मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुला॑ना इ॑ग्रजी माध्यममाच्या शाळेत घालावे का?

दीपा॑जली ·

विसोबा खेचर Mon, 01/28/2008 - 12:46
त्या॑ना वाटते जे problems ना आपण इ॑ग्रजी येत नाही म्हणून सामोरे गेलो त्याला मुला॑नी सामोरे जाऊ नये. सहमत आहे...हल्लीच्या बर्‍याच आईवडिलांना असेच वाटत असावे! समाजात मराठी तून शिक्षण घेणे कमीपणाचे मानले जाते. हम्म! नो कॉमेन्टस... त्याचवेळी आज मराठी शाळा पण चा॑गल्या नाहीत. सहमत आहे.... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

नितिन थत्ते Tue, 03/24/2009 - 13:54
हे तात्यांच्या प्रतिसादाला उत्तर नाही पण वर दिसावे म्हणून इथे लिहिले आहे खाली जे प्रतिसाद आले आहेत त्यातल्या दोन गोष्टी खटकल्या. १. हा विषय आपल्याच राज्यात राहणार्‍या लोकांनाच लागू आहे. पण प्रतिसादात अनिवासी / निवासी वाद उगीच आला आहे. २. त्याचप्रमाणे संस्कृती टिकवणे हा अनावश्यक विषय आला आहे. म्हणजे इंग्रजी शाळेत जाण्याने संस्कृती बुडते की नाही असा उगाच प्रश्न निर्माण करून त्यावर चर्चा झाली आहे. त्यात संस्कार टिकवून ठेवणार्‍या इंग्रजी शाळांची भलामण केली आहे. खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

मराठी_माणूस Tue, 03/24/2009 - 14:15
१.मुळात चर्चेचा प्रस्ताव हा ईथल्या (महाराष्ट्रातल्या) शाळेच्या माध्यमा संबंधात आहे , त्यामुळे भारता बाहेर काय आहे , काय केले जाते हे अप्रस्तुत. त्या साठी वेगळा धागा उघडला जाउ शकतो. इथे वाद घालणे हे व्यर्थ आहे.

झकासराव Mon, 01/28/2008 - 17:44
माझ्या मनातील अगदी खरखुर आहे की माझ्या मुलाने मराठी शाळेतच शिकाव. इंग्रजी बोलणे किंवा त्यातुन संभाषण साधणे हे कधीही शिकु शकतो माणुस त्याच्या नंतरच्या आयुष्यात. पण सध्याच्या काळात एक अडचण आहे ती म्हणजे नोकरीची. जग हे एक खेडं बनल आहे. आणि तुम्हाला कधी उत्तम संधी येइल आणि तुम्ही कधी हा देश किंवा राज्य सोडुन जाल ह्याचीखात्री नाही. (तशीच नोकर्‍यांची देखिल खात्री नाही हो) अशावेळी मराठी माध्यमाच्या मुलांना त्रास होउ शकतो. उदा. महाराष्ट्रात राहणार्‍या एखाद्याला जर दिल्लीत नोकरी मिळाली तर तिथे मराठी माध्यमाची शाळा नसणार. हाच त्रास अजुन मोठा होइल जर अशी व्यक्ती जर बाहेरच्या देशात गेली तर. आतापर्यंत मराठी माध्यमात शिकलेल तिकडे कितपत स्वीकारले जाइल???? त्यात मुलाच्या शैक्षणिक वर्षाच नुकसान होउ शकतं असा अनुभव कोणाला आहे का???? ह्यावर उपाय काय आहे??? राहिली गोष्ट मराठी माध्यमातल्या उत्तम शाळांची. तर अशा शाळा आहेत भले त्या कमी असतील पण आहेत. मी स्वतः ह्या शाळेत शिकलो ती मराठी माध्यमातली शाळा होती. आमची शाळा फार नावाजलेली नव्हतीच (म्हणजे विद्यार्थी बोर्डात येणे वै) पण त्या शाळेत देखिल चांगल शिक्षणच मिळाल की. :) उलट माझा अनुभव असा आहे की इन्ग्रजी माध्यमातली बरीचशी मुल दहावीपर्यंतच जे जे नको करायला ते करुन बसलेली असतात. (उदा सिगारेट, दारु )

धमाल मुलगा Mon, 01/28/2008 - 18:24
मी स्वतः मराठी माध्यमाच्या शाळेतच शिकलो, शाळाही चा॑गली होती, पण...ते ई॑ग्रजी अन् १० वी न॑तरच्या अभ्यासाच॑ ई॑ग्लिश ह्यात ई॑ग्रजी अन् ई॑ग्लिश इतकाच फरक असतो, हे ११वी सरल्यावर जाणवल॑ (तिर्थरुपा॑ना! अस्मादिका॑स हा दिव्य साक्षात्कार ११वीच्या पहिल्या दिवशीच पहिल्या तासात घडला होता.). वरच्या प्रतिसादा॑शी पूर्ण सहमत. पण, एकच गोष्ट...जे॑व्हा ही ई॑ग्लिश माध्यमाची पोर॑ आपल्या आईबापाला एखादा अस्सल म्हराठमोळ्या गोष्टी॑स॑दर्भात प्रश्न करतात, तेव्हा त्या॑ना उत्तर ई॑ग्लिशमध्येच द्याव॑ लागत॑ नाहीतर काही झेपत नाही बिचार्‍या॑ना. मराठीत सा॑गितल॑ तर पाssर फापलतात पोर॑ ! त्या॑नी हार्डी बॉईज चे सगळे भाग वाचलेले असतात, पण फास्टर फेणे कोण ते मात्र माहित नसत॑. जरा मोठे झाले की सिडने शेल्डन अन् रॉबर्ट लुडलुम फाड्फाड तो॑डावर फेकतात, पण बाबासाहेब पुर॑दरे राजाशिवछत्रपतिमध्ये काय लिहितात ते "really too tough to understand bro". कदाचित मीही माझ्या मुला॑ना ई॑ग्लिश माध्यमातून शिकायला लावेन, पण ह्या गोष्टी॑ची कशी काळजी घेईन ते मात्र अजुनतरी समजलेल॑ नाही. -(सध्यातरी ह्या प्रश्नापासून दूर..) धमाल.

गणित, विज्ञान किंवा तत्सम विषय असे आहेत कि, त्यांतील संकल्पना, आपल्या रोजच्या जीवनातील गोष्टींशी सांगड घालून जास्त चांगल्या शिकता येतात. त्यामुळे लहानपणीपासूनच या विषयांचा अभ्यास प्रगल्भतेने करता येउन, त्यांची भिती दूर होणेच नव्हे तर, या विषयांत काहि असामान्य करण्याची ताकद प्राप्त होउ शकते. पण आपल्या रोजच्या जीवनातील गोष्टीं - संभाषणे हि मात्रुभाषेत होत असल्याने शिक्षण मात्रुभाषेतच घेणे योग्य, असे मला वाटते. कारण कोणताहि विषय शिकताना, परिक्षेत गुण मिळवण्यासाठी नव्हे तर त्या विषयाशी संबंधित, मेंदूचा भाग, पायरी - पायरीने प्रगत करायचा हा मूळ हेतू असला पाहिजे. उदा. गणित शिकताना - तार्किक / संख्याशास्त्रिय प्रगति ( मेंदूचा डावा भाग - statistical brain) . मात्रुभाषेतून शिक्षण घेताना हे जास्त सहजपणे साध्य करता येउ शकते. नाहितर एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था व्हायची. इंग्रजीतून सराईतपणे बोलणे इ. साध्य करण्याचे योग्य मार्गदर्शन मिळवून, तो एक विषयही चांगला करता येउ शकतो.

धोंडोपंत Mon, 01/28/2008 - 19:26
आम्हाला इंग्रजी माध्यमाची भीति नाही. पण लोक इंग्रजी माध्यम आणि कॉनव्हेंट यातील फरक न समजता मुलांना त्या शाळेत घालतात याची भीति आहे. इंडियन एज्युकेशन सोसायटी सारख्या संस्थांच्या शाळेत माध्यम इंग्रजी असले तरी संस्कार हिंदू असतात. आमची दोन्ही मुले इंग्रजी माध्यमातून शिकतात पण शाळेतील संस्कार हे आपलेच आहेत. या उलट कॉनव्हेंट शाळा मुलांना आपली संस्कृती विसरायला लावून त्यांचे परिवर्तन त्यांच्या अनुकूलतेनुसार करतात. यावर आमचा आक्षेप आहे. आपला, (सावध) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

केशवसुमार Tue, 01/29/2008 - 20:39
आम्हाला इंग्रजी माध्यमाची भीति नाही......या उलट कॉनव्हेंट शाळा मुलांना आपली संस्कृती विसरायला लावून त्यांचे परिवर्तन त्यांच्या अनुकूलतेनुसार करतात. यावर आमचा आक्षेप ......१००% सहमत.. (मराठी माध्यमात शिकलेला ) केशवसुमार

ऋषिकेश Mon, 01/28/2008 - 19:41
याच प्रश्नावर उत्तर म्हणून सेमी इंग्रजी माध्यमे शाळांशाळांत आहेत. जेव्हा मी एस. एस. सी झालो ती माझी आमच्या शाळेची पहिली सेमी इंग्लीश बॅच होती. पण आता बर्‍याच शाळांत हि पद्धत आहे. (८वी तेदहावी) सेमी इंग्लिश म्हणजे विज्ञान आणि गणित हे विषय इंग्रजीतून तर इतिहास, भूगोल आदि विषय मराठीतून शिकलो. मला तरी याचा वैयक्तीक रित्या खूप फायदा झाला. त्यात माझा १०० मार्कांचं संस्कृत असल्याने एकावेळी तीन भाषा शिकल्या जायच्या. (सेमी इंग्लिश मर्‍हाटी) ऋषिकेश

प्राजु Mon, 01/28/2008 - 20:04
धोंडोपंतांनी जे लिहिले आहे ते अगदी खरे आहे. इंग्रजी माध्यमाची शाळा आणि कॉन्हेंट यामध्ये खूप फरक आहे. इंडियन एज्युकेशन सोसायटी सारख्या संस्थांच्या शाळेत माध्यम इंग्रजी असले तरी संस्कार हिंदू असतात. अगदी खरं.. प्राजु

संजय अभ्यंकर Mon, 01/28/2008 - 20:26
मी नेहमी मातृभाषेच्या शिक्षणाचा पुरस्कार करतो. माझ्या मुलाला इंग्रजी शाळेत घालायची आमच्या पत्नीची फार इच्छा होती. तीला मी एकच प्रश्न विचारला: तुला बे चा पाढा इंग्रजीतून येतो का? तिने नकारार्थी मान हलवली, मी म्हटले, मलाही येत नाही, मग त्या बालका वर अत्याचार कशाला? मुलाला मराठी शाळेत घातले. मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात अनेक उत्तम मराठी शाळा आहेत. ज्यांच्या नोकर्‍या बदलीच्या आहेत, ते सोडले तर इतरांनी मराठी शाळे बद्दल चिंता करण्याचे कारण नाही. मातृभाषेच्या शिक्षणाबद्दल अकारण भिती बाळगण्याचे कारण नाही. उत्तम इंग्रजी येण्यासाठी, भरपूर अवांतर वाचन (इंग्रजी व मातृभाषेतून) आवश्यक आहे. इंग्रजी शाळांतुन शिकलेली मुले, इ. ११वी पासुन पुढे भेटु लागली, तेव्हा हे जाणवले. केवळ आमच्यापेक्षा चांगले इं. ते बोलत असत, परंतु, सामान्या ज्ञानात, आम्ही त्यांच्यापेक्षा कांकणभर पुढेच होतो. इं. भाषा बोलण्यातही आम्ही त्यांनां लवकरच गाठले. मातृभाषेच्या शिक्षणाबद्दल जगातल्या शिक्षणतज्ञांचे काही निष्कर्ष पुढील प्रमाणे: १. जगातले काही देश इतर देशांपेक्षा जास्त प्रगत का करु शकले? कारण ह्या देशांनी प्राथमिक शिक्षण मातृभाषेतुन दिले. पारंपरीक उदा.: अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रांस, इटाली, स्पेन इ. आधुनिक उदा.: जापान, चीन, कोरिया, तैवान, ब्राझिल इ. २. मुल जन्माला आल्यापासुन शाळेत जायला लगे पर्यंत, त्याच्या कानावर सतत पडणारी भाषा ही त्याची मातृभाषा होय. शाळेत जायला लागे पर्यंत ह्या मातृभाषेचा त्याच शब्दसंग्रह शेकडा ते हजार शब्दांपर्यंत असतो. जी भाषा तो बोलु व समजु शकतो, ती भाषा जर त्याच्या शिक्षणाचीही भाषा असेल, तर शाळेत त्याला केवळ त्या बोलीभाषेची लिखित अक्षरांशी सांगड घालावी लागते. आणी मातृभाषेत शिकणारे मुल भराभर शिकते, कारण, जितके वय लहान तितका आकलनाचा वेग ज्यास्त. इंग्रजी भाषामात्र मुलास ध्वनी आणि लिखित, दोन्हि स्वरुपात शिकावी लागते. जे त्याच्या मेंदूचे काम वाढवते. वरिल मुद्दांवर अनेकांनी माझ्याशी अनेकवेळा वाद घातले आहेत. प्रत्येकाची आपली विचारसरणी आहे आणी तीचा मी आदर करतो. संजय अभ्यंकर

चतुरंग Mon, 01/28/2008 - 20:54
इयत्ता पाचवी पर्यंत माध्यम हे ज्या त्या मातृभाषेतीलच असावे ह्या मताचा मी आहे. मी स्वतः मराठीतूनच शिकलो. इंग्लिश पाचवीत पहिल्यांदा आलं. मला कुठेही न्यूनगंड जाणवलेला नाही. उलट एकप्रकारचा वेगळा आत्मविश्वास असतो जेव्हा आपल्या भाषेशी आपली जवळीक असते. (आणि हा फक्त माझा एकट्याचा अनुभव नाहिये. आमच्या १०वी च्या वर्गाचं सम्मेलन मागच्या वर्षी भरलं होतं तेव्हा ह्यावर छोटी बातचीत झाली. जवळजवळ सर्वांचे (वर्गातल्या ४०-५० जणांचे) असेच मत होते. कित्येक जण आपापल्या क्षेत्रात अतिशय उच्च कामगिरी करत आहेत.) मूल वयाच्या ६ वर्षांपर्यंत बराच काळ घरात असते. त्याच्या कानावर जी भाषा येते तीच ते आत्मसात करते. ते त्याच भाषेतून बोलायला शिकते. त्याच्या आजूबाजूचे सगळे व्यवहार त्याच भाषेत होत असतात. आपण संपर्क साधू शकतो, बोलू शकतो आणि आपलं बोलणं समजून त्याला प्रतिसाद मिळतो ही एक प्रक्रिया आहे आणि तीच त्या बालकाचा आत्मविश्वास वाढवत असते. एकदा मातृभाषेशी अनुसंधान आले की बाकी कोणताही विषय अवघड नाही. अगदी शास्त्र व गणिताचा मार्ग सुध्दा भाषेतूनच जातो. मूलभूत संकल्पना नीट समजण्यासाठी मातृभाषेचाच आधार चांगला. एकाएकी शाळेत इंग्लिश सुरु झाले तर मुलं गोंधळून जातात आणि शिकण्यावर बंधने येतात. (आणि धोंडोपंत म्हणतात तसे संस्कारही आपले नसले तर मग विचारायलाच नको!) मी अमेरिकेत आहे त्यामुळे माझ्या मुलाला इंग्लिश मधून शिकावे लागते पण त्याची कमतरता मी मराठीतूनच बोलून भरुन काढण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. त्यामुळे तो मराठी उत्तम समजू व बोलू शकतो. करंगळी, टाच, खिळा, थालीपीठ, मोदक म्हणजे नक्की काय हे त्याला कळतात. परवाचा, त्यानंतर असे शब्द तो योग्य जागी व्यवस्थित वापरतो. आजी आजोबांशी फोनवर मराठीतून बोलतो. त्याला शाळेत स्पॅनिशदेखील शिकवतात आणि त्याने ती ही भाषा व्यवस्थित आत्मसात करायला सुरुवात केली आहे. प्रत्येक नवीन मराठी शब्दाचा अर्थ तो विचारतोच आणि मी देखील न कंटाळता तो सांगायचा प्रयत्न करतो. (माझी बायकोदेखील हे सर्व करत असते.) हे उदाहरण मोठेपणा सांगण्यासाठी दिलेले नसून स्वानुभवाचे असल्याने दिले आहे. ह्या विषयावर जगभरात बरेच संशोधन झाले आहे. युनेस्कोच्या संकेतस्थळावरील एक दुवा इथे देत आहे. http://portal.unesco.org/education/en/ev.php-URL_ID=38921&URL_DO=DO_TOPIC&URL_SECTION=201.html आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात भाषाशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. अशोक रा. केळकर हे ह्या विषयातले अधिकारी आहेत. जिज्ञासूंनी त्यांचे ह्या विषयावरील लिखाण वाचावे. चतुरंग

In reply to by चतुरंग

अघळ पघळ Tue, 01/29/2008 - 09:30
आपला मुलगा आजी आजोबांशी मराठीत बोलतो ह्याचे आईवडीलांना कौतुक वाटते. उद्या तो आपल्या आई वडीलांशी 'बोलतो' ह्याचे देखिल त्यांना कौतुक वाटेल. अवांतर : 'परवाचा' म्हणजे काय हे मला देखिल कळले नाही ते आपल्या लहानग्याला समजते हे पाहून तुमचे कौतुक वाटले.

In reply to by अघळ पघळ

चतुरंग Tue, 01/29/2008 - 20:07
आपण कुठे राहता कल्पना नाही (म्हणजे भारतात की बाहेर) पण बहुदा भारतात असावे. कारण त्या शिवाय परदेशात राहूनही आपली भाषा टिकवण्याची मराठी माणसाची धडपड आपल्याला समजणे अशक्य आहे. ज्या मुलांच्या कानावर, ती घरातून बाहेर पडल्यावर दिवसाचे १० ते १२ तास फक्त इंग्लिश येते, त्यांच्या मनात मातृभाषेबद्दल प्रेम निर्माण करून ते टिकवून ठेवणे ह्याला काय कष्ट पडतात ते जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे! उपहास आणि कुचेष्टा फार सोपी असते! जिद्द आणि धडपड ह्याला आत्मबळ लागते!! (कुणाचीही चेष्टा करु नका, आयुष्यात कधीतरी अशी आंगलट येईल की बस!) 'परवाचा' = म्हणजे काल, आज, उद्या, परवा यातला. चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर Tue, 01/29/2008 - 23:22
उपहास आणि कुचेष्टा फार सोपी असते! जिद्द आणि धडपड ह्याला आत्मबळ लागते!! क्या बात है.. वाक्य फार आवडले! (कुणाचीही चेष्टा करु नका, आयुष्यात कधीतरी अशी आंगलट येईल की बस!) हम्म! खरं आहे...! तात्या.

प्राजु Tue, 01/29/2008 - 20:28
बोलणे सोपे असते. उचलली जीभ आणी लावली.... चतुरंग यांचे मत अगदी योग्य आहे. परदेशात राहून मातृभाषा टिकवणे किती कठीण असते त्यासाठी काय काय करावे लागते हे आपल्यासारख्या लोकांना नाहि कळणार. आणि आपण मराठी असूनही आणि (जर) महराष्ट्रात राहत असूनही आपल्याला परवाचा म्हणजे काय हे माहिती नसेल तर आपल्या तथाकथित सामान्य ज्ञानाचे कौतुक वाटते, अघळपघळराव. माझा मुलगा शाळेत जातो. ४ वर्षाचा आहे. उत्तम इंग्रजी आणि मराठी बोलतो. त्याला श्लोक येतात. मारूतीस्तोत्र येतं. गणपतीस्तोस्त्र येतं. मराठी त्याला बाहेर शाळेत कोणी नाही शिकवणार. आणि मी कितीही नाही म्हंटलं तरी तो बाहेर इंग्लिशच बोलणार हे नक्की आहे आणि ते ही न शिकवता, याची पूर्ण जाणिव आहे मला. यु-ट्यूब वर फाऊंटन च्या खूप मराठीतून गोष्टी आहेत. पंचतंत्रातल्या, इसापनितीतल्या. तो मन लावून ऐकतो, पाहतो. कित्तीतरी बालगीते आहेत तिथे मराठीतून, ती ही त्याला आवडतात. बिरबल बादशहाची गोष्ट तो अगदी नीट सांगतो आणि ती हि मराठीतून. आणि त्याला ही आवड आम्ही निर्माण केली आहे हे मला इथे अभिमानाने सांगावेसे वाटते. भारतात गेल्यावर सगळी मराठी बोलत असताना त्याला फक्त ऐकण्याचे काम नाही करावे लागणार, तो ही त्याच्या वयाच्या मुलांमध्ये समजून मराठीतून संवाद साधू शकेल याची खात्री आहे मला. - प्राजु.

In reply to by प्राजु

चतुरंग Tue, 01/29/2008 - 20:40
प्राजुताई. जिद्दीने काम करणारे लोक आपल्याबरोबर आहेत हे बघून हुरुप वाढला. यू-ट्यूब वरील माहितीबद्द्ल धन्यवाद. आता मी त्या गोष्टी माझ्या मुलाला दाखवीन. चतुरंग

In reply to by प्राजु

अघळ पघळ Wed, 01/30/2008 - 08:22
आपल्या मातृभाषेला जगवण्यासाठी परदेशात राहून अनुक्रमे चतुरंग,प्राजु, आणि स्वाती राजेश करत असलेले प्रयत्न बघून थक्क झालो. आमच्या कचेरितला बरीच वर्षे तिकडे असणारा एक सहकारी मला सांगत होता त्यांचा ६ वर्षाचा तर म्हणे हॉटेलात जेवायला गेल्यावर आईबाबा ऑर्डर करायला लागले तर वेटरला 'नो बीफ हं!!' अस ठणकावून सांगतो! तेव्हाही मी असाच भारावून गेलो होतो. अहो आपली संस्कृती आपली भाषा हे टीकवण्याची केवढी मोठी जवाबदारी अनिवासी भारतीयांवर आहे. त्यांना सॉफ्ट टारगेट करण्याच्या टारगटपणा करणार्‍यांचा मी देखिल निषेध करतो. अवांतर: काल, परवा, उद्या असे शब्द माहित आहेत हो पण एकदम विनासंदर्भ 'परवाचा' असा शब्द ऐकल्यावर तो समजायला आमच्या सामान्य आकलनशक्तिला जरा जडंच गेला. जसे आंबा पेरू चिक्कू हे शब्द लगेच कळतात पण उद्या कुणी 'पेरुचा' म्हणजे काय विचारल तर माझा गोंधळ उडतो हो. आता जरा यू ट्यूब लावून बसतो.. ह्या नव्या पिढीने आम्हाला पारंच गारद केले आहे हो!

In reply to by अघळ पघळ

चतुरंग Wed, 01/30/2008 - 17:36
अघळपघळराव, कूपमंडूक वृत्ती असेल ना तर मग चर्चा करण्यात काही अर्थ नसतो. इथे विषय चालला आहे मुलांचे शिक्षणाचे माध्यम, आणि तुमचं आपलं भलतच! अहो तुम्हाला जर अनिवासियां बद्द्ल एवढीच मळमळ असेल ना तर त्याबद्द्ल एखादी वेगळी वैचारिक चर्चा का नाही करत? उगीच इकडे तिकडे ओकार्‍या करत हिंडू नका! चतुरंग

In reply to by विसोबा खेचर

अघळ पघळ Wed, 01/30/2008 - 22:03
निरिक्षक तात्या, इथले मॉडरेटर तुम्हीच ना? तो चतुरंग वैयक्तिक पातळीवर घसरुन आमच्या लेखनाला ओकार्‍या वगैरे म्हणत आहे. त्यावर तुम्ही मॉडरेटर म्हणून सहमती देखिल दाखवली आहे. तेव्हा आम्ही पण थोडे वैयक्तिक पातळीवर उतरलो आहोत. तरी फक्त आमचे प्रतिसाद उडवून आमच्यावर अन्याय करणार नाहीत ही अपेक्षा! -(सुस्पष्ट) अघळ पघळ

In reply to by चतुरंग

अघळ पघळ Wed, 01/30/2008 - 22:00
अरे माझ्या चतुरंग्या, जिथे तिथे अनिवासी भारतीयांच्या नावाने टाळ तू कुटतोस. इथं पण अनिवासी भारतीयांच्या नावाने हगायला तू सुरू केलेस आणि वर तुला माझे लेखन ओकर्‍या वाटते होय? अमेरिकेत आहेस ना? एखाद्या चांगल्या मनोविकार तज्ञाला दाखवून घे स्वत:ला. हवंतर पैसे मी पाठवतो इथनं! (कुपमंडूक) अघळ पघळ

In reply to by अघळ पघळ

विसोबा खेचर Wed, 01/30/2008 - 22:57
अघळपघळ आणि चतुरंग या दोघांनी एकमेकांवर वैयक्तिक शेरेबाजी केली आहे. दोघांचेही प्रतिसाद ठेवत आहे. परंतु आता पुरे! :) या पुढील वैयक्तिक शेरे असलेले दोघांचेही लेखन उडवून लावले जाईल तेव्हा कृपया लिहायचे कष्ट घेऊ नयेत. या पुढे दोघांनीही एकमेकांवर वैयक्तिक शेरेबाजीकरण्याकरता पोष्टकार्डाचा किंवा एकमेकांच्या खरडवह्यांचा यथेच्छ वापर करावा ही नम्र विनंती... तात्या.

In reply to by प्राजु

कौटील्य Wed, 01/30/2008 - 18:44
आपले अभिनंदन माझ्या काही अनिवासी मित्रांनी सुचविले म्हणुन मी एक वेबसाइट चालु केली http://www.pujaarcha.com/ यात तुम्हाला काही उपयुक्त मिळाले तर बघा समजा काही तुम्हाला लागेल व ते उपलब्ध नसेल होत तर कळवा आम्ही ते साइटवर देण्याचा प्रयत्न करु

स्वाती राजेश Tue, 01/29/2008 - 22:06
प्राजु आणि चतुरंग यांच्याशी मी सहमत आहे. आपला मुलगा परदेशात राहून सुद्धा मराठीत बोलतो याचे कौतुकच वाटायला पाहिजे. कारण परदेशात मुलांना मराठी शिकवायला किती कष्ट करावे लागतात ते मला महिती आहे. माझा मुलगा इयत्ता ६ वी त( वय वर्षे ११) आहे. तो मराठी आणि हिंदी व्यवस्थित लिहितो, वाचतो. अस्खलित बोलतो सुद्धा.याचा मला काय्,माझ्या भारतातील सर्व नातेवाइकांना अभिमान आहे. यामागे त्याचे स्वतःचे कष्ट आहेत पण त्याचबरोबरीने आई/वडिलांचे सुद्धा आहेत. तो घरी मराठी बोलतो .हिंदी ,मराठी सिनेमा तो एंजॉय करतो. तसेच इथे घराबाहेर पडले इंग्रजी( ब्रिटीश accent ने) येथील लोकांशी बोलतो. शाळेत इंग्रजी & स्पॅनिश आहे.मला खात्री आहे कि जरी परत भारतात आले तरी शाळेत अथवा इतर कोठेही त्याला भाषेचा प्रश्न येणार नाही. कारण मी पाहिले आहे कि भारतात सुद्धा कितीतरी आई/वडिल आपल्या मुलाशी इंग्रजीतून बोलतात कारण का तर त्याला शाळेत, मित्रांशी बोलताना सवय व्हावी म्हणून. घरी सुद्धा इंग्रजीतून....? मग आम्ही भारताबाहेर राहून सुद्धा मुलांना स्तोत्रे, श्लोक शिकवतो याचा आम्हाला अभिमान आहे. भारतात काही पालक मुलांना संस्कार शिबिरात घालतात, काहींना आजी/आजोबा शिकवतात. ते सर्व आम्ही (आई/वडिल)मुलांना शिकवतो. याचा आम्हाला अभिमान आहे. हल्ली अनिवासी भारतीयांवर फारच बोलले जाते आहे....याचे कारण?

चतुरंग Tue, 01/29/2008 - 22:27
हल्ली अनिवासी भारतीयांवर फारच बोलले जाते आहे....याचे कारण? मला वाटते हे एक सॉफ्ट टारगेट आहे. राजकारणात कोणताही प्रश्न आला की "ह्यात परकीय शक्तींचा हात आहे!" असे म्हणतात ना, त्याप्रमाणे सगळ्या संस्कृती विषयक प्रश्नांना अनिवासी भारतीय जबाबदार! अवांतर - अनिवासी भारतीयसुध्दा ह्याला काही प्रमाणात जबाबदार आहेत, नाही असे नाही. माझ्या माहितीत असे बरेच लोक इथे आहेत की जे त्यांच्या बोलण्यात ह्या ना त्या प्रकारे भारतातील व्यवस्थे बाबत तक्रारींचा सूर लावतात. त्यांचे मन भारतात ओढ घेत असते पण ते मान्य करण्याची त्यांना लाज वाटत असावी बहुदा. तुम्ही इथे राहता आहात हे ठीक पण त्यासाठी भारताला नावे ठेवण्याचे काहीही कारण नाही, ही भूमिका मी त्यांच्यासमोर घेतो. अशाने माझे काही संपर्क हळूहळू तुटलेही आहेत पण मला ते चांगलेच वाटते कारण जे आपल्या मूल्यांविरुध्द आहे ते गेलेलेच बरे! असो. पण अशा लोकांच्या भारत भेटी च्या वेळी त्यांच्या बोलण्याचे भारतद्वेष्टे संदर्भ हे तिथल्या असंतुष्टांसाठी कोलितच ठरते! त्यांना भारताबद्द्ल फार प्रेम असेल असे नाही, पण मग "बाहेरुन" आलेले लोक हे वाईट असा सरसकट निष्कर्ष काढला जातो!! तेव्हा आपली बूज आपणच राखायची असते असे ध्यानात ठेवावे लागते. चतुरंग

प्राजु Wed, 01/30/2008 - 00:19
काहीही झालं की टार्गेट आपली अनिवासी भारतीय... हातात कोलीत मिळाल्यासारखं अनिवासी भारतीयांच्या डोक्यावर खापर फोडायचं.. यापेक्षा आपण आपल्या मुलांना किती आणि काय शिकवता याकडे लक्ष द्या असेच मी सांगेन. जी शक्ती अनिवासी भारतीयांवर टीका करण्यात व्यर्थ जाते ती तुमच्या मुलांना मराठीचे धडे देण्याच्या सत्कारणी लावा. - प्राजु.

मनिष Wed, 01/30/2008 - 11:57
@धोंडोपंत - सहमत - इंडियन एज्युकेशन सोसायटी सारख्या संस्थांच्या शाळेत माध्यम इंग्रजी असले तरी संस्कार हिंदू असतात. चतुरंग - दुव्याबद्द्ल शतशः धन्यवाद. "रमेश पानसे" हे देखील शालेय शिक्षण हया विषयावर बरेच संशोधन, लिखाण करत असतात. अक्षरनंदन ही पुण्यातील एक दर्जेदार, वेगळी मराठी शा़ळा आहे असे ऐकून आहे. कोल्हापुरातही अशीच एक शाळा आहे, पण नाव आठवत नाही. UK मधे अर्थातच 'समरहिल' ही अतिशय वेगळी आणि सर्वार्थाने legendary म्हणता येइल अशी शाळा आहे. पण किती पालकांना त्या मागील विचार उमगतील आणि आचरणात आणता येतील हा प्रश्नच आहे. "तारे जमींन पर" आवडणे वेगळे आणि तसे विचार आचरणात आणणे वेगळे. असो! 'समरहिल' विषयी इथे वाचता येईल - http://www.deccanherald.com/Content/Nov222007/dheducation2007112136940.asp At a time when schools have become giant factories churning out kids who must fit into the present order, who cooperate smoothly, and who consume more and more, Summerhill, which has been in existence since 1921, has shown the world that a school could abolish fear of teachers and adults and, deeper down, fear of life, writes Arvind Gupta. - मनिष

In reply to by अन्या दातार

चतुरंग Wed, 01/30/2008 - 23:15
ते "सृजन आनंदच"! ठाण्याजवळ "ऐना" ह्या गावात "ग्राम-मंगल" आहे. डॉ. अनुताई वाघ यांनी ती सुरु केली. त्या शाळेची कीर्ती हळूहळू पसरते आहे. त्यांनी तयार केलेली अतिशय सुंदर आणि तरीही स्वस्त खेळणी माझ्याकडे आहेत. पुण्यातही ती मिळतात. वरील दुव्यात पुण्याचाही पत्ता मिळेल. चतुरंग

अवलिया Wed, 01/30/2008 - 18:27
"आम्ही आमच्या घरी मराठी कल्चर प्रिझर्व केलेय , एव्हरी संडेला आम्ही मिल्क राइस खातो" - हे वाक्य ऋषीतुल्य गोनीदांच्या नातेचे आहे. कीव कराविशी वाटते अशा निवासी अभारतीयांची; असो पुन्हा सांगतो भाषा दुय्यम आहे संस्कार विचार मह्त्वाचे नाना

In reply to by अवलिया

सूहास Tue, 03/24/2009 - 14:19
भाषा दुय्यम आहे संस्कार विचार मह्त्वाचे हे वाक्य मी ढापतोय्.पे॑टट तर नाही ना !! सुहास.. (द गुड)

'आपला मुलगा आजी आजोबांशी मराठीत बोलतो ह्याचे आईवडीलांना कौतुक वाटते. उद्या तो आपल्या आई वडीलांशी 'बोलतो' ह्याचे देखिल त्यांना कौतुक वाटेल.' या वाक्याचा मतितार्थ पुण्यात राहील्याखेरीज नाही कळणार. तथाकथित आधुनिक पालक आपल्या पाल्याला 'गुड बॉय' म्हणून गौरवितात त्यांची मला फार कीव येते. मराठीची थोर उपेक्षा पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरी व्हावी यासारखे दु:ख नाही. अघळपघळरावांचे हे वाक्य अनिवासी नाही तर निवासी भारतीयांना जास्त लागू आहे असे वाटते. पुण्याचे पेशवे

वरदा Wed, 01/30/2008 - 22:52
खूप छान विषय आहे. इथे मुलांना मराठी शिकवणं खरंच खूप कठीण आहे...मला जीआर ई देताना मराठी मिडियम मधली असल्याने जे सोपस्कार करावे लागले त्यावरून तरी इंग्रजीत शिकले असते तर बरं झालं असतं असं वाट्टं. नुसती तुमची ट्रांसफरच नाही पण ज्या मुलांना पुढे परदेशी शिक्षण घ्यायच. असेल त्याना इंग्रजीतुन शिकण्याचा खूप फायदा होतो असं वाट्टं

अन्या दातार Wed, 01/30/2008 - 23:06
माझ्या मते शाळेचे शिक्षण हे मातृभाषेतूनच असावे. माझे काही मित्र इंग्रजी माध्यमात शिकलेले आहेत; त्यांच्याशी बोलताना एक गोष्ट जाणवते की त्यांना मराठी भाषेतील नेहमीच्या वापरातील शब्दसुद्धा माहित नसतात. समजा कोणी श्लेष अलंकारातून कोटी केली तर त्यांना ती अजिबात कळत नाही. त्या विनोदातील अर्थ त्यांना समजावून सांगावा लागतो. बरं इंग्रजी शब्दही खूप माहीत आहेत, असंही नाही. क्लासमध्ये सरांनी वापरलेल्या एका शब्दाचा अर्थ विचारला तर त्यांना सांगता येईलच याची खात्री नाही. मग साला इंग्रजी माध्यमात शिकून काय घंटा मिळवलंत? एक ना धड भाराभर चिंध्या अशी त्यांची गत झालेली असते किंवा तेलही गेले तूपही गेले हाती आले धुपाटणे या सर्वात मध्यम मार्ग म्हणजे सेमी इंग्रजी माध्यम. गणित व विज्ञान हे विषय इंग्रजीत शिकवल्याने त्यासंबंधी अवांतर इंग्रजी वाचनावेळेस फायदा होऊ शकतो. आपला, (मराठी माध्यमात शाळा शिकलेला) अभियंता

दीपा॑जली Sun, 02/03/2008 - 10:35
इ॑ग्रजी माध्यमात शिकण्याचे फायदे आणि तोटेहि आहेत. मी वरदाताईच्या मताशी सहमत आहे. पण काहीही झाल॑ तरीही आपल्या मराठीचा आभिमान मात्र कमी होता कामा नये, हे तितकच॑ महत्वाच॑... - मगो

सख्याहरि Mon, 02/04/2008 - 19:49
माझ्या मते शाळेचे शिक्षण हे मातृभाषेतूनच असावे. माझे काही मित्र इंग्रजी माध्यमात शिकलेले आहेत; त्यांच्याशी बोलताना एक गोष्ट जाणवते की त्यांना मराठी भाषेतील नेहमीच्या वापरातील शब्दसुद्धा माहित नसतात. अभियंता- आपल्याशी १००टक्के सहमत. इंग्रजी शाळेत शिकलेल्या मुलन्मध्ये मत्रुभाषेबद्दल फारसा अभिमान दिसत नाही. शिक्षण हे मातृभाषेतूनच असावे. उपहास आणि कुचेष्टा फार सोपी असते! जिद्द आणि धडपड ह्याला आत्मबळ लागते!! (कुणाचीही चेष्टा करु नका, आयुष्यात कधीतरी अशी आंगलट येईल की बस!) चतुरंगरावांशी सहमत आहे... अघळ पघळ च्या प्रतिक्रीया खेद जनक आहेत. -सख्याहरि

प्रभाकर पेठकर गुरुवार, 02/07/2008 - 18:10
मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलो आहे. ह्यामुळे ज्ञानार्जनात, अर्थार्जनात कधी नुकसान, कमतरता जाणवली नाही. परदेशात (आखाती देशात) कधी कुठली समस्या जाणवली नाही. इंग्लिश बोलणे, समजणे ह्यात कधी अडचण आली नाही. पण इंग्लिश माध्यमातील, (विशेषतः दिल्लीकर) इतर सहकार्‍यांची आक्रमक देहबोली त्रासदायक व्हायची. ह्यांना 'ज्ञान' कमी असले (किंवा अजिबात नसले) तरी ते 'गोर्‍या' साहेबावर छाप पाडायचे. तरी सुद्धा, आमच्या 'तर्खडकरी' इंग्लिशने आम्ही आमचे कचेरीतील महत्त्व टिकवून ठेवले. बरोबरीने बढत्या मिळवल्या, सन्मानाने नोकरी सोडली. असो. माझा मुलगा ६ महिन्याचा असल्यापासून १०वी पर्यंत CBSC शाळेत इंग्लिश माध्यमातून शिकला. घरात आम्ही कटाक्षाने मराठीच बोलायचो. महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमात सक्रिय सहभागी होऊन त्याची भारतीय आणि मराठी सांस्कृतिक जडण घडण केली. दहावी नंतर तो भारतात परतला. तेंव्हा त्याच्या मनात मराठीतून किंवा इंग्लिश मधून संवाद करण्याची भिती नव्हती. किंचित भिती होती ती फक्त इथल्या 'रॅगिंग'ची. पण माझ्या मौलिक सुचनांनी त्याला त्याचाही काही त्रास झाला नाही. एका प्रसंगात, त्याच्यासह, त्याच्या पुण्यात मराठी माध्यमात शिकलेल्या दुसर्‍या एका कॉलेजच्या मित्राचीही दांडी उडाली. झालं असं की, त्याचा तो मित्र त्याला भेटायला एकदा आला असताना माझ्या मुलाला म्हणाला,'अरे भिडू, तुझ्या कॉलेजातही आपली 'वट' आहे हं' माझ्या मुलाला 'वट' हा शब्द नविन होता. साहजिकच त्याने विचारले,' 'वट' म्हणजे काय?' तोही हडबडला...'अरे 'वट' म्हणजे ते असं....म्हणजे.....अरे, .........'वट' म्हणजे 'वऽऽऽऽऽट'........... अरे यार, ते समजावून सांगणं कठीण आहे.' असो. सांगण्याचा उद्देश हा की इंग्लिश माध्यमातून शिक्षण झालं तरी घरातून 'मराठी भाषा आणि संस्कारांचा' कृतीशील आग्रह धरला तर दोन्हीतील समन्वय साधता येतो.

सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 22:49
ही काय भानगड आहे? जो प्रश्न अनिवासींचा आहे तो महाराष्ट्राबाहेरील निवासींना नाही का? आम्ही कांही वर्षापुर्वी भाईंदर्ला राहात होतो. सोसायटितील ११४ फ्लॅटपैकी जेम्तेम १० मराठी होते. आमचा मुलगा कॉनव्हेंटध्ये शिकला. पण संस्कार मराठीच आहेत. घरी पण मराठीत्च बोलतो. तो संपूर्ण मराठी आहे. मी मराठीतून शिकलो. कॉलेजच्या १ ल्या वर्षी माध्यम बदलल्याचे जाणवले देखील नाही. ज्याला एक भाषा व्यवस्थित येते त्याला कोणतीहि भाषा येऊ शकते. मी जेम्स हॅडली चेस, आयर्विंग वॉलेस, ऑर्थर हॅले, इ. च्या कादंब-या, डॅनिअल गोलमनचे इमोशनल इंटेलिजन्स, फ्रीमनचे थे हुमन झू, मिचिओ काकू चे व्हीजन्स इ. पुस्तके वाचली व अजुनहि निवडक इंग्रजी पुस्तके वाचतो. काही प्रश्न येत नाही. थोडक्यात काय? माध्यम महत्वाचे नाही. घरचे संस्कार महत्वाचे. फक्त मराठी क्लासिक ऐवजी इंग्रजी क्लासिक वाचले जाईल. एवढेच. 'उपरा' काय किंवा 'द पर्ल' किंवा 'माय बिलव्हड कंट्री' असो. समाजाची वेदना तीच आहे. ती कळल्याशी कारण. उगीच नसते वाद उअपस्थित करू नये व प्रत्येक साहित्याचा आस्वाद घ्यावा. जर बालकवी कळले तर वर्ड्स्वर्थ देखील कळेल.

