मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धोरण

सदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे.

नीलकांत ·
लेखनप्रकार
नमस्कार, मिसळपाव सुरू होऊन तीनाहून अधिक वर्षे झाली आहेत. या दरम्यान अनेक वादळे येऊन गेली. मिसळपावचे स्वरूप मोकळे ढाकळे असावे. लोकांना येथे येणे आणि लिहीने सोपे व्हावे म्हणून कमीत कमी नियम आणि बंधणे ठेवून या संकेतस्थळाची सुरूवात तात्यांनी केली होती. संकेतस्थळाच्या संपुर्ण बांधणीत मी होतो. तेव्हा पासून ते मिसळपावचे सर्व नियंत्रण सांभाळण्यापर्यंत मी मिसळपाव वाढावं आणि अधिकाधिक लोकांना ते आपलं वाटावं म्हणून प्रयत्न करत आलेलो आहे. सुरूवातीच्या काळात मी लिहायचो. मग मिसळपाववर अधिकाधिक सोई उपलब्ध करून देणे आणि नंतर सदस्यांच्या अडचणी सोडवणे यात जास्त वेळ देऊ लागलो.

प्रतिबंध काढल्याची घोषणा...

सरपंच ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार, मिसळपावचे सदस्यं टारझन यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. त्यांनी झाल्याप्रकारा बद्दल दिलगीरी व्यक्त केल्यावर आणि झाल्याप्रकाराची पुनरवृत्ती न करण्याच्या, संपादन मंडळास सहकार्य करण्याच्या आणि अश्याच अन्य अटी मान्य केल्यामुळे व तश्या प्रस्तावास संपादकांनी मान्यता दिल्यामुळे त्यांना पुन्हा प्रवेश देण्यात येत आहे. यापुढे मिसळपावर टारझन हे सर्वांना सहकार्य करतील हीच अपेक्षा आहे. - सरपंच.

चिरंजीव चिंटू

डावखुरा ·
आजचा "चिंटू" वाचला का !? ह्या प्रश्नाने आमची सकाळ होते... chintoo अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रम

भारतातील प्राथमिक शिक्षण व्यवस्था: एक बट्ट्याबोळ

प्रमोद सावंत१ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शिक्षणपध्दतीचा विचार करता देशाची साक्षरता आकडेवारीत वाढवण्यावर आपण भर देतो. पण माध्यमिक शाळांतून विद्यार्थांची होणारी गळती ही आपली खरी समस्या आहे. गावात तर ही समस्या अतिशय जास्त आहे. भारतातील साडेसहा लाख खेड्यांमध्ये जवळजवळ सर्वत्र पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. पण आठवीपर्यंत शिक्षण देणा-या फक्त सवादोन लाख व मॅट्रीकपर्यंत शिक्षण देणा-या शाळा , तर दीड लाखांहून कमी आहेत. ही सरकारी आकडेवारी झाली . शाळा आहे म्हणजे तेथे शिक्षक,फळा,छत असलेली ईमारत,पटांगण इत्यादी सुविधा आहेत, असा गोड गैरसमज करुन घेणे चुकीचे होईल.

अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे झालेले 'पानीपत' व त्याचा भारतावर होणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम

सुधीर काळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे झालेले 'पानीपत' व त्याचा भारतावर होणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम मध्यावधी निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाला विरोधी लोकमताचा जबरदस्त फटका बसला, त्या पक्षाचे अगदी 'पानीपत'च झाले असे म्हणायला हरकत नाहीं. त्या पक्षाचे प्रतिनिधीगृहातील बहुमत तर संपुष्टातच आले व सिनेटमधे जवळ-जवळ ६० टक्के जागा ज्या पक्षाकडे होत्या त्यांची संख्या ५३-५४ टक्क्यावर आली. नवनिर्वाचित राज्यपालांच्या संख्येतही डेमोक्रॅटिक पक्षाला कमी जागा मिळाल्या. हे सर्व कां झाले हे मला कळत नाहीं आणि ते समजून घेण्याचा हा प्रयत्न.

स्वातंत्र्योत्तर भारत

प्रमोद सावंत१ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाच्या विकासाठी स्वप्न प्रत्येकाने पाहिले. त्यानुसार दिशा आखण्याचा प्रयत्नदेखील नंतरच्या काळात होत गेला. पंडित नेहरूंनी धरणे, पोलाद कारखाने व उच्च अभियांत्रिकी शिक्षणसंस्थांची निर्मीती करण्यावर भर दिला. इंदिरा गांधींनीं लहान गावांपर्यंत बँका नेल्या. हरिक्रांतीचा मार्ग दाखविला. राजीव गांधीनीं संगणक, दळणवळण क्षेत्रात क्रांती केली. देश आधुनिकतेच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करू लागला. नरसिंहराव यांच्या कारकिर्दीत मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार झाला. जीवनाश्यक वस्तुंची कमी झाली. अटलबिहारी वाजपेयी यांनी ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून खेडी एकमेकांशी जोडली.

अभ्यंग स्नान..

डावखुरा ·
लेखनप्रकार
तीळीचे तेल..आणि वनौषधिंनी युक्त होममेड (आईने बनवलेलं) असे त्यात थोडे बेसन पीठ मिसळुन ते दुधात भिजवुन त्यात थोडेसे मध कालवुन या पद्धतीचा उट्ण..

आंधळी कोशिंबीर

प्रमोद सावंत१ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सुमारे १००० वर्षांपूर्वी अरबी राष्ट्रांमध्येच जगाची वैचारिक प्रगती झाली. बगदाद व कैरॊ ही जागतिक संस्कृतीची केंद्रस्थाने बनली . नंतरच्या १००० हजार वर्षांत त्या प्रदेशांची अधोगती झाली. भ्रष्टाचार, बेजबाबदारपणा, संपत्तीचे ऒंगळ प्रदर्शन, आपापसातील भांडण, लढाया यामुळे अरब राष्ट्रे पारतंत्र्यात गेली. स्वतंत्र झाल्यावरही काही वर्षे तेथील नेते आंधळी कोशिंबीर खेळत होते. आता त्यांनी डोळ्यांवरची पट्टी काढली आहे. आपल्या समाजाचे भवितव्य शिक्षणावर अवलंबून आहे, हे त्यांना उमगले आहे. त्यामुळे या देशात स्वत: राष्ट्राध्यक्ष व त्यांची पत्नी शिक्षण क्षेत्रात जातीने लक्ष देतात, भरपूर पैसा ऒततात.

आंधळी कोशिंबीर

प्रमोद सावंत१ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सुमारे १००० वर्षांपूर्वी अरबी राष्ट्रांमध्येच जगाची वैचारिक प्रगती झाली. बगदाद व कैरॊ ही जागतिक संस्कृतीची केंद्रस्थाने बनली . नंतरच्या १००० हजार वर्षांत त्या प्रदेशांची अधोगती झाली. भ्रष्टाचार, बेजबाबदारपणा, संपत्तीचे ऒंगळ प्रदर्शन, आपापसातील भांडण, लढाया यामुळे अरब राष्ट्रे पारतंत्र्यात गेली. स्वतंत्र झाल्यावरही काही वर्षे तेथील नेते आंधळी कोशिंबीर खेळत होते. आता त्यांनी डोळ्यांवरची पट्टी काढली आहे. आपल्या समाजाचे भवितव्य शिक्षणावर अवलंबून आहे, हे त्यांना उमगले आहे. त्यामुळे या देशात स्वत: राष्ट्राध्यक्ष व त्यांची पत्नी शिक्षण क्षेत्रात जातीने लक्ष देतात, भरपूर पैसा ऒततात.