मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छायाचित्रण भाग ११. उद्भासन मापन आणि मीटरींग

एस ·

चौकटराजा Mon, 07/14/2014 - 06:21
एखादा माणूस एखाद्या विषयाच्या पाठीमागे किती प्रामाणिकपणे लागतो. याचा उत्तम नमुना म्हणजे हा लेख.यातील शिल्होटीचे व एक्पोझर कॉम्पेन्सेशन्चे उदा. अगदी खास म्हणावे लागेल. शेवटी तंत्र काहीही म्हणत असले तरी छायाचित्रकाराला काय प्रामुख्याने दाखवायचे आहे हे महत्वाचे. मानवी डोळ्याची टोन वाचनाची क्षमता मग कृष्णधवल व मग रंगीत फिल्म व मग डिजिटल हे बरेच काही सांगून जाते. उदा. पारदर्शक वा अर्धपारदर्शक वस्तू मधून पलिकडील वस्तूचे ज्ञान मानवी डोळ्याला जितके अचूक होते तितके भारी कॅमेर्याला देखील होत नाही असे दिसून येते. अचूक फोकसिंग नंतर अचूक प्रकाश हा दुसर्‍या क्रमांकाचा महत्वाचा घटक आहे. कारण त्याने रंग ,कॉन्ट्रास्ट सारच घडत व बिघडत जात असते. पण मीटरिंग हा एक दुर्लक्षित भाग रहातो.यातील वादळाच्या मोनोक्रोम पार्शवभूमीवर रंगीत कपडे घातलेल्या बायका हे केंद्रित प्रकाशमापनाचे किती अचूक उदाहरण ठरावे. स्वॅप भाउ धन्यवाद. निदान यातून काही जणांचे मीटरिंग व एक्पोझर स्टॉपस या फिचरवर लक्ष गेले तरी खूप.

In reply to by चौकटराजा

एस Mon, 07/14/2014 - 11:00
तुम्ही किती बारकाईने लेख वाचलाय हे प्रतिसादावरून कळतंय.
निदान यातून काही जणांचे मीटरिंग व एक्पोझर स्टॉपस या फिचरवर लक्ष गेले तरी खूप.
बरोबर. छायाचित्रणाचा हा भाग पुष्कळशा छायाचित्रकारांकडून दुर्लक्षिला जातो. नवोदितांना तर यातील तांत्रिकतेने हा विषय फारच बोजड व नीरस वाटतो.

मोहन Mon, 07/14/2014 - 10:30
अप्रतीम लेखमाले बद्दल धन्यवाद !

In reply to by स्पा

चौकटराजा Mon, 07/14/2014 - 12:52
http://digital-photography-school.com/metering-modes-explained/ या लिंकवर एकच फोटो जनरल ग्रीड रिडिंग, सेंट्रल ग्रीड रीडिंग प्लस ग्रीड अराउंड सेंटर व फक्त सेट्रल ग्रीड या तिन्ही पद्धतीनी फोटो कसा येतो ते दाखविले आहे. आपण ज्यावेळी रिम लाईट असलेले मिडशॉट किंवा क्लोज अप्स काढतो त्यावेळी त्या कट लाईटसनी चित्रात गोडवा तसेच त्रिमिती निर्माण होते. ( जी फ्लॅश असला की मार खाते) अशावेळी मागील जास्त लाईटमुळे ओठ डोळे गाल ई मात्र अंधारलेले येतात. ते येऊ नयेत म्हणून बॅक लाईटला मीटरिंग मधून वगळावे लागते . अशा वेळी फोटूतील सर्व मॅट्रिक्समधील प्रकाशाचा विचार करून चालतच नाही. अशा वेळी या इतर दोन मीटरिंग मोडचा फार उपयोग होतो.

In reply to by स्पा

एस Mon, 07/14/2014 - 23:34
खालील उदाहरणे पहा.
उदाहरण १.
SpotMeteringInPortrait या प्रतिमेत मी एका लहान मुलीला कॅमेर्‍यात कैद करण्याचा प्रयत्न करत होतो. ती खेळण्यात मग्न होती आणि फोटोसाठी न हलता पोज देण्याच्या मूडमध्ये नव्हती. सर्व प्रकाश कॅमेर्‍याच्या दिशेने समोरून येत होता आणि अशा परिस्थितीत मॅट्रिक्स किंवा सेन्टरवेटेड अ‍ॅवरेज मीटरींगने पार्श्वभूमीही लक्षात घेऊन उद्भासन काढले असते. प्रतिमा स्पष्ट यावी म्हणून फास्ट शटर इन्टर्वल वापरायचा होता. लेन्सचे कमाल अ‍ॅपर्चर हे f/5.6 इतकेच होते. म्हणजेच मला कमी आयएसओ वाढवणे हाच पर्याय होता. तरीही नॉइज टाळण्यासाठी मी आयएसओ ४०० पर्यंतच वाढवायचा निर्णय घेतला. शटर प्रायोरिटी मोडमध्ये शटर इन्टर्वल हळूहळू वाढवत नेत (म्हणजे 1/100, 1/50, 1/40 असे स्लो करत) नेले व स्पॉट मीटरींग वापरून तिच्या चेहर्‍यावर व बाजूच्या सारख्याच टोनॅलिटीच्या वस्तूंवर स्पॉट मीटरींग करून पाहिले. तरीही कॅमेरा तिचा चेहरा उद्भासित करायला खूपच दीर्घ शटर इन्टर्वल घेत होता. तेवढ्या वेळात ती हमखास हलली असती. म्हणून मग ऋणात्मक एक्स्पोजर कॉम्पेन्सेशन वापरून कॅमेर्‍याला गडद उद्भासनाची प्रतिमा घ्यायला लावली. नंतर प्रतिमासंस्करणात मग चेहरा व्यवस्थित एक्स्पोज होईल इतपत प्रखरता वाढवली. या सर्व प्रकारात एक हाय-की पोर्ट्रेट प्रतिमा मला मिळाली.

उदाहरण २.
MatrixMeteringInPortrait
इथे गडद, प्रखर व मध्यम टोनच्या घटकांचा प्रतिमाचौकटीत योग्य समावेश होता. तरीही तिच्या चेहर्‍यावरील टोनल डिटेल्स व्यवस्थित यावेत यासाठी -2/3 EV इतके उद्भासन समायोजन कमी केले व मॅट्रिक्स मीटरींग ठेवले. आधी f/1.8 पासून सुरुवात करून शेवटी सर्व चेहरा नीट फोकसमध्ये यावा यासाठी f/5.6 इतकी लेन्स स्टॉप-डाउन केली. अ‍ॅपर्चर प्रायोरिटीमध्ये मग अंतिम प्रतिमा घेतली. उद्भासन समायोजन किंचित ऋण ठेवले नसते तर चेहर्‍याची टोनॅलिटी जपण्याऐवजी कॅमेर्‍याने तिच्या कपड्यांची व बनीची टोनॅलिटी उद्भासित केली असती व चेहरा थोडा ओवरएक्स्पोज झाला असता. किंचित अंडरएक्स्पोज प्रतिमेतील शॅडो डिटेल्स मिळवणे त्यामानाने सोपे असते पण ब्लोआउट झालेल्या ओवरएक्स्पोज प्रतिमेतील हायलाइट्स पुन्हा आणणे कठीण असते.

एस Mon, 07/14/2014 - 23:42
इषय आवघाड हाय म्हूनशान लोकास्नी परतिसाद द्याया टंकाळा येवू न्हाई यापरीस दरेक लेखाखालती आमी येकेक लय इनोदी ज्योक लालटुचुक आकशरात दर टायमाला टाकीत र्‍हायतो त्ये कोनी वाचायलंय का नाय कं बुवा? च्यामारी... *new_russian*

अतिशय उत्तम लेखमाला आहे ही. अगदी सविस्तर आणि सोदाहरण, शक्य तेवढे सोप्या शब्दात. मला यातले फारसे (खरंतर काहीच) कळत नाही. पण माझा नवरा हे लेख आवर्जून वाचतो. शक्य तिथे यातल्या माहितीचा उपयोग देखील करतो. त्याच्यातर्फे लेखमालेसाठी अनेक धन्यवाद. :)

In reply to by मधुरा देशपांडे

एस Tue, 07/15/2014 - 00:02
धन्यवाद मधुराताई. त्यांनाही मिपाचे सदस्यत्व घ्यायचे निमंत्रण द्या तसेच तुम्ही लोकांनी काढलेले फोटोही कलादालनात टाका. मिपाकरांना पहायला आवडतील.

हा भाग तांत्रिक फार झाला आहे याच्याशी सहमत. पण या तंत्राच्या जोडीला, विषयानुरूप मुद्दाम कमी किंवा (भगभगीत, कोरडेपणा दाखवण्यासाठी) जास्त एक्सपोज केलेले फोटो, एचडीआर यांच्याबद्दलही माहिती वाचायला आणि उदाहरणं पहायला आवडेल. (कदाचित त्यामुळे लेखनातला कोरडेपणा कमी होईल.)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

एस Tue, 07/15/2014 - 08:24
तशी उदाहरणे व आकृत्या देणे आवश्यक होते. शिवाय साध्या पॉइन्ट-अ‍ॅण्ड-शूट वर पण कसे वापरायचे हेही सांगायचे होते. पण एवढा लेख लिहितालिहिताच मी कंटाळलो. आणि लेखात सगळं घुसडण्याऐवजी प्रतिसादातून सांगूया म्हणून टाळले. टप्प्याटप्प्याने टाकत राहतो.

प्रचेतस Tue, 07/15/2014 - 12:11
धन्यवाद ह्या भागाबद्दल. स्पा आणि चौराकाका ह्यांच्या प्रतिसाद/उपप्रतिसादांवरूनही बरीच नवी माहिती कळाली. हा लेख सोबत ठेवूनच कॅमेरा हाती घेऊन प्रयोग करावे लागतील तेव्हा मीटरींग अजून थोडे जास्त समजेल असे वाटते. हा लेख बराच तांत्रिक असल्याने दोन तीनदा वाचावा लागला पण अतिशय सखोल आणि अचूकतेने परीपूर्ण आहे. परत एकदा लेख वाचून शंका विचारेनच. अंधार्‍या भागातील (विशेषतः लेण्यांच्या) छायाचित्रणाचा विचार केल्याबद्दल विशेष धन्यवाद. ग्रे कार्ड कसे वापरावे ते समजले नाही. ते लेन्सच्या पुढ्यात अडकवायचे(फिल्टर सारखे) किंवा कसे?

In reply to by प्रचेतस

एस गुरुवार, 07/17/2014 - 00:19
खूपखूप धन्यवाद वल्ली!
ग्रे कार्ड कसे वापरावे ते समजले नाही. ते लेन्सच्या पुढ्यात अडकवायचे(फिल्टर सारखे) किंवा कसे?
उदाहरणासाठी खालील प्रतिमा पहा. GrayCardUseInMetering वरील प्रतिमेची उद्भासन मूल्यसंगती अशी आहे. अ‍ॅपर्चर: f/8 शटर इन्टर्वल: 1/500s आयएसओ: ISO 100 मीटरींग: Spot उद्भासन समायोजन: -2/3EV      ग्रे कार्ड हे लेन्सला अडकवायचे नसते. ग्रे कार्ड एका क्षणासाठी विसरून जा. समोर फक्त तुमची विषयवस्तू आहे असे समजा. प्रकाश तुम्हांला हवा त्यापेक्षा कमी किंवा जास्त आहे. त्यामुळे कॅमेरा मीटर चुकीचे उद्भासन सुचवणार याची खात्री आहे. म्हणून तुम्ही स्पॉट मीटरींग वापरायचा निर्णय घेतला आहे. पण समोरच्या दृश्यातील कोणत्या घटकावर मीटरींग करावे हे समजत नाहीये कारण आपली दृष्टी कृष्णधवल प्रकारात पाहू शकत नाही. समोरचे सगळेच रंगीत दिसत असल्याने त्यातला कोणता भाग मध्यम टोनॅलिटीच्या आसपास जाणारा असेल हे नक्की समजत नाहीये. उदा. वरील प्रतिमेत जी छोटी पाने एकदम अंधारलेल्या पार्श्वभूमीवर प्रकाशझोतात आल्यासारखी वाटताहेत तसे ते दृश्य प्रत्यक्षात नव्हते. प्रकाश खूप जास्त होता आणि आजूबाजूचे गवत, झुडुपे, खळग्याच्या पार्श्वभूमीमधील डिटेल्स हे सर्व नजरेला सहज जाणवत होते. पण मला फक्त ती सोनेरी पिवळी पानेच प्रतिमेत घ्यायची होती तेही कोणतेही पोस्टप्रोसेसिंग मॅजिक न करता. म्हणजेच मला खालील पर्याय उपलब्ध होते - अ‍ॅपर्चर - हे इतके जास्त ठेवायचे होते की पार्श्वभूमी धूसर येईल (बोके इफेक्ट) पण संपूर्ण पाने फोकस होतील इतके लहानही. म्हणून मी f/8 निवडले. आयएसओ - कमीतकमी प्रकाश संवेदकावर टिपला जावा यासाठी आयएसओ किमान पातळीवर ठेवणे आवश्यक होते, म्हणून ISO 100. शटर इन्टर्वल - हे इतके फास्ट हवे होते की कमी प्रकाशातील पार्श्वभूमी संपूर्ण गडद यावी आणि फक्त ही पानेच टिपली जावीत. शिवाय वार्‍याने पाने सारखी हलतही होती.      ह्या शटर इन्टर्वलचे मूल्य ठरवण्यासाठी मला ट्रायल-अ‍ॅण्ड-एरर मध्ये वेळ घालवायचा नव्हता म्हणून मी फक्त पानांवर उद्भासन मापन करायचे ठरवले. पण पाने तर जास्त प्रकाशित होती. त्यामुळे मध्यम टोनॅलिटीची एकही वस्तू प्रतिमेच्या चौकटीत नव्हती. मग मीटरींग करणार कसे?      इथे मग तुमच्या मदतीला येते 'ग्रे कार्ड'. मी प्रकाशाची दिशा कोणती आहे ते पाहिले. सूर्य जवळजवळ माथ्यावर होता. (आकृती पहा.) मग मी ग्रे कार्ड पानांसारखेच कॅमेर्‍याच्या दिशेने करडा पृष्ठभाग येईल असे, पण सूर्याच्या दिशेने किंचित तिरपे असे कॅमेर्‍यासमोर धरले जेणेकरून कॅमेरा त्या ग्रे कार्डवरून परावर्तित होणार्‍या प्रकाशावरून स्पॉट मीटरींग मोडमध्ये उद्भासनमापनाची आकडेमोड करू शकेल.
     ग्रे कार्ड वापरण्याच्या बर्‍याच पद्धती आहेत. त्यातल्या त्यात सोपी पद्धत खाली देत आहे. १. ग्रे कार्ड तुमच्या विषयवस्तूवर जो प्रकाश पडत आहे त्याच प्रकाशात असायला हवे. कॅमेरा स्पॉट किंवा पार्शल मीटरींग मोडमध्ये ठेवा. A Priority किंवा S Priority मोड जो हवा तो निवडून ठेवा. २. विषयवस्तूवर लेन्स संकेंद्रीत करा व फोकस लॉक करून ठेवा. ३. ग्रे कार्ड विषयवस्तू जवळ असेल तर विषयवस्तूच्याच प्रतलात शेजारी तुमच्या सहाय्यकाला धरायला सांगा. किंवा स्वतः हातानेच कॅमेर्‍याच्या समोर थोडे लांब धरा. ४. ग्रे कार्डची दिशा - कॅमेर्‍याकडे असायला हवी. प्रकाश खूपच बाजूने येत असेल व तुम्हांला विषयवस्तूची प्रकाशाकडील बाजूच उद्भासित करायची असेल तर ग्रे कार्डही त्याच कोनात धरा. समजा सावलीतली बाजू उद्भासित करायची असेल तर ग्रे कार्ड प्रकाशाच्या दिशेला त्याप्रमाणात तिरपे येईल असे धरा. उदा. बॅकलिट पोर्ट्रेटमध्ये प्रकाश विषयवस्तूच्या मागून आणि कॅमेर्‍याच्या थेट समोरून येतो. तेव्हा ग्रे कार्डही विषयवस्तूप्रमाणेच प्रकाशाच्या उलट धरले पाहिजे. ५. चित्रचौकटीत ग्रे कार्ड योग्य पद्धतीने आले की कॅमेर्‍याचा मीटर काय वाचन दर्शवतोय ते पहा व मॅन्युअल मोडमध्ये जाऊन शटर इन्टर्वल/अ‍ॅपर्चर तसे सेट करा. ६. ग्रे कार्ड बाजूला करा व छायाचित्र घ्या. ग्रे कार्डवर फोकस करू नका. स्पॉट मीटरींग वापरत असाल तर ग्रे कार्ड व्ह्यूफाइंडरच्या मधोमध आले पाहिजे. नाहीतर कॅमेरा चित्रचौकटीत ग्रे कार्ड असूनही भलतीकडेच मीटरींग करत बसेल. हे टाळण्यासाठी आधी ग्रे कार्डवर मीटरींग करून घ्या व मग कॉम्पोझिशन किंचित बदलून छायाचित्र घ्या.      हे सगळं वाचताना अवघड वाटेल, पण एकदा सराव झाला की अजिबात न चुकता तुम्ही मीटरींग स्वतःचे स्वतःच करू लागाल.

सखोल महितीने भरलेली मालिका ! माझ्यासारख्या "दिसलेले काही डोळ्यांना आवडले की जमेल तसे कॅमेर्‍याने टिपावे" या तत्वावर चालणार्‍या माझ्यासारख्याला हे जरा भारी पडले तर आश्चर्य काय ! पण परत परत वाचले तर थोsssडेसे डोस्क्यात जाईल अशी आशा आहे ! तुमच्या व्यासंगासाठी __/\__

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस गुरुवार, 07/17/2014 - 00:32
आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून आभार. तुमच्याच वाक्यात या कलेचेही सौंदर्य सामावलेले आहे. कुठलेही छायाचित्र आधी छायाचित्रकाराच्या मनात तयार होते. ते कॅमेर्‍यात टिपणे हा तांत्रिक कौशल्याचा भाग झाला. आधी दृष्टीला दिसले तर पाहिजे. हाच नियम सर्वच कलांना लागू आहे. या मालिकेचा उद्देश केवळ तांत्रिक माहितीचा भडिमार करून वाचकांना प्रभावित करणे हा नसून आधी छायाचित्रकाराची दृष्टी विकसित करणे व तिला तांत्रिकतेची जोड देऊन मूर्त स्वरूप देणे या दोन्ही बाबी ठसवणे हा आहे. यात आपल्यासारख्या दर्दी वाचकांचे प्रतिसाद माझा उत्साह वाढवत असतात. पुनरेकवार आभार. *smile*

अकिलिज Wed, 07/16/2014 - 19:49
__/\__ अक्षरशः कोपरापासून नमस्कार. आजवर हे सगळं ईंग्रजीतून वाचताना टाळक्यात घुसतच नव्हतं. मराठीतून वाचताना परत एकदा गोडी निर्माण झाली. खासकरून एखादा विषय हळूह्ळू पचनी पडेल अशा भाषेत लिहीणं यासाठी मनापासून धन्यवाद. अप्रत्यक्षपणे बर्याच जणांच्या मनातले प्रश्न सोडवले गेले आहेत. माझ्या सर्व छायाचित्रकार मित्रांनी दरवेळी लिंका ढकल्यावर आपले आभार मानण्यास सांगितले आहेत.

In reply to by अकिलिज

एस गुरुवार, 07/17/2014 - 00:38
ह्या विषयावर इंग्रजीत अक्षरशः ढिगाने माहिती उपलब्ध असली तरी मराठीत तेही ऑनलाइन असे लेखन फारच कमी झाले आहे. छायाचित्रणाच्या क्षेत्रातील पारिभाषिक संज्ञा मूळ इंग्रजीतून वाचणे बर्‍याचजणांना सहज जमतेही. पण तेच मराठीत आणताना अतिरूक्षता व अगम्यता टाळून फक्त मराठी तोंडावळा मात्र जपणे हा उद्देश ठेवायचा प्रयत्न केला आहे. थोडे अवजड वाटतेही. पण ह्या गोष्टी मराठीत पुनःपुन्हा लिहिल्या-वाचल्या-बोलल्यामुळे व्यवहारातही जरूर रुळतील असा आशावाद आहे. तुमच्या मित्रांना या लेखमालेची मदत होतेय हे वाचून छान वाटले. त्यांनाही माझे धन्यवाद जरूर कळवा. तसेच काही प्रश्न वा शंका असतील तर तुमच्यामार्फत विचारले तरी चालतील. धन्यवाद.

आतिवास गुरुवार, 07/17/2014 - 10:17
फोटो तर बरेच काढते मी - पण हौस म्हणून. इतका विचार कधी केला नाही. इतका विचार मी करत बसले तर फोटो काढायचे राहून जाईल असे वाटते! अर्थात त्यामुळे बिघडणार काहीच नाही म्हणा ;-)

In reply to by आतिवास

चौकटराजा गुरुवार, 07/17/2014 - 10:30
जाता जाता शास्त्रीय संगीत ऐकणे व ते समजून उमजून ऐकणे यात रसास्वास्दात नक्की फरक पडतो असा अनुभव आहे. तसेच चित्र माध्यमाचे ही असते. विचारपूर्वक फोटो काढणे यात पक्षी. प्राणी, लाटा , लहान मुले याना स्थान कमीच. तरीही तंत्र समजून घेतल्याने फूटबॉल खेळणारे , नर्तकी पंख पसरून अस्मानात संचार करणारे पक्षी यांचे प्रत्ययकारी फोटो काढता येतात. अगदी डिस्टोर्शन ,कलर अब्रेझन ई सखोल बाजू समजून घेतल्या नाहीत तरी फोकसिंग. कम्पोसिशन व प्रकाश या तीन महत्वाच्या बाजू देखील फोटोला एक दर्जा देऊन जातात.

In reply to by चौकटराजा

आतिवास गुरुवार, 07/17/2014 - 10:40
सहमत आहे. तांत्रिक बाबी शिकायची इच्छा जरूर आहे; त्यामुळे फोटोंचा दर्जा सुधारेल. आणि मुख्य म्हणजे एखादी गोष्ट समजून उमजून करण्यात जास्त आनंद असतो. त्या दृष्टीने ही लेखमाला अत्यंत उपयोगी आहे, वाचते आहे. माझा प्रतिसाद वाचणा-याच्या मनात लेखमालिकेविषयी माझे मत चांगले नाही असा (गैर)समज निर्माण करेल हे ध्यानात आले नव्हते; त्याबद्दल माफ करा.

In reply to by आतिवास

एस गुरुवार, 07/17/2014 - 12:06
कुठेही गेलो की एकतर आपल्या हातात खूप कमी वेळ असतो. त्यामुळे केवळ आठवणी जपून ठेवाव्यात यासाठी आपण पटकन फोटो काढून घ्यायला प्राधान्य देतो. फोटो बरे आले की तेवढं पुरेसं असतं. पण त्यातही छायाचित्रणाचे तांत्रिक ज्ञान असेल तर तुम्ही चांगल्या दर्जाचे फोटो अधिक वेगाने काढू शकाल. पर्यायाने तुमचा स्मृतिठेवा अधिक सुंदर होईल. दुसरे असे की, भेट द्यायचा उद्देशच जर छायाचित्रण हा असेल तर मग तेवढा निवांतपणा हातात राखून ठेवायलाच लागतो. अशा वेळी थोड्या वेळात जास्तीतजास्त फोटो काढण्यापेक्षा तेवढ्याच वेळात कमी परंतु उच्च अभिरूचिमूल्याचे फोटो काढता येतील. माझा अनुभव असा आहे की एकदा या सगळ्या तांत्रिक गोष्टींचा सराव झाला की चांगले फोटोही खूप कमी वेळात घेता येतात. याचे उदाहरण म्हणजे डेप्थ ऑफ् फिल्ड. किती अ‍ॅपर्चर ठेवले की हवी तशी DoF मिळेल याचा ठोकताळा असणे, हातात कॅमेरा धरून फोटो काढणार असाल तर प्रतिमा शार्प येण्यासाठी किमान किती शटर इन्टर्वल वापरायचे, कॅमेरा नक्की कुठे फोकस करत आहे व त्याच्या अंगभूत मर्यादा सांभाळूनही त्याच्याकडून चांगले फोटो कसे काढवून घ्यायचे याचा सराव होत राहतो व नंतर तुम्हांला ऑटो मोड वापरायची गरज जवळजवळ कधीच भासत नाही. कुणी असे म्हणेल की आजकाल डिजिटल कॅमेर्‍यांमुळे कितीही फोटो काढता येतात व ते कसे आले आहेत ते लगेच दिसतेही. त्यानुसार समायोजन करायचे व परत फोटो काढायचा. पण कॅमेर्‍याचा एलसीडी स्क्रीन ही कॅमेर्‍यातली सर्वात बेभरवशाची गोष्ट आहे. एलसीडीवर फोटो तेव्हा चांगला दिसत असला तरी नंतर मॉनिटरवर १००% झूम करून पाहिल्यावर कळते की काहीतरी राहून गेलं. :-) कॅमेर्‍याचा मेंदू माणसातल्या कलाकाराच्या क्षमतेपेक्षा मोठा असूच शकत नाही एवढं लक्षात ठेवलं तरी पुरे.

In reply to by स्पा

एस गुरुवार, 07/17/2014 - 18:55
मला पहिला फोटो आवडला. त्यातली उत्स्फूर्तता छान टिपलीय. हॉरिझॉन्टल फ्रेमिंगही छान वाटले. दोन्ही प्रतिमांमध्ये डायनॅमिक रेंज (रंगभेदन क्षमता) जर फिल्म असती तर अजून छान आली असती असे वाटले. तुम्ही sRGB ऐवजी Adobe RGB कलरस्पेस वापरून पहा.

मदनबाण Fri, 07/18/2014 - 06:51
वाह... काही गोष्टी नव्याने समजल्या ! :) नेहमी प्रमाणेच वाचनखूण साठवुन ठेवली आहे. आणि हो... ते लाल रंगातल आम्ही वाचतो बरं का. ;) आजची स्वाक्षरी :- Malaysia jet crashes in east Ukraine conflict zone

चौकटराजा Mon, 07/14/2014 - 06:21
एखादा माणूस एखाद्या विषयाच्या पाठीमागे किती प्रामाणिकपणे लागतो. याचा उत्तम नमुना म्हणजे हा लेख.यातील शिल्होटीचे व एक्पोझर कॉम्पेन्सेशन्चे उदा. अगदी खास म्हणावे लागेल. शेवटी तंत्र काहीही म्हणत असले तरी छायाचित्रकाराला काय प्रामुख्याने दाखवायचे आहे हे महत्वाचे. मानवी डोळ्याची टोन वाचनाची क्षमता मग कृष्णधवल व मग रंगीत फिल्म व मग डिजिटल हे बरेच काही सांगून जाते. उदा. पारदर्शक वा अर्धपारदर्शक वस्तू मधून पलिकडील वस्तूचे ज्ञान मानवी डोळ्याला जितके अचूक होते तितके भारी कॅमेर्याला देखील होत नाही असे दिसून येते. अचूक फोकसिंग नंतर अचूक प्रकाश हा दुसर्‍या क्रमांकाचा महत्वाचा घटक आहे. कारण त्याने रंग ,कॉन्ट्रास्ट सारच घडत व बिघडत जात असते. पण मीटरिंग हा एक दुर्लक्षित भाग रहातो.यातील वादळाच्या मोनोक्रोम पार्शवभूमीवर रंगीत कपडे घातलेल्या बायका हे केंद्रित प्रकाशमापनाचे किती अचूक उदाहरण ठरावे. स्वॅप भाउ धन्यवाद. निदान यातून काही जणांचे मीटरिंग व एक्पोझर स्टॉपस या फिचरवर लक्ष गेले तरी खूप.

In reply to by चौकटराजा

एस Mon, 07/14/2014 - 11:00
तुम्ही किती बारकाईने लेख वाचलाय हे प्रतिसादावरून कळतंय.
निदान यातून काही जणांचे मीटरिंग व एक्पोझर स्टॉपस या फिचरवर लक्ष गेले तरी खूप.
बरोबर. छायाचित्रणाचा हा भाग पुष्कळशा छायाचित्रकारांकडून दुर्लक्षिला जातो. नवोदितांना तर यातील तांत्रिकतेने हा विषय फारच बोजड व नीरस वाटतो.

मोहन Mon, 07/14/2014 - 10:30
अप्रतीम लेखमाले बद्दल धन्यवाद !

In reply to by स्पा

चौकटराजा Mon, 07/14/2014 - 12:52
http://digital-photography-school.com/metering-modes-explained/ या लिंकवर एकच फोटो जनरल ग्रीड रिडिंग, सेंट्रल ग्रीड रीडिंग प्लस ग्रीड अराउंड सेंटर व फक्त सेट्रल ग्रीड या तिन्ही पद्धतीनी फोटो कसा येतो ते दाखविले आहे. आपण ज्यावेळी रिम लाईट असलेले मिडशॉट किंवा क्लोज अप्स काढतो त्यावेळी त्या कट लाईटसनी चित्रात गोडवा तसेच त्रिमिती निर्माण होते. ( जी फ्लॅश असला की मार खाते) अशावेळी मागील जास्त लाईटमुळे ओठ डोळे गाल ई मात्र अंधारलेले येतात. ते येऊ नयेत म्हणून बॅक लाईटला मीटरिंग मधून वगळावे लागते . अशा वेळी फोटूतील सर्व मॅट्रिक्समधील प्रकाशाचा विचार करून चालतच नाही. अशा वेळी या इतर दोन मीटरिंग मोडचा फार उपयोग होतो.

In reply to by स्पा

एस Mon, 07/14/2014 - 23:34
खालील उदाहरणे पहा.
उदाहरण १.
SpotMeteringInPortrait या प्रतिमेत मी एका लहान मुलीला कॅमेर्‍यात कैद करण्याचा प्रयत्न करत होतो. ती खेळण्यात मग्न होती आणि फोटोसाठी न हलता पोज देण्याच्या मूडमध्ये नव्हती. सर्व प्रकाश कॅमेर्‍याच्या दिशेने समोरून येत होता आणि अशा परिस्थितीत मॅट्रिक्स किंवा सेन्टरवेटेड अ‍ॅवरेज मीटरींगने पार्श्वभूमीही लक्षात घेऊन उद्भासन काढले असते. प्रतिमा स्पष्ट यावी म्हणून फास्ट शटर इन्टर्वल वापरायचा होता. लेन्सचे कमाल अ‍ॅपर्चर हे f/5.6 इतकेच होते. म्हणजेच मला कमी आयएसओ वाढवणे हाच पर्याय होता. तरीही नॉइज टाळण्यासाठी मी आयएसओ ४०० पर्यंतच वाढवायचा निर्णय घेतला. शटर प्रायोरिटी मोडमध्ये शटर इन्टर्वल हळूहळू वाढवत नेत (म्हणजे 1/100, 1/50, 1/40 असे स्लो करत) नेले व स्पॉट मीटरींग वापरून तिच्या चेहर्‍यावर व बाजूच्या सारख्याच टोनॅलिटीच्या वस्तूंवर स्पॉट मीटरींग करून पाहिले. तरीही कॅमेरा तिचा चेहरा उद्भासित करायला खूपच दीर्घ शटर इन्टर्वल घेत होता. तेवढ्या वेळात ती हमखास हलली असती. म्हणून मग ऋणात्मक एक्स्पोजर कॉम्पेन्सेशन वापरून कॅमेर्‍याला गडद उद्भासनाची प्रतिमा घ्यायला लावली. नंतर प्रतिमासंस्करणात मग चेहरा व्यवस्थित एक्स्पोज होईल इतपत प्रखरता वाढवली. या सर्व प्रकारात एक हाय-की पोर्ट्रेट प्रतिमा मला मिळाली.

उदाहरण २.
MatrixMeteringInPortrait
इथे गडद, प्रखर व मध्यम टोनच्या घटकांचा प्रतिमाचौकटीत योग्य समावेश होता. तरीही तिच्या चेहर्‍यावरील टोनल डिटेल्स व्यवस्थित यावेत यासाठी -2/3 EV इतके उद्भासन समायोजन कमी केले व मॅट्रिक्स मीटरींग ठेवले. आधी f/1.8 पासून सुरुवात करून शेवटी सर्व चेहरा नीट फोकसमध्ये यावा यासाठी f/5.6 इतकी लेन्स स्टॉप-डाउन केली. अ‍ॅपर्चर प्रायोरिटीमध्ये मग अंतिम प्रतिमा घेतली. उद्भासन समायोजन किंचित ऋण ठेवले नसते तर चेहर्‍याची टोनॅलिटी जपण्याऐवजी कॅमेर्‍याने तिच्या कपड्यांची व बनीची टोनॅलिटी उद्भासित केली असती व चेहरा थोडा ओवरएक्स्पोज झाला असता. किंचित अंडरएक्स्पोज प्रतिमेतील शॅडो डिटेल्स मिळवणे त्यामानाने सोपे असते पण ब्लोआउट झालेल्या ओवरएक्स्पोज प्रतिमेतील हायलाइट्स पुन्हा आणणे कठीण असते.

एस Mon, 07/14/2014 - 23:42
इषय आवघाड हाय म्हूनशान लोकास्नी परतिसाद द्याया टंकाळा येवू न्हाई यापरीस दरेक लेखाखालती आमी येकेक लय इनोदी ज्योक लालटुचुक आकशरात दर टायमाला टाकीत र्‍हायतो त्ये कोनी वाचायलंय का नाय कं बुवा? च्यामारी... *new_russian*

अतिशय उत्तम लेखमाला आहे ही. अगदी सविस्तर आणि सोदाहरण, शक्य तेवढे सोप्या शब्दात. मला यातले फारसे (खरंतर काहीच) कळत नाही. पण माझा नवरा हे लेख आवर्जून वाचतो. शक्य तिथे यातल्या माहितीचा उपयोग देखील करतो. त्याच्यातर्फे लेखमालेसाठी अनेक धन्यवाद. :)

In reply to by मधुरा देशपांडे

एस Tue, 07/15/2014 - 00:02
धन्यवाद मधुराताई. त्यांनाही मिपाचे सदस्यत्व घ्यायचे निमंत्रण द्या तसेच तुम्ही लोकांनी काढलेले फोटोही कलादालनात टाका. मिपाकरांना पहायला आवडतील.

हा भाग तांत्रिक फार झाला आहे याच्याशी सहमत. पण या तंत्राच्या जोडीला, विषयानुरूप मुद्दाम कमी किंवा (भगभगीत, कोरडेपणा दाखवण्यासाठी) जास्त एक्सपोज केलेले फोटो, एचडीआर यांच्याबद्दलही माहिती वाचायला आणि उदाहरणं पहायला आवडेल. (कदाचित त्यामुळे लेखनातला कोरडेपणा कमी होईल.)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

एस Tue, 07/15/2014 - 08:24
तशी उदाहरणे व आकृत्या देणे आवश्यक होते. शिवाय साध्या पॉइन्ट-अ‍ॅण्ड-शूट वर पण कसे वापरायचे हेही सांगायचे होते. पण एवढा लेख लिहितालिहिताच मी कंटाळलो. आणि लेखात सगळं घुसडण्याऐवजी प्रतिसादातून सांगूया म्हणून टाळले. टप्प्याटप्प्याने टाकत राहतो.

प्रचेतस Tue, 07/15/2014 - 12:11
धन्यवाद ह्या भागाबद्दल. स्पा आणि चौराकाका ह्यांच्या प्रतिसाद/उपप्रतिसादांवरूनही बरीच नवी माहिती कळाली. हा लेख सोबत ठेवूनच कॅमेरा हाती घेऊन प्रयोग करावे लागतील तेव्हा मीटरींग अजून थोडे जास्त समजेल असे वाटते. हा लेख बराच तांत्रिक असल्याने दोन तीनदा वाचावा लागला पण अतिशय सखोल आणि अचूकतेने परीपूर्ण आहे. परत एकदा लेख वाचून शंका विचारेनच. अंधार्‍या भागातील (विशेषतः लेण्यांच्या) छायाचित्रणाचा विचार केल्याबद्दल विशेष धन्यवाद. ग्रे कार्ड कसे वापरावे ते समजले नाही. ते लेन्सच्या पुढ्यात अडकवायचे(फिल्टर सारखे) किंवा कसे?

In reply to by प्रचेतस

एस गुरुवार, 07/17/2014 - 00:19
खूपखूप धन्यवाद वल्ली!
ग्रे कार्ड कसे वापरावे ते समजले नाही. ते लेन्सच्या पुढ्यात अडकवायचे(फिल्टर सारखे) किंवा कसे?
उदाहरणासाठी खालील प्रतिमा पहा. GrayCardUseInMetering वरील प्रतिमेची उद्भासन मूल्यसंगती अशी आहे. अ‍ॅपर्चर: f/8 शटर इन्टर्वल: 1/500s आयएसओ: ISO 100 मीटरींग: Spot उद्भासन समायोजन: -2/3EV      ग्रे कार्ड हे लेन्सला अडकवायचे नसते. ग्रे कार्ड एका क्षणासाठी विसरून जा. समोर फक्त तुमची विषयवस्तू आहे असे समजा. प्रकाश तुम्हांला हवा त्यापेक्षा कमी किंवा जास्त आहे. त्यामुळे कॅमेरा मीटर चुकीचे उद्भासन सुचवणार याची खात्री आहे. म्हणून तुम्ही स्पॉट मीटरींग वापरायचा निर्णय घेतला आहे. पण समोरच्या दृश्यातील कोणत्या घटकावर मीटरींग करावे हे समजत नाहीये कारण आपली दृष्टी कृष्णधवल प्रकारात पाहू शकत नाही. समोरचे सगळेच रंगीत दिसत असल्याने त्यातला कोणता भाग मध्यम टोनॅलिटीच्या आसपास जाणारा असेल हे नक्की समजत नाहीये. उदा. वरील प्रतिमेत जी छोटी पाने एकदम अंधारलेल्या पार्श्वभूमीवर प्रकाशझोतात आल्यासारखी वाटताहेत तसे ते दृश्य प्रत्यक्षात नव्हते. प्रकाश खूप जास्त होता आणि आजूबाजूचे गवत, झुडुपे, खळग्याच्या पार्श्वभूमीमधील डिटेल्स हे सर्व नजरेला सहज जाणवत होते. पण मला फक्त ती सोनेरी पिवळी पानेच प्रतिमेत घ्यायची होती तेही कोणतेही पोस्टप्रोसेसिंग मॅजिक न करता. म्हणजेच मला खालील पर्याय उपलब्ध होते - अ‍ॅपर्चर - हे इतके जास्त ठेवायचे होते की पार्श्वभूमी धूसर येईल (बोके इफेक्ट) पण संपूर्ण पाने फोकस होतील इतके लहानही. म्हणून मी f/8 निवडले. आयएसओ - कमीतकमी प्रकाश संवेदकावर टिपला जावा यासाठी आयएसओ किमान पातळीवर ठेवणे आवश्यक होते, म्हणून ISO 100. शटर इन्टर्वल - हे इतके फास्ट हवे होते की कमी प्रकाशातील पार्श्वभूमी संपूर्ण गडद यावी आणि फक्त ही पानेच टिपली जावीत. शिवाय वार्‍याने पाने सारखी हलतही होती.      ह्या शटर इन्टर्वलचे मूल्य ठरवण्यासाठी मला ट्रायल-अ‍ॅण्ड-एरर मध्ये वेळ घालवायचा नव्हता म्हणून मी फक्त पानांवर उद्भासन मापन करायचे ठरवले. पण पाने तर जास्त प्रकाशित होती. त्यामुळे मध्यम टोनॅलिटीची एकही वस्तू प्रतिमेच्या चौकटीत नव्हती. मग मीटरींग करणार कसे?      इथे मग तुमच्या मदतीला येते 'ग्रे कार्ड'. मी प्रकाशाची दिशा कोणती आहे ते पाहिले. सूर्य जवळजवळ माथ्यावर होता. (आकृती पहा.) मग मी ग्रे कार्ड पानांसारखेच कॅमेर्‍याच्या दिशेने करडा पृष्ठभाग येईल असे, पण सूर्याच्या दिशेने किंचित तिरपे असे कॅमेर्‍यासमोर धरले जेणेकरून कॅमेरा त्या ग्रे कार्डवरून परावर्तित होणार्‍या प्रकाशावरून स्पॉट मीटरींग मोडमध्ये उद्भासनमापनाची आकडेमोड करू शकेल.
     ग्रे कार्ड वापरण्याच्या बर्‍याच पद्धती आहेत. त्यातल्या त्यात सोपी पद्धत खाली देत आहे. १. ग्रे कार्ड तुमच्या विषयवस्तूवर जो प्रकाश पडत आहे त्याच प्रकाशात असायला हवे. कॅमेरा स्पॉट किंवा पार्शल मीटरींग मोडमध्ये ठेवा. A Priority किंवा S Priority मोड जो हवा तो निवडून ठेवा. २. विषयवस्तूवर लेन्स संकेंद्रीत करा व फोकस लॉक करून ठेवा. ३. ग्रे कार्ड विषयवस्तू जवळ असेल तर विषयवस्तूच्याच प्रतलात शेजारी तुमच्या सहाय्यकाला धरायला सांगा. किंवा स्वतः हातानेच कॅमेर्‍याच्या समोर थोडे लांब धरा. ४. ग्रे कार्डची दिशा - कॅमेर्‍याकडे असायला हवी. प्रकाश खूपच बाजूने येत असेल व तुम्हांला विषयवस्तूची प्रकाशाकडील बाजूच उद्भासित करायची असेल तर ग्रे कार्डही त्याच कोनात धरा. समजा सावलीतली बाजू उद्भासित करायची असेल तर ग्रे कार्ड प्रकाशाच्या दिशेला त्याप्रमाणात तिरपे येईल असे धरा. उदा. बॅकलिट पोर्ट्रेटमध्ये प्रकाश विषयवस्तूच्या मागून आणि कॅमेर्‍याच्या थेट समोरून येतो. तेव्हा ग्रे कार्डही विषयवस्तूप्रमाणेच प्रकाशाच्या उलट धरले पाहिजे. ५. चित्रचौकटीत ग्रे कार्ड योग्य पद्धतीने आले की कॅमेर्‍याचा मीटर काय वाचन दर्शवतोय ते पहा व मॅन्युअल मोडमध्ये जाऊन शटर इन्टर्वल/अ‍ॅपर्चर तसे सेट करा. ६. ग्रे कार्ड बाजूला करा व छायाचित्र घ्या. ग्रे कार्डवर फोकस करू नका. स्पॉट मीटरींग वापरत असाल तर ग्रे कार्ड व्ह्यूफाइंडरच्या मधोमध आले पाहिजे. नाहीतर कॅमेरा चित्रचौकटीत ग्रे कार्ड असूनही भलतीकडेच मीटरींग करत बसेल. हे टाळण्यासाठी आधी ग्रे कार्डवर मीटरींग करून घ्या व मग कॉम्पोझिशन किंचित बदलून छायाचित्र घ्या.      हे सगळं वाचताना अवघड वाटेल, पण एकदा सराव झाला की अजिबात न चुकता तुम्ही मीटरींग स्वतःचे स्वतःच करू लागाल.

सखोल महितीने भरलेली मालिका ! माझ्यासारख्या "दिसलेले काही डोळ्यांना आवडले की जमेल तसे कॅमेर्‍याने टिपावे" या तत्वावर चालणार्‍या माझ्यासारख्याला हे जरा भारी पडले तर आश्चर्य काय ! पण परत परत वाचले तर थोsssडेसे डोस्क्यात जाईल अशी आशा आहे ! तुमच्या व्यासंगासाठी __/\__

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एस गुरुवार, 07/17/2014 - 00:32
आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून आभार. तुमच्याच वाक्यात या कलेचेही सौंदर्य सामावलेले आहे. कुठलेही छायाचित्र आधी छायाचित्रकाराच्या मनात तयार होते. ते कॅमेर्‍यात टिपणे हा तांत्रिक कौशल्याचा भाग झाला. आधी दृष्टीला दिसले तर पाहिजे. हाच नियम सर्वच कलांना लागू आहे. या मालिकेचा उद्देश केवळ तांत्रिक माहितीचा भडिमार करून वाचकांना प्रभावित करणे हा नसून आधी छायाचित्रकाराची दृष्टी विकसित करणे व तिला तांत्रिकतेची जोड देऊन मूर्त स्वरूप देणे या दोन्ही बाबी ठसवणे हा आहे. यात आपल्यासारख्या दर्दी वाचकांचे प्रतिसाद माझा उत्साह वाढवत असतात. पुनरेकवार आभार. *smile*

अकिलिज Wed, 07/16/2014 - 19:49
__/\__ अक्षरशः कोपरापासून नमस्कार. आजवर हे सगळं ईंग्रजीतून वाचताना टाळक्यात घुसतच नव्हतं. मराठीतून वाचताना परत एकदा गोडी निर्माण झाली. खासकरून एखादा विषय हळूह्ळू पचनी पडेल अशा भाषेत लिहीणं यासाठी मनापासून धन्यवाद. अप्रत्यक्षपणे बर्याच जणांच्या मनातले प्रश्न सोडवले गेले आहेत. माझ्या सर्व छायाचित्रकार मित्रांनी दरवेळी लिंका ढकल्यावर आपले आभार मानण्यास सांगितले आहेत.

In reply to by अकिलिज

एस गुरुवार, 07/17/2014 - 00:38
ह्या विषयावर इंग्रजीत अक्षरशः ढिगाने माहिती उपलब्ध असली तरी मराठीत तेही ऑनलाइन असे लेखन फारच कमी झाले आहे. छायाचित्रणाच्या क्षेत्रातील पारिभाषिक संज्ञा मूळ इंग्रजीतून वाचणे बर्‍याचजणांना सहज जमतेही. पण तेच मराठीत आणताना अतिरूक्षता व अगम्यता टाळून फक्त मराठी तोंडावळा मात्र जपणे हा उद्देश ठेवायचा प्रयत्न केला आहे. थोडे अवजड वाटतेही. पण ह्या गोष्टी मराठीत पुनःपुन्हा लिहिल्या-वाचल्या-बोलल्यामुळे व्यवहारातही जरूर रुळतील असा आशावाद आहे. तुमच्या मित्रांना या लेखमालेची मदत होतेय हे वाचून छान वाटले. त्यांनाही माझे धन्यवाद जरूर कळवा. तसेच काही प्रश्न वा शंका असतील तर तुमच्यामार्फत विचारले तरी चालतील. धन्यवाद.

