मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पांढरा रस्सा

विजुभाऊ ·

In reply to by स्वाती राजेश

धमाल मुलगा 18/03/2008 - 10:50
स्वातीताई, मी काय रेसिपी देणार कप्पाळ? साधा चहा करताना मी फाफलतो. हे तुझ्यासारख॑ सुगरण होण्यासाठी आणि ते असून इतरा॑ना समजेल अस॑ लिहून काढता येण्यासाठी पुढचे ७ जन्म एखाद्या सिध्दहस्त लेखकाकडे (ज्याला नव-नवीन प्रकारचे पदार्थ हादडण्याची हौस असेल) 'महाराज' म्हणून काम करावे लागेल. म्हणजे पदार्थ जमतील आणि 'गुण नाही पण वाण लागला' (की उलट॑?) ह्या न्यायाने रेसिपी लिहिताही येतील. त्यामुळे सध्दयातरी तुला चॅले॑ज नाही :-) आपला, - स्वय॑पाकातला 'ढ' रा॑डेचा ध मा ल.

विजुभाऊ 17/03/2008 - 19:14
धन्यवाद स्वाती ताइ तुमच्या साठी माझी एक रेसीपी शिळ्या पोळ्या १० , भाज्या ज्या असतील त्या( भाजी याचा अर्थ तयार भाजी.बटाटा /भोपळा/गवारी/ मटार/ तोण्डली/दोडका/पडवळ / फरसबी /शक्यतो कोरड्या रस्सा नसलेल्या भाज्या) तयार भज्या नसतील तर त्या तयार करुन घ्याव्या ,कांदा तिखट,थोडे बेसन पोळ्या अर्ध्या कापून घ्यावा. १ चमचा बेसन थोडे जाडसर भिजवावे. तेल तापवत ठेवावे. कच्चा कांदा बारीक कापुन भाजीत घालावा. अर्ध्या कापलेल्या पोळीचे द्रोण करावे त्यात भाजी भरुन समोशाची वरची कड बेसनाने बंद करावी. समोसा तळून् घ्यावा. मस्त कुर्कुरीत समोसे तयार होतात

In reply to by शैलेश दामले

मनस्वी 04/04/2008 - 12:30
अन् आम्हालाही सांगा! पाककृती पण सांगा. त्याची खासियत सांगा. कुठला काळा रस्सा प्रसिद्ध आहे ते सांगा.

In reply to by स्वाती राजेश

धमाल मुलगा 18/03/2008 - 10:50
स्वातीताई, मी काय रेसिपी देणार कप्पाळ? साधा चहा करताना मी फाफलतो. हे तुझ्यासारख॑ सुगरण होण्यासाठी आणि ते असून इतरा॑ना समजेल अस॑ लिहून काढता येण्यासाठी पुढचे ७ जन्म एखाद्या सिध्दहस्त लेखकाकडे (ज्याला नव-नवीन प्रकारचे पदार्थ हादडण्याची हौस असेल) 'महाराज' म्हणून काम करावे लागेल. म्हणजे पदार्थ जमतील आणि 'गुण नाही पण वाण लागला' (की उलट॑?) ह्या न्यायाने रेसिपी लिहिताही येतील. त्यामुळे सध्दयातरी तुला चॅले॑ज नाही :-) आपला, - स्वय॑पाकातला 'ढ' रा॑डेचा ध मा ल.

विजुभाऊ 17/03/2008 - 19:14
धन्यवाद स्वाती ताइ तुमच्या साठी माझी एक रेसीपी शिळ्या पोळ्या १० , भाज्या ज्या असतील त्या( भाजी याचा अर्थ तयार भाजी.बटाटा /भोपळा/गवारी/ मटार/ तोण्डली/दोडका/पडवळ / फरसबी /शक्यतो कोरड्या रस्सा नसलेल्या भाज्या) तयार भज्या नसतील तर त्या तयार करुन घ्याव्या ,कांदा तिखट,थोडे बेसन पोळ्या अर्ध्या कापून घ्यावा. १ चमचा बेसन थोडे जाडसर भिजवावे. तेल तापवत ठेवावे. कच्चा कांदा बारीक कापुन भाजीत घालावा. अर्ध्या कापलेल्या पोळीचे द्रोण करावे त्यात भाजी भरुन समोशाची वरची कड बेसनाने बंद करावी. समोसा तळून् घ्यावा. मस्त कुर्कुरीत समोसे तयार होतात

In reply to by शैलेश दामले

मनस्वी 04/04/2008 - 12:30
अन् आम्हालाही सांगा! पाककृती पण सांगा. त्याची खासियत सांगा. कुठला काळा रस्सा प्रसिद्ध आहे ते सांगा.
Taxonomy upgrade extras
काही गोष्टींचे उल्लेख जरी आले तरी काही पुस्तके आठवतात्.किंवा काही लेखकांचे उल्लेख आले तरी काही आठ्वणी ताज्या होतात्.काही उत्सुकता चाळवल्या जातात... उदा: त्याने घोडा झाडाला बांधला आणि दश्म्या सोडल्या हे वाक्य हम्खास गुरुनाथ नाइकांच्या गोलंदाज कथे मधे यायच्या. तसेच बाबा कदमांच्या कादंबरीत " पांढरा रस्सा " हा हमखास असतोच.त्यांच्या कोणत्याही कादंबरीचा तो अपरीहार्य भागच जणू. दश्म्या माहीत होत्या पण अस्सल पांढरा रस्सा मी कोल्हापूर ला जाउन चाखला. मला "पांढरा रस्सा" ची पाक क्रुती हवी आहे.

महत्वाचे..मदत हवी आहे

माझी दुनिया ·

विजुभाऊ 17/03/2008 - 17:00
१बॅन्केत स्वतः जाउन तुमचा पास्वर्ड बदलून घ्या...... २कोणत्याही वेब साइट्वर जाउन काहीही बॅन्क व्यवहार करु नका ३ तुमचे अकाउन्ट चेक करून पहा.तसेच बॅन्केकडे लेखी तक्रार करा.व तक्रारीची पोच पावती घ्या ४तुमचे डेबिट कार्ड हरवले असे साण्गोन बॅन्केकडोन ते ब्लोक करुन घ्या. व तसा लेखी/इ मेल घ्या एक ग्राहक म्हणून या सेवा देणे हे बॅन्केचे काम आहे

धमाल मुलगा 17/03/2008 - 17:05
माझ्या माहितीप्रमाणे हा प्रकार फिशि॑गचा असु शकतो. कृपया काळजी घ्या. नेहमी, शिवाय १२८ बिट एन्क्रिप्शन म्हणून न्याहाळकाच्या स्टेट्स बार मध्ये कुलुपाची खूण दिसते तिच्यावर टिचकी मारुन खातरजमा करा की 'security certificate' HDFC बॅ॑केचेच आहे. नेहमी, बॅ॑केच्या स॑स्थळावर जाऊनच नेट बॅ॑किगसाठी लॉग इन करा. विरोपात आलेल्या दुव्यावरुन कधीही करु नका. अगदी तो बॅ॑केकडून आला असला तरी. अधिक माहितीसाठी : http://www.hdfcbank.com/common/onlineservices/security/phishing_info.htm येथे वाचा. आपला हितचि॑तक -ध मा ल.

मनस्वी 17/03/2008 - 17:09
१. ही fake साईट असू शकते. लिंकवर अजिबात क्लिक करू नका. २. स्वतः बँकेत जाउन काय ती खातरजमा करा. ३. बदललेल्या ईमेल आयडी शी संबंध नसून फिशिंगचाच प्रकार असण्याची शक्यता अधिक आहे. मनस्वी

माझी दुनिया 17/03/2008 - 17:31
सहकार्याकरता धन्यवाद, मी तसा ताबडतोब त्यांच्या कस्टमर केअर ला फोन केला होता.पण ते ही काही फार म्हत्वाच्ची माहिती सांगू शकले नाहीत. फक्त तुमचा पिन नं बदला असे ठराविक छापाचे उत्तर देऊन मोकळे झाले. पण मी धीर न सोडता बॅंकेच्या संकेतस्थळावर असलेल्या या कामाकरता दिलेल्या विरोपावर हा आलेला विरोप धाडून दिला आहे. पाहूया काय होते ते. माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

मनस्वी 17/03/2008 - 17:39
दुर्लक्ष्य करावे. कारण "prevent further unauthorized access for your safety" साठी बँक विरोपाने संपर्क करेल काय? जर त्या व्यक्तीने विरोप पाहिलाच नाही तर? तर असे विरोप फसवे असतात, आपले अकाऊंट नंबर्स आणि पासवर्डस काढून घेण्यासाठी. >> *Important* Please update your records on or before 48 hours, a failure to update your records will result in a temporary hold on your funds - it's one more way that HDFC makes your online banking experience better.. -- इथेच या मेलचा फोलपणा कळतो. असा विरोप आल्यावर दुर्लक्ष्य करावे. मनस्वी

विसोबा खेचर 17/03/2008 - 18:07
मला या सगळ्या तांत्रिक गोष्टीतली फारशी काही माहिती नाही, परंतु तज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य ती काळजी घ्या एवढीच विनंती... आपले कष्टाचे पैसे सुरक्षित राहोत एवढीच मनापासूनची शुभकामना! आपला, (चिंतित!) तात्या.

आपल्याला आलेल्या साईटचा ई-पत्ता इथे कळवा आणि त्या तक्रारीचा मागोवा घ्या (नाहीतर सोंडके आपल्याकडे खुशाल दुर्लक्ष करतात, त्यांना फक्त करोडोंचा झोल झाला असेल तरच स्वारस्य.). Cyber Crime Investigation cell, Annex III, 1st floor, Office of the Commissioner of Police, D.N.Road, Mumbai - 400001 Email: officer@cybercellmumbai.com Tel: +91 - 022 - 22641261 > > आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...

हर्शल 17/03/2008 - 19:42
हा प्रकार फिसिन्गचा राहु सकतो. आपल्याला आलेल्या साईटचा ई-पत्ता इथे कळवा आणि त्या तक्रारीचा मागोवा घ्या (नाहीतर सोंडके आपल्याकडे खुशाल दुर्लक्ष करतात, त्यांना फक्त करोडोंचा झोल झाला असेल तरच स्वारस्य.). Cyber Crime Investigation cell, Annex III, 1st floor, Office of the Commissioner of Police, D.N.Road, Mumbai - 400001 Email: officer@cybercellmumbai.com Tel: +91 - 022 - 22641261

In reply to by हर्शल

हा मुंबई पोलीसांचा व देशातला पहिलाच सायबर गुन्हे रोखण्यासाठी विभाग आहे. यात फिशिंग काही नाही. मात्र त्यांच्याकडे करोडोंचे नायजेरियन घोटाळे नेहेमी तपासाला येतात म्हणून लहान गुन्ह्यांकडे ते लक्ष देऊ शकत नाहीत. आपल्यालाच पाठपुरावा करावा लागतो > > आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...

गोट्या 17/03/2008 - 20:31
फिशि॑ग बाबतीत काही सुचना : - १. आपले महाजालावरील आर्थिक व्यवहार करताना संबधीत बँकेचेच संकेतस्थळ वापरावे. २. सर्व बँक तुम्हाला पासवर्ड तथा नाव लिहण्यासाठी प्रणालीकृत की बोर्ड उपलब्ध करुन देतात त्याचाच वापर करावा (जेव्हा तुम्ही कार्यालयात अथवा ईतर जागी उपयोग करता तेव्हा कारण की लॉगर नावाच्या प्रणाली द्वारे तुमची महत्वाची माहीती कोणाला ही मिळू शकते) ३. पासवर्ड नेहमी शब्द व अंक मीळून ठेवावा. ४. बँकेला लिहून माहीती द्यावी की महत्वाचे निरोप तथा सुचना आपल्याला फक्त हार्ड कॉपीद्वारेच मिळाव्यात (ईपत्राद्वारे नको, ही सुविधा सर्व बँक देतात योग्य त्या व्यक्तीला गाठून माहीती घ्यावी ) ५. बँकेचे संकेतस्थळ उघडल्यावर उजव्या कोप-यामध्ये खिडकीवर खाली असलेले प्रमाणपत्र जरुर पाहावे ह्यासाठी काही क्षण पुरे असतात. ६. नवीन संकेतस्थळावरील पेमेंट गेटवे वापरु नका. (शक्यतो प्रयत्न करुन प्रथम संकेतस्थळाची माहीती घ्यावी व त्याचा पत्ता मगच एखाद्या नवीन संकेतस्थळावरील गेटवे वापरावा, शक्यतो सर्व बँक जेथे जेथे गेटवे उपलब्ध आहे त्याची सुची देतात त्याची मागणी करावी) ७. सर्वात महत्वाचा मुद्दा विरोपामध्ये आलेल्या मेल ओळखण्यासाठी सर्वात प्रथम http आहे का https संकेतस्थळ आहे ते पहावे, कधी कधी ते लक्षात येत नाही तेव्हा मात्र एक गोष्ट तुम्हाला मदत करु शकेल ती म्हणजे तुमचा विवेक तेव्हा नशे मध्ये अथवा मनाची अवस्था ठीक नसेल तेव्हा महाजाल बँकींगचा वापर करु नका. ८. कधी कधी जास्तच साम्य असलेले नाव असेल व शंका येत असेल तर www.whois.com वर जाऊन संकेतस्थळाची माहीती व मालकी हक्क तपासावा (येथे विश्वास ठेवावा की नाही हे माहीत माहीत नाही कारण ती माहीती देण्याचा अधिकार ज्याने संकेतस्थळ विकत घेतले आहेत त्याचा असतो तो कदाचीत माहीती चुकीची देऊ शकतो अथवा देणार नाही, जर दिली नसली तर खुशाल समजावे की ते संकेतस्थळ फिशि॑ग चाच प्रकार आहे) राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

विजुभाऊ 17/03/2008 - 17:00
१बॅन्केत स्वतः जाउन तुमचा पास्वर्ड बदलून घ्या...... २कोणत्याही वेब साइट्वर जाउन काहीही बॅन्क व्यवहार करु नका ३ तुमचे अकाउन्ट चेक करून पहा.तसेच बॅन्केकडे लेखी तक्रार करा.व तक्रारीची पोच पावती घ्या ४तुमचे डेबिट कार्ड हरवले असे साण्गोन बॅन्केकडोन ते ब्लोक करुन घ्या. व तसा लेखी/इ मेल घ्या एक ग्राहक म्हणून या सेवा देणे हे बॅन्केचे काम आहे

धमाल मुलगा 17/03/2008 - 17:05
माझ्या माहितीप्रमाणे हा प्रकार फिशि॑गचा असु शकतो. कृपया काळजी घ्या. नेहमी, शिवाय १२८ बिट एन्क्रिप्शन म्हणून न्याहाळकाच्या स्टेट्स बार मध्ये कुलुपाची खूण दिसते तिच्यावर टिचकी मारुन खातरजमा करा की 'security certificate' HDFC बॅ॑केचेच आहे. नेहमी, बॅ॑केच्या स॑स्थळावर जाऊनच नेट बॅ॑किगसाठी लॉग इन करा. विरोपात आलेल्या दुव्यावरुन कधीही करु नका. अगदी तो बॅ॑केकडून आला असला तरी. अधिक माहितीसाठी : http://www.hdfcbank.com/common/onlineservices/security/phishing_info.htm येथे वाचा. आपला हितचि॑तक -ध मा ल.

मनस्वी 17/03/2008 - 17:09
१. ही fake साईट असू शकते. लिंकवर अजिबात क्लिक करू नका. २. स्वतः बँकेत जाउन काय ती खातरजमा करा. ३. बदललेल्या ईमेल आयडी शी संबंध नसून फिशिंगचाच प्रकार असण्याची शक्यता अधिक आहे. मनस्वी

माझी दुनिया 17/03/2008 - 17:31
सहकार्याकरता धन्यवाद, मी तसा ताबडतोब त्यांच्या कस्टमर केअर ला फोन केला होता.पण ते ही काही फार म्हत्वाच्ची माहिती सांगू शकले नाहीत. फक्त तुमचा पिन नं बदला असे ठराविक छापाचे उत्तर देऊन मोकळे झाले. पण मी धीर न सोडता बॅंकेच्या संकेतस्थळावर असलेल्या या कामाकरता दिलेल्या विरोपावर हा आलेला विरोप धाडून दिला आहे. पाहूया काय होते ते. माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)

मनस्वी 17/03/2008 - 17:39
दुर्लक्ष्य करावे. कारण "prevent further unauthorized access for your safety" साठी बँक विरोपाने संपर्क करेल काय? जर त्या व्यक्तीने विरोप पाहिलाच नाही तर? तर असे विरोप फसवे असतात, आपले अकाऊंट नंबर्स आणि पासवर्डस काढून घेण्यासाठी. >> *Important* Please update your records on or before 48 hours, a failure to update your records will result in a temporary hold on your funds - it's one more way that HDFC makes your online banking experience better.. -- इथेच या मेलचा फोलपणा कळतो. असा विरोप आल्यावर दुर्लक्ष्य करावे. मनस्वी

विसोबा खेचर 17/03/2008 - 18:07
मला या सगळ्या तांत्रिक गोष्टीतली फारशी काही माहिती नाही, परंतु तज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य ती काळजी घ्या एवढीच विनंती... आपले कष्टाचे पैसे सुरक्षित राहोत एवढीच मनापासूनची शुभकामना! आपला, (चिंतित!) तात्या.

आपल्याला आलेल्या साईटचा ई-पत्ता इथे कळवा आणि त्या तक्रारीचा मागोवा घ्या (नाहीतर सोंडके आपल्याकडे खुशाल दुर्लक्ष करतात, त्यांना फक्त करोडोंचा झोल झाला असेल तरच स्वारस्य.). Cyber Crime Investigation cell, Annex III, 1st floor, Office of the Commissioner of Police, D.N.Road, Mumbai - 400001 Email: officer@cybercellmumbai.com Tel: +91 - 022 - 22641261 > > आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...