सृष्टीलावण्या Mon, 03/10/2008 - 10:05
आजकाल जवळ जवळ सगळ्याच पालका॑ना असे वाटते की आपल्या पाल्याने english medium school ला जावे. त्याला गतानुगतिकता असे ही म्हणतात. मेंढरासारखे जगायचे, लोक जातात त्या पाठून धावायचे. नाहीतर इतर माध्यमात शिकून मोठे (यशस्वी) होता येत नाही असे थोडीच आहे. मधुर भांडारकर, एकनाथ ठाकूर, जयंतराव साळगावकर, मनोहर जोशी, अभय बंग, अब्दुल कलाम, जयंतराव नारळीकर, शंतनुराव किर्लोस्कर अशी अनेक नावे वानगी दाखल देता येतील. त्या॑ना वाटते जे problems ना आपण इ॑ग्रजी येत नाही म्हणून सामोरे गेलो त्याला मुला॑नी सामोरे जाऊ नये. इंग्रजी माध्यमातील इंग्रजी न येणारी आणि मराठी माध्यमातील इंग्रजी उत्तम बोलणारी अशी दोन्ही प्रकारची मुले / माणसे मी पाहिलेली आहेत. शेवटी कुठलीही भाषा शिकायची तर त्यासाठी भाषा आवड हवी. माध्यमाचा संबंध नाही. मी असे वाचले आहे की इश्वरचंद्र विद्यासागर इंग्रजांपेक्षा उत्तम इंग्रजी बोलत. समाजात मराठी तून शिक्षण घेणे कमीपणाचे मानले जाते.त्याचवेळी आज मराठी शाळा पण चा॑गल्या नाहीत. आपल्या कडे म्हण आहे, "लग्न होत नाही म्हणून वेडा आहे आणि वेडा आहे म्हणून लग्न होत नाही". आपण मुलांना मराठी शाळेत पाठवत नाही म्हणून मराठी शाळा चांगल्या नाहीत आणि मग म्हणायचे मराठी शाळा चांगल्या नाहीत म्हणून मुलांना मराठी माध्यमात घालायचे नाही. हे तर दुष्टचक्र आहे. नव्हे हा तर आपलाच दुटप्पीपणा. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

संत ज्ञानेश्वरांनी सर्वांना गीता समजावी म्हणून प्राकृत भाषेत आणली. ती लोकांनी डोक्यावर घेतली कारण ती रोजच्या वापरातील भाषेत होती. असाच प्रयोग इंग्रजी भाषेत झाला आहे. तो लेखक त्याचं लिखाण रोज त्याच्या मोलकरणीला वाचून दाखवत असे, जर तिला समजल तर ठीक अन्यथा तो उतारा पुन्हा लिहिल्या जायचा. लेखकाचे नाव आठवत नाही. तसेही आपण तांत्रिक शब्द इंग्रजीतून का घ्यावे म्हणतो, पण त्यातले कित्येक शब्द मुळात फ्रेंच, जर्मन, ग्रीक किंवा लॅटीन आहेत. त्यावेळी इंग्लिश लोकांनी ते सरळसरळ स्वीकारले. मग आपण का नाही ? जर सामान्यांच्या भाषेत विषय शिकवल्या गेले तरच ते रंजक आणि सोपे होतिल. काही दिवसांनी कंप्युटर आणि त्याचेशी संबंधीत शब्दसुद्धा मराठी शब्द वाटू लागेल यात आश्चर्य नाही.

मनीषा Mon, 03/23/2009 - 10:12
मराठी माध्यम (ज्यांची मातृभाषा मराठी आहे त्यांच्यासाठी )कधीही चांगले. कारण जी व्यवहारातील भाषा आहे तीच शिक्षणाचीही भाषा असणे चांगले असते. पण हल्ली आई वडिल , व्यवसाय किंवा नोकरी निमित्त राज्याबाहेर किंवा परदेशी जातात त्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाखेरीज पर्याय च नसतो. इंग्रजी ही अनिवार्यच आहे पण ८वी-१०वी विज्ञान आणि गणित विषय इंग्रजी माध्यमात शिकवावे ... बाकी विषय मराठी माध्यमात असावे ... इंग्रजी माध्यमातील मुले ही मराठी माध्यमातील मुलांहून काही विशेष / वेगळे करु शकतात असे दिसत नाही . इंग्रजी संभाषण आत्मविश्वासाने करणे हा काही संपूर्ण करिअर साठी प्लस पॉइंट होतो असे नाही . शेवटी शैक्षणिक पात्रता/ योग्यता जास्त महत्वाची ... आणि इंग्रजी संभाषण करण्याची कला आत्मसात करता येते.. काही वेळा सवईने अथवा त्या साठी असलेल्या क्लासेस च्या मदतीने. माझा मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतो . मला सुरुवातीला अनेकदा असे जाणवले कि काही विषय त्याला मराठीतशिकवणे आणि त्याला समजणेही जास्त सोपे झाले असते .

चिरोटा Mon, 03/23/2009 - 10:36
शेवटी कुठलीही भाषा शिकायची तर त्यासाठी भाषा आवड हवी. माध्यमाचा संबंध नाही
बरोबर्.पण भारतात शेवटी डीग्री मिळाल्यावर नोकरीसाठी मुलाखत इन्ग्रजीतुनच होते ना?शिवाय भारतात माणुस किती 'स्मार्ट ' हे शेवटी त्याचे इन्ग्रजी भाषेवर प्रभुत्व किती ह्यावर अवलम्बुन.अर्थात नुसते इन्ग्रजी भाषेवर प्रभुत्व असुन चालत नाही पण इतर पण आवश्यक गोष्टी असाव्या लागतात.भारतिय प्रशासकिय सेवेतिल सर्वात उच्च अशी 'Indian Foreign Service' मध्ये रुजु होणार्या लोकान्ची यादी पाहिलीत तर जवळ्पास सगळिच इन्ग्रजी माध्यमातली(त्यात पण केन्द्रिय विद्यालय) असतात.तीच गोष्ट आय्.आय्.एम मध्ये सामिल होणार्यान्ची.जवळ्पास सर्व इन्ग्रजी माध्यामातले.दहावी नन्तर सर्व अभ्यास्क्रम इन्ग्रजीतुन असल्याने त्याना शिकताना भाषेची अडचण कमी येते. माझ्यामते, आपला पाल्य जर अब्दुल कलाम, जयंतराव नारळीकर वगैरे सारखा असेल तर बिन्दिक्कत कुठल्याही माध्यमात घाला. जर इतरान्सारखच असेल तर इन्ग्रजी माध्यम योग्य. भेन्डि

ऋचा Mon, 03/23/2009 - 11:13
मी पण मराठी माध्यमातुन शिकलेय...अकरावी इंग्रजी मी शास्र शाखा घेतली...सहामाहीत नापास. :( काहीही कळायच नाही मग अगदी पहील्यापासुन सुरुवात करावी लागली कशाला काय म्हणतात इथपासुन.... आणि मी वार्षिक परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास झाले.... मला नाही वाटल इंग्रजी माध्यमात शिकल्याने काही फरक पडत असेल.... "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

In reply to by ऋचा

चिरोटा Mon, 03/23/2009 - 11:40
जर इन्ग्रजी माध्यमातुन शिकला असतात तर भाषा शिकण्याची वेगळी अडचण आली नसती.शेवटी तुमची बुध्धिमत्ता,कष्ट,आवड हे महत्वाचे असतातच पण भाषा कळायला वेळ लागत असेल निराश होण्याची शक्यता असते.मराठीत शिकुन गुणवत्ता यादीत येवुन नन्तर इन्ग्रजीच्या न्युनगन्डामुळे म्हणावी तशी पुढे न आलेली माणसे मी पाहिली आहेत.

नितिन थत्ते Mon, 03/23/2009 - 12:24
आमच्यापुढे एक नवीनच पेच निर्माण झाला आहे. आमची मुलगी पुढील वर्षी ५ वीत जाईल. तिच्या शाळेत आता सेमी इंग्लिश ची टूम निघाली आहे. विज्ञान व गणित हे विषय इंग्रजीतून शिकवणार म्हणे. म्हणजे जे नको म्हणून मराठी माध्यमाच्या शाळेत घातले तेच माथी मारले जात आहे. हे विषय मराठीतून शिकायचे असतील तर दुसरर्‍या तुकडीत जावे लागेल. बघू काय होते ते. खराटा (रंग माझा वेगळा)

अभिरत भिरभि-या Mon, 03/23/2009 - 15:54
वरची चर्चा वाचून मी स्वतःचा व माझ्या परिचयातील वेगवेगळ्या माध्यमातील शिकलेल्या मित्रांचा मनोमन केस स्टडी केला. ):) या सॅम्पल सर्व्हेची काही निरिक्षणे/फायदे/तोटे .. पूर्ण मराठी माध्यम : : यातील फार थोडे पुढे शिकले. जे शिकले त्यांची बुद्धीमत्ता चांगली असली तरी इंग्रजीतून व्यक्त होताना (Expression) समस्या येई. शिवाय ही मंडळी ईश्वरचंद्र विद्यासागर नसल्याने करियरमध्ये देशी माध्यमाचा नाही म्हटला तरी तोटा; किमानपक्षी अडथळा नक्कीच झाला. वर भेंडीबाजार यांनी म्हटल्याप्रमाणे तुमची बुद्धीमत्ता,कष्ट,आवड हे महत्वाचे असतातच पण भाषा कळायला वेळ लागत असेल निराश होण्याची शक्यता असते; हे खरे आहे. त्याचवेळी मराठीतून शिकून पोल्ट्रीसारखे उद्योग सुरू करून चिक्कार पैसा कमावणरी मंडळी माहिती आहेत. आता पोल्ट्रीत विग्रजीपेक्षा मराठी 'भ'कार जास्त कामाला आला असेल ही बाब मान्य :) सेमी-इंग्रजी मी स्वत: या वर्गाचा प्रतिनिधी. प्रार्थमिक शिक्षण मराठीतून झाले व मराठी माध्यमाच्या तुलनेत इंग्रजीचे Exposure चांगले झाल्याने तुलनेने समस्या कमी आल्या. माझ्या पाहण्यातील बहुतेक सर्व सेमीइंग्रजीवाली मंडळींचे करियर उत्तम निभावले आहे. अर्थात स्पोकन इंग्लिशचा प्रॉब्लेम असतोच. फक्त जरा लौकर सुटतो इतकेच. इंग्रजी - नॉन कॉन्व्हेण्ट यांचे दोन उपप्रकार पाहिले आहेत - १ घर का न घाटका टाईप - घरचे मराठी वातावरण किंवा पालकांना शंकासमाधान करण्याइतपत इंग्रजी न येणे यामुळे भरडलेली मंडळी आहेत. मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांची वाट लागलेली असते. २ कॉण्वेण्ट तोडीस तोड - संस्काराने हिंदू पण इंग्रजी प्रभुत्वाच्या बाबतीत कॉण्वेण्टवाल्यांना तोडिस तोड असणारी मंदळी. करियरमध्ये बहुतेकांनी चांगली प्रगती केली हे सांगणे न लगे. कॉन्व्हेण्ट : आम्ही आमच्या संस्कृती/संस्कारांचा वगैरे कितीही डंका पिटला तरी या मंडळींबद्दल थोडासा मत्सर पूर्वीही होता आणि आजही थोडा वाटतोच. या मंदळींचे व्यक्तीमत्व काही वेगळेच घडते किमानपक्षी पांढरपेश्या जॉबमध्ये थोडी Edge मिळते हे नक्कीच. "वट" शब्दाला चांगला प्रतिशब्द कोणता हे सेमीइंग्रजीवाला झटकन सांगेल हे आमचे मत. एकूण जर आईबापास इंग्रजी येत नसेल तर पोराने सेमी-इंग्रजीतच जावे नाहीतर इंग्रजी उत्तम. मराठीच्या अभिमानाकरिता मुलांनी मराठी माध्यमात जावे याला माझी सहमती नाही. पालकांनी आवड लावली तर इंग्रजी माध्यमातील मुलांना देखिल परंपरेचा अभिमान वाटतो हे मी पाहिले आहे. ही मुले इंग्रजी उत्तम बोलू शकत असल्यामुळे त्यांना आयुष्यात भाषिक अडथळे येत नाहीत आणि स्वभाषेच्या परिचयामुळे मुळाशी बांधलेलीही असतात. (हेच का ते Best of both world ?) म्हणून वर चतुरंग, प्राजू आदी मंडळी करत असलेल्या प्रय्त्नांचे कौतुक वाटते. त्याचवेळी मराठीतून शिकलेली पण इंग्रजी येत नसल्यामुआळे जिथेतिथे हिंदी झाडणारी (हरामखोर म्हणाय्ची इच्छा होते आहे) अनेक उदाहरणेही आहेत. मराठीतून शिकल्याने कमीपणा येत नाही पण सर्व जण जयंत नारळीकर किंवा विद्यासागर नसतात हे ही खरे. संस्कार वगैरेंचा माध्यमाशी काहीही संबंध नाही हे आणखी निरिक्षण. ( वाया गेलेली आणि न गेलेली अशी दोन्ही प्रकार सर्व माध्यमात पाहिलेत. ) वरील गोष्टी म्हणजे सार्वित्रीकरण नाही. केवळ मनोमन केलेल्या Sample Survey चे निष्कर्ष आहेत.

मराठी_माणूस Mon, 03/23/2009 - 16:45
ईंग्रजी माध्यमातुन शिक्षण घेतल्यास कदाचीत करीअर मधे फायदा होईल हे गृहीत धरले तरी खालील गोष्टींचे काय * ट्रेन मधे मराठी पेपर न वाचणे * दोन मराठी माणसानी कार्यालयात आपसात मराठी न बोलणे * हॉटेल मधे पंजाबी कींवा दाक्षिणात्य पदार्थ खाणे (मराठी मिळत असले तरी शक्यतो टाळणे) * वेटर, दुकानदार , रीक्षावाले ह्यांच्याशी हींदीत बोलणे * मराठी चीत्रपट न पहाणे , मराठी गाणी न ऐकणे * मराठी साहित्य न वाचणे मराठी असण्याचा न्युनगंड गळुन पडणे आवश्यक आहे, भाषेचे माध्यम ही समस्या त्या मानाने लहान आहे.

In reply to by मराठी_माणूस

* ट्रेन मधे मराठी पेपर न वाचणे तो घरीच चटकन वाचून होतो, वेळ लागतो तो इंग्लीश वाचायला! * दोन मराठी माणसानी कार्यालयात आपसात मराठी न बोलणे उपस्थित असणारा तिसरा, चौथा, पाचवी पुरूष/स्त्री अनुक्रमे बंगाली, आसामी आणि पोलिश असते. * हॉटेल मधे पंजाबी कींवा दाक्षिणात्य पदार्थ खाणे (मराठी मिळत असले तरी शक्यतो टाळणे) घरी जे खाते तेच बाहेर काय खायचं? घरीच बनवून खाल्लं असतं ना! * वेटर, दुकानदार , रीक्षावाले ह्यांच्याशी हींदीत बोलणे कारण त्यांना आपण काय बोलतो ते समजत नाही. मागायचं साधं पाणी आणि वेटर आणायचा बर्फवालं पाणी, असं होण्यापेक्षा माझं भयानक हिंदी वापरलं की मला इच्छित पदार्थ मिळतो, मी इप्सित स्थळी पोहोचते. * मराठी चीत्रपट न पहाणे , मराठी गाणी न ऐकणे "सालीनं केला घोटाळा"सारखे चित्रपट आणि "डोकं फिरलया"सारखी गाणी ऐकण्यापेक्षा मला "शॉशॅंक रिडंप्शन" आणि "भला हुआ मेरी मटकी टूटी रे" सारख्या सुंदर कलाकृतींचा आस्वाद घ्यायला आवडतो. * मराठी साहित्य न वाचणे व्यक्तीगत आवड आणि साहित्यामधला बुद्ध्यांक कमी. सगळी आवड बोजड विषयांत आणि त्यांबद्दलची पुस्तकं फक्त आंग्लभाषेतच असणं. ही माझी व्यक्तीगत (आणि/किंवा विक्षिप्त) उत्तरं. प्रत्येकाच्या बाबतीत हे आणि असंच खरं असतं असा माझा गैरसमज नाही. अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मराठी_माणूस Tue, 03/24/2009 - 07:57
प्रतीसाद वाचुन धन्य झालो आणि मिपा च्या पहील्या पानावारचे खालील वाक्याशी ताळमेळ जुळवण्याचा प्रयत्न करत आहे. अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे.

In reply to by मराठी_माणूस

मला माहित नसलेल्या, माझ्यात असलेल्या न्यूनगंडाची मला ओळख करून दिल्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद करते. अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

गणा मास्तर Mon, 03/23/2009 - 17:00
मराठी माध्यमातुन शिकताना ईंग्रजीचे संभाषण आणि श्रवण कौशल्य विकसित होत नाही, त्यामुळे मराठी माध्यमातुन शिकलेल्या मुलांना न्युनगंड येतो. मराठी शाळांमध्ये ईंग्रजी संभाषण आणि श्रवण कौशल्य विकसित करता आले तर हा प्रश्न सुटेल. वर संजय अभ्यंकर आणि चतुरंग यांनी मांडलेला लहाणपणी कानावर पडाणार्‍या भाषेचा मुद्दा महत्वाचा आहे. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

प्रमोद्_पुणे Mon, 03/23/2009 - 17:56
कायदा आणि निगडीत क्शेत्रामध्ये आन्ग्ल् भाषा चान्गली अवगत असणे फार महत्वाचे आहे. माझे शालेय शिक्शण पूर्ण मराठीतून झाले. त्यामुळे वाणिज्य, कायदा आणि चिटणीस व्यवसायाचे शिक्शण घेताना थोडा (नाही बराच) त्रास झाला. अर्थशास्त्रातील, पिनल कोड मधिल शब्दान्चे अर्थ, त्यान्ची स्पेलीन्ग्स जमत नसत. व्यवसायाच्या ठीकाणी पण आन्ग्ल भाषाच वापरावी लागत असल्याने तिथे सुध्दा सुरुवातीला न्यूनगन्ड येतोच. आणि एखादा मुद्दा पटवून देताना पण आधि मराठीत विचार करून नन्तर त्याचे भाषान्तर करून मान्डावा लागतो. त्यामुळे असे वाटते की इन्ग्रजी माध्यमातून शिक्शण घेतले तर थोडा फायदा नक्कीच झाला असता. कदाचित अभियान्त्रिकी शाखेचे शिक्शण घेताना हा त्रास कमी जाणवत असावा.

अजय भागवत Mon, 03/23/2009 - 21:09
शिक्षणविषयक [बाल व प्रौढ- कोणाचेही असले तरी ] चर्चेत चाईल्ड सायकॉलजीचा उल्लेख अत्यावश्यक ठरतो. काही प्रतिसादकांनी उल्लेखलेल्या शाळांमधे हॉवर्ड गार्ड्नर ह्या चाईल्ड सायकॉलजीस्टच्या मल्टीपल इंटेलिजन्स्च्या सिद्धांतांचा वापर करुन नवी शिक्षणपद्धती विकसत करण्याचा स्तुत्य प्रयत्न चालला आहे. हॉवर्ड गार्ड्नरच्या मते, ■प्रत्येक माणसात इंटेलिजन्सच्या ८ छटा असतात ■प्रत्येक माणसात ह्या ८ इंटेलिजन्सची सरमिसळ झालेली असते व त्याचे एक सर्वस्वी स्वतंत्र असे एक प्रोफ़ाईल असते ■शिक्षण देताना ह्या ८ इंटेलिजन्सची चेतना व्हावी म्हणून त्याप्रमाणे अध्यापन करणे अपेक्षित असते ■प्रत्येक इंटेलिजन्स मेंदूचा एक स्वतंत्र भाग व्यापतो ■८ इंटेलिजन्स एकत्रितपणे अथवा स्वतंत्रपणे कार्यरत राहतात ८ इंटेलिजन्स व मानवाला त्यांची कार्यक्षमता: [मराठीत सगळे भाषांतर करु शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व] १. भाषिक व शाब्दिक: वाचणे, लिहिणे, तारखा पाठे होणे, शब्दांची योग्य निवड व वापर, गोष्टी सांगता येणे २. गणित व तत्वज्ञान: गणितात प्रगती असणे, तत्वज्ञान उत्तम असणे, अडचणींवर उपाय शोधता येण्याची क्षमता (problem-solving) संरचना मांडता येणे, कार्य-कारण ३. Visual / Spatial: Maps, reading charts, drawing, mazes, puzzles, imagining things, visualization ४. Bodily / Kinesthetic: Athletics, dancing, crafts, using tools, acting ५. Musical: Picking up sounds, remembering melodies, rhythms, singing ६. Interpersonal: Leading, organizing, understanding people, communicating, resolving conflicts, selling ७. Intrapersonal: Recognizing strengths and weaknesses, setting goals, understanding self ८. Nauralistic: Understanding nature, making distinctions, identifying flora and fauna मला जेव्हढे चाईल्ड सायकॉलजी कळते त्या त्रोटक माहितीच्या आधाराने मी खालील मते मांडत आहे. ही मते मांडतांना, शिक्षणतज्ञांना/शिक्षकांना येणाऱ्या अडचणींचा पुर्ण आदर आहे. ही सगळी मंडळी आपापल्या क्षेत्रात चांगले कार्य करत असल्यामुळेच आपण आज अनेक देशातील शिक्षणपध्दतीपेक्षा अनेक पटींनी पुढारलेले आहोत. १. सेकंडरी व प्रायमरी शाळांत ह्या सर्व ८ इंटेलिजन्सचा विकास होण्यासाठी बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आढळतो. पण वैयक्तिकपणे एखाद्या मुलांत काय प्रोफाईल आहे त्याप्रमाणे शिक्षण देण्यात अर्थातच अनेक अडचणी असतात. २. तरीही, जर आपण जे विषय शाळेत शिकतो ते पाहिले असता, [२ ते ३ भाषा, इतिहास] असे विषय पाहता ज्यांचा इंटेलिजन्स प्रोफाईल कल भाषिक व शाब्दिक कडे जास्त झुकला आहे त्यांना त्याचा फायदा होतो. [मग त्यांना माध्यम कोणतेही असले तरी झटकन स्वतःला त्याप्रमाणे बदलता येते]. त्यामुळे मराठी माध्यमात शिकुनही शैक्षणिक प्रगती न झालेली मुले किंवा ईंग्लिश माध्यमात शिकुनही प्रगती न झालेली मुले पहावयास मिळतात. ३. गणित हा विषय तर पहिली पासुनच शिकवतात. इंजिनीअरींग, अकौटन्सी, सायन्स ह्या क्षेत्रात गणित, लॉजिकल रिझनिंग हा इंटेलिजन्स नसला की प्रगती होत नाही. मग माध्यम कोणतेही असो. नोकरदार वर्ग प्रामुख्याने वरील इंटेलिजन्स वर अवलंबुन असतो ४. ज्याच्याकडे Interpersonal इंटेलिजन्सही आहे व वरील दोन्ही इंटेलिजन्स आहेत अशी व्यक्ति कोणत्याही माध्यमातून शिक्षण घेतले तरी, व्यावसायिक, इंजिनीअरींग मॅनेजरही यशस्वीपणे होते. पण Interpersonal इंटेलिजन्स आहे पण तो विकसित झाला नाही तर ती क्षमता असली तरी एखादा मागे पडतो ५. Intrapersonal इंटेलिजन्स असलेली मंडळी स्वतःच्या क्षमता ओळखू शकतात व असे लोक कष्टाने काहीही साध्य करु शकतात. अर्थातच तो इंटेलिजन्स लवकरात लवकर विकसित झाला पाहिजे. आपल्याकडे असा इंटेलिजन्स आहे ते त्या व्यक्तिला कळले पाहिजे. वरील उदाहरणांवरुन मला इतकेच म्हणायचे आहे की, जेव्हा आपण म्हणतो की, मराठीत शिक्षण घेतल्यामुळे माझे काहीच अडले नाही तेव्हा त्याची कारणीमिमांसा अधिक खोलवर जाउन केली पाहिजे. असे झाले की, माझा पाल्यही असेच करु शकेल हे म्हणणे योग्य नाही. येणाऱ्या काळात नॉलेज ईंग्लिशमधे जास्तीत जास्त निर्माण होणार असेल तर मुलांना ईंग्लिशवर प्रभुत्व मिळवणे आवश्यक आहे की नाही ते त्याच्या/तिच्या भविश्यातील कार्य्क्षेत्रावर अवलंबुन असेल. हे आधिच कसे कळणार?- हिच गोची आहे व त्यामुळेच आपण गोंधळतो. जर अशा काही टेस्ट असतील की, ज्याने एखाद्यात काय इंटेलिजन्स प्रोफाईल आहे हे समजु शकेल असे असेल तर, ज्यांना भाषिक/शाब्दिक इंटेलिजन्स कमी आहे अशांनी मातृभाषेत शिकावे असे म्हणता येईल का? [वेळे अभावी मला अपेक्षित असलेले लिखाण मी करु शकलो नाही]

मिहिर Mon, 03/23/2009 - 23:13
मराठी माध्यमच उत्तम. ११वीत इंग्रजी माध्यमाशी जमवुन घेताना फारशी अडचण येते असे वाटत नाही

अहो कुठे मराठी माध्यमात घालता. मराठी लुप्त होत चाल्लेली भाषा आहे. पुढच्या काही वर्षात मराठी ही पाली किंवा अर्धमागधी सारखी केवळ विद्यापिठात शिकवायची भाषा म्हणून तरी शिल्लक राहील किंवा हिंदीची एक बोलीभाषा म्हणून शिल्लक राहील. त्या पेक्षा इंग्रजी माध्यमातून शिकवा, कसे? पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

चिरोटा Tue, 03/24/2009 - 11:14
मराठी लुप्त होत चाल्लेली भाषा आहे
ही ओरड गेले अनेक वर्षे आपण ऐकत आहोत्.महाराष्ट्राची लोक्सन्ख्या साडे दहा कोटी, म्हणजे उत्तर प्रदेश्च्या खालोखाल लोकसन्ख्येत महाराश्ट्रचा नम्बर.! आता ह्यातले 'बाहेरचे',भैय्या,मद्रासी,गुज्जु,मारवाडी बाजुला काढले तरी मराठी बोलणारे खुप होतात.तेव्हा मराठी रहाणारच्. चिन्ता नसावी. अवान्तर्-मराठी साहित्य सम्मेलन,कोकण सहित्य सम्मेलन्,विदर्भ साहित्य सम्मेलन्,अखिल भारतिय मराठी साहित्य सम्मेलन.... अशी असन्ख्य साहित्य सम्मेलने. त्यातराजकारण न करता रसभरीत साहित्याची चर्चा करणारे,भाषेला एक वेगळाच दर्जा प्राप्त करुन देणारे आपले साहित्यिक.कोण म्हणतो मराठी भाषा लुप्त होत चालली आहे?

अभिरत भिरभि-या Tue, 03/24/2009 - 12:21
पेशव्यांच्या लिखाणातील उपरोध समजू शकतो. पण मराठी भाषा आणि मराठी माणूस यांचे हितसंबंध जर परस्परविरोधी होत असतील तर दुसरे महत्वाचे ठरावे. थोडे इतिहासात डोकावले असता १९६० दशकात मुंबईतील अनेक पांढरपेशा नोकर्‍या दाक्षिणात्यांनी पटकावल्या होत्या. असे होण्यामागे तत्कालिन मराठी मंडळींपेक्षा दाक्षिणात्यांचे इंग्रजी प्रभुत्व हे एक कारण होते. मराठीच्या नावाखाली इतिहासाची पुनरावृत्ती टाळलेली बरी! केवळ माध्यम मराठी असले म्हणजे पुढच्या पिढीत मराठी भाषा टिकेल असा (गैर)समज आपल्यापैकी बर्‍याच जणांमध्ये दिसतो. "बाहेरच्यांनाही" बघावी/ ऐकावीशी वाटतील असे चित्रपट/गाणी निघाली आणि चांगले साहित्य निघाले तर मराठीची फिकिर करण्याचे कारण नाही. (अवांतर :) माझा एक इंग्रजी माध्यमातील मित्र पुल माझ्यापेक्षा जास्त वाचतो. अभिरत

विसोबा खेचर Mon, 01/28/2008 - 12:46
त्या॑ना वाटते जे problems ना आपण इ॑ग्रजी येत नाही म्हणून सामोरे गेलो त्याला मुला॑नी सामोरे जाऊ नये. सहमत आहे...हल्लीच्या बर्‍याच आईवडिलांना असेच वाटत असावे! समाजात मराठी तून शिक्षण घेणे कमीपणाचे मानले जाते. हम्म! नो कॉमेन्टस... त्याचवेळी आज मराठी शाळा पण चा॑गल्या नाहीत. सहमत आहे.... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

नितिन थत्ते Tue, 03/24/2009 - 13:54
हे तात्यांच्या प्रतिसादाला उत्तर नाही पण वर दिसावे म्हणून इथे लिहिले आहे खाली जे प्रतिसाद आले आहेत त्यातल्या दोन गोष्टी खटकल्या. १. हा विषय आपल्याच राज्यात राहणार्‍या लोकांनाच लागू आहे. पण प्रतिसादात अनिवासी / निवासी वाद उगीच आला आहे. २. त्याचप्रमाणे संस्कृती टिकवणे हा अनावश्यक विषय आला आहे. म्हणजे इंग्रजी शाळेत जाण्याने संस्कृती बुडते की नाही असा उगाच प्रश्न निर्माण करून त्यावर चर्चा झाली आहे. त्यात संस्कार टिकवून ठेवणार्‍या इंग्रजी शाळांची भलामण केली आहे. खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

मराठी_माणूस Tue, 03/24/2009 - 14:15
१.मुळात चर्चेचा प्रस्ताव हा ईथल्या (महाराष्ट्रातल्या) शाळेच्या माध्यमा संबंधात आहे , त्यामुळे भारता बाहेर काय आहे , काय केले जाते हे अप्रस्तुत. त्या साठी वेगळा धागा उघडला जाउ शकतो. इथे वाद घालणे हे व्यर्थ आहे.

झकासराव Mon, 01/28/2008 - 17:44
माझ्या मनातील अगदी खरखुर आहे की माझ्या मुलाने मराठी शाळेतच शिकाव. इंग्रजी बोलणे किंवा त्यातुन संभाषण साधणे हे कधीही शिकु शकतो माणुस त्याच्या नंतरच्या आयुष्यात. पण सध्याच्या काळात एक अडचण आहे ती म्हणजे नोकरीची. जग हे एक खेडं बनल आहे. आणि तुम्हाला कधी उत्तम संधी येइल आणि तुम्ही कधी हा देश किंवा राज्य सोडुन जाल ह्याचीखात्री नाही. (तशीच नोकर्‍यांची देखिल खात्री नाही हो) अशावेळी मराठी माध्यमाच्या मुलांना त्रास होउ शकतो. उदा. महाराष्ट्रात राहणार्‍या एखाद्याला जर दिल्लीत नोकरी मिळाली तर तिथे मराठी माध्यमाची शाळा नसणार. हाच त्रास अजुन मोठा होइल जर अशी व्यक्ती जर बाहेरच्या देशात गेली तर. आतापर्यंत मराठी माध्यमात शिकलेल तिकडे कितपत स्वीकारले जाइल???? त्यात मुलाच्या शैक्षणिक वर्षाच नुकसान होउ शकतं असा अनुभव कोणाला आहे का???? ह्यावर उपाय काय आहे??? राहिली गोष्ट मराठी माध्यमातल्या उत्तम शाळांची. तर अशा शाळा आहेत भले त्या कमी असतील पण आहेत. मी स्वतः ह्या शाळेत शिकलो ती मराठी माध्यमातली शाळा होती. आमची शाळा फार नावाजलेली नव्हतीच (म्हणजे विद्यार्थी बोर्डात येणे वै) पण त्या शाळेत देखिल चांगल शिक्षणच मिळाल की. :) उलट माझा अनुभव असा आहे की इन्ग्रजी माध्यमातली बरीचशी मुल दहावीपर्यंतच जे जे नको करायला ते करुन बसलेली असतात. (उदा सिगारेट, दारु )

धमाल मुलगा Mon, 01/28/2008 - 18:24
मी स्वतः मराठी माध्यमाच्या शाळेतच शिकलो, शाळाही चा॑गली होती, पण...ते ई॑ग्रजी अन् १० वी न॑तरच्या अभ्यासाच॑ ई॑ग्लिश ह्यात ई॑ग्रजी अन् ई॑ग्लिश इतकाच फरक असतो, हे ११वी सरल्यावर जाणवल॑ (तिर्थरुपा॑ना! अस्मादिका॑स हा दिव्य साक्षात्कार ११वीच्या पहिल्या दिवशीच पहिल्या तासात घडला होता.). वरच्या प्रतिसादा॑शी पूर्ण सहमत. पण, एकच गोष्ट...जे॑व्हा ही ई॑ग्लिश माध्यमाची पोर॑ आपल्या आईबापाला एखादा अस्सल म्हराठमोळ्या गोष्टी॑स॑दर्भात प्रश्न करतात, तेव्हा त्या॑ना उत्तर ई॑ग्लिशमध्येच द्याव॑ लागत॑ नाहीतर काही झेपत नाही बिचार्‍या॑ना. मराठीत सा॑गितल॑ तर पाssर फापलतात पोर॑ ! त्या॑नी हार्डी बॉईज चे सगळे भाग वाचलेले असतात, पण फास्टर फेणे कोण ते मात्र माहित नसत॑. जरा मोठे झाले की सिडने शेल्डन अन् रॉबर्ट लुडलुम फाड्फाड तो॑डावर फेकतात, पण बाबासाहेब पुर॑दरे राजाशिवछत्रपतिमध्ये काय लिहितात ते "really too tough to understand bro". कदाचित मीही माझ्या मुला॑ना ई॑ग्लिश माध्यमातून शिकायला लावेन, पण ह्या गोष्टी॑ची कशी काळजी घेईन ते मात्र अजुनतरी समजलेल॑ नाही. -(सध्यातरी ह्या प्रश्नापासून दूर..) धमाल.

गणित, विज्ञान किंवा तत्सम विषय असे आहेत कि, त्यांतील संकल्पना, आपल्या रोजच्या जीवनातील गोष्टींशी सांगड घालून जास्त चांगल्या शिकता येतात. त्यामुळे लहानपणीपासूनच या विषयांचा अभ्यास प्रगल्भतेने करता येउन, त्यांची भिती दूर होणेच नव्हे तर, या विषयांत काहि असामान्य करण्याची ताकद प्राप्त होउ शकते. पण आपल्या रोजच्या जीवनातील गोष्टीं - संभाषणे हि मात्रुभाषेत होत असल्याने शिक्षण मात्रुभाषेतच घेणे योग्य, असे मला वाटते. कारण कोणताहि विषय शिकताना, परिक्षेत गुण मिळवण्यासाठी नव्हे तर त्या विषयाशी संबंधित, मेंदूचा भाग, पायरी - पायरीने प्रगत करायचा हा मूळ हेतू असला पाहिजे. उदा. गणित शिकताना - तार्किक / संख्याशास्त्रिय प्रगति ( मेंदूचा डावा भाग - statistical brain) . मात्रुभाषेतून शिक्षण घेताना हे जास्त सहजपणे साध्य करता येउ शकते. नाहितर एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था व्हायची. इंग्रजीतून सराईतपणे बोलणे इ. साध्य करण्याचे योग्य मार्गदर्शन मिळवून, तो एक विषयही चांगला करता येउ शकतो.

धोंडोपंत Mon, 01/28/2008 - 19:26
आम्हाला इंग्रजी माध्यमाची भीति नाही. पण लोक इंग्रजी माध्यम आणि कॉनव्हेंट यातील फरक न समजता मुलांना त्या शाळेत घालतात याची भीति आहे. इंडियन एज्युकेशन सोसायटी सारख्या संस्थांच्या शाळेत माध्यम इंग्रजी असले तरी संस्कार हिंदू असतात. आमची दोन्ही मुले इंग्रजी माध्यमातून शिकतात पण शाळेतील संस्कार हे आपलेच आहेत. या उलट कॉनव्हेंट शाळा मुलांना आपली संस्कृती विसरायला लावून त्यांचे परिवर्तन त्यांच्या अनुकूलतेनुसार करतात. यावर आमचा आक्षेप आहे. आपला, (सावध) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

केशवसुमार Tue, 01/29/2008 - 20:39
आम्हाला इंग्रजी माध्यमाची भीति नाही......या उलट कॉनव्हेंट शाळा मुलांना आपली संस्कृती विसरायला लावून त्यांचे परिवर्तन त्यांच्या अनुकूलतेनुसार करतात. यावर आमचा आक्षेप ......१००% सहमत.. (मराठी माध्यमात शिकलेला ) केशवसुमार

ऋषिकेश Mon, 01/28/2008 - 19:41
याच प्रश्नावर उत्तर म्हणून सेमी इंग्रजी माध्यमे शाळांशाळांत आहेत. जेव्हा मी एस. एस. सी झालो ती माझी आमच्या शाळेची पहिली सेमी इंग्लीश बॅच होती. पण आता बर्‍याच शाळांत हि पद्धत आहे. (८वी तेदहावी) सेमी इंग्लिश म्हणजे विज्ञान आणि गणित हे विषय इंग्रजीतून तर इतिहास, भूगोल आदि विषय मराठीतून शिकलो. मला तरी याचा वैयक्तीक रित्या खूप फायदा झाला. त्यात माझा १०० मार्कांचं संस्कृत असल्याने एकावेळी तीन भाषा शिकल्या जायच्या. (सेमी इंग्लिश मर्‍हाटी) ऋषिकेश

प्राजु Mon, 01/28/2008 - 20:04
धोंडोपंतांनी जे लिहिले आहे ते अगदी खरे आहे. इंग्रजी माध्यमाची शाळा आणि कॉन्हेंट यामध्ये खूप फरक आहे. इंडियन एज्युकेशन सोसायटी सारख्या संस्थांच्या शाळेत माध्यम इंग्रजी असले तरी संस्कार हिंदू असतात. अगदी खरं.. प्राजु

संजय अभ्यंकर Mon, 01/28/2008 - 20:26
मी नेहमी मातृभाषेच्या शिक्षणाचा पुरस्कार करतो. माझ्या मुलाला इंग्रजी शाळेत घालायची आमच्या पत्नीची फार इच्छा होती. तीला मी एकच प्रश्न विचारला: तुला बे चा पाढा इंग्रजीतून येतो का? तिने नकारार्थी मान हलवली, मी म्हटले, मलाही येत नाही, मग त्या बालका वर अत्याचार कशाला? मुलाला मराठी शाळेत घातले. मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात अनेक उत्तम मराठी शाळा आहेत. ज्यांच्या नोकर्‍या बदलीच्या आहेत, ते सोडले तर इतरांनी मराठी शाळे बद्दल चिंता करण्याचे कारण नाही. मातृभाषेच्या शिक्षणाबद्दल अकारण भिती बाळगण्याचे कारण नाही. उत्तम इंग्रजी येण्यासाठी, भरपूर अवांतर वाचन (इंग्रजी व मातृभाषेतून) आवश्यक आहे. इंग्रजी शाळांतुन शिकलेली मुले, इ. ११वी पासुन पुढे भेटु लागली, तेव्हा हे जाणवले. केवळ आमच्यापेक्षा चांगले इं. ते बोलत असत, परंतु, सामान्या ज्ञानात, आम्ही त्यांच्यापेक्षा कांकणभर पुढेच होतो. इं. भाषा बोलण्यातही आम्ही त्यांनां लवकरच गाठले. मातृभाषेच्या शिक्षणाबद्दल जगातल्या शिक्षणतज्ञांचे काही निष्कर्ष पुढील प्रमाणे: १. जगातले काही देश इतर देशांपेक्षा जास्त प्रगत का करु शकले? कारण ह्या देशांनी प्राथमिक शिक्षण मातृभाषेतुन दिले. पारंपरीक उदा.: अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रांस, इटाली, स्पेन इ. आधुनिक उदा.: जापान, चीन, कोरिया, तैवान, ब्राझिल इ. २. मुल जन्माला आल्यापासुन शाळेत जायला लगे पर्यंत, त्याच्या कानावर सतत पडणारी भाषा ही त्याची मातृभाषा होय. शाळेत जायला लागे पर्यंत ह्या मातृभाषेचा त्याच शब्दसंग्रह शेकडा ते हजार शब्दांपर्यंत असतो. जी भाषा तो बोलु व समजु शकतो, ती भाषा जर त्याच्या शिक्षणाचीही भाषा असेल, तर शाळेत त्याला केवळ त्या बोलीभाषेची लिखित अक्षरांशी सांगड घालावी लागते. आणी मातृभाषेत शिकणारे मुल भराभर शिकते, कारण, जितके वय लहान तितका आकलनाचा वेग ज्यास्त. इंग्रजी भाषामात्र मुलास ध्वनी आणि लिखित, दोन्हि स्वरुपात शिकावी लागते. जे त्याच्या मेंदूचे काम वाढवते. वरिल मुद्दांवर अनेकांनी माझ्याशी अनेकवेळा वाद घातले आहेत. प्रत्येकाची आपली विचारसरणी आहे आणी तीचा मी आदर करतो. संजय अभ्यंकर

चतुरंग Mon, 01/28/2008 - 20:54
इयत्ता पाचवी पर्यंत माध्यम हे ज्या त्या मातृभाषेतीलच असावे ह्या मताचा मी आहे. मी स्वतः मराठीतूनच शिकलो. इंग्लिश पाचवीत पहिल्यांदा आलं. मला कुठेही न्यूनगंड जाणवलेला नाही. उलट एकप्रकारचा वेगळा आत्मविश्वास असतो जेव्हा आपल्या भाषेशी आपली जवळीक असते. (आणि हा फक्त माझा एकट्याचा अनुभव नाहिये. आमच्या १०वी च्या वर्गाचं सम्मेलन मागच्या वर्षी भरलं होतं तेव्हा ह्यावर छोटी बातचीत झाली. जवळजवळ सर्वांचे (वर्गातल्या ४०-५० जणांचे) असेच मत होते. कित्येक जण आपापल्या क्षेत्रात अतिशय उच्च कामगिरी करत आहेत.) मूल वयाच्या ६ वर्षांपर्यंत बराच काळ घरात असते. त्याच्या कानावर जी भाषा येते तीच ते आत्मसात करते. ते त्याच भाषेतून बोलायला शिकते. त्याच्या आजूबाजूचे सगळे व्यवहार त्याच भाषेत होत असतात. आपण संपर्क साधू शकतो, बोलू शकतो आणि आपलं बोलणं समजून त्याला प्रतिसाद मिळतो ही एक प्रक्रिया आहे आणि तीच त्या बालकाचा आत्मविश्वास वाढवत असते. एकदा मातृभाषेशी अनुसंधान आले की बाकी कोणताही विषय अवघड नाही. अगदी शास्त्र व गणिताचा मार्ग सुध्दा भाषेतूनच जातो. मूलभूत संकल्पना नीट समजण्यासाठी मातृभाषेचाच आधार चांगला. एकाएकी शाळेत इंग्लिश सुरु झाले तर मुलं गोंधळून जातात आणि शिकण्यावर बंधने येतात. (आणि धोंडोपंत म्हणतात तसे संस्कारही आपले नसले तर मग विचारायलाच नको!) मी अमेरिकेत आहे त्यामुळे माझ्या मुलाला इंग्लिश मधून शिकावे लागते पण त्याची कमतरता मी मराठीतूनच बोलून भरुन काढण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. त्यामुळे तो मराठी उत्तम समजू व बोलू शकतो. करंगळी, टाच, खिळा, थालीपीठ, मोदक म्हणजे नक्की काय हे त्याला कळतात. परवाचा, त्यानंतर असे शब्द तो योग्य जागी व्यवस्थित वापरतो. आजी आजोबांशी फोनवर मराठीतून बोलतो. त्याला शाळेत स्पॅनिशदेखील शिकवतात आणि त्याने ती ही भाषा व्यवस्थित आत्मसात करायला सुरुवात केली आहे. प्रत्येक नवीन मराठी शब्दाचा अर्थ तो विचारतोच आणि मी देखील न कंटाळता तो सांगायचा प्रयत्न करतो. (माझी बायकोदेखील हे सर्व करत असते.) हे उदाहरण मोठेपणा सांगण्यासाठी दिलेले नसून स्वानुभवाचे असल्याने दिले आहे. ह्या विषयावर जगभरात बरेच संशोधन झाले आहे. युनेस्कोच्या संकेतस्थळावरील एक दुवा इथे देत आहे. http://portal.unesco.org/education/en/ev.php-URL_ID=38921&URL_DO=DO_TOPIC&URL_SECTION=201.html आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात भाषाशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. अशोक रा. केळकर हे ह्या विषयातले अधिकारी आहेत. जिज्ञासूंनी त्यांचे ह्या विषयावरील लिखाण वाचावे. चतुरंग

In reply to by चतुरंग

अघळ पघळ Tue, 01/29/2008 - 09:30
आपला मुलगा आजी आजोबांशी मराठीत बोलतो ह्याचे आईवडीलांना कौतुक वाटते. उद्या तो आपल्या आई वडीलांशी 'बोलतो' ह्याचे देखिल त्यांना कौतुक वाटेल. अवांतर : 'परवाचा' म्हणजे काय हे मला देखिल कळले नाही ते आपल्या लहानग्याला समजते हे पाहून तुमचे कौतुक वाटले.

