...शब्द काही

लेखनविषय:
काव्यरस
कधी बोल तू नेमके शब्द काही तुझ्या मनीचे नेटके शब्द काही अजुनी मला ऐकू येतात तुझिया पत्रातले बोलके शब्द काही आता टाळतो मी तुझी भेट घेणे छळती तुझे हासरे शब्द काही आता बोलणे हे मुक्यानेच होते आता जाहले पोरके शब्द काही पुढे चालणे धर्म हाचि अपूर्व विसरू कसे मागचे शब्द काही

शब्दबेवडा

लेखनविषय:
               शब्दबेवडा

आयुष्याच्या वळणावरती जेव्हा पुरता दमून गेलो
पोट बांधले पायाशी अन् हात हवेचा धरून गेलो

हळवे अंतर खुणवत होते, "संपव जगणे" सांगत होते
मग्रुरीच्या पोटासंगे दडून गेलो; जगून गेलो!

ऐश्वर्याला दिपून इथल्या बघता बघता 'बटीक' झालो
सीता शोधणे भुलुन गेलो! अशोकवनात रमून गेलो!!

अनुभूतीचा सुसाट वारू शब्दामधुनी उधळत गेलो
व्यवस्थेशी 'भिडणे' सोडून शब्दबेवडा बनून गेलो

न ठहरे किसी मंजिल पर शब होने तक

लेखनविषय:
उर्दू /हिंदी लिहिल्या बद्दल क्षमस्व. गझल हा विषय अजून शिकतो आहे, तेंव्हा चूक असल्या वर माफी असावी न ठहरे किसी मंजिल पर शब होने तक कोई क्या लगाये इल्जाम हम पर सहर होने तक क्यों जीए और कितना बेमक्सद है अब रतीब मालाल ये है कि हुए रुखसत जफर होने तक खंजर भी रोया होगा दिल से गुजरते वक़्त खैर, दोस्त क्या वो जो ना लगा हो सीने तक क्या सोच रहे हो, सोए रहो अब बेनाम न लौटेगी सांस सफर के खतम होने तक

काय आहे आमच्याकडे ?

लेखनविषय:
काव्यरस
रंग नाही रूप नाही, काय आहे आमच्याकडे सौंदर्याला तुझ्या द्यायला, न्याय आहे आमच्याकडे ओळखीचे असेल तुला ते, हुरहुरणे पावसातले सांगूच का तुला त्याचाही, उपाय आहे आमच्याकडे ना सुगंध ना वारा, ना पाऊस ना गारा शहारण्या तुला या सर्वांना, पर्याय आहे आमच्याकडे मस्तीत तुझिया आम्ही, बेदुंध होऊ ऎसे उधळून टाकू सारे, जे काय आहे आमच्याकडे लिहशील तूही काही, कविता पावसा-धुक्यावर घेशील जेव्हा भरभरून, जे काय आहे आमच्याकडे कुठवर ऎकशील वेडे, गोष्टी तू ज्या अनुभवायच्या ये इष्क कर जरासा समजेल, काय आहे आमच्याकडे

आडदांड पाऊस

लेखनविषय:
आडदांड पाऊस

अडदांड बेत ओला शिजवून पावसाने
केला शिवार खच्ची भिजवून पावसाने

गाळून घाम विणले मी वस्त्र स्वावलंबी
केल्यात पार चिंध्या खिजवून पावसाने

आले मनात जेव्हा तेव्हाच निग्रहाने
केले सपाट डोंगर झिजवून पावसाने

खाण्या-पिण्यात झाला पाऊसही अधाशी
हंगाम फस्त केला निजवून पावसाने

नाही दिले कुणाला थोडे 'अभय' परंतू
खरडून दैव नेले थिजवून पावसाने

भांडार हुंदक्यांचे....!

लेखनविषय:
भांडार हुंदक्यांचे....!

ना दाविला जगाला बाजार आसवांनी
एकांत मात्र केला बेजार आसवांनी

धुत्कारले जगाने, नाकारले सख्यांनी
तेव्हा दिला मनाला आधार आसवांनी

संतप्त भावनांना हृदयात कोंबले पण;
केलाच पंचनामा दिलदार आसवांनी

वंध्यत्व पावसाचे नडले पिकांस जेव्हा
बरसून पाजली मग जलधार आसवांनी

होतो पराभवांनी पुरता खचून गेलो
पण रोवल्या उमेदी झुंजार आसवांनी

जेव्हा विजयपताका पहिलीच रोवली मी
जल्लोष धन्य केला साभार आसवांनी

लाचार शेत झाले

लेखनविषय:
लाचार शेत झाले

आळस-तणाव-चिंता वाहून नेत आहे
हृदयात चेतनेचा बघ पूर येत आहे

पडताच वीज लखलख थरकापता भयाने
निर्जन शिवार मजला पदरात घेत आहे

कायम गहाण सारे करण्यास सातबारा
बँकेसमोर झाले लाचार शेत आहे

छाटून पंख आधी केलेय जायबंदी
आता पुन्हा शुभेच्छा उडण्यास देत आहे

अस्फ़ूट जाणिवेला मी शेंदले तरीही
थोडी सचेत झाली, थोडी अचेत आहे

नसतोस सोबतीला तू व्यूह भेदताना
पुसतोस मग कशाला की काय बेत आहे?

हुलकडूबी नाव

लेखनविषय:
हुलकडूबी नाव

यांव आहे, त्यांव आहे
फेकण्याची हाव आहे

हालल्याने डोलणारी
हुलकडूबी नाव आहे

दूध-पाणी एक होता
एक त्यांचा भाव आहे

मध्यभागी घाण-गोध्री
भोवताली गाव आहे

जीवनाने नोंद घ्यावी
जिंकलो मी डाव आहे

भ्रष्ट, लंपट, चोरटा पण;
बोलताना साव आहे

पेटलो मी पूर्ण कोठे?
अंतरंगी वाव आहे

फुंकताना धाप कसली
’अभय’ झाले घाव आहे!

अन्नधान्य स्वस्त आहे

लेखनविषय:
अन्नधान्य स्वस्त आहे

अन्नदाता या युगाचा जाहला उद्ध्वस्त आहे
(फक्त कारण एवढे की अन्नधान्ये स्वस्त आहे)

शेर नाही चांगला की, मी नसे कळपात त्यांच्या?
दाद का आलीच नाही, छान! वा... वा!! मस्त आहे!!!

मी म्हणालो फक्त इतुके "शब्द माझे शस्त्र आहे"
चक्क माझ्या भोवताली चोख बंदोबस्त आहे

अर्थसंकल्पात होती खायसाठीची व्यवस्था
कागदावर आकडे अन् माल सारा फस्त आहे

कोण गेले, कोण मेले, कोण पुसतो काळजीला
झोपली सद्भावना अन यादवी आश्वस्त आहे

.....वाहवा.....

लेखनविषय:
काव्यरस
मी तुझ्या डोळ्यात काही पाहिले होते बहुधा भास ते माझ्या मनातले होते कितीदा मी स्वतःलाच समजावतो फायदे मिळाले ते तहातले होते फुलवायचे तुला जे चार भिंतीत होते स्वच्छंद ते फुल रानातले होते विचारे का हसलो तिला एकटे पाहून मी सुख ती दुस-या कुणाची नसण्यातले होते मिळविली वाहवा माझिया गज़लांनी खरे ते दुःख काही उरातले होते
Subscribe to गझल