मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उपक्रम

हर्शल ·

In reply to by इनोबा म्हणे

विसोबा खेचर Wed, 03/19/2008 - 18:14
गुगल नावाचे संकेतस्थळ आपल्याला माहीत नाही काय? तिथे जाऊन हवं ते टाईप करा आणि मिळवा. हेच म्हणतो! मिसळपाव ही काय चौकशी करायची खिडकी वाटली का रे फोकलिच्यांनो? :) काय रे हर्षल, इथे ही चौकशी करण्यापूर्वी तू गुगलला गेला होतास काय? पब्लिकने तिच्यायला इथे चौकशी करण्यापूर्वी गुगलला जाऊन चौकशी करावी, त्यातूनही जर काहीच माहिती सापडली नाही तर मिपावर विचारावे. माहिती असल्यास मिपावाले अवश्य सांगतील! नाहीतर उद्या कुणीही उठून इथे फुकटच्या एक एक वाक्याच्या चौकश्या करू लागेल! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

छोटा डॉन Wed, 03/19/2008 - 18:40
"पब्लिकने तिच्यायला इथे चौकशी करण्यापूर्वी गुगलला जाऊन चौकशी करावी, त्यातूनही जर काहीच माहिती सापडली नाही तर मिपावर विचारावे. माहिती असल्यास मिपावाले अवश्य सांगतील! नाहीतर उद्या कुणीही उठून इथे फुकटच्या एक एक वाक्याच्या चौकश्या करू लागेल!" तात्या मज्जा वाटली राव, कुठनं कुठनं लोक येतात आणि काहिपण विचारतात... बरे केलात चांगलं झाडलात ते ... त्याला विचारा "कुठल्या गावचे ?" . मला वाटते "अलिबाग" वरून आला असावा .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by विसोबा खेचर

विजुभाऊ Wed, 03/19/2008 - 20:11
बरे झाले तात्या तुम्ही हे क्लीयर केले. नाय तर्...एक टाळके विचारणार होते की पुण्यात सर्वात कुज्कट पाट्या कुठे लिहील्या जातात पण ते सापडले या दुव्या वर http://www.busybeescorp.com/puneripatya/ आणि http://bombaydiaries.bombayaddict.com/2007/04/kahi-puneri-patya.html या इथे ही ............................................आपला पुणेरी कुज्कट पाट्या वाचुन वाचलेला विजुभाऊ

हर्शल Wed, 03/19/2008 - 19:00
फारच उत्तम प्रतिक्रिया दिलित आपण. धन्यवाद. गुगल नावाचे संकेतस्थळ आपल्याला माहीत नाही काय? तिथे जाऊन हवं ते टाईप करा आणि मिळवा. हेच म्हणतो! मिसळपाव ही काय चौकशी करायची खिडकी वाटली का रे फोकलिच्यांनो? :) काय रे हर्षल, इथे ही चौकशी करण्यापूर्वी तू गुगलला गेला होतास काय? पब्लिकने तिच्यायला इथे चौकशी करण्यापूर्वी गुगलला जाऊन चौकशी करावी, त्यातूनही जर काहीच माहिती सापडली नाही तर मिपावर विचारावे. माहिती असल्यास मिपावाले अवश्य सांगतील! नाहीतर उद्या कुणीही उठून इथे फुकटच्या एक एक वाक्याच्या चौकश्या करू लागेल!

In reply to by हर्शल

छोटा डॉन Wed, 03/19/2008 - 19:35
बाबा तुझा गैरसमज झालेला दिसतो आहे. आम्हाला काय म्हणायचे आहे की "गूगलवर " ही माहिती मिळत असताना या ठिकाणी विचारण्यात काय हाशिल ? आता आमची [ म्हणजे मी, तात्या, धमु, विनोबा, टिंग्या] उत्तर देण्याची पद्धत थोडी हटके असते ... त्याच्या राग मानू नये. मिपा वर असेच येत रहा, मजा कर, माहिती मिळव, शेअर कर, चकाट्या पिट, गंभिर विषयांवर चर्चा कर .... सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे काहि प्रतिसाद मिळातील ते "लाईटली पण सिरीअसली " घे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

हर्शल Wed, 03/19/2008 - 19:54
राग येण्याचे कारण नाहि. मिसल पाव वरच उपक्रम बद्दल वाचण्यात आले त्यासाथि विचारणा केलि होति.

मीनल Wed, 03/19/2008 - 19:57
आता आमची [ म्हणजे मी, तात्या, धमु, विनोबा, टिंग्या] उत्तर देण्याची पद्धत थोडी हटके असते ... त्याच्या राग मानू नये. कधी कधी उत्तर हटके नाही तर सटके (डोक सटकलेलली किंवा सटकवणारी) असतात.

In reply to by मीनल

छोटा डॉन Wed, 03/19/2008 - 20:02
"कधी कधी उत्तर हटके नाही तर सटके (डोक सटकलेलली किंवा सटकवणारी) असतात" आपल्याला असा अनुभव कधी आला बरे ? आता कसे आहे, आम्ही दरवेळी "ह.घ्या. / राग मानू नये " अशी तळटीप टाकू शकत नाही पण अर्थ तोच असतो ... बाकी आमच्या मनात अशी आढी कधीच नसते... याऊपर आपला असाच ग्रह राहणार असेल तर "परवरदिगार आपको खूष रख्खे !!!" एवढेच म्हणतो... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by हर्शल

विजुभाऊ Wed, 03/19/2008 - 20:19
राग आला?...................येवु दे. रागवुन उपयोग काय? मिसळ्पावा वर ची मंडळी तुम्ही रागावला तर आणखी जास्तच चेकाळतील.त्याना काय डिवचायला नवे कूळ मिळेल

In reply to by विजुभाऊ

एखादा चुकला तर त्याल मि.पा. कर चांगलाच फैलावर घेतील. कोणी आगाऊपणा करत असेल तर त्याची चांगलीच जिरवतील. पण सांभाळूनही घेतील. अहो मि.पा. कर इरसाल आहेत पण थिल्लर नाहीत असा माझा २ महीन्याचा मि.पा. वरील अनुभव सांगतो. असो. ही माझी वैयक्तिक मते आहेत. पुण्याचे पेशवे

In reply to by मीनल

प्राजु Wed, 03/19/2008 - 20:14
कधी कधी उत्तर हटके नाही तर सटके (डोक सटकलेलली किंवा सटकवणारी) असतात. मिसळपाव म्हणूनच नाव आहे ना या संकेत्स्थळाचे. नुसती बासुंदी आणि खीर आणि पक्वान काय कामाचं .. ठेचा हवाच ना चवीला... तुकारामांच्या गोड गोड अभंगांनी कंटाळलेला विठूरायासुद्धा आवली च्या शिव्याशाप आवडीने घ्यायचा..त्यासाठीच.. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

इनोबा म्हणे Wed, 03/19/2008 - 23:53
मिसळपाव म्हणूनच नाव आहे ना या संकेत्स्थळाचे. नुसती बासुंदी आणि खीर आणि पक्वान काय कामाचं .. ठेचा हवाच ना चवीला... तुकारामांच्या गोड गोड अभंगांनी कंटाळलेला विठूरायासुद्धा आवली च्या शिव्याशाप आवडीने घ्यायचा..त्यासाठीच.. आईशप्पथ! प्राजु तू तर कमालच केली. अगदी मनातलंच बोललीस. हर्शलराव राग मानू नका.कान पिळणारे हेच मिसळपावकरी उद्या तुमच्या कौतुकास्पद कामगिरी करिता तुमचा गालगुच्चा घ्यायला कमी करणार नाहीत. गुगलसारखे संस्थळ उपलब्ध असताना आपण इथे केवळ एका चौकशीकरिता एक थ्रेड टाकल्यामुळेच आम्ही तसे बोललो.पुढच्या वेळी काळजी घ्यावी. मिनल आपल्याला नक्की काय बोलायचे आहे ते स्पष्ट बोलत जा. तुम्हाला अशा प्रकारचे उत्तर कुणी दिले असल्याचे आमच्या माहितीत नाही. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

मीनल गुरुवार, 03/20/2008 - 07:36
अहो ,काही नाही मला कुणीही अशी उत्तरे दिली नाहित. आणि उपक्रमाबद्दल विचारणा केल्यावर प्रतिक्रिया ही सटकलेल्या डोक्याने लिहिलेल्या वाटल्या. आणि त्या वाचून हर्शल सटकलेला वाटला. म्हणून जरा यमक जुळवावे म्ह्टले . हटके आणि सटके! बस!

In reply to by मीनल

विसोबा खेचर गुरुवार, 03/20/2008 - 08:48
आणि उपक्रमाबद्दल विचारणा केल्यावर प्रतिक्रिया ही सटकलेल्या डोक्याने लिहिलेल्या वाटल्या. अहो पण मीनलताई, हर्षलला, 'आधी गुगलवर गेला होतास का?' किंवा 'काही शोधाशोध करायची असेल तर आधी गुगलून पाहात जा आणि तरीही जर काही माहिती मिळाली नाही तर मिपावर विचार, माहिती असल्यास मिपाकर अवश्य सांगतील' असं आम्ही हर्षलला सांगितलेलं आहे त्यावर हर्षल मूग गिळून आहे, काहीच बोलत नाही हे तुम्हाला दिसलं नाही का? आणि काय हो मीनलताई, एरवी मिपावर इतकी मंडळी लिहित असतात तेव्हा जळ्ळा कधी तुमचा दोन ओळींचा प्रतिसाद क्वचितच येतो आणि हर्षलने मिपावर ऍबरप्ट एका ओळीची चौकशी केली आणि त्यावर आम्ही त्याला दोन शब्द लिहिले तेव्हा मात्र मारे अगदी पुळका येऊन अगदी धावून धावून भांडायला आलात आणि यमकं जुळवू लागलात! :) छ्या! कमाल आहे तुमचीही! मला तर तुम्हीही अंमळ सटकलेल्या आणि हटकलेल्या डोक्याच्या वाटता! :) असो... हर्षलबुवांच्या एका ओळीच्या विचारणेवरही मिपावर इतका काथ्याकूट होऊ शकतो हे मिपा जिवंत असल्याचं लक्षण आहे असंच आम्ही मानतो! :) मराठी संस्थळ कसं, हासरं-भांडतं-खेळकर-हटकलेलं आणि सटकलेलं असावं! :) हो की नाही हो मीनलताई? :) आपला, (हटकलेला आणि सटकलेला मिपाकर!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

इनोबा म्हणे गुरुवार, 03/20/2008 - 11:36
असो... हर्षलबुवांच्या एका ओळीच्या विचारणेवरही मिपावर इतका काथ्याकूट होऊ शकतो हे मिपा जिवंत असल्याचं लक्षण आहे असंच आम्ही मानतो! :) मराठी संस्थळ कसं, हासरं-भांडतं-खेळकर-हटकलेलं आणि सटकलेलं असावं! :) तात्याबांशी सहमत (मिसळ'लेला) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by विसोबा खेचर

मीनल गुरुवार, 03/20/2008 - 17:46
आणि काय हो मीनलताई, एरवी मिपावर इतकी मंडळी लिहित असतात तेव्हा जळ्ळा कधी तुमचा दोन ओळींचा प्रतिसाद क्वचितच येतो आणि हर्षलने मिपावर ऍबरप्ट एका ओळीची चौकशी केली आणि त्यावर आम्ही त्याला दोन शब्द लिहिले तेव्हा मात्र मारे अगदी पुळका येऊन अगदी धावून धावून भांडायला आलात आणि यमकं जुळवू लागलात! :) आधी म्हटल्याप्रमाणे जरा यमक जुळवा जुळवी केली. प्रतिसाद दिला तो झोंबला वाटत कुणाला तरी? भांडायला आले असा सुर वाटला क माझा? तसा नव्हता खर तर! पुळका ?कोणाचा?तो कोण माझा? जेव्हा जमेल तेव्हा प्र तिसाद देते. काही लिहायला यायला ही हवे ना? जमल तेव्हा प्रकाशित केले - उदा:-मिसळ पाव यमक प्रार्थना ,काही लेख , कविता. मी काही कवयित्री नाही ,लेखिका नाही ,टिकाकार नाही . आहे एक वाचक. छ्या! कमाल आहे तुमचीही! मला तर तुम्हीही अंमळ सटकलेल्या आणि हटकलेल्या डोक्याच्या वाटता! :) काही शंकाच नाही. अमंळ सटकलेलली ,हटकलेली आहे,म्हणूनच तर अंमळ (दोन ओळींचा)प्रतिसाद देते ,लेखन करते. जास्त असते तर ------ सांगणे नको! पुन्हा काथ्याकुट !!

धमाल मुलगा गुरुवार, 03/20/2008 - 11:03
मिसळपाव म्हणूनच नाव आहे ना या संकेत्स्थळाचे. नुसती बासुंदी आणि खीर आणि पक्वान काय कामाचं .. ठेचा हवाच ना चवीला... तुकारामांच्या गोड गोड अभंगांनी कंटाळलेला विठूरायासुद्धा आवली च्या शिव्याशाप आवडीने घ्यायचा..त्यासाठीच.. प्राजुताई, जबरा ग॑!!! हर्शल, हर्शलराव राग मानू नका.कान पिळणारे हेच मिसळपावकरी उद्या तुमच्या कौतुकास्पद कामगिरी करिता तुमचा गालगुच्चा घ्यायला कमी करणार नाहीत. इनोबाशी पूर्ण सहमत :-) डॉनराव-ए-ब॑गळुरिस्तान अल् गुजरात, शेठ, आपण आपली पद्धत सुधारायला पाय्जे काय? आयला इकड॑ पब्लिकचा लै म्ह॑जे लैच गैरसमज व्हायला लागलाय!!! म॑डळी, अहो खर॑च आमच्या मनात तस॑ काही नसत॑ हो!!!! बर॑ इतक्या दिसा॑ची सोबत आपली, जरा समजुन घ्या ना राव..पोर॑ सोर॑ आहेत, द॑गा धूडगुस घालायचीच. असो, हर्षलबुवांच्या एका ओळीच्या विचारणेवरही मिपावर इतका काथ्याकूट होऊ शकतो हे मिपा जिवंत असल्याचं लक्षण आहे असंच आम्ही मानतो! :) क्या बात है तात्याबा....जिओ!!!!

शरुबाबा गुरुवार, 03/20/2008 - 11:44
हर्षलबुवांच्या एका ओळीच्या विचारणेवरही मिपावर इतका काथ्याकूट होऊ शकतो हे मिपा जिवंत असल्याचं लक्षण आहे असे वाटते.

In reply to by इनोबा म्हणे

विसोबा खेचर Wed, 03/19/2008 - 18:14
गुगल नावाचे संकेतस्थळ आपल्याला माहीत नाही काय? तिथे जाऊन हवं ते टाईप करा आणि मिळवा. हेच म्हणतो! मिसळपाव ही काय चौकशी करायची खिडकी वाटली का रे फोकलिच्यांनो? :) काय रे हर्षल, इथे ही चौकशी करण्यापूर्वी तू गुगलला गेला होतास काय? पब्लिकने तिच्यायला इथे चौकशी करण्यापूर्वी गुगलला जाऊन चौकशी करावी, त्यातूनही जर काहीच माहिती सापडली नाही तर मिपावर विचारावे. माहिती असल्यास मिपावाले अवश्य सांगतील! नाहीतर उद्या कुणीही उठून इथे फुकटच्या एक एक वाक्याच्या चौकश्या करू लागेल! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

छोटा डॉन Wed, 03/19/2008 - 18:40
"पब्लिकने तिच्यायला इथे चौकशी करण्यापूर्वी गुगलला जाऊन चौकशी करावी, त्यातूनही जर काहीच माहिती सापडली नाही तर मिपावर विचारावे. माहिती असल्यास मिपावाले अवश्य सांगतील! नाहीतर उद्या कुणीही उठून इथे फुकटच्या एक एक वाक्याच्या चौकश्या करू लागेल!" तात्या मज्जा वाटली राव, कुठनं कुठनं लोक येतात आणि काहिपण विचारतात... बरे केलात चांगलं झाडलात ते ... त्याला विचारा "कुठल्या गावचे ?" . मला वाटते "अलिबाग" वरून आला असावा .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by विसोबा खेचर

विजुभाऊ Wed, 03/19/2008 - 20:11
बरे झाले तात्या तुम्ही हे क्लीयर केले. नाय तर्...एक टाळके विचारणार होते की पुण्यात सर्वात कुज्कट पाट्या कुठे लिहील्या जातात पण ते सापडले या दुव्या वर http://www.busybeescorp.com/puneripatya/ आणि http://bombaydiaries.bombayaddict.com/2007/04/kahi-puneri-patya.html या इथे ही ............................................आपला पुणेरी कुज्कट पाट्या वाचुन वाचलेला विजुभाऊ

हर्शल Wed, 03/19/2008 - 19:00
फारच उत्तम प्रतिक्रिया दिलित आपण. धन्यवाद. गुगल नावाचे संकेतस्थळ आपल्याला माहीत नाही काय? तिथे जाऊन हवं ते टाईप करा आणि मिळवा. हेच म्हणतो! मिसळपाव ही काय चौकशी करायची खिडकी वाटली का रे फोकलिच्यांनो? :) काय रे हर्षल, इथे ही चौकशी करण्यापूर्वी तू गुगलला गेला होतास काय? पब्लिकने तिच्यायला इथे चौकशी करण्यापूर्वी गुगलला जाऊन चौकशी करावी, त्यातूनही जर काहीच माहिती सापडली नाही तर मिपावर विचारावे. माहिती असल्यास मिपावाले अवश्य सांगतील! नाहीतर उद्या कुणीही उठून इथे फुकटच्या एक एक वाक्याच्या चौकश्या करू लागेल!

In reply to by हर्शल

छोटा डॉन Wed, 03/19/2008 - 19:35
बाबा तुझा गैरसमज झालेला दिसतो आहे. आम्हाला काय म्हणायचे आहे की "गूगलवर " ही माहिती मिळत असताना या ठिकाणी विचारण्यात काय हाशिल ? आता आमची [ म्हणजे मी, तात्या, धमु, विनोबा, टिंग्या] उत्तर देण्याची पद्धत थोडी हटके असते ... त्याच्या राग मानू नये. मिपा वर असेच येत रहा, मजा कर, माहिती मिळव, शेअर कर, चकाट्या पिट, गंभिर विषयांवर चर्चा कर .... सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे काहि प्रतिसाद मिळातील ते "लाईटली पण सिरीअसली " घे ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

हर्शल Wed, 03/19/2008 - 19:54
राग येण्याचे कारण नाहि. मिसल पाव वरच उपक्रम बद्दल वाचण्यात आले त्यासाथि विचारणा केलि होति.

मीनल Wed, 03/19/2008 - 19:57
आता आमची [ म्हणजे मी, तात्या, धमु, विनोबा, टिंग्या] उत्तर देण्याची पद्धत थोडी हटके असते ... त्याच्या राग मानू नये. कधी कधी उत्तर हटके नाही तर सटके (डोक सटकलेलली किंवा सटकवणारी) असतात.

In reply to by मीनल

छोटा डॉन Wed, 03/19/2008 - 20:02
"कधी कधी उत्तर हटके नाही तर सटके (डोक सटकलेलली किंवा सटकवणारी) असतात" आपल्याला असा अनुभव कधी आला बरे ? आता कसे आहे, आम्ही दरवेळी "ह.घ्या. / राग मानू नये " अशी तळटीप टाकू शकत नाही पण अर्थ तोच असतो ... बाकी आमच्या मनात अशी आढी कधीच नसते... याऊपर आपला असाच ग्रह राहणार असेल तर "परवरदिगार आपको खूष रख्खे !!!" एवढेच म्हणतो... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by हर्शल

विजुभाऊ Wed, 03/19/2008 - 20:19
राग आला?...................येवु दे. रागवुन उपयोग काय? मिसळ्पावा वर ची मंडळी तुम्ही रागावला तर आणखी जास्तच चेकाळतील.त्याना काय डिवचायला नवे कूळ मिळेल

In reply to by विजुभाऊ

एखादा चुकला तर त्याल मि.पा. कर चांगलाच फैलावर घेतील. कोणी आगाऊपणा करत असेल तर त्याची चांगलीच जिरवतील. पण सांभाळूनही घेतील. अहो मि.पा. कर इरसाल आहेत पण थिल्लर नाहीत असा माझा २ महीन्याचा मि.पा. वरील अनुभव सांगतो. असो. ही माझी वैयक्तिक मते आहेत. पुण्याचे पेशवे

In reply to by मीनल

प्राजु Wed, 03/19/2008 - 20:14
कधी कधी उत्तर हटके नाही तर सटके (डोक सटकलेलली किंवा सटकवणारी) असतात. मिसळपाव म्हणूनच नाव आहे ना या संकेत्स्थळाचे. नुसती बासुंदी आणि खीर आणि पक्वान काय कामाचं .. ठेचा हवाच ना चवीला... तुकारामांच्या गोड गोड अभंगांनी कंटाळलेला विठूरायासुद्धा आवली च्या शिव्याशाप आवडीने घ्यायचा..त्यासाठीच.. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

इनोबा म्हणे Wed, 03/19/2008 - 23:53
मिसळपाव म्हणूनच नाव आहे ना या संकेत्स्थळाचे. नुसती बासुंदी आणि खीर आणि पक्वान काय कामाचं .. ठेचा हवाच ना चवीला... तुकारामांच्या गोड गोड अभंगांनी कंटाळलेला विठूरायासुद्धा आवली च्या शिव्याशाप आवडीने घ्यायचा..त्यासाठीच.. आईशप्पथ! प्राजु तू तर कमालच केली. अगदी मनातलंच बोललीस. हर्शलराव राग मानू नका.कान पिळणारे हेच मिसळपावकरी उद्या तुमच्या कौतुकास्पद कामगिरी करिता तुमचा गालगुच्चा घ्यायला कमी करणार नाहीत. गुगलसारखे संस्थळ उपलब्ध असताना आपण इथे केवळ एका चौकशीकरिता एक थ्रेड टाकल्यामुळेच आम्ही तसे बोललो.पुढच्या वेळी काळजी घ्यावी. मिनल आपल्याला नक्की काय बोलायचे आहे ते स्पष्ट बोलत जा. तुम्हाला अशा प्रकारचे उत्तर कुणी दिले असल्याचे आमच्या माहितीत नाही. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

मीनल गुरुवार, 03/20/2008 - 07:36
अहो ,काही नाही मला कुणीही अशी उत्तरे दिली नाहित. आणि उपक्रमाबद्दल विचारणा केल्यावर प्रतिक्रिया ही सटकलेल्या डोक्याने लिहिलेल्या वाटल्या. आणि त्या वाचून हर्शल सटकलेला वाटला. म्हणून जरा यमक जुळवावे म्ह्टले . हटके आणि सटके! बस!

In reply to by मीनल

विसोबा खेचर गुरुवार, 03/20/2008 - 08:48
आणि उपक्रमाबद्दल विचारणा केल्यावर प्रतिक्रिया ही सटकलेल्या डोक्याने लिहिलेल्या वाटल्या. अहो पण मीनलताई, हर्षलला, 'आधी गुगलवर गेला होतास का?' किंवा 'काही शोधाशोध करायची असेल तर आधी गुगलून पाहात जा आणि तरीही जर काही माहिती मिळाली नाही तर मिपावर विचार, माहिती असल्यास मिपाकर अवश्य सांगतील' असं आम्ही हर्षलला सांगितलेलं आहे त्यावर हर्षल मूग गिळून आहे, काहीच बोलत नाही हे तुम्हाला दिसलं नाही का? आणि काय हो मीनलताई, एरवी मिपावर इतकी मंडळी लिहित असतात तेव्हा जळ्ळा कधी तुमचा दोन ओळींचा प्रतिसाद क्वचितच येतो आणि हर्षलने मिपावर ऍबरप्ट एका ओळीची चौकशी केली आणि त्यावर आम्ही त्याला दोन शब्द लिहिले तेव्हा मात्र मारे अगदी पुळका येऊन अगदी धावून धावून भांडायला आलात आणि यमकं जुळवू लागलात! :) छ्या! कमाल आहे तुमचीही! मला तर तुम्हीही अंमळ सटकलेल्या आणि हटकलेल्या डोक्याच्या वाटता! :) असो... हर्षलबुवांच्या एका ओळीच्या विचारणेवरही मिपावर इतका काथ्याकूट होऊ शकतो हे मिपा जिवंत असल्याचं लक्षण आहे असंच आम्ही मानतो! :) मराठी संस्थळ कसं, हासरं-भांडतं-खेळकर-हटकलेलं आणि सटकलेलं असावं! :) हो की नाही हो मीनलताई? :) आपला, (हटकलेला आणि सटकलेला मिपाकर!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

इनोबा म्हणे गुरुवार, 03/20/2008 - 11:36
असो... हर्षलबुवांच्या एका ओळीच्या विचारणेवरही मिपावर इतका काथ्याकूट होऊ शकतो हे मिपा जिवंत असल्याचं लक्षण आहे असंच आम्ही मानतो! :) मराठी संस्थळ कसं, हासरं-भांडतं-खेळकर-हटकलेलं आणि सटकलेलं असावं! :) तात्याबांशी सहमत (मिसळ'लेला) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by विसोबा खेचर

मीनल गुरुवार, 03/20/2008 - 17:46
आणि काय हो मीनलताई, एरवी मिपावर इतकी मंडळी लिहित असतात तेव्हा जळ्ळा कधी तुमचा दोन ओळींचा प्रतिसाद क्वचितच येतो आणि हर्षलने मिपावर ऍबरप्ट एका ओळीची चौकशी केली आणि त्यावर आम्ही त्याला दोन शब्द लिहिले तेव्हा मात्र मारे अगदी पुळका येऊन अगदी धावून धावून भांडायला आलात आणि यमकं जुळवू लागलात! :) आधी म्हटल्याप्रमाणे जरा यमक जुळवा जुळवी केली. प्रतिसाद दिला तो झोंबला वाटत कुणाला तरी? भांडायला आले असा सुर वाटला क माझा? तसा नव्हता खर तर! पुळका ?कोणाचा?तो कोण माझा? जेव्हा जमेल तेव्हा प्र तिसाद देते. काही लिहायला यायला ही हवे ना? जमल तेव्हा प्रकाशित केले - उदा:-मिसळ पाव यमक प्रार्थना ,काही लेख , कविता. मी काही कवयित्री नाही ,लेखिका नाही ,टिकाकार नाही . आहे एक वाचक. छ्या! कमाल आहे तुमचीही! मला तर तुम्हीही अंमळ सटकलेल्या आणि हटकलेल्या डोक्याच्या वाटता! :) काही शंकाच नाही. अमंळ सटकलेलली ,हटकलेली आहे,म्हणूनच तर अंमळ (दोन ओळींचा)प्रतिसाद देते ,लेखन करते. जास्त असते तर ------ सांगणे नको! पुन्हा काथ्याकुट !!

धमाल मुलगा गुरुवार, 03/20/2008 - 11:03
मिसळपाव म्हणूनच नाव आहे ना या संकेत्स्थळाचे. नुसती बासुंदी आणि खीर आणि पक्वान काय कामाचं .. ठेचा हवाच ना चवीला... तुकारामांच्या गोड गोड अभंगांनी कंटाळलेला विठूरायासुद्धा आवली च्या शिव्याशाप आवडीने घ्यायचा..त्यासाठीच.. प्राजुताई, जबरा ग॑!!! हर्शल, हर्शलराव राग मानू नका.कान पिळणारे हेच मिसळपावकरी उद्या तुमच्या कौतुकास्पद कामगिरी करिता तुमचा गालगुच्चा घ्यायला कमी करणार नाहीत. इनोबाशी पूर्ण सहमत :-) डॉनराव-ए-ब॑गळुरिस्तान अल् गुजरात, शेठ, आपण आपली पद्धत सुधारायला पाय्जे काय? आयला इकड॑ पब्लिकचा लै म्ह॑जे लैच गैरसमज व्हायला लागलाय!!! म॑डळी, अहो खर॑च आमच्या मनात तस॑ काही नसत॑ हो!!!! बर॑ इतक्या दिसा॑ची सोबत आपली, जरा समजुन घ्या ना राव..पोर॑ सोर॑ आहेत, द॑गा धूडगुस घालायचीच. असो, हर्षलबुवांच्या एका ओळीच्या विचारणेवरही मिपावर इतका काथ्याकूट होऊ शकतो हे मिपा जिवंत असल्याचं लक्षण आहे असंच आम्ही मानतो! :) क्या बात है तात्याबा....जिओ!!!!

शरुबाबा गुरुवार, 03/20/2008 - 11:44
हर्षलबुवांच्या एका ओळीच्या विचारणेवरही मिपावर इतका काथ्याकूट होऊ शकतो हे मिपा जिवंत असल्याचं लक्षण आहे असे वाटते.
हर्शल उपक्रम ह्या मराथि ब्लोगबद्दल माहिति किन्वा त्या साइटचा पत्ता मिळेल का?

मि पा वरचे साहीत्य मुद्रीत स्वरूपात

विजुभाऊ ·

विसोबा खेचर Wed, 03/19/2008 - 13:09
मिसळपाव डॉट कॉम या संकेतस्थळावर (इथून पुढे 'मिपावर') लिहिणार्‍या मंडळींचाच त्यांच्या त्यांच्या लेखनावर (लेख, काव्य, चर्चा, पाककृती, प्रतिसाद, व इतर) संपूर्ण अधिकार आहे असेच मिपा मानते. त्यावर मिपाचा कुठलाही अधिकार नाही. मिपा केवळ एक आंतरजालीय माध्यम आहे, जे सभासदांच्या लेखनास विनामूल्य प्रसिद्धी देते. इथे लिहिल्या जाणार्‍या लेखनाकरता, त्यापासून कुणालाही होणार्‍या आर्थिक, मानसिक व इतर सर्व प्रकारच्या फायद्या/तोट्याकरता संबंधित लेखक/लेखिका मंडळीच संपूर्णपणे जबाबदार असतील. मिपावर लिहिल्या जाणार्‍या लेखनाची कुठलीही जबाबदारी/उत्तरदायित्व मिपावर अथवा तात्या अभ्यंकर यांच्यावर नाही. मिपावरील साहित्य मुद्रित स्वरुपात प्रकाशित करायचे किंवा कसे याचा निर्णयाधिकार हा त्या साहित्याच्या संबंधित लेखकांचा/लेखिकांचा आहे. सदर साहित्य प्रकाशित करण्यास परवानगी देण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार मिपाला अथवा तात्या अभ्यंकर यांना नाही! सरपंच, विसोबा खेचर यांच्याकडून पुढील सूचना मिळेपर्यंत वरील प्रकटन हे कायमस्वरुपी व्हॅलिड राहील! कळावे, आपला नम्र, तात्या अभ्यंकर ऊर्फ विसोबा खेचर ऊर्फ सरपंच, मालक, मिसळपाव डॉट कॉम. बुधवार, दिनांक १७ मार्च, २००८. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १ वाजून १० मिनिटांनी वरील प्रकटन प्रकाशित केले.

इनोबा म्हणे Wed, 03/19/2008 - 15:16
आम्ही तर केव्हापासून छापील अंकाचा हट्ट धरुन बसलो आहे.पुण्यात भेटलो की या विषयावर चर्चा करु. मिसळपावचा विजू...स्वारी ....विजय असो! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

स्वयम्भू Wed, 03/19/2008 - 16:41
अगदी मनतलं बोललात विजूभाउ. पुण्य नगरीत भेटलात की चर्चा कराच ह्यावर. माझा पुर्ण पाठींबा आहे. आपला, स्वयंभू

विसोबा खेचर Wed, 03/19/2008 - 13:09
मिसळपाव डॉट कॉम या संकेतस्थळावर (इथून पुढे 'मिपावर') लिहिणार्‍या मंडळींचाच त्यांच्या त्यांच्या लेखनावर (लेख, काव्य, चर्चा, पाककृती, प्रतिसाद, व इतर) संपूर्ण अधिकार आहे असेच मिपा मानते. त्यावर मिपाचा कुठलाही अधिकार नाही. मिपा केवळ एक आंतरजालीय माध्यम आहे, जे सभासदांच्या लेखनास विनामूल्य प्रसिद्धी देते. इथे लिहिल्या जाणार्‍या लेखनाकरता, त्यापासून कुणालाही होणार्‍या आर्थिक, मानसिक व इतर सर्व प्रकारच्या फायद्या/तोट्याकरता संबंधित लेखक/लेखिका मंडळीच संपूर्णपणे जबाबदार असतील. मिपावर लिहिल्या जाणार्‍या लेखनाची कुठलीही जबाबदारी/उत्तरदायित्व मिपावर अथवा तात्या अभ्यंकर यांच्यावर नाही. मिपावरील साहित्य मुद्रित स्वरुपात प्रकाशित करायचे किंवा कसे याचा निर्णयाधिकार हा त्या साहित्याच्या संबंधित लेखकांचा/लेखिकांचा आहे. सदर साहित्य प्रकाशित करण्यास परवानगी देण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार मिपाला अथवा तात्या अभ्यंकर यांना नाही! सरपंच, विसोबा खेचर यांच्याकडून पुढील सूचना मिळेपर्यंत वरील प्रकटन हे कायमस्वरुपी व्हॅलिड राहील! कळावे, आपला नम्र, तात्या अभ्यंकर ऊर्फ विसोबा खेचर ऊर्फ सरपंच, मालक, मिसळपाव डॉट कॉम. बुधवार, दिनांक १७ मार्च, २००८. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १ वाजून १० मिनिटांनी वरील प्रकटन प्रकाशित केले.

इनोबा म्हणे Wed, 03/19/2008 - 15:16
आम्ही तर केव्हापासून छापील अंकाचा हट्ट धरुन बसलो आहे.पुण्यात भेटलो की या विषयावर चर्चा करु. मिसळपावचा विजू...स्वारी ....विजय असो! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

स्वयम्भू Wed, 03/19/2008 - 16:41
अगदी मनतलं बोललात विजूभाउ. पुण्य नगरीत भेटलात की चर्चा कराच ह्यावर. माझा पुर्ण पाठींबा आहे. आपला, स्वयंभू
मित्रानो मि पा वरचे साहीत्य मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करुया असा एक विचार प्रवाह येतोय. पुण्याच्या मि पा संमेलनात या बाबत उहापोह होइलच्..तुम्हाला काय वाटते.? या बाबत काय / कसे करता येईल सांगा हे साहीत्य खरोखर्च मिसळ पाव प्रकारचे आहे...पोटही भरते/ जिभेचे चोचले ही होतात / वेगवेगळ्या स्वरूपात मिळु शकते. कथा/ काव्य/ विडंबन / खादाडी / सल्ले/माहीती/चारोळ्या/ आरोळ्या सगळे प्रकार आहेत .......................साहीत्य मिसळ चरणारा साहीत्य खादाड विजुभाऊ.

चित्रकळा - ३

ॐकार ·

विसोबा खेचर Wed, 03/19/2008 - 12:34
१) जुन्या पिढीतला, सचिवालयात वगैरे इमाने इतबारे नोकरी करून निवृत्त झालेला इसम. हा इसम आता अत्यंत सुखासमाधानेचे दिवस पाहतो आहे.. २) बालमोहन, पार्लेटिळक सारख्या एखाद्या शाळेत दहावीला गणित विषय शिकवणार्‍या, तसेच विद्यार्थ्यांवर्गात प्रिय असणार्‍या शिक्षिका. ३) अनेक विषयात गती असलेली, ट्रेकिंग, भटकंती, सामाजिक कार्यात भाग घेणारी, नाटकाची आवड असलेली, उत्तम वक्तृत्व असलेली एक चतुरस्त्र तरुणी! ४) नशीब साफ फुटकं असलेला, सांसारिक जबाबदार्‍यांनी अक्षरश: पिचून गेलेला एक अतिकनिष्ठ मध्यमवर्गीय इसम! ५) ज्याला अत्यंत चोखंदळ वाचकांनी, समिक्षकांनी नावाजला आहे असा एक अनवट लेखक! काय मग ॐकारा, पटलं का माझं म्हणणं?! लेका, तुझ्या चित्रांना इतकं चांगल्या रितीने कुणी समजून घेतलं नसेल! :) तात्या.

ॐकार गुरुवार, 03/20/2008 - 09:53
जनावर समभाग ( २ - सम भाग ) विषमता (३- विषम ता ) कोरे/अदृश्य ऊठवळ ( ऊठ वळ - बसलेली व्यक्ती - उठून वळलेली व्यक्ती)

विसोबा खेचर Wed, 03/19/2008 - 12:34
१) जुन्या पिढीतला, सचिवालयात वगैरे इमाने इतबारे नोकरी करून निवृत्त झालेला इसम. हा इसम आता अत्यंत सुखासमाधानेचे दिवस पाहतो आहे.. २) बालमोहन, पार्लेटिळक सारख्या एखाद्या शाळेत दहावीला गणित विषय शिकवणार्‍या, तसेच विद्यार्थ्यांवर्गात प्रिय असणार्‍या शिक्षिका. ३) अनेक विषयात गती असलेली, ट्रेकिंग, भटकंती, सामाजिक कार्यात भाग घेणारी, नाटकाची आवड असलेली, उत्तम वक्तृत्व असलेली एक चतुरस्त्र तरुणी! ४) नशीब साफ फुटकं असलेला, सांसारिक जबाबदार्‍यांनी अक्षरश: पिचून गेलेला एक अतिकनिष्ठ मध्यमवर्गीय इसम! ५) ज्याला अत्यंत चोखंदळ वाचकांनी, समिक्षकांनी नावाजला आहे असा एक अनवट लेखक! काय मग ॐकारा, पटलं का माझं म्हणणं?! लेका, तुझ्या चित्रांना इतकं चांगल्या रितीने कुणी समजून घेतलं नसेल! :) तात्या.

ॐकार गुरुवार, 03/20/2008 - 09:53
जनावर समभाग ( २ - सम भाग ) विषमता (३- विषम ता ) कोरे/अदृश्य ऊठवळ ( ऊठ वळ - बसलेली व्यक्ती - उठून वळलेली व्यक्ती)
लेखनविषय:
3

"झेंडूची फुले" परंपरा

प्रा सुरेश खेडकर ·

विसोबा खेचर Wed, 03/19/2008 - 06:11
विडंबन काव्याची परंपरा पुढे चालवून समृद्ध करण्यासाठी एकत्रित होवून प्रयत्न करु या.आपल्या स्वतःच्या विडंबन कविता जरुर पोस्ट करा. विडंबन काव्याची नुसती आवड असेल तरीही ही कम्युनिटी जॉईन करा व आपल्या मित्रांना सांगा.विडंबन काव्य संग्रहांची माहिती पाठवा. ऑर्कुटचे एजंट प्राध्यापक खेडकरसाहेब, मिपावर देखील मंडळी विडंबने लिहीत आहेत. ज्या प्रमाणे आपण 'ऑर्कुटवरील समूहावर विडंबने लिहा' असं मिपावर येऊन सांगताय, त्याचप्रमाणे 'मिपावर येऊन विडंबने लिहा' असं ऑर्कुटवरील त्या कम्युनिटीवर जाऊनही सांगताय का? असो, मिपाला काहीच वर्ज्य नाही. इथे येऊन कुणीही कुठलीही जाहिरात करावी! तात्या.

