मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निफा वायनरी - नाशिक

vcdatrange ·
ज्योत्स्ना आणि अशोक या उच्चशिक्षित शेतकरी जोडप्याची भेट मनाला अन पोटाला देखील आनंद देणारी ठरली. नाशिक निफाड रस्त्यावर पिंपळस रामाचे या गावी सुरवडे परिवाराची निफा वायनरी हे कौटुंबिक युनिट आहे. स्वतःच्या शेतात स्वतः पिकवलेल्या द्राक्षापासून स्वतःच वाइन बनवायची आणि या छोटेखानी फार्म कम आउटलेट मध्ये उपलब्ध करून द्यायची DIY हा अशोकाचा मंत्र. अगदी वेब पेज देखील त्याने स्वतःच बनवलय. दक्षिण ध्रुवावर जाऊन आलेल्या अशोक सोबत निवांत गप्पा झाल्या. स्व विनायकदादा पाटील या समान धाग्याने सुरू झालेल्या गप्पा Sustainable Solution या समवायि विषयात सहजी रमल्या.

पुष्पा २: द रूल् - संक्षिप्त ओळख वगैरे

वामन देशमुख ·

कंजूस 20/12/2024 - 17:59
एकच फार्मुला असतो कारण तोच पाहायला प्रेक्षक येतात. या मसाल्यातले बरेच चित्रपट निघत असावेत. तसे दोन आम्ही मागच्या वर्षी तमिळनाडू सहलीत बसमध्येच पाहिले होते. प्रवासात पाहण्यासाठी आणि भाषा न कळली तरी चालतात असे. हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 20/12/2024 - 18:48
हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.
कंकाका हिंदीत हेराफेरी१,२, 'अंदाज अपना अपना', धमाल, मुन्नाभाई १,२ आणि जुन्यात 'जाने भी दो यांरो' हे चित्रपट कधीही आणि कुठूनही बघितले तरी कंटाळा येत नाही 😀 बाकी द्येशमुखरावांनी 'संक्षिप्त' नावाखाली एका भव्यदिव्य चित्रपटाचा जो अत्यंत त्रोटक परिचय करून दिला आहे त्यासाठी त्यांचा त्रिवारच नाही तर पंच-षष्ठ वार निषेध... पुढल्या प्रतिसादांतून आम्हा 'पुष्पा' प्रेमिंची बाजू मांडतो!

चित्रगुप्त 20/12/2024 - 18:44
कालच दोन्ही मुलगे, सुना, अर्धांगिनी वगैरे मशारनिल्हे चित्रपट बघून आले. मी गेलो नव्हतो. आल्यावर मुलगा म्हणाला की तुम्ही आला असता तर पहिल्या पंधरा मिनिटातच उठून घरी आला असता. .

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 20/12/2024 - 18:59
अक्षरशः खरे आहे... पहिली जवळपास १३-१३.५ मिनिटे हा चित्रपट पाहताना आपण चुकून क्रिश ४, ५, ६ वगैरे किंवा मार्वल वाल्यांचा कुठला सिनेमा बघायला तर आलो नाही ना हा प्रश्न पडतो! पण ते सगळं स्वप्नात घडल्याचे बघितल्यावर पुढचा चित्रपट पाहण्यासाठी ऊर्जा मिळते आणि ती शेवटपर्यंत कायम राहते... अर्थात सुरुवातीचा तो विलक्षण सीन आणि सगळीच गाणी वगळली असती तर चित्रपटाची लांबी आणि बजेट बऱ्यापैकी कमी झाले असते असे माझे मत! बाकी चित्रपट मजेदार आहे... आपल्याला बुद्धी आहे की नाही हे तपासण्यासाठी जे लोकं चित्रपट पहायला जात असतील त्यांनी मात्र ह्या चित्रपटापासून दूर राहावे!

चौथा कोनाडा 20/12/2024 - 19:04
श्रीवल्ली (रश्मिका मादन्ना),
रश्मिका मादक अण्णा म्हणायचे आहे का ? हा .... हा .... हा .... :) रश्मिका मंदाण्णा असं नाव आहे तिचं ... अशी अण्णा वाली बरीच नावं असतात तिकडं ! सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.

In reply to by चौथा कोनाडा

टर्मीनेटर 20/12/2024 - 19:10
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
हरकत नाही... पण चित्रपट शौकीन असाल तर हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!

In reply to by टर्मीनेटर

वामन देशमुख 20/12/2024 - 20:37
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
आम्हीही पहिल्या दिवशी तिकिटे जास्त होती म्हणून पाहीला नाही. खरंतर त्या शोला अपघातानेच गेलो. आमच्या अहोंना आणि त्यांच्या मैत्रिणींना मिळून हा सिनेमा तेलुगुत १३ डिसेम्बर ला पाहायचा होता. त्यांच्यासाठी तिकीट मी बुक केले ते चुकून हिंदीचे. ते लोक घरून निघायच्या वेळी ते लक्षात आले. मग त्यांनी बेत रद्द करून, आम्ही म्हणजे मी, अहो, अपत्ये आणि आई असे पाच जण गेलो. तिसऱ्या दिवशी १५ डिसेम्बर रोजी मी आणि माझे मित्र असे संध्याकाळी मस्त टुल्ल होऊन रात्रीच्या शोला गेलो. परत येताना पुन्हा टुल्ल होऊन, जेवण करून घरी दोन वाजता परतलो. घरी आल्यावर झोप येत नव्हती म्हणून पुन्हा पुष्पा १ ओटीटीवर पाहीला. पहाटे साडेपाचला झोपी गेलो.
... हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!
अगदी अगदी! "पुष्पा अंटे फायर कादू, पुष्पा अंटे वाइल्ड फायर !" आणि मग दाढीवर दोन्ही उलटे हात फिरवणे हे पाहण्याची मजा मोठ्या पडद्यावरच आहे.

वामन देशमुख 20/12/2024 - 20:58
विशेषतः सणवार, उत्सव वगैरे बाबतीत आंध्र-तेलंगणा संस्कृती खूपच वैविध्यपूर्ण आहे. वीसपंचवीस तोळे सोन्याचे दागिने सहजच घालणाऱ्या स्त्रियांचा रुबाब, मोगरा-अबोली-गजरे माळलेल्या तरुणींची लगबग, हाफ साडी नेसलेल्या मुलींची धावपळ, रामराजचे पांढरेशुभ्र शर्ट-पंचा नेसलेल्या पुरुषांचा दरारा, नाना वेष धारण केलेल्या कलाकारांची विविध पारंपारीक रुपे, सात्विक तेजस्वी पंडित लोकांचे शास्त्रशुद्ध मंत्रोच्चार... आंब्याची तोरणे, नारळे, हळद, कुंकू, अक्षता, फळे, फुले यांची रेलचेल... पुष्पा २ (आणि इतरही अनेक सिनेमांतून) हे सर्व आणि अजूनही बरेच काही सविस्तर पाहायला मिळते. --- अवांतर: हे आवडणाऱ्या लोकांनी विशेषतः नवरात्रात तेलंगणात आणि संक्रांतीला आंध्रात पर्यटन करायला हवे. कधी योग आला तर एखाद्या देवळाच्या ध्वजस्तंभ पायाभरणी कार्यक्रमाला हजेरी लावायला हवी.

सौन्दर्य 21/12/2024 - 04:18
कालच ओटीपीवर हा सिनेमा पाहिला, मुद्दाम हाच पाहायचा अस काही नव्हतं, समोर आला आणि पहिला इतकंच . पूर्वीच्या सिनेमात हिरो सुरवातीला कितीही वाईट असला तरी शेवटी तो सुधरतो असे दाखवले जायचे जे प्रेक्षकांना भावायचं, आता गुन्हेगारीचे उदात्तीकरण लोकांना आवडतं हे बघून आपण म्हातारे होत चाललो आहोत हे जाणवले. चालायचंच , कालाय तस्मे नमः

Madhugandha 25/12/2024 - 08:25
चित्रपट म्हणजे समाजाचा आरसा . आता खलनायक नायक म्हणून समोर येत आहे आणि पोलीस खलनायक दाखवला गेला आहे. अॅनिमल चित्रपट आठवतो आहे का? म्हणजेच समाजात खलनायक प्रवृत्ती वाढत आहे, आणि वाढतच जाणार

टर्मीनेटर 25/12/2024 - 15:53
१ - 'पुष्पा: द राईज' - जगभरातील एकूण ढोबळ कमाई = ३९३.५० कोटी रुपये! "पुष्पा नाम सुनकर फ्लॉवर समझे क्या? फ्लॉवर नहीं... फायर हैं" 🙂 २ - 'पुष्पा: द रुल' - ५ डिसेंबरला प्रदर्शित झाल्यापासून काल (२४ डिसेंबर) पर्यंतची २० दिवसांतली चित्रपटाची भारतातील ढोबळ कमाई = १०८९.८५ कोटी रुपये! "पुष्पा फ्लॉवर नहीं... वाइल्ड फायर हैं" 😘 आणि, जगभरातील एकूण ढोबळ कमाई = १६२५.३१ कोटी रुपये! "पुष्पा को नॅशनल खिलाडी समझे क्या?... इंटरनॅशनल हैं" 😍 ३ - 'पुष्पा: द रॅम्पेज' - हा (आगामी) तिसरा भाग पहिल्या दोन भागांप्रमाणे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होईल कि नाही हे पुढे कळेलच, पण तो बघायची प्रचंड उत्सुकता मात्र लागून राहिली आहे! दुसऱ्या भागासाठी तब्बल तीन वर्षे वाट पाहावी लागली... तिसऱ्या भागासाठी तरी फार प्रतीक्षा करावी लागू नये ही अपेक्षा 😎 अवांतर: रविवारी 'मुफासा: द लायन किंग' पाहिला, खूप आवडला... करमणूकीच्या दृष्टीने वर्षाखेर * चांगली झाली 👌 २० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ह्या सुंदर अ‍ॅनिमेटेड चित्रपटाला भरघोस प्रतिसाद देत त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या 'वनवास' हा उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या भावनाप्रधान चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे पाहिल्यावर 'चित्रपट माध्यम' आणि त्यातल्या 'मनोरंजन मुल्या' कडे पाहण्याचा भारतीय प्रेक्षकांचा दृष्टिकोन सकारात्मकरित्या बदलत असल्याची सुखद जाणीव झाली 👍 २०२४ च्या नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या शेवटच्या दोन महिन्यात 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया ३' ह्या दोन ट्रिक्वेल चित्रपटांनी अनुक्रमे साफ निराशा आणि थोडेफार मनोरंजन केले, तर 'ग्लॅडिएटर २', 'मोआना २', 'पुष्पा: द रुल' आणि 'मुफासा: द लायन किंग' अशा अनुक्रमे तीन सिक्वेल आणि एका प्रिक्वेलने झकास करमणूक केली! २०२५ ह्या येत्या वर्षात अनेक चांगले करमणूकप्रधान चित्रपट रसिकांना पहायला मिळोत अशी मनोरंजनाच्या देवाकडे प्रार्थना 🙏 (*आज प्रदर्शित झालेला 'बेबी जॉन' हा हिंदी चित्रपट २०१६ च्या 'थेरी' ह्या तामिळ चित्रपटाचा रिमेक असुन तो पुर्वीच पाहुन झाला आहे हे एक कारण आणि वरुण धवन आणि किर्ती सुरेश हे दोन्ही कलवंत आवडत नाहीत हे दुसरे कारण असल्याने बेबी जॉन बघण्यात रस नाही त्यामुळे नविन चित्रपट बघण्याच्या दृष्टीने माझ्यासाठी हे वर्ष संपले आहे.)

वामन देशमुख 05/02/2025 - 09:15
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात, अधिकची दृश्ये वाढवून पुष्पा २: द रूल् (रिलौडेड् वर्जन्) पुन्हा प्रदर्शित झाला. सिनेमा आता पाउणेतीन तासांचा झालाय. नवीन वर्जन् सगळ्याच मोठ्या शहरांतील थेटरात अजूनही सुरुच आहे असे दिसते. मागच्या आठवड्यात तो नेटफ्लिक्सवरही प्रदर्शित झालाय.

कंजूस 20/12/2024 - 17:59
एकच फार्मुला असतो कारण तोच पाहायला प्रेक्षक येतात. या मसाल्यातले बरेच चित्रपट निघत असावेत. तसे दोन आम्ही मागच्या वर्षी तमिळनाडू सहलीत बसमध्येच पाहिले होते. प्रवासात पाहण्यासाठी आणि भाषा न कळली तरी चालतात असे. हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.

In reply to by कंजूस

टर्मीनेटर 20/12/2024 - 18:48
हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.
कंकाका हिंदीत हेराफेरी१,२, 'अंदाज अपना अपना', धमाल, मुन्नाभाई १,२ आणि जुन्यात 'जाने भी दो यांरो' हे चित्रपट कधीही आणि कुठूनही बघितले तरी कंटाळा येत नाही 😀 बाकी द्येशमुखरावांनी 'संक्षिप्त' नावाखाली एका भव्यदिव्य चित्रपटाचा जो अत्यंत त्रोटक परिचय करून दिला आहे त्यासाठी त्यांचा त्रिवारच नाही तर पंच-षष्ठ वार निषेध... पुढल्या प्रतिसादांतून आम्हा 'पुष्पा' प्रेमिंची बाजू मांडतो!

चित्रगुप्त 20/12/2024 - 18:44
कालच दोन्ही मुलगे, सुना, अर्धांगिनी वगैरे मशारनिल्हे चित्रपट बघून आले. मी गेलो नव्हतो. आल्यावर मुलगा म्हणाला की तुम्ही आला असता तर पहिल्या पंधरा मिनिटातच उठून घरी आला असता. .

In reply to by चित्रगुप्त

टर्मीनेटर 20/12/2024 - 18:59
अक्षरशः खरे आहे... पहिली जवळपास १३-१३.५ मिनिटे हा चित्रपट पाहताना आपण चुकून क्रिश ४, ५, ६ वगैरे किंवा मार्वल वाल्यांचा कुठला सिनेमा बघायला तर आलो नाही ना हा प्रश्न पडतो! पण ते सगळं स्वप्नात घडल्याचे बघितल्यावर पुढचा चित्रपट पाहण्यासाठी ऊर्जा मिळते आणि ती शेवटपर्यंत कायम राहते... अर्थात सुरुवातीचा तो विलक्षण सीन आणि सगळीच गाणी वगळली असती तर चित्रपटाची लांबी आणि बजेट बऱ्यापैकी कमी झाले असते असे माझे मत! बाकी चित्रपट मजेदार आहे... आपल्याला बुद्धी आहे की नाही हे तपासण्यासाठी जे लोकं चित्रपट पहायला जात असतील त्यांनी मात्र ह्या चित्रपटापासून दूर राहावे!

चौथा कोनाडा 20/12/2024 - 19:04
श्रीवल्ली (रश्मिका मादन्ना),
रश्मिका मादक अण्णा म्हणायचे आहे का ? हा .... हा .... हा .... :) रश्मिका मंदाण्णा असं नाव आहे तिचं ... अशी अण्णा वाली बरीच नावं असतात तिकडं ! सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.

In reply to by चौथा कोनाडा

टर्मीनेटर 20/12/2024 - 19:10
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
हरकत नाही... पण चित्रपट शौकीन असाल तर हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!

In reply to by टर्मीनेटर

वामन देशमुख 20/12/2024 - 20:37
सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.
आम्हीही पहिल्या दिवशी तिकिटे जास्त होती म्हणून पाहीला नाही. खरंतर त्या शोला अपघातानेच गेलो. आमच्या अहोंना आणि त्यांच्या मैत्रिणींना मिळून हा सिनेमा तेलुगुत १३ डिसेम्बर ला पाहायचा होता. त्यांच्यासाठी तिकीट मी बुक केले ते चुकून हिंदीचे. ते लोक घरून निघायच्या वेळी ते लक्षात आले. मग त्यांनी बेत रद्द करून, आम्ही म्हणजे मी, अहो, अपत्ये आणि आई असे पाच जण गेलो. तिसऱ्या दिवशी १५ डिसेम्बर रोजी मी आणि माझे मित्र असे संध्याकाळी मस्त टुल्ल होऊन रात्रीच्या शोला गेलो. परत येताना पुन्हा टुल्ल होऊन, जेवण करून घरी दोन वाजता परतलो. घरी आल्यावर झोप येत नव्हती म्हणून पुन्हा पुष्पा १ ओटीटीवर पाहीला. पहाटे साडेपाचला झोपी गेलो.
... हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!
अगदी अगदी! "पुष्पा अंटे फायर कादू, पुष्पा अंटे वाइल्ड फायर !" आणि मग दाढीवर दोन्ही उलटे हात फिरवणे हे पाहण्याची मजा मोठ्या पडद्यावरच आहे.