In reply to by अघळ पघळ

चतुरंग Tue, 01/29/2008 - 20:07
आपण कुठे राहता कल्पना नाही (म्हणजे भारतात की बाहेर) पण बहुदा भारतात असावे. कारण त्या शिवाय परदेशात राहूनही आपली भाषा टिकवण्याची मराठी माणसाची धडपड आपल्याला समजणे अशक्य आहे. ज्या मुलांच्या कानावर, ती घरातून बाहेर पडल्यावर दिवसाचे १० ते १२ तास फक्त इंग्लिश येते, त्यांच्या मनात मातृभाषेबद्दल प्रेम निर्माण करून ते टिकवून ठेवणे ह्याला काय कष्ट पडतात ते जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे! उपहास आणि कुचेष्टा फार सोपी असते! जिद्द आणि धडपड ह्याला आत्मबळ लागते!! (कुणाचीही चेष्टा करु नका, आयुष्यात कधीतरी अशी आंगलट येईल की बस!) 'परवाचा' = म्हणजे काल, आज, उद्या, परवा यातला. चतुरंग

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर Tue, 01/29/2008 - 23:22
उपहास आणि कुचेष्टा फार सोपी असते! जिद्द आणि धडपड ह्याला आत्मबळ लागते!! क्या बात है.. वाक्य फार आवडले! (कुणाचीही चेष्टा करु नका, आयुष्यात कधीतरी अशी आंगलट येईल की बस!) हम्म! खरं आहे...! तात्या.

प्राजु Tue, 01/29/2008 - 20:28
बोलणे सोपे असते. उचलली जीभ आणी लावली.... चतुरंग यांचे मत अगदी योग्य आहे. परदेशात राहून मातृभाषा टिकवणे किती कठीण असते त्यासाठी काय काय करावे लागते हे आपल्यासारख्या लोकांना नाहि कळणार. आणि आपण मराठी असूनही आणि (जर) महराष्ट्रात राहत असूनही आपल्याला परवाचा म्हणजे काय हे माहिती नसेल तर आपल्या तथाकथित सामान्य ज्ञानाचे कौतुक वाटते, अघळपघळराव. माझा मुलगा शाळेत जातो. ४ वर्षाचा आहे. उत्तम इंग्रजी आणि मराठी बोलतो. त्याला श्लोक येतात. मारूतीस्तोत्र येतं. गणपतीस्तोस्त्र येतं. मराठी त्याला बाहेर शाळेत कोणी नाही शिकवणार. आणि मी कितीही नाही म्हंटलं तरी तो बाहेर इंग्लिशच बोलणार हे नक्की आहे आणि ते ही न शिकवता, याची पूर्ण जाणिव आहे मला. यु-ट्यूब वर फाऊंटन च्या खूप मराठीतून गोष्टी आहेत. पंचतंत्रातल्या, इसापनितीतल्या. तो मन लावून ऐकतो, पाहतो. कित्तीतरी बालगीते आहेत तिथे मराठीतून, ती ही त्याला आवडतात. बिरबल बादशहाची गोष्ट तो अगदी नीट सांगतो आणि ती हि मराठीतून. आणि त्याला ही आवड आम्ही निर्माण केली आहे हे मला इथे अभिमानाने सांगावेसे वाटते. भारतात गेल्यावर सगळी मराठी बोलत असताना त्याला फक्त ऐकण्याचे काम नाही करावे लागणार, तो ही त्याच्या वयाच्या मुलांमध्ये समजून मराठीतून संवाद साधू शकेल याची खात्री आहे मला. - प्राजु.

In reply to by प्राजु

चतुरंग Tue, 01/29/2008 - 20:40
प्राजुताई. जिद्दीने काम करणारे लोक आपल्याबरोबर आहेत हे बघून हुरुप वाढला. यू-ट्यूब वरील माहितीबद्द्ल धन्यवाद. आता मी त्या गोष्टी माझ्या मुलाला दाखवीन. चतुरंग

In reply to by प्राजु

अघळ पघळ Wed, 01/30/2008 - 08:22
आपल्या मातृभाषेला जगवण्यासाठी परदेशात राहून अनुक्रमे चतुरंग,प्राजु, आणि स्वाती राजेश करत असलेले प्रयत्न बघून थक्क झालो. आमच्या कचेरितला बरीच वर्षे तिकडे असणारा एक सहकारी मला सांगत होता त्यांचा ६ वर्षाचा तर म्हणे हॉटेलात जेवायला गेल्यावर आईबाबा ऑर्डर करायला लागले तर वेटरला 'नो बीफ हं!!' अस ठणकावून सांगतो! तेव्हाही मी असाच भारावून गेलो होतो. अहो आपली संस्कृती आपली भाषा हे टीकवण्याची केवढी मोठी जवाबदारी अनिवासी भारतीयांवर आहे. त्यांना सॉफ्ट टारगेट करण्याच्या टारगटपणा करणार्‍यांचा मी देखिल निषेध करतो. अवांतर: काल, परवा, उद्या असे शब्द माहित आहेत हो पण एकदम विनासंदर्भ 'परवाचा' असा शब्द ऐकल्यावर तो समजायला आमच्या सामान्य आकलनशक्तिला जरा जडंच गेला. जसे आंबा पेरू चिक्कू हे शब्द लगेच कळतात पण उद्या कुणी 'पेरुचा' म्हणजे काय विचारल तर माझा गोंधळ उडतो हो. आता जरा यू ट्यूब लावून बसतो.. ह्या नव्या पिढीने आम्हाला पारंच गारद केले आहे हो!

In reply to by अघळ पघळ

चतुरंग Wed, 01/30/2008 - 17:36
अघळपघळराव, कूपमंडूक वृत्ती असेल ना तर मग चर्चा करण्यात काही अर्थ नसतो. इथे विषय चालला आहे मुलांचे शिक्षणाचे माध्यम, आणि तुमचं आपलं भलतच! अहो तुम्हाला जर अनिवासियां बद्द्ल एवढीच मळमळ असेल ना तर त्याबद्द्ल एखादी वेगळी वैचारिक चर्चा का नाही करत? उगीच इकडे तिकडे ओकार्‍या करत हिंडू नका! चतुरंग

In reply to by विसोबा खेचर

अघळ पघळ Wed, 01/30/2008 - 22:03
निरिक्षक तात्या, इथले मॉडरेटर तुम्हीच ना? तो चतुरंग वैयक्तिक पातळीवर घसरुन आमच्या लेखनाला ओकार्‍या वगैरे म्हणत आहे. त्यावर तुम्ही मॉडरेटर म्हणून सहमती देखिल दाखवली आहे. तेव्हा आम्ही पण थोडे वैयक्तिक पातळीवर उतरलो आहोत. तरी फक्त आमचे प्रतिसाद उडवून आमच्यावर अन्याय करणार नाहीत ही अपेक्षा! -(सुस्पष्ट) अघळ पघळ

In reply to by चतुरंग

अघळ पघळ Wed, 01/30/2008 - 22:00
अरे माझ्या चतुरंग्या, जिथे तिथे अनिवासी भारतीयांच्या नावाने टाळ तू कुटतोस. इथं पण अनिवासी भारतीयांच्या नावाने हगायला तू सुरू केलेस आणि वर तुला माझे लेखन ओकर्‍या वाटते होय? अमेरिकेत आहेस ना? एखाद्या चांगल्या मनोविकार तज्ञाला दाखवून घे स्वत:ला. हवंतर पैसे मी पाठवतो इथनं! (कुपमंडूक) अघळ पघळ

In reply to by अघळ पघळ

विसोबा खेचर Wed, 01/30/2008 - 22:57
अघळपघळ आणि चतुरंग या दोघांनी एकमेकांवर वैयक्तिक शेरेबाजी केली आहे. दोघांचेही प्रतिसाद ठेवत आहे. परंतु आता पुरे! :) या पुढील वैयक्तिक शेरे असलेले दोघांचेही लेखन उडवून लावले जाईल तेव्हा कृपया लिहायचे कष्ट घेऊ नयेत. या पुढे दोघांनीही एकमेकांवर वैयक्तिक शेरेबाजीकरण्याकरता पोष्टकार्डाचा किंवा एकमेकांच्या खरडवह्यांचा यथेच्छ वापर करावा ही नम्र विनंती... तात्या.

In reply to by प्राजु

कौटील्य Wed, 01/30/2008 - 18:44
आपले अभिनंदन माझ्या काही अनिवासी मित्रांनी सुचविले म्हणुन मी एक वेबसाइट चालु केली http://www.pujaarcha.com/ यात तुम्हाला काही उपयुक्त मिळाले तर बघा समजा काही तुम्हाला लागेल व ते उपलब्ध नसेल होत तर कळवा आम्ही ते साइटवर देण्याचा प्रयत्न करु

स्वाती राजेश Tue, 01/29/2008 - 22:06
प्राजु आणि चतुरंग यांच्याशी मी सहमत आहे. आपला मुलगा परदेशात राहून सुद्धा मराठीत बोलतो याचे कौतुकच वाटायला पाहिजे. कारण परदेशात मुलांना मराठी शिकवायला किती कष्ट करावे लागतात ते मला महिती आहे. माझा मुलगा इयत्ता ६ वी त( वय वर्षे ११) आहे. तो मराठी आणि हिंदी व्यवस्थित लिहितो, वाचतो. अस्खलित बोलतो सुद्धा.याचा मला काय्,माझ्या भारतातील सर्व नातेवाइकांना अभिमान आहे. यामागे त्याचे स्वतःचे कष्ट आहेत पण त्याचबरोबरीने आई/वडिलांचे सुद्धा आहेत. तो घरी मराठी बोलतो .हिंदी ,मराठी सिनेमा तो एंजॉय करतो. तसेच इथे घराबाहेर पडले इंग्रजी( ब्रिटीश accent ने) येथील लोकांशी बोलतो. शाळेत इंग्रजी & स्पॅनिश आहे.मला खात्री आहे कि जरी परत भारतात आले तरी शाळेत अथवा इतर कोठेही त्याला भाषेचा प्रश्न येणार नाही. कारण मी पाहिले आहे कि भारतात सुद्धा कितीतरी आई/वडिल आपल्या मुलाशी इंग्रजीतून बोलतात कारण का तर त्याला शाळेत, मित्रांशी बोलताना सवय व्हावी म्हणून. घरी सुद्धा इंग्रजीतून....? मग आम्ही भारताबाहेर राहून सुद्धा मुलांना स्तोत्रे, श्लोक शिकवतो याचा आम्हाला अभिमान आहे. भारतात काही पालक मुलांना संस्कार शिबिरात घालतात, काहींना आजी/आजोबा शिकवतात. ते सर्व आम्ही (आई/वडिल)मुलांना शिकवतो. याचा आम्हाला अभिमान आहे. हल्ली अनिवासी भारतीयांवर फारच बोलले जाते आहे....याचे कारण?

चतुरंग Tue, 01/29/2008 - 22:27
हल्ली अनिवासी भारतीयांवर फारच बोलले जाते आहे....याचे कारण? मला वाटते हे एक सॉफ्ट टारगेट आहे. राजकारणात कोणताही प्रश्न आला की "ह्यात परकीय शक्तींचा हात आहे!" असे म्हणतात ना, त्याप्रमाणे सगळ्या संस्कृती विषयक प्रश्नांना अनिवासी भारतीय जबाबदार! अवांतर - अनिवासी भारतीयसुध्दा ह्याला काही प्रमाणात जबाबदार आहेत, नाही असे नाही. माझ्या माहितीत असे बरेच लोक इथे आहेत की जे त्यांच्या बोलण्यात ह्या ना त्या प्रकारे भारतातील व्यवस्थे बाबत तक्रारींचा सूर लावतात. त्यांचे मन भारतात ओढ घेत असते पण ते मान्य करण्याची त्यांना लाज वाटत असावी बहुदा. तुम्ही इथे राहता आहात हे ठीक पण त्यासाठी भारताला नावे ठेवण्याचे काहीही कारण नाही, ही भूमिका मी त्यांच्यासमोर घेतो. अशाने माझे काही संपर्क हळूहळू तुटलेही आहेत पण मला ते चांगलेच वाटते कारण जे आपल्या मूल्यांविरुध्द आहे ते गेलेलेच बरे! असो. पण अशा लोकांच्या भारत भेटी च्या वेळी त्यांच्या बोलण्याचे भारतद्वेष्टे संदर्भ हे तिथल्या असंतुष्टांसाठी कोलितच ठरते! त्यांना भारताबद्द्ल फार प्रेम असेल असे नाही, पण मग "बाहेरुन" आलेले लोक हे वाईट असा सरसकट निष्कर्ष काढला जातो!! तेव्हा आपली बूज आपणच राखायची असते असे ध्यानात ठेवावे लागते. चतुरंग

प्राजु Wed, 01/30/2008 - 00:19
काहीही झालं की टार्गेट आपली अनिवासी भारतीय... हातात कोलीत मिळाल्यासारखं अनिवासी भारतीयांच्या डोक्यावर खापर फोडायचं.. यापेक्षा आपण आपल्या मुलांना किती आणि काय शिकवता याकडे लक्ष द्या असेच मी सांगेन. जी शक्ती अनिवासी भारतीयांवर टीका करण्यात व्यर्थ जाते ती तुमच्या मुलांना मराठीचे धडे देण्याच्या सत्कारणी लावा. - प्राजु.

मनिष Wed, 01/30/2008 - 11:57
@धोंडोपंत - सहमत - इंडियन एज्युकेशन सोसायटी सारख्या संस्थांच्या शाळेत माध्यम इंग्रजी असले तरी संस्कार हिंदू असतात. चतुरंग - दुव्याबद्द्ल शतशः धन्यवाद. "रमेश पानसे" हे देखील शालेय शिक्षण हया विषयावर बरेच संशोधन, लिखाण करत असतात. अक्षरनंदन ही पुण्यातील एक दर्जेदार, वेगळी मराठी शा़ळा आहे असे ऐकून आहे. कोल्हापुरातही अशीच एक शाळा आहे, पण नाव आठवत नाही. UK मधे अर्थातच 'समरहिल' ही अतिशय वेगळी आणि सर्वार्थाने legendary म्हणता येइल अशी शाळा आहे. पण किती पालकांना त्या मागील विचार उमगतील आणि आचरणात आणता येतील हा प्रश्नच आहे. "तारे जमींन पर" आवडणे वेगळे आणि तसे विचार आचरणात आणणे वेगळे. असो! 'समरहिल' विषयी इथे वाचता येईल - http://www.deccanherald.com/Content/Nov222007/dheducation2007112136940.asp At a time when schools have become giant factories churning out kids who must fit into the present order, who cooperate smoothly, and who consume more and more, Summerhill, which has been in existence since 1921, has shown the world that a school could abolish fear of teachers and adults and, deeper down, fear of life, writes Arvind Gupta. - मनिष

In reply to by अन्या दातार

चतुरंग Wed, 01/30/2008 - 23:15
ते "सृजन आनंदच"! ठाण्याजवळ "ऐना" ह्या गावात "ग्राम-मंगल" आहे. डॉ. अनुताई वाघ यांनी ती सुरु केली. त्या शाळेची कीर्ती हळूहळू पसरते आहे. त्यांनी तयार केलेली अतिशय सुंदर आणि तरीही स्वस्त खेळणी माझ्याकडे आहेत. पुण्यातही ती मिळतात. वरील दुव्यात पुण्याचाही पत्ता मिळेल. चतुरंग

अवलिया Wed, 01/30/2008 - 18:27
"आम्ही आमच्या घरी मराठी कल्चर प्रिझर्व केलेय , एव्हरी संडेला आम्ही मिल्क राइस खातो" - हे वाक्य ऋषीतुल्य गोनीदांच्या नातेचे आहे. कीव कराविशी वाटते अशा निवासी अभारतीयांची; असो पुन्हा सांगतो भाषा दुय्यम आहे संस्कार विचार मह्त्वाचे नाना

In reply to by अवलिया

सूहास Tue, 03/24/2009 - 14:19
भाषा दुय्यम आहे संस्कार विचार मह्त्वाचे हे वाक्य मी ढापतोय्.पे॑टट तर नाही ना !! सुहास.. (द गुड)

'आपला मुलगा आजी आजोबांशी मराठीत बोलतो ह्याचे आईवडीलांना कौतुक वाटते. उद्या तो आपल्या आई वडीलांशी 'बोलतो' ह्याचे देखिल त्यांना कौतुक वाटेल.' या वाक्याचा मतितार्थ पुण्यात राहील्याखेरीज नाही कळणार. तथाकथित आधुनिक पालक आपल्या पाल्याला 'गुड बॉय' म्हणून गौरवितात त्यांची मला फार कीव येते. मराठीची थोर उपेक्षा पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरी व्हावी यासारखे दु:ख नाही. अघळपघळरावांचे हे वाक्य अनिवासी नाही तर निवासी भारतीयांना जास्त लागू आहे असे वाटते. पुण्याचे पेशवे

वरदा Wed, 01/30/2008 - 22:52
खूप छान विषय आहे. इथे मुलांना मराठी शिकवणं खरंच खूप कठीण आहे...मला जीआर ई देताना मराठी मिडियम मधली असल्याने जे सोपस्कार करावे लागले त्यावरून तरी इंग्रजीत शिकले असते तर बरं झालं असतं असं वाट्टं. नुसती तुमची ट्रांसफरच नाही पण ज्या मुलांना पुढे परदेशी शिक्षण घ्यायच. असेल त्याना इंग्रजीतुन शिकण्याचा खूप फायदा होतो असं वाट्टं

अन्या दातार Wed, 01/30/2008 - 23:06
माझ्या मते शाळेचे शिक्षण हे मातृभाषेतूनच असावे. माझे काही मित्र इंग्रजी माध्यमात शिकलेले आहेत; त्यांच्याशी बोलताना एक गोष्ट जाणवते की त्यांना मराठी भाषेतील नेहमीच्या वापरातील शब्दसुद्धा माहित नसतात. समजा कोणी श्लेष अलंकारातून कोटी केली तर त्यांना ती अजिबात कळत नाही. त्या विनोदातील अर्थ त्यांना समजावून सांगावा लागतो. बरं इंग्रजी शब्दही खूप माहीत आहेत, असंही नाही. क्लासमध्ये सरांनी वापरलेल्या एका शब्दाचा अर्थ विचारला तर त्यांना सांगता येईलच याची खात्री नाही. मग साला इंग्रजी माध्यमात शिकून काय घंटा मिळवलंत? एक ना धड भाराभर चिंध्या अशी त्यांची गत झालेली असते किंवा तेलही गेले तूपही गेले हाती आले धुपाटणे या सर्वात मध्यम मार्ग म्हणजे सेमी इंग्रजी माध्यम. गणित व विज्ञान हे विषय इंग्रजीत शिकवल्याने त्यासंबंधी अवांतर इंग्रजी वाचनावेळेस फायदा होऊ शकतो. आपला, (मराठी माध्यमात शाळा शिकलेला) अभियंता

दीपा॑जली Sun, 02/03/2008 - 10:35
इ॑ग्रजी माध्यमात शिकण्याचे फायदे आणि तोटेहि आहेत. मी वरदाताईच्या मताशी सहमत आहे. पण काहीही झाल॑ तरीही आपल्या मराठीचा आभिमान मात्र कमी होता कामा नये, हे तितकच॑ महत्वाच॑... - मगो

सख्याहरि Mon, 02/04/2008 - 19:49
माझ्या मते शाळेचे शिक्षण हे मातृभाषेतूनच असावे. माझे काही मित्र इंग्रजी माध्यमात शिकलेले आहेत; त्यांच्याशी बोलताना एक गोष्ट जाणवते की त्यांना मराठी भाषेतील नेहमीच्या वापरातील शब्दसुद्धा माहित नसतात. अभियंता- आपल्याशी १००टक्के सहमत. इंग्रजी शाळेत शिकलेल्या मुलन्मध्ये मत्रुभाषेबद्दल फारसा अभिमान दिसत नाही. शिक्षण हे मातृभाषेतूनच असावे. उपहास आणि कुचेष्टा फार सोपी असते! जिद्द आणि धडपड ह्याला आत्मबळ लागते!! (कुणाचीही चेष्टा करु नका, आयुष्यात कधीतरी अशी आंगलट येईल की बस!) चतुरंगरावांशी सहमत आहे... अघळ पघळ च्या प्रतिक्रीया खेद जनक आहेत. -सख्याहरि

प्रभाकर पेठकर गुरुवार, 02/07/2008 - 18:10
मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलो आहे. ह्यामुळे ज्ञानार्जनात, अर्थार्जनात कधी नुकसान, कमतरता जाणवली नाही. परदेशात (आखाती देशात) कधी कुठली समस्या जाणवली नाही. इंग्लिश बोलणे, समजणे ह्यात कधी अडचण आली नाही. पण इंग्लिश माध्यमातील, (विशेषतः दिल्लीकर) इतर सहकार्‍यांची आक्रमक देहबोली त्रासदायक व्हायची. ह्यांना 'ज्ञान' कमी असले (किंवा अजिबात नसले) तरी ते 'गोर्‍या' साहेबावर छाप पाडायचे. तरी सुद्धा, आमच्या 'तर्खडकरी' इंग्लिशने आम्ही आमचे कचेरीतील महत्त्व टिकवून ठेवले. बरोबरीने बढत्या मिळवल्या, सन्मानाने नोकरी सोडली. असो. माझा मुलगा ६ महिन्याचा असल्यापासून १०वी पर्यंत CBSC शाळेत इंग्लिश माध्यमातून शिकला. घरात आम्ही कटाक्षाने मराठीच बोलायचो. महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमात सक्रिय सहभागी होऊन त्याची भारतीय आणि मराठी सांस्कृतिक जडण घडण केली. दहावी नंतर तो भारतात परतला. तेंव्हा त्याच्या मनात मराठीतून किंवा इंग्लिश मधून संवाद करण्याची भिती नव्हती. किंचित भिती होती ती फक्त इथल्या 'रॅगिंग'ची. पण माझ्या मौलिक सुचनांनी त्याला त्याचाही काही त्रास झाला नाही. एका प्रसंगात, त्याच्यासह, त्याच्या पुण्यात मराठी माध्यमात शिकलेल्या दुसर्‍या एका कॉलेजच्या मित्राचीही दांडी उडाली. झालं असं की, त्याचा तो मित्र त्याला भेटायला एकदा आला असताना माझ्या मुलाला म्हणाला,'अरे भिडू, तुझ्या कॉलेजातही आपली 'वट' आहे हं' माझ्या मुलाला 'वट' हा शब्द नविन होता. साहजिकच त्याने विचारले,' 'वट' म्हणजे काय?' तोही हडबडला...'अरे 'वट' म्हणजे ते असं....म्हणजे.....अरे, .........'वट' म्हणजे 'वऽऽऽऽऽट'........... अरे यार, ते समजावून सांगणं कठीण आहे.' असो. सांगण्याचा उद्देश हा की इंग्लिश माध्यमातून शिक्षण झालं तरी घरातून 'मराठी भाषा आणि संस्कारांचा' कृतीशील आग्रह धरला तर दोन्हीतील समन्वय साधता येतो.

सुधीर कांदळकर Sun, 02/10/2008 - 22:49
ही काय भानगड आहे? जो प्रश्न अनिवासींचा आहे तो महाराष्ट्राबाहेरील निवासींना नाही का? आम्ही कांही वर्षापुर्वी भाईंदर्ला राहात होतो. सोसायटितील ११४ फ्लॅटपैकी जेम्तेम १० मराठी होते. आमचा मुलगा कॉनव्हेंटध्ये शिकला. पण संस्कार मराठीच आहेत. घरी पण मराठीत्च बोलतो. तो संपूर्ण मराठी आहे. मी मराठीतून शिकलो. कॉलेजच्या १ ल्या वर्षी माध्यम बदलल्याचे जाणवले देखील नाही. ज्याला एक भाषा व्यवस्थित येते त्याला कोणतीहि भाषा येऊ शकते. मी जेम्स हॅडली चेस, आयर्विंग वॉलेस, ऑर्थर हॅले, इ. च्या कादंब-या, डॅनिअल गोलमनचे इमोशनल इंटेलिजन्स, फ्रीमनचे थे हुमन झू, मिचिओ काकू चे व्हीजन्स इ. पुस्तके वाचली व अजुनहि निवडक इंग्रजी पुस्तके वाचतो. काही प्रश्न येत नाही. थोडक्यात काय? माध्यम महत्वाचे नाही. घरचे संस्कार महत्वाचे. फक्त मराठी क्लासिक ऐवजी इंग्रजी क्लासिक वाचले जाईल. एवढेच. 'उपरा' काय किंवा 'द पर्ल' किंवा 'माय बिलव्हड कंट्री' असो. समाजाची वेदना तीच आहे. ती कळल्याशी कारण. उगीच नसते वाद उअपस्थित करू नये व प्रत्येक साहित्याचा आस्वाद घ्यावा. जर बालकवी कळले तर वर्ड्स्वर्थ देखील कळेल.

सृष्टीलावण्या Mon, 03/10/2008 - 10:05
आजकाल जवळ जवळ सगळ्याच पालका॑ना असे वाटते की आपल्या पाल्याने english medium school ला जावे. त्याला गतानुगतिकता असे ही म्हणतात. मेंढरासारखे जगायचे, लोक जातात त्या पाठून धावायचे. नाहीतर इतर माध्यमात शिकून मोठे (यशस्वी) होता येत नाही असे थोडीच आहे. मधुर भांडारकर, एकनाथ ठाकूर, जयंतराव साळगावकर, मनोहर जोशी, अभय बंग, अब्दुल कलाम, जयंतराव नारळीकर, शंतनुराव किर्लोस्कर अशी अनेक नावे वानगी दाखल देता येतील. त्या॑ना वाटते जे problems ना आपण इ॑ग्रजी येत नाही म्हणून सामोरे गेलो त्याला मुला॑नी सामोरे जाऊ नये. इंग्रजी माध्यमातील इंग्रजी न येणारी आणि मराठी माध्यमातील इंग्रजी उत्तम बोलणारी अशी दोन्ही प्रकारची मुले / माणसे मी पाहिलेली आहेत. शेवटी कुठलीही भाषा शिकायची तर त्यासाठी भाषा आवड हवी. माध्यमाचा संबंध नाही. मी असे वाचले आहे की इश्वरचंद्र विद्यासागर इंग्रजांपेक्षा उत्तम इंग्रजी बोलत. समाजात मराठी तून शिक्षण घेणे कमीपणाचे मानले जाते.त्याचवेळी आज मराठी शाळा पण चा॑गल्या नाहीत. आपल्या कडे म्हण आहे, "लग्न होत नाही म्हणून वेडा आहे आणि वेडा आहे म्हणून लग्न होत नाही". आपण मुलांना मराठी शाळेत पाठवत नाही म्हणून मराठी शाळा चांगल्या नाहीत आणि मग म्हणायचे मराठी शाळा चांगल्या नाहीत म्हणून मुलांना मराठी माध्यमात घालायचे नाही. हे तर दुष्टचक्र आहे. नव्हे हा तर आपलाच दुटप्पीपणा. > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

संत ज्ञानेश्वरांनी सर्वांना गीता समजावी म्हणून प्राकृत भाषेत आणली. ती लोकांनी डोक्यावर घेतली कारण ती रोजच्या वापरातील भाषेत होती. असाच प्रयोग इंग्रजी भाषेत झाला आहे. तो लेखक त्याचं लिखाण रोज त्याच्या मोलकरणीला वाचून दाखवत असे, जर तिला समजल तर ठीक अन्यथा तो उतारा पुन्हा लिहिल्या जायचा. लेखकाचे नाव आठवत नाही. तसेही आपण तांत्रिक शब्द इंग्रजीतून का घ्यावे म्हणतो, पण त्यातले कित्येक शब्द मुळात फ्रेंच, जर्मन, ग्रीक किंवा लॅटीन आहेत. त्यावेळी इंग्लिश लोकांनी ते सरळसरळ स्वीकारले. मग आपण का नाही ? जर सामान्यांच्या भाषेत विषय शिकवल्या गेले तरच ते रंजक आणि सोपे होतिल. काही दिवसांनी कंप्युटर आणि त्याचेशी संबंधीत शब्दसुद्धा मराठी शब्द वाटू लागेल यात आश्चर्य नाही.

मनीषा Mon, 03/23/2009 - 10:12
मराठी माध्यम (ज्यांची मातृभाषा मराठी आहे त्यांच्यासाठी )कधीही चांगले. कारण जी व्यवहारातील भाषा आहे तीच शिक्षणाचीही भाषा असणे चांगले असते. पण हल्ली आई वडिल , व्यवसाय किंवा नोकरी निमित्त राज्याबाहेर किंवा परदेशी जातात त्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाखेरीज पर्याय च नसतो. इंग्रजी ही अनिवार्यच आहे पण ८वी-१०वी विज्ञान आणि गणित विषय इंग्रजी माध्यमात शिकवावे ... बाकी विषय मराठी माध्यमात असावे ... इंग्रजी माध्यमातील मुले ही मराठी माध्यमातील मुलांहून काही विशेष / वेगळे करु शकतात असे दिसत नाही . इंग्रजी संभाषण आत्मविश्वासाने करणे हा काही संपूर्ण करिअर साठी प्लस पॉइंट होतो असे नाही . शेवटी शैक्षणिक पात्रता/ योग्यता जास्त महत्वाची ... आणि इंग्रजी संभाषण करण्याची कला आत्मसात करता येते.. काही वेळा सवईने अथवा त्या साठी असलेल्या क्लासेस च्या मदतीने. माझा मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतो . मला सुरुवातीला अनेकदा असे जाणवले कि काही विषय त्याला मराठीतशिकवणे आणि त्याला समजणेही जास्त सोपे झाले असते .

चिरोटा Mon, 03/23/2009 - 10:36
शेवटी कुठलीही भाषा शिकायची तर त्यासाठी भाषा आवड हवी. माध्यमाचा संबंध नाही
बरोबर्.पण भारतात शेवटी डीग्री मिळाल्यावर नोकरीसाठी मुलाखत इन्ग्रजीतुनच होते ना?शिवाय भारतात माणुस किती 'स्मार्ट ' हे शेवटी त्याचे इन्ग्रजी भाषेवर प्रभुत्व किती ह्यावर अवलम्बुन.अर्थात नुसते इन्ग्रजी भाषेवर प्रभुत्व असुन चालत नाही पण इतर पण आवश्यक गोष्टी असाव्या लागतात.भारतिय प्रशासकिय सेवेतिल सर्वात उच्च अशी 'Indian Foreign Service' मध्ये रुजु होणार्या लोकान्ची यादी पाहिलीत तर जवळ्पास सगळिच इन्ग्रजी माध्यमातली(त्यात पण केन्द्रिय विद्यालय) असतात.तीच गोष्ट आय्.आय्.एम मध्ये सामिल होणार्यान्ची.जवळ्पास सर्व इन्ग्रजी माध्यामातले.दहावी नन्तर सर्व अभ्यास्क्रम इन्ग्रजीतुन असल्याने त्याना शिकताना भाषेची अडचण कमी येते. माझ्यामते, आपला पाल्य जर अब्दुल कलाम, जयंतराव नारळीकर वगैरे सारखा असेल तर बिन्दिक्कत कुठल्याही माध्यमात घाला. जर इतरान्सारखच असेल तर इन्ग्रजी माध्यम योग्य. भेन्डि

ऋचा Mon, 03/23/2009 - 11:13
मी पण मराठी माध्यमातुन शिकलेय...अकरावी इंग्रजी मी शास्र शाखा घेतली...सहामाहीत नापास. :( काहीही कळायच नाही मग अगदी पहील्यापासुन सुरुवात करावी लागली कशाला काय म्हणतात इथपासुन.... आणि मी वार्षिक परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास झाले.... मला नाही वाटल इंग्रजी माध्यमात शिकल्याने काही फरक पडत असेल.... "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

In reply to by ऋचा

चिरोटा Mon, 03/23/2009 - 11:40
जर इन्ग्रजी माध्यमातुन शिकला असतात तर भाषा शिकण्याची वेगळी अडचण आली नसती.शेवटी तुमची बुध्धिमत्ता,कष्ट,आवड हे महत्वाचे असतातच पण भाषा कळायला वेळ लागत असेल निराश होण्याची शक्यता असते.मराठीत शिकुन गुणवत्ता यादीत येवुन नन्तर इन्ग्रजीच्या न्युनगन्डामुळे म्हणावी तशी पुढे न आलेली माणसे मी पाहिली आहेत.

नितिन थत्ते Mon, 03/23/2009 - 12:24
आमच्यापुढे एक नवीनच पेच निर्माण झाला आहे. आमची मुलगी पुढील वर्षी ५ वीत जाईल. तिच्या शाळेत आता सेमी इंग्लिश ची टूम निघाली आहे. विज्ञान व गणित हे विषय इंग्रजीतून शिकवणार म्हणे. म्हणजे जे नको म्हणून मराठी माध्यमाच्या शाळेत घातले तेच माथी मारले जात आहे. हे विषय मराठीतून शिकायचे असतील तर दुसरर्‍या तुकडीत जावे लागेल. बघू काय होते ते. खराटा (रंग माझा वेगळा)

अभिरत भिरभि-या Mon, 03/23/2009 - 15:54
वरची चर्चा वाचून मी स्वतःचा व माझ्या परिचयातील वेगवेगळ्या माध्यमातील शिकलेल्या मित्रांचा मनोमन केस स्टडी केला. ):) या सॅम्पल सर्व्हेची काही निरिक्षणे/फायदे/तोटे .. पूर्ण मराठी माध्यम : : यातील फार थोडे पुढे शिकले. जे शिकले त्यांची बुद्धीमत्ता चांगली असली तरी इंग्रजीतून व्यक्त होताना (Expression) समस्या येई. शिवाय ही मंडळी ईश्वरचंद्र विद्यासागर नसल्याने करियरमध्ये देशी माध्यमाचा नाही म्हटला तरी तोटा; किमानपक्षी अडथळा नक्कीच झाला. वर भेंडीबाजार यांनी म्हटल्याप्रमाणे तुमची बुद्धीमत्ता,कष्ट,आवड हे महत्वाचे असतातच पण भाषा कळायला वेळ लागत असेल निराश होण्याची शक्यता असते; हे खरे आहे. त्याचवेळी मराठीतून शिकून पोल्ट्रीसारखे उद्योग सुरू करून चिक्कार पैसा कमावणरी मंडळी माहिती आहेत. आता पोल्ट्रीत विग्रजीपेक्षा मराठी 'भ'कार जास्त कामाला आला असेल ही बाब मान्य :) सेमी-इंग्रजी मी स्वत: या वर्गाचा प्रतिनिधी. प्रार्थमिक शिक्षण मराठीतून झाले व मराठी माध्यमाच्या तुलनेत इंग्रजीचे Exposure चांगले झाल्याने तुलनेने समस्या कमी आल्या. माझ्या पाहण्यातील बहुतेक सर्व सेमीइंग्रजीवाली मंडळींचे करियर उत्तम निभावले आहे. अर्थात स्पोकन इंग्लिशचा प्रॉब्लेम असतोच. फक्त जरा लौकर सुटतो इतकेच. इंग्रजी - नॉन कॉन्व्हेण्ट यांचे दोन उपप्रकार पाहिले आहेत - १ घर का न घाटका टाईप - घरचे मराठी वातावरण किंवा पालकांना शंकासमाधान करण्याइतपत इंग्रजी न येणे यामुळे भरडलेली मंडळी आहेत. मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांची वाट लागलेली असते. २ कॉण्वेण्ट तोडीस तोड - संस्काराने हिंदू पण इंग्रजी प्रभुत्वाच्या बाबतीत कॉण्वेण्टवाल्यांना तोडिस तोड असणारी मंदळी. करियरमध्ये बहुतेकांनी चांगली प्रगती केली हे सांगणे न लगे. कॉन्व्हेण्ट : आम्ही आमच्या संस्कृती/संस्कारांचा वगैरे कितीही डंका पिटला तरी या मंडळींबद्दल थोडासा मत्सर पूर्वीही होता आणि आजही थोडा वाटतोच. या मंदळींचे व्यक्तीमत्व काही वेगळेच घडते किमानपक्षी पांढरपेश्या जॉबमध्ये थोडी Edge मिळते हे नक्कीच. "वट" शब्दाला चांगला प्रतिशब्द कोणता हे सेमीइंग्रजीवाला झटकन सांगेल हे आमचे मत. एकूण जर आईबापास इंग्रजी येत नसेल तर पोराने सेमी-इंग्रजीतच जावे नाहीतर इंग्रजी उत्तम. मराठीच्या अभिमानाकरिता मुलांनी मराठी माध्यमात जावे याला माझी सहमती नाही. पालकांनी आवड लावली तर इंग्रजी माध्यमातील मुलांना देखिल परंपरेचा अभिमान वाटतो हे मी पाहिले आहे. ही मुले इंग्रजी उत्तम बोलू शकत असल्यामुळे त्यांना आयुष्यात भाषिक अडथळे येत नाहीत आणि स्वभाषेच्या परिचयामुळे मुळाशी बांधलेलीही असतात. (हेच का ते Best of both world ?) म्हणून वर चतुरंग, प्राजू आदी मंडळी करत असलेल्या प्रय्त्नांचे कौतुक वाटते. त्याचवेळी मराठीतून शिकलेली पण इंग्रजी येत नसल्यामुआळे जिथेतिथे हिंदी झाडणारी (हरामखोर म्हणाय्ची इच्छा होते आहे) अनेक उदाहरणेही आहेत. मराठीतून शिकल्याने कमीपणा येत नाही पण सर्व जण जयंत नारळीकर किंवा विद्यासागर नसतात हे ही खरे. संस्कार वगैरेंचा माध्यमाशी काहीही संबंध नाही हे आणखी निरिक्षण. ( वाया गेलेली आणि न गेलेली अशी दोन्ही प्रकार सर्व माध्यमात पाहिलेत. ) वरील गोष्टी म्हणजे सार्वित्रीकरण नाही. केवळ मनोमन केलेल्या Sample Survey चे निष्कर्ष आहेत.

मराठी_माणूस Mon, 03/23/2009 - 16:45
ईंग्रजी माध्यमातुन शिक्षण घेतल्यास कदाचीत करीअर मधे फायदा होईल हे गृहीत धरले तरी खालील गोष्टींचे काय * ट्रेन मधे मराठी पेपर न वाचणे * दोन मराठी माणसानी कार्यालयात आपसात मराठी न बोलणे * हॉटेल मधे पंजाबी कींवा दाक्षिणात्य पदार्थ खाणे (मराठी मिळत असले तरी शक्यतो टाळणे) * वेटर, दुकानदार , रीक्षावाले ह्यांच्याशी हींदीत बोलणे * मराठी चीत्रपट न पहाणे , मराठी गाणी न ऐकणे * मराठी साहित्य न वाचणे मराठी असण्याचा न्युनगंड गळुन पडणे आवश्यक आहे, भाषेचे माध्यम ही समस्या त्या मानाने लहान आहे.

In reply to by मराठी_माणूस

* ट्रेन मधे मराठी पेपर न वाचणे तो घरीच चटकन वाचून होतो, वेळ लागतो तो इंग्लीश वाचायला! * दोन मराठी माणसानी कार्यालयात आपसात मराठी न बोलणे उपस्थित असणारा तिसरा, चौथा, पाचवी पुरूष/स्त्री अनुक्रमे बंगाली, आसामी आणि पोलिश असते. * हॉटेल मधे पंजाबी कींवा दाक्षिणात्य पदार्थ खाणे (मराठी मिळत असले तरी शक्यतो टाळणे) घरी जे खाते तेच बाहेर काय खायचं? घरीच बनवून खाल्लं असतं ना! * वेटर, दुकानदार , रीक्षावाले ह्यांच्याशी हींदीत बोलणे कारण त्यांना आपण काय बोलतो ते समजत नाही. मागायचं साधं पाणी आणि वेटर आणायचा बर्फवालं पाणी, असं होण्यापेक्षा माझं भयानक हिंदी वापरलं की मला इच्छित पदार्थ मिळतो, मी इप्सित स्थळी पोहोचते. * मराठी चीत्रपट न पहाणे , मराठी गाणी न ऐकणे "सालीनं केला घोटाळा"सारखे चित्रपट आणि "डोकं फिरलया"सारखी गाणी ऐकण्यापेक्षा मला "शॉशॅंक रिडंप्शन" आणि "भला हुआ मेरी मटकी टूटी रे" सारख्या सुंदर कलाकृतींचा आस्वाद घ्यायला आवडतो. * मराठी साहित्य न वाचणे व्यक्तीगत आवड आणि साहित्यामधला बुद्ध्यांक कमी. सगळी आवड बोजड विषयांत आणि त्यांबद्दलची पुस्तकं फक्त आंग्लभाषेतच असणं. ही माझी व्यक्तीगत (आणि/किंवा विक्षिप्त) उत्तरं. प्रत्येकाच्या बाबतीत हे आणि असंच खरं असतं असा माझा गैरसमज नाही. अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मराठी_माणूस Tue, 03/24/2009 - 07:57
प्रतीसाद वाचुन धन्य झालो आणि मिपा च्या पहील्या पानावारचे खालील वाक्याशी ताळमेळ जुळवण्याचा प्रयत्न करत आहे. अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे.