असो, मिपाला काहीच वर्ज्य नाही. इथे येऊन कुणीही कुठलीही जाहिरात करावी! तात्या. असे जर आहे तर आपल्या " ऑर्कुटचे एजंट प्राध्यापक खेडकरसाहेब," अशा उपरोधक व तिरकस शब्दातील प्रतिक्रियेचे प्रयोजन काय? शेवटी आपले विचार जास्त्तीत जास्त लोकापर्यंत ( ऑरकुटसकट) सर्व विधायक मार्गंनी पोहोचावे असे प्रत्येकाला वाटणे सहाजिक नाही का? श्री. अविनाश ओगले यांनी ऑर्कुटवरील "झेंडूची फुले" परंपरा या समूहावर "मिसळ पाव" ची माहिती दिली तेव्हा मला पहिल्यांदा मिपा बद्दल कळले व मी इथे आलो. आपला आकस कशाबद्दल आहे ते स्पष्ट होत नाही. असो.

In reply to by प्रा सुरेश खेडकर

इनोबा म्हणे Wed, 03/19/2008 - 14:32
विडंबन काव्याची परंपरा पुढे चालवून समृद्ध करण्यासाठी एकत्रित होवून प्रयत्न करु या.आपल्या स्वतःच्या विडंबन कविता जरुर पोस्ट करा. विडंबन काव्याची नुसती आवड असेल तरीही ही कम्युनिटी जॉईन करा व आपल्या मित्रांना सांगा.विडंबन काव्य संग्रहांची माहिती पाठवा. हे इथेही करता येण्यासारखे आहे.असो. तुमच्या 'झेंडूची फूले' या कम्युनिटीचा मी फार पुर्वीपासून सदस्य आहे. दर दोन-तीन दिवसाला कुठल्या ना कुठल्या जाहिराती (कम्युनिटी अथवा आपल्या कार्यक्रमासंबंधीत)माझ्या मॅसेज बॉक्समधे जमा होत असतात,तेव्हा जाहिरातींचा जोर थोडा कमी असायला हवा असे माझे प्रमाणिक(आणि वैयक्तीक) मत आहे. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

विसोबा खेचर यांना : ऑरकुट वर मी गेल्या दोन वर्षापासून तर मिपा वर जेमतेम २ महिन्यापासून आहे. त्यामुळे इथले रिती रीवाज आणि Who is who अजून नीट माहित नाहीत , तरी क्षमस्व. ऑरकुट वर मी मिपा चा प्रसार ( मी त्याला जाहिरात म्हणणार नाही) जरूर व लगेच करेन. श्री. अविनाश ओगले यांनी ऑर्कुटवरील माझ्या "झेंडूची फुले परंपरा " या समूहावरच "मिसळ पाव" ची माहिती दिली तेव्हा मला पहिल्यांदा मिपा बद्दल कळले व मी इथे आलो. ====================================================== इनोबा म्हणे यांना: तुम्ही माझ्या ऑरकुट वरील 'झेंडूची फूले' या कम्युनिटी चे फार पुर्वीपासून सदस्य आहात हे कळून अतिशय आनंद झाला ,पण तुम्ही इथे याआधी ओळख दिली असतीत तर जास्त आनंद झाला असता.. "दर दोन-तीन दिवसाला कुठल्या ना कुठल्या जाहिराती (कम्युनिटी अथवा आपल्या कार्यक्रमासंबंधीत)माझ्या मॅसेज बॉक्समधे जमा होत असतात,तेव्हा जाहिरातींचा जोर थोडा कमी असायला हवा असे माझे प्रमाणिक(आणि वैयक्तीक) मत आहे." ह्या आपल्या मताशी मी सहमत आहे. आपल्याला झालेल्या त्रासा बद्दल दिलगिर आहे.आपण नीट लक्षात घेतले तर असे दिसेल की ती जुनी गोष्ट असून गेल्या ३/४ महिन्यात सर्व सभासदांना ग्रूप मेसेज करणे मी जवळ जवळ बंद केले आहे. कारण आता सदस्य संख्या ५३० म्हणजे पुष्कळ बरी झाली आहे व ती प्रसाराशिवाय ( मी जाहिरात म्हणणार नाही) वाढत आहे. झाड/ मूल लहान असते तेव्हा जास्त निगा राखावी लागते तसे. माझ्या बरोबर एक वर्षापूर्वी सुरू झालेल्या अनेक समुहांची सदस्य संख्या १०च्या वर जाऊ शकलेली नाही हे आपण पाहू शकता. तसे जाहिरातेत एवढे वाईट काय आहे? आजच्या बदललेल्या युगात जाहिरात केल्याने माती पण विकल्या जाते पण जाहिरातीशिवाय सोने पण विकणे कठीण झाले आहे. " आपली आपण करी स्तुती ..... " ही समर्थांची उक्ती लक्षात ठेवल्या मुळे मराठी माणूस मागे पडतो आहे. "हे इथेही करता येण्यासारखे आहे." जरूर . कोणी नाही म्हटले? दोन्ही कडे झाले तर काय नुकसान आहे हे कळले नाही.

In reply to by प्रा सुरेश खेडकर

विसोबा खेचर Wed, 03/19/2008 - 17:06
प्राध्यापक साहेब, खुलाश्याबद्दल धन्यवाद... जास्त-कमी शब्दाबद्दल माफी असावी.. आपला, तात्या.

"ऑरकुट वर मी मिपा चा प्रसार ( मी त्याला जाहिरात म्हणणार नाही) जरूर व लगेच करेन. "ह्या माझ्या वचना प्रमाणे ऑरकुट वर "मिसळ पाव" चा प्रसार करीत आहे. कृपया ही लिंक पहावी. धन्यवाद. http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=28868095&tid=2589676827082582914&start=1 पण "मिसळ पाव" ला जाहिरातीची ( तुमच्या आगाऊपणाची) जरूर नाही असे म्हणून कोणी नाराज झाल्यास मी काय करावे असा विचार मनात येवून गेला.

In reply to by प्रा सुरेश खेडकर

पण "मिसळ पाव" ला जाहिरातीची ( तुमच्या आगाऊपणाची) जरूर नाही असे म्हणून कोणी नाराज झाल्यास मी काय करावे असा विचार मनात येवून गेला. कोणताही विचार आपल्या मनात येऊ देऊ नका. मिपाची जाहिरात ऑर्कुट वर करत राहा, आम्हीही एखादा स्क्रॅप खरडू तिथे :)

विसोबा खेचर Wed, 03/19/2008 - 06:11
विडंबन काव्याची परंपरा पुढे चालवून समृद्ध करण्यासाठी एकत्रित होवून प्रयत्न करु या.आपल्या स्वतःच्या विडंबन कविता जरुर पोस्ट करा. विडंबन काव्याची नुसती आवड असेल तरीही ही कम्युनिटी जॉईन करा व आपल्या मित्रांना सांगा.विडंबन काव्य संग्रहांची माहिती पाठवा. ऑर्कुटचे एजंट प्राध्यापक खेडकरसाहेब, मिपावर देखील मंडळी विडंबने लिहीत आहेत. ज्या प्रमाणे आपण 'ऑर्कुटवरील समूहावर विडंबने लिहा' असं मिपावर येऊन सांगताय, त्याचप्रमाणे 'मिपावर येऊन विडंबने लिहा' असं ऑर्कुटवरील त्या कम्युनिटीवर जाऊनही सांगताय का? असो, मिपाला काहीच वर्ज्य नाही. इथे येऊन कुणीही कुठलीही जाहिरात करावी! तात्या.

असो, मिपाला काहीच वर्ज्य नाही. इथे येऊन कुणीही कुठलीही जाहिरात करावी! तात्या. असे जर आहे तर आपल्या " ऑर्कुटचे एजंट प्राध्यापक खेडकरसाहेब," अशा उपरोधक व तिरकस शब्दातील प्रतिक्रियेचे प्रयोजन काय? शेवटी आपले विचार जास्त्तीत जास्त लोकापर्यंत ( ऑरकुटसकट) सर्व विधायक मार्गंनी पोहोचावे असे प्रत्येकाला वाटणे सहाजिक नाही का? श्री. अविनाश ओगले यांनी ऑर्कुटवरील "झेंडूची फुले" परंपरा या समूहावर "मिसळ पाव" ची माहिती दिली तेव्हा मला पहिल्यांदा मिपा बद्दल कळले व मी इथे आलो. आपला आकस कशाबद्दल आहे ते स्पष्ट होत नाही. असो.

In reply to by प्रा सुरेश खेडकर

इनोबा म्हणे Wed, 03/19/2008 - 14:32
विडंबन काव्याची परंपरा पुढे चालवून समृद्ध करण्यासाठी एकत्रित होवून प्रयत्न करु या.आपल्या स्वतःच्या विडंबन कविता जरुर पोस्ट करा. विडंबन काव्याची नुसती आवड असेल तरीही ही कम्युनिटी जॉईन करा व आपल्या मित्रांना सांगा.विडंबन काव्य संग्रहांची माहिती पाठवा. हे इथेही करता येण्यासारखे आहे.असो. तुमच्या 'झेंडूची फूले' या कम्युनिटीचा मी फार पुर्वीपासून सदस्य आहे. दर दोन-तीन दिवसाला कुठल्या ना कुठल्या जाहिराती (कम्युनिटी अथवा आपल्या कार्यक्रमासंबंधीत)माझ्या मॅसेज बॉक्समधे जमा होत असतात,तेव्हा जाहिरातींचा जोर थोडा कमी असायला हवा असे माझे प्रमाणिक(आणि वैयक्तीक) मत आहे. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

विसोबा खेचर यांना : ऑरकुट वर मी गेल्या दोन वर्षापासून तर मिपा वर जेमतेम २ महिन्यापासून आहे. त्यामुळे इथले रिती रीवाज आणि Who is who अजून नीट माहित नाहीत , तरी क्षमस्व. ऑरकुट वर मी मिपा चा प्रसार ( मी त्याला जाहिरात म्हणणार नाही) जरूर व लगेच करेन. श्री. अविनाश ओगले यांनी ऑर्कुटवरील माझ्या "झेंडूची फुले परंपरा " या समूहावरच "मिसळ पाव" ची माहिती दिली तेव्हा मला पहिल्यांदा मिपा बद्दल कळले व मी इथे आलो. ====================================================== इनोबा म्हणे यांना: तुम्ही माझ्या ऑरकुट वरील 'झेंडूची फूले' या कम्युनिटी चे फार पुर्वीपासून सदस्य आहात हे कळून अतिशय आनंद झाला ,पण तुम्ही इथे याआधी ओळख दिली असतीत तर जास्त आनंद झाला असता.. "दर दोन-तीन दिवसाला कुठल्या ना कुठल्या जाहिराती (कम्युनिटी अथवा आपल्या कार्यक्रमासंबंधीत)माझ्या मॅसेज बॉक्समधे जमा होत असतात,तेव्हा जाहिरातींचा जोर थोडा कमी असायला हवा असे माझे प्रमाणिक(आणि वैयक्तीक) मत आहे." ह्या आपल्या मताशी मी सहमत आहे. आपल्याला झालेल्या त्रासा बद्दल दिलगिर आहे.आपण नीट लक्षात घेतले तर असे दिसेल की ती जुनी गोष्ट असून गेल्या ३/४ महिन्यात सर्व सभासदांना ग्रूप मेसेज करणे मी जवळ जवळ बंद केले आहे. कारण आता सदस्य संख्या ५३० म्हणजे पुष्कळ बरी झाली आहे व ती प्रसाराशिवाय ( मी जाहिरात म्हणणार नाही) वाढत आहे. झाड/ मूल लहान असते तेव्हा जास्त निगा राखावी लागते तसे. माझ्या बरोबर एक वर्षापूर्वी सुरू झालेल्या अनेक समुहांची सदस्य संख्या १०च्या वर जाऊ शकलेली नाही हे आपण पाहू शकता. तसे जाहिरातेत एवढे वाईट काय आहे? आजच्या बदललेल्या युगात जाहिरात केल्याने माती पण विकल्या जाते पण जाहिरातीशिवाय सोने पण विकणे कठीण झाले आहे. " आपली आपण करी स्तुती ..... " ही समर्थांची उक्ती लक्षात ठेवल्या मुळे मराठी माणूस मागे पडतो आहे. "हे इथेही करता येण्यासारखे आहे." जरूर . कोणी नाही म्हटले? दोन्ही कडे झाले तर काय नुकसान आहे हे कळले नाही.

In reply to by प्रा सुरेश खेडकर

विसोबा खेचर Wed, 03/19/2008 - 17:06
प्राध्यापक साहेब, खुलाश्याबद्दल धन्यवाद... जास्त-कमी शब्दाबद्दल माफी असावी.. आपला, तात्या.

"ऑरकुट वर मी मिपा चा प्रसार ( मी त्याला जाहिरात म्हणणार नाही) जरूर व लगेच करेन. "ह्या माझ्या वचना प्रमाणे ऑरकुट वर "मिसळ पाव" चा प्रसार करीत आहे. कृपया ही लिंक पहावी. धन्यवाद. http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=28868095&tid=2589676827082582914&start=1 पण "मिसळ पाव" ला जाहिरातीची ( तुमच्या आगाऊपणाची) जरूर नाही असे म्हणून कोणी नाराज झाल्यास मी काय करावे असा विचार मनात येवून गेला.

In reply to by प्रा सुरेश खेडकर

पण "मिसळ पाव" ला जाहिरातीची ( तुमच्या आगाऊपणाची) जरूर नाही असे म्हणून कोणी नाराज झाल्यास मी काय करावे असा विचार मनात येवून गेला. कोणताही विचार आपल्या मनात येऊ देऊ नका. मिपाची जाहिरात ऑर्कुट वर करत राहा, आम्हीही एखादा स्क्रॅप खरडू तिथे :)
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे (केशवकुमार)यांचा "झेंडूची फुले" हा विडंबन काव्य संग्रह १९२५ साली प्रकाशित झाला.त्यानंतर अनेक कवींनी विडंबन कविता लिहिल्या आहेत.प्राचार्य राम डोके यांच्या "शतकातील विडंबन काव्य" ह्या पुस्तकात त्यापैकी काहींचा परामर्श घेण्यात आला आहे. "झेंडूची फुले" नंतर फारच मोजके विडंबन काव्य संग्रह आजपर्यंत प्रकाशित झाले आहेत.विडंबन काव्याची परंपरा पुढे चालवून समृद्ध करण्यासाठी एकत्रित होवून प्रयत्न करु या.आपल्या स्वतःच्या विडंबन कविता जरुर पोस्ट करा.

(कुणि जाल का, सांगाल का..)

चतुरंग ·

सर्किट Tue, 03/18/2008 - 21:42
आवडले ! हे गाणे आम्चे अत्यंत आवडते आहे, म्हणून आपले विडंबन त्या नितांतसुंदर चालीत लावून पाहिले. अधे मधे खडे लागताहेत. - (वसंतरावांचा भक्त) सर्किट

मुक्तसुनीत Tue, 03/18/2008 - 22:53
कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या 'केशवा'? आता तरी फाडू नको, कवनास ही गझलेस वा आधीच काव्यानदीतीरी ही रांग आहे लांबली दाद देता काव्य किंचित लिहित जाली थांबली श्वास पूर्वी आमुचा हा 'काव्य' वाचुन थांबला समजुनी मेलाच हा, तो शोक कवने वाहिला सांभाळुनी सार्‍या कवींना मी जरासे घेतले इतक्यात हलके पाय ते मग 'केशवाचे' वाजले सांगाल का त्या 'केशवा', की सोड रे आता तरी 'काळजी' आता कवींची घेई हा 'रंग्या' जरी

In reply to by मुक्तसुनीत

सर्किट Tue, 03/18/2008 - 14:54
विडंबनांतील खडे निवडण्याचे तुमचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे, सुनीत शेठ ! जियो !! - सर्किट

अविनाश ओगले Tue, 03/18/2008 - 22:59
विडंबन आवडले. खडे वगैरे सोडा. पण विडंबनासाठी कुठल्या कविता निवडाव्यात किंवा निवडू नयेत यावर चर्चा चालू आहे. माझ्या जे खावे पचण्याचे वय निघून गेले या कवितेच्या निमित्ताने.. या चर्चेत भाग घ्या...

विसोबा खेचर Wed, 03/19/2008 - 05:57
'सांभाळुनी' त्या सार्‍या कवींना मी जरासे घेतले इतक्यात हलके पाय ते 'केशवाचे' वाजले वा रंगराव, वरील ओळी बाकी मस्तच! आमचा हा केशवा जिथ्थे तिथ्थे दबक्या पावलाने फिरत असतो! :) तात्या.

सृष्टीलावण्या Wed, 03/19/2008 - 08:14
फार पूर्वीच श्वास माझा 'काव्य' वाचुन थांबला समजुनी मेलाच हा, तो शोक कवने वाहिला आपली आणि केशवसुमारांची प्रतिभा अजरा + अमर आहे. त्याचा श्वास थांबणे कसे काय शक्य आहे? लोक हो, मूळ काव्याची वसंतरावांच्या आवाजातील MP3 तुम्हाला इथे डाऊनलोड करता येईल. > > आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...

प्राजु Wed, 03/19/2008 - 08:23
आवडले. खूपच छान. सांगाल का त्या 'केशवा', की सोड रे आता तरी सार्‍या कवींची 'काळजी' घेई आता 'रंग्या' जरी आवांतर : केशवसुमार नुसति विडंबनेच लिहित नाहित. ते सुंदर गझलाही लिहितात. फक्त इथे विडंबनेच प्रकाशित करतात.. कारण त्यांनी लिहिलेल्या अप्रतिम गझलांचे दुसर्‍या कोणी विडंबन पाडू नये ही भिती असावी बहुधा... - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

बेसनलाडू Wed, 03/19/2008 - 08:42
ते सुंदर गझलाही लिहितात. --- हो का? कविता लिहितात, हे माहीत होते; पण मग प्रतिसादांनची, माला या प्रकारच्या शाब्दिक दिवाळखोरीत का कसे निघाले, हा इतिहास सर्वज्ञात असावा :) फक्त इथे विडंबनेच प्रकाशित करतात.. कारण त्यांनी लिहिलेल्या अप्रतिम गझलांचे दुसर्‍या कोणी विडंबन पाडू नये ही भिती असावी बहुधा... --- अहो पेराल तसे उगवेल :) :) (शेतकरी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार Wed, 03/19/2008 - 09:33
ह्या असल्या वैचारीक दिवाळखोळी पेक्षा शाब्दिक दिवाळखोरी परवडली पण हे वैचारीक दिवाळखोरांना कळणार कसे.. (शाब्दिक दिवाळखोर्)केशवसुमार

In reply to by प्राजु

केशवसुमार Wed, 03/19/2008 - 09:04
चुकीची माहिती.. जालावर नीट शोधल्यास आपल्याला आमच्याच गझलेंची आम्हीच केलेली विडंबने वाचायला मिळतील.. सर्वांना समान न्याय..कंपूबाजी अजिबात नाही.. आणि तशी भिती असती तर गझलाच प्रसिद्ध केल्या नसत्या.. असो.. केशवसुमार

In reply to by केशवसुमार

विसोबा खेचर Wed, 03/19/2008 - 09:33
सर्वांना समान न्याय..कंपूबाजी अजिबात नाही.. आणि तशी भिती असती तर गझलाच प्रसिद्ध केल्या नसत्या.. केशवाशी सहमत आहे. कंपूबाजी असली की दुसर्‍याच्या गझला, कविता, विडंबने तिसर्‍याच नावाने चवथ्या संस्थळावर प्रकाशित करायची वेळ येते! :) ज्ञानेश्वर महाराज की जय! :) आपला, (महान कंपूबाज) तात्या.

In reply to by केशवसुमार

प्राजु Wed, 03/19/2008 - 22:22
खरंतर, तुमची इथलि विडंबने मस्तच असतात. आणि सुरेश भटांच्या साईटवर गझलाही सुंदर आहेत. त्याची विडंबने कुठे आहेत हे सांगितलेत तर वाचेन मी नक्की. पण तुमच्यावर सरस्वतिचा वरदहस्त आहे एवढंच मला म्हणायचं होतं आणि तुमच्या (ओरिजिनल)गझला मिपाकरांना वाचायला मिळाव्यात म्हणून मी इथे तसे लिहिले. - (सर्वव्यापी)प्राजु

चतुरंग Wed, 03/19/2008 - 18:37
असो. विडंबन आवडून तसे सांगणार्‍या, खडे निवडणार्‍या आणि आवडून देखील आवडले नाही असे दाखविणार्‍या सर्वांना समान धन्यवाद!!;) चतुरंग

In reply to by मुक्तसुनीत

चतुरंग Wed, 03/19/2008 - 20:04
अहो कोपरखळी होती. तुमची भाषेवरची पकड नेमकी आहे आणि शब्दसंग्रह चांगलाच समृध्द आहे त्याचा माझ्यासारखाला फायदाच होतो. चतुरंग

सुधीर कांदळकर Wed, 03/19/2008 - 20:31
प्रतिभावंतांच्या या कोपरखळ्याच होत्या हे वाचून बरे वाटले. चतुरगराव विडंबन चान आहे. आणखी येऊ द्यात. केसु फक्त विडंबने लिहीत नाहीत, गजला देखील करतात हे वाचून आश्चर्य वाटले नाही. आम्हाला संशय होताच. दुवा जरूर द्या. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

सर्किट Tue, 03/18/2008 - 21:42
आवडले ! हे गाणे आम्चे अत्यंत आवडते आहे, म्हणून आपले विडंबन त्या नितांतसुंदर चालीत लावून पाहिले. अधे मधे खडे लागताहेत. - (वसंतरावांचा भक्त) सर्किट

मुक्तसुनीत Tue, 03/18/2008 - 22:53
कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या 'केशवा'? आता तरी फाडू नको, कवनास ही गझलेस वा आधीच काव्यानदीतीरी ही रांग आहे लांबली दाद देता काव्य किंचित लिहित जाली थांबली श्वास पूर्वी आमुचा हा 'काव्य' वाचुन थांबला समजुनी मेलाच हा, तो शोक कवने वाहिला सांभाळुनी सार्‍या कवींना मी जरासे घेतले इतक्यात हलके पाय ते मग 'केशवाचे' वाजले सांगाल का त्या 'केशवा', की सोड रे आता तरी 'काळजी' आता कवींची घेई हा 'रंग्या' जरी

In reply to by मुक्तसुनीत

सर्किट Tue, 03/18/2008 - 14:54
विडंबनांतील खडे निवडण्याचे तुमचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे, सुनीत शेठ ! जियो !! - सर्किट

अविनाश ओगले Tue, 03/18/2008 - 22:59
विडंबन आवडले. खडे वगैरे सोडा. पण विडंबनासाठी कुठल्या कविता निवडाव्यात किंवा निवडू नयेत यावर चर्चा चालू आहे. माझ्या जे खावे पचण्याचे वय निघून गेले या कवितेच्या निमित्ताने.. या चर्चेत भाग घ्या...

विसोबा खेचर Wed, 03/19/2008 - 05:57
'सांभाळुनी' त्या सार्‍या कवींना मी जरासे घेतले इतक्यात हलके पाय ते 'केशवाचे' वाजले वा रंगराव, वरील ओळी बाकी मस्तच! आमचा हा केशवा जिथ्थे तिथ्थे दबक्या पावलाने फिरत असतो! :) तात्या.

सृष्टीलावण्या Wed, 03/19/2008 - 08:14
फार पूर्वीच श्वास माझा 'काव्य' वाचुन थांबला समजुनी मेलाच हा, तो शोक कवने वाहिला आपली आणि केशवसुमारांची प्रतिभा अजरा + अमर आहे. त्याचा श्वास थांबणे कसे काय शक्य आहे? लोक हो, मूळ काव्याची वसंतरावांच्या आवाजातील MP3 तुम्हाला इथे डाऊनलोड करता येईल. > > आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...

प्राजु Wed, 03/19/2008 - 08:23
आवडले. खूपच छान. सांगाल का त्या 'केशवा', की सोड रे आता तरी सार्‍या कवींची 'काळजी' घेई आता 'रंग्या' जरी आवांतर : केशवसुमार नुसति विडंबनेच लिहित नाहित. ते सुंदर गझलाही लिहितात. फक्त इथे विडंबनेच प्रकाशित करतात.. कारण त्यांनी लिहिलेल्या अप्रतिम गझलांचे दुसर्‍या कोणी विडंबन पाडू नये ही भिती असावी बहुधा... - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

बेसनलाडू Wed, 03/19/2008 - 08:42
ते सुंदर गझलाही लिहितात. --- हो का? कविता लिहितात, हे माहीत होते; पण मग प्रतिसादांनची, माला या प्रकारच्या शाब्दिक दिवाळखोरीत का कसे निघाले, हा इतिहास सर्वज्ञात असावा :) फक्त इथे विडंबनेच प्रकाशित करतात.. कारण त्यांनी लिहिलेल्या अप्रतिम गझलांचे दुसर्‍या कोणी विडंबन पाडू नये ही भिती असावी बहुधा... --- अहो पेराल तसे उगवेल :) :) (शेतकरी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार Wed, 03/19/2008 - 09:33
ह्या असल्या वैचारीक दिवाळखोळी पेक्षा शाब्दिक दिवाळखोरी परवडली पण हे वैचारीक दिवाळखोरांना कळणार कसे.. (शाब्दिक दिवाळखोर्)केशवसुमार

In reply to by प्राजु

केशवसुमार Wed, 03/19/2008 - 09:04
चुकीची माहिती.. जालावर नीट शोधल्यास आपल्याला आमच्याच गझलेंची आम्हीच केलेली विडंबने वाचायला मिळतील.. सर्वांना समान न्याय..कंपूबाजी अजिबात नाही.. आणि तशी भिती असती तर गझलाच प्रसिद्ध केल्या नसत्या.. असो.. केशवसुमार

In reply to by केशवसुमार

विसोबा खेचर Wed, 03/19/2008 - 09:33
सर्वांना समान न्याय..कंपूबाजी अजिबात नाही.. आणि तशी भिती असती तर गझलाच प्रसिद्ध केल्या नसत्या.. केशवाशी सहमत आहे. कंपूबाजी असली की दुसर्‍याच्या गझला, कविता, विडंबने तिसर्‍याच नावाने चवथ्या संस्थळावर प्रकाशित करायची वेळ येते! :) ज्ञानेश्वर महाराज की जय! :) आपला, (महान कंपूबाज) तात्या.

In reply to by केशवसुमार

प्राजु Wed, 03/19/2008 - 22:22
खरंतर, तुमची इथलि विडंबने मस्तच असतात. आणि सुरेश भटांच्या साईटवर गझलाही सुंदर आहेत. त्याची विडंबने कुठे आहेत हे सांगितलेत तर वाचेन मी नक्की. पण तुमच्यावर सरस्वतिचा वरदहस्त आहे एवढंच मला म्हणायचं होतं आणि तुमच्या (ओरिजिनल)गझला मिपाकरांना वाचायला मिळाव्यात म्हणून मी इथे तसे लिहिले. - (सर्वव्यापी)प्राजु

चतुरंग Wed, 03/19/2008 - 18:37
असो. विडंबन आवडून तसे सांगणार्‍या, खडे निवडणार्‍या आणि आवडून देखील आवडले नाही असे दाखविणार्‍या सर्वांना समान धन्यवाद!!;) चतुरंग

In reply to by मुक्तसुनीत

चतुरंग Wed, 03/19/2008 - 20:04
अहो कोपरखळी होती. तुमची भाषेवरची पकड नेमकी आहे आणि शब्दसंग्रह चांगलाच समृध्द आहे त्याचा माझ्यासारखाला फायदाच होतो. चतुरंग

सुधीर कांदळकर Wed, 03/19/2008 - 20:31
प्रतिभावंतांच्या या कोपरखळ्याच होत्या हे वाचून बरे वाटले. चतुरगराव विडंबन चान आहे. आणखी येऊ द्यात. केसु फक्त विडंबने लिहीत नाहीत, गजला देखील करतात हे वाचून आश्चर्य वाटले नाही. आम्हाला संशय होताच. दुवा जरूर द्या. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
कवी 'अनिल' (आ.रा.देशपांडे) ह्यांची 'कुणि जाल का, सांगाल का' ही अप्रतिम रचना ही आमचे स्फूर्तिस्थान.

((कुणि जाल का, सांगाल का..))

केशवसुमार ·

बेसनलाडू Wed, 03/19/2008 - 08:39
प्रतिसादांनची?? माला??? इतकी तडजोड करायची पाळी यावी? वाईट वाटले. असो. (?)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार Wed, 03/19/2008 - 09:42
जर बरोबर लिहिलं तर मग तुमच्यासारख्या लाढवांना काम काय.. सगळ्यांचा विचार करावा लागतो.. (सर्व सामायिक)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

बेसनलाडू Wed, 03/19/2008 - 09:46
सगळ्यांचा विचार करता म्हणूनच तुम्ही केशवसुमार :) (!)बेसनलाडू

In reply to by आजानुकर्ण

बेसनलाडू Wed, 03/19/2008 - 09:44
आजुनी च्या ऐवजी अजुनही सुद्धा नसते चालले :) फारच सुमार पृच्छा बाबा तुमची :) (उत्तरदाता)बेसनलाडू

In reply to by आजानुकर्ण

केशवसुमार Wed, 03/19/2008 - 17:15
पाटी फुटली आई माला भूक लागली अशी जूनी शाब्दिक दिवाळखोरी ऐकल्याचे आठवत होते.. मजला ही चालले असते (स्मरणशील शाब्दिक दिवाळखोर)केशवसुमार

विसोबा खेचर Wed, 03/19/2008 - 09:35
कंपूत प्रतिसादांनची बरसात आहे लांबली एकमेका चिंब चुंबन देत किर्ती वाढली फार पूर्वीचा तसा हा डाव आजुन चालला आताच प्रतिसादातुनी मालाच मी कुरवाळला हा हा हा! हे बाकी मस्तच रे केशवा.... :) (कंपूबाज) तात्या.

इनोबा म्हणे Wed, 03/19/2008 - 16:38
आपून तर बॉ केशवाचा फ्यॅनच आहे,पहिल्यापासून.... गोडधोड लाडवापेक्षा मिसळच मस्त लागते... सांभाळुनी र्‍हावा जिवा तुम्ही जरासे आपले इतक्यात येथे वाजली कोण्या कवीची पावले सांगाल का या "केशवा", का खोड त्याची काढली आणि खाजेनेच या खरुज आता वाढली केशवा टेंसन नाय घ्यायचं... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

अविनाश ओगले Wed, 03/19/2008 - 20:53
मूळ गीत... केशवा, माधवा, तुझ्या नावात रे गोडवा... प्रेरणा... केशवसुमार आणि बेसनलाडू यांची मैत्रीपूर्ण शाब्दिक चकमक... केशवा, लाडवा नका भांडू ठेवा गोडवा. तरबेज सदस्यांनी विडंबन पुढे चालवावे...

ऋषिकेश Wed, 03/19/2008 - 23:00
आताच प्रतिसादातुनी मालाच मी कुरवाळला
:))) फक्कड जमलंय राव! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

केशवसुमार Sat, 03/22/2008 - 08:23
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! केशवसुमार

बेसनलाडू Wed, 03/19/2008 - 08:39
प्रतिसादांनची?? माला??? इतकी तडजोड करायची पाळी यावी? वाईट वाटले. असो. (?)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

केशवसुमार Wed, 03/19/2008 - 09:42
जर बरोबर लिहिलं तर मग तुमच्यासारख्या लाढवांना काम काय.. सगळ्यांचा विचार करावा लागतो.. (सर्व सामायिक)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

बेसनलाडू Wed, 03/19/2008 - 09:46
सगळ्यांचा विचार करता म्हणूनच तुम्ही केशवसुमार :) (!)बेसनलाडू

In reply to by आजानुकर्ण

बेसनलाडू Wed, 03/19/2008 - 09:44
आजुनी च्या ऐवजी अजुनही सुद्धा नसते चालले :) फारच सुमार पृच्छा बाबा तुमची :) (उत्तरदाता)बेसनलाडू

In reply to by आजानुकर्ण

केशवसुमार Wed, 03/19/2008 - 17:15
पाटी फुटली आई माला भूक लागली अशी जूनी शाब्दिक दिवाळखोरी ऐकल्याचे आठवत होते.. मजला ही चालले असते (स्मरणशील शाब्दिक दिवाळखोर)केशवसुमार

विसोबा खेचर Wed, 03/19/2008 - 09:35
कंपूत प्रतिसादांनची बरसात आहे लांबली एकमेका चिंब चुंबन देत किर्ती वाढली फार पूर्वीचा तसा हा डाव आजुन चालला आताच प्रतिसादातुनी मालाच मी कुरवाळला हा हा हा! हे बाकी मस्तच रे केशवा.... :) (कंपूबाज) तात्या.

इनोबा म्हणे Wed, 03/19/2008 - 16:38
आपून तर बॉ केशवाचा फ्यॅनच आहे,पहिल्यापासून.... गोडधोड लाडवापेक्षा मिसळच मस्त लागते... सांभाळुनी र्‍हावा जिवा तुम्ही जरासे आपले इतक्यात येथे वाजली कोण्या कवीची पावले सांगाल का या "केशवा", का खोड त्याची काढली आणि खाजेनेच या खरुज आता वाढली केशवा टेंसन नाय घ्यायचं... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

अविनाश ओगले Wed, 03/19/2008 - 20:53
मूळ गीत... केशवा, माधवा, तुझ्या नावात रे गोडवा... प्रेरणा... केशवसुमार आणि बेसनलाडू यांची मैत्रीपूर्ण शाब्दिक चकमक... केशवा, लाडवा नका भांडू ठेवा गोडवा. तरबेज सदस्यांनी विडंबन पुढे चालवावे...

ऋषिकेश Wed, 03/19/2008 - 23:00
आताच प्रतिसादातुनी मालाच मी कुरवाळला
:))) फक्कड जमलंय राव! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

केशवसुमार Sat, 03/22/2008 - 08:23
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! केशवसुमार
आमची प्रेरणा कवी अनिल यांची अप्रतिम रचना कुणि जाल का, सांगाल का..आणि कवी चतुरंगशेठ यांचे सुरेख विडंबन..(कुणि जाल का, सांगाल का..) कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कविजना ?

स्पिन अ यार्न

विजुभाऊ ·

विजुभाऊ Tue, 03/18/2008 - 11:14
अहो जरा हळु बोला ना.त्याना सगळे ऐकु येइल.इतके काही वाइट स्थळ नाही मोहीत चे. मालाबाई गॅसवर "नुस्तं" ढवळीत बोलल्या. आता वरपिता म्हंटला की काहीतरी अटी घालणारच की. अग पण आपण कधी घातल्या होत्या अशा आटी. माझ्या लग्नात तर ....मला अजून आठवतेय ते ..नुसती मुलगी द्या आणि नारळ एव्ढच म्हंटले होते आम्ही.....बाबा कळस्कर . काही सांगु नका तुमच्या लग्नाचे..माझ्याशीच झाले ना...मला माहीत आहे.दादानी समोर एक सांगीतले आणि माझ्या बाबांशी वेगळेच सांगितले.....आमची काहे मागणी नाही फक्त लग्नाचा सगळा खर्च तुम्ही करा नवर्‍याचा सासु-सासर्‍यांचा पोषाख्..मान्पान एव्ढेच तुम्ही करा...मालाबाई शक्य तेवढा चेहेरा शांत ठेवत म्हणल्या अहो आपण मंदाच्या लग्नाचे...आपल्या कन्येच्या लग्नाचे बोलत आहोत आपल्या लग्नातल्या गोष्ष्टींबद्दल नाही...बाबा कळस्कर

विजुभाऊ Wed, 03/19/2008 - 12:59
स्पिन अ यार्न्......म्हणजे गोष्टी मधे वाक्ये ऍड करणे...आणि गोष्ट पुढे नेणे.. यात ठरवुन काहीच होत नाही...एखादी ओळ गोष्टीला काय मार्ग देइल हे सांगता येत नाही.मजा येते त्यामुळे. भेळ बनवायला जातो आणि शिरा होतो ना तसे....... मराठीत असा प्रकार वापरुन "काचापाणी.....एन " हे कादंबरी दहा लेखकानी मिळून लिहीली आहे. गंमत म्हणजे त्या दहा जणांचे एकमेकांशी अजिबात जमत नव्हते आणि ते सगळे एक गावातही रहात नव्हते बघा जमतय का.

मनस्वी Tue, 03/18/2008 - 12:16
इकडे पोंबुरकरांच्या घरी : पोंबुरकर : आंऽऽ आता खरी मज्जा येईल बाब्याची. एकेकाळी पगार जास्त म्हणून माज करायचा माझ्यावर.. घाल आता हजार जेवणं. पुष्पाताई (सौ पोंबुरकर): अहो पण येवढे हजार जण बोलवणार कुठून.. शिवाय आपलाच खर्च वाढवलात पुन्हा हजार पत्रिका छापायचा.. काय म्हणे पराक्रम केलाय! पोंबुरकर (मनातल्या मनात) : च्यामारी खरंच की.. या पत्रिकांची पण काहीतरी आयडीया केली पाहिजे..

In reply to by मनस्वी

सृष्टीलावण्या Tue, 03/18/2008 - 12:30
अहो पण येवढे हजार जण बोलवणार कुठून.. शिवाय आपलाच खर्च वाढवलात पुन्हा हजार पत्रिका छापायचा.. हजार जणांसाठी ३०० पत्रिका लई झाल्या. ५ जणांच्या कुटुंबासाठी घरटी १. > > आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...

In reply to by सृष्टीलावण्या

मनस्वी Tue, 03/18/2008 - 14:05
सौ पोंबुरकर : हो हो.. मला नका शिकवू हो.. काय पण गणित मांडलय.. हिच हुशारी जर नोकरीत लावली असती (रडवेल्या होउन) तर आज माझ्यावर चाळीत रहायची वेळ नसती आली.. तरी बाबा म्हणत होते या पोंबुरकरापेक्षा मुटक्यांच्या दिनकराचे स्थळ चांगले आहे.. माझं नशिब दुसरं काय! आणि काय हो... लग्न करून देउन बाकीचे गुंडाळायला कोणी सांगितले तुम्हाला.. चांगला इंजिनिअर आहे आपला मोहित. माझ्या बाबांना तर चांगले लुबाडले होते तुम्ही. तेव्हाच माहित असतं हे असं ध्यान गळ्यात पडणार आहे तर मुटक्याशीच लग्न केलं असतं मी.. माझं नशिब दुसरं काय!

सृष्टीलावण्या Tue, 03/18/2008 - 12:14
याच्या स्व:च्या ओळ्खीची हजार काय पन्नास माणसे तरी असतील का?.............दोन्ही घरातले पाहुणे धरले तरी वीसावर पान जात नाही.. याच्या आज्या ने लग्नात हजार पान जेवु घातले म्हणतो. तरी तुम्हाला सांगत होते की कमलचे अठरावे लागताक्षणी उरकून टाकू पण माझं मेलीचं ऐकायला वेळ कोणाकडे आहे पण तो बघतोय सर्व वरनं. बघा, काहीतरी चमत्कार होईल आणि कमल शेवटी वन्संच्या मावसबहिणीचा गोपू आहे त्याच्याच गळ्यात माळ घालेल. मी तसा सोन्या मारुतीला नवस सुद्धा बोललेय. गोपू भले दिसायला कसा का असेना पण आज रग्गड कमावतोय... आपल्याला पै सुद्धा खर्च करावी लागणार नाही. तो हजार पानं लग्नात उठवील ती पण चांदीच्या ताटात आणि पेशवाई थाटात. > > आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...

