मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पन्हाळगड-विशाळगड---एका दिवसात???

राजेंद्र मेहेंदळे ·

vikramaditya 16/07/2014 - 20:35
छान वर्णन आहे. एवढे अंतर चालण्यापुर्वी थोडा सराव केला तर ट्रेकचा आनंद जास्त मिळेल. अन्यथा दमछाक झाल्याने त्रास होतो.

सही..!! सुरुवातीचे ढगाळलेले आणि मग क्लियर होत गेलेले फोटो खुपच आवडले. मला एकदम बर्‍याच वर्षांपुर्वी केलेला भिमाशंकर ते नाणेघाट हा ४ दिवसांचा पावसाळी ट्रेक आठवला.

प्रचेतस 16/07/2014 - 21:23
मस्तच. बाकी पावनखिंडीचे स्थान बघता राजे खिंडीतून गेले असावेत असे वाटत नाही. पन्हाळ्यावरून येताना खिंडीतून चढावे नाही तर उतरावे लागते. खिंडीच्या वरील बाजूस असलेल्या गजापूरातून विशाळगडावर जायला भरपूर सोप्या वाटा आहेत. अर्थात खिंडीतून उतरून गेले तर कदाचित अंतराच्या दृष्टीने कमी वेळात विशाळगडावर पोहोचता यावे पण हा मार्ग काट्याकुट्यांनी, दगडधोंड्यांनी आणि खाचखळग्यांनी भरलेला आहे. बाजीप्रभूंनी खिंडीचा वरचा भाग हा रोखून धरला असावा. अर्थात हा फक्त अंदाज. पुरावा कुठलाच नाही. पावनखिंडीची छायाचित्रे येथे पहा. a a a a a

In reply to by प्रचेतस

>>>>खिंडीच्या वरील बाजूस असलेल्या गजापूरातून विशाळगडावर जायला भरपूर सोप्या वाटा आहेत. मला वाटतं त्या वाटा सोप्या असल्याकारणानेच टाळल्या असाव्यात. शत्रू सैन्याला चुकवित मार्गक्रमणा करताना सर्वसाधारणपणे शत्रू ज्या वाटांवर अपेक्षेने शोध घेईल त्या वाटा टाळून 'छे: त्या रस्त्याने कोणी जाऊच शकत नाही' अशा वाटांचाच विचार केला गेला असावा. सिंहगडावर चढाई करतानाही जिथून शत्रूसैन्य येण्याची शक्यता नाही अशा भ्रमात राहीलेल्या गडकर्‍यांवर महाराजांच्या सैन्याने त्या अशक्य कड्यावरूनच चढाई करून गड हस्तगत केला. शाहिस्तेखानाचा 'कात्रज' करणे, सूरतेची लूट अवघड वाटांनी महाराष्ट्रात आणणे अश्या अनेक क्लुप्त्या महाराजांनी वापरल्याचे इतिहासात (अर्थात कादंबर्‍यांमधून) वाचावयास मिळते. हा गनिमी काव्याचाच भाग असावा. त्यामुळे पावनखिंडीतून महाराज गेले असावेत ह्या विचारांना पाठबळ मिळते. शिवाय काट्याकुट्यांचे भय आपल्यासारख्या शहरी लोकांना वाटते. आजही अनेक आदिवासी लोकं डोंगर दर्‍यातून, जिथे आपले पाय लटपटतात, अनवाणी, बिनधास्त आणि भरभर चालताना दिसतात. महाराजांच्या पथकात, नेहमीच असे अवघड पण सुरक्षित आणि कमी अंतराच्या वाटांचे माहितगार असायचे असे वाटते आहे. प्रतापगडाखालील जावळीतील शत्रूसैन्याची कत्तल, लाडाचे कारंजेवरून आणलेली लूट, सुरतेची लुट आणि देशावरून तळकोकणात उतरायच्या अवघड वाटा अशी अनेक वर्णने इतिहासात येतात. पावनखिंड मीही पाहीली आहे. भयानकच आहे ती. आपली सर्व छायाचित्रे खिंडीची भव्यता, रौद्रता दर्शविणारी अत्यंत बोलकी आहेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रचेतस 17/07/2014 - 17:28
नक्की काहीच सांगता येत नाही अर्थात सभासद बखर आणि इतर ठिकाणी खिंड थोपवून धरल्याचे उल्लेख आहेत. महाराजांवरील आणिक एक संकट म्हणजे त्यावेळी विशाळगडावरही जसवंतरावाने मोर्चे लावून ठेविले होते. तस्मात जसवंतरावाचे मोर्चे ध्वस्त करूनच विशाळगडावर पोहोचणे जरूर होते. एकूणातच 'पन्हाळ्यावरून सुटका' किंबहुना महाराजांचे सर्व चरित्रच अतिशय अद्भूत आहे.

In reply to by यशोधरा

आनंद, भारावलेपण आणि विशाद ह्या तिनही भावना मनात निर्माण होतात. आनंद अशासाठी की आपल्याला आपल्या आयुष्यात पावनखिंडीसारख्या ऐतिहासिक मैलाच्या दगडापाशी पोहोचण्याचे भाग्य लाभले. अवर्णनिय भारावलेपण. महाराजांचा इतिहास, बाजी प्रभू आणि त्यांच्या साथी मावळ्यांची पराकोटीची स्वामीनिष्ठा, ते वेड, ती स्वराज्यासाठीची जाणूनबुजून दिलेली आत्माहुती आपल्याला भारून टाकते. विशाद अशा साठी की पावनखिंडीसारख्या मराठ्यांच्या महापराक्रमाची साक्षीदार खोडखिंड पावन झाली पण सरकारकडून दुर्लक्षित राहिली आहे. धड नामफलक नाही, आत उतरायच्या शिड्यांची अवस्था दयनिय आहे इतिहास सांगणारा फलक नाही, बाजीप्रभूंचा पुतळा किंवा मावळ्यांना वाहिलेली आदरांजली नाही. वाईट वाटतं एव्हढ्या महत्वाच्या स्थळाची दुरावस्था पाहून.

In reply to by प्रभाकर पेठकर

@पेठकरकाका.....पावनखिंडीत तर आता बरेच मोठे दगडी बांधकाम झालेले आहे. तिथवर जायला पायर्‍या केल्या आहेत.वरच्या बाजुला मोठे स्मारक ..शिवाय खालती एक शेड त्यात सर्व माहीती आणि एक ढाल तलवार वगैरे दिसले मी तिथे रात्री पोचलो त्यामुळे दाट अंधारात फोटो काढायला जमले नाही.पण वल्लीने दिलेले फोटो खासच.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

>>>>पावनखिंडीत तर आता बरेच मोठे दगडी बांधकाम झालेले आहे. पावनखिंडीच्या भयप्रद रुपाला सौम्य करणारे नसेल अशी आशा करतो. कारण पावनखिंड ही आहे तशीच नैसर्गिक राहावी तरच बाजीप्रभूंच्या आणि त्यांच्या सहकारी मावळ्यांच्या साहसाचे महत्व आणि तो रणसंग्राम डोळ्यासमोर उभा राहतो. >>>>तिथवर जायला पायर्‍या केल्या आहेत. मी वरच्या बाजूने गेलो होतो. खिंडीत उतरलो नाही. एकतर माझे वजन जास्त (तरी बाजीप्रभूंचा पन्हाळ्यावरील पुतळा पाहता त्यांच्यापेक्षा कमीच असेल), शिवाय पावसाळ्यामुळे दगड निसरडे झाले होते आणि शिडी लटपटत होती. खिंडीच्या दुसर्‍या बाजूला (खालच्या बाजूला) गेलेलो नाही. आता पुढच्या भेटीत जाईन. पायर्‍या करायला नकोत असे वाटते. >>>>वरच्या बाजुला मोठे स्मारक .. हे मी गेलो होतो तेंव्हा नव्हते. फक्त एक ढाल-तलवार होती टांगलेली. >>>>शिवाय खालती एक शेड त्यात सर्व माहीती आणि एक ढाल तलवार वगैरे दिसले हे पुढच्या वेळी पाहिनच. सरकारने पावनखिंडी बाबत रस घेतला असेल तर कौतुकास्पदच आहे. असेच सर्व गड किल्ले डागडुजी करून पर्यटन (तिकिट लावून) स्थळे बनवावित.

In reply to by प्रभाकर पेठकर

कपिलमुनी 17/07/2014 - 13:31
असेच सर्व गड किल्ले डागडुजी करून पर्यटन (तिकिट लावून) स्थळे बनवावित.
आपल्याकडे वाट लावतात हो किल्ल्यांची.. नको नको ते घडत असता मग अशा ठिकाणी.. सध्या राजमाची लाच बघा ..

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रचेतस 17/07/2014 - 17:24
पायर्‍या फक्त खिंडीपर्यंत जाणार्‍या उतारावरच आहेत जिथे ढाल तलवार आहे तिथपर्यंत. तिहून खिंडीत उतरायला आजही त्याच जुन्या, निरुंद आणि डुगडुगणार्‍या शिड्या आहेत. पण पावनखिंड भयप्रद अशी वाटली नाही. अर्थात दुर्गम जरूर आहे.

In reply to by प्रचेतस

सहा हजारांचं शत्रूसैन्य अंगावर घेण्यासाठी भयप्रद. दुर्गम तर आहेच. कदाचित हेच मुद्दे बाजीप्रभूंना सोयीचे वाटले असतील. त्या माणसाची देहयष्टी आणि चेहर्‍यावरील करारी निर्धार पाहता (आणि अर्थात सामरिक चातुर्य) त्यांच्यासाठी घोडखिंड अवघड नसेलही.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रचेतस 17/07/2014 - 17:34
हो. ते आहेच. अवघी मोजकी माणसं खचितच खिंड बराच काळ लढवून ठेवू शकतात. एकदा खिंडीत उतरल्यावर परत बाहेर जाणे अति कठीण. खिंड अधिकाधिक खोल खोल होत जाते. त्यात मध्ये मध्ये पाण्याचे डोह.

पावनखिंडीचा ट्रेक, नुसत्या कल्पनेनेच रोमांच येतात.. तुमचा ट्रेक छान झालेला दिसतोय.. स्वाती

झकासराव 17/07/2014 - 11:15
सुरेख!!! :) मसाई देवीच्या मंदिराची डागडुजी झालेली दिसतेय. तिथलं झाड तोडलं वाटतं. :(

In reply to by बॅटमॅन

कसली जिद्द राव...माझी आई म्हणते पावनखिंडीत बाजीप्रभू लढले आणि आमचे वीर रडले :) बाकी तुकडे गोळा करणे अजुन चालु आहे.

In reply to by बॅटमॅन

बाबा पाटील 18/07/2014 - 20:26
तीन वर्षापुर्वी राजगड ट्रेक भर पावसात ३ वर्षाच्या लेकीला पाठिला बांधुन केला होता,पायाचे गोळे तर मी मी म्ह्णत होते पण तिला बांधलेला बेल्टने पाठिची सोलवटलेली कातडी प्रचंड आग करत होती भर पावसात घाम कसा येतो याचा लय भारी अनुभव घेतला होता.आणी विषेश म्हणजे चढताना आणी उतरताना एकदाही घसरगुंडी झाली नव्हती,लहानपणी डोंगरावर बोंबलत फिरल्याचा फायदा पहिल्यांदाच झाला.

धमाल मुलगा 17/07/2014 - 14:58
लै भारी ट्रेक आहे राव ह्यो. त्यात आणि एका दिवसात उरकायचा म्हणजे ब्येक्कारच. खिंडीपर्यंत पोहोचलात हेच खूप. त्याबद्दल अभिनंदन. :) आम्ही २०१०च्या जुलैमध्ये गेलो होतो. पावनखिंडीच्या लढाईला ३५० वर्षे झाल्याचा मुहुर्त साधून. रात्री ९:५० ला बाजींच्या पुतळ्यापासून सुरुवात करुन पुढे राजदिंडीतून खाली उतरायचं. हेऽऽ रपारपा पाऊस, काळामिट्ट अंधार अन आम्ही साठसत्तर टाळकी, महाराजांची मुर्ती पालखीत घेऊन निघालो होतो. राजदिंडीच्या तोंडाशीच पुढचा उतार अन अंधार्+पाऊस+चिखल पाहून काहीजण मागे फिरले. उरलेले पडत धडपडत पुढे गेलो. कसंबसं पहाटे चारएक वाजेपर्यंत चाललो, पण नडगीपर्यंतचा चिखल, मरणाचा पाऊस, सोलवटलेले पाय असल्या सगळ्या भानगडीत आमची आठजणांची टीम जायबंदी झाली. सालं आयुष्यात पहिल्यांदाच 'जांघेतही गोळे येऊ शकतात' हे कळालं ते त्याच रात्री.,म्हसवडेच्या अलिकडं कुठेतरी थांबलो अन तिथून उलटं चालत आंबवड्याकडं गेलो. तिथून गाडीनं खिंडीपर्यंत. लाज वाटली होती लाज स्वत:ची. हे असं अर्ध्यातून सोडून आल्याबद्दल. ते असो. हे असलं अवघड प्रकरण तुम्ही पार पाडलंत त्याबद्दल कौतुक वाटतं. पुन्हा एकदा अभिनंदन!! :)

In reply to by धमाल मुलगा

अरे धमाल मुला, शहरात राहून 'सुख लोलुप झाली काया' अशी आपणा सर्वांचीच कथा आणि व्यथा आहे. तरीपण मनांत महाराजांबद्दल असणारा आदर, मावळ्यांच्या धाडसाचं आणि स्वामीनिष्ठेचं कौतुक आपल्यालाही अशा धाडसाला प्रवृत्त करतं. तुला जेवढं जमलं तेवढंही कौतुकास्पद आहे. मी प्रयत्न केला तर माझी अवस्था अजून बिकट होईल असा अंदाज आहे.

हे प्रकरणच अवघड आहे .त्यात तुम्हाला पाउस आणि चिखल जास्तच लागलेला दिस्तोय.त्यामुळे अशी हालत झाली हे समजु शकतो. सुदैवाने(की दुर्दैवाने) ह्या वर्षी पावसाने ओढ दिली असल्याने नडगीएव्हढा पाय रुतेपर्यंत चिखल मलातरी कुठे लागला नाही.कदाचित म्हणुनच ट्रेक पुर्ण करु शकलो. :)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

धमाल मुलगा 17/07/2014 - 17:54
२०१० साली पन्हाळ्यात पावसानं लैच्च ऊत घातला होता. ट्रेकदिवशी संध्याकाळी एकेक बातम्या येत होत्या, अमुक ओढा भरुन गेला, तमुक ओढ्याला बेकार ओढ आहे, अमुक रस्ता पाण्यानं बंद झाला वगैरे. चिखल नव्हता म्हणजे खूपच चांगली अवस्था.

तिमा 17/07/2014 - 17:17
ट्रेकर्स ची दोन स्वप्ने असतात. सह्याद्रीत पन्हाळगड ते विशाळगड आणि हिमालयात मानससरोवर व कैलाश प्रदक्षिणा! माझी दोन्हीही कधी पूर्ण झाली नाहीत. तुमचा अचाट पराक्रम बघून कौतुक वाटले आणि साटम सरांविषयी आदर वाटला. अजून येऊ द्यात असे अनुभव!

राजगड-तोरणा आणि पन्हाळगड-विशाळगड पदभ्रमण ही माझी ट्रेकिंगमधली दोन स्वप्ने पुर्ण झाली आहेत. आता पुढे गिरनार आणि अर्थातच पैसे जमल्यावर कैलास-मानस...बघुया कधी योग येतोय ते

किसन शिंदे 17/07/2014 - 21:11
जबरदस्त!! मी करू शकेन का हा ट्रेक? ब्रम्हगिरीच्या प्रदक्षिणेसाठी ३५ ते ४० किमी चाललोय मी चढउतार, खाचखळग्यातून.

In reply to by किसन शिंदे

का नाही करु शकणार? ४-५ जणांचा ग्रुप असेल आणि थोडे दिवस आधीपसुन जॉगिंग वगैरे सुरु केले तर नक्की जमेल. तुम्हाला माझ्या शुभेच्छा *good*

प्यारे१ 18/07/2014 - 03:07
वाचून एकदम गोंधळ उडालाय. नेमकं शब्दात व्यक्त केलंय पेठकर काकांनी! बाकी वर्तमान स्थिती पाहता ह्या सगळ्या महापुरुषांनी नेमकं कशासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं हा प्रश्न पडतोय. आमच्या जमिनी आम्ही स्वतःच विकतो नि नंतर तिथं वॉचमन म्हणून राहतो. स्व घालवला नि राज्य आपसुक गेलं. :(

पन्हाळ गड - विशाल गड मोहीम या वर्षी करायचा बेत होता.... पण तुमचा लेख वाचून पुढच्या वर्षी एका दिवसात करायची सुरसुरी चढलीये. पुढच्या वर्षी रविवार आहे १२ जुलैला. त्यामुळे आयती सुट्टी पण आहे. फक्त साटम काकांचा नंबर दिलात तर पुढच्या वर्षीची हाजरी लावून ठेवतो......

आंतरजालावर आताच माहिती मिळाली. EVENT DETAILS PANHALGAD- PAVANKHIND- VISHALGAD, 11TH-12TH JULY 2015 पन्हाळगड ते विशाळगड एकदिवसीय पदभ्रमण मोहीम ! वर्ष - ८ वे. पहाटेचे ५ वाजले होते . मलकापूरच्या दिशेला असलेल्या सिद्धी जोहरच्या छावणीत शिवरायांच्या वेशात असणाऱ्या शिवा काशिदांच्या शरीराच्या चिरफळ्या उडाल्या होत्या . त्याला कारणही तसेच होतेना! शिवाजी राजे पन्हाळ गडावरून निसटले होते . कित्येक दिवस करकचून आवळलेल्या वेद्यातून अलगद निघून गेले होते . सिद्धी जोहरच्या पायाची आग मस्तकात गेली होती . नामुष्की , नाचक्की झाली होती . कोणत्या तोंडाने तो आता विजापूरच्या दरबाराला सामोरे जाणार होता ? सिद्धीने कंबर कसली . राजांचा पाठलाग सुरु केला . राजे आपल्या निवडक बांदल बांधवांसह पायी विशाळगडाची वाट तुडवत निघाले होते . पहाटेचे ८ वाजले होते . गनीम पाठलागावर आहे याची जाणीव राजांना व बाजी प्रभू देशपांड्याना झाली शत्रू कधीही समोर उभा ठाकू शकत होता . वेळ खूप थोडा होता . गनिमास रोखणे जरुरीचे होते . बाजींनी राजांस सावध केले ." लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे . राजे तुम्ही पुढे व्हा, आम्ही हि खिंड लढवतो . गनिमास खिंड चढो देत नाही . मात्र विशाल गडावर पोहचतास भांड्यांचे आवाज काढा . जो पर्यंत माझा राजा गडावर सुखरूप पोहचत नाही तोपर्यंत आम्ही हि खिंड भांडवितो . मुजरा राजे मुजरा ! आणि मग तो देवांनाही हेवा वाटावा असा समर प्रसंग गजापुर् च्या खिंडीत घडला . बाजी आणि त्यांच्या निवडक मावळ्यांच्या रुधीराने खिंड न्हावून निघाली , पावन झाली . ३५५ वर्षे होत आहेत या गोष्टीला . म्हणूनच जिजाऊ प्रतिष्ठान सलग आठव्या वर्षी पन्हाळगड ते विशाळगड हा एकदिवशीय ट्रेक आयोजित करीत आहे . तारीख आहे ११ जुलै २०१५ . नाव नोंदणी साठी संपर्क ९८१९०२८०१२ . कृपया फेसबुक वर नोंदणी करू नये . फोन वर संपर्क साधावा हि विनंती. अदमासे खर्च - रु. १८०० / - अदमासे अंतर - ५७ कि मी. प्रस्थान - शुक्रवार दि. १० - ७ - २०१५, साय. ५ वा. मुंबईहून पदभ्रमण - शनिवार दि. ११ - ७- २०१५, पहाटे ४ वा. पासून......... आगमन - रविवार दि. १२ - ७ - २०१५, दुपारी २ वा. मुंबईत.

vikramaditya 16/07/2014 - 20:35
छान वर्णन आहे. एवढे अंतर चालण्यापुर्वी थोडा सराव केला तर ट्रेकचा आनंद जास्त मिळेल. अन्यथा दमछाक झाल्याने त्रास होतो.

सही..!! सुरुवातीचे ढगाळलेले आणि मग क्लियर होत गेलेले फोटो खुपच आवडले. मला एकदम बर्‍याच वर्षांपुर्वी केलेला भिमाशंकर ते नाणेघाट हा ४ दिवसांचा पावसाळी ट्रेक आठवला.

प्रचेतस 16/07/2014 - 21:23
मस्तच. बाकी पावनखिंडीचे स्थान बघता राजे खिंडीतून गेले असावेत असे वाटत नाही. पन्हाळ्यावरून येताना खिंडीतून चढावे नाही तर उतरावे लागते. खिंडीच्या वरील बाजूस असलेल्या गजापूरातून विशाळगडावर जायला भरपूर सोप्या वाटा आहेत. अर्थात खिंडीतून उतरून गेले तर कदाचित अंतराच्या दृष्टीने कमी वेळात विशाळगडावर पोहोचता यावे पण हा मार्ग काट्याकुट्यांनी, दगडधोंड्यांनी आणि खाचखळग्यांनी भरलेला आहे. बाजीप्रभूंनी खिंडीचा वरचा भाग हा रोखून धरला असावा. अर्थात हा फक्त अंदाज. पुरावा कुठलाच नाही. पावनखिंडीची छायाचित्रे येथे पहा. a a a a a

In reply to by प्रचेतस

>>>>खिंडीच्या वरील बाजूस असलेल्या गजापूरातून विशाळगडावर जायला भरपूर सोप्या वाटा आहेत. मला वाटतं त्या वाटा सोप्या असल्याकारणानेच टाळल्या असाव्यात. शत्रू सैन्याला चुकवित मार्गक्रमणा करताना सर्वसाधारणपणे शत्रू ज्या वाटांवर अपेक्षेने शोध घेईल त्या वाटा टाळून 'छे: त्या रस्त्याने कोणी जाऊच शकत नाही' अशा वाटांचाच विचार केला गेला असावा. सिंहगडावर चढाई करतानाही जिथून शत्रूसैन्य येण्याची शक्यता नाही अशा भ्रमात राहीलेल्या गडकर्‍यांवर महाराजांच्या सैन्याने त्या अशक्य कड्यावरूनच चढाई करून गड हस्तगत केला. शाहिस्तेखानाचा 'कात्रज' करणे, सूरतेची लूट अवघड वाटांनी महाराष्ट्रात आणणे अश्या अनेक क्लुप्त्या महाराजांनी वापरल्याचे इतिहासात (अर्थात कादंबर्‍यांमधून) वाचावयास मिळते. हा गनिमी काव्याचाच भाग असावा. त्यामुळे पावनखिंडीतून महाराज गेले असावेत ह्या विचारांना पाठबळ मिळते. शिवाय काट्याकुट्यांचे भय आपल्यासारख्या शहरी लोकांना वाटते. आजही अनेक आदिवासी लोकं डोंगर दर्‍यातून, जिथे आपले पाय लटपटतात, अनवाणी, बिनधास्त आणि भरभर चालताना दिसतात. महाराजांच्या पथकात, नेहमीच असे अवघड पण सुरक्षित आणि कमी अंतराच्या वाटांचे माहितगार असायचे असे वाटते आहे. प्रतापगडाखालील जावळीतील शत्रूसैन्याची कत्तल, लाडाचे कारंजेवरून आणलेली लूट, सुरतेची लुट आणि देशावरून तळकोकणात उतरायच्या अवघड वाटा अशी अनेक वर्णने इतिहासात येतात. पावनखिंड मीही पाहीली आहे. भयानकच आहे ती. आपली सर्व छायाचित्रे खिंडीची भव्यता, रौद्रता दर्शविणारी अत्यंत बोलकी आहेत.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रचेतस 17/07/2014 - 17:28
नक्की काहीच सांगता येत नाही अर्थात सभासद बखर आणि इतर ठिकाणी खिंड थोपवून धरल्याचे उल्लेख आहेत. महाराजांवरील आणिक एक संकट म्हणजे त्यावेळी विशाळगडावरही जसवंतरावाने मोर्चे लावून ठेविले होते. तस्मात जसवंतरावाचे मोर्चे ध्वस्त करूनच विशाळगडावर पोहोचणे जरूर होते. एकूणातच 'पन्हाळ्यावरून सुटका' किंबहुना महाराजांचे सर्व चरित्रच अतिशय अद्भूत आहे.

In reply to by यशोधरा

आनंद, भारावलेपण आणि विशाद ह्या तिनही भावना मनात निर्माण होतात. आनंद अशासाठी की आपल्याला आपल्या आयुष्यात पावनखिंडीसारख्या ऐतिहासिक मैलाच्या दगडापाशी पोहोचण्याचे भाग्य लाभले. अवर्णनिय भारावलेपण. महाराजांचा इतिहास, बाजी प्रभू आणि त्यांच्या साथी मावळ्यांची पराकोटीची स्वामीनिष्ठा, ते वेड, ती स्वराज्यासाठीची जाणूनबुजून दिलेली आत्माहुती आपल्याला भारून टाकते. विशाद अशा साठी की पावनखिंडीसारख्या मराठ्यांच्या महापराक्रमाची साक्षीदार खोडखिंड पावन झाली पण सरकारकडून दुर्लक्षित राहिली आहे. धड नामफलक नाही, आत उतरायच्या शिड्यांची अवस्था दयनिय आहे इतिहास सांगणारा फलक नाही, बाजीप्रभूंचा पुतळा किंवा मावळ्यांना वाहिलेली आदरांजली नाही. वाईट वाटतं एव्हढ्या महत्वाच्या स्थळाची दुरावस्था पाहून.

In reply to by प्रभाकर पेठकर

@पेठकरकाका.....पावनखिंडीत तर आता बरेच मोठे दगडी बांधकाम झालेले आहे. तिथवर जायला पायर्‍या केल्या आहेत.वरच्या बाजुला मोठे स्मारक ..शिवाय खालती एक शेड त्यात सर्व माहीती आणि एक ढाल तलवार वगैरे दिसले मी तिथे रात्री पोचलो त्यामुळे दाट अंधारात फोटो काढायला जमले नाही.पण वल्लीने दिलेले फोटो खासच.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

>>>>पावनखिंडीत तर आता बरेच मोठे दगडी बांधकाम झालेले आहे. पावनखिंडीच्या भयप्रद रुपाला सौम्य करणारे नसेल अशी आशा करतो. कारण पावनखिंड ही आहे तशीच नैसर्गिक राहावी तरच बाजीप्रभूंच्या आणि त्यांच्या सहकारी मावळ्यांच्या साहसाचे महत्व आणि तो रणसंग्राम डोळ्यासमोर उभा राहतो. >>>>तिथवर जायला पायर्‍या केल्या आहेत. मी वरच्या बाजूने गेलो होतो. खिंडीत उतरलो नाही. एकतर माझे वजन जास्त (तरी बाजीप्रभूंचा पन्हाळ्यावरील पुतळा पाहता त्यांच्यापेक्षा कमीच असेल), शिवाय पावसाळ्यामुळे दगड निसरडे झाले होते आणि शिडी लटपटत होती. खिंडीच्या दुसर्‍या बाजूला (खालच्या बाजूला) गेलेलो नाही. आता पुढच्या भेटीत जाईन. पायर्‍या करायला नकोत असे वाटते. >>>>वरच्या बाजुला मोठे स्मारक .. हे मी गेलो होतो तेंव्हा नव्हते. फक्त एक ढाल-तलवार होती टांगलेली. >>>>शिवाय खालती एक शेड त्यात सर्व माहीती आणि एक ढाल तलवार वगैरे दिसले हे पुढच्या वेळी पाहिनच. सरकारने पावनखिंडी बाबत रस घेतला असेल तर कौतुकास्पदच आहे. असेच सर्व गड किल्ले डागडुजी करून पर्यटन (तिकिट लावून) स्थळे बनवावित.

In reply to by प्रभाकर पेठकर

कपिलमुनी 17/07/2014 - 13:31
असेच सर्व गड किल्ले डागडुजी करून पर्यटन (तिकिट लावून) स्थळे बनवावित.
आपल्याकडे वाट लावतात हो किल्ल्यांची.. नको नको ते घडत असता मग अशा ठिकाणी.. सध्या राजमाची लाच बघा ..

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रचेतस 17/07/2014 - 17:24
पायर्‍या फक्त खिंडीपर्यंत जाणार्‍या उतारावरच आहेत जिथे ढाल तलवार आहे तिथपर्यंत. तिहून खिंडीत उतरायला आजही त्याच जुन्या, निरुंद आणि डुगडुगणार्‍या शिड्या आहेत. पण पावनखिंड भयप्रद अशी वाटली नाही. अर्थात दुर्गम जरूर आहे.

In reply to by प्रचेतस

सहा हजारांचं शत्रूसैन्य अंगावर घेण्यासाठी भयप्रद. दुर्गम तर आहेच. कदाचित हेच मुद्दे बाजीप्रभूंना सोयीचे वाटले असतील. त्या माणसाची देहयष्टी आणि चेहर्‍यावरील करारी निर्धार पाहता (आणि अर्थात सामरिक चातुर्य) त्यांच्यासाठी घोडखिंड अवघड नसेलही.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रचेतस 17/07/2014 - 17:34
हो. ते आहेच. अवघी मोजकी माणसं खचितच खिंड बराच काळ लढवून ठेवू शकतात. एकदा खिंडीत उतरल्यावर परत बाहेर जाणे अति कठीण. खिंड अधिकाधिक खोल खोल होत जाते. त्यात मध्ये मध्ये पाण्याचे डोह.

पावनखिंडीचा ट्रेक, नुसत्या कल्पनेनेच रोमांच येतात.. तुमचा ट्रेक छान झालेला दिसतोय.. स्वाती

झकासराव 17/07/2014 - 11:15
सुरेख!!! :) मसाई देवीच्या मंदिराची डागडुजी झालेली दिसतेय. तिथलं झाड तोडलं वाटतं. :(

In reply to by बॅटमॅन

कसली जिद्द राव...माझी आई म्हणते पावनखिंडीत बाजीप्रभू लढले आणि आमचे वीर रडले :) बाकी तुकडे गोळा करणे अजुन चालु आहे.

In reply to by बॅटमॅन

बाबा पाटील 18/07/2014 - 20:26
तीन वर्षापुर्वी राजगड ट्रेक भर पावसात ३ वर्षाच्या लेकीला पाठिला बांधुन केला होता,पायाचे गोळे तर मी मी म्ह्णत होते पण तिला बांधलेला बेल्टने पाठिची सोलवटलेली कातडी प्रचंड आग करत होती भर पावसात घाम कसा येतो याचा लय भारी अनुभव घेतला होता.आणी विषेश म्हणजे चढताना आणी उतरताना एकदाही घसरगुंडी झाली नव्हती,लहानपणी डोंगरावर बोंबलत फिरल्याचा फायदा पहिल्यांदाच झाला.

