सुरूवातीपासून शेवटपर्यंत उद्धव ठाकर्यांनी व पर्यायाने शिवसेनेने अत्यंत चुकीची पावले टाकली आणि त्यातूनच आज शिवसेनेची अवस्था 'युद्धात हरले आणि तहातही हरले' अशी केविलवाणी झाली आहे. १५ वर्षे सत्तेपासून लांब राहिल्यावर सत्ता अगदी हातातोंडाशी येऊनही आपल्याच चुकीमुळे घास तोंडात जाताजाता हातातून पडून मातीत मिळावा आणि पुन्हा एकदा उपाशी रहावे लागण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. आणि ही वेळ शिवसेनेनेच स्वतःवर ओढवून घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर लगेचच भाजपने जागावाटपाचा फॉर्म्युला बदलण्याची मागणी करायला सुरूवात केली होती. 'महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मीच असणार' असे त्यावेळी कै. गोपीनाथ मुंड्यांनी जाहीररित्या सांगितले होते. केंद्रात सेनेला अत्यंत बिनमहत्त्वाचं फक्त १ मंत्रीपद देऊन भाजपने आपलं भविष्यातील धोरण स्पष्ट केलं होतं. भाजपचे धोरण ओळखूनच शिवसेनेने आपल्या चाली आखायला हव्या होत्या. परंतु सेना नेते आपल्याच अहंकारात, भ्रमात व नसलेल्या ताकदीच्या जोषात राहिले.
भाजप जास्त जागा लढविण्यासाठी दबाव आणणार हे मे २०१४ मध्येच स्पष्ट झाले होते. अशावेळी मे ते सप्टेंबर या काळात शिवसेनेने धोरणीपणे विचारमंथन करून आपले डावपेच आखायला हवे होते.
११९ पेक्षा थोड्या जास्त जागा देऊन भाजपचे समाधान करावे, आपण कधीच निवडून आलो नाही व ज्या जागा भाजपलाही जिंकणे अशक्य आहे अशा जागा देऊन त्याग केल्याचा आव आणावा, ११९ पेक्षा थोड्या जास्त जागा देऊन त्या बदल्यात महत्त्वाची मंत्रिपदे देण्याचे जाहीर आश्वासन भाजपकडून घ्यावे व त्या बदल्यात केंद्रात जास्त व महत्त्वाची मंत्रिपदे मागून घ्यावीत, हे सुरू असतानाच मनसे व इतर काही स्थानिक पक्षांशी बोलणी करून भाजपविरूद्ध पर्यायी आघाडी तयार करावी असे अनेक पर्यात शिवसेनेला उपलब्ध असताना शिवसेना नेते गाफील राहिले.
भाजप कदापिही युती तोडणार नाही, ज्या भाजपला आपण २५ वर्षे आपल्या तालावर नाचविले आहे तो भाजप यापुढेही आपल्याच तालावर नाचत राहील, आपण म्हणू तसेच होईल या भ्रमात शिवसेना नेते राहिले. सुरेश प्रभू, मनोहर जोशी इ. समंजस नेत्यांना वाळीत टाकून उद्धव ठाकरे अत्यंत उथळ, वाचाळ, अविचारी असलेल्या व अजिबात दूरदृष्टी नसलेल्या संजय राऊत, रामदास कदम, रावते, प्रेम शुक्ला इ. नेत्यांवर विसंबून राहिले व त्याची फळे शिवसेनेला मिळाली.
४ सप्टेंबरला अमित शहा मुंबईत येणार होते. त्यांनी स्वतःहून मातोश्रीवर येऊन आपली भेट घ्यावी अशी उद्धव ठाकर्यांची इच्छा होती. परंतु त्यांनी अमित शहा व मोदी या जोडगोळीला ओळखण्यात चूक केली. हे दोघे भाजपच्या पूर्वीच्या नेत्यांप्रमाणे प्रादेशिक पक्षांपुढे झुकणारे नसून अत्यंत धोरणी व प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व सहन न करणारे आहेत हे त्यांच्या लक्षातच आले नाहीत. अमित शहा मुंबईत येऊन उद्धव ठाकर्यांना भेटणार नाहीत हे समजल्यावर तिळपापड होऊन शिवसेनेने 'शहाणा हो' ही पोस्टर्स सोशल मिडियातून पाठवायला सुरूवात करून त्यांना डिवचले. अमित शहांना डिवचणे म्हणजे थेट मोदींनाच डिवचण्यासारखं होतं हे सेना नेतृत्वाला कधी समजलंच नाही. अमित शहांनी शहाणपणा दाखवून याकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्यावर शेवटी उद्धव ठाकर्यांना अमित शहांना मातोश्री भेटीचे सन्मानपूर्वक निमंत्रण पाठवावं लागलं आणि इथेच शिवसेना झुकायला आणि डाव हरायला सुरूवात झाली.