हर्शल 17/03/2008 - 19:42
हा प्रकार फिसिन्गचा राहु सकतो. आपल्याला आलेल्या साईटचा ई-पत्ता इथे कळवा आणि त्या तक्रारीचा मागोवा घ्या (नाहीतर सोंडके आपल्याकडे खुशाल दुर्लक्ष करतात, त्यांना फक्त करोडोंचा झोल झाला असेल तरच स्वारस्य.). Cyber Crime Investigation cell, Annex III, 1st floor, Office of the Commissioner of Police, D.N.Road, Mumbai - 400001 Email: officer@cybercellmumbai.com Tel: +91 - 022 - 22641261

In reply to by हर्शल

हा मुंबई पोलीसांचा व देशातला पहिलाच सायबर गुन्हे रोखण्यासाठी विभाग आहे. यात फिशिंग काही नाही. मात्र त्यांच्याकडे करोडोंचे नायजेरियन घोटाळे नेहेमी तपासाला येतात म्हणून लहान गुन्ह्यांकडे ते लक्ष देऊ शकत नाहीत. आपल्यालाच पाठपुरावा करावा लागतो > > आत आपुल्या झरा झुळझुळे निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...

गोट्या 17/03/2008 - 20:31
फिशि॑ग बाबतीत काही सुचना : - १. आपले महाजालावरील आर्थिक व्यवहार करताना संबधीत बँकेचेच संकेतस्थळ वापरावे. २. सर्व बँक तुम्हाला पासवर्ड तथा नाव लिहण्यासाठी प्रणालीकृत की बोर्ड उपलब्ध करुन देतात त्याचाच वापर करावा (जेव्हा तुम्ही कार्यालयात अथवा ईतर जागी उपयोग करता तेव्हा कारण की लॉगर नावाच्या प्रणाली द्वारे तुमची महत्वाची माहीती कोणाला ही मिळू शकते) ३. पासवर्ड नेहमी शब्द व अंक मीळून ठेवावा. ४. बँकेला लिहून माहीती द्यावी की महत्वाचे निरोप तथा सुचना आपल्याला फक्त हार्ड कॉपीद्वारेच मिळाव्यात (ईपत्राद्वारे नको, ही सुविधा सर्व बँक देतात योग्य त्या व्यक्तीला गाठून माहीती घ्यावी ) ५. बँकेचे संकेतस्थळ उघडल्यावर उजव्या कोप-यामध्ये खिडकीवर खाली असलेले प्रमाणपत्र जरुर पाहावे ह्यासाठी काही क्षण पुरे असतात. ६. नवीन संकेतस्थळावरील पेमेंट गेटवे वापरु नका. (शक्यतो प्रयत्न करुन प्रथम संकेतस्थळाची माहीती घ्यावी व त्याचा पत्ता मगच एखाद्या नवीन संकेतस्थळावरील गेटवे वापरावा, शक्यतो सर्व बँक जेथे जेथे गेटवे उपलब्ध आहे त्याची सुची देतात त्याची मागणी करावी) ७. सर्वात महत्वाचा मुद्दा विरोपामध्ये आलेल्या मेल ओळखण्यासाठी सर्वात प्रथम http आहे का https संकेतस्थळ आहे ते पहावे, कधी कधी ते लक्षात येत नाही तेव्हा मात्र एक गोष्ट तुम्हाला मदत करु शकेल ती म्हणजे तुमचा विवेक तेव्हा नशे मध्ये अथवा मनाची अवस्था ठीक नसेल तेव्हा महाजाल बँकींगचा वापर करु नका. ८. कधी कधी जास्तच साम्य असलेले नाव असेल व शंका येत असेल तर www.whois.com वर जाऊन संकेतस्थळाची माहीती व मालकी हक्क तपासावा (येथे विश्वास ठेवावा की नाही हे माहीत माहीत नाही कारण ती माहीती देण्याचा अधिकार ज्याने संकेतस्थळ विकत घेतले आहेत त्याचा असतो तो कदाचीत माहीती चुकीची देऊ शकतो अथवा देणार नाही, जर दिली नसली तर खुशाल समजावे की ते संकेतस्थळ फिशि॑ग चाच प्रकार आहे) राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
मला माझ्या एच.डी.एफ.सी बँकेकडून आत्ताच एक विरोप आला. तो विरोप जसाच्या तसा खाली देत आहे. इंग्रजीत आहे पण कृपया मह्त्वाचा आहे म्हणून तसदीबदल क्षमस्व.
Important Notice : In the last few weeks, our Online Banking Security team has observed multiple logons on your Internet Banking Account, from different Blacklisted IP's, therefore been blocked, to prevent further unauthorized access for your safety.

घटका, पळें...यक्षप्रश्न...झिरो पॅडिंग...असंबद्ध

नंदन ·

विसोबा खेचर 17/03/2008 - 17:53
आपल्या असण्या-नसण्याने, ब्लॉग लिहिण्या-न लिहिण्याने, कामाला दांडी मारण्याने, खून करण्या न करण्याने, इ. इ. ने; सूर्य तळपण्यात, चंद्र झळकण्यात आणि तार्‍यांनी अपुला क्रम आचरण्यात काही फरक पडणार नसला --- खरं आहे! तरी आपलं जे छोटंसं 'विश्व' आहे त्यात फरक पडतोच. हेही खरं आहे! म्हणजे वास्तव = (पुलं + जीए)/२ असं पण नाही म्हणता येणार. हा हा हा! हे गणित आवडलं! पुलं आणि जी ए! दोघंही अगदी अवघड प्रकरणं आहेत! :) नंदन सायबा, तुझं विवेचन बाकी आवडलं आपल्याला! पण काय रे बाबा, हल्ली कुठल्या आचार्याकडे गीतेचे किल्लास वगैरे तर नाही ना लावलेस? भलतंच वैचारिक आणि तात्विक लिहिलं आहेस म्हणून विचारतो! :) पण आवडलं आपल्याला! आत्ता जरा गडबडीत आहे, सवडीने तुझी साईट पाहून लिहितो.. तुझा, तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चित्रा 18/03/2008 - 01:53
पण काय रे बाबा, हल्ली कुठल्या आचार्याकडे गीतेचे किल्लास वगैरे तर नाही ना लावलेस? भलतंच वैचारिक आणि तात्विक लिहिलं आहेस म्हणून विचारतो! :) ही सिच्युएशन अगदी "तुझे आहे" सारखी... :-) असो. बाकी लेख आवडला. फार गंभीर न करता विचार करायला लावणारा वाटला. आपापली विश्वे छोटी असली तरी तेवढ्यापुरती पूर्णच असतात. त्यामुळे त्यातील घडामोडींनी आपण घेरलेले असतो, पण त्याहीपलिकडच्या जगात तशाच स्वरूपाच्या घडामोडी चालू असतात. एवढ्याची जाणीव असलेली चांगले असते..

विजुभाऊ 17/03/2008 - 18:09
एक गोष्ट सांगतो एक लांडगा होता.. तो नदीत बुडु लागला बुडत असतान लांडगा ओरडु लागला "अरे वाचवा वाचवा.जग बुडत आहे जग बुडत आहे " लोकानी त्या लांडग्याला बाहेर काढले. आणि म्हणु लागले "वेडा तू बुडत होतास असे म्हण ना.जग बुडत आहे काय म्हणतोस"? लांडगा त्यावर उत्तरला" मी मेलो म्हणजे माझ्यापुरते तरी जग बुडल्या सारखेच आहे ना? आपल्या असण्या-नसण्याने, ब्लॉग लिहिण्या-न लिहिण्याने, कामाला दांडी मारण्याने, खून करण्या न करण्याने, इ. इ. ने; सूर्य तळपण्यात, चंद्र झळकण्यात आणि तार्‍यांनी अपुला क्रम आचरण्यात काही फरक पडणार नसला --- तरी आपलं जे छोटंसं 'विश्व' आहे त्यात आपल्या पुरता तरी फरक पडतोच.

व्यंकट 17/03/2008 - 19:47
डेथ टोल कडे बघतांना, रेस्टॉरेंट्स मधे माश्या मारयचं यंत्र असतं ते डोळ्यासमोर आलं. फक्त माश्यांऐवजी आत माणसं होती. व्यंकट

चतुरंग 17/03/2008 - 20:20
जिने हे क्लॉक निर्मिले. नंदन एक छान, वेगळाच विषय चर्चेला दिल्याबद्द्ल धन्यवाद. 'वास्तव काय'? हा प्रश्न फारच आदिम आहे. 'ब्रम्ह सत्यं, जगन मिथ्या' असं शंकराचार्य म्हणून गेले. सभोवतालच्या ह्या मिथ्यातूनच वाट काढत आपण सत्यापर्यंत पोचायचं असं जर असेल तर आपणही त्याच मिथ्याचाच एक भाग असताना हे कसे साध्य व्हावे? का हे मिथ्य सत्याचा अंश घेऊनच येत असते त्यातला मिथ्याचा अंश गळाला की मागे उरते ते सत्य? पण मग मिथ्यातच सत्याचा अंश असला तर त्याला मिथ्य तरी का म्हणावे? तद् माताय! डोक्याची मंडई झाली!! सध्या तरी 'मिसळपाव' हेच सत्य आणि बाकी सगळे मिथ्या असं मानून तर्री चापायला हरकत नाही!! चतुरंग

प्राजु 17/03/2008 - 20:34
अजब प्रकरण आहे हे घड्याळ.. पण भारतीय यक्षाने अर्ध्या रिकामी प्याल्याकडे, मृत्यूकडे/विरक्तीकडे बोट दाखवणे आणि पाश्चात्य देवदुताने आशेकडे, जीवनाकडे हे अगदी टिपीकल झालं. बर्‍याचदा असतं तसं, वास्तव ह्या दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी असावं. ना पूर्ण आशावादी, ना पूर्ण निराशावादी. अगदी पटलं.. तुमचं विवेचनही आवडलं.. - (सर्वव्यापी)प्राजु

गोट्या 17/03/2008 - 20:45
ह्या चर्चेचा महत्वाचा गाभा मला वाटत हा आहे की मानव जीवन एकदम क्षणभुंगर आहे , मी ज्या काही क्षणामध्ये श्वास घेतो त्याच काही क्षणामध्ये काही जीव जन्म घेत आहेत व मरत आहे अथवा ना प्रकारच्या व्याधीने त्रस्त होत आहे तेव्हा पार्थ, फुकटची व्यर्थ काळजी करु नकोस, जसा तु जन्म घेतला आहेस तसाच अनेक घेत आहेत, जसा तु मरणाला समोर जाणार आहेस तसेच सर्व मानव जाती जाणार आहे पण पार्थ हे सगळे होताना मात्र जो तुझा गोतावळा आहे त्याला विसरू नकोस काही क्षण त्याच्या साठी देखील काढून ठेव, आपले सगे सोयरे हेच तुझे ही व माझे ही जग, ह्या पुढे पाहण्याची लायकी ना तुम्ही आहे ना माझी. पार्थ, जेव्हा वर दीलेली प्रणाली मी प्रथम पाहीली तेव्हा मी देखील तुझ्या प्रमाणेच अस्थीर झालो काही क्षण, पण हे पार्थ, जगणे व मरणे हाच जगाचा नियम आहे तेव्हा ती प्रणाली काही क्षण तुझ्यामध्ये भिती निर्माण करेल पण काही क्षणामध्ये तु पुर्वत आपल्या स्वतःच्या जगामध्ये परत येशील. तेव्हा काळजी नको, उद्या कोणीतरी तु मरणार कधी ह्या संकेतस्थळाची देखील माहीती येथे देऊ शकते पण पार्थ हे गरजेचे नाही की तु त्या संकेतस्थळाने सांगितल्या प्रमाणे त्याच काळामध्ये मरशील. तेव्हा व्यर्थ ची काळजी सोड. | |ईती राज गीता समाप्त.| | ||||||| बोला जगदगुरु..... राजे राजे की जय |||||| राजे

नंदन 20/03/2008 - 08:18
मंडळी. आपल्या प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार. तात्या, गीतेचा क्लास वगैरे नाही रे. रविवारी रात्री क्वचित असे टेम्पररी वैराग्य येते, तेव्हा हे खरडलं :) विजुभाऊ, तुम्ही दिलेली कथा आणि राजभाईंची गीता आवडली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

धनंजय 20/03/2008 - 09:14
समजायला आणि संदर्भ लागायला कठिण संकल्पना वाटली. थोडा अभ्यास करूनही अर्थ लागत नाही :-( त्यापेक्षा स्पार्स व्हेक्टर, किंवा स्पार्स सिग्नल असे म्हटले असते तर मला तरी अधिक संदर्भ लागला असता... पण जोर्ज बेलीचा देवदूत आणि युधिष्ठिराचा यक्ष यांचे सामांतर्य/विरोध द्खवला हे भन्नाटच मस्त.

विसोबा खेचर 17/03/2008 - 17:53
आपल्या असण्या-नसण्याने, ब्लॉग लिहिण्या-न लिहिण्याने, कामाला दांडी मारण्याने, खून करण्या न करण्याने, इ. इ. ने; सूर्य तळपण्यात, चंद्र झळकण्यात आणि तार्‍यांनी अपुला क्रम आचरण्यात काही फरक पडणार नसला --- खरं आहे! तरी आपलं जे छोटंसं 'विश्व' आहे त्यात फरक पडतोच. हेही खरं आहे! म्हणजे वास्तव = (पुलं + जीए)/२ असं पण नाही म्हणता येणार. हा हा हा! हे गणित आवडलं! पुलं आणि जी ए! दोघंही अगदी अवघड प्रकरणं आहेत! :) नंदन सायबा, तुझं विवेचन बाकी आवडलं आपल्याला! पण काय रे बाबा, हल्ली कुठल्या आचार्याकडे गीतेचे किल्लास वगैरे तर नाही ना लावलेस? भलतंच वैचारिक आणि तात्विक लिहिलं आहेस म्हणून विचारतो! :) पण आवडलं आपल्याला! आत्ता जरा गडबडीत आहे, सवडीने तुझी साईट पाहून लिहितो.. तुझा, तात्या.

In reply to by विसोबा खेचर

चित्रा 18/03/2008 - 01:53
पण काय रे बाबा, हल्ली कुठल्या आचार्याकडे गीतेचे किल्लास वगैरे तर नाही ना लावलेस? भलतंच वैचारिक आणि तात्विक लिहिलं आहेस म्हणून विचारतो! :) ही सिच्युएशन अगदी "तुझे आहे" सारखी... :-) असो. बाकी लेख आवडला. फार गंभीर न करता विचार करायला लावणारा वाटला. आपापली विश्वे छोटी असली तरी तेवढ्यापुरती पूर्णच असतात. त्यामुळे त्यातील घडामोडींनी आपण घेरलेले असतो, पण त्याहीपलिकडच्या जगात तशाच स्वरूपाच्या घडामोडी चालू असतात. एवढ्याची जाणीव असलेली चांगले असते..

विजुभाऊ 17/03/2008 - 18:09
एक गोष्ट सांगतो एक लांडगा होता.. तो नदीत बुडु लागला बुडत असतान लांडगा ओरडु लागला "अरे वाचवा वाचवा.जग बुडत आहे जग बुडत आहे " लोकानी त्या लांडग्याला बाहेर काढले. आणि म्हणु लागले "वेडा तू बुडत होतास असे म्हण ना.जग बुडत आहे काय म्हणतोस"? लांडगा त्यावर उत्तरला" मी मेलो म्हणजे माझ्यापुरते तरी जग बुडल्या सारखेच आहे ना? आपल्या असण्या-नसण्याने, ब्लॉग लिहिण्या-न लिहिण्याने, कामाला दांडी मारण्याने, खून करण्या न करण्याने, इ. इ. ने; सूर्य तळपण्यात, चंद्र झळकण्यात आणि तार्‍यांनी अपुला क्रम आचरण्यात काही फरक पडणार नसला --- तरी आपलं जे छोटंसं 'विश्व' आहे त्यात आपल्या पुरता तरी फरक पडतोच.