In reply to by मराठी_माणूस

मला माहित नसलेल्या, माझ्यात असलेल्या न्यूनगंडाची मला ओळख करून दिल्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद करते. अदिती आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.

गणा मास्तर Mon, 03/23/2009 - 17:00
मराठी माध्यमातुन शिकताना ईंग्रजीचे संभाषण आणि श्रवण कौशल्य विकसित होत नाही, त्यामुळे मराठी माध्यमातुन शिकलेल्या मुलांना न्युनगंड येतो. मराठी शाळांमध्ये ईंग्रजी संभाषण आणि श्रवण कौशल्य विकसित करता आले तर हा प्रश्न सुटेल. वर संजय अभ्यंकर आणि चतुरंग यांनी मांडलेला लहाणपणी कानावर पडाणार्‍या भाषेचा मुद्दा महत्वाचा आहे. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)

प्रमोद्_पुणे Mon, 03/23/2009 - 17:56
कायदा आणि निगडीत क्शेत्रामध्ये आन्ग्ल् भाषा चान्गली अवगत असणे फार महत्वाचे आहे. माझे शालेय शिक्शण पूर्ण मराठीतून झाले. त्यामुळे वाणिज्य, कायदा आणि चिटणीस व्यवसायाचे शिक्शण घेताना थोडा (नाही बराच) त्रास झाला. अर्थशास्त्रातील, पिनल कोड मधिल शब्दान्चे अर्थ, त्यान्ची स्पेलीन्ग्स जमत नसत. व्यवसायाच्या ठीकाणी पण आन्ग्ल भाषाच वापरावी लागत असल्याने तिथे सुध्दा सुरुवातीला न्यूनगन्ड येतोच. आणि एखादा मुद्दा पटवून देताना पण आधि मराठीत विचार करून नन्तर त्याचे भाषान्तर करून मान्डावा लागतो. त्यामुळे असे वाटते की इन्ग्रजी माध्यमातून शिक्शण घेतले तर थोडा फायदा नक्कीच झाला असता. कदाचित अभियान्त्रिकी शाखेचे शिक्शण घेताना हा त्रास कमी जाणवत असावा.

अजय भागवत Mon, 03/23/2009 - 21:09
शिक्षणविषयक [बाल व प्रौढ- कोणाचेही असले तरी ] चर्चेत चाईल्ड सायकॉलजीचा उल्लेख अत्यावश्यक ठरतो. काही प्रतिसादकांनी उल्लेखलेल्या शाळांमधे हॉवर्ड गार्ड्नर ह्या चाईल्ड सायकॉलजीस्टच्या मल्टीपल इंटेलिजन्स्च्या सिद्धांतांचा वापर करुन नवी शिक्षणपद्धती विकसत करण्याचा स्तुत्य प्रयत्न चालला आहे. हॉवर्ड गार्ड्नरच्या मते, ■प्रत्येक माणसात इंटेलिजन्सच्या ८ छटा असतात ■प्रत्येक माणसात ह्या ८ इंटेलिजन्सची सरमिसळ झालेली असते व त्याचे एक सर्वस्वी स्वतंत्र असे एक प्रोफ़ाईल असते ■शिक्षण देताना ह्या ८ इंटेलिजन्सची चेतना व्हावी म्हणून त्याप्रमाणे अध्यापन करणे अपेक्षित असते ■प्रत्येक इंटेलिजन्स मेंदूचा एक स्वतंत्र भाग व्यापतो ■८ इंटेलिजन्स एकत्रितपणे अथवा स्वतंत्रपणे कार्यरत राहतात ८ इंटेलिजन्स व मानवाला त्यांची कार्यक्षमता: [मराठीत सगळे भाषांतर करु शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व] १. भाषिक व शाब्दिक: वाचणे, लिहिणे, तारखा पाठे होणे, शब्दांची योग्य निवड व वापर, गोष्टी सांगता येणे २. गणित व तत्वज्ञान: गणितात प्रगती असणे, तत्वज्ञान उत्तम असणे, अडचणींवर उपाय शोधता येण्याची क्षमता (problem-solving) संरचना मांडता येणे, कार्य-कारण ३. Visual / Spatial: Maps, reading charts, drawing, mazes, puzzles, imagining things, visualization ४. Bodily / Kinesthetic: Athletics, dancing, crafts, using tools, acting ५. Musical: Picking up sounds, remembering melodies, rhythms, singing ६. Interpersonal: Leading, organizing, understanding people, communicating, resolving conflicts, selling ७. Intrapersonal: Recognizing strengths and weaknesses, setting goals, understanding self ८. Nauralistic: Understanding nature, making distinctions, identifying flora and fauna मला जेव्हढे चाईल्ड सायकॉलजी कळते त्या त्रोटक माहितीच्या आधाराने मी खालील मते मांडत आहे. ही मते मांडतांना, शिक्षणतज्ञांना/शिक्षकांना येणाऱ्या अडचणींचा पुर्ण आदर आहे. ही सगळी मंडळी आपापल्या क्षेत्रात चांगले कार्य करत असल्यामुळेच आपण आज अनेक देशातील शिक्षणपध्दतीपेक्षा अनेक पटींनी पुढारलेले आहोत. १. सेकंडरी व प्रायमरी शाळांत ह्या सर्व ८ इंटेलिजन्सचा विकास होण्यासाठी बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आढळतो. पण वैयक्तिकपणे एखाद्या मुलांत काय प्रोफाईल आहे त्याप्रमाणे शिक्षण देण्यात अर्थातच अनेक अडचणी असतात. २. तरीही, जर आपण जे विषय शाळेत शिकतो ते पाहिले असता, [२ ते ३ भाषा, इतिहास] असे विषय पाहता ज्यांचा इंटेलिजन्स प्रोफाईल कल भाषिक व शाब्दिक कडे जास्त झुकला आहे त्यांना त्याचा फायदा होतो. [मग त्यांना माध्यम कोणतेही असले तरी झटकन स्वतःला त्याप्रमाणे बदलता येते]. त्यामुळे मराठी माध्यमात शिकुनही शैक्षणिक प्रगती न झालेली मुले किंवा ईंग्लिश माध्यमात शिकुनही प्रगती न झालेली मुले पहावयास मिळतात. ३. गणित हा विषय तर पहिली पासुनच शिकवतात. इंजिनीअरींग, अकौटन्सी, सायन्स ह्या क्षेत्रात गणित, लॉजिकल रिझनिंग हा इंटेलिजन्स नसला की प्रगती होत नाही. मग माध्यम कोणतेही असो. नोकरदार वर्ग प्रामुख्याने वरील इंटेलिजन्स वर अवलंबुन असतो ४. ज्याच्याकडे Interpersonal इंटेलिजन्सही आहे व वरील दोन्ही इंटेलिजन्स आहेत अशी व्यक्ति कोणत्याही माध्यमातून शिक्षण घेतले तरी, व्यावसायिक, इंजिनीअरींग मॅनेजरही यशस्वीपणे होते. पण Interpersonal इंटेलिजन्स आहे पण तो विकसित झाला नाही तर ती क्षमता असली तरी एखादा मागे पडतो ५. Intrapersonal इंटेलिजन्स असलेली मंडळी स्वतःच्या क्षमता ओळखू शकतात व असे लोक कष्टाने काहीही साध्य करु शकतात. अर्थातच तो इंटेलिजन्स लवकरात लवकर विकसित झाला पाहिजे. आपल्याकडे असा इंटेलिजन्स आहे ते त्या व्यक्तिला कळले पाहिजे. वरील उदाहरणांवरुन मला इतकेच म्हणायचे आहे की, जेव्हा आपण म्हणतो की, मराठीत शिक्षण घेतल्यामुळे माझे काहीच अडले नाही तेव्हा त्याची कारणीमिमांसा अधिक खोलवर जाउन केली पाहिजे. असे झाले की, माझा पाल्यही असेच करु शकेल हे म्हणणे योग्य नाही. येणाऱ्या काळात नॉलेज ईंग्लिशमधे जास्तीत जास्त निर्माण होणार असेल तर मुलांना ईंग्लिशवर प्रभुत्व मिळवणे आवश्यक आहे की नाही ते त्याच्या/तिच्या भविश्यातील कार्य्क्षेत्रावर अवलंबुन असेल. हे आधिच कसे कळणार?- हिच गोची आहे व त्यामुळेच आपण गोंधळतो. जर अशा काही टेस्ट असतील की, ज्याने एखाद्यात काय इंटेलिजन्स प्रोफाईल आहे हे समजु शकेल असे असेल तर, ज्यांना भाषिक/शाब्दिक इंटेलिजन्स कमी आहे अशांनी मातृभाषेत शिकावे असे म्हणता येईल का? [वेळे अभावी मला अपेक्षित असलेले लिखाण मी करु शकलो नाही]

मिहिर Mon, 03/23/2009 - 23:13
मराठी माध्यमच उत्तम. ११वीत इंग्रजी माध्यमाशी जमवुन घेताना फारशी अडचण येते असे वाटत नाही

अहो कुठे मराठी माध्यमात घालता. मराठी लुप्त होत चाल्लेली भाषा आहे. पुढच्या काही वर्षात मराठी ही पाली किंवा अर्धमागधी सारखी केवळ विद्यापिठात शिकवायची भाषा म्हणून तरी शिल्लक राहील किंवा हिंदीची एक बोलीभाषा म्हणून शिल्लक राहील. त्या पेक्षा इंग्रजी माध्यमातून शिकवा, कसे? पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

चिरोटा Tue, 03/24/2009 - 11:14
मराठी लुप्त होत चाल्लेली भाषा आहे
ही ओरड गेले अनेक वर्षे आपण ऐकत आहोत्.महाराष्ट्राची लोक्सन्ख्या साडे दहा कोटी, म्हणजे उत्तर प्रदेश्च्या खालोखाल लोकसन्ख्येत महाराश्ट्रचा नम्बर.! आता ह्यातले 'बाहेरचे',भैय्या,मद्रासी,गुज्जु,मारवाडी बाजुला काढले तरी मराठी बोलणारे खुप होतात.तेव्हा मराठी रहाणारच्. चिन्ता नसावी. अवान्तर्-मराठी साहित्य सम्मेलन,कोकण सहित्य सम्मेलन्,विदर्भ साहित्य सम्मेलन्,अखिल भारतिय मराठी साहित्य सम्मेलन.... अशी असन्ख्य साहित्य सम्मेलने. त्यातराजकारण न करता रसभरीत साहित्याची चर्चा करणारे,भाषेला एक वेगळाच दर्जा प्राप्त करुन देणारे आपले साहित्यिक.कोण म्हणतो मराठी भाषा लुप्त होत चालली आहे?

अभिरत भिरभि-या Tue, 03/24/2009 - 12:21
पेशव्यांच्या लिखाणातील उपरोध समजू शकतो. पण मराठी भाषा आणि मराठी माणूस यांचे हितसंबंध जर परस्परविरोधी होत असतील तर दुसरे महत्वाचे ठरावे. थोडे इतिहासात डोकावले असता १९६० दशकात मुंबईतील अनेक पांढरपेशा नोकर्‍या दाक्षिणात्यांनी पटकावल्या होत्या. असे होण्यामागे तत्कालिन मराठी मंडळींपेक्षा दाक्षिणात्यांचे इंग्रजी प्रभुत्व हे एक कारण होते. मराठीच्या नावाखाली इतिहासाची पुनरावृत्ती टाळलेली बरी! केवळ माध्यम मराठी असले म्हणजे पुढच्या पिढीत मराठी भाषा टिकेल असा (गैर)समज आपल्यापैकी बर्‍याच जणांमध्ये दिसतो. "बाहेरच्यांनाही" बघावी/ ऐकावीशी वाटतील असे चित्रपट/गाणी निघाली आणि चांगले साहित्य निघाले तर मराठीची फिकिर करण्याचे कारण नाही. (अवांतर :) माझा एक इंग्रजी माध्यमातील मित्र पुल माझ्यापेक्षा जास्त वाचतो. अभिरत
आजकाल जवळ जवळ सगळ्याच पालका॑ना असे वाटते की आपल्या पाल्याने english medium school ला जावे. त्या॑ना वाटते जे problems ना आपण इ॑ग्रजी येत नाही म्हणून सामोरे गेलो त्याला मुला॑नी सामोरे जाऊ नये. समाजात मराठी तून शिक्षण घेणे कमीपणाचे मानले जाते.त्याचवेळी आज मराठी शाळा पण चा॑गल्या नाहीत. आपणास याबद्दल काय वाटते?

आधार कुणाचा?

तळेकर ·

विसोबा खेचर Sun, 01/27/2008 - 23:23
तळेकरसाहेब, कधी कधी वाटतं मुलांनी येथे यावं, आता इथेही चांगल्या, मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात. आता परत या. मुंबईत किंवा पुणे येथे राहू शकता.' पण तिथे एवढी आरामाची जीवनशैली सोडून येणं सगळ्यांच्याच जिवावर येतं. आईवडिलांचा आक्रोश हृदयापर्यंत पोहोचतच नाही, त्याला कोण काय करणार? क्या बात है तळेकर साहेब! परदेशस्थ मुलांच्या आईवडिलांचा मूक-आक्रोश आपण अगदी योग्य शब्दात मांडलात! अहो फार लांब कशाला? आमच्या घराजवळचंच एक उदाहरण आहे. एका परदेशस्थ मुलाचे आईवडील इथे अगदी एकाकी अवस्थेत आयुष्य कंठत आहेत. आता दोघांची वयं झाली आहेत. त्यांचा मुलगा तिकडे अमेरिकेत बायको मुलांसमवेत अगदी मजेत मारे बंगला वगैरे बांधून राहतो आहे. पैसे वगैरे पाठवतो पण त्याच्या पैशांची आईवडिलांना खरंच गरज नाही. त्यांना आता म्हातारपणी मुलगा जवळ असावा, सून जवळ असावी असंच वाटतं! म्हातारा-म्हातारीला काही आजारपण वगैरे आलं तर दवाखान्यात, हॉस्पिटलात वगैरे पोहोचवण्याकरता मीच धावपळ करतो. मला त्याचे वडील डोळ्यात पाणी आणून अनेकदा, "तात्या, मी मेलो की माझ्या मुलाला वगैरे कळवण्याच्या भानगडीत पडू नकोस. त्याला आईवडीलांची काहीही किंमत नाही. तूच मला अग्नी दे!" असं म्हणतात तेव्हा मला त्यांची खरोखरंच दया येते! असो, त्या मुलाचीही काही बाजू असेल! आपल्याला काय कल्पना? परंतु जर एखाद्या मुलाचे आईवडील इथे भारतात त्याच्यासाठी तळमळत असतील तर काय उपयोग त्या मुलाचा आणि त्याच्या त्या पैशांचा? अवांतर - तळेकरसाहेब, याच विषयावर मी माझे आबा जोशी हे व्यक्तिचित्र लिहिले आहे. मनोगतावर ते कधीकाळी खूप गाजले होते! असो... आपला, (निवासी भारतीय!) तात्या.

प्राजु Mon, 01/28/2008 - 05:45
कधी कधी वाटतं मुलांनी येथे यावं, आता इथेही चांगल्या, मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात. आता परत या. मुंबईत किंवा पुणे येथे राहू शकता.' हे तुमचं वाक्य मनाला भिडलं. तुम्ही लिहिलेलं अक्षरन् अक्षर खरं आहे. मी नव-यासोबत इथे आले तेव्हा आईच्या मनाची स्थिती समजूनही काही उपयोग नव्हता. तिला भेटताना गळा दाटून आला होता. ती म्हणाली, " आकाशी भरारी घेणा-या पाखराचे पाय आणि पंख बांधून नसतात ठेवायचे... फक्त तुझं घरटं इथे आहे हे मात्र विसरू नको." आईचे हे शब्द आजही आठवले की, उठून निघून सरळ भारतात यावे असे वाटते. तुमच्या या लेखाने पुन्हा हा विचार मनाशी घट्ट होऊ लागला आहे. - (पूर्णपणे भारतीय) प्राजु

पिवळा डांबिस Mon, 01/28/2008 - 06:59
मा. तळेकरसाहेब, लेख चांगला आहे. या प्रश्नाची भारतातील मंडळींची बाजू तुम्ही चांगली मांडली आहे. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, तळेकरशेठ!! :) त्यातून आजकाल "कोणीही यावे आणि अनिवासी लोकांना टपली मारून जावे" याची फॅशनच झाली आहे. :)) तसे कशाला, आपण चार दिवस थांबूया. दुसरी बाजू मांडण्यासाठी कोणी नव्या दमाची, तरणी पोरं उतरतात की मला म्हातारया शेलारमामाला मैदानात पाठवतात ते बघुया! "कायरं अनिवासी पोरांनु! हाये का कोनी हिमतीचा? का समद्यांनी शेपूट घातली?" :)) तरीही तुमचाच, (पिकल्या डुईचा) पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

बेसनलाडू Mon, 01/28/2008 - 08:37
"कोणीही यावे आणि अनिवासी लोकांना टपली मारून जावे" याची फॅशनच झाली आहे. :)) १००% सहमत आहे. (सहमत)बेसनलाडू

प्राजु Mon, 01/28/2008 - 08:22
अगदी खरं. पिवळा डांबीस म्हणतात ते ही खरे आहे. त्यातून आजकाल "कोणीही यावे आणि अनिवासी लोकांना टपली मारून जावे" याची फॅशनच झाली आहे. :)) खरंच असे झाले आहे. -(सध्या अमेरिकेत) प्राजु

प्रमोद देव Mon, 01/28/2008 - 09:09
नोकरीनिमित्त तरूणांना गाव /देश सोडून इतरत्र जावे लागते. हा प्रश्न आजचाच नाहीये. आजपासून काही वर्षांपूर्वीपर्यंत एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यामुळे ही समस्या तितकी गंभीर नव्हती. मात्र जसजशी विभक्त कुटुंब पद्धती अंमलात आली आहे तेव्हापासून ही समस्या जास्त तीव्र होत चाललेय. इथे दोष फक्त तरूण मंडळींना देणे योग्य होणार नाही. काही प्रमाणात आपल्या सारख्या ज्येष्टांचाही दोष असतो. विशेषतः स्वभावाचा दोष. आपण वागलो,वागतो तेच बरोबर आणि सद्याचे तरूण वागताहेत ते सगळे चूक असे म्हणणे. म्हणून दोष असलाच तर खरे तर तो परिस्थितीचा असतो. नोकरीसाठी जर अन्यत्र राहावे लागले (इथे परदेश/अन्य शहर/गाव अभिप्रेत आहे) तर मुले अशावेळी आपल्या वृद्ध पालकांना आपल्या बरोबर ठेऊ शकतात. पण बर्‍याच वेळा अनुभव असा असतो की ही वृद्ध मंडळी आपला गाव सोडायला तयार नसतात. काही जण असे गावे सोडून मुलांबरोबर जातातही. पण भिन्न वातावरणाशी जुळवून घेणे त्यांना जमत नाही. त्यामुळेही नाईलाजाने ते पुन्हा आपल्या गावी परततात आणि एकटेपणाचे जीवन जगतात. म्हातारपणात स्वभाव हटवादी होत असतो. त्याचाही त्रास त्यांना स्वतःला आणि कुटुंबातील इतरांना होत असतो. त्यामुळे एकत्र राहून दोन दिशांना तोंडे असण्यापेक्षा दूर राहून जवळीक असावी म्हणूनही काही जणे वेगवेगळे राहतात. अर्थात त्याचा नकळत होणारा परिणाम म्हणजे अशा वृद्ध माणसांकडे नाईलाजाने का होईना पण होणारे दूर्लक्ष; प्रकृतीची हेळसांड वगैरे. तरूणांनी वृद्धांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्याशी शक्यतोवर जमवून घेणे आणि वृद्धांनीही सद्याच्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आणि आपल्या अपत्यांच्या दैनंदिन जीवनात ढवळाढवळ न घेण्याची खबरदारी घेतल्यास हा प्रश्न बर्‍यापैकी सुटू शकेल. त्यामुळे मी दोष कोणा एकाला देणार नाही. दोष असलाच तर तो परिस्थितीचा आणि त्या प्रमाणे आपल्यात बदल न घडवणार्‍यांचा.

केशवराव Mon, 01/28/2008 - 11:51
काळ ज्या प्रमाणे बदलतो तसे आपण बदलयला हवे. मुलांनी नोकरी / व्यवसाया निमित्त दूर जाणे हे क्रमप्राप्तच आहे. [ मुलीने सासरी जाण्यासारखेच....] आपल्या संगोपनासाठी त्यानी ईथे रहावे अशी अपेक्शा करणे म्हणजे त्यांचे पंख छाटण्या सारखेच आहे. आपणच त्यांना घडवण्यास मदत करतो, मोठे करतो,भरारी घेण्यास शिकवीतो ; आणि त्यांनी भरारी घेतली कि घायाळ होतो. व्रुद्धांचे प्रश्न जरूर आहेत. जरा वेगळ्या नजरेने बघुया. आपण सुखी राहूया ,त्यांना सुखी ठेवूया. [एक विचार चमकला... आपल्या मुलांच्या म्हातारपणी हा प्रश्न किती मोठ्ठा झाला असेल ?त्यांचे समूपदेशन आपणच आत्ता करायला नको ना?] आपण आपले प्रश्न मांडल्याने 'आपण दूर आलो हा अपराधच केला' असे आपल्याच मुलांना वाटेल. एक पर्याय म्हणून पुण्याला परांजप्यांनि 'अथश्री' नावाचा प्रकल्प केला आहे . अशी योजना हि यावर उपाय नाही का ठरू शकत?

In reply to by केशवराव

विसोबा खेचर Mon, 01/28/2008 - 12:26
आपल्या संगोपनासाठी त्यानी ईथे रहावे अशी अपेक्शा करणे म्हणजे त्यांचे पंख छाटण्या सारखेच आहे. असहमत आहे....अहो कुठले आईवडील आपल्या मुलाचे पंख छाटतील? एक पर्याय म्हणून पुण्याला परांजप्यांनि 'अथश्री' नावाचा प्रकल्प केला आहे . अशी योजना हि यावर उपाय नाही का ठरू शकत? म्हणजे परांजप्यांनी थोडक्यात अजून एक वृद्धाश्रम सुरू केलाय असे तुम्हाला म्हणायचे आहे का? इथे म्हातार्‍या, हातपाय थरथरणार्‍या आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकायचं आणि स्वत: तिथे परदेशात पैसा कमवायचा, करियर बनवायचं! काय जळ्ळा उपयोग आहे त्या करियरचा? कुणाला दाखवणार ते करियर आणि तो पैसा? अहो ज्यांनी स्वत: खस्ता खाऊन, आजारपणात जागरणं करून, तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्याला जपले, लहानाचे मोठे केले, त्यांना उतारवयात सोडून निघून जायचं, मी, माझं आयुष्य, माझं करियर याचाच जप करत रहायचं हे मला तरी व्यक्तिश: पटत नाही! आईवडील असतात म्हणून जगण्यात मजा असते. त्यांचं प्रेमाने करण्यात लाख मोलाचं (लाख डॉलरचं म्हटलं पाहिजे! :) समाधान असतं! एकदा ते गेले की कुणाला दाखवणार आपलं कर्तृत्व? मग कोण आहे पाठीवरून प्रेमाचा हात फिरवायला? असो, वरील विचार हे माझे व्यक्तिगत विचार आहेत व माझ्यापुरते मर्यादित आहेत. यातून कुणाही अनिवासी भारतीयांचा अनादर करण्याचा माझा हेतू नाही. जे अनिवासी भारतीय इथे आपल्या आईवडिलांना एकटे टाकून परदेशात रहात असतील त्यांचीही काही बाजू असेल, त्यांचेही काही प्रश्न असतील याची मला कल्पना आहे. आपला, (गलेलठ्ठ पगाराची दुबई, बहारिन मधली नोकरीची संधी याच कारणस्तव अनेकदा नाकारून इथे भारतात आईसोबतच रहायचा निर्णय घेतलेला समाधानी!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

केशवराव Mon, 01/28/2008 - 22:21
तात्यासाहेब, फार भावनिक होवून लिहीलेत. कुठलेही आई- वडील मुलांचे पंख छाटणार नाहीत. मंजूर! पण , मायेच्या बंधनानी त्याना जखडुन ठेवणेही योग्य नाहीच. तुमचे वैयक्तिक उदाहरण ठिक आहे, मी सामाजिक प्रश्न म्हणुन विचार केला. मी स्वतः ६० वर्षे वयाचा आहे. माझा एक मुलगा परदेशात असतो. दुसरा ईथे आहे. पण काय सांगावे ,तो पण दूर जाऊ शकतो. आणि ईथे राहीला तरी भारतात कुठेही जाऊ शकतो. नोकरी / व्यवसायाचे चित्रच पालटले आहे. काही गोष्टी आता स्विकाराव्याच लागतिल. व्रुद्धाश्रम हि संकल्पना सुद्धा आता समाजाचे एक अंग म्हणुनच पहावी लागेल.क्रुपया 'अथश्री ' ला एकदा भेट द्या. तो व्रुद्धाश्रम नाही. ज्यांची मुले दूर आहेत अशा लोकांची ती सोसायटी आहे.[ मी परांजप्यांचा एजंट नाही.] जरा वेगळ्या द्रुष्टीने विचार करून पहा. * एक विधान : ' तुमच्या मुलांचे तुम्ही चांगले संगोपन केले पाहीजे , कारण तीच तुम्हाला चांगला व्रुद्धाश्रम निवडण्यास मदत करणार आहेत.'

In reply to by केशवराव

विसोबा खेचर Tue, 01/29/2008 - 09:53
व्रुद्धाश्रम हि संकल्पना सुद्धा आता समाजाचे एक अंग म्हणुनच पहावी लागेल. हे विधान पटले नाही. माझ्या मते आईवडीलांची काळजी, त्यांची देखभाल, त्यांच्याजवळ असणे, ह्या गोष्टींना मुलांनी प्रथम प्राधान्य द्यायला हवे. बाय द वे, मी परांजप्यांचा एजंट नाही. हे आवडले! :) तुमच्या मुलांचे तुम्ही चांगले संगोपन केले पाहीजे , कारण तीच तुम्हाला चांगला व्रुद्धाश्रम निवडण्यास मदत करणार आहेत. हम्म! असेच आता म्हणायला हवे. जी मंडळी आज आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात एकाकी, असहाय्य ठेवत आहेत त्यांच्याही वाट्याला त्यांच्या अपत्यांकडून असाच एकाकीपणा, असहाय्यपणा आला पाहिजे म्हणजे मग समजेल!! असो, आपला, (श्रावणबाळ होण्यात आयुष्याची धन्यता मानणारा!) तात्या.

In reply to by केशवराव

ऋषिकेश Mon, 01/28/2008 - 21:53
मुलांनी नोकरी / व्यवसाया निमित्त दूर जाणे हे क्रमप्राप्तच आहे. [ मुलीने सासरी जाण्यासारखेच....] संपूर्णपणे असहमत!! व्यवसाया निमित्त दूर जाणे आणि दूर स्थायिक होणे यात फरक आहे. करियरसाठी दूर जाणे वेगळे आणि बदलत्या काळात गरजेचे आहे पण घरच्यांना विसरून तिथलेच होणे वेगळे. मुलगी सासरी गेली कि तिथलीच होते. पण अर्थाजनासाठी परदेशी जाणे हे सासरी जाण्यसारखे नाहि. काहि काळासाठी परदेशी राहून अर्थार्जन करून पुन्हा आपल्या घरी आलो तर त्या पैशाचा फायदा असे मी तरी मानतो. -ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

अघळ पघळ Tue, 01/29/2008 - 09:22
घरच्यांना विसरून तिथलेच होणे वेगळे. घरच्यांना न विसरता तिथलेच होणे ह्या विषयी आपले मत जाणून घ्यायला आवडेल. आजकाल तिकडचेच झाले तरी दर आठवड्याला इकडे फोन करून इकच्यांना न विसरणारे पण आहेत हो.

सुनील Mon, 01/28/2008 - 21:47
आज मुंबईतील कोळी-भंडारी इत्यादी मूळ रहिवासी सोडले तर बाकीचे कोण आहेत? कुठून आलेत? कशासाठी आलेत? आपापले गाव सोडून शिक्षणासाठी, कचेर्‍या-कारखान्यातून काम करण्यासाठी तरुणांनी मुंबई गाठली. सर्वांनीच काय आपल्या आई-वडीलांना येथे आणले नाही. प्रत्येकाची कारणे वेगवेगळी. मुंबईतील जागा लहान म्हणा वा घरच्या शेतीवाडीकडे बघायचे आहे म्हणा, पण बहुतेक घरात वृद्ध आई-वडील गावी आणि तरुण मंडळी मुंबईत हेच दृश्य होते/आहे. कोकणच्या अर्थव्यवस्थेला "मनी ऑर्डर इकॉनॉमी" हे नाव काय उगाच नाही पडले! पुलंचा "अंतू बर्वा" काल्पनिक नाही!! आता याच मंडळींची मुले परदेशी जाऊ लागली / राहू लागली तर एवढा बाऊ कशापायी? त्यांनी जे केले त्याचेच हे विस्तारीत रूप नव्हे काय? मला स्वतःला यात वावगे वाटत नाही. अर्थात मतभिन्नता असणार हेदेखील मला मान्य आहेच. मुलांचे संगोपन केले, त्यांना उत्तम शिक्षण दिले की आई-वडीलांची जबाबदारी संपली. पुढचे निर्णय त्यांनी मुलांवरच सोडलेले बरे. (हेच त्या मुलांनाही लागू होतेच!). कारण जेव्हा परदेशी वाढलेली त्यांची मुले जरा मोठी होताच "डेटींगच्या" गोष्टी करू लागली तर दचकू नये तसेच आपल्या शाळकरी समवस्क मित्र / मैत्रीणींबरोबर "स्लीपओव्हर्"ला गेली तर आता ते काय करताहेतच्या काळजीने स्वतःच्या झोपेचे खोबरे करून घेऊ नये! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

दोन्ही आपापल्या जागी खर आहे. अमुक एक बाजू खरी आहे म्हणजे दुसरी खोटी आहे असे नाही. सुनिल व चतुरंग यांनी समन्वय साधला आहे. नोकरीनिमित्त खेड्यातून शहरात आल्यावर आम्हालाही असे टोमणे बसले आहेत. पण त्याचाही आदरच आहे. प्रकाश घाटपांडे

चतुरंग Mon, 01/28/2008 - 22:50
मी स्वतः अनिवासी असल्याकारणाने मला अनेकवेळा सामोरा आलेला! ह्यावर खूपच लिहिले गेले आहे आणि लिहिण्यासारखेही आहे. प्रत्येक माणसाची काही तत्व (प्रिंसिपल्स) आणि काही मूल्यं (व्हॅल्यूज) असतात, किंवा निदान असायला हवीत. तुमचं वय, अनुभव, आयुष्यातला टप्पा ह्या नुसार तुमच्या मूल्यांमधे थोडा-थोडा फरक पडत जातो, आणि तो सापेक्ष असतो. ते योग्यही आहे नाहीतर आयुष्य तुंबून राहील. (अर्थात हा बदल चांगल्याकडे नेणारा आहे असं इथे गृहित आहे!) तत्वं ही बहुतांश पक्की असतात (ती बदलण्यासाठी खरोखरच काही तरी उलथापालथ घडणारं आयुष्यात आलं तर ती ही बदलतात. पण साधारणतः नाही)! परिस्थितीचा तत्वांशी झगडा सुरु झाला की प्रश्न निर्माण होतात! वरती प्रमोदकाका आणि सुनील यांनी म्हणल्याप्रमाणे पिढीदरपिढीतील फरकामुळे काही तडजोडी ह्या अपरिहार्य असतात. तर काहीवर मार्ग निघू शकतो. पुढच्या-मागच्या पिढीतल्या प्रत्येकाच्या लवचिकपणावर आणि मार्ग काढण्याच्या क्षमतेवर उत्तर अवलंबून असतं. आई-वडिलांना टाकून पुढे जाणं हा कृतघ्नपणाच आहे. पण हा करणारे अनिवासीच असतात असे कुठे आहे? आपल्या हक्काच्या घरात मुला-सुनांसमवेत राहूनही "निराधार" असलेले काही लोक मला व्यक्तिशः माहीत आहेत! जे मन मोकळं करायला माझ्यासारख्या वर्षा-दोनवर्षातून भारतात येणार्‍यांची वाट बघतात - केवढा भीषण विरोधाभास आहे हा!! सुदैवाने माझ्या आई-वडिलांना (आणि त्यामुळे मला) असे प्रश्न नाहीत हे मी माझे भाग्य समजतो. खलील जिब्रान ची एक कविता देतोय त्यात त्याने हेच सत्य मांडलेले आहे. चतुरंग

In reply to by चतुरंग

सुधारक Tue, 01/29/2008 - 06:39
आम्ही मुले आमच्या मुंबईच्या बिल्डिंगमधून पांगलो. कोणी अमेरिकेला , कोणी वाशीला तर कोणी पुण्याला. फक्त एक जण अजून टिकून आहे तो आता दारूच्या आहारी जाऊन आई वडिलांना प्रचंड त्रास देतो. त्याची आई माझ्या आईला येऊन विचारत होती, ' माझा मुलगा कां हो गेला नाही तुमच्या मुलांसारखा घर सोडून ?' मला वाटते यात निवासी किंवा अनिवासी हा मुद्दा अग्राह्य आहे.

पिवळा डांबिस Mon, 01/28/2008 - 23:42
बेसनलाडू, प्राजु, केशवराव, प्रमोदराव, सुनिल, आणि चतुरंग, वा रं पठ्ठे हो! माज्या म्हातारयाच्या आवाहनाचा मान राखलात!! मन भरून पावलं!!! आपलाच, (आनंदाश्रू पुसनारा) पिवळा डांबिस

प्रत्येक व्यवस्थेचे गुण - दोष असतातच. जसे स्वत:च्या लेक-सुना नातवंडात राहून पोरके झालेले आईबाप पाहीले आहेत ,तसे आई -बाप (सासू सासर्‍यांवर) प्रेम करणारे लेक-सुना देखील मी पाहील्या आहेत...ईथे एकच मुद्दा आहे तो सारासार विवेकाचा... जेंव्हा आई वडीलांची हाक येईल तेंव्हा सर्व पाश तोडून जाणे हे मला रास्त वाटते. छोट्या भांडणातून आईबापाला वृद्धाश्रमात टाकायला निघालेला एक नातलग पाहीला... तसेच आपल्या मुलीमुळे तिचा नवरा आईबापाला वृद्धाश्रमात टाकत आहे हे कळल्यावर वरमलेले तिचे मातापिता देखील पाहीले आहेत. जगात जसे चांगले आहे तसे वाईट देखील आहे.. काय घ्यावे काय नाही हे विचारांती ठरवावे... (अमेरीकेत येऊन गोंधळलेला) डॅनी.. पुण्याचे पेशवे

प्राजु Fri, 02/01/2008 - 22:40
पाल् करान्चा शालि, आपण नक्की कोणत्या चुकांबद्दल बोलत आहात? कारण... स्वःतच्या मनसारखि उत्तरे मिलालि म्हनुन अभिनदन करन्या सारखे काहिच नाहि आहे. चुका तर आपल्या लेखनातही आहेत... (कन्फ्यूस्ड) प्राजु

In reply to by प्राजु

पिवळा डांबिस Sat, 02/02/2008 - 17:41
सांगतील, सांगतील, घाई काय आहे प्राजुताई! :)) अजून त्यांना आपले विचार नेमक्या शब्दांत मांडायला शिकायचंय! त्या आधी नेमके शब्द लेखनात कसे मांडायचे ते शिकायचंय! तुम्ही प्रश्न मुद्द्याचा विचारलात हो, पण ती दिल्ली अजून खूप दूर आहे असं दिसतंय. :)) इतकंच, की त्यांना पहिलीत असतांना एम. ए. चा पेपर सोडवायची घाई झालीय!! प्राजुताई, तुम्हाला गोरोबा कुंभार, नामदेव, आणि थापटण्याची गोष्ट माहित आहे की नाही? :) आपला गोष्टीवेल्हाळ, पिवळा डांबिस

वरदा Sat, 02/02/2008 - 02:31
हे मान्य की आई वडिलांची जबाबदारी घ्यावी..भारतात रहाणारी किती मुलं आणी सुना आवडीने आई वडीलांची काळजी घेतात? अर्धे बँगलोरला जातात उरलेले हैद्राबादला आणि बाकिच्यांच पटत नाही म्हणुन एकाच गावात वेगवेगळे रहातात असेही कितितरी आहेतच की! जवळ रहाणारे सुद्धा रोज भांडंणं करणारे आहेत....कमीत कमी आम्ही त्यांची काळजी घेण्यात असमर्थ नाही आणि सतत प्रयत्नशील असतो हे तरी चांगलं नाही का..परवाच ओळखीच्या एका मैत्रीणीने हार्ट ऑपरेशन चा सगळा खर्च करुन बँक बॅलंस संपला आणि पुढच्या ट्रीटमेंट साठी पैसे मागितले...कमीतकमी आम्ही अशी वेळ कधी येऊ देणार नाही हे तर मान्य करा..आम्हीहि इथे चैन करत नाही गाड्या चालवतो तर चैन वाटते लोकांना पण आम्हाला दुसरा ऑप्शन नाही...आम्हीही सारखे पैसे जमवून त्यांच्या नावावर करत असतो..मग ह्याला काहीच व्हॅल्यू नाही का?

प्राजु Sat, 02/02/2008 - 21:36
खरंय वरदा म्हणते ते... पूर्णपणे सहमत आहे वरदाशी.. - प्राजु

मानस Sat, 02/02/2008 - 10:39
चांगला विषय आहे. सध्या ह्याच विषयावर एक पुस्तक गाजत आहे, ते म्हणजे अपर्णा वेलणकरचे "फॉर हियर ऑर टू गो" नक्की वाचा, वेळे अभावी ह्या बद्दल प्रतिक्रिया पुन्हा केव्हातरी ...... एक अनिवासिय भारतीय ....... मानस

प्राजु Sat, 02/02/2008 - 21:39
डांबिसकाका, अगदी खरं बोललात. आणि हो ती गोष्टही माहिती आहे मला... :))) पां. च्या शा. ला (पाल् करान्चा शालि) एम्.ए.चा पेपर सोडवायची घाई झाली आहे.. हे नक्की. - प्राजु

विसोबा खेचर Sun, 01/27/2008 - 23:23
तळेकरसाहेब, कधी कधी वाटतं मुलांनी येथे यावं, आता इथेही चांगल्या, मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात. आता परत या. मुंबईत किंवा पुणे येथे राहू शकता.' पण तिथे एवढी आरामाची जीवनशैली सोडून येणं सगळ्यांच्याच जिवावर येतं. आईवडिलांचा आक्रोश हृदयापर्यंत पोहोचतच नाही, त्याला कोण काय करणार? क्या बात है तळेकर साहेब! परदेशस्थ मुलांच्या आईवडिलांचा मूक-आक्रोश आपण अगदी योग्य शब्दात मांडलात! अहो फार लांब कशाला? आमच्या घराजवळचंच एक उदाहरण आहे. एका परदेशस्थ मुलाचे आईवडील इथे अगदी एकाकी अवस्थेत आयुष्य कंठत आहेत. आता दोघांची वयं झाली आहेत. त्यांचा मुलगा तिकडे अमेरिकेत बायको मुलांसमवेत अगदी मजेत मारे बंगला वगैरे बांधून राहतो आहे. पैसे वगैरे पाठवतो पण त्याच्या पैशांची आईवडिलांना खरंच गरज नाही. त्यांना आता म्हातारपणी मुलगा जवळ असावा, सून जवळ असावी असंच वाटतं! म्हातारा-म्हातारीला काही आजारपण वगैरे आलं तर दवाखान्यात, हॉस्पिटलात वगैरे पोहोचवण्याकरता मीच धावपळ करतो. मला त्याचे वडील डोळ्यात पाणी आणून अनेकदा, "तात्या, मी मेलो की माझ्या मुलाला वगैरे कळवण्याच्या भानगडीत पडू नकोस. त्याला आईवडीलांची काहीही किंमत नाही. तूच मला अग्नी दे!" असं म्हणतात तेव्हा मला त्यांची खरोखरंच दया येते! असो, त्या मुलाचीही काही बाजू असेल! आपल्याला काय कल्पना? परंतु जर एखाद्या मुलाचे आईवडील इथे भारतात त्याच्यासाठी तळमळत असतील तर काय उपयोग त्या मुलाचा आणि त्याच्या त्या पैशांचा? अवांतर - तळेकरसाहेब, याच विषयावर मी माझे आबा जोशी हे व्यक्तिचित्र लिहिले आहे. मनोगतावर ते कधीकाळी खूप गाजले होते! असो... आपला, (निवासी भारतीय!) तात्या.

