मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ६

मार्गी ·

बोका-ए-आझम 11/11/2014 - 00:04
काश्मिरी पंडितांबद्दल वाचून ज्यूंमध्ये आणि त्यांच्यामध्ये असलेलं साधर्म्य जाणवलं.दोन्हीही अल्पसंख्याक ' एलिट ', दोघांविषयी बहुसंख्यांच्या मनात तसाच असंतोष अाणि त्यामुळे दोघांचीही तशीच फरफट. चांगली गोष्ट ही की चिवटपणा आणि झुंजार वृत्ती हेही या दोघांमधलं साम्य आहे.

बोका-ए-आझम 11/11/2014 - 00:04
काश्मिरी पंडितांबद्दल वाचून ज्यूंमध्ये आणि त्यांच्यामध्ये असलेलं साधर्म्य जाणवलं.दोन्हीही अल्पसंख्याक ' एलिट ', दोघांविषयी बहुसंख्यांच्या मनात तसाच असंतोष अाणि त्यामुळे दोघांचीही तशीच फरफट. चांगली गोष्ट ही की चिवटपणा आणि झुंजार वृत्ती हेही या दोघांमधलं साम्य आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- १ जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- २ जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ३ जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ४ जम्मू कश्मीर मदतकार्य अनुभव- ५ सर्व वाचकांना धन्यवाद! आपत्तीचे वेगवेगळे पैलू ९ ऑक्टोबरची सकाळ. काल रात्री झालेली चर्चा अजूनही ताजी आहे. दादाजींनी कालच्या मीटिंगमध्ये हेसुद्धा सांगितलं होतं की आज सकाळी एका ठिकाणी जायचं आहे.

९ नोव्हेंबर १९८९ - शेवटाच्या सुरवातीची पंचविशी!

विकास ·

बोका-ए-आझम 10/11/2014 - 23:29
अजूनही डाव्या पक्षांच्या रुपात त्यांचे शहामृगी वारसदार शिल्लक आहेत आणि ' इकाॅनाॅमिक अँड पोलिटिकल वीकली' सारखी त्यांची मुखपत्रं पण आहेत.

अर्धवटराव 10/11/2014 - 23:52
काँग्रेसेतर राजकारणाचं अवकाश समाजवाद्यांना/डाव्यांना व्यापणं शक्य होतं, किंबहुना समाजवाद हा त्याकाळी सर्वात सशक्त आणि स्वाभावीक पर्याय बनु शकला असता हे खरं आहे. पण पोथिनीष्ठा, मग ति धार्मीक असो वा राजकीय, नेहमीच घातक असते हे डाव्यांच्या लक्षातच आलं नाहि. मार्क्स म्हणजे गांधी/आंबेडकर नव्हे आणि व्होल्गा गंगेपेक्षा भिन्न आहे हे डाव्यांना ओळखताच आलं नाहि. युरोपात, रशीयात नेहमी रक्ताने सत्तांतरे घडली पण भारतात अहिंसक चळवळीने प्रचंड प्रभाव पाडला. अशा भारतात समाजवाद रूजवायचा तर त्याचे प्रथम भारतीयकरण व्हायला हवं होतं. विचारवंतांची संत-महात्म्यांची मोठी परंपरा लाभलेल्या बंगालला देखील हे जमलं कसं नाहि याचं आश्चर्य वाटतं. हि मुळात समाजवादाचीच मर्यादा होती/आहे काय न कळे. पण स्वातंत्रोत्तर काळात भारतात भांडवलदार, जमीनदार, शेतकरी, कामगार, धर्ममार्तंड, मागासजाती या सर्वांत जे प्रचंड सामाजीक अभिसरण झालं त्यात समाजवादाने त्याची भुमीका उत्तम निभवली असं वाटतं (पाकिस्तानात हे होऊ शकलं नाहि). नुकतच वाचण्यात आलं कि मुलायमसिंग पुर्वाश्रमीच्या समाजवाद्यांना एकत्र आणायच्या प्रयत्नात आहेत. अर्थात, हि केवळ राजकीय सोय म्हणुन. त्यांच्या प्रयत्नांना किती यश मिळतं बघायचं.

ऋषिकेश 11/11/2014 - 16:29
लेखाच्या मथळ्यावरून आणि पहिल्या परिच्छेदावरून वेगळ्याच लेव्हलचा नी स्कोपचा लेख असेल असे वाटले होते. त्यामुळे सरसावून बसलो - लेख वाचायला वेगळाअ वेळ काढून बसलो. नी काय हे! :( एकुणच साम्यवादाच्या अस्ताचे भारतीय समाजात उमटलेले पडसाद आणि परिणाम इतक्या सहज नी त्रोटकपणे उडवून लावण्यासारखे नाहीत. माझ्या या लेखाकडून असलेल्या अपेक्षेमुळे, हा लेख आवडला नाही. भारतीय समाजात पुर्वजर्मनीत असणार्‍या साम्यवादाने किंवा लेनिनवादाने किंवा अगदी माओवादाने कधीच म्हणावे असे मूळ धरलेले नाही. त्यांचा विजयच झाला नव्हता तर आता ते हरले वगैरे म्हणणे कल्पनाविलास झाला. मात्र समाजवादाच्या खुणा बर्‍याच खोलवर उमटलेल्या आहेत. कोणत्याही पक्षाने अगदी भाजपानेही "अंत्योदय" वगैरेंच्या माध्यमांतून त्या विचारधारेला अव्हेरलेले नाही. भारतीय घटना आणि भारतातील अनेक (किंबहुना बहुतांश) कायदे अजूनही समाजवादाच्याच अंगाने जातात. असो.

@विकास राव - लेख अपेक्षांवर नाही उतरला . समाजवादी लोकांचे अधपतन यावर चर्चा होणे आवश्यक आहे . पण गेल्या २ दशकात भाजपाचे झाले ले 'काँग्रेसी' कारण (भ्रष्टाचारी लोकाना पाठीशी घालणे , गुन्हेगारी 'बिभीषण' पावन करून घेणे ई .) पण ऐरणीवर आले पाहिजे . कॉंग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून गुणात्मक रित्या त्यांच्यात काहीच फरक नाही अस वाटणारा पण वर्ग मोठ्या प्रमाणावर उदयाला येत आहे याची पण नोंद घ्यावी लागेल . त्यामुळे चर्चा व्यापक होण्यासाठी हा मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे . बाकी डावी विचारसरणी भारतात तितकी प्रबळ नव्हती हे लक्षात घ्यायला हवे . आणि हा जर समाजवादी विचारसरणीचा शेवटाची सुरुवात होती तर २५ पैकी १५ वर्ष कॉंग्रेस सत्तेवर कशी होती ? याला सोनिया गांधी यांच्यावर असणारया स्वयंसेवी संस्थेच्या प्रभावाचा संदर्भ आहे . आणि कुठलीही विचारसरणी काही निवडणुकांच्या पराभवानंतर संपत नाही हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही

विकास 13/11/2014 - 01:28
मिपावर हवे तसे गेल्या दोन दिवसात येऊ न शकल्याने उत्तर देण्यास वेळ लागत आहे त्याबद्दल क्षमस्व! वर प्रतिसादांमध्ये आलेल्या मुद्यांना खाली उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो: एक समान मुद्दा: त्रोटकपणा... आक्षेप मान्यच. पण ते जाणून बुजून होते. कदाचीत म्हणूनच गणेशांना आणि अर्धवटरावांना काय म्हणायचे आहे ते समजले असावे असे वाटते... (नेहमीप्रमाणे) स्वतःच सगळे लिहून चर्चा करण्याऐवजी नवीन मुद्दे चर्चेत यावेत अशी अपेक्षा होती. त्या व्यतिरीक्त समाजवाद्यांना (शाब्दीक) निव्वळ झोडपणे हा उद्देश नव्हता (जरी ते एक बायप्रॉडक्ट असणार असले तरी. ;) ). @ऋषिकेश: एकुणच साम्यवादाच्या अस्ताचे भारतीय समाजात उमटलेले पडसाद आणि परिणाम इतक्या सहज नी त्रोटकपणे उडवून लावण्यासारखे नाहीत. लेखाचा उद्देश सरळ होता... ९ नोव्हेंबर १९८९ ही जागतीक स्तरावर कम्युनिजम / साम्यवादाच्या शेवटाची सुरवात होती हे कायम म्हणले जाते. पण एका अर्थाने भारतापुरते बोलायचे झाले तर, रामजन्मभूमी शिलान्यासाच्या निमित्ताने ती समाजवादी विचारसरणीची आणि त्यातून निघालेल्या स्युडोसेक्यूलर नामक भुताच्या शेवटाची सुरवात होती. मात्र, याकडे एकंदरीतच माध्यमांनी आणि विचारवंतांनी विशेष करून या वेळच्या (देश आणि राज्य) निवडणुकांच्या निकालांनंतर दुर्लक्ष केले असे वाटते. थोडक्यात भारतीय घटनांपुरते बोलताना साम्यवाद हा मुद्दा नव्हता तर साम्यवादाचे आकर्षण असलेला समाजवादी हा मुद्दा होता. काँग्रेस आणि काँग्रेसमधून बाहेर पडून तयार झालेले अनेक आदर्श समाजवादी होऊन गेले. पण दुर्दैवाने त्यांच्या काळात त्यांना सत्तेवर येता आले नाही. नंतरच्या काळातल्या समाजवाद्यांना सत्ता आणि त्याही पेक्षा अनेकदा विविध पद्धतीच्या दुही पसरवण्याच्या सवयीने ग्रासले. त्यातून स्वतः काम करायचे लांब राहीले आणि परीणामी पतन झाले... अर्थात हा मुद्दा न समजल्यामुळे (अथवा दुर्लक्ष केल्यामुळे), "त्यांचा विजयच झाला नव्हता तर आता ते हरले वगैरे म्हणणे कल्पनाविलास झाला. " असे म्हणले असावे. असो. @पिंपातला उंदीरः समाजवादी लोकांचे अधपतन यावर चर्चा होणे आवश्यक आहे . पण गेल्या २ दशकात भाजपाचे झाले ले 'काँग्रेसी' कारण (भ्रष्टाचारी लोकाना पाठीशी घालणे , गुन्हेगारी 'बिभीषण' पावन करून घेणे ई .) पण ऐरणीवर आले पाहिजे . अगदी सहमत. पण हे म्हणजे फक्त हिंदूंनाच का नावे ठेवली जातात, असे म्हणण्यासारखे. ;) तसे बघाल तर अगदी मिपावर देखील भाजपा, संघ, हिंदू धर्म आदींवर टिका करणारे भरपूर लिहून आलेले आहे. ज्या लेखाचा/चर्चेचा जो विषय आहे त्यावर चर्चा करायची असते. हा चर्चा विषय समाजवाद्यांचे नामोनिषाण राहत नाही आणि तरी देखील काळजीने देखील चर्चा होत नाही यामुळे काढला गेला आहे. वास्तवीक (वर ऋषिकेश यांना वाटले तसे) समाजवाद नसावाच असे मी म्हणलेलेच नाही. किंबहूना लोकशाहीत सशक्त सरकार आणि तितकाच सशक्त विरोधी पक्ष असणे जसे गरजेचे असते तसेच भिन्न, प्रसंगी विरुद्ध विचारसरणी असणे देखील महत्वाचे ठरू शकते. आज समाजवाद्यांनी केलेल्या समाजवादाच्या अस्तामुळे प्रबळ (म्हणजे जे सक्रीय, बुद्धीवादी, जबाबदार आहेत अशा अर्थाने) विरोधकच नाहीत असे वाटू लागले आहे. ती भुमिका काँग्रेस आणि तत्सम पार पाडू शकतील असे वाटत नाही. पण ती भुमिका पार पाडायला समाजवादी पण नाहीत ही त्या विचारांची दैन्यावस्था आहे असे वाटते. असो. आणि कुठलीही विचारसरणी काही निवडणुकांच्या पराभवानंतर संपत नाही हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही अगदी खरे आहे. किंबहुना मी ती संपू नये असेच म्हणेन. पण आज दुर्दैवाने ती अस्तंगत झालेल्यात जमा आहे असे चित्र आहे. आणि हो काँग्रेस हा केवळ सत्तावादी पक्ष आहे, समाजवादी वगैरे काही नाही असे मला वाटते. माझा लेख/मुळ मुद्दा हा केवळ राजकीय पक्षांपुरताच मर्यादीत नाही... @अर्धवटरावः पण स्वातंत्रोत्तर काळात भारतात भांडवलदार, जमीनदार, शेतकरी, कामगार, धर्ममार्तंड, मागासजाती या सर्वांत जे प्रचंड सामाजीक अभिसरण झालं त्यात समाजवादाने त्याची भुमीका उत्तम निभवली असं वाटतं अगदी सहमत! @बोका-ए-आझम: डाव्या पक्षांच्या रुपात त्यांचे शहामृगी वारसदार शिल्लक आहेत आहेत हे खरे आहे पण कुठेतरी वाटते की आता ते गोंधळलेल्या अवस्थेत भरकटत चालले आहेत.

