Skip to main content

धोरण

शब्द-जोड्शब्द

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 12/11/2015 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
प्रश्नाला उत्तर द्यायचे काही कारण होते का? ते सुद्धा भर पंक्तीत. गप्प बसायचे. मोठ्याने विचारला म्हणुन काय झाले? इतरांचा विचार करायला नको. किती ठसके? किती उचक्या? अन्न नलिकेत कण गेला असता तर किती वांधे झाले असते? ..... सकाळी नाश्त्याला गुळ,मध आणि कुमठा मसाला चे कालवलेले(शहाळ्याच्या पाण्यात भिजवलेले) पोहे २ प्लेट. मिक्स ग्रेन तिखट पुर्या ६ (३इंच व्यास) वांगी बोंडा २ (६ इंच व्यास) वांगी खास गावावरुन मागवलेली मोठ्या पपईच्या आकाराची. पण ३ वाजलेले होते.

माझ्या मराठीचा बोल

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 02/11/2015 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार कवी अशोक बागवे यांच्या 'माझ्या मराठीचा बोल' या कवितेवरून प्रेरणा घेऊन खालील काव्य लिहिले आहे. अर्थात कवितेचा भाव अशोक बागवे यांच्या कवितेच्या अगदीच विरुद्ध आहे. आज मराठी भाषा, मराठी संस्कृती किंवा आपलं मराठीपण या गोष्टींबद्दल एकंदरितच मराठी माणसांमध्ये जी अनास्था बघायला मिळते त्यावरून खरं तर हे काव्य सुचलं. सदर परिस्थिती आशादायक नाही, आणि भविष्यात मराठी माणसाची विचारपद्धती बदलली नाही तर आगोदरच कमी असलेलं मराठीचं महत्व नगण्य होईल आणि तेंव्हा हळहळून काहीही उपयोग नसेल. इंग्रजीचा दुराग्रह आणि हिंदीला दिलं जाणारं निरर्थक प्राधान्य हे मराठीसाठी धोक्याचं आहे.

एक पिल्लू: तिचं आणि आमचं....

लेखक संदीप डांगे यांनी रविवार, 01/11/2015 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
परवा बायको आमच्या छोट्या बाळाला घेऊन शेजारच्या घरी काही कामानिमित्त गेली होती. त्यावेळी तिथल्या आजींनी हिला सहज विचारले, "अगं याची दृष्ट वैगेरे काढतेस की नाही? मला वाटतंय ह्याला जबरी दृष्ट लागली आहे." तेव्हा बायकोनी त्यांना उत्तर दिले की आम्हाला यातलं काही कळत नाही, त्यामुळे आम्ही हे दृष्ट उतरवणे वैगेरे प्रकार करत नाही. तेव्हा त्या आजींनी एक अनुभव सांगितला, तो अक्षरशः चकरावणारा होता.... ते सगळं कुटुंब अंदाजे पंधरा सोळा जण त्यांच्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला गेले होते, तिथे त्या निसर्गरम्य ठिकाणी काही माकडेही होती. एका उंचशा झाडावर एक माकडीण आपलं पिल्लू सांभाळत बसली होती.

अन्नदाता सुखी भव भाग ५ - नव विचार

लेखक शेखरमोघे यांनी गुरुवार, 22/10/2015 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे संबंधित लेखन भाग १: http://www.misalpav.com/node/32554 भाग २: http://www.misalpav.com/node/32709 भाग ३: http://misalpav.com/node/32801 भाग ४: http://misalpav.com/node/33012 प्रचलित आणि रूढ विचार पद्धतीच्या विरुद्ध विचार बाळगण्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतील, याचे उत्तम उदाहरण म्हणजे Galileo Galilei (मराठी टंकताना पडलेला प्रश्न : "ग" वरचा अर्धचंद्र google मध्ये काही केल्या जमत नाही, काय करायला हवे ह

एनरॉन पुन्हा एकदा !!

लेखक अनिकेत एस जोशी यांनी रविवार, 11/10/2015 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राच्या राजकारणाला निराळी,मोठी कलाटणी देणारा एक कोणता विषय असेल तर तो आहे एनरॉन प्रकल्प. एनरॉन या अमेरिकन कंपनीने जीई व बेक्टेल या अन्य दोन अमेरिकन सुरोपीय कंपन्यांसमवेत दाभोळ वीज कंपनीची स्थापना केली. त्यात एनरॉनचा वाटा 67 टक्के होता. प्रकल्पाचे कागदोपत्री नाव जरी दाभोळ असेल तरी जनतेत मात्र तो एनरॉन प्रकल्पच राहिला. 1991-92 पासून ते 2001 मध्ये अंतिमतः राज्य सरकारने बंद करेपर्यंत या प्रकल्पासून वीज निर्मिती म्हणावी तशी झाली नाही. राजकारणाचे पाझर मात्र मोठ मोठे फुटत राहिले.