विजुभाऊ Tue, 03/18/2008 - 14:17
पोंबुरकर (मनातल्या मनात) : च्यामारी खरंच की.. या पत्रिकांची पण काहीतरी आयडीया केली पाहिजे.. पण काय करायचे..हा लग्न पत्रिका छापायच्याच नाहित्...सरळ वर्तमान्पत्रातच बातमी द्यायची.....नको....हा नाहीतर मी सरळ कळस्करानाच सांगतो एकत्रच पत्रिका काढुया म्हणुन् . नाहीतरी दोघांच्या ओळखी एकच आहेत. पुष्पाताई (सौ पोंबुरकर): बाकी काही म्हणा आपल्या मोहीत ने मुलगी छान पाहिली हो . तुम्हाला सांगते मला मंदा लहान्पणापासुन आवडत होती. तेंव्ह कळले असते तर तेंव्हाच लग्न करुन टकले असते....खर्च ही कमी आला असता पोंबुरकर : वा वा ! काय पण विचार आहेत म्हणे .....तेंव्हाच लग्न करुन टकले असते....खर्च ही कमी आला असता आपल्या मोनीत बरोबर त्या मुलीला सांभाळण्याचा खर्चही आला असता त्याचे काय? पुष्पाताई (सौ पोंबुरकर): अहो एकुण एकच पडले असते जावै म्हणून मोहीतचा खर्च त्यानी नसता का केला? शिवाय सणावारी प्रसंगावारी काही केलं असते ते निराळेच.शिवाय मला मालाबाईंची विहीण म्हणुन मी प्रत्येक वेळी मिरवले असते......चाळीतल्या प्रत्येक प्रसंगात त्यांची मदत झाली असती ते वेगळच. झालेच तर भांडणात सुद्धा त्या माझ्या बाजुने समर्थ उभ्या राहील्या असत्या... पोंबुरकर: बास बास स्वप्न रंजन बास झाले.............लग्नाच्या तयारी चे बघा.....

धमाल मुलगा Tue, 03/18/2008 - 14:22
बाबा कळसकरः ह॑...जे जे होईल ते ते पहावे झाल॑.कार्टीन॑ माझे जोडे झिजवण्याचे पैसे वाचवले खरे, पण हलकट पो॑बुर्‍या माझ॑ दिवाळ॑ काढणार दिसत॑य! बघू, निघेल काही मार्ग. शेवटी आपली काळजी त्या व्य॑कटेशाला. मालाबाई: अहो, बसलाय व्य॑कटेश तिकड॑ तिरुपतीला निवा॑त, बसुदे की.क्काय बाई माझ॑ नशिब, असला नवरोबा कपाळी लिहिलाय. जरा माझ॑ ऐका, त्या म॑देचे कान धरून उपटा चा॑गले! कसले मेलीला भिकेचे डोहाळे...काय तर म्हणे चाळीत काय माणस॑ नसतात का? त्या गोप्याशी लग्न कर म्हणाव॑. चा॑गल॑ खडसावा तीला. (इकडे चाळीच्या गच्चीत मोहित आणि म॑दा कठड्याशी था॑बून गप्पा मारताहेत. नेहमीप्रमाणे मोहित कठड्यावर बसलेला आणि म॑दा शेजारी उभी, कठड्याला रेलून खालची रहदारी निरखत. गच्चीच्या दुसर्‍या कोपर्‍यात मोहितची मित्र-भुतावळ नेहमीसारखी राखणीसाठी हजर. अर्थात आता गरज नसली तरी सवयीने रे॑गाळलेले) दिन्या (मित्र१): च्यामायला, मोहित्याच॑ झे॑गट फिक्स झाल्यापासन॑ लै बोअर होत॑य यार! पक्या (मि.२): होणारच ना बे! म॑दीबरोबर किर्ती आणि राधिका यायच्या ना...साल॑ हल्ली त्या॑ची गरजच नाय उरली म॑दीला. फुक्काट आपली पण बो॑ब झाली ना बे! ती राधी काय जबरा लाईन द्यायची आपल्याला... दिन्या:हा॑ !! लाईन द्यायची...बेन्या मग आता काय झाल॑य? बघत पन नाय ती तुझ्याकड॑ पक्या: अबे तिचा बा पोलिस हाय ना यार..घाबरतीये ती. म॑दीला सा॑गायला पायजे आनत जा बरोबर..तेव्हढ॑च आमच॑पन गाड॑ लागल॑ रा॑गेला तर बर॑च की! दिन्या: हा॑ ना यार, आपला पण जीव त्या किर्तीपायी होतो वरखाली...किती पायर्‍या किती मजले वरखाली.... पक्या: ए..गप ना बे भैताड..साल॑ कुठुन चारोळ्या चारोळया खेळून येत॑ आणि इथ॑ आमची खोपडी झ...! गप साल्या गप नायतर रात्री तुला एक पेग कमी. असा मित्रा॑चा प्रेमळ सुखस॑वाद चालला असताना मोहित आणि म॑दा मात्र गहन विषयावर बोलत आहेत. चेहेरे ग॑भीर, वातावरणात ताण. म॑दा: असे कसे रे तुझे बाबा? वाट्टेल ते कस॑ मागतायत? मोहितः मी तरी काय करु? म॑दा: बस रडत.बाहेर नुसत्या फुशारक्या..मी य॑व करतो अन् त्य॑व करतो. बाबा॑पुढे मात्र न॑दीबैल. मोहितः बाई ग, त्या॑नी लग्नाला परवानगी देताना मला किती छळल॑य तुला माहित नाही.सध्या घरी सीन टाईट आहे ग॑. तू जरा धीर धर. मी करतो काहीतरी... म॑दा: काहीतरी म्हणजे? हे बघ, गेल्या दोन दिवसा॑पासून आपण नुसते भा॑डतोय. अरे लग्न ठरल॑य तर ही अवस्था, तर झाल्यावर काय होणार? जरा मोकळेपणाने बोल की काही. का असा बघतो आणि करतो अशी उडवाउडवी करतोस? जीव टा॑गणीला लागलाय माझा. माझ्या बाबा॑नी फटकन नाही जमत म्हणून सा॑गितल॑ ना तर बसाव॑ लागेल रडत. कळ्ळ॑??

मनस्वी Wed, 03/19/2008 - 09:40
फडके काकू (आपल्या मुलीला) : पाहिलंस ना कार्टे.. जरा शिक त्या मंदीकडून.. कसा इंजिनिअर गटवलाय तिनं.. ते पण चाळीतल्या चाळीत.. हुंडा नाही नि काही नाही.. राधी : ह्याऽऽ आपल्याला काही चाळीत रहायचं नाही.. आपण डायरेक्ट तिकिट काढणार.. अमेरिका.. काय? फडके काकू : कप्पाळ.. आधी ग्रॅज्युएट होउन दाखव.. २ वर्ष झाली विषय सोडवतीये.. अन् चाललीये अमेरिकेला. राधी (मनातल्या मनात) : मोर्‍यांचा अमित जाणारे म्हटलं अमेरिकेला.. अमू ने फक्त मलाच सांगितलिये ही गोड बातमी.. हिला कळलं तर घेरी येउन पडेल.. साधं देशपांड्यांचं स्थळ नाकारलं कोकणस्थ नाही म्हणून.. एकदा जाउदे माझा अमू अमेरिकेला.. सगळ्यांचीच तोंडं गप्प करीन.

आनंदयात्री Tue, 03/18/2008 - 15:37
हा मोहित नुसता रडकाच आहे काय करतोय कोण जाणे. उद्या मोर्‍यांच्या अमितने सी.सी.डी. मधे बोलावलेय, कित्ती दिवसांपासुन बोलावतोय तो ! जातेच कशी उद्या. ती राधी शेंबडी उगाच गुलुगुलु करत असते तिच्याशी, म्हणत होती अमेरिकेला जायच अन काय काय. ती काय करणारे अमेरिकेला जाउन ? धड बोलता तरी येते का चार लोकात ? बिच्चारा अमित, समजावते त्याला उद्या, चांगला मित्र आहे माझा तो. त्याला मीच सांभाळायला हवे !

विजुभाऊ Tue, 03/18/2008 - 15:54
म॑दा:माझ्या बाबा॑नी फटकन नाही जमत म्हणून सा॑गितल॑ ना तर बसाव॑ लागेल रडत. कळ्ळ॑?? मोहितः अरे वा माझे वडील असे वागतात ही जणु माझी च चूक असल्यासारखी बोल्तेस की. मंदा: पण तू त्याना काहीही सांगु शकत नाहीस .असच ना?लग्नानंतर ते मला काही बोलले तरी तू असंच वागणार मोहीतः अग मी तसे कुठे म्हंटले. मंदा:म्हणायची काय गरज आहे? मोहीतः अग बाई माझे आई....थांब मला जरा विचार करू दे. मंदा: विचार करु दे विचार करु दे विचार करु दे..........काहीही विचारल तरी हेच उत्तर देतो आहेस तु.... कर नुसता विचार कर्........ मोहीतः दिन्या .....ए दिन्या.... दिन्या: काय रे.... मंदा: बीडी दे जरा. पक्या/दिन्या: बीडी? मंदा: बीडी? मोहीतःहो बीडी. दिन्या: मंदे किसिंग अ स्मोकर इज लाइक लिकींग ऍन ऍश ट्रे..... मोहीतः दिन्या इथे मला जीव द्यायचे वेळ येणार आहे आणि तुला चेष्टा सुचतेय? दिन्या: ओ सॉरी सॉरी.....कसले टेनशन आहे? मोहीतः महाटेन्शन म्हण्...बाबा माझ्या लग्नाला एक पैसाही खर्च करणार नाहीत. दिन्या: यात काय टेन्शन सारखे...........रजिस्टर मॅरेज करा की. मोहीतः त्याना ते ही नकोय.लग्न थाटामाटातच कर म्हणतात. पक्या: लग्न थाटामाटातच कर म्हणतात आणि एक पैसाही खर्च करणार नाहीत..तुझे बाबा गेल्या जन्मात काय अरेबियन नाइट्स मधले सुल्तान होते की काय रे.....घडा फोडायचा नाही आणि अक्कल मात्र काढुन घ्या? मंदा: काय? दिन्या:त्यावेळी निदान त्यान प्रश्नाची उकल देणारे कोणीतरी असायचे दरबारात मंदा: ए मला सांग की ती गोष्ट. मोहीतः ए अरे गोष्टी कसल्या करताय्...........मार्ग काढा.मार्ग काहीही खर्च न करता लग्न थाटामाटात करण्याचा....

धमाल मुलगा Tue, 03/18/2008 - 17:00
आयडिया.....पक्या आवेशाने ओरडला.त्या आवाजाने दचकून मोहीतच्या हातातली सिगारेट त्याच्याच मा॑डीवर पडते..तोही केकाटतो. डबल धमाका झाल्याने म॑दा बावरते, काय करावे हे न सुचून पटकन मागे सरकते तर दिन्या पक्याकडे हात पसरुन बघत असताना त्याच्या हाता॑च्या मधोमध शिरल्याने म॑दा त्याच्या मिठीत जाऊन पोचते. पक्या सुन्न...मोहीत सर्द आणि दिन्या ठार बधीर...म॑दी लाजून आणि बावचळून काय करावे हे न सुचल्याने तशीच दिन्याच्या मिठीत ! एव्हढ्यात आण्णा भे॑डे उर्फ समस्त चाळकरी पोरट्या॑चे लाडके आण्णाकाका किर्तीला घेऊन गच्चीत येतात. आण्णा: शिव शिव शिव...रा॑डेच्च्याहो, अरे हे काय ध॑दे चाललेत? रवळनाथा, हे काय बघतोय मी!!!! दिन्या: ओ काका, काहीतरी बोलू नका. चूकून झाल॑ अस॑. आण्णा: चुकून? शि॑च्या मोहीत समोर दिसत असताना ही म॑दी रा॑डेच्ची तुझ्या मिठीत? आणि चुकून? अग गधडे, लग्न ना ठरल॑य तुमच॑? काय चाललय काय? पक्या सगळी कथा आण्णा॑ना सा॑गतो तेव्हा कुठे ते शा॑त होतात. दिन्या: ए किर्ते, तू काय करतेयस आण्णाकाका॑बरोबर? आणि ह्यावेळी? तेही इथे गच्चीत? आण्णा: दिन्या, लेका माझ्या पोरीसारखी ती. कसले प्रश्न विचारतोस रे बैला! ती माझ्याशी बोलायला आली आहे. पण ते न॑तर बोलू आम्ही. पकूबाळा, कसली आयडिया आहे तुझी? पक्या: ह्या मोह्यत्याच्या बापाला लग्न फुकटात करुन हव॑य. म॑दीचा तात पण पेटलाय. हे दोघ॑ फुल्ल्टू टे॑शन्मध्ये आलेयत. मग आपन एक आयडिया काढलिये. सरळ ह्या दोघा॑नी पळून जाऊन लग्न करायच॑. आपली टोटल सेटी॑ग आहे. काय टे॑शन घ्यायच॑ नाय. म॑त्र म्हणायला गुर्जीपासुन ते ऍफिडेव्हीट करणार्‍या वकिलापर्य॑त आपण सगळी एवस्था लाऊ शकतो. मोहीतः हो! आयडिया चा॑गली आहे. त्यात थोडी ऍडिशन कर पकूबाळा, पळून जाऊन लग्न केल्यावर आमचा जमदग्नि आम्हाला घरात काही घेणार नाही, तेव्हा आमच॑ स्वतःच॑ घर होईपर्य॑त म्हणजे एक ३-४ वर्ष॑ आम्ही तुझ्या घरी रहायला यायच॑. कस॑? आण्णा: ए कार्ट्या॑नो उगाच भा॑डू नका. मला विचार करु द्या. दिन्या: घ्या आण्णा....बिडी घ्या ! ....(समोर किर्तीला बघून) म्हणजे माझी नाहेय्ये ती...पक्यान॑ ठेवायला दिल्यात. आण्णा: दिन्या फोकलिच्या, हल्ली तू जास्तच मोकाट सुटलायस. बापसाला सा॑गायला पाहिजे. आण्णा गहन विचारात बुडले. काय कराव॑ कोणालाच कळेना...... ========= च्छ्या...पुढच॑ टाका बॉ कुणितरी...आपल्याला तर मार्ग सुचत नाही काहीही खर्च न करता लग्न थाटामाटात करण्याचा....

विजुभाऊ Tue, 03/18/2008 - 17:42
आण्णा विचारात बुडले. काय कराव॑ कोणालाच कळेना...... इकडे कळस्करांच्या घरात वेगळेच रामायण घडत होते. बाबा कळस्कर :हजार पान जेवण घालणे ह्याच्या कोणी घातली होती एव्ढी जेवणे.....त्या पेक्षा मी म्हणतो की आमच्या घरात तीन वर्षे एक वेळा जेवायला ये...तुलाच एकट्याला हजार जेवणं घालतो... मालाबाई : एवढे वैतागु नका... बाबा कळस्कर : वैतागु नको मग काय करु मालाबाई: वैतागुन प्रश्न सुटत नसतात.... बाबा कळस्कर : हे मला माहीत आहे....मीच तुला सांगितलय हे...वैतागलेल्या माणसाला हे वाक्य ;न वैतागलेला माणुसच सांगु शकतो. मालाबाई: मग वैतागा....भरपूर वैतागा..........आम्ही मेलं काही सांगायला गेलो की वैतागायाचे उगाच्....कशाला बायकांच्या जन्माला घातलस रे रवळनाथा.पुढचा जन्म पुरुषाचा दे रे बाबा.....आणि ह्यांचाच नवरा कर रे रवळनाथा. आख्खा जन्म वैतागण्यात नाही घालवला तर शपथ..... बाबा कळस्कर : जरा शांत बसता का? मालाबाई : हम्म्म्म बाबा कळस्कर : मी काय म्हणतो.... मालाबाई काहीच बोलत नाहीत बाबा कळस्कर " मी काय म्हणतो...." हे वाक्य तीन वेळा म्हणुन आणखी वैतागले...अहो ऐकताय ना मी काय म्हणतोय ते हो ...चांगले ऐकु येतय्.कान अजुन फुटले नाहीत माझे.इति मालाबाई. मग हो नाही तरी म्हणा ना.बाबा कळस्कर तुम्हीच म्हनालात ना की जरा शांत बसता का म्हणुन्...मालाबाई. छे ! चूकले माझे. आता बोलतो ते ऐका जरा सांगा मी काय म्हणतो.... सांगा ना काय ते आपण पोंबुरपेकराना एकदा सांगु का लग्न साधेपणी करुया म्हणून. कशाला ? त्या पुष्पाबाई महीला मंडळात प्रत्येक वेळा उकरुन काढतील..... मग मार्ग काढा यातून.........

In reply to by विजुभाऊ

इनोबा म्हणे Tue, 03/18/2008 - 18:19
आयला! कधी लग्न लागायचं.हिथं वर्‍हाडी लोकं भुकंनं कोकलंत बसलेत. जेवण नाय तर एखादी चपटी तरी द्या. असो,छान चालू आहे.किप गोईंग्.एकता कपूरच्या सिरीयलवानी अखंड चालू राहू द्या. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

धमाल मुलगा Tue, 03/18/2008 - 18:23
आर॑ बाबा इनोबा, रिकाम्यापोटी चपटी मारु नये. आगडो॑ब उसळतो पोटात. वर ऍशिडिटी होते ती वेगळीच.. दम धर बाबा जरा...असा नको त्या मोहीतच्या गुढग्याला बाशि॑ग बा॑धू !!!

विजुभाऊ Tue, 03/18/2008 - 19:43
इकडे पोंबुरकरांच्या कडे पुष्पाताई (सौ पोंबुरकर): लग्नाचे काय बघा...एकदा तारखा ठरू द्या....मग कमावन्सना कशी मस्त पैठणी नेसून जळवते पोंबुरकर: तुम्ही नुसत्या पैठणीच नेसा बाकी काही विचार करु नका. पुष्पाताई (सौ पोंबुरकर): पैठणी म्हंटले की मला काही सुचत नाही.तुम्हाला कितीतरी वेळा सांगितले. पण तुम्ही ........ह! पोंबुरकर: लग्न आपल्या मुलाचे आहे....तुमचे नाही पुष्पाताई (सौ पोंबुरकर):हो इतके काही वाकडे बोलायला नको पोंबुरकर: मग किती बोलु? बर ते जाउदे लग्न मला वाटत होते की मोहीत ने एखादी करोड्पती नाहीतर किमान दशलक्षपतीच्या मुलीशी तरी जमवायला हवं होते. पुष्पाताई (सौ पोंबुरकर): तशी मुलगी चाळीत नसती राहीली. आणि मोहीत ने केले ते पूर्ण विचार करुन केले असावे. मंदा नाहीतरी एकटीच आहे. त्यांचा ब्लॉक आपल्या मोहीत्लाच मिळेल ना. पोंबुरकर: अरे माझ्या ते लक्षातच आले नाही. मी उगाच कळस्कराना अटी घातल्या.त्याला जमल्या नाहीत तर उगाच लग्न मोडेल. पुष्पाताई (सौ पोंबुरकर): तुम्हाला मुळी गोष्टी जरा उशीराच समजतात. पोंबुरकर: "काहीही खर्च न करता थाटामाटात लग्नं..." ही अट कोणी मला घातली असती तर मी त्याला वेड्यातच काढले असते. पुष्पाताई (सौ पोंबुरकर): हो ना पोंबुरकर: काय? पुष्पाताई (सौ पोंबुरकर): काही नाही पोंबुरकर : मला वाटते की आपणच त्याला काहीतरी मदत करायला हवी यात पुष्पाताई (सौ पोंबुरकर):करा करा..आपणच अटी घालायच्या आणि आपणच त्या साठी मदत करायची........लोक हसतील..तोंडात शेण घालतील पोंबुरकर: एवढे काही वाईट लागत नाही ते........ पुष्पाताई (सौ पोंबुरकर): का ........य?

विजुभाऊ Wed, 03/19/2008 - 12:01
पोंबुरकर: काही नाही काही नाही तुम्ही बोला पुष्पाताई (सौ पोंबुरकर): आपणच आटी घालायच्या आणि मोडायच्या ही आपणच? पोंबुरकर: या आटीच्या घोळात अडकुन कळस्करानी लग्न मोडलं नाही म्हणजे झालं. पुष्पाताई (सौ पोंबुरकर): कशाला मोडताहेत ....लग्न मोडणे म्हणजे चेष्टा नाही...शिवाय मुलीची जात पोंबुरकर: त्याचं तुम्ही सांगु नका लग्न आपल्यामुळे मोडले हे जरी लोकाना कळले तरी मोहीत चे अवघड होइल्..स्थळे येणार नाहीत. पुष्पाताई (सौ पोंबुरकर): पण मग हा घोळ निस्तरायचा कसा. इकडे चालीत सगळ्याना या अटीची कुणकुण लागली होती. त्याचे असे झाले की "ही अशी अट मी घालतो आणि त्या कळस्कराची जिरवतो "असे पोंबुरकरानी पुष्पाताई ना कुजबुजत सांगीतले.. पोंबुरकर हे मेकॅनिकल इंडस्ट्री,मधे काम करायचे..त्यांचे साधे बोलणे सुद्धा जोरात कामगार सभेत घोषणा देत असावेत अशा आवाजात व्हायचे. त्यानी पुष्पाताई कानात कधी खाजगी प्रेमळ संवाद केला असेल त्या वेळी पुष्पाताईंच्या कानाचे काय झाले असेल अशी चाळीत नेहमी चर्चा चालायची.लहान मुले तर त्यांच्या आवाजला जाम टरकुन असायची. शोलेतल्या गब्बर सारखे " झोप नाहीतर पोंबुरकर काका हाक मारतील" येवढ्या दमावर मुले नुकतीच झोपेतुन उठली असली तरी पुन्हा झोपुन जायची. या असल्या अवाजात झालेले गुप्त खलबततीन दारे पलीकडल्या फडकेंच्या राधा ने ऐकले. जणू आपलेच लग्न ठरले असावे अशा मोहोरलेल्या अवस्थेत तिने ते गुपीत आपल्या आईला अत्यंत खाजगी आवाजात सांगितले. अगोदरच फडके काकुना ऐकु कमी यायचे अन त्य्यत कानत खूस्फूस बोलणे म्हनजे वैताग्....त्यानी कार्टे नीट बोल की..आणि "काय म्हणलीस पोंबुरकरानी लग्नासाठी आटी घातल्या" असे कमी ऐकु येत असलेल्या कानाने ऐकु यावे अशा अवाजात आश्चर्य व्यक्त केले. झाले चाळीला "प्रकट निवेदन " मिळाले... पोरे सोरे सुद्धा "मार्ग काढा.मार्ग काहीही खर्च न करता लग्न थाटामाटात करण्याचा मार्ग ....रेडी का?" अशा घोषणा १०, २०, ३०, ४० ....८० ९० १०० रेडी का? या ऐवजी देउ लागली.

विजुभाऊ Wed, 03/19/2008 - 12:17
सगळ्या चाळीत चर्चा लग्नाचीच होती.अणि लग्नापेक्षाही बाबा कळस्कर हा काहीही खर्च न करता लग्न थाटामाटात करण्याचा मार्ग कसा शोधतात यावरच होती. संसदेत असा चर्चेचा प्रस्ताव आला असता तर शेअर मार्केट नक्की ४००/५०० अंकानी कोसळले / वाढले असते. मुलाना परीक्षा अभ्यास याही पेक्षाहा मोठा विषय वाटत होता. चाळीच्या गणेश मंडाळाने तर यंदाचा देखावा हा "काहीही खर्च न करता लग्न थाटामाटात करण्याचा मार्ग" नक्कीही केला . सगळे आपपल्या परीने यावर चर्चा करत होते. लोकशाही नुसार बाबा काका नी विरोधी पक्षाकडे तक्रार करावी.चि.पराग ...वय वर्षे ११ लोकशाही पेक्षासुधा मला काय वाटते की बाबा कळस्कर काकानी हा विषय शिवसेनेकडे सांगावा ...कु.चिंगी वय वर्षे १० त्यापेक्षा आपण हे सगळे त्या श्रीशांत ला सांगुया तो पोंबुरकराना मस्त दम देइल. आणि झालेच तर सायमंड आणि भज्जी ला पण बोलवुन ठेवु भांडण झालेच तर हे खूप महत्वची ठरतील्......चाळीचा क्रिकेट कॅप्टन अरिंदम वय वर्षे...८ तू काय लेका भांडणार ! पोंबुरकर काकु किती शक्तिमान आहेत माहीत आहे का तुला?इती ..बनी (खरे नाव शतसहस्रीका )खरे वय ६ छ्या माझे डॅडी त्यांच्या पेक्षा खूप शक्तिमान असतील्.....ते रोज बूस्ट पितात्......आणी मी सुद्धा बूस्ट पितो...मी मोठा झालो की पोंबुर्कर काकू ना पाठीत एक जोरात धपाटाच घालणार आहे....चे.चिरंजीव पानसरे उर्फ टिंकू.वय पाच च्या खाली. ईकडे या अशा गप्पा चालल्या होत्या तिकडे पुरुष मंडळीत काही वेगळेच होत होते.

विजुभाऊ Wed, 03/19/2008 - 14:54
तिकडे पुरुष मंडळीत काही वेगळेच होत होते. आण्णा भे॑डे :काही तरी मार्ग काढायला हाव मार्ग कसला काढताय? मागच्याच महीन्यात सगळा रस्ता उकरून ठेवला होता. रस्ते वाहने चालवण्यासाठी असतात का उकरण्याची प्रॅक्टीस करण्यासाठी तेच कळत नाही...नाना पावशे अहो नाना तो मार्ग म्हणत नाही मी. ह्या मोहीत च्या लग्नात जे विघ्न इभे राहीले आहे त्या बद्दल म्हणतोय.. विघ्न आणणारांना बाजुला करा.शेवटी चाळीचे एकी काय कामाची...एकीचे बळ हेच खरे बळ... नाना खरे आहे तुमचे....त्या एकीमुळेच हे विघ्न उभे राहीले आहे म्हणजे? नाना बुचकळ्यात पडले.. अहो त्या एकीमुळे म्हणजे सौ.पोंबुरकर त्यांच्यामुळे च हे घडले आहे.आणाना इथे सुद्धा जोक करावासा वाटत होता.पण मोनीत ची चिंता त्यांच्या चेहेर्‍यावर साफ दिसत होती. या वेळी बंडोपंत असायला हवे होते. बंडोपंत चालीतला हरहुन्नरी माणुस गेल्याच वर्षी वारले ते.अण्णांच्या गँग मधला खंदा वीर हरवला.चाळीचा गणेशोत्सव बंडोपंतानीच सुरु केला होता. कोण्त्याही समस्ये वर बंडोपंत हमखास उपाय सुचवायचे नाना आज बंडोपंत असते तर त्यानी काय सुचवले असते यावर्.नाना पावशे काहीतरी सांगतील असे वाटुन अण्णानी चौकशी केली. मी पैजेवर सांगतो त्याना असला प्रश्न कधी पडला नसेल. कसली पैज ? मीस सुद्धा खेळतो पैज.बाजुने जाणारे बर्वे आता चर्चेत सामील झाले.

विजुभाऊ Wed, 03/19/2008 - 18:39
कसली पैज ? मी सुद्धा खेळतो पैज.बाजुने जाणारे बर्वे आता चर्चेत सामील झाले. पैज म्हंतले की बर्वेंचा उत्साह नेहमीच ऊतू जायचा.ते कशावरही पैज लावयला तयार असयचे. साधा दगड फेकला तरी तो एक्झॅट कोठे पडेल यावर सुद्धा ते पैज लावायचे.

विजुभाऊ Wed, 03/19/2008 - 19:52
मोहीत च्या लग्नावर ते काय पैज लावता याची सगळ्याना उत्सुकता होती. मी सांगतो हे लग्न होणार.....१००% होणार्.....बर्वे असे बोलल्यावर सर्वानाच जरा बरे वाटले.कारण बर्वे नेहमीच पैज जिंकायचे. हे बघ बर्वे तू पैज जिंक तुला लग्नात दोन पाने वाढतो जेवायला....आण्णा भे॑डे. पण मला सांग ही पैज कशी पूर्ण होणार? पोंबरकरांची अत कशी पुर्ण होणार? ते मलाकाय ठाऊक्...घोड्यावर पैजा लावणारे कधी स्वतः पळतात का?पैजा लावणारे एक असतात आणि पळणारे दुसरेच असतात. मग पैज कशाला लावतोस? मी पैज माझ्या आतल्या आवाजाला विचारुन लावतो...तो सांगेल तसे मी वागतो.या बाबतीत म्हणाल तर मोहीत चे लग्न होणार असा माझा आतला आवाज सांगतो. कसे ते माहीत नाही........

प्राजु Wed, 03/19/2008 - 20:46
एका, रामलाल नावाचा वॉचमन कम हरकाम्या रहात असतो. चाळीच्या जिन्याच्या खाली त्याचं बाजलं आणि बाजूला एक ट्रंक एकवढंच त्याचं सामान. त्याची बायका मुलं गावी असतात. या रामलाल सगळ्यांची कामे करत असतो. या मंदा आणि मोहितच्या प्रेमपत्रांची ने-आण, त्यांचे निरोप पोचवण्याचं काम .. मोहितच्या मित्रांच्या बरोबरीने यानेही केलेलं असत. मंदा याला मुलि सारखी. लहानपणी तिला अंगावर खेळवलेली. मोहितसारख्या हुशार मुलाशी लग्न होतय हे पाहून हा आतुन सुखावलेला पण आत तिचं बालपण सरलं आता "काका" अशी हाक मारत पळतपळत येणारी मंदा त्याला नाहि भेटणार, तर एक गृहिणी मंदा त्याला दिसणार म्हणून थोडासा व्यथित झालेला. रामलालने मंदाच्या लग्नासाठी मांडववाले, केटरिंगवाले स्वतः आणण्याची जबाबदारी घेतली. पत्रिका सुद्धा वाटायला जायला हा तयार आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

विजुभाऊ Wed, 03/19/2008 - 21:42
प्राजु....धन्यवाद्...या प्रकारात केवळ कथेचा गोषवारा देउन चालणार नाहे..कथा पुढे न्यायला तु दिलेल्या दुव्याचा उप्योग होइल तो मी करुन घेइनच. पण मला अपेक्षा आहे ती कथा पुढे नेणार्‍या कन्टेन्ट ( याला मराठी शब्द्..........हा आठवला...मजकूर...बरोबर ना तात्या) ची. तसा मजकुर टाक्......कथेच्या अनुषंगाने येणार्‍या व्यक्ति / स्थळे ( दोन्ही अर्थानी) येउ दे.

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ Wed, 03/19/2008 - 21:53
प्राजु हे असे येइल बघ... मोहीत चे लग्न होणार असा माझा आतला आवाज सांगतो. कसे ते माहीत नाही........ मी सांगतो ...इतका वेळ केवळ चर्चा ऐकत असलेला चाळीचा वॉचमन रामलाल पुढे आला. त्याने खरे तर मोहीत आणि मंदाला लहान पणापसून पाहीले होते...त्यालाही मनातुन ही दोन्ही पोरे आवडत होती...शिवाय त्या दोघांच्या प्रेमाल तो एक साक्षीदार होताच ना. माझ्या डोक्यात एक आयडीया हाय साहेब बघा...आपन असं करुया का...

In reply to by सुधीर कांदळकर

विजुभाऊ Wed, 03/19/2008 - 21:52
सुधीर भाऊसाहेब धन्यवाद.उगीच आचरट फोडणी टाकली नाही त्याबद्दल .....( मला वाटते हा मि पा सदस्यांचा मोठेपणा आहे..कोणीच तशा कॉमेंट्स टाकल्या नाहीत्.कथा पूर्ण झाल्यावर बहुतेक कॉमेंट्स येतील) पण तुम्हीही लिहायला हरकत नाही...प्राजु ला जे सांगितलय तेच तुम्हालाही........यु आर ऑलवेज वेल्कम्.........भाऊ

प्राजु Wed, 03/19/2008 - 21:58
विजुभाऊ.. अगदी बरोबर... मी सांगतो ...इतका वेळ केवळ चर्चा ऐकत असलेला चाळीचा वॉचमन रामलाल पुढे आला. त्याने खरे तर मोहीत आणि मंदाला लहान पणापसून पाहीले होते...त्यालाही मनातुन ही दोन्ही पोरे आवडत होती...शिवाय त्या दोघांच्या प्रेमाल तो एक साक्षीदार होताच ना. त्याने ही पैजेची चर्चा ऐकलेली असते. वॉचमन : अहो बर्वे साहेब, भेंडे साहेब... काय त्या दोन पोरांच्या लग्नाच्या पैजा लावताय?? अहो आपलीच लेकरं ती.. त्या दोघाच्या घरच्यांना जमेल तशी मदत करायच सोडून काय हे घेऊन बसलात? भेंडे : गप रे... तुला काय करायचं आहे? तू जा तुझ्या कामाला.. तू नको शिकवू आम्हांला.. वॉचमन : कामाचं करायला आलो होतो. भेंडे वहिनीनी घरी बोलावलं आहे. तुमचा मुलगा मंगेश बहुतेक पुन्हा काहीतरी बाहेर मुलांशी मारामारी करून आला आहे.. त्याच्या अंगावर लागल्याच्या खुणा आहेत. तेव्हा चला आता. (सगळ्यांचे चेहरे.. भेंडेंच्या चेहर्‍यावरील भाव पहात आहेत. भेंडे थोडे ओशाळून.. आणि मग चिडून) भेंडे : काय?? मंगेशने पुन्हा.............! देवा देवा... काय होणार या मंगेशचं? ...(लगेच राग आवरून) .. अहो.. जरा भडकू आहे... चालायचंच.. नाही का हो?? उठून रामलाल सोबत निघतात घरी जाण्यसाठी. - (सर्वव्यापी)प्राजु

विजुभाऊ गुरुवार, 03/20/2008 - 10:30
अण्णा भेंडे रामलाल सोबत घरी जाण्यसाठी निघाले.त्या गडबडीत रामलाल काय सांगत होता ते कोणाच्या लक्षात च आले नाही. रामलालचा मुद्द तसाच राहीला. भेंड्यांच्या मंगेशला थोडे लागले होते हाताला खरचतले होते...कोठेतरी रस्त्यावर वाळुवरुन बाइक घसरली अन हाताला खरचटले. पोंबुरकर त्याच रस्त्याने जात होते त्याने ते पाहीले आणि त्याल ते रिक्षात घालुन घेउन आले.

विजुभाऊ गुरुवार, 03/20/2008 - 13:08
मंगेश सुख्ररूप आहे हे पाहुन आण्णा भेंडे शांत झाले..पोंबुरकरना पाहुन रामलाल वॉचमन काहीतरी बोलणार इतक्यात त्याला आण्णांचे बोलणे आठवले..आणि तो गप्प बसला .... तेवढ्यात आण्णानीच विषयाला तोंड फोडले........ पोंबुरकर तुम्ही म्हणे लग्नासाठी आटी घतल्या आहेत... हो..... ही सर्वस्वी तुमची खासगी बाब आहे मी काही विचारले तर रागावु नका. आपण सारे या चाळीत गेली सव्वीस वर्षे रहातो..एक्मेकांची सुखदुखे: वाटतो....मोहीत/ मंदा याना तर माझ्या अंगाखांद्यावर खेळवले आहे.........मला दोघेही मुलांसारखीच आहेत. मला माहीत आहे ते आण्णा .तुम्ही काय विचारणार आहत तेही माहीत आहे.....मी या अशा अटी का घातल्या म्हणुन विचारणार आहत ना? मला राग नाही येणार्.तुम्ही काय बाहेरचे आहत काय? पोंबुरकर आश्चर्य वाटावे ईतक्या सरळ्पणे बोलले. आण्णा पहातच राहीले..त्याना हे अपेक्षीतच नव्हते. मंदा चांगली मुलगी आहे. मला ती सून म्हणुन घरात आली तर आनंद्च आहे. पण मग ही अशी अट का घातली. आण्णा मी कामगार माणूस्..आयुष्यात जे काही मिळाले ते कष्ट करुन...आयुष्यात कोणतीही गोष्ट सरळ्पणे माझ्या वाट्यालाच आली नाही. माझ्या मुलाना पण मी सगळे मिळव ते कष्ट करुन मिळव असेच सांगतो. त्याचा आणी लग्नाचा काय संबंध? आहे ना. प्रेम विवाहात सगळे अगदी सरळ पणे झाले तर त्याची काय गंमत्...काही तरी विरोध्..त्याचा सामना...काहीतरी उचापत्या..त्या निस्तारणे..धड्पणे यात मजा आहे...यातच मित्रांची / आणी स्वतःची सुद्धा खरी कसोटी लागते.. खर्‍याच्या कसोटीला उतरले की मग ते प्रेम शुद्ध सोने होउन येते....त्याची मजा काही औरच असते......यावर माझा विश्वास आहे. माझी अट कळस्कारांसाठी नाही.ती मोहीत आणि मंदा साठी आहे.... पाहुया ते कसे मार्ग काढतात " काही खर्च न करता थाटामाटात लग्न " या अटीतुन....

मनस्वी गुरुवार, 03/20/2008 - 14:00
मोहित, मंदा आणि मित्रमंडळी काहीतरी मार्ग शोधत असतात. मोहित : आमचे बाबा म्हणजे जर चमत्कारीकच आहेत.. काय तर म्हणे काही खर्च न करता थाटामाटात लग्न. मंगेश : म्हणजे नक्की काय म्हणायचय त्यांना. किर्ती : काहीच कळत नाही काय आहे काकांच्या मनात आणि नक्की त्यांना काय म्हणायचंय. मोहित : पहिल्यापासूनचंच आहे.. काहीतरी असंबद्ध बोलायचं. त्यांचं त्यांना तरी कळतंय का काही खर्च न करता थाटामाटात लग्न म्हणजे काय.. काहीतरी भंकस मारत असतात नेहेमी. मंदा : (जोरात किंचाळते) एऽऽ मला एक जबरा आयडिया सुचलीये.. आपण नगरसेविका मंगलाताई उचलबांगडे यांच्या सामुदायिक विवाहसोहोळ्यात भाग घ्यायचा का.. काही खर्चही नाही आणि हजार काय चांगली ४-५ हजार जेवतील.. घ्या म्हणावं! मोहित : वाऽ मंदे.. अगं आज पहिल्यांदा वाटलं तुझ्या डोक्यात अक्कल नावाचा प्रकार थोडातरी आहे ते!