आतिवास गुरुवार, 07/17/2014 - 10:17
फोटो तर बरेच काढते मी - पण हौस म्हणून. इतका विचार कधी केला नाही. इतका विचार मी करत बसले तर फोटो काढायचे राहून जाईल असे वाटते! अर्थात त्यामुळे बिघडणार काहीच नाही म्हणा ;-)

In reply to by आतिवास

चौकटराजा गुरुवार, 07/17/2014 - 10:30
जाता जाता शास्त्रीय संगीत ऐकणे व ते समजून उमजून ऐकणे यात रसास्वास्दात नक्की फरक पडतो असा अनुभव आहे. तसेच चित्र माध्यमाचे ही असते. विचारपूर्वक फोटो काढणे यात पक्षी. प्राणी, लाटा , लहान मुले याना स्थान कमीच. तरीही तंत्र समजून घेतल्याने फूटबॉल खेळणारे , नर्तकी पंख पसरून अस्मानात संचार करणारे पक्षी यांचे प्रत्ययकारी फोटो काढता येतात. अगदी डिस्टोर्शन ,कलर अब्रेझन ई सखोल बाजू समजून घेतल्या नाहीत तरी फोकसिंग. कम्पोसिशन व प्रकाश या तीन महत्वाच्या बाजू देखील फोटोला एक दर्जा देऊन जातात.

In reply to by चौकटराजा

आतिवास गुरुवार, 07/17/2014 - 10:40
सहमत आहे. तांत्रिक बाबी शिकायची इच्छा जरूर आहे; त्यामुळे फोटोंचा दर्जा सुधारेल. आणि मुख्य म्हणजे एखादी गोष्ट समजून उमजून करण्यात जास्त आनंद असतो. त्या दृष्टीने ही लेखमाला अत्यंत उपयोगी आहे, वाचते आहे. माझा प्रतिसाद वाचणा-याच्या मनात लेखमालिकेविषयी माझे मत चांगले नाही असा (गैर)समज निर्माण करेल हे ध्यानात आले नव्हते; त्याबद्दल माफ करा.

In reply to by आतिवास

एस गुरुवार, 07/17/2014 - 12:06
कुठेही गेलो की एकतर आपल्या हातात खूप कमी वेळ असतो. त्यामुळे केवळ आठवणी जपून ठेवाव्यात यासाठी आपण पटकन फोटो काढून घ्यायला प्राधान्य देतो. फोटो बरे आले की तेवढं पुरेसं असतं. पण त्यातही छायाचित्रणाचे तांत्रिक ज्ञान असेल तर तुम्ही चांगल्या दर्जाचे फोटो अधिक वेगाने काढू शकाल. पर्यायाने तुमचा स्मृतिठेवा अधिक सुंदर होईल. दुसरे असे की, भेट द्यायचा उद्देशच जर छायाचित्रण हा असेल तर मग तेवढा निवांतपणा हातात राखून ठेवायलाच लागतो. अशा वेळी थोड्या वेळात जास्तीतजास्त फोटो काढण्यापेक्षा तेवढ्याच वेळात कमी परंतु उच्च अभिरूचिमूल्याचे फोटो काढता येतील. माझा अनुभव असा आहे की एकदा या सगळ्या तांत्रिक गोष्टींचा सराव झाला की चांगले फोटोही खूप कमी वेळात घेता येतात. याचे उदाहरण म्हणजे डेप्थ ऑफ् फिल्ड. किती अ‍ॅपर्चर ठेवले की हवी तशी DoF मिळेल याचा ठोकताळा असणे, हातात कॅमेरा धरून फोटो काढणार असाल तर प्रतिमा शार्प येण्यासाठी किमान किती शटर इन्टर्वल वापरायचे, कॅमेरा नक्की कुठे फोकस करत आहे व त्याच्या अंगभूत मर्यादा सांभाळूनही त्याच्याकडून चांगले फोटो कसे काढवून घ्यायचे याचा सराव होत राहतो व नंतर तुम्हांला ऑटो मोड वापरायची गरज जवळजवळ कधीच भासत नाही. कुणी असे म्हणेल की आजकाल डिजिटल कॅमेर्‍यांमुळे कितीही फोटो काढता येतात व ते कसे आले आहेत ते लगेच दिसतेही. त्यानुसार समायोजन करायचे व परत फोटो काढायचा. पण कॅमेर्‍याचा एलसीडी स्क्रीन ही कॅमेर्‍यातली सर्वात बेभरवशाची गोष्ट आहे. एलसीडीवर फोटो तेव्हा चांगला दिसत असला तरी नंतर मॉनिटरवर १००% झूम करून पाहिल्यावर कळते की काहीतरी राहून गेलं. :-) कॅमेर्‍याचा मेंदू माणसातल्या कलाकाराच्या क्षमतेपेक्षा मोठा असूच शकत नाही एवढं लक्षात ठेवलं तरी पुरे.

In reply to by स्पा

एस गुरुवार, 07/17/2014 - 18:55
मला पहिला फोटो आवडला. त्यातली उत्स्फूर्तता छान टिपलीय. हॉरिझॉन्टल फ्रेमिंगही छान वाटले. दोन्ही प्रतिमांमध्ये डायनॅमिक रेंज (रंगभेदन क्षमता) जर फिल्म असती तर अजून छान आली असती असे वाटले. तुम्ही sRGB ऐवजी Adobe RGB कलरस्पेस वापरून पहा.

मदनबाण Fri, 07/18/2014 - 06:51
वाह... काही गोष्टी नव्याने समजल्या ! :) नेहमी प्रमाणेच वाचनखूण साठवुन ठेवली आहे. आणि हो... ते लाल रंगातल आम्ही वाचतो बरं का. ;) आजची स्वाक्षरी :- Malaysia jet crashes in east Ukraine conflict zone

फ्राईड मटण चॉप्स

भिंगरी ·

भिंगरी Sun, 07/13/2014 - 21:43
माझ्याकडे केमेरा नाही त्यामुळे कृपया फोटोची अपेक्षा करू नका.

In reply to by भिंगरी

अपेक्षा वगैरे कै नै. पण कसं फोटो पाहिलं की जिज्ञासा जागृत होते की वरीजनल पाककृती कशी बनली असेल वगैरे. आता तुम्हाला म्हणुन सांगतो मला पाककृती लिहिता येत नाही पण काल आमच्याकडे आषाढाची पुजा असते सात बोकुड कापले. आता त्या मटनाचे वाटे कसे करतात ते तुम्हाला फोटू पाहुन समजेल आणि तुमच्या मनात जिज्ञासा जागृत होईल. काय असतं हे प्रकरण म्हणुन पण मी तुम्हाला काय सांगणार नाही. -दिलीप बिरुटे

प्रभाकर पेठकर Mon, 07/14/2014 - 11:48
चॉप्सची छायाचित्रं पाहिजेतच. पारंपारिक कॅमेरा नसेल पण हल्ली प्रत्येक भ्रमणध्वनीला कॅमेरा असतोच. त्याचा वापर करावा ही विनंती.

In reply to by गणपा

मुक्त विहारि Mon, 07/14/2014 - 15:20
तुमच्या हातची रेशीपी पण येवू द्यात. (बाकी, मटण चॉप्स, चिकन लॉलीपॉप आणि तळलेला पापड असला की थंडगार बियर ही हवीच.सुखाच्या आणि समाधानाच्या पलंगाचे हेच ते ४ पाय.)

In reply to by संजय कथले

मुक्त विहारि Mon, 07/14/2014 - 19:13
जरूर.. जमल्यास आमच्या डोंबिवलीला (डोंबिवली, हेच मध्यवर्ती ठिकाण आहे, हे तुम्हाला ठावूक असेलच) कधी पण या.

In reply to by संजय कथले

मुक्त विहारि Tue, 07/15/2014 - 22:16
नागपूरला आलो, की नक्की कळवीन. आणि तसेही गेल्या १०-१२ वर्षांत विदर्भात जाणे झालेले नाही. पुढल्या वर्षी दिवाळीच्या सुमारास जमवतो. तोपर्यंत आमच्या नावाने एक-दोन बियरचे थेंब उडवलेत तर फार उत्तम.

In reply to by गणपा

भिंगरी Mon, 07/14/2014 - 16:16
ह्ये बगा मिपावाल,मी हाय शाकारी गेली पंदरा वर्स त्याच्या आगुदार ह्ये सर्व परकार करत हुत्ये. आता घरात बी आणत न्हाय,तव फोटू कसा आसल? हा पर डोक्यात त्या रेशिपी हायत म्हनूनशान तुमच्यासाठी लिवते. मी म्हनते मानसान उमजून घ्यावं आता शाकारी रेशिपिचे फोटू भर्मनध्वनी वरून काढून कसे टाकायचे त्ये माझ्या टकुर्यात येत नाही. तवा जरा माला मार्गदर्सन करा की.

In reply to by दिपक.कुवेत

गणपा Mon, 07/14/2014 - 16:45
दिपकराव मटण ट्राय करुन सोडणार वाटत तुम्ही. :) नायजेरियातले बकरे दुबळे असतात. ;) खाटिकाशी ओळख असली तर भरलेले चॉप्सही मिळतात. पण हाडं फोडण्यात जी मज्जा आहे ती मांस चघळण्यात नाही राव.

भिंगरी Sun, 07/13/2014 - 21:43
माझ्याकडे केमेरा नाही त्यामुळे कृपया फोटोची अपेक्षा करू नका.

In reply to by भिंगरी

अपेक्षा वगैरे कै नै. पण कसं फोटो पाहिलं की जिज्ञासा जागृत होते की वरीजनल पाककृती कशी बनली असेल वगैरे. आता तुम्हाला म्हणुन सांगतो मला पाककृती लिहिता येत नाही पण काल आमच्याकडे आषाढाची पुजा असते सात बोकुड कापले. आता त्या मटनाचे वाटे कसे करतात ते तुम्हाला फोटू पाहुन समजेल आणि तुमच्या मनात जिज्ञासा जागृत होईल. काय असतं हे प्रकरण म्हणुन पण मी तुम्हाला काय सांगणार नाही. -दिलीप बिरुटे

प्रभाकर पेठकर Mon, 07/14/2014 - 11:48
चॉप्सची छायाचित्रं पाहिजेतच. पारंपारिक कॅमेरा नसेल पण हल्ली प्रत्येक भ्रमणध्वनीला कॅमेरा असतोच. त्याचा वापर करावा ही विनंती.

In reply to by गणपा

मुक्त विहारि Mon, 07/14/2014 - 15:20
तुमच्या हातची रेशीपी पण येवू द्यात. (बाकी, मटण चॉप्स, चिकन लॉलीपॉप आणि तळलेला पापड असला की थंडगार बियर ही हवीच.सुखाच्या आणि समाधानाच्या पलंगाचे हेच ते ४ पाय.)

In reply to by संजय कथले

मुक्त विहारि Mon, 07/14/2014 - 19:13
जरूर.. जमल्यास आमच्या डोंबिवलीला (डोंबिवली, हेच मध्यवर्ती ठिकाण आहे, हे तुम्हाला ठावूक असेलच) कधी पण या.

In reply to by संजय कथले

मुक्त विहारि Tue, 07/15/2014 - 22:16
नागपूरला आलो, की नक्की कळवीन. आणि तसेही गेल्या १०-१२ वर्षांत विदर्भात जाणे झालेले नाही. पुढल्या वर्षी दिवाळीच्या सुमारास जमवतो. तोपर्यंत आमच्या नावाने एक-दोन बियरचे थेंब उडवलेत तर फार उत्तम.

In reply to by गणपा

भिंगरी Mon, 07/14/2014 - 16:16
ह्ये बगा मिपावाल,मी हाय शाकारी गेली पंदरा वर्स त्याच्या आगुदार ह्ये सर्व परकार करत हुत्ये. आता घरात बी आणत न्हाय,तव फोटू कसा आसल? हा पर डोक्यात त्या रेशिपी हायत म्हनूनशान तुमच्यासाठी लिवते. मी म्हनते मानसान उमजून घ्यावं आता शाकारी रेशिपिचे फोटू भर्मनध्वनी वरून काढून कसे टाकायचे त्ये माझ्या टकुर्यात येत नाही. तवा जरा माला मार्गदर्सन करा की.

In reply to by दिपक.कुवेत

गणपा Mon, 07/14/2014 - 16:45
दिपकराव मटण ट्राय करुन सोडणार वाटत तुम्ही. :) नायजेरियातले बकरे दुबळे असतात. ;) खाटिकाशी ओळख असली तर भरलेले चॉप्सही मिळतात. पण हाडं फोडण्यात जी मज्जा आहे ती मांस चघळण्यात नाही राव.
फ्राईड मटण चॉप्स साहित्य---------- मटण चॉप्स---६ आलं लसूण पेस्ट २ लहान चमचे. १० हिरव्या तिखट मिरच्या आणि एक कप निवडलेली कोथिंबीर यांची पेस्ट ३ अंडी फोडून चांगली फेटलेली मीठ रवा किंवा ब्रेड क्रम्स तळण्यासाठी तेल. कृती----- मटण चॉप्स घेताना खाटकाकडून दाबून थोडे चपटे करून घ्यावे. स्वच्छ धुवून त्यांना आलं लसणाची पेस्ट व मीठ लावून कोरड्या भांड्यात ठेवावे. कुकरमध्ये हे भांडे ठेवून तीन शिट्या होऊ द्याव्या. कुकरची वाफ गेल्यावर चॉप्स बाहेर काढून थंड होऊ द्यावे.

शाही अंडा मसाला

स्वाती दिनेश ·

पैसा Mon, 07/14/2014 - 00:00
कसली भारी पाकृ आणि फोटो! बरेच दिवसांनी स्वातीकडून एक मस्त पाकृ आली!

रेवती Mon, 07/14/2014 - 00:47
वाह! फोटू व कृती आवडली. मी अंडे खात नसले तरी बाकीच्यांना करून घालता येईल. शिवाय ही पाकृ अंडे न घालता कशी करायची त्याबद्दलही सुचवण्या आहेतच!

प्रभाकर पेठकर Mon, 07/14/2014 - 12:15
चविष्ट पाककृती. अंडी फोडून न घालता, सोलून तशीच आख्खी घालावित आणि कसूरी मेथी आधी न घालता सर्वात शेवटी त्याची पावडर वरून घालावी.

In reply to by प्रभाकर पेठकर

गणपा Mon, 07/14/2014 - 13:08
सहमत फार तर उकडलेल्या अंड्याला काट्याने टोचे मारुन घ्यावेत. पाकॄ आवडली हे वेसांनल.

In reply to by प्रभाकर पेठकर

सुनील Mon, 07/14/2014 - 14:04
किंबहुना रटरटणार्‍या रश्शात अंडी फोडूनच घालावीत. एक वेगळा प्रकार. बाकी पाकृ मस्तच!

In reply to by सुनील

गणपा Mon, 07/14/2014 - 14:19
सुनीलराव मलाही लाल-तिखटजाळ रश्यात अंडी फोडुन घातलेलीच आवडतात. इथे काजु-क्रिम असे गोडुस पदार्थ असताना फोडुन घातलेली अंडी कशी दिसतील/लागतील बरं?

नंदन Mon, 07/14/2014 - 13:16
पाकृ. ग्रेव्ही अगदी रिच, चविष्ट दिसते आहे.

पैसा Mon, 07/14/2014 - 00:00
कसली भारी पाकृ आणि फोटो! बरेच दिवसांनी स्वातीकडून एक मस्त पाकृ आली!

रेवती Mon, 07/14/2014 - 00:47
वाह! फोटू व कृती आवडली. मी अंडे खात नसले तरी बाकीच्यांना करून घालता येईल. शिवाय ही पाकृ अंडे न घालता कशी करायची त्याबद्दलही सुचवण्या आहेतच!

प्रभाकर पेठकर Mon, 07/14/2014 - 12:15
चविष्ट पाककृती. अंडी फोडून न घालता, सोलून तशीच आख्खी घालावित आणि कसूरी मेथी आधी न घालता सर्वात शेवटी त्याची पावडर वरून घालावी.

In reply to by प्रभाकर पेठकर

गणपा Mon, 07/14/2014 - 13:08
सहमत फार तर उकडलेल्या अंड्याला काट्याने टोचे मारुन घ्यावेत. पाकॄ आवडली हे वेसांनल.

In reply to by प्रभाकर पेठकर

सुनील Mon, 07/14/2014 - 14:04
किंबहुना रटरटणार्‍या रश्शात अंडी फोडूनच घालावीत. एक वेगळा प्रकार. बाकी पाकृ मस्तच!

In reply to by सुनील

गणपा Mon, 07/14/2014 - 14:19
सुनीलराव मलाही लाल-तिखटजाळ रश्यात अंडी फोडुन घातलेलीच आवडतात. इथे काजु-क्रिम असे गोडुस पदार्थ असताना फोडुन घातलेली अंडी कशी दिसतील/लागतील बरं?

नंदन Mon, 07/14/2014 - 13:16
पाकृ. ग्रेव्ही अगदी रिच, चविष्ट दिसते आहे.
साहित्य- ४/५ अंडी उकडून, २/३ टोमॅटो किवा १ वाटी तयार टोमॅटो प्युरे, २/३ मध्यम कांदे, १ मोठा चमचा गरम मसाला,१ मोठा चमचा धनेजिरे पूड,१ चहाचा चमचा तिखट, १ चहाचा चमचा कसूरी मेथी, १तमालपत्राचे पान ७/८ काजूबिया, साधारण अर्धी वाटी सुके खोबरे, १ मोठा चमचा हेवी क्रिम किवा साय,२ मोठे चमचे तेल,१चमचा बटर, मीठ चवीनुसार, १/२ चहाचा चमचा साखर थोडी कोथिंबिर गार्निशिंग साठी. कॄती- खोबरे किंचित लालसर कोरडेच भाजून घ्या व बाजूला ठेवा. एक चमचाभर तेलावर चौकोनी चिरलेले कांदा व टोमॅटो परतून घ्या. त्यात गरम मसाला, तिखट, धनेजिरे पूड घालून परता, कसूरी मेथी घाला आणि काजूतुकडे घाला व थोडे परता.

पाकपुर्‍या (पाकातले चिरोटे)

मितान ·

एसमाळी Sun, 07/13/2014 - 17:39
मस्तच रेसीपी. खाऊन किती वर्ष लोटली पण चव आज हि लक्षात आहे.आमच्या मराठवाड्यातील झक्कास रेसीपी.(इतरत्र चिरोटे करतात. पिठी साखर वापरुन)

रेवती Sun, 07/13/2014 - 18:07
पाकातली पुरी हा माझा भयंकर आवडता प्रकार आहे. लहानपणी वाढदिवस आला की आधी दोन दिवस गोडाचे काय हवे? अशी विचारणा आईकडून होत असे. पाकातली पुरी हे उत्तर कधीही बदलले नाही. ;) पाकातले चिरोटेही आवडते आहेत. फोटू पाहून करावेसे वाटतायत. पुरी करताना दही घालून रवा मैदा रात्री मळून ठेवते. आता पुर्‍या करायलाच हव्यात. फोटू फारच गोड आलाय.

चित्रगुप्त Sun, 07/13/2014 - 18:30
वा वा वा... तोंडाला पाणी सुटलंय फोटो बघून.
पाकातली पुरी हा माझा भयंकर आवडता प्रकार आहे. लहानपणी वाढदिवस आला की आधी दोन दिवस गोडाचे काय हवे? अशी विचारणा आईकडून होत असे. पाकातली पुरी हे उत्तर कधीही बदलले नाही
काय योगायोग आहे! माझेही अगदी असेच आहे. अजुनही दर वाढदिवसाला पाकातल्या पुर्‍याच बनतात. आमचे मिपावरील लेखनः http://www.misalpav.com/user/9160/authored

मुक्त विहारि Sun, 07/13/2014 - 19:15
हा प्रकार फार उत्तम करते. मला पाकातले चिरोटे, हा प्रकार जास्त आवडत नाही. (संध्याकाळच्या पेयाबरोबर पाकातले चिरोटे?) त्यामुळे माझ्या साठी मिरपूड घालून चिरोटे केल्या जातात.

कंजूस Sun, 07/13/2014 - 20:48
मस्त आला आहे फोटो . धाकटा भाऊ या पुऱ्या लहानपणी आवडीने खायचा आणि सगळ्या पाकाने अंग बरबटून ठेवायचा .आजच केल्या होत्या .मलाही आंबट गोड चवीच्या आवडतात .नुसत्या गोड नाही आवडत .रवा मैदा योग्य प्रमाणात पडल्यास कणीदार होतात .

दिपक.कुवेत Mon, 07/14/2014 - 11:18
पाकातले चिरोटे एकदम टेम्टींग आणि खुशखुशीत दिसत आहेत. लगेच उचलुन खावेसे वाटतायेत. पाकातल्या पुर्‍या हा माझा सुद्धा भयंकर आवडता पदार्थ आहे. त्यातल्या त्यात हलक्या गरम पुर्‍या खायला तर जाम मजा येते. पण पाकातल्या पुर्‍या आणि चिरोटे हे दोन वेगळे पदार्थ आहेत ना? चिरोटे मैद्याचे ठिक आहेत पण पुर्‍या मला मैद्याच्या कधीच आवडत नाहित. गार झाल्या कि कडक होतात. त्यापेक्षा कणीक + रवा घालुन पुर्‍या मस्त मउ होतात आणि नंतरहि मउ राहतात. पुर्‍यांचा पाक उरला तर त्यात लिंबु पिळुन सुधारस करतात जो सुद्धा मला कधीच आवडत नाहि.

In reply to by दिपक.कुवेत

प्रभाकर पेठकर Mon, 07/14/2014 - 12:08
>>>>पाकातल्या पुर्‍या आणि चिरोटे हे दोन वेगळे पदार्थ आहेत ना? होय. माझ्या मतेही हे दोन वेगळे प्रकार आहेत. पाकातल्या पुर्‍या ह्या आपल्या साध्या पुर्‍या तळून झाल्यावर पाकातून काढतात आणि चिरोटे वरिल पाककृतीप्रमाणे बहुपदरी असतात. त्या तिनही पोळ्यांना वेगवगळे रंग लावूनही चिरोटे बनवितात. तसेच सात-सात पोळ्या लाटूनही वरील प्रमाणेच चिरोटे करतात. खुसखुशीत चिरोटे लहानपणीच काय अजूनही आवडतात पण डॉक्टरचे वटारलेले डोळे..... जाऊद्या. नम्र नकार.

In reply to by प्रभाकर पेठकर

मितान Mon, 07/14/2014 - 14:10
येस्स ! पुढच्या वेळी रंगीत करून बघेन. आई लवंगलतिका करताना असेच ५ रंग वापरते ते आठवलं. ( आमाला कुठुन येवढी भारी युक्ती सुचायला ! ) दीपकभाऊंनी सांगितल्याप्रमाणे रवा नि कणिक घेतली तर पुरीला पदर सुटतील का ?

In reply to by मितान

दिपक.कुवेत Mon, 07/14/2014 - 16:28
आय थींक तुझा का माझा जरा गोंधळ उडालाय. तुमच्याकडे चिरोट्यांनाच पुरी म्हणतात का? वर म्हटल्याप्रमाणे चिरोट्यांना पदर सुटण्यासाठि मैदाच योग्य. मैद्यामुळे त्या खुशखुशीतहि होतात. मी जे कणिक + रवा म्हणतोय ते साध्या पुर्‍यासांठि. ज्यांच्या नेहमीप्रमाणे पुर्‍या करुन साखरेच्या पाकात (किंचीत लिंबु पिळलेल्या) सोडायच्या.

In reply to by दिपक.कुवेत

वर मितानताईने दिले त्यांना आम्ही पाकातले चिरोटेच म्हणतो, रंगीत चिरोटे केले तर वरून थोडी पिठीसाखर ही भुरभुरतो (मागे मिपा दिवाळी अंकासाठी मी पाकृ दिली होती) . आम्ही सुद्धा पाकातल्या पुर्‍या , कणकेच्या किंवा रवा-मैद्याच्या पुर्‍या तळून केशर + साखरेच्या पाकात सोडतो व निथळून त्यावर सुक्यामेव्याची पुड भुरभुरतो. माझी आई तर आमरस घालून पाकतल्या पुर्‍या करते , कसल्या भन्नाट लागतात :) मितान ताई पाकातले चिरोटे भारी दिसत आहेत :) यम्मी!!

In reply to by प्रभाकर पेठकर

मुक्त विहारि Mon, 07/14/2014 - 15:10
साधे चिरोटे करा आणि पाकात न बुडवता, सॅकरिन बरोबर खा. गोड खाल्याचे समाधान आणि मधूमेहपण वाढणार नाही. (बादवे, साखरेच्या पाका ऐवजी, सॅकरीनचा पाक केला तर चालेल का? म्हणजे मधूमेह असणार्‍या व्यक्तींना पण उत्तम)

स्पंदना Fri, 07/18/2014 - 21:15
सहीच! अगदी पहिल्यांदा केल्या होत्या तेंव्हा चुकुन पातीच्या बाजूने लाटल्या होत्या अन मग ते जाड जाड लाटे तळले होते. आता जमतात. करुन पाहेन परत एकदा.

एसमाळी Sun, 07/13/2014 - 17:39
मस्तच रेसीपी. खाऊन किती वर्ष लोटली पण चव आज हि लक्षात आहे.आमच्या मराठवाड्यातील झक्कास रेसीपी.(इतरत्र चिरोटे करतात. पिठी साखर वापरुन)

रेवती Sun, 07/13/2014 - 18:07
पाकातली पुरी हा माझा भयंकर आवडता प्रकार आहे. लहानपणी वाढदिवस आला की आधी दोन दिवस गोडाचे काय हवे? अशी विचारणा आईकडून होत असे. पाकातली पुरी हे उत्तर कधीही बदलले नाही. ;) पाकातले चिरोटेही आवडते आहेत. फोटू पाहून करावेसे वाटतायत. पुरी करताना दही घालून रवा मैदा रात्री मळून ठेवते. आता पुर्‍या करायलाच हव्यात. फोटू फारच गोड आलाय.

चित्रगुप्त Sun, 07/13/2014 - 18:30
वा वा वा... तोंडाला पाणी सुटलंय फोटो बघून.
पाकातली पुरी हा माझा भयंकर आवडता प्रकार आहे. लहानपणी वाढदिवस आला की आधी दोन दिवस गोडाचे काय हवे? अशी विचारणा आईकडून होत असे. पाकातली पुरी हे उत्तर कधीही बदलले नाही
काय योगायोग आहे! माझेही अगदी असेच आहे. अजुनही दर वाढदिवसाला पाकातल्या पुर्‍याच बनतात. आमचे मिपावरील लेखनः http://www.misalpav.com/user/9160/authored

मुक्त विहारि Sun, 07/13/2014 - 19:15
हा प्रकार फार उत्तम करते. मला पाकातले चिरोटे, हा प्रकार जास्त आवडत नाही. (संध्याकाळच्या पेयाबरोबर पाकातले चिरोटे?) त्यामुळे माझ्या साठी मिरपूड घालून चिरोटे केल्या जातात.

कंजूस Sun, 07/13/2014 - 20:48
मस्त आला आहे फोटो . धाकटा भाऊ या पुऱ्या लहानपणी आवडीने खायचा आणि सगळ्या पाकाने अंग बरबटून ठेवायचा .आजच केल्या होत्या .मलाही आंबट गोड चवीच्या आवडतात .नुसत्या गोड नाही आवडत .रवा मैदा योग्य प्रमाणात पडल्यास कणीदार होतात .

दिपक.कुवेत Mon, 07/14/2014 - 11:18
पाकातले चिरोटे एकदम टेम्टींग आणि खुशखुशीत दिसत आहेत. लगेच उचलुन खावेसे वाटतायेत. पाकातल्या पुर्‍या हा माझा सुद्धा भयंकर आवडता पदार्थ आहे. त्यातल्या त्यात हलक्या गरम पुर्‍या खायला तर जाम मजा येते. पण पाकातल्या पुर्‍या आणि चिरोटे हे दोन वेगळे पदार्थ आहेत ना? चिरोटे मैद्याचे ठिक आहेत पण पुर्‍या मला मैद्याच्या कधीच आवडत नाहित. गार झाल्या कि कडक होतात. त्यापेक्षा कणीक + रवा घालुन पुर्‍या मस्त मउ होतात आणि नंतरहि मउ राहतात. पुर्‍यांचा पाक उरला तर त्यात लिंबु पिळुन सुधारस करतात जो सुद्धा मला कधीच आवडत नाहि.

In reply to by दिपक.कुवेत

प्रभाकर पेठकर Mon, 07/14/2014 - 12:08
>>>>पाकातल्या पुर्‍या आणि चिरोटे हे दोन वेगळे पदार्थ आहेत ना? होय. माझ्या मतेही हे दोन वेगळे प्रकार आहेत. पाकातल्या पुर्‍या ह्या आपल्या साध्या पुर्‍या तळून झाल्यावर पाकातून काढतात आणि चिरोटे वरिल पाककृतीप्रमाणे बहुपदरी असतात. त्या तिनही पोळ्यांना वेगवगळे रंग लावूनही चिरोटे बनवितात. तसेच सात-सात पोळ्या लाटूनही वरील प्रमाणेच चिरोटे करतात. खुसखुशीत चिरोटे लहानपणीच काय अजूनही आवडतात पण डॉक्टरचे वटारलेले डोळे..... जाऊद्या. नम्र नकार.

In reply to by प्रभाकर पेठकर

मितान Mon, 07/14/2014 - 14:10
येस्स ! पुढच्या वेळी रंगीत करून बघेन. आई लवंगलतिका करताना असेच ५ रंग वापरते ते आठवलं. ( आमाला कुठुन येवढी भारी युक्ती सुचायला ! ) दीपकभाऊंनी सांगितल्याप्रमाणे रवा नि कणिक घेतली तर पुरीला पदर सुटतील का ?

In reply to by मितान

दिपक.कुवेत Mon, 07/14/2014 - 16:28
आय थींक तुझा का माझा जरा गोंधळ उडालाय. तुमच्याकडे चिरोट्यांनाच पुरी म्हणतात का? वर म्हटल्याप्रमाणे चिरोट्यांना पदर सुटण्यासाठि मैदाच योग्य. मैद्यामुळे त्या खुशखुशीतहि होतात. मी जे कणिक + रवा म्हणतोय ते साध्या पुर्‍यासांठि. ज्यांच्या नेहमीप्रमाणे पुर्‍या करुन साखरेच्या पाकात (किंचीत लिंबु पिळलेल्या) सोडायच्या.

In reply to by दिपक.कुवेत

वर मितानताईने दिले त्यांना आम्ही पाकातले चिरोटेच म्हणतो, रंगीत चिरोटे केले तर वरून थोडी पिठीसाखर ही भुरभुरतो (मागे मिपा दिवाळी अंकासाठी मी पाकृ दिली होती) . आम्ही सुद्धा पाकातल्या पुर्‍या , कणकेच्या किंवा रवा-मैद्याच्या पुर्‍या तळून केशर + साखरेच्या पाकात सोडतो व निथळून त्यावर सुक्यामेव्याची पुड भुरभुरतो. माझी आई तर आमरस घालून पाकतल्या पुर्‍या करते , कसल्या भन्नाट लागतात :) मितान ताई पाकातले चिरोटे भारी दिसत आहेत :) यम्मी!!

In reply to by प्रभाकर पेठकर

मुक्त विहारि Mon, 07/14/2014 - 15:10
साधे चिरोटे करा आणि पाकात न बुडवता, सॅकरिन बरोबर खा. गोड खाल्याचे समाधान आणि मधूमेहपण वाढणार नाही. (बादवे, साखरेच्या पाका ऐवजी, सॅकरीनचा पाक केला तर चालेल का? म्हणजे मधूमेह असणार्‍या व्यक्तींना पण उत्तम)

स्पंदना Fri, 07/18/2014 - 21:15
सहीच! अगदी पहिल्यांदा केल्या होत्या तेंव्हा चुकुन पातीच्या बाजूने लाटल्या होत्या अन मग ते जाड जाड लाटे तळले होते. आता जमतात. करुन पाहेन परत एकदा.
पावसाळा सुरू झाला की आईचा स्वयंपाक बदलायचा. पक्वान्न पण बदलायची. आंबे संपलेत, श्रीखंड खाण्यासारखे हवामान नाही, श्रावणातला पुरणाचा रतीब सुरू व्हायचा आहे, खिरींचा खुराक सुरू व्हायला हिवाळा अजून यायचाय, बाहेर भुरभुर पावसामुळे चमचमीत नि गोड खायचा आमचा हट्ट पुरवायचा आहे.... असं सगळं असायचं. मग काय सुरू व्हायचे एकेक पदार्थ.. कधी गुळातले गडगिळे, कधी कणिक तुपावर एकदम चॉकलेटी भाजून त्याचा शिरा, गोड पुर्‍या, सुधारस, साखरभात आणि आमच्या अत्यंत आवडत्या पाकपुर्‍या. म्हणजेच चिरोटे ! आता मी तिच्या भूमिकेत गेलेय. लेक माझ्यासारखीच खवैय्यिण ( वा ! ) असल्याने तिचेही हट्ट भरपूर असतात. आजही असाच हट्ट केला तिने.

चलो काश्मीर....

दिपक.कुवेत ·

कंजूस Sun, 07/13/2014 - 13:41
एक विचारायचं राहिलंच .तिकडच्या पाककृती कधी बघणार ?'होम स्टे ' घेतल्यास पारंपारिक प्रकार पाहता येतील असं वाटतं .यानंतर हैदराबाद ,चैट्टीनाड ,मंगळूर ,कोळ्हीकोड ,कूर्ग इत्यादी ठिकाणी भेट द्यावी लागणार .

कधी काश्मिर पाहावासा वाटला तर मी `कश्मिरकी कली'ची (ओरिजिनल) सीडी लावतो! भन्नाट अँगल्स मधून घेतलेले शॉट्स, शम्मी-शर्मिलाचा प्रणय, आणि ओपीची एकसोएक गाणी!

In reply to by टवाळ कार्टा

मुक्त विहारि Sun, 07/13/2014 - 23:37
आयला, हे पाकडे आपल्याच बांधवांना काश्मीर मधून बाहेर काढतात असे ऐकिवात आहे.... खरे खोटे राम जाणे....

सखी Sun, 07/13/2014 - 21:21
ट्रिपला शुभेच्छा, इथे गेल्या हिवाळ्यात सरसरीपेक्षा तिप्पट बर्फ पडले होते, त्यामुळे बर्फाचं अजिबात कौतुक राहीलं नाही. काश्मिर बघायचं आहे कधी ते माहीती नाही.

पिंगू Tue, 07/15/2014 - 21:19
दिपकशेठ, सध्या खिशात तंगी आणि सुट्टीची शाश्वती दोन्ही मोठ्या समस्या माझ्यापुढे आ वासून उभ्या आहेत. त्यामुळे सध्या काश्मिर काय तर गोवा सुद्धा जाता येणार नाही..

कंजूस Sun, 07/13/2014 - 13:41
एक विचारायचं राहिलंच .तिकडच्या पाककृती कधी बघणार ?'होम स्टे ' घेतल्यास पारंपारिक प्रकार पाहता येतील असं वाटतं .यानंतर हैदराबाद ,चैट्टीनाड ,मंगळूर ,कोळ्हीकोड ,कूर्ग इत्यादी ठिकाणी भेट द्यावी लागणार .

कधी काश्मिर पाहावासा वाटला तर मी `कश्मिरकी कली'ची (ओरिजिनल) सीडी लावतो! भन्नाट अँगल्स मधून घेतलेले शॉट्स, शम्मी-शर्मिलाचा प्रणय, आणि ओपीची एकसोएक गाणी!

In reply to by टवाळ कार्टा

मुक्त विहारि Sun, 07/13/2014 - 23:37
आयला, हे पाकडे आपल्याच बांधवांना काश्मीर मधून बाहेर काढतात असे ऐकिवात आहे.... खरे खोटे राम जाणे....

सखी Sun, 07/13/2014 - 21:21
ट्रिपला शुभेच्छा, इथे गेल्या हिवाळ्यात सरसरीपेक्षा तिप्पट बर्फ पडले होते, त्यामुळे बर्फाचं अजिबात कौतुक राहीलं नाही. काश्मिर बघायचं आहे कधी ते माहीती नाही.

पिंगू Tue, 07/15/2014 - 21:19
दिपकशेठ, सध्या खिशात तंगी आणि सुट्टीची शाश्वती दोन्ही मोठ्या समस्या माझ्यापुढे आ वासून उभ्या आहेत. त्यामुळे सध्या काश्मिर काय तर गोवा सुद्धा जाता येणार नाही..
नमस्कार मंडळि, काश्मीर....भुतलावरील नंदनवन/स्वर्ग. खरं तर हे एक ईयर द राउंड डेस्टिनेशन म्हटलं तर वावगं ठरु नये. वेगवेगळ्या ऋतुतलं काश्मीर पहाणं हा नक्किच एक वेगवेगळा अनुभव असतो. एक वेळ आपली नजर तोकडि/थीटि पडेल ह्याच्या सौदर्यांपुढे.... असं एकलयं कि एप्रिल ते ऑगस्ट हा काश्मीर भेटिसाठि उत्तम ऋतु मानतात. एकदम योग्य हवामान, बहरलेल्या बागा, थोडासा उरलेला बर्फ....फॅमीली टुर च्या दृष्टीने एकदम अ‍ॅप्ट असा हा सीजन. पण माझ्या मते खरा जातीवंत भटका तोच जो ह्याच रुळलेल्या वाटा जरा वेगळ्या नजरेने बघतो.

"टी "

पिंपातला उंदीर ·

" हे बघ तू आयुष्यात पुढ जावस अस मला मुळीच वाटत नाहि. तू पण पुढे गेलास तर मी एकटाच मागे राहील ना . आणि तुझ्यासारख्या सामान्य कुवतीच्या माणसाला १० ते ५ कारकुनी आयुष्यच ठीक आहे . कुठे दगदग करत बसतोस ." माझ्या पण "टी " बद्दल पण याच भावना आहेत , मी बोलून दाखवत नाही एवढंच .
या परदर्शकतेचं नांव आहे : दोस्ती!

प्यारे१ Sun, 07/13/2014 - 19:32
छान लिहीलंय. पण का कुणास ठाऊक सुरुवातीच्या ओळखीनंतरदेखील " .." ह्याच्या सततच्या वापरामुळं हा "टी" आपलासा वाटतावाटता लांब राहतोय. एकदा एडीट करता येतंय का बघा बरं.

मराठी कथालेखक Mon, 07/14/2014 - 12:30
छान आहे.
प्रत्येकाला तोंडाची वाफ दवडून frustration ला वाट देण्याची एक जागा हवी असते . माझ्यासाठी "टी " हि ती जागा आहे
पण हे काही कळालं नाही कारण वरती फक्त "टी" च व्यक्त होतानाचं वर्णन आहे. टी भेटतो तेव्हा तुम्ही काय बोलता हे पण लिहलंत तर तुमची टी बरोबरची केमिस्ट्री अधिक स्पष्ट होईल.

पिलीयन रायडर Mon, 07/14/2014 - 13:51
छान लिहीलय.. मराठी लेखक म्हणतात तसं तुम्ही नक्की "टी" समोर कसे व्यक्त होता ते समजत नाही म्हणुन तुमची " frustration ला वाट देण्याची एक जागा" टी कसा काय बनतो ते नीट उलगडत नाही.. पण छान लिहीलय..

" हे बघ तू आयुष्यात पुढ जावस अस मला मुळीच वाटत नाहि. तू पण पुढे गेलास तर मी एकटाच मागे राहील ना . आणि तुझ्यासारख्या सामान्य कुवतीच्या माणसाला १० ते ५ कारकुनी आयुष्यच ठीक आहे . कुठे दगदग करत बसतोस ." माझ्या पण "टी " बद्दल पण याच भावना आहेत , मी बोलून दाखवत नाही एवढंच .
या परदर्शकतेचं नांव आहे : दोस्ती!

प्यारे१ Sun, 07/13/2014 - 19:32
छान लिहीलंय. पण का कुणास ठाऊक सुरुवातीच्या ओळखीनंतरदेखील " .." ह्याच्या सततच्या वापरामुळं हा "टी" आपलासा वाटतावाटता लांब राहतोय. एकदा एडीट करता येतंय का बघा बरं.

मराठी कथालेखक Mon, 07/14/2014 - 12:30
छान आहे.
प्रत्येकाला तोंडाची वाफ दवडून frustration ला वाट देण्याची एक जागा हवी असते . माझ्यासाठी "टी " हि ती जागा आहे
पण हे काही कळालं नाही कारण वरती फक्त "टी" च व्यक्त होतानाचं वर्णन आहे. टी भेटतो तेव्हा तुम्ही काय बोलता हे पण लिहलंत तर तुमची टी बरोबरची केमिस्ट्री अधिक स्पष्ट होईल.

पिलीयन रायडर Mon, 07/14/2014 - 13:51
छान लिहीलय.. मराठी लेखक म्हणतात तसं तुम्ही नक्की "टी" समोर कसे व्यक्त होता ते समजत नाही म्हणुन तुमची " frustration ला वाट देण्याची एक जागा" टी कसा काय बनतो ते नीट उलगडत नाही.. पण छान लिहीलय..
लेखनविषय:
लेखनप्रकार
असाच ऑफिस मध्ये पाट्या टाकण्याचा अजून एक दिवस . पावसाळी दुपार . एके काळी आपण स्वतहाशिच काय काय गगनचुंबी promises केली होती आणि आपण आता हे काय करत आहोत हि मनातून मधूनच टोचण्या देणारी जाणीव अजूनच टोकदार झालेली. असेच स्वतहाला कुरतडत बसण्याचा खेळ चालू असताना एकदम फोन वाजतो. फोन त्याचाच असतो. " जिवंत आहेस का? बऱ्याच दिवसात तुझा उदास आवाज कानावर पडला नाही . म्हंटल आपणच फोन करावा ।" "अरे काही नाही रे. असाच busy होतो ऑफिस च्या कामात. " " तुझा आवाज बराच cheerful येतोय .

CID ची गोष्ट !

पामर ·

In reply to by स्पा

पगला गजोधर Mon, 07/14/2014 - 10:00
ACP: दया, गोलीका जख्म सीनेपे है, मतलब . . . (गहन विचारांती)… गोली सामनेसे चलायी हुई है ! दया: सर, यु आर सिम्पली ब्रिलीयंट . . .

चौकटराजा Sun, 07/13/2014 - 17:51
आणि मी मात्र इतकी विनोदी,इतकी टुकार,इतकी भंगार,इतकी भिकार serial परत का बघितली कारण त्वा पामराला ठाव हाय की ब्वाणचा पिच्चर बघाया पॉपकार्न धरून कित्ती किती पयशे जात्यात. परत जायाचे पेट्रोलचा कर्च वायला. हेय काय घराल बसून शान लोळत बगता येतं त्ये बी वायाला चाल्लेली चपाती फोडणीची करून खायाला आस्ती बरूबर !

प्यारे१ Sun, 07/13/2014 - 22:41
>>> CID ची scorpio आधीची टोयोटाची 'कॅलिस' विकली काय? बाकी लहान पोरांमध्ये 'शीआयई' लई फेमस आहे. एका लहानग्यानं शीआयई म्हटल्याम्हटल्या त्याच्या काकूनं लगबगीनं कागद शोधायला सुरुवात केलेलं परतेक्ष पाह्यलंय.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Mon, 07/14/2014 - 13:14
एका लहानग्यानं शीआयई म्हटल्याम्हटल्या त्याच्या काकूनं लगबगीनं कागद शोधायला सुरुवात केलेलं परतेक्ष पाह्यलंय.
फुटलो. =)) _/\_ =))

ब़जरबट्टू Mon, 07/14/2014 - 10:31
पण थोड्या वो कंसमे का स्वगत कमी लिहला असता तर बेस झाला असता.. लिंक तुटते हो.. बाकी मस्तच...

इशा१२३ Mon, 07/14/2014 - 12:39
हाय राम..वैताग आणलाय या सीआयडी ने..माझ लेकरूही फॅन आहे या सीआयडी टिमच...दयाचे स्टंट तर काहिच्याकाहि दाखवतात आणि ते फार आवडतात.अभिजीतही लाडका.काहिहि असत कहर म्हणजे एका एपीसोडमधे तीन सिआयडि ओफिसरणी बारमधे नाचताना दाखवल्यात..खूनी शोधायला सापळा म्हणे..ड्यूटी.. असली विनोदि शिरियल फारच गंभीरपणे बघतात हि मुल.एकुणच लहान मुलांमधे भयंकर लोकप्रिय आहे सिरियल....सांगुन्,रागावून काहि उपयोग होइना लेकावर,शेवटी चॅनलच ब्लॉक केला.रोज खुनाखुनी आणि प्रेत बघणे नकोच..आता तारक मेहता बघणे चालू आहे...

इरसाल Mon, 07/14/2014 - 13:29
ज खुनाखुनी आणि प्रेत बघणे नकोच..आता तारक मेहता बघणे चालू आहे... अहो त्यात पण "दया" आहेच.

भाते Mon, 07/14/2014 - 20:04
पण आमच्या शिआयडीला कायबी बोलायचं नायं. शनिवारी तो येकच टिपी असतो वो आम्हाला!

आसिफ Mon, 07/14/2014 - 23:26
The viral fever ने केलेले CID चे जबरा spoof बघा. हाफिसात असलेने अत्ता लिंक जडवु शकत नाही. कुछ तो गडबड है दया..कुछ तो गडबड है..

पाटीलभाऊ Tue, 07/15/2014 - 11:34
तरी शिआयडी बघताना लय मजा येते राव..दिवस कसा जातो कळतच नाहि बुआ..! काय तो अभिनय...अन काय ते संवाद.. *lol*

पैसा Fri, 08/01/2014 - 23:34
मस्त लिहिलंय! पण तरी शायडी द ग्रेट! दया कुछ तो गडबड है आणि दया तोड दो ये दरवाजा हे ड्वायलॉक ऐकल्याशिवाय बरं नै वाटत!

