Skip to main content

भोसरीचा जितेंदर सिंग!

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 13/07/2014 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.loksatta.com/pune-news/atlast-jitendra-singh-arrested-664165/ भोसरी ह्या पुण्याजवळील गावात प्रियदर्शिनी नामक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. त्या शाळेत आठवीत शिकणार्‍या काही विद्यार्थ्यांनी शाळेत आणि वर्गात मराठी बोलण्याचा अक्षम्य आणि गंभीर गुन्हा केला त्यामुळे त्यांना संस्थेच्या प्रमुखाने शरीरावर वळ उठेपर्यंत मारहाण केली. ह्या संस्थेचा भोसरीचा* संचालक जितेंद्र सिंग ह्याला शेवटी अटक केली गेली. मराठीचे माहेरघर मानलेल्या पुण्याच्या एका उपनगरात मराठी बोलण्याला गुन्हा मानला जाणे म्हणजे नेत्रदीपक प्रगती म्हटली पाहिजे. मला वाटते ह्या भोसरीच्या* सिंगाला उत्तम मराठी बोलता येईपर्यंत लाथाबुक्क्यांनी तुडवून काढत राहिले पाहिजे. पुढील सहा महिने मराठी सोडून अन्य कुठले शब्द तोंडातून निघाल्यास असेच वळ उठेपर्यंत झोडपून काढावे ही शिक्षा कुठल्या सक्तमजुरीपेक्षा जास्त योग्य ठरेल. *सदर विशेषणाचा अर्थ शक्यतो भोसरी गावचा रहिवासी असा घ्यावा ;-)

वाचने 39387
प्रतिक्रिया 94

प्रतिक्रिया

In reply to by सुनील

एखाद्या गृहसंकुलात जेव्हा असा नियम केला जातो की निव्वळ शाकाहारी लोकांनाच जागा विकत घेता येईल तेव्हा लोक त्याविरुद्ध बोंब मारतातच ना? त्यामुळे अगदी खाजगी मालमत्तेलाही कायद्याच्या कक्षेतच रहावे लागते. धार्मिक स्थळी जे नियम असतात ते नियम शाळेकरता लागू होतीलच असे नाही. उदा. जाती धर्म वा पंथाविरुद्ध भेद करणे अनेक खाजगी संस्थांकरताही बेकायदा असते.

In reply to by हुप्प्या

हि जर आपली संस्था अल्पसंख्यांक( जैन) म्हणून रजिस्टर झाली असेल तर चालू शकते पण आपण गुजराती हिंदू असाल तर चालत नाही असा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आहे. एका मुसलमान माणसाला तेथे जागा घेण्यास अटकाव केल्याबद्दल त्याने केलेल्या याचिकेचा हा निकाल आहे. बहुसंखांक असणे हा आजकाल गुन्हा आहे असे वाटावे अशी परिस्थिती आहे. अल्पसंख्यांक म्हणून कोणत्याही गटाचे किंवा समाजाचे किती लाड चालवून घ्यायचे हा विचार करण्याची वेळ आली आहे?

In reply to by बॅटमॅन

पैसे घेतले म्हणजे? इथे पैशाचा काय संबंध? कारण पैसेही पालकच देतात की. प्रश्न पैशाचा नसुन. भाषा सुधारण्याचा आहे. इथे लिखित आणि बोली अश्या दोन्ही प्रकारचा संबंध आहे. इंग्रजी माध्यमातील मुले एकमेकांशी लिखित स्वरुपात संवाद साधत नसतील (तास चालु असताना ज्या चिटठ्यचपाट्या हस्तांतरित होतात त्या वेगळ्या. त्यावर असेही काही नियंत्रण ठेवता येणार नाही.) मुख्य मुद्दा आहे बोली भाषेचा. बोली भाषा सुधारली तर किमान शिक्षक वर्गात काय सांगत आहेत हे तरी नीट कळु लागेल. याचा काही विदा माझ्याकडे तरी नाही. पण संवादाची भाषा सुधारली तर मौखिक संवादाच्या माध्यमातुन दिले गेलेले ज्ञान अधिक चटकन आत्मसात करता येइल असे अनुमान काढणे नक्कीच लॉजिकल आहे. उलट्या बाजुचा म्हणजे मराठीत बोलल्यामुळे इंग्रजी नैपुण्यात लक्षणीय फरक पडतो असे अनुमान काढणे तार्किकदृष्ट्या अयोग्य ठरेल, मात्र मराठीत बोलल्यामुळे इंग्रजी नैपुण्यात लक्षणीय फरक पडतो याबाबतचा काही विदा असेल तर ते वाचणे नक्कीच जास्त रोचक ठरु शकते. याबाबत एक गोष्ट आठवली की शाळेत इंग्रजीच्या बाई नेहमी सांगायच्या की वर्गातील काही मुलांचे इंग्रजी लेखन आणि भाषा कच्ची आहे कारण ते मराठीत विचार करुन मग इंग्रजीत लिहितात / बोलतात. जर विचारच इंग्रजीत करायला सुरुवात केली तर इंग्रजी सुधारेल. विचाराची प्रक्रिया आणि त्याची भाषा नियंत्रित कशी करायची हे त्यावेळेस अजिबातच कळले नव्हते. आताही निट्से कळत नाही. पण आता असे होउ शकते एवढे मात्र नक्की सांगु शकतो. कारण आता काही विचार प्रकट करण्यासाठी पटकन इंग्रजीचाच आधार घेतला जातो आणि तेच विचार मराठीत लिहिण्यासाठी थोडा वेळ " विचार " करावा लागतो :)

