मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हॉटेल शिवीभोजन थाळी

पाषाणभेद ·

चौथा कोनाडा 08/02/2020 - 15:52
मस्त, खुसखुशीत ! फर्मास खिल्ली, स्किट सादर करण्याजोगे ! बायदवे, पहिल्या दोन-चार दिवसांच्या कौतुकांच्या बातम्या नंतर या शासकिय भोजनाची परिस्थिती कशी आहे काही आयडिया ?

चौथा कोनाडा 08/02/2020 - 15:52
मस्त, खुसखुशीत ! फर्मास खिल्ली, स्किट सादर करण्याजोगे ! बायदवे, पहिल्या दोन-चार दिवसांच्या कौतुकांच्या बातम्या नंतर या शासकिय भोजनाची परिस्थिती कशी आहे काही आयडिया ?
हॉटेल शिवीभोजन थाळी मालक: हॅ हॅ हॅ. मालक: सोन्या, नालायका बघ रे, गिर्‍हाईक आलं. हॅ हॅ हॅ या या या. बसा बसा बसा. मालक: सोन्या रांडीच्या, पाच नंबरचे कळकटलेले टेबल आरशासारखे पुस, अन गिर्‍हाईकाला काय लागते ते पुस. हॅ हॅ हॅ. मालक: सोन्या नरसाळ्या, अरे माझा कडमड्या मोबाईल कुठे आहे? त्या पेताड भाजीवाल्याची भाजी आली नाही अजून. त्याच्या *डीत जास्त माज आलेला आहे. निट वेळेवर भाजी सप्लाय करत नाही तर मग मी थाळीत काय *ट देवू काय? मालक: सापडला रे मोबाईल. माझ्याच *डीखाली होता रे तो सोन्या शिंदळीच्या. तु गिर्‍हाईकाला तुझे पाणी पाज.

चुलीवरच्या मिसळीची पाककृती

निनाद ·

mrcoolguynice 09/01/2020 - 10:15
लेख छान, आवडला... बाकी या प्रोसेस मधील एक मुख्य जिन्नस, तुम्ही कुठला वापरता ? ब वा, हे, मि, किं फी, नॉ आ, ट्यु, का...

In reply to by राघव

महासंग्राम 18/01/2020 - 15:49
बियर पिल्यानंतर आठवण राहत नाही, मग असं नाव लिहावं लागतं मधून तळीराम भट्टीवाले मालक संत्रा मदिरा मंडळी

mrcoolguynice 09/01/2020 - 10:15
लेख छान, आवडला... बाकी या प्रोसेस मधील एक मुख्य जिन्नस, तुम्ही कुठला वापरता ? ब वा, हे, मि, किं फी, नॉ आ, ट्यु, का...

In reply to by राघव

महासंग्राम 18/01/2020 - 15:49
बियर पिल्यानंतर आठवण राहत नाही, मग असं नाव लिहावं लागतं मधून तळीराम भट्टीवाले मालक संत्रा मदिरा मंडळी
चुलीवरच्या मिसळीची पाककृती "तुम्च्या मिसळीची पाककृती आमाला पायजेल" अशी विचारणा आल्याने ही कृती देत आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने यात बदल करून घ्यावेत. --- गरम असा दिवस पाहून ठेवावा. मग सर्वात आधी दुकानात जाऊन आवडती बियर बाटल्यांची एक थंडगार केस आणावी. आपल्या आवडीचे धम्माल मित्र-मैत्रिण लोक घरी बोलवावेत. मस्त बियर पीत गप्पा हाणता हाणता अगदी रंगात आल्या की, 'चला चुलीवरची मिसळ करायची का?' असे पिल्लू सोडावे. ही कल्पना बहुदा सर्वांना आवडतेच! मग चूल पेटवण्याचे प्रयत्न सुरू करावेत. या वेळा पर्यंत सर्वांची 'किमान बियर पातळी' गाठलेली असेल तर उत्तम असते.

रुपाली हॉटेल

अविनाशकुलकर्णी ·

अरे बापरे ! मला वाटले की तुमच्या अजून कोणत्यातरी कथेत नायकाची पत्नी मेली आणि त्याने कामवालीबरोबर लग्न केले की काय ? कथांमधून अगदी बायका मारण्यापेक्षा त्यांना घसटफोट देत जा हो तुम्ही. तेव्हढाच त्यांच्या जीवनात बदल ! :)

सतिश गावडे 10/11/2019 - 21:25
अप्रतिम लेख. "फुकट ते पौष्टिक" आणि "ज्याचा खावा शिरा त्याची जाहिरात करा" या दोन म्हणी आठवल्या. लक्षणी देवतेचे काही व्रत वगैरे केले होते का हाटेल वाल्यानी?

विजुभाऊ 11/11/2019 - 11:08
अरेच्चा . क्रमशः लिहायचे राहून गेलेय का? कारण अजून घट्ट मिठी , चुंबनांचा वर्षाव वगैरे काहीच आले नाही लेखनात.

In reply to by खिलजि

सोत्रि 11/11/2019 - 16:16
तुमच्या गुर्देवांचे फटू आणि फेसबुक भिंत बघा त्यांचा अनुग्रह घेण्यासाठी तुम्ही त्रिखंडात कुठेही जाल. तुमची श्रद्धा त्रिगुणित होइल. - (अकुंची FB भिंत बधून सद्गदीत झालेला) सोकाजी

नाखु 13/11/2019 - 22:36
ताणून चाललेल्या रणधुमाळीत हा शिरा बरा. बाकी स्त्री पात्र विरहित अकु कथा असू शकते यावर अखिल मिपा वाचक महासंघाचा विश्वास बसणे कठीण आहे. कुठे आहेत अच्छे दिन या नियतकालिकातील सन्यास ते उपन्यास या सदरातून साभार

In reply to by हस्तर

ते लक्षात आल्यावर परिस्थिती बदलणार आहे काय ? फडणविसांनी त्यांना पक्षांतर्गत अडचण होईल म्हणून २०११ च्या ऐवजी २०१९ ला जाहिर करुया अशी उद्धवजींना विनंती केली असेल तर ??

सुमो 16/11/2019 - 14:13
पण सकाळी सकाळी हनुमान टेकडी वर फिरायला जाणं परतताना रुपालीचा उपमा नि खोबर्‍याची चट्णी खाणं ऑफिसला जाताना वैशालीत उत्तप्पा विथ ग्रीन चटणी चापणं लंच ब्रेक मधे आम्रपालीत मलाई कोफ्ता बटर पराठा खाणं अन इतकं सगळं झाल्यावर लाइट खायला हवं असं म्हणून संध्याकाळी वैशालीत शेव बटाटा दही पुरी उर्फ एस्पीडिपी खाणं पुण्यातल्या खूप आठवणी या निमीत्ताने जाग्या झाल्या!

अरे बापरे ! मला वाटले की तुमच्या अजून कोणत्यातरी कथेत नायकाची पत्नी मेली आणि त्याने कामवालीबरोबर लग्न केले की काय ? कथांमधून अगदी बायका मारण्यापेक्षा त्यांना घसटफोट देत जा हो तुम्ही. तेव्हढाच त्यांच्या जीवनात बदल ! :)

सतिश गावडे 10/11/2019 - 21:25
अप्रतिम लेख. "फुकट ते पौष्टिक" आणि "ज्याचा खावा शिरा त्याची जाहिरात करा" या दोन म्हणी आठवल्या. लक्षणी देवतेचे काही व्रत वगैरे केले होते का हाटेल वाल्यानी?

विजुभाऊ 11/11/2019 - 11:08
अरेच्चा . क्रमशः लिहायचे राहून गेलेय का? कारण अजून घट्ट मिठी , चुंबनांचा वर्षाव वगैरे काहीच आले नाही लेखनात.

In reply to by खिलजि

सोत्रि 11/11/2019 - 16:16
तुमच्या गुर्देवांचे फटू आणि फेसबुक भिंत बघा त्यांचा अनुग्रह घेण्यासाठी तुम्ही त्रिखंडात कुठेही जाल. तुमची श्रद्धा त्रिगुणित होइल. - (अकुंची FB भिंत बधून सद्गदीत झालेला) सोकाजी

नाखु 13/11/2019 - 22:36
ताणून चाललेल्या रणधुमाळीत हा शिरा बरा. बाकी स्त्री पात्र विरहित अकु कथा असू शकते यावर अखिल मिपा वाचक महासंघाचा विश्वास बसणे कठीण आहे. कुठे आहेत अच्छे दिन या नियतकालिकातील सन्यास ते उपन्यास या सदरातून साभार

In reply to by हस्तर

ते लक्षात आल्यावर परिस्थिती बदलणार आहे काय ? फडणविसांनी त्यांना पक्षांतर्गत अडचण होईल म्हणून २०११ च्या ऐवजी २०१९ ला जाहिर करुया अशी उद्धवजींना विनंती केली असेल तर ??

सुमो 16/11/2019 - 14:13
पण सकाळी सकाळी हनुमान टेकडी वर फिरायला जाणं परतताना रुपालीचा उपमा नि खोबर्‍याची चट्णी खाणं ऑफिसला जाताना वैशालीत उत्तप्पा विथ ग्रीन चटणी चापणं लंच ब्रेक मधे आम्रपालीत मलाई कोफ्ता बटर पराठा खाणं अन इतकं सगळं झाल्यावर लाइट खायला हवं असं म्हणून संध्याकाळी वैशालीत शेव बटाटा दही पुरी उर्फ एस्पीडिपी खाणं पुण्यातल्या खूप आठवणी या निमीत्ताने जाग्या झाल्या!
..... दिवाळीत लक्ष्मी पूजनाची खरेदी आटपल्यावर आम्ही डेक्कन वरच्या रुपाली हॉटेल मध्ये खादाडी करायला गेलो होतो बिल दिल्यावर काउंटर वर गप्पा मारताना क्याशीयर म्हणाला उद्या लक्षणी पूजना निमित्त हॉटेल तर्फे सर्व ग्राहकांना मोफत शिरा वाटप आहे नक्की या मी गेलो होतो साजूक तुपातला काजू बेदाणे मिश्रित शिरा चापला हि सकाळी रांगोळी आदी सजावटीत गर्क असल्याने आली नव्हती मालकांनी २ प्लेट शिरा पार्सल करून दिला घरी आल्यावर तो पण चापला

आमार कोलकाता - भाग ९ (अंतिम) - बंगभोज

अनिंद्य ·

जेम्स वांड 06/11/2019 - 19:12
परत एकदा रसना खवळून उठली! खल्लास फोटो अन खाद्ययात्रा. एक हलकीफुलकी दुरुस्ती सुचवतो, गोड मानून घेणे इतकेच काय भारतातल्या मोजक्याच 'मिशिगन स्टार' दर्जा असलेल्या हा मिशिगन स्टार नसून मिशलीन स्टार होय असे वाटते, १९व्या शतकात स्वयंचलित चारचाकी गाड्या प्रसिद्धी पावल्या तसे त्यांना पूरक-एकमेकांस पूरक उद्योग पक्षी पोलाद, रबर टायर वगैरे उभे राहिले, अशीच एक टायर कंपनी होती मिशलीन (michelin) त्यांना टायर्सचा खप वाढवायचा होता पण लोकांनी गाड्या फिरवल्याच नाहीत तर टायर्स झिजून जुनी होणार कशी?? अन नव्या टायर्सचा खप वाढणार कसा?? त्यातून मिशलीन पडली अस्सल फ्रेंच कंपनी, फ्रेंच लोक खवय्येगिरीत वंगबंधूंचे कार्बन कॉपी किंवा एकाला झाकावे दुसऱ्याला काढावे इतकेच दर्दी, कुठं सोव्हिग्नोन कॅबरीनेट रेड वाईन उत्तम मिळते, कुठले मिमोलेत चीज सर्वोत्तम, बॅगवेत ब्रेड ताजी कुठे मिळते वगैरे सतत हुडकणारे म्हणजे फ्रेंच. झालं, मिशलीन मधल्या एका हुशार पात्राने शक्कल लढवली आणि दरवर्षी ते लोक एक मिशलीन गाईड काढू लागले सुरुवातीला (१९००-१९२२) गाईडमध्ये फक्त गाडीचे तेलपाणी वंगण वगैरे माहिती असे १९२२ पासून मिशलीननं फ्रेंच लोकांचे खाद्यप्रेम ओळखून गाईडमध्ये उत्तमोत्तम जिन्नसा मिळणारी हॉटेल्स अंतर्भूत करायला सुरुवात केली अन गम्मत म्हणजे त्यानंतर लोक गाड्या जास्त फिरवू लागले, टायर्सचा खप वाढला!! त्यानंतर मिशलीननं गाईड जरी प्रकाशित केली न केली तरी कंपनी दरवर्षी जगातील सर्वोत्तम उपहारगृह/भोजनालयांचे रेटिंग नक्कीच करते, ही प्रोसेस भयानक खडतर असते अन नावाजलेला ब्रिटिश शेफ गॉर्डन रामसे चक्क एकदा मिशलीन परिमणांवर नापास सुद्धा झालाय, त्या कडक चाचणीतून पार होणाऱ्या हॉटेल्सला वर्षभरासाठी मिशलीनकडून १,२ किंवा ३ स्टार दिले जातात ही रेटिंग बदलत असतात, म्हणून कायम मिशलीन रेटिंग मध्ये राहणे म्हणजे अशक्यप्राय असते, जे हॉटेल सतत दोन वर्षे राहिले ते तर म्हणजे सर्वोत्तम हॉटेल गणले जाते. अशी ही कथा "मिशलीन स्टार्सची"

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 06/11/2019 - 20:45
@ जेम्स, बरोबर आहे तुमचे 'मिशलीन' स्टारच पाहिजे होते. आता संपादकांनी केली तरच दुरुस्ती होईल. मिशलीनच्या जन्मकथेबद्दल खूप आभार. आता हा 'ऑल हायप लिटिल सबस्टन्स' प्रकार झालाय असे वाटते. फार माहिती नाही. ह्या लेखमालेत तुमचे अभ्यासपूर्ण पण मिश्किल प्रतिसाद वेळोवेळी आले, त्यामुळे न कंटाळता पुढील भाग लिहीत राहिलो. असाच लोभ ठेवा _/\_ अनिंद्य

पलाश 06/11/2019 - 21:03
अप्रतिम लेखमालेचा सुरस शेवट फार आवडला. माशांना "जलपुष्प" म्हणतात हे वाचल्यावर ज्या कोणी हा शब्द पहिल्यांदा वापरला असेल त्याचं कौतुक वाटलं. छानच शब्द आहे. बंगाली मिठाईंची नावंसुद्धा खूप गोड आहेत. वाचायलाही आवडली. खायला त्या ठिकाणी जायलाच हवं. पुढील लेखनाची प्रतिक्षा आहे.

In reply to by पलाश

अनिंद्य 11/11/2019 - 12:20
@ पलाश "जलपुष्प" ..... मासे खात नसलो तरी मलाही शब्द मजेदार वाटतो :-) तुम्ही वेळोवेळी दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक आभार.

