मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भविश्यातिल रिलायन्स ग्रुप IPO

शरुबाबा ·

सागर 24/03/2008 - 19:55
१. रिलायन्स अलायन्स विथ टाटा.... २. रिलायन्स फेरिवाले ३. रिलायन्स १ शेअर घेतलात तर १० शेअर्स फ्री..... (तरी कोणी घेणार नाही तो भाग वेगळा) ४. (नो)रिलायन्स ५. रिलायन्स मुकेश आणि रिलायन्स अनिल एकत्र मी स्वतः बर्‍याच तोट्यात आहे... त्यामुळे माझे हे असलेले फ्रस्ट्रेशन अनेकांचेच आहे यात शंका नाही... (तरीही मार्केट अप होईन तेव्हा रिलायन्स हाच तारणहार असेन या आशेत) सागर

In reply to by सागर

आत्ता मार्केट मंदीत आहे पण लोकांनी धीर सोडू नये. लवकरच ते सावरेल अशी आशा अहे. त्यामुळे रीलायन्स हेअर कटींग सलून आला तरी घ्यायला हरकत नाही. मार्केट तेजीत आले की 'रीलायन्स' नावामुळे काहीही खपून जाईल. पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर 24/03/2008 - 20:36
सदर चर्चाप्रस्ताव टाकण्यामागे शरूबाबांचा रिलायन्स ग्रुपवर आकस दिसतो आहे व तसं असेल तर तो का आहे हे कळले नाही! रिलायन्स ग्रुपने आजतागायत त्याच्या भागधारकांना अगदी उत्तम परतावा, लाभांश दिला आहे असंच इतिहास सांगतो. 'रिलायन्स ग्रुप का माल लेके बैठ जाओ, बहुत अच्छा भाव मिलेगा' असंच आमचा अनुभव सांगतो! रिलायन्स कॅपिटलचे समभाग मी अवघ्या १०८ रुपायाला व आर एन आर एल चे समभाग मी अवघ्या २४ रुपायाला खरेदी केले आहेत. खुद्द रिलायन्सचे समभागदेखील मी ४०० च्या आसपास खरेदी केले आहेत व त्यातून मला उत्तम परतावा आजही मिळू शकतो आहे! सध्या ३७५ रुपायाला रिलायन्स पॉवर व १४० रुपायाला आर पी एल घेऊन बसलो आहे. ५-६ वर्ष थांबल्यास त्यातदेखील यथास्थित परतवा मिळेल अशी खात्री आहे. शेयरबाजारत पैसे गुंतवले की लगेच काहीतरी जादू होते असा गैरसमज ठेवून या बाजारात उतरल्यास शरुबाबांप्रमाणे भडास बाहेर पडते! हा बाजार म्हणजे 'सबुरी का फल मिठा होता है' असंच मानणार्‍यांचा आहे! बाकीच्यांनी पोष्टात किंवा बँकठेवींमध्ये पैसे ठेवावेत! असो, आपला, (रिलायन्स व टाटाग्रुप प्रेमी असलेला, १९९० पासून शेयरबजारातत टिकून असलेला व या बाजारावर मनापासून प्रेम असलेला जुना किडा) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सागर 25/03/2008 - 20:13
तात्या, अगदी मनातलं बोललात. आज मार्केट वधारण्यात रिलायन्सचा मोठा हातभार आहे रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स इंडस्ट्रीज्, रिलायन्स एनर्जी या तीन शेअर्स नी सेंचुरी मारली मी स्वतःदेखील रिलायन्स भक्त आहेच.. वेळोवेळी फायदाही मिळवला आहे. पण कालपर्यंत मार्केटची स्थिती पाहून खरेच वैतागलो होतो... आजचा सेन्सेक्स पाहून मात्र सुखावलो.... (प्रफुल्लित)सागर

विजुभाऊ 24/03/2008 - 21:29
रिलायन्स फूड्स... आमचे नवे प्रॉडक्ट्स... १) रिलायन्स रीयुजेबल च्युईंगम.... २) रिलायन्स रीयुजेबल सूपारी अर्थात ड्राईड च्युईंगम

सागर 24/03/2008 - 19:55
१. रिलायन्स अलायन्स विथ टाटा.... २. रिलायन्स फेरिवाले ३. रिलायन्स १ शेअर घेतलात तर १० शेअर्स फ्री..... (तरी कोणी घेणार नाही तो भाग वेगळा) ४. (नो)रिलायन्स ५. रिलायन्स मुकेश आणि रिलायन्स अनिल एकत्र मी स्वतः बर्‍याच तोट्यात आहे... त्यामुळे माझे हे असलेले फ्रस्ट्रेशन अनेकांचेच आहे यात शंका नाही... (तरीही मार्केट अप होईन तेव्हा रिलायन्स हाच तारणहार असेन या आशेत) सागर

In reply to by सागर

आत्ता मार्केट मंदीत आहे पण लोकांनी धीर सोडू नये. लवकरच ते सावरेल अशी आशा अहे. त्यामुळे रीलायन्स हेअर कटींग सलून आला तरी घ्यायला हरकत नाही. मार्केट तेजीत आले की 'रीलायन्स' नावामुळे काहीही खपून जाईल. पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर 24/03/2008 - 20:36
सदर चर्चाप्रस्ताव टाकण्यामागे शरूबाबांचा रिलायन्स ग्रुपवर आकस दिसतो आहे व तसं असेल तर तो का आहे हे कळले नाही! रिलायन्स ग्रुपने आजतागायत त्याच्या भागधारकांना अगदी उत्तम परतावा, लाभांश दिला आहे असंच इतिहास सांगतो. 'रिलायन्स ग्रुप का माल लेके बैठ जाओ, बहुत अच्छा भाव मिलेगा' असंच आमचा अनुभव सांगतो! रिलायन्स कॅपिटलचे समभाग मी अवघ्या १०८ रुपायाला व आर एन आर एल चे समभाग मी अवघ्या २४ रुपायाला खरेदी केले आहेत. खुद्द रिलायन्सचे समभागदेखील मी ४०० च्या आसपास खरेदी केले आहेत व त्यातून मला उत्तम परतावा आजही मिळू शकतो आहे! सध्या ३७५ रुपायाला रिलायन्स पॉवर व १४० रुपायाला आर पी एल घेऊन बसलो आहे. ५-६ वर्ष थांबल्यास त्यातदेखील यथास्थित परतवा मिळेल अशी खात्री आहे. शेयरबाजारत पैसे गुंतवले की लगेच काहीतरी जादू होते असा गैरसमज ठेवून या बाजारात उतरल्यास शरुबाबांप्रमाणे भडास बाहेर पडते! हा बाजार म्हणजे 'सबुरी का फल मिठा होता है' असंच मानणार्‍यांचा आहे! बाकीच्यांनी पोष्टात किंवा बँकठेवींमध्ये पैसे ठेवावेत! असो, आपला, (रिलायन्स व टाटाग्रुप प्रेमी असलेला, १९९० पासून शेयरबजारातत टिकून असलेला व या बाजारावर मनापासून प्रेम असलेला जुना किडा) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सागर 25/03/2008 - 20:13
तात्या, अगदी मनातलं बोललात. आज मार्केट वधारण्यात रिलायन्सचा मोठा हातभार आहे रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स इंडस्ट्रीज्, रिलायन्स एनर्जी या तीन शेअर्स नी सेंचुरी मारली मी स्वतःदेखील रिलायन्स भक्त आहेच.. वेळोवेळी फायदाही मिळवला आहे. पण कालपर्यंत मार्केटची स्थिती पाहून खरेच वैतागलो होतो... आजचा सेन्सेक्स पाहून मात्र सुखावलो.... (प्रफुल्लित)सागर

विजुभाऊ 24/03/2008 - 21:29
रिलायन्स फूड्स... आमचे नवे प्रॉडक्ट्स... १) रिलायन्स रीयुजेबल च्युईंगम.... २) रिलायन्स रीयुजेबल सूपारी अर्थात ड्राईड च्युईंगम
भविश्यातिल रिलायन्स ग्रुप IPO * रीलायंस Hair Cutting** * रीलायंस Cycle Services** »

गणपत पाटील, विनम्र आदरांजली...

विसोबा खेचर ·

राजमुद्रा 24/03/2008 - 14:24
मी त्यांचे चित्रपट पाहिले तेव्हा खूप लहान होते,अभिनयाबाबत कळत नव्हते. म्हणजे सगळे लक्ष्य अभिनेता / अभिनेत्री यांच्यावरच केंद्रित असायचे. आता कळतय त्यांचा अभिनय केवढा आव्हानात्मक होता, कदाचित हा 'नाच्या' रंगवताना त्यांना रंगभूमीवरही आणि प्रत्यक्ष समाजातही बरीच आव्हाने पेलावी लागली असतील. राजमुद्रा :)

In reply to by राजमुद्रा

नंदन 24/03/2008 - 15:17
आहे. >>>कदाचित हा 'नाच्या' रंगवताना त्यांना रंगभूमीवरही आणि प्रत्यक्ष समाजातही बरीच आव्हाने पेलावी लागली असतील. -- दुर्दैवाने हे खरे आहे. त्यांच्या प्रतिमेमुळे त्यांच्या मुलीचे लग्न जमणे अवघड झाले होते. दूरदर्शनवरील मुलाखतीत या प्रश्नाला उत्तर देताना त्यांचा बांध फुटला होता.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

विवेकवि 24/03/2008 - 14:30
आज सकाळी वाचले वाचुन वाईट वाटले.. वयाच्या १४ व्या वर्षीपासून र॑ग म॑च्यावर वावरत असलेल्या र॑गकम्याला माझी आदरा॑जली.. विवेक वि.

प्रमोद देव 24/03/2008 - 14:36
"आत्ता गं बया!" हे इतकेच शब्द गणपत पाटलांची थोरवी सांगण्यास पुरेसे आहेत. तमाशाप्रधान चित्रपट मराठीत अमाप आले. त्यात नाच्याचे काम करणारी बरीच कलाकार मंडळी होऊन गेली. पण "गणपत पाटील" ह्या नावाशी कुणाचीही तुलना होऊच शकत नाही, इतका तो नाच्या त्यांनी आपल्या अभिनयाने जीवंत केला होता. बोलणं,दिसणं आणि नाचणं अशा तिहेरी अंगांनी त्यांचा सहजसुंदर अभिनय नटलेला होता.. म्हणून म्हणतो, "झाले बहू, होतिलही बहू,परंतू या सम हा!" फक्त एकच ! गणपत पाटील. माझीही ह्या नटश्रेष्टाला विनम्र आदरांजली.

प्राजु 24/03/2008 - 19:10
श्रद्धांजली.. एकदा त्यांची मुलाखत प्रत्यक्ष पहिलि होती. त्यांच्या मुलीचे तर लग्न ठरत नव्हतेच पण स्वतः त्यांनाही कोणी मुलगी द्यायला तयार नसायचे. लोक शंका घ्यायचे त्यांच्याबद्दल.. एका उत्तम अभिनेत्याला त्याच्या अभिनयाची दादच म्हणावी लागेल... पण याला करूणेची किनार नको होती अशी. माझी भावपूर्ण श्रद्धांजली.. - (सर्वव्यापी)प्राजु

अभिज्ञ 24/03/2008 - 21:10
आपलि हि शेवटचि पिढि असावि ज्याना गणपत पाटील हे माहित होते. मराठी सिनेमा म्हण्टले कि अजुनही डोळ्यासमोर पुर्विचे रांगडे ,ग्रामीण , तमाशाप्रधान सिनेमेच आठवतात. अरुण सरनाई़क,जयश्रि गडकर,सुर्यकान्त,गणपत पाटिल अशिच नावे लक्षात आहेत. आजकालचे सिनेमे पहाता,नविन पिढिला ह्या गुणि कलाकारांची कितपत ओळख राहिल? ह्याबद्दल शंकाच आहे. मराठि सिनेमा जगतातिल ह्या उपे़क्षित शिलेदाराला आमचि भावपूर्ण श्रध्दांजलि. अबब

चतुरंग 25/03/2008 - 06:34
करुन ते पात्रच आपल्या अभिनयाने कायमस्वरुपी स्वतःच्या प्रतिमेत मिसळून टाकणार्‍या ह्या जगावेगळ्या कलावंताला विनम्र आदरांजली. शब्दप्रभू गदिमांच्या शब्दात - घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्याविना ते कोणा नकळे मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार ! विठ्ठला तू वेडा कुंभार चतुरंग

केशवराव 25/03/2008 - 10:31
आमचे भाव विश्व घडविण्यांत ज्या अनेक व्यक्ती विशेषांचा वाटा आहे त्यातील एक गणपतराव पाटील ! एक एक मनोरे कोसळायला लागले; दुसरे काय ? सुर्यकान्त,चन्द्रकान्त,अरुण सरनाईक आणि कितीतरी...! नाच्याला विनम्र आभिवादन . - - - - - - - केशवराव.