प्राजु Mon, 01/28/2008 - 05:45
कधी कधी वाटतं मुलांनी येथे यावं, आता इथेही चांगल्या, मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात. आता परत या. मुंबईत किंवा पुणे येथे राहू शकता.' हे तुमचं वाक्य मनाला भिडलं. तुम्ही लिहिलेलं अक्षरन् अक्षर खरं आहे. मी नव-यासोबत इथे आले तेव्हा आईच्या मनाची स्थिती समजूनही काही उपयोग नव्हता. तिला भेटताना गळा दाटून आला होता. ती म्हणाली, " आकाशी भरारी घेणा-या पाखराचे पाय आणि पंख बांधून नसतात ठेवायचे... फक्त तुझं घरटं इथे आहे हे मात्र विसरू नको." आईचे हे शब्द आजही आठवले की, उठून निघून सरळ भारतात यावे असे वाटते. तुमच्या या लेखाने पुन्हा हा विचार मनाशी घट्ट होऊ लागला आहे. - (पूर्णपणे भारतीय) प्राजु

पिवळा डांबिस Mon, 01/28/2008 - 06:59
मा. तळेकरसाहेब, लेख चांगला आहे. या प्रश्नाची भारतातील मंडळींची बाजू तुम्ही चांगली मांडली आहे. पण प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, तळेकरशेठ!! :) त्यातून आजकाल "कोणीही यावे आणि अनिवासी लोकांना टपली मारून जावे" याची फॅशनच झाली आहे. :)) तसे कशाला, आपण चार दिवस थांबूया. दुसरी बाजू मांडण्यासाठी कोणी नव्या दमाची, तरणी पोरं उतरतात की मला म्हातारया शेलारमामाला मैदानात पाठवतात ते बघुया! "कायरं अनिवासी पोरांनु! हाये का कोनी हिमतीचा? का समद्यांनी शेपूट घातली?" :)) तरीही तुमचाच, (पिकल्या डुईचा) पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

बेसनलाडू Mon, 01/28/2008 - 08:37
"कोणीही यावे आणि अनिवासी लोकांना टपली मारून जावे" याची फॅशनच झाली आहे. :)) १००% सहमत आहे. (सहमत)बेसनलाडू

प्राजु Mon, 01/28/2008 - 08:22
अगदी खरं. पिवळा डांबीस म्हणतात ते ही खरे आहे. त्यातून आजकाल "कोणीही यावे आणि अनिवासी लोकांना टपली मारून जावे" याची फॅशनच झाली आहे. :)) खरंच असे झाले आहे. -(सध्या अमेरिकेत) प्राजु

प्रमोद देव Mon, 01/28/2008 - 09:09
नोकरीनिमित्त तरूणांना गाव /देश सोडून इतरत्र जावे लागते. हा प्रश्न आजचाच नाहीये. आजपासून काही वर्षांपूर्वीपर्यंत एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यामुळे ही समस्या तितकी गंभीर नव्हती. मात्र जसजशी विभक्त कुटुंब पद्धती अंमलात आली आहे तेव्हापासून ही समस्या जास्त तीव्र होत चाललेय. इथे दोष फक्त तरूण मंडळींना देणे योग्य होणार नाही. काही प्रमाणात आपल्या सारख्या ज्येष्टांचाही दोष असतो. विशेषतः स्वभावाचा दोष. आपण वागलो,वागतो तेच बरोबर आणि सद्याचे तरूण वागताहेत ते सगळे चूक असे म्हणणे. म्हणून दोष असलाच तर खरे तर तो परिस्थितीचा असतो. नोकरीसाठी जर अन्यत्र राहावे लागले (इथे परदेश/अन्य शहर/गाव अभिप्रेत आहे) तर मुले अशावेळी आपल्या वृद्ध पालकांना आपल्या बरोबर ठेऊ शकतात. पण बर्‍याच वेळा अनुभव असा असतो की ही वृद्ध मंडळी आपला गाव सोडायला तयार नसतात. काही जण असे गावे सोडून मुलांबरोबर जातातही. पण भिन्न वातावरणाशी जुळवून घेणे त्यांना जमत नाही. त्यामुळेही नाईलाजाने ते पुन्हा आपल्या गावी परततात आणि एकटेपणाचे जीवन जगतात. म्हातारपणात स्वभाव हटवादी होत असतो. त्याचाही त्रास त्यांना स्वतःला आणि कुटुंबातील इतरांना होत असतो. त्यामुळे एकत्र राहून दोन दिशांना तोंडे असण्यापेक्षा दूर राहून जवळीक असावी म्हणूनही काही जणे वेगवेगळे राहतात. अर्थात त्याचा नकळत होणारा परिणाम म्हणजे अशा वृद्ध माणसांकडे नाईलाजाने का होईना पण होणारे दूर्लक्ष; प्रकृतीची हेळसांड वगैरे. तरूणांनी वृद्धांच्या समस्या समजून घेऊन त्यांच्याशी शक्यतोवर जमवून घेणे आणि वृद्धांनीही सद्याच्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आणि आपल्या अपत्यांच्या दैनंदिन जीवनात ढवळाढवळ न घेण्याची खबरदारी घेतल्यास हा प्रश्न बर्‍यापैकी सुटू शकेल. त्यामुळे मी दोष कोणा एकाला देणार नाही. दोष असलाच तर तो परिस्थितीचा आणि त्या प्रमाणे आपल्यात बदल न घडवणार्‍यांचा.

केशवराव Mon, 01/28/2008 - 11:51
काळ ज्या प्रमाणे बदलतो तसे आपण बदलयला हवे. मुलांनी नोकरी / व्यवसाया निमित्त दूर जाणे हे क्रमप्राप्तच आहे. [ मुलीने सासरी जाण्यासारखेच....] आपल्या संगोपनासाठी त्यानी ईथे रहावे अशी अपेक्शा करणे म्हणजे त्यांचे पंख छाटण्या सारखेच आहे. आपणच त्यांना घडवण्यास मदत करतो, मोठे करतो,भरारी घेण्यास शिकवीतो ; आणि त्यांनी भरारी घेतली कि घायाळ होतो. व्रुद्धांचे प्रश्न जरूर आहेत. जरा वेगळ्या नजरेने बघुया. आपण सुखी राहूया ,त्यांना सुखी ठेवूया. [एक विचार चमकला... आपल्या मुलांच्या म्हातारपणी हा प्रश्न किती मोठ्ठा झाला असेल ?त्यांचे समूपदेशन आपणच आत्ता करायला नको ना?] आपण आपले प्रश्न मांडल्याने 'आपण दूर आलो हा अपराधच केला' असे आपल्याच मुलांना वाटेल. एक पर्याय म्हणून पुण्याला परांजप्यांनि 'अथश्री' नावाचा प्रकल्प केला आहे . अशी योजना हि यावर उपाय नाही का ठरू शकत?

In reply to by केशवराव

विसोबा खेचर Mon, 01/28/2008 - 12:26
आपल्या संगोपनासाठी त्यानी ईथे रहावे अशी अपेक्शा करणे म्हणजे त्यांचे पंख छाटण्या सारखेच आहे. असहमत आहे....अहो कुठले आईवडील आपल्या मुलाचे पंख छाटतील? एक पर्याय म्हणून पुण्याला परांजप्यांनि 'अथश्री' नावाचा प्रकल्प केला आहे . अशी योजना हि यावर उपाय नाही का ठरू शकत? म्हणजे परांजप्यांनी थोडक्यात अजून एक वृद्धाश्रम सुरू केलाय असे तुम्हाला म्हणायचे आहे का? इथे म्हातार्‍या, हातपाय थरथरणार्‍या आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकायचं आणि स्वत: तिथे परदेशात पैसा कमवायचा, करियर बनवायचं! काय जळ्ळा उपयोग आहे त्या करियरचा? कुणाला दाखवणार ते करियर आणि तो पैसा? अहो ज्यांनी स्वत: खस्ता खाऊन, आजारपणात जागरणं करून, तळहाताच्या फोडाप्रमाणे आपल्याला जपले, लहानाचे मोठे केले, त्यांना उतारवयात सोडून निघून जायचं, मी, माझं आयुष्य, माझं करियर याचाच जप करत रहायचं हे मला तरी व्यक्तिश: पटत नाही! आईवडील असतात म्हणून जगण्यात मजा असते. त्यांचं प्रेमाने करण्यात लाख मोलाचं (लाख डॉलरचं म्हटलं पाहिजे! :) समाधान असतं! एकदा ते गेले की कुणाला दाखवणार आपलं कर्तृत्व? मग कोण आहे पाठीवरून प्रेमाचा हात फिरवायला? असो, वरील विचार हे माझे व्यक्तिगत विचार आहेत व माझ्यापुरते मर्यादित आहेत. यातून कुणाही अनिवासी भारतीयांचा अनादर करण्याचा माझा हेतू नाही. जे अनिवासी भारतीय इथे आपल्या आईवडिलांना एकटे टाकून परदेशात रहात असतील त्यांचीही काही बाजू असेल, त्यांचेही काही प्रश्न असतील याची मला कल्पना आहे. आपला, (गलेलठ्ठ पगाराची दुबई, बहारिन मधली नोकरीची संधी याच कारणस्तव अनेकदा नाकारून इथे भारतात आईसोबतच रहायचा निर्णय घेतलेला समाधानी!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

केशवराव Mon, 01/28/2008 - 22:21
तात्यासाहेब, फार भावनिक होवून लिहीलेत. कुठलेही आई- वडील मुलांचे पंख छाटणार नाहीत. मंजूर! पण , मायेच्या बंधनानी त्याना जखडुन ठेवणेही योग्य नाहीच. तुमचे वैयक्तिक उदाहरण ठिक आहे, मी सामाजिक प्रश्न म्हणुन विचार केला. मी स्वतः ६० वर्षे वयाचा आहे. माझा एक मुलगा परदेशात असतो. दुसरा ईथे आहे. पण काय सांगावे ,तो पण दूर जाऊ शकतो. आणि ईथे राहीला तरी भारतात कुठेही जाऊ शकतो. नोकरी / व्यवसायाचे चित्रच पालटले आहे. काही गोष्टी आता स्विकाराव्याच लागतिल. व्रुद्धाश्रम हि संकल्पना सुद्धा आता समाजाचे एक अंग म्हणुनच पहावी लागेल.क्रुपया 'अथश्री ' ला एकदा भेट द्या. तो व्रुद्धाश्रम नाही. ज्यांची मुले दूर आहेत अशा लोकांची ती सोसायटी आहे.[ मी परांजप्यांचा एजंट नाही.] जरा वेगळ्या द्रुष्टीने विचार करून पहा. * एक विधान : ' तुमच्या मुलांचे तुम्ही चांगले संगोपन केले पाहीजे , कारण तीच तुम्हाला चांगला व्रुद्धाश्रम निवडण्यास मदत करणार आहेत.'

In reply to by केशवराव

विसोबा खेचर Tue, 01/29/2008 - 09:53
व्रुद्धाश्रम हि संकल्पना सुद्धा आता समाजाचे एक अंग म्हणुनच पहावी लागेल. हे विधान पटले नाही. माझ्या मते आईवडीलांची काळजी, त्यांची देखभाल, त्यांच्याजवळ असणे, ह्या गोष्टींना मुलांनी प्रथम प्राधान्य द्यायला हवे. बाय द वे, मी परांजप्यांचा एजंट नाही. हे आवडले! :) तुमच्या मुलांचे तुम्ही चांगले संगोपन केले पाहीजे , कारण तीच तुम्हाला चांगला व्रुद्धाश्रम निवडण्यास मदत करणार आहेत. हम्म! असेच आता म्हणायला हवे. जी मंडळी आज आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात एकाकी, असहाय्य ठेवत आहेत त्यांच्याही वाट्याला त्यांच्या अपत्यांकडून असाच एकाकीपणा, असहाय्यपणा आला पाहिजे म्हणजे मग समजेल!! असो, आपला, (श्रावणबाळ होण्यात आयुष्याची धन्यता मानणारा!) तात्या.

In reply to by केशवराव

ऋषिकेश Mon, 01/28/2008 - 21:53
मुलांनी नोकरी / व्यवसाया निमित्त दूर जाणे हे क्रमप्राप्तच आहे. [ मुलीने सासरी जाण्यासारखेच....] संपूर्णपणे असहमत!! व्यवसाया निमित्त दूर जाणे आणि दूर स्थायिक होणे यात फरक आहे. करियरसाठी दूर जाणे वेगळे आणि बदलत्या काळात गरजेचे आहे पण घरच्यांना विसरून तिथलेच होणे वेगळे. मुलगी सासरी गेली कि तिथलीच होते. पण अर्थाजनासाठी परदेशी जाणे हे सासरी जाण्यसारखे नाहि. काहि काळासाठी परदेशी राहून अर्थार्जन करून पुन्हा आपल्या घरी आलो तर त्या पैशाचा फायदा असे मी तरी मानतो. -ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

अघळ पघळ Tue, 01/29/2008 - 09:22
घरच्यांना विसरून तिथलेच होणे वेगळे. घरच्यांना न विसरता तिथलेच होणे ह्या विषयी आपले मत जाणून घ्यायला आवडेल. आजकाल तिकडचेच झाले तरी दर आठवड्याला इकडे फोन करून इकच्यांना न विसरणारे पण आहेत हो.

सुनील Mon, 01/28/2008 - 21:47
आज मुंबईतील कोळी-भंडारी इत्यादी मूळ रहिवासी सोडले तर बाकीचे कोण आहेत? कुठून आलेत? कशासाठी आलेत? आपापले गाव सोडून शिक्षणासाठी, कचेर्‍या-कारखान्यातून काम करण्यासाठी तरुणांनी मुंबई गाठली. सर्वांनीच काय आपल्या आई-वडीलांना येथे आणले नाही. प्रत्येकाची कारणे वेगवेगळी. मुंबईतील जागा लहान म्हणा वा घरच्या शेतीवाडीकडे बघायचे आहे म्हणा, पण बहुतेक घरात वृद्ध आई-वडील गावी आणि तरुण मंडळी मुंबईत हेच दृश्य होते/आहे. कोकणच्या अर्थव्यवस्थेला "मनी ऑर्डर इकॉनॉमी" हे नाव काय उगाच नाही पडले! पुलंचा "अंतू बर्वा" काल्पनिक नाही!! आता याच मंडळींची मुले परदेशी जाऊ लागली / राहू लागली तर एवढा बाऊ कशापायी? त्यांनी जे केले त्याचेच हे विस्तारीत रूप नव्हे काय? मला स्वतःला यात वावगे वाटत नाही. अर्थात मतभिन्नता असणार हेदेखील मला मान्य आहेच. मुलांचे संगोपन केले, त्यांना उत्तम शिक्षण दिले की आई-वडीलांची जबाबदारी संपली. पुढचे निर्णय त्यांनी मुलांवरच सोडलेले बरे. (हेच त्या मुलांनाही लागू होतेच!). कारण जेव्हा परदेशी वाढलेली त्यांची मुले जरा मोठी होताच "डेटींगच्या" गोष्टी करू लागली तर दचकू नये तसेच आपल्या शाळकरी समवस्क मित्र / मैत्रीणींबरोबर "स्लीपओव्हर्"ला गेली तर आता ते काय करताहेतच्या काळजीने स्वतःच्या झोपेचे खोबरे करून घेऊ नये! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

दोन्ही आपापल्या जागी खर आहे. अमुक एक बाजू खरी आहे म्हणजे दुसरी खोटी आहे असे नाही. सुनिल व चतुरंग यांनी समन्वय साधला आहे. नोकरीनिमित्त खेड्यातून शहरात आल्यावर आम्हालाही असे टोमणे बसले आहेत. पण त्याचाही आदरच आहे. प्रकाश घाटपांडे

चतुरंग Mon, 01/28/2008 - 22:50
मी स्वतः अनिवासी असल्याकारणाने मला अनेकवेळा सामोरा आलेला! ह्यावर खूपच लिहिले गेले आहे आणि लिहिण्यासारखेही आहे. प्रत्येक माणसाची काही तत्व (प्रिंसिपल्स) आणि काही मूल्यं (व्हॅल्यूज) असतात, किंवा निदान असायला हवीत. तुमचं वय, अनुभव, आयुष्यातला टप्पा ह्या नुसार तुमच्या मूल्यांमधे थोडा-थोडा फरक पडत जातो, आणि तो सापेक्ष असतो. ते योग्यही आहे नाहीतर आयुष्य तुंबून राहील. (अर्थात हा बदल चांगल्याकडे नेणारा आहे असं इथे गृहित आहे!) तत्वं ही बहुतांश पक्की असतात (ती बदलण्यासाठी खरोखरच काही तरी उलथापालथ घडणारं आयुष्यात आलं तर ती ही बदलतात. पण साधारणतः नाही)! परिस्थितीचा तत्वांशी झगडा सुरु झाला की प्रश्न निर्माण होतात! वरती प्रमोदकाका आणि सुनील यांनी म्हणल्याप्रमाणे पिढीदरपिढीतील फरकामुळे काही तडजोडी ह्या अपरिहार्य असतात. तर काहीवर मार्ग निघू शकतो. पुढच्या-मागच्या पिढीतल्या प्रत्येकाच्या लवचिकपणावर आणि मार्ग काढण्याच्या क्षमतेवर उत्तर अवलंबून असतं. आई-वडिलांना टाकून पुढे जाणं हा कृतघ्नपणाच आहे. पण हा करणारे अनिवासीच असतात असे कुठे आहे? आपल्या हक्काच्या घरात मुला-सुनांसमवेत राहूनही "निराधार" असलेले काही लोक मला व्यक्तिशः माहीत आहेत! जे मन मोकळं करायला माझ्यासारख्या वर्षा-दोनवर्षातून भारतात येणार्‍यांची वाट बघतात - केवढा भीषण विरोधाभास आहे हा!! सुदैवाने माझ्या आई-वडिलांना (आणि त्यामुळे मला) असे प्रश्न नाहीत हे मी माझे भाग्य समजतो. खलील जिब्रान ची एक कविता देतोय त्यात त्याने हेच सत्य मांडलेले आहे. चतुरंग

In reply to by चतुरंग

सुधारक Tue, 01/29/2008 - 06:39
आम्ही मुले आमच्या मुंबईच्या बिल्डिंगमधून पांगलो. कोणी अमेरिकेला , कोणी वाशीला तर कोणी पुण्याला. फक्त एक जण अजून टिकून आहे तो आता दारूच्या आहारी जाऊन आई वडिलांना प्रचंड त्रास देतो. त्याची आई माझ्या आईला येऊन विचारत होती, ' माझा मुलगा कां हो गेला नाही तुमच्या मुलांसारखा घर सोडून ?' मला वाटते यात निवासी किंवा अनिवासी हा मुद्दा अग्राह्य आहे.

पिवळा डांबिस Mon, 01/28/2008 - 23:42
बेसनलाडू, प्राजु, केशवराव, प्रमोदराव, सुनिल, आणि चतुरंग, वा रं पठ्ठे हो! माज्या म्हातारयाच्या आवाहनाचा मान राखलात!! मन भरून पावलं!!! आपलाच, (आनंदाश्रू पुसनारा) पिवळा डांबिस

प्रत्येक व्यवस्थेचे गुण - दोष असतातच. जसे स्वत:च्या लेक-सुना नातवंडात राहून पोरके झालेले आईबाप पाहीले आहेत ,तसे आई -बाप (सासू सासर्‍यांवर) प्रेम करणारे लेक-सुना देखील मी पाहील्या आहेत...ईथे एकच मुद्दा आहे तो सारासार विवेकाचा... जेंव्हा आई वडीलांची हाक येईल तेंव्हा सर्व पाश तोडून जाणे हे मला रास्त वाटते. छोट्या भांडणातून आईबापाला वृद्धाश्रमात टाकायला निघालेला एक नातलग पाहीला... तसेच आपल्या मुलीमुळे तिचा नवरा आईबापाला वृद्धाश्रमात टाकत आहे हे कळल्यावर वरमलेले तिचे मातापिता देखील पाहीले आहेत. जगात जसे चांगले आहे तसे वाईट देखील आहे.. काय घ्यावे काय नाही हे विचारांती ठरवावे... (अमेरीकेत येऊन गोंधळलेला) डॅनी.. पुण्याचे पेशवे

प्राजु Fri, 02/01/2008 - 22:40
पाल् करान्चा शालि, आपण नक्की कोणत्या चुकांबद्दल बोलत आहात? कारण... स्वःतच्या मनसारखि उत्तरे मिलालि म्हनुन अभिनदन करन्या सारखे काहिच नाहि आहे. चुका तर आपल्या लेखनातही आहेत... (कन्फ्यूस्ड) प्राजु

In reply to by प्राजु

पिवळा डांबिस Sat, 02/02/2008 - 17:41
सांगतील, सांगतील, घाई काय आहे प्राजुताई! :)) अजून त्यांना आपले विचार नेमक्या शब्दांत मांडायला शिकायचंय! त्या आधी नेमके शब्द लेखनात कसे मांडायचे ते शिकायचंय! तुम्ही प्रश्न मुद्द्याचा विचारलात हो, पण ती दिल्ली अजून खूप दूर आहे असं दिसतंय. :)) इतकंच, की त्यांना पहिलीत असतांना एम. ए. चा पेपर सोडवायची घाई झालीय!! प्राजुताई, तुम्हाला गोरोबा कुंभार, नामदेव, आणि थापटण्याची गोष्ट माहित आहे की नाही? :) आपला गोष्टीवेल्हाळ, पिवळा डांबिस

वरदा Sat, 02/02/2008 - 02:31
हे मान्य की आई वडिलांची जबाबदारी घ्यावी..भारतात रहाणारी किती मुलं आणी सुना आवडीने आई वडीलांची काळजी घेतात? अर्धे बँगलोरला जातात उरलेले हैद्राबादला आणि बाकिच्यांच पटत नाही म्हणुन एकाच गावात वेगवेगळे रहातात असेही कितितरी आहेतच की! जवळ रहाणारे सुद्धा रोज भांडंणं करणारे आहेत....कमीत कमी आम्ही त्यांची काळजी घेण्यात असमर्थ नाही आणि सतत प्रयत्नशील असतो हे तरी चांगलं नाही का..परवाच ओळखीच्या एका मैत्रीणीने हार्ट ऑपरेशन चा सगळा खर्च करुन बँक बॅलंस संपला आणि पुढच्या ट्रीटमेंट साठी पैसे मागितले...कमीतकमी आम्ही अशी वेळ कधी येऊ देणार नाही हे तर मान्य करा..आम्हीहि इथे चैन करत नाही गाड्या चालवतो तर चैन वाटते लोकांना पण आम्हाला दुसरा ऑप्शन नाही...आम्हीही सारखे पैसे जमवून त्यांच्या नावावर करत असतो..मग ह्याला काहीच व्हॅल्यू नाही का?

प्राजु Sat, 02/02/2008 - 21:36
खरंय वरदा म्हणते ते... पूर्णपणे सहमत आहे वरदाशी.. - प्राजु

मानस Sat, 02/02/2008 - 10:39
चांगला विषय आहे. सध्या ह्याच विषयावर एक पुस्तक गाजत आहे, ते म्हणजे अपर्णा वेलणकरचे "फॉर हियर ऑर टू गो" नक्की वाचा, वेळे अभावी ह्या बद्दल प्रतिक्रिया पुन्हा केव्हातरी ...... एक अनिवासिय भारतीय ....... मानस

प्राजु Sat, 02/02/2008 - 21:39
डांबिसकाका, अगदी खरं बोललात. आणि हो ती गोष्टही माहिती आहे मला... :))) पां. च्या शा. ला (पाल् करान्चा शालि) एम्.ए.चा पेपर सोडवायची घाई झाली आहे.. हे नक्की. - प्राजु
लेखनविषय:
लेखनप्रकार
आधार कुणाचा? चांगल्या नोकरीच्या, गलेलठ्ठ पगाराच्या आशेने मुलं परदेशी जातात ते परतीचे दोर कापूनच. दोन वर्षांनी येऊ, चार वर्षांनी येऊ, असं म्हणत ग्रीन कार्ड कधी घेतात आणि कायमचे अमेरिकावासी कधी होतात, ते कळतही नाही. एकदा तिथल्या जीवनशैलीची सवय झाली, की इथे परत यायला नको वाटतं. आईवडिलांनाही मुलांच्या नसण्याची सवय होते आणि शेजारी, मित्र किंवा नातेवाईकांच्या आधाराने ते आयुष्य घालवतात. 'इथे सगळं ठीक आहे,' असं सांगितलं जातं तब्येत बरी नसली तरी. मुलं तिथे दूर अमेरिकेत, आपली दुखणी त्यांना काय सांगणार? भारतात यायचं, तर खर्च ! रजा पाहिजे? नातवांच्या आठवणीन व्याकूळ होनं आहेच.

प्रमोद देव (आपले अत्यानंदकाका) यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा (२८ जानेवारी)

सागर ·

विसोबा खेचर Sun, 01/27/2008 - 12:44
देवकाकांना समस्त मिपा परिवारातर्फे वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा... लालबागचा राजा त्यांना उदंड आयुष्य, उत्तम प्रकृतीस्वास्थ्य प्रदान करो हीच मनापासून प्रार्थना..! त्यांचा वडिलकीच्या नात्याचा आशीर्वादाचा हात मिपाच्या मस्तकावर नेहमीच राहो, हीच सदिच्छा... आपला, (देवकाकांचा पुतण्या!) तात्या. अवांतर - काहीही म्हणा बाकी, आम्ही जानेवारी महिन्यात जलमलेली माणसं बाकी थोरच! :) आपला, (२ जानेवारीचा!) तात्या. ता क - देवकाका, सध्या नुसत्या प्रतिसादपर शुभेच्छा देत आहे. परंतु आमची अत्यंत आवडती आणि लाडकी नटी अनुष्का हीचं चित्र असलेलं शुभेच्छाकार्ड लवकरच पोष्ट करतो.. :) आपला, (अनुष्काप्रेमी!) तात्या.

धोंडोपंत Sun, 01/27/2008 - 14:50
श्री प्रमोदरावांना आमच्याही शुभेच्छा. आपला, (सांगाती) धोंडोपंत तात्या, अनुष्काप्रेम लई वाढलंय तुमचं आजकाल. चालू द्या. आपला, (प्रेक्षक)धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

वाढदिवसानिमित्त , शुभेच्छा. असाच स्नेह वृद्धिंगत होवो. आपल्याकडून सतत लिखाण होत राहो. आम्हालाही आपल्याकडून स्फूर्ती मिळो. प्रकाश घाटपांडे

सुनील Mon, 01/28/2008 - 07:04
प्रमोदकाका, वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा! आपल्याकडून अधिकाधिक लिखाण व्हावे हीच अपेक्षा!! सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रमोद देव Mon, 01/28/2008 - 07:56
आपल्या सगळ्यांचे प्रेम पाहून भारावलो. औपचारिक आभार न मानता मी ह्या शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी जपून ठेवतोय.

धमाल मुलगा Mon, 01/28/2008 - 14:20
प्रमोदकाका, अब तक छप्पन... वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ! आता होऊन जाऊद्या एखादी ज॑गी मेजवानी, ईथेच हो, मिपावर. लिहा काहीतरी जोरदार. आपला, (लेखन-मेजवानीभिलाषी :) ) इणम्र धमाल.

झकासराव Mon, 01/28/2008 - 17:26
तुम्हाला अनेकोत्तम शुभेच्छा! लिहित रहा. वाढदिवस साजरे करत रहा. आमच्या शुभेच्छा घेत रहा :)

चतुरंग Mon, 01/28/2008 - 21:15
नावातच मोद भरला आहे! तुम्ही असे निराश का? तुमची प्रत्यक्ष भेट नसली तरी मि.पा. करांना भरभरुन आनंद देणार्‍यांपैकी तुम्ही आहात हे निश्चित. तुम्हाला उदंड आयुष्य, स्वास्थ्य लाभो आणि मि.पा.वर तुम्ही अधिकाधिक लिहिते रहावोत हीच प्रार्थना! तेव्हा तुमच्या दोन ओळीत बदल करुन मी म्हणेन - तुम्ही हसावे म्हणून मी हसत आहे! मि.पा.करांच्या प्रेमासाठी जगत आहे!! हसते आणि लिहिते रहा!!! चतुरंग

विसोबा खेचर Sun, 01/27/2008 - 12:44
देवकाकांना समस्त मिपा परिवारातर्फे वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा... लालबागचा राजा त्यांना उदंड आयुष्य, उत्तम प्रकृतीस्वास्थ्य प्रदान करो हीच मनापासून प्रार्थना..! त्यांचा वडिलकीच्या नात्याचा आशीर्वादाचा हात मिपाच्या मस्तकावर नेहमीच राहो, हीच सदिच्छा... आपला, (देवकाकांचा पुतण्या!) तात्या. अवांतर - काहीही म्हणा बाकी, आम्ही जानेवारी महिन्यात जलमलेली माणसं बाकी थोरच! :) आपला, (२ जानेवारीचा!) तात्या. ता क - देवकाका, सध्या नुसत्या प्रतिसादपर शुभेच्छा देत आहे. परंतु आमची अत्यंत आवडती आणि लाडकी नटी अनुष्का हीचं चित्र असलेलं शुभेच्छाकार्ड लवकरच पोष्ट करतो.. :) आपला, (अनुष्काप्रेमी!) तात्या.

धोंडोपंत Sun, 01/27/2008 - 14:50
श्री प्रमोदरावांना आमच्याही शुभेच्छा. आपला, (सांगाती) धोंडोपंत तात्या, अनुष्काप्रेम लई वाढलंय तुमचं आजकाल. चालू द्या. आपला, (प्रेक्षक)धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

वाढदिवसानिमित्त , शुभेच्छा. असाच स्नेह वृद्धिंगत होवो. आपल्याकडून सतत लिखाण होत राहो. आम्हालाही आपल्याकडून स्फूर्ती मिळो. प्रकाश घाटपांडे

सुनील Mon, 01/28/2008 - 07:04
प्रमोदकाका, वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा! आपल्याकडून अधिकाधिक लिखाण व्हावे हीच अपेक्षा!! सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रमोद देव Mon, 01/28/2008 - 07:56
आपल्या सगळ्यांचे प्रेम पाहून भारावलो. औपचारिक आभार न मानता मी ह्या शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी जपून ठेवतोय.

धमाल मुलगा Mon, 01/28/2008 - 14:20
प्रमोदकाका, अब तक छप्पन... वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ! आता होऊन जाऊद्या एखादी ज॑गी मेजवानी, ईथेच हो, मिपावर. लिहा काहीतरी जोरदार. आपला, (लेखन-मेजवानीभिलाषी :) ) इणम्र धमाल.

झकासराव Mon, 01/28/2008 - 17:26
तुम्हाला अनेकोत्तम शुभेच्छा! लिहित रहा. वाढदिवस साजरे करत रहा. आमच्या शुभेच्छा घेत रहा :)

चतुरंग Mon, 01/28/2008 - 21:15
नावातच मोद भरला आहे! तुम्ही असे निराश का? तुमची प्रत्यक्ष भेट नसली तरी मि.पा. करांना भरभरुन आनंद देणार्‍यांपैकी तुम्ही आहात हे निश्चित. तुम्हाला उदंड आयुष्य, स्वास्थ्य लाभो आणि मि.पा.वर तुम्ही अधिकाधिक लिहिते रहावोत हीच प्रार्थना! तेव्हा तुमच्या दोन ओळीत बदल करुन मी म्हणेन - तुम्ही हसावे म्हणून मी हसत आहे! मि.पा.करांच्या प्रेमासाठी जगत आहे!! हसते आणि लिहिते रहा!!! चतुरंग
प्रमोद देव (आपले अत्यानंदकाका) यांच्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा परमेश्वर त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य देवो आणि तुमच्याकडून नेहमीसारखेच परखड लेखन अधिकाधिक होवो....हीच प्रार्थना. प्रमोदकाका, वाढदिवसाच्या मनापासून हार्दीक शुभेच्छा... -सागर

इनका क्या करें ?

मुक्तसुनीत ·

आपण मांडलेला विचार एक उत्तम चिंतन आहे, खरे तर दशके बदलले की माणसांची जीवनशैली बदलते आणि नंतर संवेदना. म्हणुन आपल्याला ज्यांच्याबद्द्ल श्रद्धा वाटते ती माणसे काळाच्या ओघात कधी बदलतात, ती अशी का वागतात ते कळत नाही . शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न म्हणुन सोडावे लागते. खरे तर आमचे वय फार अनुभवाने समृध्द झाले आहे, असे नाही. पण कमी वयात एका विद्वान माणसाच्या सहवास आम्हास लाभला. नैतिक मुल्य, सत्य, प्रामाणिकपणा हाच ज्यांच्या जीवनाचा भाग आहे, असे वाटणारी व्यक्ती. काही वर्षानंतर पैशासाठी कोणत्या थराला जाते. विद्वत्तेचा कसा उपयोग करते, हे पाहिले की, इनका क्या करे हा प्रश्न आमच्या समोर उरत नाही. तेव्हा आम्ही हा ज्याचा त्याचा प्रश्न म्हणुन सोडून देतो.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज Mon, 01/28/2008 - 09:05
थोड्याफार फरकाने हा अनुभव सगळ्यांनाच येत असावा. बोध घेऊन, आपण तसे न करावे हेच आपल्या हाती, बाकी काय? बाकी आई-वडील आपल्या मुलांसाठी नाही करणार तर कोण :-) तुम्हाला सुरवातीला जो आनंद मिळाला त्याची दक्षीणा म्हणायची. कोणास ठावूक काही कट्टर चाहते असतील देखील नवीन भीषण संगीताचे :-)

प्राजु Mon, 01/28/2008 - 10:00
मी ७ वीत असताना तो "मैने प्यार किया" सॉलिड हिट्ट झाला होता. भाग्यश्री पटवर्धनने ( माझी कोणी नव्हे) अक्षरशः वेड लावले होते. तिच्यासारखे ड्रेस, केशभूषा... नाना त-हा आम्ही मुली करायचो. कितीवेळा तो सिनेमा मी पाहीला त्या भाग्यश्रीलाच ठावूक. तिची जवळजवळ ३५० लहानमोठी पोस्टर्स मी जमवली होती. ती दिसायचीही अगदी निरागस.. सुंदर. बाबांना दिसू नये म्हणून माझ्या कपाटाच्या दाराच्या आतल्या बाजूला लावून ठेवली . हळू हळू भाग्यश्री पडद्याआड गेली आणि मी कॉलेजला. मध्यंतरी घर बदलायच्या वेळी आमच्या आईने ती सगळी पोस्टर्स एका बॅगेत भरून नविन घरी आणली. नव्या घरी नव्या कपाटात सामान लावताना आईने ती बॅग आणून दिली म्हणाली' " हे तुझं महत्वाचं सामान .." मी उघडून पाहिलं.. तर ती पोस्टर्स. आता मी ऐश्वर्याची फॅन झाले होते. आणि ऐश्वर्याची पोस्टर्सही आणली गेली होती, अर्थातच बाबांच्या नकळत. तेव्हा मला प्रश्न पडला..आता भाग्यश्री का क्या करे? - प्राजु

प्रमोद देव Mon, 01/28/2008 - 10:35
भाबड्या वयात आणि पोक्तवयात समजशक्तिची जी पोहोच असते त्यात जो फरक असतो तोच खरा. बाकी एकाच प्रसंगाचे वर्णन निरनिराळे लोक ज्या पद्धतीने करतात तसलाच हा प्रकार असतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. माझ्या बालपणी देवाआनंद,दिलीपकुमार,राजकपूर,राजकुमार,राजेंद्रकुमार,शम्मीकपूर वगैरे हिंदी चित्रपट सृष्टीतले नावाजलेले नट होते. त्यांचे चित्रपट पाहताना ते सगळेच खूप महान वगैरे वाटत. पण आता तेच चित्रपट पुन्हा बघण्यात आल्यावर लक्षात आले की त्यांचा अभिनय किती नकली आहे ते.(हे माझे वैयक्तिक मत आहे) देव आनंदला तर उत्कृष्ठ विनोदी अभिनेता म्हणता येईल असे आता वाटते आणि शम्मीकपूरला तर माकड उड्या मारताना पाहून आम्ही त्याला नट समजत होतो हे लक्षात आल्यावर आमचीच आम्हाला कीव येते. हा एक विचार झाला. पण जर साकल्याने विचार केला तर लक्षात येते की आपल्या जाणीवा त्या त्या वयात जशा होत्या आणि पुढे प्रगल्भ होत गेल्या त्याप्रमाणे आपण त्या त्या गोष्टीची मीमांसा केली. म्हणून तेव्हा वाटले तेही बरोबर होते आणि आज वाटतेय तेही बरोबर

केशवराव Mon, 01/28/2008 - 11:19
प्राजु , प्रमोद देवांची विचार करण्याची पद्धत बरोबर वाटते, नाही का ? काळाप्रमाणे जग बदलण्याचा वेग प्रचंड वाढतो आहे. सर्व मुल्य देखील बदलत आहेत, प्रचंड वेगाने बदलत आहेत.१० -१५ वर्षा पूर्वीची मुल्य , आदर्श आज अस्तंगत झाले आहेत. तरीपण, काळातित म्हणून काही गोष्टी टिकतातच. पं. नेहरू, डॉन ब्रॅड्मन, चार्ली चॅपलीन, पं.रवी शंकर, सत्यजीत रे, कुसुमाग्रज,लता मंगेशकर ............... आणि कितीतरी. या सर्वांना तोडच नाही. ' यांचे काय करायचे ? ' हा प्रश्न ईथे पडत नाही.भाग्यश्री ते ऐश्व्रर्या हा बदल ठिक आहे , पण नर्गिसला पर्याय नाही. काळातित गोष्टींचे सोड, पण आपण काळा बरोबर बदलायला पाहीजे. केशवराव

विसोबा खेचर Mon, 01/28/2008 - 11:33
धाकट्या मंगेशकरांबद्दल मांडलेला मुद्दा पटला. मीही एकेकाळी त्यांचे अनेक उतमोत्तम कार्यक्रम पाहिलेले आहेत. खूप मजा यायची. परंतु नंतर नंतर या कार्यक्रमाची अगदीच वाट लागली आणि मीही त्यांच्या कार्यक्रमाला जायचे थांबवले... असो, मुक्तराव आपण चांगला मुद्दा मांडलात...! आपला, (दिदीभक्त) तात्या.

अमित Mon, 01/28/2008 - 12:59
धाकट्या मंगेशकरांच्या कार्यक्रमाबद्दल आणखी काही लोकांकडूनही अशीच प्रतिक्रीया ऐकली. त्यामुळे कार्यक्रम पाहण्याचे ' कष्ट' घेणे नाही. धन्यवाद मुक्तराव

लईच वझं झाल तर कंबारडं मॉडतय. मंग ते आठवनिंच असू दे न्हाई त साठवनींच. लगी खालीच बसतोया. वकारी आली कि वकून टाकायच. न्हाई त लई मळमळातयं. मान्सांनी लईच कप्पेबाजी केलि ना कि मंग त्ये 'देवराई' पिक्चर वानी स्किझोफ्रेनिक व्हतय. जे हाय ते आस हाय. कदि मोरपिसावानी गुदगुल्या बी व्हत्यात. कदि खरवाडतय बी. पघा भैनाबाई काय म्हंतात. मन वढाय वढाय उभ्या पीकातलं ढोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर मन मोकाट मोकाट त्याले ठायी ठायी वाटा जशा वार्यानं चालल्या पानावर्हल्यारे लाटा मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोन? उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन मन जह्यरी जह्यरी याचं न्यारं रे तंतर आरे, इचू, साप बरा त्याले उतारे मंतर! मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात? आता व्हतं भुईवर गेलं गेलं आभायात मन चप्पय चप्पय त्याले नही जरा धीर तठे व्हयीसनी ईज आलं आलं धर्तीवर मन एवढं एवढं जसा खाकसचा दाना मन केवढं केवढं? आभायात बी मायेना देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात! आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत! देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं! [there is hidden child in every adult] प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

मुक्तसुनीत Tue, 01/29/2008 - 02:27
घाटपांडेकाका, तुमचे तुमच्या गावरान शैलीतले लिखाण नेहमीप्रमाणे आवडलेच. त्यातील व्यंगार्थसुद्धा समजण्यासारखा आहे. पण या विषयाशी अनुसरून त्यातून नेमके काय म्हणायचे आहे ते समजले नाही. जुन्या आठवणींचे ओझे होऊ देऊ नका असे तुम्हाला सूचित करायचे आहे काय ? तसे असल्यास माझा मुद्दा तुमच्यापर्यंत नीट पोचला नसेलसे वाटते. आपल्या प्रवासात शाश्वत् असे थोडे असते; आणि मौल्यवान म्हणून उराशी धरलेल्या कुठल्या गोष्टी एकदम जुन्या चलनाप्रमाणे आउट् डेटेड् होतील याचा आपल्याला भरवसा देववत नाही असे माझ्या म्हणण्याचा एकूण सूर होता.

In reply to by मुक्तसुनीत

पण या विषयाशी अनुसरून त्यातून नेमके काय म्हणायचे आहे ते समजले नाही.>> ते मी इतरांवर सोपवतो. जुन्या आठवणींचे ओझे होऊ देऊ नका असे तुम्हाला सूचित करायचे आहे काय ? >> बघा प्राऽऽजू काय म्हणते. जुन्या आठवणी कटू असतील तर त्याचं ओझं , गोड असतील तर तो ठेवा. पण कटु असो वा गोड तो संचयच. अपरिहार्य. प्रमोद देव व्यावहारिक सल्ला देतात. खराखुरा अनुभवातुन आलेला. तसे असल्यास माझा मुद्दा तुमच्यापर्यंत नीट पोचला नसेलसे वाटते. >> माहित नाहि, मला जे वाटल ते मी लिहिलं. बहिणाबाईंनी केलेले वर्णन मला अधिक भावत. आपल्या प्रवासात शाश्वत् असे थोडे असते; आणि मौल्यवान म्हणून उराशी धरलेल्या कुठल्या गोष्टी एकदम जुन्या चलनाप्रमाणे आउट् डेटेड् होतील याचा आपल्याला भरवसा देववत नाही असे माझ्या म्हणण्याचा एकूण सूर होता.>> अगदी सहमत. ( अकाली काकत्व आलेला) प्रकाश घाटपांडे

दीपा॑जली Tue, 01/29/2008 - 12:58
माणसाच्या जीवनात बदल अपरीहार्य आहे.या जगात प्रत्येक गोष्ट बदलत असते,तसेच माणसाचे मन पण बदलत असते. बालपण,तारुण्य,वार्ध्यक्य या सगळ्यातून जात असता॑ना प्रत्येकजण बदलत असतोच्.त्यात नवल काहीच नाहि. हे बदल हसत, मोकळेपणाने स्विकारण्यातच मजा आहे. आपण बदललो नाही तर जीवनातली मजाच निघून जाईल.

In reply to by दीपा॑जली

मुक्तसुनीत Tue, 01/29/2008 - 20:30
बदल नुसता अपरिहार्यच नव्हे ; तो आपल्या जीवनाचा स्थायिभाव आहे ! असा कुठला पैलू असेल आपल्या जगण्यातला जो बदलत नसेल ! त्यामुळे आपण खुद्द बदलणार, बर्‍यावाईट बदलाना - इच्छा असो , नसो - सामोरे जाणारच. प्रश्न आहे अशा गोष्टींचा ज्या आपण चिरंतन मानल्या. ज्यांच्यातील अनपेक्षित - आणि बर्‍याचदा त्यांच्या र्‍हासाला कारणीभूत ठरलेले - बदल नक्की कसे स्वीकारायचे ?

