहेत, आणि त्याप्रमाणे वेळोवेळी तशी कार्यवाही (जरी धागा प्रतिसादाने वाढत जात असला तरी) झालेली आहेच. त्यामुळे "धरबंधा" चा लगाम सर्वस्वी त्या टॉवरकडे आहे, जिथे "बिग ब्रदर इज वॉचिंग" अशी स्थिती आहे. काही धाग्यांचे काही विषय प्रक्षोभक तर काही माहितीपूर्वक, तर मनोरंकनात्मक असू शकतात, होऊ शकतात (उदा. अगदी लेटेस्ट 'रोजा', "विवाह कौल", "मुली आणि मदिरापान') पण त्यामुळे कित्येकवेळा कित्येकाना माहितीचे नवनवे कंगोरे मिळू शकतात व अशाच चर्चेतून उपधागेदेखील सुचू शकतात. "रोजा" च्या निमित्ताने मला एका सदस्याने "अमुक एक इंग्रजी पुस्तक जरूर वाचा..." अशी खरडीद्वारे सूचना केली. ते पुस्तक मला नवीन होते आणि त्यावरील परिक्षण वाचल्यावर समजले की किती एखाद्या विषयावरील किती सखोल माहिती मला मिळू शकते. हे सर्व धागा चहुबाजूनी फुलू लागला तरच शक्य आहे. काही सदस्यांनी "विवाह कौल" वरील चर्चा वाचून मला "५२% रिझर्व्हेशनबद्दल अजून सविस्तर लिहा" अशी विनंतीही केली. या निमित्ताने माझेही अवांतर वाचन घडून येईल. अशा विस्तारित स्वरूपाच्या संबंधामुळे धाग्यांचे आणि त्यावरील चर्चेचे प्रमाण याला कुठले आणि कसले मीटर असावे असा प्रश्न पडू नये असे वाटते. शेवटी प्रवास करणार्‍याला रेल्वेचा डबा मोकळा काय, भरलेला असला काय, तो प्रवास हा करणारच. त्यासाठी कौल काढावा लागू नये, ही अपेक्षा.

शानबा५१२ 18/08/2010 - 23:02
लेखिकेशी सहमत पण.....एक सुधारणा करतो. एका सदस्याला एका आठवड्यात कीती लेख (काव्य,कौल काहीही) प्रकाशित करता येतील ह्यावर बंधन असावे. हे पण जरा कीचकट वाटत आहे,पण लेखिकेला मिपाची फार काळजी आहे हे दीसते,त्यांनी अजुन एखादा पर्याय समोर आणावा अस वाटत. धन्यवाद्,शिल्पा मॅडम,आपण सर्व मराठी संस्थळावर अश्याच आवडीने लिहत रहावे व सुधारणासाठी उपाय सुचवावेत.........नाही उगाच नाही लिहीत खरच आपण जो प्रस्ताव मांडला आहे तो काबिले-ए-तारीफ आहे,ह्यामुळे वायफळ चर्चांना आळा बसेल व चर्चेत गंभीरता येईल अस मला वाटत. पण हो आपण सर्वीकडे असाच रस घ्या,ह्यानिमित्ताने मराठी,संस्थळावर तरी एकत्र येउ देत. जय हींद!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

शानबा५१२ 18/08/2010 - 23:18
बीपीनदा,ते करण्याआधी ह्यांचा आयडी एक आठवडाभर ब्लॉक करुन टाका,काही न सांगता,मुद्दाम. मग एक आठड्यानंतर जेव्हा ह्या ईथे येतील तेव्हा बघा.त्या स्वःताच आपला प्रस्ताव विसरतील्,व नंतर महीन्यात व्हायला हवी तेवढी चर्चा एका दीवसात होईल..............सॉरी सॉरी नॉट चर्चा,बोंबाबोंब म्हणा ना!. नाही पण त्यांनी जे लिहलय तेही बरोबर आहे,त्यांच्याकडे पाउसात ५ फुट पाणी जमा होत्,अस ऐकलय,मग असल्या भयंकर वातावरणात रहाणा-यांच्या अपेक्षा पण अश्याच भयंकर असणार ना! YOU ARE GOOD AT INDUCING SOMEONE TO DO GOOD THINGS,SO APPLY YOUR SKILLS FOR WELFARE OF NEEDY PEOPLE. BYE, GOOD NIGHT,SWEET DREAM!

In reply to by शानबा५१२

शिल्पा ब 18/08/2010 - 23:40
नाही पण त्यांनी जे लिहलय तेही बरोबर आहे,त्यांच्याकडे पाउसात ५ फुट पाणी जमा होत्,अस ऐकलय, अहो जरा तुमच्या डबक्यातून बाहेर येऊन पाहत चला...मुंबईत पाऊस पडला कि पेपर पाहत चला म्हणजे कळेल...बाकी माझ्या प्रस्तावामुळे आपल्यालाच खूप दुखः होणार हे अपेक्षितच आहे. बाकी पुस्तकं न वाचताच आणि सिनेमा न पाहताच मत देणारे थोर आपण...सध्या मुंबईतल्या पावसाबद्दल काय घेऊन बसलात..

In reply to by अप्पा जोगळेकर

शानबा५१२ 19/08/2010 - 23:02
आता समजल का की मराठी का पुढे जत नाही ते? अरे तुझ्यासरखे लोक माझ्यासारख्या क्रांतिकारी विचाराच्या माणसाचाच पाठींबा काढायला लागले तर कठीण आहे रे बाबा!! अणि हो,शिल्पा मॅडम्,मिपावर सदस्यांनी फक्त लिहायच आणि वाचायच असत्,असे सल्ले अमंलात आणले जातील अस नाही वाटत. ईथे कोण आहे ज्यांनी पावसाळ्यात ५ फुट पाणी चालुन कींवा पोहुन पार केले आहे,कींवा मानववस्ती असणा-या ठीकाणावर एवढे पाणी पाहीले आहे??

In reply to by शानबा५१२

शिल्पा ब 18/08/2010 - 23:33
एका सदस्याला एका आठवड्यात कीती लेख (काव्य,कौल काहीही) प्रकाशित करता येतील ह्यावर बंधन असावे. हे चक्क तुम्ही म्हणताय? अहो मग तुमच्या लेखांचे काय? आता प्रकाशित झाल्यावर काही लगेचच तर काही थोड्या प्रतिसादानंतर काढून टाकावे लागतात हा भाग निराळा.

हे काय आहे खुळचटासारखं....म्हणजे मनात आलं कि न लिहिता आधी उपास लक्षात ठेवल्यासारखे वार लक्षात ठेवायचे? छे.. मि,पा. वर होणार्‍या चर्चा अशाच असल्या पाहिजेत . मनात आलेले विचार अगदि मुक्त पणाने व्यक्त होतात.यातच तर मि,पा. चा जीव आहे यार! आणि अमुक विषयावर तमुक दिवशी याच विषयावर चर्चा होणार हे असे मि.पा. काही रुचेल असे वाटत नाही, गुळचट्,छान छान वाटणारे गंमत वाटणारे विषयच चर्चेला घ्यायचे हा एक अजुन बुळचट नियम. होउ द्या ना मनमुराद गप्पा...चर्वण्...असे का नियम आणि बंधने इथेही? आणि कधी कधी जेव्हा मर्यादा ओलांडल्या जातात्,सभ्यपणाला विसंगत वक्तव्ये केली जातात त्यावेळी योग्य असे संपादन केले जाते आहे... so what's the harm in there?

In reply to by जाई अस्सल कोल्हापुरी

शानबा५१२ 18/08/2010 - 23:27
आता गुमान आपला विरोध मागे घ्या,बाईंना त्यांचा विरोध केलेले चालत नाही,बाहेर फळ्यावर वाचल नाही का? नाही मागे घ्यायचा ना विरोध्,मग खावा छडीचा मार!

In reply to by शानबा५१२

शिल्पा ब 18/08/2010 - 23:35
अहो सगळेच तुमच्यासारखे छडीचा मार खाणारे नसतात...बहुतौंशी लोकांना बोललेले समजते...अर्थात आपल्यासारखे थोर अपवाद आहेत म्हणूनच जग चालले आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

पर्‍या, असले प्रश्न विचारू नयेत. मारुती कांबळेचं काय झालं माहीत आहे ना? परा कांबळे होईल. अवांतरः प्रविन भप्करचे काय झाले?

In reply to by llपुण्याचे पेशवेll

काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच.

भारतीय 19/08/2010 - 11:58
>>महिन्यातून किती वेळा अशा चर्चा व्हाव्यात? महिन्यातून २१ दिवस, दिवसातून २ वेळा, रात्री झोपण्यापूर्वी मुली-दारू/ स्वयंपाक व तत्सम धाग्यांवर चर्चा करावी.. सकाळी ऊठल्यानंतर जरा वेळ ध्यानमग्न राहून 'प्रविन्भपकरचे काय झाले' याचा विचार करावा व मगच मिपावर लॉगीन व्हावे व नवीन विषय सुरू करावेत... कधी कधी कटाळा आल्यास नितिन थत्ते, श्री बिरुटे, श्री दिवटे आदी मान्यवरांच्या लेखांना प्रतिसाद द्यावेत.. आरोग्य ऊत्तम राहील याची खात्रीशीर ग्यारंटी!!

ठराविक दिवशी ठराविक प्रकार हे वाचुन दूरदर्शनवर मंगळवारी रात्री फ्क्त प्रौढांसाठीचे चित्रपट दाखवत असत त्याची आठवण झाली.तो वार व ती वेळ ही कायम लक्षात ठेवत असु.(पुढे केबल आल्यावर तर ठराविक दिवशी मध्यरात्री तसले चित्रपट दाखवले जायचे.) बाकी चालु द्या!

In reply to by परिकथेतील राजकुमार

म्हणजे कुठले ?
ते जाऊ द्या हो. पण तिथेही पोपट व्हायचाच.तारवटलेल्या डोळ्यांनी,टी.वीचा आवाज कमी करुन काहीतरी पाहायला मिळेल म्हणुन एरवी पचनी न पडणारे चित्रपट पाहायचो आणि एखाद दुसर्या चुंबन दृष्यानेच बोळवण व्हायची.(दूरदर्शनही तसली दृष्ये संपादीत करत असे.) तो प्रकार म्हणजे "तुम्हाला ह्या पानापाशी पोचण्याची मुभा नाही" अथवा "प्रतिसाद संपादीत"चे आद्यरुपच होते म्हणा ना.

तो प्रकार म्हणजे "तुम्हाला ह्या पानापाशी पोचण्याची मुभा नाही" अथवा "प्रतिसाद संपादीत"चे आद्यरुपच होते म्हणा ना.
+ शमत आहे. सुषमा स्वराज ह्यांच्या कृपेने आता एच बी ओ, स्टार मुव्हिजचे सुद्धा आस्था चॅनेल होउ लागलेले आहे. काही दिवसांनी बहुदा ह्या चॅनेल्सवर पण फुलाला फुल चिकटलेले पाहावे लागणार असे वाटते. सगळ्यात भिकारचोटपणा म्हणजे सबटायटल्स मध्ये सुद्धा एखाद्या पात्राने बुलशिट म्हणले की bull**** असे लिहुन येते =))

In reply to by परिकथेतील राजकुमार

"सबटायटल्स मध्ये सुद्धा एखाद्या पात्राने बुलशिट म्हणले की bull**** असे लिहुन येते =))" + सहमत. तसेच Damn you चे Darn you “f***” याच्यावर तर इतकी कुर्‍हाड आहे की "एचबीओ" वर ज्यावेळी ऑलिव्हर स्टोनचा ऑस्कर विनर "प्लटून" लागला होता त्यावेळी सबटायटलमध्ये नुसत्या चांदण्याचा महापूर होता.

शिल्पाताईंना शतकी कल्पना सुचली आहे. ती ही कुणाचाही रोष ओढवून न घेता. ( कुणाचाही => पुणेकर, मुंबईकर, पुरुष, स्त्रिया, IT वाले, Non-IT वाले, रिक्षाने प्रवास करणारे, बस ने प्रवास करणारे, पायी प्रवास करणारे, प्रवासच न करणारे, दारू पिणारे, न पिणारे, सिगारेटी फुंकणारे, न फुंकणारे, शाकाहारी, मांसाहारी, मस्त्याहारी, फलाहारी... झालेच तर सरपंच, संपादक इ इ..... ) वा शिल्पाताई, आवडले आपल्याला !!!!! आता अशीच एक कल्पना मलापण सुचली पाहिजे, मग त्रिशतकच हाणतो बघा !!! ह. घ्या. हे. वे. सां. न. ल.
आजकाल मिपावर बऱ्याच चर्चा चालू आहेत...सैपाक, मुलीनी दारू पिणे, सरकारने किती करोड खर्च करावे, मोठाल्या दुकानातून समान आणणे, मुसलमान धर्मातील अतिरेकी मते आणि काय काय... एक अस्सल मराठी माणूस म्हणून आम्हीही या सगळ्यात हिरीरीने भाग घेत आहोत, घेत राहू....बरेच धागे अप्रकाशित झाले, काही वाचनमात्र झाले. आम्हाला उगाचच एक प्रश्न पडला कि अशा चर्चांना काही धरबंध असावा कि नाही? म्हणजे काय प्रमाण असावे? महिन्यातून किती वेळा अशा चर्चा व्हाव्यात? आणि याविषयी आम्ही एखादा कौल काढावा काय? आपल्यासारख्या थोरामोठ्यांकडून या समस्यांवर काही प्रकाश पडेल अशी आशा आहे.

पीपली लाइव - विरोध

शानबा५१२ ·

In reply to by शानबा५१२

मी-सौरभ 19/08/2010 - 20:14
मी सगळे प्रतिसाद वाचले... त्यावरुन तुझ मन अति(ष की श)य साफ आहे असं जाणवत. फक्त हा धागा टाकण्याआधी थोडी माहिती मिळवली असतीस (विशेषतः ज्यानी हा पाहिलाय) तर बरं झाल असतं बाकी अजुन ५ बाकी आहेत :)

मदनबाण 16/08/2010 - 08:41
महाराष्ट्रातुन पीपली लाईव्हला विरोध होत आहे,जो मला देखील योग्य वाटतो. शेतकरी अनुदानातुन मिळणार्‍या पैसाच्या हव्यासापोटी आत्महत्या करतात हे या चित्रपटातुन प्रतित होते,जे पूर्णपणे चुकीचे आहे. इतक्या लाख शेतकर्‍यांनी आत्महत्या केली ते पैसे मिळावेत म्हणुन ? ही शेतकर्‍यांची आणि त्यांच्या अवस्थेची क्रूर चेष्टा वाटते. http://www.starmajha.com/NewDiscussionReply.aspx?ForumID=12895

ऋषिकेश 16/08/2010 - 08:50
चित्रपट पाहिलेला नाही त्यामुळे काहीच बोलु शकत नाहि. मात्र केवळ शेतकरी विरोध करताहेत म्हणून दुसरी बाजु समजून न घेता किंवा शेतकर्‍यांचा विरोध नक्की कशावर बेतलेला आहे? त्याचे कारण काय? हे ही माहीत नसताना मी निषेधही व्यक्त करू शकत नाही. कोणी चित्रपट बघितला आहे का? तो सांगेल का का विरोध आहे? वर मदनबाण म्हणतात तसे प्रतीत होते का?

In reply to by ऋषिकेश

मदनबाण 16/08/2010 - 08:59
ऋषिकेश मी सुद्धा हा चित्रपण अजुन पाहिला नाही...परंतु तरी देखील मला शेतकर्‍यांचीच बाजु घ्यावीशी वाटली कारण, लाखो शेतकर्‍यांच्या आत्महत्या या पैशाच्या प्रलोभनाने झालेल्या नाहीत... बाकी ज्यांनी चित्रपट पाहिला आहे त्यांनी यावर अधिक भाष्य करावे अशी अपेक्षा आहे.

In reply to by मदनबाण

ऋषिकेश 16/08/2010 - 09:45
चित्रपटाची बाजु घेण्याचा अजिबात प्रयत्न नाही, मात्र आताच लोकसत्तात एक बातमी वाचली त्यात आमिर खानने काही दृश्ये "उपहासात्मक" दृष्टीने चित्रीत केल्याचे म्हटले आहे. आता तो खरंच उपहास आहे का? का खरंच आक्षेपार्ह काही आहे हे तो चित्रपट बघितलेल्यांपैकी कोणी सांगितले तर कळेल असे वाटते. तोपर्यंत मी ना निषेध व्यक्त करू शकत ना पाठींबा देऊ शकत. याशिवाय एखाद्या शेतकर्‍याने हा मार्ग अवलंबला अशी "कथा" असेल तर तो सर्वसामान्य नियम होऊ शकत नाही. अपवादावरही चित्रपट बनतोच. फक्त तो अपवाद आहे हे चित्रपटातूनच प्रेक्षकांना कळलं पाहीजे ही अपेक्षा रास्त आहे.

In reply to by बेसनलाडू

बेला, तू चित्रपट पाहिला आहेस म्हणून तुला प्रश्न. चित्रपटाच्या नावावरून वाटत आहे की चित्रपट मुळात शेतकर्‍यांची आत्महत्या हा बॅकड्रॉप वापरून मिडीयाच्या सवंग*पणावर टीका करण्यासाठी बनवला असावा. तुझं चित्रपट पाहून काय मत झालं? *सदर विशेषण कोणीही मिपावाचक मिडीयावाल्याने व्यक्तीगत स्वतःवर ओढवून घेऊ नये ही विनंती.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

लिखाळ 16/08/2010 - 12:00
आज सकाळ मध्ये आलेले परिक्षण वाचनीय आहे. 'आपल्या कोडगेपणाच्या कानाखाली काढलेला आवाज'

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मृत्युन्जय 16/08/2010 - 12:27
बेलाला काय वाटले ते नाही माहिती पण चित्रपट त्यावरच आहे. इतर कोणाचे काही वेगळे मत झाले असल्यास त्याने ताबडतोब बिनोद अणि उपरोध समजुन घेण्यासाठी शिकवणी लावावी. अ‍ॅड टु इट राजकारण्यांचा बेमुर्वतखोरपणा, स्थानिक राजकारण्यांचे सामान्य जनतेच्या हिताबद्दलचे औदासिन्य, सामान्य जनतेच्या प्रश्नांवरुन केले जाणारे शह- काटशाहाचे राजकारण, केंद्र आणि राज्य सरकारांचे आपापसातले हेवेदावे, शासकीय नोकरशहांचा थंड आणि चीड आणणारा आलिप्तपणा आणि केवळ बाईट साठी चाललेली धडपड. हे सगळे आहे या चित्रपटात.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बेसनलाडू 16/08/2010 - 20:53
थोडक्यात सर्वमान्य मराठीत सांगायचे झाल्यास मिडियाची #$ली आहे :) (संक्षिप्त)बेसनलाडू पैशाच्या गरजेपायी आत्महत्येस प्रवृत्त होणे/केले जाणे, हा निव्वळ फार्स आहे. खरे तर चित्रपटातील मुख्यमंत्र्याच्या तोंडी असलेले "किसानों की आत्महत्या रोजमर्रा की बात है, महाराष्ट्र देखिये, आंध्र देखिये .." सारखे संवाद म्हणजे राजकारण्यांच्या कोडगेपणाचीही कमाल दाखवणारे आहेत. चित्रपटात राजकारणी, मिडिया यांच्या सवंगपणावर, निर्लज्जपणावरच टीका आहे. चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते किंवा संबंधित इतर कोणीही शेतकर्‍यांच्या मूलभूत प्रश्नाबद्दल उदासीन नि संवेदनाशून्य आहेत, असे मला वाटले नाही. मुळात असे काही आमिष दाखवून आत्महत्येसाठी प्रवृत्त केले जाणे हा फार्सच आहे, हे न कळण्याइतके आपल्यापैकी कोणीही बत्थड नसावेत, असे वाटते. पैशाच्या गरजेपायी अगदी आत्मघातकी अतिरेकी पथकांत सामील होणारी तरुणाई असताना त्यांच्याबद्दल जर आपण चुकचुकण्यापलीकडे काही करू शकत नसू, तर शेतकर्‍यांच्या समस्येवरील फार्सबद्दल अतिसंवेदनाशील असण्यात काय हशील? (असे विचारण्यात कोणतीही एक समस्या कमी/अधिक महत्त्वाची, नैतिकता-अनैतिकता हे मुद्दे विचारात घेतलेले नाहीत. दोन्ही समस्या या समस्याच आहेत, नि सारख्याच स्वरूपाच्या आहेत, इतके साधे गृहीतक आहे) (संवेदनाशील)बेसनलाडू चित्रपटाच्या शेवटी तर शेतकरी आणि शेतमजुरांचे आडव्यातिडव्या फोफावत चाललेल्या शहरांकडे बांधकाम मजूर म्हणून होणारे स्थलांतर दाखवून त्याही समस्येला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. चित्रपट बारकाईने पाहणार्‍यांच्या नजरेतून नि डोक्यातून ही बाब सुटायला नको. (निरीक्षक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

ऋषिकेश 16/08/2010 - 10:14
तेच तर माहीत नाही ना! सगळा हवेत गोळीबार चाललाय ;) बाकी, जर तु चित्रपटपाहिला आहेस तर प्रश्न असा की "असं कोणत तरी दृश्य आहे का जे शेतकर्‍यांच्या सत्य परिस्थितीशी फारकत घेणारं किंवा शेतकर्‍यांची प्रतिमा मलीन करणारं आहे?"

In reply to by ऋषिकेश

सहज 16/08/2010 - 10:22
आता हिंदी सिनेमात भ्रष्ट पोलीस, जज्ज, सैनिकी अधिकारी दाखवतात तर सगळे (पोलीस, जज्ज, सैनिकी अधिकारी ) तसेच असतात अशी टिका करुन ते सिनेमे बंद पाडण्यात आले आहेत का? असल्यास प्रथेप्रमाणे शानबांचे ठीक वाटते. नसल्यास भले पैशासाठी जीवही देणारे लाचार (बिचारे मजबूर?? अश्या अर्थाने) शेतकरी अश्या काही व्यक्तिरेखा कथेच्या दृष्टिने दाखवल्या गेल्या असतील तर नेमके काय चुकीचे? का आजकाल मेडीयासमोर आपल्या संघटनेचे प्रदर्शन करायला कुठल्या न कुठल्या सिनेमातील एक शब्द, दृश्य वापरायचा पायंडा पडला आहे? आणि हो, पीपली लाइव्ह बघीतला नाही आहे. सेन्सॉर बोर्डचे सर्टीफिकेट पास होउनच चित्रपट प्रदर्शीत झाला आहे ना?

गंगाधर मुटे 16/08/2010 - 10:28
पैशाच्या मोहापायी शेतकरी आत्महत्या करतो, असा आभास निर्माण करणारा चित्रपट, त्यावर टाळ्या वाजवणारे प्रेक्षक आणि यात गैर काय असे वाटून घेणारा समाज..........!! काय बोलणार.....................????????????????????????????? ( विकृत,बधिर, नपुसंक,षंढ वगैरे शब्द जुने झालेत. नविन परीणामकारक शब्दांची निर्मिती होऊन योग्य शब्द मिळेपर्यंत न बोललेच बरे......... हम्म्म.)

In reply to by गंगाधर मुटे

मृत्युन्जय 16/08/2010 - 12:02
तुम्ही बोलु नये हेच खरे. समाजात एक असंतुष्ट वर्ग असतो जो सतत कशा ना कशावर टीका करत असतो. एकुण दृष्टीकोन नैराश्यावादी असतो. आपण तसे असाल तर ठीकच आहे. अन्यथा चित्रपट पाहिलेला नसतान असली जहरी टीका करण्याचा आपला अधिकार आहे असे वाटत नाही. आणि आपण चित्रपट बघितला असेल तर आपल्याला कलेची जाण नाही किंवा विनोद, उपरोध आणि उपहास आपल्याला कळतच नाही असे नाइलाजाने म्हणावे लागेल.