बोका-ए-आझम 10/11/2014 - 23:29
अजूनही डाव्या पक्षांच्या रुपात त्यांचे शहामृगी वारसदार शिल्लक आहेत आणि ' इकाॅनाॅमिक अँड पोलिटिकल वीकली' सारखी त्यांची मुखपत्रं पण आहेत.

अर्धवटराव 10/11/2014 - 23:52
काँग्रेसेतर राजकारणाचं अवकाश समाजवाद्यांना/डाव्यांना व्यापणं शक्य होतं, किंबहुना समाजवाद हा त्याकाळी सर्वात सशक्त आणि स्वाभावीक पर्याय बनु शकला असता हे खरं आहे. पण पोथिनीष्ठा, मग ति धार्मीक असो वा राजकीय, नेहमीच घातक असते हे डाव्यांच्या लक्षातच आलं नाहि. मार्क्स म्हणजे गांधी/आंबेडकर नव्हे आणि व्होल्गा गंगेपेक्षा भिन्न आहे हे डाव्यांना ओळखताच आलं नाहि. युरोपात, रशीयात नेहमी रक्ताने सत्तांतरे घडली पण भारतात अहिंसक चळवळीने प्रचंड प्रभाव पाडला. अशा भारतात समाजवाद रूजवायचा तर त्याचे प्रथम भारतीयकरण व्हायला हवं होतं. विचारवंतांची संत-महात्म्यांची मोठी परंपरा लाभलेल्या बंगालला देखील हे जमलं कसं नाहि याचं आश्चर्य वाटतं. हि मुळात समाजवादाचीच मर्यादा होती/आहे काय न कळे. पण स्वातंत्रोत्तर काळात भारतात भांडवलदार, जमीनदार, शेतकरी, कामगार, धर्ममार्तंड, मागासजाती या सर्वांत जे प्रचंड सामाजीक अभिसरण झालं त्यात समाजवादाने त्याची भुमीका उत्तम निभवली असं वाटतं (पाकिस्तानात हे होऊ शकलं नाहि). नुकतच वाचण्यात आलं कि मुलायमसिंग पुर्वाश्रमीच्या समाजवाद्यांना एकत्र आणायच्या प्रयत्नात आहेत. अर्थात, हि केवळ राजकीय सोय म्हणुन. त्यांच्या प्रयत्नांना किती यश मिळतं बघायचं.

ऋषिकेश 11/11/2014 - 16:29
लेखाच्या मथळ्यावरून आणि पहिल्या परिच्छेदावरून वेगळ्याच लेव्हलचा नी स्कोपचा लेख असेल असे वाटले होते. त्यामुळे सरसावून बसलो - लेख वाचायला वेगळाअ वेळ काढून बसलो. नी काय हे! :( एकुणच साम्यवादाच्या अस्ताचे भारतीय समाजात उमटलेले पडसाद आणि परिणाम इतक्या सहज नी त्रोटकपणे उडवून लावण्यासारखे नाहीत. माझ्या या लेखाकडून असलेल्या अपेक्षेमुळे, हा लेख आवडला नाही. भारतीय समाजात पुर्वजर्मनीत असणार्‍या साम्यवादाने किंवा लेनिनवादाने किंवा अगदी माओवादाने कधीच म्हणावे असे मूळ धरलेले नाही. त्यांचा विजयच झाला नव्हता तर आता ते हरले वगैरे म्हणणे कल्पनाविलास झाला. मात्र समाजवादाच्या खुणा बर्‍याच खोलवर उमटलेल्या आहेत. कोणत्याही पक्षाने अगदी भाजपानेही "अंत्योदय" वगैरेंच्या माध्यमांतून त्या विचारधारेला अव्हेरलेले नाही. भारतीय घटना आणि भारतातील अनेक (किंबहुना बहुतांश) कायदे अजूनही समाजवादाच्याच अंगाने जातात. असो.

@विकास राव - लेख अपेक्षांवर नाही उतरला . समाजवादी लोकांचे अधपतन यावर चर्चा होणे आवश्यक आहे . पण गेल्या २ दशकात भाजपाचे झाले ले 'काँग्रेसी' कारण (भ्रष्टाचारी लोकाना पाठीशी घालणे , गुन्हेगारी 'बिभीषण' पावन करून घेणे ई .) पण ऐरणीवर आले पाहिजे . कॉंग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून गुणात्मक रित्या त्यांच्यात काहीच फरक नाही अस वाटणारा पण वर्ग मोठ्या प्रमाणावर उदयाला येत आहे याची पण नोंद घ्यावी लागेल . त्यामुळे चर्चा व्यापक होण्यासाठी हा मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे . बाकी डावी विचारसरणी भारतात तितकी प्रबळ नव्हती हे लक्षात घ्यायला हवे . आणि हा जर समाजवादी विचारसरणीचा शेवटाची सुरुवात होती तर २५ पैकी १५ वर्ष कॉंग्रेस सत्तेवर कशी होती ? याला सोनिया गांधी यांच्यावर असणारया स्वयंसेवी संस्थेच्या प्रभावाचा संदर्भ आहे . आणि कुठलीही विचारसरणी काही निवडणुकांच्या पराभवानंतर संपत नाही हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही

विकास 13/11/2014 - 01:28
मिपावर हवे तसे गेल्या दोन दिवसात येऊ न शकल्याने उत्तर देण्यास वेळ लागत आहे त्याबद्दल क्षमस्व! वर प्रतिसादांमध्ये आलेल्या मुद्यांना खाली उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो: एक समान मुद्दा: त्रोटकपणा... आक्षेप मान्यच. पण ते जाणून बुजून होते. कदाचीत म्हणूनच गणेशांना आणि अर्धवटरावांना काय म्हणायचे आहे ते समजले असावे असे वाटते... (नेहमीप्रमाणे) स्वतःच सगळे लिहून चर्चा करण्याऐवजी नवीन मुद्दे चर्चेत यावेत अशी अपेक्षा होती. त्या व्यतिरीक्त समाजवाद्यांना (शाब्दीक) निव्वळ झोडपणे हा उद्देश नव्हता (जरी ते एक बायप्रॉडक्ट असणार असले तरी. ;) ). @ऋषिकेश: एकुणच साम्यवादाच्या अस्ताचे भारतीय समाजात उमटलेले पडसाद आणि परिणाम इतक्या सहज नी त्रोटकपणे उडवून लावण्यासारखे नाहीत. लेखाचा उद्देश सरळ होता... ९ नोव्हेंबर १९८९ ही जागतीक स्तरावर कम्युनिजम / साम्यवादाच्या शेवटाची सुरवात होती हे कायम म्हणले जाते. पण एका अर्थाने भारतापुरते बोलायचे झाले तर, रामजन्मभूमी शिलान्यासाच्या निमित्ताने ती समाजवादी विचारसरणीची आणि त्यातून निघालेल्या स्युडोसेक्यूलर नामक भुताच्या शेवटाची सुरवात होती. मात्र, याकडे एकंदरीतच माध्यमांनी आणि विचारवंतांनी विशेष करून या वेळच्या (देश आणि राज्य) निवडणुकांच्या निकालांनंतर दुर्लक्ष केले असे वाटते. थोडक्यात भारतीय घटनांपुरते बोलताना साम्यवाद हा मुद्दा नव्हता तर साम्यवादाचे आकर्षण असलेला समाजवादी हा मुद्दा होता. काँग्रेस आणि काँग्रेसमधून बाहेर पडून तयार झालेले अनेक आदर्श समाजवादी होऊन गेले. पण दुर्दैवाने त्यांच्या काळात त्यांना सत्तेवर येता आले नाही. नंतरच्या काळातल्या समाजवाद्यांना सत्ता आणि त्याही पेक्षा अनेकदा विविध पद्धतीच्या दुही पसरवण्याच्या सवयीने ग्रासले. त्यातून स्वतः काम करायचे लांब राहीले आणि परीणामी पतन झाले... अर्थात हा मुद्दा न समजल्यामुळे (अथवा दुर्लक्ष केल्यामुळे), "त्यांचा विजयच झाला नव्हता तर आता ते हरले वगैरे म्हणणे कल्पनाविलास झाला. " असे म्हणले असावे. असो. @पिंपातला उंदीरः समाजवादी लोकांचे अधपतन यावर चर्चा होणे आवश्यक आहे . पण गेल्या २ दशकात भाजपाचे झाले ले 'काँग्रेसी' कारण (भ्रष्टाचारी लोकाना पाठीशी घालणे , गुन्हेगारी 'बिभीषण' पावन करून घेणे ई .) पण ऐरणीवर आले पाहिजे . अगदी सहमत. पण हे म्हणजे फक्त हिंदूंनाच का नावे ठेवली जातात, असे म्हणण्यासारखे. ;) तसे बघाल तर अगदी मिपावर देखील भाजपा, संघ, हिंदू धर्म आदींवर टिका करणारे भरपूर लिहून आलेले आहे. ज्या लेखाचा/चर्चेचा जो विषय आहे त्यावर चर्चा करायची असते. हा चर्चा विषय समाजवाद्यांचे नामोनिषाण राहत नाही आणि तरी देखील काळजीने देखील चर्चा होत नाही यामुळे काढला गेला आहे. वास्तवीक (वर ऋषिकेश यांना वाटले तसे) समाजवाद नसावाच असे मी म्हणलेलेच नाही. किंबहूना लोकशाहीत सशक्त सरकार आणि तितकाच सशक्त विरोधी पक्ष असणे जसे गरजेचे असते तसेच भिन्न, प्रसंगी विरुद्ध विचारसरणी असणे देखील महत्वाचे ठरू शकते. आज समाजवाद्यांनी केलेल्या समाजवादाच्या अस्तामुळे प्रबळ (म्हणजे जे सक्रीय, बुद्धीवादी, जबाबदार आहेत अशा अर्थाने) विरोधकच नाहीत असे वाटू लागले आहे. ती भुमिका काँग्रेस आणि तत्सम पार पाडू शकतील असे वाटत नाही. पण ती भुमिका पार पाडायला समाजवादी पण नाहीत ही त्या विचारांची दैन्यावस्था आहे असे वाटते. असो. आणि कुठलीही विचारसरणी काही निवडणुकांच्या पराभवानंतर संपत नाही हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही अगदी खरे आहे. किंबहुना मी ती संपू नये असेच म्हणेन. पण आज दुर्दैवाने ती अस्तंगत झालेल्यात जमा आहे असे चित्र आहे. आणि हो काँग्रेस हा केवळ सत्तावादी पक्ष आहे, समाजवादी वगैरे काही नाही असे मला वाटते. माझा लेख/मुळ मुद्दा हा केवळ राजकीय पक्षांपुरताच मर्यादीत नाही... @अर्धवटरावः पण स्वातंत्रोत्तर काळात भारतात भांडवलदार, जमीनदार, शेतकरी, कामगार, धर्ममार्तंड, मागासजाती या सर्वांत जे प्रचंड सामाजीक अभिसरण झालं त्यात समाजवादाने त्याची भुमीका उत्तम निभवली असं वाटतं अगदी सहमत! @बोका-ए-आझम: डाव्या पक्षांच्या रुपात त्यांचे शहामृगी वारसदार शिल्लक आहेत आहेत हे खरे आहे पण कुठेतरी वाटते की आता ते गोंधळलेल्या अवस्थेत भरकटत चालले आहेत.
​९ नोव्हेंबर १९८९ जगाच्या नजरेत ऐतिहासिक दिवस. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे १९६१ साली पूर्व जर्मनीच्या साम्यवादी सरकारने बांधलेली बर्लीन वॉल ही त्या दिवशी कोसळली. नव्हे जनतेने पाडली. हाताची पाचही बोटांची उंची सारखी असावी असा हट्ट करणार्‍या खुळचट साम्यवादाची जाहीरपणे अखेर होण्याची ती सुरवात होती. जाहीरपणे म्हणायचे कारण इतकेच की त्या आधीच १९७८ साली (म्हणजे माओच्या मरणानंतर दोन वर्षाच्या आत) चायनीज प्रेसिडंट डेंग झिआओपेंग यांनी मुक्तअर्थव्यवस्था चायनिज स्टाईल, हळूहळू चालू केली.

रहिमन धागा प्रेम का... ( प्रेमाचा धागा...)

विवेकपटाईत ·

विवेकपटाईत 11/11/2014 - 20:09
विचार करा, एवढे काही अवघड नाही स्वर्ग सुखाचा आनंद ( स्वर्ग सुख म्हणजे काय, डोक खाजवा) मीरेच्या नशिबी आता विरह व्यथाच. (मीरेच्या नशिबी विरह कुठला आहे) सुन्द उपसुंद हे दोन राक्षस बंधू होते. (महाभारतात कथा आहे) शिवाय कथा स्पष्ट करण्या साठी रामभक्तांचे उदाहरण कहावत मुँह में राम बगल में छुरी सहित दिले आहे. अप्सरा तिलोत्तमा कोण - ज्या स्त्री वरून सुन्द -उपसुंद भाऊ भांडले - आजच्या परिस्थितीत विचार करा शेवटी टीवी वर समाचार पहा पुन्हा कथा वाचा

psajid 13/11/2014 - 16:26
विवेक जी तुम्ही प्रगल्भ लेखक आहात तुमचे लेख मी आवडीने वाचत असतो ...तुम्ही तुमच्या प्रदर्शित लेखामध्ये रहिम यांचा खूप प्रसिद्ध दोहा शीर्षक म्हणून वापरला आहे आणि लेखाची सुरवात याच दोहा ने केली आहे. म्हणून उत्सुकतेपोटी हा लेख वाचला मात्र उर्वरित लेखाचा आणि दोह्याचा अर्थाअर्थी संबंध दिसला नाही. इथे रहिम ने किती छान दोहा लिहून "माणूस (प्रेमाचा धागा) जपून ठेव, माणुसकीचे नाते जप एखाद्याला एकदम हिणवू नको किंवा बोलताना काळजी घे, एखादी गोष्ट तोडून बोलू नको जर तुझ्या हातून किंवा तुझ्या वाणीने इतराप्रती चुकून जरी एखादी वाईट गोष्ट घडली आणि नंतर तुम्ही माफी मागितली तरी तो तुम्हाला क्षमा करेल मात्र त्याच्या मनात नेहमी तुमच्याविषयी एक अढी निर्माण होईल. (टूटे से फिर ना जुड़े, जुड़े गाँठ परि जाय). फार वर्षापूर्वी वाचलेले रहिम, कबीरदास, बिहारी यांचे दोहे हे आजही जीवनाचे अर्थ (सार) सांगून जातात, जगणे शिकवत राहतात. रहिम यांचाच दुसरा दोहा जो खूप प्रसिध्द आहे त्यामध्ये ते म्हणतात कि, - "रहिमन पाणी रखिये, बिन पाणी सब सून, पाणी गये न उबरे मोती, मानस, चून!" अर्थात मोत्यांमधील चमक निघून गेली तर तो फक्त काचेच्या रुपात उरतो त्याची किंमत शुन्य होते, चुण्यातील पाणी निघून गेले तर तो फक्त सुकलेला खडा राहतो, त्याचा बांधकामासाठी उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे माणसाने मर्यादशील राहिले पाहिजे त्याने आपली प्रतिष्ठा, इज्जत जपत जगले पाहिजे. माणसाची इज्जत गेली तर तो पुढील जीवनात कितीही यशस्वी झाला तरी त्याच्या चारित्र्यावर लागलेला डाग पुसला जात नाही, गेलेली इज्जत परत येत नाही. हे जीवनाचे तत्वज्ञान रहिम यांनी अगदी सोप्या भाषेत सांगितले आहे. इथे पाणी हे मोत्याची चमक, माणसाची इज्जत आणि चुण्यातील पाणी यांच्या रूपकात वापरले आहे.

In reply to by psajid

विवेकपटाईत 14/11/2014 - 19:51
साजिद साहेब, लेखाचा विषय महाराष्ट्रातले सद्य राजकारण आहे. प्रेमाचा धागा फक्त प्रतिक म्हणून वापरला आहे. एक हा धागा तोडून सिंहासनावर बसला आणि दुसऱ्याने भरपूर वाटाघाटी केल्या तरी ही सत्तेचा विरहच त्याच्या नशीबी आला. पण ते खरोखरच मित्र होते का(?) किंवा सत्ता सुंदरी मिळविण्यासाठी मित्र झाले होते. ती भेटताच त्यांनी आपले खरे स्वरूप दाखविले म्हणून सुन्द-उपसुंद या राक्षस बंधू आणि अप्सरा तिलोत्तमा ची कथा यात घातली.

