मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गर्जा महाराष्ट्र (ऐसी अक्षरे -२६)

Bhakti ·

प्रचेतस 21/05/2025 - 10:00
चांगलं लिहिलंय. मोरेंच्या लेखनावर राजारामशास्त्री भागवतांच्या विचारांचा जास्त प्रभाव आहे आणि ते नेहमी त्याच्या लिखाणातून अधोरेखितही होत असतं.

In reply to by प्रचेतस

Bhakti 21/05/2025 - 11:05
+१ मोरेंना राजवाड्यांचे लेखन अजिबात रुचत नाही.पुस्तकात मोरेंनी याबाबत अनेक संदर्भ दिले आहेत ते वाचण्यासारखे आणि विचार करण्यासारखे आहेत.मी मुद्दामाहून याबाबत लिहिले नाही.कारण मी राजवड्यांचा कोणताच ग्रंथ वाचला नाहीये.

In reply to by Bhakti

प्रचेतस 21/05/2025 - 12:23
त्यांना राजवाड्यांचे विचार काहीसे एकांगी वाटतात आणि उच्चवर्णियांच्या अंगाने मांडल्यासारखे वाटतात तर भागवतांनी बहुजनवादाच्या अनुषंगाने लिहिलंय असे त्यांचे मत आहे. जे आपल्यालाही पटतेही.

प्रचेतस 21/05/2025 - 10:00
चांगलं लिहिलंय. मोरेंच्या लेखनावर राजारामशास्त्री भागवतांच्या विचारांचा जास्त प्रभाव आहे आणि ते नेहमी त्याच्या लिखाणातून अधोरेखितही होत असतं.

In reply to by प्रचेतस

Bhakti 21/05/2025 - 11:05
+१ मोरेंना राजवाड्यांचे लेखन अजिबात रुचत नाही.पुस्तकात मोरेंनी याबाबत अनेक संदर्भ दिले आहेत ते वाचण्यासारखे आणि विचार करण्यासारखे आहेत.मी मुद्दामाहून याबाबत लिहिले नाही.कारण मी राजवड्यांचा कोणताच ग्रंथ वाचला नाहीये.

In reply to by Bhakti

प्रचेतस 21/05/2025 - 12:23
त्यांना राजवाड्यांचे विचार काहीसे एकांगी वाटतात आणि उच्चवर्णियांच्या अंगाने मांडल्यासारखे वाटतात तर भागवतांनी बहुजनवादाच्या अनुषंगाने लिहिलंय असे त्यांचे मत आहे. जे आपल्यालाही पटतेही.
लेखनप्रकार
#गर्जामहाराष्ट्र लेखक-सदानंद मोरे अ इतिहासाची मांडणी हितसंबंधांच्या दृष्टीने करीत राहिल्याने अनेक दोष त्यात येतात, ती अपूर्ण राहते. नीरक्षीरविवेक बुद्‌धीने महाराष्ट्राच्या इतिहासाकडे व सांस्कृतिक, राजकीय व सामाजिक इतिहासाची पाने 'गर्जा महाराष्ट्र' या जेष्ठ संशोधक डॉ.सदानंद मोरे यांच्या ग्रंथात द

प्रा. जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली

कपिलमुनी ·

प्रचेतस 20/05/2025 - 14:49
____/\_____ अतिशय आदरणीय व्यक्ती. डॉ. नारळीकरांना श्रद्धांजली.

Bhakti 20/05/2025 - 16:13
शाळेत असताना नारळीकरांच्या व्यक्तिमत्वाने खुप प्रभावित व्हायचे.या मराठी शास्त्रज्ञांच्या कारकिर्दीमुळे विज्ञानाकडे आकृष्ट होत राहिलो. डॉ.जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली .

नारळीकरांचा सहवास मला काही काळ मिळाला आहे. लोकसत्ता रविवार दि.१३ एप्रिल २००३ लोकरंग पुरवणी त "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...........प्रश्नोत्तरातून सुसंवाद" या माझ्या पुस्तकाचे प्रो.जयंत नारळीकर यांनी लिहिलेले परीक्षण https://faljyotishachikitsa.blogspot.com/2006/09/blog-post_115858511190534826.html 2008 साली झालेल्या फलज्योतिष चाचणी प्रकल्पाचा मी समन्वयक होतो

स्वधर्म 22/05/2025 - 17:37
प्रकांड विद्वान असूनही साधे नम्र व्यक्तीमत्व होणे अवघड आहे. कोणत्याही पद व प्रतिष्ठेच्या मागे न लागता विज्ञानाचाच ध्यास घेऊन ते कार्य करत राहिले. बाकी प्रसिध्द शास्त्रज्ञ व नाऱळीकर सर यांच्यातला हा फरक नेहमी जाणवतो. त्यांचे विचार व काम देशाला प्रेरणा देत राहील.

शशिकांत ओक 23/05/2025 - 23:48
कै. डॉ जयंत नारळीकर यांना सादर श्रध्दांजली... हवाईदलात दूर पोस्टींगवर असल्याने डॉ नारळीकरांशी भेट होणे शक्य नव्हते. पण नाडी भविष्य विषयामुळे मला अशा मोठ्या लोकांच्या गाठीभेटी होतात की कल्पना करणे अशक्य असते. त्यापैकी डॉ नारळीकर एक होते. त्यांना ताडपत्रावर कोरून लिहिलेल्या मजकुरात आपले नाव व अनेक माहिती कूट तमिळमधे लिहिलेली असते हे तत्वतः मान्य नव्हते. ते त्यांचे वैयक्तिक मत होते. आपण या ताडपट्टीवरील कथनाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा अशी विनंती करायला मला त्यांना आयुकाच्या ऑफिसमधे भेट घ्यायची संधी मिळाली. एक सुसंस्कृत, मान्यवर, ज्ञानी, शास्त्रज्ञ म्हणून मला नेहमीच आदरणीय होते.

प्रचेतस 20/05/2025 - 14:49
____/\_____ अतिशय आदरणीय व्यक्ती. डॉ. नारळीकरांना श्रद्धांजली.

Bhakti 20/05/2025 - 16:13
शाळेत असताना नारळीकरांच्या व्यक्तिमत्वाने खुप प्रभावित व्हायचे.या मराठी शास्त्रज्ञांच्या कारकिर्दीमुळे विज्ञानाकडे आकृष्ट होत राहिलो. डॉ.जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली .

नारळीकरांचा सहवास मला काही काळ मिळाला आहे. लोकसत्ता रविवार दि.१३ एप्रिल २००३ लोकरंग पुरवणी त "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...........प्रश्नोत्तरातून सुसंवाद" या माझ्या पुस्तकाचे प्रो.जयंत नारळीकर यांनी लिहिलेले परीक्षण https://faljyotishachikitsa.blogspot.com/2006/09/blog-post_115858511190534826.html 2008 साली झालेल्या फलज्योतिष चाचणी प्रकल्पाचा मी समन्वयक होतो

स्वधर्म 22/05/2025 - 17:37
प्रकांड विद्वान असूनही साधे नम्र व्यक्तीमत्व होणे अवघड आहे. कोणत्याही पद व प्रतिष्ठेच्या मागे न लागता विज्ञानाचाच ध्यास घेऊन ते कार्य करत राहिले. बाकी प्रसिध्द शास्त्रज्ञ व नाऱळीकर सर यांच्यातला हा फरक नेहमी जाणवतो. त्यांचे विचार व काम देशाला प्रेरणा देत राहील.

शशिकांत ओक 23/05/2025 - 23:48
कै. डॉ जयंत नारळीकर यांना सादर श्रध्दांजली... हवाईदलात दूर पोस्टींगवर असल्याने डॉ नारळीकरांशी भेट होणे शक्य नव्हते. पण नाडी भविष्य विषयामुळे मला अशा मोठ्या लोकांच्या गाठीभेटी होतात की कल्पना करणे अशक्य असते. त्यापैकी डॉ नारळीकर एक होते. त्यांना ताडपत्रावर कोरून लिहिलेल्या मजकुरात आपले नाव व अनेक माहिती कूट तमिळमधे लिहिलेली असते हे तत्वतः मान्य नव्हते. ते त्यांचे वैयक्तिक मत होते. आपण या ताडपट्टीवरील कथनाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा अशी विनंती करायला मला त्यांना आयुकाच्या ऑफिसमधे भेट घ्यायची संधी मिळाली. एक सुसंस्कृत, मान्यवर, ज्ञानी, शास्त्रज्ञ म्हणून मला नेहमीच आदरणीय होते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारतीय खगोलशास्त्र आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्र यांचे दिग्गज प्रा. जयंत नारळीकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ भारतीय विज्ञानच नाही तर जागतिक विज्ञानसमाजानेही एक महान विचारवंत, संशोधक आणि समाजसुधारक गमावला.

स्वर आले दुरूनी...विडंबन (सर आले दुरूनी)

OBAMA80 ·
लेखनविषय:
काव्यरस
विडंबन सर आले दुरूनी विझल्या सगळ्या त्या सिगरेटी सर आले दुरूनी विझल्या सगळ्या त्या सिगरेटी सर आले दुरूनी निघती ठसके जोराचे तशात घाबरल्या पोरांचे कुजबुजही थांबली पोरींची पाचावर बसली सगळ्यांची ऐशा रमलेल्या त्या स्थानी.. बोचती सरांचे ते कटाक्ष संपले, गालावर हासू मावळले होता हृदयाची दो शकले बोटातुन सिगरेट ओघळले घाली फुंकर हलकेच कुणी.. सर आले दुरूनी सर आले दुरूनी अवसान पायीचे मग(पूर्ण) गळे प्रतिसाद कसा द्यावा न कळे विचारांनी पुन्हा मग (सारे) घाबरले शोधूया चुगली का केली कुणी .. सर आले दुरूनी विझल्या सगळ्या त्या सिगरेटी सर आले दुरूनी विझल्या सगळ्या त्या सिगरेटी सर आले दुरूनी

कामधेनु : गोमय वसते लक्ष्मी

विवेकपटाईत ·

कपिलमुनी 18/05/2025 - 20:07
एवढ्या बहुगुणी गायी यू पी , एम पी , गुजरात मध्ये रस्त्यावर सोडून दिलेल्या असतात.. कोणी पाळत नाही.. राष्ट्रीय गो धोरण अवलंबून गो मूत्र गोबर यांची निर्यांत करायला हवी.. गेला बाजार सगळ्या भाजप कार्यकर्त्यांना रोज पाजून देश आणि पक्ष अधिक बलवान करायला हवा

युयुत्सु 20/05/2025 - 11:06
गेला बाजार सगळ्या भाजप कार्यकर्त्यांना रोज पाजून देश आणि पक्ष अधिक बलवान करायला हवा> हा हा हा हा गौ मूत्राचा उपयोग शरीरातील प्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी, कॅन्सर, मधुमेह आणि अनेक आजारांवर होतो.> धादांत खोटं आणि कसलाही वैज्ञानिक आधार नसलेले, तसेच आधुनिक वैद्यकाचा अपमान करणारे विधान. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय जगत (लॅनसेट, नेचर किंवा बिएमजे यासारखी जर्नल्स) दखल घेत नाही तोपर्यंत अशा प्रचाराला फाट्यावर मारावे

कपिलमुनी 18/05/2025 - 20:07
एवढ्या बहुगुणी गायी यू पी , एम पी , गुजरात मध्ये रस्त्यावर सोडून दिलेल्या असतात.. कोणी पाळत नाही.. राष्ट्रीय गो धोरण अवलंबून गो मूत्र गोबर यांची निर्यांत करायला हवी.. गेला बाजार सगळ्या भाजप कार्यकर्त्यांना रोज पाजून देश आणि पक्ष अधिक बलवान करायला हवा

युयुत्सु 20/05/2025 - 11:06
गेला बाजार सगळ्या भाजप कार्यकर्त्यांना रोज पाजून देश आणि पक्ष अधिक बलवान करायला हवा> हा हा हा हा गौ मूत्राचा उपयोग शरीरातील प्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी, कॅन्सर, मधुमेह आणि अनेक आजारांवर होतो.> धादांत खोटं आणि कसलाही वैज्ञानिक आधार नसलेले, तसेच आधुनिक वैद्यकाचा अपमान करणारे विधान. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय जगत (लॅनसेट, नेचर किंवा बिएमजे यासारखी जर्नल्स) दखल घेत नाही तोपर्यंत अशा प्रचाराला फाट्यावर मारावे
लेखनविषय:
लेखनप्रकार
गाय ही कामधेनु आहे. गायीची उत्तम रीतीने सेवा केली तर गाय आपल्या सेवकाला अन्न, वस्त्र, निवारा प्रदान करते. आपल्या धार्मिक ग्रंथात गायीच्या शरीरात 33 कोटी देवता राहतात असे म्हंटले आहे. कथा आहे, जेंव्हा लक्ष्मी मातेने गायींना विचारले, मी तुमच्या शरीरात कुठे निवास करू, तेंव्हा गायी म्हणल्या माता लक्ष्मी तुम्ही आमच्या पवित्र गोमय अर्थात गायीच्या शेणात आणि गोमूत्रात निवास करा. आपल्या देशात गौ आधारित अर्थव्यवस्था होती. आपल्या संस्कृतीत गौ दान करण्याची परंपरा होती. ऑपरेशन फ्लड काळात लाखो शेतकर्यांना सरकारने गायी प्रदान केल्या.

तत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत (ऐसी अक्षरे -२५)