व्यंकट 17/03/2008 - 19:47
डेथ टोल कडे बघतांना, रेस्टॉरेंट्स मधे माश्या मारयचं यंत्र असतं ते डोळ्यासमोर आलं. फक्त माश्यांऐवजी आत माणसं होती. व्यंकट

चतुरंग 17/03/2008 - 20:20
जिने हे क्लॉक निर्मिले. नंदन एक छान, वेगळाच विषय चर्चेला दिल्याबद्द्ल धन्यवाद. 'वास्तव काय'? हा प्रश्न फारच आदिम आहे. 'ब्रम्ह सत्यं, जगन मिथ्या' असं शंकराचार्य म्हणून गेले. सभोवतालच्या ह्या मिथ्यातूनच वाट काढत आपण सत्यापर्यंत पोचायचं असं जर असेल तर आपणही त्याच मिथ्याचाच एक भाग असताना हे कसे साध्य व्हावे? का हे मिथ्य सत्याचा अंश घेऊनच येत असते त्यातला मिथ्याचा अंश गळाला की मागे उरते ते सत्य? पण मग मिथ्यातच सत्याचा अंश असला तर त्याला मिथ्य तरी का म्हणावे? तद् माताय! डोक्याची मंडई झाली!! सध्या तरी 'मिसळपाव' हेच सत्य आणि बाकी सगळे मिथ्या असं मानून तर्री चापायला हरकत नाही!! चतुरंग

प्राजु 17/03/2008 - 20:34
अजब प्रकरण आहे हे घड्याळ.. पण भारतीय यक्षाने अर्ध्या रिकामी प्याल्याकडे, मृत्यूकडे/विरक्तीकडे बोट दाखवणे आणि पाश्चात्य देवदुताने आशेकडे, जीवनाकडे हे अगदी टिपीकल झालं. बर्‍याचदा असतं तसं, वास्तव ह्या दोन टोकांच्या मध्ये कुठेतरी असावं. ना पूर्ण आशावादी, ना पूर्ण निराशावादी. अगदी पटलं.. तुमचं विवेचनही आवडलं.. - (सर्वव्यापी)प्राजु

गोट्या 17/03/2008 - 20:45
ह्या चर्चेचा महत्वाचा गाभा मला वाटत हा आहे की मानव जीवन एकदम क्षणभुंगर आहे , मी ज्या काही क्षणामध्ये श्वास घेतो त्याच काही क्षणामध्ये काही जीव जन्म घेत आहेत व मरत आहे अथवा ना प्रकारच्या व्याधीने त्रस्त होत आहे तेव्हा पार्थ, फुकटची व्यर्थ काळजी करु नकोस, जसा तु जन्म घेतला आहेस तसाच अनेक घेत आहेत, जसा तु मरणाला समोर जाणार आहेस तसेच सर्व मानव जाती जाणार आहे पण पार्थ हे सगळे होताना मात्र जो तुझा गोतावळा आहे त्याला विसरू नकोस काही क्षण त्याच्या साठी देखील काढून ठेव, आपले सगे सोयरे हेच तुझे ही व माझे ही जग, ह्या पुढे पाहण्याची लायकी ना तुम्ही आहे ना माझी. पार्थ, जेव्हा वर दीलेली प्रणाली मी प्रथम पाहीली तेव्हा मी देखील तुझ्या प्रमाणेच अस्थीर झालो काही क्षण, पण हे पार्थ, जगणे व मरणे हाच जगाचा नियम आहे तेव्हा ती प्रणाली काही क्षण तुझ्यामध्ये भिती निर्माण करेल पण काही क्षणामध्ये तु पुर्वत आपल्या स्वतःच्या जगामध्ये परत येशील. तेव्हा काळजी नको, उद्या कोणीतरी तु मरणार कधी ह्या संकेतस्थळाची देखील माहीती येथे देऊ शकते पण पार्थ हे गरजेचे नाही की तु त्या संकेतस्थळाने सांगितल्या प्रमाणे त्याच काळामध्ये मरशील. तेव्हा व्यर्थ ची काळजी सोड. | |ईती राज गीता समाप्त.| | ||||||| बोला जगदगुरु..... राजे राजे की जय |||||| राजे

नंदन 20/03/2008 - 08:18
मंडळी. आपल्या प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार. तात्या, गीतेचा क्लास वगैरे नाही रे. रविवारी रात्री क्वचित असे टेम्पररी वैराग्य येते, तेव्हा हे खरडलं :) विजुभाऊ, तुम्ही दिलेली कथा आणि राजभाईंची गीता आवडली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

धनंजय 20/03/2008 - 09:14
समजायला आणि संदर्भ लागायला कठिण संकल्पना वाटली. थोडा अभ्यास करूनही अर्थ लागत नाही :-( त्यापेक्षा स्पार्स व्हेक्टर, किंवा स्पार्स सिग्नल असे म्हटले असते तर मला तरी अधिक संदर्भ लागला असता... पण जोर्ज बेलीचा देवदूत आणि युधिष्ठिराचा यक्ष यांचे सामांतर्य/विरोध द्खवला हे भन्नाटच मस्त.
एक चिवित्र घड्याळ. वेळ, जगाची लोकसंख्या, जन्म, मृत्यू...एवढंच नाही तर पृथ्वीचं वाढतं तपमान, घटणारी जंगले, वापरलं जाणारं खनिज तेल इ. दाखवणारे. दर सेकंदाला एक लग्न, एक गर्भपात आणि एक पंचमांश घटस्फोट होतो, ही माहिती(!) देणारं. http://www.poodwaddle.com/clocks2.htm हे लिहायला जेवढं वेळ लागला तेवढ्यात पन्नासेक जन्म, वीस-बावीस मृत्यू, थोडे अपघात, डझनावारी लग्नं, चार-पाच घटस्फोट,एक कॅन्सरग्रस्त, एखाद-दुसरी आत्महत्या इ. झाल्यात ही डिप्रेसिंग बातमी देणारा एक अजून 'नाऊ' लिहिलेला टॅब.

मराठी माणूस (शिळ्या कढीला ऊत!)

दिनेश५७ ·

विसोबा खेचर 18/03/2008 - 02:42
टाळ्या वाजवायला लागलेल्या बाळाच्या प्रत्येक टाळीसोबत विठूनामाचा गजर घुमायाला काय हरकत आहे? वा! हे वाक्य फार आवडलं! बाकी लेखही चांगला आहे... आपला, (मराठी) तात्या.

बाळ टाळ्या वाजवायला लागलं, की घरातल्या आजी-आजोबांपासून, ते बाळाच्या मोठ्या भावंडापर्यंत सगळेच नकळत विठूनामाचा गजर सुरू करतात खरेच हे मराठमोळे वैशिष्ट्य आहे. अकृत्रिम भाषेमुळे वाचायला मजा आली. अभिनंदन. धन्यवाद.

अवलिया 18/03/2008 - 14:47
आता वाटतं, आमचा तेव्हाचा तो निर्णय खरच मराठी `जगवण्या'साठी होता? का ती आमच्या पराभवच्या भीतीची प्रतिक्रिया होती? मराठी माणूस म्हणून मराठीच्या भविष्याची चिंता करताना, अशाच एखाद्या भीतीचं अनामिक ओझं तर आपण वागवत नसू ना? ते झुगारून देता येईल, असा विश्वास मराठी घरात रुजला, तर मराठमोळ्या घरांवरचं मोठ्ठं दडपण कमी होईल. अमेरीकेत नोकरी करायची ... हे साधारणतः १०० टक्के सदाशिव पेठी... ६०-७० इतर शहरातील ... व साधारणतः १०-१५ टक्के उर्वरीत मराठी माणसांचे ध्येय वा इच्छा असते अर्थात सगळेच ते पुर्ण करतात असे नाही अमेरीकेत जावुन गो-यांचे अंतर्वस्त्रे धुणारी मंडळी इकडे येवुन जो तमाशा करतात त्यामुळे आमचा येथील मराठी बांधव न्युनगंडाने स्वतःला कमी लेखुन आपल्याला शक्य असलेल्या गोष्टी करायच्या सोडुन पळत्याच्या मागे लागतो त्यातच भर म्हणजे संगणकाधारीत सेवा पुरवठादारांनी जो नंगा नाच ( अक्षरशः नंगानाचच पटत नसेल तर गुगल वर पुना बीपीओ न्युड गर्ल असा शोध घ्या) चालवला व फक्त इंग्रजी फाड फाड बोला अक्कल नसली तरी चालेल हाजारो रुपये पगार ... त्यामुळे पुन्हा न्युनगंड... पण निराश होवु नका अमेरीकेची वाट लागत आहे समाज रचनेत होणारा बदल नीट बघा १० वर्षाच्या आत अमेरीका संपुर्ण संपणार (टाळ्या) व्याकरण शुन्य अर्धवट लोकांची गुलामी पर्वाची कटु आठबण पुन्हा पुन्हा जागृत करणारी आंग्ल भाषा या भरत भुमीवरुन संपुष्टात येणार(प्रचंड टाळ्या) (ज्योतिषी) नाना

In reply to by अवलिया

मनस्वी 18/03/2008 - 15:02
१० वर्षाच्या आत अमेरीका संपुर्ण संपणार (टाळ्या) व्याकरण शुन्य अर्धवट लोकांची गुलामी पर्वाची कटु आठबण पुन्हा पुन्हा जागृत करणारी आंग्ल भाषा या भरत भुमीवरुन संपुष्टात येणार(प्रचंड टाळ्या)
असे खरोखर झाले तर मजाच आहे.. प्रचंड टाळ्या.. मनस्वी

In reply to by अवलिया

बेसनलाडू 19/03/2008 - 10:14
१.सर्विस प्रोवायडर्स = बीपीओ हे समीकरण नाही; त्यात इतरही बरेच काही अंतर्भूत आहे, याचा विचारही करून पहा, ही नम्र प्रार्थना. २. हे वाचा. (प्रार्थनार्थी)बेसनलाडू

श्री. दिनेश५७, खरोखर 'मराठी माणूस' ह्या विषयावर पुन्हा पुन्हा लिहीणे म्हणजे शिळ्या कढीला उत आणणेच म्हणावे लागेल. पण तोही एक अस्सल मराठी पणाच आहे. ढिगभर चर्चा करायची ....कृती शून्य. राजकिय पक्षांनी (मुळात शिवसेनेने) मराठी माणसाच्या मनांत 'तू भूमीपुत्र आहेस' हे सारखे सारखे सांगून त्याच्या तथाकथित 'हक्कांची' जाणीव त्याला करुन दिली. काही प्रमाणात त्याला शेफारुन ठेवलं. हक्कांसाठी भांडायला शिकवलं. तो भांडायला (लगेच) शिकला आणि भांडखोर म्हणून बदनामही झाला. परंतु, मराठी माणसाला घरच्यांनी, शिक्षकांनी, मित्रांनी, साहित्यिकांनी, राजकारण्यांनी स्वउन्नतीसाठी काय करावे, स्वतःमध्ये काय काय बदल करणे आवश्यक आहे, रोजच्या व्यवहारातील स्पर्धेत टिकण्यासाठी, पुढे जाण्यासाठी कुठली मुल्ये जोपासावीत, कुठली कौशल्ये आत्मसात करावीत, आपल्या उन्नतीच्या आड येणारे कुठल्या रुढींचे, विचारांचे जोखड फेकून द्यावे हे नाही शिकवले. कोणी शिकवले नाही म्हणून मराठी माणूसही ते शिकला नाही. कौशल्याचा, आत्मविश्वासाचा अभाव, संकुचित क्षेत्रात वावरण्याची सवय, अल्पसंतुष्ट स्वभाव, पारंपारिक संस्कारांत न झालेले बदल ह्या सर्व गोष्टी मराठी माणसाच्या 'मागे' राहण्यात आहेत. वाहत्या जगात प्रवाहा बरोबर राहण्यासाठी स्वतःमध्ये आमुलाग्र बदल करणे आवश्यक आहे. इंग्रजी भाषा जरूर आवश्यक आहे पण ते हुशारीचे द्योतक नाही. अमेरिकेत नोकरी मिळविणे चांगलेच आहे पण ते 'स्वउन्नतीचे' परिमाण नाही. वृत्तीतील सकारात्मक बदल, कुठल्याही न्यूनगंडाचा परित्याग, मनःचक्षू उघडे ठेवून सामाजिक बदलांचे आकलन आणि स्पर्धेला न भिता तोंड देण्याची सवयच मराठी माणसाला पुढे नेईल.

विजुभाऊ 19/03/2008 - 12:44
१० वर्षाच्या आत अमेरीका संपुर्ण संपणार (टाळ्या) व्याकरण शुन्य अर्धवट लोकांची गुलामी पर्वाची कटु आठबण पुन्हा पुन्हा जागृत करणारी आंग्ल भाषा या भरत भुमीवरुन संपुष्टात येणार(प्रचंड टाळ्या) असे खरोखर झाले तर मजाच आहे.. प्रचंड टाळ्या.. हा विचार स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखा आहे. अमेरिकन क्लायंट च्या कामावर चालण्यार्‍या कंपनीत काम करणारा... आणे त्यातून देशाला परकिय चलन मिळवुन देणारा प्रामाणीक आय टी हमाल .............................................................विजुभाऊ

चतुरंग 19/03/2008 - 21:42
फार चांगली बाब नाही. कारण आता जगाची अशी एक अर्थव्यवस्था होऊ पहाते आहे. एकीकडचे पडसाद दुसरीकडे तितक्याच तीव्रतेने उमटतात हे आपण सर्वच स्टॉकमार्केटच्या माकडउड्यांवरुन जाणतो. त्यामुळे अमेरिका डुबली तर छान, यूरोप डबघाईला आला तर त्याहून वा वा! म्हणणे कोतेपणाचे ठरेल. आज तिथे असलेला जाळ उद्या इथे येऊ शकतो हे विसरु नये. तेव्हा 'एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ' हेच शेवटी खरे! चतुरंग

फार महत्त्वाचे आहे. भारतीय सॉफ्टवेअर तज्ञ फक्त कारागिरी करताहेत. मूलभूत संशोधनाची आपल्याकडे वानवा आहे. आयुकामधील संशोधनाच्या ६ पैकी ४ जागा गेल्या वर्षी रिक्त होत्या. हे खरे असेल तर आपण पाहातो ती सूज आहे. सौष्ठव नव्हे. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

विसोबा खेचर 18/03/2008 - 02:42
टाळ्या वाजवायला लागलेल्या बाळाच्या प्रत्येक टाळीसोबत विठूनामाचा गजर घुमायाला काय हरकत आहे? वा! हे वाक्य फार आवडलं! बाकी लेखही चांगला आहे... आपला, (मराठी) तात्या.

बाळ टाळ्या वाजवायला लागलं, की घरातल्या आजी-आजोबांपासून, ते बाळाच्या मोठ्या भावंडापर्यंत सगळेच नकळत विठूनामाचा गजर सुरू करतात खरेच हे मराठमोळे वैशिष्ट्य आहे. अकृत्रिम भाषेमुळे वाचायला मजा आली. अभिनंदन. धन्यवाद.

अवलिया 18/03/2008 - 14:47
आता वाटतं, आमचा तेव्हाचा तो निर्णय खरच मराठी `जगवण्या'साठी होता? का ती आमच्या पराभवच्या भीतीची प्रतिक्रिया होती? मराठी माणूस म्हणून मराठीच्या भविष्याची चिंता करताना, अशाच एखाद्या भीतीचं अनामिक ओझं तर आपण वागवत नसू ना? ते झुगारून देता येईल, असा विश्वास मराठी घरात रुजला, तर मराठमोळ्या घरांवरचं मोठ्ठं दडपण कमी होईल. अमेरीकेत नोकरी करायची ... हे साधारणतः १०० टक्के सदाशिव पेठी... ६०-७० इतर शहरातील ... व साधारणतः १०-१५ टक्के उर्वरीत मराठी माणसांचे ध्येय वा इच्छा असते अर्थात सगळेच ते पुर्ण करतात असे नाही अमेरीकेत जावुन गो-यांचे अंतर्वस्त्रे धुणारी मंडळी इकडे येवुन जो तमाशा करतात त्यामुळे आमचा येथील मराठी बांधव न्युनगंडाने स्वतःला कमी लेखुन आपल्याला शक्य असलेल्या गोष्टी करायच्या सोडुन पळत्याच्या मागे लागतो त्यातच भर म्हणजे संगणकाधारीत सेवा पुरवठादारांनी जो नंगा नाच ( अक्षरशः नंगानाचच पटत नसेल तर गुगल वर पुना बीपीओ न्युड गर्ल असा शोध घ्या) चालवला व फक्त इंग्रजी फाड फाड बोला अक्कल नसली तरी चालेल हाजारो रुपये पगार ... त्यामुळे पुन्हा न्युनगंड... पण निराश होवु नका अमेरीकेची वाट लागत आहे समाज रचनेत होणारा बदल नीट बघा १० वर्षाच्या आत अमेरीका संपुर्ण संपणार (टाळ्या) व्याकरण शुन्य अर्धवट लोकांची गुलामी पर्वाची कटु आठबण पुन्हा पुन्हा जागृत करणारी आंग्ल भाषा या भरत भुमीवरुन संपुष्टात येणार(प्रचंड टाळ्या) (ज्योतिषी) नाना

In reply to by अवलिया

मनस्वी 18/03/2008 - 15:02
१० वर्षाच्या आत अमेरीका संपुर्ण संपणार (टाळ्या) व्याकरण शुन्य अर्धवट लोकांची गुलामी पर्वाची कटु आठबण पुन्हा पुन्हा जागृत करणारी आंग्ल भाषा या भरत भुमीवरुन संपुष्टात येणार(प्रचंड टाळ्या)
असे खरोखर झाले तर मजाच आहे.. प्रचंड टाळ्या.. मनस्वी

In reply to by अवलिया

बेसनलाडू 19/03/2008 - 10:14
१.सर्विस प्रोवायडर्स = बीपीओ हे समीकरण नाही; त्यात इतरही बरेच काही अंतर्भूत आहे, याचा विचारही करून पहा, ही नम्र प्रार्थना. २. हे वाचा. (प्रार्थनार्थी)बेसनलाडू

श्री. दिनेश५७, खरोखर 'मराठी माणूस' ह्या विषयावर पुन्हा पुन्हा लिहीणे म्हणजे शिळ्या कढीला उत आणणेच म्हणावे लागेल. पण तोही एक अस्सल मराठी पणाच आहे. ढिगभर चर्चा करायची ....कृती शून्य. राजकिय पक्षांनी (मुळात शिवसेनेने) मराठी माणसाच्या मनांत 'तू भूमीपुत्र आहेस' हे सारखे सारखे सांगून त्याच्या तथाकथित 'हक्कांची' जाणीव त्याला करुन दिली. काही प्रमाणात त्याला शेफारुन ठेवलं. हक्कांसाठी भांडायला शिकवलं. तो भांडायला (लगेच) शिकला आणि भांडखोर म्हणून बदनामही झाला. परंतु, मराठी माणसाला घरच्यांनी, शिक्षकांनी, मित्रांनी, साहित्यिकांनी, राजकारण्यांनी स्वउन्नतीसाठी काय करावे, स्वतःमध्ये काय काय बदल करणे आवश्यक आहे, रोजच्या व्यवहारातील स्पर्धेत टिकण्यासाठी, पुढे जाण्यासाठी कुठली मुल्ये जोपासावीत, कुठली कौशल्ये आत्मसात करावीत, आपल्या उन्नतीच्या आड येणारे कुठल्या रुढींचे, विचारांचे जोखड फेकून द्यावे हे नाही शिकवले. कोणी शिकवले नाही म्हणून मराठी माणूसही ते शिकला नाही. कौशल्याचा, आत्मविश्वासाचा अभाव, संकुचित क्षेत्रात वावरण्याची सवय, अल्पसंतुष्ट स्वभाव, पारंपारिक संस्कारांत न झालेले बदल ह्या सर्व गोष्टी मराठी माणसाच्या 'मागे' राहण्यात आहेत. वाहत्या जगात प्रवाहा बरोबर राहण्यासाठी स्वतःमध्ये आमुलाग्र बदल करणे आवश्यक आहे. इंग्रजी भाषा जरूर आवश्यक आहे पण ते हुशारीचे द्योतक नाही. अमेरिकेत नोकरी मिळविणे चांगलेच आहे पण ते 'स्वउन्नतीचे' परिमाण नाही. वृत्तीतील सकारात्मक बदल, कुठल्याही न्यूनगंडाचा परित्याग, मनःचक्षू उघडे ठेवून सामाजिक बदलांचे आकलन आणि स्पर्धेला न भिता तोंड देण्याची सवयच मराठी माणसाला पुढे नेईल.