नंतर प्रत्यक्ष जागावाटपाची बोलणी सुरू असताना सुरवातीला भाजपने १३५-१३५-१८ असा फॉर्म्युला सुचविला होता. भाजपची ताकद शिवसेनेच्या तुलनेत दीडपट होती. त्यानुसार भाजप १६०-१७०, शिवसेना १००-११० व मित्रपक्ष १८ असेच जागावाटप हवे होते. असे असतानाही भाजपची मागणी जास्तीत जास्त १३५ जागांची होती. नंतरच्या चर्चेत भाजप १३०-१४०-१८ व त्यानंतर १२५-१४५-१८ इतका खाली उतरला होती. शिवसेनेला ही उत्कृष्ट संधी होती. भाजप १२५ जागा लढवत असल्याने भाजपला जास्तीत जास्त १०० जागा जिंकता आल्या असत्या व त्यामुळे भाजप बहुमतापासून खूप दूर राहिला असता (आता भाजपने १२२ जागा जिंकल्याने फार थोड्या जागांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज आहे.). शिवसेनेला १४५ जागा लढवून कदाचित भाजपपेक्षा जास्त जागा जिंकण्याची व पर्यायाने मुख्यमंत्रीपद मिळविण्याची संधी होती. जरी भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या असत्या तरी उपमुख्यमंत्रीपद व इतर अनेक महत्त्वाची मंत्रिपदे मिळाली असती. युती करून एकत्र लढल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी ला प्रत्येकी ३० पेक्षा कमी जागा मिळाल्या असत्या व राष्ट्रवादीला खूप कमी जागा मिळाल्यामुळे भाजपला पाठिंबा देउन उपयोगच झाला नसता. पर्यायाने भाजपला सर्वार्थाने शिवसेनेवरच अवलंबून रहावे लागले असते.
दुर्दैवाने उद्धव ठाकरे स्वतःच्या अहंकाराचे बळी ठरले. युती तुटल्यावर सुद्धा स्वतःच्या अहंकारामुळे मनसेबरोबर नवीन आघाडी त्यांना करता आली नाही. भाजपने आधीच योजना आखून सर्व मित्रपक्षांना स्वतःच्या बाजूला वळवून शिवसेनेला पूर्ण एकाकी पाडले.
युती तुटली ही वस्तुस्थिती मान्य करून हे वास्तव समंजसपणे स्वीकारण्याऐवजी शिवसेनेने प्रचारात असभ्य पातळी गाठली. सामनातून व सभांमधून सातत्याने अमित शहा व मोदींना लक्ष्य करून त्यांच्याविरूद्ध अत्यंत असभ्य व नकारात्मक प्रचार केला गेला. त्यांच्याबरोबरीने मित्रपक्षांचे राजू शेट्टी, रामदास आठवले, जानकर इ. ना ही लक्ष्य केले. शेवटी खडसेंविरूद्धही अत्यंत नकारात्मक प्रचार केला. महाराष्ट्रातील लोकांना मोदी हवे आहेत व काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभारातून मुक्ती हवी आहे हे सेनेने न ओळखता काँग्रेस-राष्ट्रवादी ऐवजी भाजपलाच आपला मुख्य शत्रू मानण्याची घोडचूक केली. मोदींना अफझलखानाची उपमा देणे, अमित शहांना आदिलशहा-कुतुबशहाची उपमा देणे, मोदींच्या तीर्थरूपांचा उद्धार करणे, आदित्य ठाकरे सारख्या पोराला चर्चेसाठी पाठविणे अशा अनेक घोडचुका सेनेने केल्या.
याउलट भाजपने समंजसपणे शिवसेनेच्या प्रचाराकडे दुर्लक्ष करून आपला सकारात्मक प्रचार सुरू ठेवला व सेनेचे आपोआप खच्चीकरण होत गेले. त्याचेच परीणाम निकालात दिसले. भाजपच्या तुलनेत जेमतेम निम्म्या जागा मिळवून युतीतला मोठा भाऊ खरोखर कोण होता याचे जनतेनेच उत्तर दिले.
तरीही भाजपला स्पष्ट बहुमत न मिळणे व आपल्याकडे तब्बल ६३ आमदार असणे हे शिवसेनेकडे हुकमी एक्के होते. त्यांनी आपली पाने नीट खेळली असती तर त्यांना बर्याच गोष्टी मिळविता आल्या असत्या. कदाचित सेनेला अडीच वर्षांकरता मुख्यमंत्रीपदही मिळविता आले असते.