बबन ताम्बे 06/11/2019 - 22:13
काही भागांवर मी प्रतिसाद लिहायचा कंटाळा केला,पण सर्व भाग आवर्जून वाचले. अप्रतिम लेखमाला. बंग (की वंग ?) संस्कृतीची विस्तृत ओळख झाली. पुढील लेखमालेस मनपूर्वक शुभेच्छा.

In reply to by बबन ताम्बे

अनिंद्य 07/11/2019 - 10:49
@ बबन ताम्बे, कंटाळा करू नका हो, बरे-वाईट जसे वाटले ते सांगत चला :-) इथे मिळणारे अभिप्राय / सूचना / सल्ले / प्रतिसाद यामुळे चुका समजतात, हुरूप येतो.

सुमो 07/11/2019 - 11:00
लेखमाला. आणि आणि त्यावर कळस म्हणजे हा समारोपाचा बंगभोज !!! मत्स्यमंजिरी काय, शहाळ्यातल्या मलईत शिजवलेले प्रॉन्स काय, माछेर झोल काय....!! छ्या.... जायला लागतंय कोलकात्याला.

श्वेता२४ 07/11/2019 - 11:04
मिपावरील माझ्या आवडीच्या लेखमालांपैकी ही एक लेखमाला.बंगालचा ऐतिहासिक,सामाजिक, सांस्कृतिक व चालिरीतींचा विस्तारपूर्वक सचित्र धांडोळा आपण सर्वांसाठी खुला केलात. त्याबद्दल अनेक आभार.

In reply to by श्वेता२४

अनिंद्य 11/11/2019 - 12:16
@ श्वेता२४ मालिकेवर पहिलावहिला प्रतिसाद तुमचाच होता. पूर्ण बंगाल नाही तरी कोलकाता शहराबद्दल विस्तृत सांगण्याचा प्रयत्न होता, तुम्हाला लिखाण आवडले याचा आनंद आहे. _/\_

प्रचेतस 07/11/2019 - 11:22
बंगाली शाकाहारी जेवण म्हणजे मोठे तुकडे असलेली वांग्याची आणि बटाट्याची भाजी आणि भात इतकीच धारणा होती (पुण्यातली काही बंगाली जेवण मिळणारी हाटेलं). तुमच्या लेखाद्वारे त्यातील वैविध्याचाही प्रत्यय आला. बाकी बंगाली मिठायांबाबत काही प्रश्नच नाही. आहाहाहा. ही लेखमाला खूपच छान झाली, ओघवते लेखन, विपुल माहितेने लेखात आलेली समृद्धता. तुमच्या पुढील अशाच एखाद्या रोचक माहितीच्या प्रतिक्षेत. -प्रचेतस

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 11/11/2019 - 12:11
बंगाली जेवणात शाकाहार थोडा डावा पडतो, खरे आहे. पण बंगाली मिठाया लाजवाब :-) अभिप्रायाबद्दल आभार !

नरेश माने 07/11/2019 - 11:29
सुंदर लेखमालेचा तेव्हढाच सुंदर समारोप. बाकी बंगाली खाद्यपदार्थांची नावे खुपच गमतीदार आहेत. कोलकाता शहराच्या जडणघडणीची एव्हढी सुंदर माहिती तुमच्या लेखमालेमुळेच मला मिळाली. त्याबद्दल तुमचे खुप आभार!

टर्मीनेटर 07/11/2019 - 12:20
मालिकेचा पहिला आणि हा शेवटचा भागच वाचला आहे. गलेमा आणि दिवाळी अंक वाचत असताना ह्या रसरशीत लेख मालिकेतले मधले भाग वाचायचे राहून गेले त्याची चुटपूट लागून राहिली आहे! ह्या भागातील 'जोलभरा संदेश' आणि 'रसगुल्ला' हे शब्द वाचून खूप साऱ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. वडील मध्य रेल्वेमध्ये अधिकारी होते, महिन्या दोन महिन्याआड त्यांची कामानिमित्त एकतरी कलकत्ता (तेव्हा ह्या शहराला कोलकाता म्हणत नव्हते. त्यामुळे कलकत्ताच 😀 ) वारी होत असे. ते कलकत्याला गेले कि मी आणि माझी मोठी बहिण खूप खूष व्हायचो, कारण ते येताना आम्हा दोघांच्या आवडीचे 'जोलभरा संदेश' आणि 'रसगुल्ला' व आणखीन काही दर्जेदार मिठाया तर आणायचेच, वर मला जास्ती आनंद व्हायचा तो प्रत्येक वेळी त्यांनी माझ्यासाठी आणलेल्या 'स्पोर्ट्स शूज' साठी! कलकत्तावासीयांच्या फुटबॉल प्रेमामुळे कि अन्य काही कारणाने ते माहित नाही, पण तेव्हा मुंबईतही उपलब्ध नसलेल्या इतक्या वेगवेगळ्या रंगाचे आणि डिझाईनचे स्पोर्ट्स शूज कलकत्याला मिळायचे. तेव्हा मला अक्कल आणि जतन करून ठेवण्या एवढी जागा असती तर त्या मिठायांचे खोके, पत्र्याचे डबे आणि माझ्या बालपणापासून ते त्यांच्या रीटायरमेंट पर्यंत सुरु राहिलेल्या ह्या परंपरेत त्यांनी आणलेल्या शूज चे एक मस्त म्युझियम बनवता आले असते 😀 असो, लेख खूप आवडला, आता मधले वाचायचे राहिलेले भाग सलग वाचून काढतो... धन्यवाद.

In reply to by टर्मीनेटर

अनिंद्य 07/11/2019 - 18:25
@ टर्मीनेटर, तुमच्या लहानपणीच्या / वडिलांच्या कलकत्ता भेटीच्या आठवणी बंगाली मिष्टीसारख्याच गोड आहेत :-) वस्तूंचे नसले तरी या आठवणींचे म्युझिअम तुमच्या मनात कायम राहीलच. कोलकात्यातून निघतांना विमानात बसण्यापूर्वी घरातील सर्वांच्या आवडीच्या मिठाया योग्य त्या प्रमाणात घेतल्याची खात्री करावी लागते मलाही. तो टोल दिल्याशिवाय दार उघडले जात नाही :-) मधले भागही अवश्य वाचा. प्रतिसादाची प्रतीक्षा आहे. अनिंद्य

आंबट गोड 07/11/2019 - 12:34
लेखमाला. थोडी त्रोटक वाटली...अजून खूप काही लिहीता आले असते. खरे म्हणजे हे फक्त कोलकत्याचं वर्णन होतं..पूर्ण बंगाल नव्हे. बंगाल मधे टागोर आणि शांतिनिकेतन, चैतन्य महाप्रभू, स्वामी विवेकानंद व प्रभु रामक्रिष्ण, शरद्चंद्र, सुभाषबाबू ......इ इ खूपच गोष्टी येतील........ आता पुढची लेखमाला कशावर? भूतान वर लिहा. :-)

In reply to by आंबट गोड

अनिंद्य 07/11/2019 - 14:40
@ आंबट गोड, ..... फक्त कोलकत्याचं वर्णन होतं..पूर्ण बंगाल नव्हे..... अगदी बरोबर. मालिकेचे शीर्षक आणि प्रस्तावना दोन्हीकडे स्वतःसाठी 'आमार कोलकाता' असे कुंपण घातले होते, नाहीतर विषयाचा आवाका फार मोठा होतो, त्यावर पुस्तकच लिहावे लागेल. कुणी सांगावे, लिहीनही. :-) ..... लेखमाला थोडी त्रोटक वाटली.... शहराची तोंडओळख होईल इतपत लिहायचे होते, तरीही नऊ भाग झाले. अभिप्रायाबद्दल आभारी आहे.

अनिंद्य 11/11/2019 - 12:03
@ कुमार१ @ यशोधरा @ तेजस आठवले @ वीणा३ @ जॉनविक्क @ सुमो @ नरेश माने @ संजय पाटिल @ नि३सोलपुरकर, उत्साह वाढवणाऱ्या प्रतिसादाबद्दल अनेक आभार _/\_

कोमल 12/11/2019 - 14:39
अप्रतिम भाग आणि मालिकाही. फार छान गोड शेवट केला आहे. सगळे प्रचि तोंपासु. फार खुणावत असलेले हे शहर, हा भाग वाचल्यानंतर हात पसरून आलिंगन द्यायलाच तयार आहे असे वाटले. पुलेशु

लागलीच. जलपुष्प शब्द आवडला. जालमुरी, फुचका, संदेश आणि मिश्टी वा! सांगता करायला स्वीट डिश हवीच. मजा आली. एका अपूर्व लेखमालेबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

अनिंद्य 18/11/2019 - 11:14
@ सुधीर कांदळकर, मालिकेच्या प्रत्येक भागावर विस्तृत आणि नेमके प्रतिसाद आहेत तुमचे, त्यामुळे पुढे लिहिण्याचा उत्साह कायम राहिला. अनेक आभार.

रातराणी 29/05/2020 - 12:20
भीषण सुंदर! काही भाग वाचून, सगळे भाग प्रकाशित झाल्यावर वाचायचे म्हणून अर्धवट सोडलेली ही मालिका पुन्हा पहिल्यापासून वाचली. तुमचा अभ्यास, त्याची मुद्देसूद मांडणी आणि सोबत सुरेख प्रकाशचित्रांची जोड ही त्रिवेणी सुरेख जमलीये. मनाने त्या त्या ठिकाणी जाऊन आले मी. _/\_

अनिंद्य 24/08/2020 - 19:52
याबद्दल थोडाफार वाद असला तरी विंग्रजी तारखेप्रमाणे आज २४ ऑगस्ट कोलकात्याचा बड्डे आहे. त्यानिमित्ताने रसगुल्ला खाऊन गोडतोंडी शुभेच्छा !

जेम्स वांड 06/11/2019 - 19:12
परत एकदा रसना खवळून उठली! खल्लास फोटो अन खाद्ययात्रा. एक हलकीफुलकी दुरुस्ती सुचवतो, गोड मानून घेणे इतकेच काय भारतातल्या मोजक्याच 'मिशिगन स्टार' दर्जा असलेल्या हा मिशिगन स्टार नसून मिशलीन स्टार होय असे वाटते, १९व्या शतकात स्वयंचलित चारचाकी गाड्या प्रसिद्धी पावल्या तसे त्यांना पूरक-एकमेकांस पूरक उद्योग पक्षी पोलाद, रबर टायर वगैरे उभे राहिले, अशीच एक टायर कंपनी होती मिशलीन (michelin) त्यांना टायर्सचा खप वाढवायचा होता पण लोकांनी गाड्या फिरवल्याच नाहीत तर टायर्स झिजून जुनी होणार कशी?? अन नव्या टायर्सचा खप वाढणार कसा?? त्यातून मिशलीन पडली अस्सल फ्रेंच कंपनी, फ्रेंच लोक खवय्येगिरीत वंगबंधूंचे कार्बन कॉपी किंवा एकाला झाकावे दुसऱ्याला काढावे इतकेच दर्दी, कुठं सोव्हिग्नोन कॅबरीनेट रेड वाईन उत्तम मिळते, कुठले मिमोलेत चीज सर्वोत्तम, बॅगवेत ब्रेड ताजी कुठे मिळते वगैरे सतत हुडकणारे म्हणजे फ्रेंच. झालं, मिशलीन मधल्या एका हुशार पात्राने शक्कल लढवली आणि दरवर्षी ते लोक एक मिशलीन गाईड काढू लागले सुरुवातीला (१९००-१९२२) गाईडमध्ये फक्त गाडीचे तेलपाणी वंगण वगैरे माहिती असे १९२२ पासून मिशलीननं फ्रेंच लोकांचे खाद्यप्रेम ओळखून गाईडमध्ये उत्तमोत्तम जिन्नसा मिळणारी हॉटेल्स अंतर्भूत करायला सुरुवात केली अन गम्मत म्हणजे त्यानंतर लोक गाड्या जास्त फिरवू लागले, टायर्सचा खप वाढला!! त्यानंतर मिशलीननं गाईड जरी प्रकाशित केली न केली तरी कंपनी दरवर्षी जगातील सर्वोत्तम उपहारगृह/भोजनालयांचे रेटिंग नक्कीच करते, ही प्रोसेस भयानक खडतर असते अन नावाजलेला ब्रिटिश शेफ गॉर्डन रामसे चक्क एकदा मिशलीन परिमणांवर नापास सुद्धा झालाय, त्या कडक चाचणीतून पार होणाऱ्या हॉटेल्सला वर्षभरासाठी मिशलीनकडून १,२ किंवा ३ स्टार दिले जातात ही रेटिंग बदलत असतात, म्हणून कायम मिशलीन रेटिंग मध्ये राहणे म्हणजे अशक्यप्राय असते, जे हॉटेल सतत दोन वर्षे राहिले ते तर म्हणजे सर्वोत्तम हॉटेल गणले जाते. अशी ही कथा "मिशलीन स्टार्सची"

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 06/11/2019 - 20:45
@ जेम्स, बरोबर आहे तुमचे 'मिशलीन' स्टारच पाहिजे होते. आता संपादकांनी केली तरच दुरुस्ती होईल. मिशलीनच्या जन्मकथेबद्दल खूप आभार. आता हा 'ऑल हायप लिटिल सबस्टन्स' प्रकार झालाय असे वाटते. फार माहिती नाही. ह्या लेखमालेत तुमचे अभ्यासपूर्ण पण मिश्किल प्रतिसाद वेळोवेळी आले, त्यामुळे न कंटाळता पुढील भाग लिहीत राहिलो. असाच लोभ ठेवा _/\_ अनिंद्य

पलाश 06/11/2019 - 21:03
अप्रतिम लेखमालेचा सुरस शेवट फार आवडला. माशांना "जलपुष्प" म्हणतात हे वाचल्यावर ज्या कोणी हा शब्द पहिल्यांदा वापरला असेल त्याचं कौतुक वाटलं. छानच शब्द आहे. बंगाली मिठाईंची नावंसुद्धा खूप गोड आहेत. वाचायलाही आवडली. खायला त्या ठिकाणी जायलाच हवं. पुढील लेखनाची प्रतिक्षा आहे.

In reply to by पलाश

अनिंद्य 11/11/2019 - 12:20
@ पलाश "जलपुष्प" ..... मासे खात नसलो तरी मलाही शब्द मजेदार वाटतो :-) तुम्ही वेळोवेळी दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक आभार.

बबन ताम्बे 06/11/2019 - 22:13
काही भागांवर मी प्रतिसाद लिहायचा कंटाळा केला,पण सर्व भाग आवर्जून वाचले. अप्रतिम लेखमाला. बंग (की वंग ?) संस्कृतीची विस्तृत ओळख झाली. पुढील लेखमालेस मनपूर्वक शुभेच्छा.

In reply to by बबन ताम्बे

अनिंद्य 07/11/2019 - 10:49
@ बबन ताम्बे, कंटाळा करू नका हो, बरे-वाईट जसे वाटले ते सांगत चला :-) इथे मिळणारे अभिप्राय / सूचना / सल्ले / प्रतिसाद यामुळे चुका समजतात, हुरूप येतो.