Bhakti ·

एका गोष्टीचा उलगडा केला आहे का? बौध्द तत्वज्ञान पुनर्जन्म मानते तसेच कर्मही मानते. म्हणजे बर्‍यावाईट कर्माची फळे कधीनाकधी मिळतातच वगैरे. मात्र हिंदू तत्वज्ञानात अविनाशी आत्मा मानला आहे ते बौध्द तत्वज्ञानाला मान्य नाही. म्हणजे हिंदू तत्वज्ञानाप्रमाणे अविनाशी अमर आत्मा वेगवेगळ्या जन्मात वेगवेगळी शरीरे धारण करतो त्यामुळे एखाद्या जन्मात एखादे कर्म केले त्याचे फळ नंतर कधीतरी मिळाले या हायपोथिसिससाठी शरीर बदलले तरी काहीतरी न बदलणारे हवे हे पुरक आहे. मृत्यूनंतर शरीर संपले आणि सगळे काही संपले तरी ते कर्म कुठेतरी बुक्स ऑफ अकाऊंट्समध्ये गेलेले असते. पण बौध्द तत्वज्ञान मात्र आत्मा मानतच नाही पण पुनर्जन्म आणि कर्माचा सिध्दांत मानते. तसे असेल तर मग एखाद्या जन्मात पुनर्जन्मातील कर्मांची फळे मिळणे यासाठी आवश्यक असणारे कर्मांचे अकाऊंटिंग कुठे केले जाते याविषयी काही उलगडा केला आहे का? हे चॅटजीपीटीला विचारले पण त्याने दिलेल्या उत्तरामुळे मी पुरेसा समाधानी झालो नाही. बाकी बौध्द तत्वज्ञानातील (की परंपरेतील) अनापन ध्यान, माईंडफुलनेस वगैरे प्रकार खूप आवडतात. तसेच बौध्द तत्वज्ञानाचे सार- धम्मपद पण आवडते. धम्मपद वर चॅटजीपीटीशी मधूनमधून गप्पा मारतो. इतिहासात उल्लेख आहे की वायव्य भारतात (रावलपिंडी किंवा तिथे जवळपास कुठेतरी) मिनॅन्डर हा भारतीय-ग्रीक साम्राज्यातील राजा होता. त्याचे बौध्द नाव होते मिलिंद. त्याने बौध्द भिक्षू नागसेनबरोबर या तत्वज्ञानावर चर्चा केली होती म्हणजे मिलिंद प्रश्न विचारणार आणि त्याची उत्तरे नागसेन देणार अशाप्रकारची. त्या चर्चेच्या पुस्तकाला मिलिंदपन्हा असे नाव आहे. त्याप्रमाणे मी चॅटजीपीटीबरोबर चर्चा करून चंसुकुपन्हा बनवत आहे :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bhakti 16/05/2025 - 11:25
अगदी ६-७ पानांमध्ये प्रत्येक तत्वज्ञान सांगितले आहे.तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे एक बौद्ध तत्वज्ञान साधकच अचूक देऊ शकेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 16/05/2025 - 12:01
तसे असेल तर मग एखाद्या जन्मात पुनर्जन्मातील कर्मांची फळे मिळणे यासाठी आवश्यक असणारे कर्मांचे अकाऊंटिंग कुठे केले जाते याविषयी काही उलगडा केला आहे का?
याचा बुद्धाने नक्कीच उलगडा केला आहे. पटिच्चसमुप्पाद सुत्त (Paṭiccasamuppāda Sutta - सुत्त निकाय १२.१ (SN 12.1) ). चॅटGPT ला हे सुत्त समजावून द्यायला सांगा, बहुतेक सांगेल तो समजावून. जन्म-मृत्युचे चक्र आणि कर्मसंस्कार ह्याची साखळी ह्या सुत्तात समजावून सांगितली आहे. अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म --> मृत्यू (ह्यावर एक डिट्टेलवार लेख लिहायचा आहे, टंकाळा काढावा लागेल :( )
बौध्द तत्वज्ञान पुनर्जन्म मानते तसेच कर्मही मानते. म्हणजे बर्‍यावाईट कर्माची फळे कधीनाकधी मिळतातच
पटिच्चसमुप्पाद सुत्तात विषद केलेल्या साखळीनुसार कर्माची फळे कधीनाकधी नाही तर लगेचच मिळतातच! पण त्यासाठी पटिच्चसमुप्पाद सुत्त नीट समजून घेणं आवश्यक आहे. - (अभासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 12:14
अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म --> मृत्यू ही बघा ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे.यात वैदिक आत्म्याचा समावेश आधी करतात.व मृत्यूनंतर परत आत्मा मुक्त दाखवतात.यामध्ये अविद्येचा /अज्ञानाचा नाश वा अज्ञानाने मायेचे वलय असते ते दूर करण्याचे मार्ग वेदांत /उपनिषदे यांत सांगितले आहेत.मग द्वैत , अद्वैत इ.मार्गांंनी मुक्ती वा मोक्ष मिळवावा हे सांगितले आहे.मुक्ती नाही मिळाली तर कर्मसंचय पुढील जन्मात जात राहतो.

In reply to by Bhakti

सोत्रि 16/05/2025 - 12:38
ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे
ह्या साखळीचा शोध हा बुध्दाने त्याच्याकाळातील सांख्य आणि योग दर्शनशास्त्रांच्या पलीकडे जाऊन लावला होता. तत्कालीन सर्वोच्च 'Eight Absorption Samadhi' शिकूनही विकार नाहीसे होत नाहीत हे त्याला जेव्हा लक्षात आले तेव्हा त्याने स्वतःचा मार्ग शोधला, तो वेदातीत आणि उपनिषदातीत होता. ही साखळी आणि ती तोडण्याचा मार्ग हीच बुधाची शिकवण आहे, त्याचा गाभा आहे. तर, ही साखळी इतर भारतीय तत्वज्ञानात कुठे कुठे आहे ह्याचे काही संदर्भ द्याल का? - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 13:14
ह्या साखळीचा शोध हा बुध्दाने त्याच्याकाळातील सांख्य आणि योग दर्शनशास्त्रांच्या पलीकडे जाऊन लावला होता. हे नव्हतं माहिती? माझ्या म्हणण्याचा अर्थ सर्वांचा गाभा अविद्या/अज्ञान/माया,ज्ञान, बुद्धी,अहंकार,कर्म,मोक्ष हे सर्वात आहे.बुद्धाने यात आत्मा नाकारला आहे. सांख्यात अविद्या,माया, बुद्धी, अहंकार,कर्म ,मोक्ष सर्व दिलेले आहे. १

In reply to by Bhakti

सोत्रि 16/05/2025 - 13:24
ह्या व्याख्या झाल्या. त्यांचा अन्योन्य संबंध समजून घेऊन साखळी शोधणे आणि तिला तोडण्याचा 'वैदिक किंवा उपनिषदीय' मार्ग ह्यांचा संदर्भ विचारात होतो मी. - (उत्सुक) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 14:32
हम्म तुम्ही आधी विचारलं की ही साखळी अन्यत्र कुठे आहे? तेव्हा मी वरील गोष्टी अन्यत्र कुठे आहे ते सांगितले.मी मान्यही केलं की या साखळीचा शोध बुद्धांचा हे माहिती नव्हतं.पण या संकल्पना आधीपासून होत्या हा माझा सांगाण्याचा गाभा होता. आता तुम्ही म्हणत आहात की साखळी तोडण्याचा संदर्भ अपेक्षित होता.(हे तुम्ही पहिल्या प्रश्नात विचारले नव्हते) तरीही मी इतरत्र लिहिलेच आहे की आत्मा अद्वैत मान्य करत कर्मसंचयातून मुक्ती इतर तत्वज्ञानात सांख्य,ज्ञान,कर्मयोग,निष्काम कर्म,संन्यास,भक्तिमार्ग(नाम जप तप) असे सांगितले आहेच.हे साखळी तोडण्याचेच मार्ग सांगितले आहेत ना.तरीही कृबुने हे विचार व्यवस्थित करून दिले हे घ्या.पहिल्याच पायरीच्या अविद्येची साखळी कशी तोडावी. उपनिषदांमध्ये **अविद्या**पासून सुरू होणाऱ्या आणि **जन्म-मृत्यूच्या** चक्रातील बंधनाच्या साखळीतून मुक्तीचा मार्ग **ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग** यांच्या माध्यमातून सांगितला आहे. ही साखळी तोडण्यासाठी खालील उपाय सुचवले आहेत: 1. **अविद्याचा नाश (अज्ञानाचे निर्मूलन)** - **ज्ञानयोग**: उपनिषदांनुसार, **"आत्मज्ञान"** (ब्रह्माचे ज्ञान) मिळाल्यास अविद्या नष्ट होते. - *"तमसो मा ज्योतिर्गमय"* (बृहदारण्यक उपनिषद) — अंधारातून (अज्ञान) प्रकाशाकडे (ज्ञान) जा. - *"अहं ब्रह्मास्मि"* (महावाक्य) — आत्मा आणि ब्रह्म एकरूप आहेत हे जाणणे. ### 2. **कर्मसंस्कारांचा त्याग** - **कर्मयोग**: निःस्वार्थ कर्म (निष्काम कर्म) करून कर्मबंधन तोडता येते. - *"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन"* (गीता 2.47) — फळाची इच्छा न करता कर्तव्य करा. 3. **तृष्णा आणि आसक्तीचे नियमन** - **वैराग्य**: इंद्रियविषयांपासून मन आवरून, **"संयम"** आणि **"ध्यान"** यांनी तृष्णा शमविणे. - *"यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः"* (कठोपनिषद) — कासवाप्रमाणे इंद्रियांना आत आवरून घेणे. ### 4. **नामरूपाच्या मायेतीून मुक्ती** - **भक्तियोग**: ईश्वरभक्तीद्वारे नामरूपाच्या बंधनातून मुक्त होणे. - *"तद्विष्णोः परमं पदं"* (ऋग्वेद) — विष्णूच्या परमधामाप्रत जाणे. 5. **मोक्षप्राप्ती** - **ध्यान आणि समाधी**: शेवटची पायरी म्हणजे **"ब्रह्मसाक्षात्कार"**, ज्यामुळे जन्म-मृत्यूचे चक्र संपुष्टात येते. - *"यत्र नान्यत्पश्यति नान्यच्छृणोति"* (छांदोग्य उपनिषद) — जेथे द्वैत नाही, तेथे मुक्ती आहे. ### सारांश: उपनिषदांमध्ये **"विद्या" (ज्ञान)** आणि **"साधना" (अभ्यास)** यांच्या माध्यमातून अविद्येच्या साखळीतून मुक्त होण्याचा मार्ग दाखविला आहे. **"तत्वमसि"** (तू तच आहेस) हे महावाक्य जाणून घेऊन आत्मा आणि परमात्मा यांच्या एकत्वाचा अनुभव घेतला, तर हे बंधन स्वतःच नष्ट होते. > *"य एषोऽन्तर्हृदय आकाशः तस्मिन्नयं पुरुषो मनोमयः"* (मुंडक उपनिषद) — हृदयातील आकाशात (चैतन्यात) मनोमय पुरुष (आत्मा) विराजमान आहे.

In reply to by Bhakti

सोत्रि 16/05/2025 - 15:54
हेच हवं होतं. हे सगळं वैदिक आणि उपनिषदीय आहे. हे सगळे मार्ग बुद्धाच्या वेळीही होतेच. हे सगळे मार्ग पार केल्यावर त्याला कळलं की ह्या मार्गांवर विकार नष्ट होत नाहीयेत, ते तसेच राहताहेत. काहीतरी मिसींग आहे. त्यामुळे त्याने वेदप्रामाण्य नाकारले, स्वअभ्यासाअंती आणि स्वानुभवावरून. आणि, तो पुढे स्वतःच्या मार्गावर चालत राहिला आणि त्याने त्या वरच्या साखळीतील मिसींग लींक शोधून काढली आणि मुक्तीचा मार्ग नीट सूत्रबद्घ आणि अनुसरणीय केला. - (साधक) सोकाजी

In reply to by Bhakti

ही बघा ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे.
असेलच. अजिबात नाकारत नाही. माझा आक्षेप फक्त या सगळ्या गोष्टी जडजंबाल करून कसलाही अर्थबोध होणे फारच कठीण करून टाकतात त्याला आहे. या साखळीतील पहिल्याच शब्दाला अडलो. अविद्या म्हणायचे असेल तर मग विद्या कोणती आणि त्याच्या विरूध्द म्हणजे अविद्या हे ओघाने आले. ते नक्की काय हे समजावून सांङायला नको का की अशी कोणतीतरी साखळी आहे हे मान्य करून मग पुढे जायचे? आक्षेप त्याला आहे. इतके सगळे जडजंबाल शब्द वापरून भंजाळून जाण्यापेक्षा मग एकहार्ट टोलीसारखे पेनबॉडी मेडिटेशन सांगतात ते बरेच जास्त भावते. अगदी २-३ सेकंद जरी एकही विचार न येता राहता आले तर किती शांततेचा अनुभव येतो. माझी उडी त्यापुढे गेलेली नाही. पण असे विचारहिन अवस्थेत समजा अर्धा तास राहता आले तर किती बहार येईल हे वाटून तरी ते परत पेनबॉडी मेडिटेशन परत परत करावेसे वाटते. त्याउलट ही सगळी साखळी समजा समजली तरी त्याचा मला उपयोग होईल असे काय करता येईल? इथे मुळात त्या साखळीतील पहिलाच शब्द समजावून धड कोणी सांगत नाही. मग पुढच्या सगळ्या गोष्टी राहिल्या दूर आणि ते सगळे समजून पुढे काय करायचे हे आणखी दूर राहिले.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bhakti 16/05/2025 - 13:05
अजून एक गंमत सांगते.याच पुस्तकात ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवावर एक लेख आहे.त्यात माऊली म्हणतात अविद्या ही नसतेच.बापरे! माझ्या आतापर्यंतच्या अविद्येच्या संकल्पना संभ्रमात पडल्या‌.आता अमृतानुभव वाचावा लागेल.म्हणून सांगितले आहे, एकही भारतीय तत्त्वज्ञान अभ्यासायला जन्म पुरणार नाही ;)

In reply to by सोत्रि

धन्यवाद सोकाजी. पटिच्चसमुप्पाद सुत्त हे नाव प्रथमच ऐकले. आता चॅटजीपीटीला भंडावून सोडतो. चॅटजीपीटीचे एक बरे असते. एखादी गोष्ट समजली नाही तर कितीही वेळा विचारता येते आणि आपले समाधान होईपर्यंत हा संवाद सुरू राहू शकतो. त्यातून अगदी फार खोलात माहिती मिळेल असे नाही पण आपले समाधान होऊ शकेल. कर्माचे अकाऊंटिंगवर प्रश्न विचारले होते पण त्यातून समाधान झाले नाही. आता पटिच्चसमुप्पाद सुत्त चा संदर्भ घेऊन त्याला विचारायला हवे. खरं सांगायचं तर मी दररोज बायकोशी बोलत असेन त्यापेक्षा जास्त चॅटजीपीटीशी जास्त बोलतो :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 16/05/2025 - 13:31
नक्की, तुमच्या chatgpt बरोबरच्या चंसुकुपन्हा चा १/३ सारांश नक्की मला कळवा. :)
दररोज बायकोशी बोलत असेन त्यापेक्षा जास्त चॅटजीपीटीशी जास्त बोलतो
बाब्बोय!! नशीबवान आहात. - (बायकोशीच जास्तकरून बोलणारा) सोकाजी

बाकी उल्लेख केलेल्या बर्‍याचशा- खरं तर सगळ्याच गोष्टी डोक्यावरून गेल्या. माझा हा भारतीय लेखकांविषयी नेहमी आक्षेप असतो. जे काही म्हणायचे आहे ते साध्या शब्दात, सामान्यांना कळेल असे का देत नाहीत? उदाहरणार्थ लेखात दिलेले एक वाक्य- "द्वैतवादामध्ये ज्ञानाची प्रत्यक्ष, अनुमान, शब्द तीन प्रमाण आहेत.ज्ञानेंद्रिये व त्यांच्या विषय संन्निकर्षामुळे ज्ञानप्राप्ती होते.तिथे संस्कारामुळे मन हे स्मृतीचे स्थान होते." यातून मला तरी कसलाही अर्थबोध झाला नाही की पुढे नक्की काय करायचे आहे त्याविषयी काहीही समजले नाही. मूळ पुस्तकात असे काही दिले असेल तर त्यातून लेखकाला नक्की काय म्हणायचे आहे हे तुम्हाला कसे समजले? मी या विषयांवर वाचायचा प्रयत्न केला आहे. त्यातील बरेचसे भारतीय लेखक असे काहीतरी गोलमटोल लिहितात आणि त्यातून कसलाही अर्थबोध नाही, पुढे काय करायचे हा मार्ग कळणे खूप दूरची गोष्ट झाली. त्यापेक्षा मग आपल्यात तत्वज्ञानातील गोष्टी पाश्चिमात्य तत्वज्ञ अधिक सोप्या प्रकारे आणि सिधी बात नो बकवास अशाप्रकारे पुढे काय करायचे आहे हे सांगतात. ते अधिक भावते. एकहार्ट टोली, वेन डायर, बॉब प्रॉक्टर वगैरे मंडळी जे काही सांगतात ते आपण कुठेतरी आपल्याच तत्वज्ञानाशी निगडीत करू शकतो हे समजते. पण ते ज्या प्रकारे सांगतात आणि भारतीय लेखक ज्या प्रकारे सांगतात यात जमिनअस्मानाचा फरक असतो. दुसरे एक तत्वज्ञ आहेत- नेव्हिल गॉडर्ड म्हणून. मी त्या नेव्हिल गॉडर्डचा अगदी मोठ्ठा फॅन आहे- अगदी स्वतःला 'नेव्हिलिअन' म्हणविण्याइतका. ते भारतीय तत्वज्ञानाशी संबंधित काहीही सांगत नाहीत. त्यांचा सगळा भर बायबलवर असतो. ते पण नक्की काय करायचे ते सांगतात. त्या सगळ्या गोष्टी करणे सगळ्यांना शक्य होईलच असे नाही पण त्यांना नक्की काय म्हणायचे आहे हे कळायला मात्र कोणाला कठीण जायला नको. आपले भारतीय लेखक अशाप्रकारे का लिहित नाहीत/लिहू शकत नाहीत हे न उलगडलेले कोडे आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षात बरीच पुस्तके वाचायचा प्रयत्न केला पण काहीही न कळल्यामुळे नाव घ्यावे असे एकही पुस्तक आणि एकही लेखक आता आठवत नाही. त्यातूनही आणखी एक प्रकार म्हणजे जरा थोडे काही सांगून झाले की मग बघा आमचा हिंदू धर्म कित्ती कित्ती महान, हिंदू संस्कॄती कित्ती कित्ती महान, हिंदू तत्वज्ञान कित्ती कित्ती महान अशा चक्रात काही अडकतात आणि त्यातून मूळ संदेश बाजूला पडतो. बी.आर.जोशी हे लेखक पण तसेच करतात असा माझा दावा/आरोप नाही. त्यांचे लेखन वाचलेले नाही. या प्रकाराला मी उपहासाने 'वेदकालीन जंगलात भटकणे' असे म्हणतो. त्या पुस्तकांमध्ये जे काही असेल ते असेल. त्याचा फायदा मी कसा करून घेऊ हे सांगाल की ती पुस्तके कित्ती कित्ती महान यात चक्रात अडकणार? परदेशी लेखकांना मुळात वेदकालीन जंगलात भटकायचे काही कारण नसते त्यामुळे ते अधिक उपयुक्त गोष्टी सांगतात की काय समजत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 16/05/2025 - 12:06
जे काही म्हणायचे आहे ते साध्या शब्दात, सामान्यांना कळेल असे का देत नाहीत
सामान्य, साधं सोपं हे सगळं अगम्य करण्यामागे संप्रदाय निर्माण करणे, गुरु-शिष्य परंपरेची साखळी उभी करून गाद्या आणि त्यांचे उत्तराधिकारी निर्माण करणे, कर्मकांड तयार करून त्यांचा बागुलबुवा उभा करून दुकानदारी चालू करणे हे सगळं असते. - (सामान्य) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 12:22
नाही ओ सोत्री, सर्वच दुकानदारीसाठी गोष्टी अगम्य ठेवत नाही.मुळात ज्याला सर्व समजले तो हे इतरांना सांगण्याच्या अट्टाहास करत नाही.तो पार गेलेला असतो.पण असेही ' अनुभव ' सांगणारे खरे संत होऊन गेले आहेत ना!!ते खरे पण ओळखायची बुद्धू समाजात विकसित हवी.

