मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चारोळ्या

शीळा घास

वैभवकुमारन ·
लेखनविषय:
शीळा घास भीक मागत दारापुढे भिकारीण आली फाटके पोलके अन जिरलेली चोळी सुकलेल्या ओठी अश्या भाकारीच्या ओळी ठीगळांची नटलेली भुकेलेली झोळी भीक मागत दारापुढे भिकारीण आली -------1 कपाळ नीस्तेज पोटी हातभर खोली 'आशा' बाळ्गुनी पायी अंगठा ती घोळी उन्हाचे चटके त्यात डोळी कड ओली शिळ्या घासासाठी दारी उभी अशी भोळी भीक मागत दारापुढे भिकारीण आली----2 माय -माय करतच अनवाणी आली भान साऱ हरपुनी भुकेसाठी आली आली आली अशी एक भिकारीण आली शीळा घास पडे झोळी दुसऱ्या दारी गेली भीक मागत दारापुढे भिकारीण आली वैभव कुलकर्णी

ओढ

विअर्ड विक्स ·
लेखनविषय:
काव्यरस
निशब्द राहिलो जरी मी पाहुनी सारे न्याहाळले कायम तुज विसरुनी तारे, भावनेस शब्दांची जोड का हवी कधी ओळखशील माझी ओढ हि खरी...

चारोळ्या - २

धन्या ·
लेखनविषय:
काव्यरस
चारोळ्या - १ या चारोळ्या मी जवळपास साडे पाच वर्षांपूर्वी लिहिलेल्या आहेत. यमकं बर्‍यापैकी जुळलेली असली तरी हे "र ला र आणि ट ला ट" जोडणं नव्हतं. बरंचसं उस्फुर्त.

शिळी जिलेबी - १

धन्या ·
लेखनविषय:
काव्यरस
१ धीर गंभीर गाज सागराची सोबतीला आहे बोचरा वारा हरवून गेल्या दिशा सार्‍या अन मी शोधतो आहे किनारा २ किती ऋतू असे उन्हाळ्यात गेले किती ऋतू तसे पावसात चिंब झाले कळले नाही मला कधीही ते सारं माझ्या मनात आसवांचे मेघ दाटलेले ३ डोळे पाण्याने भरून आलेले आणि मनात आठवणींचे आभाळ दाटलेले झाकोळून गेल्या चेहृयावर माझ्या थर होते टोकणार्‍या वेदनांचे साचलेले ४ तुझ्या त्या आश्वासक शब्दांमुळे मी स्वत:ला खूप सावरलं होतं मन तसं भिजून आलं होतं पण माझ्या अश्रूना मात्र मी आवरलं होतं ५ काळ वेळ कधी तशी नसतेच तशी गुलमोहर फुलांनी बहरून यायला मनाचंही थोडंसं असंच असतं पुरते एक जाणी

प्रेमाच्या वेळीवर

दिपक वायळ ·
लेखनविषय:
प्रेमाच्या वेळीवर सर्वच फुल फुलतात अस नाहि जीव जेवढा आपण लावावा तेवढा सर्व लावतात अस नाहि प्रेमा सारख नात ज्याला सिमा नसतात, हे आपण जाणतो पण प्रेमाच्या नात्याला सर्वच जाणतात अस नाहि कुणी म्ह्टलय प्रेमाम्ध्ये हातावरील रेषानाही आपल्या वाटा बदलाव्या लागतात पण त्या वाटा बदले पर्यन्त... सर्वच थाबतात अस नाहि

अलबम

दिपक वायळ ·
लेखनविषय:
आयुष्याच्या अलबम मध्ये आठणीचे फोटो असतात आणखि एक कॉपि काढायला नेगेटिव मात्र शिलक नसतात

मुंबई ईंडी आणि मानसिकता

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
मुंबई ईंडी हिरव्या गार गवतावर वाहे झुळ-झुळ पाणी. पीत-पीत पेप्सी कोला क्रिकेट खेळती मुंबई ईंडी. मानसिकता राणी म्हणाली, ब्रेड नसेल तर केक खा. मंत्री म्हणाला, पाणी नसेल तर शिवाम्बू प्या. काळ आणि देश बदलला तरी मानसिकता एकच सत्ताधार्यांची.

मुंब्रा एक प्रतिक्रिया – दोन क्षणिका

विवेकपटाईत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नेहमीचेच आहे, दिल्ली असो वा मुंबई , अनिधीकृत बांधकामे होतात, इमारती पडतात, नेता- अधिकारी इत्यादी अश्रु ढाळतात - त्यांना पाहून मला काय वाटते मगर प्रेतांच्या ढिगार्‍यावर तो नोटा मोजत होता. कधी-कधी मगर हा अश्रु ही ढाळीत होता. मुंबईचे मृगजळ मुंबईच्या मृगजळात त्याला स्वप्नांची जागा भेटली. त्यास का माहिती ती त्याची कब्र होती.

नायक क्रमांक एक

ज्ञानोबाचे पैजार ·
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.