विजुभाऊ 19/03/2008 - 12:44
१० वर्षाच्या आत अमेरीका संपुर्ण संपणार (टाळ्या) व्याकरण शुन्य अर्धवट लोकांची गुलामी पर्वाची कटु आठबण पुन्हा पुन्हा जागृत करणारी आंग्ल भाषा या भरत भुमीवरुन संपुष्टात येणार(प्रचंड टाळ्या) असे खरोखर झाले तर मजाच आहे.. प्रचंड टाळ्या.. हा विचार स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखा आहे. अमेरिकन क्लायंट च्या कामावर चालण्यार्‍या कंपनीत काम करणारा... आणे त्यातून देशाला परकिय चलन मिळवुन देणारा प्रामाणीक आय टी हमाल .............................................................विजुभाऊ

चतुरंग 19/03/2008 - 21:42
फार चांगली बाब नाही. कारण आता जगाची अशी एक अर्थव्यवस्था होऊ पहाते आहे. एकीकडचे पडसाद दुसरीकडे तितक्याच तीव्रतेने उमटतात हे आपण सर्वच स्टॉकमार्केटच्या माकडउड्यांवरुन जाणतो. त्यामुळे अमेरिका डुबली तर छान, यूरोप डबघाईला आला तर त्याहून वा वा! म्हणणे कोतेपणाचे ठरेल. आज तिथे असलेला जाळ उद्या इथे येऊ शकतो हे विसरु नये. तेव्हा 'एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ' हेच शेवटी खरे! चतुरंग

फार महत्त्वाचे आहे. भारतीय सॉफ्टवेअर तज्ञ फक्त कारागिरी करताहेत. मूलभूत संशोधनाची आपल्याकडे वानवा आहे. आयुकामधील संशोधनाच्या ६ पैकी ४ जागा गेल्या वर्षी रिक्त होत्या. हे खरे असेल तर आपण पाहातो ती सूज आहे. सौष्ठव नव्हे. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
मराठी माणूस `मराठी माणूस', `मराठीची अस्मिता' असे शब्द आजकाल हरेक मराठी माणसाच्या तोंडावर आहेत. मराठीच्या भवितव्याची चिंता तर राज्यकर्त्यांपासून सामान्य मराठी माणसाला छळते आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अमेरिकेत मराठी जपण्यासाठी ५० लाखांचे (अनु)दानही दिले. मराठी जपण्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळा हव्यात, इ़ग्रजीचे आक्रमण थोपवावे, वगैरे चिंताग्रस्त विचारही उमटत असतात. पण मराठी माणसाचं पहिलं लक्षण कोणतं? घरात एक मूल जन्माला आलं की थोरामोठ्यांच्या गर्दीनं भरलेलं घर खऱ्या अर्थानं भरून जातं.. प्रत्येक घरात मुलाच्या आगमनाचा आनंद अवर्णनीयच असतो...

(वाट)

केशवसुमार ·

नन्दु 17/03/2008 - 11:13
सांज आता पूर्ण अंधारात गेली एकट्याने चालण्याची वेळ झाली शुद्ध न उरली, ना कुणाची साथ आता निज घराची सापडावी वाट आता! हे जास्त आवड्ले [आणि खरे पण आहे] मि. पा. कुटुबातील शेडेफळ नन्दु

नन्दु 17/03/2008 - 11:13
सांज आता पूर्ण अंधारात गेली एकट्याने चालण्याची वेळ झाली शुद्ध न उरली, ना कुणाची साथ आता निज घराची सापडावी वाट आता! हे जास्त आवड्ले [आणि खरे पण आहे] मि. पा. कुटुबातील शेडेफळ नन्दु
आमची प्रेरणा सारंग यांची सुरेख कविता वाट सांज किंचित किर्र काळोखात जाता कोण घाली या मनाला साद आता? दूर गुत्यातून येते हाक आता पावले जाती कुणाच्या मागुनी ही? की सुरांचा माग घेती जागुनी ही? वाजते हे काय या रंध्रात आता? पाय ही पडती जरा वेगात आता चाललेली आत ही उन्मत्त गाणी! गात असते सावळी ठेक्यात राणी! त्या तिच्या त्या जीवघेण्या हालचाली! त्या नशेने भरून जाते सर्व खोली भास-सत्याची अनोखी पुसट रेषा जाणुनी घ्यावी अशी संकेतभाषा ती हवीशी वाटते अंधारबोली अन मनाशी जागते तुषार्त ओली सांज आता पूर्ण अंधारात गेली एकट्याने चालण्याची वेळ झाली शुद

मदतीचे आवाहन / कळकळीची विनन्ती

उदय सप्रे ·

जुना अभिजित 17/03/2008 - 14:58
आपला उपक्रम स्तुत्य आहे. पण मला वैयक्तिक माहिती नसले तरी इथले कोणीतरी नक्कीच मदत करेल. आपण मनोगत, मायबोली तसेच उपक्रम संकेतस्थळांवरही विचारून पाहू शकता. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

विसोबा खेचर 18/03/2008 - 12:24
मला ते छापण्यासाठी "प्रायोजक" हवा आहे, दुसरे पुस्तक " कान्होजी जेधे" ८५% लिहून झाले आहे.तसेच "झन्झावात" (सम्भाजी महाराजान्च्या जीवनावरील ऐतिहासिक कादम्बरी) साठी पण प्रायोजक हवा आहे मुद्रकासह , उदयराव, आपण शिवरायांच्या माणसांविषयी लिहिताय ही खूप मोठी गोष्ट आहे. मलातरी असे काही प्रायोजक माहीत नाहीत परंतु एक खारीचा वाटा म्हणून जर कुणाला काही रक्कम द्यावीशी वाटली तर काही सोय आहे का? कुठे द्यायची ही रक्कम? कुणाच्या नावावर? कृपया खुलासा करावा... असो... आपला, तात्या.

In reply to by विसोबा खेचर

उदय सप्रे 18/03/2008 - 15:38
प्रिय तात्यासाहेब, तुमच्या मनातील भावना पोचल्या, पण आजच्या तारखेला मी ती रक्कम घेऊन जर क पुस्तक छापयला आणि मधे १ वर्ष गेले तर परत त्यामुळे गैरसमज नाहि का होणार ? हा प्रश्न डोके खातोय, काय करु आपणच सान्गा.मी एक पुस्तक वाचले होते त्यात प्रत्येक पानावर "स्पॉन्सर्"चे नाव दिले होते , ३० पानी पुस्तकातील किती पाने तुम्ही "स्पॉन्सर्" करु शकाल? तर असे काही करता येणे मात्र शक्य आहे- किन्वा आपली अन्य काही सूचना असल्यास त्यावर पण विचार करुया, आपल्या उत्तराच्या अपेक्षेत, उदय सप्रे

In reply to by उदय सप्रे

विसोबा खेचर 18/03/2008 - 17:22
पण आजच्या तारखेला मी ती रक्कम घेऊन जर क पुस्तक छापयला आणि मधे १ वर्ष गेले तर परत त्यामुळे गैरसमज नाहि का होणार ? हम्म! खरं आहे. कारण पुस्तक छपाईची संपूर्ण रक्कम जमा व्हायला वेळ लागू शकतो... मी एक पुस्तक वाचले होते त्यात प्रत्येक पानावर "स्पॉन्सर्"चे नाव दिले होते , थोरल्या आबासाहेबांविषयीच्या पुस्तकाबाबत प्रत्येक पानावर प्रायोजकाचे नांव छापणे हे माझ्या मते हास्यास्पद आहे. अहो धारातीर्थी पडलेल्या कित्येक मावळ्यांची साधी नांवेही आपल्याला माहीत नाहीत! ३० पानी पुस्तकातील किती पाने तुम्ही "स्पॉन्सर्" करु शकाल? प्रत्येक पानाला किती खर्च येतो हे मला माहिती नाही त्यामुळे मी किती पाने प्रायोजित करू शकेन ते मला माहिती नाही. आपण थोरल्याआबासाहेबांच्या निष्ठावान माणसांवर पुस्तक लिहीत आहात, ही गोष्ट मिपावरील आपला एक सहसदस्य या नात्याने मला कौतुकाची वाटते आणि म्हणूनच मी आपल्या पुस्तक छपाईकरता मदत म्हणून रुपये ५०१ एवढी रक्कम देऊन खारीचा वाटा उचलू इच्छितो! माझ्यापुरतं बोलायचं झालं तर एकदा रक्कम दिली की पुढे तुम्ही तिचं काय केलंत? पुस्तक छपाईला वेळ का लागतो आहे? असे कुठलेही प्रश्न मी तरी तुम्हाला विचारणार नाही, एवढंच अगदी नि:संदिग्धपणे सांगू शकतो! आपल्या प्रामाणिकपणावर आणि मुख्य म्हणजे थोरल्या आबासाहेबांच्या पुण्याईवर माझा पूर्ण विश्वास आहे.. असो.. ता क - उद्या जर देवकृपेने पुस्तक छापून पूर्ण झालेच तर त्यावर प्रायोजक म्हणून माझं कुठेही नांव नको एवढीच माझी अट आहे.. आपला, (बाजीप्रभूंचा भक्त) तात्या.

In reply to by उदय सप्रे

धमाल मुलगा 18/03/2008 - 17:49
मीपण आहे यादीत. लिहा माझेपण ५०१/-. आणि राहिला प्रश्न प्रगती विचारण्याचा, तर शब्द देतो...पैशाच॑ काय केल॑त एका शब्दान॑ पुसणार नाही! फक्त अट एकच. पुस्तक प्रकाशीत होईल तेव्हा नक्की कळवावे. बाजारात येणारी पहिली प्रत माझ्या स॑ग्रही असावी असा मानस आहे! राहिला प्रश्न "स्पॉन्सर" चे नाव देण्याचा, तर लिहा श॑भु महादेव, जेजुरीचा ख॑डेराया आणि उभ्या महाराष्ट्राच॑ कुलदैवत आई तुळजाभवानी ह्या॑ची नाव॑. आपले पुस्तक लवकरात लवकर प्रकाशीत होवो अन् त्याला आणि पर्यायाने आपल्याला उद॑ड यश मिळो हीच श्रीश॑भुचरणि प्रार्थना ! आपला मित्र, ध मा ल. ता.क. : पैसे कोठे आणि कसे जमा करायचे ते कळवल्यास बर॑ पडेल.

In reply to by धमाल मुलगा

इनोबा म्हणे 18/03/2008 - 18:45
मी पण आहे.आमच्याकडचा ५०१ रु. चा चेक कुठे पाठवायचा ते सांगा. मात्र या पुस्तकात आपण काय लिहीणार आहात्,प्रकाशक कोण्(व्यंकटरावांनी विचारल्याप्रमाणे) याची माहीती कळाली तर बरी होईल. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

व्यंकट 18/03/2008 - 18:14
प्रकाशक आणि लेखकांप्रमाणे प्रायोजक पुस्तकांतील कथा, दावे, पात्र, वैगेरें करता जबाबदार असणार आहे का? प्रकाशक कोण आहे? ह्या प्रश्नांची उत्तरे महत्वाची आहेत असे मला वाटते. व्यंकट

In reply to by व्यंकट

विसोबा खेचर 18/03/2008 - 18:28
व्यंकटरावांनी मांडलेले मुद्देही अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्यांचाशी मी पूर्णत: सहमत आहे. सध्या तरी सगळंच संदिग्ध दिसत आहे. उदयरावांनी कृपया विस्तृत व पूर्ण माहितीनिशी आपले म्हणणे मांडावे असे वाटते.. तात्या.

केशवराव 18/03/2008 - 23:50
उदय सप्रे यांसी _ _ _ _ आपला उपक्रम स्तुत्य आहेच ; आणि आपली अडचणही खरी वाटते. मदतीचे हात नक्कीच पुढे येतील. थोडे आपल्या पुस्तकाबद्दल सविस्तर कळविले तर ते आपल्यालाच बरे होईल. 'प्रोजेक्ट रीपोर्ट ' जरा नीट असावा. मदत करताना आपले नांव व्हावे असे सर्वानाच वाटते असे नाही , पण आपण मदत कुठे करतो ते त्याला कळले तर बरे होईल. वर काही जणांनी भावनिक पातळीवरुन आपल्याला मदत केली.त्यांना मी कमी लेखत नाही. त्यांची मदत लाख मोलाची नव्हे तर अमुल्य आहे.त्यांनी तर नावासाठी देखील आग्रह धरलेला नाही. अशी थोडी माणसें असतात. आपल्याला मदत करणारी बरीच माणसें हवीत.मग बर्‍याच माणसांना भावेल तसे आपण सांगावे. [ अपील होईल असे... ] यात कोणताही कमीपणा नाही. तरी कृपया, आपल्या लिखाणाचा थोडा नमुना, छपाईचा अपेक्षीत खर्च , लोकांच्या मदतीवर छापुन आलेल्या पुस्तकाच्या विक्रीतुन जर नफा झालाच तर त्याचे काय करणार ? कुठल्या शिवप्रतिष्ठानला दान करणार का? हे प्रश्न माझ्यासाठी नाहीत , पण लोकं दान / मदत करताना अशा सर्व गोष्टीं बघतात. माझ्याकडून आपल्या उपक्रमाला १००१/- मदत , विना अट! कसे आणि कुठे पाठवू ते कळवा. जाता जाता ..... पुस्तक ठराविक वेळेत नक्की प्रकाशीत होईल असाच विचार करा. उशीराची भिती बाळगू नका. आम्ही आपल्या पाठीशी आहोत. - - - - - - - - केशवराव .

In reply to by केशवराव

उदय सप्रे 19/03/2008 - 17:54
प्रिय केशवराव, आपेल म्हणणे रास्त आहे.परन्तु "बाजी पासलकर" यान्चेविशयी "सबकुछ" या पुस्तकात मी लिहिले आहे, अश्या क्रमिक पुस्तकाचे नाव आहे "रत्न्तपारखी".यापेक्षा अधिक मी काहीही सान्गु शकत नाहिये सध्ध्या तरी.प्रकाशक्,मुद्रक यान्च्या मी शोधात आहे, मी नवीन लेखक असल्याने माझा लेखनाचा विषय काय आहे यापेक्षा जास्त रस सगळ्यान्ना "आपले उखळ किती आणि कसे पान्ढरे होईल?" याचीच जास्त फिकीर आहे , अजुन माझे कुठल्याही प्रकाशकाशी अन्तिम बोलणे झालेले नाही, एक मात्र निश्चित - मिळालेल्या मदतीचा दुरुपयोग माझ्या हातून कधिही होणार नाही. यापेक्षा अधिक माहिती म्हणजे मी तुम्हाला ते पुस्तक माझ्या घरी आलात तर नक्किच वाचायला देवू शकतो, तसेच "कान्होजी जेधे"८५ % झालेले ते पण देवू शकतो, "झन्झावात" सुध्धा देवू शकतो- जे २०% इतकेच झाले आहे - उरलेले पूर्ण करायला अजून २ वर्ष नक्किच लागतील कारण पुढचे वर्ष चिरन्जीव (म्हणजे पर्यायानी आम्हीच !) दहावीत जाणार आहेत (अशी दाट शन्का आहे.....) माझा भ्रमण्ध्वनी खाली देत आहे, आपल्याशी सविस्तर बोलयल नक्किच आवडेल, मी ठाणे पश्चिम - पान्च्पाखाडी येथे रहातो. आपला विनम्र, उदय सप्रे ९९६७५ ४२७०३ ०२२ - २५४३ २६ ५६

उदय सप्रे 19/03/2008 - 14:37
मि.पा.वरील सर्व सभासद, तुमच्या प्रतिसादामुळे माझ्या डोळ्यात पाणी आले आहे, माझ्यासारखीच "शिव-शम्भू" भक्त मन्डळी आज माझ्यासोबत आहेत याची पुन्हा एकदा खातरजमा झाली. "बाजी पासलकर" लिहून तयार आहे, पश्न फक्त हा आहे की मुद्रक आणि प्रकाशक कोण्?मी "मेहता" ना लिहिले होते, पण आजकाल प्रत्येकाला "लेखक कोण्?नवा आहे का?आम्हाला त्यात काय मिळेल्?असे व्यावहारीक प्रश्न अधिक महत्वाचे वाटतात - यात त्या लोकान्चा काही दोष नाही , पण माझ्यासारख्याचि गळचेपी होते आहे , मी प्रयत्नात आहे-नक्की झाले कि ते मि.पा.वर कळवीनच , तोवर मी मि.पा.वर माझे :"काही लेख आणि एक कविता" च्या लिन्क्स दिल्या होत्या त्या नमुम्यादाखल म्हणून वाचाव्यात म्हणजे तुम्हाला माझ्या अक्षरासकट माझ्या लिखाणाबध्धल थोडासा तरी अन्दाज येईल. पुस्तके पूर्ण करणारच आणि माझे "झन्झावात" हे पुस्तक मराठीतील पहिलेच ऐतिहासिक पुस्तक असेल ज्यात ३ पिढ्यान्चा इतिहास असेल आणि माझ्या दुर्दैवाने मी ज्यान्ना लेखक म्हणून माझा आदर्श मानतो ते भाशाप्रभू श्री.रणजित देसाई, श्री.शिवाजी सावन्त यावेळी हयात नाहीत ! माझे लेख वाचून मला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात, तुम्ही सगळे "आपले" वाटता म्हणून "आभार" सारखा औपचारीक शब्द न वापरता तुमच्या रुणात रहाणे अधिक महत्वाचे मानतो आणि इथेच थाम्बतो. आपला विनम्र, उदय सप्रे