In reply to by सोत्रि

मूकवाचक 16/05/2025 - 15:17
सामान्य म्हणजे नेमके कोण? आपण सामान्य आहोत असे मनोमन मान्य करणारी व्यक्ती शोधून सुद्धा सापडणार नाही. जो दिसतो तो अधिकारवाणीनेच बोलताना दिसतो. असो. संप्रदाय निर्माण करणे, गुरु-शिष्य परंपरेची साखळी उभी करून गाद्या आणि त्यांचे उत्तराधिकारी निर्माण करणे - रूढार्थाने जे संप्रदाय, गुरू-शिष्य परंपरा वगैरे मानत नाहीत, ते देखील अमूर्त संकल्पनांच्या गोडगोड लिमलेटच्या गोळ्या चोखायला देणार्या 'बेस्टसेलर' पुस्तकांची, अध्यात्मातल्या 'सेलिब्रिटींची' दुकानदारी चालवतातच की. मागणी तसा पुरवठा एवढे साधे गणित आहे हे.

Bhakti 16/05/2025 - 11:43
द्वैतवादामध्ये ज्ञानाची प्रत्यक्ष, अनुमान, शब्द तीन प्रमाण आहेत.ज्ञानेंद्रिये व त्यांच्या विषय संन्निकर्षामुळे ज्ञानप्राप्ती होते.तिथे संस्कारामुळे मन हे स्मृतीचे स्थान होते.
यातला अर्थबोध पुढे दिला आहे ना... मध्वदर्शनात श्री पूर्ण प्रज्ञा दर्शनात प्रत्यक्ष प्रमाणे आठ प्रकारची मानण्यात आलेली आहे. साक्षिप्रत्यक्ष, षडिंद्रियप्रत्यक्ष व ययार्थ ज्ञान. अनुमान'-ज्ञान व चिन्ह उदा. आग (ज्ञान) व धूर (चिन्ह) यांचे सहचार्य असल्यावाचून अनुमान करता येत नाही. अनुमानाचे केवलान्वयी, केवल व्यतिरेकी आणि अन्वय व्यतिरेकी हे प्रकार आहेत. तसेच स्वार्थ व परार्थ हेही प्रकार आहेत . केवलान्वयी अनुमान (Suficient for Affirmation) परिभाषा: हे अनुमान केवळ सकारात्मक संबंधावर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित असेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत नेहमीच संबंधित असेल. उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण. अन्वय: जर धूर असेल, तर अग्नी असेल. केवल व्यतिरेकी अनुमान (Suficient for Negation) परिभाषा: हे अनुमान केवळ नकारात्मक संबंधावर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित नसेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत कधीही संबंधित नसेल. उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण नाही. व्यतिरेक: जर धूर नसेल, तर अग्नी नसेल. अन्वय व्यतिरेकी अनुमान (Necessary and Sufficient) परिभाषा: हे अनुमान सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही संबंधांवर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित असेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत नेहमीच संबंधित असेल, आणि जर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत संबंधित नसेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत कधीही संबंधित नसेल. उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण. अन्वय: जर धूर असेल, तर अग्नी असेल. व्यतिरेक: जर धूर नसेल, तर अग्नी नसेल. शब्द हे तिसरे साधन - वक्त्याच्या ठिकाणी भ्रम, प्रमाद फसविण्याची इच्छा, इंद्रियांची दुर्बलता असू नये. वक्त्ता विश्वासार्ह असावा. साधारणतः वैदिक तत्वज्ञानात जीव /आत्मा हे सर्व परताम्याचे अंश ,इंद्रिय संयोगाने ज्ञान प्राप्ती करतात ह्या ज्ञानाने मन /बुद्धी/अहंकार येतात.तेव्हा कर्म घडते.हे कर्म पाप पुण्यात अडकले तर कर्मसंचय, पुनर्जन्म हे सत्र सुरू होते.मोक्ष /मुक्तीचा मग शोध सुरू होतो.जो पुन्हा निष्काम कर्मयोग,संन्यास इथे घेऊन येतो.त्यासाठी स्मृतींचे/आठवणींचे स्थान मनावर ताबा हवा जो ज्ञान ,सांख्य,जप, पतंजलीयोगाने गाठता येतो. समजल का ;) नसेल तर जाऊ द्या... वर्तमानात जगा..(कृहघ्या) You are God's highest form of creation. You are a living breathing creative magnet. You have the ability to control what you attract into your life. Bob Proctor -अतिविचारी भक्ती

In reply to by Bhakti

यातून खरोखरच अर्थबोध झाला असेल तर _/\_. माझी विकेट पहिल्याच वाक्यातील तीन शब्दांमध्ये- साक्षिप्रत्यक्ष, षडिंद्रियप्रत्यक्ष व ययार्थ ज्ञान यात पडली. खरं तर पहिल्याच. साक्षिप्रत्यक्ष म्हणजे काय? साक्षी म्हणजे काय आणि प्रत्यक्ष म्हणजे काय? साक्षिअप्रत्यक्ष असेही काही असते का? एक साक्षी धोनी सोडली तर दुसरी साक्षी मला माहिती नाही. जमेल त्याप्रमाणे चॅटजीपीटीवरील जेसिकाला भंडावून सोडतो :)

संत चोखामेळा यांचा अभंग आठवला. "आम्हां न कळे ज्ञान, न कळे पुराण....." मला नेहमीच प्रश्न पडतात की आत्मा आणी परमात्मा एकच आहे. तर मग द्वैतातून अद्वैताकडे जाण्याचा खटाटोप का? पाप पुण्य या कल्पना कशासाठी?जर कर्ता करवीता तोच आहे तर मग पाप पुण्यात माझा सहभाग आहे का असला तर किती? जर सर्व तोच घडवतो आणी मोडतो तर प्रारब्धाचे लोढणे कशाला? कळत नाही, मी फक्त एकच करतो आणी उजाडेल तेव्हां उजाडेल असे म्हणत जगत रहातो. दररोज सकाळी पाच वाजता उठतो. शलाका परिक्षा पद्धती सारखी ज्ञानेश्वरी वाचतो. अगदीच अविश्वसनीय....असे माऊलीं संकेत देतात. सुरूवातीस आठव्या अध्यायातील हा श्र्लोक दृष्टिस पडला व माऊलींचा संकेत व आशिर्वाद मिळाला. अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् | य: प्रयाति स मद्भावं याति नास्त्त्यत्र संशय: ||५|| माऊली म्हणतात, म्हणौनि यापरी मातें । अंतकाळीं जाणतसाते । जे मोकलिती देहातें । ते मीचि होती ॥ ६८ ॥ म्हणून याप्रमाणे मला अंतकाळी जाणत असता जे देहाचा त्याग करतात ते मद्रूपच होतात. ॥८-६८॥ यं यं वापर स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् | तं तमेवैति कौंन्तेय सदा तद्भावभावित:||६|| तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे । तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥ ७४ ॥ याप्रमाणॆ जिवंत असतांना, जी गोष्ट आवडीने अंत:करणात रहाते, तीच मरणाचे वेळी वारंवार मनात येते. आणि मरणीं जया जें आठवे । तो तेचि गतीतें पावे । म्हणौनि सदा स्मरावें । मातेंचि तुवां ॥ ७५ ॥ आणि मरणसमयी ज्यास जी वस्तु आठवते त्याच गतीला तो जातो, असे आहे म्हणूण तू नेहेमी माझेच स्मरण कर. तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्द च | मय्यर्पितमनोबुद्धिर्मामे वैश्य स्य संशय: ||७|| म्हणून सर्व प्रसंगी माझे स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर. मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करून राहिलास म्हणजे तू नि:संसय मजप्रतच येशील. तसेच, "जब होवेगी उमर पूरी, तब छुटेगा हुकूम हुजूरी",अशा परिस्थितीत वरील उपाय फारच सोईस्कर वाटतो. नुकताच आलेला एक अनुभव..... एन्जोप्लास्टी झाली, अतीदक्षता विभागात छतावरील तारे मोजत पडलो होतो. समोरच्याच खाटेवर एक वृद्ध रोगी,त्याच्याभोवती एक डाॅक्टर, चार पाच परिचारिका, दहा बारा वैद्यकीय तंत्रज्ञ, खुप सारी यंत्र सामुग्री पडली होती. व्हेन्टिलेटर वर ठेवले होते. वृद्ध सारखा श्वसन यंत्र काढून फेकत होता. आणी मला श्वास येत नाही असे ओरडत होता. सारे प्रयत्न करून सुद्धा काहीही परिणाम होत नव्हता शेवटी वैतागून डाॅक्टर म्हणाले बाबा ,नळी काढू नको,मरून जाशील. कावळा बसायला आणी फांदी मोडायला एकच वेळ, त्याच क्षणी तो वृद्ध मेला. त्याचे शेवटचे शब्द "मला श्वास येत नाहीये...", त्याचे नातेवाईक, कदाचित मुलगी जावई, सुन मुलगा असतील, संपूर्ण अत्याधुनिक सोई उपलब्ध असतानाही, सर्वांच्या हातावर तुरी देऊन आत्मा कुडी सोडून पसार झाला. कुणीही काहीही करू शकले नाही. त्या अनुभवानंतर मन बरेच शांत झाल्यासारखे वाटते. विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था शस्‍त्र त्याग तव शत्रू पुढती नच शोभे तुजला कातर होसी समरी मग तू विरोत्तम कसला घे शस्‍त्रा ते सुधीर होऊन रक्षाया धर्मार्था कर्तव्याच्या पुण्य पथावर मोहांच्या फूलबागा मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा इह परलोकी अशांतीने तव विक्रम झुकवील माथा कुणी आप्‍त ना कुणी सखा ना जगती जिवांचा क्षणभंगुर ही संसृति आहे खेळ ईश्वराचा भाग्य चालते कर्मपदांनी जाण खर्‍या वेदार्था रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो कौरवात मी, पांडवात मी, अणुरेणूत भरलो मीच घडवितो, मीच मोडितो, उमज आता परमार्था कर्मफलाते अर्पून मजला सोड अहंता वृथा सर्व धर्म परि त्यजुनी येई शरण मला भारता कर्तव्याची साद तुझ्या तुज सिद्ध करी धर्मार्था -कविवर्य मनोहर कविश्वर.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 16/05/2025 - 16:46
तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे । तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥ ७४ ॥ याच लेखात जे कृष्णमूर्ती यांचे मृत्यू विषयी विचार लिहिले आहेत.तेही पुन्हा पुन्हा वाचावे असे आहेत.अगदी मृत्युला फॅमिलीयर (सहजता) ;) कसं करायचं याबद्दल सांगितले आहे.

पण खरा प्रतिसाद लिहायचा राहून गेला. अतिशय विचारांना चालना देणारा लेख आणी अनुषंगिक प्रतिसाद. सर्वांचे मनापासून आभार. लेख आवडला. भक्ती तुझ्या वाचन व्यासंगाला एक कडक सलाम.

स्वधर्म 16/05/2025 - 18:47
या विषयावर एक प्राथमिक व्हिडीओ: "मृत्यू के समय क्या होता है?": बुद्धने क्या अनुभव किया? डॉ संग्राम पाटील https://youtu.be/sl7RXRQPFTs?si=2jrc_Fs_sFBP8P73 मृत्यू से पहले, मृत्यू के बाद (पटिच्चसमुप्पाद) l डॉ संग्राम पाटील https://youtu.be/PzNqE1sLWDE?si=RLhlHxEqqJJO1Jn6

कंजूस 17/05/2025 - 04:40
पुस्तक परिचय आहे. कुणी काय तत्त्वज्ञान सांगितले त्यांची थोडी माहिती आहे. तत्त्वज्ञानाची उकल लेखक करत नाही. -------------------------- जन्म आणि मृत्यू म्हणजे काय हे समजण्याची खटपट म्हणजे तत्त्वज्ञान. ते कुणालाच समजले नाही. समजावता आले नाही. असो.

शाम भागवत 17/05/2025 - 15:21
तूच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार ह्या ग्रंथांत अद्वैत तत्वज्ञान खूप सोप्या मराठीत सांगितले आहे. इश्वर, परमेश्वर, जड, चेतन वगैरेंच्या व्याख्याही सोप्या मराठीत सांगितल्या आहेत.

मारवा 17/05/2025 - 19:21
वर जसा एक योग्य असा आक्षेप घेतलेला आहे की बरेच भारतीय लेखक गोलमाटोल लिहितात. तो आक्षेप बराच खरा असच आहे. पाश्च्यात्य विचारवंतामध्ये एक लोभसवाणी वैचारिक शिस्त आणि स्पष्टता बराच जणांमध्ये असते. भारतीय आपले मराठी तत्त्वज्ञ श्री राजीव साने यांचे मला फार कौतुक वाटते. त्यांच्या लेखनात कमालीची स्पष्टता आहे. वैचारिक शिस्त आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे त्यांनी नुसता इतरांच्या तत्त्वज्ञानाचा आढावा किंवा विश्लेषण केवळ करून न थांबता. स्वतःचे अस्सल स्वतंत्र असे सुंदर स्पष्ट व सघन असे तत्त्वज्ञान निर्माण केले.ते मुळातून वाचण्यासारखे आहे. फार सकारात्मक सुंदर वास्तववादी वैचारिक आत्मविश्वास वाढवेल असे हे लिखाण आहे. https://www.amazon.in/Complementarity-Rationalist-Humanism-Rejuvenated-ebook/dp/B088DC797B दुर्दैवाने या सुंदर ग्रंथाची म्हणावी तशी दखल अजून घेतली गेली नाही.