In reply to by मृत्युन्जय

ओक्के. मुद्दा इतकाच आहे, की मराठीत किंवा इंग्लिशेतर भाषेत बोलणे अज्जीच ब्यान केल्यामुळे इंग्लिशवरच्या प्रभुत्वात लक्षणीय फरक पडतो किंवा कसे. एखादा तास ठेवा फारतर रोज-त्यात फक्त इंग्रजी बोलायचं इ.इ. पण पूर्णवेळ अशी सक्ती करणे अनाकलनीय आणि तितकाच मूर्खपणा आहे. तेल अन तूप दोन्हीही जाऊन हाती फकस्त धुपाटणे राहील मग- अन कैकदा ते तसेच राहते. तदुपरि- मराठीत बोलणे ब्यान केल्यामुळे विचारही इंग्लिशमध्ये करू लागतो का? बहुधा नाही.

In reply to by बॅटमॅन

तेल अन तूप दोन्हीही जाऊन हाती फकस्त धुपाटणे राहील मग- अन कैकदा ते तसेच राहते.
आमच्या हापिसातल्या (आंग्ल शाळेतून शिकलेल्या) किरिस्ताव स्टायलिश पोरी धडधडीत चुकीचे इंग्रजी अत्यंत अत्मविश्वासाने सपाट्याने बोलायच्या. तर्खडकरांच्या भाषांतरपाठमालेतून इंग्रजी शिकलेल्या मला त्यांच्या बोलण्यातल्या चुका कळत, पण त्यांच्यासारखे आत्मविश्वासाने बोलता मात्र येत नसे. अर्धवट ज्ञान असलेले जास्त आत्मविश्वासू असतात, याचेही हे एक उदाहरण.

In reply to by चित्रगुप्त

हम्म, ते बाकी आहे. संभाषणकला विकसित करावी लागते हे मान्य, पण त्यासाठी अन्य भाषांतून बोलणे ब्यान करणे हे एक टोक झाले. तसे न करताही इच्छित फलप्राप्ती होईलसे वाटते.

In reply to by बॅटमॅन

>> संभाषणकला विकसित करावी लागते हे मान्य, पण त्यासाठी अन्य भाषांतून बोलणे ब्यान करणे हे एक टोक झाले. तसे न करताही इच्छित फलप्राप्ती होईलसे वाटते. सहमत.

शिक्षणात शिस्त; आणि शिस्तभंगासाठी शिक्षा, आवश्यक आहे असे वाटते. आणि कुठल्या प्रकारच्या शिस्तभंगासाठी कुठल्या प्रकारची शिक्षा द्यायची हा शिक्षकाचा अधिकार मान्य करायला हवा. कारण त्याच्यावर मुलांची जबाबदारीपण आहे. मारहाण हा शिक्षेचा प्रकार आजकाल अमान्य आहे, कारण त्याने फायद्यापेक्षा तोटे जास्त होतात असे दिसते. मग शाळांमध्ये आजकाल कुठल्या शिक्षा दिल्या जातात, कुणी प्रकाश टाकेल का? डस्टरने हातावर मारणे, कोंबडा करणे, फळ्याजवळ फळ्याकडे तोंड करून उभे करणे, बाकावर उभे करणे, वर्गाबाहेर उभे करणे, वर्ग संपल्यावर थोडा वेळ बसवून ठेवणे, मैदानाला फेर्‍या मारणे वगैरे यातल्या कुठल्या शिक्षा अजूनही प्रचारात आहेत?

