मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दाल बाटी व दाल बाफले

संजय अभ्यंकर ·

विसोबा खेचर गुरुवार, 01/24/2008 - 07:11
वा वा! ही आमची आवडती पापकृती.. संजयराव, अजूनही पाककृत्या येऊ द्यात! तात्या. अवांतर - शक्य झाल्यास आपले नांव (लॉगीन आयडी) देवनागरीत करा ही विनंती.. आपला, (मराठी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पिवळा डांबिस गुरुवार, 01/24/2008 - 22:30
तात्या, संजय अभ्यंकर हे मान्य! पण तुम्ही आणि केशवसुमार कसले "अभ्यंकर"? तुम्ही तर "भयंकर"! :)) (थट्टेखोर) पिवळा डांबिस

In reply to by विसोबा खेचर

पिवळा डांबिस गुरुवार, 01/24/2008 - 22:56
थोडकी थट्टा केली, राग नसावा. तुझ्या लिखाणावर मी फिदा आहे रे!!!

चटोरी वैशू Fri, 08/15/2008 - 09:40
अय्या असाच कहिसा थोडा वेगळा ... प्रकार म्हणजे बट्टी .... जाड्सर गव्हाचे पीठ आणि त्यात थोडे मक्याचे पीठ मिसळून घट्ट कणिक मळावी. मळताना साजुक तुपाचे भरपूर मोहन घालावे. १/२ च. जीरा आणि १/२ च.ओवा ., चवीनुसार मीठ.... ह्या कणकेचे मुठी एवढे गोळे करुन ते पाण्यात उकळावेत. मग ते गोळे गार झाल्यावर त्याचे २-२ तुकडे करावे. कढईत तेल्/तूप गरम करुन ते तुकडे मस्त पैकी तळून घ्यावे. कुर्कुरित .. ही झाली बट्टी ... ही तुम्ही साध्या वरणा सोबत्...मस्तपैकि मोडुन त्यावर साधे वरण ... गावराण तूप... आणि सोबत वान्ग्याची भाजी... आहा !.... हा झाला... खान्देशी वरण बट्टी चा बेत....

विंजिनेर Fri, 03/06/2009 - 05:38
जरी गोवर्‍या मिळत नसतील तरी कोळशाची शेगडी सहजी मिळते. त्यात सुद्धा बट्ट्या खुसखुशीत भाजता येवू शकतात. ओवन पेक्षा हा पर्याय नक्कीच खुमासदार चव आणतो.

विसोबा खेचर गुरुवार, 01/24/2008 - 07:11
वा वा! ही आमची आवडती पापकृती.. संजयराव, अजूनही पाककृत्या येऊ द्यात! तात्या. अवांतर - शक्य झाल्यास आपले नांव (लॉगीन आयडी) देवनागरीत करा ही विनंती.. आपला, (मराठी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पिवळा डांबिस गुरुवार, 01/24/2008 - 22:30
तात्या, संजय अभ्यंकर हे मान्य! पण तुम्ही आणि केशवसुमार कसले "अभ्यंकर"? तुम्ही तर "भयंकर"! :)) (थट्टेखोर) पिवळा डांबिस

In reply to by विसोबा खेचर

पिवळा डांबिस गुरुवार, 01/24/2008 - 22:56
थोडकी थट्टा केली, राग नसावा. तुझ्या लिखाणावर मी फिदा आहे रे!!!

चटोरी वैशू Fri, 08/15/2008 - 09:40
अय्या असाच कहिसा थोडा वेगळा ... प्रकार म्हणजे बट्टी .... जाड्सर गव्हाचे पीठ आणि त्यात थोडे मक्याचे पीठ मिसळून घट्ट कणिक मळावी. मळताना साजुक तुपाचे भरपूर मोहन घालावे. १/२ च. जीरा आणि १/२ च.ओवा ., चवीनुसार मीठ.... ह्या कणकेचे मुठी एवढे गोळे करुन ते पाण्यात उकळावेत. मग ते गोळे गार झाल्यावर त्याचे २-२ तुकडे करावे. कढईत तेल्/तूप गरम करुन ते तुकडे मस्त पैकी तळून घ्यावे. कुर्कुरित .. ही झाली बट्टी ... ही तुम्ही साध्या वरणा सोबत्...मस्तपैकि मोडुन त्यावर साधे वरण ... गावराण तूप... आणि सोबत वान्ग्याची भाजी... आहा !.... हा झाला... खान्देशी वरण बट्टी चा बेत....

विंजिनेर Fri, 03/06/2009 - 05:38
जरी गोवर्‍या मिळत नसतील तरी कोळशाची शेगडी सहजी मिळते. त्यात सुद्धा बट्ट्या खुसखुशीत भाजता येवू शकतात. ओवन पेक्षा हा पर्याय नक्कीच खुमासदार चव आणतो.
3

गडकर्‍यांचे किस्से.

चतुरंग ·

मुक्तसुनीत Tue, 01/22/2008 - 23:23
गडकर्‍यांच्या सर्व नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत - "एकच प्याला", "पुण्यप्रभाव" (अजून आठवत नाहीयेत - कोणी मदत करेल?) ------------------ अजून काही: भावबंधन राजसंन्यास

सुनील Tue, 01/22/2008 - 23:24
"एकच प्याला", "पुण्यप्रभाव" (अजून आठवत नाहीयेत - कोणी मदत करेल?) काही आठवतात ती - संयस्त खड्ग राजसंन्यास (बहुधा हे अपूर्ण राहिले) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

अहो व्हती गडबड कदि कदि. त्ये "जेथे सागरा धरणी मिळते तेथे तुझी मी वाट पहाते " ह्ये गानं बी सावरकरांचे म्हनून वाटतय. आता "ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला" ह्या सावरकरांच्या गान्याने तो घोटाळा व्हतोय. प्रकाश घाटपांडे

भडकमकर मास्तर Wed, 01/23/2008 - 13:29
"वेड्यांचा बाजार" नावाचे सुद्धा अपूर्ण राहिले बहुतेक.... त्या अपूर्ण नाटकाचे स्क्रिप्ट मी वाचले आहे फार पूर्वी...त्यात एक कोट्या करणारे पात्र असते, एवढेच आठव्तेय.......

नंदन Wed, 01/23/2008 - 13:49
राम गणेश गडकर्‍यांचे समग्र साहित्य इ-पुस्तकाच्या स्वरूपात उपलब्ध असल्याची बातमी मागे वाचली होती. [दुवा - येथे] कुणाला याबाबत अधिक माहिती आहे का? नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

विसोबा खेचर Wed, 01/23/2008 - 17:19
चतुरंगराव, गडकरी मास्तरांचे छोटेखानी किस्से वाचायला मजा आली. कृपया येऊ द्यात अजूनही... तात्या.

मुक्तसुनीत Wed, 01/23/2008 - 19:59
मला वाटते, गडकर्‍यांच्या स्मृतिंची ज्योत पिढ्यानुपिढ्यांकरता तेवत ठेवण्याचे सारे श्रेय अत्र्यांना द्यायला हवे. चतुरंगरावानी लिहिलेले बहुतेक किस्से अत्र्यांच्या लेखांतून, भाषणांच्या संग्रहातून आलेले असावेत असा माझा अंदाज आहे. अत्र्यांची लोकप्रियता , आणि मुख्य म्हणजे एखाद्या व्यक्तिची योग्यता जाणून ती आपल्या ओघवत्या शैलीत लिहिण्या-सांगण्याची त्यांची हातोटी याचा सर्वात सुंदर मिलाफ झाला , तो गडकर्‍यांच्या गुणवर्णनात. केवळ गडकर्‍यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यानी शेकडो भाषणे केली, डझनावारी लेख लिहिले. सुदैवाने , हे सारे परचुर्‍यांसारख्या अत्रेभक्तामुळे मुद्रितस्वरूपात उपलब्ध आहे ....

In reply to by मुक्तसुनीत

चतुरंग Wed, 01/23/2008 - 20:10
ह्यातले बहुतेक किस्से मी माझ्या वडिलांशी बोलताना त्यांच्याकडून ऐकले आहेत. काही माझ्या वाचनात आलेत. आपण उल्लेख केलेले परचुर्‍यांचे पुस्तक कोणते ते सांगू शकाल का? ते मिळवून मी जरुर वाचेन. अवांतर - वाचनाची गोडी ही आयुष्य संपन्न करते. माझ्या आजोबांचा पुस्तकांचा संग्रह जवळपास २००० पुस्तकांचा होता. त्यांच्यामुळे मला वाचनाची आवड निर्माण झाली आणि ती वडिलांमुळे टिकून राहिली. चतुरंग

मुक्तसुनीत Wed, 01/23/2008 - 20:52
अत्र्यांची अनेक पुस्तके आहेत, आणि गडकर्‍यांचे संदर्भ बर्‍याच लेख आणि भाषणसंग्रहातून मिळतात. मला चटकन आठवणारी २ नावे : "क‍र्‍हेचे पाणी" या अत्र्यांच्या आत्मचरित्रामधे गडकरी, त्याकाळातले पुणे आदिंची रसाळ वर्णने आहेत. "आषाढस्य प्रथम दिवसे" नावाच्या लेखसंग्रहात गडकर्‍यांवर एक सोडून दोन-तीन लेख आहेत असे मला आठवते ... (परचुरे हे लेखक नव्हेत. ते अत्र्यांचे प्रकाशक. सावरकर आणि अत्र्यांचे खूपसे लिखाण "परचुरे प्रकाशन मंदिर" यांनी छापले आहे. या दोन लेखकांशिवाय परचुर्‍यांची मोठी कामगिरी म्हणजे जी एंच्या शेवटच्या वर्षातली (आणि त्यांच्या मृत्यूनंतरची त्यांची) पुस्तके या प्रकाशनाने काढली ...

सुनील Wed, 01/23/2008 - 21:04
सहजच मनात विचार आला - गडकर्‍यांचे सर्वात गाजलेले नाटक - एकच प्याला. त्यांचे नाव, राम - दोन अक्षरी. वडिलांचे नाव, गणेश - तीन अक्षरी. आडनाव, गडकरी - चार अक्षरी. कवी म्हणून टोपणनाव, गोविंदाग्रज - पाच अक्षरी. (आकडेबहाद्दर) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

चतुरंग Wed, 01/23/2008 - 21:24
अजून एक दुर्दैवी योगायोग - गडकर्‍यांचा जन्म गुजरातेतल्या 'नवसारी' चा (१८८५) आणि मृत्यू विदर्भातल्या 'सावनेर' चा (१९१९)! अवघं ३४ वर्षांचं आयुष्य! ही 'मोठी' माणसं लहान वयात का जातात?? चतुरंग

डॉ.प्रसाद दाढे Wed, 01/30/2008 - 09:34
समग्र गडकरी नामक पुस्तकात त्या॑चे सर्व साहित्य आहे. कर्‍हेचे पाणीमध्येसुद्धा गडकर्‍या॑चे पुष्कळ किस्से दिले आहेत. पर॑तु त्यातील सत्या-असत्त्याबद्दल प्रवाद आहेत. काही तत्कालीन टीकाकारा॑च्या मते गडकरी आणि अत्रे या॑ची कधी भेटच झाली नव्हती. अर्थात ह्या वादात आता पडण्याचे काही कारण नाही..

मुक्तसुनीत Tue, 01/22/2008 - 23:23
गडकर्‍यांच्या सर्व नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत - "एकच प्याला", "पुण्यप्रभाव" (अजून आठवत नाहीयेत - कोणी मदत करेल?) ------------------ अजून काही: भावबंधन राजसंन्यास

सुनील Tue, 01/22/2008 - 23:24
"एकच प्याला", "पुण्यप्रभाव" (अजून आठवत नाहीयेत - कोणी मदत करेल?) काही आठवतात ती - संयस्त खड्ग राजसंन्यास (बहुधा हे अपूर्ण राहिले) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

अहो व्हती गडबड कदि कदि. त्ये "जेथे सागरा धरणी मिळते तेथे तुझी मी वाट पहाते " ह्ये गानं बी सावरकरांचे म्हनून वाटतय. आता "ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला" ह्या सावरकरांच्या गान्याने तो घोटाळा व्हतोय. प्रकाश घाटपांडे

भडकमकर मास्तर Wed, 01/23/2008 - 13:29
"वेड्यांचा बाजार" नावाचे सुद्धा अपूर्ण राहिले बहुतेक.... त्या अपूर्ण नाटकाचे स्क्रिप्ट मी वाचले आहे फार पूर्वी...त्यात एक कोट्या करणारे पात्र असते, एवढेच आठव्तेय.......

नंदन Wed, 01/23/2008 - 13:49
राम गणेश गडकर्‍यांचे समग्र साहित्य इ-पुस्तकाच्या स्वरूपात उपलब्ध असल्याची बातमी मागे वाचली होती. [दुवा - येथे] कुणाला याबाबत अधिक माहिती आहे का? नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

विसोबा खेचर Wed, 01/23/2008 - 17:19
चतुरंगराव, गडकरी मास्तरांचे छोटेखानी किस्से वाचायला मजा आली. कृपया येऊ द्यात अजूनही... तात्या.

मुक्तसुनीत Wed, 01/23/2008 - 19:59
मला वाटते, गडकर्‍यांच्या स्मृतिंची ज्योत पिढ्यानुपिढ्यांकरता तेवत ठेवण्याचे सारे श्रेय अत्र्यांना द्यायला हवे. चतुरंगरावानी लिहिलेले बहुतेक किस्से अत्र्यांच्या लेखांतून, भाषणांच्या संग्रहातून आलेले असावेत असा माझा अंदाज आहे. अत्र्यांची लोकप्रियता , आणि मुख्य म्हणजे एखाद्या व्यक्तिची योग्यता जाणून ती आपल्या ओघवत्या शैलीत लिहिण्या-सांगण्याची त्यांची हातोटी याचा सर्वात सुंदर मिलाफ झाला , तो गडकर्‍यांच्या गुणवर्णनात. केवळ गडकर्‍यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यानी शेकडो भाषणे केली, डझनावारी लेख लिहिले. सुदैवाने , हे सारे परचुर्‍यांसारख्या अत्रेभक्तामुळे मुद्रितस्वरूपात उपलब्ध आहे ....