In reply to by गंगाधर मुटे

बेसनलाडू 16/08/2010 - 20:58
गरजेपायी! (गरजू)बेसनलाडू कोणत्याही गंभीर स्वरूपाच्या प्रश्नावर आपले विचार, भावना मांडण्यासाठी तितकाच किंवा त्यापेक्षा गंभीर मार्ग अवलंबायचा की काहीशा उपहासात्मक शैलीत ते व्यक्त करायचे, याचा विचार कलाकारावर सोडायला नको काय? (कलाकार)बेसनलाडू टाळ्या वाजवणार्‍या प्रेक्षकांकडून मिळणारी दाद ही या समस्येला वाचा फोडण्याच्या प्रयत्नाला मिळालेली पावती का समजू नये? यात काय गैर आहे, हे जाणून घ्यायची इच्छा आहे. (जिज्ञासू)बेसनलाडू

भारतीय 16/08/2010 - 10:56
चित्रपट बघितल्याशिवाय प्रतिक्रिया कशी देणार ? शानबा ५१२, तुमच्या या धाग्याने चित्रपटाची नकरात्मक का होईना पण प्रसिद्धि होईलच ना? ( नव्हे, ती झालीच आहे, मला हा चित्रपट पहाण्याची फार अशी ईच्छा नव्हती, पण आता वाटतेय कि काय आक्षेपार्ह आहे हे शोधण्यासाठी हा चित्रपट पहावा) सध्या ऋषीकेश यांच्याशी सहमत! ना पाठींबा देऊ शकत, ना विरोध करू शकत. (कुणी पाहू नये असे वाटतच असेल तर चित्रपटात काय आक्षेपार्ह आहे ते कृपया सांगावे)

विसुनाना 16/08/2010 - 11:23
'अती झालं अन हसू आलं' अशी मराठीत जुनी म्हण आहे. भारतातील शेतकर्‍याची (आणि इतर अनेक हातावर पोटे असलेल्या व्यक्तीसमूहांची) परिस्थिती 'अशी' कारुण्यमय हास्यास्पद झालेली आहे हे तर दिग्दर्शकाला दाखवायचे नसेल? पहायला हवा एकदा.

मी हा चित्रपट पाहीला नाही,पाहणारही नाही.पण ह्या चित्रपटाला विरोध होत आहे हे कळल्यावर ह्यात काहीतरी आक्षेपार्ह असणार हे नक्की.
श्री. शानबा, मागच्यावेळी देखील आपण शिवाजीराजांवरील पुस्तक न वाचताच त्या नावाने खडे फोडणारा एक धागा चालु केला होतात. (त्यावेळी देखील त्याच विषयावरचा एक धागा चालु होताच) तुम्ही जर हा चित्रपट बघितला नाहियेत तर त्या विषयी चांगले अथवा वाईट मत तुम्ही नोंदवुच कसे शकता ? आणि लोकांच्या बोलण्यावरुन तुम्ही स्वतःचे मत बनवलेले असेल तर ते अगदी अधिकारवाणीने धागा काढुन इथे सांगत बसायची गरजच काय ? संपादक याची योग्य ती दखल घेतील काय ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

तुम्ही जर हा चित्रपट बघितला नाहियेत तर त्या विषयी चांगले अथवा वाईट मत तुम्ही नोंदवुच कसे शकता ? हेच म्हणतो.

मृत्युन्जय 16/08/2010 - 11:57
मला खरेच खुप हसु येते आहे. एकानेही चित्रपट बघितलेला नाही आहे आणि सगळेजण टीका करत आहेत. मुळात हा चित्रपट हपापलेल्या आणि स्वार्थी शेतकर्‍यांवर नाही. मीडियाच्या सवंगपणावर आणि राजकारण्यांच्या संधीसाधूपणावर या चित्रपटामध्ये खुशखुशीत टीका केली आहे. आणि या सर्वाला पार्श्वभुमी आहे गळ्यापर्यंत कर्जात बुडलेल्या एका शेतकरी कुटुंबाची. यातील शेतकरी अनुदान मिळणार म्हणुन आत्महत्या करायला तयार होतो. संपुर्ण चित्रपट विनोदी अंगाने जातो तरी या संपुर्ण प्रकाराला राजकारण्यांचे शेतकर्‍यांच्या हिताबद्दल असलेले कमालीचे औदासिन्य, आपापसातील राजकारण, ब्युरोक्रॅट्सचा आलिप्तपणा, शेतकर्‍याची दारूण विफलता आणि दारिद्रयातुन आलेले नैराश्य आणि यातुन आत्महत्येचा टोकाचा निर्णय (तोसुद्धा स्थानिक राजकारण्यांच्या निर्लज्ज सल्ल्यातुन उद्भवलेला) या सगळ्या गोष्टी दारूण छेद देऊन जातात. आमीर खानने हा संपुर्ण विषय कमालेच्या संयततेने हाताळला आहे. मस्करीची त्याने कुस्करी होऊ दिलेली नाही आहे. आणि मुळात शेतकरी पैसे कमावण्यासाठी आत्महत्या करतो असा सुरच नाही आहे चित्रपटात. सूर असा आहे की शेतकर्‍यांना असे वाटत असते की असे जिणे जगण्यापेक्षा आत्महत्या बरी किमान अनुदान मिळाले तर बायकामुलांचे आयुष्य सुखात जाइल. टीका करण्यापुर्वी लोकांनी किमान चित्रपट बघणे अपेक्षित होते

In reply to by मृत्युन्जय

नीधप 16/08/2010 - 12:10
सूर असा आहे की शेतकर्‍यांना असे वाटत असते की असे जिणे जगण्यापेक्षा आत्महत्या बरी किमान अनुदान मिळाले तर बायकामुलांचे आयुष्य सुखात जाइल. दुर्दैव आणि दैन्यापोटी आलेल्या कमालीच्या निराशेतून येणारा हा सूर गाभ्रीचा पाऊसमधेही होताच की. चित्रपट न बघता निषेध करत रहाणारे आणि नाटक न बघता केवळ नाटकाच्या नावात देवाचं नाव आहे म्हणून येऊन काळे बिळे फासणारे एकाच धर्तीचे. बाकी पब्लिसिटी व्हावी म्हणून हा घडवून आणलेला स्टंटही असू शकतो.

In reply to by मृत्युन्जय

१००% सहमत. चित्रपट न पाहता लोक त्यावर टीका का करत आहेत? आणि पाहिल्यावरसुद्धा टीका करत असतील तर त्यांनी तू म्हणत आहेस त्याप्रमाणे विनोद आणि उपरोध ह्यातील फरक शिकण्यासाठी शिकवणी लावावी. काहीही न वाचता न पाहता त्यावर टीका करणे ही फॅशन झाली आहे आणि ही मानसिकता वाईट आहे.

विदर्भाचा शेतकरी आळशी आहे असे श्री विलास राव म्हणाल्यावर हि संतापाची लाट उसळली होति.... असहाय्य वेदनेवर हसणे सुसंस्कृत पणाचे लक्षण नाहि....खानाचा कोथळा बाहेर काढा...

In reply to by अविनाशकुलकर्णी

अनाम 16/08/2010 - 12:57
....खानाचा कोथळा बाहेर काढा...
वा वा वा कसले जाज्वल्य विचार आहेत हो तुमचे. जरा तुमच्या चरणकमलांचा फोटु पाठवा राव. चित्रपटा बद्दल नो कमेंट कारण तो अजुन पाहिला नाही. १-२ महिन्यात बरी प्रिंट येईलच नेटावर तोवर धीर धरु. कारण फुकट ते पौष्टीक अस भाईकाकांनी सांगुन ठेवलेल आहेच.

In reply to by अनाम

वा वा वा कसले जाज्वल्य विचार आहेत हो तुमचे. जरा तुमच्या चरणकमलांचा फोटु पाठवा राव.
अनामभाऊ, उपरोध सर्व लोकांना कळतोच असं नाही. तेव्हा खानाचा कोथळा काढा या विधानाला तुमचा खरंच पाठिंबा आहे असं काहींना वाटू शकेल. :) मी त्या विधानाचा स्पष्ट निषेध करतो...

In reply to by राजेश घासकडवी

अनाम 17/08/2010 - 14:37
गुर्जी तुमच्या सारख्या समजदार लोकांसाठीच ते वाक्य आहे. ज्यांना त्यातली 'खोच' कळली नाही त्यांची पर्वा आहे कुणाला. :)

शानबा५१२ 16/08/2010 - 18:48
now no मस्करी! मी आधीच लिहल आहे, मी हा चित्रपट पाहीला नाही,पाहणारही नाही.पण ह्या चित्रपटाला विरोध होत आहे हे कळल्यावर ह्यात काहीतरी आक्षेपार्ह असणार हे नक्की. Here,objection to the film is irrespective of whether the film has objectionable content,story,dialogue or not. म्हणजे माझा विरोध आहे कारण शेतक-यांना त्या चित्रपटात काहीतरी चुकीचे वाटत आहे.मी चित्रपट जरी पाहीला व मला आक्षेपार्ह अस काहीच नाही वाटल्,तरी मी शेतक-यांनाच पाठींबा देईन.जर त्यांना वाटल की आपल्या भावना दुखावल्या गेल्यात तर तसच आहे अस म्हणेन. आता वरच्या प्रतिसादांना काही श्रेणी पाडुन उत्तरे देतो. १) ज्यांनी चित्रपट पाहीला आहे व त्यांना आक्षेप घेण्यासारख काहीच वाटल नाही ते. आपण आपले मत बनवलत,पण जर शेतकरी जो विरोध करत तो चुकीचा आहे अस आपल मत आहे का? हो तर मग तुम्ही काय म्हणता त्यांनी हा विरोध करु नये? जर शेतक-यांना आक्षेप आहे तर मलाही शेतक-यांना पाठींबा दर्शवायला आवडेल अस वाटत का? २) चित्रपट पाहीला आहे व आक्षेपही आहे? फक्त आणि फक्त शेतक-यांना पाठींबा मिळावा म्हणुन तरी आपण आक्षेप घेउया. ३) चित्रपट पाहीला नाही म्हणुन ना विरोध करणारे ना पाठींबा दर्शवणारे. अहो केलात विरोध,पोहचला शेतक-यांबद्दल आपला विचार(though not possible practically) तर त्यांना नाही का बरं वाटणार? ४) आमच्यासारखे ज्यांनी चित्रपट पाहीली नाही पण आपली अक्कल गहाण ठेउन शेतक-यांना पाठींबा देणारे. अहो गरज आहे त्या हतबल झालेल्या लोकांना! विषयांतर : हा माणुस(?) काय लिहतोय्,उगाच टाईमपास करायचा म्हणु लिहतोय.अस जर तुम्हाला वाटत असेल तर हे चुक आहे.मला काहीतरी वाटतच. #%#%#% #$%#$% #$%^ $# (*&^* अस कायतरी बोलतात ना,म्हणजे 'करत काही नाही नुसता ओरडत असतो' हे मला लागु होत नाही.माझी स्वःताची ऐपत नाही म्हणुन मी आज फक्त बोलुच शकतो.जे आहे ते सर्व बापाचं.घर,पैसा,बिजनेस,माझा मार्केटमधला पैसा सर्व बापाचं.पण जेव्हा स्वःताच्या पायावर उभा राहीन(आताही आहे,पण पैसा जमवतोय) तेव्हा कमीतकमी एकतरी शेतक-याच्या घरतलं लग्न व एखाद्या मुलाचा खर्च करीन हे निश्चित! फक्त तोंडातुन हवा सोडत नाहीये.एका गरीबाच्या मुलीला शिक्षणासाठी दत्तक घेणार होतो पण माझी वर सांगितल्याप्रमाणे ऐपत नाही,वरुन लग्नही झाल नाही.पण जेव्हाही त्या मुलीला,तिच्या वडीलांना भेटतो तेव्हा एखादी निळी कींवा हीरवी नोट हातावर टेकावतोच.तेवढीच खर्चाला मदत व्हावी तिच्या घराला ही भावना."पढाई करना हां बेटा!" अस सांगतो.ती पोरही कधीकधी शाळेत काय शिकवल ते उस्तुकतेने सांगते,तेव्हा बरं वाटत. सांगायचा उद्देश हाच की मदत करा.रडणा-याला हसवा.काम करायच,पैसा कमवायचा,थोडा खर्चायचा, थोडा बँकेत टाकायचा,आणि एखादे दीवशी मरुन जायच अस जीवन जंतुही जगतो. मुलं पण आपलचं अनुकरण करणार. शेतक-यांना काहीच मदत करु शकत नाही पण 'भले त्या चित्रपटाला फायदा मिळाला' तरी मी विरोध दर्शवणारच.माझी विचार करायची शक्ती मला त्यात गैर आहे की नाही ह्याचा विचार करायला नाही वापरायची.आपण वापरा आणि आपले जीवन जगत रहा,तुम्हाला तुमच्या १००% स्वार्थी जीवनात सर्व काही मिळो ह्यासाठी हार्दीक शुभेच्छा! UPDATE : नोकरी मिळाली उद्यापासुन नवीन काम सुरु!......मी आज ह्याबद्दल पोटाला हात लावुन "भुक लगी है" म्हणणा-याला ३० रुपये काढुन दीले.मी स्वःता हाताने विकत घेउन देतो,पण आज गाडीत होतो म्हणुन नाही देउ शकलो..................................हो मोठेपण सांगतोय्,आपण 'तो मुलगा खरचं भुकेला होता का?" ह्या विषयावर चर्चा करा. जय हींद!

In reply to by शानबा५१२

धमाल मुलगा 16/08/2010 - 18:57
शानबा, बाकीची दुनयादारी गेली तिच्यायला बारा गडगड्याच्या विहिरीत! तुझा दिल साफ आहे, तुला मनापासुन काहीतरी करण्याची प्रचंड इच्छा आहे, तुला जसं जमेल तसं तू करतोही आहेस, हे पाहुन खरंच फार बरं वाटलं. नोटा जमवायचं मशीन बनुन आणि खाज भागवायला कळफळकावरुन मोठी मोठी युध्दं करणार्‍या आणि जगाला अक्कल शिकवण्याच्या आविर्भावात हिंडणार्‍यांच्या समोर आज मला तू हिमालयाएव्हढा मोठा दिसलास. भिड भावा...आवडलं आपल्याला. एक मनापासुन सुचना: तुला खरंच काही असं काम करायचं असेल तर नक्की प्रभूमास्तरांशी संपर्क कर. तुझ्या ह्या भावनांना चॅनलाईझ फार योग्य रित्या करतील ते. :) (माझ्या ह्या प्रतिसादाचा अर्थ, तुझ्या ह्या कामांबद्दल माझ्या भावना व्यक्त करणे हा आहे. इतर प्रतिसादांबद्दल्/धाग्यांबद्दल कोणतेही प्रोत्साहन नाही.)

In reply to by धमाल मुलगा

धमाल बुश हा कितवा लादेन आता ? =)) =)) (आता धम्या खरड करुन सिरीयस होउन लै घाण घाण शिव्या घालणार हे नक्की !)

मदनबाण 16/08/2010 - 20:11
चांगली चर्चा चालू आहे... ;) एव्हढा मोठा बिग बजेट चित्रपट बनवणार्‍यांनी त्या गायकांचा खुप लवकर विचार केला...विचार कसला विचार ? ह्म्म्म. सध्या जे गाणं गाजतय... मेहेंगाई डायन खाये जात है...या गाण्याच्या मूळ गायकांना १,१०० रुपये दिले, एकुण गायक आहेत ११ म्हणजे प्रत्येकाला १०० रुं प्रत्येकी. जेव्ह्या या गरीब गायकानी बंड करुन असेच दुसरे टिका करणारे गाणे बनवले...मिडियामधे बोंबाबोंब झाल्यावर या गरीब गायकांना ६ लाख देण्यात आले. http://movies.rediff.com/report/2010/jul/13/peepli-live-singers-upset.htm आता दुसर्‍या गाण्यावरुन वाद चालु झाला आहे...

मिसळभोक्ता 17/08/2010 - 03:01
चित्रपट पाहिल्याशिवाय लिहू इच्छित नाही. पाहिल्यानंतर विरोध करण्याचे एक शस्त्र (म्हणजे बहिष्कार) ताबडतोब गळून पडलेले असेल. त्यामुळे विरोध करावासा वाटला, तर कसा करावा ? इतरांना पाहू नका म्हणून सांगायला आम्हाला अधिकार नाहीत. आम्ही लेनचेही पुस्तक वाचले. विद्वत्तापूर्ण आहे. महाराजांविषयी ३५० वर्षांनंतर मराठी जनतेला काय वाटते, ह्याबद्दल मेहनत घेतलेली स्पष्टच दिसते.

मी हा लेख वाचला नाही,वाचणारही नाही.पण ह्या लेखाला विरोध होत आहे हे कळल्यावर ह्यात काहीतरी आक्षेपार्ह असणार हे नक्की. Here,objection to the article is irrespective of whether the article has objectionable content,stupidity,lack of logic or not.

In reply to by शानबा५१२

Now you think that you ANSWERED me,right?
मी केवळ एक विधान केलं. ते तुम्हाला कसलं उत्तर वाटलं ते कळलं नाही. मुळात प्रश्न काय होता ते सांगाल का? कारण मी आधी लिहिल्याप्रमाणेच लेख वाचलेला नाही. पण तो लोकांनी वाचू नये यासाठी धागा काढावा का विचार करतो आहे.

In reply to by शानबा५१२

मी-सौरभ 19/08/2010 - 20:14
मी सगळे प्रतिसाद वाचले... त्यावरुन तुझ मन अति(ष की श)य साफ आहे असं जाणवत. फक्त हा धागा टाकण्याआधी थोडी माहिती मिळवली असतीस (विशेषतः ज्यानी हा पाहिलाय) तर बरं झाल असतं बाकी अजुन ५ बाकी आहेत :)

मदनबाण 16/08/2010 - 08:41
महाराष्ट्रातुन पीपली लाईव्हला विरोध होत आहे,जो मला देखील योग्य वाटतो. शेतकरी अनुदानातुन मिळणार्‍या पैसाच्या हव्यासापोटी आत्महत्या करतात हे या चित्रपटातुन प्रतित होते,जे पूर्णपणे चुकीचे आहे. इतक्या लाख शेतकर्‍यांनी आत्महत्या केली ते पैसे मिळावेत म्हणुन ? ही शेतकर्‍यांची आणि त्यांच्या अवस्थेची क्रूर चेष्टा वाटते. http://www.starmajha.com/NewDiscussionReply.aspx?ForumID=12895

ऋषिकेश 16/08/2010 - 08:50
चित्रपट पाहिलेला नाही त्यामुळे काहीच बोलु शकत नाहि. मात्र केवळ शेतकरी विरोध करताहेत म्हणून दुसरी बाजु समजून न घेता किंवा शेतकर्‍यांचा विरोध नक्की कशावर बेतलेला आहे? त्याचे कारण काय? हे ही माहीत नसताना मी निषेधही व्यक्त करू शकत नाही. कोणी चित्रपट बघितला आहे का? तो सांगेल का का विरोध आहे? वर मदनबाण म्हणतात तसे प्रतीत होते का?

In reply to by ऋषिकेश

मदनबाण 16/08/2010 - 08:59
ऋषिकेश मी सुद्धा हा चित्रपण अजुन पाहिला नाही...परंतु तरी देखील मला शेतकर्‍यांचीच बाजु घ्यावीशी वाटली कारण, लाखो शेतकर्‍यांच्या आत्महत्या या पैशाच्या प्रलोभनाने झालेल्या नाहीत... बाकी ज्यांनी चित्रपट पाहिला आहे त्यांनी यावर अधिक भाष्य करावे अशी अपेक्षा आहे.

In reply to by मदनबाण

ऋषिकेश 16/08/2010 - 09:45
चित्रपटाची बाजु घेण्याचा अजिबात प्रयत्न नाही, मात्र आताच लोकसत्तात एक बातमी वाचली त्यात आमिर खानने काही दृश्ये "उपहासात्मक" दृष्टीने चित्रीत केल्याचे म्हटले आहे. आता तो खरंच उपहास आहे का? का खरंच आक्षेपार्ह काही आहे हे तो चित्रपट बघितलेल्यांपैकी कोणी सांगितले तर कळेल असे वाटते. तोपर्यंत मी ना निषेध व्यक्त करू शकत ना पाठींबा देऊ शकत. याशिवाय एखाद्या शेतकर्‍याने हा मार्ग अवलंबला अशी "कथा" असेल तर तो सर्वसामान्य नियम होऊ शकत नाही. अपवादावरही चित्रपट बनतोच. फक्त तो अपवाद आहे हे चित्रपटातूनच प्रेक्षकांना कळलं पाहीजे ही अपेक्षा रास्त आहे.

In reply to by बेसनलाडू

बेला, तू चित्रपट पाहिला आहेस म्हणून तुला प्रश्न. चित्रपटाच्या नावावरून वाटत आहे की चित्रपट मुळात शेतकर्‍यांची आत्महत्या हा बॅकड्रॉप वापरून मिडीयाच्या सवंग*पणावर टीका करण्यासाठी बनवला असावा. तुझं चित्रपट पाहून काय मत झालं? *सदर विशेषण कोणीही मिपावाचक मिडीयावाल्याने व्यक्तीगत स्वतःवर ओढवून घेऊ नये ही विनंती.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

लिखाळ 16/08/2010 - 12:00
आज सकाळ मध्ये आलेले परिक्षण वाचनीय आहे. 'आपल्या कोडगेपणाच्या कानाखाली काढलेला आवाज'

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मृत्युन्जय 16/08/2010 - 12:27
बेलाला काय वाटले ते नाही माहिती पण चित्रपट त्यावरच आहे. इतर कोणाचे काही वेगळे मत झाले असल्यास त्याने ताबडतोब बिनोद अणि उपरोध समजुन घेण्यासाठी शिकवणी लावावी. अ‍ॅड टु इट राजकारण्यांचा बेमुर्वतखोरपणा, स्थानिक राजकारण्यांचे सामान्य जनतेच्या हिताबद्दलचे औदासिन्य, सामान्य जनतेच्या प्रश्नांवरुन केले जाणारे शह- काटशाहाचे राजकारण, केंद्र आणि राज्य सरकारांचे आपापसातले हेवेदावे, शासकीय नोकरशहांचा थंड आणि चीड आणणारा आलिप्तपणा आणि केवळ बाईट साठी चाललेली धडपड. हे सगळे आहे या चित्रपटात.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बेसनलाडू 16/08/2010 - 20:53
थोडक्यात सर्वमान्य मराठीत सांगायचे झाल्यास मिडियाची #$ली आहे :) (संक्षिप्त)बेसनलाडू पैशाच्या गरजेपायी आत्महत्येस प्रवृत्त होणे/केले जाणे, हा निव्वळ फार्स आहे. खरे तर चित्रपटातील मुख्यमंत्र्याच्या तोंडी असलेले "किसानों की आत्महत्या रोजमर्रा की बात है, महाराष्ट्र देखिये, आंध्र देखिये .." सारखे संवाद म्हणजे राजकारण्यांच्या कोडगेपणाचीही कमाल दाखवणारे आहेत. चित्रपटात राजकारणी, मिडिया यांच्या सवंगपणावर, निर्लज्जपणावरच टीका आहे. चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते किंवा संबंधित इतर कोणीही शेतकर्‍यांच्या मूलभूत प्रश्नाबद्दल उदासीन नि संवेदनाशून्य आहेत, असे मला वाटले नाही. मुळात असे काही आमिष दाखवून आत्महत्येसाठी प्रवृत्त केले जाणे हा फार्सच आहे, हे न कळण्याइतके आपल्यापैकी कोणीही बत्थड नसावेत, असे वाटते. पैशाच्या गरजेपायी अगदी आत्मघातकी अतिरेकी पथकांत सामील होणारी तरुणाई असताना त्यांच्याबद्दल जर आपण चुकचुकण्यापलीकडे काही करू शकत नसू, तर शेतकर्‍यांच्या समस्येवरील फार्सबद्दल अतिसंवेदनाशील असण्यात काय हशील? (असे विचारण्यात कोणतीही एक समस्या कमी/अधिक महत्त्वाची, नैतिकता-अनैतिकता हे मुद्दे विचारात घेतलेले नाहीत. दोन्ही समस्या या समस्याच आहेत, नि सारख्याच स्वरूपाच्या आहेत, इतके साधे गृहीतक आहे) (संवेदनाशील)बेसनलाडू चित्रपटाच्या शेवटी तर शेतकरी आणि शेतमजुरांचे आडव्यातिडव्या फोफावत चाललेल्या शहरांकडे बांधकाम मजूर म्हणून होणारे स्थलांतर दाखवून त्याही समस्येला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. चित्रपट बारकाईने पाहणार्‍यांच्या नजरेतून नि डोक्यातून ही बाब सुटायला नको. (निरीक्षक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

ऋषिकेश 16/08/2010 - 10:14
तेच तर माहीत नाही ना! सगळा हवेत गोळीबार चाललाय ;) बाकी, जर तु चित्रपटपाहिला आहेस तर प्रश्न असा की "असं कोणत तरी दृश्य आहे का जे शेतकर्‍यांच्या सत्य परिस्थितीशी फारकत घेणारं किंवा शेतकर्‍यांची प्रतिमा मलीन करणारं आहे?"

