चारोळी विडंबन
चहात इडली
चहात गुलाबजाम
चहात जिलेबी
आणि आमची चारोळी संपली
चहात इडली
चहात गुलाबजाम
चहात जिलेबी
आणि आमची चारोळी संपली
https://www.misalpav.com/node/50568/backlinks
आमची बी एक आठवण...
कविवर्यांची क्षमा मागीतली आहे.
खिशातल्या रूमालाला
घामाचा वास
मनाला लागला
तूझाच की ग ध्यास
चार कप्प्यातला
एक कप्पा होता खाली
तू येणार म्हणून
साफसफाई केली
घरावरून मारल्या
दिवसाच्या चकरा सात
बात नाय बनली कारण
जय विजय उभे दारात
बांधीन म्हणलं
सात तळाची माडी
पण सावळ्या कुभांराची
गाढवं मधी आली
ब्रूटस
सीजर कुणीच नव्हता
सारेच ब्रूटस होते.
खंजीरीच्या पात्यांना
रक्ताची तहान होती.
जो पळतो तो जिंकतो
बाजीरावाने घुडदौड केली
निजामचा पराभव केला.
शिंदेंनी विमानदौड केली
उद्धवचा पराभव केला.
दैवयोग
किती षड्यंत्र केले
किती वेश बदलले
नशिबी मात्र माझ्या
फक्त मंत्रिपद आले.
ज्ञानी
लोक रात्री झोपतात
ज्ञानी रात्री जागतात
गीतेचा संदेश हा
शिंदेंना कळला होता.
आजचा पाऊस वेगळा होता
काठावरचे गुपित झेलता
अनु'मतीची महत्ता विशेष
वसंताचे मृगजळ खास
कटी बंधात उष्म निश्वास
नभी नाभी ताम्र गोल
चा'लते जातो तोल
आर्त कुंजन
आस पास
पर्ण विरहीत पुष्प तटी दाट
दिंगबर सुरेख मदन पाझरतो
.
.
.
.
.
.
.
स्वतःच्याच कवितेच्या विडंबनाचा विचार केला आणि कवितेतला(च) मदन अकस्मिक पाझरला. ;)
वनस्पति उद्यानातून फेरफटका मारताना
माहितीची पाटी नसलेले झाड पाहून
साहित्यिक राजूमधील चौकश्याने विचारले
हे झाड कोणते?
त्याचा वनस्पती वैज्ञानिक मित्र म्हणाला
उष्णकटिबंधीय म्हणजेच ट्रॉपीकल!
(राजूने वेळ मारून नेणे कंसात जोडले)
वनस्पती वैज्ञानिक मित्राने
राजूची वसंत ऋतूवरील कविता
ऐकुन झाल्यावर
मोबाईलवर मराठी विकिपीडियावरचे
वसंत ऋतूचे पान उघडत राजूला विचारले
रोज किती पाणी प्यावे?
शरीराची गरज असेल एवढे
आणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य
डॉक्टर सुचवतील तेवढे
रोज किती पाणी प्यावे?
अन्न पिकविण्यासाठी
शेतीसाठी
शिल्लक राहील एवढे
रोज किती पाणी प्यावे?
शेती आणि शरीरांची गरज
यांचे गणित नाही जुळली तर
इतर अपव्यय टाळून
लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व
ईतर चार जणांना पटवून
शरीराची गरज भागेल तेवढे
http://www.misalpav.com/node/50007/backlinks
श्रीमान बाजीगर यांनी मांडलेल्या विषयाची दुसरी बाजू.....
रिकामटेकडा मी खरडतो चार ओळी
नका शोधू यात जोडगोळी कुणाची
पहिलेच सागंतो मी ही तर कसरत अक्षरांची
नाहीतर उगा द्याल मज शिवीगाळी फुकाची
शोधिसी दानवा गुपीते कुणा कुणाची
का तोडू पहातो घरटी कुणाकुणाची
लागेल हाय तुला माझ्या रवळनाथची (पैचान कौन)
बालकवी म्या पामरला क्षमा करा
आनंदी आनंद गडे
मेट्रू धावे चोहीकडे
क्षणात पिपंरी,क्षणात चिंचवड
क्षणात पोहचे कोथुरुडे
आनंदी आनंद गडे
डोलत लतीका गंधवती
मेट्रु स्टाफ लगबगती
नटली संध्या प्रेमाने
कुमद ही हसते आहे
सनई चौघडे , हार तुरे
झगमग लगबग चोहीकडे
आनंदी आनंद गडे
नरमुंड रूंड पाहूनी
मनी चितंले,
प्राणनाथ धावले
भान हरले(पुणेकरांचे),
गान स्फुरले
आनंदी आनंद गडे
हेमंत दिवटे हे मराठीतील एक प्रसिद्ध कवी, प्रकाशक, आणि एकूणच काव्योत्तेजक वल्ली.
"या रूममध्ये आलं की लाईफ सुरू होतं" ही त्यांची एक प्रसिद्ध कविता.
आणि कुठल्याही वाहत्या व्हॉट्सॅप ग्रूपसाठी हे त्या कवितेचं विडंबन - अर्थातच मूळ कवितेच्या मानाने अगदीच थिल्लर.
या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं
या ग्रूपवर आलं की लाईफ सुरू होतं...
मुर्द्राक्षास...
मुरवि मनोहर द्राक्षालागी
सुधा मधुर अन् गंध केशरी
मुर्द्राक्षाची द्राक्षरसाशी
अशी चालली मधुरा-मधुरी
द्राक्षम् मधुरम् पाकम् मधुरम्
पाकामधले केशर मधुरम्
द्राक्षरसासह मधुमद मधुरम्
द्राक्षाधिपतेरखिलं मधुरम्
- कौस्तुभ आजगांवकर
*मुर्द्राक्ष - द्राक्षाचा मुरांबा