वामन देशमुख 20/12/2024 - 20:58
विशेषतः सणवार, उत्सव वगैरे बाबतीत आंध्र-तेलंगणा संस्कृती खूपच वैविध्यपूर्ण आहे. वीसपंचवीस तोळे सोन्याचे दागिने सहजच घालणाऱ्या स्त्रियांचा रुबाब, मोगरा-अबोली-गजरे माळलेल्या तरुणींची लगबग, हाफ साडी नेसलेल्या मुलींची धावपळ, रामराजचे पांढरेशुभ्र शर्ट-पंचा नेसलेल्या पुरुषांचा दरारा, नाना वेष धारण केलेल्या कलाकारांची विविध पारंपारीक रुपे, सात्विक तेजस्वी पंडित लोकांचे शास्त्रशुद्ध मंत्रोच्चार... आंब्याची तोरणे, नारळे, हळद, कुंकू, अक्षता, फळे, फुले यांची रेलचेल... पुष्पा २ (आणि इतरही अनेक सिनेमांतून) हे सर्व आणि अजूनही बरेच काही सविस्तर पाहायला मिळते. --- अवांतर: हे आवडणाऱ्या लोकांनी विशेषतः नवरात्रात तेलंगणात आणि संक्रांतीला आंध्रात पर्यटन करायला हवे. कधी योग आला तर एखाद्या देवळाच्या ध्वजस्तंभ पायाभरणी कार्यक्रमाला हजेरी लावायला हवी.

सौन्दर्य 21/12/2024 - 04:18
कालच ओटीपीवर हा सिनेमा पाहिला, मुद्दाम हाच पाहायचा अस काही नव्हतं, समोर आला आणि पहिला इतकंच . पूर्वीच्या सिनेमात हिरो सुरवातीला कितीही वाईट असला तरी शेवटी तो सुधरतो असे दाखवले जायचे जे प्रेक्षकांना भावायचं, आता गुन्हेगारीचे उदात्तीकरण लोकांना आवडतं हे बघून आपण म्हातारे होत चाललो आहोत हे जाणवले. चालायचंच , कालाय तस्मे नमः

Madhugandha 25/12/2024 - 08:25
चित्रपट म्हणजे समाजाचा आरसा . आता खलनायक नायक म्हणून समोर येत आहे आणि पोलीस खलनायक दाखवला गेला आहे. अॅनिमल चित्रपट आठवतो आहे का? म्हणजेच समाजात खलनायक प्रवृत्ती वाढत आहे, आणि वाढतच जाणार

टर्मीनेटर 25/12/2024 - 15:53
१ - 'पुष्पा: द राईज' - जगभरातील एकूण ढोबळ कमाई = ३९३.५० कोटी रुपये! "पुष्पा नाम सुनकर फ्लॉवर समझे क्या? फ्लॉवर नहीं... फायर हैं" 🙂 २ - 'पुष्पा: द रुल' - ५ डिसेंबरला प्रदर्शित झाल्यापासून काल (२४ डिसेंबर) पर्यंतची २० दिवसांतली चित्रपटाची भारतातील ढोबळ कमाई = १०८९.८५ कोटी रुपये! "पुष्पा फ्लॉवर नहीं... वाइल्ड फायर हैं" 😘 आणि, जगभरातील एकूण ढोबळ कमाई = १६२५.३१ कोटी रुपये! "पुष्पा को नॅशनल खिलाडी समझे क्या?... इंटरनॅशनल हैं" 😍 ३ - 'पुष्पा: द रॅम्पेज' - हा (आगामी) तिसरा भाग पहिल्या दोन भागांप्रमाणे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होईल कि नाही हे पुढे कळेलच, पण तो बघायची प्रचंड उत्सुकता मात्र लागून राहिली आहे! दुसऱ्या भागासाठी तब्बल तीन वर्षे वाट पाहावी लागली... तिसऱ्या भागासाठी तरी फार प्रतीक्षा करावी लागू नये ही अपेक्षा 😎 अवांतर: रविवारी 'मुफासा: द लायन किंग' पाहिला, खूप आवडला... करमणूकीच्या दृष्टीने वर्षाखेर * चांगली झाली 👌 २० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ह्या सुंदर अ‍ॅनिमेटेड चित्रपटाला भरघोस प्रतिसाद देत त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या 'वनवास' हा उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या भावनाप्रधान चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे पाहिल्यावर 'चित्रपट माध्यम' आणि त्यातल्या 'मनोरंजन मुल्या' कडे पाहण्याचा भारतीय प्रेक्षकांचा दृष्टिकोन सकारात्मकरित्या बदलत असल्याची सुखद जाणीव झाली 👍 २०२४ च्या नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या शेवटच्या दोन महिन्यात 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया ३' ह्या दोन ट्रिक्वेल चित्रपटांनी अनुक्रमे साफ निराशा आणि थोडेफार मनोरंजन केले, तर 'ग्लॅडिएटर २', 'मोआना २', 'पुष्पा: द रुल' आणि 'मुफासा: द लायन किंग' अशा अनुक्रमे तीन सिक्वेल आणि एका प्रिक्वेलने झकास करमणूक केली! २०२५ ह्या येत्या वर्षात अनेक चांगले करमणूकप्रधान चित्रपट रसिकांना पहायला मिळोत अशी मनोरंजनाच्या देवाकडे प्रार्थना 🙏 (*आज प्रदर्शित झालेला 'बेबी जॉन' हा हिंदी चित्रपट २०१६ च्या 'थेरी' ह्या तामिळ चित्रपटाचा रिमेक असुन तो पुर्वीच पाहुन झाला आहे हे एक कारण आणि वरुण धवन आणि किर्ती सुरेश हे दोन्ही कलवंत आवडत नाहीत हे दुसरे कारण असल्याने बेबी जॉन बघण्यात रस नाही त्यामुळे नविन चित्रपट बघण्याच्या दृष्टीने माझ्यासाठी हे वर्ष संपले आहे.)

वामन देशमुख 05/02/2025 - 09:15
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात, अधिकची दृश्ये वाढवून पुष्पा २: द रूल् (रिलौडेड् वर्जन्) पुन्हा प्रदर्शित झाला. सिनेमा आता पाउणेतीन तासांचा झालाय. नवीन वर्जन् सगळ्याच मोठ्या शहरांतील थेटरात अजूनही सुरुच आहे असे दिसते. मागच्या आठवड्यात तो नेटफ्लिक्सवरही प्रदर्शित झालाय.
एकाच आठवड्यात हा सिनेमा मी दोनदा पाहीला. पहिल्यांदा कुटुंबीयांसमवेत हिंदीत एका थेटरात; चार दिवसांनी मित्रांसमवेत तेलुगूत दुसऱ्या एका थेटरात. पुष्पा १: द राइज् आवडलेला होताच. पुष्पा २: द रूल् अधिकच आवडला. इतर कोणत्याही लोकप्रिय तेलुगु सिनेमातल्यासारखाच या सिनेमातही प्रचंड मसाला आहे.

सहज सुचलं म्हणून

कंजूस ·

चित्रगुप्त 22/12/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti 22/12/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र 23/12/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti 21/03/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस 23/12/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti 23/12/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 23/12/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 23/12/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस 23/12/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस 27/12/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि 27/12/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर 27/12/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि 27/12/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस 27/12/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर 29/12/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 29/12/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti 29/12/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस 29/12/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस 31/12/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस 03/01/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस 03/01/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/01/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर 03/01/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस 03/01/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ 05/01/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 04/01/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar 06/01/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti 04/01/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा 05/01/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस 05/01/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस 24/02/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस 12/03/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस 12/03/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस 19/03/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 20/03/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख 21/03/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख 30/04/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख 30/04/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख 09/05/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा 09/05/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें

चित्रगुप्त 22/12/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti 22/12/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र 23/12/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti 21/03/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस 23/12/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti 23/12/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 23/12/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 23/12/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस 23/12/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस 27/12/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि 27/12/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर 27/12/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि 27/12/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस 27/12/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर 29/12/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 29/12/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti 29/12/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस 29/12/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस 31/12/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस 03/01/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस 03/01/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/01/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर 03/01/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस 03/01/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ 05/01/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 04/01/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar 06/01/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti 04/01/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा 05/01/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस 05/01/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस 24/02/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस 12/03/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस 12/03/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस 19/03/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 20/03/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख 21/03/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख 30/04/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख 30/04/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख 09/05/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा 09/05/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें
सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

प्रसिद्ध झाले आहे!

युयुत्सु ·

गवि 14/11/2024 - 09:24
उत्तम. अभिनंदन. जाता जाता.. पुस्तकाबद्दल थोडी माहिती, परिचय इथे लिहीला असता तर बरे झाले असते. अजूनही विचार करावा. नुसती अमेझॉन लिंक दिलेली दिसत आहे.

In reply to by कंजूस

युयुत्सु 14/11/2024 - 14:34
दहा पंधरा मिनिटे श्वास रोखून ठेवता येतो का मनुष्याला?> https://www.guinnessworldrecords.com/news/2021/5/freediver-holds-breath-for-almost-25-minutes-breaking-record-660285?form=MG0AV3

सोत्रि 18/11/2024 - 10:38
किंडल व्हर्जन उपलब्ध आहे, डाउनलोड करायाला ठेवले आहे. वाचून झल्यावर अभिप्राय कळवतो किंवा काही शंका असल्यास त्याही कळवतो. - (इ-रीडरींगला सरावलेला) सोकाजी

In reply to by युयुत्सु

ब्लॉक केले असते तर, कोणताच प्रतिसाद लेखन प्रतिसाद करता येत नाही, मिपावर अधुन मधून असे तांत्रिक एरर वगैरे येत असतात. पुन्हा प्रयत्न करुन बघा. -दिलीप बिरुटे

In reply to by युयुत्सु

प्रशांत 18/11/2024 - 12:31
नवीन लेख टाकण्यापासून ब्लॉक केले आहे
, नाहि. लॉगिन करता येते /प्रतिसाद देता येतात म्हणजेच ब्लॉक केलेले नाहि. emoji काढुन लेख प्रकाशित करायचा प्रयत्न करा.

In reply to by सोत्रि

सोत्रि 01/12/2024 - 07:12
प्राणायाम म्हणजे अल्पकाळ केलेले जाणीवपूर्ण संथ श्वसन! ही व्याख्या परिपूर्ण वाटून प्रचंड आवडली आहे. पुस्तक त्यातल्या न रूळलेल्या मराठी शब्दांमुळे जरा क्लिष्ट झाले आहे असं मला वाटलं. एकंदरीत स्तुत्य उपक्रम आहे! - (प्राणायामी) सोकाजी

युयुत्सु 02/12/2024 - 15:54
पुस्तक त्यातल्या न रूळलेल्या मराठी शब्दांमुळे जरा क्लिष्ट झाले आहे असं मला वाटलं. पुस्तक लिहीताना शास्त्रीय संकल्पनांसाठी योग्य परिभाषेचे आह्वान खूप मोठे होते. फिजिओलॉजीवरील आयुर्वेदाची मराठी पुस्तके जर बघितलीत तर तुम्हाला या भाषेला मराठी का म्हणायचे असा प्रश्न पडेल. तरीही आम्ही इंग्रजीत सारांश दिला आहे, त्याचा लाभ घ्यावा. शंका असतील तर अवश्य विचाराव्यात...

गवि 14/11/2024 - 09:24
उत्तम. अभिनंदन. जाता जाता.. पुस्तकाबद्दल थोडी माहिती, परिचय इथे लिहीला असता तर बरे झाले असते. अजूनही विचार करावा. नुसती अमेझॉन लिंक दिलेली दिसत आहे.

In reply to by कंजूस

युयुत्सु 14/11/2024 - 14:34
दहा पंधरा मिनिटे श्वास रोखून ठेवता येतो का मनुष्याला?> https://www.guinnessworldrecords.com/news/2021/5/freediver-holds-breath-for-almost-25-minutes-breaking-record-660285?form=MG0AV3

सोत्रि 18/11/2024 - 10:38
किंडल व्हर्जन उपलब्ध आहे, डाउनलोड करायाला ठेवले आहे. वाचून झल्यावर अभिप्राय कळवतो किंवा काही शंका असल्यास त्याही कळवतो. - (इ-रीडरींगला सरावलेला) सोकाजी

In reply to by युयुत्सु

ब्लॉक केले असते तर, कोणताच प्रतिसाद लेखन प्रतिसाद करता येत नाही, मिपावर अधुन मधून असे तांत्रिक एरर वगैरे येत असतात. पुन्हा प्रयत्न करुन बघा. -दिलीप बिरुटे

In reply to by युयुत्सु

प्रशांत 18/11/2024 - 12:31
नवीन लेख टाकण्यापासून ब्लॉक केले आहे
, नाहि. लॉगिन करता येते /प्रतिसाद देता येतात म्हणजेच ब्लॉक केलेले नाहि. emoji काढुन लेख प्रकाशित करायचा प्रयत्न करा.

In reply to by सोत्रि

सोत्रि 01/12/2024 - 07:12
प्राणायाम म्हणजे अल्पकाळ केलेले जाणीवपूर्ण संथ श्वसन! ही व्याख्या परिपूर्ण वाटून प्रचंड आवडली आहे. पुस्तक त्यातल्या न रूळलेल्या मराठी शब्दांमुळे जरा क्लिष्ट झाले आहे असं मला वाटलं. एकंदरीत स्तुत्य उपक्रम आहे! - (प्राणायामी) सोकाजी

युयुत्सु 02/12/2024 - 15:54
पुस्तक त्यातल्या न रूळलेल्या मराठी शब्दांमुळे जरा क्लिष्ट झाले आहे असं मला वाटलं. पुस्तक लिहीताना शास्त्रीय संकल्पनांसाठी योग्य परिभाषेचे आह्वान खूप मोठे होते. फिजिओलॉजीवरील आयुर्वेदाची मराठी पुस्तके जर बघितलीत तर तुम्हाला या भाषेला मराठी का म्हणायचे असा प्रश्न पडेल. तरीही आम्ही इंग्रजीत सारांश दिला आहे, त्याचा लाभ घ्यावा. शंका असतील तर अवश्य विचाराव्यात...
प्रसिद्ध झाले आहे! प्रसिद्ध झाले आहे!

माचीवरला बुधा

श्रीगणेशा ·

प्रचेतस 14/08/2024 - 10:15
माचीवरचा बुधा हा चित्रपट बघायचा राहूनच गेला. रिलीज झाला तेव्हा जेमतेम एखाद दुसरा शो फक्त एकच आठवडाभर तोही पुण्यात होता. नंतर कुठे ओटीटी आणि युट्युबवर पण आला नाही. हे गाणं मात्र पाहिलेलं आहे. गोनिदांची कादंबरी मत्र वाचलेली आहेच आणि संग्रही देखील आहे. निव्वळ अप्रतिम.

प्रचेतस 14/08/2024 - 10:15
माचीवरचा बुधा हा चित्रपट बघायचा राहूनच गेला. रिलीज झाला तेव्हा जेमतेम एखाद दुसरा शो फक्त एकच आठवडाभर तोही पुण्यात होता. नंतर कुठे ओटीटी आणि युट्युबवर पण आला नाही. हे गाणं मात्र पाहिलेलं आहे. गोनिदांची कादंबरी मत्र वाचलेली आहेच आणि संग्रही देखील आहे. निव्वळ अप्रतिम.
माचीवरला बुधा ही गोनिदांची कादंबरी, त्यावर आधारित विजयदत्त यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट, आणि त्या चित्रपटासाठी धनंजय धुमाळ यांनी संगीतबद्ध केलेलं एक पक्ष्यांचं संगीत.