In reply to by मुक्तसुनीत

चतुरंग Wed, 01/23/2008 - 20:10
ह्यातले बहुतेक किस्से मी माझ्या वडिलांशी बोलताना त्यांच्याकडून ऐकले आहेत. काही माझ्या वाचनात आलेत. आपण उल्लेख केलेले परचुर्‍यांचे पुस्तक कोणते ते सांगू शकाल का? ते मिळवून मी जरुर वाचेन. अवांतर - वाचनाची गोडी ही आयुष्य संपन्न करते. माझ्या आजोबांचा पुस्तकांचा संग्रह जवळपास २००० पुस्तकांचा होता. त्यांच्यामुळे मला वाचनाची आवड निर्माण झाली आणि ती वडिलांमुळे टिकून राहिली. चतुरंग

मुक्तसुनीत Wed, 01/23/2008 - 20:52
अत्र्यांची अनेक पुस्तके आहेत, आणि गडकर्‍यांचे संदर्भ बर्‍याच लेख आणि भाषणसंग्रहातून मिळतात. मला चटकन आठवणारी २ नावे : "क‍र्‍हेचे पाणी" या अत्र्यांच्या आत्मचरित्रामधे गडकरी, त्याकाळातले पुणे आदिंची रसाळ वर्णने आहेत. "आषाढस्य प्रथम दिवसे" नावाच्या लेखसंग्रहात गडकर्‍यांवर एक सोडून दोन-तीन लेख आहेत असे मला आठवते ... (परचुरे हे लेखक नव्हेत. ते अत्र्यांचे प्रकाशक. सावरकर आणि अत्र्यांचे खूपसे लिखाण "परचुरे प्रकाशन मंदिर" यांनी छापले आहे. या दोन लेखकांशिवाय परचुर्‍यांची मोठी कामगिरी म्हणजे जी एंच्या शेवटच्या वर्षातली (आणि त्यांच्या मृत्यूनंतरची त्यांची) पुस्तके या प्रकाशनाने काढली ...

सुनील Wed, 01/23/2008 - 21:04
सहजच मनात विचार आला - गडकर्‍यांचे सर्वात गाजलेले नाटक - एकच प्याला. त्यांचे नाव, राम - दोन अक्षरी. वडिलांचे नाव, गणेश - तीन अक्षरी. आडनाव, गडकरी - चार अक्षरी. कवी म्हणून टोपणनाव, गोविंदाग्रज - पाच अक्षरी. (आकडेबहाद्दर) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

चतुरंग Wed, 01/23/2008 - 21:24
अजून एक दुर्दैवी योगायोग - गडकर्‍यांचा जन्म गुजरातेतल्या 'नवसारी' चा (१८८५) आणि मृत्यू विदर्भातल्या 'सावनेर' चा (१९१९)! अवघं ३४ वर्षांचं आयुष्य! ही 'मोठी' माणसं लहान वयात का जातात?? चतुरंग

डॉ.प्रसाद दाढे Wed, 01/30/2008 - 09:34
समग्र गडकरी नामक पुस्तकात त्या॑चे सर्व साहित्य आहे. कर्‍हेचे पाणीमध्येसुद्धा गडकर्‍या॑चे पुष्कळ किस्से दिले आहेत. पर॑तु त्यातील सत्या-असत्त्याबद्दल प्रवाद आहेत. काही तत्कालीन टीकाकारा॑च्या मते गडकरी आणि अत्रे या॑ची कधी भेटच झाली नव्हती. अर्थात ह्या वादात आता पडण्याचे काही कारण नाही..
लेखनविषय:
लेखनप्रकार
नाटककार राम गणेश गडकरी हे एक हजरजबाबी व्यक्तिमत्व होते त्यांचे काही किस्से. अत्रे गडकर्‍यांना गुरुस्थानी मानत. आपला पहिला काव्यसंग्रह 'फुलबाग' लिहून झाल्यावर, त्याची वही घेऊन अत्रे राम गणेशांकडे अभिप्रायासाठी गेले. काही दिवसांनी अत्रे वही आणायला गेले. त्यांनी विचारलं "कशी काय वाटली फुलबाग?" वहीच्या फाटलेल्या आवरणाकडे बोट दाखवत गडकरी म्हणाले "फुलबाग चांगली आहे, कुंपण तेवढं नीट घाला!" ---------------------------------------------------------- नाटक रंगभूमीवर येण्यापूर्वी गडकर्‍यांच्या घरी नाट्यवाचनाचे प्रयोग होत.

अंदाज बायकोचा वाटे खरा असावा

अविनाश ओगले ·

ऋषिकेश Tue, 01/22/2008 - 21:53
मी पायरीवरी त्या कुडकुड करीत होतो झोंबे मला जो वारा तो बोचरा असावा ते बंद दार आणि निद्रा न आवरे ही ज्याची उशी मी केली तो उंबरा असावा उघडेल दार तेव्हा संपून राग जावो माझ्या समोर माझा तो मोगरा असावा :))))))))) हे खास आवडलं.. बाकी विडंबनही ठिक आवडलं. -ऋषिकेश

धोंडोपंत Wed, 01/23/2008 - 13:02
वा वा पंत, क्या बात है!!!! हा हा हा हा हा अंदाज बायकोचा वाटे खरा असावा शुद्धीवरी अजूनी नवरा जरा असावा... हसून हसून पुरेवाट. सही. अप्रतिम विडंबन. मुक्तकाचे विडंबनही झकास. क्या बात है!! आपला, (हसरा)धोंडोपंत तात्या, मैफिल जमायला लागलेय रे!!! आपला, (आस्वादक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

स्वाती राजेश Wed, 01/23/2008 - 16:49
विडंबन आवडले. अजुनी अशीच येऊ देत. वाट पाहात आहे अशाच विडंबनाची.. ते बंद दार आणि निद्रा न आवरे ही ज्याची उशी मी केली तो उंबरा असावा उघडेल दार तेव्हा संपून राग जावो माझ्या समोर माझा तो मोगरा असावा हे आवडले.

In reply to by दीपा॑जली

अविनाश ओगले गुरुवार, 01/24/2008 - 20:52
अंदाज या नशेचा वाटे खरा असावा बहुतेक बायकोचा तो चेहरा असावा बायको पार्टीला गेल्यावर मी घरी बसून नशेशिवाय दुसरे काय करणार?

विसोबा खेचर गुरुवार, 01/24/2008 - 22:12
भेटून अंगणाला, इतुके विचार आता निजण्यास का न येथे, मज कोपरा असावा वा वा! मस्त विडंबन.. अवांतर - आम्हाला केशवसुमारांचे विडंबन अधिक आवडले... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अविनाश ओगले Fri, 01/25/2008 - 14:35
आम्हाला पण... ते `सुमार ' म्हणवतात, पण त्यांच्या काव्याचा `खुमार' काही औरच. `... मगर है गालिबका अंदाजे बयां और' हेच खरे...

In reply to by अविनाश ओगले

विसोबा खेचर Fri, 01/25/2008 - 16:39
आम्हाला पण... ते `सुमार ' म्हणवतात, पण त्यांच्या काव्याचा `खुमार' काही औरच. `... मगर है गालिबका अंदाजे बयां और' हेच खरे... क्या बात है...:)

In reply to by अविनाश ओगले

केशवसुमार Fri, 01/25/2008 - 21:23
अविनाशशेठ, का सुमाराची थट्टा करता... बाय द वे.. ते डोंबिवलीच्या चाळी मधले आणि ते मालिकांचे विडंबन पण येथे येऊ द्या.. दोनी ही उच्च आहेत.. ह्या विडंबनातील 'माणसे गेली कुठे ' च्या सगळ्या द्विपदी जबरा आहेत.. केशवसुमार

राजे Fri, 01/25/2008 - 19:12
कीती तरी पिय्यकडांच्या मनातील विचार बोलून दाखवले तुम्ही.... राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

अविनाशकाका खरंच मजा आली. उघडेल दार तेव्हा संपून राग जावो माझ्या समोर माझा तो मोगरा असावा काय भन्नाट आहे जितेंद्र शिंदे

ऋषिकेश Tue, 01/22/2008 - 21:53
मी पायरीवरी त्या कुडकुड करीत होतो झोंबे मला जो वारा तो बोचरा असावा ते बंद दार आणि निद्रा न आवरे ही ज्याची उशी मी केली तो उंबरा असावा उघडेल दार तेव्हा संपून राग जावो माझ्या समोर माझा तो मोगरा असावा :))))))))) हे खास आवडलं.. बाकी विडंबनही ठिक आवडलं. -ऋषिकेश

धोंडोपंत Wed, 01/23/2008 - 13:02
वा वा पंत, क्या बात है!!!! हा हा हा हा हा अंदाज बायकोचा वाटे खरा असावा शुद्धीवरी अजूनी नवरा जरा असावा... हसून हसून पुरेवाट. सही. अप्रतिम विडंबन. मुक्तकाचे विडंबनही झकास. क्या बात है!! आपला, (हसरा)धोंडोपंत तात्या, मैफिल जमायला लागलेय रे!!! आपला, (आस्वादक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

स्वाती राजेश Wed, 01/23/2008 - 16:49
विडंबन आवडले. अजुनी अशीच येऊ देत. वाट पाहात आहे अशाच विडंबनाची.. ते बंद दार आणि निद्रा न आवरे ही ज्याची उशी मी केली तो उंबरा असावा उघडेल दार तेव्हा संपून राग जावो माझ्या समोर माझा तो मोगरा असावा हे आवडले.

In reply to by दीपा॑जली

अविनाश ओगले गुरुवार, 01/24/2008 - 20:52
अंदाज या नशेचा वाटे खरा असावा बहुतेक बायकोचा तो चेहरा असावा बायको पार्टीला गेल्यावर मी घरी बसून नशेशिवाय दुसरे काय करणार?

विसोबा खेचर गुरुवार, 01/24/2008 - 22:12
भेटून अंगणाला, इतुके विचार आता निजण्यास का न येथे, मज कोपरा असावा वा वा! मस्त विडंबन.. अवांतर - आम्हाला केशवसुमारांचे विडंबन अधिक आवडले... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अविनाश ओगले Fri, 01/25/2008 - 14:35
आम्हाला पण... ते `सुमार ' म्हणवतात, पण त्यांच्या काव्याचा `खुमार' काही औरच. `... मगर है गालिबका अंदाजे बयां और' हेच खरे...

In reply to by अविनाश ओगले

विसोबा खेचर Fri, 01/25/2008 - 16:39
आम्हाला पण... ते `सुमार ' म्हणवतात, पण त्यांच्या काव्याचा `खुमार' काही औरच. `... मगर है गालिबका अंदाजे बयां और' हेच खरे... क्या बात है...:)

In reply to by अविनाश ओगले

केशवसुमार Fri, 01/25/2008 - 21:23
अविनाशशेठ, का सुमाराची थट्टा करता... बाय द वे.. ते डोंबिवलीच्या चाळी मधले आणि ते मालिकांचे विडंबन पण येथे येऊ द्या.. दोनी ही उच्च आहेत.. ह्या विडंबनातील 'माणसे गेली कुठे ' च्या सगळ्या द्विपदी जबरा आहेत.. केशवसुमार

राजे Fri, 01/25/2008 - 19:12
कीती तरी पिय्यकडांच्या मनातील विचार बोलून दाखवले तुम्ही.... राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

अविनाशकाका खरंच मजा आली. उघडेल दार तेव्हा संपून राग जावो माझ्या समोर माझा तो मोगरा असावा काय भन्नाट आहे जितेंद्र शिंदे
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा... या गज़लेचे विडंबन. सिच्युएशन अशी.. जिचे माझ्यावर नितांत प्रेम आहे, अशा त्या माझ्या भार्येची रीतसर परवानगी घेऊन, `...पण नऊच्या आत परत या' ही अशक्यप्राय अट मान्य करुन अस्मादिक मित्रांच्या बरोबर मद्यमैफलीला गेले. मित्रांनी आग्रहाने खूप पाजली. `काही काळजी करु नकोस. आम्ही आहोत. वहिनीनी तुला दार उघडून आत घेतल्यावरच आम्ही जाऊ...' अशी आश्वासने दिली. मैफल रात्री बारा वाजता संपन्न झाली. मित्रांनी दगा दिला. कडाक्याच्या थंडीत, निर्मनुष्य रस्त्यावर... मला माझ्या दारासमोर उभे केले. दार वाजवले.

भारतरत्न, सर, नाईटहूड किताबांबद्दल काही ..........