विजुभाऊ गुरुवार, 03/20/2008 - 18:01
ए चल चल त्या मंगलाताई ना फोन करुया ए पक्या लाव रे त्याना फोन तुझा मोबाइल दे की का माझा बॅलन्स संपलाय. तुझं नेहमीच असे कसं असते रे पक्या.कधीही विचारा तुझा बॅलन्स संम्पलेलाच्.कीर्ति.. मोबाइल च्या रीचार्ज चा विषय निघाला की पक्याचे डोके सटकायचे...ए कीर्ते हे बघ मी कोणाला मोबाइल मागत नाही... आणि कोणाला करत पण नाहीस्..कीर्ति पक्याला आडवे बोलयचा एकही चान्स सोडायची नाही .तुझ्या हॅन्ड्सेट्ला सुद्धा फक्त मिसकॉल द्यायची सवय लागली आहे.. ए गप बसाकी ...भांडायला पण काळ्वेळ असतो.दिग्या वैतागला.काय चाललय काय कारताय ... ए हा घे या वरुन लाव फोन. मंदाने तीचा मोबाइल पक्याकडे जवळ्जवळ फेकलाच तीला घाइ झाली होती. आणि तो स्पीकर ऑन कर म्हणजे सगळ्याना ऐकु येइल. हं लाव रे. पक्या ने नंबर फिरवला हॅलो..........कोण बोलतय फोन तुमने घुमाया है..तुम बोलो ना कोन बोलताहै मी मी प्रकाश प्रकाश बापट तो मंगलाताई आहेत का? कौन मंगलाताई इधर कोइ मंगलाताई नही है..चंपा ,चमेली , पारो , हुस्ना,मेरी , फरीदा, काजोल इनमेसे कोइ चाहिये तो बोलो. अ....अं... अहो कोण बोलता आहत तुम्ही मै..बाबू पिस्तूल जल्दी बोल कौन चाहीये? काही नाही काही नाही सॉरी सॉरी रॉन्ग नंबर... पक्याने फोन कट केला.त्याला घाम फुटलाहोता ए पक्या कोणता नंबर फिरवला होतास. हा दिग्या ने दिला होता मला कालच

मनस्वी गुरुवार, 03/20/2008 - 18:44
पक्या : ए माकड्या कुठले नंबर देतोस्स्स्स्स्.. दिग्या : अरे तो नाही तुला अजुन एक नंबर दिलेला ना तो फिरव यड्या.. (पक्या नंबर फिरवतो.) हॅलो, मंगलाताई उचलबांगड्यांचे ऑफीस का? हो. आपण? मी गपचूप चाळीतून दिगंबर डोईफोडे बोलतोय. मंगलाताईंना भेटण्यासाठी अपॉईंट्मेंट घ्यायची होती. आत्ता आले तर चालेल का? मॅडम सुंदर मी होणार ब्युटीपार्लरच्या उद्घाटनाला गेल्यात. मग.. उद्या सकाळी? सकाळी मॅडमना प्रोग्रॅम आहे. हौसमौज महिलामंडळाच्या कबड्डी स्पर्धेच्या अध्यक्षा आहेत त्या. तुम्हीच सांगा मग कधी येउ ते. विषय काय आहे. आपला तो सामुदायिक विवाहसोहोळा.. ओहोहो.. अस्सं अस्सं.. असं करा तुम्ही प्रत्यक्षच या इकडे. मी सगळी माहिती देतो. आणि मॅडमना भेटायचे असेल तर तेव्हाच अपॉईंट्मेंट फिक्स करू. ओके.. आपलं नाव.. मी जनार्दन खोडमोडे.. मॅडमचा पीए. ओके थँक्यू खोडमोडे साहेब. पक्या : चला.. आता ठरवा.. कोण कोण जायचं खोडमोड्याला भेटायला आणि काय बोलायचं तिथं.. म्हंजे काय काय चौकशा करायच्या..

विजुभाऊ गुरुवार, 03/20/2008 - 19:23
पक्या मला वाटते आपण जाण्यापेक्षा भेंडे आण्णा ना घेउन जाउ. जरा मोठे कुणी बरोबर असेल तर बरे.दिगंबर कधी नव्हे तो मुद्देसूद बोलला ही सगळी मंडळी आण्णांकडे गेली. आण्णाने सगळ्यांचे शांतपणे ऐकुन घेतले.शांतपणे ऐकणे हा भेंडे आण्णांचा गुण त्यामुळेच चाळीतल्या तरुण मंडळाला आण्णा हे प्रत्येक्वेळी आधार वाटायचे. मलासुद्धा हीच आयडीया आली होती.मी मंगलाताईंना फोन ही केला होता काय म्हणाल्या त्या.सर्वानी जणू शाळेत एक साथ नमस्ते म्हणतो तसे एका सूरात विचारले.. त्या म्हणाल्या की सामुदायिक विवाहसोहोळा हा फक्त दारीद्र्य रेषेखालील लोकांसाठीच आहे.शिवाय त्यात जोडप्यांची संख्या १२१ पूर्ण झाली आहे.आता एकही जोडपे जास्त नोंदवले जाणार नाही. फक्त दारीद्र्य रेषेखालील लोकांसाठीच आहे? मंदा बेशुद्ध्च पडायची बाकी होती. लोक पूर्वी लग्न व्हावे म्हणून उसने ऐष्वर्य दाखवायचे....आता दारीद्र्यदाखवुन लग्ने जमवावी लागतात..हंम्म्म्म्म्म्म्म खरच कलीयुग आलय :दिग्या तोंड वाकडे करत म्हणाला दिग्या यात कलीयुगाचा संबंध काय? कीर्तिने याही वेळा संधी सोडली नाही दरीद्रीच व्हायचे ना? त्यात विषेश काय? पक्याच्या डोक्यात काही तरी नवी आयडीया आली असावी.त्याचे डोळे चमकत होते .सरळ नोकरी सोडुन दे मग दरीद्री आणि बेकार दोन्ही होशील. वा वा काय पण टाळके चालवलय्...दिन्या त्याचे वाक्य तोडीत म्हणाला..काय तर म्हणे नोकरी सोडुन दे मग दरीद्री आणि बेकार दोन्ही होशील . आता तात्पुरते सिझनल दरीद्री आणि बेकार होणे ठीक आहे पण त्यानन्तर परिस्थिती तशीच राहीली तर? पोंबुरकर काकु मंदाला पांढर्‍या पायाची म्हणतील त्याचे काय्...म्हणतील की लग्ना अगोदरच सुनेने गुण दाखवले.... पण मग करायचे काय.........बराच वेळ सगळे गप्पच होते. अस्वस्थ झालेल्या दिगुने काही तरी बोलायला तोंड उघडले पण कीर्ति कदडे पाहुन त्याने उघडलेले तोंड पुन्हा मिटले. मला एक आयडीया सुचल्येय्......शांततेला तदा घालवत कीर्ति आणि मंदा दोघीही एकदम बोलल्या.अणि मग एकमेकांकडे पाहु लागल्या तु सांग कीर्ति अगोदर मग मी सांगेन. मला काय वाटते आपण असे करुया का कसे..सगळे पुन्हा एका सुरात ओरडले आपण असे करु या का ....आपणच चाळीच्या गणेश मंडळातर्फे सामुदायिक विवाहसोहोळा आयोजित करुया?कीर्ति ने तीची कल्पना मांडली. वा! मी हेच म्हणणार होते कीर्ति.....मंदा उत्साहाने ओरडली

विजुभाऊ Tue, 03/25/2008 - 15:44
आपणच चाळीच्या गणेश मंडळातर्फे सामुदायिक विवाहसोहोळा आयोजित करुया? कीर्तिच्या या वाक्याने सगळ्यांचे चेह्रे उजाळले.काहीतरी वेगळा पण मार्ग सापडला होता. आपली फुल्ल तयारी आहे. मस्तच मंगलाष्टके म्हणणारे , बँडवाले , केटरर , सगळ्यातच बचत होइल ..आणि लग्नाला हजार पान सहज जेवेल ...दिग्या पक्याला एकदम उत्साह आला होता....कधी नव्हे ते खूप मोठी जबबदारी असलेले काम करयाला मिळणार होते. लग्नात आपण विवीध गुणदर्शनाचा कर्यक्रम ही ठेउया........ ए विवीध गुणदर्शन नन्तर करुया...अगोदर सामुदायिक विवाह करयाला काय काय तयारी लागेल ते बघुया...कीर्ति ने सर्वाना जमिनीवर आणले...... काय काय म्हणजे? सर्वात अगोदर विवाह करणारी जोडपी आणि त्याहून महत्वाचे हॉल ,या शहरात एकवेळ बाकी सगळे मिळेल लग्नाचा हॉल ऐन तिथीला मिळणे म्हणजे..............कीर्ति ने वाक्य अर्धवटच सोडले.......... मंदाने चमकुन तिच्याकडे पाहीले.

सृष्टीलावण्या Sun, 03/23/2008 - 07:40
आपणच चाळीच्या गणेश मंडळातर्फे सामुदायिक विवाहसोहळा आयोजित करुया? कीर्तिच्या या वाक्याने सगळ्यांचे चेह्रे उजळले दिग्या, पक्याला तर ह्या वाक्याने धीर आला, कदाचित् आता सामुदायिक विवाह सोहळा एवीतेवी होणारच आहे तर आपली सुद्धा वाजंत्री वाजण्याचा योग आहे म्हणायचं असे दोघांनाही मनापासून वाटले. इकडे मंदाला वाटले, कीर्तिलाच का अश्या छान छान कल्पना सुचाव्यात आणि दरवेळी चार लोकांसमोर तिचेच का कौतुक व्हावे. आता असूयेपोटी ती ह्या चांगल्या कल्पनेला विरोध करण्यासाठी सबबी शोधू लागली. > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

विजुभाऊ Tue, 03/25/2008 - 15:57
या शहरात एकवेळ बाकी सगळे मिळेल लग्नाचा हॉल ऐन तिथीला मिळणे म्हणजे..............कीर्ति ने वाक्य अर्धवटच सोडले.......... मंदाने चमकुन तिच्याकडे पाहीले. तीला आठवले..बहीणीच्या लग्नात तिथी ही हॉल मिळण्यावर ठरवली होती.........त्यनन्तर बाकीच्या गोष्टी हो ना खरे आहे...आण्णा म्हणाले अगोदर आपल्याला काय काय करावे लागेल त्याची यादी करुया हॉल , पत्रिका , केटरर , पुरोहीत , फुले , कपडे , फोटोवाले......एक एक जण सांगु लागला.लीस्ट लांब होत होती लीस्ट करता करता प्रत्येकजण मनोमन म्हणत होता...खरे आहे घर पहावं बांधुन आणि लग्न पहावं करुन

विजुभाऊ Tue, 04/01/2008 - 09:54
मनस्वी च्या आवाहनास जागुनः "स्पिन अ यार्न" पुढे सुरु करत आहे लीस्ट संपतच नव्हती. काय काय म्हनून करायचे? नवर्‍या मुलाचा मेक अप नवरी चा हार मुंडवळ्या इथ पासुन ते वरातीत कोणत्या कॅसेट वाजवायच्या जेवण काय काय असेल. य सगळ्या गोष्टी मिळतील पण या मुम्बई मधे लग्नाचा हॉल मिळणार नाही. आण्णा अजुन हॉल या एका मुद्द्यवरच अडकले होते आण्णा आपण असे करु या का?आपण चाळीच्या चौकात मोठा मांडव उभा करुया. त्यात लग्ने होतील आणि वर्हाडी लोकांची जेवणाचे सोय चाळीच्या टेरेस वर करुया. पक्या अरे वा पक्या काय मस्त सजेशन्...कीर्ति एक्दम म्हणाली. अन लागलीच तर शेजारच्या चाळीत ही गच्ची आहे.ते पण वापरता येइल. पक्या ने जरा अविश्वासानेच पाहीले.कीर्ति ने त्याला मस्त म्हणणे हे जरा धक्कादायकच होते. तीने त्याला चांगले म्हणणे हे साप मुंगस मित्र होण्याइतके दुरापस्त होते. मी त्या नामजोशीना सांगतो.ते देतील गच्ची. आण्णाना मुलांची ही आयडीया पटली. आता लग्न आवाक्यात वाटत होते. आरे ते सगळे खरे पण आपल्याला सामुदायीक लग्नासाठी जोडपी हवीत्.ती कोठुन आणणार ? ह्या: त्यात काय सरळ एक बोर्ड लावायाचा. हे मुंबई आहे इथे काहीही करा लोक तयार असतात. आपण चाळीच्या नाक्यावर बोर्ड लाउया.लग्न करुन देउ म्हणुन.... हे बाकी खरे हो दिग्या..आपण आपल्याला पार्टी करायची होती तेंव्हा काय भन्नाट आयडीया केली होती. पक्याला आता उत्साह आला होता.कीर्ति ने त्याला चांगले म्हंटले याचा धक्का अजुन ओसरला नव्हता. आठवते ना तुला तर रे. आडगाव च्या भैरोबा सन्स्थान १० /१० रु.ची पावती पुस्तके छापुन घेतली आणि लोकल मधे खपवली. लोकानी एकानीही विचारले नाही की हे आडगाव कुठे आहे म्हणुन.भरीत भर म्हणून आपण खडू चे भुकटी अंगारा म्हणुन लावत होतो. खडु सुद्धा कॉलेज चे ढापलेले. पण पार्टी काय जोरदार झाली होती नाही? भैरोबा ची यात्रा सुधा इतक्या जोरात होत नाय. भैरोबा ला जोरात चांगभले करुन चांगला तीर्थाचा नैवेद्य पण दाखवला होता आपण . मला वाटला नव्हते राव की आपले भीडु इतके "तीर्थन्कर" असतील म्हणुन इतकी जोरदार पार्टी त्या जी एस ने पण दीली नाही कोणाला. त्याचा चेहेरा बघायला हवा होतास पार्टी झाल्यावर तू ए गप्पा सोडा आधी लग्नाळु जोडपी शोधा मग पार्टी चे बघा. कीर्ति ने दोघाना ही चापले. नाय तर असे करायचे का? कसे? मीकाय म्हणतो...... दिग्या तु काही म्हणु नकोस्.......पक्या जोरात ओरडला. तो का ओरडला कोणालाच कळाले नाही........

प्रमोद देव Tue, 04/01/2008 - 11:39
कोळस्कर आणि पोंबुरकर टपरीवर चहा पीत आहेत. काय म्हणा कोळस्कर... तुमची आयडियाची कल्पना बाकी झकास आहे..इति.पोंबुरकर! आहे ना! मग! कसे सगळे चक्रावलेत बघा. पण जाऊ दे. आता आज सांगूनच टाकू या सगळ्यांना! काय? कळले ना तुम्हाला?... इति.कळस्कर! अहो कळले म्हणजे काय? आपण दोघांनीच तर ठरवलंय ना? मग आज सांगितलेच पाहिजे!...इति. पोंबुरकर! आणि दोघे ग्लासाला ग्लास(चहाचा)भिडवत ओरडतात.... एप्रिल फूलऽऽऽऽऽऽ!

वरदा Wed, 04/02/2008 - 04:39
पक्या ने ओरडून दिग्याला शांत बसवले...त्याची आयडीया हाणून पाडण्यत किर्ती आपला सगळा वेळ वाया घालवेल त्यापेक्षा त्याला गप्प बसवलेले बरे म्हणून त्याने ओरडून जाहीर केले.किर्ती आपल्या सगळ्यांची मुख्य तिच्या म्हणण्याप्रमाणे करुयात. आता किर्तीला स्फुरण चढले.तिने ओळखीच्या दोन तीन ब्युटीपार्लर मधे जाहीराती लावल्या, जोडपी मिळाली तर मेकअप साठी इथेच घेऊन येईन ह्या प्रॉमिस वर. तिथे मंदाचा जळफळाट होत होता.लग्न माझं आणि महत्व मात्र किर्तीला? तिने मंदारला आडून आडून बोलूनही दाखवलं तर त्याचं उत्तर एकच अगं कमीत कमी कष्टात आपल्याला लग्न करुन मिळतय तेही बाबांच्या अटीप्रमाणे कुणी का अरेंज करेना आपल्याला काय? आणि आपली मैत्रीणच आहे की ती. पण मंदाने ठरवलं काहीतरी करुन तिचं महत्व कमी करायचच. जरा अद्दल घडवलीच पाहिजे हीला. महत्वाचा मुद्दा होता मुहुर्त निश्चित करण्याचा. कोळस्कर आणि पोंबुर्करांनी इथेही नाट लावली होती. कोळस्करांनी मुहुर्त सांगितला की पोंबुरकर नाही म्हणायचे आणि पोंबुरकरांनी ठरवला की लगेच काहीतरी न जमण्याचं कारण पोंबुरकरांकडे तयार असायचं. श्रावण महीना फार सण असतात उपासाच्या दिवसात काहींना जेवता येणार नाही. भाद्रपद खरा गणेशोत्सव असतो चाळीत तेव्हा कसं जमणार. नंतर दिवाळीची सुट्टी म्हणून लोक बाहेरगावी जातात तेव्हा नको. एक ना दोन हजार खुसपटं निघत होती. ह्यावेळी मंदाही त्यांना सामील झाली होती.

विजुभाऊ Tue, 03/18/2008 - 11:14
अहो जरा हळु बोला ना.त्याना सगळे ऐकु येइल.इतके काही वाइट स्थळ नाही मोहीत चे. मालाबाई गॅसवर "नुस्तं" ढवळीत बोलल्या. आता वरपिता म्हंटला की काहीतरी अटी घालणारच की. अग पण आपण कधी घातल्या होत्या अशा आटी. माझ्या लग्नात तर ....मला अजून आठवतेय ते ..नुसती मुलगी द्या आणि नारळ एव्ढच म्हंटले होते आम्ही.....बाबा कळस्कर . काही सांगु नका तुमच्या लग्नाचे..माझ्याशीच झाले ना...मला माहीत आहे.दादानी समोर एक सांगीतले आणि माझ्या बाबांशी वेगळेच सांगितले.....आमची काहे मागणी नाही फक्त लग्नाचा सगळा खर्च तुम्ही करा नवर्‍याचा सासु-सासर्‍यांचा पोषाख्..मान्पान एव्ढेच तुम्ही करा...मालाबाई शक्य तेवढा चेहेरा शांत ठेवत म्हणल्या अहो आपण मंदाच्या लग्नाचे...आपल्या कन्येच्या लग्नाचे बोलत आहोत आपल्या लग्नातल्या गोष्ष्टींबद्दल नाही...बाबा कळस्कर

विजुभाऊ Wed, 03/19/2008 - 12:59
स्पिन अ यार्न्......म्हणजे गोष्टी मधे वाक्ये ऍड करणे...आणि गोष्ट पुढे नेणे.. यात ठरवुन काहीच होत नाही...एखादी ओळ गोष्टीला काय मार्ग देइल हे सांगता येत नाही.मजा येते त्यामुळे. भेळ बनवायला जातो आणि शिरा होतो ना तसे....... मराठीत असा प्रकार वापरुन "काचापाणी.....एन " हे कादंबरी दहा लेखकानी मिळून लिहीली आहे. गंमत म्हणजे त्या दहा जणांचे एकमेकांशी अजिबात जमत नव्हते आणि ते सगळे एक गावातही रहात नव्हते बघा जमतय का.

मनस्वी Tue, 03/18/2008 - 12:16
इकडे पोंबुरकरांच्या घरी : पोंबुरकर : आंऽऽ आता खरी मज्जा येईल बाब्याची. एकेकाळी पगार जास्त म्हणून माज करायचा माझ्यावर.. घाल आता हजार जेवणं. पुष्पाताई (सौ पोंबुरकर): अहो पण येवढे हजार जण बोलवणार कुठून.. शिवाय आपलाच खर्च वाढवलात पुन्हा हजार पत्रिका छापायचा.. काय म्हणे पराक्रम केलाय! पोंबुरकर (मनातल्या मनात) : च्यामारी खरंच की.. या पत्रिकांची पण काहीतरी आयडीया केली पाहिजे..

In reply to by मनस्वी

सृष्टीलावण्या Tue, 03/18/2008 - 12:30
अहो पण येवढे हजार जण बोलवणार कुठून.. शिवाय आपलाच खर्च वाढवलात पुन्हा हजार पत्रिका छापायचा.. हजार जणांसाठी ३०० पत्रिका लई झाल्या. ५ जणांच्या कुटुंबासाठी घरटी १. > > आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...

In reply to by सृष्टीलावण्या

मनस्वी Tue, 03/18/2008 - 14:05
सौ पोंबुरकर : हो हो.. मला नका शिकवू हो.. काय पण गणित मांडलय.. हिच हुशारी जर नोकरीत लावली असती (रडवेल्या होउन) तर आज माझ्यावर चाळीत रहायची वेळ नसती आली.. तरी बाबा म्हणत होते या पोंबुरकरापेक्षा मुटक्यांच्या दिनकराचे स्थळ चांगले आहे.. माझं नशिब दुसरं काय! आणि काय हो... लग्न करून देउन बाकीचे गुंडाळायला कोणी सांगितले तुम्हाला.. चांगला इंजिनिअर आहे आपला मोहित. माझ्या बाबांना तर चांगले लुबाडले होते तुम्ही. तेव्हाच माहित असतं हे असं ध्यान गळ्यात पडणार आहे तर मुटक्याशीच लग्न केलं असतं मी.. माझं नशिब दुसरं काय!

सृष्टीलावण्या Tue, 03/18/2008 - 12:14
याच्या स्व:च्या ओळ्खीची हजार काय पन्नास माणसे तरी असतील का?.............दोन्ही घरातले पाहुणे धरले तरी वीसावर पान जात नाही.. याच्या आज्या ने लग्नात हजार पान जेवु घातले म्हणतो. तरी तुम्हाला सांगत होते की कमलचे अठरावे लागताक्षणी उरकून टाकू पण माझं मेलीचं ऐकायला वेळ कोणाकडे आहे पण तो बघतोय सर्व वरनं. बघा, काहीतरी चमत्कार होईल आणि कमल शेवटी वन्संच्या मावसबहिणीचा गोपू आहे त्याच्याच गळ्यात माळ घालेल. मी तसा सोन्या मारुतीला नवस सुद्धा बोललेय. गोपू भले दिसायला कसा का असेना पण आज रग्गड कमावतोय... आपल्याला पै सुद्धा खर्च करावी लागणार नाही. तो हजार पानं लग्नात उठवील ती पण चांदीच्या ताटात आणि पेशवाई थाटात. > > आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...

विजुभाऊ Tue, 03/18/2008 - 14:17
पोंबुरकर (मनातल्या मनात) : च्यामारी खरंच की.. या पत्रिकांची पण काहीतरी आयडीया केली पाहिजे.. पण काय करायचे..हा लग्न पत्रिका छापायच्याच नाहित्...सरळ वर्तमान्पत्रातच बातमी द्यायची.....नको....हा नाहीतर मी सरळ कळस्करानाच सांगतो एकत्रच पत्रिका काढुया म्हणुन् . नाहीतरी दोघांच्या ओळखी एकच आहेत. पुष्पाताई (सौ पोंबुरकर): बाकी काही म्हणा आपल्या मोहीत ने मुलगी छान पाहिली हो . तुम्हाला सांगते मला मंदा लहान्पणापासुन आवडत होती. तेंव्ह कळले असते तर तेंव्हाच लग्न करुन टकले असते....खर्च ही कमी आला असता पोंबुरकर : वा वा ! काय पण विचार आहेत म्हणे .....तेंव्हाच लग्न करुन टकले असते....खर्च ही कमी आला असता आपल्या मोनीत बरोबर त्या मुलीला सांभाळण्याचा खर्चही आला असता त्याचे काय? पुष्पाताई (सौ पोंबुरकर): अहो एकुण एकच पडले असते जावै म्हणून मोहीतचा खर्च त्यानी नसता का केला? शिवाय सणावारी प्रसंगावारी काही केलं असते ते निराळेच.शिवाय मला मालाबाईंची विहीण म्हणुन मी प्रत्येक वेळी मिरवले असते......चाळीतल्या प्रत्येक प्रसंगात त्यांची मदत झाली असती ते वेगळच. झालेच तर भांडणात सुद्धा त्या माझ्या बाजुने समर्थ उभ्या राहील्या असत्या... पोंबुरकर: बास बास स्वप्न रंजन बास झाले.............लग्नाच्या तयारी चे बघा.....

धमाल मुलगा Tue, 03/18/2008 - 14:22
बाबा कळसकरः ह॑...जे जे होईल ते ते पहावे झाल॑.कार्टीन॑ माझे जोडे झिजवण्याचे पैसे वाचवले खरे, पण हलकट पो॑बुर्‍या माझ॑ दिवाळ॑ काढणार दिसत॑य! बघू, निघेल काही मार्ग. शेवटी आपली काळजी त्या व्य॑कटेशाला. मालाबाई: अहो, बसलाय व्य॑कटेश तिकड॑ तिरुपतीला निवा॑त, बसुदे की.क्काय बाई माझ॑ नशिब, असला नवरोबा कपाळी लिहिलाय. जरा माझ॑ ऐका, त्या म॑देचे कान धरून उपटा चा॑गले! कसले मेलीला भिकेचे डोहाळे...काय तर म्हणे चाळीत काय माणस॑ नसतात का? त्या गोप्याशी लग्न कर म्हणाव॑. चा॑गल॑ खडसावा तीला. (इकडे चाळीच्या गच्चीत मोहित आणि म॑दा कठड्याशी था॑बून गप्पा मारताहेत. नेहमीप्रमाणे मोहित कठड्यावर बसलेला आणि म॑दा शेजारी उभी, कठड्याला रेलून खालची रहदारी निरखत. गच्चीच्या दुसर्‍या कोपर्‍यात मोहितची मित्र-भुतावळ नेहमीसारखी राखणीसाठी हजर. अर्थात आता गरज नसली तरी सवयीने रे॑गाळलेले) दिन्या (मित्र१): च्यामायला, मोहित्याच॑ झे॑गट फिक्स झाल्यापासन॑ लै बोअर होत॑य यार! पक्या (मि.२): होणारच ना बे! म॑दीबरोबर किर्ती आणि राधिका यायच्या ना...साल॑ हल्ली त्या॑ची गरजच नाय उरली म॑दीला. फुक्काट आपली पण बो॑ब झाली ना बे! ती राधी काय जबरा लाईन द्यायची आपल्याला... दिन्या:हा॑ !! लाईन द्यायची...बेन्या मग आता काय झाल॑य? बघत पन नाय ती तुझ्याकड॑ पक्या: अबे तिचा बा पोलिस हाय ना यार..घाबरतीये ती. म॑दीला सा॑गायला पायजे आनत जा बरोबर..तेव्हढ॑च आमच॑पन गाड॑ लागल॑ रा॑गेला तर बर॑च की! दिन्या: हा॑ ना यार, आपला पण जीव त्या किर्तीपायी होतो वरखाली...किती पायर्‍या किती मजले वरखाली.... पक्या: ए..गप ना बे भैताड..साल॑ कुठुन चारोळ्या चारोळया खेळून येत॑ आणि इथ॑ आमची खोपडी झ...! गप साल्या गप नायतर रात्री तुला एक पेग कमी. असा मित्रा॑चा प्रेमळ सुखस॑वाद चालला असताना मोहित आणि म॑दा मात्र गहन विषयावर बोलत आहेत. चेहेरे ग॑भीर, वातावरणात ताण. म॑दा: असे कसे रे तुझे बाबा? वाट्टेल ते कस॑ मागतायत? मोहितः मी तरी काय करु? म॑दा: बस रडत.बाहेर नुसत्या फुशारक्या..मी य॑व करतो अन् त्य॑व करतो. बाबा॑पुढे मात्र न॑दीबैल. मोहितः बाई ग, त्या॑नी लग्नाला परवानगी देताना मला किती छळल॑य तुला माहित नाही.सध्या घरी सीन टाईट आहे ग॑. तू जरा धीर धर. मी करतो काहीतरी... म॑दा: काहीतरी म्हणजे? हे बघ, गेल्या दोन दिवसा॑पासून आपण नुसते भा॑डतोय. अरे लग्न ठरल॑य तर ही अवस्था, तर झाल्यावर काय होणार? जरा मोकळेपणाने बोल की काही. का असा बघतो आणि करतो अशी उडवाउडवी करतोस? जीव टा॑गणीला लागलाय माझा. माझ्या बाबा॑नी फटकन नाही जमत म्हणून सा॑गितल॑ ना तर बसाव॑ लागेल रडत. कळ्ळ॑??

मनस्वी Wed, 03/19/2008 - 09:40
फडके काकू (आपल्या मुलीला) : पाहिलंस ना कार्टे.. जरा शिक त्या मंदीकडून.. कसा इंजिनिअर गटवलाय तिनं.. ते पण चाळीतल्या चाळीत.. हुंडा नाही नि काही नाही.. राधी : ह्याऽऽ आपल्याला काही चाळीत रहायचं नाही.. आपण डायरेक्ट तिकिट काढणार.. अमेरिका.. काय? फडके काकू : कप्पाळ.. आधी ग्रॅज्युएट होउन दाखव.. २ वर्ष झाली विषय सोडवतीये.. अन् चाललीये अमेरिकेला. राधी (मनातल्या मनात) : मोर्‍यांचा अमित जाणारे म्हटलं अमेरिकेला.. अमू ने फक्त मलाच सांगितलिये ही गोड बातमी.. हिला कळलं तर घेरी येउन पडेल.. साधं देशपांड्यांचं स्थळ नाकारलं कोकणस्थ नाही म्हणून.. एकदा जाउदे माझा अमू अमेरिकेला.. सगळ्यांचीच तोंडं गप्प करीन.

आनंदयात्री Tue, 03/18/2008 - 15:37
हा मोहित नुसता रडकाच आहे काय करतोय कोण जाणे. उद्या मोर्‍यांच्या अमितने सी.सी.डी. मधे बोलावलेय, कित्ती दिवसांपासुन बोलावतोय तो ! जातेच कशी उद्या. ती राधी शेंबडी उगाच गुलुगुलु करत असते तिच्याशी, म्हणत होती अमेरिकेला जायच अन काय काय. ती काय करणारे अमेरिकेला जाउन ? धड बोलता तरी येते का चार लोकात ? बिच्चारा अमित, समजावते त्याला उद्या, चांगला मित्र आहे माझा तो. त्याला मीच सांभाळायला हवे !

विजुभाऊ Tue, 03/18/2008 - 15:54
म॑दा:माझ्या बाबा॑नी फटकन नाही जमत म्हणून सा॑गितल॑ ना तर बसाव॑ लागेल रडत. कळ्ळ॑?? मोहितः अरे वा माझे वडील असे वागतात ही जणु माझी च चूक असल्यासारखी बोल्तेस की. मंदा: पण तू त्याना काहीही सांगु शकत नाहीस .असच ना?लग्नानंतर ते मला काही बोलले तरी तू असंच वागणार मोहीतः अग मी तसे कुठे म्हंटले. मंदा:म्हणायची काय गरज आहे? मोहीतः अग बाई माझे आई....थांब मला जरा विचार करू दे. मंदा: विचार करु दे विचार करु दे विचार करु दे..........काहीही विचारल तरी हेच उत्तर देतो आहेस तु.... कर नुसता विचार कर्........ मोहीतः दिन्या .....ए दिन्या.... दिन्या: काय रे.... मंदा: बीडी दे जरा. पक्या/दिन्या: बीडी? मंदा: बीडी? मोहीतःहो बीडी. दिन्या: मंदे किसिंग अ स्मोकर इज लाइक लिकींग ऍन ऍश ट्रे..... मोहीतः दिन्या इथे मला जीव द्यायचे वेळ येणार आहे आणि तुला चेष्टा सुचतेय? दिन्या: ओ सॉरी सॉरी.....कसले टेनशन आहे? मोहीतः महाटेन्शन म्हण्...बाबा माझ्या लग्नाला एक पैसाही खर्च करणार नाहीत. दिन्या: यात काय टेन्शन सारखे...........रजिस्टर मॅरेज करा की. मोहीतः त्याना ते ही नकोय.लग्न थाटामाटातच कर म्हणतात. पक्या: लग्न थाटामाटातच कर म्हणतात आणि एक पैसाही खर्च करणार नाहीत..तुझे बाबा गेल्या जन्मात काय अरेबियन नाइट्स मधले सुल्तान होते की काय रे.....घडा फोडायचा नाही आणि अक्कल मात्र काढुन घ्या? मंदा: काय? दिन्या:त्यावेळी निदान त्यान प्रश्नाची उकल देणारे कोणीतरी असायचे दरबारात मंदा: ए मला सांग की ती गोष्ट. मोहीतः ए अरे गोष्टी कसल्या करताय्...........मार्ग काढा.मार्ग काहीही खर्च न करता लग्न थाटामाटात करण्याचा....

धमाल मुलगा Tue, 03/18/2008 - 17:00
आयडिया.....पक्या आवेशाने ओरडला.त्या आवाजाने दचकून मोहीतच्या हातातली सिगारेट त्याच्याच मा॑डीवर पडते..तोही केकाटतो. डबल धमाका झाल्याने म॑दा बावरते, काय करावे हे न सुचून पटकन मागे सरकते तर दिन्या पक्याकडे हात पसरुन बघत असताना त्याच्या हाता॑च्या मधोमध शिरल्याने म॑दा त्याच्या मिठीत जाऊन पोचते. पक्या सुन्न...मोहीत सर्द आणि दिन्या ठार बधीर...म॑दी लाजून आणि बावचळून काय करावे हे न सुचल्याने तशीच दिन्याच्या मिठीत ! एव्हढ्यात आण्णा भे॑डे उर्फ समस्त चाळकरी पोरट्या॑चे लाडके आण्णाकाका किर्तीला घेऊन गच्चीत येतात. आण्णा: शिव शिव शिव...रा॑डेच्च्याहो, अरे हे काय ध॑दे चाललेत? रवळनाथा, हे काय बघतोय मी!!!! दिन्या: ओ काका, काहीतरी बोलू नका. चूकून झाल॑ अस॑. आण्णा: चुकून? शि॑च्या मोहीत समोर दिसत असताना ही म॑दी रा॑डेच्ची तुझ्या मिठीत? आणि चुकून? अग गधडे, लग्न ना ठरल॑य तुमच॑? काय चाललय काय? पक्या सगळी कथा आण्णा॑ना सा॑गतो तेव्हा कुठे ते शा॑त होतात. दिन्या: ए किर्ते, तू काय करतेयस आण्णाकाका॑बरोबर? आणि ह्यावेळी? तेही इथे गच्चीत? आण्णा: दिन्या, लेका माझ्या पोरीसारखी ती. कसले प्रश्न विचारतोस रे बैला! ती माझ्याशी बोलायला आली आहे. पण ते न॑तर बोलू आम्ही. पकूबाळा, कसली आयडिया आहे तुझी? पक्या: ह्या मोह्यत्याच्या बापाला लग्न फुकटात करुन हव॑य. म॑दीचा तात पण पेटलाय. हे दोघ॑ फुल्ल्टू टे॑शन्मध्ये आलेयत. मग आपन एक आयडिया काढलिये. सरळ ह्या दोघा॑नी पळून जाऊन लग्न करायच॑. आपली टोटल सेटी॑ग आहे. काय टे॑शन घ्यायच॑ नाय. म॑त्र म्हणायला गुर्जीपासुन ते ऍफिडेव्हीट करणार्‍या वकिलापर्य॑त आपण सगळी एवस्था लाऊ शकतो. मोहीतः हो! आयडिया चा॑गली आहे. त्यात थोडी ऍडिशन कर पकूबाळा, पळून जाऊन लग्न केल्यावर आमचा जमदग्नि आम्हाला घरात काही घेणार नाही, तेव्हा आमच॑ स्वतःच॑ घर होईपर्य॑त म्हणजे एक ३-४ वर्ष॑ आम्ही तुझ्या घरी रहायला यायच॑. कस॑? आण्णा: ए कार्ट्या॑नो उगाच भा॑डू नका. मला विचार करु द्या. दिन्या: घ्या आण्णा....बिडी घ्या ! ....(समोर किर्तीला बघून) म्हणजे माझी नाहेय्ये ती...पक्यान॑ ठेवायला दिल्यात. आण्णा: दिन्या फोकलिच्या, हल्ली तू जास्तच मोकाट सुटलायस. बापसाला सा॑गायला पाहिजे. आण्णा गहन विचारात बुडले. काय कराव॑ कोणालाच कळेना...... ========= च्छ्या...पुढच॑ टाका बॉ कुणितरी...आपल्याला तर मार्ग सुचत नाही काहीही खर्च न करता लग्न थाटामाटात करण्याचा....

विजुभाऊ Tue, 03/18/2008 - 17:42
आण्णा विचारात बुडले. काय कराव॑ कोणालाच कळेना...... इकडे कळस्करांच्या घरात वेगळेच रामायण घडत होते. बाबा कळस्कर :हजार पान जेवण घालणे ह्याच्या कोणी घातली होती एव्ढी जेवणे.....त्या पेक्षा मी म्हणतो की आमच्या घरात तीन वर्षे एक वेळा जेवायला ये...तुलाच एकट्याला हजार जेवणं घालतो... मालाबाई : एवढे वैतागु नका... बाबा कळस्कर : वैतागु नको मग काय करु मालाबाई: वैतागुन प्रश्न सुटत नसतात.... बाबा कळस्कर : हे मला माहीत आहे....मीच तुला सांगितलय हे...वैतागलेल्या माणसाला हे वाक्य ;न वैतागलेला माणुसच सांगु शकतो. मालाबाई: मग वैतागा....भरपूर वैतागा..........आम्ही मेलं काही सांगायला गेलो की वैतागायाचे उगाच्....कशाला बायकांच्या जन्माला घातलस रे रवळनाथा.पुढचा जन्म पुरुषाचा दे रे बाबा.....आणि ह्यांचाच नवरा कर रे रवळनाथा. आख्खा जन्म वैतागण्यात नाही घालवला तर शपथ..... बाबा कळस्कर : जरा शांत बसता का? मालाबाई : हम्म्म्म बाबा कळस्कर : मी काय म्हणतो.... मालाबाई काहीच बोलत नाहीत बाबा कळस्कर " मी काय म्हणतो...." हे वाक्य तीन वेळा म्हणुन आणखी वैतागले...अहो ऐकताय ना मी काय म्हणतोय ते हो ...चांगले ऐकु येतय्.कान अजुन फुटले नाहीत माझे.इति मालाबाई. मग हो नाही तरी म्हणा ना.बाबा कळस्कर तुम्हीच म्हनालात ना की जरा शांत बसता का म्हणुन्...मालाबाई. छे ! चूकले माझे. आता बोलतो ते ऐका जरा सांगा मी काय म्हणतो.... सांगा ना काय ते आपण पोंबुरपेकराना एकदा सांगु का लग्न साधेपणी करुया म्हणून. कशाला ? त्या पुष्पाबाई महीला मंडळात प्रत्येक वेळा उकरुन काढतील..... मग मार्ग काढा यातून.........

In reply to by विजुभाऊ

इनोबा म्हणे Tue, 03/18/2008 - 18:19
आयला! कधी लग्न लागायचं.हिथं वर्‍हाडी लोकं भुकंनं कोकलंत बसलेत. जेवण नाय तर एखादी चपटी तरी द्या. असो,छान चालू आहे.किप गोईंग्.एकता कपूरच्या सिरीयलवानी अखंड चालू राहू द्या. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

धमाल मुलगा Tue, 03/18/2008 - 18:23
आर॑ बाबा इनोबा, रिकाम्यापोटी चपटी मारु नये. आगडो॑ब उसळतो पोटात. वर ऍशिडिटी होते ती वेगळीच.. दम धर बाबा जरा...असा नको त्या मोहीतच्या गुढग्याला बाशि॑ग बा॑धू !!!

