असले पण गुरु असतात!
नमस्कार्,नमस्कार........
हा लेख माझ्या आवड्त्या पण आता भुतकाळात जमा झालेल्या मिपाच्या जुन्या रुपाला अर्पण.
काल गुरुपोर्णिमा झाली,काहींनी लेख लिहुन तर काहींनी मनातच गुरुंविषयी आदर व्यक्त केला.पण ज्यांना नेहमीच खडुस्,मुद्दाम रागावणारे,जळपटे शिक्षक लाभले त्यांनी काय करायचं?
गप्प रहायच?..........नाही,नाही तस कस चालेल?
त्यांनी असे लेख लिहायचे.
मी कालखंडानुसार सर्वांची 'ओळख' करुन देतो.आणि तुम्हाला काही अन्जान सत्याची जाणीव करुन देतो.
काळ : १ ते ४ थी
स्थळ : **** हायस्कुल्,बोरीवली.
त्यादीवशी उशीर झाला होता.दुपारची शाळा होती.मी रडवेला झालो होतो,छडी घेउन मारकुट्या म्हशी
(कुपोषीत)सारखी बघणारी ती 'बाई' डोळ्यासमोर उभी दीसली की जीव तुटत होता.हे सर्व चेह-यावर दीसत होत्,पण बघायचा त्रास फक्त राणे मॅडमनी घेतला.
"सुशांत्,उशीर झाला? रडु नकोस,नाही मार बसणार"
मी उसण हसत त्यांच्याबरोबर गेलो.त्यांनी माझ्या खांद्यावर हात टाकला होता.मला खरच आधाराची गरज होती.आम्ही गेटमधुन आत गेलो.'बाई' माझी वाट बघत होत्या.मी 'बाईं'समोर उभा राहीलो.वर गेलेली छडी हातावर बसली.
राणे मॅडमः "अहो मॅडम्,नका मारु!"
"अहो मारुन झाल आता काय नका मारु?" मनात बोललो.
मी "आई'आई" करत भो़काड पसरल.
'आई,तुच ग माझी!......हे सर्व साले मतलबी!' असे काहीसे मनात आले.मला पळत आईकडे जावस वाटल.पण ते शक्य नव्हत.म्हणुन मी त्या बाईंकडे बघत,तिला दया येईल ह्या आशेने मुद्दाम आवाज काढुन रडत होतो.
"पुन्हा होईल उशीर?" तिचा प्रश्न.
मी एखाद्या प्राण्याच्या पिल्लासारखा "कुं,कुं" करत मान 'नाही' अशी हलवली.राणे मॅडम सहानभुती दाखवत माझ्याकडे बघत होत्या.मी 'अरे ज्जा,नको तुझी सहानभुती' अशा भावात त्यांच्याकडे बघितल व दप्तर नीट करत वर्गात गेलो.
ह्या बाईच्या बाबतीत एक आठवत की त्या फार कडक्या,उंच होत्या व रागवल्या की त्याच्या गळ्यात काही नसा उठुन दीसायच्या.मी घाबरत त्या नसांकडे बघत रहायचो व त्यांनी काय विचारल हे लक्षात नाही रहायच म्हणुन फटके खायचो.जाम सतावल मला ह्यांनी.पीटीच्या वेळी मुद्दाम माझ्याबाजुला उभ राहुन माझ्या चुका काढायच्या,आणि माझ्या नाजुक पायांना वेदना द्यायच्या.मी माझ्या आईला आठवायचो......"अग,तु बोलतेस म्हणुन येतो ग शाळेत!............"आई,तुला कळल ना की शाळेत मला असा मुद्दाम मार दीला जातो,तर मला घेउन जाशिल ना गं इथुन?"
आईच "हो रे मुला" अस उत्तर ग्रुहीत धरायचो व सर्व सहन करायचो.
होळीच्या दीवशी मी तापलेल्या दींड्याच्या काठ्या हाताने जोरात आपटत ह्या असल्या शिक्षकांच्या नावाने 'बोंबा मारायचो'.
काळ : १ली ते ४थी.
स्थळ : तेच.
पुणीन्द्रे सर.......
हा एक मारकुटा होता.मला स्कॉलरशिपला शिकवायचा.मी रवीवारी त्याचा 'तास' असला की खुप रडायचो.माझी आय "आरं जा पोरा,हे साल कळ काढ रे!"