सुमो 07/11/2019 - 11:00
लेखमाला. आणि आणि त्यावर कळस म्हणजे हा समारोपाचा बंगभोज !!! मत्स्यमंजिरी काय, शहाळ्यातल्या मलईत शिजवलेले प्रॉन्स काय, माछेर झोल काय....!! छ्या.... जायला लागतंय कोलकात्याला.

श्वेता२४ 07/11/2019 - 11:04
मिपावरील माझ्या आवडीच्या लेखमालांपैकी ही एक लेखमाला.बंगालचा ऐतिहासिक,सामाजिक, सांस्कृतिक व चालिरीतींचा विस्तारपूर्वक सचित्र धांडोळा आपण सर्वांसाठी खुला केलात. त्याबद्दल अनेक आभार.

In reply to by श्वेता२४

अनिंद्य 11/11/2019 - 12:16
@ श्वेता२४ मालिकेवर पहिलावहिला प्रतिसाद तुमचाच होता. पूर्ण बंगाल नाही तरी कोलकाता शहराबद्दल विस्तृत सांगण्याचा प्रयत्न होता, तुम्हाला लिखाण आवडले याचा आनंद आहे. _/\_

प्रचेतस 07/11/2019 - 11:22
बंगाली शाकाहारी जेवण म्हणजे मोठे तुकडे असलेली वांग्याची आणि बटाट्याची भाजी आणि भात इतकीच धारणा होती (पुण्यातली काही बंगाली जेवण मिळणारी हाटेलं). तुमच्या लेखाद्वारे त्यातील वैविध्याचाही प्रत्यय आला. बाकी बंगाली मिठायांबाबत काही प्रश्नच नाही. आहाहाहा. ही लेखमाला खूपच छान झाली, ओघवते लेखन, विपुल माहितेने लेखात आलेली समृद्धता. तुमच्या पुढील अशाच एखाद्या रोचक माहितीच्या प्रतिक्षेत. -प्रचेतस

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 11/11/2019 - 12:11
बंगाली जेवणात शाकाहार थोडा डावा पडतो, खरे आहे. पण बंगाली मिठाया लाजवाब :-) अभिप्रायाबद्दल आभार !

नरेश माने 07/11/2019 - 11:29
सुंदर लेखमालेचा तेव्हढाच सुंदर समारोप. बाकी बंगाली खाद्यपदार्थांची नावे खुपच गमतीदार आहेत. कोलकाता शहराच्या जडणघडणीची एव्हढी सुंदर माहिती तुमच्या लेखमालेमुळेच मला मिळाली. त्याबद्दल तुमचे खुप आभार!

टर्मीनेटर 07/11/2019 - 12:20
मालिकेचा पहिला आणि हा शेवटचा भागच वाचला आहे. गलेमा आणि दिवाळी अंक वाचत असताना ह्या रसरशीत लेख मालिकेतले मधले भाग वाचायचे राहून गेले त्याची चुटपूट लागून राहिली आहे! ह्या भागातील 'जोलभरा संदेश' आणि 'रसगुल्ला' हे शब्द वाचून खूप साऱ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. वडील मध्य रेल्वेमध्ये अधिकारी होते, महिन्या दोन महिन्याआड त्यांची कामानिमित्त एकतरी कलकत्ता (तेव्हा ह्या शहराला कोलकाता म्हणत नव्हते. त्यामुळे कलकत्ताच 😀 ) वारी होत असे. ते कलकत्याला गेले कि मी आणि माझी मोठी बहिण खूप खूष व्हायचो, कारण ते येताना आम्हा दोघांच्या आवडीचे 'जोलभरा संदेश' आणि 'रसगुल्ला' व आणखीन काही दर्जेदार मिठाया तर आणायचेच, वर मला जास्ती आनंद व्हायचा तो प्रत्येक वेळी त्यांनी माझ्यासाठी आणलेल्या 'स्पोर्ट्स शूज' साठी! कलकत्तावासीयांच्या फुटबॉल प्रेमामुळे कि अन्य काही कारणाने ते माहित नाही, पण तेव्हा मुंबईतही उपलब्ध नसलेल्या इतक्या वेगवेगळ्या रंगाचे आणि डिझाईनचे स्पोर्ट्स शूज कलकत्याला मिळायचे. तेव्हा मला अक्कल आणि जतन करून ठेवण्या एवढी जागा असती तर त्या मिठायांचे खोके, पत्र्याचे डबे आणि माझ्या बालपणापासून ते त्यांच्या रीटायरमेंट पर्यंत सुरु राहिलेल्या ह्या परंपरेत त्यांनी आणलेल्या शूज चे एक मस्त म्युझियम बनवता आले असते 😀 असो, लेख खूप आवडला, आता मधले वाचायचे राहिलेले भाग सलग वाचून काढतो... धन्यवाद.

In reply to by टर्मीनेटर

अनिंद्य 07/11/2019 - 18:25
@ टर्मीनेटर, तुमच्या लहानपणीच्या / वडिलांच्या कलकत्ता भेटीच्या आठवणी बंगाली मिष्टीसारख्याच गोड आहेत :-) वस्तूंचे नसले तरी या आठवणींचे म्युझिअम तुमच्या मनात कायम राहीलच. कोलकात्यातून निघतांना विमानात बसण्यापूर्वी घरातील सर्वांच्या आवडीच्या मिठाया योग्य त्या प्रमाणात घेतल्याची खात्री करावी लागते मलाही. तो टोल दिल्याशिवाय दार उघडले जात नाही :-) मधले भागही अवश्य वाचा. प्रतिसादाची प्रतीक्षा आहे. अनिंद्य

आंबट गोड 07/11/2019 - 12:34
लेखमाला. थोडी त्रोटक वाटली...अजून खूप काही लिहीता आले असते. खरे म्हणजे हे फक्त कोलकत्याचं वर्णन होतं..पूर्ण बंगाल नव्हे. बंगाल मधे टागोर आणि शांतिनिकेतन, चैतन्य महाप्रभू, स्वामी विवेकानंद व प्रभु रामक्रिष्ण, शरद्चंद्र, सुभाषबाबू ......इ इ खूपच गोष्टी येतील........ आता पुढची लेखमाला कशावर? भूतान वर लिहा. :-)

In reply to by आंबट गोड

अनिंद्य 07/11/2019 - 14:40
@ आंबट गोड, ..... फक्त कोलकत्याचं वर्णन होतं..पूर्ण बंगाल नव्हे..... अगदी बरोबर. मालिकेचे शीर्षक आणि प्रस्तावना दोन्हीकडे स्वतःसाठी 'आमार कोलकाता' असे कुंपण घातले होते, नाहीतर विषयाचा आवाका फार मोठा होतो, त्यावर पुस्तकच लिहावे लागेल. कुणी सांगावे, लिहीनही. :-) ..... लेखमाला थोडी त्रोटक वाटली.... शहराची तोंडओळख होईल इतपत लिहायचे होते, तरीही नऊ भाग झाले. अभिप्रायाबद्दल आभारी आहे.

अनिंद्य 11/11/2019 - 12:03
@ कुमार१ @ यशोधरा @ तेजस आठवले @ वीणा३ @ जॉनविक्क @ सुमो @ नरेश माने @ संजय पाटिल @ नि३सोलपुरकर, उत्साह वाढवणाऱ्या प्रतिसादाबद्दल अनेक आभार _/\_

कोमल 12/11/2019 - 14:39
अप्रतिम भाग आणि मालिकाही. फार छान गोड शेवट केला आहे. सगळे प्रचि तोंपासु. फार खुणावत असलेले हे शहर, हा भाग वाचल्यानंतर हात पसरून आलिंगन द्यायलाच तयार आहे असे वाटले. पुलेशु

लागलीच. जलपुष्प शब्द आवडला. जालमुरी, फुचका, संदेश आणि मिश्टी वा! सांगता करायला स्वीट डिश हवीच. मजा आली. एका अपूर्व लेखमालेबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

अनिंद्य 18/11/2019 - 11:14
@ सुधीर कांदळकर, मालिकेच्या प्रत्येक भागावर विस्तृत आणि नेमके प्रतिसाद आहेत तुमचे, त्यामुळे पुढे लिहिण्याचा उत्साह कायम राहिला. अनेक आभार.

रातराणी 29/05/2020 - 12:20
भीषण सुंदर! काही भाग वाचून, सगळे भाग प्रकाशित झाल्यावर वाचायचे म्हणून अर्धवट सोडलेली ही मालिका पुन्हा पहिल्यापासून वाचली. तुमचा अभ्यास, त्याची मुद्देसूद मांडणी आणि सोबत सुरेख प्रकाशचित्रांची जोड ही त्रिवेणी सुरेख जमलीये. मनाने त्या त्या ठिकाणी जाऊन आले मी. _/\_

अनिंद्य 24/08/2020 - 19:52
याबद्दल थोडाफार वाद असला तरी विंग्रजी तारखेप्रमाणे आज २४ ऑगस्ट कोलकात्याचा बड्डे आहे. त्यानिमित्ताने रसगुल्ला खाऊन गोडतोंडी शुभेच्छा !
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533 भाग ६ - http://www.misalpav.com/node/45569 भाग ७ - https://misalpav.com/node/45585 आमार कोलकाता - भाग ९ (अंतिम) - बंगभोज मनुष्यजीवनात खाण्यापिण्याचा संबंध फक्त पोट भरण्यापुरताच नाही.

करंज्या

अविनाशकुलकर्णी ·
या वेळी दिवाळीत करंज्या करायच्या नाहीत असे ठरवले आहे मुलीची कारखानीस नावाची सी के पी मैत्रीण आहे तिच्याशी बोलणे झाले आहे कानवले ही खास सी के पी डेलिकसी आहे कानवले--वालाची उसळ -गोळ्यांचं सांभार -हिंग बडीशेप मिश्रित चिकन मटण रस्सा -हि सी के पी खासियत तिच्या मार्ग दर्शनाखाली कानवले करण्याचा प्लॅन आखला आहे खूप मेहनतीचं कौशल्याचं अन नाजूक प्रकरण आहे कानवले करणे श्री समर्थ आहे कार्य सिद्धीस नेण्यास ..

आमार कोलकाता – भाग ८ - भाषिक व धार्मिक वैविध्यांचे शहर

अनिंद्य ·

अनिंद्य 01/11/2019 - 13:37
@ संपादक / साहित्य संपादक मंडळी, अनुक्रमणिका करून मालिकेचे सर्व भाग एकत्र ओवण्यासाठी विनंती.

अनिंद्य 06/11/2019 - 16:01
@ कंजूस, @ जॉनविक्क, @ कुमार१, आपणा तिघांचे आभार. कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीबद्दलचा मालिकेचा अंतिम भाग इथे आहे :- https://misalpav.com/node/45677

प्रचेतस 06/11/2019 - 20:16
कोलकत्याच्या ह्या पैलूबद्दल कधीच वाचले नव्हते. त्यातही आर्मेनियन, ज्यू आणि पर्शियन लोकांच्या योगदानाबद्दल शून्य माहिती होती. धन्यवाद ह्या भागाबद्दल.

दिवाळीआधीपासून जालसेवा फारच रुसली आहे. कशीबशी लंगडत खुरडत चालली आहे. कधी आल्याची नोंद करण्यापूर्वीच सारे ठप्प होते तर बहुतेक वेळा गमन करण्याआधीच जासेवा गुप्त होते. आठदहा दिवस तर गमनच करता आले नव्हते. असो. आर्मेनिअनांबद्दल प्रथमच माहिती मिळाली.
त्यांच्या संपत्तीबद्दल ईर्षेचा सुप्त भाव शहरवासियांमध्ये दिसून येतो.
सुरेख संयत शब्दांकन. सिनेगॉग सुंदर. मी फक्त एकच कोचीनचे सिनेगॉग पाहिले होते. वाजिद अलीबद्दल पण छान माहिती.
मुघल शैलीतल्या या मशिदीचे वेगळेपण म्हणजे पाठीला जोडलेल्या सयामी जुळ्यांसारखी रचना.
मस्त निरीक्षण आणि भाष्य. मुख्य म्हणजे एवढे तपशील देऊनही कुठेही जंत्रीसारखे कंटाळवाणे होत नाही. वेग, रंजकता आणि उत्कठा ८व्या भागातही कायम आहे. हॅट्स ऑफ. धन्यवाद.

अनिंद्य 13/11/2019 - 11:01
@ सुधीर कांदळकर, ...... एवढे तपशील देऊनही कुठेही जंत्रीसारखे कंटाळवाणे होत नाही...... Hope so :-) हा भाग मला थोडा 'ठिगळं जोडल्यासारखा' वाटला होता पण शहारातील अ-बंगाली समुदायांबद्दल थोडे लिहिणे गरजेचे वाटले. विस्तृत प्रतिसादाबद्दल आभारी आहे. _/\_

अनिंद्य 01/11/2019 - 13:37
@ संपादक / साहित्य संपादक मंडळी, अनुक्रमणिका करून मालिकेचे सर्व भाग एकत्र ओवण्यासाठी विनंती.

अनिंद्य 06/11/2019 - 16:01
@ कंजूस, @ जॉनविक्क, @ कुमार१, आपणा तिघांचे आभार. कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीबद्दलचा मालिकेचा अंतिम भाग इथे आहे :- https://misalpav.com/node/45677

प्रचेतस 06/11/2019 - 20:16
कोलकत्याच्या ह्या पैलूबद्दल कधीच वाचले नव्हते. त्यातही आर्मेनियन, ज्यू आणि पर्शियन लोकांच्या योगदानाबद्दल शून्य माहिती होती. धन्यवाद ह्या भागाबद्दल.

दिवाळीआधीपासून जालसेवा फारच रुसली आहे. कशीबशी लंगडत खुरडत चालली आहे. कधी आल्याची नोंद करण्यापूर्वीच सारे ठप्प होते तर बहुतेक वेळा गमन करण्याआधीच जासेवा गुप्त होते. आठदहा दिवस तर गमनच करता आले नव्हते. असो. आर्मेनिअनांबद्दल प्रथमच माहिती मिळाली.
त्यांच्या संपत्तीबद्दल ईर्षेचा सुप्त भाव शहरवासियांमध्ये दिसून येतो.
सुरेख संयत शब्दांकन. सिनेगॉग सुंदर. मी फक्त एकच कोचीनचे सिनेगॉग पाहिले होते. वाजिद अलीबद्दल पण छान माहिती.
मुघल शैलीतल्या या मशिदीचे वेगळेपण म्हणजे पाठीला जोडलेल्या सयामी जुळ्यांसारखी रचना.
मस्त निरीक्षण आणि भाष्य. मुख्य म्हणजे एवढे तपशील देऊनही कुठेही जंत्रीसारखे कंटाळवाणे होत नाही. वेग, रंजकता आणि उत्कठा ८व्या भागातही कायम आहे. हॅट्स ऑफ. धन्यवाद.

