<पिवून हय क्यु?>

दारोळ्या १. प्यासा बार मंडई समोर बाटल्या रित्या २. उठला नाना लावे समाधी तुळशी बागेत ३. नाच पराचा हैदोस वाचताना मोडते समाधी प्रेरना स्त्रोतः http://misalpav.com/node/22407#comment-416944

का ग धरिला

लेखनविषय:
काव्यरस
जीवघेणा शूल- अबोला असा का ग धरिला ग्रीष्मजैसा पोळण्याचा, वसा का ग धरिला मी दिला होता सखे, चन्द्र तुझिया हाती फेकुनी पाण्यामधे, कवडसा का ग धरिला पाहिली होती सखे तू बेवफाई माझी श्वासातल्या जाणिवांचा, भरवसा का ग धरिला ओलावा शोधित, फिरलीस वणवण सखे संग ऐसा कोरडा, गरमसा का ग धरिला मखमली पाकळ्यानी लपविले मी कफन पदर त्याचा रेशमी, तलमसा का ग धरिला जीवघेणा शूल- अबोला असा का ग धरिला ग्रीष्मजैसा पोळण्याचा, वसा का ग धरिला

फुलांचे..!

लेखनविषय:
उदंड झाले वार फुलांचे, उघडले न पण दार फुलांचे चुरगळणार्‍या, सुगंध देती कसे असे व्यवहार फुलांचे तुझा हात फिरला कवितेवर शब्द शब्द होणार फुलांचे मिळे न सहवासाचे अत्तर विस्कटले बाजार फुलांचे कत्तल माझ्या बागेची अन् तिला गळाभर हार फुलांचे मोक्ष मिळावा निर्माल्याचा जीवन मी जगणार फुलांचे -- उपटसुंभ

स्वप्नांचे..

लेखनविषय:
भेटीला ये नकोच देऊ कारण स्वप्नांचे उगाच होते सत्याशी मग भांडण स्वप्नांचे नशेमधे असतानाही मी बरळलोच नाही कल्पनेस बहुतेक असावे कुंपण स्वप्नांचे हलक्याफुलक्या स्वप्नांचा तो काळ कुठे गेला ओझे का वाटावे आता मण मण स्वप्नांचे चटई निर्देशांक तयांच्या आयुष्याला द्या तुमच्यासाठी तुटले ज्यांचे अंगण स्वप्नांचे मेल्यानंतर हाल न झाले असते आत्म्यांचे जर का करता आले असते तर्पण स्वप्नांचे माझ्यासाठी उल्का कुठली निखळलीच नाही रिते तरीही पहाटेस तारांगण स्वप्नांचे - उपटसुंभ

साखर

लेखनविषय:
संत सोशी अंगी घावा, वाटी दार्‍यात साखर उसा चिरडूनी चक्री, येते फेर्‍यात साखर नेत्याच्या वल्गना, कधी जेत्याची पुंडाई देते खावया गोग्रासा, जैशी चार्‍यात साखर जणू नित्याची वंचना असा छळे मधुमेह, तोंडी लागले ते काढे, म्हणे सार्‍यात साखर डोळे लागेनात मूळी, होता कडू बाळझोप, दूधा फुंकरे आई जे, तीच्या वार्‍यात साखर घाली गुंजारव भुंगा, फूल नि:शब्द स्तब्ध घट्ट बन्द पंखुड्या, ठेवी पहार्‍यात साखर रुसलेली साजणी, तिचे बिंब कसे गोड? आरश्याच्या जणु पाठी होती पार्‍यात साखर

आहेस तू जगी हे दाखव कधी कधी..