दिवाळी विशेष - ‘सागरी पक्ष्यां’चं संग्रहालय

पराग१२२६३ ·
गोवा जवळ असूनही जाऊ-जाऊ करत राहतच होतं. गोव्यात नौदलाच्या हवाई शाखेचं संग्रहालय असल्याचं बऱ्याच वर्षांपूर्वी वाचनात आलं होतं. त्यातच नौदलाच्या हवाई शाखेबद्दल आणि त्यातही विमानवाहू जहाजांबद्दल आकर्षण असल्यामुळं ते संग्रहालय पाहावं अशी खूप इच्छा होती.

दिवाळी सुटीत डोक्याला खुराक

vcdatrange ·

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

THE PLATFORM (2019) दृश्य बरीच नकोशी आणि अंगावर येणारी, ओंगळवाणी. कसातरी पुढे जात राहिलो. शेवट काही तरी वेगळा होईल अशा अपेक्षेने. चित्रपटाचा शेवट गोंधळलेला किंवा समजत नाही. कदाचित येणारे नवे कैदी योग्य पर्याय निवडतील असे काही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

THE PLATFORM (2019) दृश्य बरीच नकोशी आणि अंगावर येणारी, ओंगळवाणी. कसातरी पुढे जात राहिलो. शेवट काही तरी वेगळा होईल अशा अपेक्षेने. चित्रपटाचा शेवट गोंधळलेला किंवा समजत नाही. कदाचित येणारे नवे कैदी योग्य पर्याय निवडतील असे काही. -दिलीप बिरुटे
दिवाळीच्या सुटीत डोक्याला खुराक हवा असेल तर दोन हटके मुवीज् सुचवतोय. . THE PLATFORM (2019) सामाजिक संदेशासोबत वेगळ्या संकल्पनेवर बनलेला हा अनोखा आणि थोडासा मन हेलावणारा चित्रपट आहे. सुमारे 300 मजल्यांची इमारत असून, तिला इमारत म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात एक तडीपार कारागृह आहे. जिथे कैदी स्वतः शिक्षा भोगण्यासाठी प्रवेशतात. त्या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर प्रत्येक खोलीत दोन कैदी राहतात. आता असे होते की दिवसातून एकदाच एक प्लॅटफॉर्म त्या खोलीच्या मध्यातुन वरपासून खालपर्यंत जातो.

हे वाचा: बगळा

अनुस्वार ·

चौथा कोनाडा 27/09/2023 - 22:08
खूप सुंदर पुस्तक परिचय !
बहुतांश कादंबरी उदगीरच्या (जि. लातूर) च्या बोलीत आहे. निवेदकानुसार ती कधी प्रमाणभाषा ते बोली भाषा अशा कलाने बदलत राहते.
व्वा, स्थानिक भाषेची मेजवानी ! शिल्लक : खुप छान लिहिलीय ! अवांतर : चित्र दिसत नाहीय ! त्यामुळे चुकचुकल्या सारखे झाले. कृपया शेअरिंग तपासून पहा !

चौथा कोनाडा 27/09/2023 - 22:08
खूप सुंदर पुस्तक परिचय !
बहुतांश कादंबरी उदगीरच्या (जि. लातूर) च्या बोलीत आहे. निवेदकानुसार ती कधी प्रमाणभाषा ते बोली भाषा अशा कलाने बदलत राहते.
व्वा, स्थानिक भाषेची मेजवानी ! शिल्लक : खुप छान लिहिलीय ! अवांतर : चित्र दिसत नाहीय ! त्यामुळे चुकचुकल्या सारखे झाले. कृपया शेअरिंग तपासून पहा !
Bagla कटाक्ष- लेखक: प्रसाद कुमठेकर प्रकाशन: पार पब्लिकेशन्स पहिली आवृत्ती: २०१६ पृष्ठे: १५८ किंमत: ₹३०० ओळख- चिंतामणप्रसाद पुरुषोत्तम सरदेशमुख, पाचवी 'क'.

हे‌ वाचा: शीतयुद्ध सदानंद

अनुस्वार ·
 कटाक्ष: लेखक - श्याम मनोहर प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन प्रथम आवृत्ती - १९८७, सध्या दुसरी आवृत्ती (२००७) (पुनर्मुद्रण २०२३) पृष्ठ संख्या - १२२ किंमत - ₹१७५ ओळख: या लघु-कादंबरीला अर्पणपत्रिका नाही तसेच प्रस्तावनाही नाही.

मदत हवी आहे - दिल्ली, मथुरा, वृदांवन, आग्रा येथे राहण्यास जागा

Trump ·

वृंदावन च्या मुख्य रस्त्यावर बर्याच धर्मशाळा आहेत तिथे वाजवी दरात सोय होऊ शकते. वृंदावन च्या जवळच गोवर्धन पर्वत आहे तिथे इलेक्ट्रीक रिक्षाने परिक्रमा करता येऊ शकते. माकडे भरपूर आहेत व उपद्रवी आहेत. शक्यतो चष्मा/मोबाईल बाहेर न काढणे उत्तम. मथुरा उभ्या उभ्या पाहण्यासारखे आहे. तिथे राहयची आवश्यकता नाही. आग्र्यासाठी अगोडा वगैरे साईट वर डिल मिळते का ते पाहा. दिल्लीसाठी महाराष्ट्र मंडळात सोय होऊ शकेल.

In reply to by कानडाऊ योगेशु

महाराष्ट्र मंडळ ह्याबद्दल विवेक पटाईत ह्यांना विचारा डिटेल. मला वाटते दिल्लीत (महाराष्ट्र मंडळात राहून) आग्रा वारी करता येईल (दोन तासच आहे प्रवास)

In reply to by इपित्तर इतिहासकार

कंजूस 25/06/2023 - 10:29
याच जुन्या इमारतीत गिजरे यांचे टुअर office आहे. त्यांचे एक एजंट पुण्यात आहेत. तेही बुकिंग करून देतात. पण दिल्लीला राहून आग्रा/जयपूर ट्रीप करू नये.

In reply to by कंजूस

Trump 26/06/2023 - 11:32
याच जुन्या इमारतीत गिजरे यांचे टुअर office आहे. त्यांचे एक एजंट पुण्यात आहेत. तेही बुकिंग करून देतात.
धन्यवाद. फिरण्याचे नियोजन मुद्दामहुन तिथे जाऊन करायचे असे ठरवले आहे. फक्त राहण्याचे ठिकाण हवे आहे.

In reply to by इपित्तर इतिहासकार

दिल्ली-आग्रा २ तास? अहो यमुना एक्स्प्रेस वे झालाय तरीही ५-६ तास लागतात. दिल्लीहुन आग्र्याला जाउन फक्त ताजमहाल बघुन यायला पुर्ण दिवस लागेल.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मनो 27/06/2023 - 16:13
दिल्ली ते ताजमहाल अर्ध्या दिवसात करता येतो, मात्र तिकीट महाग आहे. नवी दिल्ली येथून सकाळी ६.०० भोपाळ शताब्दी पकडायची, ती आग्र्याला आठ वाजता पोचते. साधारण तीन तासात ताजमहाल पाहून होतो. परतीसाठी ११.२५ ला वंदे भारत एक्स्प्रेस आग्र्याहून आहे, ती दुपारी १.२० ला निजामुद्दीन स्थानकावर परत पोचवते. या ट्रिपमध्ये दुपारपासून संध्याकाळचा वेळ वाचतो. शताब्दी सुमारे ५०० रुपये आणि वंदे भारत ७५० रुपये अधिक २५० ताज तिकीट आणि आग्र्यातील रिक्षा एकूण २००-३०० रुपये असा खर्च येईल. साधारण एका महिन्यापूर्वी केलेल्या ट्रिपचे हे आकडे आहेत. या ट्रीपमध्ये आग्ऱ्याचा किल्ला पाहणे होत नाही, तेवढा वेळ हाताशी नाही. पहाडगंज येथील स्वस्त हॉटेलमध्ये राहिल्यास सकाळी ६.०० ला शताब्दी पकडणे सोपे होते.

In reply to by मनो

सुबोध खरे 01/07/2023 - 10:00
यापेक्षा सकाळी जाताना आणि येताना शताब्दी घेतली तर रात्री २०.३८ ला आग्र्याला बसलात तर २३०० ला नवी दिल्ली स्थानकावर उतरून गंतव्य स्थानी पोचता येईल. म्हणजे सकाळी आठ ते रात्री आठ असे पूर्ण १२ तास मिळतात ज्यात ताजमहाल आग्र्याचा किल्ला आरामात पाहून होईल आणि नीट कार्यक्रम आखला तर फतेहपूर सिक्रि सुद्धा ( घाईघाईने) करता येईल. आणि नवी दिल्ली स्थानकावरच रेल्वेची रिटायरिंग रुम घेतली तर तेवढीच सुविधा होते. शुक्रवारी ताजमहाल पाहण्यासाठी फुकट आहे पण शुक्रवारी फतेहपूर सिक्रि बंद असते.

In reply to by सुबोध खरे

मनो 01/07/2023 - 11:00
माझ्या माहितीप्रमाणे शुक्रवारी स्थानिक मुसलमानांसाठी ताज मशीद उघडी असते, पण त्याकरता स्थानिक पत्ता असलेला आयडी दाखवावा लागतो. इतरांना बाहेरून किंवा नदीच्या पलीकडे जाऊन फुकट :-D

In reply to by सुबोध खरे

कंजूस 01/07/2023 - 13:41
तशी पाटीही बऱ्याच हॉटेलांच्या रिसेप्शन रुममध्ये लावलेली सापडेल. ट्रंप कुठून निघणार माहीत नाही. पण मुंबईत वर्ल्ड ट्रेंड सेंटरमध्ये उप्र पर्यटन केंद्र आहे ते ढीगभर नकाशे आणि पत्रक देतात. तसेच इंडिया टुरिझम ऑफिसमध्येही पत्रकं देतात. ते कार्यालय आता चर्चगेट समोरच्या रूझर्वेशन इमारतीतून मरीन ड्राईवकडे हलवले आहे. लाभ घ्यावा.

In reply to by कानडाऊ योगेशु

Trump 26/06/2023 - 11:28
दिल्लीसाठी महाराष्ट्र मंडळात सोय होऊ शकेल.
धन्यवाद. संपर्कमाहिती असल्यास द्यावे.
वृंदावन च्या जवळच गोवर्धन पर्वत आहे
टाकतो यादीमध्ये

In reply to by Trump

कंजूस 27/06/2023 - 19:03
वर मी दिलेल्या फोटोंत एक पत्रक महाराष्ट्र मंडळाचेच आहे. फोन नंबर बदलले असण्याची शक्यता आहे. करून पाहा. पुण्याचा नंबरही आहे. वेबसाईट आहे. बाकी दिल्लीवरून आग्रा पाहून जाण्याची घाई कशाला? आग्रा फोर्ट स्टेशन जरी ताज आणि लाल किल्ल्याजवळ असले तरी आग्रा कंटोनमेंट स्टेशन हे दिल्ली मुंबई मेन लाईनवर आहे. त्या स्टेशन बाहेर बरीच स्वस्त हॉटेल्स आहेत.

कंजूस 25/06/2023 - 05:19
पण खूप दिवस राहून पाहण्यासारखे मथुरा, वृंदावनला काय आहे? मला तरी तसे वाटले. Visa2explore channel चे विडिओ आहेत. पंधरा विडिओंची प्लेलिस्ट आहे. पूर्ण भाविकपणा हवा. बाकी विचारलेल्या राहण्याच्या जागा शोधाव्या लागल्या नाहीत कारण स्वस्त हॉटेल्स सगळीकडे आहेत. आणि सात दिवसांत दिल्ली आग्रा मथुरा जयपूर होऊ शकते. तुम्ही म्हणता तशा स्वस्त जागांना तिकडे 'बरसाती' म्हणतात. पत्रकार(कै.) विश्वास मेहेंदळे यांच्या एका पुस्तकात त्याची माहिती आहे. दूरदर्शनसाठी ते दिल्लीत सुरुवातीला राहिले होते. तिकडेच राहणाऱ्या कुणाशी ओळख असेल तर सोय होईल. किंवा तिकडे गेल्यावर 'बरसाती'ची चौकशी केल्यास सापडतील.

ओघाने आलेच कारण ९०% टूर हा भक्ती मार्गावरील आहे तुमचा. पण मराठी बोलणारा मॅनेजर असण्याचे प्रयोजन समजले नाही खास मला...... असो, आपापली चॉईस आहे, मुळात मथुरा - वृंदावन - आग्रा ही तिन्ही ठिकाणे दिल्ली पासून २-३ तासांच्या अंतरावर आहेत, मोठ्या बॅग अन् इतर जड सामान दिल्लीत महाराष्ट्र मंडळाच्या (मराठी बोलणाऱ्या) मॅनेजरच्याच अखत्यारीत अन् सुरक्षेत सोडून सड्याने उरलेली तिन्ही ठिकाणे फिरता येतील. Itenary खालील प्रमाणे :- दिवस १ - दिल्ली आगमन, वाटल्यास दिल्ली दर्शन नाहीतर आराम. दिवस २ - खासगी ठरवून घेतलेली गाडी किंवा सार्वजनिक प्रवास साधने वापरून आग्रा - सायंकाळी परत दिल्ली असेच तिसरा अन् चौथा दिवस वृंदावन आणि मथुरा करावे. बफर म्हणून २-२ दिवस ठेवता येतील वाटल्यास. हिप्पी नियोजन म्हणजे राहण्याचे खाण्याचे जास्त लाड नको आहेत असे धरून चालतोय.

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 26/06/2023 - 11:37
पण मराठी बोलणारा मॅनेजर असण्याचे प्रयोजन समजले नाही खास मला......
धन्यवाद. कारण सोबतची काही माणसे मराठीशिवाय कोणतीही भाषा बोलत नाही. तसेच महाराष्ट्राबाहेरील मराठी संस्कृती जाणुन घ्यायची इच्छा आहे.
हिप्पी नियोजन म्हणजे राहण्याचे खाण्याचे जास्त लाड नको आहेत असे धरून चालतोय.
हिप्पी म्हणजे कमीत कमी नियोजनात मनमौजी प्रवास.

कंजूस 25/06/2023 - 13:08
याने या ट्रिपमध्ये फरक पडतो. ---- जर का पुढेमागे उत्तराखंड, हिमाचल, करणार असाल तर आणि विमान प्रवास नसेल तर एक धक्का दिल्लीत होणारच. तेव्हा त्याचा उपयोग करा आणि या सहलीतून दिल्ली गाळावी.

महाराष्ट्र समाज आग्रा ,महाराष्ट्र मंडळ पहाडगंज नवी दिल्ली गुगलून बघा . टेलिफोन करा पुढील मार्ग सुचेल. म मं न दिल्ली तर चोविस तास टेलिफोन उपलब्ध असतो.

रंगीला रतन 27/06/2023 - 02:56
कारण सोबतची काही माणसे मराठीशिवाय कोणतीही भाषा बोलत नाही. बरोबर कोण आणि किती जण आहेत? ८ ते १० तरुण लोक. अशे तरुण लोक आज भारतात आहेत? असतील तर त्यांच्यासोबत जाताना तुम्हाला लाज वाटायला पाहीजे. नुस्ती फालतुगीरी

In reply to by रंगीला रतन

अशे तरुण लोक आज भारतात आहेत? असतील तर त्यांच्यासोबत जाताना तुम्हाला लाज वाटायला पाहीजे. नुस्ती फालतुगीरी का लाज वाटायला पाहीजे? नाही येत दुसर्‍या भाषा म्हणून काय नातेवाईक मित्र सोडून द्यायचे? दक्षिण भारतात लोक फिरायला जातात तेव्हां तीथले लोक मराठी हिन्दी समजत नाही किंवा समजुन सुद्धा न समजल्या सारखे करतात. आमचे काही मित्र पहिल्यांदाच उत्तर भारतात गेले. बोलता बोलता म्हणाले, तुम्हारा खुन करनेवाला और हमारा खुन करनेवाला एकच है समोरचा यजमान गोंधळात पडला. बरोबरच्या एकाला लगेच कळाले त्याने सारवा सारव केली. उनको कहना है की हम दोनो को (खुन) बनानेवाला एक ही परमात्मा है. तेव्हा ही फालतूगीरी नाही. भाषेचा सभ्यतेने वापर करावा. प्रत्येक शब्दावरी माझा ठसा,माझा ठसा शब्द माझा चेहरा,शब्द माझा आरसा. शांताबाई शेळके.