In reply to by ऋषिकेश

सहज 16/08/2010 - 10:22
आता हिंदी सिनेमात भ्रष्ट पोलीस, जज्ज, सैनिकी अधिकारी दाखवतात तर सगळे (पोलीस, जज्ज, सैनिकी अधिकारी ) तसेच असतात अशी टिका करुन ते सिनेमे बंद पाडण्यात आले आहेत का? असल्यास प्रथेप्रमाणे शानबांचे ठीक वाटते. नसल्यास भले पैशासाठी जीवही देणारे लाचार (बिचारे मजबूर?? अश्या अर्थाने) शेतकरी अश्या काही व्यक्तिरेखा कथेच्या दृष्टिने दाखवल्या गेल्या असतील तर नेमके काय चुकीचे? का आजकाल मेडीयासमोर आपल्या संघटनेचे प्रदर्शन करायला कुठल्या न कुठल्या सिनेमातील एक शब्द, दृश्य वापरायचा पायंडा पडला आहे? आणि हो, पीपली लाइव्ह बघीतला नाही आहे. सेन्सॉर बोर्डचे सर्टीफिकेट पास होउनच चित्रपट प्रदर्शीत झाला आहे ना?

गंगाधर मुटे 16/08/2010 - 10:28
पैशाच्या मोहापायी शेतकरी आत्महत्या करतो, असा आभास निर्माण करणारा चित्रपट, त्यावर टाळ्या वाजवणारे प्रेक्षक आणि यात गैर काय असे वाटून घेणारा समाज..........!! काय बोलणार.....................????????????????????????????? ( विकृत,बधिर, नपुसंक,षंढ वगैरे शब्द जुने झालेत. नविन परीणामकारक शब्दांची निर्मिती होऊन योग्य शब्द मिळेपर्यंत न बोललेच बरे......... हम्म्म.)

In reply to by गंगाधर मुटे

मृत्युन्जय 16/08/2010 - 12:02
तुम्ही बोलु नये हेच खरे. समाजात एक असंतुष्ट वर्ग असतो जो सतत कशा ना कशावर टीका करत असतो. एकुण दृष्टीकोन नैराश्यावादी असतो. आपण तसे असाल तर ठीकच आहे. अन्यथा चित्रपट पाहिलेला नसतान असली जहरी टीका करण्याचा आपला अधिकार आहे असे वाटत नाही. आणि आपण चित्रपट बघितला असेल तर आपल्याला कलेची जाण नाही किंवा विनोद, उपरोध आणि उपहास आपल्याला कळतच नाही असे नाइलाजाने म्हणावे लागेल.

In reply to by गंगाधर मुटे

बेसनलाडू 16/08/2010 - 20:58
गरजेपायी! (गरजू)बेसनलाडू कोणत्याही गंभीर स्वरूपाच्या प्रश्नावर आपले विचार, भावना मांडण्यासाठी तितकाच किंवा त्यापेक्षा गंभीर मार्ग अवलंबायचा की काहीशा उपहासात्मक शैलीत ते व्यक्त करायचे, याचा विचार कलाकारावर सोडायला नको काय? (कलाकार)बेसनलाडू टाळ्या वाजवणार्‍या प्रेक्षकांकडून मिळणारी दाद ही या समस्येला वाचा फोडण्याच्या प्रयत्नाला मिळालेली पावती का समजू नये? यात काय गैर आहे, हे जाणून घ्यायची इच्छा आहे. (जिज्ञासू)बेसनलाडू

भारतीय 16/08/2010 - 10:56
चित्रपट बघितल्याशिवाय प्रतिक्रिया कशी देणार ? शानबा ५१२, तुमच्या या धाग्याने चित्रपटाची नकरात्मक का होईना पण प्रसिद्धि होईलच ना? ( नव्हे, ती झालीच आहे, मला हा चित्रपट पहाण्याची फार अशी ईच्छा नव्हती, पण आता वाटतेय कि काय आक्षेपार्ह आहे हे शोधण्यासाठी हा चित्रपट पहावा) सध्या ऋषीकेश यांच्याशी सहमत! ना पाठींबा देऊ शकत, ना विरोध करू शकत. (कुणी पाहू नये असे वाटतच असेल तर चित्रपटात काय आक्षेपार्ह आहे ते कृपया सांगावे)

विसुनाना 16/08/2010 - 11:23
'अती झालं अन हसू आलं' अशी मराठीत जुनी म्हण आहे. भारतातील शेतकर्‍याची (आणि इतर अनेक हातावर पोटे असलेल्या व्यक्तीसमूहांची) परिस्थिती 'अशी' कारुण्यमय हास्यास्पद झालेली आहे हे तर दिग्दर्शकाला दाखवायचे नसेल? पहायला हवा एकदा.

मी हा चित्रपट पाहीला नाही,पाहणारही नाही.पण ह्या चित्रपटाला विरोध होत आहे हे कळल्यावर ह्यात काहीतरी आक्षेपार्ह असणार हे नक्की.
श्री. शानबा, मागच्यावेळी देखील आपण शिवाजीराजांवरील पुस्तक न वाचताच त्या नावाने खडे फोडणारा एक धागा चालु केला होतात. (त्यावेळी देखील त्याच विषयावरचा एक धागा चालु होताच) तुम्ही जर हा चित्रपट बघितला नाहियेत तर त्या विषयी चांगले अथवा वाईट मत तुम्ही नोंदवुच कसे शकता ? आणि लोकांच्या बोलण्यावरुन तुम्ही स्वतःचे मत बनवलेले असेल तर ते अगदी अधिकारवाणीने धागा काढुन इथे सांगत बसायची गरजच काय ? संपादक याची योग्य ती दखल घेतील काय ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

तुम्ही जर हा चित्रपट बघितला नाहियेत तर त्या विषयी चांगले अथवा वाईट मत तुम्ही नोंदवुच कसे शकता ? हेच म्हणतो.

मृत्युन्जय 16/08/2010 - 11:57
मला खरेच खुप हसु येते आहे. एकानेही चित्रपट बघितलेला नाही आहे आणि सगळेजण टीका करत आहेत. मुळात हा चित्रपट हपापलेल्या आणि स्वार्थी शेतकर्‍यांवर नाही. मीडियाच्या सवंगपणावर आणि राजकारण्यांच्या संधीसाधूपणावर या चित्रपटामध्ये खुशखुशीत टीका केली आहे. आणि या सर्वाला पार्श्वभुमी आहे गळ्यापर्यंत कर्जात बुडलेल्या एका शेतकरी कुटुंबाची. यातील शेतकरी अनुदान मिळणार म्हणुन आत्महत्या करायला तयार होतो. संपुर्ण चित्रपट विनोदी अंगाने जातो तरी या संपुर्ण प्रकाराला राजकारण्यांचे शेतकर्‍यांच्या हिताबद्दल असलेले कमालीचे औदासिन्य, आपापसातील राजकारण, ब्युरोक्रॅट्सचा आलिप्तपणा, शेतकर्‍याची दारूण विफलता आणि दारिद्रयातुन आलेले नैराश्य आणि यातुन आत्महत्येचा टोकाचा निर्णय (तोसुद्धा स्थानिक राजकारण्यांच्या निर्लज्ज सल्ल्यातुन उद्भवलेला) या सगळ्या गोष्टी दारूण छेद देऊन जातात. आमीर खानने हा संपुर्ण विषय कमालेच्या संयततेने हाताळला आहे. मस्करीची त्याने कुस्करी होऊ दिलेली नाही आहे. आणि मुळात शेतकरी पैसे कमावण्यासाठी आत्महत्या करतो असा सुरच नाही आहे चित्रपटात. सूर असा आहे की शेतकर्‍यांना असे वाटत असते की असे जिणे जगण्यापेक्षा आत्महत्या बरी किमान अनुदान मिळाले तर बायकामुलांचे आयुष्य सुखात जाइल. टीका करण्यापुर्वी लोकांनी किमान चित्रपट बघणे अपेक्षित होते

In reply to by मृत्युन्जय

नीधप 16/08/2010 - 12:10
सूर असा आहे की शेतकर्‍यांना असे वाटत असते की असे जिणे जगण्यापेक्षा आत्महत्या बरी किमान अनुदान मिळाले तर बायकामुलांचे आयुष्य सुखात जाइल. दुर्दैव आणि दैन्यापोटी आलेल्या कमालीच्या निराशेतून येणारा हा सूर गाभ्रीचा पाऊसमधेही होताच की. चित्रपट न बघता निषेध करत रहाणारे आणि नाटक न बघता केवळ नाटकाच्या नावात देवाचं नाव आहे म्हणून येऊन काळे बिळे फासणारे एकाच धर्तीचे. बाकी पब्लिसिटी व्हावी म्हणून हा घडवून आणलेला स्टंटही असू शकतो.

In reply to by मृत्युन्जय

१००% सहमत. चित्रपट न पाहता लोक त्यावर टीका का करत आहेत? आणि पाहिल्यावरसुद्धा टीका करत असतील तर त्यांनी तू म्हणत आहेस त्याप्रमाणे विनोद आणि उपरोध ह्यातील फरक शिकण्यासाठी शिकवणी लावावी. काहीही न वाचता न पाहता त्यावर टीका करणे ही फॅशन झाली आहे आणि ही मानसिकता वाईट आहे.

विदर्भाचा शेतकरी आळशी आहे असे श्री विलास राव म्हणाल्यावर हि संतापाची लाट उसळली होति.... असहाय्य वेदनेवर हसणे सुसंस्कृत पणाचे लक्षण नाहि....खानाचा कोथळा बाहेर काढा...

In reply to by अविनाशकुलकर्णी

अनाम 16/08/2010 - 12:57
....खानाचा कोथळा बाहेर काढा...
वा वा वा कसले जाज्वल्य विचार आहेत हो तुमचे. जरा तुमच्या चरणकमलांचा फोटु पाठवा राव. चित्रपटा बद्दल नो कमेंट कारण तो अजुन पाहिला नाही. १-२ महिन्यात बरी प्रिंट येईलच नेटावर तोवर धीर धरु. कारण फुकट ते पौष्टीक अस भाईकाकांनी सांगुन ठेवलेल आहेच.

In reply to by अनाम

वा वा वा कसले जाज्वल्य विचार आहेत हो तुमचे. जरा तुमच्या चरणकमलांचा फोटु पाठवा राव.
अनामभाऊ, उपरोध सर्व लोकांना कळतोच असं नाही. तेव्हा खानाचा कोथळा काढा या विधानाला तुमचा खरंच पाठिंबा आहे असं काहींना वाटू शकेल. :) मी त्या विधानाचा स्पष्ट निषेध करतो...

In reply to by राजेश घासकडवी

अनाम 17/08/2010 - 14:37
गुर्जी तुमच्या सारख्या समजदार लोकांसाठीच ते वाक्य आहे. ज्यांना त्यातली 'खोच' कळली नाही त्यांची पर्वा आहे कुणाला. :)

शानबा५१२ 16/08/2010 - 18:48
now no मस्करी! मी आधीच लिहल आहे, मी हा चित्रपट पाहीला नाही,पाहणारही नाही.पण ह्या चित्रपटाला विरोध होत आहे हे कळल्यावर ह्यात काहीतरी आक्षेपार्ह असणार हे नक्की. Here,objection to the film is irrespective of whether the film has objectionable content,story,dialogue or not. म्हणजे माझा विरोध आहे कारण शेतक-यांना त्या चित्रपटात काहीतरी चुकीचे वाटत आहे.मी चित्रपट जरी पाहीला व मला आक्षेपार्ह अस काहीच नाही वाटल्,तरी मी शेतक-यांनाच पाठींबा देईन.जर त्यांना वाटल की आपल्या भावना दुखावल्या गेल्यात तर तसच आहे अस म्हणेन. आता वरच्या प्रतिसादांना काही श्रेणी पाडुन उत्तरे देतो. १) ज्यांनी चित्रपट पाहीला आहे व त्यांना आक्षेप घेण्यासारख काहीच वाटल नाही ते. आपण आपले मत बनवलत,पण जर शेतकरी जो विरोध करत तो चुकीचा आहे अस आपल मत आहे का? हो तर मग तुम्ही काय म्हणता त्यांनी हा विरोध करु नये? जर शेतक-यांना आक्षेप आहे तर मलाही शेतक-यांना पाठींबा दर्शवायला आवडेल अस वाटत का? २) चित्रपट पाहीला आहे व आक्षेपही आहे? फक्त आणि फक्त शेतक-यांना पाठींबा मिळावा म्हणुन तरी आपण आक्षेप घेउया. ३) चित्रपट पाहीला नाही म्हणुन ना विरोध करणारे ना पाठींबा दर्शवणारे. अहो केलात विरोध,पोहचला शेतक-यांबद्दल आपला विचार(though not possible practically) तर त्यांना नाही का बरं वाटणार? ४) आमच्यासारखे ज्यांनी चित्रपट पाहीली नाही पण आपली अक्कल गहाण ठेउन शेतक-यांना पाठींबा देणारे. अहो गरज आहे त्या हतबल झालेल्या लोकांना! विषयांतर : हा माणुस(?) काय लिहतोय्,उगाच टाईमपास करायचा म्हणु लिहतोय.अस जर तुम्हाला वाटत असेल तर हे चुक आहे.मला काहीतरी वाटतच. #%#%#% #$%#$% #$%^ $# (*&^* अस कायतरी बोलतात ना,म्हणजे 'करत काही नाही नुसता ओरडत असतो' हे मला लागु होत नाही.माझी स्वःताची ऐपत नाही म्हणुन मी आज फक्त बोलुच शकतो.जे आहे ते सर्व बापाचं.घर,पैसा,बिजनेस,माझा मार्केटमधला पैसा सर्व बापाचं.पण जेव्हा स्वःताच्या पायावर उभा राहीन(आताही आहे,पण पैसा जमवतोय) तेव्हा कमीतकमी एकतरी शेतक-याच्या घरतलं लग्न व एखाद्या मुलाचा खर्च करीन हे निश्चित! फक्त तोंडातुन हवा सोडत नाहीये.एका गरीबाच्या मुलीला शिक्षणासाठी दत्तक घेणार होतो पण माझी वर सांगितल्याप्रमाणे ऐपत नाही,वरुन लग्नही झाल नाही.पण जेव्हाही त्या मुलीला,तिच्या वडीलांना भेटतो तेव्हा एखादी निळी कींवा हीरवी नोट हातावर टेकावतोच.तेवढीच खर्चाला मदत व्हावी तिच्या घराला ही भावना."पढाई करना हां बेटा!" अस सांगतो.ती पोरही कधीकधी शाळेत काय शिकवल ते उस्तुकतेने सांगते,तेव्हा बरं वाटत. सांगायचा उद्देश हाच की मदत करा.रडणा-याला हसवा.काम करायच,पैसा कमवायचा,थोडा खर्चायचा, थोडा बँकेत टाकायचा,आणि एखादे दीवशी मरुन जायच अस जीवन जंतुही जगतो. मुलं पण आपलचं अनुकरण करणार. शेतक-यांना काहीच मदत करु शकत नाही पण 'भले त्या चित्रपटाला फायदा मिळाला' तरी मी विरोध दर्शवणारच.माझी विचार करायची शक्ती मला त्यात गैर आहे की नाही ह्याचा विचार करायला नाही वापरायची.आपण वापरा आणि आपले जीवन जगत रहा,तुम्हाला तुमच्या १००% स्वार्थी जीवनात सर्व काही मिळो ह्यासाठी हार्दीक शुभेच्छा! UPDATE : नोकरी मिळाली उद्यापासुन नवीन काम सुरु!......मी आज ह्याबद्दल पोटाला हात लावुन "भुक लगी है" म्हणणा-याला ३० रुपये काढुन दीले.मी स्वःता हाताने विकत घेउन देतो,पण आज गाडीत होतो म्हणुन नाही देउ शकलो..................................हो मोठेपण सांगतोय्,आपण 'तो मुलगा खरचं भुकेला होता का?" ह्या विषयावर चर्चा करा. जय हींद!

In reply to by शानबा५१२

धमाल मुलगा 16/08/2010 - 18:57
शानबा, बाकीची दुनयादारी गेली तिच्यायला बारा गडगड्याच्या विहिरीत! तुझा दिल साफ आहे, तुला मनापासुन काहीतरी करण्याची प्रचंड इच्छा आहे, तुला जसं जमेल तसं तू करतोही आहेस, हे पाहुन खरंच फार बरं वाटलं. नोटा जमवायचं मशीन बनुन आणि खाज भागवायला कळफळकावरुन मोठी मोठी युध्दं करणार्‍या आणि जगाला अक्कल शिकवण्याच्या आविर्भावात हिंडणार्‍यांच्या समोर आज मला तू हिमालयाएव्हढा मोठा दिसलास. भिड भावा...आवडलं आपल्याला. एक मनापासुन सुचना: तुला खरंच काही असं काम करायचं असेल तर नक्की प्रभूमास्तरांशी संपर्क कर. तुझ्या ह्या भावनांना चॅनलाईझ फार योग्य रित्या करतील ते. :) (माझ्या ह्या प्रतिसादाचा अर्थ, तुझ्या ह्या कामांबद्दल माझ्या भावना व्यक्त करणे हा आहे. इतर प्रतिसादांबद्दल्/धाग्यांबद्दल कोणतेही प्रोत्साहन नाही.)

In reply to by धमाल मुलगा

धमाल बुश हा कितवा लादेन आता ? =)) =)) (आता धम्या खरड करुन सिरीयस होउन लै घाण घाण शिव्या घालणार हे नक्की !)

मदनबाण 16/08/2010 - 20:11
चांगली चर्चा चालू आहे... ;) एव्हढा मोठा बिग बजेट चित्रपट बनवणार्‍यांनी त्या गायकांचा खुप लवकर विचार केला...विचार कसला विचार ? ह्म्म्म. सध्या जे गाणं गाजतय... मेहेंगाई डायन खाये जात है...या गाण्याच्या मूळ गायकांना १,१०० रुपये दिले, एकुण गायक आहेत ११ म्हणजे प्रत्येकाला १०० रुं प्रत्येकी. जेव्ह्या या गरीब गायकानी बंड करुन असेच दुसरे टिका करणारे गाणे बनवले...मिडियामधे बोंबाबोंब झाल्यावर या गरीब गायकांना ६ लाख देण्यात आले. http://movies.rediff.com/report/2010/jul/13/peepli-live-singers-upset.htm आता दुसर्‍या गाण्यावरुन वाद चालु झाला आहे...

मिसळभोक्ता 17/08/2010 - 03:01
चित्रपट पाहिल्याशिवाय लिहू इच्छित नाही. पाहिल्यानंतर विरोध करण्याचे एक शस्त्र (म्हणजे बहिष्कार) ताबडतोब गळून पडलेले असेल. त्यामुळे विरोध करावासा वाटला, तर कसा करावा ? इतरांना पाहू नका म्हणून सांगायला आम्हाला अधिकार नाहीत. आम्ही लेनचेही पुस्तक वाचले. विद्वत्तापूर्ण आहे. महाराजांविषयी ३५० वर्षांनंतर मराठी जनतेला काय वाटते, ह्याबद्दल मेहनत घेतलेली स्पष्टच दिसते.

मी हा लेख वाचला नाही,वाचणारही नाही.पण ह्या लेखाला विरोध होत आहे हे कळल्यावर ह्यात काहीतरी आक्षेपार्ह असणार हे नक्की. Here,objection to the article is irrespective of whether the article has objectionable content,stupidity,lack of logic or not.

In reply to by शानबा५१२

Now you think that you ANSWERED me,right?
मी केवळ एक विधान केलं. ते तुम्हाला कसलं उत्तर वाटलं ते कळलं नाही. मुळात प्रश्न काय होता ते सांगाल का? कारण मी आधी लिहिल्याप्रमाणेच लेख वाचलेला नाही. पण तो लोकांनी वाचू नये यासाठी धागा काढावा का विचार करतो आहे.
मी हा चित्रपट पाहीला नाही,पाहणारही नाही.पण ह्या चित्रपटाला विरोध होत आहे हे कळल्यावर ह्यात काहीतरी आक्षेपार्ह असणार हे नक्की.महाराष्ट्रातला शेतकरी ज्याचा विरोध करतो,त्या चित्रपटाला मराठीच लोक कुरवाळत बसले आहेत,ह्यावरुन महाराष्ट्राला तोडणे का सोपे झाले आहे हे समजले.मी 'त्या' धाग्यवर हा प्रतिसाद दीला..........
विषयांतर : ह्या चित्रपटाला महाराष्ट्रात 'शेतकरी' भागांत खुप विरोध होत असताना,त्या भिकार चित्रपटाच ईथे कौतुक का केल जातय??? आपल्याला हे माहीती असुनही आपण चित्रपट पाहीलात व हे लिहलेत असे असेल तर मी आपलाही,अगदी मनापासुन निषेध करतो........शेतक-यासाठी आपण काय करतोय हा एकच प्रश्न स

interview ला जाणार आहे,सल्ले हवेत.

शानबा५१२ ·

टेक्निकल राउअंड क्रॅक केली असशील तर जनरल प्रश्न विचारतील. व्हेअर डू यु सी युवरसेल्फ आफ्टर फाईव्ह इयर्स ? ( मी एकदा या प्रश्नाला 'इन सम अदर बेटर कंपनी' असे उत्तर दिले होते. अर्थात त्या जॉबची गरज नसेल तरच असा माज करावा.) किंवा व्हाय यू वॉन्ट टू लीव्ह युवर करन्ट जॉब ? व्हाय यु वॉन्ट टू जॉईन धिस कम्पनी असले फालतू प्रश्न विचारतात. दुसर्‍याला त्रास देणं हे एकच काम एचआर चे लोक करु शकतात. या असल्या प्रश्नांची तयारी करु नये. ऐनवेळेला जे सुचेल ते उत्तर द्यावे असे माझे मत आहे. - एका भंपक एमएनसीचा एम्प्लॉयी

In reply to by अप्पा जोगळेकर

शानबा५१२ 15/08/2010 - 11:29
मी दुस-या window मधे /THIN LAYER C. /Liquid C. /Ion C. /Mass Spectroscopy /GC MS /HPLC /UHPLC /WORKING/PRINCIPLE /COLUMN/DETAILS FOR VARIOUS C. SYSTEMS ह्याची तयारी करत आहे,म्हणुन बोललो ईतर बाबतीत ईथे काहीतरी सल्ले मिळतील,पण नाही,ह्या लोकांना,मी करतो तशी,ईतरांना मदत करायची सवयच नाही!

Pain 15/08/2010 - 12:02
ह्याची तयारी करत आहे,म्हणुन बोललो ईतर बाबतीत ईथे काहीतरी सल्ले मिळतील,पण नाही,ह्या लोकांना,मी करतो तशी,ईतरांना मदत करायची सवयच नाही! इथे कोणी रसायनशास्त्राचाचा तज्ञ नसेल अशी प्राथमिक शक्यता तुम्ही विचारात घेतलेली दिसत नाही. घाईने निष्कर्ष काढून मोकळे झालात.

In reply to by Pain

शानबा५१२ 15/08/2010 - 12:07
सरजी,मला रसायनशास्त्राचे प्रश्न विचारयची पाळी आता तरी येत नाही. मला 'कोणते personal प्रश्न विचारले जातील्,अपेक्षित उत्तर काय असावे' हे विचारायचे आहे. जस पगाराबद्दल विचारल तर् नक्की काय बोलयचं वगैरे.............नेटवर फार रद्दड उत्तरे दीली आहेत.

In reply to by शानबा५१२

Pain 15/08/2010 - 12:39
मी दुस-या window मधे /THIN LAYER C. /Liquid C. /Ion C. /Mass Spectroscopy /GC MS /HPLC /UHPLC /WORKING/PRINCIPLE /COLUMN/DETAILS FOR VARIOUS C. SYSTEMS ह्याची तयारी करत आहे,म्हणुन बोललो यामुळे गैरसमज होतो. पर्सनल इंटरव्हूवर इंटरनेटवर पुष्कळ माहिती उपलब्ध आहे.

