मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(पाठ शिवा हो पाठ शिवा)

सूड ·

स्पंदना 13/11/2014 - 04:58
मान गये !!! फार वाईट वाटतयं अन डोक उठलयं. शिवसेनेला खरच अक्कल नाही. एव्हध मिळाल होतं बहुमत तर सत्तेत बसुन दाखवायच होतं, काय मिळणार आहे टेबल बडवुन देव जाणे.

नाखु 13/11/2014 - 12:06
टिकटिकविरहित जरी तव पाऊल अचूक मला पण लागे चाहूल कित्येकांची चळते बुद्धी तुझ्या ऐकता पायरवा उमटू न देईन साद पाऊली सर्रकन जाईन जशी सावली सामावून मज घेईल अलगद हा कमळांचा उभा थवा
लई म्हंजे लई बेष्ट!!!

मदनबाण 13/11/2014 - 12:31
मस्तच... मातोश्रीवर जमले सगळे फसलेल्या बैठकीतले हे मावळे ? कोण कुठला अफजलाखान तो कात्रजात सापडलेल्यांना समजेना... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnership

होकाका 13/11/2014 - 14:12
शॉलिट्ट कवन! कुणीतरी व्याघ्रसैनिक हे वाचतायत का? अरे कुठे नेऊन ठेवलीये आमची व्याघ्रसेना? डरकाळी विझली, उरलाय नुसता आक्रस्ताळेपणा!!

पैसा 13/11/2014 - 14:17
सगळ्या बातम्या वाचून जाम डोकं उठलंय. जबरदस्त लिहिलंस, पण हे ज्यांच्यापर्यंत पोचायला हवं ते डोळे झाकून गप बसलेत सगळे!

स्पंदना 13/11/2014 - 04:58
मान गये !!! फार वाईट वाटतयं अन डोक उठलयं. शिवसेनेला खरच अक्कल नाही. एव्हध मिळाल होतं बहुमत तर सत्तेत बसुन दाखवायच होतं, काय मिळणार आहे टेबल बडवुन देव जाणे.

नाखु 13/11/2014 - 12:06
टिकटिकविरहित जरी तव पाऊल अचूक मला पण लागे चाहूल कित्येकांची चळते बुद्धी तुझ्या ऐकता पायरवा उमटू न देईन साद पाऊली सर्रकन जाईन जशी सावली सामावून मज घेईल अलगद हा कमळांचा उभा थवा
लई म्हंजे लई बेष्ट!!!

मदनबाण 13/11/2014 - 12:31
मस्तच... मातोश्रीवर जमले सगळे फसलेल्या बैठकीतले हे मावळे ? कोण कुठला अफजलाखान तो कात्रजात सापडलेल्यांना समजेना... ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnership

होकाका 13/11/2014 - 14:12
शॉलिट्ट कवन! कुणीतरी व्याघ्रसैनिक हे वाचतायत का? अरे कुठे नेऊन ठेवलीये आमची व्याघ्रसेना? डरकाळी विझली, उरलाय नुसता आक्रस्ताळेपणा!!

पैसा 13/11/2014 - 14:17
सगळ्या बातम्या वाचून जाम डोकं उठलंय. जबरदस्त लिहिलंस, पण हे ज्यांच्यापर्यंत पोचायला हवं ते डोळे झाकून गप बसलेत सगळे!
लेखनविषय:
पाठ शिवा हो पाठ शिवा वार्धक्यातही वाघ रडवला डाव टाकूनि नवा नवा बन कमळांचे मुदित* सापळे लपायास मज असे मोकळे सत्तांधाला काय का कधी शिवाशिवीचा खेळ नवा? टिकटिकविरहित जरी तव पाऊल अचूक मला पण लागे चाहूल कित्येकांची चळते बुद्धी तुझ्या ऐकता पायरवा उमटू न देईन साद पाऊली सर्रकन जाईन जशी सावली सामावून मज घेईल अलगद हा कमळांचा उभा थवा मालकी घेशील परी कशाची तुझ्या पदांची तुझ्या यशाची पाठलाग मग कुठे संभवे महाराष्ट्र जर तुला हवा !! ;) *मोद-मोदी-मुदित

सत्यनारायण पूजा:

वगिश ·

hitesh 12/11/2014 - 21:34
प्रसादाचा शिरा मस्त असतो.

In reply to by धर्मराजमुटके

वगिश 12/11/2014 - 21:43
काही नसल्यामुळे नुकसान(आर्थिक) होण्याची चिंता नहि. हि पूजा धनलाभ होण्यासाठी असते का? *scratch_one-s_head* *SCRATCH*

In reply to by वगिश

इथे प्रश्न विचारण्यापेक्षा सत्यनारायण पुजा व्यवस्थित ऐकली असती तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असती. असो. माझा अंदाज असा की तुमचे नुकतेच लग्न झाले आहे व नवदांपत्यास सत्यनारायण पुजेस बसण्यास सांगीतले असल्यामुळे तुमचे लक्ष पुजेपेक्षा जोडीदाराकडेच अधिक असावे. :) तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारची उत्तरे ऐकण्यात रस आहे ते सांगा. तुमच्या आवडीप्रमाणे उत्तरे देण्याचा प्रयत्न करु. शेवटी हे हॉटेल आहे ना. जे गिर्‍हाईकाला पाहिजे ते देणार. मात्र हॉटेलात काही पुणेरी बाण्याचे वेटर आहे ते तुम्हाला हवे ते नाही तर त्यांना हवे तेच देतील. :)

In reply to by धर्मराजमुटके

वगिश 12/11/2014 - 22:14
नुकतेच लग्न झालेले नाही तरी जोडीदारकडे लक्ष होतेच *yes3*.पूजा वेगळ्या कारणासाठी होति. असो, पुजेविषयी,म्हणजे ती का,कशासाठी करतात ह्याविषयी तुमच्याकडे काही माहिती असल्यास ती इथे लिहा म्हणजे माझा गणमन वृत्ती मुळे ज्या गोष्टी मला पुजेत कळल्या नाहीत त्या इथे कळतील.

In reply to by वगिश

ते कारण सांगितल्याशिवाय पूजाफलाविषयी चर्चा कशी होईल? बाकी तुमचं म्हणणं "पण प्रत्येक अध्यायात पूजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होईल एवढीच माहिती मिळाली.", बरोबर आहे. कारण मूळात देव हीच (मानवी) संकल्पना भीतीतून निर्माण झाली आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

पगला गजोधर 14/11/2014 - 14:28
इलेक्ट्रॉनिक सत्यनारायण वर्जन: एका माणसाने सात्यानारायानांच्या बाजून ब्लॉग-प्रतिक्रिया दिली, आणि त्यामुळे त्याचं खूप भलं झालं, पण नंतर दुसऱ्या वर्षी तो तसं करायचं विसरला, आणि त्याचा सत्यानाश झाला.सगळे पैसे गेले, धंदा बुडला आणि तो देशोधडीला लागला, नंतर पुन्हा ब्लॉग-प्रतिक्रिया केल्यावर त्याचं सुख , पैसा त्याला परत मिळाला.. ( देव माझा सत्यानाश करेल, मला त्रास देईल, दहशतीखाली असली कर्मकांडे नको. मला वाटतं आजच्या युगात इतकी समज आपल्या मधे असायला हरकत नाही.)

सत्यनारायण...सत्यदत्त..सत्यविनायक...सत्यांबा..
हे चारही पूजा प्रकार अगदी अलिकडच्या काळातले आहेत.किंबहुना वैदिक धर्मात पूजा--हाच प्रकार बसत नाही..तो अलिकडे बसवला गेला आहे. {मूळ धर्मात देवतांना मंत्र पठण/गायनाने बोलावणं(आवाहन करणं) आणि त्यांना यज्ञात आथवा पाण्यात आहुती देणं..(अन्न देण) एव्हढच आहे.} तर ते असो...कुठलिही पूजा ही पंचोपचार किंवा षोडशोपचार असते..इथे प्रश्न आहे..तो चारही पूजांमधे आलेल्या कथांचा! त्या उघडपणे चमत्कारांची भलामण करणार्‍या आहेत,यात वाद नाही. तुमचा यावरच जर आक्षेप असेल..तर माझा तुम्हाला १ प्रश्नः- तुमच्या(सारख्यां)साठी मी दोन प्रकारच्या कथा तयार केल्या आहेत. १) मूळ कथेतील सगळे चमत्कार आणि पूजा केल्यावर(च) मिळणारी फळं मी वगळली आणि काहि ठिकाणी बदलली आहेत. त्यात जास्तीत जास्त प्रयत्नवाद्/आशावाद माणुसकी ही मूल्य आणायचा प्रयत्न मी केलेला आहे. २) दुसरी कथा ही सरळ सरळ पूजेला बसलेल्याची(जीवनवाद आणि नैतिकतेच्या बाबतीत) परिक्षा पाहाणारी आहे.. तुम्हाला कोणती कथा हवी? :) जी कुठली कथा हवी...ती का हवी? आणि दोन्ही नको(च) असतील..तर का नको? ==================================== समांतरः- आमच्या वैदिक धर्मापासून ते जगातल्या यच्चयावत चालू/बंद धर्मांमधे असणारी लबाडी/दांभिकता/खोटेपणा/अनैतिकता हीच मी कधिही सर्मथन करत नाही..करु शकणार नाही. फक्त मी माला(च) स्वतःला हल्ली असा प्रश्न विचारतो..की,त्या त्या धर्मांमधे असलेल्या या सर्व वाइट गोष्टी त्या त्या धर्माच्या अनुयायांना चालतात किंवा हव्या असतात..किंवा यापैकी काहिच नसलं..तरी त्याविरोधी आवाज उठवायचा नसतो.. हे सगळं कशाचं लक्षण आहे... प्राचीन काळी दोन पैलवानांच्या झुंजी लाऊन त्या पैकी एक मरेपर्यंत त्या एंजॉय करण्याचा धर्म होता...हा प्रकार अमानुष आहे..हे पटायला लागल्यावर त्या झुंजी फक्त लुटुपुटुच्या..म्हणजे दिखाऊ स्वरुपाच्या होण्याचा धर्म (WWF) सध्या प्रचलीत आहे..हा जो त्या प्रांतात घडलेला बदल आहे..तसा आपल्याला धर्मात झालेला चालणार आहे का? का नाही चालणार? का..., कशाचीच आपल्याला गरज नाही..असं आपलं म्हणणं असणार आहे? :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

अर्धवटराव 12/11/2014 - 22:43
मुळात प्रत्यक्ष नारायण समोर असताना त्याला सोडुन त्याच्या पुजेने मिळणार्‍या फळांची हाव का निर्माण होते हेच कळत नाहि.

In reply to by अत्रुप्त आत्मा

बुवा , तुमच्या सत्यनारायण कथेचे ते व्हर्जन ऐकवाना ज्यात तो साधुवाणी जहाज बुडेल म्हणुन पाणबुडीच घेवुन जातो ती =))

In reply to by प्रसाद गोडबोले

बाकी मुळ कथेविषयी बोलायचे मी टाळतो , आजकाल लोकांच्या भावना लईच् नाजुक झाल्यात ... मागे सर्वमान्य श्रध्देची चिकित्सा करणारे एक विधान फेसबुक वर टाकले होते तेव्हा माझ्या विरुध्द पोलीस कंप्लेन्ट करेन अशी धमकी मिळाली होती ... पण ते असो ... मागे एकदा मी घरी बोललो होतो की " देव जर असला दहशतवादी असेल तर मी अमेरिकन आहे म्हणाव त्याला ." तेव्हापासुन घरचे देव देव कर म्हणुन मागे लागत नाहीत :D

In reply to by अत्रुप्त आत्मा

वगिश 14/11/2014 - 22:19
तुम्हाला म्हणून विचारतो पूजेचे पैसे किती असतात हो(आउट ऑफ कुरियोसिटी).मी 200 रुपये देऊ केल्यावर गुरूजींनी माझी "मी काय तुम्हाला मराठवड्यातला भटजी वाटलो काय?" असे विचारले.(का ते माहीत नाही,मीही तिकडचा नाही हो.)असो,गरिब जनतेसाठी कुठे स्वस्त भट्जी मिळतात का? ह्या कथेचा इतिहास,मूळभाषा,कूळकथा इत्यादी विषयी कुठे माहिती मिळेल?तुम्हाला काही माहिती असल्यास कृपया इथे द्या.

In reply to by वगिश

सतिश गावडे 14/11/2014 - 22:22
मी म्हणतो नसेल परवडत तर पुजा करावीच कशाला हो. ते "देव भावाचा भुकेला" वगैरे कसं काय विसरतात बुवा लोक.

In reply to by वगिश

@पूजेचे पैसे किती असतात हो >>> माझ्या सारख्यांचा असा कुठलाच/कधिच फिक्स रेट नसतो..पण काहि जणं तो ठेवतात. तरिही खेडेगाव शहर पातळीवर अर्थार्जनाच्या दृष्टीने थोडा (वरपांगी..)फरक असतोच.. मी पुण्याचा..त्यामुळे इथलं सांगतो..आता सगळ्याच भटजिंनी सत्यनारायणा सारख्या सर्व पूजांचा- ऑफ सिझन ३०० आणि ऑन'ला ५०० -असा (मानसिक) दर ठरवलेला आहे.. प्रत्येक जण त्यासाठी अगदी हटून वगैरे बसत नाही..पण ही सामान्यतः अपेक्षा असते. आणि ती पूर्ण होते देखिल.. काहिजण (डॉमिनोज पिझ्झा सारखे) ११०० रुपये वगैरेही सांगतात..आणि वर पुन्हा...आमची पूजा हायक्लास असते..असलंही तर्कट चालवतात..हायक्लास म्हणजे काय??? असं तुंम्ही विचारलत..तर मात्र त्यांना राग येतो..असो चालायचच... धंदे धंदे मे होता है..गन्ने गन्ने का दाम! ;) लेकिन हर गन्ने को चुसो..तो अंदर मिठास ही होती है...आम!

सतिश गावडे 12/11/2014 - 22:47
माझा अनुभव उलट आहे. काही दिवसांपुर्वी दोन सश्रद्द मित्रांसोबत जेजुरीला जायचा योग आला होता. ते दोघे देवाच्या दर्शनाला तर मी "आहे वेळ तर फीरुन येऊ" या उद्देशाने गेलो होतो. मित्र दर्शनाच्या रांगेत उभे राहिले. मी मंदीराभोवतीच्या ओवरीमध्ये बसून पिवळ्या रंगाची उधळण पाहत होतो. मंदीरात चालू असलेली सत्यनारायणाची जवळपास संपत आली होती हे लाऊडस्पिकरवर चालू असलेल्या फलशृतीवरुन कळत होतं. जगातील यच्चयावत सुखं सत्यनारायणाची पुजा घातल्याने मिळतात असं त्या पुजा सांगणार्‍या व्यक्तीचं म्हणणं होतं. सत्यनारायण हा देव तसा वेगळाच म्हटला पाहिजे. केवळ एखादया व्यक्तीने पुजेचा प्रसाद खाल्ला नाही तर त्या व्यक्तीला अद्दल घडावी म्हणून त्याची सोन्या-नाण्याने भरलेली नौका सरळ सरळ बुडवणारा देव पुराणांमध्ये विरळाच. एकदम "माझा प्रसाद खात नाही म्हणजे काय. बघतोच तुला आता" असा अ‍ॅट्टीट्युड. हल्ली फक्त माणूस गेल्यावर सत्यनारायण घालत नाहीत. बाकी आयुष्यातील कुठल्याही इव्हेंटला सत्यनारायण घालतात लोक. लग्न झालं, मुलगा झाला, नोकरी लागली, नविन गाडी घेतली, वर्षभरार देवाचं काही केलं नाही असं काहीही कारण सत्यनारायणाच्या पुजेला चालतं. पुजार्‍याला दक्षिणा मिळते, लोकांना देवाचं काही केल्याचं समाधान. शिवाजी महाराजांनी सत्यनारायणाची पुजा घातल्याचे कुठे वाचण्यात आले नाही. पेशवे देवभक्त असूनही त्यांनीही सत्यनारायण घातल्याचे कुठे वाचण्यात आले नाही. सत्यनारायणाची जन्मकथा शोधण्याचा प्रयत्न केला असता त्याबद्दल एक अफलातून माहिती मिळाली. ब्रिटीश काळात कलकत्त्याला म्हणे सत्य पीर नावाच्या पीराचा उत्सव होत असे. हिंदू मुस्लिम कुठलाही भेदभाव न ठेवता उत्सवात सामिल होत. पुढे ब्रिटीशांनी मुस्लिमांची मने कलुषित केल्यावर त्यांनी हिंदूंना उत्सवात सामिल होण्यास मनाई केली. त्यामुळे मग हिंदूंनी सत्य पीराला पर्याय म्हणून हा नवा सत्य नारायण नावाचा देव शोधला. अर्थात ही वाचलेली गोष्ट आहे. किती सत्य आहे ते सत्यनारायणालाच माहिती. सत्यनारायणाची पुजा महाराष्ट्राबरोबर अजून कुठल्या राज्यांमध्ये घातली जाते हे जाणून घ्यायला आवडेल. सत्यनारायणाच्या पुजेच्या माझ्या लहानपणीच्या खास आठवणी आहेत. कोकणात पुजा सांगायला येणार्‍या ब्राम्हणाला "बामन" म्हणतात. पुजेच्या दुसर्‍या दिवशी पहाटे पुजा मोडतात. त्यावेळी पुजा मांडताना वापरलेल्या खारका, बदाम, सुपार्‍या,आरतीनंतर लोकांनी देवाला टाकलेले पैसे हे सारं पांढर्‍या वस्त्रात बांधून बामनाला दक्षिणेबरोबर द्यावे लागत असे. ही गोष्ट तेव्हा लहानपणी प्रचंड खटकायची. दुसरी आठवण म्हणजे सत्यनारायणाच्या पुजेला वाजवली जाणारी "ऐका श्री सत्यनारायणाची कथा" ही प्रल्हाद शिंदेंनी गायलेली रेकॉर्ड. ही रेकॉर्ड वाजल्याशिवाय सत्यनारायणाची पुजा होतच नसे.
पण प्रत्येक अध्यायात पूजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होईल एवढीच माहिती मिळाली.
आता हा भाग त्या पोथीतून काढून टाकला तरी चालण्यासारखा आहे. हल्ली सत्यनारायण घालण्यासाठी भटजींची अपॉईंटमेंट दोन दोन महिने आधी घ्यावी लागते असे ऐकूण आहे.

In reply to by सतिश गावडे

बॅटमॅन 12/11/2014 - 23:13
अगदी अगदी. खटकण्याबद्दल प्रचंड सहमत आहे. ती लक्ष्मी अन शामबाला इ. ची कथाही तशीच. म्हणे माझी पूजा केली नाही म्हणून मी शासन करते. च्यायला, स्वतःचा ईगो सुखावण्यासाठी माणसांची गरज असलेले हे देव नव्हेतच, सगळा पोरकट प्रकार आहे.

In reply to by सतिश गावडे

आदूबाळ 12/11/2014 - 23:25
सत्यनारायणाची जन्मकथा शोधण्याचा प्रयत्न केला असता त्याबद्दल एक अफलातून माहिती मिळाली. ब्रिटीश काळात कलकत्त्याला म्हणे सत्य पीर नावाच्या पीराचा उत्सव होत असे. हिंदू मुस्लिम कुठलाही भेदभाव न ठेवता उत्सवात सामिल होत. पुढे ब्रिटीशांनी मुस्लिमांची मने कलुषित केल्यावर त्यांनी हिंदूंना उत्सवात सामिल होण्यास मनाई केली. त्यामुळे मग हिंदूंनी सत्य पीराला पर्याय म्हणून हा नवा सत्य नारायण नावाचा देव शोधला. अर्थात ही वाचलेली गोष्ट आहे. किती सत्य आहे ते सत्यनारायणालाच माहिती.
हायला! इंट्रेष्टिंग जन्मकथा आहे!

In reply to by सतिश गावडे

@सत्यनारायणाची पुजा महाराष्ट्राबरोबर अजून कुठल्या राज्यांमध्ये घातली जाते हे जाणून घ्यायला आवडेल.>>> कर्नाटक्/तामिळनाडू/आंध्र.. या ३ प्रांतात.. याचं प्रस्थ नाही.. गुजराथी/मारवाडी/बंगाली/हिंदि भाषिकांमधे...आपल्या प्रमाणेच आहे.. @कोकणात पुजा सांगायला येणार्‍या ब्राम्हणाला "बामन" म्हणतात. पुजेच्या दुसर्‍या दिवशी पहाटे पुजा मोडतात. त्यावेळी पुजा मांडताना वापरलेल्या खारका, बदाम, सुपार्‍या,आरतीनंतर लोकांनी देवाला टाकलेले पैसे हे सारं पांढर्‍या वस्त्रात बांधून बामनाला दक्षिणेबरोबर द्यावे लागत असे. ही गोष्ट तेव्हा लहानपणी प्रचंड खटकायची.>> अहो..धनाजीराव..त्या काळातला अर्थशास्त्रीय मुद्दा आहे हा! त्याकाळात दक्षिणा म्हणून मिळणारे पैसे..हे अत्यंत कमी असायचे.. म्हणून इकडनं..नाही,तर तिकडनं पूर्तता! एव्हढच.. :) @हल्ली सत्यनारायण घालण्यासाठी भटजींची अपॉईंटमेंट दोन दोन महिने आधी घ्यावी लागते असे ऐकूण आहे.>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing019.gif ही माहिती तुंम्हाला कुठून (हाती ;) ) लागली हो! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 13/11/2014 - 06:17
माहिती तुंम्हाला कुठून (हाती ) लागली हो! >>>> त्यांचे एक भडजी मित्र आहेत. कदाचित ही माहिती त्यांनीच सांगितली असावी.

In reply to by सतिश गावडे

खटपट्या 13/11/2014 - 01:31
हल्ली सत्यनारायण घालण्यासाठी भटजींची अपॉईंटमेंट दोन दोन महिने आधी घ्यावी लागते असे ऐकूण आहे.
वर "बामनाला" भरभक्कम दक्षिणाही द्यावी लागते. समजा एखादा बामन नसलेला माणसाने ही पुजावीधी शीकुन घेतली आणी स्वतःच पुजा केली तर चालते का ? बामनानेच ही पुजा करावी असा नियम आहे का ? जाणकारांनी शंका निरसन करावे...

In reply to by खटपट्या

मुळात माझा तरी सत्यनारायण ह्या संकल्पनेवर विश्र्वास आहे आणि मी तो दरवेळी जमेल तसा पाळतो. कार्य हीच पूजा आणि त्यात पारंगत व्हायला जे कष्ट करायला लागतात तीच अर्चना. दरे वर्षी द्यायला लागणारी परीक्षा आणि त्यात पास झाले, की पालकांसमवेत मौज-मजा करणे, हा विद्यार्थांचा सत्यनारायण. तर दर वर्षीचे अप्रायझल हीच माझ्यासाठी परीक्षा आणि त्यात चांगली पगारवाढ मिळाली की मित्रांबरोबर पार्टी करणे, हाच माझा सत्यनारायण. आणि मुळात जो उत्तम शिकतो आणि शिकवतो, तो ब्राह्मण अशी माझी धारणा असल्याने, मला माझ्या सत्यनारायणासाठी, ब्राह्मणांची कमतरता कधीच जाणवत नाही. प्रथे पेक्षा त्यामागचा कार्यकारण भाव समजून घेतला, तर ह्या अशा कालबाह्य प्रथांना उडवून लावायला वेळ लागणार नाही.

अस्वस्थामा 13/11/2014 - 01:04
आमाला सत्यनारयण आत्मूगुर्जींनी सांगितला तेव्हा ते फुलांची रांगोळी काडीत होते. तेव्हा आमचे लक्ष तिकडेच सगळे.. कथा आणि त्यातले नफा-नुकसान त्यांनाच माहीत. ;)

नीलकांत 13/11/2014 - 06:13
या पुजेची कथा ऐकल्यावर आपल्या लक्षात यायला हवे की ही चित्रपटाची पटकथा शोभेल अशी कथा आहे. राग, अपमान, प्रलोभन आदी सर्वच आहे. खरं तर माझं व्यक्तिगत मत असं आहे की त्या निर्गुण निराकार म्हणवल्या जाणार्‍या देवाला मानवी पातळीवर उतरवून आणि त्याला मानवचे सर्व गुण दोष देवून वर आपण कुठल्या तोंडाने त्यालाच आशिर्वाद मागतो? मी गेली १५ वर्षे सत्यनारायण नामक पुजेत बसलेलो नाही. पुढे कधी बसण्याचा संबंध नाही. मात्र ही पर्याय व्यक्तीगत आवडीचा आहे. बाकी सत्यनारायणाचा तुपातील प्रसाद मस्तंच लागतो. आपण शिरा म्हणून खायचा :) वर उल्लेखल्याप्रमाने फक्त मरण सोडून हा कधीही करतात मात्र लग्नानंतर वैवाहीक आयुष्य सुरू करण्या अगोदर ही पुजा करावीच असा आग्रह असतो. मानसीक दृष्ट्या संवेदनशील झालेल्या व्यक्तीला अशी कथा ऐकवल्यावर तो पुढील आयुष्यात हमखास ही पुजा करणार. काय साला टायमींग आहे ना? :) तर अशी वेळ माझ्यावर आल्यावर मी आमच्या सासरकडच्या गुरूजींना बोललो होतो की सत्यनारायण सोडून अन्य पुजा सांगा. तर ते अगदीच ब्लॅन्क होते .... या वेळी हीच पुजा करतात... शेवटी माझे दैवत शंकराची कसलीही पुजा केलेली चालेल अश्या उपायावर चर्चा थांबली व पुजा झाली. शेवटी पुजा काय तर देवाचे अस्तीत्व मान्य करून त्याची कृपा आपल्यावर घेणे हे आहे. हे करण्याची पध्दत म्हणजे पुजा. मध्यंतरी वेगवेगळ्या पंथानी आपआपल्या दैवताचे पुजन करण्याच्या पध्दती ठरवल्या. आपल्याला बरी वाटेल ती पुजा करण्यास काहीही हरकत नाही. एखादी पुजा खटकत असेल तर ती नाही केलेली बरी. पुजा केल्यावर मनाला समाधान वाटले पाहीजे हा सर्वात महत्वाचा मुद्दा. :) - नीलकांत

नाखु 13/11/2014 - 09:03
च्यायला, स्वतःचा ईगो सुखावण्यासाठी माणसांची गरज असलेले हे देव नव्हेतच, सगळा पोरकट प्रकार आहे.
इथे एक बाब दुर्लक्षीत झालीय की ही कथाच मूळी एक मानवाच्या "सुपीक्"डोक्यातून आलेली आहे तेव्हा त्यातील देवही तितकेच दुराग्रही/शीघ्रकोपी असणारच्!आपण सगळे फक्त मसाल्यालाच भाजी (हाटेलातील पंजाबी डिश) समजतोय कालांतराने त्यात मूळ भाजीतरी शिल्लक राहिल का नाही हाच प्रश्न आहे!!!

राही 13/11/2014 - 15:29
एकोणिसाव्या शतकातले मुंबईतले एक प्रसिद्ध आणि समाजसुधारक गृहस्थ दैनंदिनी लिहीत असत. (हे गृहस्थ बहुधा रावसाहेब वि.ना. मंडलिक असावेत. आता नक्की आठवत नाही.) या दैनंदिनीतल्या मजकुराचा उल्लेख एका ठिकाणी वाचला. त्यात रावसाहेबमजकुरांना एकेदिवशी आलेल्या सत्यनारायणपूजेच्या निमंत्रणाविषयी लिहिताना त्यांनी लिहिले होते की अलीकडे मुंबईत ही प्रथा बोकाळू लागली आहे. मूळ बंगाल्यात ब्रह्मसमाजी लोकांनी धर्मसुधारणा म्हणून ही होमहवनविरहित पूजा प्रचलित केली. ही पूजा कोणीही (चातुर्वर्णिक) करू शकतो. हिला मुहूर्ताची जरूरी नाही. सोवळ्याओंवळ्याचे अवडंबर नाही. प्रसादही अगदी साधा, फक्त रव्याचा शिरा. संस्कृत मंत्रांचीही जरूरी नाही. पण मुळात साधेपणा हे उद्दिष्ट असलेल्या या पूजेचे आता मात्र अवडंबर होत चालले आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती. त्या वेळी (एकोणिसाव्या शतकाच्या शेवटीशेवटी )मुंबईतल्या धनवान मिश्र समाजात या पूजेची 'फॅशन' आली होती असेही यात लिहिले होते. बाकी पोथी कशी प्रचारात आली ते सांगता येत नाही. पण पोथीतही एक गुजराती वैश्य व्यापाराला दूरदेशी जातो आणि तो सुरक्षित परत यावा म्हणून त्याची पत्नी हे व्रत करते असे काहीसे आहे. अगदी अलीकडच्या काळातही मार्गशीर्षातल्या गुरुवारी करावयाच्या 'वैभवलक्ष्मी' व्रताची प्रचंड क्रेझ आहे. मजा म्हणजे या व्रतात या पोथ्या आठ/अकरा/सोळा जणांना वाटाव्या आणि त्यांनीही हे व्रत करावे असेही असते. या पोथ्या छापून एका प्रकाशनगृहाला भरपूर फायदा झालेला आहे. त्यांना जवळजवळ लाखभर प्रती छापाव्या लागतात असे ऐकले आहे. ( त्यांनी आपल्या फायद्यासाठी हे व्रत प्रचारात आणले असे अर्थात अजिबातच म्हणावयाचे नाही. त्यांना फायदा झाला तर त्यात तक्रार करण्याजोगे काही नाही.) काही वर्षांपूर्वी शुक्रवारच्या संतोषीमाताव्रताचीही जोरदार चलती होती.

In reply to by राही

हाडक्या 13/11/2014 - 15:49
मूळ बंगाल्यात ब्रह्मसमाजी लोकांनी धर्मसुधारणा म्हणून ही होमहवनविरहित पूजा प्रचलित केली. ही पूजा कोणीही (चातुर्वर्णिक) करू शकतो. हिला मुहूर्ताची जरूरी नाही. सोवळ्याओंवळ्याचे अवडंबर नाही. प्रसादही अगदी साधा, फक्त रव्याचा शिरा. संस्कृत मंत्रांचीही जरूरी नाही. पण मुळात साधेपणा हे उद्दिष्ट असलेल्या या पूजेचे आता मात्र अवडंबर होत चालले आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती.
आक्षी हेच आमीपण वाचले होते... 'ब्रह्मसमाजी' लोकांनी सुरु केलं एका हेतूने आणि लोकांनी त्याला पण सोवळा करून घेतलं. त्या 'ओह माय गॉड' मधल्या कांजीभाईचा पण शेवटी देव करणार्‍या लोकांची आठवण झाली. ;)

पामर 13/11/2014 - 15:46
मला ही पुजा फक्त प्रसादामुळेच आवडते.बाकी पुजा केली नाही म्ह्णुन सुड घेणारा,भक्ताची वाट लावणारा देव मला कधी आवडला नाही.माझा दहावीचा निकाल लागला त्यावेळी वडिलांनी घरी सत्यनारायणाची पुजा ठरवली होती..गुरुजी उपलब्ध झाले नाहीत.मला ती पुजा भंपकपणा वाटत असुन पण केवळ वडिलांची इत्छा म्ह्णुन मी पुजा केली..मात्र ती नेहमीची पोथी बिलकुल वाचली नाही त्याऐवजी विवेकानंदांच्या चरित्रामधल्या ४-५ कथा वाचल्या होत्या आणि आईला जास्तीचा प्रसाद करायला लावुन तो घराजवळच्या वृद्धाश्रमात पोचता केला होता...मला काय मिळ्णार होतं त्या साधु वाण्याचं काय झालं ते वाचुन...

कविता१९७८ 13/11/2014 - 15:50
काही दिवसापुर्वी आम्हा उभयतास सत्यनारायण पुजेस बसण्याचा योग अल.पुजा लक्षपुर्वक ऐकली. पण प्रत्येक अध्यायात पूजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होईल एवढीच माहिती मिळाली. ही पूजा म्हणजे नेमकी काय आहे?महाराष्ट्रात ती इतकी प्रसिध्ह का?
पुजा लक्षपुर्वक ऐकली असं म्हणता आणि प्रत्येक अध्यायात पुजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होइल एवढीच माहीती मिळाली असेही म्हणता म्हणजे पुजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होईल इतकच लक्षपुर्वक ऐकले का? राही यांचा प्रतिसाद अगदी माहीतीपुर्ण आहे.

In reply to by कविता१९७८

सतिश गावडे 13/11/2014 - 15:59
म्हणजे पुजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होईल इतकच लक्षपुर्वक ऐकले का?
पुर्ण पोथीत काय नुकसान होईल हेच जर प्रत्येक अध्यायात लिहिले असे तर त्याला पुजेला बसणारा काय करणार? अर्थात अशी भीती घालण्याचा हेतू एकच असणार. लोकांनी पुजा घालावी आणि पुरोहिताची पोटा-पाण्याची सोय व्हावी. आता या पोथीत सुधारणा करण्यास हरकत नाही. कारण लोक आता स्वतःहून पुजा घालतात.

असंका 13/11/2014 - 16:35
मी वाचलेल्या दोन गोष्टी या निमित्तानं आठवल्या, १. SBI च्या लेबर कोर्ट शाखा अहमदनगर इथे व्यवस्थापनासंबंधी अनेक सुविचार भिंतींवर लिहिले होते. त्यात एक होता की "कुठलाही प्रश्न/समस्या वरीष्ठांकडे नेताना, त्याचे आपल्याला योग्य वाटणारे कमीत कमी एक तरी उत्तर/समाधान घेऊन मगच जावे". २. दुसरी गोष्ट आठवली ती एका विचारवंताची, ज्याच्याबद्द्ल असे म्हणले जाते की तो लोकांना विचार करायला उद्युक्त करणारा माणूस होता- The Man Who Asked Questions: Socrates- सॉक्रेटीस. आपण फक्त शंका विचारत आहात. प्रश्न मांडत आहात. वरच्यापैकी कुठली भूमिका आपल्या ह्या वागण्याशी सुसंगत आहे? (मीही फक्त प्रश्न विचारत आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळे वरच्या प्रश्नाचे जे उत्तर आपण स्वत:कडे घेताल, तेच माझ्याकडेही द्या एवढीच विनंती)

In reply to by असंका

वगिश 14/11/2014 - 21:52
माज्या प्रश्नाचे उत्तर मजकडे आहेच,पण ते माज्या मर्यादित ज्ञानवर मी बनवले अहे.इथे मला काही नवीन विचार मिळतात का ते बघतोय.

तिमा 13/11/2014 - 17:53
लबाडांनी मूर्ख माणसांना फसवण्यासाठी काढलेल्या अनेक क्लुप्त्या आहेत. दुनिया पुजती है, फसानेवाला चाहिये.

माझे आजोबा भटजी होते. घरोघरी पुजा सांगुन त्यातुन मिळणारे पैसे, धन्य, खारिक खोबरं वगैरे वर आमचं घर चालायचं (पुजेतले पैसे ब्राह्मणाला देणं खटकणं स्वाभाविक आहे.. पण कधी काळी लोकांची घरं त्यावरच चालत होती..) अर्थात ते पुरेना म्हणुन मग शिवणकाम / छोट दुकान चलवुन बघणे असे प्रकारही झाले.. पण त्यात काही राम नव्हता.. दुकान तर चोरांनी घरात घुसुन लुटुन नेले... ..तर आमचे बाबाही पुज शिकले.. गरज पडल्यास घरोघरी जाउन सांगायचेही.. जर बारावी पास झालो नाही तर सत्यनारायणाच्या पुजा सांगायच्या हा Plan B होता.. पुढे ते शिकले.. पुन्हा कधी पुजा सांगायची वेळ आली नाही... आणि गंमत म्हणजे आमच्या घरात सुद्धा बाबांनी कधीही सत्यनारायण / सत्यांबा घातला नाही. आमचं कधीही काही नुकसान झालं नाही.. काही त्रास झाला नाही.. सामान्य माणसाच्या आयुष्यात जेवढे चढ उतार असतात तेवढेच आम्ही पण पाहिले.. त्यात पुजा घालण्या - न घालण्याचा संबंध नाही.. त्यामुळे माझा व्यक्तिशः ह्यावर अजिबातच विश्वास नाही.. बादवे.. सत्यनारायणची कथा कुणी थोडक्यात सांगेल का? मी कधीही ही कथा ऐकली नसल्याने मला फक्त "वाणी - जहाज - प्रसाद नाही खाल्ला - बुडवले" इतकंच माहित आहे...

In reply to by पिलीयन रायडर

@सत्यनारायणची कथा कुणी थोडक्यात सांगेल का? मी कधीही ही कथा ऐकली नसल्याने मला फक्त "वाणी - जहाज - प्रसाद नाही खाल्ला - बुडवले" इतकंच माहित आहे...>> चला आता मि.पा.सत्यनारायण करायलाच हवा.. ! ;) थोडं थांबा हं..आता..जुनी..नवी कथा एकदमच लावतो..सविस्तर विवेचनासह! :)

समीरसूर 14/11/2014 - 11:57
सत्यनारायण पूजेला काही अर्थ आहे किंवा नाही हे माहित नाही. तसा पूजा, तासंतास रांगेत उभे राहून देवदर्शन घेणे, दिसणार्‍या प्रत्येक मंदिराला नमस्कार करणे, वगैरे प्रकारांत मला रस नाही; पण एक वेगळा विचार केला तर थोड्याफार प्रमाणात सत्यनारायण पूजेकडे सकारात्मक दृष्टीने पाहता येईल. सत्यनारायण पूजा (किंवा कुठलीही पूजा) घरी असल्यास पाहुणे, निमंत्रित, मित्रमंडळी येतात, निवांत गप्पा-टप्पा, खाणे-पिणे होते, पूजेमुळे घरातले वातावरण आल्हाददायक आणि प्रसन्न होते (भले ते उद्बत्तीच्या वासामुळे किंवा वर्षानुवर्षांच्या सवयींमुळे वाटत असेल), मनाला उभारी देणारा, रिफ्रेश करणारा, काही नवीन चांगले घडेल अशी आशा पल्लवित करणारा, किंवा जे चांगले झाले आहे (गाडी, बंगला, नोकरी, अपत्यप्राप्ती, वगैरे) ते फक्त 'माझ्या'मुळे नव्हे अशी अहंकाराची पुटे जाळणारा एक शुद्ध आणि सात्विक विचार मनाला व्यापून राहतो. सगळे एकत्र जमल्याने विचारांची देवाणघेवाण होते. थोडक्यात 'नेटवर्किंग' होते; ख्यालीखुशाली कळते. जुन्या काळी अशा 'नेटवर्किंग'च्या सोयी उपलब्ध नव्हत्या. म्हणूनच हळदी-कुंकू, सत्यनारायणाची पूजा, वगैरे प्रथा रूढ झाल्या असाव्यात. आता सत्यनारायणाच्या कथा हा भाग तसा विवादास्पद आहे. लोकांमध्ये देवाचे भय असावे आणि त्यांनी कुठल्याही अनीतीच्या वाटेवर जाऊ नसेल म्हणून अशा चमत्कारिक आणि दहशतयुक्त कथा योजण्यात आल्या असाव्यात असा माझा अंदाज आहे. वाढदिवसाला हॉटेलात जाऊन जेवण घेणे किंवा केक कापणे किंवा शुक्रवारी रात्री पार्टी करणे या व अशा कित्येक गोष्टींना तसं पाहिलं तर काहीच अर्थ नाही; तरीही आपण यातल्या कित्येक गोष्टी करत असतो. कारण एकच, विरंगुळा, मोकळेपणा, नेटवर्किंग, मौज, सापेक्ष आनंद, इत्यादी इत्यादी. व्हॉट्सअ‍ॅपवर तासंतास टाईमपास करणे या निरर्थक गोष्टीला तर आजकाल अनन्यसाधारण महत्व आलेले आहे. आपण यापैकी कुठल्याच गोष्टीला तुच्छ लेखत नाही. याच दृष्टीकोनातून जर सत्यनारायण किंवा इतर पूजांकडे पाहिले तर मला वाटते आपली टीकेची धार नक्कीच बोथट होईल. या पूजेतून झाला तर फायदाच असतो (मनाला मिळणारी उभारी, प्रसन्न वातावरण, वगैरे). तोटा नक्कीच नसतो. मग एकदा आपला दृष्टीकोन बदलून बघायला काय हरकत आहे? अर्थात हा प्रश्न आत्ता या क्षणी मी स्वतःला देखील विचारतोय कारण मी देखील आतापर्यंत या किंवा तत्सम पूजांना तुच्छच लेखत होतो. :-)

In reply to by समीरसूर

सतिश गावडे 14/11/2014 - 12:42
लोकांमध्ये देवाचे भय असावे आणि त्यांनी कुठल्याही अनीतीच्या वाटेवर जाऊ नसेल म्हणून अशा चमत्कारिक आणि दहशतयुक्त कथा योजण्यात आल्या असाव्यात असा माझा अंदाज आहे.
हा एव्हढा भाग वगळला तर बाकीच्या प्रतिसादाशी सहमत. सत्यनारायण घातला नाही तर (किंवा घालून त्याचा प्रसाद खाल्ला नाही तर) वाईट होईल ही पोथींच्या माध्यमातून घातलेली भीती केवळ लोकांनी पुजा घालून आपला उदरनिर्वाह चालावा या हेतूने घातली असावी अशी वाटते. आमच्या सोसायटी हे असलं देव देवतांचं वर्षभर काही ना काही चालू असतं. १६ मे नंतर त्याची वारंवारता अजून वाढली आहे. देव धर्म यांवर विश्वास नसल्यामुळे मी या सार्‍याचं तटास्थपणे निरिक्षण करतो तेव्हा मला जाणवतं की यात "देवाचं करणं" हा भाग कमी असून "सेलेब्रेशन"चा भाग जास्त आहे. जे तुम्ही प्रतिसादात मांडलेल्या मताशी सुसंगत आहे. नुकतीच दिवाळी येऊन गेली. शेजार्‍यांनी म्हटलं, "अरे दारासमोर आकाश कंदील, एखादी पणती, एखादी दिव्यांची माळ लाव की". माझं उत्तर ऐकल्यावर त्यांच्या चेहर्‍यावरचे "फार मोठा विद्वान झाला आहे" हे भाव माझ्या नजरेतून सुटले नाहीत. माझं उत्तर होतं, "अंतरंगात ज्ञानाचा दिवा पेटला की बाहेर दिवा लावण्याची आवश्यकता राहत नाही". मग मी त्यांना त्यांच्याच भाषेत समजावले. जगात तीन प्रवृत्तींची माणसं असतात. सात्विक, राजस आणि तामस. तामस प्रवृत्तीची माणसं दारु, सिगारेट, जुगार, गर्द अशा शरीरास हानिकारक तसेच इतर समाजास घातक असणार्‍या इतर कृत्यांमधून आनंद मिळवतात. राजस प्रवृत्तीची माणसं सण, सोहळे, देवपुजा, गाडी, बंगला, नटणे सजणे, चित्रपट, "माझा मुलगा पुण्यातल्या बेस्ट इंटरनॅशनल स्कुलला जातो" अशा भौतिक सुखांमध्ये आनंद मानतात. सात्विक प्रवृत्ती लोक आनंद बाहेर शोधत नाहीत. आपण स्वतःच आनंदस्वरुप आहोत याची त्यांना जाणिव असते. माझं म्हणणं त्यांना समजलं, पटलं की नाही माहिती नाही.

In reply to by सतिश गावडे

, "अंतरंगात ज्ञानाचा दिवा पेटला की बाहेर दिवा लावण्याची आवश्यकता राहत नाही".
बघा बघा ... हेच आम्ही ज्ञानेश्वरांना क्वोट करुन म्हणालो की मी अविवेकाची काजळी | फेडुनि विवेकदीप उजळी | तै योगिया पाहे दिवाळी | निरंतर || ज्ञा. ४.९.५४ तर लोक आम्हाला "छुपा सनातनी " म्हणतात ;) अशा लोकांचं एकदा सायको-अ‍ॅनालिसीस करायचं आहे मला =))

In reply to by प्रसाद गोडबोले

सतिश गावडे 14/11/2014 - 13:18
तर लोक आम्हाला "छुपा सनातनी " म्हणतात
ते तुम्ही ज्ञानेश्वरीतील ओव्या उद्धृत करता म्हणून असेल. ;)
अशा लोकांचं एकदा सायको-अ‍ॅनालिसीस करायचं आहे मला
सिरियसली सायकोअ‍ॅनालिसिस शिकायचे असेल तर फ्रॉईडची "सबकॉन्शियस माईंड" ची थेअरी वाचू नको. जरी मानसाशास्त्रामध्ये फ्रॉईडचे योगदान अनमोल असले तरी या अंतर्मनाच्या सिद्धांताला शास्त्रीय आधार नाही. मेंदू विज्ञान "सबकॉन्शियस माईंड" च्या थिअरीला पाठीमागे टाकून बरंच पुढे गेलं आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

राही 14/11/2014 - 13:28
हेच सांगण्यासाठी 'आत्मतत्व, आत्मभान, स्वत्व जागृत करा' म्हटले की 'पाखंड! पाखंड!' म्हणून ओरडा होतो. 'पुरोगामी' वगैरे शेलक्या शिव्या मिळतात. कमाल आहे!

In reply to by राही

सतिश गावडे 14/11/2014 - 13:38
हेच सांगण्यासाठी 'आत्मतत्व, आत्मभान, स्वत्व जागृत करा' म्हटले की 'पाखंड! पाखंड!' म्हणून ओरडा होतो.
ते ज्याच्या त्याच्या समजूतीवर अवलंबून आहे. अर्थात भगवदगीतेत सांगितलेला "शस्त्रांनी तुकडे न होणारा, अग्नी जाळू न शकणारा, पाण्याने ओला न होणारा आणि वारा वाळवू न शकणारा आत्मा" आणि तुम्ही म्हणत असेलेले 'आत्मतत्व, आत्मभान, स्वत्व' या वेगळ्या गोष्टी आहेत. :)
'पुरोगामी' वगैरे शेलक्या शिव्या मिळतात.
तुम्हाला 'प्रतिगामी' म्हणायचं होतं का?

In reply to by सतिश गावडे

राही 14/11/2014 - 14:12
पूजाबिजा न घालता विवेकाची कास धरा, सदसद्विवेकबुद्धी जागृत करा, आत्मभान जागृत करा असे म्हणणारे लोक पुरोगामी की प्रतिगामी? जाऊ दे. या विषयावर प्रचंड वादावादी आधी झालेलीच आहे. आता पुन्हा नको.

पैसा 14/11/2014 - 12:21
चारोळी धाग्यात बरेच छान प्रतिसाद वाचायला मिळाले. सत्यनारायणाच्या प्रसादाच्या शिर्‍यासाठी लोकांनी पूजा घालाव्यात आणि आम्हाला बोलवावे ही सत्यनारायणाकडे प्रार्थना! ;) नारायण हे साधारणपणे विष्णुला दिलेले नाव आहे. तसे सूर्यालाही नारायण म्हणतात म्हणा! आता हा सत्य नारायण म्हणजे विष्णुस्वरूपच आहे का? मग इतर वेळी तो "सत्य" नसतो का? मजा आहे सगळी! बाकी ज्याला जे आवडेल ते करावे हे माझे कायमचे मत. मात्र दुसर्‍या कोणाला आवडेल म्हणून मी उपास बिपास करून सत्यनारायणाच्या पूजेला बसणार नाही. पूजा दुसरा कोणी करत असेल तर लागेल ती मदत नक्की करीन. आत्मुबुवांच्या व्यवसाय पण चालला पाहिजे ना मंडळी! =))

In reply to by पैसा

सतिश गावडे 14/11/2014 - 12:25
आत्मुबुवांच्या व्यवसाय पण चालला पाहिजे ना मंडळी!
म्हणून तर आम्ही या धाग्यावर गप्प आहोत. आम्ही आमची ज्ञानमौक्तिके या धाग्यात उधळली तर लोक शहाणे होतील आणि बुवांच्या पोटावर पाय येईल. ;)

In reply to by सतिश गावडे

पैसा 14/11/2014 - 12:30
कितीही मौक्तिके उधळली आणि कीबोर्ड मोडले तरी लोक कधीच आपली मते बदलत नाहीत. शहाणे वगैरे व्हायचे सोडाच! तस्मात न भिता "होऊ दे खर्च! मिपा आहे घरचं."

In reply to by सतिश गावडे

@म्हणून तर आम्ही या धाग्यावर गप्प आहोत. आम्ही आमची ज्ञानमौक्तिके या धाग्यात उधळली तर लोक शहाणे होतील आणि बुवांच्या पोटावर पाय येईल. >> ह्या ह्या ह्या ह्या... =)) धनाजीराव..तुम्मी आणि ह्ये असलं मत!??? लै लै आश्चेर्य वाटलं बगा आज! ;) (मागे एकदा... संतांमुळे लोक सुधारले नाहीत्,आणि लावण्यांमुळे बिघडले नाहीत!..अश्या आशयाचा प्रतिसाद देणारे तुम्हीच का? ..असा प्रश्ण पडतोय आमास्नी! ;) ) तुम्मी काय लिवायचं ते लिवा हो.. ह्यो आत्मूभट डोंबारी हाय! ;) लोकांनी माकड बगायच सोडलं की अस्वल काढतो! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

लोकांनी माकड बगायच सोडलं की अस्वल काढतो! हेच काय ते ब्रम्हसत्य, बाकी सारे मिथ्या ! ;) :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

सतिश गावडे 14/11/2014 - 13:22
धनाजीराव..तुम्मी आणि ह्ये असलं मत!???
भडजीबुवा, तो उपरोध होता. बाकी "तुमच्या" डोंबार्‍याच्या खेळातील कौशल्याबाबत आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. आज लोक शहाणे झाले आणि सत्यनारायण घालणे बंद केले तर "तुम्ही" लोकांच्या गळी एखादा नविन देव उतरवाल याची आम्हाला खात्री आहे.

In reply to by सतिश गावडे

समीरसूर 14/11/2014 - 14:04
स्टिव्ह जॉब्जने आयफोन गळी उतरवला आणि अजून कुणी व्हॉट्सअ‍ॅप उतरवलं, अगदी तसंच आहे हे. :-) शेवटी लोकांची गरज ओळखून (अत्मिक शांतता, मनाची उभारी, प्रसन्न वाटणे, निर्धास्त राहणे इत्यादी) कुणाचंही कुठल्याही प्रकारचं नुकसान न करता ती गरज पुरविणे हा समान धागा. शेवटी जगातला सगळाच व्यवहार मानसिक स्तरावरच तर येऊन ठेपतो, नव्हे काय? उकाड्यात गार हवेची झुळूक नुसती शरीराला शांत करत नाही; मनाला ही शांत करते. फेसबुकवर टाकलेले वाढदिवसाचे फोटो अहं कुरवळातात. रुपये २००००० ची एफडी मनाला सुरक्षिततेची भावना देते, हायसं वाटतं. शेवटी सगळं मनाला शांत करण्यासाठीच असतं. मग अजून एका पद्धतीने कुणी अशी शांती देण्याचा प्रयत्न केला तर चालतं की. जगरहाटीला धरूनच आहे ते. हां, अगदीच आसाराम बापू सारख्यांच्या नादी लागणं म्हणजे मूर्खपणाच पण म्हणून पूजा-अर्चा म्हणजे मूर्खपणा असे सरसकट म्हणणे जीवावर येते. :-)

जेपी 14/11/2014 - 16:12
बाकी "तुमच्या" डोंबार्‍याच्या खेळातील कौशल्याबाबत आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. आज लोक शहाणे झाले आणि सत्यनारायण घालणे बंद केले तर "तुम्ही" लोकांच्या गळी एखादा नविन देव उतरवाल याची आम्हाला खात्री आहे. त्यानीं देव नाहि काढला तर लोक त्यानां काढायला भाग पाडतिल हे आस हव

In reply to by जेपी

त्यानीं देव नाहि काढला तर लोक त्यानां काढायला भाग पाडतिल हे आस हव +१ बहुतेक माणसांना कोणा ना कोणावर तरी विसंबून राहणे जास्त सुरक्षित वाटते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सतिश गावडे 14/11/2014 - 17:23
बहुतेक माणसांना कोणा ना कोणावर तरी विसंबून राहणे जास्त सुरक्षित वाटते.
आणि जे असे विसंबून राहतात त्यांना विसंबून राहायला अक्षरशः कुणीही म्हणजे कुणीही चालते.

In reply to by प्यारे१

सतिश गावडे 15/11/2014 - 15:06
खरं तर असायला हवा होता. माऊला रिचर्ड डॉकिन्स कोण हे माहिती नसावं कदाचित. त्यामुळे ते नाव लिहिले नाही तिने ;) रिचर्ड डॉकिन्स हा उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ असून आजच्या घडीला त्याला डार्विनचा वैचारीक वारसदार समजले जाते. तो जी विधाने करतो त्याची सत्यता त्याने प्रयोगशाळेत तपासून पाहिलेली असते.

In reply to by सतिश गावडे

प्यारे१ 15/11/2014 - 17:55
कुठल्या तरी धाग्यात कुठे तरी अंतरंगातला दिवा पेटल्यावर बाहेरचे दिवे पेटवावे लागत नाहीत असं उत्तर दिलेलं म्हणे. ते अंतरंगाचे दिवे पेटलेत की कसं हे कुठल्या प्रयोगशाळेत सिद्ध केलं गेलं ब्वा? ;) तुमची विधानं तुम्हाला 'सिद्ध' (ठराविक पद्धतीनं) करता येत नसतील तर तुम्ही खोटे असता का?

In reply to by कवितानागेश

सतिश गावडे 15/11/2014 - 15:00
कारण ते विसंबून राहणे नसते तर सत्याच्या मार्गावर चालणे असते. डार्विन चालतो. कारण डार्विनची मते प्रयोगशाळेत तपासता येतात. फ्रॉईड काही अंशी चालतो. फ्रॉईडचे काही सिद्धांत चुकीचे होते हे मागच्या शंभर वर्षातील मेंदुविज्ञानातील संशोधनाने लक्षात आले आहे. फ्रॉईड ज्याला "सब कॉन्शियस माईंड" असं म्हणत होता ती खरं तर "न्युरॉन पाथवे"ची कमाल असते. केमिकल लोचा हा शब्द आता शेंबडं पोरही वापरू लागलं आहे. मुळात विज्ञान मार्गाचा अवलंब आणि सत्यनारायणाच्या पोथीत सांगितलेला मार्ग अवलंबणे यात फरक आहे. जर विज्ञानाला कालचा रस्ता चुकीचा वाटला तर विज्ञान स्वतःहून सांगतं तो रस्ता चुकीचा आहे योग्य रस्ता दुसरा आहे किंवा योग्य रस्ता सापडायचा आहे. कालचा रस्ता कितीही मोठया शास्त्रज्ञाने दाखवला असला तरी जर तो चुकीचा असेल तर ते झिडकारले जाते. पोथीवादात हे होत नाही. सुर्य हा ग्रह नसून तारा आहे हे माहिती होऊन जमाना गेला तरी कुंडलीत तो ग्रहच असतो. आणि बरेच सुशिक्षीत, उच्चशिक्षित लोक आजही कुंडल्या घेऊन ज्योतिषांकडे धाव घेतात. राहू केतू आकाशात दाखवता येत नाही तर म्हणे ल्युनार नोडस आहेत. जे नाही ते नाही म्हणून स्विकारायची धमक नाही.

hitesh 12/11/2014 - 21:34
प्रसादाचा शिरा मस्त असतो.

In reply to by धर्मराजमुटके

वगिश 12/11/2014 - 21:43
काही नसल्यामुळे नुकसान(आर्थिक) होण्याची चिंता नहि. हि पूजा धनलाभ होण्यासाठी असते का? *scratch_one-s_head* *SCRATCH*

In reply to by वगिश

इथे प्रश्न विचारण्यापेक्षा सत्यनारायण पुजा व्यवस्थित ऐकली असती तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असती. असो. माझा अंदाज असा की तुमचे नुकतेच लग्न झाले आहे व नवदांपत्यास सत्यनारायण पुजेस बसण्यास सांगीतले असल्यामुळे तुमचे लक्ष पुजेपेक्षा जोडीदाराकडेच अधिक असावे. :) तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारची उत्तरे ऐकण्यात रस आहे ते सांगा. तुमच्या आवडीप्रमाणे उत्तरे देण्याचा प्रयत्न करु. शेवटी हे हॉटेल आहे ना. जे गिर्‍हाईकाला पाहिजे ते देणार. मात्र हॉटेलात काही पुणेरी बाण्याचे वेटर आहे ते तुम्हाला हवे ते नाही तर त्यांना हवे तेच देतील. :)

In reply to by धर्मराजमुटके

वगिश 12/11/2014 - 22:14
नुकतेच लग्न झालेले नाही तरी जोडीदारकडे लक्ष होतेच *yes3*.पूजा वेगळ्या कारणासाठी होति. असो, पुजेविषयी,म्हणजे ती का,कशासाठी करतात ह्याविषयी तुमच्याकडे काही माहिती असल्यास ती इथे लिहा म्हणजे माझा गणमन वृत्ती मुळे ज्या गोष्टी मला पुजेत कळल्या नाहीत त्या इथे कळतील.

In reply to by वगिश

ते कारण सांगितल्याशिवाय पूजाफलाविषयी चर्चा कशी होईल? बाकी तुमचं म्हणणं "पण प्रत्येक अध्यायात पूजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होईल एवढीच माहिती मिळाली.", बरोबर आहे. कारण मूळात देव हीच (मानवी) संकल्पना भीतीतून निर्माण झाली आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

पगला गजोधर 14/11/2014 - 14:28
इलेक्ट्रॉनिक सत्यनारायण वर्जन: एका माणसाने सात्यानारायानांच्या बाजून ब्लॉग-प्रतिक्रिया दिली, आणि त्यामुळे त्याचं खूप भलं झालं, पण नंतर दुसऱ्या वर्षी तो तसं करायचं विसरला, आणि त्याचा सत्यानाश झाला.सगळे पैसे गेले, धंदा बुडला आणि तो देशोधडीला लागला, नंतर पुन्हा ब्लॉग-प्रतिक्रिया केल्यावर त्याचं सुख , पैसा त्याला परत मिळाला.. ( देव माझा सत्यानाश करेल, मला त्रास देईल, दहशतीखाली असली कर्मकांडे नको. मला वाटतं आजच्या युगात इतकी समज आपल्या मधे असायला हरकत नाही.)

सत्यनारायण...सत्यदत्त..सत्यविनायक...सत्यांबा..
हे चारही पूजा प्रकार अगदी अलिकडच्या काळातले आहेत.किंबहुना वैदिक धर्मात पूजा--हाच प्रकार बसत नाही..तो अलिकडे बसवला गेला आहे. {मूळ धर्मात देवतांना मंत्र पठण/गायनाने बोलावणं(आवाहन करणं) आणि त्यांना यज्ञात आथवा पाण्यात आहुती देणं..(अन्न देण) एव्हढच आहे.} तर ते असो...कुठलिही पूजा ही पंचोपचार किंवा षोडशोपचार असते..इथे प्रश्न आहे..तो चारही पूजांमधे आलेल्या कथांचा! त्या उघडपणे चमत्कारांची भलामण करणार्‍या आहेत,यात वाद नाही. तुमचा यावरच जर आक्षेप असेल..तर माझा तुम्हाला १ प्रश्नः- तुमच्या(सारख्यां)साठी मी दोन प्रकारच्या कथा तयार केल्या आहेत. १) मूळ कथेतील सगळे चमत्कार आणि पूजा केल्यावर(च) मिळणारी फळं मी वगळली आणि काहि ठिकाणी बदलली आहेत. त्यात जास्तीत जास्त प्रयत्नवाद्/आशावाद माणुसकी ही मूल्य आणायचा प्रयत्न मी केलेला आहे. २) दुसरी कथा ही सरळ सरळ पूजेला बसलेल्याची(जीवनवाद आणि नैतिकतेच्या बाबतीत) परिक्षा पाहाणारी आहे.. तुम्हाला कोणती कथा हवी? :) जी कुठली कथा हवी...ती का हवी? आणि दोन्ही नको(च) असतील..तर का नको? ==================================== समांतरः- आमच्या वैदिक धर्मापासून ते जगातल्या यच्चयावत चालू/बंद धर्मांमधे असणारी लबाडी/दांभिकता/खोटेपणा/अनैतिकता हीच मी कधिही सर्मथन करत नाही..करु शकणार नाही. फक्त मी माला(च) स्वतःला हल्ली असा प्रश्न विचारतो..की,त्या त्या धर्मांमधे असलेल्या या सर्व वाइट गोष्टी त्या त्या धर्माच्या अनुयायांना चालतात किंवा हव्या असतात..किंवा यापैकी काहिच नसलं..तरी त्याविरोधी आवाज उठवायचा नसतो.. हे सगळं कशाचं लक्षण आहे... प्राचीन काळी दोन पैलवानांच्या झुंजी लाऊन त्या पैकी एक मरेपर्यंत त्या एंजॉय करण्याचा धर्म होता...हा प्रकार अमानुष आहे..हे पटायला लागल्यावर त्या झुंजी फक्त लुटुपुटुच्या..म्हणजे दिखाऊ स्वरुपाच्या होण्याचा धर्म (WWF) सध्या प्रचलीत आहे..हा जो त्या प्रांतात घडलेला बदल आहे..तसा आपल्याला धर्मात झालेला चालणार आहे का? का नाही चालणार? का..., कशाचीच आपल्याला गरज नाही..असं आपलं म्हणणं असणार आहे? :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

अर्धवटराव 12/11/2014 - 22:43
मुळात प्रत्यक्ष नारायण समोर असताना त्याला सोडुन त्याच्या पुजेने मिळणार्‍या फळांची हाव का निर्माण होते हेच कळत नाहि.

In reply to by अत्रुप्त आत्मा

बुवा , तुमच्या सत्यनारायण कथेचे ते व्हर्जन ऐकवाना ज्यात तो साधुवाणी जहाज बुडेल म्हणुन पाणबुडीच घेवुन जातो ती =))

In reply to by प्रसाद गोडबोले

बाकी मुळ कथेविषयी बोलायचे मी टाळतो , आजकाल लोकांच्या भावना लईच् नाजुक झाल्यात ... मागे सर्वमान्य श्रध्देची चिकित्सा करणारे एक विधान फेसबुक वर टाकले होते तेव्हा माझ्या विरुध्द पोलीस कंप्लेन्ट करेन अशी धमकी मिळाली होती ... पण ते असो ... मागे एकदा मी घरी बोललो होतो की " देव जर असला दहशतवादी असेल तर मी अमेरिकन आहे म्हणाव त्याला ." तेव्हापासुन घरचे देव देव कर म्हणुन मागे लागत नाहीत :D

In reply to by अत्रुप्त आत्मा

वगिश 14/11/2014 - 22:19
तुम्हाला म्हणून विचारतो पूजेचे पैसे किती असतात हो(आउट ऑफ कुरियोसिटी).मी 200 रुपये देऊ केल्यावर गुरूजींनी माझी "मी काय तुम्हाला मराठवड्यातला भटजी वाटलो काय?" असे विचारले.(का ते माहीत नाही,मीही तिकडचा नाही हो.)असो,गरिब जनतेसाठी कुठे स्वस्त भट्जी मिळतात का? ह्या कथेचा इतिहास,मूळभाषा,कूळकथा इत्यादी विषयी कुठे माहिती मिळेल?तुम्हाला काही माहिती असल्यास कृपया इथे द्या.

In reply to by वगिश

सतिश गावडे 14/11/2014 - 22:22
मी म्हणतो नसेल परवडत तर पुजा करावीच कशाला हो. ते "देव भावाचा भुकेला" वगैरे कसं काय विसरतात बुवा लोक.

In reply to by वगिश

@पूजेचे पैसे किती असतात हो >>> माझ्या सारख्यांचा असा कुठलाच/कधिच फिक्स रेट नसतो..पण काहि जणं तो ठेवतात. तरिही खेडेगाव शहर पातळीवर अर्थार्जनाच्या दृष्टीने थोडा (वरपांगी..)फरक असतोच.. मी पुण्याचा..त्यामुळे इथलं सांगतो..आता सगळ्याच भटजिंनी सत्यनारायणा सारख्या सर्व पूजांचा- ऑफ सिझन ३०० आणि ऑन'ला ५०० -असा (मानसिक) दर ठरवलेला आहे.. प्रत्येक जण त्यासाठी अगदी हटून वगैरे बसत नाही..पण ही सामान्यतः अपेक्षा असते. आणि ती पूर्ण होते देखिल.. काहिजण (डॉमिनोज पिझ्झा सारखे) ११०० रुपये वगैरेही सांगतात..आणि वर पुन्हा...आमची पूजा हायक्लास असते..असलंही तर्कट चालवतात..हायक्लास म्हणजे काय??? असं तुंम्ही विचारलत..तर मात्र त्यांना राग येतो..असो चालायचच... धंदे धंदे मे होता है..गन्ने गन्ने का दाम! ;) लेकिन हर गन्ने को चुसो..तो अंदर मिठास ही होती है...आम!

सतिश गावडे 12/11/2014 - 22:47
माझा अनुभव उलट आहे. काही दिवसांपुर्वी दोन सश्रद्द मित्रांसोबत जेजुरीला जायचा योग आला होता. ते दोघे देवाच्या दर्शनाला तर मी "आहे वेळ तर फीरुन येऊ" या उद्देशाने गेलो होतो. मित्र दर्शनाच्या रांगेत उभे राहिले. मी मंदीराभोवतीच्या ओवरीमध्ये बसून पिवळ्या रंगाची उधळण पाहत होतो. मंदीरात चालू असलेली सत्यनारायणाची जवळपास संपत आली होती हे लाऊडस्पिकरवर चालू असलेल्या फलशृतीवरुन कळत होतं. जगातील यच्चयावत सुखं सत्यनारायणाची पुजा घातल्याने मिळतात असं त्या पुजा सांगणार्‍या व्यक्तीचं म्हणणं होतं. सत्यनारायण हा देव तसा वेगळाच म्हटला पाहिजे. केवळ एखादया व्यक्तीने पुजेचा प्रसाद खाल्ला नाही तर त्या व्यक्तीला अद्दल घडावी म्हणून त्याची सोन्या-नाण्याने भरलेली नौका सरळ सरळ बुडवणारा देव पुराणांमध्ये विरळाच. एकदम "माझा प्रसाद खात नाही म्हणजे काय. बघतोच तुला आता" असा अ‍ॅट्टीट्युड. हल्ली फक्त माणूस गेल्यावर सत्यनारायण घालत नाहीत. बाकी आयुष्यातील कुठल्याही इव्हेंटला सत्यनारायण घालतात लोक. लग्न झालं, मुलगा झाला, नोकरी लागली, नविन गाडी घेतली, वर्षभरार देवाचं काही केलं नाही असं काहीही कारण सत्यनारायणाच्या पुजेला चालतं. पुजार्‍याला दक्षिणा मिळते, लोकांना देवाचं काही केल्याचं समाधान. शिवाजी महाराजांनी सत्यनारायणाची पुजा घातल्याचे कुठे वाचण्यात आले नाही. पेशवे देवभक्त असूनही त्यांनीही सत्यनारायण घातल्याचे कुठे वाचण्यात आले नाही. सत्यनारायणाची जन्मकथा शोधण्याचा प्रयत्न केला असता त्याबद्दल एक अफलातून माहिती मिळाली. ब्रिटीश काळात कलकत्त्याला म्हणे सत्य पीर नावाच्या पीराचा उत्सव होत असे. हिंदू मुस्लिम कुठलाही भेदभाव न ठेवता उत्सवात सामिल होत. पुढे ब्रिटीशांनी मुस्लिमांची मने कलुषित केल्यावर त्यांनी हिंदूंना उत्सवात सामिल होण्यास मनाई केली. त्यामुळे मग हिंदूंनी सत्य पीराला पर्याय म्हणून हा नवा सत्य नारायण नावाचा देव शोधला. अर्थात ही वाचलेली गोष्ट आहे. किती सत्य आहे ते सत्यनारायणालाच माहिती. सत्यनारायणाची पुजा महाराष्ट्राबरोबर अजून कुठल्या राज्यांमध्ये घातली जाते हे जाणून घ्यायला आवडेल. सत्यनारायणाच्या पुजेच्या माझ्या लहानपणीच्या खास आठवणी आहेत. कोकणात पुजा सांगायला येणार्‍या ब्राम्हणाला "बामन" म्हणतात. पुजेच्या दुसर्‍या दिवशी पहाटे पुजा मोडतात. त्यावेळी पुजा मांडताना वापरलेल्या खारका, बदाम, सुपार्‍या,आरतीनंतर लोकांनी देवाला टाकलेले पैसे हे सारं पांढर्‍या वस्त्रात बांधून बामनाला दक्षिणेबरोबर द्यावे लागत असे. ही गोष्ट तेव्हा लहानपणी प्रचंड खटकायची. दुसरी आठवण म्हणजे सत्यनारायणाच्या पुजेला वाजवली जाणारी "ऐका श्री सत्यनारायणाची कथा" ही प्रल्हाद शिंदेंनी गायलेली रेकॉर्ड. ही रेकॉर्ड वाजल्याशिवाय सत्यनारायणाची पुजा होतच नसे.
पण प्रत्येक अध्यायात पूजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होईल एवढीच माहिती मिळाली.
आता हा भाग त्या पोथीतून काढून टाकला तरी चालण्यासारखा आहे. हल्ली सत्यनारायण घालण्यासाठी भटजींची अपॉईंटमेंट दोन दोन महिने आधी घ्यावी लागते असे ऐकूण आहे.

In reply to by सतिश गावडे

बॅटमॅन 12/11/2014 - 23:13
अगदी अगदी. खटकण्याबद्दल प्रचंड सहमत आहे. ती लक्ष्मी अन शामबाला इ. ची कथाही तशीच. म्हणे माझी पूजा केली नाही म्हणून मी शासन करते. च्यायला, स्वतःचा ईगो सुखावण्यासाठी माणसांची गरज असलेले हे देव नव्हेतच, सगळा पोरकट प्रकार आहे.

In reply to by सतिश गावडे

आदूबाळ 12/11/2014 - 23:25
सत्यनारायणाची जन्मकथा शोधण्याचा प्रयत्न केला असता त्याबद्दल एक अफलातून माहिती मिळाली. ब्रिटीश काळात कलकत्त्याला म्हणे सत्य पीर नावाच्या पीराचा उत्सव होत असे. हिंदू मुस्लिम कुठलाही भेदभाव न ठेवता उत्सवात सामिल होत. पुढे ब्रिटीशांनी मुस्लिमांची मने कलुषित केल्यावर त्यांनी हिंदूंना उत्सवात सामिल होण्यास मनाई केली. त्यामुळे मग हिंदूंनी सत्य पीराला पर्याय म्हणून हा नवा सत्य नारायण नावाचा देव शोधला. अर्थात ही वाचलेली गोष्ट आहे. किती सत्य आहे ते सत्यनारायणालाच माहिती.
हायला! इंट्रेष्टिंग जन्मकथा आहे!

In reply to by सतिश गावडे

@सत्यनारायणाची पुजा महाराष्ट्राबरोबर अजून कुठल्या राज्यांमध्ये घातली जाते हे जाणून घ्यायला आवडेल.>>> कर्नाटक्/तामिळनाडू/आंध्र.. या ३ प्रांतात.. याचं प्रस्थ नाही.. गुजराथी/मारवाडी/बंगाली/हिंदि भाषिकांमधे...आपल्या प्रमाणेच आहे.. @कोकणात पुजा सांगायला येणार्‍या ब्राम्हणाला "बामन" म्हणतात. पुजेच्या दुसर्‍या दिवशी पहाटे पुजा मोडतात. त्यावेळी पुजा मांडताना वापरलेल्या खारका, बदाम, सुपार्‍या,आरतीनंतर लोकांनी देवाला टाकलेले पैसे हे सारं पांढर्‍या वस्त्रात बांधून बामनाला दक्षिणेबरोबर द्यावे लागत असे. ही गोष्ट तेव्हा लहानपणी प्रचंड खटकायची.>> अहो..धनाजीराव..त्या काळातला अर्थशास्त्रीय मुद्दा आहे हा! त्याकाळात दक्षिणा म्हणून मिळणारे पैसे..हे अत्यंत कमी असायचे.. म्हणून इकडनं..नाही,तर तिकडनं पूर्तता! एव्हढच.. :) @हल्ली सत्यनारायण घालण्यासाठी भटजींची अपॉईंटमेंट दोन दोन महिने आधी घ्यावी लागते असे ऐकूण आहे.>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing019.gif ही माहिती तुंम्हाला कुठून (हाती ;) ) लागली हो! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 13/11/2014 - 06:17
माहिती तुंम्हाला कुठून (हाती ) लागली हो! >>>> त्यांचे एक भडजी मित्र आहेत. कदाचित ही माहिती त्यांनीच सांगितली असावी.

In reply to by सतिश गावडे

खटपट्या 13/11/2014 - 01:31
हल्ली सत्यनारायण घालण्यासाठी भटजींची अपॉईंटमेंट दोन दोन महिने आधी घ्यावी लागते असे ऐकूण आहे.
वर "बामनाला" भरभक्कम दक्षिणाही द्यावी लागते. समजा एखादा बामन नसलेला माणसाने ही पुजावीधी शीकुन घेतली आणी स्वतःच पुजा केली तर चालते का ? बामनानेच ही पुजा करावी असा नियम आहे का ? जाणकारांनी शंका निरसन करावे...

In reply to by खटपट्या

मुळात माझा तरी सत्यनारायण ह्या संकल्पनेवर विश्र्वास आहे आणि मी तो दरवेळी जमेल तसा पाळतो. कार्य हीच पूजा आणि त्यात पारंगत व्हायला जे कष्ट करायला लागतात तीच अर्चना. दरे वर्षी द्यायला लागणारी परीक्षा आणि त्यात पास झाले, की पालकांसमवेत मौज-मजा करणे, हा विद्यार्थांचा सत्यनारायण. तर दर वर्षीचे अप्रायझल हीच माझ्यासाठी परीक्षा आणि त्यात चांगली पगारवाढ मिळाली की मित्रांबरोबर पार्टी करणे, हाच माझा सत्यनारायण. आणि मुळात जो उत्तम शिकतो आणि शिकवतो, तो ब्राह्मण अशी माझी धारणा असल्याने, मला माझ्या सत्यनारायणासाठी, ब्राह्मणांची कमतरता कधीच जाणवत नाही. प्रथे पेक्षा त्यामागचा कार्यकारण भाव समजून घेतला, तर ह्या अशा कालबाह्य प्रथांना उडवून लावायला वेळ लागणार नाही.

अस्वस्थामा 13/11/2014 - 01:04
आमाला सत्यनारयण आत्मूगुर्जींनी सांगितला तेव्हा ते फुलांची रांगोळी काडीत होते. तेव्हा आमचे लक्ष तिकडेच सगळे.. कथा आणि त्यातले नफा-नुकसान त्यांनाच माहीत. ;)

नीलकांत 13/11/2014 - 06:13
या पुजेची कथा ऐकल्यावर आपल्या लक्षात यायला हवे की ही चित्रपटाची पटकथा शोभेल अशी कथा आहे. राग, अपमान, प्रलोभन आदी सर्वच आहे. खरं तर माझं व्यक्तिगत मत असं आहे की त्या निर्गुण निराकार म्हणवल्या जाणार्‍या देवाला मानवी पातळीवर उतरवून आणि त्याला मानवचे सर्व गुण दोष देवून वर आपण कुठल्या तोंडाने त्यालाच आशिर्वाद मागतो? मी गेली १५ वर्षे सत्यनारायण नामक पुजेत बसलेलो नाही. पुढे कधी बसण्याचा संबंध नाही. मात्र ही पर्याय व्यक्तीगत आवडीचा आहे. बाकी सत्यनारायणाचा तुपातील प्रसाद मस्तंच लागतो. आपण शिरा म्हणून खायचा :) वर उल्लेखल्याप्रमाने फक्त मरण सोडून हा कधीही करतात मात्र लग्नानंतर वैवाहीक आयुष्य सुरू करण्या अगोदर ही पुजा करावीच असा आग्रह असतो. मानसीक दृष्ट्या संवेदनशील झालेल्या व्यक्तीला अशी कथा ऐकवल्यावर तो पुढील आयुष्यात हमखास ही पुजा करणार. काय साला टायमींग आहे ना? :) तर अशी वेळ माझ्यावर आल्यावर मी आमच्या सासरकडच्या गुरूजींना बोललो होतो की सत्यनारायण सोडून अन्य पुजा सांगा. तर ते अगदीच ब्लॅन्क होते .... या वेळी हीच पुजा करतात... शेवटी माझे दैवत शंकराची कसलीही पुजा केलेली चालेल अश्या उपायावर चर्चा थांबली व पुजा झाली. शेवटी पुजा काय तर देवाचे अस्तीत्व मान्य करून त्याची कृपा आपल्यावर घेणे हे आहे. हे करण्याची पध्दत म्हणजे पुजा. मध्यंतरी वेगवेगळ्या पंथानी आपआपल्या दैवताचे पुजन करण्याच्या पध्दती ठरवल्या. आपल्याला बरी वाटेल ती पुजा करण्यास काहीही हरकत नाही. एखादी पुजा खटकत असेल तर ती नाही केलेली बरी. पुजा केल्यावर मनाला समाधान वाटले पाहीजे हा सर्वात महत्वाचा मुद्दा. :) - नीलकांत

नाखु 13/11/2014 - 09:03
च्यायला, स्वतःचा ईगो सुखावण्यासाठी माणसांची गरज असलेले हे देव नव्हेतच, सगळा पोरकट प्रकार आहे.
इथे एक बाब दुर्लक्षीत झालीय की ही कथाच मूळी एक मानवाच्या "सुपीक्"डोक्यातून आलेली आहे तेव्हा त्यातील देवही तितकेच दुराग्रही/शीघ्रकोपी असणारच्!आपण सगळे फक्त मसाल्यालाच भाजी (हाटेलातील पंजाबी डिश) समजतोय कालांतराने त्यात मूळ भाजीतरी शिल्लक राहिल का नाही हाच प्रश्न आहे!!!

राही 13/11/2014 - 15:29
एकोणिसाव्या शतकातले मुंबईतले एक प्रसिद्ध आणि समाजसुधारक गृहस्थ दैनंदिनी लिहीत असत. (हे गृहस्थ बहुधा रावसाहेब वि.ना. मंडलिक असावेत. आता नक्की आठवत नाही.) या दैनंदिनीतल्या मजकुराचा उल्लेख एका ठिकाणी वाचला. त्यात रावसाहेबमजकुरांना एकेदिवशी आलेल्या सत्यनारायणपूजेच्या निमंत्रणाविषयी लिहिताना त्यांनी लिहिले होते की अलीकडे मुंबईत ही प्रथा बोकाळू लागली आहे. मूळ बंगाल्यात ब्रह्मसमाजी लोकांनी धर्मसुधारणा म्हणून ही होमहवनविरहित पूजा प्रचलित केली. ही पूजा कोणीही (चातुर्वर्णिक) करू शकतो. हिला मुहूर्ताची जरूरी नाही. सोवळ्याओंवळ्याचे अवडंबर नाही. प्रसादही अगदी साधा, फक्त रव्याचा शिरा. संस्कृत मंत्रांचीही जरूरी नाही. पण मुळात साधेपणा हे उद्दिष्ट असलेल्या या पूजेचे आता मात्र अवडंबर होत चालले आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती. त्या वेळी (एकोणिसाव्या शतकाच्या शेवटीशेवटी )मुंबईतल्या धनवान मिश्र समाजात या पूजेची 'फॅशन' आली होती असेही यात लिहिले होते. बाकी पोथी कशी प्रचारात आली ते सांगता येत नाही. पण पोथीतही एक गुजराती वैश्य व्यापाराला दूरदेशी जातो आणि तो सुरक्षित परत यावा म्हणून त्याची पत्नी हे व्रत करते असे काहीसे आहे. अगदी अलीकडच्या काळातही मार्गशीर्षातल्या गुरुवारी करावयाच्या 'वैभवलक्ष्मी' व्रताची प्रचंड क्रेझ आहे. मजा म्हणजे या व्रतात या पोथ्या आठ/अकरा/सोळा जणांना वाटाव्या आणि त्यांनीही हे व्रत करावे असेही असते. या पोथ्या छापून एका प्रकाशनगृहाला भरपूर फायदा झालेला आहे. त्यांना जवळजवळ लाखभर प्रती छापाव्या लागतात असे ऐकले आहे. ( त्यांनी आपल्या फायद्यासाठी हे व्रत प्रचारात आणले असे अर्थात अजिबातच म्हणावयाचे नाही. त्यांना फायदा झाला तर त्यात तक्रार करण्याजोगे काही नाही.) काही वर्षांपूर्वी शुक्रवारच्या संतोषीमाताव्रताचीही जोरदार चलती होती.

In reply to by राही

हाडक्या 13/11/2014 - 15:49
मूळ बंगाल्यात ब्रह्मसमाजी लोकांनी धर्मसुधारणा म्हणून ही होमहवनविरहित पूजा प्रचलित केली. ही पूजा कोणीही (चातुर्वर्णिक) करू शकतो. हिला मुहूर्ताची जरूरी नाही. सोवळ्याओंवळ्याचे अवडंबर नाही. प्रसादही अगदी साधा, फक्त रव्याचा शिरा. संस्कृत मंत्रांचीही जरूरी नाही. पण मुळात साधेपणा हे उद्दिष्ट असलेल्या या पूजेचे आता मात्र अवडंबर होत चालले आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली होती.
आक्षी हेच आमीपण वाचले होते... 'ब्रह्मसमाजी' लोकांनी सुरु केलं एका हेतूने आणि लोकांनी त्याला पण सोवळा करून घेतलं. त्या 'ओह माय गॉड' मधल्या कांजीभाईचा पण शेवटी देव करणार्‍या लोकांची आठवण झाली. ;)

पामर 13/11/2014 - 15:46
मला ही पुजा फक्त प्रसादामुळेच आवडते.बाकी पुजा केली नाही म्ह्णुन सुड घेणारा,भक्ताची वाट लावणारा देव मला कधी आवडला नाही.माझा दहावीचा निकाल लागला त्यावेळी वडिलांनी घरी सत्यनारायणाची पुजा ठरवली होती..गुरुजी उपलब्ध झाले नाहीत.मला ती पुजा भंपकपणा वाटत असुन पण केवळ वडिलांची इत्छा म्ह्णुन मी पुजा केली..मात्र ती नेहमीची पोथी बिलकुल वाचली नाही त्याऐवजी विवेकानंदांच्या चरित्रामधल्या ४-५ कथा वाचल्या होत्या आणि आईला जास्तीचा प्रसाद करायला लावुन तो घराजवळच्या वृद्धाश्रमात पोचता केला होता...मला काय मिळ्णार होतं त्या साधु वाण्याचं काय झालं ते वाचुन...

कविता१९७८ 13/11/2014 - 15:50
काही दिवसापुर्वी आम्हा उभयतास सत्यनारायण पुजेस बसण्याचा योग अल.पुजा लक्षपुर्वक ऐकली. पण प्रत्येक अध्यायात पूजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होईल एवढीच माहिती मिळाली. ही पूजा म्हणजे नेमकी काय आहे?महाराष्ट्रात ती इतकी प्रसिध्ह का?
पुजा लक्षपुर्वक ऐकली असं म्हणता आणि प्रत्येक अध्यायात पुजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होइल एवढीच माहीती मिळाली असेही म्हणता म्हणजे पुजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होईल इतकच लक्षपुर्वक ऐकले का? राही यांचा प्रतिसाद अगदी माहीतीपुर्ण आहे.