In reply to by स्पा

पगला गजोधर Mon, 07/14/2014 - 10:00
ACP: दया, गोलीका जख्म सीनेपे है, मतलब . . . (गहन विचारांती)… गोली सामनेसे चलायी हुई है ! दया: सर, यु आर सिम्पली ब्रिलीयंट . . .

चौकटराजा Sun, 07/13/2014 - 17:51
आणि मी मात्र इतकी विनोदी,इतकी टुकार,इतकी भंगार,इतकी भिकार serial परत का बघितली कारण त्वा पामराला ठाव हाय की ब्वाणचा पिच्चर बघाया पॉपकार्न धरून कित्ती किती पयशे जात्यात. परत जायाचे पेट्रोलचा कर्च वायला. हेय काय घराल बसून शान लोळत बगता येतं त्ये बी वायाला चाल्लेली चपाती फोडणीची करून खायाला आस्ती बरूबर !

प्यारे१ Sun, 07/13/2014 - 22:41
>>> CID ची scorpio आधीची टोयोटाची 'कॅलिस' विकली काय? बाकी लहान पोरांमध्ये 'शीआयई' लई फेमस आहे. एका लहानग्यानं शीआयई म्हटल्याम्हटल्या त्याच्या काकूनं लगबगीनं कागद शोधायला सुरुवात केलेलं परतेक्ष पाह्यलंय.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Mon, 07/14/2014 - 13:14
एका लहानग्यानं शीआयई म्हटल्याम्हटल्या त्याच्या काकूनं लगबगीनं कागद शोधायला सुरुवात केलेलं परतेक्ष पाह्यलंय.
फुटलो. =)) _/\_ =))

ब़जरबट्टू Mon, 07/14/2014 - 10:31
पण थोड्या वो कंसमे का स्वगत कमी लिहला असता तर बेस झाला असता.. लिंक तुटते हो.. बाकी मस्तच...

इशा१२३ Mon, 07/14/2014 - 12:39
हाय राम..वैताग आणलाय या सीआयडी ने..माझ लेकरूही फॅन आहे या सीआयडी टिमच...दयाचे स्टंट तर काहिच्याकाहि दाखवतात आणि ते फार आवडतात.अभिजीतही लाडका.काहिहि असत कहर म्हणजे एका एपीसोडमधे तीन सिआयडि ओफिसरणी बारमधे नाचताना दाखवल्यात..खूनी शोधायला सापळा म्हणे..ड्यूटी.. असली विनोदि शिरियल फारच गंभीरपणे बघतात हि मुल.एकुणच लहान मुलांमधे भयंकर लोकप्रिय आहे सिरियल....सांगुन्,रागावून काहि उपयोग होइना लेकावर,शेवटी चॅनलच ब्लॉक केला.रोज खुनाखुनी आणि प्रेत बघणे नकोच..आता तारक मेहता बघणे चालू आहे...

इरसाल Mon, 07/14/2014 - 13:29
ज खुनाखुनी आणि प्रेत बघणे नकोच..आता तारक मेहता बघणे चालू आहे... अहो त्यात पण "दया" आहेच.

भाते Mon, 07/14/2014 - 20:04
पण आमच्या शिआयडीला कायबी बोलायचं नायं. शनिवारी तो येकच टिपी असतो वो आम्हाला!

आसिफ Mon, 07/14/2014 - 23:26
The viral fever ने केलेले CID चे जबरा spoof बघा. हाफिसात असलेने अत्ता लिंक जडवु शकत नाही. कुछ तो गडबड है दया..कुछ तो गडबड है..

पाटीलभाऊ Tue, 07/15/2014 - 11:34
तरी शिआयडी बघताना लय मजा येते राव..दिवस कसा जातो कळतच नाहि बुआ..! काय तो अभिनय...अन काय ते संवाद.. *lol*

पैसा Fri, 08/01/2014 - 23:34
मस्त लिहिलंय! पण तरी शायडी द ग्रेट! दया कुछ तो गडबड है आणि दया तोड दो ये दरवाजा हे ड्वायलॉक ऐकल्याशिवाय बरं नै वाटत!
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेले किती तरी दिवस(सॉरी, वर्ष आणि दररोज दुपारी) मुंबई पोलिसांकडे प्रचंड म्हणजे प्रचंड काम असल्याने अनेक महत्वाच्या cases सोनी चॅनलनी ह्या CID कडे सोपवल्या आहेत हे सर्वांना माहीत आहेच.(हेच हो आपले खुन, अपहरण वगैरे..)आपले सर्वांचे लाडके A.C.P. प्रद्युम्न (काय त्यांचे डोळे,काय त्यांचे टक्कल,काय त्यांचा ३ piece suit ...वा जवाब नाही!

भोसरीचा जितेंदर सिंग!

हुप्प्या ·

टवाळ कार्टा Sun, 07/13/2014 - 18:09
मला वाटते ह्या भोसरीच्या* सिंगाला उत्तम मराठी बोलता येईपर्यंत लाथाबुक्क्यांनी तुडवून काढत राहिले पाहिजे. पुढील सहा महिने मराठी सोडून अन्य कुठले शब्द तोंडातून निघाल्यास असेच वळ उठेपर्यंत झोडपून काढावे ही शिक्षा कुठल्या सक्तमजुरीपेक्षा जास्त योग्य ठरेल.
आपली प्रगती अशीच उलट्या दिशेने सुरु राहुदे मग आपल्यात आणि प्राण्यांत फरक नाही उरणार

In reply to by टवाळ कार्टा

आपली प्रगती अशीच उलट्या दिशेने सुरु राहुदे मग आपल्यात आणि प्राण्यांत फरक नाही उरणार
शत प्रतिशत सहम्त ! मै भी यही बोलने वाला था ! ऐसे फंदामेन्टालिस्ट मराठी लोगोंके वजह से हमारी बम्बै मे बवाल मचा हुवा है ! अब ये घाटी लोग हमारे पुना मे भी ऐसे बवाल निकाल के राष्ट्रभाषा हिंदी एवं विश्वभाषा अंग्रेजी के खिलाफ लोगोंको भडका रहे है ! ये बहुतही निंदनीय बाब है ! सच मे ऐसे मराठी लोगोंकी गणना प्राणीयोंमेही करनी चाहिये !

In reply to by प्रसाद गोडबोले

बालगंधर्व Mon, 07/14/2014 - 13:01
सर्व्याना महित पदले अहे केइ जितेन्दर सिन्ग हा कुहुप कुरुर मानुस अहे. महनुनच तो भोसरिचा* अहे. मी मराटी झी मराटि हाम आझा बाना आहे. अप्ल्या महरस्त्रात मराटीसाथी राजेनी अनि मवल्यानी रत्क सान्दले. त्या रज्यात मराटीचा अपमान आपन सहण कर्नार नाहि.

In reply to by प्रसाद गोडबोले

टवाळ कार्टा Mon, 07/14/2014 - 15:28
माझा आक्शेप
लाथाबुक्क्यांनी तुडवून काढत राहिले पाहिजे. पुढील सहा महिने मराठी सोडून अन्य कुठले शब्द तोंडातून निघाल्यास असेच वळ उठेपर्यंत झोडपून काढावे ही शिक्षा कुठल्या सक्तमजुरीपेक्षा जास्त योग्य ठरेल.
यासाठी होता यापेक्शा वेगळे कायद्याच्या चौकटीमधे बसणारे मार्ग सुध्धा आहेत... आणि चुक शाळेला परवानगी देणार्यांची आहे... आणि त्यांच्यामधे एखादा तरी मराठी अधिकारी असणार जो झोपा असणार बाकी चालुदे...

In reply to by टवाळ कार्टा

यासाठी होता यापेक्शा वेगळे कायद्याच्या चौकटीमधे बसणारे मार्ग सुध्धा आहेत... असणार
ह्या असल्या लेच्यापेच्या मनोवृत्तीच्या मुळेच आजवर मराठी माणसाचे नुसकान झाले आहे तरीही मराठी माणसाला काही अक्कल येत नाही
आणि चुक शाळेला परवानगी देणार्यांची आहे... आणि त्यांच्यामधे एखादा तरी मराठी अधिकारी असणार जो झोपा
संकट समये प्राप्ते वयं पंचाधिकं शतम हे अजुनही कळत नाही मराठी लोकांना !तुम्ही बसा एकामेकावरच खापर फोडत अन बाहेरच्यांना घेवुदे फायदा !!
बाकी चालुदे...
चालुच रहाणार हो ... अशी पेबळी मनोवृत्ती असेल तर असले प्रकार चालुच रहाणार !

In reply to by टवाळ कार्टा

तुमचा मुद्दाच खोडुन काढलाय हे ही तुम्हाला समजलेले दिसत नाहीये *biggrin* ... असोच ! आता बघुया तुम्हाला किती कंटाळा आलाय

नगरीनिरंजन Sun, 07/13/2014 - 19:50
आधी इंग्रजी शाळेत पोरं घालू नयेत आणि घातली तर इंग्रजीची सक्ती होते म्हणून रडू नये. पालकांना शाळेत इंग्रजीशिवाय इतर भाषा बोलायला बंदी आहे हा नियम माहित नसेल यावर माझा विश्वास नाही आणि हा नियम माहिती असूनही मुलांना त्या शाळेत घातले जात असेल तर पालकही तितकेच दोषी आहेत. शिवाय इतर कारणांसाठी शाळेत मुलांना शिक्षा होत नसेल असेही नाही. पण असो.

In reply to by नगरीनिरंजन

हुप्प्या Sun, 07/13/2014 - 21:50
पालकांची चूक कशी? शाळेने वाट्टेल ते नियम बनवावेत आणि ते पालकांनी स्वीकारले असे समजावेत हे उफराटे तर्कट आहे. शाळेचे नियम हे कायद्याच्या कक्षेत बसणारेच पाहिजेत. महाराष्ट्रातील शाळा जर मराठीवर बंदी घालत असेल आणि मराठी बोलणार्‍यांना अमानुष मारहाण केली जाईल असा नियम ठरवत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवायलाच हवा. मग ती इंग्रजी माध्यमाची शाळा असो वा कन्नड वा उर्दू. आम्ही तुमच्या शाळेत मुले दाखल करणारच आणि तुम्ही असले जाचक बेकायदेशीर नियम लादता कामा नये असे म्हणण्याचा हक्क पालकांना आहे. शुल्क भरणारा ग्राहक म्हणून तो त्यांचा हक्क आहे.

In reply to by हुप्प्या

नगरीनिरंजन Mon, 07/14/2014 - 00:33
बेकायदेशीर नियम आहेत हे पालकांना आधीच माहित होते की नाही? मग त्यांनी आधीच तक्रार का केली नाही? मुळात हे अगतिक ग्राहक आहेत आणि यांना कसेही वागवले तर चालते असा या शाळांचा (रास्त) समज व्हायची वेळ का आली याचा विचार करण्याची गरज आहे.

In reply to by नगरीनिरंजन

हुप्प्या Mon, 07/14/2014 - 06:45
मुलांनी मराठी बोलले तर त्यांना अमानुष मारहाण केली जाईल असा नियम बनवायची हिंमत ती शाळा दाखवेल असे वाटत नाही. त्या भोसरीच्या संचालकाने आपला मराठीवरील राग त्या मुलांवर काढला असावा. प्रियदर्शिनी शाळेबद्दल आपल्याला काही जास्तीची माहिती असेल तर ती जरूर सांगा.

In reply to by हुप्प्या

सुबोध खरे Mon, 07/14/2014 - 10:17
या प्रश्नाचे दोन पैलू आहेत १)इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इंग्रजी सोडून दुसर्या कोणत्याही भाषेत बोलू नये अस नियम असणे हे एक आहे. (मग यात हिंदी/ गुजराती सुद्धा आहे.) २) मुलांना अमानुष मारहाण करणे. यापैकी पहिली गोष्ट बर्याच शाळांच्या नियमात आहे आणि हे नियम आपण शाळेत दखल घेतो तेंव्हा आपल्या कडून पूर्ण संमती सकट सही करून घेतले जातात. या गोष्टीला भाषिक रंग दिला जाऊ नये असे मला वाटते. मुंबईत मला माहित असलेल्या बर्याच अशा शाळा ( ज्यात कोनव्हेन्ट शाळा प्रकर्षाने येतात) आहेत. जेथे मुल जर इंग्रजी सोडून दुसर्या भाषेत बोलले तर मुलांना ५० ते १०० रुपये दंड होतो आणि हा दंड पालकांना शाळेत येउन भरावा लागतो . याचा परिपाक म्हणून पालक मुलाला इंग्रजी बोलण्याची सक्ती करतात ( १०० रुपये भरण्यापेक्षा शाळेत खेप मारण्याची कटकट टाळण्यासाठी). "शुल्क भरणारा ग्राहक म्हणून तो त्यांचा हक्क आहे." बर्याच क्लब च्या नियमावलीत पुरुषानी बूट घालून येणे आवश्यक आहे. जीन्स ची पयंत चालत नाही ( यात बरोबर कि चूक या वादात न पडता) असे नियम करणे क्लबच्या मुलभूत हक्कात येतात असे उच्च न्यायालयांनी वेळोवेळी आपल्या निकालांमध्ये म्हटले आहे. शुल्क भरणाऱ्या ग्राहकाचा हक्क हा सरकारी शाळेत ग्राह्य धरला जाईल जर खाजगी विनाअनुदानित शाळेत आपल्याला जायचे असेल तर त्यांनी कायद्याच्या अखत्यारीत राहून केलेली नियमावली आपल्याला मान्य करावीच लागेल. नाही तर तेथे आपण प्रवेश घेऊच नका. यावर सरकार कोणतीही सक्ती करु शकत नाही. (खाजगी विना अनुदानित संस्थांच्या प्रवेशा बत) असा सर्वोच्च न्यायालयाच्या ११ न्यायाधीशांच्या पूर्ण घटनापीठाने दिलेला निर्णय आहे. (यामुळेच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशात बजबजपुरी माजली आहे हा भाग वेगळा याची विदा मी सवडीने देतो) दुसरा भाग मुलाला अमानुष मारहाण करणे हा सर्वथैव निंदनीय आहे आणि याचासुद्धा ते मुल मराठी आहे कि हिंदी भाषिक आहे याच्याशी संबंध नसावा. या बद्दल जितेंद्र सिंग यांच्यावर कायदेशीर कारवाई नक्कीच झाली पाहिजे.

In reply to by सुबोध खरे

>> असे नियम करणे क्लबच्या मुलभूत हक्कात येतात असे उच्च न्यायालयांनी वेळोवेळी आपल्या निकालांमध्ये म्हटले आहे. शुल्क भरणाऱ्या ग्राहकाचा हक्क हा सरकारी शाळेत ग्राह्य धरला जाईल जर खाजगी विनाअनुदानित शाळेत आपल्याला जायचे असेल तर त्यांनी कायद्याच्या अखत्यारीत राहून केलेली नियमावली आपल्याला मान्य करावीच लागेल. प्रश्न हा एखाद्या क्लबाच्या मूलभूत हक्कात एखादी गोष्ट बसते की नाही इतका अल्प अखत्यारीचा नाही आहे. कारण शाळा आणि क्लबात फरक आहे. आपल्या मराठी भूमिवर असली थेरे कायद्याचा आधार घेऊन कोणी करू पाहत असेल तर ती जरूर धुडकवावी. आमच्या कंपनीत देखील मराठीत बोलल्यावर 'नो रिजनल लँग्वेज' असे ऐकवले होते मला त्यावर मी 'देन प्लीज से नो फॉर हिंदी अ‍ॅज वेल' असे मी म्ह्टले कारण 'फ्रॉम अ‍ॅन अमेरिकन कंपनीज पॉईंट ऑफ व्ह्यू हिंदी इज अल्सो अ रिजनल लँग्वेज. हेन्सफोर्थ आय विल चेक व्हेदर यू से द सेम टू हिंदी स्पिकींग पीपल अ‍ॅज वेल. इफ नॉट, आय विल कंटीन्यू डिसओबेइंग यू' असे ठणकावून नक्कीच सांगावे. शाळांचे नियम, शाळांबाबतचे सरकारी नियम या बाबतीत सनदशीर मार्गाने काही सगळेच प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे कधी कधी शिवसेना मार्गाचा अवलंब करणे योग्य असते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सुबोध खरे Tue, 07/15/2014 - 12:48
पुपे साहेब मी सुरुवातीसच म्हटले आहे कि "इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इंग्रजी सोडून दुसर्या कोणत्याही भाषेत बोलू नये अस नियम असणे हे एक आहे. (मग यात हिंदी/ गुजराती सुद्धा आहे.)" तेंव्हा त्यात मराठी किंवा हिंदी असा वाद येऊ नये. तेंव्हा आपला "जर हिंदी चालत असेल तर मराठी चालेल हा मुद्दा गैरलागू आहे. जर माध्यम इंग्रजी निवडले असेल तर मी मराठीतच बोलणार हा अट्टाहास आहे. आपल्याला जर मराठीचा इतका जाज्वल्य अभिमान असेल तर मराठी माध्यमात घालावे.( दुर्दैवाने मराठी माध्यमाच्या शाळा सरकारी नियमांमुळे फारश्या चांगल्या राहिलेल्या नाहीत हि आज वस्तुस्थिती आहे). राहिली गोष्ट शिवसेनेची. त्यांची स्वताची मुले तरी कुठे मराठी माध्यमात शिकली आहेत? आदित्य ठाकरे स्वतः बॉम्बे स्कोटीश शाळेतून शिकला जेथे मी सांगितलं तसा इग्रजी सोडून इतर भाषात बोलल्यास पालकांना स्वतः येऊन दंड भरायला लावायचा हा नियम आहे. जाऊ द्या साहेब आपलाच दाम खोटा असताना वाद कशाला घालायचा.

In reply to by सुबोध खरे

मृगनयनी Tue, 07/15/2014 - 13:10
हाहा हाहा हाहा !!!... सहमत सुबोध......... मुळात "भोसरी" ह्या गावात किंवा पुण्याच्या उपनगरात जो काही प्रकार घडला तो नक्कीच निन्दनीय आहे. पण "नक्की" काय घडलंय.. याची शहनिशा होणे अत्यंत महत्वाचे आहे. "गाववाल्यां"चा माज ओसंडून वाहणार्‍या या उपनगरात इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडल्या जातात... याचेच एक मोठ्ठे अप्रूप वाटते. असो... "जितेन्द्र सिन्ग" यांचे सोशल आणि पॉलिटिकल कॉन्टॅक्ट्स बहुतेक कमी पडले असावेत. नाहीतर मराठी माध्यमाच्या शिक्षकांनी मुलांना मरेस्तोवर मारण्याच्या घटना भोसरी'ला नवीन नाहीत. त्याचप्रमाणे ज्या अंगणात आपल्याला नाचता येत नाही... ते अंगण लोकांना वाकडेच वाटते. "ही" घटना तर फक्त एक निमित्तमात्र आहे....

In reply to by मृगनयनी

कॉन्टॅक्ट कमी पडले नसावेत. या जितेंंद्रसिंह साहेबांचे डंपर हायवेवरून ज्या संख्येने आणि वारंवारितेने ये जा करतात त्यावरून असे वाटत नाही.

In reply to by मृगनयनी

कपिलमुनी Tue, 07/15/2014 - 16:20
धागा गेला खड्ड्यात ! यांनी भोसरी वरचा जुना स्कोर इथे सेटल केला ..
या उपनगरात इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडल्या जातात... याचेच एक मोठ्ठे अप्रूप वाटते
तुमच्या कल्पनेमधला भोसरी बदलला आहे आता ..आणि माज करणार्‍या गाववाल्यांच्या पोरांनी इंग्रजी शिकू नये का ?

In reply to by सूड

मृगनयनी Tue, 07/15/2014 - 18:09
धागा गेला खड्ड्यात ! यांनी भोसरी वरचा जुना स्कोर इथे सेटल केला .. या उपनगरात इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडल्या जातात... याचेच एक मोठ्ठे अप्रूप वाटते तुमच्या कल्पनेमधला भोसरी बदलला आहे आता ..आणि माज करणार्‍या गाववाल्यांच्या पोरांनी इंग्रजी शिकू नये का ?
कपिलमुनी... भोसरी'बद्दल कधी स्कोअर-सेटल करण्यासारखे काहीच घडले नव्हते. उलट 'भोसरी' येथे पान्डव राहून गेल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे आपण आधी कन्फर्म करावे. आणि गाववाल्या पोरांनी जरूर इंग्रजी शिकावे. उलट ती तर त्यांची गरज आहे. पण शिकत असताना शिक्षणसंस्थेचे नियमही पाळावेत, अशी माफक अपेक्षा आहे. गुंडागर्दी करून सगळ्याच गोष्टी मिळत नाहीत ना!!!! .. तसेच वर माझ्या प्रतिसादात मी हे देखील लिहिले आहे, की " नक्की मारहाण किती व कश्यासाठी झालेली आहे, याची सखोल चौकशी व्हावी. कारण "हे" लोक कितीही शिकले किन्वा तुमच्या भाषेत सुधारले.. तरी "गावठी पॉलिटिक्स" यांच्या रक्तातच असते..... असो... कपिलमुनी... तुम्हीदेखील भोसरी'चे असाल..तर या गोष्टी तुम्हाला माहित असतीलच... कृपया मनाला लावून घेऊ नये.... माझे वक्तव्य हे घडलेल्या घटनेशी संबंधित आहे. :)
सूड कोणाशी वाद घालताय कपिलमुनी? बाईंचे प्रतिसाद म्हणजे ताजमहालातलं बुद्धीचं थडगं आहे. डोकं आपटू नका, तुम्हालाच ईजा होईल. थडग्यावर काहीही फरक पडणार नाही.
कृपया धाग्याशी संबंधित बोलावे. ताजमहाला'चा इतिहास मी मागील एका धाग्यावर स्पष्ट केला होता. तो "तेजोमहाल"- शिवमंदिर असल्याचे सिद्धही झालेले आहे. * उर्वरीत वैयक्तिक प्रतिसाद संपादित.

In reply to by कपिलमुनी

मृगनयनी Tue, 07/15/2014 - 19:11
http://www.sakaaltimes.com/NewsDetails.aspx?NewsId=5608647216075752592&SectionId=5171561142064258099&SectionName=Pune&NewsDate=20140709&NewsTitle=20%20students%20beaten%20up%20in%20Bhosari%20school http://www.mid-day.com/articles/12-students-from-pune-school-thrashed-for-speaking-in-marathi/15436191 वर दिलेल्या सकाळ व मिड-डे यांच्या लिंक्स मध्ये स्पष्ट लिहिले आहे, की या मुलांना शाळेत इंग्रजी बोलण्यासाठी या आधीही १८-२० वेळा सौम्य शब्दांत वॉर्निन्ग देऊन झालेली होती. परन्तु तरीही ते मुद्दाम मराठीत बोलत होते. तसेच शिक्षकांशी बोलताना अर्वाच्य भाषेचाही प्रयोग करत होते. ही मुले आठवी'तली असल्यामुळे शिक्षकांनी सांगितलेले न समजण्याइतकी लहान नक्कीच नाहीत. त्यामुळे शिक्षकांना यांच्यावर हात उचलावाच लागला. नॉर्मली शहरी भागात "असे" प्रकार घडताना दिसत नाही.. किमान पुण्यात तरी! :) .. :) शिक्षकांना शिवीगाळ करणे, संस्थेच्या नियमानुसार वॉर्निन्ग देऊन सांगितले तरी मुद्दाम मराठीतच बोलणे इ. प्रकार जर १४-१५ वर्षांच्या मुलांकडून घडत असतील.. तर त्यांना आवरणे व त्यांना सुसंस्कार शिकवणे. हे केवळ त्यांचे (सुसंस्कृत) पालकच करू शकतात. वाईट याचेच वाटते, की या काही मुलांमुळे बाकीच्या चांगल्या मुलांचे नुकसान होते.

In reply to by सुबोध खरे

असहमत खरे साहेब. मुलांनी एकमेकात तासाच्या मधे कोणत्या भाषेत बोलावे यासाठी कडक कायदे असावेत याला माझा विरोध आहे. शाळेत तासिका चालू असताना, पीटीच्या वेळेला इंग्रजीत बोलावे अशी भूमिका असणे ठीक परंतु मी मित्रांशी किंवा त्यानी माझ्याशी इतर वेळेला मराठीत बोलणे यासाठी शाळेचा विरोध असणे याला माझा विरोध नक्कीच आहे. आणि महाराष्ट्रात असताना असा नियम कोणी करत असेल तर तो आपण ग्राहक म्हणून नक्कीच मोडून काढावा. झाला प्रश्न मराठी आणि इतर भाषांचा तर हे जितेंद्रसिंह उत्तर भारतीय असावेत आणि उत्तर भारतीयांची मराठीला दाबायची प्रवृत्ती सर्वत्र दिसते त्यासाठी असल्या सो कॉल्ड (तथाकथित) नियमांचा वगैरे आधार घेतला जातो. त्याचा मुकाबला प्रतिझुंडीनेच होऊ शकतो. राहीला प्रश्न नेत्यांची मुले कोणत्या शाळेतून शिकली याचा, तर नेत्यांच्या धोरणाचा जनतेला काय फायदा होतो आहे हे ठरवून जनतेने योग्य धोरणाचा फायदा उठवावा. आणि हो ही बॉम्बे स्कॉटिश विद्यार्थी मिळत नाहीत पन्नासवेळा कधी अ‍ॅडमिशन घेताय म्हणून फोन करत असते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सुबोध खरे Tue, 07/15/2014 - 19:21
पुपे साहेब, आपला कशाला संमती आहे आणि कशाला विरोध आहे हा आपला वैयक्तिक मताचा भाग आहे. मी फक्त असे करणे कायदेशीर आहे का यावर भाष्य केले. तसे पाहिले तर पुणे शहराच्या मध्यभागी असलेल्या PICT (pune Institute of Computer technology) या संस्थेत विद्यार्थ्यांनाच नाही तर शिक्षकांना सुद्धा (dress code) पोशाखाची सक्ती आहे. आता अभियांत्रिकी की महाविद्यालयात ड्रेस कोड असावा का आणि तशी सक्ती करण्याचा अधिकार त्या संस्थेला आहे काय? हे प्रत्येकाचे वैयक्तिक मत आहे. पण तसा नियम करण्याचा कायदेशीर अधिकार त्यांना आहे आणि ज्यांना ते पटत नाही त्यांनी तेथे प्रवेश घेऊ नये किंवा नोकरी करू नये. भाषिक अस्मितेचा आणि अभिमानाचा प्रश्न आला कि आपण तलवारी घेऊन उभे राहतो.पण मुंबईत असणार्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील निम्मी महाविद्यालये हि भाषिक किंवा धार्मिक अल्पसंख्यांका साठी असून त्यातील ५१ टक्के जागा ते आपल्या भाषिक बांधवाना देतात ( यात मुसलमान अंजुमन इस्लाम ख्रिस्ती फादर आग्नेल,डॉन बॉस्को, जैन, गुजराती सोमैया , सिंधी थडूमल आणि दाक्षिणात्य SIES येतात ). यावर कोणी( राजकीय पक्ष धरून) आवाज उठवताना दिसत नाही. ~ राहिल्या सरकारी संस्था तेथे ५१ टक्के आरक्षण आहेच (जे आता ७३ टक्के होऊ घातले आहे). म्हणजे फक्त ४९ टक्के जागा फक्त बुद्धिमत्तेसाठी आहेत. ~

In reply to by सुबोध खरे

आजानुकर्ण Tue, 07/15/2014 - 21:33
राहिल्या सरकारी संस्था तेथे ५१ टक्के आरक्षण आहेच (जे आता ७३ टक्के होऊ घातले आहे). म्हणजे फक्त ४९ टक्के जागा फक्त बुद्धिमत्तेसाठी आहेत.
निव्वळ हास्यास्पद दावा. ४९ टक्के जागा बुद्धिमत्तेसाठी व उरलेल्या ५१ टक्के जागा मठ्ठ दगडांसाठी की काय! असो.. सरकारी संस्थांमधील आरक्षित जागांमध्ये प्रवेश घेणारे व शिकणारे बुद्धीमान नसतात व अनारक्षित जागांमध्येच प्रवेश घेणारे तेवढे बुद्धिमान असतात हा दावा निव्वळ हास्यास्पद आहे. बाकी चालू द्या (माझ्या परवानगीची गरज आहेच असे नाही!)

In reply to by आजानुकर्ण

सुबोध खरे Tue, 07/15/2014 - 22:20
साहेब बारावीच्या PCM मध्ये ३६ % मिळालेल्या विद्यार्थ्याला मुंबईच्या जे जे रुग्णालयात प्रवेश मिळाला आहे. (अशा डॉक्टरकडे आपण जाणार का? ) आणि खुल्या वर्गात ८७. ३ टक्क्याला मिळाली नाही. तफावत असावी पण किती? दहा ते पंधरा टक्के ठीक आहे. (४१ टक्के?) आमच्या मित्राने मागास म्हणून एम बी बी एस आणि एम एस केले आणि शेवटी कोणी रुग्ण येईनात म्हणून एक दिवस महाराष्ट्र शासन राजपत्रात आपले कांबळे आड नाव बदलून ब्राम्हण आड नाव लावले.त्याच्या स्वतःच्याच शब्दात अरे आमचेच लोक येत नव्हते "अरे हा "आपल्यापैकी" आहे याच्या कडे नको. कम्युनिस्ट विचार सरणी "बुद्धिमत्ता हि जन्मजात नसून ज्या वातावरणात वाढता त्यावर ठरते " हि कालबाह्य आणि चुकीची ठरलेली आहे. असो आपले मत आपल्यापाशी

In reply to by सुबोध खरे

आजानुकर्ण Tue, 07/15/2014 - 22:30
बारावीच्या PCM मध्ये ३६ % मिळालेल्या विद्यार्थ्याला मुंबईच्या जे जे रुग्णालयात प्रवेश मिळाला आहे. (अशा डॉक्टरकडे आपण जाणार का? ) आणि खुल्या वर्गात ८७. ३ टक्क्याला मिळाली नाही. तफावत असावी पण किती? दहा ते पंधरा टक्के ठीक आहे. (४१ टक्के?)
बारावीला PCM ऐवजी PCB चे निकष ग्राह्य धरत होते असे वाटते. प्रवेशपरीक्षा येण्यापूर्वी एससी-एसटी-ओबीसी-एनटी वगैरे मागास जातींसाठी मार्कांचा निकष ४५ टक्के व खुल्या जागांसाठी मार्कांचा निकष ५० टक्के होता. पीसीएमला ३६ टक्के मार्क मिळूनही पीसीबीला जास्त मार्क मिळणे शक्य आहे. बाकी अमुकतमुकला १०० टक्के गुण मिळूनही प्रवेश मिळाला नाही अशीही अॅनेकडोटल उदाहरणे ऐकली आहेत. पेमेंट सीट्सबद्दल आपले काय मत आहे? ती बंद करावीत का? की पैशे भरल्याने बुद्धीमत्ता आपोआपच येते? बाकी शिक्षणाचा आणि आयुष्यातील प्रगतीचा फारसा संबंध नसतो असे चिंत्य मत येथेच वाचले आहे त्यामुळे त्या विषयावर चर्चा करण्याचा हेतू समजला नाही.

In reply to by आजानुकर्ण

सुबोध खरे Wed, 07/16/2014 - 09:46
पी सी एम नव्हे पी सी बी असायला हवे टंकन दोषाबद्दल क्षमा. अभियांत्रिकीला हा ५० टक्क्याचा निकष होता वैद्यकीय प्रवेशासाठी नाही. पेमेंट सीट ला सुद्धा तसाच निकष असावा याबद्दल दुमत नाही. पैसे भरल्यावर नुसती शिकायचीच नव्हे तर शिकवायचीही अक्कल येते. जातीप्रमाणे १० ते २० टक्के गुण हे आधिक (ग्रेस) द्यावे. अगदीच ३६ टक्के म्हणजे फारच वाईट आहे. राहिली गोष्ट एखाद्या परीक्षेत मुलाला चांगले गुण मिळाले नाहीत तर मुलगा हुशार नाही असा मुळीच अर्थ नाही. शैक्षणिक यशाचा आणि आयुष्यातील यशाचा १० टक्के संबंध आहे असे माझे आजही मत आहे. परंतु काही बाबतीत विशिष्ट कौशल्य प्राप्त करण्यासाठी आपली तेवढी पात्रता असणे आवश्यक आहे उदा. लढाऊ विमानाचा वैमानिक (फायटर पायलट) होण्यासाठी आवश्यक असलेली PABT टेस्ट पास न करता आपण एखाद्याला आरक्षणातून असा वैमानिक बनवला तर काय होईल? तसेच एकाच वर्गात एकाच शिक्षण घेतलेले दोन विद्यार्थी पोलिस उप निरीक्षक म्हणून भरती होतात. एक जण आरक्षणातून ७ व्या वर्षी निरीक्षक म्हणून बढती मिळवतो आणि खुल्या वर्गातील उपनिरीक्षक १५ वर्षे पर्यंत लटकत बसतो( एवढे कमी नाही तर त्याने पोलिस प्रशिक्षण अकादमीत शिकवलेला ६ वर्षे कनिष्ठ असलेला विद्यार्थी त्याच्या डोक्यावर ठाणे अंमलदार म्हणून वरिष्ठ बनून येतो यात कोणती गुणवत्ता आहे? राहिली गोष्ट मराठी अस्मितेची त्याबद्दल मी वर म्हटलेच आहे कि आपण जर गुजराती सिंधी कच्छी मद्रासी असाल तर आपल्याला भाषिक अल्पसंख्यांक आणि ख्रिस्ती, मुसलमान असाल तर धार्मिक अल्पसंख्यांक म्हणून अभियांत्रिकीत आरक्षित जागा मिळतात याबद्दल आपली अस्मिता जागी होत नाही. पण एखाद्या गैर मराठी माणसाने मराठी मुलांना मारहाण केली तर लाथा बुक्क्यांनी तुडवायची भाषा होते. हेच जर तो माणूस मराठी असता तर एवढी चर्चा झाली नसती. मग त्याला भाषिक रंग नव्हे तर माणुसकीचा अभाव असा रंग आला असता. Losing sight of the wood for the trees अशी आपली अवस्था आहे. आज हि परीस्थिती शिक्षणात आहे उद्या नोकर्यात आणि घरांच्या सोडतीत झाली तर आश्चर्य वाटू नये. असो

In reply to by सुबोध खरे

आजानुकर्ण Wed, 07/16/2014 - 16:19
अभियांत्रिकीला हा ५० टक्क्याचा निकष होता वैद्यकीय प्रवेशासाठी नाही.
जर वैद्यकीय प्रवेशाला निकष नव्हता तर बारावीला ३६ टक्के गुण मिळवणारा मुलगा अपात्र आहे हे आपण कसे काय ठरवू शकतो?
परंतु काही बाबतीत विशिष्ट कौशल्य प्राप्त करण्यासाठी आपली तेवढी पात्रता असणे आवश्यक आहे उदा. लढाऊ विमानाचा वैमानिक (फायटर पायलट) होण्यासाठी आवश्यक असलेली PABT टेस्ट पास न करता आपण एखाद्याला आरक्षणातून असा वैमानिक बनवला तर काय होईल?
आरक्षणाचे सध्याचे नियम माहीत नाहीत पण आरक्षणाबाबत तुमचा गैरसमज असावा. खुल्या जागांसाठी असलेली परीक्षा आणि राखीव जागांसाठी असलेली परीक्षा यात फरक नाही. एकदा प्रवेश मिळाल्यावर दोन्ही गटांना सारख्याच परीक्षा व तोच अभ्यासक्रम असतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने आरक्षणातून प्रवेश घेतल्याने तो कमकुवत असल्याचे सिद्ध होत नाही. जर तो ती परीक्षा पास झाला नाही तर तो डॉक्टर किंवा वैमानिक होऊच शकणार नाही.
तसेच एकाच वर्गात एकाच शिक्षण घेतलेले दोन विद्यार्थी पोलिस उप निरीक्षक म्हणून भरती होतात. एक जण आरक्षणातून ७ व्या वर्षी निरीक्षक म्हणून बढती मिळवतो आणि खुल्या वर्गातील उपनिरीक्षक १५ वर्षे पर्यंत लटकत बसतो( एवढे कमी नाही तर त्याने पोलिस प्रशिक्षण अकादमीत शिकवलेला ६ वर्षे कनिष्ठ असलेला विद्यार्थी त्याच्या डोक्यावर ठाणे अंमलदार म्हणून वरिष्ठ बनून येतो यात कोणती गुणवत्ता आहे?
अॅनेक्डॉटल उदाहरणे भरपूर आहेत. दुसरे समांतर उदा. रोहन नारायण मूर्ती हे इन्फोसिसमध्ये १५-२० वर्षे काम करणाऱ्यांच्या डोक्यावर उच्च अधिकारी म्हणून गेले. निव्वळ अॅनेक्डॉटल उदाहरणे घेण्यापेक्षा एकंदर सांख्यिकीचा विचार करावा. जिथे जिथे आरक्षण सर्वप्रथम सुरु झाले ती महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, गुजरात ही राज्ये तथाकथित गुणवत्ताधारित राज्यांपेक्षा लवकर प्रगती करु लागली. सामाजिक न्याय व अार्थिक प्रगती यांचा जवळचा संबंध आहे. अमुकतमुक डॉक्टरला ३६ टक्के मिळाल्याने एमबीबीएसला प्रवेश मिळाला होता हा निकष लावण्याइतकी डॉक्टरची माहिती मला त्या डॉक्टरकडे जाताना असत नाही. तो एमबीबीएसची परीक्षा पास झाला आहे की नाही इतपतच असते. तुम्ही ज्याला बुद्धिमत्ता म्हणता ते परीक्षेत गुण मिळवण्याचे कौशल्य असते. क्लास लावला, घोकंपट्टी केली की असे गुण मिळतात. - खरी बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शाळेतून ड्रॉपआऊट होतात. शास्त्रज्ञ होतात किंवा स्वतःची कंपनी चालू करतात. (थोडक्यात त्यांना ३६ टक्केही गुण मिळत नाहीत!) बाकी जन्माधिष्ठित बुद्धिमत्ता ठरवण्याचे प्रयोग भारतात हजारो वर्षे करुन झाले आहेत. आता निदान मुलांची पार्श्वभूमी, शैक्षणिक संस्कारांचा इतिहास वगैरे पाहून प्रवेश दिले जात असल्याने परिस्थिती सुरळीत होत आहे याचा मला आनंद वाटतो. बाकी मराठी अस्मितेच्या चर्चेत मला रस नाही. इत्यलम

In reply to by आजानुकर्ण

सुबोध खरे Wed, 07/16/2014 - 19:37
मी तो अपात्र आहे असे कुठे म्हटले आहे ? आणि अपात्र ठरविणारा मी कोण? माझे म्हणणे एवढेच आहे कि दोन्हीत काहीतरी तुलना असावी. वैमानिकाची परीक्षा PABT पास होण्यासाठी आरक्षित व्यक्तीला कमी पात्रतेचा निकष ठेवला नाही यावर आपण बोलणे टाळून जेवढे सोयीस्कर तेवढेच बोललात. PABT पास होत असेल तर तो आरक्षित कि अनारक्षित हा वाद येणारच नाही. दुर्दैवाने वैद्यकीय प्रवेशा बाबत असा काटेकोर निकष नाही. शिवाय कल्याणकारी सरकारने एक वर्षाचा अभ्यासक्रम करून होमियोपथी किंवा आयुर्वेद किंवा युनानी डॉक्टरना आधुनिक वैद्यक शास्त्राचे उपचार करण्यास परवानगी दिली आहेच. त्यात पैसे वाले धनदांडगे आहेतच. बढीया है!!!!!. उद्या राष्ट्रपती अंगरक्षक म्हणून सैनिक निवडतात त्याचा निकष हा सहा फुट उंची असा आहे. त्यावर तुम्ही असे म्हणू शकता कि साडेपाच फुटाचा माणूस कमी दर्जाचा आहे का? तसे नसेलही पण मुल मुद्दा हा आहे कि राष्ट्रपतीनचे अंगरक्षक हे त्यांचे हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी त्यांच्यापेक्षा उंच असावे म्हणजे हल्ला झाल्यास त्यांना चारही बाजूनी ते सुरक्षित करू शकतील. आता यात तुम्ही राष्ट्रपती "गेले" तरी चालतील किंवा पाच फुटाचा गुरखा सुद्धा चांगला अंगरक्षक बनू शकेल असे फाटे फोडाल तर मी त्याला उत्तर देऊ इच्छित नाही. प्रवेश देताना आपण कोणता तरी निकष लावता ना ? मग त्या निकषात आरक्षणासाठी काही वेटेज द्या त्या निकषाला अर्थ नाही असे म्हणून नुसती टीका करण्यापेक्षा आपण एखादा दुसरा मार्ग सुचवा कि? कि आपल्या म्हणण्याप्रमाणे गुणवत्ता हा निकषच नाही. मग बोलणेच खुंटले. अॅनेक्डॉटल उदाहरणे नव्हेत पण महाराष्ट्र पोलिस मध्ये बढतीचे निकष जातीनिहाय बदलतात हि वस्तुस्थिती आहे. आपल्याला हवे असेल तर माहितीच्या अधिकाराचा वापर करून पहा एक मात्र नक्की आहे कि जर आरक्षणातून झालेल्या डॉक्टरने काढलेल्या रुग्णालयात पाय ठेवण्यासाठी "सगळेच" लोक बिचकतात हि वस्तुस्थिती आहे.मग बाकी तुम्ही काहीही वाद घाला.

In reply to by सुबोध खरे

प्यारे१ Tue, 07/15/2014 - 22:33
एकदा अ‍ॅडमिशन मिळाल्यानंतर पुन्हा पास होण्यासाठी आरक्षण नसते ना? तो माणूस एमबीबीएस, एमएस झाला ह्याला काहीच अर्थ नाही का? शैक्षणिक हुशारी वाढवता येते असं मला वाटतंय. दहावीला ५८% बारावीला ५६% मिळालेला मुलगा डिप्लोमाला राज्यात दहावा येतो (इथपासून) मेरीटवर डिग्री करतो नि पीजी सुद्धा करतो. मिपावर सुद्धा अनेक जण असतील. लई गोंधळ उडतोय राव!

In reply to by आजानुकर्ण

ऋषिकेश Wed, 07/16/2014 - 14:15
सरकारी संस्थांमधील आरक्षित जागांमध्ये प्रवेश घेणारे व शिकणारे बुद्धीमान नसतात व अनारक्षित जागांमध्येच प्रवेश घेणारे तेवढे बुद्धिमान असतात हा दावा निव्वळ हास्यास्पद आहे.
१००% सहमत! असले हास्यास्पद दावे ऐकले की हसण्यावारीही नेववत नाही.. दया येते!

In reply to by विजुभाऊ

अनुप ढेरे Sun, 07/13/2014 - 21:42
अगदी अगदी... पालकांनाच सोस असतो. तसली शिक्षा झाली म्हणून लगेच मराठी प्रेमाचे उमाळे आलेत एक्दम. ती शिक्षा झाली नसती तर सगळ्यांनी गप पाळले असते नियम. त्यामुळे मराठीचा जाज्वल्य अभिमान आणि अमानूष शिक्षा हे एकत्र करायची गरज नाही. दोन वेगळे इशूज आहेत.

In reply to by अनुप ढेरे

हुप्प्या Sun, 07/13/2014 - 21:57
इथे लोक इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या मुलांबद्दल आणि त्याच्या पालकांबद्दल अकारण हिणकस शेरे मारत आहेत. इंग्रजी माध्यमात शिकणे ही गरज बनली आहे. तसे केल्याने त्या व्यक्तीला मराठीबद्दल तिरस्कार असे मानणे चूक आहे. भारतातील सगळ्या क्षेत्रात उच्च शिक्षण हे इंग्रजीतच असते. त्यात बदल होण्याची सुतराम शक्यता नाही. असे असताना अट्टाहासाने सगळ्यांनी आपापल्या मुलांना मराठी माध्यमातच अशी अपेक्षा बाळगणे खुळचटपणाचे आहे. उलट इंग्रजी माध्यमात शिकणार्‍यांना अन्य प्रकारे मराठीची गोडी लावणे जास्त व्यवहार्य ठरेल. सिनेमे, मालिका, गाणी, पुस्तके, भाषणे ह्या अनेक मार्गाने मराठी जोपासली जाऊ शकते. केवळ मराठी माध्यमातून शिकणाराच तो मराठीप्रेमी अशी मांडणी आततायीपणाची आहे. इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या लोकांना मराठीवर प्रेम करायचा हक्कच नाही असे काहीतरी बिनडोक आणि टोकाचे विचार इथे मांडले जात आहेत त्याचा मी तीव्र विरोध करतो.

In reply to by हुप्प्या

नगरीनिरंजन Mon, 07/14/2014 - 00:27
इंग्रजी शिकणे ही गरज आहे इतपत मान्य आहे, पण इंग्रजी माध्यमात शिकणे ही गरज नव्हती आणि नाही. आणि इंग्रजी माध्यमातच शिकायचे असेल तर इंग्रजीच बोलले पाहिजे हा नियम चूक नाही. इथे फक्त मुलांना अमानुषतेने वागवण्याचा प्रश्न आहे. भाषेचा काहीही संबंध नाही.

In reply to by नगरीनिरंजन

हुप्प्या Mon, 07/14/2014 - 06:43
निव्वळ इंग्रजी शिकणे नव्हे तर इंग्रजी माध्यमातून शिकणे हीच आज गरज बनली आहे. आज मराठी शाळांची स्थिती दयनीय आहे. किती हुषार विद्यार्थी शिक्षक बनण्याचे स्वप्न बघतात? तेही मराठी माध्यमाचे? जवळजवळ कुणी नाही. दुसरे काही जमत नसेल तर शिक्षक बना अशी वृत्ती बनली आहे. त्यामुळे त्यातल्या त्यात बर्या शाळा ह्या इंग्रजी माध्यमाच्या आहेत. सामान्य माणसाकडून ह्या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केले जावे आणि केवळ तत्त्वाकरता त्यांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमात धाडावे अशी अपेक्षा अवाजवी आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यम अपरिहार्य आहे. आणि तिथे प्रवेश घेतलेल्या लोकांचा दु:स्वास करण्याऐवजी त्यांनाही मराठीबद्दल प्रेम निर्माण करता आले तर त्याचा जास्त उपयोगी ठरेल. इंग्रजी माध्यमात शिकायचे असेल तर फक्त इंग्रजीच बोलले पाहिजे हा अट्टाहास अनाकलनीय आहे. मराठी भाषेला तिलांजली देऊनच इंग्रजी माध्यमात शिकता येते असा काही गंड आपण बाळगत आहात असे दिसते. हा अत्यंत निराधार आहे.