धमाल मुलगा 17/07/2014 - 14:58
लै भारी ट्रेक आहे राव ह्यो. त्यात आणि एका दिवसात उरकायचा म्हणजे ब्येक्कारच. खिंडीपर्यंत पोहोचलात हेच खूप. त्याबद्दल अभिनंदन. :) आम्ही २०१०च्या जुलैमध्ये गेलो होतो. पावनखिंडीच्या लढाईला ३५० वर्षे झाल्याचा मुहुर्त साधून. रात्री ९:५० ला बाजींच्या पुतळ्यापासून सुरुवात करुन पुढे राजदिंडीतून खाली उतरायचं. हेऽऽ रपारपा पाऊस, काळामिट्ट अंधार अन आम्ही साठसत्तर टाळकी, महाराजांची मुर्ती पालखीत घेऊन निघालो होतो. राजदिंडीच्या तोंडाशीच पुढचा उतार अन अंधार्+पाऊस+चिखल पाहून काहीजण मागे फिरले. उरलेले पडत धडपडत पुढे गेलो. कसंबसं पहाटे चारएक वाजेपर्यंत चाललो, पण नडगीपर्यंतचा चिखल, मरणाचा पाऊस, सोलवटलेले पाय असल्या सगळ्या भानगडीत आमची आठजणांची टीम जायबंदी झाली. सालं आयुष्यात पहिल्यांदाच 'जांघेतही गोळे येऊ शकतात' हे कळालं ते त्याच रात्री.,म्हसवडेच्या अलिकडं कुठेतरी थांबलो अन तिथून उलटं चालत आंबवड्याकडं गेलो. तिथून गाडीनं खिंडीपर्यंत. लाज वाटली होती लाज स्वत:ची. हे असं अर्ध्यातून सोडून आल्याबद्दल. ते असो. हे असलं अवघड प्रकरण तुम्ही पार पाडलंत त्याबद्दल कौतुक वाटतं. पुन्हा एकदा अभिनंदन!! :)

In reply to by धमाल मुलगा

अरे धमाल मुला, शहरात राहून 'सुख लोलुप झाली काया' अशी आपणा सर्वांचीच कथा आणि व्यथा आहे. तरीपण मनांत महाराजांबद्दल असणारा आदर, मावळ्यांच्या धाडसाचं आणि स्वामीनिष्ठेचं कौतुक आपल्यालाही अशा धाडसाला प्रवृत्त करतं. तुला जेवढं जमलं तेवढंही कौतुकास्पद आहे. मी प्रयत्न केला तर माझी अवस्था अजून बिकट होईल असा अंदाज आहे.

हे प्रकरणच अवघड आहे .त्यात तुम्हाला पाउस आणि चिखल जास्तच लागलेला दिस्तोय.त्यामुळे अशी हालत झाली हे समजु शकतो. सुदैवाने(की दुर्दैवाने) ह्या वर्षी पावसाने ओढ दिली असल्याने नडगीएव्हढा पाय रुतेपर्यंत चिखल मलातरी कुठे लागला नाही.कदाचित म्हणुनच ट्रेक पुर्ण करु शकलो. :)

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

धमाल मुलगा 17/07/2014 - 17:54
२०१० साली पन्हाळ्यात पावसानं लैच्च ऊत घातला होता. ट्रेकदिवशी संध्याकाळी एकेक बातम्या येत होत्या, अमुक ओढा भरुन गेला, तमुक ओढ्याला बेकार ओढ आहे, अमुक रस्ता पाण्यानं बंद झाला वगैरे. चिखल नव्हता म्हणजे खूपच चांगली अवस्था.

तिमा 17/07/2014 - 17:17
ट्रेकर्स ची दोन स्वप्ने असतात. सह्याद्रीत पन्हाळगड ते विशाळगड आणि हिमालयात मानससरोवर व कैलाश प्रदक्षिणा! माझी दोन्हीही कधी पूर्ण झाली नाहीत. तुमचा अचाट पराक्रम बघून कौतुक वाटले आणि साटम सरांविषयी आदर वाटला. अजून येऊ द्यात असे अनुभव!

राजगड-तोरणा आणि पन्हाळगड-विशाळगड पदभ्रमण ही माझी ट्रेकिंगमधली दोन स्वप्ने पुर्ण झाली आहेत. आता पुढे गिरनार आणि अर्थातच पैसे जमल्यावर कैलास-मानस...बघुया कधी योग येतोय ते

किसन शिंदे 17/07/2014 - 21:11
जबरदस्त!! मी करू शकेन का हा ट्रेक? ब्रम्हगिरीच्या प्रदक्षिणेसाठी ३५ ते ४० किमी चाललोय मी चढउतार, खाचखळग्यातून.

In reply to by किसन शिंदे

का नाही करु शकणार? ४-५ जणांचा ग्रुप असेल आणि थोडे दिवस आधीपसुन जॉगिंग वगैरे सुरु केले तर नक्की जमेल. तुम्हाला माझ्या शुभेच्छा *good*

प्यारे१ 18/07/2014 - 03:07
वाचून एकदम गोंधळ उडालाय. नेमकं शब्दात व्यक्त केलंय पेठकर काकांनी! बाकी वर्तमान स्थिती पाहता ह्या सगळ्या महापुरुषांनी नेमकं कशासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं हा प्रश्न पडतोय. आमच्या जमिनी आम्ही स्वतःच विकतो नि नंतर तिथं वॉचमन म्हणून राहतो. स्व घालवला नि राज्य आपसुक गेलं. :(

पन्हाळ गड - विशाल गड मोहीम या वर्षी करायचा बेत होता.... पण तुमचा लेख वाचून पुढच्या वर्षी एका दिवसात करायची सुरसुरी चढलीये. पुढच्या वर्षी रविवार आहे १२ जुलैला. त्यामुळे आयती सुट्टी पण आहे. फक्त साटम काकांचा नंबर दिलात तर पुढच्या वर्षीची हाजरी लावून ठेवतो......

आंतरजालावर आताच माहिती मिळाली. EVENT DETAILS PANHALGAD- PAVANKHIND- VISHALGAD, 11TH-12TH JULY 2015 पन्हाळगड ते विशाळगड एकदिवसीय पदभ्रमण मोहीम ! वर्ष - ८ वे. पहाटेचे ५ वाजले होते . मलकापूरच्या दिशेला असलेल्या सिद्धी जोहरच्या छावणीत शिवरायांच्या वेशात असणाऱ्या शिवा काशिदांच्या शरीराच्या चिरफळ्या उडाल्या होत्या . त्याला कारणही तसेच होतेना! शिवाजी राजे पन्हाळ गडावरून निसटले होते . कित्येक दिवस करकचून आवळलेल्या वेद्यातून अलगद निघून गेले होते . सिद्धी जोहरच्या पायाची आग मस्तकात गेली होती . नामुष्की , नाचक्की झाली होती . कोणत्या तोंडाने तो आता विजापूरच्या दरबाराला सामोरे जाणार होता ? सिद्धीने कंबर कसली . राजांचा पाठलाग सुरु केला . राजे आपल्या निवडक बांदल बांधवांसह पायी विशाळगडाची वाट तुडवत निघाले होते . पहाटेचे ८ वाजले होते . गनीम पाठलागावर आहे याची जाणीव राजांना व बाजी प्रभू देशपांड्याना झाली शत्रू कधीही समोर उभा ठाकू शकत होता . वेळ खूप थोडा होता . गनिमास रोखणे जरुरीचे होते . बाजींनी राजांस सावध केले ." लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे . राजे तुम्ही पुढे व्हा, आम्ही हि खिंड लढवतो . गनिमास खिंड चढो देत नाही . मात्र विशाल गडावर पोहचतास भांड्यांचे आवाज काढा . जो पर्यंत माझा राजा गडावर सुखरूप पोहचत नाही तोपर्यंत आम्ही हि खिंड भांडवितो . मुजरा राजे मुजरा ! आणि मग तो देवांनाही हेवा वाटावा असा समर प्रसंग गजापुर् च्या खिंडीत घडला . बाजी आणि त्यांच्या निवडक मावळ्यांच्या रुधीराने खिंड न्हावून निघाली , पावन झाली . ३५५ वर्षे होत आहेत या गोष्टीला . म्हणूनच जिजाऊ प्रतिष्ठान सलग आठव्या वर्षी पन्हाळगड ते विशाळगड हा एकदिवशीय ट्रेक आयोजित करीत आहे . तारीख आहे ११ जुलै २०१५ . नाव नोंदणी साठी संपर्क ९८१९०२८०१२ . कृपया फेसबुक वर नोंदणी करू नये . फोन वर संपर्क साधावा हि विनंती. अदमासे खर्च - रु. १८०० / - अदमासे अंतर - ५७ कि मी. प्रस्थान - शुक्रवार दि. १० - ७ - २०१५, साय. ५ वा. मुंबईहून पदभ्रमण - शनिवार दि. ११ - ७- २०१५, पहाटे ४ वा. पासून......... आगमन - रविवार दि. १२ - ७ - २०१५, दुपारी २ वा. मुंबईत.
मंडळी लेखाच्या शीर्षकात प्रश्नचिन्ह टाकायचे कारण या ट्रेकबद्दल मी ज्या ज्या लोकांशी बोललो होतो त्या सर्वांनी हा ट्रेक करायला किमान दोन दिवस पाहीजेतच असे ठासुन सांगितले होते.त्यामुळे भावाने मला जेव्हा सांगितले की मुंबईचे जिजाउ प्रतिष्ठान हा ट्रेक एका दिवसात करते आणि आजपर्यंत सहा वेळा त्यांनी दर वर्षी हा ट्रेक असाच केलाय तेव्हा मी त्याला वेड्यात काढले. हा ट्रेक "द लाँगेस्ट वन डे इन सह्याद्री" म्हणुन ओळखला जातो.

मॅकीनॉ आयलंड आणि पिक्चर्ड रॉक्स - भाग २

सखी ·

मराठे 16/07/2014 - 20:14
हा भागही छान. रच्याकने: टाक्वामेना फॉल्सचं पाणी तिथे असणार्‍या खनिजांमुळे (मुख्यत्वे करून लोखंड) वेगळं दिसतं, पिच्चर्ड रॉक्सवर दिसणारे रंगसुद्धा त्यामुळेच दिसतात. तिथे जमिनीत आणी तलावात मँगेनीज, लोखंड, कॉपर अशी अनेक खनिज असल्यामुळे दगडांवर जांभळा, तांबडा, हिरवा असे रंग बनतात. मायनर्स कॅसल वर गेला नाही का? तिथून मिळणारा व्ह्यु शब्दातीत आहे.

In reply to by मराठे

सखी 16/07/2014 - 20:22
अनेक खनिज असल्यामुळे दगडांवर जांभळा, तांबडा, हिरवा असे रंग बनतात. - हो खरयं. मायनर्स कॅसल वर गेला नाही का? तिथून मिळणारा व्ह्यु शब्दातीत आहे. - नाही ना, पाऊस खूपच होता त्यादिवशी, आणि दिवसभर वाढण्याचेच चान्सेस होते त्यामुळे थांबुनही उपयोग नव्हता.

ती शटल सही आहे..! आणि मला त्या हत्तीच्या खडकात वर एक चेहेरा पण दिसला.. पहिला भाग पण छान होता. आणि खर तर तो भाग वाचुनच मी पण लिहिण्याचे धाडस केले.

In reply to by स्वप्नांची राणी

सखी 16/07/2014 - 21:16
हो गं स्वरा - शटल एकदम एन्जॉय केली. आणि हत्तीच्या फोटोबद्द्ल मी आधी लिहलेलं खोडलं म्हटलं सगळ्यांना तो चेहरा दिसेल की नाही, जवळुन माकडासारखा वाटला. आणि खालुन चौथ्या फोटोत मगर पाणी प्यायला आलीय असं वाटतं होतं.

सखी 17/07/2014 - 17:05
धन्यवाद मंडळी - मधुरा, मराठे, यशो, स्वरा, वल्ली, मुवि, स्वाती, रेवती, खटपट्या, एक्कासाहेब, राजेंद्र मेहेंदळे. स्वरा: खर तर तो भाग वाचुनच मी पण लिहिण्याचे धाडस केले. - क्या बात है! मस्तच लिहील आहेस, तिथे प्रतिसाद दिलाच आहे. वल्ली आणि रेवती: तुम्हाला पॅनारामिक फोटो आवडल्याचे वाचुन बरे वाटले. राजेंद्र मेहेंदळे: मिल्वॉकीहुन फार दूर नसावे, कारने जाण्यासारखेच असावे, कारण मिल्वॉकी मिशिगनच्या तिस-या लेकच्या पल्याडच आहे.

मराठे 16/07/2014 - 20:14
हा भागही छान. रच्याकने: टाक्वामेना फॉल्सचं पाणी तिथे असणार्‍या खनिजांमुळे (मुख्यत्वे करून लोखंड) वेगळं दिसतं, पिच्चर्ड रॉक्सवर दिसणारे रंगसुद्धा त्यामुळेच दिसतात. तिथे जमिनीत आणी तलावात मँगेनीज, लोखंड, कॉपर अशी अनेक खनिज असल्यामुळे दगडांवर जांभळा, तांबडा, हिरवा असे रंग बनतात. मायनर्स कॅसल वर गेला नाही का? तिथून मिळणारा व्ह्यु शब्दातीत आहे.

In reply to by मराठे

सखी 16/07/2014 - 20:22
अनेक खनिज असल्यामुळे दगडांवर जांभळा, तांबडा, हिरवा असे रंग बनतात. - हो खरयं. मायनर्स कॅसल वर गेला नाही का? तिथून मिळणारा व्ह्यु शब्दातीत आहे. - नाही ना, पाऊस खूपच होता त्यादिवशी, आणि दिवसभर वाढण्याचेच चान्सेस होते त्यामुळे थांबुनही उपयोग नव्हता.

ती शटल सही आहे..! आणि मला त्या हत्तीच्या खडकात वर एक चेहेरा पण दिसला.. पहिला भाग पण छान होता. आणि खर तर तो भाग वाचुनच मी पण लिहिण्याचे धाडस केले.

In reply to by स्वप्नांची राणी

सखी 16/07/2014 - 21:16
हो गं स्वरा - शटल एकदम एन्जॉय केली. आणि हत्तीच्या फोटोबद्द्ल मी आधी लिहलेलं खोडलं म्हटलं सगळ्यांना तो चेहरा दिसेल की नाही, जवळुन माकडासारखा वाटला. आणि खालुन चौथ्या फोटोत मगर पाणी प्यायला आलीय असं वाटतं होतं.

सखी 17/07/2014 - 17:05
धन्यवाद मंडळी - मधुरा, मराठे, यशो, स्वरा, वल्ली, मुवि, स्वाती, रेवती, खटपट्या, एक्कासाहेब, राजेंद्र मेहेंदळे. स्वरा: खर तर तो भाग वाचुनच मी पण लिहिण्याचे धाडस केले. - क्या बात है! मस्तच लिहील आहेस, तिथे प्रतिसाद दिलाच आहे. वल्ली आणि रेवती: तुम्हाला पॅनारामिक फोटो आवडल्याचे वाचुन बरे वाटले. राजेंद्र मेहेंदळे: मिल्वॉकीहुन फार दूर नसावे, कारने जाण्यासारखेच असावे, कारण मिल्वॉकी मिशिगनच्या तिस-या लेकच्या पल्याडच आहे.
भाग १‏ दुस-या दिवशी सकाळी ऊठुन सगळ्यांनी आवरुन घेतले आणि हॉटेलच्या गेस्ट रुममध्ये नाष्टा करण्यासाठी गेलो. बहुतेक हॉटेलचे चेकआऊट सकाळी ११ वाजता असते त्यामुळे आम्ही सकाळचे आवरुन झाल्यावर झाल्यावर लगेच हॉटेल सोडले, बॅगा कारमध्ये नेऊन टाकल्या. आणि थोडा वेळ मॅकीनॉ सिटी बघायला बाहेर पडलो. आजही हवा छान होती. शहरात अजुन छोटीछोटी दुकानं होती, जागोजागी फुलं लावुन बेंचेस ठेवले होते, कारंजी होती.

कलिया बदाम

प्रभाकर पेठकर ·

शिद 16/07/2014 - 18:44
कलिया एकदम कल्ला दिसतोय. *good* पण हि पाकॄ बरीच निगुतीनं बनवायची असं दिसतेय. शंका: बोकडाचं मटन लवकर व लुशलुशीत शिजण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? कोवळा बकरा असला तर ठीक नाहीतर मटन शिजताशिजता नाकीनऊ येतात. बर्‍याच वेळा असा अनुभव आला आहे. :(

In reply to by शिद

मटण घेताना रंग बघून घ्यावा. रंग हलका गुलाबी असावा. जास्त गडद, लाल असेल तर घेऊ नये. आपल्याकडे भारतात बकर्‍याच्या नांवाखाली खुप वेळा मेंढीचे मांस विकले जाते. ते शिजायला वेळही लागतो, लुसलुशीत शिजत नाही आणि चवही जरा निकृष्ट असते. मटणाला कच्च्या पपईची पेस्ट चोळून ठेवायची. अर्ध्या तासानंतर नुसती हातानेच जास्तीची लागलेली पेस्ट असेल तर काढून टाकायची (मटण धुवायचं नाही) नंतर हवे ते मसाले लावून अर्धातास ठेवायचे. मटण चांगले शिजेल. मटणात शिजताना सुपारीही टाकतात (नंतर ती काढून टाकायची) पण मी कधी तो प्रयोग केलेला नाही. माझा भरवसा मटण विकत घेताना रंगावर आणि अगदीच वाटल्यास (कबाब वगैरे करताना) कच्च्या पपईवर असतो. खाटीक नेहमीचा ओळखिचा असावा, तेही फायद्याचे ठरते.

In reply to by प्रभाकर पेठकर

शिद 16/07/2014 - 22:01
धन्यवाद पेठकर काका. :) भारतात असताना ओळखिच्या खाटकाकडून मटन आणलं कि तशी समस्या उद्भवत नाही पण इकडे परदेशात जाम लोचा होतो. पपई बद्दल मी वाचलं होतं, आता प्रयोग करुन बघायला हवा. कच्ची पपई जर उपलब्ध नसेल तर पिकलेली चालेल का? कृपया शंका निरसन करावे हि नम्र विनंती.

In reply to by शिद

परदेशात असल्यास खालील नावे लक्षात ठेवा: १. लॅंब (Lamb) : एक वर्षापेक्षा लहान मेंढीचे मांस. हे सर्वोत्तम असते. २. हॉगेट (hogget) : एक वर्षापेक्षा जास्त पण तरूण असलेल्या मेंढीचे मांस. हे मध्यम प्रतीचे असते. ३. मटण (mutton) : पूर्ण वयात आलेल्या मेंढीचे मांस. हे त्यातल्या त्यात सर्वात जास्त वातड असते.

In reply to by शिद

>>>>कच्ची पपई जर उपलब्ध नसेल तर पिकलेली चालेल का? बाजारात पिकलेली पपई मिळत असेल तर कच्ची पपई नक्कीच असणार ना कुठेतरी. असो. कच्या पपईत पेपेन नांवाचे द्रव्य असते ते मांसाला शिजताना मऊ करण्याचे कार्य करते. ते पिकलेल्या पपईत नसते किंवा नसावे. त्यामुळे पिकलेली पपई वापरता येणार नाही. पपई कच्चीच असावी. बाजारात 'मीट टेंडरायझर्स' मिळतात त्यातही हे पेपेनच वापरलेले असते.

In reply to by मुक्त विहारि

चालेल की. पण 'तूप' म्हणजे तुम्हाला शुद्ध तुप म्हणायचे असेल तर ते प्राणिज (प्राण्याच्या चरबीपासून बनलेले) असल्याने पचायला जड जाते. शिवाय पाककृतीत बदामाची मात्राही जास्त आहे. ह्याचा विचार करून आणि आपली पचनशक्ती लक्षात घेऊन प्रयोग करावा. डालडा (वनस्पती) त्यातल्यात्यात सुरक्षित पर्याय वाटतो.

आयुर्हित 16/07/2014 - 21:03
वनस्पती तुप(डालडा)च्या ऐवजी गावराणी तुप किंवा कुठलेही तेल(राईचे,शेंगदाण्याचे,ऑलिवचे,नारळाचे)हे निश्चितच आरोग्यदायी ठरेल. पहिल्यांदाच काजू ऐवजी बदाम (मेंदुसाठी उपयुक्त)वापरलेली पाकॄ पाह्तोय.

In reply to by आयुर्हित

तुपासाठी माझा वरील प्रतिसाद पाहावा. बाकी राईचे,ऑलिवचे,नारळाचे तेल चवित बदल घडवेल. शेंगदाण्याचे, सूर्यफुलाचे तेल वापरायला हरकत नसावी.

In reply to by खटपट्या

>>>>आल्याची तयार पेस्ट चालेल का ? अजून मी कधी वापरलेली नाही पण चालावयास हरकत नाही. शक्यतो, ताजे सामान मिळत असताना तयार गोष्टी वापरू नयेत. त्यात टिकाऊपणा वाढविण्यासाठी काय रसायनं मिसळली असतील सांगता येत नाही. अशी अनावश्यक रसायने शरीराबाहेर टाकण्यात मुत्रपिंडांवर अतिरिक्त ताण पडतो.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मेहेंदळे साहेब, 'कलिया' हे बनविण्याच्या पद्धतीचे सर्वनाम आहे. दूसरी पद्धत असते 'कोर्मा'. सर्व कलिया पाककृती ह्या मोघलाई पाककृती आहेत आणि त्यात बकर्‍याचे मांस (मटण) अध्याहृत असून त्या बरोबर वापरलेल्या दूसर्‍या पदार्थाला त्या त्या कलियात खासियत म्हणून ओळखलं जातं. जसं. 'बदाम कलीया'त बदाम जास्त प्रमाणात वापरले आहेत. तो रश्श्यातला (ग्रेव्ही) मुलभूत जिन्नस आहे. 'कलिया सफेद' ह्यात रस्सा पांढरा असतो. 'कलीया रझाला' हा त्याच्या सुगंधासाठी नावाजला जातो, 'कलिया सफक शीर' मधे सफक म्हणजे सुंदर रुपाचा आणि शीर म्हणजे दूध. ह्यात अर्ध्या किलो मटणात १ लिटर दूध वापरतात. 'कलिया आंबा' मध्ये कैर्‍या साखरेच्या पाकात घोळवून मटणात वापरल्या जातात. 'कलिया केशर' मध्ये मटणाच्या रश्यात केशराचे प्रमाण जाणवण्याइतपत असते. 'तार कलिया' हा शाही प्रवृत्तीचा म्हणजे बदाम, पिस्ते, खवा, केशर वगैरे वगैरे जिन्नस वापरले जातात. ह्यातले न समजणारे शब्द मुघलांकडून आलेले आहेत. कदाचित ह्या शब्दांचे मूळ इराणी भाषेत असेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

सविस्तर प्रतिसादासाठी आभार. मस्त माहिती दिलीत. आता बाकीचे कलिये पण खाण्याची इच्छा निर्माण केलीत :-) बाकी, तेवढे साहेब म्हणू नका हो. विमे ठीक आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

अजून एक, हे असे वेगळे पदार्थ मुंबईत कुठे खायला मिळतील ? बघावे तिकडे तेच ते बटर चिकन, चिकन हंडी आणि त्याच त्या छापाचे पंजाबी पदार्थ असतात. मी दुबईत खाल्ली तशी निहारी मुंबईत मिळाली नाही अजून. हलीम चांगले कुठे मिळते देव जाणे. जर गाईडन्स द्या की.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

>>>> हे असे वेगळे पदार्थ मुंबईत कुठे खायला मिळतील ? शक्यता कमीच आहे. ही माझ्या कडच्या पाककलेच्या पुस्तकातील पाककृती आणि ज्ञान आहे. >>>>मी दुबईत खाल्ली तशी निहारी मुंबईत मिळाली नाही अजून. हलीम चांगले कुठे मिळते देव जाणे. मुंबई सोडून आता जवळ जवळ ३३ वर्षे झाली. त्यामुळे त्या दृष्टीने कांही माहिती देणं मला शक्य नाही. उलट तुम्हालाच कुठे उत्तम निहारी आणि/किंवा हलीम मिळाले तर मलाही कळवा. मला वाटतं हे दोन्ही पदार्थ मुस्लीम बहुल परिसरात, जसे मोहम्मद अली रोड वगैरे, मिळू शकतील. शोध चालू ठेवावा. आत्ता रमझान आहे. त्यामुळे वरील दोन्ही पदार्थ संध्याकाळी मुबलक प्रमाणात उपलब्ध असावेत असे वाटते.

गणपा 17/07/2014 - 16:02
पाककृती सोबतच तुमचे प्रतिसादही ज्ञानवर्धक असतात. कधी काळी तुमच्या हातचे पदार्थ खाण्याची मनिषा बाळगुन आहे. :)

पैसा 01/08/2014 - 22:58
पाकृ अगदी तपशीलवार आणि फोटो छान. तसेच प्रतिसादांमधेही खूप माहिती आहे. मात्र आमच्या घरातली मांसाहारी मंडळीही मटन खात नाहीत त्यामुळे फार तर चिकन वापरून करेन.

धन्या 02/08/2014 - 22:08
भारीच !!! पुण्यात मेंढीच्या मांसाला "बोल्हाईचे मटण" म्हणतात (बहूधा)

शिद 16/07/2014 - 18:44
कलिया एकदम कल्ला दिसतोय. *good* पण हि पाकॄ बरीच निगुतीनं बनवायची असं दिसतेय. शंका: बोकडाचं मटन लवकर व लुशलुशीत शिजण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? कोवळा बकरा असला तर ठीक नाहीतर मटन शिजताशिजता नाकीनऊ येतात. बर्‍याच वेळा असा अनुभव आला आहे. :(

In reply to by शिद

मटण घेताना रंग बघून घ्यावा. रंग हलका गुलाबी असावा. जास्त गडद, लाल असेल तर घेऊ नये. आपल्याकडे भारतात बकर्‍याच्या नांवाखाली खुप वेळा मेंढीचे मांस विकले जाते. ते शिजायला वेळही लागतो, लुसलुशीत शिजत नाही आणि चवही जरा निकृष्ट असते. मटणाला कच्च्या पपईची पेस्ट चोळून ठेवायची. अर्ध्या तासानंतर नुसती हातानेच जास्तीची लागलेली पेस्ट असेल तर काढून टाकायची (मटण धुवायचं नाही) नंतर हवे ते मसाले लावून अर्धातास ठेवायचे. मटण चांगले शिजेल. मटणात शिजताना सुपारीही टाकतात (नंतर ती काढून टाकायची) पण मी कधी तो प्रयोग केलेला नाही. माझा भरवसा मटण विकत घेताना रंगावर आणि अगदीच वाटल्यास (कबाब वगैरे करताना) कच्च्या पपईवर असतो. खाटीक नेहमीचा ओळखिचा असावा, तेही फायद्याचे ठरते.

In reply to by प्रभाकर पेठकर

शिद 16/07/2014 - 22:01
धन्यवाद पेठकर काका. :) भारतात असताना ओळखिच्या खाटकाकडून मटन आणलं कि तशी समस्या उद्भवत नाही पण इकडे परदेशात जाम लोचा होतो. पपई बद्दल मी वाचलं होतं, आता प्रयोग करुन बघायला हवा. कच्ची पपई जर उपलब्ध नसेल तर पिकलेली चालेल का? कृपया शंका निरसन करावे हि नम्र विनंती.

In reply to by शिद

परदेशात असल्यास खालील नावे लक्षात ठेवा: १. लॅंब (Lamb) : एक वर्षापेक्षा लहान मेंढीचे मांस. हे सर्वोत्तम असते. २. हॉगेट (hogget) : एक वर्षापेक्षा जास्त पण तरूण असलेल्या मेंढीचे मांस. हे मध्यम प्रतीचे असते. ३. मटण (mutton) : पूर्ण वयात आलेल्या मेंढीचे मांस. हे त्यातल्या त्यात सर्वात जास्त वातड असते.

In reply to by शिद

>>>>कच्ची पपई जर उपलब्ध नसेल तर पिकलेली चालेल का? बाजारात पिकलेली पपई मिळत असेल तर कच्ची पपई नक्कीच असणार ना कुठेतरी. असो. कच्या पपईत पेपेन नांवाचे द्रव्य असते ते मांसाला शिजताना मऊ करण्याचे कार्य करते. ते पिकलेल्या पपईत नसते किंवा नसावे. त्यामुळे पिकलेली पपई वापरता येणार नाही. पपई कच्चीच असावी. बाजारात 'मीट टेंडरायझर्स' मिळतात त्यातही हे पेपेनच वापरलेले असते.

In reply to by मुक्त विहारि

चालेल की. पण 'तूप' म्हणजे तुम्हाला शुद्ध तुप म्हणायचे असेल तर ते प्राणिज (प्राण्याच्या चरबीपासून बनलेले) असल्याने पचायला जड जाते. शिवाय पाककृतीत बदामाची मात्राही जास्त आहे. ह्याचा विचार करून आणि आपली पचनशक्ती लक्षात घेऊन प्रयोग करावा. डालडा (वनस्पती) त्यातल्यात्यात सुरक्षित पर्याय वाटतो.

आयुर्हित 16/07/2014 - 21:03
वनस्पती तुप(डालडा)च्या ऐवजी गावराणी तुप किंवा कुठलेही तेल(राईचे,शेंगदाण्याचे,ऑलिवचे,नारळाचे)हे निश्चितच आरोग्यदायी ठरेल. पहिल्यांदाच काजू ऐवजी बदाम (मेंदुसाठी उपयुक्त)वापरलेली पाकॄ पाह्तोय.

In reply to by आयुर्हित

तुपासाठी माझा वरील प्रतिसाद पाहावा. बाकी राईचे,ऑलिवचे,नारळाचे तेल चवित बदल घडवेल. शेंगदाण्याचे, सूर्यफुलाचे तेल वापरायला हरकत नसावी.