जुना अभिजित 25/03/2008 - 11:07
नाच्याशिवाय तमाशा म्हणजे कॉमेंट्रेटरशिवाय क्रिकेट... ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

मुक्तसुनीत 25/03/2008 - 19:24
गणपत पाटील यांच्या निधनाबद्दल वाचले आणि मनात संमिश्र भावना दाटून आल्या. अनेकानेक तमाशाप्रधान चित्रपटांमधून त्यानी रंगविलेल्या भूमिका, त्या चित्रपटांच्या स्मृती आणि त्यानिमित्ताने त्या काळाची घडून आलेली सफर.... मात्र जेव्हा गणपत पाटीलांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल थोडी कल्पना करायला गेलो तेव्हा जाणवले की या आयुष्याला अनेक पदर असले पाहिजेत. त्यांच्या भूमिका खुमासदार, ठसकेबाज असायच्या, त्या करण्यात त्यांचे नैपुण्य विलक्षण होते यात काहीच शंका नाही. किंबहुना, "त्या" भूमिकेमधे इतर कुणाला कल्पिणे निव्वळ अशक्य ! परंतु, हे जे "लेबल" त्याना चिकटले ते आयुष्यभर, हेदेखील खरेच. एका विशिष्ट काळात , एका विशिष्ट पठडीतल्या चित्रपट-उद्योगामधे त्यानी आपल्याकरता एक अढळ स्थान बनविले , परंतु हे ध्रुवपदच त्यांची बेडी ठरली नसेल काय ? इतर कुठल्याही प्रकारच्या भूमिका , इतर कसलेही प्रयोग याना कसलाच वाव राहिला नाही. आणि जी प्रतिमा निर्माण झाली ती स्त्रैणत्वाची. ज्या बाईने त्यांच्याशी - अगदी त्या काळात का असेना - पण लग्न लावले ; (आणि बहुदा ते एक ठरवून दिलेले लग्न असेल ज्यात मुलगी आईबापानी ठरविलेल्या बोहल्यावर चढते )त्या बाईला लग्न करताना कुठेतरी शल्य जाणवले नसेल काय ? नंतरचा संसार भले चारचौघांसारखा झाला असेल ; पण प्रत्येक मुलीचे त्या त्या कोवळ्या किमान लग्नापुरते एक स्वप्न , काही एक कल्पना असतेच. सौ. पाटलाना आपल्या स्वप्नांना तिलांजली देऊनच लग्न करावे लागले नसेल काय ? एकूण , "गणपत पाटील" हे शेवटी मराठीभाषेत एका व्यक्तिचे विशेष-नाम न रहाता एक विशिष्टगुणवाचक संज्ञा बनली. या घटनेमागे त्या कलाकाराच्या कलेतला सच्चा निखळपणा आहे तसेच ती कला सादर करणार्‍या व्यक्तिच्या आयुष्यातले विलक्षण कारुण्यही आहे. आज या व्यक्तिबद्दल विचार करतो तेव्हा भूतकाळाशी नाते जोडले जाते , त्या माणसाच्या अस्सलपणे केलेल्या भूमिकांबद्दल आदरमिश्रित कृतज्ञता वाटते आणि त्यांच्या आयुष्यातल्या कारुण्याने विषण्णही व्हायला होते.

In reply to by मुक्तसुनीत

आनंदयात्री 27/03/2008 - 15:25
>>त्यांच्या आयुष्यातल्या कारुण्याने विषण्णही व्हायला होते. असेच वाटले. सौ पाटलांसारखे त्यांच्या मुला मुलींना पण कदाचित काही त्रास सहन करावा लागला असेल, त्यावरुन कदाचित घरात वाद विवाद झाले असतील, या गोष्टींचे पाटलांना किती क्लेश सहन करावे लागले असतील याची कल्पनाच आपण वर म्हटल्या प्रमाणे विषण्ण करते.

अगदी नगण्य भूमिका अजरामर करण्याची ताकद ह्या गुणी कलाकारात होती. त्यांचा अभिनय इतका वास्तव होता की एकदा कोल्हापुरात शुटींग चालले असताना हिजड्यांचा एक ग्रुप त्यांना भेटायला आला होता. त्यांनी हार आणि काही भेटवस्तूही आणली होती. 'आपल्यातल्याच कोणीतरी इतके नांव आणि प्रतिष्ठा मिळवली ह्याचे त्यांना भयंकर कौतुक वाटत होते.'

मनस्वी 27/03/2008 - 16:00
मराठि सिनेमा जगतातिल ह्या उपे़क्षित शिलेदाराला आमचि भावपूर्ण श्रध्दांजलि.
मराठी सिनेसृष्टीत अनेक उत्तमोत्तम कलाकार उपेक्षित राहिले हे खरेच.
घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्याविना ते कोणा नकळे मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार ! विठ्ठला तू वेडा कुंभार
चपखल

धोंडोपंत 27/03/2008 - 20:50
श्री गणपत पाटलांना आमची भावपूर्ण आदरांजली. एक महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला. आपला, (खिन्न) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

राजमुद्रा 24/03/2008 - 14:24
मी त्यांचे चित्रपट पाहिले तेव्हा खूप लहान होते,अभिनयाबाबत कळत नव्हते. म्हणजे सगळे लक्ष्य अभिनेता / अभिनेत्री यांच्यावरच केंद्रित असायचे. आता कळतय त्यांचा अभिनय केवढा आव्हानात्मक होता, कदाचित हा 'नाच्या' रंगवताना त्यांना रंगभूमीवरही आणि प्रत्यक्ष समाजातही बरीच आव्हाने पेलावी लागली असतील. राजमुद्रा :)

In reply to by राजमुद्रा

नंदन 24/03/2008 - 15:17
आहे. >>>कदाचित हा 'नाच्या' रंगवताना त्यांना रंगभूमीवरही आणि प्रत्यक्ष समाजातही बरीच आव्हाने पेलावी लागली असतील. -- दुर्दैवाने हे खरे आहे. त्यांच्या प्रतिमेमुळे त्यांच्या मुलीचे लग्न जमणे अवघड झाले होते. दूरदर्शनवरील मुलाखतीत या प्रश्नाला उत्तर देताना त्यांचा बांध फुटला होता.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

विवेकवि 24/03/2008 - 14:30
आज सकाळी वाचले वाचुन वाईट वाटले.. वयाच्या १४ व्या वर्षीपासून र॑ग म॑च्यावर वावरत असलेल्या र॑गकम्याला माझी आदरा॑जली.. विवेक वि.

प्रमोद देव 24/03/2008 - 14:36
"आत्ता गं बया!" हे इतकेच शब्द गणपत पाटलांची थोरवी सांगण्यास पुरेसे आहेत. तमाशाप्रधान चित्रपट मराठीत अमाप आले. त्यात नाच्याचे काम करणारी बरीच कलाकार मंडळी होऊन गेली. पण "गणपत पाटील" ह्या नावाशी कुणाचीही तुलना होऊच शकत नाही, इतका तो नाच्या त्यांनी आपल्या अभिनयाने जीवंत केला होता. बोलणं,दिसणं आणि नाचणं अशा तिहेरी अंगांनी त्यांचा सहजसुंदर अभिनय नटलेला होता.. म्हणून म्हणतो, "झाले बहू, होतिलही बहू,परंतू या सम हा!" फक्त एकच ! गणपत पाटील. माझीही ह्या नटश्रेष्टाला विनम्र आदरांजली.

प्राजु 24/03/2008 - 19:10
श्रद्धांजली.. एकदा त्यांची मुलाखत प्रत्यक्ष पहिलि होती. त्यांच्या मुलीचे तर लग्न ठरत नव्हतेच पण स्वतः त्यांनाही कोणी मुलगी द्यायला तयार नसायचे. लोक शंका घ्यायचे त्यांच्याबद्दल.. एका उत्तम अभिनेत्याला त्याच्या अभिनयाची दादच म्हणावी लागेल... पण याला करूणेची किनार नको होती अशी. माझी भावपूर्ण श्रद्धांजली.. - (सर्वव्यापी)प्राजु

अभिज्ञ 24/03/2008 - 21:10
आपलि हि शेवटचि पिढि असावि ज्याना गणपत पाटील हे माहित होते. मराठी सिनेमा म्हण्टले कि अजुनही डोळ्यासमोर पुर्विचे रांगडे ,ग्रामीण , तमाशाप्रधान सिनेमेच आठवतात. अरुण सरनाई़क,जयश्रि गडकर,सुर्यकान्त,गणपत पाटिल अशिच नावे लक्षात आहेत. आजकालचे सिनेमे पहाता,नविन पिढिला ह्या गुणि कलाकारांची कितपत ओळख राहिल? ह्याबद्दल शंकाच आहे. मराठि सिनेमा जगतातिल ह्या उपे़क्षित शिलेदाराला आमचि भावपूर्ण श्रध्दांजलि. अबब

चतुरंग 25/03/2008 - 06:34
करुन ते पात्रच आपल्या अभिनयाने कायमस्वरुपी स्वतःच्या प्रतिमेत मिसळून टाकणार्‍या ह्या जगावेगळ्या कलावंताला विनम्र आदरांजली. शब्दप्रभू गदिमांच्या शब्दात - घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्याविना ते कोणा नकळे मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार ! विठ्ठला तू वेडा कुंभार चतुरंग

केशवराव 25/03/2008 - 10:31
आमचे भाव विश्व घडविण्यांत ज्या अनेक व्यक्ती विशेषांचा वाटा आहे त्यातील एक गणपतराव पाटील ! एक एक मनोरे कोसळायला लागले; दुसरे काय ? सुर्यकान्त,चन्द्रकान्त,अरुण सरनाईक आणि कितीतरी...! नाच्याला विनम्र आभिवादन . - - - - - - - केशवराव.

जुना अभिजित 25/03/2008 - 11:07
नाच्याशिवाय तमाशा म्हणजे कॉमेंट्रेटरशिवाय क्रिकेट... ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

मुक्तसुनीत 25/03/2008 - 19:24
गणपत पाटील यांच्या निधनाबद्दल वाचले आणि मनात संमिश्र भावना दाटून आल्या. अनेकानेक तमाशाप्रधान चित्रपटांमधून त्यानी रंगविलेल्या भूमिका, त्या चित्रपटांच्या स्मृती आणि त्यानिमित्ताने त्या काळाची घडून आलेली सफर.... मात्र जेव्हा गणपत पाटीलांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल थोडी कल्पना करायला गेलो तेव्हा जाणवले की या आयुष्याला अनेक पदर असले पाहिजेत. त्यांच्या भूमिका खुमासदार, ठसकेबाज असायच्या, त्या करण्यात त्यांचे नैपुण्य विलक्षण होते यात काहीच शंका नाही. किंबहुना, "त्या" भूमिकेमधे इतर कुणाला कल्पिणे निव्वळ अशक्य ! परंतु, हे जे "लेबल" त्याना चिकटले ते आयुष्यभर, हेदेखील खरेच. एका विशिष्ट काळात , एका विशिष्ट पठडीतल्या चित्रपट-उद्योगामधे त्यानी आपल्याकरता एक अढळ स्थान बनविले , परंतु हे ध्रुवपदच त्यांची बेडी ठरली नसेल काय ? इतर कुठल्याही प्रकारच्या भूमिका , इतर कसलेही प्रयोग याना कसलाच वाव राहिला नाही. आणि जी प्रतिमा निर्माण झाली ती स्त्रैणत्वाची. ज्या बाईने त्यांच्याशी - अगदी त्या काळात का असेना - पण लग्न लावले ; (आणि बहुदा ते एक ठरवून दिलेले लग्न असेल ज्यात मुलगी आईबापानी ठरविलेल्या बोहल्यावर चढते )त्या बाईला लग्न करताना कुठेतरी शल्य जाणवले नसेल काय ? नंतरचा संसार भले चारचौघांसारखा झाला असेल ; पण प्रत्येक मुलीचे त्या त्या कोवळ्या किमान लग्नापुरते एक स्वप्न , काही एक कल्पना असतेच. सौ. पाटलाना आपल्या स्वप्नांना तिलांजली देऊनच लग्न करावे लागले नसेल काय ? एकूण , "गणपत पाटील" हे शेवटी मराठीभाषेत एका व्यक्तिचे विशेष-नाम न रहाता एक विशिष्टगुणवाचक संज्ञा बनली. या घटनेमागे त्या कलाकाराच्या कलेतला सच्चा निखळपणा आहे तसेच ती कला सादर करणार्‍या व्यक्तिच्या आयुष्यातले विलक्षण कारुण्यही आहे. आज या व्यक्तिबद्दल विचार करतो तेव्हा भूतकाळाशी नाते जोडले जाते , त्या माणसाच्या अस्सलपणे केलेल्या भूमिकांबद्दल आदरमिश्रित कृतज्ञता वाटते आणि त्यांच्या आयुष्यातल्या कारुण्याने विषण्णही व्हायला होते.

In reply to by मुक्तसुनीत

आनंदयात्री 27/03/2008 - 15:25
>>त्यांच्या आयुष्यातल्या कारुण्याने विषण्णही व्हायला होते. असेच वाटले. सौ पाटलांसारखे त्यांच्या मुला मुलींना पण कदाचित काही त्रास सहन करावा लागला असेल, त्यावरुन कदाचित घरात वाद विवाद झाले असतील, या गोष्टींचे पाटलांना किती क्लेश सहन करावे लागले असतील याची कल्पनाच आपण वर म्हटल्या प्रमाणे विषण्ण करते.