In reply to by कर्नलतपस्वी

Trump 27/06/2023 - 11:13
का लाज वाटायला पाहीजे? नाही येत दुसर्‍या भाषा म्हणून काय नातेवाईक मित्र सोडून द्यायचे? दक्षिण भारतात लोक फिरायला जातात तेव्हां तीथले लोक मराठी हिन्दी समजत नाही किंवा समजुन सुद्धा न समजल्या सारखे करतात.
+१
तुम्हारा खुन करनेवाला और हमारा खुन करनेवाला एकच है
हे भारी आहे. मी "हमारे इधर पाऊस लई पड्या" असे हिंदी(?) बोलणारे लोक बघितले आहेत. असली भाषा ऐकुन समोरचा जीवच देईल. ह्यावर एक मस्त धागा होऊ शकतो.

In reply to by Trump

चौकस२१२ 27/06/2023 - 12:19
ह्यावर एक मस्त धागा होऊ शकतो. उन्हळ्यात उत्तरेत "चिमडी " नामक एक टरबुजासारखे पण छोटे फळ असते त्याची नुसती साखर घालून कोशिंबीर सारखे काहीतरी बनवले जायचे.. यावर एका व्यक्तीने " रामू ( आचारी नाव) "आज चीम्बडि "संप" गयि " असे "आचारी संपावर जायला" भाग पडणारे वाक्य फेकलेले आठवले सुदैवाने तो नोकर पिढ्यान पिढया मराठी कुटुंबात नोकरीत असल्यामुळे. "मामीजी मला समझले " असे काहीसे पुटपुटला असो विषयांतर झाले,,, हिप्पी सहलीला मदत करूयात ( एक उनाड दिवस याची आठवण झाली )

In reply to by रंगीला रतन

Trump 27/06/2023 - 11:09
मोठा आहे दगदगीचा प्रवास असल्याने काही लोक आजारी पडण्याची, किंवा आरामाची गरज लागणे गृहीत धरले आहे. अशा वेळी समजुन घ्यायला/सांगायला मराठी माणसे जास्त उपयोगी पडतील अशी अपेक्षा आहे. आणि भविष्यातील नातेसंबध वृधिंगत होण्याची शक्यता आजमावण्याची आहे.
८ ते १० तरुण लोक.
तरुण हा सापेक्ष शब्द आहे. काही लोक वयाने तरुण पण मनाने म्हातारे असतात, तसेच उलट.

In reply to by Trump

चौकस२१२ 27/06/2023 - 12:22
अशा वेळी समजुन घ्यायला/सांगायला मराठी माणसे जास्त उपयोगी पडतील अशी अपेक्षा आहे. ठीक आहे त्यासाठी मराठी माणूस बरोबर पाहिजे.. म्हणजे प्रवासात एक मराठी वाटाड्या / आयोजक पाहिजे कि तेथील राहण्याचं ठिकानि फक्त मराठी भाषिक मालक / नौकर पाहिजे.. काय गौड्गबल आहे हे ? दगदगीचा प्रवास ? २०२३ सालि

शहरे रामायण महाभारत कालापासून प्रसिद्ध आहेत. काय बघायचे किती बघायचे पहिलेच ठरवा. उदाहरणार्थ आग्रा ताजमहाल करता प्रसिद्ध आहे पण लाल किल्ला, इत्मद्दौला, संग्रहालय, अकबराची कबर जवळपास फतेहपुर सिक्री ,डिग पॅलेस(महाराजा सुरजमल जाट) याची राजधानी,भरतपुर पक्षी उद्यान आणखीन बरेच काही. तसेच दुसर्‍या शहरातही भरपुर बघण्या सारखे आहे. दिल्लीचे नवीन शहिद स्मारक व जुने इंडीया गेट बघायला विसरू नका. नवीन संसद,जुनी पार्ल्यमेंट,राष्ट्रपती भवन,पालिका बझार आणी बरेच काही.

In reply to by कर्नलतपस्वी

Trump 27/06/2023 - 11:00
दिल्लीचे नवीन शहिद स्मारक व जुने इंडीया गेट बघायला विसरू नका. नवीन संसद,जुनी पार्ल्यमेंट,राष्ट्रपती भवन,पालिका बझार आणी बरेच काही.
हो, नक्कीच. नेताजी सुभाष चंद्रांचा पुतळा, शिवाजी महाराजांचा पुतळा यादीमध्ये आहेच. श्री सावरकारांचा फोटो संसदेत लावलेला स्मरणात आहे. त्यामुळे तो काही बघता येणार नाही. धन्यवाद.

चौकस२१२ 27/06/2023 - 09:57
काय बघायचे किती बघायचे पहिलेच ठरवा अगदी बरोबर दिल्लीतून आग्रा , ताज आणि आग्र्याचा लाल किल्ला एवढे सकाळी लवकर निघून रात्री पर्यंत परत येणे असे करता येते पण मग बाकी राहून जाईल आग्र्याचा लाल किल्ला ला कधी जे वाटाडे असतात त्यांना तुम्हाला महाराष्ट्राच्या संधर्भात सांगा असे सांगितले तर ते आपली " कॉमेंट्री" थोडॆ बदलतात पण त्यात विशेष तसे का हि वेगळे नसते बाकी तुम्हाला "हिप्पी "पद्धतीने भटकंती कराव्यायची आहे हे ऐकून मौज वाटली एकीकडे म्हणता ना नियोजन न करत हिप्पी पद्धतीने आणि दुसरी कडे मराठी मालक, जेवण बनवता आले पाहिजे मी आपत्कालीन सेवा? आणि भाडे खोलीवर आधारीत असावे, माणसांवर नसावे. मग कसलं हो हिप्पी पद्धतीने ? ना नियम हि खरी हिप्पी पद्धत .. उचल पिशव्या आणि निघा .. येथे प्रश्न हे सुधाच एक प्रकाचे नियोजन बरं दिल्ली आग्रा वैगरे हि " चावून चोथा " अशी "पर्यटन स्थळे" आहेत त्यात तुमचं या "मराठी फक्त" चमूला हिप्पी पद्धतीने जर भटकायचे तर ते खूप "आयोजन" करून शोधावे लागेल .. बाकी सरधोपट येवध्या गोष्टी उपलब्ध आहेत कि शोध घेणे सोप्पे आहे तुमचं काही अटी जरा मौजेचं वाटत - जेवण बनवता आले पाहिजे आणि हॉटेल नको + स्वस्तात, दिलि सारख्य मेट्रो शहरात असे ठिकाण मिळेल? आणि जेवण बनवण्याची सुविधा पाहिजे तर मग "फर्निश्ड अपार्टमेंट " मग ती कसली असणार आहे स्वस्त? - शाकाहरी जेवण, मराठी बोलणारे व्यवस्थापक्/मालक-- किती दिवसांचा प्रश्न आहे ? एकूण ७-८ असावेत असे वाटते , आणि ते सुद्धा उत्तर भारतातील या मुखय शहरात मग तिथे शाकाहारी जेवण मिळणे अवघड आहे का हो? अगदी जामा मस्जिदी पाशी पण मिळेल .. काय गंमतशीरअट आहे" तुम्ही काही क्रोएशिया किंवा बुरुंडी ला नाही चालला तम्ही भाऊ -भाडे खोलीवर आधारीत असावे, माणसांवर नसावे.... म्हणजे? अहो कुठेहि माणसांची मर्यादा असणारच ना ? आणि "आपत्कालीन व्यवस्था " ह्याचा विचार केला तर एक खोलीत किती माणसे एकावेळी" याचा विचार मालक आणि राहणार्याने केला पाहिजेच कि मिपावर मदत करायला लोक उत्सुक असतात हो पण मदत/ माहिती विचारणाऱ्याने पण जरा तारतम्य बाळगावे हि माफक अपेक्षा असो, झाली एकदाची "हिप्पी" पद्धतीची भटकंती कि आमचं सारखया चाकरीतील मिपाकरांना टायचाच संचितार वृत्तांत आवडेल बजेटच्या साठी, https://www.youtube.com/@Bha2Pa/featured वर काही आहे का पहा जाता जाता .... "हिप्पी" पद्धतिने म्हणजे स्वस्त असेच नसते , त भरपूर खर्च करीत सुध्दा हिप्पी हिंडता येते

In reply to by चौकस२१२

सणसणीत पण थेट अन् तितकाच कायदेशीर प्रतिसाद. आवडला आपल्याला. मी तर ईव्हन हे म्हणतो की इतका खर्च ते संगमरवरी थडगे तरी कश्याला पहावे ! जेव्हा सील केलेली दालने उघडतील तेव्हा पाहूया की.... (बोल्ड केले आहे ते मावैम) अर्थात आपण कोणाच्या वैयक्तिक आवडीवर काय बोलावे म्हणा, ज्याला जिथे आवडेल त्याने तिथे पर्यटन करावे, जो जे वांछील तो ते लाहो.

In reply to by चौकस२१२

Trump 27/06/2023 - 11:23
आग्र्याचा लाल किल्ला ला कधी जे वाटाडे असतात त्यांना तुम्हाला महाराष्ट्राच्या संधर्भात सांगा असे सांगितले तर ते आपली " कॉमेंट्री" थोडॆ बदलतात पण त्यात विशेष तसे का हि वेगळे नसते
जरा सविस्तर सांगा. जंजिर्‍यावर भगवा झेंडा फडकावायला तेथील लोकांनी विरोध केल्याचे माहिती आहे. तेथील किल्लामार्गदर्शक लोक चुकीचा इतिहास सांगतात.
ना नियम हि खरी हिप्पी पद्धत .. उचल पिशव्या आणि निघा .. येथे प्रश्न हे सुधाच एक प्रकाचे नियोजन
प्रवास हिप्पीच आहे, पण अचानक अडचणी येऊ शकतात हे गृहीत धरुन नियोजन. एकदा राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था झाली की बाकीचे नियोजन तिथे जाऊन करता येईल.
- जेवण बनवता आले पाहिजे आणि हॉटेल नको + स्वस्तात,
काही शारिरीक अडचणीमुळे स्वतः जेवण बनवण्याची सोय अपेक्षित आहे. धन्यवाद.

In reply to by Trump

चौकस२१२ 27/06/2023 - 12:05
जंजिर्‍यावर भगवा झेंडा फडकावायला तेथील लोकांनी विरोध केल्याचे .. कधी काय संदर्भ? तुम्हाला "मराठीच सर्व काही पाहिजे" म्हणून केवळ एका अनुभवावरून सांगितले... आमचे बोलणे ऐकून वाटाड्याने जरा मराठी लोकांना म्हणजे आग्र्याहून सुटका वैगरे संधर्भ घालून सांगितले एवढेच , फार त्यात विशष नाही , बाकी तिथे कोणत्यातरी महाराष्ट सरकारने महाराजांचा पुतळा उभा केला आहे त्यामुळे आल्या आल्या मराठी भागातील पर्यटक तर सुखवतोच . तेथील किल्लामार्गदर्शक लोक चुकीचा इतिहास सांगतात. असे जर तुमचे मत असेल तर नका वापरू .. महाराष्ट्रातील जाणकार घेऊन जा ( बलकवडे येतात का बघा ) पण स्वस्तात कसे? आणि त्या वाटाड्याला तुमचे हे हिप्पी फिरणे परवडलं का? बाकी मला तरी मराठी इतिहासाशी निगडित गोष्टीं गोष्टीन पेक्षा स्वारस्य एकूण इतिहास यात जास्त स्वारस्य होते, एकूण पण आग्र्याचा लाल किल्ला आणि फतेपूर सिकरी नक्की बघावा, नुसता ताज महाल नको प्रवास हिप्पीच आहे, पण अचानक अडचणी येऊ शकतात हे गृहीत धरुन नियोजन. : अनेकांना हा हिप्पी प्रवास वगैरे यात काही वाटत नाहाये उगाच शब्द वापरल्यासारखा वाटतोय ,,, सर्वसाधारण प्रवाशांसारखया गरजा दिसत आहेत , उगाच हिप्पी वगरे विशेषणे काही शारिरीक अडचणीमुळे स्वतः जेवण बनवण्याची सोय अपेक्षित आहे. परत कोड्यात बोलताय ,, शारिरिक कि वैद्यकीय ? शारिरीक अडचणीमुळे, स्वतःचा स्वयंपाक...? बर बुवा असेल काही तरी मग "फर्निश्ड अपार्टमेंट" शिव्या पर्याय दिसत नाही ... पण तो स्वस्त कसा असेल? नाहीतर " कोणाचाच तरी काय फालतुगिरी " असा प्रतिसाद आला तर नवल नाही ! सर्वात शेवटी... ७-८ जणांसाठी त्रिकोण ( दिलि आग्रा जयपूर ) सहल "मराठी पद्धतीने ( आणि बाकी जे काय विशेष गरज असले ती ) आयोजित करणारी एकादी सन्स्था असेल महाराष्ट्रात ,, आजोब सांगायचे कि पूर्वी एक "यात्रा" कंपनी रेल्वे बोगी भाड्याने नेऊन अशी सहल आयोजित करायचे , साबुदाण खिचडी पासून ते पियुष ...सर्व काही, बोगी चा एक भाग हा स्वयंपाकघराचं असायचा ,, ( चेष्टा करीत नाहीये तर "श्री दत्तदिगंबर यात्रा कंपनी होती खरी https://www.tourtravelworld.com/travel-agents/datta-digambar-tours-travels-383989/contact.htm

In reply to by चौकस२१२

Trump 27/06/2023 - 12:50
जंजिर्‍यावर भगवा झेंडा फडकावायला तेथील लोकांनी विरोध केल्याचे .. कधी काय संदर्भ?
एका पर्यटकाला किल्ल्यावर भगवा झेंडा फडकावायला विरोध केला होता. २०२१ - २०२२ च्या दरम्यानची घटना आहे. तो अभिप्राय मला लगेच सापडला नाही. त्या मुलाने त्याचा बोटीत बसुन भगव्या झेंड्याचा फोटो टाकला आहे. स्थानिकांचा स्वभाव दाखवणारे काही अभिप्राय
vijay murudkar There is no Indian Flag hosted on Entire Murud-Janjira Fort and I found It is Very 'DISRESPECTFULL' People are very profit centric and asking charges for everything (ie. Boat charges, Fort cahrges, Guide charges etc etc) but no-one is interested in good governance of heritage like Janjir Fort which has very special place our heart & nation history.
Shrikant Auti Minority captured all business... Local muslims misbehave with tourist.
Shivaji Nade किल्ल्यातील आतील भागाची बरीच पडझड झालेली आहे. येथील काही नावाडी लोक संभाजी आणि शिवाजी महाराजांबद्दल आदराने बोलत नाहीत(सध्याची परिस्थिती कदाचित बदलली असेल). सिद्दी जौहर बद्दल मात्र आदर आणि अभिमानाने बोललं जातं. शक्य असेल तर सकाळी किंवा दुपार नंतर जाणे योग्य.

In reply to by चौकस२१२

बाकी तिथे कोणत्यातरी महाराष्ट सरकारने महाराजांचा पुतळा उभा केला आहे त्यामुळे आल्या आल्या मराठी भागातील पर्यटक तर सुखवतोच .
पुतळा बाहेर रस्त्यावर आहे. इतर शहरात असलेल्या तत्सम शिवाजी चौकामधील पुतळ्यासारखाच. आग्रा किल्ल्यामध्ये मी गाईड ला मुद्दामुन शिवाजी महाराजांना जिथे ठेवले होते ती कोठडी दाखवायला सांगितले होते. त्याने ही एका बंद दरवाजामागे असलेल्या एका वास्तुत ती असल्याचे सांगितले .पण एकुण ह्याबाबतीत उदासीनताच दिसली. पण तरीही अश्या परिसरातुन शिवाजी महाराज निसटले ह्या कल्पनेनेच अंगावर शहारे आले होते.