In reply to by विजुभाऊ

उदय सप्रे 19/03/2008 - 18:13
प्रिय विजुभाऊ, मी आधी एखाद्या प्रकाशकाशी अन्तिम बोलणे करतो आणि मग आपल्या सगळ्यान्ना सविस्तर सान्गतो, तोवर माझे :"काही लेख आणि एक कविता" या लिन्क्स ज्या जनातल मनातल या सदरात मी दिल्या आहेत त्या वाचून मला आपला अभिप्राय जरूर कळवावा.तसेच मी अत्ताच माझी आणि एक प्रतिक्रिया प्रकाशित केली आहे ती पण वाचावी - श्री. केशवराव यान्ना उद्देशून आहे ती. तुम्हा सगळ्यान्विषयी भावना व्यक्त करायला माझ्याकडे पुरेसे शब्दच नाहियेत- या क्षणी डोळे पाण्याने भरले आहेत्.एक आठवण सान्गतो : १५ औगस्ट २००६ : आम्ही मढे घाटातून चालत चालत ऐन पावसाळ्यात श्वथर घळीकडे चाललो होतो-वाट निसरडी व अरुन्द असल्याने सारखे घसरत होतो.एका गावकर्याने विचारले "शिवथर घळीत जायचे तर खाली महाड वरून जयचे तर?" त्याना मी म्हणालो,"तस नाही राव, आमच्या पहिल्या २ छत्रपतीन्नी आमच्यासाठी कश्या टाचा झिजवल्या आहेत ते आम्हाल कळायला हवे म्हणून आम्ही असे जातोय !" त्यावर त्या ग्रुहस्थाच्या डोळ्यात आलेली चमक मी अजूनहे विसरु शकत नाहिये आणि त्यावेळी त्यान्नी माझ्या खान्द्यावर थोपटले आणि मला जाणवले कि माझ्यासारखेच कित्येक लोक अजून पण शिव्-शम्भू यान्ना आपले दैवत मानतात ! हा प्रसन्ग मी माझ्या आयुश्यात कधिही विसरणार नाही.समर्थ चरणी प्रार्थना केली आहेच आणि जमल्यास पहिली प्रत तिथेच प्रकाशित करयचा मानस पण आहे. यापेक्षा जास्त लिहिण्याच्या मानसिक अवस्थेत मी अत्ता नाहिये म्हणून इथेच थाम्बतो आहे. आपला विनम्र, उदय सप्रे,ठाणे २५४३ २६ ५६ ९९६७५ ४२७०३

अनामिका 05/04/2008 - 20:37
श्री उदय! तुमच्या या कार्याला जर मी देखिल थोडा हातभार लावू शकले तर मला मनापासुन आनंद होइल. आयुष्यात काहिहि करु न शकल्याची खंत तरी निदान काही अंशी कमी करता येईल. जर छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली नसती आणि शंभुराजांनी त्या निर्दयी औरंगजेबाला ९ वर्षे झुंजवत ठेवला नसता तर आज महाराष्ट्राचे नामोनिशाण राहीले नसते..............! या अशा महान विभुतींचे अस्तित्व सध्या फक्त राजकारणापुरतेच राहिले आहे हे अतिशय खेदजनक आहे.................! असो मी प्रत्यक्ष तुम्हांस भेटायचा प्रयत्न करीनच. जय हिंद! जय महाराष्ट्र!

जुना अभिजित 17/03/2008 - 14:58
आपला उपक्रम स्तुत्य आहे. पण मला वैयक्तिक माहिती नसले तरी इथले कोणीतरी नक्कीच मदत करेल. आपण मनोगत, मायबोली तसेच उपक्रम संकेतस्थळांवरही विचारून पाहू शकता. ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

विसोबा खेचर 18/03/2008 - 12:24
मला ते छापण्यासाठी "प्रायोजक" हवा आहे, दुसरे पुस्तक " कान्होजी जेधे" ८५% लिहून झाले आहे.तसेच "झन्झावात" (सम्भाजी महाराजान्च्या जीवनावरील ऐतिहासिक कादम्बरी) साठी पण प्रायोजक हवा आहे मुद्रकासह , उदयराव, आपण शिवरायांच्या माणसांविषयी लिहिताय ही खूप मोठी गोष्ट आहे. मलातरी असे काही प्रायोजक माहीत नाहीत परंतु एक खारीचा वाटा म्हणून जर कुणाला काही रक्कम द्यावीशी वाटली तर काही सोय आहे का? कुठे द्यायची ही रक्कम? कुणाच्या नावावर? कृपया खुलासा करावा... असो... आपला, तात्या.

In reply to by विसोबा खेचर

उदय सप्रे 18/03/2008 - 15:38
प्रिय तात्यासाहेब, तुमच्या मनातील भावना पोचल्या, पण आजच्या तारखेला मी ती रक्कम घेऊन जर क पुस्तक छापयला आणि मधे १ वर्ष गेले तर परत त्यामुळे गैरसमज नाहि का होणार ? हा प्रश्न डोके खातोय, काय करु आपणच सान्गा.मी एक पुस्तक वाचले होते त्यात प्रत्येक पानावर "स्पॉन्सर्"चे नाव दिले होते , ३० पानी पुस्तकातील किती पाने तुम्ही "स्पॉन्सर्" करु शकाल? तर असे काही करता येणे मात्र शक्य आहे- किन्वा आपली अन्य काही सूचना असल्यास त्यावर पण विचार करुया, आपल्या उत्तराच्या अपेक्षेत, उदय सप्रे

In reply to by उदय सप्रे

विसोबा खेचर 18/03/2008 - 17:22
पण आजच्या तारखेला मी ती रक्कम घेऊन जर क पुस्तक छापयला आणि मधे १ वर्ष गेले तर परत त्यामुळे गैरसमज नाहि का होणार ? हम्म! खरं आहे. कारण पुस्तक छपाईची संपूर्ण रक्कम जमा व्हायला वेळ लागू शकतो... मी एक पुस्तक वाचले होते त्यात प्रत्येक पानावर "स्पॉन्सर्"चे नाव दिले होते , थोरल्या आबासाहेबांविषयीच्या पुस्तकाबाबत प्रत्येक पानावर प्रायोजकाचे नांव छापणे हे माझ्या मते हास्यास्पद आहे. अहो धारातीर्थी पडलेल्या कित्येक मावळ्यांची साधी नांवेही आपल्याला माहीत नाहीत! ३० पानी पुस्तकातील किती पाने तुम्ही "स्पॉन्सर्" करु शकाल? प्रत्येक पानाला किती खर्च येतो हे मला माहिती नाही त्यामुळे मी किती पाने प्रायोजित करू शकेन ते मला माहिती नाही. आपण थोरल्याआबासाहेबांच्या निष्ठावान माणसांवर पुस्तक लिहीत आहात, ही गोष्ट मिपावरील आपला एक सहसदस्य या नात्याने मला कौतुकाची वाटते आणि म्हणूनच मी आपल्या पुस्तक छपाईकरता मदत म्हणून रुपये ५०१ एवढी रक्कम देऊन खारीचा वाटा उचलू इच्छितो! माझ्यापुरतं बोलायचं झालं तर एकदा रक्कम दिली की पुढे तुम्ही तिचं काय केलंत? पुस्तक छपाईला वेळ का लागतो आहे? असे कुठलेही प्रश्न मी तरी तुम्हाला विचारणार नाही, एवढंच अगदी नि:संदिग्धपणे सांगू शकतो! आपल्या प्रामाणिकपणावर आणि मुख्य म्हणजे थोरल्या आबासाहेबांच्या पुण्याईवर माझा पूर्ण विश्वास आहे.. असो.. ता क - उद्या जर देवकृपेने पुस्तक छापून पूर्ण झालेच तर त्यावर प्रायोजक म्हणून माझं कुठेही नांव नको एवढीच माझी अट आहे.. आपला, (बाजीप्रभूंचा भक्त) तात्या.

In reply to by उदय सप्रे

धमाल मुलगा 18/03/2008 - 17:49
मीपण आहे यादीत. लिहा माझेपण ५०१/-. आणि राहिला प्रश्न प्रगती विचारण्याचा, तर शब्द देतो...पैशाच॑ काय केल॑त एका शब्दान॑ पुसणार नाही! फक्त अट एकच. पुस्तक प्रकाशीत होईल तेव्हा नक्की कळवावे. बाजारात येणारी पहिली प्रत माझ्या स॑ग्रही असावी असा मानस आहे! राहिला प्रश्न "स्पॉन्सर" चे नाव देण्याचा, तर लिहा श॑भु महादेव, जेजुरीचा ख॑डेराया आणि उभ्या महाराष्ट्राच॑ कुलदैवत आई तुळजाभवानी ह्या॑ची नाव॑. आपले पुस्तक लवकरात लवकर प्रकाशीत होवो अन् त्याला आणि पर्यायाने आपल्याला उद॑ड यश मिळो हीच श्रीश॑भुचरणि प्रार्थना ! आपला मित्र, ध मा ल. ता.क. : पैसे कोठे आणि कसे जमा करायचे ते कळवल्यास बर॑ पडेल.

In reply to by धमाल मुलगा

इनोबा म्हणे 18/03/2008 - 18:45
मी पण आहे.आमच्याकडचा ५०१ रु. चा चेक कुठे पाठवायचा ते सांगा. मात्र या पुस्तकात आपण काय लिहीणार आहात्,प्रकाशक कोण्(व्यंकटरावांनी विचारल्याप्रमाणे) याची माहीती कळाली तर बरी होईल. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे

व्यंकट 18/03/2008 - 18:14
प्रकाशक आणि लेखकांप्रमाणे प्रायोजक पुस्तकांतील कथा, दावे, पात्र, वैगेरें करता जबाबदार असणार आहे का? प्रकाशक कोण आहे? ह्या प्रश्नांची उत्तरे महत्वाची आहेत असे मला वाटते. व्यंकट

In reply to by व्यंकट

विसोबा खेचर 18/03/2008 - 18:28
व्यंकटरावांनी मांडलेले मुद्देही अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्यांचाशी मी पूर्णत: सहमत आहे. सध्या तरी सगळंच संदिग्ध दिसत आहे. उदयरावांनी कृपया विस्तृत व पूर्ण माहितीनिशी आपले म्हणणे मांडावे असे वाटते.. तात्या.

केशवराव 18/03/2008 - 23:50
उदय सप्रे यांसी _ _ _ _ आपला उपक्रम स्तुत्य आहेच ; आणि आपली अडचणही खरी वाटते. मदतीचे हात नक्कीच पुढे येतील. थोडे आपल्या पुस्तकाबद्दल सविस्तर कळविले तर ते आपल्यालाच बरे होईल. 'प्रोजेक्ट रीपोर्ट ' जरा नीट असावा. मदत करताना आपले नांव व्हावे असे सर्वानाच वाटते असे नाही , पण आपण मदत कुठे करतो ते त्याला कळले तर बरे होईल. वर काही जणांनी भावनिक पातळीवरुन आपल्याला मदत केली.त्यांना मी कमी लेखत नाही. त्यांची मदत लाख मोलाची नव्हे तर अमुल्य आहे.त्यांनी तर नावासाठी देखील आग्रह धरलेला नाही. अशी थोडी माणसें असतात. आपल्याला मदत करणारी बरीच माणसें हवीत.मग बर्‍याच माणसांना भावेल तसे आपण सांगावे. [ अपील होईल असे... ] यात कोणताही कमीपणा नाही. तरी कृपया, आपल्या लिखाणाचा थोडा नमुना, छपाईचा अपेक्षीत खर्च , लोकांच्या मदतीवर छापुन आलेल्या पुस्तकाच्या विक्रीतुन जर नफा झालाच तर त्याचे काय करणार ? कुठल्या शिवप्रतिष्ठानला दान करणार का? हे प्रश्न माझ्यासाठी नाहीत , पण लोकं दान / मदत करताना अशा सर्व गोष्टीं बघतात. माझ्याकडून आपल्या उपक्रमाला १००१/- मदत , विना अट! कसे आणि कुठे पाठवू ते कळवा. जाता जाता ..... पुस्तक ठराविक वेळेत नक्की प्रकाशीत होईल असाच विचार करा. उशीराची भिती बाळगू नका. आम्ही आपल्या पाठीशी आहोत. - - - - - - - - केशवराव .

In reply to by केशवराव

उदय सप्रे 19/03/2008 - 17:54
प्रिय केशवराव, आपेल म्हणणे रास्त आहे.परन्तु "बाजी पासलकर" यान्चेविशयी "सबकुछ" या पुस्तकात मी लिहिले आहे, अश्या क्रमिक पुस्तकाचे नाव आहे "रत्न्तपारखी".यापेक्षा अधिक मी काहीही सान्गु शकत नाहिये सध्ध्या तरी.प्रकाशक्,मुद्रक यान्च्या मी शोधात आहे, मी नवीन लेखक असल्याने माझा लेखनाचा विषय काय आहे यापेक्षा जास्त रस सगळ्यान्ना "आपले उखळ किती आणि कसे पान्ढरे होईल?" याचीच जास्त फिकीर आहे , अजुन माझे कुठल्याही प्रकाशकाशी अन्तिम बोलणे झालेले नाही, एक मात्र निश्चित - मिळालेल्या मदतीचा दुरुपयोग माझ्या हातून कधिही होणार नाही. यापेक्षा अधिक माहिती म्हणजे मी तुम्हाला ते पुस्तक माझ्या घरी आलात तर नक्किच वाचायला देवू शकतो, तसेच "कान्होजी जेधे"८५ % झालेले ते पण देवू शकतो, "झन्झावात" सुध्धा देवू शकतो- जे २०% इतकेच झाले आहे - उरलेले पूर्ण करायला अजून २ वर्ष नक्किच लागतील कारण पुढचे वर्ष चिरन्जीव (म्हणजे पर्यायानी आम्हीच !) दहावीत जाणार आहेत (अशी दाट शन्का आहे.....) माझा भ्रमण्ध्वनी खाली देत आहे, आपल्याशी सविस्तर बोलयल नक्किच आवडेल, मी ठाणे पश्चिम - पान्च्पाखाडी येथे रहातो. आपला विनम्र, उदय सप्रे ९९६७५ ४२७०३ ०२२ - २५४३ २६ ५६

उदय सप्रे 19/03/2008 - 14:37
मि.पा.वरील सर्व सभासद, तुमच्या प्रतिसादामुळे माझ्या डोळ्यात पाणी आले आहे, माझ्यासारखीच "शिव-शम्भू" भक्त मन्डळी आज माझ्यासोबत आहेत याची पुन्हा एकदा खातरजमा झाली. "बाजी पासलकर" लिहून तयार आहे, पश्न फक्त हा आहे की मुद्रक आणि प्रकाशक कोण्?मी "मेहता" ना लिहिले होते, पण आजकाल प्रत्येकाला "लेखक कोण्?नवा आहे का?आम्हाला त्यात काय मिळेल्?असे व्यावहारीक प्रश्न अधिक महत्वाचे वाटतात - यात त्या लोकान्चा काही दोष नाही , पण माझ्यासारख्याचि गळचेपी होते आहे , मी प्रयत्नात आहे-नक्की झाले कि ते मि.पा.वर कळवीनच , तोवर मी मि.पा.वर माझे :"काही लेख आणि एक कविता" च्या लिन्क्स दिल्या होत्या त्या नमुम्यादाखल म्हणून वाचाव्यात म्हणजे तुम्हाला माझ्या अक्षरासकट माझ्या लिखाणाबध्धल थोडासा तरी अन्दाज येईल. पुस्तके पूर्ण करणारच आणि माझे "झन्झावात" हे पुस्तक मराठीतील पहिलेच ऐतिहासिक पुस्तक असेल ज्यात ३ पिढ्यान्चा इतिहास असेल आणि माझ्या दुर्दैवाने मी ज्यान्ना लेखक म्हणून माझा आदर्श मानतो ते भाशाप्रभू श्री.रणजित देसाई, श्री.शिवाजी सावन्त यावेळी हयात नाहीत ! माझे लेख वाचून मला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात, तुम्ही सगळे "आपले" वाटता म्हणून "आभार" सारखा औपचारीक शब्द न वापरता तुमच्या रुणात रहाणे अधिक महत्वाचे मानतो आणि इथेच थाम्बतो. आपला विनम्र, उदय सप्रे