अगदी नगण्य भूमिका अजरामर करण्याची ताकद ह्या गुणी कलाकारात होती. त्यांचा अभिनय इतका वास्तव होता की एकदा कोल्हापुरात शुटींग चालले असताना हिजड्यांचा एक ग्रुप त्यांना भेटायला आला होता. त्यांनी हार आणि काही भेटवस्तूही आणली होती. 'आपल्यातल्याच कोणीतरी इतके नांव आणि प्रतिष्ठा मिळवली ह्याचे त्यांना भयंकर कौतुक वाटत होते.'

मनस्वी 27/03/2008 - 16:00
मराठि सिनेमा जगतातिल ह्या उपे़क्षित शिलेदाराला आमचि भावपूर्ण श्रध्दांजलि.
मराठी सिनेसृष्टीत अनेक उत्तमोत्तम कलाकार उपेक्षित राहिले हे खरेच.
घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्याविना ते कोणा नकळे मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार ! विठ्ठला तू वेडा कुंभार
चपखल

धोंडोपंत 27/03/2008 - 20:50
श्री गणपत पाटलांना आमची भावपूर्ण आदरांजली. एक महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला. आपला, (खिन्न) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
मराठी रजतपटावरील गणपत पाटील या ज्येष्ठ कलाकाराला मिसळपाव परिवाराची विनम्र आदरांजली.... लावणीप्रधान मराठी चित्रपटातील त्यांनी रंगवलेला 'नाच्या', हा मराठी चित्रप्रेमींच्या नेहमीच लक्षात राहील! तात्या.

सद्धगुरु च्या शोधात भाग ३ सन १९२० सालची दुर्लभ पदे.

संजीव नाईक ·

'भिऊ नकोस मी तुस्या पाठीशी आहे' असे सांगणारे आणि भक्तरक्षणार्थ धाऊन जाणारे स्वामी समर्थ मनोवेगाने भक्तरक्षणार्थ धाव घेतात. यावर माझा पूर्ण विश्वास आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात 'सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा | उडी घालितो संकटी स्वामी तैसा| अनन्यास रक्षितसे चापपाणी| नुपेक्षि कदा राम भक्ताभिमानी||' जय जय रघुवीर समर्थ|| पुण्याचे पेशवे

'भिऊ नकोस मी तुस्या पाठीशी आहे' असे सांगणारे आणि भक्तरक्षणार्थ धाऊन जाणारे स्वामी समर्थ मनोवेगाने भक्तरक्षणार्थ धाव घेतात. यावर माझा पूर्ण विश्वास आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात 'सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा | उडी घालितो संकटी स्वामी तैसा| अनन्यास रक्षितसे चापपाणी| नुपेक्षि कदा राम भक्ताभिमानी||' जय जय रघुवीर समर्थ|| पुण्याचे पेशवे
3

सुपारी आणि नारळ

विजुभाऊ ·

विजुभाऊ 24/03/2008 - 14:08
एका खौट पुणेकराने मला भ्रमणध्वनी वरून सूपारी हे स्त्रीचे प्रतीक आहे नारळ हा पुरुषाचे प्रतीक आहे. पुरुष हा इडापीडा हाकलतो आणि स्त्री निसर्गतः आमंत्रण देत असते.( म्हणजे काय हो?) असे सांगितले. ( त्या खौट पुणेकरच्या सानुनासीक आणि बोलण्यावरुन तो कदाचित थोरली सदाशिवरव भाऊ पेशवे यांच्या नावाने असलेल्या पेठेत अनन्त काळ वास्तव्यास असावा असे भासले.खरे खोटे सदाशिवरव भाऊस ठाउक.) पुरुषाकडे केवळ हाकलणे हीच भूमिका का यावी? प्रश्नांकीत्..विजुभाऊ

विजुभाऊ 01/07/2008 - 15:34
या बद्दल कोणाही मिपाकराला माहीत नसावे. याचे आश्चर्य वाटते पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

लिखाळ 01/07/2008 - 16:03
....(काही सुधारलेल्यास्त्रियानी पती सोबत नसेल तर कनवटीस नारळ लाउन पूजा कर्ण्याचा प्रयत्न केला होता.पण ते पती प्रमाणेच अडचणीचे झाल्याने ही प्रथा फार रोजली नाही) हा हा हा .. हे बाकी मस्तच ! पुणेकर खौट आहेत असे म्हणणे आणि येता जाता त्यांच्या स्वभावावर टिप्पणी करणे आम्हास पसंत पडत नाही. असो ! काही (ही) प्रकाश टाकण्याचा एक अज्ञ प्रयत्न ! नारळाविषयी काही (ही), नारळ हे फळ बहुगुणी आहे. द्रव+घन असे दोनही अन्नपदार्थ आत असलेले आणि अनेक दिवस टिकणारे तसेच पटकन न तुटणारे असे बहुगुणी, प्रवासात नेता येणारे आणि पाहिजे तेव्हा वापरता येणारे फळ आहे. घरातून निघणार्‍याला तहानलाडू-भूकलाडू एकदम देता येण्याजोगे फळ. उष्णदेशात उपकारक. असे असल्याने बाहेर जाणार्‍यास नारळ सोबत देत असावेत. -- (उपयोगितावादी) लिखाळ. नारळ हे मनुष्याचे प्रतिक आहे, शेंडी असलेला नारळ पुरुषाचे प्रतिक. नारळ देणे हा एक आशिर्वाद अथवा शुभेच्छा आहे. तुमचा वंश वाढो, संपन्नता येवो असे ध्वनित करणारा संकेत. म्हणूनच बहुधा नारळाने ओटी भरुन मुले व्हावीत असा आशिर्वाद देत असावेत. -- (परंपरावादी) लिखाळ. सुपारी विषयी काही (ही) सुपारीचे माणसाला व्यसन लागते त्या अर्थी सुपारीमध्ये उत्तेजना आणणारे घटक असतील असा माझा कयास. बोलावणे करताना आधी समोरच्याला उत्साहित करुन खुष करुन मग बोलावणे करण्यात समोरचा आपल्या बोलावण्याचा मान राखेल हा सुप्त हेतू असावा. पण कालांतराने सुपारी खायला देण्याऐवजी अख्खी देण्याची प्रथा झाली असावी. -- (व्यवहारी) लिखाळ. सुपारी घशात लागते आणि जीव कासाविस होतो. नको असलेला पाहुणा आल्यावर लगेच सुपारी देवून त्याला पळवून लावण्याचा चालूपणा कोणी केला असेल. आणि बाकिच्यांनी त्याची री ओढली असेल. तसेही स्वार्थ असेल त्याच बाबीच्या प्रथा लवकर मूळ धरतात असे आम्हास वाटते. उदा. देवाला गोडा-धोडाचा नैवेद्य दाखवणे. अहो ! देव जर तुम्ही समोर ठेवलेले पदार्थ खाउ लागला तर लोक नैवेद्याला पुर्‍या-आम्रखंड ठेवतील का?? --(निरिक्षक) लिखाळ. असो ! तर आमचे दिवे लावणे पुरे करावे म्हणतो. तज्ञ काय प्रकाश टाकतात ते पाहण्यास उत्सूक. --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.

विजुभाऊ 24/03/2008 - 14:08
एका खौट पुणेकराने मला भ्रमणध्वनी वरून सूपारी हे स्त्रीचे प्रतीक आहे नारळ हा पुरुषाचे प्रतीक आहे. पुरुष हा इडापीडा हाकलतो आणि स्त्री निसर्गतः आमंत्रण देत असते.( म्हणजे काय हो?) असे सांगितले. ( त्या खौट पुणेकरच्या सानुनासीक आणि बोलण्यावरुन तो कदाचित थोरली सदाशिवरव भाऊ पेशवे यांच्या नावाने असलेल्या पेठेत अनन्त काळ वास्तव्यास असावा असे भासले.खरे खोटे सदाशिवरव भाऊस ठाउक.) पुरुषाकडे केवळ हाकलणे हीच भूमिका का यावी? प्रश्नांकीत्..विजुभाऊ

विजुभाऊ 01/07/2008 - 15:34
या बद्दल कोणाही मिपाकराला माहीत नसावे. याचे आश्चर्य वाटते पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

लिखाळ 01/07/2008 - 16:03
....(काही सुधारलेल्यास्त्रियानी पती सोबत नसेल तर कनवटीस नारळ लाउन पूजा कर्ण्याचा प्रयत्न केला होता.पण ते पती प्रमाणेच अडचणीचे झाल्याने ही प्रथा फार रोजली नाही) हा हा हा .. हे बाकी मस्तच ! पुणेकर खौट आहेत असे म्हणणे आणि येता जाता त्यांच्या स्वभावावर टिप्पणी करणे आम्हास पसंत पडत नाही. असो ! काही (ही) प्रकाश टाकण्याचा एक अज्ञ प्रयत्न ! नारळाविषयी काही (ही), नारळ हे फळ बहुगुणी आहे. द्रव+घन असे दोनही अन्नपदार्थ आत असलेले आणि अनेक दिवस टिकणारे तसेच पटकन न तुटणारे असे बहुगुणी, प्रवासात नेता येणारे आणि पाहिजे तेव्हा वापरता येणारे फळ आहे. घरातून निघणार्‍याला तहानलाडू-भूकलाडू एकदम देता येण्याजोगे फळ. उष्णदेशात उपकारक. असे असल्याने बाहेर जाणार्‍यास नारळ सोबत देत असावेत. -- (उपयोगितावादी) लिखाळ. नारळ हे मनुष्याचे प्रतिक आहे, शेंडी असलेला नारळ पुरुषाचे प्रतिक. नारळ देणे हा एक आशिर्वाद अथवा शुभेच्छा आहे. तुमचा वंश वाढो, संपन्नता येवो असे ध्वनित करणारा संकेत. म्हणूनच बहुधा नारळाने ओटी भरुन मुले व्हावीत असा आशिर्वाद देत असावेत. -- (परंपरावादी) लिखाळ. सुपारी विषयी काही (ही) सुपारीचे माणसाला व्यसन लागते त्या अर्थी सुपारीमध्ये उत्तेजना आणणारे घटक असतील असा माझा कयास. बोलावणे करताना आधी समोरच्याला उत्साहित करुन खुष करुन मग बोलावणे करण्यात समोरचा आपल्या बोलावण्याचा मान राखेल हा सुप्त हेतू असावा. पण कालांतराने सुपारी खायला देण्याऐवजी अख्खी देण्याची प्रथा झाली असावी. -- (व्यवहारी) लिखाळ. सुपारी घशात लागते आणि जीव कासाविस होतो. नको असलेला पाहुणा आल्यावर लगेच सुपारी देवून त्याला पळवून लावण्याचा चालूपणा कोणी केला असेल. आणि बाकिच्यांनी त्याची री ओढली असेल. तसेही स्वार्थ असेल त्याच बाबीच्या प्रथा लवकर मूळ धरतात असे आम्हास वाटते. उदा. देवाला गोडा-धोडाचा नैवेद्य दाखवणे. अहो ! देव जर तुम्ही समोर ठेवलेले पदार्थ खाउ लागला तर लोक नैवेद्याला पुर्‍या-आम्रखंड ठेवतील का?? --(निरिक्षक) लिखाळ. असो ! तर आमचे दिवे लावणे पुरे करावे म्हणतो. तज्ञ काय प्रकाश टाकतात ते पाहण्यास उत्सूक. --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.
सुपारी आणि नारळ: आपण एखाद्याला फुटावयाचे असेल त्याचा पत्ता कट करायचा असेल तर त्याला "नारळ देउया" असे म्हणतो एखाद्याला बोलवयचे असेल तर त्याल " सूपारी दीली " असे म्हणतो. नारळआणि सुपारी हे दोन्ही ताड वर्गिय व्रुक्ष आहेत्.दोन्ही कोकणात मुबलक सापडतात हे त्यांच्यात साम्य. पण नारळ हा "तो नारळ "असतो आणि सूपारी ही "ती सूपारी" असते. बायको सोबत नसेल तर कनवटीस सूपारी लावण्याची प्रथा आहे....(काही सुधारलेल्यास्त्रियानी पती सोबत नसेल तर कनवटीस नारळ लाउन पूजा कर्ण्याचा प्रयत्न केला होता.पण ते पती प्रमाणेच अडचणीचे झाल्याने ही प्रथा फार रोजली नाही) तरी मिपा वरच्या ज्ञानीयानी "हाकलण्यासाठी नारळ आणि आमंत्रणासाठी

!! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!!

विजुभाऊ ·

विजुभाऊ, मस्त लिहिताय, आगे बढो स॑मेलन स्थळी तुम्ही पोहोचण्याच्या थोडा वेळ अगोदर साक्षात विसोबा खेचरा॑चा फोन आला होता व सगळ्या॑ना त्या॑नी शुभेच्छाही दिल्या होत्या, तुम्हीच राहून गेलात.