विवेकपटाईत 11/11/2014 - 20:09
विचार करा, एवढे काही अवघड नाही स्वर्ग सुखाचा आनंद ( स्वर्ग सुख म्हणजे काय, डोक खाजवा) मीरेच्या नशिबी आता विरह व्यथाच. (मीरेच्या नशिबी विरह कुठला आहे) सुन्द उपसुंद हे दोन राक्षस बंधू होते. (महाभारतात कथा आहे) शिवाय कथा स्पष्ट करण्या साठी रामभक्तांचे उदाहरण कहावत मुँह में राम बगल में छुरी सहित दिले आहे. अप्सरा तिलोत्तमा कोण - ज्या स्त्री वरून सुन्द -उपसुंद भाऊ भांडले - आजच्या परिस्थितीत विचार करा शेवटी टीवी वर समाचार पहा पुन्हा कथा वाचा

psajid 13/11/2014 - 16:26
विवेक जी तुम्ही प्रगल्भ लेखक आहात तुमचे लेख मी आवडीने वाचत असतो ...तुम्ही तुमच्या प्रदर्शित लेखामध्ये रहिम यांचा खूप प्रसिद्ध दोहा शीर्षक म्हणून वापरला आहे आणि लेखाची सुरवात याच दोहा ने केली आहे. म्हणून उत्सुकतेपोटी हा लेख वाचला मात्र उर्वरित लेखाचा आणि दोह्याचा अर्थाअर्थी संबंध दिसला नाही. इथे रहिम ने किती छान दोहा लिहून "माणूस (प्रेमाचा धागा) जपून ठेव, माणुसकीचे नाते जप एखाद्याला एकदम हिणवू नको किंवा बोलताना काळजी घे, एखादी गोष्ट तोडून बोलू नको जर तुझ्या हातून किंवा तुझ्या वाणीने इतराप्रती चुकून जरी एखादी वाईट गोष्ट घडली आणि नंतर तुम्ही माफी मागितली तरी तो तुम्हाला क्षमा करेल मात्र त्याच्या मनात नेहमी तुमच्याविषयी एक अढी निर्माण होईल. (टूटे से फिर ना जुड़े, जुड़े गाँठ परि जाय). फार वर्षापूर्वी वाचलेले रहिम, कबीरदास, बिहारी यांचे दोहे हे आजही जीवनाचे अर्थ (सार) सांगून जातात, जगणे शिकवत राहतात. रहिम यांचाच दुसरा दोहा जो खूप प्रसिध्द आहे त्यामध्ये ते म्हणतात कि, - "रहिमन पाणी रखिये, बिन पाणी सब सून, पाणी गये न उबरे मोती, मानस, चून!" अर्थात मोत्यांमधील चमक निघून गेली तर तो फक्त काचेच्या रुपात उरतो त्याची किंमत शुन्य होते, चुण्यातील पाणी निघून गेले तर तो फक्त सुकलेला खडा राहतो, त्याचा बांधकामासाठी उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे माणसाने मर्यादशील राहिले पाहिजे त्याने आपली प्रतिष्ठा, इज्जत जपत जगले पाहिजे. माणसाची इज्जत गेली तर तो पुढील जीवनात कितीही यशस्वी झाला तरी त्याच्या चारित्र्यावर लागलेला डाग पुसला जात नाही, गेलेली इज्जत परत येत नाही. हे जीवनाचे तत्वज्ञान रहिम यांनी अगदी सोप्या भाषेत सांगितले आहे. इथे पाणी हे मोत्याची चमक, माणसाची इज्जत आणि चुण्यातील पाणी यांच्या रूपकात वापरले आहे.

In reply to by psajid

विवेकपटाईत 14/11/2014 - 19:51
साजिद साहेब, लेखाचा विषय महाराष्ट्रातले सद्य राजकारण आहे. प्रेमाचा धागा फक्त प्रतिक म्हणून वापरला आहे. एक हा धागा तोडून सिंहासनावर बसला आणि दुसऱ्याने भरपूर वाटाघाटी केल्या तरी ही सत्तेचा विरहच त्याच्या नशीबी आला. पण ते खरोखरच मित्र होते का(?) किंवा सत्ता सुंदरी मिळविण्यासाठी मित्र झाले होते. ती भेटताच त्यांनी आपले खरे स्वरूप दाखविले म्हणून सुन्द-उपसुंद या राक्षस बंधू आणि अप्सरा तिलोत्तमा ची कथा यात घातली.
लेखनविषय:
लेखनप्रकार
रहिमन धागा प्रेम का, मत तोड़ो चटकाय । टूटे से फिर ना जुड़े, जुड़े गाँठ परि जाय l अत्यंत नाजुक अश्या प्रेमाचा धाग्याला सदैव जपून ठेवावे लागते. एकदा हा धागा तुटला, तर कधी-कधी पुन्हा गाठ मारणे ही शक्य होत नाही. आपली मीरा पतंग उडवीत होती, अचानक पतंगाची दोर तुटली. पतंग हवेत उंच उडाला. थेट स्वर्गात पोहचला. तिथे सोमरसा सोबत अप्सरांचे नृत्य पाहत स्वर्ग सुख भोगू लागला. इथे मीरा जमिनी वर पतंगाच्या विरहात अंतर्बाह्य बुडलेली होती. तिच्या मनात एकाच विचार, पुन्हा पतंग कधी भेटणार. पण धरती आणि आकाशाचे मिलन जवळपास अशक्यच असते.

ती....

सविता००१ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ही कथा यापूर्वी अनाहिता मध्ये प्रकाशित झाली आहे. तिथल्या मैत्रिणींच्या आग्रहाखातर इथे टाकत आहे. पहिलाच प्रयत्न आहे. सांभाळून घ्यावे.' ती.. एका वेगळ्या व्यथितांची प्रतिनिधी. सगळ्या जगाने सहज धुडकावली तिला ! काय दोष तिचा ? सगळ्यांसाठी खपली फक्त. अपेक्षा ठेवल्या नाहीत. तिच्या नशिबी असं का? मलाच का माया लावली इतकी तिने? असा काय ऋणानुबंध होता या मावशीचा अन माझा? हे उत्तर तर आजही मिळत नाही मला. काही काही कळत नाही मला......... **--** "सविता, चला आता घरी, शुभंकरोती म्हणायचय ना? आजोबा बोलावतायत" मी अगदी तीन वर्षांची असल्यापासून आजीचा हाच उद्योग.

ताजमहाल .....!!

फिझा ·

विजुभाऊ 10/11/2014 - 18:46
तेथे नुसत्या कबरी नाहीत हो. बरेच काही आहे भूमिती इतकी सुंदर असू शकते हे तेथे गेल्यावरच कळते. शेवटी आपण काय बघायचे ते आपणच ठरवायचे असते. जन्माला येणारा प्रत्येक माणूस मरणारच असतो मग जन्मभर खायचे प्यायचे कशाला ? अभ्यास वगैरे कशाला करायचे? शिकायचे कशाला? कधितरी मरून जाणार एह निश्चित असणार्‍या देहाला सजवायचे कशाला? अगदी मेल्यानंतर थोड्या वेळाने जळून राख होणार्‍याला देहाला अंघोळतरी कशाला घालायची मग? ते सोडा. प्रत्येक देह हा मांस रक्त चरबी हाडे यानी युक्त असतो. अशा हाडे मांस चरबी रक्त आणि श्लेश्मा युक्त चेहेर्‍याला सुंदर तरी कशाला म्हणायचे. अशाच एखाद्या मांसाच्या गोळ्यावर जिवापाड प्रेम तरी कशाला करायचे. अशाच एखाद्या मांसल गोळ्याला वात्सलयाने जवळ कशाला घ्यायचे? स्वतःचे नैराष्य लपवण्यासाठी अशी कृतक समर्थने करणारी बरीच जन असतात. ते त्यांचे स्वतःचे लॉजीक आहे असे ते म्हणतात. पण त्या म्हणण्याआड असे लोक स्वतःचे अपयश झाकायचा क्षीण प्रयत्न करत असतात

In reply to by विजुभाऊ

hitesh 10/11/2014 - 19:11
ही टिपिकल हिंदु प्रवृत्ती आहे.. मेलेलं मढं जरी असलं तरी त्याची किती प्रेमाने जपणुक केलेली आहे. शाहजहान आणि मुमताजमहाल प्रेमाने गाणे म्हणायचे .... जो वादा किया वो निभाना पडेगा. त्यांच्या त्या असीम प्रेमातून महान नररत्न जन्माला आलं... आलमगीर औरंगजेब !

In reply to by hitesh

टवाळ कार्टा 10/11/2014 - 20:14
शाहजहान आणि मुमताजमहाल प्रेमाने गाणे म्हणायचे .... जो वादा किया वो निभाना पडेगा. त्यांच्या त्या असीम प्रेमातून महान नररत्न जन्माला आलं... आलमगीर औरंगजेब !
तुमच्याकडे सुध्धा १ "ताजमहाल" आहे हे सिध्ध केल्याबद्दल हाबिणंदन \m/

In reply to by टवाळ कार्टा

अर्धवटराव 10/11/2014 - 20:37
त्या नराने आपल्या बापाला कैदेत टाकुन अस्सल नॉनहिंदु चौदावे रत्न दाखवले हे लक्षात घेणार आहात कि नाहि...

" साहेब , वरती ताजमहाल असला तरी खाली कबरीच आहेत शेवटी !". कोणाला अर्धा ग्लास रिकामा दिसतो तर दुसर्‍याला तोच ग्लास अर्धा भरलेला दिसतो ! ज्याची त्याची नजर, दुसरं काय ?

एस 10/11/2014 - 19:24
हा लेख ताजमहालाबद्दल नाहीये हे जरी लोकांना समजले तरी खूप. असो. लेख आवडला आणि भावलाही.

रामदास 10/11/2014 - 20:32
इक शहंशाह ने दौलत का सहारा ले कर / हम ग़रीबों की मुहब्बत का उड़ाया है मज़ाक़ मेरी महबूब कहीं और मिला कर मुझ से!

In reply to by सुबोध खरे

मारवा 11/11/2014 - 11:46
एक शहंशाह ने बनाके अँटीलीया हम गरीबोकी मोहब्बत का उडाया था मजाक फिर उसने हेलिकॉप्टर देके अपनी बेगम को गिफ्ट हम गरीबोकी जखम पे चोळा था नमक आज आया उंट जमी पे अब लेके थाली हाथ मे दिये लगा रहॉ हे वो गंगा पे अपने उसी पुरानी बेगम के साथ और धो रहॉ है अपने पाप. गंगा मैय्या की जय हो.

जेपी 10/11/2014 - 20:47
खर बोलु, ताजमहाली लेख. वरुन लै भारी आतुन फक्त थडग. जर वास्तविक असेल तर लै गोड,वाचुन मधुमेह व्हायचा बाकी राहिल.जर काल्पनीक असेल तर हॅट्स ऑफ,असल फक्त कल्पनेतच घडु शकत.