विजुभाऊ Tue, 03/18/2008 - 19:43
इकडे पोंबुरकरांच्या कडे पुष्पाताई (सौ पोंबुरकर): लग्नाचे काय बघा...एकदा तारखा ठरू द्या....मग कमावन्सना कशी मस्त पैठणी नेसून जळवते पोंबुरकर: तुम्ही नुसत्या पैठणीच नेसा बाकी काही विचार करु नका. पुष्पाताई (सौ पोंबुरकर): पैठणी म्हंटले की मला काही सुचत नाही.तुम्हाला कितीतरी वेळा सांगितले. पण तुम्ही ........ह! पोंबुरकर: लग्न आपल्या मुलाचे आहे....तुमचे नाही पुष्पाताई (सौ पोंबुरकर):हो इतके काही वाकडे बोलायला नको पोंबुरकर: मग किती बोलु? बर ते जाउदे लग्न मला वाटत होते की मोहीत ने एखादी करोड्पती नाहीतर किमान दशलक्षपतीच्या मुलीशी तरी जमवायला हवं होते. पुष्पाताई (सौ पोंबुरकर): तशी मुलगी चाळीत नसती राहीली. आणि मोहीत ने केले ते पूर्ण विचार करुन केले असावे. मंदा नाहीतरी एकटीच आहे. त्यांचा ब्लॉक आपल्या मोहीत्लाच मिळेल ना. पोंबुरकर: अरे माझ्या ते लक्षातच आले नाही. मी उगाच कळस्कराना अटी घातल्या.त्याला जमल्या नाहीत तर उगाच लग्न मोडेल. पुष्पाताई (सौ पोंबुरकर): तुम्हाला मुळी गोष्टी जरा उशीराच समजतात. पोंबुरकर: "काहीही खर्च न करता थाटामाटात लग्नं..." ही अट कोणी मला घातली असती तर मी त्याला वेड्यातच काढले असते. पुष्पाताई (सौ पोंबुरकर): हो ना पोंबुरकर: काय? पुष्पाताई (सौ पोंबुरकर): काही नाही पोंबुरकर : मला वाटते की आपणच त्याला काहीतरी मदत करायला हवी यात पुष्पाताई (सौ पोंबुरकर):करा करा..आपणच अटी घालायच्या आणि आपणच त्या साठी मदत करायची........लोक हसतील..तोंडात शेण घालतील पोंबुरकर: एवढे काही वाईट लागत नाही ते........ पुष्पाताई (सौ पोंबुरकर): का ........य?

विजुभाऊ Wed, 03/19/2008 - 12:01
पोंबुरकर: काही नाही काही नाही तुम्ही बोला पुष्पाताई (सौ पोंबुरकर): आपणच आटी घालायच्या आणि मोडायच्या ही आपणच? पोंबुरकर: या आटीच्या घोळात अडकुन कळस्करानी लग्न मोडलं नाही म्हणजे झालं. पुष्पाताई (सौ पोंबुरकर): कशाला मोडताहेत ....लग्न मोडणे म्हणजे चेष्टा नाही...शिवाय मुलीची जात पोंबुरकर: त्याचं तुम्ही सांगु नका लग्न आपल्यामुळे मोडले हे जरी लोकाना कळले तरी मोहीत चे अवघड होइल्..स्थळे येणार नाहीत. पुष्पाताई (सौ पोंबुरकर): पण मग हा घोळ निस्तरायचा कसा. इकडे चालीत सगळ्याना या अटीची कुणकुण लागली होती. त्याचे असे झाले की "ही अशी अट मी घालतो आणि त्या कळस्कराची जिरवतो "असे पोंबुरकरानी पुष्पाताई ना कुजबुजत सांगीतले.. पोंबुरकर हे मेकॅनिकल इंडस्ट्री,मधे काम करायचे..त्यांचे साधे बोलणे सुद्धा जोरात कामगार सभेत घोषणा देत असावेत अशा आवाजात व्हायचे. त्यानी पुष्पाताई कानात कधी खाजगी प्रेमळ संवाद केला असेल त्या वेळी पुष्पाताईंच्या कानाचे काय झाले असेल अशी चाळीत नेहमी चर्चा चालायची.लहान मुले तर त्यांच्या आवाजला जाम टरकुन असायची. शोलेतल्या गब्बर सारखे " झोप नाहीतर पोंबुरकर काका हाक मारतील" येवढ्या दमावर मुले नुकतीच झोपेतुन उठली असली तरी पुन्हा झोपुन जायची. या असल्या अवाजात झालेले गुप्त खलबततीन दारे पलीकडल्या फडकेंच्या राधा ने ऐकले. जणू आपलेच लग्न ठरले असावे अशा मोहोरलेल्या अवस्थेत तिने ते गुपीत आपल्या आईला अत्यंत खाजगी आवाजात सांगितले. अगोदरच फडके काकुना ऐकु कमी यायचे अन त्य्यत कानत खूस्फूस बोलणे म्हनजे वैताग्....त्यानी कार्टे नीट बोल की..आणि "काय म्हणलीस पोंबुरकरानी लग्नासाठी आटी घातल्या" असे कमी ऐकु येत असलेल्या कानाने ऐकु यावे अशा अवाजात आश्चर्य व्यक्त केले. झाले चाळीला "प्रकट निवेदन " मिळाले... पोरे सोरे सुद्धा "मार्ग काढा.मार्ग काहीही खर्च न करता लग्न थाटामाटात करण्याचा मार्ग ....रेडी का?" अशा घोषणा १०, २०, ३०, ४० ....८० ९० १०० रेडी का? या ऐवजी देउ लागली.

विजुभाऊ Wed, 03/19/2008 - 12:17
सगळ्या चाळीत चर्चा लग्नाचीच होती.अणि लग्नापेक्षाही बाबा कळस्कर हा काहीही खर्च न करता लग्न थाटामाटात करण्याचा मार्ग कसा शोधतात यावरच होती. संसदेत असा चर्चेचा प्रस्ताव आला असता तर शेअर मार्केट नक्की ४००/५०० अंकानी कोसळले / वाढले असते. मुलाना परीक्षा अभ्यास याही पेक्षाहा मोठा विषय वाटत होता. चाळीच्या गणेश मंडाळाने तर यंदाचा देखावा हा "काहीही खर्च न करता लग्न थाटामाटात करण्याचा मार्ग" नक्कीही केला . सगळे आपपल्या परीने यावर चर्चा करत होते. लोकशाही नुसार बाबा काका नी विरोधी पक्षाकडे तक्रार करावी.चि.पराग ...वय वर्षे ११ लोकशाही पेक्षासुधा मला काय वाटते की बाबा कळस्कर काकानी हा विषय शिवसेनेकडे सांगावा ...कु.चिंगी वय वर्षे १० त्यापेक्षा आपण हे सगळे त्या श्रीशांत ला सांगुया तो पोंबुरकराना मस्त दम देइल. आणि झालेच तर सायमंड आणि भज्जी ला पण बोलवुन ठेवु भांडण झालेच तर हे खूप महत्वची ठरतील्......चाळीचा क्रिकेट कॅप्टन अरिंदम वय वर्षे...८ तू काय लेका भांडणार ! पोंबुरकर काकु किती शक्तिमान आहेत माहीत आहे का तुला?इती ..बनी (खरे नाव शतसहस्रीका )खरे वय ६ छ्या माझे डॅडी त्यांच्या पेक्षा खूप शक्तिमान असतील्.....ते रोज बूस्ट पितात्......आणी मी सुद्धा बूस्ट पितो...मी मोठा झालो की पोंबुर्कर काकू ना पाठीत एक जोरात धपाटाच घालणार आहे....चे.चिरंजीव पानसरे उर्फ टिंकू.वय पाच च्या खाली. ईकडे या अशा गप्पा चालल्या होत्या तिकडे पुरुष मंडळीत काही वेगळेच होत होते.

विजुभाऊ Wed, 03/19/2008 - 14:54
तिकडे पुरुष मंडळीत काही वेगळेच होत होते. आण्णा भे॑डे :काही तरी मार्ग काढायला हाव मार्ग कसला काढताय? मागच्याच महीन्यात सगळा रस्ता उकरून ठेवला होता. रस्ते वाहने चालवण्यासाठी असतात का उकरण्याची प्रॅक्टीस करण्यासाठी तेच कळत नाही...नाना पावशे अहो नाना तो मार्ग म्हणत नाही मी. ह्या मोहीत च्या लग्नात जे विघ्न इभे राहीले आहे त्या बद्दल म्हणतोय.. विघ्न आणणारांना बाजुला करा.शेवटी चाळीचे एकी काय कामाची...एकीचे बळ हेच खरे बळ... नाना खरे आहे तुमचे....त्या एकीमुळेच हे विघ्न उभे राहीले आहे म्हणजे? नाना बुचकळ्यात पडले.. अहो त्या एकीमुळे म्हणजे सौ.पोंबुरकर त्यांच्यामुळे च हे घडले आहे.आणाना इथे सुद्धा जोक करावासा वाटत होता.पण मोनीत ची चिंता त्यांच्या चेहेर्‍यावर साफ दिसत होती. या वेळी बंडोपंत असायला हवे होते. बंडोपंत चालीतला हरहुन्नरी माणुस गेल्याच वर्षी वारले ते.अण्णांच्या गँग मधला खंदा वीर हरवला.चाळीचा गणेशोत्सव बंडोपंतानीच सुरु केला होता. कोण्त्याही समस्ये वर बंडोपंत हमखास उपाय सुचवायचे नाना आज बंडोपंत असते तर त्यानी काय सुचवले असते यावर्.नाना पावशे काहीतरी सांगतील असे वाटुन अण्णानी चौकशी केली. मी पैजेवर सांगतो त्याना असला प्रश्न कधी पडला नसेल. कसली पैज ? मीस सुद्धा खेळतो पैज.बाजुने जाणारे बर्वे आता चर्चेत सामील झाले.

विजुभाऊ Wed, 03/19/2008 - 18:39
कसली पैज ? मी सुद्धा खेळतो पैज.बाजुने जाणारे बर्वे आता चर्चेत सामील झाले. पैज म्हंतले की बर्वेंचा उत्साह नेहमीच ऊतू जायचा.ते कशावरही पैज लावयला तयार असयचे. साधा दगड फेकला तरी तो एक्झॅट कोठे पडेल यावर सुद्धा ते पैज लावायचे.

विजुभाऊ Wed, 03/19/2008 - 19:52
मोहीत च्या लग्नावर ते काय पैज लावता याची सगळ्याना उत्सुकता होती. मी सांगतो हे लग्न होणार.....१००% होणार्.....बर्वे असे बोलल्यावर सर्वानाच जरा बरे वाटले.कारण बर्वे नेहमीच पैज जिंकायचे. हे बघ बर्वे तू पैज जिंक तुला लग्नात दोन पाने वाढतो जेवायला....आण्णा भे॑डे. पण मला सांग ही पैज कशी पूर्ण होणार? पोंबरकरांची अत कशी पुर्ण होणार? ते मलाकाय ठाऊक्...घोड्यावर पैजा लावणारे कधी स्वतः पळतात का?पैजा लावणारे एक असतात आणि पळणारे दुसरेच असतात. मग पैज कशाला लावतोस? मी पैज माझ्या आतल्या आवाजाला विचारुन लावतो...तो सांगेल तसे मी वागतो.या बाबतीत म्हणाल तर मोहीत चे लग्न होणार असा माझा आतला आवाज सांगतो. कसे ते माहीत नाही........

प्राजु Wed, 03/19/2008 - 20:46
एका, रामलाल नावाचा वॉचमन कम हरकाम्या रहात असतो. चाळीच्या जिन्याच्या खाली त्याचं बाजलं आणि बाजूला एक ट्रंक एकवढंच त्याचं सामान. त्याची बायका मुलं गावी असतात. या रामलाल सगळ्यांची कामे करत असतो. या मंदा आणि मोहितच्या प्रेमपत्रांची ने-आण, त्यांचे निरोप पोचवण्याचं काम .. मोहितच्या मित्रांच्या बरोबरीने यानेही केलेलं असत. मंदा याला मुलि सारखी. लहानपणी तिला अंगावर खेळवलेली. मोहितसारख्या हुशार मुलाशी लग्न होतय हे पाहून हा आतुन सुखावलेला पण आत तिचं बालपण सरलं आता "काका" अशी हाक मारत पळतपळत येणारी मंदा त्याला नाहि भेटणार, तर एक गृहिणी मंदा त्याला दिसणार म्हणून थोडासा व्यथित झालेला. रामलालने मंदाच्या लग्नासाठी मांडववाले, केटरिंगवाले स्वतः आणण्याची जबाबदारी घेतली. पत्रिका सुद्धा वाटायला जायला हा तयार आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

विजुभाऊ Wed, 03/19/2008 - 21:42
प्राजु....धन्यवाद्...या प्रकारात केवळ कथेचा गोषवारा देउन चालणार नाहे..कथा पुढे न्यायला तु दिलेल्या दुव्याचा उप्योग होइल तो मी करुन घेइनच. पण मला अपेक्षा आहे ती कथा पुढे नेणार्‍या कन्टेन्ट ( याला मराठी शब्द्..........हा आठवला...मजकूर...बरोबर ना तात्या) ची. तसा मजकुर टाक्......कथेच्या अनुषंगाने येणार्‍या व्यक्ति / स्थळे ( दोन्ही अर्थानी) येउ दे.

In reply to by विजुभाऊ

विजुभाऊ Wed, 03/19/2008 - 21:53
प्राजु हे असे येइल बघ... मोहीत चे लग्न होणार असा माझा आतला आवाज सांगतो. कसे ते माहीत नाही........ मी सांगतो ...इतका वेळ केवळ चर्चा ऐकत असलेला चाळीचा वॉचमन रामलाल पुढे आला. त्याने खरे तर मोहीत आणि मंदाला लहान पणापसून पाहीले होते...त्यालाही मनातुन ही दोन्ही पोरे आवडत होती...शिवाय त्या दोघांच्या प्रेमाल तो एक साक्षीदार होताच ना. माझ्या डोक्यात एक आयडीया हाय साहेब बघा...आपन असं करुया का...

In reply to by सुधीर कांदळकर

विजुभाऊ Wed, 03/19/2008 - 21:52
सुधीर भाऊसाहेब धन्यवाद.उगीच आचरट फोडणी टाकली नाही त्याबद्दल .....( मला वाटते हा मि पा सदस्यांचा मोठेपणा आहे..कोणीच तशा कॉमेंट्स टाकल्या नाहीत्.कथा पूर्ण झाल्यावर बहुतेक कॉमेंट्स येतील) पण तुम्हीही लिहायला हरकत नाही...प्राजु ला जे सांगितलय तेच तुम्हालाही........यु आर ऑलवेज वेल्कम्.........भाऊ

प्राजु Wed, 03/19/2008 - 21:58
विजुभाऊ.. अगदी बरोबर... मी सांगतो ...इतका वेळ केवळ चर्चा ऐकत असलेला चाळीचा वॉचमन रामलाल पुढे आला. त्याने खरे तर मोहीत आणि मंदाला लहान पणापसून पाहीले होते...त्यालाही मनातुन ही दोन्ही पोरे आवडत होती...शिवाय त्या दोघांच्या प्रेमाल तो एक साक्षीदार होताच ना. त्याने ही पैजेची चर्चा ऐकलेली असते. वॉचमन : अहो बर्वे साहेब, भेंडे साहेब... काय त्या दोन पोरांच्या लग्नाच्या पैजा लावताय?? अहो आपलीच लेकरं ती.. त्या दोघाच्या घरच्यांना जमेल तशी मदत करायच सोडून काय हे घेऊन बसलात? भेंडे : गप रे... तुला काय करायचं आहे? तू जा तुझ्या कामाला.. तू नको शिकवू आम्हांला.. वॉचमन : कामाचं करायला आलो होतो. भेंडे वहिनीनी घरी बोलावलं आहे. तुमचा मुलगा मंगेश बहुतेक पुन्हा काहीतरी बाहेर मुलांशी मारामारी करून आला आहे.. त्याच्या अंगावर लागल्याच्या खुणा आहेत. तेव्हा चला आता. (सगळ्यांचे चेहरे.. भेंडेंच्या चेहर्‍यावरील भाव पहात आहेत. भेंडे थोडे ओशाळून.. आणि मग चिडून) भेंडे : काय?? मंगेशने पुन्हा.............! देवा देवा... काय होणार या मंगेशचं? ...(लगेच राग आवरून) .. अहो.. जरा भडकू आहे... चालायचंच.. नाही का हो?? उठून रामलाल सोबत निघतात घरी जाण्यसाठी. - (सर्वव्यापी)प्राजु

विजुभाऊ गुरुवार, 03/20/2008 - 10:30
अण्णा भेंडे रामलाल सोबत घरी जाण्यसाठी निघाले.त्या गडबडीत रामलाल काय सांगत होता ते कोणाच्या लक्षात च आले नाही. रामलालचा मुद्द तसाच राहीला. भेंड्यांच्या मंगेशला थोडे लागले होते हाताला खरचतले होते...कोठेतरी रस्त्यावर वाळुवरुन बाइक घसरली अन हाताला खरचटले. पोंबुरकर त्याच रस्त्याने जात होते त्याने ते पाहीले आणि त्याल ते रिक्षात घालुन घेउन आले.

विजुभाऊ गुरुवार, 03/20/2008 - 13:08
मंगेश सुख्ररूप आहे हे पाहुन आण्णा भेंडे शांत झाले..पोंबुरकरना पाहुन रामलाल वॉचमन काहीतरी बोलणार इतक्यात त्याला आण्णांचे बोलणे आठवले..आणि तो गप्प बसला .... तेवढ्यात आण्णानीच विषयाला तोंड फोडले........ पोंबुरकर तुम्ही म्हणे लग्नासाठी आटी घतल्या आहेत... हो..... ही सर्वस्वी तुमची खासगी बाब आहे मी काही विचारले तर रागावु नका. आपण सारे या चाळीत गेली सव्वीस वर्षे रहातो..एक्मेकांची सुखदुखे: वाटतो....मोहीत/ मंदा याना तर माझ्या अंगाखांद्यावर खेळवले आहे.........मला दोघेही मुलांसारखीच आहेत. मला माहीत आहे ते आण्णा .तुम्ही काय विचारणार आहत तेही माहीत आहे.....मी या अशा अटी का घातल्या म्हणुन विचारणार आहत ना? मला राग नाही येणार्.तुम्ही काय बाहेरचे आहत काय? पोंबुरकर आश्चर्य वाटावे ईतक्या सरळ्पणे बोलले. आण्णा पहातच राहीले..त्याना हे अपेक्षीतच नव्हते. मंदा चांगली मुलगी आहे. मला ती सून म्हणुन घरात आली तर आनंद्च आहे. पण मग ही अशी अट का घातली. आण्णा मी कामगार माणूस्..आयुष्यात जे काही मिळाले ते कष्ट करुन...आयुष्यात कोणतीही गोष्ट सरळ्पणे माझ्या वाट्यालाच आली नाही. माझ्या मुलाना पण मी सगळे मिळव ते कष्ट करुन मिळव असेच सांगतो. त्याचा आणी लग्नाचा काय संबंध? आहे ना. प्रेम विवाहात सगळे अगदी सरळ पणे झाले तर त्याची काय गंमत्...काही तरी विरोध्..त्याचा सामना...काहीतरी उचापत्या..त्या निस्तारणे..धड्पणे यात मजा आहे...यातच मित्रांची / आणी स्वतःची सुद्धा खरी कसोटी लागते.. खर्‍याच्या कसोटीला उतरले की मग ते प्रेम शुद्ध सोने होउन येते....त्याची मजा काही औरच असते......यावर माझा विश्वास आहे. माझी अट कळस्कारांसाठी नाही.ती मोहीत आणि मंदा साठी आहे.... पाहुया ते कसे मार्ग काढतात " काही खर्च न करता थाटामाटात लग्न " या अटीतुन....

मनस्वी गुरुवार, 03/20/2008 - 14:00
मोहित, मंदा आणि मित्रमंडळी काहीतरी मार्ग शोधत असतात. मोहित : आमचे बाबा म्हणजे जर चमत्कारीकच आहेत.. काय तर म्हणे काही खर्च न करता थाटामाटात लग्न. मंगेश : म्हणजे नक्की काय म्हणायचय त्यांना. किर्ती : काहीच कळत नाही काय आहे काकांच्या मनात आणि नक्की त्यांना काय म्हणायचंय. मोहित : पहिल्यापासूनचंच आहे.. काहीतरी असंबद्ध बोलायचं. त्यांचं त्यांना तरी कळतंय का काही खर्च न करता थाटामाटात लग्न म्हणजे काय.. काहीतरी भंकस मारत असतात नेहेमी. मंदा : (जोरात किंचाळते) एऽऽ मला एक जबरा आयडिया सुचलीये.. आपण नगरसेविका मंगलाताई उचलबांगडे यांच्या सामुदायिक विवाहसोहोळ्यात भाग घ्यायचा का.. काही खर्चही नाही आणि हजार काय चांगली ४-५ हजार जेवतील.. घ्या म्हणावं! मोहित : वाऽ मंदे.. अगं आज पहिल्यांदा वाटलं तुझ्या डोक्यात अक्कल नावाचा प्रकार थोडातरी आहे ते!

विजुभाऊ गुरुवार, 03/20/2008 - 18:01
ए चल चल त्या मंगलाताई ना फोन करुया ए पक्या लाव रे त्याना फोन तुझा मोबाइल दे की का माझा बॅलन्स संपलाय. तुझं नेहमीच असे कसं असते रे पक्या.कधीही विचारा तुझा बॅलन्स संम्पलेलाच्.कीर्ति.. मोबाइल च्या रीचार्ज चा विषय निघाला की पक्याचे डोके सटकायचे...ए कीर्ते हे बघ मी कोणाला मोबाइल मागत नाही... आणि कोणाला करत पण नाहीस्..कीर्ति पक्याला आडवे बोलयचा एकही चान्स सोडायची नाही .तुझ्या हॅन्ड्सेट्ला सुद्धा फक्त मिसकॉल द्यायची सवय लागली आहे.. ए गप बसाकी ...भांडायला पण काळ्वेळ असतो.दिग्या वैतागला.काय चाललय काय कारताय ... ए हा घे या वरुन लाव फोन. मंदाने तीचा मोबाइल पक्याकडे जवळ्जवळ फेकलाच तीला घाइ झाली होती. आणि तो स्पीकर ऑन कर म्हणजे सगळ्याना ऐकु येइल. हं लाव रे. पक्या ने नंबर फिरवला हॅलो..........कोण बोलतय फोन तुमने घुमाया है..तुम बोलो ना कोन बोलताहै मी मी प्रकाश प्रकाश बापट तो मंगलाताई आहेत का? कौन मंगलाताई इधर कोइ मंगलाताई नही है..चंपा ,चमेली , पारो , हुस्ना,मेरी , फरीदा, काजोल इनमेसे कोइ चाहिये तो बोलो. अ....अं... अहो कोण बोलता आहत तुम्ही मै..बाबू पिस्तूल जल्दी बोल कौन चाहीये? काही नाही काही नाही सॉरी सॉरी रॉन्ग नंबर... पक्याने फोन कट केला.त्याला घाम फुटलाहोता ए पक्या कोणता नंबर फिरवला होतास. हा दिग्या ने दिला होता मला कालच

मनस्वी गुरुवार, 03/20/2008 - 18:44
पक्या : ए माकड्या कुठले नंबर देतोस्स्स्स्स्.. दिग्या : अरे तो नाही तुला अजुन एक नंबर दिलेला ना तो फिरव यड्या.. (पक्या नंबर फिरवतो.) हॅलो, मंगलाताई उचलबांगड्यांचे ऑफीस का? हो. आपण? मी गपचूप चाळीतून दिगंबर डोईफोडे बोलतोय. मंगलाताईंना भेटण्यासाठी अपॉईंट्मेंट घ्यायची होती. आत्ता आले तर चालेल का? मॅडम सुंदर मी होणार ब्युटीपार्लरच्या उद्घाटनाला गेल्यात. मग.. उद्या सकाळी? सकाळी मॅडमना प्रोग्रॅम आहे. हौसमौज महिलामंडळाच्या कबड्डी स्पर्धेच्या अध्यक्षा आहेत त्या. तुम्हीच सांगा मग कधी येउ ते. विषय काय आहे. आपला तो सामुदायिक विवाहसोहोळा.. ओहोहो.. अस्सं अस्सं.. असं करा तुम्ही प्रत्यक्षच या इकडे. मी सगळी माहिती देतो. आणि मॅडमना भेटायचे असेल तर तेव्हाच अपॉईंट्मेंट फिक्स करू. ओके.. आपलं नाव.. मी जनार्दन खोडमोडे.. मॅडमचा पीए. ओके थँक्यू खोडमोडे साहेब. पक्या : चला.. आता ठरवा.. कोण कोण जायचं खोडमोड्याला भेटायला आणि काय बोलायचं तिथं.. म्हंजे काय काय चौकशा करायच्या..

विजुभाऊ गुरुवार, 03/20/2008 - 19:23
पक्या मला वाटते आपण जाण्यापेक्षा भेंडे आण्णा ना घेउन जाउ. जरा मोठे कुणी बरोबर असेल तर बरे.दिगंबर कधी नव्हे तो मुद्देसूद बोलला ही सगळी मंडळी आण्णांकडे गेली. आण्णाने सगळ्यांचे शांतपणे ऐकुन घेतले.शांतपणे ऐकणे हा भेंडे आण्णांचा गुण त्यामुळेच चाळीतल्या तरुण मंडळाला आण्णा हे प्रत्येक्वेळी आधार वाटायचे. मलासुद्धा हीच आयडीया आली होती.मी मंगलाताईंना फोन ही केला होता काय म्हणाल्या त्या.सर्वानी जणू शाळेत एक साथ नमस्ते म्हणतो तसे एका सूरात विचारले.. त्या म्हणाल्या की सामुदायिक विवाहसोहोळा हा फक्त दारीद्र्य रेषेखालील लोकांसाठीच आहे.शिवाय त्यात जोडप्यांची संख्या १२१ पूर्ण झाली आहे.आता एकही जोडपे जास्त नोंदवले जाणार नाही. फक्त दारीद्र्य रेषेखालील लोकांसाठीच आहे? मंदा बेशुद्ध्च पडायची बाकी होती. लोक पूर्वी लग्न व्हावे म्हणून उसने ऐष्वर्य दाखवायचे....आता दारीद्र्यदाखवुन लग्ने जमवावी लागतात..हंम्म्म्म्म्म्म्म खरच कलीयुग आलय :दिग्या तोंड वाकडे करत म्हणाला दिग्या यात कलीयुगाचा संबंध काय? कीर्तिने याही वेळा संधी सोडली नाही दरीद्रीच व्हायचे ना? त्यात विषेश काय? पक्याच्या डोक्यात काही तरी नवी आयडीया आली असावी.त्याचे डोळे चमकत होते .सरळ नोकरी सोडुन दे मग दरीद्री आणि बेकार दोन्ही होशील. वा वा काय पण टाळके चालवलय्...दिन्या त्याचे वाक्य तोडीत म्हणाला..काय तर म्हणे नोकरी सोडुन दे मग दरीद्री आणि बेकार दोन्ही होशील . आता तात्पुरते सिझनल दरीद्री आणि बेकार होणे ठीक आहे पण त्यानन्तर परिस्थिती तशीच राहीली तर? पोंबुरकर काकु मंदाला पांढर्‍या पायाची म्हणतील त्याचे काय्...म्हणतील की लग्ना अगोदरच सुनेने गुण दाखवले.... पण मग करायचे काय.........बराच वेळ सगळे गप्पच होते. अस्वस्थ झालेल्या दिगुने काही तरी बोलायला तोंड उघडले पण कीर्ति कदडे पाहुन त्याने उघडलेले तोंड पुन्हा मिटले. मला एक आयडीया सुचल्येय्......शांततेला तदा घालवत कीर्ति आणि मंदा दोघीही एकदम बोलल्या.अणि मग एकमेकांकडे पाहु लागल्या तु सांग कीर्ति अगोदर मग मी सांगेन. मला काय वाटते आपण असे करुया का कसे..सगळे पुन्हा एका सुरात ओरडले आपण असे करु या का ....आपणच चाळीच्या गणेश मंडळातर्फे सामुदायिक विवाहसोहोळा आयोजित करुया?कीर्ति ने तीची कल्पना मांडली. वा! मी हेच म्हणणार होते कीर्ति.....मंदा उत्साहाने ओरडली

विजुभाऊ Tue, 03/25/2008 - 15:44
आपणच चाळीच्या गणेश मंडळातर्फे सामुदायिक विवाहसोहोळा आयोजित करुया? कीर्तिच्या या वाक्याने सगळ्यांचे चेह्रे उजाळले.काहीतरी वेगळा पण मार्ग सापडला होता. आपली फुल्ल तयारी आहे. मस्तच मंगलाष्टके म्हणणारे , बँडवाले , केटरर , सगळ्यातच बचत होइल ..आणि लग्नाला हजार पान सहज जेवेल ...दिग्या पक्याला एकदम उत्साह आला होता....कधी नव्हे ते खूप मोठी जबबदारी असलेले काम करयाला मिळणार होते. लग्नात आपण विवीध गुणदर्शनाचा कर्यक्रम ही ठेउया........ ए विवीध गुणदर्शन नन्तर करुया...अगोदर सामुदायिक विवाह करयाला काय काय तयारी लागेल ते बघुया...कीर्ति ने सर्वाना जमिनीवर आणले...... काय काय म्हणजे? सर्वात अगोदर विवाह करणारी जोडपी आणि त्याहून महत्वाचे हॉल ,या शहरात एकवेळ बाकी सगळे मिळेल लग्नाचा हॉल ऐन तिथीला मिळणे म्हणजे..............कीर्ति ने वाक्य अर्धवटच सोडले.......... मंदाने चमकुन तिच्याकडे पाहीले.

सृष्टीलावण्या Sun, 03/23/2008 - 07:40
आपणच चाळीच्या गणेश मंडळातर्फे सामुदायिक विवाहसोहळा आयोजित करुया? कीर्तिच्या या वाक्याने सगळ्यांचे चेह्रे उजळले दिग्या, पक्याला तर ह्या वाक्याने धीर आला, कदाचित् आता सामुदायिक विवाह सोहळा एवीतेवी होणारच आहे तर आपली सुद्धा वाजंत्री वाजण्याचा योग आहे म्हणायचं असे दोघांनाही मनापासून वाटले. इकडे मंदाला वाटले, कीर्तिलाच का अश्या छान छान कल्पना सुचाव्यात आणि दरवेळी चार लोकांसमोर तिचेच का कौतुक व्हावे. आता असूयेपोटी ती ह्या चांगल्या कल्पनेला विरोध करण्यासाठी सबबी शोधू लागली. > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

विजुभाऊ Tue, 03/25/2008 - 15:57
या शहरात एकवेळ बाकी सगळे मिळेल लग्नाचा हॉल ऐन तिथीला मिळणे म्हणजे..............कीर्ति ने वाक्य अर्धवटच सोडले.......... मंदाने चमकुन तिच्याकडे पाहीले. तीला आठवले..बहीणीच्या लग्नात तिथी ही हॉल मिळण्यावर ठरवली होती.........त्यनन्तर बाकीच्या गोष्टी हो ना खरे आहे...आण्णा म्हणाले अगोदर आपल्याला काय काय करावे लागेल त्याची यादी करुया हॉल , पत्रिका , केटरर , पुरोहीत , फुले , कपडे , फोटोवाले......एक एक जण सांगु लागला.लीस्ट लांब होत होती लीस्ट करता करता प्रत्येकजण मनोमन म्हणत होता...खरे आहे घर पहावं बांधुन आणि लग्न पहावं करुन

विजुभाऊ Tue, 04/01/2008 - 09:54
मनस्वी च्या आवाहनास जागुनः "स्पिन अ यार्न" पुढे सुरु करत आहे लीस्ट संपतच नव्हती. काय काय म्हनून करायचे? नवर्‍या मुलाचा मेक अप नवरी चा हार मुंडवळ्या इथ पासुन ते वरातीत कोणत्या कॅसेट वाजवायच्या जेवण काय काय असेल. य सगळ्या गोष्टी मिळतील पण या मुम्बई मधे लग्नाचा हॉल मिळणार नाही. आण्णा अजुन हॉल या एका मुद्द्यवरच अडकले होते आण्णा आपण असे करु या का?आपण चाळीच्या चौकात मोठा मांडव उभा करुया. त्यात लग्ने होतील आणि वर्हाडी लोकांची जेवणाचे सोय चाळीच्या टेरेस वर करुया. पक्या अरे वा पक्या काय मस्त सजेशन्...कीर्ति एक्दम म्हणाली. अन लागलीच तर शेजारच्या चाळीत ही गच्ची आहे.ते पण वापरता येइल. पक्या ने जरा अविश्वासानेच पाहीले.कीर्ति ने त्याला मस्त म्हणणे हे जरा धक्कादायकच होते. तीने त्याला चांगले म्हणणे हे साप मुंगस मित्र होण्याइतके दुरापस्त होते. मी त्या नामजोशीना सांगतो.ते देतील गच्ची. आण्णाना मुलांची ही आयडीया पटली. आता लग्न आवाक्यात वाटत होते. आरे ते सगळे खरे पण आपल्याला सामुदायीक लग्नासाठी जोडपी हवीत्.ती कोठुन आणणार ? ह्या: त्यात काय सरळ एक बोर्ड लावायाचा. हे मुंबई आहे इथे काहीही करा लोक तयार असतात. आपण चाळीच्या नाक्यावर बोर्ड लाउया.लग्न करुन देउ म्हणुन.... हे बाकी खरे हो दिग्या..आपण आपल्याला पार्टी करायची होती तेंव्हा काय भन्नाट आयडीया केली होती. पक्याला आता उत्साह आला होता.कीर्ति ने त्याला चांगले म्हंटले याचा धक्का अजुन ओसरला नव्हता. आठवते ना तुला तर रे. आडगाव च्या भैरोबा सन्स्थान १० /१० रु.ची पावती पुस्तके छापुन घेतली आणि लोकल मधे खपवली. लोकानी एकानीही विचारले नाही की हे आडगाव कुठे आहे म्हणुन.भरीत भर म्हणून आपण खडू चे भुकटी अंगारा म्हणुन लावत होतो. खडु सुद्धा कॉलेज चे ढापलेले. पण पार्टी काय जोरदार झाली होती नाही? भैरोबा ची यात्रा सुधा इतक्या जोरात होत नाय. भैरोबा ला जोरात चांगभले करुन चांगला तीर्थाचा नैवेद्य पण दाखवला होता आपण . मला वाटला नव्हते राव की आपले भीडु इतके "तीर्थन्कर" असतील म्हणुन इतकी जोरदार पार्टी त्या जी एस ने पण दीली नाही कोणाला. त्याचा चेहेरा बघायला हवा होतास पार्टी झाल्यावर तू ए गप्पा सोडा आधी लग्नाळु जोडपी शोधा मग पार्टी चे बघा. कीर्ति ने दोघाना ही चापले. नाय तर असे करायचे का? कसे? मीकाय म्हणतो...... दिग्या तु काही म्हणु नकोस्.......पक्या जोरात ओरडला. तो का ओरडला कोणालाच कळाले नाही........

प्रमोद देव Tue, 04/01/2008 - 11:39
कोळस्कर आणि पोंबुरकर टपरीवर चहा पीत आहेत. काय म्हणा कोळस्कर... तुमची आयडियाची कल्पना बाकी झकास आहे..इति.पोंबुरकर! आहे ना! मग! कसे सगळे चक्रावलेत बघा. पण जाऊ दे. आता आज सांगूनच टाकू या सगळ्यांना! काय? कळले ना तुम्हाला?... इति.कळस्कर! अहो कळले म्हणजे काय? आपण दोघांनीच तर ठरवलंय ना? मग आज सांगितलेच पाहिजे!...इति. पोंबुरकर! आणि दोघे ग्लासाला ग्लास(चहाचा)भिडवत ओरडतात.... एप्रिल फूलऽऽऽऽऽऽ!

वरदा Wed, 04/02/2008 - 04:39
पक्या ने ओरडून दिग्याला शांत बसवले...त्याची आयडीया हाणून पाडण्यत किर्ती आपला सगळा वेळ वाया घालवेल त्यापेक्षा त्याला गप्प बसवलेले बरे म्हणून त्याने ओरडून जाहीर केले.किर्ती आपल्या सगळ्यांची मुख्य तिच्या म्हणण्याप्रमाणे करुयात. आता किर्तीला स्फुरण चढले.तिने ओळखीच्या दोन तीन ब्युटीपार्लर मधे जाहीराती लावल्या, जोडपी मिळाली तर मेकअप साठी इथेच घेऊन येईन ह्या प्रॉमिस वर. तिथे मंदाचा जळफळाट होत होता.लग्न माझं आणि महत्व मात्र किर्तीला? तिने मंदारला आडून आडून बोलूनही दाखवलं तर त्याचं उत्तर एकच अगं कमीत कमी कष्टात आपल्याला लग्न करुन मिळतय तेही बाबांच्या अटीप्रमाणे कुणी का अरेंज करेना आपल्याला काय? आणि आपली मैत्रीणच आहे की ती. पण मंदाने ठरवलं काहीतरी करुन तिचं महत्व कमी करायचच. जरा अद्दल घडवलीच पाहिजे हीला. महत्वाचा मुद्दा होता मुहुर्त निश्चित करण्याचा. कोळस्कर आणि पोंबुर्करांनी इथेही नाट लावली होती. कोळस्करांनी मुहुर्त सांगितला की पोंबुरकर नाही म्हणायचे आणि पोंबुरकरांनी ठरवला की लगेच काहीतरी न जमण्याचं कारण पोंबुरकरांकडे तयार असायचं. श्रावण महीना फार सण असतात उपासाच्या दिवसात काहींना जेवता येणार नाही. भाद्रपद खरा गणेशोत्सव असतो चाळीत तेव्हा कसं जमणार. नंतर दिवाळीची सुट्टी म्हणून लोक बाहेरगावी जातात तेव्हा नको. एक ना दोन हजार खुसपटं निघत होती. ह्यावेळी मंदाही त्यांना सामील झाली होती.
स्पिन अ यार्न हा ईंग्लीश मधला धमाल प्रकार आहे.यात एक कथा सूत्र घेतले जाते आणि वेगळे वेगळे लोक त्या कथेत स्वतः रंग भरतात्.सूत्रधार कथेला मार्गावर आणण्याचे काम करत असतो......( एकता कपूर असेच करत असावी) मला वाटते यात धमाल्या. सगळे डॉन , डांबीस काका प्राजु तात्या वरदा सगळे विवेक इनोबा सगळे डॉ. सर्वाना जोरदार वाव आहे..आपण्ही असा एखादा प्रयोग करुया.पुणेरी,कोल्हापुरी,मालवणी ,गोयची कोकणी ,वैदर्भी ,नागपुरी भाषेची मस्त मिसळ चालेल चला रेडी का? करू सुरुवात?