दयेच्या छावण्या

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 09/10/2015 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
पाणी पितो ती नदी आमची नाही अन्न गिळतो ती शेतं आमची नाहीत आकाश पक्षी चंद्र झाडं हे तर राहूच द्या ही कुत्री मांजरं बदकं कोंबड्या पण आमची नाहीत! युनिसेफची गुळगुळीत पुस्तकं अन तुळतुळीत मडमा WHO ची झटपट औषधं अन चाकपाक डॉक्टर्स RedCross चं जगभरातील वैविध्यपूर्ण एकच रक्त युनोने थाटलेले Waterproof तंबू अन मिनरल बाटल्या यातलं काहीच आमचं नाही! नाही हो, आमची माणसं इतकी दयावान नाहीत! ती रासवट आहेत, मारतात, मरतात तलवारीने गळे चिरतात, रक्ताच्या कुर्बान्या देतात महाहिंसक माणसं! त्यांच्या कर्तृत्वामुळेच तर आम्ही आज तुमच्यामध्ये आलो....... पण तुमच्यात आलो म्हणजे तुमचे नाही झालो, होऊ शकत नाही! एक काम कर

पुणे कट्टा वृत्तांत- ४ ऑक्टोबर २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी सोमवार, 05/10/2015 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे पेर्णास्त्रोतः भव्य आवाहन ~ दिव्य आवाहन ~ दो सोनार की इक लोहार की २४ सप्टेंबर २०१५ (ख्रिस्तपुर्व लिहायचा मोह आवरला) मिपावरचं एक भव्य (?) दिव्य (नमस्कार माझा तया दिव्यश्रीला) वॅक्टीमॅट्व श्री.स्त्री.दी.भव्यश्री ह्यांनी युरोपखंडे जर्मनदेशे नामक भुभागावरुन भारतामधल्या पुण्यभुमीमधे एक समस्तं मिपाकरांचा एक कट्टा व्हावा असा डाव्या पायातला बुट काढला.

पुणे कट्टा- ४ ऑक्टोबर २०१५,

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 02/10/2015 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल. तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५ वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम. कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का? (संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको) धन्यवाद.

अन्नदाता सुखी भव भाग ४ - वृक्ष वल्ली आम्हा सोयरीं

लेखक शेखरमोघे यांनी बुधवार, 30/09/2015 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे संबंधित लेखन भाग १: http://www.misalpav.com/node/32554 भाग २: http://www.misalpav.com/node/32709 भाग ३: http://misalpav.com/node/32801 आपण पाहिलं की नॉर्मन देव वगैरेनी शेतातल्या पिकांनांच जास्त तगडं बनवलं आणि त्यामुळे शेतकऱ्याला साधारणतः तेव्हढ्याच जमिनीत, तेव्हढ्याच पाण्यांत आणि तेव्हढ्याच प्रयत्नांत (पण जास्तीचे खत वापरायला लागून) अनेक पटीने जास्त धान्य मिळू लागले.

राग राजस्थानी

लेखक अद्द्या यांनी गुरुवार, 24/09/2015 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
लोक किती काही म्हणोत . कि बाहेर राहून आल्यावर फक्त घरचंच जेवण चांगलं लागतं किंवा आईच्या हातचा वरण भात किंवा बाबांच्या हातचा तिखट जाळ झुणका. या सगळ्याची किंमत जरी बाहेर राहिल्यावर समजते . तरीही , घर सोडून दुसऱ्या गावात राहायला गेलं कि एक कला आपल्याआपण शिकतो . ती म्हणजे चांगली खायची ठिकाणे शोधणे. मग तो साधा भेळपुरी वाला असो कि भवानी मंडपातला तोंडाला पाणी सुटेल असा तांबडा पांढरा रस्सा असो . किंवा भल्या सकाळी ७ वाजता कटाकिर्र मध्ये जाऊन हाणलेली मिसळ असो . किंवा रात्रीच्या शांत वातावरणात पद्मा गेस्ट हाउस सामोरील "चाचा" ची गरमागरम चाय असो .