आर्य बाहेरचे होते ही थिअरी बर्यापैकी चुकिची आहे. खालील लिंक्स पहा-
http://video.google.com/videoplay?docid=7678538942425297587
लेख- http://www.archaeologyonline.net/artifacts/scientific-verif-vedas.html
माझ्या वाचण्यात जी काय माहिती आली त्यानुसार मलाही तेच पटतं("बाहेरुन" वगैरे कुणी काही आक्रमण केलेलं नाही.)
याबाबतीत पुढले भाग वाचायला आवडतील,
काही नवीन मुद्दे, नवीन गोष्टी , नवीन दृष्टिकोन असल्यास तेही जाणुन घ्यायला आवडेल.
येउ द्यात मग ते ही लवकर.
आपलाच,
मनोबा
लेख माहीतीपूर्ण आहे. फक्त तो आंबेडकरांनी लिहीला आहे का तुम्ही ते नीटसे स्प्ष्ट झाले नाही. कारण लेख चालू झाल्यावर पण, "यासंदर्भात आंबेडकरांनी 'वंश' आणि 'लोक' यांच्यात भेद करून आर्यवंशासंदर्भात वंश म्हणजे काय? याचा अभ्यास केला"" असे वाक्य आहे, म्हणून हा प्रश्न.
धन्यवाद
आर्य आकाशातून पडले अथवा जमीनीतून आले... येथेच राहत होते.. अथवा बाहेरुन आले.... हे माहित झाल्यावर काय फरक पडणार आहे हे कोणी समजावून सांगेल का मला ?
स्वगत : हे माहीत नाही आहे ते माहीती करुन घेणे कधी कधी त्रासदायक ठरते... तर कधी वरदान !
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
"यासंदर्भात आंबेडकरांनी 'वंश' आणि 'लोक' यांच्यात भेद करून आर्यवंशासंदर्भात वंश म्हणजे काय? याचा अभ्यास केला"
मुळ लेख आंबेडकरांनीच लिहिला आहे. मात्र तो बराच मोठा आहे. प्रत्येक मुद्याचे स्पष्टिकरन करताना मुळ लेखात वैदिक वांङ्मयात तसेच जागतीक इतिहासातील बरेच संदर्भ दिलेले आहेत, ते संदर्भ टाळताना अनावधानाने वरील वाक्य आलेले आहे. मात्र वरील वाक्याची काहिही गरज नव्हती. ते वाक्य माझ्या चुकीने आलेले आहे.
आर्यांचे मुळस्थान कोणते? याबद्दल बरेच वाद आहेत. एका चर्चेमध्ये नुकताच त्याचा उल्लेख झाला. जगातील अनेक विचारवंतांनी त्याबद्दल मते मांडली आहेत. भारतातील एक विचारवंत डॉ. भि. रा. आंबेडकर यांनी आर्यांच्या मुळस्थानाबद्दल १९४६ साली मते मांडली.
आंबेडकरांनी आर्यवंशाबद्दल व आर्यांच्या मुळस्थानाबद्दल प्रचलीत असलेल्या सिध्दांताचा या लेखामध्ये अभ्यास केलेला आहे. ते पुढिलप्रमाणे..
आर्य वंशाबद्दल बरेच मतभेद आहेत परंतू काहि अंगाबद्दल पुर्ण एकमत आहे ते येणेप्रमाणे: -
१. ज्यांनी वैदिक वांङमय तयार केले ते लोक आर्य वंशाचे होते.
२. हे लोक मुळचे भारताबाहेरचे. त्यांनी भारतावर स्वारी केली.
३. मुळ रहिवाशी दास व दस्यू या नावाने ओळखले जात. त्यांचा वंश व आर्यांचा वंश यात फरक होता.
४. आर्यांचा रंग गोरा होता. दास व दस्यू यांचा रंग काळा होता
५. आर्यांनी दास व दस्यू यांना जिंकून अंकित केले.
आर्यवंश या नावाच एक वंश अस्तित्वात होता, या पायावर सिध्दांताची उभारणी केलेली आहे, या मुद्दाचा प्रथम विचार करणे जरूर आहे.
हा आर्यवंश म्हणजे काय? यासंदर्भात आंबेडकरांनी 'वंश' आणि 'लोक' यांच्यात भेद करून आर्यवंशासंदर्भात वंश म्हणजे काय? याचा अभ्यास केला.
मित्रा पन्कज वरिल वाक्ये सत्य प्रमाणच आहेत. आर्य भारताबाहेरुनच आलेले आहेत हे वरिल वाक्यान्वरुनच सिद्ध आहे.
असो, आता ते स्वतः भारतीय आहेत असे मानायला हरकत नसावी किमान पक्षी त्यान्नी तसे मानावे.
आर्यांचा रंग गोरा होता. दास व दस्यू यांचा रंग काळा होता
असो, आता ते स्वतः भारतीय आहेत असे मानायला हरकत नसावी किमान पक्षी त्यान्नी तसे मानावे.
म्हणजे कोण आतापर्यंत स्वत:ला परके समजत होते ? आणि आर्य म्हणजे उच्चवर्णिय (मुख्यत्वे ब्राह्मण) म्हणाल तर रंगाने काळे पण जातीने ब्राह्मण असे लोक महाराष्ट्रात वा दक्षिण भारतात खूप दिसतात याउलट निम्नवर्णिय ( खालच्या जातीचे) असूनही रंगाने गोरे असलेल्याची उदाहरणेही आहेत.
प्रतिक्रिया
आर्य
हो
एक प्रश्न
लेखन
आर्य
आंबेडकरांनी लिहीला आहे का?
आर्यांचे
म्हणजे कोणी ?