In reply to by हुप्प्या

नगरीनिरंजन Mon, 07/14/2014 - 17:27
आज मराठी शाळांची अवस्था दयनीय आहे कारण काल मराठी लोकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवून पैशांच्या थैल्या घेऊन इंग्रजी शाळांच्या दारात रांगा लावल्या. आता सापळ्यात अडकलेल्या माकडासारखी अवस्था होणे स्वाभाविक आहे. असो, मुलांना मारल्याबद्दल जितेंद्रसिंगवर कायदेशीर कारवाई व्हावी; पण त्याला लाथाबुक्क्यांनी वगैरे मारुन मराठी शिकवण्याचा खुळचटपणा करण्याऐवजी आपल्या आजूबाजूला राहणार्‍या इंग्रजाळलेल्या मराठी पोरांना समृद्ध मराठी बोलता, वाचता कसे येईल याची काळजी केल्यास बरे. इत्यलम.

In reply to by नगरीनिरंजन

सहमत आहे ननि. इंग्रजी माध्यमाचा बागुलबुवा आपणच केला आहे उगाचा परंतु आता पुण्यातही घराच्या जवळ चांगल्या मराठी शाळांची अनुपलब्धता आणि त्यामुळे जवळच्या इंग्रजी शाळेत पाल्याला घालावे लागण्याची अगतिकता यामुळे इंग्रजी शाळेत मराठी बोलण्याबद्दल सुवर्णमध्य काढणे गरजेचे झाले आहे.

बॅटमॅन Sun, 07/13/2014 - 21:31
मुळात असला काही नियम करणे हाच एक जबरदस्त मूर्खागमनीपणा आहे. धाग्याशी पूर्णपणे सहमत आहे. लै माज आहे असल्या दीडदमडीच्यांचा. त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पायजे - शक्यतोवर कायदेशीर पद्धतीने. याचिका इ. दाखल केली पाहिजे याविरोधात. अवांतरः तमिळनाडूमध्ये असा नियम असतो किंवा कसे, याबद्दल पाहिले पाहिजे. तिथली लोकं मातृभाषेबद्दल लै आग्रही आहेत हे तर सर्वांस ठाऊक आहेच.

रेवती Mon, 07/14/2014 - 07:16
लिंक वाचली नाही तरी असे म्हणावेसे वाटते की कोणत्याही माध्यमाच्या शाळेत कोणत्याही चुकीसाठी (गुन्हा वगैरे वेगळे विषय आहेत. ) वळ उठेपर्यंत मारायची (खरेतर मारायचीच) गरज नाही. मारामारी करू नये, अमूक करावे, तमूक करू नये या गोष्टी शाळेतूनच बर्‍या शिकवल्या गेल्या नाहीत तर काय उपयोग? आईवडीलांनीही संस्कार करावेत हा वेगळा (आणि महत्वाचा विषय आहे पण तो आत्ता हा धागा त्याचा नाही) विषय झाला. वळ उठेपर्यंत मारणे हे गंभीर बाब आहे. प्रत्येक शाळेचे नियम असतात आणि ते मोडल्याची शिक्षा ठराविक असायला हवी. मनमानी झाली तर हुकुमशाही म्हणायला हरकत नाही. खूप वर्षांपूर्वी मुलींच्या शाळेत (इंग्रजी माध्यम) हातावर मेंदी रंगवून शाळेत गेल्याबद्दल मुलीला वाईट पद्धतीने शिक्षा झाली होती. इंग्रजी शाळेत नागपंचमी हा सण नाही म्हणे! हरकत नाही. असतील तुमचे नियम पण समज देणे हा भागही असतो. आणि मराठीबहुल भागात शाळा काढलीयेत ना? मग स्थानिक लोक तुमच्या शाळेत येणार ना! कित्येकदा जवळची असते म्हणून त्या भागात रहिवासी मुलांना शाळेत पाठवतात. जवळची हवी, मराठी माध्यमाची हवी, तिथे घरेही स्वस्तात मिळावीत असे सगळे जमेलच असे नाही. त्यातल्यात्यात बरे कॉम्बिनेशन करून महागाईच्या जमान्यात रहायचा प्रयत्न करीत असताना काही चांगले, काही बरे तर काही मनाविरुद्ध निर्णय घेऊन लोक रहातात. त्यामुळे मराठी लोकांनाच फार सोस असतो असे म्हणण्यात अर्थ नाही. तसे नसेलच असेही नाही पण म्हणून मारण्याचा हक्क मिळत नाही.

मुक्त विहारि Mon, 07/14/2014 - 09:36
पुर्वी, म्हणजे मला जबरदस्तीने शाळेत घातले होते, त्या काळांत, त्यावेळी मला इंग्रजी बोलता येत नाही, म्हणून शिक्षकांनी मारले होते... आणि आत्ताच्या शाळा मराठीत का बोललात? म्हणून मार देतात.... कालचक्र उलटे फिरले... असो, जय रामदास काका (आधी गुंतू नये.... गुंतल्यावर मग कुंथू नये)

In reply to by मुक्त विहारि

ब़जरबट्टू Mon, 07/14/2014 - 11:03
अहो मुवि, दोन्हीत काय फरक आहे ? तेव्हा इंग्रजी बोलता येत नाही म्हणून पडायच्या, मग आतापण इंग्रजी बोलत नाही म्हणूनच पडताय की.. :) You do it Or I do it, Both can not do it. :) - इती आमची इंग्रजी :)

In reply to by ब़जरबट्टू

मुक्त विहारि Mon, 07/14/2014 - 14:45
घड्याळाचे काटे उलटे फिरले तरी... मुलांना मारणे हा शिक्षकांचा अधिकार, मात्र केंद्रस्थानीच आहे. एकूण काय तर, आपला हा अधिकार सोडायला शिक्षक तयार नाहीत हेच सत्य... जावूदे, आम्हाला मार मिळाल्याने ना आमचे इंग्रजी सुधारले ना आमच्या इतर शालेय ज्ञानांत भर पडली. पण एक माराचा एक फायदा मात्र नक्कीच झाला... आम्ही कोडगे झालो...

सुनील Mon, 07/14/2014 - 10:05
सदर शाळेचा नियम हा मुलांनी शाळेत असताना एकमेकांशी इंग्रजीतच बोलावे असा आहे, असे दिसते. मुलांनी नियमभंग केला तो इंग्रजीत न बोलल्यामुळे (मराठीत बोलल्यामुळे नव्हे). मुले जर का गुजराती, सिंधी, हिंदी, तमिळ वा संस्कृतात बोलली असती तरी ते नियमबाह्यच ठरले असते. असा नियम करायचा खासगी शाळेला अधिकार आहे काय? बहुधा असावा. जर नियम करायचा अधिकार असेल तर, नियम तोडल्यावर काय शिक्षा देण्याचा शाळेला अधिकार असावा? फौजदारी गुन्ह्याच्या कचाट्यात सापडणार नाही, इतपत. म्हणजेच, मुलांना एखादा पिरियड उभे करणे, थोडा जास्तीचा गृहपाठ देणे इत्यादी चालून जावे. अंगावर वळ उठेपर्यंत मारणे हा फौजदारी गुन्हा ठरतो. थोडक्यात, गुन्हेगारांना जी काही शिक्षा होईल ती मुलांना मारल्यामुळे होईल. त्याचा मराठीच्या अभिनिवेशाशी काहीही संबंध नाही.

In reply to by सुनील

@अंगावर वळ उठेपर्यंत मारणे हा फौजदारी गुन्हा ठरतो.>>> पूर्ण सहमत. @थोडक्यात, गुन्हेगारांना जी काही शिक्षा होईल ती मुलांना मारल्यामुळे होईल. त्याचा मराठीच्या अभिनिवेशाशी काहीही संबंध नाही. >>> ++++++++++++++११११११११११११११११११११११११११

In reply to by सुनील

हुप्प्या Mon, 07/14/2014 - 10:33
भारताने भाषावार प्रांतरचना स्वीकारली आहे. आणि महाराष्ट्राची राज्यभाषा ही मराठी आहे. त्यामुळे प्रियदर्शिनी शाळेत काही मुले सिंधी भाषेत बोलली आणि त्यांना शिक्षा झाली व दुसरीकडे मराठी बोलल्यामुळे शिक्षा झाली ह्यात थोडा फरक आहेच. मराठीला विरोध हा जळात राहून माशाशी वैराचा प्रकार आहे. अर्थात प्रकरण कोर्टात गेले तर जी काही शिक्षा होईल ती अमानुष शिक्षेबद्दलच होईल ह्यात शंकाच नाही. पण ह्यातील मराठी विरोध आहे त्याचा उपयोग ह्याविरुद्ध आवाज उठवण्याकरता झाला आहे. कुठलाही राजकीय पुढारी मराठी विरोधाचे समर्थन करणार नाही. समजा ह्या शाळेने या आधी वर्गात हिंदी बोलल्याबद्दल इतकी कठोर शिक्षा दिलेली नाही मात्र मराठी बोलल्याबद्दल मात्र वळ उठेपर्यंत मारहाण केली अशी माहिती मिळाली तर प्रकरणाला नक्कीच नवे वळण लागेल. शाळा ज्या राज्यात उघडली आहे त्या राज्याच्या राजभाषेबद्दल थोडा जास्त आदर बाळगला पाहिजे इतके तारतम्य ह्या शाळेच्या प्रमुखांना समजायला हवे. भोसरीसारख्या भागात मराठी लोकांची संख्या जास्त असणार आणि मराठी बोलण्याची प्रकरणेही जास्त होत असणार. त्यामुळे मराठी बोलल्याबद्दल कायदा हातात घेऊन मुलांची हाडे नरम करताना ह्या पैलूकडे बघण्याची अक्कल भोसरीच्या संचालकाला आली तरी पुष्कळ झाले.

In reply to by हुप्प्या

सुनील Mon, 07/14/2014 - 10:51
समजा ह्या शाळेने या आधी वर्गात हिंदी बोलल्याबद्दल इतकी कठोर शिक्षा दिलेली नाही मात्र मराठी बोलल्याबद्दल मात्र वळ उठेपर्यंत मारहाण केली अशी माहिती मिळाली तर प्रकरणाला नक्कीच नवे वळण लागेल.
अच्छा, तर तुम्हालाही ही महिती नाहीच!! ह्यालाच तर मी फुक्कटचा अभिनिवेश म्हणतोय!!! असो.

In reply to by सुनील

हुप्प्या Tue, 07/15/2014 - 10:16
ह्या प्रसंगात मराठी भाषेला काही स्थान नाही असा आपला दावा होता. तो मी खोडून काढत आहे. मराठी ही राज्यभाषा असल्यामुळे ती बोलण्यावरच्या बंधनाविरुद्ध जास्त असंतोष उफाळणार हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा जर मराठीचा आकसाने द्वेष होतो आहे असे लक्षात आले तर मराठी भाषेला स्थान नाही हा मुद्दा साफ खोडला जातो. जोवर प्रकरणाची पूर्ण माहिती मिळत नाही तोवर मराठी भाषेचा ह्या प्रकरणात काहीही संबंध नाही अशी क्लीन चिट देणे चुकीचे आहे.

चौकटराजा Mon, 07/14/2014 - 10:12
ईंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी नव्हे तर आपल्या मातृभाषेत बोलू नये. निदान सर्रास तरी बोलू नये. असा नियम मी ही संस्थाचालक असता तरी केला असता. पण असे केले नाही तर मार देईन हा कोणता न्याय ? माझी मुलगी एका किरिस्ताव वातावरणातील शाळोत्तून शिकली पण तिला अजूनही पुरेसे नीट इंग्रजी बोलता येत नाही.लिहिता ही नाही. म्हण्जे मी तिला त्या माध्यमाला घातल्याचा उद्देशच सफल झालेला नाही. एक संहिता म्हणून तिथे मराठी वा हिंदीत वा कानडीत बोलायला माझा विरोधच असेल.

मृत्युन्जय Mon, 07/14/2014 - 10:47
मातृभाषा सोडुन इतर कुठल्याही भाषेतुन शिकणार्‍या मुलांना नविन भाषा आणि त्या अनुषंगाणे ज्ञान आणि विद्या मिळवणे थोडे अवघडच जाते. घरीदारी मुले मातृभाषेतच बोलत असतात (बर्‍याचदा). असे असताना जर ती मुले इंग्रजी माध्यामातुन शिक्षण घेत असतील तर केवळ ती भाषा शिकणे अवघड जाते असे नाही तर इतर सगळेच विषय इंग्रजीतुन असल्याने त्या विषयांचा अभ्यसही कमी पडु शकतो. अश्यावेळेस त्या मुलांनी किमान शाळेत तरी इतर कुठल्याही भाषेत न बोलता इंग्रजीत संभाषण करावे असा नियम शाळेने केलेला असल्यास तो योग्यच आहे. आणी हा नियम मोडल्यास कुठलीही अनाठायी नसलेली शिक्षा करणेही योग्यच आहे. वर डॉक्टरांनी म्हटल्याप्रमाणे पालकांनी शाळेत येउन १०० रुपये दंड भरणे ही अतिशय रास्त शिक्षा आहे. त्याबरोबर मुलांनाही लिहिण्याची किंवा तत्सम इतर शिक्षाकरावी. त्यामुळे मुले अपसुक वळणावर येतील. पण वळ उठेस्तोवार मारणे हे काही योग्य वाटत नाही. उपरोक्त प्रकरणात संचालक / व्यवस्थापक जितेंद्र सिंग नसुन जितेंद्र जोशी किंवा जितेंद्र जाधव असले असते तर लोकांनी अश्याच प्रतिक्रिया दिल्या असत्या का? मारण्याबद्दल नक्की दिल्या असत्या पण त्यामुळे भाषिक अस्मिता उफाळुन नसत्या आल्या. सध्याही तसे होउ नये असे वाटते.

In reply to by सुबोध खरे

सुनील Mon, 07/14/2014 - 11:43
बराचसा सहमत. जाधवांबद्दल शंका नाही. पण जोशी "मूळचे" कुठले ह्याची ऑफलाइन चौकशी आधी झाली असती!! ;) कारण गुजराती, हिंदी आणि कन्नड भाषकांतदेखिल "जोशी" आढळतात!!

In reply to by सुबोध खरे

जितेंद्र जोशी किंवा जितेंद्र जाधव असले असते तर..... भाषिक अस्मिता उफाळुन नसत्या आल्या
जोशी असते तर दुसर्‍या अस्मिता उफाळुन आल्या असत्या राव =))

In reply to by चौकटराजा

त्यात पुण्याचे की मुंबईचे की नागपूरचे यावर पुलंनी नवीन लेख लिहिला असता !
करेक्ट , कारण पुण्याच्या जोश्यांनी मराठी बोलल्याबद्दल मारहाण केलीतर वेगळा अर्थ निघतो अन मुंबईच्यांनी केलीतर वेगळा अन इतर प्रांतीय जोशांनी केली तर त्याहुन वेगळा =))

बॅटमॅन Mon, 07/14/2014 - 12:12
पैसे घेतले म्हणून मातृभाषेत बोलायचा अधिकारही हिरावून घेता येतो हे पाहून मजा वाटली. इथे प्रश्न इंग्रजी शाळांचा नाहीये, अगदी शुद्ध तुपातल्या मराठी शाळेने असा नियम केला तरीही ते चूकच आहे. शाळेच्या निर्णयाचे समर्थन करणार्‍यांना (मार देणे नव्हे तर इंग्रजी बोलायची सक्ती करणे यासंदर्भात) माझा प्रश्न आहे. अशी सक्ती केली तर इंग्रजी नैपुण्यात लक्षणीय फरक पडतो याचा काय विदा आहे? विदा नसेल तर उगीच नियम बनवून काय साधते? अपि च- संविधानातल्या तरतुदीस हे विरोधी जात नाही का? माझा त्या विषयाचा अभ्यास नाही, पण जिथे तुम्ही कोर्टासारख्या ठिकाणीही दुभाष्या घेऊन बोलू शकता तिथे शाळेत काय अडचण आहे? पालकांना डोक्याला तकतक नको म्हणून ते त्रास करून घेत नाहीत आणि शाळा माजतात.

In reply to by बॅटमॅन

सुनील Mon, 07/14/2014 - 12:28
कुठलाशा शंकराचार्‍यांच्या मठात फक्त संकृतातच बोलावे लागते (चार पैकी नक्की कुठले पीठ ते आता आठवत नाही. कदाचित चारही असतील!) तेव्हा खासगी ठिकाणी कुठल्या भाषेत बोलावे, काय पोषाख घालावा इत्यादी नियम संबंधित संस्था नक्कीच करू शकतात.
अशी सक्ती केली तर इंग्रजी नैपुण्यात लक्षणीय फरक पडतो याचा काय विदा आहे? विदा नसेल तर उगीच नियम बनवून काय साधते?
हा निराळा मुद्दा आहे! पण नियम करायचा अधिकार आहेच!

In reply to by सुनील

बॅटमॅन Mon, 07/14/2014 - 12:37
कुठलाशा शंकराचार्‍यांच्या मठात फक्त संकृतातच बोलावे लागते (चार पैकी नक्की कुठले पीठ ते आता आठवत नाही. कदाचित चारही असतील!) तेव्हा खासगी ठिकाणी कुठल्या भाषेत बोलावे, काय पोषाख घालावा इत्यादी नियम संबंधित संस्था नक्कीच करू शकतात
. हा दाखला पुरेसा नाही. मी तिथे जाऊन मराठीत बोललो तर उत्तर मिळणार नाही इतके फारतर म्हणू शकाल. दोन्ही केसेस तुलनीय नाहीत.
पण नियम करायचा अधिकार आहेच!
अशी कुठली कायदेशीर तरतूद असेल तर ठीक, नपेक्षा नाही. असा कायदा जर असेल तर तोही बदलला पाहिजे या मताचा मी आहे, पण तो भाग वेगळा.

In reply to by सुनील

हुप्प्या Tue, 07/15/2014 - 10:19
एखाद्या गृहसंकुलात जेव्हा असा नियम केला जातो की निव्वळ शाकाहारी लोकांनाच जागा विकत घेता येईल तेव्हा लोक त्याविरुद्ध बोंब मारतातच ना? त्यामुळे अगदी खाजगी मालमत्तेलाही कायद्याच्या कक्षेतच रहावे लागते. धार्मिक स्थळी जे नियम असतात ते नियम शाळेकरता लागू होतीलच असे नाही. उदा. जाती धर्म वा पंथाविरुद्ध भेद करणे अनेक खाजगी संस्थांकरताही बेकायदा असते.

In reply to by हुप्प्या

सुबोध खरे Wed, 07/16/2014 - 09:53
हि जर आपली संस्था अल्पसंख्यांक( जैन) म्हणून रजिस्टर झाली असेल तर चालू शकते पण आपण गुजराती हिंदू असाल तर चालत नाही असा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आहे. एका मुसलमान माणसाला तेथे जागा घेण्यास अटकाव केल्याबद्दल त्याने केलेल्या याचिकेचा हा निकाल आहे. बहुसंखांक असणे हा आजकाल गुन्हा आहे असे वाटावे अशी परिस्थिती आहे. अल्पसंख्यांक म्हणून कोणत्याही गटाचे किंवा समाजाचे किती लाड चालवून घ्यायचे हा विचार करण्याची वेळ आली आहे?

In reply to by बॅटमॅन

मृत्युन्जय Mon, 07/14/2014 - 14:38
पैसे घेतले म्हणजे? इथे पैशाचा काय संबंध? कारण पैसेही पालकच देतात की. प्रश्न पैशाचा नसुन. भाषा सुधारण्याचा आहे. इथे लिखित आणि बोली अश्या दोन्ही प्रकारचा संबंध आहे. इंग्रजी माध्यमातील मुले एकमेकांशी लिखित स्वरुपात संवाद साधत नसतील (तास चालु असताना ज्या चिटठ्यचपाट्या हस्तांतरित होतात त्या वेगळ्या. त्यावर असेही काही नियंत्रण ठेवता येणार नाही.) मुख्य मुद्दा आहे बोली भाषेचा. बोली भाषा सुधारली तर किमान शिक्षक वर्गात काय सांगत आहेत हे तरी नीट कळु लागेल. याचा काही विदा माझ्याकडे तरी नाही. पण संवादाची भाषा सुधारली तर मौखिक संवादाच्या माध्यमातुन दिले गेलेले ज्ञान अधिक चटकन आत्मसात करता येइल असे अनुमान काढणे नक्कीच लॉजिकल आहे. उलट्या बाजुचा म्हणजे मराठीत बोलल्यामुळे इंग्रजी नैपुण्यात लक्षणीय फरक पडतो असे अनुमान काढणे तार्किकदृष्ट्या अयोग्य ठरेल, मात्र मराठीत बोलल्यामुळे इंग्रजी नैपुण्यात लक्षणीय फरक पडतो याबाबतचा काही विदा असेल तर ते वाचणे नक्कीच जास्त रोचक ठरु शकते. याबाबत एक गोष्ट आठवली की शाळेत इंग्रजीच्या बाई नेहमी सांगायच्या की वर्गातील काही मुलांचे इंग्रजी लेखन आणि भाषा कच्ची आहे कारण ते मराठीत विचार करुन मग इंग्रजीत लिहितात / बोलतात. जर विचारच इंग्रजीत करायला सुरुवात केली तर इंग्रजी सुधारेल. विचाराची प्रक्रिया आणि त्याची भाषा नियंत्रित कशी करायची हे त्यावेळेस अजिबातच कळले नव्हते. आताही निट्से कळत नाही. पण आता असे होउ शकते एवढे मात्र नक्की सांगु शकतो. कारण आता काही विचार प्रकट करण्यासाठी पटकन इंग्रजीचाच आधार घेतला जातो आणि तेच विचार मराठीत लिहिण्यासाठी थोडा वेळ " विचार " करावा लागतो :)

In reply to by मृत्युन्जय

बॅटमॅन Mon, 07/14/2014 - 14:48
ओक्के. मुद्दा इतकाच आहे, की मराठीत किंवा इंग्लिशेतर भाषेत बोलणे अज्जीच ब्यान केल्यामुळे इंग्लिशवरच्या प्रभुत्वात लक्षणीय फरक पडतो किंवा कसे. एखादा तास ठेवा फारतर रोज-त्यात फक्त इंग्रजी बोलायचं इ.इ. पण पूर्णवेळ अशी सक्ती करणे अनाकलनीय आणि तितकाच मूर्खपणा आहे. तेल अन तूप दोन्हीही जाऊन हाती फकस्त धुपाटणे राहील मग- अन कैकदा ते तसेच राहते. तदुपरि- मराठीत बोलणे ब्यान केल्यामुळे विचारही इंग्लिशमध्ये करू लागतो का? बहुधा नाही.

In reply to by बॅटमॅन

चित्रगुप्त Mon, 07/14/2014 - 17:37
तेल अन तूप दोन्हीही जाऊन हाती फकस्त धुपाटणे राहील मग- अन कैकदा ते तसेच राहते.
आमच्या हापिसातल्या (आंग्ल शाळेतून शिकलेल्या) किरिस्ताव स्टायलिश पोरी धडधडीत चुकीचे इंग्रजी अत्यंत अत्मविश्वासाने सपाट्याने बोलायच्या. तर्खडकरांच्या भाषांतरपाठमालेतून इंग्रजी शिकलेल्या मला त्यांच्या बोलण्यातल्या चुका कळत, पण त्यांच्यासारखे आत्मविश्वासाने बोलता मात्र येत नसे. अर्धवट ज्ञान असलेले जास्त आत्मविश्वासू असतात, याचेही हे एक उदाहरण.

In reply to by चित्रगुप्त

बॅटमॅन Mon, 07/14/2014 - 17:44
हम्म, ते बाकी आहे. संभाषणकला विकसित करावी लागते हे मान्य, पण त्यासाठी अन्य भाषांतून बोलणे ब्यान करणे हे एक टोक झाले. तसे न करताही इच्छित फलप्राप्ती होईलसे वाटते.

In reply to by बॅटमॅन

>> संभाषणकला विकसित करावी लागते हे मान्य, पण त्यासाठी अन्य भाषांतून बोलणे ब्यान करणे हे एक टोक झाले. तसे न करताही इच्छित फलप्राप्ती होईलसे वाटते. सहमत.

असंका Mon, 07/14/2014 - 15:44
शिक्षणात शिस्त; आणि शिस्तभंगासाठी शिक्षा, आवश्यक आहे असे वाटते. आणि कुठल्या प्रकारच्या शिस्तभंगासाठी कुठल्या प्रकारची शिक्षा द्यायची हा शिक्षकाचा अधिकार मान्य करायला हवा. कारण त्याच्यावर मुलांची जबाबदारीपण आहे. मारहाण हा शिक्षेचा प्रकार आजकाल अमान्य आहे, कारण त्याने फायद्यापेक्षा तोटे जास्त होतात असे दिसते. मग शाळांमध्ये आजकाल कुठल्या शिक्षा दिल्या जातात, कुणी प्रकाश टाकेल का? डस्टरने हातावर मारणे, कोंबडा करणे, फळ्याजवळ फळ्याकडे तोंड करून उभे करणे, बाकावर उभे करणे, वर्गाबाहेर उभे करणे, वर्ग संपल्यावर थोडा वेळ बसवून ठेवणे, मैदानाला फेर्‍या मारणे वगैरे यातल्या कुठल्या शिक्षा अजूनही प्रचारात आहेत?

In reply to by असंका

प्यारे१ Mon, 07/14/2014 - 16:30
चुकून घरी समजलं तर घरी पूजा बांधली जाणं हे आणखी वेगळंच. 'सहसा' शिक्षक चुकीचे नसतात/ आमच्या वेळी तरी नाहीच अशा मताचा मी आहे. बाकी ज्या मुलाला मारलं तो 'कुणाचा तरी कोण तरी' आहे का हे(सुद्धा) बघायला हवं. शिक्षकानं मारणं ह्याला हायलाईट करुन मुलानं दिलेली दुरुत्तरं कदाचित झाकली जाण्याची शक्यता पुण्याच्या पंचक्रोशीत जास्त असावी असा अंदाज आहे (गुंठामंत्र्यांची मुलं नि त्यांचं वागणं हे जनरल निरीक्षण)

In reply to by असंका

प्यारे१ Mon, 07/14/2014 - 17:16
चुकून घरी समजलं तर घरी पूजा बांधली जाणं हे आणखी वेगळंच. 'सहसा' शिक्षक चुकीचे नसतात/ आमच्या वेळी तरी नाहीच अशा मताचा मी आहे. बाकी ज्या मुलाला मारलं तो 'कुणाचा तरी कोण तरी' आहे का हे(सुद्धा) बघायला हवं. शिक्षकानं मारणं ह्याला हायलाईट करुन मुलानं दिलेली दुरुत्तरं कदाचित झाकली जाण्याची शक्यता पुण्याच्या पंचक्रोशीत जास्त असावी असा अंदाज आहे (गुंठामंत्र्यांची मुलं नि त्यांचं वागणं हे जनरल निरीक्षण)

सौंदाळा Mon, 07/14/2014 - 15:59
उलटा हात करुन बोटाच्या पेरांवर लाकडी फुटपट्टीची कड मारायची जोरात. घोडा करताना बसतो तसे बसायचे, हाताच्या बोटांनी कान धरायचे आणि कोपर जमिनीवर ठेवुन दोन गुडघे आणि दोन कोपरं यावर मैदानात चालायचे. गुडघ्यात्/कोपरात असे खडे रुतायचे. आयआयग्ग, आठवुनच झिणझिण्या आल्या. आमच्या वेळी असे असते तर अर्ध्याच्या वर मास्तरडे खडी फोडायलाच गेले असते.

ऋषिकेश Mon, 07/14/2014 - 16:38
कोणालाही कोणीही कोणत्याही कारणासाठी मारणे अत्यंत निंदनीय आहे. यासाठी सदर व्यक्तीस तीन दिवसात हिब्रुमध्ये आयत्यावेळी दिलेल्या विषयावर पाच मिनीटे विषयाशी संबंधित बोलण्याची शिक्षा द्यावी. ते न जमल्यास दरवेळी नवी भाषा व मिनीटांमध्ये वाढ. उरलेल्या वेळी एकांतवास! हे आजन्म चालु ठेवावे!

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेश Mon, 07/14/2014 - 16:42
कोणालाही कोणीही कोणत्याही कारणासाठी मारणे अत्यंत निंदनीय आहे
इथे अपवाद युद्ध करणार्‍या सैनिकांचा आहे, ही पुरवणी प्रतिसाद बदलता येत नसल्याने इथे जोडतो.

एखादी संस्था त्यांचे नियम बनवू शकते हे मान्य व इंग्रजी संभाषणाचे महत्त्व देखील मान्य , आमच्या हॉटेल व्यवस्थापनाच्या कोर्स मध्ये देखील इतर भाषा बोलल्यास दंड होता , गुटे संस्थेत दंड नसला तरी जर्मन भाषा बोलली जाते , मात्र लहान विद्यार्थ्यांना मारणे मान्य नाही. परदेशात दोषी व्यक्ती तुरुंगात खितपत पडते.

चित्रगुप्त Mon, 07/14/2014 - 17:50
'प्रियदर्शनी' असे भारदस्त संस्कृत नाव असणार्‍या शाळेत इंग्रजेतर भाषा बोलणे हा अपराध, हेच मुळात कोडे वाटले. कदाचित इंदिराबैंच्या काळात त्यांना खुष करून ग्र्यांटादि मिळवण्यासाठी तसले नाव दिले असेल, किंवा राजीव सोन्यादिंच्या काळातही असे केले गेले असेल. दुसरे म्हणजे 'येथे उभे राहून मोबाईलवर बोलू नये' पासून 'कुलकर्णी येथे रहात नाहीत, उगाच बेल वाजवून अपमान करून घेऊ नये' अश्या पाट्या असणार्‍या पुण्याच्या परिसरात असूनही शाळेत पाट्या नाहीत की काय? 'येथे इंग्रजी व्यतिरिक्त अन्य भाषा बोलणारांना बेदम चोप दिला जाईल' (की 'दिल्या' जाईल ?) अशी पाटी लावायला हवी. ही पाटी इंग्रजीत असावी, की मराठीत की उर्दूत, हाही चर्चेचा विषय होऊ शकतो.

धमाल मुलगा Tue, 07/15/2014 - 15:44
इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इंग्रजी बोलावे की नाही, तशी सक्ती करणं योग्य/कायदेशीर आहे की नाही हा बहुतेक चर्चेचा मुद्दा नसावाच. मराठी-अमराठीचा राजकीय वाद, त्यातून उभी राहिलेली दरी, भोसरी आणि आसपासच्या एम.आय.डि.सी. भागात झालेली अमराठी (उ.प्र.-बिहारी) लोकांविरोधातली आंदोलनं/राडे ह्यातून असलेला राग ह्या पैलूचा बहुतेक विचारच केला जात नाहीये. वर काही प्रतिसादांत म्हणल्याप्रमाणे, जितेंद्र सिंग ह्या नावाऐवजी ते जितेंद्र जाधव किंवा जोशी असतं तर मराठीचा मुद्दा न येता ती घटना 'विद्यार्थ्याला अमानुष मारहाण' अशी मोजली गेली असती. पण, जितेंद्र सिंग ह्या (अमराठी - बहुतेक उ.प्र./बिहार प्रांतीय असावे असं नावावरुन वाटतं.) व्यक्तीच्या हातात सत्ता असताना तीचा वापर करुन मराठीद्वेषमूलक कृती केलेली नाही असं छातीठोकपणे सांगता येईल काय? ह्यावर, 'ती मारहाण करण्यात द्वेषच होता असं छातीठोकपणे सांगता येईल काय?' असा उलटप्रश्न नक्कीच विचारता येईल. त्याचं उत्तर 'नाही' असं दिलं तरी, गावांत दरोडे पडल्यावर पोलीस जसे पहिल्यांदा पारध्यांच्या पालावर धाडी घालतात, तसंही इथेही संशयास्पद मुद्द्याचा आधार आहेच. तस्मात, ही घटना केवळ शाळेचे नियम पाळले नाहीत म्हणून शिक्षा इतपत नक्कीच मर्यादित रहात नाही. तिला प्रांतिक/राजकीय रंग येतोच येतो. घटना काय घडलेली असते आणि ती बातमी म्हणून बाहेर पडते तेव्हा, सगळेच पैलू खरोखर आणि पारदर्शकपणे सामोरे येत नाहीत हे तर आपल्याला अगदीच ठाऊक झालंय. इतका भाबडेपणा कुणातही उरलेला नाही आता. प्रश्न आहे तो 'रिडिंग बिटवीन द लाईन्स'चा, आणि त्या कोण कशा वाचतो त्यानुसार त्याचा अर्थ लावण्याचा.

आशु जोग Tue, 07/15/2014 - 17:55
हुप्प्या यांच्या लिखाणाचे एक वैशिष्ट्य आहे ते नेहमी काळाबरोबर राहतात

बाळ सप्रे Wed, 07/16/2014 - 10:18
मारहाणीच्या अमानुषपणाबद्दल दुमत नाहीच पण त्याचे कारण मराठीद्वेष असण्याबद्दल जितेंदर सिंग हे उत्तर भारतीय नाव याखेरीज काही ठोस मुद्दा कोणी मांडू शकेल का?? त्या संस्थेतील, भोसरीतील इतर घटना ज्यात मराठीद्वेष दिसतो (उदा. अमराठी विद्यार्थ्यांना तशाच उल्लंघनासाठी कमी शिक्षा किंवा शिक्षा न करणे). जितेंदर सिंगची वागणूक इ ज्यायोगे मराठीद्वेषाचा संशय येउ शकतो असा एखादा मुद्दा आहे का?? नसल्यास केवळ उत्तर भारतीय नाव यावरुन असे आरोप करणे यात आपलाच उत्तर भारतीयद्वेष दिसून येईल..

निश Wed, 07/16/2014 - 14:32
मुळात मराठी भाषेच्या दुरावस्थेला आपणच कारण आहोत. त्यामुळेच जितेंद्र सिंग सारखे उपरे लोक इथे येउन आपल्याच भाषेचा अपमान करतात. ही दुरावस्था तेव्हाच जाईल जेव्हा आपण तिचा अभिमान बाळगु व समोरच्याला ही तो करायला लावु.

टवाळ कार्टा Sun, 07/13/2014 - 18:09
मला वाटते ह्या भोसरीच्या* सिंगाला उत्तम मराठी बोलता येईपर्यंत लाथाबुक्क्यांनी तुडवून काढत राहिले पाहिजे. पुढील सहा महिने मराठी सोडून अन्य कुठले शब्द तोंडातून निघाल्यास असेच वळ उठेपर्यंत झोडपून काढावे ही शिक्षा कुठल्या सक्तमजुरीपेक्षा जास्त योग्य ठरेल.
आपली प्रगती अशीच उलट्या दिशेने सुरु राहुदे मग आपल्यात आणि प्राण्यांत फरक नाही उरणार

In reply to by टवाळ कार्टा

आपली प्रगती अशीच उलट्या दिशेने सुरु राहुदे मग आपल्यात आणि प्राण्यांत फरक नाही उरणार
शत प्रतिशत सहम्त ! मै भी यही बोलने वाला था ! ऐसे फंदामेन्टालिस्ट मराठी लोगोंके वजह से हमारी बम्बै मे बवाल मचा हुवा है ! अब ये घाटी लोग हमारे पुना मे भी ऐसे बवाल निकाल के राष्ट्रभाषा हिंदी एवं विश्वभाषा अंग्रेजी के खिलाफ लोगोंको भडका रहे है ! ये बहुतही निंदनीय बाब है ! सच मे ऐसे मराठी लोगोंकी गणना प्राणीयोंमेही करनी चाहिये !

In reply to by प्रसाद गोडबोले

बालगंधर्व Mon, 07/14/2014 - 13:01
सर्व्याना महित पदले अहे केइ जितेन्दर सिन्ग हा कुहुप कुरुर मानुस अहे. महनुनच तो भोसरिचा* अहे. मी मराटी झी मराटि हाम आझा बाना आहे. अप्ल्या महरस्त्रात मराटीसाथी राजेनी अनि मवल्यानी रत्क सान्दले. त्या रज्यात मराटीचा अपमान आपन सहण कर्नार नाहि.

In reply to by प्रसाद गोडबोले

टवाळ कार्टा Mon, 07/14/2014 - 15:28
माझा आक्शेप
लाथाबुक्क्यांनी तुडवून काढत राहिले पाहिजे. पुढील सहा महिने मराठी सोडून अन्य कुठले शब्द तोंडातून निघाल्यास असेच वळ उठेपर्यंत झोडपून काढावे ही शिक्षा कुठल्या सक्तमजुरीपेक्षा जास्त योग्य ठरेल.
यासाठी होता यापेक्शा वेगळे कायद्याच्या चौकटीमधे बसणारे मार्ग सुध्धा आहेत... आणि चुक शाळेला परवानगी देणार्यांची आहे... आणि त्यांच्यामधे एखादा तरी मराठी अधिकारी असणार जो झोपा असणार बाकी चालुदे...

In reply to by टवाळ कार्टा

यासाठी होता यापेक्शा वेगळे कायद्याच्या चौकटीमधे बसणारे मार्ग सुध्धा आहेत... असणार
ह्या असल्या लेच्यापेच्या मनोवृत्तीच्या मुळेच आजवर मराठी माणसाचे नुसकान झाले आहे तरीही मराठी माणसाला काही अक्कल येत नाही
आणि चुक शाळेला परवानगी देणार्यांची आहे... आणि त्यांच्यामधे एखादा तरी मराठी अधिकारी असणार जो झोपा
संकट समये प्राप्ते वयं पंचाधिकं शतम हे अजुनही कळत नाही मराठी लोकांना !तुम्ही बसा एकामेकावरच खापर फोडत अन बाहेरच्यांना घेवुदे फायदा !!
बाकी चालुदे...
चालुच रहाणार हो ... अशी पेबळी मनोवृत्ती असेल तर असले प्रकार चालुच रहाणार !

In reply to by टवाळ कार्टा

तुमचा मुद्दाच खोडुन काढलाय हे ही तुम्हाला समजलेले दिसत नाहीये *biggrin* ... असोच ! आता बघुया तुम्हाला किती कंटाळा आलाय

नगरीनिरंजन Sun, 07/13/2014 - 19:50
आधी इंग्रजी शाळेत पोरं घालू नयेत आणि घातली तर इंग्रजीची सक्ती होते म्हणून रडू नये. पालकांना शाळेत इंग्रजीशिवाय इतर भाषा बोलायला बंदी आहे हा नियम माहित नसेल यावर माझा विश्वास नाही आणि हा नियम माहिती असूनही मुलांना त्या शाळेत घातले जात असेल तर पालकही तितकेच दोषी आहेत. शिवाय इतर कारणांसाठी शाळेत मुलांना शिक्षा होत नसेल असेही नाही. पण असो.

In reply to by नगरीनिरंजन

हुप्प्या Sun, 07/13/2014 - 21:50
पालकांची चूक कशी? शाळेने वाट्टेल ते नियम बनवावेत आणि ते पालकांनी स्वीकारले असे समजावेत हे उफराटे तर्कट आहे. शाळेचे नियम हे कायद्याच्या कक्षेत बसणारेच पाहिजेत. महाराष्ट्रातील शाळा जर मराठीवर बंदी घालत असेल आणि मराठी बोलणार्‍यांना अमानुष मारहाण केली जाईल असा नियम ठरवत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवायलाच हवा. मग ती इंग्रजी माध्यमाची शाळा असो वा कन्नड वा उर्दू. आम्ही तुमच्या शाळेत मुले दाखल करणारच आणि तुम्ही असले जाचक बेकायदेशीर नियम लादता कामा नये असे म्हणण्याचा हक्क पालकांना आहे. शुल्क भरणारा ग्राहक म्हणून तो त्यांचा हक्क आहे.

In reply to by हुप्प्या

नगरीनिरंजन Mon, 07/14/2014 - 00:33
बेकायदेशीर नियम आहेत हे पालकांना आधीच माहित होते की नाही? मग त्यांनी आधीच तक्रार का केली नाही? मुळात हे अगतिक ग्राहक आहेत आणि यांना कसेही वागवले तर चालते असा या शाळांचा (रास्त) समज व्हायची वेळ का आली याचा विचार करण्याची गरज आहे.

In reply to by नगरीनिरंजन

हुप्प्या Mon, 07/14/2014 - 06:45
मुलांनी मराठी बोलले तर त्यांना अमानुष मारहाण केली जाईल असा नियम बनवायची हिंमत ती शाळा दाखवेल असे वाटत नाही. त्या भोसरीच्या संचालकाने आपला मराठीवरील राग त्या मुलांवर काढला असावा. प्रियदर्शिनी शाळेबद्दल आपल्याला काही जास्तीची माहिती असेल तर ती जरूर सांगा.

In reply to by हुप्प्या

सुबोध खरे Mon, 07/14/2014 - 10:17
या प्रश्नाचे दोन पैलू आहेत १)इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इंग्रजी सोडून दुसर्या कोणत्याही भाषेत बोलू नये अस नियम असणे हे एक आहे. (मग यात हिंदी/ गुजराती सुद्धा आहे.) २) मुलांना अमानुष मारहाण करणे. यापैकी पहिली गोष्ट बर्याच शाळांच्या नियमात आहे आणि हे नियम आपण शाळेत दखल घेतो तेंव्हा आपल्या कडून पूर्ण संमती सकट सही करून घेतले जातात. या गोष्टीला भाषिक रंग दिला जाऊ नये असे मला वाटते. मुंबईत मला माहित असलेल्या बर्याच अशा शाळा ( ज्यात कोनव्हेन्ट शाळा प्रकर्षाने येतात) आहेत. जेथे मुल जर इंग्रजी सोडून दुसर्या भाषेत बोलले तर मुलांना ५० ते १०० रुपये दंड होतो आणि हा दंड पालकांना शाळेत येउन भरावा लागतो . याचा परिपाक म्हणून पालक मुलाला इंग्रजी बोलण्याची सक्ती करतात ( १०० रुपये भरण्यापेक्षा शाळेत खेप मारण्याची कटकट टाळण्यासाठी). "शुल्क भरणारा ग्राहक म्हणून तो त्यांचा हक्क आहे." बर्याच क्लब च्या नियमावलीत पुरुषानी बूट घालून येणे आवश्यक आहे. जीन्स ची पयंत चालत नाही ( यात बरोबर कि चूक या वादात न पडता) असे नियम करणे क्लबच्या मुलभूत हक्कात येतात असे उच्च न्यायालयांनी वेळोवेळी आपल्या निकालांमध्ये म्हटले आहे. शुल्क भरणाऱ्या ग्राहकाचा हक्क हा सरकारी शाळेत ग्राह्य धरला जाईल जर खाजगी विनाअनुदानित शाळेत आपल्याला जायचे असेल तर त्यांनी कायद्याच्या अखत्यारीत राहून केलेली नियमावली आपल्याला मान्य करावीच लागेल. नाही तर तेथे आपण प्रवेश घेऊच नका. यावर सरकार कोणतीही सक्ती करु शकत नाही. (खाजगी विना अनुदानित संस्थांच्या प्रवेशा बत) असा सर्वोच्च न्यायालयाच्या ११ न्यायाधीशांच्या पूर्ण घटनापीठाने दिलेला निर्णय आहे. (यामुळेच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशात बजबजपुरी माजली आहे हा भाग वेगळा याची विदा मी सवडीने देतो) दुसरा भाग मुलाला अमानुष मारहाण करणे हा सर्वथैव निंदनीय आहे आणि याचासुद्धा ते मुल मराठी आहे कि हिंदी भाषिक आहे याच्याशी संबंध नसावा. या बद्दल जितेंद्र सिंग यांच्यावर कायदेशीर कारवाई नक्कीच झाली पाहिजे.

In reply to by सुबोध खरे

>> असे नियम करणे क्लबच्या मुलभूत हक्कात येतात असे उच्च न्यायालयांनी वेळोवेळी आपल्या निकालांमध्ये म्हटले आहे. शुल्क भरणाऱ्या ग्राहकाचा हक्क हा सरकारी शाळेत ग्राह्य धरला जाईल जर खाजगी विनाअनुदानित शाळेत आपल्याला जायचे असेल तर त्यांनी कायद्याच्या अखत्यारीत राहून केलेली नियमावली आपल्याला मान्य करावीच लागेल. प्रश्न हा एखाद्या क्लबाच्या मूलभूत हक्कात एखादी गोष्ट बसते की नाही इतका अल्प अखत्यारीचा नाही आहे. कारण शाळा आणि क्लबात फरक आहे. आपल्या मराठी भूमिवर असली थेरे कायद्याचा आधार घेऊन कोणी करू पाहत असेल तर ती जरूर धुडकवावी. आमच्या कंपनीत देखील मराठीत बोलल्यावर 'नो रिजनल लँग्वेज' असे ऐकवले होते मला त्यावर मी 'देन प्लीज से नो फॉर हिंदी अ‍ॅज वेल' असे मी म्ह्टले कारण 'फ्रॉम अ‍ॅन अमेरिकन कंपनीज पॉईंट ऑफ व्ह्यू हिंदी इज अल्सो अ रिजनल लँग्वेज. हेन्सफोर्थ आय विल चेक व्हेदर यू से द सेम टू हिंदी स्पिकींग पीपल अ‍ॅज वेल. इफ नॉट, आय विल कंटीन्यू डिसओबेइंग यू' असे ठणकावून नक्कीच सांगावे. शाळांचे नियम, शाळांबाबतचे सरकारी नियम या बाबतीत सनदशीर मार्गाने काही सगळेच प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे कधी कधी शिवसेना मार्गाचा अवलंब करणे योग्य असते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सुबोध खरे Tue, 07/15/2014 - 12:48
पुपे साहेब मी सुरुवातीसच म्हटले आहे कि "इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इंग्रजी सोडून दुसर्या कोणत्याही भाषेत बोलू नये अस नियम असणे हे एक आहे. (मग यात हिंदी/ गुजराती सुद्धा आहे.)" तेंव्हा त्यात मराठी किंवा हिंदी असा वाद येऊ नये. तेंव्हा आपला "जर हिंदी चालत असेल तर मराठी चालेल हा मुद्दा गैरलागू आहे. जर माध्यम इंग्रजी निवडले असेल तर मी मराठीतच बोलणार हा अट्टाहास आहे. आपल्याला जर मराठीचा इतका जाज्वल्य अभिमान असेल तर मराठी माध्यमात घालावे.( दुर्दैवाने मराठी माध्यमाच्या शाळा सरकारी नियमांमुळे फारश्या चांगल्या राहिलेल्या नाहीत हि आज वस्तुस्थिती आहे). राहिली गोष्ट शिवसेनेची. त्यांची स्वताची मुले तरी कुठे मराठी माध्यमात शिकली आहेत? आदित्य ठाकरे स्वतः बॉम्बे स्कोटीश शाळेतून शिकला जेथे मी सांगितलं तसा इग्रजी सोडून इतर भाषात बोलल्यास पालकांना स्वतः येऊन दंड भरायला लावायचा हा नियम आहे. जाऊ द्या साहेब आपलाच दाम खोटा असताना वाद कशाला घालायचा.