छोटा डॉन ·

विसोबा खेचर Tue, 01/22/2008 - 17:52
या निमित्ताने असे पूरस्कार कोणाला मिळावेत [ राजकारणी, शास्त्रज्ञ, समाजसेवक, कलाकार, अभिनेते की आणखी कोणी ???] , पूरस्कारांचे निकष, निवडीची पध्दत यासारख्या अनेक मुद्द्यांचा उहापोह "मिपा" च्या मंचावर व्हावा अशी माझी ईच्छा आहे ........... स्वरभास्कर, पद्मविभूषण पंडित भीमसेन गुरुराज जोशी यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालाच पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे! आमच्या अण्णांनी खर्‍या अर्थाने हिंदुस्थानी अभिजात संगीत अक्षरश: त्रिखंडात पोहोचवले. १९५२ साली सवाई गंधर्व महोत्सव सुरू करून, त्यात भारतातल्या उत्तमोत्तम गवयांची/गायिकांची गाणी करून गेली पन्नासहून अधिक वर्ष भारतीय रसिकांना अखंड स्वरस्नान घडवले! १९५२ साली लावलेल्या या रोपट्याचा वेलू आज गगनावेरी गेला आहे हे सांगणे न लगे! 'स्वरभास्कर' ही उपाधी खरोखरंच ज्यांना शोभून दिसावी असे अण्णांचे व्यक्तिगत गायन आणि सवाई गंधर्व संगीत महोत्सव हे हिंदुस्थानी अभिजात संगीतात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावे असे मानाचे पान आणि त्यात आमच्या अण्णांचे अनन्यसाधारण योगदान, हे निकष माझ्या मते अण्णांना 'भारतरत्न' हा पुरस्कार देण्यास पुरेसे आहेत! भारतीय अभिजात संगीताच्या या अध्वर्यूला माझा मानाचा मुजरा! अण्णांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाल्याचे ज्या दिवशी जाहीर होईल त्या दिवशी माझ्या घरी दिवाळी असेल!! आपला, (कट्टर भीमसेनभक्त) तात्या अभ्यंकर.

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग Tue, 01/22/2008 - 19:17
खरं तर या आधीच तो मिळायला हवा होता असं मला वाटतं. आण्णांच्या शास्त्रीय संगीताबरोबरच 'अभंगवाणीने' सामान्य रसिकांना जे काही दिले आहे त्याची तुलना बसल्याजागी पंढरीची वारी घडवून आणण्याशीच होईल! अभंगवाणीच्या त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्यक्ष विठोबा सुध्दा पंढरी सोडून ऐकायला येऊन बसत असेल! ह्या 'सिध्द्स्वर' गानसूर्याला तो किताब देऊन, त्या किताबाची उंची लवकरात लवकर वाढावी हीच विठूचरणी प्रार्थना!! चतुरंग

In reply to by विसोबा खेचर

पिवळा डांबिस गुरुवार, 01/24/2008 - 00:38
भीमसेन अण्णांची निवड उचित आहेच! आणखी नांवे सुचवायची तर..... मी बाबा आमटे यांचे नांव सुचवीन. बाबांच्या कार्याची माहिती या संकेतस्थळावर करुन देण्याची गरज नाही. त्यांचे नांव माहीत नसलेला मराठी माणूस असणार नाही. इथे सुचवलेले सर्व लोक महान आहेतच परन्तू मला त्यांच्यात व बाबांमध्ये एक फरक जाणवतो की इतर सर्वांनी त्यांची कला, बुद्धि आपल्या उपजिविकेचे साधन म्हणून वापरली. त्यातून अर्थप्राप्तीहि केली (अर्थात त्यात गैर काहीही नाही) पण बाबांचे मोठेपण हे की त्यांनी भरपूर प्राप्ती असलेला वकिलीचा व्यवसाय सोडून महारोग्यांची सेवा केली. बाबांना भारतरत्न देण्याने त्या पुरस्काराचा सन्मान होईल. (नम्र) पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

इनोबा म्हणे गुरुवार, 01/24/2008 - 00:44
अगदी बरोबर,अशा निस्वार्थी लोकांना हा पुरस्कार मिळणे हा खरे तर त्या पुरस्काराचाच सम्मान म्हणायला हवा. बाबांच्या कार्यापासून नव्या पिढीला काही प्रेरणा मिळेल. (बाबांचा भक्त) -इनोबा

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग गुरुवार, 01/24/2008 - 01:05
बाबांचं नाव माझ्या डोळ्यांसमोर आलं नाही ह्याची मला लाज वाटते! भीमण्णांइतकेच तेही ह्या पुरस्काराचे सार्थ मानकरी ठरु शकतात. चतुरंग

सुनील Wed, 01/23/2008 - 01:23
मग यातून अजून एक सूर निघाला की सचिनने हा पूरस्कार स्वीकारू नये कारण हा पूरस्कार ब्रिटिष संघराज्यातिल देशात राहणार्‍या लोकांसाठी आहे, म्हणून स्वतंत्र भारतात राहणार्‍या सचिनने तो स्विकारू नये ..... हा पुरस्कार केवळ ब्रिटिश संघराज्यातील देशात (तुम्हाला युनायटेड किंगडम म्हणायचे आहे असे मी गृहित धरतो) राहणार्‍यांसाठीच आहे असे नाही. हा पुरस्कार जगातील कोणत्याही व्यक्तीस दिला जातो. राष्टकूलातील (कॉमनवेल्थ) देशांतील नागरीक, हा पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या नावापूर्वी (केवळ आडनावापूर्वी नव्हे), "सर" ही पदवी लावू शकतात. राष्ट्रकूलाबाहेरील नागरीक त्यांच्या संपूर्ण नावानंतर "O.B.E." अशी आद्याक्षरे लावू शकतात. OBE = Order of British Empire न्यू यॉर्कचे माजी महापौर रुडॉल्फ गिलियानी यानींदेखील हा पुरस्कार स्वीकारला आहे. सचिनला हा मिळाला तर त्यात गैर किंवा कमीपणाचे काहीही नाही. यापूर्वी कधीही भारतरत्न या पुरस्काराची अशी जाहीर चर्चा झाली नव्हती. अडवानी यांनी एक अत्यंत क्षूद्र असे राजकारणच केले असे माझे स्पष्ट मत आहे! त्याची कारणे काहीही असोत. गेल्या कित्येक वर्षात हा पुरस्कार दिला गेला नव्हता तेव्हा अजून काही वर्षे तो न दिल्याने काही फरक पडणार नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

ऋषिकेश Wed, 01/23/2008 - 01:58
सचिनला हा मिळाला तर त्यात गैर किंवा कमीपणाचे काहीही नाही. सहमत! यापूर्वी कधीही भारतरत्न या पुरस्काराची अशी जाहीर चर्चा झाली नव्हती. अडवानी यांनी एक अत्यंत क्षूद्र असे राजकारणच केले असे माझे स्पष्ट मत आहे! त्याची कारणे काहीही असोत. अगदी सहमत!!

In reply to by ऋषिकेश

अभिज्ञ Sun, 01/27/2008 - 15:43
मंला असे वाटते कि अडावाणी यानि जे काहि केले आहे ते अत्यन्त योग्य असेच आहे. अन्यथा कोन्ग्रेस्स ने त्यन्च्या मर्जिमधल्या कोनला तरि हा पूरस्कार दिला असता.

In reply to by सुनील

पिवळा डांबिस गुरुवार, 01/24/2008 - 00:15
यापूर्वी कधीही भारतरत्न या पुरस्काराची अशी जाहीर चर्चा झाली नव्हती. अडवानी यांनी एक अत्यंत क्षूद्र असे राजकारणच केले असे माझे स्पष्ट मत आहे! त्याची कारणे काहीही असोत. नाहीतर काय! यालाच "म्हातारपणात चळ लागणे " असे म्हणतात!! अगोदरच आदर बाळगण्याजोग्या संस्था हळुहळु कमी होत चालल्या आहेत. अडवाणींकडुन यापेक्षा जास्त परिपक्वतेची अपेक्षा होती. आणि निघाले आहेत पंतप्रधान व्हायला!!! (संतप्त) पिवळा डांबिस

प्राजु Wed, 01/23/2008 - 08:48
सचिनला हा मिळाला तर त्यात गैर किंवा कमीपणाचे काहीही नाही. - मी ही सहमत.. यापूर्वी कधीही भारतरत्न या पुरस्काराची अशी जाहीर चर्चा झाली नव्हती. अडवानी यांनी एक अत्यंत क्षूद्र असे राजकारणच केले असे माझे स्पष्ट मत आहे! त्याची कारणे काहीही असोत. खरंतर कोणत्याही राजकारणी (आजच्या) माणसाला हा पुरस्कार देऊ नये. त्यापेक्षा तात्या म्हणतात तसे स्वर भासकारांना द्यावा. तेच अधिकारी आहेत याचे. - प्राजु

In reply to by प्राजु

छोटा डॉन Wed, 01/23/2008 - 20:43
"त्यापेक्षा तात्या म्हणतात तसे स्वर भासकारांना द्यावा. तेच अधिकारी आहेत याचे." आम्ही सुध्धा हेच म्हणतो ...... पण हा पूरस्कार जर "संगीतमार्तंड पंडीत जसराज " यांना मिळाला तर तात्या म्हणतात त्याप्रमाणे आमच्याकडे दिवाळी, ईद आणि ख्रिसमस असा तिहेरी आनंदोत्तसव साजरा होईल ...........

सुधीर कांदळकर Sun, 01/27/2008 - 16:00
त्रिखंडात भारताचे झेंडे ऊंचावले आहेत? वाजपेयीचे जे काही कार्य आहे ते पक्षातीत वा निव्वळ देशासाठी नाही. केवळ सरकार पाडण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षनेते असतांना गोंधळ घालून त्यांनी संसदेचे किती तास फुकट घालवून भारताच्या सर्वजनिक पैशांची उधळपट्टी केली ते आठवा. तसेच अंमली पदार्थ ज्याच्याकडे सापडले म्हणजेच ज्याच्याविरूद्ध दखलपात्र गुन्हा दाखल आहे अशा मुलाबद्दल केवळ तो त्यांच्या पक्षाच्या राजकीय पुढा-याचा मुलगा म्हणून 'होते चूक कधी कधी' अशी टिप्पणी करणा-यांना मुळीच राष्ट्रीय पुरस्कार देऊं नये. पं. भीमसेनजीबद्दल मते योग्य आहेत. सर हा किताब ब्रिटिश सरकार देते. भारतीय नागरिकाला किताब देणारे ब्रिटिश कोण लागून गेले. हा किताब सचीनने स्वीकारणे हा त्या किताबाचा बहुमान होईल. परंतु आपल्या देशाच्या सर्वभौमत्वाला ते धरून होणार नाही. तसा किताब द्यायचा झाल्यास ब्रिटिश सरकारने भारत सरकारची परवानगी घेतली पाहिजे. परंतु स्वतःला श्रेष्ठ समजणारे ब्रिटिश परस्पर एखाद्या व्यक्तीला तो देतात. हे बरोबर नाही. भारत सरकारची रीतसर परवानगी जर ब्रिटिश सरकारने मागितली आणि आपल्या संसदेने जर ती दिली तरच सचीनने तो पुरस्कार घेणे योग्य होईल.

छोटा डॉन Tue, 01/29/2008 - 13:34
मिडियामध्ये व जनमानसात चललेल्या "भारतरत्न" पूरस्कारच्या चर्चेला सरकारने यावर्षी एकही "भारतरत्न " जाहीर न करून पूर्णविराम दिला आहे.... अंदाजे गेल्या ४-५ वर्षापासून हिंदूस्थानच्या जनतेला एकसुध्धा "भारतरत्न " सापडला नाही व यावर्षी सुध्धा ही प्रथा कायम राहिली याबद्दल अस्वस्थ वाटत आहे . खरच आजच्या काळात कोणीसुध्धा या पूरस्काराला लायक नाही का ही पूरस्कार देणारे सरकार योग्य व्यक्ती शोधायला नालायक ठरले ह्याची चर्चा होणे महत्वाचे आहे..... यानिमित्ताने याविषयाचा घेतलेला मागोवा तुम्ही "दैनिक सामनाच्या दि. २८ च्या अग्रलेखात " वाचू शकता ..... अस्वस्थ आणि नाराज [ छोटा डॉन ]

विसोबा खेचर Tue, 01/22/2008 - 17:52
या निमित्ताने असे पूरस्कार कोणाला मिळावेत [ राजकारणी, शास्त्रज्ञ, समाजसेवक, कलाकार, अभिनेते की आणखी कोणी ???] , पूरस्कारांचे निकष, निवडीची पध्दत यासारख्या अनेक मुद्द्यांचा उहापोह "मिपा" च्या मंचावर व्हावा अशी माझी ईच्छा आहे ........... स्वरभास्कर, पद्मविभूषण पंडित भीमसेन गुरुराज जोशी यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालाच पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे! आमच्या अण्णांनी खर्‍या अर्थाने हिंदुस्थानी अभिजात संगीत अक्षरश: त्रिखंडात पोहोचवले. १९५२ साली सवाई गंधर्व महोत्सव सुरू करून, त्यात भारतातल्या उत्तमोत्तम गवयांची/गायिकांची गाणी करून गेली पन्नासहून अधिक वर्ष भारतीय रसिकांना अखंड स्वरस्नान घडवले! १९५२ साली लावलेल्या या रोपट्याचा वेलू आज गगनावेरी गेला आहे हे सांगणे न लगे! 'स्वरभास्कर' ही उपाधी खरोखरंच ज्यांना शोभून दिसावी असे अण्णांचे व्यक्तिगत गायन आणि सवाई गंधर्व संगीत महोत्सव हे हिंदुस्थानी अभिजात संगीतात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावे असे मानाचे पान आणि त्यात आमच्या अण्णांचे अनन्यसाधारण योगदान, हे निकष माझ्या मते अण्णांना 'भारतरत्न' हा पुरस्कार देण्यास पुरेसे आहेत! भारतीय अभिजात संगीताच्या या अध्वर्यूला माझा मानाचा मुजरा! अण्णांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाल्याचे ज्या दिवशी जाहीर होईल त्या दिवशी माझ्या घरी दिवाळी असेल!! आपला, (कट्टर भीमसेनभक्त) तात्या अभ्यंकर.