कंजूस 27/06/2023 - 11:35
मला हव्या त्या ठिकाणी खातो,राहतो,हवा तेवढा वेळ भटकतो. दुसरा कुणी बरोबर घेतला की चर्चा आली,त्याची आवड जपायला हवी. गाईड घेत नाही कारण मला वाचून सर्व माहिती मिळालेली असते. (जुनी लोनली प्लानिट पुस्तके). आगावू हॉटेल आरक्षण कधीच करत नाही. कुटुंबासह गेल्यासही नाही. जागा पाहून एक खोली स्वस्तात कुठेही मिळते. दुपारी बारा अगोदर हॉटेलवाले रेट कमी करायला तयार असतात. पावती नको असल्यास चांगली रुमही मिळते. दुपारी चार नंतर मात्र घासाघीस करता येत नाही. ओनलाइन बुकिंग न घेणारी बरीच हॉटेल्स रिकामी असतात. ओटो रिक्षा फिरवत हॉटेल रुम शोधायला कधीच जाऊ नका. (फक्त रेल्वेचं जाण्यायेण्याचं आरक्षण. तेही रद्द केल्यास दोनशे चाळीस रुपये कापून बाकीचे परत मिळतात.)

In reply to by कंजूस

Trump 27/06/2023 - 11:39
ओनलाइन बुकिंग न घेणारी बरीच हॉटेल्स रिकामी असतात. ओटो रिक्षा फिरवत हॉटेल रुम शोधायला कधीच जाऊ नका.
तेही माझ्या लक्षात आले आहे. तुम्ही दर्जाबद्दल कशी खात्री करता, किंवा जाणुन घेता?

गुरुनाथ ट्रॅव्हल्स, बाजीराव रस्ता, पुणे, इथे चौकशी करा कदाचित तुमच्या सगळ्या अटी आणि शर्तीत बसणारी टूर बनवून देतील ते लोक.

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 27/06/2023 - 14:02
गुरुनाथ ट्रॅव्हल्स, बाजीराव रस्ता, पुणे, इथे चौकशी करा कदाचित तुमच्या सगळ्या अटी आणि शर्तीत बसणारी टूर बनवून देतील ते लोक.
पुर्ण सहल नको आहे. प्रश्न फक्त राहण्याचा आणि खाण्याचा होता. इतरांनी दिलेल्या माहितीमुळे ते सुटतील असे वाटते. धन्यवाद.

महिरावण 27/06/2023 - 13:46
धागालेखक, धाग्याचे स्वरुप आणि धाग्यातील अटी पाहता धागा काढण्याच उद्देश निकोप न वाटता केवळ सदस्यांना कामाला लावून मजा बघण्याचा वाटतो.

In reply to by महिरावण

चौकस२१२ 27/06/2023 - 19:20
सुरवातीला निकोप हेतू वाटून २-४ गोष्टी सुचवयवाश्या वाटल्या तर धागाकर्ता काहीतरी गोंधळाचे आणि उगाच वेळखाऊ लिहीत आहेत असे वाटते आहे म्हणे तरुण टोळकं पण मनाने वयस्कर? सगळे ७-८? स्वतःचे जेवण स्वतः , ठीक असेल काही कारण पण त्यासाठी मग ठिकाण महाग असू शकते हे मेनी दिसत नाही , आणि ते सुद्धा मराठी मालकीचे? हे तर विचित्र अट आहे एकीकडे म्हणे हिप्पी आणि नियोजन नको आणि नियोजनाचे प्रश्न तर ५०

कंजूस 27/06/2023 - 14:57
तुमच्यापैकी किती जणांनी अशी सहल केली आहे यावर अवलंबून आहे. अशी म्हणजे तिथे जाऊन जागा शोधणे ,पाहाणे आणि मग ठिकाणं कशी पाहाणे हे ठरवणे. अगदी प्रथम बिचकायला होतं पण नंतर सवय होते. हॉटेल वाले,एजंट,बसवावे,टॅक्सी/ओटोवाले कसे कुठे फसवतात हे अगोदरच समजते. तशी बोलणी करता येतात.

In reply to by कंजूस

Trump 27/06/2023 - 15:12
तुमच्यापैकी किती जणांनी अशी सहल केली आहे यावर अवलंबून आहे. अशी म्हणजे तिथे जाऊन जागा शोधणे ,पाहाणे आणि मग ठिकाणं कशी पाहाणे हे ठरवणे. अगदी प्रथम बिचकायला होतं पण नंतर सवय होते.
अजुन तरी बहुतेकांनी अशी यात्रा केली नाही. त्यामुळे अंगवळणी पडल्या नाहीत.

In reply to by Trump

कंजूस 27/06/2023 - 19:10
हं. मला तशी शंका आली. आठ लोकांची राहाणे व्यवस्था, वाहन इत्यादी यासाठी अनुभव हवा. तीन ओटो रिक्षा करणे खटाटोप आणि गडबडीचे आहे. तीन वेगळ्या ठिकाणी जाऊ शकतात आणि गोंधळ. त्यात हिंदी न बोलणारे म्हणजे अजून गोंधळ होऊ शकेल. सावधान. रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूस कमीतकमी चार नाके असतात. कोण कुठे भलतीकडेच गेला तर चुकामुक.

In reply to by कंजूस

Trump 27/06/2023 - 19:37
ओला किंवा तत्सम सेवा वापरायचा इरादा आहे. त्यांच्याकडे ८ माणसांच्या गाड्या असतात. ज्यांना आराम करायचा असेल त्यांनी आरामशीर हॉटेलवर पडुन राहायचे. इतके लोक असल्यामुळे अडचण येण्याची शक्यता गृहीत धरली आहे.

In reply to by कंजूस

चौकस२१२ 27/06/2023 - 19:33
तुमच्यापैकी किती जणांनी अशी सहल केली आहे मी काही ठिकाणी / काही वेळा असे केले आहे ऐनवेळी काय होते ते बघू पहिले १-२ दिवसांचे आरक्षित करायायचे आणि त्या वेळेस इतर काय आहे उपलब्ध हे बघायचे एकदा अंगाशी आले होते कामानिमित्त सिंगापुर ला ३१ डिसेंबरला होतो आणि स्वखर्चाचा मामला असल्यामुळे जरा पैसे वाचव्यायचे होते... सिंगापुर ला ३१ डिसेम्बर ला काहीतरी विचित्र नियम आहे / प्रथा आहे त्यादिवशीच फक्त सगळ्या होटेल भांड्यांवर एक मोठा सरचार्ज लावतात .. त्यामुळे आणि ऐनवेळी केल्याने फर महाग होते.. ४ वाजत आले आणि कामात बुडालो होतो आधीचे होटेल सोडेल होते ..ओळ्खिचे कुटुंब एक, ते पण पण त्यादिवंशी गावात नव्हते शेवटी कसे बसे एक बॅकपॅकर हॉस्टेल मिळाले, चान्गले होते पण धांदल झाली

Trump 27/06/2023 - 19:40
वय/अनुभव वाढला की सगळे कसे नियोजीत हवे असते. पण बरेचदा असे जाणवले की जेवढा वेळ आंनद घेण्यात जातो. त्यापेक्षा जास्त वेळ नियोजनाची डोकेदुखी करण्यात जातो त्यामुळे कमीत कमी नियोजनात कसा प्रवास करता येईल ह्याचा अभ्यास चालु आहे.

दिल्ली फिरायला किती दिवस हे तुम्ही काय पाहणार यावर आहे . फक्त अक्षरधाम करायचे झाले तर अर्धा दिवस जाईल. स्थळांची यादी करा, मथुरा नि वृन्दावन करायचे असेल तर शक्यतो ८ च्या आधी निघा. ११ वाजता भोग लागतो मंदिरे बंद होतात . एक दोन मंदिरेच पहा , मरणाची गर्दी असते . विशेषतः बांकेबिहारी ला . वृन्दावन ला सुद्धा इस्कॉन ला जाणार असाल तर वेळ काढून जाणे. आग्रा नि मथुरा जवळ आहे . लोक दिल्ली सेन्टर पॉईंट धरून बेत आखतात पण वेगळा विचार करा . मुंबईहून जाणारी एक राजधानी मथुरेला थांबते . मथुरा आग्रा करून शेवटी दिल्ली करणे म्हणजे विमान व ट्रेन दोन्ही बेत आखता येतात . ७-८ माणसे म्हणजे हॉटेल पेक्षा धर्मशाळा च चांगली. मथुरा नि वृन्दावन ला सोय होईल. हिप्पी टूर करायचीय तर हॉटेल नि सोयींबद्दल "नो कटकट आवर पटापट " धोरण हवे .

In reply to by विअर्ड विक्स

कंजूस 28/06/2023 - 17:44
एवढी भाराभर ठिकाणं आहेत आणि गटातर्फे कुणी ना कुणी म्हणणारच की सगळं करू. पुन्हा कधी येणार माहिती नाही. बाकी पुणे/मुंबई निघण्याचे ठिकाण यावर ट्रेन/विमान प्रवासात फरक पडतो. आम्ही आठ जण (तीन कुटुंबे )असल्याने फुल डे दिल्ली टुअर घेतली होती. मला त्यातली दोनच ठिकाणं खरं तर पाहायची होती. मी बाकी ठिकाणी आत गेलोच नाही. बोरिंग. (वृंदावन, गोकूळ येथे बेकार घाण होती)

In reply to by कंजूस

Trump 29/06/2023 - 11:45
एवढी भाराभर ठिकाणं आहेत आणि गटातर्फे कुणी ना कुणी म्हणणारच की सगळं करू. पुन्हा कधी येणार माहिती नाही.
समुहाने प्रवास करणे म्हणजे नियोजन, अचानक होणारी तारांबळ अश्या गोष्टी नेहमीच्याच आहेत.

Trump 06/07/2023 - 12:28
मदत करणार्‍या सर्वांचे धन्यवाद. श्री कंजूस यांनी कमी पैशात चांगली राहण्याची व्यवस्था करावी यावर एक लेख लिहावा हि विनंती. श्री कर्नलतपस्वी यांनी भाषिक गमतीजमतीवर एक हलकाफुलका धागा काढावा हि विनंती.

Trump 06/07/2023 - 12:29
मदत करणार्‍या सर्वांचे धन्यवाद. श्री कंजूस यांनी कमी पैशात चांगली राहण्याची व्यवस्था करावी यावर एक लेख लिहावा हि विनंती. श्री कर्नलतपस्वी यांनी भाषिक गमतीजमतीवर एक हलकाफुलका धागा काढावा हि विनंती.

कंजूस 06/07/2023 - 16:16
अशा काही जागा कोणत्या शहरांत कुठे आहेत हे कुणी सांगत नसतं. तरीही शोधायच्या कशा ते सांगतो - १)लोनली प्लानिट'ची पुस्तके बऱ्यापैकी मार्गदर्शन नकाशे,नावांसहीत करतात. नॉर्थ इंडिया,साऊथ इंडिया. पण २०००पूर्वीच्या आवृत्त्या चांगल्या आहेत. रुम रेट जुने धरू नका पण एकूण शोधाशोध सोपी होते. २) स्कुटर,टूविलरवरच्या मनुष्यास विचारावे की हॉटेल्स कोणत्या बाजूला/रस्त्यावर आहेत. तो स्थानिक जरा फिरणारा असतो. किंवा दुकानदारही सांगतात. साधारणपणे आपला पेहराव, कुटुंब असल्यास ते योग्य जागी पाठवतात हा अनुभव आहे. ३)भरपूर फिरण्यासाठी बस स्टँड पासून दूरचे हॉटेल बघू नये. अगदी सकाळी ते रात्री येण्या जाण्यात अडचण येत नाही. बसेसचा पर्याय असल्याने टॅक्सी ,रिक्षावाले नरमच राहतात. तसेच खाणे,चहा यासाठी भरपूर चांगले पर्याय असतात. वेळेची अडचण येत नाही. सकाळी साडेपाच रात्री बारा पर्यंत खाणे हा प्रश्नच पडत नाही. ४) नवीन ठिकाणी आपला फिरण्याचा प्लान योग्य व्यक्तीस सहज सांगावा. तो आपणहून बरीच चांगली माहिती देतो. याबाबत माझा अनुभव खूप चांगला आहे. ५)सर्वात महत्त्वाचे म्हणजे ओटो रिक्षा स्टँडवर, रिक्षावाल्यांस कधीही विचारू नये. दूरवरच चौकशी करावी. त्यांच्या फायद्याच्या रूटवर नेणे गळ्यात मारतात. ६) रुम पाहिल्यावर टॉइलेट, बिछाने पाहावेत. टापटीप स्वच्छता लगेच लक्षात येते. त्यावरून रेटशी तुलना करावी. खिडक्यांना जाळ्या असाव्यात. डास येत नाहीत. दिल्लीत डेंग्यू फार आहे. विशेष लक्ष द्यावे. चेकाउट टाईमची खात्री करावी. स्वस्त हॉटेलांतले चार्जिंग पॉईंटस चालत नाहीत किंवा एकच चालू असतो तो उंचावर असतो. तीन चार मोबाईल चार्ज कसे करणार? एक्स्टेंशन बोर्ड छोटासा जवळ ठेवावा. ७)प्रवासात जर तीन ठिकाणी हॉटेल बदलणार असाल तर प्रत्येक व्यक्तीचे एकूण पाच पाच आधार फोटोकाप्या जवळ असू द्याव्यात. राहणाऱ्या प्रत्येकाची आधार प्रत मागण्याचा प्रघात पडलेला आहे. ऐनवेळी आजुबाजूस फोटोकापी काढणारे नसतात किंवा पावर गेलेली असते. ८) रिक्षावाले "हॉटेल रुम दाखवतो" चला म्हणतात तेव्हा त्यांचे कमिशन असते तिथेच नेतात. रिक्षातून फिरून रुम शोधू नये. ९)रुमवर कपडे धुता येत नाहीत (नियमाने). पण गुपचूप धुवावे लागतात. कपडे वाळत घालण्यासाठी लांब दोरी जवळ असावी. थोडे कपडे नेऊन प्रवास आटोपता होतो. ------- जागा सापडली,घेतली. पुढे काय तर फिरणे,पाहाणे. आजुबाजूस टपऱ्यांतून ,वनडे/हाफ डे टुअरचे बोर्ड दिसतात तिथून त्यांची माहिती पत्रकं गोळा करावीत. त्यातून किती रुपये,कोणती ठिकाणं केव्हा दाखवणार त्या वेळा छापलेल्या असतात. यावरून लगेच समजेल की कोणत्या ठिकाणी केव्हा जायचे नाही.. समजा प्रत्येक टुरमध्ये "भहाई मंदिर - संध्याकाळी सात ते साडेसात" दिसले तर त्या वेळी तिथे जायचे नाही. आपण स्वतंत्र वेगळ्या वेळी जायचे.

In reply to by कंजूस

सुबोध खरे 07/07/2023 - 19:33
रेल्वेने जाणार असलात तर रेल्वे रिटायरिंग रुम हा सर्वात उत्तम पर्याय आहे. सरकारी असल्यामुळे प्रशस्त खोल्या असतात आणि आता आय आर सी टी सी कडे व्यवस्था गेल्यामुळे कर्मचारी वर्ग नम्र आणि मदत करणारा असतो. आपल्या खिशाला परवडेल अशा सर्व तर्हेच्या खोल्या डॉर्मिटरी पासून वातानुकूलित आरामदायी खोल्यापर्यंत सर्व उपलब्ध असते. याशिवाय काही स्थानकांवर अगदी १ तासासाठी सुद्धा खोली डॉर्मिटरी मिळू शकते. याशिवाय आपल्या पेहरावाकडे बघून भाडे कमी जास्त होत नाही. रिक्षा, टॅक्सी, बस आणि रेल्वे ची शिवाय खाण्यापिण्याची सर्व दर्जाची व्यवस्था आणि सुविधा २४ तास ती सुद्धा हाकेच्या अंतरावर असते हा सर्वात मोठा फायदा असतो. ओला उबेर सुद्धा अगदी विचित्र वेळेस सुद्धा हमखास उपलब्ध होतात. या शिवाय ४८ तास अगोदर आपला बेत रद्द झाला तर केवळ २० % कापून सर्व रक्कम परत केली जाते.

