✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

राजीव'जींना ६६व्या जयन्तीनिमित्त विनम्र अभिवादन! ..... WE STILL MISS YOU..~~ RAJEEV'JI! LOVE YOU!

म
मृगनयनी यांनी
Fri, 08/20/2010 - 18:01  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16618 वाचन

💬 प्रतिसाद (75)

प्रतिक्रिया

अय्या!... माझ्या हरणासारख्या

मृगनयनी
Sat, 08/21/2010 - 18:23 नवीन
अय्या!... माझ्या हरणासारख्या डोळ्यांना फारच प्रसिद्धी मिळतेय बुवा! ;) __________________________________ असो... भारतीय पंखा..... उपयुक्त माहितीबद्दल आभारी आहे.... प्रतिसादाबद्दल धन्यवाद! अजून काही नवी माहिती असेल... राजीव'जींबद्दल.. तर कृपया इथे टंका... संकोच करू नका..... तुम्ही "भारतीय" असल्याने तुम्हाला घटनेने आणि मिसळपावच्या सम्पादकीय महा-मन्डळाने इथे टंकण्याचा अधिकार दिलेला आहे.... ___ हुश्श! :) --- मन्डळ आभारी आहे... __ सर्वांना विकान्ताच्या शुभेच्छा! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारतीय

छ्या छ्या!!

सुनील
Sat, 08/21/2010 - 13:53 नवीन
राजीव गांधींमुळे भारतात संगणकक्रांती झाली हे साफ़ चूक आहे. आमच्याकडे संगणक पूर्वीच होते. इतकेच काय, मोबाईल, विमाने इ. सगळे सगळे काही होते. (नाहीतर, अयोद्धेपासून थेट लंकेपर्यंत राम गूगलमॅपशिवाय जाऊ कसा शकेल?) परंतु, उदो उदो होतो तो केवळ राजघराण्याचा! कारण पाठ्यपुस्तकेच!. म्हणून आम्ही ही पाठ्यपुस्तकेच बदलायला निघालो होतो, पण जनतेने आम्हाला लागोपाठ दोन वेळा शत-प्रतिशत घरी बसवले! तरीही आम्ही हिंमत सोडली नाही. जमेल तिथे, जमेल तितक्या वेळा, कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रयक्ष, कधी बोंबलून तर कधी कुजबुजून, आम्ही राजघराण्याविरुद्ध शंख करायचे काही सोडले नाही. पण हाय रे दैवा! त्यांची चौथी पिढीच काय पण बाहेरून आलेली सूनदेखिल लोकप्रियता कमावत आहे. पण आम्ही हिंमत सोडणार नाही. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा गर्व महत्त्वाचा हे जनतेला एक दिवस कळेलच. बद्धकोष्ठ्बापूंचा राम आमचे युद्ध लढायला येणार आणि रावण मरणार, निश्चित!
  • Log in or register to post comments

पण आम्ही हिंमत सोडणार नाही.

मृगनयनी
Sat, 08/21/2010 - 14:09 नवीन
पण आम्ही हिंमत सोडणार नाही. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा गर्व महत्त्वाचा हे जनतेला एक दिवस कळेलच. इतकाही गर्व करू नका... कारण गर्वाचं घर खाली असतं! ;) ;) ;) आणि हो, राजीव गांधी, राजघराणे आणि पाठ्यपुस्तके असा एक वेगळा धागा काढून तिथे (अ)विचारप्रदर्शन करा.. इथे "राजीव गांधीं " बद्दल काही माहिती असेल. तर सांगू शकता.... बद्धकोष्ठता झाली असेल, तर "ऑम्लेट" खाणं कमी करा.... नैतर उगीच नन्तर पाण्याच प्रॉब्लेम झाला... तर आमच्या बापूंचेच नाव घ्यावे लागेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

हॅ हॅ हॅ

सुनील
Sat, 08/21/2010 - 15:28 नवीन
कारण गर्वाचं घर खाली असतं हे बाकी बरोबर! शायनिंग अहुजाचं काय झालं बघितलत ना? इथे "राजीव गांधीं " बद्दल काही माहिती असेल नाय बॉ! आम्ही काही वाचत-बिचत नाही. खोटं कशाला बोला? हां पण आमची मतं बाकी एकदम ठाम बर्रका!! अजिबात बदलायची नाहीत ती! (गुर्जींची शिकवणच तशी!) "ऑम्लेट" खाणं कमी करा आरारारारारारारा.... श्रावणात आमलेट? छ्या छ्या भलतच काय? श्रावणात आम्ही फक्त पिठलं खातो! (हां, आता पिठल्यातल्या मिरच्या कुणाला झोंबल्या तर आम्ही काय करू शकत नाय बॉ!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

नाय बॉ! आम्ही काही वाचत-बिचत

मृगनयनी
Sat, 08/21/2010 - 15:40 नवीन
नाय बॉ! आम्ही काही वाचत-बिचत नाही. खोटं कशाला बोला? हां पण आमची मतं बाकी एकदम ठाम बर्रका!! अजिबात बदलायची नाहीत ती! (गुर्जींची शिकवणच तशी!) ह्म्म्म!... वाचत बिचत नसलात, तरी "एखाद-दुसरी यत्ता" तरी शाळंला गेला असाल की न्हायी! ;) म्हणजे अक्षरओळख आहे.. असं गृहित धरायला हरकत नसावी! __ सांगायचा मुद्दा इतकाच, की राजीव गांधींव्यतिरिक्त काही लिहायचं असेल.. तर आपण नवीन धागा उघडु शकता! :) _______________ "ऑम्लेट" खाणं कमी करा आरारारारारारारा.... श्रावणात आमलेट? छ्या छ्या भलतच काय? श्रावणात आम्ही फक्त पिठलं खातो! अरे बापरे!... श्रावणात कान्दा-लसूण खाता तुम्ही ? चातुर्मास पाळत नाही वाटतं? असू दे.. असू दे! ... "ऑम्लेट्"पेक्षा बरं हो! ;) (हां, आता पिठल्यातल्या मिरच्या कुणाला झोंबल्या तर आम्ही काय करू शकत नाय बॉ!) आता "खाता" तुम्ही.. म्हणजे "झोम्बणार" तुम्हालाच की! ;) आणि नन्तर.....पाण्याची सोय तेवढी करून ठेवा! ;) ;) .. तुमच्यासाठीच हो! नाहीतर व्हायचं "गर्वाचं घर खाली!" =)) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