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग Tue, 01/22/2008 - 19:17
खरं तर या आधीच तो मिळायला हवा होता असं मला वाटतं. आण्णांच्या शास्त्रीय संगीताबरोबरच 'अभंगवाणीने' सामान्य रसिकांना जे काही दिले आहे त्याची तुलना बसल्याजागी पंढरीची वारी घडवून आणण्याशीच होईल! अभंगवाणीच्या त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्यक्ष विठोबा सुध्दा पंढरी सोडून ऐकायला येऊन बसत असेल! ह्या 'सिध्द्स्वर' गानसूर्याला तो किताब देऊन, त्या किताबाची उंची लवकरात लवकर वाढावी हीच विठूचरणी प्रार्थना!! चतुरंग

In reply to by विसोबा खेचर

पिवळा डांबिस गुरुवार, 01/24/2008 - 00:38
भीमसेन अण्णांची निवड उचित आहेच! आणखी नांवे सुचवायची तर..... मी बाबा आमटे यांचे नांव सुचवीन. बाबांच्या कार्याची माहिती या संकेतस्थळावर करुन देण्याची गरज नाही. त्यांचे नांव माहीत नसलेला मराठी माणूस असणार नाही. इथे सुचवलेले सर्व लोक महान आहेतच परन्तू मला त्यांच्यात व बाबांमध्ये एक फरक जाणवतो की इतर सर्वांनी त्यांची कला, बुद्धि आपल्या उपजिविकेचे साधन म्हणून वापरली. त्यातून अर्थप्राप्तीहि केली (अर्थात त्यात गैर काहीही नाही) पण बाबांचे मोठेपण हे की त्यांनी भरपूर प्राप्ती असलेला वकिलीचा व्यवसाय सोडून महारोग्यांची सेवा केली. बाबांना भारतरत्न देण्याने त्या पुरस्काराचा सन्मान होईल. (नम्र) पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

इनोबा म्हणे गुरुवार, 01/24/2008 - 00:44
अगदी बरोबर,अशा निस्वार्थी लोकांना हा पुरस्कार मिळणे हा खरे तर त्या पुरस्काराचाच सम्मान म्हणायला हवा. बाबांच्या कार्यापासून नव्या पिढीला काही प्रेरणा मिळेल. (बाबांचा भक्त) -इनोबा

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग गुरुवार, 01/24/2008 - 01:05
बाबांचं नाव माझ्या डोळ्यांसमोर आलं नाही ह्याची मला लाज वाटते! भीमण्णांइतकेच तेही ह्या पुरस्काराचे सार्थ मानकरी ठरु शकतात. चतुरंग

सुनील Wed, 01/23/2008 - 01:23
मग यातून अजून एक सूर निघाला की सचिनने हा पूरस्कार स्वीकारू नये कारण हा पूरस्कार ब्रिटिष संघराज्यातिल देशात राहणार्‍या लोकांसाठी आहे, म्हणून स्वतंत्र भारतात राहणार्‍या सचिनने तो स्विकारू नये ..... हा पुरस्कार केवळ ब्रिटिश संघराज्यातील देशात (तुम्हाला युनायटेड किंगडम म्हणायचे आहे असे मी गृहित धरतो) राहणार्‍यांसाठीच आहे असे नाही. हा पुरस्कार जगातील कोणत्याही व्यक्तीस दिला जातो. राष्टकूलातील (कॉमनवेल्थ) देशांतील नागरीक, हा पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या नावापूर्वी (केवळ आडनावापूर्वी नव्हे), "सर" ही पदवी लावू शकतात. राष्ट्रकूलाबाहेरील नागरीक त्यांच्या संपूर्ण नावानंतर "O.B.E." अशी आद्याक्षरे लावू शकतात. OBE = Order of British Empire न्यू यॉर्कचे माजी महापौर रुडॉल्फ गिलियानी यानींदेखील हा पुरस्कार स्वीकारला आहे. सचिनला हा मिळाला तर त्यात गैर किंवा कमीपणाचे काहीही नाही. यापूर्वी कधीही भारतरत्न या पुरस्काराची अशी जाहीर चर्चा झाली नव्हती. अडवानी यांनी एक अत्यंत क्षूद्र असे राजकारणच केले असे माझे स्पष्ट मत आहे! त्याची कारणे काहीही असोत. गेल्या कित्येक वर्षात हा पुरस्कार दिला गेला नव्हता तेव्हा अजून काही वर्षे तो न दिल्याने काही फरक पडणार नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

ऋषिकेश Wed, 01/23/2008 - 01:58
सचिनला हा मिळाला तर त्यात गैर किंवा कमीपणाचे काहीही नाही. सहमत! यापूर्वी कधीही भारतरत्न या पुरस्काराची अशी जाहीर चर्चा झाली नव्हती. अडवानी यांनी एक अत्यंत क्षूद्र असे राजकारणच केले असे माझे स्पष्ट मत आहे! त्याची कारणे काहीही असोत. अगदी सहमत!!

In reply to by ऋषिकेश

अभिज्ञ Sun, 01/27/2008 - 15:43
मंला असे वाटते कि अडावाणी यानि जे काहि केले आहे ते अत्यन्त योग्य असेच आहे. अन्यथा कोन्ग्रेस्स ने त्यन्च्या मर्जिमधल्या कोनला तरि हा पूरस्कार दिला असता.

In reply to by सुनील

पिवळा डांबिस गुरुवार, 01/24/2008 - 00:15
यापूर्वी कधीही भारतरत्न या पुरस्काराची अशी जाहीर चर्चा झाली नव्हती. अडवानी यांनी एक अत्यंत क्षूद्र असे राजकारणच केले असे माझे स्पष्ट मत आहे! त्याची कारणे काहीही असोत. नाहीतर काय! यालाच "म्हातारपणात चळ लागणे " असे म्हणतात!! अगोदरच आदर बाळगण्याजोग्या संस्था हळुहळु कमी होत चालल्या आहेत. अडवाणींकडुन यापेक्षा जास्त परिपक्वतेची अपेक्षा होती. आणि निघाले आहेत पंतप्रधान व्हायला!!! (संतप्त) पिवळा डांबिस

प्राजु Wed, 01/23/2008 - 08:48
सचिनला हा मिळाला तर त्यात गैर किंवा कमीपणाचे काहीही नाही. - मी ही सहमत.. यापूर्वी कधीही भारतरत्न या पुरस्काराची अशी जाहीर चर्चा झाली नव्हती. अडवानी यांनी एक अत्यंत क्षूद्र असे राजकारणच केले असे माझे स्पष्ट मत आहे! त्याची कारणे काहीही असोत. खरंतर कोणत्याही राजकारणी (आजच्या) माणसाला हा पुरस्कार देऊ नये. त्यापेक्षा तात्या म्हणतात तसे स्वर भासकारांना द्यावा. तेच अधिकारी आहेत याचे. - प्राजु

In reply to by प्राजु

छोटा डॉन Wed, 01/23/2008 - 20:43
"त्यापेक्षा तात्या म्हणतात तसे स्वर भासकारांना द्यावा. तेच अधिकारी आहेत याचे." आम्ही सुध्धा हेच म्हणतो ...... पण हा पूरस्कार जर "संगीतमार्तंड पंडीत जसराज " यांना मिळाला तर तात्या म्हणतात त्याप्रमाणे आमच्याकडे दिवाळी, ईद आणि ख्रिसमस असा तिहेरी आनंदोत्तसव साजरा होईल ...........

सुधीर कांदळकर Sun, 01/27/2008 - 16:00
त्रिखंडात भारताचे झेंडे ऊंचावले आहेत? वाजपेयीचे जे काही कार्य आहे ते पक्षातीत वा निव्वळ देशासाठी नाही. केवळ सरकार पाडण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षनेते असतांना गोंधळ घालून त्यांनी संसदेचे किती तास फुकट घालवून भारताच्या सर्वजनिक पैशांची उधळपट्टी केली ते आठवा. तसेच अंमली पदार्थ ज्याच्याकडे सापडले म्हणजेच ज्याच्याविरूद्ध दखलपात्र गुन्हा दाखल आहे अशा मुलाबद्दल केवळ तो त्यांच्या पक्षाच्या राजकीय पुढा-याचा मुलगा म्हणून 'होते चूक कधी कधी' अशी टिप्पणी करणा-यांना मुळीच राष्ट्रीय पुरस्कार देऊं नये. पं. भीमसेनजीबद्दल मते योग्य आहेत. सर हा किताब ब्रिटिश सरकार देते. भारतीय नागरिकाला किताब देणारे ब्रिटिश कोण लागून गेले. हा किताब सचीनने स्वीकारणे हा त्या किताबाचा बहुमान होईल. परंतु आपल्या देशाच्या सर्वभौमत्वाला ते धरून होणार नाही. तसा किताब द्यायचा झाल्यास ब्रिटिश सरकारने भारत सरकारची परवानगी घेतली पाहिजे. परंतु स्वतःला श्रेष्ठ समजणारे ब्रिटिश परस्पर एखाद्या व्यक्तीला तो देतात. हे बरोबर नाही. भारत सरकारची रीतसर परवानगी जर ब्रिटिश सरकारने मागितली आणि आपल्या संसदेने जर ती दिली तरच सचीनने तो पुरस्कार घेणे योग्य होईल.

छोटा डॉन Tue, 01/29/2008 - 13:34
मिडियामध्ये व जनमानसात चललेल्या "भारतरत्न" पूरस्कारच्या चर्चेला सरकारने यावर्षी एकही "भारतरत्न " जाहीर न करून पूर्णविराम दिला आहे.... अंदाजे गेल्या ४-५ वर्षापासून हिंदूस्थानच्या जनतेला एकसुध्धा "भारतरत्न " सापडला नाही व यावर्षी सुध्धा ही प्रथा कायम राहिली याबद्दल अस्वस्थ वाटत आहे . खरच आजच्या काळात कोणीसुध्धा या पूरस्काराला लायक नाही का ही पूरस्कार देणारे सरकार योग्य व्यक्ती शोधायला नालायक ठरले ह्याची चर्चा होणे महत्वाचे आहे..... यानिमित्ताने याविषयाचा घेतलेला मागोवा तुम्ही "दैनिक सामनाच्या दि. २८ च्या अग्रलेखात " वाचू शकता ..... अस्वस्थ आणि नाराज [ छोटा डॉन ]
नव्या वर्षाच्या प्रारंभाबरोबरच काही नव्या गोष्टींची चर्चा सूरू होते. पण आज मला एका वेगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करू वाटते ती म्हणजे वेगवेगळे पूरस्कार, ते मिळवणार्‍या व्यक्ती, त्यांचे निकष, समाजावर त्यांचा प्रभाव व समाजाला त्यांच्यापासून मिळणारी प्रेरणा व होणारा फायदा......... गेल्या २-४ दिवसापासून "सचिन तेंडूलकरला" भविष्यात दिल्या जाणार्‍या "सर किंवा नाईटहूड" सन्मानाबद्दल मिडियात चर्चा चालू झाली आहे .... मग यात हा पूरस्कार मिळवणार्‍या ईतिहासातिल व्यक्ती, त्यांचे कर्तूत्व, समाजावर त्यांचा प्रभाव यासारख्या अनेक गोष्टींवर काथ्याकूट झाला.

तुकयाची अवली.. .. अवलोकन

प्राजु ·

विसोबा खेचर Tue, 01/22/2008 - 06:40
प्राजू, 'आपण तुकारामांना सिद्धावस्थेपर्यंत नेण्यासाठी आवलीपासून दूर करतो आहोत, त्यामुळे आपल्याला शिव्या देण्याचा तिला आधिकार आहे' हे मान्य करणारा विठ्ठल मला या कादंबरीत भावला. क्या बात है! प्राजू, उत्तम परिक्षण केलं आहेस. छान, वेगळा विषय आहे. पुस्तक वाचलं पाहिजे! अवांतर - तुकोबा म्हटलं की प्रभातच्या 'संत तुकाराम' चित्रपटातील विष्णूपंत पागनीस आणि आवली म्हटलं की त्याच चित्रपटातील गौरी नांवाच्या अभिनेत्रीचा चेहेराच डोळ्यासमोर येतो, इतका मराठी रसिकांवर या चित्रपटाचा प्रभाव आहे! इतकेच काय, संत तुकारामाचे पूर्ण नांव काय होते या प्रश्नाचे उत्तर वर्गात एका मुलाने 'विष्णूपंत पागनीस' असे दिले होते अशी भाईकाकांनी एक आठवण सांगितली आहे! :) प्राजू, वरील परिक्षण वाचताना संत तुकाराम चित्रपटातील अभिनेत्री गौरी हीच आवली म्हणून माझ्या डोळ्यासमोर येत होती! विठोबाला काळतोंड्या म्हणणारी आणि कुण्या आई मंगळाईचे भक्तिभावाने नामस्मरण करणारी, साधीभोळी परंतु अत्यंत फटकळ, आणि नवर्‍याची सततची विठ्ठलभक्ति पाहून संतापणारी बायको, अशी आवलीची अत्यंत ठसठशीत भूमिका गौरीने उत्तम रितीने वठवली आहे हे इथे आवर्जून सांगावेसे वाटते! तात्या.

चतुरंग Tue, 01/22/2008 - 09:26
माझ्या पुढल्या भेटीत हे पुस्तक निदान चाळले तरी नक्कीच जाणार. आवलीचा विचारही कधी आपल्यामनात येत नाही, तुकारामांच्या समोर. पण हे खरं आहे की तिनं किती हाल सोसले असतील, काही गणतीच नाही. महापुरुषाची पत्नी म्हणजे काट्यांचं जिण! चतुरंग

स्वाती दिनेश Tue, 01/22/2008 - 12:29
प्राजु, परीक्षण छानच लिहिले आहेस,पुस्तक मिळून वाचण्यासाठी मात्र पुढच्या भारतभेटीपर्यंत थांबावे लागणार... स्वाती

प्राजु Tue, 01/22/2008 - 19:55
तात्या, चतुरंग, स्वाती, आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मी तर सदर कादंबरी भारतातून मागवून घेतली. तुम्हाला तुमच्या भारत भेटीत ही कादंबरी वाचायला मिळो. कारण घरोघरी 'आवली' ही असतेच .. कधी तिचं भांडण नातेवाईकांशी असतं, कधी करिअरशी, कधी या समाजाशी... पण या ना त्या रूपांत आपल्याला आवली भेटतेच संसारासाठी झटणारी, मुलांसाठी तळमळणारी, नव-यासाठी झुरणारी... आणि म्हणूनच काल्पनिक असली तरी मला ही कादंबरी खूप भावली. - प्राजु.