In reply to by खटपट्या

>>>>आल्याची तयार पेस्ट चालेल का ? अजून मी कधी वापरलेली नाही पण चालावयास हरकत नाही. शक्यतो, ताजे सामान मिळत असताना तयार गोष्टी वापरू नयेत. त्यात टिकाऊपणा वाढविण्यासाठी काय रसायनं मिसळली असतील सांगता येत नाही. अशी अनावश्यक रसायने शरीराबाहेर टाकण्यात मुत्रपिंडांवर अतिरिक्त ताण पडतो.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मेहेंदळे साहेब, 'कलिया' हे बनविण्याच्या पद्धतीचे सर्वनाम आहे. दूसरी पद्धत असते 'कोर्मा'. सर्व कलिया पाककृती ह्या मोघलाई पाककृती आहेत आणि त्यात बकर्‍याचे मांस (मटण) अध्याहृत असून त्या बरोबर वापरलेल्या दूसर्‍या पदार्थाला त्या त्या कलियात खासियत म्हणून ओळखलं जातं. जसं. 'बदाम कलीया'त बदाम जास्त प्रमाणात वापरले आहेत. तो रश्श्यातला (ग्रेव्ही) मुलभूत जिन्नस आहे. 'कलिया सफेद' ह्यात रस्सा पांढरा असतो. 'कलीया रझाला' हा त्याच्या सुगंधासाठी नावाजला जातो, 'कलिया सफक शीर' मधे सफक म्हणजे सुंदर रुपाचा आणि शीर म्हणजे दूध. ह्यात अर्ध्या किलो मटणात १ लिटर दूध वापरतात. 'कलिया आंबा' मध्ये कैर्‍या साखरेच्या पाकात घोळवून मटणात वापरल्या जातात. 'कलिया केशर' मध्ये मटणाच्या रश्यात केशराचे प्रमाण जाणवण्याइतपत असते. 'तार कलिया' हा शाही प्रवृत्तीचा म्हणजे बदाम, पिस्ते, खवा, केशर वगैरे वगैरे जिन्नस वापरले जातात. ह्यातले न समजणारे शब्द मुघलांकडून आलेले आहेत. कदाचित ह्या शब्दांचे मूळ इराणी भाषेत असेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

सविस्तर प्रतिसादासाठी आभार. मस्त माहिती दिलीत. आता बाकीचे कलिये पण खाण्याची इच्छा निर्माण केलीत :-) बाकी, तेवढे साहेब म्हणू नका हो. विमे ठीक आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

अजून एक, हे असे वेगळे पदार्थ मुंबईत कुठे खायला मिळतील ? बघावे तिकडे तेच ते बटर चिकन, चिकन हंडी आणि त्याच त्या छापाचे पंजाबी पदार्थ असतात. मी दुबईत खाल्ली तशी निहारी मुंबईत मिळाली नाही अजून. हलीम चांगले कुठे मिळते देव जाणे. जर गाईडन्स द्या की.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

>>>> हे असे वेगळे पदार्थ मुंबईत कुठे खायला मिळतील ? शक्यता कमीच आहे. ही माझ्या कडच्या पाककलेच्या पुस्तकातील पाककृती आणि ज्ञान आहे. >>>>मी दुबईत खाल्ली तशी निहारी मुंबईत मिळाली नाही अजून. हलीम चांगले कुठे मिळते देव जाणे. मुंबई सोडून आता जवळ जवळ ३३ वर्षे झाली. त्यामुळे त्या दृष्टीने कांही माहिती देणं मला शक्य नाही. उलट तुम्हालाच कुठे उत्तम निहारी आणि/किंवा हलीम मिळाले तर मलाही कळवा. मला वाटतं हे दोन्ही पदार्थ मुस्लीम बहुल परिसरात, जसे मोहम्मद अली रोड वगैरे, मिळू शकतील. शोध चालू ठेवावा. आत्ता रमझान आहे. त्यामुळे वरील दोन्ही पदार्थ संध्याकाळी मुबलक प्रमाणात उपलब्ध असावेत असे वाटते.

गणपा 17/07/2014 - 16:02
पाककृती सोबतच तुमचे प्रतिसादही ज्ञानवर्धक असतात. कधी काळी तुमच्या हातचे पदार्थ खाण्याची मनिषा बाळगुन आहे. :)

पैसा 01/08/2014 - 22:58
पाकृ अगदी तपशीलवार आणि फोटो छान. तसेच प्रतिसादांमधेही खूप माहिती आहे. मात्र आमच्या घरातली मांसाहारी मंडळीही मटन खात नाहीत त्यामुळे फार तर चिकन वापरून करेन.

धन्या 02/08/2014 - 22:08
भारीच !!! पुण्यात मेंढीच्या मांसाला "बोल्हाईचे मटण" म्हणतात (बहूधा)
साहित्यः बकर्‍याचे मांस (मटण) - १/२ किलो दही - १५० ग्रॅम (एक ते सव्वा कप) डालडा - १५० ग्रॅम (एक ते सव्वा कप) खवलेला नारळ - १०० ग्रॅम (एक ते सव्वा कप) मसाला वेलची - ३ नग दालचिनी - १ इंचाचे ५ तुकडे लवंगा - ६ नग कांदा - २ नग मध्यम आकाराचे. तिखट - दिड लहान चमचा. (टि स्पून) आख्खं जीरं - अर्धा लहान चमचा (टि स्पून) आलं - २ इंच बदाम - ८० ग्रॅम ( कपभर) मीठ चवीनुसार. तयारी: बकर्‍याचे मांस स्वच्छ धुवून निथळवून त्यात फेटलेले दही मिसळा आणि मुरण्यासाठी तासभर बाजूला ठेवून द्या.

वाट ईथे स्वप्नातील...

स्वप्नांची राणी ·

नुसते फोटोच परत परत पाहुन घेतलेत..!!!!!! अवांतर - पाकृ नंतर भटकंती ह्या सदरात देखील लोकांना जळवुन जळवुन त्यांचे हालहाल करायची पद्धत चालु झाली आहे... अतिअवांतर - मी पयली (?)

कॅनडामध्ये टोरांटो,नायगारा(ईस्ट कोस्ट) आणि व्हँकुव्हर,व्हिक्टोरिया(वेस्ट कोस्ट) बघुन झाल्यावर राहीलेले ठीकाण कॅलगेरी/बँफ्/जास्पर या लेखात मनसोक्त भटकायला मिळेल अशी अपेक्षा करतो. पुलेशु. अवांतर-एडमंटनचे शॉपिंग मॉलसुद्धा ऑन द वे बघता येईल काय?

सुंदर वर्णन आणि तितकेच छान फोटो.. अवांतर- मलिन लेक ,मलिन नदी... ही नाव काही पटत नाहीत बॉ.. किती निखळ्,निर्मळ आहे नदी.. आणि नाव काय असलं मलिन... स्वाती

मराठे 16/07/2014 - 20:36
फोटो आणि वर्णन दोन्हीही छान. एकदा जायलाच पाहिजे असं ठिकाण. बेत जमवला पाहिजे. मलीन लेक .. मलीन!!?...हुं! हा कसला 'मलीन'.. आमच्या ठाण्याचा कचराळी तलाव बघा म्हणावं एकेकाळी नावाला साजेसाच होता. आता परिस्थिती बदललीये.

आभार पिरा, राजेंद्र, मधुरा, यशोधरा, सखी स्वाती, मुवि मंडळी!! एवढ्यातच आभार प्रदर्शन नव्हत करायच...म्हटल होऊन जाउदेत २००-३०० प्रतिसाद...मग करु आरामात. पण आता विचार करतेय कि ३००व्या प्रतिसादानंतर पुन्हा करु आभार प्रदर्शन..हाकानाका..!! राजेंद्रजी, एडमंट्न च्या मॉल ऐवजी तिथल्या युनिवर्सिटी ऑफ अल्बर्टा विषयी लिहावं असं मनात आहे. मॉल बाकि मस्तच आहे. सखी, हो ती आमची कॉटेज. स्वाती, हो ना, मलाही अगदी तेच वाटलं होतं कि ईतकी सुंदर नदि / तळ आणि नाव काय हे असलं..? पण मग कळल कि मलिन हा फ्रेंच शब्द आहे. या तळ्याला पाणी पुरवठा करणार्‍या नदिच्या विराट खळखळाटी प्रवाहामुळे हे नाव मिळालय.

काव्यातलं आपल्याला कांही समजत नाही ह्या धारणेमुळे, 'वाट इथे स्वप्नातील...' असे काव्यत्म शीर्षक पाहिल्यावर धागा उघडण्याचा विशेष उत्साह नव्हता. पण आज उघडला आणि बॅन्फचं नांव वाचून जुन्या स्मृती जागृत झाल्या. छायाचित्र आणि वर्णन वाचून मन पुन्हा त्या ठिकाणची भ्रमंती करून आले. छान लिहीले आहे. २०११ साली मित्रा बरोबर आयुष्यात पहिल्यांदाच कॅनडाचा दौरा केला होता. तेंव्हा बॅन्फला भेट दिली होती. तो जुलै महिना असूनही चांगलीच थंडी आणि बर्फाच्छादित पर्वतांची विलोभनिय दृष्य असा तो आनंदोत्सव होता. प्रत्यक्ष बॅन्फ तर १० दिवस राहून निवांत उलगडावे असेच आहे. अर्थात मित्राबरोबर नाही पत्नीसह. असो. पुढच्या वेळी तशी योजना करूनच जाईन म्हणतो. बॅन्फच्या तुमच्या वर्णनाची आणि छायाचित्रांची आतुरतेने वाट पाहात आहे.

नुसते फोटोच परत परत पाहुन घेतलेत..!!!!!! अवांतर - पाकृ नंतर भटकंती ह्या सदरात देखील लोकांना जळवुन जळवुन त्यांचे हालहाल करायची पद्धत चालु झाली आहे... अतिअवांतर - मी पयली (?)

कॅनडामध्ये टोरांटो,नायगारा(ईस्ट कोस्ट) आणि व्हँकुव्हर,व्हिक्टोरिया(वेस्ट कोस्ट) बघुन झाल्यावर राहीलेले ठीकाण कॅलगेरी/बँफ्/जास्पर या लेखात मनसोक्त भटकायला मिळेल अशी अपेक्षा करतो. पुलेशु. अवांतर-एडमंटनचे शॉपिंग मॉलसुद्धा ऑन द वे बघता येईल काय?

सुंदर वर्णन आणि तितकेच छान फोटो.. अवांतर- मलिन लेक ,मलिन नदी... ही नाव काही पटत नाहीत बॉ.. किती निखळ्,निर्मळ आहे नदी.. आणि नाव काय असलं मलिन... स्वाती

मराठे 16/07/2014 - 20:36
फोटो आणि वर्णन दोन्हीही छान. एकदा जायलाच पाहिजे असं ठिकाण. बेत जमवला पाहिजे. मलीन लेक .. मलीन!!?...हुं! हा कसला 'मलीन'.. आमच्या ठाण्याचा कचराळी तलाव बघा म्हणावं एकेकाळी नावाला साजेसाच होता. आता परिस्थिती बदललीये.

आभार पिरा, राजेंद्र, मधुरा, यशोधरा, सखी स्वाती, मुवि मंडळी!! एवढ्यातच आभार प्रदर्शन नव्हत करायच...म्हटल होऊन जाउदेत २००-३०० प्रतिसाद...मग करु आरामात. पण आता विचार करतेय कि ३००व्या प्रतिसादानंतर पुन्हा करु आभार प्रदर्शन..हाकानाका..!! राजेंद्रजी, एडमंट्न च्या मॉल ऐवजी तिथल्या युनिवर्सिटी ऑफ अल्बर्टा विषयी लिहावं असं मनात आहे. मॉल बाकि मस्तच आहे. सखी, हो ती आमची कॉटेज. स्वाती, हो ना, मलाही अगदी तेच वाटलं होतं कि ईतकी सुंदर नदि / तळ आणि नाव काय हे असलं..? पण मग कळल कि मलिन हा फ्रेंच शब्द आहे. या तळ्याला पाणी पुरवठा करणार्‍या नदिच्या विराट खळखळाटी प्रवाहामुळे हे नाव मिळालय.

काव्यातलं आपल्याला कांही समजत नाही ह्या धारणेमुळे, 'वाट इथे स्वप्नातील...' असे काव्यत्म शीर्षक पाहिल्यावर धागा उघडण्याचा विशेष उत्साह नव्हता. पण आज उघडला आणि बॅन्फचं नांव वाचून जुन्या स्मृती जागृत झाल्या. छायाचित्र आणि वर्णन वाचून मन पुन्हा त्या ठिकाणची भ्रमंती करून आले. छान लिहीले आहे. २०११ साली मित्रा बरोबर आयुष्यात पहिल्यांदाच कॅनडाचा दौरा केला होता. तेंव्हा बॅन्फला भेट दिली होती. तो जुलै महिना असूनही चांगलीच थंडी आणि बर्फाच्छादित पर्वतांची विलोभनिय दृष्य असा तो आनंदोत्सव होता. प्रत्यक्ष बॅन्फ तर १० दिवस राहून निवांत उलगडावे असेच आहे. अर्थात मित्राबरोबर नाही पत्नीसह. असो. पुढच्या वेळी तशी योजना करूनच जाईन म्हणतो. बॅन्फच्या तुमच्या वर्णनाची आणि छायाचित्रांची आतुरतेने वाट पाहात आहे.
सुर्य अस्ताला गेला तेव्हा पारा शून्याच्याही खाली गेला, आणि हा म्हणे कॅनडातला 'उन्हाळा' होता. उद्या सक्काळी सक्काळीच उठून एका विलक्षण सफरीला निघायच होतं. पण रात्रीचा हा थंडीचा कहर पाहून ती सहल रद्द करावी की काय असं वाटू लागल. खर म्हणजे टॉरान्तोहून निघालो तेव्हा तिथे स्वच्छ उन पडल होतं. पण आम्ही अल्बर्टा ला पोचलो आणि एकदम गारठलो. त्यातून ते बोचरे गारेगार वारे...! अल्बर्टा ला 'लहरी हवामानाचा प्रदेश' म्हणतात आणि सध्याचं त्याचं हे रूप त्याच नाव सार्थ करत होतं. आता फक्त गाढगुडूप झोपावं अश्या विचारात असतानाच फोन वाजला, "हाय, झोपला नाहीत ना?

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारतीय वाचाळ वीरता

माहितगार ·

In reply to by आनन्दा

माहितगार 16/07/2014 - 20:18
हे ५-१५ दिवसात कस होणार ? परराष्ट्र खात्यासाठी लागणारी डिप्लोमसी सगळ्यात कठीण आणि जागतीक मुक्त व्यापार धोरणे तरीही आंतरराष्ट्रीय राजकीय समीकरणांमध्ये फारसा बदल न होणे यात राजकीय, सामरीक, आर्थीक मुत्सद्देगिरीची जबरदस्त आवश्यकता असणार, मला वाटते सर्व खात्यांसाठी नसेल तरी किमान अर्थ,परराष्ट्र,संरक्षण,गृह या चार विभागांसाठी विरोधी पक्षांचे शॅडो मिनीस्टर्स असावेत आणि त्यांना विरोधी पक्ष नेत्या प्रमाणेच किमान दर्जा देऊन प्रशिक्षणही उपलब्ध करावे म्हणजे जेव्हा केव्हा विरोधी पक्ष सत्तेत जातील तेव्हा माणूसबळाची कमतरता जाणवणार नाही. माणूसबळच नसेल तर एकटे मोदी कुठवर पुरतील. जेटलींच बजेटस्पीच डिटेल मध्ये वाचल तेव्हा जेटलींच्या जागी इतर कोणताही भाजपा नेता ठेवला तरी असच बजेट आल असत अस वाटल असा कल्पकतेचा अभाव जाणवण्यापेक्षा मग जेटली परराष्ट्र खात्यात काय वाईट असे वाटत राहीले. अंतर्गत सुरक्षेसाठी अजीत दोवाल नक्कीच सक्षम आहेत पण ब्राझील सारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सामरीक चर्चेसाठी ते कितपत पुरेसे आहे या बद्दल मनात शंका राहतेच. समजा इटालीयन मरीन्सच्या वादावरून इटली आणि भारताचे वाजलेच तर इटलीचे सागरी आरमार भारतापेक्षा सशक्त आहे किंवा चीनचे आरमार भारता पेक्षा सशक्त आहे. आरमारासाठी जहाजे लागतात ती अव्वाच्या सव्वा किमतीस रशीयादी देशाकडन विकत घेतली जातात. ब्राझील सारख्या देशात दक्षीण आमेरीका खंडातील अनेक देशांचे प्रमुख एकत्र आलेले असताना किमान जहाज बांधणी विमान बांधणी अशा सामरीक बाबतीत काही पहल करण्याची कल्पकता भारताने दाखवावयास हवी होती. इकॉनॉमीक टाइम्स मधील एक कार्टून उल्लेखनीय होते, मंत्री सर्व गोष्टी करताहेत पण वेगळे आणि अधिक काही करतील अशी अपेक्षा मात्र पूर्ण करू शकत नाहीत असा काही कार्टूनचा अर्थ होता.

अंतर्गत सुरक्षेसाठी अजीत दोवाल नक्कीच सक्षम आहेत पण ब्राझील सारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सामरीक चर्चेसाठी बद्दल मनात शंका राहतेच जागतिक दहशतवादावर आंतरराष्ट्रीय संस्था त्यांना व्याख्यान द्यायला बोलावतात , तुम्हाला बरे अश्या शंका पडतात. जरा अजून माहिती मिळवून मग लिहिणे

मार्केल ब्राझील ला जाणार हे आठवड्यापूर्वी जगाला माहिती होते ,लोकसत्ता मध्ये तर जर ब्राझील शी जर्मनी जिंकला तर मोदी ह्यांची भेट मार्केल ह्यांच्याशी होण्याची शक्यता नाही. असे वृत्त होते पण मोदी तरीही बर्लिन ला उतरले ह्यामागे नक्कीच त्यांची काही काही कारणे असतील. दिल्लीच्या फुकट्या पत्रकारांना विदेशी सफर घडवून न आणता ह्यावेळी पंतप्रधान कार्यालय त्यांच्या वेब साईट वरन जनतेशी संपर्क साधत आहेत व वृत्त पत्र त्या बातम्या आपल्या पेपरात प्रकाशित करत आहेत. आता पेड न्यूज च्या काळात मिडिया अशी उपाशी राहिली की त्यांना जळजळ होणारच मग ती बाहेर येणार पण तरीही अश्या बातम्या येतच राहणार कारण मोदी सरकार काय करणार हे सांगत बसत नाहीत करून दाखवतात.

आशु जोग 18/07/2014 - 23:15
या लेखकाची वाक्ये २, ३ ओळींनंतर संपतात. ती संपूच नये असे वाटते. लेखक माहितीपूर्ण आहे का माहित नाही पण फार साधं सोप सरळ लिहीतो... नो कन्फ्यूजन त्याचं आणि वाचकांचही... सध्या एवढच पुरे

In reply to by आनन्दा

माहितगार 16/07/2014 - 20:18
हे ५-१५ दिवसात कस होणार ? परराष्ट्र खात्यासाठी लागणारी डिप्लोमसी सगळ्यात कठीण आणि जागतीक मुक्त व्यापार धोरणे तरीही आंतरराष्ट्रीय राजकीय समीकरणांमध्ये फारसा बदल न होणे यात राजकीय, सामरीक, आर्थीक मुत्सद्देगिरीची जबरदस्त आवश्यकता असणार, मला वाटते सर्व खात्यांसाठी नसेल तरी किमान अर्थ,परराष्ट्र,संरक्षण,गृह या चार विभागांसाठी विरोधी पक्षांचे शॅडो मिनीस्टर्स असावेत आणि त्यांना विरोधी पक्ष नेत्या प्रमाणेच किमान दर्जा देऊन प्रशिक्षणही उपलब्ध करावे म्हणजे जेव्हा केव्हा विरोधी पक्ष सत्तेत जातील तेव्हा माणूसबळाची कमतरता जाणवणार नाही. माणूसबळच नसेल तर एकटे मोदी कुठवर पुरतील. जेटलींच बजेटस्पीच डिटेल मध्ये वाचल तेव्हा जेटलींच्या जागी इतर कोणताही भाजपा नेता ठेवला तरी असच बजेट आल असत अस वाटल असा कल्पकतेचा अभाव जाणवण्यापेक्षा मग जेटली परराष्ट्र खात्यात काय वाईट असे वाटत राहीले. अंतर्गत सुरक्षेसाठी अजीत दोवाल नक्कीच सक्षम आहेत पण ब्राझील सारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सामरीक चर्चेसाठी ते कितपत पुरेसे आहे या बद्दल मनात शंका राहतेच. समजा इटालीयन मरीन्सच्या वादावरून इटली आणि भारताचे वाजलेच तर इटलीचे सागरी आरमार भारतापेक्षा सशक्त आहे किंवा चीनचे आरमार भारता पेक्षा सशक्त आहे. आरमारासाठी जहाजे लागतात ती अव्वाच्या सव्वा किमतीस रशीयादी देशाकडन विकत घेतली जातात. ब्राझील सारख्या देशात दक्षीण आमेरीका खंडातील अनेक देशांचे प्रमुख एकत्र आलेले असताना किमान जहाज बांधणी विमान बांधणी अशा सामरीक बाबतीत काही पहल करण्याची कल्पकता भारताने दाखवावयास हवी होती. इकॉनॉमीक टाइम्स मधील एक कार्टून उल्लेखनीय होते, मंत्री सर्व गोष्टी करताहेत पण वेगळे आणि अधिक काही करतील अशी अपेक्षा मात्र पूर्ण करू शकत नाहीत असा काही कार्टूनचा अर्थ होता.

अंतर्गत सुरक्षेसाठी अजीत दोवाल नक्कीच सक्षम आहेत पण ब्राझील सारख्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सामरीक चर्चेसाठी बद्दल मनात शंका राहतेच जागतिक दहशतवादावर आंतरराष्ट्रीय संस्था त्यांना व्याख्यान द्यायला बोलावतात , तुम्हाला बरे अश्या शंका पडतात. जरा अजून माहिती मिळवून मग लिहिणे

मार्केल ब्राझील ला जाणार हे आठवड्यापूर्वी जगाला माहिती होते ,लोकसत्ता मध्ये तर जर ब्राझील शी जर्मनी जिंकला तर मोदी ह्यांची भेट मार्केल ह्यांच्याशी होण्याची शक्यता नाही. असे वृत्त होते पण मोदी तरीही बर्लिन ला उतरले ह्यामागे नक्कीच त्यांची काही काही कारणे असतील. दिल्लीच्या फुकट्या पत्रकारांना विदेशी सफर घडवून न आणता ह्यावेळी पंतप्रधान कार्यालय त्यांच्या वेब साईट वरन जनतेशी संपर्क साधत आहेत व वृत्त पत्र त्या बातम्या आपल्या पेपरात प्रकाशित करत आहेत. आता पेड न्यूज च्या काळात मिडिया अशी उपाशी राहिली की त्यांना जळजळ होणारच मग ती बाहेर येणार पण तरीही अश्या बातम्या येतच राहणार कारण मोदी सरकार काय करणार हे सांगत बसत नाहीत करून दाखवतात.

आशु जोग 18/07/2014 - 23:15
या लेखकाची वाक्ये २, ३ ओळींनंतर संपतात. ती संपूच नये असे वाटते. लेखक माहितीपूर्ण आहे का माहित नाही पण फार साधं सोप सरळ लिहीतो... नो कन्फ्यूजन त्याचं आणि वाचकांचही... सध्या एवढच पुरे
लेखनविषय:
लेखनप्रकार
"एकशे वीस कोटींचा देश; बारा क्रिकेटपटू निवडण आणि टिम म्हणून खेळणं जड जाते" हि माझी नवी म्हण, क्रिकेटवरची कॉमेंट मुळीच नाही. आमचाच पक्ष ग्रेट म्हणून टिमकी वाजवणार्‍या (सर्वच भारतीय) राजकीय पक्षांना भारतासारख्या खंदप्राय देशातून पदाला शोभेलसे चार कॅबीनेट मंत्री (गृह,संरक्षण,अर्थ,परराष्ट्र) निवडण जड जाते, असे का ? काळ बदलला इकॉनॉमीची वाटचाल समाजवादाकडन भांडवलशाहीकडे निघाली तरी, एकाधिकार शाही असलेल्या काँग्रेस पक्षाला प्रणव मुखर्जींचा (आर्थीक दृष्टीकोण असलेला) प्रभाव कमी करण्याचा सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे, राष्ट्रपतीपदावर नेमणूक करावी लागली. चला आपण याही गोष्टीच अभिनंदन करू. पि.

विसंगती - सुसंगती

आतिवास ·

आतिवास 16/07/2014 - 14:03
'पाशिचमात्य' ऐवजी 'पाश्चिमात्य' असे वाचावे. क्षमस्व. कितीही तपासून पाहिले लेखन, तरी काही चुका नंतरच दिसतात!!

विवेकानंद आचार्य किंवा आध्यात्मीक गुरु न वाटता, खांद्यावर हात ठेवत बोलणार्‍या जिवाभावाच्या मित्रा सारखे वाटतात. प्रत्येक गोष्ट ते तर्काने पटवुन देतात. याच मुळे तरुणवयातच त्यांच्या कडे आकर्षीत झालेले बरेच जण भेटतात. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आतिवास 18/07/2014 - 20:38
प्रत्येक गोष्ट ते तर्काने पटवुन देतात. याविषयी किंचित असहमती. माझ्या मते विवेकानंद अनेकदा भावनेला आवाहन करतात. पण अर्थात वाचकांना विवेकानंदांच्या शब्दांकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा हक्क आहे - अशा विविधतेमुळे बिघडत काहीच नाही; उलट वेगळा दृष्टिकोन मिळतो.

In reply to by आतिवास

प्रत्येक गोष्ट ते तर्काने पटवुन देतात.
याचे सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे "ज्ञानयोग". हं.. काही वेळा त्यांचे व्याख्यान भावनीक वाटते खरे, पण ते बहुदा काळाची गरज म्हणुन असावे. पैजारबुवा,

In reply to by प्रभाकर पेठकर

आतिवास 16/07/2014 - 18:09
माझ्या स्मरणानुसार तुम्ही उल्लेख केलेले पुस्तक स्वामी शिवानंद यांचे असावे. विवेकानंद यांचे या शीर्षकाचे पुस्तक माझ्या पाहण्यात नाही - असल्यास मला कल्पना नाही.

भृशुंडी 16/07/2014 - 23:26
छान आहे लेख.
आयुष्याबद्दल विचार करणा-यांच्या वाटेवर बहुधा विवेकानंद नावाचा हा टप्पा कधी ना कधी येतोच.
अगदी! काही कालखंड असा असतो जेव्हा विवेकानंद तुम्हाला भारून टाकतात. विद्यार्थी असताना जर विवेकानंदांनी झपाटलं, तर परिणाम काहीसे अनपेक्षित असू शकतात. वैयक्तिक अनुभवावरून तरी असं जाणवलंय की त्यांची भाषा ही कमालीची सरळ आणि अभिनिवेशरहित आहे. तत्वज्ञान वगैरे काहीतरी अगम्य वाचतो आहोत, असं अजीबात वाटत नाही. एखादा शिक्षक समोरच्या विद्यार्थ्याला जसा समजावून (उदाहरणांसहित) सांगतो, तसं काहीसं वाटतं. आणि सर्वात भावते ती गोष्ट म्हणजे तुम्ही लेखात लिहिल्याप्रमाणे "विवेकानंदांचा व्यावहारीक दृष्टीकोन"!

प्यारे१ 18/07/2014 - 03:12
खूपच छान आढावा. स्वामी विवेकानंदांच्या विचारांची खोली नि उंची दोन्ही अफाट होतं एवढंच म्हणू शकतो. नतमस्तक!

आतिवास 21/07/2014 - 10:50
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार. आपण पुस्तक वाचल्यास त्यावरचा अभिप्राय (बरा अथवा वाईट कसाही) मला अवश्य कळवावा म्हणजे माझ्या यापुढील लेखनात सुधारणा होण्याची शक्यता वाढेल.

मदनबाण 21/07/2014 - 11:36
स्वांमींच्या बद्धल काही बोलण्याची पात्रता नाही,त्यांच्या विषयी वाचण्यास त्यांचे Quotes कारणीभूत ठरले. अनेक वर्षांपूर्वी मी रिलायन्स इन्फोकॉम मधे कंत्राटी पद्धतीने कामावर होतो, तेव्हा तिथल्या एका व्यक्तीच्या डेस्कवर त्यांचे काही Quotes असलेली एक प्रिंट आउट होती, त्यांना मी विचारले जर तुमची परवानगी असेल तर याची एक कॉपी मी काढुन घेउ का ? त्यांनी आनंदाने ती प्रिंट आउट दिली, ही कॉपी अनेक वर्ष माझ्या जवळ होती आणि तिथुनच त्यांच्या विषयी वाचण्याची प्रेरणा मला मिळाली. :) आताही त्यांचा एक Quote देतो... You have to grow from the inside out. None can teach you, none can make you spiritual. There is no other teacher but your own soul. Swami Vivekananda आजची स्वाक्षरी :- महाराष्ट्रावर वरूणराजाची अवकृपा

In reply to by मदनबाण

आतिवास 22/07/2014 - 09:51
अशा ब-याच ठिकाणी स्वामी विवेकानंदांचे quotes वाचायला मिळतात. रामकृष्ण मठाने १९८७ मध्ये 'संचयनी' नामक विवेकानंद साहित्याचे संकलन (स्वामीजींच्या १२५ व्या जयंतीनिमित्त) प्रसिद्ध केले आहे. ते मिळाले तर अवश्य वाचा. मग तुमच्या आवडीनुसार (आणि सवडीनुसार) इतरही साहित्य वाचता येईल.

आतिवास 16/07/2014 - 14:03
'पाशिचमात्य' ऐवजी 'पाश्चिमात्य' असे वाचावे. क्षमस्व. कितीही तपासून पाहिले लेखन, तरी काही चुका नंतरच दिसतात!!

विवेकानंद आचार्य किंवा आध्यात्मीक गुरु न वाटता, खांद्यावर हात ठेवत बोलणार्‍या जिवाभावाच्या मित्रा सारखे वाटतात. प्रत्येक गोष्ट ते तर्काने पटवुन देतात. याच मुळे तरुणवयातच त्यांच्या कडे आकर्षीत झालेले बरेच जण भेटतात. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आतिवास 18/07/2014 - 20:38
प्रत्येक गोष्ट ते तर्काने पटवुन देतात. याविषयी किंचित असहमती. माझ्या मते विवेकानंद अनेकदा भावनेला आवाहन करतात. पण अर्थात वाचकांना विवेकानंदांच्या शब्दांकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा हक्क आहे - अशा विविधतेमुळे बिघडत काहीच नाही; उलट वेगळा दृष्टिकोन मिळतो.