+१

क्लिंटन
Sat, 08/21/2010 - 15:41 नवीन
गांधी घराण्याने फारसे कर्तृत्व दाखविलेले नाही असा ’शतप्रतिशत’ दावा असेल तर तो मुद्दा जनतेपुढे नेटाने लावून न धरता जो भाजपवाल्यांचा आक्रस्ताळेपणा चालतो त्यामुळे गांधी घराण्याला फारसे काही परिश्रम न घेताच जनतेची सहानुभूती मिळते आणि अनेकदा त्याचेच रूपांतर मतांमध्येही होते. इंदिरा गांधींच्या हत्येवरील या डॉक्युमेन्टरीमध्ये (किंवा डॉक्युमेन्टरीच्या १० पैकी दुसऱ्या कोणत्या भागात) सोनिया गांधींचा राजीव गांधींना पंतप्रधान व्हायला मुळातच विरोध होता असे स्पष्टपणे म्हटले आहे.तसेच निकोलस न्यूजंट यांनी लिहिलेल्या राजीव गांधींच्या चरित्रातही तसेच म्हटल्याचे वाचले आहे. राजीव गांधींनी मोठ्या प्रयासाने सोनिया गांधींची समजूत काढली. अन्यत्र एका मुलाखतीत सोनिया गांधींनी त्यांचा राजीव गांधींना पंतप्रधान व्हायला विरोध का होता याचे उत्तर दिले आहे. त्याचा नक्की दुवा माझ्याकडे नाही पण ती मुलाखत इंग्रजी चॅनेलवर मी बघितली होती.त्यात सोनिया गांधी म्हणतात--’ऑपरेशन ब्लू स्टारनंतर इंदिरा गांधींना आपले दिवस भारले आहेत हे जाणवले आणि तसे त्यांनी राजीव-सोनियांना अनेकदा बोलूनही दाखविले होते.३१ ऑक्टोबर १९८४ रोजी ती भिती प्रत्यक्षात उतरली आणि राजीव पंतप्रधान झाल्यास एकनाएक दिवस त्यांनाही असेच मारतील अशी भिती मला वाटत होती. आणि राजीव पंतप्रधान झाल्यानंतर मी माझ्या मनाची तयारी पण करून ठेवली की राजीव गांधींची पण एकनाएक दिवस अशीच हत्या होणार!’ अर्थात सोनियांनी १९९९ मध्ये शरद पवारांना पक्षातून का काढले किंवा २००४ मध्ये पहिल्यांदा खासदारांची यादी घेऊन राष्ट्रपतींकडे गेलेल्या सोनिया गांधी नंतर अचानक का बदलल्या असे काही अनुत्तरीत प्रश्न आहेत.पण अशा मुद्द्यांवर जनतेचे लक्ष वेधायचे सोडून भाजप व्यक्तिगत पातळीवर जाऊन सोनियांवर आरोप करतो आणि ज्या पध्दतीने सोनिया या वैयक्तिक प्रचाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात यातून जनतेच्या मनात भाजपची प्रतिमा डागाळते आणि सोनियांची अधिक उजळते यात शंका नाही. दुसरे म्हणजे ’राजीव गांधी देशाला खड्ड्यात घालून एक दिवस इटलीला पळून जाणार’ हे उद्गार मी अगदी माझ्या घरी, नातेवाईकांमध्येही ऐकले आहेत.१९८९ मध्ये निवडणुकीत पराभव झाल्यानंतर बोफोर्स प्रकरणातून वाचण्यासाठी राजीव गांधी इटलीला पळून जाणार हे अशा मंडळींनी अगदी गृहितच धरले होते.जणू काही राजीव गांधींना देशाबाहेर न्यायला दिल्ली विमानतळावर विमान तयारच आहे अशा थाटात अशा मंडळींना मी बोलताना बघितले आहे. अर्थातच तसे काही झाले नाही. नंतरच्या काळात राजीव गांधी तर गेलेच. त्यानंतरही सोनिया गांधी नाही त्या इटलीला पळून गेल्या? लग्न झाल्यानंतर स्त्रीने पतीच्या घराला आपले घर मानणे हीच भारतीय संस्कृती ना?इतकेच नव्हे तर पतीचे निधन झाल्यानंतरही त्या स्त्रीने त्या घराला अंतर न देणे ही पण भारतीय संस्कृती ना?त्यावेळी त्या इटलीला पळून गेल्या असत्या तर कोण काय बोलू शकणार होते? पण सोनिया गांधींनी ते केले नाही. (यावर त्यांची हांजीहांजी करायला दिल्लीत जसे हजारो लोक तत्पर होते तसे रोममध्ये नव्हते असे म्हणणारे महाभाग निघतीलच). याउलट पतीचे निधन झालेल्या (किंवा इतर कोणाही) स्त्रीवर वैयक्तिक पातळीवर जाऊन घाणेरडे आरोप करणे ही भारतीय संस्कृती अजिबात नाही. प्रमोद महाजनांनी तर एका परिने सोनिया गांधी आणि मोनिका ल्युईन्स्कीची तुलना १९९९ च्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती असे वाचल्याचे आठवते. मी सोनिया गांधी समर्थक अजिबात नाही.पण या काही गोष्टी मला जरूर खटकतात. स्वत:ला भारतीय संस्कृतीचे मोठे पाईक समजणाऱ्या पक्षाकडून असे भारतीय संस्कृतीविरूध्द वर्तन करणे आणि सोनिया गांधी त्याकडे जाणीवपूर्वक पूर्णपणे दुर्लक्ष करतात यातूनच सोनिया गांधींना आपोआप जनतेची सहानूभूती आणि मते मिळतात. क्लिंटन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