श्वानराजाधिराज

सृष्टीलावण्या ·

धमाल मुलगा Tue, 03/18/2008 - 10:41
अरे वा..माझ्या आवडीचा विषय :-) माहिती आवडली. पण मी 'कारवानी' ला पस॑ती देतो. कारण, मुळातच कारवानी (कारवान हाउ॑ड) कुत्रे हे काटक, शेलाट्या बा॑ध्याचे, रागीट स्वभावाचे असतात. रोगप्रतिकारक शक्तीदेखील इतर इलायती जाती॑पेक्षा उत्तम असते. अगदी शिळ॑-पाक॑ सुध्दा खाऊन टुणटुणीत राहतात. कारवानी॑चा आणखी एक 'प्लस पाइ॑ट' म्हणजे त्या॑चा चेहरा (तो॑ड). सतत हि॑स्त्र भाव असतात. गेटातून आत शिरताना अनोळखी माणूस असेल तर हे कुत्र॑ नुसत॑ समोर आल्याबरोबर बघणार्‍याची चड्डी ओली व्हायची वेळ येते. (अतिशयोक्ती नाही करत : पहिल्या॑दा आमच्याकडे आलेल्या एका मित्राची खर॑च झाली होती.) तरीही, हे पश्मिना प्रकरण जरा 'इ॑टरेश्टी॑ग' वाटत॑य. बघायला पाहिजे एकदा. सृष्टीताई, ह्याबद्दल आणखी माहिती कुठे मिळेल? ब्रिडर्स, साधारण कि॑मत, त्या॑ची पथ्य॑-पाणी, आणि सर्वात महत्वाच॑ त्या॑ना कारवानी कि॑वा लॅब्रेडॉर / फ्रे॑च मॅस्टीफ सारखी अक्कल असते का? ट्रेनि॑ग दिल्यास ते व्यवस्थित शिकू शकतात का? आपला, - श्वानप्रेमी ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

सृष्टीलावण्या Wed, 03/19/2008 - 08:18
ट्रेनि॑ग दिल्यास ते व्यवस्थित शिकू शकतात का? हो, ते खरे तर पोलीसी कुत्रे आहेत आणि पटकन शिकतात सुद्धा. मी ही जात प्रत्यक्ष पाहिली तेव्हा मला फार आवडली होती. त्यांच्याविषयी इंटरनेटवर फार कमी माहिती उपलब्ध आहे. हे वाच : http://www.hinduonnet.com/mag/2005/01/09/stories/2005010900860800.htm http://pashmis.tripod.com/index.html > > आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...

In reply to by सृष्टीलावण्या

इनोबा म्हणे Wed, 03/19/2008 - 17:09
लातूर जिल्ह्यात म्हाळुंगी येथे अस्सल भारतीय वाणाची ही कुत्र्याची जात विकसित करण्यात आली त्यानंतर त्याला मुंबईच्या लोकलमधे सोडलं असावं.गर्दीमधे चेपून लांबट झाल्यासारखं वाटतंय. लातूरमधेच राहीलं असतं तर,मोकळ्या वातावरणात चांगलं सुटलं असतं. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

प्राजु Wed, 03/19/2008 - 08:15
अतिशय सुंदर माहिती सृष्टीताई... खरं म्हणजे हे तुम्ही सांगितले इथे म्हणून नाहीतर या ब्रिड बद्दल समजलेच नसते. फोटोही चांगला आहे. कुत्रे लढाऊ असणार हे नक्की. - (सर्वव्यापी)प्राजु

डॉ.प्रसाद दाढे Wed, 03/19/2008 - 09:44
पश्मी ह्या जातीबद्दल पूर्वी ऐकले होते पण कधी पाह्यला नव्हता वा फोटोही पाहिला नव्हता. माझ्या मते विदेशी कुत्रे तब्येतीने थोडे नाजूक असतात व (भारतीय हवामानात) पावसाळ्यात वगैरे त्या॑ची विशेष काळजी घ्यावी लागते. एतद्देशीय कुत्रे जर एव्हढे देखणे असतील तर पाळायला काही हरकत नसावी. 'स्वदेशी अपनाओ!'

सृष्टीलावण्या Wed, 03/19/2008 - 18:42
खरेच. देशी वाणाचे एक छानच असते (ते पण रस्त्यावरून उचलून आणले असेल तर) सहसा आजारी पडायची भीती नाही आणि दुसरे म्हणजे त्यांना साध्या आजारांसाठी आजीबाईचा बटवा आणि इतर माणसांची औषधे लागू पडतात. पशुवैद्याकडे न्याच कशाला. आमच्या एका ओळखीच्याने कुत्र्याला जंत झाल्यावर वावडिंगाचा काढा पाजला होता. जंताचा त्रास पूर्ण गेला. तो कुत्रा चांगलाच बलदंड झाला. माझ्याकडे एक मांजराचे पिल्लु आहे त्याच्या एका डोळ्यातून सारखी पिवळी घाण बाहेर येत होती (पू नव्हता), त्याच्या डोळ्यात रोज २-३ दा Ciplox eye drops टाकले. आता डोळा छान आहे. मी तर म्हणेन, कुत्रा आणि मांजर यांचे फाजील लाड करू नयेत आणि त्यांना सारखे डॉक्टरकडे पण नेऊ नये. अवांतर: पाळीव प्राण्यांच्या जेवणात चिमूटभर मीठ घालायला विसरू नये असे प्राणी तज्ञांचे मत आहे. > > धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...

तात्या विंचू Wed, 03/19/2008 - 19:39
परवा Eight Below हा चित्रपट पाहिला... दक्षिण धृवावरची ही कहाणी आहे. सर्व चित्रपट हा स्लेज गाडी ओढणर्या कुत्र्यांवर आधारित आहे. दक्षिण धृवावर मोहिमेसाठी आलेल्या प्रोफेस्सोर्ला कुत्रे आनि त्यान्चा ट्रेनर बर्फातून वाचवतात. त्याला उप्चारांसाठी अमेरिकेत न्यावे लागते. तेव्हा पूर्ण बेस रिकामा कर्तात... ट्रेनरला वाटते की लगेच २-३ दिव्सात परत येता येइल त्यामुळे तो कुत्र्याना बरोबर घेत नाही..पण नंतर हवामान खराब झाल्याने कोणीही परत दक्षिण धृवावर जाउ शकत नाही. प्रायोजक मिळत नस्ल्याने ट्रेनर पण परत जाउ शकत नाही. अशा परिस्थितित सर्व कुत्रे कसे आनि किति दिवस दक्षिण धृवावर राहतात, एकमेकाना कसे सांभाळून घेतात,त्यांचा ट्रेनर त्यांना घ्यायला परत येतो का नाही ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर हा चित्रपट नक्की बघा... सुरेख फोटोग्राफी, कुत्र्यांचा सुंदर अभिनय ही या चित्रपटाची वैशिषट्ये आहेत... हॉलिवूड्चे चित्रपट बेश्ट मानणारा- तो मी नव्हेच

सुधीर कांदळकर Wed, 03/19/2008 - 22:00
मी पाहिला. अतिशय छान आहे. पाहिल्यावर चौदा इंजेक्शने घ्यावी लागत नाही. मी कुत्र्याला घाबरतो. तरीहि पाहिला. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

धमाल मुलगा Tue, 03/18/2008 - 10:41
अरे वा..माझ्या आवडीचा विषय :-) माहिती आवडली. पण मी 'कारवानी' ला पस॑ती देतो. कारण, मुळातच कारवानी (कारवान हाउ॑ड) कुत्रे हे काटक, शेलाट्या बा॑ध्याचे, रागीट स्वभावाचे असतात. रोगप्रतिकारक शक्तीदेखील इतर इलायती जाती॑पेक्षा उत्तम असते. अगदी शिळ॑-पाक॑ सुध्दा खाऊन टुणटुणीत राहतात. कारवानी॑चा आणखी एक 'प्लस पाइ॑ट' म्हणजे त्या॑चा चेहरा (तो॑ड). सतत हि॑स्त्र भाव असतात. गेटातून आत शिरताना अनोळखी माणूस असेल तर हे कुत्र॑ नुसत॑ समोर आल्याबरोबर बघणार्‍याची चड्डी ओली व्हायची वेळ येते. (अतिशयोक्ती नाही करत : पहिल्या॑दा आमच्याकडे आलेल्या एका मित्राची खर॑च झाली होती.) तरीही, हे पश्मिना प्रकरण जरा 'इ॑टरेश्टी॑ग' वाटत॑य. बघायला पाहिजे एकदा. सृष्टीताई, ह्याबद्दल आणखी माहिती कुठे मिळेल? ब्रिडर्स, साधारण कि॑मत, त्या॑ची पथ्य॑-पाणी, आणि सर्वात महत्वाच॑ त्या॑ना कारवानी कि॑वा लॅब्रेडॉर / फ्रे॑च मॅस्टीफ सारखी अक्कल असते का? ट्रेनि॑ग दिल्यास ते व्यवस्थित शिकू शकतात का? आपला, - श्वानप्रेमी ध मा ल.

In reply to by धमाल मुलगा

सृष्टीलावण्या Wed, 03/19/2008 - 08:18
ट्रेनि॑ग दिल्यास ते व्यवस्थित शिकू शकतात का? हो, ते खरे तर पोलीसी कुत्रे आहेत आणि पटकन शिकतात सुद्धा. मी ही जात प्रत्यक्ष पाहिली तेव्हा मला फार आवडली होती. त्यांच्याविषयी इंटरनेटवर फार कमी माहिती उपलब्ध आहे. हे वाच : http://www.hinduonnet.com/mag/2005/01/09/stories/2005010900860800.htm http://pashmis.tripod.com/index.html > > आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...

In reply to by सृष्टीलावण्या

इनोबा म्हणे Wed, 03/19/2008 - 17:09
लातूर जिल्ह्यात म्हाळुंगी येथे अस्सल भारतीय वाणाची ही कुत्र्याची जात विकसित करण्यात आली त्यानंतर त्याला मुंबईच्या लोकलमधे सोडलं असावं.गर्दीमधे चेपून लांबट झाल्यासारखं वाटतंय. लातूरमधेच राहीलं असतं तर,मोकळ्या वातावरणात चांगलं सुटलं असतं. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

प्राजु Wed, 03/19/2008 - 08:15
अतिशय सुंदर माहिती सृष्टीताई... खरं म्हणजे हे तुम्ही सांगितले इथे म्हणून नाहीतर या ब्रिड बद्दल समजलेच नसते. फोटोही चांगला आहे. कुत्रे लढाऊ असणार हे नक्की. - (सर्वव्यापी)प्राजु

डॉ.प्रसाद दाढे Wed, 03/19/2008 - 09:44
पश्मी ह्या जातीबद्दल पूर्वी ऐकले होते पण कधी पाह्यला नव्हता वा फोटोही पाहिला नव्हता. माझ्या मते विदेशी कुत्रे तब्येतीने थोडे नाजूक असतात व (भारतीय हवामानात) पावसाळ्यात वगैरे त्या॑ची विशेष काळजी घ्यावी लागते. एतद्देशीय कुत्रे जर एव्हढे देखणे असतील तर पाळायला काही हरकत नसावी. 'स्वदेशी अपनाओ!'

सृष्टीलावण्या Wed, 03/19/2008 - 18:42
खरेच. देशी वाणाचे एक छानच असते (ते पण रस्त्यावरून उचलून आणले असेल तर) सहसा आजारी पडायची भीती नाही आणि दुसरे म्हणजे त्यांना साध्या आजारांसाठी आजीबाईचा बटवा आणि इतर माणसांची औषधे लागू पडतात. पशुवैद्याकडे न्याच कशाला. आमच्या एका ओळखीच्याने कुत्र्याला जंत झाल्यावर वावडिंगाचा काढा पाजला होता. जंताचा त्रास पूर्ण गेला. तो कुत्रा चांगलाच बलदंड झाला. माझ्याकडे एक मांजराचे पिल्लु आहे त्याच्या एका डोळ्यातून सारखी पिवळी घाण बाहेर येत होती (पू नव्हता), त्याच्या डोळ्यात रोज २-३ दा Ciplox eye drops टाकले. आता डोळा छान आहे. मी तर म्हणेन, कुत्रा आणि मांजर यांचे फाजील लाड करू नयेत आणि त्यांना सारखे डॉक्टरकडे पण नेऊ नये. अवांतर: पाळीव प्राण्यांच्या जेवणात चिमूटभर मीठ घालायला विसरू नये असे प्राणी तज्ञांचे मत आहे. > > धैर्य दे अन् नम्रता दे, पाहण्या जे जे पहाणे; वाकू दे बुद्धिस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे...

तात्या विंचू Wed, 03/19/2008 - 19:39
परवा Eight Below हा चित्रपट पाहिला... दक्षिण धृवावरची ही कहाणी आहे. सर्व चित्रपट हा स्लेज गाडी ओढणर्या कुत्र्यांवर आधारित आहे. दक्षिण धृवावर मोहिमेसाठी आलेल्या प्रोफेस्सोर्ला कुत्रे आनि त्यान्चा ट्रेनर बर्फातून वाचवतात. त्याला उप्चारांसाठी अमेरिकेत न्यावे लागते. तेव्हा पूर्ण बेस रिकामा कर्तात... ट्रेनरला वाटते की लगेच २-३ दिव्सात परत येता येइल त्यामुळे तो कुत्र्याना बरोबर घेत नाही..पण नंतर हवामान खराब झाल्याने कोणीही परत दक्षिण धृवावर जाउ शकत नाही. प्रायोजक मिळत नस्ल्याने ट्रेनर पण परत जाउ शकत नाही. अशा परिस्थितित सर्व कुत्रे कसे आनि किति दिवस दक्षिण धृवावर राहतात, एकमेकाना कसे सांभाळून घेतात,त्यांचा ट्रेनर त्यांना घ्यायला परत येतो का नाही ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर हा चित्रपट नक्की बघा... सुरेख फोटोग्राफी, कुत्र्यांचा सुंदर अभिनय ही या चित्रपटाची वैशिषट्ये आहेत... हॉलिवूड्चे चित्रपट बेश्ट मानणारा- तो मी नव्हेच

सुधीर कांदळकर Wed, 03/19/2008 - 22:00
मी पाहिला. अतिशय छान आहे. पाहिल्यावर चौदा इंजेक्शने घ्यावी लागत नाही. मी कुत्र्याला घाबरतो. तरीहि पाहिला. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
pashmina लातूर जिल्ह्यात म्हाळुंगी येथे अस्सल भारतीय वाणाची ही कुत्र्याची जात विकसित करण्यात आली आहे. त्यांना पश्मीना हे नाव देण्यात आले आहे. हे कुत्रे अतिशय लढवय्ये असून त्यांची रोगप्रतिकार शक्तीसुद्धा उत्तम आहे. मात्र ते महाग आहेत. पण मूळ कुत्रे ज्यांचा संकर करून ही जात निर्माण केली गेली ते धनगर कुत्र्यांमधून शोधून काढण्यात आले होते.

मधुशाला - एक मुक्तचिंतन आणि भावानुवाद (भाग ३)

चतुरंग ·

नंदन Tue, 03/18/2008 - 09:00
हाही भावानुवाद आवडला. फक्त शेवटून दुसर्‍या ओळीत विदग्ध (हृदयी) याऐवजी भग्न किंवा ध्वस्त चालू शकेल का? विदग्धचा शब्दशः अर्थ जरी पूर्णपणे जळून गेलेला असला तरी अधिक प्रचलित अर्थ चतुर, निपुण, विद्वान असा आहे, म्हणून असं वाटलं.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

चतुरंग Tue, 03/18/2008 - 09:08
संपूर्ण 'मधुशाले'च्या अनुषंगाने विचार केला असता 'विदग्ध' शब्द जास्त योग्य वाटतो कारण ह्यात दोन्ही अर्थच्छटा दाखवायच्या आहेत. एक म्हणजे कवी भग्न हृदयी तर आहेच पण तो वाचकाला वाटही दाखवतो आहे, अनुभवाचे सार देतो आहे त्यामुळे तो निपुण आहे दुनियादारीने शहाणा झालेला आहे! पुढच्या रुबायांच्या जोडीने हा अर्थ योग्य आहे असे तुम्हालाही जाणवेल. चतुरंग

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 09:43
पण तरीहि तू घाबरुन जाऊ नकोस, तुला समजून घेण्याइतकी संवेदनशीलता आहे ह्या मधुशालेजवळ, असा आश्वासक सल्ला द्यायलाही तो विसरत नाही.. एकदा का तुझी तिच्याशी ओळख झाली की पहाच कसा गुरफटत जाशील त्या मायाजालात!! जळण्यातला आनंद ज्यांना समजलेला आहे त्यांच्यासाठीच ही मधुशाला आहे, इतरांनी त्याच्या वाटेला न जाणेच शहाणपणाचे; अशी एक गर्भित धमकीही इथे आहे असे वाटते. वा वा! सुरेख विवेचन आणि सुरेख अनुवाद!! रंगराव, तुमच्या मधुशालेला 'केवळ अप्रतिम!' असंच म्हणावं लागेल... ह्या मधुशालेमुळे मिपा खूप खूप श्रीमंत झाली आहे आणि अजूनही होईल असे वाटते! पुढील लेखनाकरता अनेकानेक शुभेच्छा! तात्या.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धनंजय Wed, 03/19/2008 - 20:18
> जलतरंग जणु हा वाजतसे, तव चुंबन करता हा प्याला, ऐवजी असे चालेल का? जलतरंग जणु हा वाजतसे, चुंबन करता प्याल्या प्याला, ... ("तव" प्याला चुंबिता जलतंरंगासारखा आवाज येणार नाही, प्याल्यास प्याला चुंबिता तसा आवाज येईल.)

In reply to by धनंजय

चतुरंग गुरुवार, 03/20/2008 - 19:36
आपण योग्य दुरुस्ती सुचविता आहात त्या बद्दल आपले कौतुक वाटते. मुळात मला शब्दांची योग्य जुळणी काही केल्या सुचेना मग प्रयत्न सोडून दिला. आज तुम्ही दुरूस्ती सुचविल्यावर पुन्हा एकदा उचल घेतली आणि शब्द मिळाले - दुरुस्ती केली आहे. धन्यवाद! चतुरंग

प्राजु गुरुवार, 03/20/2008 - 01:02
चतुरंग, तुमचा हा भावानुवद.. मराठी काव्य जगतात एकदम खळबळ उडवून देइल नक्की... अतिशय सुंदर विवेचन. मधुशाला मराठीत येणं हे मराठी वाचकांच भाग्यच म्हणावं. आणि ते मिपावर सगळ्यात आधी यां हा मिपाचा सन्मान आहे. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु

नंदन Tue, 03/18/2008 - 09:00
हाही भावानुवाद आवडला. फक्त शेवटून दुसर्‍या ओळीत विदग्ध (हृदयी) याऐवजी भग्न किंवा ध्वस्त चालू शकेल का? विदग्धचा शब्दशः अर्थ जरी पूर्णपणे जळून गेलेला असला तरी अधिक प्रचलित अर्थ चतुर, निपुण, विद्वान असा आहे, म्हणून असं वाटलं.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

चतुरंग Tue, 03/18/2008 - 09:08
संपूर्ण 'मधुशाले'च्या अनुषंगाने विचार केला असता 'विदग्ध' शब्द जास्त योग्य वाटतो कारण ह्यात दोन्ही अर्थच्छटा दाखवायच्या आहेत. एक म्हणजे कवी भग्न हृदयी तर आहेच पण तो वाचकाला वाटही दाखवतो आहे, अनुभवाचे सार देतो आहे त्यामुळे तो निपुण आहे दुनियादारीने शहाणा झालेला आहे! पुढच्या रुबायांच्या जोडीने हा अर्थ योग्य आहे असे तुम्हालाही जाणवेल. चतुरंग

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 09:43
पण तरीहि तू घाबरुन जाऊ नकोस, तुला समजून घेण्याइतकी संवेदनशीलता आहे ह्या मधुशालेजवळ, असा आश्वासक सल्ला द्यायलाही तो विसरत नाही.. एकदा का तुझी तिच्याशी ओळख झाली की पहाच कसा गुरफटत जाशील त्या मायाजालात!! जळण्यातला आनंद ज्यांना समजलेला आहे त्यांच्यासाठीच ही मधुशाला आहे, इतरांनी त्याच्या वाटेला न जाणेच शहाणपणाचे; अशी एक गर्भित धमकीही इथे आहे असे वाटते. वा वा! सुरेख विवेचन आणि सुरेख अनुवाद!! रंगराव, तुमच्या मधुशालेला 'केवळ अप्रतिम!' असंच म्हणावं लागेल... ह्या मधुशालेमुळे मिपा खूप खूप श्रीमंत झाली आहे आणि अजूनही होईल असे वाटते! पुढील लेखनाकरता अनेकानेक शुभेच्छा! तात्या.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धनंजय Wed, 03/19/2008 - 20:18
> जलतरंग जणु हा वाजतसे, तव चुंबन करता हा प्याला, ऐवजी असे चालेल का? जलतरंग जणु हा वाजतसे, चुंबन करता प्याल्या प्याला, ... ("तव" प्याला चुंबिता जलतंरंगासारखा आवाज येणार नाही, प्याल्यास प्याला चुंबिता तसा आवाज येईल.)

In reply to by धनंजय

चतुरंग गुरुवार, 03/20/2008 - 19:36
आपण योग्य दुरुस्ती सुचविता आहात त्या बद्दल आपले कौतुक वाटते. मुळात मला शब्दांची योग्य जुळणी काही केल्या सुचेना मग प्रयत्न सोडून दिला. आज तुम्ही दुरूस्ती सुचविल्यावर पुन्हा एकदा उचल घेतली आणि शब्द मिळाले - दुरुस्ती केली आहे. धन्यवाद! चतुरंग

प्राजु गुरुवार, 03/20/2008 - 01:02
चतुरंग, तुमचा हा भावानुवद.. मराठी काव्य जगतात एकदम खळबळ उडवून देइल नक्की... अतिशय सुंदर विवेचन. मधुशाला मराठीत येणं हे मराठी वाचकांच भाग्यच म्हणावं. आणि ते मिपावर सगळ्यात आधी यां हा मिपाचा सन्मान आहे. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु
लेखनविषय:
3

जोधा अकबर

कोलबेर ·

'हमे कुछ नही चाहिये बारतियोंका स्वागत पान परागसे होना चाहिये' हहपुवा!! आता गांधींचा जन्म अकबरानंतर शेकडो वर्षांनी झाला असली ऐतिहासिक कुजकट शंका कुणाला येत असेल तर तो दोष तुमचा आहे! परत एकदा हहपुवा!! एकदम जबरा परिक्षण.....मान गये गुरु.... - टिंग्या गोवारीकर

सर्किट Tue, 03/18/2008 - 01:24
'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या' हा असा डायलॉग खराच आहे या सिनेमात ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Tue, 03/18/2008 - 02:30
हा असा डायलॉग खराच आहे या सिनेमात?
म्हणजे काय? आम्ही खोटं बोलतो आहोत की काय? .. गांधीजी , एकता कपूर, जपानी आचारी हे सगळं 'खरंच' आहे या सिनेमात :))

चित्रा Tue, 03/18/2008 - 02:23
उगाच नावे ठेवता आमच्या हृतिकला. चांगले केले आहे त्याने काम. तुमच्या पत्नीचे काय मत झाले? हवे तर स्वतःला झोप येत होती म्हणून चित्रपट आवडला नाही असे म्हणा. आणि महाम आगाचे काम एकता कपूरने केले आहे असे म्हणता? हे तर तुम्हाला नक्की झोप आल्याचे लक्षण. ती एकता कपूर नसून इला अरूण आहे. विश्वास बसत नसल्यास हे पहा.. http://www.jodhaaakbar.com/ ह. घे. हे. सां. न. ल.

In reply to by चित्रा

कोलबेर Tue, 03/18/2008 - 02:28
नाही हो!..एकता कपुरने 'दिग्दर्शन' केले आहे असे आम्ही म्हणालो आहोत.. 'अभिनय' इला अरुणचाच आहे. बाकी ह्रितीक विषयी काय बोलणार?

In reply to by कोलबेर

चित्रा Tue, 03/18/2008 - 02:50
माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीत - तुमच्या पत्नीला कसा वाटला त्याचा अभिनय? दुसरा एक प्रश्न - ऐश्वर्या कशी वाटली? हृतिकलाच फक्त का नावे ठेवायची? बाकी चित्रपट "हिंदी" आहे हे नक्कीच, पण इतके न आवडण्यासारखे त्यात काय आहे? मला तर चित्रपट आवडला बुवा. आणि कंटाळाही आला नाही. मग कोणी मला त्यावरून मला चित्रपट कळत नाहीत असे म्हटले तरी चालेल.

In reply to by चित्रा

कोलबेर Tue, 03/18/2008 - 03:07
तुमच्या पत्नीला कसा वाटला त्याचा अभिनय?
एकंदरीत आज कालच्या मुली/महिला एकतर हृतिक गटात असतात किंवा अभिषेक गटात असे आमचे एक सुक्ष्म निरिक्षण आहे. आमची ही अभिषेक गटात असल्याने ह्रितीक विषयी आमचे सहसा एकमत होते. :)
ऐश्वर्या कशी वाटली?
ऐश्वर्या ठीक वाटली.

In reply to by कोलबेर

चित्रा Tue, 03/18/2008 - 05:16
बरोबर आहे. पण मी (सध्या) दोन्ही गटात आहे! असो. ऐश्वर्या ठीक वाटली हेच बरोबर, पण हृतिक अधिक मनापासून काम केले आहे असे आपले माझे मत.

धनंजय Tue, 03/18/2008 - 02:46
हा भन्नाट विनोदी चित्रपट आमच्या क्यूमधून काढून टाकावा की वरती चढवावा हे कळत नाही. मस्त परीक्षण.

In reply to by धनंजय

लिखाळ Wed, 03/19/2008 - 21:37
धनंजयशी सहमत. मस्त परिक्षण. गांधींबद्दलचे वाक्य ऐकण्यासाठी तरी पहावा म्हणतो. :) --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

व्यंकट Tue, 03/18/2008 - 02:54
>>आयतेच राज्यही मिळतेय आणि राजाची मुलगी देखिल हा राजाचा वेडसरपणा पाहून खरंतर अकबराच्या तोंडाला पाणी सुटते पण ते लपवून आपण ह्या प्रस्तावावर चक्क विचार करत आहोत असे दाखवण्यात ह्रितीक रोशनने अभिनयात कमाल केली आहे. हा हा हा !!!!!! व्यंकट

In reply to by व्यंकट

इनोबा म्हणे Tue, 03/18/2008 - 03:20
आयतेच राज्यही मिळतेय आणि राजाची मुलगी देखिल हा राजाचा वेडसरपणा पाहून खरंतर अकबराच्या तोंडाला पाणी सुटते पण ते लपवून आपण ह्या प्रस्तावावर चक्क विचार करत आहोत असे दाखवण्यात ह्रितीक रोशनने अभिनयात कमाल केली आहे आयला! ह्याच्यात त्या हृतीकची काय चूक हाय रे! गोवारीकराच्या आशूने त्येला जे सांगीतलं ,त्यानं त्येच केलं ना! (जिल्हे-तालूका ईलाही इनोबा) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

प्राजु Tue, 03/18/2008 - 03:14
'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या' असं म्हणणार्‍या त्या बाल अकबराचे आपल्या कोण कौतुक वाटते (आता गांधींचा जन्म अकबरानंतर शेकडो वर्षांनी झाला असली ऐतिहासिक कुजकट शंका कुणाला येत असेल तर तो दोष तुमचा आहे! हे वाक्य मी दोनदा तो चित्रपट बघूनही मला त्यात नाही आढळले..(तुम्हाला बरे आढळले!!) आणि जरी माझे दुर्लक्ष झाले असा विचार केला तरी "लगान' आणि 'स्वदेस" सारखे अप्रतिम चित्रपट देणारा आशुतोष अशी काही घोडचूक करेल हे न पटणारे आहे. आणि त्यात जे पात्र 'माहम अंगा' दाखवले आहे ते काल्पनिक नसून खरोखरच त्या दाईने अकबराला सांभाळले होते आईप्रमाणे पण नंतर काही कूट कारस्थानही केल्यामुळे अकबराने तिला मक्का-मदिना ला पाठवून दिले यात्रेसाठी.. हा इतिहास आहे. एक कलाकृति म्हणून उत्तम आहे चित्रपट. ज्याप्रकारे इथे (हास्यास्पद) परिक्षण केले आहे ते चुकीचे आहे. आणि एकता कपूर सारख्या क ची बाराखडी करणार्‍या निर्मातीशी आशुतोष गोवारीकर यांची तुलना करणे चुकीचे आहे. अकबराची जी प्रतिमा अभ्यासात होती तिच (९०%) तशीच रेखाटली आहे. आता जोधाचे अकबराची लग्न ठरल्यावर तिचि मनःस्थिती काय आणि कशी झाली असेल याचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही याला आशुतोष गोवारिकर जबाबदार असू शकत नाही. त्यामुळे एका दिग्दर्शकाच्या बुद्धीला जे पटेल आणि एका हिंदू मुलीचा मुस्लिम मुलाशी विवाह ठरल्यावर (मग तो प्रेम विवाह असला तरी मुलगी थोडि बावरलेली असते) ...ठरल्यावर म्हणण्यापेक्षा लादल्यावर तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल हे त्याने त्यात दाखवले आहे. पण मूळ कथेला ते कुठेही मारक ठरत नाही. दाखवलेली युद्धे.. अतिशय परिणाम कारक, घोडे, हत्ती यांचा यथायोग्य वापर याने त्या प्रसंगांना उठाव आला आहे. जोधा - अकबराचे एकमेकाला स्पर्शही न करता केवळ नजरेतून खुलणारे प्रेम ... कुठेही कोणत्याही प्रकारची ओंगळता न दाखवता, कोणतेही कामुक दर्शन न घडवता केलेले चित्रण.. हा या चित्रपटाच्या यशात वाटा(सध्याच्या काळात तरी) म्हणावा लागेल. आतापर्यंत कोणी मुघल हिंदुस्थानात आपले पाय रोवू शकला नाही याचे कारण त्यांनी केलेले धार्मिक आत्याचार हे जेव्हा अकबर म्हणतो... आणि पूर्वी पासून इथे राहणारे हिंदू आणि नंतर येऊन स्थायिक झालेले मुस्लिम दोघेही हिंदुस्थानी आहेत त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे धार्मिक आत्याचार करणे योग्य नव्हे.. हे वाक्य "एक सम्राटाला" शोभते. इतिहासाला कोठही धक्का न लावता केलेला हा चित्रपट.. हास्यास्पद नक्कीच नाही. जरूर पहावा असा आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

कोलबेर Tue, 03/18/2008 - 03:21
लेखाच्या शेवटी ह.घ्या. टाकायला विसरलो ही घोडचूक झाली खरी! पण आता ती चूक फक्त जनरल डायरच सुधारू शकतो!! :) -आशुतोष कोलबेरकर

In reply to by प्राजु

मुक्तसुनीत Tue, 03/18/2008 - 03:25
>>> हास्यास्पद नक्कीच नाही. जरूर पहावा असा आहे. अहो, कशापाई रागावताय ? कोलबेररावसुद्धा म्हणताहेत की जरूर पहावा ....हास्यास्पद आहे म्हणूनच जरूर पहावा असा आहे की. (हघ्याहेसांनल)

In reply to by प्राजु

कोलबेर Tue, 03/18/2008 - 03:29
एक कलाकृति म्हणून उत्तम आहे चित्रपट. ज्याप्रकारे इथे (हास्यास्पद) परिक्षण केले आहे ते चुकीचे आहे.
आपल्या ह्या मताचा आम्ही (असहमत असलो तरी) आदरच करतो! परंतु तरीही आम्हाला हा चित्रपट कसा वाटला हे न राहवल्याने आम्ही इथे मांडले (जे परिक्षण असल्याचा लेखकाचा दावा नाही!) तर ते चुकीचे कसे?

In reply to by प्राजु

आनंदयात्री Tue, 03/18/2008 - 10:40
प्राजुशी सहमत ! अवांतरः फक्त इंग्रजी, फ्रेंच, रशियन, अरबी अन अजुन कोणते कोणते चित्रपट (म्हणजे हिंदी वगळुन) चांगले, अभिरुचिसंपन्न असतात का ? (अभिरुचीहीन अन तद्दन लो बजेट चित्रपटांचा चाहता) -आनंदयात्री

In reply to by आनंदयात्री

आजानुकर्ण Tue, 03/18/2008 - 10:44
फक्त इंग्रजी, फ्रेंच, रशियन, अरबी अन अजुन कोणते कोणते चित्रपटच (म्हणजे हिंदी वगळुन) चांगले, अभिरुचिसंपन्न असतात का ?
खरे आहे हे. (प्रतिसादक) आजानुकर्ण इराणी व चिनी चित्रपटही चांगले असतात असा अनुभव आहे. (अनुभवी) आजानुकर्ण हिंदी चित्रपटांइतके बटबटीत मनोरंजन कदाचित हॉलीवूडमधल्या काही मेनस्ट्रीम सिनेमांतच बघायला मिळेल. मात्र तरीही ते अधिक सुसह्य असेल. (परखड) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

आनंदयात्री Tue, 03/18/2008 - 10:51
प्रतिसादक अनुभवी अन परखड रा.रा. आजानुकर्ण साहेब तुमची अभिरुची कळविल्याबद्दल धन्यवाद. अवांतरः चला आम्ही पण आजपासुन हिंदी शिनेमांना शिव्या देणार.

चतुरंग Tue, 03/18/2008 - 03:37
आशुतोषचा हा एक चांगला प्रयत्न आहे. ऐतिहासिक चित्रपट हा खरोखर इतिहासाला धरुन काढताना बराच संयम दाखवावा लागतो नाहीतर त्याचा बोजवारा उडायला वेळ लागत नाही. जोधा-अकबर मध्ये बर्‍यापैकी संयतपणे काम झाले आहे. काही प्रसंग अर्थातच दिग्दर्शकाच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून असतात आणि शेवटी अभिनेत्यांवर तर असतातच. हृतिकने ह्यात काम चांगले केले आहे. त्याने सम्राटाचा बाज चांगला सांभाळलाय. ऐश्वर्यापेक्षा तो अभिनयात सरस ठरलाय असे माझे मत. त्याचा फिटनेस ही वाखाणण्याजोगा आहे (ही बाब नगण्य नाही). लढाईची दृश्येही चांगली आहेत. असे चित्रपट सध्याच्या काळात काढणे खरोखरच कठिण आहे. परीक्षणात ज्याप्रकारे हा तद्दन चित्रपट असल्याचे भासवले आहे तसा तो नक्कीच नाहिये. (अवांतर - आशुतोषला 'लगान' नंतर लगेचच पाठीच्या त्रासाने ग्रासल्याने त्याने ह्या संपूर्ण चित्रपटाचे दिग्दर्शन झोपून केले आहे. तो खुर्चीत बसू शकत नाही. काहीसा कै. बाबा आमट्यांसारखा त्रास.) चतुरंग

In reply to by चतुरंग

बेसनलाडू Tue, 03/18/2008 - 03:53
गोवारीकर लगानच्या संघाचा (न खेळणारा - नॉनप्लेइंग)कर्णधार झाल्यापासून सुरू झालेला पाठीचा त्रास भारतीय क्रिकेट संघाच्या (प्लेइंग) कर्णधारांकडे (सध्या धोनी) वारशाने चालत आला आहे, असेही इतिहास सांगतो. (ट्वेल्थ मॅन)बेसनलाडू बाकी जोधा अकबर येथे वर्णिला गेलाय तितका हास्यास्पद नाही; मात्र (ऍज क्लेम्ड इन द मूवी) चित्रपटात दाखवलेले प्रसंग इतिहासाबरहुकूम असतील तर तत्कालीन परिस्थिती, संस्कार इ. नुसार घेतलेल्या निर्णयांचे, केलेल्या कृतींचे नि त्यामागच्या तर्काचे वर्णन सध्याच्या काळात हास्यास्पद करता येऊ शकेल, असे वाटते. कोलबेरपंतांना काहीसे हेच अपेक्षित असावे. भरजरी वस्त्राभूषणे, हत्तीघोडे, सहाय्यक कलावंत नि अनेक एक्स्ट्रॉज, नृत्ये या सगळ्यांसाठी केलेला वित्तविनियोग (सोप्या मराठीत 'उधळपट्टी'') लक्षात घेता निदान नितीन देसाई-गोवारीकरांसारखी मराठी माणसे विनोदी चित्रपट काढायचे धाडस करायची नाहीत, असे वाटते. (मध्यमवर्गीय)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

चतुरंग Tue, 03/18/2008 - 08:17
आणि कालखंडाला आवश्यक असलेली वेशभूषा, हत्तीघोडे इ. लवाजमा दाखविणे खर्चिक असणारच पण म्हणून ते चूक कसे? >>चित्रपटात दाखवलेले प्रसंग इतिहासाबरहुकूम असतील तर तत्कालीन परिस्थिती, संस्कार इ. नुसार घेतलेल्या निर्णयांचे, केलेल्या कृतींचे नि त्यामागच्या तर्काचे वर्णन सध्याच्या काळात हास्यास्पद करता येऊ शकेल, असे वाटते. कोलबेरपंतांना काहीसे हेच अपेक्षित असावे. >> हो शक्य आहे. त्याकाळातल्या काही कॄती ह्या आज हास्यास्पद वाटू शकतात आणि म्हणूनच मी वरती म्हटले आहे की इतिहासाला धरुन चित्रपट काढायचा असला तर हे अवघड काम धाडसाने करावे लागते आणि गोष्टी हास्यास्पद वाटतील ह्या भीतीने विपर्यास करता कामा नये! एकदम टोकाची भूमिका घेऊन ती व्यक्तिरेखा अगदी पूजनीय वगैरे करुन टाकली जाण्याची दाट शक्यता अशावेळी असते. ते होणार नाही ह्याची काळजी घेण्यात आशुतोष यशस्वी झाला आहे आणि ते त्याचे यश आहे असे मी मानतो. बाकी भूमिका, अभिनय इ. मधे वैयक्तिक मतमतांतरे असू शकतात. चतुरंग

In reply to by बेसनलाडू

आजानुकर्ण Tue, 03/18/2008 - 09:51
भरजरी वस्त्राभूषणे, हत्तीघोडे, सहाय्यक कलावंत नि अनेक एक्स्ट्रॉज, नृत्ये या सगळ्यांसाठी केलेला वित्तविनियोग लक्षात घेतला तरी 'जाणता राजा' आम्हाला विनोदी वाटले होते. चित्रपटावर खर्च केलेला पैसा हा कलाकृतीचा दर्जा मोजण्यासाठीचा निकष ठरू नये असे वाटते, (कंजूस) आजानुकर्ण चिदंबरम

सुधीर कांदळकर Tue, 03/18/2008 - 05:25
पान पराग, मतिमंद भाव, जपानी आचा-यांची कवायतखासच. तरी मला एक प्रश्न आहे. असला हिंदी सिनेमा पाहायला जातांना आपण मेंदू आणी घड्याळ बरोबर का नेता? जवळवळ प्रत्येक हिंदी चित्रपट एकताचाच असतो. असोधमाल आली. मस्त परीक्षण. अशीच येऊ द्यात.

सृष्टीलावण्या Tue, 03/18/2008 - 08:17
आजकाल मल्टिप्लेक्सच्या दिवसात चित्रपट बघायचा म्हणजे जेव्हा दोन तीनशे रुपयाला फोडणी लागते तेव्हा... मी त्यावर एक चांगले उपाय काढले आहेत. १) सर्व मराठी वृत्तपत्रांत जो सगळ्यात जास्त टीका करतो अश्या समीक्षकाचे परीक्षण वाचायचे. २) आपली आणि ज्यांची चित्रपटांची आवड कणभर सुद्धा जुळत नाही त्यांना चित्रपट आवडला असेल तर तो चित्रपट मुळीच पाहायला जायचे नाही. ३) तो चित्रपट घरी आधी केबलवर पाहायचा आणि अगदी फारच आवडला तरच पाहायला जायचे. ४) शक्यतो मल्टिप्लेक्स मध्ये जायचे टाळायचे. इ.इ. असो. अकबर कोणी महात्मा नव्हता असे इतिहास सांगतो. सविस्तर इथे वाचा. > > आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...