In reply to by सुबोध खरे

मृगनयनी Tue, 07/15/2014 - 13:10
हाहा हाहा हाहा !!!... सहमत सुबोध......... मुळात "भोसरी" ह्या गावात किंवा पुण्याच्या उपनगरात जो काही प्रकार घडला तो नक्कीच निन्दनीय आहे. पण "नक्की" काय घडलंय.. याची शहनिशा होणे अत्यंत महत्वाचे आहे. "गाववाल्यां"चा माज ओसंडून वाहणार्‍या या उपनगरात इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडल्या जातात... याचेच एक मोठ्ठे अप्रूप वाटते. असो... "जितेन्द्र सिन्ग" यांचे सोशल आणि पॉलिटिकल कॉन्टॅक्ट्स बहुतेक कमी पडले असावेत. नाहीतर मराठी माध्यमाच्या शिक्षकांनी मुलांना मरेस्तोवर मारण्याच्या घटना भोसरी'ला नवीन नाहीत. त्याचप्रमाणे ज्या अंगणात आपल्याला नाचता येत नाही... ते अंगण लोकांना वाकडेच वाटते. "ही" घटना तर फक्त एक निमित्तमात्र आहे....

In reply to by मृगनयनी

कॉन्टॅक्ट कमी पडले नसावेत. या जितेंंद्रसिंह साहेबांचे डंपर हायवेवरून ज्या संख्येने आणि वारंवारितेने ये जा करतात त्यावरून असे वाटत नाही.

In reply to by मृगनयनी

कपिलमुनी Tue, 07/15/2014 - 16:20
धागा गेला खड्ड्यात ! यांनी भोसरी वरचा जुना स्कोर इथे सेटल केला ..
या उपनगरात इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडल्या जातात... याचेच एक मोठ्ठे अप्रूप वाटते
तुमच्या कल्पनेमधला भोसरी बदलला आहे आता ..आणि माज करणार्‍या गाववाल्यांच्या पोरांनी इंग्रजी शिकू नये का ?

In reply to by सूड

मृगनयनी Tue, 07/15/2014 - 18:09
धागा गेला खड्ड्यात ! यांनी भोसरी वरचा जुना स्कोर इथे सेटल केला .. या उपनगरात इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडल्या जातात... याचेच एक मोठ्ठे अप्रूप वाटते तुमच्या कल्पनेमधला भोसरी बदलला आहे आता ..आणि माज करणार्‍या गाववाल्यांच्या पोरांनी इंग्रजी शिकू नये का ?
कपिलमुनी... भोसरी'बद्दल कधी स्कोअर-सेटल करण्यासारखे काहीच घडले नव्हते. उलट 'भोसरी' येथे पान्डव राहून गेल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे आपण आधी कन्फर्म करावे. आणि गाववाल्या पोरांनी जरूर इंग्रजी शिकावे. उलट ती तर त्यांची गरज आहे. पण शिकत असताना शिक्षणसंस्थेचे नियमही पाळावेत, अशी माफक अपेक्षा आहे. गुंडागर्दी करून सगळ्याच गोष्टी मिळत नाहीत ना!!!! .. तसेच वर माझ्या प्रतिसादात मी हे देखील लिहिले आहे, की " नक्की मारहाण किती व कश्यासाठी झालेली आहे, याची सखोल चौकशी व्हावी. कारण "हे" लोक कितीही शिकले किन्वा तुमच्या भाषेत सुधारले.. तरी "गावठी पॉलिटिक्स" यांच्या रक्तातच असते..... असो... कपिलमुनी... तुम्हीदेखील भोसरी'चे असाल..तर या गोष्टी तुम्हाला माहित असतीलच... कृपया मनाला लावून घेऊ नये.... माझे वक्तव्य हे घडलेल्या घटनेशी संबंधित आहे. :)
सूड कोणाशी वाद घालताय कपिलमुनी? बाईंचे प्रतिसाद म्हणजे ताजमहालातलं बुद्धीचं थडगं आहे. डोकं आपटू नका, तुम्हालाच ईजा होईल. थडग्यावर काहीही फरक पडणार नाही.
कृपया धाग्याशी संबंधित बोलावे. ताजमहाला'चा इतिहास मी मागील एका धाग्यावर स्पष्ट केला होता. तो "तेजोमहाल"- शिवमंदिर असल्याचे सिद्धही झालेले आहे. * उर्वरीत वैयक्तिक प्रतिसाद संपादित.

In reply to by कपिलमुनी

मृगनयनी Tue, 07/15/2014 - 19:11
http://www.sakaaltimes.com/NewsDetails.aspx?NewsId=5608647216075752592&SectionId=5171561142064258099&SectionName=Pune&NewsDate=20140709&NewsTitle=20%20students%20beaten%20up%20in%20Bhosari%20school http://www.mid-day.com/articles/12-students-from-pune-school-thrashed-for-speaking-in-marathi/15436191 वर दिलेल्या सकाळ व मिड-डे यांच्या लिंक्स मध्ये स्पष्ट लिहिले आहे, की या मुलांना शाळेत इंग्रजी बोलण्यासाठी या आधीही १८-२० वेळा सौम्य शब्दांत वॉर्निन्ग देऊन झालेली होती. परन्तु तरीही ते मुद्दाम मराठीत बोलत होते. तसेच शिक्षकांशी बोलताना अर्वाच्य भाषेचाही प्रयोग करत होते. ही मुले आठवी'तली असल्यामुळे शिक्षकांनी सांगितलेले न समजण्याइतकी लहान नक्कीच नाहीत. त्यामुळे शिक्षकांना यांच्यावर हात उचलावाच लागला. नॉर्मली शहरी भागात "असे" प्रकार घडताना दिसत नाही.. किमान पुण्यात तरी! :) .. :) शिक्षकांना शिवीगाळ करणे, संस्थेच्या नियमानुसार वॉर्निन्ग देऊन सांगितले तरी मुद्दाम मराठीतच बोलणे इ. प्रकार जर १४-१५ वर्षांच्या मुलांकडून घडत असतील.. तर त्यांना आवरणे व त्यांना सुसंस्कार शिकवणे. हे केवळ त्यांचे (सुसंस्कृत) पालकच करू शकतात. वाईट याचेच वाटते, की या काही मुलांमुळे बाकीच्या चांगल्या मुलांचे नुकसान होते.

In reply to by सुबोध खरे

असहमत खरे साहेब. मुलांनी एकमेकात तासाच्या मधे कोणत्या भाषेत बोलावे यासाठी कडक कायदे असावेत याला माझा विरोध आहे. शाळेत तासिका चालू असताना, पीटीच्या वेळेला इंग्रजीत बोलावे अशी भूमिका असणे ठीक परंतु मी मित्रांशी किंवा त्यानी माझ्याशी इतर वेळेला मराठीत बोलणे यासाठी शाळेचा विरोध असणे याला माझा विरोध नक्कीच आहे. आणि महाराष्ट्रात असताना असा नियम कोणी करत असेल तर तो आपण ग्राहक म्हणून नक्कीच मोडून काढावा. झाला प्रश्न मराठी आणि इतर भाषांचा तर हे जितेंद्रसिंह उत्तर भारतीय असावेत आणि उत्तर भारतीयांची मराठीला दाबायची प्रवृत्ती सर्वत्र दिसते त्यासाठी असल्या सो कॉल्ड (तथाकथित) नियमांचा वगैरे आधार घेतला जातो. त्याचा मुकाबला प्रतिझुंडीनेच होऊ शकतो. राहीला प्रश्न नेत्यांची मुले कोणत्या शाळेतून शिकली याचा, तर नेत्यांच्या धोरणाचा जनतेला काय फायदा होतो आहे हे ठरवून जनतेने योग्य धोरणाचा फायदा उठवावा. आणि हो ही बॉम्बे स्कॉटिश विद्यार्थी मिळत नाहीत पन्नासवेळा कधी अ‍ॅडमिशन घेताय म्हणून फोन करत असते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सुबोध खरे Tue, 07/15/2014 - 19:21
पुपे साहेब, आपला कशाला संमती आहे आणि कशाला विरोध आहे हा आपला वैयक्तिक मताचा भाग आहे. मी फक्त असे करणे कायदेशीर आहे का यावर भाष्य केले. तसे पाहिले तर पुणे शहराच्या मध्यभागी असलेल्या PICT (pune Institute of Computer technology) या संस्थेत विद्यार्थ्यांनाच नाही तर शिक्षकांना सुद्धा (dress code) पोशाखाची सक्ती आहे. आता अभियांत्रिकी की महाविद्यालयात ड्रेस कोड असावा का आणि तशी सक्ती करण्याचा अधिकार त्या संस्थेला आहे काय? हे प्रत्येकाचे वैयक्तिक मत आहे. पण तसा नियम करण्याचा कायदेशीर अधिकार त्यांना आहे आणि ज्यांना ते पटत नाही त्यांनी तेथे प्रवेश घेऊ नये किंवा नोकरी करू नये. भाषिक अस्मितेचा आणि अभिमानाचा प्रश्न आला कि आपण तलवारी घेऊन उभे राहतो.पण मुंबईत असणार्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील निम्मी महाविद्यालये हि भाषिक किंवा धार्मिक अल्पसंख्यांका साठी असून त्यातील ५१ टक्के जागा ते आपल्या भाषिक बांधवाना देतात ( यात मुसलमान अंजुमन इस्लाम ख्रिस्ती फादर आग्नेल,डॉन बॉस्को, जैन, गुजराती सोमैया , सिंधी थडूमल आणि दाक्षिणात्य SIES येतात ). यावर कोणी( राजकीय पक्ष धरून) आवाज उठवताना दिसत नाही. ~ राहिल्या सरकारी संस्था तेथे ५१ टक्के आरक्षण आहेच (जे आता ७३ टक्के होऊ घातले आहे). म्हणजे फक्त ४९ टक्के जागा फक्त बुद्धिमत्तेसाठी आहेत. ~

In reply to by सुबोध खरे

आजानुकर्ण Tue, 07/15/2014 - 21:33
राहिल्या सरकारी संस्था तेथे ५१ टक्के आरक्षण आहेच (जे आता ७३ टक्के होऊ घातले आहे). म्हणजे फक्त ४९ टक्के जागा फक्त बुद्धिमत्तेसाठी आहेत.
निव्वळ हास्यास्पद दावा. ४९ टक्के जागा बुद्धिमत्तेसाठी व उरलेल्या ५१ टक्के जागा मठ्ठ दगडांसाठी की काय! असो.. सरकारी संस्थांमधील आरक्षित जागांमध्ये प्रवेश घेणारे व शिकणारे बुद्धीमान नसतात व अनारक्षित जागांमध्येच प्रवेश घेणारे तेवढे बुद्धिमान असतात हा दावा निव्वळ हास्यास्पद आहे. बाकी चालू द्या (माझ्या परवानगीची गरज आहेच असे नाही!)

In reply to by आजानुकर्ण

सुबोध खरे Tue, 07/15/2014 - 22:20
साहेब बारावीच्या PCM मध्ये ३६ % मिळालेल्या विद्यार्थ्याला मुंबईच्या जे जे रुग्णालयात प्रवेश मिळाला आहे. (अशा डॉक्टरकडे आपण जाणार का? ) आणि खुल्या वर्गात ८७. ३ टक्क्याला मिळाली नाही. तफावत असावी पण किती? दहा ते पंधरा टक्के ठीक आहे. (४१ टक्के?) आमच्या मित्राने मागास म्हणून एम बी बी एस आणि एम एस केले आणि शेवटी कोणी रुग्ण येईनात म्हणून एक दिवस महाराष्ट्र शासन राजपत्रात आपले कांबळे आड नाव बदलून ब्राम्हण आड नाव लावले.त्याच्या स्वतःच्याच शब्दात अरे आमचेच लोक येत नव्हते "अरे हा "आपल्यापैकी" आहे याच्या कडे नको. कम्युनिस्ट विचार सरणी "बुद्धिमत्ता हि जन्मजात नसून ज्या वातावरणात वाढता त्यावर ठरते " हि कालबाह्य आणि चुकीची ठरलेली आहे. असो आपले मत आपल्यापाशी

In reply to by सुबोध खरे

आजानुकर्ण Tue, 07/15/2014 - 22:30
बारावीच्या PCM मध्ये ३६ % मिळालेल्या विद्यार्थ्याला मुंबईच्या जे जे रुग्णालयात प्रवेश मिळाला आहे. (अशा डॉक्टरकडे आपण जाणार का? ) आणि खुल्या वर्गात ८७. ३ टक्क्याला मिळाली नाही. तफावत असावी पण किती? दहा ते पंधरा टक्के ठीक आहे. (४१ टक्के?)
बारावीला PCM ऐवजी PCB चे निकष ग्राह्य धरत होते असे वाटते. प्रवेशपरीक्षा येण्यापूर्वी एससी-एसटी-ओबीसी-एनटी वगैरे मागास जातींसाठी मार्कांचा निकष ४५ टक्के व खुल्या जागांसाठी मार्कांचा निकष ५० टक्के होता. पीसीएमला ३६ टक्के मार्क मिळूनही पीसीबीला जास्त मार्क मिळणे शक्य आहे. बाकी अमुकतमुकला १०० टक्के गुण मिळूनही प्रवेश मिळाला नाही अशीही अॅनेकडोटल उदाहरणे ऐकली आहेत. पेमेंट सीट्सबद्दल आपले काय मत आहे? ती बंद करावीत का? की पैशे भरल्याने बुद्धीमत्ता आपोआपच येते? बाकी शिक्षणाचा आणि आयुष्यातील प्रगतीचा फारसा संबंध नसतो असे चिंत्य मत येथेच वाचले आहे त्यामुळे त्या विषयावर चर्चा करण्याचा हेतू समजला नाही.

In reply to by आजानुकर्ण

सुबोध खरे Wed, 07/16/2014 - 09:46
पी सी एम नव्हे पी सी बी असायला हवे टंकन दोषाबद्दल क्षमा. अभियांत्रिकीला हा ५० टक्क्याचा निकष होता वैद्यकीय प्रवेशासाठी नाही. पेमेंट सीट ला सुद्धा तसाच निकष असावा याबद्दल दुमत नाही. पैसे भरल्यावर नुसती शिकायचीच नव्हे तर शिकवायचीही अक्कल येते. जातीप्रमाणे १० ते २० टक्के गुण हे आधिक (ग्रेस) द्यावे. अगदीच ३६ टक्के म्हणजे फारच वाईट आहे. राहिली गोष्ट एखाद्या परीक्षेत मुलाला चांगले गुण मिळाले नाहीत तर मुलगा हुशार नाही असा मुळीच अर्थ नाही. शैक्षणिक यशाचा आणि आयुष्यातील यशाचा १० टक्के संबंध आहे असे माझे आजही मत आहे. परंतु काही बाबतीत विशिष्ट कौशल्य प्राप्त करण्यासाठी आपली तेवढी पात्रता असणे आवश्यक आहे उदा. लढाऊ विमानाचा वैमानिक (फायटर पायलट) होण्यासाठी आवश्यक असलेली PABT टेस्ट पास न करता आपण एखाद्याला आरक्षणातून असा वैमानिक बनवला तर काय होईल? तसेच एकाच वर्गात एकाच शिक्षण घेतलेले दोन विद्यार्थी पोलिस उप निरीक्षक म्हणून भरती होतात. एक जण आरक्षणातून ७ व्या वर्षी निरीक्षक म्हणून बढती मिळवतो आणि खुल्या वर्गातील उपनिरीक्षक १५ वर्षे पर्यंत लटकत बसतो( एवढे कमी नाही तर त्याने पोलिस प्रशिक्षण अकादमीत शिकवलेला ६ वर्षे कनिष्ठ असलेला विद्यार्थी त्याच्या डोक्यावर ठाणे अंमलदार म्हणून वरिष्ठ बनून येतो यात कोणती गुणवत्ता आहे? राहिली गोष्ट मराठी अस्मितेची त्याबद्दल मी वर म्हटलेच आहे कि आपण जर गुजराती सिंधी कच्छी मद्रासी असाल तर आपल्याला भाषिक अल्पसंख्यांक आणि ख्रिस्ती, मुसलमान असाल तर धार्मिक अल्पसंख्यांक म्हणून अभियांत्रिकीत आरक्षित जागा मिळतात याबद्दल आपली अस्मिता जागी होत नाही. पण एखाद्या गैर मराठी माणसाने मराठी मुलांना मारहाण केली तर लाथा बुक्क्यांनी तुडवायची भाषा होते. हेच जर तो माणूस मराठी असता तर एवढी चर्चा झाली नसती. मग त्याला भाषिक रंग नव्हे तर माणुसकीचा अभाव असा रंग आला असता. Losing sight of the wood for the trees अशी आपली अवस्था आहे. आज हि परीस्थिती शिक्षणात आहे उद्या नोकर्यात आणि घरांच्या सोडतीत झाली तर आश्चर्य वाटू नये. असो

In reply to by सुबोध खरे

आजानुकर्ण Wed, 07/16/2014 - 16:19
अभियांत्रिकीला हा ५० टक्क्याचा निकष होता वैद्यकीय प्रवेशासाठी नाही.
जर वैद्यकीय प्रवेशाला निकष नव्हता तर बारावीला ३६ टक्के गुण मिळवणारा मुलगा अपात्र आहे हे आपण कसे काय ठरवू शकतो?
परंतु काही बाबतीत विशिष्ट कौशल्य प्राप्त करण्यासाठी आपली तेवढी पात्रता असणे आवश्यक आहे उदा. लढाऊ विमानाचा वैमानिक (फायटर पायलट) होण्यासाठी आवश्यक असलेली PABT टेस्ट पास न करता आपण एखाद्याला आरक्षणातून असा वैमानिक बनवला तर काय होईल?
आरक्षणाचे सध्याचे नियम माहीत नाहीत पण आरक्षणाबाबत तुमचा गैरसमज असावा. खुल्या जागांसाठी असलेली परीक्षा आणि राखीव जागांसाठी असलेली परीक्षा यात फरक नाही. एकदा प्रवेश मिळाल्यावर दोन्ही गटांना सारख्याच परीक्षा व तोच अभ्यासक्रम असतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने आरक्षणातून प्रवेश घेतल्याने तो कमकुवत असल्याचे सिद्ध होत नाही. जर तो ती परीक्षा पास झाला नाही तर तो डॉक्टर किंवा वैमानिक होऊच शकणार नाही.
तसेच एकाच वर्गात एकाच शिक्षण घेतलेले दोन विद्यार्थी पोलिस उप निरीक्षक म्हणून भरती होतात. एक जण आरक्षणातून ७ व्या वर्षी निरीक्षक म्हणून बढती मिळवतो आणि खुल्या वर्गातील उपनिरीक्षक १५ वर्षे पर्यंत लटकत बसतो( एवढे कमी नाही तर त्याने पोलिस प्रशिक्षण अकादमीत शिकवलेला ६ वर्षे कनिष्ठ असलेला विद्यार्थी त्याच्या डोक्यावर ठाणे अंमलदार म्हणून वरिष्ठ बनून येतो यात कोणती गुणवत्ता आहे?
अॅनेक्डॉटल उदाहरणे भरपूर आहेत. दुसरे समांतर उदा. रोहन नारायण मूर्ती हे इन्फोसिसमध्ये १५-२० वर्षे काम करणाऱ्यांच्या डोक्यावर उच्च अधिकारी म्हणून गेले. निव्वळ अॅनेक्डॉटल उदाहरणे घेण्यापेक्षा एकंदर सांख्यिकीचा विचार करावा. जिथे जिथे आरक्षण सर्वप्रथम सुरु झाले ती महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, गुजरात ही राज्ये तथाकथित गुणवत्ताधारित राज्यांपेक्षा लवकर प्रगती करु लागली. सामाजिक न्याय व अार्थिक प्रगती यांचा जवळचा संबंध आहे. अमुकतमुक डॉक्टरला ३६ टक्के मिळाल्याने एमबीबीएसला प्रवेश मिळाला होता हा निकष लावण्याइतकी डॉक्टरची माहिती मला त्या डॉक्टरकडे जाताना असत नाही. तो एमबीबीएसची परीक्षा पास झाला आहे की नाही इतपतच असते. तुम्ही ज्याला बुद्धिमत्ता म्हणता ते परीक्षेत गुण मिळवण्याचे कौशल्य असते. क्लास लावला, घोकंपट्टी केली की असे गुण मिळतात. - खरी बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शाळेतून ड्रॉपआऊट होतात. शास्त्रज्ञ होतात किंवा स्वतःची कंपनी चालू करतात. (थोडक्यात त्यांना ३६ टक्केही गुण मिळत नाहीत!) बाकी जन्माधिष्ठित बुद्धिमत्ता ठरवण्याचे प्रयोग भारतात हजारो वर्षे करुन झाले आहेत. आता निदान मुलांची पार्श्वभूमी, शैक्षणिक संस्कारांचा इतिहास वगैरे पाहून प्रवेश दिले जात असल्याने परिस्थिती सुरळीत होत आहे याचा मला आनंद वाटतो. बाकी मराठी अस्मितेच्या चर्चेत मला रस नाही. इत्यलम

In reply to by आजानुकर्ण

सुबोध खरे Wed, 07/16/2014 - 19:37
मी तो अपात्र आहे असे कुठे म्हटले आहे ? आणि अपात्र ठरविणारा मी कोण? माझे म्हणणे एवढेच आहे कि दोन्हीत काहीतरी तुलना असावी. वैमानिकाची परीक्षा PABT पास होण्यासाठी आरक्षित व्यक्तीला कमी पात्रतेचा निकष ठेवला नाही यावर आपण बोलणे टाळून जेवढे सोयीस्कर तेवढेच बोललात. PABT पास होत असेल तर तो आरक्षित कि अनारक्षित हा वाद येणारच नाही. दुर्दैवाने वैद्यकीय प्रवेशा बाबत असा काटेकोर निकष नाही. शिवाय कल्याणकारी सरकारने एक वर्षाचा अभ्यासक्रम करून होमियोपथी किंवा आयुर्वेद किंवा युनानी डॉक्टरना आधुनिक वैद्यक शास्त्राचे उपचार करण्यास परवानगी दिली आहेच. त्यात पैसे वाले धनदांडगे आहेतच. बढीया है!!!!!. उद्या राष्ट्रपती अंगरक्षक म्हणून सैनिक निवडतात त्याचा निकष हा सहा फुट उंची असा आहे. त्यावर तुम्ही असे म्हणू शकता कि साडेपाच फुटाचा माणूस कमी दर्जाचा आहे का? तसे नसेलही पण मुल मुद्दा हा आहे कि राष्ट्रपतीनचे अंगरक्षक हे त्यांचे हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी त्यांच्यापेक्षा उंच असावे म्हणजे हल्ला झाल्यास त्यांना चारही बाजूनी ते सुरक्षित करू शकतील. आता यात तुम्ही राष्ट्रपती "गेले" तरी चालतील किंवा पाच फुटाचा गुरखा सुद्धा चांगला अंगरक्षक बनू शकेल असे फाटे फोडाल तर मी त्याला उत्तर देऊ इच्छित नाही. प्रवेश देताना आपण कोणता तरी निकष लावता ना ? मग त्या निकषात आरक्षणासाठी काही वेटेज द्या त्या निकषाला अर्थ नाही असे म्हणून नुसती टीका करण्यापेक्षा आपण एखादा दुसरा मार्ग सुचवा कि? कि आपल्या म्हणण्याप्रमाणे गुणवत्ता हा निकषच नाही. मग बोलणेच खुंटले. अॅनेक्डॉटल उदाहरणे नव्हेत पण महाराष्ट्र पोलिस मध्ये बढतीचे निकष जातीनिहाय बदलतात हि वस्तुस्थिती आहे. आपल्याला हवे असेल तर माहितीच्या अधिकाराचा वापर करून पहा एक मात्र नक्की आहे कि जर आरक्षणातून झालेल्या डॉक्टरने काढलेल्या रुग्णालयात पाय ठेवण्यासाठी "सगळेच" लोक बिचकतात हि वस्तुस्थिती आहे.मग बाकी तुम्ही काहीही वाद घाला.

In reply to by सुबोध खरे

प्यारे१ Tue, 07/15/2014 - 22:33
एकदा अ‍ॅडमिशन मिळाल्यानंतर पुन्हा पास होण्यासाठी आरक्षण नसते ना? तो माणूस एमबीबीएस, एमएस झाला ह्याला काहीच अर्थ नाही का? शैक्षणिक हुशारी वाढवता येते असं मला वाटतंय. दहावीला ५८% बारावीला ५६% मिळालेला मुलगा डिप्लोमाला राज्यात दहावा येतो (इथपासून) मेरीटवर डिग्री करतो नि पीजी सुद्धा करतो. मिपावर सुद्धा अनेक जण असतील. लई गोंधळ उडतोय राव!

In reply to by आजानुकर्ण

ऋषिकेश Wed, 07/16/2014 - 14:15
सरकारी संस्थांमधील आरक्षित जागांमध्ये प्रवेश घेणारे व शिकणारे बुद्धीमान नसतात व अनारक्षित जागांमध्येच प्रवेश घेणारे तेवढे बुद्धिमान असतात हा दावा निव्वळ हास्यास्पद आहे.
१००% सहमत! असले हास्यास्पद दावे ऐकले की हसण्यावारीही नेववत नाही.. दया येते!

In reply to by विजुभाऊ

अनुप ढेरे Sun, 07/13/2014 - 21:42
अगदी अगदी... पालकांनाच सोस असतो. तसली शिक्षा झाली म्हणून लगेच मराठी प्रेमाचे उमाळे आलेत एक्दम. ती शिक्षा झाली नसती तर सगळ्यांनी गप पाळले असते नियम. त्यामुळे मराठीचा जाज्वल्य अभिमान आणि अमानूष शिक्षा हे एकत्र करायची गरज नाही. दोन वेगळे इशूज आहेत.

In reply to by अनुप ढेरे

हुप्प्या Sun, 07/13/2014 - 21:57
इथे लोक इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या मुलांबद्दल आणि त्याच्या पालकांबद्दल अकारण हिणकस शेरे मारत आहेत. इंग्रजी माध्यमात शिकणे ही गरज बनली आहे. तसे केल्याने त्या व्यक्तीला मराठीबद्दल तिरस्कार असे मानणे चूक आहे. भारतातील सगळ्या क्षेत्रात उच्च शिक्षण हे इंग्रजीतच असते. त्यात बदल होण्याची सुतराम शक्यता नाही. असे असताना अट्टाहासाने सगळ्यांनी आपापल्या मुलांना मराठी माध्यमातच अशी अपेक्षा बाळगणे खुळचटपणाचे आहे. उलट इंग्रजी माध्यमात शिकणार्‍यांना अन्य प्रकारे मराठीची गोडी लावणे जास्त व्यवहार्य ठरेल. सिनेमे, मालिका, गाणी, पुस्तके, भाषणे ह्या अनेक मार्गाने मराठी जोपासली जाऊ शकते. केवळ मराठी माध्यमातून शिकणाराच तो मराठीप्रेमी अशी मांडणी आततायीपणाची आहे. इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या लोकांना मराठीवर प्रेम करायचा हक्कच नाही असे काहीतरी बिनडोक आणि टोकाचे विचार इथे मांडले जात आहेत त्याचा मी तीव्र विरोध करतो.

In reply to by हुप्प्या

नगरीनिरंजन Mon, 07/14/2014 - 00:27
इंग्रजी शिकणे ही गरज आहे इतपत मान्य आहे, पण इंग्रजी माध्यमात शिकणे ही गरज नव्हती आणि नाही. आणि इंग्रजी माध्यमातच शिकायचे असेल तर इंग्रजीच बोलले पाहिजे हा नियम चूक नाही. इथे फक्त मुलांना अमानुषतेने वागवण्याचा प्रश्न आहे. भाषेचा काहीही संबंध नाही.

In reply to by नगरीनिरंजन

हुप्प्या Mon, 07/14/2014 - 06:43
निव्वळ इंग्रजी शिकणे नव्हे तर इंग्रजी माध्यमातून शिकणे हीच आज गरज बनली आहे. आज मराठी शाळांची स्थिती दयनीय आहे. किती हुषार विद्यार्थी शिक्षक बनण्याचे स्वप्न बघतात? तेही मराठी माध्यमाचे? जवळजवळ कुणी नाही. दुसरे काही जमत नसेल तर शिक्षक बना अशी वृत्ती बनली आहे. त्यामुळे त्यातल्या त्यात बर्या शाळा ह्या इंग्रजी माध्यमाच्या आहेत. सामान्य माणसाकडून ह्या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केले जावे आणि केवळ तत्त्वाकरता त्यांनी आपल्या मुलांना मराठी माध्यमात धाडावे अशी अपेक्षा अवाजवी आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यम अपरिहार्य आहे. आणि तिथे प्रवेश घेतलेल्या लोकांचा दु:स्वास करण्याऐवजी त्यांनाही मराठीबद्दल प्रेम निर्माण करता आले तर त्याचा जास्त उपयोगी ठरेल. इंग्रजी माध्यमात शिकायचे असेल तर फक्त इंग्रजीच बोलले पाहिजे हा अट्टाहास अनाकलनीय आहे. मराठी भाषेला तिलांजली देऊनच इंग्रजी माध्यमात शिकता येते असा काही गंड आपण बाळगत आहात असे दिसते. हा अत्यंत निराधार आहे.

In reply to by हुप्प्या

नगरीनिरंजन Mon, 07/14/2014 - 17:27
आज मराठी शाळांची अवस्था दयनीय आहे कारण काल मराठी लोकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवून पैशांच्या थैल्या घेऊन इंग्रजी शाळांच्या दारात रांगा लावल्या. आता सापळ्यात अडकलेल्या माकडासारखी अवस्था होणे स्वाभाविक आहे. असो, मुलांना मारल्याबद्दल जितेंद्रसिंगवर कायदेशीर कारवाई व्हावी; पण त्याला लाथाबुक्क्यांनी वगैरे मारुन मराठी शिकवण्याचा खुळचटपणा करण्याऐवजी आपल्या आजूबाजूला राहणार्‍या इंग्रजाळलेल्या मराठी पोरांना समृद्ध मराठी बोलता, वाचता कसे येईल याची काळजी केल्यास बरे. इत्यलम.

In reply to by नगरीनिरंजन

सहमत आहे ननि. इंग्रजी माध्यमाचा बागुलबुवा आपणच केला आहे उगाचा परंतु आता पुण्यातही घराच्या जवळ चांगल्या मराठी शाळांची अनुपलब्धता आणि त्यामुळे जवळच्या इंग्रजी शाळेत पाल्याला घालावे लागण्याची अगतिकता यामुळे इंग्रजी शाळेत मराठी बोलण्याबद्दल सुवर्णमध्य काढणे गरजेचे झाले आहे.

बॅटमॅन Sun, 07/13/2014 - 21:31
मुळात असला काही नियम करणे हाच एक जबरदस्त मूर्खागमनीपणा आहे. धाग्याशी पूर्णपणे सहमत आहे. लै माज आहे असल्या दीडदमडीच्यांचा. त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पायजे - शक्यतोवर कायदेशीर पद्धतीने. याचिका इ. दाखल केली पाहिजे याविरोधात. अवांतरः तमिळनाडूमध्ये असा नियम असतो किंवा कसे, याबद्दल पाहिले पाहिजे. तिथली लोकं मातृभाषेबद्दल लै आग्रही आहेत हे तर सर्वांस ठाऊक आहेच.

रेवती Mon, 07/14/2014 - 07:16
लिंक वाचली नाही तरी असे म्हणावेसे वाटते की कोणत्याही माध्यमाच्या शाळेत कोणत्याही चुकीसाठी (गुन्हा वगैरे वेगळे विषय आहेत. ) वळ उठेपर्यंत मारायची (खरेतर मारायचीच) गरज नाही. मारामारी करू नये, अमूक करावे, तमूक करू नये या गोष्टी शाळेतूनच बर्‍या शिकवल्या गेल्या नाहीत तर काय उपयोग? आईवडीलांनीही संस्कार करावेत हा वेगळा (आणि महत्वाचा विषय आहे पण तो आत्ता हा धागा त्याचा नाही) विषय झाला. वळ उठेपर्यंत मारणे हे गंभीर बाब आहे. प्रत्येक शाळेचे नियम असतात आणि ते मोडल्याची शिक्षा ठराविक असायला हवी. मनमानी झाली तर हुकुमशाही म्हणायला हरकत नाही. खूप वर्षांपूर्वी मुलींच्या शाळेत (इंग्रजी माध्यम) हातावर मेंदी रंगवून शाळेत गेल्याबद्दल मुलीला वाईट पद्धतीने शिक्षा झाली होती. इंग्रजी शाळेत नागपंचमी हा सण नाही म्हणे! हरकत नाही. असतील तुमचे नियम पण समज देणे हा भागही असतो. आणि मराठीबहुल भागात शाळा काढलीयेत ना? मग स्थानिक लोक तुमच्या शाळेत येणार ना! कित्येकदा जवळची असते म्हणून त्या भागात रहिवासी मुलांना शाळेत पाठवतात. जवळची हवी, मराठी माध्यमाची हवी, तिथे घरेही स्वस्तात मिळावीत असे सगळे जमेलच असे नाही. त्यातल्यात्यात बरे कॉम्बिनेशन करून महागाईच्या जमान्यात रहायचा प्रयत्न करीत असताना काही चांगले, काही बरे तर काही मनाविरुद्ध निर्णय घेऊन लोक रहातात. त्यामुळे मराठी लोकांनाच फार सोस असतो असे म्हणण्यात अर्थ नाही. तसे नसेलच असेही नाही पण म्हणून मारण्याचा हक्क मिळत नाही.

मुक्त विहारि Mon, 07/14/2014 - 09:36
पुर्वी, म्हणजे मला जबरदस्तीने शाळेत घातले होते, त्या काळांत, त्यावेळी मला इंग्रजी बोलता येत नाही, म्हणून शिक्षकांनी मारले होते... आणि आत्ताच्या शाळा मराठीत का बोललात? म्हणून मार देतात.... कालचक्र उलटे फिरले... असो, जय रामदास काका (आधी गुंतू नये.... गुंतल्यावर मग कुंथू नये)

In reply to by मुक्त विहारि

ब़जरबट्टू Mon, 07/14/2014 - 11:03
अहो मुवि, दोन्हीत काय फरक आहे ? तेव्हा इंग्रजी बोलता येत नाही म्हणून पडायच्या, मग आतापण इंग्रजी बोलत नाही म्हणूनच पडताय की.. :) You do it Or I do it, Both can not do it. :) - इती आमची इंग्रजी :)

In reply to by ब़जरबट्टू

मुक्त विहारि Mon, 07/14/2014 - 14:45
घड्याळाचे काटे उलटे फिरले तरी... मुलांना मारणे हा शिक्षकांचा अधिकार, मात्र केंद्रस्थानीच आहे. एकूण काय तर, आपला हा अधिकार सोडायला शिक्षक तयार नाहीत हेच सत्य... जावूदे, आम्हाला मार मिळाल्याने ना आमचे इंग्रजी सुधारले ना आमच्या इतर शालेय ज्ञानांत भर पडली. पण एक माराचा एक फायदा मात्र नक्कीच झाला... आम्ही कोडगे झालो...

सुनील Mon, 07/14/2014 - 10:05
सदर शाळेचा नियम हा मुलांनी शाळेत असताना एकमेकांशी इंग्रजीतच बोलावे असा आहे, असे दिसते. मुलांनी नियमभंग केला तो इंग्रजीत न बोलल्यामुळे (मराठीत बोलल्यामुळे नव्हे). मुले जर का गुजराती, सिंधी, हिंदी, तमिळ वा संस्कृतात बोलली असती तरी ते नियमबाह्यच ठरले असते. असा नियम करायचा खासगी शाळेला अधिकार आहे काय? बहुधा असावा. जर नियम करायचा अधिकार असेल तर, नियम तोडल्यावर काय शिक्षा देण्याचा शाळेला अधिकार असावा? फौजदारी गुन्ह्याच्या कचाट्यात सापडणार नाही, इतपत. म्हणजेच, मुलांना एखादा पिरियड उभे करणे, थोडा जास्तीचा गृहपाठ देणे इत्यादी चालून जावे. अंगावर वळ उठेपर्यंत मारणे हा फौजदारी गुन्हा ठरतो. थोडक्यात, गुन्हेगारांना जी काही शिक्षा होईल ती मुलांना मारल्यामुळे होईल. त्याचा मराठीच्या अभिनिवेशाशी काहीही संबंध नाही.

In reply to by सुनील

@अंगावर वळ उठेपर्यंत मारणे हा फौजदारी गुन्हा ठरतो.>>> पूर्ण सहमत. @थोडक्यात, गुन्हेगारांना जी काही शिक्षा होईल ती मुलांना मारल्यामुळे होईल. त्याचा मराठीच्या अभिनिवेशाशी काहीही संबंध नाही. >>> ++++++++++++++११११११११११११११११११११११११११

In reply to by सुनील

हुप्प्या Mon, 07/14/2014 - 10:33
भारताने भाषावार प्रांतरचना स्वीकारली आहे. आणि महाराष्ट्राची राज्यभाषा ही मराठी आहे. त्यामुळे प्रियदर्शिनी शाळेत काही मुले सिंधी भाषेत बोलली आणि त्यांना शिक्षा झाली व दुसरीकडे मराठी बोलल्यामुळे शिक्षा झाली ह्यात थोडा फरक आहेच. मराठीला विरोध हा जळात राहून माशाशी वैराचा प्रकार आहे. अर्थात प्रकरण कोर्टात गेले तर जी काही शिक्षा होईल ती अमानुष शिक्षेबद्दलच होईल ह्यात शंकाच नाही. पण ह्यातील मराठी विरोध आहे त्याचा उपयोग ह्याविरुद्ध आवाज उठवण्याकरता झाला आहे. कुठलाही राजकीय पुढारी मराठी विरोधाचे समर्थन करणार नाही. समजा ह्या शाळेने या आधी वर्गात हिंदी बोलल्याबद्दल इतकी कठोर शिक्षा दिलेली नाही मात्र मराठी बोलल्याबद्दल मात्र वळ उठेपर्यंत मारहाण केली अशी माहिती मिळाली तर प्रकरणाला नक्कीच नवे वळण लागेल. शाळा ज्या राज्यात उघडली आहे त्या राज्याच्या राजभाषेबद्दल थोडा जास्त आदर बाळगला पाहिजे इतके तारतम्य ह्या शाळेच्या प्रमुखांना समजायला हवे. भोसरीसारख्या भागात मराठी लोकांची संख्या जास्त असणार आणि मराठी बोलण्याची प्रकरणेही जास्त होत असणार. त्यामुळे मराठी बोलल्याबद्दल कायदा हातात घेऊन मुलांची हाडे नरम करताना ह्या पैलूकडे बघण्याची अक्कल भोसरीच्या संचालकाला आली तरी पुष्कळ झाले.

In reply to by हुप्प्या

सुनील Mon, 07/14/2014 - 10:51
समजा ह्या शाळेने या आधी वर्गात हिंदी बोलल्याबद्दल इतकी कठोर शिक्षा दिलेली नाही मात्र मराठी बोलल्याबद्दल मात्र वळ उठेपर्यंत मारहाण केली अशी माहिती मिळाली तर प्रकरणाला नक्कीच नवे वळण लागेल.
अच्छा, तर तुम्हालाही ही महिती नाहीच!! ह्यालाच तर मी फुक्कटचा अभिनिवेश म्हणतोय!!! असो.

In reply to by सुनील

हुप्प्या Tue, 07/15/2014 - 10:16
ह्या प्रसंगात मराठी भाषेला काही स्थान नाही असा आपला दावा होता. तो मी खोडून काढत आहे. मराठी ही राज्यभाषा असल्यामुळे ती बोलण्यावरच्या बंधनाविरुद्ध जास्त असंतोष उफाळणार हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा जर मराठीचा आकसाने द्वेष होतो आहे असे लक्षात आले तर मराठी भाषेला स्थान नाही हा मुद्दा साफ खोडला जातो. जोवर प्रकरणाची पूर्ण माहिती मिळत नाही तोवर मराठी भाषेचा ह्या प्रकरणात काहीही संबंध नाही अशी क्लीन चिट देणे चुकीचे आहे.

चौकटराजा Mon, 07/14/2014 - 10:12
ईंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी नव्हे तर आपल्या मातृभाषेत बोलू नये. निदान सर्रास तरी बोलू नये. असा नियम मी ही संस्थाचालक असता तरी केला असता. पण असे केले नाही तर मार देईन हा कोणता न्याय ? माझी मुलगी एका किरिस्ताव वातावरणातील शाळोत्तून शिकली पण तिला अजूनही पुरेसे नीट इंग्रजी बोलता येत नाही.लिहिता ही नाही. म्हण्जे मी तिला त्या माध्यमाला घातल्याचा उद्देशच सफल झालेला नाही. एक संहिता म्हणून तिथे मराठी वा हिंदीत वा कानडीत बोलायला माझा विरोधच असेल.

मृत्युन्जय Mon, 07/14/2014 - 10:47
मातृभाषा सोडुन इतर कुठल्याही भाषेतुन शिकणार्‍या मुलांना नविन भाषा आणि त्या अनुषंगाणे ज्ञान आणि विद्या मिळवणे थोडे अवघडच जाते. घरीदारी मुले मातृभाषेतच बोलत असतात (बर्‍याचदा). असे असताना जर ती मुले इंग्रजी माध्यामातुन शिक्षण घेत असतील तर केवळ ती भाषा शिकणे अवघड जाते असे नाही तर इतर सगळेच विषय इंग्रजीतुन असल्याने त्या विषयांचा अभ्यसही कमी पडु शकतो. अश्यावेळेस त्या मुलांनी किमान शाळेत तरी इतर कुठल्याही भाषेत न बोलता इंग्रजीत संभाषण करावे असा नियम शाळेने केलेला असल्यास तो योग्यच आहे. आणी हा नियम मोडल्यास कुठलीही अनाठायी नसलेली शिक्षा करणेही योग्यच आहे. वर डॉक्टरांनी म्हटल्याप्रमाणे पालकांनी शाळेत येउन १०० रुपये दंड भरणे ही अतिशय रास्त शिक्षा आहे. त्याबरोबर मुलांनाही लिहिण्याची किंवा तत्सम इतर शिक्षाकरावी. त्यामुळे मुले अपसुक वळणावर येतील. पण वळ उठेस्तोवार मारणे हे काही योग्य वाटत नाही. उपरोक्त प्रकरणात संचालक / व्यवस्थापक जितेंद्र सिंग नसुन जितेंद्र जोशी किंवा जितेंद्र जाधव असले असते तर लोकांनी अश्याच प्रतिक्रिया दिल्या असत्या का? मारण्याबद्दल नक्की दिल्या असत्या पण त्यामुळे भाषिक अस्मिता उफाळुन नसत्या आल्या. सध्याही तसे होउ नये असे वाटते.

In reply to by सुबोध खरे

सुनील Mon, 07/14/2014 - 11:43
बराचसा सहमत. जाधवांबद्दल शंका नाही. पण जोशी "मूळचे" कुठले ह्याची ऑफलाइन चौकशी आधी झाली असती!! ;) कारण गुजराती, हिंदी आणि कन्नड भाषकांतदेखिल "जोशी" आढळतात!!

In reply to by सुबोध खरे

जितेंद्र जोशी किंवा जितेंद्र जाधव असले असते तर..... भाषिक अस्मिता उफाळुन नसत्या आल्या
जोशी असते तर दुसर्‍या अस्मिता उफाळुन आल्या असत्या राव =))

In reply to by चौकटराजा

त्यात पुण्याचे की मुंबईचे की नागपूरचे यावर पुलंनी नवीन लेख लिहिला असता !
करेक्ट , कारण पुण्याच्या जोश्यांनी मराठी बोलल्याबद्दल मारहाण केलीतर वेगळा अर्थ निघतो अन मुंबईच्यांनी केलीतर वेगळा अन इतर प्रांतीय जोशांनी केली तर त्याहुन वेगळा =))

बॅटमॅन Mon, 07/14/2014 - 12:12
पैसे घेतले म्हणून मातृभाषेत बोलायचा अधिकारही हिरावून घेता येतो हे पाहून मजा वाटली. इथे प्रश्न इंग्रजी शाळांचा नाहीये, अगदी शुद्ध तुपातल्या मराठी शाळेने असा नियम केला तरीही ते चूकच आहे. शाळेच्या निर्णयाचे समर्थन करणार्‍यांना (मार देणे नव्हे तर इंग्रजी बोलायची सक्ती करणे यासंदर्भात) माझा प्रश्न आहे. अशी सक्ती केली तर इंग्रजी नैपुण्यात लक्षणीय फरक पडतो याचा काय विदा आहे? विदा नसेल तर उगीच नियम बनवून काय साधते? अपि च- संविधानातल्या तरतुदीस हे विरोधी जात नाही का? माझा त्या विषयाचा अभ्यास नाही, पण जिथे तुम्ही कोर्टासारख्या ठिकाणीही दुभाष्या घेऊन बोलू शकता तिथे शाळेत काय अडचण आहे? पालकांना डोक्याला तकतक नको म्हणून ते त्रास करून घेत नाहीत आणि शाळा माजतात.