क्लिन्टन्'जी तुमचा व्यासंग

मृगनयनी
Sat, 08/21/2010 - 15:47 नवीन
क्लिन्टन्'जी तुमचा व्यासंग दांडगा आहे! :) मला तुमच्याविषयी आदर वाटतो! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

त्यानंतरही सोनिया गांधी नाही

मराठी_माणूस
Sat, 08/20/2011 - 15:30 नवीन
त्यानंतरही सोनिया गांधी नाही त्या इटलीला पळून गेल्या? लग्न झाल्यानंतर स्त्रीने पतीच्या घराला आपले घर मानणे हीच भारतीय संस्कृती ना?इतकेच नव्हे तर पतीचे निधन झाल्यानंतरही त्या स्त्रीने त्या घराला अंतर न देणे ही पण भारतीय संस्कृती ना?त्यावेळी त्या इटलीला पळून गेल्या असत्या तर कोण काय बोलू शकणार होते? पण सोनिया गांधींनी ते केले नाही. हा वरवरचा मुलामा आहे, सामान्य लोकांसाठीचा भावनिक मुद्दा आहे. मूळात प्रचंड सत्तेचा मोह टाळता आला नाही. राहुलला पुरेसे सेट होईपर्यंत सत्ता स्वतःच्या घराण्याकडेच सलग राहीली पाहीजे हा हेतु आहे. (अवांतर : पंतप्रधान पद नाकारणे , हा पण राजकारणाचाच भाग आहे कारण पीएम कोणीही असुदे , आपण चालवु तसेच चालणार हा विश्वास आहे(कारण उर्वरीत लोक बिन कण्याचे आहेत हे माहीत आहे). सेनेत त्याल उघडपणे रीमोट म्हटले जाते. इथे म्हटले जात नाहे इतकाच फरक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

मला तर सर्वाच्या बद्दल आदर आहे.

वेताळ
Sat, 08/21/2010 - 17:44 नवीन
पण तामिळ वाघानी राजीव गांधीची हत्या करुन एक मोठी घोडचुक केली असे कायम वाटते.कारण त्यावेळी राजीव गांधी हत्या झाली नसती तर आज देशाचे चित्र खरोखर वेगळे दिसले असते.निव्वळ सहानुभुतीवर ह्या कॉग्रेस कंरट्याच्या हातात त्यावेळी सत्ता मिळाली. पण ते देखणे होते हे जर एकच क्वॉलीफिकेशन त्याना लावायचे म्हटले तर आज कित्येक देखणे नट बॉलीवुड मध्ये काम करतात त्यापैकी एकाला कराना भारताचा पंतप्रधान..मग उजेड काय पाडतात ते दिसेल.राजीव गांधी जर गांधी नसते तर ते एक उच्चवर्तुळात वावरणारे वैमानिक इतकीच त्याची ओळख असती. क्लिंटन साहेब खरोखर जर चांगला राजकारणी व जनतेबद्दल काम करणारा नेता निवडायचा झाला तर नरेंद्र मोदी खेरीज आज कोणी नाही.दलीत कुटुंबात जेवणे,लोकल मधुन बोंबलत फिरणे,उगाच काम नसल्या प्रमाणे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या घराला भेट देणे (नवल म्हणजे ज्या ठिकाणी ह्याचे सरकार गेली १० ते १५ वर्षे आहे त्या आंध्र व महाराष्ट्रात ज्यादा शेतकरी आत्महत्या करतात) असली कामे म्हणजे जनतेच्या भावनाशी खेळुन ,लोंकाच्या डोळ्यात धुळफेक करणे व सत्तेत टिकुन राहणे इतकेच ह्या कुटुंबाचे आजपर्यतचे उद्योग आहेत.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद

क्लिंटन
Sat, 08/21/2010 - 18:17 नवीन
पण ते देखणे होते हे जर एकच क्वॉलीफिकेशन त्याना लावायचे म्हटले तर आज कित्येक देखणे नट बॉलीवुड मध्ये काम करतात त्यापैकी एकाला कराना भारताचा पंतप्रधान.
राजीव गांधी देखणे किंवा चांगल्या व्यक्तीमत्वाचे होते हा मुद्दा माझ्या लेखी तरी पूर्णपणे बाद आहे.कोणाही राजकिय व्यक्तीचे मूल्यमापन करताना त्या व्यक्तीचा चेहरा किती चांगला किंवा वाईट होता हा मुद्दा मी आजपर्यंत कधीही ध्यानात घेतलेला नाही आणि यापुढेही घेणार नाही. दुसरे म्हणजे आपल्या राज्यपध्दतीत वय वर्षे २५ पूर्ण केलेल्या आणि लोकसभेत बहुमताचा पाठिंबा असलेल्या कोणाही भारतीय नागरिकास पंतप्रधान बनता येते. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर कॉंग्रेस संसदीय पक्षाने त्यांना रितसर नेता निवडले होते.त्यावेळी कॉंग्रेस पक्षाकडे लोकसभेत बहुमत होते त्यामुळे त्या पक्षाचा संसदेतील नेता आपोआप पंतप्रधान बनायला पात्र होता. तसेच १९८४ च्या निवडणुकांमध्ये त्यांना लोकसभेत बहुमत प्राप्त झाले होते त्यामुळे त्यांना पंतप्रधान बनण्यापासून कोणीही रोखू शकत नव्हते. आजसुध्दा हृतिक रोशनला किंवा तत्सम चेहऱ्याच्या इतर कोणालाही लोकसभेत बहुमत असेल तर त्यालाही पंतप्रधान बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.त्यामागे त्या माणसाचा चेहरा नव्हे तर लोकसभेतील बहुमत हाच एक निकष असेल.
राजीव गांधी जर गांधी नसते तर ते एक उच्चवर्तुळात वावरणारे वैमानिक इतकीच त्याची ओळख असती.
उच्च वर्तुळात वावरणारे का एक सामान्य वैमानिक यापेक्षा त्यांची ओळख जास्त नसती.किंबहुना गांधी म्हणून जन्माला येऊनही आपली ओळख त्यापेक्षा जास्त असावी ही महत्वाकांक्षा मुळातच त्यांना नव्हती. त्यांच्या ’महान’ बंधुराजांच्या कर्तृत्वाशी तुलना केल्यास ही गोष्ट लगेच लक्षात येते.पण हे सांगण्यामागचा तुमचा उद्देश काय हे लक्षात येत नाही.वर म्हटल्याप्रमाणे ते पंतप्रधान का झाले? कारण त्यांच्यामागे लोकसभेत बहुमत होते.ते गांधी घराण्यात जन्माला आले म्हणून नव्हे. १९८९ च्या निवडणुकींनंतर ते पंतप्रधान का बनू शकले नाहीत? कारण त्यांच्याकडे लोकसभेत बहुमत नव्हते. अशावेळी ’गांधी’ घराण्यातील असणे हे ’क्वालिफिकेशन’ उपयोगी पडले का?तरीही लोक त्यांच्या पंतप्रधान बनण्याशी घराणेशाहीचा संबंध जोडतात ते मला पटत नाही.
खरोखर जर चांगला राजकारणी व जनतेबद्दल काम करणारा नेता निवडायचा झाला तर नरेंद्र मोदी खेरीज आज कोणी नाही.
असे तुम्हाला वाटते.तेच मत मतदान यंत्रांमधून व्यक्त झाले आणि नरेंद्र मोदी त्याच्याआधी तुरूंगात गेलेले नसतील तर जरूर पंतप्रधान होतील.
लोंकाच्या डोळ्यात धुळफेक करणे व सत्तेत टिकुन राहणे इतकेच ह्या कुटुंबाचे आजपर्यतचे उद्योग आहेत.
पण अजून तरी भारतातील बहुसंख्य मतदारांचे मत ते नाही याचे काय?लोकशाही हा आकड्याचा खेळ असतो.ज्यावेळी बहुसंख्य मतदारांचे तेच मत होईल तेव्हा कॉंग्रेस पक्षाचा आपोआपच पराभव होईल.पण विरोधी पक्ष अजूनतरी असा मुद्देसूद प्रचार करून जनतेत जाऊन आपली बाजू मांडत आहेत असे दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

जो न्याय तुम्ही मोदीना लावता

वेताळ
Sat, 08/21/2010 - 18:44 नवीन
तोच न्याय जर राजीव गांधीना लावला तर????? नरेंद्रमोदीनी जर काही गुन्हा केला असेल व त्यात ते दोषी आढळले तर त्याना जरुर तुरुंगात पाठवावे. मी काही नरेंद्र मोदींचा किंवा भाजपाचा हिंतचिंतक आहे असे काही नाही.मोदीनी जर गुजरात दंगलीत निरपराध लोकांच्या हत्या घडवण्यात हातभार लावला असला तरी आज सामान्य गुजराती त्याना काय समजतो? तुम्ही अमहदाबाद मध्ये आहात म्हणुन हे तुम्हाला विचारतो आहे. त्यानी आज गुजरात मध्ये खरोखरीच खुप आमुलाग्रबद्दल घडवुन आणले आहेत. मोदी हे कोणत्याही घराण्याशी संबधित नाहीत तरीही भारतातील सर्व मुख्य उद्योग घराण्याना व विकासप्रेमी लोकांना तेच देशाचे पंतप्रधान व्हावे असे का वाटते? दुसरी बाजु.. राजीव गांधीची हत्या नेमक्या कोणत्या कारणा साठी झाली होती? त्यानी भारतीय शांतीसेना श्रीलंकेत पाठवुन तामिळ लोकांचे हत्याकांड घडवुन आणले व निरपराध तामिळींवर अत्याचार झाले त्याला तेच जबाबदार होते.आज जर सुदैवाने राजीव गांधी जर जिवंत असते तर कोणी त्याच्या विरुध्द सीबीआयचा हत्यारा सारखा वापर करुन तामिळवाघांच्या हत्याकांडाला त्याना जबाबदार ठरवु शकला असता. मग राजीव गांधीना शिक्षा झाली नसती कशावरुन? हे जर तरचे प्रश्न आहेत.दोन्ही नेत्यांची कारकिर्द तपासली तर राजीव गांधी हे नशीबवान राजकारणी होते जे नंतर कमनशीबी ठरले व मोदी नशीबवान राजकारणी आहेत त्याला त्यानी कर्तुत्वाची खुप मोठी जोड दिली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

अनपेक्षीत धाग्यावरची चांगली

अर्धवट
Sat, 08/21/2010 - 18:47 नवीन
अनपेक्षीत धाग्यावरची चांगली चर्चा वाचतोय.. फक्त इथं अडखळलो. >>त्यानी भारतीय शांतीसेना श्रीलंकेत पाठवुन तामिळ लोकांचे हत्याकांड घडवुन आणले व निरपराध तामिळींवर अत्याचार झाले त्याला तेच जबाबदार होते. आजच कळतय मला.. (बाकी आमच 'सखोल' ज्ञान बघता आश्चर्य नाही म्हणा.) पण अजुन जरा माहिती कळाली तर बरं होइल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

माझ्या म्हणण्याचा उद्देश लक्षात घ्या.

