एकदा अकबर बादशहाच्या दरबारात 'सगळ्यात चांगले हत्यार कोणते?' याविषयी चर्चा चालू होती....
कुणी म्हणालं की, "तरवार वा पट्टा. जोवर हातात दम आहे तोवर चिंता नाही."
कुणी म्हणालं की, "धनुष्य-बाण. दूरवरूनच गनीम गारद करता येतो."
अजून कुणी म्हणालं की, "तोफ. एका गोळ्यात अनेक गनीम मारता येतात."
वगैरे, वगैरे...
बिरबल काहीच बोलत नाहिये हे पाहून बादशहाने त्याला मुद्दाम विचारलं,
"क्यों बिरबल, तुम्हारा क्या खयाल है?"
बिरबलाने दोन क्षण विचार केला आणि उत्तर दिलं,
"जी हुजुर, ये सब लोक सही फर्मा रहे है.