In reply to by कविता१९७८

सतिश गावडे 13/11/2014 - 15:59
म्हणजे पुजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होईल इतकच लक्षपुर्वक ऐकले का?
पुर्ण पोथीत काय नुकसान होईल हेच जर प्रत्येक अध्यायात लिहिले असे तर त्याला पुजेला बसणारा काय करणार? अर्थात अशी भीती घालण्याचा हेतू एकच असणार. लोकांनी पुजा घालावी आणि पुरोहिताची पोटा-पाण्याची सोय व्हावी. आता या पोथीत सुधारणा करण्यास हरकत नाही. कारण लोक आता स्वतःहून पुजा घालतात.

असंका 13/11/2014 - 16:35
मी वाचलेल्या दोन गोष्टी या निमित्तानं आठवल्या, १. SBI च्या लेबर कोर्ट शाखा अहमदनगर इथे व्यवस्थापनासंबंधी अनेक सुविचार भिंतींवर लिहिले होते. त्यात एक होता की "कुठलाही प्रश्न/समस्या वरीष्ठांकडे नेताना, त्याचे आपल्याला योग्य वाटणारे कमीत कमी एक तरी उत्तर/समाधान घेऊन मगच जावे". २. दुसरी गोष्ट आठवली ती एका विचारवंताची, ज्याच्याबद्द्ल असे म्हणले जाते की तो लोकांना विचार करायला उद्युक्त करणारा माणूस होता- The Man Who Asked Questions: Socrates- सॉक्रेटीस. आपण फक्त शंका विचारत आहात. प्रश्न मांडत आहात. वरच्यापैकी कुठली भूमिका आपल्या ह्या वागण्याशी सुसंगत आहे? (मीही फक्त प्रश्न विचारत आहे, याची मला जाणीव आहे. त्यामुळे वरच्या प्रश्नाचे जे उत्तर आपण स्वत:कडे घेताल, तेच माझ्याकडेही द्या एवढीच विनंती)

In reply to by असंका

वगिश 14/11/2014 - 21:52
माज्या प्रश्नाचे उत्तर मजकडे आहेच,पण ते माज्या मर्यादित ज्ञानवर मी बनवले अहे.इथे मला काही नवीन विचार मिळतात का ते बघतोय.

तिमा 13/11/2014 - 17:53
लबाडांनी मूर्ख माणसांना फसवण्यासाठी काढलेल्या अनेक क्लुप्त्या आहेत. दुनिया पुजती है, फसानेवाला चाहिये.

माझे आजोबा भटजी होते. घरोघरी पुजा सांगुन त्यातुन मिळणारे पैसे, धन्य, खारिक खोबरं वगैरे वर आमचं घर चालायचं (पुजेतले पैसे ब्राह्मणाला देणं खटकणं स्वाभाविक आहे.. पण कधी काळी लोकांची घरं त्यावरच चालत होती..) अर्थात ते पुरेना म्हणुन मग शिवणकाम / छोट दुकान चलवुन बघणे असे प्रकारही झाले.. पण त्यात काही राम नव्हता.. दुकान तर चोरांनी घरात घुसुन लुटुन नेले... ..तर आमचे बाबाही पुज शिकले.. गरज पडल्यास घरोघरी जाउन सांगायचेही.. जर बारावी पास झालो नाही तर सत्यनारायणाच्या पुजा सांगायच्या हा Plan B होता.. पुढे ते शिकले.. पुन्हा कधी पुजा सांगायची वेळ आली नाही... आणि गंमत म्हणजे आमच्या घरात सुद्धा बाबांनी कधीही सत्यनारायण / सत्यांबा घातला नाही. आमचं कधीही काही नुकसान झालं नाही.. काही त्रास झाला नाही.. सामान्य माणसाच्या आयुष्यात जेवढे चढ उतार असतात तेवढेच आम्ही पण पाहिले.. त्यात पुजा घालण्या - न घालण्याचा संबंध नाही.. त्यामुळे माझा व्यक्तिशः ह्यावर अजिबातच विश्वास नाही.. बादवे.. सत्यनारायणची कथा कुणी थोडक्यात सांगेल का? मी कधीही ही कथा ऐकली नसल्याने मला फक्त "वाणी - जहाज - प्रसाद नाही खाल्ला - बुडवले" इतकंच माहित आहे...

In reply to by पिलीयन रायडर

@सत्यनारायणची कथा कुणी थोडक्यात सांगेल का? मी कधीही ही कथा ऐकली नसल्याने मला फक्त "वाणी - जहाज - प्रसाद नाही खाल्ला - बुडवले" इतकंच माहित आहे...>> चला आता मि.पा.सत्यनारायण करायलाच हवा.. ! ;) थोडं थांबा हं..आता..जुनी..नवी कथा एकदमच लावतो..सविस्तर विवेचनासह! :)

समीरसूर 14/11/2014 - 11:57
सत्यनारायण पूजेला काही अर्थ आहे किंवा नाही हे माहित नाही. तसा पूजा, तासंतास रांगेत उभे राहून देवदर्शन घेणे, दिसणार्‍या प्रत्येक मंदिराला नमस्कार करणे, वगैरे प्रकारांत मला रस नाही; पण एक वेगळा विचार केला तर थोड्याफार प्रमाणात सत्यनारायण पूजेकडे सकारात्मक दृष्टीने पाहता येईल. सत्यनारायण पूजा (किंवा कुठलीही पूजा) घरी असल्यास पाहुणे, निमंत्रित, मित्रमंडळी येतात, निवांत गप्पा-टप्पा, खाणे-पिणे होते, पूजेमुळे घरातले वातावरण आल्हाददायक आणि प्रसन्न होते (भले ते उद्बत्तीच्या वासामुळे किंवा वर्षानुवर्षांच्या सवयींमुळे वाटत असेल), मनाला उभारी देणारा, रिफ्रेश करणारा, काही नवीन चांगले घडेल अशी आशा पल्लवित करणारा, किंवा जे चांगले झाले आहे (गाडी, बंगला, नोकरी, अपत्यप्राप्ती, वगैरे) ते फक्त 'माझ्या'मुळे नव्हे अशी अहंकाराची पुटे जाळणारा एक शुद्ध आणि सात्विक विचार मनाला व्यापून राहतो. सगळे एकत्र जमल्याने विचारांची देवाणघेवाण होते. थोडक्यात 'नेटवर्किंग' होते; ख्यालीखुशाली कळते. जुन्या काळी अशा 'नेटवर्किंग'च्या सोयी उपलब्ध नव्हत्या. म्हणूनच हळदी-कुंकू, सत्यनारायणाची पूजा, वगैरे प्रथा रूढ झाल्या असाव्यात. आता सत्यनारायणाच्या कथा हा भाग तसा विवादास्पद आहे. लोकांमध्ये देवाचे भय असावे आणि त्यांनी कुठल्याही अनीतीच्या वाटेवर जाऊ नसेल म्हणून अशा चमत्कारिक आणि दहशतयुक्त कथा योजण्यात आल्या असाव्यात असा माझा अंदाज आहे. वाढदिवसाला हॉटेलात जाऊन जेवण घेणे किंवा केक कापणे किंवा शुक्रवारी रात्री पार्टी करणे या व अशा कित्येक गोष्टींना तसं पाहिलं तर काहीच अर्थ नाही; तरीही आपण यातल्या कित्येक गोष्टी करत असतो. कारण एकच, विरंगुळा, मोकळेपणा, नेटवर्किंग, मौज, सापेक्ष आनंद, इत्यादी इत्यादी. व्हॉट्सअ‍ॅपवर तासंतास टाईमपास करणे या निरर्थक गोष्टीला तर आजकाल अनन्यसाधारण महत्व आलेले आहे. आपण यापैकी कुठल्याच गोष्टीला तुच्छ लेखत नाही. याच दृष्टीकोनातून जर सत्यनारायण किंवा इतर पूजांकडे पाहिले तर मला वाटते आपली टीकेची धार नक्कीच बोथट होईल. या पूजेतून झाला तर फायदाच असतो (मनाला मिळणारी उभारी, प्रसन्न वातावरण, वगैरे). तोटा नक्कीच नसतो. मग एकदा आपला दृष्टीकोन बदलून बघायला काय हरकत आहे? अर्थात हा प्रश्न आत्ता या क्षणी मी स्वतःला देखील विचारतोय कारण मी देखील आतापर्यंत या किंवा तत्सम पूजांना तुच्छच लेखत होतो. :-)

In reply to by समीरसूर

सतिश गावडे 14/11/2014 - 12:42
लोकांमध्ये देवाचे भय असावे आणि त्यांनी कुठल्याही अनीतीच्या वाटेवर जाऊ नसेल म्हणून अशा चमत्कारिक आणि दहशतयुक्त कथा योजण्यात आल्या असाव्यात असा माझा अंदाज आहे.
हा एव्हढा भाग वगळला तर बाकीच्या प्रतिसादाशी सहमत. सत्यनारायण घातला नाही तर (किंवा घालून त्याचा प्रसाद खाल्ला नाही तर) वाईट होईल ही पोथींच्या माध्यमातून घातलेली भीती केवळ लोकांनी पुजा घालून आपला उदरनिर्वाह चालावा या हेतूने घातली असावी अशी वाटते. आमच्या सोसायटी हे असलं देव देवतांचं वर्षभर काही ना काही चालू असतं. १६ मे नंतर त्याची वारंवारता अजून वाढली आहे. देव धर्म यांवर विश्वास नसल्यामुळे मी या सार्‍याचं तटास्थपणे निरिक्षण करतो तेव्हा मला जाणवतं की यात "देवाचं करणं" हा भाग कमी असून "सेलेब्रेशन"चा भाग जास्त आहे. जे तुम्ही प्रतिसादात मांडलेल्या मताशी सुसंगत आहे. नुकतीच दिवाळी येऊन गेली. शेजार्‍यांनी म्हटलं, "अरे दारासमोर आकाश कंदील, एखादी पणती, एखादी दिव्यांची माळ लाव की". माझं उत्तर ऐकल्यावर त्यांच्या चेहर्‍यावरचे "फार मोठा विद्वान झाला आहे" हे भाव माझ्या नजरेतून सुटले नाहीत. माझं उत्तर होतं, "अंतरंगात ज्ञानाचा दिवा पेटला की बाहेर दिवा लावण्याची आवश्यकता राहत नाही". मग मी त्यांना त्यांच्याच भाषेत समजावले. जगात तीन प्रवृत्तींची माणसं असतात. सात्विक, राजस आणि तामस. तामस प्रवृत्तीची माणसं दारु, सिगारेट, जुगार, गर्द अशा शरीरास हानिकारक तसेच इतर समाजास घातक असणार्‍या इतर कृत्यांमधून आनंद मिळवतात. राजस प्रवृत्तीची माणसं सण, सोहळे, देवपुजा, गाडी, बंगला, नटणे सजणे, चित्रपट, "माझा मुलगा पुण्यातल्या बेस्ट इंटरनॅशनल स्कुलला जातो" अशा भौतिक सुखांमध्ये आनंद मानतात. सात्विक प्रवृत्ती लोक आनंद बाहेर शोधत नाहीत. आपण स्वतःच आनंदस्वरुप आहोत याची त्यांना जाणिव असते. माझं म्हणणं त्यांना समजलं, पटलं की नाही माहिती नाही.

In reply to by सतिश गावडे

, "अंतरंगात ज्ञानाचा दिवा पेटला की बाहेर दिवा लावण्याची आवश्यकता राहत नाही".
बघा बघा ... हेच आम्ही ज्ञानेश्वरांना क्वोट करुन म्हणालो की मी अविवेकाची काजळी | फेडुनि विवेकदीप उजळी | तै योगिया पाहे दिवाळी | निरंतर || ज्ञा. ४.९.५४ तर लोक आम्हाला "छुपा सनातनी " म्हणतात ;) अशा लोकांचं एकदा सायको-अ‍ॅनालिसीस करायचं आहे मला =))

In reply to by प्रसाद गोडबोले

सतिश गावडे 14/11/2014 - 13:18
तर लोक आम्हाला "छुपा सनातनी " म्हणतात
ते तुम्ही ज्ञानेश्वरीतील ओव्या उद्धृत करता म्हणून असेल. ;)
अशा लोकांचं एकदा सायको-अ‍ॅनालिसीस करायचं आहे मला
सिरियसली सायकोअ‍ॅनालिसिस शिकायचे असेल तर फ्रॉईडची "सबकॉन्शियस माईंड" ची थेअरी वाचू नको. जरी मानसाशास्त्रामध्ये फ्रॉईडचे योगदान अनमोल असले तरी या अंतर्मनाच्या सिद्धांताला शास्त्रीय आधार नाही. मेंदू विज्ञान "सबकॉन्शियस माईंड" च्या थिअरीला पाठीमागे टाकून बरंच पुढे गेलं आहे.

In reply to by प्रसाद गोडबोले

राही 14/11/2014 - 13:28
हेच सांगण्यासाठी 'आत्मतत्व, आत्मभान, स्वत्व जागृत करा' म्हटले की 'पाखंड! पाखंड!' म्हणून ओरडा होतो. 'पुरोगामी' वगैरे शेलक्या शिव्या मिळतात. कमाल आहे!

In reply to by राही

सतिश गावडे 14/11/2014 - 13:38
हेच सांगण्यासाठी 'आत्मतत्व, आत्मभान, स्वत्व जागृत करा' म्हटले की 'पाखंड! पाखंड!' म्हणून ओरडा होतो.
ते ज्याच्या त्याच्या समजूतीवर अवलंबून आहे. अर्थात भगवदगीतेत सांगितलेला "शस्त्रांनी तुकडे न होणारा, अग्नी जाळू न शकणारा, पाण्याने ओला न होणारा आणि वारा वाळवू न शकणारा आत्मा" आणि तुम्ही म्हणत असेलेले 'आत्मतत्व, आत्मभान, स्वत्व' या वेगळ्या गोष्टी आहेत. :)
'पुरोगामी' वगैरे शेलक्या शिव्या मिळतात.
तुम्हाला 'प्रतिगामी' म्हणायचं होतं का?

In reply to by सतिश गावडे

राही 14/11/2014 - 14:12
पूजाबिजा न घालता विवेकाची कास धरा, सदसद्विवेकबुद्धी जागृत करा, आत्मभान जागृत करा असे म्हणणारे लोक पुरोगामी की प्रतिगामी? जाऊ दे. या विषयावर प्रचंड वादावादी आधी झालेलीच आहे. आता पुन्हा नको.

पैसा 14/11/2014 - 12:21
चारोळी धाग्यात बरेच छान प्रतिसाद वाचायला मिळाले. सत्यनारायणाच्या प्रसादाच्या शिर्‍यासाठी लोकांनी पूजा घालाव्यात आणि आम्हाला बोलवावे ही सत्यनारायणाकडे प्रार्थना! ;) नारायण हे साधारणपणे विष्णुला दिलेले नाव आहे. तसे सूर्यालाही नारायण म्हणतात म्हणा! आता हा सत्य नारायण म्हणजे विष्णुस्वरूपच आहे का? मग इतर वेळी तो "सत्य" नसतो का? मजा आहे सगळी! बाकी ज्याला जे आवडेल ते करावे हे माझे कायमचे मत. मात्र दुसर्‍या कोणाला आवडेल म्हणून मी उपास बिपास करून सत्यनारायणाच्या पूजेला बसणार नाही. पूजा दुसरा कोणी करत असेल तर लागेल ती मदत नक्की करीन. आत्मुबुवांच्या व्यवसाय पण चालला पाहिजे ना मंडळी! =))

In reply to by पैसा

सतिश गावडे 14/11/2014 - 12:25
आत्मुबुवांच्या व्यवसाय पण चालला पाहिजे ना मंडळी!
म्हणून तर आम्ही या धाग्यावर गप्प आहोत. आम्ही आमची ज्ञानमौक्तिके या धाग्यात उधळली तर लोक शहाणे होतील आणि बुवांच्या पोटावर पाय येईल. ;)

In reply to by सतिश गावडे

पैसा 14/11/2014 - 12:30
कितीही मौक्तिके उधळली आणि कीबोर्ड मोडले तरी लोक कधीच आपली मते बदलत नाहीत. शहाणे वगैरे व्हायचे सोडाच! तस्मात न भिता "होऊ दे खर्च! मिपा आहे घरचं."

In reply to by सतिश गावडे

@म्हणून तर आम्ही या धाग्यावर गप्प आहोत. आम्ही आमची ज्ञानमौक्तिके या धाग्यात उधळली तर लोक शहाणे होतील आणि बुवांच्या पोटावर पाय येईल. >> ह्या ह्या ह्या ह्या... =)) धनाजीराव..तुम्मी आणि ह्ये असलं मत!??? लै लै आश्चेर्य वाटलं बगा आज! ;) (मागे एकदा... संतांमुळे लोक सुधारले नाहीत्,आणि लावण्यांमुळे बिघडले नाहीत!..अश्या आशयाचा प्रतिसाद देणारे तुम्हीच का? ..असा प्रश्ण पडतोय आमास्नी! ;) ) तुम्मी काय लिवायचं ते लिवा हो.. ह्यो आत्मूभट डोंबारी हाय! ;) लोकांनी माकड बगायच सोडलं की अस्वल काढतो! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

लोकांनी माकड बगायच सोडलं की अस्वल काढतो! हेच काय ते ब्रम्हसत्य, बाकी सारे मिथ्या ! ;) :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

सतिश गावडे 14/11/2014 - 13:22
धनाजीराव..तुम्मी आणि ह्ये असलं मत!???
भडजीबुवा, तो उपरोध होता. बाकी "तुमच्या" डोंबार्‍याच्या खेळातील कौशल्याबाबत आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. आज लोक शहाणे झाले आणि सत्यनारायण घालणे बंद केले तर "तुम्ही" लोकांच्या गळी एखादा नविन देव उतरवाल याची आम्हाला खात्री आहे.

In reply to by सतिश गावडे

समीरसूर 14/11/2014 - 14:04
स्टिव्ह जॉब्जने आयफोन गळी उतरवला आणि अजून कुणी व्हॉट्सअ‍ॅप उतरवलं, अगदी तसंच आहे हे. :-) शेवटी लोकांची गरज ओळखून (अत्मिक शांतता, मनाची उभारी, प्रसन्न वाटणे, निर्धास्त राहणे इत्यादी) कुणाचंही कुठल्याही प्रकारचं नुकसान न करता ती गरज पुरविणे हा समान धागा. शेवटी जगातला सगळाच व्यवहार मानसिक स्तरावरच तर येऊन ठेपतो, नव्हे काय? उकाड्यात गार हवेची झुळूक नुसती शरीराला शांत करत नाही; मनाला ही शांत करते. फेसबुकवर टाकलेले वाढदिवसाचे फोटो अहं कुरवळातात. रुपये २००००० ची एफडी मनाला सुरक्षिततेची भावना देते, हायसं वाटतं. शेवटी सगळं मनाला शांत करण्यासाठीच असतं. मग अजून एका पद्धतीने कुणी अशी शांती देण्याचा प्रयत्न केला तर चालतं की. जगरहाटीला धरूनच आहे ते. हां, अगदीच आसाराम बापू सारख्यांच्या नादी लागणं म्हणजे मूर्खपणाच पण म्हणून पूजा-अर्चा म्हणजे मूर्खपणा असे सरसकट म्हणणे जीवावर येते. :-)

जेपी 14/11/2014 - 16:12
बाकी "तुमच्या" डोंबार्‍याच्या खेळातील कौशल्याबाबत आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. आज लोक शहाणे झाले आणि सत्यनारायण घालणे बंद केले तर "तुम्ही" लोकांच्या गळी एखादा नविन देव उतरवाल याची आम्हाला खात्री आहे. त्यानीं देव नाहि काढला तर लोक त्यानां काढायला भाग पाडतिल हे आस हव

In reply to by जेपी

त्यानीं देव नाहि काढला तर लोक त्यानां काढायला भाग पाडतिल हे आस हव +१ बहुतेक माणसांना कोणा ना कोणावर तरी विसंबून राहणे जास्त सुरक्षित वाटते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सतिश गावडे 14/11/2014 - 17:23
बहुतेक माणसांना कोणा ना कोणावर तरी विसंबून राहणे जास्त सुरक्षित वाटते.
आणि जे असे विसंबून राहतात त्यांना विसंबून राहायला अक्षरशः कुणीही म्हणजे कुणीही चालते.

In reply to by प्यारे१

सतिश गावडे 15/11/2014 - 15:06
खरं तर असायला हवा होता. माऊला रिचर्ड डॉकिन्स कोण हे माहिती नसावं कदाचित. त्यामुळे ते नाव लिहिले नाही तिने ;) रिचर्ड डॉकिन्स हा उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ असून आजच्या घडीला त्याला डार्विनचा वैचारीक वारसदार समजले जाते. तो जी विधाने करतो त्याची सत्यता त्याने प्रयोगशाळेत तपासून पाहिलेली असते.

In reply to by सतिश गावडे

प्यारे१ 15/11/2014 - 17:55
कुठल्या तरी धाग्यात कुठे तरी अंतरंगातला दिवा पेटल्यावर बाहेरचे दिवे पेटवावे लागत नाहीत असं उत्तर दिलेलं म्हणे. ते अंतरंगाचे दिवे पेटलेत की कसं हे कुठल्या प्रयोगशाळेत सिद्ध केलं गेलं ब्वा? ;) तुमची विधानं तुम्हाला 'सिद्ध' (ठराविक पद्धतीनं) करता येत नसतील तर तुम्ही खोटे असता का?

In reply to by कवितानागेश

सतिश गावडे 15/11/2014 - 15:00
कारण ते विसंबून राहणे नसते तर सत्याच्या मार्गावर चालणे असते. डार्विन चालतो. कारण डार्विनची मते प्रयोगशाळेत तपासता येतात. फ्रॉईड काही अंशी चालतो. फ्रॉईडचे काही सिद्धांत चुकीचे होते हे मागच्या शंभर वर्षातील मेंदुविज्ञानातील संशोधनाने लक्षात आले आहे. फ्रॉईड ज्याला "सब कॉन्शियस माईंड" असं म्हणत होता ती खरं तर "न्युरॉन पाथवे"ची कमाल असते. केमिकल लोचा हा शब्द आता शेंबडं पोरही वापरू लागलं आहे. मुळात विज्ञान मार्गाचा अवलंब आणि सत्यनारायणाच्या पोथीत सांगितलेला मार्ग अवलंबणे यात फरक आहे. जर विज्ञानाला कालचा रस्ता चुकीचा वाटला तर विज्ञान स्वतःहून सांगतं तो रस्ता चुकीचा आहे योग्य रस्ता दुसरा आहे किंवा योग्य रस्ता सापडायचा आहे. कालचा रस्ता कितीही मोठया शास्त्रज्ञाने दाखवला असला तरी जर तो चुकीचा असेल तर ते झिडकारले जाते. पोथीवादात हे होत नाही. सुर्य हा ग्रह नसून तारा आहे हे माहिती होऊन जमाना गेला तरी कुंडलीत तो ग्रहच असतो. आणि बरेच सुशिक्षीत, उच्चशिक्षित लोक आजही कुंडल्या घेऊन ज्योतिषांकडे धाव घेतात. राहू केतू आकाशात दाखवता येत नाही तर म्हणे ल्युनार नोडस आहेत. जे नाही ते नाही म्हणून स्विकारायची धमक नाही.
सत्यनारायण पूजा: मी मिपा वर नविन आहे.येथे असलेले लेख व त्यावरील प्रतिक्रिया वाचून माझे शंकानिरिसन होईल असे वाटते. काही दिवसापुर्वी आम्हा उभयतास सत्यनारायण पुजेस बसण्याचा योग अल.पुजा लक्षपुर्वक ऐकली. पण प्रत्येक अध्यायात पूजा न घातल्यास तुमचे काय नुकसान होईल एवढीच माहिती मिळाली. ही पूजा म्हणजे नेमकी काय आहे?महाराष्ट्रात ती इतकी प्रसिध्ह का?

शिवसेना - युद्धात हरले आणि तहातही हरले

श्रीगुरुजी ·

गणेशा 12/11/2014 - 21:45
विश्लेशन आवडले, परतु विरोधी बाकावर बसुन योग्य काम केल्यास शिवसेनेच्या नव्या उद्याची ती नांदी ठरेन. भाजपा ला वेगळीच निवडनुक लढवायची होती, जागांची चर्चा करुन अपेक्षा पुर्ण नाही झाली असे करुन युती तोडायचीच असे ठरलेले होते. लोकसभेलाच आपली जागा ओळखल्याने शरद पवार हारुन ही जिंकले आहेत शरद पवार यांची दृष्टी महानगरपालिकेंवर आहे. त्यासाठी ज्या ठिकानी त्यांचेच रीलेटेड अपक्ष आमदार किंवा ज्या ठिकाणी संभ्रम आहे असे काही नेते आधीच भाजपा मध्ये पाठवले. भाजपा जास्त स्वच्छ असते तर त्यांनी तेंव्हाच त्या नेत्यांना पक्षात घ्यायचे नव्हते. आणि तेथुनच जास्त सुरुवात झाली असे म्हणण्याची राष्ट्र्वादी भाजप एकत्र आहेत. शिवसेनेला अलगद बाजुला सारुन त्यांना व्यर्थ बोलायला लावायचे असेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे हे भाजपा ने अनुसरले. आता आपण त्याचे सम्र्थन केले तर मग भाजप ने प्रचार कोणाविरुद्ध केला हे माहीती असेलच. वाटाघाटी साठी लाचारी शिवसेनेने पत्करली तरी त्यांना किंमत द्यायचीच नाही ही आधीच ठरले होते आणि राष्ट्रवादी बरोबर आहेच मग त्यांना झुलवत ठेवण्यात भाजप ने आनंड मानला असला तरी महाराष्ट्रात बिजेपी ला याची किम्मत मोजावीच लागेल. आम्ही पाठींबा मागोतला नव्हता असे म्हणाताना, काही महिन्यांपुर्वी केजरीवल यांना याच मुद्द्यावर कॉग्रेस आणि आप एकच आहे असे बोलण्यात आले. मग आता राष्ट्रावादी + भाजपा आधीच संगनमत होते आणि त्यामुळॅ काही त्यांचे उमेदवार पण आयात केले गेले असे का होउ शकत नाही. भविस्य माझ्या हाती. ही जाहिरात आधी नाही तर नंतर लोकांच्या लक्षात आली. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र कोठे ही न्ह्या पण त्याचे भविष्य आमच्याच हाती आहे हे राष्ट्रवादी ने दाखवुन दिले. पिंपरी चिंचवड आणि मुंबई या महानगर पालिका निवडनुकीमध्ये त्याचे उत्कृष्ट उत्तर ह्या दोन्ही पक्षांनी आधीच तयार ठेवलेले आहे. या बदल्यात शिवसेना नाशिक मध्ये भगवा फडकवु शकेन. अर्धेच बोलणे झाले नंतरचे नंतर लिहितो

In reply to by गणेशा

प्रदीप 12/11/2014 - 22:00
राजकीय धाग्यांना बंदि असावी असे मला मनापासुन वाटते. हे आपण इतरस्त्र लिहील्याला एक आठवडाही उलटून गेलेला नाही. तेव्हढ्यात आपण स्वतःच, राजकारणावरील 'पवारालंबी' हा धागाही काढ्लात. आणि आता इथेही प्रतिसाद देत आहात. अमूक धागे नकोत, तमूक चर्चा नकोत, हे लिहीणार्‍यांची मला गंमत वाटते. इथे आल्यावर सर्व काही वाचले नाही, तर ह्यानंतर आपणास इथे वाचनमात्रही रहाता येणार नाही, अशी भीति असे काही लिहीणार्‍यांना असते काय्,कुणास ठाऊक!

In reply to by प्रदीप

गणेशा 12/11/2014 - 22:38
कोणाचे काय आणि यांचे काय ? राजकिय धाग्यांना बंदि असावी असे मला अजुनही वाटते, आणि त्यामागे माझे मत होते की राजकीय विषयावर बोलताना संयम टाळुन आपलेच म्हणने कसे काय बरोबर आणि आपल्याच आवडणार पक्ष कसा बरोबर म्हणुन वयक्तीक लेवल ला येवुन येथील वातावरण दुषित होउ नये म्हणुन आहे. बंदि आल्यावर मी धागा काढणार नाही.. वरील माझे मत पटत नसेल तर त्या धाग्याची लिंक द्या आणि तेथे सयंमीत भाषेत धाग्याकर्तयाचे मत होते का हे सांगावे. आणि पटत असले तर पुन्हा माझ्या रिप्लायांच्या किंवा धाग्यांच्या मागे असे लिहिण्यासाठी लागु नये. परंतु व्यव्स्थीत विषय माडण्यास आपली काही हरकत नसावी. दुसरी गोष्ट कोण वाचनमात्र ही राहणार नाही वगैरे तुम्ही मला सांगु नये.. हे असल्या फुटकळ महत्वाकांक्षेणे येथे येण्याचे काही कारण नसते. लोक मोठ्ठे कधी होणाअर आहेत हे मला कळत नाही. मी रिप्लाय दिला एका धाग्यावर, धागा काढला दूसरा आणि या तिसर्‍याच ध्याग्यावर, येव्हडे छान विश्लेशन धाग्याकर्त्याने निट अभ्यासु पद्धतीने केलेले असले तरी तेथे येवुन तुम्ही चर्चा दूसरी कडे का वळवत आहात ? माझ्याच धाग्यावर फक्त बोलायचे होते ना हे . मी माझा धागा पाहिला नाही अजुन .. बघतो तेथे ही लिहिले आहे का ? असो, या संधर्भात तुम्हाला माझा हा शेवटचा रिप्लाय असेन. उगाच थोडा विनाकारण वेळ गेला असे माझ्या मनात आहे.

रमेश आठवले 12/11/2014 - 22:18
इतके झाले तरी अफझलखान हाच आपल्या पक्षाचा तारणहार असल्याचा भ्रम दूर होत नाहिये. आता २८ नोवेम्बेरला त्याच्या कबरी जवळ आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

क्लिंटन 12/11/2014 - 22:21
ज्या दिवशी निकाल लागले त्याच दिवशी सेनेने भाजपला पाठिंबा जाहीर करून सर्वप्रथम भाजपला मिळू शकणारी राष्ट्रवादीची रसद रोखायला हवी होती. भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही हे एकदा नक्की करून नंतर भाजपकडून आपल्याला हवे ते सेनेला मिळविता आले असते. एकदा सेनेचा पाठिंबा घेतल्यावर त्यांना लाथाडून नंतर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणे भाजपला अत्यंत अवघड झाले असते. हे न करता शिवसेना पुन्हा एकदा गाफील राहिली. भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही व शेवटी त्यांना आपलेच पाय धरावे लागतील या भ्रमात सेना नेते राहिले.
याला अगदी +१.
भाजपने चातुर्याने सेनेला बोलण्यात गुंतवून अपक्ष व इतर लहान पक्षांचा पाठिंबा मिळवून आपली गरज जेमतेम ७-८ आमदारांवर आणली व राज्यपाल व सभापती आपल्याच पाठीशी राहणार असे धोरण आखून शिवसेनेच्या मदतीशिवात विश्वासदर्शक ठराव मंजूर करुन घेऊन शिवसेनेचे मानेवरील जोखड कायमचे उतरविले.
शिवसेनेचे जोखड उतरविल्यानंतर यापुढे फडणवीसांना काय करता येईल याविषयी कालच माझ्या फेसबुक भिंतीवर लिहिले आहे ते इथे पेस्ट करतो: "राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्तेसाठी तडजोडी करणाऱ्या भाजप सरकारचे मी तरी समर्थन करू शकणार नाही.तरीही यानिमित्ताने एक गोष्ट लिहावीशी वाटत आहे.पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी अर्धे शहाणे होते नाना फडणवीस.आपल्या मुत्सद्दीपणाने, बुध्दीमत्तेने आणि धूर्तपणाने अनेक राजकारणे त्यांनी लिलया पार पाडली. त्या नानांच्याच वंशजांपैकी देवेंद्र फडणवीस आहेत की नाही हे माहित नाही पण असेच धूर्त राजकारण खेळायची संधी त्यांना राष्ट्रवादीच्या पाठिंब्याच्या निमित्ताने आली आहे. पडद्यामागे काय झाले ते माहित नाही पण फडणवीसांनी किंवा अन्य कोणा भाजप नेत्यानेही राष्ट्रवादीचा पाठिंबा मागितला नाही की त्यांच्यात काही बोलणी चालू आहेत असेही नाही.तर राष्ट्रवादीने पाठिंबा आपण होऊन देऊ केला आहे.त्यातून शिवसेनेकडील बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहेच.विश्वासमत संमत व्हायच्या आधीच फडणवीसांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आणि तो म्हणजे १७० कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करायचा.तालुका पातळीवरील राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचे या समित्या म्हणजे पैसे खायचे कुरण होत्या हे सर्वमान्य आहेच.जर का सिंचन घोटाळा आणि राष्ट्रवादीच्या कुकर्मांवर फडणवीसांनी कारवाई सुरू केली तर राष्ट्रवादीचे हात दगडाखाली येतील हे नक्कीच.कारण त्या कारणावरून फडणवीसांचा पाठिंबा कसा काढणार? (१९९६-९७ मध्ये देवेगौडांनीही काँग्रेसचा पाठिंबा असतानाही काँग्रेसलाच अडचणीत आणायची खेळी केली होती त्याला समांतर खेळी करायची फडणवीसांकडे संधी आहे). आणि जर राष्ट्रवादीने पाठिंबा काढला आणि सरकार पडायची वेळ आली तर शिवसेनेची अवस्था त्या परिस्थितीत आणखी बिकट होईल. एकतर सरकारविरोधी मत देणे म्हणजे राष्ट्रवादीच्या बाजूने मत देणे आणि सरकारच्या बाजूने मत देणे म्हणजे भाजपपुढे आणखी नमते घेणे असा त्याचा अर्थ होईल. आणि फडणवीस परत ताठ मानेने निवडणुकांना सामोरे जाऊ शकतील. फडणवीसांना पाठिंबा शरद पवार का देत आहेत? कारण सहा महिन्यात परत निवडणुका झाल्या तर आपली खैर नाही हे त्यांना समजून चुकले आहे.हा पाठिंबा त्यांच्यासाठी फाशीचा दोर ठरवायची संधी फडणवीसांकडे आहे. पण सत्ता टिकवायला राष्ट्रवादीबरोबर कोणतीही तडजोड केली आणि कोणत्याही घोटाळ्यांच्या चौकशीकडे दुर्लक्ष केले तर ते आत्मघाताचे ठरेल.कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निर्णयावरून तसे होऊ नये अशी आशा आहे.तसेच केजरीवाल काँग्रेसला किंवा मनमोहन कम्युनिस्टांना "हिंमत असेल तर काढा पाठिंबा" अशी भाषा वापरत होते तशी भाषा पब्लिकमध्ये वापरायला हवी. राष्ट्रवादीबरोबर सत्तेसाठी कोणतीही तडजोड केली तर ते मला नक्कीच मान्य नाही आणि त्याला विरोधच असेल. तसे केल्यास विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मत देणे माझ्यासाठी कठिण होईल. पण त्यामागे काही राजकीय खेळी असेल/असावी ही अपेक्षा.अर्थात प्रत्यक्षात काय होते ते बघायचे." फडणवीसांना असे धूर्त राजकारण करायची संधी या निमित्ताने आली आहे.ते कितपत प्रत्यक्षात उतरते ते बघायचे. तसे फडणवीसांनी केलेत तर सोन्याहूनही पिवळे पण ते स्पष्ट होत नाही तोपर्यंत तरी मी स्वत: या सरकारचे समर्थन करू शकणार नाही.

In reply to by क्लिंटन

श्रीगुरुजी 12/11/2014 - 23:51
>>> फडणवीसांना असे धूर्त राजकारण करायची संधी या निमित्ताने आली आहे.ते कितपत प्रत्यक्षात उतरते ते बघायचे. तसे फडणवीसांनी केलेत तर सोन्याहूनही पिवळे पण ते स्पष्ट होत नाही तोपर्यंत तरी मी स्वत: या सरकारचे समर्थन करू शकणार नाही. पुढील काही महिन्यात फडणवीस मोदींच्या सल्ल्याने अत्यंत धूर्तपणे पावले टाकतील असं वाटतंय. काही लोकानुययी घोषणा करून जनमत आपल्या बाजूला वळविण्याचा प्रयत्न करणे हे पहिले पाऊल असेल. आजच राज्यपालांच्या भाषणात स्थानिक संस्था कर (एल बी टी) रद्द करण्याची घोषणा केली आहे. यामुळे समस्त व्यापारीवर्ग खूष होईल. महापालिकांचे उत्पन्न घटेल. परंतु भाजपच्या ताब्यात नागपूर ही एकमेव महापालिका असल्याने भाजपला त्रास कमी होईल. त्याचबरोबरीने राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या गैरव्यवहाराची चौकशी सुरु होईल. आपण राष्ट्रवादीबरोबर नव्हतो हे यामुळे दाखविता येईल. असे केल्यास राष्ट्रवादीला पाठिंबा काढून घ्यावाच लागेल. अशा वेळी शिवसेनेने पाठिंबा दिला नाही तर शिवसेना बदनाम होऊन भ्रष्टाचाराच्या विरूद्ध लढल्यामुळे आपण हुतात्मा झालो हे दाखविण्याची संधी भाजपला मिळून पुढील निवडणुकीत फायदा होईल. >>> पण ते स्पष्ट होत नाही तोपर्यंत तरी मी स्वत: या सरकारचे समर्थन करू शकणार नाही. मला सध्या तरी या सरकारचे समर्थन करण्यात काहीच अडचण वाटत नाही. मुख्यतः शिवसेनेचे मानेवरील जोखड कायमचे उतरले याचा आनंद आहे. शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन केली असती तर शिवसेनेने प्रत्येकवेळी प्रचंड अडथळे आणून अतिशय त्रास दिला असता व सरकार कायम अस्थिर राहिले असते. शिवसेना भविष्यात अतिशय त्रासदायक ठरेल याचा अंदाज अमित शहा व मोदींना फार पूर्वीच आला होता. त्यामुळे त्यांनी योग्य संधी मिळताच युती तोडली. आम्ही तुम्हाला पाठिंबा देणार नाही व तुम्ही राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यायचा नाही अशा शिवसेनेच्या विचित्र भूमिकेमुळे मिळेल त्याचा पाठिंबा घेण्याशिवाय भाजपला पर्यायच नव्हता. राष्ट्रवादीला आपली भ्रष्टाचाराची प्रकरणे दडपायची होती म्हणून त्यांनी भाजपला पाठिंबा दिला या आरोपाला राष्ट्रवादीच्या अधिपत्याखालील कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करून फडणविसांनी उत्तर दिलेले आहे. भाजपला केंद्रात पवारांचा पाठिंबा हवा आहे व मोदी सुप्रिया सुळे व अजून एकाला केंद्रात मंत्री करतील हा आरोप अत्यंत हास्यास्पद आहे. जिथे मोदींना शिवसेनेच्या १८ खासदारांची गरज वाटत नाही तिथे ते शिवसेनेला लाथाडून फक्त ६ खासदार असलेल्या राष्ट्रवादीचा पाठिंबा कशाला घेतील?

In reply to by श्रीगुरुजी

आनन्दा 13/11/2014 - 10:36
सहमत.. भाजपा आता राष्ट्रवदीला कायमचे संपवण्याचे राजकारण खेळणार असे मला वाटते.. आणि हो, देवेन्द्र फडणवीस म्हणजे रा रा मफलरलाल नव्हेत, हे देखील नमूद करू इच्छितो.

In reply to by आनन्दा

मालोजीराव 14/11/2014 - 16:57
भाजपा आता राष्ट्रवदीला कायमचे संपवण्याचे राजकारण खेळणार
हा हा :)) साहेब धक्क्याला लावणार बीजेपी ला, गलत आदमी के हत्थे चढगयी कमळी :P

In reply to by मालोजीराव

श्रीगुरुजी 14/11/2014 - 21:03
>>> साहेब धक्क्याला लावणार बीजेपी ला, गलत आदमी के हत्थे चढगयी कमळी आपल्या आशावादाचे कौतुक वाटते.

In reply to by श्रीगुरुजी

क्लिंटन 13/11/2014 - 10:41
त्याचबरोबरीने राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या गैरव्यवहाराची चौकशी सुरु होईल. आपण राष्ट्रवादीबरोबर नव्हतो हे यामुळे दाखविता येईल. असे केल्यास राष्ट्रवादीला पाठिंबा काढून घ्यावाच लागेल. अशा वेळी शिवसेनेने पाठिंबा दिला नाही तर शिवसेना बदनाम होऊन भ्रष्टाचाराच्या विरूद्ध लढल्यामुळे आपण हुतात्मा झालो हे दाखविण्याची संधी भाजपला मिळून पुढील निवडणुकीत फायदा होईल.
मला वाटते यासाठीच राष्ट्रवादीचा वरकरणी पाठिंबा घेऊन त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटविण्यासाठी हे सगळे चालू असावे. आणि एक भाजप समर्थक म्हणून तसेच व्हावे असे अगदी मनापासून वाटते. राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सरकार चालविण्याला माझा स्वतःचा अगदी प्रचंड विरोध आहे.इतका विरोध मी केजरीवाल किंवा कम्युनिस्टांनाही केला नसेल. बघू पुढे काय होते ते.

In reply to by क्लिंटन

अनुप ढेरे 13/11/2014 - 10:53
मला वाटते यासाठीच राष्ट्रवादीचा वरकरणी पाठिंबा घेऊन त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटविण्यासाठी हे सगळे चालू असावे.
हा भाबडा आशावाद वाटतोय. असल काही होणार नाही. लवासा, सिंचन कुठल्याही घोटा़ळ्यात रा.वा.च्या नेत्यांना काहीही होणार नाही. फारतर एक-दोन नोकरशहांवर शेकेल प्रकरण.
राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सरकार चालविण्याला माझा स्वतःचा अगदी प्रचंड विरोध आहे.
माझाही. फुडल्या वेळेल्या काँग्रेसला मत देणार!

In reply to by अनुप ढेरे

क्लिंटन 13/11/2014 - 11:10
फुडल्या वेळेल्या काँग्रेसला मत देणार!
हे काही पटले नाही. जर राष्ट्रवादीची मदत घेऊन सरकार चालविणार म्हणून भाजपला विरोध असेल तर त्याच राष्ट्रवादीची मदत घेऊन १५ वर्षे सरकार चालविणार्‍या काँग्रेस पक्षाला मत देणार याची तर्कसंगती लागत नाही. भाजपने राष्ट्रवादीची मदत घेऊन सरकार चालविले तर पुढच्या वेळी मी नक्कीच मतदान करणार नाही (यावेळीही भाजप-राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतील ही शक्यता निवडणुकांच्या वेळेपासूनच होती म्हणून यावेळीही मतदान केले नव्हते).

In reply to by क्लिंटन

अनुप ढेरे 13/11/2014 - 11:23
भाजपावाले निवडणूकी आधी स्पष्ट म्हणत होते की रा.वा. कडून पाठिंबा घेणार नाही. आजच फडणवीस यांची एक जुनी मुलाखत पाहिली. त्यात ओरडून सांगत होते की रा.वा.चा पाठिंबा घेणार नाही म्हणजे नाही. आणि आता हे. I feel cheated. भाजपाला नाहीच म्हणून काँग्रेस. मतदान न करण हे तरी मला पटल नाही. त्यापेक्षा नोटाला द्यावं.

In reply to by अनुप ढेरे

गणेशा 13/11/2014 - 11:37
बरोबर .. मतदान न करणे खरेच समर्थनिय नाही असे मला ही वाटते. पण काँग्रेस ला तुम्ही मत देताल आणि ती ही राष्ट्रवादी बरोबर पुन्हा जाईन. पुढील वेळेस माझे मत शिवसेनेला असु शकते.. यावेळेस राष्ट्रावादीला मत दिले कारण भाजपाचा उमेदवार हा आयात राष्ट्रवादीचाच उमेदवार होता . माझे मत आहे निवडुन यावे हा एकच निकष घेवुन कोणालाही पक्षात घ्यायचे आणि त्याला उमेदवारी द्यायचे. मग लोकांना ज्याला लोकसभेला विरोधात मतदान केले त्यालाच यावेळी विधानसभेला मतदान करायची पाळी आलेली होती. भाजप ला मत द्या नाही तर राष्ट्रवादी ला दोन्ही मते राष्ट्रवादीलाच होती चिंचवड मतदार संघात. कारण पिंपरी चिंचवड महानगर पालिका राष्ट्रवादी ला गमवायची नाहिये, आता राष्ट्रवादीच्या ४० नगरसेवकांनी भाजप चे काम केले आहे. म्हणुन राष्ट्रवादी संपवण्याच्या गोष्टी भाजप करत असेन तर उलटा विचार केला तर ते नगरसेवक स्वताकडेच ठेवुन आक्खा आमदारच राष्ट्रवादी फेवरेबल करुन टाकायचा आणि पुन्हा पिंपरी चिंचवड मध्ये सत्ता घ्यायची. ही खेळी राष्ट्रवादीची आहे, आणि त्या विरोधात शिवसेनेला मिळणारी मते ही भाजपा आपल्याकडे घेवुन आपले स्थान थोडेशे चांगले करु पाहत आहे. सगळी कडे हे असेच चालु आहे. पण लोक्सभेला जसा पक्ष पाहिला जातो तसे विधानसभेला उमेदवार पाहिला जातो, त्यामुळे योग्य उमेदवार देणार्‍याला मतदान केले पाहिजे.

In reply to by अनुप ढेरे

क्लिंटन 13/11/2014 - 17:10
भाजपाला नाहीच म्हणून काँग्रेस.
म्हणजे काँग्रेसला पर्याय म्हणून भाजप आणि भाजपला नाही म्हणून परत काँग्रेस? हे काही समजले नाही. असो.

In reply to by अनुप ढेरे

मतदाराने आपले मत "अडम् तडम्... " करून न देता विचारपूर्वक देशाचे जास्तीत जास्त भले करेल अश्या पक्षाला / उमेदवाराला दिले तर जास्त योग्य होईल असे वाटते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

क्लिंटन 14/11/2014 - 22:14
मतदाराने आपले मत "अडम् तडम्... " करून न देता विचारपूर्वक देशाचे जास्तीत जास्त मले करेल अश्या पक्षाला / उमेदवाराला दिले तर जास्त योग्य होईल असे वाटते.
+१. महाराष्ट्राचा तामिळनाडू होऊ नये.म्हणजे कॉंग्रेस नको म्हणून लोकांनी यावेळी भाजपला मत दिले.आता राष्ट्रवादी प्रकरणाने परत एकदा कॉंग्रेसला मत द्यायची बात सुरू झाली आहे.त्याच्यापुढच्या वेळी तीच कॉंग्रेस नको म्हणून परत भाजप???

In reply to by श्रीगुरुजी

येवढा सगळा द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा शिवसेना फोडणे सोपे नव्हे का ? का कोणाचा असा समज आहे की शिवसेनेत सगळे जहाल तत्वनिष्ठ लोक आहेत ? फक्त एक काडी टाकण्ञाचा अवकाश आहे ! बास..... उधोजींना कोकणात जाऊन भातशेती करण्याशिवाय पर्याय रहाणार नाही. ( राणे यांनी काही शेती सोडली असेल तर !)

In reply to by क्लिंटन

खटपट्या 13/11/2014 - 01:14
जर का सिंचन घोटाळा आणि राष्ट्रवादीच्या कुकर्मांवर फडणवीसांनी कारवाई सुरू केली तर राष्ट्रवादीचे हात दगडाखाली येतील हे नक्कीच.कारण त्या कारणावरून फडणवीसांचा पाठिंबा कसा काढणार? (१९९६-९७ मध्ये देवेगौडांनीही काँग्रेसचा पाठिंबा असतानाही काँग्रेसलाच अडचणीत आणायची खेळी केली होती त्याला समांतर खेळी करायची फडणवीसांकडे संधी आहे). आणि जर राष्ट्रवादीने पाठिंबा काढला आणि सरकार पडायची वेळ आली तर शिवसेनेची अवस्था त्या परिस्थितीत आणखी बिकट होईल. एकतर सरकारविरोधी मत देणे म्हणजे राष्ट्रवादीच्या बाजूने मत देणे आणि सरकारच्या बाजूने मत देणे म्हणजे भाजपपुढे आणखी नमते घेणे असा त्याचा अर्थ होईल. आणि फडणवीस परत ताठ मानेने निवडणुकांना सामोरे जाऊ शकतील.
ही रणनीती बरी दिसतेय !! पण नेमके हेच झाले तर मजा आहे. अन्यथा राष्ट्रवादीसमोर बोट्चेपे धोरण स्विकारल्यास भाजपाचे पुढे कठीण आहे.

In reply to by खटपट्या

नितिन थत्ते 13/11/2014 - 11:13
>>अन्यथा राष्ट्रवादीसमोर बोट्चेपे धोरण स्विकारल्यास भाजपाचे पुढे कठीण आहे. असं काही नसतंय हो. जे भाजपला मत देतात ते भाजपलाच देणार काँग्रेसला देणारे काँग्रेसलाच देणार. आज कोणती अ किंवा ब कृती केली म्हणून काही फरक पडत नसतो. कारण कुठल्या तरी भ्रष्टाचारी नेत्यांना शिक्षा व्हावी म्हणून मतदान केलेलेच नसते. ते कुठल्यातरी अमूर्त गोष्टीसाठीच (भारत महासत्ता होणे, पाकिस्तानला/मुसलमानांना वचक बसणे वगैरे- किंवा काँग्रेसी असेल तर सेक्युलरिझम टिकण्यासाठी वगैरे) केलेले असते.

In reply to by नितिन थत्ते

खटपट्या 15/11/2014 - 01:13
जे भाजपला मत देतात ते भाजपलाच देणार काँग्रेसला देणारे काँग्रेसलाच देणार.
भाजप की शिवसेना असा विचार करणारे नक्कीच शिवसेनेकडे झुकतील.
आज कोणती अ किंवा ब कृती केली म्हणून काही फरक पडत नसतो. कारण कुठल्या तरी भ्रष्टाचारी नेत्यांना शिक्षा व्हावी म्हणून मतदान केलेलेच नसते. ते कुठल्यातरी अमूर्त गोष्टीसाठीच (भारत महासत्ता होणे, पाकिस्तानला/मुसलमानांना वचक बसणे वगैरे- किंवा काँग्रेसी असेल तर सेक्युलरिझम टिकण्यासाठी वगैरे) केलेले असते.
हे तुमचे वयक्तीक मत झाले. सर्वच मतदार असाच विचार करत असतील कशावरुन ? आणी बाकी भारत महासत्ता, पाकीस्तान्/मुसलमानांना वचक वगैरे लोकसभेच्या वेळेस.. विधानसभेला लोक स्थानीक प्रश्नांवरच मतदान करतात.

In reply to by खटपट्या

श्रीगुरुजी 15/11/2014 - 14:03
>>> भाजप की शिवसेना असा विचार करणारे नक्कीच शिवसेनेकडे झुकतील. असे वाटत नाही. विशेषतः युती तुटल्याच्या दिवसापासून आजतगायत वास्तवाचा समंजसपणे स्वीकार न करता शिवसेनेची विलक्षण आदळआपट व त्रागा सुरू आहे. 'सामना'तून रोज टीकेचा भडीमार सुरू आहे. 'जय विदर्भ' घोषणेला देशद्रोह्यांचे विषारी फूत्कार व ती घोषणा देणारे देशद्रोही असे म्हणण्यापर्यंत शिवसेना निराश झालेली आहे. शिवसेना नेतृत्वाला जाग येण्याचे काहीच चिन्ह नाही. भाजप सोडून शिवसेनेकडे जाण्यासाठी आशादायक काहीच नाही. अशा परिस्थितीत भाजपचे मतदार शिवसेनेकडे वळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

In reply to by श्रीगुरुजी

पैसा 15/11/2014 - 17:57
भाजपाचे मतदार शिवसेनेकडे वळणार नाहीत. पण मी किंवा क्लिंटनसारखे अनेकजण आहेत की योग्य उमेदवार किंवा धोरण दिसत नसेल तर आम्ही मतदानच करणार नाही म्हणतो. असे बरेचजण मतदान न करता घरी बसून राहिलो आणि काँग्रेस त्यांच्या मतदारांना मतदानाला आणू शकली तर भाजपा कुठे असेल? की आमच्यासारखे मध्यमवर्गीय मतदार कवडीमोल आहेत असा सगळ्यांचा समज आहे?

In reply to by पैसा

श्रीगुरुजी 15/11/2014 - 20:50
बहुसंख्य मतदार १-२ घटनांवरून पक्षाकडे पाठ फिरवित नाहीत. जेव्हा एखादे सरकार सातत्याने आणि अनेक प्रतिकूल निर्णय घेते तेव्हाच जनमत विरोधी जाते. आवाजी मतदान किंवा राष्ट्रवादीचा स्पष्टपणे न नाकारलेला पाठिंबा यामुळे लगेच भाजपविरोधी लाट येईल अशी शक्यता नाही.

In reply to by श्रीगुरुजी

खटपट्या 16/11/2014 - 01:44
राष्ट्रवादीचा स्पष्टपणे न नाकारलेला पाठिंबा यामुळे लगेच भाजपविरोधी लाट येईल अशी शक्यता नाही.
हे मान्य. तरीही "सरकार बचानेकेलिये सरकार मत चलाना" हा आदेश कसा आचरणात येतो ते बघावे लागेल. "पार्टी विथ डीफरन्स" या विश्वासालाही थोडा तडा गेलाच.

In reply to by खटपट्या

नितिन थत्ते 16/11/2014 - 07:20
>>"पार्टी विथ डीफरन्स" या विश्वासालाही थोडा तडा गेलाच. हा विश्वास आत्ताआत्तापर्यंत टिकला होता हे वाचून मौज वाटली.

In reply to by खटपट्या

दुश्यन्त 15/11/2014 - 21:19
भाजप की शिवसेना असा विचार करणारे नक्कीच शिवसेनेकडे झुकतील. +१ . राष्ट्रवादीशी युती/ समझोता 'नाही नाही नाही' म्हणत भाजपने जे शेण खाल्ले आहे त्यामुळे भाजपचा पाठीराखा मोठ्या प्रमाणत सेनेकडे जाणार हे उघड आहे. आज अमित शहा पण राष्ट्रवादीच्या पाठींब्या बाबत योग्य वेळी स्पष्टीकरण देवू असे म्हणाले आहेत. काही दिवसांनी पवार सरकार मध्ये पण येईल.

In reply to by खटपट्या

आनन्दा 16/11/2014 - 11:17
भाजप की शिवसेना असा विचार करणारे नक्कीच शिवसेनेकडे झुकतील.
कशाच्या आद्हारावर मी शिवसेनेला मत देउ? भाजप नाही तर म नोटा.. हे ठीक आहे.

अर्धवटराव 12/11/2014 - 22:33
निवडणुका आणि सरकार स्थापनेपर्यंत उद्धव आणि पर्यायाने सेना चुकीची वागली हे खरं असलं तरिही भाजपने शेवटी ज्यापद्धतीने रा.कॉ. च्या मदतीने सरकार स्थापन केलं तेही चुकच आहे. सध्यातरी सहानुभूती सेनेच्या पारड्यात गेल्याचं दिसतय. प्राप्त परिस्थितीचा उपयोग शहाणपणाने करण्यात सेना कदाचीत यापुढे देखील कमि पडेल व पवार साहेब स्वतःचा फायदा निश्चित करुन घेतील. भाजप काय करेल ते सांगता येत नाहि.

In reply to by आयुर्हित

क्लिंटन 15/11/2014 - 21:26
महापुरे झाडी जाती| तेथे लव्हाळे वाचती||
तुकाराम महाराजांना लव्हाळेच्या ऐवजी 'लव्हासे' असे म्हणायचे होते का? :)

गणेशा 12/11/2014 - 23:51
भाजपा ला शिवसेना नको होती.. आणि शरद पवार यांना माहिती होते, की भाजपा सत्तेजवळ गेल्यास मनसे ची ५-१० आमदारांची पण साथ त्यांना होऊ शकेन. त्यामुळे नाशिक मध्ये त्यांनी मनसे बरोबर महानगर पालिका घेतली आणि मनसेचा नाशिक विधानसभा क्षेत्रात पिछेहाट होण्यास येव्ह्डे निमित्त पुरेशे ठरले. तरीही शिवसेने ला जी नावे ठेवत आहेत ते मला योउग्य वाटत नाही. एकट्या उद्धव ठाकरे यांच्या जीवावर शिवसेने ने बर्यापैकी आमदार आनलेले आहेत. उद्धव ठाकरेंची कार्यशैली मला वयक्तिक आवडत नाही, पण खुनशी राजकारण त्यांना येत नाही उआपुढे जावुन राजकारण करणेच त्यांना जास्त जड जाते असे मला वाटते. शिवसेना संपण्याची नांदी जे तुम्ही म्हणालात ते खरे तर मला शक्य वाटत नाही परंतु शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांना माननारे सच्चे कार्यकर्ते त्यांची साथ कधीच सोडत नाहीत. या दोनही नेत्यांचे संबंध डायरेक्ट लो लेवल पर्यंत असल्याने त्यांची पडझड येव्हड्या पटकन होणार नाही असे मला वाटते. उद्धव ठाकरेंनी राज्यव्यापी एक जरी योग्य आंदोलन यशस्वी केले, पारंपारीक मराठी अस्मिता आणि इतर मुद्द्यापेक्षा, शेतकरी .. त्यांचे प्रश्न. राज्याला आवश्य्क असणारी विरोधी पक्षाची सोच तरी पुढील निवडनुक ते यश्स्वी पणे पार पाडतील असे मला वाटते. परंतु राष्ट्रवादी हा महानगरपालिकेत सर्वांना जड जाणारा पक्ष आहे, पिंपरी चिंचवड ला या वेळेस थोडे विरोधी वातावर्ण झाले असले तरी भाजप बरोबर सांगमत झाल्याने तेथील सत्ता न जाण्यासाठीची पुरेपुर तरतुद झालेली असेल. त्यात राष्ट्रवादी ही एक पक्ष कॉन्ग्रेस बरिओबर.. शिवसेने बरोबर आणि आता स्पष्ट झाल्या प्रमाणे भाजप बरोबर ही पुढील निवडनुकीनंतर जावु शकतो. कोणी तरी भाजप राष्ट्रवादी बरोबर जाईन हे आधी भाकीत केले होते का ? याला धोरणी राजकारण म्हणावे लागेल. परंतु शरद पवार यांच्या नंतर, उद्धव ठाकरे इतके ही राष्ट्रवादीला तग धरता येईल का याची साशंकता आहे. फक्त शिवसेनेला लांब ठेवण्याबरोबर भाजप चा डोळा मुंबई महानगर पालिके सोबतच इतर महानगर पालिकडे असु शकतो.. त्यातच राज्यात भाजप बरोबर जावुन, शिवसेनेला सरकार पासुन लांब ठ्वण्त्यात आणि कॉन्ग्रेस चे कुठे नाव ही न आणण्यात शरद पवार यशस्वी ठरलेले आहेत. सध्या तरी राकराणात त्यांचा हात धरणारा कोणी नाही.

In reply to by गणेशा

@ शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांना माननारे सच्चे कार्यकर्ते त्यांची साथ कधीच सोडत नाहीत बाळासाहेबांच्या वेळची सेना , वाजपेयींच्या काळातील भाजपा व शरद राव महाराष्ट्रात होते तेव्हाची राष्ट्रवादी आता उरली नाही . आवाजी बहुमत ही अफलातून चाल भाजपने खेळली. नियमांकडे बोट दाखवून मतविभाजनाचा प्रस्ताव टाळला, परत पंजाच्या ५ आमदारांवर दोन वर्षांचे निलंबन आणले. च्यायला बिग बॉस सारखा लुटापूटी ची भांडणे , छडयंत्रे पाहण्यापेक्षा आता विधान सभेचे कामकाज लाईव्ह दाखवले तर मजबूत टी र पी मिळेल. सहा म महिने जीवदान उरलेले ६ ते ८ आमदार भाजप मधल्या काळात नक्की मिळवेल. प्रभू सर्व पक्षात असतात त्यांना शोधण्यासाठी बस नजर और अक्कल चाहिये

In reply to by निनाद मुक्काम …

क्लिंटन 13/11/2014 - 11:06
सहा म महिने जीवदान उरलेले ६ ते ८ आमदार भाजप मधल्या काळात नक्की मिळवेल.
बर्‍याच ठिकाणी भाजप सरकारला सहा महिने जीवदान मिळाले अशा स्वरूपाचे उल्लेख आहेत.ते माझ्या मते चुकीचे आहेत. इतके दिवस मला वाटत होते की राज्यघटनेत केवळ अविश्वास प्रस्तावाचा उल्लेख आहे आणि विश्वासदर्शक प्रस्तावाचा उल्लेख नाही.आजच राज्यघटनेची पी.डी.फ फाईल परत एकदा बघितली.त्यात अविश्वास प्रस्तावाचाही उल्लेख नाही.तर उल्लेख केवळ इतकाच आहे की केंद्रीय मंत्रीमंडळ सामुहिकरित्या लोकसभेला जबाबदार असेल. राज्यघटनेत केवळ तत्वांचा उल्लेख असतो (केंद्रीय मंत्रीमंडळ लोकसभेला जबाबदार असेल हे तत्व) आणि त्या तत्वांची अंमलबजावणी कशी करावी हे सभागृहांच्या नियमांवर सोडलेले असते. तेव्हा अविश्वास प्रस्ताव आणि विश्वासदर्शक ठराव या गोष्टी लोकसभेच्या (आणि राज्य विधानसभांच्या) कामकाजाच्या नियमांअंतर्गत असाव्यात.हे नियम मी तपासून बघितलेले नाहीत.तरीही आपल्या राज्यव्यवस्थेत इतर गोष्टी ज्या पध्दतीने चालतात त्याला अनुसरूनच ही पध्दत आहे. एकदा अविश्वास ठराव आणला आणि त्या ठरावाचा पराभव झाला तर पुढचा अविश्वास ठराव सहा महिन्यांपर्यंत आणता येत नाही असे कधीतरी वाचल्याचे आठवते.विश्वासदर्शक ठरावाविषयी नक्की काय नियम आहेत हे माहित नाही. फडणवीस सरकारने काल विश्वासदर्शक ठराव आणला.त्यामुळे विरोधी पक्षांना अविश्वास ठराव आणायचा असेल तर त्याला ही सहा महिन्यांची अट लागू होईल असे वाटत नाही. दुसरे म्हणजे सरकारचा पराभव आणखी दोन प्रकारे होऊ शकतो.राज्यपालांच्या भाषणावरील धन्यवाद प्रस्ताव जर विधानसभेने फेटाळला तर सरकारचा पडते.तसेच कोणत्याही अर्थबिलावर सरकारचा पराभव झाला तरी सरकार पडते.अनेकवेळा विरोधी पक्ष अर्थसंकल्पावर कपात सूचना आणतात (आणि या कपात सूचना प्रतिकात्मक म्हणून एक रूपयाच्या असतात). या कपात सूचना विधानसभेने मंजूर केल्या तरी सरकारचे बहुमत गेले असा त्याचा अर्थ होतो. राज्यपालांचे अभिभाषण काल झाले. बहुदा आजच त्यावरील धन्यवाद प्रस्तावावर मतदान होईल.अर्थसंकल्पावर मतदान मार्च महिन्यात होईल.त्यावेळी पराभव झाल्यासही सरकार पडू शकेल.त्यामुळे सरकारला सहा महिन्यांचे जीवदान मिळाले हे म्हणणे चुकीचे आहे असे मला वाटते.

In reply to by क्लिंटन

माहितगार 13/11/2014 - 12:15
बर्‍याच ठिकाणी भाजप सरकारला सहा महिने जीवदान मिळाले अशा स्वरूपाचे उल्लेख आहेत.ते माझ्या मते चुकीचे आहेत.
हे सहा महिनेवाले उल्लेख मला आश्चर्यकारक वाटले. पक्षांतरबंदी कायद्यात असे काही बदल झाले असण्याची शक्यता वाटते काय ? पक्षांतरबंदी कायद्यात असा काही केला गेला असलातरी पार्लमेंटरी लोकशाहीत अशा नियमाची वैधता सांशंकीत करणारी वाटते.
दुसरे म्हणजे सरकारचा पराभव आणखी दोन प्रकारे होऊ शकतो.राज्यपालांच्या भाषणावरील धन्यवाद प्रस्ताव जर विधानसभेने फेटाळला तर सरकारचा पडते.तसेच कोणत्याही अर्थबिलावर सरकारचा पराभव झाला तरी सरकार पडते.अनेकवेळा विरोधी पक्ष अर्थसंकल्पावर कपात सूचना आणतात (आणि या कपात सूचना प्रतिकात्मक म्हणून एक रूपयाच्या असतात). या कपात सूचना विधानसभेने मंजूर केल्या तरी सरकारचे बहुमत गेले असा त्याचा अर्थ होतो.
सरकारकडे पुरेसे बहुमत नसल्याचा हा फक्त अप्रत्यक्ष अर्थ झाला. त्याचा अर्थ नाचक्की एवढाच होतो. पण प्रत्यक्ष अविश्वास प्रस्ताव मंजूर होई पर्यंत सरकार पडणे घटनेच्या दृष्टीने अत्यावश्यक नसावे असे वाटते. महाराष्ट्र विधानसभेच्या स्थितीत सध्याच्या समजा भाजपेतर तिन्ही पक्षांनी सुस्पष्ट सांगीतले की सरकार तुम्ही चालवा पण अर्थ विधेयकासहीत प्रत्येक कायद्यावर विधानसभेत आम्ही बाकीचे तीन पक्ष मिळून काय करायचे ते ठरवू या केस मधे सरकारकडे फक्त अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह राईट राहतील, निर्णयशक्ती विरोधी बाकांसोबत प्रत्येकवेळी होणार्‍या तडजोडीवर असेल. हे सरकारात बसलेल्या पक्षास मंजूर असेल तर एखादे सरकारी अर्थ विधेयक मंजूर झाले नाही एखादी कपात सूचना मंजूर झाली म्हणून सरकार पडण्याचे मला कारण दिसत नाही. अर्थात हि काल्पनिक गोष्ट आहे, कमीत कमी शक्यता गृहीत धरूनही घटनात्मकतेच्या दृष्टीने मी शंका मांडत आहे.

In reply to by माहितगार

क्लिंटन 13/11/2014 - 22:11
सरकारकडे पुरेसे बहुमत नसल्याचा हा फक्त अप्रत्यक्ष अर्थ झाला. त्याचा अर्थ नाचक्की एवढाच होतो. पण प्रत्यक्ष अविश्वास प्रस्ताव मंजूर होई पर्यंत सरकार पडणे घटनेच्या दृष्टीने अत्यावश्यक नसावे असे वाटते.
नाही राज्यघटनेत केंद्रीय मंत्रीमंडळ सामूहिकपणे लोकसभेला जबाबदार असेल असे म्हटले आहे.कोणत्या परिस्थितीत सरकारने लोकसभेत बहुमत गमावले असे म्हणता येईल? यासाठी बऱ्याच गोष्टी रूढी,प्रथा आणि संकेतांवर आधारीत असतात.त्यातले बरेच आपल्याकडे ब्रिटिश पध्दतीतून आले आहेत.त्यानुसार अविश्वास प्रस्ताव, अर्थविधेयकावर सरकारचा पराभव होणे आणि राष्ट्रपती/राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर सरकारचा पराभव होणे या गोष्टी नक्कीच ब्रिटिशांकडून आल्या आहेत.विश्वासदर्शक ठराव हा प्रकार ब्रिटिशांकडे आहे की नाही याची कल्पना नाही.तो अगदी मुळातला भारतीय असला तरी केंद्रीय मंत्रीमंडळाचे लोकसभेत बहुमत सिध्द करायचा तो प्रकार असल्यामुळे तो लोकशाहीचा स्पिरीटमध्येच बसणारा आहे त्यामुळे त्याविषयी तक्रार असायचे कारण नाही.यापैकी एकाही प्रकारे सरकारचा पराभव झाला तर त्याचा अर्थ सरकारने बहुमत गमावले असा होऊन सरकार पडते.
हे सरकारात बसलेल्या पक्षास मंजूर असेल तर एखादे सरकारी अर्थ विधेयक मंजूर झाले नाही एखादी कपात सूचना मंजूर झाली म्हणून सरकार पडण्याचे मला कारण दिसत नाही.
२००३ मध्ये झारखंडमध्ये बाबूलाल मरांडी यांचे भाजप सरकार विधानसभेत कपात सूचना मंजूर झाल्यामुळे पडले होते.

In reply to by क्लिंटन

सव्यसाची 13/11/2014 - 13:45
क्लिंटन सर, मला वाटते सरकारवर एकदा विश्वास प्रस्ताव मजूर झाला कि पुढचे सहा महिने सरकारवरती अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही. तुम्ही म्हणता ती परिस्थिती पण असू शकते. अर्थसंकल्पाबद्दल आपल्याशी सहमत आहे. फक्त अविश्वास प्रस्तावानेच सरकार पडू शकते हा भाबडेपणाच म्हणावा लागेल. दुसरा एक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. मला वाटते त्याप्रमाणे विधानपरिषद हि सुद्धा राज्यसभेसारखीच आहे आणि तिथे सरकार कधीच पडू शकत नाही (चुकीचे असेल तर दुरुस्त करावे हि विनंती.) परंतु ordinary bills पास करायची असतील तर ती विधानपरिषदेमध्येही मंजूर करून घ्यावी लागतील. तिथे सध्या राष्ट्रवादीचे सर्वात जास्ती आमदार आहेत. (२८) कॉंग्रेस (२१), भाजप (११), सेना(६). असे थोड्या वेळासाठी आपण समजले कि सेना भाजप एकत्र आले असते तर विधानसभेत बहुमत होते पण विधानपरिषद मध्ये अजून पण बहुमत मिळालेच नसते. तिथे राष्ट्रवादी किंवा कॉंग्रेस यांचा आधार घ्यावाच लागला असता. संसदेप्रमाणे इथेही संयुक्त अधिवेशन असेल तर सेना भाजप एकत्र येण्याचा फायदा झाला असता. पण मी विधानसभा आणि विधानपरिषद संयुक्त अधिवेशन पाहिले नाही. त्यामुळे ते असते कि नाही याची कल्पना नाही.

In reply to by सव्यसाची

क्लिंटन 13/11/2014 - 22:46
मला वाटते सरकारवर एकदा विश्वास प्रस्ताव मजूर झाला कि पुढचे सहा महिने सरकारवरती अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही. तुम्ही म्हणता ती परिस्थिती पण असू शकते.
मी हे बऱ्याच वर्षांपूर्वी (मी शाळेत असताना) वाचले होते. माझी वाचण्यात चूक झाली होती की आठवण्यात चूक झाली आहे समजत नाही. बहुतांश वेळा हे नियम लोकसभा आणि राज्य विधानसभांना एकसारखेच असतात.लोकसभेत मात्र ६ महिन्यांची मुदत लागू पडत नाही असे वाटते. नरसिंह राव सरकारवर पहिला अविश्वास ठराव आला होता हर्षद मेहता प्रकरण उघडकीस आल्यानंतर १९९२ च्या पावसाळी अधिवेशनात म्हणजे जून १९९२ मध्ये.तो ठराव फेटाळला गेला हे मी दुसऱ्या दिवशी शाळेत जायच्या आधी पेपर वाचला त्यात वाचले होते हे पक्के आठवते म्हणजे तो ठराव १० ते १५ जूननंतर आला होता हे नक्की.तर अयोध्या प्रकरणानंतर ८ डिसेंबर १९९२ रोजी वाजपेयींनी अविश्वास ठरावावर नोटिस दिली.ती लोकसभा अध्यक्षांनी मान्य केली.प्रत्यक्ष ठरावावर चर्चा झाली १५ डिसेंबरनंतर कारण दंगलींच्या कारणावरून आठवडाभर संसद तहकूब केली होती हे पण आठवते. ६ महिन्यांची मुदत असेल तर ८ डिसेंबरला अध्यक्षांनी अविश्वास ठरावाची नोटिस मान्य करायला नको होती. बहुदा माझी स्मरणशक्ती दगा देत नसावी :) मग हा नियम मी महाराष्ट्र विधानसभेच्या संदर्भात वाचला होता की असा कोणता नियमच नाही हे समजत नाही. याविषयी कोणाला माहिती असल्यास ते लिहिले तर चांगले होईल.
दुसरा एक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. मला वाटते त्याप्रमाणे विधानपरिषद हि सुद्धा राज्यसभेसारखीच आहे आणि तिथे सरकार कधीच पडू शकत नाही (चुकीचे असेल तर दुरुस्त करावे हि विनंती.)
हो बरोबर. तिथे सरकार पडू शकत नाही. पण विधानपरिषद ही राज्यसभेइतकी बलिष्ठ नाही. समजा विधानसभेने पास केलेले विधेयक विधानपरिषदेने फेटाळले (किंवा विधानसभेला मान्य नसलेल्या दुरूस्त्या विधानपरिषदेने मंजूर केल्या) तर ते विधेयक परत एकदा विधानसभेकडे येते.ते परत विधानसभेने पास केले आणि विधानपरिषदेने दुसऱ्यांदा फेटाळले तर विधानपरिषदेचा दुसरा नकार ग्राह्य धरला जात नाही आणि विधानसभेने मंजूर केलेल्या स्वरूपात ते विधेयक विधीमंडळाने पास केले असे धरले जाते. तेव्हा विधानपरिषद म्हणजे बऱ्याच अंशी एक cosmetic अधिकार असलेले सभागृह आहे. याविषयी अधिक भारतीय राज्यघटनेच्या कलम १९७--पी.डी.एफ मधील पान ९६ वर.
संसदेप्रमाणे इथेही संयुक्त अधिवेशन असेल तर सेना भाजप एकत्र येण्याचा फायदा झाला असता. पण मी विधानसभा आणि विधानपरिषद संयुक्त अधिवेशन पाहिले नाही. त्यामुळे ते असते कि नाही याची कल्पना नाही.
वर लिहिल्याप्रमाणे असे संयुक्त अधिवेशन घ्यायची गरज नाही कारण विधान परिषदेला तितके अधिकार नाहीत.

ओंकारा 13/11/2014 - 01:56
या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्र लढले. सर्वांनी स्वबळावर मतदारांकडे कौल मागितला. संपूर्ण प्रचारात भाजपाने शिवसेनेवर टीका केली नाही. ठाकरे आणि कंपनीच्या सर्व विखारी प्रचारानंतरही भाजपानं 122 जागा जिंकल्या. शिवसेनेची उडी 63 पर्यंतच मर्यादित राहिली. मतदारांनी स्पष्ट बहुमत दिलं नाही. पण त्यांचा मूड ओळखून शिवसेनेनं भाजपला पाठिंबा द्यायला हवा होता. भाजपनं शिवसेनेच्या पाठिंब्याची इच्छा व्यक्त केली होती. राष्ट्रवादीचा पाठिंबा मागितला नाही, किंवा त्यांच्याशी बोलणीही केली नाही. शिवसेनेनं पाठिंबा दिला असता तर राष्ट्रवादीची रसद रोखली गेली असती. पवारांचं महत्व कमी झालं असतं तसं काहीही झालं नाही. ठराविक वर्तुळाच्या बाहेर न पाहणारं शिवसेना नेतृत्व नुसत्या पोकळ गर्जना करत राहिलं. पण दुसरिकडं अगदी शेवटपर्यंत भाजपशी वाटाघाटी सुरु होत्या.अगदीराष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटूनही भाजपला दगा करण्याचा प्रयत्न झाला. बहुमताच्या निम्या जागा नसतानाही उपमुख्यमंत्री, गृहमंत्रीसह निम्मे मंत्रीपदचा हट्ट धरुन रुसून बसणा-या शिवसेनेचं जोखड भाजपाच्या खांद्यावरुन उतरलं ते बरचं झालं. आता जे काही भलं बुरं होईल ते स्वबळावर. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर तरलेल्या सरकारची प्रतिमा खरब झालीय. हे शेंबड पोरगंही सांगतंयय. ते फडणवीस सरकारलाही मान्य असेल. त्यामुळे आगामी काळात भाजपाला टिकवण्यासाठी त्यांना चांगली काम करावीच लागती. ती या सरकारनं केली तरच त्यांचा आगामी काळात निभाव लागेल. राज्याच्या जनतेसाठी ही आनंदाची बाब आहे. राजकारण हा सर्व्हायवल ऑफ द फिटेस्टचा खेळ आहे. इथे जो टिकला तो तरला. उगीच भावनिक होऊन सार संपलं म्हणून शोक करण्यात काहीच अर्थ नाही.

In reply to by ओंकारा

आनन्दा 13/11/2014 - 10:37
राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर तरलेल्या सरकारची प्रतिमा खरब झालीय. हे शेंबड पोरगंही सांगतंयय. ते फडणवीस सरकारलाही मान्य असेल. त्यामुळे आगामी काळात भाजपाला टिकवण्यासाठी त्यांना चांगली काम करावीच लागती. ती या सरकारनं केली तरच त्यांचा आगामी काळात निभाव लागेल. राज्याच्या जनतेसाठी ही आनंदाची बाब आहे. राजकारण हा सर्व्हायवल ऑफ द फिटेस्टचा खेळ आहे. इथे जो टिकला तो तरला. उगीच भावनिक होऊन सार संपलं म्हणून शोक करण्यात काहीच अर्थ नाही.
+१

आनन्दा 13/11/2014 - 10:48
याव्यतिरिक्त मला अजून एक शक्यता वाटते ती म्हणजे, कॉंग्रेसला संपवण्याच्या व्यापक कटाचा हा देखील एक भाग तर नव्हे? सत्ताधारी आणि विरोधी अशी दोन्ही तुणतुणी वाजवून कोंग्रेसचे खच्चीकरण करण्याचा देखील हा एक प्रयत्न होऊ शकतो.. कालचं पहा,

In reply to by आनन्दा

गणेशा 13/11/2014 - 11:26
हा भाबडा आशावाद आहे, राष्ट्रवादीला आणि कॉग्रेस ला नेस्तनाबुत करण्याची चांगली संधी भाजप ने गमावलेली आहे. शिवसेनेचीच उलट जास्त कोंडी केल्याचे स्पष्ट जानवत आहे. सेने ने पहिल्यांदाच आम्ही विरोधात बसु म्हंटले असते तर तो त्यांचा आतताईपना आहे असे म्हंटले गेले असते आणि आम्हाला राष्ट्रवादी शिवाय पर्याय नाही अशी बोलणी भाजप तर्फे झाली असती आणि शिवसेनेने चर्चा करण्यास नमते घेतले तर ते लाचर होते, त्यांच्यात पहिली जरब राहिली नाही असे म्ह्ंटले जाते. राजकारणात कोणी कोणाला कमी लेखु नये असेच मला वाटते. आण्जि कोण कोणत्या पक्षाला संपवु पाहत नाहिये हा आपला भाबडा आश्वाद आहे. स्वपक्ष विस्तारा साठी वाटेल ते असे धोरण सर्वांकडे आखले जात आहे. कॉग्रेस विलास राव देशमुखां नंतर विखुरलेली दिसत आहे. भाजप राष्ट्रवादीला संपवणार आहे हा तर आशावाद सोडा खुप चुकीचा विचार आहे. महानगर पालिकेची सत्ता तळागाळात टिकुन राहण्यात जास्त मदत करते आणि त्यासाठी भाजप - राष्टवादी एकत्र आले आहेत. यात ना शिवसेनेची चुक किंवा कमकुवत नेत्रुत्व आहे ना कोणाला संपवायचे धोरण. संपवायचेच असते तर त्यांचा हातभार घेतला गेला नसता. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्याकडे राज यांच्या सारखे वक्त्रुत्व नाही .. तसेच त्यांच्याकडे चांगली मास लिडर नेते मंडळी नाहीत. तीच गत महाराष्ट्र भाजप मध्ये ही आहे. देवेंद्र फडनविस हे मास लिडर आहेत असे मला तरी वाटत नाही. गोपिनाथ मुंडे हे एकमेव मास लिडर बिजेपी मध्ये होते. तरीही त्यांचे १२२ आमदार निवडुन आलेत, यात मोदी आण राष्ट्रवादी यांचा चांगलाच हातभार आहे. २२ आमदार उसने आलेले आहेत आणि त्यांच्यावर होल्ड भाजपा चा नाहिये. आणि भाजप कसे इतरांना संपवेन. भाजपा ने राष्ट्राव्दी ला संपवायचा पर्यत्न केला तर हे २२ जन पण शरद पवार त्यांच्याकडे घेवु शकतील, इतके राजकारण त्यांना येतेच येते. उलट स्वताचे ४०-४२ जे काही आहेत ते, आणो ह्या २२ मधिल १०-१२ आणि अपक्ष ८-१० या सर्वांना एकत्र ठेवुन शरद पवार भाजपा ला जेरीस आणु शकतात. शिवसेने ने त्यांचे कार्य सरळ चालु ठेवले तर पुढील निवडनुकीत कॉन्ग्रेस राष्ट्रवादी यांच्या विरोधातील मतदान शिवसेनेला होयील. आणि राष्ट्रवादी कॉग्रेस, काँग्रेस ची ही काही मते आपल्याकडे खेचण्यात यशस्वी होयील. भाजपाच्या बाजुने एकांगी विचार करुन आपण शरद पवार, उद्धव ठाकरे यांना कमकुवत समजत आहोत. भाजपा ला पक्ष वाढवायचाय.. राष्ट्रवादीला सत्ताकेंद्र टिकवायचेय..शिवसेनेला संभ्रमातुन पाहेर पडायचेय आणि कॉग्रेस ला नवसंजीवनीचा शोध घ्यायचाय..