वेताळ
Sat, 08/21/2010 - 19:03 नवीन
कायदा जोपर्यंत तुम्हाला दोषी ठरवत नही तो पर्यत तुम्हाला गुन्हेगार म्हणता येत नाही.मी वर जो मुद्दा मांडला आहे तो जर तर चा आहे.राजीव गांधीची हत्या कोणत्या कारणासाठी झाली? ती नक्कीच वैयक्तिक वादातुन झालेली नाही.त्याचा शांतीसेना पाठवण्याचा जो निर्णय होता,त्यातुन जी तामिळवाघाची हत्या श्रीलंकेत भारतिय सेनेकडुन झाली त्यामुळे बिथरुन जावुन तामिळी वाघानी त्याची हत्या घडवुन आणली.राजीव गांधीची हत्या ज्या मानवी बॉम्बने घडवुन आणली त्या मुलीच्या बहिणीवर लंकेत शांतीसेनेकडुन अत्याचार झाले होते म्हणुन ती सहभागी झाली होती असे त्यावेळच्या पेपरात मी वाचले होते.राजीव गांधीची हत्या झाली त्यावेळी मी देखिल लहान होतो व थोडेफार कळत देखिल होते.मी देखिल त्यावेळी खुपच भावनावश झालो होतो.म्हणुनच त्याची हत्या एक घोडचुक होती असे मी वर म्हटले देखिल आहे. पण आज जो कॉग्रेस वाल्यानी सीबीआयचा तपासाचा ससेमिरा आपल्या विरोधकांच्या मागे लावुन आपल्याला हवे ते साध्य करण्याचा पायंडा पाडला आहे. तसा कोणीही सीबीआयचा वापर करुन शांतीसेना लंकेत पाठवायला राजीव गांधी जबाबदार होते व त दोषी आहेत असा निष्कर्श काढला असता. मी फक्त जर तर असा उल्लेख वर मुद्दामहुन केला आहे.राजीव गांधी लंकेतील तामिळवाघाच्या नाशाला कितपत कारणीभुत होते कि नाही त्याचे सविस्तर उत्तर निदन आजतरी मी तुम्हाला देवु शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