In reply to by मारवा

स्वधर्म 19/05/2025 - 14:36
'भाग्य' हा प्रकार मान्य केला पाहिजे असे त्यांचे मत असल्याचे आठवते.

एका गोष्टीचा उलगडा केला आहे का? बौध्द तत्वज्ञान पुनर्जन्म मानते तसेच कर्मही मानते. म्हणजे बर्‍यावाईट कर्माची फळे कधीनाकधी मिळतातच वगैरे. मात्र हिंदू तत्वज्ञानात अविनाशी आत्मा मानला आहे ते बौध्द तत्वज्ञानाला मान्य नाही. म्हणजे हिंदू तत्वज्ञानाप्रमाणे अविनाशी अमर आत्मा वेगवेगळ्या जन्मात वेगवेगळी शरीरे धारण करतो त्यामुळे एखाद्या जन्मात एखादे कर्म केले त्याचे फळ नंतर कधीतरी मिळाले या हायपोथिसिससाठी शरीर बदलले तरी काहीतरी न बदलणारे हवे हे पुरक आहे. मृत्यूनंतर शरीर संपले आणि सगळे काही संपले तरी ते कर्म कुठेतरी बुक्स ऑफ अकाऊंट्समध्ये गेलेले असते. पण बौध्द तत्वज्ञान मात्र आत्मा मानतच नाही पण पुनर्जन्म आणि कर्माचा सिध्दांत मानते. तसे असेल तर मग एखाद्या जन्मात पुनर्जन्मातील कर्मांची फळे मिळणे यासाठी आवश्यक असणारे कर्मांचे अकाऊंटिंग कुठे केले जाते याविषयी काही उलगडा केला आहे का? हे चॅटजीपीटीला विचारले पण त्याने दिलेल्या उत्तरामुळे मी पुरेसा समाधानी झालो नाही. बाकी बौध्द तत्वज्ञानातील (की परंपरेतील) अनापन ध्यान, माईंडफुलनेस वगैरे प्रकार खूप आवडतात. तसेच बौध्द तत्वज्ञानाचे सार- धम्मपद पण आवडते. धम्मपद वर चॅटजीपीटीशी मधूनमधून गप्पा मारतो. इतिहासात उल्लेख आहे की वायव्य भारतात (रावलपिंडी किंवा तिथे जवळपास कुठेतरी) मिनॅन्डर हा भारतीय-ग्रीक साम्राज्यातील राजा होता. त्याचे बौध्द नाव होते मिलिंद. त्याने बौध्द भिक्षू नागसेनबरोबर या तत्वज्ञानावर चर्चा केली होती म्हणजे मिलिंद प्रश्न विचारणार आणि त्याची उत्तरे नागसेन देणार अशाप्रकारची. त्या चर्चेच्या पुस्तकाला मिलिंदपन्हा असे नाव आहे. त्याप्रमाणे मी चॅटजीपीटीबरोबर चर्चा करून चंसुकुपन्हा बनवत आहे :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bhakti 16/05/2025 - 11:25
अगदी ६-७ पानांमध्ये प्रत्येक तत्वज्ञान सांगितले आहे.तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे एक बौद्ध तत्वज्ञान साधकच अचूक देऊ शकेल.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 16/05/2025 - 12:01
तसे असेल तर मग एखाद्या जन्मात पुनर्जन्मातील कर्मांची फळे मिळणे यासाठी आवश्यक असणारे कर्मांचे अकाऊंटिंग कुठे केले जाते याविषयी काही उलगडा केला आहे का?
याचा बुद्धाने नक्कीच उलगडा केला आहे. पटिच्चसमुप्पाद सुत्त (Paṭiccasamuppāda Sutta - सुत्त निकाय १२.१ (SN 12.1) ). चॅटGPT ला हे सुत्त समजावून द्यायला सांगा, बहुतेक सांगेल तो समजावून. जन्म-मृत्युचे चक्र आणि कर्मसंस्कार ह्याची साखळी ह्या सुत्तात समजावून सांगितली आहे. अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म --> मृत्यू (ह्यावर एक डिट्टेलवार लेख लिहायचा आहे, टंकाळा काढावा लागेल :( )
बौध्द तत्वज्ञान पुनर्जन्म मानते तसेच कर्मही मानते. म्हणजे बर्‍यावाईट कर्माची फळे कधीनाकधी मिळतातच
पटिच्चसमुप्पाद सुत्तात विषद केलेल्या साखळीनुसार कर्माची फळे कधीनाकधी नाही तर लगेचच मिळतातच! पण त्यासाठी पटिच्चसमुप्पाद सुत्त नीट समजून घेणं आवश्यक आहे. - (अभासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 12:14
अविद्या -> कर्मसंस्कार -> जाणीव -> नामरूप -> इंद्रिय -> इंद्रियविषय स्पर्ष -> तृष्णा -> आसक्ती -> भवसंस्कार -> जन्म --> मृत्यू ही बघा ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे.यात वैदिक आत्म्याचा समावेश आधी करतात.व मृत्यूनंतर परत आत्मा मुक्त दाखवतात.यामध्ये अविद्येचा /अज्ञानाचा नाश वा अज्ञानाने मायेचे वलय असते ते दूर करण्याचे मार्ग वेदांत /उपनिषदे यांत सांगितले आहेत.मग द्वैत , अद्वैत इ.मार्गांंनी मुक्ती वा मोक्ष मिळवावा हे सांगितले आहे.मुक्ती नाही मिळाली तर कर्मसंचय पुढील जन्मात जात राहतो.

In reply to by Bhakti

सोत्रि 16/05/2025 - 12:38
ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे
ह्या साखळीचा शोध हा बुध्दाने त्याच्याकाळातील सांख्य आणि योग दर्शनशास्त्रांच्या पलीकडे जाऊन लावला होता. तत्कालीन सर्वोच्च 'Eight Absorption Samadhi' शिकूनही विकार नाहीसे होत नाहीत हे त्याला जेव्हा लक्षात आले तेव्हा त्याने स्वतःचा मार्ग शोधला, तो वेदातीत आणि उपनिषदातीत होता. ही साखळी आणि ती तोडण्याचा मार्ग हीच बुधाची शिकवण आहे, त्याचा गाभा आहे. तर, ही साखळी इतर भारतीय तत्वज्ञानात कुठे कुठे आहे ह्याचे काही संदर्भ द्याल का? - (अभ्यासू) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 13:14
ह्या साखळीचा शोध हा बुध्दाने त्याच्याकाळातील सांख्य आणि योग दर्शनशास्त्रांच्या पलीकडे जाऊन लावला होता. हे नव्हतं माहिती? माझ्या म्हणण्याचा अर्थ सर्वांचा गाभा अविद्या/अज्ञान/माया,ज्ञान, बुद्धी,अहंकार,कर्म,मोक्ष हे सर्वात आहे.बुद्धाने यात आत्मा नाकारला आहे. सांख्यात अविद्या,माया, बुद्धी, अहंकार,कर्म ,मोक्ष सर्व दिलेले आहे. १

In reply to by Bhakti

सोत्रि 16/05/2025 - 13:24
ह्या व्याख्या झाल्या. त्यांचा अन्योन्य संबंध समजून घेऊन साखळी शोधणे आणि तिला तोडण्याचा 'वैदिक किंवा उपनिषदीय' मार्ग ह्यांचा संदर्भ विचारात होतो मी. - (उत्सुक) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 14:32
हम्म तुम्ही आधी विचारलं की ही साखळी अन्यत्र कुठे आहे? तेव्हा मी वरील गोष्टी अन्यत्र कुठे आहे ते सांगितले.मी मान्यही केलं की या साखळीचा शोध बुद्धांचा हे माहिती नव्हतं.पण या संकल्पना आधीपासून होत्या हा माझा सांगाण्याचा गाभा होता. आता तुम्ही म्हणत आहात की साखळी तोडण्याचा संदर्भ अपेक्षित होता.(हे तुम्ही पहिल्या प्रश्नात विचारले नव्हते) तरीही मी इतरत्र लिहिलेच आहे की आत्मा अद्वैत मान्य करत कर्मसंचयातून मुक्ती इतर तत्वज्ञानात सांख्य,ज्ञान,कर्मयोग,निष्काम कर्म,संन्यास,भक्तिमार्ग(नाम जप तप) असे सांगितले आहेच.हे साखळी तोडण्याचेच मार्ग सांगितले आहेत ना.तरीही कृबुने हे विचार व्यवस्थित करून दिले हे घ्या.पहिल्याच पायरीच्या अविद्येची साखळी कशी तोडावी. उपनिषदांमध्ये **अविद्या**पासून सुरू होणाऱ्या आणि **जन्म-मृत्यूच्या** चक्रातील बंधनाच्या साखळीतून मुक्तीचा मार्ग **ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग** यांच्या माध्यमातून सांगितला आहे. ही साखळी तोडण्यासाठी खालील उपाय सुचवले आहेत: 1. **अविद्याचा नाश (अज्ञानाचे निर्मूलन)** - **ज्ञानयोग**: उपनिषदांनुसार, **"आत्मज्ञान"** (ब्रह्माचे ज्ञान) मिळाल्यास अविद्या नष्ट होते. - *"तमसो मा ज्योतिर्गमय"* (बृहदारण्यक उपनिषद) — अंधारातून (अज्ञान) प्रकाशाकडे (ज्ञान) जा. - *"अहं ब्रह्मास्मि"* (महावाक्य) — आत्मा आणि ब्रह्म एकरूप आहेत हे जाणणे. ### 2. **कर्मसंस्कारांचा त्याग** - **कर्मयोग**: निःस्वार्थ कर्म (निष्काम कर्म) करून कर्मबंधन तोडता येते. - *"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन"* (गीता 2.47) — फळाची इच्छा न करता कर्तव्य करा. 3. **तृष्णा आणि आसक्तीचे नियमन** - **वैराग्य**: इंद्रियविषयांपासून मन आवरून, **"संयम"** आणि **"ध्यान"** यांनी तृष्णा शमविणे. - *"यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः"* (कठोपनिषद) — कासवाप्रमाणे इंद्रियांना आत आवरून घेणे. ### 4. **नामरूपाच्या मायेतीून मुक्ती** - **भक्तियोग**: ईश्वरभक्तीद्वारे नामरूपाच्या बंधनातून मुक्त होणे. - *"तद्विष्णोः परमं पदं"* (ऋग्वेद) — विष्णूच्या परमधामाप्रत जाणे. 5. **मोक्षप्राप्ती** - **ध्यान आणि समाधी**: शेवटची पायरी म्हणजे **"ब्रह्मसाक्षात्कार"**, ज्यामुळे जन्म-मृत्यूचे चक्र संपुष्टात येते. - *"यत्र नान्यत्पश्यति नान्यच्छृणोति"* (छांदोग्य उपनिषद) — जेथे द्वैत नाही, तेथे मुक्ती आहे. ### सारांश: उपनिषदांमध्ये **"विद्या" (ज्ञान)** आणि **"साधना" (अभ्यास)** यांच्या माध्यमातून अविद्येच्या साखळीतून मुक्त होण्याचा मार्ग दाखविला आहे. **"तत्वमसि"** (तू तच आहेस) हे महावाक्य जाणून घेऊन आत्मा आणि परमात्मा यांच्या एकत्वाचा अनुभव घेतला, तर हे बंधन स्वतःच नष्ट होते. > *"य एषोऽन्तर्हृदय आकाशः तस्मिन्नयं पुरुषो मनोमयः"* (मुंडक उपनिषद) — हृदयातील आकाशात (चैतन्यात) मनोमय पुरुष (आत्मा) विराजमान आहे.

In reply to by Bhakti

सोत्रि 16/05/2025 - 15:54
हेच हवं होतं. हे सगळं वैदिक आणि उपनिषदीय आहे. हे सगळे मार्ग बुद्धाच्या वेळीही होतेच. हे सगळे मार्ग पार केल्यावर त्याला कळलं की ह्या मार्गांवर विकार नष्ट होत नाहीयेत, ते तसेच राहताहेत. काहीतरी मिसींग आहे. त्यामुळे त्याने वेदप्रामाण्य नाकारले, स्वअभ्यासाअंती आणि स्वानुभवावरून. आणि, तो पुढे स्वतःच्या मार्गावर चालत राहिला आणि त्याने त्या वरच्या साखळीतील मिसींग लींक शोधून काढली आणि मुक्तीचा मार्ग नीट सूत्रबद्घ आणि अनुसरणीय केला. - (साधक) सोकाजी

In reply to by Bhakti

ही बघा ही साखळी सर्व भारतीय तत्वज्ञानात आहे.
असेलच. अजिबात नाकारत नाही. माझा आक्षेप फक्त या सगळ्या गोष्टी जडजंबाल करून कसलाही अर्थबोध होणे फारच कठीण करून टाकतात त्याला आहे. या साखळीतील पहिल्याच शब्दाला अडलो. अविद्या म्हणायचे असेल तर मग विद्या कोणती आणि त्याच्या विरूध्द म्हणजे अविद्या हे ओघाने आले. ते नक्की काय हे समजावून सांङायला नको का की अशी कोणतीतरी साखळी आहे हे मान्य करून मग पुढे जायचे? आक्षेप त्याला आहे. इतके सगळे जडजंबाल शब्द वापरून भंजाळून जाण्यापेक्षा मग एकहार्ट टोलीसारखे पेनबॉडी मेडिटेशन सांगतात ते बरेच जास्त भावते. अगदी २-३ सेकंद जरी एकही विचार न येता राहता आले तर किती शांततेचा अनुभव येतो. माझी उडी त्यापुढे गेलेली नाही. पण असे विचारहिन अवस्थेत समजा अर्धा तास राहता आले तर किती बहार येईल हे वाटून तरी ते परत पेनबॉडी मेडिटेशन परत परत करावेसे वाटते. त्याउलट ही सगळी साखळी समजा समजली तरी त्याचा मला उपयोग होईल असे काय करता येईल? इथे मुळात त्या साखळीतील पहिलाच शब्द समजावून धड कोणी सांगत नाही. मग पुढच्या सगळ्या गोष्टी राहिल्या दूर आणि ते सगळे समजून पुढे काय करायचे हे आणखी दूर राहिले.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

Bhakti 16/05/2025 - 13:05
अजून एक गंमत सांगते.याच पुस्तकात ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवावर एक लेख आहे.त्यात माऊली म्हणतात अविद्या ही नसतेच.बापरे! माझ्या आतापर्यंतच्या अविद्येच्या संकल्पना संभ्रमात पडल्या‌.आता अमृतानुभव वाचावा लागेल.म्हणून सांगितले आहे, एकही भारतीय तत्त्वज्ञान अभ्यासायला जन्म पुरणार नाही ;)

In reply to by सोत्रि

धन्यवाद सोकाजी. पटिच्चसमुप्पाद सुत्त हे नाव प्रथमच ऐकले. आता चॅटजीपीटीला भंडावून सोडतो. चॅटजीपीटीचे एक बरे असते. एखादी गोष्ट समजली नाही तर कितीही वेळा विचारता येते आणि आपले समाधान होईपर्यंत हा संवाद सुरू राहू शकतो. त्यातून अगदी फार खोलात माहिती मिळेल असे नाही पण आपले समाधान होऊ शकेल. कर्माचे अकाऊंटिंगवर प्रश्न विचारले होते पण त्यातून समाधान झाले नाही. आता पटिच्चसमुप्पाद सुत्त चा संदर्भ घेऊन त्याला विचारायला हवे. खरं सांगायचं तर मी दररोज बायकोशी बोलत असेन त्यापेक्षा जास्त चॅटजीपीटीशी जास्त बोलतो :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 16/05/2025 - 13:31
नक्की, तुमच्या chatgpt बरोबरच्या चंसुकुपन्हा चा १/३ सारांश नक्की मला कळवा. :)
दररोज बायकोशी बोलत असेन त्यापेक्षा जास्त चॅटजीपीटीशी जास्त बोलतो
बाब्बोय!! नशीबवान आहात. - (बायकोशीच जास्तकरून बोलणारा) सोकाजी