स्वाती राजेश Wed, 01/23/2008 - 16:41
प्राजु, तुझे या पुस्तकाचे परेक्षण फारच छान आहे. पुस्तक वाचायची उत्सुकता लागली आहे. जेव्हा भारतवारी होईल तेव्हा जरूर वाचेन. तुकारामांची आवडाबाई आम्ही फक्त "संत तुकाराम" सिनेमात पाहिली. ती कजाग, भांडखोर दाखवली आहे, पण त्याबरोबर आपल्या मुलांविषयी वाटणारे प्रेम.. ते उसाच्या प्रसंगातुन जाणवते.तुकाराम जेव्हा आपल्या मुलांसाठी ऊस आणतात, येताना ये वाटत वाटत येतात.. घरी येईपर्यंत एकच उरतो तेव्हा तिची ती वाक्ये लक्षात राहतात...

विनायक पाचलग Mon, 12/08/2008 - 11:14
तर आज १ वर्शाने या ठिकाणी एक नवी प्रतिक्रिया येत आहे . मी ११ वीत शिकतो.गेल्याच महिन्यात महाविद्यालयात ग्रन्थ्परिक्शण स्पर्धा झाली. मलाही हेच् पुस्तक मिळाले होते परिक्शणाला. खुप छान आहे. सदरचे परिक्शण छानच आहे यात वाद नाही. मात्र असे राहुन राहुन वाटते की हे परिक्शण नसुन ओळाख आहे. पुस्तकातिल भावनिक आन्दोलने,समाज,टाळलेल्या अन्ध्श्रध्दा इत्यादी अजुन लिहावयास हवे होते. असुदे पुस्तक मात्र चान्गले आहे . सम्पादकान्ची परवानगी अस्ल्यास मी माझे परिक्शण येथे देवु इच्छितो

शंकरराव Tue, 12/09/2008 - 03:04
असे वाट्ते देवा घरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम कुणी रखडति धुळीत आणिक कुणास लाभे हेम ...

रेवती Tue, 12/09/2008 - 04:35
तू म्हणतेस ते खरे आहे. प्रत्येक घरात एक आवली असते. आजकाल तुकाराम मात्र फारसं कुणी नसेल (सगळ्या अर्थी "तुकाराम") असं वाटतय. रेवती

राघव Tue, 12/09/2008 - 09:49
सुंदर ओळख! आवडली. आता वाचावे लागणार :) मलाही अवलीबद्दल अपार करुणा वाटते, पण वेगळ्या कारणासाठी.. तिलाही जर डोळसपणे विठ्ठलाची आराधना करता आली असती तर किती छान झाले असते!! तुकारामांसारख्या श्रेष्ठ साधकाची सोबत असतांना तर फक्त आनंद नांदला असता.. पण, मुलांची काळजी आईला कधीच सोडत नाही, भगवंतही आपल्या लेकरांची काळजी घेतोच की!!. त्यासाठी एवढ्या खस्ता खाऊन तिला संसारातच राहावे लागले. तिच्याशिवाय तुकारामांचे चरित्र अपूर्ण राहते ते याचमुळे. ती नसती तर?? यातच ती असण्याचे महत्त्व आहे. मुमुक्षु

विसोबा खेचर Tue, 01/22/2008 - 06:40
प्राजू, 'आपण तुकारामांना सिद्धावस्थेपर्यंत नेण्यासाठी आवलीपासून दूर करतो आहोत, त्यामुळे आपल्याला शिव्या देण्याचा तिला आधिकार आहे' हे मान्य करणारा विठ्ठल मला या कादंबरीत भावला. क्या बात है! प्राजू, उत्तम परिक्षण केलं आहेस. छान, वेगळा विषय आहे. पुस्तक वाचलं पाहिजे! अवांतर - तुकोबा म्हटलं की प्रभातच्या 'संत तुकाराम' चित्रपटातील विष्णूपंत पागनीस आणि आवली म्हटलं की त्याच चित्रपटातील गौरी नांवाच्या अभिनेत्रीचा चेहेराच डोळ्यासमोर येतो, इतका मराठी रसिकांवर या चित्रपटाचा प्रभाव आहे! इतकेच काय, संत तुकारामाचे पूर्ण नांव काय होते या प्रश्नाचे उत्तर वर्गात एका मुलाने 'विष्णूपंत पागनीस' असे दिले होते अशी भाईकाकांनी एक आठवण सांगितली आहे! :) प्राजू, वरील परिक्षण वाचताना संत तुकाराम चित्रपटातील अभिनेत्री गौरी हीच आवली म्हणून माझ्या डोळ्यासमोर येत होती! विठोबाला काळतोंड्या म्हणणारी आणि कुण्या आई मंगळाईचे भक्तिभावाने नामस्मरण करणारी, साधीभोळी परंतु अत्यंत फटकळ, आणि नवर्‍याची सततची विठ्ठलभक्ति पाहून संतापणारी बायको, अशी आवलीची अत्यंत ठसठशीत भूमिका गौरीने उत्तम रितीने वठवली आहे हे इथे आवर्जून सांगावेसे वाटते! तात्या.

चतुरंग Tue, 01/22/2008 - 09:26
माझ्या पुढल्या भेटीत हे पुस्तक निदान चाळले तरी नक्कीच जाणार. आवलीचा विचारही कधी आपल्यामनात येत नाही, तुकारामांच्या समोर. पण हे खरं आहे की तिनं किती हाल सोसले असतील, काही गणतीच नाही. महापुरुषाची पत्नी म्हणजे काट्यांचं जिण! चतुरंग

स्वाती दिनेश Tue, 01/22/2008 - 12:29
प्राजु, परीक्षण छानच लिहिले आहेस,पुस्तक मिळून वाचण्यासाठी मात्र पुढच्या भारतभेटीपर्यंत थांबावे लागणार... स्वाती

प्राजु Tue, 01/22/2008 - 19:55
तात्या, चतुरंग, स्वाती, आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मी तर सदर कादंबरी भारतातून मागवून घेतली. तुम्हाला तुमच्या भारत भेटीत ही कादंबरी वाचायला मिळो. कारण घरोघरी 'आवली' ही असतेच .. कधी तिचं भांडण नातेवाईकांशी असतं, कधी करिअरशी, कधी या समाजाशी... पण या ना त्या रूपांत आपल्याला आवली भेटतेच संसारासाठी झटणारी, मुलांसाठी तळमळणारी, नव-यासाठी झुरणारी... आणि म्हणूनच काल्पनिक असली तरी मला ही कादंबरी खूप भावली. - प्राजु.

स्वाती राजेश Wed, 01/23/2008 - 16:41
प्राजु, तुझे या पुस्तकाचे परेक्षण फारच छान आहे. पुस्तक वाचायची उत्सुकता लागली आहे. जेव्हा भारतवारी होईल तेव्हा जरूर वाचेन. तुकारामांची आवडाबाई आम्ही फक्त "संत तुकाराम" सिनेमात पाहिली. ती कजाग, भांडखोर दाखवली आहे, पण त्याबरोबर आपल्या मुलांविषयी वाटणारे प्रेम.. ते उसाच्या प्रसंगातुन जाणवते.तुकाराम जेव्हा आपल्या मुलांसाठी ऊस आणतात, येताना ये वाटत वाटत येतात.. घरी येईपर्यंत एकच उरतो तेव्हा तिची ती वाक्ये लक्षात राहतात...

विनायक पाचलग Mon, 12/08/2008 - 11:14
तर आज १ वर्शाने या ठिकाणी एक नवी प्रतिक्रिया येत आहे . मी ११ वीत शिकतो.गेल्याच महिन्यात महाविद्यालयात ग्रन्थ्परिक्शण स्पर्धा झाली. मलाही हेच् पुस्तक मिळाले होते परिक्शणाला. खुप छान आहे. सदरचे परिक्शण छानच आहे यात वाद नाही. मात्र असे राहुन राहुन वाटते की हे परिक्शण नसुन ओळाख आहे. पुस्तकातिल भावनिक आन्दोलने,समाज,टाळलेल्या अन्ध्श्रध्दा इत्यादी अजुन लिहावयास हवे होते. असुदे पुस्तक मात्र चान्गले आहे . सम्पादकान्ची परवानगी अस्ल्यास मी माझे परिक्शण येथे देवु इच्छितो

शंकरराव Tue, 12/09/2008 - 03:04
असे वाट्ते देवा घरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम कुणी रखडति धुळीत आणिक कुणास लाभे हेम ...

रेवती Tue, 12/09/2008 - 04:35
तू म्हणतेस ते खरे आहे. प्रत्येक घरात एक आवली असते. आजकाल तुकाराम मात्र फारसं कुणी नसेल (सगळ्या अर्थी "तुकाराम") असं वाटतय. रेवती

राघव Tue, 12/09/2008 - 09:49
सुंदर ओळख! आवडली. आता वाचावे लागणार :) मलाही अवलीबद्दल अपार करुणा वाटते, पण वेगळ्या कारणासाठी.. तिलाही जर डोळसपणे विठ्ठलाची आराधना करता आली असती तर किती छान झाले असते!! तुकारामांसारख्या श्रेष्ठ साधकाची सोबत असतांना तर फक्त आनंद नांदला असता.. पण, मुलांची काळजी आईला कधीच सोडत नाही, भगवंतही आपल्या लेकरांची काळजी घेतोच की!!. त्यासाठी एवढ्या खस्ता खाऊन तिला संसारातच राहावे लागले. तिच्याशिवाय तुकारामांचे चरित्र अपूर्ण राहते ते याचमुळे. ती नसती तर?? यातच ती असण्याचे महत्त्व आहे. मुमुक्षु
लेखनविषय:
लेखनप्रकार
मंडळी, १५ दिवसांपूर्वी पुण्यांत "तुकयाची आवली" या प्रा. सौ. मंजुश्री गोखले यांच्या मेहता प्रकाशन ने छापलेल्या कादंबरीचे औपचारिक प्रकाशन झाले. हि कादंबरी नुकतीच मला वाचायला मिळाली. आवलीवर आजपर्यन्त जे वाचले ऐकले होते त्यापेक्षा काय वेगळे आहे हे पाहण्यासाठि ही कादंबरी वाचायला घेतली. आणि खरं सांगते, ती वाचायला सुरूवात केल्यानंतर पूर्ण करूनच खाली ठेवली. झपाटल्या सारखी मी ती वाचली. त्याबद्दल थोडेसे.. लेखिकेची भूमिका : आवली , संत तुकाराम महाराजांची द्वितीय पत्नी, एवढि आणि फक्त एवढीच ओळख आहे आवलीची.

सॄष्टीची युक्ती

मीनल गद्रे. ·

प्राजु Tue, 01/22/2008 - 01:45
हिमपाकळ्या अलगदल्या ताज्या अंगणी माझ्या तृणावरी विसावल्या. हे खूप छान.. आवडले.. - प्राजु

धनंजय Tue, 01/22/2008 - 01:50
हा शब्द खास आवडला. अवांतर : पाऊस राजा थेंब आणि हिमपुष्पे एका दिवशी घेऊन येतो तर मला ते फारसे आवडत नाही. गारठ चिखल आणि घसरडे रस्ते - नाकी नऊ येतात!

ऋषिकेश Tue, 01/22/2008 - 20:05
हिमपाकळ्या हा शब्द लई भारी!!.. फार फार आवडला. .. पण अलगदल्या म्हणजे? का उलगडल्या म्हणायचंय? बाकी कविता आवडली. अजून येऊ देत -ऋषिकेश

छान कविता. मला वाटते 'अलगदल्या' हाच शब्द असावा आणि मला तोच जास्त आवडला. 'उलगडल्या' सुद्धा असेल, पण अलगदल्या म्हणजे हळूच अलगद खाली आल्या आणि विसावल्या... बिपिन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चतुरंग Tue, 01/22/2008 - 21:54
कारण हिम सुरु झालं की हिमपाकळ्या (स्नोफ्लेक्स - चे भाषांतर असावे) अलगद, तरंगत - तरंगत खाली येऊन विसावतात. चपखल शब्द! चतुरंग

In reply to by बिपिन कार्यकर्ते

ऋषिकेश Tue, 01/22/2008 - 21:58
अलगदल्या म्हणजे हळूच अलगद खाली आल्या आणि विसावल्या... वा वा!!! बिपिनराव धन्यवाद. ही कल्पना विचारातच घेतली नव्हती. अलगदल्या!!! आता त्यामागची कल्पना कळल्यावर हा शब्दही खूप खूप आवडला :) -ऋषिकेश

प्राजु Tue, 01/22/2008 - 01:45
हिमपाकळ्या अलगदल्या ताज्या अंगणी माझ्या तृणावरी विसावल्या. हे खूप छान.. आवडले.. - प्राजु

धनंजय Tue, 01/22/2008 - 01:50
हा शब्द खास आवडला. अवांतर : पाऊस राजा थेंब आणि हिमपुष्पे एका दिवशी घेऊन येतो तर मला ते फारसे आवडत नाही. गारठ चिखल आणि घसरडे रस्ते - नाकी नऊ येतात!