In reply to by बॅटमॅन

सुनील Mon, 07/14/2014 - 12:28
कुठलाशा शंकराचार्‍यांच्या मठात फक्त संकृतातच बोलावे लागते (चार पैकी नक्की कुठले पीठ ते आता आठवत नाही. कदाचित चारही असतील!) तेव्हा खासगी ठिकाणी कुठल्या भाषेत बोलावे, काय पोषाख घालावा इत्यादी नियम संबंधित संस्था नक्कीच करू शकतात.
अशी सक्ती केली तर इंग्रजी नैपुण्यात लक्षणीय फरक पडतो याचा काय विदा आहे? विदा नसेल तर उगीच नियम बनवून काय साधते?
हा निराळा मुद्दा आहे! पण नियम करायचा अधिकार आहेच!

In reply to by सुनील

बॅटमॅन Mon, 07/14/2014 - 12:37
कुठलाशा शंकराचार्‍यांच्या मठात फक्त संकृतातच बोलावे लागते (चार पैकी नक्की कुठले पीठ ते आता आठवत नाही. कदाचित चारही असतील!) तेव्हा खासगी ठिकाणी कुठल्या भाषेत बोलावे, काय पोषाख घालावा इत्यादी नियम संबंधित संस्था नक्कीच करू शकतात
. हा दाखला पुरेसा नाही. मी तिथे जाऊन मराठीत बोललो तर उत्तर मिळणार नाही इतके फारतर म्हणू शकाल. दोन्ही केसेस तुलनीय नाहीत.
पण नियम करायचा अधिकार आहेच!
अशी कुठली कायदेशीर तरतूद असेल तर ठीक, नपेक्षा नाही. असा कायदा जर असेल तर तोही बदलला पाहिजे या मताचा मी आहे, पण तो भाग वेगळा.

In reply to by सुनील

हुप्प्या Tue, 07/15/2014 - 10:19
एखाद्या गृहसंकुलात जेव्हा असा नियम केला जातो की निव्वळ शाकाहारी लोकांनाच जागा विकत घेता येईल तेव्हा लोक त्याविरुद्ध बोंब मारतातच ना? त्यामुळे अगदी खाजगी मालमत्तेलाही कायद्याच्या कक्षेतच रहावे लागते. धार्मिक स्थळी जे नियम असतात ते नियम शाळेकरता लागू होतीलच असे नाही. उदा. जाती धर्म वा पंथाविरुद्ध भेद करणे अनेक खाजगी संस्थांकरताही बेकायदा असते.

In reply to by हुप्प्या

सुबोध खरे Wed, 07/16/2014 - 09:53
हि जर आपली संस्था अल्पसंख्यांक( जैन) म्हणून रजिस्टर झाली असेल तर चालू शकते पण आपण गुजराती हिंदू असाल तर चालत नाही असा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आहे. एका मुसलमान माणसाला तेथे जागा घेण्यास अटकाव केल्याबद्दल त्याने केलेल्या याचिकेचा हा निकाल आहे. बहुसंखांक असणे हा आजकाल गुन्हा आहे असे वाटावे अशी परिस्थिती आहे. अल्पसंख्यांक म्हणून कोणत्याही गटाचे किंवा समाजाचे किती लाड चालवून घ्यायचे हा विचार करण्याची वेळ आली आहे?

In reply to by बॅटमॅन

मृत्युन्जय Mon, 07/14/2014 - 14:38
पैसे घेतले म्हणजे? इथे पैशाचा काय संबंध? कारण पैसेही पालकच देतात की. प्रश्न पैशाचा नसुन. भाषा सुधारण्याचा आहे. इथे लिखित आणि बोली अश्या दोन्ही प्रकारचा संबंध आहे. इंग्रजी माध्यमातील मुले एकमेकांशी लिखित स्वरुपात संवाद साधत नसतील (तास चालु असताना ज्या चिटठ्यचपाट्या हस्तांतरित होतात त्या वेगळ्या. त्यावर असेही काही नियंत्रण ठेवता येणार नाही.) मुख्य मुद्दा आहे बोली भाषेचा. बोली भाषा सुधारली तर किमान शिक्षक वर्गात काय सांगत आहेत हे तरी नीट कळु लागेल. याचा काही विदा माझ्याकडे तरी नाही. पण संवादाची भाषा सुधारली तर मौखिक संवादाच्या माध्यमातुन दिले गेलेले ज्ञान अधिक चटकन आत्मसात करता येइल असे अनुमान काढणे नक्कीच लॉजिकल आहे. उलट्या बाजुचा म्हणजे मराठीत बोलल्यामुळे इंग्रजी नैपुण्यात लक्षणीय फरक पडतो असे अनुमान काढणे तार्किकदृष्ट्या अयोग्य ठरेल, मात्र मराठीत बोलल्यामुळे इंग्रजी नैपुण्यात लक्षणीय फरक पडतो याबाबतचा काही विदा असेल तर ते वाचणे नक्कीच जास्त रोचक ठरु शकते. याबाबत एक गोष्ट आठवली की शाळेत इंग्रजीच्या बाई नेहमी सांगायच्या की वर्गातील काही मुलांचे इंग्रजी लेखन आणि भाषा कच्ची आहे कारण ते मराठीत विचार करुन मग इंग्रजीत लिहितात / बोलतात. जर विचारच इंग्रजीत करायला सुरुवात केली तर इंग्रजी सुधारेल. विचाराची प्रक्रिया आणि त्याची भाषा नियंत्रित कशी करायची हे त्यावेळेस अजिबातच कळले नव्हते. आताही निट्से कळत नाही. पण आता असे होउ शकते एवढे मात्र नक्की सांगु शकतो. कारण आता काही विचार प्रकट करण्यासाठी पटकन इंग्रजीचाच आधार घेतला जातो आणि तेच विचार मराठीत लिहिण्यासाठी थोडा वेळ " विचार " करावा लागतो :)

In reply to by मृत्युन्जय

बॅटमॅन Mon, 07/14/2014 - 14:48
ओक्के. मुद्दा इतकाच आहे, की मराठीत किंवा इंग्लिशेतर भाषेत बोलणे अज्जीच ब्यान केल्यामुळे इंग्लिशवरच्या प्रभुत्वात लक्षणीय फरक पडतो किंवा कसे. एखादा तास ठेवा फारतर रोज-त्यात फक्त इंग्रजी बोलायचं इ.इ. पण पूर्णवेळ अशी सक्ती करणे अनाकलनीय आणि तितकाच मूर्खपणा आहे. तेल अन तूप दोन्हीही जाऊन हाती फकस्त धुपाटणे राहील मग- अन कैकदा ते तसेच राहते. तदुपरि- मराठीत बोलणे ब्यान केल्यामुळे विचारही इंग्लिशमध्ये करू लागतो का? बहुधा नाही.

In reply to by बॅटमॅन

चित्रगुप्त Mon, 07/14/2014 - 17:37
तेल अन तूप दोन्हीही जाऊन हाती फकस्त धुपाटणे राहील मग- अन कैकदा ते तसेच राहते.
आमच्या हापिसातल्या (आंग्ल शाळेतून शिकलेल्या) किरिस्ताव स्टायलिश पोरी धडधडीत चुकीचे इंग्रजी अत्यंत अत्मविश्वासाने सपाट्याने बोलायच्या. तर्खडकरांच्या भाषांतरपाठमालेतून इंग्रजी शिकलेल्या मला त्यांच्या बोलण्यातल्या चुका कळत, पण त्यांच्यासारखे आत्मविश्वासाने बोलता मात्र येत नसे. अर्धवट ज्ञान असलेले जास्त आत्मविश्वासू असतात, याचेही हे एक उदाहरण.

In reply to by चित्रगुप्त

बॅटमॅन Mon, 07/14/2014 - 17:44
हम्म, ते बाकी आहे. संभाषणकला विकसित करावी लागते हे मान्य, पण त्यासाठी अन्य भाषांतून बोलणे ब्यान करणे हे एक टोक झाले. तसे न करताही इच्छित फलप्राप्ती होईलसे वाटते.

In reply to by बॅटमॅन

>> संभाषणकला विकसित करावी लागते हे मान्य, पण त्यासाठी अन्य भाषांतून बोलणे ब्यान करणे हे एक टोक झाले. तसे न करताही इच्छित फलप्राप्ती होईलसे वाटते. सहमत.

असंका Mon, 07/14/2014 - 15:44
शिक्षणात शिस्त; आणि शिस्तभंगासाठी शिक्षा, आवश्यक आहे असे वाटते. आणि कुठल्या प्रकारच्या शिस्तभंगासाठी कुठल्या प्रकारची शिक्षा द्यायची हा शिक्षकाचा अधिकार मान्य करायला हवा. कारण त्याच्यावर मुलांची जबाबदारीपण आहे. मारहाण हा शिक्षेचा प्रकार आजकाल अमान्य आहे, कारण त्याने फायद्यापेक्षा तोटे जास्त होतात असे दिसते. मग शाळांमध्ये आजकाल कुठल्या शिक्षा दिल्या जातात, कुणी प्रकाश टाकेल का? डस्टरने हातावर मारणे, कोंबडा करणे, फळ्याजवळ फळ्याकडे तोंड करून उभे करणे, बाकावर उभे करणे, वर्गाबाहेर उभे करणे, वर्ग संपल्यावर थोडा वेळ बसवून ठेवणे, मैदानाला फेर्‍या मारणे वगैरे यातल्या कुठल्या शिक्षा अजूनही प्रचारात आहेत?

In reply to by असंका

प्यारे१ Mon, 07/14/2014 - 16:30
चुकून घरी समजलं तर घरी पूजा बांधली जाणं हे आणखी वेगळंच. 'सहसा' शिक्षक चुकीचे नसतात/ आमच्या वेळी तरी नाहीच अशा मताचा मी आहे. बाकी ज्या मुलाला मारलं तो 'कुणाचा तरी कोण तरी' आहे का हे(सुद्धा) बघायला हवं. शिक्षकानं मारणं ह्याला हायलाईट करुन मुलानं दिलेली दुरुत्तरं कदाचित झाकली जाण्याची शक्यता पुण्याच्या पंचक्रोशीत जास्त असावी असा अंदाज आहे (गुंठामंत्र्यांची मुलं नि त्यांचं वागणं हे जनरल निरीक्षण)

In reply to by असंका

प्यारे१ Mon, 07/14/2014 - 17:16
चुकून घरी समजलं तर घरी पूजा बांधली जाणं हे आणखी वेगळंच. 'सहसा' शिक्षक चुकीचे नसतात/ आमच्या वेळी तरी नाहीच अशा मताचा मी आहे. बाकी ज्या मुलाला मारलं तो 'कुणाचा तरी कोण तरी' आहे का हे(सुद्धा) बघायला हवं. शिक्षकानं मारणं ह्याला हायलाईट करुन मुलानं दिलेली दुरुत्तरं कदाचित झाकली जाण्याची शक्यता पुण्याच्या पंचक्रोशीत जास्त असावी असा अंदाज आहे (गुंठामंत्र्यांची मुलं नि त्यांचं वागणं हे जनरल निरीक्षण)

सौंदाळा Mon, 07/14/2014 - 15:59
उलटा हात करुन बोटाच्या पेरांवर लाकडी फुटपट्टीची कड मारायची जोरात. घोडा करताना बसतो तसे बसायचे, हाताच्या बोटांनी कान धरायचे आणि कोपर जमिनीवर ठेवुन दोन गुडघे आणि दोन कोपरं यावर मैदानात चालायचे. गुडघ्यात्/कोपरात असे खडे रुतायचे. आयआयग्ग, आठवुनच झिणझिण्या आल्या. आमच्या वेळी असे असते तर अर्ध्याच्या वर मास्तरडे खडी फोडायलाच गेले असते.

ऋषिकेश Mon, 07/14/2014 - 16:38
कोणालाही कोणीही कोणत्याही कारणासाठी मारणे अत्यंत निंदनीय आहे. यासाठी सदर व्यक्तीस तीन दिवसात हिब्रुमध्ये आयत्यावेळी दिलेल्या विषयावर पाच मिनीटे विषयाशी संबंधित बोलण्याची शिक्षा द्यावी. ते न जमल्यास दरवेळी नवी भाषा व मिनीटांमध्ये वाढ. उरलेल्या वेळी एकांतवास! हे आजन्म चालु ठेवावे!

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेश Mon, 07/14/2014 - 16:42
कोणालाही कोणीही कोणत्याही कारणासाठी मारणे अत्यंत निंदनीय आहे
इथे अपवाद युद्ध करणार्‍या सैनिकांचा आहे, ही पुरवणी प्रतिसाद बदलता येत नसल्याने इथे जोडतो.

एखादी संस्था त्यांचे नियम बनवू शकते हे मान्य व इंग्रजी संभाषणाचे महत्त्व देखील मान्य , आमच्या हॉटेल व्यवस्थापनाच्या कोर्स मध्ये देखील इतर भाषा बोलल्यास दंड होता , गुटे संस्थेत दंड नसला तरी जर्मन भाषा बोलली जाते , मात्र लहान विद्यार्थ्यांना मारणे मान्य नाही. परदेशात दोषी व्यक्ती तुरुंगात खितपत पडते.

चित्रगुप्त Mon, 07/14/2014 - 17:50
'प्रियदर्शनी' असे भारदस्त संस्कृत नाव असणार्‍या शाळेत इंग्रजेतर भाषा बोलणे हा अपराध, हेच मुळात कोडे वाटले. कदाचित इंदिराबैंच्या काळात त्यांना खुष करून ग्र्यांटादि मिळवण्यासाठी तसले नाव दिले असेल, किंवा राजीव सोन्यादिंच्या काळातही असे केले गेले असेल. दुसरे म्हणजे 'येथे उभे राहून मोबाईलवर बोलू नये' पासून 'कुलकर्णी येथे रहात नाहीत, उगाच बेल वाजवून अपमान करून घेऊ नये' अश्या पाट्या असणार्‍या पुण्याच्या परिसरात असूनही शाळेत पाट्या नाहीत की काय? 'येथे इंग्रजी व्यतिरिक्त अन्य भाषा बोलणारांना बेदम चोप दिला जाईल' (की 'दिल्या' जाईल ?) अशी पाटी लावायला हवी. ही पाटी इंग्रजीत असावी, की मराठीत की उर्दूत, हाही चर्चेचा विषय होऊ शकतो.

धमाल मुलगा Tue, 07/15/2014 - 15:44
इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इंग्रजी बोलावे की नाही, तशी सक्ती करणं योग्य/कायदेशीर आहे की नाही हा बहुतेक चर्चेचा मुद्दा नसावाच. मराठी-अमराठीचा राजकीय वाद, त्यातून उभी राहिलेली दरी, भोसरी आणि आसपासच्या एम.आय.डि.सी. भागात झालेली अमराठी (उ.प्र.-बिहारी) लोकांविरोधातली आंदोलनं/राडे ह्यातून असलेला राग ह्या पैलूचा बहुतेक विचारच केला जात नाहीये. वर काही प्रतिसादांत म्हणल्याप्रमाणे, जितेंद्र सिंग ह्या नावाऐवजी ते जितेंद्र जाधव किंवा जोशी असतं तर मराठीचा मुद्दा न येता ती घटना 'विद्यार्थ्याला अमानुष मारहाण' अशी मोजली गेली असती. पण, जितेंद्र सिंग ह्या (अमराठी - बहुतेक उ.प्र./बिहार प्रांतीय असावे असं नावावरुन वाटतं.) व्यक्तीच्या हातात सत्ता असताना तीचा वापर करुन मराठीद्वेषमूलक कृती केलेली नाही असं छातीठोकपणे सांगता येईल काय? ह्यावर, 'ती मारहाण करण्यात द्वेषच होता असं छातीठोकपणे सांगता येईल काय?' असा उलटप्रश्न नक्कीच विचारता येईल. त्याचं उत्तर 'नाही' असं दिलं तरी, गावांत दरोडे पडल्यावर पोलीस जसे पहिल्यांदा पारध्यांच्या पालावर धाडी घालतात, तसंही इथेही संशयास्पद मुद्द्याचा आधार आहेच. तस्मात, ही घटना केवळ शाळेचे नियम पाळले नाहीत म्हणून शिक्षा इतपत नक्कीच मर्यादित रहात नाही. तिला प्रांतिक/राजकीय रंग येतोच येतो. घटना काय घडलेली असते आणि ती बातमी म्हणून बाहेर पडते तेव्हा, सगळेच पैलू खरोखर आणि पारदर्शकपणे सामोरे येत नाहीत हे तर आपल्याला अगदीच ठाऊक झालंय. इतका भाबडेपणा कुणातही उरलेला नाही आता. प्रश्न आहे तो 'रिडिंग बिटवीन द लाईन्स'चा, आणि त्या कोण कशा वाचतो त्यानुसार त्याचा अर्थ लावण्याचा.

आशु जोग Tue, 07/15/2014 - 17:55
हुप्प्या यांच्या लिखाणाचे एक वैशिष्ट्य आहे ते नेहमी काळाबरोबर राहतात

बाळ सप्रे Wed, 07/16/2014 - 10:18
मारहाणीच्या अमानुषपणाबद्दल दुमत नाहीच पण त्याचे कारण मराठीद्वेष असण्याबद्दल जितेंदर सिंग हे उत्तर भारतीय नाव याखेरीज काही ठोस मुद्दा कोणी मांडू शकेल का?? त्या संस्थेतील, भोसरीतील इतर घटना ज्यात मराठीद्वेष दिसतो (उदा. अमराठी विद्यार्थ्यांना तशाच उल्लंघनासाठी कमी शिक्षा किंवा शिक्षा न करणे). जितेंदर सिंगची वागणूक इ ज्यायोगे मराठीद्वेषाचा संशय येउ शकतो असा एखादा मुद्दा आहे का?? नसल्यास केवळ उत्तर भारतीय नाव यावरुन असे आरोप करणे यात आपलाच उत्तर भारतीयद्वेष दिसून येईल..

निश Wed, 07/16/2014 - 14:32
मुळात मराठी भाषेच्या दुरावस्थेला आपणच कारण आहोत. त्यामुळेच जितेंद्र सिंग सारखे उपरे लोक इथे येउन आपल्याच भाषेचा अपमान करतात. ही दुरावस्था तेव्हाच जाईल जेव्हा आपण तिचा अभिमान बाळगु व समोरच्याला ही तो करायला लावु.
http://www.loksatta.com/pune-news/atlast-jitendra-singh-arrested-664165/ भोसरी ह्या पुण्याजवळील गावात प्रियदर्शिनी नामक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. त्या शाळेत आठवीत शिकणार्‍या काही विद्यार्थ्यांनी शाळेत आणि वर्गात मराठी बोलण्याचा अक्षम्य आणि गंभीर गुन्हा केला त्यामुळे त्यांना संस्थेच्या प्रमुखाने शरीरावर वळ उठेपर्यंत मारहाण केली. ह्या संस्थेचा भोसरीचा* संचालक जितेंद्र सिंग ह्याला शेवटी अटक केली गेली. मराठीचे माहेरघर मानलेल्या पुण्याच्या एका उपनगरात मराठी बोलण्याला गुन्हा मानला जाणे म्हणजे नेत्रदीपक प्रगती म्हटली पाहिजे.

सत्याचा "बुरखा"फाश

कॅप्टन जॅक स्पॅरो ·

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

खटपट्या Sun, 07/13/2014 - 22:28
तिनही भाग ऐकले. हे सगळे खरे असेल तर काय म्हणावे कळत नाहीये… त्यावेळच्या अत्त्याचाराच्या कथा ऐकून सुन्न झालोय गांधीवाद्यांचे/गांधी प्रेमींचे याबद्दल मत ऐकायला आवडेल.

In reply to by खटपट्या

हाडक्या Tue, 07/15/2014 - 21:00
नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते. तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ? तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

शशिकांत ओक Sun, 07/13/2014 - 22:58
मित्रा, महात्मा गांधीजींची आणखी एक वैयक्तिक शोकांतिका. मुलांची त्यांच्या विचारांच्या प्रभावाखाली दबून राहिल्याने झालेली घुसमट... बऱ्याच वेळी मी विमाननगरहून आगाखान पॅलेस समोरून जाताना आईला भेटायला आलेल्या मुलाला८- ८ दिवस तेथील फाटकात अडवले जात होते. कस्तुरबा बाहेर येऊन त्याला आत घेऊन गेल्या. नंतर हटवादीपणा करून मद्रासला असताना तो इस्लामी धर्मात गेल्या वर त्याला परत आणायला आईला तिथे जावे लागले होते. आदि आठवून वाईट वाटत राहते..

नेत्रेश Mon, 07/14/2014 - 08:36
किर्तनकाराचे आख्यान, तद्दन प्रचारकी आणी नाटकी. गांधीजींचे तत्व ऐकण्याची जबरदस्ती ना गांधींनी केली, ना त्यांच्या सहकार्यानी. गांधीजींच्यामुळेच कदाचीत भारताची अवस्था पाकीस्तानसारखी झाली नाही.

In reply to by नेत्रेश

गांधीजींचे तत्व ऐकण्याची जबरदस्ती ना गांधींनी केली, ना त्यांच्या सहकार्यानी.
नक्की. नुसती जबरदस्ती नाही, लादला गेलाय गांधीवाद.
किर्तनकाराचे आख्यान, तद्दन प्रचारकी आणी नाटकी.
गांधीवादाएवढं नक्कीच नाही.

गांधीवाद म्हणजे थोतांड वगैरे अप-प्रचार नेहमी करण्यात येतो.महात्मा गांधी ह्या व्यक्तीमागे ईतके लोक- केवळ भारतातलेच नव्हेत तर परदेशातले देखील अगदी तुमचा तो आईन्स्ताईनदेखील का आकर्षित झाले ह्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करताना ही मंडळी दिसत नाहीत. फक्त गांधींमुळेच स्वातंत्र्य मिळाले असे तेव्हाही कोणी म्हंटले नव्हते व तसे आताही कोणी म्हणत नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

फक्त गांधींमुळेच स्वातंत्र्य मिळाले असे तेव्हाही कोणी म्हंटले नव्हते व तसे आताही कोणी म्हणत नाही.
चला ,आता उचललेस तु मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया असल्या कविता मोडीत काढायला हरकत नाही हे पाहुन आनंद झाला ! बाकी थोडी तरी प्रगती आहे विचारसरणीत ....हेही नसे थोडके ....!!

In reply to by प्रसाद गोडबोले

सुनील Mon, 07/14/2014 - 14:55
थोडी तरी प्रगती आहे विचारसरणीत
चला, एका पार्टीच्या विचारसरणीत थोडी प्रगती झाली. आता दुसर्‍या पार्टीच्या विचारसरणीत कधी प्रगती होणार? ;)

In reply to by सुनील

आता दुसर्‍या पार्टीच्या विचारसरणीत कधी प्रगती होणार?
>>> पहिली पार्टी संपुर्ण मतपरिवर्तन होवुन दुसर्‍या पार्टीस सामील झाल्यावर !! :)

In reply to by सुनील

ऋषिकेश Tue, 07/15/2014 - 15:15
आता दुसर्‍या पार्टीच्या विचारसरणीत कधी प्रगती होणार?
अहो त्यांनी गांधीवाद पूर्ण अंगिकारलाय बघितला नाहित? विरोधकांच्या हृदयपरिवर्तनावर विश्वास असल्यानेच तर हा धागा काढलाय ना? इथेच गांधीवाद जिंकला नै का?

In reply to by ऋषिकेश

विरोधकांच्या हृदयपरिवर्तनावर विश्वास असल्यानेच तर हा धागा काढलाय ना? इथेच गांधीवाद जिंकला नै का?
आँ ?
"शत्रुचेही हृदयपरिवर्तनकरता येते"
ह्या विचारसरणीचे क्रेडिट गांधींना ? गांधीच्या आधीपासुन "शत्रुचेही हृदयपरिवर्तनकरता येते" ही विचारसरणी अस्तित्वात आहे ...किमान हिंदुंच्यात तरी ! अंगदशिष्टाई... कृष्णशिष्टाई वगैरेंच्या अभ्यास केलेला दिसत नाहीये बहुधा ! साम दाम दंड भेद हेही ऐकले नाहीये काय ? ह्यातही पहिल्यांदा "साम" म्हणजे सामोपचार आहे ! ह्यात गांधीगिरी काही नाही उलट गांधीगिरी म्हणजे केवळ ह्यातील पहिली स्टेप आहे :) अवांतर : हिटलर आणि दुसरे महायुध्द झाले नसते तर गांधीनी विन्स्टन चर्चिल चे हृदयपरिवर्तन कसे केले असते हे पहायला मजा आली असती !

In reply to by प्रसाद गोडबोले

हाडक्या Tue, 07/15/2014 - 21:00
नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते. तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ? तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्रसाद१९७१ Tue, 09/09/2014 - 14:51
परदेशातले देखील अगदी तुमचा तो आईन्स्ताईनदेखील का आकर्षित झाले ह्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करताना ही मंडळी दिसत नाहीत.
त्यात काय विषेश हो. रजनिश च्या मागे सुद्धा भले भले गोरे लागलेच होते की. आईन्स्टाईन ला काय जातय अमेरिकेत राहुन काहीतरी बोलायला, त्याला कुठे भोगायला लागणार होते? तो कुठला आकर्षीत होयला, २-४ ठीकाणी तोंडदेखले बरे बोलला तर लागली इथले काँग्रेस्सी नाचायला. आणि युरोप अमेरिकेत पण अगदी कमी प्रमाणात असली तरी भारतातल्या सारखी निष्क्रीय आणि खाल्ल्या घरचे वासे मोजणारे आहेतच की.

मागे एकदा नथुराम गोडसेंच्या धाग्यावरुन बरीच शाब्दिक हाणामारी झालेली होती.
एकदा? जरा मिपाचा अभ्यास वाढवा अशी फुकटची सुचना देतो. मिपावर नथुराम विरूध्द गांधी, अस्तिक विरूध्द नास्तिक, मोदी विरूध्द केजरीवाल अशा विविध धाग्यांचे अनंतवेळा दळण झाले आहे :) ह.घ्या हे वेगळे सांगणे न लागे.

आदूबाळ Mon, 07/14/2014 - 20:44
ते सगळं जौंद्या. आफळेबुवा गातात बाकी मस्त. त्यांचा नाट्यसंगीताच्या वाटचालीवरचा एक कार्यक्रम आकाशवाणी पुणेवरून सादर व्हायचा तो फार भारी असे.

असे सत्तावन्न आफळे बघितले आहेत आजपर्यंत तरीही गांधींच्या तत्वज्ञानाची महती सर्वदूर पसरलेली आहेच. अशा आफळ्यांकडे दुर्लक्ष करणे सगळ्यात उत्तम.

आनन्दा Tue, 07/15/2014 - 15:06
मी या पुराव्यांबद्दल कोणीतरी काहीतरी बोलेल या आशेने कित्येक दिवस रोज हा धागा उघडून बघत आहे. पण हाय रे दैवा!! बाकी अली बंधूंबद्दल घेतलेल्या भूमिकेबद्दल मी गांधींना दोष देणार नाही. त्यांची चूक असलीच तर ही असेल की त्यांनी खिलाफत चळवळीबरोबर आघाडी केली. परंतु मला ही राजकीय अपरिहार्यता वाटते. आफळ्यांच्या कीर्तनावर धागा काढण्यासाठीच मी बराच सर्च केला होता, तेव्हा गांधींच्या या भूमिकेला माझ्या द्रुष्टीने योग्य ठरवणारे काही पुरावे माझ्या हाताला लागले होते. ते नेमके आता मिळत नाहीयेत, मिळाले की डकवतो. बाकीच्या विषयांमध्ये मात्र आफळेंचे मुद्दे मला योग्य वाटतात. एक धोरणी म्हणून गांधी बर्‍याच वेळेस चुकले आहेत. त्यांच्या भूमिकेबद्दल शंका यावी असे बरेच प्रसंग आहेत. गांधींच्या मुस्लिम अनुनयाबद्दल तर बोलूच नये असे बरेच प्रसंग सांगता येतील. मला व्यक्तिशः तो गांधींमधल्या राजकारण्याचा पराभव वाटतो. त्यांनी आपल्या राजकारणातील भविष्यकालीन धोके ओळखलेच नाहीत. त्यांना काँग्रेसमधील जनरेशन-२ ने मोठे केले, आणि त्यांच्या जीवावर आपली पोळी भाजून घेतली असे माझे मत आहे. जसे आपल्या राळेगणसिद्धीच्या गांधींबद्दल झाले तसे. बाकी गांधी त्यावेळेस असे का वागले हे सांगणे कठीण आहे. एव्हढे तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी म्हणून मिरवणारे टिळक, पण वेदोक्त प्रकरणात त्यांना देखील फटका बसलाच ना.

बॅटमॅन Tue, 07/15/2014 - 15:09
फाळणीस अनुमोदन देऊन ज्या गांधीजींनी मुस्लिम वरचष्मा पूर्णपणे मोडून काढला त्या गांधींना मुस्लिम अनुनयाबद्दल शिव्या घालणारे लोक पाहिले की हसू आवरत नाही. =)) असो, चालायचंच.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Tue, 07/15/2014 - 15:17
फाळणी झाली नसती तर काय झालं असतं त्या अखंड भारतात? अगोदरच विभक्त मतदारसंघ इ.इ. चा धोशा चाललेलाच होता, टिळकांनी सांगितले की तेवढं घेऊन का होईना जर इंग्रजांशी लढणार असाल तर ठीके म्हणून. ते सगळं जर पुढं गेलं असतं तर त्रांगडं झालं असतं विचित्र. त्याजागी फाळणी झालेला का होईना, एक धर्मनिरपेक्ष भारत मिळाला हे गांधीजींचे मोठे क्रेडिट आहे. शेषराव मोर्‍यांच्या 'अखंड भारत का नाकारला' की अशाच काहीशा नावाच्या पुस्तकात ही भूमिका विस्ताराने आलेली आहे.

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश Tue, 07/15/2014 - 15:22
+१ टि़ळकांच्यावेळी लखनौ करार करावा लागला होता, विभक्त मतदारसंघ होते. फाळणीनंतर लखनौ कराराच्याही मागे भारत आला. विभक्त मतदारसंघ रद्द झाले, धर्मनिहाय आरक्षण येऊ दिले गेले नाही (व ते भारतात थांबलेल्या मुसलमानांनाही नको होते). मोर्‍यांचे लेखन ग्रेट आहे. कुरूंदकरांचेही या विषयाचे लेखन वाचनीय आहे.

In reply to by बॅटमॅन

धर्मनिरपेक्ष भारत म्हणजे काय भाऊ ? आज हिंदु मेजॉरिती मधे आहेत म्हणुन हा देश धर्मनिरपेक्ष आहे , इतर धर्मिय मेजॉरीतीत असलेला एक तरी धर्मनिरपेक्ष देश दाखवा ( आता लगेच तुर्कस्तान म्हणाल , पण तिथल्या खिलाफत चळवळीला मोडुन तो कमाल पाशा मुळे तो धर्मनिरपेक्ष आहे ...ज्या खिलाफत चळवळीला गांधीबाबा समर्थन देत होते ती हो =)) ) , धर्मनिरपेक्षता हा भारताचा नव्हे तर हिंदुंचा गुण आहे... हिंदुराष्ट्राचा गुण आहे...! ... जेव्हा इतर धर्मिय मेजॉरिटीमधे येतील तेव्हा पाहु भारत किती धर्मनिरपेक्ष राहतो ते ! बाकी अभ्यासासाठी : मिझोरम आणि नागालॅन्ड हे तुमच्या धर्मनिरपेक्ष भारतातील अधिकृत / डीक्लीयर्ड ख्रिश्चन स्टेट्स आहेत बरं का !!

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Tue, 07/15/2014 - 15:56
धर्मनिरपेक्षता हा भारताचा नव्हे तर हिंदुंचा गुण आहे... हिंदुराष्ट्राचा गुण आहे...! ... जेव्हा इतर धर्मिय मेजॉरिटीमधे येतील तेव्हा पाहु भारत किती धर्मनिरपेक्ष राहतो ते !
मग हिंदू मेजॉरिटीत राहतील अशी तरतूद गांधींनी केली असेच म्हणायला नको का ;)

In reply to by बॅटमॅन

मग हिंदू मेजॉरिटीत राहतील अशी तरतूद गांधींनी केली असेच म्हणायला नको का
अं हं ! तेही क्रेडीट देता येणार नाही ! तेव्हाच क्लीन स्वीप फाळणी झाली असती ... हिंदु अ‍ॅबसोलुट मेजॉरीटीत आले असते तर तसे क्रेडीट देता आले असते ... देशाचा तुकडा तोडला ते तोडला शिवाय प्रॉब्लेम सोल्व्ह झाला नाहीच ...प्रॉब्लेम जिथल्या तिथेच ! कुठे आहे समान नागरी कायदा ? कुठे आहे सर्वधर्मिय घटस्फोटितांना समान अधिकार ? कुठे आहे अमर जवानच्या स्मारकाला लाथ मारणार्यांवर कारवाई करायची धमक ? कुठे आहे आसामात घुसखोरी करणार्‍यांना धडा शिकवायची हिंम्मत ? कुठे आहे तालिबान सारख्या हिंसक प्रवुत्तीशी लढणार्‍या अमेरिकेला ओपन सपोर्ट द्यायची जिगर ? कुठे आहे निर्वासित कश्मीरी पंडीतांना सुरक्षित पणे पर कस्मीरमधे पुनर्वसन करण्याची शक्ती ? येवढचं कशाला ...तर जो काश्मीर तुम्ही नकाशावर दाखवताना तो ही जिंकुन घेता येत नाही ह्याचे खरे कारण देशाबाहेर नाहे तर देशाआतच आहे! मान्य करा राव , धर्मनिरपेक्षता आमच्यात आधीपासुनच होती ...अगदी सातवाहन काला पासुन ते १८५७ च्या जिहाद मधे खांद्याला खांदा लावुन लढे पर्यंत , गांधीचेकाही क्रेडीट नाही त्याबाबत !! अवांतर : बाकी फाळणीविषयी क्लीनस्वीप फाळणी व्हाव्ही असे आंबेडकरांचेही मत होते असे ऐकुन आहे , कन्फर्म करुन कळवतो !

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Tue, 07/15/2014 - 16:14
धर्मनिरपेक्षता आधीपासूनच होती, मात्र ती झाकोळू पाहत होती त्याचा यशस्वी प्रतिबंध गांधीजींनी केला हे मानलेच पाहिजे. असो, बाकी वाईड बॉलबद्दल बोलायचे तर औरंगजेबाच्या कृत्यांबद्दल अकबराला शिव्या घालण्यापैकी आहे हे.

In reply to by बॅटमॅन

आनन्दा Tue, 07/15/2014 - 16:19
धर्मनिरपेक्षता आधीपासूनच होती, मात्र ती झाकोळू पाहत होती त्याचा यशस्वी प्रतिबंध गांधीजींनी केला हे मानलेच पाहिजे.
ऑं? म्हणजे गांधींच्या समकालीन विरोधकांमध्ये धर्मनिरपेक्षता नव्हतीच की काय? अहो ज्या नथुरामने गांधींना मारले त्याचा इतिहास देखील धर्मनिरपेक्षतेचाच आहे, हां पण ती धर्मनिरपेक्षता आणि गांधी/ काँग्रेसची धर्मनिरपेक्षता यात फरक आहे. तुम्ही काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेबद्दल बोलत असाल तर मात्र आपला पास.

In reply to by बॅटमॅन

मात्र ती झाकोळू पाहत होती
>>> कुणामुळे ? हिंदुंमुळे ? फाळणीच्यावेळी भारत +पाकिस्तान अशी फाळणी झालीये ... भारत + हिंदुस्तान + पाकिस्तान अशी नाही ! ह्यावरुनच कळते की धर्मनिरपेक्षता कोणामुळे झाकोलत होती ते ! अकबराविषयी मते बनावताना जोधा अकबर ह्या चित्रपटाचा आधार घेवु नये !आअकबरही औरंगजेबा इतकाच क्रुर होता होता फक्त त्याच्या लवकर लक्षात आले की इतक्या सगळ्या हिंदुंना मारणे शक्य नाही , त्याची धर्मनिरपेक्षता आगतिकतेतुन आलेली आहे स्वेच्छेतुन नव्हे ! (मुघलांच्यात धर्मनिरपेक्ष म्हणता येईल असा एकच माणुस झाला तो म्हणजे दाराशिकोव्ह )!

In reply to by प्रसाद गोडबोले

आनन्दा Tue, 07/15/2014 - 16:25
अकबरही औरंगजेबा इतकाच क्रुर होता होता फक्त त्याच्या लवकर लक्षात आले की इतक्या सगळ्या हिंदुंना मारणे शक्य नाही , त्याची धर्मनिरपेक्षता आगतिकतेतुन आलेली आहे स्वेच्छेतुन नव्हे !
भारीच. + १००. अकबर हा पूर्वायुष्यात फार क्रूर होता. परंतु उत्तरायुष्यात त्याला प्रेषित व्हायची इच्छा होती असे ऐकून आहे. त्यातूनच हे सारे राजकारण झाले असावे.

In reply to by बॅटमॅन

ल्ज्याला तुम्ही वाईड बॉल म्हणता आहात त्या बद्दल अजुन थोडे ....
समान नागरी कायदा ? सर्वधर्मिय घटस्फोटितांना समान अधिकार ? अमर जवानच्या स्मारकाला लाथ मारणार्यांवर कारवाई? आसामात घुसखोरी करणार्‍यांना धडा ? तालिबान सारख्या हिंसक प्रवुत्तीशी लढणार्‍या अमेरिकेला ओपन सपोर्ट? निर्वासित कश्मीरी पंडीतांना सुरक्षित पणे पर कस्मीरमधे पुनर्वसन?
ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ततहाकथित धर्मनिरपेक्ष भारतात करता येत नाहीत ह्याला एकमेव कारण आहे ... एका विषिष्ठ समाजाचा विरोध / रोष होण्याची भीति ! जर भारत खरच धर्मनिरपेक्ष असता तर त्याने नक्कीच असला विरोध न जुमानता न्याय ते केले असते !! असो. अवांतर: शेनवॉर्नचा एक अप्रतिम लेगस्पिन चेंडु आठवला ... बॅट्स्मॅनने वाईड बॉल म्हणुन सोडुन दिला तो टप्पा पडल्यावर जवळ जवळ ४५ अंश वळुन मिडल स्टंपवर आदळला ...बोल्ड ! *biggrin* सोडा राव धर्मफर्मनिरपेक्षता ...आपण क्रिकेटची मॅच बघु :)

In reply to by बॅटमॅन

हाडक्या Tue, 07/15/2014 - 21:01
नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते. तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ? तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

In reply to by प्रसाद गोडबोले

आनन्दा Tue, 07/15/2014 - 16:21
कुठे आहे तालिबान सारख्या हिंसक प्रवुत्तीशी लढणार्‍या अमेरिकेला ओपन सपोर्ट द्यायची जिगर ?
असहमत. बाकी चलू द्या.

In reply to by आनन्दा

कुठे आहे तालिबान सारख्या हिंसक प्रवुत्तीशी लढणार्‍या अमेरिकेला ओपन सपोर्ट द्यायची जिगर ?
अहो आता कराची एयरपोर्ट बॉम्बब्लास्ट नंतर खुद्द पाकिस्तानही तालिबानशी लढायला अमेरिकेला साथ देईल अशी चिन्हे आहेत ! तुम्ही घ्या तुमचे पांघरुण ओढुन तोंडावर ! =))

In reply to by बॅटमॅन

आनन्दा Tue, 07/15/2014 - 15:30
बादवे, माझ्या शरीराचे तुकडे होऊन मगच फाळणी होईल हे देखील त्याच गांधींचे वाक्य आहे ना? गांधींनी फाळणीला दिलेली मान्यता ही त्यांची राजकीय अप्रिहार्यता होती. आणि त्यानंतर मुस्लिम पाकिस्तानातून धर्मनिरपेक्ष भारतात येऊ इच्छिणार्‍यांची काळजी घेणे हेदेखील एक नेता म्हणून त्यांचे कर्तव्य होते, नाही का? थोडे गूगलून आणखीन थोडे दुवे देतो, जमले तर. फाळणीबद्दल मला सावरकरांचे जास्त पटते. लोकसंख्येची शांततापूर्ण अदलाबदल झाली की मगच फाळणी करावी असे काहीसे त्यांचे मत होते बहुधा. हिंदू नेत्यांमध्ये द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत प्रथम त्यांनीच मांडला बहुधा.

In reply to by बॅटमॅन

आनन्दा Tue, 07/15/2014 - 16:13
बाकी गांधींच्या मुस्लिम अनुनयाबद्दल - he pahaa गोपीनाथ सहा बद्दल गांधींची मते इथे वाचायला मिळतील. याच गांधींनी अब्दुल रशीद चा भाई अब्दुल रशीद म्हणून सन्मान केलेला आहे, पुढच्या ६ महिन्यातच. त्याचे पुरावे हवे असल्यास सांगा.

In reply to by बॅटमॅन

फाळणीस अनुमोदन देऊन ज्या गांधीजींनी मुस्लिम वरचष्मा पूर्णपणे मोडून काढला त्या गांधींना मुस्लिम अनुनयाबद्दल शिव्या घालणारे लोक पाहिले की हसू आवरत नाही. Lol असो, चालायचंच.
फाळणीनंतरच्या दंगलीत झालेल्या हिंदुच्या कत्तलीत हिंदुना शांत बसा असं म्हणणारे कोण होते? बलात्कारीत स्त्रियांना असाल तिथे सुखानी राहा किंवा तुम्ही विरोध करु नका असं सांगणारं कोण होतं? आता ह्याचे पुरावे नाहीत असं तुम्ही म्हणु शकत नाही. हा धागा मुस्लिम विरोधी नाही. हा धागा हिप्पोक्रसी विरोधी आहे. सत्तेच्या हव्यासापोटी क्रांतीकारकांचे बळी जाऊ देण्याविषयी आहे. स्वातंत्र्याच सगळं क्रेडीट स्वतःला घेण्याला आहे. पद्धतशीर पणे पुढच्या पिढीच ब्रेन वॉशिंग करणार्‍या वृत्ती विरोधी आहे. असो. चालायचचं. :)

In reply to by बॅटमॅन

हाडक्या Tue, 07/15/2014 - 20:59
नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते. तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ? तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

हाडक्या Tue, 07/15/2014 - 20:59
नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते. तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ? तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

In reply to by हाडक्या

देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!
प्रचंड ! गांधींना इतिहासाच्या अअभ्यासक्रमा घातल्याने ते फार लहानपणीच लोकांच्या डोक्यात शिरतात , तिथुन मग त्यांना बाहेर काढायला फार वेळ लागणारच ! आपण जगाच्या इतिहासाचा अभ्यास करत रहावा ... हिटलर , स्टॅलिन ,मुसोलिनी ह्यांचे क्रौर्य पहावे त्यापुढे मिळमिळीत अहिंसा टिकली असती का ह्याचा विचार करावा चर्चिल , लिंकन ह्यांचा अभ्यास करावा देषाच्या साठी वट्टेल त्या लेव्हल ला जावुन विजय मिळवण्याची त्यांची वृत्ती पहावी . अमेरिकेच्या स्वातंत्रयुध्दातील "स्व्तःचे स्वातंत्र्य स्वातंत्र्य्जे आपल्याला वसाहत समजतात त्यांच्या विरुध्द युध्द पुकारणे "...आणि आपल्या इथल्या "अहो थोदे तरी स्वातंत्र्य द्या की" ह्या वृत्तींचा तुलनात्मक अभ्यास करावा ... हळु हळु हे जग काही फेरीलॅन्ड नाही तर एक वॉरलॅन्ड आहे हे उमजेल मग लोकांचा असल्या भ्रामक कल्पनांवरील विश्वास आपोआप उडेल ! आपला आदर्श चाणक्य असला पाहिजे ... चाणक्य !

In reply to by प्रसाद गोडबोले

हाडक्या Wed, 07/16/2014 - 14:52
@ प्रगो, या ना शेंडा ना बुडख्याच्या चर्चा संपणार नाहीत आणि तेच तेच परत येत राहणार हेच चार-पाच वेळा एकच प्रतिक्रिया लिहून सुचवायचं होतं.. पण असो. रच्याकने, (वादात न पडता) एवढेच सांगतो, तुम्ही जे सांगत आहात तेच तुम्हालाही लागू पडते असे दूसर्‍या बाजूचे लोक म्हणत असतील तर काय वो? पंचाईतच की.. *biggrin*

In reply to by हाडक्या

या ना शेंडा ना बुडख्याच्या चर्चा संपणार नाहीत
>>निराशावाद !इतके निराश होवुन नका हाडुकराव ... सत्याचा नेहमीच विजय होतो आपण कायम आपली / आपल्याला जे सत्य वाटते ती बाजु माम्डत रहावी ... फरक तो पडता है भै !एक उदाहरण देतो ...एक काळ असा होता जेव्हा लोकं डारविनला यड्यात काढत असत .... पण वारंवार चर्चांमुळे आता डारविनच योग्य होता हे लोकांना पतले आहे ... जुने विचार विचारसरणी बदलालयला वेळ लागतो ... ह्या ५-५० वर्षात होणार्‍या गोष्टी नव्हेत ...थिन्क अबाऊट १००-५०० इयर्स होरायझन ! आपल्या म्हातारपणा पर्यंत "गांधी तुमच्या आमच्या सारखाच मातीचा माणुस होता त्यांच्या कडुनही चुका , गंभीर चुका झाल्या" इतके जर लोकांना पटले तरी खुप होईल !! बाकी ... तुम्ही भवभुतीचा श्लोक उत्तररामचरितातील वाचला नाहीये काय ? ये नाम केचिदिह न: प्रथयन्त्यवज्ञां जानन्तु ते किमपि तान्प्रति नैष यत्नः | उत्पत्स्यतेऽस्ति मम कोऽपि समानधर्मा कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी || भवभूति ||

In reply to by प्रसाद गोडबोले

हाडक्या Wed, 07/16/2014 - 20:02
हाडुकराव
एवढा आदर पाहून सद्गदून आले हो. ;) . असो. निराशावाद नाही हो.
तुम्ही भवभुतीचा श्लोक उत्तररामचरितातील वाचला नाहीये काय ?
वाचलाय तो, पण त्याचा संदर्भ इथे देता येईल असे वाटत नाही. (context वेगळा आहे!)
आपण कायम आपली / आपल्याला जे सत्य वाटते ती बाजु माम्डत रहावी
म्हणजे दूसर्‍याची मते (ती सत्य नाहीत हे आधीच निश्चित आहे ना!) आपण विचारात घ्यायची नाहीत आणि आपण आपले घोडे दामटत रहायचे, असे काय ? ;) मग चालू द्यात. गेल्या प्रतिसादातील आमच्या प्रश्नाचे उत्तर राहिले तुमचे राव.! (बादवे, सातार्‍याला कधी जाताय? पाऊस सुरु झालाय आता, ठोसेघरला पाणी वाढलेलं असणारे :) )

In reply to by हाडक्या

भवभुती म्हणतो की जे आमच्या विषयी काहीच्या बाही बोलत असतील त्यांना बोलुद्या कारण आमचा प्रयत्न त्यांच्यासाठी नाहीये , आमचे विचार समजुन घेणारा कोणीना कोणीतरी समान धर्मा नक्कीच कुठे ना कुठे जन्माला येईल कारण काळ अनंत आहे अन पृथ्वीही विशाल आहे !! धिस इज एक्झ्यॅक्टली व्हॉट आय वॉन्ट टू से ! बाकी आपलेच घोडे दामटणे हा प्रकार गांधीवाद्यांनीच चालवलाय स्वातंत्र्यापासुन ... उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया किंव्वा दे दी हमे आजादी बिना ख्ड्ग बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल ...वगैरे ऐकले नाही काय ? जणु काही एका काँग्रेस अन गांधी मुळेच देषाला स्वातंत्र मिळालय ... इतकच कशाला सोप्पं पहा ना आपल्या नोटेवर कोणा एका माणसाचाच चेहरा छापलाय नाही का ! एव्हन सौदी अरेबियाच्या नोटांवरही वेगवेगळ्या राजांचे फोटो असतात !! सत्याची कास धरणे आणि आपलेच घोडे दामटणे ह्यातील फरक लक्षात आला का आता ? अवांतर : गेल्या प्रतिसादातील आमच्या प्रश्नाचे उत्तर राहिले तुमचे राव.! >>> कोणता प्रश्न ? मला जे इर्रीलेव्हन्ट वाटतं त्याच्या वर मी सहसा प्रतिसाद देत नाही ... अर्थात अफवाद :काश्मीर करायचा मुड नसला तर *biggrin* !!