चावटमेला 15/08/2010 - 13:09
माझ्या मते पर्सनल interview हाच मूळात एक भंपक प्रकार आहे. HR लोक वर सांगितल्याप्रमाणे काही फालतू प्रश्न विचारतात आणि बोअर करत बसतात. ह्या interview चा मुख्य आणि एकमात्र उद्देश हा तुम्हाला कमीत कमी पगार ऑफर करुन पटविणे असते. बाकीच्या प्रश्नांची काही एक तयारी करायची आवश्यकता नाही. मी तर म्हणेन जशी सुचतील तशी उत्तरे द्या, नंतर त्या HR ला त्या interview मधील तुम्ही सांगितलेल्या पगाराच्या अपेक्षित आकड्याशिवाय एक शब्दही लक्षात राहणार नाही. पगाराचा आकडा तुमच्या अपेक्षेपेक्षा अंमळ जास्तच सांगा म्हणजे व्यवस्थित negotiate करता येईल. तुम्हाला job ची कितीही गरज असली तरी आपल्याला मुळीच गरज नाही असे भासवावे (नाहीतर HR लोक exploit करायला तयारच असतात) interview साठी हार्दिक शुभेच्छा, job मिळाल्यानंतर पार्टी द्यायला विसरु नका राव :) (१५ interviews चा अनुभव पाठीशी असलेला) चावटमेला

वेताळ 15/08/2010 - 13:21
बेंगलोर एन्फोसिस मधील एचाअर मॅनेजर ने आपल्या बायकोचा सुपारी देऊन खुन घडवुन आणला. interview घेताना मानसिक संतुलन किती वाईट होते ह्याचे हे एक उदाहरण. तेव्हा interview देताना संभाळुन जा बाबा. आमच्या शुभेच्छा तुला.

सुहास.. 15/08/2010 - 17:15
मी बरेच दिवसात असा ईन्टर-व्ह्यु(मास्तरांची आठवण झाली.) दिला नाही , आमचे सहसा टेलिफोनिकच होतात, पहिले एच.आर, मग ईन्टरनल लिड.क्लाईंट आनी सरतेशेवटी एच-आर स्क्रिनींग, आणी फायनल म्हणजे पगार ठरविण्यासाठी ...आजकाल 'व्हिडीयो रेझ्युमे'ची सोय झाल्याने थोबाडाचे आधीच दर्शन होते. असो ... काही टिप्स १) शक्यतो जास्त स्टायलिश कपडे घालु नयेत. (मेन्स कॅरी कॉन्फिडन्स नॉट द क्लोथ्स ..जॉन अब्राहमच ऊदाहरण घ्या ..तो केवळ ,दोनच कलर,ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट, घालुन देखील,ईम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी कमी पडु देत नाही..बाकी ज्याची त्याची आवड !! ) २)पॅनल (एका पेक्षा जास्त लोक्स ) असेल तर, सर्वांना प्रश्न विचारण्याची संधी द्यावी.पॅनल मुद्दामुन कन्फुज करण्यासाठी असतो..एकाच्या प्रश्नाचे ऊत्तर संपविण्याआधीच दुसरा प्रश्न विचारतो अश्या वेळेस,दुसर्‍याला आदराने विनंती करावी की मला पहिल्या प्रश्नाचे ऊत्तर देऊ द्यात, मग ऊत्तर संपले की दुसर्‍याकडे वळावे , प्रश्न लक्षात असेल तर ठीक ,नसेल तर पुन्हा विचारून घ्यावे ... हॅप्पी ईन्टरव्ह्यु !! बेस्ट ऑफ लक !! अवांतर : गुगलवर अश्या बाबतीत भरपुर मटेरियल असताना, ईथे धागा टाकण्याची गरज नव्हती ..बट व्हाटेव्हर

In reply to by सुहास..

शानबा५१२ 15/08/2010 - 18:28
हो ह्या आधीच्या नोकरीसाठी जो ई. दीला त्यापुर्वी तेच नेटवरचे लेख वाचले होते.वाचण्याअधी बरा होतो,वाचल्यानंतर चेहरा कोमजुन गेला,कारण 'पगार' ह्या विषयावर दोन परस्परविरोधी लेख लिहले होते मी कमी वेळ असल्याने जास्त शोध घेत बसलो नव्हतो.आणी तसाच भांबावल्यासारखा चेहरा घेउन ई. ला गेलो. अधिक माहीती : त्या नोकरीला आम्ही एका महीन्यात फुटबॉल बनवल.

स्मृती 15/08/2010 - 18:12
हाहाहाहा.. इंटरव्ह्यूला उत्तर कसे देऊ नये.. एक किस्सा.. कोणे एके काळी एक मुलगी एच डी एफ सी नामक बँकेत इंटरव्ह्युसाठी गेली.. तीन जण होते.. मुलाखत उत्तम चालली होती.. आपली नोकरी इथे पक्की आहे हे तिच्यासारख्या नवख्या मुलीलाही जाणवलं... शेवटी एच आर वाल्याने विचारलं... तुला दोन वर्षांनी आमच्यापेक्षा मोठ्या बँकेने मोठ्या पगाराची नोकरी दिली तर तू काय करशील? ती म्हणाली.. तुला पुढच्या महिन्यात chase manhattan बँकेने ऑफर दिली तर तू काय करशील.. आणि अचानक कॅबीन मध्ये ओक्वर्ड शांतता पसरली.. पुढच्याच क्षणी तिला, आपल्याला ही नोकरी मिळणार नसल्याचंही कळून चुकलं... आणि झालंही तसंच.... तर तात्पर्य हे की इंटरव्ह्यूला पर्सनल प्रश्नांची खरी उत्तरं जरूर द्यावीत; पण त्यांना आवडतील अशा भाषेत! :)

In reply to by मिसळभोक्ता

सहज 18/08/2010 - 07:17
खरे आहे. काही चुकले नव्हते त्या प्रतीप्रश्नात. संभाव्य उत्तरे १) जॉब सोडण्याबद्दल कॉन्ट्रॅक्ट मधे काय लिहले आहे? त्या अटींचे पालन करीन. २) दोन वर्षांनी मला मोठी बँक जॉब ऑफर करेल हा विश्वास माझ्यावर दाखवल्याबद्दल धन्यवाद. माझा एक प्रश्न हा आहे की चांगली संधी मिळेल तर मी जाउ नये म्हणून / टॅलेंट रिटेन करण्याकरता एच आरची नक्की काय पॉलिसी आहे? :-) समांतर अवांतर - अ‍ॅरेंज्ड मॅरेजमधे, सुरवातीला मुले - मुली (त्यांचे पालक) एकमेकांना भेटून प्रश्न विचारतात त्यात असे प्रश्न व अशीच सडेतोड उत्तरे यांची देवाण घेवाण झाली पाहीजे. अश्या प्रश्नोत्तरांचा एक धागा निघाला पाहीजे. ज्यांचे अ‍ॅरेंज्ड मॅरेज झाले आहे / हे अश्या 'कांदेपोहे कार्यक्रमात' सहभागी झाले आहेत, कृपया त्यांनी अनुभव / अफलातुन विचारलेले प्रश्न लिहा. आपण त्याला मस्त उत्तरे शोधु. भावी पिढीला उपयुक्त दस्ताऐवज बनवुया. :-)

In reply to by सहज

अर्धवट 18/08/2010 - 08:08
अबे असल्या बेभरवशाच्या डॉक्युमेंटेशनमधे वेळ घालवण्यापेक्षा अ‍ॅरेंज मॅरेज कसं करावंच लागणार नाही याच्या प्रयत्नात वेळ घालवा की रे..

In reply to by अर्धवट

नगरीनिरंजन 18/08/2010 - 08:29
आपल्या प्रतिसादात अ‍ॅरेंज हा शब्द अनावश्यक असल्याचा बहुतेक विवाहेच्चुक (सहजरावांकडून साभार उधार) लोकांचा दावा असण्याची शक्यता आहे.

पाषाणभेद 15/08/2010 - 19:28
इंटरव्ह्यू घेणे हे ही एक शास्त्र आहे हे आताशा कधीच समजले जात नाही. रिझ्युमीत नसलेल्या टॉपीकवर हमखास प्रश्न विचारतात. बाकी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा. यश मिळो अन नोकरी लागो.

प्रियाली 18/08/2010 - 05:02
हे व्हेअर डू यू सी युवरसेल्फ आफ्टर फाईव इयर्सचं गणित कसं केलं जातं? म्हणजे पाचच का? सर्व एचआरवाले हटकून पाचचाच आकडा का घेतात? पाच वर्षांआधी मनुष्य झटपट वर (वर म्हणजे वरच्या हुद्यावर.. स्वर्गवासी हा वरचा हुद्दा मानू नये) जाऊ शकत नाही याची खात्री त्यांना का वाटते? काहीजण व्हेअर डू यू सी युवरसेल्फ इन फाईव इयर्स असे विचारतात. त्यांच्या मनात नेमके कोणते गणित केलेले असते? माझ्या मनात अशा प्रश्नांना वाईटसाईट उत्तरे देण्याचे खूप मनात येते. १. आय डोन्ट लाइक गेसिंग गेम्स २. आय विल बी राईट हियर आफ्टर फाईव्ह इयर्स; व्हॉट अबाऊट यू अँड धिस ऑर्गनायझेशन? ३. राईट हिअर! सेलेब्रेटींग द फिफ्थ अ‍ॅनिवर्सरी ऑफ यू आस्किंग मी धिस स्टुपिड क्वेश्चन

टेक्निकल राउअंड क्रॅक केली असशील तर जनरल प्रश्न विचारतील. व्हेअर डू यु सी युवरसेल्फ आफ्टर फाईव्ह इयर्स ? ( मी एकदा या प्रश्नाला 'इन सम अदर बेटर कंपनी' असे उत्तर दिले होते. अर्थात त्या जॉबची गरज नसेल तरच असा माज करावा.) किंवा व्हाय यू वॉन्ट टू लीव्ह युवर करन्ट जॉब ? व्हाय यु वॉन्ट टू जॉईन धिस कम्पनी असले फालतू प्रश्न विचारतात. दुसर्‍याला त्रास देणं हे एकच काम एचआर चे लोक करु शकतात. या असल्या प्रश्नांची तयारी करु नये. ऐनवेळेला जे सुचेल ते उत्तर द्यावे असे माझे मत आहे. - एका भंपक एमएनसीचा एम्प्लॉयी

In reply to by अप्पा जोगळेकर

शानबा५१२ 15/08/2010 - 11:29
मी दुस-या window मधे /THIN LAYER C. /Liquid C. /Ion C. /Mass Spectroscopy /GC MS /HPLC /UHPLC /WORKING/PRINCIPLE /COLUMN/DETAILS FOR VARIOUS C. SYSTEMS ह्याची तयारी करत आहे,म्हणुन बोललो ईतर बाबतीत ईथे काहीतरी सल्ले मिळतील,पण नाही,ह्या लोकांना,मी करतो तशी,ईतरांना मदत करायची सवयच नाही!

Pain 15/08/2010 - 12:02
ह्याची तयारी करत आहे,म्हणुन बोललो ईतर बाबतीत ईथे काहीतरी सल्ले मिळतील,पण नाही,ह्या लोकांना,मी करतो तशी,ईतरांना मदत करायची सवयच नाही! इथे कोणी रसायनशास्त्राचाचा तज्ञ नसेल अशी प्राथमिक शक्यता तुम्ही विचारात घेतलेली दिसत नाही. घाईने निष्कर्ष काढून मोकळे झालात.

In reply to by Pain

शानबा५१२ 15/08/2010 - 12:07
सरजी,मला रसायनशास्त्राचे प्रश्न विचारयची पाळी आता तरी येत नाही. मला 'कोणते personal प्रश्न विचारले जातील्,अपेक्षित उत्तर काय असावे' हे विचारायचे आहे. जस पगाराबद्दल विचारल तर् नक्की काय बोलयचं वगैरे.............नेटवर फार रद्दड उत्तरे दीली आहेत.

In reply to by शानबा५१२

Pain 15/08/2010 - 12:39
मी दुस-या window मधे /THIN LAYER C. /Liquid C. /Ion C. /Mass Spectroscopy /GC MS /HPLC /UHPLC /WORKING/PRINCIPLE /COLUMN/DETAILS FOR VARIOUS C. SYSTEMS ह्याची तयारी करत आहे,म्हणुन बोललो यामुळे गैरसमज होतो. पर्सनल इंटरव्हूवर इंटरनेटवर पुष्कळ माहिती उपलब्ध आहे.

चावटमेला 15/08/2010 - 13:09
माझ्या मते पर्सनल interview हाच मूळात एक भंपक प्रकार आहे. HR लोक वर सांगितल्याप्रमाणे काही फालतू प्रश्न विचारतात आणि बोअर करत बसतात. ह्या interview चा मुख्य आणि एकमात्र उद्देश हा तुम्हाला कमीत कमी पगार ऑफर करुन पटविणे असते. बाकीच्या प्रश्नांची काही एक तयारी करायची आवश्यकता नाही. मी तर म्हणेन जशी सुचतील तशी उत्तरे द्या, नंतर त्या HR ला त्या interview मधील तुम्ही सांगितलेल्या पगाराच्या अपेक्षित आकड्याशिवाय एक शब्दही लक्षात राहणार नाही. पगाराचा आकडा तुमच्या अपेक्षेपेक्षा अंमळ जास्तच सांगा म्हणजे व्यवस्थित negotiate करता येईल. तुम्हाला job ची कितीही गरज असली तरी आपल्याला मुळीच गरज नाही असे भासवावे (नाहीतर HR लोक exploit करायला तयारच असतात) interview साठी हार्दिक शुभेच्छा, job मिळाल्यानंतर पार्टी द्यायला विसरु नका राव :) (१५ interviews चा अनुभव पाठीशी असलेला) चावटमेला

वेताळ 15/08/2010 - 13:21
बेंगलोर एन्फोसिस मधील एचाअर मॅनेजर ने आपल्या बायकोचा सुपारी देऊन खुन घडवुन आणला. interview घेताना मानसिक संतुलन किती वाईट होते ह्याचे हे एक उदाहरण. तेव्हा interview देताना संभाळुन जा बाबा. आमच्या शुभेच्छा तुला.

सुहास.. 15/08/2010 - 17:15
मी बरेच दिवसात असा ईन्टर-व्ह्यु(मास्तरांची आठवण झाली.) दिला नाही , आमचे सहसा टेलिफोनिकच होतात, पहिले एच.आर, मग ईन्टरनल लिड.क्लाईंट आनी सरतेशेवटी एच-आर स्क्रिनींग, आणी फायनल म्हणजे पगार ठरविण्यासाठी ...आजकाल 'व्हिडीयो रेझ्युमे'ची सोय झाल्याने थोबाडाचे आधीच दर्शन होते. असो ... काही टिप्स १) शक्यतो जास्त स्टायलिश कपडे घालु नयेत. (मेन्स कॅरी कॉन्फिडन्स नॉट द क्लोथ्स ..जॉन अब्राहमच ऊदाहरण घ्या ..तो केवळ ,दोनच कलर,ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट, घालुन देखील,ईम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी कमी पडु देत नाही..बाकी ज्याची त्याची आवड !! ) २)पॅनल (एका पेक्षा जास्त लोक्स ) असेल तर, सर्वांना प्रश्न विचारण्याची संधी द्यावी.पॅनल मुद्दामुन कन्फुज करण्यासाठी असतो..एकाच्या प्रश्नाचे ऊत्तर संपविण्याआधीच दुसरा प्रश्न विचारतो अश्या वेळेस,दुसर्‍याला आदराने विनंती करावी की मला पहिल्या प्रश्नाचे ऊत्तर देऊ द्यात, मग ऊत्तर संपले की दुसर्‍याकडे वळावे , प्रश्न लक्षात असेल तर ठीक ,नसेल तर पुन्हा विचारून घ्यावे ... हॅप्पी ईन्टरव्ह्यु !! बेस्ट ऑफ लक !! अवांतर : गुगलवर अश्या बाबतीत भरपुर मटेरियल असताना, ईथे धागा टाकण्याची गरज नव्हती ..बट व्हाटेव्हर

In reply to by सुहास..

शानबा५१२ 15/08/2010 - 18:28
हो ह्या आधीच्या नोकरीसाठी जो ई. दीला त्यापुर्वी तेच नेटवरचे लेख वाचले होते.वाचण्याअधी बरा होतो,वाचल्यानंतर चेहरा कोमजुन गेला,कारण 'पगार' ह्या विषयावर दोन परस्परविरोधी लेख लिहले होते मी कमी वेळ असल्याने जास्त शोध घेत बसलो नव्हतो.आणी तसाच भांबावल्यासारखा चेहरा घेउन ई. ला गेलो. अधिक माहीती : त्या नोकरीला आम्ही एका महीन्यात फुटबॉल बनवल.

स्मृती 15/08/2010 - 18:12
हाहाहाहा.. इंटरव्ह्यूला उत्तर कसे देऊ नये.. एक किस्सा.. कोणे एके काळी एक मुलगी एच डी एफ सी नामक बँकेत इंटरव्ह्युसाठी गेली.. तीन जण होते.. मुलाखत उत्तम चालली होती.. आपली नोकरी इथे पक्की आहे हे तिच्यासारख्या नवख्या मुलीलाही जाणवलं... शेवटी एच आर वाल्याने विचारलं... तुला दोन वर्षांनी आमच्यापेक्षा मोठ्या बँकेने मोठ्या पगाराची नोकरी दिली तर तू काय करशील? ती म्हणाली.. तुला पुढच्या महिन्यात chase manhattan बँकेने ऑफर दिली तर तू काय करशील.. आणि अचानक कॅबीन मध्ये ओक्वर्ड शांतता पसरली.. पुढच्याच क्षणी तिला, आपल्याला ही नोकरी मिळणार नसल्याचंही कळून चुकलं... आणि झालंही तसंच.... तर तात्पर्य हे की इंटरव्ह्यूला पर्सनल प्रश्नांची खरी उत्तरं जरूर द्यावीत; पण त्यांना आवडतील अशा भाषेत! :)

In reply to by मिसळभोक्ता

सहज 18/08/2010 - 07:17
खरे आहे. काही चुकले नव्हते त्या प्रतीप्रश्नात. संभाव्य उत्तरे १) जॉब सोडण्याबद्दल कॉन्ट्रॅक्ट मधे काय लिहले आहे? त्या अटींचे पालन करीन. २) दोन वर्षांनी मला मोठी बँक जॉब ऑफर करेल हा विश्वास माझ्यावर दाखवल्याबद्दल धन्यवाद. माझा एक प्रश्न हा आहे की चांगली संधी मिळेल तर मी जाउ नये म्हणून / टॅलेंट रिटेन करण्याकरता एच आरची नक्की काय पॉलिसी आहे? :-) समांतर अवांतर - अ‍ॅरेंज्ड मॅरेजमधे, सुरवातीला मुले - मुली (त्यांचे पालक) एकमेकांना भेटून प्रश्न विचारतात त्यात असे प्रश्न व अशीच सडेतोड उत्तरे यांची देवाण घेवाण झाली पाहीजे. अश्या प्रश्नोत्तरांचा एक धागा निघाला पाहीजे. ज्यांचे अ‍ॅरेंज्ड मॅरेज झाले आहे / हे अश्या 'कांदेपोहे कार्यक्रमात' सहभागी झाले आहेत, कृपया त्यांनी अनुभव / अफलातुन विचारलेले प्रश्न लिहा. आपण त्याला मस्त उत्तरे शोधु. भावी पिढीला उपयुक्त दस्ताऐवज बनवुया. :-)

In reply to by सहज

अर्धवट 18/08/2010 - 08:08
अबे असल्या बेभरवशाच्या डॉक्युमेंटेशनमधे वेळ घालवण्यापेक्षा अ‍ॅरेंज मॅरेज कसं करावंच लागणार नाही याच्या प्रयत्नात वेळ घालवा की रे..

In reply to by अर्धवट

नगरीनिरंजन 18/08/2010 - 08:29
आपल्या प्रतिसादात अ‍ॅरेंज हा शब्द अनावश्यक असल्याचा बहुतेक विवाहेच्चुक (सहजरावांकडून साभार उधार) लोकांचा दावा असण्याची शक्यता आहे.

पाषाणभेद 15/08/2010 - 19:28
इंटरव्ह्यू घेणे हे ही एक शास्त्र आहे हे आताशा कधीच समजले जात नाही. रिझ्युमीत नसलेल्या टॉपीकवर हमखास प्रश्न विचारतात. बाकी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा. यश मिळो अन नोकरी लागो.

प्रियाली 18/08/2010 - 05:02
हे व्हेअर डू यू सी युवरसेल्फ आफ्टर फाईव इयर्सचं गणित कसं केलं जातं? म्हणजे पाचच का? सर्व एचआरवाले हटकून पाचचाच आकडा का घेतात? पाच वर्षांआधी मनुष्य झटपट वर (वर म्हणजे वरच्या हुद्यावर.. स्वर्गवासी हा वरचा हुद्दा मानू नये) जाऊ शकत नाही याची खात्री त्यांना का वाटते? काहीजण व्हेअर डू यू सी युवरसेल्फ इन फाईव इयर्स असे विचारतात. त्यांच्या मनात नेमके कोणते गणित केलेले असते? माझ्या मनात अशा प्रश्नांना वाईटसाईट उत्तरे देण्याचे खूप मनात येते. १. आय डोन्ट लाइक गेसिंग गेम्स २. आय विल बी राईट हियर आफ्टर फाईव्ह इयर्स; व्हॉट अबाऊट यू अँड धिस ऑर्गनायझेशन? ३. राईट हिअर! सेलेब्रेटींग द फिफ्थ अ‍ॅनिवर्सरी ऑफ यू आस्किंग मी धिस स्टुपिड क्वेश्चन
नमस्कार्,नमस्कार....... आताच वहीदाच्या एका खरडीला उत्तर देताना,मी लिहले.......
अरे मी उद्या एका MNC मधे interview ला जाणार आहे. ते personal की काय ते प्रश्न,कोणते अपेक्षित आहेत व काय उत्तरं द्यायची जरा थोडक्यात सांगशिल का? मला ह्यावर एक लेख लिहायचा आहे.ईथे professional लोकं फार आहेत,मदत होईल. (जॉब मलाच मिळणार आहे)
पण ती गैरहजर आहे,मला जलद व योग्य प्रतिसाद हवेत. आता जास्त काही बोलत नाही.होउ द्या सुरु!! आणि हो,सर्वांना आज जो आहे त्या दीनाच्या शुभेच्छा!

मिपाकरांची ओळखपरेड ( नव्या-जुन्या सदस्यांची ओळख ) ...

छोटा डॉन ·

अवलिया 10/08/2010 - 15:05
नमस्कार, मी अवलिया , मिपा संकेतस्थळाचा व्यवस्थापक / चालक नीलकांत माझा मित्र. मिपा संकेतस्थळाचा संपादक चोता दोन हा सुद्धा माझा मित्र. आणि हितचिंतक. मी घरात राहतो. आवडी : अनेक आहेत, फिरणे सर्वात मोठा छंद आहे. संगीत आवडते, गाणी आवडतात. प्यायला- खायला आवडते ;) लेखन करतो काही विषयामध्ये स्पेशेलिस्ट आहे :) माझे लेखन वाचले की तुम्हाला कळेलच !!