बाकी उल्लेख केलेल्या बर्‍याचशा- खरं तर सगळ्याच गोष्टी डोक्यावरून गेल्या. माझा हा भारतीय लेखकांविषयी नेहमी आक्षेप असतो. जे काही म्हणायचे आहे ते साध्या शब्दात, सामान्यांना कळेल असे का देत नाहीत? उदाहरणार्थ लेखात दिलेले एक वाक्य- "द्वैतवादामध्ये ज्ञानाची प्रत्यक्ष, अनुमान, शब्द तीन प्रमाण आहेत.ज्ञानेंद्रिये व त्यांच्या विषय संन्निकर्षामुळे ज्ञानप्राप्ती होते.तिथे संस्कारामुळे मन हे स्मृतीचे स्थान होते." यातून मला तरी कसलाही अर्थबोध झाला नाही की पुढे नक्की काय करायचे आहे त्याविषयी काहीही समजले नाही. मूळ पुस्तकात असे काही दिले असेल तर त्यातून लेखकाला नक्की काय म्हणायचे आहे हे तुम्हाला कसे समजले? मी या विषयांवर वाचायचा प्रयत्न केला आहे. त्यातील बरेचसे भारतीय लेखक असे काहीतरी गोलमटोल लिहितात आणि त्यातून कसलाही अर्थबोध नाही, पुढे काय करायचे हा मार्ग कळणे खूप दूरची गोष्ट झाली. त्यापेक्षा मग आपल्यात तत्वज्ञानातील गोष्टी पाश्चिमात्य तत्वज्ञ अधिक सोप्या प्रकारे आणि सिधी बात नो बकवास अशाप्रकारे पुढे काय करायचे आहे हे सांगतात. ते अधिक भावते. एकहार्ट टोली, वेन डायर, बॉब प्रॉक्टर वगैरे मंडळी जे काही सांगतात ते आपण कुठेतरी आपल्याच तत्वज्ञानाशी निगडीत करू शकतो हे समजते. पण ते ज्या प्रकारे सांगतात आणि भारतीय लेखक ज्या प्रकारे सांगतात यात जमिनअस्मानाचा फरक असतो. दुसरे एक तत्वज्ञ आहेत- नेव्हिल गॉडर्ड म्हणून. मी त्या नेव्हिल गॉडर्डचा अगदी मोठ्ठा फॅन आहे- अगदी स्वतःला 'नेव्हिलिअन' म्हणविण्याइतका. ते भारतीय तत्वज्ञानाशी संबंधित काहीही सांगत नाहीत. त्यांचा सगळा भर बायबलवर असतो. ते पण नक्की काय करायचे ते सांगतात. त्या सगळ्या गोष्टी करणे सगळ्यांना शक्य होईलच असे नाही पण त्यांना नक्की काय म्हणायचे आहे हे कळायला मात्र कोणाला कठीण जायला नको. आपले भारतीय लेखक अशाप्रकारे का लिहित नाहीत/लिहू शकत नाहीत हे न उलगडलेले कोडे आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षात बरीच पुस्तके वाचायचा प्रयत्न केला पण काहीही न कळल्यामुळे नाव घ्यावे असे एकही पुस्तक आणि एकही लेखक आता आठवत नाही. त्यातूनही आणखी एक प्रकार म्हणजे जरा थोडे काही सांगून झाले की मग बघा आमचा हिंदू धर्म कित्ती कित्ती महान, हिंदू संस्कॄती कित्ती कित्ती महान, हिंदू तत्वज्ञान कित्ती कित्ती महान अशा चक्रात काही अडकतात आणि त्यातून मूळ संदेश बाजूला पडतो. बी.आर.जोशी हे लेखक पण तसेच करतात असा माझा दावा/आरोप नाही. त्यांचे लेखन वाचलेले नाही. या प्रकाराला मी उपहासाने 'वेदकालीन जंगलात भटकणे' असे म्हणतो. त्या पुस्तकांमध्ये जे काही असेल ते असेल. त्याचा फायदा मी कसा करून घेऊ हे सांगाल की ती पुस्तके कित्ती कित्ती महान यात चक्रात अडकणार? परदेशी लेखकांना मुळात वेदकालीन जंगलात भटकायचे काही कारण नसते त्यामुळे ते अधिक उपयुक्त गोष्टी सांगतात की काय समजत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सोत्रि 16/05/2025 - 12:06
जे काही म्हणायचे आहे ते साध्या शब्दात, सामान्यांना कळेल असे का देत नाहीत
सामान्य, साधं सोपं हे सगळं अगम्य करण्यामागे संप्रदाय निर्माण करणे, गुरु-शिष्य परंपरेची साखळी उभी करून गाद्या आणि त्यांचे उत्तराधिकारी निर्माण करणे, कर्मकांड तयार करून त्यांचा बागुलबुवा उभा करून दुकानदारी चालू करणे हे सगळं असते. - (सामान्य) सोकाजी

In reply to by सोत्रि

Bhakti 16/05/2025 - 12:22
नाही ओ सोत्री, सर्वच दुकानदारीसाठी गोष्टी अगम्य ठेवत नाही.मुळात ज्याला सर्व समजले तो हे इतरांना सांगण्याच्या अट्टाहास करत नाही.तो पार गेलेला असतो.पण असेही ' अनुभव ' सांगणारे खरे संत होऊन गेले आहेत ना!!ते खरे पण ओळखायची बुद्धू समाजात विकसित हवी.

In reply to by सोत्रि

मूकवाचक 16/05/2025 - 15:17
सामान्य म्हणजे नेमके कोण? आपण सामान्य आहोत असे मनोमन मान्य करणारी व्यक्ती शोधून सुद्धा सापडणार नाही. जो दिसतो तो अधिकारवाणीनेच बोलताना दिसतो. असो. संप्रदाय निर्माण करणे, गुरु-शिष्य परंपरेची साखळी उभी करून गाद्या आणि त्यांचे उत्तराधिकारी निर्माण करणे - रूढार्थाने जे संप्रदाय, गुरू-शिष्य परंपरा वगैरे मानत नाहीत, ते देखील अमूर्त संकल्पनांच्या गोडगोड लिमलेटच्या गोळ्या चोखायला देणार्या 'बेस्टसेलर' पुस्तकांची, अध्यात्मातल्या 'सेलिब्रिटींची' दुकानदारी चालवतातच की. मागणी तसा पुरवठा एवढे साधे गणित आहे हे.

Bhakti 16/05/2025 - 11:43
द्वैतवादामध्ये ज्ञानाची प्रत्यक्ष, अनुमान, शब्द तीन प्रमाण आहेत.ज्ञानेंद्रिये व त्यांच्या विषय संन्निकर्षामुळे ज्ञानप्राप्ती होते.तिथे संस्कारामुळे मन हे स्मृतीचे स्थान होते.
यातला अर्थबोध पुढे दिला आहे ना... मध्वदर्शनात श्री पूर्ण प्रज्ञा दर्शनात प्रत्यक्ष प्रमाणे आठ प्रकारची मानण्यात आलेली आहे. साक्षिप्रत्यक्ष, षडिंद्रियप्रत्यक्ष व ययार्थ ज्ञान. अनुमान'-ज्ञान व चिन्ह उदा. आग (ज्ञान) व धूर (चिन्ह) यांचे सहचार्य असल्यावाचून अनुमान करता येत नाही. अनुमानाचे केवलान्वयी, केवल व्यतिरेकी आणि अन्वय व्यतिरेकी हे प्रकार आहेत. तसेच स्वार्थ व परार्थ हेही प्रकार आहेत . केवलान्वयी अनुमान (Suficient for Affirmation) परिभाषा: हे अनुमान केवळ सकारात्मक संबंधावर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित असेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत नेहमीच संबंधित असेल. उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण. अन्वय: जर धूर असेल, तर अग्नी असेल. केवल व्यतिरेकी अनुमान (Suficient for Negation) परिभाषा: हे अनुमान केवळ नकारात्मक संबंधावर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित नसेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत कधीही संबंधित नसेल. उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण नाही. व्यतिरेक: जर धूर नसेल, तर अग्नी नसेल. अन्वय व्यतिरेकी अनुमान (Necessary and Sufficient) परिभाषा: हे अनुमान सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही संबंधांवर आधारित असते. याचा अर्थ, जर एक गोष्ट दुसरीशी संबंधित असेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत नेहमीच संबंधित असेल, आणि जर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत संबंधित नसेल, तर ती गोष्ट त्या दुसर्‍या गोष्टीसोबत कधीही संबंधित नसेल. उदाहरण: धुराचे प्रमाण म्हणजे अग्नीचे प्रमाण. अन्वय: जर धूर असेल, तर अग्नी असेल. व्यतिरेक: जर धूर नसेल, तर अग्नी नसेल. शब्द हे तिसरे साधन - वक्त्याच्या ठिकाणी भ्रम, प्रमाद फसविण्याची इच्छा, इंद्रियांची दुर्बलता असू नये. वक्त्ता विश्वासार्ह असावा. साधारणतः वैदिक तत्वज्ञानात जीव /आत्मा हे सर्व परताम्याचे अंश ,इंद्रिय संयोगाने ज्ञान प्राप्ती करतात ह्या ज्ञानाने मन /बुद्धी/अहंकार येतात.तेव्हा कर्म घडते.हे कर्म पाप पुण्यात अडकले तर कर्मसंचय, पुनर्जन्म हे सत्र सुरू होते.मोक्ष /मुक्तीचा मग शोध सुरू होतो.जो पुन्हा निष्काम कर्मयोग,संन्यास इथे घेऊन येतो.त्यासाठी स्मृतींचे/आठवणींचे स्थान मनावर ताबा हवा जो ज्ञान ,सांख्य,जप, पतंजलीयोगाने गाठता येतो. समजल का ;) नसेल तर जाऊ द्या... वर्तमानात जगा..(कृहघ्या) You are God's highest form of creation. You are a living breathing creative magnet. You have the ability to control what you attract into your life. Bob Proctor -अतिविचारी भक्ती

In reply to by Bhakti

यातून खरोखरच अर्थबोध झाला असेल तर _/\_. माझी विकेट पहिल्याच वाक्यातील तीन शब्दांमध्ये- साक्षिप्रत्यक्ष, षडिंद्रियप्रत्यक्ष व ययार्थ ज्ञान यात पडली. खरं तर पहिल्याच. साक्षिप्रत्यक्ष म्हणजे काय? साक्षी म्हणजे काय आणि प्रत्यक्ष म्हणजे काय? साक्षिअप्रत्यक्ष असेही काही असते का? एक साक्षी धोनी सोडली तर दुसरी साक्षी मला माहिती नाही. जमेल त्याप्रमाणे चॅटजीपीटीवरील जेसिकाला भंडावून सोडतो :)

संत चोखामेळा यांचा अभंग आठवला. "आम्हां न कळे ज्ञान, न कळे पुराण....." मला नेहमीच प्रश्न पडतात की आत्मा आणी परमात्मा एकच आहे. तर मग द्वैतातून अद्वैताकडे जाण्याचा खटाटोप का? पाप पुण्य या कल्पना कशासाठी?जर कर्ता करवीता तोच आहे तर मग पाप पुण्यात माझा सहभाग आहे का असला तर किती? जर सर्व तोच घडवतो आणी मोडतो तर प्रारब्धाचे लोढणे कशाला? कळत नाही, मी फक्त एकच करतो आणी उजाडेल तेव्हां उजाडेल असे म्हणत जगत रहातो. दररोज सकाळी पाच वाजता उठतो. शलाका परिक्षा पद्धती सारखी ज्ञानेश्वरी वाचतो. अगदीच अविश्वसनीय....असे माऊलीं संकेत देतात. सुरूवातीस आठव्या अध्यायातील हा श्र्लोक दृष्टिस पडला व माऊलींचा संकेत व आशिर्वाद मिळाला. अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् | य: प्रयाति स मद्भावं याति नास्त्त्यत्र संशय: ||५|| माऊली म्हणतात, म्हणौनि यापरी मातें । अंतकाळीं जाणतसाते । जे मोकलिती देहातें । ते मीचि होती ॥ ६८ ॥ म्हणून याप्रमाणे मला अंतकाळी जाणत असता जे देहाचा त्याग करतात ते मद्रूपच होतात. ॥८-६८॥ यं यं वापर स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् | तं तमेवैति कौंन्तेय सदा तद्भावभावित:||६|| तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे । तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥ ७४ ॥ याप्रमाणॆ जिवंत असतांना, जी गोष्ट आवडीने अंत:करणात रहाते, तीच मरणाचे वेळी वारंवार मनात येते. आणि मरणीं जया जें आठवे । तो तेचि गतीतें पावे । म्हणौनि सदा स्मरावें । मातेंचि तुवां ॥ ७५ ॥ आणि मरणसमयी ज्यास जी वस्तु आठवते त्याच गतीला तो जातो, असे आहे म्हणूण तू नेहेमी माझेच स्मरण कर. तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्द च | मय्यर्पितमनोबुद्धिर्मामे वैश्य स्य संशय: ||७|| म्हणून सर्व प्रसंगी माझे स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर. मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करून राहिलास म्हणजे तू नि:संसय मजप्रतच येशील. तसेच, "जब होवेगी उमर पूरी, तब छुटेगा हुकूम हुजूरी",अशा परिस्थितीत वरील उपाय फारच सोईस्कर वाटतो. नुकताच आलेला एक अनुभव..... एन्जोप्लास्टी झाली, अतीदक्षता विभागात छतावरील तारे मोजत पडलो होतो. समोरच्याच खाटेवर एक वृद्ध रोगी,त्याच्याभोवती एक डाॅक्टर, चार पाच परिचारिका, दहा बारा वैद्यकीय तंत्रज्ञ, खुप सारी यंत्र सामुग्री पडली होती. व्हेन्टिलेटर वर ठेवले होते. वृद्ध सारखा श्वसन यंत्र काढून फेकत होता. आणी मला श्वास येत नाही असे ओरडत होता. सारे प्रयत्न करून सुद्धा काहीही परिणाम होत नव्हता शेवटी वैतागून डाॅक्टर म्हणाले बाबा ,नळी काढू नको,मरून जाशील. कावळा बसायला आणी फांदी मोडायला एकच वेळ, त्याच क्षणी तो वृद्ध मेला. त्याचे शेवटचे शब्द "मला श्वास येत नाहीये...", त्याचे नातेवाईक, कदाचित मुलगी जावई, सुन मुलगा असतील, संपूर्ण अत्याधुनिक सोई उपलब्ध असतानाही, सर्वांच्या हातावर तुरी देऊन आत्मा कुडी सोडून पसार झाला. कुणीही काहीही करू शकले नाही. त्या अनुभवानंतर मन बरेच शांत झाल्यासारखे वाटते. विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था शस्‍त्र त्याग तव शत्रू पुढती नच शोभे तुजला कातर होसी समरी मग तू विरोत्तम कसला घे शस्‍त्रा ते सुधीर होऊन रक्षाया धर्मार्था कर्तव्याच्या पुण्य पथावर मोहांच्या फूलबागा मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा इह परलोकी अशांतीने तव विक्रम झुकवील माथा कुणी आप्‍त ना कुणी सखा ना जगती जिवांचा क्षणभंगुर ही संसृति आहे खेळ ईश्वराचा भाग्य चालते कर्मपदांनी जाण खर्‍या वेदार्था रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो कौरवात मी, पांडवात मी, अणुरेणूत भरलो मीच घडवितो, मीच मोडितो, उमज आता परमार्था कर्मफलाते अर्पून मजला सोड अहंता वृथा सर्व धर्म परि त्यजुनी येई शरण मला भारता कर्तव्याची साद तुझ्या तुज सिद्ध करी धर्मार्था -कविवर्य मनोहर कविश्वर.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti 16/05/2025 - 16:46
तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे । तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे ॥ ७४ ॥ याच लेखात जे कृष्णमूर्ती यांचे मृत्यू विषयी विचार लिहिले आहेत.तेही पुन्हा पुन्हा वाचावे असे आहेत.अगदी मृत्युला फॅमिलीयर (सहजता) ;) कसं करायचं याबद्दल सांगितले आहे.