In reply to by गणेशा

श्रीगुरुजी 13/11/2014 - 12:50
>>> हा भाबडा आशावाद आहे, राष्ट्रवादीला आणि कॉग्रेस ला नेस्तनाबुत करण्याची चांगली संधी भाजप ने गमावलेली आहे. शिवसेनेचीच उलट जास्त कोंडी केल्याचे स्पष्ट जानवत आहे. महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक त्रास देणारी शिवसेनाच आहे. भाजपची शिवसेनेबरोबर युती म्हणजे 'सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही' अशी अवस्था होती. त्यामुळे भाजप शिवसेनेलाच नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करणार हे उघड आहे. >>> सेने ने पहिल्यांदाच आम्ही विरोधात बसु म्हंटले असते तर तो त्यांचा आतताईपना आहे असे म्हंटले गेले असते नाही. उलट शिवसेनेने एक निश्चित भूमिका घेतल्याने शिवसेनेबद्दल जनतेचा आदर वाढला असता आणि भाजपलाही सेनेला खेळविता आले नसते. >>> शिवसेने ने त्यांचे कार्य सरळ चालु ठेवले तर पुढील निवडनुकीत कॉन्ग्रेस राष्ट्रवादी यांच्या विरोधातील मतदान शिवसेनेला होयील. आणि राष्ट्रवादी कॉग्रेस, काँग्रेस ची ही काही मते आपल्याकडे खेचण्यात यशस्वी होयील. हा फारच भाबडा आशावाद आहे. कालच्याच 'सामना'च्या अग्रलेखातील हा परिच्छेद वाचा. हा परिच्छेद संजय राऊतांनी लिहिला की उद्धव ठाकर्‍यांनी हे माहित नाही. पण जे लिहिले आहे त्यावरून यांचा पीळ आणि अविचारीपणा अजूनही गेलेला नाही हे स्पष्टपणे दृग्गोचर होतंय. "महाराष्ट्राच्या विधानसभेत ‘जय विदर्भ’चा नारा देण्याची हिंमत वाढली आहे. स्वतंत्र विदर्भाच्या विचाराचे काही लोक राज्याच्या विधिमंडळात असू शकतात. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासूनच त्यांचे शेपटे असे वळवळत आहे, पण महाराष्ट्राच्या विधानसभेत जहरी फणा काढून स्वतंत्र विदर्भाचे फूत्कार सोडण्याची हिंमत आतापर्यंत कोणी दाखवली नव्हती. नव्या सरकारच्या आमदानीत हे सर्व घडताना दिसत आहे. हिंदुस्थानच्या संसदेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे देणे व महाराष्ट्राच्या विधानसभेत स्वतंत्र विदर्भाचे नारे देणे हा अपराध असून ‘अशा’ उलट्या ‘खोपडे’च्या लोकांवर मुख्यमंत्र्यांनी खरे म्हणजे कठोर कारवाई करायला हवी. अर्थात स्वत: मुख्यमंत्र्यांनीच शपथ घेतल्यानंतर नागपुरात जाऊन महाराष्ट्रद्वेष्ट्या जहरी सापांना दूध पाजल्यावर अशा सापांची हिंमत वाढणारच. तशी ती वाढताना दिसत आहे आणि नैतिकता व तत्त्वाचे ‘हवाबाण’ सोडणारे मात्र अशावेळी गप्प बसले आहेत. "

In reply to by श्रीगुरुजी

गणेशा 13/11/2014 - 13:14
तुम्ही दिलेल्या पॅरेग्राफ वाचुन हासतो आहे. शिवसेने ने वरची फळी बदलली पाहिजे असे माझे ही मत आहे. नाहितर अश्या मनोरंजक लोकांमुळे शिवसेना फक्त मनोरंजन कार ठरु शकते. तुमची मते मला पटतात.. पण दिसते तसे येव्हडे सोप्पे नाहिये. असे माझे मत आहे. भाजप ला शिवसेना सर्वात जास्त त्रास देणारी वाटत होती.. तेच मला ही म्हणायचे आहे, म्हणुनच त्यांना ती सत्तेत नको होती. आणि ही भाजपाची चाल होती शिवसेना त्यात फसली. आणि भाजपची चाल राष्ट्रवादीच्या बरोबरीने होती. सर्व आधीच ठरले होते हे जर आपण माणनार असु तर भाजपा ने लोकांना अंधारात ठेवुन मते मागितली आहेत हे कळते. आणि त्यामुळे वेगळा पक्ष म्हणुन भाजप दिसत नाहिये. सर्व आता एकाच लेवल ला आहेत असे वाटते. बाकी तुमचे बरेच से मुद्दे पटणारेच आहेत, म्हणुन त्यावर रिप्लाय न देता मी माझी मते मांडली.

In reply to by श्रीगुरुजी

चिगो 20/11/2014 - 13:14
नव्या सरकारच्या आमदानीत हे सर्व घडताना दिसत आहे. हिंदुस्थानच्या संसदेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे देणे व महाराष्ट्राच्या विधानसभेत स्वतंत्र विदर्भाचे नारे देणे हा अपराध असून ‘अशा’ उलट्या ‘खोपडे’च्या लोकांवर मुख्यमंत्र्यांनी खरे म्हणजे कठोर कारवाई करायला हवी. अर्थात स्वत: मुख्यमंत्र्यांनीच शपथ घेतल्यानंतर नागपुरात जाऊन महाराष्ट्रद्वेष्ट्या जहरी सापांना दूध पाजल्यावर अशा सापांची हिंमत वाढणारच. तशी ती वाढताना दिसत आहे आणि नैतिकता व तत्त्वाचे ‘हवाबाण’ सोडणारे मात्र अशावेळी गप्प बसले आहेत. "
हे असं एका अग्रगण्य वृत्तपत्राने लिहीणं, बलेही त्याची वैचारीक बैठक काहीही का असेना, हा महाप्रचंड मुर्खपणा आहे. वेगळा विदर्भ असावा की नको, तो आर्थिक आणि विकासदृष्ट्या सुदृढ असेल की नाही ह्यावर विचार करुन आणि प्रॅक्टीकल बाबी तपासून हा निर्णय व्हायला पाहीजे. आणि वेगळा विदर्भ मागणे म्हणजे देशद्रोह हे म्हणणार्‍यांना फाट्यावर मारले पाहीजे. नको तिथे इमोशनल वायझेडपणा करणारे वैदर्भियांना आवडत नाही. कमीत कमी ह्या एका वैदर्भियाला तरी नक्कीच नाही..

In reply to by चिगो

कपिलमुनी 20/11/2014 - 13:18
वेगळा विदर्भाची कारणे जर संयुक्तीक असतील तर तो दिलाच पाहिजे . आणि अशी मागणे ते घटनेच्या चौकटीत राहून करत आहेत.यात चुकीचे काहीच नाही. नेत्यांनी स्वार्थासाठी याचा बागुलबुवा बनवला आहे

In reply to by कपिलमुनी

'वेगळ्या खान्देशाच्या क्षीण हाकाही प्रसारमाध्यमातून कानावर येत आहेत.' उद्या वेगळा कोंकण, वेगळी मुंबई अशाही हाका सयुक्तिक कारणाने आणि घटनेच्या चौकटीत राहून होऊ लागल्या तर त्यांनाही वेगळे काढून, महाराष्ट्राचे नांव बदलून 'मराठी संघराष्ट्र' असे करावे लागेल.

विटेकर 13/11/2014 - 11:09
आवडले ! नेहमीप्रमाणे क्लिंट्न यांचाही मार्मिक प्रतिसाद ! आता भाजप पुढची चाल काय खेळते यावर बाकीच्या सार्‍या गोष्टी अवलम्बून आहेत. शरद पवारांचा पाठिंबा घेतल्याने भाजपाचा प्रामाणिक मतदार आतून दुखावला गेला आहे. हे दुखणे भाजपाला बरे करयचे असेल तर आता सिंचन घोटाळ्यासारख्या भानगडी तातडीने बाहेर काढायला हव्यात, भ्रष्टाचारी आत जायला हवेत ! त्यामुळे हे दुखणे आपोआपच बरे होईल. कधे कधी मला वाट्ते , पवार धुरंधर राजकारणी आहेतच पण अमित शहा त्यांच्या वरचढ आहेत ! त्यांनी शिवसेनेचा काटा राष्ट्रवादीच्या काट्याने काढला. फक्त योग्य वेळ येताच , दोन्ही काटे फेकून देता आले पाहीजे !!

In reply to by विटेकर

गणेशा 13/11/2014 - 11:58
कधे कधी मला वाट्ते , पवार धुरंधर राजकारणी आहेतच पण अमित शहा त्यांच्या वरचढ आहेत ! त्यांनी शिवसेनेचा काटा राष्ट्रवादीच्या काट्याने काढला. फक्त योग्य वेळ येताच , दोन्ही काटे फेकून देता आले पाहीजे !!
थोडा उलटा विचार केला तर. कॉन्ग्रेस ला विरोधी पक्ष पद ही मिळवुन द्यायचे नाही, भाजपाला शिवसेने बरोबर ही जाउन द्यायचे नाही. आण स्वताचे महत्त्व ही टिकवायचे असे राष्ट्रवादीचे धोरण असु शकनार नाही का ? भाजप कशी ही करुन सत्ता स्थापण करणार होती, जर त्यांनी शिवसेनेला बरोबर घेतले असते तर कॉन्ग्रेस विरोधी पक्ष झाला असता, आणि या सगळ्यात राष्ट्रवादी कोठे तरी असता का ? उलट आता असलेल्या महानगर पालिका ही राष्त्रवादी ला गमवाया लागल्या असत्या. आणि हे झाले असते. त्यामुळे कोन वरचढ आहे हे सिद्ध झालेलेच आहे. उलट राष्ट्रवादी ला सोबत घेण्यात वरचढ पना नसुन धोक्याची पहिली चाहुल आहे हे येणारा काळ सांगेन. त्यातुन भाजपा सगळे भ्रष्टाचार बाहेर काढेल असे जे म्हंटले जाते, ते चुक आहे. महाराष्ट्र भाजप फक्त आणि फक्त केंद्र सरकारच्या म्हणण्यानेच चालेल. त्यांना वयक्तिक रित्या जास्त काही करता येइल असे मला वाटत नाही. बाकी सामान्य लोकांचा विकासा कडे कोणी लक्ष देइल का असे वाटते आहे. भाजप शिवसेने बरोबर गेम प्लॅन खेळण्यात अत्यंत यशश्वी झाली कारण तेथे उद्धव ठाकरे होते.. पण पवार साहेब असे आहेत ज्यांना विरोधी लोके ही साहेबच म्हणतात. त्यामुळे भाजप ने जे केले आहे सत्तेवर जाण्यासाठी ते कदापी समर्थनिय आणि पारदर्षी नाही. त्यामुळे पक्षीय वेगळेपण टिकवण्यात आत्ता साफ अपयशी ठरली. आणि एक विचार, जर शेवटच्या क्रमाम्कावर फेकल्या गेले तरी आपल्या पक्षाभोवती सत्ताकेंद्र फिरवत ठेवण्याला कुठली नीती म्हंटले पाहिजे, चानक्य निती पेक्षा ही वरचढ..

मदनबाण 13/11/2014 - 12:14
ह्म्म्म.... वेळ मिळताच संपूर्ण विश्लेषण आणि क्लिंटनरावांचे प्रतिसाद वाचीन... जाता जाता :- शरदचंद्र पवार => राष्ट्रवादी कॉग्रेस => ४१ उद्धव ठाकरे => शिवसेना => ६३ शिवसेनेच्या जागा राष्ट्रवादी पेक्षा जास्त असुन सुद्धा त्यांची अशी अवस्था व्हावी यावरुन पक्ष प्रमुखांची निर्णय क्षमता आणि चाणाक्षपणा कमी पडला हे या सर्व घटना क्रमातुन अगदी स्पष्ट झाले !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnership

समीरसूर 13/11/2014 - 12:24
इथे असणार्‍यांइतके मला कळत नाही पण मला वाटते भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षातले नेते डोक्यावर पडलेले आहेत. थोडं समजदारीने वागले असते तर दोघांचा फायदा झाला असता. भाजपला राष्ट्रवादीच्या बेभरवशाच्या आधाराची गरज पडली नसती आणि त्यांची नामुष्की टळली असती. शिवसेनेला चांगले काम करून दाखवून प्रतिमा सुधारता आली असती आणि सत्तादेखील मिळाली असती. मुंबई टिकवण्यात याचा हातभार लागला असता. शिवाय आता अकारण जे राष्ट्रवादीचे महत्व वाढले ते घडले नसते. आता भाजप आणि शिवसेना बाजूला राहिले; राष्ट्रवादीच सगळी सूत्रे हलवते आहे असे चित्र निर्माण झाले आहे. अर्थात, शिवसेनेने थोडे पडते घ्यायला हवे होते यात वादच नाही. आपल्या जागा कमी, आपला करिष्मा संपलेला, आणि आपण बोलतो किती याचे भान शिवसेनेला राहिले नाही. शिवसेनेमध्ये काय करावे हा गोंधळ शेवटपर्यंत होता आणि त्याने त्याचा घात केला. शिवाय त्यांचे सल्लागार म्हणजे आनंदीआनंदच. भाजपनेदेखील नको तितके ताणले आणि शेवटी रडीचा डाव खेळले आणि टीकेचे धनी झाले. यात नुकसान दोघांनाही होणर हे नक्की.

श्रीगुरुजी 13/11/2014 - 13:09
महाराष्ट्र विधानसभेत १९८८ पासून आतापर्यंत आठ वेळा विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आले. त्यापैकी सहा ठराव सभागृहात आवाजी मतदानाने मंजूर झाले आहेत. *२५ मार्च १९९५ - मनोहर जोशी सरकारवरील ठराव. *७ डिसेंबर १९९५ - मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळावर विश्वासदर्शक ठराव *१७ फेब्रुवारी १९९९ - नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठराव *२३ ऑक्टोबर १९९९ - विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळावर ठराव *१३ जून २००२ - विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळावर विश्वासदर्शक ठराव - मतदान अनुकूल १४३ तर विरोधात १३२ मते *२३ जानेवारी २००३ - सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळावर ठराव - चर्चेविना आवाजी मतदानाने. *१६ जुलै २००६ - विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळावर विश्वासदर्शक ठराव - मतदान, अनुकूल १५३ मते, विरोधात शून्य मत *१९८८ - शरद पवार यांच्या मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठराव - चर्चेविना आवाजी मतदानाने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर करणे ही जुनी व कायदेशीर प्रथा आहे.

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी 13/11/2014 - 14:43
सरकारे अल्पमतात होती की बहुमतात हा प्रश्नच उद्भवत नाही. आवाजी मतदानाची प्रक्रिया कायदेशीर होती का नव्हती एवढाच मुद्दा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

कपिलमुनी 13/11/2014 - 15:27
अगोदर राज्यपालांना सरकारला पाठिंबा असलेल्या आमदारांची यादी द्यावी लागते. वाजपेयी सरकारने पण पहिल्यांदा आवाजी मतदान घेतले होते तेव्हा बालयोगी यांना ते मंजूर झाले म्हणता आले असते. पण ते वाजपेयी होते, असले टेक्निकल आणि घाणेरडे खेळ त्यांना मंजूर नव्हते . म्हणून आवाजी मतदानानंतरही जेव्हा मतदनाची मागणी झाली ती त्यांनी मंजूर केली. आता मोदी आणि कंपनीचे पाय मातीचे आहेत त्याला कोण काय करणार. भाजपाचा काँग्रेसीकरण झालाय . सत्तेसाठी काय पण ! खाली म्हणले तसे रडीचा डाव ! आणि रेटून समर्थने

In reply to by कपिलमुनी

अनुप ढेरे 13/11/2014 - 16:48
कपिलमुनीसाहेब, श्रीगुरुजींशी वाद घालू नका. त्यांच्या विरोधात बोललात तर लगेच तुम्हाला नाना नेफळे, माईसाहेब वगैरे म्हणायला सुरुवात करतील ते लगेच.

In reply to by अनुप ढेरे

हाडक्या 13/11/2014 - 17:07
*lol* . *lol* परत नान्याची आठवण झाली.. तोच बाजीप्रभूच्या सारखा श्रीगुरुजीसमोर अखंड खिंड लढवित असायचा.. तरी असोच.. ( डोळ्यास उत्तरिय लावल्याची स्माईली कल्पावी)

In reply to by अनुप ढेरे

श्रीगुरुजी 13/11/2014 - 20:46
नाही हो. कपिलमुनी हे नानासाहेब नाहीत. नानासाहेब, माईसाहेब इ. आयडी वापरणारी व्यक्ती अजून कोणकोणते आयडी वापरते याची मला पूर्ण माहिती आहे. निव्वळ नानासाहेबच नव्हे तर इथले इतर काही सदस्य कोणकोणते वेगवेगळे डूआय वापरतात हे मला माहिती आहे. माहिती हवी असल्यास व्यनि करा. पुलंच्या 'व्यक्ती आणि वल्ली' मध्ये 'नाथा कामत'च्या व्यक्तिरेखेत एक वाक्य आहे. "उद्या विलेपारले ते गिरगाव वॉर्डापर्यंतच्या तमाम तरूणी बुरखा घालून हिंडल्या तरी नाथा नुसत्या त्यांच्या टाचांवरून किंवा चालीवरून त्यांची नावे व घरनंबर सांगेल." तद्वत इथल्या काही सदस्यांनी कितीही वेगवेगळे डूआय घेतले तरी नुसत्या त्यांच्या एका प्रतिसादावरून मी त्या आयडीमागच्या मूळ सदस्याला ओळखू शकतो.

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी 13/11/2014 - 20:31
>>> अगोदर राज्यपालांना सरकारला पाठिंबा असलेल्या आमदारांची यादी द्यावी लागते. याची गरज नसते. सरकार बनविण्यासाठी कोणत्या पक्षाला व नेत्याला आमंत्रण द्यायचे याविषयी घटनेने राज्यपालांना मार्गदर्शक तत्वे व अधिकार दिले आहेत. ज्या पक्षाकडे/युतीकडे स्पष्ट बहुमत आहे अशा पक्षाला राज्यपाल आमदारांची यादी न मागता सरकार स्थापनेचे आमंत्रण देऊ शकतात. समजा कोणत्याच पक्षाकडे/युतीकडे स्पष्ट बहुमत नसेल तर राज्यपाल सर्वाधिक मोठ्या पक्षाला आमदारांची यादी न मागता सरकार स्थापनेचे आमंत्रण देऊ शकतात व त्यांना एका ठराविक कालावधीत विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देऊ शकतात. बोम्मई खटल्यात यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे की राजभवन ही बहुमत सिद्ध करण्याची जागा नसून बहुमत हे विधानसभेत सिद्ध करायचे असते. त्यामुळे आधी कमीतकमी निम्म्या आमदारांची यादी दाखवा आणि मगच मी सरकार स्थापनेचे निमंत्रण देईन अशी भूमिका राज्यपाल कायद्याने घेऊच शकत नाहीत. जर सर्व पक्षांनी सरकार स्थापनेविषयी असमर्थता दर्शविली तर राज्यपाल विधानसभा स्थगित करण्याची शिफारस करू शकतात. >>>> वाजपेयी सरकारने पण पहिल्यांदा आवाजी मतदान घेतले होते तेव्हा बालयोगी यांना ते मंजूर झाले म्हणता आले असते. पण ते वाजपेयी होते, असले टेक्निकल आणि घाणेरडे खेळ त्यांना मंजूर नव्हते . म्हणून आवाजी मतदानानंतरही जेव्हा मतदनाची मागणी झाली ती त्यांनी मंजूर केली. आवाजी मतदान हे संपूर्णपणे कायदेशीर व घटनेला धरून आहे. >>> आता मोदी आणि कंपनीचे पाय मातीचे आहेत त्याला कोण काय करणार. इथे मोदींच्या पायांचा काय संबंध? काल जे काही झाले ते पूर्णपणे कायद्याला व घटनेला धरून झाले आहे. याच्यात मातीचे पाय कोठून आले? >>> भाजपाचा काँग्रेसीकरण झालाय . सत्तेसाठी काय पण ! खाली म्हणले तसे रडीचा डाव ! आणि रेटून समर्थने ज्या प्रक्रियेची घटनेत तरतूद आहे व जी तरतूद या पूर्वी अनेक वेळा वापरली गेली आहे तो रडीचा डाव कसा होतो?

In reply to by श्रीगुरुजी

कपिलमुनी 14/11/2014 - 15:37
ज्या प्रक्रियेची घटनेत तरतूद आहे व जी तरतूद या पूर्वी अनेक वेळा वापरली गेली आहे तो रडीचा डाव कसा होतो?
सरकार पूर्ण बहुमतात आहे हे नक्की असेल तर ती सोय आहे. इथे सरकारचा बहुमत सिद्ध झालाच नव्हत . आणि आवाजी मतदानामधे नक्की कोणता निकष लावला गेला ? होय चा आवाज किती डेसिबल होता आणि नाही च किती डेसिबल ? आणि कहिजण समजा हो ओरडलेच नसतील किंवा पार्टी बदलून ओरडले असतील तर कसे कळणार ? भाजपाचे ऑन पेपर १४५ असते आणि लोकसभे प्रमाणे पूर्ण बहुमत असते तर कोणी आक्षेप घेतला नसता. आवाजी मतदानाची पळवाट काढणे अनैतिक आहे आणि भाजपाच्या नैतिकतेच्या मोठ्या गप्पा असतात म्हणून हा विरोधाभास जास्त जाणवला .

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी 14/11/2014 - 21:06
>>> सरकार पूर्ण बहुमतात आहे हे नक्की असेल तर ती सोय आहे. चूक. पूर्ण बहुमत असले किंवा नसले तरी घटनेनुसार आवाजी मतदान घेता येते. >>> इथे सरकारचा बहुमत सिद्ध झालाच नव्हत . आणि आवाजी मतदानामधे नक्की कोणता निकष लावला गेला ? होय चा आवाज किती डेसिबल होता आणि नाही च किती डेसिबल ? आणि कहिजण समजा हो ओरडलेच नसतील किंवा पार्टी बदलून ओरडले असतील तर कसे कळणार ? या सर्वांचा निर्णय सभापती करतात. >>> भाजपाचे ऑन पेपर १४५ असते आणि लोकसभे प्रमाणे पूर्ण बहुमत असते तर कोणी आक्षेप घेतला नसता. आवाजी मतदानाची पळवाट काढणे अनैतिक आहे आणि भाजपाच्या नैतिकतेच्या मोठ्या गप्पा असतात म्हणून हा विरोधाभास जास्त जाणवला . घटनेत काय नैतिक आहे व काय अनैतिक आहे अशी सब्जेक्टिव्ह व सापेक्ष कलमे नसतात. तिथे लोकशाही व्यवस्थेसाठी कायदे व नियम दिले आहेत. त्यानुसार आवाजी मतदान हे पूर्णपणे कायदेशीर आहे.

मदनबाण 13/11/2014 - 13:49
राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्तेसाठी तडजोडी करणाऱ्या भाजप सरकारचे मी तरी समर्थन करू शकणार नाही.तरीही यानिमित्ताने एक गोष्ट लिहावीशी वाटत आहे.पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी अर्धे शहाणे होते नाना फडणवीस.आपल्या मुत्सद्दीपणाने, बुध्दीमत्तेने आणि धूर्तपणाने अनेक राजकारणे त्यांनी लिलया पार पाडली. त्या नानांच्याच वंशजांपैकी देवेंद्र फडणवीस आहेत की नाही हे माहित नाही पण असेच धूर्त राजकारण खेळायची संधी त्यांना राष्ट्रवादीच्या पाठिंब्याच्या निमित्ताने आली आहे. पडद्यामागे काय झाले ते माहित नाही पण फडणवीसांनी किंवा अन्य कोणा भाजप नेत्यानेही राष्ट्रवादीचा पाठिंबा मागितला नाही की त्यांच्यात काही बोलणी चालू आहेत असेही नाही.तर राष्ट्रवादीने पाठिंबा आपण होऊन देऊ केला आहे.त्यातून शिवसेनेकडील बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहेच.विश्वासमत संमत व्हायच्या आधीच फडणवीसांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आणि तो म्हणजे १७० कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करायचा.तालुका पातळीवरील राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचे या समित्या म्हणजे पैसे खायचे कुरण होत्या हे सर्वमान्य आहेच.जर का सिंचन घोटाळा आणि राष्ट्रवादीच्या कुकर्मांवर फडणवीसांनी कारवाई सुरू केली तर राष्ट्रवादीचे हात दगडाखाली येतील हे नक्कीच.कारण त्या कारणावरून फडणवीसांचा पाठिंबा कसा काढणार? (१९९६-९७ मध्ये देवेगौडांनीही काँग्रेसचा पाठिंबा असतानाही काँग्रेसलाच अडचणीत आणायची खेळी केली होती त्याला समांतर खेळी करायची फडणवीसांकडे संधी आहे). आणि जर राष्ट्रवादीने पाठिंबा काढला आणि सरकार पडायची वेळ आली तर शिवसेनेची अवस्था त्या परिस्थितीत आणखी बिकट होईल. एकतर सरकारविरोधी मत देणे म्हणजे राष्ट्रवादीच्या बाजूने मत देणे आणि सरकारच्या बाजूने मत देणे म्हणजे भाजपपुढे आणखी नमते घेणे असा त्याचा अर्थ होईल. आणि फडणवीस परत ताठ मानेने निवडणुकांना सामोरे जाऊ शकतील. फडणवीसांना पाठिंबा शरद पवार का देत आहेत? कारण सहा महिन्यात परत निवडणुका झाल्या तर आपली खैर नाही हे त्यांना समजून चुकले आहे.हा पाठिंबा त्यांच्यासाठी फाशीचा दोर ठरवायची संधी फडणवीसांकडे आहे.
१००% सहमत. राष्ट्रवादीचा पाठिंबा घेउन त्यांचीच चांगली पाचर मारली आणि याला व्यवस्थित प्रसिद्धी दिली गेली तर याचा मोठा फायदा भाजपला होइल असे मलाही वाटते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnership

In reply to by मदनबाण

समीरसूर 13/11/2014 - 14:04
एवढं किचकट राजकारण आहे हे? पण जनतेला इतकं नाही कळत. आज तरी भाजप आणि शिवसेना जनतेच्या रोषाचे धनी झालेले आहेत. उद्या जर पुन्हा निवडणूका झाल्या तर असंच काही होईल असं ठामपणे सांगता येत नाही. जनता कसा विचार करते हे राजकारण्यांचं राजकारण नाही ठरवत. एवढं सगळं कुटील कारस्थान रचण्यापेक्षा आधीच थोडा समंजसपणा दाखवला असता तर... मटामध्ये एक लेख आला होता. त्यात लेखकाने म्हटले होते की शरद पवारांना आपण एवढे धोरणी, मुत्सद्दी, मुरलेले राजकारणी म्हणतो. जे काही चाललं आहे त्यामागे शरद पवारांचाच हात आहे असं सगळे म्हणतात. शरद पवार जर एवढे पॉवरफुल आहेत तर त्यांना राष्ट्रवादीच्या ५० देखील जागा का नाही मिळवता येत? दर निवडणुकीला त्यांच्या जागा लक्षणीयरीत्या कमी कशा काय होत जातात? अजून एकदाही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का नाही होऊ शकला? त्यांच्या पंतप्रधानपदाच्या महत्वाकांक्षेचं सोडून द्या. आता ते ही म्हणतील की मला कधीच पंतप्रधान व्हायचं नव्हतं म्हणून. :-) त्या लेखाचा रोख असा होता की प्रत्येक राजकीय घटनेचं विश्लेषण हे बरोबर असतंच असं नाही. मला वाटतं अतिकिचकट राजकारण खेळण्याच्या नादात पक्ष आपलं नुकसानच करून घेतात. शरद पवारांनी ते नेहमीच करून घेतलंय. म्हणून आजकाल स्वतःचा पक्ष नव्याने उभारण्यापेक्षा त्यांना नको त्या युक्त्या वापरून केवळ स्वार्थ साधण्यासाठी तग धरून रहावं लागतंय. पण हे फार काळ टिकणार नाही. अशा एक-दोन काड्यांवर फार काळ तरंगता येत नसतं. ही शेवटची स्वार्थ साधण्यासाठीची केविलवाणी धडपड आहे. भाजप-शिवसेनेच्या मूर्खपणामुळे ती जनतेवर लादली गेली आहे इतकंच.

In reply to by समीरसूर

खरे तर ते राजकारण तेवढे किचकट नसतेच. शरद्चे म्हणतोस ते खरे आहे.पुलोदच्या स्थापनेच्यावेळी (१९७८ साली) अनेकांनी त्याचे मुत्सद्दी म्हणून तोंड भरून प्रशंसा केली होती. पण सध्याच्या राजकारण्यांची जातकुळी पाहिलीस तर तो अनेक बाबतीत उजवा ठरतो.देशाच्या राजकारणात मात्र राष्ट्रवादीचे राजकारण सपशेल फसले.

मदनबाण 13/11/2014 - 14:12
सध्याच्या या घडामोडी पाहुन मला खव्यासाठी भांडणार्‍या बोक्यांची आणि माकडाची गोष्ट आठवली होती ! ;) CAT & Monkey {चित्र जालावरुन घेतले आहे.}

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnership

एकतर, भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा मागितलेला नाही. राष्ट्रवादीने स्वतःहून तो घोषित केला आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळीही राष्ट्रवादीने भाजपाच्या बाजूने मतदान केलेले नाही. राष्ट्रवादी त्यांच्या स्वघोषित पाठींब्याच्या धोरणानुसार 'तटस्थ' राहिले. बिजेपीच्या सांगण्यावरून नाही. राष्ट्रवादीचा पाठींबा आम्ही स्विकारला आहे असे अजून तरी भाजपने घोषित केलेले नाही. आता भाजपकडे ६ महिने आहेत आणि ८-१० आमदारांची गरज आहे. फोडतीलही ते एखाद्या पक्षातून.

कपिलमुनी 13/11/2014 - 14:38
भाजपा समर्थक सारी चुक शिवसेनेची आहे असे गळे काढण्यात गुंतले आहेत. राजधर्म पाळायचा असतो एव्ढा साधा कॉमन सेन्स नाहिये. जर राष्ट्रवादीचा पाठिंबा स्विकारला नाहिये तर तसा स्प्ष्ट सांगायची हिंमत दाखवायची. मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असा प्रकार आहे. ज्या मतदारांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस्च्या विरोधत मतदान केले हा त्या मतदारांचा विश्वासघात आहे. प्रादेशिक पक्ष : याबद्दलची मोदी शहा यांची भुमिका स्पष्ट आहे . हरयाणा , महाराष्ट्र आणि पंजाब मधे त्यांनी युती तोडली आहे. गोव्या मधे पण युती तोडली पाहिजे असे चालू आहे. त्यामुळे शिवसेनेने समंजसपणा दाखवूनही भाजपा ने युती टिकवलीच असती असे समजणे चुकीचे आहे. आता प्रश्न कालच्या गोंधळाचा : राजकीय समीकरणे काहीही असो , मी ज्यांच्या सोबत बोललो , चेपु वर, वैयक्तीक , किंवा आंजावर , सर्व सामान्य ( नमोरूग्ण नव्हे सामान्य !) लोकांचे एकच मत होते , भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यायला नको होता . यामुळे भाजपाची प्रतिमा मलीन झाली आहे.

In reply to by कपिलमुनी

समीरसूर 13/11/2014 - 15:01
शिवसेना कितीका मूर्ख असेना, भाजप रडीचा डाव खेळली यात शंका नाही. आवाजी मतदान काय, मूग गिळून गप्प राहणे काय, अगदीच तांत्रिक बाबींचा आधार घेऊन कार्यभाग साधणे काय...मोदींच्या डरकाळी फोडून कामाला लागण्याच्या अगदीच विपरित असे हे महाराष्ट्र भाजपचे वर्तन होते. खेळतांना लहान मुले कशी बोटावरची थुंकी बदलतात तसा पोरखेळ केला भाजपने. आणि याचे नुकसान भाजपला भोगावेच लागणार. शिवसेनेइतकीच गोंधळाची अवस्था भाजपची होती. राष्ट्रवादीने काहीही केले तरी आश्चर्य वाटत नाही; सत्तेसाठी अक्षरशः 'काहीही' करणे हा त्यांचा धर्मच आहे. पण भाजपने हा जो रडीचा डाव खेळला तो काही पचनी पडला नाही. अजय जडेजाने फिक्सिंग केले तर काही विशेष वाटत नाही; सचिनने केले तर कसे वाटेल?

In reply to by समीरसूर

कपिलमुनी 13/11/2014 - 16:13
अगदी हेच ! अ पार्टी विथ डिफरन्स आणि विपरीत वागणूक.

In reply to by कपिलमुनी

आनन्दा 13/11/2014 - 16:30
ह्म्म.. काल माझ्या मनात देखील असेच विचार होते.. पण नंतर मी शांतपणे विचार केला की तसेही दगडापेक्षा वीट मऊ. त्यांनी सत्ता कशी मिळवली यापेक्षा ती कशी राबवली हे जास्त महत्वाचे आहे. तसेही त्यांनी केले ते नैतिकतेला धरून नसेलही, पण बाकीचे जे वागत होते ती कोणती नैतिकता होती? त्यामुळे सध्या मी वेट अ‍ॅण्ड वॉच असे ठरवले आहे, तसेही माझ्या दॄष्टीने ते याच्या पुढे कसे काम करतात हे महत्वाचे. आत्ता नेमके काय तोडपाणी झाले आहे ते पुढच्या निवडणूकीच्या वेळेसच बाहेर येईल. तोपर्यंत वाट पाहणे एव्हढेच आपल्या हातात आहे. आणि मुख्य म्हणजे, आत्ता अश्या प्रकारे सत्ता मिळवल्यामुळे त्यांच्यावर अधिक दडपण असणार आहे. जर काम नाही केले तर त्यांचा मफलरवाल होईलच, त्यामुळे मला वाटते भाजपा यावेळेस अधिक प्रामाणिकपणे सत्ता राबवेल.

In reply to by समीरसूर

श्रीगुरुजी 13/11/2014 - 20:52
रडीच्या डावाचा प्रश्नच उद्भवत नाही. आवाजी मतदान हे पूर्णपणे कायदेशीर व घटनेला धरून आहे. यापूर्वी अनेकवेळा आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर केला गेला आहे. भाजपने आवाजी मतदान प्रक्रिया वापरली तर तो रडीचा डाव कसा होतो? >>> शिवसेनेइतकीच गोंधळाची अवस्था भाजपची होती. भाजप मुळीच गोंधळलेला नव्हता. अगदी व्यवस्थित योजना आखून व आपल्याला हवी ती कायदेशीर व घटनात्मक प्रक्रिया वापरून भाजपने विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेतलेला आहे. >>> अजय जडेजाने फिक्सिंग केले तर काही विशेष वाटत नाही; सचिनने केले तर कसे वाटेल? ही तुलना चुकीची आहे. फिक्सिंग हे मुळातच बेकायदेशीर आहे व फिक्सिंग हा फौजदारी गुन्हा आहे. आवाजी मतदान हे कायदेशीर व घटनेला धरून आहे.

श्रीगुरुजी - श्री गणेशा - श्री क्लिंटन वरिल सर्व प्रभुतींना माझा __/\/\__/\. वरिल सर्व प्रतिसादांचे वाचन करुन आमच्या राजकरणाविषयी ज्ञानात खुप भर पडत आहे. मला वाटते आज पर्यंत एकमेकांच्या विषयी मनात कसलेही किल्मिष न ठेवता फक्त ऊहापोह करण्याच्या उद्देशाने चाललेला प्रतिसादाला विनम्र प्रतिसाद देवुन आपले मुद्दे मांडत आहेत हा मि.पा च्या इतिसासात पहिल्यांदाच ठरतोय. इतर कोणी ही ह्या धाग्यावर उगाच भरकटवुन त्याची खिल्ली उडवु नये. स.पा मंडाळाला विनंती की अशा प्रतिसादाला पंख लावावेत.

In reply to by प्रमोद देर्देकर

कलंत्री 13/11/2014 - 15:24
मराठी माणसाच्या आवडीच्या क्षेत्रापैकी एक म्हणजे राजकारण. आजच्या राजकारणातील इतके असंख्य कंगोरे असू शकतात आणि त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध उलगडून सांगण्याबद्दल सर्वांचेच अभिनंदन. माझ्याही ज्ञानात भर पडली आहे हे मी नमूद करु इच्छितो.

श्रीगुरुजी 13/11/2014 - 14:55
>>> भाजपा समर्थक सारी चुक शिवसेनेची आहे असे गळे काढण्यात गुंतले आहेत. राजधर्म पाळायचा असतो एव्ढा साधा कॉमन सेन्स नाहिये. स्वत:ची ताकद भाजपच्या तुलनेत खूप कमी असताना स्वतः जास्त जागा लढविण्याचा हट्टाग्रह धरून बसणे आणि एकदा युती तुटल्यावर व्यक्तिगत पातळीवर उतरून असभ्य व नकारात्मक प्रचार करणे ही कोणाची चूक होती? राजधर्म पाळणे म्हणजे नक्की काय? एकदा युती तुटल्यावर भाजपने समंजसपणे शिवसेनेवर टीका न करता युतीधर्म पाळला होता. उलट शिवसेनेलाच युती तुटल्याचे वास्तव मानवले नाही व त्यांनी भाजपला मुख्य शत्रू मानून असभ्य व व्यक्तिगत टीका सुरू केली. राजधर्म भाजपनेच पाळला. शिवसेनेला ते जमले नाही. >>> जर राष्ट्रवादीचा पाठिंबा स्विकारला नाहिये तर तसा स्प्ष्ट सांगायची हिंमत दाखवायची. मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असा प्रकार आहे. राष्ट्रवादीने पाठिंबा स्वतःहून भाजपने न मागता दिला आहे. त्यावर भाजपने भूमिका घेण्यासारखे काहीही नव्हते. एखाद्या सज्जन उमेदवाराला निवडणुकीत गावातल्या गुंडांनी स्वतःहून मत दिले म्हणजे त्या माणसाने त्यांचा पाठिंबा घेतला असा अर्थ होत नाही. राष्ट्रवादीने स्वतःहून दिलेल्या एकतर्फी पाठिंब्याचा भाजपने अधिकृत स्वीकार न करता किंवा अधिकृतपणे न नाकारता शिवसेनेला नमविण्यासाठी योग्य तो उपयोग करून घेतला. >>> प्रादेशिक पक्ष : याबद्दलची मोदी शहा यांची भुमिका स्पष्ट आहे . हरयाणा , महाराष्ट्र आणि पंजाब मधे त्यांनी युती तोडली आहे. गोव्या मधे पण युती तोडली पाहिजे असे चालू आहे. पंजाब व गोव्यात प्रादेशिक पक्षांबरोबर युती शाबूत आहे. >>> त्यामुळे शिवसेनेने समंजसपणा दाखवूनही भाजपा ने युती टिकवलीच असती असे समजणे चुकीचे आहे. शिवसेनेने समंजसपणा दाखवून भाजपची १२५-१३० जागांची मागणी मान्य केली असती तर युती १०० टक्के टिकली असती. >>> राजकीय समीकरणे काहीही असो , मी ज्यांच्या सोबत बोललो , चेपु वर, वैयक्तीक , किंवा आंजावर , सर्व सामान्य ( नमोरूग्ण नव्हे सामान्य !) लोकांचे एकच मत होते , भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यायला नको होता . यामुळे भाजपाची प्रतिमा मलीन झाली आहे. भाजपला शिवसेना पाठिंबा देणार नाही, भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यायचा नाही अशा परिस्थितीत सरकार स्थापन न करणे हा एकच पर्याय शिल्लक होता. भाजपने राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या पाठिंब्याची कमीतकमी गरज पडावी या दृष्टीने ९ अपक्ष व इतर लहान पक्षांच्या ५-६ आमदारांचा आधीच पाठिंबा मिळविला आहे. राष्ट्रवादीने स्वतःहून पाठिंबा दिलेला आहे. भाजपने तो मागितलेला नाही.

In reply to by श्रीगुरुजी

आता तुम्ही भाजपाचे अधिकृत प्रभारी होण्याच्या मार्गावर आहे. थोडा अजुन लांगुलचालन करा. टिव्हीवर संधी मिळेल कारण इतकी भक्ती सध्या असणारे प्रभारी देखील दाखवत नाही.

In reply to by दिवाकर देशमुख

>>>>>हा शब्द तर पेपरात देखील असतो पेपर वाचत नाहीत का ? 'लांगूलचालन' हा शब्द मी कधी ऐकला नाही असा अर्थ तुम्ही काढता आहात. माझं वाक्य नीट वाचलंत तर कळेल, शब्द पहिल्यांदाच ऐकला असे म्हंटलेले नाही तर ह्या शब्दाचा 'प्रयोग' इथे अप्रस्तुत आहे असे म्हंटलेले आहे. 'लांगूलचालन' स्वार्थासाठी, सर्व लाजलज्जा सोडून, केले जाते. इथे तसे दिसत नाही. श्री. गुरुजी ह्यांचा एकूण घटनाक्रमाच्या विश्लेषणात कांही स्वार्थ दिसत नाही. म्हणून शब्दप्रयोग चुकीचा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

कपिलमुनी 13/11/2014 - 15:11
राजधर्म पाळणे म्हणजे नक्की काय ? १.पूर्ण १४४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देणे आणि मग आवाजी मतदान घेणे. २.जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे त्या जनतेला सत्य सांगणे. ३. विरोधी पक्षाला त्यांचे म्हणने मांडायची संधी देणे. >>राष्ट्रवादीने पाठिंबा स्वतःहून भाजपने न मागता दिला आहे त्यांनी दिला आहे पण भाजपाने तो पाठिंबा स्वीकारला आहे की नाहे ते एक मतदार म्हणून मला / जनतेला समजले पाहिजे जर त्यांनी स्वीकारला नसेल तर सरकार अल्पमतात आहे. स्वीकारला आहे तर तसा सांगावा. आणि पवारांच्या राजकारणा मधे फुकट काही नसता हे महाराष्ट्रामधला शेंबड पोर देखील सांगेल . त्यामुळे पवारांचा पाठिंबा जाहीरपणे स्वीकारता येत नसेल तरी काय देवेघेव झाली हे कळेलच. >>>राष्ट्रवादीने स्वतःहून दिलेल्या एकतर्फी पाठिंब्याचा भाजपने अधिकृत स्वीकार न करता किंवा अधिकृतपणे न नाकारता शिवसेनेला नमविण्यासाठी योग्य तो उपयोग करून घेतला. शिवसेना काय मागत होती या पेक्षा भाजपा त्यांना किती मंत्रीपदे किंवा सहभाग देत होती ? लोकसभेच्या निवडणुकीनंतर केवळ एक कमी महत्वाचे पद आपल्या सर्वात जुन्या सहकार्‍याला दिले होते , हे विसरलात का?? आणि सरकार एनडीए असून देखील इतर पक्षांना न्याय वाटा मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे . मी व कित्येक लोकांनी भाजपाला समर्थन केले होते पण कुठल्याही परीस्थितीमधे राष्ट्रवादी हा योग्य साथीदार नाहिये. आणि राष्त्रवादीच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापले म्हणत असतील तर " खोटा बोला पण रेटून बोला" च्या साथीची लागण झाली आहे .

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी 13/11/2014 - 21:05
>>> १.पूर्ण १४४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देणे आणि मग आवाजी मतदान घेणे. याची गरजच नव्हती. घटनेनुसार राज्यपाल राजभवनात बहुमत सिद्ध करायला सांगू शकत नाहीत. >>> २.जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे त्या जनतेला सत्य सांगणे. सत्य म्हणजे नक्की काय सांगायचं आहे? >>> ३. विरोधी पक्षाला त्यांचे म्हणने मांडायची संधी देणे. जेव्हा नव्याने प्रथमच सरकार स्थापन होत असते तेव्हा विश्वासदर्शक ठरावावर फक्त मतदान होते. त्या ठरावावर भाषणे होत नसतात. सरकार स्थापन झाल्यानंतर कालांतराने अविश्वासदर्शक किंवा विश्वासदर्शक ठराव आला तर त्यावर दोन्ही बाजूंना आपले विचार मांडायची संधी असते. >> >> राष्ट्रवादीने पाठिंबा स्वतःहून भाजपने न मागता दिला आहे >> त्यांनी दिला आहे पण भाजपाने तो पाठिंबा स्वीकारला आहे की नाहे ते एक मतदार म्हणून मला / जनतेला समजले पाहिजे एक मतदार म्हणून हे समजण्याची मला गरज वाटत नाही. >>> जर त्यांनी स्वीकारला नसेल तर सरकार अल्पमतात आहे. स्वीकारला आहे तर तसा सांगावा. आणि पवारांच्या राजकारणा मधे फुकट काही नसता हे महाराष्ट्रामधला शेंबड पोर देखील सांगेल . त्यामुळे पवारांचा पाठिंबा जाहीरपणे स्वीकारता येत नसेल तरी काय देवेघेव झाली हे कळेलच. नुसते स्पेक्युलेशन करण्यापेक्षा काही ठोस माहिती असेल तर ते सांगा. >>> शिवसेना काय मागत होती या पेक्षा भाजपा त्यांना किती मंत्रीपदे किंवा सहभाग देत होती ? लोकसभेच्या निवडणुकीनंतर केवळ एक कमी महत्वाचे पद आपल्या सर्वात जुन्या सहकार्‍याला दिले होते , हे विसरलात का?? आणि सरकार एनडीए असून देखील इतर पक्षांना न्याय वाटा मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे . शिवसेनेने भाजपला २५ वर्षे आपल्या तालावर नाचविले. भाजपच्या जीवावर शिवसेनेने माज केला. पीक पिकवायचे भाजपने व पीक कापून न्यायचे सेनेने असेच २५ वर्षे चालत आले. ठाणे (राम कापसे), शिवाजीनगर (अण्णा जोशी) अशा अनेक मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी मेहनत करून आपला पक्ष वाढविला. पण युती झाल्यावर शिवसेनेने दांडगाई करून हे मतदारसंघ लाटले. भाजपने संधी मिळताच आपले सामर्थ्य वाढवून सेनेचे जोखड मानेवरून उतरविले. >>> मी व कित्येक लोकांनी भाजपाला समर्थन केले होते पण कुठल्याही परीस्थितीमधे राष्ट्रवादी हा योग्य साथीदार नाहिये. आणि राष्त्रवादीच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापले म्हणत असतील तर " खोटा बोला पण रेटून बोला" च्या साथीची लागण झाली आहे. सरकार राष्ट्रवादीच्या पाठिंब्याशिवायच आहे. भाजपकडे १३५+ आमदारांचे समर्थन आहे. विरोधात फक्त १०४ आमदार आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

आनन्दा 13/11/2014 - 21:25
>> >> राष्ट्रवादीने पाठिंबा स्वतःहून भाजपने न मागता दिला आहे >> त्यांनी दिला आहे पण भाजपाने तो पाठिंबा स्वीकारला आहे की नाहे ते एक मतदार म्हणून मला / जनतेला समजले पाहिजे एक मतदार म्हणून हे समजण्याची मला गरज वाटत नाही.
याच्याशी असहमत. बाकी ठीक आहे. भाजपाने तो पाठिंबा स्वीकरला आहे की नाही हे लवकरच कळेल, स्वीकारला नसेल तर तसे त्यांना आता कृतीतून सिद्ध करावे लागेल...

In reply to by श्रीगुरुजी

कपिलमुनी 14/11/2014 - 15:58
>>घटनेनुसार राज्यपाल राजभवनात बहुमत सिद्ध करायला सांगू शकत नाहीत. मला याबद्दल माहीती नाही . पण पूर्वी स्पष्ट बहुमत नसताना अशी यादी कीम्वा पाठिंब्याचे पत्र दिल्याचे स्मरते . विदा शोधून देतो. >>> २.जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे त्या जनतेला सत्य सांगणे. सत्य म्हणजे नक्की काय सांगायचं आहे? तुमच्याकडे नक्की किती आमदार आहेत , कोण तटस्थ आणि कोण विरोधी आहे. >>> ३. विरोधी पक्षाला त्यांचे म्हणने मांडायची संधी देणे. जेव्हा नव्याने प्रथमच सरकार स्थापन होत असते तेव्हा विश्वासदर्शक ठरावावर फक्त मतदान होते. त्या ठरावावर भाषणे होत नसतात. सरकार स्थापन झाल्यानंतर कालांतराने अविश्वासदर्शक किंवा विश्वासदर्शक ठराव आला तर त्यावर दोन्ही बाजूंना आपले विचार मांडायची संधी असते. >>> अचानक कार्यक्रम पत्रिकेवरचे विषय बदलणे , त्या नंतर बाहेर गेलेल्या आमदारांना आत येउ देण्याच्या अगोदर ठराव मांडणे.. ठरावानंतर ५ -१ ० मिनिट वेळ दिला जातो आणि नंतर बेल वाजते आणि मग मतदान होते. आवाजी मतदान घेणार आहे असे नमूद करून त्याच्यावर हरकतीला वेळ देणे ईई. हे फक्त नैतिक आणि सदसदविवेक बुद्धीनुसार वागणार्‍यांसाठी , चलाखी करणार्‍यांसाठी या अपेक्षा नाहीतच . >> >> राष्ट्रवादीने पाठिंबा स्वतःहून भाजपने न मागता दिला आहे >> त्यांनी दिला आहे पण भाजपाने तो पाठिंबा स्वीकारला आहे की नाहे ते एक मतदार म्हणून मला / जनतेला समजले पाहिजे एक मतदार म्हणून हे समजण्याची मला गरज वाटत नाही. >> तुम्हाला गरज वाटत नसेल पण या धाग्यावर आणि इतर अनेक लोकांना ती वाटत आहे . आणि पारदशिकतेच्या मुद्द्यावर ते कळालेच पाहिजे. >>> जर त्यांनी स्वीकारला नसेल तर सरकार अल्पमतात आहे. स्वीकारला आहे तर तसा सांगावा. आणि पवारांच्या राजकारणा मधे फुकट काही नसता हे महाराष्ट्रामधला शेंबड पोर देखील सांगेल . त्यामुळे पवारांचा पाठिंबा जाहीरपणे स्वीकारता येत नसेल तरी काय देवेघेव झाली हे कळेलच. नुसते स्पेक्युलेशन करण्यापेक्षा काही ठोस माहिती असेल तर ते सांगा. >> पूर्वी ज्या आरक्षणांना भाजप विरोध करत होती त्याला राज्य सरकार आज सपोर्ट करत आहे. आणि बाकी अजित पवार , भुजबळ , तटकरे यांच्या अटके नंतर बोलूच ( कोण हसतय रे तिकडे ;) ) >>> शिवसेना काय मागत होती या पेक्षा भाजपा त्यांना किती मंत्रीपदे किंवा सहभाग देत होती ? लोकसभेच्या निवडणुकीनंतर केवळ एक कमी महत्वाचे पद आपल्या सर्वात जुन्या सहकार्‍याला दिले होते , हे विसरलात का?? आणि सरकार एनडीए असून देखील इतर पक्षांना न्याय वाटा मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे . शिवसेनेने भाजपला २५ वर्षे आपल्या तालावर नाचविले. भाजपच्या जीवावर शिवसेनेने माज केला. पीक पिकवायचे भाजपने व पीक कापून न्यायचे सेनेने असेच २५ वर्षे चालत आले. ठाणे (राम कापसे), शिवाजीनगर (अण्णा जोशी) अशा अनेक मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी मेहनत करून आपला पक्ष वाढविला. पण युती झाल्यावर शिवसेनेने दांडगाई करून हे मतदारसंघ लाटले. भाजपने संधी मिळताच आपले सामर्थ्य वाढवून सेनेचे जोखड मानेवरून उतरविले. >> भाजपा त्यांना किती मंत्रीपदे किंवा सहभाग देत होती .. याचे उत्तर शेवटपर्यंत दिलेच नहीत . आणि शिवसेनेचे जोखड लोकसभेला का नाही फेकून दिले ? एवढा त्रास होता तर लोकसभेपासून वेगळा व्ह्यायचा . >>> मी व कित्येक लोकांनी भाजपाला समर्थन केले होते पण कुठल्याही परीस्थितीमधे राष्ट्रवादी हा योग्य साथीदार नाहिये. आणि राष्त्रवादीच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापले म्हणत असतील तर " खोटा बोला पण रेटून बोला" च्या साथीची लागण झाली आहे. सरकार राष्ट्रवादीच्या पाठिंब्याशिवायच आहे. भाजपकडे १३५+ आमदारांचे समर्थन आहे. विरोधात फक्त १०४ आमदार आहेत. अहो हेच तर अजून कोणी बोलला नाहिये ना ! राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे असे ते सांगत आहेत . फडणवीस यांनी आम्ही तो स्वीकारला नाहीये असा स्टेट्मेंट दिला नाहिये अजून. ठरावानंतर असे स्टेट्मेंट दिले असेल तर दाखवा . आणि १३५ असतील तर ते बहुमत कसे ? फडणवीस खोटा बोलत आहेत का ?

In reply to by कपिलमुनी

क्लिंटन 14/11/2014 - 19:05
वरील प्रतिसादात बर्‍याच गोष्टी स्पष्ट करणे गरजेचे वाटते.
मला याबद्दल माहीती नाही . पण पूर्वी स्पष्ट बहुमत नसताना अशी यादी कीम्वा पाठिंब्याचे पत्र दिल्याचे स्मरते . विदा शोधून देतो.
कोणाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करायचे हा राष्ट्रपतींचा/राज्यपालांचा विशेषाधिकार असतो. के.आर.नारायणन यांनी १९९८ मध्ये सरकार स्थापन करायला वाजपेयींना आमंत्रित केले त्यापूर्वी समर्थनाची पत्रे घेतली होती.हा मार्ग नारायणन यांना योग्य वाटला.पण तसे राष्ट्रपती/राज्यपालांनी केलेच पाहिजे असा घटनात्मक दंडक अजिबात नाही.
जेव्हा नव्याने प्रथमच सरकार स्थापन होत असते तेव्हा विश्वासदर्शक ठरावावर फक्त मतदान होते. त्या ठरावावर भाषणे होत नसतात. सरकार स्थापन झाल्यानंतर कालांतराने अविश्वासदर्शक किंवा विश्वासदर्शक ठराव आला तर त्यावर दोन्ही बाजूंना आपले विचार मांडायची संधी असते.
हे नक्की कोणत्या आधारावर लिहिता?तो रेफरन्स सांगा मग पुढील चर्चा (गरज पडल्यास) करता येईल.
अचानक कार्यक्रम पत्रिकेवरचे विषय बदलणे , त्या नंतर बाहेर गेलेल्या आमदारांना आत येउ देण्याच्या अगोदर ठराव मांडणे.. ठरावानंतर ५ -१ ० मिनिट वेळ दिला जातो आणि नंतर बेल वाजते आणि मग मतदान होते. आवाजी मतदान घेणार आहे असे नमूद करून त्याच्यावर हरकतीला वेळ देणे ईई. हे फक्त नैतिक आणि सदसदविवेक बुद्धीनुसार वागणार्‍यांसाठी , चलाखी करणार्‍यांसाठी या अपेक्षा नाहीतच .
एक गोष्ट समजत नाही आवाजी मतदान या गोष्टीविषयी परवापासून अचानक आक्षेप का उफाळून आले आहेत? आवाजी मतदान ही पूर्णपणे संकेतांना आणि लोकशाहीच्या स्पिरीटला धरूनच असलेली संकल्पना आहे.
आणि शिवसेनेचे जोखड लोकसभेला का नाही फेकून दिले ? एवढा त्रास होता तर लोकसभेपासून वेगळा व्ह्यायचा .
शिवसेनेचे जोखड भाजपने फेकून द्यायला हवे होते का? असल्यास कधी? या प्रश्नाची उत्तरे भाजपच्या नेतृत्वावरच सोडलेली बरी नाही का? एक गोष्ट समजत नाही.भाजपने काय करायला हवे याची इतरांनाच काळजी फार जास्त असते. मागच्या वर्षीही मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार केले तेव्हा सुषमा स्वराज का नाहीत, शिवराजसिंग चौहान का नाहीत, उत्तर प्रदेशातील कोणी नेता का नाही, अमका का नाही, तमका का नाही असे एकना दोन हजार प्रश्न भाजप बाहेरच्यांनाच पडलेले होते.आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असावा हे भाजपच्या कार्यकर्त्यांनी अडवाणींच्या घरासमोर निदर्शने करून सांगितलेच की आणि तो सिग्नल पक्ष नेतृत्वाने मान्य केला. तुम्हाला मोदी मान्य नसतील तर मत देऊ नका.भाजपाने काय करावे याची फुकटची चिंता इतरांना कशाला? त्याचप्रमाणे शिवसेनेशी युती तोडायला हवी होती का नाही, कधी याची चिंता इतरांना कशाला?
आणि १३५ असतील तर ते बहुमत कसे ? फडणवीस खोटा बोलत आहेत का ?
ठिक आहे ना. १३५ हे बहुमत नसेल तरी अल्पमतातील सरकार तर आहेच ना. नरसिंह रावांचेही सरकार पहिले अडीच वर्षे अल्पमतात होते.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 14/11/2014 - 19:12
आणि हो. फडणवीसांनी अल्पमतातले सरकार चालविले आणि ते चालले आणि सत्तेत राहण्यासाठी राष्ट्रवादीशी कोणत्याही प्रकारच्या तडजोडी केल्या नाहीत तर माझे स्वतःचे तरी या सरकारविषयी आक्षेप राहणार नाही.पण तशा कोणत्याही तडजोडी केल्या जात नाहीत हे दाखवून द्यायची जबाबदारी मात्र फडणवीसांचीच.

In reply to by क्लिंटन

हाडक्या 14/11/2014 - 19:59
+१ .. क्लिंटन, आपली मते बर्‍याच अंशी पटतायत. जरी भाजपबद्दल आदर एवढा नसला तरी या घटनाक्रमाने तो थोडा कमीच झलाय असे म्हणेन. याउप्पर आपण म्हणता तसे फडणवीस सरकार कसे ही जबाब्दारी (तडजोडी करत नाही आहोत हे दाखवण्याची) त्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असतील. (जाता जाता थोडे अवांतर : याच प्रकारच्या प्रसंगातून केजरिवाल पण गेले होते, तेव्हा त्यांनी आवाजी मतदानाचा सेफ मार्ग घ्यायला हवा होता असे वाटतेय, पण ते राजकीय चातुर्यात कमी पडले असावेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जे लोक आत्ता या सरकारसाठी वाट बघायला तयार आहेत तेच लोक मात्र तेव्हा 'काँग्रेसची बी-टीम' म्हणायला दोन दिवस पण थांबले नव्हते असे निरिक्षण नोंदवतो. ;) 'शेवटी आपला तो बाब्या' हे अभ्यासू विश्लेषकांनाही सुटलेले नाही तर.. )

In reply to by हाडक्या

क्लिंटन 14/11/2014 - 22:44
आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जे लोक आत्ता या सरकारसाठी वाट बघायला तयार आहेत तेच लोक मात्र तेव्हा 'काँग्रेसची बी-टीम' म्हणायला दोन दिवस पण थांबले नव्हते असे निरिक्षण नोंदवतो. Wink 'शेवटी आपला तो बाब्या' हे अभ्यासू विश्लेषकांनाही सुटलेले नाही तर..
नाही हो इतरांचे माहित नाही. आणि मी अभ्यासू आहे की विश्लेषक आहे की दोन्ही नाही हे मला माहित नाही.तरीही हा उपप्रतिसाद माझ्या प्रतिसादावर दिला आहे तेव्हा माझ्यापुरते तरी सांगतो.कोणत्याही पक्षाविषयीची मते बनविताना तो पक्ष नक्की कोणते पॅकेज देत आहे आणि त्या पॅकेजची अंमलबजावणी करायची त्या पक्षाची आणि नेत्याची क्षमता आहे की नाही या गोष्टी बघून मी माझी मते ठरवत असतो.पॅकेजमधील सगळ्या गोष्टी मला मान्य असतीलच असे नाही आणि एखाद्या पक्षाच्या पॅकेजमधल्या चार गोष्टी मला आवडल्या नाहीत म्हणून दुसऱ्या पक्षाच्या पॅकेजमधल्या ४० गोष्टी आवडत नसतानाही त्या दुसऱ्या पक्षाचे समर्थन मला तरी करता येत नाही. मुळातच अण्णांचे आंदोलन आणि जनलोकपालची स्वप्नाळू मागणी या दोन्ही गोष्टींचा अगदी मी पहिल्या दिवसापासून विरोधक होतो.ते त्यावेळी मी मिसळपाववरही लिहिले होते.त्याच आंदोलनातून पुढे आलेल्या आम आदमी पक्षाविषयी माझे तरी चांगले मत असायचा संबंधच नव्हता.तसेच प्रशांत भूषण सारख्यांनी काश्मीरवरती उधळलेली मुक्ताफळे मला तरी अजिबात मान्य नव्हती.आणि मुळातल्या नव्या पक्षात त्याच प्रशांत भूषण सारख्यांना महत्वाचे नेतेपद दिले गेल्यामुळे आआपचे समर्थन मी करूच शकत नव्हतो.आणि त्यातून वीजेची बिलेच भरू नका, तोडलेले मीटर स्वत: जोडणे अशा अराजकतावादी प्रकारामुळे त्या पक्षाविषयी मत आणखी वाईट झाले.तेव्हा त्या पक्षाचे पॅकेज मला मुळातच आवडलेले नव्हते. तेव्हा माझे मत ज्या पक्षाविषयी मुळातच वाईट मत होते त्या पक्षाने परत कॉंग्रेसचा पाठिंबा घेतला हा एक ट्रिगर होता असे म्हणता येईल फारतर. कदाचित आआप जर आर्थिकदृष्ट्या उजवा आणि राष्ट्रवादी असता आणि नंबर मिळवायला कॉंग्रेसचा पाठिंबा घेतला असता तर कदाचित मी त्या पक्षाला कॉंग्रेसची बी टिम असे म्हटलेही नसते. आणि समजा आआपला स्वबळावर बहुमत मिळाले असते आणि कॉंग्रेसचा पाठिंबा घेतला नसता तरी त्या पक्षाचे पॅकेज मला मुळातच मान्य नसल्यामुळे त्या परिस्थितीतही त्या पक्षावर मी टिकाच केली असती--कॉंग्रेसची बी टिम असे म्हटले नसते तर दुसरे काही म्हटले असते.हे आत्याबाईला मिशा असत्या तर अशा टाइपचे झाले तरीही मला वाटते माझा मुद्दा मी स्पष्ट केला आहे. महाराष्ट्रातील परिस्थितीशी तुलना केल्यावर असे दिसते की भाजपच्या पॅकेजमध्ये राष्ट्रवादी ही मोठी पोखरणारी अळी आली आहे ती सगळ्या गोष्टींचा सत्यानाश करू शकेल.त्यामुळे महाराष्ट्र लेव्हलवर तरी वरकरणी कितीही चांगले वाटणारे पॅकेज भाजप देत असेल तरीही ती अळी आहे तोपर्यंत त्या पॅकेजवर विश्वास वाटणार नाही.तरीही पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वावर नक्कीच विश्वास आहे.त्यामुळे पक्ष म्हणून अजून तरी माझे मत विधानसभा लेव्हलला भाजपला समर्थन न द्यायचे असले तरी लोकसभा निवडणुकांसाठी नक्कीच तसे नाही. आता हा प्रकार म्हणजे 'आपला तो बाब्या' असा होतो की नाही मला माहित नाही आणि ते माहित करून घेण्यात फारसा रसही नाही.

In reply to by क्लिंटन

अनन्त अवधुत 15/11/2014 - 02:46
+१ मला भाजपा + राष्ट्रवादी हि युती फारच अनैसर्गिक वाटते (अजूनही). सुबोध खरे यांचा "भाजपा कडे याच्या पेक्षा चांगला पर्याय उपलब्ध पर्याय नाही" हे विश्लेषण पटले. जोवर सत्तेत राहण्यासाठी राष्ट्रवादीशी कोणत्याही प्रकारच्या तडजोडी केल्या नाहीत तर माझे स्वतःचे तरी या सरकारविषयी आक्षेप राहणार नाही.

In reply to by अनन्त अवधुत

हाडक्या 15/11/2014 - 22:28
एवढाच साधक बाधक विचार 'आप' साठी का बरे कोणी केला नसावा असा प्रश्न पडतो. ते ही अशाच अगदी अश्शाच प्रसंगातून गेले होते ना ?

In reply to by क्लिंटन

कपिलमुनी 19/11/2014 - 14:44
>>> १.पूर्ण १४४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देणे आणि मग आवाजी मतदान घेणे. याची गरजच नव्हती. घटनेनुसार राज्यपाल राजभवनात बहुमत सिद्ध करायला सांगू शकत नाहीत.
असे श्रीगुरुजींनी लिहिले होते. मला नक्की रेफरन्स ( १९९८ चा ) आठवत नव्हता.
पण तसे राष्ट्रपती/राज्यपालांनी केलेच पाहिजे असा घटनात्मक दंडक अजिबात नाही.
तसे असेल तर ठीकच आहे . पण शेवटी मुद्दा तोच येतो सध्याचे सरकार तांत्रिक द्रूष्ट्या बहुमतात आहे पण नैतिकतेचे काय ? ( ती बासनात गुंडाळली आहेच ) सध्या पवारांनी राष्ट्रवादी तटस्थ होती असे सांगून संभ्रम दूर केला . पण मुख्यमंत्र्यांचे हे काम होते की नक्की किती आमदार त्यांच्या सोबत आहेत ते जनतेला सांगितले पाहिजे.
जेव्हा नव्याने प्रथमच सरकार स्थापन होत असते तेव्हा विश्वासदर्शक ठरावावर फक्त मतदान होते. त्या ठरावावर भाषणे होत नसतात. सरकार स्थापन झाल्यानंतर कालांतराने अविश्वासदर्शक किंवा विश्वासदर्शक ठराव आला तर त्यावर दोन्ही बाजूंना आपले विचार मांडायची संधी असते.
हे श्रीगुरुजींनी लिहिले आहे . त्याचे स्पष्टीकरण ते देतीलच !
एक गोष्ट समजत नाही आवाजी मतदान या गोष्टीविषयी परवापासून अचानक आक्षेप का उफाळून आले आहेत? आवाजी मतदान ही पूर्णपणे संकेतांना आणि लोकशाहीच्या स्पिरीटला धरूनच असलेली संकल्पना आहे.
आवाजी मतदानाला आक्षेप मुळीच नाहिये. आ़क्षेप संभ्रमावस्थेला, अपारदर्शकतेला आणि राष्ट्रवादीला सोबत घेण्याबद्दल आहे . मतदानाच्या अगोदर किंवा मतदानानंतर मुख्यमंत्र्यांनी / अध्यक्षांनी सांगितला असता , राष्ट्रवादी तटस्थ राहिली आहे तर ते एव्ढा गदारोळ झालाच नसता. लोकसभेमधे पण आवाजी मतदानच झाले तेव्हा कोणीच आक्षेप घेतला नाही. कारण स्पष्ट बहुमत होते. सरकार निवडण्याची प्रक्रिया शक्यतो संशयातीत असावी एवढीच अपेक्षा . एक्दा बहुमत सिद्ध झाले की पुढे ५ वर्ष आवाजी मतदान चालतेच.
आणि शिवसेनेचे जोखड लोकसभेला का नाही फेकून दिले ? एवढा त्रास होता तर लोकसभेपासून वेगळा व्ह्यायचा
शिवसेनेने भाजपला २५ वर्षे आपल्या तालावर नाचविले. भाजपच्या जीवावर शिवसेनेने माज केला. पीक पिकवायचे भाजपने व पीक कापून न्यायचे सेनेने असेच २५ वर्षे चालत आले.
श्रीगुरुजींचा शिवसेनेबद्दल बराच त्रागा चालला होता, आता ते अधिकृत प्रवक्ते असल्याने विचारले , एव्ढा त्रास , मानहानी होती तर अगोदरच जोखड फेकायचा . भाजपाने काय करावे हा पक्षाचा प्रश्न आसला तरी ते आमच्याकडे मत मागायला येतात , त्यामुळे त्यांच्या भुमिकेवर मतप्रदर्शन करणे ( आवडली तर आवडली , नाही आवडली तर नाही ) हा मतदारांचा हक्कच आहे.
शिवसेनेशी युती तोडायला हवी होती का नाही, कधी याची चिंता इतरांना कशाला?
कारण लोकसभेला यांनी सेनेशी लग्न लावल्याने आमच्याकडे सेनेचा खासदार आहे आणि आता भाजपाचा आमदार म्हणून चिंता , यांच्या कोलांट्याउड्यामुळे लोकांचा नुकसान होतय .
१३५ हे बहुमत नसेल तरी अल्पमतातील सरकार तर आहेच ना
अल्पमतातील सरकारला मुळीच विरोध नाही. कित्येक अल्पमतातील सरकारांनी आपले कालखंड यशस्वी पूर्ण केले अहेत. पण मग फडणवीस बहुमताचा दावा का करत होते ? त्यांनी कुठेही सांगितला नाही , माझे सरकार अल्पमतातील आहे किंवा राष्त्रवादी तटस्थ आहे. बादवे , तुमचा अभ्यास खूप आहे म्हणून एक शंका, काँग्रेसचे ५ आमदार निलंबित आहेत, समजा अजून ५ म्हणजे एकूण १० आमदार निलंबित झाले तर २७७ पैकी १३९ आमदारांचे मत मिळाले तर बहुमत सिद्ध होउ शकते का ? निलंबित आमदारांस मतदानाचा हक्क असतो का

In reply to by कपिलमुनी

क्लिंटन 19/11/2014 - 15:29
पण शेवटी मुद्दा तोच येतो सध्याचे सरकार तांत्रिक द्रूष्ट्या बहुमतात आहे पण नैतिकतेचे काय ? ( ती बासनात गुंडाळली आहेच )
भारतीय राजकारणातून नैतिकता तर कधीचीच बासनात गुंडाळली आहे.आणि सगळे पक्ष त्या गुन्ह्यात कमीअधिक प्रमाणात सहभागी आहेत. लोकसभा आणि राज्यसभा मिळून सुमारे ८०० तर विविध विधानसभांमध्ये मिळून ३००० असे ३८०० शत प्रतिशत स्वच्छ चारित्र्याचे निस्पृह प्रतिनिधी आपल्याला १२० कोटींच्या भारतात मिळत नाहीत याचा अर्थ आपणही त्या गुन्ह्यात अप्रत्यक्षपणे सामील आहोत.असो.
सध्या पवारांनी राष्ट्रवादी तटस्थ होती असे सांगून संभ्रम दूर केला . पण मुख्यमंत्र्यांचे हे काम होते की नक्की किती आमदार त्यांच्या सोबत आहेत ते जनतेला सांगितले पाहिजे.
तांत्रिकदृष्या अल्पमतातील सरकारही पराभव होत नाही तोपर्यंत सत्तेत राहू शकते. १९९१ ते १९९३ या काळात नरसिंह रावांकडे बहुमत नव्हते तरीही त्यांच्या सरकारचा पराभव झाला नव्हता म्हणून ते अल्पमतातील सरकारही सत्तेत टिकून होते.
कारण लोकसभेला यांनी सेनेशी लग्न लावल्याने आमच्याकडे सेनेचा खासदार आहे आणि आता भाजपाचा आमदार म्हणून चिंता , यांच्या कोलांट्याउड्यामुळे लोकांचा नुकसान होतय .
असे कधीही होऊ शकते.सांगलीत प्रथमच भाजपने लोकसभेची जागा जिंकली पण तासगावमधून आर.आर आबाच निवडून गेले.
पण मग फडणवीस बहुमताचा दावा का करत होते ? त्यांनी कुठेही सांगितला नाही , माझे सरकार अल्पमतातील आहे किंवा राष्त्रवादी तटस्थ आहे.
हा राजकारणाचाच भाग असायची शक्यता जास्त. अशा अनेक गोष्टी राजकारणी उघड करत नसतात. १९९८ मध्ये तेलुगु देसमचे जी.एम.सी बालयोगी लोकसभा अध्यक्ष म्हणून निवडून गेले त्यावेळी तेलुगु देसम भाजपप्रणीत आघाडीचा भाग बनणार की नाही हे दोन्ही पक्षांनी उघड केले नव्हते. पहिल्यांदा तेलुगु देसम तटस्थ राहणार असे सांगितले जात होते. वाजपेयींच्या विश्वासदर्शक ठरावावर सरकारला २७४ आणि विरोधात २६१ मते मिळाली. सरकारला २७४ हा आकडा आला याचाच अर्थ तेलुगु देसमच्या इतर ११ (अध्यक्ष वगळून) खासदारांनी सरकारच्या बाजूने मतदान केले हे स्पष्ट झाले.त्यावेळीच पक्षाची भूमिका कळली. १९९९ मध्ये वाजपेयींचे सरकार एका मताने पडले त्यावेळी मतदान झाले होते शनीवार १७ एप्रिल १९९९ रोजी. त्याच्या आधल्या दिवशी रात्री उशीरा मायावतींनी त्यांच्या पक्षाचे पाच खासदार तटस्थ राहतील असे लोकसभेत जाहिर केले होते (यह लडाई सापनाथ और नागनाथ के बीच मै है. हम इस लडाई मै किसी का पक्ष नही ले सकते). तरीही आयत्या वेळी मायावतींच्या पाच खासदारांनी सरकारविरोधी मत दिले. प्रत्येक वेळी नेत्यांनी जे काही ठरले असेल ते जगजाहीर करावे ही अपेक्षा आपल्याला करता येणार नाही. प्रतिपक्षाची दिशाभूल करायला असे कात्रजचे घाट मधूनमधून दाखविले जातातच.
काँग्रेसचे ५ आमदार निलंबित आहेत, समजा अजून ५ म्हणजे एकूण १० आमदार निलंबित झाले तर २७७ पैकी १३९ आमदारांचे मत मिळाले तर बहुमत सिद्ध होउ शकते का ? निलंबित आमदारांस मतदानाचा हक्क असतो का
नाही निलंबित आमदारांना मतदानाचा हक्क नसतो. बहुमत म्हणजे सभागृहात हजर असलेल्या सदस्यांपैकी जितके सदस्य मत देतात त्यात सरकारच्या बाजूने जास्त मते मिळणे. ही मते एकूण सभागृहाच्या सदस्यसंख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त असतीलच असे नाही.

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी 14/11/2014 - 21:01
>>> अचानक कार्यक्रम पत्रिकेवरचे विषय बदलणे , त्या नंतर बाहेर गेलेल्या आमदारांना आत येउ देण्याच्या अगोदर ठराव मांडणे.. ठरावानंतर ५ -१ ० मिनिट वेळ दिला जातो आणि नंतर बेल वाजते आणि मग मतदान होते. आवाजी मतदान घेणार आहे असे नमूद करून त्याच्यावर हरकतीला वेळ देणे ईई. कार्यक्रम पत्रिकेवरील पहिला विषय सभापतींची निवड हा होता. तो त्या क्रमानुसारच पार पडला. आपले उमेदवार मागे घेऊन शिवसेना व काँग्रेसने भाजपकडे पुरेसे बहुमत आहे हे मान्य केले होते. दुसरा विषय हा विरोधी पक्षनेत्याची निवड होता व तिसरा विषय विश्वासदर्शक ठरावावरील मतदान होता. जोपर्यंत सत्ताधारी पक्षाच्या बाजूने कोण व विरोधात कोण हे नक्की होत नाही तो पर्यंत अधिकृत विरोधी पक्ष कोण हे ठरू शकत नव्हते. विश्वासदर्शक ठरावावरील मतदानानंतरच अधिकृत विरोधी पक्ष कोणता हे ठरणार होते. त्यामुळे दुसर्‍या व तिसर्‍या विषयांची अदलाबदल हा योग्य निर्णय होता. >>> हे फक्त नैतिक आणि सदसदविवेक बुद्धीनुसार वागणार्‍यांसाठी , चलाखी करणार्‍यांसाठी या अपेक्षा नाहीतच . नैतिक/अनैतिक या सापेक्ष कल्पना आहेत. घटनेत नैतिक/अनैतिकतेची व्याख्या नाही. __________________________________________________________________________ >> >> राष्ट्रवादीने पाठिंबा स्वतःहून भाजपने न मागता दिला आहे >> त्यांनी दिला आहे पण भाजपाने तो पाठिंबा स्वीकारला आहे की नाहे ते एक मतदार म्हणून मला / जनतेला समजले पाहिजे एक मतदार म्हणून हे समजण्याची मला गरज वाटत नाही. >> तुम्हाला गरज वाटत नसेल पण या धाग्यावर आणि इतर अनेक लोकांना ती वाटत आहे . आणि पारदशिकतेच्या मुद्द्यावर ते कळालेच पाहिजे. राष्ट्रवादीचा पाठिंबा दुर्लक्षिलेला आहे. _________________________________________________________________________ ____________________________________________________________________________ >>> जर त्यांनी स्वीकारला नसेल तर सरकार अल्पमतात आहे. स्वीकारला आहे तर तसा सांगावा. आणि पवारांच्या राजकारणा मधे फुकट काही नसता हे महाराष्ट्रामधला शेंबड पोर देखील सांगेल . त्यामुळे पवारांचा पाठिंबा जाहीरपणे स्वीकारता येत नसेल तरी काय देवेघेव झाली हे कळेलच. नुसते स्पेक्युलेशन करण्यापेक्षा काही ठोस माहिती असेल तर ते सांगा. >> पूर्वी ज्या आरक्षणांना भाजप विरोध करत होती त्याला राज्य सरकार आज सपोर्ट करत आहे. आणि बाकी अजित पवार , भुजबळ , तटकरे यांच्या अटके नंतर बोलूच ( कोण हसतय रे तिकडे ) कोणती आरक्षणे? ____________________________________________________________________________ >> भाजपा त्यांना किती मंत्रीपदे किंवा सहभाग देत होती .. याचे उत्तर शेवटपर्यंत दिलेच नहीत . भाजप मला विचारून इतरांना मंत्रीपदे देत नाही किंवा इतरांच्या मंत्रीपदांची संख्या मी ठरवित नाही. >>> आणि शिवसेनेचे जोखड लोकसभेला का नाही फेकून दिले ? एवढा त्रास होता तर लोकसभेपासून वेगळा व्ह्यायचा . हे भाजपलाच ठरवू द्यात. >>> सरकार राष्ट्रवादीच्या पाठिंब्याशिवायच आहे. भाजपकडे १३५+ आमदारांचे समर्थन आहे. विरोधात फक्त १०४ आमदार आहेत. > अहो हेच तर अजून कोणी बोलला नाहिये ना ! राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे असे ते सांगत आहेत . फडणवीस यांनी आम्ही तो स्वीकारला नाहीये असा स्टेट्मेंट दिला नाहिये अजून. ठरावानंतर असे स्टेट्मेंट दिले असेल तर दाखवा . आणि १३५ असतील तर ते बहुमत कसे ? फडणवीस खोटा बोलत आहेत का ? बाजूने १३५ व विरोधात १०४ म्हणजे बहुमतच आहे. विश्वासदर्शक/अविश्वासदर्शक ठरावावरील मतदानात सभागृहाच्या एकून सदस्य संख्येपेक्षा एकूण मतदानात ज्या बाजूने ५० टक्क्यांहून अधिक मतदान होते तो ठराव जिंकतो. उद्या २८८ पैकी फक्त २९ सदस्यांनी मतदान केले तर ठराव जिंकण्यासाठी १५ मते मिळाली तरी चालते.

In reply to by श्रीगुरुजी

कपिलमुनी 19/11/2014 - 15:08
नैतिक/अनैतिक या सापेक्ष कल्पना आहेत. घटनेत नैतिक/अनैतिकतेची व्याख्या नाही.
याला आमच्याकडे बोटावरची थुंकी बदलणे म्हणतात.
जोपर्यंत सत्ताधारी पक्षाच्या बाजूने कोण व विरोधात कोण हे नक्की होत नाही तो पर्यंत अधिकृत विरोधी पक्ष कोण हे ठरू शकत नव्हते. विश्वासदर्शक ठरावावरील मतदानानंतरच अधिकृत विरोधी पक्ष कोणता हे ठरणार होते. त्यामुळे दुसर्‍या व तिसर्‍या विषयांची अदलाबदल हा योग्य निर्णय होता.
मग अगोदरच ही गोष्ट ध्यानात आली नव्हती का ?
भाजप मला विचारून इतरांना मंत्रीपदे देत नाही किंवा इतरांच्या मंत्रीपदांची संख्या मी ठरवित नाही.
तुम्ही त्याच पद्धतीने डीफेंड करत आहात
हे भाजपलाच ठरवू द्यात.
तुम्हाला त्रास होत होता सेनेचा म्हणोन तुम्हालाच विचारला
बाजूने १३५ व विरोधात १०४ म्हणजे बहुमतच आहे.
हे राष्ट्रवादी तटस्थ होती तेव्हा कळाला फडणवीस किंवा कोणीही याचा स्पष्टीकरण दिला नव्हता

In reply to by श्रीगुरुजी

समीरसूर 13/11/2014 - 15:14
अशा परिस्थितीत भाजपने सत्तास्थापनेचा विचार सोडून द्यायला हवा होता. त्यात त्यांचेच भले झाले असते. राष्ट्रवादीचा कुचकामी आणि बिनभरवशाचा आधार घेऊन निंदानालस्ती सहन करण्यापेक्षा ठामपणे सत्तेला नकार दिला असता तर नवीन निवडणुकीत (जर शिवसेनेला तोपर्यंतदेखील समज आली नसती तर) त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले असते. आज नाही तर उद्या निवडणुक पुन्हा होणारच आहे. हे असलं बेंगरुळ आणि बालिश खेळ खेळून स्थापलेलं सरकार किती टिकणार हा प्रश्नच आहे. आणि ते देखील काकांच्या भरवशावर उभं राहिलेलं? मग तर प्रश्न आणखीनच जटील आणि कुटील होतो. :-) काका केव्हा सतरंजी ओढून घेतील ते खाली आदळणार्‍यांना देखील कळणार नाही. :-)

In reply to by समीरसूर

गणेशा 13/11/2014 - 16:25
भाजपने सत्ता स्थापनच करायला नको होती
नाही, भाजप ने शिवसेने बरोबर सत्ता स्थापन करावयास हवी होती. जर शिवसेनेला तोडायचेच होते म्हंटल्यावर तीने चुका करु नाहितर काही करु, भाजप ने त्या चुकांचे भांडवल का करावे ? त्यांना शिवसेना जड जात आहे असे वाटत होते तर त्यांनी राष्ट्रवादी बरोबर संधान करुन आपला मार्ग आखला. शिवसेने बरोबर युती तुटली होती, आणि आठवले, जानकर शेट्टी मंडळी भाजप बरोबर गेली (कारण केंद्रात त्यांची सत्ता होती, आणि वातावरण ही) पण मग भाजप ने राज ठाकरें बरोबर का नाही युती केली ? कारण त्यांना माहिती होते राज ठाकरे त्यांना काही जास्त मदत करु शकणार नाही, उगाच १०-५ जागा आणि त्या ही मुंबई मधील काही सोडाव्या लागतील. त्या पेक्षा राष्ट्रवादी त्यांना जवळाचा वाटला. आणि ही सरासर धुळफेक होती बाकी जनतेला. हे आधीच ठरल्या मुळे असे झाले. जर आवाजी मतदानात जर राष्ट्रवादी भाजप बरोबर होती तर तो आधीचा डाव होता, आम्ही त्यांचा पाठिंबा मागितला नव्हता अशी ही धुळफेकच आहे. मग असे असेन तर कुठल्या तोंडाने दिल्लीत तुम्ही सर्वात मोठा पक्ष असुनही, आप अणि कॉन्ग्रेस ला एकाच नाण्याच्या दोन बाजु बोलता, तेथेही आपने पाठिंबा मागितलेला नव्हता. जर तेथे नाण्याच्या त्या २ बाजु असु शकतात, तर येथे ही ह्या नाण्याच्या २ बाजुच का नाही ? अमित शहा-मोदी यां मध्ये उद्धव भरडले गेले. स्वता त्यांनाच काय भाजपा च्याच कीती तरी लोकांना राष्ट्रवादी बरोबर आपण जाणार आहोत हे वाटत नव्हते. मला वाटते देवेंद्र पण त्याच जनात होते. तरीही एकत्र भाजप ने बहुमत आनायचे आणि नाही जमले तर शिवसेने बरोबर जायचे असेच करायचे होते. राष्ट्रवादी हा धुर्त आहे तर भाजपा हा धोरणी पक्ष आहे आणि शिवसेना ह्या दोन्ही गोष्टीत फेल असला तरी तो चुकीचा असा जो सूर उमटत आहे तो त्यांची रणनिती चुकली असा पाहिजे त्यांची निती चुकीची नव्हती असे नमुद करावेशे वाटते. आता आनखिन एक सांगतो.. (कृपया हे कोन म्हणाले होते हे विचारु नये, एक बारामतीकर असल्या कारणाने बर्याच गोष्टी ऐकलेल्या असतात.. उगाचच) जर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे मिळुन १४४ आमदार झाले असते ( कॉग्रेस ला ही दूर ठेवुनच) तर शरद पवारांनी भाजपा बरोबर झालेली बोलणी विसरुन शिवसेने बरोबर जाण्याचे योजीले असते. आधीही हा पर्यत्न झाला होता पण तो त्यावेळेस फसला गेला होता. मला वाटते जोशींनी हे सांगितले आहे कुठल्याशा मुलाखतीमध्ये. मला वयक्तिक रित्या राष्ट्रीय राजकारणात अटल बिहारी वाजपेयी आवडायचे, राजकारणी असा असावा सर्व पक्षात त्याला मान असावा, मोदी यांचे विकासाचे धोरण आहे पण त्या मध्ये साधे व्यापारी.. सामान्य धंदे बुडुन जातील अशी शंका मला आहे, परंतु हे परिनाम १० वर्षांनंतर दिसतील. आताच मला वाटते FDI बांधकाम क्षेत्रात आण इतर बर्याच क्षेत्रात येण्यास त्यांनी पुर्ण संमत्ती दिलेली आहे. आणि अश्याच रिटेल FDI बद्दल त्यांनी कॉन्ग्रेस ला चुकीचे धरले आहे. रीटेल मध्ये ही लवकरच FDI आल्या शिवाय राहणार नाही. विकास म्हणजे काय ? फक्त चकाचक जिवन शैली, चकाचक रस्ते पुल मॉल म्हणजे विकास ? तर नाही, प्रत्येकाचे दरडोयी उत्पन्न वाढल्या नंतर त्याच्या गरजा भागल्या नंतर जे जे गरजेचे आहे ते देणे म्हणजे विकास. तसे नसते तर मग पिंपरी चिंचवड चा विकास डोळ्यात भरणारा आहे. कोणीही या आणि रस्ते-पुल औद्योकीकरण बघावे आणि सांगावे. आता ५० हजार पगार असला तरी येथे साधा १ BHK फ्लॅट सामान्य माणसाला घेता येत नाही, हा विकास त्याच्या कामाचा नाही. विषय राजकारणावरुन भरकटायला लागला असल्याने थांबतो

In reply to by समीरसूर

श्रीगुरुजी 13/11/2014 - 21:11
>>> अशा परिस्थितीत भाजपने सत्तास्थापनेचा विचार सोडून द्यायला हवा होता. त्यात त्यांचेच भले झाले असते. भाजपचे भले झाले असते का ते माहित नाही, पण भाजपने सरकार स्थापन केले नसते तर विधानसभा बरखास्त होऊन पुन्हा एकदा निवडणुका होऊन अब्जावधी रूपयांचा चुराडा झाला असता व तोपर्यंत महाराष्ट्रात निर्नायकी अवस्था येऊन वाईट परीणाम झाला असता. >>> हे असलं बेंगरुळ आणि बालिश खेळ खेळून स्थापलेलं सरकार किती टिकणार हा प्रश्नच आहे. आणि ते देखील काकांच्या भरवशावर उभं राहिलेलं? मग तर प्रश्न आणखीनच जटील आणि कुटील होतो. काका केव्हा सतरंजी ओढून घेतील ते खाली आदळणार्‍यांना देखील कळणार नाही. भाजप काही बोळ्याने दूध पीत नाही किंवा शिवसेनेसारखा भ्रमात राहणारा गाफील पक्ष नाही. १९९९ ला वाजपेयी सरकार केवळ १ मताने पडले होते. त्या अनुभवातून भाजप खूप काही शिकला आहे. भाजपने कर्नाटकात (२००८-१३), राजस्थानात (१९९३-९८), उ.प्र. मध्ये (१९९७-२००३) अल्पमतातील सरकारे टिकविली आहेत. काकांनी सतरंजी ओढली तरीसुद्धा हे सरकार टिकेल याची खात्री बाळगा.