In reply to by आतिवास

प्रत्येक गोष्ट ते तर्काने पटवुन देतात.
याचे सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे "ज्ञानयोग". हं.. काही वेळा त्यांचे व्याख्यान भावनीक वाटते खरे, पण ते बहुदा काळाची गरज म्हणुन असावे. पैजारबुवा,

In reply to by प्रभाकर पेठकर

आतिवास 16/07/2014 - 18:09
माझ्या स्मरणानुसार तुम्ही उल्लेख केलेले पुस्तक स्वामी शिवानंद यांचे असावे. विवेकानंद यांचे या शीर्षकाचे पुस्तक माझ्या पाहण्यात नाही - असल्यास मला कल्पना नाही.

भृशुंडी 16/07/2014 - 23:26
छान आहे लेख.
आयुष्याबद्दल विचार करणा-यांच्या वाटेवर बहुधा विवेकानंद नावाचा हा टप्पा कधी ना कधी येतोच.
अगदी! काही कालखंड असा असतो जेव्हा विवेकानंद तुम्हाला भारून टाकतात. विद्यार्थी असताना जर विवेकानंदांनी झपाटलं, तर परिणाम काहीसे अनपेक्षित असू शकतात. वैयक्तिक अनुभवावरून तरी असं जाणवलंय की त्यांची भाषा ही कमालीची सरळ आणि अभिनिवेशरहित आहे. तत्वज्ञान वगैरे काहीतरी अगम्य वाचतो आहोत, असं अजीबात वाटत नाही. एखादा शिक्षक समोरच्या विद्यार्थ्याला जसा समजावून (उदाहरणांसहित) सांगतो, तसं काहीसं वाटतं. आणि सर्वात भावते ती गोष्ट म्हणजे तुम्ही लेखात लिहिल्याप्रमाणे "विवेकानंदांचा व्यावहारीक दृष्टीकोन"!

प्यारे१ 18/07/2014 - 03:12
खूपच छान आढावा. स्वामी विवेकानंदांच्या विचारांची खोली नि उंची दोन्ही अफाट होतं एवढंच म्हणू शकतो. नतमस्तक!

आतिवास 21/07/2014 - 10:50
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार. आपण पुस्तक वाचल्यास त्यावरचा अभिप्राय (बरा अथवा वाईट कसाही) मला अवश्य कळवावा म्हणजे माझ्या यापुढील लेखनात सुधारणा होण्याची शक्यता वाढेल.

मदनबाण 21/07/2014 - 11:36
स्वांमींच्या बद्धल काही बोलण्याची पात्रता नाही,त्यांच्या विषयी वाचण्यास त्यांचे Quotes कारणीभूत ठरले. अनेक वर्षांपूर्वी मी रिलायन्स इन्फोकॉम मधे कंत्राटी पद्धतीने कामावर होतो, तेव्हा तिथल्या एका व्यक्तीच्या डेस्कवर त्यांचे काही Quotes असलेली एक प्रिंट आउट होती, त्यांना मी विचारले जर तुमची परवानगी असेल तर याची एक कॉपी मी काढुन घेउ का ? त्यांनी आनंदाने ती प्रिंट आउट दिली, ही कॉपी अनेक वर्ष माझ्या जवळ होती आणि तिथुनच त्यांच्या विषयी वाचण्याची प्रेरणा मला मिळाली. :) आताही त्यांचा एक Quote देतो... You have to grow from the inside out. None can teach you, none can make you spiritual. There is no other teacher but your own soul. Swami Vivekananda आजची स्वाक्षरी :- महाराष्ट्रावर वरूणराजाची अवकृपा

In reply to by मदनबाण

आतिवास 22/07/2014 - 09:51
अशा ब-याच ठिकाणी स्वामी विवेकानंदांचे quotes वाचायला मिळतात. रामकृष्ण मठाने १९८७ मध्ये 'संचयनी' नामक विवेकानंद साहित्याचे संकलन (स्वामीजींच्या १२५ व्या जयंतीनिमित्त) प्रसिद्ध केले आहे. ते मिळाले तर अवश्य वाचा. मग तुमच्या आवडीनुसार (आणि सवडीनुसार) इतरही साहित्य वाचता येईल.
लेखनविषय:
लेखनप्रकार
विवेकानंद साहित्य' वाचणे म्हणजे काहीतरी विशेष गोष्ट करणे असा आपल्याकडे आजही काही लोकांचा समज आहे. विवेकानंद साहित्य वाचणा-या व्यक्तीचे कौतुक तर होतेच पण ही व्यक्ती काहीतरी अवघड बाब करते आहे, असा समज होऊन त्या व्यक्तीकडे आदराने पाहण्याची प्रवृत्ती आजूबाजूच्या लोकांमध्ये निर्माण होताना दिसते. अर्थात काही लोक विवेकानंद 'वाचणे' ही निरर्थक कृतीही समजत असावेत – पण ला तरी असे लोक अपवादानेच भेटले आहेत. आयुष्याबद्दल विचार करणा-यांच्या वाटेवर बहुधा विवेकानंद नावाचा हा टप्पा कधी ना कधी येतोच. मला स्वत:ला विवेकानंद अवघड कधीच वाटले नव्हते, वाटत नाहीत.

द ईएमआय ट्रॅप

वेल्लाभट ·

काही अंशी खरे आहे तुमचे म्हणणे..पण असे बघा...आज मी कमावतोय...उद्याचे माहीत नाही. आत्ता वय आहे,हौस आहे,खरेदीची क्षमता आहे. (ईएम आय वर का होईना)वस्तू आत्ताच मिळाली तर त्याचा उपभोग घेउ शकतो.नाहीतर चणे आहेत तेव्हा दात नाहीत आणि दात आहेत तर चणे नाहीत असे व्हायचे. आणि हो..ईकॉनॉमी शुड बी रोलींग हे तत्वसुद्धा आहेच.त्यामुळे कही बाबतीत तरी ईएम आय ला पर्याय नाही. आणि मी पयला.हे राहीलेच

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

पण ते चणे ठिसुळ आहेत की लोखंडाचे ते तपासुन बघा नाहितर आपले दातच पडायचे खातांना. डिझायनर घड्याळाचे उदाहरण चपलख आहे इथे.

If you buy things you don't need, you will soon sell things you need. - Warren Buffett माझे काही मित्र Brand च्या प्रेमात बुडून प्रचंड पैसा खर्च करताना दिसतात... अर्थात अतिरेकी कंजुसपणा ही करु नये. मध्यममार्गी असावे. बचतीचे उद्दिष्ट असावेत. माझा एक अनुभव : मी चांगल्या mutual funds मध्ये वगैरे पैसे गुंतवले आणि मग जेव्हा ते छान वाढताना बघितलेत तेव्हा आपोआपच माझा खर्चिकपणा कमी झाला आणि बचतीकडे कल वाढला.

कवितानागेश 16/07/2014 - 14:12
हे सगळं ब्रॅन्ड्स्चे आणि इतर महागड्या गोष्टींचे वेड स्पर्धेतून निर्माण होतं. आणि स्पर्धा तर आपापल्या परीनी सगळेच निर्माण करतायत....... आपली स्वतःची 'गरज आणि कुवत' काय आहे याचा विचार करणं फार कठीण जातं , एकदा का तुलना करण्याचं भूत डोक्यावर बसलं की.

आदूबाळ 16/07/2014 - 14:15
कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑटोमोबाईल, बांधकाम हे उद्योग ईएमायच्या जिवावर फोफावतात. उद्या सगळ्यांनीच ईएमायवर या वस्तू घ्यायचं थांबवलं तर त्या क्षेत्रांत मंदी येईल. त्याचा स्पिलओव्हर इफेक्ट म्हणून नोकर्‍या जातील, कर्जचुकवेगिरी वाढेल, महागाई, वगैरे वगैरे. कर्जाऊ पैसे देण्याच्या माध्यमातूनच बँका अर्थव्यवस्थेत पैसे "निर्माण" करतात. तेही मंदावेल. माझ्यामते मुख्य मुद्दा उधळपट्टी, कॉन्स्पिक्युअस कंझम्प्शन बंद करायचा आहे. थोड्या घाऊक प्रमाणात बोलायचं तर अर्थसाक्षरतेचा आहे. फक्त ईएमायला दोष देऊन कसं भागेल? हे म्हणजे अपघात होतात म्हणून रस्त्याने चालणं बंद करण्यासारखं आहे.

In reply to by आदूबाळ

गरजेचा विचार करुन वस्तू विकत घेणं योग्य. उदा: जर मी बर्‍यापैकी भटकंती करुन फोटोग्राफी करणार असेन, मी खरंच चांगला फोटोग्राफर असेन (भले व्यावसायिक नसेन) तर मी महागडा कॅमेरा घेण्याचं समर्थन होतं अन्यथा घरगुती फोटो काढायला पाच-सात हजारांचा कॅमेराही चालू शकतो. आणि जर मी अशा प्रकारे निसर्गरम्य ठिकाणी भटकंती करण्यात जास्त (फावला) वेळ घालवत असेन तर मला दिखावूपणाची ,ब्रँडेड घड्याळ वा कपड्यांची फारशी गरज नाही मग त्या वस्तूंत मी पैसे वाचवणे योग्य. याउलट मला पार्टी ,समारंभ वगैरेंची जास्त आवड असेल तर मला महागडे कपडे, घड्याळ ई ची गरज अधिक भासेल पण अशा समारंभात माझा आणि माझ्या कुटूंबाचा जास्त वेळ जाणार असेल तर घरी ५२ ईंची ऐवजी ३२ इंची टीवी असून चालण्यासारखे आहे. थोडक्यात सांगायचे तर कुठे तरी समतोल साधावा.

चौकटराजा 16/07/2014 - 15:57
कशासाठी कर्ज घायचे कशासाठी नाही याचे सर्वसाधारण उत्तर असे असू शकते की स्थावर गोष्टीसाठी कर्ज घ्यावे. शिक्षणासाठी कर्ज घ्यावे. व्यवसायाचा भाग म्हणून कर्ज घ्यावे. उदा. अगदी सेकंड थर्ड कितवेही घर असेल तर कर्ज घ्यावे.उच्च शिक्षणाने पुढे चांगली अर्थप्राप्ती होते सबब कर्ज घेण्यास हरकत नाही. भारी क्यामेरा व्यवसायासाठी घ्यायचा असेल तरीही कर्ज घ्यावे. पण तोच हौस म्हणून घ्यायचा असेल तर कर्ज कशासाठी ?हे झाले सरळसोट अर्थशास्त्र पण हौस, प्रतिष्ठा यांचे प्रभावाखाली जे मन काम करणारे असते बहुदा मुर्खाचे असते. पण अर्थ्व्यवस्था चालण्यासाठी अशी माणसे आवश्यक असतात. बिशेषतः मुक्त अर्थ्व्यवस्थेत तर क्याबरे पहाणारे, वेश्येकडे जाणारे, शुभ क्र गाडीसाठी घेणारे, लगनात निमंत्रण पत्रिकेलाही लाखो खर्च करणारे, निरनिराळ्या रंगाचे प्रेशस स्टोन वापरणारे, व्यवसाय वृद्धी, संततिप्राप्ती साठी याग करणारे,पार्ट्या देणारे व घेणारे असे लोक असावे लागतातच. कारण त्यातून जाहिरात कंपन्या, बिल्डर. सेल्समन, वॉचमन हॉटेले ई अनेकाना रोजगार मिळणार असतो.समाजात सगळेच सुज्ञ लोक होणे यातून कल्याणा च्या कल्पनेबरोबर यादवीचा ही धोका संभवतो.

In reply to by चौकटराजा

तुमचे म्हणणे खरे असेल. पण ०% किंवा तत्सम अल्प व्याजदराने कर्ज मिळते म्हणून पण घेतले जाते. म्हणजे EMI ने ५०-६० हजारांचा camera घेणार्‍याकडे ५०-६० हजार कॅश (म्हणजे सेविंग, एफ डी ई) नसतीलच असे नाही पण एफ डी वर मिळणार्‍या व्याजापेक्षा कर्ज वा EMI स्वस्त पडत असेल तर तसे घेणे शहाणपणाचेच ठरते.

पगला गजोधर 16/07/2014 - 16:46
आमचे औरंगाबादचे बोकीलकाका म्हणतात, पूर्वीच्या काळी लोकं वर्तमान विकून भविष्य सुखी करायला बघायचे. (रेफ: निवृत्तिवेतनातूनच घर बांधायचे), आजच्या काळी लोक भविष्य विकून, वर्तमानात सुख विकत घ्यायला पाहतात (जे कि तुम्ही लेखात मांडलय) (मी पूर्वीची लोक बरोबर कि आजचे बरोबर, यावर भाष्य करत नाही आहे, कृपया हळू घ्या)

In reply to by पगला गजोधर

(दोन वेळा `कृपया हळू घ्या' म्हटलंय!) आणि पुढे डिस्क्लेमर टाकलायं : `मी पूर्वीची लोक बरोबर कि आजचे बरोबर, यावर भाष्य करत नाही आहे.' तुमचं बरोबर आहे. `वर्तमान स्वस्थ असला पाहिजे' ही मजेत जगण्यासाठी एकमेव कंडीशन आहे. भविष्य गहाण टाकून तुम्ही `वर्तमानात अस्वस्थ आहात', की `भविष्यात जगू' म्हणून `वर्तमान सोसतायं' यानं काही फरक पडत नाही.

आदिजोशी 16/07/2014 - 17:18
EMI हे एक बूमरँग आहे. वळून परत आल्यावर पकडायचा दम असेल तरच वापरावे :)

मराठे 16/07/2014 - 20:44
वपुंच्या 'दोंदे' ह्या कथेची थोडी आठवण झाली. त्यातच एक वाक्य आहे, की "कर्ज काढणं म्हणजे एक भला मोठा दगड डोंगरावरून खाली ढकलून देणं, आणि कर्ज फेडणं म्हणजे तोच दगड पुन्हा वर नेऊन ठेवणं".

स्पार्टाकस 16/07/2014 - 21:31
इएमआय हा घर, गाडी घेण्यासाठी काहीसा अविभाज भाग झालेला आहे. मात्रं अनेकदा या वस्तूंच्या दुप्पट किंमत आपण व्याजासकट भरत असतो. विशेषतः घर घेताना. एक उदाहरण : गृह कर्ज - ३० लाख व्याजदर - १० % फ्लोटींग.. हा नेहमी वाढतोच. मात्रं मूळ दरापेक्षा कमी कधीच होत नाही. कर्जचा कालावधी - २० वर्ष इएमआय - २८९५०/- आता २० वर्षांपर्यंत इएमाआय भरत बसलो तर परत केलेली रक्कम - २८९५० * १२ * २० = ६९,४८,०००/- म्हणजेच मूळ कर्जाच्या दुप्पटीपेक्षा जास्त पैसे इएमआय रुपाने परत केले !! अर्थात जर गृह कर्जाचे हप्ते पूर्ण वीस वर्ष भरत बसलो तरच. लवकर लोन बंद केले तर किती तरी प्रमाणात हे पैसे वाचू शकतात.

In reply to by स्पार्टाकस

अहो, ज्यांनी वीस वर्षांपूर्वी पाच-दहा लाखांना घरं घेतली, ते नक्की कुठच्या सापळ्यात अकडलेले आहेत? महिन्याला पाच दहा हजार रुपये इएमआय! अबबबबबबबब!!! तेच घर आज कितीपट किमतीला मिळेल? त्यांनी त्यावेळी कर्ज न घेता, घर न घेता बचत केली असती, तर आज ते घर परवडेल का? समजा परवडलं, तरी गेली वीस वर्षं कुठच्यातरी घरासाठी भाडं भरावं लागलंच असतं नाही का? उगाच सापळे वगैरे शब्द वापरायला काय जातंय? रास्त दराने कर्ज घेता येण्याचा सर्वसामान्य माणसाला फायदाच होतो. अतिरेक केला तर तोटा होतो हे बरोबरच. कर्ज हे एक साधन म्हणून वापरावं, आपल्या मर्यादेत रहावं वगैरे ठीक आहे. पण कर्ज काढण्याची प्रथाच वाईट वगैरे मूळ लेखातला टोन पटत नाही.

In reply to by राजेश घासकडवी

यशोधरा 16/07/2014 - 23:40
पण कर्ज काढण्याची प्रथाच वाईट वगैरे मूळ लेखातला टोन पटत नाही. >> असा काही टोन जाणवला नाही, पण केवळ ब्रेंडच्या हव्यासापायी कुवतीपेक्षा आणि विनागरज आपलं बजेट केवळ इएमआय भरण्याची (फसवी) सोय उपलब्ध आहे म्हणून ताणू नये,असे म्हणणे असल्यासारखे वाटते. आता अर्थात, मूळ मुद्दा वगळून एमआय असतातच त्यासाठी वगैरे बरीच चर्चा होऊ शकतेच म्हणा. @ वेल्लाभट - लेख आवडला, पटला. धन्यवाद.

In reply to by स्पार्टाकस

खटपट्या 17/07/2014 - 00:49
३० लाखाच्या घराची २० वर्षांनी किमंत किती झाली असेल ? समजा १ करोड झाली. मला तरी सौदा फायद्याचाच वाटतोय.

In reply to by खटपट्या

३० लाखाचे २० वर्षात १ कोटी म्हणजे रेट ऑफ रिटर्न साधारण ६.२५% झाला. (१.०६२५^२०*३० = ३.३६*३० = १ कोटी). भारतातील चलनवाढ साधारण ८-९% धरली तरी सौदा घाट्यातलाच आहे. (१.०८५^२०*३० = १.५ कोटी) हेच पैसे एफ.डीमध्ये ८-९% नी ठेवले तर जास्त फायदा होईल. थोडक्यात काय तर घर हे राहाण्याकरता घ्या गुंतवणूक हे मुख्य ध्येय ठेवून घेउ नका. जेव्हाकेव्हा घर विकायची वेळ येईल (आलीच तर) तेव्हा फायदा झाला असेल तर उत्तमच पण नुसते ३० लाखाचे १ कोटी झाले म्हणजे गुंतवणूक चांगली असे नाही.

In reply to by अमेरिकन त्रिशंकू

खटपट्या 17/07/2014 - 05:30
काही अंशी तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण २० वर्षानंतर ३० लाखाच्या घराची किंमत १ करोड पेक्षा खूप जास्त असणार हे नक्की. कदाचित २ करोड पेक्षाही जास्त असू शकते पेठकर काकांच्या शेवटच्या प्रतिसादाशी सहमत

In reply to by खटपट्या

सुबोध खरे 17/07/2014 - 10:26
लष्करातून निवृत्त होताना २००४ साली मी माझे घर मुंबईत (मुलुंड येथे )१८ लाख रुपयाला विकत घेतले (७५० चौ. फूट). त्या घराची आज किंमत ८५ लाख पर्यंत येते आहे. हिशेब करा परतावा किती टक्के मिळतो ते. सर्व व्यवहार धनादेशाने केलेला आहे. ( राहते घर विकत येत नाही पण म्हातारपणी रिव्हर्स मोर्तगेज ठेवून मरेपर्यंत पेन्शन सदृश्य दरमहा रक्कम मिळू शकते) ३ लाख माझ्या खिशातून आणि १५ लाख्रुपये एच डी एफ सी चे कर्ज. याचा महिन्याचा हप्ता(?) १४२०० रुपये आहे. यात मला २०,०००/- रुपये मुदलात आणि १,५०,०००/- व्याजात आयकरातून सुट मिळते. म्हणजे ५१,००० रुपये वर्षाला कर बचत. म्हणजे मला प्रत्यक्ष हप्ता रुपये १०,०००/- च पडतो हीच गोष्ट मी जर होंडा अकोर्ड तेंव्हा १८ लाखाला घेतली असती तर आज तिची किंमत १. ८ लाख आली असती वर त्याचा हप्ता तेंव्हा रुपये ५५, ००० पडला असता( मोटारीचे कर्ज फक्त ७ वर्षासाठी मिळते.) तात्पर्य आपण इ एम आय कशासाठी घेतो आहे आणि त्याचा फायदा काय आणि तोटा काय हे प्रत्येकाने तारतम्य ठेवून घ्यावे

In reply to by चौकटराजा

धन्या 17/07/2014 - 14:45
वीस वर्षांपूर्वी विकत घेतलेल्या राहत्या घराची किंम आजच्या बाजारभावाने कितीही कोटी असली तरी ती कागदावरील किंमत असते. ती किंमत रुपयांमध्ये रुपांतरीत करावयाची झाल्यास ते राहते घर विकावे लागेल. राहते घर विकल्यानंतर राहण्यासाठी आपल्या घराच्या किंमतीत आपल्याच घरासारखे जुने घर विकत घेता येऊ शकते. नविन घर घ्यावयाचे झाल्यास आपल्या घराच्या किंमतीत निदान काही लाख तरी टाकावे लागतात. काय फायदा मग अशा वीस लाखाचे एखादा कोटी रुपये झाल्याचा? आपल्या घराची किंमत कोटीमध्ये आहे अशा धारणेपलिकडे त्याला काहीही अर्थ नाही. कुणी जर राहत्या घराबरोबरच गुंतवणूक म्हणून असे एखादे जास्त घर घेतले असेल तर त्या घरालाच हे "वीस लाखाचे एक कोटी" गणित लागू होते.

In reply to by धन्या

सुबोध खरे 17/07/2014 - 18:43
धन्या साहेब राहते घर हे सुद्धा एक फार महत्त्वाचे साधन असू शकते. माझ्या ओळखीतील किंवा माहितीतील चार उदाहरणे अशी आहेत. १) ६० व्या वर्षी निवृत्त झाल्यावर निवृत्तीवेतन नव्हते फक्त फंड होता.मुल बाळ नसलेले जोडपे. व्याजदर कमी झाल्याने त्यात भागेना. त्यातुंन वैद्यकीय खर्च वाढत चाललेला. कोणाकडे हात पसरणार. शेवटी आमच्या सोसायटीतील ( मुलुंड चे) घर विकले २० लाख रुपये आले. तेवढेच घर पार्वती पायथ्याला पुण्यात तेंव्हा ११ लाखाला आले उरलेले ९ लाख रुपये व्याजावर ठेवून त्या जोडप्याचे उर्वरित आयुष्य समाधानात गेले. २) एक जोडपे बांद्र्याला राहत होते. निवृत्तीवेतन नाही. मुले अमेरिकेत. मुंबईत राहून काय करायचे? बांद्र्याचे घर विकले ४० लाखाला. १२ लाखाला कोथरूडला भावाच्या शेजारी ३ बेडरूमचे घर घेतले. उरलेले २८ लाख ब्यांकेत ठेवून आपल्या भावन्डान्सोबत आनंदात आहेत. शिवाय मुले अमेरिकेतून येतात त्यांच्यासाठी मोठे घरहि झाले. अशी अजून २ उदाहरणे आहेत. असो. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला तेंव्हा लोकसंख्या ४० कोटी होती. भारताचे क्षेत्रफळ वाढले नाही पण लोकसंख्या तिप्पटी हून जास्त झाली आहे. तेंव्हा घराच्या किमती कमी होण्याची शक्यता नाही. केंव्हाही स्वतःचे घर असणे हे उत्तम. त्याहून जास्त पैसे असतील तर दुसरे घर घ्यावे भाड्याने द्यावे. आणि जेंव्हा परवडेनासे होईल तेंव्हा मोडून खावे.

In reply to by धन्या

बेकार तरुण 18/07/2014 - 07:29
अपवादात्मक परिस्थितिच होत अस वाटत नाहि मला. घर घेण हे गुंतवणुक म्हणुन असु दे वा रहायला असु दे, त्याचि किंमत वाढण हे जरि कागदि असलं तरि याचाच अर्थ असाहि होतो कि त्या भागातिल घरांचि भाडि देखिल साधारण त्याच रेट मधे वाढलि आहेत. सो स्वतचे घर नसेल तर भाडे हि तेवढेच वाढेल. सो झेपेल तेवढे कर्ज घेउन स्वताचे घर घेणे शहाणपणाचे ठरु शकते. आणि एक म्हंणजे अनेक ईकॉनोमिक सायकल्स आल्या आणी गेल्या पण घराच्या किमति वाढतच राहिल्या आहेत. आपला ई एम आय तोच राहिल (थोड्या फार फरकाने) पण आपले भाडे नक्किच वाढत राहिल. बाकि मूळ लेखातिल मुद्द्याशि सहमत आहे. घड्याळ हे उदाहरण पण चपखल आहे.

In reply to by बेकार तरुण

आदूबाळ 18/07/2014 - 14:09
नाही, भाड्याची घरं हे स्वतंत्र मार्केट आहे. घरं (residential property) भाड्याने देण्यात ५-७% च्या वर रिटर्न मिळत असेल असं वाटत नाही. (अपवादः कॉट बेसिस, सर्विस अपार्टमेंटस वगैरे. पण ती प्युअर टेनंसी नव्हे.) घर विकत घेऊन त्याचा ईएमाय आलेल्या भाड्याच्या पैशांत बसला आहे असं उदाहरण माझ्यातरी पहाण्यात नाही. (तुमच्या असल्यास सांगा - लगेच इन्वेस्ट करू!)

In reply to by आदूबाळ

घर घेऊन भाड्याने देण्यापेक्षा दुकान घेऊन (मोक्याच्या ठिकाणचं) भाड्याने देणं जास्त सोयिस्कर. सगळा ईएमाय गेला नाही तरी बराच रिलिफ मिळतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

बाबा पाटील 19/07/2014 - 10:40
बायकोने साठ लाखाचे दुकान विकत घेतले त्याचे भाडे मिळते १५०००. आता विचार करा ह्याच साठ लाखाची पुन्यापासुन ४० ते ५० किमी च्या परिसरात साधारण ४ ते ५ एकर जिरायत जमिन सरासरी १२ ते १५ लाख रु एकर ने आली असती त्यात विहिर खोदन्याचा मोटार पाइपलाइनचा खर्च २ ते ३ लाख. व फळ झाडे लावण्याचा खर्च २ लाख या वरच्या खर्चालाही शासकिय अनुदान आहे, व कालावधी १ ते दिड वर्ष आता दिड वर्षाने या जमिनीची विक्री करावयाची ठरवली तर साधारण फळबाग बागायत जमिनिची एकरी किंमत कमित कमी २५ लाख रुपये एकर चालु आहे व्यवहार बसता बसता सहा महिने गेले तरी दोन वर्षांनी जमिनीची किंमत येते येते १.१० ते १.२५ कोटी मग हे जे दुकान घेतले त्याची वाढुन वाढुन दोन वर्षांनी किंमत किती वाढेल्,समजा स्वतःकडेच ठेवले तर त्याचे भाडे किती येइल.

In reply to by बाबा पाटील

माझ्या प्रतिसादातील '(मोक्याच्या ठिकाणी)' हा मुद्दा आपण लक्षात घेतलेला दिसत नाहिये. ६० लाखात घेतलेले दुकान कुठल्या गावात, परिसरात आणि किती चौरस फुटाचे आहे हे लिहीलेले नाही. पण पुण्यात जिथे मी उपहारगृह चालवत होतो तिथे २५० चौरस फुटाच दुकानाचे भाडे २००००/- रुपये होते ते दुका॑न मालकाने ८ की १० लाखात घेतले होते. शहरातील मुख्य उलाढालीच्या केंद्राजवळ दुकानांचा प्रत्येक चौरस फुटाचा खरेदी दर आणि त्यातून मिळणार्‍या भाड्याच्या रकमेचा परतावा दोन्ही जास्त असतात. अशा केंद्रापासून जेवढे दूर जाल तेवढे प्रत्येक चौरस फुटाचा खरेदी दर कमी असतो (म्हणजे तेव्हढ्याच पैशात जास्त जागा मिळते) तसेच भाडेही कमी मिळते पण जागा जास्त असल्याने फायदाच होतो. ह्यातून कर्जाचा संपूर्ण ईएमाय निघत नाही पण बर्‍यापैकी रिलिफ मिळतो. आणि कालांतराने दुकानाची संपूर्ण मालकी तुमच्याकडे येऊन वाढीव भाडे (वाढत्या महागाई नुसार) कायम तुम्हास मिळते.

In reply to by प्रभाकर पेठकर

बाबा पाटील 19/07/2014 - 19:30
तरी सरळ वैद्यकिय व्यवसायाचा विचार केला तर त्यातुन संपुर्ण परतावा मिळण्यासाठी म्हातारपण उजाडावे लागेल. त्याच्या उलट सध्या पुण्याच्या जवळपास ५०-६० कि.मी.च्या परिसरात जरी एकरामध्ये जमिन घेतली तर त्वरित खेळते भांडवल उपलब्ध होते. सध्या माझ्या भागात २२०० ते २८०० रु स्के.फु. चा जागेचा भाव आहे,बिल्डरला डेव्हलपमेंट साठी लागतात सरासरी १५०० रु. म्हणजे त्याचा खर्च होतो ४००० रु प्रती स्के.फुट , प्रत्यक्षात यापेक्षाही बराच कमी खर्च लागतो. सध्या दुकानाचा भाव चालु आहे १० ते १८ हजार प्रती स्के. फु.म्बायकोने घेतलेले दुकान आहे ४८० स्के.फु. प्रत्यक्षात मोजल्यावर भरते २८ * १२=३३६ म्हणजे कारपेट आणी बिल्ट अप मधला फरक मला तरी कळला नाही. मग या दुकानामागचा हिशोब कसा पडला तुम्हीच सांगा. या पेक्षा असे म्हातारपणाचा विचार करुन असे फुकट भांडवल अडकवुन ठेवण्यापेक्षा ते इतर धंद्यात लावले अथवा शेतजमिनित लावले तर मिळणारा परतावा कित्येक पटीने अधिक असतो. नशिब याच्यात तिने कुठेही किरकोळ कर्ज सोडले तर व्यवसायिक कर्ज घेतले नाही म्हणुन काही वाटत नाही पण हिच गोष्ट जर कर्जाने केली असती तर..... आता मी माझा विचार सांगतो. थोडी थोडी बचत रेग्युलर करत जा. दोन तिन वर्षात पुरेसे पैसे साठतात्,त्यावेळी टोकन अमाउंट टाकुन एखादा जमिनिचा व्यवहार पक्का करा,ज्या दिवशी कागद होइल त्याच्या दुसर्‍या दिवशी त्याला गिर्हाइक पाहायला सुरुवात करा हा यात कधी कधी मसल पॉवर वापरावी लागते.तर कधी अंगावर आले तर लगेच पुर्ण खरेदी खताची तयारी ठेवा. कर्ज काढुन नव्हे. त्यांन्तर जमिन पुढच्या पार्टीला फिरवा १० रुपाचे अगदी २० हजार नाही तरी कमित कमी १५ ते १८ रुपये नक्की होतात्,हिच रक्कम जेंव्हा लाखात असते त्यावेळी फरक खुप मोठा पडतो.