जोधा-अकबर चांगला चित्रपट आहे, पण त्याच्या या सुंदर हसर्‍या परिक्षणाने आमची ह. ह.पु. वा. झाली. :) बाकी त्या 'ख्वाजा मेरे ख्वाजा' या गाण्याने रडावे की हसावे कळत नाही, हे मात्र खरेच आहे. पान पराग, मतिमंद भाव, जपानी आचा-यांची कवायत या उपमांना तोड नाही. :))))))))))

आजानुकर्ण Tue, 03/18/2008 - 09:24
कोलबेरराव, परीक्षण चित्रपटापेक्षा मनोरंजक आहे. अधिक काय लिहू. (आनंदित) आजानुकर्ण

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 09:31
वरूणदेवा, झक्कास परिक्षण केले आहेस... मजा आली.. माझं वैयक्तिक मत विचाराल तर मला हा चित्रपट जामच बोअर वाटला होता. गाढ झोप लागण्याकरता या चित्रपटाचा उत्तम उपयोग होऊ शकेल असे वाटते! :) तात्या.

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 09:50
अवांतर - कुणीतरी मोठ्ठा दिग्दर्शक असल्याच्या थाटात हिंडणारी आणि तसा गाजावाजा करणारी ही आशुतोष गोवारीकरसारखी मंडळी बघितली की 'गोलमाल' सारखे निखळ चित्रपट देणारे आमचे हृषिदा खरंच किती मोठे होते हे समजतं! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू Tue, 03/18/2008 - 09:56
कुणीतरी मोठ्ठा दिग्दर्शक असल्याच्या थाटात हिंडणारी आणि तसा गाजावाजा करणारी ही आशुतोष गोवारीकरसारखी मंडळी --- आक्षेप आहे. जो मनुष्य शाहरूख खानकडून योग्य इन्टेन्सिटीचा अभिनय (स्वदेस) करून घेऊ शकतो :) :) आणि आमिर खानसारख्या कसलेल्या अभिनेत्यासोबत, त्याची दादागिरी (दिग्दर्शक मराठी माणूस आणि आमिर खान निर्माता - पैसा पुरवणारा, मेहनताना देणारा इ. असून!) नियंत्रणाखाली ठेवून काम करू शकतो, तो दिग्दर्शक मोठा आहे, हे मान्य करण्यास हरकत नसावी.त्यातून आशुतोषने स्वत:च स्वतःच्या तोंडाने स्वतःचे गोडवे गायल्याचे (निदान माझ्या तरी) पाहण्यात/वाचनात/ऐकण्यात नाही. मग असा बिनबुडाचा आरोप करण्यात काय हशील? (विश्लेषक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 10:02
कबूल आहे, अहो पण चित्रपटांचं काय? ते तर हृषिदांच्या तुलनेत अगदीच टुकार आणि तद्दन वाटतात! असो... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू Tue, 03/18/2008 - 10:05
अहो पण चित्रपटांचं काय? ते तर हृषिदांच्या तुलनेत अगदीच टुकार आणि तद्दन वाटतात --- हे वादातीत आहे. विषय वेगळे, कलाकार वेगळे, काळ वेगळा हे लक्षात घेऊन मी तरी बेनिफिट ऑफ डाउट देऊ शकतो. (सहमत)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

प्राजु Wed, 03/19/2008 - 08:31
काळ वेगळा, कलाकार वेगळा.... आणि गोलमाल सारख्या पूर्णपणे विनोदी चित्रपटाशी जोधा-अकबर ची तुलना नाही होऊ शकत. तुलना करायची तर आजच्या परेश रावलच्या भन्नाट अभिनयाने भरलेल्या हेराफेरी (पहिला) शी करावी. हा चित्रपट तर ऐतिहासिक आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

विसोबा खेचर Wed, 03/19/2008 - 08:41
तुलना करायची तर आजच्या परेश रावलच्या भन्नाट अभिनयाने भरलेल्या हेराफेरी (पहिला) शी करावी. भन्नाट?? अहो आमच्या उत्पल दत्तची साधी एन्ट्री, पडद्यावरचं सहजतेने उठणं-बसणं-दिसणं यापासून बिचारा परेश रावल अजून खूप खूप दूर आहे. हेराफेरी उथळ वाटतो, मध्येच हिंसक होतो, त्यात गोलमालसारख्या निखळ करमणूकीचा पुष्कळच अभाव वाटतो. शिवाय गोलमाल है भाई सब गोलमाल है, आनेवाला पल यासारखी सुंदर गाणी गोलमाल मध्ये आहेत त्याचीही हेराफेरीत बोंब आहे. असो.. आपला, (गोलमाल, उत्पल दत्त प्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू Wed, 03/19/2008 - 08:50
पडद्यावरचं सहजतेने उठणं-बसणं-दिसणं यापासून बिचारा परेश रावल अजून खूप खूप दूर आहे. हेराफेरी उथळ वाटतो, मध्येच हिंसक होतो, त्यात गोलमालसारख्या निखळ करमणूकीचा पुष्कळच अभाव वाटतो. --- असहमत. परेश रावलचा अभिनेता म्हणून विचार करावयाचा झाल्यास त्याची स्टेजवरील नाटके, 'सरदार', 'सर' सारखे चित्रपट यांची उदाहरणे देता येतील. विथ ड्यू रेस्पेक्ट टु उत्पल दत्त, केवळ उठणं-बसणं, दिसणं, श्रीराम लागूंसारखी ठराविक पठडीतील संवादफेक इतकेच चांगल्या अभिनयाचे निकष नसतात, असे वाटते. खरे पाहता परेश रावल, नासिरुद्दीन शहा, के के मेनन, मनोज बाजपाई यांसारख्या अभिनेत्यांनी उठण्याबसण्यात किंवा दिसण्यात असणार्‍या उणिवांची कमतरता भरून काढून 'अभिनेता' म्हणून नाव कमावले आहे, हे विसरता येणार नाही. शिवाय हेराफेरीतील हिंसा ही सामान्य हिंसा नाही, तर निमित्तमात्र, प्रासंगिक मारामारी आहे. हिंसा बघायची असल्यास स्मोकिंग एसेस हा इंग्रजी चित्रपट पहावा :) यात पाहिलेली हिंसा (निदान माझ्या तरी पाहण्यात )इतरत्र आलेली नाही :) (अभिनेता)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

आजानुकर्ण Wed, 03/19/2008 - 09:12
बेसनलाडवाशी सहमत आहे. हिंसा बघायची असेल तर टॅरेंटिनोचा सिनेमा बघा. विशेषतः पल्प फिक्शन किंवा किल बिल. जमल्यास सिटी ऑफ गॉड बघा त्यातलीहिंसा पाहून मन बधीर झाले नाही तर मग जोधा अकबर बघा. नक्की बधीर होईल. आपला, (हिंसकलाडू) आजानुकर्ण

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग Wed, 03/19/2008 - 20:38
'गोलमाल' आणि 'हेराफेरी' ह्याचीही तुलना बरोबर नाही. दिग्दर्शकीय कौशल्याचा भाग घेतलात तर त्यात हृषीदा हे प्रियदर्शनपेक्षा कैक पटीने मोठे आहेत ह्यात वाद नाही. पण त्यात परेश रावलचा रोल हा वाखाणण्याजोगा होता आणि तो एक सशक्त अभिनेता आहे ह्यात शंकाच नाही. शेवटी दिग्दर्शक चांगला असला तर सोन्याला सुगंध येतोच पण मुळात सोने हवे ना? तेव्हा तुलना ही काळानुरुप हवी. (अवांतर - नाही तरी ६० ते ८० च्या दोन दशकात असे किती खरेखुरे नट होते? सुंदर गाणी; किशोर, रफी, मन्ना दा, असे एकाहून एक आवाज; आर्.डी, एस्.डी., मदन मोहन अशी प्रभावळ असताना, कोणताही मद्दड नट म्हणून उभा राहिला तरी चालून गेले. पण त्यातही अशोककुमार, संजीवकुमार, अमिताभ, अशा लोकांनी त्यांचे वेगळेपण दाखवून दिलेच.) चतुरंग

In reply to by चतुरंग

प्राजु Wed, 03/19/2008 - 22:08
नाही तरी ६० ते ८० च्या दोन दशकात असे किती खरेखुरे नट होते? सुंदर गाणी; किशोर, रफी, मन्ना दा, असे एकाहून एक आवाज; आर्.डी, एस्.डी., मदन मोहन अशी प्रभावळ असताना, कोणताही मद्दड नट म्हणून उभा राहिला तरी चालून गेले. उदाहरणच द्यायचे तर.. भारत भूषण.. केवळ उत्तम सहनायिका मिळाल्या आणि पट्टीचे संगितकार आणि गायक... यांच्या जोरावर चालून गेला. नाहितर चेहर्‍यावरची माशी हलेल तर शप्पथ! तसाच तो राजेंद्र कुमार..जॉय मुखर्जी... काही प्रमाणात मनोज कुमार (चेहर्‍यावरचा हात काढला तर संवाद ऐकू येतील) यांना अभिनेता का म्हणायचे असा प्रश्नच पडतो. या सगळ्यांच्या बाबतीत एक अभिनय ही गोष्ट सोडली तर बाकीच्या चित्रपट हिट्ट होण्यासाठी लागणार्‍या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे, स्टोरी, गीतकार, संगितकार, गायक... आणि प्रोड्युसर.. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by विसोबा खेचर

प्राजु Wed, 03/19/2008 - 22:13
हृषिकेशदां एक उत्तम दिग्दर्शक होते यांत काडी इतकी सुद्धा शंका नाही. पण त्यांनी सुद्धा, गोल माल मधले संवाद जसेच्या तसे त्यांच्याच नरम गरम या चित्रपटात वापरले आहेत. आणि मुख्य म्हणजे ते संवाद उत्पलदत्त यांच्याच तोंडी आहेत. आणि अभिनयही अगदी सारखा आहे.. ते असे.. "कितना पवित्र घर है, जैसा पवित्र घर है वैसा ही पवित्र वातावरण, जैसा पवित्र वातावरण वैसेही पवित्र विचार..... आपके पवित्र कहा है.. आपकी माताजी कहाहै??" - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 10:52
लगान हा चित्रपट टुकार व तद्दन नव्हता. सुरवातीला नव्हता परंतु दुसर्‍या की तिसर्‍या दिवशीच्या खेळाआधी रात्री मंदिरात सगळी मंडळी भावनाविवश होऊन भजनबिजन गाऊ लागतात तिथे या चित्रपटाचा बॅलन्स पार जातो आणि चित्रपट तद्दनतेकडे वळतो! आपला, (हृषिदा, गुलजारच्या चित्रपटांचा प्रेमी) तात्या.‍

जुना अभिजित Tue, 03/18/2008 - 13:55
(मग तो प्रेम विवाह असला तरी मुलगी थोडि बावरलेली असते) ह्यावरुन सुचलं. स्वप्निल बांदोडकरचं 'राधा ही बावरी' गाणं थोडा फेरफार करून 'जोधा ही बावरी' असं वापरता आलं असतं.. स्वदेस आणि लगानच्या तुलनेत हा चित्रपट गंडला आहे हे नक्की.. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

मनस्वी Tue, 03/18/2008 - 10:38
वेगळ्या धाटणीचे परिक्षण आवडले. मजा आली. वाचकांनी इतके सिरियसली घेउ नये. असे हलकेफुलके वाचायला छान वाटते. मनस्वी

धम्मकलाडू Tue, 03/18/2008 - 13:12
सुरेख परीक्षण कोलबेर. अभिनंदन.
'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या'
हा संवाद ऐकून डोळ्यांत पाणी आले. खरंच कसं काय सुचतं हे सारं काही. दिग्दर्शकाला. प्राजू, पुन्हा एकदा चित्रपट नीट बघा बरं.
त्यावेळेस त्याच्या चेहर्‍यावर असणारे मतिमंद भाव खरंच दाद देण्यासारखे आहेत.
हृतिकला यासाठी नक्कीच वेगळे प्रयत्न करावे लागले नसावेत. त्याचा मतिमंद अभिनय नैसर्गिक, साहजिकच असतो. जोधा अकबर नंतर आशुतोष गोवारीकर खोजा अकबर हा चित्रपट काढणार आहेत अशी बातमी माझ्या मित्राने नुकतीच दिली. अकबराच्या जनानखान्याची चौकीदारी करणारा एका खोजा आणि सम्राट अकबर यांतील प्रेमप्रकरणावर आधारित असणार आहे. धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by धम्मकलाडू

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 13:23
हृतिकला यासाठी नक्कीच वेगळे प्रयत्न करावे लागले नसावेत. त्याचा मतिमंद अभिनय नैसर्गिक, साहजिकच असतो. हा हा हा! जोधा अकबर नंतर आशुतोष गोवारीकर खोजा अकबर हा चित्रपट काढणार आहेत अशी बातमी माझ्या मित्राने नुकतीच दिली. अकबराच्या जनानखान्याची चौकीदारी करणारा एका खोजा आणि सम्राट अकबर यांतील प्रेमप्रकरणावर आधारित असणार आहे. खोजा-अकबर!! हहपुवा.... :) आपला, (ज़नानखान्याचा खोजा) तात्या.

In reply to by धम्मकलाडू

मनस्वी Tue, 03/18/2008 - 13:54
हृतिकला यासाठी नक्कीच वेगळे प्रयत्न करावे लागले नसावेत. त्याचा मतिमंद अभिनय नैसर्गिक, साहजिकच असतो.
आमच्या हृतिकला नावे ठेवलेली मुळीच खपवून घेणार नाही. गुरु आणि इतर सुमार चित्रपटांतील अतिमतिमंद अभिषेकपेक्षा हृतिक नक्कीच सरस आहे. ह.घ्या. मनस्वी

In reply to by मनस्वी

जुना अभिजित Tue, 03/18/2008 - 14:03
गुरु आणि इतर सुमार चित्रपटांतील अतिमतिमंद अभिषेकपेक्षा हृतिक नक्कीच सरस आहे अहो अजून रुत्थिकला मणिरत्नम भेटलेला नाही. ते भेटूनसुद्धा जर रुत्थिकने मंदपणा कायम ठेवला तर मानलं. अवांतरः अभिषेकला कुणीतरी तू दाढी काढलीस तर काढणारा न्हावी मरेल असं भविष्य सांगितलेलं दिसतय.. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

In reply to by जुना अभिजित

मनस्वी Tue, 03/18/2008 - 14:10
अवांतरः अभिषेकला कुणीतरी तू दाढी काढलीस तर काढणारा न्हावी मरेल असं भविष्य सांगितलेलं दिसतय..
आणि अभिनय करण्याचा प्रयत्न केला तर प्रेक्षक मरतील! मनस्वी

In reply to by मनस्वी

टारझन Wed, 07/09/2008 - 03:14
मनस्वी से १००% सहमत ....किसने हमारे हृतिक को नाव ठेवणेकी गुस्ताखी की ? अर्रे ओ सांभा , ऊठा तो जरा बंदूक और लगा तो निसाना ये गुस्ताखी करने वाले पे .. आरे तुमको तो चू__ अभिषेक (बाप अमिताभ नसता तर दादर स्टेशन वर बिल्ला लाऊनच फिरला आसता ..) आणि ती भटकभवानी ऐश्वर्या नाही का दिसत ('हे आमचे वैयक्तिक मत... जगातले ९९.९९९९९९९% लोकांनीच काय पण ब्रम्हदेवानी जरी सांगितलं तरी बदलनार नाही.') हमारे हृतिक के पास ईटालियन लूक्स है, बॉडी है, ऍक्शन है, अफलातुन डान्स स्किल है(जरा अभिशेक च्या "नाचरे मोरा " बरोबर कंपेअर करा) बाकी त्या ऐश्वर्यामधे मला काही एक सूंदरता दिसलेली नाही (कत्रिना प्रियांका लाख पटीने बर्‍या) ती पिक्चरमधे फार बोर मारते राव .. आई शप्पथ... आपल्या ईथे बाहेरून गाजा-वाजा झाला की विचार न करता त्याकडे पळायची पारंपारिक प्रथा आहे... ऐश्वर्या कौतुक त्यातलाच एक भाग बाकी त्या आख्ख्या बच्च्न कुटूंबाला पैशाचीच हाव.. तो मोठा ब आता फक्त हार्पिक च्या जाहिरातीत , ह्या प्रॉडक्ट ने तुमचे तयखाने साफ करा ..(मी यानेच करतो ) असे सांगायचा बाकी राहिलाय. त्यांच्या धर्मपत्नी चार फुटी राजकारन करून आपलीच रंगीत करून घेतात.. आणि ऊरलेल्या दोघांचा महीमा सांगायला महीना अपूरा पडेल अवांतर : (ईथे बाकीचा चर्चा जास्त झाल्याने मुळ मुद्द अवांतर मधे का घेतला याची हुशार लोकांना कल्पना येईल) कुणाचे काही मत असो. आपल्याला समिक्षण भयानक आवडले.... मला चित्रपटात आपला हृतिकच आवडला फक्त... बाकी बकवासच होता... ईतिहासपट बघावा तर ट्रॉय सारखा... आपल्याला तर बुआ हृतिक ब्रॅड च्या जोडीचा नक्कीच वाट्टो.. (ब्रॅड ने हृतिक सारख नाचून दाखवावे) हृतिकप्रेमी आणि बच्चन शत्रु ) कु. ख
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

सृष्टीलावण्या Tue, 03/18/2008 - 15:15
तो अमिताभ बच्चनचा मुलगा आहे. एकच ओळख. ते खरे पण सध्या अमिताभच अभिषेक बरोबर एकावर एक योजनेत ( under One plus one free scheme) मोफत येतो जिकडे तिकडे उदा. झुबझु, बंटी-बबली. अभिषेकचा 'रन' चित्रपटातला बथ्थडपणा खासच विशेषत: 'जरा जरा' गाण्यातला. हृतिकला त्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील. अर्थात दोघांनाही गतिमंद बालकांच्या भूमिका दिल्या तर सर्वोत्कृष्ट भूमिकेचे पारितोषिक विभागून द्यावे लागेल. > > आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...

In reply to by सृष्टीलावण्या

जुना अभिजित Tue, 03/18/2008 - 15:46
दोघांनाही गतिमंद बालकांच्या भूमिका दिल्या तर सर्वोत्कृष्ट भूमिकेचे पारितोषिक विभागून द्यावे लागेल. मै प्रेम की दिवानी हूं चित्रपटासाठी. आणि नायिकांमध्ये करिनाला एकटीला. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

In reply to by सृष्टीलावण्या

एक Tue, 03/18/2008 - 22:54
हिट गेल्यावर अमिताभ महाराजांनी एक मोठ्ठा विनोद केला होता. ते म्हणाले, "धूम २ चा खरा हिरो अभिषेक आहे. लोकं त्याला बघायला येत आहेत..." आंधळी लोकं जात असतील. मी तर ऐशू ला बघायला गेलो होतो (बायको हृतिक ला). जो पर्यंत ऐशू अभिनयासाठी तोंड उघडत नाहीत तो पर्यंत बेश्ट दिसते..हृतिकची एंट्री तर आपल्याला पण जाम आवडली..असा फिटनेस ठेवणं आणि ग्रेसफुली नाचणं खायचं काम नाही..

In reply to by एक

आजानुकर्ण Wed, 03/19/2008 - 09:07
असा फिटनेस ठेवणं हे न खायचं काम आहे.. असे म्हणायचे आहे का एक शेठ! (दीडशहाणा) आजानुकर्ण

धमाल मुलगा Tue, 03/18/2008 - 16:31
मै प्रेम की दिवानी हूं... खर॑य. च्यायला शिणेमाच्या प्रोमोजमध्ये त्या अभिषेकला सायकलीवर बसून गरागरा चकरा मारताना पाहून मला खरच वाटल॑ होत॑ की हे येड॑ मतिम॑दाचा रोल करत॑य :-))) त्याचा एक बेशीक प्रॉब्लेम हाय. ते दाढी ठेवली तर ठार बधीर दिसत॑ आणि काढली तर निव्वळ दगड. दाढी असताना चेहर्‍यावरचे हावभाव टिपत नाहीत आणि दाढी काढल्यावर हावभावा॑चा अभाव आढळून आल्याने तो माणूसच टिपत नाही :-)))) असो, बहुतेक अभिषेकच्या जी कोणती गाडी असेल तिच्या मागे नक्की लिहिलेल॑ असणार..... "आई-वडिला॑ची कृपा" हृतिकशेठबद्दल पण आपल॑ काही खास मत नाहीय्ये. नाच-बिच चा॑गला करतो, चा॑गला लवचिक आहे...पण प्रभुदेवा पण तसाच आहे की :-))

In reply to by धमाल मुलगा

आजानुकर्ण Tue, 03/18/2008 - 16:45
त्याचा एक बेशीक प्रॉब्लेम हाय. ते दाढी ठेवली तर ठार बधीर दिसत॑ आणि काढली तर निव्वळ दगड. दाढी असताना चेहर्‍यावरचे हावभाव टिपत नाहीत आणि दाढी काढल्यावर हावभावा॑चा अभाव आढळून आल्याने तो माणूसच टिपत नाही :-))))
चोख समीक्षा. (न्हावी) आजानुकर्ण

कोलबेर Tue, 03/18/2008 - 20:23
लेख आवडला/ नाही आवडला हे आवर्जुन कळवणार्‍यांचे आणि सर्व वाचकांचे मनःपुर्वक आभार! - आशुतोष कोलबेरकर

शरुबाबा Wed, 03/19/2008 - 11:19
'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या' हा असा डायलॉग खराच आहे या सिनेमात ? >(दुवा मिळेल का ).

प्रसन्न Wed, 03/19/2008 - 13:33
मला हा चित्रपट आवड्ला, पण तुमच हे परिक्षणसुधा आपल्याला लै आवडल, बेस्ट आहे. लगे रहो.......

आणि हा विनोदी चित्रपट फार आवडला बुवा मला.. किती उच्च प्रतिचे विनोद होते यात सुरुवातीपासून... :"भारतावर प्रेम करणार्‍या मुघल सल्तनतीचा उदय झाला "म्हणे.यात होते कोण कोण तर "हुमायून, बाबर.. आणि या परंपरेत दाखल झाला अकबर". वाहवा! हो ना! आणि याच परंपरेत पुढे जहांगीर, शाहजहान, औरंगझेब असे राजे निर्माण झाले असे सुधा म्हणतील हे लोक. मग काही दिवसानी औरंगझेबावर पण सिनेमा लागेल आणि त्यात त्याचा उल्लेख "प्रेमळ, मनमिळावू, सहृदय" असा झाला तर आश्चर्य वाटायला नको. पुण्याचे पेशवे

छोटा डॉन Wed, 03/19/2008 - 22:37
कोलबेरराव जबरा परिक्षण लिहले आहे. मलाही पिक्चर जास्त आवडला नव्हता, झोपलो नाही इतकेच .... "'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या'" हे वाक्य खरोखर आहे का नाही ते लक्षात नाही पण अकबराने असे सोडून दिलेले अजिबात आवडले नाही.... च्यायला पिक्चर बघण्यामागे आमच्या काही अपेक्षा असतात आणि त्या जर तुम्ही पूर्ण करणार नसाल तर आम्हाला 'दगडफेक' करण्याचा पूर्ण अधिकार आहे असे आम्ही मानतो... शेवटी अकबर एकांतात तिला भेटायला जातो.ह्या टेन्स वातावरणात, 'हमे कुछ नही चाहिये बारतियोंका स्वागत पान परागसे होना चाहिये' अशी अट तर जोधा घालणार नाही ना?..." हा हा हा. आणि समजा घातली असती तर अकबराने म्हणायला हवे " बारातीयों का स्वागत हम रेडियो मिर्ची लगाकर करेंगे " अजून एक खटाकलेला प्रसंग म्हणजे अकबराचे "खलिफा-ए-तुर्कस्तानच्या" आवेशात बाजारात काय जातो, तिथे सवाल्-जबाब काय करतो, लोक पण त्याला अत्यंत "महत्वपूर्ण व आतल्या गोटातली" माहिती देतात ... सगळेच हस्यास्पद ... मला शंका आली की आता अकबराला बाजारात "मार तर नाही खवा लागणार". आता तुम्ही अकबराला येवढे "दिलवाले जिल्लेईलाही" दाखवले आहे तर त्याच्या दरबारातील "नवरत्ने " दाखवता नाहित आली ... बाकी तुमच्या उपमा जपानी आचारी , मतिमंद, पान पराग ह्याला तोड नाही ... छोटा डॉन-ए- बंगरूळूस्तान [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भडकमकर मास्तर गुरुवार, 03/20/2008 - 02:47
ह ह पु वा झाली... ........... अतिशयोक्त वर्णन आवडले....( अर्थात तुम्ही जितकी वाट लावून ठेवली आहे, तितकी फिल्म वाईट नाही... आमच्या मते काही प्रसंग झकास जमले आहेत उदा. तलवार बाजी करणार्‍या हृतिक ला जोधाने लपून पाहणे, युद्धे,हत्ती ला काबूत आणणे वगैरे)... ते असो) सर्व लोक तुमचे गान्धीजी डायलॉग फार सीरियसली घेत आहेत...का कोण जाणे?? अहो, तुम्ही फार लवकर झोपलात..... पुढे फार विनोदी विनोदी प्रसन्ग तुम्ही मिस केलेत..... उदा. १.ते २६ जानेवारील दिल्लीला असते तसे गाणे किंवा गॅदरिन्ग ला असते ना प्राथमिक शाळेच्या , तसे , ( अझीमो-शाह-शहन्शाह).....त्यात तर नन्तर नन्तर डोक्यात पिसे खोवलेले ईशान्येचे आदिवासी डांस करताना पाहून खूपच करमणूक झाली...आणि टिपिकल कोरिओग्राफी, गोलात नाचतायत , एकदा पुढे, मग मागे, एकदा क्लॉक्वाईज मग बाहेरचा गोल अँटिक्लॉकवाईज)वगैरे.... २. अकबर आपल्या बायकोसमोर आपण निरक्षर असल्याचे कबूल करतो तो प्रसंग महा विनोदी आहे....( सत्य असले तरी लेखकाने आपल रिसर्च दाखवायची ती वेळ नव्हती) ३.हृतिक ने काम बरेच बरे केले आहे, पण एकूणच सारखे प्रश्न पडत राहतात सिनेम पाहताना.... जेव्हा तो म्हणतो , " हम हिन्दुस्तान को गलत हाथोमें नाही जाने देंगे"..अरे जलालुद्दिन, तू स्वतःच गलत नाहीस का रे लब्बाडा, कुठून बाहेरून येतोस , आणि हिन्दुस्थानावर राज्य करतोस?? ______________________ ते ख्वाजा मेरे ख्वाजा गाण्यातले हावभाव आणि नृत्य मलाही भयन्कर विनोदी वाटले होते...परन्तु "तुर्कनामा " ( ले. मीना प्रभु) या पुस्तकात या धार्मिक गाणे गात गोल गोल फिरणार्‍या तुर्की मंडळींचे फोटो आहेत, ती तशीच पद्धत असते म्हणे गात नाचण्याची.... थोडक्यात गोवारीकरांचा रिसर्च तुम्हाला -आम्हाला झेपला नाही इतकेच.... ______________________________ माझ्या बायकोच्या मते अकबर सिनेमात लहानपणापासून कोणाच्या तरी इच्छेने चालणारा दाखवला आहे, आधी बहराम खान, मग ती दाई, मग जोधा ( ती म्हणते म्हणून जनतेच्या कल्याणाची कामे करतो तो..... आणि तीर्थयात्रेचा टॅक्स कमी करणे इतकेच काय ते महान काम दाखवले आहे....)....शेवटी शेवटी सिनेमा सम्पता सम्पत नाही....आवरा हो आवरा, असे म्हणायची वेळ येते प्रेक्षकावर, मला जाम कंटाळा आला..._______________एवढ्या पैशांत किमान पन्नास चांगले मराठी सिनेमे निघाले असते....

देवदत्त Sun, 03/30/2008 - 01:32
मला तर सिनेमा एवढा खराब नाही वाटला. एकदा तरी पाहू शकतो. हो, एवढे आहे की इतर आवडलेल्या सिनेमांप्रमाणे नंतर टीव्ही वर त्याची जाहिरात पाहताना चित्रपट पाहिल्याची खास आठवण येत नाही ( हा माझा चित्रपट आवडणे/ न आवडणे ह्याचा निकष काढण्याच्या पद्धतीतील एक आहे. माझ्या फिल्लमबाजीवर नंतर लिहिनच :) ) मी सिनेमा पहायला गेलो तो हृतिक रोशन करीता, आणि त्यावेळी नववधूबरोबर तोच एक चित्रपट पहावासा वाटला ;) सर्वांचे काम आहेच चांगले, गाणी एवढी खास नाही वाटली. आताही माहित नाही त्यात किती व कोणती गाणी आहेत

ऋषिकेश Sun, 03/30/2008 - 11:54
जबरा!!!!.. परिक्षण वाचून ह ह लो पो :))))))) त्यातही जपानी आचारी, पान पराग आणि गांधी तर क्लास !!! जियो! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

ऐश्वर्या राय Mon, 04/07/2008 - 00:11
मी हा चित्रपट पाहीला नाही. पाहण्याचे काही कारणही नाही. पण, तुमच्या 'आग्रहा'मुळे हे अत्यंत कंटाळवाणे गाणे उगिच बघितले. हे गाणेतर विनोदीही नाही. नुसतेच रटाळ साडेसहा मिनिटे........................................................................................................... अशी. कंटाळलेली, ऐश

बबलु Wed, 07/09/2008 - 02:05
जोधा अकबर चांगला सिनेमा आहे. अकबराचा थोडा उदो उदो आहे which is bad. पण in general या परिक्षणा इतका वाईट नक्किच नाहि.

'हमे कुछ नही चाहिये बारतियोंका स्वागत पान परागसे होना चाहिये' हहपुवा!! आता गांधींचा जन्म अकबरानंतर शेकडो वर्षांनी झाला असली ऐतिहासिक कुजकट शंका कुणाला येत असेल तर तो दोष तुमचा आहे! परत एकदा हहपुवा!! एकदम जबरा परिक्षण.....मान गये गुरु.... - टिंग्या गोवारीकर

सर्किट Tue, 03/18/2008 - 01:24
'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या' हा असा डायलॉग खराच आहे या सिनेमात ? - सर्किट

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

कोलबेर Tue, 03/18/2008 - 02:30
हा असा डायलॉग खराच आहे या सिनेमात?
म्हणजे काय? आम्ही खोटं बोलतो आहोत की काय? .. गांधीजी , एकता कपूर, जपानी आचारी हे सगळं 'खरंच' आहे या सिनेमात :))

चित्रा Tue, 03/18/2008 - 02:23
उगाच नावे ठेवता आमच्या हृतिकला. चांगले केले आहे त्याने काम. तुमच्या पत्नीचे काय मत झाले? हवे तर स्वतःला झोप येत होती म्हणून चित्रपट आवडला नाही असे म्हणा. आणि महाम आगाचे काम एकता कपूरने केले आहे असे म्हणता? हे तर तुम्हाला नक्की झोप आल्याचे लक्षण. ती एकता कपूर नसून इला अरूण आहे. विश्वास बसत नसल्यास हे पहा.. http://www.jodhaaakbar.com/ ह. घे. हे. सां. न. ल.

In reply to by चित्रा

कोलबेर Tue, 03/18/2008 - 02:28
नाही हो!..एकता कपुरने 'दिग्दर्शन' केले आहे असे आम्ही म्हणालो आहोत.. 'अभिनय' इला अरुणचाच आहे. बाकी ह्रितीक विषयी काय बोलणार?

In reply to by कोलबेर

चित्रा Tue, 03/18/2008 - 02:50
माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीत - तुमच्या पत्नीला कसा वाटला त्याचा अभिनय? दुसरा एक प्रश्न - ऐश्वर्या कशी वाटली? हृतिकलाच फक्त का नावे ठेवायची? बाकी चित्रपट "हिंदी" आहे हे नक्कीच, पण इतके न आवडण्यासारखे त्यात काय आहे? मला तर चित्रपट आवडला बुवा. आणि कंटाळाही आला नाही. मग कोणी मला त्यावरून मला चित्रपट कळत नाहीत असे म्हटले तरी चालेल.

In reply to by चित्रा

कोलबेर Tue, 03/18/2008 - 03:07
तुमच्या पत्नीला कसा वाटला त्याचा अभिनय?
एकंदरीत आज कालच्या मुली/महिला एकतर हृतिक गटात असतात किंवा अभिषेक गटात असे आमचे एक सुक्ष्म निरिक्षण आहे. आमची ही अभिषेक गटात असल्याने ह्रितीक विषयी आमचे सहसा एकमत होते. :)
ऐश्वर्या कशी वाटली?
ऐश्वर्या ठीक वाटली.

In reply to by कोलबेर

चित्रा Tue, 03/18/2008 - 05:16
बरोबर आहे. पण मी (सध्या) दोन्ही गटात आहे! असो. ऐश्वर्या ठीक वाटली हेच बरोबर, पण हृतिक अधिक मनापासून काम केले आहे असे आपले माझे मत.

धनंजय Tue, 03/18/2008 - 02:46
हा भन्नाट विनोदी चित्रपट आमच्या क्यूमधून काढून टाकावा की वरती चढवावा हे कळत नाही. मस्त परीक्षण.

In reply to by धनंजय

लिखाळ Wed, 03/19/2008 - 21:37
धनंजयशी सहमत. मस्त परिक्षण. गांधींबद्दलचे वाक्य ऐकण्यासाठी तरी पहावा म्हणतो. :) --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

व्यंकट Tue, 03/18/2008 - 02:54
>>आयतेच राज्यही मिळतेय आणि राजाची मुलगी देखिल हा राजाचा वेडसरपणा पाहून खरंतर अकबराच्या तोंडाला पाणी सुटते पण ते लपवून आपण ह्या प्रस्तावावर चक्क विचार करत आहोत असे दाखवण्यात ह्रितीक रोशनने अभिनयात कमाल केली आहे. हा हा हा !!!!!! व्यंकट

In reply to by व्यंकट

इनोबा म्हणे Tue, 03/18/2008 - 03:20
आयतेच राज्यही मिळतेय आणि राजाची मुलगी देखिल हा राजाचा वेडसरपणा पाहून खरंतर अकबराच्या तोंडाला पाणी सुटते पण ते लपवून आपण ह्या प्रस्तावावर चक्क विचार करत आहोत असे दाखवण्यात ह्रितीक रोशनने अभिनयात कमाल केली आहे आयला! ह्याच्यात त्या हृतीकची काय चूक हाय रे! गोवारीकराच्या आशूने त्येला जे सांगीतलं ,त्यानं त्येच केलं ना! (जिल्हे-तालूका ईलाही इनोबा) "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

प्राजु Tue, 03/18/2008 - 03:14
'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या' असं म्हणणार्‍या त्या बाल अकबराचे आपल्या कोण कौतुक वाटते (आता गांधींचा जन्म अकबरानंतर शेकडो वर्षांनी झाला असली ऐतिहासिक कुजकट शंका कुणाला येत असेल तर तो दोष तुमचा आहे! हे वाक्य मी दोनदा तो चित्रपट बघूनही मला त्यात नाही आढळले..(तुम्हाला बरे आढळले!!) आणि जरी माझे दुर्लक्ष झाले असा विचार केला तरी "लगान' आणि 'स्वदेस" सारखे अप्रतिम चित्रपट देणारा आशुतोष अशी काही घोडचूक करेल हे न पटणारे आहे. आणि त्यात जे पात्र 'माहम अंगा' दाखवले आहे ते काल्पनिक नसून खरोखरच त्या दाईने अकबराला सांभाळले होते आईप्रमाणे पण नंतर काही कूट कारस्थानही केल्यामुळे अकबराने तिला मक्का-मदिना ला पाठवून दिले यात्रेसाठी.. हा इतिहास आहे. एक कलाकृति म्हणून उत्तम आहे चित्रपट. ज्याप्रकारे इथे (हास्यास्पद) परिक्षण केले आहे ते चुकीचे आहे. आणि एकता कपूर सारख्या क ची बाराखडी करणार्‍या निर्मातीशी आशुतोष गोवारीकर यांची तुलना करणे चुकीचे आहे. अकबराची जी प्रतिमा अभ्यासात होती तिच (९०%) तशीच रेखाटली आहे. आता जोधाचे अकबराची लग्न ठरल्यावर तिचि मनःस्थिती काय आणि कशी झाली असेल याचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही याला आशुतोष गोवारिकर जबाबदार असू शकत नाही. त्यामुळे एका दिग्दर्शकाच्या बुद्धीला जे पटेल आणि एका हिंदू मुलीचा मुस्लिम मुलाशी विवाह ठरल्यावर (मग तो प्रेम विवाह असला तरी मुलगी थोडि बावरलेली असते) ...ठरल्यावर म्हणण्यापेक्षा लादल्यावर तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल हे त्याने त्यात दाखवले आहे. पण मूळ कथेला ते कुठेही मारक ठरत नाही. दाखवलेली युद्धे.. अतिशय परिणाम कारक, घोडे, हत्ती यांचा यथायोग्य वापर याने त्या प्रसंगांना उठाव आला आहे. जोधा - अकबराचे एकमेकाला स्पर्शही न करता केवळ नजरेतून खुलणारे प्रेम ... कुठेही कोणत्याही प्रकारची ओंगळता न दाखवता, कोणतेही कामुक दर्शन न घडवता केलेले चित्रण.. हा या चित्रपटाच्या यशात वाटा(सध्याच्या काळात तरी) म्हणावा लागेल. आतापर्यंत कोणी मुघल हिंदुस्थानात आपले पाय रोवू शकला नाही याचे कारण त्यांनी केलेले धार्मिक आत्याचार हे जेव्हा अकबर म्हणतो... आणि पूर्वी पासून इथे राहणारे हिंदू आणि नंतर येऊन स्थायिक झालेले मुस्लिम दोघेही हिंदुस्थानी आहेत त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे धार्मिक आत्याचार करणे योग्य नव्हे.. हे वाक्य "एक सम्राटाला" शोभते. इतिहासाला कोठही धक्का न लावता केलेला हा चित्रपट.. हास्यास्पद नक्कीच नाही. जरूर पहावा असा आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

कोलबेर Tue, 03/18/2008 - 03:21
लेखाच्या शेवटी ह.घ्या. टाकायला विसरलो ही घोडचूक झाली खरी! पण आता ती चूक फक्त जनरल डायरच सुधारू शकतो!! :) -आशुतोष कोलबेरकर

In reply to by प्राजु

मुक्तसुनीत Tue, 03/18/2008 - 03:25
>>> हास्यास्पद नक्कीच नाही. जरूर पहावा असा आहे. अहो, कशापाई रागावताय ? कोलबेररावसुद्धा म्हणताहेत की जरूर पहावा ....हास्यास्पद आहे म्हणूनच जरूर पहावा असा आहे की. (हघ्याहेसांनल)

In reply to by प्राजु

कोलबेर Tue, 03/18/2008 - 03:29
एक कलाकृति म्हणून उत्तम आहे चित्रपट. ज्याप्रकारे इथे (हास्यास्पद) परिक्षण केले आहे ते चुकीचे आहे.
आपल्या ह्या मताचा आम्ही (असहमत असलो तरी) आदरच करतो! परंतु तरीही आम्हाला हा चित्रपट कसा वाटला हे न राहवल्याने आम्ही इथे मांडले (जे परिक्षण असल्याचा लेखकाचा दावा नाही!) तर ते चुकीचे कसे?