In reply to by प्रसाद गोडबोले

हाडक्या गुरुवार, 07/17/2014 - 15:23
एवढेच सांगतो, तुम्ही जे सांगत आहात तेच तुम्हालाही लागू पडते असे दूसर्‍या बाजूचे लोक म्हणत असतील तर काय वो?
हा तो प्रश्न .. आणि भवभूती जे म्हणतोय ते तुम्हाला लागू पडत नाही कारण दुसरी बाजू देखील हाच दावा करू शकते हे म्हणायचे होते. (आम्हाला थोडे फार संस्कृत समजतय वो तरी पण भाषांतराबद्दल धन्स.. :) ) तुमचे मुद्दे मान्य की अमान्य यावर मी काहीही भाष्य करत नाहीये ( आणि करू इच्छित नाहीये.) पण हा आमचा मूळ मुद्दा देखील तुम्ही इर्रीलेव्हन्ट समजत असाल तर मग असोच..

In reply to by हाडक्या

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/17/2014 - 16:15
तुमचा मुद्दा फार अनक्लीयर आहे राव ... दुसरी बाजु काय दावा करु शकते हेच कळत नाहीये ... जरा उलगडुन लिहिलत तर चर्छा करता येइळ !

In reply to by प्रसाद गोडबोले

हाडक्या गुरुवार, 07/17/2014 - 20:06
दुसरी बाजु काय दावा करु शकते हेच कळत नाहीये
हाच तर कळीचा मुद्दा आहे ! असो, एकदा समजावण्याचा प्रयत्न करतो,
गांधींना इतिहासाच्या अभ्यासक्रमात घातल्याने ते फार लहानपणीच लोकांच्या डोक्यात शिरतात , तिथुन मग त्यांना बाहेर काढायला फार वेळ लागणारच !
हेच गांधी-द्वेषाबाबत देखील म्हणता येईल. अनेकजण विना-अभ्यास गांधी-टिका झोडत असतात. त्यांच्या डोक्यातून गांधी-द्वेष बाहेर काढायला वेळ लागणारच !
आपण जगाच्या इतिहासाचा अभ्यास करत रहावा...
हिटलर , स्टॅलिन ,मुसोलिनी ह्यांचे क्रौर्य पहावे त्यापुढे मिळमिळीत अहिंसा टिकली असती का ह्याचा विचार करावा
'जर्रा अभ्यास वाढवावा' असेच दुसरी बाजू पण तुम्हाला म्हणू शकते ना ! :)
हळु हळु हे जग काही फेरीलॅन्ड नाही तर एक वॉरलॅन्ड आहे हे उमजेल मग लोकांचा असल्या भ्रामक कल्पनांवरील विश्वास आपोआप उडेल !
'जग हे वॉरलॅन्ड आहे' हा स्वतंत्र चर्चेचा विषय होवू शकतो. तूर्तास या तुमच्या भ्रामक कल्पना आहेत असे दुसरी बाजू म्हणू शकते ना.!! आता असोच.. बाकी चर्चेला येतानाच तुमच्या मनात लक्ख प्रकाश आहे, तुमच्या मुद्द्यांना तुम्ही अटळ अंतिम सत्य म्हणून संपूर्ण मान्यता दिली आहे आणि त्यामुळे कोणी प्रतिवाद करण्याचा आणि केला तरी तुम्ही त्यावर विचारदेखील करण्याची अपेक्षा करण्याचा प्रश्नच येत नाही, हे आधीच स्पष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला कोणी गांधीवादी भेटो आणि तुम्हाला त्यांचे ह्रदयपरिवर्तन करण्याची सुसंधी मिळो यासाठी शुभेच्छा ..

In reply to by हाडक्या

हे लॉगिक चुकीचे आहे कारण ...
हेच गांधी-द्वेषाबाबत देखील म्हणता येईल. अनेकजण विना-अभ्यास गांधी-टिका झोडत असतात. त्यांच्या डोक्यातून गांधी-द्वेष बाहेर काढायला वेळ लागणारच
गांधीद्वेष हा कोणत्याच अभ्यासक्रमातुन शिकवला जात नाही रादर गांधी हेच कसे स्वातंत्र्यसंग्रामातील मेन कॅरॅक्टर होते हे शिकवले जाते त्यांचा चुका कोठेच शालेय इतिहासातही गांधीवर ६-७ धडे त्यांच्या आधीच्या टिळक, दादाभाई वगैरेंवर १-२ आणि क्रांतिकारकांवर फक्त १ धडा आहे ... मग लोक स्वतःहुन हा माणुस इतका कसा काय देवासारखा असु शकतो मग फाळणी , खिलाफत चळवळीला सपोर्ट , पुणेकरारा आंबेडकरांना वेठीस पकडणे , ३ वेळा नेताजींन्कडुन काँग्रेस मधे हरल्यावर मागल्यादारुन पॉलिटिक्स चालवणे , श्रीयुत.जीनांना प्रधानमंत्री पद ऑफर करणे वगैरे गोष्टी अभ्यासात आल्यावर गांधी किती सामन्य माणुस होता हे लक्षात येते ! प्लीज नोट : सामान्यता लक्षात येणे म्हणजे द्वेष नव्हे !
'जर्रा अभ्यास वाढवावा' असेच दुसरी बाजू पण तुम्हाला म्हणू शकते ना
अभ्यासवाढवायला आपण कधीही तयार आहे ! फक्त दुसर्‍याबाजुने फक्त कोणत्या रेफरन्स मधे अभ्यास वाढवावा हे सांगावे . पोकळ अहिंसेने अन नुसत्या उपासमारीने जगात काहीतरी घडले आहे अशी एक तरी घटना दाखवुन द्यावी ...आपण त्याचा सविस्तर अभ्यास करु !
त्यामुळे तुम्हाला कोणी गांधीवादी भेटो आणि तुम्हाला त्यांचे ह्रदयपरिवर्तन करण्याची सुसंधी मिळो यासाठी शुभेच्छा .
>>> माझा एक मित्र कटटर गांधीवादी आहे (सध्या आप साठी काम करत आहे.) त्याच्याशीही "दुसरे महायुध्द होवुन ब्रिटिश साम्राज्य कमकुवत झाले नसते तर अजुन ५०-१०० वर्षे स्वातंत्य्र मिलाले नसते " ह्यावर एकमत झाले आहे ! असो अजुन कोणीही गांधीवादीशी चर्चा करायला आपली कधीही तयारी आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

हाडक्या Fri, 07/18/2014 - 16:18
लॉगिक
हॅ हॅ हॅ .. लॉगिक चुकीचे असेल तर असू द्या हो, पण 'लॉजिक' किमान असावे तरी. पुन्हा सांगतो की तुमच्या मुद्द्यांच्याबद्दल मी सहमत वा असहमत यावर काहीही भाष्य करत नाहीये.. हे मी आधीच स्पष्ट केलंय.
तुमचे मुद्दे मान्य की अमान्य यावर मी काहीही भाष्य करत नाहीये ( आणि करू इच्छित नाहीये.)
माझा मुद्दा तुमचा अभिनिवेश जो की 'मीच एकटा एक अंतिम सत्य सांगतोय' असा होता आणि आहे त्याकडे निर्देश करणारा होता.
बाकी चर्चेला येतानाच तुमच्या मनात लक्ख प्रकाश आहे, तुमच्या मुद्द्यांना तुम्ही अटळ अंतिम सत्य म्हणून संपूर्ण मान्यता दिली आहे आणि त्यामुळे कोणी प्रतिवाद करण्याचा आणि केला तरी तुम्ही त्यावर विचारदेखील करण्याची अपेक्षा करण्याचा प्रश्नच येत नाही, हे आधीच स्पष्ट आहे.
तुमच्या मित्राला या वरच्या विधानाचा प्रत्यय आला असेल आणि मनातल्या मनात 'बर बाबा, तुझीच XXX लाल' म्हणून गप झाला असेल भौ.. *lol* अवांतर : 'दुसरे महायुध्द झाले नसते तर' हा लई इंटरेष्टिंग चर्चा विषय होऊ शकतो असे वाटते आहे.. ;) ---- "It is not coincidence that rubbish and non-sense is usually used to justify Bullshits " ----

In reply to by हाडक्या

तुमचा अभिनिवेश जो की 'मीच एकटा एक अंतिम सत्य सांगतोय'
हा माझा अभिनिवेश नाहीये , इतिहासाची पुस्तके चाळुन पहा म्हणजे कळेल की स्वातंत्र्याचा इतिहासा कोणाच्या अभिविषाने भरलेला आहे ते !
तुमच्या मित्राला या वरच्या विधानाचा प्रत्यय आला असेल आणि मनातल्या मनात 'बर बाबा, तुझीच XXX लाल' म्हणून गप झाला असेल भौ.
>>> ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ! हे लोगिकही चुकीचे आहे ! तर्काधिष्टीत वादविवादात स्वतःचे मत मांडता आले नाही की लोक असल्या पळवाटा शोधतात .( आमचा मित्र गांधीवादी असला तरीही पळवाटा शोध्दणारा नक्कीच नाही ) .... बाकी ह्यावरुन एक घटना आठवली : आचार्यांनी जेव्हा वादविवादात बौध्दमतखंडन केले तेव्हा बौध्द भिक्कु असेच सिमिलर लाईन्स वर म्हणत होते र्की "मती दौर्बल्यमेतत न मत दौर्बल्यं " आमच्या मति दौर्बल्यामुळे आमचा पराभव होत आहे , हे आमच्या मताचे दौर्बल्य नव्हे ... पुढल्या पाच पन्नास वर्षात बौध्द धर्म पुर्ण नामशेष झाला मग त्यांना कलाले मती दुर्बल होती की मत ते *biggrin* इथे घाई कुणाला आहे ? मी आधीच म्हणालो आहे की १००-५०० वर्षाच्या होरायझनचा विचार करा...गांधीचा पोकळ आदर्श(?)वाद पुसला जायला इतका वेळ तर नक्कीच लागेल ... कालोह्यं निरवधिर विपुलाच प्रूथ्वी !!

In reply to by हाडक्या

आनन्दा Wed, 07/16/2014 - 13:21
नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते. तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ? तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!
तुम्ही म.टा. वर पण प्रतिक्रिया देता का हो?

In reply to by आनन्दा

हाडक्या Wed, 07/16/2014 - 14:33
हॅ हॅ हॅ .. 'मटा' आणि 'टाईम्स ऑफ ईंडिया' वर बहिष्कार आहे आमचा. तुम्हाला असे वाटले हा आम्ही 'शाल जोडीतला' समजायचा का? ;)

In reply to by हाडक्या

आनन्दा Wed, 07/16/2014 - 18:46
तुम्हाला असे वाटले हा आम्ही 'शाल जोडीतला' समजायचा का?
अर्थात. एकच प्रतिक्रिया ३ वेळा टाकलीत म्हणून विचारले मी असे.

In reply to by आनन्दा

हाडक्या Wed, 07/16/2014 - 19:31
हा हा हा .. अस्सं होय. वोके वोके.. कारण आम्ही दुसर्‍या प्रतिसादात दिले आहे..
या ना शेंडा ना बुडख्याच्या चर्चा संपणार नाहीत आणि तेच तेच परत येत राहणार हेच चार-पाच वेळा एकच प्रतिक्रिया लिहून सुचवायचं होतं.. पण असो.

अवतार Tue, 07/15/2014 - 22:51
आणि त्या कृतीचे स्वत:ला सोयीस्कर दृष्टीकोनातून लावलेले अन्वयार्थ वेगळे. सोयीस्कर दृष्टीकोनातून लावलेले अन्वयार्थ आणि वस्तुस्थितीवर आधारित विश्लेषण ह्यात मुख्य फरक म्हणजे - पहिल्या पद्धतीत नेहमीच कोणातरी एका व्यक्तीवर किंवा गटावर सर्व अपयशाचे खापर फोडले जाते आणि ज्यांचा झेंडा खांद्यावर घेतला असेल त्यांना संपूर्ण निर्दोष ठरवले जाते. तर दुसऱ्या पद्धतीत प्रत्येक व्यक्ती आणि गट यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू मांडून तुलनात्मक विश्लेषण केले जाते. गांधींनी मंदिरात जाऊन कुराणाचे वाचन केले. मशिदीत जाऊन भगवद्गीतेचे वाचन केले नाही ! ह्या कृतीचा अर्थ ज्यांना कळतो त्यांना स्पष्टीकरण देण्याची गरज नाही; ज्यांना कळत नाही त्यांना स्पष्टीकरण देऊन काही उपयोग नाही; आणि जे कळूनही न कळल्यासारखे दाखवतात त्यांना स्पष्टीकरणाने काही फरक पडत नाही. सत्याच्या झेंड्याचा रंग हा सूर्यप्रकाशासारखा स्वच्छ असतो. म्हणूनच त्या रंगात इतर सर्व रंग सामावलेले असतात.

मुक्त विहारि Wed, 07/16/2014 - 22:59
मशिदीत जाऊन भगवद्गीतेचे वाचन केले नाही !!!!! असेल, असे पण असू शकेल. बाद्वे, "गांधी" नावाच्या सिनेमांत हा प्रसंग दाखवला होता का?

In reply to by आनन्दा

प्यारे१ Fri, 07/18/2014 - 02:57
तसा अनुभव कमीच पण तरीही आमच्याक्डून हा प्रतिसाद हातभार म्हणून घेण्यात यावा. धन्या-वाद... आपलं धन्यवाद! ;)

मदनबाण Mon, 09/08/2014 - 08:46
आत्ताच नरसोबाच्या वाडीतुन परत आलोय... हा धागा जेव्हा पाहिला होता तेव्हा वाटलही नव्हत की चारुदत्त आफळ्यांचे किर्तन ऐकावयास मिळेल. परंतु गेले ३ दिवस वाडीत चारुदत्त आफळ्यांचे किर्तन चालु होते त्यातील २ दिवसांचे किर्तनाचा लाभ मला घेता आला :) विषय होता " सावरकरांचे थोरले बंधु :- गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबाराव सावरकर " किर्तनाचा अनुभव केवळ अवर्णीय होता ! कित्येक वर्षांनी अतिशय सुरेख किर्तन ऐकल्याचा अनुभव आणि आनंद मिळाला ! :) माझ्या मोबल्यातुन लांबुन फोटु काढले ते तितकेसे चांगले आणि स्पष्ट नाहीत, परंतु तरी सुद्धा ते इथे देत आहे :- गणपती बाप्पाला हार घालताना चारुदत्त आफळे. 1 चारुदत्त आफळे किर्तन करताना. 2 बाकी कॄष्णेच्या पाण्याचा स्तर बराच वर आलेला आहे, माझी एकदातरी दक्षिणद्वार घडावे अशी इच्छा आहे, बघु कधी तो योग येइल. 3 जाता जाता :- आपल्या महाराष्ट्राला आणि देशाला अश्या असंख्य किर्तनकारांची आजच्या घडीला गरज आहे हे प्रकर्षाने जाणवले. {वाडीकर} :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mary Kom - Official Trailer

In reply to by मदनबाण

फोटोंबद्दल धन्यवाद मदनबाण :)....काय काय सांगीतलं आफळेबुवांनी त्याचा ईथे किंवा दुसरा धागा काढुन सांगितलतं तर बरं वाटेल. :)

मदनबाण Mon, 09/08/2014 - 13:04
काय काय सांगीतलं आफळेबुवांनी त्याचा ईथे किंवा दुसरा धागा काढुन सांगितलतं तर बरं वाटेल. रात्री ९:०० ते १२:३० इतका वेळ किर्तन चालले. :) सावरकर बंधुंचे आणि त्यांच्या घरातील स्त्रीयांनी केलेले देशकार्य. बाबाराव साबरकरांनी भोगलेल्या यातना,त्रास.त्यांच्या शारिरीक आजारा बद्धल आणि बरचं काही. :) हे सगळं लिहण्याची माझी क्षमता नाही ! शिवाय ऐकण्यात जे समाधान आहे ते वाचण्यात नाही. :) यात सुरुवातीला मुख्य विषयाची सुरुवात करण्याआधी कविराज भूषण आणि औरंगजेब यांच्या बद्धल सांगितलं, त्यात खाली दिलेला भाग थोडक्यात आला होता :- https://www.facebook.com/kavirajbhushan/posts/692220437481911

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mary Kom - Official Trailer

प्रभाकर पेठकर Tue, 09/09/2014 - 01:01
आम्ही लहानपणी ज्येष्ठ आफळे बुवांचे किर्तन ऐकलेले आहे. त्यामुळे 'आफळे' नांवाभोवती असणारे किर्तनाचे वलय प्रत्यक्ष अनुभवले आहे. धाकटे आफळे 'बापसे बेटा सवाई' असतिल ह्यात शंका नाही. घराण्याला ओघवत्या भाषेचे आणि ज्ञानाचे वरदान आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

हो काका. बापसे बेटा सवाई नक्की आहेत. सिनिअर आफळे बुवांच्या किर्तनाचं रेकोर्डींगच्या दोन कॅसेट मा़झ्या आजोबांकडे होत्या. त्यातली एक ऐकलं आहे (अर्धवट). ज्युनिअर आफळेबुवांची जिभ अजुन धारदार आहे. बाकी बुवा गातात जबरदस्त.

मदनबाण Tue, 09/09/2014 - 09:50
धाकटे आफळे 'बापसे बेटा सवाई' असतिल ह्यात शंका नाही. घराण्याला ओघवत्या भाषेचे आणि ज्ञानाचे वरदान आहे. अगदी असेच आहेत, चारुदत्त आफळे सुरेख गायन करतात आणि अर्थात भाषेवर प्रभुत्व आहेच ! :) ज्यांनी वरचे दुवे {लेखात दिलेले} अजुन ऐकले नसतील त्यांनी ते आवार्जुन ऐकावेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

प्रसाद१९७१ Tue, 09/09/2014 - 14:45
भारताच्या स्वातंत्र्याची मागणी ही भारतातल्या काही सत्ता पिपासू लोकांनी त्यांना सत्तेवर येण्यासाठी केली होती असे माझे मत बनत चालले आहे. १९०० सालाच्या आधी पासुन महानगर पालिके वर हिंदी लोक निवडुन येउन राज्य करत होते. राज्यांच्या विधानसभासुद्धा तीस च्या दशकात चालू झाल्या होत्या. संसद सुद्धा अस्तीत्वात आली होती १९४० च्या आसपास. पण ह्या चोरांना वाट्टेल तसे खायला ब्रिटीशांमुळे संधी मिळत नव्हती म्हणुन ह्यांना स्वातंत्र्य हवे होते. अगदी १९४५ पर्यंत लष्कर आणि पोलिस दल ब्रिटीशांना एकनिष्ठ राहीले. जगात कुठेच ज्या लोकांवर सो कॉल्ड राज्य करायचे त्याच लोकांचे ९०% लष्कर आहे असे दिसले नाहीये. ब्रिटिशांच्या काळातच सामान्य माणुस स्वतंत्र होता.

In reply to by बॅटमॅन

मदनबाण Tue, 09/09/2014 - 15:13
रा.रा. मदनबाण, तुम्ही वाडीकर हे ठौक न्हवते! अगदी शब्दशः वाडीकर नाही, पण वाडी प्राण आहे माझा. :) आता काही काळाने वयाची पस्तीशी गाठेन, त्यातली जवळपास ३३ वर्ष वाडीला जात आहे. :) बाकी मिरज वाडी रस्ता अगदी रद्दड आहे ! इतके वर्ष प्रवास करतोय पण रस्त्याला धड डांबर नाही, आपल्या महाराष्ट्रीची प्रगती असे रस्ते पाहुनच कळुन येते. :( सरकारने जनतेच्या पैशातुन जाहिरात करण्या ऐवजी धड रस्ते बांधावेत आधी !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

मदनबाण Mon, 09/15/2014 - 14:59
नथुराम गोडसे यांच्यावर आता चित्रपट येत आहे. नव्या वादाची सुरुवात ? http://www.youtube.com/watch?v=l0d-MJ8lIHE

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्ट

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण Mon, 09/15/2014 - 17:24
अच्छा... हे माहित नव्हते. तू-नळीवर असल्यास पाहण्याचा प्रयत्न करीन.तू-नळीवर नाटक आहे, ते सुद्धा पहायचे आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्ट

In reply to by मदनबाण

प्रभाकर पेठकर Mon, 09/15/2014 - 21:52
तू नळीवर आहे. जोडणी: http://www.google.com/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=3&cad=rja&uact=8&ved=0CCwQtwIwAg&url=http%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DWA4AZWM75QA&ei=NM8WVMFGkvForfCB6Ak&usg=AFQjCNFh6xT8nMCNV7WzVfoHZXL4yt1hjQ&sig2=YM6hRDnppI2NP5btzJJBMw

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

खटपट्या Sun, 07/13/2014 - 22:28
तिनही भाग ऐकले. हे सगळे खरे असेल तर काय म्हणावे कळत नाहीये… त्यावेळच्या अत्त्याचाराच्या कथा ऐकून सुन्न झालोय गांधीवाद्यांचे/गांधी प्रेमींचे याबद्दल मत ऐकायला आवडेल.

In reply to by खटपट्या

हाडक्या Tue, 07/15/2014 - 21:00
नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते. तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ? तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

शशिकांत ओक Sun, 07/13/2014 - 22:58
मित्रा, महात्मा गांधीजींची आणखी एक वैयक्तिक शोकांतिका. मुलांची त्यांच्या विचारांच्या प्रभावाखाली दबून राहिल्याने झालेली घुसमट... बऱ्याच वेळी मी विमाननगरहून आगाखान पॅलेस समोरून जाताना आईला भेटायला आलेल्या मुलाला८- ८ दिवस तेथील फाटकात अडवले जात होते. कस्तुरबा बाहेर येऊन त्याला आत घेऊन गेल्या. नंतर हटवादीपणा करून मद्रासला असताना तो इस्लामी धर्मात गेल्या वर त्याला परत आणायला आईला तिथे जावे लागले होते. आदि आठवून वाईट वाटत राहते..

नेत्रेश Mon, 07/14/2014 - 08:36
किर्तनकाराचे आख्यान, तद्दन प्रचारकी आणी नाटकी. गांधीजींचे तत्व ऐकण्याची जबरदस्ती ना गांधींनी केली, ना त्यांच्या सहकार्यानी. गांधीजींच्यामुळेच कदाचीत भारताची अवस्था पाकीस्तानसारखी झाली नाही.

In reply to by नेत्रेश

गांधीजींचे तत्व ऐकण्याची जबरदस्ती ना गांधींनी केली, ना त्यांच्या सहकार्यानी.
नक्की. नुसती जबरदस्ती नाही, लादला गेलाय गांधीवाद.
किर्तनकाराचे आख्यान, तद्दन प्रचारकी आणी नाटकी.
गांधीवादाएवढं नक्कीच नाही.

गांधीवाद म्हणजे थोतांड वगैरे अप-प्रचार नेहमी करण्यात येतो.महात्मा गांधी ह्या व्यक्तीमागे ईतके लोक- केवळ भारतातलेच नव्हेत तर परदेशातले देखील अगदी तुमचा तो आईन्स्ताईनदेखील का आकर्षित झाले ह्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करताना ही मंडळी दिसत नाहीत. फक्त गांधींमुळेच स्वातंत्र्य मिळाले असे तेव्हाही कोणी म्हंटले नव्हते व तसे आताही कोणी म्हणत नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

फक्त गांधींमुळेच स्वातंत्र्य मिळाले असे तेव्हाही कोणी म्हंटले नव्हते व तसे आताही कोणी म्हणत नाही.
चला ,आता उचललेस तु मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया असल्या कविता मोडीत काढायला हरकत नाही हे पाहुन आनंद झाला ! बाकी थोडी तरी प्रगती आहे विचारसरणीत ....हेही नसे थोडके ....!!

In reply to by प्रसाद गोडबोले

सुनील Mon, 07/14/2014 - 14:55
थोडी तरी प्रगती आहे विचारसरणीत
चला, एका पार्टीच्या विचारसरणीत थोडी प्रगती झाली. आता दुसर्‍या पार्टीच्या विचारसरणीत कधी प्रगती होणार? ;)

In reply to by सुनील

आता दुसर्‍या पार्टीच्या विचारसरणीत कधी प्रगती होणार?
>>> पहिली पार्टी संपुर्ण मतपरिवर्तन होवुन दुसर्‍या पार्टीस सामील झाल्यावर !! :)

In reply to by सुनील

ऋषिकेश Tue, 07/15/2014 - 15:15
आता दुसर्‍या पार्टीच्या विचारसरणीत कधी प्रगती होणार?
अहो त्यांनी गांधीवाद पूर्ण अंगिकारलाय बघितला नाहित? विरोधकांच्या हृदयपरिवर्तनावर विश्वास असल्यानेच तर हा धागा काढलाय ना? इथेच गांधीवाद जिंकला नै का?

In reply to by ऋषिकेश

विरोधकांच्या हृदयपरिवर्तनावर विश्वास असल्यानेच तर हा धागा काढलाय ना? इथेच गांधीवाद जिंकला नै का?
आँ ?
"शत्रुचेही हृदयपरिवर्तनकरता येते"
ह्या विचारसरणीचे क्रेडिट गांधींना ? गांधीच्या आधीपासुन "शत्रुचेही हृदयपरिवर्तनकरता येते" ही विचारसरणी अस्तित्वात आहे ...किमान हिंदुंच्यात तरी ! अंगदशिष्टाई... कृष्णशिष्टाई वगैरेंच्या अभ्यास केलेला दिसत नाहीये बहुधा ! साम दाम दंड भेद हेही ऐकले नाहीये काय ? ह्यातही पहिल्यांदा "साम" म्हणजे सामोपचार आहे ! ह्यात गांधीगिरी काही नाही उलट गांधीगिरी म्हणजे केवळ ह्यातील पहिली स्टेप आहे :) अवांतर : हिटलर आणि दुसरे महायुध्द झाले नसते तर गांधीनी विन्स्टन चर्चिल चे हृदयपरिवर्तन कसे केले असते हे पहायला मजा आली असती !

In reply to by प्रसाद गोडबोले

हाडक्या Tue, 07/15/2014 - 21:00
नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते. तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ? तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

प्रसाद१९७१ Tue, 09/09/2014 - 14:51
परदेशातले देखील अगदी तुमचा तो आईन्स्ताईनदेखील का आकर्षित झाले ह्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करताना ही मंडळी दिसत नाहीत.
त्यात काय विषेश हो. रजनिश च्या मागे सुद्धा भले भले गोरे लागलेच होते की. आईन्स्टाईन ला काय जातय अमेरिकेत राहुन काहीतरी बोलायला, त्याला कुठे भोगायला लागणार होते? तो कुठला आकर्षीत होयला, २-४ ठीकाणी तोंडदेखले बरे बोलला तर लागली इथले काँग्रेस्सी नाचायला. आणि युरोप अमेरिकेत पण अगदी कमी प्रमाणात असली तरी भारतातल्या सारखी निष्क्रीय आणि खाल्ल्या घरचे वासे मोजणारे आहेतच की.

मागे एकदा नथुराम गोडसेंच्या धाग्यावरुन बरीच शाब्दिक हाणामारी झालेली होती.
एकदा? जरा मिपाचा अभ्यास वाढवा अशी फुकटची सुचना देतो. मिपावर नथुराम विरूध्द गांधी, अस्तिक विरूध्द नास्तिक, मोदी विरूध्द केजरीवाल अशा विविध धाग्यांचे अनंतवेळा दळण झाले आहे :) ह.घ्या हे वेगळे सांगणे न लागे.

आदूबाळ Mon, 07/14/2014 - 20:44
ते सगळं जौंद्या. आफळेबुवा गातात बाकी मस्त. त्यांचा नाट्यसंगीताच्या वाटचालीवरचा एक कार्यक्रम आकाशवाणी पुणेवरून सादर व्हायचा तो फार भारी असे.

असे सत्तावन्न आफळे बघितले आहेत आजपर्यंत तरीही गांधींच्या तत्वज्ञानाची महती सर्वदूर पसरलेली आहेच. अशा आफळ्यांकडे दुर्लक्ष करणे सगळ्यात उत्तम.

आनन्दा Tue, 07/15/2014 - 15:06
मी या पुराव्यांबद्दल कोणीतरी काहीतरी बोलेल या आशेने कित्येक दिवस रोज हा धागा उघडून बघत आहे. पण हाय रे दैवा!! बाकी अली बंधूंबद्दल घेतलेल्या भूमिकेबद्दल मी गांधींना दोष देणार नाही. त्यांची चूक असलीच तर ही असेल की त्यांनी खिलाफत चळवळीबरोबर आघाडी केली. परंतु मला ही राजकीय अपरिहार्यता वाटते. आफळ्यांच्या कीर्तनावर धागा काढण्यासाठीच मी बराच सर्च केला होता, तेव्हा गांधींच्या या भूमिकेला माझ्या द्रुष्टीने योग्य ठरवणारे काही पुरावे माझ्या हाताला लागले होते. ते नेमके आता मिळत नाहीयेत, मिळाले की डकवतो. बाकीच्या विषयांमध्ये मात्र आफळेंचे मुद्दे मला योग्य वाटतात. एक धोरणी म्हणून गांधी बर्‍याच वेळेस चुकले आहेत. त्यांच्या भूमिकेबद्दल शंका यावी असे बरेच प्रसंग आहेत. गांधींच्या मुस्लिम अनुनयाबद्दल तर बोलूच नये असे बरेच प्रसंग सांगता येतील. मला व्यक्तिशः तो गांधींमधल्या राजकारण्याचा पराभव वाटतो. त्यांनी आपल्या राजकारणातील भविष्यकालीन धोके ओळखलेच नाहीत. त्यांना काँग्रेसमधील जनरेशन-२ ने मोठे केले, आणि त्यांच्या जीवावर आपली पोळी भाजून घेतली असे माझे मत आहे. जसे आपल्या राळेगणसिद्धीच्या गांधींबद्दल झाले तसे. बाकी गांधी त्यावेळेस असे का वागले हे सांगणे कठीण आहे. एव्हढे तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी म्हणून मिरवणारे टिळक, पण वेदोक्त प्रकरणात त्यांना देखील फटका बसलाच ना.

बॅटमॅन Tue, 07/15/2014 - 15:09
फाळणीस अनुमोदन देऊन ज्या गांधीजींनी मुस्लिम वरचष्मा पूर्णपणे मोडून काढला त्या गांधींना मुस्लिम अनुनयाबद्दल शिव्या घालणारे लोक पाहिले की हसू आवरत नाही. =)) असो, चालायचंच.

In reply to by प्यारे१

बॅटमॅन Tue, 07/15/2014 - 15:17
फाळणी झाली नसती तर काय झालं असतं त्या अखंड भारतात? अगोदरच विभक्त मतदारसंघ इ.इ. चा धोशा चाललेलाच होता, टिळकांनी सांगितले की तेवढं घेऊन का होईना जर इंग्रजांशी लढणार असाल तर ठीके म्हणून. ते सगळं जर पुढं गेलं असतं तर त्रांगडं झालं असतं विचित्र. त्याजागी फाळणी झालेला का होईना, एक धर्मनिरपेक्ष भारत मिळाला हे गांधीजींचे मोठे क्रेडिट आहे. शेषराव मोर्‍यांच्या 'अखंड भारत का नाकारला' की अशाच काहीशा नावाच्या पुस्तकात ही भूमिका विस्ताराने आलेली आहे.

In reply to by बॅटमॅन

ऋषिकेश Tue, 07/15/2014 - 15:22
+१ टि़ळकांच्यावेळी लखनौ करार करावा लागला होता, विभक्त मतदारसंघ होते. फाळणीनंतर लखनौ कराराच्याही मागे भारत आला. विभक्त मतदारसंघ रद्द झाले, धर्मनिहाय आरक्षण येऊ दिले गेले नाही (व ते भारतात थांबलेल्या मुसलमानांनाही नको होते). मोर्‍यांचे लेखन ग्रेट आहे. कुरूंदकरांचेही या विषयाचे लेखन वाचनीय आहे.

In reply to by बॅटमॅन

धर्मनिरपेक्ष भारत म्हणजे काय भाऊ ? आज हिंदु मेजॉरिती मधे आहेत म्हणुन हा देश धर्मनिरपेक्ष आहे , इतर धर्मिय मेजॉरीतीत असलेला एक तरी धर्मनिरपेक्ष देश दाखवा ( आता लगेच तुर्कस्तान म्हणाल , पण तिथल्या खिलाफत चळवळीला मोडुन तो कमाल पाशा मुळे तो धर्मनिरपेक्ष आहे ...ज्या खिलाफत चळवळीला गांधीबाबा समर्थन देत होते ती हो =)) ) , धर्मनिरपेक्षता हा भारताचा नव्हे तर हिंदुंचा गुण आहे... हिंदुराष्ट्राचा गुण आहे...! ... जेव्हा इतर धर्मिय मेजॉरिटीमधे येतील तेव्हा पाहु भारत किती धर्मनिरपेक्ष राहतो ते ! बाकी अभ्यासासाठी : मिझोरम आणि नागालॅन्ड हे तुमच्या धर्मनिरपेक्ष भारतातील अधिकृत / डीक्लीयर्ड ख्रिश्चन स्टेट्स आहेत बरं का !!

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Tue, 07/15/2014 - 15:56
धर्मनिरपेक्षता हा भारताचा नव्हे तर हिंदुंचा गुण आहे... हिंदुराष्ट्राचा गुण आहे...! ... जेव्हा इतर धर्मिय मेजॉरिटीमधे येतील तेव्हा पाहु भारत किती धर्मनिरपेक्ष राहतो ते !
मग हिंदू मेजॉरिटीत राहतील अशी तरतूद गांधींनी केली असेच म्हणायला नको का ;)

In reply to by बॅटमॅन

मग हिंदू मेजॉरिटीत राहतील अशी तरतूद गांधींनी केली असेच म्हणायला नको का
अं हं ! तेही क्रेडीट देता येणार नाही ! तेव्हाच क्लीन स्वीप फाळणी झाली असती ... हिंदु अ‍ॅबसोलुट मेजॉरीटीत आले असते तर तसे क्रेडीट देता आले असते ... देशाचा तुकडा तोडला ते तोडला शिवाय प्रॉब्लेम सोल्व्ह झाला नाहीच ...प्रॉब्लेम जिथल्या तिथेच ! कुठे आहे समान नागरी कायदा ? कुठे आहे सर्वधर्मिय घटस्फोटितांना समान अधिकार ? कुठे आहे अमर जवानच्या स्मारकाला लाथ मारणार्यांवर कारवाई करायची धमक ? कुठे आहे आसामात घुसखोरी करणार्‍यांना धडा शिकवायची हिंम्मत ? कुठे आहे तालिबान सारख्या हिंसक प्रवुत्तीशी लढणार्‍या अमेरिकेला ओपन सपोर्ट द्यायची जिगर ? कुठे आहे निर्वासित कश्मीरी पंडीतांना सुरक्षित पणे पर कस्मीरमधे पुनर्वसन करण्याची शक्ती ? येवढचं कशाला ...तर जो काश्मीर तुम्ही नकाशावर दाखवताना तो ही जिंकुन घेता येत नाही ह्याचे खरे कारण देशाबाहेर नाहे तर देशाआतच आहे! मान्य करा राव , धर्मनिरपेक्षता आमच्यात आधीपासुनच होती ...अगदी सातवाहन काला पासुन ते १८५७ च्या जिहाद मधे खांद्याला खांदा लावुन लढे पर्यंत , गांधीचेकाही क्रेडीट नाही त्याबाबत !! अवांतर : बाकी फाळणीविषयी क्लीनस्वीप फाळणी व्हाव्ही असे आंबेडकरांचेही मत होते असे ऐकुन आहे , कन्फर्म करुन कळवतो !

In reply to by प्रसाद गोडबोले

बॅटमॅन Tue, 07/15/2014 - 16:14
धर्मनिरपेक्षता आधीपासूनच होती, मात्र ती झाकोळू पाहत होती त्याचा यशस्वी प्रतिबंध गांधीजींनी केला हे मानलेच पाहिजे. असो, बाकी वाईड बॉलबद्दल बोलायचे तर औरंगजेबाच्या कृत्यांबद्दल अकबराला शिव्या घालण्यापैकी आहे हे.

In reply to by बॅटमॅन

आनन्दा Tue, 07/15/2014 - 16:19
धर्मनिरपेक्षता आधीपासूनच होती, मात्र ती झाकोळू पाहत होती त्याचा यशस्वी प्रतिबंध गांधीजींनी केला हे मानलेच पाहिजे.
ऑं? म्हणजे गांधींच्या समकालीन विरोधकांमध्ये धर्मनिरपेक्षता नव्हतीच की काय? अहो ज्या नथुरामने गांधींना मारले त्याचा इतिहास देखील धर्मनिरपेक्षतेचाच आहे, हां पण ती धर्मनिरपेक्षता आणि गांधी/ काँग्रेसची धर्मनिरपेक्षता यात फरक आहे. तुम्ही काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेबद्दल बोलत असाल तर मात्र आपला पास.

In reply to by बॅटमॅन

मात्र ती झाकोळू पाहत होती
>>> कुणामुळे ? हिंदुंमुळे ? फाळणीच्यावेळी भारत +पाकिस्तान अशी फाळणी झालीये ... भारत + हिंदुस्तान + पाकिस्तान अशी नाही ! ह्यावरुनच कळते की धर्मनिरपेक्षता कोणामुळे झाकोलत होती ते ! अकबराविषयी मते बनावताना जोधा अकबर ह्या चित्रपटाचा आधार घेवु नये !आअकबरही औरंगजेबा इतकाच क्रुर होता होता फक्त त्याच्या लवकर लक्षात आले की इतक्या सगळ्या हिंदुंना मारणे शक्य नाही , त्याची धर्मनिरपेक्षता आगतिकतेतुन आलेली आहे स्वेच्छेतुन नव्हे ! (मुघलांच्यात धर्मनिरपेक्ष म्हणता येईल असा एकच माणुस झाला तो म्हणजे दाराशिकोव्ह )!

In reply to by प्रसाद गोडबोले

आनन्दा Tue, 07/15/2014 - 16:25
अकबरही औरंगजेबा इतकाच क्रुर होता होता फक्त त्याच्या लवकर लक्षात आले की इतक्या सगळ्या हिंदुंना मारणे शक्य नाही , त्याची धर्मनिरपेक्षता आगतिकतेतुन आलेली आहे स्वेच्छेतुन नव्हे !
भारीच. + १००. अकबर हा पूर्वायुष्यात फार क्रूर होता. परंतु उत्तरायुष्यात त्याला प्रेषित व्हायची इच्छा होती असे ऐकून आहे. त्यातूनच हे सारे राजकारण झाले असावे.

In reply to by बॅटमॅन

ल्ज्याला तुम्ही वाईड बॉल म्हणता आहात त्या बद्दल अजुन थोडे ....
समान नागरी कायदा ? सर्वधर्मिय घटस्फोटितांना समान अधिकार ? अमर जवानच्या स्मारकाला लाथ मारणार्यांवर कारवाई? आसामात घुसखोरी करणार्‍यांना धडा ? तालिबान सारख्या हिंसक प्रवुत्तीशी लढणार्‍या अमेरिकेला ओपन सपोर्ट? निर्वासित कश्मीरी पंडीतांना सुरक्षित पणे पर कस्मीरमधे पुनर्वसन?
ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ततहाकथित धर्मनिरपेक्ष भारतात करता येत नाहीत ह्याला एकमेव कारण आहे ... एका विषिष्ठ समाजाचा विरोध / रोष होण्याची भीति ! जर भारत खरच धर्मनिरपेक्ष असता तर त्याने नक्कीच असला विरोध न जुमानता न्याय ते केले असते !! असो. अवांतर: शेनवॉर्नचा एक अप्रतिम लेगस्पिन चेंडु आठवला ... बॅट्स्मॅनने वाईड बॉल म्हणुन सोडुन दिला तो टप्पा पडल्यावर जवळ जवळ ४५ अंश वळुन मिडल स्टंपवर आदळला ...बोल्ड ! *biggrin* सोडा राव धर्मफर्मनिरपेक्षता ...आपण क्रिकेटची मॅच बघु :)

In reply to by बॅटमॅन

हाडक्या Tue, 07/15/2014 - 21:01
नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते. तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ? तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

In reply to by प्रसाद गोडबोले

आनन्दा Tue, 07/15/2014 - 16:21
कुठे आहे तालिबान सारख्या हिंसक प्रवुत्तीशी लढणार्‍या अमेरिकेला ओपन सपोर्ट द्यायची जिगर ?
असहमत. बाकी चलू द्या.

In reply to by आनन्दा

कुठे आहे तालिबान सारख्या हिंसक प्रवुत्तीशी लढणार्‍या अमेरिकेला ओपन सपोर्ट द्यायची जिगर ?
अहो आता कराची एयरपोर्ट बॉम्बब्लास्ट नंतर खुद्द पाकिस्तानही तालिबानशी लढायला अमेरिकेला साथ देईल अशी चिन्हे आहेत ! तुम्ही घ्या तुमचे पांघरुण ओढुन तोंडावर ! =))

In reply to by बॅटमॅन

आनन्दा Tue, 07/15/2014 - 15:30
बादवे, माझ्या शरीराचे तुकडे होऊन मगच फाळणी होईल हे देखील त्याच गांधींचे वाक्य आहे ना? गांधींनी फाळणीला दिलेली मान्यता ही त्यांची राजकीय अप्रिहार्यता होती. आणि त्यानंतर मुस्लिम पाकिस्तानातून धर्मनिरपेक्ष भारतात येऊ इच्छिणार्‍यांची काळजी घेणे हेदेखील एक नेता म्हणून त्यांचे कर्तव्य होते, नाही का? थोडे गूगलून आणखीन थोडे दुवे देतो, जमले तर. फाळणीबद्दल मला सावरकरांचे जास्त पटते. लोकसंख्येची शांततापूर्ण अदलाबदल झाली की मगच फाळणी करावी असे काहीसे त्यांचे मत होते बहुधा. हिंदू नेत्यांमध्ये द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत प्रथम त्यांनीच मांडला बहुधा.

In reply to by बॅटमॅन

आनन्दा Tue, 07/15/2014 - 16:13
बाकी गांधींच्या मुस्लिम अनुनयाबद्दल - he pahaa गोपीनाथ सहा बद्दल गांधींची मते इथे वाचायला मिळतील. याच गांधींनी अब्दुल रशीद चा भाई अब्दुल रशीद म्हणून सन्मान केलेला आहे, पुढच्या ६ महिन्यातच. त्याचे पुरावे हवे असल्यास सांगा.

In reply to by बॅटमॅन

फाळणीस अनुमोदन देऊन ज्या गांधीजींनी मुस्लिम वरचष्मा पूर्णपणे मोडून काढला त्या गांधींना मुस्लिम अनुनयाबद्दल शिव्या घालणारे लोक पाहिले की हसू आवरत नाही. Lol असो, चालायचंच.
फाळणीनंतरच्या दंगलीत झालेल्या हिंदुच्या कत्तलीत हिंदुना शांत बसा असं म्हणणारे कोण होते? बलात्कारीत स्त्रियांना असाल तिथे सुखानी राहा किंवा तुम्ही विरोध करु नका असं सांगणारं कोण होतं? आता ह्याचे पुरावे नाहीत असं तुम्ही म्हणु शकत नाही. हा धागा मुस्लिम विरोधी नाही. हा धागा हिप्पोक्रसी विरोधी आहे. सत्तेच्या हव्यासापोटी क्रांतीकारकांचे बळी जाऊ देण्याविषयी आहे. स्वातंत्र्याच सगळं क्रेडीट स्वतःला घेण्याला आहे. पद्धतशीर पणे पुढच्या पिढीच ब्रेन वॉशिंग करणार्‍या वृत्ती विरोधी आहे. असो. चालायचचं. :)

In reply to by बॅटमॅन

हाडक्या Tue, 07/15/2014 - 20:59
नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते. तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ? तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

हाडक्या Tue, 07/15/2014 - 20:59
नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते. तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ? तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

In reply to by हाडक्या

देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!
प्रचंड ! गांधींना इतिहासाच्या अअभ्यासक्रमा घातल्याने ते फार लहानपणीच लोकांच्या डोक्यात शिरतात , तिथुन मग त्यांना बाहेर काढायला फार वेळ लागणारच ! आपण जगाच्या इतिहासाचा अभ्यास करत रहावा ... हिटलर , स्टॅलिन ,मुसोलिनी ह्यांचे क्रौर्य पहावे त्यापुढे मिळमिळीत अहिंसा टिकली असती का ह्याचा विचार करावा चर्चिल , लिंकन ह्यांचा अभ्यास करावा देषाच्या साठी वट्टेल त्या लेव्हल ला जावुन विजय मिळवण्याची त्यांची वृत्ती पहावी . अमेरिकेच्या स्वातंत्रयुध्दातील "स्व्तःचे स्वातंत्र्य स्वातंत्र्य्जे आपल्याला वसाहत समजतात त्यांच्या विरुध्द युध्द पुकारणे "...आणि आपल्या इथल्या "अहो थोदे तरी स्वातंत्र्य द्या की" ह्या वृत्तींचा तुलनात्मक अभ्यास करावा ... हळु हळु हे जग काही फेरीलॅन्ड नाही तर एक वॉरलॅन्ड आहे हे उमजेल मग लोकांचा असल्या भ्रामक कल्पनांवरील विश्वास आपोआप उडेल ! आपला आदर्श चाणक्य असला पाहिजे ... चाणक्य !