In reply to by विजुभाऊ

उदय सप्रे 19/03/2008 - 18:13
प्रिय विजुभाऊ, मी आधी एखाद्या प्रकाशकाशी अन्तिम बोलणे करतो आणि मग आपल्या सगळ्यान्ना सविस्तर सान्गतो, तोवर माझे :"काही लेख आणि एक कविता" या लिन्क्स ज्या जनातल मनातल या सदरात मी दिल्या आहेत त्या वाचून मला आपला अभिप्राय जरूर कळवावा.तसेच मी अत्ताच माझी आणि एक प्रतिक्रिया प्रकाशित केली आहे ती पण वाचावी - श्री. केशवराव यान्ना उद्देशून आहे ती. तुम्हा सगळ्यान्विषयी भावना व्यक्त करायला माझ्याकडे पुरेसे शब्दच नाहियेत- या क्षणी डोळे पाण्याने भरले आहेत्.एक आठवण सान्गतो : १५ औगस्ट २००६ : आम्ही मढे घाटातून चालत चालत ऐन पावसाळ्यात श्वथर घळीकडे चाललो होतो-वाट निसरडी व अरुन्द असल्याने सारखे घसरत होतो.एका गावकर्याने विचारले "शिवथर घळीत जायचे तर खाली महाड वरून जयचे तर?" त्याना मी म्हणालो,"तस नाही राव, आमच्या पहिल्या २ छत्रपतीन्नी आमच्यासाठी कश्या टाचा झिजवल्या आहेत ते आम्हाल कळायला हवे म्हणून आम्ही असे जातोय !" त्यावर त्या ग्रुहस्थाच्या डोळ्यात आलेली चमक मी अजूनहे विसरु शकत नाहिये आणि त्यावेळी त्यान्नी माझ्या खान्द्यावर थोपटले आणि मला जाणवले कि माझ्यासारखेच कित्येक लोक अजून पण शिव्-शम्भू यान्ना आपले दैवत मानतात ! हा प्रसन्ग मी माझ्या आयुश्यात कधिही विसरणार नाही.समर्थ चरणी प्रार्थना केली आहेच आणि जमल्यास पहिली प्रत तिथेच प्रकाशित करयचा मानस पण आहे. यापेक्षा जास्त लिहिण्याच्या मानसिक अवस्थेत मी अत्ता नाहिये म्हणून इथेच थाम्बतो आहे. आपला विनम्र, उदय सप्रे,ठाणे २५४३ २६ ५६ ९९६७५ ४२७०३

अनामिका 05/04/2008 - 20:37
श्री उदय! तुमच्या या कार्याला जर मी देखिल थोडा हातभार लावू शकले तर मला मनापासुन आनंद होइल. आयुष्यात काहिहि करु न शकल्याची खंत तरी निदान काही अंशी कमी करता येईल. जर छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली नसती आणि शंभुराजांनी त्या निर्दयी औरंगजेबाला ९ वर्षे झुंजवत ठेवला नसता तर आज महाराष्ट्राचे नामोनिशाण राहीले नसते..............! या अशा महान विभुतींचे अस्तित्व सध्या फक्त राजकारणापुरतेच राहिले आहे हे अतिशय खेदजनक आहे.................! असो मी प्रत्यक्ष तुम्हांस भेटायचा प्रयत्न करीनच. जय हिंद! जय महाराष्ट्र!
मी सध्ध्या छत्रपती शिवाजी महाराजान्ची माणसे यावर क्रमशः लिहितो आहे - यातील "बाजी पासलकर" लिहून तयार आहे ३० पानी, मला ते छापण्यासाठी "प्रायोजक" हवा आहे, दुसरे पुस्तक " कान्होजी जेधे" ८५% लिहून झाले आहे.तसेच "झन्झावात" (सम्भाजी महाराजान्च्या जीवनावरील ऐतिहासिक कादम्बरी) साठी पण प्रायोजक हवा आहे मुद्रकासह , यावर कुणी काही करु शकेल काय , तर करावे आणि मल कळवावे ही विनन्ती. आपला विनम्र, उदय सप्रे, ठाणे

सुनीतः एक प्रयत्न

ऋषिकेश ·

प्राजु 17/03/2008 - 00:04
शार्दुलविक्रिडीत चांगले जमले आहे... चांगली जाण आहे तुम्हाला वृत्ताची.. - (सर्वव्यापी)प्राजु

मुक्तसुनीत 17/03/2008 - 06:38
सर्वांची करतो झटून कामे कोणी न पुसतों मला पूर्णत्वी मम मागणीस असता , दूजी वसे अंतरा | साभांळून जरी घरास सगळ्या माझा असे कोपरा लागे मीच जळी स्थळी अन तरी "रात्री इथे हा बरा""|| म्हातारी असते जरी जर्जरा मी फिट्ट तिजला करी वैद्यचि 'पाणि' असे भला जवळचा वाटे न मी अंतरी | (अर्थ लागत नाही ...:-( ) "अन्नाने तुझिया भरून खळगी लाभे समाधानही" सांगावे मजला असे कुणितरी केव्हाचि ती आस ही || धिंगाणा पिउनी असे नि तरीही मी पाळली शांतता त्याचे हेच असे मिळे फळ तरी माझ्यावरी आळ का | अंधारात अश्या घरात तुमच्या दावी तुम्हा ज्योत ही जेव्हा हा भरला प्रकाश सदनी, पृच्छा करे - कोण मी ??|| देव्हारी असणेचि योग्य मजला - कामास आहे बरा ! "रामा" नाहि असे वदून दमलो, मी राम आहे खरा ||

ऋषिकेश 17/03/2008 - 21:19
धन्यवाद प्राजु आणि मुक्तसुनित :) मुक्तसुनित, पाणि मला हात या अर्थी घ्यायचा होता. वैद्याच्या हाताला गुण आला असा. अभिप्रायाबद्दल धन्यु! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

प्राजु 17/03/2008 - 00:04
शार्दुलविक्रिडीत चांगले जमले आहे... चांगली जाण आहे तुम्हाला वृत्ताची.. - (सर्वव्यापी)प्राजु

मुक्तसुनीत 17/03/2008 - 06:38
सर्वांची करतो झटून कामे कोणी न पुसतों मला पूर्णत्वी मम मागणीस असता , दूजी वसे अंतरा | साभांळून जरी घरास सगळ्या माझा असे कोपरा लागे मीच जळी स्थळी अन तरी "रात्री इथे हा बरा""|| म्हातारी असते जरी जर्जरा मी फिट्ट तिजला करी वैद्यचि 'पाणि' असे भला जवळचा वाटे न मी अंतरी | (अर्थ लागत नाही ...:-( ) "अन्नाने तुझिया भरून खळगी लाभे समाधानही" सांगावे मजला असे कुणितरी केव्हाचि ती आस ही || धिंगाणा पिउनी असे नि तरीही मी पाळली शांतता त्याचे हेच असे मिळे फळ तरी माझ्यावरी आळ का | अंधारात अश्या घरात तुमच्या दावी तुम्हा ज्योत ही जेव्हा हा भरला प्रकाश सदनी, पृच्छा करे - कोण मी ??|| देव्हारी असणेचि योग्य मजला - कामास आहे बरा ! "रामा" नाहि असे वदून दमलो, मी राम आहे खरा ||

ऋषिकेश 17/03/2008 - 21:19
धन्यवाद प्राजु आणि मुक्तसुनित :) मुक्तसुनित, पाणि मला हात या अर्थी घ्यायचा होता. वैद्याच्या हाताला गुण आला असा. अभिप्रायाबद्दल धन्यु! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
वृत्तबद्ध रचना करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.

निसर्गाची किमया

धनाधीश ·

प्राजु 17/03/2008 - 00:09
पहिली तिन चित्रे सुंदर आहेत. खरंच असे डोळे.... कुठेही नसतील. शेवटचे चित्र पेंटीग वाटते आहे. तेही सुंदर आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर 18/03/2008 - 02:35
छायाचित्रे लै भारी आहेत, मजा आली! वरून दुसरं करकोच्याचं छायाचित्रं तर केवळ अप्रतिम... तात्या.

कोलबेर 18/03/2008 - 02:41
प्राजुताईंनी म्हंटल्या प्रमाणे शेवटचे चित्र हे पेंटींगच असावे पण कल्पना भन्नाट आहे. करकोच्याच्या चित्रात डेप्थ ऑफ फिल्ड काय मस्त वापरले आहे. तुम्ही काढली आहेत का ही चित्रे? एकदम प्रोफेशनल काढली आहेत!! .. पोपटाचे चित्र मात्र आणखी शार्प असायला हवे होते

सगळेच फोटो मस्त आहेत. वरील सर्व प्रतिसादांशी सहमत. हे फोटो आपण स्वतः काढले असतील तर लेन्स, ऍपरचर, स्पीड आदी गोष्टींची माहिती दिलीत तर जास्त मजा येईल. नुसतेच नेत्रसुख मिळविण्यापेक्षा कलासुखही मिळाले तर ज्ञानात भर पडेल.

प्राजु 17/03/2008 - 00:09
पहिली तिन चित्रे सुंदर आहेत. खरंच असे डोळे.... कुठेही नसतील. शेवटचे चित्र पेंटीग वाटते आहे. तेही सुंदर आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर 18/03/2008 - 02:35
छायाचित्रे लै भारी आहेत, मजा आली! वरून दुसरं करकोच्याचं छायाचित्रं तर केवळ अप्रतिम... तात्या.

कोलबेर 18/03/2008 - 02:41
प्राजुताईंनी म्हंटल्या प्रमाणे शेवटचे चित्र हे पेंटींगच असावे पण कल्पना भन्नाट आहे. करकोच्याच्या चित्रात डेप्थ ऑफ फिल्ड काय मस्त वापरले आहे. तुम्ही काढली आहेत का ही चित्रे? एकदम प्रोफेशनल काढली आहेत!! .. पोपटाचे चित्र मात्र आणखी शार्प असायला हवे होते

सगळेच फोटो मस्त आहेत. वरील सर्व प्रतिसादांशी सहमत. हे फोटो आपण स्वतः काढले असतील तर लेन्स, ऍपरचर, स्पीड आदी गोष्टींची माहिती दिलीत तर जास्त मजा येईल. नुसतेच नेत्रसुख मिळविण्यापेक्षा कलासुखही मिळाले तर ज्ञानात भर पडेल.
owl!!!! असे डोळे इंद्राकडेही नसतील. waah!! popat बघत राहावंसं वाटतं. kaay garudin aahe!! आपण प्रत्यक्षात तेथे असत

विडंबन - तोच नौरोबा घरात, स्थूल आणि स्वस्थ ही

अविनाश ओगले ·

सचिन 16/03/2008 - 21:12
अविनाशजी दि ग्रेट !! टीव्हीच्या चॅनलवर, घाली जणूं गस्त ही ....खासच !!

सचिन 16/03/2008 - 21:12
अविनाशजी दि ग्रेट !! टीव्हीच्या चॅनलवर, घाली जणूं गस्त ही ....खासच !!
आमच्या प्रेरणा - १. शांता शेळके यांची कविता तोच चंद्रमा नभात २. बॅंकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले आमचे काही नशीबवान सहकारी ३. त्याच सुमारास कर्नाटक सरकारने एक्साइज ड्यूटी कमी करुन मद्य स्वस्त केल्याची आनंद वार्ता (हुश्श......

विडंबन - जे खावे पचण्याचे वय निघून गेले

अविनाश ओगले ·

धनाधीश 16/03/2008 - 21:28
दुरुनी ये वास जरी, गरम भजी कोण करी शोध घेत फिरण्याचे वय निघून गेले खुणाविले `पिझ्झा'ने,`चायनीज' दे आव्हाने हाय, पुरे पडण्याचे वय निघून गेले छान !! मस्त आहे विडंबन !! मूळ गझलही छान आहे.

इसम 16/03/2008 - 22:29
अविनाशजी, जे खावे पचण्याचे वय निघून गेले पैजेवर चरण्याचे वय निघून गेले जे वाचले ते उमजण्याचे वय खुणावते आहे ज्ञानोबा सार्त्र पचवणे, अजूनी बाकी आहे तंबाखू कुणी मळता, स्वत:सही न कळता हात पुढे करण्याचे वय निघून गेले काम कवडीचे न करण्याचे वय खुणावते आहे निवांत पेन्शन घेणे, अजूनी बाकी आहे बघत काही देखणे, कट्ट्यावर खात चणे तास तास बसण्याचे वय निघून गेले अनुभवी नजरेने घेणे, कट्ट्यावर मित्रांसवे पुन्हा 'निर्मळ' नेत्रसुख, अजूनी बाकी आहे -एक इसम

नन्दु 16/03/2008 - 22:58
तंबाखू कुणी मळता, स्वत:सही न कळता हात पुढे करण्याचे वय निघून गेले दुरुनी ये वास जरी, गरम भजी कोण करी शोध घेत फिरण्याचे वय निघून गेले वा !!! सुरेख आणि सफायि दार विडंबन मि. पा. कुटुबातील शेडेफळ नन्दु

प्राजु 16/03/2008 - 23:25
बघत काही देखणे, कट्ट्यावर खात चणे तास तास बसण्याचे वय निघून गेले खातांना रोज मिसळ, ओतुन कट लालजाळ नेत्रनाक पुसण्याचे वय निघून गेले हे मस्तच... - (सर्वव्यापी)प्राजु

तंबाखू कुणी मळता, स्वत:सही न कळता हात पुढे करण्याचे वय निघून गेले क्या बात है! आम्ही स्वतः तंबाखू खात नाही, पण भावना जाणू शकतो.:)) आम्ही म्हणू, नेहेमीच्या वेटरने, "काय पिणार?" पुसता, त्याच्यावर चिडायचे वय निघून गेले... -डांबिसकाका

पूर्वी एका ठिकाणी लिहिले होते "अविनाश ओगले - मद्य = शून्य भोपळा". पण माझे हे शब्द (बिनशर्त) सपशेल पाठी. तुमचे विडंबन मूळ काव्यापेक्षा जास्ती छान. म्हणून तुमच्या काव्यप्रतिभेला कुनिर्सात. > > आत आपुल्या झरा झुळझुळे, निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...

In reply to by सृष्टीलावण्या

अविनाश ओगले 17/03/2008 - 21:13
पूर्वी एका ठिकाणी लिहिले होते "अविनाश ओगले - मद्य = शून्य भोपळा". पण माझे हे शब्द (बिनशर्त) सपशेल पाठी. तुमचे विडंबन मूळ काव्यापेक्षा जास्ती छान. म्हणून तुमच्या काव्यप्रतिभेला कुनिर्सात. मद्य या विषयावर जास्त लिहितो हे मान्य.. पण अन्य विषय वर्ज्य आहेत, असे नाही. माझी मि.पा. वरची अन्य विडंबने व कविता अवश्य वाचाव्यात ही विनंती. विषेशतः चाळीमधल्या खोलीमधली राजा आणिक राणी संथ चालते मालिका ही

In reply to by सृष्टीलावण्या

'देखावे बघण्याचे' ही कविता आहे. गझल नाही. एकंदर विडंबन फार सुमार आहे. पहिली ओळ आवडली. सृष्टीलावण्य ह्यांनी "तुमचे विडंबन मूळ काव्यापेक्षा जास्ती छान" हे लिहिलेले वाचून अतिशय हसू आले. आपल्या मातृभाषेतलेच चांगले काव्य कुठले हे कुणाला कळत नसेल तर त्याला संस्कृतकाव्यातले काही कळत असेलसे वाटत नाही, असे मी म्हणणार नाही. एका प्रतिसादावरून कुठलाही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. असो. एखाद्याला गुळाची चव नसली म्हणून काय झाले! अखेर पंसद अपनी अपनी, खयाल अपना अपना!

In reply to by चित्तरंजन भट

विसोबा खेचर 18/03/2008 - 12:47
आपल्या मातृभाषेतलेच चांगले काव्य कुठले हे कुणाला कळत नसेल तर त्याला संस्कृतकाव्यातले काही कळत असेलसे वाटत नाही, असे मी म्हणणार नाही. हा हा हा! हे बाकी लै भारी! :) तात्या.

बेसनलाडू 18/03/2008 - 10:03
मागे कुणी विद्वानांनी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे पसायदानाचे विडंबन, झालंच तर जन गण मन चे विडंबन यांचीच आता मिपावर प्रतीक्षा आहे :) माझे या रचनेवरचे प्रामाणिक मत - १. तुमच्या इतर रचनांच्या तुलनेत तितकी उजवी रचना वाटली नाही; मात्र विषय मजेशीर आणि सुसह्य आहे. २. विडंबनासाठी मूळ रचना निवडताना ठेवायचे भान या ठिकाणी जरा सुटले, असे वाटते. असो. पुढील लेखनासाठी अनेकोत्तम शुभेच्छा. प्रामाणिक मत; राग नसावा. (प्रामाणिक)बेसनलाडू

विसोबा खेचर 18/03/2008 - 12:20
खातांना रोज मिसळ, ओतुन कट लालजाळ नेत्रनाक पुसण्याचे वय निघून गेले वा, क्या बात है! आपला, (वयस्कर) तात्या.

अविनाश ओगले 18/03/2008 - 19:58
या विडंबनावर बर्‍यावाईट प्रतिक्रिया देणार्‍या सर्वांचे आभार! काही प्रश्न. १.'देखावे बघण्याचे' ही कविता आहे. गझल नाही. (चित्तर) ही गझल कशी नाही हे जरा स्पष्ट कराल काय? मी ती गझल आहे या समजूतीत आहे. २. विडंबनासाठी मूळ रचना निवडताना ठेवायचे भान या ठिकाणी जरा सुटले, असे वाटते. (बेसनलाडू) एखाद्या कवितेचे विडंबन म्हणजे त्या कविचा अथवा कवितेचा अनादर किंवा चेष्टा नसते अशी माझी समजूत आहे. असे मानल्यास विडंबन लिहिता येणे अशक्य होईल. वरील विडंबनात असे काही झाले आहे का? कृपया `विडंबनासाठी मूळ रचना निवडताना ठेवायचे भान' ही कल्पना अधिक स्पष्ट करावी. सर्व सदस्यांनी मोकळेपणाने या चर्चेत मते मांडावीत. एक चांगली चर्चा घडेल. मला टिकेचे वावडे नाही.