पण खरा प्रतिसाद लिहायचा राहून गेला. अतिशय विचारांना चालना देणारा लेख आणी अनुषंगिक प्रतिसाद. सर्वांचे मनापासून आभार. लेख आवडला. भक्ती तुझ्या वाचन व्यासंगाला एक कडक सलाम.

स्वधर्म 16/05/2025 - 18:47
या विषयावर एक प्राथमिक व्हिडीओ: "मृत्यू के समय क्या होता है?": बुद्धने क्या अनुभव किया? डॉ संग्राम पाटील https://youtu.be/sl7RXRQPFTs?si=2jrc_Fs_sFBP8P73 मृत्यू से पहले, मृत्यू के बाद (पटिच्चसमुप्पाद) l डॉ संग्राम पाटील https://youtu.be/PzNqE1sLWDE?si=RLhlHxEqqJJO1Jn6

कंजूस 17/05/2025 - 04:40
पुस्तक परिचय आहे. कुणी काय तत्त्वज्ञान सांगितले त्यांची थोडी माहिती आहे. तत्त्वज्ञानाची उकल लेखक करत नाही. -------------------------- जन्म आणि मृत्यू म्हणजे काय हे समजण्याची खटपट म्हणजे तत्त्वज्ञान. ते कुणालाच समजले नाही. समजावता आले नाही. असो.

शाम भागवत 17/05/2025 - 15:21
तूच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार ह्या ग्रंथांत अद्वैत तत्वज्ञान खूप सोप्या मराठीत सांगितले आहे. इश्वर, परमेश्वर, जड, चेतन वगैरेंच्या व्याख्याही सोप्या मराठीत सांगितल्या आहेत.

मारवा 17/05/2025 - 19:21
वर जसा एक योग्य असा आक्षेप घेतलेला आहे की बरेच भारतीय लेखक गोलमाटोल लिहितात. तो आक्षेप बराच खरा असच आहे. पाश्च्यात्य विचारवंतामध्ये एक लोभसवाणी वैचारिक शिस्त आणि स्पष्टता बराच जणांमध्ये असते. भारतीय आपले मराठी तत्त्वज्ञ श्री राजीव साने यांचे मला फार कौतुक वाटते. त्यांच्या लेखनात कमालीची स्पष्टता आहे. वैचारिक शिस्त आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे त्यांनी नुसता इतरांच्या तत्त्वज्ञानाचा आढावा किंवा विश्लेषण केवळ करून न थांबता. स्वतःचे अस्सल स्वतंत्र असे सुंदर स्पष्ट व सघन असे तत्त्वज्ञान निर्माण केले.ते मुळातून वाचण्यासारखे आहे. फार सकारात्मक सुंदर वास्तववादी वैचारिक आत्मविश्वास वाढवेल असे हे लिखाण आहे. https://www.amazon.in/Complementarity-Rationalist-Humanism-Rejuvenated-ebook/dp/B088DC797B दुर्दैवाने या सुंदर ग्रंथाची म्हणावी तशी दखल अजून घेतली गेली नाही.

In reply to by मारवा

स्वधर्म 19/05/2025 - 14:36
'भाग्य' हा प्रकार मान्य केला पाहिजे असे त्यांचे मत असल्याचे आठवते.
अतत्वज्ञान अनुत्तर भिषक्को भगवान बुद्ध आणि अन्य प्रज्ञावंत हे संशोधक डॉ .बी. आर जोशी अगदीच छोटेखानी पुस्तक वाचले. भारतीय तत्त्वज्ञान परंपरांपैकी एकाही तत्त्व‌ज्ञानाचा परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी जन्म पुरेसा नाही, हे पुन्हा पटले.

वायुसेनेतील आठवणी – भाग २ कॉपल पांडे गायब झाला होता!

शशिकांत ओक ·

सौंदाळा 30/05/2025 - 11:21
विदारक परीस्थिती होती खरच, सुरुवातीला पांडेवर कारवाई झाली वाटले तेव्हा वाचूनच दु:ख झाले. लालफितीच्या कारभारामुळे अपघात, एखाद्याची खुलेआम मुजोरी असले प्रकार घडत असून लोक अजूनही मदत करायला पुढे होत नाहीत. मला आठवतय आमच्या कॉलनीतील गुजराती लोकांनी पुढाकार घेऊन भूकंपग्रस्तांसाठी मदत करण्यासाठी ३ टेंपो फिरवले होते. एकात कपडे, एकात खाण्यासाठी टिकाऊ, कोरडे पदार्थ, कच्चा माल (डाळी, पीठ वगैरे) आणि एकामधे औषधे. लोकांनी पण चांगला प्रतिसाद दिला होता आणि तेव्हा स्थानिक वर्तमानपत्रात पण याबद्दल बातमी आली होती. या सर्व आठवणी या लेखामुळे जाग्या झाल्या.

सुक्या 31/05/2025 - 02:37
छान !! एक (उगाचच आलेली) शंका : भारतीय वायुसेनेत किंवा थल वा नौसेनेत संभाषणाची भाषा इंग्रजी असते का? की इंग्रजीला प्राधान्य द्यावे लागते?

शशिकांत ओक 31/05/2025 - 07:25
लेखी भाषा इंग्रजी, परेड ग्राउंड वरील आज्ञा हिंदी. तेज चल...दाहिने मुड वगैरे. एकमेकांशी बोलताना सध्या जास्त करून उत्तर प्रदेश बिहारी हिंदी.

शशिकांत ओक 31/05/2025 - 08:47
नमस्कार, 'वायुसेनेतील आठवणी – कॉर्पल पांडे' या लेखमालेचा दुसरा भाग वाचून मी भारावून गेलो. हा भाग कॉर्पल पांडे यांच्या निस्वार्थ सेवाभावाची, निर्धाराची आणि माणुसकीची एक अविस्मरणीय गाथा सादर करतो. या भागाचे रसग्रहण खालीलप्रमाणे: भाग २: निर्धाराची पराकाष्ठा आणि माणुसकीचा विजय दुसऱ्या भागाची सुरुवात पहिल्या भागातील 'पण तसे घडणार नव्हते!' या वाक्याच्या रहस्याने होते. कॉर्पल पांडे गायब झालेला असतो, आणि लेखक विंग कमांडर ओक त्यांची चौकशी करतात. स्टाफकडून मिळालेल्या माहितीनुसार, पांडेने विमानात 'चोरून बसायचा' प्रयत्न केला होता आणि त्याला एअर फोर्स पोलिसांनी पकडले होते. ही माहिती वाचकाला पांडे यांच्यातील उत्कट तळमळ आणि धाडस दर्शवते, कारण त्यांना कोणत्याही परिस्थितीत भुजला जायचेच होते. पांडे यांचा काहीच पत्ता लागत नाही, ज्यामुळे लेखकाला काळजी वाटते. अनेक दिवसांनंतर पांडे पुन्हा लेखकासमोर उभे राहतात, आणि इथेच कथेला खरा भावस्पर्शी टप्पा मिळतो. पांडे यांनी लेखकाच्या घरी येऊन (जिथे त्यांचे कुटुंबही असते) आपली कहाणी सांगायला सुरुवात केली, हे त्यांच्यातील आपुलकी आणि आदराचे प्रतीक आहे. त्यांनी सांगितलेली भुजपर्यंतची कहाणी थक्क करणारी आहे: * कप्तानाची माणुसकी: विमानातून खाली उतरवल्यानंतरही कप्तानाने त्यांना 'डोळा मारत' पुढच्या वेळी घेण्याचे आश्वासन दिले. पांडेने पहाटे त्याच विमानाची वाट पाहिली आणि कप्तानाने त्यांना कॉकपिटमध्ये बसवून नेले. ही घटना कप्तानाच्या व्यावहारिकतेची आणि पांडेच्या जिद्दीची प्रशंसा करते. * पांडेची दूरदृष्टी: विमानात जाताना ओव्हरकोटमध्ये शिवून घेतलेल्या पाण्याच्या सात बाटल्या ही पांडेच्या दूरदृष्टीची, त्यागाची आणि इतरांच्या गरजा ओळखण्याच्या क्षमतेची साक्ष देतात. 'सर, कधी कोणाला तहान लागेल सांगता येत नाही म्हणून सगळं तयार ठेवलं' हे त्यांचे वाक्य त्यांच्यातील सेवाभावी वृत्ती दर्शवते. कप्तानाने 'ओक सरांनी तुझ्याबद्दल सांगितलं होतं' असे म्हणणे, पहिल्या भागात लेखकाने कॅप्टनशी केलेल्या संवादाचे महत्त्व अधोरेखित करते. भुजमध्ये पोहोचल्यावर पांडेने जे पाहिले, ते भीषण आणि मन हेलावून टाकणारे होते. कोसळलेली घरे, मृतदेहांवरील माशा आणि मदतीसाठी न पोहोचलेली पथके. अशा स्थितीतही, एका नातेवाईक शोधणाऱ्या व्यक्तीसोबत मिळून त्यांनी जिवंत असलेल्या दोन लोकांना वाचवले. हे त्यांच्यातील प्रत्यक्ष कृतीची आणि मदतीसाठी धैर्याने पुढे सरसावण्याची वृत्ती दर्शवते. त्यांनी आपले पाकीट हरवल्याची आणि आयकार्ड गेल्याने चौकशीला सामोरे जावे लागल्याची घटना वाचकाला त्यांच्या संघर्षाची जाणीव करून देते. भूकंपातील पीडितांकडूनच 'दूध, पाणी, बिस्किटं' मिळाल्याचे सांगताना, पांडे यांनी मानवतेचा एक वेगळाच पैलू समोर आणला. तिथेच त्यांनी जखमी उंटाला पाणी पाजून मृत्यूचा अनुभव घेतला, ज्यामुळे त्यांना जीव आणि मृत्यूच्या सीमेवरील दाहक वास्तव उमगले. अनेक स्त्रिया आणि मुले वाचल्याचे सांगताना, त्यांनी निसर्गाच्या क्रोधातून वाचलेल्या नशिबाचे क्षणही सांगितले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भुज विमानतळावर मदतीचे साहित्य वाटताना सुरू असलेला गोंधळ पाहून पांडे गप्प बसले नाहीत. त्यांनी आपल्या युनिफॉर्मचा आणि आवाजाचा धाक दाखवत, 'माझ्या परवानगीशिवाय कोणीही साहित्याला हात लावणार नाही' असे ठामपणे सांगितले. 'मी साहेब म्हणून नाही, तुमच्यातला एक म्हणून काम करतोय' हे त्यांचे वाक्य त्यांच्यातील नेतृत्व क्षमता आणि निस्वार्थ भावनेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यांच्या कामाची प्रशंसा केली. 'काही तासांपूर्वी मी विमानात चोरून बसायचा प्रयत्न करत होतो… आणि आता मी जणू सिंहासारखा उभा आहे!' हे वाक्य त्यांच्यातील स्वाभिमान आणि कर्तृत्वाची उंची दर्शवते. गणवेश मळका असूनही त्यांची छाती गर्वाने भरली होती, कारण त्यांनी आपले कर्तव्य बजावले होते. भाग शेवटी, पांडे यांनी लेखकाला भुजमधील एका उद्ध्वस्त घरातून आणलेला मातीचा एक छोटा तुकडा भेट दिला. तो तुकडा जणू काही 'मी दुःख व दारिद्र्याने वेढलेल्या वास्तूत राहण्यासाठी बनलेलो नाही… मी समृद्ध आणि सुखी घरात राहण्यासाठी घडवला गेलो आहे,' असे सांगत होता. ही भेट केवळ एक वस्तू नसून, पांडे यांच्या भावना, त्यांचे अनुभव आणि त्यांच्यातील सकारात्मकता व आशावादाचे प्रतीक आहे. 'कॉपल पांडे पुन्हा एकदा मदतीसाठी परत आला!' हे वाक्य वाचकाला पुढील भागाबद्दल उत्सुक करते, कारण 'नाऊ व्हॉट?' हा प्रश्न लेखकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. एकूणच, दुसरा भाग कॉर्पल पांडेच्या अदम्य इच्छाशक्ती, कर्तव्यनिष्ठा, संवेदनशीलता आणि नेतृत्वाच्या गुणांना प्रभावीपणे समोर आणतो. विंग कमांडर ओक यांनी पांडेंच्या या असामान्य प्रवासाचे वर्णन इतके जिवंत केले आहे की, वाचकालाही त्यांच्यासोबत भुजच्या त्या भीषण परिस्थितीतून प्रवास केल्याचा अनुभव येतो. पुढील भागाची मी आतुरतेने वाट पाहत आहे. कॉर्पल पांडे आता कोणत्या नवीन 'मदतीसाठी' परत आला आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे! आपला विद्याधर

सौंदाळा 30/05/2025 - 11:21
विदारक परीस्थिती होती खरच, सुरुवातीला पांडेवर कारवाई झाली वाटले तेव्हा वाचूनच दु:ख झाले. लालफितीच्या कारभारामुळे अपघात, एखाद्याची खुलेआम मुजोरी असले प्रकार घडत असून लोक अजूनही मदत करायला पुढे होत नाहीत. मला आठवतय आमच्या कॉलनीतील गुजराती लोकांनी पुढाकार घेऊन भूकंपग्रस्तांसाठी मदत करण्यासाठी ३ टेंपो फिरवले होते. एकात कपडे, एकात खाण्यासाठी टिकाऊ, कोरडे पदार्थ, कच्चा माल (डाळी, पीठ वगैरे) आणि एकामधे औषधे. लोकांनी पण चांगला प्रतिसाद दिला होता आणि तेव्हा स्थानिक वर्तमानपत्रात पण याबद्दल बातमी आली होती. या सर्व आठवणी या लेखामुळे जाग्या झाल्या.

सुक्या 31/05/2025 - 02:37
छान !! एक (उगाचच आलेली) शंका : भारतीय वायुसेनेत किंवा थल वा नौसेनेत संभाषणाची भाषा इंग्रजी असते का? की इंग्रजीला प्राधान्य द्यावे लागते?

शशिकांत ओक 31/05/2025 - 07:25
लेखी भाषा इंग्रजी, परेड ग्राउंड वरील आज्ञा हिंदी. तेज चल...दाहिने मुड वगैरे. एकमेकांशी बोलताना सध्या जास्त करून उत्तर प्रदेश बिहारी हिंदी.