मी "आय,तु म्हणतीस म्हणुन नायतर ह्यांच्या आता....बोललो असतो!"
हे असे संवाद कधी झाले नाहीत.पण मला आईबरोबरच्या संवादांमधे हेच बोलायच असयच.
मी पुनीन्द्रेचा छळ सहन करुन घरात आलो,की आईच्या कुशीत बसुन खुप तक्रारी करायचो.
आईचा आधार होता म्हणुन सर्व झेपत होत,नाहीतर ह्या सर्वांणी पागल करुन सोडल असत.
ह्या महाशयांची एक आठ्वण......
"काय गणित सुटल नाही का अजुन" पुनीन्द्रे.
"सर,सर ते........." पुनीन्द्र्याचा अवतार बघुन माझी शंका घशातच राहली.
"का नाही शिकवल का तुझ्या क्लासवाल्यांनी" पुनीन्द्रे.
"जा ना सर तुम्ही त्यांच्याशी भांडा ना,मला कशाला त्रास देता?" मला अस सारख बोलावस वाटायच.
खरा लफडा हा होता की मी संध्याकाळी राणे मॅडमच्या क्लासला जायचो.हा पुनीन्द्रे माझा 'वर्गशिक्षक' असुनही मी 'राणे'च्या क्लासला जायचो म्हणुन त्याच्या पोटात दुखायच.म्हणून तो राणेंच्या शिकवणीतल्या चुका काढायचा.
एक हजाम दुस-या हजामाने दाढी चांगली नाही केली अस म्हणतो ना,हे अगदी तसच आहे.
"अरे ते त्यांची भांडणं माझ्यासारख्या लहान पोरावर का काढतात?" अश्या अर्थाचे रडगाणे मी आईशी गायचो.
आई पण माझ्या रोजच्या तक्रारींना कंटाळली होती,"अरे ही स्कॉलरशिप तेवढी पास हो,मग जाउ आपण इथुन" अस बोलायची.
मी: "तु गप्प बस!!........खोट बोलतेस." अस बोलत आता आईला पण माझा कंटाळा आला,अशी भावना मनात येउन मी भोकाड पसरायचो.आई समजावयला आली की मी लाडात आईचा हात माझ्या हाताने जोरात लांब ढकलायचो.कधी कधी "मी आज जेवणारच नाही!" अस बोलायचो.आई जास्त काही बोलायची नाही.कारण मी अस बोलुन घरातुन पळुन जातो व नंतर खेळुन परतल्यावर जेवायला बसतो हे तिला माहीती होतं.(आम्ही खरच एका वर्षानी बोरीवली सोडणार होतो हे मला माहीत नव्हत.)
एकदा मला क्लासच्या ट्रीपला जायच होत तेव्हा "नाही आज रवीवार आहे,माझ्या तासाला बसुन नंतर जाउ दे ट्रीपला!" अस माझ्या वडीलांना बोलणारा हाच तो पानुन्द्रे!
मग त्यादीवशी माझे वडील पानुन्द्र्याचा तास संपेपर्यंत बाहेर बसुन राहीले व नंतर मी बाहेर आल्यावर मला ट्रीपच्या स्पॉट्वर स्वःता सोडुन आले.मला त्यादीवशी पानुन्द्र्याचा जास्तच राग आला.मला जायच आहे माहीती असुनही मला 'गणित सोडव लवकर!' असे दम भरत होता.एकदाचं जायला भेटल मला ट्रीपला.
माझ्या आईला खुप आनंद झाला,मी मनात तिचेच आभार मानले.बाप फक्त 'कामापुरता मामा'.
असो,तर असे हे आमचे गुरु........ज्यांनी आम्हाला गुरु असण्याचा फायदा घेत कामचोर गुरासारख छळल.
अशांना गुरुपोर्णिमेच्या दीवशी आठवायच का?
(अजुन आहेत त्याच्याबद्दल पुन्हा कधीतरी.)
प्रतिक्रिया
हा हा हा
अहो ज्यांना आम्ही मनातल्या
खरं आहे.....
एवढच म्हणतो शानबा५१२ की
>>>हा लेख माझ्या आवड्त्या पण