मोदी आणि राजीव गांधी

क्लिंटन
Sat, 08/21/2010 - 19:30 नवीन
त्यानी आज गुजरात मध्ये खरोखरीच खुप आमुलाग्रबद्दल घडवुन आणले आहेत. मोदी हे कोणत्याही घराण्याशी संबधित नाहीत तरीही भारतातील सर्व मुख्य उद्योग घराण्याना व विकासप्रेमी लोकांना तेच देशाचे पंतप्रधान व्हावे असे का वाटते?
मोदींनी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास घडवून आणला आहे हे उघडच आहे.अगदी कच्छच्या वाळवंटात त्यांनी पिण्याचे पाणी नेऊन पोहोचवले आहे. अंबानी, रतन टाटा यासारख्यांनी मोदींची जाहिरपणे तारिफ केली आहे. २००३ मध्ये आमच्या आय.आय.एम मध्ये येऊन आझीम प्रेमजींनी मोदींवर टिका केली होती पण काही दिवसांपूर्वी याच आझीम प्रेमजींनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. यात दोन मुद्दे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे गोध्रासारखी महाभयंकर घटना घडूनही मरणारे हिंदू होते म्हणून की काय पण तथाकथित धर्मनिरपेक्ष मिडिया आणि राजकिय पक्षांनी गोध्रावर चकार शब्द न काढता दुसऱ्या दिवशी सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पावर जास्त लक्ष केंद्रित केले.गुजरात गांधींजींचा असूनही जातीय दंगलींची मोठी पार्श्वभूमी राज्याला आहे. १९६९ मध्ये चार महिने दंगली चालू होत्या आणि शेवटी खान अब्दुल गफार खानांना बोलावून घेऊन त्यांच्याकरवी शांततेचे आवाहन करावे लागले होते. तसेच १९८५ आणि १९९२-९३ मध्येही दंगली मोठ्या प्रमाणावर झाल्या होत्या.अशा परिस्थितीत जो भडका उडाला तेव्हा नरेन्द्र मोदीच काय अगदी शंकरसिंह वाघेला जरी मुख्यमंत्री असते तरी किती उपयोग झाला असता हे त्या भगवंतालाच ठाऊक. तरीही या दंगलींमध्ये मोदींनी खरोखरच भाग घेतला होता का हे अजून तरी सिध्द झालेले नाही.वर्तमानपत्रातील बातम्यांप्रमाणे तरी एहसान जाफरी हत्या आणि गुलबर्ग सोसायटी प्रकरणी ते अडचणीत यायची शक्यता आहे.एहसान जाफरींनी संरक्षणाची मागणी फोन करून केली असता त्यांना फोनवर शिवीगाळ करणे आणि ’मरा मी काही तुम्हाला संरक्षण देणार नाही’ असे मोदींनी म्हटल्याचे वर्तमानपत्रांमध्ये वाचनात आले आहे. कायद्याच्या दृष्टीने यातून मोदींवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका जरूर ठेवता येईल पण त्यांचा दंगलीत प्रत्यक्ष हात होता हे सिध्द करता येईल की नाही यासाठी काही महिने थांबावे लागेल. पण तसा हात मोदींचा असेल तर मात्र त्यांना तुरूंगात जावेच लागेल. दुसरा मुद्दा म्हणजे मोदी विरोधकांचे म्हणणे असे की मोदींची पक्की खात्री आहे की मुख्यमंत्रीपदावरून दूर होताच त्यांना तुरूंगात जावे लागेल.म्हणून त्यांना मुख्यमंत्री म्हणून चांगले काम करणे भागच आहे.कारण तिकडे जर आळस केला तर किंमत आहे तुरूंगवासाची! या प्रकरणी कायद्याला मान्य असेल ते होईल.मोदींचे नशीब चांगले असेल तर ते तुरूंगात जायच्या आधी पंतप्रधान होतीलही.आणि ते पंतप्रधान झाले तर निदान विकासाच्या बाबतीत तरी गुजरात मॉडेल त्यांनी देशभरात राबवावे असेच मला वाटते.
त्यानी भारतीय शांतीसेना श्रीलंकेत पाठवुन तामिळ लोकांचे हत्याकांड घडवुन आणले व निरपराध तामिळींवर अत्याचार झाले त्याला तेच जबाबदार होते.
अगदी इंदिरा गांधी, एम.जी.रामचंद्रन यांनी एल.टी.टी.ई ला अनूकूल भूमिका घेतली होती.इतकेच काय तर मे १९८७ मध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना जाफनामध्ये श्रीलंकन सैन्याने एल.टी.टी.ई ची कोंडी केल्यानंतर भारतीय हवाईदलाच्या विमानांनी श्रीलंकेची हवाईहद्द ओलांडून तामिळ लोकांच्या मानवी अधिकारांचे उल्लंघन होत आहे या नावाखाली अनेक टन धान्य आणि इतर सामुग्री टाकली होती.परराष्ट्र राज्यमंत्री नटवर सिंह यांनी श्रीलंकेच्या दिल्लीतील राजदूतास बोलावून घेऊन ’आमची विमाने तुमच्या देशात जाऊन तामिळ लोकांना मदत टाकून येणार आहेत आणि त्यावर हल्ले केल्यास गंभीर परिणाम होतील’ अशी धमकी दिली. माझ्या मते राजीव सरकारने उचललेले हे पाऊल सर्वथैव अयोग्य होते. उद्या काश्मीरी लोकांवर अन्याय होत आहे अशी हाकाटी करत पाकिस्तानची विमाने श्रीनगरमध्ये आली तर आपल्याला चालेल का? श्रीलंकेच्या सार्वभौमत्वाची अशी पायमल्ली करणे पूर्णपणे अयोग्य होते असे मला वाटते. भारतापुढे आपली धडगत नाही हे श्रीलंकन अध्यक्ष जयवर्धने यांना समजून चुकले आणि त्यातून जुलै १९८७ मध्ये श्रीलंका करार झाला. या कराराचा उद्देश तामिळ समस्येवर श्रीलंकेच्या एकात्मतेच्या चौकटीत तोडगा शोधणे हा होता. तसेच तामिळ वाघांना नि:शस्त्र करायला (साध्या शब्दात त्यांच्याशी लढायला) भारताची शांतीसेना पाठविण्यात आली. तेव्हा १. तामिळ लोकांवर अत्याचार करावेत यासाठी भारतीय शांतीसेना पाठविण्यात आलेली नव्हती. २. भारतीय सैन्याकडून तामिळ लोकांवर अत्याचार काही प्रमाणावर जरूर झाले. याचे कारण तामिळ जनतेत तामिळ वाघांविषयी काही प्रमाणात तरी सहानूभूती असल्यामुळे स्थानिक लोकांनी भारतीय सैन्याविरूध्द तामिळ वाघांना मदत केली आणि त्यातूनच पुढे काही प्रमाणावर त्यांच्यावर अत्याचार झाले. हाच प्रकार भारतात पंजाब, काश्मीर आणि पूर्वोत्तर भारतात बघायला मिळाला आहे. तेव्हा मुद्दा क्रमांक १ हा valid असल्यामुळे मुद्दा क्रमांक २ प्रमाणे झालेल्या अत्याचारांसाठी संबंधित सैनिक/अधिकारी यांना जबाबदार धरता येईल. तेव्हा अगदी निरपराध तामिळींवर जरी अत्याचार झाले असतील तरी त्यासाठी राजीव गांधींना (ते हयात असते तरीही) कोणतेही न्यायालय शिक्षा करू शकणार नाही. अनेक वर्षे तामिळ वाघांना भारत सरकारने पाठिंबा दिला होता पण अचानक त्यांच्याविरूध्द भारत सरकार (राजीव गांधींचे सरकार) उलटले याचा राग म्हणून पुढे राजीव गांधींची हत्या तामिळ वाघांनी केली.
सुदैवाने राजीव गांधी जर जिवंत असते तर कोणी त्याच्या विरुध्द सीबीआयचा हत्यारा सारखा वापर करुन तामिळवाघांच्या हत्याकांडाला त्याना जबाबदार ठरवु शकला असता. मग राजीव गांधीना शिक्षा झाली नसती कशावरुन
याचे उत्तर वर दिलेलेच आहे. पण नरेंद्र मोदींविरूध्दचे आरोप आणि राजीव गांधींविरूध्द काल्पनिक आरोप एका मापाने कसे तोलता येतील? तसा अर्थ आपल्या प्रतिसादातून ध्वनित होत आहे म्हणून मुद्दामून लिहावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