In reply to by खटपट्या

सुबोध खरे 11/11/2014 - 21:20
मागच्या वर्षी रिक्षा वाल्याची मुलगी सी ए च्या परीक्षेत पहिली आली होती. बुद्धिमत्ता हि काही मध्यम किंवा उच्च वर्गाची मक्तेदारी नाही. फ़िश ताई लेख चांगला आहे तुम्ही लिहित्या राहा.

गणेशा 11/11/2014 - 13:10
सुंदर लेख.... "जगाच्या सुंदरते पेक्षा मनाची सुंदरता जगाकडे पहाण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन देवुन जाते"

कंजूस 11/11/2014 - 13:41
बोर्डातले नंबर ,हुशारी ,ताजमहाल ,मार्चमध्ये सुटिचा अर्ज करून नंतर रेल्वे रेझ॰ मिळणे कमालीचे योगायोग आणि आठवे आच्श्रर्य आश्चर्य वाटते .लपवूनी ठेवलीसी पंधरा वर्षे ही तू कथा .

पैसा 11/11/2014 - 21:23
चांगलं लिहिलंय. हे वाचून तुम्ही कविता का लिहिता हे लक्षात येतंय. ताजमहाल म्हणजे वरून सुंदर आतून कबरी हे वाचून मिपावर प्रतिसादांतून घडलेला एक खंग्री वादविवाद आठवला.

शशिकांत ओक 11/11/2014 - 22:30
फिज़ा, वस्तू वा वास्तू तीच असते त्याचा वापर कसा केला जातो यावर त्याची किंमत वा उपेक्षा अवलंबून असते. आपल्या शारीरिक आव्हानांना कसे सामोरे जायचे व त्यातून जीवनातील आनंद शोधायचा याची हातोटी शिकणे हे खरे जीवनशिक्षण... ते पुस्तकी परिपाठातून मिळवता येत नाही.... ताज महालाच्या रुपाने सुंदरतेला पहायची दृष्टी कशी जोपासावी याचा धडा मिळतो. अन्यथा ते दगडा-मातीचे बांधकाम...

विजुभाऊ 10/11/2014 - 18:46
तेथे नुसत्या कबरी नाहीत हो. बरेच काही आहे भूमिती इतकी सुंदर असू शकते हे तेथे गेल्यावरच कळते. शेवटी आपण काय बघायचे ते आपणच ठरवायचे असते. जन्माला येणारा प्रत्येक माणूस मरणारच असतो मग जन्मभर खायचे प्यायचे कशाला ? अभ्यास वगैरे कशाला करायचे? शिकायचे कशाला? कधितरी मरून जाणार एह निश्चित असणार्‍या देहाला सजवायचे कशाला? अगदी मेल्यानंतर थोड्या वेळाने जळून राख होणार्‍याला देहाला अंघोळतरी कशाला घालायची मग? ते सोडा. प्रत्येक देह हा मांस रक्त चरबी हाडे यानी युक्त असतो. अशा हाडे मांस चरबी रक्त आणि श्लेश्मा युक्त चेहेर्‍याला सुंदर तरी कशाला म्हणायचे. अशाच एखाद्या मांसाच्या गोळ्यावर जिवापाड प्रेम तरी कशाला करायचे. अशाच एखाद्या मांसल गोळ्याला वात्सलयाने जवळ कशाला घ्यायचे? स्वतःचे नैराष्य लपवण्यासाठी अशी कृतक समर्थने करणारी बरीच जन असतात. ते त्यांचे स्वतःचे लॉजीक आहे असे ते म्हणतात. पण त्या म्हणण्याआड असे लोक स्वतःचे अपयश झाकायचा क्षीण प्रयत्न करत असतात

In reply to by विजुभाऊ

hitesh 10/11/2014 - 19:11
ही टिपिकल हिंदु प्रवृत्ती आहे.. मेलेलं मढं जरी असलं तरी त्याची किती प्रेमाने जपणुक केलेली आहे. शाहजहान आणि मुमताजमहाल प्रेमाने गाणे म्हणायचे .... जो वादा किया वो निभाना पडेगा. त्यांच्या त्या असीम प्रेमातून महान नररत्न जन्माला आलं... आलमगीर औरंगजेब !

In reply to by hitesh

टवाळ कार्टा 10/11/2014 - 20:14
शाहजहान आणि मुमताजमहाल प्रेमाने गाणे म्हणायचे .... जो वादा किया वो निभाना पडेगा. त्यांच्या त्या असीम प्रेमातून महान नररत्न जन्माला आलं... आलमगीर औरंगजेब !
तुमच्याकडे सुध्धा १ "ताजमहाल" आहे हे सिध्ध केल्याबद्दल हाबिणंदन \m/

In reply to by टवाळ कार्टा

अर्धवटराव 10/11/2014 - 20:37
त्या नराने आपल्या बापाला कैदेत टाकुन अस्सल नॉनहिंदु चौदावे रत्न दाखवले हे लक्षात घेणार आहात कि नाहि...

" साहेब , वरती ताजमहाल असला तरी खाली कबरीच आहेत शेवटी !". कोणाला अर्धा ग्लास रिकामा दिसतो तर दुसर्‍याला तोच ग्लास अर्धा भरलेला दिसतो ! ज्याची त्याची नजर, दुसरं काय ?

एस 10/11/2014 - 19:24
हा लेख ताजमहालाबद्दल नाहीये हे जरी लोकांना समजले तरी खूप. असो. लेख आवडला आणि भावलाही.

रामदास 10/11/2014 - 20:32
इक शहंशाह ने दौलत का सहारा ले कर / हम ग़रीबों की मुहब्बत का उड़ाया है मज़ाक़ मेरी महबूब कहीं और मिला कर मुझ से!

In reply to by सुबोध खरे

मारवा 11/11/2014 - 11:46
एक शहंशाह ने बनाके अँटीलीया हम गरीबोकी मोहब्बत का उडाया था मजाक फिर उसने हेलिकॉप्टर देके अपनी बेगम को गिफ्ट हम गरीबोकी जखम पे चोळा था नमक आज आया उंट जमी पे अब लेके थाली हाथ मे दिये लगा रहॉ हे वो गंगा पे अपने उसी पुरानी बेगम के साथ और धो रहॉ है अपने पाप. गंगा मैय्या की जय हो.

जेपी 10/11/2014 - 20:47
खर बोलु, ताजमहाली लेख. वरुन लै भारी आतुन फक्त थडग. जर वास्तविक असेल तर लै गोड,वाचुन मधुमेह व्हायचा बाकी राहिल.जर काल्पनीक असेल तर हॅट्स ऑफ,असल फक्त कल्पनेतच घडु शकत.

In reply to by खटपट्या

सुबोध खरे 11/11/2014 - 21:20
मागच्या वर्षी रिक्षा वाल्याची मुलगी सी ए च्या परीक्षेत पहिली आली होती. बुद्धिमत्ता हि काही मध्यम किंवा उच्च वर्गाची मक्तेदारी नाही. फ़िश ताई लेख चांगला आहे तुम्ही लिहित्या राहा.

गणेशा 11/11/2014 - 13:10
सुंदर लेख.... "जगाच्या सुंदरते पेक्षा मनाची सुंदरता जगाकडे पहाण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन देवुन जाते"

कंजूस 11/11/2014 - 13:41
बोर्डातले नंबर ,हुशारी ,ताजमहाल ,मार्चमध्ये सुटिचा अर्ज करून नंतर रेल्वे रेझ॰ मिळणे कमालीचे योगायोग आणि आठवे आच्श्रर्य आश्चर्य वाटते .लपवूनी ठेवलीसी पंधरा वर्षे ही तू कथा .

पैसा 11/11/2014 - 21:23
चांगलं लिहिलंय. हे वाचून तुम्ही कविता का लिहिता हे लक्षात येतंय. ताजमहाल म्हणजे वरून सुंदर आतून कबरी हे वाचून मिपावर प्रतिसादांतून घडलेला एक खंग्री वादविवाद आठवला.

शशिकांत ओक 11/11/2014 - 22:30
फिज़ा, वस्तू वा वास्तू तीच असते त्याचा वापर कसा केला जातो यावर त्याची किंमत वा उपेक्षा अवलंबून असते. आपल्या शारीरिक आव्हानांना कसे सामोरे जायचे व त्यातून जीवनातील आनंद शोधायचा याची हातोटी शिकणे हे खरे जीवनशिक्षण... ते पुस्तकी परिपाठातून मिळवता येत नाही.... ताज महालाच्या रुपाने सुंदरतेला पहायची दृष्टी कशी जोपासावी याचा धडा मिळतो. अन्यथा ते दगडा-मातीचे बांधकाम...
लेखनविषय:
ताजमहाल ....! साल 2000. माझं दहावीचं वर्ष.भरपूर अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवायचे, पुढे सायन्स ला एडमिशन घ्यायचे मग इंजिनीअरिंग करायचे असे आपले बाकीच्या चार चौघिंसारखे माझेही प्लान्स. अर्थात 'चारचौघी ' असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा प्रत्येकाचे आयुष्य वेगळे असते, हे मान्य असुनही बाकी सगळ्यांकड़े जे आहे ते सगळं माझ्याकडेही असावे अशी अपेक्षा. आणि वयाच्या १५ -१६ व्या वर्शी मित्र मैत्रिणिंचे तर आयुष्यात खुप महत्व. मग काय ते करतील ती पूर्व दिशा ! दहावी ची परीक्षा तोंडावर आली होती आणि रात्रि जागुन जागुन केलेल्या अभ्यासाच्या खुणा पण तोंडावर दिसत होत्या पिम्पल्स च्या स्वरूपात.