ऋषिकेश Tue, 01/22/2008 - 20:05
हिमपाकळ्या हा शब्द लई भारी!!.. फार फार आवडला. .. पण अलगदल्या म्हणजे? का उलगडल्या म्हणायचंय? बाकी कविता आवडली. अजून येऊ देत -ऋषिकेश

छान कविता. मला वाटते 'अलगदल्या' हाच शब्द असावा आणि मला तोच जास्त आवडला. 'उलगडल्या' सुद्धा असेल, पण अलगदल्या म्हणजे हळूच अलगद खाली आल्या आणि विसावल्या... बिपिन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चतुरंग Tue, 01/22/2008 - 21:54
कारण हिम सुरु झालं की हिमपाकळ्या (स्नोफ्लेक्स - चे भाषांतर असावे) अलगद, तरंगत - तरंगत खाली येऊन विसावतात. चपखल शब्द! चतुरंग

In reply to by बिपिन कार्यकर्ते

ऋषिकेश Tue, 01/22/2008 - 21:58
अलगदल्या म्हणजे हळूच अलगद खाली आल्या आणि विसावल्या... वा वा!!! बिपिनराव धन्यवाद. ही कल्पना विचारातच घेतली नव्हती. अलगदल्या!!! आता त्यामागची कल्पना कळल्यावर हा शब्दही खूप खूप आवडला :) -ऋषिकेश
लेखनविषय:
लेखनप्रकार
मेघानी केली अवनीची पूजा कधी थेंबांनी आला पाऊस राजा हिमपाकळ्या अलगदल्या ताज्या अंगणी माझ्या तृणावरी विसावल्या. नवरस ,नव आल्हाद ताजा वाटे पूजेची मज मौजमजा मेघाची काय वर्णावी भक्ती कळेना अशी ही सॄष्टीची युक्ती.

आनंदयात्री..

प्राजु ·

In reply to by सुनील

इनोबा म्हणे Tue, 01/22/2008 - 01:33
मलाही असेच वाटतेय... कविता सुरेख आहे. (काव्यप्रेमी) -इनोबा (शाहिर साबळे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी निगडीत "माझी मैना गावाकडं राह्यली" हे गाणे अथवा त्यासंबंधी आणखी माहिती कोणाकडे असल्यास कृपया संपर्क साधावा.)

In reply to by सुनील

इनोबा म्हणे Tue, 01/22/2008 - 01:33
मलाही असेच वाटतेय... कविता सुरेख आहे. (काव्यप्रेमी) -इनोबा (शाहिर साबळे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी निगडीत "माझी मैना गावाकडं राह्यली" हे गाणे अथवा त्यासंबंधी आणखी माहिती कोणाकडे असल्यास कृपया संपर्क साधावा.)
लेखनविषय:
ही कविता माझी नाही. कोणाची आहे ते ही नाही माहिति. मला आवडली म्हणून इथे देत आहे. अफाट आकाश हिरवी धरती पुनवेची रात सागर-भरती पाचूंची लकेर कुरणाच्या ओठी प्रकाशाचा गर्भ जलवंती-पोटी अखंड नूतन मला ही धरित्री आनंदयात्री मी आनंदयात्री मेघांच्या उत्सवीं जाहलों उन्मन दवांत तीर्थांचे घेतलें दर्शन दूर क्षितिजाची निळी भुलावण पाशांविण मला ठेवी खिळवून अक्षयवीणाच घुमे माझ्या गात्री आनंदयात्री मी आनंदयात्री हलके कढून कंटक पायींचे स्वरांत विणिले सर मीं स्वप्नांचे हासत दु:खाचा केला मी स्वीकार वर्षिलें चादंणें पिऊन अंधार प्रकाशाचें गाणें अवसेच्या रात्रीं आनंदयात्री मी आनंदयात्री

प्राजक्त..

प्राजु ·

विसोबा खेचर Mon, 01/21/2008 - 23:50
आम्ही स्वत: मोगर्‍याचे प्रेमी आहोत, परंतु हे प्राजक्ताबद्दलचे हे लेखनही आवडले! शेफ़ालिकेला आता हवं असो की नसो. तिच्या डहाळ्या रोज संध्याकाळी ह्या लालबुंद देठांच्या शुभ्र कांतिमान फ़ुलांनी सजत रहातात आणि उत्तररात्रीपासून त्यांची पखरण जमिनीवर ती करतच रहाते वा! वा! अतिशय सुरेख लेखन...! प्राजू, तुझ्या मैत्रिणीपाशी मिपातर्फे कृतज्ञता व्यक्त कर! तात्या.

धनंजय Mon, 01/21/2008 - 23:51
माझ्या मनःचक्षूंसमोर माळलेल्या प्राजक्ताचे चित्र आहे. पण ताज्या फुलांचा, पडलेल्या फुलांचा रंग यांत फरक सुचवायला मिनल गद्रे यांनी वापरलेले रूपक फार आवडले.

प्राजक्त म्हटले की मला आठवतात माझ्या लहानपणीचे गणपतिचे दिवस... आम्ही मुले भल्या पहाटे उठायचो आणि फुले वेचायला जायचो. आमच्या जवळपास प्राजक्ताची झाडे भरपूर... सकाळी सकाळी नुसता सडा पडलेला असायचा आणि त्याचा तो विशिष्ट सुगंध सगळिकडे भरून गेलेला असायचा. पु.लं. नी जपान च्या प्रवासवर्णात चेरी ब्लॉसम बद्दल लिहिले आहे... (साकुरा).... पण प्राजक्ताचा सडा पण तसेच वेड लावतो. माहिती आवडली. तुमच्या मैत्रिणिला 'थँक्स' सांगा. बिपिन.

मुक्तसुनीत Tue, 01/22/2008 - 00:30
प्राजक्त म्हणजे पारिजातक असे मला अंधुकसे आठवते. हे खरे ना ? मुक्तकाव्यात्मक चिंतन आवडले. विशेषतः ही ओळ : "शेफ़ालिकेला आता हवं असो की नसो. तिच्या डहाळ्या रोज संध्याकाळी ह्या लालबुंद देठांच्या शुभ्र कांतिमान फ़ुलांनी सजत रहातात आणि उत्तररात्रीपासून त्यांची पखरण जमिनीवर ती करतच रहाते. " लेखिकेची काव्यात्म दृष्टी, त्यांचे या झाडावरचे प्रेम आणि कविमनास शोभून दिसेल असा मनस्वीपणा त्यातून मला दिसला. मीनल गद्रे यानी चेतनागुणोक्ति अलंकाराचा वापर करताना त्यांच्या उपमेयस्वरूपी मैत्रिणीला समोर आणले होते काय ? :-) (हलकेच घ्या !)

चतुरंग Tue, 01/22/2008 - 00:30
माझ्या बहिणीचं नावही प्राजक्ताच आहे त्यामुळे ह्या नावाशी माझं सहाजिकच जिव्हाळ्याचं नातं. इंजिनियरिंग च्या वेळी मी माझ्या मावशीकडे रहात असताना मी ज्या खोलीत झोपत असे त्याच्या बाहेर प्राजक्ताचं झाड होतं. हिवाळ्यातल्या पहाटे कितीतरी वेळा थंड वार्‍याची झुळूक आत येई ती प्राजक्ताचा सुगंध घेऊनच! मग मी बोचर्‍या थंडीत अंगणातल्या प्राजक्ताची फुले वेचून घ्यायला जायचा. (आत्ताही माझ्या अंगावर काटा आला!!) ह्या आठवणी किती खोलवर दडलेल्या असतात ना? पुन्हा एकदा ती प्राजक्तमय सफर घडवून आणल्याबद्द्ल तुला आणि तुझ्या मैत्रिणीला धन्यवाद! चतुरंग

विसोबा खेचर Tue, 01/22/2008 - 00:37
प्राजू, तुल एक विनंती! तुझ्या मैत्रिणीला मोगर्‍यावरदेखील असंच काहितरी छानसं लिहायला सांग! आपला साला जाम जीव आहे मोगर्‍यावर! मोगरा तो मोगरा! साला काय सुरेख वास असतो! खल्लास... बघ बुवा तुझ्या मैत्रिणीला एकदा मोगर्‍यावर लिहिण्याची रिक्वेष्ट करून! आपला, (मोगराप्रेमी) तात्या.

स्वाती राजेश Tue, 01/22/2008 - 01:08
खूपच मस्त... ही गोष्ट फारच छान आहे. गोष्ट वाचता वाचता बालपण च्या आठवणी कधी जाग्या झाल्या कळलच नाही. ते पारिजाकताचे झाड.. फुले कोमेजु नयेत म्हणून अलगद वेचलेली फुले...

मीनल गद्रे. Tue, 01/22/2008 - 01:28
गैरसमज झाला आहे .ले़खिका मी नाही. ती माहिती tulipsintwiligh Blog मधे वाचायला मिळाली. आपली प्रामाणिक मीनल गद्रे.

ध्रुव Tue, 01/22/2008 - 14:42
महिती अत्यंत छान आहे, मिनलने तर प्रामाणिकपणे हेदेखील सांगीतले की लेखीका ती नाही. ते काहिही असो, माहिती ही कधीच वाया जात नाही. उलट माहिती असेल तर आपल्यालाच छान वाटते. आता मलाही कुठेही प्राजक्ताचे झाड दिसले की ही माहिती आठवणार. बाकी प्राजक्ताच्या झाडाबद्दल कुठल्यातरी कथेत वाचले होते. लेखक म्हणतो, मला मृत्युनंतर अग्नी देऊ नका, मला मातीत जाऊदे, मला जिथे पुराल तिथे प्राजक्ताचे झाड लावा. माझी आठवण कायम त्या फुलांच्या रुपाने कायम होऊदे आणि मला अमर होऊदे. बाकी या गोष्टीबद्दल संदर्भ/लेखक काही आठवत नाही पण ही लेखकाची इच्छा मात्र मनात घर करुन गेली. -- (प्राजक्ताच्या सुवासात रमणारा)ध्रुव

सुधीर कांदळकर Sun, 01/27/2008 - 09:38
फुले हा वि स खांडेकरांचा लघुनिबंध आम्हाला एस एस सी (पास झालोय बरे का) ला होता. कवि प्रफुल्ल दत्त उर्फ द. वि. तेंडुलकर आम्हाला शिकवीत. हा लघुनिबंध त्यांनी इतका छान शिकविला की आम्ही लघुनिबंध याप्रकाराच्या प्रेमात पडलो आणि बरेच दिवस अभ्यास सोडुन लघुनिबंध वाचायच्या वेडात होतो. अनंत काणेकर, म ना अदवंत, वि स खांडेकर इ. च्या अनेक लघुनिबंधांनी आमचे आयुष्य सोनेरी केले. माझ्या आजोळी प्राजक्ताचे झाड होते. मी ३ री ४ थीत होतो व सुटीत आजोळी जात असे. फुले वेचून आणणे व हार बनविणे हे आमचे लहान मुलांचे काम असे. मला चांगले हार बनविता येत नसत व ते कामहि आवडत नसे. माझी मामेबहीण माझ्यापेक्षा फक्त ६ महिन्यांनी मोठी असलेली फार सुरेख बनवी. माझ्या वाट्याचेहि तीच बनवी. या मनोरम आठवणी जाग्या झाल्या. हल्ली ती फक्त लग्न इ. समारंभांतच भेटते. मग आम्ही त्या आठवणी पुन्हा जगतो. धन्यवाद. वरिल सदर हे गद्यकाव्य आहे. अशीच सदरे येऊद्यात. लघुनिबंध आला तरी चालेल.

विसोबा खेचर Mon, 01/21/2008 - 23:50
आम्ही स्वत: मोगर्‍याचे प्रेमी आहोत, परंतु हे प्राजक्ताबद्दलचे हे लेखनही आवडले! शेफ़ालिकेला आता हवं असो की नसो. तिच्या डहाळ्या रोज संध्याकाळी ह्या लालबुंद देठांच्या शुभ्र कांतिमान फ़ुलांनी सजत रहातात आणि उत्तररात्रीपासून त्यांची पखरण जमिनीवर ती करतच रहाते वा! वा! अतिशय सुरेख लेखन...! प्राजू, तुझ्या मैत्रिणीपाशी मिपातर्फे कृतज्ञता व्यक्त कर! तात्या.

धनंजय Mon, 01/21/2008 - 23:51
माझ्या मनःचक्षूंसमोर माळलेल्या प्राजक्ताचे चित्र आहे. पण ताज्या फुलांचा, पडलेल्या फुलांचा रंग यांत फरक सुचवायला मिनल गद्रे यांनी वापरलेले रूपक फार आवडले.

प्राजक्त म्हटले की मला आठवतात माझ्या लहानपणीचे गणपतिचे दिवस... आम्ही मुले भल्या पहाटे उठायचो आणि फुले वेचायला जायचो. आमच्या जवळपास प्राजक्ताची झाडे भरपूर... सकाळी सकाळी नुसता सडा पडलेला असायचा आणि त्याचा तो विशिष्ट सुगंध सगळिकडे भरून गेलेला असायचा. पु.लं. नी जपान च्या प्रवासवर्णात चेरी ब्लॉसम बद्दल लिहिले आहे... (साकुरा).... पण प्राजक्ताचा सडा पण तसेच वेड लावतो. माहिती आवडली. तुमच्या मैत्रिणिला 'थँक्स' सांगा. बिपिन.

मुक्तसुनीत Tue, 01/22/2008 - 00:30
प्राजक्त म्हणजे पारिजातक असे मला अंधुकसे आठवते. हे खरे ना ? मुक्तकाव्यात्मक चिंतन आवडले. विशेषतः ही ओळ : "शेफ़ालिकेला आता हवं असो की नसो. तिच्या डहाळ्या रोज संध्याकाळी ह्या लालबुंद देठांच्या शुभ्र कांतिमान फ़ुलांनी सजत रहातात आणि उत्तररात्रीपासून त्यांची पखरण जमिनीवर ती करतच रहाते. " लेखिकेची काव्यात्म दृष्टी, त्यांचे या झाडावरचे प्रेम आणि कविमनास शोभून दिसेल असा मनस्वीपणा त्यातून मला दिसला. मीनल गद्रे यानी चेतनागुणोक्ति अलंकाराचा वापर करताना त्यांच्या उपमेयस्वरूपी मैत्रिणीला समोर आणले होते काय ? :-) (हलकेच घ्या !)

