नायक क्रमांक एक

लेखनविषय:
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.

<नाव सुचले नाही>

लेखनविषय:
काव्यरस
काळजातल्या जखमांना, न्याय पाहिजे होता तु घाईत होतीस अन् , त्यांना वेळ पाहिजे होता तू गेलीस परंतु , हा वसंत ईथेच आहे मोग-याला तुझा जरासा, सुगंध पाहिजे होता रोजचेच आहे, हे ही धुके परंतु सुर्यास आज यायला, उजेड पाहिजे होता तू दिल्या जखमांचे, ओझे कधीच नव्हते एकदा तरी पण करायला, मी वार पाहिजे होता एकटाच येत गेलो , हरेक मैफिलीतून मी ऎकल्या स्वरांचा मला, झंकार पाहिजे होता हो म्हणून गेलीस, मी विचारल्या प्रश्नास तू आता वाटते द्यायला, तू नकार पाहिजे होता

दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

लेखनविषय:
                        दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

किती गोड ताज्या स्मृती त्या क्षणांच्या, तुझे ते बिथरणें वगैरे वगैरे
छुप्या पावलांनी हळूवार येणे, दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे

तुझा शब्द एकेक वेचायचो मी, उतावीळ होतो तुला ऐकण्याला
तुझे मात्र मिथ्या अती भाव खाणे, अबोलाच धरणे वगैरे वगैरे

तुझा केशशृंगार न्याहाळतांना, उभा फ़क्त होतो तुझ्या पायशाला

कदाचित

लेखनविषय:
काव्यरस
सुखासीन आयुष्य अळणी कदाचित चवीला व्यथाही जरूरी कदाचित म्हणावे तशी ती न जगली कधीही जराही असोशी नसावी कदाचित पुन्हा चंद्र, तारे झगडले निशेशी पुन्हा अवस येण्याचि नांदी कदाचित अपूर्णास पूर्णत्व येण्याचसाठी तुझी भेट झाली असावी कदाचित जरा लांबलेलीच ती रात्र होती दिशाहीन झाली असावी कदाचित नको आणखी कोणताही उतारा नशा वेदनांची पुरेशी कदाचित उभा जन्म गेला करूनी गुलामी हिशेबात अजुनी उधारी कदाचित पिते ताक फुंकून फुंकून अजुनी कुणी पोळलेली असावी कदाचित सुखालाच केले म्हणे जायबंदी बरळणे असावे खरेही कदाचित जयश्री अंबासकर

हा मानवी मनाचा गुंता कसा सुटेना -

लेखनविषय:
हा मानवी मनाचा गुंता कसा सुटेना एकास आवडे जे दुसऱ्यास का पटेना स्पर्धेत जीवनाच्या का ताळमेळ नाही कुठलाच मनपतंग कटता कसा कटेना उपदेश कायद्याचा करण्यात गुंततो जो सुधरावयास तोरा अपुलाच का झटेना भिक्कार आहे म्हणुनी धिक्कारतो कुणी तो किति छान आहे म्हणुनी हा दूर का हटेना माझ्याचसारखा मी समजे कुणी स्वत:ला गर्वात आत्मस्तुतिचा फुगता फुगा फुटेना .

निष्पर्ण जाहले तुझ्याविना

लेखनविषय:
काव्यरस
निष्पर्ण जाहले तुझ्याविना कोसळले नाही मी जगत राहिले पुन्हा पुन्हा ऊन्मळले नाही आडास पोहरा जखडुन करतो वेठबिगारी पाण्यात अश्रु मिसळले कुणाला कळले नाही वाटेत हात सोडला कधी तू कळले नाही मी चाल बदलली जरा परी अडखळले नाही शाळेत रोजची चिडाचिडी अन भांडाभांडी का घट्ट आपुला लगाव मजला कळले नाही का पौर्णिमेस तारका नभी येण्या आतुरती रजनीस अजुन हे गुपित जराही कळले नाही जयश्री अंबासकर

गहाणात ७/१२.....

लेखनविषय:
गहाणात ७/१२.....

गहाणात हा सातबारा वगैरे
तरी वाढतो शेतसारा वगैरे

कुठे राहिली आज ही गाय माझी?
घरी खात नाहीच चारा वगैरे

रुबाबात लक्ष्मी पुसे शारदेला
हवी काय खुर्ची, निवारा वगैरे?

मला अन्य काहीच पर्याय नाही
करावाच लागेल ’मारा’ वगैरे

बढाई असूदे तुझी तूजपाशी
कुणी ना इथे ऐकणारा वगैरे

कशाला अशी सांग दर्पोक्तवाणी?
तुला कोण येथे भिणारा वगैरे?

खुले नेत्र ठेऊन गिळतो नशेला
खरा तोच असतो पिणारा वगैरे

किनारे

लेखनविषय:
[कविवर्य सुरेश भट यांच्या 'मज दोन आसवांना हुलकावता न आले' या ओळीवरची तरही गझल] मज दोन आसवांना हुलकावता न आले हसण्यात हुंदक्यांचे कढ दाबता न आले कितिदा मनात आले, सुखपेरणी करावी उपटून यातनांचे तण काढता न आले निमिषात भंग झाली गहिरी, अतूट नाती परक्याच आपल्यांना समजावता न आले मरणासवे कितीदा फसवे करार झाले जगणे नकोच होते, पण टाळता न आले अनुकूल सूचनांना वगळून चूक केली प्रतिकूल आर्जवांना धुडकावता न आले असण्याहुनी सुखाचे नसणेच ठीक होते उपभोगता न आले अन् वाटता न आले अभिजात वेदनेचे जडशीळ जून ओझे कवटाळले उराशी, भिरकावता न आले जुळवून काफिये मी जपल्या अलामतीही, गझले, तुझे किनारे पण गाठता

आयुष्य राजयोगी (तरही गझल)

लेखनविषय:
काव्यरस
आयुष्य राजयोगी,उपभोगता न आले माझे असून “माझे” संबोधता न आले आभाळ पापण्यांना सांभाळता न आले मज दोन आसवांना हुलकावता न आले राशी अनेक होत्या गाठीस पातकांच्या गंगेस पाप सारे स्वीकारता न आले बरसात तू सुखाची, केली सदैव देवा झोळीच फाटकी मज सुख झेलता न आले जखमा असंख्य होत्या अन्‌ वेदना पुरेशा वणव्यास का मनाच्या सुलगावता न आले सोडून दूर सुख मी दु:खात चूर झाले दु:खातल्या सुखाचे "सुख" टाळता न आले जयवी - जयश्री अंबासकर

बेरीज

लेखनविषय:
काव्यरस
पाहिली डोळ्यात तुझिया वीज मी झेलण्या केले खुले काळीज मी भेटुनी जाते त्सुनामीसारखी मिरवतो आयुष्यभर ती झीज मी आज स्वप्नांनो, नको तसदी मला काल कवडीमोल विकली नीज मी पूर्णता नाही तुला माझ्याविना मी तरी कोठे तुझ्याखेरीज मी ठरवले आहेस तू उत्तर तुझे, की चुकीची मांडतो बेरीज मी? -- उपटसुंभ
Subscribe to गझल