मनाचा प्रवास
मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी मी कल्याणला ट्रेन पकडते. एकदा आपल्या आसनावर स्थिरस्थावर झालं की बरोबर वाचण्यासाठी घेतलेलं पुस्तक मी काढते. मन एकाग्र व्हायला थोडा वेळ लागतोच कारण तोपर्यंत लोकांची उठ बस , ये जा चालू असते. पण पुस्तकात लक्ष घालून मी वाचण्याचा प्रयत्न करू लागते.
अंबरनाथ सोडले की माथेरान डोंगर रांग सुरु होते. मग पुस्तक बाजूला ठेवून ते डोंगर निरखण्यात मन गुंग होऊन जातं. ज्या डोंगरांवर गेले आहे ते पाहून मन हर्षभरित होते तर जिथे नाही गेले तिथे कधी जायला मिळेल या विचारात हरवून जातं.
मधून मधून पुस्तक वाचन चालूच असतं.