In reply to by श्रीगुरुजी

कपिलमुनी 14/11/2014 - 16:00
अल्पमतातील सरकारे टिकविली आहेत
कोणत्या प्रकारे ते पण सांगा , म्हणजे अजून काही मतदारांच भ्रम असेल की भाजपा सोवळा आहे तो दूर होईल .

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी 14/11/2014 - 21:08
>>> कोणत्या प्रकारे ते पण सांगा , म्हणजे अजून काही मतदारांच भ्रम असेल की भाजपा सोवळा आहे तो दूर होईल . कायदेशीर व घटनात्मक मार्गाने ही अल्पमतातील सरकारे चालविली गेली होती. माहिती नसल्यास इतिहासाची पाने चाळा.

In reply to by श्रीगुरुजी

आवाजी मतदान आधी जे झालेले तेव्हा आमदारांनी आधीच समर्थन पत्रे दिलेली.

गुरुजी ही गोष्ट का लपवत आहेत. सुधरणार नाहीच म्हणा तुम्ही. भाजपाने रडीचाच डाव खेळला आहे सत्तेसाठी कोणत्याही थरावर जातात आणि भक्तांना सोशल मिडीयावर वार्‍यावर सोडतात :)

In reply to by दिवाकर देशमुख

क्लिंटन 19/11/2014 - 12:34
भाजपाने रडीचाच डाव खेळला आहे सत्तेसाठी कोणत्याही थरावर जातात आणि भक्तांना सोशल मिडीयावर वार्‍यावर सोडतात
आणि काही काही आय.डी मिसळपाववर उच्छाद मांडायचाच म्हणून बॅन केले तरी लोचटासारखे परतपरत वेगवेगळ्या नावाने येतात.त्यातूनच कधीतरी उदयचा दिवाकर होतो. काय करणार? चालायचच :)

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी 14/11/2014 - 23:19
>>> कोणत्या प्रकारे ते पण सांगा , म्हणजे अजून काही मतदारांच भ्रम असेल की भाजपा सोवळा आहे तो दूर होईल . विरोधकांमध्ये एकी नसली व त्यांच्यात फाटाफूट आणि वैचारीक विरोधाभास असला की सरकार अल्पमतात असले तरी ते टिकून आपला कार्यकाल यशस्वीपणे पूर्ण करते. अल्पमतातील सरकार टिकविण्यासाठी सोवळे सोडून ओवळे नेसावेच लागते असे नाही.

वर थत्ते यांनी नमूद केल्याप्रमाणे त्या त्या पक्षाचे समर्थक काही झाले तरी आपल्या च पक्षाला मत देतात किंवा पक्षाने कितीही खालची पातळी गाठली तरी पक्षाचे समर्थन करतात . वर भाजप चे अनेक समर्थक तेच करत आहेत . आपल्या पक्षाने अनेक भर्श्टाचारि नेत्याच टोळक असणारया पक्षाच समर्थन घेतलं आहे हि खंत जर त्याना मनातून पण (दाखवायचे दात काहीही वेगळ असले तरी ) वाटत नसली तर या पक्षाच कॉंग्रेस सारखच वेगाने अधपतन का होत आहे याच उत्तर मिळेल . दुर्दैवम्हणजे हेच भाजप समर्थक टोळक इथ कॉंग्रेस कशी नैतिक दृष्ट्या अधपतित आहे , राष्ट्रवादी कशी भ्रष्ट आहे , मनसे नाशिक मध्ये राष्ट्रवादीचा पाठींबा घेणे कसे चूक आहे यावर इतर लोकाना प्रवचन देत होती . बाकी एवढी आंधळी भक्ती असणारे कार्यकर्ते पाहून इतर पक्षांना नक्कीच भाजप चा हेवा वाटत असेल . बाकी झोपलेल्याला जाग करता येत पण झोपेच सोंग घेतलेल्याला कस जाग करणार हा चिरंतन प्रश्नच आहे आंधळ्या समर्थकांची हि वृत्ती पाहून लालू , गडकरी , पवार अशा भ्रष्ट नेत्यांमागे कार्यकर्ते कसे उभे असतात ह्या मध्यमवर्गीय प्रश्नाचे उत्तर पण मिळाले . बाकी चालू द्या . राष्ट्रवादीच्या मागे फरफटत जाऊन या राज्याचे अजून वाटोळे करू नका म्हणजे झाल

दुश्यन्त 13/11/2014 - 17:39
भाजपने शेवटी एनसीपीशी संग करण्याचा आपला मनसुबा पूर्ण केला वर ते पटलावर येवू नये म्हणून आवजी मतदानाची चलाखी करून पाहिली पण परिणाम काय झाला? सगळीकडे भाजप आणि देवेंद्र यांची निर्भत्सना, टवाळी चालू आहे. भाजप आणि एनसीपीचे सेटिंग खूप आधीपासून सुरु होते ते आता उघड झाले आहे. भाजपचा मतदार नाराज आहे पवारांना काही फरक पडत नाही. भाजपकडे बहुमत नसतानाही सेनेला आधी विश्वासदर्शक ठराव पास होवू दे मग सत्तेत सामील व्हायचं बघू अस म्हणणे म्हणजे तुमची मुलगी आमच्या घरी द्या मात्र मुलगा कसा आहे वगैरे आत्ता काही बोलू नका ते लग्नानंतर पहा असे म्हणण्यासारखे झाले. केंद्रात एखाद फुटकळ मंत्रिपद दिल आणि राज्यात अशीच ४ खाती दिली तर सेना लगेच फरफटत आपल्या मागे येईल या भ्रमात भाजप राहिली. मात्र सेनेने केंद्रात विस्तारत येणार पद सोडून दिल आणि राज्यात पण विरोधात बसली हे बरच झाल. आता आवजी मतदान घेवून पवारांच्या कृपेने सरकार तरल मात्र जी अब्रू जायची ती गेलीच आहे. पुढे कधी तरी मतदान घ्यावच लागणार आहे, एनसीपी कधीही दगा देवू शकते ते होणार नाही तोवर हे 'पवारालंबी' सरकार चालणार आहे. एकंदरीत भाजपची लोकांत छी थु झाली आहे.यांचे खरे रूप समोर आले ते बरेच झाले.ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप उठवून सत्तेत आले त्यांच्याशी असलेली यांची मिलीभगत उघड झाली. सेनेने विरोधात बसून चांगले काम केले.

In reply to by आजानुकर्ण

http://www.misalpav.com/comment/627525#comment-627525 इथे गुरुजी ना वाटते कि राज ने राष्ट्रवादी शी 'साटलोट' केल त्यामुळे जनते ने त्याना लाथ दिली . बहुतेक राष्ट्रवादी आणि भाजप उच्च नैतिक मुल्य आणि महाराष्ट्राच हित जपण्यासाठी 'शय्यासोबत ' करत आहेत असा काहीसा त्यांचा ग्रह झाला असावा . राज चाच (राष्ट्रवादीचा बाहेरून पाठींबा ) नाशिक फ़ोर्मुला त्याना महाराष्ट्राच्या हिताचा वाटत आहे .

In reply to by आजानुकर्ण

श्रीगुरुजी 13/11/2014 - 21:15
दोन्हीपैकी काहीही नाही. 'दिल तो पागल है' हा चित्रपट आठवला. या चित्रपटात लोलो शाहरूखच्या मागे लागलेली असते. परंतु शाहरूख माधूरी दिक्षितच्या प्रेमात असतो. परंतु तो लोलोचे प्रेम स्वीकारत नाही व तिला झिडकारतही नाही. असे करण्याची त्याला आवश्यकता वाटत नाही.सद्यस्थितीत असेच झाले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

असल 'अफलातून ' उत्तर वाचून आजानुकर्ण झीट येउन पडले आहेत असे चित्र डोळ्यापुढे उभे राहिले . भाजप - शाहरुख खान (दोन दोन मुली (पक्षी -शिवसेना व राष्ट्रवादी ) ज्याच्यामागे आहेत असा बाका छोरा ) राष्ट्रवादी - माधुरी दीक्षित (शाहरुख च प्रेम पात्र ) शिवसेना -करिश्मा कपूर ( कॉंग्रेस -अक्षय कुमार (राष्ट्रवादी कडून नाकारलेले गेलेले ) दिल तो पागल है च्या शेवट च्या सीन मध्ये नाईलाजाने अक्षय आणि करिश्मा (दोघेही नाकारलेले गेलेलं ) एकत्र येण्याची शक्यता दाखवली आहे . जसे काल विधानभवनात कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र येउन धिंगाणा घालताना पाहून अनेकाना तो सीन आठवला असेल . बाकी राज आणि माया (बाकी माया हे नाव मोठे साहेब पक्षी राष्ट्रवादी याना लई शोभून दिसत म्हणा ) याचं मिलन काल अख्ख्या राज्याने पाहिलेच . जमली का हो गुरुजी casting ?

In reply to by पिंपातला उंदीर

आजानुकर्ण 13/11/2014 - 21:53
शाहरुख खान (भाजपा) माधुरीच्या प्रेमात आहेत म्हणजे माधुरी ही राष्ट्रवादी नसून महाराष्ट्राची सत्ता आहे असे वाटते.

दुश्यन्त 13/11/2014 - 17:58
भाजपा समर्थक सारी चुक शिवसेनेची आहे असे गळे काढण्यात गुंतले आहेत. राजधर्म पाळायचा असतो एव्ढा साधा कॉमन सेन्स नाहिये. जर राष्ट्रवादीचा पाठिंबा स्विकारला नाहिये तर तसा स्प्ष्ट सांगायची हिंमत दाखवायची. मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असा प्रकार आहे. ज्या मतदारांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस्च्या विरोधत मतदान केले हा त्या मतदारांचा विश्वासघात आहे. +१ बाहेर लोकं भाजप आणि फडणवीसांची भयंक टवाळी करत आहेत, इथे बोलता येत नाही अश्या भाषेत त्यांचा उद्धर चालू आहे.खिंड लढवणारे काही तुरळक भक्त सोडले तर बहुतांशी लोकं भाजपवर नाराज आहेत.

In reply to by दुश्यन्त

बॅटमॅन 13/11/2014 - 18:00
खिंड लढवणारे काही तुरळक भक्त सोडले तर बहुतांशी लोकं भाजपवर नाराज आहेत.
असेच म्हणतो. (पश्चात्तप्त) बॅटमॅन.

In reply to by हाडक्या

बरोबर आहे... बॅटमन भाजपच्या कारवाई पश्चात् तप्त (रागाने गरम) झालेला आहे... तेव्हा सांभाळून...... असे म्हणायचे असेल ;) :)

जयनीत 13/11/2014 - 20:17
वरील मुद्द्यावर भाजप आपल्या धोरणाचे समर्थन करत आहे. मूळ मुद्दा हा की शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीची साथ घेऊन भाजप ने काय मिळवले? वेगळे पणा जपणारा पक्ष हा दावा ते आता कितीही करतील तरी ही त्याला आता तेव्हढा आधार राहणार नाही त्यांचे पक्के समर्थक तसे मानत राहतील तरीही सामान्य मतदार जो भाजप किंवा मोदीं कडे ज्या आशेने बघत होता त्यावर नक्कीच परिणाम होइल. मुळात राष्ट्रवादीची साथ घेण्याची गरजच काय होती? हरियाणात बहुमताचा आकडा गाठण्या साठी दहा पाच आमदार कमी पडले असते तेव्हा आय. एन. एल. डी. ची साथ घ्यावी लागली असती तर ते समर्थनीय तरी होते पण तिथे तशी परिस्थिती आली नाही तितका नशीबवान भाजप ह्या दोन राज्यांच्या निवडणुकां मध्ये होता महाराष्ट्रात ही तशी परिस्थिती नव्हती मग कशा साठी स्वत:च्या तथाकथीत स्वच्छ प्रतिमेला ला धक्का पोहचवला. अन तों ही इतक्या लवकर. केंद्र सरकार अजूनही लोकप्रिय आहे न खाउंगा न खाने दुंगा ह्यावर लोकांनी विश्वास ठेऊन मते दिली होती आता ह्या कृतीचे समर्थन काय? मी भाजपचा किंवा शिवसेनेचा समर्थक नाही त्या दोन्ही पक्षां बद्दल कुठलीही सहानुभूती नाही अन भाजप जे बोलतो त्यावर माझा काडीचाही विश्वास कधीच नव्हता तो इतकेच काय तर ह्याही पुढे जातील ह्यात काही शंका कधीच नव्हती पण इतक्या लवकर अन कसलीही गरज नसतांना ते असे करतील ह्याचे मात्र अतिशय आश्चर्य वाटले. भाजपला शिवसेनेची अडचण होत होती शत प्रतिशत भाजप पाहिजे होता म्हणून त्यांनी असे केले. हे जागावाटपां च्या वेळे पासून ठरवून केल्या जात आहे. मग कारणे काहीही सांगितल्या गेली आता भाजप १२१ अन शिवसेना ६३ ही परिस्थिती असतांना त्यांनी शिवसेनेनी उपमुख्य मंत्री अन एक तृतीयांश मंत्रीपदे ही मागू नयेत त्यांनी नाक घासून जे मिळेल ते गोड मानून घ्यावे कारण ते आमच्या मुळे जिंकलेत हा अहंकार काय सांगतो? अन त्या अहंकाराला ही काय आधार आहे हरियाणाच्या पक्षाने एकटे लढून आपली शक्ती किती पटीने वाढवली अन इथे आधी पासून भाजपचे चांगले अस्तित्व असतांना चार पक्षांशी युती करूनही बहुमाताचा आकड्याचा इतके दूर रहावे लागले तरीही आम्हीच सारे निर्णय घेणार तुम्ही मान्य करा हा हेका मात्र जात नाही. भाजपची शक्ती शिवसेने पेक्षा जास्त होती हे मान्य त्यांनी जास्त जागा मागितल्या अन त्यासाठे वेगळे लढले इथपर्यंत ही ठीक पण नंतर मात्र आहे ती परिस्थिती मान्य करून पुढे जायला हवे होते. पण तसे केले नाही. शिवसेनेला ज्या अठरा जागा लोकसभेच्या निवडणुकीत मिळाल्या होत्या ते काही भाजपचे उपकार नव्हते हे ही सिद्ध झालेच की. १८ लोकसभेचा मतदार संघात ६ प्रमाणे १०८ जागा होतात शिवसेनेने मिळवल्या ६३ म्हणजे हिशोब लावला की प्रत्येक लोकसभा मतदार संघातल्या साडे तीन मतदार संघात त्यांनी आघाडी घेतली असे मान्य करावे लागते. (हे काही निवडणूक पूर्व अंदाज नसून सिद्ध झालेली आकडेवारी आहे ) पण थोड्या फार यशाने डोळे आंधळे झाली की ती कशी दिसणार?

In reply to by जयनीत

hitesh 14/11/2014 - 15:32
म्हणजे असे बघा केळीवाला बुट्टीभर केळी घेऊन बसला आहे. तुम्ही किती केळी घ्याल ? तुमच्या गरजेपुरतीच ना ? भाजपाला बहुमताला १५ लोकांचीच गरज आहे. सेनेने फक्त १५ च लोक द्यावेत की.. सेनेचे साठ असले तरी तितके केळी भाजपाला नकोचआहेय्त. म्हणजे भाजपाच १२० व सेनेचे १५. ... म्हणजे भाजपाची ताकद सेनेच्या आठपट भरते. उरलेली केळी सेनेने फेकुन द्यावीत.

In reply to by कपिलमुनी

hitesh 14/11/2014 - 17:49
तो सगळी केळी विकेल तरीही त्याला १५ केळ्याचेच पैसे घ्यावे लागतील. उरलेली केळी बुट्टीत घालुन घरी न्यायची नसतील तरीही ती केळी त्याला फुकटच घालावी लागतील. त्यामुळे २ : १ चा बालहट्ट सोडुन ८ : १ हे कटू सत्य त्यांनी स्वीकारले असते तर निदान केळ्रे कुजली तरी नसती. आमचे पवार बघा.. सत्यनारायण घालायला केळी उसनीही दिली आणि पुजाही त्यानी स्वतःच सांगितल्याने पुजा संपल्यावर आपलीच केळी हक्काने घेऊनही गेले

In reply to by hitesh

hitesh 14/11/2014 - 17:59
मला तर शंका आहे केळीच नव्हे भाजपा जी बाकीच्या खारका सुपार्‍या आमच्या म्हणुन सांगते त्याहीपवारांच्याच आहेत.

In reply to by hitesh

vikramaditya 16/11/2014 - 15:49
केळ्यांचे उदाहरण नको. नुकतेच मिपावर "वसईची पिवळी केळी" यावर आवाजी मत-प्रदर्शन झाले आहे.

सुबोध खरे 13/11/2014 - 20:51
राजकारण हा माझा प्रांत नाही. सर्व लोक भाजपचे चुकले म्हणताहेत. त्यांनी साधन शुचिता पाळायला पाहिजे होती. ते बरोबरही असेल पण माझ्यासारख्या एका सर्वसामान्य मतदाराला असे वाटते कि भाजपने काय करायला पाहिजे होते. शिवसेनेपुढे लोटांगण घालायला पाहिजे होते? शिवसेनेने किती ताठरपणा निवडणुकीच्या अगोदर दाखवला होता हे आपण पाहिलेच आहे मग त्यांना झुकते माप देऊन त्यांच्या दुप्पट आमदार निवडून येउन सुद्धा त्यांच्या तालावर नाचायला पाहिजे होते. आज कितीही म्हणालात तरी भाजप ला ४२ टक्के जागा महाराष्ट्राच्या जनतेने दिल्या आहेत. बाकी लोकांना २१ टक्के किंवा त्याहूनही कमी जागा आहेत याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेने भाजपला जनादेश दिला आहे. अशा परिस्थितीत भाजप ने काय करायला हवे होते? का विश्वास दर्शक ठरावात नापास होऊन लगेच निवडणुका परत घेऊन कर्जाच्या खाईत असलेल्या महाराष्ट्राला अजून काही शे कोटी रुपयाच्या खर्चात टाकायला हवे होते? किंवा राज्यावर ६ महिने राष्ट्रपती राजवट आणायला हवी होती? लोकांना नक्की काय हवे आहे? प्राप्त परिस्थितीत त्यांनी जे केले ते कदाचित साधन्शुचीतेच्या दृष्टीने बरोबर नसेल पण याच्या पेक्षा चांगला पर्याय त्यांना उपलब्ध होता असे मला वाटत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

शशिकांत ओक 13/11/2014 - 22:10
मित्रा,सध्याच्या राजकारणात चालू घडामोडींची घडामोडींचीसुंदर व मार्मिक रेखाटने 'ढिंग टांग' मधून ब्रिटिश नंदी करतात. ती पहिल्या चहा बरोबर कुरकुरीत क्रम्स प्रमाणे खुसखुशीत वाटतात. मामला म्हणून एक... त्यातील शेपटीचा फटकारा मान डोलायला लावतो. (नंतर डकवतो.)

In reply to by श्रीगुरुजी

आजानुकर्ण 14/11/2014 - 17:53
काँग्रेसचा तो भ्रष्टाचार आणि भाजपाची ती अपरिहार्यता! युक्तिवाद छान आहे. खरंच. इथूनपुढं पानभर निबंध लिहायच्या ऐवजी एवढाच युक्तिवाद केलेला पुरे!

In reply to by सुबोध खरे

आनन्दा 13/11/2014 - 21:30
सहमत आहे, काल ह सगळा घटनाक्रम पाहिल्यावर मी देखील निराश झालो होतो, पण कालांतराने विचार करता असे लक्षात आले की शिवसेना काय आणि राष्ट्रवादी काय, खाणार नाहीत असे कोणी सांगितले आहे? अगदी फॉर दॅट मॅटर भाजपा देखील. आपल्याला सुशासनाशी मतलब. जर भाजपाने चांगले काम केले तर काय फरक पडतो त्यांनी असे बहुमत सिद्ध केले म्हणून? माझ्याड्रुष्टीने साधन नव्हे, तर साध्य महत्वाचे.

In reply to by सुबोध खरे

अर्धवटराव 13/11/2014 - 21:34
प्राप्त परिस्थितीत त्यांनी जे केले ते कदाचित साधन्शुचीतेच्या दृष्टीने बरोबर नसेल पण याच्या पेक्षा चांगला पर्याय त्यांना उपलब्ध होता असे मला वाटत नाही.
-- प्रश्न केवळ साधनशुचीतेचा असेल तर भाजपने संपूर्ण सभागृहाला सरकारला पाठिंबा द्यायचे आवाहन करायला हवे होते. भाजपचे रूडी साहेब म्हणाले कि एक काँग्रेस सोडुन आम्हि कोणाचेही समर्थन घेऊ. त्यापेक्षा महायुती सरकार बनवत आहे, स्थिर सरकारसाठी ज्याला वाटेल त्याने पाठिंबा द्यावा, असा स्टॅण्ड घेतला असता तर बहुमत देखील मिळवता आले असते व चारित्र्यावर डाग देखील लागले नसते. अर्थात, हे सगळं जर-तर आणि भावनांचा खेळ आहे. जे झालं ते व्यवस्थीत गणित मांडुन केलं गेलं असणार.

पैसा 13/11/2014 - 23:42
राजकारण गेलं चुलीत. औषधांच्या किंमतीबद्दल अमेरिकी दबावाखाली बदललेले धोरण, पाकिस्तानला सबसिडाईज्ड गॅस द्यायचा प्रस्ताव, पर्यावरणविषयक धोरण इ. भाजपा सरकारचे गेल्या काही दिवसांतील काही निर्णय अजिबात पटत नाहीयेत. भाजपा म्हणजे स्वच्छ वगैरे काही गोड गैरसमज नसले तरी हे सगळे बरेच अनपेक्षित वाटले. प्रादेशिक पक्ष संपवायचा भाजपाचा विचार असेल तरीही त्यासाठी स्वीकारलेले मार्ग बरोबर वाटत नाहीयेत. आता राष्ट्रवादीकडे भाजपाने पाठिंबा कुठे मागितला वगैरे कोणी कृपया सांगू नका. ते सगळं इतकं सोपं नसतं हे तुम्हा आम्हाला माहित आहे. अजितदादा पवारांनी शिवसेनेचे सरकार आणि त्याला दोन्ही काँग्रेसचा पाठिबा असा प्रस्ताव नाकारल्याचे सांगितले. दुसरीकडे सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रीपद देणार अशा बातम्या येत होत्या, मात्र सुरेश प्रभूंना मंत्रीपद मिळाले आहे. ते साहेबांच्या अगदी जवळचे आहेत असेही लगेच सगळीकडे लिहून येत आहेच. दिल्लीत विधानसभा निवडणुकांत भाजपाने जे केले ते महाराष्ट्रात करायचे टाळले आहे. इथेही त्यांना तसे करता आले असते, कारण परिस्थिती अगदी तशीच होती. तसे काही झाले असते तर कदाचित पुढच्या निवडणुकांत लोकांनी त्यांना जास्त प्रमाणात मते दिली असती. आता ते कठीण वाटते. वाजपेयींची भाजपा आता नाही हे ठळकपणे दिसून येत आहे. त्याशिवाय बदलत्या परिस्थितीत रा.स्व.संघ आणि भाजपाचे समीकरण काय असेल याबद्दलही कुतुहल आहे. सामान्य लोक आशेने किंवा भावनेच्या भरात मतं देऊन एका किंवा दुसर्‍या पक्षाला निवडून आणत असतात, त्यां सगळ्या राजकारण्यांना मात्र या लोकांशी किंवा त्यांच्या भावनांशी काही देणेघेणे नसते हे अनेकदा दिसून आले आहे. चलता है. जसे आम्ही, तसेच आमचे नेते. लोकशाईचा जय हो !!

In reply to by पैसा

क्लिंटन 14/11/2014 - 10:50
वाजपेयींची भाजपा आता नाही हे ठळकपणे दिसून येत आहे.
नाही हो. वाजपेयींच्याच भाजपाने १९९८ मध्ये जयललितांशी (आणि इतर अनेकांशी) युती केली नसती तर वाजपेयी पंतप्रधान बनूच शकणे शक्य नव्हते. अगदी काठावरचे बहुमत असलेल्या वाजपेयी सरकारला तामिळनाडूतून घसघशीत ३० खासदारांचा पाठिंबा मिळाला. जयललितांशी युती केली नसती तर ३९ पैकी अगदी एखाद्या जागी तरी भाजप उमेदवाराचे डिपॉझिट वाचले असते तरी ते भाजपने आपले मोठे यश मानले असते!! जयललितांविरूध्दच्या आरोपांचा तपास करणार्‍या अधिकार्‍यांची एकसाथ बदली वाजपेयी सरकारने जयललितांनी पाठिंबा काढून घ्यायच्या दोन महिने आधी केली होती.त्यावर 'प्रत्येक अधिकारी कोणत्या ना कोणत्या केसचा तपास करतच असतो आणि कोणीही अधिकारी आयुष्यभर एकाच ठिकाणी थोडीच काम करतो' असे स्पष्टीकरण प्रमोद महाजन यांनी दिले होते. उत्तर प्रदेशातील नेत्यांच्या विरोधाला न जुमानता मायावतींना तीन वेळा मुख्यमंत्री करून त्यांना मोठे करण्यात वाजपेयींचाच हात होता. कल्याणसिंगांच्या मंत्रीमंडळात ९५ मंत्री होते आणि त्यात अनेक गँगस्टरचाही समावेश होता.त्यावर 'ते जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांना मंत्री बनण्यापासून कोणीही अडवू शकत नाही' अशा स्वरूपाचे उत्तर वाजपेयींनीच दिले होते. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की वाजपेयींनी सुध्दा अशा तडजोडी अनेकवेळी केल्या होत्या.त्याची किंमत त्यांना भरायला लागली का? नक्कीच लागली. सर्वसामान्यांमध्ये त्यांच्याविषयी आदर असूनही त्यांना २००४ मध्ये पंतप्रधान बनता आले नाही. यावेळीही राष्ट्रवादीशी तडजोड करून भाजपाने एक मोठी रिस्क घेतली आहे.पायात घुसलेला एक काटा काढायला दुसरा काटा वापरायचा आणि योग्य वेळ येताच दोन्ही काटे फेकून द्यायचे अशी रणनिती असावी असे एक भाजप समर्थक म्हणून मनापासून वाटते. तरीही जोपर्यंत दुसरा काटा हातात आहे तोपर्यंत अस्वस्थता राहणारच. पण भाजपाने एक काटा हातात घेतला हे मला आवडले नाही म्हणून त्यांच्या विरोधातील बाभळीच्या झाडाला मात्र मी मत देऊ शकणार नाही हे नक्कीच.

In reply to by क्लिंटन

वाजपेयी स्वतः अतिशय निस्पृह आणि आदरणीय होते . पण त्यांचे सरकार आणि मंत्री अनेक आरोपांनी घेरले गेले होते . किंबहुना आज जे भाजप चे कॉन्ग्रेसीकरण झाले आहे त्याची प्रक्रिया वाजपेयी यांच्या पंतप्रधान काळात सुरु झाली होती . वाजपेयी या सर्वासमोर हतबल झाले होते . अवांतर - आज भक्तांच्या आंखो का तारा असणारया आणि मोदी यांचे विश्वासू असणार्या सुब्रमन्यम स्वामी यांनी अटलजी यांच्या विरुद्ध इतके घाणेरडे आरोप केले आहेत कि अटलजी यांच्या बद्दल असणारया आदरामुळे त्याच्या लिंक इथे देण्याचा मोह टाळत आहे . ऋषितुल्य अटलजी बद्दल असले बिभित्स आरोप करणारा इसम आज भाजप च्या थिंक tank मध्ये आहे यावरून भाजप साठी अटलजी आज अडगळीत जमा झाले आहेत हेच अधोरेखित हते

In reply to by पिंपातला उंदीर

प्रसाद१९७१ 14/11/2014 - 11:40
बाजपाईंचे उगाच कौतुक करु नका हो. कॉग्रेस चा माणुस असल्यासारखा वागणे कायम. निस्पृह कसले, मानलेली मुलगी आणी जावई धिंगाणा घालत होते सरकार मधे आणि बरोबर भाजपचे शरद पवार प्रमोद महाजन आणी ब्रिजेश नावाचा सरकारी अधिकारी. वाजपाईच्या जागी तेंव्हा मोदी सारखा कोणी असता तर पूर्ण बहुमतात भाजप आले असते निवडुन १९९९ सालीच.

In reply to by प्रसाद१९७१

श्रीगुरुजी 14/11/2014 - 14:57
>>> निस्पृह कसले, मानलेली मुलगी आणी जावई धिंगाणा घालत होते सरकार मधे हे माध्यमांनी निर्माण केलेले स्पेक्युलेशन आहे. त्यांच्या मानलेल्या मुलीच्या व जावयाच्या सरकारमधील धिंगाण्याचे काही पुरावे असतील तर कृपया ते उघड करावेत.

In reply to by श्रीगुरुजी

आजानुकर्ण 14/11/2014 - 19:59
कदाचित राजकीय अपरिहार्यतेपोटी मानलेली मुलगी व जावयाने काही प्रताप केले असतील. मला तरी अपरिहार्यतेपोटी केलेले प्रकार क्षम्य वाटताहेत बुवा. निदान काँग्रेससारखा भ्रष्टाचार तरी केला नाही ना!

In reply to by आजानुकर्ण

तुम्हाला काही कळत नाही बघा आजानुकर्ण . जावई फ़क़्त गांधी घराण्याचा असेल तर कांही पुरावे द्यावे लागत नाहीत . भाजप सारख्या साधन शुचिता जपणारया पक्षाचे नेत्याचे जावई कसे भ्रष्टाचारी असतील ? तिथे मात्र पुरावे लागतात याना . लोक काहीही बोलतात . जळतात मेले त्यांच्या भरभराटी वर

In reply to by पिंपातला उंदीर

श्रीगुरुजी 14/11/2014 - 21:12
@ प्रसाद१९७१, आजानुकर्ण, पिंपातला उंदीर, वाजपेयींच्या मानलेल्या मुलीच्या व जावयाच्या सरकारमधील धिंगाण्याचे काही पुरावे असतील तर कृपया ते उघड करावेत. जाताजाता ... मोदींविरूद्ध कणभरही पुरावा नसताना काँग्रेसने त्यांना १० वर्षे प्रचंड त्रास दिला. वाजपेयींच्या मुलीविरूद्ध किंवा जावयाविरूद्ध कणभर पुरावा जरी असता तरी त्यांना किती त्रास झाला असता याची कल्पनाच केलेली बरी.

In reply to by श्रीगुरुजी

भाजपावर आरोप झाले की पुरावे मागणे आणि काँग्रेसवर बिना पुराव्याने बोंबलत गावभर फिरणे हे यांचे धंदे आहे

In reply to by श्रीगुरुजी

प्रसाद१९७१ 17/11/2014 - 13:25
@गुरुजी - असे पुरावे कधी देता येतात का हो? आणि तुम्ही मी दिलेली दुसरी दोन नावे सोयीस्कर रीत्या विसरलात ( प्रम, आणी ब्रिजेश ), त्यांच्या बद्दल बोला की. कोलगेट आणि २जी ची प्रकरणे कोणी केली. माझे असे ही म्हणणे आहे की बाजपाईंच्या ऐवजी मोदींसारखा कोणी माणुस असता तर १९९७-९९ मधेच भाजपचे बहुमत आले असते. किंवा बाजपाई पेक्षा कोणी दुसरा माणुस असता तर २००४ साली भाजप हरली नसती. बाजपाईंनी भाजपला आतुन खाण्याचे काम ५० वर्ष केले. मनापासुन हिंदुत्ववादी मतदार कधीच बाजपाईंना मत द्यायला बाहेर पडले नाहीत. आज पण बाजपाई प्रचारात असते तर भाजपला बहुमत मिळणार नाही ह्याची त्यांनी बरोबर काळजी घेतली असती.

गणेशा 12/11/2014 - 21:45
विश्लेशन आवडले, परतु विरोधी बाकावर बसुन योग्य काम केल्यास शिवसेनेच्या नव्या उद्याची ती नांदी ठरेन. भाजपा ला वेगळीच निवडनुक लढवायची होती, जागांची चर्चा करुन अपेक्षा पुर्ण नाही झाली असे करुन युती तोडायचीच असे ठरलेले होते. लोकसभेलाच आपली जागा ओळखल्याने शरद पवार हारुन ही जिंकले आहेत शरद पवार यांची दृष्टी महानगरपालिकेंवर आहे. त्यासाठी ज्या ठिकानी त्यांचेच रीलेटेड अपक्ष आमदार किंवा ज्या ठिकाणी संभ्रम आहे असे काही नेते आधीच भाजपा मध्ये पाठवले. भाजपा जास्त स्वच्छ असते तर त्यांनी तेंव्हाच त्या नेत्यांना पक्षात घ्यायचे नव्हते. आणि तेथुनच जास्त सुरुवात झाली असे म्हणण्याची राष्ट्र्वादी भाजप एकत्र आहेत. शिवसेनेला अलगद बाजुला सारुन त्यांना व्यर्थ बोलायला लावायचे असेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे हे भाजपा ने अनुसरले. आता आपण त्याचे सम्र्थन केले तर मग भाजप ने प्रचार कोणाविरुद्ध केला हे माहीती असेलच. वाटाघाटी साठी लाचारी शिवसेनेने पत्करली तरी त्यांना किंमत द्यायचीच नाही ही आधीच ठरले होते आणि राष्ट्रवादी बरोबर आहेच मग त्यांना झुलवत ठेवण्यात भाजप ने आनंड मानला असला तरी महाराष्ट्रात बिजेपी ला याची किम्मत मोजावीच लागेल. आम्ही पाठींबा मागोतला नव्हता असे म्हणाताना, काही महिन्यांपुर्वी केजरीवल यांना याच मुद्द्यावर कॉग्रेस आणि आप एकच आहे असे बोलण्यात आले. मग आता राष्ट्रावादी + भाजपा आधीच संगनमत होते आणि त्यामुळॅ काही त्यांचे उमेदवार पण आयात केले गेले असे का होउ शकत नाही. भविस्य माझ्या हाती. ही जाहिरात आधी नाही तर नंतर लोकांच्या लक्षात आली. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र कोठे ही न्ह्या पण त्याचे भविष्य आमच्याच हाती आहे हे राष्ट्रवादी ने दाखवुन दिले. पिंपरी चिंचवड आणि मुंबई या महानगर पालिका निवडनुकीमध्ये त्याचे उत्कृष्ट उत्तर ह्या दोन्ही पक्षांनी आधीच तयार ठेवलेले आहे. या बदल्यात शिवसेना नाशिक मध्ये भगवा फडकवु शकेन. अर्धेच बोलणे झाले नंतरचे नंतर लिहितो

In reply to by गणेशा

प्रदीप 12/11/2014 - 22:00
राजकीय धाग्यांना बंदि असावी असे मला मनापासुन वाटते. हे आपण इतरस्त्र लिहील्याला एक आठवडाही उलटून गेलेला नाही. तेव्हढ्यात आपण स्वतःच, राजकारणावरील 'पवारालंबी' हा धागाही काढ्लात. आणि आता इथेही प्रतिसाद देत आहात. अमूक धागे नकोत, तमूक चर्चा नकोत, हे लिहीणार्‍यांची मला गंमत वाटते. इथे आल्यावर सर्व काही वाचले नाही, तर ह्यानंतर आपणास इथे वाचनमात्रही रहाता येणार नाही, अशी भीति असे काही लिहीणार्‍यांना असते काय्,कुणास ठाऊक!

In reply to by प्रदीप

गणेशा 12/11/2014 - 22:38
कोणाचे काय आणि यांचे काय ? राजकिय धाग्यांना बंदि असावी असे मला अजुनही वाटते, आणि त्यामागे माझे मत होते की राजकीय विषयावर बोलताना संयम टाळुन आपलेच म्हणने कसे काय बरोबर आणि आपल्याच आवडणार पक्ष कसा बरोबर म्हणुन वयक्तीक लेवल ला येवुन येथील वातावरण दुषित होउ नये म्हणुन आहे. बंदि आल्यावर मी धागा काढणार नाही.. वरील माझे मत पटत नसेल तर त्या धाग्याची लिंक द्या आणि तेथे सयंमीत भाषेत धाग्याकर्तयाचे मत होते का हे सांगावे. आणि पटत असले तर पुन्हा माझ्या रिप्लायांच्या किंवा धाग्यांच्या मागे असे लिहिण्यासाठी लागु नये. परंतु व्यव्स्थीत विषय माडण्यास आपली काही हरकत नसावी. दुसरी गोष्ट कोण वाचनमात्र ही राहणार नाही वगैरे तुम्ही मला सांगु नये.. हे असल्या फुटकळ महत्वाकांक्षेणे येथे येण्याचे काही कारण नसते. लोक मोठ्ठे कधी होणाअर आहेत हे मला कळत नाही. मी रिप्लाय दिला एका धाग्यावर, धागा काढला दूसरा आणि या तिसर्‍याच ध्याग्यावर, येव्हडे छान विश्लेशन धाग्याकर्त्याने निट अभ्यासु पद्धतीने केलेले असले तरी तेथे येवुन तुम्ही चर्चा दूसरी कडे का वळवत आहात ? माझ्याच धाग्यावर फक्त बोलायचे होते ना हे . मी माझा धागा पाहिला नाही अजुन .. बघतो तेथे ही लिहिले आहे का ? असो, या संधर्भात तुम्हाला माझा हा शेवटचा रिप्लाय असेन. उगाच थोडा विनाकारण वेळ गेला असे माझ्या मनात आहे.

रमेश आठवले 12/11/2014 - 22:18
इतके झाले तरी अफझलखान हाच आपल्या पक्षाचा तारणहार असल्याचा भ्रम दूर होत नाहिये. आता २८ नोवेम्बेरला त्याच्या कबरी जवळ आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

क्लिंटन 12/11/2014 - 22:21
ज्या दिवशी निकाल लागले त्याच दिवशी सेनेने भाजपला पाठिंबा जाहीर करून सर्वप्रथम भाजपला मिळू शकणारी राष्ट्रवादीची रसद रोखायला हवी होती. भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही हे एकदा नक्की करून नंतर भाजपकडून आपल्याला हवे ते सेनेला मिळविता आले असते. एकदा सेनेचा पाठिंबा घेतल्यावर त्यांना लाथाडून नंतर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणे भाजपला अत्यंत अवघड झाले असते. हे न करता शिवसेना पुन्हा एकदा गाफील राहिली. भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही व शेवटी त्यांना आपलेच पाय धरावे लागतील या भ्रमात सेना नेते राहिले.
याला अगदी +१.
भाजपने चातुर्याने सेनेला बोलण्यात गुंतवून अपक्ष व इतर लहान पक्षांचा पाठिंबा मिळवून आपली गरज जेमतेम ७-८ आमदारांवर आणली व राज्यपाल व सभापती आपल्याच पाठीशी राहणार असे धोरण आखून शिवसेनेच्या मदतीशिवात विश्वासदर्शक ठराव मंजूर करुन घेऊन शिवसेनेचे मानेवरील जोखड कायमचे उतरविले.
शिवसेनेचे जोखड उतरविल्यानंतर यापुढे फडणवीसांना काय करता येईल याविषयी कालच माझ्या फेसबुक भिंतीवर लिहिले आहे ते इथे पेस्ट करतो: "राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्तेसाठी तडजोडी करणाऱ्या भाजप सरकारचे मी तरी समर्थन करू शकणार नाही.तरीही यानिमित्ताने एक गोष्ट लिहावीशी वाटत आहे.पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी अर्धे शहाणे होते नाना फडणवीस.आपल्या मुत्सद्दीपणाने, बुध्दीमत्तेने आणि धूर्तपणाने अनेक राजकारणे त्यांनी लिलया पार पाडली. त्या नानांच्याच वंशजांपैकी देवेंद्र फडणवीस आहेत की नाही हे माहित नाही पण असेच धूर्त राजकारण खेळायची संधी त्यांना राष्ट्रवादीच्या पाठिंब्याच्या निमित्ताने आली आहे. पडद्यामागे काय झाले ते माहित नाही पण फडणवीसांनी किंवा अन्य कोणा भाजप नेत्यानेही राष्ट्रवादीचा पाठिंबा मागितला नाही की त्यांच्यात काही बोलणी चालू आहेत असेही नाही.तर राष्ट्रवादीने पाठिंबा आपण होऊन देऊ केला आहे.त्यातून शिवसेनेकडील बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहेच.विश्वासमत संमत व्हायच्या आधीच फडणवीसांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आणि तो म्हणजे १७० कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करायचा.तालुका पातळीवरील राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचे या समित्या म्हणजे पैसे खायचे कुरण होत्या हे सर्वमान्य आहेच.जर का सिंचन घोटाळा आणि राष्ट्रवादीच्या कुकर्मांवर फडणवीसांनी कारवाई सुरू केली तर राष्ट्रवादीचे हात दगडाखाली येतील हे नक्कीच.कारण त्या कारणावरून फडणवीसांचा पाठिंबा कसा काढणार? (१९९६-९७ मध्ये देवेगौडांनीही काँग्रेसचा पाठिंबा असतानाही काँग्रेसलाच अडचणीत आणायची खेळी केली होती त्याला समांतर खेळी करायची फडणवीसांकडे संधी आहे). आणि जर राष्ट्रवादीने पाठिंबा काढला आणि सरकार पडायची वेळ आली तर शिवसेनेची अवस्था त्या परिस्थितीत आणखी बिकट होईल. एकतर सरकारविरोधी मत देणे म्हणजे राष्ट्रवादीच्या बाजूने मत देणे आणि सरकारच्या बाजूने मत देणे म्हणजे भाजपपुढे आणखी नमते घेणे असा त्याचा अर्थ होईल. आणि फडणवीस परत ताठ मानेने निवडणुकांना सामोरे जाऊ शकतील. फडणवीसांना पाठिंबा शरद पवार का देत आहेत? कारण सहा महिन्यात परत निवडणुका झाल्या तर आपली खैर नाही हे त्यांना समजून चुकले आहे.हा पाठिंबा त्यांच्यासाठी फाशीचा दोर ठरवायची संधी फडणवीसांकडे आहे. पण सत्ता टिकवायला राष्ट्रवादीबरोबर कोणतीही तडजोड केली आणि कोणत्याही घोटाळ्यांच्या चौकशीकडे दुर्लक्ष केले तर ते आत्मघाताचे ठरेल.कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निर्णयावरून तसे होऊ नये अशी आशा आहे.तसेच केजरीवाल काँग्रेसला किंवा मनमोहन कम्युनिस्टांना "हिंमत असेल तर काढा पाठिंबा" अशी भाषा वापरत होते तशी भाषा पब्लिकमध्ये वापरायला हवी. राष्ट्रवादीबरोबर सत्तेसाठी कोणतीही तडजोड केली तर ते मला नक्कीच मान्य नाही आणि त्याला विरोधच असेल. तसे केल्यास विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मत देणे माझ्यासाठी कठिण होईल. पण त्यामागे काही राजकीय खेळी असेल/असावी ही अपेक्षा.अर्थात प्रत्यक्षात काय होते ते बघायचे." फडणवीसांना असे धूर्त राजकारण करायची संधी या निमित्ताने आली आहे.ते कितपत प्रत्यक्षात उतरते ते बघायचे. तसे फडणवीसांनी केलेत तर सोन्याहूनही पिवळे पण ते स्पष्ट होत नाही तोपर्यंत तरी मी स्वत: या सरकारचे समर्थन करू शकणार नाही.

In reply to by क्लिंटन

श्रीगुरुजी 12/11/2014 - 23:51
>>> फडणवीसांना असे धूर्त राजकारण करायची संधी या निमित्ताने आली आहे.ते कितपत प्रत्यक्षात उतरते ते बघायचे. तसे फडणवीसांनी केलेत तर सोन्याहूनही पिवळे पण ते स्पष्ट होत नाही तोपर्यंत तरी मी स्वत: या सरकारचे समर्थन करू शकणार नाही. पुढील काही महिन्यात फडणवीस मोदींच्या सल्ल्याने अत्यंत धूर्तपणे पावले टाकतील असं वाटतंय. काही लोकानुययी घोषणा करून जनमत आपल्या बाजूला वळविण्याचा प्रयत्न करणे हे पहिले पाऊल असेल. आजच राज्यपालांच्या भाषणात स्थानिक संस्था कर (एल बी टी) रद्द करण्याची घोषणा केली आहे. यामुळे समस्त व्यापारीवर्ग खूष होईल. महापालिकांचे उत्पन्न घटेल. परंतु भाजपच्या ताब्यात नागपूर ही एकमेव महापालिका असल्याने भाजपला त्रास कमी होईल. त्याचबरोबरीने राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या गैरव्यवहाराची चौकशी सुरु होईल. आपण राष्ट्रवादीबरोबर नव्हतो हे यामुळे दाखविता येईल. असे केल्यास राष्ट्रवादीला पाठिंबा काढून घ्यावाच लागेल. अशा वेळी शिवसेनेने पाठिंबा दिला नाही तर शिवसेना बदनाम होऊन भ्रष्टाचाराच्या विरूद्ध लढल्यामुळे आपण हुतात्मा झालो हे दाखविण्याची संधी भाजपला मिळून पुढील निवडणुकीत फायदा होईल. >>> पण ते स्पष्ट होत नाही तोपर्यंत तरी मी स्वत: या सरकारचे समर्थन करू शकणार नाही. मला सध्या तरी या सरकारचे समर्थन करण्यात काहीच अडचण वाटत नाही. मुख्यतः शिवसेनेचे मानेवरील जोखड कायमचे उतरले याचा आनंद आहे. शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन केली असती तर शिवसेनेने प्रत्येकवेळी प्रचंड अडथळे आणून अतिशय त्रास दिला असता व सरकार कायम अस्थिर राहिले असते. शिवसेना भविष्यात अतिशय त्रासदायक ठरेल याचा अंदाज अमित शहा व मोदींना फार पूर्वीच आला होता. त्यामुळे त्यांनी योग्य संधी मिळताच युती तोडली. आम्ही तुम्हाला पाठिंबा देणार नाही व तुम्ही राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यायचा नाही अशा शिवसेनेच्या विचित्र भूमिकेमुळे मिळेल त्याचा पाठिंबा घेण्याशिवाय भाजपला पर्यायच नव्हता. राष्ट्रवादीला आपली भ्रष्टाचाराची प्रकरणे दडपायची होती म्हणून त्यांनी भाजपला पाठिंबा दिला या आरोपाला राष्ट्रवादीच्या अधिपत्याखालील कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करून फडणविसांनी उत्तर दिलेले आहे. भाजपला केंद्रात पवारांचा पाठिंबा हवा आहे व मोदी सुप्रिया सुळे व अजून एकाला केंद्रात मंत्री करतील हा आरोप अत्यंत हास्यास्पद आहे. जिथे मोदींना शिवसेनेच्या १८ खासदारांची गरज वाटत नाही तिथे ते शिवसेनेला लाथाडून फक्त ६ खासदार असलेल्या राष्ट्रवादीचा पाठिंबा कशाला घेतील?

In reply to by श्रीगुरुजी

आनन्दा 13/11/2014 - 10:36
सहमत.. भाजपा आता राष्ट्रवदीला कायमचे संपवण्याचे राजकारण खेळणार असे मला वाटते.. आणि हो, देवेन्द्र फडणवीस म्हणजे रा रा मफलरलाल नव्हेत, हे देखील नमूद करू इच्छितो.

In reply to by आनन्दा

मालोजीराव 14/11/2014 - 16:57
भाजपा आता राष्ट्रवदीला कायमचे संपवण्याचे राजकारण खेळणार
हा हा :)) साहेब धक्क्याला लावणार बीजेपी ला, गलत आदमी के हत्थे चढगयी कमळी :P

In reply to by मालोजीराव

श्रीगुरुजी 14/11/2014 - 21:03
>>> साहेब धक्क्याला लावणार बीजेपी ला, गलत आदमी के हत्थे चढगयी कमळी आपल्या आशावादाचे कौतुक वाटते.

In reply to by श्रीगुरुजी

क्लिंटन 13/11/2014 - 10:41
त्याचबरोबरीने राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या गैरव्यवहाराची चौकशी सुरु होईल. आपण राष्ट्रवादीबरोबर नव्हतो हे यामुळे दाखविता येईल. असे केल्यास राष्ट्रवादीला पाठिंबा काढून घ्यावाच लागेल. अशा वेळी शिवसेनेने पाठिंबा दिला नाही तर शिवसेना बदनाम होऊन भ्रष्टाचाराच्या विरूद्ध लढल्यामुळे आपण हुतात्मा झालो हे दाखविण्याची संधी भाजपला मिळून पुढील निवडणुकीत फायदा होईल.
मला वाटते यासाठीच राष्ट्रवादीचा वरकरणी पाठिंबा घेऊन त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटविण्यासाठी हे सगळे चालू असावे. आणि एक भाजप समर्थक म्हणून तसेच व्हावे असे अगदी मनापासून वाटते. राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सरकार चालविण्याला माझा स्वतःचा अगदी प्रचंड विरोध आहे.इतका विरोध मी केजरीवाल किंवा कम्युनिस्टांनाही केला नसेल. बघू पुढे काय होते ते.

In reply to by क्लिंटन

अनुप ढेरे 13/11/2014 - 10:53
मला वाटते यासाठीच राष्ट्रवादीचा वरकरणी पाठिंबा घेऊन त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटविण्यासाठी हे सगळे चालू असावे.
हा भाबडा आशावाद वाटतोय. असल काही होणार नाही. लवासा, सिंचन कुठल्याही घोटा़ळ्यात रा.वा.च्या नेत्यांना काहीही होणार नाही. फारतर एक-दोन नोकरशहांवर शेकेल प्रकरण.
राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सरकार चालविण्याला माझा स्वतःचा अगदी प्रचंड विरोध आहे.
माझाही. फुडल्या वेळेल्या काँग्रेसला मत देणार!

In reply to by अनुप ढेरे

क्लिंटन 13/11/2014 - 11:10
फुडल्या वेळेल्या काँग्रेसला मत देणार!
हे काही पटले नाही. जर राष्ट्रवादीची मदत घेऊन सरकार चालविणार म्हणून भाजपला विरोध असेल तर त्याच राष्ट्रवादीची मदत घेऊन १५ वर्षे सरकार चालविणार्‍या काँग्रेस पक्षाला मत देणार याची तर्कसंगती लागत नाही. भाजपने राष्ट्रवादीची मदत घेऊन सरकार चालविले तर पुढच्या वेळी मी नक्कीच मतदान करणार नाही (यावेळीही भाजप-राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतील ही शक्यता निवडणुकांच्या वेळेपासूनच होती म्हणून यावेळीही मतदान केले नव्हते).

In reply to by क्लिंटन

अनुप ढेरे 13/11/2014 - 11:23
भाजपावाले निवडणूकी आधी स्पष्ट म्हणत होते की रा.वा. कडून पाठिंबा घेणार नाही. आजच फडणवीस यांची एक जुनी मुलाखत पाहिली. त्यात ओरडून सांगत होते की रा.वा.चा पाठिंबा घेणार नाही म्हणजे नाही. आणि आता हे. I feel cheated. भाजपाला नाहीच म्हणून काँग्रेस. मतदान न करण हे तरी मला पटल नाही. त्यापेक्षा नोटाला द्यावं.

In reply to by अनुप ढेरे

गणेशा 13/11/2014 - 11:37
बरोबर .. मतदान न करणे खरेच समर्थनिय नाही असे मला ही वाटते. पण काँग्रेस ला तुम्ही मत देताल आणि ती ही राष्ट्रवादी बरोबर पुन्हा जाईन. पुढील वेळेस माझे मत शिवसेनेला असु शकते.. यावेळेस राष्ट्रावादीला मत दिले कारण भाजपाचा उमेदवार हा आयात राष्ट्रवादीचाच उमेदवार होता . माझे मत आहे निवडुन यावे हा एकच निकष घेवुन कोणालाही पक्षात घ्यायचे आणि त्याला उमेदवारी द्यायचे. मग लोकांना ज्याला लोकसभेला विरोधात मतदान केले त्यालाच यावेळी विधानसभेला मतदान करायची पाळी आलेली होती. भाजप ला मत द्या नाही तर राष्ट्रवादी ला दोन्ही मते राष्ट्रवादीलाच होती चिंचवड मतदार संघात. कारण पिंपरी चिंचवड महानगर पालिका राष्ट्रवादी ला गमवायची नाहिये, आता राष्ट्रवादीच्या ४० नगरसेवकांनी भाजप चे काम केले आहे. म्हणुन राष्ट्रवादी संपवण्याच्या गोष्टी भाजप करत असेन तर उलटा विचार केला तर ते नगरसेवक स्वताकडेच ठेवुन आक्खा आमदारच राष्ट्रवादी फेवरेबल करुन टाकायचा आणि पुन्हा पिंपरी चिंचवड मध्ये सत्ता घ्यायची. ही खेळी राष्ट्रवादीची आहे, आणि त्या विरोधात शिवसेनेला मिळणारी मते ही भाजपा आपल्याकडे घेवुन आपले स्थान थोडेशे चांगले करु पाहत आहे. सगळी कडे हे असेच चालु आहे. पण लोक्सभेला जसा पक्ष पाहिला जातो तसे विधानसभेला उमेदवार पाहिला जातो, त्यामुळे योग्य उमेदवार देणार्‍याला मतदान केले पाहिजे.

In reply to by अनुप ढेरे

क्लिंटन 13/11/2014 - 17:10
भाजपाला नाहीच म्हणून काँग्रेस.
म्हणजे काँग्रेसला पर्याय म्हणून भाजप आणि भाजपला नाही म्हणून परत काँग्रेस? हे काही समजले नाही. असो.

In reply to by अनुप ढेरे

मतदाराने आपले मत "अडम् तडम्... " करून न देता विचारपूर्वक देशाचे जास्तीत जास्त भले करेल अश्या पक्षाला / उमेदवाराला दिले तर जास्त योग्य होईल असे वाटते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

क्लिंटन 14/11/2014 - 22:14
मतदाराने आपले मत "अडम् तडम्... " करून न देता विचारपूर्वक देशाचे जास्तीत जास्त मले करेल अश्या पक्षाला / उमेदवाराला दिले तर जास्त योग्य होईल असे वाटते.
+१. महाराष्ट्राचा तामिळनाडू होऊ नये.म्हणजे कॉंग्रेस नको म्हणून लोकांनी यावेळी भाजपला मत दिले.आता राष्ट्रवादी प्रकरणाने परत एकदा कॉंग्रेसला मत द्यायची बात सुरू झाली आहे.त्याच्यापुढच्या वेळी तीच कॉंग्रेस नको म्हणून परत भाजप???

In reply to by श्रीगुरुजी

येवढा सगळा द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा शिवसेना फोडणे सोपे नव्हे का ? का कोणाचा असा समज आहे की शिवसेनेत सगळे जहाल तत्वनिष्ठ लोक आहेत ? फक्त एक काडी टाकण्ञाचा अवकाश आहे ! बास..... उधोजींना कोकणात जाऊन भातशेती करण्याशिवाय पर्याय रहाणार नाही. ( राणे यांनी काही शेती सोडली असेल तर !)

In reply to by क्लिंटन

खटपट्या 13/11/2014 - 01:14
जर का सिंचन घोटाळा आणि राष्ट्रवादीच्या कुकर्मांवर फडणवीसांनी कारवाई सुरू केली तर राष्ट्रवादीचे हात दगडाखाली येतील हे नक्कीच.कारण त्या कारणावरून फडणवीसांचा पाठिंबा कसा काढणार? (१९९६-९७ मध्ये देवेगौडांनीही काँग्रेसचा पाठिंबा असतानाही काँग्रेसलाच अडचणीत आणायची खेळी केली होती त्याला समांतर खेळी करायची फडणवीसांकडे संधी आहे). आणि जर राष्ट्रवादीने पाठिंबा काढला आणि सरकार पडायची वेळ आली तर शिवसेनेची अवस्था त्या परिस्थितीत आणखी बिकट होईल. एकतर सरकारविरोधी मत देणे म्हणजे राष्ट्रवादीच्या बाजूने मत देणे आणि सरकारच्या बाजूने मत देणे म्हणजे भाजपपुढे आणखी नमते घेणे असा त्याचा अर्थ होईल. आणि फडणवीस परत ताठ मानेने निवडणुकांना सामोरे जाऊ शकतील.
ही रणनीती बरी दिसतेय !! पण नेमके हेच झाले तर मजा आहे. अन्यथा राष्ट्रवादीसमोर बोट्चेपे धोरण स्विकारल्यास भाजपाचे पुढे कठीण आहे.

In reply to by खटपट्या

नितिन थत्ते 13/11/2014 - 11:13
>>अन्यथा राष्ट्रवादीसमोर बोट्चेपे धोरण स्विकारल्यास भाजपाचे पुढे कठीण आहे. असं काही नसतंय हो. जे भाजपला मत देतात ते भाजपलाच देणार काँग्रेसला देणारे काँग्रेसलाच देणार. आज कोणती अ किंवा ब कृती केली म्हणून काही फरक पडत नसतो. कारण कुठल्या तरी भ्रष्टाचारी नेत्यांना शिक्षा व्हावी म्हणून मतदान केलेलेच नसते. ते कुठल्यातरी अमूर्त गोष्टीसाठीच (भारत महासत्ता होणे, पाकिस्तानला/मुसलमानांना वचक बसणे वगैरे- किंवा काँग्रेसी असेल तर सेक्युलरिझम टिकण्यासाठी वगैरे) केलेले असते.

In reply to by नितिन थत्ते

खटपट्या 15/11/2014 - 01:13
जे भाजपला मत देतात ते भाजपलाच देणार काँग्रेसला देणारे काँग्रेसलाच देणार.
भाजप की शिवसेना असा विचार करणारे नक्कीच शिवसेनेकडे झुकतील.
आज कोणती अ किंवा ब कृती केली म्हणून काही फरक पडत नसतो. कारण कुठल्या तरी भ्रष्टाचारी नेत्यांना शिक्षा व्हावी म्हणून मतदान केलेलेच नसते. ते कुठल्यातरी अमूर्त गोष्टीसाठीच (भारत महासत्ता होणे, पाकिस्तानला/मुसलमानांना वचक बसणे वगैरे- किंवा काँग्रेसी असेल तर सेक्युलरिझम टिकण्यासाठी वगैरे) केलेले असते.
हे तुमचे वयक्तीक मत झाले. सर्वच मतदार असाच विचार करत असतील कशावरुन ? आणी बाकी भारत महासत्ता, पाकीस्तान्/मुसलमानांना वचक वगैरे लोकसभेच्या वेळेस.. विधानसभेला लोक स्थानीक प्रश्नांवरच मतदान करतात.

In reply to by खटपट्या

श्रीगुरुजी 15/11/2014 - 14:03
>>> भाजप की शिवसेना असा विचार करणारे नक्कीच शिवसेनेकडे झुकतील. असे वाटत नाही. विशेषतः युती तुटल्याच्या दिवसापासून आजतगायत वास्तवाचा समंजसपणे स्वीकार न करता शिवसेनेची विलक्षण आदळआपट व त्रागा सुरू आहे. 'सामना'तून रोज टीकेचा भडीमार सुरू आहे. 'जय विदर्भ' घोषणेला देशद्रोह्यांचे विषारी फूत्कार व ती घोषणा देणारे देशद्रोही असे म्हणण्यापर्यंत शिवसेना निराश झालेली आहे. शिवसेना नेतृत्वाला जाग येण्याचे काहीच चिन्ह नाही. भाजप सोडून शिवसेनेकडे जाण्यासाठी आशादायक काहीच नाही. अशा परिस्थितीत भाजपचे मतदार शिवसेनेकडे वळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

In reply to by श्रीगुरुजी

पैसा 15/11/2014 - 17:57
भाजपाचे मतदार शिवसेनेकडे वळणार नाहीत. पण मी किंवा क्लिंटनसारखे अनेकजण आहेत की योग्य उमेदवार किंवा धोरण दिसत नसेल तर आम्ही मतदानच करणार नाही म्हणतो. असे बरेचजण मतदान न करता घरी बसून राहिलो आणि काँग्रेस त्यांच्या मतदारांना मतदानाला आणू शकली तर भाजपा कुठे असेल? की आमच्यासारखे मध्यमवर्गीय मतदार कवडीमोल आहेत असा सगळ्यांचा समज आहे?

In reply to by पैसा

श्रीगुरुजी 15/11/2014 - 20:50
बहुसंख्य मतदार १-२ घटनांवरून पक्षाकडे पाठ फिरवित नाहीत. जेव्हा एखादे सरकार सातत्याने आणि अनेक प्रतिकूल निर्णय घेते तेव्हाच जनमत विरोधी जाते. आवाजी मतदान किंवा राष्ट्रवादीचा स्पष्टपणे न नाकारलेला पाठिंबा यामुळे लगेच भाजपविरोधी लाट येईल अशी शक्यता नाही.

In reply to by श्रीगुरुजी

खटपट्या 16/11/2014 - 01:44
राष्ट्रवादीचा स्पष्टपणे न नाकारलेला पाठिंबा यामुळे लगेच भाजपविरोधी लाट येईल अशी शक्यता नाही.
हे मान्य. तरीही "सरकार बचानेकेलिये सरकार मत चलाना" हा आदेश कसा आचरणात येतो ते बघावे लागेल. "पार्टी विथ डीफरन्स" या विश्वासालाही थोडा तडा गेलाच.

In reply to by खटपट्या

नितिन थत्ते 16/11/2014 - 07:20
>>"पार्टी विथ डीफरन्स" या विश्वासालाही थोडा तडा गेलाच. हा विश्वास आत्ताआत्तापर्यंत टिकला होता हे वाचून मौज वाटली.

In reply to by खटपट्या

दुश्यन्त 15/11/2014 - 21:19
भाजप की शिवसेना असा विचार करणारे नक्कीच शिवसेनेकडे झुकतील. +१ . राष्ट्रवादीशी युती/ समझोता 'नाही नाही नाही' म्हणत भाजपने जे शेण खाल्ले आहे त्यामुळे भाजपचा पाठीराखा मोठ्या प्रमाणत सेनेकडे जाणार हे उघड आहे. आज अमित शहा पण राष्ट्रवादीच्या पाठींब्या बाबत योग्य वेळी स्पष्टीकरण देवू असे म्हणाले आहेत. काही दिवसांनी पवार सरकार मध्ये पण येईल.

In reply to by खटपट्या

आनन्दा 16/11/2014 - 11:17
भाजप की शिवसेना असा विचार करणारे नक्कीच शिवसेनेकडे झुकतील.
कशाच्या आद्हारावर मी शिवसेनेला मत देउ? भाजप नाही तर म नोटा.. हे ठीक आहे.

अर्धवटराव 12/11/2014 - 22:33
निवडणुका आणि सरकार स्थापनेपर्यंत उद्धव आणि पर्यायाने सेना चुकीची वागली हे खरं असलं तरिही भाजपने शेवटी ज्यापद्धतीने रा.कॉ. च्या मदतीने सरकार स्थापन केलं तेही चुकच आहे. सध्यातरी सहानुभूती सेनेच्या पारड्यात गेल्याचं दिसतय. प्राप्त परिस्थितीचा उपयोग शहाणपणाने करण्यात सेना कदाचीत यापुढे देखील कमि पडेल व पवार साहेब स्वतःचा फायदा निश्चित करुन घेतील. भाजप काय करेल ते सांगता येत नाहि.

In reply to by आयुर्हित

क्लिंटन 15/11/2014 - 21:26
महापुरे झाडी जाती| तेथे लव्हाळे वाचती||
तुकाराम महाराजांना लव्हाळेच्या ऐवजी 'लव्हासे' असे म्हणायचे होते का? :)

गणेशा 12/11/2014 - 23:51
भाजपा ला शिवसेना नको होती.. आणि शरद पवार यांना माहिती होते, की भाजपा सत्तेजवळ गेल्यास मनसे ची ५-१० आमदारांची पण साथ त्यांना होऊ शकेन. त्यामुळे नाशिक मध्ये त्यांनी मनसे बरोबर महानगर पालिका घेतली आणि मनसेचा नाशिक विधानसभा क्षेत्रात पिछेहाट होण्यास येव्ह्डे निमित्त पुरेशे ठरले. तरीही शिवसेने ला जी नावे ठेवत आहेत ते मला योउग्य वाटत नाही. एकट्या उद्धव ठाकरे यांच्या जीवावर शिवसेने ने बर्यापैकी आमदार आनलेले आहेत. उद्धव ठाकरेंची कार्यशैली मला वयक्तिक आवडत नाही, पण खुनशी राजकारण त्यांना येत नाही उआपुढे जावुन राजकारण करणेच त्यांना जास्त जड जाते असे मला वाटते. शिवसेना संपण्याची नांदी जे तुम्ही म्हणालात ते खरे तर मला शक्य वाटत नाही परंतु शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांना माननारे सच्चे कार्यकर्ते त्यांची साथ कधीच सोडत नाहीत. या दोनही नेत्यांचे संबंध डायरेक्ट लो लेवल पर्यंत असल्याने त्यांची पडझड येव्हड्या पटकन होणार नाही असे मला वाटते. उद्धव ठाकरेंनी राज्यव्यापी एक जरी योग्य आंदोलन यशस्वी केले, पारंपारीक मराठी अस्मिता आणि इतर मुद्द्यापेक्षा, शेतकरी .. त्यांचे प्रश्न. राज्याला आवश्य्क असणारी विरोधी पक्षाची सोच तरी पुढील निवडनुक ते यश्स्वी पणे पार पाडतील असे मला वाटते. परंतु राष्ट्रवादी हा महानगरपालिकेत सर्वांना जड जाणारा पक्ष आहे, पिंपरी चिंचवड ला या वेळेस थोडे विरोधी वातावर्ण झाले असले तरी भाजप बरोबर सांगमत झाल्याने तेथील सत्ता न जाण्यासाठीची पुरेपुर तरतुद झालेली असेल. त्यात राष्ट्रवादी ही एक पक्ष कॉन्ग्रेस बरिओबर.. शिवसेने बरोबर आणि आता स्पष्ट झाल्या प्रमाणे भाजप बरोबर ही पुढील निवडनुकीनंतर जावु शकतो. कोणी तरी भाजप राष्ट्रवादी बरोबर जाईन हे आधी भाकीत केले होते का ? याला धोरणी राजकारण म्हणावे लागेल. परंतु शरद पवार यांच्या नंतर, उद्धव ठाकरे इतके ही राष्ट्रवादीला तग धरता येईल का याची साशंकता आहे. फक्त शिवसेनेला लांब ठेवण्याबरोबर भाजप चा डोळा मुंबई महानगर पालिके सोबतच इतर महानगर पालिकडे असु शकतो.. त्यातच राज्यात भाजप बरोबर जावुन, शिवसेनेला सरकार पासुन लांब ठ्वण्त्यात आणि कॉन्ग्रेस चे कुठे नाव ही न आणण्यात शरद पवार यशस्वी ठरलेले आहेत. सध्या तरी राकराणात त्यांचा हात धरणारा कोणी नाही.

In reply to by गणेशा

@ शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांना माननारे सच्चे कार्यकर्ते त्यांची साथ कधीच सोडत नाहीत बाळासाहेबांच्या वेळची सेना , वाजपेयींच्या काळातील भाजपा व शरद राव महाराष्ट्रात होते तेव्हाची राष्ट्रवादी आता उरली नाही . आवाजी बहुमत ही अफलातून चाल भाजपने खेळली. नियमांकडे बोट दाखवून मतविभाजनाचा प्रस्ताव टाळला, परत पंजाच्या ५ आमदारांवर दोन वर्षांचे निलंबन आणले. च्यायला बिग बॉस सारखा लुटापूटी ची भांडणे , छडयंत्रे पाहण्यापेक्षा आता विधान सभेचे कामकाज लाईव्ह दाखवले तर मजबूत टी र पी मिळेल. सहा म महिने जीवदान उरलेले ६ ते ८ आमदार भाजप मधल्या काळात नक्की मिळवेल. प्रभू सर्व पक्षात असतात त्यांना शोधण्यासाठी बस नजर और अक्कल चाहिये

In reply to by निनाद मुक्काम …

क्लिंटन 13/11/2014 - 11:06
सहा म महिने जीवदान उरलेले ६ ते ८ आमदार भाजप मधल्या काळात नक्की मिळवेल.
बर्‍याच ठिकाणी भाजप सरकारला सहा महिने जीवदान मिळाले अशा स्वरूपाचे उल्लेख आहेत.ते माझ्या मते चुकीचे आहेत. इतके दिवस मला वाटत होते की राज्यघटनेत केवळ अविश्वास प्रस्तावाचा उल्लेख आहे आणि विश्वासदर्शक प्रस्तावाचा उल्लेख नाही.आजच राज्यघटनेची पी.डी.फ फाईल परत एकदा बघितली.त्यात अविश्वास प्रस्तावाचाही उल्लेख नाही.तर उल्लेख केवळ इतकाच आहे की केंद्रीय मंत्रीमंडळ सामुहिकरित्या लोकसभेला जबाबदार असेल. राज्यघटनेत केवळ तत्वांचा उल्लेख असतो (केंद्रीय मंत्रीमंडळ लोकसभेला जबाबदार असेल हे तत्व) आणि त्या तत्वांची अंमलबजावणी कशी करावी हे सभागृहांच्या नियमांवर सोडलेले असते. तेव्हा अविश्वास प्रस्ताव आणि विश्वासदर्शक ठराव या गोष्टी लोकसभेच्या (आणि राज्य विधानसभांच्या) कामकाजाच्या नियमांअंतर्गत असाव्यात.हे नियम मी तपासून बघितलेले नाहीत.तरीही आपल्या राज्यव्यवस्थेत इतर गोष्टी ज्या पध्दतीने चालतात त्याला अनुसरूनच ही पध्दत आहे. एकदा अविश्वास ठराव आणला आणि त्या ठरावाचा पराभव झाला तर पुढचा अविश्वास ठराव सहा महिन्यांपर्यंत आणता येत नाही असे कधीतरी वाचल्याचे आठवते.विश्वासदर्शक ठरावाविषयी नक्की काय नियम आहेत हे माहित नाही. फडणवीस सरकारने काल विश्वासदर्शक ठराव आणला.त्यामुळे विरोधी पक्षांना अविश्वास ठराव आणायचा असेल तर त्याला ही सहा महिन्यांची अट लागू होईल असे वाटत नाही. दुसरे म्हणजे सरकारचा पराभव आणखी दोन प्रकारे होऊ शकतो.राज्यपालांच्या भाषणावरील धन्यवाद प्रस्ताव जर विधानसभेने फेटाळला तर सरकारचा पडते.तसेच कोणत्याही अर्थबिलावर सरकारचा पराभव झाला तरी सरकार पडते.अनेकवेळा विरोधी पक्ष अर्थसंकल्पावर कपात सूचना आणतात (आणि या कपात सूचना प्रतिकात्मक म्हणून एक रूपयाच्या असतात). या कपात सूचना विधानसभेने मंजूर केल्या तरी सरकारचे बहुमत गेले असा त्याचा अर्थ होतो. राज्यपालांचे अभिभाषण काल झाले. बहुदा आजच त्यावरील धन्यवाद प्रस्तावावर मतदान होईल.अर्थसंकल्पावर मतदान मार्च महिन्यात होईल.त्यावेळी पराभव झाल्यासही सरकार पडू शकेल.त्यामुळे सरकारला सहा महिन्यांचे जीवदान मिळाले हे म्हणणे चुकीचे आहे असे मला वाटते.

In reply to by क्लिंटन

माहितगार 13/11/2014 - 12:15
बर्‍याच ठिकाणी भाजप सरकारला सहा महिने जीवदान मिळाले अशा स्वरूपाचे उल्लेख आहेत.ते माझ्या मते चुकीचे आहेत.
हे सहा महिनेवाले उल्लेख मला आश्चर्यकारक वाटले. पक्षांतरबंदी कायद्यात असे काही बदल झाले असण्याची शक्यता वाटते काय ? पक्षांतरबंदी कायद्यात असा काही केला गेला असलातरी पार्लमेंटरी लोकशाहीत अशा नियमाची वैधता सांशंकीत करणारी वाटते.
दुसरे म्हणजे सरकारचा पराभव आणखी दोन प्रकारे होऊ शकतो.राज्यपालांच्या भाषणावरील धन्यवाद प्रस्ताव जर विधानसभेने फेटाळला तर सरकारचा पडते.तसेच कोणत्याही अर्थबिलावर सरकारचा पराभव झाला तरी सरकार पडते.अनेकवेळा विरोधी पक्ष अर्थसंकल्पावर कपात सूचना आणतात (आणि या कपात सूचना प्रतिकात्मक म्हणून एक रूपयाच्या असतात). या कपात सूचना विधानसभेने मंजूर केल्या तरी सरकारचे बहुमत गेले असा त्याचा अर्थ होतो.
सरकारकडे पुरेसे बहुमत नसल्याचा हा फक्त अप्रत्यक्ष अर्थ झाला. त्याचा अर्थ नाचक्की एवढाच होतो. पण प्रत्यक्ष अविश्वास प्रस्ताव मंजूर होई पर्यंत सरकार पडणे घटनेच्या दृष्टीने अत्यावश्यक नसावे असे वाटते. महाराष्ट्र विधानसभेच्या स्थितीत सध्याच्या समजा भाजपेतर तिन्ही पक्षांनी सुस्पष्ट सांगीतले की सरकार तुम्ही चालवा पण अर्थ विधेयकासहीत प्रत्येक कायद्यावर विधानसभेत आम्ही बाकीचे तीन पक्ष मिळून काय करायचे ते ठरवू या केस मधे सरकारकडे फक्त अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह राईट राहतील, निर्णयशक्ती विरोधी बाकांसोबत प्रत्येकवेळी होणार्‍या तडजोडीवर असेल. हे सरकारात बसलेल्या पक्षास मंजूर असेल तर एखादे सरकारी अर्थ विधेयक मंजूर झाले नाही एखादी कपात सूचना मंजूर झाली म्हणून सरकार पडण्याचे मला कारण दिसत नाही. अर्थात हि काल्पनिक गोष्ट आहे, कमीत कमी शक्यता गृहीत धरूनही घटनात्मकतेच्या दृष्टीने मी शंका मांडत आहे.

In reply to by माहितगार

क्लिंटन 13/11/2014 - 22:11
सरकारकडे पुरेसे बहुमत नसल्याचा हा फक्त अप्रत्यक्ष अर्थ झाला. त्याचा अर्थ नाचक्की एवढाच होतो. पण प्रत्यक्ष अविश्वास प्रस्ताव मंजूर होई पर्यंत सरकार पडणे घटनेच्या दृष्टीने अत्यावश्यक नसावे असे वाटते.
नाही राज्यघटनेत केंद्रीय मंत्रीमंडळ सामूहिकपणे लोकसभेला जबाबदार असेल असे म्हटले आहे.कोणत्या परिस्थितीत सरकारने लोकसभेत बहुमत गमावले असे म्हणता येईल? यासाठी बऱ्याच गोष्टी रूढी,प्रथा आणि संकेतांवर आधारीत असतात.त्यातले बरेच आपल्याकडे ब्रिटिश पध्दतीतून आले आहेत.त्यानुसार अविश्वास प्रस्ताव, अर्थविधेयकावर सरकारचा पराभव होणे आणि राष्ट्रपती/राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर सरकारचा पराभव होणे या गोष्टी नक्कीच ब्रिटिशांकडून आल्या आहेत.विश्वासदर्शक ठराव हा प्रकार ब्रिटिशांकडे आहे की नाही याची कल्पना नाही.तो अगदी मुळातला भारतीय असला तरी केंद्रीय मंत्रीमंडळाचे लोकसभेत बहुमत सिध्द करायचा तो प्रकार असल्यामुळे तो लोकशाहीचा स्पिरीटमध्येच बसणारा आहे त्यामुळे त्याविषयी तक्रार असायचे कारण नाही.यापैकी एकाही प्रकारे सरकारचा पराभव झाला तर त्याचा अर्थ सरकारने बहुमत गमावले असा होऊन सरकार पडते.
हे सरकारात बसलेल्या पक्षास मंजूर असेल तर एखादे सरकारी अर्थ विधेयक मंजूर झाले नाही एखादी कपात सूचना मंजूर झाली म्हणून सरकार पडण्याचे मला कारण दिसत नाही.
२००३ मध्ये झारखंडमध्ये बाबूलाल मरांडी यांचे भाजप सरकार विधानसभेत कपात सूचना मंजूर झाल्यामुळे पडले होते.

In reply to by क्लिंटन

सव्यसाची 13/11/2014 - 13:45
क्लिंटन सर, मला वाटते सरकारवर एकदा विश्वास प्रस्ताव मजूर झाला कि पुढचे सहा महिने सरकारवरती अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही. तुम्ही म्हणता ती परिस्थिती पण असू शकते. अर्थसंकल्पाबद्दल आपल्याशी सहमत आहे. फक्त अविश्वास प्रस्तावानेच सरकार पडू शकते हा भाबडेपणाच म्हणावा लागेल. दुसरा एक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. मला वाटते त्याप्रमाणे विधानपरिषद हि सुद्धा राज्यसभेसारखीच आहे आणि तिथे सरकार कधीच पडू शकत नाही (चुकीचे असेल तर दुरुस्त करावे हि विनंती.) परंतु ordinary bills पास करायची असतील तर ती विधानपरिषदेमध्येही मंजूर करून घ्यावी लागतील. तिथे सध्या राष्ट्रवादीचे सर्वात जास्ती आमदार आहेत. (२८) कॉंग्रेस (२१), भाजप (११), सेना(६). असे थोड्या वेळासाठी आपण समजले कि सेना भाजप एकत्र आले असते तर विधानसभेत बहुमत होते पण विधानपरिषद मध्ये अजून पण बहुमत मिळालेच नसते. तिथे राष्ट्रवादी किंवा कॉंग्रेस यांचा आधार घ्यावाच लागला असता. संसदेप्रमाणे इथेही संयुक्त अधिवेशन असेल तर सेना भाजप एकत्र येण्याचा फायदा झाला असता. पण मी विधानसभा आणि विधानपरिषद संयुक्त अधिवेशन पाहिले नाही. त्यामुळे ते असते कि नाही याची कल्पना नाही.