अनिंद्य 13/11/2019 - 11:01
@ सुधीर कांदळकर, ...... एवढे तपशील देऊनही कुठेही जंत्रीसारखे कंटाळवाणे होत नाही...... Hope so :-) हा भाग मला थोडा 'ठिगळं जोडल्यासारखा' वाटला होता पण शहारातील अ-बंगाली समुदायांबद्दल थोडे लिहिणे गरजेचे वाटले. विस्तृत प्रतिसादाबद्दल आभारी आहे. _/\_
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533 भाग ६ - http://www.misalpav.com/node/45569 भाग ७ - https://misalpav.com/node/45585 आमार कोलकाता – भाग ८ - भाषिक व धार्मिक वैविध्यांचे शहर भारतातील सर्वाधिक गर्दीच्या शहरांमध्ये कोलकात्याच्या

आमार कोलकाता – भाग ७ - मेरा नाम चिन-चिन-चू

अनिंद्य ·

हेमंतकुमार 22/10/2019 - 13:28
* समाज-संस्कृती आणि भाषा एकमेकांना जगवतात >>> + १११ लेखमाला संपली की तुमच्याबरोबर कोलकाता कट्टा करावासा वाटतोय ☺️

जेम्स वांड 22/10/2019 - 14:25
वाटच पाहत होतो! कोलकात्याच्या अतूट भाग असणाऱ्या चायना टाऊन्स बद्दल! खल्लास लिहिलेत. तुमचे कोलकात्यावर विलक्षण प्रेम दिसते अनिंद्य! बाकी कोलकाता चायना टाऊनचा उल्लेख करताना तिथल्या पाकसंस्कृतीचा पासींग रेफरन्स थोडा खटकला, सद्यांत हवा होता म्हणजे बघा जगाला इंडो चायनीजची देणगी देणाऱ्या चायना टाऊनमध्ये नेल्सन वांग हे बल्लवरत्न निपजले होते खिशात सत्तावीस रुपये घेऊन मुंबईला आलेल्या ह्या माणसाने चिकन मंचुरीयन ही डिश तर शोधून काढलीच पण इंडो चायनीज जेवणाचा प्रसारही भरपूर केला. चायना गार्डन नावाचं त्याचं इंडोचायनीज रेस्टॉरंट तुफान प्रसिद्ध होतं म्हणतात मुंबईत. इंडो चायनीज हे फक्त चिनी आणि भारतीय फ्युजन जेवण नाही तर ते एक अलटरनेटिव्ह फूड कल्चर आहे, हॉटेल मध्ये न खाऊ शकणारे मजूर ते कमी पैशात पोटभरीचा पर्याय शोधणारे विद्यार्थी सगळ्यांना ह्या कुझीननं जगवलं आहे, इंजिनियरिंग कॉलेज हॉस्टेल किंवा कॅम्पस पासून "चिकन/व्हेज ट्रिपल शेजवान राईस" वेगळा काढता यायचा नाही! अन ह्या अद्वैताचा निर्माता नेल्सन वांग! मालक

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 23/10/2019 - 11:33
@ जेम्स, अधिकच्या माहितीबद्दल आभारी आहे. पण नेल्सन वांगचे कर्मक्षेत्र मुंबई आहे, कोलकाता नाही. .... इंडो चायनीज एक अलटरनेटिव्ह फूड कल्चर आहे... याबद्दल पूर्ण सहमत. खाण्यापिण्यावर तर लिहावे तितके थोडे :-) कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीवर एक मोठा भाग लिहिणार आहेच. (भाग ९) तोवर हे खास तुमच्यासाठी :-

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 23/10/2019 - 11:33
@ जेम्स, अधिकच्या माहितीबद्दल आभारी आहे. पण नेल्सन वांगचे कर्मक्षेत्र मुंबई आहे, कोलकाता नाही. .... इंडो चायनीज एक अलटरनेटिव्ह फूड कल्चर आहे... याबद्दल पूर्ण सहमत. खाण्यापिण्यावर तर लिहावे तितके थोडे :-) कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीवर एक मोठा भाग लिहिणार आहेच. (भाग ९) तोवर हे खास तुमच्यासाठी :-

In reply to by सुमो

अनिंद्य 23/10/2019 - 11:19
@ सुमो, हो, कायतरी चुकले. योग्य लिंकबद्दल आभारी आहे. आता संपादक मंडळी लेखात लिंक दुरुस्त करतील तर होईल.

कुठेतरी वाचले होते की चायना टाऊनमधले चिनी सतत काम करतात. भारतात मिळणारे सर्वोत्कृष्ट बनावटीचे बूट तिथेच मिळतात आणि तेही योग्य किंमतीत. आता कातडे कमावण्याच्या आणि शिलाईच्या आधुनिक यंत्रांमुळे कदाचित फरक पडला असेल. पखालीबद्दल वाचून मुंबईतली एक जुनी आठवण जागी झाली. मुंबईत एके ठिकाणी बालपणी ट्राममधून फिरतांना मला आठदहा फूट लांब, तीनचार फूट रुंद आणि दोन अडीच फूट खोल अशी लोखंडी भांडी पदपथाच्या कडेला रस्त्याला लागून ठेवलेली आढळली. ती कसली याचे उत्तर तीर्थरूप देऊ शकले नव्हते. पण एका वृद्धाने सांगितले की पूर्वी घोड्यांच्या ट्राम्स होत्या. त्या लोखंडी भांड्यांत घोड्यांसाठी पाणी ठेवलेले असे. कलकत्त्याची प्रचि पाहिली की मन नकळत मंबईशी तुलना करतेच. तशाच ब्रिटीश वास्तू. पण मुंबईत न आढळणारी गोष्ट प्रचिंमध्ये दिसते ती म्हणजे लाल रंगाचा वापर. जमले तर ट्रामचे चित्र वा व्हीडीओ पुढील लेखांकात टाका. धन्यवाद. पुभाप्र.

In reply to by सुधीर कांदळकर

अनिंद्य 23/10/2019 - 16:46
सुधीर जी, तुमचे अभिप्राय प्रत्येक भागात काहीतरी नवीन मुद्दा लक्षात आणून देतात, उदा. इमारतींचा लाल रंग ! खूप आभार. चिनी आणि त्यांचे परंपरागत उद्योग दोन्ही आता हद्दपारच आहेत म्हणा ना. ट्रामचे फोटो ? हा घ्या एक जुना - कोलकात्यातील घोड्यांच्या ट्रामचा. आमच्या पिढीला नाही बघायला मिळाली ही ट्राम.

प्रचेतस 23/10/2019 - 08:40
जबरदस्त. चायना टाऊनबद्द्ल तुम्ही लिहाल असं वाटलंच होतं. कोलकत्याची विभिन्न अंगांनी उत्त्म माहिती मिळत आहे.

यशोधरा 23/10/2019 - 09:40
मध्यंतरी एक कार्यक्रम पाहिला होता एका चॅनेलवर, त्यात दाखवले होते की कलकत्त्याची चिनी वंशाची तरुणाई आता इतर देशांत स्थायिक होत असल्याने - कॅनडा, ऑस्ट्रेलिया वगैरे - कलकत्त्यात आता चायना टाऊनमध्येही चिनी मंडळी खूप कमी दिसतात. पूर्वी चायना टाऊन मध्ये जी चिनी मंडळी रस्त्यावर मोमो, सूप इत्यादी विकायला घेऊन बसत असत, तो बाजारही आता बऱ्यापैकी स्थानिकांच्या हातात गेला आहे म्हणे. कार्यक्रमात रेड चर्चचा सुद्धा उल्लेख होता. चायना टाऊनवर अजून लिहिलेलेही चालले असते.

In reply to by यशोधरा

अनिंद्य 23/10/2019 - 11:38
बरोबर. आता फार कमी राहिलेत चिनी कोलकात्यात, २००० च्या आतबाहेर असतील. इंग्रजी आणि बंगाली बोलतात, स्वतःची भाषा येत नाही. म्हणूनच त्यांच्याबद्दल थोडक्यात लिहावेसे वाटले.

सरनौबत 23/10/2019 - 11:50
अप्रतिम लेख! पूर्वीचे भाग वाचायचं राहून गेलं, आता ह्या निमित्ताने नक्की वाचेन. कोलकत्याच्या अस्वच्छतेला वैतागून शिंपी आणि चांभार मुंबईत स्थायिक झाले असण्याची शक्यता आहे. ज्यांनी पुलंच्या अपूर्वाई मध्ये त्यांचे बूट आणि कोट बनवला ;-)

In reply to by सरनौबत

अनिंद्य 23/10/2019 - 13:17
थँक्यू. कानपुर आणि कोलकाता - गंगाकाठची ही दोन शहरं घाऊक चर्मोद्योगासाठी प्रसिद्ध आहेत. दोन्हीकडे स्वच्छतेचा आनंदच आहे. पूर्वीचे भागही अवश्य वाचा, , मत कळवत रहा.

अनिंद्य 24/10/2019 - 10:56
@ जॉनविक्क, @ जालिम लोशन, @ प्रचेतस, @ कंजूस, @ यशोधरा, आपण वेळोवेळी देत असलेल्या प्रोत्साहनपर अभिप्रायाबद्दल आभारी आहे. पुढील भाग आता दिवाळी अंकाचे 'रसग्रहण' झाल्यानंतर ! सर्वांना दीपावलीच्या खूप-खूप शुभेच्छा.

हेमंतकुमार 22/10/2019 - 13:28
* समाज-संस्कृती आणि भाषा एकमेकांना जगवतात >>> + १११ लेखमाला संपली की तुमच्याबरोबर कोलकाता कट्टा करावासा वाटतोय ☺️

जेम्स वांड 22/10/2019 - 14:25
वाटच पाहत होतो! कोलकात्याच्या अतूट भाग असणाऱ्या चायना टाऊन्स बद्दल! खल्लास लिहिलेत. तुमचे कोलकात्यावर विलक्षण प्रेम दिसते अनिंद्य! बाकी कोलकाता चायना टाऊनचा उल्लेख करताना तिथल्या पाकसंस्कृतीचा पासींग रेफरन्स थोडा खटकला, सद्यांत हवा होता म्हणजे बघा जगाला इंडो चायनीजची देणगी देणाऱ्या चायना टाऊनमध्ये नेल्सन वांग हे बल्लवरत्न निपजले होते खिशात सत्तावीस रुपये घेऊन मुंबईला आलेल्या ह्या माणसाने चिकन मंचुरीयन ही डिश तर शोधून काढलीच पण इंडो चायनीज जेवणाचा प्रसारही भरपूर केला. चायना गार्डन नावाचं त्याचं इंडोचायनीज रेस्टॉरंट तुफान प्रसिद्ध होतं म्हणतात मुंबईत. इंडो चायनीज हे फक्त चिनी आणि भारतीय फ्युजन जेवण नाही तर ते एक अलटरनेटिव्ह फूड कल्चर आहे, हॉटेल मध्ये न खाऊ शकणारे मजूर ते कमी पैशात पोटभरीचा पर्याय शोधणारे विद्यार्थी सगळ्यांना ह्या कुझीननं जगवलं आहे, इंजिनियरिंग कॉलेज हॉस्टेल किंवा कॅम्पस पासून "चिकन/व्हेज ट्रिपल शेजवान राईस" वेगळा काढता यायचा नाही! अन ह्या अद्वैताचा निर्माता नेल्सन वांग! मालक

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 23/10/2019 - 11:33
@ जेम्स, अधिकच्या माहितीबद्दल आभारी आहे. पण नेल्सन वांगचे कर्मक्षेत्र मुंबई आहे, कोलकाता नाही. .... इंडो चायनीज एक अलटरनेटिव्ह फूड कल्चर आहे... याबद्दल पूर्ण सहमत. खाण्यापिण्यावर तर लिहावे तितके थोडे :-) कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीवर एक मोठा भाग लिहिणार आहेच. (भाग ९) तोवर हे खास तुमच्यासाठी :-

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 23/10/2019 - 11:33
@ जेम्स, अधिकच्या माहितीबद्दल आभारी आहे. पण नेल्सन वांगचे कर्मक्षेत्र मुंबई आहे, कोलकाता नाही. .... इंडो चायनीज एक अलटरनेटिव्ह फूड कल्चर आहे... याबद्दल पूर्ण सहमत. खाण्यापिण्यावर तर लिहावे तितके थोडे :-) कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीवर एक मोठा भाग लिहिणार आहेच. (भाग ९) तोवर हे खास तुमच्यासाठी :-

In reply to by सुमो

अनिंद्य 23/10/2019 - 11:19
@ सुमो, हो, कायतरी चुकले. योग्य लिंकबद्दल आभारी आहे. आता संपादक मंडळी लेखात लिंक दुरुस्त करतील तर होईल.

कुठेतरी वाचले होते की चायना टाऊनमधले चिनी सतत काम करतात. भारतात मिळणारे सर्वोत्कृष्ट बनावटीचे बूट तिथेच मिळतात आणि तेही योग्य किंमतीत. आता कातडे कमावण्याच्या आणि शिलाईच्या आधुनिक यंत्रांमुळे कदाचित फरक पडला असेल. पखालीबद्दल वाचून मुंबईतली एक जुनी आठवण जागी झाली. मुंबईत एके ठिकाणी बालपणी ट्राममधून फिरतांना मला आठदहा फूट लांब, तीनचार फूट रुंद आणि दोन अडीच फूट खोल अशी लोखंडी भांडी पदपथाच्या कडेला रस्त्याला लागून ठेवलेली आढळली. ती कसली याचे उत्तर तीर्थरूप देऊ शकले नव्हते. पण एका वृद्धाने सांगितले की पूर्वी घोड्यांच्या ट्राम्स होत्या. त्या लोखंडी भांड्यांत घोड्यांसाठी पाणी ठेवलेले असे. कलकत्त्याची प्रचि पाहिली की मन नकळत मंबईशी तुलना करतेच. तशाच ब्रिटीश वास्तू. पण मुंबईत न आढळणारी गोष्ट प्रचिंमध्ये दिसते ती म्हणजे लाल रंगाचा वापर. जमले तर ट्रामचे चित्र वा व्हीडीओ पुढील लेखांकात टाका. धन्यवाद. पुभाप्र.

In reply to by सुधीर कांदळकर

अनिंद्य 23/10/2019 - 16:46
सुधीर जी, तुमचे अभिप्राय प्रत्येक भागात काहीतरी नवीन मुद्दा लक्षात आणून देतात, उदा. इमारतींचा लाल रंग ! खूप आभार. चिनी आणि त्यांचे परंपरागत उद्योग दोन्ही आता हद्दपारच आहेत म्हणा ना. ट्रामचे फोटो ? हा घ्या एक जुना - कोलकात्यातील घोड्यांच्या ट्रामचा. आमच्या पिढीला नाही बघायला मिळाली ही ट्राम.

प्रचेतस 23/10/2019 - 08:40
जबरदस्त. चायना टाऊनबद्द्ल तुम्ही लिहाल असं वाटलंच होतं. कोलकत्याची विभिन्न अंगांनी उत्त्म माहिती मिळत आहे.