ज्या दिवशी निकाल लागले त्याच दिवशी सेनेने भाजपला पाठिंबा जाहीर करून सर्वप्रथम भाजपला मिळू शकणारी राष्ट्रवादीची रसद रोखायला हवी होती. भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही हे एकदा नक्की करून नंतर भाजपकडून आपल्याला हवे ते सेनेला मिळविता आले असते. एकदा सेनेचा पाठिंबा घेतल्यावर त्यांना लाथाडून नंतर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणे भाजपला अत्यंत अवघड झाले असते. हे न करता शिवसेना पुन्हा एकदा गाफील राहिली. भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही व शेवटी त्यांना आपलेच पाय धरावे लागतील या भ्रमात सेना नेते राहिले. भाजपने चातुर्याने सेनेला बोलण्यात गुंतवून अपक्ष व इतर लहान पक्षांचा पाठिंबा मिळवून आपली गरज जेमतेम ७-८ आमदारांवर आणली व राज्यपाल व सभापती आपल्याच पाठीशी राहणार असे धोरण आखून शिवसेनेच्या मदतीशिवात विश्वासदर्शक ठराव मंजूर करुन घेऊन शिवसेनेचे मानेवरील जोखड कायमचे उतरविले.
भारतीय मतदार व्यक्तिगत असभ्य टीका व नकारात्मक प्रचार कायमच नाकारतो हे शिवसेनेच्या पराभवामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
शिवसेनेच्या जागी मायावती असती तर तिने अत्यंत चातुर्याने पत्ते खेळून स्वत:च्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद मिळविले असते. किंवा राकाँ, काँ बरोबर मोट बांधून स्वतःचाच मुख्यमंत्री बनविला असता. दुर्दैवाने शिवसेना नेत्यांकडे धोरणीपणाचा संपूर्ण अभाव व अहंकार, स्वतःच्या नसलेल्या ताकदीबद्दल भ्रम, उर्मटपणा, अविचारीपणा, प्रक्षोभक शब्द, उथळ्पणा व असंमजपणा याशिवाय दुसरे काहीच नसल्याने शिवसेना युद्ध हरलीच पण तहातही हरली.
ही निवडणुक शिवसेनेच्या अंताचा प्रारंभ ठरणार असे आता वाटत आहे.
वाचने
122342
प्रतिक्रिया
256
मिसळपाव
प्रतिक्रिया
राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnershipबाप रे
In reply to राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर by मदनबाण
ते
In reply to बाप रे by समीरसूर
सध्याच्या या घडामोडी पाहुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Microsoft to invest Rs 1,400 crore in India cloud data centres Amazon plans it big with India Post network to ramp up its delivery mechanism After a gap of 28 years: PM Narendra Modi's Australia trip to boost trade, investment, energy and security partnershipअजून वेळ आहे.....
भाजपा
+१
In reply to भाजपा by कपिलमुनी
+१
In reply to +१ by समीरसूर
ह्म्म.. काल माझ्या मनात देखील
In reply to +१ by कपिलमुनी
रडीच्या डावाचा प्रश्नच उद्भवत
In reply to +१ by समीरसूर
श्रीगुरुजी - श्री गणेशा -
कंगोरे.
In reply to श्रीगुरुजी - श्री गणेशा - by प्रमोद देर्देकर
>>> भाजपा समर्थक सारी चुक
प्रभारी व्हाच
In reply to >>> भाजपा समर्थक सारी चुक by श्रीगुरुजी
(No subject)
In reply to प्रभारी व्हाच by दिवाकर देशमुख
लांगुलचालन?
In reply to प्रभारी व्हाच by दिवाकर देशमुख
हिन पातळीचा ?
In reply to लांगुलचालन? by प्रभाकर पेठकर
शब्दप्रयोग चुकीचाच.
In reply to हिन पातळीचा ? by दिवाकर देशमुख
बरोबर
In reply to शब्दप्रयोग चुकीचाच. by प्रभाकर पेठकर
राजधर्म
In reply to >>> भाजपा समर्थक सारी चुक by श्रीगुरुजी
>>> १.पूर्ण १४४ आमदारांच्या
In reply to राजधर्म by कपिलमुनी
>> >> राष्ट्रवादीने पाठिंबा
In reply to >>> १.पूर्ण १४४ आमदारांच्या by श्रीगुरुजी
बहुमत आणि सत्य
In reply to >>> १.पूर्ण १४४ आमदारांच्या by श्रीगुरुजी
जरा टॅन्जशिअल जात आहे
In reply to बहुमत आणि सत्य by कपिलमुनी
आणखी एक
In reply to जरा टॅन्जशिअल जात आहे by क्लिंटन
+१ ..