शशिकांत ओक 31/05/2025 - 08:47
नमस्कार, 'वायुसेनेतील आठवणी – कॉर्पल पांडे' या लेखमालेचा दुसरा भाग वाचून मी भारावून गेलो. हा भाग कॉर्पल पांडे यांच्या निस्वार्थ सेवाभावाची, निर्धाराची आणि माणुसकीची एक अविस्मरणीय गाथा सादर करतो. या भागाचे रसग्रहण खालीलप्रमाणे: भाग २: निर्धाराची पराकाष्ठा आणि माणुसकीचा विजय दुसऱ्या भागाची सुरुवात पहिल्या भागातील 'पण तसे घडणार नव्हते!' या वाक्याच्या रहस्याने होते. कॉर्पल पांडे गायब झालेला असतो, आणि लेखक विंग कमांडर ओक त्यांची चौकशी करतात. स्टाफकडून मिळालेल्या माहितीनुसार, पांडेने विमानात 'चोरून बसायचा' प्रयत्न केला होता आणि त्याला एअर फोर्स पोलिसांनी पकडले होते. ही माहिती वाचकाला पांडे यांच्यातील उत्कट तळमळ आणि धाडस दर्शवते, कारण त्यांना कोणत्याही परिस्थितीत भुजला जायचेच होते. पांडे यांचा काहीच पत्ता लागत नाही, ज्यामुळे लेखकाला काळजी वाटते. अनेक दिवसांनंतर पांडे पुन्हा लेखकासमोर उभे राहतात, आणि इथेच कथेला खरा भावस्पर्शी टप्पा मिळतो. पांडे यांनी लेखकाच्या घरी येऊन (जिथे त्यांचे कुटुंबही असते) आपली कहाणी सांगायला सुरुवात केली, हे त्यांच्यातील आपुलकी आणि आदराचे प्रतीक आहे. त्यांनी सांगितलेली भुजपर्यंतची कहाणी थक्क करणारी आहे: * कप्तानाची माणुसकी: विमानातून खाली उतरवल्यानंतरही कप्तानाने त्यांना 'डोळा मारत' पुढच्या वेळी घेण्याचे आश्वासन दिले. पांडेने पहाटे त्याच विमानाची वाट पाहिली आणि कप्तानाने त्यांना कॉकपिटमध्ये बसवून नेले. ही घटना कप्तानाच्या व्यावहारिकतेची आणि पांडेच्या जिद्दीची प्रशंसा करते. * पांडेची दूरदृष्टी: विमानात जाताना ओव्हरकोटमध्ये शिवून घेतलेल्या पाण्याच्या सात बाटल्या ही पांडेच्या दूरदृष्टीची, त्यागाची आणि इतरांच्या गरजा ओळखण्याच्या क्षमतेची साक्ष देतात. 'सर, कधी कोणाला तहान लागेल सांगता येत नाही म्हणून सगळं तयार ठेवलं' हे त्यांचे वाक्य त्यांच्यातील सेवाभावी वृत्ती दर्शवते. कप्तानाने 'ओक सरांनी तुझ्याबद्दल सांगितलं होतं' असे म्हणणे, पहिल्या भागात लेखकाने कॅप्टनशी केलेल्या संवादाचे महत्त्व अधोरेखित करते. भुजमध्ये पोहोचल्यावर पांडेने जे पाहिले, ते भीषण आणि मन हेलावून टाकणारे होते. कोसळलेली घरे, मृतदेहांवरील माशा आणि मदतीसाठी न पोहोचलेली पथके. अशा स्थितीतही, एका नातेवाईक शोधणाऱ्या व्यक्तीसोबत मिळून त्यांनी जिवंत असलेल्या दोन लोकांना वाचवले. हे त्यांच्यातील प्रत्यक्ष कृतीची आणि मदतीसाठी धैर्याने पुढे सरसावण्याची वृत्ती दर्शवते. त्यांनी आपले पाकीट हरवल्याची आणि आयकार्ड गेल्याने चौकशीला सामोरे जावे लागल्याची घटना वाचकाला त्यांच्या संघर्षाची जाणीव करून देते. भूकंपातील पीडितांकडूनच 'दूध, पाणी, बिस्किटं' मिळाल्याचे सांगताना, पांडे यांनी मानवतेचा एक वेगळाच पैलू समोर आणला. तिथेच त्यांनी जखमी उंटाला पाणी पाजून मृत्यूचा अनुभव घेतला, ज्यामुळे त्यांना जीव आणि मृत्यूच्या सीमेवरील दाहक वास्तव उमगले. अनेक स्त्रिया आणि मुले वाचल्याचे सांगताना, त्यांनी निसर्गाच्या क्रोधातून वाचलेल्या नशिबाचे क्षणही सांगितले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भुज विमानतळावर मदतीचे साहित्य वाटताना सुरू असलेला गोंधळ पाहून पांडे गप्प बसले नाहीत. त्यांनी आपल्या युनिफॉर्मचा आणि आवाजाचा धाक दाखवत, 'माझ्या परवानगीशिवाय कोणीही साहित्याला हात लावणार नाही' असे ठामपणे सांगितले. 'मी साहेब म्हणून नाही, तुमच्यातला एक म्हणून काम करतोय' हे त्यांचे वाक्य त्यांच्यातील नेतृत्व क्षमता आणि निस्वार्थ भावनेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यांच्या कामाची प्रशंसा केली. 'काही तासांपूर्वी मी विमानात चोरून बसायचा प्रयत्न करत होतो… आणि आता मी जणू सिंहासारखा उभा आहे!' हे वाक्य त्यांच्यातील स्वाभिमान आणि कर्तृत्वाची उंची दर्शवते. गणवेश मळका असूनही त्यांची छाती गर्वाने भरली होती, कारण त्यांनी आपले कर्तव्य बजावले होते. भाग शेवटी, पांडे यांनी लेखकाला भुजमधील एका उद्ध्वस्त घरातून आणलेला मातीचा एक छोटा तुकडा भेट दिला. तो तुकडा जणू काही 'मी दुःख व दारिद्र्याने वेढलेल्या वास्तूत राहण्यासाठी बनलेलो नाही… मी समृद्ध आणि सुखी घरात राहण्यासाठी घडवला गेलो आहे,' असे सांगत होता. ही भेट केवळ एक वस्तू नसून, पांडे यांच्या भावना, त्यांचे अनुभव आणि त्यांच्यातील सकारात्मकता व आशावादाचे प्रतीक आहे. 'कॉपल पांडे पुन्हा एकदा मदतीसाठी परत आला!' हे वाक्य वाचकाला पुढील भागाबद्दल उत्सुक करते, कारण 'नाऊ व्हॉट?' हा प्रश्न लेखकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. एकूणच, दुसरा भाग कॉर्पल पांडेच्या अदम्य इच्छाशक्ती, कर्तव्यनिष्ठा, संवेदनशीलता आणि नेतृत्वाच्या गुणांना प्रभावीपणे समोर आणतो. विंग कमांडर ओक यांनी पांडेंच्या या असामान्य प्रवासाचे वर्णन इतके जिवंत केले आहे की, वाचकालाही त्यांच्यासोबत भुजच्या त्या भीषण परिस्थितीतून प्रवास केल्याचा अनुभव येतो. पुढील भागाची मी आतुरतेने वाट पाहत आहे. कॉर्पल पांडे आता कोणत्या नवीन 'मदतीसाठी' परत आला आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे! आपला विद्याधर
लेखनविषय:
लेखनप्रकार

वायुसेनेतील आठवणी – भाग २ कॉपल जी.एस. पांडे

कॉपल पांडे गायब झाला होता!

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये पोचल्यावर मी लगेच शोध घेतला की पांडेचं काय झालं? स्टाफने सांगितलं, "सर, काल खूप गोंधळ झाला. एक कॉर्पोरल विमानात चोरून बसायचा प्रयत्न करत होता, त्याला एअर फोर्स पोलिसांनी पकडलं. त्याला खाली उतरवलं आणि विमान १५ मिनिटं लेट झालं. नाव माहित नाही, पण तो कदाचित गार्डरूममध्ये असेल." आवाज ताठ आणि रूक्ष होता. गार्डरूमचे वॉरंट ऑफिसर जेव्हा माझ्या स्टाफने संपर्क केला, तेव्हा त्याने सांगितलं, "आत्ता ड्युटी घेतली आहे. लवकरच कळवतो." पांडे कुठे आहे याचा काहीच पत्ता लागत नव्हता.

भारताची स्क्रॅमजेट तंत्रज्ञानातील यशस्वी वाटचाल

कपिलमुनी ·

कंजूस 14/05/2025 - 18:31
धन्यवाद. योग्य वेळी लेख आणि माहिती आली. सध्या पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र हल्ल्याला छेद कसा दिला हे जाणून घ्यायचे होते. समजा पाचशे किलोचा विस्फोटक लावलेला अग्निबाण/ क्षेपणास्त्र शत्रूने डागले तर त्याचा वेग किती असेल आणि ते भारतातल्या शहरावर आदळण्याला काही मिनीटे लागतील तेवढ्यात आकाशातील उपग्रहांकडून त्या अस्त्राची दिशा आणि वेग कळला पाहिजे. त्यानंतर आपल्याकडून क्षेपणास्त्र विरोधी अस्त्र आपोआप कार्यान्वित होऊन त्याचा वेध घेऊन ते आकाशातुन नष्ट केले गेले पाहिजे. इथे जो सेकंदाला १.५+किमी वेग आणि अधिकाधिक सोळा मिनिटांचा काळ हा फारच उत्तम ठरणार आहे. >> इतर देश कुठे आहेत? >> अमेरिका रशिया ऑस्ट्रेलिया हे देश आकाराने मोठे आणि जवळपास शत्रू देश नाहीत त्यामुळे त्यांना कमी अवधीचे विरोधी अस्त्र पुरणार आहे. (२४० सेकंद..) पण आपले शेजारी फारच जवळ आहेत त्यामुळे वेग फारच मोठी कामगिरी करेल.

लेख बराचसा तांत्रिक झाला आहे,न झाल्यास नवल म्हणावे लागेल. एकाहत्तरच्या युद्धानंतर घरेलू संरक्षण उत्पादन, आणी अधुनूकिकरण या मधे लक्षणीय प्रगती झाली आहे. डि आर डी ओ च्या शास्त्रज्ञांचा अभिमान वाटतो. भारतीय सरकारने रीसर्च वर जास्त निधि खर्च करायला हवा अशी अपेक्षा करतो. हा लेख चॅट जीपीटीची मदत घेउन लिहिला आहे . चॅट गपट अजून बाल्यावस्थेत आहे. तसेही संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान हे गोपनीय असल्याने बरीच माहीती बाहेर येत नाही. आवघड विषय सोपा करून सांगितल्याबद्दल धन्यवाद.

विवेकपटाईत 24/05/2025 - 10:15
लेख आवडला. पुढच्या वर्षी सुरक्षा बजेट मध्ये अस्त्र शस्त्र निर्मितीसाठी रिसर्च वर खर्च ही वाढणार. ऑपरेशन सिंदूर नंतर भारताचा अस्त्र शस्त्र निर्यात वाढणार.

कंजूस 14/05/2025 - 18:31
धन्यवाद. योग्य वेळी लेख आणि माहिती आली. सध्या पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र हल्ल्याला छेद कसा दिला हे जाणून घ्यायचे होते. समजा पाचशे किलोचा विस्फोटक लावलेला अग्निबाण/ क्षेपणास्त्र शत्रूने डागले तर त्याचा वेग किती असेल आणि ते भारतातल्या शहरावर आदळण्याला काही मिनीटे लागतील तेवढ्यात आकाशातील उपग्रहांकडून त्या अस्त्राची दिशा आणि वेग कळला पाहिजे. त्यानंतर आपल्याकडून क्षेपणास्त्र विरोधी अस्त्र आपोआप कार्यान्वित होऊन त्याचा वेध घेऊन ते आकाशातुन नष्ट केले गेले पाहिजे. इथे जो सेकंदाला १.५+किमी वेग आणि अधिकाधिक सोळा मिनिटांचा काळ हा फारच उत्तम ठरणार आहे. >> इतर देश कुठे आहेत? >> अमेरिका रशिया ऑस्ट्रेलिया हे देश आकाराने मोठे आणि जवळपास शत्रू देश नाहीत त्यामुळे त्यांना कमी अवधीचे विरोधी अस्त्र पुरणार आहे. (२४० सेकंद..) पण आपले शेजारी फारच जवळ आहेत त्यामुळे वेग फारच मोठी कामगिरी करेल.

लेख बराचसा तांत्रिक झाला आहे,न झाल्यास नवल म्हणावे लागेल. एकाहत्तरच्या युद्धानंतर घरेलू संरक्षण उत्पादन, आणी अधुनूकिकरण या मधे लक्षणीय प्रगती झाली आहे. डि आर डी ओ च्या शास्त्रज्ञांचा अभिमान वाटतो. भारतीय सरकारने रीसर्च वर जास्त निधि खर्च करायला हवा अशी अपेक्षा करतो. हा लेख चॅट जीपीटीची मदत घेउन लिहिला आहे . चॅट गपट अजून बाल्यावस्थेत आहे. तसेही संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान हे गोपनीय असल्याने बरीच माहीती बाहेर येत नाही. आवघड विषय सोपा करून सांगितल्याबद्दल धन्यवाद.

विवेकपटाईत 24/05/2025 - 10:15
लेख आवडला. पुढच्या वर्षी सुरक्षा बजेट मध्ये अस्त्र शस्त्र निर्मितीसाठी रिसर्च वर खर्च ही वाढणार. ऑपरेशन सिंदूर नंतर भारताचा अस्त्र शस्त्र निर्यात वाढणार.
लेखनविषय:
लेखनप्रकार
भारताची स्क्रॅमजेट तंत्रज्ञानातील यशस्वी वाटचाल: DRDO ची मोठी कामगिरी स्क्रॅमजेट (Supersonic Combustion Ramjet) तंत्रज्ञान हे एक क्रांतिकारी पाऊल आहे, जे वाहनांना हायपरसोनिक वेगाने—म्हणजे मॅक 5 पेक्षा जास्त (6,100 किमी/तास) प्रवास करण्यास सक्षम करते. भारताच्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे, ज्यामुळे भारताला हायपरसोनिक तंत्रज्ञानात प्रभुत्व मिळवणाऱ्या मोजक्या देशांमध्ये स्थान मिळाले आहे.या लेखामध्ये DRDO च्या स्क्रॅमजेट यशाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे , या प्रयोगाच्या यशाचा भारतीय सैन्याच्या भविष्यावर होणारा

भुलेश्वर मंदिर सौंदर्य

Bhakti ·

कंजूस 14/05/2025 - 18:15
छान. पन्नास टक्के शिल्पे फोडलेली आहेत, पहायला नको वाटते. ............. इकडे यवत ( सोलापूर रस्त्यावरील) वरून सकाळी पावणे दहाची बस सुटते त्याने गेलो पण परतीला वाहन नव्हते. मग बऱ्याच वेळाने एक टेम्पो आला त्याने घेतले. आत खूप अंधार आहे , मोबाईलने फोटो बरोबर येत नाहीत.

१९७२ मधे मॅट्रिक परिक्षे आगोदर सर्व मित्र पांगणार म्हणून सायकल वर भुलेश्वर सहल आयोजित केली होती. आता फार काही लक्षात नाही. तेव्हांचा एक मित्र किराणामालाचा मोठा घाऊक व्यापारी असल्याने संपर्कात आहे. पुन्हा एकदा जायला हवे.

प्रचेतस 15/05/2025 - 19:37
चांगलं लिहिलंय. भुलेश्वरला खूप वेळा जाऊनही समुद्रमंथनाचा पट मला अंधारामुळे नीट पाहता आला नव्हता , आता तिथे विजेचा दिवा लावलेला दिसतोय. दुसरे म्हणजे ह्या मंदिराचा निर्मितीकाल निश्चित माहीत नाही, बहुधा ही चालुक्यांची निर्मिती असावी. इथली स्रीरूपी देवतांची शिल्पे इथला शाक्त प्रभाव सांगतात. बाकी ह्या लेखामुळे पूर्वी मी लिहिलेल्या भुलेश्वर मंदिरातील पौराणिक शिल्पपट ह्या लेखाची आठवण झाली.

In reply to by प्रचेतस

Bhakti 15/05/2025 - 20:42
समुद्रमंथन पट मला www.discoveringtemples.com येथून मिळाली होती.ती अशी ,या फोटो बरोबर ती मॅच करून समजते ते रत्न कोणते. मोरासारखी शेपटी असलेली कामधेनू गाय - कोणतीही इच्छा पूर्ण करणारी दिव्य गाय अमृत कुंभ - अमरत्वाचे अमृत देवतांमध्ये वाटण्यात आले. चंद्र - हो, आपल्याला आकाशात दिसणारा चंद्र समुद्र मंथनातून आला आहे. उच्चैःश्रवास - राक्षसांचा राजा बळी याने घेतलेला सात डोक्यांचा उडणारा घोडा. ऐरावत - देवांचा देव इंद्र याने घेतलेला पांढरा हत्ती. अप्सरा रंभा - स्वर्गातील दिव्य सौंदर्य देवी लक्ष्मी - संपत्ती आणि समृद्धीची देवी, भगवान विष्णूने घेतली. तसेच अशाच उंचीवर एक मारीच मृग वध आहे तो मला घाईत सापडला नाही.