चौथा कोनाडा 08/07/2023 - 13:13
मजेशीर धागा. गरजा आणि अटी पाहून मौज वाटली. ... आणि प्रतिसाद, चर्चा वाचून धमाल आली ! सहल झाल्यावर वृतांत यायलाच पायजेल .. नै तर हा धागा व्यर्थफुकाट ! सहल भटकंती वृतांत (आलाच तर) मी पैले वाचणार ...कमेंट मी आधी पैली करणार !

In reply to by चौथा कोनाडा

कंजूस 08/07/2023 - 14:17
आपण कुठे काय अपेक्षेने गेलो आणि प्रत्यक्ष काय घडलं हे प्रामाणिकपणे लिहून ठेवल्यास पुढच्या पर्यटकांस निश्चितच लाभ होत असतो. फजिती झाल्यास तीही लिहावी. चार लोक हसले तर हसू द्यावं. लोनली प्लानिटची काही जुनी पुस्तकं तशी आहेत. १९९३ सालात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचं नाव - India -a travel survival kit हे आहे. . एखाद्या ठिकाणी स्वस्तात जाता राहता येत असेल तर महागातही राहू शकतो. पण उलट खरं असेलच असं नसतं. आमच्या इथल्या एका शाळेतल्या सहायकाच्या तरुण मुलाशी(२३) ओळख झाली आणि गप्पा मारताना तो म्हणाला माझा भारत फिरून झालाय. मी सहज काही विचारले तेव्हा समजले की खरोखरच तो स्वस्तात एकटाच फिरलाय.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 08/07/2023 - 14:52
खरंय ! नुसती मदत मागवून / प्रश्न विचारून पळ काढला की मजा नाय ... आपले अनुभव , सोयी, गैरसोयी फजीती हे लिहायला पायजले ना राव ! सहायकाच्या मुलाचा अनुभव भारी आहे !

वृंदावन च्या मुख्य रस्त्यावर बर्याच धर्मशाळा आहेत तिथे वाजवी दरात सोय होऊ शकते. वृंदावन च्या जवळच गोवर्धन पर्वत आहे तिथे इलेक्ट्रीक रिक्षाने परिक्रमा करता येऊ शकते. माकडे भरपूर आहेत व उपद्रवी आहेत. शक्यतो चष्मा/मोबाईल बाहेर न काढणे उत्तम. मथुरा उभ्या उभ्या पाहण्यासारखे आहे. तिथे राहयची आवश्यकता नाही. आग्र्यासाठी अगोडा वगैरे साईट वर डिल मिळते का ते पाहा. दिल्लीसाठी महाराष्ट्र मंडळात सोय होऊ शकेल.

In reply to by कानडाऊ योगेशु

महाराष्ट्र मंडळ ह्याबद्दल विवेक पटाईत ह्यांना विचारा डिटेल. मला वाटते दिल्लीत (महाराष्ट्र मंडळात राहून) आग्रा वारी करता येईल (दोन तासच आहे प्रवास)

In reply to by इपित्तर इतिहासकार

कंजूस 25/06/2023 - 10:29
याच जुन्या इमारतीत गिजरे यांचे टुअर office आहे. त्यांचे एक एजंट पुण्यात आहेत. तेही बुकिंग करून देतात. पण दिल्लीला राहून आग्रा/जयपूर ट्रीप करू नये.

In reply to by कंजूस

Trump 26/06/2023 - 11:32
याच जुन्या इमारतीत गिजरे यांचे टुअर office आहे. त्यांचे एक एजंट पुण्यात आहेत. तेही बुकिंग करून देतात.
धन्यवाद. फिरण्याचे नियोजन मुद्दामहुन तिथे जाऊन करायचे असे ठरवले आहे. फक्त राहण्याचे ठिकाण हवे आहे.

In reply to by इपित्तर इतिहासकार

दिल्ली-आग्रा २ तास? अहो यमुना एक्स्प्रेस वे झालाय तरीही ५-६ तास लागतात. दिल्लीहुन आग्र्याला जाउन फक्त ताजमहाल बघुन यायला पुर्ण दिवस लागेल.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

मनो 27/06/2023 - 16:13
दिल्ली ते ताजमहाल अर्ध्या दिवसात करता येतो, मात्र तिकीट महाग आहे. नवी दिल्ली येथून सकाळी ६.०० भोपाळ शताब्दी पकडायची, ती आग्र्याला आठ वाजता पोचते. साधारण तीन तासात ताजमहाल पाहून होतो. परतीसाठी ११.२५ ला वंदे भारत एक्स्प्रेस आग्र्याहून आहे, ती दुपारी १.२० ला निजामुद्दीन स्थानकावर परत पोचवते. या ट्रिपमध्ये दुपारपासून संध्याकाळचा वेळ वाचतो. शताब्दी सुमारे ५०० रुपये आणि वंदे भारत ७५० रुपये अधिक २५० ताज तिकीट आणि आग्र्यातील रिक्षा एकूण २००-३०० रुपये असा खर्च येईल. साधारण एका महिन्यापूर्वी केलेल्या ट्रिपचे हे आकडे आहेत. या ट्रीपमध्ये आग्ऱ्याचा किल्ला पाहणे होत नाही, तेवढा वेळ हाताशी नाही. पहाडगंज येथील स्वस्त हॉटेलमध्ये राहिल्यास सकाळी ६.०० ला शताब्दी पकडणे सोपे होते.

In reply to by मनो

सुबोध खरे 01/07/2023 - 10:00
यापेक्षा सकाळी जाताना आणि येताना शताब्दी घेतली तर रात्री २०.३८ ला आग्र्याला बसलात तर २३०० ला नवी दिल्ली स्थानकावर उतरून गंतव्य स्थानी पोचता येईल. म्हणजे सकाळी आठ ते रात्री आठ असे पूर्ण १२ तास मिळतात ज्यात ताजमहाल आग्र्याचा किल्ला आरामात पाहून होईल आणि नीट कार्यक्रम आखला तर फतेहपूर सिक्रि सुद्धा ( घाईघाईने) करता येईल. आणि नवी दिल्ली स्थानकावरच रेल्वेची रिटायरिंग रुम घेतली तर तेवढीच सुविधा होते. शुक्रवारी ताजमहाल पाहण्यासाठी फुकट आहे पण शुक्रवारी फतेहपूर सिक्रि बंद असते.

In reply to by सुबोध खरे

मनो 01/07/2023 - 11:00
माझ्या माहितीप्रमाणे शुक्रवारी स्थानिक मुसलमानांसाठी ताज मशीद उघडी असते, पण त्याकरता स्थानिक पत्ता असलेला आयडी दाखवावा लागतो. इतरांना बाहेरून किंवा नदीच्या पलीकडे जाऊन फुकट :-D

In reply to by सुबोध खरे

कंजूस 01/07/2023 - 13:41
तशी पाटीही बऱ्याच हॉटेलांच्या रिसेप्शन रुममध्ये लावलेली सापडेल. ट्रंप कुठून निघणार माहीत नाही. पण मुंबईत वर्ल्ड ट्रेंड सेंटरमध्ये उप्र पर्यटन केंद्र आहे ते ढीगभर नकाशे आणि पत्रक देतात. तसेच इंडिया टुरिझम ऑफिसमध्येही पत्रकं देतात. ते कार्यालय आता चर्चगेट समोरच्या रूझर्वेशन इमारतीतून मरीन ड्राईवकडे हलवले आहे. लाभ घ्यावा.

In reply to by कानडाऊ योगेशु

Trump 26/06/2023 - 11:28
दिल्लीसाठी महाराष्ट्र मंडळात सोय होऊ शकेल.
धन्यवाद. संपर्कमाहिती असल्यास द्यावे.
वृंदावन च्या जवळच गोवर्धन पर्वत आहे
टाकतो यादीमध्ये

In reply to by Trump

कंजूस 27/06/2023 - 19:03
वर मी दिलेल्या फोटोंत एक पत्रक महाराष्ट्र मंडळाचेच आहे. फोन नंबर बदलले असण्याची शक्यता आहे. करून पाहा. पुण्याचा नंबरही आहे. वेबसाईट आहे. बाकी दिल्लीवरून आग्रा पाहून जाण्याची घाई कशाला? आग्रा फोर्ट स्टेशन जरी ताज आणि लाल किल्ल्याजवळ असले तरी आग्रा कंटोनमेंट स्टेशन हे दिल्ली मुंबई मेन लाईनवर आहे. त्या स्टेशन बाहेर बरीच स्वस्त हॉटेल्स आहेत.

कंजूस 25/06/2023 - 05:19
पण खूप दिवस राहून पाहण्यासारखे मथुरा, वृंदावनला काय आहे? मला तरी तसे वाटले. Visa2explore channel चे विडिओ आहेत. पंधरा विडिओंची प्लेलिस्ट आहे. पूर्ण भाविकपणा हवा. बाकी विचारलेल्या राहण्याच्या जागा शोधाव्या लागल्या नाहीत कारण स्वस्त हॉटेल्स सगळीकडे आहेत. आणि सात दिवसांत दिल्ली आग्रा मथुरा जयपूर होऊ शकते. तुम्ही म्हणता तशा स्वस्त जागांना तिकडे 'बरसाती' म्हणतात. पत्रकार(कै.) विश्वास मेहेंदळे यांच्या एका पुस्तकात त्याची माहिती आहे. दूरदर्शनसाठी ते दिल्लीत सुरुवातीला राहिले होते. तिकडेच राहणाऱ्या कुणाशी ओळख असेल तर सोय होईल. किंवा तिकडे गेल्यावर 'बरसाती'ची चौकशी केल्यास सापडतील.

ओघाने आलेच कारण ९०% टूर हा भक्ती मार्गावरील आहे तुमचा. पण मराठी बोलणारा मॅनेजर असण्याचे प्रयोजन समजले नाही खास मला...... असो, आपापली चॉईस आहे, मुळात मथुरा - वृंदावन - आग्रा ही तिन्ही ठिकाणे दिल्ली पासून २-३ तासांच्या अंतरावर आहेत, मोठ्या बॅग अन् इतर जड सामान दिल्लीत महाराष्ट्र मंडळाच्या (मराठी बोलणाऱ्या) मॅनेजरच्याच अखत्यारीत अन् सुरक्षेत सोडून सड्याने उरलेली तिन्ही ठिकाणे फिरता येतील. Itenary खालील प्रमाणे :- दिवस १ - दिल्ली आगमन, वाटल्यास दिल्ली दर्शन नाहीतर आराम. दिवस २ - खासगी ठरवून घेतलेली गाडी किंवा सार्वजनिक प्रवास साधने वापरून आग्रा - सायंकाळी परत दिल्ली असेच तिसरा अन् चौथा दिवस वृंदावन आणि मथुरा करावे. बफर म्हणून २-२ दिवस ठेवता येतील वाटल्यास. हिप्पी नियोजन म्हणजे राहण्याचे खाण्याचे जास्त लाड नको आहेत असे धरून चालतोय.

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 26/06/2023 - 11:37
पण मराठी बोलणारा मॅनेजर असण्याचे प्रयोजन समजले नाही खास मला......
धन्यवाद. कारण सोबतची काही माणसे मराठीशिवाय कोणतीही भाषा बोलत नाही. तसेच महाराष्ट्राबाहेरील मराठी संस्कृती जाणुन घ्यायची इच्छा आहे.
हिप्पी नियोजन म्हणजे राहण्याचे खाण्याचे जास्त लाड नको आहेत असे धरून चालतोय.
हिप्पी म्हणजे कमीत कमी नियोजनात मनमौजी प्रवास.

कंजूस 25/06/2023 - 13:08
याने या ट्रिपमध्ये फरक पडतो. ---- जर का पुढेमागे उत्तराखंड, हिमाचल, करणार असाल तर आणि विमान प्रवास नसेल तर एक धक्का दिल्लीत होणारच. तेव्हा त्याचा उपयोग करा आणि या सहलीतून दिल्ली गाळावी.

महाराष्ट्र समाज आग्रा ,महाराष्ट्र मंडळ पहाडगंज नवी दिल्ली गुगलून बघा . टेलिफोन करा पुढील मार्ग सुचेल. म मं न दिल्ली तर चोविस तास टेलिफोन उपलब्ध असतो.

रंगीला रतन 27/06/2023 - 02:56
कारण सोबतची काही माणसे मराठीशिवाय कोणतीही भाषा बोलत नाही. बरोबर कोण आणि किती जण आहेत? ८ ते १० तरुण लोक. अशे तरुण लोक आज भारतात आहेत? असतील तर त्यांच्यासोबत जाताना तुम्हाला लाज वाटायला पाहीजे. नुस्ती फालतुगीरी

In reply to by रंगीला रतन

अशे तरुण लोक आज भारतात आहेत? असतील तर त्यांच्यासोबत जाताना तुम्हाला लाज वाटायला पाहीजे. नुस्ती फालतुगीरी का लाज वाटायला पाहीजे? नाही येत दुसर्‍या भाषा म्हणून काय नातेवाईक मित्र सोडून द्यायचे? दक्षिण भारतात लोक फिरायला जातात तेव्हां तीथले लोक मराठी हिन्दी समजत नाही किंवा समजुन सुद्धा न समजल्या सारखे करतात. आमचे काही मित्र पहिल्यांदाच उत्तर भारतात गेले. बोलता बोलता म्हणाले, तुम्हारा खुन करनेवाला और हमारा खुन करनेवाला एकच है समोरचा यजमान गोंधळात पडला. बरोबरच्या एकाला लगेच कळाले त्याने सारवा सारव केली. उनको कहना है की हम दोनो को (खुन) बनानेवाला एक ही परमात्मा है. तेव्हा ही फालतूगीरी नाही. भाषेचा सभ्यतेने वापर करावा. प्रत्येक शब्दावरी माझा ठसा,माझा ठसा शब्द माझा चेहरा,शब्द माझा आरसा. शांताबाई शेळके.

In reply to by कर्नलतपस्वी

Trump 27/06/2023 - 11:13
का लाज वाटायला पाहीजे? नाही येत दुसर्‍या भाषा म्हणून काय नातेवाईक मित्र सोडून द्यायचे? दक्षिण भारतात लोक फिरायला जातात तेव्हां तीथले लोक मराठी हिन्दी समजत नाही किंवा समजुन सुद्धा न समजल्या सारखे करतात.
+१
तुम्हारा खुन करनेवाला और हमारा खुन करनेवाला एकच है
हे भारी आहे. मी "हमारे इधर पाऊस लई पड्या" असे हिंदी(?) बोलणारे लोक बघितले आहेत. असली भाषा ऐकुन समोरचा जीवच देईल. ह्यावर एक मस्त धागा होऊ शकतो.

In reply to by Trump

चौकस२१२ 27/06/2023 - 12:19
ह्यावर एक मस्त धागा होऊ शकतो. उन्हळ्यात उत्तरेत "चिमडी " नामक एक टरबुजासारखे पण छोटे फळ असते त्याची नुसती साखर घालून कोशिंबीर सारखे काहीतरी बनवले जायचे.. यावर एका व्यक्तीने " रामू ( आचारी नाव) "आज चीम्बडि "संप" गयि " असे "आचारी संपावर जायला" भाग पडणारे वाक्य फेकलेले आठवले सुदैवाने तो नोकर पिढ्यान पिढया मराठी कुटुंबात नोकरीत असल्यामुळे. "मामीजी मला समझले " असे काहीसे पुटपुटला असो विषयांतर झाले,,, हिप्पी सहलीला मदत करूयात ( एक उनाड दिवस याची आठवण झाली )

In reply to by रंगीला रतन

Trump 27/06/2023 - 11:09
मोठा आहे दगदगीचा प्रवास असल्याने काही लोक आजारी पडण्याची, किंवा आरामाची गरज लागणे गृहीत धरले आहे. अशा वेळी समजुन घ्यायला/सांगायला मराठी माणसे जास्त उपयोगी पडतील अशी अपेक्षा आहे. आणि भविष्यातील नातेसंबध वृधिंगत होण्याची शक्यता आजमावण्याची आहे.
८ ते १० तरुण लोक.
तरुण हा सापेक्ष शब्द आहे. काही लोक वयाने तरुण पण मनाने म्हातारे असतात, तसेच उलट.