In reply to by बाबा पाटील

माझी उपहारगृहाची जागा कोथरुडात होती. तिथे २००००/- हा भाड्याचा दर होता. तुमच्या परिसराची मला कल्पना नाही. त्यामुळे कदाचित तुमची गणितं तुमच्या व्यवसायासाठी बरोबर की चुक मी ठरवू शकत नाही. तेंव्हा असो.माझ्या अनुभवानुसार शहरातील व्यवसायाची जागाच मला जास्त फायदेशिर वाटते. भविष्यातील माझी गुंतवणूक त्या दृष्टीनेच असेल.

In reply to by आदूबाळ

अनुप ढेरे 18/07/2014 - 14:59
सहमत. जास्तीत जास्त कर्ज काढलं तर २० वर्षाच्या ईएमायच्या अर्ध भाडं येईल साधारण असं बर्‍याच ठीकाणी दिस्तं. पण हळूहळू भाडं वाढवता पण येईल. ईएमाय तेव्ढाच रहाणार आहे. कधीतरी हे फायद्यात येईलच.

In reply to by आदूबाळ

आजानुकर्ण 19/07/2014 - 21:40
राहण्यासाठी स्वतःचे घर असावे. इतपत रियल इस्टेट सामान्य माणसांना पुरेशी आहे. गुंतवणूक म्हणून रियल इस्टेटकडे पाहणे हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे हे कर्ज-व्याज-उत्पन्न-भाडं यांची साधी आकडेमोड करुन कळते. अमुकतमुकाने १० लाखात घेतलेल्या घराची आता १ कोटी किंमत आहे ह्या सांगोवांगीच्या माहितीवर विश्वास ठेवून गुंतवणुकीचे निर्णय घेऊ नयेत असे वाटते. कायदेशीर व्हाईट मनी कमावणाऱ्याला म्युच्युअल फंडांसारखी टॅक्स एफिशियन्ट साधने उपलब्ध आहेत. एनपीएससारख्या उत्तम पेन्शन योजना आहेत. सेबीसारख्या संस्था या गोष्टींवर बऱ्यापैकी नियंत्रण ठेवून आहेत. हवे असल्यास अगदी ३ दिवसात खात्यात पैसे येतील इतकी चांगली लिक्विडिटी आहे. ऐपतीप्रमाणे गुंतवणूक करता येते. कर्जाच्या जाळ्यापासून बाहेर राहता येते. अधिक धाडस करण्याची इच्छा असेल तर थेट शेअर बाजारात गुंतवणूक करु शकता. याउलट घराच्या बाबतीत ब्रोकरपासून, सोसायटी, महापालिका हजार कटकटी असतात. सरकार व्हॅटसारखा पूर्वलक्ष्यी बांबू लावतं. घराच्या कायदेशीरपणाबाबत अनेकदा आपण अंधारात असतो. शिवाय घराच्या बाबतीत होऊ शकणारा बहुतेक फायदा आधीच बिल्डरने घशात घातलेला असतो. प्रचंड प्रमाणात काळा पैसा, आणि स्पेक्युलेशन याच्यावर विश्वास ठेवून हे मार्केट सुरु आहे मात्र तरीही शेअर बाजाराच्या तुलनेत मिळणाऱ्या रिटर्न्समध्ये फारसा फरक नाही. जमिनीच्या व्यवहारात तर शहाण्या माणसाने अजिबात पडू नये.

In reply to by सुबोध खरे

बाबा पाटील 19/07/2014 - 10:21
मी २००५ ला पुन्यात साडेतिन लाखात अडीच गुंठे जागा घेतली त्यावर २००८ ला २८ लाख खर्च करुन घर बांधले त्याच्या साठी सहा लाखाचे कर्ज काढले त्याचा हप्ता १० हजार,पण आता घराची किंमत आहे सरासरी दिड ते दोन कोटी. नक्कीच फायद्याचा सौदा आहे, पण २००८ ला च पहिली अल्टो विकुन इंडिगो घेतली त्यानंतर २०११ ला ती विकुन जवळ जवळ १७ हजार हप्त्याने लक्झरी लिनिया घेतली त्यानंतर दोन वेळा सिग्नला थांबलो असताना अपघात झाले त्यात समोरच्या गाड्यांची पुर्ण मोडतोड झाली माझ्या गाडीची बाहेरच्या भागाची दैनिय अवस्था होती पण आतमध्ये मला हलकासा धक्का बसण्याव्यतिरिक्त काहिही जाणवले नाही,मी एकच विचार केला जर तेथे मि अल्टो अथवा इंडिगो मध्ये असतो तर........... माझे या गाडीत गेलेले अतिरिक्त पैसे नक्की वसुल झाले होते. कारण जो पर्यंत मी चालतो फिरतो आहे तोपर्यंत माझा व्यवसाय चालु आहे.मी खुर्चीत नसेल तर तेथे कुत्र फिरकणार नाही त्यामुळे हाय एंड सेप्टी फिचर्स असलेली गाडी हि माझी गरज आहे,त्यामुळे या गोष्टींचा वेगळा विचार होवु शकतो.

In reply to by स्पार्टाकस

स्रुजा 18/07/2014 - 00:49
इएमआय हा घर, गाडी घेण्यासाठी काहीसा अविभाज भाग झालेला आहे. मात्रं अनेकदा या वस्तूंच्या दुप्पट किंमत आपण व्याजासकट भरत असतो.
पण त्यावर सुद्धा जास्त पैसे भरून व्याज वाचवता येतं . तुम्हाला तुमच्या प्राप्तीकरा वर मिळणारी सूट आणि तुम्ही भरत असलेलं व्याज हे साधारण एका पातळीवर आलं की गृह कर्ज फेडून टाकण्यावर भर द्यावा आणि कर वाचान्व्ण्यासाठी दुसरे उपाय (अजून एखादं घर? ) शोधावेत. व्याज वाचवणं कधी ही आपल्या हातात असतं आणि दर महिन्याला हाती मिळणारी रक्कम या एकाच गोष्टीवर लक्ष न देत जर हफ्ते वाढवत राहिलो आपण तर गृह कर्ज खूप फायदेशीर ठरतं हा माझा वैयक्तिक अनुभव आहे . बाकी लेख खूप पटलाय . डिझायनर घड्याळा एवढं चपखल उदाहरण मला विचार करून ही सापडत नाहीये. माझ्या ही माहिती मध्ये असे खूप लोक आहेत जे घरातलं फर्निचर करायला पण वैयक्तिक कर्ज घेतात. या गोष्टी हळू हळू करण्यात पण मजा असते. मुख्य म्हणजे जेंव्हा करायचा तेंव्हा करेन पण छान च करेन असा जर एक विचार असला तर माणूस पिअर प्रेशर ला सहज सहजी बळी पडत नाही. आणि त्यांच्याकडून अशा चुका होत नाहीत असं माझं मत आहे.

मोक्याच्या ठिकाणच्या स्थावर मालमत्तेसाठी काढलेले (परवडणारे) कर्ज स्वस्तच पडते. अगदी ठरवून ठराविक रक्कम शिल्लक टाकणे फार कमी लोकांना जमते. बहुतेकांच्या शिलकीला अनेक वाटा फुटतात आणि ध्येयप्राप्ती होत नाही. कर्ज घेतले असेल तर मारुनमुटकून परतफेड केली जाते आणि आपसुक पैसा मालमत्तेच्या स्वरुपात शिल्लक पडतो. जी माणसं खर्चिक असतात त्यांच्यासाठी पैसा साठविण्याचा हा सुलभ मार्ग आहे. 'ऋण काढून सण करु नये' असे जे आपले पूर्वज सांगत आले आहेत त्यात तथ्य आहे. सण साजरे करण्यासाठी, बडेजाव मिरविण्यासाठी कर्ज काढू नये. पण, मुलांचे शिक्षण आणि क्वचित अपरिहार्यतेतून येणारे आजारपणाचे खर्च उचलण्यासाठी कर्ज काढावे लागते. तसेच, सोन्या-चांदीचे भाव उतरले असताना थोडेफार कर्ज काढून केलेली खरेदीही यथायोग्यच म्हणायला हवी.

In reply to by सुबोध खरे

पण ईथे फक्त वास्तू हा लेखाचा (ई एम आयचा) विषय नाहीये. एकुणच कर्ज वाईट असा सूर दिसतोय. सर्व प्रतिसाद बघता ज्या वस्तूंची किंमत दिवसागणिक वाढते (अ‍ॅप्रिसिएशन) ती ई एम आय वर घ्यायला हरकत नसावी. म्हणजे " वाजली तर वाजली नाहीतर मोडुन खाल्ली" डेप्रिसिएशनवाल्या वस्तूबाबत मात्र खरेच गरज आहे का ? हा विचार केला जावा.

पाषाणभेद 17/07/2014 - 05:02
कार्य आहे घरचं, होवू दे खर्च समजा एखाद्या वस्तूचा इएमआय करायचाच असेल तर आपल्या गरजेच्या मॉडेलचा विचार करावा. उगाचच इएमआय मिळतो म्हणून २९ इंचाच्या टिव्हीऐवजी ५१ इंची टिव्ही घेवू नये.

कर्जाला फायनान्सच्या भाषेत Financial Leverage म्हणतात कारण फायदेशीर व्यवसायात कर्ज घेवून व्यवसाय वृध्दींगत करणे योग्य ठरते (cost of capitalच्या तत्वानुसार). स्थावर मालमत्ता ही गुंतवणूक आहे आणि गरजही त्यामुळे त्याकरिता कर्ज घेणे योग्यच. पण ज्या वस्तूंच्या किमती (पुनर्विक्री) झपाट्याने कमीच होणार आहेत त्याकरिता कर्ज घेणे कदाचित फारसे योग्य होणार नाही. पण पुन्हा तुलना आहेच की एखाद्या विक्रेत्याने खप वाढावा वा विक्री उद्दिष्ट गाठता यावे याकरिता अगदी कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन दिले असल्यास त्या पर्यायाचा विचार करण्यास हरकत नाही कारण तुमची गुंतवणूक तुम्हाला त्या व्याजापेक्षा अधिक परतावा देत असते. बाकी वस्तूच्या उपयूक्ततेचा विचार नेहमीच करावा अगदी जवळ नगद असेल , कर्ज घ्यायची गरज नसेल तरीही. कारण आपल्याला आवश्यक नसलेली वस्तू आपण उगाच विकत घेवून आपले मेहनतीने कमवलेले पैसे वाया का दवडावे ? एकूणातच तारतम्य महत्वाचे आणि काही वेळा चुका करुनच शहाणपण येते हे ही तितकेच खरे... (अनेकदा वस्तू घेतल्यावर काही काळाने वाटते आपण ही वस्तू उगाच घेतली.)

मी तर म्हणतो कन्झ्युमरिझम हवा. त्यायोगे कंपन्या प्रॉफिट करतात. मी त्यांचे शेअर्स घेतो, ते वाढतात. बँका कर्ज देऊन मालदार होतात. मी त्यांचे शेअर्स घेतो, ते वाढतात. नातेवाईक आणि मित्रांना शक्यतो सांगतो की उधळपट्टी करू नका, काहीन्ना पटत नाही, मग सोडून देतो आणि अजून काही शेअर्स खरेदी करतो. मज्जानी लाईफ :-)

कपिलमुनी 17/07/2014 - 13:24
अवांतर : सर्व प्रकारचे कर्ज घेताना त्याचा विमा काढावा .. जेणे करून तुमचा जॉब गेला किंवा मृत्यू झाला तर त्याचा फटका घरच्यांना बसणार नाही.. अगदी पर्सनल लोन ला सुद्धा जॉबलॉस चा विमा मिळतो.. बाकी सेव्हिंग , महिन्याचा खर्च , महिन्याचा पगार आणि ईएमआय याचे गुणोत्तर कसे असावे यावर वाचायला आवडेल.. म्हणजे पुढे गृहकर्ज काढताना काळजी घेता येइल

In reply to by कपिलमुनी

चित्रगुप्त 17/07/2014 - 14:34
सर्व प्रकारचे कर्ज घेताना त्याचा विमा काढावा ..
कर्जाचा विमा' याबद्दल अधिक माहिती द्यावी. आधीच घेतलेल्या गृहकर्जाचा विमा होऊ शकतो का? साधारणतः किती प्रिमियम लागतो?

In reply to by चित्रगुप्त

स्रुजा 18/07/2014 - 01:25
आधीच घेतलेल्या गृह कर्जाचा पण विमा होऊ शकतो. साधारण पाने जर हा विमा केला असेल तर ज्या वेळी क्लेम करायची वेळ येईल त्या वेळेला उरलेली कर्ज रक्कम ही insured sum म्हणून दिली जाते. जर कर्जदार चा मृत्यू झाला असेल तर त्याच्या कुटुंबियांना मिळते . ते कर्ज फेडू शकतात. प्रिमियम हा रकमेवर अवलंबून असतो. साधारण कर्ज सुरु होताना हा पर्याय जर निवडला तर वन टाईम हफ्ता हा कर्जाच्या रकमेवर धरला जातो . कर्ज काढल्यावर काही काळाने जर विमा काढायचा असेल तर तेंव्हा सम insured साठी पर्याय पण निवडता येतो. उदा. दहा लाखांवर १५ वर्षांसाठी १०००० वन टाईम हफ्ता अथवा मंथली प्रिमियम. मंथली प्रिमियम अर्थात च महाग पडतं . माझ्या मते जर कर्जानंतर काही काळाने विमा काढायचा असेल तर त्या वेळी गृह कर्ज विम्य पेक्षा टर्म इन्शुरन्स जास्त आय्देशीर ठरतो. तो मोठ्या पल्ल्यासाठी आणि मोठ्या रकमे साठी अत्यंत कमी प्रिमियम मध्ये मिलतो. अर्थात क्लेम सेटलमेंट हिस्टरी बघून च विमा कंपनी निवडावी या इन्शुरन्स साठी.

In reply to by स्रुजा

आदूबाळ 18/07/2014 - 14:13
सृजातै माझ्या डोक्यात जरा कंफुजन आहे. विमा नक्की कशाचा काढायचा? "ऑब्जेक्ट इन्शुअर्ड" काय आहे? कर्जदार, की ज्यासाठी कर्ज घेतलंय ती (पक्षी: तारण ठेवलेली) मालमत्ता, की कर्ज (पर्यायाने बँकेची रीपेमेंट रिस्क?)

In reply to by स्रुजा

कवितानागेश 19/07/2014 - 09:05
अगदी बरोबर. टर्म इन्श्युरन्स केन्व्हाही जास्त चांगला. पण जॉबलॉससाठीपण काहीतरी सोय करुन ठेवावी लागते हल्ली.

आदिजोशी 17/07/2014 - 13:35
प्लॅनींग आणि ऐपत ह्या नुसार कर्ज घेतले तर ते एक अतिशय चांगले रिसोर्स म्हणून वापरता येऊ शकते. ह्या दोन गोष्टींचा विचार न करता घेतलेले कर्ज बहुतेक करून घेणार्‍याला झोपवते.

सुनील 17/07/2014 - 14:23
स्साला ह्ये घाटी लोकान्ला जगायचा कसा ते बी समजत नाय. आधी मस्त तंगडी ताणून झोपायचा आणि मग अंथरूण अ‍ॅडजस्ट करायचा हे पन ह्यान्ला कोणी शिकवलं नाय. ह्यांचा तुक्राम्म्हाराज सांगतो - ठेविले अनंते तैसेची रहावे! तो तरी काय करणार? तो बी घाटीच. बापजाद्यांनी ठेवलेले दुकान बी चालवता येईना. (शेवटी मारवाड्यानीच घेतलं असणार!) ;)

कर्ज काढून केसरी वा थॉमस कूकच्या सहलीला जाणारा ह्यांचा एक मित्र होता.नंतर आजारपणात औषधासाठी चार ठिकाणी पैशासाठी फोन. चैनीच्या गोष्टींसाठी कर्ज नको.ऐपत असेल तरच अशा वस्तु घ्याव्यात.घर्,गाडीसाठी आवश्यक कर्ज घेण्यात गैर आहे असे वाटत नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

चैनीच्या गोष्टींसाठी कर्ज नको. ऐपत असेल तरच अशा वस्तु घ्याव्यात. घर, गाडीसाठी आवश्यक कर्ज घेण्यात गैर आहे असे वाटत नाही.
दोन वाक्यात सर्व मथितार्थ! गाडी सुद्धा आवश्यक असेल तरच, म्हणजे रोज कामाला जायला लागत असेल तरच.

आदिजोशी 17/07/2014 - 19:17
लोन घेऊन फायदा तसेच नुकसान झाल्याची ओळखीतली उदाहरणे आहेत का? ती इथे सांगितली तर नक्कीच फायदा होईल.

ईथे बहुतेक जणांचा सुर कर्ज हे प्रकरण वाईट आहे असा दिसतोय. गरजेच्या वस्तु (घर, अपवादात्मक स्थितीमधे गाडी ) घेण्यासाठी कर्ज घेणं नक्कीच वाईट नाही. पण गरज नसलेल्या आणि उगीच दुसर्‍याकडे आहे ते आपल्याकडे पाहिजेचं ह्या वृत्तीच्या लोकांचं मात्र मला हसु वाटतं आणि त्यातुनही क्रेडीट कार्डावरील खरेदी हा आख्खा वेगळा रिस्की प्रकार आहे. माझ्याकडे गेली ४-५ वर्ष क्रेडीट कार्ड्स असुन मी आजपर्यंत एकदाच त्यावरुन खरेदी केली आहे. जी आहेत ती सुद्धा मी कॅन्सल करुन घेणारे. आमच्याकडे कुठलीही महागाईची (चैनीची) वस्तु घ्यायची असेल तर त्यासाठी आम्ही प्लॅन करुन रिकरींग काढतो ते मॅचुअर झालं की वस्तु घेतो. भले काही महिने उशिरा मिळेल वस्तु पण डोक्याला ताप रहात नाही. घरासाठी कर्ज ही खरेकाकांनी म्हणल्याप्रमाणे उत्तम गुंतवणुक आहे. बा द वे, रिव्हर्स मॉर्गेजिंग काय प्रकार आहे?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

चौकटराजा 18/07/2014 - 08:29
म्हणजे समजा आपल्याकडे एक फ्लॅट आहे व तो मोक्याच्या एरियात आहे. आपल्याला मूल नाही किंवा आपल्याला आपली मुले फारशी किमत देत नाहीत. अशा वेळी आपल्या म्हातारपणी आपल्याला केअर टेकर ठेवायचा आहे. त्याला महिन्याला रू. १५००० इतके वेतन देणे भाग आहे. आपल्याकडे आपले पेन्शन फक्त रू १००००इतकेच येते. अशावेळी त्याल वेतन काय देणार कप्पाळ ? आपल्याला हा फ्लॅट विकून तालुक्याच्या गावाला जाता येईल तिथे नव्याने घेतलेला फ्लॅट व आताचा विकलेला फ्लॅट यांच्या फरकाला मुदत बंद ठेवीत गुंतवून रू १०००० पेक्षा आपले मासिक उत्पन्न वाढविता येईल. पण मानसिक रित्या आपल्याला तालुक्याच्या गावाला जाणे शक्य नसेल तर आपल्या फ्लॅट ला बँकेकडे गहाण ठेवायचा त्या बदल्यात बॅ़क आपल्याला पेंशनसारखे वेतन देत जाईल. आपल्या पश्च्यात फ्लॅट बेंकेच्या मालकीचा. व आपल्याला न विचारणार्या पोरांच्या हातात धत्तूरा. याला म्हणतात रिवर्स मॉर्टगेज .

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सुबोध खरे 18/07/2014 - 09:49
रिव्हर्स मोर्टगेज म्हणजे जसे आपण आपले घर तारण ठेवून कर्ज घेतो तसे बँक आपले घर खरेदी करून आपल्याला दर महा हप्ता म्हणून पैसे देते. आपण आपले २० लाखाचे घर जर २० वर्षासाठी रिव्हर्स मोर्टगेज ठेवले. तर बँक आपल्याला वीस वर्षे पर्यंत साधारण २० ते २२ हजार रुपये देते. याच्या मधील कालावधीत आपला मृत्यू झाला तर जितकी रक्कम बँकेने आपल्याला दिली आहे तितकी रक्कम आपला वारस भरून ते घर ताब्यात घेऊ शकतो किंवा आपण घेतलेली रक्कम आणि घराचे सध्याचे मुली यातील फरक आपल्या वारसाला देऊन बँक घर ताब्यात घेते. आपल्या निवृत्ती वेतनाला हा एक पर्याय ठरू शकतो. हो आणि वरील वीस वर्षे आपण आपल्या घरात राहू शकता. फक्त ते आपल्याला विकत येत नाही.पण आपल्याकडे जर मधल्या कालावधीत पैसे आले तर आपण ते भरून या तारणातून आपले घर सोडवू शकता. वरील वीस ते बावीस हजारात व्याजाचा सुद्धा समावेश आहे असे मला वाटते. या बाबतीत शंका निरसन तज्ञ व्यक्तींनी करावे अशी मी विनंती करीत आहे.

In reply to by सुबोध खरे

संपत 19/07/2014 - 12:18
एकच सुधारणा. आपण त्या घरात स्वत: किंवा जोडीदार जिवंत असेपर्यंत राहू शकतो, केवळ २० वर्षे नाही. वीस वर्षानंतर उत्पन्न बंद होईल किंवा जागेच्या वाढलेल्या किमतीनुसार नवीन उत्पन्न चालू होऊ शकेल.

बाळ सप्रे 18/07/2014 - 10:08
एखाद्या गोष्टीची आपल्याला गरज आहे का? किंवा हौस्,मौज म्हणून असल्यास परवडणारी आहे का? याचा विचार प्रत्येक खरेदीआधी केल्यास कर्ज, क्रेडीट कार्ड वापरून आपला फायदा करुन घेता येउ शकतो. मी फक्त गृहकर्ज घेतलय. जिथे शक्य असेल तिथे फक्त क्रेडीट कार्ड वापरून पेमेंट करतो. ०% असल्यास EMI ने पैसे भरतो. कुठलेही अरितिक्त चार्जेस नसलेले क्रेडीट कार्डच वापरतो. वेगवेगळ्या बिलिंग सायकलची २-३ कार्ड वापरून जास्तीत जास्त उशीरा पण न विसरता आणी लेट चार्ज लागण्यापूर्वी पेमेंट करतो.

In reply to by बाळ सप्रे

कार्ड रिसायकलींगनं उशीरा पैसे भरुन विषेश फायदा होत नाही, त्यापेक्षा लगेच पेमेंट करुन होणारी मानसिक सुटका जास्त श्रेयस आहे. करुन पाहा.

क्रेडिट कार्ड हे फक्त व्यहवाराचे सोयीस्कर साधन आहे असे समजावे (म्हणजे कॅश बाळगण्याची कटकट नाही वगैरे फायदे). याशिवाय पॉईंट्स मिळाल्याने होणारा फायदा , इतर ऑफर्स (सिनेमाच्या तिकिटाच्या वगैरे) यांचा अवश्य लाभ घ्यावा. पण लिमिट मोठे आहे म्हणुन खर्च करत सुटू नये. खरेतर लिमिटही कमीच ठेवावे. म्हणजे साधारण मासिक खर्चाच्या फारतर दीडपट-दुप्पट वगैरे. याचा अजून एक फायदा की आपल्या क्रेडीट कार्डाच्या बाबत काही फ्रॉड झालाच तरी होणारे नुकसान कमी असेल. शक्यतो क्रेडिट कार्डाचे पेमेंट लवकरच करावे कारण तसेही सेवींग खात्यात पगार आल्यावर ४% दराने मिळणारे व्याज फार काही मोठे नसते. शिवाय बँकेत पैसे असताना खर्चायचा मोह होत राहील. याशिवाय स्वतःला काही नियम घालावेत. उदा: घेतलेला मोबाईल किमान दोन वर्षे बदलणार नाही. नवीन मोबाईल घेताना आधी बजेट ठरवावे आणि त्यातच खरेदी करावी ई.

रामपुरी 19/07/2014 - 01:42
एकंदर (प्रतिसाद आणि लेख) दोन्हीकडे सूर असा दिसतोय कि फक्त "गरजेच्या" गोष्टींसाठी कर्ज काढायला हरकत नाही. माझ्यामते काही ठिकाणी चैनीच्या वस्तूंसाठी पण कर्ज काढायला हरकत नाही. उदा. मला ६०" टिव्ही घ्यायचा आहे पण आत्ता माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. मला ०% व्याजाने दुकानदार २४ महिन्यांसाठी कर्ज द्यायला तयार आहे. आणि मला खात्री आहे की मी २४ नव्हे तर १२ महिन्यातच ते पैसे फेडू शकतो. तर मी तो टिव्ही आत्ताच का घेऊ नये? की "चैनीच्या वस्तूंसाठी कर्ज घ्यायचे नाही" एवढ्याच कारणासाठी मी १२ महिने वाट बघायची? आता यामध्ये मी फक्त एवढेच भान ठेवीन की माझे सगळे पैसे महिनाअखेरीला खर्च होत नाहीत आणि माझ्या महिन्याच्या बचतीवर नवीन कर्जाचा फार मोठा परिणाम होत नाही. जर योग्य मेळ जमवता आला तर चैन आणि बचत दोन्ही साधता येईल. क्रेडीट कार्ड हे सुद्धा एक प्रकारे कर्जच आहे. योग्य आर्थिक नियोजन करून त्याचा खूप चांगला वापर करून घेता येतो हा स्वानुभव.

In reply to by रामपुरी

थिओरेटिकली हे करणं सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्षात हा स्लिपरी स्लोप होउ शकतो. कधी थांबायचं हे कळलं तर जगातले खूपसे प्रॉब्लेम्स आलेच नसते.

In reply to by अमेरिकन त्रिशंकू

रामपुरी 19/07/2014 - 02:29
थिओरेटिकलीच नव्हे पण प्रॅक्टीकली सुद्धा हे शक्य आहे. फक्त सगळे लगाम हातात घट्ट असले पाहीजेत.

In reply to by रामपुरी

खटपट्या 19/07/2014 - 03:09
२४ महिन्यासाठी बिनव्याजी कर्ज द्यायला दुकानदार तयार आहे. त्यासाठी त्याने आगोदरच किमत वाढवून ठेवली नाही आहे हे बघा. जुना माल गळ्यात मारत नाही ना याची खात्री करा. बाकी सौदा फायद्याचा आहे.

In reply to by रामपुरी

चित्रगुप्त 19/07/2014 - 03:34
मला ६०" टिव्ही घ्यायचा आहे
"घ्यायचा आहे" हा निश्चय झाला, म्हणजे ती तुमची गरज आहे. चैन नव्हे. प्रत्येकाची गरज आणि चैन यांची व्याख्या वेगवेगळी असू शकते. फक्त गरजा भागवत जगणे हे काय जगणे झाले? चैन ही हवीच.

In reply to by चित्रगुप्त

गरज म्हणजे ज्याच्याशिवाय पर्याय नाही असा खर्च आणि चैन म्हणजे असा खर्च, जो केला नाही तरी चालेल.
प्रत्येकाची गरज आणि चैन यांची व्याख्या वेगवेगळी असू शकते.
प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी असली तरी व्याख्या सर्वांसाठी एकच आहे.
फक्त गरजा भागवत जगणे हे काय जगणे झाले? चैन ही हवीच
या अ‍ॅटिट्यूडमुळे आर्थिक पेच निर्माण होतो. मूळ गोष्ट मनःस्वास्थ्य आहे. तुमच्याकडे वस्तू कुठली आहे यापेक्षा, तुम्ही तिचा निवांतपणे उपभोग घेऊ शकत नसाल, तर वस्तूला अर्थ नाही. आनंद स्वास्थ्यपूर्ण उपभोगात आहे, वस्तूत नाही. फ्लॅट कितीही मोठा असला आणि तुम्हाला इएमायचं ओझं असेल तर बेचैनी कायम राहील. टिवी कितीही भारी असला तरी तो निवांतपणे पाहण्यात, हप्त्याचा विचार मधे येऊन सुख हिरावेल. आणि कार कितीही हायटेक असली तरी ड्रायवींगचा आनंद मिळणार नाही. वॉरेन बफेशी किमान एका गोष्टीत तरी मी संपूर्ण सहमत आहे: (हे रुपकात्मक असलं तरी अर्थपूर्ण आहे) अनावश्यक वस्तूंची खरेदी, आवश्यक वस्तू विकायला भाग पाडेल!

In reply to by संजय क्षीरसागर

पियू परी 19/07/2014 - 12:01
आमच्या माहितीत एकजण आहेत. नवरा बायको दोघेही नोकरी करतात. कर्ज काढुन खुप मोठे घर घेतले आहे. दोघांचा एकुलता एक मुलगा खुप लहान आहे. दोघे सकाळी ८ ला जातात ते रात्री ९-१०-११ कसेही परत येतात. मुलाचा सहवास मिळत नाही. जे घर घेतले आहे तिथे फक्त झोपायला येतात. आम्हालाच खुप वाईट वाटते ते बघुन (त्यांना वाटते कि नाही माहित नाही).

In reply to by पियू परी

धड येत नसेल. त्यात (स्वैपाक जमत नसल्यास) जेवणाची बोंब. घरी नोकरीची विवंचना आणि ऑफिसमधे मुलाची ओढ. अशी एकूण परिस्थिती आहे!

In reply to by संजय क्षीरसागर

शिल्पा नाईक 14/05/2015 - 17:53
पण स्वतःचे हक्काचे घर तर आहे. शिवाय थोडे नियोजन करुन पार्ट पेमेंट करुन लवकर सुटता येत. अन मग हवा तेवढा वेळ देता येइल मुलांना. (स्वानुभव)

शब्दबम्बाळ 13/05/2015 - 20:12
हा हा! अहो काही दिवसांपूर्वीच अरमानी च्या कपड्यांसाठी EMI ची योजना आलीये! :D म्हणजे आता न परवडणारे बूट, कपडेसुद्धा कर्ज काढून घ्यायची सोय झालीये लोकांची!! हि बघा लिंक.

In reply to by शब्दबम्बाळ

चला म्हणजे आता ह्या क्षेत्रातली डिफॉल्टर मंडळी लगेचं ओळखता येतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

gogglya 14/05/2015 - 15:52
कर्ज हप्ते न भरल्यामुळे कार जप्त करणे ईत्यादी प्रकार ऐकुन होतो. आता परिधान केलेली वस्त्रे कोणी काढुन नेणार असेल तर कहरच होईल!

काही अंशी खरे आहे तुमचे म्हणणे..पण असे बघा...आज मी कमावतोय...उद्याचे माहीत नाही. आत्ता वय आहे,हौस आहे,खरेदीची क्षमता आहे. (ईएम आय वर का होईना)वस्तू आत्ताच मिळाली तर त्याचा उपभोग घेउ शकतो.नाहीतर चणे आहेत तेव्हा दात नाहीत आणि दात आहेत तर चणे नाहीत असे व्हायचे. आणि हो..ईकॉनॉमी शुड बी रोलींग हे तत्वसुद्धा आहेच.त्यामुळे कही बाबतीत तरी ईएम आय ला पर्याय नाही. आणि मी पयला.हे राहीलेच

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

पण ते चणे ठिसुळ आहेत की लोखंडाचे ते तपासुन बघा नाहितर आपले दातच पडायचे खातांना. डिझायनर घड्याळाचे उदाहरण चपलख आहे इथे.