यशोधरा 23/10/2019 - 09:40
मध्यंतरी एक कार्यक्रम पाहिला होता एका चॅनेलवर, त्यात दाखवले होते की कलकत्त्याची चिनी वंशाची तरुणाई आता इतर देशांत स्थायिक होत असल्याने - कॅनडा, ऑस्ट्रेलिया वगैरे - कलकत्त्यात आता चायना टाऊनमध्येही चिनी मंडळी खूप कमी दिसतात. पूर्वी चायना टाऊन मध्ये जी चिनी मंडळी रस्त्यावर मोमो, सूप इत्यादी विकायला घेऊन बसत असत, तो बाजारही आता बऱ्यापैकी स्थानिकांच्या हातात गेला आहे म्हणे. कार्यक्रमात रेड चर्चचा सुद्धा उल्लेख होता. चायना टाऊनवर अजून लिहिलेलेही चालले असते.

In reply to by यशोधरा

अनिंद्य 23/10/2019 - 11:38
बरोबर. आता फार कमी राहिलेत चिनी कोलकात्यात, २००० च्या आतबाहेर असतील. इंग्रजी आणि बंगाली बोलतात, स्वतःची भाषा येत नाही. म्हणूनच त्यांच्याबद्दल थोडक्यात लिहावेसे वाटले.

सरनौबत 23/10/2019 - 11:50
अप्रतिम लेख! पूर्वीचे भाग वाचायचं राहून गेलं, आता ह्या निमित्ताने नक्की वाचेन. कोलकत्याच्या अस्वच्छतेला वैतागून शिंपी आणि चांभार मुंबईत स्थायिक झाले असण्याची शक्यता आहे. ज्यांनी पुलंच्या अपूर्वाई मध्ये त्यांचे बूट आणि कोट बनवला ;-)

In reply to by सरनौबत

अनिंद्य 23/10/2019 - 13:17
थँक्यू. कानपुर आणि कोलकाता - गंगाकाठची ही दोन शहरं घाऊक चर्मोद्योगासाठी प्रसिद्ध आहेत. दोन्हीकडे स्वच्छतेचा आनंदच आहे. पूर्वीचे भागही अवश्य वाचा, , मत कळवत रहा.

अनिंद्य 24/10/2019 - 10:56
@ जॉनविक्क, @ जालिम लोशन, @ प्रचेतस, @ कंजूस, @ यशोधरा, आपण वेळोवेळी देत असलेल्या प्रोत्साहनपर अभिप्रायाबद्दल आभारी आहे. पुढील भाग आता दिवाळी अंकाचे 'रसग्रहण' झाल्यानंतर ! सर्वांना दीपावलीच्या खूप-खूप शुभेच्छा.
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533 भाग ६ - http://www.misalpav.com/node/45569 आमार कोलकाता – भाग ७ - मेरा नाम चिन-चिन-चू  भारत आणि चीन प्रचंड लोकसंख्या असलेले सख्खे शेजार

आमार कोलकाता – भाग ६ – बंगाली कलासंस्कृतीचा अध्वर्यु

अनिंद्य ·

नूतन 18/10/2019 - 13:21
लेख आवडला. रविन्द्र संगीतातील माझी आवडती दोन गाणी, भालोबाशी भालोबाशी....गायिका इन्द्राणी सेन ह्रिदोय आमार नाचेरे आजिके .... गायिका लतादिदी

जालिम लोशन 18/10/2019 - 13:31
सद्यस्थितीवर आधारीत असते तर प्रबोधनपर झाले असते. विशेषतः बंगाली माणसाचा स्वभाव त्यांची हिंसक वृत्ती वास्तवाशी तुटलेली नाळ. त्यांचे अमेरिकेविरुध्दची आंदोलने. जगभर पसरलेली डावीकडे झुकणारी लाॅबी. त्यातुन मिळवलेली नोबेल सारखी पारितोषिके. अरुधंती राॅय सारख्या कचरा लेखिकेला मिळणारी प्रसिध्दी त्याचवेळी तस्लिमा नसरिन सारख्या लेखिकेवर होणारे हल्ले ह्या मागची बंगाली मनोवृत्ती जर टिपता आली असती तर लेख वास्तववादी झाला असता.

In reply to by जालिम लोशन

जेम्स वांड 19/10/2019 - 10:20
त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिलाय, ऐतिहासिक धांडोळा घेणे हा त्यांचा मोटिव्ह स्पष्ट दिसतोय, त्यात राजकारण अन डावे विचार वगैरे घेणे न घेणे त्यांचे स्वातंत्र्य होय, त्यांच्या लिखाणावर काही बोला की. आणि, जर लेखमाला इतकी उणी वाटत असली तर तुम्ही तुम्हाला जी न्याय्य अन उत्तम वाटत असेल अश्या वळणाची लेखमाला स्वतःच लिहून टाका की एखादी, हाकानाका.

शांतिनेकेतनातील शिशुघर आणि सहजपाठांबद्दल आपल्या लेखणीतले वाचायला आवडेल. तसेच त्यांच्या एका सुनेला बंगालची मा म्हणतात - तिच्याबद्दलही वाचायला आवडेल. आणखी एका सुंदर लेखाबद्दल धन्यवाद.

जॉनविक्क 19/10/2019 - 13:44
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर व गीतांजली ही नावे नुसती ऐकली तरी मनाच्या हालचाली सुरू होतात _/\_
दोन-दोन राष्ट्रांचे राष्ट्रगीत लिहिणारे ते बहुदा जगातील एकमेव कवी असावेत. (काहींच्या मते श्रीलंकेचे राष्ट्रगीतही टागोरांनीच लिहिलय, पण त्याबद्दल एकवाक्यता नाही.)
क्या बात है...

In reply to by जॉनविक्क

जॉनविक्क 19/10/2019 - 13:47
समस्त मानवी जीवनात असा एकही प्रसंग नाही ज्यावर टागोरांची कविता आपल्याला मिळणार नाही. पण अतीप्राचीन महाभारताच्या पुढे जाऊन विचार करायची मानसिकता हवी हे उमजुन यायला आणि मान्यही करायला.

In reply to by जॉनविक्क

अनिंद्य 22/10/2019 - 11:18
@ जॉनविक्क रवींद्रनाथांचे 'एकला चलो' गायिले नाही असा बंगाली गायक/गायिका विरळाच. हे ही छान आहे, श्रेया घोषाल म्हणजे गोड गळा. मिष्टी. कवितांबद्दल सहमत, लेखात म्हटल्याप्रमाणे जीवनाच्या सर्व भल्याबुऱ्या अंगांवर टागोरांनी लिहिले आहे.

@जालीम लोशन: कोणताही हिंसाचार हा निषेधार्हच आहे. १. पु. ल. आणि काही विचारवंतांच्या मते बंगालमधील हिंसाचारात मोठा वाटा हा फाळणीच्या वेळी पूर्व पाकिस्तानमधून सर्वस्व गमावून आलेल्या निर्धन निर्वासितांच्या आणि त्यांच्या वाट चुकलेल्या वंशजांच्या नैराश्यातून आलेला आहे. त्या हिंसाचाराला परकीय हितसंबंधी खतपाणी घालतात हे उघड गुपित आहे. संवेदनाक्षम मनाचा सामान्य बंगाली माणूस हिंसाचारग्रस्तांबद्दल द्वेषाने बोलत नाही. २. कृपया अरुंधती रॉय यांच्या आपल्याला न आवडलेल्या काही पुस्तकांची नावे द्या. जमले तर त्यातली काही वाचेन. सत्यकथेच्या संपादकांनी साभार परत केलेले मराठी साहित्य श्रेष्ठ दर्जाचे निघाले होते हे विसरून चालणार नाही. ३. तस्लीमावर सर्वसामान्य बंगाली नव्हे तर कडवे धार्मिक लोक हल्ले करतात. ढाकापेक्षा ती पश्चिम बंगालमध्येच जास्त सुरक्षित आहे असे म्हणतात. ४. भारतातील दुष्काळात माणसे मरतात ती अन्न नसल्यामुळे नव्हे तर अन्न परवडत नसल्यामुळे हे नोबेलविजेते संशोधन एका सधन बंगाल्याचेच आहे.

प्रचेतस 20/10/2019 - 08:54
हा लेखही आवडला. रवींद्रनाथांचे मूळचे आडनाव ठाकूर ना? टागोर हा ब्रिटिशांनी केलेला अपभ्रंश का बंगाली भाषेच्या वळणाने गेलेला शब्द? मध्यंतरी एपिक चॅनेलवर रवींद्रनाथांच्या कथांवर आधारीत 'रबिंद्रनाथकी कथाएं' नामक मालिका प्रसारित होत होती. आपल्या मिपावर पण रातराणी ह्यांनी रवींद्रनाथांच्या 'राजर्षी' ह्या अप्रतिम कादंबरीचा भावानुवाद केला होता. दुर्दैवाने तो अनुवाद अजुन अर्धवटच आहे.

In reply to by प्रचेतस

जेम्स वांड 20/10/2019 - 10:29
महाराजा काबुलीवाला काय रंगला होता म्हणून सांगू, अहाहा! त्याशिवाय राधिका आपटेनं रंगवलेली चोखेर बाली मधील बिनोदिनी तर क्लास अभिनय, दिगदर्शक अनुराग बासू, असलं जबरी कॉम्बो आहे बघा

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 22/10/2019 - 11:39
@ प्रचेतस, .... रवींद्रनाथांचे मूळचे आडनाव ठाकूर ना? ... होय. टागोर हा ब्रिटिश अपभ्रंश. जमीनदारांना ठाकूर म्हणण्याची प्रथा आहे. त्यांचे पिताश्री ब्राम्होसमाजी झाले नसते तर कदाचित त्यांचे आडनाव 'बंदोपाध्याय' तथा 'बॅनर्जी' सुद्धा असते असे काहींचे मत आहे. एकूणच बंगाली आडनावे हा मोठा घोळ आहे. मिपावरचे 'राजर्षी' वाचतो आता.

अनिंद्य 22/10/2019 - 11:30
@ जेम्स वांड @ प्रचेतस @ यशोधरा @ सुधीर कांदळकर @ जालिम लोशन @ कुमार१ @ जॉनविक्क @ नूतन प्रतिसादांबद्दल आपला आभारी आहे. मते-मतांतरे असणारच. यानिमित्ताने आपल्याच देशातील एका शहराबद्दल थोडेफार वाचन-मनन होते आहे त्याचा आनंदच आहे.

सुबोध खरे 22/10/2019 - 19:09
बंगाली लोकांची नावे संस्कृतोद्भव आणि अतिशय अर्थपूर्ण असतात. आमच्या वर्गात १२ बंगाली होते त्यांची नवे शैबल, इंद्रोजीत, तापोष, चांद्रेयी, प्रोदीप्ता, इंद्रोनील, प्रोबल, तीर्थांकर, शुदीप्तो, नभोजीत अशी सुंदर सुंदर आहेत. आजकालच्या तरुण तरुणींची चिया, टिया, कायरा, मायरा, शिजू, बिजू सारख्या अर्थहीन नावांपेक्षा किती तरी छान वाटतात

Prajakta२१ 07/05/2020 - 20:31
गुरुदेवांना आदरांजली कालच त्यांच्या चोखेर बाली ह्या कथेची आणि त्यांच्या कथांवर आधारित एपिक चॅनेल वरील स्टोरीज ऑफ रवींद्रनाथ टागोर ह्या सिरीयल ची आठवण झाली होती वरती त्यावर चर्चा झालीच आहे एकंदर बंगाली समाज हा पांढरपेशा बुद्धिजीवी वर्गातच येतो असे वाटते "टागोरांच्या कथानायिका हा बंगाली साहित्यातील एक रोचक आणि मननीय अध्याय. त्यांच्या सर्व कथांमधील नायिका आपल्या सांप्रत काळापेक्षा पुढचा विचार करणाऱ्या, हुशार आणि वैचारिक स्पष्टता असलेल्या स्त्रिया आहेत. पुरुषांपेक्षा कोठेही कमी नसलेल्या, उलट काकणभर सरसच. दर्पहरण, हैमंती सारख्या कथांमध्ये बंगाली स्त्रीजीवनाचे तरल चित्रण आहे. एक विशेष बाब म्हणजे टागोरांच्या बहुतेक नायिका अपत्यहीन आहेत. मृणाल असो, बिनोदिनी असो की बिमला, चारुलता. बहुतेक नायिकांना अपत्य नाही. मातृशक्तीचा गौरव करणाऱ्या मातृसत्ताक धाटणीच्या बंगाली संस्कृतीतल्या या कथांमध्ये अपत्यहीन नायिका हा मुद्दा मला विशेष वाटतो.">>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> रवींद्रनाथ टागोर आणि अजून काही साहित्यिकांच्या कथांवरून (परिणिता ,देवदास इ.) बंगाली स्त्रिया ह्या स्वतंत्र आणि सामर्थ्यशाली (दुसरा कुठला शब्द नाहो) वाटतात स्वतंत्रपणे निर्णय घेऊन ते निभावण्याची क्षमता त्यांच्यात दिसून येते कदाचित ह्यामागे महिषासुरमर्दिनीची/कालिमातेची उपासना पूजा असू शकते आपण ज्या देवतांची उपासना करतो तसेच त्यांचे गुण अंगी बाळगावयास सुरवात करतो आणि कौटुंबिक मानसिकतेवर पण तसाच प्रभाव पडतो चांगल्या लेखमालेबद्दल धन्यवाद

In reply to by Prajakta२१

अनिंद्य 07/05/2020 - 21:49
प्रतिसादाबद्दल आभार. ..... आपण ज्या देवतांची उपासना करतो त्यांचे गुण अंगी ..... सर्व देवरुपे मानवनिर्मित आहेत असे माझे मत आहे :-)

चित्रगुप्त 29/11/2020 - 06:17
आज अचानकच हा लेख वाचनात आला. खूपच माहितीपूर्ण आणि रंजक शैलीत लिहीले आहे. बंगाली कला-संस्कृतीबद्दलचे तुमचे सगळे लेख आता वाचायला हवेत. मला बंगाली समजत नसले तरी रविंद्र संगीत ऐकायला आवडते. (अर्थात फारच कमी ऐकलेले आहे) श्रीराधा बॅनर्जी (म्हणजेच बंदोपाध्याय का? ) यांनी गायलेले " नील दिगोन्ते ... हे फारच आवडते. त्यांची एक कॅसेट फार पूर्वी कलकत्त्याहून आणली होती, ती रोज ऐकायचो. तसेच जयदेवच्या 'गीतगोविंद' ने भारून जाऊन रविंद्रनाथ अगदी तरूण असताना 'भानुसिंग' नावाने रचलेली पदावली खूपच ऐकायचो. सुरुवातीला हेमन्त कुमार यांच्या धीरगंभीर आवाजात जयदेवांचेच मंगलाचरण (... श्रित-कमला-कुच-मण्डल धृत-कुण्डल , कलित-ललित-वन-माल ... जय जय देव हरे) आणि त्यानंतर 'आश्रमकन्या' - कणिका बंदोपाध्याय (आणि कोरस) यांनी गायलेली रविंद्रनाथांची अप्रतीम कवने. अजूनही यूट्यूबवर अधून मधून ऐकतो. यातील 'श्रावण गगने घोर घनघटा' मधील विरहिनी राधेची व्याकुळ आर्तता अशी काही प्रकटली आहे ( - की त्यापुढे लताने गायलेले हे गीत अगदी सामान्य वाटते) 'सुंदर राधे आवे बने' मधील राधेच्या सौंदर्‍याचे वर्णन, अश्या अनेक गोष्टी अतिशय श्रवणीय आहेत. Bhanusingher Padavali, Pt. 1 https://www.youtube.com/watch?v=Xq7YjejeEEo&ab_channel=VariousArtists-Topic Bhanusingher Padavali, Pt. 2 https://www.youtube.com/watch?v=ExeoHevH-Ww&ab_channel=VariousArtists-Topic तुमचे अन्य लेख वाचून प्रतिसाद देत राहीन. माझ्यासाठी एक नवाच खजिना उघडा करून दिलाचे अनेक आभार.