In reply to by Trump

चौकस२१२ 27/06/2023 - 12:22
अशा वेळी समजुन घ्यायला/सांगायला मराठी माणसे जास्त उपयोगी पडतील अशी अपेक्षा आहे. ठीक आहे त्यासाठी मराठी माणूस बरोबर पाहिजे.. म्हणजे प्रवासात एक मराठी वाटाड्या / आयोजक पाहिजे कि तेथील राहण्याचं ठिकानि फक्त मराठी भाषिक मालक / नौकर पाहिजे.. काय गौड्गबल आहे हे ? दगदगीचा प्रवास ? २०२३ सालि

शहरे रामायण महाभारत कालापासून प्रसिद्ध आहेत. काय बघायचे किती बघायचे पहिलेच ठरवा. उदाहरणार्थ आग्रा ताजमहाल करता प्रसिद्ध आहे पण लाल किल्ला, इत्मद्दौला, संग्रहालय, अकबराची कबर जवळपास फतेहपुर सिक्री ,डिग पॅलेस(महाराजा सुरजमल जाट) याची राजधानी,भरतपुर पक्षी उद्यान आणखीन बरेच काही. तसेच दुसर्‍या शहरातही भरपुर बघण्या सारखे आहे. दिल्लीचे नवीन शहिद स्मारक व जुने इंडीया गेट बघायला विसरू नका. नवीन संसद,जुनी पार्ल्यमेंट,राष्ट्रपती भवन,पालिका बझार आणी बरेच काही.

In reply to by कर्नलतपस्वी

Trump 27/06/2023 - 11:00
दिल्लीचे नवीन शहिद स्मारक व जुने इंडीया गेट बघायला विसरू नका. नवीन संसद,जुनी पार्ल्यमेंट,राष्ट्रपती भवन,पालिका बझार आणी बरेच काही.
हो, नक्कीच. नेताजी सुभाष चंद्रांचा पुतळा, शिवाजी महाराजांचा पुतळा यादीमध्ये आहेच. श्री सावरकारांचा फोटो संसदेत लावलेला स्मरणात आहे. त्यामुळे तो काही बघता येणार नाही. धन्यवाद.

चौकस२१२ 27/06/2023 - 09:57
काय बघायचे किती बघायचे पहिलेच ठरवा अगदी बरोबर दिल्लीतून आग्रा , ताज आणि आग्र्याचा लाल किल्ला एवढे सकाळी लवकर निघून रात्री पर्यंत परत येणे असे करता येते पण मग बाकी राहून जाईल आग्र्याचा लाल किल्ला ला कधी जे वाटाडे असतात त्यांना तुम्हाला महाराष्ट्राच्या संधर्भात सांगा असे सांगितले तर ते आपली " कॉमेंट्री" थोडॆ बदलतात पण त्यात विशेष तसे का हि वेगळे नसते बाकी तुम्हाला "हिप्पी "पद्धतीने भटकंती कराव्यायची आहे हे ऐकून मौज वाटली एकीकडे म्हणता ना नियोजन न करत हिप्पी पद्धतीने आणि दुसरी कडे मराठी मालक, जेवण बनवता आले पाहिजे मी आपत्कालीन सेवा? आणि भाडे खोलीवर आधारीत असावे, माणसांवर नसावे. मग कसलं हो हिप्पी पद्धतीने ? ना नियम हि खरी हिप्पी पद्धत .. उचल पिशव्या आणि निघा .. येथे प्रश्न हे सुधाच एक प्रकाचे नियोजन बरं दिल्ली आग्रा वैगरे हि " चावून चोथा " अशी "पर्यटन स्थळे" आहेत त्यात तुमचं या "मराठी फक्त" चमूला हिप्पी पद्धतीने जर भटकायचे तर ते खूप "आयोजन" करून शोधावे लागेल .. बाकी सरधोपट येवध्या गोष्टी उपलब्ध आहेत कि शोध घेणे सोप्पे आहे तुमचं काही अटी जरा मौजेचं वाटत - जेवण बनवता आले पाहिजे आणि हॉटेल नको + स्वस्तात, दिलि सारख्य मेट्रो शहरात असे ठिकाण मिळेल? आणि जेवण बनवण्याची सुविधा पाहिजे तर मग "फर्निश्ड अपार्टमेंट " मग ती कसली असणार आहे स्वस्त? - शाकाहरी जेवण, मराठी बोलणारे व्यवस्थापक्/मालक-- किती दिवसांचा प्रश्न आहे ? एकूण ७-८ असावेत असे वाटते , आणि ते सुद्धा उत्तर भारतातील या मुखय शहरात मग तिथे शाकाहारी जेवण मिळणे अवघड आहे का हो? अगदी जामा मस्जिदी पाशी पण मिळेल .. काय गंमतशीरअट आहे" तुम्ही काही क्रोएशिया किंवा बुरुंडी ला नाही चालला तम्ही भाऊ -भाडे खोलीवर आधारीत असावे, माणसांवर नसावे.... म्हणजे? अहो कुठेहि माणसांची मर्यादा असणारच ना ? आणि "आपत्कालीन व्यवस्था " ह्याचा विचार केला तर एक खोलीत किती माणसे एकावेळी" याचा विचार मालक आणि राहणार्याने केला पाहिजेच कि मिपावर मदत करायला लोक उत्सुक असतात हो पण मदत/ माहिती विचारणाऱ्याने पण जरा तारतम्य बाळगावे हि माफक अपेक्षा असो, झाली एकदाची "हिप्पी" पद्धतीची भटकंती कि आमचं सारखया चाकरीतील मिपाकरांना टायचाच संचितार वृत्तांत आवडेल बजेटच्या साठी, https://www.youtube.com/@Bha2Pa/featured वर काही आहे का पहा जाता जाता .... "हिप्पी" पद्धतिने म्हणजे स्वस्त असेच नसते , त भरपूर खर्च करीत सुध्दा हिप्पी हिंडता येते

In reply to by चौकस२१२

सणसणीत पण थेट अन् तितकाच कायदेशीर प्रतिसाद. आवडला आपल्याला. मी तर ईव्हन हे म्हणतो की इतका खर्च ते संगमरवरी थडगे तरी कश्याला पहावे ! जेव्हा सील केलेली दालने उघडतील तेव्हा पाहूया की.... (बोल्ड केले आहे ते मावैम) अर्थात आपण कोणाच्या वैयक्तिक आवडीवर काय बोलावे म्हणा, ज्याला जिथे आवडेल त्याने तिथे पर्यटन करावे, जो जे वांछील तो ते लाहो.

In reply to by चौकस२१२

Trump 27/06/2023 - 11:23
आग्र्याचा लाल किल्ला ला कधी जे वाटाडे असतात त्यांना तुम्हाला महाराष्ट्राच्या संधर्भात सांगा असे सांगितले तर ते आपली " कॉमेंट्री" थोडॆ बदलतात पण त्यात विशेष तसे का हि वेगळे नसते
जरा सविस्तर सांगा. जंजिर्‍यावर भगवा झेंडा फडकावायला तेथील लोकांनी विरोध केल्याचे माहिती आहे. तेथील किल्लामार्गदर्शक लोक चुकीचा इतिहास सांगतात.
ना नियम हि खरी हिप्पी पद्धत .. उचल पिशव्या आणि निघा .. येथे प्रश्न हे सुधाच एक प्रकाचे नियोजन
प्रवास हिप्पीच आहे, पण अचानक अडचणी येऊ शकतात हे गृहीत धरुन नियोजन. एकदा राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था झाली की बाकीचे नियोजन तिथे जाऊन करता येईल.
- जेवण बनवता आले पाहिजे आणि हॉटेल नको + स्वस्तात,
काही शारिरीक अडचणीमुळे स्वतः जेवण बनवण्याची सोय अपेक्षित आहे. धन्यवाद.

In reply to by Trump

चौकस२१२ 27/06/2023 - 12:05
जंजिर्‍यावर भगवा झेंडा फडकावायला तेथील लोकांनी विरोध केल्याचे .. कधी काय संदर्भ? तुम्हाला "मराठीच सर्व काही पाहिजे" म्हणून केवळ एका अनुभवावरून सांगितले... आमचे बोलणे ऐकून वाटाड्याने जरा मराठी लोकांना म्हणजे आग्र्याहून सुटका वैगरे संधर्भ घालून सांगितले एवढेच , फार त्यात विशष नाही , बाकी तिथे कोणत्यातरी महाराष्ट सरकारने महाराजांचा पुतळा उभा केला आहे त्यामुळे आल्या आल्या मराठी भागातील पर्यटक तर सुखवतोच . तेथील किल्लामार्गदर्शक लोक चुकीचा इतिहास सांगतात. असे जर तुमचे मत असेल तर नका वापरू .. महाराष्ट्रातील जाणकार घेऊन जा ( बलकवडे येतात का बघा ) पण स्वस्तात कसे? आणि त्या वाटाड्याला तुमचे हे हिप्पी फिरणे परवडलं का? बाकी मला तरी मराठी इतिहासाशी निगडित गोष्टीं गोष्टीन पेक्षा स्वारस्य एकूण इतिहास यात जास्त स्वारस्य होते, एकूण पण आग्र्याचा लाल किल्ला आणि फतेपूर सिकरी नक्की बघावा, नुसता ताज महाल नको प्रवास हिप्पीच आहे, पण अचानक अडचणी येऊ शकतात हे गृहीत धरुन नियोजन. : अनेकांना हा हिप्पी प्रवास वगैरे यात काही वाटत नाहाये उगाच शब्द वापरल्यासारखा वाटतोय ,,, सर्वसाधारण प्रवाशांसारखया गरजा दिसत आहेत , उगाच हिप्पी वगरे विशेषणे काही शारिरीक अडचणीमुळे स्वतः जेवण बनवण्याची सोय अपेक्षित आहे. परत कोड्यात बोलताय ,, शारिरिक कि वैद्यकीय ? शारिरीक अडचणीमुळे, स्वतःचा स्वयंपाक...? बर बुवा असेल काही तरी मग "फर्निश्ड अपार्टमेंट" शिव्या पर्याय दिसत नाही ... पण तो स्वस्त कसा असेल? नाहीतर " कोणाचाच तरी काय फालतुगिरी " असा प्रतिसाद आला तर नवल नाही ! सर्वात शेवटी... ७-८ जणांसाठी त्रिकोण ( दिलि आग्रा जयपूर ) सहल "मराठी पद्धतीने ( आणि बाकी जे काय विशेष गरज असले ती ) आयोजित करणारी एकादी सन्स्था असेल महाराष्ट्रात ,, आजोब सांगायचे कि पूर्वी एक "यात्रा" कंपनी रेल्वे बोगी भाड्याने नेऊन अशी सहल आयोजित करायचे , साबुदाण खिचडी पासून ते पियुष ...सर्व काही, बोगी चा एक भाग हा स्वयंपाकघराचं असायचा ,, ( चेष्टा करीत नाहीये तर "श्री दत्तदिगंबर यात्रा कंपनी होती खरी https://www.tourtravelworld.com/travel-agents/datta-digambar-tours-travels-383989/contact.htm

In reply to by चौकस२१२

Trump 27/06/2023 - 12:50
जंजिर्‍यावर भगवा झेंडा फडकावायला तेथील लोकांनी विरोध केल्याचे .. कधी काय संदर्भ?
एका पर्यटकाला किल्ल्यावर भगवा झेंडा फडकावायला विरोध केला होता. २०२१ - २०२२ च्या दरम्यानची घटना आहे. तो अभिप्राय मला लगेच सापडला नाही. त्या मुलाने त्याचा बोटीत बसुन भगव्या झेंड्याचा फोटो टाकला आहे. स्थानिकांचा स्वभाव दाखवणारे काही अभिप्राय
vijay murudkar There is no Indian Flag hosted on Entire Murud-Janjira Fort and I found It is Very 'DISRESPECTFULL' People are very profit centric and asking charges for everything (ie. Boat charges, Fort cahrges, Guide charges etc etc) but no-one is interested in good governance of heritage like Janjir Fort which has very special place our heart & nation history.
Shrikant Auti Minority captured all business... Local muslims misbehave with tourist.
Shivaji Nade किल्ल्यातील आतील भागाची बरीच पडझड झालेली आहे. येथील काही नावाडी लोक संभाजी आणि शिवाजी महाराजांबद्दल आदराने बोलत नाहीत(सध्याची परिस्थिती कदाचित बदलली असेल). सिद्दी जौहर बद्दल मात्र आदर आणि अभिमानाने बोललं जातं. शक्य असेल तर सकाळी किंवा दुपार नंतर जाणे योग्य.

In reply to by चौकस२१२

बाकी तिथे कोणत्यातरी महाराष्ट सरकारने महाराजांचा पुतळा उभा केला आहे त्यामुळे आल्या आल्या मराठी भागातील पर्यटक तर सुखवतोच .
पुतळा बाहेर रस्त्यावर आहे. इतर शहरात असलेल्या तत्सम शिवाजी चौकामधील पुतळ्यासारखाच. आग्रा किल्ल्यामध्ये मी गाईड ला मुद्दामुन शिवाजी महाराजांना जिथे ठेवले होते ती कोठडी दाखवायला सांगितले होते. त्याने ही एका बंद दरवाजामागे असलेल्या एका वास्तुत ती असल्याचे सांगितले .पण एकुण ह्याबाबतीत उदासीनताच दिसली. पण तरीही अश्या परिसरातुन शिवाजी महाराज निसटले ह्या कल्पनेनेच अंगावर शहारे आले होते.

कंजूस 27/06/2023 - 11:35
मला हव्या त्या ठिकाणी खातो,राहतो,हवा तेवढा वेळ भटकतो. दुसरा कुणी बरोबर घेतला की चर्चा आली,त्याची आवड जपायला हवी. गाईड घेत नाही कारण मला वाचून सर्व माहिती मिळालेली असते. (जुनी लोनली प्लानिट पुस्तके). आगावू हॉटेल आरक्षण कधीच करत नाही. कुटुंबासह गेल्यासही नाही. जागा पाहून एक खोली स्वस्तात कुठेही मिळते. दुपारी बारा अगोदर हॉटेलवाले रेट कमी करायला तयार असतात. पावती नको असल्यास चांगली रुमही मिळते. दुपारी चार नंतर मात्र घासाघीस करता येत नाही. ओनलाइन बुकिंग न घेणारी बरीच हॉटेल्स रिकामी असतात. ओटो रिक्षा फिरवत हॉटेल रुम शोधायला कधीच जाऊ नका. (फक्त रेल्वेचं जाण्यायेण्याचं आरक्षण. तेही रद्द केल्यास दोनशे चाळीस रुपये कापून बाकीचे परत मिळतात.)

In reply to by कंजूस

Trump 27/06/2023 - 11:39
ओनलाइन बुकिंग न घेणारी बरीच हॉटेल्स रिकामी असतात. ओटो रिक्षा फिरवत हॉटेल रुम शोधायला कधीच जाऊ नका.
तेही माझ्या लक्षात आले आहे. तुम्ही दर्जाबद्दल कशी खात्री करता, किंवा जाणुन घेता?

गुरुनाथ ट्रॅव्हल्स, बाजीराव रस्ता, पुणे, इथे चौकशी करा कदाचित तुमच्या सगळ्या अटी आणि शर्तीत बसणारी टूर बनवून देतील ते लोक.

In reply to by इपित्तर इतिहासकार

Trump 27/06/2023 - 14:02
गुरुनाथ ट्रॅव्हल्स, बाजीराव रस्ता, पुणे, इथे चौकशी करा कदाचित तुमच्या सगळ्या अटी आणि शर्तीत बसणारी टूर बनवून देतील ते लोक.
पुर्ण सहल नको आहे. प्रश्न फक्त राहण्याचा आणि खाण्याचा होता. इतरांनी दिलेल्या माहितीमुळे ते सुटतील असे वाटते. धन्यवाद.

महिरावण 27/06/2023 - 13:46
धागालेखक, धाग्याचे स्वरुप आणि धाग्यातील अटी पाहता धागा काढण्याच उद्देश निकोप न वाटता केवळ सदस्यांना कामाला लावून मजा बघण्याचा वाटतो.