If you buy things you don't need, you will soon sell things you need. - Warren Buffett माझे काही मित्र Brand च्या प्रेमात बुडून प्रचंड पैसा खर्च करताना दिसतात... अर्थात अतिरेकी कंजुसपणा ही करु नये. मध्यममार्गी असावे. बचतीचे उद्दिष्ट असावेत. माझा एक अनुभव : मी चांगल्या mutual funds मध्ये वगैरे पैसे गुंतवले आणि मग जेव्हा ते छान वाढताना बघितलेत तेव्हा आपोआपच माझा खर्चिकपणा कमी झाला आणि बचतीकडे कल वाढला.

कवितानागेश 16/07/2014 - 14:12
हे सगळं ब्रॅन्ड्स्चे आणि इतर महागड्या गोष्टींचे वेड स्पर्धेतून निर्माण होतं. आणि स्पर्धा तर आपापल्या परीनी सगळेच निर्माण करतायत....... आपली स्वतःची 'गरज आणि कुवत' काय आहे याचा विचार करणं फार कठीण जातं , एकदा का तुलना करण्याचं भूत डोक्यावर बसलं की.

आदूबाळ 16/07/2014 - 14:15
कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑटोमोबाईल, बांधकाम हे उद्योग ईएमायच्या जिवावर फोफावतात. उद्या सगळ्यांनीच ईएमायवर या वस्तू घ्यायचं थांबवलं तर त्या क्षेत्रांत मंदी येईल. त्याचा स्पिलओव्हर इफेक्ट म्हणून नोकर्‍या जातील, कर्जचुकवेगिरी वाढेल, महागाई, वगैरे वगैरे. कर्जाऊ पैसे देण्याच्या माध्यमातूनच बँका अर्थव्यवस्थेत पैसे "निर्माण" करतात. तेही मंदावेल. माझ्यामते मुख्य मुद्दा उधळपट्टी, कॉन्स्पिक्युअस कंझम्प्शन बंद करायचा आहे. थोड्या घाऊक प्रमाणात बोलायचं तर अर्थसाक्षरतेचा आहे. फक्त ईएमायला दोष देऊन कसं भागेल? हे म्हणजे अपघात होतात म्हणून रस्त्याने चालणं बंद करण्यासारखं आहे.

In reply to by आदूबाळ

गरजेचा विचार करुन वस्तू विकत घेणं योग्य. उदा: जर मी बर्‍यापैकी भटकंती करुन फोटोग्राफी करणार असेन, मी खरंच चांगला फोटोग्राफर असेन (भले व्यावसायिक नसेन) तर मी महागडा कॅमेरा घेण्याचं समर्थन होतं अन्यथा घरगुती फोटो काढायला पाच-सात हजारांचा कॅमेराही चालू शकतो. आणि जर मी अशा प्रकारे निसर्गरम्य ठिकाणी भटकंती करण्यात जास्त (फावला) वेळ घालवत असेन तर मला दिखावूपणाची ,ब्रँडेड घड्याळ वा कपड्यांची फारशी गरज नाही मग त्या वस्तूंत मी पैसे वाचवणे योग्य. याउलट मला पार्टी ,समारंभ वगैरेंची जास्त आवड असेल तर मला महागडे कपडे, घड्याळ ई ची गरज अधिक भासेल पण अशा समारंभात माझा आणि माझ्या कुटूंबाचा जास्त वेळ जाणार असेल तर घरी ५२ ईंची ऐवजी ३२ इंची टीवी असून चालण्यासारखे आहे. थोडक्यात सांगायचे तर कुठे तरी समतोल साधावा.

चौकटराजा 16/07/2014 - 15:57
कशासाठी कर्ज घायचे कशासाठी नाही याचे सर्वसाधारण उत्तर असे असू शकते की स्थावर गोष्टीसाठी कर्ज घ्यावे. शिक्षणासाठी कर्ज घ्यावे. व्यवसायाचा भाग म्हणून कर्ज घ्यावे. उदा. अगदी सेकंड थर्ड कितवेही घर असेल तर कर्ज घ्यावे.उच्च शिक्षणाने पुढे चांगली अर्थप्राप्ती होते सबब कर्ज घेण्यास हरकत नाही. भारी क्यामेरा व्यवसायासाठी घ्यायचा असेल तरीही कर्ज घ्यावे. पण तोच हौस म्हणून घ्यायचा असेल तर कर्ज कशासाठी ?हे झाले सरळसोट अर्थशास्त्र पण हौस, प्रतिष्ठा यांचे प्रभावाखाली जे मन काम करणारे असते बहुदा मुर्खाचे असते. पण अर्थ्व्यवस्था चालण्यासाठी अशी माणसे आवश्यक असतात. बिशेषतः मुक्त अर्थ्व्यवस्थेत तर क्याबरे पहाणारे, वेश्येकडे जाणारे, शुभ क्र गाडीसाठी घेणारे, लगनात निमंत्रण पत्रिकेलाही लाखो खर्च करणारे, निरनिराळ्या रंगाचे प्रेशस स्टोन वापरणारे, व्यवसाय वृद्धी, संततिप्राप्ती साठी याग करणारे,पार्ट्या देणारे व घेणारे असे लोक असावे लागतातच. कारण त्यातून जाहिरात कंपन्या, बिल्डर. सेल्समन, वॉचमन हॉटेले ई अनेकाना रोजगार मिळणार असतो.समाजात सगळेच सुज्ञ लोक होणे यातून कल्याणा च्या कल्पनेबरोबर यादवीचा ही धोका संभवतो.

In reply to by चौकटराजा

तुमचे म्हणणे खरे असेल. पण ०% किंवा तत्सम अल्प व्याजदराने कर्ज मिळते म्हणून पण घेतले जाते. म्हणजे EMI ने ५०-६० हजारांचा camera घेणार्‍याकडे ५०-६० हजार कॅश (म्हणजे सेविंग, एफ डी ई) नसतीलच असे नाही पण एफ डी वर मिळणार्‍या व्याजापेक्षा कर्ज वा EMI स्वस्त पडत असेल तर तसे घेणे शहाणपणाचेच ठरते.

पगला गजोधर 16/07/2014 - 16:46
आमचे औरंगाबादचे बोकीलकाका म्हणतात, पूर्वीच्या काळी लोकं वर्तमान विकून भविष्य सुखी करायला बघायचे. (रेफ: निवृत्तिवेतनातूनच घर बांधायचे), आजच्या काळी लोक भविष्य विकून, वर्तमानात सुख विकत घ्यायला पाहतात (जे कि तुम्ही लेखात मांडलय) (मी पूर्वीची लोक बरोबर कि आजचे बरोबर, यावर भाष्य करत नाही आहे, कृपया हळू घ्या)

In reply to by पगला गजोधर

(दोन वेळा `कृपया हळू घ्या' म्हटलंय!) आणि पुढे डिस्क्लेमर टाकलायं : `मी पूर्वीची लोक बरोबर कि आजचे बरोबर, यावर भाष्य करत नाही आहे.' तुमचं बरोबर आहे. `वर्तमान स्वस्थ असला पाहिजे' ही मजेत जगण्यासाठी एकमेव कंडीशन आहे. भविष्य गहाण टाकून तुम्ही `वर्तमानात अस्वस्थ आहात', की `भविष्यात जगू' म्हणून `वर्तमान सोसतायं' यानं काही फरक पडत नाही.

आदिजोशी 16/07/2014 - 17:18
EMI हे एक बूमरँग आहे. वळून परत आल्यावर पकडायचा दम असेल तरच वापरावे :)

मराठे 16/07/2014 - 20:44
वपुंच्या 'दोंदे' ह्या कथेची थोडी आठवण झाली. त्यातच एक वाक्य आहे, की "कर्ज काढणं म्हणजे एक भला मोठा दगड डोंगरावरून खाली ढकलून देणं, आणि कर्ज फेडणं म्हणजे तोच दगड पुन्हा वर नेऊन ठेवणं".

स्पार्टाकस 16/07/2014 - 21:31
इएमआय हा घर, गाडी घेण्यासाठी काहीसा अविभाज भाग झालेला आहे. मात्रं अनेकदा या वस्तूंच्या दुप्पट किंमत आपण व्याजासकट भरत असतो. विशेषतः घर घेताना. एक उदाहरण : गृह कर्ज - ३० लाख व्याजदर - १० % फ्लोटींग.. हा नेहमी वाढतोच. मात्रं मूळ दरापेक्षा कमी कधीच होत नाही. कर्जचा कालावधी - २० वर्ष इएमआय - २८९५०/- आता २० वर्षांपर्यंत इएमाआय भरत बसलो तर परत केलेली रक्कम - २८९५० * १२ * २० = ६९,४८,०००/- म्हणजेच मूळ कर्जाच्या दुप्पटीपेक्षा जास्त पैसे इएमआय रुपाने परत केले !! अर्थात जर गृह कर्जाचे हप्ते पूर्ण वीस वर्ष भरत बसलो तरच. लवकर लोन बंद केले तर किती तरी प्रमाणात हे पैसे वाचू शकतात.

In reply to by स्पार्टाकस

अहो, ज्यांनी वीस वर्षांपूर्वी पाच-दहा लाखांना घरं घेतली, ते नक्की कुठच्या सापळ्यात अकडलेले आहेत? महिन्याला पाच दहा हजार रुपये इएमआय! अबबबबबबबब!!! तेच घर आज कितीपट किमतीला मिळेल? त्यांनी त्यावेळी कर्ज न घेता, घर न घेता बचत केली असती, तर आज ते घर परवडेल का? समजा परवडलं, तरी गेली वीस वर्षं कुठच्यातरी घरासाठी भाडं भरावं लागलंच असतं नाही का? उगाच सापळे वगैरे शब्द वापरायला काय जातंय? रास्त दराने कर्ज घेता येण्याचा सर्वसामान्य माणसाला फायदाच होतो. अतिरेक केला तर तोटा होतो हे बरोबरच. कर्ज हे एक साधन म्हणून वापरावं, आपल्या मर्यादेत रहावं वगैरे ठीक आहे. पण कर्ज काढण्याची प्रथाच वाईट वगैरे मूळ लेखातला टोन पटत नाही.

In reply to by राजेश घासकडवी

यशोधरा 16/07/2014 - 23:40
पण कर्ज काढण्याची प्रथाच वाईट वगैरे मूळ लेखातला टोन पटत नाही. >> असा काही टोन जाणवला नाही, पण केवळ ब्रेंडच्या हव्यासापायी कुवतीपेक्षा आणि विनागरज आपलं बजेट केवळ इएमआय भरण्याची (फसवी) सोय उपलब्ध आहे म्हणून ताणू नये,असे म्हणणे असल्यासारखे वाटते. आता अर्थात, मूळ मुद्दा वगळून एमआय असतातच त्यासाठी वगैरे बरीच चर्चा होऊ शकतेच म्हणा. @ वेल्लाभट - लेख आवडला, पटला. धन्यवाद.

In reply to by स्पार्टाकस

खटपट्या 17/07/2014 - 00:49
३० लाखाच्या घराची २० वर्षांनी किमंत किती झाली असेल ? समजा १ करोड झाली. मला तरी सौदा फायद्याचाच वाटतोय.

In reply to by खटपट्या

३० लाखाचे २० वर्षात १ कोटी म्हणजे रेट ऑफ रिटर्न साधारण ६.२५% झाला. (१.०६२५^२०*३० = ३.३६*३० = १ कोटी). भारतातील चलनवाढ साधारण ८-९% धरली तरी सौदा घाट्यातलाच आहे. (१.०८५^२०*३० = १.५ कोटी) हेच पैसे एफ.डीमध्ये ८-९% नी ठेवले तर जास्त फायदा होईल. थोडक्यात काय तर घर हे राहाण्याकरता घ्या गुंतवणूक हे मुख्य ध्येय ठेवून घेउ नका. जेव्हाकेव्हा घर विकायची वेळ येईल (आलीच तर) तेव्हा फायदा झाला असेल तर उत्तमच पण नुसते ३० लाखाचे १ कोटी झाले म्हणजे गुंतवणूक चांगली असे नाही.

In reply to by अमेरिकन त्रिशंकू

खटपट्या 17/07/2014 - 05:30
काही अंशी तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण २० वर्षानंतर ३० लाखाच्या घराची किंमत १ करोड पेक्षा खूप जास्त असणार हे नक्की. कदाचित २ करोड पेक्षाही जास्त असू शकते पेठकर काकांच्या शेवटच्या प्रतिसादाशी सहमत

In reply to by खटपट्या

सुबोध खरे 17/07/2014 - 10:26
लष्करातून निवृत्त होताना २००४ साली मी माझे घर मुंबईत (मुलुंड येथे )१८ लाख रुपयाला विकत घेतले (७५० चौ. फूट). त्या घराची आज किंमत ८५ लाख पर्यंत येते आहे. हिशेब करा परतावा किती टक्के मिळतो ते. सर्व व्यवहार धनादेशाने केलेला आहे. ( राहते घर विकत येत नाही पण म्हातारपणी रिव्हर्स मोर्तगेज ठेवून मरेपर्यंत पेन्शन सदृश्य दरमहा रक्कम मिळू शकते) ३ लाख माझ्या खिशातून आणि १५ लाख्रुपये एच डी एफ सी चे कर्ज. याचा महिन्याचा हप्ता(?) १४२०० रुपये आहे. यात मला २०,०००/- रुपये मुदलात आणि १,५०,०००/- व्याजात आयकरातून सुट मिळते. म्हणजे ५१,००० रुपये वर्षाला कर बचत. म्हणजे मला प्रत्यक्ष हप्ता रुपये १०,०००/- च पडतो हीच गोष्ट मी जर होंडा अकोर्ड तेंव्हा १८ लाखाला घेतली असती तर आज तिची किंमत १. ८ लाख आली असती वर त्याचा हप्ता तेंव्हा रुपये ५५, ००० पडला असता( मोटारीचे कर्ज फक्त ७ वर्षासाठी मिळते.) तात्पर्य आपण इ एम आय कशासाठी घेतो आहे आणि त्याचा फायदा काय आणि तोटा काय हे प्रत्येकाने तारतम्य ठेवून घ्यावे

In reply to by चौकटराजा

धन्या 17/07/2014 - 14:45
वीस वर्षांपूर्वी विकत घेतलेल्या राहत्या घराची किंम आजच्या बाजारभावाने कितीही कोटी असली तरी ती कागदावरील किंमत असते. ती किंमत रुपयांमध्ये रुपांतरीत करावयाची झाल्यास ते राहते घर विकावे लागेल. राहते घर विकल्यानंतर राहण्यासाठी आपल्या घराच्या किंमतीत आपल्याच घरासारखे जुने घर विकत घेता येऊ शकते. नविन घर घ्यावयाचे झाल्यास आपल्या घराच्या किंमतीत निदान काही लाख तरी टाकावे लागतात. काय फायदा मग अशा वीस लाखाचे एखादा कोटी रुपये झाल्याचा? आपल्या घराची किंमत कोटीमध्ये आहे अशा धारणेपलिकडे त्याला काहीही अर्थ नाही. कुणी जर राहत्या घराबरोबरच गुंतवणूक म्हणून असे एखादे जास्त घर घेतले असेल तर त्या घरालाच हे "वीस लाखाचे एक कोटी" गणित लागू होते.

In reply to by धन्या

सुबोध खरे 17/07/2014 - 18:43
धन्या साहेब राहते घर हे सुद्धा एक फार महत्त्वाचे साधन असू शकते. माझ्या ओळखीतील किंवा माहितीतील चार उदाहरणे अशी आहेत. १) ६० व्या वर्षी निवृत्त झाल्यावर निवृत्तीवेतन नव्हते फक्त फंड होता.मुल बाळ नसलेले जोडपे. व्याजदर कमी झाल्याने त्यात भागेना. त्यातुंन वैद्यकीय खर्च वाढत चाललेला. कोणाकडे हात पसरणार. शेवटी आमच्या सोसायटीतील ( मुलुंड चे) घर विकले २० लाख रुपये आले. तेवढेच घर पार्वती पायथ्याला पुण्यात तेंव्हा ११ लाखाला आले उरलेले ९ लाख रुपये व्याजावर ठेवून त्या जोडप्याचे उर्वरित आयुष्य समाधानात गेले. २) एक जोडपे बांद्र्याला राहत होते. निवृत्तीवेतन नाही. मुले अमेरिकेत. मुंबईत राहून काय करायचे? बांद्र्याचे घर विकले ४० लाखाला. १२ लाखाला कोथरूडला भावाच्या शेजारी ३ बेडरूमचे घर घेतले. उरलेले २८ लाख ब्यांकेत ठेवून आपल्या भावन्डान्सोबत आनंदात आहेत. शिवाय मुले अमेरिकेतून येतात त्यांच्यासाठी मोठे घरहि झाले. अशी अजून २ उदाहरणे आहेत. असो. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला तेंव्हा लोकसंख्या ४० कोटी होती. भारताचे क्षेत्रफळ वाढले नाही पण लोकसंख्या तिप्पटी हून जास्त झाली आहे. तेंव्हा घराच्या किमती कमी होण्याची शक्यता नाही. केंव्हाही स्वतःचे घर असणे हे उत्तम. त्याहून जास्त पैसे असतील तर दुसरे घर घ्यावे भाड्याने द्यावे. आणि जेंव्हा परवडेनासे होईल तेंव्हा मोडून खावे.

In reply to by धन्या

बेकार तरुण 18/07/2014 - 07:29
अपवादात्मक परिस्थितिच होत अस वाटत नाहि मला. घर घेण हे गुंतवणुक म्हणुन असु दे वा रहायला असु दे, त्याचि किंमत वाढण हे जरि कागदि असलं तरि याचाच अर्थ असाहि होतो कि त्या भागातिल घरांचि भाडि देखिल साधारण त्याच रेट मधे वाढलि आहेत. सो स्वतचे घर नसेल तर भाडे हि तेवढेच वाढेल. सो झेपेल तेवढे कर्ज घेउन स्वताचे घर घेणे शहाणपणाचे ठरु शकते. आणि एक म्हंणजे अनेक ईकॉनोमिक सायकल्स आल्या आणी गेल्या पण घराच्या किमति वाढतच राहिल्या आहेत. आपला ई एम आय तोच राहिल (थोड्या फार फरकाने) पण आपले भाडे नक्किच वाढत राहिल. बाकि मूळ लेखातिल मुद्द्याशि सहमत आहे. घड्याळ हे उदाहरण पण चपखल आहे.

In reply to by बेकार तरुण

आदूबाळ 18/07/2014 - 14:09
नाही, भाड्याची घरं हे स्वतंत्र मार्केट आहे. घरं (residential property) भाड्याने देण्यात ५-७% च्या वर रिटर्न मिळत असेल असं वाटत नाही. (अपवादः कॉट बेसिस, सर्विस अपार्टमेंटस वगैरे. पण ती प्युअर टेनंसी नव्हे.) घर विकत घेऊन त्याचा ईएमाय आलेल्या भाड्याच्या पैशांत बसला आहे असं उदाहरण माझ्यातरी पहाण्यात नाही. (तुमच्या असल्यास सांगा - लगेच इन्वेस्ट करू!)

In reply to by आदूबाळ

घर घेऊन भाड्याने देण्यापेक्षा दुकान घेऊन (मोक्याच्या ठिकाणचं) भाड्याने देणं जास्त सोयिस्कर. सगळा ईएमाय गेला नाही तरी बराच रिलिफ मिळतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

बाबा पाटील 19/07/2014 - 10:40
बायकोने साठ लाखाचे दुकान विकत घेतले त्याचे भाडे मिळते १५०००. आता विचार करा ह्याच साठ लाखाची पुन्यापासुन ४० ते ५० किमी च्या परिसरात साधारण ४ ते ५ एकर जिरायत जमिन सरासरी १२ ते १५ लाख रु एकर ने आली असती त्यात विहिर खोदन्याचा मोटार पाइपलाइनचा खर्च २ ते ३ लाख. व फळ झाडे लावण्याचा खर्च २ लाख या वरच्या खर्चालाही शासकिय अनुदान आहे, व कालावधी १ ते दिड वर्ष आता दिड वर्षाने या जमिनीची विक्री करावयाची ठरवली तर साधारण फळबाग बागायत जमिनिची एकरी किंमत कमित कमी २५ लाख रुपये एकर चालु आहे व्यवहार बसता बसता सहा महिने गेले तरी दोन वर्षांनी जमिनीची किंमत येते येते १.१० ते १.२५ कोटी मग हे जे दुकान घेतले त्याची वाढुन वाढुन दोन वर्षांनी किंमत किती वाढेल्,समजा स्वतःकडेच ठेवले तर त्याचे भाडे किती येइल.

In reply to by बाबा पाटील

माझ्या प्रतिसादातील '(मोक्याच्या ठिकाणी)' हा मुद्दा आपण लक्षात घेतलेला दिसत नाहिये. ६० लाखात घेतलेले दुकान कुठल्या गावात, परिसरात आणि किती चौरस फुटाचे आहे हे लिहीलेले नाही. पण पुण्यात जिथे मी उपहारगृह चालवत होतो तिथे २५० चौरस फुटाच दुकानाचे भाडे २००००/- रुपये होते ते दुका॑न मालकाने ८ की १० लाखात घेतले होते. शहरातील मुख्य उलाढालीच्या केंद्राजवळ दुकानांचा प्रत्येक चौरस फुटाचा खरेदी दर आणि त्यातून मिळणार्‍या भाड्याच्या रकमेचा परतावा दोन्ही जास्त असतात. अशा केंद्रापासून जेवढे दूर जाल तेवढे प्रत्येक चौरस फुटाचा खरेदी दर कमी असतो (म्हणजे तेव्हढ्याच पैशात जास्त जागा मिळते) तसेच भाडेही कमी मिळते पण जागा जास्त असल्याने फायदाच होतो. ह्यातून कर्जाचा संपूर्ण ईएमाय निघत नाही पण बर्‍यापैकी रिलिफ मिळतो. आणि कालांतराने दुकानाची संपूर्ण मालकी तुमच्याकडे येऊन वाढीव भाडे (वाढत्या महागाई नुसार) कायम तुम्हास मिळते.

In reply to by प्रभाकर पेठकर

बाबा पाटील 19/07/2014 - 19:30
तरी सरळ वैद्यकिय व्यवसायाचा विचार केला तर त्यातुन संपुर्ण परतावा मिळण्यासाठी म्हातारपण उजाडावे लागेल. त्याच्या उलट सध्या पुण्याच्या जवळपास ५०-६० कि.मी.च्या परिसरात जरी एकरामध्ये जमिन घेतली तर त्वरित खेळते भांडवल उपलब्ध होते. सध्या माझ्या भागात २२०० ते २८०० रु स्के.फु. चा जागेचा भाव आहे,बिल्डरला डेव्हलपमेंट साठी लागतात सरासरी १५०० रु. म्हणजे त्याचा खर्च होतो ४००० रु प्रती स्के.फुट , प्रत्यक्षात यापेक्षाही बराच कमी खर्च लागतो. सध्या दुकानाचा भाव चालु आहे १० ते १८ हजार प्रती स्के. फु.म्बायकोने घेतलेले दुकान आहे ४८० स्के.फु. प्रत्यक्षात मोजल्यावर भरते २८ * १२=३३६ म्हणजे कारपेट आणी बिल्ट अप मधला फरक मला तरी कळला नाही. मग या दुकानामागचा हिशोब कसा पडला तुम्हीच सांगा. या पेक्षा असे म्हातारपणाचा विचार करुन असे फुकट भांडवल अडकवुन ठेवण्यापेक्षा ते इतर धंद्यात लावले अथवा शेतजमिनित लावले तर मिळणारा परतावा कित्येक पटीने अधिक असतो. नशिब याच्यात तिने कुठेही किरकोळ कर्ज सोडले तर व्यवसायिक कर्ज घेतले नाही म्हणुन काही वाटत नाही पण हिच गोष्ट जर कर्जाने केली असती तर..... आता मी माझा विचार सांगतो. थोडी थोडी बचत रेग्युलर करत जा. दोन तिन वर्षात पुरेसे पैसे साठतात्,त्यावेळी टोकन अमाउंट टाकुन एखादा जमिनिचा व्यवहार पक्का करा,ज्या दिवशी कागद होइल त्याच्या दुसर्‍या दिवशी त्याला गिर्हाइक पाहायला सुरुवात करा हा यात कधी कधी मसल पॉवर वापरावी लागते.तर कधी अंगावर आले तर लगेच पुर्ण खरेदी खताची तयारी ठेवा. कर्ज काढुन नव्हे. त्यांन्तर जमिन पुढच्या पार्टीला फिरवा १० रुपाचे अगदी २० हजार नाही तरी कमित कमी १५ ते १८ रुपये नक्की होतात्,हिच रक्कम जेंव्हा लाखात असते त्यावेळी फरक खुप मोठा पडतो.

In reply to by बाबा पाटील

माझी उपहारगृहाची जागा कोथरुडात होती. तिथे २००००/- हा भाड्याचा दर होता. तुमच्या परिसराची मला कल्पना नाही. त्यामुळे कदाचित तुमची गणितं तुमच्या व्यवसायासाठी बरोबर की चुक मी ठरवू शकत नाही. तेंव्हा असो.माझ्या अनुभवानुसार शहरातील व्यवसायाची जागाच मला जास्त फायदेशिर वाटते. भविष्यातील माझी गुंतवणूक त्या दृष्टीनेच असेल.

In reply to by आदूबाळ

अनुप ढेरे 18/07/2014 - 14:59
सहमत. जास्तीत जास्त कर्ज काढलं तर २० वर्षाच्या ईएमायच्या अर्ध भाडं येईल साधारण असं बर्‍याच ठीकाणी दिस्तं. पण हळूहळू भाडं वाढवता पण येईल. ईएमाय तेव्ढाच रहाणार आहे. कधीतरी हे फायद्यात येईलच.

In reply to by आदूबाळ

आजानुकर्ण 19/07/2014 - 21:40
राहण्यासाठी स्वतःचे घर असावे. इतपत रियल इस्टेट सामान्य माणसांना पुरेशी आहे. गुंतवणूक म्हणून रियल इस्टेटकडे पाहणे हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे हे कर्ज-व्याज-उत्पन्न-भाडं यांची साधी आकडेमोड करुन कळते. अमुकतमुकाने १० लाखात घेतलेल्या घराची आता १ कोटी किंमत आहे ह्या सांगोवांगीच्या माहितीवर विश्वास ठेवून गुंतवणुकीचे निर्णय घेऊ नयेत असे वाटते. कायदेशीर व्हाईट मनी कमावणाऱ्याला म्युच्युअल फंडांसारखी टॅक्स एफिशियन्ट साधने उपलब्ध आहेत. एनपीएससारख्या उत्तम पेन्शन योजना आहेत. सेबीसारख्या संस्था या गोष्टींवर बऱ्यापैकी नियंत्रण ठेवून आहेत. हवे असल्यास अगदी ३ दिवसात खात्यात पैसे येतील इतकी चांगली लिक्विडिटी आहे. ऐपतीप्रमाणे गुंतवणूक करता येते. कर्जाच्या जाळ्यापासून बाहेर राहता येते. अधिक धाडस करण्याची इच्छा असेल तर थेट शेअर बाजारात गुंतवणूक करु शकता. याउलट घराच्या बाबतीत ब्रोकरपासून, सोसायटी, महापालिका हजार कटकटी असतात. सरकार व्हॅटसारखा पूर्वलक्ष्यी बांबू लावतं. घराच्या कायदेशीरपणाबाबत अनेकदा आपण अंधारात असतो. शिवाय घराच्या बाबतीत होऊ शकणारा बहुतेक फायदा आधीच बिल्डरने घशात घातलेला असतो. प्रचंड प्रमाणात काळा पैसा, आणि स्पेक्युलेशन याच्यावर विश्वास ठेवून हे मार्केट सुरु आहे मात्र तरीही शेअर बाजाराच्या तुलनेत मिळणाऱ्या रिटर्न्समध्ये फारसा फरक नाही. जमिनीच्या व्यवहारात तर शहाण्या माणसाने अजिबात पडू नये.

In reply to by सुबोध खरे

बाबा पाटील 19/07/2014 - 10:21
मी २००५ ला पुन्यात साडेतिन लाखात अडीच गुंठे जागा घेतली त्यावर २००८ ला २८ लाख खर्च करुन घर बांधले त्याच्या साठी सहा लाखाचे कर्ज काढले त्याचा हप्ता १० हजार,पण आता घराची किंमत आहे सरासरी दिड ते दोन कोटी. नक्कीच फायद्याचा सौदा आहे, पण २००८ ला च पहिली अल्टो विकुन इंडिगो घेतली त्यानंतर २०११ ला ती विकुन जवळ जवळ १७ हजार हप्त्याने लक्झरी लिनिया घेतली त्यानंतर दोन वेळा सिग्नला थांबलो असताना अपघात झाले त्यात समोरच्या गाड्यांची पुर्ण मोडतोड झाली माझ्या गाडीची बाहेरच्या भागाची दैनिय अवस्था होती पण आतमध्ये मला हलकासा धक्का बसण्याव्यतिरिक्त काहिही जाणवले नाही,मी एकच विचार केला जर तेथे मि अल्टो अथवा इंडिगो मध्ये असतो तर........... माझे या गाडीत गेलेले अतिरिक्त पैसे नक्की वसुल झाले होते. कारण जो पर्यंत मी चालतो फिरतो आहे तोपर्यंत माझा व्यवसाय चालु आहे.मी खुर्चीत नसेल तर तेथे कुत्र फिरकणार नाही त्यामुळे हाय एंड सेप्टी फिचर्स असलेली गाडी हि माझी गरज आहे,त्यामुळे या गोष्टींचा वेगळा विचार होवु शकतो.