In reply to by प्राजु

आनंदयात्री Tue, 03/18/2008 - 10:40
प्राजुशी सहमत ! अवांतरः फक्त इंग्रजी, फ्रेंच, रशियन, अरबी अन अजुन कोणते कोणते चित्रपट (म्हणजे हिंदी वगळुन) चांगले, अभिरुचिसंपन्न असतात का ? (अभिरुचीहीन अन तद्दन लो बजेट चित्रपटांचा चाहता) -आनंदयात्री

In reply to by आनंदयात्री

आजानुकर्ण Tue, 03/18/2008 - 10:44
फक्त इंग्रजी, फ्रेंच, रशियन, अरबी अन अजुन कोणते कोणते चित्रपटच (म्हणजे हिंदी वगळुन) चांगले, अभिरुचिसंपन्न असतात का ?
खरे आहे हे. (प्रतिसादक) आजानुकर्ण इराणी व चिनी चित्रपटही चांगले असतात असा अनुभव आहे. (अनुभवी) आजानुकर्ण हिंदी चित्रपटांइतके बटबटीत मनोरंजन कदाचित हॉलीवूडमधल्या काही मेनस्ट्रीम सिनेमांतच बघायला मिळेल. मात्र तरीही ते अधिक सुसह्य असेल. (परखड) आजानुकर्ण

In reply to by आजानुकर्ण

आनंदयात्री Tue, 03/18/2008 - 10:51
प्रतिसादक अनुभवी अन परखड रा.रा. आजानुकर्ण साहेब तुमची अभिरुची कळविल्याबद्दल धन्यवाद. अवांतरः चला आम्ही पण आजपासुन हिंदी शिनेमांना शिव्या देणार.

चतुरंग Tue, 03/18/2008 - 03:37
आशुतोषचा हा एक चांगला प्रयत्न आहे. ऐतिहासिक चित्रपट हा खरोखर इतिहासाला धरुन काढताना बराच संयम दाखवावा लागतो नाहीतर त्याचा बोजवारा उडायला वेळ लागत नाही. जोधा-अकबर मध्ये बर्‍यापैकी संयतपणे काम झाले आहे. काही प्रसंग अर्थातच दिग्दर्शकाच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून असतात आणि शेवटी अभिनेत्यांवर तर असतातच. हृतिकने ह्यात काम चांगले केले आहे. त्याने सम्राटाचा बाज चांगला सांभाळलाय. ऐश्वर्यापेक्षा तो अभिनयात सरस ठरलाय असे माझे मत. त्याचा फिटनेस ही वाखाणण्याजोगा आहे (ही बाब नगण्य नाही). लढाईची दृश्येही चांगली आहेत. असे चित्रपट सध्याच्या काळात काढणे खरोखरच कठिण आहे. परीक्षणात ज्याप्रकारे हा तद्दन चित्रपट असल्याचे भासवले आहे तसा तो नक्कीच नाहिये. (अवांतर - आशुतोषला 'लगान' नंतर लगेचच पाठीच्या त्रासाने ग्रासल्याने त्याने ह्या संपूर्ण चित्रपटाचे दिग्दर्शन झोपून केले आहे. तो खुर्चीत बसू शकत नाही. काहीसा कै. बाबा आमट्यांसारखा त्रास.) चतुरंग

In reply to by चतुरंग

बेसनलाडू Tue, 03/18/2008 - 03:53
गोवारीकर लगानच्या संघाचा (न खेळणारा - नॉनप्लेइंग)कर्णधार झाल्यापासून सुरू झालेला पाठीचा त्रास भारतीय क्रिकेट संघाच्या (प्लेइंग) कर्णधारांकडे (सध्या धोनी) वारशाने चालत आला आहे, असेही इतिहास सांगतो. (ट्वेल्थ मॅन)बेसनलाडू बाकी जोधा अकबर येथे वर्णिला गेलाय तितका हास्यास्पद नाही; मात्र (ऍज क्लेम्ड इन द मूवी) चित्रपटात दाखवलेले प्रसंग इतिहासाबरहुकूम असतील तर तत्कालीन परिस्थिती, संस्कार इ. नुसार घेतलेल्या निर्णयांचे, केलेल्या कृतींचे नि त्यामागच्या तर्काचे वर्णन सध्याच्या काळात हास्यास्पद करता येऊ शकेल, असे वाटते. कोलबेरपंतांना काहीसे हेच अपेक्षित असावे. भरजरी वस्त्राभूषणे, हत्तीघोडे, सहाय्यक कलावंत नि अनेक एक्स्ट्रॉज, नृत्ये या सगळ्यांसाठी केलेला वित्तविनियोग (सोप्या मराठीत 'उधळपट्टी'') लक्षात घेता निदान नितीन देसाई-गोवारीकरांसारखी मराठी माणसे विनोदी चित्रपट काढायचे धाडस करायची नाहीत, असे वाटते. (मध्यमवर्गीय)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

चतुरंग Tue, 03/18/2008 - 08:17
आणि कालखंडाला आवश्यक असलेली वेशभूषा, हत्तीघोडे इ. लवाजमा दाखविणे खर्चिक असणारच पण म्हणून ते चूक कसे? >>चित्रपटात दाखवलेले प्रसंग इतिहासाबरहुकूम असतील तर तत्कालीन परिस्थिती, संस्कार इ. नुसार घेतलेल्या निर्णयांचे, केलेल्या कृतींचे नि त्यामागच्या तर्काचे वर्णन सध्याच्या काळात हास्यास्पद करता येऊ शकेल, असे वाटते. कोलबेरपंतांना काहीसे हेच अपेक्षित असावे. >> हो शक्य आहे. त्याकाळातल्या काही कॄती ह्या आज हास्यास्पद वाटू शकतात आणि म्हणूनच मी वरती म्हटले आहे की इतिहासाला धरुन चित्रपट काढायचा असला तर हे अवघड काम धाडसाने करावे लागते आणि गोष्टी हास्यास्पद वाटतील ह्या भीतीने विपर्यास करता कामा नये! एकदम टोकाची भूमिका घेऊन ती व्यक्तिरेखा अगदी पूजनीय वगैरे करुन टाकली जाण्याची दाट शक्यता अशावेळी असते. ते होणार नाही ह्याची काळजी घेण्यात आशुतोष यशस्वी झाला आहे आणि ते त्याचे यश आहे असे मी मानतो. बाकी भूमिका, अभिनय इ. मधे वैयक्तिक मतमतांतरे असू शकतात. चतुरंग

In reply to by बेसनलाडू

आजानुकर्ण Tue, 03/18/2008 - 09:51
भरजरी वस्त्राभूषणे, हत्तीघोडे, सहाय्यक कलावंत नि अनेक एक्स्ट्रॉज, नृत्ये या सगळ्यांसाठी केलेला वित्तविनियोग लक्षात घेतला तरी 'जाणता राजा' आम्हाला विनोदी वाटले होते. चित्रपटावर खर्च केलेला पैसा हा कलाकृतीचा दर्जा मोजण्यासाठीचा निकष ठरू नये असे वाटते, (कंजूस) आजानुकर्ण चिदंबरम

सुधीर कांदळकर Tue, 03/18/2008 - 05:25
पान पराग, मतिमंद भाव, जपानी आचा-यांची कवायतखासच. तरी मला एक प्रश्न आहे. असला हिंदी सिनेमा पाहायला जातांना आपण मेंदू आणी घड्याळ बरोबर का नेता? जवळवळ प्रत्येक हिंदी चित्रपट एकताचाच असतो. असोधमाल आली. मस्त परीक्षण. अशीच येऊ द्यात.

सृष्टीलावण्या Tue, 03/18/2008 - 08:17
आजकाल मल्टिप्लेक्सच्या दिवसात चित्रपट बघायचा म्हणजे जेव्हा दोन तीनशे रुपयाला फोडणी लागते तेव्हा... मी त्यावर एक चांगले उपाय काढले आहेत. १) सर्व मराठी वृत्तपत्रांत जो सगळ्यात जास्त टीका करतो अश्या समीक्षकाचे परीक्षण वाचायचे. २) आपली आणि ज्यांची चित्रपटांची आवड कणभर सुद्धा जुळत नाही त्यांना चित्रपट आवडला असेल तर तो चित्रपट मुळीच पाहायला जायचे नाही. ३) तो चित्रपट घरी आधी केबलवर पाहायचा आणि अगदी फारच आवडला तरच पाहायला जायचे. ४) शक्यतो मल्टिप्लेक्स मध्ये जायचे टाळायचे. इ.इ. असो. अकबर कोणी महात्मा नव्हता असे इतिहास सांगतो. सविस्तर इथे वाचा. > > आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...

जोधा-अकबर चांगला चित्रपट आहे, पण त्याच्या या सुंदर हसर्‍या परिक्षणाने आमची ह. ह.पु. वा. झाली. :) बाकी त्या 'ख्वाजा मेरे ख्वाजा' या गाण्याने रडावे की हसावे कळत नाही, हे मात्र खरेच आहे. पान पराग, मतिमंद भाव, जपानी आचा-यांची कवायत या उपमांना तोड नाही. :))))))))))

आजानुकर्ण Tue, 03/18/2008 - 09:24
कोलबेरराव, परीक्षण चित्रपटापेक्षा मनोरंजक आहे. अधिक काय लिहू. (आनंदित) आजानुकर्ण

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 09:31
वरूणदेवा, झक्कास परिक्षण केले आहेस... मजा आली.. माझं वैयक्तिक मत विचाराल तर मला हा चित्रपट जामच बोअर वाटला होता. गाढ झोप लागण्याकरता या चित्रपटाचा उत्तम उपयोग होऊ शकेल असे वाटते! :) तात्या.

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 09:50
अवांतर - कुणीतरी मोठ्ठा दिग्दर्शक असल्याच्या थाटात हिंडणारी आणि तसा गाजावाजा करणारी ही आशुतोष गोवारीकरसारखी मंडळी बघितली की 'गोलमाल' सारखे निखळ चित्रपट देणारे आमचे हृषिदा खरंच किती मोठे होते हे समजतं! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू Tue, 03/18/2008 - 09:56
कुणीतरी मोठ्ठा दिग्दर्शक असल्याच्या थाटात हिंडणारी आणि तसा गाजावाजा करणारी ही आशुतोष गोवारीकरसारखी मंडळी --- आक्षेप आहे. जो मनुष्य शाहरूख खानकडून योग्य इन्टेन्सिटीचा अभिनय (स्वदेस) करून घेऊ शकतो :) :) आणि आमिर खानसारख्या कसलेल्या अभिनेत्यासोबत, त्याची दादागिरी (दिग्दर्शक मराठी माणूस आणि आमिर खान निर्माता - पैसा पुरवणारा, मेहनताना देणारा इ. असून!) नियंत्रणाखाली ठेवून काम करू शकतो, तो दिग्दर्शक मोठा आहे, हे मान्य करण्यास हरकत नसावी.त्यातून आशुतोषने स्वत:च स्वतःच्या तोंडाने स्वतःचे गोडवे गायल्याचे (निदान माझ्या तरी) पाहण्यात/वाचनात/ऐकण्यात नाही. मग असा बिनबुडाचा आरोप करण्यात काय हशील? (विश्लेषक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 10:02
कबूल आहे, अहो पण चित्रपटांचं काय? ते तर हृषिदांच्या तुलनेत अगदीच टुकार आणि तद्दन वाटतात! असो... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू Tue, 03/18/2008 - 10:05
अहो पण चित्रपटांचं काय? ते तर हृषिदांच्या तुलनेत अगदीच टुकार आणि तद्दन वाटतात --- हे वादातीत आहे. विषय वेगळे, कलाकार वेगळे, काळ वेगळा हे लक्षात घेऊन मी तरी बेनिफिट ऑफ डाउट देऊ शकतो. (सहमत)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

प्राजु Wed, 03/19/2008 - 08:31
काळ वेगळा, कलाकार वेगळा.... आणि गोलमाल सारख्या पूर्णपणे विनोदी चित्रपटाशी जोधा-अकबर ची तुलना नाही होऊ शकत. तुलना करायची तर आजच्या परेश रावलच्या भन्नाट अभिनयाने भरलेल्या हेराफेरी (पहिला) शी करावी. हा चित्रपट तर ऐतिहासिक आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

विसोबा खेचर Wed, 03/19/2008 - 08:41
तुलना करायची तर आजच्या परेश रावलच्या भन्नाट अभिनयाने भरलेल्या हेराफेरी (पहिला) शी करावी. भन्नाट?? अहो आमच्या उत्पल दत्तची साधी एन्ट्री, पडद्यावरचं सहजतेने उठणं-बसणं-दिसणं यापासून बिचारा परेश रावल अजून खूप खूप दूर आहे. हेराफेरी उथळ वाटतो, मध्येच हिंसक होतो, त्यात गोलमालसारख्या निखळ करमणूकीचा पुष्कळच अभाव वाटतो. शिवाय गोलमाल है भाई सब गोलमाल है, आनेवाला पल यासारखी सुंदर गाणी गोलमाल मध्ये आहेत त्याचीही हेराफेरीत बोंब आहे. असो.. आपला, (गोलमाल, उत्पल दत्त प्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

बेसनलाडू Wed, 03/19/2008 - 08:50
पडद्यावरचं सहजतेने उठणं-बसणं-दिसणं यापासून बिचारा परेश रावल अजून खूप खूप दूर आहे. हेराफेरी उथळ वाटतो, मध्येच हिंसक होतो, त्यात गोलमालसारख्या निखळ करमणूकीचा पुष्कळच अभाव वाटतो. --- असहमत. परेश रावलचा अभिनेता म्हणून विचार करावयाचा झाल्यास त्याची स्टेजवरील नाटके, 'सरदार', 'सर' सारखे चित्रपट यांची उदाहरणे देता येतील. विथ ड्यू रेस्पेक्ट टु उत्पल दत्त, केवळ उठणं-बसणं, दिसणं, श्रीराम लागूंसारखी ठराविक पठडीतील संवादफेक इतकेच चांगल्या अभिनयाचे निकष नसतात, असे वाटते. खरे पाहता परेश रावल, नासिरुद्दीन शहा, के के मेनन, मनोज बाजपाई यांसारख्या अभिनेत्यांनी उठण्याबसण्यात किंवा दिसण्यात असणार्‍या उणिवांची कमतरता भरून काढून 'अभिनेता' म्हणून नाव कमावले आहे, हे विसरता येणार नाही. शिवाय हेराफेरीतील हिंसा ही सामान्य हिंसा नाही, तर निमित्तमात्र, प्रासंगिक मारामारी आहे. हिंसा बघायची असल्यास स्मोकिंग एसेस हा इंग्रजी चित्रपट पहावा :) यात पाहिलेली हिंसा (निदान माझ्या तरी पाहण्यात )इतरत्र आलेली नाही :) (अभिनेता)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

आजानुकर्ण Wed, 03/19/2008 - 09:12
बेसनलाडवाशी सहमत आहे. हिंसा बघायची असेल तर टॅरेंटिनोचा सिनेमा बघा. विशेषतः पल्प फिक्शन किंवा किल बिल. जमल्यास सिटी ऑफ गॉड बघा त्यातलीहिंसा पाहून मन बधीर झाले नाही तर मग जोधा अकबर बघा. नक्की बधीर होईल. आपला, (हिंसकलाडू) आजानुकर्ण

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग Wed, 03/19/2008 - 20:38
'गोलमाल' आणि 'हेराफेरी' ह्याचीही तुलना बरोबर नाही. दिग्दर्शकीय कौशल्याचा भाग घेतलात तर त्यात हृषीदा हे प्रियदर्शनपेक्षा कैक पटीने मोठे आहेत ह्यात वाद नाही. पण त्यात परेश रावलचा रोल हा वाखाणण्याजोगा होता आणि तो एक सशक्त अभिनेता आहे ह्यात शंकाच नाही. शेवटी दिग्दर्शक चांगला असला तर सोन्याला सुगंध येतोच पण मुळात सोने हवे ना? तेव्हा तुलना ही काळानुरुप हवी. (अवांतर - नाही तरी ६० ते ८० च्या दोन दशकात असे किती खरेखुरे नट होते? सुंदर गाणी; किशोर, रफी, मन्ना दा, असे एकाहून एक आवाज; आर्.डी, एस्.डी., मदन मोहन अशी प्रभावळ असताना, कोणताही मद्दड नट म्हणून उभा राहिला तरी चालून गेले. पण त्यातही अशोककुमार, संजीवकुमार, अमिताभ, अशा लोकांनी त्यांचे वेगळेपण दाखवून दिलेच.) चतुरंग

In reply to by चतुरंग

प्राजु Wed, 03/19/2008 - 22:08
नाही तरी ६० ते ८० च्या दोन दशकात असे किती खरेखुरे नट होते? सुंदर गाणी; किशोर, रफी, मन्ना दा, असे एकाहून एक आवाज; आर्.डी, एस्.डी., मदन मोहन अशी प्रभावळ असताना, कोणताही मद्दड नट म्हणून उभा राहिला तरी चालून गेले. उदाहरणच द्यायचे तर.. भारत भूषण.. केवळ उत्तम सहनायिका मिळाल्या आणि पट्टीचे संगितकार आणि गायक... यांच्या जोरावर चालून गेला. नाहितर चेहर्‍यावरची माशी हलेल तर शप्पथ! तसाच तो राजेंद्र कुमार..जॉय मुखर्जी... काही प्रमाणात मनोज कुमार (चेहर्‍यावरचा हात काढला तर संवाद ऐकू येतील) यांना अभिनेता का म्हणायचे असा प्रश्नच पडतो. या सगळ्यांच्या बाबतीत एक अभिनय ही गोष्ट सोडली तर बाकीच्या चित्रपट हिट्ट होण्यासाठी लागणार्‍या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे, स्टोरी, गीतकार, संगितकार, गायक... आणि प्रोड्युसर.. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by विसोबा खेचर

प्राजु Wed, 03/19/2008 - 22:13
हृषिकेशदां एक उत्तम दिग्दर्शक होते यांत काडी इतकी सुद्धा शंका नाही. पण त्यांनी सुद्धा, गोल माल मधले संवाद जसेच्या तसे त्यांच्याच नरम गरम या चित्रपटात वापरले आहेत. आणि मुख्य म्हणजे ते संवाद उत्पलदत्त यांच्याच तोंडी आहेत. आणि अभिनयही अगदी सारखा आहे.. ते असे.. "कितना पवित्र घर है, जैसा पवित्र घर है वैसा ही पवित्र वातावरण, जैसा पवित्र वातावरण वैसेही पवित्र विचार..... आपके पवित्र कहा है.. आपकी माताजी कहाहै??" - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 10:52
लगान हा चित्रपट टुकार व तद्दन नव्हता. सुरवातीला नव्हता परंतु दुसर्‍या की तिसर्‍या दिवशीच्या खेळाआधी रात्री मंदिरात सगळी मंडळी भावनाविवश होऊन भजनबिजन गाऊ लागतात तिथे या चित्रपटाचा बॅलन्स पार जातो आणि चित्रपट तद्दनतेकडे वळतो! आपला, (हृषिदा, गुलजारच्या चित्रपटांचा प्रेमी) तात्या.‍

जुना अभिजित Tue, 03/18/2008 - 13:55
(मग तो प्रेम विवाह असला तरी मुलगी थोडि बावरलेली असते) ह्यावरुन सुचलं. स्वप्निल बांदोडकरचं 'राधा ही बावरी' गाणं थोडा फेरफार करून 'जोधा ही बावरी' असं वापरता आलं असतं.. स्वदेस आणि लगानच्या तुलनेत हा चित्रपट गंडला आहे हे नक्की.. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

मनस्वी Tue, 03/18/2008 - 10:38
वेगळ्या धाटणीचे परिक्षण आवडले. मजा आली. वाचकांनी इतके सिरियसली घेउ नये. असे हलकेफुलके वाचायला छान वाटते. मनस्वी

धम्मकलाडू Tue, 03/18/2008 - 13:12
सुरेख परीक्षण कोलबेर. अभिनंदन.
'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या'
हा संवाद ऐकून डोळ्यांत पाणी आले. खरंच कसं काय सुचतं हे सारं काही. दिग्दर्शकाला. प्राजू, पुन्हा एकदा चित्रपट नीट बघा बरं.
त्यावेळेस त्याच्या चेहर्‍यावर असणारे मतिमंद भाव खरंच दाद देण्यासारखे आहेत.
हृतिकला यासाठी नक्कीच वेगळे प्रयत्न करावे लागले नसावेत. त्याचा मतिमंद अभिनय नैसर्गिक, साहजिकच असतो. जोधा अकबर नंतर आशुतोष गोवारीकर खोजा अकबर हा चित्रपट काढणार आहेत अशी बातमी माझ्या मित्राने नुकतीच दिली. अकबराच्या जनानखान्याची चौकीदारी करणारा एका खोजा आणि सम्राट अकबर यांतील प्रेमप्रकरणावर आधारित असणार आहे. धम्मकलाडू "तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?" "तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

In reply to by धम्मकलाडू

विसोबा खेचर Tue, 03/18/2008 - 13:23
हृतिकला यासाठी नक्कीच वेगळे प्रयत्न करावे लागले नसावेत. त्याचा मतिमंद अभिनय नैसर्गिक, साहजिकच असतो. हा हा हा! जोधा अकबर नंतर आशुतोष गोवारीकर खोजा अकबर हा चित्रपट काढणार आहेत अशी बातमी माझ्या मित्राने नुकतीच दिली. अकबराच्या जनानखान्याची चौकीदारी करणारा एका खोजा आणि सम्राट अकबर यांतील प्रेमप्रकरणावर आधारित असणार आहे. खोजा-अकबर!! हहपुवा.... :) आपला, (ज़नानखान्याचा खोजा) तात्या.

In reply to by धम्मकलाडू

मनस्वी Tue, 03/18/2008 - 13:54
हृतिकला यासाठी नक्कीच वेगळे प्रयत्न करावे लागले नसावेत. त्याचा मतिमंद अभिनय नैसर्गिक, साहजिकच असतो.
आमच्या हृतिकला नावे ठेवलेली मुळीच खपवून घेणार नाही. गुरु आणि इतर सुमार चित्रपटांतील अतिमतिमंद अभिषेकपेक्षा हृतिक नक्कीच सरस आहे. ह.घ्या. मनस्वी

In reply to by मनस्वी

जुना अभिजित Tue, 03/18/2008 - 14:03
गुरु आणि इतर सुमार चित्रपटांतील अतिमतिमंद अभिषेकपेक्षा हृतिक नक्कीच सरस आहे अहो अजून रुत्थिकला मणिरत्नम भेटलेला नाही. ते भेटूनसुद्धा जर रुत्थिकने मंदपणा कायम ठेवला तर मानलं. अवांतरः अभिषेकला कुणीतरी तू दाढी काढलीस तर काढणारा न्हावी मरेल असं भविष्य सांगितलेलं दिसतय.. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

In reply to by जुना अभिजित

मनस्वी Tue, 03/18/2008 - 14:10
अवांतरः अभिषेकला कुणीतरी तू दाढी काढलीस तर काढणारा न्हावी मरेल असं भविष्य सांगितलेलं दिसतय..
आणि अभिनय करण्याचा प्रयत्न केला तर प्रेक्षक मरतील! मनस्वी

In reply to by मनस्वी

टारझन Wed, 07/09/2008 - 03:14
मनस्वी से १००% सहमत ....किसने हमारे हृतिक को नाव ठेवणेकी गुस्ताखी की ? अर्रे ओ सांभा , ऊठा तो जरा बंदूक और लगा तो निसाना ये गुस्ताखी करने वाले पे .. आरे तुमको तो चू__ अभिषेक (बाप अमिताभ नसता तर दादर स्टेशन वर बिल्ला लाऊनच फिरला आसता ..) आणि ती भटकभवानी ऐश्वर्या नाही का दिसत ('हे आमचे वैयक्तिक मत... जगातले ९९.९९९९९९९% लोकांनीच काय पण ब्रम्हदेवानी जरी सांगितलं तरी बदलनार नाही.') हमारे हृतिक के पास ईटालियन लूक्स है, बॉडी है, ऍक्शन है, अफलातुन डान्स स्किल है(जरा अभिशेक च्या "नाचरे मोरा " बरोबर कंपेअर करा) बाकी त्या ऐश्वर्यामधे मला काही एक सूंदरता दिसलेली नाही (कत्रिना प्रियांका लाख पटीने बर्‍या) ती पिक्चरमधे फार बोर मारते राव .. आई शप्पथ... आपल्या ईथे बाहेरून गाजा-वाजा झाला की विचार न करता त्याकडे पळायची पारंपारिक प्रथा आहे... ऐश्वर्या कौतुक त्यातलाच एक भाग बाकी त्या आख्ख्या बच्च्न कुटूंबाला पैशाचीच हाव.. तो मोठा ब आता फक्त हार्पिक च्या जाहिरातीत , ह्या प्रॉडक्ट ने तुमचे तयखाने साफ करा ..(मी यानेच करतो ) असे सांगायचा बाकी राहिलाय. त्यांच्या धर्मपत्नी चार फुटी राजकारन करून आपलीच रंगीत करून घेतात.. आणि ऊरलेल्या दोघांचा महीमा सांगायला महीना अपूरा पडेल अवांतर : (ईथे बाकीचा चर्चा जास्त झाल्याने मुळ मुद्द अवांतर मधे का घेतला याची हुशार लोकांना कल्पना येईल) कुणाचे काही मत असो. आपल्याला समिक्षण भयानक आवडले.... मला चित्रपटात आपला हृतिकच आवडला फक्त... बाकी बकवासच होता... ईतिहासपट बघावा तर ट्रॉय सारखा... आपल्याला तर बुआ हृतिक ब्रॅड च्या जोडीचा नक्कीच वाट्टो.. (ब्रॅड ने हृतिक सारख नाचून दाखवावे) हृतिकप्रेमी आणि बच्चन शत्रु ) कु. ख
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

सृष्टीलावण्या Tue, 03/18/2008 - 15:15
तो अमिताभ बच्चनचा मुलगा आहे. एकच ओळख. ते खरे पण सध्या अमिताभच अभिषेक बरोबर एकावर एक योजनेत ( under One plus one free scheme) मोफत येतो जिकडे तिकडे उदा. झुबझु, बंटी-बबली. अभिषेकचा 'रन' चित्रपटातला बथ्थडपणा खासच विशेषत: 'जरा जरा' गाण्यातला. हृतिकला त्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील. अर्थात दोघांनाही गतिमंद बालकांच्या भूमिका दिल्या तर सर्वोत्कृष्ट भूमिकेचे पारितोषिक विभागून द्यावे लागेल. > > आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...

In reply to by सृष्टीलावण्या

जुना अभिजित Tue, 03/18/2008 - 15:46
दोघांनाही गतिमंद बालकांच्या भूमिका दिल्या तर सर्वोत्कृष्ट भूमिकेचे पारितोषिक विभागून द्यावे लागेल. मै प्रेम की दिवानी हूं चित्रपटासाठी. आणि नायिकांमध्ये करिनाला एकटीला. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

In reply to by सृष्टीलावण्या

एक Tue, 03/18/2008 - 22:54
हिट गेल्यावर अमिताभ महाराजांनी एक मोठ्ठा विनोद केला होता. ते म्हणाले, "धूम २ चा खरा हिरो अभिषेक आहे. लोकं त्याला बघायला येत आहेत..." आंधळी लोकं जात असतील. मी तर ऐशू ला बघायला गेलो होतो (बायको हृतिक ला). जो पर्यंत ऐशू अभिनयासाठी तोंड उघडत नाहीत तो पर्यंत बेश्ट दिसते..हृतिकची एंट्री तर आपल्याला पण जाम आवडली..असा फिटनेस ठेवणं आणि ग्रेसफुली नाचणं खायचं काम नाही..

In reply to by एक

आजानुकर्ण Wed, 03/19/2008 - 09:07
असा फिटनेस ठेवणं हे न खायचं काम आहे.. असे म्हणायचे आहे का एक शेठ! (दीडशहाणा) आजानुकर्ण

धमाल मुलगा Tue, 03/18/2008 - 16:31
मै प्रेम की दिवानी हूं... खर॑य. च्यायला शिणेमाच्या प्रोमोजमध्ये त्या अभिषेकला सायकलीवर बसून गरागरा चकरा मारताना पाहून मला खरच वाटल॑ होत॑ की हे येड॑ मतिम॑दाचा रोल करत॑य :-))) त्याचा एक बेशीक प्रॉब्लेम हाय. ते दाढी ठेवली तर ठार बधीर दिसत॑ आणि काढली तर निव्वळ दगड. दाढी असताना चेहर्‍यावरचे हावभाव टिपत नाहीत आणि दाढी काढल्यावर हावभावा॑चा अभाव आढळून आल्याने तो माणूसच टिपत नाही :-)))) असो, बहुतेक अभिषेकच्या जी कोणती गाडी असेल तिच्या मागे नक्की लिहिलेल॑ असणार..... "आई-वडिला॑ची कृपा" हृतिकशेठबद्दल पण आपल॑ काही खास मत नाहीय्ये. नाच-बिच चा॑गला करतो, चा॑गला लवचिक आहे...पण प्रभुदेवा पण तसाच आहे की :-))

In reply to by धमाल मुलगा

आजानुकर्ण Tue, 03/18/2008 - 16:45
त्याचा एक बेशीक प्रॉब्लेम हाय. ते दाढी ठेवली तर ठार बधीर दिसत॑ आणि काढली तर निव्वळ दगड. दाढी असताना चेहर्‍यावरचे हावभाव टिपत नाहीत आणि दाढी काढल्यावर हावभावा॑चा अभाव आढळून आल्याने तो माणूसच टिपत नाही :-))))
चोख समीक्षा. (न्हावी) आजानुकर्ण

कोलबेर Tue, 03/18/2008 - 20:23
लेख आवडला/ नाही आवडला हे आवर्जुन कळवणार्‍यांचे आणि सर्व वाचकांचे मनःपुर्वक आभार! - आशुतोष कोलबेरकर

शरुबाबा Wed, 03/19/2008 - 11:19
'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या' हा असा डायलॉग खराच आहे या सिनेमात ? >(दुवा मिळेल का ).

प्रसन्न Wed, 03/19/2008 - 13:33
मला हा चित्रपट आवड्ला, पण तुमच हे परिक्षणसुधा आपल्याला लै आवडल, बेस्ट आहे. लगे रहो.......

आणि हा विनोदी चित्रपट फार आवडला बुवा मला.. किती उच्च प्रतिचे विनोद होते यात सुरुवातीपासून... :"भारतावर प्रेम करणार्‍या मुघल सल्तनतीचा उदय झाला "म्हणे.यात होते कोण कोण तर "हुमायून, बाबर.. आणि या परंपरेत दाखल झाला अकबर". वाहवा! हो ना! आणि याच परंपरेत पुढे जहांगीर, शाहजहान, औरंगझेब असे राजे निर्माण झाले असे सुधा म्हणतील हे लोक. मग काही दिवसानी औरंगझेबावर पण सिनेमा लागेल आणि त्यात त्याचा उल्लेख "प्रेमळ, मनमिळावू, सहृदय" असा झाला तर आश्चर्य वाटायला नको. पुण्याचे पेशवे

छोटा डॉन Wed, 03/19/2008 - 22:37
कोलबेरराव जबरा परिक्षण लिहले आहे. मलाही पिक्चर जास्त आवडला नव्हता, झोपलो नाही इतकेच .... "'हा देश महात्मा गांधींचा आहे, इथं मी हिंसा करणार नाही! ह्या राजाला जिवंत सोडून द्या'" हे वाक्य खरोखर आहे का नाही ते लक्षात नाही पण अकबराने असे सोडून दिलेले अजिबात आवडले नाही.... च्यायला पिक्चर बघण्यामागे आमच्या काही अपेक्षा असतात आणि त्या जर तुम्ही पूर्ण करणार नसाल तर आम्हाला 'दगडफेक' करण्याचा पूर्ण अधिकार आहे असे आम्ही मानतो... शेवटी अकबर एकांतात तिला भेटायला जातो.ह्या टेन्स वातावरणात, 'हमे कुछ नही चाहिये बारतियोंका स्वागत पान परागसे होना चाहिये' अशी अट तर जोधा घालणार नाही ना?..." हा हा हा. आणि समजा घातली असती तर अकबराने म्हणायला हवे " बारातीयों का स्वागत हम रेडियो मिर्ची लगाकर करेंगे " अजून एक खटाकलेला प्रसंग म्हणजे अकबराचे "खलिफा-ए-तुर्कस्तानच्या" आवेशात बाजारात काय जातो, तिथे सवाल्-जबाब काय करतो, लोक पण त्याला अत्यंत "महत्वपूर्ण व आतल्या गोटातली" माहिती देतात ... सगळेच हस्यास्पद ... मला शंका आली की आता अकबराला बाजारात "मार तर नाही खवा लागणार". आता तुम्ही अकबराला येवढे "दिलवाले जिल्लेईलाही" दाखवले आहे तर त्याच्या दरबारातील "नवरत्ने " दाखवता नाहित आली ... बाकी तुमच्या उपमा जपानी आचारी , मतिमंद, पान पराग ह्याला तोड नाही ... छोटा डॉन-ए- बंगरूळूस्तान [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भडकमकर मास्तर गुरुवार, 03/20/2008 - 02:47
ह ह पु वा झाली... ........... अतिशयोक्त वर्णन आवडले....( अर्थात तुम्ही जितकी वाट लावून ठेवली आहे, तितकी फिल्म वाईट नाही... आमच्या मते काही प्रसंग झकास जमले आहेत उदा. तलवार बाजी करणार्‍या हृतिक ला जोधाने लपून पाहणे, युद्धे,हत्ती ला काबूत आणणे वगैरे)... ते असो) सर्व लोक तुमचे गान्धीजी डायलॉग फार सीरियसली घेत आहेत...का कोण जाणे?? अहो, तुम्ही फार लवकर झोपलात..... पुढे फार विनोदी विनोदी प्रसन्ग तुम्ही मिस केलेत..... उदा. १.ते २६ जानेवारील दिल्लीला असते तसे गाणे किंवा गॅदरिन्ग ला असते ना प्राथमिक शाळेच्या , तसे , ( अझीमो-शाह-शहन्शाह).....त्यात तर नन्तर नन्तर डोक्यात पिसे खोवलेले ईशान्येचे आदिवासी डांस करताना पाहून खूपच करमणूक झाली...आणि टिपिकल कोरिओग्राफी, गोलात नाचतायत , एकदा पुढे, मग मागे, एकदा क्लॉक्वाईज मग बाहेरचा गोल अँटिक्लॉकवाईज)वगैरे.... २. अकबर आपल्या बायकोसमोर आपण निरक्षर असल्याचे कबूल करतो तो प्रसंग महा विनोदी आहे....( सत्य असले तरी लेखकाने आपल रिसर्च दाखवायची ती वेळ नव्हती) ३.हृतिक ने काम बरेच बरे केले आहे, पण एकूणच सारखे प्रश्न पडत राहतात सिनेम पाहताना.... जेव्हा तो म्हणतो , " हम हिन्दुस्तान को गलत हाथोमें नाही जाने देंगे"..अरे जलालुद्दिन, तू स्वतःच गलत नाहीस का रे लब्बाडा, कुठून बाहेरून येतोस , आणि हिन्दुस्थानावर राज्य करतोस?? ______________________ ते ख्वाजा मेरे ख्वाजा गाण्यातले हावभाव आणि नृत्य मलाही भयन्कर विनोदी वाटले होते...परन्तु "तुर्कनामा " ( ले. मीना प्रभु) या पुस्तकात या धार्मिक गाणे गात गोल गोल फिरणार्‍या तुर्की मंडळींचे फोटो आहेत, ती तशीच पद्धत असते म्हणे गात नाचण्याची.... थोडक्यात गोवारीकरांचा रिसर्च तुम्हाला -आम्हाला झेपला नाही इतकेच.... ______________________________ माझ्या बायकोच्या मते अकबर सिनेमात लहानपणापासून कोणाच्या तरी इच्छेने चालणारा दाखवला आहे, आधी बहराम खान, मग ती दाई, मग जोधा ( ती म्हणते म्हणून जनतेच्या कल्याणाची कामे करतो तो..... आणि तीर्थयात्रेचा टॅक्स कमी करणे इतकेच काय ते महान काम दाखवले आहे....)....शेवटी शेवटी सिनेमा सम्पता सम्पत नाही....आवरा हो आवरा, असे म्हणायची वेळ येते प्रेक्षकावर, मला जाम कंटाळा आला..._______________एवढ्या पैशांत किमान पन्नास चांगले मराठी सिनेमे निघाले असते....

देवदत्त Sun, 03/30/2008 - 01:32
मला तर सिनेमा एवढा खराब नाही वाटला. एकदा तरी पाहू शकतो. हो, एवढे आहे की इतर आवडलेल्या सिनेमांप्रमाणे नंतर टीव्ही वर त्याची जाहिरात पाहताना चित्रपट पाहिल्याची खास आठवण येत नाही ( हा माझा चित्रपट आवडणे/ न आवडणे ह्याचा निकष काढण्याच्या पद्धतीतील एक आहे. माझ्या फिल्लमबाजीवर नंतर लिहिनच :) ) मी सिनेमा पहायला गेलो तो हृतिक रोशन करीता, आणि त्यावेळी नववधूबरोबर तोच एक चित्रपट पहावासा वाटला ;) सर्वांचे काम आहेच चांगले, गाणी एवढी खास नाही वाटली. आताही माहित नाही त्यात किती व कोणती गाणी आहेत

ऋषिकेश Sun, 03/30/2008 - 11:54
जबरा!!!!.. परिक्षण वाचून ह ह लो पो :))))))) त्यातही जपानी आचारी, पान पराग आणि गांधी तर क्लास !!! जियो! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

ऐश्वर्या राय Mon, 04/07/2008 - 00:11
मी हा चित्रपट पाहीला नाही. पाहण्याचे काही कारणही नाही. पण, तुमच्या 'आग्रहा'मुळे हे अत्यंत कंटाळवाणे गाणे उगिच बघितले. हे गाणेतर विनोदीही नाही. नुसतेच रटाळ साडेसहा मिनिटे........................................................................................................... अशी. कंटाळलेली, ऐश

बबलु Wed, 07/09/2008 - 02:05
जोधा अकबर चांगला सिनेमा आहे. अकबराचा थोडा उदो उदो आहे which is bad. पण in general या परिक्षणा इतका वाईट नक्किच नाहि.
आशुतोष गोवारिकरचा हा भव्य दिव्य वादग्रस्त चित्रपट एकदाचा पाहायला मिळाला. भारतात हा चित्रपट बंद पाडण्यासाठी लोक रस्त्यावर का उतरले आहेत ह्याची पुसटशी कल्पना आली. इतिहास वगैरे मारो गोली पण आजकाल मल्टिप्लेक्सच्या दिवसात चित्रपट बघायचा म्हणजे जेव्हा दोन तीनशे रुपयाला फोडणी लागते तेव्हा त्या बदल्यात पदरात असले काही पडणार असेल तर लोकं रस्त्यावर येणारच. असो.. तर हा भव्य दिव्य चित्रपट सुरू होतो अमिताभ बच्चन ह्यांच्या खर्जातल्या आवाजाने. मुघल भारतात कसे आले इथपासून ते छोटा अकबर पानिपतावर कसा पोहोचला इथपर्यंत त्यांचा आवाज आपली सोबत करतो.