In reply to by महिरावण

चौकस२१२ 27/06/2023 - 19:20
सुरवातीला निकोप हेतू वाटून २-४ गोष्टी सुचवयवाश्या वाटल्या तर धागाकर्ता काहीतरी गोंधळाचे आणि उगाच वेळखाऊ लिहीत आहेत असे वाटते आहे म्हणे तरुण टोळकं पण मनाने वयस्कर? सगळे ७-८? स्वतःचे जेवण स्वतः , ठीक असेल काही कारण पण त्यासाठी मग ठिकाण महाग असू शकते हे मेनी दिसत नाही , आणि ते सुद्धा मराठी मालकीचे? हे तर विचित्र अट आहे एकीकडे म्हणे हिप्पी आणि नियोजन नको आणि नियोजनाचे प्रश्न तर ५०

कंजूस 27/06/2023 - 14:57
तुमच्यापैकी किती जणांनी अशी सहल केली आहे यावर अवलंबून आहे. अशी म्हणजे तिथे जाऊन जागा शोधणे ,पाहाणे आणि मग ठिकाणं कशी पाहाणे हे ठरवणे. अगदी प्रथम बिचकायला होतं पण नंतर सवय होते. हॉटेल वाले,एजंट,बसवावे,टॅक्सी/ओटोवाले कसे कुठे फसवतात हे अगोदरच समजते. तशी बोलणी करता येतात.

In reply to by कंजूस

Trump 27/06/2023 - 15:12
तुमच्यापैकी किती जणांनी अशी सहल केली आहे यावर अवलंबून आहे. अशी म्हणजे तिथे जाऊन जागा शोधणे ,पाहाणे आणि मग ठिकाणं कशी पाहाणे हे ठरवणे. अगदी प्रथम बिचकायला होतं पण नंतर सवय होते.
अजुन तरी बहुतेकांनी अशी यात्रा केली नाही. त्यामुळे अंगवळणी पडल्या नाहीत.

In reply to by Trump

कंजूस 27/06/2023 - 19:10
हं. मला तशी शंका आली. आठ लोकांची राहाणे व्यवस्था, वाहन इत्यादी यासाठी अनुभव हवा. तीन ओटो रिक्षा करणे खटाटोप आणि गडबडीचे आहे. तीन वेगळ्या ठिकाणी जाऊ शकतात आणि गोंधळ. त्यात हिंदी न बोलणारे म्हणजे अजून गोंधळ होऊ शकेल. सावधान. रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूस कमीतकमी चार नाके असतात. कोण कुठे भलतीकडेच गेला तर चुकामुक.

In reply to by कंजूस

Trump 27/06/2023 - 19:37
ओला किंवा तत्सम सेवा वापरायचा इरादा आहे. त्यांच्याकडे ८ माणसांच्या गाड्या असतात. ज्यांना आराम करायचा असेल त्यांनी आरामशीर हॉटेलवर पडुन राहायचे. इतके लोक असल्यामुळे अडचण येण्याची शक्यता गृहीत धरली आहे.

In reply to by कंजूस

चौकस२१२ 27/06/2023 - 19:33
तुमच्यापैकी किती जणांनी अशी सहल केली आहे मी काही ठिकाणी / काही वेळा असे केले आहे ऐनवेळी काय होते ते बघू पहिले १-२ दिवसांचे आरक्षित करायायचे आणि त्या वेळेस इतर काय आहे उपलब्ध हे बघायचे एकदा अंगाशी आले होते कामानिमित्त सिंगापुर ला ३१ डिसेंबरला होतो आणि स्वखर्चाचा मामला असल्यामुळे जरा पैसे वाचव्यायचे होते... सिंगापुर ला ३१ डिसेम्बर ला काहीतरी विचित्र नियम आहे / प्रथा आहे त्यादिवशीच फक्त सगळ्या होटेल भांड्यांवर एक मोठा सरचार्ज लावतात .. त्यामुळे आणि ऐनवेळी केल्याने फर महाग होते.. ४ वाजत आले आणि कामात बुडालो होतो आधीचे होटेल सोडेल होते ..ओळ्खिचे कुटुंब एक, ते पण पण त्यादिवंशी गावात नव्हते शेवटी कसे बसे एक बॅकपॅकर हॉस्टेल मिळाले, चान्गले होते पण धांदल झाली

Trump 27/06/2023 - 19:40
वय/अनुभव वाढला की सगळे कसे नियोजीत हवे असते. पण बरेचदा असे जाणवले की जेवढा वेळ आंनद घेण्यात जातो. त्यापेक्षा जास्त वेळ नियोजनाची डोकेदुखी करण्यात जातो त्यामुळे कमीत कमी नियोजनात कसा प्रवास करता येईल ह्याचा अभ्यास चालु आहे.

दिल्ली फिरायला किती दिवस हे तुम्ही काय पाहणार यावर आहे . फक्त अक्षरधाम करायचे झाले तर अर्धा दिवस जाईल. स्थळांची यादी करा, मथुरा नि वृन्दावन करायचे असेल तर शक्यतो ८ च्या आधी निघा. ११ वाजता भोग लागतो मंदिरे बंद होतात . एक दोन मंदिरेच पहा , मरणाची गर्दी असते . विशेषतः बांकेबिहारी ला . वृन्दावन ला सुद्धा इस्कॉन ला जाणार असाल तर वेळ काढून जाणे. आग्रा नि मथुरा जवळ आहे . लोक दिल्ली सेन्टर पॉईंट धरून बेत आखतात पण वेगळा विचार करा . मुंबईहून जाणारी एक राजधानी मथुरेला थांबते . मथुरा आग्रा करून शेवटी दिल्ली करणे म्हणजे विमान व ट्रेन दोन्ही बेत आखता येतात . ७-८ माणसे म्हणजे हॉटेल पेक्षा धर्मशाळा च चांगली. मथुरा नि वृन्दावन ला सोय होईल. हिप्पी टूर करायचीय तर हॉटेल नि सोयींबद्दल "नो कटकट आवर पटापट " धोरण हवे .

In reply to by विअर्ड विक्स

कंजूस 28/06/2023 - 17:44
एवढी भाराभर ठिकाणं आहेत आणि गटातर्फे कुणी ना कुणी म्हणणारच की सगळं करू. पुन्हा कधी येणार माहिती नाही. बाकी पुणे/मुंबई निघण्याचे ठिकाण यावर ट्रेन/विमान प्रवासात फरक पडतो. आम्ही आठ जण (तीन कुटुंबे )असल्याने फुल डे दिल्ली टुअर घेतली होती. मला त्यातली दोनच ठिकाणं खरं तर पाहायची होती. मी बाकी ठिकाणी आत गेलोच नाही. बोरिंग. (वृंदावन, गोकूळ येथे बेकार घाण होती)

In reply to by कंजूस

Trump 29/06/2023 - 11:45
एवढी भाराभर ठिकाणं आहेत आणि गटातर्फे कुणी ना कुणी म्हणणारच की सगळं करू. पुन्हा कधी येणार माहिती नाही.
समुहाने प्रवास करणे म्हणजे नियोजन, अचानक होणारी तारांबळ अश्या गोष्टी नेहमीच्याच आहेत.

Trump 06/07/2023 - 12:28
मदत करणार्‍या सर्वांचे धन्यवाद. श्री कंजूस यांनी कमी पैशात चांगली राहण्याची व्यवस्था करावी यावर एक लेख लिहावा हि विनंती. श्री कर्नलतपस्वी यांनी भाषिक गमतीजमतीवर एक हलकाफुलका धागा काढावा हि विनंती.

Trump 06/07/2023 - 12:29
मदत करणार्‍या सर्वांचे धन्यवाद. श्री कंजूस यांनी कमी पैशात चांगली राहण्याची व्यवस्था करावी यावर एक लेख लिहावा हि विनंती. श्री कर्नलतपस्वी यांनी भाषिक गमतीजमतीवर एक हलकाफुलका धागा काढावा हि विनंती.

कंजूस 06/07/2023 - 16:16
अशा काही जागा कोणत्या शहरांत कुठे आहेत हे कुणी सांगत नसतं. तरीही शोधायच्या कशा ते सांगतो - १)लोनली प्लानिट'ची पुस्तके बऱ्यापैकी मार्गदर्शन नकाशे,नावांसहीत करतात. नॉर्थ इंडिया,साऊथ इंडिया. पण २०००पूर्वीच्या आवृत्त्या चांगल्या आहेत. रुम रेट जुने धरू नका पण एकूण शोधाशोध सोपी होते. २) स्कुटर,टूविलरवरच्या मनुष्यास विचारावे की हॉटेल्स कोणत्या बाजूला/रस्त्यावर आहेत. तो स्थानिक जरा फिरणारा असतो. किंवा दुकानदारही सांगतात. साधारणपणे आपला पेहराव, कुटुंब असल्यास ते योग्य जागी पाठवतात हा अनुभव आहे. ३)भरपूर फिरण्यासाठी बस स्टँड पासून दूरचे हॉटेल बघू नये. अगदी सकाळी ते रात्री येण्या जाण्यात अडचण येत नाही. बसेसचा पर्याय असल्याने टॅक्सी ,रिक्षावाले नरमच राहतात. तसेच खाणे,चहा यासाठी भरपूर चांगले पर्याय असतात. वेळेची अडचण येत नाही. सकाळी साडेपाच रात्री बारा पर्यंत खाणे हा प्रश्नच पडत नाही. ४) नवीन ठिकाणी आपला फिरण्याचा प्लान योग्य व्यक्तीस सहज सांगावा. तो आपणहून बरीच चांगली माहिती देतो. याबाबत माझा अनुभव खूप चांगला आहे. ५)सर्वात महत्त्वाचे म्हणजे ओटो रिक्षा स्टँडवर, रिक्षावाल्यांस कधीही विचारू नये. दूरवरच चौकशी करावी. त्यांच्या फायद्याच्या रूटवर नेणे गळ्यात मारतात. ६) रुम पाहिल्यावर टॉइलेट, बिछाने पाहावेत. टापटीप स्वच्छता लगेच लक्षात येते. त्यावरून रेटशी तुलना करावी. खिडक्यांना जाळ्या असाव्यात. डास येत नाहीत. दिल्लीत डेंग्यू फार आहे. विशेष लक्ष द्यावे. चेकाउट टाईमची खात्री करावी. स्वस्त हॉटेलांतले चार्जिंग पॉईंटस चालत नाहीत किंवा एकच चालू असतो तो उंचावर असतो. तीन चार मोबाईल चार्ज कसे करणार? एक्स्टेंशन बोर्ड छोटासा जवळ ठेवावा. ७)प्रवासात जर तीन ठिकाणी हॉटेल बदलणार असाल तर प्रत्येक व्यक्तीचे एकूण पाच पाच आधार फोटोकाप्या जवळ असू द्याव्यात. राहणाऱ्या प्रत्येकाची आधार प्रत मागण्याचा प्रघात पडलेला आहे. ऐनवेळी आजुबाजूस फोटोकापी काढणारे नसतात किंवा पावर गेलेली असते. ८) रिक्षावाले "हॉटेल रुम दाखवतो" चला म्हणतात तेव्हा त्यांचे कमिशन असते तिथेच नेतात. रिक्षातून फिरून रुम शोधू नये. ९)रुमवर कपडे धुता येत नाहीत (नियमाने). पण गुपचूप धुवावे लागतात. कपडे वाळत घालण्यासाठी लांब दोरी जवळ असावी. थोडे कपडे नेऊन प्रवास आटोपता होतो. ------- जागा सापडली,घेतली. पुढे काय तर फिरणे,पाहाणे. आजुबाजूस टपऱ्यांतून ,वनडे/हाफ डे टुअरचे बोर्ड दिसतात तिथून त्यांची माहिती पत्रकं गोळा करावीत. त्यातून किती रुपये,कोणती ठिकाणं केव्हा दाखवणार त्या वेळा छापलेल्या असतात. यावरून लगेच समजेल की कोणत्या ठिकाणी केव्हा जायचे नाही.. समजा प्रत्येक टुरमध्ये "भहाई मंदिर - संध्याकाळी सात ते साडेसात" दिसले तर त्या वेळी तिथे जायचे नाही. आपण स्वतंत्र वेगळ्या वेळी जायचे.

In reply to by कंजूस

सुबोध खरे 07/07/2023 - 19:33
रेल्वेने जाणार असलात तर रेल्वे रिटायरिंग रुम हा सर्वात उत्तम पर्याय आहे. सरकारी असल्यामुळे प्रशस्त खोल्या असतात आणि आता आय आर सी टी सी कडे व्यवस्था गेल्यामुळे कर्मचारी वर्ग नम्र आणि मदत करणारा असतो. आपल्या खिशाला परवडेल अशा सर्व तर्हेच्या खोल्या डॉर्मिटरी पासून वातानुकूलित आरामदायी खोल्यापर्यंत सर्व उपलब्ध असते. याशिवाय काही स्थानकांवर अगदी १ तासासाठी सुद्धा खोली डॉर्मिटरी मिळू शकते. याशिवाय आपल्या पेहरावाकडे बघून भाडे कमी जास्त होत नाही. रिक्षा, टॅक्सी, बस आणि रेल्वे ची शिवाय खाण्यापिण्याची सर्व दर्जाची व्यवस्था आणि सुविधा २४ तास ती सुद्धा हाकेच्या अंतरावर असते हा सर्वात मोठा फायदा असतो. ओला उबेर सुद्धा अगदी विचित्र वेळेस सुद्धा हमखास उपलब्ध होतात. या शिवाय ४८ तास अगोदर आपला बेत रद्द झाला तर केवळ २० % कापून सर्व रक्कम परत केली जाते.

चौथा कोनाडा 08/07/2023 - 13:13
मजेशीर धागा. गरजा आणि अटी पाहून मौज वाटली. ... आणि प्रतिसाद, चर्चा वाचून धमाल आली ! सहल झाल्यावर वृतांत यायलाच पायजेल .. नै तर हा धागा व्यर्थफुकाट ! सहल भटकंती वृतांत (आलाच तर) मी पैले वाचणार ...कमेंट मी आधी पैली करणार !

In reply to by चौथा कोनाडा

कंजूस 08/07/2023 - 14:17
आपण कुठे काय अपेक्षेने गेलो आणि प्रत्यक्ष काय घडलं हे प्रामाणिकपणे लिहून ठेवल्यास पुढच्या पर्यटकांस निश्चितच लाभ होत असतो. फजिती झाल्यास तीही लिहावी. चार लोक हसले तर हसू द्यावं. लोनली प्लानिटची काही जुनी पुस्तकं तशी आहेत. १९९३ सालात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचं नाव - India -a travel survival kit हे आहे. . एखाद्या ठिकाणी स्वस्तात जाता राहता येत असेल तर महागातही राहू शकतो. पण उलट खरं असेलच असं नसतं. आमच्या इथल्या एका शाळेतल्या सहायकाच्या तरुण मुलाशी(२३) ओळख झाली आणि गप्पा मारताना तो म्हणाला माझा भारत फिरून झालाय. मी सहज काही विचारले तेव्हा समजले की खरोखरच तो स्वस्तात एकटाच फिरलाय.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 08/07/2023 - 14:52
खरंय ! नुसती मदत मागवून / प्रश्न विचारून पळ काढला की मजा नाय ... आपले अनुभव , सोयी, गैरसोयी फजीती हे लिहायला पायजले ना राव ! सहायकाच्या मुलाचा अनुभव भारी आहे !
दिल्ली, मथुरा, वृदांवन, आग्रा येथे पर्यटनासाठी जायचे योजत आहेत. सदर प्रवास हा हिप्पी आणि कमनियोजीत (कमीत कमी नियोजीत), कमीत कमी खर्चात अशा प्रकारचा करायचा आहे. त्यामुळे हॉटेल हा शेवटचा पर्याय आहे. कृपया राहण्यासाठी ठिकाणे सुचवा. १. सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेपासुन जवळ असावे. २. जेवण स्वतः बनवण्याची मोकळीक असावी. ३. ठिकाण सुरक्षित असावे, मालक प्रामाणिक असावा. दिलेले कपडे, बिछाणे, भांडी स्वच्छ असावीत. आपत्कालीन व्यवस्था असावी. ४. जवळ तयार जेवणाची व्यवस्था असावी, गरज पडल्या विकत घेता येईल. किराणा मालाचे दुकान जवळ असावे. ५. भाडे खोलीवर आधारीत असावे, माणसांवर नसावे. ६.