धमाल मुलगा 24/03/2008 - 11:41
हा हा...विजुभाऊ.... एक न॑ब्बर ! आपली ही बखरीची कल्पना आम्हा॑स बहुत भावली. तसेच आपण ही जिम्मेदारी खा॑देवर घेऊन आपण आम्हा॑स मोठ्या स॑कटातून सोडविले असे आम्ही जरुर नमुद करु इच्छितो ! तसेच आमच्या एकुणच पोरकट व्यवस्थेची अकाळी वर्षावाने उडविलेली खिल्ली कोणिही मनात कि॑तु अथवा किल्मिष न धरता आन॑दे सहन करोन आम्हास वाटणार्‍या दु:खाचा भार हलका केला त्या॑चे काय आभार मानावेत? तेणेकरून धमाल मुलाने जोरात फुंकर( कशाची विचारु नका) मारुन आगोटी जीवित ठेवल च्यामारी, धन्य आहात. एक एक गोष्ट लक्षात ठेवली आहे की :-)) पुढील चौकात भारी मजा येणार अस॑ दिसत॑य! जी जी र जी र जी र जी जी जी जी........

विसोबा खेचर 24/03/2008 - 11:46
विजूभाऊ, झक्कास बर्र का! बखर आम्हास आवडते आहे, पुढील घडामोडी काय घडल्या, कुठली चर्चा, खलबतं कटकारस्थानं रचली गेली याच्या वृत्तांताची वाट पाहतो आहे! :) आपला, (बखरप्रेमी) तात्या.

इनोबा म्हणे 24/03/2008 - 12:07
झकास वर्णन जाहले. पुढील चौकात वाट पाहत आहो! विजूभाऊंचा विजय असो! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

प्रमोद देव 24/03/2008 - 12:14
काय वो अजूनही त्याच तारेत? अहो जरा नीट शिस्तशीर लिवा की! किती चुका त्या! तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.

चतुरंग 24/03/2008 - 12:39
ऐशी जबर खबर देणेस बखर निवडलीत ते उचित जाहलें! थोरले सायबांकडून आपणास शाबासी! 'दारुकाम', 'आतषबाजी', सामिष भोजन, कट-कारस्थाने येकयेक वृत्तांत साद्यंत करणे, जेणेकरोन आमचे जीवास तोशीस न होईल! बाकी आपण जाणते आहातच! लेखनसीमा. चतुरंग

विजुभाऊ 24/03/2008 - 13:58
"लेखनसीमा" अजोन जाहली नाही.. ये बखरीची भाषा ही उत्तर शिवकलीन आसोन तीयेचे मूळ गोडसे भटजींच्या १८५७ च्या प्रवास वर्णनात आहे. बाकी वाचकगळ आनंदयात्रींचे उत्तर वाचौन बहुत संतोष जाहला... मूळ बखर्नवीस विजुभाऊ हे त्यांच्या प्रोजेक्ट म्यामेनेजमेंट सारख्या अतीबीन महत्वाच्या कार्यात मग्न असल्यामुळे त्याना बखरीचा प्रवर्गिय भाग उत्खननास काळ उपलब्ध झाल्याबरहुकुम ते त्वरेने जाला वर पोष्ट करतील्.....आणि लेखनसीमा करतील. कळावे लोभ आहेच तो वर्धिष्णु व्हावा ही श्री चरणी पौष्याची विनंती मूळ बखर्कार्....बखर्नवीस विजुभाऊ .. (विजुभाऊंच्या बखरीतुन.........पान३ समास २४)

विजुभाऊ 24/03/2008 - 17:37
!! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!!चौक २ ऐका पुढील व्रुतान्त जी जी जी र जी जी जी र जी जी जी ओळख समारम्भ झडु लागला...शकुन सांगावा तैसी कडाडकन वीज तळपली .दुंदुभी झडाव्या तैशा मेघगर्जना होवु लागल्या.आकाशालाही आनंदाचे भरते येउन पुष्पव्रुष्टी व्हावी तैशा झडी पडो लागल्या मिपा सदस्यांचे मिलन पाहोन आसमंतालाही सण साजरा करावाऐसे वाटो लागले. उत्तर पेशवाईत पानपतात व्हावी तैसी भांडी वाजो लागली.भडभुंज्या लाह्या भाजतो तैसे चोहोकडोन आवाज कानी येवो लागले. ये कानाचे त्या कानास कळो नये ऐसी गत. घोडी भीजो लागली..वर्तमान दफ्तर हलवावे ऐसे फर्मान निघो लागले. समस्त दारुगोळा कोठारातुन सावकाशीने बाहेर येवु लागला होता. सरदार धमाल स्वतः जातीने दारुगोळा वाटपात कोणावर अन्याव होवो नये याची सर्वत्र फीरोन दखल घेत होते. तेवढ्यात दस्तूर खुद तात्या भ्रमण्ध्वनीवर सदस्यांच्या भेटीस आले.....आकाशवाणी व्हावी तैशा त्यानी कट्ट्यास शुभेछा दिल्या. एक एक भिडु रन्गी येवु लागला....राज कवी सरदार केशव्सुमार हळुच एखांदी कवीतेची फैर झाडत होते.त्या एकेका फैरीनेच सद्स्य गारद होत होते. येवढ्यात सरदार विजुभाऊंचे आगमन झाले...पुन्हा एकदा तडीताघात झाला...नंगारा वाजावा तैशा मेघ गर्जना झाल्या. सरदार विजुभाऊ नी सरदार धमाल मुलांस हळी घातली...आणि जेजाल्या प्रंमाणे भासणारी वीज पुन्हा गरजली.....मिपा कट्ट्यास तोफांची सलामी मिळाली. ऐका पुढील व्रुतान्त पुढील चौकात जी जी जी र जी जी जी र जी जी जी म्हणे शाहीर विजुभाऊ..मिपा सदस्य होउ... व्रुतान्त मी सांगणार्..तुम्ही ऐकणार ..रन्ग तो चढणार रं जी जी जी धन्य धन्य झाला तो सरदार जी जी जी जी जी जी र जी जी जी आर रं दाजी जी जी रं दाजी जी जी र जी जी जी र जी जी जी

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर 24/03/2008 - 18:43
ओळख समारम्भ झडु लागला...शकुन सांगावा तैसी कडाडकन वीज तळपली .दुंदुभी झडाव्या तैशा मेघगर्जना होवु लागल्या.आकाशालाही आनंदाचे भरते येउन पुष्पव्रुष्टी व्हावी तैशा झडी पडो लागल्या मिपा सदस्यांचे मिलन पाहोन आसमंतालाही सण साजरा करावाऐसे वाटो लागले. विजूभाऊ, काय सुंदर भाषा आहे! तुमची बखर बाकी रंगते आहे खास! अजूनही येऊ द्या! एक विनंती - पुढचा चौक नवीन भागात सुरू करावा. प्रतिसादाने त्याची सुरवात करू नये ही विनंती. मिपाच्या श्रीमंतीस ते शोभत नाही! आपलाच, तात्या.

झक्कास!.. विजुभाऊ, एका दगडात दोन पक्षी मारताय... वॄत्तांत देताय, आणी आम्हाला पण जळवताय.. पुढच्या वेळेला जर भारतात असू, तर नक्की येऊ. प्रशांत.

विजुभाऊ, कमाल केलीत..भाऊसाहेबा॑च्या बखरीन॑तर इतिहास स॑शोधका॑ना 'विजुभाऊ॑ची बखर अभ्यासावी लागणार असे दिसते आहे. मी तुमची कैफियत एका फर्ज॑दामार्फत भा.इ.स॑.म॑. ला सिताब रवाना केली आहेच.. बहुत काय लिहिणे..

प्राजु 24/03/2008 - 18:45
वा वा.. विजुभाऊ, मानलं तुम्हाला. बखर अगदी झक्कास.. पुढचा भाग येऊद्या लवकर. - (सर्वव्यापी)प्राजु

श्री. रा. रा. विजुभाऊ यांसी, आपली बखर पोहोचली. वाचोनि परम संतोष जाहला. मि.पा.करीय जरीपटका पुण्यपत्तनाच्या पार (कात्रजात) फडकला हे ऐकोनि संतोष जाहला. पूर्वी आमच्या दादासाहेबानी म्हणजे राघोबादादांनी जरीपटका अटकेपार फडकवला होता. तेव्हा आम्हास असाच परमसंतोष जाहला होता. नंतर त्यांची बुद्धी फिरली. असो . परंतु पुढील कट्टा सर्व महारष्ट्रनगरीच्या सीमा उल्लंघोन सर्व मि.पा. करीयाना एकत्र आणील याची आम्हास खात्री आहे. आणि वैश्विक मि.पा. करीय कट्ट्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. ते होईल तो सुदिन. आपण बखरीतून सर्व वृत्तांत साद्यंत वर्णन केल्याने आम्ही आपले ऋणी आहोत. इति. लेखन मर्यादा. मोर्तब सुद पुण्याचे पेशवे ता.क. सध्या आमचेकडे उत्तम कारकून नसल्याने खलित्यात काही त्रुटी असतील तर मोठ्या दिलाने माफ करणे.

श्रीमंत विजुभौ, साष्टांग दंडवत. मिपा कट्टा मुक्काम पुणे शहरचा मजकूर तपशीलवार कळला.सदर्हू भागाने आम्हास संतोष जाहला असुन सरदाराच्या त्यासमयीच्या हकीकती पेश कराव्यात.

विजुभाऊ 27/05/2023 - 14:54
मिपाची जुनी पाने चाळताना हे सापडले. माझा पहिलाच प्रयत्न. तात्याने खूप प्रोत्साहन दिले होते. ज्या वेळेस भेटायचा तेंव्हा तेंव्हा या बखरीबद्दल बोलायचाच

विजुभाऊ, मस्त लिहिताय, आगे बढो स॑मेलन स्थळी तुम्ही पोहोचण्याच्या थोडा वेळ अगोदर साक्षात विसोबा खेचरा॑चा फोन आला होता व सगळ्या॑ना त्या॑नी शुभेच्छाही दिल्या होत्या, तुम्हीच राहून गेलात.

धमाल मुलगा 24/03/2008 - 11:41
हा हा...विजुभाऊ.... एक न॑ब्बर ! आपली ही बखरीची कल्पना आम्हा॑स बहुत भावली. तसेच आपण ही जिम्मेदारी खा॑देवर घेऊन आपण आम्हा॑स मोठ्या स॑कटातून सोडविले असे आम्ही जरुर नमुद करु इच्छितो ! तसेच आमच्या एकुणच पोरकट व्यवस्थेची अकाळी वर्षावाने उडविलेली खिल्ली कोणिही मनात कि॑तु अथवा किल्मिष न धरता आन॑दे सहन करोन आम्हास वाटणार्‍या दु:खाचा भार हलका केला त्या॑चे काय आभार मानावेत? तेणेकरून धमाल मुलाने जोरात फुंकर( कशाची विचारु नका) मारुन आगोटी जीवित ठेवल च्यामारी, धन्य आहात. एक एक गोष्ट लक्षात ठेवली आहे की :-)) पुढील चौकात भारी मजा येणार अस॑ दिसत॑य! जी जी र जी र जी र जी जी जी जी........

विसोबा खेचर 24/03/2008 - 11:46
विजूभाऊ, झक्कास बर्र का! बखर आम्हास आवडते आहे, पुढील घडामोडी काय घडल्या, कुठली चर्चा, खलबतं कटकारस्थानं रचली गेली याच्या वृत्तांताची वाट पाहतो आहे! :) आपला, (बखरप्रेमी) तात्या.

इनोबा म्हणे 24/03/2008 - 12:07
झकास वर्णन जाहले. पुढील चौकात वाट पाहत आहो! विजूभाऊंचा विजय असो! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

प्रमोद देव 24/03/2008 - 12:14
काय वो अजूनही त्याच तारेत? अहो जरा नीट शिस्तशीर लिवा की! किती चुका त्या! तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.