चित्रगुप्त 29/11/2020 - 06:24
@अनिंद्य, भानुशिंगेर पोदाबोली मधील बंगालीतील निवेदनाचा अर्थ मला समजत नाही. हिंदी वा मराठीत हे उपलब्ध होऊ शकते का? तसेच ही पदे संस्कृतात आहे की ब्रजभा॑षेत की बंगालीत ?

In reply to by चित्रगुप्त

अनिंद्य 17/12/2020 - 21:03
भानुशिंगेर पोदाबोली फार उच्च दर्जाच्या बंगालीत आहे :-) मिपाकर 'नूतन' यांनी ह्या लेखमालेतील एका परिच्छेदाचा सुंदर अनुवाद मराठीत स्वयंस्फूर्तपणे केला होता. त्यांनी 'आरण्यक' ह्या एका सुंदर पुस्तकाचा बंगालीतून थेट मराठीत अनुवादही केला आहे. https://www.misalpav.com/node/43651 त्यांनाच विनंती करूयात. नूतन जी, हे शुभकर्म करणार का ?

अनिंद्य 17/12/2020 - 20:54
चित्रगुप्त जी, रसभोक्ते खरे तुम्ही. हेमंत कुमार, श्रीराधा बॅनर्जी, कणिका बंदोपाध्याय... सगळी मोठी नावे. जय हो ! हेमंतदांनी गायलेले रवींद्रनाथांचेच 'क्लांती आमार खोमा (क्षमा) करो प्रभू' हे माझे अत्यंत आवडते, अनेकदा ऐकतो. लेखमालेतील अन्य लेख अवश्य वाचा आणि शक्य झाल्यास अभिप्राय कळवा. बंगाली शैलीचित्रांबद्दल तुम्ही आम्हा सर्वांना नवीन काही सांगू शकाल. खूप आवडेल. 🙏

नूतन 18/10/2019 - 13:21
लेख आवडला. रविन्द्र संगीतातील माझी आवडती दोन गाणी, भालोबाशी भालोबाशी....गायिका इन्द्राणी सेन ह्रिदोय आमार नाचेरे आजिके .... गायिका लतादिदी

जालिम लोशन 18/10/2019 - 13:31
सद्यस्थितीवर आधारीत असते तर प्रबोधनपर झाले असते. विशेषतः बंगाली माणसाचा स्वभाव त्यांची हिंसक वृत्ती वास्तवाशी तुटलेली नाळ. त्यांचे अमेरिकेविरुध्दची आंदोलने. जगभर पसरलेली डावीकडे झुकणारी लाॅबी. त्यातुन मिळवलेली नोबेल सारखी पारितोषिके. अरुधंती राॅय सारख्या कचरा लेखिकेला मिळणारी प्रसिध्दी त्याचवेळी तस्लिमा नसरिन सारख्या लेखिकेवर होणारे हल्ले ह्या मागची बंगाली मनोवृत्ती जर टिपता आली असती तर लेख वास्तववादी झाला असता.

In reply to by जालिम लोशन

जेम्स वांड 19/10/2019 - 10:20
त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिलाय, ऐतिहासिक धांडोळा घेणे हा त्यांचा मोटिव्ह स्पष्ट दिसतोय, त्यात राजकारण अन डावे विचार वगैरे घेणे न घेणे त्यांचे स्वातंत्र्य होय, त्यांच्या लिखाणावर काही बोला की. आणि, जर लेखमाला इतकी उणी वाटत असली तर तुम्ही तुम्हाला जी न्याय्य अन उत्तम वाटत असेल अश्या वळणाची लेखमाला स्वतःच लिहून टाका की एखादी, हाकानाका.

शांतिनेकेतनातील शिशुघर आणि सहजपाठांबद्दल आपल्या लेखणीतले वाचायला आवडेल. तसेच त्यांच्या एका सुनेला बंगालची मा म्हणतात - तिच्याबद्दलही वाचायला आवडेल. आणखी एका सुंदर लेखाबद्दल धन्यवाद.

जॉनविक्क 19/10/2019 - 13:44
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर व गीतांजली ही नावे नुसती ऐकली तरी मनाच्या हालचाली सुरू होतात _/\_
दोन-दोन राष्ट्रांचे राष्ट्रगीत लिहिणारे ते बहुदा जगातील एकमेव कवी असावेत. (काहींच्या मते श्रीलंकेचे राष्ट्रगीतही टागोरांनीच लिहिलय, पण त्याबद्दल एकवाक्यता नाही.)
क्या बात है...

In reply to by जॉनविक्क

जॉनविक्क 19/10/2019 - 13:47
समस्त मानवी जीवनात असा एकही प्रसंग नाही ज्यावर टागोरांची कविता आपल्याला मिळणार नाही. पण अतीप्राचीन महाभारताच्या पुढे जाऊन विचार करायची मानसिकता हवी हे उमजुन यायला आणि मान्यही करायला.

In reply to by जॉनविक्क

अनिंद्य 22/10/2019 - 11:18
@ जॉनविक्क रवींद्रनाथांचे 'एकला चलो' गायिले नाही असा बंगाली गायक/गायिका विरळाच. हे ही छान आहे, श्रेया घोषाल म्हणजे गोड गळा. मिष्टी. कवितांबद्दल सहमत, लेखात म्हटल्याप्रमाणे जीवनाच्या सर्व भल्याबुऱ्या अंगांवर टागोरांनी लिहिले आहे.

@जालीम लोशन: कोणताही हिंसाचार हा निषेधार्हच आहे. १. पु. ल. आणि काही विचारवंतांच्या मते बंगालमधील हिंसाचारात मोठा वाटा हा फाळणीच्या वेळी पूर्व पाकिस्तानमधून सर्वस्व गमावून आलेल्या निर्धन निर्वासितांच्या आणि त्यांच्या वाट चुकलेल्या वंशजांच्या नैराश्यातून आलेला आहे. त्या हिंसाचाराला परकीय हितसंबंधी खतपाणी घालतात हे उघड गुपित आहे. संवेदनाक्षम मनाचा सामान्य बंगाली माणूस हिंसाचारग्रस्तांबद्दल द्वेषाने बोलत नाही. २. कृपया अरुंधती रॉय यांच्या आपल्याला न आवडलेल्या काही पुस्तकांची नावे द्या. जमले तर त्यातली काही वाचेन. सत्यकथेच्या संपादकांनी साभार परत केलेले मराठी साहित्य श्रेष्ठ दर्जाचे निघाले होते हे विसरून चालणार नाही. ३. तस्लीमावर सर्वसामान्य बंगाली नव्हे तर कडवे धार्मिक लोक हल्ले करतात. ढाकापेक्षा ती पश्चिम बंगालमध्येच जास्त सुरक्षित आहे असे म्हणतात. ४. भारतातील दुष्काळात माणसे मरतात ती अन्न नसल्यामुळे नव्हे तर अन्न परवडत नसल्यामुळे हे नोबेलविजेते संशोधन एका सधन बंगाल्याचेच आहे.

प्रचेतस 20/10/2019 - 08:54
हा लेखही आवडला. रवींद्रनाथांचे मूळचे आडनाव ठाकूर ना? टागोर हा ब्रिटिशांनी केलेला अपभ्रंश का बंगाली भाषेच्या वळणाने गेलेला शब्द? मध्यंतरी एपिक चॅनेलवर रवींद्रनाथांच्या कथांवर आधारीत 'रबिंद्रनाथकी कथाएं' नामक मालिका प्रसारित होत होती. आपल्या मिपावर पण रातराणी ह्यांनी रवींद्रनाथांच्या 'राजर्षी' ह्या अप्रतिम कादंबरीचा भावानुवाद केला होता. दुर्दैवाने तो अनुवाद अजुन अर्धवटच आहे.

In reply to by प्रचेतस

जेम्स वांड 20/10/2019 - 10:29
महाराजा काबुलीवाला काय रंगला होता म्हणून सांगू, अहाहा! त्याशिवाय राधिका आपटेनं रंगवलेली चोखेर बाली मधील बिनोदिनी तर क्लास अभिनय, दिगदर्शक अनुराग बासू, असलं जबरी कॉम्बो आहे बघा

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 22/10/2019 - 11:39
@ प्रचेतस, .... रवींद्रनाथांचे मूळचे आडनाव ठाकूर ना? ... होय. टागोर हा ब्रिटिश अपभ्रंश. जमीनदारांना ठाकूर म्हणण्याची प्रथा आहे. त्यांचे पिताश्री ब्राम्होसमाजी झाले नसते तर कदाचित त्यांचे आडनाव 'बंदोपाध्याय' तथा 'बॅनर्जी' सुद्धा असते असे काहींचे मत आहे. एकूणच बंगाली आडनावे हा मोठा घोळ आहे. मिपावरचे 'राजर्षी' वाचतो आता.

अनिंद्य 22/10/2019 - 11:30
@ जेम्स वांड @ प्रचेतस @ यशोधरा @ सुधीर कांदळकर @ जालिम लोशन @ कुमार१ @ जॉनविक्क @ नूतन प्रतिसादांबद्दल आपला आभारी आहे. मते-मतांतरे असणारच. यानिमित्ताने आपल्याच देशातील एका शहराबद्दल थोडेफार वाचन-मनन होते आहे त्याचा आनंदच आहे.

सुबोध खरे 22/10/2019 - 19:09
बंगाली लोकांची नावे संस्कृतोद्भव आणि अतिशय अर्थपूर्ण असतात. आमच्या वर्गात १२ बंगाली होते त्यांची नवे शैबल, इंद्रोजीत, तापोष, चांद्रेयी, प्रोदीप्ता, इंद्रोनील, प्रोबल, तीर्थांकर, शुदीप्तो, नभोजीत अशी सुंदर सुंदर आहेत. आजकालच्या तरुण तरुणींची चिया, टिया, कायरा, मायरा, शिजू, बिजू सारख्या अर्थहीन नावांपेक्षा किती तरी छान वाटतात

Prajakta२१ 07/05/2020 - 20:31
गुरुदेवांना आदरांजली कालच त्यांच्या चोखेर बाली ह्या कथेची आणि त्यांच्या कथांवर आधारित एपिक चॅनेल वरील स्टोरीज ऑफ रवींद्रनाथ टागोर ह्या सिरीयल ची आठवण झाली होती वरती त्यावर चर्चा झालीच आहे एकंदर बंगाली समाज हा पांढरपेशा बुद्धिजीवी वर्गातच येतो असे वाटते "टागोरांच्या कथानायिका हा बंगाली साहित्यातील एक रोचक आणि मननीय अध्याय. त्यांच्या सर्व कथांमधील नायिका आपल्या सांप्रत काळापेक्षा पुढचा विचार करणाऱ्या, हुशार आणि वैचारिक स्पष्टता असलेल्या स्त्रिया आहेत. पुरुषांपेक्षा कोठेही कमी नसलेल्या, उलट काकणभर सरसच. दर्पहरण, हैमंती सारख्या कथांमध्ये बंगाली स्त्रीजीवनाचे तरल चित्रण आहे. एक विशेष बाब म्हणजे टागोरांच्या बहुतेक नायिका अपत्यहीन आहेत. मृणाल असो, बिनोदिनी असो की बिमला, चारुलता. बहुतेक नायिकांना अपत्य नाही. मातृशक्तीचा गौरव करणाऱ्या मातृसत्ताक धाटणीच्या बंगाली संस्कृतीतल्या या कथांमध्ये अपत्यहीन नायिका हा मुद्दा मला विशेष वाटतो.">>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> रवींद्रनाथ टागोर आणि अजून काही साहित्यिकांच्या कथांवरून (परिणिता ,देवदास इ.) बंगाली स्त्रिया ह्या स्वतंत्र आणि सामर्थ्यशाली (दुसरा कुठला शब्द नाहो) वाटतात स्वतंत्रपणे निर्णय घेऊन ते निभावण्याची क्षमता त्यांच्यात दिसून येते कदाचित ह्यामागे महिषासुरमर्दिनीची/कालिमातेची उपासना पूजा असू शकते आपण ज्या देवतांची उपासना करतो तसेच त्यांचे गुण अंगी बाळगावयास सुरवात करतो आणि कौटुंबिक मानसिकतेवर पण तसाच प्रभाव पडतो चांगल्या लेखमालेबद्दल धन्यवाद

In reply to by Prajakta२१

अनिंद्य 07/05/2020 - 21:49
प्रतिसादाबद्दल आभार. ..... आपण ज्या देवतांची उपासना करतो त्यांचे गुण अंगी ..... सर्व देवरुपे मानवनिर्मित आहेत असे माझे मत आहे :-)

चित्रगुप्त 29/11/2020 - 06:17
आज अचानकच हा लेख वाचनात आला. खूपच माहितीपूर्ण आणि रंजक शैलीत लिहीले आहे. बंगाली कला-संस्कृतीबद्दलचे तुमचे सगळे लेख आता वाचायला हवेत. मला बंगाली समजत नसले तरी रविंद्र संगीत ऐकायला आवडते. (अर्थात फारच कमी ऐकलेले आहे) श्रीराधा बॅनर्जी (म्हणजेच बंदोपाध्याय का? ) यांनी गायलेले " नील दिगोन्ते ... हे फारच आवडते. त्यांची एक कॅसेट फार पूर्वी कलकत्त्याहून आणली होती, ती रोज ऐकायचो. तसेच जयदेवच्या 'गीतगोविंद' ने भारून जाऊन रविंद्रनाथ अगदी तरूण असताना 'भानुसिंग' नावाने रचलेली पदावली खूपच ऐकायचो. सुरुवातीला हेमन्त कुमार यांच्या धीरगंभीर आवाजात जयदेवांचेच मंगलाचरण (... श्रित-कमला-कुच-मण्डल धृत-कुण्डल , कलित-ललित-वन-माल ... जय जय देव हरे) आणि त्यानंतर 'आश्रमकन्या' - कणिका बंदोपाध्याय (आणि कोरस) यांनी गायलेली रविंद्रनाथांची अप्रतीम कवने. अजूनही यूट्यूबवर अधून मधून ऐकतो. यातील 'श्रावण गगने घोर घनघटा' मधील विरहिनी राधेची व्याकुळ आर्तता अशी काही प्रकटली आहे ( - की त्यापुढे लताने गायलेले हे गीत अगदी सामान्य वाटते) 'सुंदर राधे आवे बने' मधील राधेच्या सौंदर्‍याचे वर्णन, अश्या अनेक गोष्टी अतिशय श्रवणीय आहेत. Bhanusingher Padavali, Pt. 1 https://www.youtube.com/watch?v=Xq7YjejeEEo&ab_channel=VariousArtists-Topic Bhanusingher Padavali, Pt. 2 https://www.youtube.com/watch?v=ExeoHevH-Ww&ab_channel=VariousArtists-Topic तुमचे अन्य लेख वाचून प्रतिसाद देत राहीन. माझ्यासाठी एक नवाच खजिना उघडा करून दिलाचे अनेक आभार.