In reply to by अविनाश ओगले

बेसनलाडू 18/03/2008 - 15:39
नुसते दात काढून हसायला लावणारे असे नाही, तर त्याहीपेक्षा काहीतरी जास्त असे शाब्दिक, मार्मिक व्यंगचित्र अशी माझी भाबडी समजूत आहे. मूळ कवितेचा त्यात अनादर नसावा, चेष्टा नसावी. तुमच्या इतर विडंबनांमध्ये किंवा येथेही ती झाली आहे, असे मी म्हटलेले नाही, म्हणणारही नाही. पण मूळ रचनेतली ताकद विडंबनातही असेल, तर विडंबन खुलते, असे मला वाटते. वानगीदाखल देखावे बघण्याचे वय निघून गेले आणि भातुकलीच्या खेळामधली पाहू. दोन भिन्न रचना, भिन्न ताकदीच्या रचना. पाडगावकरांची समजण्यास अधिक सोपी, त्यामुळे तिच्यातले भाव, ताकद सहज समजण्याजोगी. त्यामुळे 'चाळीमधल्या खोलीमधली' हे तुमचे विडंबनही साजेसे झाले, खुलले. मात्र देखावे बघण्याचे ची केस वेगळी आहे. पहिल्या वाचनात किंवा दोन वाचनांत कळेल, पूर्ण समजेल, अशी ती रचना नाही. ओळीओळींमधून अर्थाचे अनेक पदर, भावांचे हजार कंगोरे ही दादांच्या जवळपास सगळ्याच रचनांची वैशिष्ट्ये आहेत. ती येथेही आहेत. साहजिकच विडंबनातील सामान्यताही जाणवते आहे (जरी विडंबनाचा विषय वेगळा असला तरी). विडंबनासठी मूळ रचना निवडताना ठेवायचे भान, यातून मला हेच सुचवायचे आहे की आधी अशा रचनेची ताकद अजमावणे आवश्यक आणि त्यामुळे पर्यायाने ती रचना कोणी लिहिली आहे, हे पाहणेही ओघाओघाने येतेच. म्हणूनच मनोगत, मिसळपाव किंवा इतर संकेतस्थळांवरील हौशी किंवा सराईत गझलकारांच्या, कवींच्या रचना घेऊन लेंड्यांगत विडंबने पाडणे/पडणे वेगळे आणि सुरेश भट, पाडगावकर प्रभृतींच्या रचनांची विडंबने करणे वेगळे, असे मला वाटते. मूळ रचनेइतक्या ताकदीचे विडंबन झाले आहे का, हे पाहण्याची जबाबदारी विडंबनकाराने स्वतः उचलावी. कदाचित प्रस्तुत विडंबनात आपण ही जबाबदारी पेललेली नाही (असे निदान मला तरी वाटते) मूळ रचनेतून मूळ रचनाकर्त्याला जे सुचवायचे आहे, त्याच्याशी कितपत न्याय झाला आहे; आणि विडंबनातून आपण ज्या विषयातील व्यंगाकडे बोट दाखवतो आहोत, त्या उद्दिष्टाशी आपले शब्द, ओळी कितपत न्याय करीत आहेत, यांच्या तुल्यबळतेची विडंबनकाराकडून पडताळणी व्हायला हवी. आणि म्हणूनच विडंबन हे 'धोरण' नसावे .दुर्दैवाने सगळ्याच मराठी संकेतस्थळांवर अशा धोरणी विडंबनकारांची भूछत्रे उगवल्याचे आज आपण सगळेच पाहत आहोत.तुमचे ते 'धोरण' नाही, हे मी जाणतो, पण तुमचे हे विडंबन माझ्या मूळ रचनेची ताकद, विषय व उद्दिष्टांशी केलेला न्याय या मुद्द्यांच्या मोजपट्टीवर कमी पडते आहे, असे माझे मत. आणि यासाठीच मूळ रचना - भाव नि ताकद, मूळ कवी, रचनेचा विषय यांचा सारासार विचार, यांचे भान असणे अत्यावश्यक आहे, असे मला वाटते. चित्तंनी वर म्हटल्याप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रकृती किंवा खयाल अपना पसंद अपनी या निसर्गनियमानुसार मी मांडलेली मते पटतीलच, पटावीतच असा हट्ट/अपेक्षा नाही. या प्रतिसादाच्या अनुषंगाने माझे प्रामाणिक मत मांडण्याची संधी मिळाली, याचे समाधान आहे. जे पटेल ते घ्यावे, नाहीतर सोडून द्यावे, इतके सगळे सोपे आहे/असते. (समाधानी)बेसनलाडू

In reply to by अविनाश ओगले

उदय सप्रे 19/03/2008 - 20:08
अविनाश जी, एक अतिशय सुन्दर विडम्बन ! अभिनन्दन ! "देखावे बघण्याचे" ही मूळ गझलच आहे, कविता नव्हे , तुमचा समज अगदी बरोबर आहे, जमल्यास तुम्ही सुरेश भट यान्चे "एल्गार" हे पुस्तक वाचा त्यात आहे ही गझल. मूळ कवितेचि जरि खिल्लि उडवली गेली असेल तरी पण त्यात मूळ कवीचा अपमान करण्याची कुणाची इच्छा असेल असे मल तरी वाटत नाही, तुमच्या हातऊन तर असे काही मुळीच झलेले नाहिये ! जमल्यास माझ्या "काहि लेख आणि एक कविता"ह्या लिन्क्स वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा ही "सप्रे"म विनन्ती. उदय सप्रे

In reply to by अविनाश ओगले

चतुरंग 19/03/2008 - 21:20
बे.ला. ने त्याचे म्हणणे विस्तृतपणे मांडलेच आहे. त्यातले सर्व मुद्दे पटण्यासारखे आहेत. मी फार विडंबने केलेली नाहीत. पण जी काही आहेत त्याच्या अनुषंगाने बोलतोय. मुळात हा प्रकार अवघड आहे आणि तो नीट करायला धाडस लागते असे माझे मत. कारण मूळ रचना तुमच्यासमोर असते त्याबद्दल तुमचे आणि वाचकांचे एक मत बनलेले असते आणि त्यावर हा दुसरा ठसा उमटवणे कठिण काम असते. मुळात काव्य सशक्त आहे की नाही ह्याची चांगली जाण, त्यानंतर शब्दसंपत्ती, भाषेवरची पकड ह्या अत्यावश्यक गोष्टी आहेत. त्याखेरीज लय, ताल, मात्रा, ठेका ह्यांची जाण असेल तर विडंबन हास्यास्पद न होता जमून येते. वाचकांना भावते. आता ह्या गोष्टी जमाव्यात कशा? कुठेतरी सुरुवात करणे भाग आहे. तेव्हा विडंबनकाराने हा विचार करुन एखादे साधे नवख्या कवीचे काव्य 'गिनीपिग' म्हणून वापरुन बघावे त्यात काही गैर आहे असे वाटत नाही. आणि त्यावेळी काही 'लेंड्या पडल्या' तरी घाबरुन जाण्याचे कारण नाही.;) (अर्थात उठसूट कोणतेही काव्य घेऊन लेंड्या टाकत हिंडणेही फारसे प्रशस्त नाहीच;). हा शेवटी तारतम्याचा भाग आहे. तो अनुभवानेच येतो, शिकवून नाही! प्रथितयश कवी/कवयित्रींचे काव्य घेताना मात्र फारच जागरुक रहावे लागते. कारण मूळ काव्यातला विचार, त्यातल्या प्रतिमा, शब्दांचे नेमके अर्थ, कंगोरे, छटा, नादमयता, गेयता, वृत्त, ताल, मात्रा हे सगळे समजून घ्यायचा प्रयत्न व्हायलाच हवा. त्याशिवाय, विडंबन का करणार आहात त्याचा स्पष्ट उद्देश डोळ्यांसमोर पाहिजे. त्यातून काय द्यायचे आहे हे नक्की नसेल तर ते करु नये. त्यात तुम्ही वापरणार आहात त्या प्रतिमा, उपमा मूळ काव्याला बाध आणणार्‍या नसाव्यात. मूळ काव्य अनेक वेळा वाचावे, दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेला वाचावे त्यातले अर्थ उमगत जातात तसे आपल्याला त्याला न्याय देणे सोपे जाते. विडंबन करुन झाले की ते तसेच मुरवत ठेवावे (लोणच्यासारखे;). मग पुन्हा काही काळाने वाचून बघावे त्यातल्या त्रुटी बर्‍याच वेळा ध्यानात येतात. काही वेळा उगीच केले असे वाटते त्यावेळी सरळ पुसून टाकावे. आणि जर मनासारखे झाले आहे ह्याची खात्री पटली तरच प्रसिध्द करावे. त्यावर येणार्‍या प्रतिक्रियाही मोकळेपणाने घेता आल्या पाहिजेत. असे झाले तर खर्‍या अर्थाने विडंबन समृध्द होण्यास हातभार (कि काव्यभार?) लागेल असे वाटते. चतुरंग

जे खावे पचण्याचे वय निघून गेले पैजेवर चरण्याचे वय निघून गेले... बघत काही देखणे, कट्ट्यावर खात चणे तास तास बसण्याचे वय निघून गेले अविनाशकाका विडंबन खुप छान जमलयं पण, चुइंगम, चने असे काही पदार्थ असते तर अजुन मजा आला असता.

(विडंबना सकट) सर्व काव्यांत तीन प्रकारचे सौंदर्य अपेक्षित असते. (१) भाव सौंदर्य / कल्पनेचे सौंदर्य (२) शब्द सौंदर्य (३) लय/ रिदम/मात्रा यांचे सौंदर्य . आपण सामान्य कवी तर जाऊ द्या पण जेष्ठ /श्रेष्ठ कवींच्या प्रत्येक रचने च्या बाबतीत परिपूर्णता (परफेक्शन) अपेक्षिणे बरोबर आहे कां ? आपण साहित्य निर्माण करतांना त्याचा जास्त विचार केल्यास ते निर्माणच होणार नाही.एक विडंबनकार म्हणून माझा अनुभव सांगतो. एखादि शिळा पाहिली की जसे मुर्तीकाराला त्यातून होऊ शकणारी मुर्ती दिसते तसे एखादे चांगले गीत ऐकले की त्याच्या शब्द व चालीतून विडंबनाचा मुखडा तायार होतो. बाकिच्या ओळी मग मूळ शब्दावरून सुचत जातात. आचार्य अत्रेंच्या झेंडूची फुले पुस्तकातील प्रस्तावना आपण पुन्हा पुन्हा वाचली पाहिजे.

अविनाश ओगले 19/03/2008 - 20:43
बेसनलाडूजी, मी आपला अत्यंत आभारी आहे. तुम्ही तुमचे म्हणणे अत्यंत नेमक्या शब्दात मांडलेत. या निमित्ताने विडंबनाकडेही किती गांभीर्याने पाहता येते हे समजले. ही चर्चा तुम्ही समृद्ध केलीत. अशाच आशयसंपन्न चर्चा मि.पा.वर घडत रहाव्यात. अन्य सहभागी सदस्यांचेही आभार.

त्या कविचा अथवा कवितेचा अनादर किंवा चेष्टा नसते अशी माझी समजूत आहे. अविनाशरावांच्या यामताशी मी सहमत आहे. बे.ला. च्या पण मूळ रचनेतली ताकद विडंबनातही असेल, तर विडंबन खुलते आधी अशा रचनेची ताकद अजमावणे आवश्यक हे तर खरेच. उत्कृष्ट तेच सादर करावे. गाळ फेकावाच. उत्कृष्टतेच्या ध्यासाला अंत नसावाच. बेलाची फूटपट्टी प्रत्येकानेच जरूर वापरावी. प्रा. सुरेश खेडकरांचे मतहि आवडले. यावर खरे म्हणजे खुद्द विडंबनकारांचे मत जाणून घेण्यास आवडेल. मी तर फक्त आस्वादक आहे. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

(खुलासा: खालील उतारा इतर एका ठिकाणी अनेक दिवसा पूर्वी लिहिला होता व तो प्रस्तुत चर्चेशी संयुक्तिक वाटला म्हणून इथे उध्रूत केला आहे. कुणाचाहि अपमान करण्याचा मानस नाही, क्षमस्व.) अनेक समीक्षक स्वतः एकही ओळ न लिहिता साहित्यिकांना व त्यातल्या त्यात लोकप्रिय साहित्यिकांना व त्यांच्या साहित्याला तुच्छ लेखतात.परंतु कै.म.वा.धोंड(जे नुकतेच वयाच्या ९३व्या वर्षी वारले)याला अपवाद होते.ते लेखकाच्या कलाकृतीला आपल्या समीक्षेपेक्षा मोठे समजत.आपली समीक्षा परिपूर्ण नाही ह्याचे भान ठेवतांना त्यांनी आपल्या समीक्षा पुस्तकाला नाव ठेवले "जाळ्यातील चंद्र". या नावाचे स्पष्टीकरण देतांना त्यांनी ज्ञानेश्वरीतील पुढील ओवी दिली आहे. "जे जालं जली पांगिले|तेथ प्रतिबिंब दिसे कीरू आतुडले| मग थडिये काढूनि झाडिले|तेव्हलि बिंब के सांघै ||" (अर्थात,कोणतेही व्यक्तिमत्त्व किंवा काव्य स्वतःच्या शब्दात पकडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे समुद्रात जाळे पांगून त्यात आकाशातील चंद्राचे प्रतिबिंब पकडण्याचा प्रयास करणे.जाळे पांगलेले असेपर्यंत त्यात प्रतिबिंब अडकल्याचा भास होतो.परंतु किना~यावर आणून ते झटकले की त्यातून ते निसटल्याचे आढळून येते.

In reply to by प्रा सुरेश खेडकर

चतुरंग 20/03/2008 - 02:48
बर्‍याचवेळा आढळणारी समीक्षेतली अकलेची दिवाळखोरी अत्यंत समर्पक शब्दात तुम्ही दाखवून दिलीत त्याबद्दल तुमचे आभार. कै.म.वा.धोंड ह्यांच्याबद्दलही नवीन माहिती मिळाली. 'जाळ्यातला चंद्र' नावामागचा दृष्टांत केवढा मौलिक आहे, म्हणूनच ते ज्ञानेश्वर होते! चतुरंग

सुधीरजी व चतुरंगजी , तसेच इतरांचेहि आभार. खुलासा : मी नागपूरच्या एका कॉलेजात इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग शिकवितो, म्हणजेच मी मराठीच काय कोणत्याहि भाषेचा प्राध्यापक नाही. म्हटलं पितळ(की तांबं?) उघडं पडायच्या आधीच सांगून टाकालेलं बरं. नाही कां?

धनाधीश 16/03/2008 - 21:28
दुरुनी ये वास जरी, गरम भजी कोण करी शोध घेत फिरण्याचे वय निघून गेले खुणाविले `पिझ्झा'ने,`चायनीज' दे आव्हाने हाय, पुरे पडण्याचे वय निघून गेले छान !! मस्त आहे विडंबन !! मूळ गझलही छान आहे.

इसम 16/03/2008 - 22:29
अविनाशजी, जे खावे पचण्याचे वय निघून गेले पैजेवर चरण्याचे वय निघून गेले जे वाचले ते उमजण्याचे वय खुणावते आहे ज्ञानोबा सार्त्र पचवणे, अजूनी बाकी आहे तंबाखू कुणी मळता, स्वत:सही न कळता हात पुढे करण्याचे वय निघून गेले काम कवडीचे न करण्याचे वय खुणावते आहे निवांत पेन्शन घेणे, अजूनी बाकी आहे बघत काही देखणे, कट्ट्यावर खात चणे तास तास बसण्याचे वय निघून गेले अनुभवी नजरेने घेणे, कट्ट्यावर मित्रांसवे पुन्हा 'निर्मळ' नेत्रसुख, अजूनी बाकी आहे -एक इसम

नन्दु 16/03/2008 - 22:58
तंबाखू कुणी मळता, स्वत:सही न कळता हात पुढे करण्याचे वय निघून गेले दुरुनी ये वास जरी, गरम भजी कोण करी शोध घेत फिरण्याचे वय निघून गेले वा !!! सुरेख आणि सफायि दार विडंबन मि. पा. कुटुबातील शेडेफळ नन्दु

प्राजु 16/03/2008 - 23:25
बघत काही देखणे, कट्ट्यावर खात चणे तास तास बसण्याचे वय निघून गेले खातांना रोज मिसळ, ओतुन कट लालजाळ नेत्रनाक पुसण्याचे वय निघून गेले हे मस्तच... - (सर्वव्यापी)प्राजु

तंबाखू कुणी मळता, स्वत:सही न कळता हात पुढे करण्याचे वय निघून गेले क्या बात है! आम्ही स्वतः तंबाखू खात नाही, पण भावना जाणू शकतो.:)) आम्ही म्हणू, नेहेमीच्या वेटरने, "काय पिणार?" पुसता, त्याच्यावर चिडायचे वय निघून गेले... -डांबिसकाका

पूर्वी एका ठिकाणी लिहिले होते "अविनाश ओगले - मद्य = शून्य भोपळा". पण माझे हे शब्द (बिनशर्त) सपशेल पाठी. तुमचे विडंबन मूळ काव्यापेक्षा जास्ती छान. म्हणून तुमच्या काव्यप्रतिभेला कुनिर्सात. > > आत आपुल्या झरा झुळझुळे, निळा निळा स्वच्छंद, जगणे म्हणजे उधळीत जाणे, हृदयातील आनंद...

In reply to by सृष्टीलावण्या

अविनाश ओगले 17/03/2008 - 21:13
पूर्वी एका ठिकाणी लिहिले होते "अविनाश ओगले - मद्य = शून्य भोपळा". पण माझे हे शब्द (बिनशर्त) सपशेल पाठी. तुमचे विडंबन मूळ काव्यापेक्षा जास्ती छान. म्हणून तुमच्या काव्यप्रतिभेला कुनिर्सात. मद्य या विषयावर जास्त लिहितो हे मान्य.. पण अन्य विषय वर्ज्य आहेत, असे नाही. माझी मि.पा. वरची अन्य विडंबने व कविता अवश्य वाचाव्यात ही विनंती. विषेशतः चाळीमधल्या खोलीमधली राजा आणिक राणी संथ चालते मालिका ही

In reply to by सृष्टीलावण्या

'देखावे बघण्याचे' ही कविता आहे. गझल नाही. एकंदर विडंबन फार सुमार आहे. पहिली ओळ आवडली. सृष्टीलावण्य ह्यांनी "तुमचे विडंबन मूळ काव्यापेक्षा जास्ती छान" हे लिहिलेले वाचून अतिशय हसू आले. आपल्या मातृभाषेतलेच चांगले काव्य कुठले हे कुणाला कळत नसेल तर त्याला संस्कृतकाव्यातले काही कळत असेलसे वाटत नाही, असे मी म्हणणार नाही. एका प्रतिसादावरून कुठलाही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. असो. एखाद्याला गुळाची चव नसली म्हणून काय झाले! अखेर पंसद अपनी अपनी, खयाल अपना अपना!