In reply to by सव्यसाची

क्लिंटन 13/11/2014 - 22:46
मला वाटते सरकारवर एकदा विश्वास प्रस्ताव मजूर झाला कि पुढचे सहा महिने सरकारवरती अविश्वास प्रस्ताव आणता येत नाही. तुम्ही म्हणता ती परिस्थिती पण असू शकते.
मी हे बऱ्याच वर्षांपूर्वी (मी शाळेत असताना) वाचले होते. माझी वाचण्यात चूक झाली होती की आठवण्यात चूक झाली आहे समजत नाही. बहुतांश वेळा हे नियम लोकसभा आणि राज्य विधानसभांना एकसारखेच असतात.लोकसभेत मात्र ६ महिन्यांची मुदत लागू पडत नाही असे वाटते. नरसिंह राव सरकारवर पहिला अविश्वास ठराव आला होता हर्षद मेहता प्रकरण उघडकीस आल्यानंतर १९९२ च्या पावसाळी अधिवेशनात म्हणजे जून १९९२ मध्ये.तो ठराव फेटाळला गेला हे मी दुसऱ्या दिवशी शाळेत जायच्या आधी पेपर वाचला त्यात वाचले होते हे पक्के आठवते म्हणजे तो ठराव १० ते १५ जूननंतर आला होता हे नक्की.तर अयोध्या प्रकरणानंतर ८ डिसेंबर १९९२ रोजी वाजपेयींनी अविश्वास ठरावावर नोटिस दिली.ती लोकसभा अध्यक्षांनी मान्य केली.प्रत्यक्ष ठरावावर चर्चा झाली १५ डिसेंबरनंतर कारण दंगलींच्या कारणावरून आठवडाभर संसद तहकूब केली होती हे पण आठवते. ६ महिन्यांची मुदत असेल तर ८ डिसेंबरला अध्यक्षांनी अविश्वास ठरावाची नोटिस मान्य करायला नको होती. बहुदा माझी स्मरणशक्ती दगा देत नसावी :) मग हा नियम मी महाराष्ट्र विधानसभेच्या संदर्भात वाचला होता की असा कोणता नियमच नाही हे समजत नाही. याविषयी कोणाला माहिती असल्यास ते लिहिले तर चांगले होईल.
दुसरा एक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. मला वाटते त्याप्रमाणे विधानपरिषद हि सुद्धा राज्यसभेसारखीच आहे आणि तिथे सरकार कधीच पडू शकत नाही (चुकीचे असेल तर दुरुस्त करावे हि विनंती.)
हो बरोबर. तिथे सरकार पडू शकत नाही. पण विधानपरिषद ही राज्यसभेइतकी बलिष्ठ नाही. समजा विधानसभेने पास केलेले विधेयक विधानपरिषदेने फेटाळले (किंवा विधानसभेला मान्य नसलेल्या दुरूस्त्या विधानपरिषदेने मंजूर केल्या) तर ते विधेयक परत एकदा विधानसभेकडे येते.ते परत विधानसभेने पास केले आणि विधानपरिषदेने दुसऱ्यांदा फेटाळले तर विधानपरिषदेचा दुसरा नकार ग्राह्य धरला जात नाही आणि विधानसभेने मंजूर केलेल्या स्वरूपात ते विधेयक विधीमंडळाने पास केले असे धरले जाते. तेव्हा विधानपरिषद म्हणजे बऱ्याच अंशी एक cosmetic अधिकार असलेले सभागृह आहे. याविषयी अधिक भारतीय राज्यघटनेच्या कलम १९७--पी.डी.एफ मधील पान ९६ वर.
संसदेप्रमाणे इथेही संयुक्त अधिवेशन असेल तर सेना भाजप एकत्र येण्याचा फायदा झाला असता. पण मी विधानसभा आणि विधानपरिषद संयुक्त अधिवेशन पाहिले नाही. त्यामुळे ते असते कि नाही याची कल्पना नाही.
वर लिहिल्याप्रमाणे असे संयुक्त अधिवेशन घ्यायची गरज नाही कारण विधान परिषदेला तितके अधिकार नाहीत.

ओंकारा 13/11/2014 - 01:56
या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्र लढले. सर्वांनी स्वबळावर मतदारांकडे कौल मागितला. संपूर्ण प्रचारात भाजपाने शिवसेनेवर टीका केली नाही. ठाकरे आणि कंपनीच्या सर्व विखारी प्रचारानंतरही भाजपानं 122 जागा जिंकल्या. शिवसेनेची उडी 63 पर्यंतच मर्यादित राहिली. मतदारांनी स्पष्ट बहुमत दिलं नाही. पण त्यांचा मूड ओळखून शिवसेनेनं भाजपला पाठिंबा द्यायला हवा होता. भाजपनं शिवसेनेच्या पाठिंब्याची इच्छा व्यक्त केली होती. राष्ट्रवादीचा पाठिंबा मागितला नाही, किंवा त्यांच्याशी बोलणीही केली नाही. शिवसेनेनं पाठिंबा दिला असता तर राष्ट्रवादीची रसद रोखली गेली असती. पवारांचं महत्व कमी झालं असतं तसं काहीही झालं नाही. ठराविक वर्तुळाच्या बाहेर न पाहणारं शिवसेना नेतृत्व नुसत्या पोकळ गर्जना करत राहिलं. पण दुसरिकडं अगदी शेवटपर्यंत भाजपशी वाटाघाटी सुरु होत्या.अगदीराष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटूनही भाजपला दगा करण्याचा प्रयत्न झाला. बहुमताच्या निम्या जागा नसतानाही उपमुख्यमंत्री, गृहमंत्रीसह निम्मे मंत्रीपदचा हट्ट धरुन रुसून बसणा-या शिवसेनेचं जोखड भाजपाच्या खांद्यावरुन उतरलं ते बरचं झालं. आता जे काही भलं बुरं होईल ते स्वबळावर. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर तरलेल्या सरकारची प्रतिमा खरब झालीय. हे शेंबड पोरगंही सांगतंयय. ते फडणवीस सरकारलाही मान्य असेल. त्यामुळे आगामी काळात भाजपाला टिकवण्यासाठी त्यांना चांगली काम करावीच लागती. ती या सरकारनं केली तरच त्यांचा आगामी काळात निभाव लागेल. राज्याच्या जनतेसाठी ही आनंदाची बाब आहे. राजकारण हा सर्व्हायवल ऑफ द फिटेस्टचा खेळ आहे. इथे जो टिकला तो तरला. उगीच भावनिक होऊन सार संपलं म्हणून शोक करण्यात काहीच अर्थ नाही.

In reply to by ओंकारा

आनन्दा 13/11/2014 - 10:37
राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर तरलेल्या सरकारची प्रतिमा खरब झालीय. हे शेंबड पोरगंही सांगतंयय. ते फडणवीस सरकारलाही मान्य असेल. त्यामुळे आगामी काळात भाजपाला टिकवण्यासाठी त्यांना चांगली काम करावीच लागती. ती या सरकारनं केली तरच त्यांचा आगामी काळात निभाव लागेल. राज्याच्या जनतेसाठी ही आनंदाची बाब आहे. राजकारण हा सर्व्हायवल ऑफ द फिटेस्टचा खेळ आहे. इथे जो टिकला तो तरला. उगीच भावनिक होऊन सार संपलं म्हणून शोक करण्यात काहीच अर्थ नाही.
+१

आनन्दा 13/11/2014 - 10:48
याव्यतिरिक्त मला अजून एक शक्यता वाटते ती म्हणजे, कॉंग्रेसला संपवण्याच्या व्यापक कटाचा हा देखील एक भाग तर नव्हे? सत्ताधारी आणि विरोधी अशी दोन्ही तुणतुणी वाजवून कोंग्रेसचे खच्चीकरण करण्याचा देखील हा एक प्रयत्न होऊ शकतो.. कालचं पहा,

In reply to by आनन्दा

गणेशा 13/11/2014 - 11:26
हा भाबडा आशावाद आहे, राष्ट्रवादीला आणि कॉग्रेस ला नेस्तनाबुत करण्याची चांगली संधी भाजप ने गमावलेली आहे. शिवसेनेचीच उलट जास्त कोंडी केल्याचे स्पष्ट जानवत आहे. सेने ने पहिल्यांदाच आम्ही विरोधात बसु म्हंटले असते तर तो त्यांचा आतताईपना आहे असे म्हंटले गेले असते आणि आम्हाला राष्ट्रवादी शिवाय पर्याय नाही अशी बोलणी भाजप तर्फे झाली असती आणि शिवसेनेने चर्चा करण्यास नमते घेतले तर ते लाचर होते, त्यांच्यात पहिली जरब राहिली नाही असे म्ह्ंटले जाते. राजकारणात कोणी कोणाला कमी लेखु नये असेच मला वाटते. आण्जि कोण कोणत्या पक्षाला संपवु पाहत नाहिये हा आपला भाबडा आश्वाद आहे. स्वपक्ष विस्तारा साठी वाटेल ते असे धोरण सर्वांकडे आखले जात आहे. कॉग्रेस विलास राव देशमुखां नंतर विखुरलेली दिसत आहे. भाजप राष्ट्रवादीला संपवणार आहे हा तर आशावाद सोडा खुप चुकीचा विचार आहे. महानगर पालिकेची सत्ता तळागाळात टिकुन राहण्यात जास्त मदत करते आणि त्यासाठी भाजप - राष्टवादी एकत्र आले आहेत. यात ना शिवसेनेची चुक किंवा कमकुवत नेत्रुत्व आहे ना कोणाला संपवायचे धोरण. संपवायचेच असते तर त्यांचा हातभार घेतला गेला नसता. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्याकडे राज यांच्या सारखे वक्त्रुत्व नाही .. तसेच त्यांच्याकडे चांगली मास लिडर नेते मंडळी नाहीत. तीच गत महाराष्ट्र भाजप मध्ये ही आहे. देवेंद्र फडनविस हे मास लिडर आहेत असे मला तरी वाटत नाही. गोपिनाथ मुंडे हे एकमेव मास लिडर बिजेपी मध्ये होते. तरीही त्यांचे १२२ आमदार निवडुन आलेत, यात मोदी आण राष्ट्रवादी यांचा चांगलाच हातभार आहे. २२ आमदार उसने आलेले आहेत आणि त्यांच्यावर होल्ड भाजपा चा नाहिये. आणि भाजप कसे इतरांना संपवेन. भाजपा ने राष्ट्राव्दी ला संपवायचा पर्यत्न केला तर हे २२ जन पण शरद पवार त्यांच्याकडे घेवु शकतील, इतके राजकारण त्यांना येतेच येते. उलट स्वताचे ४०-४२ जे काही आहेत ते, आणो ह्या २२ मधिल १०-१२ आणि अपक्ष ८-१० या सर्वांना एकत्र ठेवुन शरद पवार भाजपा ला जेरीस आणु शकतात. शिवसेने ने त्यांचे कार्य सरळ चालु ठेवले तर पुढील निवडनुकीत कॉन्ग्रेस राष्ट्रवादी यांच्या विरोधातील मतदान शिवसेनेला होयील. आणि राष्ट्रवादी कॉग्रेस, काँग्रेस ची ही काही मते आपल्याकडे खेचण्यात यशस्वी होयील. भाजपाच्या बाजुने एकांगी विचार करुन आपण शरद पवार, उद्धव ठाकरे यांना कमकुवत समजत आहोत. भाजपा ला पक्ष वाढवायचाय.. राष्ट्रवादीला सत्ताकेंद्र टिकवायचेय..शिवसेनेला संभ्रमातुन पाहेर पडायचेय आणि कॉग्रेस ला नवसंजीवनीचा शोध घ्यायचाय..

In reply to by गणेशा

श्रीगुरुजी 13/11/2014 - 12:50
>>> हा भाबडा आशावाद आहे, राष्ट्रवादीला आणि कॉग्रेस ला नेस्तनाबुत करण्याची चांगली संधी भाजप ने गमावलेली आहे. शिवसेनेचीच उलट जास्त कोंडी केल्याचे स्पष्ट जानवत आहे. महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक त्रास देणारी शिवसेनाच आहे. भाजपची शिवसेनेबरोबर युती म्हणजे 'सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही' अशी अवस्था होती. त्यामुळे भाजप शिवसेनेलाच नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करणार हे उघड आहे. >>> सेने ने पहिल्यांदाच आम्ही विरोधात बसु म्हंटले असते तर तो त्यांचा आतताईपना आहे असे म्हंटले गेले असते नाही. उलट शिवसेनेने एक निश्चित भूमिका घेतल्याने शिवसेनेबद्दल जनतेचा आदर वाढला असता आणि भाजपलाही सेनेला खेळविता आले नसते. >>> शिवसेने ने त्यांचे कार्य सरळ चालु ठेवले तर पुढील निवडनुकीत कॉन्ग्रेस राष्ट्रवादी यांच्या विरोधातील मतदान शिवसेनेला होयील. आणि राष्ट्रवादी कॉग्रेस, काँग्रेस ची ही काही मते आपल्याकडे खेचण्यात यशस्वी होयील. हा फारच भाबडा आशावाद आहे. कालच्याच 'सामना'च्या अग्रलेखातील हा परिच्छेद वाचा. हा परिच्छेद संजय राऊतांनी लिहिला की उद्धव ठाकर्‍यांनी हे माहित नाही. पण जे लिहिले आहे त्यावरून यांचा पीळ आणि अविचारीपणा अजूनही गेलेला नाही हे स्पष्टपणे दृग्गोचर होतंय. "महाराष्ट्राच्या विधानसभेत ‘जय विदर्भ’चा नारा देण्याची हिंमत वाढली आहे. स्वतंत्र विदर्भाच्या विचाराचे काही लोक राज्याच्या विधिमंडळात असू शकतात. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासूनच त्यांचे शेपटे असे वळवळत आहे, पण महाराष्ट्राच्या विधानसभेत जहरी फणा काढून स्वतंत्र विदर्भाचे फूत्कार सोडण्याची हिंमत आतापर्यंत कोणी दाखवली नव्हती. नव्या सरकारच्या आमदानीत हे सर्व घडताना दिसत आहे. हिंदुस्थानच्या संसदेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे देणे व महाराष्ट्राच्या विधानसभेत स्वतंत्र विदर्भाचे नारे देणे हा अपराध असून ‘अशा’ उलट्या ‘खोपडे’च्या लोकांवर मुख्यमंत्र्यांनी खरे म्हणजे कठोर कारवाई करायला हवी. अर्थात स्वत: मुख्यमंत्र्यांनीच शपथ घेतल्यानंतर नागपुरात जाऊन महाराष्ट्रद्वेष्ट्या जहरी सापांना दूध पाजल्यावर अशा सापांची हिंमत वाढणारच. तशी ती वाढताना दिसत आहे आणि नैतिकता व तत्त्वाचे ‘हवाबाण’ सोडणारे मात्र अशावेळी गप्प बसले आहेत. "

In reply to by श्रीगुरुजी

गणेशा 13/11/2014 - 13:14
तुम्ही दिलेल्या पॅरेग्राफ वाचुन हासतो आहे. शिवसेने ने वरची फळी बदलली पाहिजे असे माझे ही मत आहे. नाहितर अश्या मनोरंजक लोकांमुळे शिवसेना फक्त मनोरंजन कार ठरु शकते. तुमची मते मला पटतात.. पण दिसते तसे येव्हडे सोप्पे नाहिये. असे माझे मत आहे. भाजप ला शिवसेना सर्वात जास्त त्रास देणारी वाटत होती.. तेच मला ही म्हणायचे आहे, म्हणुनच त्यांना ती सत्तेत नको होती. आणि ही भाजपाची चाल होती शिवसेना त्यात फसली. आणि भाजपची चाल राष्ट्रवादीच्या बरोबरीने होती. सर्व आधीच ठरले होते हे जर आपण माणनार असु तर भाजपा ने लोकांना अंधारात ठेवुन मते मागितली आहेत हे कळते. आणि त्यामुळे वेगळा पक्ष म्हणुन भाजप दिसत नाहिये. सर्व आता एकाच लेवल ला आहेत असे वाटते. बाकी तुमचे बरेच से मुद्दे पटणारेच आहेत, म्हणुन त्यावर रिप्लाय न देता मी माझी मते मांडली.

In reply to by श्रीगुरुजी

चिगो 20/11/2014 - 13:14
नव्या सरकारच्या आमदानीत हे सर्व घडताना दिसत आहे. हिंदुस्थानच्या संसदेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे देणे व महाराष्ट्राच्या विधानसभेत स्वतंत्र विदर्भाचे नारे देणे हा अपराध असून ‘अशा’ उलट्या ‘खोपडे’च्या लोकांवर मुख्यमंत्र्यांनी खरे म्हणजे कठोर कारवाई करायला हवी. अर्थात स्वत: मुख्यमंत्र्यांनीच शपथ घेतल्यानंतर नागपुरात जाऊन महाराष्ट्रद्वेष्ट्या जहरी सापांना दूध पाजल्यावर अशा सापांची हिंमत वाढणारच. तशी ती वाढताना दिसत आहे आणि नैतिकता व तत्त्वाचे ‘हवाबाण’ सोडणारे मात्र अशावेळी गप्प बसले आहेत. "
हे असं एका अग्रगण्य वृत्तपत्राने लिहीणं, बलेही त्याची वैचारीक बैठक काहीही का असेना, हा महाप्रचंड मुर्खपणा आहे. वेगळा विदर्भ असावा की नको, तो आर्थिक आणि विकासदृष्ट्या सुदृढ असेल की नाही ह्यावर विचार करुन आणि प्रॅक्टीकल बाबी तपासून हा निर्णय व्हायला पाहीजे. आणि वेगळा विदर्भ मागणे म्हणजे देशद्रोह हे म्हणणार्‍यांना फाट्यावर मारले पाहीजे. नको तिथे इमोशनल वायझेडपणा करणारे वैदर्भियांना आवडत नाही. कमीत कमी ह्या एका वैदर्भियाला तरी नक्कीच नाही..

In reply to by चिगो

कपिलमुनी 20/11/2014 - 13:18
वेगळा विदर्भाची कारणे जर संयुक्तीक असतील तर तो दिलाच पाहिजे . आणि अशी मागणे ते घटनेच्या चौकटीत राहून करत आहेत.यात चुकीचे काहीच नाही. नेत्यांनी स्वार्थासाठी याचा बागुलबुवा बनवला आहे

In reply to by कपिलमुनी

'वेगळ्या खान्देशाच्या क्षीण हाकाही प्रसारमाध्यमातून कानावर येत आहेत.' उद्या वेगळा कोंकण, वेगळी मुंबई अशाही हाका सयुक्तिक कारणाने आणि घटनेच्या चौकटीत राहून होऊ लागल्या तर त्यांनाही वेगळे काढून, महाराष्ट्राचे नांव बदलून 'मराठी संघराष्ट्र' असे करावे लागेल.

विटेकर 13/11/2014 - 11:09
आवडले ! नेहमीप्रमाणे क्लिंट्न यांचाही मार्मिक प्रतिसाद ! आता भाजप पुढची चाल काय खेळते यावर बाकीच्या सार्‍या गोष्टी अवलम्बून आहेत. शरद पवारांचा पाठिंबा घेतल्याने भाजपाचा प्रामाणिक मतदार आतून दुखावला गेला आहे. हे दुखणे भाजपाला बरे करयचे असेल तर आता सिंचन घोटाळ्यासारख्या भानगडी तातडीने बाहेर काढायला हव्यात, भ्रष्टाचारी आत जायला हवेत ! त्यामुळे हे दुखणे आपोआपच बरे होईल. कधे कधी मला वाट्ते , पवार धुरंधर राजकारणी आहेतच पण अमित शहा त्यांच्या वरचढ आहेत ! त्यांनी शिवसेनेचा काटा राष्ट्रवादीच्या काट्याने काढला. फक्त योग्य वेळ येताच , दोन्ही काटे फेकून देता आले पाहीजे !!

In reply to by विटेकर

गणेशा 13/11/2014 - 11:58
कधे कधी मला वाट्ते , पवार धुरंधर राजकारणी आहेतच पण अमित शहा त्यांच्या वरचढ आहेत ! त्यांनी शिवसेनेचा काटा राष्ट्रवादीच्या काट्याने काढला. फक्त योग्य वेळ येताच , दोन्ही काटे फेकून देता आले पाहीजे !!
थोडा उलटा विचार केला तर. कॉन्ग्रेस ला विरोधी पक्ष पद ही मिळवुन द्यायचे नाही, भाजपाला शिवसेने बरोबर ही जाउन द्यायचे नाही. आण स्वताचे महत्त्व ही टिकवायचे असे राष्ट्रवादीचे धोरण असु शकनार नाही का ? भाजप कशी ही करुन सत्ता स्थापण करणार होती, जर त्यांनी शिवसेनेला बरोबर घेतले असते तर कॉन्ग्रेस विरोधी पक्ष झाला असता, आणि या सगळ्यात राष्ट्रवादी कोठे तरी असता का ? उलट आता असलेल्या महानगर पालिका ही राष्त्रवादी ला गमवाया लागल्या असत्या. आणि हे झाले असते. त्यामुळे कोन वरचढ आहे हे सिद्ध झालेलेच आहे. उलट राष्ट्रवादी ला सोबत घेण्यात वरचढ पना नसुन धोक्याची पहिली चाहुल आहे हे येणारा काळ सांगेन. त्यातुन भाजपा सगळे भ्रष्टाचार बाहेर काढेल असे जे म्हंटले जाते, ते चुक आहे. महाराष्ट्र भाजप फक्त आणि फक्त केंद्र सरकारच्या म्हणण्यानेच चालेल. त्यांना वयक्तिक रित्या जास्त काही करता येइल असे मला वाटत नाही. बाकी सामान्य लोकांचा विकासा कडे कोणी लक्ष देइल का असे वाटते आहे. भाजप शिवसेने बरोबर गेम प्लॅन खेळण्यात अत्यंत यशश्वी झाली कारण तेथे उद्धव ठाकरे होते.. पण पवार साहेब असे आहेत ज्यांना विरोधी लोके ही साहेबच म्हणतात. त्यामुळे भाजप ने जे केले आहे सत्तेवर जाण्यासाठी ते कदापी समर्थनिय आणि पारदर्षी नाही. त्यामुळे पक्षीय वेगळेपण टिकवण्यात आत्ता साफ अपयशी ठरली. आणि एक विचार, जर शेवटच्या क्रमाम्कावर फेकल्या गेले तरी आपल्या पक्षाभोवती सत्ताकेंद्र फिरवत ठेवण्याला कुठली नीती म्हंटले पाहिजे, चानक्य निती पेक्षा ही वरचढ..

मदनबाण 13/11/2014 - 12:14
ह्म्म्म.... वेळ मिळताच संपूर्ण विश्लेषण आणि क्लिंटनरावांचे प्रतिसाद वाचीन... जाता जाता :- शरदचंद्र पवार => राष्ट्रवादी कॉग्रेस => ४१ उद्धव ठाकरे => शिवसेना => ६३ शिवसेनेच्या जागा राष्ट्रवादी पेक्षा जास्त असुन सुद्धा त्यांची अशी अवस्था व्हावी यावरुन पक्ष प्रमुखांची निर्णय क्षमता आणि चाणाक्षपणा कमी पडला हे या सर्व घटना क्रमातुन अगदी स्पष्ट झाले !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnership

समीरसूर 13/11/2014 - 12:24
इथे असणार्‍यांइतके मला कळत नाही पण मला वाटते भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षातले नेते डोक्यावर पडलेले आहेत. थोडं समजदारीने वागले असते तर दोघांचा फायदा झाला असता. भाजपला राष्ट्रवादीच्या बेभरवशाच्या आधाराची गरज पडली नसती आणि त्यांची नामुष्की टळली असती. शिवसेनेला चांगले काम करून दाखवून प्रतिमा सुधारता आली असती आणि सत्तादेखील मिळाली असती. मुंबई टिकवण्यात याचा हातभार लागला असता. शिवाय आता अकारण जे राष्ट्रवादीचे महत्व वाढले ते घडले नसते. आता भाजप आणि शिवसेना बाजूला राहिले; राष्ट्रवादीच सगळी सूत्रे हलवते आहे असे चित्र निर्माण झाले आहे. अर्थात, शिवसेनेने थोडे पडते घ्यायला हवे होते यात वादच नाही. आपल्या जागा कमी, आपला करिष्मा संपलेला, आणि आपण बोलतो किती याचे भान शिवसेनेला राहिले नाही. शिवसेनेमध्ये काय करावे हा गोंधळ शेवटपर्यंत होता आणि त्याने त्याचा घात केला. शिवाय त्यांचे सल्लागार म्हणजे आनंदीआनंदच. भाजपनेदेखील नको तितके ताणले आणि शेवटी रडीचा डाव खेळले आणि टीकेचे धनी झाले. यात नुकसान दोघांनाही होणर हे नक्की.

श्रीगुरुजी 13/11/2014 - 13:09
महाराष्ट्र विधानसभेत १९८८ पासून आतापर्यंत आठ वेळा विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आले. त्यापैकी सहा ठराव सभागृहात आवाजी मतदानाने मंजूर झाले आहेत. *२५ मार्च १९९५ - मनोहर जोशी सरकारवरील ठराव. *७ डिसेंबर १९९५ - मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळावर विश्वासदर्शक ठराव *१७ फेब्रुवारी १९९९ - नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठराव *२३ ऑक्टोबर १९९९ - विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळावर ठराव *१३ जून २००२ - विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळावर विश्वासदर्शक ठराव - मतदान अनुकूल १४३ तर विरोधात १३२ मते *२३ जानेवारी २००३ - सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळावर ठराव - चर्चेविना आवाजी मतदानाने. *१६ जुलै २००६ - विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळावर विश्वासदर्शक ठराव - मतदान, अनुकूल १५३ मते, विरोधात शून्य मत *१९८८ - शरद पवार यांच्या मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठराव - चर्चेविना आवाजी मतदानाने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर करणे ही जुनी व कायदेशीर प्रथा आहे.

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी 13/11/2014 - 14:43
सरकारे अल्पमतात होती की बहुमतात हा प्रश्नच उद्भवत नाही. आवाजी मतदानाची प्रक्रिया कायदेशीर होती का नव्हती एवढाच मुद्दा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

कपिलमुनी 13/11/2014 - 15:27
अगोदर राज्यपालांना सरकारला पाठिंबा असलेल्या आमदारांची यादी द्यावी लागते. वाजपेयी सरकारने पण पहिल्यांदा आवाजी मतदान घेतले होते तेव्हा बालयोगी यांना ते मंजूर झाले म्हणता आले असते. पण ते वाजपेयी होते, असले टेक्निकल आणि घाणेरडे खेळ त्यांना मंजूर नव्हते . म्हणून आवाजी मतदानानंतरही जेव्हा मतदनाची मागणी झाली ती त्यांनी मंजूर केली. आता मोदी आणि कंपनीचे पाय मातीचे आहेत त्याला कोण काय करणार. भाजपाचा काँग्रेसीकरण झालाय . सत्तेसाठी काय पण ! खाली म्हणले तसे रडीचा डाव ! आणि रेटून समर्थने

In reply to by कपिलमुनी

अनुप ढेरे 13/11/2014 - 16:48
कपिलमुनीसाहेब, श्रीगुरुजींशी वाद घालू नका. त्यांच्या विरोधात बोललात तर लगेच तुम्हाला नाना नेफळे, माईसाहेब वगैरे म्हणायला सुरुवात करतील ते लगेच.

In reply to by अनुप ढेरे

हाडक्या 13/11/2014 - 17:07
*lol* . *lol* परत नान्याची आठवण झाली.. तोच बाजीप्रभूच्या सारखा श्रीगुरुजीसमोर अखंड खिंड लढवित असायचा.. तरी असोच.. ( डोळ्यास उत्तरिय लावल्याची स्माईली कल्पावी)

In reply to by अनुप ढेरे

श्रीगुरुजी 13/11/2014 - 20:46
नाही हो. कपिलमुनी हे नानासाहेब नाहीत. नानासाहेब, माईसाहेब इ. आयडी वापरणारी व्यक्ती अजून कोणकोणते आयडी वापरते याची मला पूर्ण माहिती आहे. निव्वळ नानासाहेबच नव्हे तर इथले इतर काही सदस्य कोणकोणते वेगवेगळे डूआय वापरतात हे मला माहिती आहे. माहिती हवी असल्यास व्यनि करा. पुलंच्या 'व्यक्ती आणि वल्ली' मध्ये 'नाथा कामत'च्या व्यक्तिरेखेत एक वाक्य आहे. "उद्या विलेपारले ते गिरगाव वॉर्डापर्यंतच्या तमाम तरूणी बुरखा घालून हिंडल्या तरी नाथा नुसत्या त्यांच्या टाचांवरून किंवा चालीवरून त्यांची नावे व घरनंबर सांगेल." तद्वत इथल्या काही सदस्यांनी कितीही वेगवेगळे डूआय घेतले तरी नुसत्या त्यांच्या एका प्रतिसादावरून मी त्या आयडीमागच्या मूळ सदस्याला ओळखू शकतो.

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी 13/11/2014 - 20:31
>>> अगोदर राज्यपालांना सरकारला पाठिंबा असलेल्या आमदारांची यादी द्यावी लागते. याची गरज नसते. सरकार बनविण्यासाठी कोणत्या पक्षाला व नेत्याला आमंत्रण द्यायचे याविषयी घटनेने राज्यपालांना मार्गदर्शक तत्वे व अधिकार दिले आहेत. ज्या पक्षाकडे/युतीकडे स्पष्ट बहुमत आहे अशा पक्षाला राज्यपाल आमदारांची यादी न मागता सरकार स्थापनेचे आमंत्रण देऊ शकतात. समजा कोणत्याच पक्षाकडे/युतीकडे स्पष्ट बहुमत नसेल तर राज्यपाल सर्वाधिक मोठ्या पक्षाला आमदारांची यादी न मागता सरकार स्थापनेचे आमंत्रण देऊ शकतात व त्यांना एका ठराविक कालावधीत विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देऊ शकतात. बोम्मई खटल्यात यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे की राजभवन ही बहुमत सिद्ध करण्याची जागा नसून बहुमत हे विधानसभेत सिद्ध करायचे असते. त्यामुळे आधी कमीतकमी निम्म्या आमदारांची यादी दाखवा आणि मगच मी सरकार स्थापनेचे निमंत्रण देईन अशी भूमिका राज्यपाल कायद्याने घेऊच शकत नाहीत. जर सर्व पक्षांनी सरकार स्थापनेविषयी असमर्थता दर्शविली तर राज्यपाल विधानसभा स्थगित करण्याची शिफारस करू शकतात. >>>> वाजपेयी सरकारने पण पहिल्यांदा आवाजी मतदान घेतले होते तेव्हा बालयोगी यांना ते मंजूर झाले म्हणता आले असते. पण ते वाजपेयी होते, असले टेक्निकल आणि घाणेरडे खेळ त्यांना मंजूर नव्हते . म्हणून आवाजी मतदानानंतरही जेव्हा मतदनाची मागणी झाली ती त्यांनी मंजूर केली. आवाजी मतदान हे संपूर्णपणे कायदेशीर व घटनेला धरून आहे. >>> आता मोदी आणि कंपनीचे पाय मातीचे आहेत त्याला कोण काय करणार. इथे मोदींच्या पायांचा काय संबंध? काल जे काही झाले ते पूर्णपणे कायद्याला व घटनेला धरून झाले आहे. याच्यात मातीचे पाय कोठून आले? >>> भाजपाचा काँग्रेसीकरण झालाय . सत्तेसाठी काय पण ! खाली म्हणले तसे रडीचा डाव ! आणि रेटून समर्थने ज्या प्रक्रियेची घटनेत तरतूद आहे व जी तरतूद या पूर्वी अनेक वेळा वापरली गेली आहे तो रडीचा डाव कसा होतो?

In reply to by श्रीगुरुजी

कपिलमुनी 14/11/2014 - 15:37
ज्या प्रक्रियेची घटनेत तरतूद आहे व जी तरतूद या पूर्वी अनेक वेळा वापरली गेली आहे तो रडीचा डाव कसा होतो?
सरकार पूर्ण बहुमतात आहे हे नक्की असेल तर ती सोय आहे. इथे सरकारचा बहुमत सिद्ध झालाच नव्हत . आणि आवाजी मतदानामधे नक्की कोणता निकष लावला गेला ? होय चा आवाज किती डेसिबल होता आणि नाही च किती डेसिबल ? आणि कहिजण समजा हो ओरडलेच नसतील किंवा पार्टी बदलून ओरडले असतील तर कसे कळणार ? भाजपाचे ऑन पेपर १४५ असते आणि लोकसभे प्रमाणे पूर्ण बहुमत असते तर कोणी आक्षेप घेतला नसता. आवाजी मतदानाची पळवाट काढणे अनैतिक आहे आणि भाजपाच्या नैतिकतेच्या मोठ्या गप्पा असतात म्हणून हा विरोधाभास जास्त जाणवला .

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी 14/11/2014 - 21:06
>>> सरकार पूर्ण बहुमतात आहे हे नक्की असेल तर ती सोय आहे. चूक. पूर्ण बहुमत असले किंवा नसले तरी घटनेनुसार आवाजी मतदान घेता येते. >>> इथे सरकारचा बहुमत सिद्ध झालाच नव्हत . आणि आवाजी मतदानामधे नक्की कोणता निकष लावला गेला ? होय चा आवाज किती डेसिबल होता आणि नाही च किती डेसिबल ? आणि कहिजण समजा हो ओरडलेच नसतील किंवा पार्टी बदलून ओरडले असतील तर कसे कळणार ? या सर्वांचा निर्णय सभापती करतात. >>> भाजपाचे ऑन पेपर १४५ असते आणि लोकसभे प्रमाणे पूर्ण बहुमत असते तर कोणी आक्षेप घेतला नसता. आवाजी मतदानाची पळवाट काढणे अनैतिक आहे आणि भाजपाच्या नैतिकतेच्या मोठ्या गप्पा असतात म्हणून हा विरोधाभास जास्त जाणवला . घटनेत काय नैतिक आहे व काय अनैतिक आहे अशी सब्जेक्टिव्ह व सापेक्ष कलमे नसतात. तिथे लोकशाही व्यवस्थेसाठी कायदे व नियम दिले आहेत. त्यानुसार आवाजी मतदान हे पूर्णपणे कायदेशीर आहे.

मदनबाण 13/11/2014 - 13:49
राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्तेसाठी तडजोडी करणाऱ्या भाजप सरकारचे मी तरी समर्थन करू शकणार नाही.तरीही यानिमित्ताने एक गोष्ट लिहावीशी वाटत आहे.पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी अर्धे शहाणे होते नाना फडणवीस.आपल्या मुत्सद्दीपणाने, बुध्दीमत्तेने आणि धूर्तपणाने अनेक राजकारणे त्यांनी लिलया पार पाडली. त्या नानांच्याच वंशजांपैकी देवेंद्र फडणवीस आहेत की नाही हे माहित नाही पण असेच धूर्त राजकारण खेळायची संधी त्यांना राष्ट्रवादीच्या पाठिंब्याच्या निमित्ताने आली आहे. पडद्यामागे काय झाले ते माहित नाही पण फडणवीसांनी किंवा अन्य कोणा भाजप नेत्यानेही राष्ट्रवादीचा पाठिंबा मागितला नाही की त्यांच्यात काही बोलणी चालू आहेत असेही नाही.तर राष्ट्रवादीने पाठिंबा आपण होऊन देऊ केला आहे.त्यातून शिवसेनेकडील बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहेच.विश्वासमत संमत व्हायच्या आधीच फडणवीसांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आणि तो म्हणजे १७० कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करायचा.तालुका पातळीवरील राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचे या समित्या म्हणजे पैसे खायचे कुरण होत्या हे सर्वमान्य आहेच.जर का सिंचन घोटाळा आणि राष्ट्रवादीच्या कुकर्मांवर फडणवीसांनी कारवाई सुरू केली तर राष्ट्रवादीचे हात दगडाखाली येतील हे नक्कीच.कारण त्या कारणावरून फडणवीसांचा पाठिंबा कसा काढणार? (१९९६-९७ मध्ये देवेगौडांनीही काँग्रेसचा पाठिंबा असतानाही काँग्रेसलाच अडचणीत आणायची खेळी केली होती त्याला समांतर खेळी करायची फडणवीसांकडे संधी आहे). आणि जर राष्ट्रवादीने पाठिंबा काढला आणि सरकार पडायची वेळ आली तर शिवसेनेची अवस्था त्या परिस्थितीत आणखी बिकट होईल. एकतर सरकारविरोधी मत देणे म्हणजे राष्ट्रवादीच्या बाजूने मत देणे आणि सरकारच्या बाजूने मत देणे म्हणजे भाजपपुढे आणखी नमते घेणे असा त्याचा अर्थ होईल. आणि फडणवीस परत ताठ मानेने निवडणुकांना सामोरे जाऊ शकतील. फडणवीसांना पाठिंबा शरद पवार का देत आहेत? कारण सहा महिन्यात परत निवडणुका झाल्या तर आपली खैर नाही हे त्यांना समजून चुकले आहे.हा पाठिंबा त्यांच्यासाठी फाशीचा दोर ठरवायची संधी फडणवीसांकडे आहे.
१००% सहमत. राष्ट्रवादीचा पाठिंबा घेउन त्यांचीच चांगली पाचर मारली आणि याला व्यवस्थित प्रसिद्धी दिली गेली तर याचा मोठा फायदा भाजपला होइल असे मलाही वाटते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnership

In reply to by मदनबाण

समीरसूर 13/11/2014 - 14:04
एवढं किचकट राजकारण आहे हे? पण जनतेला इतकं नाही कळत. आज तरी भाजप आणि शिवसेना जनतेच्या रोषाचे धनी झालेले आहेत. उद्या जर पुन्हा निवडणूका झाल्या तर असंच काही होईल असं ठामपणे सांगता येत नाही. जनता कसा विचार करते हे राजकारण्यांचं राजकारण नाही ठरवत. एवढं सगळं कुटील कारस्थान रचण्यापेक्षा आधीच थोडा समंजसपणा दाखवला असता तर... मटामध्ये एक लेख आला होता. त्यात लेखकाने म्हटले होते की शरद पवारांना आपण एवढे धोरणी, मुत्सद्दी, मुरलेले राजकारणी म्हणतो. जे काही चाललं आहे त्यामागे शरद पवारांचाच हात आहे असं सगळे म्हणतात. शरद पवार जर एवढे पॉवरफुल आहेत तर त्यांना राष्ट्रवादीच्या ५० देखील जागा का नाही मिळवता येत? दर निवडणुकीला त्यांच्या जागा लक्षणीयरीत्या कमी कशा काय होत जातात? अजून एकदाही राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का नाही होऊ शकला? त्यांच्या पंतप्रधानपदाच्या महत्वाकांक्षेचं सोडून द्या. आता ते ही म्हणतील की मला कधीच पंतप्रधान व्हायचं नव्हतं म्हणून. :-) त्या लेखाचा रोख असा होता की प्रत्येक राजकीय घटनेचं विश्लेषण हे बरोबर असतंच असं नाही. मला वाटतं अतिकिचकट राजकारण खेळण्याच्या नादात पक्ष आपलं नुकसानच करून घेतात. शरद पवारांनी ते नेहमीच करून घेतलंय. म्हणून आजकाल स्वतःचा पक्ष नव्याने उभारण्यापेक्षा त्यांना नको त्या युक्त्या वापरून केवळ स्वार्थ साधण्यासाठी तग धरून रहावं लागतंय. पण हे फार काळ टिकणार नाही. अशा एक-दोन काड्यांवर फार काळ तरंगता येत नसतं. ही शेवटची स्वार्थ साधण्यासाठीची केविलवाणी धडपड आहे. भाजप-शिवसेनेच्या मूर्खपणामुळे ती जनतेवर लादली गेली आहे इतकंच.

In reply to by समीरसूर

खरे तर ते राजकारण तेवढे किचकट नसतेच. शरद्चे म्हणतोस ते खरे आहे.पुलोदच्या स्थापनेच्यावेळी (१९७८ साली) अनेकांनी त्याचे मुत्सद्दी म्हणून तोंड भरून प्रशंसा केली होती. पण सध्याच्या राजकारण्यांची जातकुळी पाहिलीस तर तो अनेक बाबतीत उजवा ठरतो.देशाच्या राजकारणात मात्र राष्ट्रवादीचे राजकारण सपशेल फसले.

मदनबाण 13/11/2014 - 14:12
सध्याच्या या घडामोडी पाहुन मला खव्यासाठी भांडणार्‍या बोक्यांची आणि माकडाची गोष्ट आठवली होती ! ;) CAT & Monkey {चित्र जालावरुन घेतले आहे.}

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnership

एकतर, भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा मागितलेला नाही. राष्ट्रवादीने स्वतःहून तो घोषित केला आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळीही राष्ट्रवादीने भाजपाच्या बाजूने मतदान केलेले नाही. राष्ट्रवादी त्यांच्या स्वघोषित पाठींब्याच्या धोरणानुसार 'तटस्थ' राहिले. बिजेपीच्या सांगण्यावरून नाही. राष्ट्रवादीचा पाठींबा आम्ही स्विकारला आहे असे अजून तरी भाजपने घोषित केलेले नाही. आता भाजपकडे ६ महिने आहेत आणि ८-१० आमदारांची गरज आहे. फोडतीलही ते एखाद्या पक्षातून.

कपिलमुनी 13/11/2014 - 14:38
भाजपा समर्थक सारी चुक शिवसेनेची आहे असे गळे काढण्यात गुंतले आहेत. राजधर्म पाळायचा असतो एव्ढा साधा कॉमन सेन्स नाहिये. जर राष्ट्रवादीचा पाठिंबा स्विकारला नाहिये तर तसा स्प्ष्ट सांगायची हिंमत दाखवायची. मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असा प्रकार आहे. ज्या मतदारांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस्च्या विरोधत मतदान केले हा त्या मतदारांचा विश्वासघात आहे. प्रादेशिक पक्ष : याबद्दलची मोदी शहा यांची भुमिका स्पष्ट आहे . हरयाणा , महाराष्ट्र आणि पंजाब मधे त्यांनी युती तोडली आहे. गोव्या मधे पण युती तोडली पाहिजे असे चालू आहे. त्यामुळे शिवसेनेने समंजसपणा दाखवूनही भाजपा ने युती टिकवलीच असती असे समजणे चुकीचे आहे. आता प्रश्न कालच्या गोंधळाचा : राजकीय समीकरणे काहीही असो , मी ज्यांच्या सोबत बोललो , चेपु वर, वैयक्तीक , किंवा आंजावर , सर्व सामान्य ( नमोरूग्ण नव्हे सामान्य !) लोकांचे एकच मत होते , भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यायला नको होता . यामुळे भाजपाची प्रतिमा मलीन झाली आहे.

In reply to by कपिलमुनी

समीरसूर 13/11/2014 - 15:01
शिवसेना कितीका मूर्ख असेना, भाजप रडीचा डाव खेळली यात शंका नाही. आवाजी मतदान काय, मूग गिळून गप्प राहणे काय, अगदीच तांत्रिक बाबींचा आधार घेऊन कार्यभाग साधणे काय...मोदींच्या डरकाळी फोडून कामाला लागण्याच्या अगदीच विपरित असे हे महाराष्ट्र भाजपचे वर्तन होते. खेळतांना लहान मुले कशी बोटावरची थुंकी बदलतात तसा पोरखेळ केला भाजपने. आणि याचे नुकसान भाजपला भोगावेच लागणार. शिवसेनेइतकीच गोंधळाची अवस्था भाजपची होती. राष्ट्रवादीने काहीही केले तरी आश्चर्य वाटत नाही; सत्तेसाठी अक्षरशः 'काहीही' करणे हा त्यांचा धर्मच आहे. पण भाजपने हा जो रडीचा डाव खेळला तो काही पचनी पडला नाही. अजय जडेजाने फिक्सिंग केले तर काही विशेष वाटत नाही; सचिनने केले तर कसे वाटेल?

In reply to by समीरसूर

कपिलमुनी 13/11/2014 - 16:13
अगदी हेच ! अ पार्टी विथ डिफरन्स आणि विपरीत वागणूक.

In reply to by कपिलमुनी

आनन्दा 13/11/2014 - 16:30
ह्म्म.. काल माझ्या मनात देखील असेच विचार होते.. पण नंतर मी शांतपणे विचार केला की तसेही दगडापेक्षा वीट मऊ. त्यांनी सत्ता कशी मिळवली यापेक्षा ती कशी राबवली हे जास्त महत्वाचे आहे. तसेही त्यांनी केले ते नैतिकतेला धरून नसेलही, पण बाकीचे जे वागत होते ती कोणती नैतिकता होती? त्यामुळे सध्या मी वेट अ‍ॅण्ड वॉच असे ठरवले आहे, तसेही माझ्या दॄष्टीने ते याच्या पुढे कसे काम करतात हे महत्वाचे. आत्ता नेमके काय तोडपाणी झाले आहे ते पुढच्या निवडणूकीच्या वेळेसच बाहेर येईल. तोपर्यंत वाट पाहणे एव्हढेच आपल्या हातात आहे. आणि मुख्य म्हणजे, आत्ता अश्या प्रकारे सत्ता मिळवल्यामुळे त्यांच्यावर अधिक दडपण असणार आहे. जर काम नाही केले तर त्यांचा मफलरवाल होईलच, त्यामुळे मला वाटते भाजपा यावेळेस अधिक प्रामाणिकपणे सत्ता राबवेल.

In reply to by समीरसूर

श्रीगुरुजी 13/11/2014 - 20:52
रडीच्या डावाचा प्रश्नच उद्भवत नाही. आवाजी मतदान हे पूर्णपणे कायदेशीर व घटनेला धरून आहे. यापूर्वी अनेकवेळा आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर केला गेला आहे. भाजपने आवाजी मतदान प्रक्रिया वापरली तर तो रडीचा डाव कसा होतो? >>> शिवसेनेइतकीच गोंधळाची अवस्था भाजपची होती. भाजप मुळीच गोंधळलेला नव्हता. अगदी व्यवस्थित योजना आखून व आपल्याला हवी ती कायदेशीर व घटनात्मक प्रक्रिया वापरून भाजपने विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेतलेला आहे. >>> अजय जडेजाने फिक्सिंग केले तर काही विशेष वाटत नाही; सचिनने केले तर कसे वाटेल? ही तुलना चुकीची आहे. फिक्सिंग हे मुळातच बेकायदेशीर आहे व फिक्सिंग हा फौजदारी गुन्हा आहे. आवाजी मतदान हे कायदेशीर व घटनेला धरून आहे.

श्रीगुरुजी - श्री गणेशा - श्री क्लिंटन वरिल सर्व प्रभुतींना माझा __/\/\__/\. वरिल सर्व प्रतिसादांचे वाचन करुन आमच्या राजकरणाविषयी ज्ञानात खुप भर पडत आहे. मला वाटते आज पर्यंत एकमेकांच्या विषयी मनात कसलेही किल्मिष न ठेवता फक्त ऊहापोह करण्याच्या उद्देशाने चाललेला प्रतिसादाला विनम्र प्रतिसाद देवुन आपले मुद्दे मांडत आहेत हा मि.पा च्या इतिसासात पहिल्यांदाच ठरतोय. इतर कोणी ही ह्या धाग्यावर उगाच भरकटवुन त्याची खिल्ली उडवु नये. स.पा मंडाळाला विनंती की अशा प्रतिसादाला पंख लावावेत.

In reply to by प्रमोद देर्देकर

कलंत्री 13/11/2014 - 15:24
मराठी माणसाच्या आवडीच्या क्षेत्रापैकी एक म्हणजे राजकारण. आजच्या राजकारणातील इतके असंख्य कंगोरे असू शकतात आणि त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध उलगडून सांगण्याबद्दल सर्वांचेच अभिनंदन. माझ्याही ज्ञानात भर पडली आहे हे मी नमूद करु इच्छितो.

श्रीगुरुजी 13/11/2014 - 14:55
>>> भाजपा समर्थक सारी चुक शिवसेनेची आहे असे गळे काढण्यात गुंतले आहेत. राजधर्म पाळायचा असतो एव्ढा साधा कॉमन सेन्स नाहिये. स्वत:ची ताकद भाजपच्या तुलनेत खूप कमी असताना स्वतः जास्त जागा लढविण्याचा हट्टाग्रह धरून बसणे आणि एकदा युती तुटल्यावर व्यक्तिगत पातळीवर उतरून असभ्य व नकारात्मक प्रचार करणे ही कोणाची चूक होती? राजधर्म पाळणे म्हणजे नक्की काय? एकदा युती तुटल्यावर भाजपने समंजसपणे शिवसेनेवर टीका न करता युतीधर्म पाळला होता. उलट शिवसेनेलाच युती तुटल्याचे वास्तव मानवले नाही व त्यांनी भाजपला मुख्य शत्रू मानून असभ्य व व्यक्तिगत टीका सुरू केली. राजधर्म भाजपनेच पाळला. शिवसेनेला ते जमले नाही. >>> जर राष्ट्रवादीचा पाठिंबा स्विकारला नाहिये तर तसा स्प्ष्ट सांगायची हिंमत दाखवायची. मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असा प्रकार आहे. राष्ट्रवादीने पाठिंबा स्वतःहून भाजपने न मागता दिला आहे. त्यावर भाजपने भूमिका घेण्यासारखे काहीही नव्हते. एखाद्या सज्जन उमेदवाराला निवडणुकीत गावातल्या गुंडांनी स्वतःहून मत दिले म्हणजे त्या माणसाने त्यांचा पाठिंबा घेतला असा अर्थ होत नाही. राष्ट्रवादीने स्वतःहून दिलेल्या एकतर्फी पाठिंब्याचा भाजपने अधिकृत स्वीकार न करता किंवा अधिकृतपणे न नाकारता शिवसेनेला नमविण्यासाठी योग्य तो उपयोग करून घेतला. >>> प्रादेशिक पक्ष : याबद्दलची मोदी शहा यांची भुमिका स्पष्ट आहे . हरयाणा , महाराष्ट्र आणि पंजाब मधे त्यांनी युती तोडली आहे. गोव्या मधे पण युती तोडली पाहिजे असे चालू आहे. पंजाब व गोव्यात प्रादेशिक पक्षांबरोबर युती शाबूत आहे. >>> त्यामुळे शिवसेनेने समंजसपणा दाखवूनही भाजपा ने युती टिकवलीच असती असे समजणे चुकीचे आहे. शिवसेनेने समंजसपणा दाखवून भाजपची १२५-१३० जागांची मागणी मान्य केली असती तर युती १०० टक्के टिकली असती. >>> राजकीय समीकरणे काहीही असो , मी ज्यांच्या सोबत बोललो , चेपु वर, वैयक्तीक , किंवा आंजावर , सर्व सामान्य ( नमोरूग्ण नव्हे सामान्य !) लोकांचे एकच मत होते , भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यायला नको होता . यामुळे भाजपाची प्रतिमा मलीन झाली आहे. भाजपला शिवसेना पाठिंबा देणार नाही, भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यायचा नाही अशा परिस्थितीत सरकार स्थापन न करणे हा एकच पर्याय शिल्लक होता. भाजपने राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या पाठिंब्याची कमीतकमी गरज पडावी या दृष्टीने ९ अपक्ष व इतर लहान पक्षांच्या ५-६ आमदारांचा आधीच पाठिंबा मिळविला आहे. राष्ट्रवादीने स्वतःहून पाठिंबा दिलेला आहे. भाजपने तो मागितलेला नाही.

In reply to by श्रीगुरुजी

आता तुम्ही भाजपाचे अधिकृत प्रभारी होण्याच्या मार्गावर आहे. थोडा अजुन लांगुलचालन करा. टिव्हीवर संधी मिळेल कारण इतकी भक्ती सध्या असणारे प्रभारी देखील दाखवत नाही.

In reply to by दिवाकर देशमुख

>>>>>हा शब्द तर पेपरात देखील असतो पेपर वाचत नाहीत का ? 'लांगूलचालन' हा शब्द मी कधी ऐकला नाही असा अर्थ तुम्ही काढता आहात. माझं वाक्य नीट वाचलंत तर कळेल, शब्द पहिल्यांदाच ऐकला असे म्हंटलेले नाही तर ह्या शब्दाचा 'प्रयोग' इथे अप्रस्तुत आहे असे म्हंटलेले आहे. 'लांगूलचालन' स्वार्थासाठी, सर्व लाजलज्जा सोडून, केले जाते. इथे तसे दिसत नाही. श्री. गुरुजी ह्यांचा एकूण घटनाक्रमाच्या विश्लेषणात कांही स्वार्थ दिसत नाही. म्हणून शब्दप्रयोग चुकीचा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

कपिलमुनी 13/11/2014 - 15:11
राजधर्म पाळणे म्हणजे नक्की काय ? १.पूर्ण १४४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देणे आणि मग आवाजी मतदान घेणे. २.जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे त्या जनतेला सत्य सांगणे. ३. विरोधी पक्षाला त्यांचे म्हणने मांडायची संधी देणे. >>राष्ट्रवादीने पाठिंबा स्वतःहून भाजपने न मागता दिला आहे त्यांनी दिला आहे पण भाजपाने तो पाठिंबा स्वीकारला आहे की नाहे ते एक मतदार म्हणून मला / जनतेला समजले पाहिजे जर त्यांनी स्वीकारला नसेल तर सरकार अल्पमतात आहे. स्वीकारला आहे तर तसा सांगावा. आणि पवारांच्या राजकारणा मधे फुकट काही नसता हे महाराष्ट्रामधला शेंबड पोर देखील सांगेल . त्यामुळे पवारांचा पाठिंबा जाहीरपणे स्वीकारता येत नसेल तरी काय देवेघेव झाली हे कळेलच. >>>राष्ट्रवादीने स्वतःहून दिलेल्या एकतर्फी पाठिंब्याचा भाजपने अधिकृत स्वीकार न करता किंवा अधिकृतपणे न नाकारता शिवसेनेला नमविण्यासाठी योग्य तो उपयोग करून घेतला. शिवसेना काय मागत होती या पेक्षा भाजपा त्यांना किती मंत्रीपदे किंवा सहभाग देत होती ? लोकसभेच्या निवडणुकीनंतर केवळ एक कमी महत्वाचे पद आपल्या सर्वात जुन्या सहकार्‍याला दिले होते , हे विसरलात का?? आणि सरकार एनडीए असून देखील इतर पक्षांना न्याय वाटा मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे . मी व कित्येक लोकांनी भाजपाला समर्थन केले होते पण कुठल्याही परीस्थितीमधे राष्ट्रवादी हा योग्य साथीदार नाहिये. आणि राष्त्रवादीच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापले म्हणत असतील तर " खोटा बोला पण रेटून बोला" च्या साथीची लागण झाली आहे .

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी 13/11/2014 - 21:05
>>> १.पूर्ण १४४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देणे आणि मग आवाजी मतदान घेणे. याची गरजच नव्हती. घटनेनुसार राज्यपाल राजभवनात बहुमत सिद्ध करायला सांगू शकत नाहीत. >>> २.जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे त्या जनतेला सत्य सांगणे. सत्य म्हणजे नक्की काय सांगायचं आहे? >>> ३. विरोधी पक्षाला त्यांचे म्हणने मांडायची संधी देणे. जेव्हा नव्याने प्रथमच सरकार स्थापन होत असते तेव्हा विश्वासदर्शक ठरावावर फक्त मतदान होते. त्या ठरावावर भाषणे होत नसतात. सरकार स्थापन झाल्यानंतर कालांतराने अविश्वासदर्शक किंवा विश्वासदर्शक ठराव आला तर त्यावर दोन्ही बाजूंना आपले विचार मांडायची संधी असते. >> >> राष्ट्रवादीने पाठिंबा स्वतःहून भाजपने न मागता दिला आहे >> त्यांनी दिला आहे पण भाजपाने तो पाठिंबा स्वीकारला आहे की नाहे ते एक मतदार म्हणून मला / जनतेला समजले पाहिजे एक मतदार म्हणून हे समजण्याची मला गरज वाटत नाही. >>> जर त्यांनी स्वीकारला नसेल तर सरकार अल्पमतात आहे. स्वीकारला आहे तर तसा सांगावा. आणि पवारांच्या राजकारणा मधे फुकट काही नसता हे महाराष्ट्रामधला शेंबड पोर देखील सांगेल . त्यामुळे पवारांचा पाठिंबा जाहीरपणे स्वीकारता येत नसेल तरी काय देवेघेव झाली हे कळेलच. नुसते स्पेक्युलेशन करण्यापेक्षा काही ठोस माहिती असेल तर ते सांगा. >>> शिवसेना काय मागत होती या पेक्षा भाजपा त्यांना किती मंत्रीपदे किंवा सहभाग देत होती ? लोकसभेच्या निवडणुकीनंतर केवळ एक कमी महत्वाचे पद आपल्या सर्वात जुन्या सहकार्‍याला दिले होते , हे विसरलात का?? आणि सरकार एनडीए असून देखील इतर पक्षांना न्याय वाटा मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे . शिवसेनेने भाजपला २५ वर्षे आपल्या तालावर नाचविले. भाजपच्या जीवावर शिवसेनेने माज केला. पीक पिकवायचे भाजपने व पीक कापून न्यायचे सेनेने असेच २५ वर्षे चालत आले. ठाणे (राम कापसे), शिवाजीनगर (अण्णा जोशी) अशा अनेक मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी मेहनत करून आपला पक्ष वाढविला. पण युती झाल्यावर शिवसेनेने दांडगाई करून हे मतदारसंघ लाटले. भाजपने संधी मिळताच आपले सामर्थ्य वाढवून सेनेचे जोखड मानेवरून उतरविले. >>> मी व कित्येक लोकांनी भाजपाला समर्थन केले होते पण कुठल्याही परीस्थितीमधे राष्ट्रवादी हा योग्य साथीदार नाहिये. आणि राष्त्रवादीच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापले म्हणत असतील तर " खोटा बोला पण रेटून बोला" च्या साथीची लागण झाली आहे. सरकार राष्ट्रवादीच्या पाठिंब्याशिवायच आहे. भाजपकडे १३५+ आमदारांचे समर्थन आहे. विरोधात फक्त १०४ आमदार आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

आनन्दा 13/11/2014 - 21:25
>> >> राष्ट्रवादीने पाठिंबा स्वतःहून भाजपने न मागता दिला आहे >> त्यांनी दिला आहे पण भाजपाने तो पाठिंबा स्वीकारला आहे की नाहे ते एक मतदार म्हणून मला / जनतेला समजले पाहिजे एक मतदार म्हणून हे समजण्याची मला गरज वाटत नाही.
याच्याशी असहमत. बाकी ठीक आहे. भाजपाने तो पाठिंबा स्वीकरला आहे की नाही हे लवकरच कळेल, स्वीकारला नसेल तर तसे त्यांना आता कृतीतून सिद्ध करावे लागेल...

In reply to by श्रीगुरुजी

कपिलमुनी 14/11/2014 - 15:58
>>घटनेनुसार राज्यपाल राजभवनात बहुमत सिद्ध करायला सांगू शकत नाहीत. मला याबद्दल माहीती नाही . पण पूर्वी स्पष्ट बहुमत नसताना अशी यादी कीम्वा पाठिंब्याचे पत्र दिल्याचे स्मरते . विदा शोधून देतो. >>> २.जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे त्या जनतेला सत्य सांगणे. सत्य म्हणजे नक्की काय सांगायचं आहे? तुमच्याकडे नक्की किती आमदार आहेत , कोण तटस्थ आणि कोण विरोधी आहे. >>> ३. विरोधी पक्षाला त्यांचे म्हणने मांडायची संधी देणे. जेव्हा नव्याने प्रथमच सरकार स्थापन होत असते तेव्हा विश्वासदर्शक ठरावावर फक्त मतदान होते. त्या ठरावावर भाषणे होत नसतात. सरकार स्थापन झाल्यानंतर कालांतराने अविश्वासदर्शक किंवा विश्वासदर्शक ठराव आला तर त्यावर दोन्ही बाजूंना आपले विचार मांडायची संधी असते. >>> अचानक कार्यक्रम पत्रिकेवरचे विषय बदलणे , त्या नंतर बाहेर गेलेल्या आमदारांना आत येउ देण्याच्या अगोदर ठराव मांडणे.. ठरावानंतर ५ -१ ० मिनिट वेळ दिला जातो आणि नंतर बेल वाजते आणि मग मतदान होते. आवाजी मतदान घेणार आहे असे नमूद करून त्याच्यावर हरकतीला वेळ देणे ईई. हे फक्त नैतिक आणि सदसदविवेक बुद्धीनुसार वागणार्‍यांसाठी , चलाखी करणार्‍यांसाठी या अपेक्षा नाहीतच . >> >> राष्ट्रवादीने पाठिंबा स्वतःहून भाजपने न मागता दिला आहे >> त्यांनी दिला आहे पण भाजपाने तो पाठिंबा स्वीकारला आहे की नाहे ते एक मतदार म्हणून मला / जनतेला समजले पाहिजे एक मतदार म्हणून हे समजण्याची मला गरज वाटत नाही. >> तुम्हाला गरज वाटत नसेल पण या धाग्यावर आणि इतर अनेक लोकांना ती वाटत आहे . आणि पारदशिकतेच्या मुद्द्यावर ते कळालेच पाहिजे. >>> जर त्यांनी स्वीकारला नसेल तर सरकार अल्पमतात आहे. स्वीकारला आहे तर तसा सांगावा. आणि पवारांच्या राजकारणा मधे फुकट काही नसता हे महाराष्ट्रामधला शेंबड पोर देखील सांगेल . त्यामुळे पवारांचा पाठिंबा जाहीरपणे स्वीकारता येत नसेल तरी काय देवेघेव झाली हे कळेलच. नुसते स्पेक्युलेशन करण्यापेक्षा काही ठोस माहिती असेल तर ते सांगा. >> पूर्वी ज्या आरक्षणांना भाजप विरोध करत होती त्याला राज्य सरकार आज सपोर्ट करत आहे. आणि बाकी अजित पवार , भुजबळ , तटकरे यांच्या अटके नंतर बोलूच ( कोण हसतय रे तिकडे ;) ) >>> शिवसेना काय मागत होती या पेक्षा भाजपा त्यांना किती मंत्रीपदे किंवा सहभाग देत होती ? लोकसभेच्या निवडणुकीनंतर केवळ एक कमी महत्वाचे पद आपल्या सर्वात जुन्या सहकार्‍याला दिले होते , हे विसरलात का?? आणि सरकार एनडीए असून देखील इतर पक्षांना न्याय वाटा मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे . शिवसेनेने भाजपला २५ वर्षे आपल्या तालावर नाचविले. भाजपच्या जीवावर शिवसेनेने माज केला. पीक पिकवायचे भाजपने व पीक कापून न्यायचे सेनेने असेच २५ वर्षे चालत आले. ठाणे (राम कापसे), शिवाजीनगर (अण्णा जोशी) अशा अनेक मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी मेहनत करून आपला पक्ष वाढविला. पण युती झाल्यावर शिवसेनेने दांडगाई करून हे मतदारसंघ लाटले. भाजपने संधी मिळताच आपले सामर्थ्य वाढवून सेनेचे जोखड मानेवरून उतरविले. >> भाजपा त्यांना किती मंत्रीपदे किंवा सहभाग देत होती .. याचे उत्तर शेवटपर्यंत दिलेच नहीत . आणि शिवसेनेचे जोखड लोकसभेला का नाही फेकून दिले ? एवढा त्रास होता तर लोकसभेपासून वेगळा व्ह्यायचा . >>> मी व कित्येक लोकांनी भाजपाला समर्थन केले होते पण कुठल्याही परीस्थितीमधे राष्ट्रवादी हा योग्य साथीदार नाहिये. आणि राष्त्रवादीच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापले म्हणत असतील तर " खोटा बोला पण रेटून बोला" च्या साथीची लागण झाली आहे. सरकार राष्ट्रवादीच्या पाठिंब्याशिवायच आहे. भाजपकडे १३५+ आमदारांचे समर्थन आहे. विरोधात फक्त १०४ आमदार आहेत. अहो हेच तर अजून कोणी बोलला नाहिये ना ! राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे असे ते सांगत आहेत . फडणवीस यांनी आम्ही तो स्वीकारला नाहीये असा स्टेट्मेंट दिला नाहिये अजून. ठरावानंतर असे स्टेट्मेंट दिले असेल तर दाखवा . आणि १३५ असतील तर ते बहुमत कसे ? फडणवीस खोटा बोलत आहेत का ?

In reply to by कपिलमुनी

क्लिंटन 14/11/2014 - 19:05
वरील प्रतिसादात बर्‍याच गोष्टी स्पष्ट करणे गरजेचे वाटते.
मला याबद्दल माहीती नाही . पण पूर्वी स्पष्ट बहुमत नसताना अशी यादी कीम्वा पाठिंब्याचे पत्र दिल्याचे स्मरते . विदा शोधून देतो.
कोणाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करायचे हा राष्ट्रपतींचा/राज्यपालांचा विशेषाधिकार असतो. के.आर.नारायणन यांनी १९९८ मध्ये सरकार स्थापन करायला वाजपेयींना आमंत्रित केले त्यापूर्वी समर्थनाची पत्रे घेतली होती.हा मार्ग नारायणन यांना योग्य वाटला.पण तसे राष्ट्रपती/राज्यपालांनी केलेच पाहिजे असा घटनात्मक दंडक अजिबात नाही.
जेव्हा नव्याने प्रथमच सरकार स्थापन होत असते तेव्हा विश्वासदर्शक ठरावावर फक्त मतदान होते. त्या ठरावावर भाषणे होत नसतात. सरकार स्थापन झाल्यानंतर कालांतराने अविश्वासदर्शक किंवा विश्वासदर्शक ठराव आला तर त्यावर दोन्ही बाजूंना आपले विचार मांडायची संधी असते.
हे नक्की कोणत्या आधारावर लिहिता?तो रेफरन्स सांगा मग पुढील चर्चा (गरज पडल्यास) करता येईल.
अचानक कार्यक्रम पत्रिकेवरचे विषय बदलणे , त्या नंतर बाहेर गेलेल्या आमदारांना आत येउ देण्याच्या अगोदर ठराव मांडणे.. ठरावानंतर ५ -१ ० मिनिट वेळ दिला जातो आणि नंतर बेल वाजते आणि मग मतदान होते. आवाजी मतदान घेणार आहे असे नमूद करून त्याच्यावर हरकतीला वेळ देणे ईई. हे फक्त नैतिक आणि सदसदविवेक बुद्धीनुसार वागणार्‍यांसाठी , चलाखी करणार्‍यांसाठी या अपेक्षा नाहीतच .
एक गोष्ट समजत नाही आवाजी मतदान या गोष्टीविषयी परवापासून अचानक आक्षेप का उफाळून आले आहेत? आवाजी मतदान ही पूर्णपणे संकेतांना आणि लोकशाहीच्या स्पिरीटला धरूनच असलेली संकल्पना आहे.
आणि शिवसेनेचे जोखड लोकसभेला का नाही फेकून दिले ? एवढा त्रास होता तर लोकसभेपासून वेगळा व्ह्यायचा .
शिवसेनेचे जोखड भाजपने फेकून द्यायला हवे होते का? असल्यास कधी? या प्रश्नाची उत्तरे भाजपच्या नेतृत्वावरच सोडलेली बरी नाही का? एक गोष्ट समजत नाही.भाजपने काय करायला हवे याची इतरांनाच काळजी फार जास्त असते. मागच्या वर्षीही मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार केले तेव्हा सुषमा स्वराज का नाहीत, शिवराजसिंग चौहान का नाहीत, उत्तर प्रदेशातील कोणी नेता का नाही, अमका का नाही, तमका का नाही असे एकना दोन हजार प्रश्न भाजप बाहेरच्यांनाच पडलेले होते.आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असावा हे भाजपच्या कार्यकर्त्यांनी अडवाणींच्या घरासमोर निदर्शने करून सांगितलेच की आणि तो सिग्नल पक्ष नेतृत्वाने मान्य केला. तुम्हाला मोदी मान्य नसतील तर मत देऊ नका.भाजपाने काय करावे याची फुकटची चिंता इतरांना कशाला? त्याचप्रमाणे शिवसेनेशी युती तोडायला हवी होती का नाही, कधी याची चिंता इतरांना कशाला?
आणि १३५ असतील तर ते बहुमत कसे ? फडणवीस खोटा बोलत आहेत का ?
ठिक आहे ना. १३५ हे बहुमत नसेल तरी अल्पमतातील सरकार तर आहेच ना. नरसिंह रावांचेही सरकार पहिले अडीच वर्षे अल्पमतात होते.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन 14/11/2014 - 19:12
आणि हो. फडणवीसांनी अल्पमतातले सरकार चालविले आणि ते चालले आणि सत्तेत राहण्यासाठी राष्ट्रवादीशी कोणत्याही प्रकारच्या तडजोडी केल्या नाहीत तर माझे स्वतःचे तरी या सरकारविषयी आक्षेप राहणार नाही.पण तशा कोणत्याही तडजोडी केल्या जात नाहीत हे दाखवून द्यायची जबाबदारी मात्र फडणवीसांचीच.

In reply to by क्लिंटन

हाडक्या 14/11/2014 - 19:59
+१ .. क्लिंटन, आपली मते बर्‍याच अंशी पटतायत. जरी भाजपबद्दल आदर एवढा नसला तरी या घटनाक्रमाने तो थोडा कमीच झलाय असे म्हणेन. याउप्पर आपण म्हणता तसे फडणवीस सरकार कसे ही जबाब्दारी (तडजोडी करत नाही आहोत हे दाखवण्याची) त्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून असतील. (जाता जाता थोडे अवांतर : याच प्रकारच्या प्रसंगातून केजरिवाल पण गेले होते, तेव्हा त्यांनी आवाजी मतदानाचा सेफ मार्ग घ्यायला हवा होता असे वाटतेय, पण ते राजकीय चातुर्यात कमी पडले असावेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जे लोक आत्ता या सरकारसाठी वाट बघायला तयार आहेत तेच लोक मात्र तेव्हा 'काँग्रेसची बी-टीम' म्हणायला दोन दिवस पण थांबले नव्हते असे निरिक्षण नोंदवतो. ;) 'शेवटी आपला तो बाब्या' हे अभ्यासू विश्लेषकांनाही सुटलेले नाही तर.. )

In reply to by हाडक्या

क्लिंटन 14/11/2014 - 22:44
आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जे लोक आत्ता या सरकारसाठी वाट बघायला तयार आहेत तेच लोक मात्र तेव्हा 'काँग्रेसची बी-टीम' म्हणायला दोन दिवस पण थांबले नव्हते असे निरिक्षण नोंदवतो. Wink 'शेवटी आपला तो बाब्या' हे अभ्यासू विश्लेषकांनाही सुटलेले नाही तर..
नाही हो इतरांचे माहित नाही. आणि मी अभ्यासू आहे की विश्लेषक आहे की दोन्ही नाही हे मला माहित नाही.तरीही हा उपप्रतिसाद माझ्या प्रतिसादावर दिला आहे तेव्हा माझ्यापुरते तरी सांगतो.कोणत्याही पक्षाविषयीची मते बनविताना तो पक्ष नक्की कोणते पॅकेज देत आहे आणि त्या पॅकेजची अंमलबजावणी करायची त्या पक्षाची आणि नेत्याची क्षमता आहे की नाही या गोष्टी बघून मी माझी मते ठरवत असतो.पॅकेजमधील सगळ्या गोष्टी मला मान्य असतीलच असे नाही आणि एखाद्या पक्षाच्या पॅकेजमधल्या चार गोष्टी मला आवडल्या नाहीत म्हणून दुसऱ्या पक्षाच्या पॅकेजमधल्या ४० गोष्टी आवडत नसतानाही त्या दुसऱ्या पक्षाचे समर्थन मला तरी करता येत नाही. मुळातच अण्णांचे आंदोलन आणि जनलोकपालची स्वप्नाळू मागणी या दोन्ही गोष्टींचा अगदी मी पहिल्या दिवसापासून विरोधक होतो.ते त्यावेळी मी मिसळपाववरही लिहिले होते.त्याच आंदोलनातून पुढे आलेल्या आम आदमी पक्षाविषयी माझे तरी चांगले मत असायचा संबंधच नव्हता.तसेच प्रशांत भूषण सारख्यांनी काश्मीरवरती उधळलेली मुक्ताफळे मला तरी अजिबात मान्य नव्हती.आणि मुळातल्या नव्या पक्षात त्याच प्रशांत भूषण सारख्यांना महत्वाचे नेतेपद दिले गेल्यामुळे आआपचे समर्थन मी करूच शकत नव्हतो.आणि त्यातून वीजेची बिलेच भरू नका, तोडलेले मीटर स्वत: जोडणे अशा अराजकतावादी प्रकारामुळे त्या पक्षाविषयी मत आणखी वाईट झाले.तेव्हा त्या पक्षाचे पॅकेज मला मुळातच आवडलेले नव्हते. तेव्हा माझे मत ज्या पक्षाविषयी मुळातच वाईट मत होते त्या पक्षाने परत कॉंग्रेसचा पाठिंबा घेतला हा एक ट्रिगर होता असे म्हणता येईल फारतर. कदाचित आआप जर आर्थिकदृष्ट्या उजवा आणि राष्ट्रवादी असता आणि नंबर मिळवायला कॉंग्रेसचा पाठिंबा घेतला असता तर कदाचित मी त्या पक्षाला कॉंग्रेसची बी टिम असे म्हटलेही नसते. आणि समजा आआपला स्वबळावर बहुमत मिळाले असते आणि कॉंग्रेसचा पाठिंबा घेतला नसता तरी त्या पक्षाचे पॅकेज मला मुळातच मान्य नसल्यामुळे त्या परिस्थितीतही त्या पक्षावर मी टिकाच केली असती--कॉंग्रेसची बी टिम असे म्हटले नसते तर दुसरे काही म्हटले असते.हे आत्याबाईला मिशा असत्या तर अशा टाइपचे झाले तरीही मला वाटते माझा मुद्दा मी स्पष्ट केला आहे. महाराष्ट्रातील परिस्थितीशी तुलना केल्यावर असे दिसते की भाजपच्या पॅकेजमध्ये राष्ट्रवादी ही मोठी पोखरणारी अळी आली आहे ती सगळ्या गोष्टींचा सत्यानाश करू शकेल.त्यामुळे महाराष्ट्र लेव्हलवर तरी वरकरणी कितीही चांगले वाटणारे पॅकेज भाजप देत असेल तरीही ती अळी आहे तोपर्यंत त्या पॅकेजवर विश्वास वाटणार नाही.तरीही पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वावर नक्कीच विश्वास आहे.त्यामुळे पक्ष म्हणून अजून तरी माझे मत विधानसभा लेव्हलला भाजपला समर्थन न द्यायचे असले तरी लोकसभा निवडणुकांसाठी नक्कीच तसे नाही. आता हा प्रकार म्हणजे 'आपला तो बाब्या' असा होतो की नाही मला माहित नाही आणि ते माहित करून घेण्यात फारसा रसही नाही.

In reply to by क्लिंटन

अनन्त अवधुत 15/11/2014 - 02:46
+१ मला भाजपा + राष्ट्रवादी हि युती फारच अनैसर्गिक वाटते (अजूनही). सुबोध खरे यांचा "भाजपा कडे याच्या पेक्षा चांगला पर्याय उपलब्ध पर्याय नाही" हे विश्लेषण पटले. जोवर सत्तेत राहण्यासाठी राष्ट्रवादीशी कोणत्याही प्रकारच्या तडजोडी केल्या नाहीत तर माझे स्वतःचे तरी या सरकारविषयी आक्षेप राहणार नाही.

In reply to by अनन्त अवधुत

हाडक्या 15/11/2014 - 22:28
एवढाच साधक बाधक विचार 'आप' साठी का बरे कोणी केला नसावा असा प्रश्न पडतो. ते ही अशाच अगदी अश्शाच प्रसंगातून गेले होते ना ?

In reply to by क्लिंटन

कपिलमुनी 19/11/2014 - 14:44
>>> १.पूर्ण १४४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देणे आणि मग आवाजी मतदान घेणे. याची गरजच नव्हती. घटनेनुसार राज्यपाल राजभवनात बहुमत सिद्ध करायला सांगू शकत नाहीत.
असे श्रीगुरुजींनी लिहिले होते. मला नक्की रेफरन्स ( १९९८ चा ) आठवत नव्हता.
पण तसे राष्ट्रपती/राज्यपालांनी केलेच पाहिजे असा घटनात्मक दंडक अजिबात नाही.
तसे असेल तर ठीकच आहे . पण शेवटी मुद्दा तोच येतो सध्याचे सरकार तांत्रिक द्रूष्ट्या बहुमतात आहे पण नैतिकतेचे काय ? ( ती बासनात गुंडाळली आहेच ) सध्या पवारांनी राष्ट्रवादी तटस्थ होती असे सांगून संभ्रम दूर केला . पण मुख्यमंत्र्यांचे हे काम होते की नक्की किती आमदार त्यांच्या सोबत आहेत ते जनतेला सांगितले पाहिजे.
जेव्हा नव्याने प्रथमच सरकार स्थापन होत असते तेव्हा विश्वासदर्शक ठरावावर फक्त मतदान होते. त्या ठरावावर भाषणे होत नसतात. सरकार स्थापन झाल्यानंतर कालांतराने अविश्वासदर्शक किंवा विश्वासदर्शक ठराव आला तर त्यावर दोन्ही बाजूंना आपले विचार मांडायची संधी असते.
हे श्रीगुरुजींनी लिहिले आहे . त्याचे स्पष्टीकरण ते देतीलच !
एक गोष्ट समजत नाही आवाजी मतदान या गोष्टीविषयी परवापासून अचानक आक्षेप का उफाळून आले आहेत? आवाजी मतदान ही पूर्णपणे संकेतांना आणि लोकशाहीच्या स्पिरीटला धरूनच असलेली संकल्पना आहे.
आवाजी मतदानाला आक्षेप मुळीच नाहिये. आ़क्षेप संभ्रमावस्थेला, अपारदर्शकतेला आणि राष्ट्रवादीला सोबत घेण्याबद्दल आहे . मतदानाच्या अगोदर किंवा मतदानानंतर मुख्यमंत्र्यांनी / अध्यक्षांनी सांगितला असता , राष्ट्रवादी तटस्थ राहिली आहे तर ते एव्ढा गदारोळ झालाच नसता. लोकसभेमधे पण आवाजी मतदानच झाले तेव्हा कोणीच आक्षेप घेतला नाही. कारण स्पष्ट बहुमत होते. सरकार निवडण्याची प्रक्रिया शक्यतो संशयातीत असावी एवढीच अपेक्षा . एक्दा बहुमत सिद्ध झाले की पुढे ५ वर्ष आवाजी मतदान चालतेच.
आणि शिवसेनेचे जोखड लोकसभेला का नाही फेकून दिले ? एवढा त्रास होता तर लोकसभेपासून वेगळा व्ह्यायचा
शिवसेनेने भाजपला २५ वर्षे आपल्या तालावर नाचविले. भाजपच्या जीवावर शिवसेनेने माज केला. पीक पिकवायचे भाजपने व पीक कापून न्यायचे सेनेने असेच २५ वर्षे चालत आले.
श्रीगुरुजींचा शिवसेनेबद्दल बराच त्रागा चालला होता, आता ते अधिकृत प्रवक्ते असल्याने विचारले , एव्ढा त्रास , मानहानी होती तर अगोदरच जोखड फेकायचा . भाजपाने काय करावे हा पक्षाचा प्रश्न आसला तरी ते आमच्याकडे मत मागायला येतात , त्यामुळे त्यांच्या भुमिकेवर मतप्रदर्शन करणे ( आवडली तर आवडली , नाही आवडली तर नाही ) हा मतदारांचा हक्कच आहे.
शिवसेनेशी युती तोडायला हवी होती का नाही, कधी याची चिंता इतरांना कशाला?
कारण लोकसभेला यांनी सेनेशी लग्न लावल्याने आमच्याकडे सेनेचा खासदार आहे आणि आता भाजपाचा आमदार म्हणून चिंता , यांच्या कोलांट्याउड्यामुळे लोकांचा नुकसान होतय .
१३५ हे बहुमत नसेल तरी अल्पमतातील सरकार तर आहेच ना
अल्पमतातील सरकारला मुळीच विरोध नाही. कित्येक अल्पमतातील सरकारांनी आपले कालखंड यशस्वी पूर्ण केले अहेत. पण मग फडणवीस बहुमताचा दावा का करत होते ? त्यांनी कुठेही सांगितला नाही , माझे सरकार अल्पमतातील आहे किंवा राष्त्रवादी तटस्थ आहे. बादवे , तुमचा अभ्यास खूप आहे म्हणून एक शंका, काँग्रेसचे ५ आमदार निलंबित आहेत, समजा अजून ५ म्हणजे एकूण १० आमदार निलंबित झाले तर २७७ पैकी १३९ आमदारांचे मत मिळाले तर बहुमत सिद्ध होउ शकते का ? निलंबित आमदारांस मतदानाचा हक्क असतो का

In reply to by कपिलमुनी

क्लिंटन 19/11/2014 - 15:29
पण शेवटी मुद्दा तोच येतो सध्याचे सरकार तांत्रिक द्रूष्ट्या बहुमतात आहे पण नैतिकतेचे काय ? ( ती बासनात गुंडाळली आहेच )
भारतीय राजकारणातून नैतिकता तर कधीचीच बासनात गुंडाळली आहे.आणि सगळे पक्ष त्या गुन्ह्यात कमीअधिक प्रमाणात सहभागी आहेत. लोकसभा आणि राज्यसभा मिळून सुमारे ८०० तर विविध विधानसभांमध्ये मिळून ३००० असे ३८०० शत प्रतिशत स्वच्छ चारित्र्याचे निस्पृह प्रतिनिधी आपल्याला १२० कोटींच्या भारतात मिळत नाहीत याचा अर्थ आपणही त्या गुन्ह्यात अप्रत्यक्षपणे सामील आहोत.असो.
सध्या पवारांनी राष्ट्रवादी तटस्थ होती असे सांगून संभ्रम दूर केला . पण मुख्यमंत्र्यांचे हे काम होते की नक्की किती आमदार त्यांच्या सोबत आहेत ते जनतेला सांगितले पाहिजे.
तांत्रिकदृष्या अल्पमतातील सरकारही पराभव होत नाही तोपर्यंत सत्तेत राहू शकते. १९९१ ते १९९३ या काळात नरसिंह रावांकडे बहुमत नव्हते तरीही त्यांच्या सरकारचा पराभव झाला नव्हता म्हणून ते अल्पमतातील सरकारही सत्तेत टिकून होते.
कारण लोकसभेला यांनी सेनेशी लग्न लावल्याने आमच्याकडे सेनेचा खासदार आहे आणि आता भाजपाचा आमदार म्हणून चिंता , यांच्या कोलांट्याउड्यामुळे लोकांचा नुकसान होतय .
असे कधीही होऊ शकते.सांगलीत प्रथमच भाजपने लोकसभेची जागा जिंकली पण तासगावमधून आर.आर आबाच निवडून गेले.
पण मग फडणवीस बहुमताचा दावा का करत होते ? त्यांनी कुठेही सांगितला नाही , माझे सरकार अल्पमतातील आहे किंवा राष्त्रवादी तटस्थ आहे.
हा राजकारणाचाच भाग असायची शक्यता जास्त. अशा अनेक गोष्टी राजकारणी उघड करत नसतात. १९९८ मध्ये तेलुगु देसमचे जी.एम.सी बालयोगी लोकसभा अध्यक्ष म्हणून निवडून गेले त्यावेळी तेलुगु देसम भाजपप्रणीत आघाडीचा भाग बनणार की नाही हे दोन्ही पक्षांनी उघड केले नव्हते. पहिल्यांदा तेलुगु देसम तटस्थ राहणार असे सांगितले जात होते. वाजपेयींच्या विश्वासदर्शक ठरावावर सरकारला २७४ आणि विरोधात २६१ मते मिळाली. सरकारला २७४ हा आकडा आला याचाच अर्थ तेलुगु देसमच्या इतर ११ (अध्यक्ष वगळून) खासदारांनी सरकारच्या बाजूने मतदान केले हे स्पष्ट झाले.त्यावेळीच पक्षाची भूमिका कळली. १९९९ मध्ये वाजपेयींचे सरकार एका मताने पडले त्यावेळी मतदान झाले होते शनीवार १७ एप्रिल १९९९ रोजी. त्याच्या आधल्या दिवशी रात्री उशीरा मायावतींनी त्यांच्या पक्षाचे पाच खासदार तटस्थ राहतील असे लोकसभेत जाहिर केले होते (यह लडाई सापनाथ और नागनाथ के बीच मै है. हम इस लडाई मै किसी का पक्ष नही ले सकते). तरीही आयत्या वेळी मायावतींच्या पाच खासदारांनी सरकारविरोधी मत दिले. प्रत्येक वेळी नेत्यांनी जे काही ठरले असेल ते जगजाहीर करावे ही अपेक्षा आपल्याला करता येणार नाही. प्रतिपक्षाची दिशाभूल करायला असे कात्रजचे घाट मधूनमधून दाखविले जातातच.
काँग्रेसचे ५ आमदार निलंबित आहेत, समजा अजून ५ म्हणजे एकूण १० आमदार निलंबित झाले तर २७७ पैकी १३९ आमदारांचे मत मिळाले तर बहुमत सिद्ध होउ शकते का ? निलंबित आमदारांस मतदानाचा हक्क असतो का
नाही निलंबित आमदारांना मतदानाचा हक्क नसतो. बहुमत म्हणजे सभागृहात हजर असलेल्या सदस्यांपैकी जितके सदस्य मत देतात त्यात सरकारच्या बाजूने जास्त मते मिळणे. ही मते एकूण सभागृहाच्या सदस्यसंख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त असतीलच असे नाही.