चित्रगुप्त 29/11/2020 - 06:24
@अनिंद्य, भानुशिंगेर पोदाबोली मधील बंगालीतील निवेदनाचा अर्थ मला समजत नाही. हिंदी वा मराठीत हे उपलब्ध होऊ शकते का? तसेच ही पदे संस्कृतात आहे की ब्रजभा॑षेत की बंगालीत ?

In reply to by चित्रगुप्त

अनिंद्य 17/12/2020 - 21:03
भानुशिंगेर पोदाबोली फार उच्च दर्जाच्या बंगालीत आहे :-) मिपाकर 'नूतन' यांनी ह्या लेखमालेतील एका परिच्छेदाचा सुंदर अनुवाद मराठीत स्वयंस्फूर्तपणे केला होता. त्यांनी 'आरण्यक' ह्या एका सुंदर पुस्तकाचा बंगालीतून थेट मराठीत अनुवादही केला आहे. https://www.misalpav.com/node/43651 त्यांनाच विनंती करूयात. नूतन जी, हे शुभकर्म करणार का ?

अनिंद्य 17/12/2020 - 20:54
चित्रगुप्त जी, रसभोक्ते खरे तुम्ही. हेमंत कुमार, श्रीराधा बॅनर्जी, कणिका बंदोपाध्याय... सगळी मोठी नावे. जय हो ! हेमंतदांनी गायलेले रवींद्रनाथांचेच 'क्लांती आमार खोमा (क्षमा) करो प्रभू' हे माझे अत्यंत आवडते, अनेकदा ऐकतो. लेखमालेतील अन्य लेख अवश्य वाचा आणि शक्य झाल्यास अभिप्राय कळवा. बंगाली शैलीचित्रांबद्दल तुम्ही आम्हा सर्वांना नवीन काही सांगू शकाल. खूप आवडेल. 🙏
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533 आमार कोलकाता - भाग ६ – बंगाली कलासंस्कृतीचा अध्वर्यु प्रत्येक भारतीय ‘जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत गातो तेव्हा तो रवींद्रनाथ टागोरांचे गीत गात असतो. भारताचेच नाही तर बांगलादेशचे राष्ट्रगीतही टागोरांनी लिहिले आहे.

आमार कोलकाता - भाग ५

अनिंद्य ·

जॉनविक्क 15/10/2019 - 22:11
कोलकाता शहराची खास अशी जी लक्षणे आहेत त्यात शहरवासियांचे नाट्यवेड हे प्रमुख आहे मग जरा त्याशहरवासिय रसिकांनचेही किस्से येऊदे ना.

आंबट गोड 16/10/2019 - 16:13
कोलकत्यातील खाद्य परंपरा, कुटुंब व्यवस्था, रुढी व समजुती, प्रतिष्ठा व मान सन्मानाचे अनाठायी स्तोम, गरीबी आणि श्रीमंती यातील आत्यंतिक दरी, अगदी टोकाची समर्पित भावना असणार्‍या स्त्रिया ... ..याबद्दल वाचायला अधिक आवडेल...!!

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 18/10/2019 - 10:54
@ प्रचेतस, चित्रविषय वेगळ्याच पद्धतीने हाताळतात ह्यात. उदा. शिवशंकर तांडव करीत डमरू वाजवण्याऐवजी शांत-एकटा बसून वीणा वाजवितो आहे, उमा-महेश चित्रांच्या प्रचलित अभयमुद्रेऐवजी पतीच्या मांडीवर झोपलेली शिवपत्नी दर्शवली आहे - असे वेगळे चित्रविषय असतात. मांडणी फार साधी आणि चित्रातले रंग खास भारतीय / परिचित पॅलेटचे असतात.

तपशीलवार असूनही कुठेही कंटाळवाणे न होता उत्कंठा उत्तरोत्तर वाढते आहे. आता भारतमातेच्या सर्वश्रेष्ठ सुपुत्राच्या प्रतीक्षेत. धन्यवाद.

अनिंद्य 18/10/2019 - 10:34
@ कुमार१ @ यशोधरा @ नूतन @ जेम्स वांड @ कंजूस प्रतिसादांबद्दल आभारी आहे. _/\_

अनिंद्य 18/10/2019 - 10:53
@ जॉनविक्क, @ आंबट गोड, आपल्या सूचना उत्तम आहेत पण वाचक कंटाळतील. मालिकेच्या ३-४ भागांनंतर वाचकांचा उत्साह उतरणीला लागतो असा अनुभव आहे :-)

अनिंद्य 18/10/2019 - 12:28
मालिकेचा पुढील भाग "आमार कोलकाता – भाग ६ – बंगाली कलासंस्कृतीचा अध्वर्यु" येथे आहे :- http://www.misalpav.com/node/45569

जॉनविक्क 15/10/2019 - 22:11
कोलकाता शहराची खास अशी जी लक्षणे आहेत त्यात शहरवासियांचे नाट्यवेड हे प्रमुख आहे मग जरा त्याशहरवासिय रसिकांनचेही किस्से येऊदे ना.

आंबट गोड 16/10/2019 - 16:13
कोलकत्यातील खाद्य परंपरा, कुटुंब व्यवस्था, रुढी व समजुती, प्रतिष्ठा व मान सन्मानाचे अनाठायी स्तोम, गरीबी आणि श्रीमंती यातील आत्यंतिक दरी, अगदी टोकाची समर्पित भावना असणार्‍या स्त्रिया ... ..याबद्दल वाचायला अधिक आवडेल...!!

In reply to by प्रचेतस

अनिंद्य 18/10/2019 - 10:54
@ प्रचेतस, चित्रविषय वेगळ्याच पद्धतीने हाताळतात ह्यात. उदा. शिवशंकर तांडव करीत डमरू वाजवण्याऐवजी शांत-एकटा बसून वीणा वाजवितो आहे, उमा-महेश चित्रांच्या प्रचलित अभयमुद्रेऐवजी पतीच्या मांडीवर झोपलेली शिवपत्नी दर्शवली आहे - असे वेगळे चित्रविषय असतात. मांडणी फार साधी आणि चित्रातले रंग खास भारतीय / परिचित पॅलेटचे असतात.

तपशीलवार असूनही कुठेही कंटाळवाणे न होता उत्कंठा उत्तरोत्तर वाढते आहे. आता भारतमातेच्या सर्वश्रेष्ठ सुपुत्राच्या प्रतीक्षेत. धन्यवाद.

अनिंद्य 18/10/2019 - 10:34
@ कुमार१ @ यशोधरा @ नूतन @ जेम्स वांड @ कंजूस प्रतिसादांबद्दल आभारी आहे. _/\_

अनिंद्य 18/10/2019 - 10:53
@ जॉनविक्क, @ आंबट गोड, आपल्या सूचना उत्तम आहेत पण वाचक कंटाळतील. मालिकेच्या ३-४ भागांनंतर वाचकांचा उत्साह उतरणीला लागतो असा अनुभव आहे :-)

अनिंद्य 18/10/2019 - 12:28
मालिकेचा पुढील भाग "आमार कोलकाता – भाग ६ – बंगाली कलासंस्कृतीचा अध्वर्यु" येथे आहे :- http://www.misalpav.com/node/45569
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 आमार कोलकाता - भाग ५ कोलकाता शहराची खास अशी जी लक्षणे आहेत त्यात शहरवासियांचे नाट्यवेड हे प्रमुख आहे आणि ते बरेच जुनेही आहे. नेमका कालावधी सांगायचा तर सव्वादोनशे वर्षे जुने !! आज प्रचलित असलेल्या स्वरूपातल्या (फॉरमॅट) ‘बंगाली’ नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची कहाणी अद्भुत म्हणावी अशी.

आमार कोलकाता - भाग ४

अनिंद्य ·

अनिंद्य 09/10/2019 - 12:46
वाचक मित्रहो, संपादकांनी अनुक्रमणिका बनवून देईपर्यंत पूर्वीच्या भागांसाठी खालील लिंक्स :- आमार कोलकाता - भाग http://www.misalpav.com/node/45320 आमार कोलकाता - भाग http://www.misalpav.com/node/45361 आमार कोलकाता - भाग http://www.misalpav.com/node/45433

नूतन 09/10/2019 - 15:34
छान. लेखातील चित्रातील फ्रेममध्ये लिहिलेला मजकूर व अर्थ (लिहिण्याचा छोटासा प्रयत्न ) (मध्यजुगीन अन्धकाराष्छन्न भारतबर्षे नबजागरणेर अग्रदूत राजा राम मोहन रायेर स्मृतिधन्या 'सिमला हाऊस'नामें ख्यात एई ऐतिहासिक भबने दर्शनार्थीदेर स्वागत ) मध्ययुगीन अंधःकारमय भारतवर्षातील नवजागरणाचे अग्रणी राजा राममोहन रॉय यांचे स्मारक असलेल्या आणि सिमला हाऊस नांवाने ख्यात असलेल्या या ऐतिहासिक भवनात अभ्यागतांचे (visitors) स्वागत.

राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल आदर होताच. त्यांच्या विद्वत्तेबद्दल ठाऊक नव्हते. ते वाचून आदर द्विगुणित झाला. मन नकळत तत्कालीन मराठी विचारवंतांशी, समाजधुरीणांशी तुलना करतेच आणि वाईटही वाटते. नवजागरणाचे टप्पे पाहून आपण किती आत्मीयतेने सारे अभ्यासले आहे हे ध्यानात येते. सुंदर लेखांकाबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

अनिंद्य 11/10/2019 - 13:21
@ सुधीर कांदळकर, राजकीय घटना आणि राज्यकर्त्यांच्या रुक्ष इतिहासापेक्षा समाज आणि सामान्य लोकांचे त्या-त्या काळातले जीवन जास्त अपील होते. त्यामुळे 'नवजागरण' बद्दल आत्मीयता वाटते. महाराष्ट्रातही विद्वानांची-सुधारकांची परंपरा मोठी आहे (त्याबद्दल सध्या हिंदीत लिहीत आहे). प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

जेम्स वांड 10/10/2019 - 10:07
खूप समतोल आणि उत्तम लिहिताय, लगे रहो ! रच्याकने, हा कालखंड सुरू असतानाच १८९७ साली तत्कालीन बंगाल प्रांत आणि आजच्या ओडिशातील कटक नामे गावात एका गडगंज श्रीमंत वकिलाच्या पोटी एक नरशार्दूल जन्माला आला पुढे जाऊन कटकच्या रेव्हनशॉ कॉलेजीएट स्कुल मधून बंडखोरी करून बाहेर पडलेला हा तप्त निखारा कलकत्याने आनंदाने आपल्या पदरात पोसला, इतका की तो धगधगता विस्तव आणि ते शहर ह्यांचं एक परिचयाद्वैत झालं त्याचं नाव सुभाषचंद्र जानकीनाथ बोस (महानायकमय) वांडो

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 11/10/2019 - 13:10
बरोबर. नेताजींचे कोलकात्यातले निवासस्थानसुद्धा उत्तम जपले आहे. मी शेवटचा मे २०१७ मध्ये गेलो तेंव्हा त्या घरात नेताजींची ऑडी कार जर्मनीहून आलेले तंत्रज्ञ दुरुस्त करत होते. (दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश पहाऱ्यातून कोलकात्यातून बाहेर पडण्यासाठी वापरलेली). माझा इंटरेस्ट पाहून तिथल्या म्यानेजरने गाडीचे आणि जर्मन टीमचे फोटो तर काढू दिलेच, वर ह्याच घरात काढलेल्या एका जुन्या छायाचित्राची मला हवी असलेली प्रत स्वतःहून दिली. सुखद आठवण.

In reply to by अनिंद्य

जेम्स वांड 12/10/2019 - 09:59
जर्मन बनावटीची wandrer मोटर होती ती, त्यावेळी शिशिरकुमार बोस ह्या त्यांच्या पुतण्याने त्यांना त्या गाडीने दुसरे पुतणे असणाऱ्या अशोकनाथ बोस ह्यांच्याकडे सोडले होते तिथून बाबूजी गोमोह स्टेशनवरून फ्रंटियर मेल पकडून पेशावरला पळाले होते. गोमोह स्टेशन झारखंड मध्ये आहे आणि आता त्याचे नाव बहुतेक नेताजी सुभाषचंद्र बोस गोमोह जंक्शन असे काहीसे केले आहे.

जेम्स वांड 10/10/2019 - 10:43
मिरात उल अखबारचा उल्लेख तुम्ही कुठल्या कंटेक्स्ट मध्ये केलाय ते जरा स्पष्ट कराल जमल्यास. म्हणजे, ते फारसी भाषेतील पहिले वृत्तपत्र म्हणून का राजा राममोहन ह्यांनी सुरू केले म्हणून ते जरा उलगडले तर स्पष्टता येईल. कारण फक्त बंगाल नवजागरण संदर्भात छापील वर्तमानपत्र इतकं एक परिमाण लावलं तर बंगाल, भारत अन किंबहुना पूर्ण आशिया खंडातील पहिले छापील वृत्तपत्र असण्याचा मान १७८० मधील "हिकीज बंगाल गॅझेट" ला जाईल असे वाटते. अर्थात हिकीज बंगाल गॅझेट हे चक्क करमणूक डोळ्यासमोर ठेऊन छापलेले एक गॉसिप टाब्लोईड पद्धतीचे वृत्तपत्र होते हा पण एक भाग माझ्या वाचनात आला होता.