In reply to by असंका

चुकून घरी समजलं तर घरी पूजा बांधली जाणं हे आणखी वेगळंच. 'सहसा' शिक्षक चुकीचे नसतात/ आमच्या वेळी तरी नाहीच अशा मताचा मी आहे. बाकी ज्या मुलाला मारलं तो 'कुणाचा तरी कोण तरी' आहे का हे(सुद्धा) बघायला हवं. शिक्षकानं मारणं ह्याला हायलाईट करुन मुलानं दिलेली दुरुत्तरं कदाचित झाकली जाण्याची शक्यता पुण्याच्या पंचक्रोशीत जास्त असावी असा अंदाज आहे (गुंठामंत्र्यांची मुलं नि त्यांचं वागणं हे जनरल निरीक्षण)

In reply to by असंका

चुकून घरी समजलं तर घरी पूजा बांधली जाणं हे आणखी वेगळंच. 'सहसा' शिक्षक चुकीचे नसतात/ आमच्या वेळी तरी नाहीच अशा मताचा मी आहे. बाकी ज्या मुलाला मारलं तो 'कुणाचा तरी कोण तरी' आहे का हे(सुद्धा) बघायला हवं. शिक्षकानं मारणं ह्याला हायलाईट करुन मुलानं दिलेली दुरुत्तरं कदाचित झाकली जाण्याची शक्यता पुण्याच्या पंचक्रोशीत जास्त असावी असा अंदाज आहे (गुंठामंत्र्यांची मुलं नि त्यांचं वागणं हे जनरल निरीक्षण)

उलटा हात करुन बोटाच्या पेरांवर लाकडी फुटपट्टीची कड मारायची जोरात. घोडा करताना बसतो तसे बसायचे, हाताच्या बोटांनी कान धरायचे आणि कोपर जमिनीवर ठेवुन दोन गुडघे आणि दोन कोपरं यावर मैदानात चालायचे. गुडघ्यात्/कोपरात असे खडे रुतायचे. आयआयग्ग, आठवुनच झिणझिण्या आल्या. आमच्या वेळी असे असते तर अर्ध्याच्या वर मास्तरडे खडी फोडायलाच गेले असते.

कोणालाही कोणीही कोणत्याही कारणासाठी मारणे अत्यंत निंदनीय आहे. यासाठी सदर व्यक्तीस तीन दिवसात हिब्रुमध्ये आयत्यावेळी दिलेल्या विषयावर पाच मिनीटे विषयाशी संबंधित बोलण्याची शिक्षा द्यावी. ते न जमल्यास दरवेळी नवी भाषा व मिनीटांमध्ये वाढ. उरलेल्या वेळी एकांतवास! हे आजन्म चालु ठेवावे!

In reply to by ऋषिकेश

कोणालाही कोणीही कोणत्याही कारणासाठी मारणे अत्यंत निंदनीय आहे
इथे अपवाद युद्ध करणार्‍या सैनिकांचा आहे, ही पुरवणी प्रतिसाद बदलता येत नसल्याने इथे जोडतो.

एखादी संस्था त्यांचे नियम बनवू शकते हे मान्य व इंग्रजी संभाषणाचे महत्त्व देखील मान्य , आमच्या हॉटेल व्यवस्थापनाच्या कोर्स मध्ये देखील इतर भाषा बोलल्यास दंड होता , गुटे संस्थेत दंड नसला तरी जर्मन भाषा बोलली जाते , मात्र लहान विद्यार्थ्यांना मारणे मान्य नाही. परदेशात दोषी व्यक्ती तुरुंगात खितपत पडते.

'प्रियदर्शनी' असे भारदस्त संस्कृत नाव असणार्‍या शाळेत इंग्रजेतर भाषा बोलणे हा अपराध, हेच मुळात कोडे वाटले. कदाचित इंदिराबैंच्या काळात त्यांना खुष करून ग्र्यांटादि मिळवण्यासाठी तसले नाव दिले असेल, किंवा राजीव सोन्यादिंच्या काळातही असे केले गेले असेल. दुसरे म्हणजे 'येथे उभे राहून मोबाईलवर बोलू नये' पासून 'कुलकर्णी येथे रहात नाहीत, उगाच बेल वाजवून अपमान करून घेऊ नये' अश्या पाट्या असणार्‍या पुण्याच्या परिसरात असूनही शाळेत पाट्या नाहीत की काय? 'येथे इंग्रजी व्यतिरिक्त अन्य भाषा बोलणारांना बेदम चोप दिला जाईल' (की 'दिल्या' जाईल ?) अशी पाटी लावायला हवी. ही पाटी इंग्रजीत असावी, की मराठीत की उर्दूत, हाही चर्चेचा विषय होऊ शकतो.