In reply to by मुक्तसुनीत

चतुरंग Wed, 01/30/2008 - 04:55
प्रश्न आहे अशा गोष्टींचा ज्या आपण चिरंतन मानल्या. ज्यांच्यातील अनपेक्षित - आणि बर्‍याचदा त्यांच्या र्‍हासाला कारणीभूत ठरलेले - बदल नक्की कसे स्वीकारायचे ? हा प्रश्न मला सातत्याने वेगवेगळ्या रुपात सामोरा येऊन छळतो. एक उदाहरण घेऊयात - आपण आपल्याला आणि आपल्या मुलाला (मुलगा/मुलगी) शिस्तीचे धडे देतो - मग ते हस्ताक्षर असेल, जेवण्याच्या पद्धती असतील, कपडयांच्या घड्या असतील, मोठ्या माणसांचा आदर करणे असेल किंवा सार्वजनिक जीवनातली शिस्त.... हे त्या बालकाला पुढच्या आयुष्यात उपयोगी पडणार ह्याची आपल्याला खात्री असते. आपण आटापिटा करतो. कारण ही मूल्यं आपण शाश्वत मानलेली असतात, त्यातलं हित माहीत असतं. आणि जेव्हा आपण आजूबाजूला निरीक्षण करतो तेव्हा बर्‍याच वेळा असं दिसतं की कितीतरी लोक बेशिस्त जगत असतात, काही विशिष्ठ धोरण नाही, काही उद्देश नाही, लांबचा विचार नाही, जसे होईल तसे आयुष्य चालू असते. त्यांच्या आयुष्यात वरकरणी आपल्याला काही कमी दिसत नाही. सगळं काही आलबेल दिसत असतं. मग आपल्या मनात विचार येतो की आपण जे कष्ट (खरं सांगायचं तर त्यावेळी मनात येणारा शब्द "मगजमारी"!) करतो आहोत त्याचा काही उपयोग आहे की नाही? का हे सगळं वाया जाणार? १० पैकी ८ लोक बेशिस्त असले तर उरलेल्या २ लोकांचा निभाव काय लागणार? उत्तर : ह्याचं उत्तर मी माझ्या परीनं शोधण्याचा प्रयत्न केला आणि ते मला मिळालं, तेही निसर्गातून! वसंत ऋतूत झाडं फुलतात, फुलांचे सुंदर रंग काहींना आनंद देतात, काही जणांना त्यात काहीच वाटत नाही. पण कुणाला काही वाटावं किंवा वाटू नये म्हणून फुलं फुलतात का हो? नाही, तो त्यांचा धर्म आहे. ती फुलणारच. आंब्याला काही वर्षे निगा, खतपाणी करावंच लागतं, काही वर्ष काहीच फळ हाती नसतं, पण काही वर्षांनी हापूस चाखायला मिळणारच, तो त्याचा धर्म आहे! आयुष्यातल्या बर्‍याच गोष्टी ह्या सुप्तावस्थेत बराच काळ असतात असे मला वाटते. कधीतरी अचानक वेळ येते आणि ती गोष्ट डोकं वर काढते आणि तुम्हाला हात देते. पण त्या साठी ती गोष्ट तुमच्याकडे हवी! आणि त्याचसाठी चांगल्या गोष्टी चालू ठेवण्याचा धर्म बाळगणे जरुरीचे आहे. आजूबाजूला पडझड होत असताना तर जास्तच प्रकर्षानं हे जाणवतं! आपण शाश्वत मानलेल्या गोष्टीचा र्‍हास झाला तर एकतर ती शाश्वत मानणं तितकसं योग्य नव्हतं असं सिद्ध झालं. किंवा त्या गोष्टीत बदल झालेला आहे आणि तो नव्या स्वरुपात पुन्हा पुढे येणार आहे! सप्तसूर हे शाश्वत आहेत. गाणार्‍याचा र्‍हास होऊ शकतो, सुरांचा नाही. त्यामुळे विश्वास आधी सुरांवर हवा मग गाणार्‍यावर, म्हणजे मग विश्वास मुळापासून हादरत नाही! अशी अनेक उदाहरणे पदोपदी आढळतात, अस्वस्थ करत राहतात, कारण तो त्यांचा धर्म आहे! अवांतर :- "सकाळ" समूहाचे प्रतापराव पवार ह्यांचा एक सुंदर लेख वाचला त्याचा दुवा . तो लेख ह्या विषयाला स्पर्श करून जाणारा वाटला. चतुरंग

प्रश्न आहे अशा गोष्टींचा ज्या आपण चिरंतन मानल्या. ज्यांच्यातील अनपेक्षित - आणि बर्‍याचदा त्यांच्या र्‍हासाला कारणीभूत ठरलेले - बदल नक्की कसे स्वीकारायचे ? >> स्विकारावे तर लागतातच. पण मन 'र्‍हासाला' आपण कारणीभूत आहोत हे स्वीकारायला कचरते. आपण निमित्तमात्र आहोत हे स्वीकारायला तयार होते. पण 'वृद्धी' हा घटक असेल तर आपण कारणीभूत आहोत हे पटकन स्विकारायला तयार होते. दुसरा पर्याय म्हणजे चिरंतन असे काहीच नसते असे मानणे. शाश्वत मूल्य वा त्रिकालाबाधित सत्य हे नसतेच असे मानणे. प्रकाश घाटपांडे

प्राजु Wed, 01/30/2008 - 00:10
जुन्या आठवणींचे ओझे होऊ देऊ नका असे तुम्हाला सूचित करायचे आहे काय ? >> बघा प्राऽऽजू काय म्हणते. जुन्या आठवणी कटू असतील तर त्याचं ओझं , गोड असतील तर तो ठेवा. पण कटु असो वा गोड तो संचयच. अपरिहार्य. प्रमोद देव व्यावहारिक सल्ला देतात. खराखुरा अनुभवातुन आलेला. इथे माझं नाव आणायचं कारण समजू शकेल हो...घाटपांडे साऽऽऽऽऽऽऽऽहेब? -(गोंधळ) प्राजु

आपण मांडलेला विचार एक उत्तम चिंतन आहे, खरे तर दशके बदलले की माणसांची जीवनशैली बदलते आणि नंतर संवेदना. म्हणुन आपल्याला ज्यांच्याबद्द्ल श्रद्धा वाटते ती माणसे काळाच्या ओघात कधी बदलतात, ती अशी का वागतात ते कळत नाही . शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न म्हणुन सोडावे लागते. खरे तर आमचे वय फार अनुभवाने समृध्द झाले आहे, असे नाही. पण कमी वयात एका विद्वान माणसाच्या सहवास आम्हास लाभला. नैतिक मुल्य, सत्य, प्रामाणिकपणा हाच ज्यांच्या जीवनाचा भाग आहे, असे वाटणारी व्यक्ती. काही वर्षानंतर पैशासाठी कोणत्या थराला जाते. विद्वत्तेचा कसा उपयोग करते, हे पाहिले की, इनका क्या करे हा प्रश्न आमच्या समोर उरत नाही. तेव्हा आम्ही हा ज्याचा त्याचा प्रश्न म्हणुन सोडून देतो.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज Mon, 01/28/2008 - 09:05
थोड्याफार फरकाने हा अनुभव सगळ्यांनाच येत असावा. बोध घेऊन, आपण तसे न करावे हेच आपल्या हाती, बाकी काय? बाकी आई-वडील आपल्या मुलांसाठी नाही करणार तर कोण :-) तुम्हाला सुरवातीला जो आनंद मिळाला त्याची दक्षीणा म्हणायची. कोणास ठावूक काही कट्टर चाहते असतील देखील नवीन भीषण संगीताचे :-)

प्राजु Mon, 01/28/2008 - 10:00
मी ७ वीत असताना तो "मैने प्यार किया" सॉलिड हिट्ट झाला होता. भाग्यश्री पटवर्धनने ( माझी कोणी नव्हे) अक्षरशः वेड लावले होते. तिच्यासारखे ड्रेस, केशभूषा... नाना त-हा आम्ही मुली करायचो. कितीवेळा तो सिनेमा मी पाहीला त्या भाग्यश्रीलाच ठावूक. तिची जवळजवळ ३५० लहानमोठी पोस्टर्स मी जमवली होती. ती दिसायचीही अगदी निरागस.. सुंदर. बाबांना दिसू नये म्हणून माझ्या कपाटाच्या दाराच्या आतल्या बाजूला लावून ठेवली . हळू हळू भाग्यश्री पडद्याआड गेली आणि मी कॉलेजला. मध्यंतरी घर बदलायच्या वेळी आमच्या आईने ती सगळी पोस्टर्स एका बॅगेत भरून नविन घरी आणली. नव्या घरी नव्या कपाटात सामान लावताना आईने ती बॅग आणून दिली म्हणाली' " हे तुझं महत्वाचं सामान .." मी उघडून पाहिलं.. तर ती पोस्टर्स. आता मी ऐश्वर्याची फॅन झाले होते. आणि ऐश्वर्याची पोस्टर्सही आणली गेली होती, अर्थातच बाबांच्या नकळत. तेव्हा मला प्रश्न पडला..आता भाग्यश्री का क्या करे? - प्राजु

प्रमोद देव Mon, 01/28/2008 - 10:35
भाबड्या वयात आणि पोक्तवयात समजशक्तिची जी पोहोच असते त्यात जो फरक असतो तोच खरा. बाकी एकाच प्रसंगाचे वर्णन निरनिराळे लोक ज्या पद्धतीने करतात तसलाच हा प्रकार असतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. माझ्या बालपणी देवाआनंद,दिलीपकुमार,राजकपूर,राजकुमार,राजेंद्रकुमार,शम्मीकपूर वगैरे हिंदी चित्रपट सृष्टीतले नावाजलेले नट होते. त्यांचे चित्रपट पाहताना ते सगळेच खूप महान वगैरे वाटत. पण आता तेच चित्रपट पुन्हा बघण्यात आल्यावर लक्षात आले की त्यांचा अभिनय किती नकली आहे ते.(हे माझे वैयक्तिक मत आहे) देव आनंदला तर उत्कृष्ठ विनोदी अभिनेता म्हणता येईल असे आता वाटते आणि शम्मीकपूरला तर माकड उड्या मारताना पाहून आम्ही त्याला नट समजत होतो हे लक्षात आल्यावर आमचीच आम्हाला कीव येते. हा एक विचार झाला. पण जर साकल्याने विचार केला तर लक्षात येते की आपल्या जाणीवा त्या त्या वयात जशा होत्या आणि पुढे प्रगल्भ होत गेल्या त्याप्रमाणे आपण त्या त्या गोष्टीची मीमांसा केली. म्हणून तेव्हा वाटले तेही बरोबर होते आणि आज वाटतेय तेही बरोबर

केशवराव Mon, 01/28/2008 - 11:19
प्राजु , प्रमोद देवांची विचार करण्याची पद्धत बरोबर वाटते, नाही का ? काळाप्रमाणे जग बदलण्याचा वेग प्रचंड वाढतो आहे. सर्व मुल्य देखील बदलत आहेत, प्रचंड वेगाने बदलत आहेत.१० -१५ वर्षा पूर्वीची मुल्य , आदर्श आज अस्तंगत झाले आहेत. तरीपण, काळातित म्हणून काही गोष्टी टिकतातच. पं. नेहरू, डॉन ब्रॅड्मन, चार्ली चॅपलीन, पं.रवी शंकर, सत्यजीत रे, कुसुमाग्रज,लता मंगेशकर ............... आणि कितीतरी. या सर्वांना तोडच नाही. ' यांचे काय करायचे ? ' हा प्रश्न ईथे पडत नाही.भाग्यश्री ते ऐश्व्रर्या हा बदल ठिक आहे , पण नर्गिसला पर्याय नाही. काळातित गोष्टींचे सोड, पण आपण काळा बरोबर बदलायला पाहीजे. केशवराव

विसोबा खेचर Mon, 01/28/2008 - 11:33
धाकट्या मंगेशकरांबद्दल मांडलेला मुद्दा पटला. मीही एकेकाळी त्यांचे अनेक उतमोत्तम कार्यक्रम पाहिलेले आहेत. खूप मजा यायची. परंतु नंतर नंतर या कार्यक्रमाची अगदीच वाट लागली आणि मीही त्यांच्या कार्यक्रमाला जायचे थांबवले... असो, मुक्तराव आपण चांगला मुद्दा मांडलात...! आपला, (दिदीभक्त) तात्या.

अमित Mon, 01/28/2008 - 12:59
धाकट्या मंगेशकरांच्या कार्यक्रमाबद्दल आणखी काही लोकांकडूनही अशीच प्रतिक्रीया ऐकली. त्यामुळे कार्यक्रम पाहण्याचे ' कष्ट' घेणे नाही. धन्यवाद मुक्तराव

लईच वझं झाल तर कंबारडं मॉडतय. मंग ते आठवनिंच असू दे न्हाई त साठवनींच. लगी खालीच बसतोया. वकारी आली कि वकून टाकायच. न्हाई त लई मळमळातयं. मान्सांनी लईच कप्पेबाजी केलि ना कि मंग त्ये 'देवराई' पिक्चर वानी स्किझोफ्रेनिक व्हतय. जे हाय ते आस हाय. कदि मोरपिसावानी गुदगुल्या बी व्हत्यात. कदि खरवाडतय बी. पघा भैनाबाई काय म्हंतात. मन वढाय वढाय उभ्या पीकातलं ढोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर मन मोकाट मोकाट त्याले ठायी ठायी वाटा जशा वार्यानं चालल्या पानावर्हल्यारे लाटा मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोन? उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन मन जह्यरी जह्यरी याचं न्यारं रे तंतर आरे, इचू, साप बरा त्याले उतारे मंतर! मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात? आता व्हतं भुईवर गेलं गेलं आभायात मन चप्पय चप्पय त्याले नही जरा धीर तठे व्हयीसनी ईज आलं आलं धर्तीवर मन एवढं एवढं जसा खाकसचा दाना मन केवढं केवढं? आभायात बी मायेना देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात! आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत! देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं! [there is hidden child in every adult] प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

मुक्तसुनीत Tue, 01/29/2008 - 02:27
घाटपांडेकाका, तुमचे तुमच्या गावरान शैलीतले लिखाण नेहमीप्रमाणे आवडलेच. त्यातील व्यंगार्थसुद्धा समजण्यासारखा आहे. पण या विषयाशी अनुसरून त्यातून नेमके काय म्हणायचे आहे ते समजले नाही. जुन्या आठवणींचे ओझे होऊ देऊ नका असे तुम्हाला सूचित करायचे आहे काय ? तसे असल्यास माझा मुद्दा तुमच्यापर्यंत नीट पोचला नसेलसे वाटते. आपल्या प्रवासात शाश्वत् असे थोडे असते; आणि मौल्यवान म्हणून उराशी धरलेल्या कुठल्या गोष्टी एकदम जुन्या चलनाप्रमाणे आउट् डेटेड् होतील याचा आपल्याला भरवसा देववत नाही असे माझ्या म्हणण्याचा एकूण सूर होता.

In reply to by मुक्तसुनीत

पण या विषयाशी अनुसरून त्यातून नेमके काय म्हणायचे आहे ते समजले नाही.>> ते मी इतरांवर सोपवतो. जुन्या आठवणींचे ओझे होऊ देऊ नका असे तुम्हाला सूचित करायचे आहे काय ? >> बघा प्राऽऽजू काय म्हणते. जुन्या आठवणी कटू असतील तर त्याचं ओझं , गोड असतील तर तो ठेवा. पण कटु असो वा गोड तो संचयच. अपरिहार्य. प्रमोद देव व्यावहारिक सल्ला देतात. खराखुरा अनुभवातुन आलेला. तसे असल्यास माझा मुद्दा तुमच्यापर्यंत नीट पोचला नसेलसे वाटते. >> माहित नाहि, मला जे वाटल ते मी लिहिलं. बहिणाबाईंनी केलेले वर्णन मला अधिक भावत. आपल्या प्रवासात शाश्वत् असे थोडे असते; आणि मौल्यवान म्हणून उराशी धरलेल्या कुठल्या गोष्टी एकदम जुन्या चलनाप्रमाणे आउट् डेटेड् होतील याचा आपल्याला भरवसा देववत नाही असे माझ्या म्हणण्याचा एकूण सूर होता.>> अगदी सहमत. ( अकाली काकत्व आलेला) प्रकाश घाटपांडे

दीपा॑जली Tue, 01/29/2008 - 12:58
माणसाच्या जीवनात बदल अपरीहार्य आहे.या जगात प्रत्येक गोष्ट बदलत असते,तसेच माणसाचे मन पण बदलत असते. बालपण,तारुण्य,वार्ध्यक्य या सगळ्यातून जात असता॑ना प्रत्येकजण बदलत असतोच्.त्यात नवल काहीच नाहि. हे बदल हसत, मोकळेपणाने स्विकारण्यातच मजा आहे. आपण बदललो नाही तर जीवनातली मजाच निघून जाईल.

In reply to by दीपा॑जली

मुक्तसुनीत Tue, 01/29/2008 - 20:30
बदल नुसता अपरिहार्यच नव्हे ; तो आपल्या जीवनाचा स्थायिभाव आहे ! असा कुठला पैलू असेल आपल्या जगण्यातला जो बदलत नसेल ! त्यामुळे आपण खुद्द बदलणार, बर्‍यावाईट बदलाना - इच्छा असो , नसो - सामोरे जाणारच. प्रश्न आहे अशा गोष्टींचा ज्या आपण चिरंतन मानल्या. ज्यांच्यातील अनपेक्षित - आणि बर्‍याचदा त्यांच्या र्‍हासाला कारणीभूत ठरलेले - बदल नक्की कसे स्वीकारायचे ?

In reply to by मुक्तसुनीत

चतुरंग Wed, 01/30/2008 - 04:55
प्रश्न आहे अशा गोष्टींचा ज्या आपण चिरंतन मानल्या. ज्यांच्यातील अनपेक्षित - आणि बर्‍याचदा त्यांच्या र्‍हासाला कारणीभूत ठरलेले - बदल नक्की कसे स्वीकारायचे ? हा प्रश्न मला सातत्याने वेगवेगळ्या रुपात सामोरा येऊन छळतो. एक उदाहरण घेऊयात - आपण आपल्याला आणि आपल्या मुलाला (मुलगा/मुलगी) शिस्तीचे धडे देतो - मग ते हस्ताक्षर असेल, जेवण्याच्या पद्धती असतील, कपडयांच्या घड्या असतील, मोठ्या माणसांचा आदर करणे असेल किंवा सार्वजनिक जीवनातली शिस्त.... हे त्या बालकाला पुढच्या आयुष्यात उपयोगी पडणार ह्याची आपल्याला खात्री असते. आपण आटापिटा करतो. कारण ही मूल्यं आपण शाश्वत मानलेली असतात, त्यातलं हित माहीत असतं. आणि जेव्हा आपण आजूबाजूला निरीक्षण करतो तेव्हा बर्‍याच वेळा असं दिसतं की कितीतरी लोक बेशिस्त जगत असतात, काही विशिष्ठ धोरण नाही, काही उद्देश नाही, लांबचा विचार नाही, जसे होईल तसे आयुष्य चालू असते. त्यांच्या आयुष्यात वरकरणी आपल्याला काही कमी दिसत नाही. सगळं काही आलबेल दिसत असतं. मग आपल्या मनात विचार येतो की आपण जे कष्ट (खरं सांगायचं तर त्यावेळी मनात येणारा शब्द "मगजमारी"!) करतो आहोत त्याचा काही उपयोग आहे की नाही? का हे सगळं वाया जाणार? १० पैकी ८ लोक बेशिस्त असले तर उरलेल्या २ लोकांचा निभाव काय लागणार? उत्तर : ह्याचं उत्तर मी माझ्या परीनं शोधण्याचा प्रयत्न केला आणि ते मला मिळालं, तेही निसर्गातून! वसंत ऋतूत झाडं फुलतात, फुलांचे सुंदर रंग काहींना आनंद देतात, काही जणांना त्यात काहीच वाटत नाही. पण कुणाला काही वाटावं किंवा वाटू नये म्हणून फुलं फुलतात का हो? नाही, तो त्यांचा धर्म आहे. ती फुलणारच. आंब्याला काही वर्षे निगा, खतपाणी करावंच लागतं, काही वर्ष काहीच फळ हाती नसतं, पण काही वर्षांनी हापूस चाखायला मिळणारच, तो त्याचा धर्म आहे! आयुष्यातल्या बर्‍याच गोष्टी ह्या सुप्तावस्थेत बराच काळ असतात असे मला वाटते. कधीतरी अचानक वेळ येते आणि ती गोष्ट डोकं वर काढते आणि तुम्हाला हात देते. पण त्या साठी ती गोष्ट तुमच्याकडे हवी! आणि त्याचसाठी चांगल्या गोष्टी चालू ठेवण्याचा धर्म बाळगणे जरुरीचे आहे. आजूबाजूला पडझड होत असताना तर जास्तच प्रकर्षानं हे जाणवतं! आपण शाश्वत मानलेल्या गोष्टीचा र्‍हास झाला तर एकतर ती शाश्वत मानणं तितकसं योग्य नव्हतं असं सिद्ध झालं. किंवा त्या गोष्टीत बदल झालेला आहे आणि तो नव्या स्वरुपात पुन्हा पुढे येणार आहे! सप्तसूर हे शाश्वत आहेत. गाणार्‍याचा र्‍हास होऊ शकतो, सुरांचा नाही. त्यामुळे विश्वास आधी सुरांवर हवा मग गाणार्‍यावर, म्हणजे मग विश्वास मुळापासून हादरत नाही! अशी अनेक उदाहरणे पदोपदी आढळतात, अस्वस्थ करत राहतात, कारण तो त्यांचा धर्म आहे! अवांतर :- "सकाळ" समूहाचे प्रतापराव पवार ह्यांचा एक सुंदर लेख वाचला त्याचा दुवा . तो लेख ह्या विषयाला स्पर्श करून जाणारा वाटला. चतुरंग

प्रश्न आहे अशा गोष्टींचा ज्या आपण चिरंतन मानल्या. ज्यांच्यातील अनपेक्षित - आणि बर्‍याचदा त्यांच्या र्‍हासाला कारणीभूत ठरलेले - बदल नक्की कसे स्वीकारायचे ? >> स्विकारावे तर लागतातच. पण मन 'र्‍हासाला' आपण कारणीभूत आहोत हे स्वीकारायला कचरते. आपण निमित्तमात्र आहोत हे स्वीकारायला तयार होते. पण 'वृद्धी' हा घटक असेल तर आपण कारणीभूत आहोत हे पटकन स्विकारायला तयार होते. दुसरा पर्याय म्हणजे चिरंतन असे काहीच नसते असे मानणे. शाश्वत मूल्य वा त्रिकालाबाधित सत्य हे नसतेच असे मानणे. प्रकाश घाटपांडे

प्राजु Wed, 01/30/2008 - 00:10
जुन्या आठवणींचे ओझे होऊ देऊ नका असे तुम्हाला सूचित करायचे आहे काय ? >> बघा प्राऽऽजू काय म्हणते. जुन्या आठवणी कटू असतील तर त्याचं ओझं , गोड असतील तर तो ठेवा. पण कटु असो वा गोड तो संचयच. अपरिहार्य. प्रमोद देव व्यावहारिक सल्ला देतात. खराखुरा अनुभवातुन आलेला. इथे माझं नाव आणायचं कारण समजू शकेल हो...घाटपांडे साऽऽऽऽऽऽऽऽहेब? -(गोंधळ) प्राजु
खूप वर्षांपूर्वी ब्ल्याकँडव्हाईट् च्या जमान्यामधे - जेव्हा टीव्ही थोडे तास असायचा - तेव्हा पाहिलेले काहीही (अक्षरशः काहीही ) टीपकागदाप्रमाणे शोषले जायचे. मनात कायमचे वसतीला येऊन रहायचे. त्याकाळात पाहिलेली एक "फिल्म्स (उच्चारी "फ्लिम") डिव्हीजन की भेंट्"अजून आठवते. फिल्मचे शीर्षक होते : "इसका क्या करें ?" सहलीला गेले असतानाचा कचरा तिकडेच इतस्ततः टाकणार्‍या एका समूहापैकी एक छोटा मुलगा शेवटी तो कचरा हातात गोळा करतो आणि त्या सर्वाना विचारतो : " हां , चले तो जाते हैं हम यहांसे , लेकिन इसका क्या करें ?" हीच फ्रेम मग शेवटी फ्रिज होते आणि फिल्म संपते.

संडे स्पेशल (बटर चिकन)

स्वाती राजेश ·

प्राजु Sun, 01/27/2008 - 02:39
मस्त रेसिपी. खरं तर आजपर्यंत मी नॉनव्हेज पदार्थ केले नाहीत कधी. पण तुझी रेसिपी वाचून करावे असे वाटू लागले आहे. नाही जमलं तर तुझ्याकडे यावे असा विचार आहे. :) - प्राजु.

विसोबा खेचर Mon, 01/28/2008 - 11:51
स्वातीताई, नेहमीप्रमाणेच सुंदर पाककृती...! आता पुढची पाककृती कुठली? आता मिपाकरांना काय खिलवताय याची वाट पाहतो आहे! :) आपला, (खादाड) तात्या.

चतुरंग Tue, 01/29/2008 - 00:24
तरी एक खाद्यवेडा म्हणून ही कृती वाचली. मॅरिनेट केल्यावर चिकन फ्रिजमधे ठेवावे असे काहीसे माझ्या मावसभावाशी बोलतानाचे स्मरते - कारण बाहेर ठेवल्यास, लावलेल्या मिठामुळे त्याला किंचित पाणी सुटण्याची शक्यता असते. बरोबर की चूक आपण सांगू शकता. चतुरंग

In reply to by चतुरंग

स्वाती राजेश Tue, 01/29/2008 - 15:44
आपण जरी चिकन/मटण मॅरिनेट केले तरी तरी ते रॉ असते. ते फ्रिज मध्ये ठेवावे कारण This procedure is essential to reduce the risk of food poisoning: chickens are potential carriers of salmonella and if birds are cooked from frozen state there is the risk of the requied degree of heat to kill off salmonella not reaching the centre of the birds. रॉ मटण हे बॅक्टेरीया पसरवू शकतात. म्हणून खाली दिलेल्या काही गोष्टी पाळाव्यात.. १.नेहमी चंगल्या क्वालीटीचे /माहिती तील दुकानातून मटण/चिकन आणावे.(refrigerrated) २.आणलेल्या दिवशी वापरावे किंवा फ्रिज करावे.झाकून ठेवावे. ३. मटण /चिकन शिजवल्यानंतर १ तासात वापरावे किंवा थंड झालेवर refrigerrate किंवा फ्रिज करावे. ४.परत वापरताना थॉ करून वापरावे. म्हणून मोठ्या होटेल्स मध्ये मटण्/चिकन मॅरिनेट करून फ्रिज मध्ये १०/१२ तास ठेवतात. फ्रिज मध्ये ३० तास त्याला काही होत नाही असे एका पुस्तकात वाचले आहे.

धोंडोपंत Tue, 01/29/2008 - 13:00
स्वाती ताई, अतीव सुंदर पाककृती. क्या बात है | तुमच्यासारख्या सुगरणीकडून अशाच उत्तमोत्तम पाककृती मिपावर येत राहोत. आपला, (खवैय्या) धोंडोपंत झकास कोंबडीवड्याची पाककृती येऊ द्या. वडे हळद घातलेले बरं का? आपला, (भुकेला) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

स्वाती राजेश Tue, 01/29/2008 - 15:56
धोंडोपंत भाऊ, तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. इथे एवढे खवय्ये असतील याची कल्पना नव्हती. तात्या , प्राजु, चतुरंग आणि विनायक यांचीही मी आभारी आहे. मी तुमच्या रेसीपी च्या फर्माइशी पुर्ण करण्याचा करण्याचा प्रयत्न करेन.

प्राजु Sun, 01/27/2008 - 02:39
मस्त रेसिपी. खरं तर आजपर्यंत मी नॉनव्हेज पदार्थ केले नाहीत कधी. पण तुझी रेसिपी वाचून करावे असे वाटू लागले आहे. नाही जमलं तर तुझ्याकडे यावे असा विचार आहे. :) - प्राजु.

विसोबा खेचर Mon, 01/28/2008 - 11:51
स्वातीताई, नेहमीप्रमाणेच सुंदर पाककृती...! आता पुढची पाककृती कुठली? आता मिपाकरांना काय खिलवताय याची वाट पाहतो आहे! :) आपला, (खादाड) तात्या.

चतुरंग Tue, 01/29/2008 - 00:24
तरी एक खाद्यवेडा म्हणून ही कृती वाचली. मॅरिनेट केल्यावर चिकन फ्रिजमधे ठेवावे असे काहीसे माझ्या मावसभावाशी बोलतानाचे स्मरते - कारण बाहेर ठेवल्यास, लावलेल्या मिठामुळे त्याला किंचित पाणी सुटण्याची शक्यता असते. बरोबर की चूक आपण सांगू शकता. चतुरंग

In reply to by चतुरंग

स्वाती राजेश Tue, 01/29/2008 - 15:44
आपण जरी चिकन/मटण मॅरिनेट केले तरी तरी ते रॉ असते. ते फ्रिज मध्ये ठेवावे कारण This procedure is essential to reduce the risk of food poisoning: chickens are potential carriers of salmonella and if birds are cooked from frozen state there is the risk of the requied degree of heat to kill off salmonella not reaching the centre of the birds. रॉ मटण हे बॅक्टेरीया पसरवू शकतात. म्हणून खाली दिलेल्या काही गोष्टी पाळाव्यात.. १.नेहमी चंगल्या क्वालीटीचे /माहिती तील दुकानातून मटण/चिकन आणावे.(refrigerrated) २.आणलेल्या दिवशी वापरावे किंवा फ्रिज करावे.झाकून ठेवावे. ३. मटण /चिकन शिजवल्यानंतर १ तासात वापरावे किंवा थंड झालेवर refrigerrate किंवा फ्रिज करावे. ४.परत वापरताना थॉ करून वापरावे. म्हणून मोठ्या होटेल्स मध्ये मटण्/चिकन मॅरिनेट करून फ्रिज मध्ये १०/१२ तास ठेवतात. फ्रिज मध्ये ३० तास त्याला काही होत नाही असे एका पुस्तकात वाचले आहे.

धोंडोपंत Tue, 01/29/2008 - 13:00
स्वाती ताई, अतीव सुंदर पाककृती. क्या बात है | तुमच्यासारख्या सुगरणीकडून अशाच उत्तमोत्तम पाककृती मिपावर येत राहोत. आपला, (खवैय्या) धोंडोपंत झकास कोंबडीवड्याची पाककृती येऊ द्या. वडे हळद घातलेले बरं का? आपला, (भुकेला) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

स्वाती राजेश Tue, 01/29/2008 - 15:56
धोंडोपंत भाऊ, तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. इथे एवढे खवय्ये असतील याची कल्पना नव्हती. तात्या , प्राजु, चतुरंग आणि विनायक यांचीही मी आभारी आहे. मी तुमच्या रेसीपी च्या फर्माइशी पुर्ण करण्याचा करण्याचा प्रयत्न करेन.
3

वाङ्मयचौर्य की तरही गझल

तळीराम ·

धनंजय Sat, 01/26/2008 - 22:42
बोलायचे तर अनुमतीशिवाय अनुवाद म्हणजे प्रत-अधिकाराचे उल्लंघन. हे वाङ्मयचौर्य असते. विडंबन मात्र वाङ्मयचौर्य नसते. अभ्यासपूर्ण उल्लेख (याबद्दल अधिक विवेचन अन्यत्र वाचावे) हेदेखील वाङ्मयचौर्य मानले जात नाही.

धनंजय Sat, 01/26/2008 - 22:42
बोलायचे तर अनुमतीशिवाय अनुवाद म्हणजे प्रत-अधिकाराचे उल्लंघन. हे वाङ्मयचौर्य असते. विडंबन मात्र वाङ्मयचौर्य नसते. अभ्यासपूर्ण उल्लेख (याबद्दल अधिक विवेचन अन्यत्र वाचावे) हेदेखील वाङ्मयचौर्य मानले जात नाही.
प्रदीप निफाडकर यांच्या गझलदीप या पुस्तकातील काही मजकूर खाली देत आहे. मराठी गझलांबद्दलच्या काही गैरसमजांबाबत ते लिहितात... मराठीत ऊर्दू गझलेचाच अनुवाद असतो हा आणखी मोठा गैरसमज आहे. आणि त्याला आमचे काही सन्माननीय गझलकार जबाबदार आहेत. ऊर्दूतील काही शेर अगदी तसेच्या तसे उचलले आहेत.

कुणी मत देता का मत?

विसोबा खेचर ·

प्राजु Sat, 01/26/2008 - 20:41
आहे ही. एस्.एम्.एस. मुळेच तर गायक .. नव्हे महागायक तयार होतात. आणि कित्येक तपं साधना करणारे मूर्ख ठरून "जोश" इ. घराण्यात काही महिने शिकून महागायक ही पदवीही भूषवितात. घराणी फक्त जयपूर, ग्वाल्हेर, किराना , आग्रा ... ही सामान्य लोकांसाठी आहेत. महागायकांची वेगळी असतात. आवांतर : तात्या, मुक्तछंदात चांगलं लिहिता तुम्ही. उगाच पद्याच्या नावने खडे का फोडता.. लिहा ना अशीच आणखी मुक्तछंदात काव्ये. - प्राजु.

धनंजय Sat, 01/26/2008 - 21:08
यात तळमळ आहे. हे विडंबन नसून नवी कृती शोभते. पण तरी एक प्रश्न विचारतो - कलाकाराला टाळ्या/वाहावा ची गरज पूर्वीही नव्हती का? हे एसेमेस म्हणजे त्याचाच प्रकार नाही काय? सवंग टाळ्या-जमवू कलाकार, नव्या माध्यमात वावरून जुन्या, तप केलेल्या गायकांवर लोकप्रियतेत विजय मिळवतात, असे पूर्वीही झालेले आहे. "हमिदाबाई" हे पात्र या विषयाला हात घालते - रेकॉर्डिंग आणि सिनेमागाण्यांचा पाणचट रतीब घालत पोरकट गायक-गायिकांनी बाजारपेठ काबीज केली, आणि आभिजात संगीत आळवणारी हमिदाबाईची कोठी ओस पडली. हे तर मागच्या (च्या मागच्या) पिढीत झाले. पण शेवटी असेच होते की जे नवीन तंत्रज्ञानातले "महागायक" असतात, ते फोल ठरतात, पाचोळ्यासारखे उडून जातात, आणि खरे कलाकार नवे माध्यमही काबीज करतात. हमिदाबाई बेजान डब्यात आवाज बंदिस्त करणार्‍या कलाकारांना तुच्छ लेखते. पण रेकॉर्डिंग हे माध्यम भिमसेन वगैरे श्रेष्ठ कलाकारांनी जिंकले आहे. बेजान डब्यात आवाज भरला म्हणून त्यांना तुच्छ लेखायची कोणाला छाती होऊ नये. एसेमेसची नवलाई संपून खरी स्पर्धा या माध्यमांत येईल तेव्हा उत्तम कलाकार टीव्ही वाहिन्या हे माध्यमही जिंकून दाखवतील. खुद्द नटसम्राटातही त्या महान कलाकारावर, काळ बदलता, थेटराच्या बाहेर उष्टे खायची वेळ येते. पण ते हृदयद्रावक सत्य मानले, तरी त्या नवीन नाट्यसृष्टीत पुढे उत्तम कलाकार निपजले हेही नकारता येत नाही. हे अवांतर विचार, बरे का... तुमची कविता/नाट्यमय गद्य आवडले, हे आधीच सांगितले आहे.

In reply to by धनंजय

विसोबा खेचर Sun, 01/27/2008 - 11:02
धन्याशेठ, कलाकाराला टाळ्या/वाहावा ची गरज पूर्वीही नव्हती का? हे एसेमेस म्हणजे त्याचाच प्रकार नाही काय? मुळीच नाही! माझ्या मते टाळ्या, वाहवा वेगळ्या आणि समस वेगळे! समस मागवण्यात पैशांचे राजकारण फार मोठ्या प्रमाणावर आहे! टाळ्या किंवा वाहवा याबद्दल कलाकाराला कुणाकडे भीक मागावी लागत नाही. टाळी ही उत्स्फूर्तपणे वाजवली जाते, वाहवा ही हृदयापासून नकळत उमटते!समसच्या बाबतीत, 'माझे गाणे आवडले असेल तर मला प्लीज प्लीज प्लीज समस करा हो' अशी जशी भीक मागितली जाते तशी टाळ्यावाहवांच्या बाबतीत मागितली जात नाही! कलाकाराचे काम म्हणजे प्रामाणिकपणे अधिकाधिक उत्तम रितीने आपली कला सादर करणे हे आणि एवढेच होय!लोकांकडे समस मागणे, टाळ्या-वाहवा मागणे हे कलाकाराचं काम नव्हे/असू नये! सवंग टाळ्या-जमवू कलाकार, नव्या माध्यमात वावरून जुन्या, तप केलेल्या गायकांवर लोकप्रियतेत विजय मिळवतात, असे पूर्वीही झालेले आहे. याचे उत्तर तुझ्या वरील वाक्यातच दडलेले आहे. टाळ्या-जमवू (हल्लीच्या युगात समस-जमवू!) कलाकारांच्या बाबतीत तूच सवंग हा शब्द वापरला आहेस! सो, यू सेड इट! "हमिदाबाई" हे पात्र या विषयाला हात घालते - रेकॉर्डिंग आणि सिनेमागाण्यांचा पाणचट रतीब घालत पोरकट गायक-गायिकांनी बाजारपेठ काबीज केली, आणि आभिजात संगीत आळवणारी हमिदाबाईची कोठी ओस पडली. हे तर मागच्या (च्या मागच्या) पिढीत झाले. पण शेवटी असेच होते की जे नवीन तंत्रज्ञानातले "महागायक" असतात, ते फोल ठरतात, पाचोळ्यासारखे उडून जातात, आणि खरे कलाकार नवे माध्यमही काबीज करतात. अगदी खरे आहे! परंतु लोकांकडून, तेही खास करून गायन स्पर्धेकरता समस मागवणे, ज्यात पैशांचे मोठे राजकारण आहे, तसेच समस पद्धतीत मोठे मॅन्युप्युलेशनही होऊ शकते, या प्रकाराला 'नवे तंत्रज्ञान' हा शब्द वापरणे हे मला अत्यंत चुकीचे, दिशाभूल करणारे, तसेच हास्यास्पदही वाटते! गाण्याची स्पर्धा असेल तर त्याबाबत निकाल देण्याचा अधिकार हा फक्त तज्ञ मंडळींकडेच असावा असे माझे मत आहे. शेवटी मायबाप रसिक ही आम जनताच असते, तेव्हा कुणाला दाद द्यायची, कुणाला नाही, कुणाला डोक्यावर घेऊन नाचायचे, कुणाला नाही, हे जनताच ठरवते हे मलाही मान्य, परंतु as far as spardhaa is concerned, त्या बाबतीत मात्र निकालाचे सर्वाधिकार फक्त आणि फक्त तज्ञ मंडळींच्या पॅनलकडेच असावेत. सध्याची समस पद्धती ही कलेला घातक तर आहेच, शिवाय खरोखरंच गुणी आणि लायक स्पर्धक कलाकाराच्या हिताच्या दृष्टीनेही घातक आहे असे माझे मत आहे... हमिदाबाई बेजान डब्यात आवाज बंदिस्त करणार्‍या कलाकारांना तुच्छ लेखते. पण रेकॉर्डिंग हे माध्यम भिमसेन वगैरे श्रेष्ठ कलाकारांनी जिंकले आहे. बेजान डब्यात आवाज भरला म्हणून त्यांना तुच्छ लेखायची कोणाला छाती होऊ नये. एसेमेसची नवलाई संपून खरी स्पर्धा या माध्यमांत येईल तेव्हा उत्तम कलाकार टीव्ही वाहिन्या हे माध्यमही जिंकून दाखवतील. खुद्द नटसम्राटातही त्या महान कलाकारावर, काळ बदलता, थेटराच्या बाहेर उष्टे खायची वेळ येते. पण ते हृदयद्रावक सत्य मानले, तरी त्या नवीन नाट्यसृष्टीत पुढे उत्तम कलाकार निपजले हेही नकारता येत नाही. माझ्या मते स्पर्धेकरता आम जनतेकडून समस मागवून केवळ अन केवळ पैशांचे राजकारण करून समस मागवणे आणि 'ध्वनिमुद्रण-तंत्रज्ञान' या दोन्ही गोष्टी पूर्णत: भिन्न आहेत. या दोन गोष्टींचा आपापसात दुरान्वयेही संबंध नाही. सबब, माझ्या मते वरील दाखला सदर चर्चेसंदर्भात अत्यंत गैरलागू व चुकीचा आहे! हे अवांतर विचार, बरे का... तुमची कविता/नाट्यमय गद्य आवडले, हे आधीच सांगितले आहे. धन्यवाद धन्याशेठ! तुझ्यासारख्या चोखंदळ समिक्षकाने आणि प्रतिभावंताने माझ्या प्रकटनाला क्षणभर का होईना परंतु 'कविता' असे म्हटले, आपल्या प्रतिसादाचे शीर्षक 'शिरवाडकरांना अप्रूप वाटेल' असे ठेवले, हे पाहून काव्यातले फारसे काही न कळणार्‍या माझ्यासारख्या माणसाला लाजेने गोरेगुलाबी अन चूरचूर व्ह्यायला झाले आहे! आज रविवार दुपारचे जेवण अंमळ दोन घास जास्तच जाऊन माझ्या अंगावर संध्याकाळपर्यंत मूठभर मास अधिक चढणार एवढे मात्र खरे! :) आपला, (नवा नवा कवी!) तात्या :))

तात्या, सर्वप्रथम कविता या प्रांतात आपल्या प्रवेशाचे कवींच्या वतीने प्रातेनिधीक स्वरुपात आम्ही आपले स्वागत करतो. :) ( इथे शाल, श्रीफळ आणि एक फुलांचा गुच्छ दिला असे चित्र डोळ्यासमोर आणावे ) मुक्तछंदातील कवितेच्या आशयाच्या संदर्भात डॊ. धनजय यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. काही काही गायक खरेच छान गातात. पण, ज्या पद्धतीने ते एस.एम.एस ने मते मागतात, ते दृष्य पाहवत नाही.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Sun, 01/27/2008 - 11:16
( इथे शाल, श्रीफळ आणि एक फुलांचा गुच्छ दिला असे चित्र डोळ्यासमोर आणावे ) वा वा! आपल्या शाल आणि श्रीफळामुळे मी भारावून गेलो आहे! धन्यवाद शेठ...:) काही काही गायक खरेच छान गातात. पण, ज्या पद्धतीने ते एस.एम.एस ने मते मागतात, ते दृष्य पाहवत नाही. यू सेड इट, मला अगदी हेच म्हणायचे आहे! दुसरा मुद्दा म्हणजे समस पद्धत! स्पर्धा जरूर असाव्यात, परंतु सर्वात लायक आणि पात्र स्पर्धक हा समस पद्धतीने ठरवला जाऊ नये, तर त्याचा अधिकार हा फक्त तज्ञ मंडळींनाच असावा! हल्लीची समस पद्धत म्हणजे केवळ मोबाईल कंपन्यांचे आणि वाहिन्यांचे लाखो कऱोडो रुपये कमवायचे एक माध्यम झाले आहे, चरायचे कुरण झाले आहे! आणि या सगळ्या गदारोळात खरोखरंच एखाद्या गुणी स्पर्धक कलाकारावर अन्याय होऊ नये, तसेच लाखो-हजारोंमध्ये परमेश्वर एखाद्यालाच थोर गायककलेचे दान देऊन सन्मानित करतो अश्या व्यक्तिने, "माझा कोड अबक आहे, मला प्लीज प्लीज प्लीज समस करा हो" अशी लाचारी करणे मला अत्यंत चुकीचे, संतापजनक, लज्जास्पद, आणि घृणास्पद वाटते म्हणूनच केवळ वरील प्रकटनवजा कविता! असो...! आपला, (कुणाकडेही कधीही 'समस' करता हात न पसरलेल्या भीमण्णा-बाबूजींचा एकलव्य शिष्य!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

इनोबा म्हणे Sun, 01/27/2008 - 11:42
तात्यांची कविता आवडली आणि त्यांचे विचारही.... समस पद्धती चालू झाल्यामुळे,कलाकार लोक भिकार्‍यासारखे वागू लागले आहेत.समस पद्धतीने खरेतर चांगला व गुणी कलाकार येण्याऐवजी नको तेच निवडून येतात कारण सर्वात जास्त समस अमूक अमूक विजेत्याला मिळाले('सर्वात चांगला भिकारी'म्हणा हवे तर). मध्यंतरी हिंदी वॉईस ऑफ इंडीया मधे आसामच्या देबोजीतला भांडून भांडून विजय मिळाला,असला विजय काय कामाचा? आणि असले कलाकार तरी काय कामाचे? यांना कलाकार तरी कसे म्हणायचे? मराठीतील हास्यसम्राट मधेही असाच किस्सा घडला होता.या कलाकाराने आपला (समस पद्धतीने) पराजय होणार हे आधीच हेरले होते जणू,म्हणूनच अंतीम फेरीपुर्वीच्या कार्यक्रमात त्याने एक किस्सा ऐकवला तो असा.... एका कुस्तीच्या लढती दरम्यान एक नावाजलेला पैलवान जिंकणार जिंकणार असे वाटत असताना एका किरकोळ वाळक्या बांबू एवढ्या पैलवानाकडून चित होतो. आश्चर्याने एक दर्शक त्याला कारण विचारतो तेव्हा तो सांगतो,"मी जिंकणारच होतो,पण मला समस कमी पडले हो!". कालाय तस्मै नमः-दूसरे काय? (हताश) -इनोबा

धोंडोपंत Sun, 01/27/2008 - 12:18
वा तात्यासाहेब, आपले मुक्तछंदातील प्रकटन आवडले. तुम्ही वेदना उत्कृष्टपणे मांडली आहे. अभिनंदन. आयुष्यभर संगीतसाधना करूनही अत्यंत महान कलाकार आजच्या जमान्यात पडद्याआड गेले आहेत.(काळाच्या नव्हे.) आणि दोन चार अनुकरणे करणारे इंडियन आयडॉल आणि काय काय म्हणून मिरवून घेत आहेत. या परिस्थितीवर आपले भाष्य अत्यंत चांगले झाले आहे. मुक्तछंदातील अजून लेखन आपणाकडून अपेक्षित आहे. आपला, (उतावळा) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

ऋषिकेश Sun, 01/27/2008 - 20:39
आपले मुक्तछंदातील प्रकटन आवडले. तुम्ही वेदना उत्कृष्टपणे मांडली आहे. अभिनंदन. असेच म्हणतो. रचना आवडली आणि व्यथा भिडली -ऋषिकेश

स्वाती राजेश Sun, 01/27/2008 - 16:11
कवितेचा प्रकार वगैरे काही माहिती नाही पण वाचताना मजा आली. आमच्या भाषेत जी मनाला आनंद देते ती कविता उत्तम.