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 11/10/2019 - 10:39
@ जेम्स वांड .....मिरात उल अखबारचा उल्लेख तुम्ही कुठल्या कंटेक्स्ट मध्ये केलाय -फारसी भाषेतील पहिले वृत्तपत्र म्हणून का राजा राममोहन ह्यांनी सुरू केले म्हणून .... दोन्हीही. पहिले फारसी आणि राममोहन रॉय यांचे पहिले 'वृत्तपत्र'. मिरातचा विशेष उल्लेख करण्याचे आणखी एक कारण म्हणजे खुद्द फारसीचा वापर असलेल्या भागातही असा 'अखबार' नव्हता तेव्हा ते कोलकात्यातून प्रकाशित आणि निर्यात होत असे :-) संदर्भाच्या सोयीसाठी :- भाषा = फारसी वृत्तपत्राचे नाव = मिरात-उल-अखबार स्थापना = ४ एप्रिल १८२२ (मालक-प्रकाशक-संपादक - राजा राममोहन रॉय ) भाषा = बंगाली वृत्तपत्राचे नाव = समाचार दर्पण स्थापना = २३ मे १८१८ (प्रकाशक-संपादक - जोशुआ मार्शमन) भाषा = इंग्रजी वृत्तपत्राचे नाव = Hickey's Bengal Gazette स्थापना = 1780 (प्रकाशक-संपादक - James Augustus Hicky)

मदनबाण 10/10/2019 - 19:42
अप्रतिम लेखमाला ! बर्‍याच काळाने इतके उत्तम लेखन वाचनात आले आहे. असेच लिहीत रहा !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- प्यार तुम मुझसे करती हो डोन्ट से नो... ;) :- Ghayal

अनिंद्य 11/10/2019 - 13:29
@ कुमार१ @ जालिम लोशन आभार. @ जेम्स वांड, अनिंद्य 'बुवा' म्हटलं तर धोतर उपरणे घालून कीतर्नाला बसल्यासारखे वाटते, 'साहेब' म्हटले तर सरकारी बाबू असल्याचा फील येतो आणि 'जी' लावले तर उगाच वय वाढल्याचे फीलिंग टोचते. पेक्षा 'अनिंद्य'च म्हणा, हमारा नाम ही काफी है :-)

बबन ताम्बे 12/10/2019 - 07:34
नेहमीप्रमाणेच सुंदर लेख. फक्त खालील वाक्ये पटली नाहीत. "त्यावेळी दिल्लीचा बादशाह औरंगजेब नुकताच मृत्यू पावला होता आणि अकबर-दुसरा याचे शासन सुरु झाले होते (अकबर-दुसरा ह्यानेच राममोहन रॉय यांना 'राजा' ही पदवी दिली)" राजा राम मनोहर रॉय यांचा जन्म जर 1775 साली झाला तर औरंगजेब जाऊन बरीच वर्षे झाली . नुकताच मृत्यू पावला होता असे म्हणता येणार नाही. काहीतरी गल्लत होतेय का?

In reply to by बबन ताम्बे

जेम्स वांड 12/10/2019 - 10:06
औरंगजेब वारला १७०७ मध्ये, त्यानंतर त्याचा पोऱ्या बहादुरशहा पहिला सत्तेत आला तो सय्यद बंधू आणि चीन कुलीच खान ह्यांच्या मदतीने आपल्या इतर भावंडांची वासलात लावून. त्यानंतर आला तो फारुखसियार ज्याच्या काळात सय्यद बंधू हे अघोषित राज्यकर्ते (किंग मेकर, डी फॅकटो रुलर्स) वगैरे झाले होते त्या पूर्ण संक्रमणानंतर सत्तेत आलेला पहिला खऱ्या अर्थाने बाह्यप्रभावमुक्त मुघल राज्यकर्ता म्हणून नाव येते ते दुसऱ्या अकबराचेच, ह्या पार्श्वभूमीवर अनिंद्य ह्यांनी केलेलं विधान संयुक्तिक वाटते.

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 12/10/2019 - 20:14
@ बबन ताम्बे, औरंजेबाचा उल्लेख अस्थानी असल्याचा तुमचा मुद्धा बरोबर आहे. "अकबर-दुसरा ह्याने राममोहन रॉय यांना 'राजा' ही पदवी दिली" एवढे पुरेसे ठरले असते :-) @ जेम्स वांड, तुमचे अभ्यासपूर्ण प्रतिसाद रंगत आणीत आहेत.

अनिंद्य 12/10/2019 - 20:05
@ यशोधरा, @ प्रचेतस, तुमच्या नियमित प्रतिसादांनी आनंद होतो. @ बोलघेवडा, @ जॉनविक्क, भारत भूमी नररत्नांची खाण आहे, बंगाल अपवाद नाही. लेखमाला कंटाळवाणी होण्याच्या भीतीमुळे उदाहरणे वानगीदाखल आहेत. सूचनेबद्दल आभारी आहे.

अनिंद्य 09/10/2019 - 12:46
वाचक मित्रहो, संपादकांनी अनुक्रमणिका बनवून देईपर्यंत पूर्वीच्या भागांसाठी खालील लिंक्स :- आमार कोलकाता - भाग http://www.misalpav.com/node/45320 आमार कोलकाता - भाग http://www.misalpav.com/node/45361 आमार कोलकाता - भाग http://www.misalpav.com/node/45433

नूतन 09/10/2019 - 15:34
छान. लेखातील चित्रातील फ्रेममध्ये लिहिलेला मजकूर व अर्थ (लिहिण्याचा छोटासा प्रयत्न ) (मध्यजुगीन अन्धकाराष्छन्न भारतबर्षे नबजागरणेर अग्रदूत राजा राम मोहन रायेर स्मृतिधन्या 'सिमला हाऊस'नामें ख्यात एई ऐतिहासिक भबने दर्शनार्थीदेर स्वागत ) मध्ययुगीन अंधःकारमय भारतवर्षातील नवजागरणाचे अग्रणी राजा राममोहन रॉय यांचे स्मारक असलेल्या आणि सिमला हाऊस नांवाने ख्यात असलेल्या या ऐतिहासिक भवनात अभ्यागतांचे (visitors) स्वागत.

राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल आदर होताच. त्यांच्या विद्वत्तेबद्दल ठाऊक नव्हते. ते वाचून आदर द्विगुणित झाला. मन नकळत तत्कालीन मराठी विचारवंतांशी, समाजधुरीणांशी तुलना करतेच आणि वाईटही वाटते. नवजागरणाचे टप्पे पाहून आपण किती आत्मीयतेने सारे अभ्यासले आहे हे ध्यानात येते. सुंदर लेखांकाबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

अनिंद्य 11/10/2019 - 13:21
@ सुधीर कांदळकर, राजकीय घटना आणि राज्यकर्त्यांच्या रुक्ष इतिहासापेक्षा समाज आणि सामान्य लोकांचे त्या-त्या काळातले जीवन जास्त अपील होते. त्यामुळे 'नवजागरण' बद्दल आत्मीयता वाटते. महाराष्ट्रातही विद्वानांची-सुधारकांची परंपरा मोठी आहे (त्याबद्दल सध्या हिंदीत लिहीत आहे). प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

जेम्स वांड 10/10/2019 - 10:07
खूप समतोल आणि उत्तम लिहिताय, लगे रहो ! रच्याकने, हा कालखंड सुरू असतानाच १८९७ साली तत्कालीन बंगाल प्रांत आणि आजच्या ओडिशातील कटक नामे गावात एका गडगंज श्रीमंत वकिलाच्या पोटी एक नरशार्दूल जन्माला आला पुढे जाऊन कटकच्या रेव्हनशॉ कॉलेजीएट स्कुल मधून बंडखोरी करून बाहेर पडलेला हा तप्त निखारा कलकत्याने आनंदाने आपल्या पदरात पोसला, इतका की तो धगधगता विस्तव आणि ते शहर ह्यांचं एक परिचयाद्वैत झालं त्याचं नाव सुभाषचंद्र जानकीनाथ बोस (महानायकमय) वांडो

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 11/10/2019 - 13:10
बरोबर. नेताजींचे कोलकात्यातले निवासस्थानसुद्धा उत्तम जपले आहे. मी शेवटचा मे २०१७ मध्ये गेलो तेंव्हा त्या घरात नेताजींची ऑडी कार जर्मनीहून आलेले तंत्रज्ञ दुरुस्त करत होते. (दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश पहाऱ्यातून कोलकात्यातून बाहेर पडण्यासाठी वापरलेली). माझा इंटरेस्ट पाहून तिथल्या म्यानेजरने गाडीचे आणि जर्मन टीमचे फोटो तर काढू दिलेच, वर ह्याच घरात काढलेल्या एका जुन्या छायाचित्राची मला हवी असलेली प्रत स्वतःहून दिली. सुखद आठवण.

In reply to by अनिंद्य

जेम्स वांड 12/10/2019 - 09:59
जर्मन बनावटीची wandrer मोटर होती ती, त्यावेळी शिशिरकुमार बोस ह्या त्यांच्या पुतण्याने त्यांना त्या गाडीने दुसरे पुतणे असणाऱ्या अशोकनाथ बोस ह्यांच्याकडे सोडले होते तिथून बाबूजी गोमोह स्टेशनवरून फ्रंटियर मेल पकडून पेशावरला पळाले होते. गोमोह स्टेशन झारखंड मध्ये आहे आणि आता त्याचे नाव बहुतेक नेताजी सुभाषचंद्र बोस गोमोह जंक्शन असे काहीसे केले आहे.

जेम्स वांड 10/10/2019 - 10:43
मिरात उल अखबारचा उल्लेख तुम्ही कुठल्या कंटेक्स्ट मध्ये केलाय ते जरा स्पष्ट कराल जमल्यास. म्हणजे, ते फारसी भाषेतील पहिले वृत्तपत्र म्हणून का राजा राममोहन ह्यांनी सुरू केले म्हणून ते जरा उलगडले तर स्पष्टता येईल. कारण फक्त बंगाल नवजागरण संदर्भात छापील वर्तमानपत्र इतकं एक परिमाण लावलं तर बंगाल, भारत अन किंबहुना पूर्ण आशिया खंडातील पहिले छापील वृत्तपत्र असण्याचा मान १७८० मधील "हिकीज बंगाल गॅझेट" ला जाईल असे वाटते. अर्थात हिकीज बंगाल गॅझेट हे चक्क करमणूक डोळ्यासमोर ठेऊन छापलेले एक गॉसिप टाब्लोईड पद्धतीचे वृत्तपत्र होते हा पण एक भाग माझ्या वाचनात आला होता.

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 11/10/2019 - 10:39
@ जेम्स वांड .....मिरात उल अखबारचा उल्लेख तुम्ही कुठल्या कंटेक्स्ट मध्ये केलाय -फारसी भाषेतील पहिले वृत्तपत्र म्हणून का राजा राममोहन ह्यांनी सुरू केले म्हणून .... दोन्हीही. पहिले फारसी आणि राममोहन रॉय यांचे पहिले 'वृत्तपत्र'. मिरातचा विशेष उल्लेख करण्याचे आणखी एक कारण म्हणजे खुद्द फारसीचा वापर असलेल्या भागातही असा 'अखबार' नव्हता तेव्हा ते कोलकात्यातून प्रकाशित आणि निर्यात होत असे :-) संदर्भाच्या सोयीसाठी :- भाषा = फारसी वृत्तपत्राचे नाव = मिरात-उल-अखबार स्थापना = ४ एप्रिल १८२२ (मालक-प्रकाशक-संपादक - राजा राममोहन रॉय ) भाषा = बंगाली वृत्तपत्राचे नाव = समाचार दर्पण स्थापना = २३ मे १८१८ (प्रकाशक-संपादक - जोशुआ मार्शमन) भाषा = इंग्रजी वृत्तपत्राचे नाव = Hickey's Bengal Gazette स्थापना = 1780 (प्रकाशक-संपादक - James Augustus Hicky)

मदनबाण 10/10/2019 - 19:42
अप्रतिम लेखमाला ! बर्‍याच काळाने इतके उत्तम लेखन वाचनात आले आहे. असेच लिहीत रहा !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- प्यार तुम मुझसे करती हो डोन्ट से नो... ;) :- Ghayal

अनिंद्य 11/10/2019 - 13:29
@ कुमार१ @ जालिम लोशन आभार. @ जेम्स वांड, अनिंद्य 'बुवा' म्हटलं तर धोतर उपरणे घालून कीतर्नाला बसल्यासारखे वाटते, 'साहेब' म्हटले तर सरकारी बाबू असल्याचा फील येतो आणि 'जी' लावले तर उगाच वय वाढल्याचे फीलिंग टोचते. पेक्षा 'अनिंद्य'च म्हणा, हमारा नाम ही काफी है :-)

बबन ताम्बे 12/10/2019 - 07:34
नेहमीप्रमाणेच सुंदर लेख. फक्त खालील वाक्ये पटली नाहीत. "त्यावेळी दिल्लीचा बादशाह औरंगजेब नुकताच मृत्यू पावला होता आणि अकबर-दुसरा याचे शासन सुरु झाले होते (अकबर-दुसरा ह्यानेच राममोहन रॉय यांना 'राजा' ही पदवी दिली)" राजा राम मनोहर रॉय यांचा जन्म जर 1775 साली झाला तर औरंगजेब जाऊन बरीच वर्षे झाली . नुकताच मृत्यू पावला होता असे म्हणता येणार नाही. काहीतरी गल्लत होतेय का?

In reply to by बबन ताम्बे

जेम्स वांड 12/10/2019 - 10:06
औरंगजेब वारला १७०७ मध्ये, त्यानंतर त्याचा पोऱ्या बहादुरशहा पहिला सत्तेत आला तो सय्यद बंधू आणि चीन कुलीच खान ह्यांच्या मदतीने आपल्या इतर भावंडांची वासलात लावून. त्यानंतर आला तो फारुखसियार ज्याच्या काळात सय्यद बंधू हे अघोषित राज्यकर्ते (किंग मेकर, डी फॅकटो रुलर्स) वगैरे झाले होते त्या पूर्ण संक्रमणानंतर सत्तेत आलेला पहिला खऱ्या अर्थाने बाह्यप्रभावमुक्त मुघल राज्यकर्ता म्हणून नाव येते ते दुसऱ्या अकबराचेच, ह्या पार्श्वभूमीवर अनिंद्य ह्यांनी केलेलं विधान संयुक्तिक वाटते.

In reply to by जेम्स वांड

अनिंद्य 12/10/2019 - 20:14
@ बबन ताम्बे, औरंजेबाचा उल्लेख अस्थानी असल्याचा तुमचा मुद्धा बरोबर आहे. "अकबर-दुसरा ह्याने राममोहन रॉय यांना 'राजा' ही पदवी दिली" एवढे पुरेसे ठरले असते :-) @ जेम्स वांड, तुमचे अभ्यासपूर्ण प्रतिसाद रंगत आणीत आहेत.

अनिंद्य 12/10/2019 - 20:05
@ यशोधरा, @ प्रचेतस, तुमच्या नियमित प्रतिसादांनी आनंद होतो. @ बोलघेवडा, @ जॉनविक्क, भारत भूमी नररत्नांची खाण आहे, बंगाल अपवाद नाही. लेखमाला कंटाळवाणी होण्याच्या भीतीमुळे उदाहरणे वानगीदाखल आहेत. सूचनेबद्दल आभारी आहे.
८५ अँमहर्स्ट स्ट्रीट, कोलकाता  चित्रसौजन्य - राजा राममोहन रॉय मेमोरियल, कोलकाता. जुन्या कोलकात्यातील एक महालसदृश्य इमारत. जॉर्जियन वास्तुशास्त्राचा सुंदर नमुना असलेल्या शहरातील थोडक्याच इमारतींपैकी एक. फ्रान्सिस मेंडीस नामक श्रीमंत कलाप्रिय माणूस इमारतीचा मूळ मालक. १८१४ साली रंगपूरहून (सध्या बांग्लादेशात असलेले शहर) आलेल्या एका भारतीय व्यक्तीने १३००० रुपयांचा घसघशीत मोबदला देऊन फ्रान्सिसकडून हे घर विकत घेतले आणि तिथे कायमचे राहायला येण्याचे ठरवले.