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी 14/11/2014 - 21:01
>>> अचानक कार्यक्रम पत्रिकेवरचे विषय बदलणे , त्या नंतर बाहेर गेलेल्या आमदारांना आत येउ देण्याच्या अगोदर ठराव मांडणे.. ठरावानंतर ५ -१ ० मिनिट वेळ दिला जातो आणि नंतर बेल वाजते आणि मग मतदान होते. आवाजी मतदान घेणार आहे असे नमूद करून त्याच्यावर हरकतीला वेळ देणे ईई. कार्यक्रम पत्रिकेवरील पहिला विषय सभापतींची निवड हा होता. तो त्या क्रमानुसारच पार पडला. आपले उमेदवार मागे घेऊन शिवसेना व काँग्रेसने भाजपकडे पुरेसे बहुमत आहे हे मान्य केले होते. दुसरा विषय हा विरोधी पक्षनेत्याची निवड होता व तिसरा विषय विश्वासदर्शक ठरावावरील मतदान होता. जोपर्यंत सत्ताधारी पक्षाच्या बाजूने कोण व विरोधात कोण हे नक्की होत नाही तो पर्यंत अधिकृत विरोधी पक्ष कोण हे ठरू शकत नव्हते. विश्वासदर्शक ठरावावरील मतदानानंतरच अधिकृत विरोधी पक्ष कोणता हे ठरणार होते. त्यामुळे दुसर्‍या व तिसर्‍या विषयांची अदलाबदल हा योग्य निर्णय होता. >>> हे फक्त नैतिक आणि सदसदविवेक बुद्धीनुसार वागणार्‍यांसाठी , चलाखी करणार्‍यांसाठी या अपेक्षा नाहीतच . नैतिक/अनैतिक या सापेक्ष कल्पना आहेत. घटनेत नैतिक/अनैतिकतेची व्याख्या नाही. __________________________________________________________________________ >> >> राष्ट्रवादीने पाठिंबा स्वतःहून भाजपने न मागता दिला आहे >> त्यांनी दिला आहे पण भाजपाने तो पाठिंबा स्वीकारला आहे की नाहे ते एक मतदार म्हणून मला / जनतेला समजले पाहिजे एक मतदार म्हणून हे समजण्याची मला गरज वाटत नाही. >> तुम्हाला गरज वाटत नसेल पण या धाग्यावर आणि इतर अनेक लोकांना ती वाटत आहे . आणि पारदशिकतेच्या मुद्द्यावर ते कळालेच पाहिजे. राष्ट्रवादीचा पाठिंबा दुर्लक्षिलेला आहे. _________________________________________________________________________ ____________________________________________________________________________ >>> जर त्यांनी स्वीकारला नसेल तर सरकार अल्पमतात आहे. स्वीकारला आहे तर तसा सांगावा. आणि पवारांच्या राजकारणा मधे फुकट काही नसता हे महाराष्ट्रामधला शेंबड पोर देखील सांगेल . त्यामुळे पवारांचा पाठिंबा जाहीरपणे स्वीकारता येत नसेल तरी काय देवेघेव झाली हे कळेलच. नुसते स्पेक्युलेशन करण्यापेक्षा काही ठोस माहिती असेल तर ते सांगा. >> पूर्वी ज्या आरक्षणांना भाजप विरोध करत होती त्याला राज्य सरकार आज सपोर्ट करत आहे. आणि बाकी अजित पवार , भुजबळ , तटकरे यांच्या अटके नंतर बोलूच ( कोण हसतय रे तिकडे ) कोणती आरक्षणे? ____________________________________________________________________________ >> भाजपा त्यांना किती मंत्रीपदे किंवा सहभाग देत होती .. याचे उत्तर शेवटपर्यंत दिलेच नहीत . भाजप मला विचारून इतरांना मंत्रीपदे देत नाही किंवा इतरांच्या मंत्रीपदांची संख्या मी ठरवित नाही. >>> आणि शिवसेनेचे जोखड लोकसभेला का नाही फेकून दिले ? एवढा त्रास होता तर लोकसभेपासून वेगळा व्ह्यायचा . हे भाजपलाच ठरवू द्यात. >>> सरकार राष्ट्रवादीच्या पाठिंब्याशिवायच आहे. भाजपकडे १३५+ आमदारांचे समर्थन आहे. विरोधात फक्त १०४ आमदार आहेत. > अहो हेच तर अजून कोणी बोलला नाहिये ना ! राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे असे ते सांगत आहेत . फडणवीस यांनी आम्ही तो स्वीकारला नाहीये असा स्टेट्मेंट दिला नाहिये अजून. ठरावानंतर असे स्टेट्मेंट दिले असेल तर दाखवा . आणि १३५ असतील तर ते बहुमत कसे ? फडणवीस खोटा बोलत आहेत का ? बाजूने १३५ व विरोधात १०४ म्हणजे बहुमतच आहे. विश्वासदर्शक/अविश्वासदर्शक ठरावावरील मतदानात सभागृहाच्या एकून सदस्य संख्येपेक्षा एकूण मतदानात ज्या बाजूने ५० टक्क्यांहून अधिक मतदान होते तो ठराव जिंकतो. उद्या २८८ पैकी फक्त २९ सदस्यांनी मतदान केले तर ठराव जिंकण्यासाठी १५ मते मिळाली तरी चालते.

In reply to by श्रीगुरुजी

कपिलमुनी 19/11/2014 - 15:08
नैतिक/अनैतिक या सापेक्ष कल्पना आहेत. घटनेत नैतिक/अनैतिकतेची व्याख्या नाही.
याला आमच्याकडे बोटावरची थुंकी बदलणे म्हणतात.
जोपर्यंत सत्ताधारी पक्षाच्या बाजूने कोण व विरोधात कोण हे नक्की होत नाही तो पर्यंत अधिकृत विरोधी पक्ष कोण हे ठरू शकत नव्हते. विश्वासदर्शक ठरावावरील मतदानानंतरच अधिकृत विरोधी पक्ष कोणता हे ठरणार होते. त्यामुळे दुसर्‍या व तिसर्‍या विषयांची अदलाबदल हा योग्य निर्णय होता.
मग अगोदरच ही गोष्ट ध्यानात आली नव्हती का ?
भाजप मला विचारून इतरांना मंत्रीपदे देत नाही किंवा इतरांच्या मंत्रीपदांची संख्या मी ठरवित नाही.
तुम्ही त्याच पद्धतीने डीफेंड करत आहात
हे भाजपलाच ठरवू द्यात.
तुम्हाला त्रास होत होता सेनेचा म्हणोन तुम्हालाच विचारला
बाजूने १३५ व विरोधात १०४ म्हणजे बहुमतच आहे.
हे राष्ट्रवादी तटस्थ होती तेव्हा कळाला फडणवीस किंवा कोणीही याचा स्पष्टीकरण दिला नव्हता

In reply to by श्रीगुरुजी

समीरसूर 13/11/2014 - 15:14
अशा परिस्थितीत भाजपने सत्तास्थापनेचा विचार सोडून द्यायला हवा होता. त्यात त्यांचेच भले झाले असते. राष्ट्रवादीचा कुचकामी आणि बिनभरवशाचा आधार घेऊन निंदानालस्ती सहन करण्यापेक्षा ठामपणे सत्तेला नकार दिला असता तर नवीन निवडणुकीत (जर शिवसेनेला तोपर्यंतदेखील समज आली नसती तर) त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले असते. आज नाही तर उद्या निवडणुक पुन्हा होणारच आहे. हे असलं बेंगरुळ आणि बालिश खेळ खेळून स्थापलेलं सरकार किती टिकणार हा प्रश्नच आहे. आणि ते देखील काकांच्या भरवशावर उभं राहिलेलं? मग तर प्रश्न आणखीनच जटील आणि कुटील होतो. :-) काका केव्हा सतरंजी ओढून घेतील ते खाली आदळणार्‍यांना देखील कळणार नाही. :-)

In reply to by समीरसूर

गणेशा 13/11/2014 - 16:25
भाजपने सत्ता स्थापनच करायला नको होती
नाही, भाजप ने शिवसेने बरोबर सत्ता स्थापन करावयास हवी होती. जर शिवसेनेला तोडायचेच होते म्हंटल्यावर तीने चुका करु नाहितर काही करु, भाजप ने त्या चुकांचे भांडवल का करावे ? त्यांना शिवसेना जड जात आहे असे वाटत होते तर त्यांनी राष्ट्रवादी बरोबर संधान करुन आपला मार्ग आखला. शिवसेने बरोबर युती तुटली होती, आणि आठवले, जानकर शेट्टी मंडळी भाजप बरोबर गेली (कारण केंद्रात त्यांची सत्ता होती, आणि वातावरण ही) पण मग भाजप ने राज ठाकरें बरोबर का नाही युती केली ? कारण त्यांना माहिती होते राज ठाकरे त्यांना काही जास्त मदत करु शकणार नाही, उगाच १०-५ जागा आणि त्या ही मुंबई मधील काही सोडाव्या लागतील. त्या पेक्षा राष्ट्रवादी त्यांना जवळाचा वाटला. आणि ही सरासर धुळफेक होती बाकी जनतेला. हे आधीच ठरल्या मुळे असे झाले. जर आवाजी मतदानात जर राष्ट्रवादी भाजप बरोबर होती तर तो आधीचा डाव होता, आम्ही त्यांचा पाठिंबा मागितला नव्हता अशी ही धुळफेकच आहे. मग असे असेन तर कुठल्या तोंडाने दिल्लीत तुम्ही सर्वात मोठा पक्ष असुनही, आप अणि कॉन्ग्रेस ला एकाच नाण्याच्या दोन बाजु बोलता, तेथेही आपने पाठिंबा मागितलेला नव्हता. जर तेथे नाण्याच्या त्या २ बाजु असु शकतात, तर येथे ही ह्या नाण्याच्या २ बाजुच का नाही ? अमित शहा-मोदी यां मध्ये उद्धव भरडले गेले. स्वता त्यांनाच काय भाजपा च्याच कीती तरी लोकांना राष्ट्रवादी बरोबर आपण जाणार आहोत हे वाटत नव्हते. मला वाटते देवेंद्र पण त्याच जनात होते. तरीही एकत्र भाजप ने बहुमत आनायचे आणि नाही जमले तर शिवसेने बरोबर जायचे असेच करायचे होते. राष्ट्रवादी हा धुर्त आहे तर भाजपा हा धोरणी पक्ष आहे आणि शिवसेना ह्या दोन्ही गोष्टीत फेल असला तरी तो चुकीचा असा जो सूर उमटत आहे तो त्यांची रणनिती चुकली असा पाहिजे त्यांची निती चुकीची नव्हती असे नमुद करावेशे वाटते. आता आनखिन एक सांगतो.. (कृपया हे कोन म्हणाले होते हे विचारु नये, एक बारामतीकर असल्या कारणाने बर्याच गोष्टी ऐकलेल्या असतात.. उगाचच) जर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे मिळुन १४४ आमदार झाले असते ( कॉग्रेस ला ही दूर ठेवुनच) तर शरद पवारांनी भाजपा बरोबर झालेली बोलणी विसरुन शिवसेने बरोबर जाण्याचे योजीले असते. आधीही हा पर्यत्न झाला होता पण तो त्यावेळेस फसला गेला होता. मला वाटते जोशींनी हे सांगितले आहे कुठल्याशा मुलाखतीमध्ये. मला वयक्तिक रित्या राष्ट्रीय राजकारणात अटल बिहारी वाजपेयी आवडायचे, राजकारणी असा असावा सर्व पक्षात त्याला मान असावा, मोदी यांचे विकासाचे धोरण आहे पण त्या मध्ये साधे व्यापारी.. सामान्य धंदे बुडुन जातील अशी शंका मला आहे, परंतु हे परिनाम १० वर्षांनंतर दिसतील. आताच मला वाटते FDI बांधकाम क्षेत्रात आण इतर बर्याच क्षेत्रात येण्यास त्यांनी पुर्ण संमत्ती दिलेली आहे. आणि अश्याच रिटेल FDI बद्दल त्यांनी कॉन्ग्रेस ला चुकीचे धरले आहे. रीटेल मध्ये ही लवकरच FDI आल्या शिवाय राहणार नाही. विकास म्हणजे काय ? फक्त चकाचक जिवन शैली, चकाचक रस्ते पुल मॉल म्हणजे विकास ? तर नाही, प्रत्येकाचे दरडोयी उत्पन्न वाढल्या नंतर त्याच्या गरजा भागल्या नंतर जे जे गरजेचे आहे ते देणे म्हणजे विकास. तसे नसते तर मग पिंपरी चिंचवड चा विकास डोळ्यात भरणारा आहे. कोणीही या आणि रस्ते-पुल औद्योकीकरण बघावे आणि सांगावे. आता ५० हजार पगार असला तरी येथे साधा १ BHK फ्लॅट सामान्य माणसाला घेता येत नाही, हा विकास त्याच्या कामाचा नाही. विषय राजकारणावरुन भरकटायला लागला असल्याने थांबतो

In reply to by समीरसूर

श्रीगुरुजी 13/11/2014 - 21:11
>>> अशा परिस्थितीत भाजपने सत्तास्थापनेचा विचार सोडून द्यायला हवा होता. त्यात त्यांचेच भले झाले असते. भाजपचे भले झाले असते का ते माहित नाही, पण भाजपने सरकार स्थापन केले नसते तर विधानसभा बरखास्त होऊन पुन्हा एकदा निवडणुका होऊन अब्जावधी रूपयांचा चुराडा झाला असता व तोपर्यंत महाराष्ट्रात निर्नायकी अवस्था येऊन वाईट परीणाम झाला असता. >>> हे असलं बेंगरुळ आणि बालिश खेळ खेळून स्थापलेलं सरकार किती टिकणार हा प्रश्नच आहे. आणि ते देखील काकांच्या भरवशावर उभं राहिलेलं? मग तर प्रश्न आणखीनच जटील आणि कुटील होतो. काका केव्हा सतरंजी ओढून घेतील ते खाली आदळणार्‍यांना देखील कळणार नाही. भाजप काही बोळ्याने दूध पीत नाही किंवा शिवसेनेसारखा भ्रमात राहणारा गाफील पक्ष नाही. १९९९ ला वाजपेयी सरकार केवळ १ मताने पडले होते. त्या अनुभवातून भाजप खूप काही शिकला आहे. भाजपने कर्नाटकात (२००८-१३), राजस्थानात (१९९३-९८), उ.प्र. मध्ये (१९९७-२००३) अल्पमतातील सरकारे टिकविली आहेत. काकांनी सतरंजी ओढली तरीसुद्धा हे सरकार टिकेल याची खात्री बाळगा.

In reply to by श्रीगुरुजी

कपिलमुनी 14/11/2014 - 16:00
अल्पमतातील सरकारे टिकविली आहेत
कोणत्या प्रकारे ते पण सांगा , म्हणजे अजून काही मतदारांच भ्रम असेल की भाजपा सोवळा आहे तो दूर होईल .

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी 14/11/2014 - 21:08
>>> कोणत्या प्रकारे ते पण सांगा , म्हणजे अजून काही मतदारांच भ्रम असेल की भाजपा सोवळा आहे तो दूर होईल . कायदेशीर व घटनात्मक मार्गाने ही अल्पमतातील सरकारे चालविली गेली होती. माहिती नसल्यास इतिहासाची पाने चाळा.

In reply to by श्रीगुरुजी

आवाजी मतदान आधी जे झालेले तेव्हा आमदारांनी आधीच समर्थन पत्रे दिलेली.

गुरुजी ही गोष्ट का लपवत आहेत. सुधरणार नाहीच म्हणा तुम्ही. भाजपाने रडीचाच डाव खेळला आहे सत्तेसाठी कोणत्याही थरावर जातात आणि भक्तांना सोशल मिडीयावर वार्‍यावर सोडतात :)

In reply to by दिवाकर देशमुख

क्लिंटन 19/11/2014 - 12:34
भाजपाने रडीचाच डाव खेळला आहे सत्तेसाठी कोणत्याही थरावर जातात आणि भक्तांना सोशल मिडीयावर वार्‍यावर सोडतात
आणि काही काही आय.डी मिसळपाववर उच्छाद मांडायचाच म्हणून बॅन केले तरी लोचटासारखे परतपरत वेगवेगळ्या नावाने येतात.त्यातूनच कधीतरी उदयचा दिवाकर होतो. काय करणार? चालायचच :)

In reply to by कपिलमुनी

श्रीगुरुजी 14/11/2014 - 23:19
>>> कोणत्या प्रकारे ते पण सांगा , म्हणजे अजून काही मतदारांच भ्रम असेल की भाजपा सोवळा आहे तो दूर होईल . विरोधकांमध्ये एकी नसली व त्यांच्यात फाटाफूट आणि वैचारीक विरोधाभास असला की सरकार अल्पमतात असले तरी ते टिकून आपला कार्यकाल यशस्वीपणे पूर्ण करते. अल्पमतातील सरकार टिकविण्यासाठी सोवळे सोडून ओवळे नेसावेच लागते असे नाही.

वर थत्ते यांनी नमूद केल्याप्रमाणे त्या त्या पक्षाचे समर्थक काही झाले तरी आपल्या च पक्षाला मत देतात किंवा पक्षाने कितीही खालची पातळी गाठली तरी पक्षाचे समर्थन करतात . वर भाजप चे अनेक समर्थक तेच करत आहेत . आपल्या पक्षाने अनेक भर्श्टाचारि नेत्याच टोळक असणारया पक्षाच समर्थन घेतलं आहे हि खंत जर त्याना मनातून पण (दाखवायचे दात काहीही वेगळ असले तरी ) वाटत नसली तर या पक्षाच कॉंग्रेस सारखच वेगाने अधपतन का होत आहे याच उत्तर मिळेल . दुर्दैवम्हणजे हेच भाजप समर्थक टोळक इथ कॉंग्रेस कशी नैतिक दृष्ट्या अधपतित आहे , राष्ट्रवादी कशी भ्रष्ट आहे , मनसे नाशिक मध्ये राष्ट्रवादीचा पाठींबा घेणे कसे चूक आहे यावर इतर लोकाना प्रवचन देत होती . बाकी एवढी आंधळी भक्ती असणारे कार्यकर्ते पाहून इतर पक्षांना नक्कीच भाजप चा हेवा वाटत असेल . बाकी झोपलेल्याला जाग करता येत पण झोपेच सोंग घेतलेल्याला कस जाग करणार हा चिरंतन प्रश्नच आहे आंधळ्या समर्थकांची हि वृत्ती पाहून लालू , गडकरी , पवार अशा भ्रष्ट नेत्यांमागे कार्यकर्ते कसे उभे असतात ह्या मध्यमवर्गीय प्रश्नाचे उत्तर पण मिळाले . बाकी चालू द्या . राष्ट्रवादीच्या मागे फरफटत जाऊन या राज्याचे अजून वाटोळे करू नका म्हणजे झाल

दुश्यन्त 13/11/2014 - 17:39
भाजपने शेवटी एनसीपीशी संग करण्याचा आपला मनसुबा पूर्ण केला वर ते पटलावर येवू नये म्हणून आवजी मतदानाची चलाखी करून पाहिली पण परिणाम काय झाला? सगळीकडे भाजप आणि देवेंद्र यांची निर्भत्सना, टवाळी चालू आहे. भाजप आणि एनसीपीचे सेटिंग खूप आधीपासून सुरु होते ते आता उघड झाले आहे. भाजपचा मतदार नाराज आहे पवारांना काही फरक पडत नाही. भाजपकडे बहुमत नसतानाही सेनेला आधी विश्वासदर्शक ठराव पास होवू दे मग सत्तेत सामील व्हायचं बघू अस म्हणणे म्हणजे तुमची मुलगी आमच्या घरी द्या मात्र मुलगा कसा आहे वगैरे आत्ता काही बोलू नका ते लग्नानंतर पहा असे म्हणण्यासारखे झाले. केंद्रात एखाद फुटकळ मंत्रिपद दिल आणि राज्यात अशीच ४ खाती दिली तर सेना लगेच फरफटत आपल्या मागे येईल या भ्रमात भाजप राहिली. मात्र सेनेने केंद्रात विस्तारत येणार पद सोडून दिल आणि राज्यात पण विरोधात बसली हे बरच झाल. आता आवजी मतदान घेवून पवारांच्या कृपेने सरकार तरल मात्र जी अब्रू जायची ती गेलीच आहे. पुढे कधी तरी मतदान घ्यावच लागणार आहे, एनसीपी कधीही दगा देवू शकते ते होणार नाही तोवर हे 'पवारालंबी' सरकार चालणार आहे. एकंदरीत भाजपची लोकांत छी थु झाली आहे.यांचे खरे रूप समोर आले ते बरेच झाले.ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप उठवून सत्तेत आले त्यांच्याशी असलेली यांची मिलीभगत उघड झाली. सेनेने विरोधात बसून चांगले काम केले.

In reply to by आजानुकर्ण

http://www.misalpav.com/comment/627525#comment-627525 इथे गुरुजी ना वाटते कि राज ने राष्ट्रवादी शी 'साटलोट' केल त्यामुळे जनते ने त्याना लाथ दिली . बहुतेक राष्ट्रवादी आणि भाजप उच्च नैतिक मुल्य आणि महाराष्ट्राच हित जपण्यासाठी 'शय्यासोबत ' करत आहेत असा काहीसा त्यांचा ग्रह झाला असावा . राज चाच (राष्ट्रवादीचा बाहेरून पाठींबा ) नाशिक फ़ोर्मुला त्याना महाराष्ट्राच्या हिताचा वाटत आहे .

In reply to by आजानुकर्ण

श्रीगुरुजी 13/11/2014 - 21:15
दोन्हीपैकी काहीही नाही. 'दिल तो पागल है' हा चित्रपट आठवला. या चित्रपटात लोलो शाहरूखच्या मागे लागलेली असते. परंतु शाहरूख माधूरी दिक्षितच्या प्रेमात असतो. परंतु तो लोलोचे प्रेम स्वीकारत नाही व तिला झिडकारतही नाही. असे करण्याची त्याला आवश्यकता वाटत नाही.सद्यस्थितीत असेच झाले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

असल 'अफलातून ' उत्तर वाचून आजानुकर्ण झीट येउन पडले आहेत असे चित्र डोळ्यापुढे उभे राहिले . भाजप - शाहरुख खान (दोन दोन मुली (पक्षी -शिवसेना व राष्ट्रवादी ) ज्याच्यामागे आहेत असा बाका छोरा ) राष्ट्रवादी - माधुरी दीक्षित (शाहरुख च प्रेम पात्र ) शिवसेना -करिश्मा कपूर ( कॉंग्रेस -अक्षय कुमार (राष्ट्रवादी कडून नाकारलेले गेलेले ) दिल तो पागल है च्या शेवट च्या सीन मध्ये नाईलाजाने अक्षय आणि करिश्मा (दोघेही नाकारलेले गेलेलं ) एकत्र येण्याची शक्यता दाखवली आहे . जसे काल विधानभवनात कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र येउन धिंगाणा घालताना पाहून अनेकाना तो सीन आठवला असेल . बाकी राज आणि माया (बाकी माया हे नाव मोठे साहेब पक्षी राष्ट्रवादी याना लई शोभून दिसत म्हणा ) याचं मिलन काल अख्ख्या राज्याने पाहिलेच . जमली का हो गुरुजी casting ?

In reply to by पिंपातला उंदीर

आजानुकर्ण 13/11/2014 - 21:53
शाहरुख खान (भाजपा) माधुरीच्या प्रेमात आहेत म्हणजे माधुरी ही राष्ट्रवादी नसून महाराष्ट्राची सत्ता आहे असे वाटते.

दुश्यन्त 13/11/2014 - 17:58
भाजपा समर्थक सारी चुक शिवसेनेची आहे असे गळे काढण्यात गुंतले आहेत. राजधर्म पाळायचा असतो एव्ढा साधा कॉमन सेन्स नाहिये. जर राष्ट्रवादीचा पाठिंबा स्विकारला नाहिये तर तसा स्प्ष्ट सांगायची हिंमत दाखवायची. मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असा प्रकार आहे. ज्या मतदारांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस्च्या विरोधत मतदान केले हा त्या मतदारांचा विश्वासघात आहे. +१ बाहेर लोकं भाजप आणि फडणवीसांची भयंक टवाळी करत आहेत, इथे बोलता येत नाही अश्या भाषेत त्यांचा उद्धर चालू आहे.खिंड लढवणारे काही तुरळक भक्त सोडले तर बहुतांशी लोकं भाजपवर नाराज आहेत.

In reply to by दुश्यन्त

बॅटमॅन 13/11/2014 - 18:00
खिंड लढवणारे काही तुरळक भक्त सोडले तर बहुतांशी लोकं भाजपवर नाराज आहेत.
असेच म्हणतो. (पश्चात्तप्त) बॅटमॅन.

In reply to by हाडक्या

बरोबर आहे... बॅटमन भाजपच्या कारवाई पश्चात् तप्त (रागाने गरम) झालेला आहे... तेव्हा सांभाळून...... असे म्हणायचे असेल ;) :)

जयनीत 13/11/2014 - 20:17
वरील मुद्द्यावर भाजप आपल्या धोरणाचे समर्थन करत आहे. मूळ मुद्दा हा की शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीची साथ घेऊन भाजप ने काय मिळवले? वेगळे पणा जपणारा पक्ष हा दावा ते आता कितीही करतील तरी ही त्याला आता तेव्हढा आधार राहणार नाही त्यांचे पक्के समर्थक तसे मानत राहतील तरीही सामान्य मतदार जो भाजप किंवा मोदीं कडे ज्या आशेने बघत होता त्यावर नक्कीच परिणाम होइल. मुळात राष्ट्रवादीची साथ घेण्याची गरजच काय होती? हरियाणात बहुमताचा आकडा गाठण्या साठी दहा पाच आमदार कमी पडले असते तेव्हा आय. एन. एल. डी. ची साथ घ्यावी लागली असती तर ते समर्थनीय तरी होते पण तिथे तशी परिस्थिती आली नाही तितका नशीबवान भाजप ह्या दोन राज्यांच्या निवडणुकां मध्ये होता महाराष्ट्रात ही तशी परिस्थिती नव्हती मग कशा साठी स्वत:च्या तथाकथीत स्वच्छ प्रतिमेला ला धक्का पोहचवला. अन तों ही इतक्या लवकर. केंद्र सरकार अजूनही लोकप्रिय आहे न खाउंगा न खाने दुंगा ह्यावर लोकांनी विश्वास ठेऊन मते दिली होती आता ह्या कृतीचे समर्थन काय? मी भाजपचा किंवा शिवसेनेचा समर्थक नाही त्या दोन्ही पक्षां बद्दल कुठलीही सहानुभूती नाही अन भाजप जे बोलतो त्यावर माझा काडीचाही विश्वास कधीच नव्हता तो इतकेच काय तर ह्याही पुढे जातील ह्यात काही शंका कधीच नव्हती पण इतक्या लवकर अन कसलीही गरज नसतांना ते असे करतील ह्याचे मात्र अतिशय आश्चर्य वाटले. भाजपला शिवसेनेची अडचण होत होती शत प्रतिशत भाजप पाहिजे होता म्हणून त्यांनी असे केले. हे जागावाटपां च्या वेळे पासून ठरवून केल्या जात आहे. मग कारणे काहीही सांगितल्या गेली आता भाजप १२१ अन शिवसेना ६३ ही परिस्थिती असतांना त्यांनी शिवसेनेनी उपमुख्य मंत्री अन एक तृतीयांश मंत्रीपदे ही मागू नयेत त्यांनी नाक घासून जे मिळेल ते गोड मानून घ्यावे कारण ते आमच्या मुळे जिंकलेत हा अहंकार काय सांगतो? अन त्या अहंकाराला ही काय आधार आहे हरियाणाच्या पक्षाने एकटे लढून आपली शक्ती किती पटीने वाढवली अन इथे आधी पासून भाजपचे चांगले अस्तित्व असतांना चार पक्षांशी युती करूनही बहुमाताचा आकड्याचा इतके दूर रहावे लागले तरीही आम्हीच सारे निर्णय घेणार तुम्ही मान्य करा हा हेका मात्र जात नाही. भाजपची शक्ती शिवसेने पेक्षा जास्त होती हे मान्य त्यांनी जास्त जागा मागितल्या अन त्यासाठे वेगळे लढले इथपर्यंत ही ठीक पण नंतर मात्र आहे ती परिस्थिती मान्य करून पुढे जायला हवे होते. पण तसे केले नाही. शिवसेनेला ज्या अठरा जागा लोकसभेच्या निवडणुकीत मिळाल्या होत्या ते काही भाजपचे उपकार नव्हते हे ही सिद्ध झालेच की. १८ लोकसभेचा मतदार संघात ६ प्रमाणे १०८ जागा होतात शिवसेनेने मिळवल्या ६३ म्हणजे हिशोब लावला की प्रत्येक लोकसभा मतदार संघातल्या साडे तीन मतदार संघात त्यांनी आघाडी घेतली असे मान्य करावे लागते. (हे काही निवडणूक पूर्व अंदाज नसून सिद्ध झालेली आकडेवारी आहे ) पण थोड्या फार यशाने डोळे आंधळे झाली की ती कशी दिसणार?

In reply to by जयनीत

hitesh 14/11/2014 - 15:32
म्हणजे असे बघा केळीवाला बुट्टीभर केळी घेऊन बसला आहे. तुम्ही किती केळी घ्याल ? तुमच्या गरजेपुरतीच ना ? भाजपाला बहुमताला १५ लोकांचीच गरज आहे. सेनेने फक्त १५ च लोक द्यावेत की.. सेनेचे साठ असले तरी तितके केळी भाजपाला नकोचआहेय्त. म्हणजे भाजपाच १२० व सेनेचे १५. ... म्हणजे भाजपाची ताकद सेनेच्या आठपट भरते. उरलेली केळी सेनेने फेकुन द्यावीत.

In reply to by कपिलमुनी

hitesh 14/11/2014 - 17:49
तो सगळी केळी विकेल तरीही त्याला १५ केळ्याचेच पैसे घ्यावे लागतील. उरलेली केळी बुट्टीत घालुन घरी न्यायची नसतील तरीही ती केळी त्याला फुकटच घालावी लागतील. त्यामुळे २ : १ चा बालहट्ट सोडुन ८ : १ हे कटू सत्य त्यांनी स्वीकारले असते तर निदान केळ्रे कुजली तरी नसती. आमचे पवार बघा.. सत्यनारायण घालायला केळी उसनीही दिली आणि पुजाही त्यानी स्वतःच सांगितल्याने पुजा संपल्यावर आपलीच केळी हक्काने घेऊनही गेले

In reply to by hitesh

hitesh 14/11/2014 - 17:59
मला तर शंका आहे केळीच नव्हे भाजपा जी बाकीच्या खारका सुपार्‍या आमच्या म्हणुन सांगते त्याहीपवारांच्याच आहेत.

In reply to by hitesh

vikramaditya 16/11/2014 - 15:49
केळ्यांचे उदाहरण नको. नुकतेच मिपावर "वसईची पिवळी केळी" यावर आवाजी मत-प्रदर्शन झाले आहे.

सुबोध खरे 13/11/2014 - 20:51
राजकारण हा माझा प्रांत नाही. सर्व लोक भाजपचे चुकले म्हणताहेत. त्यांनी साधन शुचिता पाळायला पाहिजे होती. ते बरोबरही असेल पण माझ्यासारख्या एका सर्वसामान्य मतदाराला असे वाटते कि भाजपने काय करायला पाहिजे होते. शिवसेनेपुढे लोटांगण घालायला पाहिजे होते? शिवसेनेने किती ताठरपणा निवडणुकीच्या अगोदर दाखवला होता हे आपण पाहिलेच आहे मग त्यांना झुकते माप देऊन त्यांच्या दुप्पट आमदार निवडून येउन सुद्धा त्यांच्या तालावर नाचायला पाहिजे होते. आज कितीही म्हणालात तरी भाजप ला ४२ टक्के जागा महाराष्ट्राच्या जनतेने दिल्या आहेत. बाकी लोकांना २१ टक्के किंवा त्याहूनही कमी जागा आहेत याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेने भाजपला जनादेश दिला आहे. अशा परिस्थितीत भाजप ने काय करायला हवे होते? का विश्वास दर्शक ठरावात नापास होऊन लगेच निवडणुका परत घेऊन कर्जाच्या खाईत असलेल्या महाराष्ट्राला अजून काही शे कोटी रुपयाच्या खर्चात टाकायला हवे होते? किंवा राज्यावर ६ महिने राष्ट्रपती राजवट आणायला हवी होती? लोकांना नक्की काय हवे आहे? प्राप्त परिस्थितीत त्यांनी जे केले ते कदाचित साधन्शुचीतेच्या दृष्टीने बरोबर नसेल पण याच्या पेक्षा चांगला पर्याय त्यांना उपलब्ध होता असे मला वाटत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

शशिकांत ओक 13/11/2014 - 22:10
मित्रा,सध्याच्या राजकारणात चालू घडामोडींची घडामोडींचीसुंदर व मार्मिक रेखाटने 'ढिंग टांग' मधून ब्रिटिश नंदी करतात. ती पहिल्या चहा बरोबर कुरकुरीत क्रम्स प्रमाणे खुसखुशीत वाटतात. मामला म्हणून एक... त्यातील शेपटीचा फटकारा मान डोलायला लावतो. (नंतर डकवतो.)

In reply to by श्रीगुरुजी

आजानुकर्ण 14/11/2014 - 17:53
काँग्रेसचा तो भ्रष्टाचार आणि भाजपाची ती अपरिहार्यता! युक्तिवाद छान आहे. खरंच. इथूनपुढं पानभर निबंध लिहायच्या ऐवजी एवढाच युक्तिवाद केलेला पुरे!

In reply to by सुबोध खरे

आनन्दा 13/11/2014 - 21:30
सहमत आहे, काल ह सगळा घटनाक्रम पाहिल्यावर मी देखील निराश झालो होतो, पण कालांतराने विचार करता असे लक्षात आले की शिवसेना काय आणि राष्ट्रवादी काय, खाणार नाहीत असे कोणी सांगितले आहे? अगदी फॉर दॅट मॅटर भाजपा देखील. आपल्याला सुशासनाशी मतलब. जर भाजपाने चांगले काम केले तर काय फरक पडतो त्यांनी असे बहुमत सिद्ध केले म्हणून? माझ्याड्रुष्टीने साधन नव्हे, तर साध्य महत्वाचे.

In reply to by सुबोध खरे

अर्धवटराव 13/11/2014 - 21:34
प्राप्त परिस्थितीत त्यांनी जे केले ते कदाचित साधन्शुचीतेच्या दृष्टीने बरोबर नसेल पण याच्या पेक्षा चांगला पर्याय त्यांना उपलब्ध होता असे मला वाटत नाही.
-- प्रश्न केवळ साधनशुचीतेचा असेल तर भाजपने संपूर्ण सभागृहाला सरकारला पाठिंबा द्यायचे आवाहन करायला हवे होते. भाजपचे रूडी साहेब म्हणाले कि एक काँग्रेस सोडुन आम्हि कोणाचेही समर्थन घेऊ. त्यापेक्षा महायुती सरकार बनवत आहे, स्थिर सरकारसाठी ज्याला वाटेल त्याने पाठिंबा द्यावा, असा स्टॅण्ड घेतला असता तर बहुमत देखील मिळवता आले असते व चारित्र्यावर डाग देखील लागले नसते. अर्थात, हे सगळं जर-तर आणि भावनांचा खेळ आहे. जे झालं ते व्यवस्थीत गणित मांडुन केलं गेलं असणार.

पैसा 13/11/2014 - 23:42
राजकारण गेलं चुलीत. औषधांच्या किंमतीबद्दल अमेरिकी दबावाखाली बदललेले धोरण, पाकिस्तानला सबसिडाईज्ड गॅस द्यायचा प्रस्ताव, पर्यावरणविषयक धोरण इ. भाजपा सरकारचे गेल्या काही दिवसांतील काही निर्णय अजिबात पटत नाहीयेत. भाजपा म्हणजे स्वच्छ वगैरे काही गोड गैरसमज नसले तरी हे सगळे बरेच अनपेक्षित वाटले. प्रादेशिक पक्ष संपवायचा भाजपाचा विचार असेल तरीही त्यासाठी स्वीकारलेले मार्ग बरोबर वाटत नाहीयेत. आता राष्ट्रवादीकडे भाजपाने पाठिंबा कुठे मागितला वगैरे कोणी कृपया सांगू नका. ते सगळं इतकं सोपं नसतं हे तुम्हा आम्हाला माहित आहे. अजितदादा पवारांनी शिवसेनेचे सरकार आणि त्याला दोन्ही काँग्रेसचा पाठिबा असा प्रस्ताव नाकारल्याचे सांगितले. दुसरीकडे सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रीपद देणार अशा बातम्या येत होत्या, मात्र सुरेश प्रभूंना मंत्रीपद मिळाले आहे. ते साहेबांच्या अगदी जवळचे आहेत असेही लगेच सगळीकडे लिहून येत आहेच. दिल्लीत विधानसभा निवडणुकांत भाजपाने जे केले ते महाराष्ट्रात करायचे टाळले आहे. इथेही त्यांना तसे करता आले असते, कारण परिस्थिती अगदी तशीच होती. तसे काही झाले असते तर कदाचित पुढच्या निवडणुकांत लोकांनी त्यांना जास्त प्रमाणात मते दिली असती. आता ते कठीण वाटते. वाजपेयींची भाजपा आता नाही हे ठळकपणे दिसून येत आहे. त्याशिवाय बदलत्या परिस्थितीत रा.स्व.संघ आणि भाजपाचे समीकरण काय असेल याबद्दलही कुतुहल आहे. सामान्य लोक आशेने किंवा भावनेच्या भरात मतं देऊन एका किंवा दुसर्‍या पक्षाला निवडून आणत असतात, त्यां सगळ्या राजकारण्यांना मात्र या लोकांशी किंवा त्यांच्या भावनांशी काही देणेघेणे नसते हे अनेकदा दिसून आले आहे. चलता है. जसे आम्ही, तसेच आमचे नेते. लोकशाईचा जय हो !!

In reply to by पैसा

क्लिंटन 14/11/2014 - 10:50
वाजपेयींची भाजपा आता नाही हे ठळकपणे दिसून येत आहे.
नाही हो. वाजपेयींच्याच भाजपाने १९९८ मध्ये जयललितांशी (आणि इतर अनेकांशी) युती केली नसती तर वाजपेयी पंतप्रधान बनूच शकणे शक्य नव्हते. अगदी काठावरचे बहुमत असलेल्या वाजपेयी सरकारला तामिळनाडूतून घसघशीत ३० खासदारांचा पाठिंबा मिळाला. जयललितांशी युती केली नसती तर ३९ पैकी अगदी एखाद्या जागी तरी भाजप उमेदवाराचे डिपॉझिट वाचले असते तरी ते भाजपने आपले मोठे यश मानले असते!! जयललितांविरूध्दच्या आरोपांचा तपास करणार्‍या अधिकार्‍यांची एकसाथ बदली वाजपेयी सरकारने जयललितांनी पाठिंबा काढून घ्यायच्या दोन महिने आधी केली होती.त्यावर 'प्रत्येक अधिकारी कोणत्या ना कोणत्या केसचा तपास करतच असतो आणि कोणीही अधिकारी आयुष्यभर एकाच ठिकाणी थोडीच काम करतो' असे स्पष्टीकरण प्रमोद महाजन यांनी दिले होते. उत्तर प्रदेशातील नेत्यांच्या विरोधाला न जुमानता मायावतींना तीन वेळा मुख्यमंत्री करून त्यांना मोठे करण्यात वाजपेयींचाच हात होता. कल्याणसिंगांच्या मंत्रीमंडळात ९५ मंत्री होते आणि त्यात अनेक गँगस्टरचाही समावेश होता.त्यावर 'ते जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांना मंत्री बनण्यापासून कोणीही अडवू शकत नाही' अशा स्वरूपाचे उत्तर वाजपेयींनीच दिले होते. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की वाजपेयींनी सुध्दा अशा तडजोडी अनेकवेळी केल्या होत्या.त्याची किंमत त्यांना भरायला लागली का? नक्कीच लागली. सर्वसामान्यांमध्ये त्यांच्याविषयी आदर असूनही त्यांना २००४ मध्ये पंतप्रधान बनता आले नाही. यावेळीही राष्ट्रवादीशी तडजोड करून भाजपाने एक मोठी रिस्क घेतली आहे.पायात घुसलेला एक काटा काढायला दुसरा काटा वापरायचा आणि योग्य वेळ येताच दोन्ही काटे फेकून द्यायचे अशी रणनिती असावी असे एक भाजप समर्थक म्हणून मनापासून वाटते. तरीही जोपर्यंत दुसरा काटा हातात आहे तोपर्यंत अस्वस्थता राहणारच. पण भाजपाने एक काटा हातात घेतला हे मला आवडले नाही म्हणून त्यांच्या विरोधातील बाभळीच्या झाडाला मात्र मी मत देऊ शकणार नाही हे नक्कीच.

In reply to by क्लिंटन

वाजपेयी स्वतः अतिशय निस्पृह आणि आदरणीय होते . पण त्यांचे सरकार आणि मंत्री अनेक आरोपांनी घेरले गेले होते . किंबहुना आज जे भाजप चे कॉन्ग्रेसीकरण झाले आहे त्याची प्रक्रिया वाजपेयी यांच्या पंतप्रधान काळात सुरु झाली होती . वाजपेयी या सर्वासमोर हतबल झाले होते . अवांतर - आज भक्तांच्या आंखो का तारा असणारया आणि मोदी यांचे विश्वासू असणार्या सुब्रमन्यम स्वामी यांनी अटलजी यांच्या विरुद्ध इतके घाणेरडे आरोप केले आहेत कि अटलजी यांच्या बद्दल असणारया आदरामुळे त्याच्या लिंक इथे देण्याचा मोह टाळत आहे . ऋषितुल्य अटलजी बद्दल असले बिभित्स आरोप करणारा इसम आज भाजप च्या थिंक tank मध्ये आहे यावरून भाजप साठी अटलजी आज अडगळीत जमा झाले आहेत हेच अधोरेखित हते

In reply to by पिंपातला उंदीर

प्रसाद१९७१ 14/11/2014 - 11:40
बाजपाईंचे उगाच कौतुक करु नका हो. कॉग्रेस चा माणुस असल्यासारखा वागणे कायम. निस्पृह कसले, मानलेली मुलगी आणी जावई धिंगाणा घालत होते सरकार मधे आणि बरोबर भाजपचे शरद पवार प्रमोद महाजन आणी ब्रिजेश नावाचा सरकारी अधिकारी. वाजपाईच्या जागी तेंव्हा मोदी सारखा कोणी असता तर पूर्ण बहुमतात भाजप आले असते निवडुन १९९९ सालीच.

In reply to by प्रसाद१९७१

श्रीगुरुजी 14/11/2014 - 14:57
>>> निस्पृह कसले, मानलेली मुलगी आणी जावई धिंगाणा घालत होते सरकार मधे हे माध्यमांनी निर्माण केलेले स्पेक्युलेशन आहे. त्यांच्या मानलेल्या मुलीच्या व जावयाच्या सरकारमधील धिंगाण्याचे काही पुरावे असतील तर कृपया ते उघड करावेत.

In reply to by श्रीगुरुजी

आजानुकर्ण 14/11/2014 - 19:59
कदाचित राजकीय अपरिहार्यतेपोटी मानलेली मुलगी व जावयाने काही प्रताप केले असतील. मला तरी अपरिहार्यतेपोटी केलेले प्रकार क्षम्य वाटताहेत बुवा. निदान काँग्रेससारखा भ्रष्टाचार तरी केला नाही ना!

In reply to by आजानुकर्ण

तुम्हाला काही कळत नाही बघा आजानुकर्ण . जावई फ़क़्त गांधी घराण्याचा असेल तर कांही पुरावे द्यावे लागत नाहीत . भाजप सारख्या साधन शुचिता जपणारया पक्षाचे नेत्याचे जावई कसे भ्रष्टाचारी असतील ? तिथे मात्र पुरावे लागतात याना . लोक काहीही बोलतात . जळतात मेले त्यांच्या भरभराटी वर

In reply to by पिंपातला उंदीर

श्रीगुरुजी 14/11/2014 - 21:12
@ प्रसाद१९७१, आजानुकर्ण, पिंपातला उंदीर, वाजपेयींच्या मानलेल्या मुलीच्या व जावयाच्या सरकारमधील धिंगाण्याचे काही पुरावे असतील तर कृपया ते उघड करावेत. जाताजाता ... मोदींविरूद्ध कणभरही पुरावा नसताना काँग्रेसने त्यांना १० वर्षे प्रचंड त्रास दिला. वाजपेयींच्या मुलीविरूद्ध किंवा जावयाविरूद्ध कणभर पुरावा जरी असता तरी त्यांना किती त्रास झाला असता याची कल्पनाच केलेली बरी.

In reply to by श्रीगुरुजी

भाजपावर आरोप झाले की पुरावे मागणे आणि काँग्रेसवर बिना पुराव्याने बोंबलत गावभर फिरणे हे यांचे धंदे आहे

In reply to by श्रीगुरुजी

प्रसाद१९७१ 17/11/2014 - 13:25
@गुरुजी - असे पुरावे कधी देता येतात का हो? आणि तुम्ही मी दिलेली दुसरी दोन नावे सोयीस्कर रीत्या विसरलात ( प्रम, आणी ब्रिजेश ), त्यांच्या बद्दल बोला की. कोलगेट आणि २जी ची प्रकरणे कोणी केली. माझे असे ही म्हणणे आहे की बाजपाईंच्या ऐवजी मोदींसारखा कोणी माणुस असता तर १९९७-९९ मधेच भाजपचे बहुमत आले असते. किंवा बाजपाई पेक्षा कोणी दुसरा माणुस असता तर २००४ साली भाजप हरली नसती. बाजपाईंनी भाजपला आतुन खाण्याचे काम ५० वर्ष केले. मनापासुन हिंदुत्ववादी मतदार कधीच बाजपाईंना मत द्यायला बाहेर पडले नाहीत. आज पण बाजपाई प्रचारात असते तर भाजपला बहुमत मिळणार नाही ह्याची त्यांनी बरोबर काळजी घेतली असती.
सुरूवातीपासून शेवटपर्यंत उद्धव ठाकर्‍यांनी व पर्यायाने शिवसेनेने अत्यंत चुकीची पावले टाकली आणि त्यातूनच आज शिवसेनेची अवस्था 'युद्धात हरले आणि तहातही हरले' अशी केविलवाणी झाली आहे. १५ वर्षे सत्तेपासून लांब राहिल्यावर सत्ता अगदी हातातोंडाशी येऊनही आपल्याच चुकीमुळे घास तोंडात जाताजाता हातातून पडून मातीत मिळावा आणि पुन्हा एकदा उपाशी रहावे लागण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. आणि ही वेळ शिवसेनेनेच स्वतःवर ओढवून घेतली आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर लगेचच भाजपने जागावाटपाचा फॉर्म्युला बदलण्याची मागणी करायला सुरूवात केली होती. 'महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मीच असणार' असे त्यावेळी कै.

पवारावलंबी

गणेशा ·

अस कस ! भाजप नेहमीच बरोबर असत . मोदी जे काही करतात ते नेहमीच सत्याच्या बाजूने असत . मग ती काळ्या पैशा च्या मुद्द्यावर मारलेली कोलांटी उडी असो , सीमेवर सैनिक शहीद होत असताना नवाझ शरीफ यांची आई ला साडी पाठवणे असो वा राष्ट्रवादी सोबत ची शय्यासोबत असो . मोदी जे करतात ते नेहमीच बरोबर असत . भ्रष्टाचार , समाजात दुही माजवण , दंगली बद्दल काय म्हणता ? छे छे ? ते पाप कॉंग्रेस , शिवसेना , समाजवादी , साम्यवादी यांच . दाखले देऊ का ? भाजप च कॉन्ग्रेस्सीकरण झाल ? अरे जिभेला काही हाड ? संघ आणि त्याची पुण्याई आहे भाजप मागे . फडतूस कॉंग्रेस च अनुकरण भाजप कसे करेल ? तेंव्हा भाजप बद्दल आमच मत बदलण्याच पातक करू नका . मंदिर वही बनायेंगे , दावूद ला फरफटत आणू , ३७० कलम रद्द करू , जय श्री राम वैगेरे वैगेरे

स्वप्नज 12/11/2014 - 19:19
झकास जमलाय तडका,,.. दिल्लीचा 'वाल' महाराष्ट्रातील 'घेवड्यां'पुढे फिका पडलाय..... महाराष्ट्र कुठं निऊन ठेवींग राव....

शिद 12/11/2014 - 19:28
खरडफळ्यावर डकवलेला फोटो येथे सुद्धा डकवत आहे. 1 अगोदर घड्याळ बांधण्यासाठी हाताची गरज लागायची पण आता परीस्थिती अशी आली आहे (की आणली गेली आहे) की घड्याळ अलगदपणे कमळाच्या कुशीत जाऊन विसावलं आहे.

hitesh 12/11/2014 - 22:52
अच्छे दिन आ गये

नाखु 13/11/2014 - 09:54
नसल्याबद्द्ल विशेष अभिनंदन.. नेमक्या व्यथा आणि व्य्थेच्या कथा दोन बोके,लोणी आणी माकड याची गोष्ट चित्ररूपात आता दोन्ही मुख्यालयात लावावी!!!

अस कस ! भाजप नेहमीच बरोबर असत . मोदी जे काही करतात ते नेहमीच सत्याच्या बाजूने असत . मग ती काळ्या पैशा च्या मुद्द्यावर मारलेली कोलांटी उडी असो , सीमेवर सैनिक शहीद होत असताना नवाझ शरीफ यांची आई ला साडी पाठवणे असो वा राष्ट्रवादी सोबत ची शय्यासोबत असो . मोदी जे करतात ते नेहमीच बरोबर असत . भ्रष्टाचार , समाजात दुही माजवण , दंगली बद्दल काय म्हणता ? छे छे ? ते पाप कॉंग्रेस , शिवसेना , समाजवादी , साम्यवादी यांच . दाखले देऊ का ? भाजप च कॉन्ग्रेस्सीकरण झाल ? अरे जिभेला काही हाड ? संघ आणि त्याची पुण्याई आहे भाजप मागे . फडतूस कॉंग्रेस च अनुकरण भाजप कसे करेल ? तेंव्हा भाजप बद्दल आमच मत बदलण्याच पातक करू नका . मंदिर वही बनायेंगे , दावूद ला फरफटत आणू , ३७० कलम रद्द करू , जय श्री राम वैगेरे वैगेरे

स्वप्नज 12/11/2014 - 19:19
झकास जमलाय तडका,,.. दिल्लीचा 'वाल' महाराष्ट्रातील 'घेवड्यां'पुढे फिका पडलाय..... महाराष्ट्र कुठं निऊन ठेवींग राव....

शिद 12/11/2014 - 19:28
खरडफळ्यावर डकवलेला फोटो येथे सुद्धा डकवत आहे. 1 अगोदर घड्याळ बांधण्यासाठी हाताची गरज लागायची पण आता परीस्थिती अशी आली आहे (की आणली गेली आहे) की घड्याळ अलगदपणे कमळाच्या कुशीत जाऊन विसावलं आहे.

hitesh 12/11/2014 - 22:52
अच्छे दिन आ गये

नाखु 13/11/2014 - 09:54
नसल्याबद्द्ल विशेष अभिनंदन.. नेमक्या व्यथा आणि व्य्थेच्या कथा दोन बोके,लोणी आणी माकड याची गोष्ट चित्ररूपात आता दोन्ही मुख्यालयात लावावी!!!
सामान्य काक (कार्यकर्ता, कावळा नाही) : केंद्रात नरेंद्र .. महाराष्ट्रात देवेंद्र , आठवले का काही . राम (अयोध्याचा नाही, आठवलेंचा) : आणि दूरुन स्मित हसतोय शरदचंद्र .. जमलेना मस्त ? काक : जमले आहे, पण उठा बाबा आता ? राम : का हो उठू ? काक : अहो उ. ठा. आणि बाबा यांचे काय ? असे बोललो. राम : थांबा मोदी नी त्या बद्दल काय बोलायचे सांगितले आहे ते पाहतो आणि मग बोलतो .. दादा : विसरू नका , आम्ही सर्व घड्याळामध्ये पाहून आणि तारखेनुसार काम करतो . काक : .ऑ ? दादा : आज तारीख १२. त्यात ११/१२/२०१४ बेरीज बघा बरोबर १२.

महाराष्ट्र - विश्वासदर्शक ठराव

धर्मराजमुटके ·

प्रसाद१९७१ 12/11/2014 - 18:47
४. काही खासदारांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत जय विदर्भ म्हणून घोषणा दिल्या त्या योग्य वाटतात काय ?>>>> खासदार विधानसभेत का आले होते ते कळले नाही. पण जय विदर्भ घोषणा दिल्या हे चांगलेच झाले. कोकणाला कधीपासुन विदर्भ मराठवाड्यापासुन सुटका हवी आहे.

In reply to by प्रसाद१९७१

खासदार ऐवजी आमदार असे वाचावे. संपादक कृपया बदल करु शकतील काय ?
पण जय विदर्भ घोषणा दिल्या हे चांगलेच झाले. कोकणाला कधीपासुन विदर्भ मराठवाड्यापासुन सुटका हवी आहे.
मग तुम्हीही जय कोकण म्हणा की ! :)

In reply to by प्रसाद१९७१

मराठी_माणूस 13/11/2014 - 15:15
कोकणाला कधीपासुन विदर्भ मराठवाड्यापासुन सुटका हवी आहे.
मग त्यांनी त्यांना हव्या तशा घोषणा द्याव्यात

अक्षरमित्र 12/11/2014 - 18:50
४. काही खासदारांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत जय विदर्भ म्हणून घोषणा दिल्या त्या योग्य वाटतात काय ?
हा मुद्दा वरील चर्चेत गैरलागू आहे असे नमूद करतो. तुमच्या इतर प्रश्नांची उत्तरे क्लिंटनसारखे अभ्यासूच देऊ शकतील. प्रतिक्रिया म्हणाल तर हे महाराष्ट्र व नवीन सरकार पहिल्या दिवसापासूनच मध्यावधी निवडणूकांकडे चालले आहे असे वाटतेय.

hitesh 12/11/2014 - 18:53
मेल्यानो , आमच्या काँग्रेसला पाडलं ... असाच तळपट होणार तुमचा

अस कस ! भाजप नेहमीच बरोबर असत . मोदी जे काही करतात ते नेहमीच सत्याच्या बाजूने असत . मग ती काळ्या पैशा च्या मुद्द्यावर मारलेली कोलांटी उडी असो , सीमेवर सैनिक शहीद होत असताना नवाझ शरीफ यांची आई ला साडी पाठवणे असो वा राष्ट्रवादी सोबत ची शय्यासोबत असो . मोदी जे करतात ते नेहमीच बरोबर असत . भ्रष्टाचार , समाजात दुही माजवण , दंगली बद्दल काय म्हणता ? छे छे ? ते पाप कॉंग्रेस , शिवसेना , समाजवादी , साम्यवादी यांच . दाखले देऊ का ? भाजप च कॉन्ग्रेस्सीकरण झाल ? अरे जिभेला काही हाड ? संघ आणि त्याची पुण्याई आहे भाजप मागे . फडतूस कॉंग्रेस च अनुकरण भाजप कसे करेल ? तेंव्हा भाजप बद्दल आमच मत बदलण्याच पातक करू नका . मंदिर वही बनायेंगे , दावूद ला फरफटत आणू , ३७० कलम रद्द करू , जय श्री राम वैगेरे वैगेरे

क्लिंटन 12/11/2014 - 18:58
मागे मी आवाजी मतदान म्हणजे काय याविषयी मिपावरच लिहिले होते ते चोप्य-पस्ते करतो: संसदेच्या किंवा राज्य विधीमंडळांच्या सभागृहांमध्ये एखादा प्रस्ताव मतदानाला येतो (उदाहरणार्थ मंत्रीमंडळावरील विश्वासदर्शक ठराव) तेव्हा सभागृहाचे अध्यक्ष--"या ठरावाच्या समर्थनात असलेल्या सदस्यांनी 'आयेस' (हो) म्हणावे" असे म्हणून त्यानंतर त्या प्रस्तावाला पाठिंबा देणारे सदस्य आयेस... असे म्हणतात.त्यानंतर "या ठरावाच्या विरोधात असलेल्या सदस्यांनी 'नोस' (नाही) म्हणावे" असे म्हणून त्यानंतर त्या प्रस्तावाला विरोध करणारे सदस्य 'नोस' असे म्हणतात. यापैकी ज्या बाजूचा आवाज अधिक मोठा असेल त्याप्रमाणे अध्यक्ष तो प्रस्ताव मंजूर्/नामंजूर झाला असे जाहीर करतात.याला आवाजी मतदान म्हणतात. कुणाही एका सदस्याने प्रत्यक्ष मतदानाची मागणी केली तर मतदान घ्यावे लागते अन्यथा अध्यक्षांनी दिलेला निर्णय अंतिम असतो. आजच्या आवाजी मतदानात शिवसेना सदस्यांनी मतविभाजनाची मागणी करूनही अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ती नाकारली हे माझ्या मते अयोग्य केले.त्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येईल की नाही माहित नाही.बहुदा नाही कारण अशा गोष्टींमध्ये सभागृह अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो. प्रत्यक्ष मतदान करायची वेळ आली तर लोकसभेत मतदान इलेक्ट्रॉनिक व्होटिंग पध्दतीने होते आणि जर यंत्रणेत काही कारणाने बिघाड झाला असेल तर मात्र मतपत्रिका वाटून मतदान होते. महाराष्ट्र विधानसभेत नक्की काय पध्दत आहे हे माहित नाही. वेळ मिळेल त्याप्रमाणे माझ्या जिव्हाळ्याच्या चर्चेत मी भाग घेणार आहेच.

In reply to by क्लिंटन

कोणत्या बाजूचा आवाज मोठा हे कसे ठरवितात ? म्हणजे त्याबाबतीत अध्य़क्षांच्या श्रवणक्षमतेवर अवलंबून असते की आवाजाची पातळी मोजणारे यंत्र लावलेले असते ? स्पष्ट बहूमत (संख्याबळ) असेल तर आवाजी मतदान योग्य असावे असे वाटते. मात्र आजच्या कार्यक्रमात शंका घेण्यास पुरेपुर जागा आहे असे वाटते शिवाय अशा गोष्टींमध्ये सभागृह अध्यक्षांचा निर्णय अंतिम असला तरी जनतेत चुकीचा संदेश जाऊ शकतो.

In reply to by धर्मराजमुटके

क्लिंटन 12/11/2014 - 19:40
कोणत्या बाजूचा आवाज मोठा हे कसे ठरवितात ? म्हणजे त्याबाबतीत अध्य़क्षांच्या श्रवणक्षमतेवर अवलंबून असते की आवाजाची पातळी मोजणारे यंत्र लावलेले असते ?
नाही या बाबतीत अध्यक्षांचे सब्जेक्टिव्ह जजमेन्टच महत्वाचे.प्रथेप्रमाणे (आणि बहुदा नियमांप्रमाणे सुध्दा) एका जरी सदस्याने मतविभाजनाची मागणी केली तरी मतदान घेणे गरजेचे असते.आणि अर्थात ते योग्यही आहे. वाजपेयींचे सरकार एका मताने पडले त्यावेळी पहिल्यांदा आवाजी मतदान झाले.अध्यक्ष बालयोगींनी आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव पास झाला असे जाहिर केले.पण त्यानंतर अर्थातच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मतविभाजनाची मागणी केली.पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक पध्दतीने मतदान झाले.त्यात काही सदस्यांचे मत नोंदले गेले नाही म्हणून मतपत्रिका देऊन मतदान झाले.त्यात वाजपेयींचे सरकार एका मताने पडले.
मात्र आजच्या कार्यक्रमात शंका घेण्यास पुरेपुर जागा आहे असे वाटते शिवाय अशा गोष्टींमध्ये सभागृह अध्यक्षांचा निर्णय अंतिम असला तरी जनतेत चुकीचा संदेश जाऊ शकतो.
नक्कीच. शिवसेना आणि काँग्रेस सदस्यांनी मतविभाजनाची मागणी केल्यानंतर ती मान्य करायला हवीच होती.विधानसभा अध्यक्ष या पदाच्या प्रतिष्ठेला साजेसे वर्तन हरिभाऊंचे नक्कीच नाही.या कारणासाठी तरी विरोधी पक्षांनी विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणायला हवा.तो पास होणार नाही ती गोष्ट वेगळी पण निदान हे वर्तन अयोग्य आहे हे दाखवायला तरी असा प्रस्ताव आणायला पाहिजे असे वाटते.

In reply to by क्लिंटन

धन्यवाद. मात्र अजून एक प्रश्न. आवाजी मतदान घेण्याची कारणे काय असू शकतात ? शिवाय आपल्या म्हणण्याप्रमाणे "वाजपेयींचे सरकार एका मताने पडले त्यावेळी पहिल्यांदा आवाजी मतदान झाले." म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून जवळपास ५० वर्षांत अशा पद्धतीचे मतदान नगण्य वेळाच झाले आहे काय ? शिवाय अशा अविश्वसनीय पद्धती एवढ्या दीर्घकाळ कशी चालू शकते ?

In reply to by धर्मराजमुटके

क्लिंटन 12/11/2014 - 22:04
आवाजी मतदान घेण्याची कारणे काय असू शकतात ?
आपल्याकडच्या बऱ्याच गोष्टी ब्रिटिश संसदेतील प्रथा आणि प्रॅक्टिसेसवरून घेतलेल्या आहेत.आवाजी मतदान ही गोष्टही आपल्याकडे हाऊस ऑफ कॉमन्सकडून आली आहे.मला वाटते की या पध्दतीत फारसे काही चुकीचे नाही.कारण सभागृहांमध्ये मतदान अनेकवेळा घ्यावे लागते.आणि बहुतांश वेळी सरकारमधील पक्षाचा विजय होणार हे स्पष्टच असते.अशावेळी मतदान घेऊन सभागृहाचा वेळ घालविण्यापेक्षा आवाजी मतदान घेऊन नियमाप्रमाणे प्रस्ताव सभागृहात मंजूर करून घेणे कधीही चांगले.त्यातूनही कोणाही सदस्याला जर मतविभाजन हवे असेल तर ते घेता येतेच.त्यामुळे या पध्दतीत अविश्वसनीय असे काही नाही.
"वाजपेयींचे सरकार एका मताने पडले त्यावेळी पहिल्यांदा आवाजी मतदान झाले." म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून जवळपास ५० वर्षांत अशा पद्धतीचे मतदान नगण्य वेळाच झाले आहे काय ?
नाही.यातील ’पहिल्यांदा’ चा अर्थ ’सुरवातीला’ असा आहे. वरील वाक्याचा अर्थ १९९९ मध्ये सर्वप्रथम आवाजी मतदान झाले असा निघत असल्यास ते वाक्य अर्थ अधिक स्पष्ट होईल अशा पध्दतीने लिहायला हवे होते.सभागृहात कोणत्याही प्रस्तावावर मतदान होते त्यावेळी पहिल्यांदा आवाजी मतदानच होते.सरकारकडे चांगल्यापैकी बहुमत असेल तर बहुतांश वेळा विरोधी पक्ष मतविभाजनाची मागणी करत नाहीत. जसे इतर सर्व प्रस्तावांविषयी होते तसेच १९९९ मध्ये वाजपेयी सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरही झाले-म्हणजे सुरवातीला आवाजी मतदान झाले. विरोधकांनी मतविभाजनाची मागणी केल्यानंतर मतदान झाले.

In reply to by क्लिंटन

चौकटराजा 14/11/2014 - 16:52
मी म्हणतो कोणत्याही निकषाने आवाजा ची पद्धत गर्हणीय आहे. एकूण मतदार किती ? ५४५. संसदेतले प्रत्येक मतदान मग विषय महत्वाचा असो की नसो एक आदेश असतो एक संदेश असतो जनतेसाठी. न्यायालय , इलेक्शन कमिशन याना त्यातून सतत संसद हीच साव्रभौम असल्याची समज दिली जात असते. आज काल इलेक्ट्रोनिक पद्धतीने मतदान करताना या मतदानाचा वेग असतो सेकंदास १ लक्ष ८६ हजार मैल. अशा वेळी संसदेचा वेळ " वाया" जातो हे म्हणणे साफ चूक आहे. ब्रिटीशांची परंपरा त्यावेळी घाईत स्वीकारली असणे शक्य आहे पण साठ वर्षात यावर एकाही विद्वानाने हरकत घेउ नये याचा भारा विस्मय व क्रोध वाटतो.

In reply to by चौकटराजा

क्लिंटन 14/11/2014 - 19:35
पण साठ वर्षात यावर एकाही विद्वानाने हरकत घेउ नये याचा भारा विस्मय व क्रोध वाटतो.
हे समजले नाही. आवाजी मतदानात आक्षेप घेण्यासारखे काय आहे?राज्यघटनेत केवळ इतके म्हटले आहे की काही गोष्टींना (विधेयके, अर्थसंकल्प इत्यादी) सभागृहाची मान्यता लागते. ही मान्यता कशी घ्यावी हे राज्यघटनेत लिहिलेले नाही आणि सगळ्या गोष्टी राज्यघटनेत असायची गरजही नाही. एक तत्व राज्यघटनेत लिहिणे आणि त्याची अंमलबजावणी नक्की कशी करावी हे नियमांवर/प्रथांवर सोडणे यात चूक काय आहे? आवाजी मतदान हा सभागृहात मतदान घ्यायचा एक मार्ग झाला.त्यातूनही कोणा सदस्याने मतदानाची मागणी केली तर प्रत्यक्ष मतदान घ्यायची तरतूद आहेच की. परवा हरिभाऊ बागडेंनी नक्की काय केले याविषयी उलटसुलट बातम्या येत आहेत.त्यामुळे त्यांनी खरोखरच आवाजी मतदानानंतर काही सदस्यांनी केलेली मतदानाची मागणी नाकारली का हे अजूनही तितकेसे स्पष्ट नाही.पण हरिभाऊंनी अशी मागणी नाकारली असेल तर मात्र ते सर्वथैव अयोग्य आहे.पण म्हणून आवाजी मतदान ही मूळ कल्पनात रद्दबादल करता येणार नाही.

In reply to by क्लिंटन

हाडक्या 14/11/2014 - 20:41
हे समजले नाही. आवाजी मतदानात आक्षेप घेण्यासारखे काय आहे?राज्यघटनेत केवळ इतके म्हटले आहे की काही गोष्टींना (विधेयके, अर्थसंकल्प इत्यादी) सभागृहाची मान्यता लागते. ही मान्यता कशी घ्यावी हे राज्यघटनेत लिहिलेले नाही आणि सगळ्या गोष्टी राज्यघटनेत असायची गरजही नाही. एक तत्व राज्यघटनेत लिहिणे आणि त्याची अंमलबजावणी नक्की कशी करावी हे नियमांवर/प्रथांवर सोडणे यात चूक काय आहे? आवाजी मतदान हा सभागृहात मतदान घ्यायचा एक मार्ग झाला.त्यातूनही कोणा सदस्याने मतदानाची मागणी केली तर प्रत्यक्ष मतदान घ्यायची तरतूद आहेच की.
अहो पण चौ.रा. यांचेपण बरोबरच आहे की. जर आज काल जलद काम करण्यासाठीची साधने उपलब्ध असतील तर उगीच परंपरा वगैरे कारणे देऊन 'मोघम' असे अंदाजपंचे काम करणारी पद्धत फक्त आजवर चालू होती म्हणून चालू ठेवण्यात कोणता शहाणपणा आहे ? प्रतेक सदस्याच्या टेबलावर 'हो'/'नाही' ची बटणे बसवली तर ५ सेकंदात हे काम बिनबोभाट होईल की. (अर्थात हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे आणि झालेल्या प्रसंगात इथे तितकासा लागु नाही हे पण मान्य. तरीही तुम्ही आवाजी मतदानाच्या आक्षेपाबाबत इतक्या निरागसपणे विचारलेत म्हणून मांडतोय इतकेच.)

In reply to by हाडक्या

क्लिंटन 14/11/2014 - 22:08
तरीही तुम्ही आवाजी मतदानाच्या आक्षेपाबाबत इतक्या निरागसपणे विचारलेत म्हणून मांडतोय इतकेच.
निरागसपणा कसला त्यात? गरजेप्रमाणे किती प्रिसिजनपर्यंत उत्तर हवे आहे हे शोधले तर त्यात चूक काय? समजा २,१९८,३०९,२३१ भागिले ३,२८९,४२७,८७१ हे उत्तर हवे असेल तर ते दोन तृतीयांशच्या आसपास आहे म्हणजे ०.६६ हे लगेचच कळू शकेल.पण प्रत्यक्ष भागाकार करून उत्तर ०.६६८२९५३ आहे हे समजायला बराच वेळ जाईल. ज्या परिस्थितीत ०.६६ हे उत्तर पुरेसे असेल तिथे ०.६६८२९५३ हे उत्तर काढायची गरज नाही. त्याचप्रमाणे एखाद्या प्रस्तावास सभागृहात जास्त सदस्यांचा पाठिंबा आहे की विरोध जास्त सदस्यांचा आहे हे बघायचे असेल म्हणजे २८८ पैकी १४४ पेक्षा जास्त की कमी एवढेच तपासायचे असेल आणि एखादी पध्दत ते उत्तर देऊ शकत असेल तर त्यात चुकीचे काय? समजा कोणाला नक्की किती सदस्यांचा पाठिंबा आहे-- १५२ की १५३ की १५४ हे तपासायचे असेल तर पूर्ण मतदान आहेच की. त्यातूनही आवाजी मतदानावर आक्षेप असतील तर पूर्ण मतदान घेता येतेच. आवाजी मतदान न घेता पूर्ण मतदान घेऊ नयेच असे मी म्हणत नाही. पण आवाजी मतदान म्हणजे एखादा फ्रॉड असल्याप्रमाणे गेल्या दोन दिवसांपासून चित्र उभे केले जात आहे ते चुकीचे आहे इतकेच. हा मुद्दा मी न वेळा मांडला आहे.परत त्याची पुनरावृत्ती नको.

In reply to by क्लिंटन

हाडक्या 14/11/2014 - 23:22
समजा २,१९८,३०९,२३१ भागिले ३,२८९,४२७,८७१ हे उत्तर हवे असेल तर ते दोन तृतीयांशच्या आसपास आहे म्हणजे ०.६६ हे लगेचच कळू शकेल.पण प्रत्यक्ष भागाकार करून उत्तर ०.६६८२९५३ आहे हे समजायला बराच वेळ जाईल. ज्या परिस्थितीत ०.६६ हे उत्तर पुरेसे असेल तिथे ०.६६८२९५३ हे उत्तर काढायची गरज नाही.
क्लिंटन भौ, with all due respect, उदाहरण गंडले आहे असे नमूद करतो पण तो इथे मुद्दा नाही म्हणून मी आधी खालच्या प्रतिसादाबद्दल बोलतो.
चप्रमाणे एखाद्या प्रस्तावास सभागृहात जास्त सदस्यांचा पाठिंबा आहे की विरोध जास्त सदस्यांचा आहे हे बघायचे असेल म्हणजे २८८ पैकी १४४ पेक्षा जास्त की कमी एवढेच तपासायचे असेल आणि एखादी पध्दत ते उत्तर देऊ शकत असेल तर त्यात चुकीचे काय? समजा कोणाला नक्की किती सदस्यांचा पाठिंबा आहे-- १५२ की १५३ की १५४ हे तपासायचे असेल तर पूर्ण मतदान आहेच की.
आपला आवाजी मतदानाच्या उपयुक्ततेचा मुद्दा पतलाय, ते फ्रॉड नाही हे पण या चर्चेच्या आधीच मान्य आहे. पण आता हे बघा, आपल्याकडचे बहुतांश भ्रष्टाचार कसे होतात ? तर नियमात बसवून.. म्हणजे वाढवलेल्या निविदा या नियमात बसतात म्हणून त्या बरोबर होतात का ? तर नाही. इथे सरकार बहुमतात आहे की नाही यासाठी १४४ हवे आहेत. 'मोघम' १४४ नव्हे तर बंदे १४४. १४३ देखील चालणार नाहीत (म्हणून आधी सरकारे पडली आहेत). अशा वेळेस तुम्हीच तुमच्या पक्षाचा व्यक्ती न्यायाधीश म्हणून बसवणर आणि 'आवाज कुणाचा?' म्हणून बहुमत ठरवणार ही पद्धत जरी तांत्रिकदृष्ट्या बरोबर ठरत असली तरी ती बरोबर नाही हे तुम्हाला देखील मान्य असेल. म्हणून तो अर्थाअर्थी फसवणूक ठरते एवढेच. 'आवाजी मतदान' जरी फसवणूक नसली तरी तुम्ही बहुतेक संसदीय संकेत हे जसे राबवणार्‍याकडून सारासार विवेक आणि विचाराची अपेक्षा करतात त्याप्रमाणे विवेकानेच वापरायची सोय आहे. काँग्रेस असो वा कोणी इतर, कोणी आधी पण गैर फायदा घेतला असेल तर गैरच आणि त्यानी घेतलाय म्हणून आम्ही पण घेणार असे म्हणून कोणी घेणार असेल तरी ते गैरच (वरून मग तुम्ही काय वेगळे हा प्रश्न उरतोच).. या व्यतिरिक्त, (ज्यामुळे हा प्रतिसाद सुरु झाला) जो मुद्दा चौ.रा. नी मांडला आहे की 'सोयीची साधने असताना ही आवाजी मतदानासारखी 'मोघम पद्धत' उगीच (सगळ्यांचीच) स्वार्थी सोय म्हणून चालू ठेवायची हे ठीक नाही' तो बरोबरच आहे. तुमचे त्या 'मोघम'पणाच्या समर्थनार्थ उत्तर पटण्याजोगे नाही. इथे थोडक्यात, तुमच्या मित्रांच्या बर्‍यापैकी मोठ्या ग्रुपमध्ये तुम्हाला किती लोक 'मिसळ' आणि किती लोक 'वडा-पाव' असे ठरवायचे असेल आणि बहुमताने एकच पदार्थ सगळ्याना मागवावा लागणार असेल तर तुम्ही आवाजी मतदान करून शेवटी तुम्हीच निर्णय देण्यासारखे आहे. सोपा मार्ग हा किती लोकांनबहुमताने/'वडा' हवा हे विचारायचा असताना तुम्ही (तुम्हाला 'मिसळ' हवी म्हणून कदाचित ;) ) तुमची सोय पाहीली तर ते तांत्रिकदृष्ट्या बरोबर ठरवालही पण ते तसे नाही हे तुम्हाला मनोमन मान्य असेलच आणि तुम्ही तुमची सोय नाही पाहीली तरी ते (तुमचा निवाडा प्रामाणिक आहे ते) इतरांना मान्य होईलच असेही नाही हे ही तुम्हाला मनोमन मान्य असेलच. असो, थोडक्यात, १. 'आवाजी मतदान हे फ्रॉड नाही पण वापर करताना तारतम्य आणि विवेक अपेक्षित. २. 'आवाजी मतदानासारखे प्रकार नवीन पद्धती, तंत्रज्ञान वापरून सुधारायला काहीच हरकत नसावी. जर आपण प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता अपेक्षित धरतो तर संसदीय कामात का नको ? उगीच नको तिथे परंपरांचे अवडंबर नको.

In reply to by हाडक्या

श्रीगुरुजी 14/11/2014 - 23:46
>>> इथे सरकार बहुमतात आहे की नाही यासाठी १४४ हवे आहेत. 'मोघम' १४४ नव्हे तर बंदे १४४. १४३ देखील चालणार नाहीत (म्हणून आधी सरकारे पडली आहेत). क्लिंटनसाहेबांबद्दल आदर बाळगूनसुद्धा असे म्हणावेसे वाटते की इथे क्लिंटन व हाडक्या या दोघांचाही गोंधळ झालेला आहे. महाराष्ट्र विधानसभेत (किंवा इतर कोणत्याही विधानसभेत/विधानपरीषदेत/लोकसभेत/राज्यसभेत/नगरपालिकेत इ. सभागृहात) बहुमतासाठी सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येपैकी निम्म्याहून अधिक मतांची गरज नसून एकूण जितके मतदान झाले आहे त्यापैकी निम्म्याहून अधिक मतांची गरज असते. उदा. सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण २८७ सदस्य आहेत (एका सदस्याचे निधन झाले आहे). सभापती सोडून इतर २८६ जण मतदानास पात्र आहेत. समजा २८६ पैकी राष्ट्रवादीच्या ४१ सदस्यमतदान न करता तटस्थ राहिले तर एकूण मतदान २४५ इतके होते. त्यापैकी बहुमतासाठी १२३ मते पुरेशी आहेत. १४५ मतांची गरज नाही. काल भाजपकडे स्वतःची १२० (सभापती सोडून), रासपचे १, अपक्ष व इतर छोटे पक्ष मिळून १४ (काही जण हा आकडा १६ असे सांगतात) अशी एकूण १३५ मते होती. विरोधकांकडे कॉग्रेस+शिवसेना अशी एकूण १०४ मते होती. ४१ जण तटस्थ होते. आवाजी मतदानात 'होय'वाल्यांच्या १३५ जणांचा आवाज भाजपचे बहुमत सिद्ध करणारा होता. त्यामुळे भाजपचे बहुमत कायदेशीर व घटनात्मक मार्गाने सिद्ध झाले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

क्लिंटन 15/11/2014 - 10:26
महाराष्ट्र विधानसभेत (किंवा इतर कोणत्याही विधानसभेत/विधानपरीषदेत/लोकसभेत/राज्यसभेत/नगरपालिकेत इ. सभागृहात) बहुमतासाठी सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येपैकी निम्म्याहून अधिक मतांची गरज नसून एकूण जितके मतदान झाले आहे त्यापैकी निम्म्याहून अधिक मतांची गरज असते.
हो बरोबर. १९९३ मध्ये नरसिंह राव सरकारविरूध्दचा अविश्वास ठराव (झारखंड मुक्ती मोर्चा लाच प्रकरणामुळे बदनाम झालेला) फेटाळला गेला त्यावेळी सरकारच्या बाजूने २६५ आणि विरोधात २५१ मते दिली गेली होती. २७३ मते न मिळाल्यामुळे सरकार पडले नव्हते.कोणत्याही सभागृहात मतदान करणार्‍या सदस्यांपैकी अर्ध्याहून जास्त असा नियम आहे हे मलाही माहित आहे :) तरीही या प्रतिसादात १४४+ असे लिहिले याचे एक कारण आहे. आवाजी मतदान कित्येक वर्षांपासून चालत आले आहे तरीही फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावानंतर आवाजी मतदान हा प्रकारच फ्रॉड आहे अशाप्रकारचे अत्यंत चुकीचे चित्र उभे केले जात आहे.ते चित्र चुकीचे आहे हे दाखवून देण्यावर माझा भर होता.आणि तीच गोष्ट अनेकवेळा लिहून खरे सांगायचे तर मला कंटाळाही आला होता. तेव्हा भर आवाजी मतदानावर होता सभागृहात नक्की बहुमत म्हणजे काय या तांत्रिकतेवर नव्हता.

In reply to by क्लिंटन

हाडक्या 15/11/2014 - 22:25
बहुमताचं नियमांच कळते हो राव. १४४ फक्त उदाहरणार्थ असा मुद्दा पटवण्यासाठीचा आकडा होता. बाकी selective reading करून इतर मजकूराकडे आणि म्हणण्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करण्याची पद्धत आवडली बरं का.. परत सांगतो पद्धत फ्रॉड आहे असे कुठेही म्हणालेलो नाही. वरून तुम्हाला तेच परत परत सांगायला लागतय असा तुमचा कांगावा पटला नाही. असो, तुम्हा दोघांबद्दल आदर आहेच परंतु असे सोईचे फक्त वाचून पुढे जाणे योग्य नाही एवढेच. बाकी तुमची मर्जी.

In reply to by हाडक्या

चौकटराजा 15/11/2014 - 05:16
राज्यघटनेत लोकशाहीतील अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे मतदान यावर काही नसणे हे गंभीर आहे. मतदान हा लोकशाहीचा श्वास असतो. लोकशाहीत लोकप्रतिनिधींचे पर्यायाने लोकांचे मत हा तर मोठा महत्वाचा भाग आहे जो हुकूमशाही पासून तिला वेगळी करतो. यावर आपले वा भारतातील राजकीय क्षेत्राच्या अभ्यासकांचे वेगळे असे मत आहे का? बरे त्यावेळी असे स्पष्ट काही चा समावेश करता आला नाही तरी त्यानंतर इतक्या घटना दुरूस्त्या झाल्या त्यात या विषयाला प्राधान्य मिळू नये याचे फार दु:ख होते. आपल्या लोकशाहीतील सर्वात मोठा भोंगळपणा जर कोठे असेल तर तो मतदानातच आहे. वेगवेगळ्या स्तराला मतदानाचे वेगवेगळे अर्थ व उपचार आहेत.पळवाटा जणू हेतूपूर्वक ठेवाव्या असे ! साध्या ग्रामपंचायती पासून सहकारी संस्थेच्या निवडणुकीपासून ते संसदेपर्यंत सर्व प्रकारच्या निवडणुका या गुप्त मतदानानेच व्हावयास हव्यात मग विषय लहान असो की मोठा ! आपल्या लोकशाहीत मतदान पक्ष करतो की व्यक्ती याचाही स्पष्ट खुलासा घटनेत असणे आबश्यक आहे. दोन चार ओळी घटनेत टाकणे म्हणजे हिमालय त्याच्या जागेवरून हलविणे आहे काय ?

In reply to by क्लिंटन

श्रीगुरुजी 12/11/2014 - 21:16
गुप्त मतदान काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेला अजिबात नको होते. भाजपने पूर्ण फिल्डिंग लावली होती. गुप्त मतदानात या तीनही पक्षांच्या काही आमदारांनी भाजपच्या बाजूने मतदान केले असते व त्यांची पूर्ण नाचक्की होऊन पक्षात फूट पडली असती. हे टाळण्यासाठी प्रथम काँग्रेस व सेनेने आपला अध्यक्षपदाचा उमेदवार मागे घेतला व नंतर विश्वासदर्शक ठरावावर आवाजी मतदान होऊन तो मंजूर झाल्यावर व नंतर विरोधी पक्षनेता निवडल्यानंतर मतविभाजनाची मागणी करायला सुरूवात केली. विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर लगेचच मतविभाजनाची मागणी करता येते. परंतु त्यानंतर विरोधी पक्षनेता निवडण्याचा विषय पार पडल्यानंतर त्यापूर्वीच मंजूर झालेल्या ठरावावर मतविभाजनाची मागणी नियमानुसार मान्य करता येत नाही. त्यामुळे नूतन अध्यक्षांनी ती मागणी फेटाळण्याचा योग्य तोच निर्णय घेतला.

