आयुष्य राजयोगी (तरही गझल)
लेखनविषय:
काव्यरस
आयुष्य राजयोगी,उपभोगता न आले
माझे असून “माझे” संबोधता न आले
आभाळ पापण्यांना सांभाळता न आले
मज दोन आसवांना हुलकावता न आले
राशी अनेक होत्या गाठीस पातकांच्या
गंगेस पाप सारे स्वीकारता न आले
बरसात तू सुखाची, केली सदैव देवा
झोळीच फाटकी मज सुख झेलता न आले
जखमा असंख्य होत्या अन् वेदना पुरेशा
वणव्यास का मनाच्या सुलगावता न आले
सोडून दूर सुख मी दु:खात चूर झाले
दु:खातल्या सुखाचे "सुख" टाळता न आले
जयवी - जयश्री अंबासकर
वाचने
2725
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
तरही गझल म्हणजे काय?
तरही गझल म्हणजे एक कुठला तरी मिसरा कुणाच्या तरी गझलेतला घेऊन लिहीलेली गझल.
ह्यात "मज दोन आसवांना हुलकावता न आले" हा मिसरा सुरेश भटांचा आहे.
सुरेख रचना:
जखमा असंख्य होत्या अन् वेदना पुरेशा वणव्यास का मनाच्या सुलगावता न आलेव्वाह!
राशी अनेक होत्या गाठीस पातकांच्या गंगेस पाप सारे स्वीकारता न आलेही ओळ मस्तच वाटली.
अरे वा !
मस्तं
मनापासून धन्यवाद :)
जखमा असंख्य होत्या अन् वेदना पुरेशा
वणव्यास का मनाच्या सुलगावता न आले
अप्रतिम !
आवडली गझल. 'आयुष्य राजयोगी' खासच!
मनापासून धन्यवाद :)
बहोत बढिया...!
लावुनी आग मनाला, सोडुनी गेलीस तू
अश्रुंचा पूर वाहिला, विझवता ने आले |
दिल्यास संधी तू अनेक झेल घेण्याच्या
गळकेच हात माझे, कॅच झेलता न आले | :-)
ह्या मर्त्य ललना की अप्सरा स्वर्गातल्या
बायको साथीला, भरुनी डोळे बघता न आले. | :-)
तरही?