जडण-घडण १३

माधुरी विनायक ·

मागच्या भागात पहाटवारा यांच्या प्रतिसादातल्या सूचनेनुसार पूर्वीच्या भागांना क्र. देण्याचा प्रयत्न केला खरा, पण तो फसला बहुतेक. माफ करा मंडळी, पुन्हा प्रयत्न करते. तोवर... आधीच्या भागांचे हे दुवे. जडण-घडण १ http://www.misalpav.com/node/28093 जडण-घडण २ http://www.misalpav.com/node/28102 जडण-घडण ३ http://www.misalpav.com/node/28126 जडण-घडण 4 http://www.misalpav.com/node/28163 जडण-घडण ५ http://www.misalpav.com/node/28270 जडण-घडण 6 http://www.misalpav.com/node/28354 जडण-घडण 7 http://www.misalpav.com/node/28383 जडण-घडण 8 http://www.misalpav.com/node/28437 जडण-घडण 9 http://www.misalpav.com/node/28519 जडण-घडण १० http://www.misalpav.com/node/28600 जडण-घडण ११ http://www.misalpav.com/node/28838 जडण-घडण १२ http://www.misalpav.com/node/29159

In reply to by माधुरी विनायक

पहाटवारा 11/11/2014 - 03:14
1)"Insert/edit Link (Alt+L)" असे लिहिलेल्या आयकोन ला टिचकी मार 2)मग खालील ऊदहरणाप्रमाणे माहिति भरा a)Link URL : http://www.misalpav.com/node/28093 b)Link Text: 1 c)Link Title:1 ३) मग ते असे दिसेल : 1 हाकानाका .. रचाकने.. बाकि हाहि भाग मस्तच.. -पहाटवारा

रामदास 10/11/2014 - 20:35
लेखमाला मी वाचलीच नव्हती. आता वाचतो. हा भाग अर्थातच चांगला झाला आहे.

सुनील 11/11/2014 - 08:37
लेखमाला आवडतेय. सुधा नरवणे आणि शरद चव्हाण हे आकाशवाणीवरील अनुक्रमे सकाळ आणि संध्याकाळचे वृत्तनिवेदक लख्ख आठवताहेत.

समीरसूर 11/11/2014 - 11:07
हा ही भाग उत्कृष्ट! संपूर्ण मालिकाच काहीतरी नवीन, छान, वेगळं वाचल्याचा आनंद देतेय. शुभेच्छा! :-) आकाशवाणीवरील बातम्यांच्या अनेक आठवणी आहेत. अर्थात बातम्या ऐकल्याच्या आठवणी. :-) सकाळी ६:५५ वाजता संस्कृत बातम्या असत. अजूनही असतात. संस्कृत बातम्यांची "इयम आकाशवाणी, प्रवाचकः बलदेवानंद सागरः..." अशी धीर-गंभीर सुरुवात झाली की दिवस सुरू झाल्यासारखं वाटे. या वृत्तनिवेदकाचा आवाज असा मजबूत आणि स्वच्छ! ऐकायला खूप मस्त वाटायचं. एक आगळं चैतन्य वाटायचं. सकाळी ७:०५ ते ७:१० मराठी बातम्या असत. "आकाशवाणी, सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे..." यांचा आवाजदेखील एकदम स्वच्छ, खणखणीत, आणि आश्वासक वाटे. या बातम्यांमध्ये अनेकदा वाक्याच्या शेवटी "...आहे" चा इतका अतिरेक होत असे की ऐकतांना मजा वाटत असे. "पंतप्रधान श्री नरसिंहराव यांनी देशाला उद्देशून हे आव्हान केलं आहे. ही पाऊलं उचलणं देशाच्या हिताचं आहे असं त्यांनी म्हटलं आहे...." आमच्या लहानपणी जळगांव केंद्रावर उषा शर्मा नावाच्या निवेदिका होत्या. त्यांचा आवाज इतका मधूर आणि मुलायम होता की त्या बोलत असतांना ऐकतच रहावे असे वाटत असे. त्यांनी अगदी "आवक - घेवडा २ क्विंटल, गवार शेंग - १ क्विंटल. बाजारभाव - कांदा - ठोक ७ रुपये किलो..." वगैरे जरी सादर केलं तरी गोड वाटायचं. अर्थात त्यांनी कधी बाजारभाव सांगीतले नाहीत. जळगांव आकाशवाणीवर भैय्या उपासनी हे एक दमदार आवाजाचे सादरकर्ते होते. "नमस्कार मंडळी" असे म्हणून त्यांनी कार्यक्रम सुरू केला की ऐकतांना उत्साह संचारत असे. यांचं दुर्दैवानं काही वर्षांपूर्वी अकाली निधन झालं. यांनी 'गोट्या' मालिकेमध्ये गोट्याच्या वडिलांची भूमिका छान साकारली होती. आकाशवाणीवरून छोट्या पडद्यावर असा प्रगतीचा प्रवास सुरू असतांनाच काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि एक गुणी निवेदक-नट हरवला.

पहाटवारा 11/11/2014 - 12:10
मस्त प्रतीसाद ..सुधा नरवणेंचे 'आहे' एक्दम पिन्-पोईंट .. लहानपणी आमच्या घरी तर सकाळी रेडिओ हा जणू काहि टाईमकीपर असे. प्रत्येक कार्यक्रमानुसार आप्-आप्ली कामे ऊरकली तरच आम्ही अन आई (शिक्षीका असल्याने)शाळेत वेळेवर पोहोचत असू. ती सवय अजूनहि आहे .. आता जर बीबीसी वल्ड न्युज वाल्या लाक्श्म्मी सिंग यांच्या न्युज गाडिच्या एफ एम वर ऐकु आल्या नाहि तर समजावे . ऊशीर झाला .. :) -पहाटवारा

प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार...सुधा नरवणे, शरद चव्हाण, भय्या उपासनी यांच्याबरोबर माझ्या शाळेतल्या आठवणींमधला आवाज म्हणजे भालचंद्र जोशी... आकाशवाणीने खरंच भरभरून दिलं, वाढत्या वयात आणि प्रत्यक्ष काम करतानाही...प्रतिसादांनीही अनेक आठवणी जागवल्या...

मागच्या भागात पहाटवारा यांच्या प्रतिसादातल्या सूचनेनुसार पूर्वीच्या भागांना क्र. देण्याचा प्रयत्न केला खरा, पण तो फसला बहुतेक. माफ करा मंडळी, पुन्हा प्रयत्न करते. तोवर... आधीच्या भागांचे हे दुवे. जडण-घडण १ http://www.misalpav.com/node/28093 जडण-घडण २ http://www.misalpav.com/node/28102 जडण-घडण ३ http://www.misalpav.com/node/28126 जडण-घडण 4 http://www.misalpav.com/node/28163 जडण-घडण ५ http://www.misalpav.com/node/28270 जडण-घडण 6 http://www.misalpav.com/node/28354 जडण-घडण 7 http://www.misalpav.com/node/28383 जडण-घडण 8 http://www.misalpav.com/node/28437 जडण-घडण 9 http://www.misalpav.com/node/28519 जडण-घडण १० http://www.misalpav.com/node/28600 जडण-घडण ११ http://www.misalpav.com/node/28838 जडण-घडण १२ http://www.misalpav.com/node/29159

In reply to by माधुरी विनायक

पहाटवारा 11/11/2014 - 03:14
1)"Insert/edit Link (Alt+L)" असे लिहिलेल्या आयकोन ला टिचकी मार 2)मग खालील ऊदहरणाप्रमाणे माहिति भरा a)Link URL : http://www.misalpav.com/node/28093 b)Link Text: 1 c)Link Title:1 ३) मग ते असे दिसेल : 1 हाकानाका .. रचाकने.. बाकि हाहि भाग मस्तच.. -पहाटवारा

रामदास 10/11/2014 - 20:35
लेखमाला मी वाचलीच नव्हती. आता वाचतो. हा भाग अर्थातच चांगला झाला आहे.

सुनील 11/11/2014 - 08:37
लेखमाला आवडतेय. सुधा नरवणे आणि शरद चव्हाण हे आकाशवाणीवरील अनुक्रमे सकाळ आणि संध्याकाळचे वृत्तनिवेदक लख्ख आठवताहेत.

समीरसूर 11/11/2014 - 11:07
हा ही भाग उत्कृष्ट! संपूर्ण मालिकाच काहीतरी नवीन, छान, वेगळं वाचल्याचा आनंद देतेय. शुभेच्छा! :-) आकाशवाणीवरील बातम्यांच्या अनेक आठवणी आहेत. अर्थात बातम्या ऐकल्याच्या आठवणी. :-) सकाळी ६:५५ वाजता संस्कृत बातम्या असत. अजूनही असतात. संस्कृत बातम्यांची "इयम आकाशवाणी, प्रवाचकः बलदेवानंद सागरः..." अशी धीर-गंभीर सुरुवात झाली की दिवस सुरू झाल्यासारखं वाटे. या वृत्तनिवेदकाचा आवाज असा मजबूत आणि स्वच्छ! ऐकायला खूप मस्त वाटायचं. एक आगळं चैतन्य वाटायचं. सकाळी ७:०५ ते ७:१० मराठी बातम्या असत. "आकाशवाणी, सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे..." यांचा आवाजदेखील एकदम स्वच्छ, खणखणीत, आणि आश्वासक वाटे. या बातम्यांमध्ये अनेकदा वाक्याच्या शेवटी "...आहे" चा इतका अतिरेक होत असे की ऐकतांना मजा वाटत असे. "पंतप्रधान श्री नरसिंहराव यांनी देशाला उद्देशून हे आव्हान केलं आहे. ही पाऊलं उचलणं देशाच्या हिताचं आहे असं त्यांनी म्हटलं आहे...." आमच्या लहानपणी जळगांव केंद्रावर उषा शर्मा नावाच्या निवेदिका होत्या. त्यांचा आवाज इतका मधूर आणि मुलायम होता की त्या बोलत असतांना ऐकतच रहावे असे वाटत असे. त्यांनी अगदी "आवक - घेवडा २ क्विंटल, गवार शेंग - १ क्विंटल. बाजारभाव - कांदा - ठोक ७ रुपये किलो..." वगैरे जरी सादर केलं तरी गोड वाटायचं. अर्थात त्यांनी कधी बाजारभाव सांगीतले नाहीत. जळगांव आकाशवाणीवर भैय्या उपासनी हे एक दमदार आवाजाचे सादरकर्ते होते. "नमस्कार मंडळी" असे म्हणून त्यांनी कार्यक्रम सुरू केला की ऐकतांना उत्साह संचारत असे. यांचं दुर्दैवानं काही वर्षांपूर्वी अकाली निधन झालं. यांनी 'गोट्या' मालिकेमध्ये गोट्याच्या वडिलांची भूमिका छान साकारली होती. आकाशवाणीवरून छोट्या पडद्यावर असा प्रगतीचा प्रवास सुरू असतांनाच काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि एक गुणी निवेदक-नट हरवला.