In reply to by प्रचेतस

स्वधर्म 23/05/2025 - 13:56
काही वर्षांपूर्वी मी व काही मित्र या मंदीराला भेट देण्यासाठी गेलो होतो. या मंदीराचीच निवड करण्याचे कारण म्हणजे प्रचेतस यांचा वरील लेख. तसेच त्यांच्या लेखातील माहितीमुळे आपण काय पहात आहोत व त्याचा काय अर्थ आहे ते समजत होते. भक्ती यांनी पण उत्तम माहिती दिली आहे. दोन्ही व्यासंगी लोकांचे आभार.

चौथा कोनाडा 15/05/2025 - 20:23
वाह, सुंदर अप्रतिम !!! दर वेळा हा प्रश्न पडतो की एवढी अप्रतिम कलाकुसर आणी प्रमाणबद्धता कशी केली केली असेल ? तीन चार वर्षांपुर्वी गेलो होतो, तेव्हा घाईत सहल झाली होती. आता पुन्हा निवांत जायला हवे ! धन्यवाद !

कंजूस 14/05/2025 - 18:15
छान. पन्नास टक्के शिल्पे फोडलेली आहेत, पहायला नको वाटते. ............. इकडे यवत ( सोलापूर रस्त्यावरील) वरून सकाळी पावणे दहाची बस सुटते त्याने गेलो पण परतीला वाहन नव्हते. मग बऱ्याच वेळाने एक टेम्पो आला त्याने घेतले. आत खूप अंधार आहे , मोबाईलने फोटो बरोबर येत नाहीत.

१९७२ मधे मॅट्रिक परिक्षे आगोदर सर्व मित्र पांगणार म्हणून सायकल वर भुलेश्वर सहल आयोजित केली होती. आता फार काही लक्षात नाही. तेव्हांचा एक मित्र किराणामालाचा मोठा घाऊक व्यापारी असल्याने संपर्कात आहे. पुन्हा एकदा जायला हवे.

प्रचेतस 15/05/2025 - 19:37
चांगलं लिहिलंय. भुलेश्वरला खूप वेळा जाऊनही समुद्रमंथनाचा पट मला अंधारामुळे नीट पाहता आला नव्हता , आता तिथे विजेचा दिवा लावलेला दिसतोय. दुसरे म्हणजे ह्या मंदिराचा निर्मितीकाल निश्चित माहीत नाही, बहुधा ही चालुक्यांची निर्मिती असावी. इथली स्रीरूपी देवतांची शिल्पे इथला शाक्त प्रभाव सांगतात. बाकी ह्या लेखामुळे पूर्वी मी लिहिलेल्या भुलेश्वर मंदिरातील पौराणिक शिल्पपट ह्या लेखाची आठवण झाली.

In reply to by प्रचेतस

Bhakti 15/05/2025 - 20:42
समुद्रमंथन पट मला www.discoveringtemples.com येथून मिळाली होती.ती अशी ,या फोटो बरोबर ती मॅच करून समजते ते रत्न कोणते. मोरासारखी शेपटी असलेली कामधेनू गाय - कोणतीही इच्छा पूर्ण करणारी दिव्य गाय अमृत कुंभ - अमरत्वाचे अमृत देवतांमध्ये वाटण्यात आले. चंद्र - हो, आपल्याला आकाशात दिसणारा चंद्र समुद्र मंथनातून आला आहे. उच्चैःश्रवास - राक्षसांचा राजा बळी याने घेतलेला सात डोक्यांचा उडणारा घोडा. ऐरावत - देवांचा देव इंद्र याने घेतलेला पांढरा हत्ती. अप्सरा रंभा - स्वर्गातील दिव्य सौंदर्य देवी लक्ष्मी - संपत्ती आणि समृद्धीची देवी, भगवान विष्णूने घेतली. तसेच अशाच उंचीवर एक मारीच मृग वध आहे तो मला घाईत सापडला नाही.

In reply to by प्रचेतस

स्वधर्म 23/05/2025 - 13:56
काही वर्षांपूर्वी मी व काही मित्र या मंदीराला भेट देण्यासाठी गेलो होतो. या मंदीराचीच निवड करण्याचे कारण म्हणजे प्रचेतस यांचा वरील लेख. तसेच त्यांच्या लेखातील माहितीमुळे आपण काय पहात आहोत व त्याचा काय अर्थ आहे ते समजत होते. भक्ती यांनी पण उत्तम माहिती दिली आहे. दोन्ही व्यासंगी लोकांचे आभार.

चौथा कोनाडा 15/05/2025 - 20:23
वाह, सुंदर अप्रतिम !!! दर वेळा हा प्रश्न पडतो की एवढी अप्रतिम कलाकुसर आणी प्रमाणबद्धता कशी केली केली असेल ? तीन चार वर्षांपुर्वी गेलो होतो, तेव्हा घाईत सहल झाली होती. आता पुन्हा निवांत जायला हवे ! धन्यवाद !
लेखनविषय:
लेखनप्रकार
१ भुलेश्वर मंदिर हे मंगलगड किंवा दौलतमंगल किल्ला नावाच्या डोंगरी किल्ल्यावर(पुणे जिल्हा) वसलेले आहे. १३ व्या शतकात यादव राजवंशातील राजा कृष्णदेवराय यांनी या मंदिराची पुनर्बाधणी केली. नंतर मराठ्यांनी त्यांच्या राजवटीत त्याची भर घातली. भुलेश्वर मंदिर खूप वेळा नष्ट आणि पुनर्बाधणी करण्यात आले आहे.

आव्वाज आव्वाज..

आजी ·

In reply to by प्रकाश घाटपांडे

स्वधर्म 22/05/2025 - 17:26
आजींचा मूड बघता त्यांना हे कबीर भजन आवडेल असे वाटते: https://youtu.be/wWqRYmHR9XA?si=e33ElUakiCywJoZV मला लक्ष्मी शंकर यांचा आवाज आणि त्यातले संगीत अगदी शांतवणारे वाटते. कबीराच्या रचनांबद्दल काय बोलायचे?

सौंदाळा 14/05/2025 - 20:01
आनंदाच्या प्रमाणात डेसिबल्स वाढतात हल्ली लोकांचे. परीक्षांचा कालावधी, म्हातारी माणसे, अर्भके, शाळा, दवाखाने, काळ-वेळ याचे काही सोयर-सुतक नसते लोकांना.

गवि 18/05/2025 - 06:45
खूप मोठा आवाज केल्याशिवाय कोणताच कार्यक्रम सुफळ संपूर्ण होत नसतो अशी एक समजूत वाढते आहे हे नक्की. देवाचे तर कान बधिर झाले असतील कंठाळी भक्तिगीते ऐकून. त्याने कान बंद करून घेतले आहेत यात आश्चर्य नाही.

लेखनातला आशय पोहचला. आता भजन, आरत्या आणि सर्व धार्मिक परंपरा असलेल्या कार्यक्रमाचं स्वरुप दिवसेंदिवस अधिक बदलत चाललं आहे. भक्ती कमी आणि प्रदर्शन वाढलं आहे. विलाज नाही. एकतर सहन करावे किंवा बाहेर पडावे असे होऊन जाते. यजमान दुखावल्या जाऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते. दिवसभरांच्या श्रमानं कानावर पडणारा भजनाचा तो गोड आवाज, टाळ मृदुंगाचं एकरुप होणं आनंदायी असायचं. आता तर अशा विषयावर बोललं, टीका केली म्हणजे आपण नुसते देवाचे दुश्मन तर होतोच पण देशाचे दुश्मन होऊन जातो. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे 22/05/2025 - 10:10
आता तर अशा विषयावर बोललं, टीका केली म्हणजे आपण नुसते देवाचे दुश्मन तर होतोच पण देशाचे दुश्मन होऊन जातो. जिथे तिथे आपला पूर्वग्रह आणलाच पाहिजे का? मी रात्री दहा नंतर डी जे चालू असेल तर १०० वर फोन करून पोलिसांना फोन करतो. जवळच एका नगरसेवकाच्या गणपतीसाठी रात्री साडे दहा पर्यंत चालू असलेला डी जे मी प्रत्यक्ष जाऊन विनंती करून बंद केला. ( पोलीस फक्त हो हो येतो करत होते). आपण डीजे चा बीभत्स आवाजच कशाला ढोल ताशे सुद्धा बंद करू शकता. मिपावरच एकाने ढोल ताशे वर टाकलेल्या लेखात मी त्याविरुद्ध लिहिलेले होते त्यात आपला पूर्वग्रह आणायची आवश्यकता नाही

श्वेता२४ 22/05/2025 - 12:32
आजी तुमचं लिखाण नेहमीच भावतं व पटतंदेखील कारण ते आपलं वाटतं. गणपती, नवरात्र, लग्न यांच्यामुळे होणाऱ्या आवाजकल्लोळात अजुन एक भर म्हणजे हळद या महाभयंकर समारंभाची. याचे आयोजन बहुदा रात्रीच केले जाते आणि मग होळी/रंगपंचमीपेक्षाही अगाउपणाला उत येऊन डीजेसोबत तरुणाईच्या किंकाळ्यांनी हल्लकल्लोळ माजतो. मीही मग बिनदिक्कत १० वाजून १ मिनीटांनी पोलिसांना फोन करते व त्यांच्या उत्साहावर पाणी फेरते.

स्वधर्म 22/05/2025 - 17:33
आजी, तुमचे लिखाण नेहमीच आवडते. अगदी रोजच्या जीवनातले अनुभव आंम्ही जगतो आणि विसरून जातो. तुंम्ही त्यांना छान परत परत वाचावंसं वाटेल याप्रकारे पकडून ठेवता. सांगलीत 'प्रामुख्याने हिंदी, गुजराती, पंजाबी, थोडी मराठी' भजन असल्याचे नवल वाटले. अजून तरी बहुतांश वारकरी किंवा एकतारी/ नाथपंथी भजने असतील असे वाटत होते. पण सिनेमातील गाण्याच्या चालीवर भजने म्हणजे काय च्या कायच वाटते.

In reply to by प्रकाश घाटपांडे

स्वधर्म 22/05/2025 - 17:26
आजींचा मूड बघता त्यांना हे कबीर भजन आवडेल असे वाटते: https://youtu.be/wWqRYmHR9XA?si=e33ElUakiCywJoZV मला लक्ष्मी शंकर यांचा आवाज आणि त्यातले संगीत अगदी शांतवणारे वाटते. कबीराच्या रचनांबद्दल काय बोलायचे?

सौंदाळा 14/05/2025 - 20:01
आनंदाच्या प्रमाणात डेसिबल्स वाढतात हल्ली लोकांचे. परीक्षांचा कालावधी, म्हातारी माणसे, अर्भके, शाळा, दवाखाने, काळ-वेळ याचे काही सोयर-सुतक नसते लोकांना.

गवि 18/05/2025 - 06:45
खूप मोठा आवाज केल्याशिवाय कोणताच कार्यक्रम सुफळ संपूर्ण होत नसतो अशी एक समजूत वाढते आहे हे नक्की. देवाचे तर कान बधिर झाले असतील कंठाळी भक्तिगीते ऐकून. त्याने कान बंद करून घेतले आहेत यात आश्चर्य नाही.

लेखनातला आशय पोहचला. आता भजन, आरत्या आणि सर्व धार्मिक परंपरा असलेल्या कार्यक्रमाचं स्वरुप दिवसेंदिवस अधिक बदलत चाललं आहे. भक्ती कमी आणि प्रदर्शन वाढलं आहे. विलाज नाही. एकतर सहन करावे किंवा बाहेर पडावे असे होऊन जाते. यजमान दुखावल्या जाऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते. दिवसभरांच्या श्रमानं कानावर पडणारा भजनाचा तो गोड आवाज, टाळ मृदुंगाचं एकरुप होणं आनंदायी असायचं. आता तर अशा विषयावर बोललं, टीका केली म्हणजे आपण नुसते देवाचे दुश्मन तर होतोच पण देशाचे दुश्मन होऊन जातो. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ हाय. -दिलीप बिरुटे

सुबोध खरे 22/05/2025 - 10:10
आता तर अशा विषयावर बोललं, टीका केली म्हणजे आपण नुसते देवाचे दुश्मन तर होतोच पण देशाचे दुश्मन होऊन जातो. जिथे तिथे आपला पूर्वग्रह आणलाच पाहिजे का? मी रात्री दहा नंतर डी जे चालू असेल तर १०० वर फोन करून पोलिसांना फोन करतो. जवळच एका नगरसेवकाच्या गणपतीसाठी रात्री साडे दहा पर्यंत चालू असलेला डी जे मी प्रत्यक्ष जाऊन विनंती करून बंद केला. ( पोलीस फक्त हो हो येतो करत होते). आपण डीजे चा बीभत्स आवाजच कशाला ढोल ताशे सुद्धा बंद करू शकता. मिपावरच एकाने ढोल ताशे वर टाकलेल्या लेखात मी त्याविरुद्ध लिहिलेले होते त्यात आपला पूर्वग्रह आणायची आवश्यकता नाही

श्वेता२४ 22/05/2025 - 12:32
आजी तुमचं लिखाण नेहमीच भावतं व पटतंदेखील कारण ते आपलं वाटतं. गणपती, नवरात्र, लग्न यांच्यामुळे होणाऱ्या आवाजकल्लोळात अजुन एक भर म्हणजे हळद या महाभयंकर समारंभाची. याचे आयोजन बहुदा रात्रीच केले जाते आणि मग होळी/रंगपंचमीपेक्षाही अगाउपणाला उत येऊन डीजेसोबत तरुणाईच्या किंकाळ्यांनी हल्लकल्लोळ माजतो. मीही मग बिनदिक्कत १० वाजून १ मिनीटांनी पोलिसांना फोन करते व त्यांच्या उत्साहावर पाणी फेरते.

स्वधर्म 22/05/2025 - 17:33
आजी, तुमचे लिखाण नेहमीच आवडते. अगदी रोजच्या जीवनातले अनुभव आंम्ही जगतो आणि विसरून जातो. तुंम्ही त्यांना छान परत परत वाचावंसं वाटेल याप्रकारे पकडून ठेवता. सांगलीत 'प्रामुख्याने हिंदी, गुजराती, पंजाबी, थोडी मराठी' भजन असल्याचे नवल वाटले. अजून तरी बहुतांश वारकरी किंवा एकतारी/ नाथपंथी भजने असतील असे वाटत होते. पण सिनेमातील गाण्याच्या चालीवर भजने म्हणजे काय च्या कायच वाटते.
आमच्या सोसायटीत सगळे बंगलेच आहेत. आपापली घरं फक्त कामवाल्यांसाठी उघडून आणि त्या कामं करून गेल्यावर ती पुन्हा बंद करून सगळ्या गृहिणी टीव्हीवर, आणि आताशा ओटीटीवर सिनेमे किंवा हिंदी भाषेतल्या कौटुंबिक मालिका बघत बसतात. पण त्या अधुनमधून बंगल्याबाहेरही पडतात. भिशी,किटी पार्टी, हळदीकुंकू,बारशी, वाढदिवस,भजन, सत्यनारायणाची पूजा, इत्यादी त्या थाटामाटात आणि एकत्र येऊन साजरे करतात. यात थोडा बदल म्हणून मी त्यांना घरपोच लायब्ररी चालू करणे, रीडर्स क्लब, साहित्य कट्टा, चांगल्या वक्त्यांची भाषणे, चांगल्या गायकांच्या गाण्याचे कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम सुचवून पाहिले पण त्याला शून्य प्रतिसाद मिळाला.