गांधी घराण्यातील काही (हा

भारतीय
Sat, 08/21/2010 - 17:45 नवीन
गांधी घराण्यातील काही (हा शब्दही मोठा वाटतोय !) अपवाद वगळता ईतरांबद्दल मला व्यक्तिशः काहीच आदर नाही.. काँग्रेसी लोक तर ज्याप्रकारे गाधी घराण्याचे लांगूलचालन करतात ते पाहून किव येते त्यांची.. मी अभ्यासलेल्या अथवा मला समजायला लागल्यापासून सर्व राजकारण्यांमधे अटलजींबद्दलच फक्त आदर होता.. पण आता सगळे एका माळेचे मणी! लक्षात घ्या राजीव गांधी नसते तर दूसरा कोणीतरी असता! 'बोफोर्स' तोफांचा व्यवहार (कि गैरव्यवहार?) त्यांच्याच काळातील होता.. बोफोर्स तोफा भारताला आवश्यक होत्याच, ते कारगिल युद्धात दिसलेच.. त्या राजीवजींच्या काळात खरेदी केल्या गेल्या म्हणून राजीव गांधी थोर होतात? त्या खरेदी करताना झालेल्या गैरव्यवहाराबद्दल काय? राजीवजी शुद्ध होते काय?.. मग नरसिंह रावही त्याच्यापेक्षा थोर म्हणावेत, कारण त्याच्याच कालखंडात भारताने खुले आर्थिक धोरण स्वीकारले.. पण नरसिंहांचे आडनाव 'गांधी' नव्हते ना ! म्हणून ते थोर नाहीत.. (नरसिंह रावांचे समर्थन करण्याचा प्रयत्न नाही, कॉंग्रेसची प्रकृती दाखवतोय..) राजीव गांधींनतर काँग्रेस गांधीमुक्त झाला होता.. पण सीताराम केसरींसारखे फुटकळ नेते काँग्रेसचे नेतृत्व करताना कॉग्रेसची हालत काय होती हे सर्व जाणतातच, 'गांधी' नावाचे टॉनिक काँग्रेसला म्हणूनच हवे होते, अन म्हणूनच सोनिया गांधींना राजकारणात आणले गेले... बाकी सोनियांबद्दल काही बोलणार नाही.. सध्या काँग्रेस सत्तेवर आहे ते केवळ "वासरांत लंगडी गाय शहाणी" म्हणून!
  • Log in or register to post comments

प्रतिसाद

क्लिंटन
Sat, 08/21/2010 - 18:37 नवीन
बोफोर्स तोफा भारताला आवश्यक होत्याच, ते कारगिल युद्धात दिसलेच.. त्या राजीवजींच्या काळात खरेदी केल्या गेल्या म्हणून राजीव गांधी थोर होतात?
या कारणावरून राजीव गांधींना थोर म्हणणारी मंडळी आहेतच.पण त्यांना थोर म्हणण्यासाठी हे पुरेसे सबळ कारण नाही असेच माझे तरी स्वत:चे मत आहे. तसेच राजीव गांधींना ’थोर’ मी तरी म्हटलेले नाही.माझा मुद्दा एवढाच की त्यांच्याकडे संगणक आणि टेलिकॉम क्षेत्रात विकास घडवून आणायची दूरदृष्टी होती (जी बहुसंख्य भारतीयांकडे त्याकाळी नव्हती) आणि ते बदल त्यांनी नेटाने घडवून आणले. आजच्या तरूण पिढीला त्याचा फायदा किती होत आहे हे समोर दिसतच आहे आणि त्याचे श्रेय त्यांना द्यायलाच हवे.
राजीवजी शुद्ध होते काय?
खरेखोटे त्या भगवंतालाच ठाऊक.पण कायद्याच्या दृष्टीने तरी त्यांचा कोणत्याही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सहभाग सिध्द होऊ शकलेला नाही.
मग नरसिंह रावही त्याच्यापेक्षा थोर म्हणावेत, कारण त्याच्याच कालखंडात भारताने खुले आर्थिक धोरण स्वीकारले.. पण नरसिंहांचे आडनाव 'गांधी' नव्हते ना ! म्हणून ते थोर नाहीत..
माझे स्वत:चे मत हे तर नरसिंह राव हे भारताचे सर्वोत्तम पंतप्रधान होते हेच आहे.विविध पंतप्रधानांच्या कारभाराचे मी माझ्या पातळीवर मूल्यमापन केले आहे त्यावरून माझे मत झाले आहे की नरसिंह रावांनी न बोलता देशासाठी खूप चांगले काम करून ठेवले.आणि हे मूल्यमापन करताना पंतप्रधानांचा पक्ष, चेहरा, व्यक्तिमत्व,ते जन्माला आले त्या घराण्याचे नाव या सगळ्या गोष्टी गौण मानून केवळ त्यांचे कार्य हा एकच मुद्दा मी ध्यानात घेतला होता. आणि नरसिंह राव गांधी नाहीत याच एका कारणावरून अर्जुन सिंहांसारखी झुरळे त्यांच्यावर टिका करतात ते पूर्णपणे अयोग्य आहे असेच माझे मत आहे.
सध्या काँग्रेस सत्तेवर आहे ते केवळ "वासरांत लंगडी गाय शहाणी" म्हणून!
हीच तर लोकशाही व्यवस्था आहे. ज्या क्षणी जनतेला कॉंग्रेसपेक्षा समर्थ पर्याय आहे असे वाटेल त्याक्षणी निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाचा पराभव होईल. भारतीय जनतेने हे यापूर्वी पण दाखवून दिले आहे आणि जनता यापुढेही ते दाखवून देईल याविषयी शंका नको.
समग्र देशव्यापी क्रांतीच्या प्रतिक्षेत.
फक्त ही देशव्यापी क्रांती मतदान यंत्रातूनच होऊ दे ही सदिच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारतीय

~*~*.|.*~*~ राजीव गान्धींना

मृगनयनी
Sat, 08/20/2011 - 12:34 नवीन
~*~*.|.*~*~ राजीव गान्धींना ६७व्या जयन्तीनिमित्त विनम्र अभिवादन!!! ~*~*.|.*~*~ राजीव'जी, तुमच्या राहुलमध्ये तुमच्यातले काही चान्गले गुण आले असते तर कदाचित आज आपल्या देशाचे चित्र खूपच वेगळे असते.... :| राजीव'जी, तुमचे कॉन्ग्रेसवाले ज्या म. गान्धींचा उदो उदो करून आजपर्यन्त लोकांच्या भावनांशी खेळत आले... त्याच गान्धींना दैवत मानणार्‍या अण्णा हजारेंच्यामुळे गान्धीवादाच्या शान्ततामय मार्गाने कॉन्ग्रेसी भ्रष्टाचाराविरूद्ध सम्पूर्ण भारत देश जागृत होऊन एकत्रितपणे लढा देत आहे... आणि आम्ही न पाहिलेली "ऑगस्ट क्रान्ती" पुन्हा घडवून आणत आहे.... या क्रान्तीमध्ये सहभागी होऊन भ्रष्टाचाराविरूद्ध खारीचा वाटा उचलण्याची सन्धी आम्हालाही मिळाल्याबद्दल अण्णा हजारेंचे शतशः आभार!!!.... राजीव'जी... तुम्ही पाहिलेल्या उज्ज्वल भारतवर्षाचे स्वप्न कदाचित देशातील जनता.... अण्णांच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्याला अधिकाधिक मूर्त स्वरूप देऊन पूर्ण करेल...... अर्थात तुमच्या राहुलबाबाचा यात सहभाग असता..... तर कदाचित तुमच्याबद्दल, इन्दिराजींबद्दल आम्हाला वाटणारा आदर राहुल गान्धींबद्दलही वाटला असता...... || जयहिन्द ||
  • Log in or register to post comments

राजीव गांधीं'ना जयन्तीनिमित्त

मृगनयनी
Tue, 08/20/2013 - 12:12 नवीन
राजीव गांधीं'ना जयन्तीनिमित्त विनम्र अभिवादन ..._/\_ ..... *मानवी बॉम्ब'च्या माध्यमातून हत्या झालेल्या राजीव'जींच्या जयन्तीदिनाची सुरुवात एका सामाजिक कार्यकर्त्याच्या -नरेन्द्र दाभोळकरांच्या हत्येनेच व्हावी...... याचे खरोखर दु:ख वाटते.... :|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

राजीव'जींना विनम्र अभिवादन!!!

मृगनयनी
Wed, 08/20/2014 - 13:50 नवीन
राजीव'जींना विनम्र अभिवादन!!!! :) राहुल'च्या जन्माच्या आधी सोनियाजीं'वर उचित गर्भसंस्कार झाले असते.. तर कदाचित आज परिस्थिती वेगळी असती!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

म हा न आहेस. ___/\___

प्यारे१
Wed, 08/20/2014 - 14:40 नवीन
म हा न आहेस. ___/\___
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

मॄग्गा... मॄग्गा अगं काय हे ?

मदनबाण
Fri, 08/22/2014 - 12:35 नवीन
मॄग्गा... मॄग्गा अगं काय हे ? स्त्रीया दरवर्षी ज्या प्रमाणे वटसावित्रीची पुजा करुन वडाला चक्कर मारतात, तशी दरवर्षी या धाग्यावर तू चक्कर टाकताना दिसत आहेस हो. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हो रे.. मदनबाण.. अ‍ॅक्चुली

मृगनयनी
Fri, 08/22/2014 - 13:00 नवीन
:) हो रे.. मदनबाण.. अ‍ॅक्चुली 'राजीव गान्धी' यांच्याबद्दल मला मनापासून आदर वाटतो. कंप्युटर-सिस्टीम भारतात त्यांच्यामुळे आली. इतर राजकारण्यांप्रमाणे राजीव'जींच्या नावावरही काही भ्रष्टाचार आहेत.. पण तरीही त्यांच्यात 'असं' काहीतरी निश्चित होतं..ज्यामुळे आजही ते गेल्यानंतर सुद्धा मला (इन्डिविड्ज्युअली) त्यांच्याबद्दल मनापासून आदर, प्रेम वाटते. तसे "ते" कायमच माझ्या मनात असतात. पण तरीही दरवर्षी त्यांच्या जयन्ती-पुण्यतिथी'ला इथे या मराठी संस्थळावर त्यांच्या स्मृती जागृत करताना मला विशेष आनन्द होतो. आय लव राजीव गान्धी!!!! राजीव'जींमधले व इंदिराजींमधले "नेतृत्वा"चे आणि समाजकारणा'चे गुण राहुल'मध्ये आलेले नाहीत.. त्यामुळे वाईटही वाटते... :) पण तरीही 'नरेन्द्र भाई मोदीं'च्या भगव्या राज्यात मी खूष आहे...... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

>>> कंप्युटर-सिस्टीम भारतात

श्रीगुरुजी
Fri, 08/22/2014 - 22:51 नवीन
>>> कंप्युटर-सिस्टीम भारतात त्यांच्यामुळे आली. + १ त्याच प्रमाणे नरसिंहरावांमुळे भारतात केबल टीव्ही सुरू झाला, देवेगौडामुळे भारतात इंटरनेट सुरू झाले, गुजरालांमुळे भारतात मोबाईल फोन सुरू झाले आणि मनमोहन सिंगांमुळे स्मार्ट फोन आणि टॅब्ज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

बघा ! बघा !

धर्मराजमुटके
Fri, 08/22/2014 - 14:19 नवीन
बघा ! बघा ! आणि इथे महाराष्ट्रात बालाजी तांब्यांना मोडीत काढतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

(No subject)

अनुप ढेरे
Fri, 08/22/2014 - 14:24 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा