राहणी

२० मिनिटात होणारा व्यायाम - सर्किट ट्रेनिंग

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
22 Nov 2013 - 7:27 am

व्यायाम हा प्रत्येक आणि प्रत्येक जणाला किती महत्वाचा आहे हे सगळेच जाणतात. ते नव्याने सांगायला नको. पण तो न केला जाण्याची जी अनेक कारणं असतात त्यापैकी जास्तीत जास्त जणांना लागू होणारी आणि टॉप ३ कारणं अशी असतील.
१. कंटाळा
२. वेळच नाही (याचं खरं कारण क्र.१ आहे)
३. त्यापेक्षा सोप्पं काहीतरी सांग ना

समाजजीवनमानराहणीविचारसल्लामाहिती

कुठली कार घ्यावी?

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in काथ्याकूट
19 Nov 2013 - 2:05 pm

नमस्कार मिपाकर मंडळी

माझा कार घ्यायचा विचार चालु आहे.
बजेट- ५-६ लाख

वापर शनिवार/रविवार नक्की. इतरवेळी कधीतरी ऑफिसला येण्यासाठी..
नेहमीप्रमाणे जास्त मायलेज,कमी मेंटेनन्स्,सर्व सुविधा,आफ्टर सेल सर्व्हिस या अपेक्षा आहेतच.

काही प्रतिक्रिया
मारुती-- स्पेअर पार्ट स्वस्त आणि मस्त,सगळीकडे उपलब्ध,पण पिक अप नाही (ओवरटेक करताना दम तोडते),पत्रा पुचाट,अक्सिलेटरला जोर लावावा लागतो

फोर्ड्-दणकट गाडी,लाँग ड्राइव्हला मस्त पण सर्विसिंगला महाग,अॅव्हरेज कमी

टोयोटा- गाडी बेस्ट,स्पेअर पार्ट महाग

फोक्सवॅगन- फारशी माहीती नाही

नवे व्यवसाय

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जनातलं, मनातलं
14 Nov 2013 - 10:04 am

शेठ वालचंद हिराचंद ह्यांच्या वडिलोपार्जित बिडी व्यवसायातून, ते वडिलांशी भांडून, निर्धाराने बाहेर पडले आणि साखर उद्योगाची पायाभरणी केली. का? तर समाजविघातक व्यवसायांनी स्वतःचे पोट भरणे त्यांना मंजूर नव्हते. साखरेचा व्यवसाय, त्याकाळी त्यांना समाजोद्धारक वाटला होता. आज; साखर, मीठ, तेल, तूप इत्यादी संहत पदार्थांचा आरोग्यरक्षणातील अपूर्व अडथळा पाहता; साखर व्यवसाय समाजास कितपत हितकर आहे, ह्याविषयीच प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहे.

संस्कृतीधर्मसमाजजीवनमानराहणीप्रकटनलेखअनुभव

हिंदुस्थानचे मंगळ अभियान आणि सामान्य नागरिकांचे जीवन !

मदनबाण's picture
मदनबाण in काथ्याकूट
5 Nov 2013 - 5:24 pm

आपल्या देशाने मंगळावर यान पाठवले आहे ही बातमी आता तुम्हा सर्वांना माहित झालीच असेल... तर सर्व प्रथम मी त्या सर्व शास्त्रज्ञ मंडळी / तंत्रज्ञ यांचे अभिनंदन करतो ज्यांनी त्यांची बुद्धीमत्ता वापरुन ही योजना साकरली आहे.
-
-
-
पण मला या निमित्त्यानी काही प्रश्न विचारावेसे वाटत आहेत, तुम्हालाही काही प्रश्न विचारावेसे वाटत असतील तर हा धागा त्यासाठीच टाकला गेलेला आहे.

सगळ्यात पहिली नाडी कोणी वापरली असेल?

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in काथ्याकूट
31 Oct 2013 - 6:16 am

सकाळी सकाळी तिकडे जायची वेळ झाली, कि मला लहानपणापासून एक प्रश्न पडतो , म्हणजे साला हे नाडी सोडण्याचं, बांधण्याचं सर्वात पहिले कधी समजल असेल मानवाला ? म्हणजे सगळ्यात पहिली नाडी कोणी वापरली असेल ? कधी वापरली असेल ?
आणि कशी बनवली असेल ? ... विशेषतः पायजम्याचं कौतुक वाटतं हो ,च्यायला कोणच्या सुपीक डोक्यात आलं असेल कि आधी कापडाच्या दोन भोंगळ्या करून त्या एकमेकांना शिवून टाकायच्या, त्यात तंगड्या घुसवून मग हे झुंबाड खाली सरकून जाऊ नये, पण योग्य वेळी पटकन सरकवताही यावे, म्हणून त्यात नाडी घालावी, बांधावी, सोडावी ?

सगळ्यात पहिला खडू कोणी बनवला असेल?

खटासि खट's picture
खटासि खट in काथ्याकूट
30 Oct 2013 - 2:30 pm

शाळेचे दिवस आले नं की मला लहानपणापासून एक प्रश्न पडतो, म्हणजे स्साला हे फळ्यावर लिहून दाखवायचे खूळ सर्वात पहिले मानवाच्या डोक्यात कधी आलं असेल? म्हणजे सगळ्यात पहिला खडू कोणी बनवला असेल? कधी बनवला असेल?

आणि कसा बनवला असेल. विशेषतः खराट्यांचं कौतुक वाटतं हो, तिच्यामारी कोणाच्या सुपीक डोक्यात आलं असेल कि आधी जिप्सम वगैरे आणा, मग भुकटी खाली पाडल्यावर साच्यात काढायचा प्रकार म्हणजे "सृष्टीच्या सृजनशीलतेचा अप्रतिम नमुना असलेल्या मानवाच्या सृजनशीलतेची आणि कल्पकतेची आणि हात कि सफाईची आणि कृष्णपृष्ठीयश्वेतशिंतोडीकरणाची हाईट" वाटते मला!

विचार रथ सारथ्य आणि संवाद धनुष्य !!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
29 Oct 2013 - 1:17 pm

आपल्या मनातल्या विचारांबाबतचा एक नवा विचार मी येथे मांडत आहे. त्या नव्या विचाराचा स्वीकार झाल्यास तसे जरूर कळवा.

बरेचदा आपल्याला दोन प्रश्न भेडसावत असतात.
म्हणजे खाली दिलेल्या या दोन प्रश्नांबाबत आपण "विचार" करतो:
लोक काय विचार करतील?
लोक काय म्हणतील?

मला असे वाटते की लोक काय विचार करतील याचा विचारही आपणच केला तर लोकांना विचार करायला काहीही उरणार नाही आणि आपल्याला काय विचार करायचा आहे तेच मात्र राहून जाईल आणि त्यामुळे आपण मात्र लोकांच्या विचारपद्धतीचे गुलाम होवून जाऊ.

समाजजीवनमानतंत्रराहणीप्रकटनविचारअनुभवमत

मॉल संस्कृति आणि फ़ेरीवाले

नेत्रेश's picture
नेत्रेश in काथ्याकूट
20 Oct 2013 - 1:50 pm

काही दीवसांपुर्वी आलेल्या मॉल संस्कृति धाग्यावर बर्याचजणांनी मॉलमधून भाजी न घेता रस्त्यावरच्या फेरीवाल्यांकडून आपण का खरेदी करतो / करावी याची कारणे दीली आहेत.

माझ्या माहीतीतले बरेच लोकही त्याच मताचे आहेत. आश्चर्याची गोष्ट अशी की हेच लोक आरक्षणामुळे आपल्यावर कसा अन्याय होतो हे कंटाळा येईपर्यंत सांगत असतात. पण फेरीवाल्यांमुळे कायदेशीरपणे दुकान चालवणार्या दुकानदारावर होणारया अन्यायाचे भागीदार असतात.

जराजर्जर म्हातारपण ....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
19 Oct 2013 - 8:28 am

मागच्या आठवड्यात एक ओळखीची व्यक्ती देवाघरी गेली.थोडे वाईट वाटले पण का कुणास ठावूक
आनंद जास्त झाला.खरे तर गेलेल्या व्यक्ती विषयी असे बोलू नये, पण खरेच वाटले की सुटली बिचारी..काहीतरी ९०/९२ वय असेल..कुणी मोजलंय…

८५ ओलांडली आणि त्यांना लकवा झाला, पुढची ५/७ वर्षे अंथरुणालाच खिळून होती.रोज देवाची पार्थना करायची की मला घेवून चल.पण देव काही प्रसन्न होत न्हवता..परवा झाला.....

मॉल संस्कृति

बलि's picture
बलि in काथ्याकूट
16 Oct 2013 - 5:42 pm

सर्वप्रथम मला सामील करून घेतल्याबद्दल मिपा चे आभार. माझं पहिलं लेखन तुमच्यासमोर ठेवतो आहे . चूकभूल माफ असावी .

काही दिवसांपूर्वी मी माझ्या फेसबुक च्या भिंतीवर एक चित्र प्रकाशित केले होते. त्यात एक गरीब स्त्री रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकत होति. त्या चित्राचा आशय असा होता कि,
" कृपया रस्त्यावर भाजी विकणाऱ्या लोकांबरोबर भाव कमी जास्त करू नका. ते आपल्या शेतातील माल कमी किमतीला विकतात. मॉल मध्ये खरेदी करू नका. शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी भाजी विकत असतो. "