In reply to by अवलिया

छोटा डॉन 10/08/2010 - 16:56
माझी ओळख काहीशी अवलियासारखीच आहे ... झालच तर अवलिया माझा मित्र आहे ( असे त्याला सारखे वाटते, असो ) आणि हितचिंतकही आहे.
मिपा संकेतस्थळाचा व्यवस्थापक / चालक नीलकांत माझा मित्र.
+१, हेच म्हणतो.
मिपा संकेतस्थळाचा संपादक चोता दोन हा सुद्धा माझा मित्र. आणि हितचिंतक.
हे महाशय कोण आहेत ह्याची मला खरोखर कल्पना नाही, बहुतेक एखादा हलकट छुपा आयडी असावा, असो. असो, तर आता माझी ओळख. मी छोटा डॉन, माझे खरे नाव अ‍ॅक्च्युअली छोटा डॉन नाही पण माझे टोपणनाव 'डॉन' आहे. मिपावर आल्यावर त्याचे डान्राव, डॉन्या, डॉनराव, डॉनबा असे नाना अवतार आले. माझे खरे नावही थोडे हुडकले तर नक्कीच सापडेल ;) शिक्षण पुण्यातच घडुन गेले ( झाले आणि घडुन गेले ह्यात जमिनाअस्मानाचा फरक आहे, असो ). सध्या पोटापाण्यासाठी काही कमवावे म्हणुन काहीबाही नोकरी वगैरे करत असतो, नोकरी काय लै भारी नाही पण उगाच फारिनर्सना थुका लावायला मजा येते. थोडक्यात सांगायचे तर 'Engine Design' असे आमच्या जॉबचे वर्णन करता येईल. आवडी-निवडी आणि छंद काय फारसे वेगळे आणि विक्षिप्त नाहीत. " ऊगाच बोंबलत हिंडणे , तासनतास आंतरजालावर कालापव्याय करणे [ यात वाचन , लेखन व अनेक नसत्या ऊचापती यांचा समवेष होतो .] , ठार मेल्यासारखे झोपणे ,तासनतास कुठल्याही 'अर्थहीन विषयावर ' गप्पा ठोकणे , 'चेंडू झोडपण्याचे' सगळे खेळ खेळणे, मनोसोक्त हादडणे त्यात बल्लवगिरीची हौस , 'सगळ्या प्रकारचे सिनेमे' अतिशय आत्मीयतेने पहाणे , कसलेही गाणे लावून ते तन्मयतेने ऐकणे व कधितरी आपल्या सारख्या ४ मित्रांना गोळा करून "बैठक बसवणे " यासारखे आमचे काही छंद आहेत .... आजकाल आम्हाला त्यातल्या त्यात "फुटबॉल ( पहायला व त्यावर अफाट लिहायला व बोलायला ) " हा खेळ खुप आवडतो. कधीमधी माफक लिखाण वगैरे करत असतो पण ते काही खास नोंद घेण्यासारखे नाही. बाकी मित्र जमवायची आवड आहे ( आणि जमलेल्या मित्रांना वारंवार कल्टी द्यायचा छंद आहे, वाटल्यास कुठल्याही पुणेकर मिपाकराला विचारा ). हे झाले माझ्याबद्दल, ही माझी थोडक्यात ओळख. आता सांगतो माझ्याबद्दलच्या काही अफवा ( ज्या तुम्ही कित्येकवेळा वाचल्या असतील किंवा भविष्यातली वाचताल ) : १. मी म्हणे काही लोकांना 'लेख लिहतो रे' असे वायदा करतो व तो पुर्ण करत नाही. म्हणुन लोक आम्हाला 'वायदेआझम' म्हणतात. १००% खोटे आहे हे, इच्छुकांनी आमचा ब्लॉग पहावा ( जाहिरात नको म्हणुन लिंक देत नाही ). २. मी उगाच लोकांचे प्रतिसाद, लेख आणि अजुन बरेच काही उडवतो म्हणे, शुद्ध लोणकढी थाप आहे ही. ३. इथे बरेच लोक मी त्यांचा 'मित्र' असल्याचा दावा करतात. ह्यावर मी केवळ "हास्यास्पद" इतकेच मत देऊ इच्छितो. बाकी सविस्तर सवडीने, तुर्तास एवढेच ....

In reply to by छोटा डॉन

विजुभाऊ 10/08/2010 - 17:01
( आणि जमलेल्या मित्रांना वारंवार कल्टी द्यायचा छंद आहे, वाटल्यास कुठल्याही पुणेकर मिपाकराला विचारा ). वायदे आझम ही पदवी फक्त डॉन्यालाच खर्‍या अर्थाने शोभून दिसते.

In reply to by अवलिया

असुर 10/08/2010 - 17:04
एक निरीक्षण (आणि एक अनुमान)! धागा डान्रावांनी काढला आणि नानासाहेबांचा प्रतिसाद पहिल्या नंबरला, म्हणजे या धाग्यावर किमान १५० प्रतिसाद येणार येणार येणार!!! चकास! (ह. घ्या!) --असुर

In reply to by असुर

असुर 11/08/2010 - 00:54
धत्तर तत्तर, धिन्च्यान तिच्यान... नाच्चो तिच्यायला! १५० झाले की राव!!! येका डावात, येका दिसात १५० मारले की या ध्याग्यानं... अन अजून चालू हाये!!! २००-३०० मारतंय जनू! चकास!!!

In reply to by अवलिया

कोण मी??? असा प्रश्न मला बरेच वेळा पडतो... आणि या प्रश्नाचे उत्तर आजवर तरी मला उमगलेले नाहिए.... आमचे नाव निखिल देशपांडे हे माझ्या आयडी मधुन तुम्हाला लक्षात आलेच असावे. आमचा पोटापाण्याचा धंदा म्हणालं तर बघा आय टी कंपनीत हमाल आहोत.... आणि आय टी असल्यामुळे अंमळ हळवेपणा हा बाय डिफॉल्ट आलाच??? तर आम्ही मिपा वर आलो तेव्हा आमचा आयडी हा निखील देश्पन्दे असा होता. अर्थात रुळल्यावर आम्ही तो बदलून घेतला हा भाग अलाहिदा. जालावर भटकण्याची सवयीनेच मिसळपाव च्या घोषणे पासूनच शोध लागला होता पण आम्ही जरा सदस्यत्व घ्यायला उशीर केला आणि आमचा बिल्ला नं झाला ५४१. सदस्यत्व घेतल्यानंतर पहिले २-४ महिने आम्ही फक्त वाचनमात्रच होतो पण एक दिवस असेच लॉगिन केले आणि आम्हाला खरडवही या मिपावर एकेकाळी सगळ्यात हॅपनिंग असलेल्या गोष्टीचा साक्षात्कार झाला. आणि आम्ही लवकरच खरडवही उचकापाचक मंडळाचे अध्यक्ष प.रा. राजवाडे यांचा मार्गदर्शना खाली आम्ही खव उचकापाचक करायला लागलो. त्याच काळात आम्हाला खरडवहीत झेंड्याचा चड्ड्या हा ऐतिहासिक खरडवाद वाचायला मिळाला. तुमचे लाडके चोता दोन आणि आमचे एक आमच्याच गावचे म्हणजेच औरंगाबादचे मित्र आनंदयात्रीजी आणि यांच्यातला वाद गाजला. या वादात आक्रस्ताळी अदिती पण बहुधा सामील होती. या वादाचा आम्हाला सगळ्यात जास्त झालेला फायदा म्हणजे श्री. धमाल मुलगा बारामतीकर यांची मैत्री. हा माणुस कुणालाही गप्पात कसा गुंतवेल सांगता येत नाही हो.. आणि त्यानंतर एक एक करुन ओळखी व्हायलाच लागल्या, काही चांगले नांतेसंबध जुळल्या गेले. इथल्या मित्रांची यादी आता खुप मोठी आहे. तर असे हे मिपा ज्यावर आम्ही आलो आणि इथलेच झालो. बाकी माझ्याबाबत लिहायचे राहुनच गेले. अर्थात सांगण्यासारखे काही खास नाही. हळुहळु बोलुयात खरडवहीतुन म्हणजे ओळख होईलच.

मितभाषी 25/08/2010 - 18:40
डॉनराव हे लै भारी. मी भाउसाहेब. तसे मला सगळे हौशा, गवश्या, नवश्या किंवा भावश्या म्हणुन ओळखतात. म्हणजे त्याचे असे झाले. आम्ही आमच्या पालनकर्त्या मायबापास एका जत्रेत सापडलो त्यामुळे 'गवश्या'. आम्ही सापडण्याअगोदर आमच्या पालनकर्त्या मायबापानी देवाला नवस केल्ता. त्याणा अपत्यप्राप्ती होन्याअगुद्रच आम्ही त्यांना सापाडलो/गवासलो. म्हणुन नवश्या. तसेच आम्हाला लहानपनापसुनच लै हौस(हवस नव्हे) म्हुन हौश्या. आनि ठेवल्याल नाव भाउसाहेब म्हुन भावश्या. आमचे आवडते लेखक्/लेखिका म्हन्जी, फुस्स, कार्लोस, वहिनी, दादा कोंडके, _अदिती, गणपा, संजोप राव, बिकाशेठ इ इ. आम्ही कट्ट्यावर लय 'धमाल' करतो. दादा दरोज येगयेगळ्या बाया काखत घालुन येतो नि आम्हाला लै हसवतो म्ह्नुन आम्ही त्याइचे आभारी. कार्लोस मला इंग्रजी शिकवतो. फुस्स एक नंबर ठुसक्या आहे. म्हणुन त्याला सरकारने PUC अनिवार्य केले आहे. तो कट्ट्याव आल्याव आम्ही मागच्या वर्षीचे स्वाइन्चे मास्क घालुन बसतो. मला मिपा फार्फार आवडते. इथले प्रतिसाद फार आवडतात. मला वाचायला आवडते. भावश्या.

फुस्स 10/08/2010 - 14:56
वैयक्तिक ओळख वाढवावी किंवा कोणत्याही प्रकारची मस्करी करावी ह्या साठी संस्थळावंर येत नसल्याने जास्त काही लिहु शकणार नाही. -(आवाज आला क्का ?) फुस्स

In reply to by पांथस्थ

फुस्स 10/08/2010 - 16:48
मला वाटतं इथे प्रत्येकजण आपल्या आवडीनिवडी आणि स्वतःची ओळख / हेतु सांगतोय. बघा, मराठी कळत असलं तर! ह.घ्या.हे.वे.सां.न.ल -(आवाज आला क्का ?) फुस्स

In reply to by फुस्स

पांथस्थ 11/08/2010 - 08:45
बघा, मराठी कळत असलं तर!
हो का? बघू बरं ...
ओळख म्हणजे 'खरे नाव' आणि इतर डिटेल्सच सांगावे अशी अपेक्षा नाही, सांगितले तर हरकत नाही. मात्र तुमच्या आयडीबद्दल, आवडीनिवडीबद्दल, छंदाबद्दल अशीतशी अवांतर माहिती हवी आहे. तुम्ही काय करता, कुठे असता ह्यासंबंधी माहिती दिलीत तरीही हरकत नाही.
...वैयक्तिक ओळख वाढवावी किंवा कोणत्याही प्रकारची मस्करी करावी ह्या साठी संस्थळावंर येत नसल्याने...
या प्रश्नाला तुमची प्रतिक्रिया कसे बरं उत्तर ठरू शकते? ना त्यात आवड सांगितली आहे ना छंद ना काही अवांतर. ह्याला माझा (तात्त्विक) आक्षेप होता :) असोत. जास्त वैयक्तिक होण्यापेक्षा हा (सं)वाद इथेच थांबवूया.

In reply to by मी ऋचा

फुस्स 11/08/2010 - 12:45
:) लाफिंग गॅस सोडला होता वाट्टं ! असो , पाथस्थांना उत्तर देण्याची गरज वाटत नाही. टारझनाचे पाहुन सगळ्यांनीच त्याच्या स्टाईलचे अनुसरन करायला सुरुवात केली आहे. प्रत्येकाला जमेलंच असे नाही. -(आवाज आला क्का?) फुस्स

असुर 10/08/2010 - 14:57
मायला, डान्रावांनी धागा काढून १० मिनिट झाली आणि कोणी काय बोलला नाय इथे!! फक्त २ प्रतिसाद!!! फाउल झाला ना!!! असो!!! आपण असुर. बरीचशी माहिती लिहिली आहेच पण परत एकदा. चकाट्या पिटणे हा आमचा जाहीर व्यवसाय आहे. आणि असुर हे नाव घेण्यामागे काहीही प्रयोजन नाही. "सुहास्य तुझे" हे गाणे ऐकत होतो, आणि "जशी विमोही सुरासुरांची" हे वाक्य ऐकून आपल्याला हे नाव सुचलंय. बाकी आपण नवीन-जुने हा फरक मानतच नाय! माफक मस्करी करावी, चांगला टाईमपास होतो.. चार बरे लेख पाडावेत, काहीतरी चांगलं वाचल्यासारखं वाटतं. बास, अजून काय लिहिणे, लेखन-सीमा!

नगरीनिरंजन 10/08/2010 - 15:05
मी नगरीनिरंजन, मूळचा नगरचा (अहमदनगरचा). सध्या सिंगापुरात. नवीन चांगले मराठी वाचण्याचा आणि काहीबाही लिहिण्याचा किडा आहे म्हणून इथे आलोय.

मनि२७ 10/08/2010 - 15:08
मला आता माझी ओळख करून द्यायला आणि घ्यायला पण एकदम सोप झाल ... (गट:- नवीन सदस्य!!!!!!) चला सुरवात नावापासून.(अर्थात माझ्या..) माझ नाव:- मला मनी/ माऊ काहीही म्हणू शकता .... :-) काम :- मी पुण्यात एका software कंपनी मध्ये नोकरी करतेय पण मुळची अस्सल विदर्भातली....... छंद :- नवीन नवीन पदार्थ खायला जरा जास्त आवडत(शाकाहारी आणि मासाहारी दोन्हीपण) आणि त्यामुळे पाककृतीची आवड, भटकंती करायला आवडत(पावसाळ्यात जास्त), त्यामुळे पक्षी निरीक्षणाची आवड आणि असाच time pass भरपूर काही आहे पण आता आठवत नैये (आठवलं कि सांगतेच परत)..... सध्याची आवड:- मिपावर हिंडणे बस!!!!... आणि अशीच थोडक्यात ओळख सगळ्या सदस्यांनी द्यावी(माझी ओळख थोडी जास्त झाली असेल तर तुम्ही थोडक्यात द्या पण द्याच...) आभारी.... :-) मनी...

मन 10/08/2010 - 15:09
नवीन्-जुने,हिरवे-पिवळे चर्चेला सकारात्मक वळण दिल्याबद्दल डॉन्याचं अभिनंदन आणि आभार. मी, मन.... मनोबा. मला दोनेक वर्षापासुन इथं नवीन असल्यासारखच वाटतय. :) मी क्वचितच लिहितो.(लेख किंवा प्रतिसाद) आणि जितकं लिहिलय त्यातही क्वचितच समोरच्याचं कौतुक करतो.(चांगल्या गोष्टीला "फाल्तु आहे.सवंग आहे" असं म्हटल्याशिवाय मला मोठं कोण म्हणणार?(तसही कुणीच म्हणत नाही म्हणा) ) प्रवेश करत नस्लो तरी बहुतांशी वाचनमात्र असतोच असतो. इथल्या जवळपास सगळ्याच "हिट" लेखांचा(आणि तो लिहिणार्‍यांचा मी फ्यान आहे) अधिक काय सांगु?

माझं नाव माझ्या नावाप्रमाणेच आहे. सुरूवातीपासून तसंच आहे. त्यामुळे कसं सुचलं वगैरे प्रश्न गैरलागू आहेत. एक नंबर कंपूबाज. फक्त आपल्या कंपूला काही बंधन नाही. गप्पा मारणारे, हसून खेळून वावरणारे कोणीही आमच्या कंपूत बाय डिफॉल्ट सामावून घेतले जातात. कधी कधी काही तरी लिहितो इथे. ( http://www.misalpav.com/newtracker/322 प्लिज प्लिज प्लिज वाचा आणि कौतुक करा ) ... नवीन सदस्यांचं स्वागत. मिपावरही आणि आमच्या कंपूतही.

जोशी 'ले' 10/08/2010 - 15:13
आता डान साहेबांनी इचारालय म्हून सांगतो , नाय तर आपण कुणाला घाबरत नाय, मी जोशी 'ले' माझ्या बद्दल सांगण्या सारखे काही नाही , मी खूप दिवसां पासून मि. पा. चा एक वाचक आहे, पण सदसत्व आताच मिळालाय,

गणपा 10/08/2010 - 15:14
नमस्कार मंडळी, मी गणापा. बिल्ला नंबर ७०७ मुंबईकर, पण सध्या वास्तव्य विदेशात. प्रत्यक्षात एका मिपाकराला सोडुन अन्य कुणाला पाहिलेल नाही. पण बरेच मित्र असे मिळालेत की वाटत आम्ही शाळुसोबतीच. :) विनाकरण कुणाशी वाकड्यात जात नाही. कुणी डिवचल तर मग मात्र खरडी प्रतिसाद फेकुन मरतो ;) आवड निवड म्हणाल तर कानसेन आहोत. हौशी कुक. आता जालिय मित्रांनी डोक्यावर चढवुन ठेवलय ही त्यांची दर्यादिली. फिरायला घरातुन पाय बाहेर पडत नाही, पण पडलोच तर मात्र मनमुराद आनंद लुटतो. बाकी आता आहात इथेच तर खरडत जा इथे अधुन मधुन. तेवढीच ओळख वाढत जाईढ.

In reply to by गणपा

'हौशी' शब्दावर जोरदार आक्षेप आहे. बाकी कोण मिपाकर आहेत हो तुमच्या ओळखीचे? आय मीन, तुम्ही बघितलेले?

In reply to by गणपा

चिंतामणी 10/08/2010 - 23:31
मी गणापा. प्रत्यक्षात एका मिपाकराला सोडुन अन्य कुणाला पाहिलेल नाही. प्रेषक गणपा दि. मंगळ, 10/08/2010 - 15:31. दिसत न्हाय का मावत न्हाय. =)) म्हंजी बिकाला बघितला हायेस दिसते. (चौकस)चिंतामणी.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

विकास 10/08/2010 - 16:39
'हौशी' शब्दावर जोरदार आक्षेप आहे. अगदी! हे म्हणजे, दहावीला बोर्डात पहीले येणारे मुलाखतीत कसे सांगतात की मी कधी अभ्यास केलाच नाही, तसेच काहीसे हे झाले. ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

विजुभाऊ 08/12/2014 - 15:46
हौशी' शब्दावर जोरदार आक्षेप आहे. बिका मराठीत "हौशी " हा शब्द फारसी "हवस " या शब्दावरून आलेला आहे .. ( चला पळा................ )

ऋषिकेश 10/08/2010 - 15:25
मी ऋषिकेश. बिल्ला नं २७० मुंबईकर भटकायला - वाचायला - चित्रपट बघायला आणि या सगळ्यावर लिहायला (उतरत्या क्रमाने) आवडतं.. मिपावर गप्पा मारणे, माहीती मिळवणे आणि मजा करणे अश्या तिहेरी हेतूने येतो.

In reply to by ऋषिकेश

नंदन 10/08/2010 - 23:41
भटकायला - वाचायला - चित्रपट बघायला आवडतं.. मिपावर गप्पा मारणे, माहीती मिळवणे आणि मजा करणे अश्या तिहेरी हेतूने येतो.
--- +१ :)

गांधीवादी 10/08/2010 - 15:35
एक सामान्य माणूस अभियांत्रिकी शाखेतून पदवीधर, पुण्यातील एका संस्थेतून MBA (finance) करीत आहे. आवडता विषय एक आणि एकच राजकारण. माझे स्वप्न एकद दिवस तरी भगतसिंग/ सावरकर यांच्या सारखे जगायचे आहे. ( DO OR DIE ) हा जन्म भारताच्या सत्कारणी लावायचा आहे.

In reply to by गांधीवादी

विजुभाऊ 10/08/2010 - 16:11
गांधीवादी : माझे स्वप्न एकद दिवस तरी भगतसिंग/ सावरकर यांच्या सारखे जगायचे आहे. हम्म.. नो कॉमेन्ट्स. राजकारणातल्या कोलाम्ट्याउड्या इतिहासातही :) अवांतर :तुमच्या त्या अवताराला गांधीवादी सावरकर म्हणावे लागेल. अतीअवांतर : भाजपने कधितरी स्वीकारलेला गांधीवादी समाजवाद तो हा असाच होता का?

"माफक थट्टामस्करी चालणार असली तर धागा भरकटु नये ह्याची काळजी घ्यायला 'संपादक मंडळ' समर्थ आहे." (हे काही धाग्यांतील प्रतिसादाबाबतही व्हावे अशी अपेक्षा आहे. असो.) =================================================== नमस्कार. मी 'इन्द्रराज पवार' आणि याच मूळ नावाने इथे वावरतो. कलाशाखेचा पदव्युत्तर. मूळचा कोल्हापुरचा पण आता दिल्ली, हरियाणा आणि पंजाब या भागात व्यवसायानिमित्ताने भटकंती. महिन्यातून एकदोनवेळा कोल्हापुरी घरी परत येत असतो. खूप प्रवास त्यामुळे "मिसळपाव" हा प्रवासातील फार जवळचा असा मित्र बनला आहे. (रोहटकच्या वाटेवर "ती" स्वयंपाक धागा मालिका वाचत असताना होत असलेल्या मनोरंजनामुळे प्रवास चालू असताना फार हसू येत होते, आणि माझे त्या हसण्यामागील कारण न समजल्याने माझे शिख मित्र गोंधळुन "ओये, देखो तो अपना बिट्टा पागल हो गया है" असे आपसात म्हणत होते.) साहित्य (मराठी आणि इंग्लिश), राजकारण, समाजजीवन, इतिहास यांची आवड त्यामुळे या विषयावरील धाग्यात भाग घेणे, प्रतिसाद देणे आवडते. तसा फार जुना सदस्य नाही, तरीही सदस्यत्व घेतलेल्या दिवसापासून इथे रमलो आहे हे तितकेच खरे. संपादक मंडळ "मिसळपाव"साठी स्वतःचा वेळ/पैसा खर्च करत असते याची जाणीव असल्याने त्यांनी आखणी केलेल्या धोरणाविरुद्ध कधीही वर्तन केलेले नाही. शिवाय एखादी बाब व्यक्तीशः आवडली नसेल तर मंडळातील कुणाही एकाला "व्य.नि." केला तर त्यावर कार्यवाही होते असा अनुभव असल्याने तक्रारीस जागा नाही. अशुद्ध लिखाणाची नावड आहे, त्यामुळे धागा देताना वा प्रतिसाद देताना तो तिथे जाण्यापूर्वी दोन-तीन वेळा तपासतो. (तसेच चर्चेत वाद वाढणार असे दिसल्यास कुठे थांबायचे ते समजते, "क्षमस्व" म्हटल्यास सर्व काही शांत-शांत होते असा अनुभव आला आहे. त्यामुळे एकमेकात कटुता राहात नाही.) नवीन सदस्यांचे हार्दिक स्वागत आणि त्यांच्या लेखनास शुभेच्छा ! इन्द्रा

विलासराव 10/08/2010 - 15:47
मी विलास शिंदे........मला बरेच लोक विलासरावच म्हनतात म्हनुन हि आयडी.मुळचा अहमदनगरचा.वास्तव्य मुंबई येथे. भटकंती, वाचन ही आवड. नवीन सदस्य असलो तरी वाचक जुनाच आहे. खेचाखेची आवडत नाही पण कुनी केलिच तर..............सरळ दुर्लक्ष करतो. कुणाही मिपाकराला प्रत्यक्ष ओळखत नाही.

In reply to by शेखर दिवसे

काका!!! प्रश्नाची गल्ली चुकली.... असो. आधी माहिती द्या ना... डान्या वरडू वरडू सांगायलाय की तुमची माहिती द्या म्हून...

नितिन थत्ते 10/08/2010 - 15:43
मी नितिन थत्ते. पूर्वी काही काळ खराटा या नावाने लिहित असे. स्वतः खूप काही लिहीत नाही. (दुसर्‍याने लिहिलेल्यावर कॉमेण्ट मारणे सोपेच असते). घटना, अर्थशास्त्र, स्त्रीपुरुषसमानता आणि पुरुषमुक्ती, रॅशनलिझम, राजकारण हे जिव्हाळ्याचे विषय.

अमोल मेंढे 10/08/2010 - 15:43
माझ्याबद्दल थोडेसे, मी अमोल मेंढे, मुळचा वर्ध्याचा...सध्या राजस्थानात राहतो. मिपा वर बर्‍याच दिवसांपासुन येतो..पण सदस्यत्व आता आताच मिळाले. आवडी म्हणाल तर...वाचायला, गायला ,रचायला आणि नाचायला आवडते. जालावर बर्‍याच दिवसांपासुन असल्यामुळे खुप मित्र आहेत. आणखी काय सांगु? ( माझी बायको मला माझ्यापेक्षा जास्त ओळखते.)