In reply to by स्पार्टाकस

स्रुजा 18/07/2014 - 00:49
इएमआय हा घर, गाडी घेण्यासाठी काहीसा अविभाज भाग झालेला आहे. मात्रं अनेकदा या वस्तूंच्या दुप्पट किंमत आपण व्याजासकट भरत असतो.
पण त्यावर सुद्धा जास्त पैसे भरून व्याज वाचवता येतं . तुम्हाला तुमच्या प्राप्तीकरा वर मिळणारी सूट आणि तुम्ही भरत असलेलं व्याज हे साधारण एका पातळीवर आलं की गृह कर्ज फेडून टाकण्यावर भर द्यावा आणि कर वाचान्व्ण्यासाठी दुसरे उपाय (अजून एखादं घर? ) शोधावेत. व्याज वाचवणं कधी ही आपल्या हातात असतं आणि दर महिन्याला हाती मिळणारी रक्कम या एकाच गोष्टीवर लक्ष न देत जर हफ्ते वाढवत राहिलो आपण तर गृह कर्ज खूप फायदेशीर ठरतं हा माझा वैयक्तिक अनुभव आहे . बाकी लेख खूप पटलाय . डिझायनर घड्याळा एवढं चपखल उदाहरण मला विचार करून ही सापडत नाहीये. माझ्या ही माहिती मध्ये असे खूप लोक आहेत जे घरातलं फर्निचर करायला पण वैयक्तिक कर्ज घेतात. या गोष्टी हळू हळू करण्यात पण मजा असते. मुख्य म्हणजे जेंव्हा करायचा तेंव्हा करेन पण छान च करेन असा जर एक विचार असला तर माणूस पिअर प्रेशर ला सहज सहजी बळी पडत नाही. आणि त्यांच्याकडून अशा चुका होत नाहीत असं माझं मत आहे.

मोक्याच्या ठिकाणच्या स्थावर मालमत्तेसाठी काढलेले (परवडणारे) कर्ज स्वस्तच पडते. अगदी ठरवून ठराविक रक्कम शिल्लक टाकणे फार कमी लोकांना जमते. बहुतेकांच्या शिलकीला अनेक वाटा फुटतात आणि ध्येयप्राप्ती होत नाही. कर्ज घेतले असेल तर मारुनमुटकून परतफेड केली जाते आणि आपसुक पैसा मालमत्तेच्या स्वरुपात शिल्लक पडतो. जी माणसं खर्चिक असतात त्यांच्यासाठी पैसा साठविण्याचा हा सुलभ मार्ग आहे. 'ऋण काढून सण करु नये' असे जे आपले पूर्वज सांगत आले आहेत त्यात तथ्य आहे. सण साजरे करण्यासाठी, बडेजाव मिरविण्यासाठी कर्ज काढू नये. पण, मुलांचे शिक्षण आणि क्वचित अपरिहार्यतेतून येणारे आजारपणाचे खर्च उचलण्यासाठी कर्ज काढावे लागते. तसेच, सोन्या-चांदीचे भाव उतरले असताना थोडेफार कर्ज काढून केलेली खरेदीही यथायोग्यच म्हणायला हवी.

In reply to by सुबोध खरे

पण ईथे फक्त वास्तू हा लेखाचा (ई एम आयचा) विषय नाहीये. एकुणच कर्ज वाईट असा सूर दिसतोय. सर्व प्रतिसाद बघता ज्या वस्तूंची किंमत दिवसागणिक वाढते (अ‍ॅप्रिसिएशन) ती ई एम आय वर घ्यायला हरकत नसावी. म्हणजे " वाजली तर वाजली नाहीतर मोडुन खाल्ली" डेप्रिसिएशनवाल्या वस्तूबाबत मात्र खरेच गरज आहे का ? हा विचार केला जावा.

पाषाणभेद 17/07/2014 - 05:02
कार्य आहे घरचं, होवू दे खर्च समजा एखाद्या वस्तूचा इएमआय करायचाच असेल तर आपल्या गरजेच्या मॉडेलचा विचार करावा. उगाचच इएमआय मिळतो म्हणून २९ इंचाच्या टिव्हीऐवजी ५१ इंची टिव्ही घेवू नये.

कर्जाला फायनान्सच्या भाषेत Financial Leverage म्हणतात कारण फायदेशीर व्यवसायात कर्ज घेवून व्यवसाय वृध्दींगत करणे योग्य ठरते (cost of capitalच्या तत्वानुसार). स्थावर मालमत्ता ही गुंतवणूक आहे आणि गरजही त्यामुळे त्याकरिता कर्ज घेणे योग्यच. पण ज्या वस्तूंच्या किमती (पुनर्विक्री) झपाट्याने कमीच होणार आहेत त्याकरिता कर्ज घेणे कदाचित फारसे योग्य होणार नाही. पण पुन्हा तुलना आहेच की एखाद्या विक्रेत्याने खप वाढावा वा विक्री उद्दिष्ट गाठता यावे याकरिता अगदी कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन दिले असल्यास त्या पर्यायाचा विचार करण्यास हरकत नाही कारण तुमची गुंतवणूक तुम्हाला त्या व्याजापेक्षा अधिक परतावा देत असते. बाकी वस्तूच्या उपयूक्ततेचा विचार नेहमीच करावा अगदी जवळ नगद असेल , कर्ज घ्यायची गरज नसेल तरीही. कारण आपल्याला आवश्यक नसलेली वस्तू आपण उगाच विकत घेवून आपले मेहनतीने कमवलेले पैसे वाया का दवडावे ? एकूणातच तारतम्य महत्वाचे आणि काही वेळा चुका करुनच शहाणपण येते हे ही तितकेच खरे... (अनेकदा वस्तू घेतल्यावर काही काळाने वाटते आपण ही वस्तू उगाच घेतली.)

मी तर म्हणतो कन्झ्युमरिझम हवा. त्यायोगे कंपन्या प्रॉफिट करतात. मी त्यांचे शेअर्स घेतो, ते वाढतात. बँका कर्ज देऊन मालदार होतात. मी त्यांचे शेअर्स घेतो, ते वाढतात. नातेवाईक आणि मित्रांना शक्यतो सांगतो की उधळपट्टी करू नका, काहीन्ना पटत नाही, मग सोडून देतो आणि अजून काही शेअर्स खरेदी करतो. मज्जानी लाईफ :-)

कपिलमुनी 17/07/2014 - 13:24
अवांतर : सर्व प्रकारचे कर्ज घेताना त्याचा विमा काढावा .. जेणे करून तुमचा जॉब गेला किंवा मृत्यू झाला तर त्याचा फटका घरच्यांना बसणार नाही.. अगदी पर्सनल लोन ला सुद्धा जॉबलॉस चा विमा मिळतो.. बाकी सेव्हिंग , महिन्याचा खर्च , महिन्याचा पगार आणि ईएमआय याचे गुणोत्तर कसे असावे यावर वाचायला आवडेल.. म्हणजे पुढे गृहकर्ज काढताना काळजी घेता येइल

In reply to by कपिलमुनी

चित्रगुप्त 17/07/2014 - 14:34
सर्व प्रकारचे कर्ज घेताना त्याचा विमा काढावा ..
कर्जाचा विमा' याबद्दल अधिक माहिती द्यावी. आधीच घेतलेल्या गृहकर्जाचा विमा होऊ शकतो का? साधारणतः किती प्रिमियम लागतो?

In reply to by चित्रगुप्त

स्रुजा 18/07/2014 - 01:25
आधीच घेतलेल्या गृह कर्जाचा पण विमा होऊ शकतो. साधारण पाने जर हा विमा केला असेल तर ज्या वेळी क्लेम करायची वेळ येईल त्या वेळेला उरलेली कर्ज रक्कम ही insured sum म्हणून दिली जाते. जर कर्जदार चा मृत्यू झाला असेल तर त्याच्या कुटुंबियांना मिळते . ते कर्ज फेडू शकतात. प्रिमियम हा रकमेवर अवलंबून असतो. साधारण कर्ज सुरु होताना हा पर्याय जर निवडला तर वन टाईम हफ्ता हा कर्जाच्या रकमेवर धरला जातो . कर्ज काढल्यावर काही काळाने जर विमा काढायचा असेल तर तेंव्हा सम insured साठी पर्याय पण निवडता येतो. उदा. दहा लाखांवर १५ वर्षांसाठी १०००० वन टाईम हफ्ता अथवा मंथली प्रिमियम. मंथली प्रिमियम अर्थात च महाग पडतं . माझ्या मते जर कर्जानंतर काही काळाने विमा काढायचा असेल तर त्या वेळी गृह कर्ज विम्य पेक्षा टर्म इन्शुरन्स जास्त आय्देशीर ठरतो. तो मोठ्या पल्ल्यासाठी आणि मोठ्या रकमे साठी अत्यंत कमी प्रिमियम मध्ये मिलतो. अर्थात क्लेम सेटलमेंट हिस्टरी बघून च विमा कंपनी निवडावी या इन्शुरन्स साठी.

In reply to by स्रुजा

आदूबाळ 18/07/2014 - 14:13
सृजातै माझ्या डोक्यात जरा कंफुजन आहे. विमा नक्की कशाचा काढायचा? "ऑब्जेक्ट इन्शुअर्ड" काय आहे? कर्जदार, की ज्यासाठी कर्ज घेतलंय ती (पक्षी: तारण ठेवलेली) मालमत्ता, की कर्ज (पर्यायाने बँकेची रीपेमेंट रिस्क?)

In reply to by स्रुजा

कवितानागेश 19/07/2014 - 09:05
अगदी बरोबर. टर्म इन्श्युरन्स केन्व्हाही जास्त चांगला. पण जॉबलॉससाठीपण काहीतरी सोय करुन ठेवावी लागते हल्ली.

आदिजोशी 17/07/2014 - 13:35
प्लॅनींग आणि ऐपत ह्या नुसार कर्ज घेतले तर ते एक अतिशय चांगले रिसोर्स म्हणून वापरता येऊ शकते. ह्या दोन गोष्टींचा विचार न करता घेतलेले कर्ज बहुतेक करून घेणार्‍याला झोपवते.

सुनील 17/07/2014 - 14:23
स्साला ह्ये घाटी लोकान्ला जगायचा कसा ते बी समजत नाय. आधी मस्त तंगडी ताणून झोपायचा आणि मग अंथरूण अ‍ॅडजस्ट करायचा हे पन ह्यान्ला कोणी शिकवलं नाय. ह्यांचा तुक्राम्म्हाराज सांगतो - ठेविले अनंते तैसेची रहावे! तो तरी काय करणार? तो बी घाटीच. बापजाद्यांनी ठेवलेले दुकान बी चालवता येईना. (शेवटी मारवाड्यानीच घेतलं असणार!) ;)

कर्ज काढून केसरी वा थॉमस कूकच्या सहलीला जाणारा ह्यांचा एक मित्र होता.नंतर आजारपणात औषधासाठी चार ठिकाणी पैशासाठी फोन. चैनीच्या गोष्टींसाठी कर्ज नको.ऐपत असेल तरच अशा वस्तु घ्याव्यात.घर्,गाडीसाठी आवश्यक कर्ज घेण्यात गैर आहे असे वाटत नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

चैनीच्या गोष्टींसाठी कर्ज नको. ऐपत असेल तरच अशा वस्तु घ्याव्यात. घर, गाडीसाठी आवश्यक कर्ज घेण्यात गैर आहे असे वाटत नाही.
दोन वाक्यात सर्व मथितार्थ! गाडी सुद्धा आवश्यक असेल तरच, म्हणजे रोज कामाला जायला लागत असेल तरच.

आदिजोशी 17/07/2014 - 19:17
लोन घेऊन फायदा तसेच नुकसान झाल्याची ओळखीतली उदाहरणे आहेत का? ती इथे सांगितली तर नक्कीच फायदा होईल.

ईथे बहुतेक जणांचा सुर कर्ज हे प्रकरण वाईट आहे असा दिसतोय. गरजेच्या वस्तु (घर, अपवादात्मक स्थितीमधे गाडी ) घेण्यासाठी कर्ज घेणं नक्कीच वाईट नाही. पण गरज नसलेल्या आणि उगीच दुसर्‍याकडे आहे ते आपल्याकडे पाहिजेचं ह्या वृत्तीच्या लोकांचं मात्र मला हसु वाटतं आणि त्यातुनही क्रेडीट कार्डावरील खरेदी हा आख्खा वेगळा रिस्की प्रकार आहे. माझ्याकडे गेली ४-५ वर्ष क्रेडीट कार्ड्स असुन मी आजपर्यंत एकदाच त्यावरुन खरेदी केली आहे. जी आहेत ती सुद्धा मी कॅन्सल करुन घेणारे. आमच्याकडे कुठलीही महागाईची (चैनीची) वस्तु घ्यायची असेल तर त्यासाठी आम्ही प्लॅन करुन रिकरींग काढतो ते मॅचुअर झालं की वस्तु घेतो. भले काही महिने उशिरा मिळेल वस्तु पण डोक्याला ताप रहात नाही. घरासाठी कर्ज ही खरेकाकांनी म्हणल्याप्रमाणे उत्तम गुंतवणुक आहे. बा द वे, रिव्हर्स मॉर्गेजिंग काय प्रकार आहे?

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

चौकटराजा 18/07/2014 - 08:29
म्हणजे समजा आपल्याकडे एक फ्लॅट आहे व तो मोक्याच्या एरियात आहे. आपल्याला मूल नाही किंवा आपल्याला आपली मुले फारशी किमत देत नाहीत. अशा वेळी आपल्या म्हातारपणी आपल्याला केअर टेकर ठेवायचा आहे. त्याला महिन्याला रू. १५००० इतके वेतन देणे भाग आहे. आपल्याकडे आपले पेन्शन फक्त रू १००००इतकेच येते. अशावेळी त्याल वेतन काय देणार कप्पाळ ? आपल्याला हा फ्लॅट विकून तालुक्याच्या गावाला जाता येईल तिथे नव्याने घेतलेला फ्लॅट व आताचा विकलेला फ्लॅट यांच्या फरकाला मुदत बंद ठेवीत गुंतवून रू १०००० पेक्षा आपले मासिक उत्पन्न वाढविता येईल. पण मानसिक रित्या आपल्याला तालुक्याच्या गावाला जाणे शक्य नसेल तर आपल्या फ्लॅट ला बँकेकडे गहाण ठेवायचा त्या बदल्यात बॅ़क आपल्याला पेंशनसारखे वेतन देत जाईल. आपल्या पश्च्यात फ्लॅट बेंकेच्या मालकीचा. व आपल्याला न विचारणार्या पोरांच्या हातात धत्तूरा. याला म्हणतात रिवर्स मॉर्टगेज .

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सुबोध खरे 18/07/2014 - 09:49
रिव्हर्स मोर्टगेज म्हणजे जसे आपण आपले घर तारण ठेवून कर्ज घेतो तसे बँक आपले घर खरेदी करून आपल्याला दर महा हप्ता म्हणून पैसे देते. आपण आपले २० लाखाचे घर जर २० वर्षासाठी रिव्हर्स मोर्टगेज ठेवले. तर बँक आपल्याला वीस वर्षे पर्यंत साधारण २० ते २२ हजार रुपये देते. याच्या मधील कालावधीत आपला मृत्यू झाला तर जितकी रक्कम बँकेने आपल्याला दिली आहे तितकी रक्कम आपला वारस भरून ते घर ताब्यात घेऊ शकतो किंवा आपण घेतलेली रक्कम आणि घराचे सध्याचे मुली यातील फरक आपल्या वारसाला देऊन बँक घर ताब्यात घेते. आपल्या निवृत्ती वेतनाला हा एक पर्याय ठरू शकतो. हो आणि वरील वीस वर्षे आपण आपल्या घरात राहू शकता. फक्त ते आपल्याला विकत येत नाही.पण आपल्याकडे जर मधल्या कालावधीत पैसे आले तर आपण ते भरून या तारणातून आपले घर सोडवू शकता. वरील वीस ते बावीस हजारात व्याजाचा सुद्धा समावेश आहे असे मला वाटते. या बाबतीत शंका निरसन तज्ञ व्यक्तींनी करावे अशी मी विनंती करीत आहे.

In reply to by सुबोध खरे

संपत 19/07/2014 - 12:18
एकच सुधारणा. आपण त्या घरात स्वत: किंवा जोडीदार जिवंत असेपर्यंत राहू शकतो, केवळ २० वर्षे नाही. वीस वर्षानंतर उत्पन्न बंद होईल किंवा जागेच्या वाढलेल्या किमतीनुसार नवीन उत्पन्न चालू होऊ शकेल.

बाळ सप्रे 18/07/2014 - 10:08
एखाद्या गोष्टीची आपल्याला गरज आहे का? किंवा हौस्,मौज म्हणून असल्यास परवडणारी आहे का? याचा विचार प्रत्येक खरेदीआधी केल्यास कर्ज, क्रेडीट कार्ड वापरून आपला फायदा करुन घेता येउ शकतो. मी फक्त गृहकर्ज घेतलय. जिथे शक्य असेल तिथे फक्त क्रेडीट कार्ड वापरून पेमेंट करतो. ०% असल्यास EMI ने पैसे भरतो. कुठलेही अरितिक्त चार्जेस नसलेले क्रेडीट कार्डच वापरतो. वेगवेगळ्या बिलिंग सायकलची २-३ कार्ड वापरून जास्तीत जास्त उशीरा पण न विसरता आणी लेट चार्ज लागण्यापूर्वी पेमेंट करतो.

In reply to by बाळ सप्रे

कार्ड रिसायकलींगनं उशीरा पैसे भरुन विषेश फायदा होत नाही, त्यापेक्षा लगेच पेमेंट करुन होणारी मानसिक सुटका जास्त श्रेयस आहे. करुन पाहा.

क्रेडिट कार्ड हे फक्त व्यहवाराचे सोयीस्कर साधन आहे असे समजावे (म्हणजे कॅश बाळगण्याची कटकट नाही वगैरे फायदे). याशिवाय पॉईंट्स मिळाल्याने होणारा फायदा , इतर ऑफर्स (सिनेमाच्या तिकिटाच्या वगैरे) यांचा अवश्य लाभ घ्यावा. पण लिमिट मोठे आहे म्हणुन खर्च करत सुटू नये. खरेतर लिमिटही कमीच ठेवावे. म्हणजे साधारण मासिक खर्चाच्या फारतर दीडपट-दुप्पट वगैरे. याचा अजून एक फायदा की आपल्या क्रेडीट कार्डाच्या बाबत काही फ्रॉड झालाच तरी होणारे नुकसान कमी असेल. शक्यतो क्रेडिट कार्डाचे पेमेंट लवकरच करावे कारण तसेही सेवींग खात्यात पगार आल्यावर ४% दराने मिळणारे व्याज फार काही मोठे नसते. शिवाय बँकेत पैसे असताना खर्चायचा मोह होत राहील. याशिवाय स्वतःला काही नियम घालावेत. उदा: घेतलेला मोबाईल किमान दोन वर्षे बदलणार नाही. नवीन मोबाईल घेताना आधी बजेट ठरवावे आणि त्यातच खरेदी करावी ई.

रामपुरी 19/07/2014 - 01:42
एकंदर (प्रतिसाद आणि लेख) दोन्हीकडे सूर असा दिसतोय कि फक्त "गरजेच्या" गोष्टींसाठी कर्ज काढायला हरकत नाही. माझ्यामते काही ठिकाणी चैनीच्या वस्तूंसाठी पण कर्ज काढायला हरकत नाही. उदा. मला ६०" टिव्ही घ्यायचा आहे पण आत्ता माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. मला ०% व्याजाने दुकानदार २४ महिन्यांसाठी कर्ज द्यायला तयार आहे. आणि मला खात्री आहे की मी २४ नव्हे तर १२ महिन्यातच ते पैसे फेडू शकतो. तर मी तो टिव्ही आत्ताच का घेऊ नये? की "चैनीच्या वस्तूंसाठी कर्ज घ्यायचे नाही" एवढ्याच कारणासाठी मी १२ महिने वाट बघायची? आता यामध्ये मी फक्त एवढेच भान ठेवीन की माझे सगळे पैसे महिनाअखेरीला खर्च होत नाहीत आणि माझ्या महिन्याच्या बचतीवर नवीन कर्जाचा फार मोठा परिणाम होत नाही. जर योग्य मेळ जमवता आला तर चैन आणि बचत दोन्ही साधता येईल. क्रेडीट कार्ड हे सुद्धा एक प्रकारे कर्जच आहे. योग्य आर्थिक नियोजन करून त्याचा खूप चांगला वापर करून घेता येतो हा स्वानुभव.

In reply to by रामपुरी

थिओरेटिकली हे करणं सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्षात हा स्लिपरी स्लोप होउ शकतो. कधी थांबायचं हे कळलं तर जगातले खूपसे प्रॉब्लेम्स आलेच नसते.

In reply to by अमेरिकन त्रिशंकू

रामपुरी 19/07/2014 - 02:29
थिओरेटिकलीच नव्हे पण प्रॅक्टीकली सुद्धा हे शक्य आहे. फक्त सगळे लगाम हातात घट्ट असले पाहीजेत.

In reply to by रामपुरी

खटपट्या 19/07/2014 - 03:09
२४ महिन्यासाठी बिनव्याजी कर्ज द्यायला दुकानदार तयार आहे. त्यासाठी त्याने आगोदरच किमत वाढवून ठेवली नाही आहे हे बघा. जुना माल गळ्यात मारत नाही ना याची खात्री करा. बाकी सौदा फायद्याचा आहे.

In reply to by रामपुरी

चित्रगुप्त 19/07/2014 - 03:34
मला ६०" टिव्ही घ्यायचा आहे
"घ्यायचा आहे" हा निश्चय झाला, म्हणजे ती तुमची गरज आहे. चैन नव्हे. प्रत्येकाची गरज आणि चैन यांची व्याख्या वेगवेगळी असू शकते. फक्त गरजा भागवत जगणे हे काय जगणे झाले? चैन ही हवीच.

In reply to by चित्रगुप्त

गरज म्हणजे ज्याच्याशिवाय पर्याय नाही असा खर्च आणि चैन म्हणजे असा खर्च, जो केला नाही तरी चालेल.
प्रत्येकाची गरज आणि चैन यांची व्याख्या वेगवेगळी असू शकते.
प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगळी असली तरी व्याख्या सर्वांसाठी एकच आहे.
फक्त गरजा भागवत जगणे हे काय जगणे झाले? चैन ही हवीच
या अ‍ॅटिट्यूडमुळे आर्थिक पेच निर्माण होतो. मूळ गोष्ट मनःस्वास्थ्य आहे. तुमच्याकडे वस्तू कुठली आहे यापेक्षा, तुम्ही तिचा निवांतपणे उपभोग घेऊ शकत नसाल, तर वस्तूला अर्थ नाही. आनंद स्वास्थ्यपूर्ण उपभोगात आहे, वस्तूत नाही. फ्लॅट कितीही मोठा असला आणि तुम्हाला इएमायचं ओझं असेल तर बेचैनी कायम राहील. टिवी कितीही भारी असला तरी तो निवांतपणे पाहण्यात, हप्त्याचा विचार मधे येऊन सुख हिरावेल. आणि कार कितीही हायटेक असली तरी ड्रायवींगचा आनंद मिळणार नाही. वॉरेन बफेशी किमान एका गोष्टीत तरी मी संपूर्ण सहमत आहे: (हे रुपकात्मक असलं तरी अर्थपूर्ण आहे) अनावश्यक वस्तूंची खरेदी, आवश्यक वस्तू विकायला भाग पाडेल!

In reply to by संजय क्षीरसागर

पियू परी 19/07/2014 - 12:01
आमच्या माहितीत एकजण आहेत. नवरा बायको दोघेही नोकरी करतात. कर्ज काढुन खुप मोठे घर घेतले आहे. दोघांचा एकुलता एक मुलगा खुप लहान आहे. दोघे सकाळी ८ ला जातात ते रात्री ९-१०-११ कसेही परत येतात. मुलाचा सहवास मिळत नाही. जे घर घेतले आहे तिथे फक्त झोपायला येतात. आम्हालाच खुप वाईट वाटते ते बघुन (त्यांना वाटते कि नाही माहित नाही).

In reply to by पियू परी

धड येत नसेल. त्यात (स्वैपाक जमत नसल्यास) जेवणाची बोंब. घरी नोकरीची विवंचना आणि ऑफिसमधे मुलाची ओढ. अशी एकूण परिस्थिती आहे!

In reply to by संजय क्षीरसागर

शिल्पा नाईक 14/05/2015 - 17:53
पण स्वतःचे हक्काचे घर तर आहे. शिवाय थोडे नियोजन करुन पार्ट पेमेंट करुन लवकर सुटता येत. अन मग हवा तेवढा वेळ देता येइल मुलांना. (स्वानुभव)

शब्दबम्बाळ 13/05/2015 - 20:12
हा हा! अहो काही दिवसांपूर्वीच अरमानी च्या कपड्यांसाठी EMI ची योजना आलीये! :D म्हणजे आता न परवडणारे बूट, कपडेसुद्धा कर्ज काढून घ्यायची सोय झालीये लोकांची!! हि बघा लिंक.

In reply to by शब्दबम्बाळ

चला म्हणजे आता ह्या क्षेत्रातली डिफॉल्टर मंडळी लगेचं ओळखता येतील.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

gogglya 14/05/2015 - 15:52
कर्ज हप्ते न भरल्यामुळे कार जप्त करणे ईत्यादी प्रकार ऐकुन होतो. आता परिधान केलेली वस्त्रे कोणी काढुन नेणार असेल तर कहरच होईल!
लेखनविषय:
लेखनप्रकार
गेल्या दोन-तीन दशकांत, पैसा आणि त्याचं महत्त्व या गोष्टींत कमालीचा बदल होत गेलेला आहे. शिवाय बदलत गेलेत ते पैसा मिळवण्याचे आयाम, तो साठवण्याची परिमाणं, त्याच्या व्ययाच्या पद्धती, त्याचा व्यय करण्यासाठी उपलब्ध असलेले पर्याय आणि त्याच्या व्ययातून मिळणारं समाधान. lifestyleफार पूर्वी नाही, अगदी तीन एक दशकांपूर्वीच्या परिस्थितीची कल्पना करूया. एखादी गोष्ट खरेदी करण्याची प्रक्रिया साधारण अशी असायची. सर्वप्रथम गोष्ट हवी आहे की तिची गरज आहे याचा विचार व्हायचा. अर्थातच गरज असल्यासच बहुदा तो पुढे नेला जात असे. मग त्या गोष्टीची किंमत किती हे बघणं आलं. ब्रँड वैगरे दुय्यम गोष्टी असत.

बालगुन्हेगारी कायद्याचा पुनर्विचार

अक्शु ·

माहितगार 18/07/2014 - 14:07
पहीले शिक्षेतील सवलती केवळ बालगुन्हेगारांना मिळतात हे समजणे कितपत तथ्यास धरून आहे ? राज्यपालांकडून 'आदर्श' सवलती घेणार्‍यांच काय ? समजा एक घटना घडते त्यात दोन्ही बाजूं कडून गून्हा घडलेला असतो त्यातील एकाची पोच वर पर्यंत असते दुसर्‍याची नसते ज्याची वर पर्यंत पोच आहे त्यांच्या नावाने गून्हा दाखल होत नाही आणि ज्याची नसते त्याच्या नावाने गुन्हा दाखल होतो असे घडते की घडत नाही ? लिमीटेशन अ‍ॅक्ट नावाच्या कायद्यान्वये (गंभीर नसलेल्या गुन्ह्यांना लागू होतो) विशीष्ट कालावधीत गून्हा दाखल झाला नाहीतर केस रद्दबातल होते. शिवाय अजून एका प्रकारात गुन्हेगार पुरावे मिळून मोकाट राहू शकतात समजा एक गून्हा झाला कोर्टात केस सर्वोच्च न्यायालया पर्यंत गेली सबळ पुराव्यांच्या अभावी आरोपी निर्दोष सुटले, समजा त्याच केसकरता सबळ पुरावे सर्वोच्च न्यायालयातून सुटल्या नंतर मिळाले जरी तरी ज्या मुद्या करता एकदा केस झाली आहे त्याच मुद्याकरता पुन्हा केस चालू करता येत नाही. त्याही शिवाय अगदी गंभीर गुन्ह्यात सहभाग असूनही ज्यांच्या विरुद्ध केस कधी उभीच टाकत नाही, किंवा उभी टाकूनही पुराव्यांअभावी सुटणार्‍यांना सोबत घेऊन समाज त्याचा व्यवहार चालू ठेवतच असतो. येशू ख्रिस्तानी ज्यांनी कधीच एकही गुन्हा/पाप केल नाही अशांनीच दगड फेकावा म्ह्टल्या नंतर एकानेही दगड फेकला नाही अशी काही गोष्ट आहे म्हणे. व्यक्तीच्या घडण्यावर आसपासच्या समाजाचा परिणाम होतच असतो. जर आसपासच्या समाजाचा परिणाम होत असतो असे गृहीत धरले तर संपूर्ण समाजालाच शिक्षा का करू नये ? करावी तर कुठवर ? गुन्हेगार ज्या विशीष्ट समाजातून येतो तेवढ्यांबद्दलच म्हणत नाहीए; गुन्हा हा संयम सुटल्याच लक्षण असेल तर गुन्हेगारांबद्दल संयम न बाळगू शकणार्‍या समाजाला काय शिक्षा असावी ? गंभीर गुन्हा म्हणजे काय ?, सब्जेक्टीव्ह नसलेली गांभीर्याची व्याख्या कोणती ?