In reply to by श्रीगुरुजी

क्लिंटन 12/11/2014 - 21:46
विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर लगेचच मतविभाजनाची मागणी करता येते. परंतु त्यानंतर विरोधी पक्षनेता निवडण्याचा विषय पार पडल्यानंतर त्यापूर्वीच मंजूर झालेल्या ठरावावर मतविभाजनाची मागणी नियमानुसार मान्य करता येत नाही. त्यामुळे नूतन अध्यक्षांनी ती मागणी फेटाळण्याचा योग्य तोच निर्णय घेतला.
हो. अशाच स्वरूपाची चर्चा न्यूज चॅनेलवर चालू आहे. यावेळी हरिभाऊ बागडेंनी योग्य निर्णय घेतला असे मान्य केले तरी लवकरच राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर मतदान होईल त्यावेळी नक्की काय ती परिस्थिती कळून येईल. त्यावेळी मात्र मतविभाजन व्हावे ही अपेक्षा.

In reply to by क्लिंटन

प्रसाद१९७१ 13/11/2014 - 17:56
विरोधी पक्षांनी विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणायला हवा.तो पास होणार नाही ती गोष्ट वेगळी
विधानसभा अध्यक्षांवरचा अविश्वास ठराव म्हणजे सरकारवरचा अविश्वास ठराव असल्या सारखे असते. तो जर पास होणार नाही हे माहीतिय तर सरकारचा विश्वासदर्शक ठराव नक्कीच पास होणार.

In reply to by प्रसाद१९७१

क्लिंटन 13/11/2014 - 18:05
विधानसभा अध्यक्षांवरचा अविश्वास ठराव म्हणजे सरकारवरचा अविश्वास ठराव असल्या सारखे असते.
तांत्रिकदृष्ट्या हो कारण विधानसभा अध्यक्ष हे बहुतांश वेळा बहुमतवाल्या पक्षाचेच असतात.त्यामुळे अध्यक्षांवर अविश्वास ठराव पास झाला तर त्याचा अर्थ सरकारने बहुमत गमावले असा होईल. तरीही अध्यक्षांवर अविश्वास ठराव पास झाला म्हणून सरकार लगेच पडत नाही.
तो जर पास होणार नाही हे माहीतिय तर सरकारचा विश्वासदर्शक ठराव नक्कीच पास होणार.
हो बरोबर. तरीही अध्यक्षांवर अविश्वास ठराव मांडावा याचे कारण जास्त प्रतिकात्मक आहे.त्यांचा निर्णय योग्य की अयोग्य याविषयी वेगवेगळ्या बातम्या येत आहेत त्यामुळे नक्की काय ते समजत नाही.जर त्यांचा निर्णय अयोग्य असला तर त्याला विधानसभेत विरोध होणार आहे आणि आपल्याला पाहिजे तसे अध्यक्ष वागू शकत नाहीत हे दाखवून द्यायला तरी विरोधी पक्षांनी त्यांच्याविरूध्द अविश्वास ठराव आणायला हवा असे मला वाटते. बहुतेकवेळा हे अविश्वास ठराव प्रतिकात्मकच असतात. इंदिरा गांधींच्या सरकारविरूध्द तब्बल १५ वेळा अविश्वास ठराव आले होते.ते पास व्हायची सुतराम शक्यता नाही हे विरोधी पक्षांना माहित नव्हते किंवा कळत नव्हते असे नाही.तरीही आपला विरोध दाखवायचा एक मार्ग म्हणून ते अविश्वास ठराव आणत होते.तसेच नागपूरला नोव्हेंबर १९९४ मध्ये गोवारी समाजाच्या मोर्चावर लाठीमार आणि त्यात १२३ जणांचा मृत्यू झाल्यानंतरही भाजपने शरद पवारांच्या सरकारविरूध्द अविश्वास ठराव आणला होता--तो पास होणार नाही हे माहित असूनही.

In reply to by क्लिंटन

ऋषिकेश 14/11/2014 - 16:14
+१ याला पुरवणी: अजून एक कारण असते अशा प्रस्तावांचे ते म्हणजे ठराविक संख्येच्या सदस्यांनी मिळून हे प्रस्ताव साद झाल्यावर सरकार वा सभापती यांची इच्छा असो नसो यावर चर्चा करणे व मतदान घेणे सभापतींना बंधनकारक असते. इतर अनेक नियमांतर्गत चर्चा व मतदान सरकारच्या किंवा किमान सभापतींच्या मर्जीवर असते.

In reply to by क्लिंटन

शिद 12/11/2014 - 19:23
यापैकी ज्या बाजूचा आवाज अधिक मोठा असेल त्याप्रमाणे अध्यक्ष तो प्रस्ताव मंजूर्/नामंजूर झाला असे जाहीर करतात.
च्यायला, अजबच आहे हा प्रकार. धन्यवाद क्लिंटन. नविन माहीती मिळाली.

आवा.............ज कुणाचा? असे म्हंटले की पूर्वी एकच उत्तर यायचे. दुसरे उत्तर दिले की कानाखाली आवाज.ह्यावेळी मात्र दुसरा आवाज आल्याने ते सैर्भैर झाले असे ह्यांचे मत.

hitesh 12/11/2014 - 19:29
हायला मग आम्ही मतदान का करायचं ? आम्हालाही हीच पद्धत का नाही ?

In reply to by hitesh

ते वेगवेगळ्या टी.व्ही. चॅनेल्सच्या माध्यमातून्चालूच असते.उ.दा. तुमचा तो अर्नब गोस्वामी,निखिल वागळे...

hitesh 12/11/2014 - 19:42
दैवजात दु:खे कमळा दोष ना कुणाचा पवाराधीन आहे जगती पुत्र मावळ्याचा

माहितगार 12/11/2014 - 19:54
राजकारणात अनपेक्षीताशी सोबत करावी लागू शकते ही बाब राजकीय निरीक्षकांना नवी नसते. परंतु एखाद्या विशीष्टच गोष्टीवर/तत्वावर विश्वास ठेवणार्‍या दोन्ही बाजूच्या हाडाच्या कार्यकर्त्यास सहसा अशा राजकीय कोलांट उड्या भावनिक दृष्ट्या सहज झेपणार्‍या नसतात. अल्पमतातील सरकारला मुदतपूर्व निवडणूक घ्यावीच लागलीतर हाडाचा कार्यकर्ता आणि मतदार दुखावलेला राहणे परवडत नाही. आपला असंगाशी संग होणारच आहे पण जनता विसरेपर्यंत तो तसा दिसू नये याची तजवीज करणे कदाचित जरूरी वाटले असावे. जनतेचे लक्ष विश्वासदर्शक ठरावात नेमके कोण कोणाला पाठींबा देते हे पाहण्याकडे लागले होते आणि राज्यकर्त्यांना बहुमताची शास्वती असूनही, मतदानोत्तर नको असलेली चर्चा आणि हाडाच्या समर्थकांचे नाराज होणे नको असावे. हाडाचे समर्थक नाराज झाले की अंतर्गत विरोधही अधीक उफाळून येण्याची भिती. आवाजी मतदानात नेमके कुणाचे समर्थन आले तर सर्वच पक्षातून आले असेल अशी नंतरच्या सारवासारवीची तजवीज असावी. गेले दोन दिवस आमचे हितचिंतक सर्वच पक्षात आहेत अशी भूमीकेची पेरणी नवराज्यकर्त्यांकडून कदाचित त्यामुळेच चालू असावी. म्हणून आवाजी मतदानातील मेख बहुधा पुर्वनियोजीतच असावी. सत्तेसाठी तडजोडी भाजपाच्या इतिहासात नवी नाहीत पण उत्तर, दक्षीणेत सोबतच विदर्भात आपण शिवसेनेशी तडजोड करत नाही हे दाखवण्याची व्यवस्थाही झाली दुसरीकडे शिवसेनेलाच मुख्य विरोधीपक्ष केले म्हणजे काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न तेवढेच लौकर पुर्ण होते. एकुण राजकारणाचे आराखडे इतपत पुर्वनियोजीत होते की सत्तेच्या तडजोडीत शिवसेना जरी झुकली असती तरीही भाजपाच्या आतल्या गोटाला ते नको असावे. एकुण काँग्रेसला नव्या भाजपाचा राष्ट्रवादी युतीच्या राजकारणाचा अनुभव म्हणजे कानामागून आले आणि तीखट झाले असा आला असेल तर नवल नाही. राष्ट्रवादीला सकाळने घेतलेल्या सर्वेमुळे राजकारणाचे फासे कसे पडणार याचा अंदाचा कदाचित निवडणूकपुर्व काळातच आला असल्याने असेल किंवा काँग्रेसमुक्त भारताच्या ध्येयात आधी पासूनच सामील असतील नाहीतर निकाल हाती आल्या आल्या पाठींब्याची गणिते एवढ्या चटकन जाहीर झाली नसती. शेवटी जनतेचा कौल मिळतच नाही मग कालहरणच करायचे तर फासे आपल्या बाजूस ठेऊन करा हा हिशेब एकुण नवल नाही असे म्हणावयास हवे. शिवसेनाही पडद्यामागच्या खेळात सामील असेल का ? कमी अधिक प्रमाणात नाकारता येत नसले तरी राजकीय निर्णय प्रक्रीयेतील एकुण प्रगल्भतेचा अभाव पाहता तसे असण्यापेक्षा राजकीय फरफट झाली असण्याची शक्यताच अशीक वाटते.

भाते 12/11/2014 - 20:19
गडकरी मुमं व्हावेत या गटाचे ४० भाजपा आमदार (फडणवीस मुमं झाल्याने त्यांच्या) विरोधात मतदान करणार होते आणि हे टाळण्यासाठी आवाजी मतदानाचा पर्याय स्विकारला असे विरोधकांचे म्हणणे आहे. (प्रत्यक्ष मतदानात त्यांची नावे अर्थातच ऊघड झाली असती). पुर्ण बहुमताची खात्री होती तर भाजपाने प्रत्यक्ष मतदानाचा पर्याय का नाकारला? पुढल्या सहा महिने/वर्षभरात मध्यवर्ती निवडणुका होणार आहेत याची सर्वच पक्षांना कल्पना आहे. त्यामुळेच आत्ता हे सगळे आपल्या भविष्याचा विचार करत आहेत. खांग्रेस आणि भ्रष्टवादी खांग्रेस गेली १५ वर्षे सत्तेत होते. भ्रष्टवादी खांग्रेसने भाजपाला आतुन/बाहेरून (प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष) पाठिंबा का दिला याचे कारण जगजाहीर आहे. ते ऊद्या 'को णा ला ही' पाठिंबा देतील! मध्यवर्ती निवडणुकांमध्ये 'भाजपा, आम्ही भ्रष्टवादी खांग्रेसचा पाठिंबा घेतला नाही' आणि शिवसेना, भाजपाने भ्रष्टवादी खांग्रेसचा पाठिंबा घेतला' हा मुद्दा बनवणार.

In reply to by भाते

श्रीगुरुजी 12/11/2014 - 21:15
गुप्त मतदान काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेला अजिबात नको होते. भाजपने पूर्ण फिल्डिंग लावली होती. गुप्त मतदानात या तीनही पक्षांच्या काही आमदारांनी भाजपच्या बाजूने मतदान केले असते व त्यांची पूर्ण नाचक्की होऊन पक्षात फूट पडली असती. हे टाळण्यासाठी प्रथम काँग्रेस व सेनेने आपला अध्यक्षपदाचा उमेदवार मागे घेतला व नंतर विश्वासदर्शक ठरावावर आवाजी मतदान होऊन तो मंजूर झाल्यावर व नंतर विरोधी पक्षनेता निवडल्यानंतर मतविभाजनाची मागणी करायला सुरूवात केली. विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर लगेचच मतविभाजनाची मागणी करता येते. परंतु त्यानंतर विरोधी पक्षनेता निवडण्याचा विषय पार पडल्यानंतर त्यापूर्वीच मंजूर झालेल्या ठरावावर मतविभाजनाची मागणी नियमानुसार मान्य करता येत नाही. त्यामुळे नूतन अध्यक्षांनी ती मागणी फेटाळण्याचा योग्य तोच निर्णय घेतला.

In reply to by श्रीगुरुजी

गुप्त मतदान काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेला अजिबात नको होते. भाजपने पूर्ण फिल्डिंग लावली होती. गुप्त मतदानात या तीनही पक्षांच्या काही आमदारांनी भाजपच्या बाजूने मतदान केले असते व त्यांची पूर्ण नाचक्की होऊन पक्षात फूट पडली असती.
मग अशावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने गप्प बसणे पसंत केले असते. मतविभाजनाची मागणी केली नसती. तसेच भाजपाने त्या मागणीस होकार देऊन सर्वच पक्षांना उघडे पाडायची संधी घेतली असती. भाजपाला सर्व पक्षांची अब्रू झाकण्यात रस होता असे तुम्हाला म्हणायचे आहे काय ?

In reply to by धर्मराजमुटके

क्लिंटन 12/11/2014 - 22:08
भाजपाला सर्व पक्षांची अब्रू झाकण्यात रस होता असे तुम्हाला म्हणायचे आहे काय ?
इतर आमदार फुटले आहेत हे स्पष्ट झाले असते तर ते आमदार भाजपनेच फोडले आहेत हा आरोप झाला असता. बहुदा त्या कारणामुळे भाजपलाही झाकली मूठ ठेवायची असेल.

क्लिंटन 12/11/2014 - 22:34
काही आमदारांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत जय विदर्भ म्हणून घोषणा दिल्या त्या योग्य वाटतात काय ?
मला स्वतःला तरी अशा घोषणा दिल्या असतील तर आणि सभागृहाच्या शिस्तीचा भंग होत नसेल तर त्यात काही चुकीचे वाटत नाही.काही आमदारांचे स्वतंत्र विदर्भ व्हावा असे मत असेल तर त्यात त्यांचे काय चुकले? जय विदर्भ असे म्ह्टले तर आपल्याच देशातल्या एका भागाचा जयजयकार केला जात आहे की शत्रूराष्ट्राचा उदोउदो केला जात आहे? आणि विदर्भ वेगळे राज्य केले जाणार असेल तर भारत-पाकिस्तानसारखी फाळणी का होणार आहे? मग जय विदर्भ म्हटले तर त्यांचे फार काही चुकले असे मला तरी वाटत नाही.

भाजपाने माज दाखवला निर्लज्जांनी पटलावर आधीचा मुद्दा बदलुन मुद्दामुन दुसरा मुद्दा वर उचलला आनि शिवसेना बाहेर गेल्याचे निमित्तसाधुन अचानक त्यावर आवाजी मतदान घ्यायला सुरुवात केली अश्या वेळी इतका गोंधळ चालु झाला की काय चालु आहे हे कुणालाच कळले नाही याच प्रकारचे वाक्य काल आव्हाड यांनी मिडीयाला सांगितले म्हणजे भाजपाने मुद्दामुन गोंधळ घालुन योग्य संधी घेउन लगेच आवाजी मतदान घेतले कारण त्यांना माहीत आहे की प्रत्यक्ष मतदान घेतल्यावर त्यांच्याकडेच नितिन गडकरी समर्थक आमदार सरकारविरुद्ध मतदान करुन सरकार पाडणार होते. म्हणुन घाबरुन गेलेले फडणवीस आपली खुर्ची वाचबण्याकरीता असले निंदनिय कृत्य केले

In reply to by बॅटमॅन

ते काय आहे वर गुरुजीने एक पोस्ट २ वेळा टाकली ते दिसत नाही का. ? म्हणुन मुद्दामुनच ३ वेळा टाकली ते बरे डोळ्यात खुपले :) दुसर्याची रेकॉर्ड अडकली ते ग्वाड वाटते बॅटमॅनाला

In reply to by दिवाकर देशमुख

हाडक्या 13/11/2014 - 15:52
मला दि.दे. ची प्रतिक्रिया पाहून नानाचा भास झाला .. तसा आजकाल तो बर्‍याच नव्या आयडींमध्ये होतो म्हणा, तरीपण.. (कुठे नेवून ठेवलाय नाना आमचा ..!) ;)

प्रसाद१९७१ 13/11/2014 - 17:58
जर मतदान झाले असते तर शिवसेनेची आब्रू गेली असती. भाजप्+राकाँ च्या आकड्यापेक्षा बरीच मते जास्त मिळाली असती. शिवसेनेची बरीच मते फुटणार होती. लाज वाचवण्यासाठी त्यांना गोंधळ घालुन सभागृहातुन पलायन केले. हा भाजप्+राकॉ, शिवसेना ह्यान्नी एकत्र येउन केलेला प्लॅन होता. काँग्रेस ला मात्र वेडे बनवले.

In reply to by प्रसाद१९७१

कपिलमुनी 13/11/2014 - 18:20
तुम्ही सांगितले.. खरे तर भाजपाने हे सर्व केवळ शिवसेनाची लाज वाचवण्यासाठी केले. आणि बरीच द्वाड लोकं भाजपाला नावे ठेवतात.. बादवे , फडणवीसांनी अजून काय काय कानगोष्टी सांगितल्या हो तुम्हाला ;)

दुश्यन्त 13/11/2014 - 18:14
भाजपाला सर्व पक्षांची अब्रू झाकण्यात रस होता असे तुम्हाला म्हणायचे आहे काय ?+१ काही लोकं अजब तर्कत मांडत आहेत. भाजप स्वतः विरोधी पक्षांतली (तथाकथित) फूट झाकू पाहत होता काय? आवाजी मतदान घेवून पण लोकांत एनसीपीशी संग करणारा भाजप असाच मेसेज गेला आणि होणारी निर्भत्सना भाजप टाळू शकला नाही. मग उघड मतदान घेवून इतर पक्ष फोडले जरी असते तरी इभ्रत वाचली असती. भाजपने १२३ ते १४५ अंतर कसे कापले याचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते. ज्यांच्यावर आरोप करून सत्ता आणली त्यांचेच समर्थन घेवून सरकार बनवत आहोत ही बाब भाजपला झाकायची होती मात्र त्यासाठी खटपटी करूनही जे व्हायचे ते झालेच.भाजप एनसीपी यांचे सेटिंग आत्तापासून नाही खूप जुने आहे. सिंचन, आदर्श, कोळसा घोटाळे यांत भाजपही सामील होती. देवेंद्र स्वतः स्वच्छ असतीलही (ठामपणे आता यांच्या बद्दलही बोलता येत नाही) पण बाकी बरेच भाजपेयीचे एनसीपीशी साटेलोटे आहे.आता भाजपला एनसीपीशी केलेला संग पुढे महागात पडणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही.

In reply to by दुश्यन्त

प्रसाद१९७१ 13/11/2014 - 18:48
सर्वच एकमेकांची अब्रू वाचवत होते १. भाजपला राकॉं चा पाठींबा घेतला हे उघड पणे दाखवायचे नव्हते. २. शिवसेनेला सर्व आमदार आपल्या बरोबर नाहीत हे लपवायचे होते. ३. राकाँ ला भाजपवर उपकार करायचे होते भविष्यासाठी. तसेच शिवसेना पुढच्या २-३ महीन्यात मंत्रामंडळात दिसेल. अजुन शिवसेनेनी केंद्रातले मंत्रीपद सोडले नाही. किंवा छभु नी जशी शिवसेना फोडली तशी पुन्हा फुटेल काही महीन्यात आणि मग भाजपचे बहुमताचे सरकार येइल.

दुश्यन्त 13/11/2014 - 19:28
सेनेन केंद्रातल मंत्रिपद सोडल नाही तास भाजपने तरी कुठे गीतेंना काढलय? कारण केंद्रात भाजपला लोकसभेत बहुमत आहे पण राज्यसभेत एनडीए अगदीच कमकुवत आहे. मोठी विधेयके संमत करायला दोन्ही सभागृहात बहुमत असाव लागत किंवा लोकसभा/राज्यसभा अस संयुक्त अधिवेशन घेवून ते पारित कराव लागत. इथे शिवसेनेकडे असणारे २१ खासदार (लोकसभ १८, राज्यसभा ३) भाजप गमावायला तयार नाही. शिवसेना विरोधात जाणार नाही. केंद्रात आणखी एखाद फुटकळ पद आणि राज्यात पण ४-२ मंत्रिपदे दिली कि सेना मुकाट्याने बरोबर येईल हाच भाजपचा होरा होता म्हणून ते सेनेला खिजवत होते. सेना केंद्रातले वाढीव पद नाकारेल हे त्यांना वाटले नव्हते. आता मात्र एनसीपीची साथ घेतल्याने लोकांच्या टीकेचा भडीमार झाल्यावर भाजपेयी विचार बदलू पण शकतील. आता समजा सेना सरकारमध्ये आली तरी जास्त पदे द्यावी लागतील. माझ्या मते सेनेने विरोधातच बसावे. पवारांचा पाठींबा काय किमतीचा आहे हे फडणवीस आणि लोकांना पण कळेल. पवारांनी सरकार पाडले तरी तोवर भाजप जनतेसमोर एक्स्पोज झालेली असेल.हे पवारालंबी सरकार एनसीपीच्या मर्जीवरच चालणार. सरकार कोसळून निवडणुका लागल्या तर परत मते मागायला जाताना ते एनसीपी वर टीका पण करू शकणार नाहीत.आधी भाजप सेनेला खेळवत राहिली मग सेनेने तेच केले .भाजप-एनसीपी छुपी युती उघड करणे हाच सेनेचा अजेंडा होता म्हणून त्यांनी चर्चेचे गुर्हाळ चालू ठेवून ऐनवेळी विरोधात बसणे पसंत केले.

कपिलमुनी 13/11/2014 - 19:32
केंद्रामधला सरकार हे एनडीए चा आहे . भाजपा चा एकट्याचा नाहिये .म्हणून केंद्रीय मंत्रीपद सोडण्याचा प्रश्नच येत नाही

In reply to by कपिलमुनी

सव्यसाची 15/11/2014 - 00:24
सरकार फक्त भाजपचेच आहे. राष्ट्रपतींनी जे पत्र पंतप्रधानांना दिले त्यामध्ये त्यांनी भाजपचे सरकार असाच उल्लेख केला आहे.

दुश्यन्त 13/11/2014 - 19:39
आमदार फोडणे एवढे सोपे राहिले नाही.२/३ आमदार फोडावे लागतात नाहीतर आमदारकी रद्द होवू शकते. समजा काही आमदार फुटले/ राजीनामे दिले तर निवडणुका लावून त्यांना परत निवडून आणावे लागणार. यात वेळ जातोच पण त्यासाठी किंमत पण मोजावी लागणार. आता पण जे लहान पक्ष, अपक्ष बरोबर आले आहेत त्यांच्या अपेक्षा पण पूर्ण कराव्या लागणारच नाहीतर ते कशाला बरोबर राहतील? त्यापेक्षा भाजपने आधीच सेनेला खिजवत न बसता योग्य वात दिला असता तर ६३ आमदारांच एकगठ्ठा समर्थन मिळून एक स्थिर आणि मजबूत सरकार मिळाल असत मात्र भाजपला सुटलेली हाव आणि सेनेच खच्चीकरण करायच्या नादात भाजपने राष्ट्रवादीला जवळ केले.आवाजी मतदानामुळे भाजपने एन्सिपिला विधन परिषदेत फायदा करून दिला आहे. कारण प्रत्यक्ष मतदानात एनसीपीने भाजपच्या बाजूने मत टाकले असते किंवा सभा त्याग केला असता तरी त्यांना विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद मिळाले नसते. आता एन्सिपिला वि. परिषदेत विरोधीपक्षनेते पद मिळेल. आत्ता पुरते सरकार तरले आहे पुढे एनसीपी सरकार मध्ये येवून बसली तरी आश्चर्य वाटायला नको.

In reply to by दुश्यन्त

प्रसाद१९७१ 13/11/2014 - 20:00
जे पुन्हा निवडुन येउ शकतील अश्या आमदारांना राजीनामा द्यायला लावुन भाजप तर्फे पुन्हा निवडुन आणणार आहेत.

तिमा 15/11/2014 - 10:45
आवाजी मतदान ही संकल्पना फक्त सुसंस्कृत राजकारणी नेत्यांसाठी आहे. जेंव्हा सगळे लबाड लांडगे एकत्र जमा होतात तेंव्हा ही पद्धत कशी चालेल ? यापुढे कुठल्याही चर्चेनंतर मतदान अनिवार्य केले पाहिजे.

गजानन५९ 15/11/2014 - 14:57
अखेर भाजपने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव रडत खडत का होईना जिंकला, पण प्रश्न असा आहे कि शिवसेनेला इतके अपमानित करून या मोदी सेनेने काय साध्य केले ? ज्या सेनेच्या साथीत गेली २५ वर्ष तुम्ही गळ्यात गले घालून फिरत होतात ती यांना अचानक इतकी नकोशी का वाटू लागली ? मोदीसेना कदाचित ५ वर्ष इथे टीकेलही (ते पण आपल्या तथाकथित जाणत्या राजाच्या मनात असेल तर) पण जिथे स्वतः मोदी २७ सभा घेऊनही या लोकांना भ्रष्टाचार्वादी कॉंग्रेस (हे मोदींनी दिलेले नाव आहे )चा पाठींबा घ्यावा लागतोय तिथे पुढीलवेळी लोकांनी यांच्यावर का आणि कशासाठी विश्वास ठेवावा ? सेना चुकली असेल, नव्हे मी मान्य करतो कि सेना चुकली पण या मोदी लाटेत आणि बाळासाहेब हयात नसताना उद्धव ठाकरेंनी ६३ आमदार निवडून आणले हे हि काही कमी नाही. खरे तर याच उद्धव ठाकरेंची (मी धरून) सर्वांनी खिल्ली उडवली होती (खील्ली सम्राट राज ठाकरेंनी तर पार वडे आणि सुप बीप काढले होते ते त्यांच्यावर उलटलेच आहे.) पण जितका संयम उद्धावनी गेल्या २ महिन्यात दाखवला (जो सेनेच्या विचार (खरे तर आचार) सरणीत कधीच बसत नव्हता. वयक्तिक मला सेनेने विरोधात बसावे असे निकालापासून वाटत होते कारण साहजिकच भाजपसोबत सरकारमध्ये सेना गेली असती तरीही तिला कधीच तो आधीचा सन्मान मिळाला नसता. आता विरोधात बसून या कमकुवत सरकारविरुद राळ उठवून मान ताठ ठेवून वावरणे हेच खरे शहाणपणाचे ठरेल. खरे तर मी पक्का भाजपेयी माणूस ( भाजपेयी अशासाठी कि वाजपेयींचे विचार पटायचे पण मोदि चे पटतील असे नाही रादर ७०% मोदी विचार पटत नाहीत ) पण या तावडे, फडणीस, राजीव(प्रताप) रुडी, माधव भंडारी आणि खडसे मामांनी इतका माज करून ठेवला म्हणून वैतागून गेलोय कि साला भाजप नाही निवडून आले तरी चालेल पण या मंडळींचा माज कमी करा. असो साला गेल्या २ महिन्यातला राग बाहेर पडल्यामुळे आता कसे बरे वाटत आहे.

प्रसाद१९७१ 12/11/2014 - 18:47
४. काही खासदारांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत जय विदर्भ म्हणून घोषणा दिल्या त्या योग्य वाटतात काय ?>>>> खासदार विधानसभेत का आले होते ते कळले नाही. पण जय विदर्भ घोषणा दिल्या हे चांगलेच झाले. कोकणाला कधीपासुन विदर्भ मराठवाड्यापासुन सुटका हवी आहे.

In reply to by प्रसाद१९७१

खासदार ऐवजी आमदार असे वाचावे. संपादक कृपया बदल करु शकतील काय ?
पण जय विदर्भ घोषणा दिल्या हे चांगलेच झाले. कोकणाला कधीपासुन विदर्भ मराठवाड्यापासुन सुटका हवी आहे.
मग तुम्हीही जय कोकण म्हणा की ! :)

In reply to by प्रसाद१९७१

मराठी_माणूस 13/11/2014 - 15:15
कोकणाला कधीपासुन विदर्भ मराठवाड्यापासुन सुटका हवी आहे.
मग त्यांनी त्यांना हव्या तशा घोषणा द्याव्यात

अक्षरमित्र 12/11/2014 - 18:50
४. काही खासदारांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत जय विदर्भ म्हणून घोषणा दिल्या त्या योग्य वाटतात काय ?
हा मुद्दा वरील चर्चेत गैरलागू आहे असे नमूद करतो. तुमच्या इतर प्रश्नांची उत्तरे क्लिंटनसारखे अभ्यासूच देऊ शकतील. प्रतिक्रिया म्हणाल तर हे महाराष्ट्र व नवीन सरकार पहिल्या दिवसापासूनच मध्यावधी निवडणूकांकडे चालले आहे असे वाटतेय.

hitesh 12/11/2014 - 18:53
मेल्यानो , आमच्या काँग्रेसला पाडलं ... असाच तळपट होणार तुमचा

अस कस ! भाजप नेहमीच बरोबर असत . मोदी जे काही करतात ते नेहमीच सत्याच्या बाजूने असत . मग ती काळ्या पैशा च्या मुद्द्यावर मारलेली कोलांटी उडी असो , सीमेवर सैनिक शहीद होत असताना नवाझ शरीफ यांची आई ला साडी पाठवणे असो वा राष्ट्रवादी सोबत ची शय्यासोबत असो . मोदी जे करतात ते नेहमीच बरोबर असत . भ्रष्टाचार , समाजात दुही माजवण , दंगली बद्दल काय म्हणता ? छे छे ? ते पाप कॉंग्रेस , शिवसेना , समाजवादी , साम्यवादी यांच . दाखले देऊ का ? भाजप च कॉन्ग्रेस्सीकरण झाल ? अरे जिभेला काही हाड ? संघ आणि त्याची पुण्याई आहे भाजप मागे . फडतूस कॉंग्रेस च अनुकरण भाजप कसे करेल ? तेंव्हा भाजप बद्दल आमच मत बदलण्याच पातक करू नका . मंदिर वही बनायेंगे , दावूद ला फरफटत आणू , ३७० कलम रद्द करू , जय श्री राम वैगेरे वैगेरे

क्लिंटन 12/11/2014 - 18:58
मागे मी आवाजी मतदान म्हणजे काय याविषयी मिपावरच लिहिले होते ते चोप्य-पस्ते करतो: संसदेच्या किंवा राज्य विधीमंडळांच्या सभागृहांमध्ये एखादा प्रस्ताव मतदानाला येतो (उदाहरणार्थ मंत्रीमंडळावरील विश्वासदर्शक ठराव) तेव्हा सभागृहाचे अध्यक्ष--"या ठरावाच्या समर्थनात असलेल्या सदस्यांनी 'आयेस' (हो) म्हणावे" असे म्हणून त्यानंतर त्या प्रस्तावाला पाठिंबा देणारे सदस्य आयेस... असे म्हणतात.त्यानंतर "या ठरावाच्या विरोधात असलेल्या सदस्यांनी 'नोस' (नाही) म्हणावे" असे म्हणून त्यानंतर त्या प्रस्तावाला विरोध करणारे सदस्य 'नोस' असे म्हणतात. यापैकी ज्या बाजूचा आवाज अधिक मोठा असेल त्याप्रमाणे अध्यक्ष तो प्रस्ताव मंजूर्/नामंजूर झाला असे जाहीर करतात.याला आवाजी मतदान म्हणतात. कुणाही एका सदस्याने प्रत्यक्ष मतदानाची मागणी केली तर मतदान घ्यावे लागते अन्यथा अध्यक्षांनी दिलेला निर्णय अंतिम असतो. आजच्या आवाजी मतदानात शिवसेना सदस्यांनी मतविभाजनाची मागणी करूनही अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ती नाकारली हे माझ्या मते अयोग्य केले.त्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येईल की नाही माहित नाही.बहुदा नाही कारण अशा गोष्टींमध्ये सभागृह अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो. प्रत्यक्ष मतदान करायची वेळ आली तर लोकसभेत मतदान इलेक्ट्रॉनिक व्होटिंग पध्दतीने होते आणि जर यंत्रणेत काही कारणाने बिघाड झाला असेल तर मात्र मतपत्रिका वाटून मतदान होते. महाराष्ट्र विधानसभेत नक्की काय पध्दत आहे हे माहित नाही. वेळ मिळेल त्याप्रमाणे माझ्या जिव्हाळ्याच्या चर्चेत मी भाग घेणार आहेच.

In reply to by क्लिंटन

कोणत्या बाजूचा आवाज मोठा हे कसे ठरवितात ? म्हणजे त्याबाबतीत अध्य़क्षांच्या श्रवणक्षमतेवर अवलंबून असते की आवाजाची पातळी मोजणारे यंत्र लावलेले असते ? स्पष्ट बहूमत (संख्याबळ) असेल तर आवाजी मतदान योग्य असावे असे वाटते. मात्र आजच्या कार्यक्रमात शंका घेण्यास पुरेपुर जागा आहे असे वाटते शिवाय अशा गोष्टींमध्ये सभागृह अध्यक्षांचा निर्णय अंतिम असला तरी जनतेत चुकीचा संदेश जाऊ शकतो.

In reply to by धर्मराजमुटके

क्लिंटन 12/11/2014 - 19:40
कोणत्या बाजूचा आवाज मोठा हे कसे ठरवितात ? म्हणजे त्याबाबतीत अध्य़क्षांच्या श्रवणक्षमतेवर अवलंबून असते की आवाजाची पातळी मोजणारे यंत्र लावलेले असते ?
नाही या बाबतीत अध्यक्षांचे सब्जेक्टिव्ह जजमेन्टच महत्वाचे.प्रथेप्रमाणे (आणि बहुदा नियमांप्रमाणे सुध्दा) एका जरी सदस्याने मतविभाजनाची मागणी केली तरी मतदान घेणे गरजेचे असते.आणि अर्थात ते योग्यही आहे. वाजपेयींचे सरकार एका मताने पडले त्यावेळी पहिल्यांदा आवाजी मतदान झाले.अध्यक्ष बालयोगींनी आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव पास झाला असे जाहिर केले.पण त्यानंतर अर्थातच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मतविभाजनाची मागणी केली.पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक पध्दतीने मतदान झाले.त्यात काही सदस्यांचे मत नोंदले गेले नाही म्हणून मतपत्रिका देऊन मतदान झाले.त्यात वाजपेयींचे सरकार एका मताने पडले.
मात्र आजच्या कार्यक्रमात शंका घेण्यास पुरेपुर जागा आहे असे वाटते शिवाय अशा गोष्टींमध्ये सभागृह अध्यक्षांचा निर्णय अंतिम असला तरी जनतेत चुकीचा संदेश जाऊ शकतो.
नक्कीच. शिवसेना आणि काँग्रेस सदस्यांनी मतविभाजनाची मागणी केल्यानंतर ती मान्य करायला हवीच होती.विधानसभा अध्यक्ष या पदाच्या प्रतिष्ठेला साजेसे वर्तन हरिभाऊंचे नक्कीच नाही.या कारणासाठी तरी विरोधी पक्षांनी विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणायला हवा.तो पास होणार नाही ती गोष्ट वेगळी पण निदान हे वर्तन अयोग्य आहे हे दाखवायला तरी असा प्रस्ताव आणायला पाहिजे असे वाटते.

In reply to by क्लिंटन

धन्यवाद. मात्र अजून एक प्रश्न. आवाजी मतदान घेण्याची कारणे काय असू शकतात ? शिवाय आपल्या म्हणण्याप्रमाणे "वाजपेयींचे सरकार एका मताने पडले त्यावेळी पहिल्यांदा आवाजी मतदान झाले." म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून जवळपास ५० वर्षांत अशा पद्धतीचे मतदान नगण्य वेळाच झाले आहे काय ? शिवाय अशा अविश्वसनीय पद्धती एवढ्या दीर्घकाळ कशी चालू शकते ?

In reply to by धर्मराजमुटके

क्लिंटन 12/11/2014 - 22:04
आवाजी मतदान घेण्याची कारणे काय असू शकतात ?
आपल्याकडच्या बऱ्याच गोष्टी ब्रिटिश संसदेतील प्रथा आणि प्रॅक्टिसेसवरून घेतलेल्या आहेत.आवाजी मतदान ही गोष्टही आपल्याकडे हाऊस ऑफ कॉमन्सकडून आली आहे.मला वाटते की या पध्दतीत फारसे काही चुकीचे नाही.कारण सभागृहांमध्ये मतदान अनेकवेळा घ्यावे लागते.आणि बहुतांश वेळी सरकारमधील पक्षाचा विजय होणार हे स्पष्टच असते.अशावेळी मतदान घेऊन सभागृहाचा वेळ घालविण्यापेक्षा आवाजी मतदान घेऊन नियमाप्रमाणे प्रस्ताव सभागृहात मंजूर करून घेणे कधीही चांगले.त्यातूनही कोणाही सदस्याला जर मतविभाजन हवे असेल तर ते घेता येतेच.त्यामुळे या पध्दतीत अविश्वसनीय असे काही नाही.
"वाजपेयींचे सरकार एका मताने पडले त्यावेळी पहिल्यांदा आवाजी मतदान झाले." म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून जवळपास ५० वर्षांत अशा पद्धतीचे मतदान नगण्य वेळाच झाले आहे काय ?
नाही.यातील ’पहिल्यांदा’ चा अर्थ ’सुरवातीला’ असा आहे. वरील वाक्याचा अर्थ १९९९ मध्ये सर्वप्रथम आवाजी मतदान झाले असा निघत असल्यास ते वाक्य अर्थ अधिक स्पष्ट होईल अशा पध्दतीने लिहायला हवे होते.सभागृहात कोणत्याही प्रस्तावावर मतदान होते त्यावेळी पहिल्यांदा आवाजी मतदानच होते.सरकारकडे चांगल्यापैकी बहुमत असेल तर बहुतांश वेळा विरोधी पक्ष मतविभाजनाची मागणी करत नाहीत. जसे इतर सर्व प्रस्तावांविषयी होते तसेच १९९९ मध्ये वाजपेयी सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरही झाले-म्हणजे सुरवातीला आवाजी मतदान झाले. विरोधकांनी मतविभाजनाची मागणी केल्यानंतर मतदान झाले.

In reply to by क्लिंटन

चौकटराजा 14/11/2014 - 16:52
मी म्हणतो कोणत्याही निकषाने आवाजा ची पद्धत गर्हणीय आहे. एकूण मतदार किती ? ५४५. संसदेतले प्रत्येक मतदान मग विषय महत्वाचा असो की नसो एक आदेश असतो एक संदेश असतो जनतेसाठी. न्यायालय , इलेक्शन कमिशन याना त्यातून सतत संसद हीच साव्रभौम असल्याची समज दिली जात असते. आज काल इलेक्ट्रोनिक पद्धतीने मतदान करताना या मतदानाचा वेग असतो सेकंदास १ लक्ष ८६ हजार मैल. अशा वेळी संसदेचा वेळ " वाया" जातो हे म्हणणे साफ चूक आहे. ब्रिटीशांची परंपरा त्यावेळी घाईत स्वीकारली असणे शक्य आहे पण साठ वर्षात यावर एकाही विद्वानाने हरकत घेउ नये याचा भारा विस्मय व क्रोध वाटतो.

In reply to by चौकटराजा

क्लिंटन 14/11/2014 - 19:35
पण साठ वर्षात यावर एकाही विद्वानाने हरकत घेउ नये याचा भारा विस्मय व क्रोध वाटतो.
हे समजले नाही. आवाजी मतदानात आक्षेप घेण्यासारखे काय आहे?राज्यघटनेत केवळ इतके म्हटले आहे की काही गोष्टींना (विधेयके, अर्थसंकल्प इत्यादी) सभागृहाची मान्यता लागते. ही मान्यता कशी घ्यावी हे राज्यघटनेत लिहिलेले नाही आणि सगळ्या गोष्टी राज्यघटनेत असायची गरजही नाही. एक तत्व राज्यघटनेत लिहिणे आणि त्याची अंमलबजावणी नक्की कशी करावी हे नियमांवर/प्रथांवर सोडणे यात चूक काय आहे? आवाजी मतदान हा सभागृहात मतदान घ्यायचा एक मार्ग झाला.त्यातूनही कोणा सदस्याने मतदानाची मागणी केली तर प्रत्यक्ष मतदान घ्यायची तरतूद आहेच की. परवा हरिभाऊ बागडेंनी नक्की काय केले याविषयी उलटसुलट बातम्या येत आहेत.त्यामुळे त्यांनी खरोखरच आवाजी मतदानानंतर काही सदस्यांनी केलेली मतदानाची मागणी नाकारली का हे अजूनही तितकेसे स्पष्ट नाही.पण हरिभाऊंनी अशी मागणी नाकारली असेल तर मात्र ते सर्वथैव अयोग्य आहे.पण म्हणून आवाजी मतदान ही मूळ कल्पनात रद्दबादल करता येणार नाही.

In reply to by क्लिंटन

हाडक्या 14/11/2014 - 20:41
हे समजले नाही. आवाजी मतदानात आक्षेप घेण्यासारखे काय आहे?राज्यघटनेत केवळ इतके म्हटले आहे की काही गोष्टींना (विधेयके, अर्थसंकल्प इत्यादी) सभागृहाची मान्यता लागते. ही मान्यता कशी घ्यावी हे राज्यघटनेत लिहिलेले नाही आणि सगळ्या गोष्टी राज्यघटनेत असायची गरजही नाही. एक तत्व राज्यघटनेत लिहिणे आणि त्याची अंमलबजावणी नक्की कशी करावी हे नियमांवर/प्रथांवर सोडणे यात चूक काय आहे? आवाजी मतदान हा सभागृहात मतदान घ्यायचा एक मार्ग झाला.त्यातूनही कोणा सदस्याने मतदानाची मागणी केली तर प्रत्यक्ष मतदान घ्यायची तरतूद आहेच की.
अहो पण चौ.रा. यांचेपण बरोबरच आहे की. जर आज काल जलद काम करण्यासाठीची साधने उपलब्ध असतील तर उगीच परंपरा वगैरे कारणे देऊन 'मोघम' असे अंदाजपंचे काम करणारी पद्धत फक्त आजवर चालू होती म्हणून चालू ठेवण्यात कोणता शहाणपणा आहे ? प्रतेक सदस्याच्या टेबलावर 'हो'/'नाही' ची बटणे बसवली तर ५ सेकंदात हे काम बिनबोभाट होईल की. (अर्थात हा वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे आणि झालेल्या प्रसंगात इथे तितकासा लागु नाही हे पण मान्य. तरीही तुम्ही आवाजी मतदानाच्या आक्षेपाबाबत इतक्या निरागसपणे विचारलेत म्हणून मांडतोय इतकेच.)

In reply to by हाडक्या

क्लिंटन 14/11/2014 - 22:08
तरीही तुम्ही आवाजी मतदानाच्या आक्षेपाबाबत इतक्या निरागसपणे विचारलेत म्हणून मांडतोय इतकेच.
निरागसपणा कसला त्यात? गरजेप्रमाणे किती प्रिसिजनपर्यंत उत्तर हवे आहे हे शोधले तर त्यात चूक काय? समजा २,१९८,३०९,२३१ भागिले ३,२८९,४२७,८७१ हे उत्तर हवे असेल तर ते दोन तृतीयांशच्या आसपास आहे म्हणजे ०.६६ हे लगेचच कळू शकेल.पण प्रत्यक्ष भागाकार करून उत्तर ०.६६८२९५३ आहे हे समजायला बराच वेळ जाईल. ज्या परिस्थितीत ०.६६ हे उत्तर पुरेसे असेल तिथे ०.६६८२९५३ हे उत्तर काढायची गरज नाही. त्याचप्रमाणे एखाद्या प्रस्तावास सभागृहात जास्त सदस्यांचा पाठिंबा आहे की विरोध जास्त सदस्यांचा आहे हे बघायचे असेल म्हणजे २८८ पैकी १४४ पेक्षा जास्त की कमी एवढेच तपासायचे असेल आणि एखादी पध्दत ते उत्तर देऊ शकत असेल तर त्यात चुकीचे काय? समजा कोणाला नक्की किती सदस्यांचा पाठिंबा आहे-- १५२ की १५३ की १५४ हे तपासायचे असेल तर पूर्ण मतदान आहेच की. त्यातूनही आवाजी मतदानावर आक्षेप असतील तर पूर्ण मतदान घेता येतेच. आवाजी मतदान न घेता पूर्ण मतदान घेऊ नयेच असे मी म्हणत नाही. पण आवाजी मतदान म्हणजे एखादा फ्रॉड असल्याप्रमाणे गेल्या दोन दिवसांपासून चित्र उभे केले जात आहे ते चुकीचे आहे इतकेच. हा मुद्दा मी न वेळा मांडला आहे.परत त्याची पुनरावृत्ती नको.

In reply to by क्लिंटन

हाडक्या 14/11/2014 - 23:22
समजा २,१९८,३०९,२३१ भागिले ३,२८९,४२७,८७१ हे उत्तर हवे असेल तर ते दोन तृतीयांशच्या आसपास आहे म्हणजे ०.६६ हे लगेचच कळू शकेल.पण प्रत्यक्ष भागाकार करून उत्तर ०.६६८२९५३ आहे हे समजायला बराच वेळ जाईल. ज्या परिस्थितीत ०.६६ हे उत्तर पुरेसे असेल तिथे ०.६६८२९५३ हे उत्तर काढायची गरज नाही.
क्लिंटन भौ, with all due respect, उदाहरण गंडले आहे असे नमूद करतो पण तो इथे मुद्दा नाही म्हणून मी आधी खालच्या प्रतिसादाबद्दल बोलतो.
चप्रमाणे एखाद्या प्रस्तावास सभागृहात जास्त सदस्यांचा पाठिंबा आहे की विरोध जास्त सदस्यांचा आहे हे बघायचे असेल म्हणजे २८८ पैकी १४४ पेक्षा जास्त की कमी एवढेच तपासायचे असेल आणि एखादी पध्दत ते उत्तर देऊ शकत असेल तर त्यात चुकीचे काय? समजा कोणाला नक्की किती सदस्यांचा पाठिंबा आहे-- १५२ की १५३ की १५४ हे तपासायचे असेल तर पूर्ण मतदान आहेच की.
आपला आवाजी मतदानाच्या उपयुक्ततेचा मुद्दा पतलाय, ते फ्रॉड नाही हे पण या चर्चेच्या आधीच मान्य आहे. पण आता हे बघा, आपल्याकडचे बहुतांश भ्रष्टाचार कसे होतात ? तर नियमात बसवून.. म्हणजे वाढवलेल्या निविदा या नियमात बसतात म्हणून त्या बरोबर होतात का ? तर नाही. इथे सरकार बहुमतात आहे की नाही यासाठी १४४ हवे आहेत. 'मोघम' १४४ नव्हे तर बंदे १४४. १४३ देखील चालणार नाहीत (म्हणून आधी सरकारे पडली आहेत). अशा वेळेस तुम्हीच तुमच्या पक्षाचा व्यक्ती न्यायाधीश म्हणून बसवणर आणि 'आवाज कुणाचा?' म्हणून बहुमत ठरवणार ही पद्धत जरी तांत्रिकदृष्ट्या बरोबर ठरत असली तरी ती बरोबर नाही हे तुम्हाला देखील मान्य असेल. म्हणून तो अर्थाअर्थी फसवणूक ठरते एवढेच. 'आवाजी मतदान' जरी फसवणूक नसली तरी तुम्ही बहुतेक संसदीय संकेत हे जसे राबवणार्‍याकडून सारासार विवेक आणि विचाराची अपेक्षा करतात त्याप्रमाणे विवेकानेच वापरायची सोय आहे. काँग्रेस असो वा कोणी इतर, कोणी आधी पण गैर फायदा घेतला असेल तर गैरच आणि त्यानी घेतलाय म्हणून आम्ही पण घेणार असे म्हणून कोणी घेणार असेल तरी ते गैरच (वरून मग तुम्ही काय वेगळे हा प्रश्न उरतोच).. या व्यतिरिक्त, (ज्यामुळे हा प्रतिसाद सुरु झाला) जो मुद्दा चौ.रा. नी मांडला आहे की 'सोयीची साधने असताना ही आवाजी मतदानासारखी 'मोघम पद्धत' उगीच (सगळ्यांचीच) स्वार्थी सोय म्हणून चालू ठेवायची हे ठीक नाही' तो बरोबरच आहे. तुमचे त्या 'मोघम'पणाच्या समर्थनार्थ उत्तर पटण्याजोगे नाही. इथे थोडक्यात, तुमच्या मित्रांच्या बर्‍यापैकी मोठ्या ग्रुपमध्ये तुम्हाला किती लोक 'मिसळ' आणि किती लोक 'वडा-पाव' असे ठरवायचे असेल आणि बहुमताने एकच पदार्थ सगळ्याना मागवावा लागणार असेल तर तुम्ही आवाजी मतदान करून शेवटी तुम्हीच निर्णय देण्यासारखे आहे. सोपा मार्ग हा किती लोकांनबहुमताने/'वडा' हवा हे विचारायचा असताना तुम्ही (तुम्हाला 'मिसळ' हवी म्हणून कदाचित ;) ) तुमची सोय पाहीली तर ते तांत्रिकदृष्ट्या बरोबर ठरवालही पण ते तसे नाही हे तुम्हाला मनोमन मान्य असेलच आणि तुम्ही तुमची सोय नाही पाहीली तरी ते (तुमचा निवाडा प्रामाणिक आहे ते) इतरांना मान्य होईलच असेही नाही हे ही तुम्हाला मनोमन मान्य असेलच. असो, थोडक्यात, १. 'आवाजी मतदान हे फ्रॉड नाही पण वापर करताना तारतम्य आणि विवेक अपेक्षित. २. 'आवाजी मतदानासारखे प्रकार नवीन पद्धती, तंत्रज्ञान वापरून सुधारायला काहीच हरकत नसावी. जर आपण प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता अपेक्षित धरतो तर संसदीय कामात का नको ? उगीच नको तिथे परंपरांचे अवडंबर नको.

In reply to by हाडक्या

श्रीगुरुजी 14/11/2014 - 23:46
>>> इथे सरकार बहुमतात आहे की नाही यासाठी १४४ हवे आहेत. 'मोघम' १४४ नव्हे तर बंदे १४४. १४३ देखील चालणार नाहीत (म्हणून आधी सरकारे पडली आहेत). क्लिंटनसाहेबांबद्दल आदर बाळगूनसुद्धा असे म्हणावेसे वाटते की इथे क्लिंटन व हाडक्या या दोघांचाही गोंधळ झालेला आहे. महाराष्ट्र विधानसभेत (किंवा इतर कोणत्याही विधानसभेत/विधानपरीषदेत/लोकसभेत/राज्यसभेत/नगरपालिकेत इ. सभागृहात) बहुमतासाठी सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येपैकी निम्म्याहून अधिक मतांची गरज नसून एकूण जितके मतदान झाले आहे त्यापैकी निम्म्याहून अधिक मतांची गरज असते. उदा. सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण २८७ सदस्य आहेत (एका सदस्याचे निधन झाले आहे). सभापती सोडून इतर २८६ जण मतदानास पात्र आहेत. समजा २८६ पैकी राष्ट्रवादीच्या ४१ सदस्यमतदान न करता तटस्थ राहिले तर एकूण मतदान २४५ इतके होते. त्यापैकी बहुमतासाठी १२३ मते पुरेशी आहेत. १४५ मतांची गरज नाही. काल भाजपकडे स्वतःची १२० (सभापती सोडून), रासपचे १, अपक्ष व इतर छोटे पक्ष मिळून १४ (काही जण हा आकडा १६ असे सांगतात) अशी एकूण १३५ मते होती. विरोधकांकडे कॉग्रेस+शिवसेना अशी एकूण १०४ मते होती. ४१ जण तटस्थ होते. आवाजी मतदानात 'होय'वाल्यांच्या १३५ जणांचा आवाज भाजपचे बहुमत सिद्ध करणारा होता. त्यामुळे भाजपचे बहुमत कायदेशीर व घटनात्मक मार्गाने सिद्ध झाले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

क्लिंटन 15/11/2014 - 10:26
महाराष्ट्र विधानसभेत (किंवा इतर कोणत्याही विधानसभेत/विधानपरीषदेत/लोकसभेत/राज्यसभेत/नगरपालिकेत इ. सभागृहात) बहुमतासाठी सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येपैकी निम्म्याहून अधिक मतांची गरज नसून एकूण जितके मतदान झाले आहे त्यापैकी निम्म्याहून अधिक मतांची गरज असते.
हो बरोबर. १९९३ मध्ये नरसिंह राव सरकारविरूध्दचा अविश्वास ठराव (झारखंड मुक्ती मोर्चा लाच प्रकरणामुळे बदनाम झालेला) फेटाळला गेला त्यावेळी सरकारच्या बाजूने २६५ आणि विरोधात २५१ मते दिली गेली होती. २७३ मते न मिळाल्यामुळे सरकार पडले नव्हते.कोणत्याही सभागृहात मतदान करणार्‍या सदस्यांपैकी अर्ध्याहून जास्त असा नियम आहे हे मलाही माहित आहे :) तरीही या प्रतिसादात १४४+ असे लिहिले याचे एक कारण आहे. आवाजी मतदान कित्येक वर्षांपासून चालत आले आहे तरीही फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावानंतर आवाजी मतदान हा प्रकारच फ्रॉड आहे अशाप्रकारचे अत्यंत चुकीचे चित्र उभे केले जात आहे.ते चित्र चुकीचे आहे हे दाखवून देण्यावर माझा भर होता.आणि तीच गोष्ट अनेकवेळा लिहून खरे सांगायचे तर मला कंटाळाही आला होता. तेव्हा भर आवाजी मतदानावर होता सभागृहात नक्की बहुमत म्हणजे काय या तांत्रिकतेवर नव्हता.

In reply to by क्लिंटन

हाडक्या 15/11/2014 - 22:25
बहुमताचं नियमांच कळते हो राव. १४४ फक्त उदाहरणार्थ असा मुद्दा पटवण्यासाठीचा आकडा होता. बाकी selective reading करून इतर मजकूराकडे आणि म्हणण्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करण्याची पद्धत आवडली बरं का.. परत सांगतो पद्धत फ्रॉड आहे असे कुठेही म्हणालेलो नाही. वरून तुम्हाला तेच परत परत सांगायला लागतय असा तुमचा कांगावा पटला नाही. असो, तुम्हा दोघांबद्दल आदर आहेच परंतु असे सोईचे फक्त वाचून पुढे जाणे योग्य नाही एवढेच. बाकी तुमची मर्जी.

In reply to by हाडक्या

चौकटराजा 15/11/2014 - 05:16
राज्यघटनेत लोकशाहीतील अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे मतदान यावर काही नसणे हे गंभीर आहे. मतदान हा लोकशाहीचा श्वास असतो. लोकशाहीत लोकप्रतिनिधींचे पर्यायाने लोकांचे मत हा तर मोठा महत्वाचा भाग आहे जो हुकूमशाही पासून तिला वेगळी करतो. यावर आपले वा भारतातील राजकीय क्षेत्राच्या अभ्यासकांचे वेगळे असे मत आहे का? बरे त्यावेळी असे स्पष्ट काही चा समावेश करता आला नाही तरी त्यानंतर इतक्या घटना दुरूस्त्या झाल्या त्यात या विषयाला प्राधान्य मिळू नये याचे फार दु:ख होते. आपल्या लोकशाहीतील सर्वात मोठा भोंगळपणा जर कोठे असेल तर तो मतदानातच आहे. वेगवेगळ्या स्तराला मतदानाचे वेगवेगळे अर्थ व उपचार आहेत.पळवाटा जणू हेतूपूर्वक ठेवाव्या असे ! साध्या ग्रामपंचायती पासून सहकारी संस्थेच्या निवडणुकीपासून ते संसदेपर्यंत सर्व प्रकारच्या निवडणुका या गुप्त मतदानानेच व्हावयास हव्यात मग विषय लहान असो की मोठा ! आपल्या लोकशाहीत मतदान पक्ष करतो की व्यक्ती याचाही स्पष्ट खुलासा घटनेत असणे आबश्यक आहे. दोन चार ओळी घटनेत टाकणे म्हणजे हिमालय त्याच्या जागेवरून हलविणे आहे काय ?

In reply to by क्लिंटन

श्रीगुरुजी 12/11/2014 - 21:16
गुप्त मतदान काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेला अजिबात नको होते. भाजपने पूर्ण फिल्डिंग लावली होती. गुप्त मतदानात या तीनही पक्षांच्या काही आमदारांनी भाजपच्या बाजूने मतदान केले असते व त्यांची पूर्ण नाचक्की होऊन पक्षात फूट पडली असती. हे टाळण्यासाठी प्रथम काँग्रेस व सेनेने आपला अध्यक्षपदाचा उमेदवार मागे घेतला व नंतर विश्वासदर्शक ठरावावर आवाजी मतदान होऊन तो मंजूर झाल्यावर व नंतर विरोधी पक्षनेता निवडल्यानंतर मतविभाजनाची मागणी करायला सुरूवात केली. विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर लगेचच मतविभाजनाची मागणी करता येते. परंतु त्यानंतर विरोधी पक्षनेता निवडण्याचा विषय पार पडल्यानंतर त्यापूर्वीच मंजूर झालेल्या ठरावावर मतविभाजनाची मागणी नियमानुसार मान्य करता येत नाही. त्यामुळे नूतन अध्यक्षांनी ती मागणी फेटाळण्याचा योग्य तोच निर्णय घेतला.

In reply to by श्रीगुरुजी

क्लिंटन 12/11/2014 - 21:46
विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर लगेचच मतविभाजनाची मागणी करता येते. परंतु त्यानंतर विरोधी पक्षनेता निवडण्याचा विषय पार पडल्यानंतर त्यापूर्वीच मंजूर झालेल्या ठरावावर मतविभाजनाची मागणी नियमानुसार मान्य करता येत नाही. त्यामुळे नूतन अध्यक्षांनी ती मागणी फेटाळण्याचा योग्य तोच निर्णय घेतला.
हो. अशाच स्वरूपाची चर्चा न्यूज चॅनेलवर चालू आहे. यावेळी हरिभाऊ बागडेंनी योग्य निर्णय घेतला असे मान्य केले तरी लवकरच राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर मतदान होईल त्यावेळी नक्की काय ती परिस्थिती कळून येईल. त्यावेळी मात्र मतविभाजन व्हावे ही अपेक्षा.

In reply to by क्लिंटन

प्रसाद१९७१ 13/11/2014 - 17:56
विरोधी पक्षांनी विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणायला हवा.तो पास होणार नाही ती गोष्ट वेगळी
विधानसभा अध्यक्षांवरचा अविश्वास ठराव म्हणजे सरकारवरचा अविश्वास ठराव असल्या सारखे असते. तो जर पास होणार नाही हे माहीतिय तर सरकारचा विश्वासदर्शक ठराव नक्कीच पास होणार.

In reply to by प्रसाद१९७१

क्लिंटन 13/11/2014 - 18:05
विधानसभा अध्यक्षांवरचा अविश्वास ठराव म्हणजे सरकारवरचा अविश्वास ठराव असल्या सारखे असते.
तांत्रिकदृष्ट्या हो कारण विधानसभा अध्यक्ष हे बहुतांश वेळा बहुमतवाल्या पक्षाचेच असतात.त्यामुळे अध्यक्षांवर अविश्वास ठराव पास झाला तर त्याचा अर्थ सरकारने बहुमत गमावले असा होईल. तरीही अध्यक्षांवर अविश्वास ठराव पास झाला म्हणून सरकार लगेच पडत नाही.
तो जर पास होणार नाही हे माहीतिय तर सरकारचा विश्वासदर्शक ठराव नक्कीच पास होणार.
हो बरोबर. तरीही अध्यक्षांवर अविश्वास ठराव मांडावा याचे कारण जास्त प्रतिकात्मक आहे.त्यांचा निर्णय योग्य की अयोग्य याविषयी वेगवेगळ्या बातम्या येत आहेत त्यामुळे नक्की काय ते समजत नाही.जर त्यांचा निर्णय अयोग्य असला तर त्याला विधानसभेत विरोध होणार आहे आणि आपल्याला पाहिजे तसे अध्यक्ष वागू शकत नाहीत हे दाखवून द्यायला तरी विरोधी पक्षांनी त्यांच्याविरूध्द अविश्वास ठराव आणायला हवा असे मला वाटते. बहुतेकवेळा हे अविश्वास ठराव प्रतिकात्मकच असतात. इंदिरा गांधींच्या सरकारविरूध्द तब्बल १५ वेळा अविश्वास ठराव आले होते.ते पास व्हायची सुतराम शक्यता नाही हे विरोधी पक्षांना माहित नव्हते किंवा कळत नव्हते असे नाही.तरीही आपला विरोध दाखवायचा एक मार्ग म्हणून ते अविश्वास ठराव आणत होते.तसेच नागपूरला नोव्हेंबर १९९४ मध्ये गोवारी समाजाच्या मोर्चावर लाठीमार आणि त्यात १२३ जणांचा मृत्यू झाल्यानंतरही भाजपने शरद पवारांच्या सरकारविरूध्द अविश्वास ठराव आणला होता--तो पास होणार नाही हे माहित असूनही.

In reply to by क्लिंटन

ऋषिकेश 14/11/2014 - 16:14
+१ याला पुरवणी: अजून एक कारण असते अशा प्रस्तावांचे ते म्हणजे ठराविक संख्येच्या सदस्यांनी मिळून हे प्रस्ताव साद झाल्यावर सरकार वा सभापती यांची इच्छा असो नसो यावर चर्चा करणे व मतदान घेणे सभापतींना बंधनकारक असते. इतर अनेक नियमांतर्गत चर्चा व मतदान सरकारच्या किंवा किमान सभापतींच्या मर्जीवर असते.

In reply to by क्लिंटन

शिद 12/11/2014 - 19:23
यापैकी ज्या बाजूचा आवाज अधिक मोठा असेल त्याप्रमाणे अध्यक्ष तो प्रस्ताव मंजूर्/नामंजूर झाला असे जाहीर करतात.
च्यायला, अजबच आहे हा प्रकार. धन्यवाद क्लिंटन. नविन माहीती मिळाली.

आवा.............ज कुणाचा? असे म्हंटले की पूर्वी एकच उत्तर यायचे. दुसरे उत्तर दिले की कानाखाली आवाज.ह्यावेळी मात्र दुसरा आवाज आल्याने ते सैर्भैर झाले असे ह्यांचे मत.

hitesh 12/11/2014 - 19:29
हायला मग आम्ही मतदान का करायचं ? आम्हालाही हीच पद्धत का नाही ?

In reply to by hitesh

ते वेगवेगळ्या टी.व्ही. चॅनेल्सच्या माध्यमातून्चालूच असते.उ.दा. तुमचा तो अर्नब गोस्वामी,निखिल वागळे...

hitesh 12/11/2014 - 19:42
दैवजात दु:खे कमळा दोष ना कुणाचा पवाराधीन आहे जगती पुत्र मावळ्याचा

माहितगार 12/11/2014 - 19:54
राजकारणात अनपेक्षीताशी सोबत करावी लागू शकते ही बाब राजकीय निरीक्षकांना नवी नसते. परंतु एखाद्या विशीष्टच गोष्टीवर/तत्वावर विश्वास ठेवणार्‍या दोन्ही बाजूच्या हाडाच्या कार्यकर्त्यास सहसा अशा राजकीय कोलांट उड्या भावनिक दृष्ट्या सहज झेपणार्‍या नसतात. अल्पमतातील सरकारला मुदतपूर्व निवडणूक घ्यावीच लागलीतर हाडाचा कार्यकर्ता आणि मतदार दुखावलेला राहणे परवडत नाही. आपला असंगाशी संग होणारच आहे पण जनता विसरेपर्यंत तो तसा दिसू नये याची तजवीज करणे कदाचित जरूरी वाटले असावे. जनतेचे लक्ष विश्वासदर्शक ठरावात नेमके कोण कोणाला पाठींबा देते हे पाहण्याकडे लागले होते आणि राज्यकर्त्यांना बहुमताची शास्वती असूनही, मतदानोत्तर नको असलेली चर्चा आणि हाडाच्या समर्थकांचे नाराज होणे नको असावे. हाडाचे समर्थक नाराज झाले की अंतर्गत विरोधही अधीक उफाळून येण्याची भिती. आवाजी मतदानात नेमके कुणाचे समर्थन आले तर सर्वच पक्षातून आले असेल अशी नंतरच्या सारवासारवीची तजवीज असावी. गेले दोन दिवस आमचे हितचिंतक सर्वच पक्षात आहेत अशी भूमीकेची पेरणी नवराज्यकर्त्यांकडून कदाचित त्यामुळेच चालू असावी. म्हणून आवाजी मतदानातील मेख बहुधा पुर्वनियोजीतच असावी. सत्तेसाठी तडजोडी भाजपाच्या इतिहासात नवी नाहीत पण उत्तर, दक्षीणेत सोबतच विदर्भात आपण शिवसेनेशी तडजोड करत नाही हे दाखवण्याची व्यवस्थाही झाली दुसरीकडे शिवसेनेलाच मुख्य विरोधीपक्ष केले म्हणजे काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न तेवढेच लौकर पुर्ण होते. एकुण राजकारणाचे आराखडे इतपत पुर्वनियोजीत होते की सत्तेच्या तडजोडीत शिवसेना जरी झुकली असती तरीही भाजपाच्या आतल्या गोटाला ते नको असावे. एकुण काँग्रेसला नव्या भाजपाचा राष्ट्रवादी युतीच्या राजकारणाचा अनुभव म्हणजे कानामागून आले आणि तीखट झाले असा आला असेल तर नवल नाही. राष्ट्रवादीला सकाळने घेतलेल्या सर्वेमुळे राजकारणाचे फासे कसे पडणार याचा अंदाचा कदाचित निवडणूकपुर्व काळातच आला असल्याने असेल किंवा काँग्रेसमुक्त भारताच्या ध्येयात आधी पासूनच सामील असतील नाहीतर निकाल हाती आल्या आल्या पाठींब्याची गणिते एवढ्या चटकन जाहीर झाली नसती. शेवटी जनतेचा कौल मिळतच नाही मग कालहरणच करायचे तर फासे आपल्या बाजूस ठेऊन करा हा हिशेब एकुण नवल नाही असे म्हणावयास हवे. शिवसेनाही पडद्यामागच्या खेळात सामील असेल का ? कमी अधिक प्रमाणात नाकारता येत नसले तरी राजकीय निर्णय प्रक्रीयेतील एकुण प्रगल्भतेचा अभाव पाहता तसे असण्यापेक्षा राजकीय फरफट झाली असण्याची शक्यताच अशीक वाटते.

भाते 12/11/2014 - 20:19
गडकरी मुमं व्हावेत या गटाचे ४० भाजपा आमदार (फडणवीस मुमं झाल्याने त्यांच्या) विरोधात मतदान करणार होते आणि हे टाळण्यासाठी आवाजी मतदानाचा पर्याय स्विकारला असे विरोधकांचे म्हणणे आहे. (प्रत्यक्ष मतदानात त्यांची नावे अर्थातच ऊघड झाली असती). पुर्ण बहुमताची खात्री होती तर भाजपाने प्रत्यक्ष मतदानाचा पर्याय का नाकारला? पुढल्या सहा महिने/वर्षभरात मध्यवर्ती निवडणुका होणार आहेत याची सर्वच पक्षांना कल्पना आहे. त्यामुळेच आत्ता हे सगळे आपल्या भविष्याचा विचार करत आहेत. खांग्रेस आणि भ्रष्टवादी खांग्रेस गेली १५ वर्षे सत्तेत होते. भ्रष्टवादी खांग्रेसने भाजपाला आतुन/बाहेरून (प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष) पाठिंबा का दिला याचे कारण जगजाहीर आहे. ते ऊद्या 'को णा ला ही' पाठिंबा देतील! मध्यवर्ती निवडणुकांमध्ये 'भाजपा, आम्ही भ्रष्टवादी खांग्रेसचा पाठिंबा घेतला नाही' आणि शिवसेना, भाजपाने भ्रष्टवादी खांग्रेसचा पाठिंबा घेतला' हा मुद्दा बनवणार.

In reply to by भाते

श्रीगुरुजी 12/11/2014 - 21:15
गुप्त मतदान काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेला अजिबात नको होते. भाजपने पूर्ण फिल्डिंग लावली होती. गुप्त मतदानात या तीनही पक्षांच्या काही आमदारांनी भाजपच्या बाजूने मतदान केले असते व त्यांची पूर्ण नाचक्की होऊन पक्षात फूट पडली असती. हे टाळण्यासाठी प्रथम काँग्रेस व सेनेने आपला अध्यक्षपदाचा उमेदवार मागे घेतला व नंतर विश्वासदर्शक ठरावावर आवाजी मतदान होऊन तो मंजूर झाल्यावर व नंतर विरोधी पक्षनेता निवडल्यानंतर मतविभाजनाची मागणी करायला सुरूवात केली. विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर लगेचच मतविभाजनाची मागणी करता येते. परंतु त्यानंतर विरोधी पक्षनेता निवडण्याचा विषय पार पडल्यानंतर त्यापूर्वीच मंजूर झालेल्या ठरावावर मतविभाजनाची मागणी नियमानुसार मान्य करता येत नाही. त्यामुळे नूतन अध्यक्षांनी ती मागणी फेटाळण्याचा योग्य तोच निर्णय घेतला.

In reply to by श्रीगुरुजी

गुप्त मतदान काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेला अजिबात नको होते. भाजपने पूर्ण फिल्डिंग लावली होती. गुप्त मतदानात या तीनही पक्षांच्या काही आमदारांनी भाजपच्या बाजूने मतदान केले असते व त्यांची पूर्ण नाचक्की होऊन पक्षात फूट पडली असती.
मग अशावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने गप्प बसणे पसंत केले असते. मतविभाजनाची मागणी केली नसती. तसेच भाजपाने त्या मागणीस होकार देऊन सर्वच पक्षांना उघडे पाडायची संधी घेतली असती. भाजपाला सर्व पक्षांची अब्रू झाकण्यात रस होता असे तुम्हाला म्हणायचे आहे काय ?

In reply to by धर्मराजमुटके

क्लिंटन 12/11/2014 - 22:08
भाजपाला सर्व पक्षांची अब्रू झाकण्यात रस होता असे तुम्हाला म्हणायचे आहे काय ?
इतर आमदार फुटले आहेत हे स्पष्ट झाले असते तर ते आमदार भाजपनेच फोडले आहेत हा आरोप झाला असता. बहुदा त्या कारणामुळे भाजपलाही झाकली मूठ ठेवायची असेल.

क्लिंटन 12/11/2014 - 22:34
काही आमदारांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत जय विदर्भ म्हणून घोषणा दिल्या त्या योग्य वाटतात काय ?
मला स्वतःला तरी अशा घोषणा दिल्या असतील तर आणि सभागृहाच्या शिस्तीचा भंग होत नसेल तर त्यात काही चुकीचे वाटत नाही.काही आमदारांचे स्वतंत्र विदर्भ व्हावा असे मत असेल तर त्यात त्यांचे काय चुकले? जय विदर्भ असे म्ह्टले तर आपल्याच देशातल्या एका भागाचा जयजयकार केला जात आहे की शत्रूराष्ट्राचा उदोउदो केला जात आहे? आणि विदर्भ वेगळे राज्य केले जाणार असेल तर भारत-पाकिस्तानसारखी फाळणी का होणार आहे? मग जय विदर्भ म्हटले तर त्यांचे फार काही चुकले असे मला तरी वाटत नाही.

भाजपाने माज दाखवला निर्लज्जांनी पटलावर आधीचा मुद्दा बदलुन मुद्दामुन दुसरा मुद्दा वर उचलला आनि शिवसेना बाहेर गेल्याचे निमित्तसाधुन अचानक त्यावर आवाजी मतदान घ्यायला सुरुवात केली अश्या वेळी इतका गोंधळ चालु झाला की काय चालु आहे हे कुणालाच कळले नाही याच प्रकारचे वाक्य काल आव्हाड यांनी मिडीयाला सांगितले म्हणजे भाजपाने मुद्दामुन गोंधळ घालुन योग्य संधी घेउन लगेच आवाजी मतदान घेतले कारण त्यांना माहीत आहे की प्रत्यक्ष मतदान घेतल्यावर त्यांच्याकडेच नितिन गडकरी समर्थक आमदार सरकारविरुद्ध मतदान करुन सरकार पाडणार होते. म्हणुन घाबरुन गेलेले फडणवीस आपली खुर्ची वाचबण्याकरीता असले निंदनिय कृत्य केले

In reply to by बॅटमॅन

ते काय आहे वर गुरुजीने एक पोस्ट २ वेळा टाकली ते दिसत नाही का. ? म्हणुन मुद्दामुनच ३ वेळा टाकली ते बरे डोळ्यात खुपले :) दुसर्याची रेकॉर्ड अडकली ते ग्वाड वाटते बॅटमॅनाला

In reply to by दिवाकर देशमुख

हाडक्या 13/11/2014 - 15:52
मला दि.दे. ची प्रतिक्रिया पाहून नानाचा भास झाला .. तसा आजकाल तो बर्‍याच नव्या आयडींमध्ये होतो म्हणा, तरीपण.. (कुठे नेवून ठेवलाय नाना आमचा ..!) ;)

प्रसाद१९७१ 13/11/2014 - 17:58
जर मतदान झाले असते तर शिवसेनेची आब्रू गेली असती. भाजप्+राकाँ च्या आकड्यापेक्षा बरीच मते जास्त मिळाली असती. शिवसेनेची बरीच मते फुटणार होती. लाज वाचवण्यासाठी त्यांना गोंधळ घालुन सभागृहातुन पलायन केले. हा भाजप्+राकॉ, शिवसेना ह्यान्नी एकत्र येउन केलेला प्लॅन होता. काँग्रेस ला मात्र वेडे बनवले.

In reply to by प्रसाद१९७१

कपिलमुनी 13/11/2014 - 18:20
तुम्ही सांगितले.. खरे तर भाजपाने हे सर्व केवळ शिवसेनाची लाज वाचवण्यासाठी केले. आणि बरीच द्वाड लोकं भाजपाला नावे ठेवतात.. बादवे , फडणवीसांनी अजून काय काय कानगोष्टी सांगितल्या हो तुम्हाला ;)

दुश्यन्त 13/11/2014 - 18:14
भाजपाला सर्व पक्षांची अब्रू झाकण्यात रस होता असे तुम्हाला म्हणायचे आहे काय ?+१ काही लोकं अजब तर्कत मांडत आहेत. भाजप स्वतः विरोधी पक्षांतली (तथाकथित) फूट झाकू पाहत होता काय? आवाजी मतदान घेवून पण लोकांत एनसीपीशी संग करणारा भाजप असाच मेसेज गेला आणि होणारी निर्भत्सना भाजप टाळू शकला नाही. मग उघड मतदान घेवून इतर पक्ष फोडले जरी असते तरी इभ्रत वाचली असती. भाजपने १२३ ते १४५ अंतर कसे कापले याचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते. ज्यांच्यावर आरोप करून सत्ता आणली त्यांचेच समर्थन घेवून सरकार बनवत आहोत ही बाब भाजपला झाकायची होती मात्र त्यासाठी खटपटी करूनही जे व्हायचे ते झालेच.भाजप एनसीपी यांचे सेटिंग आत्तापासून नाही खूप जुने आहे. सिंचन, आदर्श, कोळसा घोटाळे यांत भाजपही सामील होती. देवेंद्र स्वतः स्वच्छ असतीलही (ठामपणे आता यांच्या बद्दलही बोलता येत नाही) पण बाकी बरेच भाजपेयीचे एनसीपीशी साटेलोटे आहे.आता भाजपला एनसीपीशी केलेला संग पुढे महागात पडणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही.

In reply to by दुश्यन्त

प्रसाद१९७१ 13/11/2014 - 18:48
सर्वच एकमेकांची अब्रू वाचवत होते १. भाजपला राकॉं चा पाठींबा घेतला हे उघड पणे दाखवायचे नव्हते. २. शिवसेनेला सर्व आमदार आपल्या बरोबर नाहीत हे लपवायचे होते. ३. राकाँ ला भाजपवर उपकार करायचे होते भविष्यासाठी. तसेच शिवसेना पुढच्या २-३ महीन्यात मंत्रामंडळात दिसेल. अजुन शिवसेनेनी केंद्रातले मंत्रीपद सोडले नाही. किंवा छभु नी जशी शिवसेना फोडली तशी पुन्हा फुटेल काही महीन्यात आणि मग भाजपचे बहुमताचे सरकार येइल.

दुश्यन्त 13/11/2014 - 19:28
सेनेन केंद्रातल मंत्रिपद सोडल नाही तास भाजपने तरी कुठे गीतेंना काढलय? कारण केंद्रात भाजपला लोकसभेत बहुमत आहे पण राज्यसभेत एनडीए अगदीच कमकुवत आहे. मोठी विधेयके संमत करायला दोन्ही सभागृहात बहुमत असाव लागत किंवा लोकसभा/राज्यसभा अस संयुक्त अधिवेशन घेवून ते पारित कराव लागत. इथे शिवसेनेकडे असणारे २१ खासदार (लोकसभ १८, राज्यसभा ३) भाजप गमावायला तयार नाही. शिवसेना विरोधात जाणार नाही. केंद्रात आणखी एखाद फुटकळ पद आणि राज्यात पण ४-२ मंत्रिपदे दिली कि सेना मुकाट्याने बरोबर येईल हाच भाजपचा होरा होता म्हणून ते सेनेला खिजवत होते. सेना केंद्रातले वाढीव पद नाकारेल हे त्यांना वाटले नव्हते. आता मात्र एनसीपीची साथ घेतल्याने लोकांच्या टीकेचा भडीमार झाल्यावर भाजपेयी विचार बदलू पण शकतील. आता समजा सेना सरकारमध्ये आली तरी जास्त पदे द्यावी लागतील. माझ्या मते सेनेने विरोधातच बसावे. पवारांचा पाठींबा काय किमतीचा आहे हे फडणवीस आणि लोकांना पण कळेल. पवारांनी सरकार पाडले तरी तोवर भाजप जनतेसमोर एक्स्पोज झालेली असेल.हे पवारालंबी सरकार एनसीपीच्या मर्जीवरच चालणार. सरकार कोसळून निवडणुका लागल्या तर परत मते मागायला जाताना ते एनसीपी वर टीका पण करू शकणार नाहीत.आधी भाजप सेनेला खेळवत राहिली मग सेनेने तेच केले .भाजप-एनसीपी छुपी युती उघड करणे हाच सेनेचा अजेंडा होता म्हणून त्यांनी चर्चेचे गुर्हाळ चालू ठेवून ऐनवेळी विरोधात बसणे पसंत केले.

कपिलमुनी 13/11/2014 - 19:32
केंद्रामधला सरकार हे एनडीए चा आहे . भाजपा चा एकट्याचा नाहिये .म्हणून केंद्रीय मंत्रीपद सोडण्याचा प्रश्नच येत नाही

In reply to by कपिलमुनी

सव्यसाची 15/11/2014 - 00:24
सरकार फक्त भाजपचेच आहे. राष्ट्रपतींनी जे पत्र पंतप्रधानांना दिले त्यामध्ये त्यांनी भाजपचे सरकार असाच उल्लेख केला आहे.

दुश्यन्त 13/11/2014 - 19:39
आमदार फोडणे एवढे सोपे राहिले नाही.२/३ आमदार फोडावे लागतात नाहीतर आमदारकी रद्द होवू शकते. समजा काही आमदार फुटले/ राजीनामे दिले तर निवडणुका लावून त्यांना परत निवडून आणावे लागणार. यात वेळ जातोच पण त्यासाठी किंमत पण मोजावी लागणार. आता पण जे लहान पक्ष, अपक्ष बरोबर आले आहेत त्यांच्या अपेक्षा पण पूर्ण कराव्या लागणारच नाहीतर ते कशाला बरोबर राहतील? त्यापेक्षा भाजपने आधीच सेनेला खिजवत न बसता योग्य वात दिला असता तर ६३ आमदारांच एकगठ्ठा समर्थन मिळून एक स्थिर आणि मजबूत सरकार मिळाल असत मात्र भाजपला सुटलेली हाव आणि सेनेच खच्चीकरण करायच्या नादात भाजपने राष्ट्रवादीला जवळ केले.आवाजी मतदानामुळे भाजपने एन्सिपिला विधन परिषदेत फायदा करून दिला आहे. कारण प्रत्यक्ष मतदानात एनसीपीने भाजपच्या बाजूने मत टाकले असते किंवा सभा त्याग केला असता तरी त्यांना विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद मिळाले नसते. आता एन्सिपिला वि. परिषदेत विरोधीपक्षनेते पद मिळेल. आत्ता पुरते सरकार तरले आहे पुढे एनसीपी सरकार मध्ये येवून बसली तरी आश्चर्य वाटायला नको.

In reply to by दुश्यन्त

प्रसाद१९७१ 13/11/2014 - 20:00
जे पुन्हा निवडुन येउ शकतील अश्या आमदारांना राजीनामा द्यायला लावुन भाजप तर्फे पुन्हा निवडुन आणणार आहेत.

तिमा 15/11/2014 - 10:45
आवाजी मतदान ही संकल्पना फक्त सुसंस्कृत राजकारणी नेत्यांसाठी आहे. जेंव्हा सगळे लबाड लांडगे एकत्र जमा होतात तेंव्हा ही पद्धत कशी चालेल ? यापुढे कुठल्याही चर्चेनंतर मतदान अनिवार्य केले पाहिजे.