In reply to आणखी एक by क्लिंटन
आपला तो बाब्या?
In reply to +१ .. by हाडक्या
मार्मिक प्रतिसाद
In reply to आणखी एक by क्लिंटन
एवढाच साधक बाधक विचार 'आप'
In reply to मार्मिक प्रतिसाद by अनन्त अवधुत
मुद्दा फक्त नैतिकतेचाआहे
In reply to जरा टॅन्जशिअल जात आहे by क्लिंटन
पण शेवटी मुद्दा तोच येतो
In reply to मुद्दा फक्त नैतिकतेचाआहे by कपिलमुनी
>>> अचानक कार्यक्रम
In reply to बहुमत आणि सत्य by कपिलमुनी
सापेक्ष
In reply to >>> अचानक कार्यक्रम by श्रीगुरुजी
भाजपने सत्ता स्थापनच करायला नको होती
In reply to >>> भाजपा समर्थक सारी चुक by श्रीगुरुजी
भाजपने सत्ता स्थापनच करायला
In reply to भाजपने सत्ता स्थापनच करायला नको होती by समीरसूर
>>> अशा परिस्थितीत भाजपने
In reply to भाजपने सत्ता स्थापनच करायला नको होती by समीरसूर
अल्पमतातील सरकारे
In reply to >>> अशा परिस्थितीत भाजपने by श्रीगुरुजी
>>> कोणत्या प्रकारे ते पण
In reply to अल्पमतातील सरकारे by कपिलमुनी
आवाजी मतदान आधी जे झालेले
In reply to >>> कोणत्या प्रकारे ते पण by श्रीगुरुजी
आवाजी मतदान आधी जे झालेले तेव्हा आमदारांनी आधीच समर्थन पत्रे दिलेली.
गुरुजी ही गोष्ट का लपवत आहेत. सुधरणार नाहीच म्हणा तुम्ही. भाजपाने रडीचाच डाव खेळला आहे सत्तेसाठी कोणत्याही थरावर जातात आणि भक्तांना सोशल मिडीयावर वार्यावर सोडतात :)चालायचच
In reply to आवाजी मतदान आधी जे झालेले by दिवाकर देशमुख
>>> कोणत्या प्रकारे ते पण
In reply to अल्पमतातील सरकारे by कपिलमुनी
माझ्या नाशिकच्या मित्रांनी ही
वर थत्ते यांनी नमूद
भाजपचे 'पवारालंबी' सरकार!
मग काय ठरलं शेवटी?
http://www.misalpav.com
In reply to मग काय ठरलं शेवटी? by आजानुकर्ण
दोन्हीपैकी काहीही नाही.
In reply to मग काय ठरलं शेवटी? by आजानुकर्ण
असल 'अफलातून ' उत्तर वाचून
In reply to दोन्हीपैकी काहीही नाही. by श्रीगुरुजी
माधुरी दीक्षित
In reply to असल 'अफलातून ' उत्तर वाचून by पिंपातला उंदीर
+१
In reply to असल 'अफलातून ' उत्तर वाचून by पिंपातला उंदीर
झाले एकत्र
In reply to +१ by श्रीगुरुजी
भाजपा समर्थक सारी चुक
खिंड लढवणारे काही तुरळक भक्त
In reply to भाजपा समर्थक सारी चुक by दुश्यन्त
बाकी चालु द्या .. पण एक
In reply to खिंड लढवणारे काही तुरळक भक्त by बॅटमॅन
बरोबर आहे...
In reply to बाकी चालु द्या .. पण एक by हाडक्या
वरील मुद्द्यावर भाजप आपल्या
बरोबर शब्दात बोलला आहात,
In reply to वरील मुद्द्यावर भाजप आपल्या by जयनीत
.
In reply to वरील मुद्द्यावर भाजप आपल्या by जयनीत
बुट्टी आणि सुटी
In reply to . by hitesh
.
In reply to बुट्टी आणि सुटी by कपिलमुनी
.
In reply to . by hitesh
शक्यतो
In reply to . by hitesh
राजकारण हा माझा प्रांत नाही.
+१
In reply to राजकारण हा माझा प्रांत नाही. by सुबोध खरे
सुयोग्य विश्लेषण
In reply to +१ by श्रीगुरुजी
क्या बात है!!
In reply to +१ by श्रीगुरुजी
सहमत आहे, काल ह सगळा घटनाक्रम
In reply to राजकारण हा माझा प्रांत नाही. by सुबोध खरे
साधनशुचीता.
In reply to राजकारण हा माझा प्रांत नाही. by सुबोध खरे
+१
In reply to राजकारण हा माझा प्रांत नाही. by सुबोध खरे
थोडक्यात काय तर