चतुरंग Tue, 01/22/2008 - 00:30
माझ्या बहिणीचं नावही प्राजक्ताच आहे त्यामुळे ह्या नावाशी माझं सहाजिकच जिव्हाळ्याचं नातं. इंजिनियरिंग च्या वेळी मी माझ्या मावशीकडे रहात असताना मी ज्या खोलीत झोपत असे त्याच्या बाहेर प्राजक्ताचं झाड होतं. हिवाळ्यातल्या पहाटे कितीतरी वेळा थंड वार्‍याची झुळूक आत येई ती प्राजक्ताचा सुगंध घेऊनच! मग मी बोचर्‍या थंडीत अंगणातल्या प्राजक्ताची फुले वेचून घ्यायला जायचा. (आत्ताही माझ्या अंगावर काटा आला!!) ह्या आठवणी किती खोलवर दडलेल्या असतात ना? पुन्हा एकदा ती प्राजक्तमय सफर घडवून आणल्याबद्द्ल तुला आणि तुझ्या मैत्रिणीला धन्यवाद! चतुरंग

विसोबा खेचर Tue, 01/22/2008 - 00:37
प्राजू, तुल एक विनंती! तुझ्या मैत्रिणीला मोगर्‍यावरदेखील असंच काहितरी छानसं लिहायला सांग! आपला साला जाम जीव आहे मोगर्‍यावर! मोगरा तो मोगरा! साला काय सुरेख वास असतो! खल्लास... बघ बुवा तुझ्या मैत्रिणीला एकदा मोगर्‍यावर लिहिण्याची रिक्वेष्ट करून! आपला, (मोगराप्रेमी) तात्या.

स्वाती राजेश Tue, 01/22/2008 - 01:08
खूपच मस्त... ही गोष्ट फारच छान आहे. गोष्ट वाचता वाचता बालपण च्या आठवणी कधी जाग्या झाल्या कळलच नाही. ते पारिजाकताचे झाड.. फुले कोमेजु नयेत म्हणून अलगद वेचलेली फुले...

मीनल गद्रे. Tue, 01/22/2008 - 01:28
गैरसमज झाला आहे .ले़खिका मी नाही. ती माहिती tulipsintwiligh Blog मधे वाचायला मिळाली. आपली प्रामाणिक मीनल गद्रे.

ध्रुव Tue, 01/22/2008 - 14:42
महिती अत्यंत छान आहे, मिनलने तर प्रामाणिकपणे हेदेखील सांगीतले की लेखीका ती नाही. ते काहिही असो, माहिती ही कधीच वाया जात नाही. उलट माहिती असेल तर आपल्यालाच छान वाटते. आता मलाही कुठेही प्राजक्ताचे झाड दिसले की ही माहिती आठवणार. बाकी प्राजक्ताच्या झाडाबद्दल कुठल्यातरी कथेत वाचले होते. लेखक म्हणतो, मला मृत्युनंतर अग्नी देऊ नका, मला मातीत जाऊदे, मला जिथे पुराल तिथे प्राजक्ताचे झाड लावा. माझी आठवण कायम त्या फुलांच्या रुपाने कायम होऊदे आणि मला अमर होऊदे. बाकी या गोष्टीबद्दल संदर्भ/लेखक काही आठवत नाही पण ही लेखकाची इच्छा मात्र मनात घर करुन गेली. -- (प्राजक्ताच्या सुवासात रमणारा)ध्रुव

सुधीर कांदळकर Sun, 01/27/2008 - 09:38
फुले हा वि स खांडेकरांचा लघुनिबंध आम्हाला एस एस सी (पास झालोय बरे का) ला होता. कवि प्रफुल्ल दत्त उर्फ द. वि. तेंडुलकर आम्हाला शिकवीत. हा लघुनिबंध त्यांनी इतका छान शिकविला की आम्ही लघुनिबंध याप्रकाराच्या प्रेमात पडलो आणि बरेच दिवस अभ्यास सोडुन लघुनिबंध वाचायच्या वेडात होतो. अनंत काणेकर, म ना अदवंत, वि स खांडेकर इ. च्या अनेक लघुनिबंधांनी आमचे आयुष्य सोनेरी केले. माझ्या आजोळी प्राजक्ताचे झाड होते. मी ३ री ४ थीत होतो व सुटीत आजोळी जात असे. फुले वेचून आणणे व हार बनविणे हे आमचे लहान मुलांचे काम असे. मला चांगले हार बनविता येत नसत व ते कामहि आवडत नसे. माझी मामेबहीण माझ्यापेक्षा फक्त ६ महिन्यांनी मोठी असलेली फार सुरेख बनवी. माझ्या वाट्याचेहि तीच बनवी. या मनोरम आठवणी जाग्या झाल्या. हल्ली ती फक्त लग्न इ. समारंभांतच भेटते. मग आम्ही त्या आठवणी पुन्हा जगतो. धन्यवाद. वरिल सदर हे गद्यकाव्य आहे. अशीच सदरे येऊद्यात. लघुनिबंध आला तरी चालेल.
लेखनविषय:
माझी मैत्रिण मीनल गद्रे हिने पाठवलेली ही माहीती. आवडली म्हणून इथे देत आहे. शेफ़ालिका म्हणजे प्राजक्त. प्राजक्ताला आधी खूप दिवस फ़ुलं येत नव्हती. रंगरुपाने सामान्य असलेलं ते झाड बिचारं अबोल होऊन गुमसुम उभं असायचं. पानं काळवंडलेली उदास. वनातले इतर वॄक्ष फ़ुलांनी बहरुन गेलेले. देवानेच दया वाटून सांगितलं की, "बहरशील तु ही. पण फ़ुलांच हे लेणं मिळवायला तुला तपश्चर्या मात्र करावी लागेल. " प्राजक्ताने ती केली. दिवस-महिने-वर्ष उलटले. तपात रमून गेल्यावर फ़ुलांची असोशीचं फ़िकट झाली मनात.

मिस्सळ मी चापतो, तर्रीची, मिस्सळ मी चापतो...

अविनाश ओगले ·

धोंडोपंत Mon, 01/21/2008 - 22:05
वा वा वा वा पंत, अगदी झकास तिखट मिसळ दिलीत हो. वा वा. मजा आली. मिसळपावावर हार्दिक स्वागत. तुमच्या कविता गझला आणि विडंबने मिसळपावावर येऊ द्यात. रसिकजन आतुरले आहेत. आपला, (स्नेही) धोंडोपंत लोकहो, आमचे परममित्र श्री. अविनाशपंत ओगले हे अत्यंत प्रतिभावान साहित्यिक आहेत. कविता, गझल विडंबने असे विविध लेखन त्यांनी केलेले आहे. त्यांच्या गझलांची "पाऊस पहिला" ही सीडी प्रकाशित झाली आहे. त्याचप्रमाणे त्यांचे "चषक माझा"हे विडंबनात्मक खंडकाव्य प्रसिध्द आहे. वाचनसंस्कृती रुजावी म्हणून जिवापाड कार्य करणारा हा माणूस आहे. पुस्तक हा त्यांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्यांची "वाच पुस्तके"ही गझल त्यांनी येथे प्रकाशित करावी. मराठी साहित्यशारदेची पालखी स्वत:च्या खांद्यावरून नेणार्‍या या प्रतिभावंताचे मिसळपाववर जोरदार स्वागत करूया. आपला, (स्वागतोत्सुक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विसोबा खेचर Mon, 01/21/2008 - 23:39
ओगलेसाहेब, हे सत्य असे की स्वप्न म्हणावे, भान हरपूनी जाई मिसळीवाचून जीवनास या अर्थच काही नाही ह्या चालत जाता वाटेवरूनी, स्वर्गच हाती येई मिस्सळ मी चापतो, तर्रीची, मिस्सळ मी चापतो... वा! सुंदर विडंबन! धोंडोपंत म्हणतात त्याप्रमाणे आम्ही आपले मिसळपाववर जोरदार स्वागत करतो. आपल्या हातून येथे उत्तमोत्तम लेखन घडावे हीच सदिच्छा! ... (मिसळपावपरायण) अविनाश ओगले, बेळगाव (महाराष्ट्र) चला! म्हणजे मिसळपावपुरता सीमाप्रश्न सुटला म्हणायचा! :) आपला, (बेळगाव आणि भीमण्णांच्या धारवाड डिष्ट्रीकचा प्रेमी!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अविनाश ओगले Tue, 01/22/2008 - 20:39
विसोबा धन्यवाद... धारवाड परिसराबद्दल आम्हाला अतिशय प्रेम. आमची आई हुबळीची. बायकोचा जन्म धारवाडचा. शिवाय भिमण्णा आणि जी.ए. त्याशिवाय ते प्रसिद्ध धारवाडी पेढे... अहाहा

In reply to by अविनाश ओगले

केशवसुमार Tue, 01/22/2008 - 22:03
मिपा वर स्वागत, चला नवा विडंबनकार आला म्हणजे आता आम्ही हरी हरी करायला मोकळे..कसे.. ते धारवाडच पेढ्याच आठवण कशाला हो काढल.. ते मिश्रा ने पुन्यात दुकान काधून एकदम बेस करून सोडल..निदान परत आल्यावर ते अता धारवाडला जाव लागणार नाही बघा धारवाड आणि बेळगाव च आमच पण जूनं संबंध असत बघा.. केशवसुमार

चतुरंग Tue, 01/22/2008 - 00:10
अहो साक्षात पुलंच्या लाडक्या बेळगावास्नं डायरेक्ट एंट्री! झकास!! मि.पा.चा जन्म बाकी चांगल्या योगावर झाला असे दिसते, दिवसेंदिवस बाळसे धरत आहे! चतुरंग

धमाल मुलगा Tue, 01/22/2008 - 10:46
वा अविनाशराव, आधीच "राधा ही बावरी" आमच लाडक॑, त्यातून मिसळ हा प्रकार जिवलग अन् मि.पा. वर आता जीव जडलेला... सगळ॑च कस॑ छान जुळून आल॑य. एकदम फक्कड आहे तुमची "मिस्सळ मी चापतो" बाकी तुमच्या बेळगावात आमच्या पुल॑चे रावसाहेब अजूनही सापडतात का? -(मिसळवेडा) धमाल.

झकासराव Tue, 01/22/2008 - 11:02
आहे विडंबन :) आवडल आमच्या कोल्हापुरी मिसळीएवढं :) आपलाच झकासराव पाटिल कोल्हापुरकर :)

अविनाशराव, एका पेक्षा एक सरस गझला आम्हाला वाचायला मिळतील असे वाटतंय, आपल्या पुढील लेखनाला आमच्या भरघोस शुभेच्छा !!! अवांतर :- बेळगाव च्या माणसाला इथे भेटल्यावर खूप आनंद झाला, बेळगावच्या मराठी माणसाच्या वेदनाही कधीतरी इथे येऊ दे !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषिकेश Tue, 01/22/2008 - 21:47
मस्तीत दंग, तो लाल रंग, हा गंध कसा दरवळतो येताच वास, घेऊन ध्यास, हा पाय त्या दिशे वळतो.... वा वा अत्यंत नादमय विडंबन.. फार फार आवडले.. अति रुचकर!! अविनाशराव, हार्दिक स्वागत आता आम्हाला मिपा वर आपले उत्तमोत्तम साहित्य वाचायला मिळो हीच इच्छा!! बाकी बेळगाव (महाराष्ट्र) ही तर्री खासच!! -ऋषिकेश

नंदन Tue, 01/22/2008 - 21:51
मस्त जमलंय विडंबन. घामल धारा, उनाड कांदा...मस्तच :). 'वाच पुस्तके' ही गझल वाचायला आवडेल. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

धोंडोपंत Mon, 01/21/2008 - 22:05
वा वा वा वा पंत, अगदी झकास तिखट मिसळ दिलीत हो. वा वा. मजा आली. मिसळपावावर हार्दिक स्वागत. तुमच्या कविता गझला आणि विडंबने मिसळपावावर येऊ द्यात. रसिकजन आतुरले आहेत. आपला, (स्नेही) धोंडोपंत लोकहो, आमचे परममित्र श्री. अविनाशपंत ओगले हे अत्यंत प्रतिभावान साहित्यिक आहेत. कविता, गझल विडंबने असे विविध लेखन त्यांनी केलेले आहे. त्यांच्या गझलांची "पाऊस पहिला" ही सीडी प्रकाशित झाली आहे. त्याचप्रमाणे त्यांचे "चषक माझा"हे विडंबनात्मक खंडकाव्य प्रसिध्द आहे. वाचनसंस्कृती रुजावी म्हणून जिवापाड कार्य करणारा हा माणूस आहे. पुस्तक हा त्यांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्यांची "वाच पुस्तके"ही गझल त्यांनी येथे प्रकाशित करावी. मराठी साहित्यशारदेची पालखी स्वत:च्या खांद्यावरून नेणार्‍या या प्रतिभावंताचे मिसळपाववर जोरदार स्वागत करूया. आपला, (स्वागतोत्सुक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विसोबा खेचर Mon, 01/21/2008 - 23:39
ओगलेसाहेब, हे सत्य असे की स्वप्न म्हणावे, भान हरपूनी जाई मिसळीवाचून जीवनास या अर्थच काही नाही ह्या चालत जाता वाटेवरूनी, स्वर्गच हाती येई मिस्सळ मी चापतो, तर्रीची, मिस्सळ मी चापतो... वा! सुंदर विडंबन! धोंडोपंत म्हणतात त्याप्रमाणे आम्ही आपले मिसळपाववर जोरदार स्वागत करतो. आपल्या हातून येथे उत्तमोत्तम लेखन घडावे हीच सदिच्छा! ... (मिसळपावपरायण) अविनाश ओगले, बेळगाव (महाराष्ट्र) चला! म्हणजे मिसळपावपुरता सीमाप्रश्न सुटला म्हणायचा! :) आपला, (बेळगाव आणि भीमण्णांच्या धारवाड डिष्ट्रीकचा प्रेमी!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अविनाश ओगले Tue, 01/22/2008 - 20:39
विसोबा धन्यवाद... धारवाड परिसराबद्दल आम्हाला अतिशय प्रेम. आमची आई हुबळीची. बायकोचा जन्म धारवाडचा. शिवाय भिमण्णा आणि जी.ए. त्याशिवाय ते प्रसिद्ध धारवाडी पेढे... अहाहा

In reply to by अविनाश ओगले

केशवसुमार Tue, 01/22/2008 - 22:03
मिपा वर स्वागत, चला नवा विडंबनकार आला म्हणजे आता आम्ही हरी हरी करायला मोकळे..कसे.. ते धारवाडच पेढ्याच आठवण कशाला हो काढल.. ते मिश्रा ने पुन्यात दुकान काधून एकदम बेस करून सोडल..निदान परत आल्यावर ते अता धारवाडला जाव लागणार नाही बघा धारवाड आणि बेळगाव च आमच पण जूनं संबंध असत बघा.. केशवसुमार

चतुरंग Tue, 01/22/2008 - 00:10
अहो साक्षात पुलंच्या लाडक्या बेळगावास्नं डायरेक्ट एंट्री! झकास!! मि.पा.चा जन्म बाकी चांगल्या योगावर झाला असे दिसते, दिवसेंदिवस बाळसे धरत आहे! चतुरंग

धमाल मुलगा Tue, 01/22/2008 - 10:46
वा अविनाशराव, आधीच "राधा ही बावरी" आमच लाडक॑, त्यातून मिसळ हा प्रकार जिवलग अन् मि.पा. वर आता जीव जडलेला... सगळ॑च कस॑ छान जुळून आल॑य. एकदम फक्कड आहे तुमची "मिस्सळ मी चापतो" बाकी तुमच्या बेळगावात आमच्या पुल॑चे रावसाहेब अजूनही सापडतात का? -(मिसळवेडा) धमाल.