सहज Sun, 01/27/2008 - 18:24
तात्या तुम्हाला संगीत/गायन आवडते पण हे ऐसेमेस मतदान प्रकरण नाही पण म्हणुन कविता हा प्रांत तुमचा नसला (असे तुम्ही म्हणता) तरी एक कविता निर्माण झाली हे तर छान झाले ना :-) शिवाय असो कलाप्रेमी तात्याला हा ऐसेमेस प्रकार आवडत नसेल पण शेयरसम्राट तात्याला मोबाइल कंपन्यांच्या समभागातून त्या त्रासाची नुकसान भरपाई (थोडी का होईना) होतीय ना? ;-) अहो चालायचेच!!!

संजय अभ्यंकर Sun, 01/27/2008 - 19:29
तात्यांच्या वरिल कवितेत व विवेचनात म्हटल्याप्रमाणे हा उद्वेगजनक प्रकार बदलायला हवाय. अंतिम विजेता हा तज्ञांच्या निर्णयावर ठरविला जावा. ह्या एस्.एम्.एस. पद्धतीत काही गैरप्रकार घडतात उ.दा., स्पर्धा सुरु असताना एस्.टि.डि. बूथ अडवून, सारखे स.म.स. पाठवणे (त्यासाठी माणसे नेमुन त्यांना त्या कामाचे पैसे देणे इ.). तसेच, गावात घरोघरि जाउन, स्पर्धकाचे माता-पिता, काका-मामा, आजी-आजोबा स.म.स. चा जोगवा मागतात. माझ्या माहितितल्या एका स्पर्धकाच्या संबंधितांनी ह्या साठी अमाप पैसे खर्चले होते. आपल्या पाल्याला सहज सोप्या जीवनाची सवय लावल्यावर, त्याला यशही सहज सोपे हवे असते. पालकही ते मिळवून द्यायचा प्रयत्न करतात. शालेय जीवनात, मार्कांसाठी जसे विद्यार्थ्यास घासावे लागते, तेव्हडेच संगीतात (किंबहुना सर्वच क्षेत्रात उच्च गुणवत्तेसाठी) घासावे लागते, हे पालकांनी मुलांवर बिंबवणे आवश्यक आहे. स.म.स. बद्दल बोलायचे, तर, मोबईल कंपन्यांच्या आश्रयाशिवाय, तो सेटचा झगमगाट, परिक्षकांची फी, स्पर्धकांची झगमगीत प्रावरणे कोठुन येणार? आणि स्पर्धा आयोजक पैसे कोठुन कमावणार? संजय अभ्यंकर

केशवसुमार Sun, 01/27/2008 - 23:23
तुझी तळमळ समजते आहे.. पण तू म्हणतोस त्या स्पर्धा नसून तो एक मोबाईल कंपन्याचा मार्केटींगचा भाग आहे..पाश्चिमात्य देशातून उचललेले खूळ आहे कोणाला ही कला , कलाकार यांच्याशी मतलब नाही.. ना भाग घेणार्‍याला.. ना त्या परिक्षकाला.. ना त्या प्रयोजकाला..सब से बडा रुपया.. हेच खर बाबा.. उगाच त्रास करून घेऊ नको.. हे कर्यक्रम सुरु झाले की तो इडियट बॉक्स सरळ बंद करत जा.. आवांतर : तात्या, मुक्तछंदात चांगलं लिहिता तुम्ही. उगाच पद्याच्या नावने खडे का फोडता.. लिहा ना अशीच आणखी मुक्तछंदात काव्ये... प्राजुशी एकदम सहमत आहे..

सुनील Mon, 01/28/2008 - 07:30
तात्या, कविता आवडली. मुक्तछांदाचा फॉर्म छान जमलाय. समसमध्ये मोबाईल कंपन्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. ते केवळ गाण्याच्या कार्यक्रमाताच नव्हे तर "करोडपती" सारख्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमातदेखील जाणवून येत होते. मागे ठाण्यातच एका व्य्क्तीला आपल्या पत्नीलाच अश्लील समस पाठवला म्हणून अटक झाली तेव्हा हेही उघडकीस आले की, कार्यक्रमातील व्यक्तीच अनेक सीमकार्डे वितरीत करून आपल्याला अधिक समस येतील याची व्यवस्था करते! पण, ह्या तरुण, नवोदित कलाकारांना समसचा जोगवा मागावासा वाटला तर ते समजून घेता येईल. कारण शेवटी त्या स्पर्धेत जिंकणे ही त्यांचे अंतीम धेय नसते तर त्यांच्या करीयरची ती सुरुवात असते! आणि त्यासाठी जाणकारांच्या नजरेसमोर येणे जरूरीचे असते. आजच्या कित्येक बुजूर्ग नटांनी आपल्या करीयरचा सुरुवातीचा काळ नामवंत स्टुडियोबाहेरील फूटपाथवर घुटमळत घालवला आहे, तोही त्याच कारणासाठी! अर्थात समसपेक्षाही नामवंत परीक्षकांनी दिलेल्या निकालावर स्पर्धेचे विजेते ठरवावेत हे मान्य होण्यासारखे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्राजु Sat, 01/26/2008 - 20:41
आहे ही. एस्.एम्.एस. मुळेच तर गायक .. नव्हे महागायक तयार होतात. आणि कित्येक तपं साधना करणारे मूर्ख ठरून "जोश" इ. घराण्यात काही महिने शिकून महागायक ही पदवीही भूषवितात. घराणी फक्त जयपूर, ग्वाल्हेर, किराना , आग्रा ... ही सामान्य लोकांसाठी आहेत. महागायकांची वेगळी असतात. आवांतर : तात्या, मुक्तछंदात चांगलं लिहिता तुम्ही. उगाच पद्याच्या नावने खडे का फोडता.. लिहा ना अशीच आणखी मुक्तछंदात काव्ये. - प्राजु.

धनंजय Sat, 01/26/2008 - 21:08
यात तळमळ आहे. हे विडंबन नसून नवी कृती शोभते. पण तरी एक प्रश्न विचारतो - कलाकाराला टाळ्या/वाहावा ची गरज पूर्वीही नव्हती का? हे एसेमेस म्हणजे त्याचाच प्रकार नाही काय? सवंग टाळ्या-जमवू कलाकार, नव्या माध्यमात वावरून जुन्या, तप केलेल्या गायकांवर लोकप्रियतेत विजय मिळवतात, असे पूर्वीही झालेले आहे. "हमिदाबाई" हे पात्र या विषयाला हात घालते - रेकॉर्डिंग आणि सिनेमागाण्यांचा पाणचट रतीब घालत पोरकट गायक-गायिकांनी बाजारपेठ काबीज केली, आणि आभिजात संगीत आळवणारी हमिदाबाईची कोठी ओस पडली. हे तर मागच्या (च्या मागच्या) पिढीत झाले. पण शेवटी असेच होते की जे नवीन तंत्रज्ञानातले "महागायक" असतात, ते फोल ठरतात, पाचोळ्यासारखे उडून जातात, आणि खरे कलाकार नवे माध्यमही काबीज करतात. हमिदाबाई बेजान डब्यात आवाज बंदिस्त करणार्‍या कलाकारांना तुच्छ लेखते. पण रेकॉर्डिंग हे माध्यम भिमसेन वगैरे श्रेष्ठ कलाकारांनी जिंकले आहे. बेजान डब्यात आवाज भरला म्हणून त्यांना तुच्छ लेखायची कोणाला छाती होऊ नये. एसेमेसची नवलाई संपून खरी स्पर्धा या माध्यमांत येईल तेव्हा उत्तम कलाकार टीव्ही वाहिन्या हे माध्यमही जिंकून दाखवतील. खुद्द नटसम्राटातही त्या महान कलाकारावर, काळ बदलता, थेटराच्या बाहेर उष्टे खायची वेळ येते. पण ते हृदयद्रावक सत्य मानले, तरी त्या नवीन नाट्यसृष्टीत पुढे उत्तम कलाकार निपजले हेही नकारता येत नाही. हे अवांतर विचार, बरे का... तुमची कविता/नाट्यमय गद्य आवडले, हे आधीच सांगितले आहे.

In reply to by धनंजय

विसोबा खेचर Sun, 01/27/2008 - 11:02
धन्याशेठ, कलाकाराला टाळ्या/वाहावा ची गरज पूर्वीही नव्हती का? हे एसेमेस म्हणजे त्याचाच प्रकार नाही काय? मुळीच नाही! माझ्या मते टाळ्या, वाहवा वेगळ्या आणि समस वेगळे! समस मागवण्यात पैशांचे राजकारण फार मोठ्या प्रमाणावर आहे! टाळ्या किंवा वाहवा याबद्दल कलाकाराला कुणाकडे भीक मागावी लागत नाही. टाळी ही उत्स्फूर्तपणे वाजवली जाते, वाहवा ही हृदयापासून नकळत उमटते!समसच्या बाबतीत, 'माझे गाणे आवडले असेल तर मला प्लीज प्लीज प्लीज समस करा हो' अशी जशी भीक मागितली जाते तशी टाळ्यावाहवांच्या बाबतीत मागितली जात नाही! कलाकाराचे काम म्हणजे प्रामाणिकपणे अधिकाधिक उत्तम रितीने आपली कला सादर करणे हे आणि एवढेच होय!लोकांकडे समस मागणे, टाळ्या-वाहवा मागणे हे कलाकाराचं काम नव्हे/असू नये! सवंग टाळ्या-जमवू कलाकार, नव्या माध्यमात वावरून जुन्या, तप केलेल्या गायकांवर लोकप्रियतेत विजय मिळवतात, असे पूर्वीही झालेले आहे. याचे उत्तर तुझ्या वरील वाक्यातच दडलेले आहे. टाळ्या-जमवू (हल्लीच्या युगात समस-जमवू!) कलाकारांच्या बाबतीत तूच सवंग हा शब्द वापरला आहेस! सो, यू सेड इट! "हमिदाबाई" हे पात्र या विषयाला हात घालते - रेकॉर्डिंग आणि सिनेमागाण्यांचा पाणचट रतीब घालत पोरकट गायक-गायिकांनी बाजारपेठ काबीज केली, आणि आभिजात संगीत आळवणारी हमिदाबाईची कोठी ओस पडली. हे तर मागच्या (च्या मागच्या) पिढीत झाले. पण शेवटी असेच होते की जे नवीन तंत्रज्ञानातले "महागायक" असतात, ते फोल ठरतात, पाचोळ्यासारखे उडून जातात, आणि खरे कलाकार नवे माध्यमही काबीज करतात. अगदी खरे आहे! परंतु लोकांकडून, तेही खास करून गायन स्पर्धेकरता समस मागवणे, ज्यात पैशांचे मोठे राजकारण आहे, तसेच समस पद्धतीत मोठे मॅन्युप्युलेशनही होऊ शकते, या प्रकाराला 'नवे तंत्रज्ञान' हा शब्द वापरणे हे मला अत्यंत चुकीचे, दिशाभूल करणारे, तसेच हास्यास्पदही वाटते! गाण्याची स्पर्धा असेल तर त्याबाबत निकाल देण्याचा अधिकार हा फक्त तज्ञ मंडळींकडेच असावा असे माझे मत आहे. शेवटी मायबाप रसिक ही आम जनताच असते, तेव्हा कुणाला दाद द्यायची, कुणाला नाही, कुणाला डोक्यावर घेऊन नाचायचे, कुणाला नाही, हे जनताच ठरवते हे मलाही मान्य, परंतु as far as spardhaa is concerned, त्या बाबतीत मात्र निकालाचे सर्वाधिकार फक्त आणि फक्त तज्ञ मंडळींच्या पॅनलकडेच असावेत. सध्याची समस पद्धती ही कलेला घातक तर आहेच, शिवाय खरोखरंच गुणी आणि लायक स्पर्धक कलाकाराच्या हिताच्या दृष्टीनेही घातक आहे असे माझे मत आहे... हमिदाबाई बेजान डब्यात आवाज बंदिस्त करणार्‍या कलाकारांना तुच्छ लेखते. पण रेकॉर्डिंग हे माध्यम भिमसेन वगैरे श्रेष्ठ कलाकारांनी जिंकले आहे. बेजान डब्यात आवाज भरला म्हणून त्यांना तुच्छ लेखायची कोणाला छाती होऊ नये. एसेमेसची नवलाई संपून खरी स्पर्धा या माध्यमांत येईल तेव्हा उत्तम कलाकार टीव्ही वाहिन्या हे माध्यमही जिंकून दाखवतील. खुद्द नटसम्राटातही त्या महान कलाकारावर, काळ बदलता, थेटराच्या बाहेर उष्टे खायची वेळ येते. पण ते हृदयद्रावक सत्य मानले, तरी त्या नवीन नाट्यसृष्टीत पुढे उत्तम कलाकार निपजले हेही नकारता येत नाही. माझ्या मते स्पर्धेकरता आम जनतेकडून समस मागवून केवळ अन केवळ पैशांचे राजकारण करून समस मागवणे आणि 'ध्वनिमुद्रण-तंत्रज्ञान' या दोन्ही गोष्टी पूर्णत: भिन्न आहेत. या दोन गोष्टींचा आपापसात दुरान्वयेही संबंध नाही. सबब, माझ्या मते वरील दाखला सदर चर्चेसंदर्भात अत्यंत गैरलागू व चुकीचा आहे! हे अवांतर विचार, बरे का... तुमची कविता/नाट्यमय गद्य आवडले, हे आधीच सांगितले आहे. धन्यवाद धन्याशेठ! तुझ्यासारख्या चोखंदळ समिक्षकाने आणि प्रतिभावंताने माझ्या प्रकटनाला क्षणभर का होईना परंतु 'कविता' असे म्हटले, आपल्या प्रतिसादाचे शीर्षक 'शिरवाडकरांना अप्रूप वाटेल' असे ठेवले, हे पाहून काव्यातले फारसे काही न कळणार्‍या माझ्यासारख्या माणसाला लाजेने गोरेगुलाबी अन चूरचूर व्ह्यायला झाले आहे! आज रविवार दुपारचे जेवण अंमळ दोन घास जास्तच जाऊन माझ्या अंगावर संध्याकाळपर्यंत मूठभर मास अधिक चढणार एवढे मात्र खरे! :) आपला, (नवा नवा कवी!) तात्या :))

तात्या, सर्वप्रथम कविता या प्रांतात आपल्या प्रवेशाचे कवींच्या वतीने प्रातेनिधीक स्वरुपात आम्ही आपले स्वागत करतो. :) ( इथे शाल, श्रीफळ आणि एक फुलांचा गुच्छ दिला असे चित्र डोळ्यासमोर आणावे ) मुक्तछंदातील कवितेच्या आशयाच्या संदर्भात डॊ. धनजय यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. काही काही गायक खरेच छान गातात. पण, ज्या पद्धतीने ते एस.एम.एस ने मते मागतात, ते दृष्य पाहवत नाही.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Sun, 01/27/2008 - 11:16
( इथे शाल, श्रीफळ आणि एक फुलांचा गुच्छ दिला असे चित्र डोळ्यासमोर आणावे ) वा वा! आपल्या शाल आणि श्रीफळामुळे मी भारावून गेलो आहे! धन्यवाद शेठ...:) काही काही गायक खरेच छान गातात. पण, ज्या पद्धतीने ते एस.एम.एस ने मते मागतात, ते दृष्य पाहवत नाही. यू सेड इट, मला अगदी हेच म्हणायचे आहे! दुसरा मुद्दा म्हणजे समस पद्धत! स्पर्धा जरूर असाव्यात, परंतु सर्वात लायक आणि पात्र स्पर्धक हा समस पद्धतीने ठरवला जाऊ नये, तर त्याचा अधिकार हा फक्त तज्ञ मंडळींनाच असावा! हल्लीची समस पद्धत म्हणजे केवळ मोबाईल कंपन्यांचे आणि वाहिन्यांचे लाखो कऱोडो रुपये कमवायचे एक माध्यम झाले आहे, चरायचे कुरण झाले आहे! आणि या सगळ्या गदारोळात खरोखरंच एखाद्या गुणी स्पर्धक कलाकारावर अन्याय होऊ नये, तसेच लाखो-हजारोंमध्ये परमेश्वर एखाद्यालाच थोर गायककलेचे दान देऊन सन्मानित करतो अश्या व्यक्तिने, "माझा कोड अबक आहे, मला प्लीज प्लीज प्लीज समस करा हो" अशी लाचारी करणे मला अत्यंत चुकीचे, संतापजनक, लज्जास्पद, आणि घृणास्पद वाटते म्हणूनच केवळ वरील प्रकटनवजा कविता! असो...! आपला, (कुणाकडेही कधीही 'समस' करता हात न पसरलेल्या भीमण्णा-बाबूजींचा एकलव्य शिष्य!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

इनोबा म्हणे Sun, 01/27/2008 - 11:42
तात्यांची कविता आवडली आणि त्यांचे विचारही.... समस पद्धती चालू झाल्यामुळे,कलाकार लोक भिकार्‍यासारखे वागू लागले आहेत.समस पद्धतीने खरेतर चांगला व गुणी कलाकार येण्याऐवजी नको तेच निवडून येतात कारण सर्वात जास्त समस अमूक अमूक विजेत्याला मिळाले('सर्वात चांगला भिकारी'म्हणा हवे तर). मध्यंतरी हिंदी वॉईस ऑफ इंडीया मधे आसामच्या देबोजीतला भांडून भांडून विजय मिळाला,असला विजय काय कामाचा? आणि असले कलाकार तरी काय कामाचे? यांना कलाकार तरी कसे म्हणायचे? मराठीतील हास्यसम्राट मधेही असाच किस्सा घडला होता.या कलाकाराने आपला (समस पद्धतीने) पराजय होणार हे आधीच हेरले होते जणू,म्हणूनच अंतीम फेरीपुर्वीच्या कार्यक्रमात त्याने एक किस्सा ऐकवला तो असा.... एका कुस्तीच्या लढती दरम्यान एक नावाजलेला पैलवान जिंकणार जिंकणार असे वाटत असताना एका किरकोळ वाळक्या बांबू एवढ्या पैलवानाकडून चित होतो. आश्चर्याने एक दर्शक त्याला कारण विचारतो तेव्हा तो सांगतो,"मी जिंकणारच होतो,पण मला समस कमी पडले हो!". कालाय तस्मै नमः-दूसरे काय? (हताश) -इनोबा

धोंडोपंत Sun, 01/27/2008 - 12:18
वा तात्यासाहेब, आपले मुक्तछंदातील प्रकटन आवडले. तुम्ही वेदना उत्कृष्टपणे मांडली आहे. अभिनंदन. आयुष्यभर संगीतसाधना करूनही अत्यंत महान कलाकार आजच्या जमान्यात पडद्याआड गेले आहेत.(काळाच्या नव्हे.) आणि दोन चार अनुकरणे करणारे इंडियन आयडॉल आणि काय काय म्हणून मिरवून घेत आहेत. या परिस्थितीवर आपले भाष्य अत्यंत चांगले झाले आहे. मुक्तछंदातील अजून लेखन आपणाकडून अपेक्षित आहे. आपला, (उतावळा) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

ऋषिकेश Sun, 01/27/2008 - 20:39
आपले मुक्तछंदातील प्रकटन आवडले. तुम्ही वेदना उत्कृष्टपणे मांडली आहे. अभिनंदन. असेच म्हणतो. रचना आवडली आणि व्यथा भिडली -ऋषिकेश

स्वाती राजेश Sun, 01/27/2008 - 16:11
कवितेचा प्रकार वगैरे काही माहिती नाही पण वाचताना मजा आली. आमच्या भाषेत जी मनाला आनंद देते ती कविता उत्तम.

सहज Sun, 01/27/2008 - 18:24
तात्या तुम्हाला संगीत/गायन आवडते पण हे ऐसेमेस मतदान प्रकरण नाही पण म्हणुन कविता हा प्रांत तुमचा नसला (असे तुम्ही म्हणता) तरी एक कविता निर्माण झाली हे तर छान झाले ना :-) शिवाय असो कलाप्रेमी तात्याला हा ऐसेमेस प्रकार आवडत नसेल पण शेयरसम्राट तात्याला मोबाइल कंपन्यांच्या समभागातून त्या त्रासाची नुकसान भरपाई (थोडी का होईना) होतीय ना? ;-) अहो चालायचेच!!!

संजय अभ्यंकर Sun, 01/27/2008 - 19:29
तात्यांच्या वरिल कवितेत व विवेचनात म्हटल्याप्रमाणे हा उद्वेगजनक प्रकार बदलायला हवाय. अंतिम विजेता हा तज्ञांच्या निर्णयावर ठरविला जावा. ह्या एस्.एम्.एस. पद्धतीत काही गैरप्रकार घडतात उ.दा., स्पर्धा सुरु असताना एस्.टि.डि. बूथ अडवून, सारखे स.म.स. पाठवणे (त्यासाठी माणसे नेमुन त्यांना त्या कामाचे पैसे देणे इ.). तसेच, गावात घरोघरि जाउन, स्पर्धकाचे माता-पिता, काका-मामा, आजी-आजोबा स.म.स. चा जोगवा मागतात. माझ्या माहितितल्या एका स्पर्धकाच्या संबंधितांनी ह्या साठी अमाप पैसे खर्चले होते. आपल्या पाल्याला सहज सोप्या जीवनाची सवय लावल्यावर, त्याला यशही सहज सोपे हवे असते. पालकही ते मिळवून द्यायचा प्रयत्न करतात. शालेय जीवनात, मार्कांसाठी जसे विद्यार्थ्यास घासावे लागते, तेव्हडेच संगीतात (किंबहुना सर्वच क्षेत्रात उच्च गुणवत्तेसाठी) घासावे लागते, हे पालकांनी मुलांवर बिंबवणे आवश्यक आहे. स.म.स. बद्दल बोलायचे, तर, मोबईल कंपन्यांच्या आश्रयाशिवाय, तो सेटचा झगमगाट, परिक्षकांची फी, स्पर्धकांची झगमगीत प्रावरणे कोठुन येणार? आणि स्पर्धा आयोजक पैसे कोठुन कमावणार? संजय अभ्यंकर

केशवसुमार Sun, 01/27/2008 - 23:23
तुझी तळमळ समजते आहे.. पण तू म्हणतोस त्या स्पर्धा नसून तो एक मोबाईल कंपन्याचा मार्केटींगचा भाग आहे..पाश्चिमात्य देशातून उचललेले खूळ आहे कोणाला ही कला , कलाकार यांच्याशी मतलब नाही.. ना भाग घेणार्‍याला.. ना त्या परिक्षकाला.. ना त्या प्रयोजकाला..सब से बडा रुपया.. हेच खर बाबा.. उगाच त्रास करून घेऊ नको.. हे कर्यक्रम सुरु झाले की तो इडियट बॉक्स सरळ बंद करत जा.. आवांतर : तात्या, मुक्तछंदात चांगलं लिहिता तुम्ही. उगाच पद्याच्या नावने खडे का फोडता.. लिहा ना अशीच आणखी मुक्तछंदात काव्ये... प्राजुशी एकदम सहमत आहे..

सुनील Mon, 01/28/2008 - 07:30
तात्या, कविता आवडली. मुक्तछांदाचा फॉर्म छान जमलाय. समसमध्ये मोबाईल कंपन्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. ते केवळ गाण्याच्या कार्यक्रमाताच नव्हे तर "करोडपती" सारख्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमातदेखील जाणवून येत होते. मागे ठाण्यातच एका व्य्क्तीला आपल्या पत्नीलाच अश्लील समस पाठवला म्हणून अटक झाली तेव्हा हेही उघडकीस आले की, कार्यक्रमातील व्यक्तीच अनेक सीमकार्डे वितरीत करून आपल्याला अधिक समस येतील याची व्यवस्था करते! पण, ह्या तरुण, नवोदित कलाकारांना समसचा जोगवा मागावासा वाटला तर ते समजून घेता येईल. कारण शेवटी त्या स्पर्धेत जिंकणे ही त्यांचे अंतीम धेय नसते तर त्यांच्या करीयरची ती सुरुवात असते! आणि त्यासाठी जाणकारांच्या नजरेसमोर येणे जरूरीचे असते. आजच्या कित्येक बुजूर्ग नटांनी आपल्या करीयरचा सुरुवातीचा काळ नामवंत स्टुडियोबाहेरील फूटपाथवर घुटमळत घालवला आहे, तोही त्याच कारणासाठी! अर्थात समसपेक्षाही नामवंत परीक्षकांनी दिलेल्या निकालावर स्पर्धेचे विजेते ठरवावेत हे मान्य होण्यासारखे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मुक्तछंदात काही ओळी लिवायचा आमचा एक प्रयत्न! कुणी मत देता का मत? एका गायकाला कुणी मत देता का मत? खरं सांगतो बाबांनो, गायक आता लाचार झाला आहे! झी, सोनी, आणि स्टारप्लस आणि कुणी कुणी त्याला लाचार केला आहे...! कुणी मत देता का मत? एका गायकाला कुणी मत देता का मत? कुणी सांगितलं की कलाकार एखादाच असतो, अभिमानी असतो? कुणी सांगितलं की त्याचं फक्त कलेशीच इमान असतं म्हणून? खरं सांगतो बाबांनो, गायक आताशा एस एम एस मुळेच लहानमोठा ठरतो! कुणी सांगितलं की एस एम एस मुळे वाहिन्यांना लाख्खो रुपये मिळतात? कुणी सांगितलं की संगीतकला ही वाहिन्यांच्या दारातली एक बाजारबसवी रांड झाली आहे म्हणून? तसं काही नाही बाबा

विडंबनः चाळीमधल्या खोलीमधली राजा आणिक राणी

अविनाश ओगले ·

विसोबा खेचर Sat, 01/26/2008 - 14:10
नवेच होते लग्न आणखी खेळ नवा तो सारा परि तेथल्या खिडकीमधूनी मुळी न येई वारा झोप न येई, डास चावती, नव्हती मच्छरदाणी क्या बात है ओगले साहेब! मस्तच... "करा उधारी चुकती सारी" कालच वदला वाणी ही ओळ जाम आवडली...:) चाळीचाळीमधुनी असती असंख्य राजाराणी सुरावाचूनी तालावाचूनी गुदमरलेली गाणी डोळ्यामधूनी अन ओघळती स्वप्ने केविलवाणी... विडंबन असूनही हृदयाला हात घालणारा वास्तवदर्शी शेवट! वा वा... ओगले साहेब, ख ल्ला स वि डं ब न! आणि प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन... आपल्यासारखे, केशवासारखे उत्तम विडंबनकार मिपावर आहेत याचा मिपाला अभिमान वाटतो!... अजूनही येऊ द्या... केशवा, भातुकलीतील राजाराणीवर तुझ्याकडूनही येऊ देत काही ओळी! आम्ही वाट पाहात आहोत. घाई नाही, टेक युवर ओन टाईम.. आपला, (भातुकलीतला राजा) तात्या.

नंदन Sat, 01/26/2008 - 17:04
शेवटचे कडवे विशेष आवडले. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

विडंबन जबराच आहे, चाळीचाळीमधुनी असती असंख्य राजाराणी सुरावाचूनी तालावाचूनी गुदमरलेली गाणी डोळ्यामधूनी अन ओघळती स्वप्ने केविलवाणी...!!! किती सुंदर !!!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धनंजय Sat, 01/26/2008 - 21:14
मला वाटते की विडंबनात वास्तवाला भिडणारे काहीतरी असले (इथल्यासारखे) तरच ते इतके आवडू शकते - "वाहवा" चे "आहाहा" होऊ शकते.

प्राजु Sat, 01/26/2008 - 21:32
नवेच होते लग्न आणखी खेळ नवा तो सारा परि तेथल्या खिडकीमधूनी मुळी न येई वारा झोप न येई, डास चावती, नव्हती मच्छरदाणी या ओळीतून खरंच चाळीतले चित्र उभे रहिले. चाळीचाळीमधुनी असती असंख्य राजाराणी सुरावाचूनी तालावाचूनी गुदमरलेली गाणी डोळ्यामधूनी अन ओघळती स्वप्ने केविलवाणी... एकदम छान.. आवडली. - प्राजु

तळीराम Sat, 01/26/2008 - 22:08
त्या राजाचा पगार थोडा त्यात कसे भागावे? राणीनेही समजून सारे काहीच ना मागावे संध्याकाळी कुठे न फीरती, खिशात नसती नाणी महिन्यामधले दिवस भासती सर्व सारखेची त्या राजाला फक्त काळजी, एक तारखेची "करा उधारी चुकती सारी" कालच वदला वाणी आमचे अशाच एका चाळीत करपलेले तारुण्य आठवले... विनोद चांगला, पण साला डोळ्यातून पाणीच आलं एकदम.

इनोबा म्हणे Sun, 01/27/2008 - 00:56
ओगले साहेब तुमचे हे विडंबनही आम्ही यापुर्वीच ऑर्कुटवर वाचले आहे,बाकी हे विडंबन अगदी झकास जमले आहे. आम्ही तुमची बरीचशी विडंबने वाचलेली आहेत बहूधा,तरीही मिपावासीयांकरिता अशीच आणखी काही येऊ द्या. (राणीचा राजा) -इनोबा

बेसनलाडू Sun, 01/27/2008 - 07:23
विडंबन फार आवडले. बरेच दिवसांनी असे चांगले विडंबन वाचनात आले. आणखी येऊ द्यात. (आस्वादक)बेसनलाडू

धोंडोपंत Sun, 01/27/2008 - 14:47
पंत, विडंबन झकास. अप्रतिम झालाय. त्याला असलेली कारूण्याची झालर काळजात रुतली. बहोत बढिया | आपला, (संतुष्ट) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धमाल मुलगा Mon, 01/28/2008 - 18:03
त्या राजाचा पगार थोडा त्यात कसे भागावे? राणीनेही समजून सारे काहीच ना मागावे संध्याकाळी कुठे न फीरती, खिशात नसती नाणी... वाईट्ट हो! टचकन डोळ्यात पाणी आल॑. साला माझे जुने - उमेदवारीचे ( लाज वाटते ना "बेकारीचे / बेरोजगारीचे" म्हणायला, बाकी हा उमेदवारी शब्द भारदस्त वाटतो) दिवस आठवले. मी अन् माझी ती...तिच॑ शिक्षण चालू अन् आमच॑ पाकिट सदा उताण॑ ! ते॑व्हा नाही जाणवल॑ पण किती समजुतदार ती, कधी काही मागितल॑ नाही की हट्ट नाही....साला आता पैसा आहे तर ते गुलाबी दिवस कुठे गायब झालेत कोण जाणे. बर्‍याचदा तर एकच चहा दोघा॑त...जाऊदे, माझी कसली ला॑बड लाऊन बसलो मी. छ्या: लै वाईट ल्हिता राव तुमी...भर हापिसात बापयगड्याच्या डोळ्यातून पाणी काढताना कसला हो आन॑द मानता? च्यायला, उगाचच मी साहित्यिक दु:खी झालोय..ते काळजात कालवाकालव इ.इ. अविनाशराव, सलाम तुम्हाला अन् तुमच्या ह्या चाळीमधल्या... ला. (कधीतरी हळवा होणारा) धमाल.

चतुरंग Mon, 01/28/2008 - 21:42
खिशात ५००रु. आणि ४००रु. चा आहेर करायचाय कारण जवळच्याचं लग्न (ही 'जवळची' माणसं खरंच किती 'लांबची' निघाली ते नंतर कळतं - पण आपण काही करु शकत नाही - गरीब लोकांना चॉइस नसतो!) १००रु.यात पुढचे पंधरा दिवस?? डोळ्यापुढे काहीच नाही! त्या कठिण दिवसात बायकोने जी साथ दिली त्याला तोड नाही! मी आयुष्यभरासाठी तिचा ऋणी आहे!! गोड बोलून कामं करुन घेणारे जवळचे नातेवाईकच निघाले! त्यानंतर लौकिकार्थाने सगळेच यश मिळत गेलं तेव्हा आता तेच लोक लाळघोटेपणा करत येतात तेव्हा कीव येते. असो. जुन्या खपल्या काढल्या गेल्यामुळे डोळ्यात आलेलं पाणी पुसून पुढे जाऊयात! सुंदर काव्य अविनाशराव. (ह्याला विडंबन म्हणणे म्हणजे त्या काव्याची विटंबना आहे! दुसरा शब्द सुचवतोय "विरुपिणी" - जाणकारांनी मत द्यावे). आणि पुरस्काराबद्द्ल अभिनंदनही! चतुरंग

झकासराव Tue, 01/29/2008 - 00:00
क्या बात है. हसवता हसवता डोळ्यात चटकन पाणी आणलत की हो. जबरा आहे तुमची लेखणी.

अघळ पघळ Wed, 01/30/2008 - 08:41
मागे एकदा हेच विडंबन 'डोंबीवलीच्या चाळी मधली राजा आणिक राणी' असे ऐकले होते. ते पण असेच मार्मिक आणि छान होते. आपणच रचले होते का?

In reply to by अघळ पघळ

सुनील Wed, 01/30/2008 - 09:00
'डोंबीवलीच्या चाळी मधली राजा आणिक राणी' हे विडंबन प्रसाद शिरगावकर यांचे आहे (ते मायबोली आणि मनोगतावर कार्यरत असतात). तेदेखील अविनाशरावांच्या विडंबनाइतकेच उत्तम आहे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

दीपा॑जली Wed, 01/30/2008 - 11:45
चाळीचाळीमधुनी असती असंख्य राजाराणी सुरावाचूनी तालावाचूनी गुदमरलेली गाणी डोळ्यामधूनी अन ओघळती स्वप्ने केविलवाणी... मस्त जमलय.

वडापाव Wed, 01/30/2008 - 17:52
मलाही कविता करायला फार आवडते. पण मी अशी मस्त विडंबने तर काय, साधं विडंबन सुध्दा नाही करू शकत. कुटुंं्ब रंगलंय काव्यात, ही कविता मी कधी ऐकली नाही, पण तरीही मला हे विडंबन खूपच आवडलं. आपण आपल्या ह्या कविता व विडंबने www.blogger.com वर देखील प्रकाशित करू शकता. जर आधीपासूनच तेथे असाल, तर उत्तमच. तुमच्या बरोबर मैत्री करण्यास खूप उत्सूक आहे मी. आपला नम्र, किन्गके

In reply to by वडापाव

तळीराम Wed, 01/30/2008 - 20:49
कुटुंब रंगलंय काव्यात हा श्री. विसुभाऊ बापट सादर करत असलेला कार्यक्रम आहे. ते स्वतः कवी नाहीत. पण प्रसिद्ध कवींच्या अप्रसिद्ध कविता आणि अप्रसिद्ध कवींच्या गुणवान कविता या कार्यक्रमात असतात. एकदा हा कार्यक्रम मी पाहीला होता.

मनिष गुरुवार, 01/31/2008 - 13:35
चाळीचाळीमधुनी असती असंख्य राजाराणी सुरावाचूनी तालावाचूनी गुदमरलेली गाणी डोळ्यामधूनी अन ओघळती स्वप्ने केविलवाणी... काय बोलावे??? मुळ गाण्याइतकेच सुरेख!!!

विसोबा खेचर Sat, 01/26/2008 - 14:10
नवेच होते लग्न आणखी खेळ नवा तो सारा परि तेथल्या खिडकीमधूनी मुळी न येई वारा झोप न येई, डास चावती, नव्हती मच्छरदाणी क्या बात है ओगले साहेब! मस्तच... "करा उधारी चुकती सारी" कालच वदला वाणी ही ओळ जाम आवडली...:) चाळीचाळीमधुनी असती असंख्य राजाराणी सुरावाचूनी तालावाचूनी गुदमरलेली गाणी डोळ्यामधूनी अन ओघळती स्वप्ने केविलवाणी... विडंबन असूनही हृदयाला हात घालणारा वास्तवदर्शी शेवट! वा वा... ओगले साहेब, ख ल्ला स वि डं ब न! आणि प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन... आपल्यासारखे, केशवासारखे उत्तम विडंबनकार मिपावर आहेत याचा मिपाला अभिमान वाटतो!... अजूनही येऊ द्या... केशवा, भातुकलीतील राजाराणीवर तुझ्याकडूनही येऊ देत काही ओळी! आम्ही वाट पाहात आहोत. घाई नाही, टेक युवर ओन टाईम.. आपला, (भातुकलीतला राजा) तात्या.

नंदन Sat, 01/26/2008 - 17:04
शेवटचे कडवे विशेष आवडले. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

विडंबन जबराच आहे, चाळीचाळीमधुनी असती असंख्य राजाराणी सुरावाचूनी तालावाचूनी गुदमरलेली गाणी डोळ्यामधूनी अन ओघळती स्वप्ने केविलवाणी...!!! किती सुंदर !!!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धनंजय Sat, 01/26/2008 - 21:14
मला वाटते की विडंबनात वास्तवाला भिडणारे काहीतरी असले (इथल्यासारखे) तरच ते इतके आवडू शकते - "वाहवा" चे "आहाहा" होऊ शकते.

प्राजु Sat, 01/26/2008 - 21:32
नवेच होते लग्न आणखी खेळ नवा तो सारा परि तेथल्या खिडकीमधूनी मुळी न येई वारा झोप न येई, डास चावती, नव्हती मच्छरदाणी या ओळीतून खरंच चाळीतले चित्र उभे रहिले. चाळीचाळीमधुनी असती असंख्य राजाराणी सुरावाचूनी तालावाचूनी गुदमरलेली गाणी डोळ्यामधूनी अन ओघळती स्वप्ने केविलवाणी... एकदम छान.. आवडली. - प्राजु

तळीराम Sat, 01/26/2008 - 22:08
त्या राजाचा पगार थोडा त्यात कसे भागावे? राणीनेही समजून सारे काहीच ना मागावे संध्याकाळी कुठे न फीरती, खिशात नसती नाणी महिन्यामधले दिवस भासती सर्व सारखेची त्या राजाला फक्त काळजी, एक तारखेची "करा उधारी चुकती सारी" कालच वदला वाणी आमचे अशाच एका चाळीत करपलेले तारुण्य आठवले... विनोद चांगला, पण साला डोळ्यातून पाणीच आलं एकदम.

इनोबा म्हणे Sun, 01/27/2008 - 00:56
ओगले साहेब तुमचे हे विडंबनही आम्ही यापुर्वीच ऑर्कुटवर वाचले आहे,बाकी हे विडंबन अगदी झकास जमले आहे. आम्ही तुमची बरीचशी विडंबने वाचलेली आहेत बहूधा,तरीही मिपावासीयांकरिता अशीच आणखी काही येऊ द्या. (राणीचा राजा) -इनोबा

बेसनलाडू Sun, 01/27/2008 - 07:23
विडंबन फार आवडले. बरेच दिवसांनी असे चांगले विडंबन वाचनात आले. आणखी येऊ द्यात. (आस्वादक)बेसनलाडू

धोंडोपंत Sun, 01/27/2008 - 14:47
पंत, विडंबन झकास. अप्रतिम झालाय. त्याला असलेली कारूण्याची झालर काळजात रुतली. बहोत बढिया | आपला, (संतुष्ट) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धमाल मुलगा Mon, 01/28/2008 - 18:03
त्या राजाचा पगार थोडा त्यात कसे भागावे? राणीनेही समजून सारे काहीच ना मागावे संध्याकाळी कुठे न फीरती, खिशात नसती नाणी... वाईट्ट हो! टचकन डोळ्यात पाणी आल॑. साला माझे जुने - उमेदवारीचे ( लाज वाटते ना "बेकारीचे / बेरोजगारीचे" म्हणायला, बाकी हा उमेदवारी शब्द भारदस्त वाटतो) दिवस आठवले. मी अन् माझी ती...तिच॑ शिक्षण चालू अन् आमच॑ पाकिट सदा उताण॑ ! ते॑व्हा नाही जाणवल॑ पण किती समजुतदार ती, कधी काही मागितल॑ नाही की हट्ट नाही....साला आता पैसा आहे तर ते गुलाबी दिवस कुठे गायब झालेत कोण जाणे. बर्‍याचदा तर एकच चहा दोघा॑त...जाऊदे, माझी कसली ला॑बड लाऊन बसलो मी. छ्या: लै वाईट ल्हिता राव तुमी...भर हापिसात बापयगड्याच्या डोळ्यातून पाणी काढताना कसला हो आन॑द मानता? च्यायला, उगाचच मी साहित्यिक दु:खी झालोय..ते काळजात कालवाकालव इ.इ. अविनाशराव, सलाम तुम्हाला अन् तुमच्या ह्या चाळीमधल्या... ला. (कधीतरी हळवा होणारा) धमाल.