In reply to by चित्तरंजन भट

विसोबा खेचर 18/03/2008 - 12:47
आपल्या मातृभाषेतलेच चांगले काव्य कुठले हे कुणाला कळत नसेल तर त्याला संस्कृतकाव्यातले काही कळत असेलसे वाटत नाही, असे मी म्हणणार नाही. हा हा हा! हे बाकी लै भारी! :) तात्या.

बेसनलाडू 18/03/2008 - 10:03
मागे कुणी विद्वानांनी एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे पसायदानाचे विडंबन, झालंच तर जन गण मन चे विडंबन यांचीच आता मिपावर प्रतीक्षा आहे :) माझे या रचनेवरचे प्रामाणिक मत - १. तुमच्या इतर रचनांच्या तुलनेत तितकी उजवी रचना वाटली नाही; मात्र विषय मजेशीर आणि सुसह्य आहे. २. विडंबनासाठी मूळ रचना निवडताना ठेवायचे भान या ठिकाणी जरा सुटले, असे वाटते. असो. पुढील लेखनासाठी अनेकोत्तम शुभेच्छा. प्रामाणिक मत; राग नसावा. (प्रामाणिक)बेसनलाडू

विसोबा खेचर 18/03/2008 - 12:20
खातांना रोज मिसळ, ओतुन कट लालजाळ नेत्रनाक पुसण्याचे वय निघून गेले वा, क्या बात है! आपला, (वयस्कर) तात्या.

अविनाश ओगले 18/03/2008 - 19:58
या विडंबनावर बर्‍यावाईट प्रतिक्रिया देणार्‍या सर्वांचे आभार! काही प्रश्न. १.'देखावे बघण्याचे' ही कविता आहे. गझल नाही. (चित्तर) ही गझल कशी नाही हे जरा स्पष्ट कराल काय? मी ती गझल आहे या समजूतीत आहे. २. विडंबनासाठी मूळ रचना निवडताना ठेवायचे भान या ठिकाणी जरा सुटले, असे वाटते. (बेसनलाडू) एखाद्या कवितेचे विडंबन म्हणजे त्या कविचा अथवा कवितेचा अनादर किंवा चेष्टा नसते अशी माझी समजूत आहे. असे मानल्यास विडंबन लिहिता येणे अशक्य होईल. वरील विडंबनात असे काही झाले आहे का? कृपया `विडंबनासाठी मूळ रचना निवडताना ठेवायचे भान' ही कल्पना अधिक स्पष्ट करावी. सर्व सदस्यांनी मोकळेपणाने या चर्चेत मते मांडावीत. एक चांगली चर्चा घडेल. मला टिकेचे वावडे नाही.

In reply to by अविनाश ओगले

बेसनलाडू 18/03/2008 - 15:39
नुसते दात काढून हसायला लावणारे असे नाही, तर त्याहीपेक्षा काहीतरी जास्त असे शाब्दिक, मार्मिक व्यंगचित्र अशी माझी भाबडी समजूत आहे. मूळ कवितेचा त्यात अनादर नसावा, चेष्टा नसावी. तुमच्या इतर विडंबनांमध्ये किंवा येथेही ती झाली आहे, असे मी म्हटलेले नाही, म्हणणारही नाही. पण मूळ रचनेतली ताकद विडंबनातही असेल, तर विडंबन खुलते, असे मला वाटते. वानगीदाखल देखावे बघण्याचे वय निघून गेले आणि भातुकलीच्या खेळामधली पाहू. दोन भिन्न रचना, भिन्न ताकदीच्या रचना. पाडगावकरांची समजण्यास अधिक सोपी, त्यामुळे तिच्यातले भाव, ताकद सहज समजण्याजोगी. त्यामुळे 'चाळीमधल्या खोलीमधली' हे तुमचे विडंबनही साजेसे झाले, खुलले. मात्र देखावे बघण्याचे ची केस वेगळी आहे. पहिल्या वाचनात किंवा दोन वाचनांत कळेल, पूर्ण समजेल, अशी ती रचना नाही. ओळीओळींमधून अर्थाचे अनेक पदर, भावांचे हजार कंगोरे ही दादांच्या जवळपास सगळ्याच रचनांची वैशिष्ट्ये आहेत. ती येथेही आहेत. साहजिकच विडंबनातील सामान्यताही जाणवते आहे (जरी विडंबनाचा विषय वेगळा असला तरी). विडंबनासठी मूळ रचना निवडताना ठेवायचे भान, यातून मला हेच सुचवायचे आहे की आधी अशा रचनेची ताकद अजमावणे आवश्यक आणि त्यामुळे पर्यायाने ती रचना कोणी लिहिली आहे, हे पाहणेही ओघाओघाने येतेच. म्हणूनच मनोगत, मिसळपाव किंवा इतर संकेतस्थळांवरील हौशी किंवा सराईत गझलकारांच्या, कवींच्या रचना घेऊन लेंड्यांगत विडंबने पाडणे/पडणे वेगळे आणि सुरेश भट, पाडगावकर प्रभृतींच्या रचनांची विडंबने करणे वेगळे, असे मला वाटते. मूळ रचनेइतक्या ताकदीचे विडंबन झाले आहे का, हे पाहण्याची जबाबदारी विडंबनकाराने स्वतः उचलावी. कदाचित प्रस्तुत विडंबनात आपण ही जबाबदारी पेललेली नाही (असे निदान मला तरी वाटते) मूळ रचनेतून मूळ रचनाकर्त्याला जे सुचवायचे आहे, त्याच्याशी कितपत न्याय झाला आहे; आणि विडंबनातून आपण ज्या विषयातील व्यंगाकडे बोट दाखवतो आहोत, त्या उद्दिष्टाशी आपले शब्द, ओळी कितपत न्याय करीत आहेत, यांच्या तुल्यबळतेची विडंबनकाराकडून पडताळणी व्हायला हवी. आणि म्हणूनच विडंबन हे 'धोरण' नसावे .दुर्दैवाने सगळ्याच मराठी संकेतस्थळांवर अशा धोरणी विडंबनकारांची भूछत्रे उगवल्याचे आज आपण सगळेच पाहत आहोत.तुमचे ते 'धोरण' नाही, हे मी जाणतो, पण तुमचे हे विडंबन माझ्या मूळ रचनेची ताकद, विषय व उद्दिष्टांशी केलेला न्याय या मुद्द्यांच्या मोजपट्टीवर कमी पडते आहे, असे माझे मत. आणि यासाठीच मूळ रचना - भाव नि ताकद, मूळ कवी, रचनेचा विषय यांचा सारासार विचार, यांचे भान असणे अत्यावश्यक आहे, असे मला वाटते. चित्तंनी वर म्हटल्याप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रकृती किंवा खयाल अपना पसंद अपनी या निसर्गनियमानुसार मी मांडलेली मते पटतीलच, पटावीतच असा हट्ट/अपेक्षा नाही. या प्रतिसादाच्या अनुषंगाने माझे प्रामाणिक मत मांडण्याची संधी मिळाली, याचे समाधान आहे. जे पटेल ते घ्यावे, नाहीतर सोडून द्यावे, इतके सगळे सोपे आहे/असते. (समाधानी)बेसनलाडू

In reply to by अविनाश ओगले

उदय सप्रे 19/03/2008 - 20:08
अविनाश जी, एक अतिशय सुन्दर विडम्बन ! अभिनन्दन ! "देखावे बघण्याचे" ही मूळ गझलच आहे, कविता नव्हे , तुमचा समज अगदी बरोबर आहे, जमल्यास तुम्ही सुरेश भट यान्चे "एल्गार" हे पुस्तक वाचा त्यात आहे ही गझल. मूळ कवितेचि जरि खिल्लि उडवली गेली असेल तरी पण त्यात मूळ कवीचा अपमान करण्याची कुणाची इच्छा असेल असे मल तरी वाटत नाही, तुमच्या हातऊन तर असे काही मुळीच झलेले नाहिये ! जमल्यास माझ्या "काहि लेख आणि एक कविता"ह्या लिन्क्स वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा ही "सप्रे"म विनन्ती. उदय सप्रे

In reply to by अविनाश ओगले

चतुरंग 19/03/2008 - 21:20
बे.ला. ने त्याचे म्हणणे विस्तृतपणे मांडलेच आहे. त्यातले सर्व मुद्दे पटण्यासारखे आहेत. मी फार विडंबने केलेली नाहीत. पण जी काही आहेत त्याच्या अनुषंगाने बोलतोय. मुळात हा प्रकार अवघड आहे आणि तो नीट करायला धाडस लागते असे माझे मत. कारण मूळ रचना तुमच्यासमोर असते त्याबद्दल तुमचे आणि वाचकांचे एक मत बनलेले असते आणि त्यावर हा दुसरा ठसा उमटवणे कठिण काम असते. मुळात काव्य सशक्त आहे की नाही ह्याची चांगली जाण, त्यानंतर शब्दसंपत्ती, भाषेवरची पकड ह्या अत्यावश्यक गोष्टी आहेत. त्याखेरीज लय, ताल, मात्रा, ठेका ह्यांची जाण असेल तर विडंबन हास्यास्पद न होता जमून येते. वाचकांना भावते. आता ह्या गोष्टी जमाव्यात कशा? कुठेतरी सुरुवात करणे भाग आहे. तेव्हा विडंबनकाराने हा विचार करुन एखादे साधे नवख्या कवीचे काव्य 'गिनीपिग' म्हणून वापरुन बघावे त्यात काही गैर आहे असे वाटत नाही. आणि त्यावेळी काही 'लेंड्या पडल्या' तरी घाबरुन जाण्याचे कारण नाही.;) (अर्थात उठसूट कोणतेही काव्य घेऊन लेंड्या टाकत हिंडणेही फारसे प्रशस्त नाहीच;). हा शेवटी तारतम्याचा भाग आहे. तो अनुभवानेच येतो, शिकवून नाही! प्रथितयश कवी/कवयित्रींचे काव्य घेताना मात्र फारच जागरुक रहावे लागते. कारण मूळ काव्यातला विचार, त्यातल्या प्रतिमा, शब्दांचे नेमके अर्थ, कंगोरे, छटा, नादमयता, गेयता, वृत्त, ताल, मात्रा हे सगळे समजून घ्यायचा प्रयत्न व्हायलाच हवा. त्याशिवाय, विडंबन का करणार आहात त्याचा स्पष्ट उद्देश डोळ्यांसमोर पाहिजे. त्यातून काय द्यायचे आहे हे नक्की नसेल तर ते करु नये. त्यात तुम्ही वापरणार आहात त्या प्रतिमा, उपमा मूळ काव्याला बाध आणणार्‍या नसाव्यात. मूळ काव्य अनेक वेळा वाचावे, दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेला वाचावे त्यातले अर्थ उमगत जातात तसे आपल्याला त्याला न्याय देणे सोपे जाते. विडंबन करुन झाले की ते तसेच मुरवत ठेवावे (लोणच्यासारखे;). मग पुन्हा काही काळाने वाचून बघावे त्यातल्या त्रुटी बर्‍याच वेळा ध्यानात येतात. काही वेळा उगीच केले असे वाटते त्यावेळी सरळ पुसून टाकावे. आणि जर मनासारखे झाले आहे ह्याची खात्री पटली तरच प्रसिध्द करावे. त्यावर येणार्‍या प्रतिक्रियाही मोकळेपणाने घेता आल्या पाहिजेत. असे झाले तर खर्‍या अर्थाने विडंबन समृध्द होण्यास हातभार (कि काव्यभार?) लागेल असे वाटते. चतुरंग

जे खावे पचण्याचे वय निघून गेले पैजेवर चरण्याचे वय निघून गेले... बघत काही देखणे, कट्ट्यावर खात चणे तास तास बसण्याचे वय निघून गेले अविनाशकाका विडंबन खुप छान जमलयं पण, चुइंगम, चने असे काही पदार्थ असते तर अजुन मजा आला असता.

(विडंबना सकट) सर्व काव्यांत तीन प्रकारचे सौंदर्य अपेक्षित असते. (१) भाव सौंदर्य / कल्पनेचे सौंदर्य (२) शब्द सौंदर्य (३) लय/ रिदम/मात्रा यांचे सौंदर्य . आपण सामान्य कवी तर जाऊ द्या पण जेष्ठ /श्रेष्ठ कवींच्या प्रत्येक रचने च्या बाबतीत परिपूर्णता (परफेक्शन) अपेक्षिणे बरोबर आहे कां ? आपण साहित्य निर्माण करतांना त्याचा जास्त विचार केल्यास ते निर्माणच होणार नाही.एक विडंबनकार म्हणून माझा अनुभव सांगतो. एखादि शिळा पाहिली की जसे मुर्तीकाराला त्यातून होऊ शकणारी मुर्ती दिसते तसे एखादे चांगले गीत ऐकले की त्याच्या शब्द व चालीतून विडंबनाचा मुखडा तायार होतो. बाकिच्या ओळी मग मूळ शब्दावरून सुचत जातात. आचार्य अत्रेंच्या झेंडूची फुले पुस्तकातील प्रस्तावना आपण पुन्हा पुन्हा वाचली पाहिजे.

अविनाश ओगले 19/03/2008 - 20:43
बेसनलाडूजी, मी आपला अत्यंत आभारी आहे. तुम्ही तुमचे म्हणणे अत्यंत नेमक्या शब्दात मांडलेत. या निमित्ताने विडंबनाकडेही किती गांभीर्याने पाहता येते हे समजले. ही चर्चा तुम्ही समृद्ध केलीत. अशाच आशयसंपन्न चर्चा मि.पा.वर घडत रहाव्यात. अन्य सहभागी सदस्यांचेही आभार.

त्या कविचा अथवा कवितेचा अनादर किंवा चेष्टा नसते अशी माझी समजूत आहे. अविनाशरावांच्या यामताशी मी सहमत आहे. बे.ला. च्या पण मूळ रचनेतली ताकद विडंबनातही असेल, तर विडंबन खुलते आधी अशा रचनेची ताकद अजमावणे आवश्यक हे तर खरेच. उत्कृष्ट तेच सादर करावे. गाळ फेकावाच. उत्कृष्टतेच्या ध्यासाला अंत नसावाच. बेलाची फूटपट्टी प्रत्येकानेच जरूर वापरावी. प्रा. सुरेश खेडकरांचे मतहि आवडले. यावर खरे म्हणजे खुद्द विडंबनकारांचे मत जाणून घेण्यास आवडेल. मी तर फक्त आस्वादक आहे. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

(खुलासा: खालील उतारा इतर एका ठिकाणी अनेक दिवसा पूर्वी लिहिला होता व तो प्रस्तुत चर्चेशी संयुक्तिक वाटला म्हणून इथे उध्रूत केला आहे. कुणाचाहि अपमान करण्याचा मानस नाही, क्षमस्व.) अनेक समीक्षक स्वतः एकही ओळ न लिहिता साहित्यिकांना व त्यातल्या त्यात लोकप्रिय साहित्यिकांना व त्यांच्या साहित्याला तुच्छ लेखतात.परंतु कै.म.वा.धोंड(जे नुकतेच वयाच्या ९३व्या वर्षी वारले)याला अपवाद होते.ते लेखकाच्या कलाकृतीला आपल्या समीक्षेपेक्षा मोठे समजत.आपली समीक्षा परिपूर्ण नाही ह्याचे भान ठेवतांना त्यांनी आपल्या समीक्षा पुस्तकाला नाव ठेवले "जाळ्यातील चंद्र". या नावाचे स्पष्टीकरण देतांना त्यांनी ज्ञानेश्वरीतील पुढील ओवी दिली आहे. "जे जालं जली पांगिले|तेथ प्रतिबिंब दिसे कीरू आतुडले| मग थडिये काढूनि झाडिले|तेव्हलि बिंब के सांघै ||" (अर्थात,कोणतेही व्यक्तिमत्त्व किंवा काव्य स्वतःच्या शब्दात पकडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे समुद्रात जाळे पांगून त्यात आकाशातील चंद्राचे प्रतिबिंब पकडण्याचा प्रयास करणे.जाळे पांगलेले असेपर्यंत त्यात प्रतिबिंब अडकल्याचा भास होतो.परंतु किना~यावर आणून ते झटकले की त्यातून ते निसटल्याचे आढळून येते.

In reply to by प्रा सुरेश खेडकर

चतुरंग 20/03/2008 - 02:48
बर्‍याचवेळा आढळणारी समीक्षेतली अकलेची दिवाळखोरी अत्यंत समर्पक शब्दात तुम्ही दाखवून दिलीत त्याबद्दल तुमचे आभार. कै.म.वा.धोंड ह्यांच्याबद्दलही नवीन माहिती मिळाली. 'जाळ्यातला चंद्र' नावामागचा दृष्टांत केवढा मौलिक आहे, म्हणूनच ते ज्ञानेश्वर होते! चतुरंग

सुधीरजी व चतुरंगजी , तसेच इतरांचेहि आभार. खुलासा : मी नागपूरच्या एका कॉलेजात इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग शिकवितो, म्हणजेच मी मराठीच काय कोणत्याहि भाषेचा प्राध्यापक नाही. म्हटलं पितळ(की तांबं?) उघडं पडायच्या आधीच सांगून टाकालेलं बरं. नाही कां?
आमची प्रेरणा.. सुरेश भटांची गझल देखावे बघण्याचे वय निघून गेले आमची शिफारस..