In reply to by प्रसाद गोडबोले

हाडक्या Wed, 07/16/2014 - 14:52
@ प्रगो, या ना शेंडा ना बुडख्याच्या चर्चा संपणार नाहीत आणि तेच तेच परत येत राहणार हेच चार-पाच वेळा एकच प्रतिक्रिया लिहून सुचवायचं होतं.. पण असो. रच्याकने, (वादात न पडता) एवढेच सांगतो, तुम्ही जे सांगत आहात तेच तुम्हालाही लागू पडते असे दूसर्‍या बाजूचे लोक म्हणत असतील तर काय वो? पंचाईतच की.. *biggrin*

In reply to by हाडक्या

या ना शेंडा ना बुडख्याच्या चर्चा संपणार नाहीत
>>निराशावाद !इतके निराश होवुन नका हाडुकराव ... सत्याचा नेहमीच विजय होतो आपण कायम आपली / आपल्याला जे सत्य वाटते ती बाजु माम्डत रहावी ... फरक तो पडता है भै !एक उदाहरण देतो ...एक काळ असा होता जेव्हा लोकं डारविनला यड्यात काढत असत .... पण वारंवार चर्चांमुळे आता डारविनच योग्य होता हे लोकांना पतले आहे ... जुने विचार विचारसरणी बदलालयला वेळ लागतो ... ह्या ५-५० वर्षात होणार्‍या गोष्टी नव्हेत ...थिन्क अबाऊट १००-५०० इयर्स होरायझन ! आपल्या म्हातारपणा पर्यंत "गांधी तुमच्या आमच्या सारखाच मातीचा माणुस होता त्यांच्या कडुनही चुका , गंभीर चुका झाल्या" इतके जर लोकांना पटले तरी खुप होईल !! बाकी ... तुम्ही भवभुतीचा श्लोक उत्तररामचरितातील वाचला नाहीये काय ? ये नाम केचिदिह न: प्रथयन्त्यवज्ञां जानन्तु ते किमपि तान्प्रति नैष यत्नः | उत्पत्स्यतेऽस्ति मम कोऽपि समानधर्मा कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी || भवभूति ||

In reply to by प्रसाद गोडबोले

हाडक्या Wed, 07/16/2014 - 20:02
हाडुकराव
एवढा आदर पाहून सद्गदून आले हो. ;) . असो. निराशावाद नाही हो.
तुम्ही भवभुतीचा श्लोक उत्तररामचरितातील वाचला नाहीये काय ?
वाचलाय तो, पण त्याचा संदर्भ इथे देता येईल असे वाटत नाही. (context वेगळा आहे!)
आपण कायम आपली / आपल्याला जे सत्य वाटते ती बाजु माम्डत रहावी
म्हणजे दूसर्‍याची मते (ती सत्य नाहीत हे आधीच निश्चित आहे ना!) आपण विचारात घ्यायची नाहीत आणि आपण आपले घोडे दामटत रहायचे, असे काय ? ;) मग चालू द्यात. गेल्या प्रतिसादातील आमच्या प्रश्नाचे उत्तर राहिले तुमचे राव.! (बादवे, सातार्‍याला कधी जाताय? पाऊस सुरु झालाय आता, ठोसेघरला पाणी वाढलेलं असणारे :) )

In reply to by हाडक्या

भवभुती म्हणतो की जे आमच्या विषयी काहीच्या बाही बोलत असतील त्यांना बोलुद्या कारण आमचा प्रयत्न त्यांच्यासाठी नाहीये , आमचे विचार समजुन घेणारा कोणीना कोणीतरी समान धर्मा नक्कीच कुठे ना कुठे जन्माला येईल कारण काळ अनंत आहे अन पृथ्वीही विशाल आहे !! धिस इज एक्झ्यॅक्टली व्हॉट आय वॉन्ट टू से ! बाकी आपलेच घोडे दामटणे हा प्रकार गांधीवाद्यांनीच चालवलाय स्वातंत्र्यापासुन ... उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया किंव्वा दे दी हमे आजादी बिना ख्ड्ग बिना ढाल साबरमती के संत तुने कर दिया कमाल ...वगैरे ऐकले नाही काय ? जणु काही एका काँग्रेस अन गांधी मुळेच देषाला स्वातंत्र मिळालय ... इतकच कशाला सोप्पं पहा ना आपल्या नोटेवर कोणा एका माणसाचाच चेहरा छापलाय नाही का ! एव्हन सौदी अरेबियाच्या नोटांवरही वेगवेगळ्या राजांचे फोटो असतात !! सत्याची कास धरणे आणि आपलेच घोडे दामटणे ह्यातील फरक लक्षात आला का आता ? अवांतर : गेल्या प्रतिसादातील आमच्या प्रश्नाचे उत्तर राहिले तुमचे राव.! >>> कोणता प्रश्न ? मला जे इर्रीलेव्हन्ट वाटतं त्याच्या वर मी सहसा प्रतिसाद देत नाही ... अर्थात अफवाद :काश्मीर करायचा मुड नसला तर *biggrin* !!

In reply to by प्रसाद गोडबोले

हाडक्या गुरुवार, 07/17/2014 - 15:23
एवढेच सांगतो, तुम्ही जे सांगत आहात तेच तुम्हालाही लागू पडते असे दूसर्‍या बाजूचे लोक म्हणत असतील तर काय वो?
हा तो प्रश्न .. आणि भवभूती जे म्हणतोय ते तुम्हाला लागू पडत नाही कारण दुसरी बाजू देखील हाच दावा करू शकते हे म्हणायचे होते. (आम्हाला थोडे फार संस्कृत समजतय वो तरी पण भाषांतराबद्दल धन्स.. :) ) तुमचे मुद्दे मान्य की अमान्य यावर मी काहीही भाष्य करत नाहीये ( आणि करू इच्छित नाहीये.) पण हा आमचा मूळ मुद्दा देखील तुम्ही इर्रीलेव्हन्ट समजत असाल तर मग असोच..

In reply to by हाडक्या

प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/17/2014 - 16:15
तुमचा मुद्दा फार अनक्लीयर आहे राव ... दुसरी बाजु काय दावा करु शकते हेच कळत नाहीये ... जरा उलगडुन लिहिलत तर चर्छा करता येइळ !

In reply to by प्रसाद गोडबोले

हाडक्या गुरुवार, 07/17/2014 - 20:06
दुसरी बाजु काय दावा करु शकते हेच कळत नाहीये
हाच तर कळीचा मुद्दा आहे ! असो, एकदा समजावण्याचा प्रयत्न करतो,
गांधींना इतिहासाच्या अभ्यासक्रमात घातल्याने ते फार लहानपणीच लोकांच्या डोक्यात शिरतात , तिथुन मग त्यांना बाहेर काढायला फार वेळ लागणारच !
हेच गांधी-द्वेषाबाबत देखील म्हणता येईल. अनेकजण विना-अभ्यास गांधी-टिका झोडत असतात. त्यांच्या डोक्यातून गांधी-द्वेष बाहेर काढायला वेळ लागणारच !
आपण जगाच्या इतिहासाचा अभ्यास करत रहावा...
हिटलर , स्टॅलिन ,मुसोलिनी ह्यांचे क्रौर्य पहावे त्यापुढे मिळमिळीत अहिंसा टिकली असती का ह्याचा विचार करावा
'जर्रा अभ्यास वाढवावा' असेच दुसरी बाजू पण तुम्हाला म्हणू शकते ना ! :)
हळु हळु हे जग काही फेरीलॅन्ड नाही तर एक वॉरलॅन्ड आहे हे उमजेल मग लोकांचा असल्या भ्रामक कल्पनांवरील विश्वास आपोआप उडेल !
'जग हे वॉरलॅन्ड आहे' हा स्वतंत्र चर्चेचा विषय होवू शकतो. तूर्तास या तुमच्या भ्रामक कल्पना आहेत असे दुसरी बाजू म्हणू शकते ना.!! आता असोच.. बाकी चर्चेला येतानाच तुमच्या मनात लक्ख प्रकाश आहे, तुमच्या मुद्द्यांना तुम्ही अटळ अंतिम सत्य म्हणून संपूर्ण मान्यता दिली आहे आणि त्यामुळे कोणी प्रतिवाद करण्याचा आणि केला तरी तुम्ही त्यावर विचारदेखील करण्याची अपेक्षा करण्याचा प्रश्नच येत नाही, हे आधीच स्पष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला कोणी गांधीवादी भेटो आणि तुम्हाला त्यांचे ह्रदयपरिवर्तन करण्याची सुसंधी मिळो यासाठी शुभेच्छा ..

In reply to by हाडक्या

हे लॉगिक चुकीचे आहे कारण ...
हेच गांधी-द्वेषाबाबत देखील म्हणता येईल. अनेकजण विना-अभ्यास गांधी-टिका झोडत असतात. त्यांच्या डोक्यातून गांधी-द्वेष बाहेर काढायला वेळ लागणारच
गांधीद्वेष हा कोणत्याच अभ्यासक्रमातुन शिकवला जात नाही रादर गांधी हेच कसे स्वातंत्र्यसंग्रामातील मेन कॅरॅक्टर होते हे शिकवले जाते त्यांचा चुका कोठेच शालेय इतिहासातही गांधीवर ६-७ धडे त्यांच्या आधीच्या टिळक, दादाभाई वगैरेंवर १-२ आणि क्रांतिकारकांवर फक्त १ धडा आहे ... मग लोक स्वतःहुन हा माणुस इतका कसा काय देवासारखा असु शकतो मग फाळणी , खिलाफत चळवळीला सपोर्ट , पुणेकरारा आंबेडकरांना वेठीस पकडणे , ३ वेळा नेताजींन्कडुन काँग्रेस मधे हरल्यावर मागल्यादारुन पॉलिटिक्स चालवणे , श्रीयुत.जीनांना प्रधानमंत्री पद ऑफर करणे वगैरे गोष्टी अभ्यासात आल्यावर गांधी किती सामन्य माणुस होता हे लक्षात येते ! प्लीज नोट : सामान्यता लक्षात येणे म्हणजे द्वेष नव्हे !
'जर्रा अभ्यास वाढवावा' असेच दुसरी बाजू पण तुम्हाला म्हणू शकते ना
अभ्यासवाढवायला आपण कधीही तयार आहे ! फक्त दुसर्‍याबाजुने फक्त कोणत्या रेफरन्स मधे अभ्यास वाढवावा हे सांगावे . पोकळ अहिंसेने अन नुसत्या उपासमारीने जगात काहीतरी घडले आहे अशी एक तरी घटना दाखवुन द्यावी ...आपण त्याचा सविस्तर अभ्यास करु !
त्यामुळे तुम्हाला कोणी गांधीवादी भेटो आणि तुम्हाला त्यांचे ह्रदयपरिवर्तन करण्याची सुसंधी मिळो यासाठी शुभेच्छा .
>>> माझा एक मित्र कटटर गांधीवादी आहे (सध्या आप साठी काम करत आहे.) त्याच्याशीही "दुसरे महायुध्द होवुन ब्रिटिश साम्राज्य कमकुवत झाले नसते तर अजुन ५०-१०० वर्षे स्वातंत्य्र मिलाले नसते " ह्यावर एकमत झाले आहे ! असो अजुन कोणीही गांधीवादीशी चर्चा करायला आपली कधीही तयारी आहे !

In reply to by प्रसाद गोडबोले

हाडक्या Fri, 07/18/2014 - 16:18
लॉगिक
हॅ हॅ हॅ .. लॉगिक चुकीचे असेल तर असू द्या हो, पण 'लॉजिक' किमान असावे तरी. पुन्हा सांगतो की तुमच्या मुद्द्यांच्याबद्दल मी सहमत वा असहमत यावर काहीही भाष्य करत नाहीये.. हे मी आधीच स्पष्ट केलंय.
तुमचे मुद्दे मान्य की अमान्य यावर मी काहीही भाष्य करत नाहीये ( आणि करू इच्छित नाहीये.)
माझा मुद्दा तुमचा अभिनिवेश जो की 'मीच एकटा एक अंतिम सत्य सांगतोय' असा होता आणि आहे त्याकडे निर्देश करणारा होता.
बाकी चर्चेला येतानाच तुमच्या मनात लक्ख प्रकाश आहे, तुमच्या मुद्द्यांना तुम्ही अटळ अंतिम सत्य म्हणून संपूर्ण मान्यता दिली आहे आणि त्यामुळे कोणी प्रतिवाद करण्याचा आणि केला तरी तुम्ही त्यावर विचारदेखील करण्याची अपेक्षा करण्याचा प्रश्नच येत नाही, हे आधीच स्पष्ट आहे.
तुमच्या मित्राला या वरच्या विधानाचा प्रत्यय आला असेल आणि मनातल्या मनात 'बर बाबा, तुझीच XXX लाल' म्हणून गप झाला असेल भौ.. *lol* अवांतर : 'दुसरे महायुध्द झाले नसते तर' हा लई इंटरेष्टिंग चर्चा विषय होऊ शकतो असे वाटते आहे.. ;) ---- "It is not coincidence that rubbish and non-sense is usually used to justify Bullshits " ----

In reply to by हाडक्या

तुमचा अभिनिवेश जो की 'मीच एकटा एक अंतिम सत्य सांगतोय'
हा माझा अभिनिवेश नाहीये , इतिहासाची पुस्तके चाळुन पहा म्हणजे कळेल की स्वातंत्र्याचा इतिहासा कोणाच्या अभिविषाने भरलेला आहे ते !
तुमच्या मित्राला या वरच्या विधानाचा प्रत्यय आला असेल आणि मनातल्या मनात 'बर बाबा, तुझीच XXX लाल' म्हणून गप झाला असेल भौ.
>>> ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ! हे लोगिकही चुकीचे आहे ! तर्काधिष्टीत वादविवादात स्वतःचे मत मांडता आले नाही की लोक असल्या पळवाटा शोधतात .( आमचा मित्र गांधीवादी असला तरीही पळवाटा शोध्दणारा नक्कीच नाही ) .... बाकी ह्यावरुन एक घटना आठवली : आचार्यांनी जेव्हा वादविवादात बौध्दमतखंडन केले तेव्हा बौध्द भिक्कु असेच सिमिलर लाईन्स वर म्हणत होते र्की "मती दौर्बल्यमेतत न मत दौर्बल्यं " आमच्या मति दौर्बल्यामुळे आमचा पराभव होत आहे , हे आमच्या मताचे दौर्बल्य नव्हे ... पुढल्या पाच पन्नास वर्षात बौध्द धर्म पुर्ण नामशेष झाला मग त्यांना कलाले मती दुर्बल होती की मत ते *biggrin* इथे घाई कुणाला आहे ? मी आधीच म्हणालो आहे की १००-५०० वर्षाच्या होरायझनचा विचार करा...गांधीचा पोकळ आदर्श(?)वाद पुसला जायला इतका वेळ तर नक्कीच लागेल ... कालोह्यं निरवधिर विपुलाच प्रूथ्वी !!

In reply to by हाडक्या

आनन्दा Wed, 07/16/2014 - 13:21
नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते. तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ? तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!
तुम्ही म.टा. वर पण प्रतिक्रिया देता का हो?

In reply to by आनन्दा

हाडक्या Wed, 07/16/2014 - 14:33
हॅ हॅ हॅ .. 'मटा' आणि 'टाईम्स ऑफ ईंडिया' वर बहिष्कार आहे आमचा. तुम्हाला असे वाटले हा आम्ही 'शाल जोडीतला' समजायचा का? ;)

In reply to by हाडक्या

आनन्दा Wed, 07/16/2014 - 18:46
तुम्हाला असे वाटले हा आम्ही 'शाल जोडीतला' समजायचा का?
अर्थात. एकच प्रतिक्रिया ३ वेळा टाकलीत म्हणून विचारले मी असे.

In reply to by आनन्दा

हाडक्या Wed, 07/16/2014 - 19:31
हा हा हा .. अस्सं होय. वोके वोके.. कारण आम्ही दुसर्‍या प्रतिसादात दिले आहे..
या ना शेंडा ना बुडख्याच्या चर्चा संपणार नाहीत आणि तेच तेच परत येत राहणार हेच चार-पाच वेळा एकच प्रतिक्रिया लिहून सुचवायचं होतं.. पण असो.

अवतार Tue, 07/15/2014 - 22:51
आणि त्या कृतीचे स्वत:ला सोयीस्कर दृष्टीकोनातून लावलेले अन्वयार्थ वेगळे. सोयीस्कर दृष्टीकोनातून लावलेले अन्वयार्थ आणि वस्तुस्थितीवर आधारित विश्लेषण ह्यात मुख्य फरक म्हणजे - पहिल्या पद्धतीत नेहमीच कोणातरी एका व्यक्तीवर किंवा गटावर सर्व अपयशाचे खापर फोडले जाते आणि ज्यांचा झेंडा खांद्यावर घेतला असेल त्यांना संपूर्ण निर्दोष ठरवले जाते. तर दुसऱ्या पद्धतीत प्रत्येक व्यक्ती आणि गट यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू मांडून तुलनात्मक विश्लेषण केले जाते. गांधींनी मंदिरात जाऊन कुराणाचे वाचन केले. मशिदीत जाऊन भगवद्गीतेचे वाचन केले नाही ! ह्या कृतीचा अर्थ ज्यांना कळतो त्यांना स्पष्टीकरण देण्याची गरज नाही; ज्यांना कळत नाही त्यांना स्पष्टीकरण देऊन काही उपयोग नाही; आणि जे कळूनही न कळल्यासारखे दाखवतात त्यांना स्पष्टीकरणाने काही फरक पडत नाही. सत्याच्या झेंड्याचा रंग हा सूर्यप्रकाशासारखा स्वच्छ असतो. म्हणूनच त्या रंगात इतर सर्व रंग सामावलेले असतात.

मुक्त विहारि Wed, 07/16/2014 - 22:59
मशिदीत जाऊन भगवद्गीतेचे वाचन केले नाही !!!!! असेल, असे पण असू शकेल. बाद्वे, "गांधी" नावाच्या सिनेमांत हा प्रसंग दाखवला होता का?

In reply to by आनन्दा

प्यारे१ Fri, 07/18/2014 - 02:57
तसा अनुभव कमीच पण तरीही आमच्याक्डून हा प्रतिसाद हातभार म्हणून घेण्यात यावा. धन्या-वाद... आपलं धन्यवाद! ;)

मदनबाण Mon, 09/08/2014 - 08:46
आत्ताच नरसोबाच्या वाडीतुन परत आलोय... हा धागा जेव्हा पाहिला होता तेव्हा वाटलही नव्हत की चारुदत्त आफळ्यांचे किर्तन ऐकावयास मिळेल. परंतु गेले ३ दिवस वाडीत चारुदत्त आफळ्यांचे किर्तन चालु होते त्यातील २ दिवसांचे किर्तनाचा लाभ मला घेता आला :) विषय होता " सावरकरांचे थोरले बंधु :- गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबाराव सावरकर " किर्तनाचा अनुभव केवळ अवर्णीय होता ! कित्येक वर्षांनी अतिशय सुरेख किर्तन ऐकल्याचा अनुभव आणि आनंद मिळाला ! :) माझ्या मोबल्यातुन लांबुन फोटु काढले ते तितकेसे चांगले आणि स्पष्ट नाहीत, परंतु तरी सुद्धा ते इथे देत आहे :- गणपती बाप्पाला हार घालताना चारुदत्त आफळे. 1 चारुदत्त आफळे किर्तन करताना. 2 बाकी कॄष्णेच्या पाण्याचा स्तर बराच वर आलेला आहे, माझी एकदातरी दक्षिणद्वार घडावे अशी इच्छा आहे, बघु कधी तो योग येइल. 3 जाता जाता :- आपल्या महाराष्ट्राला आणि देशाला अश्या असंख्य किर्तनकारांची आजच्या घडीला गरज आहे हे प्रकर्षाने जाणवले. {वाडीकर} :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mary Kom - Official Trailer

In reply to by मदनबाण

फोटोंबद्दल धन्यवाद मदनबाण :)....काय काय सांगीतलं आफळेबुवांनी त्याचा ईथे किंवा दुसरा धागा काढुन सांगितलतं तर बरं वाटेल. :)

मदनबाण Mon, 09/08/2014 - 13:04
काय काय सांगीतलं आफळेबुवांनी त्याचा ईथे किंवा दुसरा धागा काढुन सांगितलतं तर बरं वाटेल. रात्री ९:०० ते १२:३० इतका वेळ किर्तन चालले. :) सावरकर बंधुंचे आणि त्यांच्या घरातील स्त्रीयांनी केलेले देशकार्य. बाबाराव साबरकरांनी भोगलेल्या यातना,त्रास.त्यांच्या शारिरीक आजारा बद्धल आणि बरचं काही. :) हे सगळं लिहण्याची माझी क्षमता नाही ! शिवाय ऐकण्यात जे समाधान आहे ते वाचण्यात नाही. :) यात सुरुवातीला मुख्य विषयाची सुरुवात करण्याआधी कविराज भूषण आणि औरंगजेब यांच्या बद्धल सांगितलं, त्यात खाली दिलेला भाग थोडक्यात आला होता :- https://www.facebook.com/kavirajbhushan/posts/692220437481911

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Mary Kom - Official Trailer

प्रभाकर पेठकर Tue, 09/09/2014 - 01:01
आम्ही लहानपणी ज्येष्ठ आफळे बुवांचे किर्तन ऐकलेले आहे. त्यामुळे 'आफळे' नांवाभोवती असणारे किर्तनाचे वलय प्रत्यक्ष अनुभवले आहे. धाकटे आफळे 'बापसे बेटा सवाई' असतिल ह्यात शंका नाही. घराण्याला ओघवत्या भाषेचे आणि ज्ञानाचे वरदान आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

हो काका. बापसे बेटा सवाई नक्की आहेत. सिनिअर आफळे बुवांच्या किर्तनाचं रेकोर्डींगच्या दोन कॅसेट मा़झ्या आजोबांकडे होत्या. त्यातली एक ऐकलं आहे (अर्धवट). ज्युनिअर आफळेबुवांची जिभ अजुन धारदार आहे. बाकी बुवा गातात जबरदस्त.

मदनबाण Tue, 09/09/2014 - 09:50
धाकटे आफळे 'बापसे बेटा सवाई' असतिल ह्यात शंका नाही. घराण्याला ओघवत्या भाषेचे आणि ज्ञानाचे वरदान आहे. अगदी असेच आहेत, चारुदत्त आफळे सुरेख गायन करतात आणि अर्थात भाषेवर प्रभुत्व आहेच ! :) ज्यांनी वरचे दुवे {लेखात दिलेले} अजुन ऐकले नसतील त्यांनी ते आवार्जुन ऐकावेत.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

प्रसाद१९७१ Tue, 09/09/2014 - 14:45
भारताच्या स्वातंत्र्याची मागणी ही भारतातल्या काही सत्ता पिपासू लोकांनी त्यांना सत्तेवर येण्यासाठी केली होती असे माझे मत बनत चालले आहे. १९०० सालाच्या आधी पासुन महानगर पालिके वर हिंदी लोक निवडुन येउन राज्य करत होते. राज्यांच्या विधानसभासुद्धा तीस च्या दशकात चालू झाल्या होत्या. संसद सुद्धा अस्तीत्वात आली होती १९४० च्या आसपास. पण ह्या चोरांना वाट्टेल तसे खायला ब्रिटीशांमुळे संधी मिळत नव्हती म्हणुन ह्यांना स्वातंत्र्य हवे होते. अगदी १९४५ पर्यंत लष्कर आणि पोलिस दल ब्रिटीशांना एकनिष्ठ राहीले. जगात कुठेच ज्या लोकांवर सो कॉल्ड राज्य करायचे त्याच लोकांचे ९०% लष्कर आहे असे दिसले नाहीये. ब्रिटिशांच्या काळातच सामान्य माणुस स्वतंत्र होता.

In reply to by बॅटमॅन

मदनबाण Tue, 09/09/2014 - 15:13
रा.रा. मदनबाण, तुम्ही वाडीकर हे ठौक न्हवते! अगदी शब्दशः वाडीकर नाही, पण वाडी प्राण आहे माझा. :) आता काही काळाने वयाची पस्तीशी गाठेन, त्यातली जवळपास ३३ वर्ष वाडीला जात आहे. :) बाकी मिरज वाडी रस्ता अगदी रद्दड आहे ! इतके वर्ष प्रवास करतोय पण रस्त्याला धड डांबर नाही, आपल्या महाराष्ट्रीची प्रगती असे रस्ते पाहुनच कळुन येते. :( सरकारने जनतेच्या पैशातुन जाहिरात करण्या ऐवजी धड रस्ते बांधावेत आधी !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

मदनबाण Mon, 09/15/2014 - 14:59
नथुराम गोडसे यांच्यावर आता चित्रपट येत आहे. नव्या वादाची सुरुवात ? http://www.youtube.com/watch?v=l0d-MJ8lIHE

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्ट

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण Mon, 09/15/2014 - 17:24
अच्छा... हे माहित नव्हते. तू-नळीवर असल्यास पाहण्याचा प्रयत्न करीन.तू-नळीवर नाटक आहे, ते सुद्धा पहायचे आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- सार्वजनिक शरमेची गोष्ट

In reply to by मदनबाण

प्रभाकर पेठकर Mon, 09/15/2014 - 21:52
तू नळीवर आहे. जोडणी: http://www.google.com/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=3&cad=rja&uact=8&ved=0CCwQtwIwAg&url=http%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DWA4AZWM75QA&ei=NM8WVMFGkvForfCB6Ak&usg=AFQjCNFh6xT8nMCNV7WzVfoHZXL4yt1hjQ&sig2=YM6hRDnppI2NP5btzJJBMw
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकर मित्रमंडळींनो. मागे एकदा नथुराम गोडसेंच्या धाग्यावरुन बरीच शाब्दिक हाणामारी झालेली होती. त्यावेळेला काही गांधींच्या समर्थक बुद्धीवादी मंडळींनी आंधळ्या गांधीवादाखातर बरीच शाब्दिक हिंसा केली होती (अर्बन डिक्शनरीमधे हिप्पोक्रसी चा नवा अर्थ टाकता येईल काय?) असो. त्यावेळी पुरावा द्या, पुरावा द्या असा 'सत्याग्रह' काही गांधीवाद्यांनी केला होता. आपल्या मौलिक वेळातला फक्त दिड तास काढुन हे नक्की बघा किंवा ऐका. ज्या गोष्टींचे पुरावे अस्तित्वात आहेत आणि कोणालाही बघता येतील अश्या स्थितीत आहेत त्यावरुन "गांधीवादः एक थोतांड" हा मुद्दा अधोरेखित केला जाऊ शकेल.

पाऊस दाटलेला

स्पा ·

प्रभाकर पेठकर Sun, 07/13/2014 - 11:30
फार सुंदर तर्‍हेने व्यक्त झालाय पाऊसमित्र. >>>>मी निघताना त्याने माझ्या खिशात शंभर रुपये कोंबले, लागतील म्हणुन. >>>>घरी तोंड दाखवल्यावर आइने देवाला साखरच ठेवली. >>>>तीन वर्षांनी अशाच एका संध्याकाळी, जेव्हा ती मला सोडुन गेली, तेव्हा पठ्ठ्या हजर झाला. ही वाक्य मनाला विशेष स्पर्शून गेली.

वाडीचे सावंत Sun, 07/13/2014 - 11:49
तीन वर्षांनी अशाच एका संध्याकाळी जेव्हा ती मला सोडुन गेली.तेव्हा पठ्ठ्या हजर झाला. भिजता,भिजता डोळ्यातले अश्रु आपोआप लपले गेले.
+११११

प्यारे१ Sun, 07/13/2014 - 15:39
___/\___ क्लास्स्स्स. बाकी काही गोष्टी मागच्या मागं सोडून देणं रास्त ठरतं. वर्तमान हाती धरण्यासाठी भूतकाळ सोडावाच लागेल. विशेषतः काहीच करणं आपल्या हाती नस्तं तेव्हा ते श्रेयस्कर देखील ठरतं.

In reply to by प्यारे१

वपाडाव Sun, 07/13/2014 - 20:23
तेच तर धुवुन-पुसुन टाकावं म्हणौन पौस येतो ना, प्यारेकाका... स्पावड्या टच असलेला... चिंब (चिंब या शब्दावरुन इंट्या आठौला)

कंजूस Sun, 07/13/2014 - 16:00
शब्दच नाहीत .पुन्हा पुन्हा वाचतोय .तुझा पाऊस सुखदु:खांनी दाटलाय .एकदम ते सर्व अनुभव उफाळून आलेत . धरण फुटलंय .खोट्या बेगडी उपमा न लिहिता खरंखुरं मनाला भिडणारं गेल्या वर्षभरातलं सर्वोत्तम शब्दचित्र आहे स्पा .

सुबोध खरे Sun, 07/13/2014 - 16:10
स्पा साहेब तुमच्याच शब्दात "आयुष्य पुढे जातच राहीलं". तस म्हणतो आता "आपली" कोणीतरी शोधा म्हणजे पावसाचा अर्थ परत नव्याने कळेल (किंवा नवीन अर्थ. लेख सुरेख आहेच पण कुठेतरी एकटेपणाची जाणीव करून देतो असे वाटले( कदाचित मनाचे खेळ असतील पण पावसात एकटेपणाची जाणीव तीव्र होते).

In reply to by सुबोध खरे

बॅटमॅन Mon, 07/14/2014 - 15:09
( कदाचित मनाचे खेळ असतील पण पावसात एकटेपणाची जाणीव तीव्र होते).
मनाचेच खेळ असतील तर कालिदासाच्या मनाचेही असेच खेळ होते. तो मेघदूतात नेमके हेच म्हणतो: "मेघालोके भवति सुखिनोऽप्यन्यथावृत्तिचेतः कण्ठाश्लेषप्रणयिनिजने, किं पुनर्दूरसंस्थे????" "आकाशात एकदा ढग दाटून आले की सुखी माणसाचेही चित्त सैरभैर होते आणि आपल्या कंठाला मिठी मारणार्‍या प्रिय व्यक्तीची आठवण येते. प्रिय व्यक्तीपासून दुरावलेल्यांची तर काय गत होत असेल??"

मी निघताना त्याने माझ्या खिशात शंभर रुपये कोंबले, लागतील म्हणुन. आणि पावसावरचं प्रेम काही कमी झालं नाही. योगायोगाने एके वर्षी चक्क फेब्रुवारीत पाउस पडला. त्याच संध्याकाळी नेमका तिने होकार दिला.त्यानेही मुहुर्त साधुन हजेरी लावली. कलिना कॅम्पस मध्ये भिजत किती वेळ गप्पा मारल्या असतील. साला टायमिंग हवं तर असं त्याने दोस्ती निभावली पण,तीन वर्षांनी अशाच एका संध्याकाळी जेव्हा ती मला सोडुन गेली.तेव्हा पठ्ठ्या हजर झाला. भिजता,भिजता डोळ्यातले अश्रु आपोआप लपले गेले. ये यार...असं नै लिहायचं मला त्रास होतो. पाऊस दाटला ना भो....! -दिलीप बिरुटे

राही Sun, 07/13/2014 - 21:21
सुंदर लेख. २६ जुलै प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.

In reply to by राही

सखी Mon, 07/14/2014 - 18:59
सुंदर लेख स्पा! सुखदुखा:त बघितलेला छान उतरला आहे लेखणीतुन. राहीजी: २६ जुलै प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.- हे कळले नाही, २६ जुलै ज्यांनी अनुभवलेला आहे त्यांना परत तसा नकोच यायला अशी भावना असेल असे मला वाटत होते.

पैसा Sun, 07/13/2014 - 23:58
वाचताना तू टॅबवर टाईप केलं आहेस हे लक्षात आलंच. पाऊस असतोच. मात्र तो सगळ्यांना भेटतो असं नाही. तुला भेटलाय तो, नशीबवान आहेस! पावसाळी पाखरं येतात आणि जातात पण उन्हापावसात घर बांधणारी चिऊ भेटेलच कधीतरी. पावसाला मात्र विसरू नको.

नगरीनिरंजन Mon, 07/14/2014 - 01:04
लेखन खूप आवडले. बाहेर धो-धो पाऊस पडताना मनात दाटून आलेले मळभ लेखात अलगद उतरले आहे. त्यामुळे लेखाला कातरवेळच्या पावसाची एक हुरहुर लावणारी डूब मिळाली आहे. मस्त!

मराठी कथालेखक Mon, 07/14/2014 - 12:25
पाऊस हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय, प्रत्येकाच्या आठवणी आणि दाटून येणार्‍या भावना मात्र निराळ्या. अर्थात पुढे मागे ही भावूकता कधी कमी होवू लागते. मग असा एखादा सुंदर लेख आठवणी आणि भावना जागवतो. बाकी "पाऊस दाटलेला" शिवाय दुसरं काही उत्तम शीर्षक होवूच शकलं नसतं. गारवातलं सगळ्यात अप्रतिम आणि वेड लावणारं गाणं. सौमित्रच्या आवाजात असलेल्या गद्दातल्या ओळी भारावून टाकत (पण आजकाल कधी कधी त्या ओळींची खिल्ली पण उडवतो.. वाढत्या वयाबरोबर हरवलेली भावूकता !!) अजून लिहा...

सौरभ उप्स Mon, 07/14/2014 - 14:45
व्वा सुपर्ब …। दोन्ही वेळा पावसाने हजेरी लावली, खर्या अर्थाने मैत्री निभावली त्याने…. बाकी प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिलाच नेहमी प्रमाणे… अन आमच्याही जुन्या आठवणी जाग्या झाल्या ….

सौरभ उप्स Mon, 07/14/2014 - 14:45
व्वा सुपर्ब …। दोन्ही वेळा पावसाने हजेरी लावली, खर्या अर्थाने मैत्री निभावली त्याने…. बाकी प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिलाच नेहमी प्रमाणे… अन आमच्याही जुन्या आठवणी जाग्या झाल्या ….

शिद Mon, 07/14/2014 - 15:09
मस्तच लिहलंय... आवडलं. आम्हीपण शाळेत असताना शाळेचा मागच्या बाजुला उतारावर धरण बांधायचो आणि वह्यांची पानं फाडून छोट्या होड्या बनवून त्यात सोडायचो. ज्या मुलाची कागदी होडी सगळ्यांत शेवटी बुडेल तो जिंकला...मस्त धमाल आठवणी.

माधुरी विनायक Mon, 07/14/2014 - 16:21
ट्रेनच्या त्याच डब्यात बसून तुमच्याच तोंडून या आठवणी ऐकत असल्यासारखं वाटत राहिलं... खूप सहज सुंदर आणि उत्स्फूर्त... खूप आवडलं...

सौन्दर्य गुरुवार, 09/24/2015 - 08:18
अतिशय सुंदर, हळवं करणारं लिखाण. उफाळलेल्या दर्यासारखा कोसळणारा पाउस देखील मनाचा ठाव घेतो. तुम्ही ते सर्व फार छान मांडलत.

बोका-ए-आझम गुरुवार, 09/24/2015 - 09:41
पाऊस आवडत नाही, पण लेख अतिशय आवडला. मलाही २६ जुलैच्या पावसात भायखळा ते दादर चालत यावं लागलं होतं. तीवाठवण परत जागी झाली.

बरखा Wed, 07/04/2018 - 21:17
मस्त लेख, आवडला. पाऊस सुरू झाला की आपोआप मन जुन्या आठवणीत हरवत जात. एका मागून एक आठवणी डोळ्यासमोर तरळून जातात.

प्रभाकर पेठकर Sun, 07/13/2014 - 11:30
फार सुंदर तर्‍हेने व्यक्त झालाय पाऊसमित्र. >>>>मी निघताना त्याने माझ्या खिशात शंभर रुपये कोंबले, लागतील म्हणुन. >>>>घरी तोंड दाखवल्यावर आइने देवाला साखरच ठेवली. >>>>तीन वर्षांनी अशाच एका संध्याकाळी, जेव्हा ती मला सोडुन गेली, तेव्हा पठ्ठ्या हजर झाला. ही वाक्य मनाला विशेष स्पर्शून गेली.

वाडीचे सावंत Sun, 07/13/2014 - 11:49
तीन वर्षांनी अशाच एका संध्याकाळी जेव्हा ती मला सोडुन गेली.तेव्हा पठ्ठ्या हजर झाला. भिजता,भिजता डोळ्यातले अश्रु आपोआप लपले गेले.
+११११

प्यारे१ Sun, 07/13/2014 - 15:39
___/\___ क्लास्स्स्स. बाकी काही गोष्टी मागच्या मागं सोडून देणं रास्त ठरतं. वर्तमान हाती धरण्यासाठी भूतकाळ सोडावाच लागेल. विशेषतः काहीच करणं आपल्या हाती नस्तं तेव्हा ते श्रेयस्कर देखील ठरतं.

In reply to by प्यारे१

वपाडाव Sun, 07/13/2014 - 20:23
तेच तर धुवुन-पुसुन टाकावं म्हणौन पौस येतो ना, प्यारेकाका... स्पावड्या टच असलेला... चिंब (चिंब या शब्दावरुन इंट्या आठौला)

कंजूस Sun, 07/13/2014 - 16:00
शब्दच नाहीत .पुन्हा पुन्हा वाचतोय .तुझा पाऊस सुखदु:खांनी दाटलाय .एकदम ते सर्व अनुभव उफाळून आलेत . धरण फुटलंय .खोट्या बेगडी उपमा न लिहिता खरंखुरं मनाला भिडणारं गेल्या वर्षभरातलं सर्वोत्तम शब्दचित्र आहे स्पा .

सुबोध खरे Sun, 07/13/2014 - 16:10
स्पा साहेब तुमच्याच शब्दात "आयुष्य पुढे जातच राहीलं". तस म्हणतो आता "आपली" कोणीतरी शोधा म्हणजे पावसाचा अर्थ परत नव्याने कळेल (किंवा नवीन अर्थ. लेख सुरेख आहेच पण कुठेतरी एकटेपणाची जाणीव करून देतो असे वाटले( कदाचित मनाचे खेळ असतील पण पावसात एकटेपणाची जाणीव तीव्र होते).

In reply to by सुबोध खरे

बॅटमॅन Mon, 07/14/2014 - 15:09
( कदाचित मनाचे खेळ असतील पण पावसात एकटेपणाची जाणीव तीव्र होते).
मनाचेच खेळ असतील तर कालिदासाच्या मनाचेही असेच खेळ होते. तो मेघदूतात नेमके हेच म्हणतो: "मेघालोके भवति सुखिनोऽप्यन्यथावृत्तिचेतः कण्ठाश्लेषप्रणयिनिजने, किं पुनर्दूरसंस्थे????" "आकाशात एकदा ढग दाटून आले की सुखी माणसाचेही चित्त सैरभैर होते आणि आपल्या कंठाला मिठी मारणार्‍या प्रिय व्यक्तीची आठवण येते. प्रिय व्यक्तीपासून दुरावलेल्यांची तर काय गत होत असेल??"

मी निघताना त्याने माझ्या खिशात शंभर रुपये कोंबले, लागतील म्हणुन. आणि पावसावरचं प्रेम काही कमी झालं नाही. योगायोगाने एके वर्षी चक्क फेब्रुवारीत पाउस पडला. त्याच संध्याकाळी नेमका तिने होकार दिला.त्यानेही मुहुर्त साधुन हजेरी लावली. कलिना कॅम्पस मध्ये भिजत किती वेळ गप्पा मारल्या असतील. साला टायमिंग हवं तर असं त्याने दोस्ती निभावली पण,तीन वर्षांनी अशाच एका संध्याकाळी जेव्हा ती मला सोडुन गेली.तेव्हा पठ्ठ्या हजर झाला. भिजता,भिजता डोळ्यातले अश्रु आपोआप लपले गेले. ये यार...असं नै लिहायचं मला त्रास होतो. पाऊस दाटला ना भो....! -दिलीप बिरुटे

राही Sun, 07/13/2014 - 21:21
सुंदर लेख. २६ जुलै प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.

In reply to by राही

सखी Mon, 07/14/2014 - 18:59
सुंदर लेख स्पा! सुखदुखा:त बघितलेला छान उतरला आहे लेखणीतुन. राहीजी: २६ जुलै प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला.- हे कळले नाही, २६ जुलै ज्यांनी अनुभवलेला आहे त्यांना परत तसा नकोच यायला अशी भावना असेल असे मला वाटत होते.

पैसा Sun, 07/13/2014 - 23:58
वाचताना तू टॅबवर टाईप केलं आहेस हे लक्षात आलंच. पाऊस असतोच. मात्र तो सगळ्यांना भेटतो असं नाही. तुला भेटलाय तो, नशीबवान आहेस! पावसाळी पाखरं येतात आणि जातात पण उन्हापावसात घर बांधणारी चिऊ भेटेलच कधीतरी. पावसाला मात्र विसरू नको.

नगरीनिरंजन Mon, 07/14/2014 - 01:04
लेखन खूप आवडले. बाहेर धो-धो पाऊस पडताना मनात दाटून आलेले मळभ लेखात अलगद उतरले आहे. त्यामुळे लेखाला कातरवेळच्या पावसाची एक हुरहुर लावणारी डूब मिळाली आहे. मस्त!

मराठी कथालेखक Mon, 07/14/2014 - 12:25
पाऊस हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय, प्रत्येकाच्या आठवणी आणि दाटून येणार्‍या भावना मात्र निराळ्या. अर्थात पुढे मागे ही भावूकता कधी कमी होवू लागते. मग असा एखादा सुंदर लेख आठवणी आणि भावना जागवतो. बाकी "पाऊस दाटलेला" शिवाय दुसरं काही उत्तम शीर्षक होवूच शकलं नसतं. गारवातलं सगळ्यात अप्रतिम आणि वेड लावणारं गाणं. सौमित्रच्या आवाजात असलेल्या गद्दातल्या ओळी भारावून टाकत (पण आजकाल कधी कधी त्या ओळींची खिल्ली पण उडवतो.. वाढत्या वयाबरोबर हरवलेली भावूकता !!) अजून लिहा...

सौरभ उप्स Mon, 07/14/2014 - 14:45
व्वा सुपर्ब …। दोन्ही वेळा पावसाने हजेरी लावली, खर्या अर्थाने मैत्री निभावली त्याने…. बाकी प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिलाच नेहमी प्रमाणे… अन आमच्याही जुन्या आठवणी जाग्या झाल्या ….

सौरभ उप्स Mon, 07/14/2014 - 14:45
व्वा सुपर्ब …। दोन्ही वेळा पावसाने हजेरी लावली, खर्या अर्थाने मैत्री निभावली त्याने…. बाकी प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिलाच नेहमी प्रमाणे… अन आमच्याही जुन्या आठवणी जाग्या झाल्या ….

शिद Mon, 07/14/2014 - 15:09
मस्तच लिहलंय... आवडलं. आम्हीपण शाळेत असताना शाळेचा मागच्या बाजुला उतारावर धरण बांधायचो आणि वह्यांची पानं फाडून छोट्या होड्या बनवून त्यात सोडायचो. ज्या मुलाची कागदी होडी सगळ्यांत शेवटी बुडेल तो जिंकला...मस्त धमाल आठवणी.

माधुरी विनायक Mon, 07/14/2014 - 16:21
ट्रेनच्या त्याच डब्यात बसून तुमच्याच तोंडून या आठवणी ऐकत असल्यासारखं वाटत राहिलं... खूप सहज सुंदर आणि उत्स्फूर्त... खूप आवडलं...

सौन्दर्य गुरुवार, 09/24/2015 - 08:18
अतिशय सुंदर, हळवं करणारं लिखाण. उफाळलेल्या दर्यासारखा कोसळणारा पाउस देखील मनाचा ठाव घेतो. तुम्ही ते सर्व फार छान मांडलत.

बोका-ए-आझम गुरुवार, 09/24/2015 - 09:41
पाऊस आवडत नाही, पण लेख अतिशय आवडला. मलाही २६ जुलैच्या पावसात भायखळा ते दादर चालत यावं लागलं होतं. तीवाठवण परत जागी झाली.

बरखा Wed, 07/04/2018 - 21:17
मस्त लेख, आवडला. पाऊस सुरू झाला की आपोआप मन जुन्या आठवणीत हरवत जात. एका मागून एक आठवणी डोळ्यासमोर तरळून जातात.
लेखनविषय:
लेखनप्रकार
Guess what? शेवटच्या ट्रेन मध्ये आहे, कर्जत.१२.४० करी रोड वरुन बसलेलो, आत्ता जेमतेम कुर्ल्यापर्यंत गाडी आलीये.अ.... आत्ता वाजलेत १.३०. तासभर होत आलाय.गाडी हलायची चिन्ह नाहीत.डब्यात जेमतेम चार डोकी.बाहेर मजबुत पाऊस पडतोय.डोळे मिटुन बसलोय.बाकी काहीच करू शकत नाही.पाउस निवांत एकतोय.आज सकाळी पण भिजलो, आत्ता येताना पण भिजलो,छत्री असुन नसल्यासारखी अख्ख्या मुंबइला वाकडा तिकडा कसाही धुतोय.डबा मस्त गार पडलाय.बाहेरुन पाउस आत गळतोय, मला काकडायला होतयं.डोंबोली अजुन लय लांब , त्यात ही शेवटची ट्रेन.कधी सुटेल पत्ता नाही.डोळे पेंगायला लागलेत..