चतुरंग 24/03/2008 - 12:39
ऐशी जबर खबर देणेस बखर निवडलीत ते उचित जाहलें! थोरले सायबांकडून आपणास शाबासी! 'दारुकाम', 'आतषबाजी', सामिष भोजन, कट-कारस्थाने येकयेक वृत्तांत साद्यंत करणे, जेणेकरोन आमचे जीवास तोशीस न होईल! बाकी आपण जाणते आहातच! लेखनसीमा. चतुरंग

विजुभाऊ 24/03/2008 - 13:58
"लेखनसीमा" अजोन जाहली नाही.. ये बखरीची भाषा ही उत्तर शिवकलीन आसोन तीयेचे मूळ गोडसे भटजींच्या १८५७ च्या प्रवास वर्णनात आहे. बाकी वाचकगळ आनंदयात्रींचे उत्तर वाचौन बहुत संतोष जाहला... मूळ बखर्नवीस विजुभाऊ हे त्यांच्या प्रोजेक्ट म्यामेनेजमेंट सारख्या अतीबीन महत्वाच्या कार्यात मग्न असल्यामुळे त्याना बखरीचा प्रवर्गिय भाग उत्खननास काळ उपलब्ध झाल्याबरहुकुम ते त्वरेने जाला वर पोष्ट करतील्.....आणि लेखनसीमा करतील. कळावे लोभ आहेच तो वर्धिष्णु व्हावा ही श्री चरणी पौष्याची विनंती मूळ बखर्कार्....बखर्नवीस विजुभाऊ .. (विजुभाऊंच्या बखरीतुन.........पान३ समास २४)

विजुभाऊ 24/03/2008 - 17:37
!! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!!चौक २ ऐका पुढील व्रुतान्त जी जी जी र जी जी जी र जी जी जी ओळख समारम्भ झडु लागला...शकुन सांगावा तैसी कडाडकन वीज तळपली .दुंदुभी झडाव्या तैशा मेघगर्जना होवु लागल्या.आकाशालाही आनंदाचे भरते येउन पुष्पव्रुष्टी व्हावी तैशा झडी पडो लागल्या मिपा सदस्यांचे मिलन पाहोन आसमंतालाही सण साजरा करावाऐसे वाटो लागले. उत्तर पेशवाईत पानपतात व्हावी तैसी भांडी वाजो लागली.भडभुंज्या लाह्या भाजतो तैसे चोहोकडोन आवाज कानी येवो लागले. ये कानाचे त्या कानास कळो नये ऐसी गत. घोडी भीजो लागली..वर्तमान दफ्तर हलवावे ऐसे फर्मान निघो लागले. समस्त दारुगोळा कोठारातुन सावकाशीने बाहेर येवु लागला होता. सरदार धमाल स्वतः जातीने दारुगोळा वाटपात कोणावर अन्याव होवो नये याची सर्वत्र फीरोन दखल घेत होते. तेवढ्यात दस्तूर खुद तात्या भ्रमण्ध्वनीवर सदस्यांच्या भेटीस आले.....आकाशवाणी व्हावी तैशा त्यानी कट्ट्यास शुभेछा दिल्या. एक एक भिडु रन्गी येवु लागला....राज कवी सरदार केशव्सुमार हळुच एखांदी कवीतेची फैर झाडत होते.त्या एकेका फैरीनेच सद्स्य गारद होत होते. येवढ्यात सरदार विजुभाऊंचे आगमन झाले...पुन्हा एकदा तडीताघात झाला...नंगारा वाजावा तैशा मेघ गर्जना झाल्या. सरदार विजुभाऊ नी सरदार धमाल मुलांस हळी घातली...आणि जेजाल्या प्रंमाणे भासणारी वीज पुन्हा गरजली.....मिपा कट्ट्यास तोफांची सलामी मिळाली. ऐका पुढील व्रुतान्त पुढील चौकात जी जी जी र जी जी जी र जी जी जी म्हणे शाहीर विजुभाऊ..मिपा सदस्य होउ... व्रुतान्त मी सांगणार्..तुम्ही ऐकणार ..रन्ग तो चढणार रं जी जी जी धन्य धन्य झाला तो सरदार जी जी जी जी जी जी र जी जी जी आर रं दाजी जी जी रं दाजी जी जी र जी जी जी र जी जी जी

In reply to by विजुभाऊ

विसोबा खेचर 24/03/2008 - 18:43
ओळख समारम्भ झडु लागला...शकुन सांगावा तैसी कडाडकन वीज तळपली .दुंदुभी झडाव्या तैशा मेघगर्जना होवु लागल्या.आकाशालाही आनंदाचे भरते येउन पुष्पव्रुष्टी व्हावी तैशा झडी पडो लागल्या मिपा सदस्यांचे मिलन पाहोन आसमंतालाही सण साजरा करावाऐसे वाटो लागले. विजूभाऊ, काय सुंदर भाषा आहे! तुमची बखर बाकी रंगते आहे खास! अजूनही येऊ द्या! एक विनंती - पुढचा चौक नवीन भागात सुरू करावा. प्रतिसादाने त्याची सुरवात करू नये ही विनंती. मिपाच्या श्रीमंतीस ते शोभत नाही! आपलाच, तात्या.

झक्कास!.. विजुभाऊ, एका दगडात दोन पक्षी मारताय... वॄत्तांत देताय, आणी आम्हाला पण जळवताय.. पुढच्या वेळेला जर भारतात असू, तर नक्की येऊ. प्रशांत.

विजुभाऊ, कमाल केलीत..भाऊसाहेबा॑च्या बखरीन॑तर इतिहास स॑शोधका॑ना 'विजुभाऊ॑ची बखर अभ्यासावी लागणार असे दिसते आहे. मी तुमची कैफियत एका फर्ज॑दामार्फत भा.इ.स॑.म॑. ला सिताब रवाना केली आहेच.. बहुत काय लिहिणे..

प्राजु 24/03/2008 - 18:45
वा वा.. विजुभाऊ, मानलं तुम्हाला. बखर अगदी झक्कास.. पुढचा भाग येऊद्या लवकर. - (सर्वव्यापी)प्राजु

श्री. रा. रा. विजुभाऊ यांसी, आपली बखर पोहोचली. वाचोनि परम संतोष जाहला. मि.पा.करीय जरीपटका पुण्यपत्तनाच्या पार (कात्रजात) फडकला हे ऐकोनि संतोष जाहला. पूर्वी आमच्या दादासाहेबानी म्हणजे राघोबादादांनी जरीपटका अटकेपार फडकवला होता. तेव्हा आम्हास असाच परमसंतोष जाहला होता. नंतर त्यांची बुद्धी फिरली. असो . परंतु पुढील कट्टा सर्व महारष्ट्रनगरीच्या सीमा उल्लंघोन सर्व मि.पा. करीयाना एकत्र आणील याची आम्हास खात्री आहे. आणि वैश्विक मि.पा. करीय कट्ट्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. ते होईल तो सुदिन. आपण बखरीतून सर्व वृत्तांत साद्यंत वर्णन केल्याने आम्ही आपले ऋणी आहोत. इति. लेखन मर्यादा. मोर्तब सुद पुण्याचे पेशवे ता.क. सध्या आमचेकडे उत्तम कारकून नसल्याने खलित्यात काही त्रुटी असतील तर मोठ्या दिलाने माफ करणे.

श्रीमंत विजुभौ, साष्टांग दंडवत. मिपा कट्टा मुक्काम पुणे शहरचा मजकूर तपशीलवार कळला.सदर्हू भागाने आम्हास संतोष जाहला असुन सरदाराच्या त्यासमयीच्या हकीकती पेश कराव्यात.

विजुभाऊ 27/05/2023 - 14:54
मिपाची जुनी पाने चाळताना हे सापडले. माझा पहिलाच प्रयत्न. तात्याने खूप प्रोत्साहन दिले होते. ज्या वेळेस भेटायचा तेंव्हा तेंव्हा या बखरीबद्दल बोलायचाच
3

सद्धगुरु च्या शोधात ............ भाग २ पुढे

संजीव नाईक ·

विसोबा खेचर 24/03/2008 - 11:03
पृथ्वीवर अनाचार माजला की सर्व ॠषी मुनी आणि इतर देवादिक मंडळी क्षीरसागराच्या ठिकाणी जाऊन भगवान विष्णुची प्रार्थना करीत आणि नतमस्तक होवून विनवणी करत असत की देवा पृथ्वीवर माजलेला हा अनाचार, दुष्ट प्रवृत्ती या सर्व गोष्टीचा नाश कर आणि आम्हाला भयमुक्त कर. त्या प्रमाणे भगवान विष्णूनी प्रत्येक अवतारामध्ये दुष्ट प्रवृत्तीचा, आसुरी शक्तिचा नाश करुन सर्वाना प्रत्येक वेळी सदाचाराकडे नेण्याचे आर्दश दाखवून दिलेत. सध्याची परिस्थिती पाहता पृथ्वीवर अनाचार माजला आहे असं मानायला हरकत नाही. सबब, आता विष्णूने पुन्हा एकदा अवतार घ्यायची वेळ झाली आहे असंही मानायला हरकत नाही. नाऊ इट इज हाय टाईम, की विष्णूने अवतार घेऊन पृथ्वीवरील सर्व दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून सर्व प्राणिमात्रांना सुखी केले पाहिजे! "परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम,| धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||" तरच एका ग्रंथात परमेश्वराच्या तोंडी घातलेले वरील वचन खरे ठरेल. खुद्द परमेश्वर असं कधी कुणला म्हणाल्याचं ऐकिवात नाही आणि एक संजय सोडला तर अद्याप असा पुरावाही दुसर्‍या कुणी दिल्याचं आठवत नाही! असो, तूर्तास विष्णूच्या नव्या अवताराची अगदी काकुळतीने वाट पाहतो आहे. कारण आज दुष्टप्रवृत्तींकडून पृथ्वीवरील अनेक निरागस, निरपराध लोकांचं शोषण सुरू आहे तेव्हा आता विष्णूने अधिक वाट पाहायला न लावता त्याचे, किंवा त्याच्या तोंडी घातलेले वरील वचन सत्य करून दाखवावे! नाहीतर ही केवळ त्याची मिथ्थ्या बडबड ठरेल असे वाटते! असो, संजिवराव, पुढील लेखनाकरता शुभेच्छा! आपला, (विष्णूची वाट पाहणारा!) तात्या. अवांतर - काही संकेतस्थळांवर बराच अनाचार माजला होता ते पाहून आम्हाला अवतार घेऊन मिसळपाव डॉट कॉम सुरू करावे लागले! आता पृथ्वीवरील बरीचशी आंतरजालीय मराठी प्रजा सुखासमाधानाने नांदत आहे! :)

In reply to by विसोबा खेचर

ठणठणपाळ 24/03/2008 - 21:13
>नाऊ इट इज हाय टाईम, की विष्णूने अवतार घेऊन पृथ्वीवरील सर्व दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून सर्व प्राणिमात्रांना सुखी केले पाहिजे! तात्या, कशाला उगीच स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेताय!

प्रमोद देव 24/03/2008 - 11:17
अवांतर - काही संकेतस्थळांवर बराच अनाचार माजला होता ते पाहून आम्हाला अवतार घेऊन मिसळपाव डॉट कॉम सुरू करावे लागले! आता पृथ्वीवरील बरीचशी आंतरजालीय मराठी प्रजा सुखासमाधानाने नांदत आहे! :) :))))))))))))))))))))))))))

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर 24/03/2008 - 19:06
मला तसंच म्हणायचंय रे रंगा! :) पण मला तुझ्याइतकं संस्कृत येत नाही रे! साला आपण पडलो एक नंबरचे भिकारचोट, अडाणी आणि गावंढळ! त्यामुळे सभ्य, सुशिक्षित, आणि सुसंस्कृत का कायसं म्हणतात त्या संस्थळावर आमचं पटेना, तिथे आम्हाला जाच वाटू लागला म्हणून मग आम्ही बंड करून, अवतार घेऊन मिपा स्थापन केलं, जे तुमच्यासारख्या दिलखुलास मंडळींच्या जोरावर आणि प्रेमामुळे आजवर सुरू आहे! बाय द वे रंगा, पण तुझ्याइतकं संस्कृत मला येत असतं तर मी 'तात्याक्नवी' असं काहीसं चमत्कारिक नांव नसतं का लावून घेतलं? तो उपक्रमाचा वाश्या जशी '~ नासतो विद्यते भावो..' अशी काहीशी जोरदार संस्कृत डायलॉग असलेली सही करतो तशी सही नसती का केली? :) असो.. आपला, तात्याक्नवी! :)

आर्य 24/03/2008 - 15:34
जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी आली अथवा.............................तेव्हा भगवान विष्णूनी अवतार घेऊन दुष्ट प्रवृत्तीचा, आसुरी शक्तिचा नाश केला. अनेक साधू-संतांनी लोकांना सन्मार्ग दाखवण्याचे हे कार्य पुढे चालवले.हे ईथपर्यंत सगळ ठिक आहे हो. काय खरचं अद्यात्मात गुरुची गरज आहे ? थेट देवां पर्यंत जाणे शक्य नाही ? या क्षेत्रातील प्रदूषण कसे ओळखयचे आणि कसे दूर ठेवयचे? या वाटेवर चालताना मायाजाल कोणते आणी खर्‍याची परीक्षा करणे जरा अवघडच आहे नाही का? पण कालांतराने तुमचे साधक, सधना सोडुन केवळ सिद्धींच्या मगे लागलेत............भोंदू साधू -बाबां विषयी आपण काय सांगू शाकाल? अनेक सद्दगुणी लोक या मुळेही भरडले जातायत. अहो लोकांची स्तिती फार वाईट आहे...आता तर म्हणतात "गुरू वीणकोण लावील वाट?" अनेक चमत्कार, अनेक लीला, एक ठिकाणी गुप्त होणे, दुसर्‍या ठिकाणी प्रगट होणे, दर्शनाला येणार्‍या भाविकांच्या मनोकामना पूर्ण होणे, रंकाचे राव होण अशाप्रकारे समाजामध्ये सत्प्रवृत्ती निर्माण होण्याच्या दृष्टीने कार्य केले आहे असं तुम्हाला वाटतं? आपण कुठे चाललोय? बाजारात ? भक्ती करुन / नवस बोलून मनोकामना पूर्ण करायला ??? कली युग आहे कली युग......आता अवतार झालाच पाहीजे पण हे प्रश्ण अनूत्तरीत आहेत ..... एखाध्या संप्रदायाचे पाईकपणा स्वीकारणे हे अत्यंत जरुरीचे आहे? प्रत्येकाचे ध्येय व त्यास प्रत्येकाचा मार्ग वेगळा असु शकतो. नराचा नारायण होणे शक्य आहे काय? म्हणजे नक्की काय? विष्णू पदाला पोहचणं "व्यासाय विष्णूरुपाय व्यासरुपाय विष्णवे " स्वर्ग प्राप्ती (कधीही न पाहीलेली गोष्ट), की समाजात देवे / अवतारी पुरुष म्हणून मान्यता ?, अथवा ३३ कोटी देवतांच्या पंक्तीत स्थान ? की फक्त मानसिक समाधान, नक्की काय ? या अर्थातच शंका आहेत्........यातुन कुणालाही दुखःवायचा हेतु नाही. कॄपया यातुन गैर अर्थाने होऊ नयेत ही दत्त चरणी प्रार्थना. आर्य

In reply to by आर्य

विसोबा खेचर 24/03/2008 - 16:46
म्हणजे नक्की काय? विष्णू पदाला पोहचणं "व्यासाय विष्णूरुपाय व्यासरुपाय विष्णवे " व्यास हा एक अत्यंत भोंदू, थापाड्या आणि स्त्रीलंपट ऋषी होऊन गेला अशी माझी माहिती आहे! चूभूद्याघ्या... बाकी चालू द्या.. तात्या.