मृत्युन्जय 10/08/2010 - 15:49
मी पुण्याचा . नावात काय आहे. त्यामुळे सांगत नाही. मृत्युन्जय माझे नाव नाही हे तर ओघाने आलेच. नवीन सदस्य म्हणावा तर आयडी तयार करुन २ वर्षे झाली. आणि जुना म्हणावा तर फारसे काही लिहिलेले नाही. मि पा वरचा सक्रीय वावर सध्याचाच. एवढ्यात इथ खुप "छान" चर्चा चालु आहेत त्यामुळे जरा जास्तच सक्रीय आहे. एरवी आधी फारसे लिहीले नव्हते (म्हणजे मी खुप छान लिहितो तरीही लिहिले नव्हते असे नाही तर वाचण्यासारखे काही आपल्याला लिहिता येते असे वाटतच नसल्यामुळे लिहिले नव्हते. नुकत्याच पेव फुटलेल्या अनेक लेखकांचे लेख बघुन आपणही याहुन वाईट लिहित नाही याची खात्री पटल्यामुळे काही लेख लिहिले आहेत खरे. ) वाचायचो मात्र खुप. मित्राने मिसळपाव वरुन रामदासांचा काटेकोरांटीची फुले स्कॅन करुन पाठवला तेव्हापासुन मि पा चा फॅन झालो. आणि शिंपिणीचे घरटे वाचुन रामदासकाकांच्या लेखणीच्या प्रेमात पडलो. इथे उत्तमोत्तम लेख वाचायला आणि त्याहुन महत्वाचे म्हणजे त्याचे रसग्रहण करणार्‍या प्रतिक्रिया वाचायला जाम आवडते. इथे मुख्यत्वेकरुन तेच करायचो पुर्वी. अजुनही तेच करतो. पुढेही तेच करत राहीन (नाही म्हणता कुजकटपणा अजुन थोडा वाढला तर कदचित प्रतिक्रिया पण देइन.) आवडते लेखक अर्थात रामदास काका.

बर झाले! हा धागा सुरु झाला (गट:- नवीन सदस्य!!!!!!) माझ नाव:- मला हर्षद म्हणू शकता .... काम :- मी पुण्यात एका software कंपनी मध्ये नोकरी करतोय पण मुळं मात्र सातारा, सांगली आणी कोल्हापुरची ....... छंद :- नवीन नवीन पदार्थ खायला आवडत(शाकाहारी आणि मासाहारी दोन्हीपण) भटकंती करायला आवडत)..... सध्याची आवड:- मिपावर हिंडणे बस!!!!... बिपिन कार्यकर्ते रोचक विशाल व इतर मंडळींचा प्रचंड फंखा. त्यांच लेखन वाचुनच इथ्ले सभासदत्व घेण्यासाठी धड्पड केली आणी काही अंशी यशस्वी झाली. झालच तर बिकाषेठच्या कंपुमध्ये जागा बळकावि म्हणतो.

स्व 10/08/2010 - 15:52
माहिती माझी.... व्यावहारिकदृष्ट्या बिनकामाच्या माहितीचा अफाट खजिना ...... मी. भावनिक जगाच्या हिंदोळ्यात डोलणारा..........................मी नको तितकं खरं नाही त्या ठिकाणी बोलून पस्तावणारा ..........मी तिला पाहुन खुदकन हसणारा आणि आपलं हसु दाबणाराही....हो ..मी च. मी गर्दित उभा असतो गर्दितला एक बनून पण त्या धामधुमीत्,त्या गर्दीतही बघत असतो बाहेरच्या गोबर्‍या गुलाबावरचा टप्पोरा थेंब तल्लीन होउन मी असतो अफाट काम करणारा... तथाकथित "थॅंकलेस्" जॉब करणारा.... पण ते केल्यावर लोकांचं समाधान पाहुन भरुन पावणारा. माझ्या मनात आहे इच्छा ओंजळभर भूतकाळ बदलण्याची.... माझ्यात आहे उर्मी उद्याचं भविष्य घडवायची. थोडासा बावळट्,किंचित भोळ्सट दिसत असेनही. वागायला मात्र थोडासा खट्याळ बराचसा नाठाळ असेनही. पण तु नसताना तुझ्याच आठवणीत रमलेला मी असेनही.... सगळ्या दोस्तांत एकमेव मी.... भरल्या गर्दित एकटाच मी....... माझा मलाच पुरत नाही मी! जगभर सांडुन इथं तिथं सगळिकडं भरुन राहिलोय मी दोस्तांनो, ह्या सफळ्यातला कुठला तरी "मी" तुम्हीही असणारच. का ह्याहुन वेगळे, आपल्या सप्तरंगात स्वच्छंद तरी तुम्ही असणारच. इथं लिहिलय तस्साच आहे मी... तुम्हीही सांगा कसे,कोण आहात तुम्ही? अजुन डीट्टेल माहिती हवी असेल तर बोला, मी लिहायला मोकळाच आहे.(मिपा च्या ब्यांडविड्थ चं तेव्हढं माहित नाही. त्यांना हे झेपल की नाही.)

In reply to by स्व

तुमचं खरं नाव नानू सरंजामे आहे का हो? (ह. घ्या).
माझ्या मनात आहे इच्छा ओंजळभर भूतकाळ बदलण्याची.... माझ्यात आहे उर्मी उद्याचं भविष्य घडवायची. माझा मलाच पुरत नाही मी! जगभर सांडुन इथं तिथं सगळिकडं भरुन राहिलोय मी

मी अदिती; आयडीतल्या विशेषणाप्रमाणे विक्षिप्त आहे असं प्रत्यक्षात भेटलेले लोकं मला सांगतात. ३_१४ आकडा मी पायपंथी, इरॅशनल, असल्यामुळे तिथून उचलला. तसंही माझी तीनतेराशी असलेली जुनी जवळीक ३_१४ मधूनही दिसतेच (असं मीच म्हणते). माझ्याबद्दल खास काही सांगण्यासारखं नाही, अर्थात आपली आपण काय स्तुती करायची! पण सदर धागाप्रवर्तक चोता दोन, आपलं छोटा डॉन, आमचे रा.को. असल्यामुळे धाग्यावर लिहीलं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

"आयडीतल्या विशेषणाप्रमाणे विक्षिप्त" मला ही "अदिती" कधीही विक्षिप्त वाटलेली नाही, त्यामुळे या विशेषणाचा (तसेच त्या ३_१४ चा) कधीच विचार केलेला नाही. इन्द्रा

कशी शाळा-कॉलेजमधल्या, गेलाबाजार हापिसातल्या पहिल्या दिवसाची आठवण आली. हजारो आयडी असलेल्या अश्या संकेतस्थळावर अश्या ओळखी होणं खरच उपयोगी असतं याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. मी जेव्हा परक्या शहरात खुप अडचणीत होतो तेव्हा इथंच ओळख झालेले संपादक निखिल यांनी मला किती मदत केली ते माझं मला माहिती. या धाग्यामुळं सदस्यांमधे सामंजस्य्-सौहार्दाचं मनमोकळं वातावरण निर्मा होईल अन नवनविन मित्रांची ओळख होईल ही अपेक्षा. असो! आता माझ्याबद्दल थोडंस. माझं नाव प्रसन्नकुमार केसकर. मुक्काम पुणे. व्यवसाय पत्रकार. सध्या पुण्यातल्या एका इंग्रजी दैनिकात काम करतो आहे.

In reply to by अर्धवट

अजुन फक्त `गार'च आहे. थोडे दिवस आहेत अजुन सल्ला देऊन लोकांना `गार' करायला सुरुवात करायला. सध्या फक्त पत्रक-कारच आहे रे.

मितान 10/08/2010 - 16:04
नमस्कार मी माया ज्ञानेश. लातूर-औरंगाबाद-पुणे -सध्या बेल्जियम मध्ये राहाते. स्कूल सायकॉलॉजिस्ट आहे. पण सध्या रिकामटेकडी. माणसं-पुस्तकं, खाणं-खाऊ घालणं, सैपाकघरात अनेक प्रयोग करणं, आणि सर्वात आवडीचं -भटकायला आवडतं. अशीच जालावर भटकत भटकत इथे आले, अनेक समानधर्मी दिसले म्हणून थांबले.. :)

In reply to by मितान

"आवडीचं -भटकायला आवडतं." माया.... नवीन सदस्यांची संख्या खूप आहे, त्यामुळे त्यांना केव्हातरी बेल्जियमच्या "त्या निळाई" चा आनंद द्या. इन्द्रा

In reply to by मेघवेडा

ऊप्प्प्प्प्स्स्स्स्स !! सॉरी.... "माया" ब्रुसेल्समध्ये असल्याने बेल्जियमच डोक्यात राहिले. ("निळाई"चा वरदहस्त त्या देशावरदेखील असेलच.) इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

असुर 10/08/2010 - 16:51
एक शंका येऊ रहायली कवाधरून... या निळाईचा आणि आपल्या 'निळूभौ'चा काय सबंध हाये का??? कोनिबी शंकाणीरसण करावे! --असुर

In reply to by असुर

Nile 10/08/2010 - 23:03
कोण निळुभौ? ;-) बाकी आपली काय वळक द्यायची राव? सुतासारखा सरळ मानुस, सुशील, सोज्वळ समंजस (वग्रै वग्रै) गरजेपुरता सैपाक येतो, अगदी साध्या आवडीनिवडी, कसला सोस नाय की काय नाय, अहो एकदम कॉमन मॅनच म्हणा ना. (डान्या, जमलंय का?)

In reply to by इन्द्र्राज पवार

ग्रीस नाही आणि बेल्जियम नाही. ती "निळाई" इटलीची. सुर्याला आव्हान देणा वेश घालणार्‍या तरुणी. आठवलं का ? या निमित्ताने पुलंचं ते वाक्य आठवलं जे कायम लक्षात राहिलंय. "आज माथ्यावरच्या निळ्या आकाशाला मी मोठ्या अभिमानाने सांगतो की तुझ्या निळाईचा अर्थ सांगणार्‍या त्या नीलकुहरातल्या पाण्याला मी भेटून आलो आहे."

In reply to by अप्पा जोगळेकर

"पुलंचं ते वाक्य आठवलं जे कायम लक्षात राहिलंय." हे बरोबर आहे आणि पु.लं.नी तसा "निळाई"चा उल्लेख केलेला हेही वाचले आहेच. पण आम्ही मायाताईंना उद्देशून जे लिहिले आहे त्याचा संबंध त्यांनी केलेल्या "ग्रीस" सफरीचा सविस्तर वृत्तांत इथे कलादालनात अनेक सुंदर फोटोसह दिला होता, तीमध्ये अगदी "इटली" सारख्याच एका निळाईचा समावेश होता. नवीन सदस्यांना (जे अनेक आहेत) कदाचित कलादालनची पाने उपलब्ध नसावीत - 'प्रवेश प्रतिबंधीत' असा इशारा येत असल्याची संपादकांकडे त्यांनी तक्रारही केली आहे - म्हणून पुनश्च फोटोंचा तो खजिना नव्याने द्यावा यासाठीचा तो प्रतिसाद होता.

In reply to by इन्द्र्राज पवार

मितान 13/08/2010 - 18:41
इंद्रराज, माझ्या नावामुळे काही सदस्यांचा घोटाळा होतो आहे. म्हणून आजपासून मी ' माया ज्ञानेश ' च्या ऐवजी ' मितान ' या नावाने मिपावर असेन. :) ग्रीस ची निळाई मी दुसर्‍या एका संस्थळावर लिहिली होती. इथे नाही. इथेही टाकण्याच्या विचारात आहे.

विजुभाऊ 10/08/2010 - 16:18
मी विजुभाऊ रहायला विले पार्ले. सध्या मात्र पुण्यात वाचायला आवडते. द मा मिरासदार , शंकर पाटील , पु ल ,सु शि , व पु, जी ए , नेमाडे , श्री ना ,मार्क ट्वेन , अंतोन चेकॉव्ह , हॅन्स अ‍ॅन्डरसन्स , डॅन ब्राऊन , सिडने शेल्डॉन , पाउलो कोएलो , इलियाहु गोल्डराट , सोफोक्लीस आर्थर कोनन डॉयल हे आवडते लेखक. आय ड्रीम ऑफ अ जीनी , डेनीस द मिनेस , थ्री स्टुजेस , हम पांच या आवडत्या सिरीज. थोडे फार लिखाण करतो , फार पूर्वी कधितरी नाटक करायचो. पगार देणारे काम : ई आर पी कन्सल्टिंग , प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट इ. लष्करच्या भाकर्‍या : स्ट्रेस मॅनेजमेन्ट , मेमरी रीटेन्शन, पर्सनल काउन्सेलिंग वगैरे. खाण्याची आवडः: उंधियो , पिठलं भाकरी ,पापलेट,सुरमयी , सोलकढी सर्वात आवडते काम : चकाट्या पिटणे, गप्पा मारायला सौंगडी गोळा करणे, टीममधल्या स्वभावाने सिर्यस लोकाना कामाला जुंपणे वगैरे वगैरे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आधी तुम्ही आरोप करणार | मग आम्ही स्पष्टीकरण मागणार || तेव्हा तुम्ही पळून जाणार | (आता पुरे नाहीतर) डान्राव मारणार निश्चित ||

अवलिया 10/08/2010 - 15:05
नमस्कार, मी अवलिया , मिपा संकेतस्थळाचा व्यवस्थापक / चालक नीलकांत माझा मित्र. मिपा संकेतस्थळाचा संपादक चोता दोन हा सुद्धा माझा मित्र. आणि हितचिंतक. मी घरात राहतो. आवडी : अनेक आहेत, फिरणे सर्वात मोठा छंद आहे. संगीत आवडते, गाणी आवडतात. प्यायला- खायला आवडते ;) लेखन करतो काही विषयामध्ये स्पेशेलिस्ट आहे :) माझे लेखन वाचले की तुम्हाला कळेलच !!

In reply to by अवलिया

छोटा डॉन 10/08/2010 - 16:56
माझी ओळख काहीशी अवलियासारखीच आहे ... झालच तर अवलिया माझा मित्र आहे ( असे त्याला सारखे वाटते, असो ) आणि हितचिंतकही आहे.
मिपा संकेतस्थळाचा व्यवस्थापक / चालक नीलकांत माझा मित्र.
+१, हेच म्हणतो.
मिपा संकेतस्थळाचा संपादक चोता दोन हा सुद्धा माझा मित्र. आणि हितचिंतक.
हे महाशय कोण आहेत ह्याची मला खरोखर कल्पना नाही, बहुतेक एखादा हलकट छुपा आयडी असावा, असो. असो, तर आता माझी ओळख. मी छोटा डॉन, माझे खरे नाव अ‍ॅक्च्युअली छोटा डॉन नाही पण माझे टोपणनाव 'डॉन' आहे. मिपावर आल्यावर त्याचे डान्राव, डॉन्या, डॉनराव, डॉनबा असे नाना अवतार आले. माझे खरे नावही थोडे हुडकले तर नक्कीच सापडेल ;) शिक्षण पुण्यातच घडुन गेले ( झाले आणि घडुन गेले ह्यात जमिनाअस्मानाचा फरक आहे, असो ). सध्या पोटापाण्यासाठी काही कमवावे म्हणुन काहीबाही नोकरी वगैरे करत असतो, नोकरी काय लै भारी नाही पण उगाच फारिनर्सना थुका लावायला मजा येते. थोडक्यात सांगायचे तर 'Engine Design' असे आमच्या जॉबचे वर्णन करता येईल. आवडी-निवडी आणि छंद काय फारसे वेगळे आणि विक्षिप्त नाहीत. " ऊगाच बोंबलत हिंडणे , तासनतास आंतरजालावर कालापव्याय करणे [ यात वाचन , लेखन व अनेक नसत्या ऊचापती यांचा समवेष होतो .] , ठार मेल्यासारखे झोपणे ,तासनतास कुठल्याही 'अर्थहीन विषयावर ' गप्पा ठोकणे , 'चेंडू झोडपण्याचे' सगळे खेळ खेळणे, मनोसोक्त हादडणे त्यात बल्लवगिरीची हौस , 'सगळ्या प्रकारचे सिनेमे' अतिशय आत्मीयतेने पहाणे , कसलेही गाणे लावून ते तन्मयतेने ऐकणे व कधितरी आपल्या सारख्या ४ मित्रांना गोळा करून "बैठक बसवणे " यासारखे आमचे काही छंद आहेत .... आजकाल आम्हाला त्यातल्या त्यात "फुटबॉल ( पहायला व त्यावर अफाट लिहायला व बोलायला ) " हा खेळ खुप आवडतो. कधीमधी माफक लिखाण वगैरे करत असतो पण ते काही खास नोंद घेण्यासारखे नाही. बाकी मित्र जमवायची आवड आहे ( आणि जमलेल्या मित्रांना वारंवार कल्टी द्यायचा छंद आहे, वाटल्यास कुठल्याही पुणेकर मिपाकराला विचारा ). हे झाले माझ्याबद्दल, ही माझी थोडक्यात ओळख. आता सांगतो माझ्याबद्दलच्या काही अफवा ( ज्या तुम्ही कित्येकवेळा वाचल्या असतील किंवा भविष्यातली वाचताल ) : १. मी म्हणे काही लोकांना 'लेख लिहतो रे' असे वायदा करतो व तो पुर्ण करत नाही. म्हणुन लोक आम्हाला 'वायदेआझम' म्हणतात. १००% खोटे आहे हे, इच्छुकांनी आमचा ब्लॉग पहावा ( जाहिरात नको म्हणुन लिंक देत नाही ). २. मी उगाच लोकांचे प्रतिसाद, लेख आणि अजुन बरेच काही उडवतो म्हणे, शुद्ध लोणकढी थाप आहे ही. ३. इथे बरेच लोक मी त्यांचा 'मित्र' असल्याचा दावा करतात. ह्यावर मी केवळ "हास्यास्पद" इतकेच मत देऊ इच्छितो. बाकी सविस्तर सवडीने, तुर्तास एवढेच ....

In reply to by छोटा डॉन

विजुभाऊ 10/08/2010 - 17:01
( आणि जमलेल्या मित्रांना वारंवार कल्टी द्यायचा छंद आहे, वाटल्यास कुठल्याही पुणेकर मिपाकराला विचारा ). वायदे आझम ही पदवी फक्त डॉन्यालाच खर्‍या अर्थाने शोभून दिसते.

In reply to by अवलिया

असुर 10/08/2010 - 17:04
एक निरीक्षण (आणि एक अनुमान)! धागा डान्रावांनी काढला आणि नानासाहेबांचा प्रतिसाद पहिल्या नंबरला, म्हणजे या धाग्यावर किमान १५० प्रतिसाद येणार येणार येणार!!! चकास! (ह. घ्या!) --असुर

In reply to by असुर

असुर 11/08/2010 - 00:54
धत्तर तत्तर, धिन्च्यान तिच्यान... नाच्चो तिच्यायला! १५० झाले की राव!!! येका डावात, येका दिसात १५० मारले की या ध्याग्यानं... अन अजून चालू हाये!!! २००-३०० मारतंय जनू! चकास!!!

In reply to by अवलिया

कोण मी??? असा प्रश्न मला बरेच वेळा पडतो... आणि या प्रश्नाचे उत्तर आजवर तरी मला उमगलेले नाहिए.... आमचे नाव निखिल देशपांडे हे माझ्या आयडी मधुन तुम्हाला लक्षात आलेच असावे. आमचा पोटापाण्याचा धंदा म्हणालं तर बघा आय टी कंपनीत हमाल आहोत.... आणि आय टी असल्यामुळे अंमळ हळवेपणा हा बाय डिफॉल्ट आलाच??? तर आम्ही मिपा वर आलो तेव्हा आमचा आयडी हा निखील देश्पन्दे असा होता. अर्थात रुळल्यावर आम्ही तो बदलून घेतला हा भाग अलाहिदा. जालावर भटकण्याची सवयीनेच मिसळपाव च्या घोषणे पासूनच शोध लागला होता पण आम्ही जरा सदस्यत्व घ्यायला उशीर केला आणि आमचा बिल्ला नं झाला ५४१. सदस्यत्व घेतल्यानंतर पहिले २-४ महिने आम्ही फक्त वाचनमात्रच होतो पण एक दिवस असेच लॉगिन केले आणि आम्हाला खरडवही या मिपावर एकेकाळी सगळ्यात हॅपनिंग असलेल्या गोष्टीचा साक्षात्कार झाला. आणि आम्ही लवकरच खरडवही उचकापाचक मंडळाचे अध्यक्ष प.रा. राजवाडे यांचा मार्गदर्शना खाली आम्ही खव उचकापाचक करायला लागलो. त्याच काळात आम्हाला खरडवहीत झेंड्याचा चड्ड्या हा ऐतिहासिक खरडवाद वाचायला मिळाला. तुमचे लाडके चोता दोन आणि आमचे एक आमच्याच गावचे म्हणजेच औरंगाबादचे मित्र आनंदयात्रीजी आणि यांच्यातला वाद गाजला. या वादात आक्रस्ताळी अदिती पण बहुधा सामील होती. या वादाचा आम्हाला सगळ्यात जास्त झालेला फायदा म्हणजे श्री. धमाल मुलगा बारामतीकर यांची मैत्री. हा माणुस कुणालाही गप्पात कसा गुंतवेल सांगता येत नाही हो.. आणि त्यानंतर एक एक करुन ओळखी व्हायलाच लागल्या, काही चांगले नांतेसंबध जुळल्या गेले. इथल्या मित्रांची यादी आता खुप मोठी आहे. तर असे हे मिपा ज्यावर आम्ही आलो आणि इथलेच झालो. बाकी माझ्याबाबत लिहायचे राहुनच गेले. अर्थात सांगण्यासारखे काही खास नाही. हळुहळु बोलुयात खरडवहीतुन म्हणजे ओळख होईलच.

मितभाषी 25/08/2010 - 18:40
डॉनराव हे लै भारी. मी भाउसाहेब. तसे मला सगळे हौशा, गवश्या, नवश्या किंवा भावश्या म्हणुन ओळखतात. म्हणजे त्याचे असे झाले. आम्ही आमच्या पालनकर्त्या मायबापास एका जत्रेत सापडलो त्यामुळे 'गवश्या'. आम्ही सापडण्याअगोदर आमच्या पालनकर्त्या मायबापानी देवाला नवस केल्ता. त्याणा अपत्यप्राप्ती होन्याअगुद्रच आम्ही त्यांना सापाडलो/गवासलो. म्हणुन नवश्या. तसेच आम्हाला लहानपनापसुनच लै हौस(हवस नव्हे) म्हुन हौश्या. आनि ठेवल्याल नाव भाउसाहेब म्हुन भावश्या. आमचे आवडते लेखक्/लेखिका म्हन्जी, फुस्स, कार्लोस, वहिनी, दादा कोंडके, _अदिती, गणपा, संजोप राव, बिकाशेठ इ इ. आम्ही कट्ट्यावर लय 'धमाल' करतो. दादा दरोज येगयेगळ्या बाया काखत घालुन येतो नि आम्हाला लै हसवतो म्ह्नुन आम्ही त्याइचे आभारी. कार्लोस मला इंग्रजी शिकवतो. फुस्स एक नंबर ठुसक्या आहे. म्हणुन त्याला सरकारने PUC अनिवार्य केले आहे. तो कट्ट्याव आल्याव आम्ही मागच्या वर्षीचे स्वाइन्चे मास्क घालुन बसतो. मला मिपा फार्फार आवडते. इथले प्रतिसाद फार आवडतात. मला वाचायला आवडते. भावश्या.

फुस्स 10/08/2010 - 14:56
वैयक्तिक ओळख वाढवावी किंवा कोणत्याही प्रकारची मस्करी करावी ह्या साठी संस्थळावंर येत नसल्याने जास्त काही लिहु शकणार नाही. -(आवाज आला क्का ?) फुस्स

In reply to by पांथस्थ

फुस्स 10/08/2010 - 16:48
मला वाटतं इथे प्रत्येकजण आपल्या आवडीनिवडी आणि स्वतःची ओळख / हेतु सांगतोय. बघा, मराठी कळत असलं तर! ह.घ्या.हे.वे.सां.न.ल -(आवाज आला क्का ?) फुस्स

In reply to by फुस्स

पांथस्थ 11/08/2010 - 08:45
बघा, मराठी कळत असलं तर!
हो का? बघू बरं ...
ओळख म्हणजे 'खरे नाव' आणि इतर डिटेल्सच सांगावे अशी अपेक्षा नाही, सांगितले तर हरकत नाही. मात्र तुमच्या आयडीबद्दल, आवडीनिवडीबद्दल, छंदाबद्दल अशीतशी अवांतर माहिती हवी आहे. तुम्ही काय करता, कुठे असता ह्यासंबंधी माहिती दिलीत तरीही हरकत नाही.
...वैयक्तिक ओळख वाढवावी किंवा कोणत्याही प्रकारची मस्करी करावी ह्या साठी संस्थळावंर येत नसल्याने...
या प्रश्नाला तुमची प्रतिक्रिया कसे बरं उत्तर ठरू शकते? ना त्यात आवड सांगितली आहे ना छंद ना काही अवांतर. ह्याला माझा (तात्त्विक) आक्षेप होता :) असोत. जास्त वैयक्तिक होण्यापेक्षा हा (सं)वाद इथेच थांबवूया.