झकासराव Tue, 01/22/2008 - 11:02
आहे विडंबन :) आवडल आमच्या कोल्हापुरी मिसळीएवढं :) आपलाच झकासराव पाटिल कोल्हापुरकर :)

अविनाशराव, एका पेक्षा एक सरस गझला आम्हाला वाचायला मिळतील असे वाटतंय, आपल्या पुढील लेखनाला आमच्या भरघोस शुभेच्छा !!! अवांतर :- बेळगाव च्या माणसाला इथे भेटल्यावर खूप आनंद झाला, बेळगावच्या मराठी माणसाच्या वेदनाही कधीतरी इथे येऊ दे !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषिकेश Tue, 01/22/2008 - 21:47
मस्तीत दंग, तो लाल रंग, हा गंध कसा दरवळतो येताच वास, घेऊन ध्यास, हा पाय त्या दिशे वळतो.... वा वा अत्यंत नादमय विडंबन.. फार फार आवडले.. अति रुचकर!! अविनाशराव, हार्दिक स्वागत आता आम्हाला मिपा वर आपले उत्तमोत्तम साहित्य वाचायला मिळो हीच इच्छा!! बाकी बेळगाव (महाराष्ट्र) ही तर्री खासच!! -ऋषिकेश

नंदन Tue, 01/22/2008 - 21:51
मस्त जमलंय विडंबन. घामल धारा, उनाड कांदा...मस्तच :). 'वाच पुस्तके' ही गझल वाचायला आवडेल. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मित्रहो, कोल्हापूरी मिसळ हा आमचा फार `जिव्हा'ळ्याचा विषय. म्हणूनच आमचे परममित्र मा. धोंडोपंत यानी मिसळपाव या स्थळाची वाट दाखवताच आम्हाला विलक्षण आनंद झाला. कोल्हापूरातील विविध मिसळस्थळे आमच्या उत्तम परिचयाची. `येथे उत्तम मिसळ मिळेल' असा फलक असलेल्या हाटेलात मिसळ कधीच चांगली नसते... पण ज्या हाटेलावर नावाचा फलकसुद्धा नसतो, अशी उत्तम मिसळस्थळे केवळ वासावरून आम्ही हुडकत असतो.. परवा कधीतरी `राधा ही बावरी हरीची' हे गाणे मनात घोळत असताना आम्ही मिसळ चापत होतो... या दोन्हीची कधीतरी सरमिसळ झाली... आणि हे विडंबन जन्माला आले...

आंतर्जालावर प्रत-अधिकाराची मालकी कशी ठरावी? मालकाची ओळख काय? चोराची काय?

धनंजय ·

सुनील Mon, 01/21/2008 - 21:53
एकच व्यक्ती दोन विभिन्न संकेतस्थळांवर वेगवेगळ्या नावांनी वावरणे सहज शक्य आहे (किंबहुना, एकच व्यक्ती एकाच संकेतस्थळावरदेखील वेगवेगळ्या नावाने वावरते, हे वास्तव तूर्तास दूर ठेवू!). अशा वेळेस एक करता येईल, की, त्या व्यक्तीस पूर्वप्रसिद्धी असे डिस्क्लेमर देण्यास भाग पाडता येईल. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

इनोबा म्हणे Mon, 01/21/2008 - 22:06
सुन्याशी सहमत, या प्रकारे साहित्य प्रसिद्ध झाले असल्यास मानहानी टाळण्याकरीता लेखकाने स्वतःच ती काळजी घ्यायला हवी. प्रश्न असा आहे की जर ते साहित्य उचललेले असल्यास व नविन लेखकाने पुर्वीचा लेखक आपणच आहे असा दावा केल्यास,ते साहित्यचौर्य कसे ओळखावे? साहित्यचौर्य रोखण्याकरीता क्रिएटीव कॉमन्स या परवान्याचा उपयोग होईल का?

साहित्य चोरणे याला फार मोठी परंपरा आहे, असे वाटते. :) पण,असे प्रकार रोखण्यासाठी काय केले पाहिजे हा प्रश्न मात्र कठीणच आहे. टोपण नावाने लिहिणा-याने पुर्वप्रसिद्धीचा उल्लेख केला पाहिजे. पण,उचललेल्या लेखनाबाबत काही नियम आहेत, जसे संशोधनात आपण पुर्वसुरींच्या मताचा परामर्ष घेतो. पण, निव्वळ चालूगिरीच्या बाबतीत काय करु शकतो हे मात्र काही माहित नाही बॊ..........!!! उदाहरणार्थ :- रौशनीच्या आंतरजालावरील लेखनाच्या प्रिन्ट काढून जर मी लेखक म्हणुन माझे नाव टाकले तर ? कायदा काय म्हणतो.........आणि त्याचा लेखक काय कार्यवाही करु शकतो त्याची माहिती कोणी देईल काय ?
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Tue, 01/22/2008 - 20:39
उदाहरणार्थ :- रौशनीच्या आंतरजालावरील लेखनाच्या प्रिन्ट काढून जर मी लेखक म्हणुन माझे नाव टाकले तर ? कायदा काय म्हणतो.........आणि त्याचा लेखक काय कार्यवाही करु शकतो त्याची माहिती कोणी देईल काय ? ओ बिरुटेशेठ, अहो माझी रौशनी अजून लिहून पूर्ण होऊ द्या की! मग ढापा अगदी जरूर!! :)) ( ह घ्या ) असो, माझ्यापुरतं बोलायचं तर आम्ही पडलो साला फकीर माणूस. आमचं लेखन कुणी ढापलं तर ढापू दे तिच्यायला! आमचं लेखन कुणी ढापलं आणि स्वत:चं म्हणून छापलं तर आमचं लेखन कुणाला ढापावंसं वाटण्याइतपत तरी बरं आहे, एवढंच आम्ही समाधान मानू! बाकी, खुदा सब देख रहा है. तात्या मिपात नाही, तात्या नाही मनोगती तात्या चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई! एवढं म्हणून आम्ही गप्प बसू... :) काय बिरुटेशेठ, खरं की नाही? आपलाच, तात्या.

सुधीर कांदळकर Sun, 01/27/2008 - 15:20
"हा चोरीचा माल आहे" असे लेबल नसते. तसेच सरपंच अथवा प्रशासक यांना अंतर्ज्ञान नाही. त्यामुळे ते प्रेषकाचेच आहे असे गृहीत धरणे क्रमप्राप्त आहे. सरपंचांनी प्रत्येक सदराबरोबर ते स्वतःचेच असल्याबद्दल प्रेषकाचे एक प्रतिज्ञापत्र घ्यावे. तरीहि चोरी झालीच तर मिपा त्याबद्दल जबाबदार राहणार नाही. चोरी आढळल्यास त्या सदस्यावर कायम बहिष्कार टाकावा. शक्य असल्यास कायदेशीर कार्यवाही करून पोलिसांचा ससेमिरा मागे लावून द्यावा.

सुनील Mon, 01/21/2008 - 21:53
एकच व्यक्ती दोन विभिन्न संकेतस्थळांवर वेगवेगळ्या नावांनी वावरणे सहज शक्य आहे (किंबहुना, एकच व्यक्ती एकाच संकेतस्थळावरदेखील वेगवेगळ्या नावाने वावरते, हे वास्तव तूर्तास दूर ठेवू!). अशा वेळेस एक करता येईल, की, त्या व्यक्तीस पूर्वप्रसिद्धी असे डिस्क्लेमर देण्यास भाग पाडता येईल. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

इनोबा म्हणे Mon, 01/21/2008 - 22:06
सुन्याशी सहमत, या प्रकारे साहित्य प्रसिद्ध झाले असल्यास मानहानी टाळण्याकरीता लेखकाने स्वतःच ती काळजी घ्यायला हवी. प्रश्न असा आहे की जर ते साहित्य उचललेले असल्यास व नविन लेखकाने पुर्वीचा लेखक आपणच आहे असा दावा केल्यास,ते साहित्यचौर्य कसे ओळखावे? साहित्यचौर्य रोखण्याकरीता क्रिएटीव कॉमन्स या परवान्याचा उपयोग होईल का?

साहित्य चोरणे याला फार मोठी परंपरा आहे, असे वाटते. :) पण,असे प्रकार रोखण्यासाठी काय केले पाहिजे हा प्रश्न मात्र कठीणच आहे. टोपण नावाने लिहिणा-याने पुर्वप्रसिद्धीचा उल्लेख केला पाहिजे. पण,उचललेल्या लेखनाबाबत काही नियम आहेत, जसे संशोधनात आपण पुर्वसुरींच्या मताचा परामर्ष घेतो. पण, निव्वळ चालूगिरीच्या बाबतीत काय करु शकतो हे मात्र काही माहित नाही बॊ..........!!! उदाहरणार्थ :- रौशनीच्या आंतरजालावरील लेखनाच्या प्रिन्ट काढून जर मी लेखक म्हणुन माझे नाव टाकले तर ? कायदा काय म्हणतो.........आणि त्याचा लेखक काय कार्यवाही करु शकतो त्याची माहिती कोणी देईल काय ?
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Tue, 01/22/2008 - 20:39
उदाहरणार्थ :- रौशनीच्या आंतरजालावरील लेखनाच्या प्रिन्ट काढून जर मी लेखक म्हणुन माझे नाव टाकले तर ? कायदा काय म्हणतो.........आणि त्याचा लेखक काय कार्यवाही करु शकतो त्याची माहिती कोणी देईल काय ? ओ बिरुटेशेठ, अहो माझी रौशनी अजून लिहून पूर्ण होऊ द्या की! मग ढापा अगदी जरूर!! :)) ( ह घ्या ) असो, माझ्यापुरतं बोलायचं तर आम्ही पडलो साला फकीर माणूस. आमचं लेखन कुणी ढापलं तर ढापू दे तिच्यायला! आमचं लेखन कुणी ढापलं आणि स्वत:चं म्हणून छापलं तर आमचं लेखन कुणाला ढापावंसं वाटण्याइतपत तरी बरं आहे, एवढंच आम्ही समाधान मानू! बाकी, खुदा सब देख रहा है. तात्या मिपात नाही, तात्या नाही मनोगती तात्या चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई! एवढं म्हणून आम्ही गप्प बसू... :) काय बिरुटेशेठ, खरं की नाही? आपलाच, तात्या.

सुधीर कांदळकर Sun, 01/27/2008 - 15:20
"हा चोरीचा माल आहे" असे लेबल नसते. तसेच सरपंच अथवा प्रशासक यांना अंतर्ज्ञान नाही. त्यामुळे ते प्रेषकाचेच आहे असे गृहीत धरणे क्रमप्राप्त आहे. सरपंचांनी प्रत्येक सदराबरोबर ते स्वतःचेच असल्याबद्दल प्रेषकाचे एक प्रतिज्ञापत्र घ्यावे. तरीहि चोरी झालीच तर मिपा त्याबद्दल जबाबदार राहणार नाही. चोरी आढळल्यास त्या सदस्यावर कायम बहिष्कार टाकावा. शक्य असल्यास कायदेशीर कार्यवाही करून पोलिसांचा ससेमिरा मागे लावून द्यावा.
हल्लीच मिसळपावावर काही सदस्यांच्या अशा लक्षात आले आहे की येथे प्रकाशित झालेले काही लेखन त्यांनी पूर्वी वाचलेले होते. (एक दुवा.) यावर सरपंचांनी धोरणाचे सूतोवाच केले. (सरपंचांचे धोरण) ते धोरण चोख असले, नैतिक असले, तरी त्याच्या अंमलबजावणीविषयी मनात प्रश्न उभा राहातो. मिसळपावकर क्षक्ष आणि मायबोलीकर यय दोघेही एकच असू शकतात ही कल्पना मनात चमकून गेली. आता त्यांच्या अन्य प्रतिसादांत दोघांची लेखनशैली एकच की वेगळी, वेगळी असल्यास तो प्रतिभेचा भाग आहे काय?