In reply to by आर्य

संजीव नाईक 24/03/2008 - 17:16
श्रीमान आर्य यास. आपला प्रश्न योग्य आहे. मला मराठी टाईप करणे. फार जमत नाही मी शिकत आहे. पण हळुहळु आपल्या प्रश्ननाची उत्तरे माझ्या पुढील भागा मध्ये आहे. सध्द्गरुच्या शोधात यांचा अर्थ आपनास नक्की कळेल. स्वर्ग प्राप्ती म्हणजे "मिसळपाव वर ज्या शोधार्थ आपन येतात व मानाला आनंद / मानसिक सुख उपभोगता यालाच "स्वर्ग प्राप्ती " का म्हणूनये? राग धरुनये क्षमस्व आपला संजिव

आर्य 24/03/2008 - 17:57
स्वर्ग प्राप्ती म्हणजे "मिसळपाव वर ज्या शोधार्थ आपन येतात व मानाला आनंद / मानसिक सुख उपभोगता यालाच "स्वर्ग प्राप्ती " का म्हणूनये? ही जर स्वर्ग प्राप्ती आहे तर तुमचा सद्-गुरु का हवा.......मग उद्या पासुन पुजा -अर्चना बंद का करु नये. का स्वर्ग ही व्याख्या सपेक्ष आहे. प्रत्येकाच्या विचारानूसार, वेळेनूसार, आवडीनुसार बदलते..........मग अस्तीत्वत काय आहे. मला तर वाटतं हे देव आणि पुराणातल्या विश्व निर्मितिच्या कल्पनांनी लोकांची विचार शक्ती कुंठीत केली आहे. तात्या व्यास हा एक अत्यंत भोंदू, थापाड्या आणि स्त्रीलंपट ऋषी होऊन गेला अशी माझी माहिती आहे! तसे वर वर पहता आपल्या मताशी मी सहमत आहे, पण त्यांची सृजनशिलता मानली पाहीजे. व्यास हा एक अत्यंत भोंदू, थापाड्या आणि स्त्रीलंपट ऋषी होऊन गेला अशी माझी माहिती आहे! आर्य

In reply to by आर्य

विसोबा खेचर 24/03/2008 - 18:48
तात्या व्यास हा एक अत्यंत भोंदू, थापाड्या आणि स्त्रीलंपट ऋषी होऊन गेला अशी माझी माहिती आहे! तसे वर वर पहता आपल्या मताशी मी सहमत आहे, पण त्यांची सृजनशिलता मानली पाहीजे. ओक्के बॉस! :) आपला, (व्यासप्रेमी!) तात्या.

संजीव नाईक 24/03/2008 - 23:49
महाशय आपण दोघे का भाडतात उगाच आपण आपल्या मनाला लावून का घेतात असअसेल तर आज पासुन माझ चुकते म्हणुन मी लेख बंद करु का? आपला संजिव

आर्य 25/03/2008 - 10:02
प्रिय संजिव, उपरोक्त लेखात मी माझे मत व्यक्त करताना व्यासांचा संदर्भ दिला होता, त्या वर तात्यांनी त्यांचे मत मांडले आहे. आम्ही ऐक मेकांच्या मताचा आदर करीत विचार सहमती दर्शवली आहे. यात कोणीही-काहीही वैयक्तीक रीत्या धेतले आहे असे मला तरी वाटत नाही. (तात्या माझ्या या मताशी सहमत असतील). संजिव, (आपले वय आणि पोंच माहीत नसल्याने केवळ ऐकेरी ऊल्लेख आहे) आपण वाद न घालता संवाद करु. कॄपया विषय पुढे चालुठेवावा...............चू .भू. दे. धे. आपला (ह. भ. प.) आर्य सुचना - ह. भ. प. म्हणजे हरीभक्त भक्तपारायण असा संदर्भ न घेता "हळूच भजी पळवणारा" असे वाचावे.

संजीव नाईक 25/03/2008 - 10:15
श्रीमान श्रीयुक्त माननीय मिसळ्पाव परिवार सदस्य..... मी लहान असून आता मिपा वर आताच लिहण्याचा सराव करित आहे. वय वर्ष १००ला ५५ कमी धंदा नोकरी बी.एस्.एन्.एल्. मध्ये मंबई आवडता विषय चास्तू ,ज्योतिष ,टेरो , या विषयी समुपदेश करणे शास्त्रीय द्रुष्टी कोनातून आपला (केवळ एकेरी ) संजिव

विसोबा खेचर 24/03/2008 - 11:03
पृथ्वीवर अनाचार माजला की सर्व ॠषी मुनी आणि इतर देवादिक मंडळी क्षीरसागराच्या ठिकाणी जाऊन भगवान विष्णुची प्रार्थना करीत आणि नतमस्तक होवून विनवणी करत असत की देवा पृथ्वीवर माजलेला हा अनाचार, दुष्ट प्रवृत्ती या सर्व गोष्टीचा नाश कर आणि आम्हाला भयमुक्त कर. त्या प्रमाणे भगवान विष्णूनी प्रत्येक अवतारामध्ये दुष्ट प्रवृत्तीचा, आसुरी शक्तिचा नाश करुन सर्वाना प्रत्येक वेळी सदाचाराकडे नेण्याचे आर्दश दाखवून दिलेत. सध्याची परिस्थिती पाहता पृथ्वीवर अनाचार माजला आहे असं मानायला हरकत नाही. सबब, आता विष्णूने पुन्हा एकदा अवतार घ्यायची वेळ झाली आहे असंही मानायला हरकत नाही. नाऊ इट इज हाय टाईम, की विष्णूने अवतार घेऊन पृथ्वीवरील सर्व दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून सर्व प्राणिमात्रांना सुखी केले पाहिजे! "परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम,| धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ||" तरच एका ग्रंथात परमेश्वराच्या तोंडी घातलेले वरील वचन खरे ठरेल. खुद्द परमेश्वर असं कधी कुणला म्हणाल्याचं ऐकिवात नाही आणि एक संजय सोडला तर अद्याप असा पुरावाही दुसर्‍या कुणी दिल्याचं आठवत नाही! असो, तूर्तास विष्णूच्या नव्या अवताराची अगदी काकुळतीने वाट पाहतो आहे. कारण आज दुष्टप्रवृत्तींकडून पृथ्वीवरील अनेक निरागस, निरपराध लोकांचं शोषण सुरू आहे तेव्हा आता विष्णूने अधिक वाट पाहायला न लावता त्याचे, किंवा त्याच्या तोंडी घातलेले वरील वचन सत्य करून दाखवावे! नाहीतर ही केवळ त्याची मिथ्थ्या बडबड ठरेल असे वाटते! असो, संजिवराव, पुढील लेखनाकरता शुभेच्छा! आपला, (विष्णूची वाट पाहणारा!) तात्या. अवांतर - काही संकेतस्थळांवर बराच अनाचार माजला होता ते पाहून आम्हाला अवतार घेऊन मिसळपाव डॉट कॉम सुरू करावे लागले! आता पृथ्वीवरील बरीचशी आंतरजालीय मराठी प्रजा सुखासमाधानाने नांदत आहे! :)

In reply to by विसोबा खेचर

ठणठणपाळ 24/03/2008 - 21:13
>नाऊ इट इज हाय टाईम, की विष्णूने अवतार घेऊन पृथ्वीवरील सर्व दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून सर्व प्राणिमात्रांना सुखी केले पाहिजे! तात्या, कशाला उगीच स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेताय!

प्रमोद देव 24/03/2008 - 11:17
अवांतर - काही संकेतस्थळांवर बराच अनाचार माजला होता ते पाहून आम्हाला अवतार घेऊन मिसळपाव डॉट कॉम सुरू करावे लागले! आता पृथ्वीवरील बरीचशी आंतरजालीय मराठी प्रजा सुखासमाधानाने नांदत आहे! :) :))))))))))))))))))))))))))

In reply to by चतुरंग

विसोबा खेचर 24/03/2008 - 19:06
मला तसंच म्हणायचंय रे रंगा! :) पण मला तुझ्याइतकं संस्कृत येत नाही रे! साला आपण पडलो एक नंबरचे भिकारचोट, अडाणी आणि गावंढळ! त्यामुळे सभ्य, सुशिक्षित, आणि सुसंस्कृत का कायसं म्हणतात त्या संस्थळावर आमचं पटेना, तिथे आम्हाला जाच वाटू लागला म्हणून मग आम्ही बंड करून, अवतार घेऊन मिपा स्थापन केलं, जे तुमच्यासारख्या दिलखुलास मंडळींच्या जोरावर आणि प्रेमामुळे आजवर सुरू आहे! बाय द वे रंगा, पण तुझ्याइतकं संस्कृत मला येत असतं तर मी 'तात्याक्नवी' असं काहीसं चमत्कारिक नांव नसतं का लावून घेतलं? तो उपक्रमाचा वाश्या जशी '~ नासतो विद्यते भावो..' अशी काहीशी जोरदार संस्कृत डायलॉग असलेली सही करतो तशी सही नसती का केली? :) असो.. आपला, तात्याक्नवी! :)

आर्य 24/03/2008 - 15:34
जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी आली अथवा.............................तेव्हा भगवान विष्णूनी अवतार घेऊन दुष्ट प्रवृत्तीचा, आसुरी शक्तिचा नाश केला. अनेक साधू-संतांनी लोकांना सन्मार्ग दाखवण्याचे हे कार्य पुढे चालवले.हे ईथपर्यंत सगळ ठिक आहे हो. काय खरचं अद्यात्मात गुरुची गरज आहे ? थेट देवां पर्यंत जाणे शक्य नाही ? या क्षेत्रातील प्रदूषण कसे ओळखयचे आणि कसे दूर ठेवयचे? या वाटेवर चालताना मायाजाल कोणते आणी खर्‍याची परीक्षा करणे जरा अवघडच आहे नाही का? पण कालांतराने तुमचे साधक, सधना सोडुन केवळ सिद्धींच्या मगे लागलेत............भोंदू साधू -बाबां विषयी आपण काय सांगू शाकाल? अनेक सद्दगुणी लोक या मुळेही भरडले जातायत. अहो लोकांची स्तिती फार वाईट आहे...आता तर म्हणतात "गुरू वीणकोण लावील वाट?" अनेक चमत्कार, अनेक लीला, एक ठिकाणी गुप्त होणे, दुसर्‍या ठिकाणी प्रगट होणे, दर्शनाला येणार्‍या भाविकांच्या मनोकामना पूर्ण होणे, रंकाचे राव होण अशाप्रकारे समाजामध्ये सत्प्रवृत्ती निर्माण होण्याच्या दृष्टीने कार्य केले आहे असं तुम्हाला वाटतं? आपण कुठे चाललोय? बाजारात ? भक्ती करुन / नवस बोलून मनोकामना पूर्ण करायला ??? कली युग आहे कली युग......आता अवतार झालाच पाहीजे पण हे प्रश्ण अनूत्तरीत आहेत ..... एखाध्या संप्रदायाचे पाईकपणा स्वीकारणे हे अत्यंत जरुरीचे आहे? प्रत्येकाचे ध्येय व त्यास प्रत्येकाचा मार्ग वेगळा असु शकतो. नराचा नारायण होणे शक्य आहे काय? म्हणजे नक्की काय? विष्णू पदाला पोहचणं "व्यासाय विष्णूरुपाय व्यासरुपाय विष्णवे " स्वर्ग प्राप्ती (कधीही न पाहीलेली गोष्ट), की समाजात देवे / अवतारी पुरुष म्हणून मान्यता ?, अथवा ३३ कोटी देवतांच्या पंक्तीत स्थान ? की फक्त मानसिक समाधान, नक्की काय ? या अर्थातच शंका आहेत्........यातुन कुणालाही दुखःवायचा हेतु नाही. कॄपया यातुन गैर अर्थाने होऊ नयेत ही दत्त चरणी प्रार्थना. आर्य

In reply to by आर्य

विसोबा खेचर 24/03/2008 - 16:46
म्हणजे नक्की काय? विष्णू पदाला पोहचणं "व्यासाय विष्णूरुपाय व्यासरुपाय विष्णवे " व्यास हा एक अत्यंत भोंदू, थापाड्या आणि स्त्रीलंपट ऋषी होऊन गेला अशी माझी माहिती आहे! चूभूद्याघ्या... बाकी चालू द्या.. तात्या.

In reply to by आर्य

संजीव नाईक 24/03/2008 - 17:16
श्रीमान आर्य यास. आपला प्रश्न योग्य आहे. मला मराठी टाईप करणे. फार जमत नाही मी शिकत आहे. पण हळुहळु आपल्या प्रश्ननाची उत्तरे माझ्या पुढील भागा मध्ये आहे. सध्द्गरुच्या शोधात यांचा अर्थ आपनास नक्की कळेल. स्वर्ग प्राप्ती म्हणजे "मिसळपाव वर ज्या शोधार्थ आपन येतात व मानाला आनंद / मानसिक सुख उपभोगता यालाच "स्वर्ग प्राप्ती " का म्हणूनये? राग धरुनये क्षमस्व आपला संजिव

आर्य 24/03/2008 - 17:57
स्वर्ग प्राप्ती म्हणजे "मिसळपाव वर ज्या शोधार्थ आपन येतात व मानाला आनंद / मानसिक सुख उपभोगता यालाच "स्वर्ग प्राप्ती " का म्हणूनये? ही जर स्वर्ग प्राप्ती आहे तर तुमचा सद्-गुरु का हवा.......मग उद्या पासुन पुजा -अर्चना बंद का करु नये. का स्वर्ग ही व्याख्या सपेक्ष आहे. प्रत्येकाच्या विचारानूसार, वेळेनूसार, आवडीनुसार बदलते..........मग अस्तीत्वत काय आहे. मला तर वाटतं हे देव आणि पुराणातल्या विश्व निर्मितिच्या कल्पनांनी लोकांची विचार शक्ती कुंठीत केली आहे. तात्या व्यास हा एक अत्यंत भोंदू, थापाड्या आणि स्त्रीलंपट ऋषी होऊन गेला अशी माझी माहिती आहे! तसे वर वर पहता आपल्या मताशी मी सहमत आहे, पण त्यांची सृजनशिलता मानली पाहीजे. व्यास हा एक अत्यंत भोंदू, थापाड्या आणि स्त्रीलंपट ऋषी होऊन गेला अशी माझी माहिती आहे! आर्य

In reply to by आर्य

विसोबा खेचर 24/03/2008 - 18:48
तात्या व्यास हा एक अत्यंत भोंदू, थापाड्या आणि स्त्रीलंपट ऋषी होऊन गेला अशी माझी माहिती आहे! तसे वर वर पहता आपल्या मताशी मी सहमत आहे, पण त्यांची सृजनशिलता मानली पाहीजे. ओक्के बॉस! :) आपला, (व्यासप्रेमी!) तात्या.

संजीव नाईक 24/03/2008 - 23:49
महाशय आपण दोघे का भाडतात उगाच आपण आपल्या मनाला लावून का घेतात असअसेल तर आज पासुन माझ चुकते म्हणुन मी लेख बंद करु का? आपला संजिव

आर्य 25/03/2008 - 10:02
प्रिय संजिव, उपरोक्त लेखात मी माझे मत व्यक्त करताना व्यासांचा संदर्भ दिला होता, त्या वर तात्यांनी त्यांचे मत मांडले आहे. आम्ही ऐक मेकांच्या मताचा आदर करीत विचार सहमती दर्शवली आहे. यात कोणीही-काहीही वैयक्तीक रीत्या धेतले आहे असे मला तरी वाटत नाही. (तात्या माझ्या या मताशी सहमत असतील). संजिव, (आपले वय आणि पोंच माहीत नसल्याने केवळ ऐकेरी ऊल्लेख आहे) आपण वाद न घालता संवाद करु. कॄपया विषय पुढे चालुठेवावा...............चू .भू. दे. धे. आपला (ह. भ. प.) आर्य सुचना - ह. भ. प. म्हणजे हरीभक्त भक्तपारायण असा संदर्भ न घेता "हळूच भजी पळवणारा" असे वाचावे.

संजीव नाईक 25/03/2008 - 10:15
श्रीमान श्रीयुक्त माननीय मिसळ्पाव परिवार सदस्य..... मी लहान असून आता मिपा वर आताच लिहण्याचा सराव करित आहे. वय वर्ष १००ला ५५ कमी धंदा नोकरी बी.एस्.एन्.एल्. मध्ये मंबई आवडता विषय चास्तू ,ज्योतिष ,टेरो , या विषयी समुपदेश करणे शास्त्रीय द्रुष्टी कोनातून आपला (केवळ एकेरी ) संजिव
3

लोकमित्र मंडळ - शिक्षणात्मक लेख लोकांत पोचवण्याचा प्रकल्प

धनंजय ·

विसोबा खेचर 24/03/2008 - 08:23
शाब्बास रे धन्या! तीन महिन्यांपूर्वी जे बोलला होतास ते करून दाखवलंस! 'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले'! असं म्हटलेलंच आहे.. तुझे, बिरुटेशेठचे आणि आजानुकर्णाचे मन:पूर्वक अभिनंदन व लोकमित्र प्रतिष्ठानला माझ्या व्यक्तिगत व मिसळपाव परिवारातर्फे अनेकोत्तम शुभेच्छा! ही मूळ कल्पना ज्यांनी मांडली त्या आमच्या वालवलकरशेठचेही अभिनंदन! (अवांतर - एक कोकणी या नात्याने मला त्यांचा अभिमान वाटतो!) धन्याशेठ, मात्र आता थांबू नका. लोकमित्र प्रतिष्ठानचे हे जे रोपटे तू लावले आहेस, त्याचा वेलू आता गगनावेरी नेण्याची जबाबदरी तुम्हा मंडळींवर आहे. नाहीतर उत्साहाच्या भरात अशी अनेक प्रतिष्ठानं, संस्था स्थापन होतात व लवकरच बंद पडतात, तसं होता कामा नये, असं वाटतं! व्यक्तिश: माझ्याकडून काही मदत होण्यासारखी असेल तर अवश्य सांग, मी ती यथाशक्ति, यथामती करण्याचा जरूर प्रयत्न करीन, नव्हे ते मला आवडेल! आत्ता जरा गडबडीत आहे, सवडीने विस्तृत प्रतिसाद पाठवतो... प्रतिष्ठानला पुन्हा एकदा शुभेच्छा व सुयश चिंतितो! तात्या.

प्राजु 28/03/2008 - 08:48
अतिशय सुंदर उप्क्रम सुरू केला आहे. तुमचे सगळ्यांचे आभार आणि शुभेच्छा. माझ्याकडूनही जमेल तितकी मदत मी करेन... - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर 24/03/2008 - 08:23
शाब्बास रे धन्या! तीन महिन्यांपूर्वी जे बोलला होतास ते करून दाखवलंस! 'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले'! असं म्हटलेलंच आहे.. तुझे, बिरुटेशेठचे आणि आजानुकर्णाचे मन:पूर्वक अभिनंदन व लोकमित्र प्रतिष्ठानला माझ्या व्यक्तिगत व मिसळपाव परिवारातर्फे अनेकोत्तम शुभेच्छा! ही मूळ कल्पना ज्यांनी मांडली त्या आमच्या वालवलकरशेठचेही अभिनंदन! (अवांतर - एक कोकणी या नात्याने मला त्यांचा अभिमान वाटतो!) धन्याशेठ, मात्र आता थांबू नका. लोकमित्र प्रतिष्ठानचे हे जे रोपटे तू लावले आहेस, त्याचा वेलू आता गगनावेरी नेण्याची जबाबदरी तुम्हा मंडळींवर आहे. नाहीतर उत्साहाच्या भरात अशी अनेक प्रतिष्ठानं, संस्था स्थापन होतात व लवकरच बंद पडतात, तसं होता कामा नये, असं वाटतं! व्यक्तिश: माझ्याकडून काही मदत होण्यासारखी असेल तर अवश्य सांग, मी ती यथाशक्ति, यथामती करण्याचा जरूर प्रयत्न करीन, नव्हे ते मला आवडेल! आत्ता जरा गडबडीत आहे, सवडीने विस्तृत प्रतिसाद पाठवतो... प्रतिष्ठानला पुन्हा एकदा शुभेच्छा व सुयश चिंतितो! तात्या.

प्राजु 28/03/2008 - 08:48
अतिशय सुंदर उप्क्रम सुरू केला आहे. तुमचे सगळ्यांचे आभार आणि शुभेच्छा. माझ्याकडूनही जमेल तितकी मदत मी करेन... - (सर्वव्यापी)प्राजु
तीन महिन्यांपूर्वी यनावाला यांनी (अन्यत्र) चालू केलेल्या विषयावर पुढे विचार येथे देत आहे. गेल्या तीन महिन्यात लोकमित्र प्रतिष्ठान नावाची एक विश्वस्त संस्था मी फोंडा, गोवा, येथे पंजीकृत केली आहे. या संस्थेची कागदपत्रे विश्वस्तांच्या हातात रजिस्ट्रार कडून आता प्राप्त झालेली आहेत (विश्वस्त तसेच संस्थेसाठी मी दिलेल्या पैशांचा करण्यास समर्थ म्हणून माझे काही नातेवाईक योजले आहेत. मंडळ कार्यरत झाल्यावर यांच्या हातून जबाबदारी आणि सूत्रे काढून टाकावीत अशी माझी इच्छा आहे.) काम एक कार्यकारी मंडळ करेल.

कविवर्य सुरेश भट स्मृती मुशायरा

चित्तरंजन भट ·

प्राजु 23/03/2008 - 22:54
अतिशय सुंदर होणार हा मुशायरा यात शंकाच नाही. मलाही आवडलेल. १३ एप्रिल तारखेला भारतात येण्याचा विचार आहे. बघू कसे आणि काय जमते. पण उपस्थित राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन नक्की. चित्तर, आपण याचा वृतांत इथे लिहावा , फोटो द्यावेत.. आणि जमल्यास यू-ट्यूब एखादी चित्रफितही टाकावी. ही विनंती.. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

बेसनलाडू 24/03/2008 - 01:29
अतिशय सुंदर होणार हा मुशायरा यात शंकाच नाही. मलाही आवडलेल. १३ एप्रिल तारखेला भारतात येण्याचा विचार आहे. बघू कसे आणि काय जमते. पण उपस्थित राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन नक्की. -- मीही १४ एप्रिलला मुंबईत येतोय. १८ ला पुण्याला यायचा नक्की प्रयत्न करेन. मुशायर्‍यास हार्दिक शुभेच्छा. (प्रवासी)बेसनलाडू

विसोबा खेचर 23/03/2008 - 22:57
मुशायर्‍याला माझ्या वैयक्तिक व संपूर्ण मिसळपाव परिवारातर्फे अनेकानेक शुभेच्छा! तसेच भट साहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन... कृपया कार्यक्रमाचा तपशील, कोण कोण मंडळी भाग घेणार आहेत, ही माहिती इथे अवश्य कळवावी... आपला, (सुरेशभट प्रेमी) तात्या.

कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका कार्यक्रमाच्या दिवशी म्हणजे १८-४-२००८ ला भरत नाट्यमंदिरात मिळतीलच. ह्याशिवाय, प्रवेशिका हव्या असल्यास खालील दूरध्वनींवर संपर्क साधावा: चित्तरंजन भट ९३७३१०४९०३ अनिरुद्ध अभ्यंकर ९८५००००४३४ १५, १६ ला कविवर्य सुरेश भट ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांची गल्लत होण्याची संभावना आहे. वरील कार्यक्रम १८ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता भरत नाट्यमंदिरात आहे. ह्याची कृपया पुन्हा एकदा नोंद घ्यावी.

नीलकांत 14/04/2008 - 20:58
कार्यक्रमाला मी सुध्दा येतोय. थोडा लवकरच पोहोचेन. कुणी लवकर आलात तर शक्यतो आल्यावर कॉल करा, भेटूया. ९८२३५५२५२३ नीलकांत

प्राजु 23/03/2008 - 22:54
अतिशय सुंदर होणार हा मुशायरा यात शंकाच नाही. मलाही आवडलेल. १३ एप्रिल तारखेला भारतात येण्याचा विचार आहे. बघू कसे आणि काय जमते. पण उपस्थित राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन नक्की. चित्तर, आपण याचा वृतांत इथे लिहावा , फोटो द्यावेत.. आणि जमल्यास यू-ट्यूब एखादी चित्रफितही टाकावी. ही विनंती.. - (सर्वव्यापी)प्राजु

In reply to by प्राजु

बेसनलाडू 24/03/2008 - 01:29
अतिशय सुंदर होणार हा मुशायरा यात शंकाच नाही. मलाही आवडलेल. १३ एप्रिल तारखेला भारतात येण्याचा विचार आहे. बघू कसे आणि काय जमते. पण उपस्थित राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन नक्की. -- मीही १४ एप्रिलला मुंबईत येतोय. १८ ला पुण्याला यायचा नक्की प्रयत्न करेन. मुशायर्‍यास हार्दिक शुभेच्छा. (प्रवासी)बेसनलाडू

विसोबा खेचर 23/03/2008 - 22:57
मुशायर्‍याला माझ्या वैयक्तिक व संपूर्ण मिसळपाव परिवारातर्फे अनेकानेक शुभेच्छा! तसेच भट साहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन... कृपया कार्यक्रमाचा तपशील, कोण कोण मंडळी भाग घेणार आहेत, ही माहिती इथे अवश्य कळवावी... आपला, (सुरेशभट प्रेमी) तात्या.

कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका कार्यक्रमाच्या दिवशी म्हणजे १८-४-२००८ ला भरत नाट्यमंदिरात मिळतीलच. ह्याशिवाय, प्रवेशिका हव्या असल्यास खालील दूरध्वनींवर संपर्क साधावा: चित्तरंजन भट ९३७३१०४९०३ अनिरुद्ध अभ्यंकर ९८५००००४३४ १५, १६ ला कविवर्य सुरेश भट ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांची गल्लत होण्याची संभावना आहे. वरील कार्यक्रम १८ एप्रिल रोजी रात्री ९.३० वाजता भरत नाट्यमंदिरात आहे. ह्याची कृपया पुन्हा एकदा नोंद घ्यावी.

नीलकांत 14/04/2008 - 20:58
कार्यक्रमाला मी सुध्दा येतोय. थोडा लवकरच पोहोचेन. कुणी लवकर आलात तर शक्यतो आल्यावर कॉल करा, भेटूया. ९८२३५५२५२३ नीलकांत



दिनांक १८ एप्रिल २००८ रोजी भरत नाट्य मंदिर, पुणे येथे कविवर्य सुरेश भट ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुशायरा आयोजित करण्यात आला आहे.
ह्या कार्यक्रमासाठी सर्व रसिकांना सुरेशभट.इनतर्फे आग्रहाचे आमंत्रण आहे.


मुशायऱ्याचे स्थान:
भरत नाट्य मंदिर, पुणे

७-८-९

पुष्कर ·

हा खेळ मस्त असेल असे वाटते. पुढचा अड्डा जमला की नक्की खेळून पाहू. नशीब तुम्ही पण ह्याला 'चांदण्यात रात्र रात्र' असे शीर्षक दिले नाही कारण बरेच जणांचा मागच्या वेळी हिरमोड झाला होता... ;) 'चांदण्यात रात्र रात्र' म्हटल्यावर त्यांना काही तरी वेगळेच वाटले होते... जाऊ दे. पत्त्याची नशा पत्तेबाजालाच ठाऊक.. > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

विसोबा खेचर 24/03/2008 - 09:28
हम्म! खेळ चांगला वाटतो आहे. एकदा खेळून पाहिला पाहिजे! तरीही तीन पत्तीतली मजा कशातच नाही, हे माझं मत.. आपला, (तीनपत्ती प्रेमी) तात्या.

हा खेळ मस्त असेल असे वाटते. पुढचा अड्डा जमला की नक्की खेळून पाहू. नशीब तुम्ही पण ह्याला 'चांदण्यात रात्र रात्र' असे शीर्षक दिले नाही कारण बरेच जणांचा मागच्या वेळी हिरमोड झाला होता... ;) 'चांदण्यात रात्र रात्र' म्हटल्यावर त्यांना काही तरी वेगळेच वाटले होते... जाऊ दे. पत्त्याची नशा पत्तेबाजालाच ठाऊक.. > > मना बोलणे नीच सोशीत जावे, स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे...

विसोबा खेचर 24/03/2008 - 09:28
हम्म! खेळ चांगला वाटतो आहे. एकदा खेळून पाहिला पाहिजे! तरीही तीन पत्तीतली मजा कशातच नाही, हे माझं मत.. आपला, (तीनपत्ती प्रेमी) तात्या.
सृष्टीलावण्याचं चांदण्यात रात्र रात्र वाचलं आणि डोक्यात अगदी भिकार सावकार पासून ते मुंगूस, चॅलेंज, बदाम सात, ५-३-२, ७-८, बेरीज झब्बू, गुलाम चोर, लॅडीज, मेंढीकोट, नॉट ऍट होम, जजमेंट/बिस्मार्क, कॅनस, ३०४, २८, रम्मी, तीन पानी पर्यंत खेळांची गर्दी झाली. पण या सगळ्यांपेक्षा वेगळ्याने एकच खेळ सारखा डोकं वर काढत होता, तो म्हणजे ७-८-९. हा एक नव्यानेच कळलेला खेळ (तरी मला तो शिकून ७-८ वर्षं झाली असतील). "शॉर्ट अँड स्वीट" अश्या शब्दात वर्णन करावं असा हा खेळ आहे. पण तरीसुद्धा हा खेळ त्याचं व्यसन लावू शकतो. मग कितीही झालं तरी डाव संपवावासा वाटत नाही.

मृत्यु आणि मृत्युंजय

सर्वसाक्षी ·

मदनबाण 23/03/2008 - 19:08
आपला लेख वाचुन माझ्या मनाला प्रचंड आनंद झाला, देशातील प्रत्येक युवकाने आणि जनतेने हे तेजस्वी निवेदन वाचालाच पाहिजे आणि आत्मसात ही केले पाहिजे कारण तीच तर खरी देशनिष्टा आहे. (कुठेतरी वाचले आहे:-- जे लोक अपला इतिहास विसरतात त्यांचे भविष्य कठीण आहे.) (त्रिदेव भक्त) मदनबाण

मुळात या तिघांवर दाखल केलेला अभियोग हा हत्येचा नव्हता तर ’राजद्रोहाचा, सरकार उलथुन टाकण्याच्या प्रयत्नाचा’ होता हे त्यांच्या वरील आरोपपत्र वाचताच लक्षात येते. या आरोपपत्राचा सारांश असा: अभिमानास्पद आहे. तिथे उपस्थित असलेल्या दंडाधिकार्‍याला उद्देशून सरदार भगतसिंग म्हणाले " तुम्ही भाग्यवान आहात. हिंदुस्थानी क्रांतिकारक आपल्या सर्वोच्च ध्येयासाठी मृत्युला आनंदाने कसे कवटाळतात हे आज प्रत्यक्ष पाहायचे भाग्य आपल्याला लाभले आहे" लक्ष लक्ष प्रणिपात. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

विसोबा खेचर 23/03/2008 - 23:14
किमान सत्याचा उदो उदो करणार्‍या व न्यायाचा प़क्ष घेण्याचा दावा करणार्‍या गांधी महाशयांनी सरकारला या संदर्भात जाब विचारु नये हे फार काही सांगुन जाते. अगदी खरं! सदर आरोपपत्र वाचताच प्रत्य्रेक भारतियाची मान अभिमानाने उंचावेल, कि स्वातंत्र्ययुद्धाचा असा महान उद्गाता आमच्या या देशात होवुन गेला. निश्चितच उंचावेल! आणि तुम्ही ती मान्य कराल अशी आशा आहे की, तुम्ही आपल्या सैनिकी विभागाला एक सैन्यपथक वा बंदूकधारी पथक पाठवुन आम्हाला गोळ्या घालुन सैनिकाप्रमाणे मारण्याचे आदेश द्यावेत" ----! नि:शब्द! याला म्हणतात दिलेरी!! संध्याकाळी सात वाजुन तेहेतीस मिनिटांनी हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव इन्किलाब झिंदाबादच्या घोष्णा देत फासावर गेले. या तिघा वीरांकरता 'विनम्र अभिवादन' हे शब्ददेखील पोकळ ठरावेत, तोकडे ठरावेत, नुसताच एक शाब्दिक उपचार ठरावेत, असं वाटतं! खरं तर यांचं बलिदान हे शब्दातीत आहे... साक्षिदेवा, तुझा ह्या लेखाचं मोल आभाळाइतकं आहे!! आपला, (नतमस्तक आणि नि:शब्द) तात्या.

ट्रेड मार्क 23/03/2016 - 19:29
वयाच्या फक्त २४व्या वर्षी एवढी प्रगल्भता आणि देशप्रेम, स्वतःला फाशी होणार आहे हे माहित असूनही इतके तेजस्वी निवेदन! लाख वेळा सलाम!!!
किमान सत्याचा उदो उदो करणार्‍या व न्यायाचा प़क्ष घेण्याचा दावा करणार्‍या गांधी महाशयांनी सरकारला या संदर्भात जाब विचारु नये हे फार काही सांगुन जाते.
याबद्दल काय बोलणार? गांधीबाबांनी बरेचदा चुकीची बाजू घेतली आहे. आपले सोडून दुसर्यांचे लांगूलचालन करण्याची प्रथा फार जुनी आहे हिंदूंमध्ये.

मदनबाण 23/03/2008 - 19:08
आपला लेख वाचुन माझ्या मनाला प्रचंड आनंद झाला, देशातील प्रत्येक युवकाने आणि जनतेने हे तेजस्वी निवेदन वाचालाच पाहिजे आणि आत्मसात ही केले पाहिजे कारण तीच तर खरी देशनिष्टा आहे. (कुठेतरी वाचले आहे:-- जे लोक अपला इतिहास विसरतात त्यांचे भविष्य कठीण आहे.) (त्रिदेव भक्त) मदनबाण

मुळात या तिघांवर दाखल केलेला अभियोग हा हत्येचा नव्हता तर ’राजद्रोहाचा, सरकार उलथुन टाकण्याच्या प्रयत्नाचा’ होता हे त्यांच्या वरील आरोपपत्र वाचताच लक्षात येते. या आरोपपत्राचा सारांश असा: अभिमानास्पद आहे. तिथे उपस्थित असलेल्या दंडाधिकार्‍याला उद्देशून सरदार भगतसिंग म्हणाले " तुम्ही भाग्यवान आहात. हिंदुस्थानी क्रांतिकारक आपल्या सर्वोच्च ध्येयासाठी मृत्युला आनंदाने कसे कवटाळतात हे आज प्रत्यक्ष पाहायचे भाग्य आपल्याला लाभले आहे" लक्ष लक्ष प्रणिपात. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

विसोबा खेचर 23/03/2008 - 23:14
किमान सत्याचा उदो उदो करणार्‍या व न्यायाचा प़क्ष घेण्याचा दावा करणार्‍या गांधी महाशयांनी सरकारला या संदर्भात जाब विचारु नये हे फार काही सांगुन जाते. अगदी खरं! सदर आरोपपत्र वाचताच प्रत्य्रेक भारतियाची मान अभिमानाने उंचावेल, कि स्वातंत्र्ययुद्धाचा असा महान उद्गाता आमच्या या देशात होवुन गेला. निश्चितच उंचावेल! आणि तुम्ही ती मान्य कराल अशी आशा आहे की, तुम्ही आपल्या सैनिकी विभागाला एक सैन्यपथक वा बंदूकधारी पथक पाठवुन आम्हाला गोळ्या घालुन सैनिकाप्रमाणे मारण्याचे आदेश द्यावेत" ----! नि:शब्द! याला म्हणतात दिलेरी!! संध्याकाळी सात वाजुन तेहेतीस मिनिटांनी हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव इन्किलाब झिंदाबादच्या घोष्णा देत फासावर गेले. या तिघा वीरांकरता 'विनम्र अभिवादन' हे शब्ददेखील पोकळ ठरावेत, तोकडे ठरावेत, नुसताच एक शाब्दिक उपचार ठरावेत, असं वाटतं! खरं तर यांचं बलिदान हे शब्दातीत आहे... साक्षिदेवा, तुझा ह्या लेखाचं मोल आभाळाइतकं आहे!! आपला, (नतमस्तक आणि नि:शब्द) तात्या.

ट्रेड मार्क 23/03/2016 - 19:29
वयाच्या फक्त २४व्या वर्षी एवढी प्रगल्भता आणि देशप्रेम, स्वतःला फाशी होणार आहे हे माहित असूनही इतके तेजस्वी निवेदन! लाख वेळा सलाम!!!
किमान सत्याचा उदो उदो करणार्‍या व न्यायाचा प़क्ष घेण्याचा दावा करणार्‍या गांधी महाशयांनी सरकारला या संदर्भात जाब विचारु नये हे फार काही सांगुन जाते.
याबद्दल काय बोलणार? गांधीबाबांनी बरेचदा चुकीची बाजू घेतली आहे. आपले सोडून दुसर्यांचे लांगूलचालन करण्याची प्रथा फार जुनी आहे हिंदूंमध्ये.

आज दिनांक २३ मार्च, आज हुतात्मा भगतसिंग, हुतात्मा राजगुरू आणि हुतात्मा सुखदेव यांचा ७७ वा हौतात्म्यदिन. ध्येयाप्रत समर्पित जीवन आणि हौतात्म्य याचा एक नवा आदर्श या त्रिमूर्तीने निर्माण केला. bhagatsingh

raj sukhdev