In reply to by मी ऋचा

फुस्स 11/08/2010 - 12:45
:) लाफिंग गॅस सोडला होता वाट्टं ! असो , पाथस्थांना उत्तर देण्याची गरज वाटत नाही. टारझनाचे पाहुन सगळ्यांनीच त्याच्या स्टाईलचे अनुसरन करायला सुरुवात केली आहे. प्रत्येकाला जमेलंच असे नाही. -(आवाज आला क्का?) फुस्स

असुर 10/08/2010 - 14:57
मायला, डान्रावांनी धागा काढून १० मिनिट झाली आणि कोणी काय बोलला नाय इथे!! फक्त २ प्रतिसाद!!! फाउल झाला ना!!! असो!!! आपण असुर. बरीचशी माहिती लिहिली आहेच पण परत एकदा. चकाट्या पिटणे हा आमचा जाहीर व्यवसाय आहे. आणि असुर हे नाव घेण्यामागे काहीही प्रयोजन नाही. "सुहास्य तुझे" हे गाणे ऐकत होतो, आणि "जशी विमोही सुरासुरांची" हे वाक्य ऐकून आपल्याला हे नाव सुचलंय. बाकी आपण नवीन-जुने हा फरक मानतच नाय! माफक मस्करी करावी, चांगला टाईमपास होतो.. चार बरे लेख पाडावेत, काहीतरी चांगलं वाचल्यासारखं वाटतं. बास, अजून काय लिहिणे, लेखन-सीमा!

नगरीनिरंजन 10/08/2010 - 15:05
मी नगरीनिरंजन, मूळचा नगरचा (अहमदनगरचा). सध्या सिंगापुरात. नवीन चांगले मराठी वाचण्याचा आणि काहीबाही लिहिण्याचा किडा आहे म्हणून इथे आलोय.

मनि२७ 10/08/2010 - 15:08
मला आता माझी ओळख करून द्यायला आणि घ्यायला पण एकदम सोप झाल ... (गट:- नवीन सदस्य!!!!!!) चला सुरवात नावापासून.(अर्थात माझ्या..) माझ नाव:- मला मनी/ माऊ काहीही म्हणू शकता .... :-) काम :- मी पुण्यात एका software कंपनी मध्ये नोकरी करतेय पण मुळची अस्सल विदर्भातली....... छंद :- नवीन नवीन पदार्थ खायला जरा जास्त आवडत(शाकाहारी आणि मासाहारी दोन्हीपण) आणि त्यामुळे पाककृतीची आवड, भटकंती करायला आवडत(पावसाळ्यात जास्त), त्यामुळे पक्षी निरीक्षणाची आवड आणि असाच time pass भरपूर काही आहे पण आता आठवत नैये (आठवलं कि सांगतेच परत)..... सध्याची आवड:- मिपावर हिंडणे बस!!!!... आणि अशीच थोडक्यात ओळख सगळ्या सदस्यांनी द्यावी(माझी ओळख थोडी जास्त झाली असेल तर तुम्ही थोडक्यात द्या पण द्याच...) आभारी.... :-) मनी...

मन 10/08/2010 - 15:09
नवीन्-जुने,हिरवे-पिवळे चर्चेला सकारात्मक वळण दिल्याबद्दल डॉन्याचं अभिनंदन आणि आभार. मी, मन.... मनोबा. मला दोनेक वर्षापासुन इथं नवीन असल्यासारखच वाटतय. :) मी क्वचितच लिहितो.(लेख किंवा प्रतिसाद) आणि जितकं लिहिलय त्यातही क्वचितच समोरच्याचं कौतुक करतो.(चांगल्या गोष्टीला "फाल्तु आहे.सवंग आहे" असं म्हटल्याशिवाय मला मोठं कोण म्हणणार?(तसही कुणीच म्हणत नाही म्हणा) ) प्रवेश करत नस्लो तरी बहुतांशी वाचनमात्र असतोच असतो. इथल्या जवळपास सगळ्याच "हिट" लेखांचा(आणि तो लिहिणार्‍यांचा मी फ्यान आहे) अधिक काय सांगु?

माझं नाव माझ्या नावाप्रमाणेच आहे. सुरूवातीपासून तसंच आहे. त्यामुळे कसं सुचलं वगैरे प्रश्न गैरलागू आहेत. एक नंबर कंपूबाज. फक्त आपल्या कंपूला काही बंधन नाही. गप्पा मारणारे, हसून खेळून वावरणारे कोणीही आमच्या कंपूत बाय डिफॉल्ट सामावून घेतले जातात. कधी कधी काही तरी लिहितो इथे. ( http://www.misalpav.com/newtracker/322 प्लिज प्लिज प्लिज वाचा आणि कौतुक करा ) ... नवीन सदस्यांचं स्वागत. मिपावरही आणि आमच्या कंपूतही.

जोशी 'ले' 10/08/2010 - 15:13
आता डान साहेबांनी इचारालय म्हून सांगतो , नाय तर आपण कुणाला घाबरत नाय, मी जोशी 'ले' माझ्या बद्दल सांगण्या सारखे काही नाही , मी खूप दिवसां पासून मि. पा. चा एक वाचक आहे, पण सदसत्व आताच मिळालाय,

गणपा 10/08/2010 - 15:14
नमस्कार मंडळी, मी गणापा. बिल्ला नंबर ७०७ मुंबईकर, पण सध्या वास्तव्य विदेशात. प्रत्यक्षात एका मिपाकराला सोडुन अन्य कुणाला पाहिलेल नाही. पण बरेच मित्र असे मिळालेत की वाटत आम्ही शाळुसोबतीच. :) विनाकरण कुणाशी वाकड्यात जात नाही. कुणी डिवचल तर मग मात्र खरडी प्रतिसाद फेकुन मरतो ;) आवड निवड म्हणाल तर कानसेन आहोत. हौशी कुक. आता जालिय मित्रांनी डोक्यावर चढवुन ठेवलय ही त्यांची दर्यादिली. फिरायला घरातुन पाय बाहेर पडत नाही, पण पडलोच तर मात्र मनमुराद आनंद लुटतो. बाकी आता आहात इथेच तर खरडत जा इथे अधुन मधुन. तेवढीच ओळख वाढत जाईढ.

In reply to by गणपा

'हौशी' शब्दावर जोरदार आक्षेप आहे. बाकी कोण मिपाकर आहेत हो तुमच्या ओळखीचे? आय मीन, तुम्ही बघितलेले?

In reply to by गणपा

चिंतामणी 10/08/2010 - 23:31
मी गणापा. प्रत्यक्षात एका मिपाकराला सोडुन अन्य कुणाला पाहिलेल नाही. प्रेषक गणपा दि. मंगळ, 10/08/2010 - 15:31. दिसत न्हाय का मावत न्हाय. =)) म्हंजी बिकाला बघितला हायेस दिसते. (चौकस)चिंतामणी.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

विकास 10/08/2010 - 16:39
'हौशी' शब्दावर जोरदार आक्षेप आहे. अगदी! हे म्हणजे, दहावीला बोर्डात पहीले येणारे मुलाखतीत कसे सांगतात की मी कधी अभ्यास केलाच नाही, तसेच काहीसे हे झाले. ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

विजुभाऊ 08/12/2014 - 15:46
हौशी' शब्दावर जोरदार आक्षेप आहे. बिका मराठीत "हौशी " हा शब्द फारसी "हवस " या शब्दावरून आलेला आहे .. ( चला पळा................ )

ऋषिकेश 10/08/2010 - 15:25
मी ऋषिकेश. बिल्ला नं २७० मुंबईकर भटकायला - वाचायला - चित्रपट बघायला आणि या सगळ्यावर लिहायला (उतरत्या क्रमाने) आवडतं.. मिपावर गप्पा मारणे, माहीती मिळवणे आणि मजा करणे अश्या तिहेरी हेतूने येतो.

In reply to by ऋषिकेश

नंदन 10/08/2010 - 23:41
भटकायला - वाचायला - चित्रपट बघायला आवडतं.. मिपावर गप्पा मारणे, माहीती मिळवणे आणि मजा करणे अश्या तिहेरी हेतूने येतो.
--- +१ :)

गांधीवादी 10/08/2010 - 15:35
एक सामान्य माणूस अभियांत्रिकी शाखेतून पदवीधर, पुण्यातील एका संस्थेतून MBA (finance) करीत आहे. आवडता विषय एक आणि एकच राजकारण. माझे स्वप्न एकद दिवस तरी भगतसिंग/ सावरकर यांच्या सारखे जगायचे आहे. ( DO OR DIE ) हा जन्म भारताच्या सत्कारणी लावायचा आहे.

In reply to by गांधीवादी

विजुभाऊ 10/08/2010 - 16:11
गांधीवादी : माझे स्वप्न एकद दिवस तरी भगतसिंग/ सावरकर यांच्या सारखे जगायचे आहे. हम्म.. नो कॉमेन्ट्स. राजकारणातल्या कोलाम्ट्याउड्या इतिहासातही :) अवांतर :तुमच्या त्या अवताराला गांधीवादी सावरकर म्हणावे लागेल. अतीअवांतर : भाजपने कधितरी स्वीकारलेला गांधीवादी समाजवाद तो हा असाच होता का?

"माफक थट्टामस्करी चालणार असली तर धागा भरकटु नये ह्याची काळजी घ्यायला 'संपादक मंडळ' समर्थ आहे." (हे काही धाग्यांतील प्रतिसादाबाबतही व्हावे अशी अपेक्षा आहे. असो.) =================================================== नमस्कार. मी 'इन्द्रराज पवार' आणि याच मूळ नावाने इथे वावरतो. कलाशाखेचा पदव्युत्तर. मूळचा कोल्हापुरचा पण आता दिल्ली, हरियाणा आणि पंजाब या भागात व्यवसायानिमित्ताने भटकंती. महिन्यातून एकदोनवेळा कोल्हापुरी घरी परत येत असतो. खूप प्रवास त्यामुळे "मिसळपाव" हा प्रवासातील फार जवळचा असा मित्र बनला आहे. (रोहटकच्या वाटेवर "ती" स्वयंपाक धागा मालिका वाचत असताना होत असलेल्या मनोरंजनामुळे प्रवास चालू असताना फार हसू येत होते, आणि माझे त्या हसण्यामागील कारण न समजल्याने माझे शिख मित्र गोंधळुन "ओये, देखो तो अपना बिट्टा पागल हो गया है" असे आपसात म्हणत होते.) साहित्य (मराठी आणि इंग्लिश), राजकारण, समाजजीवन, इतिहास यांची आवड त्यामुळे या विषयावरील धाग्यात भाग घेणे, प्रतिसाद देणे आवडते. तसा फार जुना सदस्य नाही, तरीही सदस्यत्व घेतलेल्या दिवसापासून इथे रमलो आहे हे तितकेच खरे. संपादक मंडळ "मिसळपाव"साठी स्वतःचा वेळ/पैसा खर्च करत असते याची जाणीव असल्याने त्यांनी आखणी केलेल्या धोरणाविरुद्ध कधीही वर्तन केलेले नाही. शिवाय एखादी बाब व्यक्तीशः आवडली नसेल तर मंडळातील कुणाही एकाला "व्य.नि." केला तर त्यावर कार्यवाही होते असा अनुभव असल्याने तक्रारीस जागा नाही. अशुद्ध लिखाणाची नावड आहे, त्यामुळे धागा देताना वा प्रतिसाद देताना तो तिथे जाण्यापूर्वी दोन-तीन वेळा तपासतो. (तसेच चर्चेत वाद वाढणार असे दिसल्यास कुठे थांबायचे ते समजते, "क्षमस्व" म्हटल्यास सर्व काही शांत-शांत होते असा अनुभव आला आहे. त्यामुळे एकमेकात कटुता राहात नाही.) नवीन सदस्यांचे हार्दिक स्वागत आणि त्यांच्या लेखनास शुभेच्छा ! इन्द्रा

विलासराव 10/08/2010 - 15:47
मी विलास शिंदे........मला बरेच लोक विलासरावच म्हनतात म्हनुन हि आयडी.मुळचा अहमदनगरचा.वास्तव्य मुंबई येथे. भटकंती, वाचन ही आवड. नवीन सदस्य असलो तरी वाचक जुनाच आहे. खेचाखेची आवडत नाही पण कुनी केलिच तर..............सरळ दुर्लक्ष करतो. कुणाही मिपाकराला प्रत्यक्ष ओळखत नाही.

In reply to by शेखर दिवसे

काका!!! प्रश्नाची गल्ली चुकली.... असो. आधी माहिती द्या ना... डान्या वरडू वरडू सांगायलाय की तुमची माहिती द्या म्हून...

नितिन थत्ते 10/08/2010 - 15:43
मी नितिन थत्ते. पूर्वी काही काळ खराटा या नावाने लिहित असे. स्वतः खूप काही लिहीत नाही. (दुसर्‍याने लिहिलेल्यावर कॉमेण्ट मारणे सोपेच असते). घटना, अर्थशास्त्र, स्त्रीपुरुषसमानता आणि पुरुषमुक्ती, रॅशनलिझम, राजकारण हे जिव्हाळ्याचे विषय.

अमोल मेंढे 10/08/2010 - 15:43
माझ्याबद्दल थोडेसे, मी अमोल मेंढे, मुळचा वर्ध्याचा...सध्या राजस्थानात राहतो. मिपा वर बर्‍याच दिवसांपासुन येतो..पण सदस्यत्व आता आताच मिळाले. आवडी म्हणाल तर...वाचायला, गायला ,रचायला आणि नाचायला आवडते. जालावर बर्‍याच दिवसांपासुन असल्यामुळे खुप मित्र आहेत. आणखी काय सांगु? ( माझी बायको मला माझ्यापेक्षा जास्त ओळखते.)

मृत्युन्जय 10/08/2010 - 15:49
मी पुण्याचा . नावात काय आहे. त्यामुळे सांगत नाही. मृत्युन्जय माझे नाव नाही हे तर ओघाने आलेच. नवीन सदस्य म्हणावा तर आयडी तयार करुन २ वर्षे झाली. आणि जुना म्हणावा तर फारसे काही लिहिलेले नाही. मि पा वरचा सक्रीय वावर सध्याचाच. एवढ्यात इथ खुप "छान" चर्चा चालु आहेत त्यामुळे जरा जास्तच सक्रीय आहे. एरवी आधी फारसे लिहीले नव्हते (म्हणजे मी खुप छान लिहितो तरीही लिहिले नव्हते असे नाही तर वाचण्यासारखे काही आपल्याला लिहिता येते असे वाटतच नसल्यामुळे लिहिले नव्हते. नुकत्याच पेव फुटलेल्या अनेक लेखकांचे लेख बघुन आपणही याहुन वाईट लिहित नाही याची खात्री पटल्यामुळे काही लेख लिहिले आहेत खरे. ) वाचायचो मात्र खुप. मित्राने मिसळपाव वरुन रामदासांचा काटेकोरांटीची फुले स्कॅन करुन पाठवला तेव्हापासुन मि पा चा फॅन झालो. आणि शिंपिणीचे घरटे वाचुन रामदासकाकांच्या लेखणीच्या प्रेमात पडलो. इथे उत्तमोत्तम लेख वाचायला आणि त्याहुन महत्वाचे म्हणजे त्याचे रसग्रहण करणार्‍या प्रतिक्रिया वाचायला जाम आवडते. इथे मुख्यत्वेकरुन तेच करायचो पुर्वी. अजुनही तेच करतो. पुढेही तेच करत राहीन (नाही म्हणता कुजकटपणा अजुन थोडा वाढला तर कदचित प्रतिक्रिया पण देइन.) आवडते लेखक अर्थात रामदास काका.

बर झाले! हा धागा सुरु झाला (गट:- नवीन सदस्य!!!!!!) माझ नाव:- मला हर्षद म्हणू शकता .... काम :- मी पुण्यात एका software कंपनी मध्ये नोकरी करतोय पण मुळं मात्र सातारा, सांगली आणी कोल्हापुरची ....... छंद :- नवीन नवीन पदार्थ खायला आवडत(शाकाहारी आणि मासाहारी दोन्हीपण) भटकंती करायला आवडत)..... सध्याची आवड:- मिपावर हिंडणे बस!!!!... बिपिन कार्यकर्ते रोचक विशाल व इतर मंडळींचा प्रचंड फंखा. त्यांच लेखन वाचुनच इथ्ले सभासदत्व घेण्यासाठी धड्पड केली आणी काही अंशी यशस्वी झाली. झालच तर बिकाषेठच्या कंपुमध्ये जागा बळकावि म्हणतो.

स्व 10/08/2010 - 15:52
माहिती माझी.... व्यावहारिकदृष्ट्या बिनकामाच्या माहितीचा अफाट खजिना ...... मी. भावनिक जगाच्या हिंदोळ्यात डोलणारा..........................मी नको तितकं खरं नाही त्या ठिकाणी बोलून पस्तावणारा ..........मी तिला पाहुन खुदकन हसणारा आणि आपलं हसु दाबणाराही....हो ..मी च. मी गर्दित उभा असतो गर्दितला एक बनून पण त्या धामधुमीत्,त्या गर्दीतही बघत असतो बाहेरच्या गोबर्‍या गुलाबावरचा टप्पोरा थेंब तल्लीन होउन मी असतो अफाट काम करणारा... तथाकथित "थॅंकलेस्" जॉब करणारा.... पण ते केल्यावर लोकांचं समाधान पाहुन भरुन पावणारा. माझ्या मनात आहे इच्छा ओंजळभर भूतकाळ बदलण्याची.... माझ्यात आहे उर्मी उद्याचं भविष्य घडवायची. थोडासा बावळट्,किंचित भोळ्सट दिसत असेनही. वागायला मात्र थोडासा खट्याळ बराचसा नाठाळ असेनही. पण तु नसताना तुझ्याच आठवणीत रमलेला मी असेनही.... सगळ्या दोस्तांत एकमेव मी.... भरल्या गर्दित एकटाच मी....... माझा मलाच पुरत नाही मी! जगभर सांडुन इथं तिथं सगळिकडं भरुन राहिलोय मी दोस्तांनो, ह्या सफळ्यातला कुठला तरी "मी" तुम्हीही असणारच. का ह्याहुन वेगळे, आपल्या सप्तरंगात स्वच्छंद तरी तुम्ही असणारच. इथं लिहिलय तस्साच आहे मी... तुम्हीही सांगा कसे,कोण आहात तुम्ही? अजुन डीट्टेल माहिती हवी असेल तर बोला, मी लिहायला मोकळाच आहे.(मिपा च्या ब्यांडविड्थ चं तेव्हढं माहित नाही. त्यांना हे झेपल की नाही.)

In reply to by स्व

तुमचं खरं नाव नानू सरंजामे आहे का हो? (ह. घ्या).
माझ्या मनात आहे इच्छा ओंजळभर भूतकाळ बदलण्याची.... माझ्यात आहे उर्मी उद्याचं भविष्य घडवायची. माझा मलाच पुरत नाही मी! जगभर सांडुन इथं तिथं सगळिकडं भरुन राहिलोय मी

मी अदिती; आयडीतल्या विशेषणाप्रमाणे विक्षिप्त आहे असं प्रत्यक्षात भेटलेले लोकं मला सांगतात. ३_१४ आकडा मी पायपंथी, इरॅशनल, असल्यामुळे तिथून उचलला. तसंही माझी तीनतेराशी असलेली जुनी जवळीक ३_१४ मधूनही दिसतेच (असं मीच म्हणते). माझ्याबद्दल खास काही सांगण्यासारखं नाही, अर्थात आपली आपण काय स्तुती करायची! पण सदर धागाप्रवर्तक चोता दोन, आपलं छोटा डॉन, आमचे रा.को. असल्यामुळे धाग्यावर लिहीलं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

"आयडीतल्या विशेषणाप्रमाणे विक्षिप्त" मला ही "अदिती" कधीही विक्षिप्त वाटलेली नाही, त्यामुळे या विशेषणाचा (तसेच त्या ३_१४ चा) कधीच विचार केलेला नाही. इन्द्रा

कशी शाळा-कॉलेजमधल्या, गेलाबाजार हापिसातल्या पहिल्या दिवसाची आठवण आली. हजारो आयडी असलेल्या अश्या संकेतस्थळावर अश्या ओळखी होणं खरच उपयोगी असतं याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. मी जेव्हा परक्या शहरात खुप अडचणीत होतो तेव्हा इथंच ओळख झालेले संपादक निखिल यांनी मला किती मदत केली ते माझं मला माहिती. या धाग्यामुळं सदस्यांमधे सामंजस्य्-सौहार्दाचं मनमोकळं वातावरण निर्मा होईल अन नवनविन मित्रांची ओळख होईल ही अपेक्षा. असो! आता माझ्याबद्दल थोडंस. माझं नाव प्रसन्नकुमार केसकर. मुक्काम पुणे. व्यवसाय पत्रकार. सध्या पुण्यातल्या एका इंग्रजी दैनिकात काम करतो आहे.

In reply to by अर्धवट

अजुन फक्त `गार'च आहे. थोडे दिवस आहेत अजुन सल्ला देऊन लोकांना `गार' करायला सुरुवात करायला. सध्या फक्त पत्रक-कारच आहे रे.

मितान 10/08/2010 - 16:04
नमस्कार मी माया ज्ञानेश. लातूर-औरंगाबाद-पुणे -सध्या बेल्जियम मध्ये राहाते. स्कूल सायकॉलॉजिस्ट आहे. पण सध्या रिकामटेकडी. माणसं-पुस्तकं, खाणं-खाऊ घालणं, सैपाकघरात अनेक प्रयोग करणं, आणि सर्वात आवडीचं -भटकायला आवडतं. अशीच जालावर भटकत भटकत इथे आले, अनेक समानधर्मी दिसले म्हणून थांबले.. :)

In reply to by मितान

"आवडीचं -भटकायला आवडतं." माया.... नवीन सदस्यांची संख्या खूप आहे, त्यामुळे त्यांना केव्हातरी बेल्जियमच्या "त्या निळाई" चा आनंद द्या. इन्द्रा

In reply to by मेघवेडा

ऊप्प्प्प्प्स्स्स्स्स !! सॉरी.... "माया" ब्रुसेल्समध्ये असल्याने बेल्जियमच डोक्यात राहिले. ("निळाई"चा वरदहस्त त्या देशावरदेखील असेलच.) इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

असुर 10/08/2010 - 16:51
एक शंका येऊ रहायली कवाधरून... या निळाईचा आणि आपल्या 'निळूभौ'चा काय सबंध हाये का??? कोनिबी शंकाणीरसण करावे! --असुर

In reply to by असुर

Nile 10/08/2010 - 23:03
कोण निळुभौ? ;-) बाकी आपली काय वळक द्यायची राव? सुतासारखा सरळ मानुस, सुशील, सोज्वळ समंजस (वग्रै वग्रै) गरजेपुरता सैपाक येतो, अगदी साध्या आवडीनिवडी, कसला सोस नाय की काय नाय, अहो एकदम कॉमन मॅनच म्हणा ना. (डान्या, जमलंय का?)

In reply to by इन्द्र्राज पवार

ग्रीस नाही आणि बेल्जियम नाही. ती "निळाई" इटलीची. सुर्याला आव्हान देणा वेश घालणार्‍या तरुणी. आठवलं का ? या निमित्ताने पुलंचं ते वाक्य आठवलं जे कायम लक्षात राहिलंय. "आज माथ्यावरच्या निळ्या आकाशाला मी मोठ्या अभिमानाने सांगतो की तुझ्या निळाईचा अर्थ सांगणार्‍या त्या नीलकुहरातल्या पाण्याला मी भेटून आलो आहे."

In reply to by अप्पा जोगळेकर

"पुलंचं ते वाक्य आठवलं जे कायम लक्षात राहिलंय." हे बरोबर आहे आणि पु.लं.नी तसा "निळाई"चा उल्लेख केलेला हेही वाचले आहेच. पण आम्ही मायाताईंना उद्देशून जे लिहिले आहे त्याचा संबंध त्यांनी केलेल्या "ग्रीस" सफरीचा सविस्तर वृत्तांत इथे कलादालनात अनेक सुंदर फोटोसह दिला होता, तीमध्ये अगदी "इटली" सारख्याच एका निळाईचा समावेश होता. नवीन सदस्यांना (जे अनेक आहेत) कदाचित कलादालनची पाने उपलब्ध नसावीत - 'प्रवेश प्रतिबंधीत' असा इशारा येत असल्याची संपादकांकडे त्यांनी तक्रारही केली आहे - म्हणून पुनश्च फोटोंचा तो खजिना नव्याने द्यावा यासाठीचा तो प्रतिसाद होता.

