श्री० देवेन्द्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री
महाराष्ट्र
स० न० वि० वि०
सध्या हिंदी १ली पासून शिकवली या मुद्द्यावरून बरेच चर्वितचर्वण चालू आहे. यात होणारा विरोध हा भावनिक आणि राजकीय अंगाने होत आहे असे वाटते. याशिवाय आणखी एका अंगाचा विचार व्हायला हवा, तो म्ह० चेताविज्ञान म्ह० न्युरोसायन्स.
मी चेताविज्ञानातील प्रशिक्षित तज्ज्ञ नसलो तरी याविषयातील ताजे संशोधन भरपूर वाचत असल्याने काही मुद्दे पुढे ठेवावेसे वाटतात. या मुद्द्यांचा प्रशिक्षित तज्ज्ञ साक्षेपाने विचार करतील याची खात्री आहे -
० शालेय विद्यार्थ्यांवरील ताण आता पराकोटीला पोचला आहे. त्यात कुपोषण आणि प्रदुषण भर घालून गंभीर समस्या निर्माण करत आहेत. याचा परिणाम म्ह० शालेय विद्यार्थ्यांमध्ये दिसणारे मधुमेह, हृदयरोगासारखे आजार. मेंदूच्या क्षमतेवर होणार्या परिणामावर मी नोव्हे० २४ मध्ये म०टा०मध्ये लेख लिहीला होता.
० निसर्ग सर्वाना समान ग्रहणक्षमता देत नाही. त्यात वर उल्लेख केलेले घटक अधिक भर टाकतात आणि समस्या अधिक वाढतात.
० हिंदीचे मराठीवर आक्रमण झाल्याने मराठी समृद्ध किती झाली याचा वस्तूनिष्ठ विचार/मूल्यमापन होणे आवश्यक आहे.
० पुरेशी ग्रहण क्षमता नसलेले मानवी मेंदू ’लर्निंग कॊन्फ्लिक्ट’च्या ताणामुळे मराठीभाषेच्या वाढीला पूरक ठरतील की मारक याचे उत्तर फारसे उत्साहवर्धक नसेल असे मराठीची सद्यस्थिती बघून वाटते.
राजकीय हेतूने प्रेरित धोरणे वैज्ञानिक सत्याचा आदर करतील असे वाटत नाही.
-राजीव उपाध्ये
वाचने
1564
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
योग्य
सहमतीदर्शक प्रतिसादाबद्दल
In reply to योग्य by माईसाहेब कुरसूंदीकर
फडणविसांनी लोकांना हिंदीचे
डीएनए हा शब्द भावार्थाने देखील वापरतात
In reply to फडणविसांनी लोकांना हिंदीचे by युयुत्सु
मजा नहीं आ रहा
तुमच्यापेक्षा संक्षी परवडले!