लेखनविषय:
आहेस तू जगी हे दाखव कधी कधी दगडास अंतरीच्या जागव कधी कधी होतो जरा सुखाचा वर्षाव अन पुन्हा वठल्या मनास होते पालव कधी कधी नुसत्या हताशतेला गोंजारसी किती? अंगार अंतरीचा पेटव कधी कधी का बोलणे तुझे हे 'आज्ञाच' भासते तूही करून बघ ना आर्जव कधी कधी स्वप्नांत रंगताना, पडला विसर असा बघते सहल म्हणुन मी, वास्तव कधी कधी मी एरवी तशीही, असतेच शांत पण नसते विचार करती, तांडव कधी कधी! आतूर मीच होते तुज पाहण्यास का? आतूरतोस तूही, भासव कधी कधी! ध्यानात ठेव 'प्राजू' हरलीस तू जरी जेत्यापरी स्वत:ला वागव कधी कधी -प्राजु

सत्यमार्गा उजळुनी आम्हास तारा बापुजी

लेखनविषय:
काव्यरस
अंतराळी कालगंगी अढळ तारा बापुजी सत्यमार्गा उजळुनी आम्हास तारा बापुजी पेटत्या हीमालयाची रोजची होई व्यथा तोफगोळ्यांचा धुमसता नित्य मारा बापुजी विहिर सुकली रान सुकले ऊष्ण उन्हाच्या झळा आपुल्या शेळीस आणू कुठुन चारा बापुजी भ्रष्ट नेते देश लुटती खाटकाची गाय ही संस्कृतीचे वाजवीती रोज बारा बापुजी पीक येवो वा न येवो नित्य कर्जे काढली फाटला घेऊन बोजा सात बारा बापुजी पाचशेची नोट कोणी काल दारी फेकली धुंद लोकांच्या सभेचा आज नारा बापुजी

मेहदी हसन यांना श्रद्धांजली!

लेखनप्रकार
सुप्रसिद्ध गायक मेहदी हसन यांचे निधन झाले आहे अशी बातमी नुकतीच समजली. त्यांना अतिशय भावपूर्ण श्रद्धांजली! या निमित्ताने त्यांनी गायलेल्या गझलांबद्दल, त्यांच्या गायकीबद्दल चर्चा व्हावी ही अपेक्षा! माझ्याकडून हे... सुरूवातीचा संवाद ऐकण्यासारखा आहे. ***

मन भरून गेले प्रेमाने मी रिताच होतो ना?

लेखनविषय:
मन भरून गेले प्रेमाने मी रिताच होतो ना? नव्हतीस कधी तू माझी पण मी तुझाच होतो ना ? "चल विसरुन जाऊ झाले-गेले, जगू नवे आता" म्हटलेस तरीही गुरफटून मी उगाच होतो ना ? तुज बरेच काही दिले सुखी करण्याला नशिबाने पण मनात गुपचुप जपलेली मी व्यथाच होतो ना ? मज वेडा मानुन सोडुन जा, हरकत नाही माझी 'तो' प्रेम तुझ्यावर करणारा मी खुळाच होतो ना? माझ्या पायाशी हरून ही दुनिया लोळण घेवो तू समोर माझ्या आल्यावर मी खुजाच होतो ना ? तुला नेहमी तुझ्या घराची चौकट प्यारी होती केलेस मनातुन प्रेम तरी मी 'दुजा'च होतो ना ? ....रसप.... ११ जून २०१२ http://www.ranjeetparadkar.com/2012/06/blog-post_12.html

आयुष्यातून आयुष्यच हद्दपार.............

लेखनविषय:
लेखनप्रकार
आयुष्यातून आयुष्यच निघून चालले आहे............. एक दिवस असा उगवतो की वाटते आता आयुष्यातून काहीतरी कमी होत चालले आहे. सगळी सुखे दाराशी हात जोडून उभी आहेत पण काय कमी होते आहे हेच कळत नाही. आत्तापर्यंत जे नव्हते ते मिळवण्यात सगळा वेळ गेला. जे मिळवले त्याचा उपभोग घेण्यात वेळ गेला. मित्र मंडळीसमवेत मजेने या आयुष्याची मजा घेतली पण आता असे वाटते आहे की काहीतरी हातातून सुटत चालले आहे. आत्तापर्यंत दु:खे ही अनेक भोगली आणि खोटे कशाला बोलू, त्यांचीही या आयुष्यात सोबतच होती.
Subscribe to गझल