In reply to by माहितगार

व्यक्तीच्या घडण्यावर आसपासच्या समाजाचा परिणाम होतच असतो. जर आसपासच्या समाजाचा परिणाम होत असतो असे गृहीत धरले तर संपूर्ण समाजालाच शिक्षा का करू नये ? करावी तर कुठवर ?
बरोबर आहे. म्हणून कोणालाच कसलीच शिक्षा करू नये. मग कोणीही हरामजादा येईल, निर्भयावर अत्याचार करेल आणि समाजाकडे बोट दाखवून मोकळा होईल.
गुन्हा हा संयम सुटल्याच लक्षण असेल तर गुन्हेगारांबद्दल संयम न बाळगू शकणार्‍या समाजाला काय शिक्षा असावी ?
त्यापूर्वी असले काहीतरी आडाण्यासारखा विचार करणार्‍यांना काय शिक्षा करावी हाच विचार येत आहे.
गंभीर गुन्हा म्हणजे काय ?, सब्जेक्टीव्ह नसलेली गांभीर्याची व्याख्या कोणती ?
म्हणजे निर्भयाप्रकरणातील त्या पाच हरामखोरांचा गुन्हा, कसाब, अफझल यांचे गुन्हे आणि दुकानातून पाच रूपयाची वस्तू पैसे न देता नेणे या गुन्ह्यांमधला गंभीर गुन्हा कोणता आणि कोणता गुन्हा तितका गंभीर नाही हे तुम्हाला कळत नाही का? नसेल तर वेळीच तपासणी करून घ्या.बरोबर आहे. तुमच्या मते गुन्हेगार हा माणूस नसतोच तर समाज असतो. म्हणजे निर्भया प्रकरणातही त्या पाच हरामखोरांनी काहीच गुन्हा केलेला नाही. बरोबर? या असल्या कुजलेल्या विचारांचे लोक दिसले ना तरी भयंकर संताप येतो. तुमच्यासारख्या असल्या मानवाधिकारवाल्यांना इतकाच पुळका आला असेल तर निर्भया ज्या यातनांमधून आणि विटंबनेतून गेली त्यातून एकदा कल्पनेतून तरी जाऊन बघा.आपला काहीही गुन्हा नसताना कोणीतरी हरामखोर कसाब येणार आणि गोळ्या घालणार आणि आपल्यामागे आपल्या बायकामुलांचे हाल होणार आणि इतर कोणीतरी त्या कसाबचेच मानवाधिकारांच्या नावावर समर्थन करणार याचे दु:ख आणि संताप काय असेल हे निदान कल्पनेत तरी इमॅजिन करून बघा. आणि हो असले आडाण्यासारखे मानवाधिकारांचे कौतुक सांगू नका. बालगुन्हेगारी कायद्याचा पुनर्विचार व्हायलाच हवा.ज्या मुलाला बलात्कार करायची अक्कल असते तो कोवळा आणि इनोसन्ट नक्कीच नसतो हे नक्कीच.आमच्या छत्रपतींनी अशांना जी शिक्षा दिली होती-- हातपाय तोडणे ही सध्याच्या काळात अंमलात आणता येणार नसली तरी अशांना प्रचलित कायद्याप्रमाणेच सज्ञान समजूनच कारवाई केली पाहिजे या मागणीला १००% पाठिंबा.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

माहितगार 25/07/2014 - 13:44
त्यापूर्वी असले काहीतरी आडाण्यासारखा विचार करणार्‍यांना काय शिक्षा करावी हाच विचार येत आहे.
व्यक्तिलक्ष्य तर्कदोष: मुळ युक्तिवादास बगल देऊन, युक्तिवाद करणाऱ्या व्यक्तिस नकारात्मक लक्ष्य बनवण्याच्या उद्देशाने अथवा अप्रस्तुत विषयाकडे लक्ष वळवण्यारा, अप्रस्तुत मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तर्कदोषास(तार्कीक उणीवेस) व्यक्तिलक्ष्य तर्कदोष अथवा व्यक्तियुक्ती[१] अथवा Ad hominem [मराठी शब्द सुचवा] असे म्हणतात.यास अप्रस्तुत अथवा अनौपचारिक तर्कदोष असेही समजले जाते. * बाकी मुद्दा गुन्हेगारीला अटकाव करू नये असा नाही, मी कोणी मानवाधिकारांचा समर्थक वगैरे नाही परंतु समतोल विचार न ढळू देता प्रश्नाचा सांगोपांग विचार करणे हा सुसंस्कृतपणा आहे. निर्णय भावनेच्या आधारावर करावयाचे अथवा विवेकाच्या आधारावर हा प्रश्न आहे. समोरची व्यक्ती असंस्कृत पणे वागली म्हणून मी तसेच वागतो हा शेवटचा पर्याय नेहमीच असतो पण हे धोरण सुसंस्कृतीस पुढे नेणारे का मागे नेणारे ? माझा आक्षेप शिक्षा देण्या बद्दल नाही केवळ एकाच टोकाचा विचार करण्या बद्दल आहे म्हणून सांगोपांग समतोल विचार व्हावा म्हणून प्रश्नाच्या दुसर्‍या बाजूही दाखवल्या एवढेच.

In reply to by माहितगार

जोपर्यंत शंभर टक्के गुन्ह्यांविरुद्ध कायदे व त्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत कोणताच कायदा करू असे आपले म्हणणे आहे काय? 'अ' ला एका गुन्ह्याबद्दल शिक्षा झाली नाही म्हणून 'ब' ला त्याच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा करू नये ? ... एका चुकेचे परिमार्जन दुसर्‍या चुकेने होऊ शकते असे म्हणणे ठीक नाही. दोघानांही त्यांच्या गुन्ह्याला योग्य अश्या शिक्षा व्हाव्या असे बोलणे आणि त्याकरिता प्रयत्न करणे जास्त योग्य होईल. रोम एका रात्रीत बांधले गेले नव्हते असे म्हणतात. तेव्हा कोणा एका मुद्द्यावर कोणी काम सुरू केले तर त्याला प्रोत्साहन द्यावे आणि उरलेल्या इतर मुद्द्यांचा आग्रह धरावा हेच ठीक राहील.

हाडक्या 25/07/2014 - 17:34
माहितगार-साहेब, तुमचे मुद्दे अयोग्य आहेत असे नाही परंतु बर्‍याचदा विद्वद्जनांचा असे होते की ते साध्या शब्दातील मुद्दे मांडण्याअगोदर जणु काही खूप मोठी तात्विक चर्चाच आरंभत आहेत आणि मग गडबड होते. इथे पहिली बाजू नीट मांडली गेली नसतानाच (लेखात पहिली बाजू अगदी संक्षिप्त आहे हे दिसतेच) आपण थेट दूसरी बाजू धरून प्रश्न उपस्थित केले आहेत, जरी ते महत्त्वाचे असले तरी आपण इथे उपस्थित केलेल्या मूळ प्रश्नास दुर्लक्षित करताय असा उगीचच संदेश जातोय.. असो. आपल्या प्रामाणिक प्रतिसादाबद्दल माहिती असल्याने हा प्रपंच. प्रथमतः खालील मुद्द्यांचा विचार करु..
ह्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या मानव अधिकार संघटना तसेच राष्टीय बाल संरक्षण आयोग या संस्थांनी ह्या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे.त्यांच्या मते हा प्रस्ताव बाल हक्कांच्या विरोधात आहे.त्यांच्या मते अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी बालगुन्हेगार हे सामाजिकदृष्ट्या अतिशय वाईट परिस्थितीत वाढलेले असतात, त्यामुळे ते गुन्हेगारीकडे वळतात व हा फक्त त्या विशिष्ठ गुन्ह्याबद्दलचा प्रश्न नसून एका मोठ्या सामाजिक समस्येचा प्रश्न आहे. त्यामुळे अशा बालगुन्हेगारांच्या आयुष्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन तसेच कायद्या अंतर्गत शिक्षेचा 'गुन्हेगारांचे पुनर्वसन' हा मुख्य उद्देश लक्षात घेऊन अशा गुन्हेगारांना वाईट वर्तनापासून परावृत्त करून मुख्य सामाजिक प्रवाहात कसे आणता येईल हे बघायला हवे अन्यथा असे बालगुन्हेगार प्रौढ गुन्हेगारांप्रमाणे शिक्षा भोगून आल्यावर आणखी कट्टर गुन्हेगारीकडे वळतील.
ही भुमिका त्यांच्या कार्याशी सुसंगतच आहे पण त्यामुळे ते बरोबर ठरत नाही, तसेच इतरांनी त्यांची भुमिका तारतम्याने पार पाडणे जास्त महत्त्वपूर्ण ठरते. अशा वेळी न्यायालयाची भुमिका जास्त महत्त्वाची असेल कारण त्यावर अशा संघटनांची भविष्यातील भुमिकापण अवलंबून असते. एक उदाहरण म्हणून ही एक केस घेऊ. http://en.wikipedia.org/wiki/Jamie_Bulger यात अल्पवयीन मुलांना त्यांच्या गुन्ह्यासाठी तशी कठोर शिक्षा झालेली आहे परंतु पुढे घडलेल्या घटनाही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. थोडक्यात, इथे मुळ गुन्हा, गुन्हेगार, त्याना झालेली शिक्षा, न्यायालयाची भुमिका, माध्यमांचा दबाव, आणि या सगळ्याचे पडसाद या सगळ्याच गोष्टी खूप दिशादर्शक आहेत. याचा प्रभाव इथल्या 'अल्पवयीन गुन्हेगार कायद्यावर' देखील दिसतो. ही माहिती प्राथमिक असूनदेखील रोचक आहे.

माहितगार 18/07/2014 - 14:07
पहीले शिक्षेतील सवलती केवळ बालगुन्हेगारांना मिळतात हे समजणे कितपत तथ्यास धरून आहे ? राज्यपालांकडून 'आदर्श' सवलती घेणार्‍यांच काय ? समजा एक घटना घडते त्यात दोन्ही बाजूं कडून गून्हा घडलेला असतो त्यातील एकाची पोच वर पर्यंत असते दुसर्‍याची नसते ज्याची वर पर्यंत पोच आहे त्यांच्या नावाने गून्हा दाखल होत नाही आणि ज्याची नसते त्याच्या नावाने गुन्हा दाखल होतो असे घडते की घडत नाही ? लिमीटेशन अ‍ॅक्ट नावाच्या कायद्यान्वये (गंभीर नसलेल्या गुन्ह्यांना लागू होतो) विशीष्ट कालावधीत गून्हा दाखल झाला नाहीतर केस रद्दबातल होते. शिवाय अजून एका प्रकारात गुन्हेगार पुरावे मिळून मोकाट राहू शकतात समजा एक गून्हा झाला कोर्टात केस सर्वोच्च न्यायालया पर्यंत गेली सबळ पुराव्यांच्या अभावी आरोपी निर्दोष सुटले, समजा त्याच केसकरता सबळ पुरावे सर्वोच्च न्यायालयातून सुटल्या नंतर मिळाले जरी तरी ज्या मुद्या करता एकदा केस झाली आहे त्याच मुद्याकरता पुन्हा केस चालू करता येत नाही. त्याही शिवाय अगदी गंभीर गुन्ह्यात सहभाग असूनही ज्यांच्या विरुद्ध केस कधी उभीच टाकत नाही, किंवा उभी टाकूनही पुराव्यांअभावी सुटणार्‍यांना सोबत घेऊन समाज त्याचा व्यवहार चालू ठेवतच असतो. येशू ख्रिस्तानी ज्यांनी कधीच एकही गुन्हा/पाप केल नाही अशांनीच दगड फेकावा म्ह्टल्या नंतर एकानेही दगड फेकला नाही अशी काही गोष्ट आहे म्हणे. व्यक्तीच्या घडण्यावर आसपासच्या समाजाचा परिणाम होतच असतो. जर आसपासच्या समाजाचा परिणाम होत असतो असे गृहीत धरले तर संपूर्ण समाजालाच शिक्षा का करू नये ? करावी तर कुठवर ? गुन्हेगार ज्या विशीष्ट समाजातून येतो तेवढ्यांबद्दलच म्हणत नाहीए; गुन्हा हा संयम सुटल्याच लक्षण असेल तर गुन्हेगारांबद्दल संयम न बाळगू शकणार्‍या समाजाला काय शिक्षा असावी ? गंभीर गुन्हा म्हणजे काय ?, सब्जेक्टीव्ह नसलेली गांभीर्याची व्याख्या कोणती ?

In reply to by माहितगार

व्यक्तीच्या घडण्यावर आसपासच्या समाजाचा परिणाम होतच असतो. जर आसपासच्या समाजाचा परिणाम होत असतो असे गृहीत धरले तर संपूर्ण समाजालाच शिक्षा का करू नये ? करावी तर कुठवर ?
बरोबर आहे. म्हणून कोणालाच कसलीच शिक्षा करू नये. मग कोणीही हरामजादा येईल, निर्भयावर अत्याचार करेल आणि समाजाकडे बोट दाखवून मोकळा होईल.
गुन्हा हा संयम सुटल्याच लक्षण असेल तर गुन्हेगारांबद्दल संयम न बाळगू शकणार्‍या समाजाला काय शिक्षा असावी ?
त्यापूर्वी असले काहीतरी आडाण्यासारखा विचार करणार्‍यांना काय शिक्षा करावी हाच विचार येत आहे.
गंभीर गुन्हा म्हणजे काय ?, सब्जेक्टीव्ह नसलेली गांभीर्याची व्याख्या कोणती ?
म्हणजे निर्भयाप्रकरणातील त्या पाच हरामखोरांचा गुन्हा, कसाब, अफझल यांचे गुन्हे आणि दुकानातून पाच रूपयाची वस्तू पैसे न देता नेणे या गुन्ह्यांमधला गंभीर गुन्हा कोणता आणि कोणता गुन्हा तितका गंभीर नाही हे तुम्हाला कळत नाही का? नसेल तर वेळीच तपासणी करून घ्या.बरोबर आहे. तुमच्या मते गुन्हेगार हा माणूस नसतोच तर समाज असतो. म्हणजे निर्भया प्रकरणातही त्या पाच हरामखोरांनी काहीच गुन्हा केलेला नाही. बरोबर? या असल्या कुजलेल्या विचारांचे लोक दिसले ना तरी भयंकर संताप येतो. तुमच्यासारख्या असल्या मानवाधिकारवाल्यांना इतकाच पुळका आला असेल तर निर्भया ज्या यातनांमधून आणि विटंबनेतून गेली त्यातून एकदा कल्पनेतून तरी जाऊन बघा.आपला काहीही गुन्हा नसताना कोणीतरी हरामखोर कसाब येणार आणि गोळ्या घालणार आणि आपल्यामागे आपल्या बायकामुलांचे हाल होणार आणि इतर कोणीतरी त्या कसाबचेच मानवाधिकारांच्या नावावर समर्थन करणार याचे दु:ख आणि संताप काय असेल हे निदान कल्पनेत तरी इमॅजिन करून बघा. आणि हो असले आडाण्यासारखे मानवाधिकारांचे कौतुक सांगू नका. बालगुन्हेगारी कायद्याचा पुनर्विचार व्हायलाच हवा.ज्या मुलाला बलात्कार करायची अक्कल असते तो कोवळा आणि इनोसन्ट नक्कीच नसतो हे नक्कीच.आमच्या छत्रपतींनी अशांना जी शिक्षा दिली होती-- हातपाय तोडणे ही सध्याच्या काळात अंमलात आणता येणार नसली तरी अशांना प्रचलित कायद्याप्रमाणेच सज्ञान समजूनच कारवाई केली पाहिजे या मागणीला १००% पाठिंबा.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

माहितगार 25/07/2014 - 13:44
त्यापूर्वी असले काहीतरी आडाण्यासारखा विचार करणार्‍यांना काय शिक्षा करावी हाच विचार येत आहे.
व्यक्तिलक्ष्य तर्कदोष: मुळ युक्तिवादास बगल देऊन, युक्तिवाद करणाऱ्या व्यक्तिस नकारात्मक लक्ष्य बनवण्याच्या उद्देशाने अथवा अप्रस्तुत विषयाकडे लक्ष वळवण्यारा, अप्रस्तुत मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तर्कदोषास(तार्कीक उणीवेस) व्यक्तिलक्ष्य तर्कदोष अथवा व्यक्तियुक्ती[१] अथवा Ad hominem [मराठी शब्द सुचवा] असे म्हणतात.यास अप्रस्तुत अथवा अनौपचारिक तर्कदोष असेही समजले जाते. * बाकी मुद्दा गुन्हेगारीला अटकाव करू नये असा नाही, मी कोणी मानवाधिकारांचा समर्थक वगैरे नाही परंतु समतोल विचार न ढळू देता प्रश्नाचा सांगोपांग विचार करणे हा सुसंस्कृतपणा आहे. निर्णय भावनेच्या आधारावर करावयाचे अथवा विवेकाच्या आधारावर हा प्रश्न आहे. समोरची व्यक्ती असंस्कृत पणे वागली म्हणून मी तसेच वागतो हा शेवटचा पर्याय नेहमीच असतो पण हे धोरण सुसंस्कृतीस पुढे नेणारे का मागे नेणारे ? माझा आक्षेप शिक्षा देण्या बद्दल नाही केवळ एकाच टोकाचा विचार करण्या बद्दल आहे म्हणून सांगोपांग समतोल विचार व्हावा म्हणून प्रश्नाच्या दुसर्‍या बाजूही दाखवल्या एवढेच.

In reply to by माहितगार

जोपर्यंत शंभर टक्के गुन्ह्यांविरुद्ध कायदे व त्यांची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत कोणताच कायदा करू असे आपले म्हणणे आहे काय? 'अ' ला एका गुन्ह्याबद्दल शिक्षा झाली नाही म्हणून 'ब' ला त्याच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा करू नये ? ... एका चुकेचे परिमार्जन दुसर्‍या चुकेने होऊ शकते असे म्हणणे ठीक नाही. दोघानांही त्यांच्या गुन्ह्याला योग्य अश्या शिक्षा व्हाव्या असे बोलणे आणि त्याकरिता प्रयत्न करणे जास्त योग्य होईल. रोम एका रात्रीत बांधले गेले नव्हते असे म्हणतात. तेव्हा कोणा एका मुद्द्यावर कोणी काम सुरू केले तर त्याला प्रोत्साहन द्यावे आणि उरलेल्या इतर मुद्द्यांचा आग्रह धरावा हेच ठीक राहील.

हाडक्या 25/07/2014 - 17:34
माहितगार-साहेब, तुमचे मुद्दे अयोग्य आहेत असे नाही परंतु बर्‍याचदा विद्वद्जनांचा असे होते की ते साध्या शब्दातील मुद्दे मांडण्याअगोदर जणु काही खूप मोठी तात्विक चर्चाच आरंभत आहेत आणि मग गडबड होते. इथे पहिली बाजू नीट मांडली गेली नसतानाच (लेखात पहिली बाजू अगदी संक्षिप्त आहे हे दिसतेच) आपण थेट दूसरी बाजू धरून प्रश्न उपस्थित केले आहेत, जरी ते महत्त्वाचे असले तरी आपण इथे उपस्थित केलेल्या मूळ प्रश्नास दुर्लक्षित करताय असा उगीचच संदेश जातोय.. असो. आपल्या प्रामाणिक प्रतिसादाबद्दल माहिती असल्याने हा प्रपंच. प्रथमतः खालील मुद्द्यांचा विचार करु..
ह्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या मानव अधिकार संघटना तसेच राष्टीय बाल संरक्षण आयोग या संस्थांनी ह्या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे.त्यांच्या मते हा प्रस्ताव बाल हक्कांच्या विरोधात आहे.त्यांच्या मते अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी बालगुन्हेगार हे सामाजिकदृष्ट्या अतिशय वाईट परिस्थितीत वाढलेले असतात, त्यामुळे ते गुन्हेगारीकडे वळतात व हा फक्त त्या विशिष्ठ गुन्ह्याबद्दलचा प्रश्न नसून एका मोठ्या सामाजिक समस्येचा प्रश्न आहे. त्यामुळे अशा बालगुन्हेगारांच्या आयुष्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन तसेच कायद्या अंतर्गत शिक्षेचा 'गुन्हेगारांचे पुनर्वसन' हा मुख्य उद्देश लक्षात घेऊन अशा गुन्हेगारांना वाईट वर्तनापासून परावृत्त करून मुख्य सामाजिक प्रवाहात कसे आणता येईल हे बघायला हवे अन्यथा असे बालगुन्हेगार प्रौढ गुन्हेगारांप्रमाणे शिक्षा भोगून आल्यावर आणखी कट्टर गुन्हेगारीकडे वळतील.
ही भुमिका त्यांच्या कार्याशी सुसंगतच आहे पण त्यामुळे ते बरोबर ठरत नाही, तसेच इतरांनी त्यांची भुमिका तारतम्याने पार पाडणे जास्त महत्त्वपूर्ण ठरते. अशा वेळी न्यायालयाची भुमिका जास्त महत्त्वाची असेल कारण त्यावर अशा संघटनांची भविष्यातील भुमिकापण अवलंबून असते. एक उदाहरण म्हणून ही एक केस घेऊ. http://en.wikipedia.org/wiki/Jamie_Bulger यात अल्पवयीन मुलांना त्यांच्या गुन्ह्यासाठी तशी कठोर शिक्षा झालेली आहे परंतु पुढे घडलेल्या घटनाही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. थोडक्यात, इथे मुळ गुन्हा, गुन्हेगार, त्याना झालेली शिक्षा, न्यायालयाची भुमिका, माध्यमांचा दबाव, आणि या सगळ्याचे पडसाद या सगळ्याच गोष्टी खूप दिशादर्शक आहेत. याचा प्रभाव इथल्या 'अल्पवयीन गुन्हेगार कायद्यावर' देखील दिसतो. ही माहिती प्राथमिक असूनदेखील रोचक आहे.
महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी नुकत्याच केलेल्या विधानानुसार लैंगिक गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन म्हणजे १८ पेक्षा कमी वय असणाऱ्या गुन्हेगारांची संख्या जवळपास ५० टक्के एव्हढी आहे.बालगुन्हेगारी कायद्या अंतर्गत प्रौढ गुन्हेगारांप्रमाणे शिक्षा न होता जास्तीत जास्त ३ वर्षांची रिमांड होम देण्यात येते.बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्या अल्पवयीन गुन्हेगारांना कायद्याची ही कच्ची बाजू माहिती असल्यामुळे अशा बाल्गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याचे म्हटले जात आहे.मनेका गांधी यांनी अशा गंभीर स्वरूपातील बालगुन्हेगारांना प्रौढ गुन्हेगारांप्रमाणे शिक्षेची तरतूद केल्यास बाल्गुन्हेगारीवर

विजयोत्सव!

स्वाती दिनेश ·

ह्याला म्हणतात विजयोत्सव. सर्व जर्मन नागरीकांना विशेषतः फुटबॉल खेळाच्या नवखेळाडूंना/नवतरूणांना अत्यंत प्रेरणादायी दिवस. जर्मनीचे मनःपूर्वक अभिनंदन. आणि हा जल्लोष मिपावर मुक्त उधळल्याबद्दल स्वातीला अनेकानेक धन्यवाद.

मस्तच. अंतिम सामन्यापूर्वी माहौल कसा होता याविषयी थोडे इथे खरडले होते. अंतिम सामन्याला पब्लिक व्ह्यूइंग ला गेलो होतो तिथे हा जल्लोष अनुभवताना फार भारी वाटत होते. जेव्हा गोल झाला तेव्हा तर लोक त्या स्क्रीन च्या इतके जवळ गेले की आम्ही घरी येउन पुन्हा पाहिला गोल कसा झाला ते.

ह्याला म्हणतात विजयोत्सव. सर्व जर्मन नागरीकांना विशेषतः फुटबॉल खेळाच्या नवखेळाडूंना/नवतरूणांना अत्यंत प्रेरणादायी दिवस. जर्मनीचे मनःपूर्वक अभिनंदन. आणि हा जल्लोष मिपावर मुक्त उधळल्याबद्दल स्वातीला अनेकानेक धन्यवाद.

मस्तच. अंतिम सामन्यापूर्वी माहौल कसा होता याविषयी थोडे इथे खरडले होते. अंतिम सामन्याला पब्लिक व्ह्यूइंग ला गेलो होतो तिथे हा जल्लोष अनुभवताना फार भारी वाटत होते. जेव्हा गोल झाला तेव्हा तर लोक त्या स्क्रीन च्या इतके जवळ गेले की आम्ही घरी येउन पुन्हा पाहिला गोल कसा झाला ते.
लेखनविषय:
लेखनप्रकार
.
१५ जुलै २०१४... बर्लिनचे ब्रांडेनबुर्ग गेट माणसांनी गच्च फुलले होते, हातात जर्मनीचे झेंडे,गळ्यात झेंड्याच्या रंगाच्या प्लास्टिकफुलमाळा, अंगात जर्मनीचा शर्ट..

बाउमकुखन (ट्री केक)

Mrunalini ·

हे असे प्रकार फक्त बेकरी मध्ये पाहिलेत आजवर इकडे. केवढा तो उत्साह आणि पेशन्स. अगदी प्रोफेशनल दिसतोय. खासच. फोटो पण सुंदर.

मस्त.. बाउमकुकन, डोनाववेलं टोर्ट आदि प्रकार खूप वेळखाऊ असल्याने करायचा कंटाळा केला गेला.. पण तुझा केक भारी टेम्टिंग आहे..(आता नवीन केक करावाच लागणार असं दिसतय..) स्वाती

पाककृती जरा वेळ खाऊ आणि कष्टप्रद वाटली तरी शेवटचा थरांचा थरार पाहूनच श्रमपरिहार होईल. अभिनंदन.

In reply to by प्रभाकर पेठकर

Mrunalini 16/07/2014 - 11:02
अगदी खरं काका. तसा केक बनवायला सोपा आहे पण थोडा वेळ जास्त लागतो. तरी शेवटी ते जे लेयर्स दिसतात, दिल खुष हो जाता हे! :P तरी माझा केक पॅन छोटा असल्यामुळे जास्त लेयर्स नाहि करता आले.

In reply to by Mrunalini

एस 17/07/2014 - 00:47
पण पाककृती खल्लास. वर ते फोटोपण कातिल. तुमच्या 'अहों' ना आमच्यातर्फे दाद द्या! शेवटून तिसरा फोटो तर वा क्या बात है!

हसरी 16/07/2014 - 12:55
सही दिसतोय केक. हे हेवी क्रिम म्हणजेच भारतात इळतं ते फ्रेश क्रिम का? ते गरम म्हणजे किती गरम करायच? चॉकलेटचे तुकडे इत्यादी सामान घातल्यावर परत गरम करायचं नाही का?

In reply to by हसरी

Mrunalini 16/07/2014 - 13:08
हो. हेवी क्रिम म्हणजे तेच फ्रेश क्रिम जे फेटुन आपण whipped cream करतो. ते क्रिम उकळी येईपर्यंत गरम करायचे. गॅस बंद करुन त्यात मग बकिचे सामान टाकुन मिक्स करुन घ्यायचे. क्रिम गरम असल्यामुळे चॉकलेट सहज वितळते. शेवटी त्यात गरम पाण्यात मिक्स केलेले जिलेटिन टाकायचे. :)

दिपक.कुवेत 16/07/2014 - 13:17
Photo छान आलेत. Layerचा केक पाहुन गोव्याच्या बिबिनका Sweet ची आठवण झाली. ते हि असचं Layerचं असतं आणि अप्रतिम Taste असते.

केक जबराट दिसत आहे गं , खरचं मला जाम कौतुक वाटतं जेव्हा आपण इतका वेळ घालून एखादी पाककृती बनवतो व ती हिट होते, मेहनतीचे फळ्चं ते. आय अ‍ॅम ड्रुलिंग हियर ;) ___/\__

सविता००१ 16/07/2014 - 16:21
क्लासिक. मस्त केक. आता तू आणि सानिका पटापट इकडे यायचा प्रोग्रॅम करा म्हणजे आमची चंगळ.

In reply to by सविता००१

सखी 16/07/2014 - 18:12
सविता त्या दोघी व्हाया अमेरिका येणार आहेत (१-२ वर्ष तरी लागतीलच इथे), रेवाक्कानेच फर्मान काढलयं :) मृनालिनी - केक सुरेखच दिसतोच आहे, सगळेच फोटो छान आलेत, मला तो चॉकलेट घालण्याआधीचा अखंड केकचा फोटोही आवडला.

हे असे प्रकार फक्त बेकरी मध्ये पाहिलेत आजवर इकडे. केवढा तो उत्साह आणि पेशन्स. अगदी प्रोफेशनल दिसतोय. खासच. फोटो पण सुंदर.

मस्त.. बाउमकुकन, डोनाववेलं टोर्ट आदि प्रकार खूप वेळखाऊ असल्याने करायचा कंटाळा केला गेला.. पण तुझा केक भारी टेम्टिंग आहे..(आता नवीन केक करावाच लागणार असं दिसतय..) स्वाती

पाककृती जरा वेळ खाऊ आणि कष्टप्रद वाटली तरी शेवटचा थरांचा थरार पाहूनच श्रमपरिहार होईल. अभिनंदन.

In reply to by प्रभाकर पेठकर

Mrunalini 16/07/2014 - 11:02
अगदी खरं काका. तसा केक बनवायला सोपा आहे पण थोडा वेळ जास्त लागतो. तरी शेवटी ते जे लेयर्स दिसतात, दिल खुष हो जाता हे! :P तरी माझा केक पॅन छोटा असल्यामुळे जास्त लेयर्स नाहि करता आले.

In reply to by Mrunalini

एस 17/07/2014 - 00:47
पण पाककृती खल्लास. वर ते फोटोपण कातिल. तुमच्या 'अहों' ना आमच्यातर्फे दाद द्या! शेवटून तिसरा फोटो तर वा क्या बात है!

हसरी 16/07/2014 - 12:55
सही दिसतोय केक. हे हेवी क्रिम म्हणजेच भारतात इळतं ते फ्रेश क्रिम का? ते गरम म्हणजे किती गरम करायच? चॉकलेटचे तुकडे इत्यादी सामान घातल्यावर परत गरम करायचं नाही का?

In reply to by हसरी

Mrunalini 16/07/2014 - 13:08
हो. हेवी क्रिम म्हणजे तेच फ्रेश क्रिम जे फेटुन आपण whipped cream करतो. ते क्रिम उकळी येईपर्यंत गरम करायचे. गॅस बंद करुन त्यात मग बकिचे सामान टाकुन मिक्स करुन घ्यायचे. क्रिम गरम असल्यामुळे चॉकलेट सहज वितळते. शेवटी त्यात गरम पाण्यात मिक्स केलेले जिलेटिन टाकायचे. :)

दिपक.कुवेत 16/07/2014 - 13:17
Photo छान आलेत. Layerचा केक पाहुन गोव्याच्या बिबिनका Sweet ची आठवण झाली. ते हि असचं Layerचं असतं आणि अप्रतिम Taste असते.

केक जबराट दिसत आहे गं , खरचं मला जाम कौतुक वाटतं जेव्हा आपण इतका वेळ घालून एखादी पाककृती बनवतो व ती हिट होते, मेहनतीचे फळ्चं ते. आय अ‍ॅम ड्रुलिंग हियर ;) ___/\__

सविता००१ 16/07/2014 - 16:21
क्लासिक. मस्त केक. आता तू आणि सानिका पटापट इकडे यायचा प्रोग्रॅम करा म्हणजे आमची चंगळ.

In reply to by सविता००१

सखी 16/07/2014 - 18:12
सविता त्या दोघी व्हाया अमेरिका येणार आहेत (१-२ वर्ष तरी लागतीलच इथे), रेवाक्कानेच फर्मान काढलयं :) मृनालिनी - केक सुरेखच दिसतोच आहे, सगळेच फोटो छान आलेत, मला तो चॉकलेट घालण्याआधीचा अखंड केकचा फोटोही आवडला.
"बाउमकुखन" (Baumkuchen) मधे Baum म्हणजे जर्मन भाषेत झाड आणि Kuchen म्हणजे केक. हा केक originally rotisserie मधे बनवला जातो आणि जेव्हा हा केक कापतात तेव्हा त्यात झाडाच्या खोडामधे जश्या rings किंवा layers दिसतात, तसे ते वाटते. म्हणुन ह्याला झाडाचा केक (Baumkuchen) असे म्हणतात. माझ्याकडे rotisserie नसल्यामुळे मी तो केक पॅनमधे बनवायचा try केला आहे. I hope तुम्हाला सगळ्यांना आवडेल.