चतुरंग Mon, 01/28/2008 - 21:42
खिशात ५००रु. आणि ४००रु. चा आहेर करायचाय कारण जवळच्याचं लग्न (ही 'जवळची' माणसं खरंच किती 'लांबची' निघाली ते नंतर कळतं - पण आपण काही करु शकत नाही - गरीब लोकांना चॉइस नसतो!) १००रु.यात पुढचे पंधरा दिवस?? डोळ्यापुढे काहीच नाही! त्या कठिण दिवसात बायकोने जी साथ दिली त्याला तोड नाही! मी आयुष्यभरासाठी तिचा ऋणी आहे!! गोड बोलून कामं करुन घेणारे जवळचे नातेवाईकच निघाले! त्यानंतर लौकिकार्थाने सगळेच यश मिळत गेलं तेव्हा आता तेच लोक लाळघोटेपणा करत येतात तेव्हा कीव येते. असो. जुन्या खपल्या काढल्या गेल्यामुळे डोळ्यात आलेलं पाणी पुसून पुढे जाऊयात! सुंदर काव्य अविनाशराव. (ह्याला विडंबन म्हणणे म्हणजे त्या काव्याची विटंबना आहे! दुसरा शब्द सुचवतोय "विरुपिणी" - जाणकारांनी मत द्यावे). आणि पुरस्काराबद्द्ल अभिनंदनही! चतुरंग

झकासराव Tue, 01/29/2008 - 00:00
क्या बात है. हसवता हसवता डोळ्यात चटकन पाणी आणलत की हो. जबरा आहे तुमची लेखणी.

अघळ पघळ Wed, 01/30/2008 - 08:41
मागे एकदा हेच विडंबन 'डोंबीवलीच्या चाळी मधली राजा आणिक राणी' असे ऐकले होते. ते पण असेच मार्मिक आणि छान होते. आपणच रचले होते का?

In reply to by अघळ पघळ

सुनील Wed, 01/30/2008 - 09:00
'डोंबीवलीच्या चाळी मधली राजा आणिक राणी' हे विडंबन प्रसाद शिरगावकर यांचे आहे (ते मायबोली आणि मनोगतावर कार्यरत असतात). तेदेखील अविनाशरावांच्या विडंबनाइतकेच उत्तम आहे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

दीपा॑जली Wed, 01/30/2008 - 11:45
चाळीचाळीमधुनी असती असंख्य राजाराणी सुरावाचूनी तालावाचूनी गुदमरलेली गाणी डोळ्यामधूनी अन ओघळती स्वप्ने केविलवाणी... मस्त जमलय.

वडापाव Wed, 01/30/2008 - 17:52
मलाही कविता करायला फार आवडते. पण मी अशी मस्त विडंबने तर काय, साधं विडंबन सुध्दा नाही करू शकत. कुटुंं्ब रंगलंय काव्यात, ही कविता मी कधी ऐकली नाही, पण तरीही मला हे विडंबन खूपच आवडलं. आपण आपल्या ह्या कविता व विडंबने www.blogger.com वर देखील प्रकाशित करू शकता. जर आधीपासूनच तेथे असाल, तर उत्तमच. तुमच्या बरोबर मैत्री करण्यास खूप उत्सूक आहे मी. आपला नम्र, किन्गके

In reply to by वडापाव

तळीराम Wed, 01/30/2008 - 20:49
कुटुंब रंगलंय काव्यात हा श्री. विसुभाऊ बापट सादर करत असलेला कार्यक्रम आहे. ते स्वतः कवी नाहीत. पण प्रसिद्ध कवींच्या अप्रसिद्ध कविता आणि अप्रसिद्ध कवींच्या गुणवान कविता या कार्यक्रमात असतात. एकदा हा कार्यक्रम मी पाहीला होता.

मनिष गुरुवार, 01/31/2008 - 13:35
चाळीचाळीमधुनी असती असंख्य राजाराणी सुरावाचूनी तालावाचूनी गुदमरलेली गाणी डोळ्यामधूनी अन ओघळती स्वप्ने केविलवाणी... काय बोलावे??? मुळ गाण्याइतकेच सुरेख!!!
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
भातुकलीच्या खेळामधली... या कवितेचे विडंबन (प्रा. विसुभाऊ बापट यांच्या "कुटुंब रंगलंय काव्यात" या कार्यक्रमाच्या १००१व्या प्रयोगानिमित्त आयोजित विडंबन स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राप्त विडंबन...

संथ चालते मालिका ही...

अविनाश ओगले ·

विसोबा खेचर Sat, 01/26/2008 - 14:15
वा ओगलेसाहेब, अत्यंत सुरेख आणि मार्मिक विडंबन.. दूरचित्रवाणीवरील कुत्र्याच्या छत्र्यांसारख्या उगवलेल्या एकापेक्षा एक फालतू मालिकांना आपण अगदी झकास हाणले आहे! साला, वाचून मौज वाटली! आपला, (टीव्हीवरील मालिका पाहणे हा स्वत:च्या रसिकतेचा अपमान आहे असं समजणारा) तात्या.

तळीराम Sat, 01/26/2008 - 22:13
साले तुमी काय भारी मानसं जमला मिसळपाव खायला? मी आपला कालपासून हिकडेच हाय. ते स्साला जेवणखाणचा पण शुद्ध नाय राहीला.. ते मूळ कविता आनि तुमचा आभिप्राय दोनी लै भारी... सूना, सासवा, आजी, नाती मालिकांचे च्युईंगम खाती सरला रस अन उरला चोथा, तरी थुंकवत नाही... हे मस्त...

इनोबा म्हणे Sun, 01/27/2008 - 00:50
ओगले... तुमचे हे विडंबन आम्ही फार पुर्वी ऑर्कुटवर वाचले आहे, तुमच्या नावाने की कुणा तिर्‍हाईताच्या नावाने हे आठवत नाही. (आम्हालाही आवडत नाहीत मालिका)-इनोबा

भडकमकर मास्तर Sat, 02/02/2008 - 14:51
नदीस फुटावे नाले, ओहळ, तशी 'वाहवत' जाई............... >>>>> अहाहा....अगदी तंतोतंत्.....मस्तच..... अवंतिका नावाच्या एका अतिलांब्लचक मालिकेत ती अभिनेत्री घर सोडून दुसर्या सोसायटीत राहायला जाते आणि त्या सोसायटीमधील *( मुख्य गोष्टीशी संपूर्णपणे असंबंधित)बाळे,तरूण म्हातारे कोतारे, यांचे प्रश्न / समस्या पाहत राहायच्या आपण... :)

ऋषिकेश Sun, 02/03/2008 - 00:46
सूना, सासवा, आजी, नाती मालिकांचे च्युईंगम खाती सरला रस अन उरला चोथा, तरी थुंकवत नाही... संथ चालते मालिका ही... हा हा हा हे सगळ्यात आवडले

स्वाती राजेश Sun, 02/03/2008 - 16:14
छान केले आहे. मालिका जरी २ महिन्यांनी पाहिली तरी काही बिघडत नाही ती आहे तिथे च असते. १० वर्षे झाली तरी कोणतेही पात्र चेज( वयात) होत नाही. केसाला कोणते तेल वापरतात? क्रिम कोणती वापरतात? हे विचारले पाहिजे..:))))))))))))))))

In reply to by स्वाती राजेश

अविनाश ओगले Sun, 02/03/2008 - 21:42
''प्रेक्षकांचा बिन'डोक'पणा'' नावाचे तेल केसाना चोपडल्याने व टीआरपी नावाचे 'क्रीम' चेहर्‍याला फासल्याने ही पात्रे तरुण रहात असावीत.

विसोबा खेचर Sat, 01/26/2008 - 14:15
वा ओगलेसाहेब, अत्यंत सुरेख आणि मार्मिक विडंबन.. दूरचित्रवाणीवरील कुत्र्याच्या छत्र्यांसारख्या उगवलेल्या एकापेक्षा एक फालतू मालिकांना आपण अगदी झकास हाणले आहे! साला, वाचून मौज वाटली! आपला, (टीव्हीवरील मालिका पाहणे हा स्वत:च्या रसिकतेचा अपमान आहे असं समजणारा) तात्या.

तळीराम Sat, 01/26/2008 - 22:13
साले तुमी काय भारी मानसं जमला मिसळपाव खायला? मी आपला कालपासून हिकडेच हाय. ते स्साला जेवणखाणचा पण शुद्ध नाय राहीला.. ते मूळ कविता आनि तुमचा आभिप्राय दोनी लै भारी... सूना, सासवा, आजी, नाती मालिकांचे च्युईंगम खाती सरला रस अन उरला चोथा, तरी थुंकवत नाही... हे मस्त...

इनोबा म्हणे Sun, 01/27/2008 - 00:50
ओगले... तुमचे हे विडंबन आम्ही फार पुर्वी ऑर्कुटवर वाचले आहे, तुमच्या नावाने की कुणा तिर्‍हाईताच्या नावाने हे आठवत नाही. (आम्हालाही आवडत नाहीत मालिका)-इनोबा

भडकमकर मास्तर Sat, 02/02/2008 - 14:51
नदीस फुटावे नाले, ओहळ, तशी 'वाहवत' जाई............... >>>>> अहाहा....अगदी तंतोतंत्.....मस्तच..... अवंतिका नावाच्या एका अतिलांब्लचक मालिकेत ती अभिनेत्री घर सोडून दुसर्या सोसायटीत राहायला जाते आणि त्या सोसायटीमधील *( मुख्य गोष्टीशी संपूर्णपणे असंबंधित)बाळे,तरूण म्हातारे कोतारे, यांचे प्रश्न / समस्या पाहत राहायच्या आपण... :)

ऋषिकेश Sun, 02/03/2008 - 00:46
सूना, सासवा, आजी, नाती मालिकांचे च्युईंगम खाती सरला रस अन उरला चोथा, तरी थुंकवत नाही... संथ चालते मालिका ही... हा हा हा हे सगळ्यात आवडले

स्वाती राजेश Sun, 02/03/2008 - 16:14
छान केले आहे. मालिका जरी २ महिन्यांनी पाहिली तरी काही बिघडत नाही ती आहे तिथे च असते. १० वर्षे झाली तरी कोणतेही पात्र चेज( वयात) होत नाही. केसाला कोणते तेल वापरतात? क्रिम कोणती वापरतात? हे विचारले पाहिजे..:))))))))))))))))

In reply to by स्वाती राजेश

अविनाश ओगले Sun, 02/03/2008 - 21:42
''प्रेक्षकांचा बिन'डोक'पणा'' नावाचे तेल केसाना चोपडल्याने व टीआरपी नावाचे 'क्रीम' चेहर्‍याला फासल्याने ही पात्रे तरुण रहात असावीत.
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
संथ चालते मालिका ही... 'पात्रे' बदलून का होईना पण बारमाही वाहणा-या सर्व मराठी मालिकांना अर्पण.. (संथ वाहणा-या कृष्णामाईची क्षमा मागून..) संथ चालते मालिका ही... दर्शक देती दीर्घ जांभया, जाणीव तिजला नाही! कथानकाचा थांग न लागे पुढे तीळभर, गहूभर मागे 'मार्गी' झाली म्हणता म्हणता क्षणात 'वक्री' होई.. संथ चालते मालिका ही... नसे कुणी का तिला नियंता कंटाळून करी प्रश्न ही जनता नदीस फुटावे नाले, ओहळ, तशी 'वाहवत' जाई.. संथ चालते मालिका ही... सूना, सासवा, आजी, नाती मालिकांचे च्युईंगम खाती सरला रस अन उरला चोथा, तरी थुंकवत नाही... संथ चालते मालिका ही... -अविनाश ओगले

बोधकथा

पिवळा डांबिस ·

इनोबा म्हणे Sat, 01/26/2008 - 11:27
वाह!खरे आहे. मन शांत ठेवायचे तर असले प्रयोग करायला हरकत नाही. पण फक्त शिव्याशापापुरते... आपल्याला कोणी हात लावल्यावर मात्र हा विचार डोक्यात येत नाही,त्यावेळी डोक्यात असते ते फक्त आपला हात आणि मारणार्‍याचे थोबाड. भगवान गौतम बुद्धांनी सांगीतलेले एक वाक्य आठवते;ते म्हणाले होते "स्वतःला जिंकणारा हा विश्वविजेत्यापेक्षा मोठा विजेता असतो". (बुद्धं शरणं गच्छामी) -इनोबा

विसोबा खेचर Sat, 01/26/2008 - 11:37
मला याचा स्वानुभव आलेला आहे म्हणून हे मी सर्वांसाठी शेअर करीत आहे. थोडे दिवस उपयोग करुन पहा व मला तुमचा अनुभव कळवा. शाब्बास रे माझ्या गौतमा! :) पाहू पाहू, आम्हीही हा अनुभव घेऊन पाहू... बाय द वे, बोधकथेची ष्टोरी आवडली बरं का रे पिवळ्या डांबिसा... आपला, तात्या आंबेडकर.

खरंच बुद्धाच्या सगळ्याच बोधकथा छान आहेत. आवडली. अशीच एक गोष्ट म. गांधींची पण आहे बहुतेक. लहानपणी शाळेत एक धडा होता आम्हाला. एकदा त्यांना एक अतिशय शिव्या देणारे पत्र येते. ते त्या पत्राला लावलेली टाचणी काढून घेतात आणि बाकीचे पत्र परत त्या पाठवणारर्‍या व्यक्तिलाच पाठवून देतात. सोबत एक ओळ लिहितात, "तुम्ही जे पाठवले त्यातले मला जे उपयोगी होते तेवढे मी ठेवून घेतले, ज्याचा मला उपयोग नाही ते मी परत पाठवत आहे." बिपिन.

प्राजु Sun, 01/27/2008 - 09:28
कोणी एक स्वामी असेच शांत असत . प्रसन्न असत. राग त्याना माहितीच नव्हता. एकदा काही लोकांनी त्यांची फजिती करायचे ठरवले. स्वामी स्नान आटोपून नदीतून बाहेर येताना पाहून त्यातील काही लोकांनी पान खाऊन त्यांच्या अंगावर पिंक थुंकली. ते स्वामी पुन्हा नदीत गेले आणि स्नान करून बाहेर आले. पुन्हा तसेच झाले. असेच ५-६ वेळा झाले. पण ते स्वामी काहीही न बोलता नदीतून पुन्हा पुन्हा स्नान करून बाहेर येत होते. शेवटी त्या लोकांनी स्वामींना विचारले, "आम्ही इतक्या वेळेला ही घाण आपल्या अंगावर थुंकली, तुम्हाला राग नाही का आला?" स्वामी म्हणाले, "घाण? पण ही तर काही वेळापूर्वी तुमच्या तोंडात होती.. तुम्ही घाण खाता का?" ते लोक काय समजायचे ते समजले आणि स्वामींची माफी मागून खाली मान घालून निघून गेले. लहानपणी बाबांनी सांगितली होती ही गोष्ट. - (गोष्टीत रमणारी) प्राजु

In reply to by प्राजु

लिखाळ Fri, 11/21/2008 - 20:07
बहुधा एकनांथाच्या जीवनातील प्रसंग आहे. ते म्हणतात की चला या योगे मला १०८ वेळा स्नान घडले.. असे काहीतरी.. -- लिखाळ.

आजानुकर्ण Fri, 11/21/2008 - 19:49
डांबीसपंत, नाक पुसून कथा वाचली. बोधकथा फार आवडली. आम्हालाही कोणी सहजपणे शिव्या घातल्या तर आम्ही त्या स्वतःकडे घेत नाही. त्या त्यांच्याकडेच राहतात. आपला, (बुद्धम् शरणम् गच्छामि) आजानुकर्ण

लिखाळ Fri, 11/21/2008 - 20:06
देणार्‍यांची तोंडे हजारो.. माझ्याकडे आरसा :) कथा छान आहे.. आवडली.. याचसारखी एक कथा (बहुधा ओशोंच्या पुस्तकात) वाचली होती. एका साधूला एक मनुष्य शिवी देतो. त्यावर तो साधू त्याला आशिर्वाद देतो त्यावर तो साधू त्याला आशिर्वाद देतो. माणूस चमकतो.. साधू म्हणतो 'तुझ्याकडे जे देण्यासारखे होते ते तू दिलेस.. माझ्याकडे जे देण्यासारखे होते ते मी दिले '. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

आजानुकर्ण Fri, 11/21/2008 - 20:19
साधू म्हणतो 'तुझ्याकडे जे देण्यासारखे होते ते तू दिलेस.. माझ्याकडे जे देण्यासारखे होते ते मी दिले '.
मस्त!!! आपला, (साधू) ओशो आजानुकर्ण

सुनील Fri, 11/21/2008 - 20:16
हम्म. वाचायला छान पण आचरणात आणायला कठीण आहे बॉ. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

कपिल काळे Fri, 11/21/2008 - 20:18
सध्याच्या तंग वातावरणात सर्वांनी हे आचरणात आणावे . http://kalekapil.blogspot.com/

In reply to by कपिल काळे

लिखाळ Fri, 11/21/2008 - 20:23
सर्वांनी? अहो कुणी एकाने शिव्या दिल्या तर दुसर्‍याला शिकवण आचरणात आणण्याची संधी मिळणार ना ! त्यामुळे जो शिव्या देईल तो समोरच्याला बुद्धाची शिकवण आचरण्याची संधी देत आहे असे समजावे. कुणी आपणहून समाजसेवा करत असेल तर करु द्यावी :) (हघ्याहेसांनलगे) -- लिखाळ.

In reply to by कपिल काळे

अभिज्ञ Fri, 11/21/2008 - 21:01
डांबिसि बोधकथा आवडली. अभिनंदन. असो, अभिज्ञ. अवांतर (फाटे)-सध्याचे तंग वातावरण? असे अचानक काय घडले आहे कि वातावरण तंग व्हावे? कपिलदादा तुम्ही बुवा फारच लोड घेताय असे दिसते. ;) नवीन सदस्यांकरिता इतिहासाची उठाठेव खरच गरजेची आहे असे नमुद करावेसे वाटते.

In reply to by अभिज्ञ

सर्किट Sun, 11/23/2008 - 06:08
नवीन सदस्यांकरिता इतिहासाची उठाठेव खरच गरजेची आहे असे नमुद करावेसे वाटते. अभिज्ञशी सहमत आहे... -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

शितल Fri, 11/21/2008 - 20:19
कथा माहित होती, आणि त्या कथे नुसार वागण्याचा प्रयत्न तरी नक्की करेन. :) आता पर्यत अधे मध्ये तो प्रयत्न डळमळायचा, पण जाणिव पुर्वक तो न डळमळण्याचा प्रयत्न करेन. :)

टवाळचिखलू Fri, 11/21/2008 - 20:21
मस्तच. मीही ही युक्ती वापरुन पाहीन. - (बॉस या व्यक्तीपासुन वैतागलेला) चिखलू

कोलबेर Fri, 11/21/2008 - 21:07
एका किराणा मालाच्या दुकानात रोज एक गिर्‍हाइक तिथल्या शेठजीला अर्वाच्य शिव्या देउन जात असतो. ह्यावर एकदा न राहवुन तिथला पोर्‍या शेठजीला विचारतो, 'आपको गुस्सा नही आता क्या?' ह्यावर शेठजी थंडपणे उत्तर देतो ' कुछ देकेही जा रहा है ना? कुछ लेके तो नही ना जा रहा..फिर ठीक है! " (बनिया) कोलबेर

In reply to by कोलबेर

सर्किट Sun, 11/23/2008 - 06:10
कोलबेरा, हल्ली आपले शेठजीही असेच काहीसे थंडसे झालेले आहेत, असे फक्त मलाच वाटते आहे, की तुलाही ?? (मार्केट धबाधबा पडल्याने तशी बरीच देवमाणसे सध्या थंड झाली आहेत रे !) -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

टारझन Fri, 11/21/2008 - 21:07
आहो डांबिषकाका ... हे असले प्रकार काय जमणार णाही , हो शिव्यांची उत्तरं तितक्याच घाण शिव्याणी णाही देणार ... मी माझ्याच शारिरीक भाषेत उत्तर देईल ... बुद्द , गांधी , किंवा संत हे भूतकाळ आहेत .. तेंव्हाच्या गोष्टी आता चालतील असं पटत नाही. चुकी असेल तर शिव्या खाण्याचा संयम अंगी आहे, पण कोणी विणाकारण णडला तर फोडण्याशिवाय पर्याय आम्हाला णाही. महाभारतात आम्हाला युधिष्ठीरापेक्षा भिमार्जून आवडले. कारण त्या बैल युधिष्ठीरामुळेच महायुद्ध झालं,नको ते फंडे लाउन दुर्योधनाला सुधारण्याचा मुर्खपणा केला. आजकाल दुर्योधनांची संख्या जास्त आहे . (आडव्या डोक्याचा) टारझन उभे

In reply to by टारझन

हे असले प्रकार काय जमणार णाही , हो शिव्यांची उत्तरं तितक्याच घाण शिव्याणी णाही देणार ... मी माझ्याच शारिरीक भाषेत उत्तर देईल ... बुद्द , गांधी , किंवा संत हे भूतकाळ आहेत ...... टारू, म्हणूनच प्लास्टिक सर्जरीची गरज पडते. बाकी बोधकथा आवडली/ल्या. अदिती (टारूबाळाची आज्जी)

वेताळ Fri, 11/21/2008 - 22:41
आता कोण विनाकारण शिव्या देत असेल तर त्याला कृतीतुन उत्तर देण्याचा जमाना आहे. कथा छान आहे. आजकाल रागावर नियंत्रण राहणे खुप कठिण आहे. पण पिडांकाका तुमचा सल्ला लक्षात नक्की ठेऊ. वेताळ

पिवळा डांबिस Sat, 11/22/2008 - 00:00
तुम्हा मिपाकर मित्रांची पण कमाल आहे राव!!! मी ही कथा लिहिली होती जानेवारी मध्ये... तुम्ही अभिप्राय देताय नोव्हेंबर मध्ये..... नाय म्हणजे इतके महिने काय कथेवर चिंतन-मनन करत होता काय? ही तर खुद्द गौतम बुद्धाच्या वरताण झाली की!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

अभिज्ञ Sat, 11/22/2008 - 01:03
काका, तुम्ही म्हणता ते खरे आहे, पण माझ्या वाचनातून हि कथा खरच मिस झाली होती. अभिज्ञ.

यशोधरा Sat, 11/22/2008 - 00:09
तुम्ही उदाहरणच असा दणदणीत दिल्यात मां काका, मगे काय करतीत मिपाकर तरी?? :)

मनीषा Sat, 11/22/2008 - 05:50
(मी आजच वाचली) खरोखर बोध घेण्या सारखी .. या कथेत सांगीतल्या प्रमाणे वागणे जमले तर सगळेच बुद्ध होतील. पण तसे होत नाही म्हणून इतकी वर्ष झाली तरी दूसरा बुद्ध झाला नाही .

In reply to by मनीषा

पिवळा डांबिस Sat, 11/22/2008 - 09:12
कोण म्हणतो दुसरा बुद्ध झाला नाही? एकदा सदर्न कॅलिफोर्नियात चक्कर मारा..... दुसरा बुद्ध दाखवतो!!!! :) आणि जर स्वतःबरोबर शिवास रीगल घेऊन आलांत तर.... बुद्ध, पैगंबर, श्रीकृष्ण, सगळे दाखवतो....... :)

In reply to by पिवळा डांबिस

सर्किट Sat, 11/22/2008 - 09:14
आणि जर स्वतःबरोबर शिवास रीगल घेऊन आलांत तर.... बुद्ध, पैगंबर, श्रीकृष्ण, सगळे दाखवतो....... मस्त !!!! मी मात्र महावीर... -- (बाहुबली) सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

पिवळा डांबिस Sat, 11/22/2008 - 22:52
मी मात्र महावीर... -- (बाहुबली) सर्किट होय रे होय!!!! तो दिगंबर महावीर मात्र तूच!!!:) ती "जालनागडा" (संदर्भः मिसळप्रेमी!) ही पदवी काय उगाचच मिळाली काय तुला?:) कासोटा घट्ट आवळलेला, पिडां

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग Sun, 11/23/2008 - 02:13
असे हे आधुनिक बुद्ध आणि महावीर बघून मी मात्र हतबुद्ध झालोय खरा!! ;) (खुद के साथ बातां : रंगा, आता तू ही शंकराचार्य बनणे सुरु कर बाबा!! ;) ) चतुरंग

In reply to by पिवळा डांबिस

सर्किट Sun, 11/23/2008 - 06:13
Namo ariha.ntaaNaM Namo siddhaaNaM Namo aayariyaaNaM Namo uvajjhaayaaNaM Namo loe savvasaahuNaM eso pa.ncha Namokaaro savva paavapaNaasaNo ma.ngalaaNaM cha savvesim paDhamaM hava{ii} ma.ngalaM -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

जैनाचं कार्ट Sun, 11/23/2008 - 09:02
क्या बात है ! आमच्या खानदानात एकुलता एक मी ज्यानं याची देही.. याची डोळी.... विदेशी भाषा मध्ये नमोकार मत्रं वाचला =)) धन्य हो प्रभु सर्किट ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ

In reply to by मनीषा

पिवळा डांबिस Sat, 11/22/2008 - 23:01
ती शिवास रिगल कि काय ... ती कुठे मिळते? आरारारं! तुमच्यासारख्या झंटलमन लोकान्ला इकती शिंपल गोष्ट म्हायती नाय? सांगतो.... मध्य रेल्वेची लोकलगाडी पकडून ठाण्याला उतरायचं.... तिथे अभ्यंकरभटजी कुठे रहातात म्हणून विचारायचं...... त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे "उसाचा रस" मागायचा...... आणि ते फडताळात लपवलेली (त्यांच्या मातोश्री लय कडक आहेत!!!!) बाटली देतील ती घेऊन तडक आमच्याकडे यायचं!!!! :) पुजे साठी आणखी काय काय साहित्य लागते? आणखी बर्फ लागतो. पण तो आम्ही देवस्थानातर्फे मोफत पुरवतो.... :)

अनामिका Sun, 11/23/2008 - 00:15
तुमची बोधकथा आवडली पण हे करता आल तर बर्‍याच अंशी आमच देखिल आयुष्य सुसह्य होईल. प्रयत्न करुन बघु एकदा जमतय का ते? कठीण दिसतय पण????????? "अनामिका"

इनोबा म्हणे Sat, 01/26/2008 - 11:27
वाह!खरे आहे. मन शांत ठेवायचे तर असले प्रयोग करायला हरकत नाही. पण फक्त शिव्याशापापुरते... आपल्याला कोणी हात लावल्यावर मात्र हा विचार डोक्यात येत नाही,त्यावेळी डोक्यात असते ते फक्त आपला हात आणि मारणार्‍याचे थोबाड. भगवान गौतम बुद्धांनी सांगीतलेले एक वाक्य आठवते;ते म्हणाले होते "स्वतःला जिंकणारा हा विश्वविजेत्यापेक्षा मोठा विजेता असतो". (बुद्धं शरणं गच्छामी) -इनोबा

विसोबा खेचर Sat, 01/26/2008 - 11:37
मला याचा स्वानुभव आलेला आहे म्हणून हे मी सर्वांसाठी शेअर करीत आहे. थोडे दिवस उपयोग करुन पहा व मला तुमचा अनुभव कळवा. शाब्बास रे माझ्या गौतमा! :) पाहू पाहू, आम्हीही हा अनुभव घेऊन पाहू... बाय द वे, बोधकथेची ष्टोरी आवडली बरं का रे पिवळ्या डांबिसा... आपला, तात्या आंबेडकर.

खरंच बुद्धाच्या सगळ्याच बोधकथा छान आहेत. आवडली. अशीच एक गोष्ट म. गांधींची पण आहे बहुतेक. लहानपणी शाळेत एक धडा होता आम्हाला. एकदा त्यांना एक अतिशय शिव्या देणारे पत्र येते. ते त्या पत्राला लावलेली टाचणी काढून घेतात आणि बाकीचे पत्र परत त्या पाठवणारर्‍या व्यक्तिलाच पाठवून देतात. सोबत एक ओळ लिहितात, "तुम्ही जे पाठवले त्यातले मला जे उपयोगी होते तेवढे मी ठेवून घेतले, ज्याचा मला उपयोग नाही ते मी परत पाठवत आहे." बिपिन.

प्राजु Sun, 01/27/2008 - 09:28
कोणी एक स्वामी असेच शांत असत . प्रसन्न असत. राग त्याना माहितीच नव्हता. एकदा काही लोकांनी त्यांची फजिती करायचे ठरवले. स्वामी स्नान आटोपून नदीतून बाहेर येताना पाहून त्यातील काही लोकांनी पान खाऊन त्यांच्या अंगावर पिंक थुंकली. ते स्वामी पुन्हा नदीत गेले आणि स्नान करून बाहेर आले. पुन्हा तसेच झाले. असेच ५-६ वेळा झाले. पण ते स्वामी काहीही न बोलता नदीतून पुन्हा पुन्हा स्नान करून बाहेर येत होते. शेवटी त्या लोकांनी स्वामींना विचारले, "आम्ही इतक्या वेळेला ही घाण आपल्या अंगावर थुंकली, तुम्हाला राग नाही का आला?" स्वामी म्हणाले, "घाण? पण ही तर काही वेळापूर्वी तुमच्या तोंडात होती.. तुम्ही घाण खाता का?" ते लोक काय समजायचे ते समजले आणि स्वामींची माफी मागून खाली मान घालून निघून गेले. लहानपणी बाबांनी सांगितली होती ही गोष्ट. - (गोष्टीत रमणारी) प्राजु

In reply to by प्राजु

लिखाळ Fri, 11/21/2008 - 20:07
बहुधा एकनांथाच्या जीवनातील प्रसंग आहे. ते म्हणतात की चला या योगे मला १०८ वेळा स्नान घडले.. असे काहीतरी.. -- लिखाळ.

आजानुकर्ण Fri, 11/21/2008 - 19:49
डांबीसपंत, नाक पुसून कथा वाचली. बोधकथा फार आवडली. आम्हालाही कोणी सहजपणे शिव्या घातल्या तर आम्ही त्या स्वतःकडे घेत नाही. त्या त्यांच्याकडेच राहतात. आपला, (बुद्धम् शरणम् गच्छामि) आजानुकर्ण

लिखाळ Fri, 11/21/2008 - 20:06
देणार्‍यांची तोंडे हजारो.. माझ्याकडे आरसा :) कथा छान आहे.. आवडली.. याचसारखी एक कथा (बहुधा ओशोंच्या पुस्तकात) वाचली होती. एका साधूला एक मनुष्य शिवी देतो. त्यावर तो साधू त्याला आशिर्वाद देतो त्यावर तो साधू त्याला आशिर्वाद देतो. माणूस चमकतो.. साधू म्हणतो 'तुझ्याकडे जे देण्यासारखे होते ते तू दिलेस.. माझ्याकडे जे देण्यासारखे होते ते मी दिले '. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

आजानुकर्ण Fri, 11/21/2008 - 20:19
साधू म्हणतो 'तुझ्याकडे जे देण्यासारखे होते ते तू दिलेस.. माझ्याकडे जे देण्यासारखे होते ते मी दिले '.
मस्त!!! आपला, (साधू) ओशो आजानुकर्ण

सुनील Fri, 11/21/2008 - 20:16
हम्म. वाचायला छान पण आचरणात आणायला कठीण आहे बॉ. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

कपिल काळे Fri, 11/21/2008 - 20:18
सध्याच्या तंग वातावरणात सर्वांनी हे आचरणात आणावे . http://kalekapil.blogspot.com/

In reply to by कपिल काळे

लिखाळ Fri, 11/21/2008 - 20:23
सर्वांनी? अहो कुणी एकाने शिव्या दिल्या तर दुसर्‍याला शिकवण आचरणात आणण्याची संधी मिळणार ना ! त्यामुळे जो शिव्या देईल तो समोरच्याला बुद्धाची शिकवण आचरण्याची संधी देत आहे असे समजावे. कुणी आपणहून समाजसेवा करत असेल तर करु द्यावी :) (हघ्याहेसांनलगे) -- लिखाळ.

In reply to by कपिल काळे

अभिज्ञ Fri, 11/21/2008 - 21:01
डांबिसि बोधकथा आवडली. अभिनंदन. असो, अभिज्ञ. अवांतर (फाटे)-सध्याचे तंग वातावरण? असे अचानक काय घडले आहे कि वातावरण तंग व्हावे? कपिलदादा तुम्ही बुवा फारच लोड घेताय असे दिसते. ;) नवीन सदस्यांकरिता इतिहासाची उठाठेव खरच गरजेची आहे असे नमुद करावेसे वाटते.

In reply to by अभिज्ञ

सर्किट Sun, 11/23/2008 - 06:08
नवीन सदस्यांकरिता इतिहासाची उठाठेव खरच गरजेची आहे असे नमुद करावेसे वाटते. अभिज्ञशी सहमत आहे... -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

शितल Fri, 11/21/2008 - 20:19
कथा माहित होती, आणि त्या कथे नुसार वागण्याचा प्रयत्न तरी नक्की करेन. :) आता पर्यत अधे मध्ये तो प्रयत्न डळमळायचा, पण जाणिव पुर्वक तो न डळमळण्याचा प्रयत्न करेन. :)

टवाळचिखलू Fri, 11/21/2008 - 20:21
मस्तच. मीही ही युक्ती वापरुन पाहीन. - (बॉस या व्यक्तीपासुन वैतागलेला) चिखलू

कोलबेर Fri, 11/21/2008 - 21:07
एका किराणा मालाच्या दुकानात रोज एक गिर्‍हाइक तिथल्या शेठजीला अर्वाच्य शिव्या देउन जात असतो. ह्यावर एकदा न राहवुन तिथला पोर्‍या शेठजीला विचारतो, 'आपको गुस्सा नही आता क्या?' ह्यावर शेठजी थंडपणे उत्तर देतो ' कुछ देकेही जा रहा है ना? कुछ लेके तो नही ना जा रहा..फिर ठीक है! " (बनिया) कोलबेर

In reply to by कोलबेर

सर्किट Sun, 11/23/2008 - 06:10
कोलबेरा, हल्ली आपले शेठजीही असेच काहीसे थंडसे झालेले आहेत, असे फक्त मलाच वाटते आहे, की तुलाही ?? (मार्केट धबाधबा पडल्याने तशी बरीच देवमाणसे सध्या थंड झाली आहेत रे !) -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

टारझन Fri, 11/21/2008 - 21:07
आहो डांबिषकाका ... हे असले प्रकार काय जमणार णाही , हो शिव्यांची उत्तरं तितक्याच घाण शिव्याणी णाही देणार ... मी माझ्याच शारिरीक भाषेत उत्तर देईल ... बुद्द , गांधी , किंवा संत हे भूतकाळ आहेत .. तेंव्हाच्या गोष्टी आता चालतील असं पटत नाही. चुकी असेल तर शिव्या खाण्याचा संयम अंगी आहे, पण कोणी विणाकारण णडला तर फोडण्याशिवाय पर्याय आम्हाला णाही. महाभारतात आम्हाला युधिष्ठीरापेक्षा भिमार्जून आवडले. कारण त्या बैल युधिष्ठीरामुळेच महायुद्ध झालं,नको ते फंडे लाउन दुर्योधनाला सुधारण्याचा मुर्खपणा केला. आजकाल दुर्योधनांची संख्या जास्त आहे . (आडव्या डोक्याचा) टारझन उभे

In reply to by टारझन

हे असले प्रकार काय जमणार णाही , हो शिव्यांची उत्तरं तितक्याच घाण शिव्याणी णाही देणार ... मी माझ्याच शारिरीक भाषेत उत्तर देईल ... बुद्द , गांधी , किंवा संत हे भूतकाळ आहेत ...... टारू, म्हणूनच प्लास्टिक सर्जरीची गरज पडते. बाकी बोधकथा आवडली/ल्या. अदिती (टारूबाळाची आज्जी)

वेताळ Fri, 11/21/2008 - 22:41
आता कोण विनाकारण शिव्या देत असेल तर त्याला कृतीतुन उत्तर देण्याचा जमाना आहे. कथा छान आहे. आजकाल रागावर नियंत्रण राहणे खुप कठिण आहे. पण पिडांकाका तुमचा सल्ला लक्षात नक्की ठेऊ. वेताळ

पिवळा डांबिस Sat, 11/22/2008 - 00:00
तुम्हा मिपाकर मित्रांची पण कमाल आहे राव!!! मी ही कथा लिहिली होती जानेवारी मध्ये... तुम्ही अभिप्राय देताय नोव्हेंबर मध्ये..... नाय म्हणजे इतके महिने काय कथेवर चिंतन-मनन करत होता काय? ही तर खुद्द गौतम बुद्धाच्या वरताण झाली की!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

अभिज्ञ Sat, 11/22/2008 - 01:03
काका, तुम्ही म्हणता ते खरे आहे, पण माझ्या वाचनातून हि कथा खरच मिस झाली होती. अभिज्ञ.

यशोधरा Sat, 11/22/2008 - 00:09
तुम्ही उदाहरणच असा दणदणीत दिल्यात मां काका, मगे काय करतीत मिपाकर तरी?? :)

मनीषा Sat, 11/22/2008 - 05:50
(मी आजच वाचली) खरोखर बोध घेण्या सारखी .. या कथेत सांगीतल्या प्रमाणे वागणे जमले तर सगळेच बुद्ध होतील. पण तसे होत नाही म्हणून इतकी वर्ष झाली तरी दूसरा बुद्ध झाला नाही .

In reply to by मनीषा

पिवळा डांबिस Sat, 11/22/2008 - 09:12
कोण म्हणतो दुसरा बुद्ध झाला नाही? एकदा सदर्न कॅलिफोर्नियात चक्कर मारा..... दुसरा बुद्ध दाखवतो!!!! :) आणि जर स्वतःबरोबर शिवास रीगल घेऊन आलांत तर.... बुद्ध, पैगंबर, श्रीकृष्ण, सगळे दाखवतो....... :)

In reply to by पिवळा डांबिस

सर्किट Sat, 11/22/2008 - 09:14
आणि जर स्वतःबरोबर शिवास रीगल घेऊन आलांत तर.... बुद्ध, पैगंबर, श्रीकृष्ण, सगळे दाखवतो....... मस्त !!!! मी मात्र महावीर... -- (बाहुबली) सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

पिवळा डांबिस Sat, 11/22/2008 - 22:52
मी मात्र महावीर... -- (बाहुबली) सर्किट होय रे होय!!!! तो दिगंबर महावीर मात्र तूच!!!:) ती "जालनागडा" (संदर्भः मिसळप्रेमी!) ही पदवी काय उगाचच मिळाली काय तुला?:) कासोटा घट्ट आवळलेला, पिडां

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग Sun, 11/23/2008 - 02:13
असे हे आधुनिक बुद्ध आणि महावीर बघून मी मात्र हतबुद्ध झालोय खरा!! ;) (खुद के साथ बातां : रंगा, आता तू ही शंकराचार्य बनणे सुरु कर बाबा!! ;) ) चतुरंग

In reply to by पिवळा डांबिस

सर्किट Sun, 11/23/2008 - 06:13
Namo ariha.ntaaNaM Namo siddhaaNaM Namo aayariyaaNaM Namo uvajjhaayaaNaM Namo loe savvasaahuNaM eso pa.ncha Namokaaro savva paavapaNaasaNo ma.ngalaaNaM cha savvesim paDhamaM hava{ii} ma.ngalaM -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

जैनाचं कार्ट Sun, 11/23/2008 - 09:02
क्या बात है ! आमच्या खानदानात एकुलता एक मी ज्यानं याची देही.. याची डोळी.... विदेशी भाषा मध्ये नमोकार मत्रं वाचला =)) धन्य हो प्रभु सर्किट ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ

In reply to by मनीषा

पिवळा डांबिस Sat, 11/22/2008 - 23:01
ती शिवास रिगल कि काय ... ती कुठे मिळते? आरारारं! तुमच्यासारख्या झंटलमन लोकान्ला इकती शिंपल गोष्ट म्हायती नाय? सांगतो.... मध्य रेल्वेची लोकलगाडी पकडून ठाण्याला उतरायचं.... तिथे अभ्यंकरभटजी कुठे रहातात म्हणून विचारायचं...... त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे "उसाचा रस" मागायचा...... आणि ते फडताळात लपवलेली (त्यांच्या मातोश्री लय कडक आहेत!!!!) बाटली देतील ती घेऊन तडक आमच्याकडे यायचं!!!! :) पुजे साठी आणखी काय काय साहित्य लागते? आणखी बर्फ लागतो. पण तो आम्ही देवस्थानातर्फे मोफत पुरवतो.... :)

अनामिका Sun, 11/23/2008 - 00:15
तुमची बोधकथा आवडली पण हे करता आल तर बर्‍याच अंशी आमच देखिल आयुष्य सुसह्य होईल. प्रयत्न करुन बघु एकदा जमतय का ते? कठीण दिसतय पण????????? "अनामिका"
लेखनविषय:
लेखनप्रकार
गौतम बुद्धांची एक कथा. बुद्ध हे मनोविजयी होते हे सर्वज्ञात आहे. ते नेहमी शांत, सस्मित, आणि प्रसन्न असत. त्यांच्या सहवासात येणारया लोकांनाही या प्रसन्नतेचा लाभ होत असे. पण काही लोक असेही होते की त्यांना गौतमांना मिळणारा सन्मान सहन होत नसे. त्यांचा अगदी जळफळाट होत असे. असाच एक माणूस एकदा गौतमांना रागवावयास भाग पाडायचेच, त्यांचा अपमान करायचाच, फजिती करायचीच असे ठरवून त्यांच्या प्रवचनाच्या ठिकाणी आला. प्रचंड जनसमुदाय जमला होता. तथागत शांतपणे त्या समुदायाला मार्गदर्शन करत होते. तेंव्हा हा माणूस तेथे पोचला आणि सर्वांसमोर त्याने गौतमांना न भूतो न भविष्यति अश्या शिव्या दिल्या.