पहाटवारा 11/11/2014 - 12:10
मस्त प्रतीसाद ..सुधा नरवणेंचे 'आहे' एक्दम पिन्-पोईंट .. लहानपणी आमच्या घरी तर सकाळी रेडिओ हा जणू काहि टाईमकीपर असे. प्रत्येक कार्यक्रमानुसार आप्-आप्ली कामे ऊरकली तरच आम्ही अन आई (शिक्षीका असल्याने)शाळेत वेळेवर पोहोचत असू. ती सवय अजूनहि आहे .. आता जर बीबीसी वल्ड न्युज वाल्या लाक्श्म्मी सिंग यांच्या न्युज गाडिच्या एफ एम वर ऐकु आल्या नाहि तर समजावे . ऊशीर झाला .. :) -पहाटवारा

प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार...सुधा नरवणे, शरद चव्हाण, भय्या उपासनी यांच्याबरोबर माझ्या शाळेतल्या आठवणींमधला आवाज म्हणजे भालचंद्र जोशी... आकाशवाणीने खरंच भरभरून दिलं, वाढत्या वयात आणि प्रत्यक्ष काम करतानाही...प्रतिसादांनीही अनेक आठवणी जागवल्या...
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझी रोजची कामं सुरू होतीच. फ्री लान्सींग बरं चाललं होतं. कंपन्यांना आवश्यकतेनुसार मजकूर द्यावा लागायचा. पण कधी तरी एखाद्या शुभेच्छापत्रांच्या दुकानात शब्द ओळखीचे दिसावेत, उत्सुकतेने कार्ड हातात घ्यावं आणि आपणच लिहिलेला तो मजकूर फार सुसंगत नसलेल्या चित्रासह दिसावा, अशी स्थिती झाली की मन खट्टू व्हायचं. कधी कधी तर मजकूर छापल्यानंतर तो तपासलाही गेलेला नसे. चुकीच्या ठिकाणी तोडलेली वाक्यं, व्याकरणाच्या चुका बघून वाईट वाटायचं. या कामासाठी मी वेगळे पैसे नाही घेणार, असं सांगूनही प्रत्येक वेळी ही तसदी घेतली जायचीच, असंही नव्हतं.

महाराष्ट्राच्या स्वयंघोषित मराठी सम्राटांना काही प्रश्न

चिनार ·

प्राध्यापक 10/11/2014 - 18:21
आधी भावकीत भांडणं करायची. नंतर सख्ख्या शेजाऱ्यांशी भांडायचं ! भविष्यात पुण्याला किंवा कोकणात स्थायिक होण्याचा आपला विचार आहे का ? पुण्याचा संबंध इथे जोडण्याचे काय कारण?

In reply to by स्पा

चौकटराजा 11/11/2014 - 10:07
दोनशे कशाला ?तुम्ही त्यात क डोंं म पा घुसवा चारशे होतील. बाकी नाथाभाउ खडसे ना एक टोपी फुकटात मिळाली. सरकार पडले तर हाती काय लागले असा प्रश्न पडावयास नको !

क्लिंटन 10/11/2014 - 18:32
विधानसभा जागावाटपासाठीच्या चर्चेत २०-२२ वर्षाच्या मुलाला पाठवण्यामागची नेमकी भुमिका काय होती ?
अहो महाराजांनी सोळाव्या वर्षी तोरणा घेतला होता, अठराव्या वर्षी फत्तेखानाचा पराभव केला होता आणि शहाजहानला पत्र लिहून कैदेत पडलेल्या शहाजीराजांची सुटका मोठ्या युक्तीने करून घेतली होती हे विसरलात वाटते? पराक्रमाला आणि तेजाला वयाचे बंधन नसते. आणि मुळात शिवसेनेतला आणि त्यातून मातोश्रीवर जन्माला आलेला म्हणजे डायरेक्ट शिवरायांचाच अवतार तो हे तुम्ही कसे विसरलात? (हा उपहास आहे हे वेगळे सांगायलाच नको :) )

hitesh 10/11/2014 - 18:35
या ठाकरेंवर दोन दिवसात तीन नवीव धागे निघाले.

दुश्यन्त 10/11/2014 - 19:21
राज्यात मोठा पक्ष भाजप. सरकार बनलेय भाजपचे (तरणार पवारांच्या मर्जीने) मात्र गेले महिनाभर मीडिया आणि चर्चेचा फोकस उद्धव आणि शिवसेनेवरच आहे.

मस्तच रे चिनार्या.राज्याचे राजकारण जरा इण्टरेस्टिंग का काय म्हणतात तसे होतेय असे हेही म्हणतात. गेले २५ वर्षे महाराष्ट्राचे राजकारण अगदी रटाळ असे होते.अन्य भारतात अनेक पक्ष आलटून पालटून सत्तेवर आले,समीकरणे बदलली पण मराठी मतदार ढिम्म्.काँग्रेस एके काँग्रेस.यावेळी मात्र अगदी असे काही मतदान केले की उलथापालथच करून टाकली.कोणी जातोय मुंबईहून नागपूरला तर कुणी नागपूरहून दिल्लीला तर कुणी विमानतळावरूनच परत....

In reply to by टवाळ कार्टा

जेपी 11/11/2014 - 12:47
तेथे कॉलवून कंफर्म करतात ना फक्त कॉलवुन जमत नाय. पण माई खमकी असल्यामुळे , तिला तिकडची गरज पडत नसेल. *wink*

In reply to by अजया

इरसाल 12/11/2014 - 11:40
मी नाव बदलुन इरसाली किंवा इ-रसाली (रसना रसाळकर सारखे) केले तर अनाहिता मधे प्रवेश मिळेल काय ? आणी हो मी तोपर्यंत अगं, गेले, आले, बोलले, चालले, ची प्रॅक्टीस करते.....आपलं करतो.

In reply to by इरसाल

hitesh 12/11/2014 - 13:27
अनाहिता म्हणजे काय

In reply to by hitesh

जेपी 12/11/2014 - 13:47
हितेस भाय, आमच्या देखत तुमचे तीन जन्म झाले तरी तुमाला अनाहिता माहिती नाही.कुठल्या जगात राहता.नाय मंजे आब्यास बघता तुमी इतच राहात असणार की .

In reply to by hitesh

जेपी 12/11/2014 - 17:28
हितेस भाई, कुठला मटका लावला आहे. कल्याण का मुबंई ? सांगा.आकडेमोड करुन सांगतो कुठला लागेल.

मराठी_माणूस 11/11/2014 - 14:26
. तुमच्याजवळ असलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात मुंबईबाहेरील किती जिल्हे समाविष्ट आहेत ?
बाकी वरील प्रश्न खुप जणांना लागु आहे , जसे आज पर्यंतची सगळी सरकारे, प्रिंट मिडीआ, टीव्ही मीडीआ, फिल्म इंडस्ट्री ईत्यादी

प्राध्यापक 10/11/2014 - 18:21
आधी भावकीत भांडणं करायची. नंतर सख्ख्या शेजाऱ्यांशी भांडायचं ! भविष्यात पुण्याला किंवा कोकणात स्थायिक होण्याचा आपला विचार आहे का ? पुण्याचा संबंध इथे जोडण्याचे काय कारण?

In reply to by स्पा

चौकटराजा 11/11/2014 - 10:07
दोनशे कशाला ?तुम्ही त्यात क डोंं म पा घुसवा चारशे होतील. बाकी नाथाभाउ खडसे ना एक टोपी फुकटात मिळाली. सरकार पडले तर हाती काय लागले असा प्रश्न पडावयास नको !

क्लिंटन 10/11/2014 - 18:32
विधानसभा जागावाटपासाठीच्या चर्चेत २०-२२ वर्षाच्या मुलाला पाठवण्यामागची नेमकी भुमिका काय होती ?
अहो महाराजांनी सोळाव्या वर्षी तोरणा घेतला होता, अठराव्या वर्षी फत्तेखानाचा पराभव केला होता आणि शहाजहानला पत्र लिहून कैदेत पडलेल्या शहाजीराजांची सुटका मोठ्या युक्तीने करून घेतली होती हे विसरलात वाटते? पराक्रमाला आणि तेजाला वयाचे बंधन नसते. आणि मुळात शिवसेनेतला आणि त्यातून मातोश्रीवर जन्माला आलेला म्हणजे डायरेक्ट शिवरायांचाच अवतार तो हे तुम्ही कसे विसरलात? (हा उपहास आहे हे वेगळे सांगायलाच नको :) )

hitesh 10/11/2014 - 18:35
या ठाकरेंवर दोन दिवसात तीन नवीव धागे निघाले.

दुश्यन्त 10/11/2014 - 19:21
राज्यात मोठा पक्ष भाजप. सरकार बनलेय भाजपचे (तरणार पवारांच्या मर्जीने) मात्र गेले महिनाभर मीडिया आणि चर्चेचा फोकस उद्धव आणि शिवसेनेवरच आहे.

मस्तच रे चिनार्या.राज्याचे राजकारण जरा इण्टरेस्टिंग का काय म्हणतात तसे होतेय असे हेही म्हणतात. गेले २५ वर्षे महाराष्ट्राचे राजकारण अगदी रटाळ असे होते.अन्य भारतात अनेक पक्ष आलटून पालटून सत्तेवर आले,समीकरणे बदलली पण मराठी मतदार ढिम्म्.काँग्रेस एके काँग्रेस.यावेळी मात्र अगदी असे काही मतदान केले की उलथापालथच करून टाकली.कोणी जातोय मुंबईहून नागपूरला तर कुणी नागपूरहून दिल्लीला तर कुणी विमानतळावरूनच परत....

In reply to by टवाळ कार्टा

जेपी 11/11/2014 - 12:47
तेथे कॉलवून कंफर्म करतात ना फक्त कॉलवुन जमत नाय. पण माई खमकी असल्यामुळे , तिला तिकडची गरज पडत नसेल. *wink*

In reply to by अजया

इरसाल 12/11/2014 - 11:40
मी नाव बदलुन इरसाली किंवा इ-रसाली (रसना रसाळकर सारखे) केले तर अनाहिता मधे प्रवेश मिळेल काय ? आणी हो मी तोपर्यंत अगं, गेले, आले, बोलले, चालले, ची प्रॅक्टीस करते.....आपलं करतो.

