किनारे
लेखनविषय:
[कविवर्य सुरेश भट यांच्या 'मज दोन आसवांना हुलकावता न आले' या ओळीवरची तरही गझल]
मज दोन आसवांना हुलकावता न आले
हसण्यात हुंदक्यांचे कढ दाबता न आले
कितिदा मनात आले, सुखपेरणी करावी
उपटून यातनांचे तण काढता न आले
निमिषात भंग झाली गहिरी, अतूट नाती
परक्याच आपल्यांना समजावता न आले
मरणासवे कितीदा फसवे करार झाले
जगणे नकोच होते, पण टाळता न आले
अनुकूल सूचनांना वगळून चूक केली
प्रतिकूल आर्जवांना धुडकावता न आले
असण्याहुनी सुखाचे नसणेच ठीक होते
उपभोगता न आले अन् वाटता न आले
अभिजात वेदनेचे जडशीळ जून ओझे
कवटाळले उराशी, भिरकावता न आले
जुळवून काफिये मी जपल्या अलामतीही,
गझले, तुझे किनारे पण गाठता न आले !
वाचने
5242
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
अप्रतिम आहे एकेक कडवं.
काय बोलु क्रांती !
छान
माय.. तुझ्या चरणांचे
अ प्र ति म !!
गझल अत्तिशय आवडली.
क्रांति
जबरदस्त यार !
जुळवून काफिये मी जपल्या
अनुकूल सूचनांना वगळून चूक
वाह!!
अप्रतिम रचना!
In reply to अप्रतिम रचना! by पैसा
हे घ्या..
क्लास !!
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by क्रान्ति
धन्यवाद!
केवळ अप्रतिम!!
असण्याहुनी सुखाचे नसणेच ठीक
झकास
सुरेख!
वा!
खुपच सुन्दर !!!!
अप्रतिम.. सर्व कडवी परत परत
मला गझल फारशी क्ळत नाही. पण
खतरनाक !
सुभानल्लाह!
सहीच...!!!
अवघड आहे बुवा अशी रचना करणं...
असण्याहुनी सुखाचे नसणेच ठीक
छानच ! पण तुमच्या लौकिकास