गजानन५९ 15/11/2014 - 14:57
अखेर भाजपने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव रडत खडत का होईना जिंकला, पण प्रश्न असा आहे कि शिवसेनेला इतके अपमानित करून या मोदी सेनेने काय साध्य केले ? ज्या सेनेच्या साथीत गेली २५ वर्ष तुम्ही गळ्यात गले घालून फिरत होतात ती यांना अचानक इतकी नकोशी का वाटू लागली ? मोदीसेना कदाचित ५ वर्ष इथे टीकेलही (ते पण आपल्या तथाकथित जाणत्या राजाच्या मनात असेल तर) पण जिथे स्वतः मोदी २७ सभा घेऊनही या लोकांना भ्रष्टाचार्वादी कॉंग्रेस (हे मोदींनी दिलेले नाव आहे )चा पाठींबा घ्यावा लागतोय तिथे पुढीलवेळी लोकांनी यांच्यावर का आणि कशासाठी विश्वास ठेवावा ? सेना चुकली असेल, नव्हे मी मान्य करतो कि सेना चुकली पण या मोदी लाटेत आणि बाळासाहेब हयात नसताना उद्धव ठाकरेंनी ६३ आमदार निवडून आणले हे हि काही कमी नाही. खरे तर याच उद्धव ठाकरेंची (मी धरून) सर्वांनी खिल्ली उडवली होती (खील्ली सम्राट राज ठाकरेंनी तर पार वडे आणि सुप बीप काढले होते ते त्यांच्यावर उलटलेच आहे.) पण जितका संयम उद्धावनी गेल्या २ महिन्यात दाखवला (जो सेनेच्या विचार (खरे तर आचार) सरणीत कधीच बसत नव्हता. वयक्तिक मला सेनेने विरोधात बसावे असे निकालापासून वाटत होते कारण साहजिकच भाजपसोबत सरकारमध्ये सेना गेली असती तरीही तिला कधीच तो आधीचा सन्मान मिळाला नसता. आता विरोधात बसून या कमकुवत सरकारविरुद राळ उठवून मान ताठ ठेवून वावरणे हेच खरे शहाणपणाचे ठरेल. खरे तर मी पक्का भाजपेयी माणूस ( भाजपेयी अशासाठी कि वाजपेयींचे विचार पटायचे पण मोदि चे पटतील असे नाही रादर ७०% मोदी विचार पटत नाहीत ) पण या तावडे, फडणीस, राजीव(प्रताप) रुडी, माधव भंडारी आणि खडसे मामांनी इतका माज करून ठेवला म्हणून वैतागून गेलोय कि साला भाजप नाही निवडून आले तरी चालेल पण या मंडळींचा माज कमी करा. असो साला गेल्या २ महिन्यातला राग बाहेर पडल्यामुळे आता कसे बरे वाटत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारनं विधानसभेत ‘आवाजी शक्ती’ दाखवून देत ‘विश्वास’ जिंकण्याची किमया साधली आहे. मात्र शिवसेना आणि कॉंग्रेसने हा प्रकार नियमबाह्य असल्याचे म्हटले असून शिवसेनेने मतदान पुन्हा घ्यावे तर काँग्रेसने अल्पमतातलं हे सरकार घटनाविरोधी असून या सरकारच्या बरखास्तीच्या मागणीसाठी राज्यपालांकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे असे विविध बातम्या वाचून कळते. १. आवाजी मतदान काय आहे ? २. मतविभागणी कशी मोजतात ? ३. तसेच लोकसत्ताच्या एका बातमीनुसार हा मुद्दा तांत्रिक आहे की नैतिक एवढाच मुद्दा आहे त्यात कायदेप्रक्रियेचा संबंध येत नाही असे म्ह्टले आहे. ४.

आनंद - कार्लसन, सोची २०१४ - डाव ४

चतुरंग ·

चतुरंग 12/11/2014 - 17:37
अतिशय शार्प वेरिएशन्स असलेली ओपनिंग थिअरी. आनंद त्यातला एक माहिर खेळाडू समजला जातो. मॅग्नुसचा किल्लेकोट झालाय आनंदचा राजा पुढच्या खेळीत किल्लेकोटात जाईल. ५ मिनिटात ७ खेळ्या झाल्यात. वेग चांगलाच आहे.

चतुरंग 12/11/2014 - 17:43
डी५ असा मोक्याचे ठाणे धरुन ठेवायला बघणार. नंतर सी प्यादे पुढे येऊन पटाचा मध्य मजबूत करणार. आनंदचे पर्याय - उंट जी ४ येऊ शकतो, किल्लेकोट करु शकतो.

बहुगुणी 12/11/2014 - 17:50
सिसिलियन डिफेन्सने डाव सुरु झालाय. या व्हिडिओ ट्युटोरियलची आठवण झाली. (बुद्दीबळाविषयी इंटरेस्ट पण मोजकीच माहिती असणार्‍या माझासारख्यांसाठी ही सिरीजच माहितीपूर्ण आहे)

चतुरंग 12/11/2014 - 17:56
किल्लेकोट करण्यात वेळ आणि टेंपो दोन्ही न घालवता सरळ मोहोरी पुढे आणण्यावर भर दिलाय म्हणजे त्याची कॉन्फिडन्स लेवेल उत्तम आहे. शिवाय दोन्ही बाजूपैकी कोठेही किल्लेकोट करता येईल अशी शक्यता ठेवली आहे. मेग्नुस शुड कीप गेसिंग!

त्याने ङ्हो घोडा आणला एफ-३ ला. आनंद ला राजच्या बाजुने सावध व्हावे लागेल. वजीर एच-७ वर रोखला आहे कार्लसन चा.

चतुरंग 12/11/2014 - 18:34
जी ५ मधे येण्यापासून रोखले आनंदच्या एच ६ खेळीने. आणि ही एक वेटिंग मूव देखील आहे पांढर्‍याचा प्लॅन जाणून घेण्यासाठीची.

चतुरंग 12/11/2014 - 18:54
डायनामिक आहे. आनंदचे वजिराचे प्यादे आय्सोलेटेड आहे. त्याचा जी४ वरचा उंट मॅग्नुसला त्रासदायक ठरायच्या आतच तो हुसकावून लावायला त्याने वजीर एफ १ मधे आणलाय. मॅग्नुसचा रोख हा डाव सोपा करण्याकडे आणि नंतर वजिराचे प्यादे खाण्याकडे असेल. आणि आनंद त्याला संधी मिळू नये यासाठी प्रयत्नशील.

अनुप ढेरे 12/11/2014 - 19:12
मला नव्यानेच कळालेली माहिती शेअर करतोय. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी. पटाखाली हुडिनी, कमोडो आणि स्टॉकफिश ही जी नावं आहेत त्यांना इंजिन्स म्हणतात. ते एक एक कॉप्युटर प्रोग्राम्स आहेत जे प्रत्येक खेळी नंतर पटाला अ‍ॅनालाईज करत असतात. त्यातून एक आकडा निघतो जो धन(positive) अथवा ऋण असू शकतो. धन आकडा पांढर्‍याच्या पारड्याला झुकणारा डाव आहे अस दर्शवतो. आकडा ऋण असेल तर डाव काळ्याच्या पारड्यात झुकणारा आहे. जेवढा मोठा आकडा डाव तितका जास्तं त्या पारड्यात झुकला आहे. -३ म्हणजे काळ्याच्या बाजूला झुकला आहे खूप. +३ म्हणजे पांढर्‍याच्या बाजूला.

In reply to by आदूबाळ

अनुप ढेरे 12/11/2014 - 21:42
युनिट असतं का ते नाही माहित, पण युनिटची गरज वाटत नाही. गेल्या म्याचमध्ये ४ वगैरे आकडा बघितला आहे. पण पूर्ण रेंज नाही माहिती.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्याद्याचा वजीर होईल अशी धमकी. कारण या दोन दिग्गजात केवळ वजीर आणि घोड्यानं मात, आणि ते ही सद्य स्थितीत असंभव आहे. आनंदच्या डी-प्याद्याला बढत शक्य आहे त्यामुळे तो बरोबरी मान्य करणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

रामपुरी 12/11/2014 - 22:41
त्या एकमेव थ्रेटवर सगळा गेम होता! :) :) :) अवांतर: इंग्लिश वाक्य ChessDom वरुन चोप्य्पस्ते. ज्याचं श्रेय त्याला द्यायला शिका श्री श्री

चतुरंग 12/11/2014 - 22:39
आता खेळानंतरच्या पत्रकारपरिषदेमध्ये खेळीमेळीने डावाचे विश्लेषण सुरु आहे! :) या परिषदेत पत्रकारांनी डोकेबाज प्रश्न विचारायला बंदी असते की काय कोण जाणे? मागे एकाने आनंदला विचारले होते "पुढच्या डावात तुझी स्ट्रॅटेजी काय असेल??: आनंद : "सीरिअसली? डू यू बिलीव दॅट आय शुड डिस्कस धिस हिअर?" डाव जिंकल्यावर किंवा हरल्यावर आता तुला कसं वाटतंय? हा आणखी एक गाढव प्रश्न, अरे कसं वाटणार? ऑब्विअस आहे ना? पण ते एक मस्त मनोरंजन असते यात वाद नाही!

In reply to by चतुरंग

पहाटवारा 12/11/2014 - 23:17
आनंद मस्त खेचतो.. गॅरी कास्पारोव विचित्र पण भारी बोलतो मुलाखतींमधे.. मागे एक हा संवाद पाहिला होता तूनळीवर जिथे ऊत्तम मुलाखतकारालाहि त्याने एकदम निरुत्तर केले होते .. -पहाटवारा

In reply to by गणेशा

मित्रांबरोबर संगीताच्या कार्यक्रमाला जाणरे आणि तिथे गेल्यानंतर, पुस्तक वाचनांत दंग होणारे... असो, ही सगळी भली मंडळी चर्चा करतात, त्यातल्या खेळीमेळीच्या वातावरणातच आपल्याला रस. बाद्वे...व्यनि केला आअहे.

बहुगुणी 13/11/2014 - 04:57
दोघांनाही १/२ गुण मिळाला. ४ डावांनंतर प्रत्येकी २ गुण (दोन बरोबरीत सुटले, दोघांनी प्रत्येकी १ डाव जिंकला)

चतुरंग 12/11/2014 - 17:37
अतिशय शार्प वेरिएशन्स असलेली ओपनिंग थिअरी. आनंद त्यातला एक माहिर खेळाडू समजला जातो. मॅग्नुसचा किल्लेकोट झालाय आनंदचा राजा पुढच्या खेळीत किल्लेकोटात जाईल. ५ मिनिटात ७ खेळ्या झाल्यात. वेग चांगलाच आहे.

चतुरंग 12/11/2014 - 17:43
डी५ असा मोक्याचे ठाणे धरुन ठेवायला बघणार. नंतर सी प्यादे पुढे येऊन पटाचा मध्य मजबूत करणार. आनंदचे पर्याय - उंट जी ४ येऊ शकतो, किल्लेकोट करु शकतो.

बहुगुणी 12/11/2014 - 17:50
सिसिलियन डिफेन्सने डाव सुरु झालाय. या व्हिडिओ ट्युटोरियलची आठवण झाली. (बुद्दीबळाविषयी इंटरेस्ट पण मोजकीच माहिती असणार्‍या माझासारख्यांसाठी ही सिरीजच माहितीपूर्ण आहे)

चतुरंग 12/11/2014 - 17:56
किल्लेकोट करण्यात वेळ आणि टेंपो दोन्ही न घालवता सरळ मोहोरी पुढे आणण्यावर भर दिलाय म्हणजे त्याची कॉन्फिडन्स लेवेल उत्तम आहे. शिवाय दोन्ही बाजूपैकी कोठेही किल्लेकोट करता येईल अशी शक्यता ठेवली आहे. मेग्नुस शुड कीप गेसिंग!

त्याने ङ्हो घोडा आणला एफ-३ ला. आनंद ला राजच्या बाजुने सावध व्हावे लागेल. वजीर एच-७ वर रोखला आहे कार्लसन चा.

चतुरंग 12/11/2014 - 18:34
जी ५ मधे येण्यापासून रोखले आनंदच्या एच ६ खेळीने. आणि ही एक वेटिंग मूव देखील आहे पांढर्‍याचा प्लॅन जाणून घेण्यासाठीची.

चतुरंग 12/11/2014 - 18:54
डायनामिक आहे. आनंदचे वजिराचे प्यादे आय्सोलेटेड आहे. त्याचा जी४ वरचा उंट मॅग्नुसला त्रासदायक ठरायच्या आतच तो हुसकावून लावायला त्याने वजीर एफ १ मधे आणलाय. मॅग्नुसचा रोख हा डाव सोपा करण्याकडे आणि नंतर वजिराचे प्यादे खाण्याकडे असेल. आणि आनंद त्याला संधी मिळू नये यासाठी प्रयत्नशील.

अनुप ढेरे 12/11/2014 - 19:12
मला नव्यानेच कळालेली माहिती शेअर करतोय. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी. पटाखाली हुडिनी, कमोडो आणि स्टॉकफिश ही जी नावं आहेत त्यांना इंजिन्स म्हणतात. ते एक एक कॉप्युटर प्रोग्राम्स आहेत जे प्रत्येक खेळी नंतर पटाला अ‍ॅनालाईज करत असतात. त्यातून एक आकडा निघतो जो धन(positive) अथवा ऋण असू शकतो. धन आकडा पांढर्‍याच्या पारड्याला झुकणारा डाव आहे अस दर्शवतो. आकडा ऋण असेल तर डाव काळ्याच्या पारड्यात झुकणारा आहे. जेवढा मोठा आकडा डाव तितका जास्तं त्या पारड्यात झुकला आहे. -३ म्हणजे काळ्याच्या बाजूला झुकला आहे खूप. +३ म्हणजे पांढर्‍याच्या बाजूला.

In reply to by आदूबाळ

अनुप ढेरे 12/11/2014 - 21:42
युनिट असतं का ते नाही माहित, पण युनिटची गरज वाटत नाही. गेल्या म्याचमध्ये ४ वगैरे आकडा बघितला आहे. पण पूर्ण रेंज नाही माहिती.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्याद्याचा वजीर होईल अशी धमकी. कारण या दोन दिग्गजात केवळ वजीर आणि घोड्यानं मात, आणि ते ही सद्य स्थितीत असंभव आहे. आनंदच्या डी-प्याद्याला बढत शक्य आहे त्यामुळे तो बरोबरी मान्य करणार नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

रामपुरी 12/11/2014 - 22:41
त्या एकमेव थ्रेटवर सगळा गेम होता! :) :) :) अवांतर: इंग्लिश वाक्य ChessDom वरुन चोप्य्पस्ते. ज्याचं श्रेय त्याला द्यायला शिका श्री श्री

चतुरंग 12/11/2014 - 22:39
आता खेळानंतरच्या पत्रकारपरिषदेमध्ये खेळीमेळीने डावाचे विश्लेषण सुरु आहे! :) या परिषदेत पत्रकारांनी डोकेबाज प्रश्न विचारायला बंदी असते की काय कोण जाणे? मागे एकाने आनंदला विचारले होते "पुढच्या डावात तुझी स्ट्रॅटेजी काय असेल??: आनंद : "सीरिअसली? डू यू बिलीव दॅट आय शुड डिस्कस धिस हिअर?" डाव जिंकल्यावर किंवा हरल्यावर आता तुला कसं वाटतंय? हा आणखी एक गाढव प्रश्न, अरे कसं वाटणार? ऑब्विअस आहे ना? पण ते एक मस्त मनोरंजन असते यात वाद नाही!

In reply to by चतुरंग

पहाटवारा 12/11/2014 - 23:17
आनंद मस्त खेचतो.. गॅरी कास्पारोव विचित्र पण भारी बोलतो मुलाखतींमधे.. मागे एक हा संवाद पाहिला होता तूनळीवर जिथे ऊत्तम मुलाखतकारालाहि त्याने एकदम निरुत्तर केले होते .. -पहाटवारा

In reply to by गणेशा

मित्रांबरोबर संगीताच्या कार्यक्रमाला जाणरे आणि तिथे गेल्यानंतर, पुस्तक वाचनांत दंग होणारे... असो, ही सगळी भली मंडळी चर्चा करतात, त्यातल्या खेळीमेळीच्या वातावरणातच आपल्याला रस. बाद्वे...व्यनि केला आअहे.

बहुगुणी 13/11/2014 - 04:57
दोघांनाही १/२ गुण मिळाला. ४ डावांनंतर प्रत्येकी २ गुण (दोन बरोबरीत सुटले, दोघांनी प्रत्येकी १ डाव जिंकला)
लेखनविषय:
लेखनप्रकार
पहिल्या तीन डावातच दोन डाव निकाली निघालेत यापेक्षा जास्त उत्सुकता ताणणारे अजून काय असू शकते? आज चौथा डाव मॅग्नुस पांढर्‍या मोहोर्‍यांनी खेळणार. कोणती सुरुवात असेल ई४ का अजून काही? डाव सुरु व्हायला जेम्तेम एक मिनिट आहे चला बघूयात !

मला आवडलेली पुस्तके:विनोदी साहित्य

पुस्तकमित्र ·

आदूबाळ 12/11/2014 - 16:52
धागा इंटेन्शनल विनोदाविषयी आहे असं गृहित धरतो. अनइंटेन्शनल विनोदासाठी मुक्तपीठ, मोकलाया, मोजी, सनातन प्रभात, असे बरेच ऑप्शन्स असतात.

प्रचेतस 12/11/2014 - 16:56
सुहास शिरवळकर यांची जाता..येता... आणि बरसात चांदण्यांची ह्या दोन धमाल विनोदी कादंबर्या प्रचंड आवडतात. मिरासदार, चिं. वि. जोशी, शंकर पाटील यांचे सर्वच विनोदी साहित्य आवडीचे आहे. पु. ल. देशपांडे यांचे विनोदी लेखन मात्र आवडत नाही.

In reply to by प्रचेतस

संदीप डांगे 12/11/2014 - 17:20
वल्लीशेठ कुणास काय आवडावे न आवडावे हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण बरेचदा विशिष्ट असा उल्लेख करून पु. ल. यांचे लेखन आवडत नाही असे सांगण्यामागे काय कारण असेल? फार प्रांजळपणे विचारतो आहे, गैरसमज करू नये. पण दुसरी बाजू किंवा पुल न आवडणाऱ्यांची बाजू काय असेल हा प्रश्न बरेच दिवस पडलेला आहे. तुम्ही विषय मांडला आहेच तर उत्तर द्याल का?

In reply to by संदीप डांगे

प्रचेतस 12/11/2014 - 17:32
मला मुकुंद टांकसाळे, अशोक पाटोळे, चंद्रकांत महामिने, मंगला गोडबोले यांचेही विनोदी लेखन आवडत नाही पण हे लेखक तुलनेने अदखलपात्र आहेत. तसे पु. लं चे नाही. महाराष्ट्रातील थोर लेखक ते. मला मात्र त्यांचे लेखन बाळबोध आणि काहीसे एकसुरी वाटते. मला जे वाटते तसे इतरांनाही वाटायला हवे असा माझा आग्रह नाही.

In reply to by प्रचेतस

संदीप डांगे 12/11/2014 - 19:11
उत्तराबद्दल धन्यवाद! कुणास काय आवडते ते त्याचा वैयक्तिक प्रश्न असे तर मी आधीच म्हटले आहे. फक्त ह्या दुसऱ्या दृष्टीकोनाची उत्सुकता होती. अशी एकाच वस्तूबद्दल ची वेगवेगळी मते कळल्याने जाणीवेत भर पडते आणि वाचन अजून प्रगल्भ होते. अजून दुसरा काही हेतू नव्हता ह्या प्रश्नामागे. तुम्ही "बाळबोध व एकसुरी" असे म्हटले आहे, अजून कुणी वेगळे काही मत मांडेल. ह्यातून अजून सकस व उच्च प्रतीचे काय असते ह्याची माहिती मिळत जाते. कुणी जर म्हणेल कि विनोदी लेखन म्हणजे पु ल च फक्त बाकी कोण नाही तर त्यासम मूर्खपणा दुजा नाही. वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या शैलीतून वेगवेगळ्या लेखकांनी आम्हाला हसवत राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

विजुभाऊ 12/11/2014 - 17:05
झकास धागा पुमि. आत्तापर्यन्त वाचलेल्यात सर्वात इनोदी पुस्तक म्हणजे बुधकौशिक ऋषी यानी लिहीलेले "रामरक्षा" हे.

In reply to by वॉल्टर व्हाईट

असंका 13/11/2014 - 11:42
+1 त्यात काय विनोदी आहे सांगा. आम्ही पण मग त्या विनोदांचा आस्वाद घेउ शकू...?

जेपी 12/11/2014 - 17:18
मोजी कथा,खरडफळा आणी काही मिपाकरांच्या खरडवह्या सध्या जाम हसवतात. अवांतर-काहि पुस्तके आहेत पण त्यांची नावे आठवत नाहित. फक्त वाचन आठवत. दिसल पुस्तक की पाड फडशा अस वाचतो

रंगोजी 12/11/2014 - 17:32
दिलीप प्रभावळकरांची 'गुगली' आणि 'नवी गुगली'. ८५ च्या सुमारास ते षटकार साप्ताहिकात क्रिकेटवर लेखन करीत. त्याचा संग्रह. तत्कालीन खेळाडू आणि नियामक मंडळ यांची खुसखुशीत शब्दात फिरकी घेताना वापरलेल्या कल्पनाशक्तीला दाद द्यावीच लगेल. जयवंत दळवी यांचे 'सारे प्रवासी घडीचे' - कोकणाचे, तिथल्या लोकांचे, आपापसातील भांडणांचे फार सुरेख वर्णन आहे

In reply to by रंगोजी

सौंदाळा 13/11/2014 - 16:45
एकदम हेच लिहायला आलो होतो. दिलीप प्रभावळकर : गुगली, हसगत जयवंत दळवी : सारे प्रवासी घडीचे मधु मंगेश कर्णिक : गावाकडच्या गजाली. द मा मिरासदार : मिरासदारी, भोकरवाडीच्या सगळ्या कथा

अजया 12/11/2014 - 18:30
एक लंबरी धागा! मिरासदारी ____/\____ अजरामर व्यंकुची शिकवण,,भूताचा जन्म,माझ्या बापाची पेंड! मराठी वाङमयाचा गाळीव इतिहास-पुलं,यावर तर स्वतंत्र धागा येऊन गेलाय. चिमणरावाचे च-हाट-चिंवि जोशी त्यांचं१च ओसाडवाडीचे देव,त्यातली गणपती हनुमानाची क्रिकेट मॅच! गंगाधर गाडगिळांचा बंडु तर अजरामर आहे!त्याची पत्नी स्नेहलता अाणि चावरा मुलगा जकु उर्फ जकरंद!!सर्वच कथा हहपुवा आहेत!! विंग्रजीमध्ये द वुडहाऊस_/\_ लाफ विथ लिकाॅक पण आवडतं.रस्किन बाॅण्ड कधीकधी हसवुन जातात. अजून लिहतेच पुढे!!धन्स पुस्तकमित्रा!

आत्ता एकच आठवतंय - "Surely You're Joking, Mr. Feynman!" हे भौतिकशास्त्रातल्या नोबेल पारितोषिक विजेत्या Richard Feynman ह्यांचं आत्मचरित्र आहे. ह्यात एका भन्नाट व्यक्तिमत्वाचे भन्नाट किस्से आहेत. त्यांची कथनशैली साधीसरळ आणि मस्त विनोदी आहे.

In reply to by विशाखा पाटील

बॅटमॅन 12/11/2014 - 19:36
काही असलं तरी ते पुस्तक विनोदी म्हणवत नाही.

In reply to by बॅटमॅन

रामपुरी 13/11/2014 - 01:55
अहो त्यांना एकच पुस्तक आठवलंय ते पण इंग्लिश.. तुम्ही कशाला त्यावर पाणी ओतताय

आदूबाळ 12/11/2014 - 21:38
एखाद्या भाषेतला विनोद समजला याचा अर्थ त्या भाषेची समज चांगली आहे. कारण विनोद हा त्या त्या भाषेचं, संस्कृतीचं लेणं घेऊन येतो. उदा. पुलंच्या "वीट येणं कशाला म्हणतात, ते त्या दिवशी मला समजलं" साठी "वीट येणं" हा वाक्प्रचार माहीत असायला पाहिजे. वुडहाऊसच्या "फुल मून" मधल्या "I thought for a moment of saying “My mate!”, but decided against it because it seemed to me to have too nautical a ring." या वाक्यातला विनोद समजायला आरमाराच्या इंग्रजी परिभाषेत बोटीवरच्या अधिकार्‍याला mate म्हणतात याची जाणीव हवी. मला मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषा येतात. (आमचं हिंदी म्हणजे..ह्या ह्या ह्या...) इंग्रजी विनोदी साहित्याची ओळख - वरील कारणामुळे - फार उशीरा झाली. तर हा प्रतिसाद इंग्रजीतल्या प्रचंड आवडलेल्या विनोदी पुस्तकांबद्दल आणि लेखकांबद्दल. १. वुडहाऊस पेल्हम ग्रेनविल वुडहाऊस हा लेखक इंग्रजीतल्या विनोदी लेखनाचा बादशा. जीव्ज-वूस्टर, ब्लँडिंग्ज कासल, गोल्फ-कथा असं त्याने विपुल लिहिलेलं आहे. कधीही कोणतंही पुस्तक उचलावं आणि रंगून जावं. २. सू टाउन्सेंडच्या "आद्रियन मोल" कादंबर्‍या आद्रियन मोल हा स्वतःला भारी समजतो. आपण मोठे साहित्यिक बुद्धिजीवी वगैरे आहोत असं त्याला उगाचच वाटतं. त्याच्या आसपासचे लोक मात्र त्याला पूर्णपणे ओळखून असतात. (लखू रिसबूडची इंग्रजी आवृत्ती.) ३. हिचहायकर्स गाईड टू गॅलेक्सी (सीरीज) विज्ञानकथा-कादंबर्‍यांची उडवलेली रेवडी. ४. फ्लॅशमॅन कादंबर्‍या फ्लॅशमॅन हा विक्टोरियन ब्रिटनमधला एक सैनिक असतो. तो अत्यंत भित्रट आणि पेद्रट असतो, पण घटना अश्या घडतात की त्याच्या शौर्याचा बोलबाला सगळीकडे होतो. इंग्रजीत विनोदी साहित्य लिहिणार्‍या भारतीय उपखंडातल्या लेखकांमध्ये - सिदीन वादुकूटने लिहिलेल्या "रॉबिन 'आईन्स्टाईन' वर्गीस" या कथानायकाच्या तीन कादंबर्‍या - तार्किन हॉलने लिहिलेल्या "विश पुरी" या प्रायवेट डिटेक्टिवच्या नर्मविनोदी रहस्यकथा - मोहम्मद हनीफ या पाकिस्तानी लेखकाचं "अ केस ऑफ एक्स्प्लोडिंग मँगोज" नावाचं कमाल पुस्तक. (हे नक्की वाचा अशी आवर्जून शिफारस करतो.)

In reply to by आदूबाळ

पुलंच्या "वीट येणं कशाला म्हणतात, ते त्या दिवशी मला समजलं" साठी "वीट येणं" हा वाक्प्रचार माहीत असायला पाहिजे.
आणि त्याच पुलंच्या अपूर्वाईमध्ये श्रीलंकेतल्या एका हॉस्पिटलचं सुरू असलेलं बांधकाम बघतांना, "मी तितक्यात हळूच विटा पाहून घेतल्या. हल्ली लंकेत सोन्याच्या विटा नाहीत!" हे समजायला देखील ती म्हण नेमकी आठवावी लागते. भाषिक (शब्दजन्य) विनोदाचा आस्वाद घेण्यासाठी (उदा. टिपिकल इंग्लिश ह्यूमर) मुळात ती भाषा चांगली अवगत असणं हे अतिशय आवश्यक असतं. पुलंच्या बाबतीत म्हणाल तर त्यांचं पुस्तक वाचायला घेऊन चालत्या आगगाडीच्या डब्यात ठो ठो हसून अख्खा डबा डोक्यावर घेणारे आणि त्याचबरोबर पुलंचं पुस्तक वाचताना चेहर्‍यावरची रेषाही न हलणारे असे दोन्ही प्रकारचे लोक पाहण्यात आलेले आहेत. प्राक्तन आपलं आपलं!! :) आंबा न आवडणारे लोकही जगात असतीलच की!!!

In reply to by पिवळा डांबिस

अजया 13/11/2014 - 12:11
अादुबाळ आणि पिडांकाकांशी सहमत. पुलं कोळुन प्यायलेल्यासमोर पुलं न वाचलेला माणूस समोर येण्यासारखा वैताग नाही.नकळत पुलंनी आपल्या भाषेवर त्यांचं गारुड केलंय.एखादं मुल उगाच कानफटीत मारावेसे वाटणारे कार्टे दिसतं!अमूक मनुष्य एक नंबर गटणे असतो.फुळकवणी चा प्यायल्यावर रत्नांग्रीच्या समस्त म्हैशी आपोआप आठवतात.माझ्या कामात दाताचा अण्णु गोगटे झालेले पेशंट असतात!! प्रत्येकाला आपले मत असतेच.असो!

In reply to by पिवळा डांबिस

बॅटमॅन 13/11/2014 - 12:55
आंबा न आवडणार्‍यांवर लोक इतके खार खाऊन का असतात ते कळत नाही. लहानपणी मलाही आंबा आवडत नसे, पेरू जास्त आवडायचा. असो.

In reply to by आदूबाळ

पिशी अबोली 13/11/2014 - 11:53
वुडहाऊस __/\__ निखळ विनोद.. बाकी
हिचहायकर्स गाईड टू गॅलेक्सी (सीरीज) विज्ञानकथा-कादंबर्‍यांची उडवलेली रेवडी.
हे एवढंच वाटत नाही मला.. इतकं असंबद्ध पण तरीही सुसूत्र लिहायला काय ताकद पाहिजे(असं आपलं मला वाटतं)

प्रचेतस 12/11/2014 - 22:17
सूर्यकांत खोकले यांनी चंद्रशेखर गोखले ह्यांच्या 'मी माझा' ह्या चारोळी संग्रहाचे ' मी माझा..मग माझा कुणाचा' ह्या नावाने केलेले धमाल विडंबनांचे पुस्तक संग्रही आहे. एकापेक्षा एक जबरदस्त विनोदी चारोळ्य़ा ह्या संग्रहात आहेत. सध्या हे पुस्तक आवृत्ती संपल्यामुळे मिळत नाही पण मजजवळ खुद्द कवीची स्वाक्षरी असलेले हे पुस्तक आहे.

बोबो 12/11/2014 - 23:53
रमेश मंत्री यांचे विनोदी लिखाणसुद्धा छान आहे. ते जेम्स बॉन्डचे विडंबन जनू बांडे साठी प्रसिद्ध आहेत. पण त्यांची बाकीची विनोदी पुस्तके सुद्धा मला आवडली होती.

In reply to by मुक्त विहारि

भाव्यांचं जळजळीत लिखाण वाचून मिसळीची तर्री प्याल्यासारखं वाटतं. पण त्यांचा तो "नसीमबानूने चड्डी चोरली" तो लेख मात्र अप्रतिम!!!! ;) (अधिक माहितीसाठी पिडांकाकांना मस्का लावण्याची बोली आता सुरू करीत आहोत! बोला एक हजार!!) :)

सस्नेह 13/11/2014 - 13:24
विशिष्ट लेखकांचे सर्व विनोदी लेखन आवडते. म्ह्णून पुस्तकाचे नाव न देता लेखकांची यादी दिलीय पु.ल. जयवंत दळवी गंगाधर गाडगीळ द. मा. रमेश मंत्री

In reply to by बॅटमॅन

पिशी अबोली 13/11/2014 - 15:46
एका हाताने पेरु खात आणि दुसर्‍या हातात ब्रह्मेचा लेख घेऊन वाचत गरागरा फिरणारा बॅटमॅन डोळ्यांसमोर दिसला! ;)

In reply to by पिशी अबोली

बॅटमॅन 13/11/2014 - 16:40
गरागरा फिरायला आम्ही आमच्या 'बॅट' नामक उडनपंखी खटोल्यात बसलो होतो ते सांगायचें विसरलांत बरें? नुस्तेच गरगरां फिरावयास आम्ही तें काय शक्तिमान की कवण समजलांत कायें ;)

In reply to by टवाळ कार्टा

अजया 13/11/2014 - 16:12
ज्यु.ब्रम्हे _/\_ =)) पोपा मॅडम आणि मुक्तपिठावरचे हिरव्या देशाला जाऊन आल्यावर लेख लिहिणारे यांची पण पंखी आहे मी!

असंका 13/11/2014 - 15:55
पंधरा सोळा वर्षांपूर्वी मी एक अफाट विनोदी पुस्तक वाचले होते. लेखक नक्कीच वसंत सबनीस होते. पुस्तकाचे नाव बहुतेक 'सबनिशी'. मी 'मसाप'च्या वाचनालयात हे पुस्तक घेतले वाचायला. पण मला इतकं हसणं आवरीना की शेवटी मी टेबलावरून उठून कपाटांच्या आडोशाला जाऊन वाचायला लागलो. इतकी वर्ष झाल्यामुळे त्या पुस्तकात काय होते ते काही आता आठवत नाहिये. फक्त आवाज खाली ठेवून हसण्याची माझी खटपट लक्षात आहे.... सर्वात आवडते मात्र श्री कृ कोल्हटकरांचे 'सुदाम्याचे पोहे'.

पैसा 14/11/2014 - 12:03
या अर्थाने आम्ही पक्के टवाळ! बहुतेकांची नावं इथे आलीच आहेत. आचार्य अत्रे यांचा अस्वली विनोद पण कधी कधी आवडतो. तसाच बाळकराम आणि नंतरच्या सगळ्या गंभीरपणे विनोदी साहित्य तयार करणार्‍यांचाही. गंभीर विनोदी साहित्य मराठीत समजायला सोपे जाते. मात्र इंग्रजी भाषा आणि संस्कृती याचे आकलन जसे जास्त होते तसा तो विनोद समजू लागतो. इतर बरेच इंग्रजी वाचन झाल्यानंतरच विनोदी पुस्तके वाचायला घ्यावीत.

अजया 14/11/2014 - 17:04
पूर्विच्या पाटकरांच्या अावाज दिवाळी अंकात छान विनोदी कथा असत. वसंत सबनिसांच्या कथा ,वि अा बुवांच्या कथा प्रथम अावाजमध्येच वाचलेल्या.हल्लीचा अावाज अाणि डुप्लीकेट अावाज यातल्या विनोदाबद्दल न बोललेलेच बरे!

आदूबाळ 12/11/2014 - 16:52
धागा इंटेन्शनल विनोदाविषयी आहे असं गृहित धरतो. अनइंटेन्शनल विनोदासाठी मुक्तपीठ, मोकलाया, मोजी, सनातन प्रभात, असे बरेच ऑप्शन्स असतात.

प्रचेतस 12/11/2014 - 16:56
सुहास शिरवळकर यांची जाता..येता... आणि बरसात चांदण्यांची ह्या दोन धमाल विनोदी कादंबर्या प्रचंड आवडतात. मिरासदार, चिं. वि. जोशी, शंकर पाटील यांचे सर्वच विनोदी साहित्य आवडीचे आहे. पु. ल. देशपांडे यांचे विनोदी लेखन मात्र आवडत नाही.

In reply to by प्रचेतस

संदीप डांगे 12/11/2014 - 17:20
वल्लीशेठ कुणास काय आवडावे न आवडावे हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण बरेचदा विशिष्ट असा उल्लेख करून पु. ल. यांचे लेखन आवडत नाही असे सांगण्यामागे काय कारण असेल? फार प्रांजळपणे विचारतो आहे, गैरसमज करू नये. पण दुसरी बाजू किंवा पुल न आवडणाऱ्यांची बाजू काय असेल हा प्रश्न बरेच दिवस पडलेला आहे. तुम्ही विषय मांडला आहेच तर उत्तर द्याल का?

In reply to by संदीप डांगे

प्रचेतस 12/11/2014 - 17:32
मला मुकुंद टांकसाळे, अशोक पाटोळे, चंद्रकांत महामिने, मंगला गोडबोले यांचेही विनोदी लेखन आवडत नाही पण हे लेखक तुलनेने अदखलपात्र आहेत. तसे पु. लं चे नाही. महाराष्ट्रातील थोर लेखक ते. मला मात्र त्यांचे लेखन बाळबोध आणि काहीसे एकसुरी वाटते. मला जे वाटते तसे इतरांनाही वाटायला हवे असा माझा आग्रह नाही.

In reply to by प्रचेतस

संदीप डांगे 12/11/2014 - 19:11
उत्तराबद्दल धन्यवाद! कुणास काय आवडते ते त्याचा वैयक्तिक प्रश्न असे तर मी आधीच म्हटले आहे. फक्त ह्या दुसऱ्या दृष्टीकोनाची उत्सुकता होती. अशी एकाच वस्तूबद्दल ची वेगवेगळी मते कळल्याने जाणीवेत भर पडते आणि वाचन अजून प्रगल्भ होते. अजून दुसरा काही हेतू नव्हता ह्या प्रश्नामागे. तुम्ही "बाळबोध व एकसुरी" असे म्हटले आहे, अजून कुणी वेगळे काही मत मांडेल. ह्यातून अजून सकस व उच्च प्रतीचे काय असते ह्याची माहिती मिळत जाते. कुणी जर म्हणेल कि विनोदी लेखन म्हणजे पु ल च फक्त बाकी कोण नाही तर त्यासम मूर्खपणा दुजा नाही. वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या शैलीतून वेगवेगळ्या लेखकांनी आम्हाला हसवत राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

विजुभाऊ 12/11/2014 - 17:05
झकास धागा पुमि. आत्तापर्यन्त वाचलेल्यात सर्वात इनोदी पुस्तक म्हणजे बुधकौशिक ऋषी यानी लिहीलेले "रामरक्षा" हे.

In reply to by वॉल्टर व्हाईट

असंका 13/11/2014 - 11:42
+1 त्यात काय विनोदी आहे सांगा. आम्ही पण मग त्या विनोदांचा आस्वाद घेउ शकू...?

जेपी 12/11/2014 - 17:18
मोजी कथा,खरडफळा आणी काही मिपाकरांच्या खरडवह्या सध्या जाम हसवतात. अवांतर-काहि पुस्तके आहेत पण त्यांची नावे आठवत नाहित. फक्त वाचन आठवत. दिसल पुस्तक की पाड फडशा अस वाचतो

रंगोजी 12/11/2014 - 17:32
दिलीप प्रभावळकरांची 'गुगली' आणि 'नवी गुगली'. ८५ च्या सुमारास ते षटकार साप्ताहिकात क्रिकेटवर लेखन करीत. त्याचा संग्रह. तत्कालीन खेळाडू आणि नियामक मंडळ यांची खुसखुशीत शब्दात फिरकी घेताना वापरलेल्या कल्पनाशक्तीला दाद द्यावीच लगेल. जयवंत दळवी यांचे 'सारे प्रवासी घडीचे' - कोकणाचे, तिथल्या लोकांचे, आपापसातील भांडणांचे फार सुरेख वर्णन आहे

In reply to by रंगोजी

सौंदाळा 13/11/2014 - 16:45
एकदम हेच लिहायला आलो होतो. दिलीप प्रभावळकर : गुगली, हसगत जयवंत दळवी : सारे प्रवासी घडीचे मधु मंगेश कर्णिक : गावाकडच्या गजाली. द मा मिरासदार : मिरासदारी, भोकरवाडीच्या सगळ्या कथा

अजया 12/11/2014 - 18:30
एक लंबरी धागा! मिरासदारी ____/\____ अजरामर व्यंकुची शिकवण,,भूताचा जन्म,माझ्या बापाची पेंड! मराठी वाङमयाचा गाळीव इतिहास-पुलं,यावर तर स्वतंत्र धागा येऊन गेलाय. चिमणरावाचे च-हाट-चिंवि जोशी त्यांचं१च ओसाडवाडीचे देव,त्यातली गणपती हनुमानाची क्रिकेट मॅच! गंगाधर गाडगिळांचा बंडु तर अजरामर आहे!त्याची पत्नी स्नेहलता अाणि चावरा मुलगा जकु उर्फ जकरंद!!सर्वच कथा हहपुवा आहेत!! विंग्रजीमध्ये द वुडहाऊस_/\_ लाफ विथ लिकाॅक पण आवडतं.रस्किन बाॅण्ड कधीकधी हसवुन जातात. अजून लिहतेच पुढे!!धन्स पुस्तकमित्रा!

आत्ता एकच आठवतंय - "Surely You're Joking, Mr. Feynman!" हे भौतिकशास्त्रातल्या नोबेल पारितोषिक विजेत्या Richard Feynman ह्यांचं आत्मचरित्र आहे. ह्यात एका भन्नाट व्यक्तिमत्वाचे भन्नाट किस्से आहेत. त्यांची कथनशैली साधीसरळ आणि मस्त विनोदी आहे.

In reply to by विशाखा पाटील

बॅटमॅन 12/11/2014 - 19:36
काही असलं तरी ते पुस्तक विनोदी म्हणवत नाही.

In reply to by बॅटमॅन

रामपुरी 13/11/2014 - 01:55
अहो त्यांना एकच पुस्तक आठवलंय ते पण इंग्लिश.. तुम्ही कशाला त्यावर पाणी ओतताय

आदूबाळ 12/11/2014 - 21:38
एखाद्या भाषेतला विनोद समजला याचा अर्थ त्या भाषेची समज चांगली आहे. कारण विनोद हा त्या त्या भाषेचं, संस्कृतीचं लेणं घेऊन येतो. उदा. पुलंच्या "वीट येणं कशाला म्हणतात, ते त्या दिवशी मला समजलं" साठी "वीट येणं" हा वाक्प्रचार माहीत असायला पाहिजे. वुडहाऊसच्या "फुल मून" मधल्या "I thought for a moment of saying “My mate!”, but decided against it because it seemed to me to have too nautical a ring." या वाक्यातला विनोद समजायला आरमाराच्या इंग्रजी परिभाषेत बोटीवरच्या अधिकार्‍याला mate म्हणतात याची जाणीव हवी. मला मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषा येतात. (आमचं हिंदी म्हणजे..ह्या ह्या ह्या...) इंग्रजी विनोदी साहित्याची ओळख - वरील कारणामुळे - फार उशीरा झाली. तर हा प्रतिसाद इंग्रजीतल्या प्रचंड आवडलेल्या विनोदी पुस्तकांबद्दल आणि लेखकांबद्दल. १. वुडहाऊस पेल्हम ग्रेनविल वुडहाऊस हा लेखक इंग्रजीतल्या विनोदी लेखनाचा बादशा. जीव्ज-वूस्टर, ब्लँडिंग्ज कासल, गोल्फ-कथा असं त्याने विपुल लिहिलेलं आहे. कधीही कोणतंही पुस्तक उचलावं आणि रंगून जावं. २. सू टाउन्सेंडच्या "आद्रियन मोल" कादंबर्‍या आद्रियन मोल हा स्वतःला भारी समजतो. आपण मोठे साहित्यिक बुद्धिजीवी वगैरे आहोत असं त्याला उगाचच वाटतं. त्याच्या आसपासचे लोक मात्र त्याला पूर्णपणे ओळखून असतात. (लखू रिसबूडची इंग्रजी आवृत्ती.) ३. हिचहायकर्स गाईड टू गॅलेक्सी (सीरीज) विज्ञानकथा-कादंबर्‍यांची उडवलेली रेवडी. ४. फ्लॅशमॅन कादंबर्‍या फ्लॅशमॅन हा विक्टोरियन ब्रिटनमधला एक सैनिक असतो. तो अत्यंत भित्रट आणि पेद्रट असतो, पण घटना अश्या घडतात की त्याच्या शौर्याचा बोलबाला सगळीकडे होतो. इंग्रजीत विनोदी साहित्य लिहिणार्‍या भारतीय उपखंडातल्या लेखकांमध्ये - सिदीन वादुकूटने लिहिलेल्या "रॉबिन 'आईन्स्टाईन' वर्गीस" या कथानायकाच्या तीन कादंबर्‍या - तार्किन हॉलने लिहिलेल्या "विश पुरी" या प्रायवेट डिटेक्टिवच्या नर्मविनोदी रहस्यकथा - मोहम्मद हनीफ या पाकिस्तानी लेखकाचं "अ केस ऑफ एक्स्प्लोडिंग मँगोज" नावाचं कमाल पुस्तक. (हे नक्की वाचा अशी आवर्जून शिफारस करतो.)

In reply to by आदूबाळ

पुलंच्या "वीट येणं कशाला म्हणतात, ते त्या दिवशी मला समजलं" साठी "वीट येणं" हा वाक्प्रचार माहीत असायला पाहिजे.
आणि त्याच पुलंच्या अपूर्वाईमध्ये श्रीलंकेतल्या एका हॉस्पिटलचं सुरू असलेलं बांधकाम बघतांना, "मी तितक्यात हळूच विटा पाहून घेतल्या. हल्ली लंकेत सोन्याच्या विटा नाहीत!" हे समजायला देखील ती म्हण नेमकी आठवावी लागते. भाषिक (शब्दजन्य) विनोदाचा आस्वाद घेण्यासाठी (उदा. टिपिकल इंग्लिश ह्यूमर) मुळात ती भाषा चांगली अवगत असणं हे अतिशय आवश्यक असतं. पुलंच्या बाबतीत म्हणाल तर त्यांचं पुस्तक वाचायला घेऊन चालत्या आगगाडीच्या डब्यात ठो ठो हसून अख्खा डबा डोक्यावर घेणारे आणि त्याचबरोबर पुलंचं पुस्तक वाचताना चेहर्‍यावरची रेषाही न हलणारे असे दोन्ही प्रकारचे लोक पाहण्यात आलेले आहेत. प्राक्तन आपलं आपलं!! :) आंबा न आवडणारे लोकही जगात असतीलच की!!!

In reply to by पिवळा डांबिस

अजया 13/11/2014 - 12:11
अादुबाळ आणि पिडांकाकांशी सहमत. पुलं कोळुन प्यायलेल्यासमोर पुलं न वाचलेला माणूस समोर येण्यासारखा वैताग नाही.नकळत पुलंनी आपल्या भाषेवर त्यांचं गारुड केलंय.एखादं मुल उगाच कानफटीत मारावेसे वाटणारे कार्टे दिसतं!अमूक मनुष्य एक नंबर गटणे असतो.फुळकवणी चा प्यायल्यावर रत्नांग्रीच्या समस्त म्हैशी आपोआप आठवतात.माझ्या कामात दाताचा अण्णु गोगटे झालेले पेशंट असतात!! प्रत्येकाला आपले मत असतेच.असो!

In reply to by पिवळा डांबिस

बॅटमॅन 13/11/2014 - 12:55
आंबा न आवडणार्‍यांवर लोक इतके खार खाऊन का असतात ते कळत नाही. लहानपणी मलाही आंबा आवडत नसे, पेरू जास्त आवडायचा. असो.

In reply to by आदूबाळ

पिशी अबोली 13/11/2014 - 11:53
वुडहाऊस __/\__ निखळ विनोद.. बाकी
हिचहायकर्स गाईड टू गॅलेक्सी (सीरीज) विज्ञानकथा-कादंबर्‍यांची उडवलेली रेवडी.
हे एवढंच वाटत नाही मला.. इतकं असंबद्ध पण तरीही सुसूत्र लिहायला काय ताकद पाहिजे(असं आपलं मला वाटतं)

प्रचेतस 12/11/2014 - 22:17
सूर्यकांत खोकले यांनी चंद्रशेखर गोखले ह्यांच्या 'मी माझा' ह्या चारोळी संग्रहाचे ' मी माझा..मग माझा कुणाचा' ह्या नावाने केलेले धमाल विडंबनांचे पुस्तक संग्रही आहे. एकापेक्षा एक जबरदस्त विनोदी चारोळ्य़ा ह्या संग्रहात आहेत. सध्या हे पुस्तक आवृत्ती संपल्यामुळे मिळत नाही पण मजजवळ खुद्द कवीची स्वाक्षरी असलेले हे पुस्तक आहे.

बोबो 12/11/2014 - 23:53
रमेश मंत्री यांचे विनोदी लिखाणसुद्धा छान आहे. ते जेम्स बॉन्डचे विडंबन जनू बांडे साठी प्रसिद्ध आहेत. पण त्यांची बाकीची विनोदी पुस्तके सुद्धा मला आवडली होती.

In reply to by मुक्त विहारि

भाव्यांचं जळजळीत लिखाण वाचून मिसळीची तर्री प्याल्यासारखं वाटतं. पण त्यांचा तो "नसीमबानूने चड्डी चोरली" तो लेख मात्र अप्रतिम!!!! ;) (अधिक माहितीसाठी पिडांकाकांना मस्का लावण्याची बोली आता सुरू करीत आहोत! बोला एक हजार!!) :)

सस्नेह 13/11/2014 - 13:24
विशिष्ट लेखकांचे सर्व विनोदी लेखन आवडते. म्ह्णून पुस्तकाचे नाव न देता लेखकांची यादी दिलीय पु.ल. जयवंत दळवी गंगाधर गाडगीळ द. मा. रमेश मंत्री

In reply to by बॅटमॅन

पिशी अबोली 13/11/2014 - 15:46
एका हाताने पेरु खात आणि दुसर्‍या हातात ब्रह्मेचा लेख घेऊन वाचत गरागरा फिरणारा बॅटमॅन डोळ्यांसमोर दिसला! ;)

In reply to by पिशी अबोली

बॅटमॅन 13/11/2014 - 16:40
गरागरा फिरायला आम्ही आमच्या 'बॅट' नामक उडनपंखी खटोल्यात बसलो होतो ते सांगायचें विसरलांत बरें? नुस्तेच गरगरां फिरावयास आम्ही तें काय शक्तिमान की कवण समजलांत कायें ;)

In reply to by टवाळ कार्टा

अजया 13/11/2014 - 16:12
ज्यु.ब्रम्हे _/\_ =)) पोपा मॅडम आणि मुक्तपिठावरचे हिरव्या देशाला जाऊन आल्यावर लेख लिहिणारे यांची पण पंखी आहे मी!

असंका 13/11/2014 - 15:55
पंधरा सोळा वर्षांपूर्वी मी एक अफाट विनोदी पुस्तक वाचले होते. लेखक नक्कीच वसंत सबनीस होते. पुस्तकाचे नाव बहुतेक 'सबनिशी'. मी 'मसाप'च्या वाचनालयात हे पुस्तक घेतले वाचायला. पण मला इतकं हसणं आवरीना की शेवटी मी टेबलावरून उठून कपाटांच्या आडोशाला जाऊन वाचायला लागलो. इतकी वर्ष झाल्यामुळे त्या पुस्तकात काय होते ते काही आता आठवत नाहिये. फक्त आवाज खाली ठेवून हसण्याची माझी खटपट लक्षात आहे.... सर्वात आवडते मात्र श्री कृ कोल्हटकरांचे 'सुदाम्याचे पोहे'.

पैसा 14/11/2014 - 12:03
या अर्थाने आम्ही पक्के टवाळ! बहुतेकांची नावं इथे आलीच आहेत. आचार्य अत्रे यांचा अस्वली विनोद पण कधी कधी आवडतो. तसाच बाळकराम आणि नंतरच्या सगळ्या गंभीरपणे विनोदी साहित्य तयार करणार्‍यांचाही. गंभीर विनोदी साहित्य मराठीत समजायला सोपे जाते. मात्र इंग्रजी भाषा आणि संस्कृती याचे आकलन जसे जास्त होते तसा तो विनोद समजू लागतो. इतर बरेच इंग्रजी वाचन झाल्यानंतरच विनोदी पुस्तके वाचायला घ्यावीत.

अजया 14/11/2014 - 17:04
पूर्विच्या पाटकरांच्या अावाज दिवाळी अंकात छान विनोदी कथा असत. वसंत सबनिसांच्या कथा ,वि अा बुवांच्या कथा प्रथम अावाजमध्येच वाचलेल्या.हल्लीचा अावाज अाणि डुप्लीकेट अावाज यातल्या विनोदाबद्दल न बोललेलेच बरे!
लेखनविषय:
लेखनप्रकार
रामराम मंडळी! अात्मचरित्रांच्या धाग्याला तुम्ही दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!या भागात अापल्या अावडत्या विनोदी पुस्तकांबद्दल बोलुया. जगण्याची मजा घ्यायची असेल,ताणतणाव विसरायचे असतील तर विनोदी साहित्य वाचण्यासारखा इलाज नाही.सूचक,मार्मिक विनोद,रोजच्या जगण्यातल्या विसंगतींवर बोट ठेवुन स्मितहास्य निर्माण करणा-या विनोदापासुन पोट धरुन हसायला लावणारे विनोद अशा सर्व प्रकारचं विनोदी साहित्य विविध पुस्तकांतुन अापण वाचलं असेल.त्याबद्दल इथे लिहुया!

.....रिप रिप रिप ! !

फिझा ·

एस 12/11/2014 - 22:54
दर वेळी तितकीच अस्वस्थता जाणवली. विषय काही फार जगावेगळा नाही. मांडणी, वृत्तबंधताही खूप बंडखोर नाही, उपमा-उत्प्रेक्षाही नवीन अजिबात नाहीत. तरीही ओलेचिंब भिजलेलो असताना आडोश्याला अंगावर उडणारे पागोळ्यांचे चुकार तुषार जितके प्रकर्षाने जाणवतात आणि एक प्रकारचा वैताग आणतात तशी ही कविता, तिचे एकेक कडवे मनाला कुठेतरी टाचताहेत. पाउस आणि अंधार सोबतीला एकटी.... दाराची गंजलेली बीजागिरी... मोडकळीला आलेले घर, गंजलेली बिजागिरी, अंधाराचे भय, पावसाच्या हालअपेष्टा, आणि त्यातूनही पुढच्या क्षणाची वाट पाहण्याचा आशावाद, आणि सकाळी सगळ्या जगात उजेड पसरला तरी त्या घरात झालेला अंधार,... काय झाले असेल म्हातारीचे? कवीने काय सुचवले आहे विझलेल्या कंदिलाच्या माध्यमातून? सगळीच भयाण अस्वस्थता... छ्या: उगीच वाचली कविता...!

एस 12/11/2014 - 22:54
दर वेळी तितकीच अस्वस्थता जाणवली. विषय काही फार जगावेगळा नाही. मांडणी, वृत्तबंधताही खूप बंडखोर नाही, उपमा-उत्प्रेक्षाही नवीन अजिबात नाहीत. तरीही ओलेचिंब भिजलेलो असताना आडोश्याला अंगावर उडणारे पागोळ्यांचे चुकार तुषार जितके प्रकर्षाने जाणवतात आणि एक प्रकारचा वैताग आणतात तशी ही कविता, तिचे एकेक कडवे मनाला कुठेतरी टाचताहेत. पाउस आणि अंधार सोबतीला एकटी.... दाराची गंजलेली बीजागिरी... मोडकळीला आलेले घर, गंजलेली बिजागिरी, अंधाराचे भय, पावसाच्या हालअपेष्टा, आणि त्यातूनही पुढच्या क्षणाची वाट पाहण्याचा आशावाद, आणि सकाळी सगळ्या जगात उजेड पसरला तरी त्या घरात झालेला अंधार,... काय झाले असेल म्हातारीचे? कवीने काय सुचवले आहे विझलेल्या कंदिलाच्या माध्यमातून? सगळीच भयाण अस्वस्थता... छ्या: उगीच वाचली कविता...!
लेखनविषय:
रिप रिप रिप........ मोड़कळिला आलेले घर त्या गल्लीतले शेवटचेच, अजुनही चातक बनुन चिवटपणे उभे असलेले , कालच्या पावसाने पुन्हा एकदा झोड़पले पाऊस नेहमी सारखाच.... ..........रिप रिप रिप खिड़कीची धूसर झालेली काच आधीच तडकलेली.. आता नि:शब्द! पावसाच्या एक एक थेंबाला रस्ता दाखवत ती चिर .....कृतार्थ ! जुनाट चौकट भिजलेली... सगळंच ... ..........रिप रिप रिप पाउस आणि अंधार सोबतीला एकटी....

जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ८

मार्गी ·

चागली चालली आहे लेखमाला. प्रत्यक्ष अनुभव आणि माहिती देण्यासाठी केलेले लेखन यातला फरक नक्कीच जाणवतोय. स्वानुभवांचे लेखन केव्हाही जास्त आकर्षक असते. वाचनेही चालली आहेतच. तेव्हा प्रतिसादांची संख्येला महत्व देऊ नका. लिहीत रहा.

यशोधरा 13/11/2014 - 21:16
सगळे भाग वाचत आहे हे सांगण्यासाठी ही पोस्ट. कठीण काम आहे आणि इतक्या निस्वार्थीपणे तुम्ही सगळे हे करत आहात. खूप कौतुक तुमचे.

चागली चालली आहे लेखमाला. प्रत्यक्ष अनुभव आणि माहिती देण्यासाठी केलेले लेखन यातला फरक नक्कीच जाणवतोय. स्वानुभवांचे लेखन केव्हाही जास्त आकर्षक असते. वाचनेही चालली आहेतच. तेव्हा प्रतिसादांची संख्येला महत्व देऊ नका. लिहीत रहा.

यशोधरा 13/11/2014 - 21:16
सगळे भाग वाचत आहे हे सांगण्यासाठी ही पोस्ट. कठीण काम आहे आणि इतक्या निस्वार्थीपणे तुम्ही सगळे हे करत आहात. खूप कौतुक तुमचे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

सल्ला हवाय

बार्नी ·

रामदास 12/11/2014 - 10:44
हे सांगण्याइतका मोकळेपणा तुमच्यात आलेला आहे हे (कदाचीत) स्किझोफ्रेनियाच्या विळख्यातून बाहेर पडत असल्याचे लक्षण आहे. माझ्या परीचयातील काही व्यक्ती हाय स्ट्रेस जॉब करत आहेत. यशस्वी आहेत. (दोन्ही अर्थाने)पण तुम्ही तुमच्या डॉक्टरचा सल्ला मानावा हे योग्य असेल. खाजगी क्षेत्रातही लो स्ट्रेस जॉब असतात. मिपावर लिहीणे हा एक स्ट्रेसबस्टर आहेच.

In reply to by रामदास

सरकारी नोकरी ही बिन-स्ट्रेसची आणि खाजगी क्षेत्रातली नोकरी स्ट्रेसफुल असं सरसकटीकरण नाही करता येत. स्ट्रेस हा तुमच्या कामाच्या स्वरूपावर आणि पदावर अवलंबून असतो. त्यामुळे रामदासांशी सहमत पण,
मिपावर लिहीणे हा एक स्ट्रेसबस्टर आहेच.
हे शीक्रेट फोडल्याबद्दल स्वामींचा निषेध!!! :)

"असा फार महत्वाचा आणि जीवनावर दीर्घकालीन परिणाम करणारा सल्ला मिपाच नव्हे तर इतरही कोणत्या संस्थळावरून घेऊ नका." हा सल्ला देत आहे. विषेशतः आरोग्याबद्दल आणि व्यवसायाबद्दल... खासकरून काही विशेष समस्या आहेत अश्या परिस्थितीत... कोणतीही तज्ञ व्यक्ती खोलवर माहिती काढून घेतल्याशिवाय सल्ला देणार नाही. जर सखोल माहितीशिवाय ठाम सल्ला देणारी व्यक्ती सापडली तर ती व्यक्ती नक्कीच तज्ञ नाही आणि तिचा सल्ला व्यवहारात आणण्यास धोका आहे असे समजावे. अर्थात "आपल्या समस्यांबद्दल मिपामित्रांशी मोकळेपणाने चर्चा करायला" आणि "योग्य तज्ञांपर्यंत पोहोचण्यासाठी काही संकेत मिळण्यासाठी" मिपा उत्तम संस्थळ आहे हे इथल्या पूर्वीच्या काही चर्चांवरून खात्रीने सांगू शकतो. तुमच्या आरोग्यपूर्ण सुखकारक व्यावसायिक यशासाठी शुभेच्छा !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बार्नी 13/11/2014 - 09:54
सल्ल्याबद्दल आभारी आहे. बाहेरच्या जगात कुणाला असा सल्ला विचारता येत नाही, लोक संशयाने बघतात . मिपावार एनॉनिमस राहण्याची सोय असल्याने विचारण्याचे धाडस केले , अंतिम निर्णय डॉक्टरांच्या व घरच्यांशी सल्लामसलत करुन घेइन. त्यामुळे काळजी नसावी.

विटेकर 12/11/2014 - 10:54
मानसिक ताण हा आपल्या मनातच असतो , त्याचा बाहेरच्या परिस्थितीशी तसा फारसा संबंध असतोच असे नाही. सुख, दु:ख याप्रमाणे ताण ही देखील मनाचीच एक अवस्था आहे. तुम्ही आता बरे झालेले आहात / पूर्ण बरे होण्याच्या वाटेवर आहात.( अर्थात यामधे तुमच्या डो़क्टरांचा शब्द अंतिम !) आवडीचे क्षेत्र असेल तर ताण ही वाट्णार नाही. तेव्हा निन्धास्त रहा आणि स्वामी चिन्मयानंद म्हणतात तसे - Carry your own environment with you !! तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळावी म्हणून हार्दिक शुभेच्छा ! आणि यशस्वी झाल्यावर तुमचे अनुभव इथे मांडायला विसरु नका.

कवितानागेश 12/11/2014 - 10:58
तुम्ही याबद्दल Institute For Psychological Health किंवा अजून तशाच कुठल्या संस्थेकडून नीट सल्ला घेतलात तर जास्त योग्य होईल. मनोरुग्ण असले तरी प्रत्येकाची ताण घेण्याची ताकद वेगवेगळी असू शकते. तुम्ही काय काय काम करु शकता हे तुम्हाला नीट तपासूनच सायकेअट्रिस्त सांगू शकतील. तुम्ही बीटेक पूर्ण केले आहे, तर तुमची मानसिक स्थिती नक्कीच चांगली आहे. आणि कदाचित सुधारूही शकेल. माझ्याही बघण्यात स्किझोफ्रेनिक असलेले पण व्यवस्थित काम करणारे लोक आहेत. त्यांना फार क्वचित औषधे घ्यायची वेळ येते. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.

hitesh 12/11/2014 - 14:03
मानसिक आजार असुनही करियर शक्य आहे. किंबहुना करियए करताना मिळणारा आर्थिक सपोर्ट व आनंद यातुन तुमच्या आजाराविरुद्ध लढण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास मिळेल. माझा एक एम बी बी एस मित्र स्प्लिट पर्सनॅलिटीचा शिकार होता. कॉलेजचे पहिलेच वर्ष झाले आणि व्याधीमुळे त्याने कॉलेज सोडले. उपचारात ११ वर्षे निघुन गेली. त्यानंतर त्याने उरलेले शिक्षण पुर्ण केले. सध्या करियर लग्न करुन व्यवस्थित आहे.

आदूबाळ 12/11/2014 - 15:46
बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये न्यूरोडायवर्सिटी असली तरी समान संधी दिल्या जातात. इतकंच नव्हे तर सहकार्‍यांना न्यूरोडायवर्स व्यक्तींशी कसं वागायचं याचं प्रशिक्षण दिलं जातं. अ‍ॅस्पर्जर सिंड्रोम असलेल्या व्यक्तीबरोबर मी नेहेमी काम करतो. मुद्दा हा आहे, की संधी असतात. ती तुम्ही घ्यायची की नाही हा अर्थातच तुमचा निर्णय आहे - आणि त्यासाठी लीमाऊजेट यांचा सल्ला अत्यंत योग्य वाटतो.

प्रसाद१९७१ 12/11/2014 - 16:01
सरकारी नोकरीत ताण तणाव नसतात हा गैर समज आहे. तुम्ही COEP मधुन शिकला आहात. तुम्ही काही सरकारी कारकुन नक्कीच होणार नाही. म्हणजे सरकारी नोकरी मिळवली तरी ती जबाबदारीचीच असेल. Class 1 सरकारी नोकरी फार अवघड आहे. त्यातील ताण तणाव खाजगी नोकरी पेक्षा जास्त असतात. १२-१४ तास काम असते आणि लायकी नसलेल्या राजकीय गुंडांकडुन अपमान सहन करायला लागलो. तसेच आपली मुल्ये जपण्याचा पण मानसिक त्रास असतो.

बोका-ए-आझम 13/11/2014 - 00:34
आधीच्या सर्व प्रतिक्रियांशी सहमत. एका अत्यंत गंभीर समस्येला तोंड देऊन त्यातून बाहेर येणं ही एक असामान्य गोष्ट आहे. भल्याभल्यांना ते जमत नाही. आपण ते केले आहे. याचा अर्थ आपण लढाऊ आहात आणि कठीण परिस्थितीला सामोरे जाऊ शकता. स्वतःच्या मनाएवढं अाव्हान जगात दुसरं कुणीच तुम्हाला देऊ शकणार नाही. तुम्ही जर त्याचा मुकाबला केलेला आहे, तर बाकीच्या गोष्टीही सहज करु शकाल. ज्या अंत:प्रेरणेने तुम्ही इथे लिहायला सुरुवात केली तीच प्रेरणा तुम्हाला योग्य सल्ला देईल. थोडक्यात, जे तुम्हाला योग्य वाटतं, मनापासून करावंसं वाटतं, जे करताना आनंद मिळतो ते करा! मनापासून शुभेच्छा!

रामदास, इ.ए., लीमाउजेट, विटेकर, बोका-ए-आझम आणि प्रसाद१९७१ यांनी योग्य ते मार्गदर्शन केले आहेच. तरीपण जमल्यास, ए ब्युटीफूल माइंड, हा सिनेमा जरूर बघा. बिंधास्त र्‍हावा...मजेत आयुष्य जगा...

In reply to by खटपट्या

ते तर आहेच... लवकरच आम्ही "संसारसुखाचे मुलमंत्र" हा ग्रंथ प्रकाशीत करणार आहोत.त्यातलेच एक कवन.... जो करी ठराविक अंतारने कट्टे त्याच्या करीयरला न लागे बट्टे क्ठले पेय ते महत्वाचे नसे तसेच कुठलेही खाद्य काया-वाचा अन मनाने कट्टा करावा आणि तो मित्रांच्या संगतीत उपभोगावा कूठलाही विषय वर्ज्य नसावा राजकारण आणि जातीभेदास मात्र थारा नसावा.

In reply to by मुक्त विहारि

सूड 13/11/2014 - 16:48
मूलमंत्र वैगरे पेक्षा वर्णसठीची कहाणी, संपत शन्वाराची कहाणी च्या चालीवर मध्यवर्ती कट्ट्यांची कहाणी छापा...ऐकावी कट्टेकर्‍यांनो तुमची कहाणीवर सुरु करुन साठा उत्तराची पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण करा. लोक भाविक आहेत, फेमस होईल कहाणी. ;)

In reply to by मुक्त विहारि

सूड 13/11/2014 - 16:48
मूलमंत्र वैगरे पेक्षा वर्णसठीची कहाणी, संपत शन्वाराची कहाणी च्या चालीवर मध्यवर्ती कट्ट्यांची कहाणी छापा...ऐकावी कट्टेकर्‍यांनो तुमची कहाणीवर सुरु करुन साठा उत्तराची पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण करा. लोक भाविक आहेत, फेमस होईल कहाणी. ;)

In reply to by मुक्त विहारि

बार्नी 13/11/2014 - 10:04
सिनेमा बघितला आहे. त्यात schizophrenia ला खूपच जास्त रोमांटिसाइस करून दाखविले आहे , John Nash चे वैयक्तिक जीवन बरेच वेगळे होते, तरी पण उत्तम सिनमा. आमच्यासारख्या लोकांसाठी हा माणूस प्रेरणा आहे.

सुबोध खरे 13/11/2014 - 09:29
अनाहूत /आगाऊ सल्ला बार्नी साहेब, सरकारी नोकरीत तणाव कमी असतो असे नाही परंतु एक गोष्ट वस्तुस्थिती आहे कि प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्या कामा वर कितीही परिणाम झाला तरी आपल्याला नोकरीवरून काढून टाकले जात नाही. शिवाय आपण जोवर वैद्यकीय रजेवर आहात किंवा रुग्णालयात भरती आहात तोवर आपल पगार चालू राहतो. खाजगी नोकरीत तुम्हाला नवनिर्मिती ला जास्त वाव असेल किंवा तेथे पगारही जास्त मिळेल परंतु सरकारी नोकरीत ६ व्या वेतन आयोगानंतर पगार सुरुवातीला तरी खाजगी आस्थापनापेक्षा जास्त आहेत. आपल्या नोकरीपुर्वी होणार्या वैद्यकीय चाचणीत आपल्याला बर्याच वेळेस आपल्या पूर्वीच्या आजारांबाबत माहिती विचारली जाते/ प्रतिज्ञापत्र (DECLARATION) द्यावे लागते. आपण आपल्याला स्किझोफ्रेनिया आहे हे लिहून दिल्यावर खाजगी आस्थापने आपल्याला नोकरी देण्यापूर्वी दोन वेळा विचार करतील हि वस्तुस्थिती आहे (निदान सुरुवातीला तरी.)अर्थात असे काही नाही हे आपण लिहून दिलेत तर गोष्ट वेगळी. आणखी एक सुचवू इच्छितो. आपण जी नोकरी शोधाल ती आपल्या घराच्या जवळ( एकाच शहरात) असेल असे पहा कारण आपला आजाराचा पुनरुदभव होण्याची थोडीशी शक्यता असते आणी हि गोष्ट कुटुंबातील व्यक्तीच्या फार लवकर लक्षात येते. त्यामुळे आपला इलाज सुद्धा लवकर होतो आणी त्यामुळे आजार लगेचच बरा होऊ शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा कि हा आजार परत उद्भवतो आहे हे तो व्यक्ती स्वतः सांगू शकत नाही त्यामुळे मन खंबीर ठेवा इ. गोष्टीनी आपला आजार आटोक्यात येणार नाही. तेंव्हा आपल्याला आपल्या जवळच्या सख्ख्या नातेवाईकांच्या सान्निध्यात राहणे हे जास्त श्रेयस्कर आहे. बाकी प्रत्यक्ष कोणती नोकरी करावी/ स्वीकारावी हे आपण आपल्या मनोविकार तज्ञांच्या सल्ल्यानेच ठरवावे. एक गोष्ट मी आपणास सुचवू इच्छितो कि स्किझोफ्रेनिया हा आजार आहे म्हणून आपल्याला कोणतीही उंची गाठायला कोणताही अडथळा येणार नाही.माझ्या माहीतीतील( मला ३ वर्षे वरिष्ठ) असलेला डॉक्टर याच आजारातून बरा होऊन आज दक्षिणेतील मोठ्या शहरात प्रथितयश मनोविकार तज्ञ म्हणून नाव कमावून आहे. आपल्याला आपल्या जीवनक्षेत्र / व्यवसायात(करियरला प्रतिशब्द सापडत नाही) यश लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.

रामदास 12/11/2014 - 10:44
हे सांगण्याइतका मोकळेपणा तुमच्यात आलेला आहे हे (कदाचीत) स्किझोफ्रेनियाच्या विळख्यातून बाहेर पडत असल्याचे लक्षण आहे. माझ्या परीचयातील काही व्यक्ती हाय स्ट्रेस जॉब करत आहेत. यशस्वी आहेत. (दोन्ही अर्थाने)पण तुम्ही तुमच्या डॉक्टरचा सल्ला मानावा हे योग्य असेल. खाजगी क्षेत्रातही लो स्ट्रेस जॉब असतात. मिपावर लिहीणे हा एक स्ट्रेसबस्टर आहेच.

In reply to by रामदास

सरकारी नोकरी ही बिन-स्ट्रेसची आणि खाजगी क्षेत्रातली नोकरी स्ट्रेसफुल असं सरसकटीकरण नाही करता येत. स्ट्रेस हा तुमच्या कामाच्या स्वरूपावर आणि पदावर अवलंबून असतो. त्यामुळे रामदासांशी सहमत पण,
मिपावर लिहीणे हा एक स्ट्रेसबस्टर आहेच.
हे शीक्रेट फोडल्याबद्दल स्वामींचा निषेध!!! :)

"असा फार महत्वाचा आणि जीवनावर दीर्घकालीन परिणाम करणारा सल्ला मिपाच नव्हे तर इतरही कोणत्या संस्थळावरून घेऊ नका." हा सल्ला देत आहे. विषेशतः आरोग्याबद्दल आणि व्यवसायाबद्दल... खासकरून काही विशेष समस्या आहेत अश्या परिस्थितीत... कोणतीही तज्ञ व्यक्ती खोलवर माहिती काढून घेतल्याशिवाय सल्ला देणार नाही. जर सखोल माहितीशिवाय ठाम सल्ला देणारी व्यक्ती सापडली तर ती व्यक्ती नक्कीच तज्ञ नाही आणि तिचा सल्ला व्यवहारात आणण्यास धोका आहे असे समजावे. अर्थात "आपल्या समस्यांबद्दल मिपामित्रांशी मोकळेपणाने चर्चा करायला" आणि "योग्य तज्ञांपर्यंत पोहोचण्यासाठी काही संकेत मिळण्यासाठी" मिपा उत्तम संस्थळ आहे हे इथल्या पूर्वीच्या काही चर्चांवरून खात्रीने सांगू शकतो. तुमच्या आरोग्यपूर्ण सुखकारक व्यावसायिक यशासाठी शुभेच्छा !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बार्नी 13/11/2014 - 09:54
सल्ल्याबद्दल आभारी आहे. बाहेरच्या जगात कुणाला असा सल्ला विचारता येत नाही, लोक संशयाने बघतात . मिपावार एनॉनिमस राहण्याची सोय असल्याने विचारण्याचे धाडस केले , अंतिम निर्णय डॉक्टरांच्या व घरच्यांशी सल्लामसलत करुन घेइन. त्यामुळे काळजी नसावी.

विटेकर 12/11/2014 - 10:54
मानसिक ताण हा आपल्या मनातच असतो , त्याचा बाहेरच्या परिस्थितीशी तसा फारसा संबंध असतोच असे नाही. सुख, दु:ख याप्रमाणे ताण ही देखील मनाचीच एक अवस्था आहे. तुम्ही आता बरे झालेले आहात / पूर्ण बरे होण्याच्या वाटेवर आहात.( अर्थात यामधे तुमच्या डो़क्टरांचा शब्द अंतिम !) आवडीचे क्षेत्र असेल तर ताण ही वाट्णार नाही. तेव्हा निन्धास्त रहा आणि स्वामी चिन्मयानंद म्हणतात तसे - Carry your own environment with you !! तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळावी म्हणून हार्दिक शुभेच्छा ! आणि यशस्वी झाल्यावर तुमचे अनुभव इथे मांडायला विसरु नका.

कवितानागेश 12/11/2014 - 10:58
तुम्ही याबद्दल Institute For Psychological Health किंवा अजून तशाच कुठल्या संस्थेकडून नीट सल्ला घेतलात तर जास्त योग्य होईल. मनोरुग्ण असले तरी प्रत्येकाची ताण घेण्याची ताकद वेगवेगळी असू शकते. तुम्ही काय काय काम करु शकता हे तुम्हाला नीट तपासूनच सायकेअट्रिस्त सांगू शकतील. तुम्ही बीटेक पूर्ण केले आहे, तर तुमची मानसिक स्थिती नक्कीच चांगली आहे. आणि कदाचित सुधारूही शकेल. माझ्याही बघण्यात स्किझोफ्रेनिक असलेले पण व्यवस्थित काम करणारे लोक आहेत. त्यांना फार क्वचित औषधे घ्यायची वेळ येते. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.

hitesh 12/11/2014 - 14:03
मानसिक आजार असुनही करियर शक्य आहे. किंबहुना करियए करताना मिळणारा आर्थिक सपोर्ट व आनंद यातुन तुमच्या आजाराविरुद्ध लढण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास मिळेल. माझा एक एम बी बी एस मित्र स्प्लिट पर्सनॅलिटीचा शिकार होता. कॉलेजचे पहिलेच वर्ष झाले आणि व्याधीमुळे त्याने कॉलेज सोडले. उपचारात ११ वर्षे निघुन गेली. त्यानंतर त्याने उरलेले शिक्षण पुर्ण केले. सध्या करियर लग्न करुन व्यवस्थित आहे.

आदूबाळ 12/11/2014 - 15:46
बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये न्यूरोडायवर्सिटी असली तरी समान संधी दिल्या जातात. इतकंच नव्हे तर सहकार्‍यांना न्यूरोडायवर्स व्यक्तींशी कसं वागायचं याचं प्रशिक्षण दिलं जातं. अ‍ॅस्पर्जर सिंड्रोम असलेल्या व्यक्तीबरोबर मी नेहेमी काम करतो. मुद्दा हा आहे, की संधी असतात. ती तुम्ही घ्यायची की नाही हा अर्थातच तुमचा निर्णय आहे - आणि त्यासाठी लीमाऊजेट यांचा सल्ला अत्यंत योग्य वाटतो.

प्रसाद१९७१ 12/11/2014 - 16:01
सरकारी नोकरीत ताण तणाव नसतात हा गैर समज आहे. तुम्ही COEP मधुन शिकला आहात. तुम्ही काही सरकारी कारकुन नक्कीच होणार नाही. म्हणजे सरकारी नोकरी मिळवली तरी ती जबाबदारीचीच असेल. Class 1 सरकारी नोकरी फार अवघड आहे. त्यातील ताण तणाव खाजगी नोकरी पेक्षा जास्त असतात. १२-१४ तास काम असते आणि लायकी नसलेल्या राजकीय गुंडांकडुन अपमान सहन करायला लागलो. तसेच आपली मुल्ये जपण्याचा पण मानसिक त्रास असतो.

बोका-ए-आझम 13/11/2014 - 00:34
आधीच्या सर्व प्रतिक्रियांशी सहमत. एका अत्यंत गंभीर समस्येला तोंड देऊन त्यातून बाहेर येणं ही एक असामान्य गोष्ट आहे. भल्याभल्यांना ते जमत नाही. आपण ते केले आहे. याचा अर्थ आपण लढाऊ आहात आणि कठीण परिस्थितीला सामोरे जाऊ शकता. स्वतःच्या मनाएवढं अाव्हान जगात दुसरं कुणीच तुम्हाला देऊ शकणार नाही. तुम्ही जर त्याचा मुकाबला केलेला आहे, तर बाकीच्या गोष्टीही सहज करु शकाल. ज्या अंत:प्रेरणेने तुम्ही इथे लिहायला सुरुवात केली तीच प्रेरणा तुम्हाला योग्य सल्ला देईल. थोडक्यात, जे तुम्हाला योग्य वाटतं, मनापासून करावंसं वाटतं, जे करताना आनंद मिळतो ते करा! मनापासून शुभेच्छा!

रामदास, इ.ए., लीमाउजेट, विटेकर, बोका-ए-आझम आणि प्रसाद१९७१ यांनी योग्य ते मार्गदर्शन केले आहेच. तरीपण जमल्यास, ए ब्युटीफूल माइंड, हा सिनेमा जरूर बघा. बिंधास्त र्‍हावा...मजेत आयुष्य जगा...

In reply to by खटपट्या

ते तर आहेच... लवकरच आम्ही "संसारसुखाचे मुलमंत्र" हा ग्रंथ प्रकाशीत करणार आहोत.त्यातलेच एक कवन.... जो करी ठराविक अंतारने कट्टे त्याच्या करीयरला न लागे बट्टे क्ठले पेय ते महत्वाचे नसे तसेच कुठलेही खाद्य काया-वाचा अन मनाने कट्टा करावा आणि तो मित्रांच्या संगतीत उपभोगावा कूठलाही विषय वर्ज्य नसावा राजकारण आणि जातीभेदास मात्र थारा नसावा.

In reply to by मुक्त विहारि

सूड 13/11/2014 - 16:48
मूलमंत्र वैगरे पेक्षा वर्णसठीची कहाणी, संपत शन्वाराची कहाणी च्या चालीवर मध्यवर्ती कट्ट्यांची कहाणी छापा...ऐकावी कट्टेकर्‍यांनो तुमची कहाणीवर सुरु करुन साठा उत्तराची पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण करा. लोक भाविक आहेत, फेमस होईल कहाणी. ;)

In reply to by मुक्त विहारि

सूड 13/11/2014 - 16:48
मूलमंत्र वैगरे पेक्षा वर्णसठीची कहाणी, संपत शन्वाराची कहाणी च्या चालीवर मध्यवर्ती कट्ट्यांची कहाणी छापा...ऐकावी कट्टेकर्‍यांनो तुमची कहाणीवर सुरु करुन साठा उत्तराची पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण करा. लोक भाविक आहेत, फेमस होईल कहाणी. ;)

In reply to by मुक्त विहारि

बार्नी 13/11/2014 - 10:04
सिनेमा बघितला आहे. त्यात schizophrenia ला खूपच जास्त रोमांटिसाइस करून दाखविले आहे , John Nash चे वैयक्तिक जीवन बरेच वेगळे होते, तरी पण उत्तम सिनमा. आमच्यासारख्या लोकांसाठी हा माणूस प्रेरणा आहे.

सुबोध खरे 13/11/2014 - 09:29
अनाहूत /आगाऊ सल्ला बार्नी साहेब, सरकारी नोकरीत तणाव कमी असतो असे नाही परंतु एक गोष्ट वस्तुस्थिती आहे कि प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्या कामा वर कितीही परिणाम झाला तरी आपल्याला नोकरीवरून काढून टाकले जात नाही. शिवाय आपण जोवर वैद्यकीय रजेवर आहात किंवा रुग्णालयात भरती आहात तोवर आपल पगार चालू राहतो. खाजगी नोकरीत तुम्हाला नवनिर्मिती ला जास्त वाव असेल किंवा तेथे पगारही जास्त मिळेल परंतु सरकारी नोकरीत ६ व्या वेतन आयोगानंतर पगार सुरुवातीला तरी खाजगी आस्थापनापेक्षा जास्त आहेत. आपल्या नोकरीपुर्वी होणार्या वैद्यकीय चाचणीत आपल्याला बर्याच वेळेस आपल्या पूर्वीच्या आजारांबाबत माहिती विचारली जाते/ प्रतिज्ञापत्र (DECLARATION) द्यावे लागते. आपण आपल्याला स्किझोफ्रेनिया आहे हे लिहून दिल्यावर खाजगी आस्थापने आपल्याला नोकरी देण्यापूर्वी दोन वेळा विचार करतील हि वस्तुस्थिती आहे (निदान सुरुवातीला तरी.)अर्थात असे काही नाही हे आपण लिहून दिलेत तर गोष्ट वेगळी. आणखी एक सुचवू इच्छितो. आपण जी नोकरी शोधाल ती आपल्या घराच्या जवळ( एकाच शहरात) असेल असे पहा कारण आपला आजाराचा पुनरुदभव होण्याची थोडीशी शक्यता असते आणी हि गोष्ट कुटुंबातील व्यक्तीच्या फार लवकर लक्षात येते. त्यामुळे आपला इलाज सुद्धा लवकर होतो आणी त्यामुळे आजार लगेचच बरा होऊ शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा कि हा आजार परत उद्भवतो आहे हे तो व्यक्ती स्वतः सांगू शकत नाही त्यामुळे मन खंबीर ठेवा इ. गोष्टीनी आपला आजार आटोक्यात येणार नाही. तेंव्हा आपल्याला आपल्या जवळच्या सख्ख्या नातेवाईकांच्या सान्निध्यात राहणे हे जास्त श्रेयस्कर आहे. बाकी प्रत्यक्ष कोणती नोकरी करावी/ स्वीकारावी हे आपण आपल्या मनोविकार तज्ञांच्या सल्ल्यानेच ठरवावे. एक गोष्ट मी आपणास सुचवू इच्छितो कि स्किझोफ्रेनिया हा आजार आहे म्हणून आपल्याला कोणतीही उंची गाठायला कोणताही अडथळा येणार नाही.माझ्या माहीतीतील( मला ३ वर्षे वरिष्ठ) असलेला डॉक्टर याच आजारातून बरा होऊन आज दक्षिणेतील मोठ्या शहरात प्रथितयश मनोविकार तज्ञ म्हणून नाव कमावून आहे. आपल्याला आपल्या जीवनक्षेत्र / व्यवसायात(करियरला प्रतिशब्द सापडत नाही) यश लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.
नमस्कार, मी गेल्या वर्षी सी ओ ई पी महाविद्यालयातून बी टेक पूर्ण केले असून , सध्या एका मेक कंपनी मधे काम करत आहे. पुढे एम बी ए (mostly IIMs) करुन फायनान्स मधे नोकरी करण्याचा विचार आहे. परंतु मी बारावीत असताना मला स्किझोफ्रेनिया असल्याचे निदान झाले होते. mba करुन खाजगी नोकरी करण्याएवजी सरकारी नोकरी (low stress environment ) करावी असे माझ्या डॉक्टर चे म्हणणे आहे. पण सरकारी नोकरी मधे मला रस वाटत नाही. टेक्निकल फिल्ड मधे जास्त आवड नसल्याने लेक्चरर होण्यातही रस नाही. मानसिक आजार असून खाजगी नोकरी करणे शक्य आहे का ?