In reply to by इरसाल

hitesh 12/11/2014 - 13:27
अनाहिता म्हणजे काय

In reply to by hitesh

जेपी 12/11/2014 - 13:47
हितेस भाय, आमच्या देखत तुमचे तीन जन्म झाले तरी तुमाला अनाहिता माहिती नाही.कुठल्या जगात राहता.नाय मंजे आब्यास बघता तुमी इतच राहात असणार की .

In reply to by hitesh

जेपी 12/11/2014 - 17:28
हितेस भाई, कुठला मटका लावला आहे. कल्याण का मुबंई ? सांगा.आकडेमोड करुन सांगतो कुठला लागेल.

मराठी_माणूस 11/11/2014 - 14:26
. तुमच्याजवळ असलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात मुंबईबाहेरील किती जिल्हे समाविष्ट आहेत ?
बाकी वरील प्रश्न खुप जणांना लागु आहे , जसे आज पर्यंतची सगळी सरकारे, प्रिंट मिडीआ, टीव्ही मीडीआ, फिल्म इंडस्ट्री ईत्यादी
१. विधानसभा जागावाटपासाठीच्या चर्चेत २०-२२ वर्षाच्या मुलाला पाठवण्यामागची नेमकी भुमिका काय होती ? विधानसभेचे जागावाटप म्हणजे गणेशोत्सवातली खिरापत वाटण्यासारखं असतं का ? २. विधानसभेसाठी युती तोडायची आणि केंद्रात व राज्यातल्या एक महापालिकेत ती कायम ठेवायची असा पवित्रा म्हणजे गल्लीत गोंधळ अनं दिल्लीत मुजरा नव्हे काय ? ३. तुमच्याजवळ असलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात मुंबईबाहेरील किती जिल्हे समाविष्ट आहेत ? ४. समोरच्या पक्षाला बहुमत मिळालं नाही म्हणजे आपला पक्ष जिंकला असं संविधानात कुठे लिहिलंय ? ५.

ग्रेट भेट - राजगड आणि आप्पा परब

वेल्लाभट ·

सुंदर फोटो आणि समर्पक वर्णन. काही दिवसांपूर्वी मिपावर हा धागा आला होता, तेव्हा यायची जबरदस्त इच्छा झाली होती, पण जमलं नाही. तुमच्या वॄत्तान्ताने अंशतः इच्छापूर्ती झाली. दोन कॄष्णधवल फोटो फार आवडले. राजांना (आणि आप्पांना) मुजरा...

कंजूस 10/11/2014 - 16:43
मुलांनी हे किल्ले पाहायलाच हवेत. शिवाय राणी लक्ष्मिबाईचा झाशिचा किल्ला (उ॰प्र॰)राणा कुंभाचा कुंभालगड,राणा प्रतापचा चितोडगड, भरतपूरचा लोहगड, (राजस्थान) व्यंकोजीचा ललितामहाल (तंजोर, तामिळनाड) राणी चन्नमाचा कित्तुर,चित्रदुर्ग (कर्नाटक) हे पण उतारवयात न जाता आता पाहायला हवेत.

कपिलमुनी 10/11/2014 - 20:17
वर्णन आणि फोटो मस्तच . आपा परब यांच्याकडून ऐकलेल्या गोष्टींपैकी १-२ इथे लिहिल्या असत्या तर अजून मजा आली असती

१. वेल्ला भटांना, कारण त्यांनी आधी धागा काढून ह्या उपक्रमाची माहिती दिली. २. अप्पा परब, ह्यांची आणि माझ्या मुलाची गाठ-भेट घालून दिली. ३. अर्थात माझ्या मिपाला आणि मिपाकरांना.मिपाकर आम्हाला भरभरून देत असतात..इतके की, आता ओंजळ भरून वहात आहे...

In reply to by खटपट्या

सखी 11/11/2014 - 00:13
माझाही झालाय, काही कळत काही धाग्यातले काहीच फोटु दिसतात सगळे दिसत नाही. या धाग्यात फुल्ल गणेशा.

सुंदर फोटो आणि समर्पक वर्णन. काही दिवसांपूर्वी मिपावर हा धागा आला होता, तेव्हा यायची जबरदस्त इच्छा झाली होती, पण जमलं नाही. तुमच्या वॄत्तान्ताने अंशतः इच्छापूर्ती झाली. दोन कॄष्णधवल फोटो फार आवडले. राजांना (आणि आप्पांना) मुजरा...

कंजूस 10/11/2014 - 16:43
मुलांनी हे किल्ले पाहायलाच हवेत. शिवाय राणी लक्ष्मिबाईचा झाशिचा किल्ला (उ॰प्र॰)राणा कुंभाचा कुंभालगड,राणा प्रतापचा चितोडगड, भरतपूरचा लोहगड, (राजस्थान) व्यंकोजीचा ललितामहाल (तंजोर, तामिळनाड) राणी चन्नमाचा कित्तुर,चित्रदुर्ग (कर्नाटक) हे पण उतारवयात न जाता आता पाहायला हवेत.

कपिलमुनी 10/11/2014 - 20:17
वर्णन आणि फोटो मस्तच . आपा परब यांच्याकडून ऐकलेल्या गोष्टींपैकी १-२ इथे लिहिल्या असत्या तर अजून मजा आली असती

१. वेल्ला भटांना, कारण त्यांनी आधी धागा काढून ह्या उपक्रमाची माहिती दिली. २. अप्पा परब, ह्यांची आणि माझ्या मुलाची गाठ-भेट घालून दिली. ३. अर्थात माझ्या मिपाला आणि मिपाकरांना.मिपाकर आम्हाला भरभरून देत असतात..इतके की, आता ओंजळ भरून वहात आहे...

In reply to by खटपट्या

सखी 11/11/2014 - 00:13
माझाही झालाय, काही कळत काही धाग्यातले काहीच फोटु दिसतात सगळे दिसत नाही. या धाग्यात फुल्ल गणेशा.
रा'जांनी ज'गलेला गड रा'जपण ज'पणारा गड रा'जांचा ज'वळचा गड रा'जधानीचा ज'बरदस्त गड 1 प्रातःकिरण वरील विस्तारित शब्दांना विशेष अर्थ नाही. राजगडाची आठवण काढल्यावाचून राहणं कठीण होतंय, म्हणून आपलं काहीतरी. पहिल्या वेळेस राजगड भेट झाली तेंव्हाच पुन्हा यायचं हे निश्चित केलं होतं. त्या 'पुन्हा' चा जो योग आला तो फार वेगळा आणि विशेष होता. शिवशौर्य ट्रेकर्स तर्फे राजगड पदभ्रमण मोहीम आयोजित केली गेली आणि सोबत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आप्पा परब असणार अशी माहिती फेसबुकवर बघितली. आप्पांना आधीही भेटलो होतो, त्यांची पुस्तकं वाचलेली आहेतच.

अंधार क्षण भाग ३ (लेख ९)- वंश

बोका-ए-आझम ·

बोका-ए-आझम 10/11/2014 - 14:31
माझा अभ्यास काहीच नाही. मूळ लेखक लाॅरेन्स रीजचं या विषयावर प्रचंड काम आहे. मी फक्त अनुवाद केलाय. ही भाग ३ ची प्रस्तावना अाहे. पूर्ण भाग बरेच मोठे आहेत.

हे लेखन केवळ मुलाखती नसून खूपच खोलवरचा शास्त्रिय विचार करून केलेल दिसतेय. हळू हळू मनाची जबरदस्त पकड घेईल याची चुणूक दिसू लागलीय. धन्यवाद हे लेखन आमच्यापर्यंत आणल्याबद्दल !

असंका 11/11/2014 - 16:50
आपण फारच सारांशाने लिहित आहात का? आपले सर्व लेख अगदी पकड घेत असतानाच संपल्यासारखे वाटले. (बाकी आपण फार भावूक वर्णने अजिबात केलेली नाहीत. हा मुद्दाम घेतलेला निर्णय आहे का? कसेही असले तरी त्याबद्द्ल धन्यवाद...एरवी मी ढसाढसा रडलो आहे यासंबंधीची इतर माहिती वाचून!)

बोका-ए-आझम 10/11/2014 - 14:31
माझा अभ्यास काहीच नाही. मूळ लेखक लाॅरेन्स रीजचं या विषयावर प्रचंड काम आहे. मी फक्त अनुवाद केलाय. ही भाग ३ ची प्रस्तावना अाहे. पूर्ण भाग बरेच मोठे आहेत.

हे लेखन केवळ मुलाखती नसून खूपच खोलवरचा शास्त्रिय विचार करून केलेल दिसतेय. हळू हळू मनाची जबरदस्त पकड घेईल याची चुणूक दिसू लागलीय. धन्यवाद हे लेखन आमच्यापर्यंत आणल्याबद्दल !

असंका 11/11/2014 - 16:50
आपण फारच सारांशाने लिहित आहात का? आपले सर्व लेख अगदी पकड घेत असतानाच संपल्यासारखे वाटले. (बाकी आपण फार भावूक वर्णने अजिबात केलेली नाहीत. हा मुद्दाम घेतलेला निर्णय आहे का? कसेही असले तरी त्याबद्द्ल धन्यवाद...एरवी मी ढसाढसा रडलो आहे यासंबंधीची इतर माहिती वाचून!)
लेखनविषय:
लेखनप्रकार
अंधार क्षण भाग ३ - वंश वंश आणि त्याच्या अनुषंगाने येणारे इतर सांस्कृतिक मुद्दे दुस-या महायुद्धात फार महत्त्वाचे होते. या भागात ज्या ४ जणांच्या मुलाखती आहेत ते सर्वजण - २ जपानी, १ अमेरिकन आणि १ जर्मन - या युद्धात सैनिक म्हणून लढले आहेत. यांच्या मुलाखती जरी इथे एकाच भागात असल्या तरी मी त्या वेगवेगळ्या ठिकाणी (स्पष्टपणे सांगायचं तर तीन वेगवेगळ्या खंडांमध्ये) आणि वेगवेगळ्या काळात घेतलेल्या आहेत.