In reply to by इन्द्र्राज पवार

मितान 13/08/2010 - 18:41
इंद्रराज, माझ्या नावामुळे काही सदस्यांचा घोटाळा होतो आहे. म्हणून आजपासून मी ' माया ज्ञानेश ' च्या ऐवजी ' मितान ' या नावाने मिपावर असेन. :) ग्रीस ची निळाई मी दुसर्‍या एका संस्थळावर लिहिली होती. इथे नाही. इथेही टाकण्याच्या विचारात आहे.

विजुभाऊ 10/08/2010 - 16:18
मी विजुभाऊ रहायला विले पार्ले. सध्या मात्र पुण्यात वाचायला आवडते. द मा मिरासदार , शंकर पाटील , पु ल ,सु शि , व पु, जी ए , नेमाडे , श्री ना ,मार्क ट्वेन , अंतोन चेकॉव्ह , हॅन्स अ‍ॅन्डरसन्स , डॅन ब्राऊन , सिडने शेल्डॉन , पाउलो कोएलो , इलियाहु गोल्डराट , सोफोक्लीस आर्थर कोनन डॉयल हे आवडते लेखक. आय ड्रीम ऑफ अ जीनी , डेनीस द मिनेस , थ्री स्टुजेस , हम पांच या आवडत्या सिरीज. थोडे फार लिखाण करतो , फार पूर्वी कधितरी नाटक करायचो. पगार देणारे काम : ई आर पी कन्सल्टिंग , प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट इ. लष्करच्या भाकर्‍या : स्ट्रेस मॅनेजमेन्ट , मेमरी रीटेन्शन, पर्सनल काउन्सेलिंग वगैरे. खाण्याची आवडः: उंधियो , पिठलं भाकरी ,पापलेट,सुरमयी , सोलकढी सर्वात आवडते काम : चकाट्या पिटणे, गप्पा मारायला सौंगडी गोळा करणे, टीममधल्या स्वभावाने सिर्यस लोकाना कामाला जुंपणे वगैरे वगैरे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आधी तुम्ही आरोप करणार | मग आम्ही स्पष्टीकरण मागणार || तेव्हा तुम्ही पळून जाणार | (आता पुरे नाहीतर) डान्राव मारणार निश्चित ||
नमस्कार मित्रांनो ( आणि मित्रांच्या मैत्रिणींनो ) ! मिसळपावच्या कट्ट्यावर दिवसेंदिवस नवनविन सदस्यांची भर पडते आहे.सर्व नविन सदस्यांचे मिपा परिवारातर्फे स्वागत ! मिपाचे रुपडे पालटले आहे.

गोची-१

विनायक प्रभू ·

सहज 09/08/2010 - 07:56
मला तो सिनेमातला एक संवाद आठवला. ये बंबई (मुंबई हो) है| यहा पूरे देशसे रोज हजारों नौजवान फिल्मोंमे हिरो या हिरॉइन बनने चले आते है| स्लो एन्ड स्टेडी विन्स द रेस की राईट नाउ राईट हियर?

सहज 09/08/2010 - 07:56
मला तो सिनेमातला एक संवाद आठवला. ये बंबई (मुंबई हो) है| यहा पूरे देशसे रोज हजारों नौजवान फिल्मोंमे हिरो या हिरॉइन बनने चले आते है| स्लो एन्ड स्टेडी विन्स द रेस की राईट नाउ राईट हियर?
कधी येणार ही बस? शेअर टॅक्सी केली तर बरे झाले असते. की चालत जाऊ? नको.

संपादकांचे अभिनंदन

अवलिया ·

ऋषिकेश 03/08/2010 - 14:50
माताय! प्रत्येकाला आपल्या रेझ्युमेवर १००+ धागे हवेत.. :P

तहाची प्रक्रिया सुरु झालेली दिसते. असा धागा काढल्याबद्दल नानाचे देखील अभिनंदन. ह्या धाग्यावर उर्मटपना न करणारा प्रतिसाद दिला म्हणुन 'रुशिकेश्' चे पण अभिनंदन.

अनिल २७ 03/08/2010 - 15:56
हा धागा सुरू झाल्या झाल्या मागच्या बेंचावरुन एक आवाज आला.."संपादकांचेच का अभिनंदन? माझे का नाही.. तुमच्या ईतकी नसेल पण माझ्याही लेखनाला कोलिती आहे"... कुणाचा बरे असेल हा आवाज..?

सविता 03/08/2010 - 16:09
मला मंगेश पावस्कर नामक सदस्य आल्यावर त्याचे लेखन.... त्यावर झालेली विडंबने.... वगैरे वगैरे दिवस आठवले.... जाम मजा यायची..... तसेच परत वाटतेय्..सु.कु आणि प्रविन्भाप्कर हैदोस घालताहेत.... लोक त्यावर तावातावाने प्रतिसाद देताहेत.... बरेचसे लोक बाजूला झाडावर बसून डाएट कोक आणि पॉपकॉर्न खात मजा लुटताहेत.... वाह वाह.... कोक पिवानु...मज्जानि लाईफ..... अशी मजा करण्यासाठी तर माणूस मराठी संस्थळावर जातो.... सभ्य....तात्विक (चांगल्या मराठीत पुचाट!!)चर्चा कधी कधी ठिक आहेत... पण फक्त तेवढेच? फार बोअर होऊ लागले होते अलीकडे मला मिसळ्पाव.... तर्री हरवल्यासारखे!! पण परत मजा यायला लागली आहे... थेन्कु थेन्कु सु.कु आणि प्रविन्भाप्कर..मिभो..अवालिया........ -सविता.

श्रावण मोडक 03/08/2010 - 17:47
या अशा गोष्टी नानाच करू जाणे. अभिनंदन करून मोकळे. आता कुठंही संपादकांनी काही केलं तर आधी संपादकांनी डुलक्या घेतल्या असे म्हणायला झाले मोकळे आकाश... :) हे असं का म्हणतोय त्याचा एक खुलासा - मला एक आठवलं. महाराष्ट्रातल्या एका गावातील आमदारांच्या मुलीनं पळून जाऊन लग्न केलं. तो मुलगा आमदारांच्या विरोधकाच्या गटातील. लग्न नोंदणीकृत. त्यामुळं गोपनीयता टिकून राहिली. काही दिवसांनी दोघांचंही लग्नानिमित्त अभिनंदन करणारी जाहिरात एकदम स्थानिक पेपरांमध्ये. ती करणारे कोण हे काही सांगण्याची गरज नाही म्हणा. आमदारांनाही जाहिरातीतूनच पोरीनं काय केलं ते कळलं.

आमोद शिंदे 03/08/2010 - 18:08
अजून तरी इथल्या ग्रामस्थांनी तक्रार न केल्याने पोलिसांच्या आडकाठी शिवाय मिभो पार्ट्या जोरात चाललेल्या दिसतात. ग्रामस्थांचे व पोलिसांचे अभिनंदन!

हम्म, धाग्यातल्या आशयाची नोंद घेतली. :) आपल्या चर्चाप्रस्तावातील काही शब्द शुद्धलेखनाच्या दृष्टीने असे हवे होते, दिवसापासून, विचार प्रबोधन , दाबून , मनापासून आपल्या लेखनातील अशुद्ध शब्दाबद्दल माझे निरीक्षण असे आहे की आपण उकार देतांना र्‍हस्व शब्द लिहिण्यावर भर देता थोडी काळजी घेतली तर लिहितांना चुका होणार नाहीत. किंवा फायरफॉक्स न्याहाळक वापरत असाल तर त्याला हे Add-ons जोडावे शुद्ध शब्द लिहिण्यास मदत होईल. स्वगत: हा नाना जातो कुठे माझ्या तावडीतून. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अवलिया 03/08/2010 - 18:26
आपल्या चर्चाप्रस्तावातील काही शब्द शुद्धलेखनाच्या दृष्टीने असे हवे होते नोंद घेतली आहे. स्वसंपादनाची सोय नसल्याने कृपया ते बदलुन द्यावे. (आपण संपादक असल्याने आपल्यालाच प्रत्यक्ष सांगत आहे, तरी अंमलबजावणी व्हावी) आपल्या लेखनातील अशुद्ध शब्दाबद्दल माझे निरीक्षण असे आहे की आपण उकार देतांना र्‍हस्व शब्द लिहिण्यावर भर देता थोडी काळजी घेतली तर लिहितांना चुका होणार नाहीत. इतरत्र समांतर विषयावर आपण प्रतिसाद दिला होता, त्याला मी उत्तर दिले होते. कदाचित आपण ते वाचले नसावे म्हणुन त्यातला काही अंश देत आहे. मुळ प्रतिसाद - http://misalpav.com/node/13543#comment-220134
मी मराठीचा प्राध्यापक नाही, होण्याची शक्यता नाही त्यामुळे मी लिहिलेले शुद्ध लेखन असेलच असे नाही. माझ्याकडून असली भलती अपेक्षा कुणीही करणार नाही. तुम्ही सुद्धा करु नका. सबब तुमचा मुद्दा गैरलागु, तरीही तुम्ही दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचा कसोशीने प्रयत्न करेन, करेनच असे नाही.
किंवा फायरफॉक्स न्याहाळक वापरत असाल तर त्याला हे Add-ons जोडावे शुद्ध शब्द लिहिण्यास मदत होईल. सल्ल्याबद्दल आभारी. स्वगत: हा नाना जातो कुठे माझ्या तावडीतून. फारच हिंस्त्र विचार आहेत तुमचे. जरा देवाचे अभंग वगैरे वाचत जा. मन शांत होईल, वाईट विचार मनात येणार नाहीत. हरिपाठाच्या अभंगापासुन सुरवात करा...

In reply to by अवलिया

विकास 03/08/2010 - 20:42
वरील दोन (शुद्ध लेखनासंदर्भातील) प्रतिसाद हे या धाग्यात अवांतर आहेत. तसेच शुद्धलेखन मिपाच्या धोरणात बसत नाही.* असेच पुढे चालू राहीले तर अप्रकाशीत करण्यात येतील हे संबंधीतांनी ध्यानात ठेवावे. ;) * शुद्धलेखन मिपाच्या धोरणात बसत नाही, म्हणून अशुद्ध विचार बसतात असा उलट अर्थ कोणी कृपया काढू नये. :-)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नितिन थत्ते 03/08/2010 - 20:06
नानाने "संपादकांनी तक्रार करण्याची वेळ आणली नाही" म्हणून धागा काढला तेवढ्यात.....

पण अवलिया जी.... तुम्ही अगोदरच भीती व्यक्त केल्याप्रमाणे संपादकांनी "त्या दोन" प्रतिसादावर अखेर कात्री चालविलीच. तुम्ही जिंकलात. (पण त्यामुळे या अभिनंदन धाग्यातील जोर थोडा कमी होणार.)

ऋषिकेश 03/08/2010 - 14:50
माताय! प्रत्येकाला आपल्या रेझ्युमेवर १००+ धागे हवेत.. :P

तहाची प्रक्रिया सुरु झालेली दिसते. असा धागा काढल्याबद्दल नानाचे देखील अभिनंदन. ह्या धाग्यावर उर्मटपना न करणारा प्रतिसाद दिला म्हणुन 'रुशिकेश्' चे पण अभिनंदन.

अनिल २७ 03/08/2010 - 15:56
हा धागा सुरू झाल्या झाल्या मागच्या बेंचावरुन एक आवाज आला.."संपादकांचेच का अभिनंदन? माझे का नाही.. तुमच्या ईतकी नसेल पण माझ्याही लेखनाला कोलिती आहे"... कुणाचा बरे असेल हा आवाज..?

सविता 03/08/2010 - 16:09
मला मंगेश पावस्कर नामक सदस्य आल्यावर त्याचे लेखन.... त्यावर झालेली विडंबने.... वगैरे वगैरे दिवस आठवले.... जाम मजा यायची..... तसेच परत वाटतेय्..सु.कु आणि प्रविन्भाप्कर हैदोस घालताहेत.... लोक त्यावर तावातावाने प्रतिसाद देताहेत.... बरेचसे लोक बाजूला झाडावर बसून डाएट कोक आणि पॉपकॉर्न खात मजा लुटताहेत.... वाह वाह.... कोक पिवानु...मज्जानि लाईफ..... अशी मजा करण्यासाठी तर माणूस मराठी संस्थळावर जातो.... सभ्य....तात्विक (चांगल्या मराठीत पुचाट!!)चर्चा कधी कधी ठिक आहेत... पण फक्त तेवढेच? फार बोअर होऊ लागले होते अलीकडे मला मिसळ्पाव.... तर्री हरवल्यासारखे!! पण परत मजा यायला लागली आहे... थेन्कु थेन्कु सु.कु आणि प्रविन्भाप्कर..मिभो..अवालिया........ -सविता.

श्रावण मोडक 03/08/2010 - 17:47
या अशा गोष्टी नानाच करू जाणे. अभिनंदन करून मोकळे. आता कुठंही संपादकांनी काही केलं तर आधी संपादकांनी डुलक्या घेतल्या असे म्हणायला झाले मोकळे आकाश... :) हे असं का म्हणतोय त्याचा एक खुलासा - मला एक आठवलं. महाराष्ट्रातल्या एका गावातील आमदारांच्या मुलीनं पळून जाऊन लग्न केलं. तो मुलगा आमदारांच्या विरोधकाच्या गटातील. लग्न नोंदणीकृत. त्यामुळं गोपनीयता टिकून राहिली. काही दिवसांनी दोघांचंही लग्नानिमित्त अभिनंदन करणारी जाहिरात एकदम स्थानिक पेपरांमध्ये. ती करणारे कोण हे काही सांगण्याची गरज नाही म्हणा. आमदारांनाही जाहिरातीतूनच पोरीनं काय केलं ते कळलं.

आमोद शिंदे 03/08/2010 - 18:08
अजून तरी इथल्या ग्रामस्थांनी तक्रार न केल्याने पोलिसांच्या आडकाठी शिवाय मिभो पार्ट्या जोरात चाललेल्या दिसतात. ग्रामस्थांचे व पोलिसांचे अभिनंदन!

हम्म, धाग्यातल्या आशयाची नोंद घेतली. :) आपल्या चर्चाप्रस्तावातील काही शब्द शुद्धलेखनाच्या दृष्टीने असे हवे होते, दिवसापासून, विचार प्रबोधन , दाबून , मनापासून आपल्या लेखनातील अशुद्ध शब्दाबद्दल माझे निरीक्षण असे आहे की आपण उकार देतांना र्‍हस्व शब्द लिहिण्यावर भर देता थोडी काळजी घेतली तर लिहितांना चुका होणार नाहीत. किंवा फायरफॉक्स न्याहाळक वापरत असाल तर त्याला हे Add-ons जोडावे शुद्ध शब्द लिहिण्यास मदत होईल. स्वगत: हा नाना जातो कुठे माझ्या तावडीतून. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अवलिया 03/08/2010 - 18:26
आपल्या चर्चाप्रस्तावातील काही शब्द शुद्धलेखनाच्या दृष्टीने असे हवे होते नोंद घेतली आहे. स्वसंपादनाची सोय नसल्याने कृपया ते बदलुन द्यावे. (आपण संपादक असल्याने आपल्यालाच प्रत्यक्ष सांगत आहे, तरी अंमलबजावणी व्हावी) आपल्या लेखनातील अशुद्ध शब्दाबद्दल माझे निरीक्षण असे आहे की आपण उकार देतांना र्‍हस्व शब्द लिहिण्यावर भर देता थोडी काळजी घेतली तर लिहितांना चुका होणार नाहीत. इतरत्र समांतर विषयावर आपण प्रतिसाद दिला होता, त्याला मी उत्तर दिले होते. कदाचित आपण ते वाचले नसावे म्हणुन त्यातला काही अंश देत आहे. मुळ प्रतिसाद - http://misalpav.com/node/13543#comment-220134
मी मराठीचा प्राध्यापक नाही, होण्याची शक्यता नाही त्यामुळे मी लिहिलेले शुद्ध लेखन असेलच असे नाही. माझ्याकडून असली भलती अपेक्षा कुणीही करणार नाही. तुम्ही सुद्धा करु नका. सबब तुमचा मुद्दा गैरलागु, तरीही तुम्ही दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचा कसोशीने प्रयत्न करेन, करेनच असे नाही.
किंवा फायरफॉक्स न्याहाळक वापरत असाल तर त्याला हे Add-ons जोडावे शुद्ध शब्द लिहिण्यास मदत होईल. सल्ल्याबद्दल आभारी. स्वगत: हा नाना जातो कुठे माझ्या तावडीतून. फारच हिंस्त्र विचार आहेत तुमचे. जरा देवाचे अभंग वगैरे वाचत जा. मन शांत होईल, वाईट विचार मनात येणार नाहीत. हरिपाठाच्या अभंगापासुन सुरवात करा...

In reply to by अवलिया

विकास 03/08/2010 - 20:42
वरील दोन (शुद्ध लेखनासंदर्भातील) प्रतिसाद हे या धाग्यात अवांतर आहेत. तसेच शुद्धलेखन मिपाच्या धोरणात बसत नाही.* असेच पुढे चालू राहीले तर अप्रकाशीत करण्यात येतील हे संबंधीतांनी ध्यानात ठेवावे. ;) * शुद्धलेखन मिपाच्या धोरणात बसत नाही, म्हणून अशुद्ध विचार बसतात असा उलट अर्थ कोणी कृपया काढू नये. :-)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नितिन थत्ते 03/08/2010 - 20:06
नानाने "संपादकांनी तक्रार करण्याची वेळ आणली नाही" म्हणून धागा काढला तेवढ्यात.....

पण अवलिया जी.... तुम्ही अगोदरच भीती व्यक्त केल्याप्रमाणे संपादकांनी "त्या दोन" प्रतिसादावर अखेर कात्री चालविलीच. तुम्ही जिंकलात. (पण त्यामुळे या अभिनंदन धाग्यातील जोर थोडा कमी होणार.)
गेल्या दोन दिवसांपासुन मिपावर अनेक सुरेख चर्चा चालु आहेत. अनेक नवनवीन सदस्य मिपावर येऊन लेखन करुन आपल्या मनातल्या भावनांचा निचरा करत आहेत. विचारांची देवाण घेवाण करत आहेत. त्यावर साधक बाधक चर्चा होत आहेत. कधी कधी अवांतर प्रतिसाद पण येत आहेत. पण एक मात्र नक्की की विचारप्रबोधन, तसेच मनोरंजन होत आहे अशा या धाग्यांमधले अवांतर प्रतिसाद, अनाठायी प्रतिसाद या नावाखाली प्रतिसाद उडवणे हे संपादकांनी केलेले नसल्याने धाग्याचा मजा लुटणे शक्य झाले आहे. अन्यथा तोंड दाबुन मुक्क्यांचा मार होते... मनापासुन हसता पण येत नाही.

ताप

मितभाषी ·

स्पंदना 02/08/2010 - 07:36
आणी झाडाच्या मुळ्या? की कवितेते ठेचा ठेची बसत नाही? आणखी एक' "सज्जनंम...' ते पण लय भारी हाय. मि.पा, वरच्या मित्र मैत्रीणींना 'मित्रदिनाच्या' शुभेच्छा'

स्पंदना 02/08/2010 - 07:36
आणी झाडाच्या मुळ्या? की कवितेते ठेचा ठेची बसत नाही? आणखी एक' "सज्जनंम...' ते पण लय भारी हाय. मि.पा, वरच्या मित्र मैत्रीणींना 'मित्रदिनाच्या' शुभेच्छा'
तुम्हाला वाजते का थंडी. आणि कळपाची भीती. का भरलाय तुम्हाला ताप. तोंड दाबुन बुक्क्याचा मार. शब्दांना नसते दु:ख. फक्त ओझे वाहणारे आपण. सवत आनली म्हणे. ग्यानबाची बायको हरवली. आता जास्त विचारत नाही. कारण तुमच्याकडे उत्तर नाही. राम रावण युध्द होणार अनिरुध्द मिशा पिळणार मी झाडावर लपणार ।। निश्चित ।। ही कविता संपादकांना अडचणीत तर नाही ना आणनार?????????? . . . कविवर्य भावसार.

असले पण गुरु असतात!

शानबा५१२ ·

In reply to by विनायक पाचलग

शानबा५१२ 26/07/2010 - 13:08
अहो ज्यांना आम्ही मनातल्या मनात अजुनही पुजतो असे पण शिक्षक आहेत त्यांच्याबद्दलही लिहीन. अवांतरः आपली साईट मस्त आहे! कीती खर्च आला?

सूर्यपुत्र 26/07/2010 - 21:07
खरं आहे... बाकी हल्ली शिक्षक कसे असावेत यापेक्षा शिक्षक कसे नसावेत याचीच उदाहरणे जास्त दिसतात.....

गणपा 26/07/2010 - 21:20
एवढच म्हणतो शानबा५१२ की जन्माला येण्याची घाई केलीत राव. आता जन्मला असतात तर त्या मारकुट्या शिक्षकांचीच बिनपाण्याने झाली असती.

पाषाणभेद 27/07/2010 - 09:35
>>>हा लेख माझ्या आवड्त्या पण आता भुतकाळात जमा झालेल्या मिपाच्या जुन्या रुपाला अर्पण. सहमत अहो शानबा ज्या गुरूंनी तुम्हाला काहीतरी दिले त्यांना आठवा या दिवशी. अगदीच शाळेतले शिक्षक पाहिजे असे नाही काही. करे तर गुरूपोर्णीमेसाठी एकच गुरू योग्य नाही असे माझे मत. लहान मुलाकडूनही आपण कधी कधी शिकतो. अन आयुष्यभर शिकतच असतो. बाकी इतर शिक्षकांचा अनुभव वाचण्यासाठी लिहा. अवांतर: मराठी टंकनाचा हात साफ झाला ना आता?

In reply to by विनायक पाचलग

शानबा५१२ 26/07/2010 - 13:08
अहो ज्यांना आम्ही मनातल्या मनात अजुनही पुजतो असे पण शिक्षक आहेत त्यांच्याबद्दलही लिहीन. अवांतरः आपली साईट मस्त आहे! कीती खर्च आला?

सूर्यपुत्र 26/07/2010 - 21:07
खरं आहे... बाकी हल्ली शिक्षक कसे असावेत यापेक्षा शिक्षक कसे नसावेत याचीच उदाहरणे जास्त दिसतात.....

गणपा 26/07/2010 - 21:20
एवढच म्हणतो शानबा५१२ की जन्माला येण्याची घाई केलीत राव. आता जन्मला असतात तर त्या मारकुट्या शिक्षकांचीच बिनपाण्याने झाली असती.

पाषाणभेद 27/07/2010 - 09:35
>>>हा लेख माझ्या आवड्त्या पण आता भुतकाळात जमा झालेल्या मिपाच्या जुन्या रुपाला अर्पण. सहमत अहो शानबा ज्या गुरूंनी तुम्हाला काहीतरी दिले त्यांना आठवा या दिवशी. अगदीच शाळेतले शिक्षक पाहिजे असे नाही काही. करे तर गुरूपोर्णीमेसाठी एकच गुरू योग्य नाही असे माझे मत. लहान मुलाकडूनही आपण कधी कधी शिकतो. अन आयुष्यभर शिकतच असतो. बाकी इतर शिक्षकांचा अनुभव वाचण्यासाठी लिहा. अवांतर: मराठी टंकनाचा हात साफ झाला ना आता?
नमस्कार्,नमस्कार........ हा लेख माझ्या आवड्त्या पण आता भुतकाळात जमा झालेल्या मिपाच्या जुन्या रुपाला अर्पण. काल गुरुपोर्णिमा झाली,काहींनी लेख लिहुन तर काहींनी मनातच गुरुंविषयी आदर व्यक्त केला.पण ज्यांना नेहमीच खडुस्,मुद्दाम रागावणारे,जळपटे शिक्षक लाभले त्यांनी काय करायचं? गप्प रहायच?..........नाही,नाही तस कस चालेल? त्यांनी असे लेख लिहायचे. मी कालखंडानुसार सर्वांची 'ओळख' करुन देतो.आणि तुम्हाला काही अन्जान सत्याची जाणीव करुन देतो. काळ : १ ते ४ थी स्थळ : **** हायस्कुल्,बोरीवली. त्यादीवशी उशीर झाला होता.दुपारची शाळा होती.मी रडवेला झालो होतो,छडी घेउन मारकुट्या म्हशी (कुपोषीत)सारखी बघणारी ती 'बाई'