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इंग्रजी बोलावे की नाही, तशी सक्ती करणं योग्य/कायदेशीर आहे की नाही हा बहुतेक चर्चेचा मुद्दा नसावाच. मराठी-अमराठीचा राजकीय वाद, त्यातून उभी राहिलेली दरी, भोसरी आणि आसपासच्या एम.आय.डि.सी. भागात झालेली अमराठी (उ.प्र.-बिहारी) लोकांविरोधातली आंदोलनं/राडे ह्यातून असलेला राग ह्या पैलूचा बहुतेक विचारच केला जात नाहीये. वर काही प्रतिसादांत म्हणल्याप्रमाणे, जितेंद्र सिंग ह्या नावाऐवजी ते जितेंद्र जाधव किंवा जोशी असतं तर मराठीचा मुद्दा न येता ती घटना 'विद्यार्थ्याला अमानुष मारहाण' अशी मोजली गेली असती. पण, जितेंद्र सिंग ह्या (अमराठी - बहुतेक उ.प्र./बिहार प्रांतीय असावे असं नावावरुन वाटतं.) व्यक्तीच्या हातात सत्ता असताना तीचा वापर करुन मराठीद्वेषमूलक कृती केलेली नाही असं छातीठोकपणे सांगता येईल काय? ह्यावर, 'ती मारहाण करण्यात द्वेषच होता असं छातीठोकपणे सांगता येईल काय?' असा उलटप्रश्न नक्कीच विचारता येईल. त्याचं उत्तर 'नाही' असं दिलं तरी, गावांत दरोडे पडल्यावर पोलीस जसे पहिल्यांदा पारध्यांच्या पालावर धाडी घालतात, तसंही इथेही संशयास्पद मुद्द्याचा आधार आहेच. तस्मात, ही घटना केवळ शाळेचे नियम पाळले नाहीत म्हणून शिक्षा इतपत नक्कीच मर्यादित रहात नाही. तिला प्रांतिक/राजकीय रंग येतोच येतो. घटना काय घडलेली असते आणि ती बातमी म्हणून बाहेर पडते तेव्हा, सगळेच पैलू खरोखर आणि पारदर्शकपणे सामोरे येत नाहीत हे तर आपल्याला अगदीच ठाऊक झालंय. इतका भाबडेपणा कुणातही उरलेला नाही आता. प्रश्न आहे तो 'रिडिंग बिटवीन द लाईन्स'चा, आणि त्या कोण कशा वाचतो त्यानुसार त्याचा अर्थ लावण्याचा.

हुप्प्या यांच्या लिखाणाचे एक वैशिष्ट्य आहे ते नेहमी काळाबरोबर राहतात

मारहाणीच्या अमानुषपणाबद्दल दुमत नाहीच पण त्याचे कारण मराठीद्वेष असण्याबद्दल जितेंदर सिंग हे उत्तर भारतीय नाव याखेरीज काही ठोस मुद्दा कोणी मांडू शकेल का?? त्या संस्थेतील, भोसरीतील इतर घटना ज्यात मराठीद्वेष दिसतो (उदा. अमराठी विद्यार्थ्यांना तशाच उल्लंघनासाठी कमी शिक्षा किंवा शिक्षा न करणे). जितेंदर सिंगची वागणूक इ ज्यायोगे मराठीद्वेषाचा संशय येउ शकतो असा एखादा मुद्दा आहे का?? नसल्यास केवळ उत्तर भारतीय नाव यावरुन असे आरोप करणे यात आपलाच उत्तर भारतीयद्वेष दिसून येईल..

मुळात मराठी भाषेच्या दुरावस्थेला आपणच कारण आहोत. त्यामुळेच जितेंद्र सिंग सारखे उपरे लोक इथे येउन आपल्याच भाषेचा अपमान करतात. ही दुरावस्था तेव्हाच जाईल जेव्हा आपण तिचा अभिमान बाळगु व समोरच्याला ही तो करायला लावु.

आता शतकाला थोडा हात भार लावू या म्हणतो...